विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.10 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf 106 1874 232978 232908 2026-07-09T07:13:49Z कल्पनाशक्ती 3813 232978 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]] |Language=mr |Volume= |Author=विवेकानंद |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=न. म. कुलकर्णी |Address= |Year=१९२२ |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist 4="अनुक्रमणिका" 5="हिंदु देवालय फोटो" 6="एक उघडे रहस्य" 19="कैवल्याचा मार्ग" 32="याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी" 44="सांख्यविचार" 65="सांख्य आणि वेदान्त" 82="वेदान्त व हक्क" 107="हक्क" 118 ="अभ्यास" 141="भक्ति" 169 ="हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप."/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} jxi9cd4bp68s1zpi9djp9rzl7bdg9yj पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१६५ 104 66730 232979 149009 2026-07-09T07:16:29Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232979 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६० |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>विचार तो करीत असतो. त्याचा स्वार्थ त्या वेळी अत्यंत आकुंचित रूपाचा असतो. त्याने लग्न केलें म्हणजे त्याचें आत्मरूप दुप्पट होते, आणि मुलें झाली म्हणजे हेच मूळ रूप आणखी किती तरी पटींनी विस्तार पावते. हा विस्तार असाच वाढत गेला म्हणजे हाच पुरुष अनंतपटीनें विस्तृत होऊन 'हे विश्वचि माझें घर' असे म्हणू लागतो आणि अखेरीस आपणच चराचर रूप होऊन जातो. साऱ्या विश्वांतील प्रेम त्याच्या ठायीं एकवटतें, तो प्रेमनिधान बनतो; आणि प्रेमनिधान, हेंच परमेश्वराचे रूप होय.<br>{{gap}}पराभक्तीला पोहोचण्याचा मार्ग हा आहे. भक्तीच्या या कोटींत सर्व चिन्हें, विधी आणि बाह्योपचार ही गळून जातात. या भक्तीच्या स्थितीपर्यंत जो कोणी पावता झाला असेल तो अमुक एका विशिष्ट पंथाचा अथवा धर्माचा असें म्हणवत नाहीं; कारण सर्व धर्म आणि पंथ त्याच्या ठिकाणी एकवटलेले असतात. मग यांपैकी कोणता एक अमुक पंथ त्याचा असा कसा म्हणावा? पूर्णपणे स्वतःच्या ठिकाणी त्याला सांठवू शकेल असा पंथ तरी कोणता? अशा प्रकारें मुख्यतः पराभक्तीच्याच पायावर ज्या धर्माची उभारणी झाली आहे, त्या धर्मात ती भक्ति स्पष्टत्वास आणण्याची धडपड एकसारखी सुरू असते असें आपणास आढळून येईल. या पराभक्तीची अंधुकशी तरी कल्पना आपणास असते. त्याचप्रमाणे या जगांत प्रत्ययास येणारे प्रेम आणि आकर्षण हीसुद्धा त्याच भक्तीची स्वरूपे आहेत हेही आपणास कळत असते; तथापि जगांतल्या सर्व धर्मातील संत आणि सत्पुरुष हीच भक्ति अनेक प्रकारांनी व्यक्त करण्याची धडपड करीत असतात असे आपणांस आढळून येईल. फार काय, पण विषयसुखाचे रूपांतरही पराभक्तींत करण्याची त्यांची धडपड सुरू असते. भाषेत जे काही सामर्थ्य असेल त्या साऱ्याचा उपयोग पराभक्तीची व्याख्या करण्याकडे ते करीत असतात. अत्यंत जड विषयांचें रूपांतर चैतन्यरूपांत करण्यासाठी त्यांची धडपड अव्याहत सुरू आहे.<br>{{gap}}"प्रिय परमेश्वरा, तुझ्या ओष्ठांचे चुंबन ज्याला एकवार लाधलें त्याची प्रेमपिपासा एकसारखी वाढतच जाते; मग तुझ्याशिवाय अन्य कोणताही विषय त्याला गोड लागत नाही. त्या चुंबनसुखांत सारी लौकिक दुःखें बुडून नाहीशी होतात, साऱ्या भूतकालाचे विस्मरण होतें, वर्तमान आठवत नाहींसा होतो आणि भविष्याच्या अस्तित्वाची जाणीवच नाहीशी होते. काल म्हणजे<noinclude></noinclude> 9mom59o8eucsucitw9g3y4qfd4tynva पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१६६ 104 66731 232980 149016 2026-07-09T07:19:41Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232980 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|भक्ति.|१६१ }} {{rule}}</noinclude>काय हेच समजेनासें होतें. तुझ्या अस्तित्वावांचून कालाचे अथवा दुसऱ्या कशाचेही अस्तित्व स्फुरेनासें होतें." असे शब्द जगांतील सर्व भाषांत आणि सर्व धर्मात तुम्हांस आढळतील. या भक्तीचे वेड असे आहे. सर्व आशा, इच्छा आणि कल्पना मरून गेल्या म्हणजे ही एकटीच शिल्लक उरते. मग भक्त म्हणतो, "मला मुक्तीची काय जरूर आहे? मुक्तीची फिकीर कोण करीत बसतो? फार काय, पण पूर्णत्व पावण्याचीही इच्छा मला नाही, आणि स्वतंत्र होण्याचीही गरज नाही." खऱ्या भक्ताची भाषा या प्रकारची असते.<br>{{gap}}"मला संपत्ति नको आणि शक्तिही नको. माझें शरीर सुस्थितीत आहे की नाही, याचीही पर्वा मी करीत नाही. मला सौंदर्य नको, आणि बुद्धिही नको. या जगांत अनेक प्रकारची दुःखें भरली असली तरी त्यांत पुनः पुनः जन्म घेऊन तुझी भक्ति करावी असे मला वाटते. तुझी भक्ति मला प्राप्त होत असेल तर दुःखमय जगांत हजारों जन्म आले तरी मला त्यांची खंती वाटणार नाही." अशा प्रकारच्या काव्यमय उद्गारांत भक्तीचा सारा उन्माद तुम्हांस आढळून येईल. प्रेमाची जितकी स्वरूपें या जगांत स्पष्टत्वास येतात, त्या सर्वांत स्त्रीपुरुषांच्या प्रेमात त्याचे उत्तान आणि अत्यंत उत्कट रूप व्यक्त झालेले असते. यामुळे परमेश्वरविषयक प्रेम अथवा भक्ति व्यक्त करतांनाही तसल्याच प्रकारच्या भाषेचा उपयोग सर्वत्र होत असल्याचे आपणास आढळून येते. संतांच्या आणि भक्तांच्या हृदयांत ज्या प्रेमाचा वास असतो, त्याचा एक अंधुकसा किरण तुम्हांस स्त्रीपुरुषांच्या प्रेमांत आढळून येईल. परमेश्वराच्या प्रेमाने खरा भक्त वेडापिसा होऊन जातो, किंबहुना त्या प्रेमाने वेडे व्हावें अशी त्याची इच्छाच असते. भक्तीने त्याचे चित्त बेफाम आणि बेभान होऊन जाते. भक्तीचा उन्मादवायु त्याला पछाडतो, आणि भक्तिरसाचे आकंठ पान केल्यामुळे तो धुंद झालेला असतो. सांपडेल तेथे भक्तिरस प्यावा अशी इच्छा भक्तीमागे लागलेल्या मनुष्यांस असते. तेथे जातगोताचा विचार त्यास शिवतसुद्धा नाही. जगांतल्या कोणत्याही धर्मातील आणि कोणत्याही जातीच्या संतानें भक्तिरसाचा साठा करून ठेवल्याची बातमी त्यास लागली की त्यांतला आस्वाद आपणास कसा मिळेल एवढेच चिंतन त्याचे चित्त करूं लागते. अशा भक्ताला कसल्याही प्रकारच्या प्रतिफलाची अपेक्षा नसते. भक्तीच्या बदल्यांत अमुक एका वस्तूची प्राप्ति व्हावी<noinclude><br>{{gap}}स्वा० वि० खं०-९-११</noinclude> ka5ajnud549rm8jato7xvhlaxssa2df पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१६७ 104 66732 232981 149019 2026-07-09T07:22:23Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232981 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६२ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>असें त्यांस कधीच वाटत नसते. त्यांची भक्ति म्हणजे वाण्याचे बाजारी प्रेम नव्हे. त्यांची भक्ति म्हणजे बाजारात मिळणारा सवदा नव्हे. भक्तीचा मार्ग भक्ति, भक्तीचे साध्य भक्ति आणि भक्तीचे फळही भक्तीच. पण या फळाचा गुण काय आहे पहा! भवरोगाचे पूर्ण निर्मूलन करण्याची दिव्य औषधि हीच. सर्व दुःखांचा पूर्ण परिहार करण्याचे सामर्थ्य एकट्या भक्तीला मात्र आहे. मनुष्यमात्राला जो संसाररोग जडला आहे आणि जो त्याच्या हाडीमासी खिळून बसला आहे, तो नाहींसा करावयाचा असेल तर या रसाचा एक प्याला घ्या आणि अनुभव पहा! या रसाचे आकंठ पान तुम्ही केले तर परमेश्वरी उन्मादवायु तुम्हांस होईल, आणि आपण मनुष्य आहों ही वस्तुस्थितिसुद्धा तुम्ही विसरून जाल.<br>{{gap}}परमात्मप्राप्तीचे मार्ग वेगवेगळे असून ते परस्परांपासून अगदी भिन्न आहेत, असा आभास आरंभी होत असला तरी हे सारे मार्ग अखेरीस एकत्र होतात असें आपणांस आढळून येईल. 'सर्वं खल्विदं ब्रह्म' हाच सर्व मार्गांचा अखेरचा मुकाम आहे. वेगवेगळ्या बिंदूंपासून निघालेले वेगवेगळे रस्ते या ठिकाणी एकवटून एकरूप होतात. साऱ्या रस्त्यांचे अंतिम पर्यवसान एकच. आरंभी आपण सारे द्वैतीच असतो. 'मी परमात्मरूप आहे' असे आपणास कधी चुकूनसुद्धां वाटत नाही. केवळ बुद्धिवाद करतांना अशा प्रकारची भाषा आपण क्वचित् प्रसंगी वापरली तरी त्या वेळी सुद्धा आपल्या भाषणास आपले मन ग्वाही देत नसते. आपण बोलतों ते आपल्या अनुभवाबाहेरचें बोलतों, असें तेव्हांसुद्धा आपणांस वाटत असते. परमात्मरूपापासून आपण भिन्न आहों, हीच आपली आरंभीची भावना असते. मी वेगळा आणि परमेश्वर माझ्याहून वेगळा असे आपणांस वाटत असते. यानंतर भक्तीचा उदय होऊ लागला म्हणजे मनुष्य परमेश्वरासंनिध जाऊं लागतो आणि आपल्या बाजूनें परमेश्वरही मनुष्याजवळ येऊ लागतो. 'तूं माता, तूं पिता, तूं बंधु' इत्यादि अनेक रूपांनी मनुष्याची भक्ति स्पष्टदशेस येऊ लागते, आणि अखेरीस भक्त व ईश्वर हे एकरूप होऊन जातात. 'तूं आणि मी एकच आहों व तुझे पूजन करण्यांत मी स्वतःचीच पूजा करतो' असें भक्त म्हणू लागतो. भक्तीच्या आरंभींच्या स्वरूपाचे अंतिम पर्यवसान अशा प्रकारचे आहे. भक्तीचे आरंभींचे स्वरूप अत्यंत आकुंचित असते, आणि अखेरीस ते इतके विशाल<noinclude></noinclude> 3bkn17y0xlmmruny225bgmu4gvwlukl पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१६८ 104 66733 232982 149022 2026-07-09T07:24:12Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232982 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|भक्ति.|१६३ }} {{rule}}</noinclude>होतें की आपल्या विस्ताराने सारे विश्व तें व्यापून टाकतें. आरंभी काजव्यासारखी लुकलुकणारी अल्पशी ज्योत अखेरीस इतकी प्रखर आणि तेजोमय होते की, आपल्या दिव्य प्रकाशाने सारे विश्व ती उजाळते. आरंभींचे अल्प आणि आकुंचित रूप अनंत होते. परमेश्वर कोठे तरी आकाशाच्या कोपऱ्यांत दडी मारून बसला आहे, ही आरंभींची भावना नष्ट होते, आणि त्याचा वास सर्वत्र आहे, किंबहुना तोच सर्व आहे असा अनुभव अखेरीस येतो. अशा रीतीने मनुष्याचे रूपांतर परमेश्वरांत होते. आरंभी नररूपाने नारायणाकडे जाऊ पाहणारा मनुष्य अखेरीस स्वतःच नारायण होऊन बसतो. वस्तुतः तो आरंभींच नारायण होता, पण तसा अनुभव त्याला नव्हता. मी नर आहे असा भ्रम त्याला झाला होता. त्याच्या चित्तांत ज्या अनेक तृष्णा होत्या त्यांनी हा भ्रम उत्पन्न केला होता. या तृष्णा एकामागून एक नाहीशा होत चालल्या आणि त्यांजबरोबर आकुंचित स्वार्थबुद्धिही लोपूं लागली; आणि अखेरच्या मुक्कामास नर आणि नारायण एकच आहेत असा अनुभव त्याला आला. <br><br><Br> {{rule|7em}}{{rule|7em}}{{rule|7em}} {{nop}}<noinclude></noinclude> ggwljwhftz130az8kk01pr0n8tl4nxs पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१६९ 104 66734 232983 149253 2026-07-09T07:28:54Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232983 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|{{xx-larger|'''हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.'''}}}} {{rule|7em}} {{gap}}आमचा धर्म आणि आमचें कुल यांचा निदर्शक असा एक शब्द सर्वांच्या सामान्य परिचयाचा झाला आहे. हा शब्द 'हिंदु' असा आहे. वेदान्त धर्म आणि हिंदु यांचा परस्परसंबंध काय आहे याचे स्पष्टीकरण येथे करणे अवश्य आहे. आमच्या देशांत सिंधु या नांवाची एक नदी आहे. याच नदीला प्राचीन पारसीक लोकांनी हिंदु असें नांव दिले होते. संस्कृत भाषेत जेथे 'स' हा वर्ण येतो तेथें त्याचे रूपांतर 'ह'या वर्णांत पारसीक लोक करीत असत. याच रीतीनें सिंधु या शब्दाचे रूपांतर हिंदु असें झालें. 'ह' या वर्णाचा उच्चार करणे ग्रीक लोकांस फार जड जाई; यामुळे त्यांनी तो 'ह' कारही गाळला आणि हिंदु याचे आणखी एक रूपांतर होऊन इंडियन हा शब्द बनला. सिंधु नदाच्या परतीरी राहणाऱ्या लोकांस प्राचीन पारसिकांनी हिंदु हे नांव दिले. त्या काळी या शब्दाचा प्रचार कोणत्याही अर्थाने होत असला तरी सांप्रत तो अर्थ नष्ट झाला आहे. कारण सिंधुनदाच्या दक्षिणेस राहणारे सांप्रतचे लोक एकाच धर्माचे नसून त्यांत आतां अनेक धर्मानुयायांची वस्ती आहे. त्यांत हिंदु आहेत, मुसलमान आहेत, पारसी आहेत, ख्रिस्ती आहेत, बौद्ध आहेत आणि जैनही आहेत. 