विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.39.0-wmf.21
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Gadget
Gadget talk
Gadget definition
Gadget definition talk
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२६
104
66791
154924
130985
2022-07-21T12:00:04Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>खंड.]हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.२२१
{{rule}}
आणि परमात्मा यांचे अस्तित्व विसरून जाऊन ते निरीश्वरवादी झाले, असेंहि
आचार्यांनी सिद्ध केले आहे. आचार्याच्या या तत्त्वांचा प्रसार होऊन लोकांना
ती पटतांच या लोकगंगेच्या प्रवाहाची दिशा बदलली. हिंदु लोक आपल्या
प्राचीन धर्माकडे पुनः वळू लागले. पण पूर्वीच्या अनेक चाली त्यांच्या अंगी
इतक्या पक्क्या खिळून गेल्या होत्या की, त्यांचा त्याग त्यांना सहसा करवेना.
यानंतर श्रीरामानुजांचा अवतार झाला. श्रीशंकराचार्य विशालवुद्धि होते,
यांत शंका नाही. तथापि अंतःकरणाची आर्द्रता त्यांजपाशी नव्हती, असे
मला म्हणावेसे वाटते. त्यांची बुद्धि जितकी विशाल होती तितकी विशालता
अंतःकरणाला नव्हती. रामानुज या बाबींत त्यांच्याहून अधिक श्रेष्ठ होते.
समाजाच्या तळी वावरणाऱ्या कनिष्ठ वर्गाबद्दल रामानुजांचे चित्त कळवळलें
होते. या वर्गाबद्दल त्यांच्या चित्तांत अत्यंत सहानुकंपा होती. या वर्गाला
धर्ममार्गाला लावावयाचें तर शुद्ध तत्त्वप्रधान धर्म त्यांना पटावयाचा नाही,
ही गोष्ट रामानुजांच्या लक्षात आली. या वर्गाची बुद्धि जड, तत्त्वांचे आक
लन करण्याचे सामर्थ्य तिला नाही, याकरितां ही परोक्षतत्त्वें प्रत्यक्ष विधि
विधानांच्या रूपाने त्यांजपुढे मांडली पाहिजेत, हे लक्षात आणून रामानु
जांनी जुने पूजाप्रकार शुद्ध करून ते पुनः चालू केले आणि त्यांत कांही
नव्यांचीहि भर घातली. ज्यांना परोक्ष तत्त्वें पटविण्याचा दुसरा कोणताहि
मार्ग उपयोगी नाही, त्यांच्याचकरितां ही तयारी रामानुजांनी केली होती.
पण असे करीत असतांहि तत्त्वज्ञानमंदिराचे कवाड त्यांनी बंद केले नाही.
ब्राह्मण आणि त्यांच्याचसारख्या दुसऱ्या उच्च वर्णाकरितां तत्त्वज्ञानाची सोपा
नपरंपरा निर्माण करून पूजनाचा उच्च प्रकारही त्यांनी सुरू केला. अशा रीतीने
अगदी तळातल्या अंत्यजापासून तो थेट सर्वश्रेष्ठ ब्राह्मणापर्यंत सर्वांनाच
धर्माचा मार्ग रामानुजाने मोकळा करून दिला. रामानुजांनी जें कार्य केलें
त्याचे स्वरूप अशा प्रकारचे आहे. रामानुजांच्या या कार्याचा प्रसार उत्तरे-
कडेहि झाला. तथापि तेथे त्याचे स्वरूप परिणतावस्थेस येण्यास बराच काळ
लोटावा लागला. मुसलमानांच्या स्वाऱ्या होऊं लागेपर्यंत उत्तरेतील धर्म
ग्लानि समूळ नाहींशी झाली नव्हती. यानंतर तेथे थोडेबहुत धर्मवीर निर्माण
होऊ लागले आणि समाजसुधारणेचे बरेच कार्य त्यांनी केले. या सर्वांच्या
मुकुटस्थानी योजना करण्यासारखें नांव म्हटलें म्हणजे श्रीचैतन्य यांचेच
.<noinclude></noinclude>
9sc3r96iadfnrhiqzwo4gozbg4xoufo
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२७
104
66792
154927
130986
2022-07-21T12:06:52Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>२२२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम
{{rule}}
होय. रामानुजांच्या काळापासून धर्मोन्नतीचा मार्ग सर्वांस सर्रास मोकळा
झाला, ही गोष्ट विशेष लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे. रामानुजांनंतर जितके
धर्मगुरू झाले, तितक्या साऱ्यांनी हा मुद्दा लक्ष्यांत ठेवला होता. श्रीशंकरा
चार्याच्या काळापूर्वीचेही धर्मगुरु या बाबींत मागे नव्हते. खुद्द शंकराचार्या
नींहि खालच्या वर्गासाठी कांहींच केले नाही. अथवा त्यांच्या धर्मोन्नतीला
विरोध केला असा आक्षेप त्यांजवर कां यावा हे मला समजत नाही. त्यांच्या
साऱ्या ग्रंथभांडारांत अशा अर्थाचा एक शब्दही मला दिसत नाही. आता
आचार्यांच्या कालानंतर त्यांची ग्रंथसंपत्ति एखाद्या विशिष्ट वर्गाच्या हातांत
राहिली असेल तर तो त्यांचा अपराध नाही. भगवान् बुद्धाचीहि अशीच
गोष्ट झाली. त्यांच्या तत्त्वांचे मूळरूप त्यांच्या शिष्यपरंपरेच्या हाती आल्या
नंतर ते भ्रष्ट झाले. चैतन्य हे मुख्यतः भक्तिमार्गप्रवर्तक होते. गोपींची
शुद्धभक्ति त्यांच्या ठिकाणी अवतीर्ण झाली होती. भक्तीचे वेड त्यांना लागले
होते. त्यांचा जन्म अत्युच्च आणि शुद्ध बुद्धिमार्गी ब्राह्मणकुलांत झाला होता.
न्यायशास्त्रांत ते स्वतः अत्यंत प्रवीण होते. प्रतिपक्षाबरोबर अनेक शब्द
युद्धे करून त्यांत ते विजयी झाले होते. अशा सभा जिंकणे हीच ब्राह्मण
पंडिताच्या जन्माची इतिकर्तव्यता आहे असा समज त्या काळी होता, आणि
चैतन्यांनाहि याच समाजाचे बाळकडू लहानपणापासून मिळाले होते; पण
कोणा गुरूच्या प्रसादानें ही परिस्थिति पालटली. चैतन्यांचें सारें अंतरंग बद
लून गेले. त्यांनी या शाब्दिक युद्धांचा त्याग केला. आपलें सारें तर्कशास्त्र ते
विसरून गेले. त्यांचे मन पूर्ण परावृत्त होऊन तें शुद्ध भक्तिमार्गाकडे वळले.
साऱ्या जगांत श्रीचैतन्यदेवासारखा भक्त आजपर्यंत कोणी झाला नाही.
त्यांच्या भक्तीचा प्रवाह सा-या बंगालभर वाहिला; आणि अनेक जीवांना
शांतिसुखाचा लाभ त्यांनी करून दिला. त्यांच्या भक्तीला मोजमाप नव्हते.
कोणी साधु असो अथवा अत्यंत पातकी असो; हिंदु असो अथवा मुसल
मान असो; स्त्री असो अथवा पुरुष असो; मोठा राव असो अथवा रस्त्यांत
फिरणारा रंक असो; चैतन्यांच्या हृदयांत सर्वांना एकच स्थान मिळे. आज
चैतन्यपंथाची अवनति झाली आहे ही गोष्ट खरी, आणि कालांतराने सर्वच
धर्मांना ग्लानी येत असते हेही खरें; तथापि आजच्या मितीसही दीनदुब
ळ्यांचा पाठीराखा कोणता पंथ असेल तर तो चैतन्यपंथच होय. सर्व समा<noinclude></noinclude>
eiaftrbfn0se1ynj1n8dgn7mq1s9fqj
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२८
104
66793
154929
130987
2022-07-21T12:12:09Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>खंड.]हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.२२३
{{rule}}
जानें ज्याला बहिष्कार घातला त्याला अद्यापिही येथे आश्रय मिळतो. केवळ
तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने श्रीशंकराचार्याच्या मार्गाइतका उदार आणि व्यापक
मार्ग दुसरा नाही. अनेक पंथांत आणि धर्मात वस्तुतः भेद नाही ही गोष्ट
आचार्यांचे सारे अनुयायी कबूल करितात; तथापि हेच अनुयायी वर्ण भेद
अत्यंत कठोरतेने पाळतात, हेही येथें अवश्य सांगितले पाहिजे. उलटपक्षी
वैष्णवधर्म सर्वांना पोटाशी धरीत असतो; पण तत्त्वदृष्ट्या आपलाच मार्ग
तेवढा खरा असा हटवादीपणाही करीत असतो.<br>
{{gap}}श्रीमच्छंकराचार्य यांची बुद्धि जशी विशाल होती, त्याचप्रमाणे श्रीचैत
न्यांचें अंतःकरण विशाल होते. यानंतर या दोन वस्तूंचा संगम जेथें एकत्र
असेल अशी विभूति उत्पन्न होण्याची वेळ आली. ज्याच्या ठिकाणी बुद्धीचें
विशालत्व आणि अंतःकरणाची आर्दता यांचा एकत्र वास असेल, अशा अव
ताराची आतां आवश्यकता उत्पन्न झाली होती. अनंत प्रकारच्या पंथांच्या
द्वारे एकच परमेश्वर आपले कार्य करीत आहे, हे पाहण्याइतकी दिव्य दृष्टि
ज्याला आहे, असा नवा अवतार आता हवा होता. वस्तुमात्राच्या ठिकाणी
ज्याच्या दृष्टीला एकाच परमेश्वराचे स्वरूप दिसतें, दीन दुबळ्यांच्या आणि
पतितांच्या दर्शनाने ज्याच्या अंतःकरणाला पाझर फुटतो; हा स्वकीय, हा
परकीय, असा भेद ज्याच्या दृष्टीला दिसत नाही; आणि नाना पंथांतील
रहस्ये ओळखून त्यांचे अंतर्गत ऐक्य जाणण्याइतकी ज्याची बुद्धि विशाल
आहे; असा अवतार आता होणे इष्ट होते. सर्व मतमतांतरांचे ऐक्य करून
सर्वव्यापी असा एकच धर्म निर्माण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या बुद्धीला आहे,
असा अवतार आता हवा होता; आणि अशी वेळ आल्याबरोबर असा पुरुष
उत्पन्न झाला. या श्रेष्ठ विभूतीच्या पायांजवळ कित्येक वर्षे बसण्याचे महद्भाग्य
मला प्राप्त झाले होते. ही वेळच अशी होती की, असा पुरुष उत्पन्न व्हावा.
पाश्चात्य आचारविचारांनी अगदीं गजबजून गेलेल्या एका शहरासन्निध या
पुण्य पुरुषाचा जन्म झाला; आणि याचे मुख्य अवतारकार्यही याच ठिकाणी
झाले. हे शहर अगदी बेभान होऊन पाश्चात्य कल्पनांमागे पळत सुटलें होतें.
पाश्चात्य वस्तूचे वेड त्याला लागले होते. हिंदुस्थानांत दुसरे कोणतेंहि गांव
याच्या इतके युरोपीय बनले नव्हते. अशा प्रकारच्या शहरासंनिध हा अव
तार जन्मास आला, आणि या शहरांतच त्याचे कार्य सुरू होते. पुस्तकी<noinclude></noinclude>
lu2jng9nvf8mflifjhibu53dqabhr2b
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२९
104
66794
154934
130988
2022-07-21T12:24:06Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>२२४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम
{{rule}}
ज्ञान याला मुळीच नव्हते; फार काय, पण स्वतःची सही करण्यापुरतीहि
अक्षरओळख त्याला नव्हती असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. अशा
प्रकारे हे श्रीरामकृष्ण परमहंस मोठे विचित्र गृहस्थ होते. यांचे समग्र चरित्र
कथन करणे म्हणजे तो एक मोठा इतिहासच होईल. आजच्या प्रसंगी तसे
करण्यास मला वेळ नाही. सध्या मी इतकेंच म्हणतों की, हिंदुस्थानांत जे जे
अवतार आजपर्यंत होऊन गेले त्या सर्वांची ऐक्यमूर्ति श्रीरामकृष्ण परमहंस
ही होय. पूर्वीचे सारे वेगवेगळे भाग या एका देहांत एकरूपाला आले. चोहो
कडे विखरलेलें धर्मकार्य येथे एकत्र झालें, अपूर्णसें भासणारे कार्य येथे पूर्ण
त्वास आले. यामुळेच सध्याच्या अवनतस्थितीत हे अवतारकार्य अत्यंत
उपयुक्त झाले. रामकृष्ण परमहंस यांचा जन्म एका दरिद्री भिक्षुकाच्या पोटी
झाला. हा भिक्षुक एका बाजूच्या लहानशा खेड्यांत रहात होता. त्याच्या
अस्तित्वाची खबरही कोणास नव्हती; आणि अशा परिस्थितीत जन्मल्यामुळे
श्रीरामकृष्णहि अगदी अप्रसिद्ध होते; पण त्यांच्या पाठीमागे सारी विश्वशक्ति
उभी होती. यामुळे आज युरोप, अमेरिका वगैरे साऱ्या जगांतील देशांत
कोटयवधि लोक या विभूतीचे पूजन आज करीत आहेत. परमेश्वराची लीला
वर्णन करण्याचे सामर्थ्य कोणाला आहे ? त्याची इच्छा काय असेल हे कोणी
सांगावें ? सांप्रतच्या काळी भगवान् रामकृष्ण यांचा जन्म व्हावा या गोष्टींत
असलेला गूढ ईश्वरी संकेत आज आपणास दिसत नसेल तर तो दोष
आपल्या डोळ्यांचा आहे. आपण आंधळे ह्मणून सूर्यप्रकाशहि आपणास
दिसत नाही. मित्रहो, तुमच्या भेटीचा आणखी एखादा प्रसंग प्राप्त झाला
तर या चरित्राची आणखीहि काही माहिती मी तुम्हांस सांगेन. आज मी
इतकेंच म्हणतो की, माझ्या या साऱ्या बडबडीत जर एखादा शब्द सत्यपूर्ण
असेल तर तो श्रीरामकृष्णांचा आहे. त्यांजवांचून दुसऱ्या कोणाचीहि मा
लकी त्याजवर नाही; आणि यांत जे काही फोल असेल, ज्या पुष्कळशा
खोट्या गोष्टी मी बोललों असेन आणि मानवजातीला ज्यांचा कांहींच उपयोग
नसेल, अशा साऱ्या वस्तू एकट्या माझ्याच असून त्यांची सारी जबाबदारी
फक्त माझ्याच शिरावर आहे.{{nop}}
{{center|{{rule}}}}<noinclude></noinclude>
f6v11u4cqjmgw1t1qij3gbis16iq04c
154935
154934
2022-07-21T12:25:27Z
JayashreeVI
4058
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>२२४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम
{{rule}}
ज्ञान याला मुळीच नव्हते; फार काय, पण स्वतःची सही करण्यापुरतीहि
अक्षरओळख त्याला नव्हती असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. अशा
प्रकारे हे श्रीरामकृष्ण परमहंस मोठे विचित्र गृहस्थ होते. यांचे समग्र चरित्र
कथन करणे म्हणजे तो एक मोठा इतिहासच होईल. आजच्या प्रसंगी तसे
करण्यास मला वेळ नाही. सध्या मी इतकेंच म्हणतों की, हिंदुस्थानांत जे जे
अवतार आजपर्यंत होऊन गेले त्या सर्वांची ऐक्यमूर्ति श्रीरामकृष्ण परमहंस
ही होय. पूर्वीचे सारे वेगवेगळे भाग या एका देहांत एकरूपाला आले. चोहो
कडे विखरलेलें धर्मकार्य येथे एकत्र झालें, अपूर्णसें भासणारे कार्य येथे पूर्ण
त्वास आले. यामुळेच सध्याच्या अवनतस्थितीत हे अवतारकार्य अत्यंत
उपयुक्त झाले. रामकृष्ण परमहंस यांचा जन्म एका दरिद्री भिक्षुकाच्या पोटी
झाला. हा भिक्षुक एका बाजूच्या लहानशा खेड्यांत रहात होता. त्याच्या
अस्तित्वाची खबरही कोणास नव्हती; आणि अशा परिस्थितीत जन्मल्यामुळे
श्रीरामकृष्णहि अगदी अप्रसिद्ध होते; पण त्यांच्या पाठीमागे सारी विश्वशक्ति
उभी होती. यामुळे आज युरोप, अमेरिका वगैरे साऱ्या जगांतील देशांत
कोटयवधि लोक या विभूतीचे पूजन आज करीत आहेत. परमेश्वराची लीला
वर्णन करण्याचे सामर्थ्य कोणाला आहे ? त्याची इच्छा काय असेल हे कोणी
सांगावें ? सांप्रतच्या काळी भगवान् रामकृष्ण यांचा जन्म व्हावा या गोष्टींत
असलेला गूढ ईश्वरी संकेत आज आपणास दिसत नसेल तर तो दोष
आपल्या डोळ्यांचा आहे. आपण आंधळे ह्मणून सूर्यप्रकाशहि आपणास
दिसत नाही. मित्रहो, तुमच्या भेटीचा आणखी एखादा प्रसंग प्राप्त झाला
तर या चरित्राची आणखीहि काही माहिती मी तुम्हांस सांगेन. आज मी
इतकेंच म्हणतो की, माझ्या या साऱ्या बडबडीत जर एखादा शब्द सत्यपूर्ण
असेल तर तो श्रीरामकृष्णांचा आहे. त्यांजवांचून दुसऱ्या कोणाचीहि मा
लकी त्याजवर नाही; आणि यांत जे काही फोल असेल, ज्या पुष्कळशा
खोट्या गोष्टी मी बोललों असेन आणि मानवजातीला ज्यांचा कांहींच उपयोग
नसेल, अशा साऱ्या वस्तू एकट्या माझ्याच असून त्यांची सारी जबाबदारीफक्त माझ्याच शिरावर आहे.{{nop}}
{{center|{{------}}}}<noinclude></noinclude>
t0fs6zznd4rlv84djac22p4v7d4c7j9
154937
154935
2022-07-21T12:27:13Z
JayashreeVI
4058
