विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.9
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf
106
1874
232820
232810
2026-07-01T12:01:02Z
कल्पनाशक्ती
3813
232820
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]]
|Language=mr
|Volume=
|Author=विवेकानंद
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=न. म. कुलकर्णी
|Address=
|Year=१९२२
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist 4="अनुक्रमणिका" 5="हिंदु देवालय फोटो" 6="एक उघडे रहस्य" 19="कैवल्याचा मार्ग" 32="याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी" 44="सांख्यविचार" 65="सांख्य आणि वेदान्त" 82="वेदान्त व हक्क" 107="हक्क"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
9mjgkbhq4346g00or1ax0yjmec25hjt
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१०६
104
66668
232819
162276
2026-07-01T12:00:07Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
232819
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|खंड]|वेदान्त व हक्क.|१०१}}
{{rule}}</noinclude>करण्याकरितां खटपट केली पाहिजे. सामान्य लोकांपेक्षा चार अक्षरे आपणास अधिक येतात आणि त्यांच्याहून अधिक सुंदर भाषा आपणास बोलतां येते इतक्यानेच तुम्ही स्वतःस त्यांच्याहून श्रेष्ठ समजत असता; पण अशा भलत्याच भ्रमांत जोवर तुम्ही स्वतःस बांधून घेतले असेल तोवर मुक्तिमार्गाकडे एक पाऊलभरही तुम्ही पुढे टाकलेले नाही हे पक्के लक्ष्यात ठेवा. हा मार्ग मुक्तीचा नाही, इतकेच नव्हे तर यामुळे तुमच्या पायांतील शृंखलेला एक एक नवा दुवा तुम्ही रोज जोडीत असतां; आणि अशांतच 'मी साधु, मी ब्रह्मनिष्ठ' या श्रमानें जर तुमच्या चित्तास पछाडले, तर मग ईश्वरच तुमचे रक्षण करो. मग त्या दुर्गतीपंकांतून तुम्हांस बाहेर ओढण्याचे सामर्थ्य या भुवनत्रयांत कोणाच्याही अंगी नाही. 'मी साधु' या पाशापुढे नागपाश आणि कालपाश हे कःपदार्थ होत. पैशाचा मोठेपणा अथवा दुसऱ्या कसल्या गोष्टीने आलेला मोठेपणा हा जीवात्म्यास इतक्या पक्क्या रीतीने बांधीत नाही; पण 'मी साधु' या पाशाचा प्रभाव अतर्क्य-अलक्ष्य आहे. मनुष्याच्या मनात घर करण्याकरितां टपून बसलेल्या पिशाचसंघांत हा ब्रह्मसमंध आहे. याचें बिऱ्हाड एकदां आले की त्याला गाडणारा पंचाक्षरी तुम्हांस कोठेही भेटावयाचा नाही. तुम्ही स्वतःस ज्या गुणाने अधिक पवित्र समजत असतो तो गुण कोणचा? तुमच्या ठिकाणी असलेल्या ईश्वरत्वाचा. हे ईश्वरत्व इतर ठिकाणीही आहे; आणि स्वतःच्या ठिकाणचे ईश्वरत्वच सर्वत्र भरलें आहे हे तुम्हांस कळले नसेल, तर ज्ञानाचा ओनामाही तुम्हांस ठाऊक नाही. अशा स्थितीत स्वतःस तुम्ही ज्ञानी समजत असाल, तर तुम्ही अज्ञाहून अज्ञ इतकें मात्र खरें. "सर्वं खल्विदं ब्रह्म' मग यांत उच्चनीचता आली कोठून? "रामसभामें हरिजन बैठे को बडा को छोटा है" परमात्म्याच्या देवळाच्या सभामंडपांतच सर्व विश्व बसले आहे. हे ज्ञान तुम्हांस झाले असेल तर ठीकच आहे, आणि तसे नसेल तर ईश्वराची भेट होण्यास अद्यापि बरेच कल्प तुम्हांस वाट पाहावी लागणार हे उघड आहे.<Br>
{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
l2nszckxo99f1s8inhsdqy8dj63j3j4
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१०७
104
66669
232821
162277
2026-07-01T12:03:12Z
कल्पनाशक्ती
3813
232821
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|१०२|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude><br>
{{center|{{x-larger|'''७'''<br>'''हक्क'''}}}}
{{rule|4em}}{{rule|4em}}<br>
