विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.39.0-wmf.21
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Gadget
Gadget talk
Gadget definition
Gadget definition talk
पान:मनतरंग.pdf/१४१
104
70555
155015
2022-07-23T12:41:12Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop
|Image = मनतरंग.pdf
|Page = 141
|bSize = 399
|cWidth = 311
|cHeight = 204
|oTop = 45
|oLeft = 45
|Location = center
|Description =
}}
{{gap}}आज समोर उभ्या असलेल्या सकिनाला मी क्षणभर ओळखलंच नाही. बरोबर सात वर्षांचा देखणा साकीब ऊर्फ बोस्की.<br>{{gap}}"मॅडम पहचाना नाही ? मै सकिना. आपकी विद्यार्थिनी और... <br>{{gap}}"अब आया यादमे"<br>{{gap}}विद्यापीठातून एम.एस्सी. ची पदवी प्रथम वर्गासह मिळवली होती आणि या पदवीच्या दागिन्यावर तिला अमेरिकेत नोकरी करणारा भारतीय मुस्लिम इंजिनिअर पती मिळाला. सकिना आपल्या पतीवर खूष होती. अमेरिकेतील मनमोकळ्या वातावरणात ती मनापासून समरस झाली. अमेरिकेत नोकरी मिळण्याच्या दृष्टीने तिने अभ्यास सुरू केला आणि लक्षात आले की, ती 'आई' होणार आहे. पहिले बाळंतपण माहेरी व्हावे हां सकिनाचा आग्रह. तिच्या पतीला ही मागणी फारशी पसंत नव्हती. पण त्याने मान्य केले आणि सकिना भारतात आली.<br>{{gap}}अमेरिकेतील पती-पत्नीच्या संसारातील मोकळेपणा आणि भारतातील सासरचे पारंपरिक वातावरण यात जमीनअस्मानाचा फरक होता. गरोदर स्त्रियांचा आहार, नि घ्यावयाची काळजी याबाबतच्या तिच्या नव्या कल्पना आणि घरातील<noinclude>{{Right|एक देश : एक कुटुंब कायदा/१३३}}</noinclude>
g89glxk8wqlt36h68uwxmqyd1mdttby
पान:मनतरंग.pdf/१४२
104
70556
155016
2022-07-23T12:43:48Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>वातावरण यांचा मेळ बसेना. बुरखा पद्धत घरात कडक होती. माहेरी ती नव्हती. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत अमेरिकेत गेल्याने, ती पद्धत विवाहानंतर सासरच्या मुक्कामात फारशी जाचक वाटली नाही. पण ती आता जाचू लागली. सासरच्या वडीलधाऱ्या माणसांना वाटे, गावातच माहेर आहे. लेकरू झालं की माहेरी पाठवू. तोवर बहूने सासरी राहावे. अखेरीस अम्मीअब्बांना सांगून ती माहेरी गेली. योग्य वेळी मुलगा झाला. पण सासरकडून मुलगा पाहायलाही कोणी आले नाही आणि बाळ जेमतेम महिन्याचे असताना सकिनाची चुलतसासू काहीही कल्पना न देता आली आणि पाळण्यातले बाळ घेऊन निघून गेली. पाळण्यातले बाळ दिसेना आणि शोधाशोध सुरू झाली तेव्हा बाजूच्या लोकांनी सांगितले की बाळाची दादी बाळाला घेऊन गेली. तात्काळ सकिनाला घेऊन अम्मी अब्बा तिच्या सासरी गेले. त्यांना कोणीही बोलेना की, बसा म्हणेना. स्पेशल जीप करून बाळ मालेगावला घेऊन गेल्याचे कळले नि सकिनाचा धीर खचला. ती सल्ला घेण्यासाठी आमच्याकडे आली. आम्ही गावातील सुजाण, प्रतिष्ठित, ज्यांचा तिच्या सासरच्या मंडळींशी संपर्क आहे असे पाच-सहा जण घरी जाऊन भेटलो. त्यांच्या समाजातील सुशिक्षित अशा प्रौढ महिलेस घेऊन बाळाला आणण्यासाठी सकिना, तिचे आई-वडील, समाजातील प्रतिष्ठित दोघेजण जीप करून मालेगावला गेले. बाळाला घेऊन परत आले.<br>{{gap}}अमेरिकेतून बाळाच्या वडिलांना पाठविलेल्या पत्राचे उत्तर आले नव्हते. पुढे काय करायचे ? भारतातच नोकरी पाह्यची की परत अमेरिकेत जायचे याबाबत निर्णय घेता येत नव्हता. तिच्या सासरची माणसे मुलाने... नवाजने सकिनाला तलाक द्यावा अशा प्रयत्नात होते. नवाझ सकिनाला पत्र पाठवीत नव्हता. शेवटी सकिनाच्या माहेरची मंडळी व आम्ही एकत्र बसून निर्णय घेतला. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय मुस्लिम कुटुंबाशी संपर्क साधला. सकिनाच्या मनात नवाज़ला भेटण्याची, अमेरिकेतील मनमोकळे जीवन जगण्याची उत्सुकता होती पण तरीही नवाज़ने स्वीकारले नाही तर पुढे काय ? पुढे काय ? हा प्रश्नही असुरक्षितता दाखविणारा होता आणि तो प्रश्नच तिला हैराण करी. सकिना अमेरिकेत गेली. दोन वर्षे अमेरिकेत राहत असल्याने व्हिसाचा प्रश्न आला नाही. सकिनाची पाठवणी काहीशी तिच्या मनाविरुद्ध केली गेली.<br>{{gap}}अमेरिका, कॅनडा, जर्मनी आदी युरोपीय देशात 'एक देश : एक कायदा'<noinclude>{{rh|मनतरंग / १३४ ||}}</noinclude>
rd40ad6m5xak8zus93mq2q1b0hdjy0u
पान:मनतरंग.pdf/१४३
104
70557
155017