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>२२४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम
{{rule}}
ज्ञान याला मुळीच नव्हते; फार काय, पण स्वतःची सही करण्यापुरतीहि
अक्षरओळख त्याला नव्हती असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. अशा
प्रकारे हे श्रीरामकृष्ण परमहंस मोठे विचित्र गृहस्थ होते. यांचे समग्र चरित्र
कथन करणे म्हणजे तो एक मोठा इतिहासच होईल. आजच्या प्रसंगी तसे
करण्यास मला वेळ नाही. सध्या मी इतकेंच म्हणतों की, हिंदुस्थानांत जे जे
अवतार आजपर्यंत होऊन गेले त्या सर्वांची ऐक्यमूर्ति श्रीरामकृष्ण परमहंस
ही होय. पूर्वीचे सारे वेगवेगळे भाग या एका देहांत एकरूपाला आले. चोहो
कडे विखरलेलें धर्मकार्य येथे एकत्र झालें, अपूर्णसें भासणारे कार्य येथे पूर्ण
त्वास आले. यामुळेच सध्याच्या अवनतस्थितीत हे अवतारकार्य अत्यंत
उपयुक्त झाले. रामकृष्ण परमहंस यांचा जन्म एका दरिद्री भिक्षुकाच्या पोटी
झाला. हा भिक्षुक एका बाजूच्या लहानशा खेड्यांत रहात होता. त्याच्या
अस्तित्वाची खबरही कोणास नव्हती; आणि अशा परिस्थितीत जन्मल्यामुळे
श्रीरामकृष्णहि अगदी अप्रसिद्ध होते; पण त्यांच्या पाठीमागे सारी विश्वशक्ति
उभी होती. यामुळे आज युरोप, अमेरिका वगैरे साऱ्या जगांतील देशांत
कोटयवधि लोक या विभूतीचे पूजन आज करीत आहेत. परमेश्वराची लीला
वर्णन करण्याचे सामर्थ्य कोणाला आहे ? त्याची इच्छा काय असेल हे कोणी
सांगावें ? सांप्रतच्या काळी भगवान् रामकृष्ण यांचा जन्म व्हावा या गोष्टींत
असलेला गूढ ईश्वरी संकेत आज आपणास दिसत नसेल तर तो दोष
आपल्या डोळ्यांचा आहे. आपण आंधळे ह्मणून सूर्यप्रकाशहि आपणास
दिसत नाही. मित्रहो, तुमच्या भेटीचा आणखी एखादा प्रसंग प्राप्त झाला
तर या चरित्राची आणखीहि काही माहिती मी तुम्हांस सांगेन. आज मी
इतकेंच म्हणतो की, माझ्या या साऱ्या बडबडीत जर एखादा शब्द सत्यपूर्ण
असेल तर तो श्रीरामकृष्णांचा आहे. त्यांजवांचून दुसऱ्या कोणाचीहि मा
लकी त्याजवर नाही; आणि यांत जे काही फोल असेल, ज्या पुष्कळशा
खोट्या गोष्टी मी बोललों असेन आणि मानवजातीला ज्यांचा कांहींच उपयोग
नसेल, अशा साऱ्या वस्तू एकट्या माझ्याच असून त्यांची सारी जबाबदारी
फक्त माझ्याच शिरावर आहे.{{nop}}
{{center|{{------}}<noinclude></noinclude>
pzgqxhe8lk3ljdkph2k921gbuy537kj
154938
154937
2022-07-21T12:29:31Z
JayashreeVI
4058
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>२२४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम
{{rule}}
ज्ञान याला मुळीच नव्हते; फार काय, पण स्वतःची सही करण्यापुरतीहि
अक्षरओळख त्याला नव्हती असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. अशा
प्रकारे हे श्रीरामकृष्ण परमहंस मोठे विचित्र गृहस्थ होते. यांचे समग्र चरित्र
कथन करणे म्हणजे तो एक मोठा इतिहासच होईल. आजच्या प्रसंगी तसे
करण्यास मला वेळ नाही. सध्या मी इतकेंच म्हणतों की, हिंदुस्थानांत जे जे
अवतार आजपर्यंत होऊन गेले त्या सर्वांची ऐक्यमूर्ति श्रीरामकृष्ण परमहंस
ही होय. पूर्वीचे सारे वेगवेगळे भाग या एका देहांत एकरूपाला आले. चोहो
कडे विखरलेलें धर्मकार्य येथे एकत्र झालें, अपूर्णसें भासणारे कार्य येथे पूर्ण
त्वास आले. यामुळेच सध्याच्या अवनतस्थितीत हे अवतारकार्य अत्यंत
उपयुक्त झाले. रामकृष्ण परमहंस यांचा जन्म एका दरिद्री भिक्षुकाच्या पोटी
झाला. हा भिक्षुक एका बाजूच्या लहानशा खेड्यांत रहात होता. त्याच्या
अस्तित्वाची खबरही कोणास नव्हती; आणि अशा परिस्थितीत जन्मल्यामुळे
श्रीरामकृष्णहि अगदी अप्रसिद्ध होते; पण त्यांच्या पाठीमागे सारी विश्वशक्ति
उभी होती. यामुळे आज युरोप, अमेरिका वगैरे साऱ्या जगांतील देशांत
कोटयवधि लोक या विभूतीचे पूजन आज करीत आहेत. परमेश्वराची लीला
वर्णन करण्याचे सामर्थ्य कोणाला आहे ? त्याची इच्छा काय असेल हे कोणी
सांगावें ? सांप्रतच्या काळी भगवान् रामकृष्ण यांचा जन्म व्हावा या गोष्टींत
असलेला गूढ ईश्वरी संकेत आज आपणास दिसत नसेल तर तो दोष
आपल्या डोळ्यांचा आहे. आपण आंधळे ह्मणून सूर्यप्रकाशहि आपणास
दिसत नाही. मित्रहो, तुमच्या भेटीचा आणखी एखादा प्रसंग प्राप्त झाला
तर या चरित्राची आणखीहि काही माहिती मी तुम्हांस सांगेन. आज मी
इतकेंच म्हणतो की, माझ्या या साऱ्या बडबडीत जर एखादा शब्द सत्यपूर्ण
असेल तर तो श्रीरामकृष्णांचा आहे. त्यांजवांचून दुसऱ्या कोणाचीहि मा
लकी त्याजवर नाही; आणि यांत जे काही फोल असेल, ज्या पुष्कळशा
खोट्या गोष्टी मी बोललों असेन आणि मानवजातीला ज्यांचा कांहींच उपयोग
नसेल, अशा साऱ्या वस्तू एकट्या माझ्याच असून त्यांची सारी जबाबदारी
फक्त माझ्याच शिरावर आहे.{{nop}}
{{center|{{------}}}}<noinclude></noinclude>
e6d97wi4eqa32wj01ydl731ot105t6w
154940
154938
2022-07-21T12:30:48Z
JayashreeVI
4058
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>२२४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम
{{rule}}
ज्ञान याला मुळीच नव्हते; फार काय, पण स्वतःची सही करण्यापुरतीहि
अक्षरओळख त्याला नव्हती असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. अशा
प्रकारे हे श्रीरामकृष्ण परमहंस मोठे विचित्र गृहस्थ होते. यांचे समग्र चरित्र
कथन करणे म्हणजे तो एक मोठा इतिहासच होईल. आजच्या प्रसंगी तसे
करण्यास मला वेळ नाही. सध्या मी इतकेंच म्हणतों की, हिंदुस्थानांत जे जे
अवतार आजपर्यंत होऊन गेले त्या सर्वांची ऐक्यमूर्ति श्रीरामकृष्ण परमहंस
ही होय. पूर्वीचे सारे वेगवेगळे भाग या एका देहांत एकरूपाला आले. चोहो
कडे विखरलेलें धर्मकार्य येथे एकत्र झालें, अपूर्णसें भासणारे कार्य येथे पूर्ण
त्वास आले. यामुळेच सध्याच्या अवनतस्थितीत हे अवतारकार्य अत्यंत
उपयुक्त झाले. रामकृष्ण परमहंस यांचा जन्म एका दरिद्री भिक्षुकाच्या पोटी
झाला. हा भिक्षुक एका बाजूच्या लहानशा खेड्यांत रहात होता. त्याच्या
अस्तित्वाची खबरही कोणास नव्हती; आणि अशा परिस्थितीत जन्मल्यामुळे
श्रीरामकृष्णहि अगदी अप्रसिद्ध होते; पण त्यांच्या पाठीमागे सारी विश्वशक्ति
उभी होती. यामुळे आज युरोप, अमेरिका वगैरे साऱ्या जगांतील देशांत
कोटयवधि लोक या विभूतीचे पूजन आज करीत आहेत. परमेश्वराची लीला
वर्णन करण्याचे सामर्थ्य कोणाला आहे ? त्याची इच्छा काय असेल हे कोणी
सांगावें ? सांप्रतच्या काळी भगवान् रामकृष्ण यांचा जन्म व्हावा या गोष्टींत
असलेला गूढ ईश्वरी संकेत आज आपणास दिसत नसेल तर तो दोष
आपल्या डोळ्यांचा आहे. आपण आंधळे ह्मणून सूर्यप्रकाशहि आपणास
दिसत नाही. मित्रहो, तुमच्या भेटीचा आणखी एखादा प्रसंग प्राप्त झाला
तर या चरित्राची आणखीहि काही माहिती मी तुम्हांस सांगेन. आज मी
इतकेंच म्हणतो की, माझ्या या साऱ्या बडबडीत जर एखादा शब्द सत्यपूर्ण
असेल तर तो श्रीरामकृष्णांचा आहे. त्यांजवांचून दुसऱ्या कोणाचीहि मा
लकी त्याजवर नाही; आणि यांत जे काही फोल असेल, ज्या पुष्कळशा
खोट्या गोष्टी मी बोललों असेन आणि मानवजातीला ज्यांचा कांहींच उपयोग
नसेल, अशा साऱ्या वस्तू एकट्या माझ्याच असून त्यांची सारी जबाबदारी
फक्त माझ्याच शिरावर आहे.{{nop}}
{{center|-----}}<noinclude></noinclude>
akbo94czfzlo3ig0qd62gbd0zbyojnh
पान:मनतरंग.pdf/८४
104
70478
154923
2022-07-21T11:59:53Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>वेगाने पळू शकत नाही, ना त्याचे दात वा जबडा समोरच्या संकटाचा घास घेऊ शकणारे, मात्र माणसाला निसर्गाने दोन शक्ती अशा दिल्या आहेत की, त्यांच्या बळावर तो अवघ्या विश्वावर, निसर्गावर वर्चस्व गाजविणारा शक्तिमान होऊ शकतो. पहिली शक्ती म्हणजे विचार करण्याची, घटनेमागील कार्यकारणभाव शोधण्याची जिषा, बुद्धिमत्ता आणि तो विचार वाचेद्वारे प्रकट करण्यासाठी लाभलेले आगळेवेगळे स्वरयंत्र. ज्याच्याद्वारे त्याने भाषा तयार केली आणि स्वतःला व्यक्त करण्याचा मार्ग निर्माण केला. काळाच्या प्रवाहात गरजेनुरूप माणसाला स्वत:च्या या शक्तींचा शोध लागला.<br>{{gap}}आदी काळात माणूस इतर प्राणिमात्रांप्रमाणे समोर येईल ते खात होता. गुहा, झाडांच्या कोटरात राहात होता. इतर प्राणिमात्रांत आई आणि नवजातप्राणी यांच्यात विशिष्टकाळच माताबालकाचे नाते असते. पिल्लू वयात आल्यावर जिने जन्म दिला त्या मातेशी ही कधी मादी म्हणून रत होते. त्यांना पिल्ले होतात. ही अवस्था एकेकाळी मानवी जीवनातही होती. याची साक्ष इडिपसची कथा देते. जन्म देणारी स्त्री राणी ही संपत्तीची, राज्याची मालकीण आहे. राजाचा मृत्यू झाला आणि राणी वृद्ध नसेल तर विशिष्ट पणावर तिचा विवाह त्या पुरुषाशी लावला जाई. इडिपस आणि त्याची पत्नी यांच्या नवजात बालकाचे भविष्य भयानक होते. आई आणि पुत्र यांना संतती होण्याचा योग त्यात होता. हे विधिलिखित टाळण्यासाठी नवजात बालकास ठार मारण्याचा आदेश सेवकांना दिला. परंतु मानवी मनातल्या संवेदनेने त्यांना तसे करू दिले नाही. अठरा वर्षानंतर राजा मरण पावला. हत्ती ज्याला हार घालील त्याच्याशी राणीचा विवाह करण्याचा 'पण' जनसमूहाने ठरवला. ज्याच्या गळ्यात हार घातला तो युवक राणीचाच मारण्यास दिलेला पुत्र होता. त्यांना मुले झाली. योगायोगाने हे सत्य लक्षात आले. हा आघात सहन न झाल्याने आई, मुलगा-पत्नी...पती यांनी आत्मघात करून घेतला. मुलांना आपली आई तीच आपली आजी आपला बाप तोच आपला भाऊ...हे नात्याचे सत्य उद्ध्वस्त करून गेले. त्यांनीही स्वत:चे डोळे फोडून हे सत्य नाकारून, विजनाकडे पाय वळवले. नात्याचा सांस्कृतिक प्रवास उजेडाच्या दिशेने सुरू झाला.<br>{{gap}}अशीच प्रतिकात्मक कथा यम आणि यमीची आहे. एकेकाळी सख्या बहीणभावाचा विवाह निषिद्ध नव्हता. बौद्ध रामायणात राम-सीता हे बहीणभाऊ असल्याचा उल्लेख आहे. यमाने हा विवाह निषिद्ध ठरवला. मानवाने स्वत:चे<noinclude>{{rh|मनतरंग / ७६ ||}}</noinclude>
dovqxqi39d1vsheviziuy0b36i43suh
पान:मनतरंग.pdf/८५
104
70479
154925
2022-07-21T12:03:56Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>वेगळेपण, स्वयंभूअस्तित्व विचार करण्याच्या बळावर सिद्ध केले. यमाने यमीच्या इच्छेचा स्वीकार केला नाही. यमी अत्यंत दु:खी झाली. यमाने तिला विरह सहन व्हावा म्हणून दिवस आणि रात्र निर्माण केली. आजही भाऊबीजेचा दिवस- कार्तिक शुक्ल द्वितीयेचा दिवस-यमद्वितीया म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात भाऊबीज अत्यंत महत्त्वाची. भाऊ-बहीण यांच्यातील रक्ताच्या नात्याला भावनेचा, संवेदनेचा रेशमी धागा जोडला गेला.<br>{{gap}}रक्ताच्या नात्याइतकेच भावनिक नातेही अत्यंत बळकट असते. आधार देणारे असते. याची साक्ष राखीपौर्णिमा... रक्षाबंधनाचा सण देतो. या सांस्कृतिक जडणघडणीच्या प्रवासात नातीगोती निर्माण झाली. कुटुंबसंस्थेचा आधार बनली. मानवी बुद्धीच्या विविध पैलूंपैकी एक पैलू म्हणजे 'संवेदना' संवेदनेच्या बळावर कुटुंबसंस्था अर्थपूर्ण, नियमबद्ध आणि बळकट झाली.<br>{{gap}}नाती रक्ताची असतात तशी धर्माची असतात. रक्ताची नाती भाऊबहीण, मुलगा-मुलगी, काका, मामा, आत्या, मावशी, सासू-सासरे, दीर-नणंद वगैरे सर्वच पती-पत्नी या धर्मसंबंधावर वा सामाजिक संबंधावर आधारित दैहिक बंधाशी जोडलेली असतात आणि या नात्याचा पाया केवळ देह नसतो तर देहात सळसळणारी संवेदना, भावना असते. हे नाते धर्माचे असले तरी ते इतके जवळचे, मनस्वी असते की त्याच्या बळकटीवर, चैतन्यावर इतर नात्यांचे जिवंतपण अवलंबून असते. पती-पत्नींच्या एकरूपतेचे वर्णन करताना कवी कालिदास लिहितो,
{{center|<poem>"वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये ।
जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ ॥"</poem>}}{{gap}}वाणी आणि अर्थ यांची जशी एकरूपता तशीच पार्वती-परमेश्वराची एकरूपता. त्यांना वेगळे कसे करावे ? पती-पत्नी या नात्याची एकरूपता अशी असेल तर...? तर असा हा प्रवास नात्यागोत्याचा...भारतीय संस्कृतीच्या आगळेपणाचा.<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{Right|प्रवास, नात्यागोत्याचा.../७७}}</noinclude>
byvnuenhzfdylsn8hl2o8qiim03d08m
पान:मनतरंग.pdf/८६
104
70480
154926
2022-07-21T12:06:33Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop
|Image = मनतरंग.pdf
|Page = 86
|bSize = 402
|cWidth = 276
|cHeight = 216
|oTop = 39
|oLeft = 47
|Location = center
|Description =
}}
{{gap}}तो गेल्यावेळी भेटला तेव्हाच त्याच्या डोळ्यात अखेरच्या प्रवासाची चमक जाणवली होती. समोर बघण्याचेही तो टाळत होता. नजरेत हताश असहायता, पुढ्यातल्या काळोखाची पापण्यांवर गर्द सावली. त्याला पाहून जीव आतल्या आत गलबलला. अत्यंत सधन, उच्चशिक्षित आईवडिलांचा... उच्चशिक्षित कुटुंबातला, सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या घरातला हा एकुलता एक मुलगा. पस्तिशी ओलांडायच्या आत याला मृत्यूच्या कड्यावर कोणी आणून उभे केले ?<br>{{gap}}विविध व्यसने, प्रचंड उद्दाम स्वभाव, पैशाची चढेली हे दोष त्याच्यात कसे निर्माण झाले ? का निर्माण झाले ? कुणी निर्माण केले ? भवतालच्या परिसरातील सामाजिक बदलामुळे ? हा मला माहीत असलेला एक. पण असे अनेक आणि असंख्य केवळ भारतात नाही तर जगभर...<br>{{gap}}आमचा एक मित्र पस्तीस वर्षापूर्वी कॅनडात जाऊन स्थायिक झालाय. त्याने वीस वर्षांपूर्वी सांगितलेला अनुभव. त्याची कन्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये... छात्रालय असलेल्या शाळेत होती. तिने तिची अडचण आपल्या बाबांना लिहून कळवली होती. तिच्या मैत्रिणीला दोन डॅडी होते आणि दोन मम्मी होत्या. ती<noinclude>{{rh|मनतरंग / ७८ ||}}</noinclude>
f6xl2cylmaqw42d2ca085twcvj8lhg9
