विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.10 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१६४ 104 110944 233111 2026-07-12T14:06:14Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233111 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३० |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>येऊन गंगेचा प्रवाह पूर्वेकडे गेल्या दोनतीनशे वर्षांत सरकला असावा. किल्ल्याची तिसरी भिंत हल्लींच्या अलाहाबाद शहराच्या आग्नेय अंगास आहे. या भिंतीच्यामध्यें प्रवेशद्वार आहे व हल्लीं अलाहाबादेच्या नव्या वस्तीकडून येणारा फोर्टरोड थेट या तटाचे प्रवेशद्वाराचे समोरच येतो. आम्ही किल्ला पाहण्यास लागणारी परवानगी आधीं मिळवून ठेविली होती. तेव्हां आम्हीं फोर्ट रोडने किल्ल्याशीं आलों. इंग्रजी अंमलांत लष्करी खात्यानें तटाचे अलीकडे मातीचा मोठा बंधारा घातलेला आहे. त्यांतल्या खिंडवजा सडकेनें आम्हीं तटाचे नजीक गेलों. पूर्वकाळीं तटाचे सभोंवार खंदक होता. हल्लीं तो खंदक कोरडा ठणठणीत आहे. त्या खंदकावरील पुलानें आमची मोटार प्रवेशद्वाराशीं गेली. तेथें युरोपीयन शिपायांचा संत्री पहारा होता. त्याला परवाना दाखविल्यामुळे त्या शिपायाने आमची मोटार आंत जाऊं दिली. किल्ल्याचे आंत प्रवेश केल्याबरोबर प्रथम आमचें लक्ष समोर उभ्या असलेल्या पुरातन व प्रख्यात अशोकस्तंभानें वेधलें. मोटार येथपर्यंतच नेण्याची परवानगी असल्यामुळे आम्हीं मोटार येथे थांबविली व अशोक स्तंभ पाहण्याकरितां आम्ही मोटारींतून बाहेर आलों.<br>{{gap}}हा अशोक स्तंभ पुरा चाळीस फूट उंचीचा असून तो एका अखंड दगडाचा वाटोळा स्तंभ आहे. इतर अशोकस्तंभांवर दिसून येणारे सिंहादि प्राण्याचें चित्र मात्र या स्तंभावर नाहीं. तें चित्र केव्हां व कसें नाहींसें झालें हें आतां सांगतां येत नाहीं. हा स्तंभ ख्रिस्ती शकापूर्वी २४० या वर्षी अशोक या बौद्धधर्मप्रचारक राजाने तयार करविला व त्यावर बौद्धधर्माच्या लोकांनीं नेहेमींच्या व्यवहारांत आचरावयाची धर्मतत्त्व अशोकाच्या प्रजाजनांस व धर्माधिकाऱ्यांस दिलेल्या आज्ञा म्हणून कोरून ठेविल्या. हा स्तंभ कौशांबी येथें प्रथम उभारला व मागाहून प्रयाग येथे उभारण्यांत आला कीं काय हा एक वादग्रस्त प्रश्न आहे. एका आज्ञेमध्यें कौशांबी शहराचा उल्लेख आहे यावरून तो प्रथमतः कौशांबी येथें असावा असा तर्क केलेला आहे, पण प्रयाग<noinclude></noinclude> bphkqot9gj429g7juccuj2qx0y24qkt पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१६५ 104 110945 233112 2026-07-12T14:09:03Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233112 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१३१ }}</noinclude>येथें गौतमबुद्ध कांहीं दिवस आला होता व त्यानें आपलीं धर्मतत्त्वें प्रयाग येथे लोकांना उपदेशिलीं होतीं; तसेंच अशोकही प्रयागला आलेला असून त्यानें तेथें स्तूप व स्तंभ उभारला होता. या गोष्टी पाली वाङ्मयावरून निर्विवाद सिद्ध होतात. तेव्हां सध्यांचा स्तंभच अशोकानें उभारलेला असणें अगदीं शक्य नव्हें हें अगदीं सत्य दिसतें. कारणं या स्तंभावर निरनिराळ्या काळचे शिलालेख कोरलेले आहेत. तेव्हां कौशांबीच्या उल्लेखाचा शिलालेखही मागाहून कोरलेला असणें शक्य आहे. सध्यां या शिलालेखावर अशोकाच्या प्रमुख व प्रख्यात साही आज्ञा कोरलेल्या आहेत, नंतर समुद्रगुप्त सम्राटाच्या दिग्विजयाबद्दलची लेख आहे, नंतर दोन लहान आज्ञा लेख आहेत, पुढे जहांगिर बादशाहाच्या राज्यारोहणाबद्दलचा परशीयन भाषेतील लेख आहे व शेवटीं त्या काळानंतरचेही लेख आहेत!<br>{{gap}}अशोकाचा हा स्तंभ पाहिला व त्यावरील पुरातन काळापासूनचे नाना शिलालेख अवलोकन केलें तेव्हां मला काय वाटलें हें सांगणें कठीण आहे. इतक्या जुन्या काळीं या अखंड दगडाचें कोरीव काम कसें केलें असेल व इतका प्रचंड स्तंभ हल्लींचीं यांत्रिक साधने नसतांना जागेवर आणून तो बांधलेल्या जोत्यावर बसवून कशा तऱ्हेनें उभा केला गेला असेल या सर्वच गोष्टींचें मला सारखें आश्चर्य वाटत होतें. हिंदुस्थानांत उदय पावलेल्या पण हिंदुस्थानांत आतां नामशेष झालेल्या पण हिंदुस्थानाबाहेर पसरलेल्या व आजतागाईत चालू राहिलेल्या बौद्धधर्माची तत्त्वे यांची व पुढील काळच्या राजवटीची माहिती देणारा तो मूर्तिमंत इतिहास पाहून मला विलक्षण आनंद व अभिमान वाटला. त्या अशोक स्तंभाच्या दर्शनानें असे मिश्र मनोविकार माझ्या मनांत उद्भूत झाले.<br>{{gap}}हा स्तंभ किल्ल्याचे प्रवेशदरवाज्याचे आंत पण खुल्या आवारांतच आहे. येथून जरा पुढे गेल्यावर आम्हांला ब्रिटिश अंमलांत बांधलेल्या<noinclude></noinclude> iqtm9evs7bu6qzk9lvz87tbfq7phqc7 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१६६ 104 110946 233113 2026-07-12T14:10:40Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "बराकी, दारूगोळा तयार करण्याकरितां आरसीनलच्या यंत्रयुक्त इमारती दृष्टीस पडल्या व या किल्ल्यामध्यें कितीतरी फेरफार झालेले आहेत हे ताबडतोब कळून आलें. अकबराचा राजवाडा व किल्ल्या..." 