2022-07-23T12:46:31Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>हा नियम आहे. धर्मानुसार कायदे बदलत नाहीत अमेरिकेत जाताच तिथेही सकिनाची नोंद नवाज़ची पत्नी म्हणून झाली होती. नवाझने तेथील नागरिकत्व स्वीकारले होते. तेथील कायद्यानुसार प्रथम पत्नीशी घटस्फोट झाल्याशिवाय दुसरा विवाह करता येत नाही. सकिना अमरिकेत परतल्याने 'तलाक'चा धोका पूर्णपणे टळला होता.<br>{{gap}}तीच सकिना रुबाबदार साकीबला घेऊन माझ्यासमोर उभी होती. "दीदी, परसोही बंबईमे आयी. आज सुबह यहाँ पहुंची तो पहले आपको ही याद किया" सकिना उत्साहाने बोलत होती.<br>{{gap}}"मी न्यूयॉर्कला पोहोचेपर्यंत खात्री नव्हती की नवाज़ घ्यायला येईल की नाही ते ! पण नवाज़ सुरेखशी बेबी कॅरिअर घेऊन स्वागताला आला होता. दीदी, वर्षानुवर्षे झालेले संस्कार काही दिवसात नाहीसे होत नाहीत. नवाजच्या अम्मी-अब्बांपेक्षाही बाकीच्यांचेच दडपण होते. नवाजने भारतात येऊन तलाक घ्यावा म्हणून. नवाजने भारतात येण्याचे, कोणालाही पत्र पाठवण्याचे टाळले. दीदी मी एवढी एम.एस्सी. झाले, पण कायद्याचे ज्ञान म्हणावे तर शून्य. नवाजचे म्हणणे की मी ओळखायला हवे होते की, युरोपीय राष्ट्रांत त्या देशात राहणाऱ्यांसाठी कायदा एकच असतो.<br>{{gap}}जाताना नवाज़च्या अम्मींना घेऊन जाणारेय. त्या खूप प्रेमळ आहेत. त्यांनासुद्धा काहीही दोष नसताना, भांडण नसताना शिकलेल्या सुनेला तलाक देणे मान्य नव्हते. सकिनाचा प्रश्न ती अमेरिकेत होती म्हणून सुटला. पण आज भारतात हजारो सकिना आहेत. कॅथॉलिक प्रवाहात अडकलेल्या आयरिन वा ओल्गा आहेत, कायद्याला हरताळ फासून पहिली पत्नी असूनही दुसरा वा तिसरा... चौथा विवाह करणारे 'हिंदू' भारतीय आहेत. या सर्व असहाय भारतीय महिलांची कौटुंबिक अत्याचार, अन्यायातून सुटका करण्याचा एकच मार्ग आहे. 'समान कुटुंब कायदा !' पण तो करण्याची राजकीय हिंमत, सामाजिक जाण कोण दाखवणार ? शेवटी आमची नजर मतांच्या गठ्यांवर !!<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{Right|एक देश : एक कुटुंब कायदा /१३५}}</noinclude>
cexa7aurw1uepuc2zq4cdsxdndcpdsz
पान:मनतरंग.pdf/१४४
104
70558
155018
2022-07-23T12:52:13Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop
|Image = मनतरंग.pdf
|Page = 144
|bSize = 401
|cWidth = 248
|cHeight = 204
|oTop = 45
|oLeft = 50
|Location = center
|Description =
}}
{{gap}}भारतीय सैन्याच्या विमानदलात आता मुलीही प्रवेश घेऊ लागल्या आहेत भारतीय विमानदलाचे प्रमुख, टिपणीस यांच्या हातून लेफ्टनंटचा हुद्दा स्वीकारणारी अनिता आपटे अत्यंत धीटपणाने दूरदर्शनच्या प्रतिनिधीशी बोलताना पाहिली आणि मन गर्वाने ताठ झाले.<br>{{gap}}गेल्या तीन-चार हजार वर्षांच्या काळात स्त्रियांना जीवनातील कोणत्याच क्षेत्रात संधी दिली नाही. किंबहुना त्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बळ असतात ही ठाम समजूत आमच्या भारतीय समाजमनात घट्ट रुजली आहे. खरे तर प्राचीन काळीही युद्धात स्त्रिया सहभागी होत असत. कैकयी राजा दशरथाबरोबर युद्धावर जात असे. राजघराण्यातील स्त्रियांना शस्त्राचे शास्त्र अवगत करून दिले जाई. परंतु नंतरच्या काळात स्त्रियांच्या सौंदर्याचा,देहाचा उपयोग युद्धात करून घेतला गेला. 'विषकन्ये' ची कथा सर्वश्रुत आहे बालपणापासून एखाद्या कन्येला विषाची मात्रा दिली जाई. तरुणपणात प्रवेश करीपर्यंत ती परिपूर्ण 'विषकन्या' होत असे, तिच्या सौंदर्याचा विषारीपणाचा उपयोग शत्रूराष्ट्राचे अधिकारी फोडण्यासाठी, त्यांची गुपिते हस्तगत करण्यासाठी केला जाई. परंतु अशा पद्धतीच्या उपयोगात स्त्रीच्या केवळ देहाला महत्त्व दिले जाई. युद्धशास्त्रातील<noinclude>{{rh|मनतरंग / १३६ ||}}</noinclude>
l62m20ouaso8iwpzzupf0yg46qzeu12
पान:मनतरंग.pdf/१४५
104
70559
155019