पान:मनतरंग.pdf/८७
104
70481
154928
2022-07-21T12:10:56Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>आधी तिच्या खऱ्या मम्मीकडे नि 'त्या' डडीकडे जाणार होती. नंतर खऱ्या डॅडीकडे नि 'त्या' मम्मीकडे जाणार होती. एकूण तिची मज्जाच होती. कारण दोन-दोन ठिकाणी सुट्टी घालवायला मिळणार. शिवाय दोन - दोन भेटवस्तू... आणि ही मज्जा आमच्या मित्राच्या कन्येला मिळणार नव्हती. कारण खरी मम्मी नि खरे डॅडी एकाच घरात राहत होते.<br>{{gap}}आमचा मित्र नेहमी सांगत असे. आपल्या कुटुंब संस्थेचे नेमकेपण; तिचा जीवनात मिळणारा आधार इकडे आल्यावर कळतो. पण ही बात वीस वर्षांपूर्वीची.<br>{{gap}}आमची पिढी स्वातंत्र्योत्तर काळात, एकोणीसशे साठ नंतर तरुणाईत आली. प्रगतीची विविध क्षितिजे आमच्यासमोर रोजन् रोज उजळत होती. मध्यमवर्गातील स्त्रिया शिकू लागल्या होत्या. आपण स्वत: नोकरी वा व्यवसाय करून मिळणारा पैसा खर्च करताना आपण निर्णय घेऊ शकतो. आपले मत अधिकाराने मांडू शकतो आणि त्या मताला घरातील वडीलधारी माणसे किंमत देतात याचा सुखद अनुभव त्यांना येऊ लागला होता. दिवसेंदिवस गरजा वाढत होत्या. पैसा मोकळेपणाने येऊ लागला की गरजा वाढतातच. पण विवाहसंस्था, कुटुंबसंस्था यांच्या चौकटी मात्र परंपरागत राहिल्या, त्यात फारसे बदल झाले नाहीत. पूर्वी घरात संपूर्ण तनमन केंद्रित करणाऱ्या बाईला आज अर्थार्जनासाठी आठ दहा तास घराबाहेर गुंतावे लागते. पण घरातल्या जबाबदाऱ्या... विशेषतः मातृत्व आणि मुलांचे संगोपन ह्या नैसर्गिक जबाबदाऱ्या यांतून तिला मुक्ती नसते. या धावपळीत खूपदा मुलांना 'अगदी हवीच' असलेली आई सापडत नाही; कुटुंबाच्या अवकाशात मुले एकटी, एकाकी होतात. पूर्वी आजोबा-आजी घरात असत. त्यांच्याशी मुलांची दोस्ती असे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत ही संस्थाही मिटत चालली आहे. पालकांना मुलांशी संवाद साधायला वेळ नाही. मग जो थोडाफार वेळ मिळेल, त्यात मुलांवर वस्तू... खाऊ यांची उधळण करून त्यांचे नको ते हट्ट पुरवून आपल्या प्रेमाची, जवळिकतेची जाहिरात मुलांच्या मनावर कोरण्याचा प्रयत्न पालक करतात. पण त्यातून त्यांच्या मनातले उदास रिकामेपण भरून निघेल का ?<br>{{gap}}एक आजी कौतुकाने सांगत होत्या की, आईपासून दूर त्याच्याकडे राहणाऱ्या नातवाने रात्री एक वाजता पुरण पोळीचा हट्ट धरला आणि स्वयंपाक<noinclude>{{Right|कदाचित् हे तुम्हाला पटणार नाही / ७९}}</noinclude>
kazn540bvqnzs6tf4k7cexy07c8dg4d
पान:मनतरंग.pdf/८८
104
70482
154930
2022-07-21T12:14:15Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>करणाऱ्या बाईला रात्री उठवून, तिला वेठीस धरून त्यांनी तो पुरवलासुद्धा !!<br>{{gap}}एका विशिष्ट उच्चभ्रू वर्गातील स्त्री-पुरुष रात्री गप्पा मारीत, पत्ते खेळत, खास पेयाचे घुटके घेत, दिवसभराचा बौद्धिक... शारीरिक ताण घालवतात. आणि त्यांच्या गप्पा, त्यांचे सैल विनोद अधमुऱ्या वयाच्या मुलांच्या कानांवर पडतात. डोळ्यात झोप असते, कुशीत घ्यायला आई नसते... डोक्यावरून हात फिरवीत गमतीजमतीच्या गोष्टी सांगायला जवळ बाबा नसतात. अशावेळी कान असतात आई-बाबांच्या गप्पांकडे. बंद खोलीच्या फटीतून दिसणारा पलीकडचा रंगलेला खेळ. अशावेळी मुलांचे एकटेपण त्यांना अधिक बोचू लागते.<br>{{gap}}माझी एक मैत्रीण तक्रार करीत असे. ती जे सांगेल त्याच्या नेमके उलट तिची मुलगी वागे. मुलगी वाढत्या वयातली. आणि ही दिवसभर कामावर. तिला काम करताना धस्स होई. वाटे, मुलीला काही अडचण तर नसेल ना आली? तिला कोणी फसवणार तर नाही ना ? खरं तर, एका विशिष्ट वयात आई लेकीची अगदी जीवश्चकंठश्च मैत्रिण असायला हवी. तसा खास प्रयत्न आईकडूनच व्हायला हवा. आणि तोही लेकीला जाणवणार नाही अशा सहजपणे. त्या अधमुऱ्या वयात मुलांना शरीराबद्दल, बाहेरच्या जगाबद्दल तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न पडत असतात. अशावेळी हळुवारपणे उत्तरे देणारी, निसर्गाच्या रीती समजावून सांगणारी, आत्मविश्वासाने जवळ घेणारी आई 'मैत्रीण' म्हणून हवी असते. तर मुलांना बाबा 'मित्र' म्हणूनच हवे असतात.<br>{{gap}}'प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्रं मित्र वदाचरेत् ।' असे पूर्वीपासून म्हटले आहे. पण 'फास्टफूड'च्या काळात हे सगळेच हरवून चालले आहे.<br>{{gap}}वयाच्या पाचव्या वर्षी रात्री दीड वाजता पुरणपोळीचा हट्ट पुरा केला जातो. मग वयाच्या विशीत कुणाला अमृता तर कुणाला शबाना हवी असते. इथे हट्ट घरापुरता मर्यादित राहात नाही. दिसेल ते माझेच. आणि माझे झाले नाही तर हातात कायदा ; शस्त्र घेण्याचा उद्दामपणा! तऱ्हेतऱ्हेची व्यसने, सवयी आधीच जडलेल्या.आणि हे सारे आईवडिलांच्या लक्षात येते तेव्हा प्रेमाचे... वात्सल्याचे, नीतीचे दोर कापून घरचे 'लेकरू' कड्याच्या दिशेने बेफाम धावत सुटलेले असते.<br>{{gap}}आता कुटुंबासंबंधीच्या संकल्पना अधिक नेटक्या आणि नेमक्या करणे आवश्यक आहे. आज ज्योत्स्नाताई नाहीत. त्या म्हणत की, 'स्त्रीच्या जीवनात काही काळ 'हायबरनेशन'चा असतो. त्या काळात स्त्रीला कुटुंबात स्थिर राहावे<noinclude>{{rh|मनतरंग / ८० ||}}</noinclude>
eergqp3cs506935ocfot8j53qqv5jim
पान:मनतरंग.pdf/८९
104
70483
154931
2022-07-21T12:16:19Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>लागते. आपण निर्माण केलेल्या मुलांना जगाची ओळख करून देण्याची, त्यांना चांगल्या रीतीने जगण्याचे रस्ते दाखवण्याची जबाबदारी आई आणि वडील या दोघांचीही असते. अशा काळात व्यावसायिक प्रगती... सहजपणे मिळवता येणारा पैसा... यश या सर्वांना काही काळ दूर सारावे लागते. ही जबाबदारी 'बापा'ची असतेच. त्याने पत्नीला पूर्णत्वाने सहयोग द्यायचा असतो. परंतु तरीही निसर्गाने सोपवलेली जबाबदारी 'बांधीलकी' मानून स्त्रीने, आईने स्वीकारायची असते. त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि तसे झाले तर...?<br>{{gap}}ऐन उमेदीत नकळत वाट चुकून कड्यावरून कोसळणाऱ्या लेकरांची संख्या वाढत जाणार... !!<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{Right|कदाचित् हे तुम्हाला पटणार नाही / ८१}}</noinclude>
eaufzlsm80k0z8phqwnda4xfyq7ghla
पान:मनतरंग.pdf/९०
104
70484
154932
2022-07-21T12:18:51Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop
|Image = मनतरंग.pdf
|Page = 90
|bSize = 396
|cWidth = 246
|cHeight = 203
|oTop = 42
|oLeft = 54
|Location = center
|Description =
}}
{{gap}}मी घरच्या फाटकातून आत शिरले. तुळशी वृंदावनासमोर त्या उभ्या होत्या. हात जोडलेले. चेहऱ्यावर निरामय शांती. डोळे मिटलेले. वृंदावनातले निरांजन तेवणारे, कपाळावर हळदीकुंकवाची नुकतीच रेखलेली बोटं. उदबत्तीचा मंद गंध आणि भवताली दवात न्हालेली ताजी सकाळ. त्यांनी डोळे उघडले नि माझ्याकडे पाहून मंदपणे हसल्या. सकाळचा प्राजक्ती गंध मला वेढून गेला.<br>{{gap}}"किती दिवसांनी आलात ! आलात की येत जा ना. तुम्ही भेटलात की मनाला खूप बरं वाटतं." त्या बोलल्या आणि माझेच मन... डोळे आतल्या आत भरून आले. <br>{{gap}}तीन वर्षांपूर्वी वकीलसाहेब हे जग सोडून गेले. जाण्यापूर्वी सहा महिने त्यांना रक्ताचा कॅन्सर झालाय हे लक्षात आले होते. असे काही निदान झाले की भवतालच्या, जवळच्या माणसांच्या मनाची आतल्या आत तयारी होत असते. तरीही ती व्यक्ती नसण्याची कल्पना सुद्धा मन पिळवटून टाकणारी असते. त्यातून तीस-बत्तीस वर्षे जिने समर्पित भावनेने साथ दिली, तिच्या मनाची थरथर कशी सांगावी ?<br>{{gap}}निदान झाल्यापासून वकीलसाहेब ताईंशी सतत बोलत. नवनवीन विचार सांगत. त्यांनी खूप वाचावे म्हणून आग्रह धरीत. मुलांना पुस्तके आणून आईला<noinclude>{{rh|मनतरंग / ८२ ||}}</noinclude>
rtmytjzisx2zmd0px3jwlxkcr4kv2fl
पान:मनतरंग.pdf/९१
104
70485
154933
2022-07-21T12:21:25Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>द्यायला लावीत. तसे ते भाविकच. अरविंद, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, विनोबाजी यांचे विचार त्यांना विशेष भावत. त्या शेवटच्या सहा महिन्यात त्यांनी आपल्या पत्नीच्या मनात काही भूमिका गोंदवली.<br>{{gap}}... मनोरमा, आपण मरतो म्हणजे इथले अस्तित्व संपते. देवाला प्रिय होतो. आपल्याला निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांना शरीराचे वेगळेपण दिले तरी दोघेही माणूसच. दोघांचे मन सारखे. भावना, संवेदना, इच्छा, आकांक्षा... सारे सारखे. दोघांनाही निसर्गाने बुद्धी दिली आहे. दोघांच्या व्याधी सारख्याच. दोघेही चुका करणार, त्या दुरुस्त करणार. सुखाचा, निवांत शांतीचा शोध घेणार. माणसे माणसाशिवाय जगूच शकत नाहीत. साथसंगत हवी, आधार हवा.<br>{{gap}}गेली तीस वर्षे मला पत्नी म्हणून पदोपदी साथ दिलीस. माझे घर शाकारलेस... फुलवलेस आणि आता मला आधी बोलवणे आलेय. एक आग्रही विनंती...शेवटचा हट्ट मी करणार आहे, पुरवशील ना? मी गेल्यावर सौभाग्यालंकार उतरावयाचे नाहीत; तुझी साग्रसंगीत तुळशीची पूजा, सण... व्रते सारे साजरे करायचे. अगं, शेवटी आपण परमेश्वराजवळ जाणार ना? मग अशुभ होऊन का जायचे ? सौभाग्य हे केवळ पतीशी जोडलेले नसते. ते आपल्याशी, आपल्या विचारांशी... आपल्या वर्तनाशी... आपल्या राहणीशी जोडलेले असते. तुझ्या स्वरातील गीता ऐकता ऐकता शेवटचा श्वास घ्यायचाय मला...<br>{{gap}}करशील ना माझा हट्ट पूर्ण ?<br>{{gap}}...आणि ताई वकीलसाहेबांचा हट्ट अत्यंत आत्मीयतेने पुरवीत आहेत. इतकेच नाही तर स्वीकारलेला वसा, न उतता न मातता, या प्रसंगाला सामोऱ्या जाणाऱ्या इतर भगिनींनाही देत आहेत. त्यांच्या प्रसन्न हसण्याला कदाचित करुणेची किनार असेलही. पण त्यामुळे त्यांचा चेहरा अधिक निरामय... प्रशांत वाटतो. एरवी कशा दिसल्या असत्या त्या ? कोरा चेहरा, डोळ्यातून टपटपणारे कारुण्य, रुखेफिके कपडे, अवतीभवती एक किर्र उदासी. पण आज ताई, त्यांची मुले, सुना, लेक, जावई, नातवंड.. अवघे घर प्रसन्नपणे उभे आहे.<br>{{gap}}...ताईंना वकीलसाहेबांची आठवण येतच असेल. कधीकधी आठवणींनी डोळे भरून येत असतील, मन कशातच लागत नसेल. पण हे सारे व्यक्तिगत, आतल्या आत. त्यामुळे परिसरावर अशुभाची सावली नाही. काही माणसे इतक्या सहजपणे परिवर्तनाची लय पकडून पुढे जातात. अशा वेळी आठवतो<noinclude>{{Right|सुभगा...सुखदा ! / ८३}}</noinclude>
o3x41iycn5hzv5hmjvpoyjf92dctx96
पान:मनतरंग.pdf/९२
104
70486
154936
2022-07-21T12:25:29Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>त्या तालुक्याच्या गावचा प्रसंग. गोपाळ गणेश आगरकरांच्या सामाजिक परिषदेच्या शताब्दीच्या वेळचा. एका पुरोगामी गृहस्थाकडे आम्हांला संध्याकाळी चहाला बोलावले. आम्हांला म्हणजे कुशाक्कांना, त्यांच्या बरोबर आम्ही. कुशाक्कांनी स्वातंत्र्य संग्रामात दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला होता. गृहस्थांच्या सुनेने सुरेख पोहे केले होते. गप्पांच्या रंगात पोह्यांची चव अधिक खमंग झाली. निघताना या पुरोगामी गृहस्थांनी सुनेला आठवण दिली, 'अगं, कुंकू लावलंस का ?'<br>{{gap}}तिने मला, सुनीताला कुंकू लावले. आणि ती कुंकवाचे बोट कुशाक्कांच्या कुंकू लावलेल्या प्रसन्न कपाळावर टेकवणार इतक्यात सासरेबुवाच्या तोंडून जमिनीतून धार उसळून यावी तसे शब्द बाहेर आले 'अगंऽऽअगंऽऽ'. ती सून बिचारी दचकून थबकली. कुशाक्कांच्या गळ्यातले मंगळसूत्र, माथ्यावरचे कुंकू, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अक्षरश: कोमेजून गेले. कुशाक्कांचे सतत कामगारांसाठी लढणारे पती, अप्पा गेल्या वर्षीच अचानक गेले होते. मृत्यू म्हणजे जीवनाची एक अपरिहार्य नैसर्गिक अवस्था हे मानणाऱ्या कुशाक्कांनी पतीच्या मृत्यूचा सहजपणे स्वीकार केला होता.<br>{{gap}}"वयाच्या विसाव्या वर्षी मी मंगळसूत्र स्वीकारले होते. ते आता माझे लेणे आहे. तो माझा दागिना, माझे सौभाग्य आहे. ते माझ्या सोबतच येणार." अशी भूमिका घेऊन कुशाक्काने नवी वाट चोखाळली होती आणि आज पायात काटा रुतला तोही आपल्या माणसाने पेरलेला !!<br>{{gap}}सुभग दिसणे, प्रसन्न राहणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष. हा अधिकार कुणाच्या असण्या-नसण्याशी का जोडायचा? जेव्हा एखादी व्यक्ती वा वस्तू एखाद्याच्या मालकीची होते, तेव्हाच त्याच्या असण्या-नसण्याचे अधिकार त्याच्या मालकीच्या व्यक्तीचे होतात. कालप्रवाहाच्या ओघात असे घडले असावे आणि त्यातून सतीप्रथा, केशवपन, एका लाल लुगड्यात बाईला लपेटणे, ती अशुभ मानणे वगैरे आले असावे. शिक्षणातून समोरचे क्षितिज उजळत जाते. तसे घडले आणि मग राजा राममोहन राय, जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी रांग क्षितिजाला उजळत गेली. ही झाली काही इतिहासाने नोंदवलेली नावे. पण आज उजळती रांग एकेरी न राहता समृद्ध... विशाल होत चालली आहे.<br>{{gap}}बारा तेरा वर्षांपूर्वीची गोष्ट. राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी तीस बत्तीस युवकयुवतींचा जत्था घेऊन मी अन्नामलाई विद्यापीठात गेले होते. मधुरिकाही त्यात होती.<noinclude>{{rh|मनतरंग / ८४ ||}}</noinclude>
7pz9bmr70zo32kjq721hwghitsg82mc
पान:मनतरंग.pdf/९३
104
70487
154939
2022-07-21T12:29:49Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>जेमतेम अठरा-एकोणीस वर्षांचे वय. विलक्षण गोड तरीही धारदार आवाज. ऐकणाऱ्याला भारून टाकणारा, समूहगीत, सुगमसंगीत, समूहनृत्याला पार्श्वगायन यांची मुख्य जबाबदारी तिच्यावर होती. महोत्सवाची सुरुवात शोभायात्रेने केली जाणार होती. आमच्या गटाने भारतीय पोषाखातील विविधता सजवायचे ठरवले.