{{gap}}या साऱ्या सृष्टीच्या घडामोडीचे अवलोकन केले तर त्यात दोन प्रकारच्या शक्तींची कार्ये सुरू आहेत असे आढळून येते. यांतील एक शक्ति सदोदित विघटनेचे कार्य करीत असते. संयुक्त पदार्थातील घटक एकमेकांपासून विभक्त करावयाचे हे तिचे कार्य आहे; आणि दुसरी शक्ति एकीकरणाची क्रिया करीत असते. सृष्टीतील वेगवेगळे पदार्थ एकत्र आणून त्यांचा संयोग करावयाचा हे या दुसऱ्या प्रकारच्या शक्तीचे कार्य आहे. पहिल्या प्रकारच्या शक्तीमुळे व्यक्ती निर्माण होत असतात; आणि दुसरी शक्ति, जणू काय, या साऱ्या व्यक्तींची अथवा व्यष्टींची गांठ बांधून त्यांना समष्टिरूप करावें व त्यांच्यांत एकतानता आणावी यासाठी धडपडत असते. अशा रीतीने विभक्ततेचा प्रत्यय सर्वत्र येत असतांही तिच्याच पोटी एकतानतेची धडपडही चालू आहे. या दोन्ही शक्तींचे कार्य सृष्टीच्या सर्व भागांत आणि मनुष्याच्या जीवनांतही चालू असल्याचा प्रत्यय येतो. केवळ जड अथवा पदार्थसृष्टीकडे पाहिले तरी तीत या दोन्ही शक्तींचे कार्य अगदी स्पष्ट स्वरूपाने दिसते. एका पक्षी पहिल्या शक्तीच्या कार्यामुळे व्यक्ति व्यक्तीपासून भिन्न होत असते. दोन व्यक्तींत प्रत्येकी विशिष्ट गुणदोषांची वाढ होऊन त्या व्यक्ती परस्परांपासून अधिकाधिक दूर होत असतात; आणि दुसऱ्या पक्षी दुसऱ्या प्रकारच्या शक्तीच्या कार्यामुळे अनेक व्यक्तींत गुणदोषांचे साधर्म्य उत्पन्न होऊन त्यांची एक जाति बनत असते. एका जातींत समसमान गुणांच्या अनेक व्यक्ती एकत्र बांधल्या जातात आणि यामुळे त्यांच्यांत एकतानता उत्पन्न होत असते. एका जातींत बाह्य आकाराने व अंतर्गत गुणांनी एकमेकांशी जुळणाऱ्या अनेक व्यक्तींचा समावेश होतो. हाच नियम मनुष्यप्राण्याच्या सामाजिक जीवनालाही लागू आहे. मनुष्य समाजरूपाने राहूं लागला तेव्हांपासून त्या समाजांत घटना आणि विघटना या दोन शक्तींचें कार्य सतत सुरू राहिले आहे. या दोन क्रियांची रूपें देश, काल आणि परिस्थिति यांस अनुसरून वेगवेगळ्या प्रकारची होतात आणि तदनुरूप भिन्न<noinclude></noinclude>
7sdrdh5nyinqwto332epzw5tslpwobw
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१०७
104
110570
232824
230776
2026-07-02T05:47:55Z
JayashreeVI
4058
232824
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रकरण ८ वें'''}}}}
{{rule|7em}}
{{larger|{{center|'''दक्षिण-काशी : श्रवणबेलगोला'''}}}}
{{gap}}{{x-larger|'''म्है'''}}}}'''सूर''' व त्यालगतचा मलबार या प्रांतांत प्राचीनकाळीं जैन- धर्माचा पुष्कळच प्रसार झालेला होता. पण पुढे शंकराचार्य रामानुजाचार्य यांच्यासारखे वैदिकधर्माचे पुरस्कर्ते व प्रवर्तक आचार्य या प्रांतांत उदयास आले आणि विजयानगराच्या मोठ्या वैदिकधर्मी साम्राज्याचा या प्रांतावर ताबा झाला. यामुळे जैनधर्माला अवनत काळ आला व या प्रांतांतील त्याचे वर्चस्व नाहींसें झालें. परंतु जैनधर्मांच्या भरभराटीच्या काळांत या प्रांतांत जिकडे तिकडे जैन वस्ती, तीर्थ- करांच्या मूर्ती व धार्मिक इमारती बांधण्यांत आल्या. या सर्वांचे अव- शेष अजून म्हैसूर व मलबार या प्रांतांत तगून राहिले आहेत. सध्यां हे अवशेषच प्रवाशांचे मुख्य दर्शनविषय झाले आहेत. या जैनधर्मी दर्शन विषयामध्यें श्रवणबेलगोला हैं अत्यंत पवित्र स्थान मानतात. जैन लोक तर या स्थानाला काशी इतकें धार्मिक महत्त्व देतात व म्हणून त्याला ते दक्षिण काशी म्हणतात. धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र असें हें स्थान निसर्ग व शिल्पकला या दोन्ही दृष्टीनींही अत्यंत प्रेक्ष- णीय आहे. म्हणून थोडेसे आडवाटेवर असतांना सुद्धां मी आपल्या काशीरामेश्वर यात्रा योजनेमध्यें या स्थानाचा अन्तर्भाव केला होता. तदनुरूप आम्हीं हैं स्थान पाहण्यास मोठ्या उत्सुक व उतावीळ मनानें ता. ६ मार्च सन १९३६ रविवार रोजी सकाळी साडेसात वाजतां म्हैसूरहून मोटारमार्गे व मोटारींतून निघालों.
