विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.9 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf 106 1874 232908 232838 2026-07-06T11:14:26Z कल्पनाशक्ती 3813 232908 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]] |Language=mr |Volume= |Author=विवेकानंद |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=न. म. कुलकर्णी |Address= |Year=१९२२ |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist 4="अनुक्रमणिका" 5="हिंदु देवालय फोटो" 6="एक उघडे रहस्य" 19="कैवल्याचा मार्ग" 32="याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी" 44="सांख्यविचार" 65="सांख्य आणि वेदान्त" 82="वेदान्त व हक्क" 107="हक्क" 118 ="अभ्यास" 141="भक्ति"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} 84n69yokze4fdtg77xo8ios8plgi2ox पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२५ 104 66690 232892 162300 2026-07-06T10:22:46Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232892 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|१२० |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>वली असे घडल्याचे एकही उदाहरण अस्तित्वात नाही. बाहेरून दुसऱ्या एखाद्या संस्कृत मानवकुलाच्या आगमनावांचून जिची संस्कृति सिद्ध झाली अशी एकही शाखा कोठे अस्तित्वात नाही. यावरून एखाद्या दुसऱ्या मानवकुलाकडेच सुधारणेचा मक्ता होता असे मानणे ओघास येते. या संस्कृत कुलाच्या शाखोपशाखांचा विस्तार जगभर झाला आणि अशा रीतीने या सुधारणेच्या वृक्षाची वाढ झाली असली पाहिजे असे मानण्यावांचून गत्यंतर नाही.<br>{{gap}}या विषयाचा विचार व्यवहाराच्या दृष्टीने करण्याकरितां अर्वाचीन शास्त्रांची भाषा आपण आतां बोलूं. पण येथेही एक सूचना तुम्हांस देणे इष्ट आहे. धार्मिक बाबतींत ज्याप्रमाणे आपली बुद्धि पूर्वग्रहांनी दूषित झाली असल्याचे पुष्कळ वेळां आढळून येते, त्याचप्रमाणे अर्वाचीन भौतिक शास्त्रांच्या अचूकपणाबद्दल आपल्या मनांत फाजील विश्वास भरला आहे. जुने धार्मिक लोक ज्याप्रमाणे आपल्या धर्मग्रंथांतील वचनाचे ग्रहण आंधळेपणाने करतात, त्याचप्रमाणे अर्वाचीन सुशिक्षित भौतिकशास्त्रांच्या वचनांपुढे निमूटपणे मान वांकवितात. ज्याप्रमाणे धर्मोपाध्याय आपले काम आपल्या खास हक्काचे असे समजून करीत असतात, त्याचप्रमाणे पुष्कळ अर्वाचीन विद्वानही आधिभौतिक शास्त्रांचे उपाध्ये बनले आहेत; आणि या उपाध्यांनी आपणांस काहीही सांगितले तरी आपण डोळे झाकून त्यांचे म्हणणे कबूल करीत असतो. डार्विन, हक्स्ले इत्यादिकांचे नुसतें नांव कानी पडतांच आपल्या बुद्धीचे डोळे मिटत असतात. असे करणे हीच सध्याची 'फ्याशन' आहे. ज्याला आपण सशास्त्र ज्ञान अशी संज्ञा लावीत असतो, त्या ज्ञानाच्या एकंदर पुंजीपैकी नव्याणव हिसे गोष्टी नुसत्या उपपत्ती आहेत. त्यांत सत्याचा अंश कितपत आहे या गोष्टीचा निर्णय अद्यापिही झालेला नाही. यांतील कित्येक उपपत्ती तर जुन्या भुताटकीच्या गोष्टींहून अधिक योग्यतेच्या नाहीत. जुन्या काळी ज्याप्रमाणे भुतांना पुष्कळ डोकी आणि हात होते, त्याचप्रमाणे या उपपत्तींना पुष्कळ शिंगें फुटलेली असतात. याकरितां उगीच मोठ्या नावाखाली फसून जाण्याचे कारण आपणास नाही. खरा शास्त्रीय मार्ग म्हटला म्हणजे आपली बुद्धि शाबूत आणि डोळस ठेवणे हाच होय. 'अखंड सावधान असावें' हेच आपणास हितप्रद आहे. ज्याप्रमाणे<noinclude></noinclude> 43gpiv9plodnlohqzkjydel2ggwzivj पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२६ 104 66691 232893 162301 2026-07-06T10:25:52Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232893 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|खंड ]|अभ्यास.|१२१ }} {{rule}}</noinclude>धर्मोपाध्यांची शास्त्रे तावून सुलाखून घेतली पाहिजेत, त्याचप्रमाणे अर्वाचीन शास्त्रोपाध्यांची वचनेंही तोलून घेण्यास आपण शिकले पाहिजे. एखादा अर्वाचीन पंडित केवढाही मोठा असला तरी तो सांगेल तें एकदम खरें मानूं नये. आरंभी आपली वृत्ति साशंक ठेवणे आपल्या हिताचे आहे. त्याचें म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांतील साऱ्या मुद्यांचे पृथक्करण करावे; अनुभव पाहावा आणि अशा रीतीने तावून सुलाखून नंतर त्याचे ग्रहण करावें. अर्वाचीन शास्त्रांनी सांगितलेले काही सिद्धांत सर्वत्र प्रचलित झाले आहेत, परंतु त्यांची निःसंशय सिद्धि अद्यापि झालेली नाही. गणितशास्त्र हे मोठे निश्चित शास्त्र; तथापि त्याच्या कित्येक उपपत्ती नुसत्या गृहीत धराव्या लागतात. कारण त्या गृहीत धरल्या नाहीत तर पुढे पाऊलच पडावयाचे नाही. ज्ञानाची वाढ होईल तशा या उपपत्ती आपोआपच मागे पडत जातील.<br>{{gap}}खिस्ती शकाच्या पूर्वी सुमारे १४०० वर्षांवर एक महान् तत्त्वदर्शी होऊन गेला. सूक्ष्मेंद्रियांच्या ज्या क्रिया अनुभवास येतात त्यांचे निरीक्षण व पृथक्करण करून त्यांना सूत्रबद्ध करण्याची खटपट त्याने केली. त्यानंतर त्याच्या कित्येक अनुयायांनी या शास्त्राच्या वेगवेगळ्या भागांचा विशेष अभ्यास करून या शास्त्राची वाढ केली. या शास्त्राचा अभ्यास अत्यंत मनःपूर्वक जर कोणी केला असेल तर तो हिंदूंनीच होय. दुसऱ्या कोणत्याही मानवकुलाने त्याकडे विशेष लक्ष्य दिले नाही. आज या विषयाची चर्चा आपणांसमोर मी करीत आहे, पण हे सारे विवेचन ऐकून घेऊन त्याप्रमाणे प्रत्यक्ष अभ्यास तुम्हांपैकी किती लोक करतील हे मला सांगता येत नाही; आणि काही जणांनी तसा आरंभ केला तरी त्या मार्गात किती दिवस ते टिकून राहतील हाही एक प्रश्नच आहे. या बाबतींत तुम्ही पाश्चात्य लोक अद्यापि अनभ्यस्त आहां; या बाबींत हिंदु लोक फार पक्के. पिढ्यांमागे पिढ्या या रीतीने युगानुयुगे त्यांचा अभ्यास चालू आहे. विशिष्ट देवळांत ठरीव वेळी जावें आणि ठरीव कवाईत करून ठरीव स्तोत्रे म्हणावी अशी पद्धत हिंदु लोकांत नाही हे तुम्हांस ठाऊक असेलच. तथापि प्राणायाम करून मनाची एकाग्रता करण्याचा अभ्यास ते अद्यापि रोज करीत असतात, हे ऐकून तुम्हांस नवलच वाटेल. परमेश्वराच्या प्रार्थनेचा त्यांचा मुख्य कार्यक्रम हाच. हे शिक्षण त्यांना जन्मादारभ्य मिळालेले असते आणि ते त्यांचे एक प्रमुख कर्तव्यच होऊन बसलेले असते. हिंदुस्थान<noinclude></noinclude> 6jsuezy3a7g85yon4z4y49b3ikrvy49 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२७ 104 66692 232894 162302 2026-07-06T10:28:53Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232894 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|१२२ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>देशाचा धर्मच अशा प्रकारचा आहे. फार झाले तरी व्यक्तीला अनुरूप असा फरक या क्रियांच्या आचारांत दिसेल; परंतु तत्त्व एकच. एखादा मनुष्य काही विशिष्ट प्रकाराने प्राणायाम करीत असेल आणि मन एकाग्र करण्याचा एखाद्याचा मार्ग काही विशिष्ट प्रकारचा असेल; तथापि दोघांचें अंतिम साध्य एकच. जो तो आपापल्या रीतीने आपला अभ्यास निमूटपणे करीत असतो. आपल्या अभ्यासाच्या पद्धतीची चर्चा चार चौघांसमक्ष तो कधीच करीत नाही. फार काय, पण ती पद्धत त्याच्या खुद्द बायकोला सुद्धा समजावयाची नाही. मुलाचा मार्ग कोणता हे बापाला ठाऊक नसते. तथापि प्रत्येकानें अभ्यास केलाच पाहिजे हे मात्र खरे. असें आहे तथापि यांत कांहीं गुप्त अथवा अगम्य आहे, असेंही कोणी समजत नाही. 'गुप्त, अगम्य' या शब्दांचा संबंध अर्थाअर्थी अभ्यासाशी नाही. तुम्ही गंगातीरी गेला तर डोळे मिटून चित्तैकाय साधणारे हजारों लोक तुम्हांस आढळून येतील. या अभ्यासांतील साऱ्याच क्रिया सर्वांस साध्य होतील असें नाहीं; आणि असें होण्याची कारणे दोन आहेत. एक असें की योगमार्गावर आरूढ होण्याची योग्यता सामान्य मनुष्यांस असत नाही असें योगी म्हणतात आणि यामुळे हा मार्ग सर्वांस दाखविण्यास ते तयार नसतात. योग्यांच्या या म्हणण्यांत बरेंच तथ्य आहे ही गोष्ट खोटी नाही, तथापि त्यांत त्यांच्या स्वतःच्या आढ्यतेचाही अंश असतो हेही खोटें नाही. दुसरे असें की सामान्य जनांचा मार्ग सोडून एखाद्या वेगळ्या मार्गाचा स्वीकार करण्यास मनुष्याचे मन साहजिकच कचरतें. लोकांच्या उपहासाची भीति त्याला वाटत असते. तुमच्या या देशांत प्राणायाम करण्याची भीति पुष्कळांस वाटेल. चार चौघांसमक्ष हा अभ्यास करण्यास त्याचे मन कचरेल, कारण येथले लोक त्याला विक्षिप्त समजल्याशिवाय राहणार नाहीत. येथे 'फ्याशन' हेच दैवत आहे आणि 'फ्याशन' सोडून कोणी वागला तर तो लोकांच्या उपहासास अवश्य पात्र होतो. "हे देवा, माझी रोजची भाकरी मला दे" असली प्रार्थना करणे ही तुमची रूढी असल्यामुळे तसे करणे येथे श्रेयस्कर समजले जाते; पण हिंदुस्थानांत अशी प्रार्थना कोणी केली तर लोक त्याची थट्टा उडवितील. त्रैलोक्याधिपतीकडे जाऊन चतकोर भाकरी मागण्याची कल्पना त्यांच्या चित्तास पटावयाची नाही. "हे परमेश्वरा, आकाशांतील<noinclude></noinclude> s644eiv7ndme3plzmjz72tsm4ajb4rh पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२८ 104 66693 232895 162303 2026-07-06T10:31:16Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232895 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|खंड ]|अभ्यास.|१२३ }} {{rule}}</noinclude>बापा," अशी हांक मारणे तुम्हांस सयुक्तिक वाटते; पण देव आपल्या अंतर्यामींच आहे अशी आम्हा हिंदु लोकांची खात्री असल्यामुळे परमेश्वराला आकाशांत शोध करणाऱ्या माणसाची कीव आह्मांस येईल. एकंदरीने मुद्दा इतकाच की देशपरत्वें चालू असणाऱ्या रूढीत ढवळाढवळ करण्यास कोणीही मनुष्य सहसा तयार होत नाही.