{{Block center|<poem>"युग की जडता के खिलाफ एक इन्किलाब है
हिंद के जवानों का इक सुनहेरा ख्वाब है
भारतीय सांस्कृतिक क्रांती, मानवीय सांस्कृतिक क्रांती ॥"</poem>}}
{{gap}}हे गीत ढोलकी... पेटीवर गात गटागटाने जायचे होते. मुलींना मी सजवीत होते. इतक्यात मधुरिका काहीशा अस्वस्थपणे माझ्याजवळ आली. तिच्या डोळ्यात अस्वस्थता होती. "ताई मी बंगकन्या होतेय. भांगात सिंदूर कशी भरू मी? माझे मिस्टर लग्नानंतर अवघ्या सात महिन्यात ब्रेन ट्यूमरने गेले..." तिचा स्वर जड झाला होता.<br>{{gap}}"आण, मी भरते तुझ्या भागात सिंदूर... लग्नानंतर चार महिन्यात नवऱ्याला ब्रेन ट्यूमर होणे हा तुझा का दोष आहे ? आणि काही पापबीपच लागणार असेल ना, तर ते मला लागेल. तुला नाही." तिच्या भागात सिंदूर भरीत मी बोलले. बंद कडी उघडावी तसे मधुरिकाला झाले असावे. नंतरच्या चारपाच दिवसात खळाळणारी, वादावादी करणारी, स्कर्ट...पंजाबी ड्रेस घालून लालचुटूक टिकली कपाळावर रेखून मुक्तपणे वावरणारी मधुरिका. अन्नमलाईहून परतताना हैदराबाद - मनमाड रेल्वेत आम्ही सर्वजण. औरंगाबाद यायला थोडा वेळ उरलेला. जो तो आवराआवरी करणारा. मधुरिका कुठे दिसेना. खरे तर ती समोरच होती... अंगभर नेसलेली फिकट राखाडी रंगाची साडी. कपाळावर टेकलेली बारीकशी काळी टिकली. दिसेल न दिसेल अशी. माझ्या डोळ्यांतले प्रश्नचिन्ह तिने वाचले असावे.<br>{{gap}}"बाई, एक लक्ष्मणरेषा तुमच्या आधाराने ओलांडली मी. खूप काही हाती आलं. नवं बळ मिळालं. माझी खात्री आहे की मी आज ना उद्या नवी दिशा शोधीन. जिथे समाधान असेल आणि मी सुभगा असेन... सुखदा असेन."<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{Right|सुभगा...सुखदा ! / ८५}}</noinclude>
40nbtefd64lw9d6960z26ips0302zqj
पान:मनतरंग.pdf/९४
104
70488
154941
2022-07-21T12:33:42Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop
|Image = मनतरंग.pdf
|Page = 94
|bSize = 390
|cWidth = 266
|cHeight = 189
|oTop = 51
|oLeft = 39
|Location = center
|Description =
}}
{{gap}}सेंटजोन हे कॅनडातील अतिपूर्वेकडील न्यूफाऊंलंड प्रांतातील देखणे शहर. ते ॲटलांटिक सागराच्या किनारी आहे. खरे तर हा प्रांतच चिमुकल्या बेटासारखा. दोन दिवसांपूर्वी इथे आल्यापासून मला वेध लागला होता, ॲटलांटिक महासागरात पाय बुडवून, डोळे मिटून उभे राहण्याचा. वसंत ऋतू नुकताच सुरू झालेला. थोडे लवकरच आलो होतो आम्ही. थंडी अजूनही आळस देत उभी होती. उत्तरेकडचे पाणी गोठलेलेच होते. उन्हाळा वाढू लागला की बर्फ वितळू लागे आणि बर्फाची जमीन उत्तरेकडून वाहत वाहत थेट या किनाऱ्यावर येऊन धडके. ते बर्फाळ सौंदर्य पाहण्याचा योग भाग्यात नसला तरी अटलांटिक समुद्राच्या फिक्कट निळ्या लाटाच्या झुळकी पावलांवर झेलण्यातली मौज मनसोक्त अनुभवली. ती अनुभवतो आहोत एवढ्यात थोड्या दूरवर एक अतिप्रचंड मासा उसळी मारून वेलांटी घेत पाण्यात गडप झाला नि मधुश्री ओररडली 'शार्क... शार्क !! केवढा मोठा शार्क !!!<br>{{gap}}मग आम्ही डोळ्यांनी आणि स्मरणशक्तीला ताण देत त्या शार्कचे तैलजाडी असलेले गलेलठ्ठ शरीर आठवू लागलो.<br>{{gap}}यापूर्वी समुद्र पाहिला होता तो जुहूचा आणि अगदी आकंठ समुद्र<noinclude>{{rh|मनतरंग / ८६ ||}}</noinclude>
f291o8yw2ozixzyewzwyqm7cyepwogn
पान:मनतरंग.pdf/९५
104
70489
154942
2022-07-21T12:37:11Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>अनुभवला तो उंबरगावचा. उतरत्या घनदाट सुरूच्या झाडांची हिरवाई, लाटांच्या पापण्यात साठवीत ऐसपैस पहुडलेला अरबी समुद्र. किनाऱ्यावरची चंदेरी वाळू पाण्यात मिसळल्याने समुद्राचा रंग रुखाफिका दिसायचा. अर्थात ऐन उन्हाळ्यात; आम्ही आत्याकडे सुट्टीत जायचो तेव्हा.<br>{{gap}}एकतीस डिसेंबरची रात्र सरत चालली आहे. एक जानेवारीची पहाट थोड्याच वेळात होईल, अशी अधमुरी वेळ. कन्याकुमारीच्या टोकावर आम्ही उभे. समोर निळाभोर हिंदी महासागर, डावीकडे गुलाबी निळा बंगालचा उपसागर आणि उजवीकडे फिकट निळा अरबी समुद्र. एकाच वेळी बुडणारा चंद्र आणि उगवणारा सूर्य. पहाटेच्या अधुक्या उजेडात अनुभवलेला तो समुद्र कसा विसरता येईल?<br>{{gap}}मद्रासजवळील महाबलीपुरमचा खडकाळ किनारा त्या किनाऱ्यावर शिल्पकलेचा अत्युत्कृष्ट नमुना असलेली सात मंदिरे हजारो वर्षांपासून उभी आहेत. त्यातील सहा पाण्याखाली गेली असून शेवटचे लाटा झेलीत उभे आहे. तेही एखाद्या शतकात पाण्याखाली जाईल. त्या मंदिराच्या पायऱ्यावर लाटांचे तुषार झेलीत काढलेली अमावस्येची रात्र, माझ्या मनात बंगालच्या उपसागराच्या आठवणींनी भिजवून ठेवली आहे आणि न्यू फाऊंडलंड किनाऱ्यावरील अटलांटिक सागरात पाय बुडवत असताना मनाला बजावले की, हा मी अनुभवलेला चौथा समुद्र...<br>{{gap}}पाचवा समुद्र पाहिला नि अनुभवला तो पॅसिफिक महासागर. उसळ्या मारणारा आणि घनगर्द निळ्या रंगाचा. पॅसिफिक सॅनफ्रैंसिस्कोचा, लॉस एंजिल्सचा आणि व्हँकुवरचा. तीनही एकच आणि तरीही वेगवेगळे.<br>{{gap}}पण पॅसिफिकची आठवण लक्षात राहिली व्हँकुवरची. काही माणसं पहिल्यांदा भेटली तरी वाटतं की रोज न रोज ती भेटतात. वर्षानुवर्षांचा संवाद आहे. जणू अंतस्थ भावरेषा जुळालेल्याच असतात. तसेच आम्हां दोघांचे आणि अशोक गर्टुडचे झाले. आल्याक्षणी पॅसिफिकच्या किनाऱ्यावर वेळ काढून जायचे ठरले होतेच.<br>{{gap}}तिथली दुपारी रेशमी. ओढणी अंगावर पांघरावी तशी असते गर्टूड नोकरीवर गेलेली. साशा आणि शानू दोघीजणी शाळेत गेलेल्या. आम्ही तिघे समुद्रावर निघालो. भारतात वाढलेले भारतीय कॅनडात जाऊन 'इंडो कॅनडियन'<noinclude>{{Right|समुद्राच्या काठाने... / ८७}}</noinclude>
3dru7o6k7vcrppin64pssjhehliahfo
पान:मनतरंग.pdf/९६
104
70490
154943
2022-07-21T12:40:51Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>झाले आणि एक तपाच्यावर वर्षे त्याभूमीत घालवली तरी त्यांच्या मनात पुरलेला 'भारत' एखादा भारतीय भेटला की वर उसळून येतो. तसेच झाले. गप्पांच्या ओघात, गाडी नेमक्या जागी लावून ठेवताना अशोक शेजारील यंत्रात वेळ नोंदवून नाणे टाकायला विसरला. जेमतेम शंभर पावलेच पुढे गेलो असू. अशोकच्या चूक लक्षात आली आणि तो अक्षरश: गाडीकडे धावला. पण गाडीच्या बॉनेटवर पंधरा डॉलर्स दंडाची पावती ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी दंडाची रक्कम न भरल्यास दर दिवशी दहा डॉलर्स उशीराचा दंड भरावा लागेल असा सज्जड दम त्यावर लिहिला होता. पोलिसमामा अक्षरशः अदृश्य मानवासारखे वावरतात इथे. आपल्याला ते दिसत नाहीत पण आपण नि आपल्या चुका मात्र त्यांना ठसठशीत दिसत असतात.<br>{{gap}}जिवाला डसून जाणारा समुद्र बँकाँकचा... पटायाचा. रात्रीच्या झगमगाटात कण्हणारा. पटायाच्या किनाऱ्याने आम्ही पायी हिंडत होतो. सत्तरी पुढचे तरुण आणि परिस्थितीच्या भोवऱ्यात गरगरणाऱ्या तेरा-चौदाच्या त्यांच्या जोडीदारिणी. एकमेकात मिसळून चालणारे ते. भडकपणे रंगलेल्या डोळ्यातून आक्रंदणारा वैराण समुद्र. अधुक्या उजेडात देहाचा बाजार मांडून लेकरांच्या पोटात दोन घास घालण्यासाठी ठुमकणाऱ्या उदास आया. रात्रभर तो झगझगणारा किनारा सतावीत होता. शेवटी,<br>{{gap}}कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ।<br>{{gap}}असे ठामपणे सांगणारी भारतीय संस्कृती दक्षिण अशियाभर पसरली आहे. तरीही पटायाचा किनारा असो, किंवा गोवा-केरळचा चंदेरी किनारा असो, त्यात थरथरणारी प्रतिबिंबे असतात. उदास देहस्विनींची. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांच्या संगमावर ती तेजस्विनी... मनस्विनी 'कन्या'... कन्याकुमारी जग जन्मल्यापासून उभी आहे. वाट पाहते आहे, त्या अंबराची... आकाशाची.जे तिच्या अंतरीच्या शिवत्वावर भाळून तिला आपल्यात सामावून घेईल. तो किनारा अजूनही तिला सापडलेला नाही.<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{rh|मनतरंग / ८८||}}</noinclude>
93adnab24gsya3j3zx57gccd7ne5wp0
154944
154943
2022-07-21T12:44:42Z
अश्विनीलेले
3813
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>झाले आणि एक तपाच्यावर वर्षे त्याभूमीत घालवली तरी त्यांच्या मनात पुरलेला 'भारत' एखादा भारतीय भेटला की वर उसळून येतो. तसेच झाले. गप्पांच्या ओघात, गाडी नेमक्या जागी लावून ठेवताना अशोक शेजारील यंत्रात वेळ नोंदवून नाणे टाकायला विसरला. जेमतेम शंभर पावलेच पुढे गेलो असू. अशोकच्या चूक लक्षात आली आणि तो अक्षरश: गाडीकडे धावला. पण गाडीच्या बॉनेटवर पंधरा डॉलर्स दंडाची पावती ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी दंडाची रक्कम न भरल्यास दर दिवशी दहा डॉलर्स उशीराचा दंड भरावा लागेल असा सज्जड दम त्यावर लिहिला होता. पोलिसमामा अक्षरशः अदृश्य मानवासारखे वावरतात इथे. आपल्याला ते दिसत नाहीत पण आपण नि आपल्या चुका मात्र त्यांना ठसठशीत दिसत असतात.<br>{{gap}}जिवाला डसून जाणारा समुद्र बँकाँकचा... पटायाचा. रात्रीच्या झगमगाटात कण्हणारा. पटायाच्या किनाऱ्याने आम्ही पायी हिंडत होतो. सत्तरी पुढचे तरुण आणि परिस्थितीच्या भोवऱ्यात गरगरणाऱ्या तेरा-चौदाच्या त्यांच्या जोडीदारिणी. एकमेकात मिसळून चालणारे ते. भडकपणे रंगलेल्या डोळ्यातून आक्रंदणारा वैराण समुद्र. अर्धुक्या उजेडात देहाचा बाजार मांडून लेकरांच्या पोटात दोन घास घालण्यासाठी ठुमकणाऱ्या उदास आया. रात्रभर तो झगझगणारा किनारा सतावीत होता. शेवटी,<br>{{gap}}कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ।<br>{{gap}}असे ठामपणे सांगणारी भारतीय संस्कृती दक्षिण अशियाभर पसरली आहे. तरीही पटायाचा किनारा असो, किंवा गोवा-केरळचा चंदेरी किनारा असो, त्यात थरथरणारी प्रतिबिंबे असतात. उदास देहस्विनींची. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांच्या संगमावर ती तेजस्विनी... मनस्विनी 'कन्या'... कन्याकुमारी जग जन्मल्यापासून उभी आहे. वाट पाहते आहे, त्या अंबराची... आकाशाची.जे तिच्या अंतरीच्या शिवत्वावर भाळून तिला आपल्यात सामावून घेईल. तो किनारा अजूनही तिला सापडलेला नाही.<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{rh|मनतरंग / ८८||}}</noinclude>
jr7ogjfo8qdrcb6aym8k989xqteribw
पान:मनतरंग.pdf/९७
104
70491
154945
2022-07-21T13:15:01Z
अश्विनीलेले
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ धक्क्याच्या मागे डोकावून पहा! पासपोर्टवर शिक्का मारला गेला नि आम्ही बाहेरच्या प्रचंड दालनात आलो. माझ्या आणि आशाच्या साडीमुळे ब्रिजिटा धावतच आमच्याजवळ आली. इतक्यात लिंड..."
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="अश्विनीलेले" /></noinclude>________________
धक्क्याच्या मागे डोकावून पहा!
पासपोर्टवर शिक्का मारला गेला नि आम्ही बाहेरच्या प्रचंड दालनात आलो. माझ्या आणि आशाच्या साडीमुळे ब्रिजिटा धावतच आमच्याजवळ आली. इतक्यात लिंडाही सामनवाहू गाडी घेऊन पुढे आली. आमचे सामान त्यात ठेवून आम्ही तिच्यामागे चालू लागतो. दोन्ही बाजूंनी असंख्य जाहिराती. सेक्सशॉपच्याही. अंबाजोगाईसारख्या चिमुकल्या आणि जुनाट वळणाच्या गावातून थेट फ्रैंकफूटला पोचलेल्या मला पहिला धक्का बसला. सरकते रस्ते. फिरते जिने पार करताना वाटे आपण पुनः पुन्हा त्याच त्याच रस्त्यावरून फिरतोय, जणू 'चकव्या' त सापडलोय. फ्रैंकफूट विमानतळाची प्रचंड जादुई गुहा एकदाची पार केली आणि मोकळ्या आभाळाखाली आलो..
निरभ्र आभाळ. अधमुऱ्या दह्यासारखं कोवळं ऊन आणि भयानक थंडी. मागून आणलेला ओव्हरकोट 'कारणी लागला' याचं समाधान !! गाडीत बसताच ब्रिजिटानं एक पट्टा माझ्या गळ्यात अडकवला होता. गाडीचा वेग पाहून तो पट्टा किती 'संरक्षण' करणार आहे ते मनोमन पटलं. गाडीच्या वेगाची नोंद घेणारा काटा शंभर ते दीडशेत फिरत होता आणि म्हणे ती खास आमच्यासाठी गाडी 'स्लो' याने के 'सावकाश' चालवीत होती.