{{gap}}'''श्रवणबेलगोला''' है म्हैसूरच्या थेट उत्तरेस असून सुमारें पन्नास मैल अंतरावर आहे. म्हैसूरपासून '''फ्रेंच रॉक्स''' या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणा- पर्यंतचा रस्ता फार चांगला आहे. दुतर्फा सुंदर हिरव्यागार वृक्षांची-<noinclude></noinclude>
pw10x1wb7b08fuy90lwsti5c13l07ms
232825
232824
2026-07-02T05:53:09Z
JayashreeVI
4058
232825
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रकरण ८ वें'''}}}}
{{rule|7em}}
{{larger|{{center|'''दक्षिण-काशी : श्रवणबेलगोला'''}}}}
{{gap}}{{x-larger|'''म्है'''}}'''सूर''' व त्यालगतचा मलबार या प्रांतांत प्राचीनकाळीं जैनधर्माचा पुष्कळच प्रसार झालेला होता. पण पुढे शंकराचार्य रामानुजाचार्य यांच्यासारखे वैदिकधर्माचे पुरस्कर्ते व प्रवर्तक आचार्य या प्रांतांत उदयास आले आणि विजयानगराच्या मोठ्या वैदिकधर्मी साम्राज्याचा या प्रांतावर ताबा झाला. यामुळे जैनधर्माला अवनत काळ आला व या प्रांतांतील त्याचे वर्चस्व नाहींसें झालें. परंतु जैनधर्माच्या भरभराटीच्या काळांत या प्रांतांत जिकडे तिकडे जैन वस्ती, तीर्थकरांच्या मूर्ती व धार्मिक इमारती बांधण्यांत आल्या. या सर्वांचे अवशेष अजून म्हैसूर व मलबार या प्रांतांत तगून राहिले आहेत. सध्यां हे अवशेषच प्रवाशांचे मुख्य दर्शनविषय झाले आहेत. या जैनधर्मी दर्शन विषयामध्यें '''श्रवणबेलगोला''' हैं अत्यंत पवित्र स्थान मानतात. जैन लोक तर या स्थानाला काशी इतकें धार्मिक महत्त्व देतात व म्हणून त्याला ते दक्षिण काशी म्हणतात. धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र असें हें स्थान निसर्ग व शिल्पकला या दोन्ही दृष्टीनींही अत्यंत प्रेक्षणीय आहे. म्हणून थोडेसे आडवाटेवर असतांना सुद्धां मी आपल्या काशीरामेश्वर यात्रा योजनेमध्यें या स्थानाचा अन्तर्भाव केला होता. तदनुरूप आम्हीं हें स्थान पाहण्यास मोठ्या उत्सुक व उतावीळ मनानें ता. ६ मार्च सन १९३६ रविवार रोजी सकाळी साडेसात वाजतां म्हैसूरहून मोटारमार्गे व मोटारींतून निघालों.