2022-07-23T12:55:26Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>ज्ञान, जाण त्यात नसे. दुसऱ्या महायुद्धात अनेक स्त्रियांनी राष्ट्ररक्षणासाठी आपली बुद्धी, कला, सौंदर्य यांचा उपयोग, शत्रूपक्षाला नामोहरम करण्यासाठी केला होता. गुप्तहेर खात्यातील स्त्रियांचे महत्त्व आर्य चाणक्यापासून मान्य होते.<br>{{gap}}२१ व्या शतकात प्रवेश करणारी स्त्री युद्धशास्त्रात प्रावीण्य मिळवू लागली आहे. नौदलात, विमानदलात स्त्रियांना प्रवेश दिला जातो. पोलिस विभागातील त्यांची कामगिरी अभिमानास्पद आहे. किरण बेदी, मीरा बोरवणकर, श्रीदेवी गोएल यांच्या जोडीला आता नव्या तरुणी आत्मविश्वासाने या क्षेत्रात येत आहेत.<br>{{gap}}चारएक वर्षांपूर्वीचा अनुभव. आम्ही पुणे-बेंगलोर प्रवास अवकाशमार्गाने... विमानाने करणार होतो विमानचालक आणि दिशानिर्देक या दोघी महिला आहेत हे पाहून भोवताली कुजबूज सुरू झाली.<br>{{gap}}"आज काही आपलं खरं नाही. नॅव्हिगेटर आणि वैमानिक दोघी स्त्रिया दिसताहेत." दोन पुरुष प्रवाशांतला संवाद.<br>{{gap}}"अरे बाबा, बायकांचं राज्य खऱ्या अर्थाने आलंय हं."<br>{{gap}}"बघा हो, आज तुमचे जीव आमच्या ताब्यात आहेत." एका पत्नीचा गोड टोमणा !<br>{{gap}}"कलियुग है बाबा. आँखे बंद करके जीना..."<br>{{gap}}कॅप्टन सौदामिनी देशमुख यांनी आम्हाला सुखरूपणे आणि अलगदपणे बंगलोरच्या धावपट्टीवर उतरवले.<br>{{gap}}मी न राहवून त्या प्रवाशांना विचारलेच, "सुखरूप उतरवलं ना विमान महिलांनी ? पुरुष वैमानिकांपेक्षा कुठे कमी पडल्या नाहीत ना त्या ?"<br>{{gap}}दूरदर्शनवरील फ्लाईट लेफ्टनंट अनिता आपटेला पाहताना बंगलोर प्रवासाची याद आली.<br>{{gap}}कारगिलच्या परिसरातले बर्फाचे उत्तुंग डोंगर आज पेटले आहेत या खंडप्राय देशाचे स्वातंत्र्य अखंड. अक्षय. अभंग राखण्यासाठी, सीमेवर वळवळणाऱ्या पाकी बांडगुळांना चिरडून टाकण्यासाठी, हजारो भारतीय तरुण सैनिक कारगिल, द्रास, बटालिक या पंधरा-सोळा हजार फूट उंचावरील भागात डोळ्याचे सूर्य करून. प्राण तळहातावर घेऊन लढत आहेत, त्यांना आमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही. पण आमच्या अत्यंत संपृक्त भावनांचे... शुभेच्छामय भावनांचे नैतिक बळ त्यांच्या पाठीशी राहिले तर त्यांचा उत्साह नक्कीच वाढणार आहे.<br><noinclude>{{Right|राहतील मागे का भारतीय नारी?/ १३७}}</noinclude>
thtib76we088i5zwsgwgb439mxmlp71
पान:मनतरंग.pdf/१४६
104
70560
155020
2022-07-23T12:58:54Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}आम्ही स्त्रियांनी आमच्या मुलींना युद्धशास्त्राचा अभ्यास करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. एन.सी.सी.त मुली जातात. बंदूक चालवायलाही शिकतात. पण त्यातून निर्माण होणारा आत्मविश्वास पुढे संसार करताना, भाजी-आमटी फोडणीला टाकताना किंवा दहा ते पाच 'चाकरमानी' करताना गळून जातो. असे का व्हावे? संसार करणे ही बाब दुय्यम नाही. संसार नेटका करायचा असेल तर डोळ्यांचे सूर्य करावेच लागतात. स्त्रीचे डोळे तर जन्मत:च चंद्राप्रमाणे शीतल, स्नेहल असतात पण ही शीतलता प्रसंगी अग्नीचे तेज धारण करणारी असावी लागते.<br>{{gap}}स्त्री ही मुळातच भाविनी आहे, अग्निकन्या आहे आणि मनस्विनी आहे. परंतु काळाच्या ओघात तिच्या 'भाविनी' या रूपालाच महत्त्व दिले गेले. त्या रूपाला त्याग, सहनशीलता यांचे लेप चढवले गेले. तिच्या व्यक्तिमत्त्वातील मनस, अग्नी यांच्यावर, अविद्या... अंधश्रद्धा... आत्मघृणा... आत्मसंभ्रम यांची राख साठली आहे. राजाराम मोहन राय, महर्षी दयानंद, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्यासारख्या अनेक महामानवांनी स्त्रीचे माणूसपण जाणले. तिच्यातील माणूसपण जगावे, यासाठी शिक्षणाची दिशा मोकळी करून दिली. दीडशे वर्षांच्या वाटचालीतून आज स्त्रीला आत्मभान आले आहे. तिने जाणले आहे की, हे जग स्त्री-पुरुष दोघांचे आहे.<br>{{gap}}समाजाचे प्रश्न, राष्ट्राचे प्रश्न सोडविण्यासाठी दोघांनी पुढे यायला हवे. भविष्यात वेळच आली तर भारतीय स्त्रिया रणांगणातही मागे राहणार नाहीत. त्या एकमुखाने सांगतील,
{{Block center|<poem>"कोटी कोटी वीर पुरुष
समरवेश धारी
राहतील मागे का भारतीय नारी ?
समय बिकट येता
मानसात दिवस रात्र एक हा विचार हो
राहतील मागे का भारतीय नारी ?"</poem>}}<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{rh|मनतरंग / १३८ ||}}</noinclude>
sojphuphlg2zkr3sjon3gudc67eplke
पान:मनतरंग.pdf/१४७
104
70561
155021
2022-07-23T13:02:10Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop
|Image = मनतरंग.pdf
|Page = 147
|bSize = 404
|cWidth = 279
|cHeight = 213
|oTop = 33
|oLeft = 50
|Location = center
|Description =
}}
{{gap}}शाळेत असताना श्रावणाची आणि ऑगस्ट महिन्याची आम्ही मनभरून वाट पाहायचो. श्रावण आणि ऑगस्ट यांची आगून-मागून जोडी असतेच. यंदा अधिकाचा ज्येष्ठ होता तरीही बारा ऑगस्टपासून श्रावण सुरू झाला. श्रावण आला की बालकवी आठवणारच !