'हिंदु' या नांवाचा केवळ शब्दार्थ घेतला तर या साऱ्यांसच हिंदु हे नांव द्यावे लागेल; पण एका विशिष्ट धर्माचा वाचक या अर्थाने त्याचा उपयोग करावयाचा असेल तर या सर्वांस हिंदु हे नांव देता येणार नाही हे उघड आहे. वास्तविक पाहतां हिंदु धर्मात अनेक धर्मातील तत्त्वांचा अंतर्भाव झालेला आहे. तो धर्म कोणत्याही प्रकारे एकदेशीय स्वरूपाचा नाही. अशा प्रकारच्या सर्वगामी धर्माच्या स्वरूपाचे बोधक असें एकच नांव देणे बहुतांशी दुरापास्त आहे. या धर्मात अनेक स्वरूपांची तत्त्वे आहेत, अनेक प्रकारच्या कल्पना आहेत. यांत नानाविध आचार तुम्हांस आढळतील. हे सारे प्रकार कांहीं सुसंघटित रूपाचे आहेत असेंही नाही. काही विशिष्ट आचार ठरलेले आहेत असेंही नाही. अमुक पंथाचे अमुक निश्चित आचार आहेत असें तुम्हांस सांगता येणार नाही. या साऱ्या विविधतेत एकवाक्यता<noinclude></noinclude> h3n70safbqir94jrxzt7mha0zo6efuj पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७० 104 66735 232984 154867 2026-07-09T07:33:33Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232984 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१६५ }} {{rule}}</noinclude>शोधावयाची म्हटले, तर ती एकाच मुद्यावर होते असे आपणास आढळून येईल. हिंदुधर्मात अनेक शाखा आणि पंथ यांचे वास्तव्य असले, तरी त्या सर्वांस वेद ग्रंथ प्रमाण आहेत. श्रुतींची पूज्यता सर्वांस सारखीच मान्य आहे. यामुळे श्रुतिग्रंथ हा सर्वांचा सामान्य पाया आहे असे म्हणण्यास हरकत नाही. फार काय, पण जो श्रुतींचे प्रामाण्य मानीत नाही, त्याला स्वतःस हिंदु म्हणविण्याचा अधिकार नाही असेही म्हणता येईल. या श्रुतींचे मुख्य भाग दोन आहेत, हे आपणांस बहुधा अवगत असेलच. या दोन भागांस कर्मकांड आणि ज्ञानकांड अशी नावे आहेत. यज्ञयागादि क्रियाकलाप, हव्यकव्य इत्यादिकांचें विवरण कर्मकांडांत आहेत. सांप्रतकाळी कर्मकांड बहुतांशी प्रचारांतून गेलें आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. उपनिषदग्रंथ आणि वेदान्त यांचा अंतर्भाव ज्ञानकांडात होत असून त्यांत आमच्या धर्मतत्त्वांचे विवरण केलें आहे. हा भाग सर्व प्रकारच्या मतवाद्यांस मान्य आहे. द्वैती, विशिष्टाद्वैती आणि अद्वैती या सर्वांस आणि सर्व पंथांच्या तत्त्वज्ञास हा भाग सारखाच मानार्ह वाटत असून स्वमताच्या पुष्टीकरणास याच ज्ञानकांडाचा आधार ते वारंवार घेत असतात. निरनिराळ्या मतांचे तंटे तोडण्याचे अखेरचे आणि अत्युच्च दर्जाचे न्यायमंदिर ज्ञानकांड हेंच होय. कोणत्याही मताचें विवरण तुम्हांस करावयाचे असेल, तर त्याला ज्ञानकांडाचा आधार आहे हे तुम्हांस प्रथम दाखवावे लागते. ते तुम्हांस करतां न आले तर तुमचें सारें पांडित्य फुकट जाऊन तुमचे मत वेदबाह्य आणि अग्राह्य ठरते. याकरतां हिंदुधर्मातील सर्व मतांचा, पंथांचा आणि शाखोपशाखांचा अंतर्भाव एकाच नांवांत तुम्हांस करावयाचा असेल, तर तें कार्य वेदान्ती अथवा वैदिक अशा त‌‌ऱ्हेच्या एखाद्या नांवाने तुम्हांस करता येईल. वेदान्तधर्म अथवा वेदान्त या नांवाचा उपयोग जेव्हा जेव्हा मी करतो, तेव्हां याच अर्थाने तो शब्द मी योजीत असतो. केवळ अद्वैत मताचा निदर्शक या अर्थाने वेदान्त या शब्दाचा उपयोग करण्याची चाल सांप्रत पडली आहे; याकरितां माझ्या म्हणण्याचे थोडें अधिक स्पष्टीकरण करणे येथें भाग आहे, उपनिषद् ग्रंथांच्या मूळ पायावर ज्या अनेक मतांची उभारणी झाली आहे, त्यांपैकीच अद्वैत हेही एक मत आहे हे आपणा सर्वांस विदित आहेच. उपनिषदवृक्षाला ज्या अनेक शाखा पुढे फुटल्या, त्यांतीलच अद्वैत ही एक शाखा आहे; पण शाखा<noinclude></noinclude> ts88puf9iyeayw4keq6tai8cxeflrca पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७१ 104 66736 232985 149393 2026-07-09T07:38:59Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232985 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>म्हणजे समग्र वृक्ष असें मात्र नव्हे. उपनिषदांबद्दल जितका पूज्यभाव अद्वैतवादी बाळगतात, तितकाच विशिष्टाद्वैतवादीही तो बाळगतात. त्याचप्रमाणे स्वमताच्या पुष्टीकरणासाठी उपनिषदांचा आधार अद्वैती जितका घेतात, तितकाच विशिष्टाद्वैतीही तो घेतात. हीच गोष्ट द्वैतवाद्यांसही लागू आहे; आणि अशाच प्रकारचा संबंध उपनिषदें आणि इतर मतें व पंथ यांतही आहे. अशा प्रकारे वेदान्त ग्रंथांचा आधार सर्वांस सारखाच असतांही वेदान्ती म्हणजे अद्वैती असा अर्थ सामान्य जनांच्या मनांत पक्का रूढ होऊन गेला आहे; आणि असे होण्यास थोडेसें विशेष कारणही घडले आहे. अद्वैत मताचे आधारस्तंभ आद्य श्रीशंकराचार्य आणि त्यांच्या नंतर होऊन गेलेले त्याच मताचे आचार्य यांनी स्वमताच्या पुष्टीकरणासाठी उपनिषदांवर जितकी भिस्त ठेविली आहे तितकी ती स्मृति वगैरे ग्रंथांवर ठेवलेली नाही. स्मृति आणि पुराणे हे ग्रंथ वेदकालानंतरचे असून श्रुतितत्त्वांच्या आचाराचा मार्ग यांत स्पष्ट केला आहे. तत्त्वांचा प्रत्यक्ष आचार कसा असतो हे दाखविण्याकरितांच पुराणें जन्मास आली. तथापि श्रुतिग्रंथांना जो मान आहे तो या ग्रंथांना नाही हे स्वाभाविकच आहे. श्रुति आणि स्मृति अथवा पुराणे यांत मतभेद झाला तर श्रुतीचे वचन आम्ही प्रमाण मानतों व स्मृतीचें अथवा पुराणांचें वचन तेवढ्यापुरतें मागे पडते. कोणत्याही मतनिर्णयाच्या प्रसंगी श्रुति हीच प्रमाण धरावी असा नियम आहे. यामुळे श्रीशंकरादि आचार्यांनी श्रुतींचे आधार जितके दाखविले आहेत, तितके स्मृतींचे अथवा पुराणांचे दाखविले नाहीत. जेथे श्रुतीचा आधार मिळण्यासारखाच नव्हता, अशा एखाद्या प्रसंगी मात्र स्मृतीकडे अथवा पुराणाकडे त्यांनी बोट दाखविले आहे. उलट पक्षी इतर मतवाद्यांनी स्मृति-पुराणांचा आश्रय अधिक प्रमाणावर केला असून, श्रुतीकडे त्यांचा ओढा कमी कमी होत गेला आहे. द्वैताच्या बाजूला एखादें मत जों जो अधिक झुकत जातें तों तो श्रुतींचा आधार सोडून स्मृति-पुराणांकडे धाव घेण्याची त्यांची प्रवृत्ति अधिकाधिक वाढत जाते असें आपणास आढळून येईल. केवळ तत्त्वमार्गाचा विचार करूं जाणाऱ्या कोणत्याही पंथाने उपनिषदांसारख्या शुद्ध ज्ञानप्रवर्तक ग्रंथांचा आधार घ्यावा अशी आपली स्वाभाविक अपेक्षा असते; पण द्वैत ग्रंथांत ही आपली अपेक्षा पूर्ण होत नाही. अशी वस्तुस्थिति असल्यामुळे वेदान्ती म्हणजे अद्वैती असा<noinclude></noinclude> bb7cz306lbcxkm25z0laqdgahusyn0n पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७२ 104 66737 232986 149394 2026-07-09T07:44:31Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232986 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१६७ }} {{rule}}</noinclude>अर्थ लोकांच्या मनांत रूढ झाला असावा. अद्वैतवादी म्हणजेच खरा वेदान्ती असें लोकांस वाटण्याचे कारण बहुधा हेच असावे असे मला वाटते.<br>{{gap}}रूढी कशीही असली तरी वेदान्त या शब्दांत सर्व मतांचा आणि शाखांचा अंतर्भाव झाला पाहिजे हे निर्विवाद आहे. श्रुतिग्रंथ हे प्राचीनतम वाङ्मय आहे, याबद्दल आमच्या पंडितांत तरी वाद नाही. त्याचप्रमाणे अर्वाचीन पाश्चात्य पंडितांच्या मते श्रुतिग्रंथांतील वेगवेगळे भाग आगेमागे लिहिले गेले असें ठरत असले, तरी त्यांचे हे मत ग्राह्य समजण्यास आम्ही तयार नाही. सर्व श्रुती एकाच काळी निर्माण झाल्या, या आमच्या समजुतींत यत्किचितही फरक करण्यास आम्ही तयार नाही. किंबहुना श्रुती अमुक एका कालीं निर्माण झाल्या असेंही घडलें नाहीं; तर त्यांचे अस्तित्व चिरंतन कालापासून आहे. परमात्म्याच्या चित्तांत श्रुतींना अस्तित्व नव्हतें असें कधीच घडलें नाहीं असेंही आम्ही म्हणतों. वेदान्त या शब्दांचा उपयोग मी करतो त्यावेळी जो भावार्थ माझ्या मनांत असतो तो इतका विस्तृत आहे. द्वैत, विशिष्टाद्वैत आणि अद्वैत या साऱ्यांचा अंतर्भाव वेदान्त या शब्दांत होतो असें माझें मत आहे. फार काय, पण जैन आणि बौद्ध या धर्माची तशी मर्जी असेल, तर त्यांसही आमच्या पंक्तीत बसविण्याची आमची तयारी आहे. तसे करण्याइतकें औदार्य आमच्या अंतःकरणांत खास आहे; पण आपला अंतर्भाव वेदान्त धर्मात होऊ नये असा त्यांचाच हट्ट आहे; मग आम्हांकडून तयारी असून काय उपयोग? बौद्ध धर्माचे सार काढलें तर उपनिषदांतील तत्त्वांहून त्याचा मथितार्थ वेगळा नाहीं असें आपणांस आढळून येईल. बौद्ध धर्मांत अत्युच्च नीतितत्त्वांचा अंतर्भाव झाला आहे, अशी त्याची ख्याती आहे; पण ही सारी तत्त्वे एक अथवा अनेक उपनिषद् ग्रंथांतून जशीच्या तशीच घेतली आहेत, हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे जैन धर्मातील ग्राह्य मतेंही उपनिषदांत तुम्हांस आढळतील. आता त्यांतील तर्कबाह्य भाग मात्र उपनिषदांत कोठे आढळावयाचा नाही, हे आम्ही प्रांजलपणे कबूल करतो. हिंदुस्थानांत आजपर्यंत जितकी मते उद्भवली आहेत, त्या साऱ्यांचे बीज उपनिषदांत तुम्हांस सांपडेल. भक्तिमार्गाचा मागमूसहि उपनिषदांत आढळत नाही, असे कोणी कोणी म्हणतात; पण हे म्हणणे अगदी निराधार आहे. उपनिषदांचा अभ्यास ज्यांनी मनःपूर्वक केला असेल, त्यांस या<noinclude></noinclude> 1xjf5u3m5rccj4e44k95x7r2rilgcsk पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७३ 104 66738 232987 149395 2026-07-09T07:48:06Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232987 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>मताचा फोलपणा तेव्हांच कळून चुकेल. प्रत्येक उपनिषदांत भक्ति भरपूर आहे. मात्र ती दिसण्यास आपणांस तशी दृष्टि पाहिजे. आता इतकी गोष्ट मात्र खरी की स्मृतिपुराणांतून ज्या काही तत्त्वांचा पूर्ण विकास आढळतो, ती तत्त्वे केवळ बीजरूपाने मात्र उपनिषदांत आहेत. जणूं काय, उपनिषदांनी केलेल्या नकाशावरून पुढील इमारत स्मृतिपुराणांनी बांधली. ज्याचें उगमस्थान उपनिषदांत नाही, असें एकही मत अथवा असा एकही पंथ उभ्या हिंदुस्थानांत तुम्हांस आढळावयाचा नाही. उपनिषद् ग्रंथांशी ज्यांचा फारसा परिचयही नाही, अशा कांहीं पंडितंमन्यांनी भक्तीच्या उगमाचा शोध उपनिषदांबाहेर दुसऱ्या कोठे लावण्याचे यत्न केले होते; पण हे सारे यत्न अगदी निष्फळ झाले आहेत, हे आपणां सर्वांस आतां ठाऊक आहेच. संहिता ग्रंथ उपनिषदांच्या अगोदरच्या कालांतले असतांही भक्तीचा उल्लेख त्यांत आहे; मग उपनिषदांत तो आहे हे वेगळे सांगण्याचे प्रयोजनच नाही. परमेश्वरपूजन आणि भक्तीचे अनेक प्रकार या साऱ्यांची बीजें उपनिषदांत आहेत. संहितांच्या कालानंतर व उपनिषदांनंतरही भक्तीचे ध्येय आणि स्वरूप ही दिवसेंदिवस अधिक उच्च होत गेली हे मात्र खरें. संहितांत भेणेभावाची भक्ति पुष्कळ वेळां आढळून येते. भक्ताचे चित्त भीतीने कंपायमान झाले असल्याचे तेथे पुष्कळ वेळां आढळतें. वरुणासमोर अथवा दुसऱ्या एखाद्या देवासमोर त्याचा भक्त चळचळां कांपत उभा आहे, असा देखावाही तेथे आपणांस दिसतो. आपण पापी आहों ही कल्पना चित्तांत येऊन भक्ताचें चित्त कावरेबावरें झालें आहे असेंही आपणांस दिसते. पण उपनिषदांत असल्या गोष्टींस थारा मिळण्यास कोठे स्थळच नाही. उपनिषदांत भेणेभाव तुम्हांस कोठेही आढळावयाचा नाही. शुद्ध भक्ति आणि शुद्ध ज्ञान एवढया दोनच वस्तू तुम्हांस तेथें सांपडतील.<br> {{gap}}उपनिषदें हे आमचे धर्मग्रंथ आहेत; आणि त्यांच्या अर्थासंबंधी अनेक वादविवाद झाले असून अनेकांनी त्यांचे अर्थ अनेक प्रकारचे लावले आहेत. पुराणें अथवा स्मृतिग्रंथ आणि उपनिषदें यांत मतभेद होईल तेथे पुराणे मागे पडून उपनिषद्वचन प्रमाण मानावें, हा शास्त्रार्थ मागे एकवेळां मी आपणास सांगितलाच आहे. तथापि असे असतांही आमचा प्रत्यक्ष आचार पाहिला तर वैदिक धर्मानुयायी या नांवापेक्षा पौराणिक धर्मानुयायी हेच<noinclude></noinclude> ofacer0sldwtk7kuyss3t1lhoow1fqi पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७४ 104 66739 232988 149396 2026-07-09T07:54:34Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232988 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१६९ }} {{rule}}</noinclude>नांव आम्हांस अधिक साजतें असेंही तुम्हांस आढळून येईल. आमच्या आचारावरून आमच्या धर्मपरायणतेचे प्रमाण काढावयाचे म्हटले तर नव्वद किंवा अधिक टक्के आम्ही पौराणिक असून बाकीच्या उरलेल्या अंशांनी आम्ही वैदिक आहों. त्याचप्रमाणे परस्परविरोधी अशाही अनेक चाली आमच्या आचारांत शिरून बसल्या असल्याचे तुम्हांस आढळून येईल. त्याचप्रमाणे ज्यांना श्रुतिग्रंथांत यत्किंचितही आधार आढळावयाचा नाही, असली मतेंसुद्धां धर्म म्हणून उघड्या माथ्याने आमच्या समाजांत धुडगुस घालीत असल्याचे तुह्मांस दिसेल. त्याच प्रमाणे देशाच्या आणि परिस्थितीच्या अनुरोधाने कोठे कोठे अशा विलक्षण चाली आढळतात, की त्यांना श्रुतींचाच नव्हे तर स्मृतींचा अथवा पुराणांचाही आधार नसतो हे पाहून आपणास मोठे नवल वाटते; पण अशा चालींचें माहात्म्य त्या त्या विशिष्ट स्थलापुरतेच असते, हेही ध्यानात आणले पाहिजे. या चाली वेदबाह्य असल्या तरी अज्ञ लोकांच्या चित्तावर त्याचा पगडा इतका बसलेला असतो की, त्या नाहीशा झाल्या तर धर्म बुडून आपलें हिंदुत्वसुद्धा नष्ट होईल अशी भीति त्यांस वाटते. वेदान्तधर्म आणि त्याच्या चालीरीती यांची पक्की गांठ त्याने आपल्या चित्तांत मारलेली असते, आणि ही गांठ सुटण्यासारखी आहे असे त्याला कधी चुकूनसुद्धा वाटत नाही. धर्मग्रंथ तो वाचतो त्या वेळी आपल्या चाली शास्त्रसंमत नाहीत हेही त्याला कळत नाही. या चाली सोडून दिल्या तर आपली धर्महानी काही होणार नाही आणि उलटपक्षी आपले हित होईल, ही गोष्टही त्याच्या लक्षात येत नाही. सामान्य जनसमूह इतका अज्ञ राहण्याचे आणखीही एक कारण आहे. आमचे धार्मिक वाङ्मय सागराप्रमाणे अफाट आहे. एकट्या सामवेदालाच एक हजार शाखा होत्या, असें भगवान् पतंजलि यांनी आपल्या महाभाष्यांत म्हटले आहे. या सर्व शाखांचे काय झाले हे आज कोणासही ठाऊक नाही. हीच गोष्ट इतर वेदांसही लागू आहे. त्यांचा पुष्कळसा भाग नष्ट झाला आहे, आणि आतां आमच्या हातीं अल्पसा भाग मात्र राहिला आहे. हे भाग काही विशिष्ट कुलांच्या हाती होते. कदाचित् ही कुलें कालांतराने नष्ट झाली असावी, परकीयांच्या स्वाऱ्यांत मारली गेली असावी अथवा दुसऱ्या काही कारणांनी स्मृतिगत झाली असावी; आणि त्यांजबरोबर त्यांच्या हाती असलेल्या श्रुतिशाखाही नष्ट झाल्या असाव्या. श्रुतिबाह्य अशी एखादी<noinclude></noinclude> hy5t14a4t5ekpid5zahqn1ilk7q01ro पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७५ 104 66740 232989 149397 2026-07-09T08:05:07Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232989 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७० |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>चाल अथवा असे एखादें मत प्रतिपादन करण्याचा प्रसंग त्याच्या पुरस्कर्त्यास येतो, तेव्हां या नष्ट झालेल्या शाखा त्याच्या उपयोगी पडत असतात. तुमचे मत वेदबाह्य आहे असे त्याला कोणी म्हटले, की त्याला आधार या नष्ट श्रुतीत होता असे उत्तर तो बिनदिक्कत देतो. आपल्या अशास्त्र मताचें समर्थन अशा रीतीने करणे हीसुद्धा एक चालच होऊन बसली आहे. अशा रीतीने या नष्ट शाखा अनेक चालीरितींचे मोठे आश्रयस्थान होऊन बसलें आहे. श्रुतींच्या अर्थांसंबंधीही मोठ्या कडाक्याचे वाद चालू असतात, आणि त्यांतून वेगवेगळा अर्थ काढण्याची धडपड प्रत्येक पक्ष करीत असतो. यामुळे त्याच्या अंतर्गत रहस्याचा धागा ध्यानी येणे मोठे दुरापास्त होऊन बसतें. श्रुतिग्रंथ पुष्कळ असले तरी ते खरोखर विस्कळित नाहीत. त्यांच्यांत परस्पर संबंध कांहींच नाही, असें नाही. बाह्यतः विविध म्हणून दिसणाऱ्या ह्या ग्रंथांच्या पोटी एकतानता असली पाहिजे, ही खूण आपल्या अंतर्यामी आपणास पटल्याशिवाय राहत नाही. या साऱ्यांचा पाया एकच असला पाहिजे. बाह्यतः अगदी विसंगत दिसणारा हा सारस्वतसमूह कोणत्या तरी एखाद्या मुख्य मुद्यावर एकरूप आणि सुसंगत होत असला पाहिजे. याच मूळ पायाला आम्ही आमचा धर्म असें म्हणतो. आमचा धर्म दिसतो तितका खरोखरच विसंगत आणि विस्कळित असता तर कालचक्राच्या तडाक्यांत तो कधीच नाहीसा होऊन गेला असता. आज हजारों वर्षे अनेक प्रकारच्या आपत्ति आणि प्रतिकूल परिस्थिति भोगीत असतांही तो जिवंत आणि ताजातवाना आहे, या एकाच गोष्टीवरून त्याचा अंतर्गत जिवटपणा आणि त्याची अभेद्य घटना यांचा अजमास सहज करता येतो.