<br>{{gap}}आपल्या देहांत ज्ञानतंतूंच्या मध्यवर्ती नाड्या तीन आहेत असे योग्यांचें म्हणणे आहे. यांपैकी एकीचे नांव इडा असें असून दुसरीचें पिंगला असें आहे; आणि या दोहोंच्या मध्ये सुषुम्ना या नावाची नाडी आहे. या तिन्ही नाड्या पृष्ठवंशांतर्गत आहेत. आपल्या पाठीच्या कण्याची जी हाडे आहेत त्यांच्या पोकळीत या तीन नाड्या आहेत. इडा ही उजवीकडे आणि पिंगला डावीकडे आहे. इडा आणि पिंगला हे ज्ञानतंतूंचे रज्जू आहेत. काथ्याच्या बारीक तंतूंचा मोठा जाड दोर वळावा त्याप्रमाणे इडा आणि पिंगला या नाड्या बारीक बारीक ज्ञानतंतूंच्या एकीकरणाने बनल्या आहेत. या दोहोंच्या मधील सुषुम्ना नाडी ही नुसती पोकळी आहे. तिच्यांत ज्ञानतंतूंचे दोर नाहीत. या सुषुम्नेचे द्वार बंद आहे आणि सामान्य मनुष्याला या पोकळ नाडीचा काही उपयोग होत नाही. त्याची सारी देहपरिचर्या इडा आणि पिंगला या दोन नाड्यांच्या द्वारेंच चालू असते. या दोन नाड्यांमधून वायूचें अभिसरण वरून खाली आणि खालून वर होत असते, आणि याच नाड्यांशी शरिरातील दुसरे ज्ञानतंतू जोडलेले असून त्यांच्या द्वारा हुकुमांची नेआण होत असते. शरिरांतील सारी इंद्रिये अशा रीतीने या दोन नाड्यांशी जोडलेली असतात. <br>{{gap}}या दोन नाड्यांच्या कार्यात समतोलपणा आणणे हा प्राणायामाचा मुख्य हेतु आहे. नुसता प्राणायाम ही विशेष महत्वाची क्रिया आहे असें नाहीं; तर त्या क्रियेनें जो हेतु साध्य करावयाचा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. प्राणायामाने पुष्कळशी हवा फुप्फुसांत भरली जाते व तीमुळे रक्त शुद्ध होतें इतकेंच. यापेक्षा त्याचा अधिक उपयोग नाही. आपण आपल्या नाकाने हवा आंत घेतों यांत गुप्त अथवा रहस्यमय असें काय आहे? हवा आंत घेणे आणि अशा रीतीने रक्त शुद्ध करणे ही क्रिया आपल्या ठिकाणी प्रत्येक क्षणी चालू आहे. हा केवळ गतीचा एक प्रकार आहे. ज्यापासून ही गति अनेक<noinclude></noinclude> 5osnq96iizql1ukpbecoaknmrextlx3 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२९ 104 66694 232896 162304 2026-07-06T10:33:32Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232896 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|१२४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>प्रकारांनी प्रकट होते, त्या शक्तीच्या मूलरूपास प्राण अशी संज्ञा आहे. जगांत जितक्या प्रकारच्या गती आपल्या अवलोकनांत येतात, तितक्या साऱ्यांचा उगम प्राणापासूनच झाला आहे. प्राणशक्तीनेच इतकी अनेकविध रूपे घेतली आहेत. प्राणाचे स्वरूप विद्युत् आणि चुंबकाकर्षण यांजसारखें आहे. हीच प्राणशक्ति विचाररूपाने मेंदूंतून बाहेर पडते. विश्वांत प्राणाचें वास्तव्य सर्वत्र आहे किंबहुना सर्व प्राणमयच आहे. सूर्य, चंद्र आणि तारे यांस गति देण्याचे कार्य प्राणशक्ति करीत आहे.<br>{{gap}}या साऱ्या विश्वांत जितकें दृश्यजात आहे तितकें सारें प्राणशक्तीच्या स्पंदांमुळे व्यक्तदशेस आले आहे असें योग्यांचे म्हणणे आहे. प्राणस्पंदांचें वरिष्ठ कार्य विचार हे आहे. याहून अधिक महत्वाचे असे एखादें कार्य असेल तर त्याचा शोध मनुष्यास अद्यापि लागलेला नाही. याहून वरचढ अशा एखाद्या कार्याची कल्पनासुद्धां आम्हांस करता येत नाही. इडा आणि पिंगला या नाड्यांचे कार्य प्राणाच्या द्वारे चालते. शरिराच्या प्रत्येक भागाची हालचाल प्राणामुळे होते; आणि ही हालचाल करतांना ही एकच प्राणशक्ति अनेक रूपें धारण करीत असते. परमेश्वर या साऱ्या क्रिया करवीत असतो ही जुनी कल्पना तुम्ही आता सोडून द्या. तो विश्वाच्या बाहेर कोठे वसत नाही, आणि तेथून न्याय देण्याचे कामही करीत नाही. प्राणायामामुळे श्वासोच्छ्वासाची क्रिया सुरळीत चालते. श्वासोच्छवास हे प्राणशक्तीचे एक दृश्य रूप आहे. प्राणशक्तीचे प्रकटीकरण समतोलपणे होत आहे की नाही हे जाणण्याचे एक साधन श्वासोच्छवास हे आहे. प्राणशक्तीचे प्रकटीकरण समतोलपणे होत असले म्हाणजे शरिरांतील यच्चयावत् क्रिया सुरळीत चालतात. प्राणायामाने सारे शरीर योग्यांच्या ताब्यांत आले म्हणजे शरिरांतील कोणत्याही भागांत काही रोग झाला म्हणजे प्राणशक्तीचें आविष्करण त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत नाही असे ते जाणतात आणि प्राणाचा संयम त्या विशिष्ट जागी करून ते रोगमुक्त होतात.<br>{{gap}}आपल्या देहांतील प्राणशक्तीवर ज्याप्रमाणे तुम्हांस ताबा चालवितां येतो, त्याप्रमाणे तेवढे सामर्थ्य तुम्हांस प्राप्त झाले तर येथून हिंदुस्थानांतल्या एखाद्या माणसाच्या प्राणशक्तीवरही तुम्हांस ताबा चालविता येईल. प्राणशक्ति कोठेही झाली तरी एकाच स्वरूपाची आहे. प्राणशक्तीचा वास<noinclude></noinclude> brcuqzmv0fm06kiyxaljzaibuppqsjf पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३० 104 66695 232897 162305 2026-07-06T10:36:42Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232897 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|खंड ]|अभ्यास.|१२५ }} {{rule}}</noinclude>विश्वांत अखंड आहे. देशांच्या आणि समुद्रांच्या मर्यादेने तिच्या वर्तुळांत खंड पडत नाही. 'सर्वं खल्विदं ब्रह्म' हा सिद्धांत आहे. यांत कोणत्याही उपाधीनें खंड पडत नाही अथवा त्यांत मर्यादाही उत्पन्न होत नाही. शरीरदृष्ट्या, सूक्ष्मेंद्रियदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, इंद्रियातीतदृष्ट्या अथवा शुद्ध चैतन्य या दृष्टीनेही वस्तुतः कोठे खंड नाही. जीवित या शब्दाचा शास्त्रीय अर्थ काय? जीवित या क्रियेचे स्वरूप काय? जीवित म्हणजे प्राणशक्तीचे स्पंद. सर्वव्यापी आकाशतत्त्व समुद्रावर ज्यामुळे स्पंद उत्पन्न होतात त्याचमुळे तुमच्या जीविताचे स्पंदही चालू असतात. दोघांची चालकशक्ति एकच. ज्याप्रमाणे एखाद्या तळ्यांत कमी अधिक प्रमाणाच्या जाडीचें बर्फ ठिकठिकाणी बनते, त्याचप्रमाणे आकाशतत्त्वाचे घनीभवन कमी अधिक प्रमाणानें होऊन हे विश्व बनले आहे. ज्याप्रमाणे वातावरणांतील वाफ कोठे अदृश्य असण्याइतकी सूक्ष्म, तर कोठे अत्यंत घनीभवनाने काळ्या ढगाचे रूप धारण करते, त्याचप्रमाणे आकाशतत्त्व कोठे विरल, तर कोठे घनीभूत वेगवेगळ्या आकारांनी प्रकट होते. हे सारे विश्व म्हणजे जड वस्तूंचा एक महासागर आहे. या आकाशतत्त्वसागरांत वेगवेगळ्या परिमाणाच्या घनीभवनाने सूर्य, चंद्र, तारे आणि आपण स्वतः निर्माण झालो आहो. आपण एकमेकांपासून बाह्यतः भिन्न भिन्न दिसत असलो तरी वस्तुतः एकरूपच आहों. आपल्या दृश्य भिन्नत्वामुळे मुळांतील समरसतेचा आणि ऐक्याचा भंग होत नाही- तें सर्वदा एकरूपच राहतें.<br>{{gap}}अतींद्रिय शास्त्राचा अभ्यास आपण केला म्हणजे सर्व विश्व एकरूप आहे आणि त्यांत जड, सूक्ष्म, चैतन्यात्मक, मानसिक असे भेद नाहीत ही गोष्ट आपल्या लक्ष्यांत येते. आपणांस जो भेद दिसतो तो मुळांत वस्तुतः नसून आपल्या वेगवेगळ्या दृष्टिकोणामुळे दिसतअसतो, अथवा भासत असतो. आपल्या मनाची घटनाच अशी आहे की एका वेळी एकाच वस्तूचा विचार तें करीत असते. 'मी देह' अशी भावना आपल्या मनांत असते तेव्हां 'मन' म्हणून कांहीं वस्तु आपणाजवळ आहे हे आपण विसरलेले असतो. त्याचप्रमाणे 'मी मनोरूप आहे' अशी दृढ भावना आपणास करतां आली तर जड देहाचा विसर आपणास पडेल. आपलें खरें अस्तित्व म्हटलें म्हणजे 'मी आहे' या भावनेत जी अस्मिता आहे तितक्यापुरतेच आहे. मग या खऱ्या स्वरूपावर वाट-<noinclude></noinclude> 9l4723f6z8p3ngbfl55765x587kgo5n पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३१ 104 66696 232898 162306 2026-07-06T10:39:24Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232898 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|१२६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>तील ते आरोप करून तुम्हांस स्थूल देहमय अथवा मनोमय बनता येते. जीवित आणि मृत्यु ही जुनी खुळे आम्हांस चिकटून बसली आहेत. वास्तविक कोणी जन्मास आला नव्हता आणि कोणी मरणारही नाही. आपण आपली दृष्टि मात्र बदलीत असतो, आणि एका परिस्थितीला जन्म व दुसरीला मृत्यु म्हणत असतो. तुम्हां पाश्चात्यांना मृत्यूची एवढी भीति वाटते हे पाहून मला खरोखरच फार वाईट वाटते. मरण म्हटल्याबरोबर तुम्ही अगदी गांगरून जाता. जीविताचा एखादा क्षण तरी अधिक लाभावा यासाठी भगीरथ प्रयत्न तुम्ही करीत असता. परमेश्वराजवळ तरी तुम्ही काय मागत असतां? "मृत्यूनंतर आम्हांस चिरंतन जीवित दे" हेच. मेल्यानंतरही जो जीवित तुम्हांस मिळेल असें कोणी सांगितले तर तुम्ही केवढे आनंदून जातां! छे, छे; मृत्यूची इतकी खंत करूं नका. वास्तविक तुम्ही जन्मासच आला नाहीं; मग तुम्हांस मरण कोठचे? मरण येईल अशी शंका तरी मला का यावी? मी मेलेला आहे अशी कल्पनाही मला होत नाही. मी मरून पडलो आहे अशी कल्पना करण्याचा यत्न करा; म्हणजे स्वतःचें मृत शरीर पाहण्यात आपण हजर आहो असें तुम्हांस आढळून येईल, तुमचे चैतन्य इतके सत्यरूप आहे की त्याचा विसर एक क्षणसुद्धा तुम्हांस पडत नाही. स्वतःला अस्तित्व आहे की नाही अशी शंका तरी तुमच्या मनांत कधी येते काय? "मला अस्तित्व आहे" ही तर तुमची पहिली जाणीव आहे. सर्व सत्यांत हे अत्यंत उघड असें सत्य आहे. त्याचा अनुभव दर क्षणी येत आहे. याचा विसर पडला असे कधीच घडावयाचे नाही. यावरून अमृतत्वाची कल्पना मनुष्याच्या मनात स्वाभाविक आणि जन्मजात आहे असें निःसंशय सिद्ध होते. "मी मरेन" असें चुकूनसुद्धा कोणाच्या मनात येत नाही. "मी सर्वथा नष्ट होणार आहे" अशी कल्पनाही कोणास करवत नाही. मग ज्या विषयाची कल्पनासुद्धा आपणास होत नाही त्याजबद्दल वादविवाद कसला आणि त्याचा उहापोह तरी कशाला? जो विषय इतका उघड आहे त्यात पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष संभवतच नाही.<br>{{gap}}जड, सूक्ष्म अथवा चैतन्यात्मक यांपैकी कोणत्याही दृष्टीने तुम्ही पाहिले तरी विश्व एकरूप हेच अखेरीस आढळून येते. आपल्या सध्याच्या अवस्थेत या विश्वाचा प्रत्यय आपणास दोन प्रकारचा येत आहे. एक शक्ति आणि<noinclude></noinclude> pgh0b13u4jag0vcv16agrdaqndgcsn0 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३२ 104 66697 232899 162307 2026-07-06T10:41:38Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232899 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|खंड ]|अभ्यास.|१२७ }} {{rule}}</noinclude>दुसरी जड अथवा स्थूल अवस्था; पण या प्रत्ययांतही एक गंमत लक्ष्यांत घेण्यासारखी आहे. आकाश आणि प्राण अथवा शक्ति आणि जड पदार्थ यांचे वेगवेगळे प्रत्यय आपणास कधीच येत नाहीत. आपल्या साऱ्या सिद्धांतांचें मूळ असेच असतें. कसल्याही सिद्धांताच्या सांखळीच्या अखेरच्या दुव्याला आपण पोहोंचलों म्हणजे तेथें परस्परविरोधी पदार्थ सांपडतात. शक्ति म्हणजे काय? तर जड पदार्थाला जी चालन देते ती; आणि जड पदार्थ म्हणजे काय? तर शक्तीच्या क्रियेनें ज्याची हालचाल होते तो. अखेरीस अशा चक्राकार परिभ्रमणांत आपण सांपडतो. अनेक शास्त्रे निर्माण झाली, ज्ञानाची वाढ कोणीकडच्या कोणीकडे झाली, अशी घमेंड आपणांस वाटत असते; तथापि बुद्धिवादाच्या अखेरीस पुष्कळ वेळां मोठ्या विचित्र वस्तू आढळून येत असतात. मस्तकालाच ठावठिकाण नसतां मस्तक दुखतें असें आपण त्रिवार बजावून सांगत सुटतो. यालाच आम्ही माया म्हणतो. जेथे अस्तित्व आहे असे सांगवत नाहीं अथवा नाही असेंही निश्चयाने म्हणवत नाहीं, ती माया. जी अनिर्वचनीय स्वरूप ती माया. अशा अस्तित्वाला अस्तित्व ही संज्ञा लावता येत नाहीं; कारण काल आणि देश यांच्यापलीकडे उपाधिरहित असलेलें अस्तित्व मात्र सत्यरूप आहे. तथापि असे असतांही या जगांतील आपल्या अस्तित्वाचा अनुभव आपणास येतो. मग अशा स्थितीत तें नाहीं असें तरी कसे म्हणावें? यावरून, आपलें चालू अस्तित्व सत्यरूप नसून ते भासमान होणारे अस्तित्व मात्र आहे असे सिद्ध होते.