{{Block center|<poem>"श्रावणामासी हर्ष मानसी -
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सर सर शिरवे -
क्षणात फिरूनि ऊन पडे ॥"</poem>}}{{gap}}त्या पाऊसधारातून आरपार जाणारी सूर्यकिरणे. मग निसर्गनियमानुसार इन्द्रधनूचा गोफ आकाशात विणलाच जाणार ! श्रावण आला की नागपंचमी, नारळीपौर्णिमा, पोळा हे सण आले. श्रावणी सोमवारची मजा तर औरच असे. श्रावणी सोमवारी शाळा सकाळी असे. शाळा सुटली की आम्ही साळकाया माळकाया पांझरा नदीच्या काठाने रमतगमत थेट जमनागिरीच्या शिवमंदिरात जात असू. तिथे वडाखाली बसून डब्यातली शाबुदाण्याची खिचडी...उसळ खायची,<noinclude>{{Right|आठवणींचे रंग सावनी / १३९}}</noinclude>
ksk3gt4mqjb60yn54gu52wcq6rul7xs
पान:मनतरंग.pdf/१४८
104
70562
155022
2022-07-23T13:05:57Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>शिवाला सलाम ठोकून थेट घराच्या ओढीने परतायचे. जिना चढताना कढीचा खमंग वास, मेथीच्या मुद्दाभाजीची फोडणी...सारे नाकात झणझणायचे. मग थकलेले पाय सरसर जिना चढत.<br>{{gap}}श्रावण आला की, आम्ही मैत्रिणी कुणाकुणाच्या घरी बहीण नाहीतर वहिनीची मंगळागौर आहे, याची यादी करीत असू. किमान दोन मंगळवारी तरी जागरणे हवीतच. मग तऱ्हेतऱ्हेच्या खेळांचा दंगा. त्यावरून भांडणे, तव्यावरची फुगडी, बसफुगडी अशी फुगड्यांची चढाओढ. सूप नाचवतानाची धांदल. फक्त मजा... मजा... आणि मज्जाच. उखाण्यांतून एकमेकीवर केलेल्या चढाया. ही सारी धमाल म्हणजे श्रावण.<br>{{gap}}मंगळागौरीची सजावट हा तर खास अमचा प्रांत. मंगळागौर कुणाची का असेना, पण वेगवेगळ्या आकाराची...रंगाची फुले आणि पाने गोळा करण्यासाठी अख्खे गाव पालथे घालायचे. पानाफुलांच्या विविध आकारांनी मंगळागौरीच्या चौरंगाभोवती गालिचा विणण्यातला आनंद आगळाच असे. श्रावण आला की, कोपऱ्यावरच्या दुकानात श्रावणाचे रंगीत कागद विकायला येत त्यातला छान रंगाचा कागद आणून भिंतीवर उत्साहाने चिकटविण्यात येई. त्यावर बुधबृहस्पती, जिवती, शिवपार्वती, नागनरसोबा, नृसिंह यांची चित्रे असत. बुधवारी बृहस्पतीची पूजा, शुक्रवारी जिवतीची पूजा होईच. श्रावण म्हटला की मेंदी आलीच. मेंदीची झुडपं आषाढ अंगावर झेलून अक्षरश: पिसारून जात. मेंदीचे काटे श्रावणात रेशमी होतात. झग्याचे खिसे...परकराचे ओचे भरभरून मेंदीची पाने आम्ही घरी घेऊन यायचो. मग ती वाटण्याचा घाट, त्यात घालायला चिमणीचा गू गुपचूप आणून त्यात टाकायचा. मेंदी लालचुटुक रंगते म्हणे त्याने. घराच्या मधल्या चौकात भलामोठा धुण्याचा दगड असे. त्यावर मेंदी जोर लावून बारीक वाटीत असू आणि ती वाटतानाच हात लालचुटूक होऊन जात. मग कष्टाने वाटलेला हिरवा गोळा शेजारच्या मैत्रिणीला देताना जीव कासावीस होत असे. श्रावणभर मुलींचे हात मेंदीने रंगलेले आणि केस फुलांनी बहरून गेलेले, आज ते दिवस आठवले की पुन्हा आठवतात बालकवी. "सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती..." फुलं गोळा करणाऱ्या पोरीसोरी जणू फुलमाळाच !!<br>{{gap}}पाहता पाहता नववीत कधी आलो ते कळलेच नाही. डोळ्यातली कोवळी झळाळी जाऊन तिथे एक वेगळीच चमक आली. तरुणाईच्या उंबरठ्याची<noinclude>{{rh|मनतरंग / १४० ||}}</noinclude>
qqykyd0e9cubp11fst8ze9c125fk566
पान:मनतरंग.pdf/१४९
104
70563
155023
2022-07-23T13:09:34Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>ती चाहूल असावी. राजाराणीच्या आणि पऱ्यांच्या राज्यात रमणारे मन. फडके, खांडेकर, विभावरी शिरूरकर, गोनिदांच्या कादंबऱ्या; बापट, विंदा, पाडगावकर, इंदिरा, पद्मा यांच्या कवितांत रमू लागले. गंगाधर गाडगीळांची बिन चेहऱ्याची संध्याकाळ स्वप्नात येऊ लागली आणि ऑगस्टचे आगळेवेगळेपण मनाला वेढू लागले. 'स्वराज्य' हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. असे ब्रिटिश शासनाला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक आणि ऑगस्ट यांचे नाते कळू लागले. 'चले जाव' चळवळीचा उठाव, 'भारत छोडो' चा महात्माजींनी दिलेला नारा, बाबू गेनू...शिरीषकुमार यांसारख्या हजारो वीर वीरांगनांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदान आणि सोसलेल्या यातना या सर्वांचा नऊ ऑगस्टशी असलेला अनुबंध लक्षात येऊ लागला आणि कवितातल्या शब्दांचे अन्वयार्थ मनासमोर उलगडू लागले. शेकडो कविता जीवनाला नवे संदर्भ देऊ लागल्या 'ने मजसी ने परत मातृभूमीला' असे आर्तपणे आळवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तळमळणारा आत्मा आणि सागराच्या जिथल्या तिथे रिचणाऱ्या उत्तुंग... अस्वस्थ लाटांचे एकात्म पण त्याच काळात उमगले. साठीच्या उंबरठ्यावरचा श्रावण जेव्हा दारात येतो, तेव्हा असे अनेक श्रावण मनात तरंग उठवीत जातात. त्या श्रावणांपेक्षा हा श्रावण काही वेगळा आहे का ? छे, मुळीच नाही. श्रावण नेहमीच हिरवा... गंधगारवा देणारा असतो. मग आपोआप ओठावर ओळी येतात.