233113 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३२ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>बराकी, दारूगोळा तयार करण्याकरितां आरसीनलच्या यंत्रयुक्त इमारती दृष्टीस पडल्या व या किल्ल्यामध्यें कितीतरी फेरफार झालेले आहेत हे ताबडतोब कळून आलें. अकबराचा राजवाडा व किल्ल्याचा यमुनानदीकाठचा भाग पाहण्यास आणखी एक दरवाजा आहे व तो उघडण्या- करितां लागणाऱ्या किल्ल्या आणण्याकरितां एक शिपायी लष्करी कचेरीकडे गेला. इतक्या दरम्यान आम्ही या किल्ल्यांतील अशोक स्तंभापेक्षां जास्त पुरातन काळचा एक भाग पाहिला. प्रयागांतील हैं एक अत्यंत पवित्रस्थान गणलेलें आहे. त्याला हल्लीं यात्रेकरू व पंड्ये पाताळपुरी म्हणतात. हैं ठिकाण अकबराच्या राजवाड्याच्या भिंतीच्या बाहेर पण त्याचे आवाराचे आंत असून त्याचे बाजूला हल्लीं तारेचें कांपाऊंड घातलें आहे. या तारेच्या फाटकांतून आम्ही आत गेलों तो जमिनींत खोल दगडी जिना लागला. त्यानें खालीं गेल्यावर लांबच लांब व अरुंद अशी ग्यालरी सारखी गुहा लागली. या गुहेमध्यें पुष्कळ दगडी मूर्ती बसवि- लेल्या आहेत. प्रत्येक मूर्तीजवळ एक एक पुजारी बसलेला असून तो त्या त्या मूर्तीचं नांव सांगून पैसे मागत होता. येथें धर्मराज, इत्यादि पुराण पुरुषांच्या गोरखनाथ इत्यादि अर्वाचीन साधु पुरुषांच्या व इतर पुष्कळ देवांच्या मूर्ती आहेत; ही पाताळपुरी म्हणजे सध्यां नाना हिंदु देवांची देवपुरी झालेली आहे. अर्थात् प्रयागच्या पंड्यांनीं व बैरागी पंथाच्या महंतांनीं यात्रेकरूंकडून पैसे उकळण्याकरितां अर्वाचीन मथुरा- वृंदावनाच्या प्रमाणे तयार केलेल्या या जागा व मूर्ती आहेत असें माझ्या- सारख्या चिकित्सक माणसाच्या मनांत आल्याखेरीज राहिलें नाहीं. या पाताळपुरीच्या एका भागांत पुराण प्रसिद्ध अक्षयवाटाचा एक जुना बुंधा व खोड दाखविण्यांत येते. हा वटवृक्ष पूर्वी जीवंत असून तो अगदीं संगमाचे कांठावर होता. या वटवृक्षावरून मनुष्यानीं संगमामध्यें उडी मारून जलसमाधि घेतली म्हणजे तत्काळ मोक्षप्राप्ति होते अशी धार्मिक समजूत होती व यामुळे येथे किती तरी यात्रेकरू जलसमाधि घेत.<noinclude></noinclude> jd4tq80kwqvqcw6qc6ie0d4x4oobfjn 233121 233113 2026-07-12T15:23:18Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233121 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३२ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>बराकी, दारूगोळा तयार करण्याकरितां आरसीनलच्या यंत्रयुक्त इमारती दृष्टीस पडल्या व या किल्ल्यामध्यें कितीतरी फेरफार झालेले आहेत हे ताबडतोब कळून आलें. अकबराचा राजवाडा व किल्ल्याचा यमुनानदीकाठचा भाग पाहण्यास आणखी एक दरवाजा आहे व तो उघडण्याकरितां लागणाऱ्या किल्ल्या आणण्याकरितां एक शिपायी लष्करी कचेरीकडे गेला. इतक्या दरम्यान आम्ही या किल्ल्यांतील अशोक स्तंभापेक्षां जास्त पुरातन काळचा एक भाग पाहिला. प्रयागांतील हे एक अत्यंत पवित्रस्थान गणलेलें आहे. त्याला हल्लीं यात्रेकरू व पंड्ये '''पाताळपुरी''' म्हणतात.<br>{{gap}}हे ठिकाण अकबराच्या राजवाड्याच्या भिंतीच्या बाहेर पण त्याचे आवाराचे आंत असून त्याचे बाजूला हल्लीं तारेचें कांपाऊंड घातलें आहे. या तारेच्या फाटकांतून आम्ही आत गेलों तो जमिनींत खोल दगडी जिना लागला. त्यानें खालीं गेल्यावर लांबच लांब व अरुंद अशी ग्यालरी सारखी गुहा लागली. या गुहेमध्यें पुष्कळ दगडी मूर्ती बसविलेल्या आहेत. प्रत्येक मूर्तीजवळ एक एक पुजारी बसलेला असून तो त्या त्या मूर्तीचं नांव सांगून पैसे मागत होता. येथें धर्मराज, इत्यादि पुराण पुरुषांच्या गोरखनाथ इत्यादि अर्वाचीन साधु पुरुषांच्या व इतर पुष्कळ देवांच्या मूर्ती आहेत; ही पाताळपुरी म्हणजे सध्यां नाना हिंदु देवांची देवपुरी झालेली आहे. अर्थात् प्रयागच्या पंड्यांनीं व बैरागी पंथाच्या महंतांनीं यात्रेकरूंकडून पैसे उकळण्याकरितां अर्वाचीन मथुरा- वृंदावनाच्या प्रमाणे तयार केलेल्या या जागा व मूर्ती आहेत असें माझ्यासारख्या चिकित्सक माणसाच्या मनांत आल्याखेरीज राहिलें नाहीं. या पाताळपुरीच्या एका भागांत पुराण प्रसिद्ध '''अक्षयवाटाचा''' एक जुना बुंधा व खोड दाखविण्यांत येते. हा वटवृक्ष पूर्वी जीवंत असून तो अगदीं संगमाचे कांठावर होता. या वटवृक्षावरून मनुष्यानीं संगमामध्यें उडी मारून जलसमाधि घेतली म्हणजे तत्काळ मोक्षप्राप्ति होते अशी धार्मिक समजूत होती व यामुळे येथे किती तरी यात्रेकरू जलसमाधि घेत.<noinclude></noinclude> p54u8k2tdwmf7texvliyqcuelh85vdh पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१६७ 104 110947 233114 2026-07-12T14:10:50Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "ही पाताळपुरीची जागा पाहिली म्हणजे किल्ला होण्यापूर्वी येथें पूर्व- काळीं संगम असला पाहिजे व जरी सध्यांच्या देवाच्या मूर्ती व गुहेसारखा बांधलेला भाग व अक्षयवट वृक्षाचे खोड हैं..." 233114 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१३३ }}</noinclude>ही पाताळपुरीची जागा पाहिली म्हणजे किल्ला होण्यापूर्वी येथें पूर्व- काळीं संगम असला पाहिजे व जरी सध्यांच्या देवाच्या मूर्ती व गुहेसारखा बांधलेला भाग व अक्षयवट वृक्षाचे खोड हैं अलीकडील काळांतील असले तरी अक्षयवट वृक्षाचें मूळ ठिकाण हेच असले पाहिजे असे वाटल्यावांचून रहात नाहीं. ज्याप्रमाणें अकबरानें हिंदुसमाजातील सतीची चाल बंद केली होती त्याप्रमाणे हिंदु लोकांतील जलसमाधीची अमानुष चाल आपोआप बंद पडावी अशा उद्देशानें अकबरानें संगमाची जागा किल्ला बांध- ण्यांस पसंत केली असावी असें वाटतें. त्यायोगें हैं ठिकाण किल्ल्याच्या आवारांत येऊन संगम आपोआप दुरावला असला पाहिजे. पाताळपुरी पाहून होत आहे तोंच अकबराच्या राजवाड्याचा दर- वाजा उघडण्यांत आला व आम्हीं आंत शिरलों. या राजवाड्याचा - पुष्कळसा भाग लष्करच्या ताब्यांत असल्यामुळे पहावयास सांपडत नाहीं. फक्त दिल्लीच्या