<br>{{gap}}पण चालू अस्तित्व मायारूप असले तरी प्रत्येक वस्तूला चिरंतन अस्तित्व आहे, हेही खोटें नाही. हेच चिरंतन आणि सत्यरूप अस्तित्व, देश, काल आणि कारण यांच्या जाळ्यांत सांपडून केवळ भासमान आणि असत्य झाले आहे. खरे अस्तित्व अनंत, अनादि आणि सदैव आनंदरूप असे आहे. तें उपाधिरहित आणि सदामुक्त असे आहे. मनुष्याचे हे अपार रूप देश, काल आणि कारण या उपाधित्रयाने बद्ध होऊन सांप्रतचे मानवी जीवित बनले आहे. हीच गोष्ट जगांतील प्रत्येक वस्तूस लागू आहे. प्रत्येक वस्तूच्या पोटी तेंच अपार रूप आहे. या साऱ्या शिळोप्याच्या गप्पा आहेत असे समजू नका. हे नुसतें कल्पनामय साम्राज्य नाही. या जगाला अस्तित्वच नाही असें आम्ही म्हणत नाही; पण त्याचे अस्तित्व सापेक्ष असून ज्या हेतूस्तव<noinclude></noinclude> qrn23cajbugt2rtk8edlc16e7giskpl पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३३ 104 66698 232900 162308 2026-07-06T10:44:50Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232900 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|१२८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>व्यक्तदशेला आले आहे तो परिपूर्ण करण्याला लागणारी साधनें त्यांत आहेत. त्याचे अस्तित्व हेतुपूर्तीपुरतें मात्र आहे. त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. त्याचे अस्तित्व देशकालकारणादि उपाधिरहित जे अस्तित्व आहे त्यावर अवलंबून आहे.<br>{{gap}}असो. मूळ रस्ता सोडून आपण बरेच बाजूला आलो. आता हे विषयांतर येथेच सोडून आपल्या उद्दिष्ट विषयाकडे आपण वळू.<br>{{gap}}आपल्या हस्तपादादि अवयवांनी ज्या क्रिया आपण जाणून बुजून करतो त्या अथवा हृदयाच्या उडण्यासारख्या ज्या आपल्या जाणिवेंत येत नाहीत त्या क्रिया प्राणशक्ति ज्ञानतंतूंच्या द्वारे करीत असते. आपल्या शरिरांत कित्येक क्रिया अशा प्रकारच्या घडत असतात की त्यांवर आपणास ताबा चालवितां येत नाही. उदाहरणार्थ, हृदयाची क्रिया. हृदयाचे उडणे आपणास वाटेल तेव्हां बंद करता येत नाही. आपली नाडी आणि आपल्या दुसऱ्या धमन्या उडण्याचे आपणास बंद करता येत नाही. आपल्या देहांत या क्रिया घडतात कशा हे आपल्या जाणिवेतही येत नाही. आपल्या समजुतींत न येतां त्या चालत असतात. अशा क्रिया आपणास आपल्या ताब्यात आणता आल्या तर खरोखर मोठी गंमत होईल. <br>{{gap}}परमेश्वर ह्मणजे काय आणि मनुष्यप्राणी ह्मणजे काय याच्या व्याख्या दुसऱ्या एका प्रसंगी मी आपणांस सांगितल्या होत्या. मनुष्य ह्मणजे व्यासरहित अखंड चक्रासारखा असून त्याचा मध्यबिंदु एकाच ठिकाणी आहे; आणि परमेश्वर ह्मणजे व्यासरहित चक्र असून त्याला मध्यबिंदु नाहीं असें ठिकाणच नाही. एकाचा मध्यबिंदु एकाच स्थानी असून दुसऱ्याचा सर्व व्यापी आहे. मनुष्याच्या क्रिया दोनच हातांनी चालतात. परमेश्वर अनंतहस्तांनी कार्य करीत असतो. मनुष्याला दोनच डोळे असतात. परमेश्वर अनंत डोळ्यांनी पाहतो. मनुष्य दोनच पायांनी चालतो. परमेश्वर अनंत पायांनी चालत असतो. मनुष्य एकाच देहांत आपली जीवितयात्रा क्रमीत असतो. परमेश्वराची वस्ती अनंत देहांत आहे. मनुष्य आणि परमेश्वर यांत असा फरक दिसत आहे; तथापि मनुष्यालाही सर्वव्यापी होण्याचे सामर्थ्य आहे. 'नर करनी करे तो नरका नारायण होत.' मनुष्याला परमेश्वर होतां येते आणि सर्व विश्वावर ताबा चालवितां येतो. त्याच्या जाणिवेचा मध्यबिंदु सध्या एकाच<noinclude></noinclude> fw5m30d9bcgkeaa0c8px971mpjtr0s2 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३४ 104 66699 232901 162309 2026-07-06T10:47:39Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232901 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|खंड ]|अभ्यास.|१२९ }} {{rule}}</noinclude>ठिकाणी आहे. त्याचे अनंत बिंदू करून सारे विश्व त्याने आपल्या जाणिवेंत आणलें म्हणजे तो परमेश्वर झालाच. त्याची जाणीव सध्या अत्यंत संकुचित आहे, तीच त्याने विश्वव्यापी केली पाहिजे. आपल्या जाणिवेच्या कक्षेचा विस्तार मनुष्याने अनंतपटीने वाढविला तर तोच परमेश्वर होतो. याकरितां जाणीव म्हणजे काय याचा विचार प्रथम करणे अगत्याचे आहे. किंबहुना, ही एकच वस्तु आपणास पूर्णपणे समजली की आपले काम झाले.<br>{{gap}}आपण असे समजूं की चोहोकडे पूर्ण अंधकार भरला असून त्यांतून एक अनंतरेषा गेली आहे. अंधारामुळे ही रेषा आपणास दिसत नाही. पण या रेषेवर एकच तेजोविंदु असून त्या रेषेवरून तो पुढे जात आहे. आपला मार्ग हा बिंदु आक्रमीत असतां त्या रेषेचे वेगवेगळे भाग तो प्रकाशित करितो. परंतु प्रकाशित भागाच्या आगेमागें मात्र पूर्ण अंधार तसाच आहे. आपली जाणीव या तेजोबिंदूसारखी आहे. या जाणिवेचे पूर्वानुभव नाहीसे होऊन नवे अनुभव त्यांच्या जागी आले आहेत. काही पूर्वानुभव अगदीच नष्ट झाले नसले तरी ते विस्मृतीच्या कक्षेत पडले आहेत. त्यांचा विसर आपणास इतका पडला आहे, की जणूं काय त्यांना अस्तित्वच नाही. त्यांचे अस्तित्व आपल्या ठिकाणी आहे ही जाणीवच आपणास नाही. पण असें आहे तरी त्यांचे कार्य अगदी थांबले आहे असे मात्र नाही. आपल्या समजुतींत न येतांही त्यांचे कार्य आपल्या शरिरावर अविरतपणे चालू आहे. हे कार्य केवळ शरिरापुरते आहे असेंही नाही; तर तें मनावरही चालू आहे.<br>{{gap}}जगांत अनेक नीतिग्रंथ निर्माण झाले आहेत. प्रत्येकाने आपापली वेगवेगळी उपपत्ति सांगून नीतीचा व्यवहार सांगितला आहे; पण या साऱ्यांनी एक घोडचूक केली आहे. अकार्यापासून परावृत्त कसे व्हावें हे कोणीही सांगितलेले नाही. सत्कार्य करावें हे चांगले; पण अकार्य करूं नये हेही तितकेंच चांगले नाही काय? "अरे मुला, चोरी करूं नको" असे प्रत्येक शास्त्र सांगते. उपदेश फार उत्तम आहे; पण मनुष्य चोरी कां करतो, याचा विचार कोणी केला आहे काय? चोरी, दरोडेगिरी आणि आपली बाकीची सारी दुष्कृत्ये अनिवार्य अशा स्वरूपाची आहेत. इच्छा नसतांही मनुष्य चोरी करतो, खोटे बोलतो आणि दुसऱ्याचे घर फोडतो. त्याच्या इंद्रियांवर त्याचा ताबा चालत नाही. त्याचे एक मन नको नको म्हणत असतांही त्याची इंद्रियें<noinclude><br>{{gap}}स्वा० वि० ९-९</noinclude> 0kztrljxdkwfxddbz5f664xoyst7he3 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३५ 104 66700 232902 162310 2026-07-06T10:57:17Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232902 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|१३० |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>त्याला ओढून नेऊन बलात्काराने त्याजकडून चोरी करवीत असतात! माझी ही उपपत्ति ऐकून तुमचा जीव कदाचित् दडपून गेला असेल; पण काय करावें? वस्तुस्थिति तशीच आहे. मानसशास्त्रांतील हे खरोखर एक मोठे कोडे आहे. मनुष्याच्या भलेबुरेपणाची कसोटी लावतांना आपले चित्त आपण उदार ठेवले पाहिजे. सर्व प्रकारे चांगले होणे हे आपणांस वाटते तितकें सोपे नाही. काही झाले तरी तुम्ही परिस्थितीचे गुलाम आहां. भोवतालच्या परिस्थितीची जाणीव कायम असतां आम्ही स्वतंत्र आहों असें म्हणणे हे अशास्त्र आणि मूर्खपणाचे आहे. पूर्ण मुक्तावस्था प्राप्त होईपर्यंत आपली स्वतंत्रबुद्धीची बडबड व्यर्थ आहे. "सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि।" हा सिद्धांत आपण नेहमी ध्यानात ठेवला पाहिजे. तुमचे चांगुलपणसुद्धा तुमच्या प्रकृतीचे अंकित आहे. तुम्ही चांगले आहां याचे कारणही हेच की तसे असल्यावांचून तुम्हांस गत्यंतरच नाही. त्याचप्रमाणे जो वाईट आहे तोही असल्या प्रकृतीमुळेच आहे. त्याचे वाईटपण त्याला सहसा टाकतां येत नाही. त्याच्या परिस्थितीत तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते हे कोणी सांगावें? रस्त्यांत भटकणारी भिकारीण आणि तुरुंगांत पडलेला चोर यांचे बळी तुमच्या कल्याणाकरितां पडले आहेत. चांगले असें नांव तुम्हांला प्राप्त व्हावे म्हणून ती स्त्री भिकारीण झाली आणि तो मनुष्य तुरुंगांत गेला. विश्वाच्या समतोलपणाचा कायदा अशा प्रकारचा आहे. जगांतील सारे चोर, खुनी, अन्यायी, दुबळे, दुष्ट आणि सैतानी लोक हे माझे उद्धारकर्ते गुरू आहेत. या साऱ्यांचे पूजन करावें हेच मला उचित आहे. ज्याप्रमाणे दैवी संपत्तिवानाला मी नमन करणे योग्य, त्याचप्रमाणे आसुरी संपत्तिवानालाही मला नमन केले पाहिजे! मित्र हो, माझी ही मते ऐकून तुम्हांला मोठे नवल वाटेल, पण मी तरी काय करूं? माझ्या डोक्यांत असेच विचार येतात आणि ते बंद करणे अथवा त्यांची दिशा बदलणे मला शक्य नाही. ज्याप्रमाणे सद्गुणी भगवद्भक्तांना मी नमन करतो, त्याचप्रमाणे अत्यंत दुर्गुणी सैतानालाही मी नमन करतो. ते सारेच माझे गुरू आहेत. ते सारेच मला ज्ञानदात्या वडिलांसमान पूज्य आहेत. ते सारेच माझे तारक आहेत. इतर स्त्रिया शुद्ध आणि पवित्र कां? रस्त्याने डोळे मोडीत फिरणारी नगरभवानी अस्तित्वात आहे म्हणून. लोक तिला हंसतात म्हणून मीही तिला हंसले पाहिजे! एखाद्याला<noinclude></noinclude> lwx3joxzqvg79jazv0ol431n2ma5igq पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३६ 104 66701 232903 162311 2026-07-06T10:59:26Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232903 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|खंड ]|अभ्यास.