<br>{{gap}}आतां आमच्या टीकाकार पंडितांकडे पाहिले म्हणजे आणखीही एक अडचण दिसू लागते. एखादा अद्वैतवादी श्रुतिग्रंथांचा अर्थ लावू लागला म्हणजे आपल्या मताला अनुकूल असें वचन आढळेल तें जसेच्या तसेच ठेवतो; पण त्यांत एखादे वचन द्वैताला पुष्टि देणारे आढळले, की त्याची विलक्षण ओढाताण आणि चिरफाड करून त्यांतून विचित्र अर्थ तो निर्माण करतो. तुमच्या स्वप्नींही कधी आला नसेल असला विलक्षण अर्थ तो तुम्हांपुढे मांडतो. 'अज' म्हणजे जन्मास न आलेला असा सरळ अर्थ संदर्भानुरूप लागत असला, तरी तो स्वमताविरुद्ध जात असल्यास येथें अज म्हणजे बकरा<noinclude></noinclude> bwi1vty7jt4xz4k5mjmawle9dfuj6np पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७६ 104 66741 232990 149398 2026-07-09T08:09:27Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232990 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१७१}} {{rule}}</noinclude>असा अर्थ आहे' असें तो तुम्हांस चापून सांगेल. कित्येक वेळां तर याहूनही विलक्षण अर्थ निर्माण करून द्वैत मताच्या टीकाकारांनी आपल्या टीका सजविल्या आहेत. द्वैतमताला पोषक असे वचन जसेच्या तसेंच राखावें आणि अद्वैतदर्शक वचनाची ओढाताण करून आपल्या इच्छेस येतील ते अर्थ त्यांतून निर्माण करावे, अशा मार्गाचा अवलंब त्यांनी केला आहे. संस्कृत भाषा सामान्यतःच फार भानगडीची आहे; आणि त्यांतून श्रुतींची भाषा तर फारच जुनी. दुसरे असे की संस्कृत भाषेत एकाच शब्दांतून अनेक अर्थ संभवतात आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द असतात. यामुळे एका शब्दाच्या अर्थाबद्दलही युगानुयुगें वाद घालीत बसणे अशक्य नाही. एखाद्याने काहीही अक्षरांची बडबड केली तरी तिचा सुसंगत अर्थ एखादा पंडित लावून दाखवील. त्याच्या मनात आले पुरे की एकएका अक्षराचा कीस पाडून आणि आपल्या बुद्धीच्या सांच्यांत घालून त्या निरर्थक बडबडीचा अर्थही तो तुम्हांस करून दाखवील. मग हा अर्थ खरा आहे हे सिद्ध करण्याकरितां अनेक ग्रंथांतून समानार्थक वचनें तो काढील आणि व्याकरणाचे शेंकडों नियमही तो तोंडपाठ म्हणेल. उपनिषदांचे खरे रहस्य हस्तगत करण्यास कोणी निघाला म्हणजे त्याच्या मार्गात या मोठ्या अडचणी उभ्या राहतात. परमेश्वराच्या कृपेने ज्या महानुभावाची संगति घडण्याचे महद्भाग्य मला प्राप्त झालें होतें, तो जितका द्वैती तितकाच अद्वैती आणि जितका भक्त तितकाच ज्ञानीही होता. या सत्संगामुळेच उपनिषदांचे खरें हृद्गत जाणण्याचा मार्ग मला उपलब्ध झाला. टीकाकारांच्या मागून डोळे मिटून चालण्याने हे रहस्य कोणासही लाभावयाचे नाही. तसे होण्यास अगदी स्वतंत्र आणि याहून अधिक चांगल्या अशा मार्गाचा अवलंब करावयास पाहिजे. मला असा मार्ग सद्गुरुकृपेनें लाभला. अशा रीतीने उपनिषदांचा अभ्यास केल्यावरही संहिता परस्परविरोधी नाही अशी माझी खात्री झाली. याकरितां उपनिषदांचे रहस्य हस्तगत होण्यास त्यांतील वचनांची ओढाताण करण्याचे प्रयोजन मुळीच नाही. मूळ संहिता अत्यंत सुंदर आणि अत्यंत चित्ताकर्षक असून तीत परस्परविरोध कोठेही नाही. तींत विरोध नाही एवढेच नव्हे, तर तींत विलक्षण सामरस्य आहे. कल्पना अनेक, पण त्या परस्परांस विरोध करीत नसून परस्परांस पोषक मात्र होतात. एकीहून एक चढती अशा कल्पनांची श्रेणी<noinclude></noinclude> ac3x053pkgeypd0vctyyroh982d6nyh पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७७ 104 66742 232991 149399 2026-07-09T08:13:27Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232991 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७२ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>त्यात असल्यामुळे क्षणभर विरोधाभास उत्पन्न झाला तरी वास्तविक विरोध तेथे नाही. सर्व उपनिषदांचा आरंभ द्वैतांत झाला असून त्यांची अखेर अद्वैताच्या अत्युच्च आणि उत्कट कल्पनांत झाली आहे, असे मला आढळून आले.<br>{{gap}}याकरिता द्वैतवादी आणि अद्वैती यांनी परस्परांशी तंटा करण्याचे काहींच कारण नाही. हीच गोष्ट माझ्या सद्गुरूंच्या प्रत्यक्ष जीवनक्रमावरूनही माझ्या अनुभवास आली. अमुक एक मत तेवढेच खरे आणि बाकीची सारी खोटी असा भाग नसून सर्व मतांनी गुण्यागोविंदाने एकत्र वास करावा अशी स्थिति आहे. मानवकुलाला या साऱ्यांचीच गरज असल्यामुळे ती सारीच खरी आहेत असे म्हणण्यास काय हरकत आहे? मानवकुलाच्या अंतिम कल्याणासाठी सारीच आवश्यक आहेत. अखेरच्या हेतूच्या सिद्धीसाठी अद्वैत मत जितकें जरुरीचे, तितकेंच द्वैतही जरुरीचे असल्यामुळे ते नष्ट होऊ शकत नाही. फार काय, पण ही सारी मतें परस्परावलंबी आहेत असेही म्हणण्यास प्रत्यवाय नाही. यांतील प्रत्येकाचे जीवित दुसऱ्यांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. यांतील प्रत्येक इतरांचे पोषक असून इतरांकडून त्याच्या पोषणास मदत होत असते. अनेक भाग मिळून ज्याप्रमाणे एखादा अखंड पदार्थ बनलेला असतो, त्याप्रमाणे ही सारी मते मिळून मनुष्यमात्राचे धर्मजीवन बनले आहे. शरिराच्या साऱ्या क्रिया सुरळीत चालण्यास आणि तें जिवंत राहण्यास ज्याप्रमाणे अनेक अवयवांची जरूर आहे, त्याचप्रमाणे मानवकुलाचें धर्मजीवन कायम राहण्यास या साऱ्या मतांच्या अस्तित्वाची जरूर आहे. यांतील प्रत्येक मत जिवंत राहिले म्हणजे ते दुसऱ्याच्या पोषणाच्या उपयोगी पडते. यांतील एखादें पायाच्या जागी बसते, दुसरें इमारतीची जागा घेतें आणि तिसरें कळसाच्या जागी विराजमान होतें. अशा रीतीने ही सारी इमारत पुरी होत असते. यांतील एक मुळासारखें, दुसरें वृक्षासारखें आणि तिसरे एखादे फळासारखें असतें. ध्यानांत ठेवण्याचा मुख्य मुद्दा इतकाच की ही सारी मतें परस्परविरोधी नसून परस्परांची पोषक आहेत. याकरितां उपनिषदांच्या मूळ संहितेची ओढाताण करण्याचा यत्न मला अत्यंत हास्यास्पद वाटतो. उपनिषदांतील उच्च तत्त्वज्ञान क्षणभर बाजूस ठेवले तरी त्यांची नुसती भाषासुद्धां इतकी कर्णमनोहर आहे की तुमचें चित्त ती तत्क्षणींच मोहून टाकते. त्यांतील ईश्वर-<noinclude></noinclude> 74da7qjhcngotx4nklmyln958o1hcqy पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७८ 104 66743 232992 149400 2026-07-09T08:20:55Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232992 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१७३ }} {{rule}}</noinclude>विषयक ज्ञानाचा विचार आपण केला नाही, तरी केवळ भाषागांभीर्याने त्यांची बरोबरी करणारा एतद्विषयक ग्रंथ जगांत दुसरा नाही, अशी तुमची खात्री होईल. मनुष्याला मुक्तीचा मार्ग दाखविणारे जितकें कांहीं वाङ्मय साऱ्या जगांत आज उपलब्ध आहे, त्या साऱ्यांत उपनिषद्ग्रंग्रंथ मेरुमण्याच्या जागी आहेत. अत्यंत उदात्त अशा कल्पनांचें यथातथ्य रूप येथे जसें रंगविलें आहे, तसें दुसऱ्या कोठेही तें तुम्हांस आढळणार नाही. अंतर्ज्ञान हा एकट्या मानवी मनाचाच हक्क आहे. बाह्यजग सोडून अंतःसृष्टीत बुडी मारण्याचे कार्य फक्त मानवी मनच करूं शकतें, आणि हे काम विशेषतः हिंदु मानवकुलानेच केलें असल्यामुळे त्याच्या अंतःसाक्षित्वाचे पूर्ण रूप येथें तुम्हांस पाहावयास सांपडते. उदात्त भावनांची शब्दचित्रे जगांतील साऱ्या राष्ट्रांत रेखाटलेली आढळतात; पण त्यांतील उदात्तपणा केवळ जड सृष्टीच्या हद्दीतलाच आहे. दृश्य विश्व ओलांडून पलीकडे उडी मारण्याचा यत्न त्यांनी केलेला नाही. या नियमाला अपवाद असा बहुधा एकही तुम्हांस आढळावयाचा नाही. मिल्टन, होमर, डान्टी अथवा यांजसारखेच दुसरेही जगविख्यात कवी घेतले, तरी त्यांच्या काव्यांतही हाच प्रकार आढळून येतो. त्यांत उदात्त प्रसंग पुष्कळ आहेत आणि त्या त्या कवींनी ते मोठ्या बहारीचे रंगविले आहेत हेही खरें; पण तेथेसुद्धां इंद्रियांस चिकटण्यापलीकडे मजल गेलेली नाही. अनंताला वीतभर जागेत कोंडण्याचा हा यत्न आहे. अशाच प्रकारचा यत्न श्रुतींच्या संहितांत आढळतो. सृष्टीच्या उत्पत्तीचे कथन ज्या ऋचांत केले आहे त्या किती सुंदर आणि उदात्त आहेत! तथापि तेथें सृष्टीच्या बाहेर पाऊल पडलेले नाही. अशा रीतीने अनंताचा माग लागावयाचा नाही ही गोष्ट आमच्या मंत्रद्रष्टयांच्या लक्ष्यांत लवकरच आली. बाह्यसृष्टीत आपण कितीही भटकलों आणि आपला कल्पनासंचार कितीही स्वैर झाला, तरी त्याच्या आटोक्यांत अनंत सांपडावयाचे नाही हे त्यांस कळून आले, आणि हा मार्ग अशा रीतीने बंद झाल्यानंतर आपल्या चित्तांतील कल्पनासमूहास बाहेर पडण्यास दुसरा कोठे वाव आहे की नाही हे ते पाहूं लागले. यानंतर उपनिषदें निर्माण होत गेली. येथे पूर्वीची सारी भाषा बदलली, आणि तिला अगदी नवें वळण लागलें. 'नेति नेति' अशा प्रकारची नकारात्मक अथवा निषेध- बोधक भाषा येथे दृग्गोचर होऊ लागली. कित्येक ठिकाणी कल्पनांचा संचार<noinclude></noinclude> etq2dcg9gw422a2d2qhxeofxuvbbvwu पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७९ 104 66744 232993 150623 2026-07-09T08:27:47Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232993 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>इतका स्वैर झाला आहे की, त्यांत सुसंबद्धता नसावी असाही भास होतो, आणि कल्पनांचा नुसता गोंधळ झाला आहे असे वाटू लागते. इंद्रियांपलीकडे तुम्हांस घेऊन जाण्याची धडपड येथे दिसेल. आपल्या बुद्धीच्या आटोक्याबाहेर असलेल्या एखाद्या तत्त्वाकडे या ऋचा आपणास नेत आहेत असें तुम्हांस ताबडतोब कळून चुकतें. इंद्रियांनी ज्याचें ज्ञान करून घेता येत नाही, अशा एखाद्या वस्तूकडे आपण ओढले जात आहों, असा अनुभव तुम्हांस येतो. पण अशा स्थितीतही तुमची बुद्धी घाबरून जात नाहीं अथवा ती परतही फिरत नाही. कारण, बुद्धीच्या आटोक्याबाहेरचे असले तरी असें तत्त्व अस्तित्वांत खास आहे अशी जाणीव तुमच्या ठिकाणी त्यांनी अगोदरच उत्पन्न केलेली असते आणि हीच जाणीव या संधींत तुमच्या उपयोगी पडते. 'न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः।' "सूर्य, चंद्र, तारका, विद्युत् यांपैकी या स्थळाला कोणीही प्रकाशित करूं शकत नाही. मग या अग्नीबद्दल काय निराळे सांगावें?" अशा प्रकारच्या ऋचांशी तुल्य असे एखादें वाक्य तरी साऱ्या जगाच्या वाङमयांतून तुम्हांस काढून दाखविता येईल काय? {{Block center|<poem>'द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते । तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्त्यनश्नन्नन्यो अभिचाकशीति ॥ समाने वृक्षे पुरुषो निमग्नोऽनीशया शोचति मुह्यमानः । जुष्टं यदा पश्यत्यन्यमीशमस्य महिमानमिति वीतशोकः ॥'</poem>}} {{gap}}"एकाच वृक्षावर सुंदर पिसाऱ्याचे दोन पक्षी बसले होते. या दोघांत उत्तम स्नेह होता. यांपैकी एक त्या वृक्षाची फळे खात होता आणि दुसरा अगदी शांत बसला असून तो काही खात नव्हता. वृक्षाच्या खालच्या खांदीवर बसलेला पक्षी कडू आणि गोड अशा दोन्ही प्रकारची फळे भक्षण करीत होता, आणि दुःख अथवा आनंद पावत होता. कडू फळ लागले म्हणजे शोक करावा आणि गोड मिळाले म्हणजे हर्षभराने नाचूं लागावें असा त्याचा क्रम चालू होता. तिकडे तो दुसरा पक्षी स्वात्मसुखनिमग्न होऊन स्वस्थ बसला होता. कडू किंवा गोड यांपैकी कोणतेंच फळ तो खात नव्हता. तो सुखाच्या मागे लागला नव्हता अथवा दुःखाने उद्विग्नही होत नव्हता. तो आपल्याच वैभवांत गर्क होऊन बसला होता." जगांतील साऱ्या तत्त्वज्ञा-<noinclude></noinclude> p1i33nbsq7zbnx6kan52exve42l7bos पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८० 104 66745 232994 150627 2026-07-09T08:30:56Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232994 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१७५ }} {{rule}}</noinclude>नाचें सार, प्राचीन हिंदु तत्त्ववेत्त्यांच्या साऱ्या विचारसागरांतील अमृत मुक्तीच्या अफाट कल्पनातरंगांचे रहस्य इतक्या सुंदर आणि परिपूर्ण रीतीने प्रकट झाल्याचे दुसरे उदाहरण तुम्हांस कोठे सांपडेल? मनुष्याच्या जीवात्म्याचे सुंदर चित्र या अल्पकथेत रंगविले आहे. आपल्या जीवित वृक्षाची कडू आणि गोड फळे मनुष्यप्राणी साऱ्या जन्मभर खात असतो. संपत्तीमागे तो धावत सुटतो. इंद्रियजन्य सुखांचा पाठलाग तो करतो आणि सृष्टीतील पोकळ व नुसत्या दिखाऊ वस्तूंच्या मागे वेड्यासारखा पळत सुटतो. अशी धावपळ करून सुख गांठतां येईल अशी आशा त्याला खरोखरच आहे काय?