दिवाणी आमसारखा जो एक दिवाणखाना राजवाड्यांत होता तेवढाच हल्ली प्रवाशास दाख- विला जातो. हा चाळीस खांबाचा दिवाणखाना तांबड्या दगडाचा असून खांबावरील नक्षीकाम वाखाणण्यासारखें आहे व दिवाण- खान्याची बांधणी मोठी प्रमाणशीर व चतुराईची असल्यामुळे या दिवाणखान्याचा मनावर मोठा अनुकूल परिणाम होतो. हा दिवाण- खाना यमुनानदीच्या प्रवाहाला लागून असलेल्या तटाशेजारीच आहे. दिवाणखाना पाहिल्यावर आम्हीं किल्ल्याच्या तटाशीं उभे राहिलों तोंच तटाला खेटून जाणारा यमुनानदीचा काळसर निळसर रंगाच्या पाण्याचा तो प्रवाह; डाव्या हाताच्या बाजूस दिसणारें तें वाळंवट व त्याचे पलीकडे गंगायमुनेचा तो संगम हा देखावा एकसमयावच्छेदे करून दृष्टीस पडला व तो पाहून सानंदआश्चर्य वाटलें. या तटाशीं आम्ही क्षणभर उभे राहिलों व मग तडक परत येऊन आमची मोटार गाठली.<noinclude></noinclude> 3pycbefdpya1ik1fgpom6ixy9ml3mdq 233122 233114 2026-07-12T15:26:22Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233122 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१३३ }}</noinclude>ही पाताळपुरीची जागा पाहिली म्हणजे किल्ला होण्यापूर्वी येथें पूर्वकाळीं संगम असला पाहिजे व जरी सध्यांच्या देवाच्या मूर्ती व गुहेसारखा बांधलेला भाग व अक्षयवट वृक्षाचे खोड हे अलीकडील काळांतील असले तरी अक्षयवट वृक्षाचें मूळ ठिकाण हेच असले पाहिजे असे वाटल्यावांचून रहात नाहीं.<br>{{gap}}ज्याप्रमाणें अकबरानें हिंदुसमाजातील सतीची चाल बंद केली होती त्याप्रमाणे हिंदु लोकांतील जलसमाधीची अमानुष चाल आपोआप बंद पडावी अशा उद्देशानें अकबरानें संगमाची जागा किल्ला बांधण्यांस पसंत केली असावी असें वाटतें. त्यायोगें हे ठिकाण किल्ल्याच्या आवारांत येऊन संगम आपोआप दुरावला असला पाहिजे.<br>{{gap}}पाताळपुरी पाहून होत आहे तोंच अकबराच्या राजवाड्याचा दरवाजा उघडण्यांत आला व आम्हीं आंत शिरलों. या राजवाड्याचा पुष्कळसा भाग लष्करच्या ताब्यांत असल्यामुळे पहावयास सांपडत नाहीं. फक्त दिल्लीच्या दिवाणी आमसारखा जो एक दिवाणखाना राजवाड्यांत होता तेवढाच हल्ली प्रवाशास दाखविला जातो. हा चाळीस खांबाचा दिवाणखाना तांबड्या दगडाचा असून खांबावरील नक्षीकाम वाखाणण्यासारखें आहे व दिवाणखान्याची बांधणी मोठी प्रमाणशीर व चतुराईची असल्यामुळे या दिवाणखान्याचा मनावर मोठा अनुकूल परिणाम होतो. हा दिवाणखाना यमुनानदीच्या प्रवाहाला लागून असलेल्या तटाशेजारीच आहे. दिवाणखाना पाहिल्यावर आम्हीं किल्ल्याच्या तटाशीं उभे राहिलों तोंच तटाला खेटून जाणारा यमुनानदीचा काळसर निळसर रंगाच्या पाण्याचा तो प्रवाह; डाव्या हाताच्या बाजूस दिसणारें तें वाळंवट व त्याचे पलीकडे गंगायमुनेचा तो संगम हा देखावा एकसमयावच्छेदे करून दृष्टीस पडला व तो पाहून सानंदआश्चर्य वाटलें. या तटाशीं आम्ही क्षणभर उभे राहिलों व मग तडक परत येऊन आमची मोटार गाठली.<noinclude></noinclude> 4t0xmhhmshymifmfiu5smqigcx0zfse पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१६८ 104 110948 233115 2026-07-12T14:10:58Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "कोर्ट रोडने परत येतांना आम्ही मँडटकारोडवर असलेल्या अलोपीबाग नांवाच्या देवळांच्या समूहावर ओझरती नजर टाकली. या छोट्या देवळा- सभोवार छोटी बाग आहे. नंतर गंगा प्रवाहाच्या बाजूला व श..." 233115 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३४ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>कोर्ट रोडने परत येतांना आम्ही मँडटकारोडवर असलेल्या अलोपीबाग नांवाच्या देवळांच्या समूहावर ओझरती नजर टाकली. या छोट्या देवळा- सभोवार छोटी बाग आहे. नंतर गंगा प्रवाहाच्या बाजूला व शहराच्या पूर्व टोकाला वसलेल्या दारागंज या प्रख्यात पेठेतून आलों. शहराचा हा भाग काशी, मथुरा, वृंदावनाप्रमाणें फार दाट वस्तीचा भाग आहे. या भागांतले रस्ते फार अरुंद असून त्यांपैकीं कांहीं कांहीं फरसबंदी आहेत. प्रयागशहरी कायमचे रहिवाशी झालेल्या महाराष्ट्रीयांची वस्ती या भागांतच आहे; तसेंच या भागांत पुष्कळ बंगाली लोक रहातात असें कळलें. दारागंज पेट ही गंगानदीचे वाळवंट व दारागंज स्टेशनपर्यंत आलेला ई. आय रेलवेचा फाटा यांचे दरम्यान दक्षिणोत्तर लांबचलांब पट्टीप्रमाणे वसलेली आहे. या दारागंजाचे उत्तर टोकास वासुकीनागाचे देऊळ असून त्या नजीक नागवासूबाट नांवाचा घाट बांध- लेला आहे. पण प्रयागला काशीप्रमाणे घाट फारसे नाहींत. कारण दोन्ही नयांचे तीर वालुकामय मातीचे असल्यामुळे घाट बांधण्यास घट्ट जमीनच नाहीं. नंतर आम्हीं वाल्मिकीरामायणांत वर्णन केलेल्या भारद्वाजाश्रमाच्या भागांतून ( हल्लीं त्याला कर्नलगंज म्हणतात ) गेलों. दंतकथेप्रमाणे भारद्वाज हा हजार विद्यार्थ्यांना शिकविणारा कुलपती होता व त्याचा आश्रम येथें गंगातटाकी ( नजीक अजूनही गंगानदीचे वळण आलेले दिसतें) होता. त्याच भागांत हल्लींच्या अलाहाबाद विश्वविद्यालयाच्या इमारती व त्यांची मोठी मोठी विद्यार्थीवसति- गृहें आहेत हे पाहून मला सरस्वतीच्या पुरातन काळापासूनच्या या निवासस्थानाबद्दल आश्चर्य व आनंद वाटला. आनंदभवन व युनिव्हर्सिटी कॉलेजवरून आम्हीं विन्हाडीं आलों. सायंकाळी आम्हीं फोर्ट रोडनें यमुनानदीच्या कांठानें यमुनानदीवरील पुलाकडे जाणाऱ्या सुंदर सहल-सडकेनें जुन्या शहरापर्यंत गेलों. या सडकेच्या डाव्या हातास नवीन मिंटो पार्क बनविण्यांत आला आहे व त्यांतच राणीच्या जाहीरनाम्याचा स्मारक स्तंभ उभारला<noinclude></noinclude> 