|१३१ }} {{rule}}</noinclude>मी शिव्या देत असेन आणि कदाचित् त्याच्या दुर्गुणांचा मला उपयोगही होत असेल! त्याचप्रमाणे एखाद्याला मी पूज्य मानीत असेन आणि त्याच्या चांगुलपणाचा फायदा मी घेत असेन. केवळ कल्पनावारूवर आरूढ होऊन हे मी काही तरी बोलत आहे असे आपण समजू नका. जी वस्तुस्थिति आहे तीच मी सांगत आहे. मी तुम्हांसमोर उभा आहे हे जितके खरे आहे, तितकाच आतां सांगितलेला सिद्धांतही खरा आहे. रस्तोरस्ती फिरणाऱ्या नगरभवानीची हेटाळणी केवळ लोकांच्या इच्छेस्तव मला करावी लागते, पण पातिव्रत्यरक्षणाच्या कामी किती स्त्रियांना तिने मदत केली आहे हा विचार माझ्या मनांत आला म्हणजे तिची योग्यता माझ्या मुक्तिदात्या गुरूइतकी आहे असे माझ्या मनांत आल्यावांचून राहत नाही. आपण सर्वांनीच या गोष्टीचा विचार करणे अवश्य आहे. प्रिय मित्र हो, आपण मनांतल्या मनांत या गोष्टीचा खोल विचार करा. जे सत्य आहे ते जसेच्या तसेंच तुम्हांपुढे मी मांडले आहे. जो जो जगाचे अवलोकन मी अधिक करतो आणि अधिकाधिक स्त्रीपुरुष माझ्या निरीक्षणांत येतात, तो तो या सिद्धांताबद्दल माझी खात्री अधिक पटत जाते. अशा स्थितीत मी नांवे तरी कोणाला ठेवावी, आणि स्तुति कोणाची करावी? एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. नाणे पाहावयाचें म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू अवलोकनांत आणल्या पाहिजेत.<br>{{gap}}आपणापुढे असलेले कार्य लहानसान नाही. त्याचा विस्तार फार मोठा आहे. तें साधण्यासाठी आपणास जें अत्यंत महत्वाचे कर्तव्य करावयाचें आहे ते हे की सुप्तावस्थेत असलेला जो प्रचंड विचारसमूह आपणापाशी आहे त्यावर ताबा मिळवावयाचा. आपले हे विचार सध्या आपल्या ताब्यांत नाहीत, यामुळे त्यांचे कार्यही आपल्या जाणिवेंत न येतां चालू असतें. <br>{{gap}}एखाद्याने काहीं असत्कर्म केले तर ते अगदी आपोआप घडलेले नसून त्याच्या जाणिवेने घडलेले असते हे खरे; पण ज्या कारणामुळे तें असत्कृतीचे कार्य घडलें तें कारण जाणिवेच्या प्रांतापासून इतके लांबवर आणि खोल असतें की कर्त्याच्या दृष्टिपथांत तें केव्हांच येत नाही; आणि यामुळे त्याचा प्रतिकार करणेही त्याला अशक्य होते. त्या कारणाला केव्हांच प्रतिकार ठाऊक नसल्यामुळे ते फार बलिष्ठ होऊन बसले आहे आणि कर्त्याला गुलाम बनवून आपला अंमल तें त्याजवर चालवीत असते.{{nop}}<noinclude></noinclude> e3256kcpj34t31bho57ez1tjqfsce89 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३७ 104 66702 232904 162313 2026-07-06T11:01:59Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232904 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|१३२ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>{{gap}}हे कारण ताब्यात आणावयाचें हेच अभ्यासयोगाचे पहिले अवतारकार्य आहे. ते ताब्यात आणणे अशक्य नाही असे आपणास आढळून येईल. आपल्या ठिकाणी जो विचारसमूह आज जाणिवेच्या प्रांतापलीकडचा होऊन बसला आहे त्याचा जन्म प्रथम जाणिवेच्या प्रांतांतच झाला आहे. त्याची उत्पत्ति प्रथम जाणिवेपासून झाली आणि नंतर खोल बुडी मारून तो जाणिवेच्या हद्दीबाहेर गेला. यामुळे त्याच्या जन्मभूमीला त्याला परत आणणे अशक्य नाही. पूर्वी ज्या क्रिया जाणिवेने आपण केल्या, त्या कालांतराने आपण विसरून गेलों. यामुळे त्यांना केवळ जडरूप येऊन त्या जाणिवेच्या बाहेर गेल्या. आपल्या सध्याच्या वाईट कर्माना जशा या पूर्व क्रिया कारण होतात, त्याचप्रमाणे आपल्या सत्कार्यांचे कारणही या पूर्वक्रियाच होत हे लक्ष्यात ठेवणे अवश्य आहे. आपली अंतःप्रकृति सत्कार्याकडे वळो अगर असत्कार्याकडे वळो; दोहींचे कारण एकच आहे. आपल्या सूक्ष्म देहाच्या पोतड्यांत असंख्य चिजा आपण भरून ठेवल्या आहेत. दीर्घकाळपर्यंत या खजिन्याची पाहणी आपण न केल्यामुळे त्यांत काय काय चिजा आहेत याचा विसर आपणास पडला आहे. त्या तेथे आहेत इतकेही स्मरण सांप्रत आपणास राहिलेले नाही. यामुळे त्यांजसंबंधी काही विचारही आपल्या मनांत येत नाही. त्यांतील कित्येकांस आतां अगदी कीड लागून जाऊन त्या नुकसानकारक झाल्या आहेत. आपणास त्या केव्हां अपाय करतील याचा नेम नाही. यांतल्याच कित्येकांचा उद्रेक होतो आणि मनुष्यहानी करतो. या गुप्त विचारांचे सामर्थ्य असें भयंकर आहे की त्यामुळे देशचे देश बेचिराख होतात. या विचारांना परत ताब्यात घेऊन त्यांना जाणिवेच्या प्रांतांत पुन्हां नेऊन घालावें यासाठीच अभ्यासयोगशास्त्र अवतीर्ण झाले आहे. अनेक सुप्तासुप्त विचार एकत्र होऊन त्यांच्या संघटनेने मानवी जीवित बनले आहे. यांतील कांहीं विचारमात्र आज प्रत्यक्ष क्रिया करीत असून बाकीचे विचार तसेच निजून राहिले आहेत. या साऱ्या विचारांना जागे करून ते सारे आपल्या अंमलाखाली वागवावयाचे हेच प्रचंड कार्य आज आपणापुढे आहे. असें झाले तरच आपली आजची गुलामगिरी जाऊन आपले गेलेलें धनीपण आपणास पुन्हा प्राप्त होईल. काळीज, हृदय वगैरे अंतर्गत इंद्रियांच्या ज्या क्रिया आज आपणास नकळत चालू आहेत त्यांजवरही आपला अंमल चालू होईल आणि आपण म्हणूं त्याप्रमाणे हा सारा इंद्रियगण वागू लागेल.{{nop}}<noinclude></noinclude> 8c8b93rp2of8qhcpdipq3vloqr8pvbf पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३८ 104 66703 232905 162314 2026-07-06T11:04:33Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232905 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|खंड ]|अभ्यास.|१३३ }} {{rule}}</noinclude>जाणिवेच्या हद्दीबाहेरील विचारांचे आक्रमण करणे हे अभ्यासयोगाच्या कार्यक्रमांतील पहिले कलम आहे. यानंतर विचारातीत होण्यास आपण योग्य होतो. ज्याप्रमाणे आपोआप घडणाऱ्या क्रिया आपल्या विचाराक्षम स्थितीत घडून येतात, त्याचप्रमाणे दुसरी कित्येक कार्ये विचारातीत स्थितीतील आहेत. या विचारातीत स्थितीपर्यंत आपण पोहोंचलों म्हणजे आपण मुक्तावस्थेला पोहोचतों- नराचे आपण नारायण बनतो. मृत्यूचे रूपांतर चिरजीवितांत होतें; दुबळेपणाच्या जागी सर्वशक्तिमत्त्व येते आणि शृंखला गळून जाऊन आपले पाय मोकळे होतात. विचारातीत स्थितीचे ध्येय हे आहे. या स्थितीच्या साम्राज्याचा विस्तार अनंत आहे.<br>{{gap}}आपल्यापुढे असलेले कार्य दोन प्रकारचे आहे हे आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून आपल्या ध्यानात आले असेलच. इडा आणि पिंगला यांच्या समतोल कार्याने आपल्या निद्रित विचारभांडारावर जय मिळविणे हे आपले पहिले कार्य आहे. इडा आणि पिंगला यांच्या कार्यक्षमतेवरच आपला रोजचा व्यवहार चालू आहे. यांचे कार्य आपल्या ओळखीचे आहे. या ओळखीच्या मार्गाने अनोळखीचा रस्ता शोधून काढणे हे आपले पहिल्या प्रकारचे कार्य आहे; आणि विचारातीत प्रांतांत प्रवेश करणे हे आपले दुसरें कार्य आहे.<br>{{gap}}दीर्घकाळ अभ्यास करून ज्याला या सत्याची ओळख पटली असेल तोच खरा योगी होय असें योगशास्त्राचे म्हणणे आहे. आपणासारख्या सामान्य मनुष्यांस सुषुम्नेचा उपयोग कांहींच होत नाही. सामान्य मनुष्यांत तिचें द्वार बंद असते. योग्याच्या सुषुन्नेचे द्वार खुले होते आणि कुंडलिनीचा प्रवेश त्यांत होतो, आणि हळुहळु वर चढतां चढतां सहस्रदल कमलापर्यंत पोहोचते. ती मेंदूंत पोहोचली म्हणजे आपलें सत्यरूप काय आहे हे योग्याला समजतें. आपण प्रत्यक्ष परमेश्वर आहों असा अनुभव त्याला येतो.<br>{{gap}}योगसोपानाची ही अखेरची पायरी आहे. आपणांपैकी प्रत्येकास या पायरीवर आरूढ होणे शक्य आहे. ज्याला अशी योग्यता नाही असा एकही मनुष्य नाही. तथापि हे कार्य अत्यंत दुष्कर आहे अशी सूचना देणे मात्र अवश्य आहे. नुसती व्याख्याने ऐकून आणि पांच चार मिनिटें प्राणायाम करून हे कार्य सिद्ध होईल असा भलताच भ्रम कोणीही बाळगू नये. अखेरची सिद्धि प्राप्त होण्यासाठी करावी लागणारी आगाऊ तयारीच अत्यंत<noinclude></noinclude> 2ityy8dxgbc1hrw9r982jet0mbwv16i पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३९ 104 66704 232906 162315 2026-07-06T11:07:19Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232906 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|१३४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>बिकट अशी आहे. दिवा लावण्यास पुरता एक क्षणही लागत नाही. काडी ओढली की ताबडतोब मेणबत्ती पेटून जिकडे तिकडे प्रकाशच प्रकाश होतो; पण मूळ मेणबत्ती तयार करण्यास केवढा काळ लागतो याचा विचार करा. जेवण जेवण्यास फार तर अर्धा तास लागेल; पण ते तयार करण्यास किती वेळ लागतो! मेणबत्ती पेटून क्षणार्धात प्रकाश व्हावा अशी आपली इच्छा आहे; पण मेणबत्ती तयार झाल्याशिवाय ती पेटणार कशी हा विचार मात्र आपण कधीच करीत नाही. ती तयार करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे.<br>{{gap}}या अखेरच्या पायरीवर जाऊन बसणे हे काम अत्यंत दुर्घट आहे हे खरें; तथापि या कार्यासाठी अल्पही परिश्रम आपण केले तरी ते फुकट जात नाहीत. आपले परिश्रम पुष्कळ झाले तर महत्कार्य साधेल आणि ते थोडे झाले तर कार्यही थोडें होईल; पण ते अगदीच वायां गेलें असें मात्र कधीच घडणार नाही. कशाचाही पूर्ण नाश होत नाही हे अर्वाचीन शास्त्रांचें एक तत्त्व आपणास ठाऊक आहेच. भगवान् श्रीकृष्ण यांस अर्जुन प्रश्न करतोः "अयतिः श्रद्धयोपेतो योगाचलितमानलः । अप्राप्य योगसंसिद्धिं कां गति कृष्ण गच्छति ॥ कच्चिनोभयविभ्रष्टः च्छिन्नानामिव नश्यति" या प्रश्नाचे उत्तर भगवान् देतात : 'पार्थ नैवेह नानुन विनाशस्तस्य विद्यते । नहि कल्याणकृत् कश्चिदुर्गति तात गच्छति ॥' या जन्मी योगसिद्धीची प्राप्ति तुम्हांस न झाली तर पुढील जन्मी तोच अभ्यास पुढे चालवून ती सिद्धि तुम्ही मिळवाल. असे होत नसेल तर येशु, बुद्ध, श्रीशंकराचार्य यांच्या लोकातीत बाल्यावस्थेची संगति तुम्ही कशी लावतां? बालवयांत जी कार्ये कोणाच्या स्वप्नीही यावयाची नाहीत, ती त्यांनी प्रत्यक्ष करून दाखविली हे कसे घडलें?<br>{{gap}}प्राणायाम, आसन इत्यादि क्रियांची मदत योगाभ्यासांत फार होते यांत संशय नाहीं; तथापि त्या केवळ जड देहाच्या बाह्य क्रिया होत हेही लक्ष्यांत ठेवले पाहिजे. खरा अभ्यास मानसिक आहे. तयारी करावयाची ती जड देहाची नसून मनाची करावयाची. याकरिता आपल्या आजूबाजूची परिस्थिति आपणास अनुकूल अशी असली पाहिजे. आपल्या चित्ताला शांति असावी. अनेक प्रकारच्या व्यवसायांनी तें व्यग्र असू नये. चित्ताला हांव फार असली म्हणजे तें रजोगुणी होऊन इतस्ततः भटकू लागते आणि तें केव्हांच शांत राहत नाहीं; अशी मानसिक अवस्था योगाला प्रतिकूल आहे.{{nop}}<noinclude></noinclude> tpq6t710jemitlwsv2nf4vrt9m9mxgw पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१४० 104 66705 232907 162316 2026-07-06T11:10:21Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232907 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|खंड ]|अभ्यास.