{{Block center|<poem>"आठवणींचे रंग ताजे
साठीच्या उंबऱ्यात ओठी
श्रावण गीत बिराजे..."</poem>}}<noinclude>{{Right|आठवणींचे रंग सावनी/ १४१}}</noinclude>
7sopuh6q1trtet35152ipuj9d9ddpov
155024
155023
2022-07-23T13:10:06Z
अश्विनीलेले
3813
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>ती चाहूल असावी. राजाराणीच्या आणि पऱ्यांच्या राज्यात रमणारे मन. फडके, खांडेकर, विभावरी शिरूरकर, गोनिदांच्या कादंबऱ्या; बापट, विंदा, पाडगावकर, इंदिरा, पद्मा यांच्या कवितांत रमू लागले. गंगाधर गाडगीळांची बिन चेहऱ्याची संध्याकाळ स्वप्नात येऊ लागली आणि ऑगस्टचे आगळेवेगळेपण मनाला वेढू लागले. 'स्वराज्य' हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. असे ब्रिटिश शासनाला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक आणि ऑगस्ट यांचे नाते कळू लागले. 'चले जाव' चळवळीचा उठाव, 'भारत छोडो' चा महात्माजींनी दिलेला नारा, बाबू गेनू...शिरीषकुमार यांसारख्या हजारो वीर वीरांगनांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदान आणि सोसलेल्या यातना या सर्वांचा नऊ ऑगस्टशी असलेला अनुबंध लक्षात येऊ लागला आणि कवितातल्या शब्दांचे अन्वयार्थ मनासमोर उलगडू लागले. शेकडो कविता जीवनाला नवे संदर्भ देऊ लागल्या 'ने मजसी ने परत मातृभूमीला' असे आर्तपणे आळवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तळमळणारा आत्मा आणि सागराच्या जिथल्या तिथे रिचणाऱ्या उत्तुंग... अस्वस्थ लाटांचे एकात्म पण त्याच काळात उमगले. साठीच्या उंबरठ्यावरचा श्रावण जेव्हा दारात येतो, तेव्हा असे अनेक श्रावण मनात तरंग उठवीत जातात. त्या श्रावणांपेक्षा हा श्रावण काही वेगळा आहे का ? छे, मुळीच नाही. श्रावण नेहमीच हिरवा... गंधगारवा देणारा असतो. मग आपोआप ओठावर ओळी येतात.
{{Block center|<poem>"आठवणींचे रंग ताजे
साठीच्या उंबऱ्यात ओठी
श्रावण गीत बिराजे..."</poem>}}<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{Right|आठवणींचे रंग सावनी/ १४१}}</noinclude>
5r1skpbzbgnvkafrtuq5fqlb62sb1dn
पान:मनतरंग.pdf/१५०
104
70564
155025
2022-07-23T13:12:58Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop
|Image = मनतरंग.pdf
|Page = 150
|bSize = 402
|cWidth = 282
|cHeight = 209
|oTop = 39
|oLeft = 38
|Location = center
|Description =
}}
{{gap}}'ताई, मत कोणाला देणार ? कोणकोणते उमेदवार आहेत ? बायांपैकी आहेत का कोणी ?" एक राज्यशास्त्राची विद्यर्थिनी निवडणूकपूर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाजाराला आलेल्या भाजीवालीला प्रश्न विचारीत होती.<br>{{gap}}"कसलं मत हो ताई ? पुन्ना मताची वारी आली का? मागल्या सालीच टाकलं होतं की ! आन् ह्ये बगा, आमी ल्योकाला न्हाईतर मालकाला इचारतो की कच्च्या चित्रावर शिक्का हाणायचा. पयलं दोगंबी एकच चित्र सांगायचे. आता ल्योक म्हणतो घड्याळ तर बाप म्हणतो फूल आन् सासरा म्हणतो 'हात'च बरा, बघा ही नवी रीत. तुमीच सांगा वो कोनचं चित्र बरं होय?" ती तरुण कार्यकर्ती गोंधळून गेली आणि पुढे सरकली.<br>{{gap}}रिक्षा चालवणाऱ्या दादांना सहज विचारलं "कुणाचा जोर आहे यंदाच्या निवडणुकीत?" तो रिक्षावाला मनापासून हसला आणि टोमणा देत मला म्हणाला, "आत्ता, तुमी मला इचारता ? आवं तुमीच म्हंता की बायांना निवडून दिलं तर भ्रष्टाचार कमी व्हईल. पन आपल्याला न्हाय पटत बुवा ! आपल्या बाया राज चालवाया लागल्या तर, पोळ्या भाकऱ्या कुनी भाजायच्या ? समदेच उपाशी ऱ्हात्याल की ! एकांदुसरी पाटवली तर निभतंय की!" रिक्षावाल्याचे उत्तर.<br><noinclude>{{rh|मनतरंग / १४२ ||}}</noinclude>
ks8b5qiqh1pwm94wy01bak17kamefcw
पान:मनतरंग.pdf/१५१
104
70565
155026
2022-07-23T13:15:55Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}लोकसभेत काही काळ खासदार असलेली मैत्रीण सांगत होती. विधानसभेत आणि लोकसभेत महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवाव्यात हे विधेयक मांडले गेले तेव्हा राजकारणात मोठ्या पदावर असलेली व्यक्ती सहज बोलून गेली,<br>{{gap}}"अरे भई, महिलाएं अगर राज करने लगी, तो हम पुरुष क्या रोटियाँ बेलेंगे?"<br>{{gap}}गेल्या हजारो वर्षांपासून चालत आलेली ही श्रमविभागणी समाजमनात घट्ट रुजून बसली आहे. ही श्रमविभागणी पाचपन्नास वर्षांत बदलणारी नाही; याची कल्पना स्त्रीवादी स्त्रीपुरुषांना आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की स्त्रीच्या घराशी निगडित असलेल्या श्रमाची दखल समाज कधी घेणार आहे ? ते श्रम आर्थिक मूल्य निर्माण करणाऱ्या श्रमांइतकेच महत्त्वाचे आहेत हे आपण मान्य करणार आहे का ? सडा-सारवण, केरवारे, पाणी भरणे, लाकूड-फाटा गोळा करणे, शेणगोठा-सफाई आणि गोवऱ्या थापणे, अन्न शिजवणे, जेवणात लागणारे टिकाऊ पदार्थ तयार करणे, पापड, लोणची, कुरडया, पापड्या डाळी-साळी करणे आदी उन्हाळी कामे त्यात आली, मुलांना जन्म देऊन त्यांचे संगोपन करणे, या कामांसाठी तिला दिवसाचे किमान ८ ते १२ तास द्यावे लागतात. या व्यतिरिक्त कुटुंबाच्या सुखासाठी...