3brjfgz94pq3v9s6n3wv2a0juz6rwus 233123 233115 2026-07-12T15:31:22Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233123 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३४ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>कोर्टरोडने परत येतांना आम्ही मँडटकारोडवर असलेल्या अलोपीबाग नांवाच्या देवळांच्या समूहावर ओझरती नजर टाकली. या छोट्या देवळासभोवार छोटी बाग आहे. नंतर गंगा प्रवाहाच्या बाजूला व शहराच्या पूर्व टोकाला वसलेल्या दारागंज या प्रख्यात पेठेतून आलों. शहराचा हा भाग काशी, मथुरा, वृंदावनाप्रमाणें फार दाट वस्तीचा भाग आहे. या भागांतले रस्ते फार अरुंद असून त्यांपैकीं कांहीं कांहीं फरसबंदी आहेत. प्रयागशहरी कायमचे रहिवाशी झालेल्या महाराष्ट्रीयांची वस्ती या भागांतच आहे; तसेंच या भागांत पुष्कळ बंगाली लोक रहातात असें कळलें. दारागंज पेठ ही गंगानदीचे वाळवंट व दारागंज स्टेशनपर्यंत आलेला ई. आय रेलवेचा फाटा यांचे दरम्यान दक्षिणोत्तर लांबचलांब पट्टीप्रमाणे वसलेली आहे. या दारागंजाचे उत्तर टोकास वासुकीनागाचे देऊळ असून त्या नजीक '''नागवासूघाट''' नांवाचा घाट बांधलेला आहे. पण प्रयागला काशीप्रमाणे घाट फारसे नाहींत. कारण दोन्ही नद्यांचे तीर वालुकामय मातीचे असल्यामुळे घाट बांधण्यास घट्ट जमीनच नाहीं. नंतर आम्हीं वाल्मिकीरामायणांत वर्णन केलेल्या भारद्वाजाश्रमाच्या भागांतून (हल्लीं त्याला कर्नलगंज म्हणतात) गेलों. दंतकथेप्रमाणे भारद्वाज हा हजार विद्यार्थ्यांना शिकविणारा कुलपती होता व त्याचा आश्रम येथें गंगातटाकी (नजीक अजूनही गंगानदीचे वळण आलेले दिसतें) होता. त्याच भागांत हल्लींच्या अलाहाबाद विश्वविद्यालयाच्या इमारती व त्यांची मोठी मोठी विद्यार्थीवसतिगृहें आहेत हे पाहून मला सरस्वतीच्या पुरातन काळापासूनच्या या निवासस्थानाबद्दल आश्चर्य व आनंद वाटला. आनंदभवन व युनिव्हर्सिटी कॉलेजवरून आम्हीं बिऱ्हाडीं आलों. सायंकाळी आम्हीं फोर्ट रोडनें यमुनानदीच्या कांठानें यमुनानदीवरील पुलाकडे जाणाऱ्या सुंदर सहल-सडकेनें जुन्या शहरापर्यंत गेलों. या सडकेच्या डाव्या हातास नवीन मिंटो पार्क बनविण्यांत आला आहे व त्यांतच राणीच्या जाहीरनाम्याचा स्मारक स्तंभ उभारला<noinclude></noinclude> k97aq0fn428bx72lu103xyi8jdyihha पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१६९ 104 110949 233116 2026-07-12T14:11:07Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "आहे. कारण राणीचा जाहीरनामा प्रथम अलाहाबादमध्यें प्रसिद्ध करण्यांत आला. त्याची माहिती पुढे या प्रकरणाच्या ऐतिहासिक भागांत येईल. येथून पूर्वपश्चिम वाहणाऱ्या यमुना नदीचा तो शांत..." 233116 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१३५ }}</noinclude>आहे. कारण राणीचा जाहीरनामा प्रथम अलाहाबादमध्यें प्रसिद्ध करण्यांत आला. त्याची माहिती पुढे या प्रकरणाच्या ऐतिहासिक भागांत येईल. येथून पूर्वपश्चिम वाहणाऱ्या यमुना नदीचा तो शांत, गंभीर, काळसर प्रवाह व त्याचे पलीकडील क्षितिजापर्यंत भिडलेला सपाट, सुपीक, अफाट तो प्रदेश यांचें मोठें नवल वाटतें. पूर्वकाळीं यमुनानदी पार पडण्याकरितां तरीचा उपयोग करावा लागे; तें 'तरबंदर ' या सडकेला लागूनच आहे. तेथे पढकासा इमारतीचा अवशेष आहे. दाट वस्तीच्या जुन्या शहरांतील एका रस्त्यानें आम्ही परत बिन्हाडीं आलों. अलाहाबादेतील जुनीं नवीं प्रेक्षणीय स्थळे पाहून झालीं व दृश्यदर्शन- प्रिय प्रवासी या नात्यानें माझें अलाहाबादेतील काम संपलें. धार्मिक यात्रेकरू प्रयागला ज्या धार्मिक विधीकरितां येतात ते विधी, मुंडन व पिंडदान मला करावयाचें नव्हतें. तरी पण सेतुरामेश्वरी समुद्र- संगमावर स्नान करून कांहींसा कौतुकानें, कांहींसा तेथल्या नव्या ओळखीच्या उपाध्यायाला कांहींतरी पोहोंचविण्याच्या उद्देशानें आण- लेला सेतू (सेतुरामेश्वरीं नारळाच्या बेल्यांत भरून आणलेली वाळू ) प्रयागच्या संगमांत टाकावयाचा व विशेषतः आरबी समुद्र व बंगालचा उपसागर या समुद्रसंगमस्थानीं केलेल्या स्नानाप्रमाणें गंगायमुना नद्यांच्या संगमस्थानीं स्नान करावयाचें असा माझा प्रथमपासून बेत होता. अर्थात् भाविक यात्रेकरू संगमस्नान हा एक पुण्यदायक प्रमुख धार्मिक विधि मानतात तशी जरी माझी भावना नव्हती तरी स्नानाचा अनुभव व विशेषतः संगमाची शोभा पहाण्याची माझी हौस होती. मात्र माझे मित्र प्रो. रानडे यांच्या नाजुक प्रकृतीमुळे ते माझ्याबरोबर येऊ शकले नाहींत. म्हणून मी त्यांच्या येथल्या पुरुष मंडळीसकट रविवार ता. ३१ मार्च १९३५ रोजी सकाळीं मोटारीनें गंगायमुना नद्यांच्या संगमावर स्नानास आलों. मागें सांगि- तल्याप्रमाणे गंगायमुना नद्यांचा संगम शहराच्या आग्नेय दिशेस आहे. गंगारोड नांवाच्या रस्त्यानें आम्ही गेलों. नदीच्या प्रवाहाच्या आधीं<noinclude></noinclude> eagrh28dd8tsmfcqpwxrxklssvw28jr 233124 233116 2026-07-12T15:35:05Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233124 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१३५ }}</noinclude>आहे. कारण राणीचा जाहीरनामा प्रथम अलाहाबादमध्यें प्रसिद्ध करण्यांत आला. त्याची माहिती पुढे या प्रकरणाच्या ऐतिहासिक भागांत येईल. येथून पूर्वपश्चिम वाहणाऱ्या यमुना नदीचा तो शांत, गंभीर, काळसर प्रवाह व त्याचे पलीकडील क्षितिजापर्यंत भिडलेला सपाट, सुपीक, अफाट तो प्रदेश यांचें मोठें नवल वाटतें. पूर्वकाळीं यमुनानदी पार पडण्याकरितां तरीचा उपयोग करावा लागे; तें ''''तरबंदर'''' या सडकेला लागूनच आहे. तेथे पडकासा इमारतीचा अवशेष आहे. दाट वस्तीच्या जुन्या शहरांतील एका रस्त्यानें आम्ही परत बिऱ्हाडीं आलों.