|१३५ }} {{rule}}</noinclude>{{gap}}तुम्हांस योगी व्हावयाचे असेल, तर तुमची वृत्ति अत्यंत मोकळी असली पाहिजे. आशेच्या शृंखलेत तुमचे पाय गुंतलेले असूं नयेत. स्वातंत्र्याची आणि चित्ताला काळजी उत्पन्न न करणारी अशी आपली दिनचर्या असावी. आपल्यामागे कसल्याही उपाधी लावून घेऊ नये. योगाभ्यासाला ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. आपल्या साऱ्या चैनी व्यवस्थितपणे चालल्या पाहिजेत आणि त्याबरोबरच आत्मानुभवही झाला पाहिजे अशी इच्छा करणारा मनुष्य अत्यंत मूर्ख होय. नदीपलीकडे जावें या इच्छेनें कोणा एका मनुष्याने सुसरीच्या पाठीवर स्वारी केली अशी एक गोष्ट आहे. या मनुष्याचें शाहाणपण आणि संसारांतील चैनी भोगतां भोगतां आत्मानुभवाची वाट चोखाळू पाहणारा, शाहाणपण ही एकाच किंमतीची आहेत. "प्रथम परमेश्वराच्या राज्याचा शोध करा; म्हणजे बाकीच्या सर्व वस्तू तुम्हांस मिळतील," अशी येशू ख्रिस्ताचीही आज्ञा आहे. आपलें आदि कर्तव्य हेच आहे. त्याग याचा अर्थ हाच, जगावयाचे ते केवळ आपल्या ध्येयाच्या सिद्धीसाठी. दुसऱ्या कोणत्याही भावना चित्तांत उरू द्यावयाच्या नाहीत अशा पद्धतीची वागणूक आपण ठेवली पाहिजे. आपल्या ध्येयाशिवाय दुसऱ्या कोणत्याही विचारास आपल्या चित्तांत स्थळ मिळू नये. आपले आध्यात्मिक साम्राज्य मिळवावें यासाठीच आपण सारी धडपड करावी. ऐहिक वस्तु आणि सुखें ही सारी नाशवंत आहेत हे आपण प्रत्यही पाहत आहों. यासाठी चिरंतन स्वरूपाचे जे काही असेल आणि जे एकवार प्राप्त झाल्यानंतर आपणापासून निघून जाणार नाहीं तें मिळविण्याची खटपट करणे हेच आपलें पहिले कर्तव्य आहे. आत्मानुभव व्हावा अशी खरी तळमळ आपल्या चित्तास लागली असेल, तर त्यासाठी एकसारखी धडपड केल्यावांचून आपणास गत्यंतर नाहीं; आणि अशा प्रकारची धडपड हीच आपल्या वाढीस कारण होईल. इच्छा नसेल तर धडपडही नाही आणि धडपडीच्या अभावी वाढही नाही. अशी धडपड करीत असतां अनेक प्रकारच्या चुका आपण कदाचित् करूं; पण त्या चुकाच आपल्या कल्याणास कारण होणार नाहीत अस तरी कोणी म्हणावें?<br>{{gap}}आत्मानुभवाच्या मार्गात आपला पहिला मोठा मदतगार ध्यान हा होय. यानावस्थेत आपल्या भोवतालचे जड विश्व आपण विसरून गेलेले असतो.<noinclude></noinclude> 0b9s1o9hque28f9qhkjk46i307goccm पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१४१ 104 66706 232909 162318 2026-07-06T11:14:49Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232909 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|१३६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>आपण वस्तुतः आणि स्वभावतः चैतन्यरूप आहों ही भावना त्याच अवस्थेत जागृत होत असते. त्या स्थितीत बाह्य जगाच्या मदतीची अपेक्षा आपल्या चित्तांत नसते. अगदी अंधारमय अशा एखाद्या गुहेत आपण बसलो असलों तरी आपला जीवात्मा आपल्याभोंवतीं प्रकाशाचा पूर उत्पन्न करीत असतो. नीचतम वस्तूही तेथे उज्ज्वल दिसतात. दुर्गंध सुगंधमय होतो. सैतानही तेथें परमात्मरूप होतो. त्या ठिकाणीं क्रोधादि विकारांना जागा नाही. तेथे शत्रूचे मित्र होतात. 'मी आणि माझें' या शब्दांचे अर्थ आपण विसरून जातो. ध्यानाच्या वेळी शरिराच्या अस्तित्वाचा विचार होईल तितका कमी करीत जावा. मला देहच नाही ही भावना पक्की करण्याचा प्रयत्न होईल तितका करावा; कारण आपल्या साऱ्या अधःपतनाचें मूळ कारण देहच होय. देह म्हणजेच मी ही पहिली भावना आपल्या नाशाचें मूळ कारण होय. देहाच्या ठिकाणीं ममत्व उत्पन्न झाले की आपलें सारें सुख तेवढ्या साडेतीन हातांत गोळा होऊन बसते. त्याच्या इच्छांची तृप्ति करणे हेच आपलें कर्तव्य आहे असे वाटू लागते, आणि मग आपली सारी धडपड केवळ त्याच हेतूने सुरू असते. त्यांत तृप्ति सांपडली नाही की आपली जीवितयात्रा कष्टमय होते. याकरिता 'मी देह' असें वाटणे हीच आपली पहिली चूक होय. आपल्या साऱ्या दुःखाचे रहस्य हेच. 'मी देह' ही भावना टाकून 'मी चैतन्य' ही भावना उत्पन्न करणे हे आणि सुखदुःखमिश्रित विश्व केवळ पडद्यावरील चित्रांसारखे आहे हे जाणणे हीच आत्मानुभवाची गुरुकिल्ली आहे. 'सारे विश्व पडद्यावर रंगविले असून मी त्याचा साक्षी आहे' असा अनुभव येणे हेच आपलें अखेरचें साध्य.<br> {{rule|7em}} <br> {{x-larger|{{center|'''९<br>भक्ति.'''}}}} {{rule|5em}}{{rule|5em}}<br> {{gap}}काही थोडे धर्म वगळले असतां बाकीच्या धर्मात व्यक्तिविशिष्ट परमेश्वराची कल्पना आढळून येते. बौद्ध आणि जैन या धर्माशिवाय जगातील बाकीच्या साऱ्या धर्मात ही कल्पना आहे, आणि तीबरोबरच भक्ति आणि पूजन या कल्पनांचाही उगम आहे. बौद्ध आणि जैन या धर्मात परमेश्वराची<noinclude></noinclude> fcnigx6aulo9d6u2xu0a2qsy6ic1jj7 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१४२ 104 66707 232910 162319 2026-07-06T11:17:22Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232910 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|खंड ]|अभ्यास.|१३७ }} {{rule}}</noinclude>कल्पना नाही आणि तेथे त्याचे पूजनही अर्थातच नाही; तथापि आपापल्या धर्मसंस्थापकांचे पूजन तेही करीत असतात; आणि त्यांच्या पूजनाचा प्रकारही इतरांसारखाच आहे. मनुष्यमात्रावर प्रेम करणाऱ्या कोणातरी उच्च प्रतीच्या प्राण्याच्या भक्तीची कल्पना सर्व जगभर रूढ आहे. बौद्ध आणि जैन हे परमेश्वराचे अस्तित्व मानीत नसले, तरी आपल्या धर्मसंस्थापकांच्या ठिकाणी तितकीच पूज्यबुद्धि ठेवतात आणि इतर धर्मानुयायी जशी परमेश्वराची भक्ति करतात, त्याचप्रमाणे ते आपापल्या धर्मसंस्थापकांची करीत असतात. नांवांत फरक असला, तरी मूळ भावनांचे स्वरूप तेंच आहे. जगांतील भिन्न भिन्न धर्मांच्या उपासकांच्या पायरीप्रमाणे व परिस्थितीप्रमाणे भक्तीचे प्रकार वेगवेगळे आढळून येतात. पूजनाचे होम हवनादि जड प्रकार हे भक्तीच्या कनिष्ठ रूपाचे द्योतक आहेत. ज्यांना परोक्ष तत्त्वांचे आकलन करण्याची पात्रता नसते त्यांच्यांत हे प्रकार विशेषेकरून रूढ असतात. बुद्धीला प्रगल्भता नसल्यामुळे सूक्ष्म तत्त्वांना जडरूप दिल्याशिवाय त्यांच्या आकलनांत ती येणे शक्यच नसते. सूक्ष्म तत्त्वांच्या उच्च वातावरणांत तरंगण्याची विद्या त्यांस पारखी असल्यामुळे त्या तत्त्वांना खाली ओढून स्वतःच्या पदवीस ते आणून बसवीत असतात. अशा स्थितींत बाह्य विधींचे स्तोम माजतें हे रास्तच आहे. या बाह्यविधीतच नानाप्रकारच्या चिन्हांचा अंतर्भाव होतो. जगाच्या प्राचीन काळच्या इतिहासांतही हा प्रकार आरंभापासून आढळून येतो. सूक्ष्म आणि परोक्ष तत्त्वांचे आकलन जड संज्ञांच्या द्वारें करण्याची धडपड मनुष्यप्राणी फार प्राचीन काळापासून करीत आला आहे. बाह्यविधी आणि चिन्हें यांची उत्पत्ति अशा प्रकारे झाली आहे. घंटानाद, संगीत, होमहवन, ग्रंथप्रतिमा वगैरे साऱ्या वस्तू याच प्रकारांत येतात. बाह्येंद्रियांना ज्यांचे आकलन करता येईल आणि ज्यांच्या द्वारें अमूर्त तत्त्वांचें आकलन करता येईल अशा कोणत्याही पदार्थाचे पूजन मनुष्यप्राणी करीत असतो.<br>{{gap}}अशा प्रकारें जड पदार्थांचे पूजन करणे अयोग्य आहे असे म्हणणारा सुधारकवर्गही प्रत्येक धर्मात फार प्राचीन काळापासून निर्माण होत आला आहे. होमहवनादि क्रिया आणि प्रतिमापूजन या गोष्टी या वर्गाच्या मतें सर्वथैव त्याज्य दिसतात. तथापि अशा सुधारकांच्या प्रयत्नाला कधी काळी<noinclude></noinclude> lpslzm1k3gerpo1a6wnvsfwrtf3kke2 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१४३ 104 66708 232911 162320 2026-07-06T11:19:27Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232911 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|१३८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>तरी यश येईल असा संभव दिसत नाही. हे प्रयत्न यापूर्वी जसे विफल झाले तसेच ते यापुढेही होतील असें भाकित करण्यास हरकत नाही. मनुष्याचा स्वभाव आहे तसाच चालू राहील तोपर्यंत कोणत्या तरी जड वस्तूची मदत त्याला लागणारच. प्रत्यक्ष दिसणाऱ्या अशा एखाद्या वस्तूला तो अवश्य मिठी मारणार. स्वतःच्या चित्तांतील कल्पनातरंग केवळ कल्पनामय आणि अधांतरी राहणे त्याला पसंत पडत नाही. चित्तांतील हे कल्पनातरंग प्रत्यक्ष सृष्टीत स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची लालसा त्याला असते, आणि ती पूर्ण करण्याकरिता त्यांची संगती कोणत्या तरी जड पदार्थाशी तो घालतो. अशा रीतीने अमूर्त कल्पनासमूहाला मूर्तरूप देण्याची त्याची वहिवाट फार प्राचीन काळापासून आहे. अशा प्रकारच्या जड क्रिया नष्ट कराव्या असा उपक्रम महंमदी सुधारकांनी केला; पण त्यांत एक जड पदार्थ जाऊन त्याच्या जागी दुसरा येण्यापलीकडे अधिक कांहींच झाले नाही. अशाच प्रकारचा यत्न ख्रिस्ती धर्मातील प्रॉटेस्टंट पंथानेही केला आणि त्याची वाटही तशीच लागली. यावरून बाह्य उपचार समूळ नाहीसे करणे शक्य नाहीं असे म्हणण्यास हरकत दिसत नाही. एका प्रकारचा विधी तुम्ही बंद केला तर त्या जागी आणखी एखादा नवा प्रकार येतो. कोणत्याही प्रकारचे बाह्य-विधी, प्रतिमा, अथवा चिन्हें ही पापमूलक आहेत असें मुसलमान समजतात; पण स्वतःची काबा येथील मशीद मात्र त्यांना खपते, इतकेंच नव्हे तर ती परमपवित्र वाटते. प्रार्थना करतांना आपण त्या मशिदीत आहों अशी भावना प्रत्येक मुसलमानाने प्रार्थनेच्या वेळी करणे अवश्य आहे. इतर धर्माची बाह्य चिन्हें त्याला पापमय दिसतात आणि तसलीच स्वतःची चिन्हें तो पुण्यमय समजत असतो! मशिदीच्या भिंतींत बसविलेल्या एका काळ्या धोंड्याचे चुंबन प्रत्येक मुसलमान यात्रेकरूने करणे अवश्य आहे. अखेरच्या दिवशी परमेश्वर पापपुण्याचा निवाडा करील तेव्हां हा धोंडा प्रत्येकाबद्दल साक्ष देण्यास हजर राहणार आहे! त्याचप्रमाणे झिमझिम येथील विहिरीतील चुळकाभर तीर्थ जो कोणी प्राशन करील त्याला न्यायाच्या दिवशी दिव्य देह मिळणार असून त्यानंतर चिरजीवनही त्याला प्राप्त होईल!<br>{{gap}}इतर धर्मात विशिष्ट आकाराच्या इमारती या चिन्हांच्या जागी येतात. चर्च हे स्थळ इतर कोणत्याही जागेहून अधिक पवित्र आहे असे प्रॉटेस्टंट पंथी<noinclude></noinclude> lt9qvzx4qgqdl6h4xcdqwq4a2oq21m8 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१४४ 104 66709 232912 162321 2026-07-06T11:21:17Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232912 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|खंड ]|अभ्यास.