भाकरीसाठी दुसऱ्याच्या शेतात मजुरी करावी लागते वा स्वत:च्या शेतात राबावे लागते वा जनावरांमागे राखणीला हिंडावे लागते. त्यासाठी तिला ६ ते ८ तास द्यावे लागतात.<br>{{gap}}मजुरीला जाणाऱ्या स्त्रीच्या हातात वीस-पंचवीस रुपये दिवसाकाठी आले तरी ते स्वत:च्या सोयीसाठी वा इच्छेनुसार ती खर्च करू शकते का ? आणि घरच्या शेतात काम करणाऱ्या वा घरातल्या गुरांमागे राखणीसाठी जाणाऱ्या बाईला रोजगार कोण देणार ?<br>{{gap}}उजाडल्यापासून ते पाठ टेकेपर्यंत, या सतत भिरभिरणाऱ्या ग्रामीण भागातील बाईच्या श्रमांबद्दल कुटुंबाला वा समाजाला कृतज्ञता असते का ? उत्तर नकारार्थी. हजारात एखादा अपवाद असेलही.<br>{{gap}}ऑफिसमध्ये जाणारा चाकरमानी, विद्यालयात शिकवणारा शिक्षक- प्राध्यापक, अधीक्षक वगैरे वगैरे सर्व नोकरदार, सुमारे पंच्चाण्णव टक्केंच्या पत्नी, गृहिणी असतात. पतीला त्याच्या पेशात वा कामात प्रत्यक्ष मदत नसली तरी<noinclude>{{Right|...तर आम्ही काय भाकऱ्या भाजायच्या? / १४३}}</noinclude>
otj40ehz1cv8gh5eogmpionb1b50d1j
पान:मनतरंग.pdf/१५२
104
70566
155027
2022-07-23T13:18:37Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>घराचे व्यवस्थापन करून त्यांना कामासाठी लागणारी शांती, सुविधा त्या निर्माण करतात. मग वेळेवर चहा, नाश्ता, जेवण करणे, घर नीटनेटके ठेवून, मुलांचे संगोपन करणे असेल. त्या गृहव्यवस्थापनासाठी त्यांना सन्मान मिळतो ? किमान त्याबद्दल कृतज्ञतेची जाणीव कुटुंबात, समाजात असते का ? जे श्रम 'अर्थ' निर्माण करतात त्यांनाच मूल्यवान मानले जाते. त्यांनाच समाजात 'अर्थ' प्राप्त होतो. जे श्रम 'अर्थ' निर्माण करीत नाहीत ते 'अर्थहीन' ठरतात. ते 'काबाड' ठरतात.<br>{{gap}}निवडणुकीतल्या जाहीरनाम्यात सर्व पक्षांनी विधानसभेत, लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यास मान्यता दिली आहे. पण प्रत्यक्षात किती टक्के महिलांना तिकिटे दिली आहेत ? हे आरक्षण आम्हांला २१ व्या शतकात नक्कीच मिळेल. पण त्यासाठी शेतात, घरात, कारखान्यात 'काबाड' करणाऱ्या महिलांच्या श्रमांचे, आर्थिकदृष्टिकोनातून मूल्यमापन करण्याचा आग्रह आम्हां महिलांची 'महत्त्वाची मागणी' म्हणून जाहीरनाम्यात कधी घालायला लावणार ?<br>{{gap}}भाकऱ्या आणि गोवऱ्या कुशलपणे थापणारी स्त्री, राजकारणही कुशलतेने करू शकते याची साक्ष ग्रामपंचायतीत निवडून येण्याची संधी मिळालेल्या स्त्रिया देऊ लागल्या आहेत. खरे तर महिलांच्या सर्वांगीण सबलीकरणासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचे निवारण करण्यासाठी धडपडणाऱ्या स्त्री-पुरुष संघटनांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या महिलांच्या कार्यशाळा पक्षाच्या पलीकडे जाऊन आयोजित केल्या पाहिजेत. महिलांच्या सर्वांगीण सबलीकरणासाठीच्या योजना राबवण्यासाठी त्यांना सक्षम करणे, त्यांच्या चौकसपणाची व माहितीची क्षेत्रे विस्तारित करणे हे काम अधिक महत्त्वाचे मानले पाहिजे... म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करताना तरी असे उद्गार कोणी काढू नयेत की "बायका राज्य करू लागल्या तर आम्ही काय भाकरी भाजायच्या ?"<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{rh|मनतरंग / १४४ ||}}</noinclude>
464i9riq23eiavwcsdbzqibz5njejyv
अनुक्रमणिका:हिंदुस्तानची राज्यव्यवस्था व लोकस्थिती (संक्षिप्त वर्णन)१८९५.pdf
106
70567
155028
2022-07-24T04:44:33Z
Shilpa Deshpande
4401
नवीन पान
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=हिंदुस्तानची राज्यव्यवस्था व लोकस्थिती (संक्षिप्त वर्णन)१८९५.pdf
|Language=mr
|Volume=
|Author=आर्यविजय छापखाना
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=आर्यविजय छापखाना
|Address=पुणे
|Year=1895
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
8rrpyic8brbox13z8ouyjlelwcjsupx
अनुक्रमणिका:हिंदुस्तानचा संक्षिप्त इतिहास.pdf
106
70568
155029
2022-07-24T04:48:01Z
Shilpa Deshpande
4401
नवीन पान
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=हिंदुस्तानचा संक्षिप्त इतिहास.pdf
|Language=mr
|Volume=
|Author=चिंतामण गंगाधर गोगटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=नवीन किताबखाना
|Address=पुणे
|Year=1909
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
ho9exmfxfmahalfm69nv1vo9ger9c6p
पान:गुन्हेगार जाती.pdf/१९
104
70569
155030
2022-07-24T08:02:14Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "गुन्हेगार जाती. कोर्टाचे हवींची त्यांना चांगली माहिती असते, त्या बेतानें ते गुन्ह्याचें ठिकाण ठरवितात. दरोडे वगैरे घालण्याची त्यांची पद्धति जवळजवळ रामोशासारखी असते. 'बगली' ( हात..."
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>गुन्हेगार जाती.