<br>{{gap}}जीवात्मा हा रथकार आणि इंद्रियें ही भडकलेल्या घोड्यांसारखी आहेत, अशीही कल्पना उपनिषदांत कित्येक ठिकाणी आढळते. या जगांतील पोकळ सुखांच्यामागे लागणाऱ्या मनुष्यांची गति वास्तविक अशीच आहे. सुखस्वप्ने पडावी आणि जागे झाल्याबरोबर जशी ती नाहींशी व्हावी, त्याचप्रमाणे जगांतील सारी सुखें स्वप्नवत् आहेत असा अनुभव अखेरीस येतो. आपली सारी पूर्वकर्मे आठवून म्हातारी माणसें सुखी अथवा दुःखी होत असतात; पण या प्रचंड कर्मजालांतून कायमचे बाहेर कसे पडावें, याची कोणतीही युक्ति त्यांस सुचत नाही. जगाचे स्वरूप अशा प्रकारचे आहे. असें आहे तथापि प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यांत खरोखर महत्वाचे असे काही क्षण अवश्य येतात. अत्यंत दुःखाच्या प्रसंगींच नव्हे तर अत्यंत सुखाच्या वेळीही असे क्षण प्राप्त होत असतात. ज्या सूर्याचा प्रकाश ढगाच्या आवरणामुळे दिसत नसतो, त्याचा एखादा किरण अशा प्रसंगी दृग्गोचर होत असतो. पण मनुष्यप्राणी विलक्षण विसराळू असल्यामुळे ह्या अंधुक प्रकाशदर्शनाचे स्मरण त्यास राहत नाही. अशा विस्मृतीत काही काळ लोटल्यानंतर पुनः एखादा असाच प्रसंग येऊन पुन्हां एक वेळ हे शुभ दर्शन त्याला घडते. आपल्या या इंद्रियांच्या आटोक्यांत कधीही न येणारे अशा प्रकारचे काही अस्तित्व असेल अशी आपली कल्पनाही नसते. हे अस्तित्व शुद्ध प्रकाशरूप आहे हेही आपणास कळत नसते आणि यामुळे या प्रकाशमयाचे दर्शन आपणास घडावें, या इच्छेनें कांहीं खटपटही आपण कधी केलेली नसते. तथापि असे असतांही क्वचित् प्रसंगी या इंद्रियबाह्य प्रकाशाचा क्षणिक प्रत्यय आपणास अवश्य येतो. हे प्रकाशमय अस्तित्व आपल्या इंद्रियांच्या बाहेर आहे; एवढेच नव्हे तर आपल्या साऱ्या<noinclude></noinclude> 2a8pcjgakcwnfogocv7qr404mnh1tf5 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८१ 104 66746 232995 150663 2026-07-09T08:34:11Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232995 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>सुखदुःखांच्या, आपल्या स्वर्गीय कल्पनांच्या आणि या साऱ्या सृष्टीच्याही बाहेर तें आहे. ऐहिकसुखाची परमावधि अथवा त्याही पलीकडच्या स्वर्गीय सुखाची कल्पना या अस्तित्वास आकलन करू शकत नाही. हे अस्तित्व संपत्तिविषयक अथवा संततिविषयक अत्यंत तीव्र कल्पनेच्याही पलीकडचे आहे. पक्षीरूप जीवात्मा सांसारिक सुखदुःखरूप फळे भक्षण करीत असतां त्याला या अस्तित्वाचा प्रत्यय जेव्हां येतो तेव्हां तोही क्षणभर अगदी स्तब्ध होत्साता त्या दुसऱ्या पक्ष्याकडे पाहतो. त्या वेळी तो दुसरा पक्षी कडू अथवा गोड फळे न खातां आपल्याच ठिकाणी संतुष्ट होऊन स्तब्ध बसला असल्याचे त्याला आढळून येते. 'यस्त्वात्मरतिरेवस्यादात्मतृप्तश्च मानवः । आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥' असें गीतावचन आहे. ज्याची भक्ति फक्त आत्म्याच्याच ठिकाणी जडली आहे, ज्याला आत्म्याशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज उरलेली नाही आणि जो आत्मतृप्त झाला आहे त्याला दुसरें कोणतें कर्तव्य उरणार? क्लेशदायक कर्माचा अवलंब त्याने कां करावा? अशी आत्मतृप्तीची अवस्था ज्या ठिकाणी प्राप्त होते त्या ठिकाणाचे क्षणमात्र दर्शन मनुष्याला होते, पण तें तो लवकरच विसरतो आणि पुन्हां कर्मचक्रांत पडून त्याची कडू आणि गोड फळे खाऊं लागतो. अशा रीतीने आयुष्य व्यतीत होत असतां त्याला त्या शुभदर्शनाचा आणखी एखादा योग येतो. अशा रीतीने वारंवार धक्के खातां खातां त्या वरील पक्ष्यासंनिध हा खालचा पक्षी जात असतो. त्यांतच एखादा विशेष जोराचा धक्का बसण्याइतके त्याचे भाग्य प्रबळ असले, तर त्याची गति वाढून तो त्या आपल्या स्नेही पक्ष्याकडे अधिकच लवकर जातो. त्या वेळी त्या वरील पक्ष्याचा प्रकाश आपणाभोंवतीं पसरला आहे असें त्याला आढळून येतें. तो अधिकाधिक जवळ जाऊं लागला म्हणजे त्याच्या ठिकाणीही स्थित्यंतर घडून येऊ लागते. त्याचे मूळचें रूप हळू हळू नाहीसे होऊ लागते आणि अखेरीस त्या रूपाचा पत्ताही कोठे लागेनासा होतो. त्याला वस्तुतः अस्तित्वच नव्हते, तो केवळ छायारूप होता. वरील पक्ष्याची तो छाया होता. त्या वरील पक्ष्यालाच खरें अस्तित्व असून त्याचाच प्रकाश सर्वत्र भरला होता, तो अगदी निर्भय होऊन बसला होता, तो अगदी आत्मतृप्त होता आणि अगदी शांत होऊन बसला होता. अशा रीतीनें शुद्ध द्वैतांतून थेट अद्वैतापर्यंत उपनिषदें तुम्हांस घेऊन जातात.{{nop}}<noinclude></noinclude> k0ah3if6jzlenncsda2tnbr8xm1tk17 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८२ 104 66747 232996 150691 2026-07-09T08:38:59Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232996 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१७७ }} {{rule}}</noinclude>{{gap}}अशाच प्रकारची आणखीही उदाहरणे असंख्य देता येतील; पण वेळाच्या अभावी मला तसे करता येत नाही. उपनिषदांतील विचार किती उच्च, त्यांतील उदात्ततेचे चित्र किती बहारीचे आणि काव्य किती मनोहारी आहे हे यथास्थित रीतीने दाखवावयाचे म्हटले तर तें काम अशा शेंकडों व्याख्यानांनीही व्हावयाचें नाही. याकरितां ही बाजू इतकीच सोडून आपण आपला पुढील मार्ग पाहूं.<br>{{gap}}उपनिषदांची भाषा अशा प्रकारची आहे की, तिचा प्रवेश थेट तुमच्या अंतःकरणांत एकदम होतो. तिच्यांत आढ्यावेढ्यांचा अथवा बोबडेपणाचा दोष तुम्हांस कोठेही आढळावयाचा नाही. विचार आणि भाषा ही दोन्हीही भाल्याच्या टोकासारखी सरळ आणि तीक्ष्ण असल्यामुळे तुमच्या मनाला स्पर्श होण्याबरोबर ती थेट अंतःकरणांत शिरतात. त्यांत लेचेपेचेपणाचा अंशही तुम्हांस कोठे सांपडावयाचा नाही. त्यांत तीन चार भावार्थही निघावयाचे नाहीत. त्यांतून उद्भवणारा प्रत्येक सूर अगदी निकोप आणि निष्कंप असल्यामुळे त्याचा परिणाम जितका व्हावयाचा तितका पूर्णत्वानें तो होतो. त्यांत कोठे चक्रव्यूह नाहीत अथवा गिरक्याफिरक्या नाहीत. निरर्थक शब्दजाल अथवा साखरेची साल काढून मेंदूला व्यर्थ शिणविणाऱ्या विचारांचा काथ्याकूटही त्यांत नाही. कित्येक लेखांची मजा अशी असते की ते वाचता वाचतां भांबाऊन जाऊन अखेरीस वाचक अगदी वेडा बनतो. आपण काय वाचलें याचेही पुरतेंसें स्मरण त्यास राहत नाही. अशा प्रकारचे लेख हे लेखकाच्या बुद्धीच्या अवनतावस्थेचे चिह्न होय. असा प्रकार उपनिषदांत कोठेही नाही. रूपकांची आणि अलंकारांची फाजील रेलचेल कोठेही नाही. विशेषणामागे विशेषणे असलाही प्रकार कोठे नाही. असल्या प्रकारांनी अपेक्षित अर्थ इतका लोपून जातो की तो शोधून काढतां काढतां बिचारा मेंदूही थकून जातो आणि अखेरीस बेशुद्ध झाल्यासारखा जागच्याजागींच थिजून बसतो; व असल्या प्रचंड चक्रव्यूहांतून बाहेर कसे पडावें हे त्यास सुचेनासें होतें. बुद्धीच्या गतवैभवाची ही चिन्हें उपनिषत्कालापर्यंत दृष्टीस पडत नव्हती. हे ग्रंथ मनुष्यकृत असतील तर ज्या मानवकुलांत ते जन्म पावले त्याच्या मानसिक जोमाला अद्यापि उतरती कळा लागली नव्हती असें निःशंकपणे म्हणता येईल.<br>{{gap}}उपनिषदांनी जर काही गोष्ट विशेषेकरून मला शिकविली असेल, तर ती मनोबल ही होय. हीन बलाला मोक्ष नाही हे तत्त्व उपनिषदें जणूं काय<noinclude><br>{{gap}}स्वा०वि० ख०-९-१२</noinclude> sq4xusaxd1n6e6udfh662l713x4g36g पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८३ 104 66748 232997 151545 2026-07-09T08:41:54Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232997 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>प्रत्येक शब्दाने तुमच्या चित्तावर ठसवीत आहेत! उपनिषदांसंबंधी सर्वांत मोठा आणि नित्य लक्ष्यात ठेवण्याचा मुद्दा तो हाच. काही झाले तरी हीनबल होऊ नका असा उपदेश अखिल मानवजातीला ती उच्च दोषाने करीत आहेत. माझ्या साऱ्या आयुष्यांत जर कोणता अत्यंत महत्वाचा धडा मी शिकलो असेन तर तो हाच. 'नायमात्मा बलहीनेन लभ्यः ।' हेच तत्त्व सर्व उपनिषदें आपणांस मुख्यत्वेकरून सांगत आहेत. <br>{{gap}}मनुष्यप्राणी म्हटला की त्याच्या ठिकाणी दौर्बल्य हे असावयाचेंच, असा आपला अनुभव आहे; आणि ही गोष्ट उपनिषदांनीही कबूल केली आहे. यासाठीच त्यांचा उपदेश असा आहे की दौर्बल्य वाढविणाऱ्या अशा कोणत्याही गोष्टी करूं नका. अधिक घाण केल्याने पहिली घाण नाहीशी होते असें नाही. पापाने पाप धुतले जात नाही, आणि दौर्बल्याने दौर्बल्य नाहींसें होत नाही. बलवान् होण्यानेच दौर्बल्य नाहीसे होईल. याकरिता बलवान् होण्याचा यत्न करा. जागे व्हा, बलवान् व्हा, असा उपनिषदांचा उपदेश आहे. 'निर्भय व्हा' असा उपदेश साऱ्या जगांतल्या वाङ्मयांत तुम्हांस फक्त येथेच आढळतो. हा उपदेश उपनिषदांनी वारंवार केला आहे. 'निर्भय' हे गुणदर्शक विशेषण परमेश्वरामागे अथवा मनुष्यामागे लावण्याचे उदाहरण जगांतील दुसऱ्या कोणत्याही वाङ्मयांत तुम्हांस आढळावयाचे नाही. महाप्रतापी बादशहा शिकंदर याची आठवण या प्रसंगी मला होते. सिंधुनदीच्या कांठी असलेल्या एका अरण्यांत एक दिगंबर संन्यासी एका शिलातलावर बसला असतां त्याजपुढे उभा राहून शिकंदर बादशहा त्याला द्रव्याचा लोभ दाखवीत आहे असे चित्र या प्रसंगी माझ्या मनश्चक्षूंपुढे उभे राहते. त्या अवधूत संन्याशाचे ज्ञान पाहून बादशहा चकित होऊन क्षणभर अगदी स्तब्ध झाला. संन्याशाने आपणाबरोबर ग्रीस देशास यावें. अशी बादशहाची फार इच्छा होती. बादशहाच्या सुवर्णाच्या देखाव्याने संन्यासी मोह पावला नाही. त्याच्या मानमरातबांनी संन्याशाचे चित्त किंचितही कंप पावलें नाहीं. मानपान आणि सुवर्ण हे पदार्थ तुच्छ आहेत असा भाव संन्याशाने दर्शविला. हा आपला मोठा अपमान झाला असे वाटून बादशहा क्रोधायमान झाला. आपण पृथ्वीपति आणि हा कंगाल हा फरक बादशहाच्या चित्ताला या वेळी विशेष जाणवला. तो म्हणाला, तूं मजबरोबर न येशील तर तुला ठार<noinclude></noinclude> i3oyt7jbq523yu886hhgv4nxkzq315u पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८४ 104 66749 232998 151546 2026-07-09T08:44:12Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232998 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१७९ }} {{rule}}</noinclude>करण्याचे सामर्थ्य मजमध्ये आहे." बादशहाचे हे भाषण ऐकून संन्याशी खदखदा हसून म्हणाला, "राजा, असे खोटें कां बोलतोस? मला मारण्याचे सामर्थ्य तुलाच काय, पण दुसऱ्याही कोणाला नाही. तूं जड जगाचा धनी आहेस. मला चैतन्यरूपाला तूं काय करू शकणार आहेस? तूं मला मारूं शकशील ही गोष्ट कालत्रयांत घडावयाची नाहीं; कारण, मी अजन्मा आहे. मी चैतन्यरूप आहे, मी अक्षय्य आहे, मी कधी जन्मत नाही आणि मरतही नाही. मी अनंत आणि सर्वव्यापी आहे, आणि मी सर्वसाक्षीही आहे. बच्चा, तूं मला मारू शकशील काय?" विशाल सामर्थ्य म्हणतात तें हेंच. माझ्या मित्रांनो, माझ्या देशबांधवांनो, उपनिषदांचा अभ्यास मी जों जों करतो तो तो त्यांचा हाच उपदेश आहे, असा माझा प्रत्यय वाढतच जातो. उपनिषदांचे जे अत्यंत व्यवहार्य तत्त्व आहे ते हेच. आम्हांला जर कोणत्या वस्तूची गरज असेल, तर ती याच मनःसामर्थ्याची आहे. अत्यंत दृढ अशा आत्मश्रद्धेचीच जरूर आपणास आहे. माझ्या देशबांधवांनो, उपनिषग्रंथ चाचीत असतां तुमची आठवण होऊन मला रडू कोसळते, आणि हे सामर्थ्य कोण देईल याचा ध्यास चित्ताला लागून राहतो. दिवसेंदिवस आपणास अधिकाधिक दुर्बल करणारे लोक मात्र आपल्याभोवती लक्षावधि आहेत. आपणास लाथ मारण्यासाठी आपला पाय जो कोणी पुढे करील, त्याच्याच पायापाशी आपण खुशाल लोळण घेतों! मातीत लोळणाऱ्या किड्याच्या कोटीत आज आपण जाऊन बसलो आहों. आता यापेक्षा आणखी काही निराळी अधोगति म्हणून राहिली आहे काय? दिवसेंदिवस अधिकाधिक दुर्बळ होण्याचाच यत्न जणू काय आपण गेली हजार वर्षे केला. आमची सारी पुराणे पहा. त्यांतही याच दौर्बल्य आणणाऱ्या गोष्टी. या गोष्टींची संख्या इतकी होईल की त्यांनी पाऊण हिस्सा पुस्तकालये भरून जातील. दुर्बल कसे व्हावें हाच ध्यास जणू काय आमच्या चित्ताला या अवधीत लागून गेला होता; आणि सांप्रतची आपली अवनतावस्था हा या ध्यासाचाच परिणाम होय. माझ्या मित्रांनो, तुम्हाला जर कशाची आज जरूर असेल तर ती बलवान् चित्ताची आहे हे मी त्रिवार सांगतो. मीही तुमच्यापैकीच एक आहे. माझा जन्म तुमच्यांत झाला आणि या देहाची अखेरही तुमच्यांत असतांच व्हावयाची आहे. जे रक्त तुमच्या धमन्यांत खेळत आहे, तेंच माझ्याही अंगांत<noinclude></noinclude> mp74f00thczkmobh48eppg5nflur9ah पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/३३ 104 110554 232972 232430 2026-07-09T05:16:02Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 232972 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{rh|२० |'''काशी - रामेश्वर यात्रा'''|}}</noinclude>व प्रांतांत मोठा दुष्काळ पडला. तेव्हां देवळाची नासाडी झाली. पण विजय रघुनाथ सेतुपती यानें वादळाने झालेली देशाची दुर्दशा आपल्या उत्तम राज्यव्यवस्थेनें नाहींशी केली. याची रामेश्वराच्या देवळावर फार भक्ति होती व तो रामनादहून ३३ मैल दररोज सायंकाळी घोड्यावर बसून दर्शनास येत असे. त्यानें देवळाच्या इमारतींमध्यें पुष्कळच वाढ केली. त्यानें यात्रेकरूंना पंबन खाडी ओलांडण्याची व धनुष्कोडी (सेतु- रामेश्वर) पर्यंत जाण्याची चांगली व्यवस्था केली. याच्या जावयानें पंबन खाडीवरील नदीवर कर बसविला म्हणून त्याला विजयानें देहांत शिक्षा दिली. इतका हा राजा न्यायनिष्ठुर होता. रामनादचे हल्लींचे राजे षङ्मुग रामेश्वर नागनाथ सेतुपती हे तरुण असून सुशिक्षित आहेत. ते सन १९२८ मध्ये गादीवर आले. यांचे दरसाल उत्पन्न १६ लाखांचे आहे.