|१३९ }} {{rule}}</noinclude>समजतात. या ठिकाणी तें चर्च हे पवित्रतेचें जड चिन्ह आहे हे कोणाच्याही लक्ष्यांत येईल. त्याचप्रमाणे नव्या कराराचे पुस्तकही अत्यंत पूज्य समजलें जाते. एकंदरीने तात्पर्यार्थ इतकाच की जड चिन्हें समूळ नाहीशी करणे आपणांस शक्य नाही. यासंबंधाने कितीही ओरड आपण केली तरी ती अरण्यरुदनवत् होणार यांत संशय नाही; आणि वास्तविक पाहतां अशी ओरड तरी आपण कां करावी? अशा प्रकारच्या चिन्हांचा उपयोग करण्यास हरकत कोणती? त्यांविरुद्ध एवढा गिल्ला करण्याचे कारण मला तरी काही दिसत नाही. नुसत्या चिन्हांना काही महत्व नाही हे खरे, पण ज्या सत्य वस्तूची ती दर्शक आहेत, त्या महत्वाच्या नाहीत असें कोण म्हणेल? फार काय, पण हे सारे विश्व हेही एक चिन्हच आहे, आणि त्याच्या पाठीमागे जी सत्य वस्तु आहे तिचें आकलन करण्याचा यत्न त्याच्याद्वारे आपण करीत आहो. जड वस्तु अथवा चिन्ह हे कांहीं आपलें साध्य नव्हे; तथापि ते साधन आहे आणि त्या साधनाच्याद्वारे चैतन्याला पोहोचण्याचा यत्न आपण करीत असतो. आकृती, मूर्ती, घंटा, धूपदीप, ग्रंथ, देवळे, चर्चे आणि इतर सारी चिन्हें ही पावित्र्याची द्योतक असल्यामुळे ती त्याज्य नव्हत. चैतन्याचे जे बीज आपण पेरले आहे त्याला जोमदार अंकूर फुटून त्याचा वृक्ष बनण्यास या साऱ्या गोष्टींची मदत आपणास होत असते; तथापि ही केवळ मदतीची साधने आहेत हेही विसरता उपयोगी नाही. नाही तर साधनेच साध्यरूप होऊन बसतात आणि आपल्या अखेरच्या फळाला आपण अंतरतो. अशा साधनांचा उपयोग लक्षावधि लोक करित असतात; आणि यांपैकी बहुतेकांची वाढ फारशी होत नाही हेही आपण पाहातो. अशा अनेक साधनांच्या समृद्धींत आपला अध्यात्मिक जन्म होतो हे वावगें नाहीं; पण त्या साधनांत असतांच मृत्यु यावा हे मात्र रास्त नाही. साधनांच्या मर्यादित भूमीत आपल्या कार्याला आरंभ व्हावा हे युक्त आहे, पण मरेपर्यंत जर ही साधनें टाकता आली नाहीत जर आपली वाढ झाली नाहीं हेच सिद्ध होत नाही काय? मुलाने चालण्यास शिकावें म्हणून त्याला पांगुळगाडा देतात, पण जन्मभर त्याचा पांगुळगाडा जर सुटला नाही, तर त्याची बाल्यदशा संपली नाही असेच म्हणावे लागेल. गुराचे तोंड लागू नये आणि वाऱ्यावावटळीपासून इजा होऊ नये म्हणून रोपाच्या भोंवतीं कुंपण<noinclude></noinclude> rj2cz74qtlwh6gxex1a9mwgmqpv0fs4 अनुक्रमणिका:काशी-रामेश्वर यात्रा.pdf 106 104084 232868 232832 2026-07-06T07:10:42Z कल्पनाशक्ती 3813 232868 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=काशी-रामेश्वर यात्रा |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=गोविंद चिमणाजी भाटे |Address=पुणे |Year=1936 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 3="फोटो" 5="प्रस्तावना" 8="अनुक्रमणिका" 10="नकाशा" 12="यात्रामार्ग व यात्राकाल" 17="रामेश्वर व सेतुरामेश्वर" 28 ="फोटो" 29="फोटो" 34="मदुरा" 42 ="फोटो" 43="फोटो" 46="फोटो" 51="कोडैकनाल" 55="फोटो" 56="फोटो" 65="फोटो" 66="फोटो" 69="डिंडिंगल आणि पालघाट" 76="पालघाट - कोइमतुर" 84="नीलगिरीवरील विलायत" 87="फोटो" 88="फोटो" 95="फोटो" 96="फोटो" 107="दक्षिण-काशी : श्रवणबेलगोला" 113="फोटो" 114="फोटो" 123="जबलपूर" 125="फोटो" 126="फोटो" 129="फोटो" 130="फोटो" 133="फोटो" 134="फोटो" 161="फोटो" 162="फोटो" 171="फोटो" 172="फोटो" 203="फोटो" 204="फोटो" 207="फोटो" 208="फोटो" 217 ="फोटो" 218="फोटो" 227 ="फोटो" 228 ="फोटो" 233 ="फोटो" 234 ="फोटो"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] tjx5yff40k158nndq259rpinas17r0l 232890 232868 2026-07-06T07:32:24Z कल्पनाशक्ती 3813 232890 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=काशी-रामेश्वर यात्रा |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=गोविंद चिमणाजी भाटे |Address=पुणे |Year=1936 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 3="फोटो" 5="प्रस्तावना" 8="अनुक्रमणिका" 10="नकाशा" 12="यात्रामार्ग व यात्राकाल" 17="रामेश्वर व सेतुरामेश्वर" 28 ="फोटो" 29="फोटो" 34="मदुरा" 42 ="फोटो" 43="फोटो" 46="फोटो" 51="कोडैकनाल" 55="फोटो" 56="फोटो" 65="फोटो" 66="फोटो" 69="डिंडिंगल आणि पालघाट" 76="पालघाट - कोइमतुर" 84="नीलगिरीवरील विलायत" 87="फोटो" 88="फोटो" 95="फोटो" 96="फोटो" 107="दक्षिण-काशी : श्रवणबेलगोला" 113="फोटो" 114="फोटो" 123="जबलपूर" 125="फोटो" 126="फोटो" 129="फोटो" 130="फोटो" 133="फोटो" 134="फोटो" 149="प्रयाग अथवा अलाहाबाद" 161="फोटो" 162="फोटो" 171="फोटो" 172="फोटो" 187="काशी अथवा बनारस" 203="फोटो" 204="फोटो" 207="फोटो" 208="फोटो" 212="गया व सारनाथ" 217 ="फोटो" 218="फोटो" 227 ="फोटो" 228 ="फोटो" 233 ="फोटो" 234 ="फोटो" 235="अयोध्या"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] d84k0myyuktibwx18djje014b2hi5ob अनुक्रमणिका चर्चा:काशी-रामेश्वर यात्रा.pdf 107 110891 232866 2026-07-06T07:03:23Z कल्पनाशक्ती 3813 /* पीडीएफ १३५ पासून 'वाचा' हा पर्याय येत नाही */ नवीन विभाग 232866 wikitext text/x-wiki == पीडीएफ १३५ पासून 'वाचा' हा पर्याय येत नाही == @[[सदस्य:QueerEcofeminist|QueerEcofeminist]]@[[सदस्य:Subodh (CIS-A2K)|Subodh (CIS-A2K)]] पीडीएफ १३५ पासून 'वाचा' हा पर्याय येत नाही; पण संपादन करता येत आहे. त्यामुळे फोटो/ चित्र घालण्यासाठी jpg image save करता येत नाही. काय करावे? [[सदस्य:कल्पनाशक्ती|कल्पनाशक्ती]] ([[सदस्य चर्चा:कल्पनाशक्ती|चर्चा]]) १२:३३, ६ जुलै २०२६ (IST) tnmginmcv6ckxdz2j0fciph40eg5a8j 232870 232866 2026-07-06T07:15:26Z कल्पनाशक्ती 3813 या पानावरील सगळा मजकूर काढला 232870 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१३५ 104 110892 232867 2026-07-06T07:04:03Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ जबलपूर १०३ शोभा अद्वितीय दिसते यांत शंका नाहीं. नदीचें तें शांत हिरवट पाणी व दोन्ही बाजूंस ते भिंतीसारखे उभे पांढरे शुभ्र खडक, व त्यांवर पडलेला- सूर्यप्रकाश हा देखावा विल..." 232867 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ जबलपूर १०३ शोभा अद्वितीय दिसते यांत शंका नाहीं. नदीचें तें शांत हिरवट पाणी व दोन्ही बाजूंस ते भिंतीसारखे उभे पांढरे शुभ्र खडक, व त्यांवर पडलेला- सूर्यप्रकाश हा देखावा विलक्षण आकर्षक आहे यांत शंका नाहीं. एके . ठिकाणीं दोन्ही बाजूंचे शुभ्र खडक इतके एकमेकांजवळ आले आहेत कीं, माकड या तीरावरून त्या तीरावर सहज उडी मारून जाईल. म्हणून या ठिकाणाला वानरप्लुती ( monkey's leap ) असें नांव पडलेलें आहे. - येथें आम्ही थोडा वेळ होडी थांबविली व पांढऱ्या शुभ्र संगमरवरी खड- कांनीं मर्यादित अशा त्या शांतजल पुष्करणीची शोभा पहात - बसलों. नंतर होडी पुढे चालू करण्यांत आली व थोड्याच वेळांत आमची होडी पुन्हां थांबली. कारण आतां नदींतील प्रवाहरूपी संथ तलाव संपला. कारण आम्हांला धबधब्याचा धो धो आवाज ऐकू येऊं लागला. तेव्हां आतां पुढे जाणें शक्य नव्हतें. म्हणून आम्ही परत फिरलों व सभोवारचे ते पांढरे शुभ्र खडक व नदीचीं तीं नागमोडी · वळणें यांची शोभा पहात पहात परत घाटाच्या पाय-यांशीं आलों व होडीवाल्यास चिरीमिरी देऊन आलेल्या त्या भयंकर दरडीनें धर्मशाळेशी आलों. येथल्या प्रेक्षणीय स्थळांमधील एकच स्थळ गौरीशंकराचे देवालय पहा- वयाचें राहिलें. वास्तविक येथून तें पायीं जाऊन पहाण्यासारखे होतें; पण पुण्याच्या पर्वतीप्रमाणे तें टेंकडीच्या माथ्यावर असल्यामुळे बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात असे कळले. या माझ्या प्रवासांत पायांनीं चालण्याचे श्रम होतां होईल तितके टाळावे असें माझ्या सल्लागार डॉक्टरनीं सांगितलें होतें. ( कारण दोन महिन्यांपूर्वी फर्ग्युसन कॉलेजच्या टेंकडी- - वरून बराच खोल खालीं मी पडलों होतों व माझा डावा पाय अतिशय मुरगळला होता. म्हणून त्या पायाला चालण्याचे व विशेषतः - पायऱ्या चढण्याचे श्रम यावयाचे नव्हते. ) म्हणून गौरीशंकराच्या देवळास जाण्याकरितां मला माणसांनी उचलून न्यावयाची डोली करावी लागली. ती डोली कसली ! एक छोटीशी चौपाई (खाट)<noinclude></noinclude> 15og9oumrvfdmalcag08w6f6cpsp6fl पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१६१ 104 110893 232869 2026-07-06T07:14:51Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ नं. २९] अलाहाबाद : शहराचा विहंगम देखावा [पान १२८ न. ३०] अलाहाबाद : संगमावरील किल्ला [ पान १२८" 232869 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ नं. २९] अलाहाबाद : शहराचा विहंगम देखावा [पान १२८ न. ३०] अलाहाबाद : संगमावरील किल्ला [ पान १२८<noinclude></noinclude> l05uoyyf5j233lvvthfernru09cadaa पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१६२ 104 110894 232871 2026-07-06T07:16:51Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ नं. ३१] अलाहाबाद : मिंटो वार्गेतील जाहरिनाम्याचा स्मारक खांब [ पान १२९" 232871 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ नं. ३१] अलाहाबाद : मिंटो वार्गेतील जाहरिनाम्याचा स्मारक खांब [ पान १२९<noinclude></noinclude> c3t910niq1w5b7y0akuv1lvec0iwq6o पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१७१ 104 110895 232872 2026-07-06T07:17:20Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ अलाहाबाद : म्युर सेंट्रल कॉलेज (विश्वविद्यालयाचीं नं. ३२] प्रयोगालयें ) [ पान १३६-" 232872 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ अलाहाबाद : म्युर सेंट्रल कॉलेज (विश्वविद्यालयाचीं नं. ३२] प्रयोगालयें ) [ पान १३६-<noinclude></noinclude> 1wic4utn1n4hgbnihqs5ldjlvs5w9k6 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१७२ 104 110896 232873 2026-07-06T07:17:46Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ नं. ३३] अलाहाबाद : प्रयागचा माघमेळा [ पान १३७" 232873 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ नं. ३३] अलाहाबाद : प्रयागचा माघमेळा [ पान १३७<noinclude></noinclude> cu8b8co6jwzmrt24u57maunp0i0dp3u पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२०३ 104 110897 232874 2026-07-06T07:18:21Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ नं. ३४ ] काशी : मनकर्णिका घाट [ पान १६६" 232874 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ नं. ३४ ] काशी : मनकर्णिका घाट [ पान १६६<noinclude></noinclude> 6mzjpd1s5fsorveeux7lur8u6ziy20y पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२०४ 104 110898 232875 2026-07-06T07:18:41Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ नं. ५ ] काशी : पंचगंगाघाट व औरंगझेबाची मशीद [पान १६७ Dashaswamedh Gha Benares नं. ३६ ] काशी : दशाश्वमेध घाट [ पान १६७" 232875 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ नं. ५ ] काशी : पंचगंगाघाट व औरंगझेबाची मशीद [पान १६७ Dashaswamedh Gha Benares नं. ३६ ] काशी : दशाश्वमेध घाट [ पान १६७<noinclude></noinclude> 0q0beh2rrvtzb1831kw2cdeiuly3sxm पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२०७ 104 110899 232876 2026-07-06T07:19:10Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ नं. ३७] काशी : काशीविश्वेश्वराचें देऊळ [ पान १६८" 232876 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ नं. ३७] काशी : काशीविश्वेश्वराचें देऊळ [ पान १६८<noinclude></noinclude> g1tzr9chwe9ql2iyjl1m14elmhak4rf पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२०८ 104 110900 232877 2026-07-06T07:19:29Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ काशी : हिंदु विश्वविद्यालयाची विद्यार्थी वसतीगृहे नं.