{{gap}}'''श्रवणबेलगोला''' है म्हैसूरच्या थेट उत्तरेस असून सुमारें पन्नास मैल अंतरावर आहे. म्हैसूरपासून '''फ्रेंच रॉक्स''' या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणापर्यंतचा रस्ता फार चांगला आहे. दुतर्फा सुंदर हिरव्यागार वृक्षांची-<noinclude></noinclude>
jxk6lbpv9j1f5mlistso7ujwgxnc2rg
232826
232825
2026-07-02T05:53:39Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
232826
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रकरण ८ वें'''}}}}
{{rule|7em}}
{{larger|{{center|'''दक्षिण-काशी : श्रवणबेलगोला'''}}}}
{{gap}}{{x-larger|'''म्है'''}}'''सूर''' व त्यालगतचा मलबार या प्रांतांत प्राचीनकाळीं जैनधर्माचा पुष्कळच प्रसार झालेला होता. पण पुढे शंकराचार्य रामानुजाचार्य यांच्यासारखे वैदिकधर्माचे पुरस्कर्ते व प्रवर्तक आचार्य या प्रांतांत उदयास आले आणि विजयानगराच्या मोठ्या वैदिकधर्मी साम्राज्याचा या प्रांतावर ताबा झाला. यामुळे जैनधर्माला अवनत काळ आला व या प्रांतांतील त्याचे वर्चस्व नाहींसें झालें. परंतु जैनधर्माच्या भरभराटीच्या काळांत या प्रांतांत जिकडे तिकडे जैन वस्ती, तीर्थकरांच्या मूर्ती व धार्मिक इमारती बांधण्यांत आल्या. या सर्वांचे अवशेष अजून म्हैसूर व मलबार या प्रांतांत तगून राहिले आहेत. सध्यां हे अवशेषच प्रवाशांचे मुख्य दर्शनविषय झाले आहेत. या जैनधर्मी दर्शन विषयामध्यें '''श्रवणबेलगोला''' हैं अत्यंत पवित्र स्थान मानतात. जैन लोक तर या स्थानाला काशी इतकें धार्मिक महत्त्व देतात व म्हणून त्याला ते दक्षिण काशी म्हणतात. धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र असें हें स्थान निसर्ग व शिल्पकला या दोन्ही दृष्टीनींही अत्यंत प्रेक्षणीय आहे. म्हणून थोडेसे आडवाटेवर असतांना सुद्धां मी आपल्या काशीरामेश्वर यात्रा योजनेमध्यें या स्थानाचा अन्तर्भाव केला होता. तदनुरूप आम्हीं हें स्थान पाहण्यास मोठ्या उत्सुक व उतावीळ मनानें ता. ६ मार्च सन १९३६ रविवार रोजी सकाळी साडेसात वाजतां म्हैसूरहून मोटारमार्गे व मोटारींतून निघालों.
{{gap}}'''श्रवणबेलगोला''' है म्हैसूरच्या थेट उत्तरेस असून सुमारें पन्नास मैल अंतरावर आहे. म्हैसूरपासून '''फ्रेंच रॉक्स''' या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणापर्यंतचा रस्ता फार चांगला आहे. दुतर्फा सुंदर हिरव्यागार वृक्षांची-<noinclude></noinclude>
blqpehhg9ie4gmnkjxbas0xojzfp1c0
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१०८
104
110879
232822
2026-07-02T05:35:15Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "रांगची रांग लावलेली आहे. या सर्व भागांत कावेरीच्या कालव्याचे जाळे पसरलेलें असल्यामुळे जिकडे तिकडे हिरवी हिरवीगार शेतेंच शेत लागतात. सिंध प्रांताला जशी सिंधु नदी तशी म्हैसूर प्..."
232822
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{rh|८४|'''काशी-रामेश्वर यात्रा}}</noinclude>रांगची रांग लावलेली आहे. या सर्व भागांत कावेरीच्या कालव्याचे जाळे पसरलेलें असल्यामुळे जिकडे तिकडे हिरवी हिरवीगार शेतेंच शेत लागतात. सिंध प्रांताला जशी सिंधु नदी तशी म्हैसूर प्रांताला कावेरी नदी लोकांची अन्नदात्री झालेली आहे यांत शंका नाहीं. कावेरी नदीच्या नव्याच काढलेल्या अर्विन कालव्यानें भिजविलेला भूमिभाग टाकून वायव्य दिशेकडे रस्ता वळला म्हणजे मात्र रुक्ष व माळरानी भूमिभाग लागतो. कारण या भागांत पाऊस कमी पडतो व नद्या कालवे यांचाही अभाव आहे. पण सखल भागांत विहिरींच्या पाण्यावर थोडे फार बागाईत होतें व तेथेंच हिरवीगार शेतें दिसतात. अकरा बाराच्या सुमारास आम्ही चन्नराय पाटणाच्यानजीक आलों, तोंच आमचे उजवे हातस सपाट खुल्या मैदानांत दोन काळेभोर खडकाचे उंच डोंगर दृष्टीस पडले, ते '''श्रवणबेलगोल्या'''चे प्रख्यात डोंगर होत असें आम्हांला मोटारींतल्या लोकांनी सांगितले व आम्ही आश्चर्यचकित दृष्टीनें त्यांचेकडे पाहूं लागलों. '''चन्नराय पाटणा'''पासून पूर्वेकडे आठ मैलांवर '''श्रवणबेलगोला''' असल्यामुळे दक्षिणेकडून '''चन्नराय पाटणा'''कडे जातांना हे डोंगर पुष्कळ
आधीपासून दिसूं लागतात.