<Br><br><br> {{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> 60hs6wrumwjwalrm4zj8a561l451wue पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१०७ 104 110570 232956 232826 2026-07-08T12:10:23Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 232956 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रकरण ८ वें.'''}}}} {{rule|7em}} {{center|'''दक्षिण-काशी : श्रवणबेलगोला'''}} {{gap}}{{x-larger|'''म्है'''}}'''सूर''' व त्यालगतचा मलबार या प्रांतांत प्राचीनकाळीं जैनधर्माचा पुष्कळच प्रसार झालेला होता. पण पुढे शंकराचार्य रामानुजाचार्य यांच्यासारखे वैदिकधर्माचे पुरस्कर्ते व प्रवर्तक आचार्य या प्रांतांत उदयास आले आणि विजयानगराच्या मोठ्या वैदिकधर्मी साम्राज्याचा या प्रांतावर ताबा झाला. यामुळे जैनधर्माला अवनत काळ आला व या प्रांतांतील त्याचे वर्चस्व नाहींसें झालें. परंतु जैनधर्माच्या भरभराटीच्या काळांत या प्रांतांत जिकडे तिकडे जैन वस्ती, तीर्थकरांच्या मूर्ती व धार्मिक इमारती बांधण्यांत आल्या. या सर्वांचे अवशेष अजून म्हैसूर व मलबार या प्रांतांत तगून राहिले आहेत. सध्यां हे अवशेषच प्रवाशांचे मुख्य दर्शनविषय झाले आहेत. या जैनधर्मी दर्शन विषयामध्यें '''श्रवणबेलगोला''' हे अत्यंत पवित्र स्थान मानतात. जैन लोक तर या स्थानाला काशी इतकें धार्मिक महत्त्व देतात व म्हणून त्याला ते दक्षिण काशी म्हणतात. धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र असें हें स्थान निसर्ग व शिल्पकला या दोन्ही दृष्टीनींही अत्यंत प्रेक्षणीय आहे. म्हणून थोडेसे आडवाटेवर असतांना सुद्धां मी आपल्या काशीरामेश्वर यात्रा योजनेमध्यें या स्थानाचा अन्तर्भाव केला होता. तदनुरूप आम्हीं हें स्थान पाहण्यास मोठ्या उत्सुक व उतावीळ मनानें ता. ६ मार्च सन १९३६ रविवार रोजी सकाळी साडेसात वाजतां म्हैसूरहून मोटारमार्गे व मोटारींतून निघालों.<br>{{gap}}'''श्रवणबेलगोला''' हे म्हैसूरच्या थेट उत्तरेस असून सुमारें पन्नास मैल अंतरावर आहे. म्हैसूरपासून '''फ्रेंच रॉक्स''' या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणापर्यंतचा रस्ता फार चांगला आहे. दुतर्फा सुंदर हिरव्यागार वृक्षांची<noinclude></noinclude> e5pyey0zm2p48dujkylyo3o0hwo937o पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१२३ 104 110573 232957 230781 2026-07-08T12:14:15Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232957 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रकरण ९ वें.'''}}}} {{rule|7em}} {{center|'''जबलपूर'''}} {{gap}}{{x-larger|'''का'''}}शी-रामेश्वर यात्रेची योजना व त्याची पूर्तता याबद्दल मी मनामध्यें जो दृश्यदर्शनक्रम धरला होता त्याप्रमाणें श्रवणबेलगोला किंवा दक्षिण काशी पाहिल्यावर माझा विचार हनुमानी मोठे उड्डाण मारून एकदम उत्तर हिंदुस्थानचें नाके व मध्य प्रांतांतलें दुसरें मोठें शहर जबलपूर येथें जाण्याचा होता. कारण म्हैसूर संस्थानांतील प्रेक्षणीय स्थळांचें मीं एका स्वतंत्र पुस्तकांत वर्णन केलेच होतें; तसेंच वाटेंत लागणाऱ्या नाशीक त्र्यंबकेश्वराचेही वर्णन मी आधींच केलें होतें. तेव्हां त्या प्रवासाच्या बाबतींत मारुतीची मोठी मंडूकप्लुती करून मुंबईहून ता. १९ मार्च सन १९३५ रोजी कलकत्ता मेलनें रात्री सव्वानवाला निघून दुसरे दिवशीं सव्वा दोन वाजतां मी जबलपुरास आलों व तेथे माझे विद्यार्थी मित्र प्रो. गंगू नाना कानेटकर यांचें येथें राहिलों.<Br>{{gap}}जबलपूर हें हल्लीं एक मोठे वाढतें व भरभराटीचें शहर आहे. ते मध्य प्रांतांतील नागपुरच्या खालोखाल शहर असून त्याची लोकवस्ती दीड लाखाचे वर आहे. हे शहर मी प्रथम सन १९०६ मध्यें पाहिलें होतें व नंतर आतां २९ वर्षांनीं त्याचें पुनर्दर्शन मला घडलें. या काळांत शहराची किती तरी वाढ झालेली दिसली. जबलपुरच्या अर्वाचीन महत्त्वाप्रमाणें त्याचें पुरातन महत्त्वही मोठें आहे.<Br>{{gap}}अमरकंटक पर्वताच्या पायथ्यापासून निघणारी नर्मदा नदी व बैतुल जिल्ह्यांतील मुलताई सरोवरांतून निघणारी तापी नदी या दोन नद्या एकमेकींना समांतर अशा पश्चिमेकडे वाहत जाऊन आरबी समुद्राला मिळतात. नर्मदा नदी विंध्य पर्वताच्या दक्षिण पायथ्याजवळून वहात जाते, तर तापी नदी सातपुडा पर्वताच्या दक्षिण पायथ्याजवळून वहात जाते.{{nop}}<noinclude><Br>{{gap}}७</noinclude> ld7nn4auqlrivsqpwva6l44dbguyr8t 232958 232957 2026-07-08T12:14:44Z कल्पनाशक्ती 3813 232958 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रकरण ९ वें.'''}}}} {{rule|7em}} {{center|'''जबलपूर'''}} {{gap}}{{x-larger|'''का'''}}शी-रामेश्वर यात्रेची योजना व त्याची पूर्तता याबद्दल मी मनामध्यें जो दृश्यदर्शनक्रम धरला होता त्याप्रमाणें श्रवणबेलगोला किंवा दक्षिण काशी पाहिल्यावर माझा विचार हनुमानी मोठे उड्डाण मारून एकदम उत्तर हिंदुस्थानचें नाके व मध्य प्रांतांतलें दुसरें मोठें शहर जबलपूर येथें जाण्याचा होता. कारण म्हैसूर संस्थानांतील प्रेक्षणीय स्थळांचें मीं एका स्वतंत्र पुस्तकांत वर्णन केलेच होतें; तसेंच वाटेंत लागणाऱ्या नाशीक त्र्यंबकेश्वराचेही वर्णन मी आधींच केलें होतें. तेव्हां त्या प्रवासाच्या बाबतींत मारुतीची मोठी मंडूकप्लुती करून मुंबईहून ता. १९ मार्च सन १९३५ रोजी कलकत्ता मेलनें रात्री सव्वानवाला निघून दुसरे दिवशीं सव्वा दोन वाजतां मी जबलपुरास आलों व तेथे माझे विद्यार्थी मित्र प्रो. गंगू नाना कानेटकर यांचें येथें राहिलों.<Br>{{gap}}जबलपूर हें हल्लीं एक मोठे वाढतें व भरभराटीचें शहर आहे. ते मध्य प्रांतांतील नागपुरच्या खालोखाल शहर असून त्याची लोकवस्ती दीड लाखाचे वर आहे. हे शहर मी प्रथम सन १९०६ मध्यें पाहिलें होतें व नंतर आतां २९ वर्षांनीं त्याचें पुनर्दर्शन मला घडलें. या काळांत शहराची किती तरी वाढ झालेली दिसली. जबलपुरच्या अर्वाचीन महत्त्वाप्रमाणें त्याचें पुरातन महत्त्वही मोठें आहे.<Br>{{gap}}अमरकंटक पर्वताच्या पायथ्यापासून निघणारी नर्मदा नदी व बैतुल जिल्ह्यांतील मुलताई सरोवरांतून निघणारी तापी नदी या दोन नद्या एकमेकींना समांतर अशा पश्चिमेकडे वाहत जाऊन आरबी समुद्राला मिळतात. नर्मदा नदी विंध्य पर्वताच्या दक्षिण पायथ्याजवळून वहात जाते, तर तापी नदी सातपुडा पर्वताच्या दक्षिण पायथ्याजवळून वहात जाते.{{nop}}<noinclude><Br>{{gap}}७</noinclude> qey9pj5ni3lpcu56n272zk7h9a06m9o पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/३४ 104 110732 232973 232434 2026-07-09T05:16:57Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 232973 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रकरण ३ रें.'''}}}} {{rule|7em}} {{center|'''मदुरा'''}} {{gap}}{{x-larger|'''ता.'''}}२८ डिसेंबर सन १९३३ या दिवशीं पहांटेस सवापांच वाजतां मी न बदलणाऱ्या रामेश्वर-मदुरा पॅसेंजर गाडीनें मदुरा शहराकडे जाण्यास निघालों.<br>{{gap}}रामेश्वरचे वाळवंटी मैदान मागे टाकल्यावर प्रथमतः मन आकर्षण करणारें प्रेक्षणीय दृश्य म्हणजे '''पंबन''' खाडीवरील लोखंडी पूल होय. हा पूल फारच लांब आहे. तो खाडीच्या खाऱ्या पाण्यापासून फार उंच नसल्यामुळे व लोखंडी तुळया व कड्या यांवर लाकडी फळ्या टाकलेल्या असल्यामुळे माझ्या डब्याखालीं खळखळ वाजणारें तें पोपटीरंगी पाणी मला स्पष्टपणें दिसत होतें. या देखाव्याची मला मोठी मजा वाटली. खाडीच्या मधोमध प्रचंड लोखंडी खांब आहेत. येथला पूल दोहींकडे लोखंडी दोरांनी हवे तेव्हां उचलल्या जाणाऱ्या प्रचंड लोखंडी फाटकांचा केलेला आहे. हीं फाटकें मोठीं गलबतें खाडींतून जाऊं येऊं लागलीं म्हणजे उघडतात. हा फाटकांच्या पुलाचा भाग टाकल्यावर पुन्हा किती वेळ तरी लाकडी तक्तपोशीचा पुलाचा भाग लागत राहतो. हा पूल बाँबे-बडोदा रेल्वे रस्त्यावरील वसईच्या खाडीवरील पुलापेक्षांसुद्धां मोठा वाटला. पण खाडीमधल्या बेटानें त्या पुलाचे दोन निरनिराळे तुकडे झालेले आहेत. यामुळे अंदाज चुकण्याचा संभव आहे. हा पूल टाकल्यावर लागलीच '''मंडपम्''' नांवाचें नव्या वस्तीचें स्टेशन लागलें. हें ठिकाण जवळजवळ समुद्रवलयांकित असल्यामुळे सदा हवाशीर व थंडगार असतें. येथें लंकेला जाणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी होते. येथून मदुरेपर्यंत सारखा सपाट, सुपीक व सुजल असा भूमिभाग लागतो. नारळी, केळी, पालमिरा-पाम इत्यादि सदा<noinclude></noinclude> svo2qu5kbczbx01imrampoplkm7gxxc पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/३५ 104 110733 232974 232435 2026-07-09T05:18:25Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 232974 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{rh|२२|'''काशी-रामेश्वर यात्रा'''|}}</noinclude>हिरवी हिरवीगार असणाऱ्या सुंदर झांडांच्या बागा व राया लागतात; मधून मधून विस्तीर्ण भात शेतीची जमीन लागते; विड्याची पाने, ऊस व इतर पिके यांचीही लागवड मधून मधून दृग्गोचर होते. तलाव व पाण्याचे पाट तर वाटोवाट लागतात. यावरून मदुरा जिल्हा सुपीक व सुजल असल्याचे प्रत्यंतर आगगाडीतून प्रवास करतांनाच मनाला पटतें. सभोवारचा सुंदर देखावा पहात असतांना मदुरा स्टेशन आलें. या प्रांतांत मुंबई इलाख्याप्रमाणे स्टेशनचें नांव ओरडण्याची पोर्टरची रीत दिसली नाहीं. यामुळे स्टेशनच्या नांवाची पाटी प्रत्यक्ष पाहिल्याखेरीज आपले उद्दिष्ट स्थळ आलें कीं नाहीं हें कळत नाहीं. मीं स्टेशनच्या समोर असलेल्या एका धर्मशाळेत स्वतंत्र खोली घेऊन त्यांत आपलें सामान टाकले. येथें मी तीन चार दिवस राहिलों.<Br>{{gap}}'''मदुरा''' हे मद्रासच्या नैऋत्येस सुमारे तीनशें मैलांवर असलेले शहर आहे. तें समुद्रसपाटीपासून सुमारे साडेचारशें फूट उंच असून सपाट प्रदेशाच्या मध्यभागी आहे. याचे दक्षिणेस काय ती एक छोट्या खडकाळ टेकड्यांची लहानशी ओळ आहे. हे शहर मद्रास इलाख्यांतील दुसरे मोठे महत्त्वाचे ठिकाण होय. दक्षिण हिंदुस्थानचे ते जणूं कांहीं नाकें व नाकच आहे. याची सध्यांची वस्ती दीड पावणेदोन लाखांची आहे. हे शहर इसवी सनापूर्वीच्या अशोक काळपासून पांड्य देशाची व पांड्य नांवाच्या राजघराण्याची राजधानी म्हणून प्रख्यात आहे. काशी, प्रयाग, उज्जयनी, पाटलीपुत्र इत्यादि उत्तर हिंदुस्थानांतील प्रख्यात शहरांच्या बरोबरीचें पुरातन हे शहर आहे. मात्र प्रवाशानें प्रथम मदुरेत प्रवेश केला म्हणजे शहर अगदीं अर्वाचीन ब्रिटिश राजवटीतील आहे असा भास होतो. पुणेकरांस तर हे शहर पुण्यासारखेच वाटतें. पुण्याप्रमाणेंच हे जुन्या राजवटीच्या राजधानीचे शहर आहे. ज्याप्रमाणें पुणे मुठा नदीच्या कांठीं आहे, त्याचप्रमाणे मदुरा हे '''वैगै नदीच्या कांठी''' आहे. ही नदी पुण्याच्या नदीपेक्षां उथळ पण रुंद आहे. पण पुण्याच्या नदीप्रमाणे हिचा कमी प्रवाह आहे; पुण्याच्या नदीप्रमाणे येथें<noinclude></noinclude> banu44ljv8ru3aciatazzernz9yfweg पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/३६ 104 110734 232975 232436 2026-07-09T05:19:41Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 232975 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{rh||'''मदुरा'''|२३}}</noinclude>घाण व शेवाळ आहे; पुण्याच्या नदीप्रमाणे येथें कपडे धुतांना बायका- पुरुष दृष्टीस पडले; पण येथल्या नदींत दगड, गोटे किंवा चिखल नसून अगदी बारीक तांबूस वाळू आहे. यामुळे नदीच्या पाऊल पाऊल पाण्यांतून चालतांना पायाला चिखल किंवा घाण अगदीं लागली नाहीं व पायी पाण्यांतून चालण्याची मौज वाटली. पुण्याप्रमाणे मदुरेस बारिक घाणेरडे बोळ आहेत; पुण्याप्रमाणें येथें रस्त्यावर केरकचरा टाकतांना लोक दिसतात. पुण्याप्रमाणेच रस्त्याचे गटारांत नैसर्गिक विधि करण्याची मुभा दिसली. या झाल्या पुण्याच्या काळ्या बाजूच्या साम्याच्या गोष्टी! पण पुण्याप्रमाणे या शहरांतील कांहीं रस्ते डामरी दिसले. प्रशस्त पुण्याप्रमाणेच येथे नदीपलीकडे सुंदर बंगल्यांचें व मोठमोठ्या संस्थांचे नवें शहर वसत आहे. पुण्याप्रमाणे या नव्या शहरास जोडणारा, दगडी नव्हे पण तांबड्या विटांचा मोठा नवाच सुंदर व प्रशस्त पूल बांधला आहे. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजप्रमाणे या भागांत अमेरिकन मिशनचे एक मोठें आर्ट्स कॉलेज आहे. पुण्याप्रमाणेच येथें वाटोवाट चहा फराळाचीं उपाहारगृहें आहेत; मात्र येथें चहाऐवजीं कॉफी मिळते. पुण्याप्रमाणें हें शहरही हातमागाच्या व जरतारीच्या कामाकरितां प्रसिद्ध आहे; पण पुण्यापेक्षां जास्त म्हणजे येथें कापडाच्या अनेक गिरण्या आहेत; पुण्याप्रमाणें हें शहर अर्वाचीन विद्येचें आगर असून प्राचीन काळापासून तामीळ विद्येकरितां व तामीळ वाङ्मयाकरितां प्रख्यात आहे. पुण्याप्रमाणें येथें टांगे नाहींत, पण टांग्यापेक्षां स्वस्त व टांग्याइतके जलद चालणारे झटके (आपल्या इकडील बैलाच्या तट्याच्या एक्क्या गाड्याप्रमाणे पण एका बैलाऐवजी एक तटू जोडलेल्या गाडया) येथें आहेत. पुण्याप्रमाणें मोठ्या शहराला आवश्यक असणारी ट्रामगाडी किंवा बसगाडी नाहीं; पण शहराला विजेच्या दिव्यांची सोय आहे. पुण्याप्रमाणें येथें दूरदूर जाणाऱ्या मोटार लॉऱ्यांचा सुकाळ आहे. मात्र येथें बूट पॉलीश करणारे फार दुर्मिळ आहेत; कारण येथले बहुतेक लोक सुशिक्षित व संभावित लोक-<noinclude></noinclude> lguht88c75jxp31wcil10a6qg1er1zl पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/३७ 104 110735 232976 232437 2026-07-09T05:20:40Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 232976 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{rh|२४ |'''काशी - रामेश्वर यात्रा'''|}}</noinclude>सुद्धां सदा अनवाणी चालतात! मागें एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणें येथें वाळवंटी रस्ते असल्यामुळे व देवळाच्या आवारांत बूट, जोडा किंवा चप्पल कांहीं एक न्यावयाचें नाहीं या नियमाचा पूर्णपणे अंमल चालू असल्यामुळे नेहेमींच अनवाणी चालणें लोकांना सोयीचें वाटतें. मला रामेश्वरीं तीच चाल नाइलाजानें पतकरावी लागली. मदुरा येथें बूट पॉलीश करणारे सहसा आढळतना म्हणून मी येथल्या चपला मुद्दाम विकत घेतल्या. पुण्यापेक्षां येथें खाणावळींचा व कॉफीगृहांचा, सुकाळ आहे पण येथले दर पुण्याच्या पेक्षां कमी आहेत. येथल्या चांगल्या खाणावळीतील चांगले जेवण तीन आण्याला मिळते. जेवायला सुंदर केळीचे पान, दोन तीन भाज्या, एखादी चटणी व पापड इतक्या गोष्टी असतात, पण पोळी भाकरी मात्र नाहीं. पहिल्यानें भात व कोळंबो खावें, मग भात व सारम् खावें, शेवटीं भात व ताक खावें; दह्याची वाटी पाहिजे असल्यास एक आणा जादा चार्ज पडतो; पण चार आण्यांत खरोखरी स्वस्त व उत्तम जेवण मिळतें यांत शंका नाहीं. तसेच सकाळीं दोन ऊन ऊन डोशे (आंबोळ्या), चटणी, व काफीचें एक पितळी टंबरेल (येथें कपबशी मुळींच नाहीं, त्याचे ऐवजी पितळी पातेली व व टंबरेल मिळतें व आपल्या इकडे पुरभय्ये उंच उंच ओतून दूध गार करतात त्याप्रमाणें येथें काफी गार करतात) दोन आण्यांत मिळते. येथली हवा पुण्यापेक्षां ऊष्ण आहे; डांसही आहेत; पण ते मलेरियाचे नाहींत. पुण्याचें व मदुरेचें साम्य दाखवितांना मी आपला मदुरेतील अनुभव अनुषंगानें सांगितला त्यामुळे येथल्या लोकांच्या रीतीरिवाजांची अनायासें वाचकांस माहिती मिळाली हे बरेंच झालें. आतां मदुरेच्या पूर्वपीठिकेचें थोडक्यांत सिंहावलोकन करून मग येथल्या दृश्यदर्शनाकडे वळणें बरें.<Br>{{gap}}मदुरा हे पांड्य नांवाच्या लोकांवरून पांड्य देश असें नांव पडलेल्या (ज्यांचा उल्लेख कालिदासानें '''रघुवंशांत''' रघूच्या दक्षिण दिशेच्या दिग्विजयांत केला आहे.) मध्यदेशाची राजधानी होय. याचा उल्लेख<noinclude></noinclude> eg1s1gq792glwy9dkslktuzpijg3os2 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/३८ 104 110736 232977 232523 2026-07-09T05:27:24Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 232977 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{rh||'''मदुरा'''|२५ }}</noinclude>मागे आलाच आहे. पण या फार पुरातन राजवटीच्या वेळचे कांहीं एक अवशेष सध्यां मदुरेस दृष्टीस पडत नाहीत. कारण मुसलमानांनीं प्रथमतः जेव्हां दक्षिण हिंदुस्थानचा हा प्रांत जिंकला तेव्हां पूर्वीच्या सर्व इमारती व राजधानीचा चवदा बुरुजांचा तट वगैरे राजवैभवाचे व तत्कालीन शिल्पकलेचे मासले जमीनदोस्त करून टाकले. सुदैवानें मीनाक्षीच्या व सुंदरेश्वराच्या देवळांचे गाभारे मात्र शाबूत राहिले. पण त्याकाळीं तुंगभद्रा नदीच्या कांठीं विजयानगरचें मोठें राज्य स्थापन झाले होते. सन १३७२ मध्ये त्या राज्यांतील म्हैसूर प्रांताचा '''कंपाना उदेयार''' नांवाचा सेनापती यानें मदुरा प्रांत व शहर येथून मुसलमानांना हुसकावून लावलें. मदुरा प्रांताची चांगली व्यवस्था करून '''कंपाना उदेयार''' परत म्हैसूरास गेला. सन १४०४ च्या सुमारास '''लखना''' नायक नांवाचा नाईक विजयानगरचा प्रतिनिधी म्हणून मदुरा येथें अंमल चालवीत होता. याच घराण्याचे कारकीर्दीत मदुरा प्रांत व मदुरा शहर यांचा वैभवरवी कांहीं काळपर्यंत दैदीप्यपणे तळपत होता. याच काळांत '''मीनाक्षी''' देवळाचा जीर्णोद्धार होऊन पहिल्या प्रकाराचीं चार गोपुरे बांधण्यांत आलीं. पुढे विश्वनाथ नांवाचा नायक प्रथम विजयानगरचा प्रतिनिधी xग स्वतंत्र राजा म्हणून मदुरेत राज्य करूं लागला. या विश्वनाथा बरोबर '''आर्य नायगमुडली''' नांवाचा बेलाल जातीचा गरीब आईबापाच्या पोटचा पोरका तरुण मदुरेस आला होता. तो आपल्या बुद्धिमत्तेनें व कर्तबगारीनें विश्वनाथाचा प्रधान बनला. तो पुढे नायक राजांच्या तीन पिढ्यांपर्यंत प्रधान राहिला. मदुरा येथील पाळेगार म्हणून प्रख्यातीस आलेल्या अंमलदारांचा वर्ग त्यानें निर्माण केला. त्याने मदुरा किल्ल्याच्या ७२ बुरुजांवर एक एक पाळेगार xxx पाळेगाराने एकएका बुरुजाचें संरक्षण स्वतःचे बारगीर जय्यत करावें असें ठरविलें, व त्यांना कायमच्या धाराबंदीवर जमिनी दिल्या. यांचेच वंशज मदुरेचे शूर व लढवय्ये पाळेगार म्हणून<noinclude></noinclude> 5lqi7opj8t76utxepj4sb0gxmoz510v पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१२० 104 110889 232953 232864 2026-07-08T11:59:12Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232953 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९४|काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>दर्शन घेण्यास फार वेळ लागणार नाहीं व आपण भोजन तयार होतें आहे तो सहज परत येऊं. शिवाय स्वामीचें ध्यानमननादि विधी उरकण्यास पुष्कळ वेळ लागतो. तेव्हां त्यांचेकडे जाण्यास थोडा उशीर झालेलाच चांगला. म्हणजे आपणास तेथें तिष्ठत बसावयास नको. इतके सांगितल्यावर आमचें उतावीळ मन शांत झालें.<br>{{gap}}पिठासारखे पांढरे शुभ्र चांदणें पडल्यावर आम्हीं चन्द्रगिरी चढण्यास लागलो. तिसऱ्या प्रहरी सूर्यप्रकाशामध्ये डोंगर चढण्यापेक्षां रात्रींच्या शांत व शीतल वेळी डोंगर चढण्याची आम्हांला मोठी मौज वाटली व आम्ही डोंगराच्या माथ्यावर केव्हां आलों हे आम्हांला कळलें सुद्धां नाहीं.<br>{{gap}}चन्द्रगिरीवर जैन धर्मी लोकांच्या बारा बस्ती- तीर्थकरांची मंदिरें- आहेत. शिवाय जैन दृष्टीने पवित्रांतलें पवित्र स्थान- भद्र बाहू व चन्द्रगुप्त यांची गुहा येथेंच आहे.<br>{{gap}}आम्हीं तीं जैन मंदिरें क्रमानें पहात गेलों. हीं मंदिरें लहान मोठी असून ती निरनिराळ्या काळी बांधलेली असल्यामुळे त्यांच्या बांधकलेमध्ये तरतमपणा पुष्कळ आहे. तसेंच तीर्थंकरांच्या मूर्ति सुद्धां लहान-मोठ्या असून त्याही कमीअधिक कौशल्याच्या निदर्शक आहेत. सुभय्याशास्त्री प्रत्येक मंदिराची व त्यांतील तीर्थंकराच्या मूर्तीची मनोरंजक हकीकत सांगत होते. सरते शेवटीं त्यांनी आम्हांला भद्रबाहूची गुहा दाखविली. या गुहेचें प्रवेशद्वार बरेंच ठेंगणें असल्यामुळे अगदीं वाकून आंत जावें लागलें. खोदलेल्या गुहेची उंचीही बेताचीच असल्यामुळे वाकून उभे राहावें लागलें. जरी गुहेच्या बाहेर चांगला चन्द्रप्रकाश पडला होता तरी गुहेचें आंत काळोखच होता. म्हणून आंतलें आम्हांला कांहीं एक दिसलें नाहीं. तरी पण सुभय्या शास्त्र्यांनी भक्तिभावानें ती पवित्र गुहा आम्हांला दाखविली व भद्रबाहूची व चन्द्रगुप्ताची कथा पुनः एकदां सांगितली.{{nop}}<noinclude></noinclude> 451r2nwcpizxoisjx7yjwt0y2jnzsfn पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१२१ 104 110890 232954 232865 2026-07-08T12:03:02Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232954 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||दक्षिण काशी : श्रवणबेलगोला|९५}}</noinclude>झालें आमची दक्षिणकाशीची यात्रा संपल्यासारखीच झाली. चन्द्रगिरीवरून आम्हीं केव्हांच खालीं उतरलों व सुभय्याशास्त्र्यांच्या बिऱ्हाडीं पोहोंचलों.<br>{{gap}}भोजन आटोपल्यावर आम्हीं श्रवणबेलगोला येथील मठाच्या स्वामींचे दर्शन घेण्यास निघालों व वाटेवर असलेले श्रवणबेलगोला गांवांतील जैनमंदिर ओझरतें पाहिलें. चौवीस तीर्थंकरांचें हें मंदिर अवाढव्य आहे व त्यांत कलाकुसरी कामें पुष्कळ आहेत. पण रात्रीचीं ती कितीशी दिसणार. तेव्हां मंदिराकडे नुसती नजर टाकूनच आम्हांला समाधान मानून घ्यावें लागलें.<br>{{gap}}मठ मंदिरानजीक असल्यामुळे आम्हीं तेथून मठांत गेलों. मठवासी स्वामी आमची वाटच पहात होते. आम्हीं दोघे विद्यादानाच्या कामांत गुंतलेले गृहस्थ आहोंत असें सुभय्याशास्त्र्यांनी स्वामींना सांगितलें. स्वामीनीं आमचे मनःपूर्वक स्वागत केलें. थोडावेळ संभाषण झाल्यावर आम्हीं स्वामींचा निरोप घेतला. त्यांनी प्रसाद म्हणून फुलें व नारळ आम्हांला आपल्या हातांनी देऊन आमचा विशेष बहुमान केला. नंतर आम्हीं मठाचे बाहेर आलों व सुभय्याशास्त्र्यांनी आमच्याकरितां फार तसदी घेतल्याबद्दल व आमचा विशेष पाहुणचार केल्याबद्दल त्यांचे आभार मानून आम्ही तडक आमच्या प्रवाशी गृहाला आलों. लगेच प्रवाशी पथाऱ्या पसरून आम्हीं निद्रादेवीची आराधना केली. सर्व दिवसाची आमची खडतर तपश्चर्या पाहून देवीनेंही लागलाच आमच्यावर अनुग्रह केला हें सांगावयास नको.<br>{{gap}}ठरल्याप्रमाणें सकाळीं आरसीकेरीची मोटारबस आली. आमची दक्षिण काशीची यात्रा यशश्वी रीतीनें पार पडली असें आमच्या मनांत आलें व मोठ्या प्रमुदित मनानें आम्हीं मोटारीत बसून मार्गस्थ झालों व सुखरूपपणें आरसीकेरीला आलों. तेथें आम्हीं सांगलीस जाणाऱ्या आगगाडीत बसलों. आणासाहेब गोखले दुसरे दिवशीं सकाळीं सांगलीस<noinclude></noinclude> bfaay9ykv06hrl4j9uv709zm9wzkthj पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१३५ 104 110892 232965 232867 2026-07-08T16:05:42Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232965 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जबलपूर|१०३ }}</noinclude>शोभा अद्वितीय दिसते यांत शंका नाहीं. नदीचें तें शांत हिरवट पाणी व दोन्ही बाजूंस ते भिंतीसारखे उभे पांढरे शुभ्र खडक, व त्यांवर पडलेला सूर्यप्रकाश हा देखावा विलक्षण आकर्षक आहे यांत शंका नाहीं. एके ठिकाणीं दोन्ही बाजूंचे शुभ्र खडक इतके एकमेकांजवळ आले आहेत कीं, माकड या तीरावरून त्या तीरावर सहज उडी मारून जाईल. म्हणून या ठिकाणाला वानरप्लुती (monkey's leap) असें नांव पडलेलें आहे. येथें आम्ही थोडा वेळ होडी थांबविली व पांढऱ्या शुभ्र संगमरवरी खडकांनीं मर्यादित अशा त्या शांतजल पुष्करणीची शोभा पहात बसलों. नंतर होडी पुढे चालू करण्यांत आली व थोड्याच वेळांत आमची होडी पुन्हां थांबली. कारण आतां नदींतील प्रवाहरूपी संथ तलाव संपला. कारण आम्हांला धबधब्याचा धो धो आवाज ऐकू येऊं लागला. तेव्हां आतां पुढे जाणें शक्य नव्हतें. म्हणून आम्ही परत फिरलों व सभोवारचे ते पांढरे शुभ्र खडक व नदीचीं तीं नागमोडी वळणें यांची शोभा पहात पहात परत घाटाच्या पायऱ्यांशीं आलों व होडीवाल्यास चिरीमिरी देऊन आलेल्या त्या भयंकर दरडीनें धर्मशाळेशी आलों.<br>{{gap}}येथल्या प्रेक्षणीय स्थळांमधील एकच स्थळ गौरीशंकराचे देवालय पहावयाचें राहिलें. वास्तविक येथून तें पायीं जाऊन पहाण्यासारखे होतें; पण पुण्याच्या पर्वतीप्रमाणे तें टेंकडीच्या माथ्यावर असल्यामुळे बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात असे कळले. या माझ्या प्रवासांत पायांनीं चालण्याचे श्रम होतां होईल तितके टाळावे असें माझ्या सल्लागार डॉक्टरनीं सांगितलें होतें. (कारण दोन महिन्यांपूर्वी फर्ग्युसन कॉलेजच्या टेंकडी वरून बराच खोल खालीं मी पडलों होतों व माझा डावा पाय अतिशय मुरगळला होता. म्हणून त्या पायाला चालण्याचे व विशेषतः पायऱ्या चढण्याचे श्रम द्यावयाचे नव्हते.) म्हणून गौरीशंकराच्या देवळास जाण्याकरितां मला माणसांनी उचलून न्यावयाची डोली करावी लागली. ती डोली कसली! एक छोटीशी चौपाई (खाट)<noinclude></noinclude> d4xsdndmu1p20tjlbbmdeq1nvzs662u पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१२२ 104 110914 232955 2026-07-08T12:06:24Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232955 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९६|काशी-रामेश्वर यात्रा|}}</noinclude>उतरले व मी पुढें पुण्यास निघाली व दोन प्रहरी पुण्यास सुखरूप पोहोचलो.