३] [ पान १६९" 232877 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ काशी : हिंदु विश्वविद्यालयाची विद्यार्थी वसतीगृहे नं.३] [ पान १६९<noinclude></noinclude> rw5d0h56kfug01s5vqohfla84d51vx5 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२१७ 104 110901 232878 2026-07-06T07:20:07Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ नं. ३९] बुद्धगया : महाबोधी वृक्ष (पिंपळाचे झाड ) [ पान १७६" 232878 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ नं. ३९] बुद्धगया : महाबोधी वृक्ष (पिंपळाचे झाड ) [ पान १७६<noinclude></noinclude> 34qa50skhpkeld595pvjeh5d7goipe0 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२१८ 104 110902 232879 2026-07-06T07:20:14Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ नं. ४०] बुद्धगया : बुद्ध देवालय [ पान १७७" 232879 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ नं. ४०] बुद्धगया : बुद्ध देवालय [ पान १७७<noinclude></noinclude> kbzfg819e025mx1a3mu4l2y8ti3ep2l पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२२७ 104 110903 232880 2026-07-06T07:21:20Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ The Chaukhandi stupa Saranath नं. ४१ ] सारनाथ : चौखंडी स्तूप [ पान १८४ Res: Saranath ४२] सारनाथ स्तूप व विहारांचे अवशेष [ पान १८४" 232880 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ The Chaukhandi stupa Saranath नं. ४१ ] सारनाथ : चौखंडी स्तूप [ पान १८४ Res: Saranath ४२] सारनाथ स्तूप व विहारांचे अवशेष [ पान १८४<noinclude></noinclude> 4j6z6wlwkgwhl3dfxv35643rhfes6bo पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२२८ 104 110904 232881 2026-07-06T07:21:29Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ LGUN CAPITAL SARNATH सारनाथ : अशोकस्तंभावरील सिंह [ पान १८५ : नं. ४ ] सारनाथ ध्यानी बुद्ध [पान १८५ नं. ४४ ]" 232881 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ LGUN CAPITAL SARNATH सारनाथ : अशोकस्तंभावरील सिंह [ पान १८५ : नं. ४ ] सारनाथ ध्यानी बुद्ध [पान १८५ नं. ४४ ]<noinclude></noinclude> isggvxc93eeuaqoa4bgzqy8o7jf4niu पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२३३ 104 110905 232882 2026-07-06T07:21:38Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ नं. ४५] सारनाथ : नवा विहार [ पान १८८" 232882 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ नं. ४५] सारनाथ : नवा विहार [ पान १८८<noinclude></noinclude> tosps7a687pia0ry027mgj1zp3g7f1r पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२३४ 104 110906 232883 2026-07-06T07:21:46Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ नं. ४६ ] अयोध्या : महाराजाचें देऊळ [ पान १८९" 232883 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ नं. ४६ ] अयोध्या : महाराजाचें देऊळ [ पान १८९<noinclude></noinclude> 83dntrxq8rhpdt3yrq89be7qn6qczrm पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१४३ 104 110907 232884 2026-07-06T07:23:31Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ जबलपूर १११ ब वाड्यांच्या अवशेषावरून स्पष्टपणे दिसून येतें. आम्ही मदनमहालाचे वरचे मजल्यासमोरील गच्चीवर गेलों. येथून सभोवारचा सुंदर देखावा दृष्टीस पडून या प्रांताच्या..." 232884 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ जबलपूर १११ ब वाड्यांच्या अवशेषावरून स्पष्टपणे दिसून येतें. आम्ही मदनमहालाचे वरचे मजल्यासमोरील गच्चीवर गेलों. येथून सभोवारचा सुंदर देखावा दृष्टीस पडून या प्रांताच्या सपाटीचें, सुपीकतेचें व त्यांतील पाण्याच्या विपुलतेचें आश्चर्य वाटलें. तसेंच आम्हीं उभे होतों त्या ठिकाणच्या टँकड्यांच्या अर्धवर्तुळाकार रांगेचे व त्यांच्या विलक्षण शिलामय घड णीचेही विलक्षण आश्चर्य वाटलें. या टॅकडीवरून पिसनहारीचें देऊळ ( पीठ दळणाऱ्या एका बाईनें बांधलेलें सुंदर देऊळ ) स्पष्टपणे दिसत होतें. तसेंच टेंकड्यांवर व त्यांचे आसपास किती तरी तलाव व पूर्व- काळच्या वस्तीचे अवशेष दृष्टिगोचर होत होते. तेव्हां याच टेंकड्यांच्या आश्रयाला पूर्वीची गोंडवण राजांची राजधानी गन्हा कां व कशी बांध- ण्यांत आली होती हैं उत्तम तऱ्हेनें कळून आलें. पूर्वीच्या त्या अंदा- धुंदीच्या काळांत सपाटीवर राजधानी स्थापन न करितां या दुर्गम व खडकाळ ठिकाणीच राजधानी स्थापन करणें त्या गोंड राजांना सोयीचें व सुरक्षितपणाचें वाटलें असलें पाहिजे. या गोंड घराण्याचा मूळ पुरुष एका अगदीं सामान्य घराण्यांतील तरुण यदुराय म्हणून होता. तो काला चुरी राजाच्या पदरी लष्करांत नोकर राहिला. त्याने नागदेव नांवाच्या गोंड सरदाराच्या मुलीशी लग्न करून आपला सामाजिक दर्जा वाढविला व हळू हळू आपले सामर्थ्य व वर्चस्व वाढविलें. मग त्यानें कालाचुरी राजाला पदच्युत करून आपले स्वतंत्र राज्य स्थापन केलें. या घरा- ण्यांत अत्यंत प्रतापी राजा संग्रामसिंग हा सन १४८० मध्ये गादीवर आला. त्यानें बहुतेक सर्व गोंडवन आपल्या ताब्यांत आणलें. तो सन १५४१ मध्यें वारला. त्याचा मुलगा दलपतसिंग हा गादीवर आला. महोबा या राजस्थानांतील एका ठिकाणच्या चंडेल नांवाच्या राजाची दुर्गावती नांवाची राजकन्या दलपतसिंगाला आवडली. दुर्गावतीलाही दलपतसिंग पसंत पडला. पण चंडेल राजा हीन जातीच्या गोंड घरा- ण्यांतील राजाला आपली मुलगी देण्यास तयार होईना. म्हणून दलपत-<noinclude></noinclude> r218uwb4rk2iqxfv1i5am52fk9g5l3c पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१४५ 104 110908 232885 2026-07-06T07:23:55Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "जबलपूर ११३ कमाबद्दल व परीपकारी क्रुत्याबड्ल लोकामध्र्ये पूज्यवुद्धि आहेव तिच्या संवंर्वीच्या दतकथा समाजामध्ये प्रचलित आहेत. तिची साध[ छरीं चबुतरा नांवाने जबलपुरापासून दहा..." 232885 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>जबलपूर ११३ कमाबद्दल व परीपकारी क्रुत्याबड्ल लोकामध्र्ये पूज्यवुद्धि आहेव तिच्या संवंर्वीच्या दतकथा समाजामध्ये प्रचलित आहेत. तिची साध[ छरीं चबुतरा नांवाने जबलपुरापासून दहा मैलावर दाखविण्यात येतेव त्या चवुतऱ्यचिं त्या भागांतील ल[क भाविकपणें दर्शन घेतात असें मला. सांगण्यात आले. मदनमहालाच्या दर्शनाते व तेथून दूरवर दिसणाऱ्या. प्रांताच्या गतबँमवाच्या ऎकलेल्या व वाचलेल्या हकॉँकतीते माझ्यामतांत आश्चर्य व खेद असें परस्पर विरोधी मनोविकार उटूमूत झाले. आम्र्दीऱ् किती वेळ तो समोवारचा देखावा सतेदळाश्र्नर्याते पहात होतो हे कळले नाहीं. पण शेवर्टी फार उशीर झाला म्हणून त्या मदनमहालावसन आम्ही दुसऱ्या वाटेते खाली उतरली व टेकडीच्या खालच्या मज्ञगींवर, असलेले छोठेसें शारदा देवींर्चे देवालय पाहून परत ट[ग[ उभा होता तेथें आकीं. मग आम्हीं थोडेसें आल्या’ बाटेमें परतून शहराच्या दूरच्या एका भागांतून मुतेप्रवर नांवार्वे महादेवाचे देऊळ पहाण्यास गेली. हे देऊळ अर्घवहुंलाकार टॅकडयाच्या दुसऱ्या टोकाला असल्यामुळे आम्हाला टरियाते बराच वळसा घालून याले लागले. ब[क[ पायवाटेने व शारदा देवीच्या देवळळापासून मुसेंभ्वर हे ठिकाण फार दूर नाहीं असें `आम्हांला दिसून आले, गुवे’क्र हें. महादेवाचे एक देऊळ असून तें एका मोठ्या खडकाच्या गुहेत बांधलेले अळाहे, म्हणून त्याला गुते’वर असें अन्यर्थक नाव पडले आहे. येथें देवळाच्या आवारात विपुल पाण्याची एक विहार आहे. विहोरीला दगडी, पायऱ्या असून पाणी पचिसहाफुट'ळापेंक्षांजक्तसौलीवरनाहींअसेंदिसले. पाण्याचा र'ग पांढुरका दिसला. पण हे पाणी फार पाचक व आरीम्यकारक समजले. जातें असें कळठेंभंदेंवळल्प प्रशस्त अशा फरसब’दी पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही अगास राहण्यासाररव्या ओऱ्या व खोल्या आहेत. गुहेंच्यापुढेंयोंडेसेंटुवठेंपटांगणआहे. येथल्या महादेवापुढचा नंदी बसलेलापाहूनमलामँठिंनवलवाटलेहानंदी त्या खडकात रट्यून तयार केलेला असल्यामुळे कासागेंरामें बसका नंदी कोरलेला असावा "<noinclude></noinclude> 2xe0fz74izs9l1xg61mg7slsdx17lw9 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१४४ 104 110909 232886 2026-07-06T07:24:09Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ११२ काशी - रामेश्वर यात्रा सिंगाला चंडेल राजावर स्वारी करून दुर्गावतीला जिंकून तिच्याशी लग्न करावें लागलें. दलपतसिंगानें सातच वर्षे राज्य केलें. दलपतसिंगाच्या मरण समयी..." 