<br>{{gap}}अलाहाबादेतील जुनीं नवीं प्रेक्षणीय स्थळे पाहून झालीं व दृश्यदर्शनप्रिय प्रवासी या नात्यानें माझें अलाहाबादेतील काम संपलें. धार्मिक यात्रेकरू प्रयागला ज्या धार्मिक विधीकरितां येतात ते विधी, मुंडन व पिंडदान मला करावयाचें नव्हतें. तरी पण सेतुरामेश्वरी समुद्र- संगमावर स्नान करून कांहींसा कौतुकानें, कांहींसा तेथल्या नव्या ओळखीच्या उपाध्यायाला कांहींतरी पोहोंचविण्याच्या उद्देशानें आणलेला सेतू (सेतुरामेश्वरीं नारळाच्या बेल्यांत भरून आणलेली वाळू) प्रयागच्या संगमांत टाकावयाचा व विशेषतः आरबी समुद्र व बंगालचा उपसागर या समुद्रसंगमस्थानीं केलेल्या स्नानाप्रमाणें गंगायमुना नद्यांच्या संगमस्थानीं स्नान करावयाचें असा माझा प्रथमपासून बेत होता. अर्थात् भाविक यात्रेकरू संगमस्नान हा एक पुण्यदायक प्रमुख धार्मिक विधि मानतात तशी जरी माझी भावना नव्हती तरी स्नानाचा अनुभव व विशेषतः संगमाची शोभा पहाण्याची माझी हौस होती. मात्र माझे मित्र प्रो. रानडे यांच्या नाजुक प्रकृतीमुळे ते माझ्याबरोबर येऊ शकले नाहींत. म्हणून मी त्यांच्या येथल्या पुरुष मंडळीसकट रविवार ता. ३१ मार्च १९३५ रोजी सकाळीं मोटारीनें गंगायमुना नद्यांच्या संगमावर स्नानास आलों. मागें सांगितल्याप्रमाणे गंगायमुना नद्यांचा संगम शहराच्या आग्नेय दिशेस आहे. गंगारोड नांवाच्या रस्त्यानें आम्ही गेलों. नदीच्या प्रवाहाच्या आधीं<noinclude></noinclude> krfbqois5hz0nscmkdwd0ugmjw8c97n पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१७० 104 110950 233117 2026-07-12T14:11:16Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "सुमारें दोन मैलांचें पांढऱ्या वाळूचें वाळवंट लागतें. याच अफाट वाळ- वंटामध्ये बारा वर्षानें भरणाऱ्या कुंभमेळ्याचे वेळीं हजारों झोपड्या यात्रेकरूंकरितां घालतात असे मला सांगण्..." 233117 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३६ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>सुमारें दोन मैलांचें पांढऱ्या वाळूचें वाळवंट लागतें. याच अफाट वाळ- वंटामध्ये बारा वर्षानें भरणाऱ्या कुंभमेळ्याचे वेळीं हजारों झोपड्या यात्रेकरूंकरितां घालतात असे मला सांगण्यांत आलें. प्रथमतः यमुना- नदीचे पात्र व प्रवाह लागतो. पात्राचे कडेला होडयाच होड्या दिसतात. त्याची मोठी मौज वाटते. या संगमाचे स्थानीं सुमारें दोन हजार होड्या आहेत. प्रत्येक होडीवर १४ रुपये वार्षिक कर आहे. ही एक म्युनिसिपालिटीच्या उत्पन्नाची मोठी बाब आहे. या होडीत बसून गंगा- यमुना यांचे संगमाचे ठिकाणी जाऊन स्नान करण्याची पद्धत आहे. दोन्ही नद्यांचा जेथे संगम होतो तेथें दोन्ही प्रवाहांची वाळू येऊन जमते यामुळे येथें पाणी खोल नसतें. सुमारें तीस वर्षांपूर्वी मी प्रयागला दिजंबर महिन्यांत आलों होतों. तेव्हां संगमावर मी स्नानास गेलों होतों त्यावेळीं छातीभर पाणी संगमस्थानी होते असें मला आठवतें. या खेपेस कमरभर सुद्धां पाणी संगमस्थानीं नव्हतें. इतके पाणी कमी होतें तरी गंगायमुना यांच्या पाण्यामध्यें पांढरा व काळसर हा रंगाचा फरक स्पष्ट दिसत होता ! काय विलक्षण तो देखावा ! दोन्ही नद्यांचे प्रवाह संथपणे वहात वहात संगमस्थानीं जवळ जवळ स्थिर राहून मग दुसऱ्या दिशेनें एकत्र होऊन वहात जात होते. येथें स्नान करण्याची मोठी मौज वाटली. एक दोन बुड्या मारून मी आंग वगैरे घुघून स्नान केलें. पायाखालची वाळू सारखी घसरत असते यामुळे किंचित् भीति वाटते. बाकीं पाणी जास्त नसल्यामुळें व तें जोरानें वहात नसल्यामुळे येथें स्नान करणं मुळींच धोक्याचें नाहीं. गंगायमुना संगमाचे ठिकाणीं स्नान करीत असतांना मला माझ्या सेतु रामेश्वरीं केलेल्या स्नानाची सारखी आठवण होत होती. दोन समुद्रांच्या संगमावर (सेतुरामेश्वरीं ) मी ता. २७ डिसेंबर १९३३ रोजी स्नान केलें होतें. तेथेही दोन समुद्रांच्या पाण्याच्या रंगाचा विलक्षण देखावा दिसतो. आरबी समुद्राचे पाणी निळसर आहे तर बंगालच्या उपसागराचें पाणी हिरवट आहे. पण तेथें लाटांचा काय विलक्षण थयथयाट ! यामुळे रामेश्वरीं स्नान करतांना<noinclude></noinclude> 1kbspiv89pv48rwk4skgco5ipn6jrx7 233125 233117 2026-07-12T15:38:09Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233125 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३६ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>सुमारें दोन मैलांचें पांढऱ्या वाळूचें वाळवंट लागतें. याच अफाट वाळवंटामध्ये बारा वर्षानें भरणाऱ्या कुंभमेळ्याचे वेळीं हजारों झोपड्या यात्रेकरूंकरितां घालतात असे मला सांगण्यांत आलें. प्रथमतः यमुनानदीचे पात्र व प्रवाह लागतो. पात्राचे कडेला होड्याच होड्या दिसतात. त्याची मोठी मौज वाटते. या संगमाचे स्थानीं सुमारें दोन हजार होड्या आहेत. प्रत्येक होडीवर १४ रुपये वार्षिक कर आहे. ही एक म्युनिसिपालिटीच्या उत्पन्नाची मोठी बाब आहे. या होडीत बसून गंगा-यमुना यांचे संगमाचे ठिकाणी जाऊन स्नान करण्याची पद्धत आहे. दोन्ही नद्यांचा जेथे संगम होतो तेथें दोन्ही प्रवाहांची वाळू येऊन जमते यामुळे येथें पाणी खोल नसतें. सुमारें तीस वर्षांपूर्वी मी प्रयागला दिजंबर महिन्यांत आलों होतों. तेव्हां संगमावर मी स्नानास गेलों होतों त्यावेळीं छातीभर पाणी संगमस्थानी होते असें मला आठवतें. या खेपेस कमरभर सुद्धां पाणी संगमस्थानीं