<br>{{gap}}झाले. माझ्या काशीयात्रेच्या तीन हप्त्यांपैकी दुसऱ्या हप्त्याचे माझें वर्णन संपले. आतां थोडा कालविपर्यय करून मी माझ्या महायात्रेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वर्णनास पुढील प्रकरणांत सुरवात करणार आहे. तरी वाचक सावधान राहतील अशी आशा करून लेखणी खाली ठेवतो.<Br><Br><br> {{rule|5em}} {{nop}}<noinclude></noinclude> lfupwmdz2bhrjp3d2meteri9jiy5flg पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१२४ 104 110915 232959 2026-07-08T12:19:38Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232959 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९८|काशी - रामेश्वर यात्रा|right}}</noinclude>{{gap}}या दोन पर्वतराजीमधील सुपीक, सपाट व सुजल भूमिभागाला '''गोंडवन''' म्हणत असत. कारण पूर्व काळीं व अजूनही गोंड नांवाच्या जंगलांत राहणाऱ्या लोकांची वस्ती या भागांत पुष्कळ आहे. पुरातन काळी या गोंडवनामध्यें गोंड लोकांची चार शूर घराणी उदयास येऊन त्यांनीं चार ठिकाणीं राज्य स्थापन केलीं होतीं व तीं राज्ये सुमारें चारशें शतकें चालली होती. त्या राज्यांपैकी एका राज्याची राजधानी जबलपुरानजीकच्या व सध्यां जबलपूर म्युनिसिपल हद्दींत असलेल्या '''गऱ्हा''' किंवा गढा नांवाच्या गांवीं होती. त्या काळचे अवशेष अजून तेथें आहेत. याप्रमाणें जबलपूर हे मोठें ऐतिहासिक प्रसिद्ध शहर आहे; तसेंच सर्व हिंदुस्तानांत अपूर्व असें निसर्ग- रमणीय स्थान नर्मदा नदीचा धबधबा व नदीकाठचे संगमरवरी खडक जबलपुरच्या दक्षिणेस १३ मैलांवर आहेत. अशा या इतिहासप्रसिद्ध व निसर्गरमणीय ठिकाणीं व मित्रसहवासांत माझा एक आठवडा केव्हां संपला हे कळलेंसुद्धां नाहीं. तरी आतां येथल्या निवासांत पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांच्या वर्णनास लागूं या.<Br>{{gap}}मागें उल्लेख केल्याप्रमाणें नर्मदानदी मंडला जिल्ह्यांत अमरकंटक शिखरीं उगम पावते. प्रथम ती उत्तर दिशेने वाहते व जबलपुरच्या दक्षिणेस पांच मैलपर्यंत आल्यावर पश्चिमवाहिनी बनते व मग सामान्यतः त्याच दिशेनें वाहत जाऊन समुद्रास मिळते. '''जबलपूर संगमरवरा खडक''' नांवाचें प्रख्यात ठिकाण जबलपूरपासून तेरा मैलांवर नैऋत्य दिशेस आहे. आम्ही एका सकाळी मोटारीने गेलों व तीनचार तासांनीं दृश्यदर्शन आटपून परत आलों. मोटारीचे जातां येतांचे भाडे ८ रुपये पडलें. जबलपूर हे सपाट व सखल प्रदेशाच्या मधोमध वसलेलें शहर आहे. यामुळे शहराबाहेर आलें कीं, चारी दिशांचा देखावा एकदम दिसतो. ते उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सभोवारचा देखावा फारसा नयनमनोहर दिसला नाहीं; कारण गव्हाचे पीक पार वाळून गेलेलें किंवा कापून टाकलेलें होतें; यामुळें भूमिभाग उघडा बोडका दिसत<noinclude></noinclude> d6s55hvxgqs8h28q81xy59lg4v901mu सदस्य चर्चा:संजय मुनशी 3 110916 232960 2026-07-08T14:31:56Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 232960 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=संजय मुनशी}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) २०:०१, ८ जुलै २०२६ (IST) 5bf0xci8fubfz897msdq7pft2vj6exh पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१२७ 104 110917 232961 2026-07-08T15:48:47Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232961 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जबलपूर|९९}}</noinclude>होता. हिंवाळ्यामध्ये हा भूमिभाग गव्हाच्या व तुरीच्या पिकांनीं सारखा भरलेला असल्यामुळे हिरवा हिरवागार व म्हणून फार नयन- मनोहर दिसतो. पण उन्हाळ्यामध्ये सुद्धां हा भाग अगदीं उजाड किंवा ओसाड वाटला नाहीं. कारण या भागांत आंब्याच्या झाडांची लागवड अतोनात आहे. रस्त्याच्या दुतर्फा आंब्याची झाडें लावलेली आहेत. यामुळे या रस्त्यानें जातांना मला बडोदा शहरांतून मकरपुरा राजवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याची आठवण झाली. इतकें या दोन रस्त्यांमध्ये विलक्षण, साम्य आहे. ती गेंदासारखी डौलदार वाढलेली व हारीनें लावलेली आंब्याची दुतर्फा झाडी फार नयनमनोहर आहे यांत शंका नाहीं. तसेंच या सपाट प्रदेशामध्यें पूर्वकाळच्या राजवटीमध्ये केलेले तलावही पुष्कळच आहेत. त्या तलावांनी या भूमिभागाला शोभा आली आहे इतकेंच नाहीं तर गारवाही आलेला आहे.<br>{{gap}}शहर टाकून जरा पुढें आल्यावर एक टेंकड्यांची अर्धवर्तुळाकार रांग आपलें लक्ष वेधते. याच टेंकड्यांच्या आश्रयानें पूर्वीची गऱ्हा किंवा गढा राजधानी वसलेली होती. आतां तें गांव अगदीं खेडेगांव बनले आहे. या गांवातूनच सडक जाते व सडकेच्या उजव्या हातास आतां अगदीं मोडकळीस आलेल्या गोंड राजवटींतील राजवाड्याचा अवशेष दृष्टीस पडतो. आपल्या डाव्या हातास ती लांबच लांब पसरलेली टेंकडी लागते तर उजव्या बाजूस दोन तीन मोठमोठे तलाव लागतात. या टेंकड्यांची रांग टाकल्यावर मात्र पुन्हां सारखा सपाट भूमिभाग लागतो. नदी जसजशी जवळ येते तसतशा जमिनीमध्यें राक्षसी भेगा पडलेल्या दिसतात व आपण खालीं खालीं खोल चाललों आहोंत असे दिसून येते व नर्मदा नदीला मिळणारा एक मोठा भीषण ओढा लागतो. त्यावर एक छोटा पूल आहे. तो ओलांडून पलीकडे गेलें म्हणजे झोंपडीवजा घरे लागतात. येथेंच जिल्हा बोर्डाची धर्मशाळा असून नर्मदा नदीच्या शांत प्रवाहांतून संगमरवरी दगडाचे खडक पाहण्या-<noinclude></noinclude> 3dc8qcygw4h86id7dr4s7mjhrqmfod7 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१२८ 104 110918 232962 2026-07-08T15:56:35Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232962 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०० |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>करितां ठेवलेल्या होड्यांचे पास मिळतात. लहान आठ माणसांच्या होडीला जाऊन येण्याचे भाडें पावणेदोन रुपये पडतें; त्यांतला १ रुपया जिल्हा बोर्डाला मिळतो व बारा आणे होडी वल्हविणारांस व सुकाणूवाल्यास मिळतात. आम्हीं पास काढून होडी तयार ठेवण्यास सांगून प्रथमतः नर्मदा नदीचा धबधबा पाहण्यास मोटारींतून जातां आलें तेथपर्यंत मोटारीने गेलों व मग धबधब्यापर्यंत दीडदोन फर्लांग पायीं चालत गेलों.<br>{{gap}}मोटारींतून आम्हीं खालीं उतरलों तोंच नर्मदा नदीचा तो पांढरा पांढरा शुभ्र खडकमय किनारा पाहून मी आश्चर्यचकित झालों. नदीच्या दोन्ही बाजूस सारखे खडक असून ते कांहीं संगमरवरी व कांहीं शंखजिऱ्याचे असे मिश्र खडक आहेत. अर्थात् शंखजिऱ्याचे खडक संगमरवरी दगडापेक्षां पुष्कळच मऊ असतात. तेव्हां पाण्याच्या प्रवाहाच्या जोरानें शंखजिऱ्याचे खडक फुटून जाऊन नदीच्या पात्रांत मोठमोठ्या घळी व भेगा पडल्या असाव्या असे मला वाटलें. आम्हांला दीड दोन फर्लांग पायीपायीं व खडकाळ व वाळवंटी भागांतून जावें लागलें. आमचे डाव्या हातास बऱ्याच दूरवर पर्यंत जास्त पांढरे शुभ्र खडक दिसत होते. ते गेल्या दोनतीन वर्षांतील पुरामध्यें वरची माती वाहून जाऊन उघडे पडले म्हणून मला सांगण्यांत आलें. बऱ्याच काळापासून उघड्या असलेल्या संगमरवरी व शंखजिरी खडकावर काळसर व हिरवट बुरा आलेला होता. यामुळे ते खडक नव्या खडकाइतके शुभ्र व चकाकीत दिसत नव्हते. शेवटीं आम्हीं खुद्द धबधब्याचे ठिकाणीं आलों. हा धबधबा फार मोठा आहे असें नाहीं. पंचवीस चाळीस फूट फार तर खोल असेल. पण येथला देखावा विलक्षण वाटतो खरा! नदीच्या वरचें पात्र पांढऱ्या शुभ्र गोट्यांनी भरलेले असून तें साधारणतः सपाट आहे. पुढे नदीच्या पात्रांमध्यें पांढऱ्या शुभ्र खडकामध्ये एकदम मोठी थोरली राक्षसी घळ किंवा भेग पडली आहे. नदीच्या वरच्या सपाट व पसरट पात्रांतून संथपणें वाहणारा पाण्याचा प्रवाह एकदम त्या निमुळत्या<noinclude></noinclude> mz0gco8g4h1lctjjvo4w3kcttsgh57l पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१३१ 104 110919 232963 2026-07-08T16:00:40Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232963 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जबलपूर|१०१ }}</noinclude>भेगेत जोराने जणूं कांहीं उडी घेत आहे असा भास होतो. काय आश्चर्यकारक तो देखावा! सभोवार पांढरे पांढरे खडक, गोटे व वाळू यांनी युक्त नदीचें पात्र, त्यामध्यें तो हिरवट पाण्याचा प्रवाह व प्रवाहाच्या एकदमच्या प्लुतीमुळे धोधो आवाज करणारा व फेसाळणारा तो पाण्याचा झोत हा देखावा एकसमयावच्छेदेकरून पाहिला म्हणजे मन थक्क होतें व सृष्टिसुंदरीनें आपल्या निसर्गरूपी अफाट बागेत किती चमत्कार करून ठेवले आहेत याचे राहून राहून नवल वाटतें व मन न कळत निसर्गदेवतेच्या चरणी लीन होतें. हा धबधब्याचा अद्वितीय देखावा पहात आम्हीं संगमरवरी शिलातलावर बराच वेळ विश्रांति घेतली. एकोणतीस वर्षांपूर्वी प्रो. हरिभाऊ लिमये यांच्या समवेत मी हा धबधबा व येथला निसर्गरमणीय देखावा पाहिला होता. त्याची मला आठवण झाली व जबलपूर शहरांत व त्याच्या आसपास कितीही फरक झाला असला तरी जबलपूरचा धबधबा व जबलपूरचे संगमरवरी खडक आहेत तसेच आहेत हें पाहून मला उत्तररामचरित्रांतील खालील श्लोकाची आठवण झाली. {{Block center|<poem>'''पुरा यत्र स्रोतः पुलिनमधुना तत्र सरितां ।''' '''विपर्यासं यातो घनविरलभावः क्षितिरुहाम् ॥''' '''वहोर्दृष्टं कालादपरमिव मन्ये वनमिदम् ।''' '''निवेशः शैलानां तदिदमिति बुद्धिं द्रढयति ॥'''</poem>}} {{gap}}याप्रमाणे बराच वेळ धबधब्याची शोभा पाहिल्यावर आम्हीं पायीं- पायीं मोटारीशीं आलों व मग लागलींच धर्मशाळेजवळ आलों. आधींच सांगून ठेवले असल्यामुळे पासाचे पैसे भरून पास काढण्यास वेळ लागला नाहीं. आम्हीं चालत नदीच्या प्रवाहाशीं गेलों. नदीचे पात्र धर्मशाळेपासून फार खोल आहे. यामुळे मोठी दरड उतरून खालीं जावें लागतें. येथें नदीला एक मोठा ओढा येऊन मिळाला आहे व त्याचेपलीकडे पांच चार लांबच लांब पायऱ्यांचा घाट बांधलेला आहे. नर्मदानदी ही दक्षिण गंगा समजली गेल्यामुळे व ही जागा जास्त पवित्र मानली गेल्यामुळे<noinclude></noinclude> lj97675q67kkz71memg5eiter7q2fnc पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१३२ 104 110920 232964 2026-07-08T16:02:38Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232964 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०२ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>येथे मोठी यात्रा जमते व त्यावेळीं हजारों यात्रेकरू येऊन नदीमधील या घाटावर स्नानें करतात असें मला समजलें. जबलपूरच्या एका श्रीमान् गृहस्थानें येथें एक मोठी धर्मशाळा बांधली आहे. ती पांढऱ्याशुभ्र रंगाची धर्मशाळा पात्राच्या पलीकडे असलेली आम्हांला दिसत होती. घाटाच्या बाजूनें नदीचा प्रवाह वहात जात होता; पण घाटाच्यावरच्या बाजूस नदीचें पाणी तलावासारखें संथ होतें. तेथेंच कांठाला आमची होडी तयार होती. त्यांत आम्हीं बसलों व मग होडी लागलींच चालू झाली. प्रारंभीं नदीच्या पात्रांतील तलाव रुंद आहे. डाव्या बाजूला भिंतीसारखी उंचच उंच दरड आहे व पलीकडची दरड कमी उंच असून भिंतीसारखी नाहीं; शिवाय येथले खडक काळवंडलेले असून त्यांचेमध्यें व त्यांचेवर थोडें तरी गवत, शेवाळ व लहान झुडपें वाढलेली आहेत. यामुळे सामान्यतः तलावांतून जातांना जशी मौज वाटते तशीच या प्रवाहांतून होडीने जातांना मौज वाटते. पण जरासें प्रवाहांतून पुढे गेलें म्हणजे प्रवाह अगदी चिंचोळा होऊन दोन्ही बाजूंस शंभरशंभर फूट असे भिंतीसारखे पांढरे पांढरे शुभ्र संगमरवरी खडक दृष्टीस पडतात व आपण काय एखाद्या पांढऱ्या शुभ्र प्रचंड दंतपंक्तींनी युक्त अशा राक्षसाच्या जबड्यांत प्रवेश करतों कीं काय असा भास होतो व मन कांहींसें भीतीनें ग्रस्त होतें! जर का या राक्षसानें आपला राक्षसी जबडा एकदम मिटला तर आपण तत्काळ गुदमरून जाऊं असें वाटतें. जसजसें प्रवाहांतून पुढे जावें तसतसा प्रवाह फारच चिंचोळा होतो व तो विलक्षण नागमोडी वळणानें चालला आहे असें कळून येतें. पण मग आपली दिशाभूल होते. केव्हां केव्हां खडक इतके समोर येतात कीं पुढें प्रवाहाची वाट पार बंद झाली असावी असें वाटतें तोंच एका चिंचोळ्या चिळणींतून नदी जात आहे असें कळून आश्चर्य व आनंद असे मिश्र मनोविकार मनांत उद्भूत होतात! आतां मात्र खडक पांढरे पांढरे शुभ्र व गुळगुळीत आहेत असे दिसून येतें. या संगमरवरी खडकावर सूर्याचीं किरणें पडली म्हणजे त्यांची<noinclude></noinclude> lh22aftfjn3464lk0fcnd7cfvw92u37 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१३६ 104 110921 232966 2026-07-08T16:09:57Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232966 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०४ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>होती. तिच्या चारी खुरांना बांधलेली दोरखंडें होतीं व त्यामध्यें दोन बांबूचे खांब घातले होते. मी त्या खाटेवर पाय उचलून बसलों व मग चार माणसांनी ती डोली खांद्यावर घेतली व याप्रमाणे मी देवदर्शनास किंवा दृश्यदर्शनास निघालों. या माझ्या अपघाताने आलेल्या आगंतुक परावलंबीपणाबद्दल माझ्या मनाला किंचित् खेद झाला. मी मोठा झाल्यापासून हजारों मैलांचा प्रवास केला; साता समुद्रापलीकडे गेलों; सात सात हजार फूट उंचीचीं पर्वतशिखरें पायीं चढून गेलों; एका