धक्क्याच्या मागे डोकावून पहा ! /८९<noinclude></noinclude>
sb7jdgd9k8d1n23gamw1ygxpd1b9bxc
154946
154945
2022-07-21T14:40:37Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop
|Image = मनतरंग.pdf
|Page = 97
|bSize = 398
|cWidth = 248
|cHeight = 227
|oTop = 32
|oLeft = 45
|Location = center
|Description =
}}
{{gap}}पासपोर्टवर शिक्का मारला गेला नि आम्ही बाहेरच्या प्रचंड दालनात आलो. माझ्या आणि आशाच्या साडीमुळे ब्रिजिटा धावतच आमच्याजवळ आली. इतक्यात लिंडाही सामनवाहू गाडी घेऊन पुढे आली. आमचे सामान त्यात ठेवून आम्ही तिच्यामागे चालू लागतो. दोन्ही बाजूंनी असंख्य जाहिराती. सेक्सशॉपच्याही. अंबाजोगाईसारख्या चिमुकल्या आणि जुनाट वळणाच्या गावातून थेट फ्रॅंकफूर्टला पोचलेल्या मला पहिला धक्का बसला. सरकते रस्ते. फिरते जिने पार करताना वाटे आपण पुनः पुन्हा त्याच त्याच रस्त्यावरून फिरतोय, जणू 'चकव्या' त सापडलोय. फ्रॅंकफूर्ट विमानतळाची प्रचंड जादुई गुहा एकदाची पार केली आणि मोकळ्या आभाळाखाली आलो.<br>{{gap}}निरभ्र आभाळ. अधमुऱ्या दह्यासारखं कोवळं ऊन आणि भयानक थंडी. मागून आणलेला ओव्हरकोट 'कारणी लागला' याचं समाधान !! गाडीत बसताच ब्रिजिटानं एक पट्टा माझ्या गळ्यात अडकवला होता. गाडीचा वेग पाहून तो पट्टा किती 'संरक्षण' करणार आहे ते मनोमन पटलं. गाडीच्या वेगाची नोंद घेणारा काटा शंभर ते दीडशेत फिरत होता आणि म्हणे ती खास आमच्यासाठी गाडी 'स्लो' याने के 'सावकाश' चालवीत होती.<br><noinclude>{{Right|धक्क्याच्या मागे डोकावून पहा ! /८९}}</noinclude>
ds72nzj20ok94nc3u1pfcvm5z81kpq3
पान:मनतरंग.pdf/९८
104
70492
154947
2022-07-21T14:56:32Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}मौलोफ या चिमुकल्या खेड्यात तेरे देस होम्स या जर्मनीतील संस्थेने महिलांची परिषद आणि पंधरा दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. बत्तीस देशांतल्या... विशेष करून विकसनशील देशातल्या पासष्ठ महिला एकत्र येऊन एकमेकींच्या अनुभवांची देवाणघेवाण करणार होत्या. स्त्रियांच्या प्रश्नांवर विचारविनिमय करणार होत्या. मौलोफ हे खेडे फॅंकफूर्टपासून पन्नासएक किलो मिटर्सवर असेल. तेथील सुसज्ज अशा सांस्कृतिक केंद्रात रिक्रिअेशन सेंटरमध्ये आमची ही परिषद होती आणि तिकडेच आम्ही भारतीय पंचकन्या निघालो होतो.<br>{{gap}}वेगाने धावणारी गाडी. भवताली हिरव्या रंगाच्या तऱ्हेतऱ्हेच्या छटांच्या लाटा. जमिनीवर हिरव्या रंगाचे लुसलुशीत गालिचे. त्यांच्यापाठी हिरव्या गर्द पाईन वृक्षांच्या लहानमोठ्या भिंती. हिरवी तटबंदीच म्हणाना ! सर्वात मागे शेकडो फूट उंचीचे विशाल वृक्ष. जणू निसर्ग आणि माणूस यांचे रक्षण करणाऱ्या पुरातन यक्षांचा थवाच ! नखशिखांत सजलेल्या चैत्र गौरीसारखी भूमी. जिकडे तिकडे ताजेपणा. इतका टवटवीत निसर्ग मी फक्त कॅलेंडरवर किंवा चित्रातच पाहिला होता. पिवळ्या रानफुलांचे अधूनमधून वाफे. या हिरव्या मैफलीत अधून मधून उतरत्या छपरांच्या घरांचे थांबे लागत. चिमखडी घरे... काचेच्या खिडक्या आणि प्रत्येक खिडकीत फुलांची टवटवीत गर्दी.<br>{{gap}}मौलोफच्या देखण्या रस्त्यावरन भरकटताना फ्रैंकफूर्टच्या विमानतळावर पाहिलेल्या 'सेक्सशॉप्स' च्या भडक जाहिराती मनाच्या तळाशी कधी जाऊन बसल्या ते कळलं नाही. इतक्यात ब्रिजिटा जर्मनीच्या मुक्कामात काय काय पाहायचं त्याची माहिती देत होती आणि आमचे मनसुबेही विचारीत होती.<br>{{gap}}"तुम्हाला लेस्बीयन्सना भेटायला आवडेल ? इथे त्याच्या वसाहती आहेत. ब्रेमेनला तुम्ही आठ दिवस राहाणार आहात. तिथे त्या चालवीत असलेले कॉफीशॉप आहे. तिथे जाता येईल तुम्हाला...'<br>{{gap}}लेस्बीयन... लेस्बीयन... फारसा न ऐकलेला शब्द. माझ्या मनातली डिक्शनरी उलगडून पाहिली आणि तिच्या या प्रश्नाने मला पुन्हा एकदा धक्का बसला.<br>{{gap}}आज बारा वर्षांनी 'फायर' च्या निमित्ताने त्या कॉफीहाऊसला दिलेली भेट...त्या मुली. सारे आठवतेय. चुकलेल्या वाटेने बरेच अंतर चालून आल्यावर<noinclude>{{rh|मनतरंग / ९० ||}}</noinclude>
7xmpgsml149egbr98mzq54bjdnqm0pl
पान:मनतरंग.pdf/९९
104
70493
154948
2022-07-21T14:58:45Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>धड ना मागे फिरता येतं, धड ना पुढे जाण्याचे मानसिक बळ राहतं. अशावेळी झालेला मानसिक गोंधळ चेहऱ्यावर उमटलेला. प्रश्नांचे जाळे नि अवाक् डोळे पाहून उला या कार्यकर्तीने माझा हात घट्ट धरून कानात सांगितले होते.<br>{{gap}}'डोंन्ट गेट एक्साइटेड...' बाई गं अशी धक्का बसल्यागत त्यांच्याकडे पाहू नकोस. त्यांच्या मनात शिरून काही उलगडा झाला तर शोध !!<br>{{gap}}आज दहा बारा वर्षानंतर पुन्हा.... 'फायर' च्या निमित्ताने.<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{Right|धक्क्याच्या मागे डोकावून पहा!/९१}}</noinclude>
1p82nwlf9xtlcyc3jln3bprvbr7g3cv
पान:मनतरंग.pdf/१००
104
70494
154949
2022-07-21T15:02:49Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop
|Image = मनतरंग.pdf
|Page = 100
|bSize = 401
|cWidth = 260
|cHeight = 228
|oTop = 36
|oLeft = 54
|Location = center
|Description =
}}
{{gap}}पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या चिमुकल्या गावात ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले होते. नव्या नवलाईचा उत्साह गावातल्या सर्वांतच असे. बाहेरून-परप्रांतातून आलेले तज्ज्ञ डॉक्टरर्स, विद्यार्थी या साऱ्यांची गैरसोय होऊ नये. 'कुठे खेडे गावात येऊन पडलोय' असे त्यांना वाटू नये म्हणून अवघे गाव काळजी घेई. इतकी की चायनीज पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या सोया सॉस, अजिनोमोटो वगैरे काय काय चिजा दुकानदार उत्साहाने घेऊन येत. ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय ही गावाची शान. ती गावकऱ्यांनी राखावी ही भावना. एम- कॉम साठी येणाऱ्या त्रिपुरा मणिपूरच्या मुलांना, वैद्यकीय महाविद्यालयातील थेट अंदमान निकोबार, नागालँड वगैरे भागातून आलेल्या एकट्यादुकट्याला, नवरात्राच्या निमित्ताने मीही घरी बोलावीत असे. मुळात मी रविबाबूंच्या कवितांवर... लोकसाहित्यावर आणि बंगाली भाषेवर अगदी उमलल्या वयापासून अक्षरश: भाळलेली. या मुलांना आईच्या... दिदीच्या हाताने खाऊ घालताना खूप छान वाटे. त्यात एक नागा मुलगा होता. डॉक्टर होऊ घातलेला;<br>{{gap}}धर्म, जात, राष्ट्रीयता, भाषा यावर चर्चा होई. एकदा आमचा नागाबंधू अत्यंत नम्रतेने सांगता झाला.<br><noinclude>{{rh|मनतरंग / ९२ ||}}</noinclude>
ktuf1m52hky99bpkgs877cq4gcm2dol
पान:मनतरंग.pdf/१०१
104
70495
154950
2022-07-21T15:07:19Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}'मी प्रथम ख्रिश्चन आहे आणि मग इंडियन.. भारतीय आहे.'<br>{{gap}}त्याचे बोलणे आम्हाला धक्का देणारे, न पटणारे होते. आमच्या मनातली अस्वस्थता त्याने ओळखली आणि तो सांगू लागला,<br>{{gap}}"मॅडम, माझे पणजोबा माणसं खाणारे होते. देवासमोर माणूस बळी द्यायचा नि तो भाजून मिटक्या मारीत खायचा, ही हजारो वर्षांपासूनची आमची परंपरा, आम्ही शरीराने माणूस. काळाच्या प्रवाहात माकडाचे असलेले शरीर माणसासारखे झाले एवढेच. पण आमचे मन ? आमचा व्यवहार ? आम्हांला जगण्याची दिशा दाखवताना शेकडो मिशनरींनी, धर्मगुरूंनी प्राण गमावले. 'करुणा आणि प्रेम' या दोन रेशमी हत्यारांच्या साहाय्याने आमच्यासारख्या लाखोंना माणसात आणले. कपडे घालायला, अन्न शिजवायला, झोपडी बांधायला, शेती करायला शिकवले. भाषेचा वापर शिकवला. आम्ही घनदाट जंगलात राहणारी, रानटी प्राण्यांशी आणि कोपलेल्या निसर्गाशी संघर्ष करीत जगणारी माणसं, ज्यांनी आमचे जगणे माणसांचे केले, त्यांनी शिकवलेला धर्म आमच्या मागच्या पिढ्यांनी सहजपणे स्वीकारला. किंबहुना तोच एकमेव धर्म आमच्या मनात रुजला. आमच्यासारखी एकदोन मुलं भारतातल्या शहरांत शिकण्यासाठी येतात. त्यामुळे देशातल्या मिशनऱ्यांबद्दलचे ऋण अधिक बळकट होत जाते.'<br>{{gap}}तो नागा मुलगा डॉक्टर झाला आणि नोकरीच्या मागे न लागता परत आपल्या परिसरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला गेला, त्याची पुढची पिढी तरी, 'मी भारतीय आहे आणि मग ख्रिश्चन आहे' असे सांगणारी असेल का ?<br>{{gap}}आठ मार्चच्या निमित्ताने गोव्याला मला निमंत्रण होते. गोव्याचे समुद्री सौंदर्य पाहण्याचीही इच्छा होती. व्याख्यानांच्या निमित्ताने अत्यंत देखणी देवळे पाहता आली.<br>{{gap}}घरासमोरच्या देवळीत सायंकाळी दिवा तेवताना पाहिला. खूप प्रसन्न वाटले. जवळ गेले तर त्या देवळीत चिमुकला क्रूस आणि समोर तेवणारी मेणबत्ती. माणसं कुठलीही असोत, कोणत्याही धर्माची असोत, तमसो मा ज्योतिर्गमय... अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा ध्यास-हीच त्यांची दिशा. शांतादुर्गेच्या देवळात गेलो तर एक नाचता झुलता स्त्रीपुरुषांचा जत्था देवीसाठी फुलांनी विणलेली छत्री वाहण्यासाठी येत होता. चौकशी केल्यावर कळले गावातले ख्रिश्चन दरवर्षी<noinclude>{{Right|प्रकाशाच्या दिशेने / ९३}}</noinclude>
pilvkcp8d7hpmt91mnz9z58x0ibj9dj
पान:मनतरंग.pdf/१०२
104
70496
154951
2022-07-21T15:11:29Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>देवीला फुलांची छत्री चढवतात. मी त्यांच्यात मिसळून काही महिलांना विचारले की ख्रिश्चन असूनही ही प्रथा कशी ?<br>{{gap}}"आमचे पूर्वज याच मातीतून जन्मले. याच मातीत मिसळून गेले. आमच्या पूर्वजांची देवी हीच. काळाच्या ओघात आमचे पूर्वज ख्रिश्चन झाले. त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न धर्मधुरीणांनी कधी केलाच नाही ?<br>{{gap}}"विहिरीत पाव टाकलेले पाणी प्यायले म्हणून पूर्वज ख्रिस्ती झाले. पण असे पाणी प्यायल्याने माणसाचा धर्म बदलत नाही, त्याची संस्कृती... जीवन पद्धती बदलत नाही, असा विश्वास दिला का कोणी त्यांना?"<br>{{gap}}"आमच्या मनातली या मातीबद्दलची, या देवीबद्दलची श्रद्धा नाहीशी कशी होणार?" मला मिळालेले उत्तर.<br>{{gap}}...संघर्ष, समन्वय आणि समरसता यातून 'वसुधैव कुटुंबकम' भूमिका घेणारी, विश्वात्मक परमेश्वराला 'जो जे वांछील तो ते लाहो' असे प्रार्थणारी आमची भारतीय संस्कृती...<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{rh|मनतरंग / ९४ ||}}</noinclude>
9xkhmmcfiokpgk4kg0cejrnbt8ewr7u
पान:मनतरंग.pdf/१०३
104
70497
154952
2022-07-21T16:23:30Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop
|Image = मनतरंग.pdf
|Page = 103
|bSize = 401
|cWidth = 285
|cHeight = 215
|oTop = 41
|oLeft = 47
|Location = center
|Description =
}}
{{gap}}त्या दोघींचे नवरे सरकारी नोकरीतले. एकीचा नवरा चक्रधर ड्राईव्हर. तर दुसरीचा कंडक्टर. दोघीही तीन-तीन लेकरांच्या आया. आणि दोघींनाही नवऱ्याने टाकले म्हणून माहेरी राहणाऱ्या दोघींची प्रकरणे आमच्या कुटुंब सल्ला आणि कायदा मदतकेंद्रात नोंदवलेली होती. एकीचे प्रकरण वर्षभर कोर्टात चालले. सततच्या पाठपुराव्यानंतर पोटगी मंजूर झाली. मुलांना प्रत्येकी शंभर आणि तिला दोनशे रुपये. असे दरमहा पाचशे रुपये तिला पोटगीदाखल मिळू लागले. चार माणासांच्या अन्न-वस्त्र-निवाऱ्यासाठी दरमहा पाचशे रुपये म्हणजे दिवसाकाठी माणशी चार रुपये नि बारा पैसे. त्यात दोन वेळचे जेवण तरी होते का? पण तरीही ती समाधानी होती.<br>{{gap}}"पदमिन को पाचसो रूपया महिना सुरू हो गया. मेरेकोच क्यू नही ? उसका मरद डाइवर होये तो मेरा भी कंडक्टर हाये. मेरा काम नही कऱ्या तो मै यहीचं बैठनेवाली हू बच्चो को लेके हॉ... बोल देती हूं परतिभाताई, मेरा भी तुमीच करना." रूखसाना बुबू प्रतिभाशी भांडत होती. आणि मी केंद्रात प्रवेश केला. 'देखो ना भाभी, ऐसा कैसा तुम्हारा कायदा? पदमिन को पोटगी, मेरेकू क्यो नही? तिने माझ्याही समोर सवाल फेकला. काय उत्तर होते माझ्याकडे ?<br><noinclude>{{Right|सवाल रूखसानाचा.../ ९५}}</noinclude>
nkbj9on9pz3uz8tmlkh2xwdvlgaptey
पान:मनतरंग.pdf/१०४
104
70498
154953
2022-07-21T16:27:14Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}रूखसानाचा नवरा कंडक्टर होता. सुरुवातीची सहा वर्षे सुखात गेली. दोन मुली आणि एक मुलगा यांना जन्म दिला. शहाण्यासारखी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली. अर्थात तीन मुलांची देखभाल करण्यात, घरकामात ती एवढी बुडून गेली की नवऱ्याला खूष करण्यासाठी छानछोकीने राहणे तिला जमेना. पूर्वीची देखणी रूखसाना, पिठात नि लेकरांच्या शी..शूत बुडालेली, गबाळी रूखसाना बनली. ती नवऱ्याला आवडेना. त्याने दुसरी मैत्रीण शोधली. त्याचा सारा पैसा या नव्या मैत्रिणीवर आणि दारूतच खर्च होई. पोटगीसाठी कोर्टातून केस करण्याचे ठरले. पण तिच्याच भावाने थोडे दिवस थांबायला सांगितले. कोर्टात गेलो तर तिचा नवरा तलाक घेण्यासाठी धर्मगुरूकडे जाईल. जवळच्या नातलगांना रूखसाना कशी त्रास देते, ते पटवून सांगील. आणि तलाक मिळाला तर सारेच दरवाजे बंद होतील, असे त्याला वाटत होते. 'ताई मैने भी रूखसाना आपा को समझाया. दुसरी शादी करेगा तो करने दो. दोनोको सम्हालेगा, तलाग देगा तो सबको कौन सम्हालेगा? तो मला पटवून देत होता. मी तिला परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. पण तिचे समाधान होत नव्हते.<br>{{gap}}आयरिन ही अत्यंत सेवाभावी वृत्तीची परिचारिका, दवाखान्यातील रोग्यांना नैतिक बळ देणारी, मानसिक आधार देणारी. सर्वांची लाडकी 'सिस्टर'. ती प्रोटेस्टेट पंथाची तर तिचा नवरा डॅनिल कॅथलिक होता. अत्यंत गोडबोल्या, पण मनाने विकृत. आणि दुष्ट. छळवाद सुरू झाला. सिगारेटचे चटके देण्यापासून ते पट्ट्याने मारण्यापर्यंत सर्व प्रकार तो हाताळी. ती कामावर असताना घरातील सर्व सामान विकून टाकण्यापर्यंत त्याची मजल गेली. तिच्या मैत्रिणींनी तिला आमच्या केंद्राचा पत्ता दिला. कोर्टात केस सुरू झाली. कॅथलिक धर्मरुढीनुसार घटस्फोट घेता येत नाही. परंतु त्यांचा 'पर्सनल लॉ...धर्माधारित व्यक्तिगत कायदा' वेगळा नसल्याने तिला न्याय मिळाला. अर्थात गावातील कॅथलिक ज्येष्ठांनी घटस्फोट घेणे कसे अयोग्य आहे, कुटुंबसंस्थाच अशाने कोसळेल वगैरे वगैरे सांगून आमच्या कार्यकर्त्यांना, वकिलांना पटवायचा प्रयत्न केला ती बात वेगळीच. आज आयरिन मनावरची दडपणे झटकून दवाखान्यातील रोग्यांची सेवा करण्यात मग्न आहे.<br>{{gap}}अशावेळी आठवतात बीजिंगच्या कुंभा मैदानावर आमच्यात झालेल्या गप्पा. पाकिस्तान, भारत, बांगला देशाच्या महिला मोकळेपणाने हिंदीतून गप्पा मारीत होत्या.<br><noinclude>{{rh|मनतरंग / ९६ ||}}</noinclude>