कोर्टाचे हवींची त्यांना चांगली माहिती असते, त्या बेतानें ते गुन्ह्याचें
ठिकाण ठरवितात. दरोडे वगैरे घालण्याची त्यांची पद्धति जवळजवळ
रामोशासारखी असते. 'बगली' ( हात जाईल असें चौकटीजवळ
भोंक पाडून ) अगर ' रुमाली ' ( अंग जाईल असें भिंतीला धारें पाडून )
पद्धतीने ते घरफोडी करतात. ते स्वतः अगर गांवच्या गुन्हेगाराकडून
खबर काढतात. पुष्कळ वेळां अदावतवाले आपल्या वैऱ्याचें घर फोड-
ण्यासाठीं त्यांना बोलावून घेतात. गुन्हा करण्याचे काम कोणत्याही दुस-
या जातीच्या लोकांची ते संगत करतात. ते कैकाडी लोकांसारखे क्रूर
व गुन्ह्याचे वेळीं निष्कारण इजा करणारे नसतात.
गुन्ह्याचीं हत्यारें:- 'कंगट्टी' (अठरा इंच लांच, दीड इंच व्यास
• असा, एका टोंकाला चपटा होत गेलेला लोखंडी बत्ता ) 'अरसुकुंची
( अठरा इंच लांबीचा टिकाव ) हीं त्यांची घरफोडीचीं हत्यारें होत.
दरोडा किंवा जबरीच्या चोरीच्या वेळी त्यांचे जवळ कुन्हाड, पहार, विळा,
काठ्या, गोफणगुंडे, व अपटबार हीं असतात, व मिळाल्यास तलवार,
बंदूकही बरोबर नेतात.
,
चोरीच्या मालाची निर्गतिः- चोरीचा माल ते जंगलांत, झाडा-
खालीं, किंवा ओड्यांत अगर अशाच दुसऱ्या ठिकाणीं पुरून ठेवितात,
आणि संधि सांपडली ह्मणजे सोनार, कलाल, सावकार, पाटील-कुळ-
कर्णी ह्यांना विकतात. चोरलेल्या जनावरांची काय वाट लावितात हें वर
आलेंच आहे.
भामटे.
संज्ञा:- हे घंटी चोर, उचले, खिसेकातरू, टकारी, वडारी, कल-
वडरू, तुडुग वडरू, कामाठी आणि पाथरट या नांवांनींही ओळखले
जातात.<noinclude></noinclude>
pjgj44v2ompx42glhs6zp9jc3vkgdiw
पान:गुन्हेगार जाती.pdf/२०
104
70570
155031
2022-07-24T08:02:40Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "म. - वस्तिः - मूळचे हे लोक तेलगू भाषा बोलणारे जिल्ह्यांपैकी, एखा- ग्रांतील रहिवाशी असावेत. पण हल्लीं पुणे, सातारा, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांत त्यांचा भरणा विशेष आहे. त्यांची व..."
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>म.
-
वस्तिः - मूळचे हे लोक तेलगू भाषा बोलणारे जिल्ह्यांपैकी, एखा-
ग्रांतील रहिवाशी असावेत. पण हल्लीं पुणे, सातारा, अहमदनगर आणि
सोलापूर या जिल्ह्यांत त्यांचा भरणा विशेष आहे. त्यांची वस्ति आहे
अशा गांवांची नांवें जिल्हानिहाय खालीं नमूद केली आहेत. एखादे
गांवीं त्यांना त्रास होऊं लागला, तर तें गांव सोडून ते दुसऱ्या गांवीं
जातात, आणि तेथें सोयरसंबंध करून रहातात.
-
पुणे जिल्हा :- हवेली तालुक्यांत बोपुडी, भोपखेल, फुग्याची वाडी,
मुंढवा, वडगांव शेरी. भिमथडी तालुक्यांत निंबाळकराचें वडगांव, चोप-
डज ऊर्फ भडगव्हाण, वाकी, सोमयाचें करंजें, मोरगांव, बाभुर्डी, कन्हऱ्हाटी.
इंदापूर तालुक्यांत गोंदी. शिरूर तालुक्यांत तळेगांव ढमढेरे, पाबळ,
केंदूर, धामारी. खेड तालुक्यांत लोणी, धामणी, कन्हेरसर. जुन्नर तालु-
क्यांत वळती, रांजणी, खोडद. सातारा जिल्हा:- कोरेगांव तालुक्यांत
रुई, शेंदुरजणें, कन्हेरखेड. कन्हऱ्हाड तालुक्यांत उंब्रज, गोळेश्वर.
खानापूर तालुक्यांत भिकार वडगांव, तडसर, चिचणी. वाळवें तालुक्यांत
गोटखिंडी, बाहादर वाडी. सोलापूर जिल्हा:- बार्शी तालुक्यांत दहि-
टणें. अहमदनगर जिल्हा:- पारनेर तालुक्यांत रुई, बाभुर्डी, अस्तगांव.
श्रीगोंदें तालुक्यांत चांभुर्डी. कर्जत तालुक्यांत शिंदें. जामखेड तालुक्यांत
खर्डे. नेवासें तालुक्यांत हिंगोणी, केंगोणी. संगमनेर तालुक्यांत पिंपरी, लोकें
अजमपूर. नाशिक जिल्हा:- निफाड तालुक्यांत रावळस, कुंदेवाडी, शेवरी,
पिंपरी जांब, सौंदरपूर, ऊगांव, पिंपळस. खानदेश जिल्हा:- शिर्सोली
स्टेशनाजवळ केळी, खर्डी. ब-हाणपूर स्टेशनाजवळ चोरवाडी. बेळगांव
जिल्हा:- चिकोडी तालुक्यांत भेंडवड, खडक, भानवी, नवल्यल, यम-
कनमर्दी, अंकलगी. अथणी तालुक्यांत सकुनहड्डी, यरगट्टी. विजापूर
जिल्हा:- बदामी तालुक्यांत हंसनूर, हलकुर्की, ब्यद्रबुडीहल, असंगी,
कटनल्ली. बागेवाडी तालुक्यांत मसूटी. विजापूर तालुक्यांत अर्केरी,
जलगेरी. इंडी तालुक्यांत बर्गुडी, कुमसगी. धारवाड जिल्हा:- बंकापूर
-<noinclude></noinclude>
ie97zphetx5d5uqajwdhhwi9j7368fg
पान:गुन्हेगार जाती.pdf/२१
104
70571
155032
2022-07-24T08:03:00Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "१२ गुन्हेगार जाती. तालुक्यांत बालेहुसूर. कोल्हापूर संस्थान:- शिरोळ तालुक्यांत दनोली, शिरगांव. सांगली संस्थान:- सांगलीजवळ कौलापूर. अक्कलकोट संस्थानः- अंकलगी, बर्गुडी, कोनली, ( येथें..."