<br>{{gap}}त्याप्रमाणें ते आम्हांला दिसूं लागले व तेव्हांपासून आमचे मन त्या पवित्र स्थानाने जणूं कांहीं आकर्षून घेतलें. बारा वाजण्याच्या सुमारास आम्ही '''चन्नराय पाटणा'''च्या मोटार अड्यावर आलो. येथें आम्हांला मोटारींतून उतरावें लागलें. कारण '''श्रवणबेलगोला'''ला जाणारी मोटार दुसरीकडून यावयाची होती. ती येईपर्यंत आम्हांला वाट पहावी लागली. लांबचा प्रवास वेळेवर आटोपून उतरावयाचें स्टेशन जवळ आलें असतांना आगगाडी मध्येच थांबली म्हणजे मनाची जी उतावीळ व उत्कंठित वृत्ति होते तशी आमच्या मनाची स्थिति झाली. '''श्रवणबेलगोला''' अवघें आठ मैल होतें; तीन तासांत चालत सुद्धां जाणें शक्य; पण या
आठ मैलांच्या प्रवासाकरितां आम्हांला आमच्या येणाऱ्या मोटारीची दीड दोन तास वाट पहावी लागली. हा वेळ कसा एकदां संपतो असें-<noinclude></noinclude>
t0p5r2k4rzzgpp80wrya2j2aafho6r7
232823
232822
2026-07-02T05:35:42Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
232823
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|८४|'''काशी-रामेश्वर यात्रा}}</noinclude>रांगची रांग लावलेली आहे. या सर्व भागांत कावेरीच्या कालव्याचे जाळे पसरलेलें असल्यामुळे जिकडे तिकडे हिरवी हिरवीगार शेतेंच शेत लागतात. सिंध प्रांताला जशी सिंधु नदी तशी म्हैसूर प्रांताला कावेरी नदी लोकांची अन्नदात्री झालेली आहे यांत शंका नाहीं. कावेरी नदीच्या नव्याच काढलेल्या अर्विन कालव्यानें भिजविलेला भूमिभाग टाकून वायव्य दिशेकडे रस्ता वळला म्हणजे मात्र रुक्ष व माळरानी भूमिभाग लागतो. कारण या भागांत पाऊस कमी पडतो व नद्या कालवे यांचाही अभाव आहे. पण सखल भागांत विहिरींच्या पाण्यावर थोडे फार बागाईत होतें व तेथेंच हिरवीगार शेतें दिसतात. अकरा बाराच्या सुमारास आम्ही चन्नराय पाटणाच्यानजीक आलों, तोंच आमचे उजवे हातस सपाट खुल्या मैदानांत दोन काळेभोर खडकाचे उंच डोंगर दृष्टीस पडले, ते '''श्रवणबेलगोल्या'''चे प्रख्यात डोंगर होत असें आम्हांला मोटारींतल्या लोकांनी सांगितले व आम्ही आश्चर्यचकित दृष्टीनें त्यांचेकडे पाहूं लागलों. '''चन्नराय पाटणा'''पासून पूर्वेकडे आठ मैलांवर '''श्रवणबेलगोला''' असल्यामुळे दक्षिणेकडून '''चन्नराय पाटणा'''कडे जातांना हे डोंगर पुष्कळ
आधीपासून दिसूं लागतात.
<br>{{gap}}त्याप्रमाणें ते आम्हांला दिसूं लागले व तेव्हांपासून आमचे मन त्या पवित्र स्थानाने जणूं कांहीं आकर्षून घेतलें. बारा वाजण्याच्या सुमारास आम्ही '''चन्नराय पाटणा'''च्या मोटार अड्यावर आलो. येथें आम्हांला मोटारींतून उतरावें लागलें. कारण '''श्रवणबेलगोला'''ला जाणारी मोटार दुसरीकडून यावयाची होती. ती येईपर्यंत आम्हांला वाट पहावी लागली. लांबचा प्रवास वेळेवर आटोपून उतरावयाचें स्टेशन जवळ आलें असतांना आगगाडी मध्येच थांबली म्हणजे मनाची जी उतावीळ व उत्कंठित वृत्ति होते तशी आमच्या मनाची स्थिति झाली. '''श्रवणबेलगोला''' अवघें आठ मैल होतें; तीन तासांत चालत सुद्धां जाणें शक्य; पण या
आठ मैलांच्या प्रवासाकरितां आम्हांला आमच्या येणाऱ्या मोटारीची दीड दोन तास वाट पहावी लागली. हा वेळ कसा एकदां संपतो असें-<noinclude></noinclude>
1n51pgcxk4hf5akqiru3qpyzyzum23v