4c3t6ff0u2n5xrgsqljl5by395ce0z7
पान:मनतरंग.pdf/१०५
104
70499
154954
2022-07-21T16:29:21Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}प्रत्येक देशात एक 'कुटुंब कायदा' असायला हवा. धर्म कोणताही असला तरी कुटुंबाची रचना एकाच तऱ्हेची असते. पती-पत्नी, त्यांची मुले, त्यांच्यावर अवलंबून असलेले पालक आणि भावंडे. त्यांचे एकमेकांशी असलेले नाते, कर्तव्ये, यावर आधारित हा कायदा असावा. तो देशातील सर्वधर्मीय नागरिकांना समान असायला हवा, असे मत सर्वजणी मनापासून व आवेशाने व्यक्त करीत होत्या.<br>{{gap}}आज बीजिंगची महिला परिषद होऊन तीन वर्षे उलटून गेली आहेत. मोहिनी गिरी, वसुधा धागमवार, इंदिरा जयसिंग फ्लेविया, रझिया यांच्यासारख्या हजारोजणी आपापल्या परीने समान कुटुंब कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. कायदे करून तरी उपयोग काय ? पुस्तकातले कायदे मनात...कृतीत कधी लिहिले जाणार ?<br>{{gap}}रूखसाना अजूनही बाहेर बसून माझ्या उत्तराची वाट पाहतेय, उत्तर देण्याची शक्ती कधी येणार आहे ?<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{Right|सवाल रूखसानाचा.../९७}}</noinclude>
mcum1sb4k9cq4pj5hthne9e4e4w1yfn
पान:मनतरंग.pdf/१०६
104
70500
154955
2022-07-21T16:31:49Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop
|Image = मनतरंग.pdf
|Page = 106
|bSize = 393
|cWidth = 308
|cHeight = 230
|oTop = 32
|oLeft = 39
|Location = center
|Description =
}}
{{gap}}रामशास्त्रींच्या नावाने एक गोष्ट सांगितली जाते. ती रामशास्त्रीच्या नावाला शोभेशी आहे. त्या काळात पुण्यातील एक लाल लुगड्यातील बाई अप्रतिम प्रवचन करीत असे. तिच्या प्रवचनांची ख्याती त्या परिसरात पसरली होती. शास्त्रीजींना हे प्रवचन ऐकण्याची इच्छा झाली आणि ते आवर्जून तेथे गेले. त्या प्रवचनकार महिलेने शास्त्रीजींसमोर एक प्रश्न टाकला.<br>{{gap}}"शास्त्रीजी, परमेश्वराने तुम्हाला आणि मला, एकाच रीतीने जन्म दिला. स्त्री-पुरुषांना होणारे रोग सारखेच. भावभावना सारख्या, मग माझे पती वयाच्या आठव्या वर्षी मरण पावले म्हणून, वयात येताच मला विद्रूप केले. जीवनाचे, आनंदाचे सारे दरवाजे बंद करून टाकले. पण पुरुषाची पत्नी म्हातारपणी मरण पावली तरी त्याचा दुसरा विवाह मात्र १४ व्या दिवशीही होऊ शकतो. हे असे का ? निसर्गाने... परमेश्वराने आम्हाला न्याय दिला; पण समाजाने, धर्माने दिला का नाही ?"<br>{{gap}}शास्त्रीजी क्षणभर चक्रावले चकितही झाले. ते उत्तरले-<br>{{gap}}"बाई गं, तुझा प्रश्न योग्य आहे. आजवरचे कायदे पुरुषांनी केले. त्यात तुमच्या अडचणींचा आम्ही विचार केला नाही. पण एक दिवस असा येईल त्यावेळी ज्ञानाच्या बळावर महिलांत कायदे करण्याची क्षमता येईल, ताकद येईल.<noinclude>{{rh|मनतरंग / ९८ ||}}</noinclude>
c13e5yr934q480tyic3rtaduvfh9f2o
पान:मनतरंग.pdf/१०७
104
70501
154956
2022-07-21T16:35:44Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>त्यावेळी स्त्रियांना न्याय देणारा कायदा अस्तित्वात येईल."<br>{{gap}}जे पुरुष ज्ञानी होते. ज्ञानाइतकीच ज्यांची संवेदनशक्ती तरल होती त्यांना स्त्रीचे... विधवा बालिकेचे तरुणीचे दुःख कळले होते. भास्कराचार्यांची कन्या लीलावती वयाच्या आठव्या वर्षी वैधव्याचा शाप घेऊन माघारी वडिलांकडे आली. ते दु:ख विसरण्यासाठी भास्कराचार्यांनी गणित शास्त्राचा ग्रंथ लिहिला. लीलावतीला ज्ञान दिले. ग्रंथाला लीलावतीचे नाव दिले.<br>{{gap}}चौदा वर्षाच्या भावजयीला तिच्या पतीच्या शवाबरोबर 'सतित्वा'च्या नावाखाली सर्वांदेखत कोडकौतुकाने जाळण्यात येत असल्याचे पाहून राजा राममोहन राय याचा आत्मा तळमळला. त्या आगीत भाजून निघाला आणि एका संवेदनशील धाडसी दिराने लक्षावधी भावजयींची लादलेल्या सतित्वातून सुटका केली.<br>{{gap}}तेल्यातांबोळ्यांचे पुढारी म्हणून गौरविलेल्या लोकमान्यांनी आगरकरांच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेला कडाडून विरोध केला. कारण पारंपरिक विचारांवर पोसलेल्या गतानुगतिक समाजात इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध लढण्याची आग पेटवणे हे लोकान्यांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे आणि पहिले ध्येय होते. त्यांना आगरकरांच्या विचाराबंद्दल कृतज्ञता नव्हती असे थोडेच आहे ?<br>{{gap}}महात्मा फुल्यांनी तर ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्मलेल्या अनौरस बाळाला औरस पितृत्व दिले. सावित्रीसारखी आई दिली. शाहू महाराजांनी मुलींच्या शिक्षणाची सोय केली. डॉ. बाबासाहेबांनी दलित समाजातील स्त्रियांना लुगडे पायाच्या टाचेपर्यंत येईल असे नेसावे हे आवर्जून सांगितले. सवर्णाच्या स्त्रियांनी अंगभरून लुगडे नेसायचे आणि इतर स्त्रियांनी मात्र पोटऱ्या उघड्या ठेवणारे लुगडे का नेसायचे. असा सवाल त्यांनी केला. 'शील गहाण टाकून कुठे स्वातंत्र्य मिळते का ?' असा जळजळीत सवाल त्यांनी बहिष्कृत भारताचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रासमोर टाकला. आणि असा सवाल टाकणाऱ्या महात्म्याने भारताची घटना रचली. म्हणूनच आम्हां भारतीय स्त्रियांना १५ ऑगस्ट १९४७ ला सर्वांबरोबर स्वातंत्र्य मिळाले. इंग्लंड, अमेरिका आदी पाश्चात्त्य देशांतील महिलांसारखे मुक्तीसाठी लढे द्यावे लागले नाहीत.<br>{{gap}}कागदोपत्री स्वातंत्र्य मिळाले हे खरेच, पण हे स्वातंत्र्य समाजाच्या 'मना' ने मान्य केले आहे का ?<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{Right|समाज मना'चे खरे स्वातंत्र्य / ९९}}</noinclude>
rda415owc3nkzelh6crvnicw2y1zobs
पान:मनतरंग.pdf/१०८
104
70502
154957
2022-07-21T16:38:44Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop
|Image = मनतरंग.pdf
|Page = 108
|bSize = 393
|cWidth = 245
|cHeight = 215
|oTop = 35
|oLeft = 39
|Location = center
|Description =
}}
{{gap}}यंदा आंब्याची झाडं पानोपानी मोहरली आहेत. घनदाट आंबाड्यावर मोतियारंगी सुरंगीच्या फुलांचे गच्च वळेसर माळून झोकात उभ्या असलेल्या सावळ्या कोळिणीची आठवण करून देणारी ही झाडं जागोजाग उभी आहेत. जणू पानांनी पंख आतल्या आत मिटून घेतले आहेत आणि इथून-तिथून उभारल्या आहेत मोहोराच्या गुढ्या, प्रत्येक झाडाच्या मोहोराचा रंग वेगळा, कुठे लालसर रंगाची महिरप तर कुठे पिवळसर रंगाची झूल, कुठे आकाशाची निळाई झेलणारी शुभ्रता तर कुठे मोतिया रंगाचा नाजूक नखरा.<br>{{gap}}मोहोर हा शब्दच किती चित्रमय, न मोजता येणान्या लक्षावधी चिटुकल्या टिंबकटू कळ्यांचा हा झुलता मनोरा. मंद तरीही मादक गंधाने घमघमणारा. हा गंध अवघ्या आसमंताला कवेत घेतो.<br>{{gap}}संध्याकाळची वेळ, घरी परतताना नाक एकदम जागे झाले. नकळत दहादिशांनी श्वास घेऊन काही शोधू लागले आणि नजरेने वेधले. आंब्याचे आकंठ मोहरलेले झाड. मनाशी खूणगाठ बांधली की थंडी आता साईसुट्यो म्हणणार आणि क्षितिजापल्याड पळून जाणार. माझ्या डोळ्यासमोर हिरव्यागार कैऱ्यांचे घुंगरू केसांत बांधून झुलणारी बंजारन उभी राहिली.<br><noinclude>{{rh|मनतरंग / १०० ||}}</noinclude>
jv4vrz69ra3cjgb67bz29egoj1gp355
पान:मनतरंग.pdf/१०९
104
70503
154958
2022-07-21T16:41:47Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}हे मोहोराचे दिवस तसे क्षणजीवीच ! मोहाराचे देखणेपण डोळाभर अनुभवण्याआधीच बाळकैऱ्यांचे डूल पानापानातून डुलू लागतात आणि कैरीच्या खमंग लोणच्याची चव जिभेलाच नव्हे तर जिवाला चटक लावून जाते.<br>{{gap}}आंब्याचा मोहोर झडू लागतोय तोवर कडुलिंबाच्या झाडांवरून गंधकिन्नरींचा मेळा दहादिशांनी धावू लागतो. कडुलिंबाला 'कडू' का म्हणावे असा प्रश्न पडावा इतका गोड वास या फुलांना... नव्हे मोहराला असतो. ज्वारीच्या दाण्याइतकी चिमुकली, पण पूर्णफुलाचा आकार असलेली ही विलक्षण नाजूक फुलं, पानांची हिरवाइ झाकून टाकतात. चैत्रातली कडुलिंबाची मोहरलेली डौलदार पेढेघाटी झाडं पाहिली की वाटतं चादणं चार दिवसाच्या सुट्टीसाठी जणू या 'माथेरान'ला आलंय.<br>{{gap}}मी पुसदला निघाले होते. शिवरात्र मावळली की, उन्हाचे फुलोर चटचटायला लागतात, त्यातून पंचवीस वर्षापूर्वीचा 'यष्टी' तला प्रवास! तेव्हाच्या 'एस्टी'चा निळा रंगही म्हातारीच्या तव्यासारखा तापायचा. तर अशा या भर दुपारच्या प्रवासाला वैतागून मी खिडकीबाहेर नजर टाकली नि काय ? भवतालचे डोंगर...नव्हे टेकड्या लालचुटूक फुलांनी अगदी आकंठ लखडल्या होत्या. पानांचा कुठेच पत्ता नाही. फक्त लालड्या पोवळ्यांनी रुमझुमणारी झाडं. न राहवून मी शेजारच्या माणसाला विचारलंच की ही झाडं कोणती आणि तो माझ्याकडे चकित नजरेने पाहू लागला, नि विचारले "बहिन येवढं बी म्हाईत न्हाई तुले ? काहूनची हाईस ?"<br>{{gap}}ती पळसाची झाडं होती. तेव्हा कुठे लक्षात आलं की 'पळसाला पाने तीनच' असे का म्हणतात ते ?<br>{{gap}}घर आणि कॉलेजच्या वाटेवर एक कुठलंसं झाड आहे. वर्षभर ते कधीच नजरेला साद घालत नाही. पण एक दिवस अचानक लक्षात येते की शेलाट्या बांध्याची नववयसा नृत्यांगना पोपटी अंजिरी रंगाची रेशमी ओढणी सावरीत कुणाची तरी वाट पाहत उभी आहे... चार-दोन पावलं पुढे यावे तर जाणवते की गेला महिनाभर पिवळ्या रंगाच्या खुळखुळ पहाड्या शेंगा अंगभर वागवीत बसलेल्या ध्यानस्थ शिशिराचेही डोळे उघडू लागले आहेत. विलक्षण मदिर गंधाने भारून टाकणारी फिक्कट हिरव्या पांढऱ्या रंगाची फुलं आता वसंताच्या स्वागतासाठी चवऱ्या ढाळू लागली आहेत. अशावेळी 'कालनिर्णया' वर नजर न टाकताच<noinclude>{{Right|मोहोराचे दिवस/१०१}}</noinclude>
n07y11cjo8hdpc51tsz7py1cf60xoqe
पान:मनतरंग.pdf/११०
104
70504
154959
2022-07-21T16:43:20Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>कळते की, होळी उंबरठ्यावर उभी आहे नि पाडवा पल्याड उभा राहून साखर बत्ताशाच्या माळांनी सजलेल्या रेशमी गुढ्यांची वाट पाहतोय.<br>{{gap}}हे मोहरलेले दिवस आणि मोहराचे दिवस झोपाळ्यावाचून झुलायचे दिवस. प्रत्येक क्षण ओंजळीत भरभरून झेलायचे दिवस. हे दिवस अचानक अंगणात येतात नि त्यांचा मृदुमुलायम स्पर्श अनुभवण्याच्या आत उडूनही जातात.<br>{{gap}}...पण त्या मोहरलेल्या आठवणी ? त्या मात्र हृदयाच्या गाभाऱ्यात अगदी जपून ठेवायच्या. या वसंतमोहोराच्या आठवणी जे जीवाभावाने आठवीत राहातात त्यांना साठींची दृष्ट लागत नाही म्हणे !!<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{rh|मनतरंग / १०२ ||}}</noinclude>
lj8fglebjyatvlxy53gfb604u4rfevd
सदस्य चर्चा:किशोर दत्तात्रय सोनवणे
3
70505
154960
2022-07-22T01:39:16Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=किशोर दत्तात्रय सोनवणे}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) ०७:०९, २२ जुलै २०२२ (IST)
oqvia7ni5wr31gso0730gjb59iz9ibe
पान:मनतरंग.pdf/१११
104
70506
154961
2022-07-22T04:43:54Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop
|Image = मनतरंग.pdf
|Page = 111
|bSize = 399
|cWidth = 303
|cHeight = 212
|oTop = 35
|oLeft = 39
|Location = center
|Description =
}}
{{gap}}'स्वत:च्या लेकीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला सात वर्षाची सक्तमजुरी'. दैनिकातील ही बातमी वाचून मन अक्षरश: फाटून गेलं आणि त्याच पानावर अत्यंत ठळक अक्षरात कविकुलगुरू कसुमाग्रजांच्या निधनाचे वृत्त. माझ्या मनासमोर ओळी लकाकल्या, त्यांच्या कवितेच्या-
{{Block center|<poem>“साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध
हक्क आहे फुलण्याचा
जन्म असो माळावरती
अथवा शाही उद्यानात
प्रत्येक कळीला हक्क आहे
फूल म्हणून जगण्याचा."</poem>}}{{gap}}हा जन्मसिद्ध हक्क किती कळ्यांना मिळतो? या बापाची ही चौदा वर्षांची कन्या. रात्रीची वेळ. बाप गच्च दारू पिऊन घरात आला. पाणी मागितले. थकलेल्या मायीचा डोळा लागलेला. म्हणून लेक पाणी आणायला स्वयंपाक घरात गेली. पण बापाच्या तरी डोळ्यांना लेकीच्या जागी एक बाई... उपभोग<noinclude>{{Right|फुलण्याचा जन्मसिद्ध अधिकार बापच नाकारतो तेव्हा... / १०३}}</noinclude>
3h3luqp7r7cwhi4k6q1qrxlktjgr3rs
पान:मनतरंग.pdf/११२
104
70507
154962