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>१२
गुन्हेगार जाती.
तालुक्यांत बालेहुसूर. कोल्हापूर संस्थान:-
शिरोळ तालुक्यांत दनोली,
शिरगांव. सांगली संस्थान:- सांगलीजवळ कौलापूर. अक्कलकोट
संस्थानः- अंकलगी, बर्गुडी, कोनली, ( येथें भामटे कालीच्या दर्शनास
जातात,) भगेली. माळवा:- देवास. निजामशाही:- सिद्धपूर, मुंगाशी,
एकनाथवाडी, येल्लमवाडी, भैरवाडी, श्रीपतवाडी, ओकर्डी, खरुंडी.
गुन्ह्याचें क्षेत्रः - भामट्यांचा प्रलय सर्व हिंदुस्थानभर आहे. रेल्वे,
बंदरें, बाजार, देवळें, यात्रा वगैरे गर्दीच्या ठिकाणीं भामटे आपले ठेवले-
लेच. प्रवासांत सोबतीच्या मुशाफरांनाही ते सोडीत नाहीत. पण त्यांचा
विशेष भर रेल्वेवर असतो. कारण रेल्वेंत झालेली चोरी मालकाला
बऱ्याच वेळानें कळते; तोंपर्यंत भामटा कोठेंच्या कोठें शेंकडों मैल मागेंच
उतरलेला असतो. कोठें चोरी झाली आणि कोणाचें नांव घ्यावें ह्याचें
मालकाला गूढ पडतें, व त्यामुळे पोलिसाचेही पाय मोडल्यासारखे होतात.
जेव्हां बायकापोरांनिशीं भामट्यांचीं बिन्हाडेंचीं बि-हाडें चोऱ्यांसाठीं
लांब लांब प्रवास करतात, तेव्हां ते बाग, धर्मशाळा, देवळें वगैरे ठिकाणीं
उतरतात; आणि थाप मारतात की आह्मी दुष्काळी मुलुखांतले मराठे
शेतकरी असून पोट भरण्याला निघालों आहोंत.
-
लोकसंख्या:- सुमारें ६०० पुरुष व ६०० बायका अशी त्यांची
खानेसुमारी आहे; पण ती बरोबर नसावी.
स्वरूपः- महार,
मांग, चांभार, ढोर, बुरूड, टाकून बेरडांसुद्धां सर्व
जातींचे हिंदु आणि मुसलमान ह्यांना भामटे लोक आपल्या जातींत
घेतात. इतर जातींची मुलें लहानपणींच घेऊन त्यांना ते आपला धंदा
शिकवितात. अशा मुलांना 'कोन्नड ' अगर 'गोल्ड' ह्मणतात; आणि
मुलींना 'कोन्नडी ' ह्मणतात. एखाद्या कुलवान् स्त्रीचें वांकडें पाऊल पडलें
तर भामटे तिला आसरा देऊन तिचें मूल ठेवून घेतात, आणि लुगडें,
चोळी, व वर रुपया दोन रुपये देऊन तिची बोळवण करतात. दरएक गांवीं<noinclude></noinclude>
ad427yf41upe83xuc3v8w3qwwt27bdb
पान:गुन्हेगार जाती.pdf/२२
104
70572
155033
2022-07-24T08:03:16Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "भामटे. १३ सर्वांत वडील भामटा नाईक असतो, त्याला पाटील, तालमड, तालदरू अगर कट्टिमनी ह्मणतात. जातीच्या पंचायती तो मिटवितो. आपल्या साथीदारांना चोरून एखाद्यानें, चोरीचा माल बळकाविला कि..."
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>भामटे.
१३
सर्वांत वडील भामटा नाईक असतो, त्याला पाटील, तालमड, तालदरू
अगर कट्टिमनी ह्मणतात. जातीच्या पंचायती तो मिटवितो. आपल्या
साथीदारांना चोरून एखाद्यानें, चोरीचा माल बळकाविला किंवा एखाद्या
स्त्रीनें व्यभिचार केला, तर तेलरवा अथवा तेलगोटी करण्याचा भामट्यां-
मध्ये रिवाज आहे. कढत तेलांतून गोटी किंवा पैसा काढावयाचा, ज
हात भाजला नाहीं तर तो इसम किंवा औरत निर्दोषी आहे असें सम-
जावें. पाण्यांत हात भिजवून कढत तेलांत घालून चलाखीने बाहेर
काढला तर त्याला इजा होत नाहीं असें ह्मणतात.
,
भामटे खुजट, टणक, चपळ व जातिसंकरामुळे कांहीं काळे व कांहीं नि-
मगोरे असतात. भामटिणी देखण्या पण व्यभिचारी असतात. त्यांची रहाणी
डौलाची नसते, तरी एकंदरीत ते कपडालत्ता चांगला वापरतात. भाम-
टिणी नथ घालतात, उजवे हातापेक्षां डावे हातावर जास्त गोंधून घेतात
व हातातोंडावरही गोंधतात आणि कधीं कधीं मराठे-ब्राह्मणांच्या बायकां-
प्रमाणें पोषाख करतात. चोरीला निवाला ह्मणजे भामटा कधीं गाफील
नसतो, तो एके जागीं फार वेळ ठरत नाहीं व त्याची नजर चोहोंकडे
असते. चोरींत निष्णात ठरल्याशिवाय भामट्याला बायको मिळत नाहीं.
त्यांची कैकाड्यांशीं सोयरीक होते. ते फार खादाड व दारूबाज अस
तात आणि गांवडुकरें खातात.
भाषा:- एकमेकांत ते वडारी बोली बोलतात. त्यांना मराठी, हिंदु
स्थानी व कानडी येतें. विजापुर जिल्ह्यांत राहणारे घंटी चोर घरीं कानडी
भाषा बोलतात.
उल्मुख अथवा,
वाघनख
फुड्डूड, गोषड
कट्टेड
सांकेतिक शब्द.
ओचखर
डांगिकुशी
वाकडा चाकू.
फौजदार, इन्स्पे- नेल्ला, कुछलु
यरवेलक
वैपल
क्टर.
पोलीस.
आला.
लप.
कान्स्टेबल.
सोन्याचे दागिने.
रुपये.<noinclude></noinclude>
0ietttluzzmociao2gjgu4jm6rex3r9