नव्हतें. इतके पाणी कमी होतें तरी गंगायमुना यांच्या पाण्यामध्यें पांढरा व काळसर हा रंगाचा फरक स्पष्ट दिसत होता! काय विलक्षण तो देखावा! दोन्ही नद्यांचे प्रवाह संथपणे वहात वहात संगमस्थानीं जवळ जवळ स्थिर राहून मग दुसऱ्या दिशेनें एकत्र होऊन वहात जात होते. येथें स्नान करण्याची मोठी मौज वाटली. एक दोन बुड्या मारून मी आंग वगैरे घुवून स्नान केलें. पायाखालची वाळू सारखी घसरत असते यामुळे किंचित् भीति वाटते. बाकीं पाणी जास्त नसल्यामुळें व तें जोरानें वहात नसल्यामुळे येथें स्नान करणे मुळींच धोक्याचें नाहीं. गंगायमुना संगमाचे ठिकाणीं स्नान करीत असतांना मला माझ्या सेतु रामेश्वरीं केलेल्या स्नानाची सारखी आठवण होत होती. दोन समुद्रांच्या संगमावर (सेतुरामेश्वरीं) मी ता. २७ डिसेंबर १९३३ रोजी स्नान केलें होतें. तेथेही दोन समुद्रांच्या पाण्याच्या रंगाचा विलक्षण देखावा दिसतो. आरबी समुद्राचे पाणी निळसर आहे तर बंगालच्या उपसागराचें पाणी हिरवट आहे. पण तेथें लाटांचा काय विलक्षण थयथयाट! यामुळे रामेश्वरीं स्नान करतांना<noinclude></noinclude> dbcwrs8tmdgcfdh7k3nox0ndtfu89ax पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१७३ 104 110951 233118 2026-07-12T14:11:26Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "फार भीति वाटते. तेथे तर उभे राहण्याची सोय नाहीं. कारण लाटेच्या जोरानें मनुष्य उभा असल्यास पालथा पडण्याची फार भीति. तेथेही पायाखालची वाळू सरासर सरत असते. मात्र तेथें मुद्दाम बुडी..." 233118 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१३७ }}</noinclude>फार भीति वाटते. तेथे तर उभे राहण्याची सोय नाहीं. कारण लाटेच्या जोरानें मनुष्य उभा असल्यास पालथा पडण्याची फार भीति. तेथेही पायाखालची वाळू सरासर सरत असते. मात्र तेथें मुद्दाम बुडी मारण्याची जरूरी नाहीं. गुडघ्या भर पाण्यांत आपण बसून राहावें म्हणजे समुद्राची लाट नेमकी आपल्या डोक्यावरून जाते. लाटेच्या त्या जोराच्या लोंढ्यानें मनुष्याचे तोंड गोरें मोरें होतें व प्रथमतः तर फारच भीति वाटते ! सेतुरामेश्वरचे दृश्य भव्य व भीतिदायक वाटतें. तरी पण त्या अफाट क्षितिजापर्यंत पसरलेल्या दोन्ही समुद्रांचें विलक्षण आश्चर्य वाटतें. त्या मानानें गंगायमुनेचें संगमस्थान स्थिर व शांत भासतें. मात्र येथें अफाट, सपाट असें वाळंवट दिसतें. पाण्याचे प्रवाह मर्यादित भासतात ! याप्रमाणें गंगायमुना संगमस्थान व रामेश्वरचे समुद्रसंगमस्थान यामधलें साम्य: वैषम्य माझ्या मनांत सारखे घोळत असतांना मी आपलें स्नान आटो पलें व रामेश्वराहून आणलेला सेतु या संगमस्थानीं टाकून मला स्नान - आटोपल्यावर आम्हीं होडींत बसलों व होडी थोडीशी भाप्रवाहांतून किल्ल्याचे बाजूस नेली. नदीप्रवाहामधून किल्ल्यावर देखावा मोठा रमणीय दिसला. इतकें झाल्यावर उशीर झाला म्हणून अ परतलों व नदीतीरावर येऊन प्रमुदितमनानें मोटारीत बसून हा परत आलों. सायंकाळी आम्ही पुन्हां एकदां शहराच्या उत्तर टोकाला असलेल्या कर्झन पुलापर्यंत सहल करावयास गेलें ता. १ एप्रिल हा दिवस मी कारण त्यांनी कॉलेजांतली रानडे ज्यांचे बंगल्यावर काढला. या शाखेची प्रोफेसरमंडळी आणि कलकत्ता व नागपूर येथून आलेले दोन तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर यांना चहापार्टी दिली होती. त्यामध्यें माझे पुण्याचे जुने मित्र रे. रॉबर्टसन हे होते. पुष्कळ दिवसांनी त्यांची भेट झाल्यामुळे मला फार आनंद वाटला. दुसरे दिवशीं पहांटेस सहाचे गाडीनें पुढील प्रवासास<noinclude></noinclude> 3k2gh36p07s5kk15gocxqt883omwsd7 233126 233118 2026-07-12T15:44:34Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233126 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१३७ }}</noinclude>फार भीति वाटते. तेथे तर उभे राहण्याची सोय नाहीं. कारण लाटेच्या जोरानें मनुष्य उभा असल्यास पालथा पडण्याची फार भीति. तेथेही पायाखालची वाळू सरासर सरत असते. मात्र तेथें मुद्दाम बुडी मारण्याची जरूरी नाहीं. गुडघ्या भर पाण्यांत आपण बसून राहावें म्हणजे समुद्राची लाट नेमकी आपल्या डोक्यावरून जाते. लाटेच्या त्या जोराच्या लोंढ्यानें मनुष्याचे तोंड गोरें मोरें होतें व प्रथमतः तर फारच भीति वाटते! सेतुरामेश्वरचे दृश्य भव्य व भीतिदायक वाटतें. तरी पण त्या अफाट क्षितिजापर्यंत पसरलेल्या दोन्ही समुद्रांचें विलक्षण आश्चर्य वाटतें. त्या मानानें गंगायमुनेचें संगमस्थान स्थिर व शांत भासतें. मात्र येथें अफाट, सपाट असें वाळंवट दिसतें. पाण्याचे प्रवाह मर्यादित भासतात! याप्रमाणें गंगायमुना संगमस्थान व रामेश्वरचे समुद्रसंगमस्थान यामधलें साम्य- वैषम्य माझ्या मनांत सारखे घोळत असतांना मी आपलें स्नान आटोपलें व रामेश्वराहून आणलेला सेतु या संगमस्थानीं टाकून दिला. स्नान आटोपल्यावर आम्हीं होडींत बसलों व होडी थोडीशी यमुनाप्रवाहांतून किल्ल्याचे बाजूस नेली. नदीप्रवाहामधून किल्ल्याचा देखावा मोठा रमणीय दिसला. इतकें झाल्यावर उशीर झाला म्हणून आम्ही परतलों व नदीतीरावर येऊन प्रमुदितमनानें मोटारीत बसून बिऱ्हाडी परत आलों.