2022-07-22T04:47:24Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>घेण्याची भावली दिसली. मायीच्या हृदयातल्या आणि शरीरातल्याही आईने सत्य समोर ठेवले, त्या नराधमाला सात वर्षांची शिक्षा झाली. पण त्या कळीचे काय ? त्या कळीचा फुलण्याचा जन्मसिद्ध हक्क तिला या समाजात मिळेल ? शरीराच्या जखमा.. घाव, कालांतराने भरून निघतात. पण त्या चौदा वर्षाच्या कळीच्या मनावरचा घाव भरून येईल ? तो भरून यावा, तिला समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी तिच्या भवतालची माणसे, नातलग मदत करतील तिला ?<br>{{gap}}चार वर्षापूर्वी मुंबईच्या वेश्या विभागातून सुमारे साडेतीनशे बालिकांची सुटका पोलीस विभागाने केली. त्यापैकी दोनशेहून अधिक मुली नेपाळमधल्या होत्या. त्या मुलींचे पालक, नेपाळ शासन, त्या परिसरातील स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून, एकशे ब्याण्णव मुली नेपाळला परत पाठविण्याचा निर्णय शासनाने घेतला. मुली एअर इंडियाच्या विमानाने पाठविल्या जाणार होत्या. वेश्यावस्तीतून... त्या भयानक अत्याचारातून सुटका झालेल्या कळ्या... ज्यांनी सोळावे वर्षही पार केले नव्हते, या विमानातून जाणार होत्या. त्या विमानातन जाणाऱ्या इतर प्रवाशांनी आपली तिकिटे कॅन्सल केली. तात्काळ रद्द करून टाकली. असल्या मुलींबरोबर गेल्याने ही मंडळी अपवित्र होणार होती म्हणे!<br>{{gap}}सर्वच आशियाई देशांमधून कळ्यांचा व्यापार जोरात चालतो. नेपाळ, थायलंड, भारत यात अग्रेसर आहेत. बेसुमार वाढणारी लोकसंख्या... मग माणसांचाही व्यापार. अर्थात व्यापार म्हटला की मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्रातला सिद्धान्त आलाच. पाश्चात्त्य देशांनी, युरोपीयन देशांनी शेकडो वर्षांपासून आमचा कच्चा माल लुटला, तीच परंपरा आजही !<br>{{gap}}पटायामधली ती संध्याकाळ, आजही अंगावर सर्रकन काटा उमटवून जाणारी. जागतिक महिला परिषदेतून परतताना थायलंडमध्ये चार दिवस थांबलो होतो. तेथे पोटासाठी सर्वसामान्य स्त्रीला शरीर विकावे लागते असे ऐकले होते. अंगाला मसाज करणारी, अंग रगडून देणारी विद्यापीठे असतात म्हणे तिथे. हे सारेच पाहायचे होते. पटायाच्या समुद्रकिनाऱ्याने मैलोनमैल आम्ही चालत होतो. उजवीकडे विलक्षण देखणा समुद्र. मध्यात रस्ता आणि डावीकडे अर्धुक्या उजेडाची 'मोटेल', 'इन' नावाची दुकाने. त्यात सजूनधजून बसलेल्या मुली. सौदा पटला, गिऱ्हाईक मिळाले की समोरचा समुद्र किनारा गाठायचा. जेमतेम चौदा पंधराची, जिच्या डोळ्यातले बालपण अजून चिवचिवते आहे अशी मुलगी<noinclude>{{rh|मनतरंग / १०४ ||}}</noinclude>
tkpvijeo9xcvr1x7add0h32zra7b8tm
पान:मनतरंग.pdf/११३
104
70508
154963
2022-07-22T04:49:19Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>आणि सत्तरी पार केलेला हौशी म्हातारा. अशा कितीतरी जोड्या...<br>{{gap}}गेल्या दहा पंधरा वर्षांपासून पाश्चात्त्य देशांतले म्हातारे पुरुष पर्यटन करायला थायलंड, नेपाळ, भारत येथे मोठ्या प्रमाणावर येतात. थायलंडमध्ये तर जास्तच. त्यांना तेरा-चौदा वर्षांच्या मुली आणि मुले हवी असतात... कळ्यांचा व्यापार थांबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. वाढत्या विमेन ट्रॅफिक... स्त्रियांच्या व्यापाराला, थांबवता कसे येईल यासाठी शासन, स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते यांच्या कार्यशाळेत एक नेपाळी कार्यकर्ती तळमळीने बोलत होती.<br>{{gap}}जोवर समाजाचे मन माणसाचे होत नाही, त्यावरील धार्मिक, सामाजिक, अंधश्रद्धांची पुटे गळून पडत नाहीत, नवनवीन व्यसनांच्या चिखलातून ते बाहेर येत नाही, दोन वेळच्या भाकरीच्या चिंतेतून त्याची सुटका होत नाही, तोवर समाजातील कळ्यांना फुलण्याचा जन्मसिद्ध अधिकार मिळणार कसा?<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{Right|फुलण्याचा जन्मसिद्ध अधिकार बापच नाकारतो तेव्हा.../१०५}}</noinclude>
s2irxot2rwfbisv71qjy54j1ezgnplf
पान:मनतरंग.pdf/११४
104
70509
154964
2022-07-22T04:51:38Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop
|Image = मनतरंग.pdf
|Page = 114
|bSize = 398
|cWidth = 264
|cHeight = 228
|oTop = 26
|oLeft = 54
|Location = center
|Description =
}}
{{gap}}"पाकिस्तानातल्या सामान्य माणसांना भारतातील लोकांबद्दल खूप खूप प्रेम आहे. येथील जीवनाबद्दल उत्सुकता आहे. तेथील स्त्रिया तर रस्त्यातून जाताना थाबून थांबून चौकशी करीत. एक गोष्ट माझ्या मनात खूप बसली की तुम्ही कुठेही जा. अगदी कराची, लाहोरसारख्या शहरांत किंवा खैबर खिंडीतील लहान लहान वस्त्यांवर. स्त्रियांचा पोषाख अगदी अंग भरून असतो. बुरखा बाहेर जाताना जरूर घालीत असतील. पण शेतात, घरात काम करताना बुरखा घालून कसे चालेल ? पण त्यांची ओढणी अतिशय नेटकेपणाने माथा झाकून घेतलेली असते. कुठेही शरीराचे प्रदर्शन नाही."<br>{{gap}}माझी मैत्रीण गेल्या डिसेंबरमध्ये दहा दिवस पाकिस्तानात जाऊन आली होती. ही मैत्रीण मुंबईकरीण. लिप्स्टिक, क्रीम, सेंट या बाबी दैनंदिन गरजेच्याच मानणारी. अशीच कुटुंबे भवताली राहणारी. आजकाल महानगरातील सर्वसामान्य समाजात या 'वस्तू' जीवनावश्यक झाल्या आहेत. आम्ही दिल्लीला पुरस्कार घेण्यासाठी गेलो होतो तेव्हाची गोष्ट. मी आणि माझ्याबरोबर पुण्याकडील खेड्यातून बालसदनचे बालमजुरांच्यासाठी शिक्षणाचे काम करणाऱ्या एक बाई. तिथे एका विख्यात कार्यकर्त्याच्या घरात आमची सोय केली होती. कार्यकर्ते व कुटुंब<noinclude>{{rh|मनतरंग / १०६ ||}}</noinclude>
976d1uuzkbtg3kpbgsw3sb1sj4n7cse
पान:मनतरंग.pdf/११५
104
70510
154965
2022-07-22T04:54:38Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>परदेशात सुट्टीसाठी गेलेले. पण घरात आचारी, धुणी, भांडी, झाडझूड करणारी एक महिला आमच्या सेवेसाठी सज्ज. टिकल्यांचे भरतकाम केलेला झगमगीत लेहेंगा, आरशांची गोंडेदार चोळी आणि अगदी साजेशी... मॅचिंगवाली लेहरेदार ओढणी. जणू समुद्राच्या लाटा ओढणीवर नाचताहेत ! लिप्स्टिक, डोळ्यात सुरमा, चेहेऱ्यावर मेकअपची कल्हई. सारे साग्रसंगीत. आमचे आंघोळीचे पाणी काढून दिल्याचे सांगायला आली तेव्हा तिने आदबीने सांगितले.<br>{{gap}}"मॅडम, ड्रेसिंग टेबलपे मेकअपका पुरा सामान रखा है, आप इस्तेमाल कर सकते है."<br>{{gap}}मी न राहवून तिला नाव विचारले. गाव विचारले, शिक्षण, मुलं वगैरे आलेच. ती मूळ पंजाब-राजस्थानच्या सीमेवरच्या खेड्यातली. पोटासाठी माहेर आणि सासरच्या दोन पिढ्यांमागचे लोक दिल्लीत येऊन स्थिरावले. शिक्षण म्हणजे काला अक्षर भैस बराबर. कळायला लागलं की, आईसोबत कामाला जायचे. वयात आली मुलगी की, सगाई मग ब्याह.<br>{{gap}}"काय सुरेख मेकप केला आहेस गं. कुठे शिकलीस ? आणि एवढ्या महागाईची क्रिम्स परवडतात तुला...' मी शब्दांत कौतुकाचे फुगे भरून विचारले.<br>{{gap}}"मैडम, यह दिल्ली है. इथे चांगल्या पगाराचं काम मिळवायचं तर असं सजधजकेही रहेना पडता. भलेही ते काम झाडझुडीचे असो. आता माझंच पहाना. लग्न झालं बारव्यासाली. 'गौना' झाला तेव्हा पंधराची होते. पाच बरसात तीन लेकरं जलमली. सुसराजी, माझा नवरा, दीर मिळून पंधरा हजार घरात येतात. पण खाणारी आम्ही आठ माणसं. झोपडीचा किराया जातो दीड हजार रूपये मग मी पण कामाला जाऊ लागले. ही वस्ती मोठ्यांची हाय. हितं मला निसत्या धुणं, भांडी नि झाडझुडीचे ढाई हजार मिळतात. तुमी हितल्या कोनच्या पन घरातली झाडुवाली पहा. ती अशीच दिसंल माज्यासारखी. ढाई हजारातले चार-दोनशे रूपये थोबाडावर घालायचे. पण काम तर इज्जतीचं हाय. पण रस्त्यावरून जाताना मन घाबरतंच. अशा वेळी हातभर घुगट ओढून घ्याचा नि सरसर घर गाठायचं !" सुखदा सांगत होती.<br>{{gap}}पाकिस्तानातल्या आठवणी ऐकताना सुखदाची आठवण झाली. माझ्या मैत्रिणीला पाकिस्तानातल्या स्त्री पोलीसही भेटल्या. काही बास्केटबॉल खेळाडू भेटल्या. पोलीस महिलेस मैत्रिणीने विचारलं की, त्यांचा घोळदार पोषाख, विशेषतः<noinclude>{{Right|मत बाँटो इन्सान को ! / १०७}}</noinclude>
n3j3xsir8e01dopp4sm39ypll9y3b5l
पान:मनतरंग.pdf/११६
104
70511
154966
2022-07-22T04:56:45Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>ओढणी अडचणीची नाही होत ? त्या मुलीने लगेच आपल्याकडे सोवळ्या बायका लुगडं नेसताना डोक्यावरून कान न झाकता पदर घेतात, तशी ओढणी लपेटून दाखवली. कमरेला गच्च बांधून कुठेही कसे चढता येते, रायफल चालवता येते तेही दाखवले. पण एक खंत मात्र तिने बोलून दाखवली, "आम्ही कष्टाला तयार आहोत. भरपूर मेहनत करून शिक्षण घेतले. पण महिलांना बंदूक चालवायला शिकवूनही त्यांच्या हातात ती देत नाहीत. कारण काय तर स्त्रिया अत्यंत तापट आणि मनावर, भावनेवर ताबा न ठेवणाऱ्या असतात. त्यांच्या हातात बंदूक दिली तर नको ते घडेल म्हणे. तुमच्याकडेही असेच आहे ?" तिने प्रश्न विचारला होता. माझ्या मैत्रिणीने किरण बेदी, मीरा बोरवणकर, श्रीदेवी गोयल यांच्या शौर्याच्या सत्यकथा तिला सांगितल्या.<br>{{gap}}"म्हणूनच आम्हाला तुमच्या देशाबद्दल, तेथील महिलांना मिळणाऱ्या संधीबद्दल उत्सुकता आहे, प्रेम आहे, आमचा धर्मावर विश्वास आहे. आम्हांला अंगाचे प्रदर्शन करणे मुळीच आवडत नाही. पण आम्हालाही पुरुषांसारखीच संधी मिळायला हवी." ती म्हणाली.<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{rh|मनतरंग / १०८ ||}}</noinclude>
oe0ejsfgzlcpkxvfj6590wwz1rr95zv
पान:मनतरंग.pdf/११७
104
70512
154967
2022-07-22T04:59:17Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop
|Image = मनतरंग.pdf
|Page = 117
|bSize = 395
|cWidth = 222
|cHeight = 216
|oTop = 35
|oLeft = 57
|Location = center
|Description =
}}
{{gap}}काटेरी उन्हाच्या बाभळी आता चांगल्याच पेटायला लागल्या आहेत. आणि त्या ज्वालांच्या आगीत परीक्षांच्या काहिलीची भर, हातात अभ्यासाच्या विषयाचे पुस्तक... म्हणजे दोन तासात पासिंगची गॅरंटी'. 'वाचा, लिहा नि पास व्हा' वगैरे दोस्त, हातात घेतले की डोळे पेंगुळतात. झोप अक्षरशः डोळ्यातून वाहू लागते. मग आई नाहीतर बाबा येतात. हलवून जागं आणतात. अशा वेळी आपण अगदी सहजपणे डोळे उघडतो नि सांगतो,<br>{{gap}}"छे छे, जागीच आहे मी. किंवा जागाच आहे मी. जरा मनन करीत होतो. सर म्हणाले, एकदोन पानं वाचत जा. नि त्यावर चिंतन करत जा, म्हणून चिंतन करीत होतो..."<br>{{gap}}बहुतेक मध्यमवर्गीय घरातली ही कथा. जिथे आई-बाबांची पाखर आहे. दोन वेळेला कौतुकाने, मनाजोगे जेवायला मिळते तिथली. जरा आणखीन पुढे जाऊया. एखाद्या महाविद्यालयाचे गरीब विद्यार्थ्याचे वसतिगृह. नाहीतर अगदी गल्लीबोळातले पत्र्याचे घर. जिथे ग्रामीण भागातील चारसहा मुलं एक चूल मांडून राहतात. गावाकडून पीठमीठ घेऊन यायचे. हातानेच भाकऱ्या थापायच्या. चटणी, कांदा आणि पाण्याबरोबर पोटात ढकलायच्या. यांच्या त्यांच्या नोटस् मागून<noinclude>{{Right|काटेरी मौसम/१०९}}</noinclude>
0xl1jzz4x1rimzllpl5u4tlyzvhnduv
पान:मनतरंग.pdf/११८
104
70513
154968
2022-07-22T05:03:52Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>आणायच्या, पुस्तकं आणायची, थकलेले डोळे फाडफाडून अक्षरे वाचत राहायची. मेंदूत ठसवीत राहायची. एखाद्या क्षणी अशी डुलकी लागणार की जणू काही काळ जग बुडून गेलंय...<br>{{gap}}"ए पोरी ते परिक्साफिरिक्सा ऱ्हाऊंदे बाजूला. हितं जल्माची परक्साहाय. म्होरल्या साली द्ये पेपर. समोरच्यान् ला त्याच दिसी येळ हाय. पोरगं दोन दिस सुटीवर आलंय. त्यात बक्कळ पोरी पाहिच्यात, आन् पसंत क्येली तर परिक्सेआंदीच पोरगी पास आमची ! काय ?"<br>{{gap}}शिकण्यासाठी तालुक्याच्या गावी वसतिगृहात राहणाऱ्या मुलीला घरी घेऊन जायला आलेल्या वडलांचे फर्मान.<br>{{gap}}काही घरांच्या खिडक्यांतून रात्रभर जागणाऱ्या दिव्यांचा झगमगाट, मधूनच फास्ट फटफटीचे आवाज. मग हलक्या पावलांनी येणारी जाणारी माणसे. हलक्या आवाजातली खुसरफुस... खुसरफुस. दुसऱ्या दिवशी पेपर फुटल्याच्या, मुख्य प्रत मुख्य ठिकाणातून दहा हजाराला गावातून पोचल्याच्या आणि त्याच्या हजारो झेरॉक्स प्रती दोनशेला एक या भावात विकल्याच्या, हवेतून उडणाऱ्या वावड्या.<br>{{gap}}"त्या अमक्या मास्तरानं तमक्या गल्लीतल्या पोराच्या अंगाला बांधलेल्या कॉप्या त्याला उघडा करून काढल्या,' "त्या मास्तराला संध्याकाळी धरलं ना खडकावरच्या पोरांनी. चोळामोळा करून रस्त्यात फेकून निघून गेले."<br>{{gap}}"अरे पण कशाला डोळे उघडे ठेवून वर्गातून फेऱ्या मारायच्या? आपणच डोळे उघडले नाही तर कशा सापडणार कॉप्या ? नि मग पकडणार तरी कोणाला? डोळे मिटून दूध प्यायचे बस् !"<br>{{gap}}"चिनू ,आज्जी गावाला जातेय. तुझी परीक्षा आहे ना परवा ? तिला जय करून टाक बेटा' चार वर्षांच्या गोंडस पिल्लाची आई त्याला बजावतेय.<br>{{gap}}"कैसी चल रही है स्टडी ? मै तो तंग आ गयी बाबा. दिनभर खाना पकाना, घरका काम और रातमे स्टडी. ये बारवी का साल..." एका 'अभ्यासू' आईचे फोनवरून दुसऱ्या 'अभ्यासू' आईशी बोलणे.<br>{{gap}}परीक्षांचा मौसम सुरू झाला की विद्यार्थी, त्यांच्या आया यांचे हालच ! हो आयांचेच!<br>{{gap}}पूर्वी बाजार करणे, मुलांना दवाखान्यात नेणे, मुलांचा अभ्यास घेणे<noinclude>{{rh|मनतरंग / ११० ||}}</noinclude>
06nbosaojcoyynlszmrufppuwdig1gz
पान:मनतरंग.pdf/११९
104
70514
154969
2022-07-22T05:08:57Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>वगैरे कामं घरातले पुरुष करीत. पण आता असे म्हणतात, जगातील एकूण श्रमापैकी ६७ टक्के श्रम स्त्रियांच्या नावावर आहे. ही बातही उन्हाची तलखी वाढवणारी !<br>{{gap}}वयाच्या चौथ्या वर्षापासून परीक्षा द्यायला जे सुरुवात करायची ती थेट पंचविशी ओलांडेपर्यंत. किंवा मग कितीही वर्षे; आम्ही इंटरला होतो तेव्हा एक पन्नाशीच्या 'विद्यार्थिनी' नऊवार साडी भव्य कपाळावर चंद्रकोर, हातात घड्याळ अशा थाटात सायकलवरून कॉलेजला येत.आमच्याच वर्गात होत्या. लॉजिकची समीकरणं पाठ करता करता डोकं थकून जायचं. पण मावशींच्या जिभेवर समीकरणं अगदी गोंदलेली. शेवटी आम्ही रहस्य विचारलं. त्यांचं उत्तर असं,<br>{{gap}}"अग सोपं आहे फार. मी समीकरणांचे कागद भिंतीला चिटकावून ठेवलेत. पोळ्या करताना, भाजीला फोडणी देताना अगदी देवाला फुलं वाहताना सुद्धा तेच डोळ्यासमोर असते. मग न कळत मनाट फिट्ट बसते. पोरींनो, मी काही नोकरीच्या हिशेबाने शिकत नाहीये. मला खूपखूप हौस आहे शिकायची. बस!"<br>{{gap}}परीक्षांचा ताण दिवसेंदिवस वाढत चाललाय. शिकणे, अभ्यास, परीक्षा या बाबी जगाबद्दलच्या उत्सुकतेशी, ज्ञानाशी बांधलेल्या राहिलेल्या नाहीत. त्या व्यवसाय, उपजीविका यांच्याशीच केवळ जोडल्या गेल्या आहेत. मग या परीक्षा केव्हाही आणि कुठेही घेतल्या तरी हवा 'गरम' करणारच !!<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{Right|काटेरी मौसम /१११}}</noinclude>
oc3hj9vt90y86aehahkdaet52j1f9tw
पान:मनतरंग.pdf/१२०
104
70515
154970
2022-07-22T05:11:28Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop
|Image = मनतरंग.pdf
|Page = 120
|bSize = 399
|cWidth = 276
|cHeight = 215