232886 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ ११२ काशी - रामेश्वर यात्रा सिंगाला चंडेल राजावर स्वारी करून दुर्गावतीला जिंकून तिच्याशी लग्न करावें लागलें. दलपतसिंगानें सातच वर्षे राज्य केलें. दलपतसिंगाच्या मरण समयीं त्याचा व दुर्गावती राणीचा वीरनारायण नांवाचा राजपुत्र केवळ पांच वर्षाचा होता. दुर्गावतीनें बालराजाच्या नांवानें पंधरा वर्षे उत्तम तऱ्हेने राज्यकारभार केला. तिनें आपल्या प्रजेकरितां राज्यांत किती तरी तलाव बांधले. अजून जवलपुरच्या नजीकच्या एका मोठ्या तलावाला राणी तलाव असें म्हणतात. तसेंच तिनें कितीतरी देवळें व व वाडे बांधले. दुर्गावती राणी फार पराक्रमी व मुत्सद्दी निघाली. पण तिच्या कारकीर्दीमध्यें मोंगल बादशाहीचा अंमल सर्वत्र पसरत चालला. या बादशाहीच्या सुभेदारांपैकीं माणिकपुरचा सुभेदार असफशाह याला दुर्गावती राणीच्या रूपाचा व तिच्या राज्याचा मोह उत्पन्न झाला व त्यानें दुर्गावती राणीच्या मुलखावर मोठ्या सैन्यानिशीं स्वारी केली व गन्हा या राजधानीच्या सभोवार नाकेबंदी केली. दुर्गावती राणी निकरानें लढली व तिनें आपल्या राजधानीचें पुष्कळ काळपर्यंत संर- क्षण केलें. राजधानीहून आपल्या राज्यांतील दक्षिणेकडील मंडला नांवाच्या गांवाकडे जाण्याचा तिचा बेत होता. पण असफशहाचा निकराचा हल्ला चालू झाला असतांना गन्हा नजीकच्या नदीला पूर आला. दुर्गावती राणी हत्तीवर बसून लढत होती व तिनें हल्ला परतविण्याची शर्थ केली. पण आतां आपण शत्रूचे हातीं जाणार व मग असफशाह जबरीनें आपल्याशीं निका लावील या भीतीनें दुर्गावती राणीनें आत्महत्या करून घेतली ! अशी दुर्गावती राणीची मोठी करुण कहाणी मीं गोंडवनाच्या दंतकथात्मक इतिहासाच्या पुस्त- कांत वाचली, तेव्हां मला सत्तावन सालच्या बंडांतील झांशीच्या राणीच्या करुणकहाणीची आठवण झाली ! दुर्गावती राणीच्या व झांशीच्या राणीच्या कारकीर्दीमध्ये तीनशे वर्षांचा कालावधी आहे खरा; पण दोन्ही राण्यांच्या चरित्रामध्यें किती तरी साम्य आहे असें मला वाटलें. अजून सुद्धां जबलपुरच्या आसपासच्या भागामध्यें या दुर्गावती राणीच्या परा-<noinclude></noinclude> cdnm9rin1fbmkpod70v710m4fpyerul पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१४९ 104 110910 232887 2026-07-06T07:25:33Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ प्रकरण १० वें प्रयाग अथवा अलाहाबाद धार्मिक वाङ्मयांत ज्याप्रमाणें भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे व दशोपनिषद् 'यांना प्रस्थानत्रयी म्हणतात; व प्रत्येक धर्मप्रवर्तक आचार्यान..." 232887 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ प्रकरण १० वें प्रयाग अथवा अलाहाबाद धार्मिक वाङ्मयांत ज्याप्रमाणें भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे व दशोपनिषद् 'यांना प्रस्थानत्रयी म्हणतात; व प्रत्येक धर्मप्रवर्तक आचार्यानें या प्रस्थानत्रयींवर भाष्यें केलींच पाहिजेत अशी प्रथा पडली त्याप्रमाणें धार्मिक यात्रांमध्यें प्रयाग, काशी व गया यांना त्रिस्थळी यात्रा म्हण- तात व भाविक हिंदूनें आयुष्याच्या शेवटल्या पादामध्यें या यात्रा केल्याच पाहिजेत अशी पुरातन काळापासून प्रथा पडली आहे. नुसती ही त्रिस्थळीची यात्रा घडावी येवढेच नव्हे तर गंगायमुनांचे संगमावर * आपल्याला मरण येऊन आपल्या अस्थि गंगेत पडून पवित्र व्हाव्या म्हणजे आपल्याला हटकून मोक्षप्राप्ति होते अशी धार्मिक श्रद्धा असल्या- मुळें प्रयागच्या संगमावर व काशीच्या ज्ञानवापीत विशेष भाविक यात्रेकरू आपखुषीनें जलसमाधी घेत, तर पुष्कळ लोक वृद्धापकाळीं या पवित्र स्थळी कायमचे जाऊन रहात व मग अर्थात् तेथेंच त्यांना मृत्यु- लाभ व मोक्षप्राप्ति होई. पूर्वकाळी अशा यात्रांना पाय किंवा बैलगाडीनें जाऊन येण्यास सहज वर्ष साहा महिने लागत व म्हणून पुरातनकाळीं काशीयात्रेस निघतांना लोक आपल्या मालमत्तेची निरवानिरव करून व मृत्युपत्र करून घर सोडीत असत. पूर्वकाळीं ज्या यात्रा करून येण्यास दहाबारा महिने लागत त्या यात्रा हल्लींच्या जलद प्रवासाच्या साधनांनीं दहा बारा दिवसांत आटपता येतात याचा मला प्रत्यक्ष अनु- भव आला. कारण ही त्रिस्थळी यात्रा, व अयोध्या, मथुरा, वृंदावन, दिल्ली, आग्रा वगैरे प्रेक्षणीय स्थळे मी खरोखरी तीन आठवड्याचे आंत सावकाशपणें पाहून परत स्वस्थानीं आलों. या माझ्या त्रिस्थळी यात्रेचें वर्णन या व पुढील प्रकरणांत करावयाचा विचार आहे.<noinclude></noinclude> rycsannfy5k36s7ovne7xvck7ra8kf3 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१८७ 104 110911 232888 2026-07-06T07:28:04Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ प्रकरण ११ वें काशी अथवा बनारस २ एप्रिल सन १९३५ रोजी पहाटेस पांच वाजतां प्रो. रानडे ता.... •यांचा प्रेमपूर्वक निरोप घेऊन मी इ. आय. रेल्वेच्या अलाहा- बाद - जानपूर शाखेवरील प्रया..." 232888 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ प्रकरण ११ वें काशी अथवा बनारस २ एप्रिल सन १९३५ रोजी पहाटेस पांच वाजतां प्रो. रानडे ता.... •यांचा प्रेमपूर्वक निरोप घेऊन मी इ. आय. रेल्वेच्या अलाहा- बाद - जानपूर शाखेवरील प्रयाग स्टेशनवर आलों. स्टेशन लहानसेंच आहे. येथें गाडी सव्वासहा वाजतां आली. ही गाडी न बदलतां थेट बनारस कँटोन्मेट स्टेशनला जाणारी होती. 'अलाहाबादेहून बनारसेस जाण्यास रेलवेचे कमी ज्यास्त लांब तीन मार्ग आहेत. अलाहा बादेस यमुनेच्या पुलाच्या अलीकडील नैना व चौकी या फाटयानें जबलपुर- कडून कलकत्त्याला जाणान्या मोठ्या इ. आय. रेलवेच्या मार्गानें मोगल सराईस येऊन मग तेथून गंगेचा पूल ओलांडून बनारसला जाणे हा पहिला मार्ग होय. हा अर्थात् सर्वात लांबचा मार्ग आहे. यामध्ये फक्त गंगानदीच्या पुलावरून जावें लागतें. दुसरा रेलवेरस्ता बंगाल नार्थ वेस्ट (B. N. W. ) रेलवे कंपनीचा आहे. पण तो मिटर गेज आहे. त्यानें अलाहाबादच्या पूर्वेस असलेल्या गंगेच्या पुलावरून जावें लागतें. या रस्त्यानें बनारस सुमारें ७५ मैल आहे. पण काशीस पोहोंचावयास पांच तास लागतात. तिसरा रेलवे रस्ता इ. आय. रेलवे कंपनीचाच आहे. तो रस्ता अलाहाबादेच्या उत्तरेस असलेल्या गंगा नदीवरील कर्झन पुलावरून जातो व मग जंगघाय जंक्शन वरून बनारसला जातो. या रस्त्यानें बनारस सुमारें ऐशी व्यायशी मैल आहे. पण गाडी बनारसला साडेतीन तासांत पोहोंचते. या रस्त्यावरच प्रयाग स्टेशन आहे व म्हणून मी प्रयाग स्टेशनला येऊन गाडीत बसलों. गाडीत गर्दी फारशी नव्हती. गंगेवरील तो लांबच लांब कर्झन पूल पाहून व नदीचें तें अफाट पात्र पाहून मला आश्चर्य वाटलें. पूल टाकला की पांढरट रंगाच्या मातीचा सपाट प्रदेश एक सारखा लागतो. क्षितिजा-<noinclude></noinclude> tdatik5h5x9mxbqctmgwxmpfj9aogn3 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२१२ 104 110912 232889 2026-07-06T07:30:48Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ प्रकरण १२ वें गया व सारनाथ गौतमबुद्धाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेलीं अशीं बौद्धधर्मीयांचीं स्थानें हिंदुस्थानांत व सिंहली दंतकथेप्रमाणें सिंव्हलद्वीपांत मिळून पुष..." 232889 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ प्रकरण १२ वें गया व सारनाथ गौतमबुद्धाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेलीं अशीं बौद्धधर्मीयांचीं स्थानें हिंदुस्थानांत व सिंहली दंतकथेप्रमाणें सिंव्हलद्वीपांत मिळून पुष्कळ आहेत. या स्थानांपैकी चार स्थानें पवित्रांतलीं पवित्र अशीं मानलेलीं आहेत. खुद्द गौतमबुद्धानें या चार स्थानांचें नियमितपणें दर्शन घेत जावें अशी आपल्या शिष्यांस आज्ञा केली होती. ती आज्ञा कितीतरी शतकें भाविकपणे पाळली जात असे व अझूनही पाळली जाते. तीं चार स्थानें म्हणजे गौतमबुद्धाचें जन्मग्राम कपिलवस्तु; साक्षात्कार स्थान गया; त्याचे आयोपदेश- स्थान ऋषिपतन किंवा मृगदाव ( अर्वाचीन नांव सारनाथ ); त्याचें निर्वाणस्थान कुशिनारा ( अर्वाचीन नांव काशीया) हीं तीं चार स्थानें होत. जेथें जेथें बौद्धधर्म पसरलेला होता त्या त्या दूर देशां- हून पुरातन काळचा कष्टमय प्रवास करून भाविक यात्रेकरू हिंदुस्थानां- तील या व इतर पवित्रस्थळीं येत असत हें आपलीं प्रवासवृत्त लिहून ठेवणाऱ्या फे हायन व हुएन सँग या चिनी यात्रेकरूंच्या उदाहरणां- वरून दिसून येतें. कारण आपल्या प्रवासाचे वृत्त लिहून ठेवण्याचा खटाटोप न करणारे कितीतरी अज्ञात यात्रेकरू या दीर्घकाळामध्यें येऊन गेले असले पाहिजेत. अशा या पवित्र स्थानांपैकीं गया व सारनाथ हीं दोन स्थानें मी ता. ३ व ४ एप्रिल सन १९३५ या दोन दिवशीं लागोपाठ पाहिली. तरी त्या स्थानांचें यथाक्रम वर्णन करतों. गया हैं ठिकाण काशीच्या थेट पूर्वेस असून तें काशीपासून सुमारें सवाशें मैल अंतरावर आहे. मी गयेस जाण्याकरितां ता. ४ एप्रिल रोजी पहांटेस चार वाजतां कँटोनमेंट स्टेशनवर आगगाडी गाठली. तिसऱ्या<noinclude></noinclude> 3hv2zro9k8rn4r4c3tqzccsqzyigl5g पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२३५ 104 110913 232891 2026-07-06T07:32:45Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ प्रकरण १३ वें अयोध्या :0: कोसलो नाम मुदितः स्फीतो जनपदो महान् । निविष्टः सरयूतीरे प्रभूतधनधान्यवान् ॥ अयोध्या नाम नगरी तत्रासील्लोकविश्रुता । मनुना मानवेन्द्रेण या पुर..." 232891 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ प्रकरण १३ वें अयोध्या :0: कोसलो नाम मुदितः स्फीतो जनपदो महान् । निविष्टः सरयूतीरे प्रभूतधनधान्यवान् ॥ अयोध्या नाम नगरी तत्रासील्लोकविश्रुता । मनुना मानवेन्द्रेण या पुरी निर्मिता स्वयम् ॥ आयता दश च द्वे च योजनानि महापुरी । श्रीमती त्रीणि विस्तीर्णा सुविभक्तमहापथा ॥ राजमार्गेण महता सुविभक्तेन शोभिता ॥ मुक्तपुष्पावकीर्णेन जलसिक्तेन नित्यशः ॥ तां तु राजा दशरथी महाराष्ट्रविवर्धनः । पुरीमावासयामास दिवि देवपतिर्यथा ॥ हिंदुस्थानांतील फार पुरातन काळपासून प्रख्यात असलेल्या सात नगरांपैकीं “अयोध्या मथुरामाया काशीकांची अवन्तिका । पुरी द्वारावती चैव सप्तैताः मोक्षदायिकाः । " या सुभाषिताप्रमाणें अयोध्या में पहिलें शहर होतें. वाल्मीकि रामायणांतील अवतरणावरून कोसल देशाच्या दशरथ राजाची ती राजधानी असून ती नगरी फारच सुंदर व संपन्न अशी होती. रामाचे काळीं तर तिचें वैभव अधिकच वाढलेलें होतें. कालिदासानें रघुवंशामध्ये अयोध्येच्या नांवापलीकडे फारसें वर्णन केलें नाहीं. पण त्यानें रावणवधानंतर राम विमानांतून परत अयोध्येच्या नजीक आला तेव्हां दुरून दिसणाऱ्या शरयू नदीचें फारच सुंदर वर्णन केलें आहे व रामाला त्या नदीबद्दल किती विलक्षण प्रेम वाटत होतें हैं<noinclude></noinclude> 9h4tzzfgoxe4kdumqgx4rvytgnjkaj3