दिवसांत पंचवीस पंचवीस मैलांची मजल मारली; तेव्हां येवढ्याशा चढावाकरितां मजूर माणसांची मदत घ्यावी लागली याबद्दल मला खेद कसा वाटणार नाहीं? पण 'आलिया भोगासी असावें सादर' असें म्हणून मी मनाचे समाधान केलें. मात्र या वेळी डोलीमधून जातांना मला पन्नास वर्षांपूर्वीची माझ्या आईसकट डोलीमधून मामांच्या घरीं जाण्याची आठवण झाली व पूर्वकाळी बायकामुलांना बिनसडकेच्या स्थळी नेण्याकरितां याच साधनाचा सररहा उपयोग केला जात असे असें माझ्या ध्यानांत आलें व वृद्धावस्था म्हणजे दुसरी बाल्यावस्था म्हणतात त्याचा मला अनुभव आला. पण लवकर माझा पाय पूर्ण बरा होऊन मी स्वतःच्या पायांवर प्रवास करण्यास समर्थ होईन अशी मला आशा होती. अशा प्रकारचे सुखदुःखमिश्रित मनोविकार माझ्या मनांत डोलीमधून वर चढतांना सारखे येत होते. थोड्याच वेळाने आम्ही देवळाच्या प्राकाराशी आलों व मग मी डोलींतून उतरून देवळाच्या आंगणांत गेलों. या देवळाला वाटोळा असा प्राकार असून आंतल्या बाजूला एकमजली दगडी सोपा आहे व सोप्याच्या पुढच्या बाजूला दर खणागणिक एक एक दगडी खांब आहे व प्रत्येक खणांत प्राकाराला टेकून एक एक देवीची दगडी मूर्ति बसविलेली आहे. या एकंदर ६४ योगिनींच्या मूर्ती आहेत असें मला सांगण्यांत आलें. एकंदर तो वर्तुळाकार सोपा पाहून ती संख्या बरोबर असली पाहिजे असें मला वाटलें. पांच चार मूर्ती आम्हीं बारकाईने पाहिल्या. मर्तींचे काम फार कला-<noinclude><br>{{gap}}</noinclude> 22bk6eha67am5rje2vtz7t5k67j1i7t पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१३७ 104 110922 232967 2026-07-08T16:13:07Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232967 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जबलपूर|१०५ }}</noinclude>कौशल्याचे दिसलें. विशेष चमत्काराची व कौतुकाची गोष्ट म्हणजे प्रत्येक मूर्तीची ठेवण व ध्यान वेगवेगळें होतें. शिवाय प्रत्येक मूर्तीमध्यें एक एक वेगळी पुराणकथा चित्रित केली होती. किती विलक्षण व आश्चर्यकारक है मूर्तिकलेचें कौशल्य! पण अत्यंत खेदाची गोष्ट ही कीं, मुसलमानी लोकांच्या धर्मवेडामुळे इतक्या सुंदर मूर्ती थोडयाफार फोडण्यांत आल्या होत्या व यामुळे त्यांना थोडासा विद्रूपपणा आलेला होता. पण हिंदी मूर्तिकलेचे उत्तम मासले म्हणून या मूर्ती खरोखरी फार वाखाणण्यासारख्या आहेत यांत शंका नाहीं. या मूर्तीपैकी एक मूर्ति- परदेशी पाठवून खूब पैसे मिळविण्याच्या बुद्धीनें असेल कदाचित्- लांबविण्यांत आली होती व ती गोष्ट उघडकीस आल्यामुळे पुराणवस्तू- खात्यांतील एका अंमलदारास बडतर्फ करण्यांत आलें होतें असें मला माझ्या बरोबरच्या प्रोफेसर मित्रांनी सांगितलें. या देवळाच्या प्राकारांत जणूं कांहीं मूर्तिकलाप्रदर्शन भरलें आहे असा या सभोंवार बसविलेल्या मूर्ती पाहून मनाला भास होतो. याप्रमाणें. बाहेरचे दृश्यदर्शन आटोपून मग पादत्राण काढून आम्हीं मधल्या देवालयांत प्रवेश केला. देवालयाच्या पुढे लहानसा सभामंडप आहे व पुढें चबुतऱ्यावर व भिंतीला टेकून गौरीशंकराच्या मूर्ती आहेत. शंकर हे आपल्या नंदीवर बसलेले असून त्यांचे पाठीमागें पार्वती बसली आहे. अशा प्रकारच्या नंदीवर आरूढ झालेल्या शंकरपार्वतीच्या मूर्ती मी पूर्वी कधींच पाहिल्या नसल्यामुळे या मूर्ती पाहून मला फार आश्चर्य वाटलें. या मूर्तींच्या विशेषामुळें हे गौरीशंकराचें देऊळ म्हणजे जबलपुरानजीकचें एक अपूर्व प्रेक्षणीय स्थळ आहे असें मला वाटलें व मजूरमाणसांच्या मदतीनें कां होईना पण मीं हें स्थळ पाहिलें म्हणून मला फार आनंद वाटला.<br>{{gap}}परत येतांना आम्ही रस्त्याच्या जरा बाजूला असलेल्या '''देवतलाव''' नांवाच्या मोठ्या तलावाशीं असलेली देवळें पाहिली. हा तलाव मागे उल्लेख केलेल्या टेकड्यांच्या रांगेला लागूनच आहे. या टेंकडीवर विल-<noinclude></noinclude> 7vejczk5vnkkl0a8ozaoh8rnxl9a6cd पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१३८ 104 110923 232968 2026-07-08T16:16:20Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232968 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०६ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>क्षण आकाराचे प्रचंड राक्षसी दगड जिकडे तिकडे पसरलेले आहेत ते पाहून आश्चर्य वाटलें. देवतलाव हा ठेंगण्या टेंकड्यांमध्ये बांधलेला आहे. त्याचे कांठावर कितीतरी लहानमोठी दगडी देवळें आहेत. देवळांचे बांधकाम बऱ्यापैकीं आहे. पण हीं देवळें पडकीं झालेलीं आहेत. येथें पूर्वी एक विद्यालय होते. येथलें एका झऱ्याचें पाणी फार पाचक असून तें शहरांतील लोक पिण्यास नेतात असें मला सांगण्यांत आलें व एक मनुष्य एका सायकलवर मोठी कळशी नेतांना आम्हीं प्रत्यक्ष पाहिला. येथे आंब्याची झाडीही बरीच आहे. हे ठिकाण वनभोजनाला किंवा अर्वाचीन काळच्या पीकनिकला फार चांगलें आहे असे मला वाटलें व सुटीमध्ये असे लोक येथे येतात असे मला माझ्या सोबत्यांनी सांगितलें. हें वाटेवरचें प्रेक्षणीय स्थळ पाहून आम्ही थेट बिऱ्हाडी परतलों.<br>{{gap}}दुसरे दिवशी सकाळी आम्हीं जबलपुरांतील अर्वाचीन शिक्षणसंस्था पाहिल्या. येथें अशा संस्था पुष्कळच आहेत. प्रथमतः आम्ही येथील महाराष्ट्र शिक्षण मंडळाने चालविलेले हायस्कूल पाहिलें. येथल्या महाराष्ट्रीय मंडळीने स्वतःच्या खर्चाने साधी स्वस्त पण सुबक अशी नवीच दुमजली इमारत बांधली आहे हे त्या मंडळास भूषणावह आहे. मीं शाळेतील सर्व वर्ग पाहिले. वर्गातील मुलांची टापटीप व शिस्त वाखाणण्यासारखी होती. येथल्या हायस्कूलमध्ये प्रत्येक वर्गात जवळ जवळ निम्या मुली आहेत असे दिसून आलें. हा सहशिक्षणाचा खरा व प्रत्यक्ष प्रयोग आहे असे मला वाटलें. या मुख्यतः हिंदी भाषा बोलणाऱ्या वस्तीमध्यें मराठी बोलणाऱ्या महाराष्ट्रीयांनी चालविलेल्या हायस्कूलमध्यें साहजिकपणें मुलामुलींचें शिक्षण एकत्र करणें हे सोयीचें व कमी खर्चाचें आहे व म्हणून असें सहशिक्षण येथें चालू झालें आहे. येथें बी. ए. झालेल्या एक स्त्री-शिक्षकही नेमण्यांत आलेल्या आहेत. त्या बाईंचा व माझा परिचय करून देण्यांत आला. या शाळेची इमारत, जागा व शाळेची एकंदर व्यवस्था पाहून मला फार आनंद वाटला. नंतर आम्हीं येथली पासष्ट वर्षांची जुनी संस्था पाहिली. ती म्हणजे हितकारिणी सभेनें<noinclude></noinclude> tja3tb73m9tgetamnope91a1gmm22d9 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१३९ 104 110924 232969 2026-07-08T16:19:42Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232969 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जबलपूर|१०७ }}</noinclude>चालविलेले हायस्कूल होय. याची विटांची मोठी लांबच लांब इमारत आहे. मुलांच्या वार्षिक परीक्षा चालू होत्या. या सभेच्या आश्रयाखालीं व तिच्याच एका इमारतीत नवें इंटर आर्टस कॉलेज काढण्यांत आलें आहे असें कळलें. पण कॉलेज बंद असल्यामुळे आम्हीं दुरूनच इमारत पाहून मग जबलपुरचें सार्वजनिक सभागृह (टाऊन हॉल) व वाचनालय पाहिलें. वाचनालयामध्यें पुष्कळशीं वर्तमानपत्रे येतात व ग्रंथसंग्रहही बराच आहे असे दिसून आलें. या वाचनालयाला लागून मोठा थोरला प्रशस्त टाऊन हॉल आहे. हा दिवाणखाना दिसण्यांत भव्य आहे. याची उंची दोन मजल्याइतकी असून त्याला मोठमोठे दरवाजे असून त्यांचेवर मोठमोठ्या खिडक्या आहेत. लोंबती ग्यालरी करून दिवाणखान्यांत दुप्पट माणसें बसण्याची सोय सहज व थोड्या खर्चात करण्यासारखी आहे असे मला वाटलें.<br>{{gap}}नंतर येथलें ट्रेनिंग कॉलेज पाहाण्यास गेलो. आवारांतील फुलबाग नानारंगी फुलांनी फुललेली असल्यामुळे मोठी नयनमनोहर वाटली. विशेषतः बागेत राखलेल्या हिरव्यागार '''हरळीचें पटांगण''' (लॉन) पाहून मला फार आनंद वाटला. उष्ण प्रांतांत उन्हाळ्याच्या दिवसांत हरळीचें हिरवेगार पटांगण हा एक अद्वितीय नयनमनोहर देखावा आहे यांत शंका नाहीं. हे कॉलेज स्पेन्स नांवाच्या एका शिक्षणतज्ज्ञाच्या कळकळीचें फळ आहे व म्हणून त्याच्या पश्चात् त्या कॉलेजचें स्पेन्स ट्रेनिंग कॉलेज असे नवें नामकरण करण्यांत आलें, असें मला सांगण्यांत आलें. येथें पदवीधर शिक्षकांना बी. टी. डिग्रीचे व बिनपदवीच्या शिक्षकांना शिक्षणशास्त्राचा डिप्लोमा देण्याचे असे दुहेरी वर्ग आहेत. डिप्लोमा वर्गाच्या शिक्षकांची लेखी परीक्षा चालू होती. येथल्या प्रोफेसर मंडळीशीं माझा परिचय करून देण्यांत आला.<br>{{gap}}चालू शिक्षणपद्धतीबद्दल आमचें बरेंच बोलणें झालें. नंतर आम्ही जबलपुर राबर्ट कॉलेज पाहण्यास गेलों. हे शहरापासून<noinclude></noinclude> 2d1237kxf7kcmew2xkn8n2uft75jzd5 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१४० 104 110925 232970 2026-07-08T16:23:03Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232970 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०८ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>बरेंच दूर (सुमारें चार मैल) आहे. तें एका मोठ्या तलावाचे नजीकच्या सपाट खुल्या मैदानावर बांधलेलें आहे. तलाव प्रचंड असून त्याचे सभोवार ठेंगण्या टेंकड्यांची रांगच रांग आहे. या टेंकड्यांच्या पाणलोटाचा फायदा घेऊन तलाव करण्यांत आलेला आहे असे दिसून आलें. या कॉलेजच्या सभोवारची सृष्टिरचना मोठी नयनमनोहर आहे यांत शंका नाहीं. कॉलेजची तीन दालनी दुमजली इमारत मोठी भव्य व प्रेक्षणीय आहे. पण उपयुक्ततेच्या दृष्टीनें ती पुष्कळ कमी प्रतीची वाटली. आधी व्हरांड्याच्या कमानी कमी उंच धरल्यामुळे खोल्यांत व क्लासांत भरपूर उजेड नाहीं असें भासलें. तसेच दुसऱ्या मजल्यावरील मुलांच्या राहण्याच्या खोल्या तर फारच गैरसोयीच्या वाटल्या. आधीं लहान खोल्यांत दोन दोन तीन तीन सुद्धां विद्यार्थी ठेवण्याची व्यवस्था आहे. यामुळे प्रत्येक मुलास जागा फार कमी मिळते. शिवाय या खोल्यांची मोठी पठाडी गोम म्हणजे या खोल्या मोठमोठ्या दिवाणखान्यामध्ये सहा सात फूट उंचीच्या पण वर खुल्या अशा पातळ पडद्याखालून तयार केल्या असल्यामुळे एका खोलीमध्यें जरा मोठ्याने बोललें किंवा वाचलें तर तें शेजारच्या पांच चार खोल्यांत सहज ऐकूं जातें! खरोखरी ही येवढी इमारत प्रथमतः कॉलेजच्या वर्गाकरितां म्हणून बांधण्यांत आली. पण मग मागाहून या वर्गाच्या राहण्याच्या खोल्या करण्याची कल्पना निघाली. पण मध्ये भिंतींना पुरेसा पाया नसल्यामुळे पातळ विटेच्या खुज्या पडद्या बांधून दिवाणखान्याच्या तात्पुरत्या खोल्या बनविण्यांत आल्या. ही व्यवस्था फार गैरसोयीची वाटली. कॉलेज शहरापासून फार दूर असल्यामुळे व विद्यार्थ्यांची राहण्याची गैरसोय असल्यामुळे या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या फारशी वाढली नाहीं व वाढणें शक्यही नाहीं. येथल्या या सरकारी कॉलेजची प्रतिकूल परिस्थिति पाहून मला असे वाटलें कीं, येथल्या शहरांत निघालेल्या खासगी कॉलेजची भरभराट होण्यास वेळ लागणार नाहीं. मात्र कॉलेजच्या प्रोफेसर मंडळींनीं नव्या कॉलेजांत<noinclude></noinclude> 9clnflswd5a3mesth6fhx6tb9nwvztt पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१४१ 104 110926 232971 2026-07-08T16:25:39Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 232971 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जबलपूर|१०९ }}</noinclude>शिक्षणाची चांगली सोय केली पाहिजे व त्यांनीं उत्तम शिक्षक म्हणून नांवलौकिक मिळविला पाहिजे. असें झाल्यास सरकारी कॉलेज ओस पडण्याची वेळ येईल असे मला वाटलें. पण असें होईल तेव्हां खरें!<br>{{gap}}दुसरे दिवशी सकाळी माझ्या प्रोफेसर मित्रांना काम होतें म्हणून त्यांनी माझ्याबरोबर दोन विद्यार्थी दिले व आम्ही सकाळी टांग्यानें जबलपुरांतील दोन पुरातन प्रेक्षणीय स्थळे पाहण्यास गेलों. प्रथमतः आम्हीं मदन महाल नांवाच्या टेंकडीवर असलेली इमारत पाहिली. जबलपुरचे संगमरवरी खडक पाहण्यास ज्या रस्त्याने आम्ही आदले दिवशीं गेलो होतों त्याच रस्त्यानें दोनतीन मैल गेल्यावर आम्ही उजवीकडे टेंकड्यांच्या रांगेकडे वळलों व टेंकडीच्या पायथ्यापर्यंत पोहोंचलों. तेथून टेंकडी पायवाटेनें चढत चाललों. खरोखरीं ही एक टेंकडी नसून अर्धवर्तुळाकार अशी बरीच लांबलचक अशी टेकड्यांची ओळ आहे असें दिसून आलें. काय विलक्षण या टेंकड्यांच्या रांगेची रचना! या टेकड्या तांबूस काळसर दगडाच्या व तांबड्या मातीच्या असून सर्व टेंकड्यांवर विलक्षण आकाराचे प्रचंड राक्षसी दगडच दगड सर्वत्र पिसकरलेले आहेत. टेंकड्यांवर फारशी झाडी किंवा रान नाहीं. तरी पण तुरळक तुरळक अशीं आंब्याचीं व इतर झाडें लावलेली दिसली. या टेंकड्या म्हैसूर नजीकच्या चामुंडी टेकडीप्रमाणे थेट दिसतात. तेव्हां भगर्भशास्त्र दृष्ट्या या टेकड्या एकाच तऱ्हेनें बनलेल्या असाव्या व हे प्रचंड राक्षसी दगड हिमनगांनी असे सांधीकोंदींत घसरत आले असावे व मग हिमनग वितळून गेल्यामुळे हे जागचे जागीं स्थिर झाले असावे. हे मोठमोठे दगड एकमेकांवर राहिले आहेत तरी कसे असें आश्चर्य वाटतें. वाटेने जातांना एक प्रचंड शिला तर आधांत्रीं दुसऱ्या एका मोठ्या दगडावर असलेली पाहून मला विलक्षण आश्चर्य वाटलें. ज्याप्रमाणें गारोडी लोक एका बोटावर मोठा एखादा पदार्थ तोलून धरतात, त्याप्रमाणें तो प्रचंड दगड अगदी बारिक व निमुळत्या आधारावर<noinclude></noinclude> eeqsn5qdyg2imjofga89guqkof34aie