|oTop = 36
|oLeft = 42
|Location = center
|Description =
}}
{{gap}}आशियाई स्त्रियांच्या मानवी हक्कांबाबत जागरूकपणे कार्य करणारी एशियन वुमेन्स ह्युमन राईट कौन्सिल (AWHRC) ही संघटना आणि स्त्रियांच्या प्रश्नांवर आग्रही भूमिका घेऊन काम करणारी 'विमोचना' संघटना, या दोहोंनी मिळून बंगलोरला चार दिवसांची परिषद घेतली होती. परिषदेचा विषय होता, 'बोलणारी झाडे... जेव्हा स्त्रियाही बोलू लागतात.' इंडोनेशिया, फिलिपाईन्स, ट्युनिशिया, नेपाळ, चीन आदी देशांतून आणि अवघ्या भारतातून शेकडो स्त्रिया आणि संघटना आपापल्या भागातले प्रश्न आणि त्या प्रश्नांनी झुंजणाऱ्या स्त्रियांना घेऊन आल्या होत्या.<br>{{gap}}पहिल्या सायंकाळी बांबूनी वेढलेलेल्या वनात माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी लढताना मृत्यूला सामोरे गेलेल्या स्त्रियांना श्रद्धांजली वाहिली, गोलाकार बसलेले कार्यकर्ते, मध्यात रांगोळीची सुरेख वर्तुळाकार नक्षी. प्रत्येक गट आपापले प्रश्न आणि कामाची ओळख सांगण्यासाठी त्या वर्तुळात येई. प्रत्येकाच्या हातात कागदाच्या नक्षीदार चौकोनात पेटलेला दिवा. तो दिवा त्या वर्तुळात ठेवत आणि थोडक्या शब्दांत प्रश्न मांडत. कुणी मूकनाट्याच्या साह्याने, तर कोणी संगीताच्या साह्याने किंवा नृत्याच्या तालात. झारखंडातील<noinclude>{{rh|मनतरंग / ११२ ||}}</noinclude>
i8xpao2u0h2bfwnt5i646ywg4m0w1za
पान:मनतरंग.pdf/१२१
104
70516
154971
2022-07-22T05:14:32Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>आदिवासी स्त्रियांचे प्रश्न मांडले होते रामदयाल मुंडा यांनी. बोलण्याला साथ होती बासरीच्या आदिम स्वरांची त्यांनी सांगितलेली मिथककथा आजही अंगावर काटा आणते...<br>{{gap}}...या आदिवासींचा डोंगर देव मारंगबुरू. तो ठरावीक रात्री पुरुषांना ज्ञान देई आणि स्त्रियांना कसे ताब्यात ठेवायचे याची विद्या शिकवी. त्यामुळे स्त्रियांना खूप त्रास होई. स्त्रियांनी एकत्र येऊन गुफ्तंगू केले आणि एक युक्ती केली. पुरुषांना दारूची आवड. ज्या रात्री देव ज्ञान आणि विद्या देतो त्या दिवशी स्त्रियांनी पुरुषांना भरपूर दारू पाजली. पुरुष दारू पिऊन धुंद झाल्यावर, सर्व स्त्रियांनी पुरुषांचा पोषाख केला आणि त्या डोंगरदेवाकडे गेल्या. बिचारा डोंगर देव, शंकरासारखा साधा भोळा. त्याने पुरुष समजून स्त्रियांना ज्ञान दिले. त्या हुशार आणि तल्लख झाल्या. स्त्रिया बुद्धिमती झाल्या की पुरुषांना वैताग येतोच. अगदी आजही. पुरुषार्थाला धक्का वगैरे. कारण बायकांची अक्कल चुलीपर्यंत चालावी ही रीत. अगदी उच्चशिक्षित समाजातही अनेकांची ही प्रवृत्ती. ते तर आदिवासी होते. मग सगळे पुरुष डोंगरदेवाकडे... मारंग बुरूकडे गेले. डोंगरदेव म्हणाला, मूर्खानो, दारू कुठे एवढी पितात? तुम्हीच तुमचे नुकसान केले. आता मी तुम्हाला हुशार स्त्रियांना 'चेटकीण' कसे ठरवायचे त्याची कला शिकवतो, युक्ती सांगतो. तेव्हापासून हुशार आणि शहाण्या स्त्रीला समाज चेटकीण ठरवून मारीत असे. अशा विच हंटर्सनी... चेटकिणी मारणाऱ्यांनी, शेकडो हुशार... अनुभवाचे शहाणपण समाजाला देणाऱ्या स्त्रिया नष्ट केल्या. या स्त्रियांचे दुःख जाणून त्यांचा बचाव करण्याचा व समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठीचा प्रयत्न केला बिरसामुंडा यांनी. अवघा झारखंड पालथा घालून या युवकाने आदिवासींच्या उन्नतीसाठी जीवाचे रान केले. पण बिरसामुंडा सरकारला खपला नाही. माणसातला माणूस जागा होणे म्हणजे इंग्रजांच्या हुकूमशाहीला आव्हान. हे आव्हानच इंग्रज सरकारने गाडून टाकले. पण आजही झारखंडातील आदिवासी बिरसामुंडा या जगात नाही हे मानायला तयार नाहीत. त्यांना वाटते की बिरसामुंडा दिल्लीला गेलाय नि सरकारशी आदिवासींच्या विकासासाठी बातचीत करतोय... भांडतोय...<br>{{gap}}ते ऐकत असताना मला जर्मनीतले अनुभव... गप्पा आठवल्या. जर्मनीतही अनेक हुशार, वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना<noinclude>{{Right|बोलणाऱ्या झाडांना मिटावे लागते तेव्हा... / ११३}}</noinclude>
rfptropithy2kybbedr8waqe5d5r4j4
पान:मनतरंग.pdf/१२२
104
70517
154972
2022-07-22T05:18:24Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>चेटकीण ठरवून मारले गेले होते. आमच्या लोककथांतही चेटकीण असतेच की. तिचे डोळे चकचकीत असतात, ती म्हातारी किंवा तरुण आणि अतिसुंदर असते. जर्मनीतील चेटकिणींच्या कथा तेथील दगडी किल्ल्यातून फिरताना ऐकल्या होत्या.<br>{{gap}}अशावेळी ऱ्हेनफेल यांचे मत आठवते. जेथे जेथे कृषिप्रधान जीवनपद्धती होती, तेथे मातृसत्ताक जीवनपद्धती विकसित झाली. दृढ झाली, अत्यंत जोमात वाढली. त्यामुळेच ती नष्ट करून पितृसत्ताक जीवनव्यवस्था स्थापित करताना, तिची मुळे निर्घृणपणे खणून काढावी लागली.<br>{{gap}}ही मुळे खणून काढण्यासाठी तीन हत्यारे वापरली. एक म्हणजे बालविवाह, दुसरे पुरुषाला अनेक विवाह करण्याची मुभा आणि तिसरे विधवा स्त्रीने पतीबरोबर सहगमन करावे वा स्वत:वरचे निर्बंध स्वीकारून कुरूप करून घ्यावे. कारण परंपरेने मानले की विधवा अर्धमृत असते.<br>{{gap}}पंधरा दिवसांपूर्वीच कळले की नवऱ्याच्या माराचे वळ सोशीत, नेहमी हसतमुख असणाऱ्या, लहानग्यांसाठी सतत कष्ट करणाऱ्या उर्मिलाने स्वत:ला जाळून घेतले. गेली दहा वर्षे अत्यंत उत्साहाने पडलोणची करणारी, कवडी कवडीची काटकसर करून घर घेणारी, लेकीला शिकवून, तिला पायावर उभे करून तिचे लग्न करणारी उर्मिला. तिला झाले तरी काय होते ? एक दिवस तिच्या शेजारचे गृहस्थ भेटले. त्यांना विचारले नि मन बधिर झाले. आता बापाबरोबर मुलगाही सामील झाला होता दारूच्या नशेत. "दारू नव्हेत मूत पिताहात' असे
ओरडून सांगणाऱ्या उर्मिलाचा आवाज, "या बाया लई शान्या होऊन बोलाया लागल्यात, हिचा आवाज कायमचा बंद करून टाका", असे म्हणत त्या दोघांनी दारूच्या धुंदीत तिचा आवाज कायमचा मिटवून टाकला होता. असं पाहिलं... ऐकलं की वाटतं किती शतकं हा लढा खेळत राहायचा ?<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{rh|मनतरंग / ११४ ||}}</noinclude>
2i099p1id2r34h4c7vpw1ntjtz6mgxf
154973
154972
2022-07-22T05:18:45Z
अश्विनीलेले
3813
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>चेटकीण ठरवून मारले गेले होते. आमच्या लोककथांतही चेटकीण असतेच की. तिचे डोळे चकचकीत असतात, ती म्हातारी किंवा तरुण आणि अतिसुंदर असते. जर्मनीतील चेटकिणींच्या कथा तेथील दगडी किल्ल्यातून फिरताना ऐकल्या होत्या.<br>{{gap}}अशावेळी ऱ्हेनफेल यांचे मत आठवते. जेथे जेथे कृषिप्रधान जीवनपद्धती होती, तेथे मातृसत्ताक जीवनपद्धती विकसित झाली. दृढ झाली, अत्यंत जोमात वाढली. त्यामुळेच ती नष्ट करून पितृसत्ताक जीवनव्यवस्था स्थापित करताना, तिची मुळे निर्घृणपणे खणून काढावी लागली.<br>{{gap}}ही मुळे खणून काढण्यासाठी तीन हत्यारे वापरली. एक म्हणजे बालविवाह, दुसरे पुरुषाला अनेक विवाह करण्याची मुभा आणि तिसरे विधवा स्त्रीने पतीबरोबर सहगमन करावे वा स्वत:वरचे निर्बंध स्वीकारून कुरूप करून घ्यावे. कारण परंपरेने मानले की विधवा अर्धमृत असते.<br>{{gap}}पंधरा दिवसांपूर्वीच कळले की नवऱ्याच्या माराचे वळ सोशीत, नेहमी हसतमुख असणाऱ्या, लहानग्यांसाठी सतत कष्ट करणाऱ्या उर्मिलाने स्वत:ला जाळून घेतले. गेली दहा वर्षे अत्यंत उत्साहाने पडलोणची करणारी, कवडी कवडीची काटकसर करून घर घेणारी, लेकीला शिकवून, तिला पायावर उभे करून तिचे लग्न करणारी उर्मिला. तिला झाले तरी काय होते ? एक दिवस तिच्या शेजारचे गृहस्थ भेटले. त्यांना विचारले नि मन बधिर झाले. आता बापाबरोबर मुलगाही सामील झाला होता दारूच्या नशेत. "दारू नव्हेत मूत पिताहात' असे ओरडून सांगणाऱ्या उर्मिलाचा आवाज, "या बाया लई शान्या होऊन बोलाया लागल्यात, हिचा आवाज कायमचा बंद करून टाका", असे म्हणत त्या दोघांनी दारूच्या धुंदीत तिचा आवाज कायमचा मिटवून टाकला होता. असं पाहिलं... ऐकलं की वाटतं किती शतकं हा लढा खेळत राहायचा ?<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{rh|मनतरंग / ११४ ||}}</noinclude>
59zhu12onk2wd393nave54xhidp5udw
पान:मनतरंग.pdf/१२३
104
70518
154974
2022-07-22T05:21:26Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop
|Image = मनतरंग.pdf
|Page = 123
|bSize = 395
|cWidth = 249
|cHeight = 224
|oTop = 36
|oLeft = 51
|Location = center
|Description =
}}
{{gap}}स्त्री ही निसर्गाचं रूप आहे. निर्मितीसाठी लागणारा काळ, वेदना, भावबंध यांचा ती प्रत्यक्ष अनुभव घेत असते. म्हणूनच ती आई असते. निरपेक्षपणे भवतालच्या परिसराला चैतन्य देत जाणारी लोकमाता नदी असते. जगभर मायेचा... ममतेचा सुगंध पसरवीत जाणारी वाऱ्याची शीतल लहर असते. सुखदुःख, चांगले वाईट, अग्निज्वालांचा... घनघोर पावसाचा वर्षाव... उरात सामावून घेत जीवनातले चैतन्य हिरव्या अंकुरातून जन्माला घालणारी भूमाता असते. दशदिशांतून येणाऱ्या अनुभवांना पचवून जमिनीवर ठामपणे उभी राहणारी साक्षात् ज्ञानदा असते... वृक्षासारखी. अशा पंचरूपांतून निसर्ग आणि माणूस यांच्यातील नाते सतत जागते ठेवणारी स्त्री गेल्या काही हजार वर्षांपासून स्वत:चे अस्तित्व हरवून बसली. निसर्गातील झाडांची कटाई झाली, नद्यांचे पाणी रासायनिक द्रव्ये आणि माणसांची घाण मिसळल्यामुळे दूषित झाले. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. पावसाळ्याने आपले वेळापत्रक बदलले. उन्हाच्या झळांनी तपमानाची उंची पार केली. थंडीच्या दिवसात उकाड्याने हैराण केले.<br>{{gap}}शेकडो वर्षांपासून तऱ्हेतऱ्हेचे अत्याचार, अन्याय निस्पंदपणे सोसणारी, आतल्याआत घुसमटणारी, दगडी जात्याजवळ नाहीतर लाकडी मुसळाजवळ<noinclude>{{Right|अग्निघटिका आणि अग्निसाक्षी/ ११५}}</noinclude>
cn7fddu5lkregjiey9xxqvv1vj0w58q
पान:मनतरंग.pdf/१२४
104
70519
154975
2022-07-22T05:25:19Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>उरातली सल मोकळी करणारी स्त्री फक्त शिव्यांची धनीण होते. त्यामुळे सामाजिक पर्यावरणही बेताल झाले. या पर्यावरणाने समतोल साधावा यासाठी प्रत्यक्ष अन्यायग्रस्त स्त्रियांना बोलके करून, 'अग्निघटिका' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. टाकलेल्या विवाहिता, चेटकिणी ठरवून ज्यांना मारण्याचा प्रयत्न झाला अशा स्त्रिया, देवदासी प्रथेतून वेश्याव्यवसायाकडे ढकलल्या गेलेल्या तरुण मुली, मुलगी जन्मली की तिला मारून टाकायचे, फक्त एक मुलगी जिवंत ठेवायची, या प्रथेची बळी एक 'आई'; पर्यटन व्यवसायातून वेश्याव्यवसायात ढकललेल्या मुली सगळ्याजणी प्रश्नांना स्वत: तोंड देणाऱ्या. त्या व्यासपीठावर येऊन लोकांच्या न्यायालयात साक्ष देत होत्या. अग्निघटिका... अग्नि झेलताना झालेल्या तडफडीतून उमटलेले उद्गार !!<br>{{gap}}झारखंडातील हल्ल्यांनी घायाळ झालेली ही स्त्री. चेटकीण नव्हती. दोन मुलांची आई, पतीची लाडकी. भरपूर कष्ट करी. आवाज गोड. खूप गाणी येत. गाणी गुणगुणताना हातही वेगाने चालत. दारूच्या नशेत शेजाऱ्याने छेडले. हिने प्रतिकार केला. नवरा साधासुधा. दिवसभरच्या कष्टांनी थकणारा. शेजाऱ्याशी भांडण्याचे बळ नव्हते.<br>{{gap}}कामात हुशार असूनही, नवऱ्याचा तिच्यावर विश्वास असूनही शेजाऱ्याने स्वतःच्या प्रतिष्ठेच्या आणि पैशाच्या बळावर तिला चेटकीण ठरवले. ओझा... त्यांचा धर्मगुरु. त्याला हाताशी धरून तिला मारण्याचा प्रयत्न केला. महिला सामाख्याच्या कार्यकर्तीच्या मदतीने ती वाचली...<br>{{gap}}तामिळनाडूतील उसलामपट्टी जिल्ह्यातील काही जमातीत एकच मुलगी जिवंत ठेवतात. ही आई त्यातलीच. तिच्या पहिल्या दोन मुली जन्मतःच मातीत पुरून टाकल्या. तिसरीच्या वेळी हिने लढा दिला. नवऱ्याचे म्हणणे की मुलगा झाल्यानंतरची एक मुलगी जिवंत ठेवू. नुकतंच जन्मलेलं लेकरू ठार मारण्यासाठी हातून ओढून नेतानाची जिवाची काहिली सांगताना तिला अश्रू आवरेनात. समोर बसलेले असंख्य साक्षीदारही अश्रू पुसत होते. पण कडेवरची ती वर्षा-दीड वर्षांची गोंडस मुलगी मात्र गालभरून हसत होती...<br>{{gap}}बेकारीची कुऱ्हाड प्रथम स्त्रियांवरच कोसळत असते. अशियाई देशांतील वाढते दारिद्र्य, वाढती लोकसंख्या, कुटुंबात वा समाजात स्त्रियांना नसलेले स्थान, या बाबींचा फायदा घेतला जातो. थोडेफार शिकलेल्या तरुणी 'मदतनीस' म्हणून<noinclude>{{rh|मनतरंग / ११६ ||}}</noinclude>
ed4x0rb7eg3pbxmbagx574qey1ce09n
पान:मनतरंग.pdf/१२५
104
70520
154976
2022-07-22T05:27:52Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>अरब देशात पाठविल्या जातात. नेपाळ, थायलंड हे देश आघाडीवर. ती जे सांगेल त्याचे इंग्रजी-हिंदी भाषांतर करून संध्या श्रेष्ठ सांगत होती. भरपूर पगार, परदेशगमनाचे आकर्षण या जाळ्यात अडकलेली ती सुशिक्षित मुलगी, त्या भयानक अनुभवाने मुळासकट हादरून गेली. ना तिथली भाषा अवगत, ना जनसंपर्क. लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या मुलीला अक्षरांनी आधार दिला. चोरून पत्र टाकले. मग तिच्या देशातील स्वयंसेवी संघटनेनं पुढाकार घेऊन तिला सोडवले.<br>{{gap}}आणि सांगली परिसरातील दुर्गा आमच्यासमोर प्रश्न फेकणारी.<br>{{gap}}"ताई, तुमच्यापाशी बुद्धी हाये; डोक हाये; तुमच्या मायबापानी शिकिवलं ते डोकं इकून तुमी चार पैशे मिळिवता. मला शिक्षण मिळालं न्हाही. माज्यापाशी डौलदार शरीर हाय... पुरसांना हवा तसा बांधा हाये. ते इकून मी चार पैशे मिळिवते. जे जवळ हाये ते इकायचं नि चार पैशे कमवायचे. मग तुमच्यात नि माज्यात फरक तो काय ?"<br>{{gap}}दुर्गाचा प्रश्न ऐकणाऱ्यांना अस्वस्थ करणारा, ती अग्निघटिकाच अंगावरचे संस्कृती, जागृती, संस्कार, शक्ती, मुक्ती वगैरे रेशमी आणि बांधीव कपडे फेडणारी, ऐकणाऱ्याला होरपळवणारी.<br>{{gap}}तेव्हा उन्हाचा ताप वाढू लागला की ती अग्निघटिका थेट मनासमोर उभी राहते.<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{Right|अग्निघटिका आणि अग्निसाक्षी/ ११७}}</noinclude>
57a3fpuxlbofw7z1hxqh2kpluo71mua