<br>{{gap}}सायंकाळी आम्ही पुन्हां एकदां शहराच्या उत्तर टोकाला असलेल्या कर्झन पुलापर्यंत सहल करावयास गेलो. <br>{{gap}}ता. १ एप्रिल हा दिवस मी प्रो. रानडे ज्यांचे बंगल्यावर काढला. कारण त्यांनी कॉलेजांतली आपल्या शाखेची प्रोफेसरमंडळी आणि कलकत्ता व नागपूर येथून आलेले दोन तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर यांना चहापार्टी दिली होती. त्यामध्यें माझे पुण्याचे जुने मित्र रे. रॉबर्टसन हे होते. पुष्कळ दिवसांनी त्यांची भेट झाल्यामुळे मला फार आनंद वाटला. दुसरे दिवशीं पहांटेस सहाचे गाडीनें पुढील प्रवासास<noinclude></noinclude> 3kctwuctd948axti5mztelgmw0qrwgx पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१७४ 104 110952 233119 2026-07-12T14:11:36Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "निघालों. पण त्या प्रवासवर्णनास लागण्यापूर्वी प्रयागाची पूर्वपीठिका व अर्वाचीन काळपर्यंतची माहिती यांचा सारांश देणे इष्ट आहे. या शहराचे अलाहाबाद हे नांव सरकारीरीत्या व रेलवेर..." 233119 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३८ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>निघालों. पण त्या प्रवासवर्णनास लागण्यापूर्वी प्रयागाची पूर्वपीठिका व अर्वाचीन काळपर्यंतची माहिती यांचा सारांश देणे इष्ट आहे. या शहराचे अलाहाबाद हे नांव सरकारीरीत्या व रेलवेरस्त्याच्या रहदारीमुळे हल्लीं जास्त प्रचलित झाले असले तरी हें नांव अर्वाचीन काळचें आहे. या शहराचे पुरातन व यात्रेकरूंना प्रिय नांव म्हणजे प्रयाग है होय. ब्रह्मदेवानें येथें पुष्कळ याग केले म्हणून त्याला प्रयाग नांव पडलें. जरी प्रयाग शहर हिंदुस्थानांतील प्रख्यात नगरसप्तकांत अन्तर्भूत झालेले नाहीं तरी तीर्थराज अशी त्याची फार जुन्या काळा- पासून प्रख्याति आहे. गंगायमुना संगमावरील या तीर्थाचा महिमा खालील श्लोकांत वर्णिला आहे. सितासिते यत्र तरङ्गचामरे । नद्यौ विभाते मुनिभानुकन्यके ॥ नीलातपत्रं वट एवं साक्षात् । स तीर्थराजो जयति प्रयागः । गंगायमुना संगमस्थान या नात्यानें प्रयाग है आर्यांना फार पवित्र स्थान वाटत आले आहे. या संगमाचा उल्लेख खुद्द आपल्या ऋग्वेदांत सांपडतो. रामायण व महाभारत या राष्ट्रीय महा काव्यांत या संगमाचा अनेकदां निर्देश आला असून रामायण-महाभारतांतील प्रख्यात विभूति या स्थळीं आल्याचा उल्लेख आहे. राम, लक्ष्मण, सीता वनवासांत जातांना येथें भारद्वाजाश्रमी येऊन मग गंगा पार झाली असें वर्णन आहे. रावणाचा वध करून सीतेला घेऊन पुष्पक विमानांतून अयोध्येला परत जातांना राम, लक्ष्मण व सीता प्रयागाहून पुढें अयोध्येस गेलीं. कालिदासानें रघुवंशाच्या तेराव्या सर्गामध्यें गंगायमुनेच्या भिन्नरंगी प्रवाहांचे व संगमाचें अलंकारप्रचुर असें वर्णन खालील श्लोकपंचकांत केलें आहे.<noinclude></noinclude> m352kw2v1pv5qy2p6cwdlty9b8fsq2z 233127 233119 2026-07-12T15:50:06Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233127 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३८ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>निघालों. पण त्या प्रवासवर्णनास लागण्यापूर्वी प्रयागाची पूर्वपीठिका व अर्वाचीन काळपर्यंतची माहिती यांचा सारांश देणे इष्ट आहे.<br>{{gap}}या शहराचे '''अलाहाबाद''' हे नांव सरकारीरीत्या व रेलवेरस्त्याच्या रहदारीमुळे हल्लीं जास्त प्रचलित झाले असले तरी हें नांव अर्वाचीन काळचें आहे. या शहराचे पुरातन व यात्रेकरूंना प्रिय नांव म्हणजे प्रयाग हे होय. ब्रह्मदेवानें येथें पुष्कळ याग केले म्हणून त्याला प्रयाग नांव पडलें. जरी प्रयाग शहर हिंदुस्थानांतील प्रख्यात नगरसप्तकांत अन्तर्भूत झालेले नाहीं तरी '''तीर्थराज''' अशी त्याची फार जुन्या काळापासून प्रख्याति आहे. गंगायमुना संगमावरील या तीर्थाचा महिमा खालील श्लोकांत वर्णिला आहे. {{Block center|<poem>'''सितासिते यत्र तरङ्गचामरे ।''' '''नद्यौ विभाते मुनिभानुकन्यके ॥''' '''नीलातपत्रं वट एवं साक्षात् ।''' '''स तीर्थराजो जयति प्रयागः ।'''</poem>}} {{gap}}गंगायमुना संगमस्थान या नात्यानें प्रयाग हे आर्यांना फार पवित्र स्थान वाटत आले आहे. या संगमाचा उल्लेख खुद्द आपल्या ऋग्वेदांत सांपडतो. रामायण व महाभारत या राष्ट्रीय महा काव्यांत या संगमाचा अनेकदां निर्देश आला असून रामायण-महाभारतांतील प्रख्यात विभूति या स्थळीं आल्याचा उल्लेख आहे. राम, लक्ष्मण, सीता वनवासांत जातांना येथें भारद्वाजाश्रमी येऊन मग गंगा पार झाली असें वर्णन आहे. रावणाचा वध करून सीतेला घेऊन पुष्पक विमानांतून अयोध्येला परत जातांना राम, लक्ष्मण व सीता प्रयागाहून पुढें अयोध्येस गेलीं. कालिदासानें रघुवंशाच्या तेराव्या सर्गामध्यें गंगायमुनेच्या भिन्नरंगी प्रवाहांचे व संगमाचें अलंकारप्रचुर असें वर्णन खालील श्लोकपंचकांत केलें आहे.{{nop}}<noinclude></noinclude> 3hcplqpl8elkg67tciiyze1j4xtswce पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१७५ 104 110953 233120 2026-07-12T14:11:44Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "कचित् प्रभाले पिभिरिन्द्रनीलैर्मुक्तामयी यष्टिरिवानुविद्धा । अन्यत्र माला सितपंकजानामिंदीवरैरुत्खचितान्तरेव ॥ क्वचित्खगानां प्रियमानसानां कादम्बसंसर्गवतीवपङ्किः । अन..." 233120 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१३९ }}</noinclude>कचित् प्रभाले पिभिरिन्द्रनीलैर्मुक्तामयी यष्टिरिवानुविद्धा । अन्यत्र माला सितपंकजानामिंदीवरैरुत्खचितान्तरेव ॥ क्वचित्खगानां प्रियमानसानां कादम्बसंसर्गवतीवपङ्किः । अन्यत्र कालागरुदत्तपत्रा भक्तिर्भुवश्चन्दनकल्पितेव ॥ कचित्प्रभाचान्द्रमसी तमोभिच्छयाविलीनैः शबलीकृतेव । अन्यत्र शुभ्रा शरदभ्रलेखा रन्धेष्विवालक्ष्य नभः प्रदेशा | क्वचित्कृष्णोरगभूषणेव भस्माङ्गरागातनुरीश्वरस्य । पश्यानवद्याङ्गि विभाति गंगा भिन्नप्रवाहा यमुना तरंगैः । समुद्रकन्योर्जलसंनिपाते पूतात्मनामच किलाभिषेकात् । तयावत्रोधेन विनापिभूयस्तनुत्यजां नास्ति शरीरबन्धः ॥ १३९ हे सुंदरी ! यमुना नदीशीं संगम पावणाऱ्या या गंगेची शोभा अव- लोकन कर. त्यांच्यापैकीं एकीच्या पाण्याचा रंग काळा व दुसरीच्या पाण्याचा रंग पांढरा असल्यामुळे त्यांच्या संगमाची शोभा कोठें जणूं तेजस्वी इंद्रनील मणी आणि पांढरे शुभ्र मोती यांचेपासून बनविलेल्या हाराप्रमाणे दिसत आहे; तर कोठें मधून मधून नीलकमले घातलेल्या श्वेतकमलांच्या मालेप्रमाणे दिसत आहे; कोठें कृष्णवर्ण कादंच पक्ष्यांच्या थव्यामध्ये मिसळून गेलेल्या शुभ्र हंसांच्या समूहाप्रमाणें दिसत आहे; तर कोठें जणूं पृथ्वीच्या पृष्ठभागावर पांढऱ्या चंदनाच्या उटीच्या पार्श्व- भूमीवर काळ्या चंदनानें काढलेल्या वेलबुट्टीप्रमाणे दिसत आहे, कोठें वृक्षांच्या छायेमध्यें लपून बसलेल्या काळोखाच्यामुळे चित्रविचित्र ( शबल) दिसणाऱ्या शुभ्र चांदण्याप्रमाणे दिसत आहे; तर कोठें मधून मधून निळ्या आकाशाचें दर्शन देणाऱ्या शरत्कालीन शुभ्र मेघ- पंक्तीप्रमाणे दिसत आहे; आणि कोठें कृष्णसर्परूपी अलंकार धारण करणाऱ्या श्रीशंकराच्या भस्मसित देहाप्रमाणे भासत आहे.<noinclude></noinclude> lc6opfxnq3nu33q0xmtovjd02w5eohg 233128 233120 2026-07-12T16:01:41Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233128 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१३९ }}</noinclude>{{center|'''प्रयाग'''}} {{Block center|<poem>'''क्वचित् प्रभालेपिभिरिन्द्रनीलैर्मुक्तामयी यष्टिरिवानुविद्धा ।''' '''अन्यत्र माला सितपंकजानामिंदीवरैरुत्खचितान्तरेव ॥'''<br> '''क्वचित्खगानां प्रियमानसानां कादम्बसंसर्गवतीवपङ्क्तिः ।''' '''अन्यत्र कालागरुदत्तपत्रा भक्तिर्भुवश्चन्दनकल्पितेव ॥'''<br> '''क्वचित्प्रभाचान्द्रमसी तमोभिच्छयाविलीनैः शबलीकृतेव ।''' '''अन्यत्र शुभ्रा शरदभ्रलेखा रन्ध्रेष्विवालक्ष्य नभः प्रदेशा ।'''<br> '''क्वचित्कृष्णोरगभूषणेव भस्माङ्गरागातनुरीश्वरस्य ।''' '''पश्यानवद्याङ्गि विभाति गंगा भिन्नप्रवाहा यमुना तरंगैः ।''' '''समुद्रकन्योर्जलसंनिपाते पूतात्मनामच किलाभिषेकात् ।''' '''तत्त्वावबोधेन विनापिभूयस्तनुत्यजां नास्ति शरीरबन्धः ॥'''</poem>}} {{gap}}हे सुंदरी! यमुना नदीशीं संगम पावणाऱ्या या गंगेची शोभा अवलोकन कर. त्यांच्यापैकीं एकीच्या पाण्याचा रंग काळा व दुसरीच्या पाण्याचा रंग पांढरा असल्यामुळे त्यांच्या संगमाची शोभा कोठें जणूं तेजस्वी इंद्रनील मणी आणि पांढरे शुभ्र मोती यांचेपासून बनविलेल्या हाराप्रमाणे दिसत आहे; तर कोठें मधून मधून नीलकमले घातलेल्या श्वेतकमलांच्या मालेप्रमाणे दिसत आहे; कोठें कृष्णवर्ण कादंब पक्ष्यांच्या थव्यामध्ये मिसळून गेलेल्या शुभ्र हंसांच्या समूहाप्रमाणें दिसत आहे; तर कोठें जणूं पृथ्वीच्या पृष्ठभागावर पांढऱ्या चंदनाच्या उटीच्या पार्श्वभूमीवर काळ्या चंदनानें काढलेल्या वेलबुट्टीप्रमाणे दिसत आहे, कोठें वृक्षांच्या छायेमध्यें लपून बसलेल्या काळोखाच्यामुळे चित्रविचित्र (शबल) दिसणाऱ्या शुभ्र चांदण्याप्रमाणे दिसत आहे; तर कोठें मधून मधून निळ्या आकाशाचें दर्शन देणाऱ्या शरत्कालीन शुभ्र मेघपंक्तीप्रमाणे दिसत आहे; आणि कोठें कृष्णसर्परूपी अलंकार धारण करणाऱ्या श्रीशंकराच्या भस्मसित देहाप्रमाणे भासत आहे.{{nop}}<noinclude></noinclude> 222bvph9cypd6u2jxmishdmr7om1zr3 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१७६ 104 110954 233129 2026-07-12T16:18:08Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233129 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४० |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>{{gap}}असें म्हणतात कीं, या दोन नद्यांच्या पवित्र संगमाचे ठिकाणी स्नान करून जे लोक पावन होतात त्यांना आत्मज्ञानाचे अभावी सुद्धां मोक्ष प्राप्त होऊन त्यांच्या मागचा संसाराचा त्रास कायमचा चुकतो.<br>{{gap}}याप्रमाणें प्रयाग हे तीर्थ फार पुरातन काळापासून आसेतुहिमाचल हिंदु लोकांचें पवित्र स्थान म्हणून प्रख्यात आहे.<br>{{gap}}आर्यावर्तातील प्रख्यात यात्रास्थानांचा हा विशेष आहे कीं, हीं यात्रास्थाने बौद्धधर्मी व हिंदुधर्मी लोकांना सारखीच पवित्र वाटत असत व अझूनही वाटतात. म्हणूनच फेहायन व हुएनसँग हे दोघेही चिनी प्रवासी या पवित्र यात्रास्थानीं येऊन गेले होते व त्यानी या स्थानांचें वर्णन आपल्या प्रवासग्रंथांत करून ठेविलें आहे. हुएन सँग तर हर्षवर्धन राजाबरोबर प्रयागास आला होता व तेथें तो एक महिना राहिला होता. त्यानें प्रयाग येथे असलेल्या बौद्ध विहारांची व हिंदु देवळांची सविस्तर माहिती दिली आहे व हर्षवर्धन राजाच्या सर्व धर्माच्या लोकांना मुक्तहस्तानें केलेल्या दानाची हकीकत दिली आहे. प्रयाग शहराला अलाहाबाद हें नाव अकबराने दिले. मूळ नांव इलाहाबाद (परमेश्वराचें निवासस्थान) असें होतें. त्याचा अपभ्रंश अलाहाबाद असा झाला. अकबरानें गंगायमुनेच्या संगमाचे नजीक पण यमुना प्रवाहावर हल्लींचा किल्ला सन १५८४ मध्ये बांधला. मागें वर्णन केल्याप्रमाणे किल्ल्याच्या आवारांत संगमावरील अक्षयवट समाविष्ट झाला. यामुळे या वटवृक्षावरून प्रवाहांत जलसमाधी घेण्याचा प्रघात आपोआप बंद झाला. याप्रमाणे अकबराने युक्तीनें ही आत्मार्पणाची अमानुष चाल बंद केली.<br>{{gap}}मोंगलांच्या सर्व कारकीर्दीमध्यें अलाहाबाद हें एक महत्त्वाचें ठिकाण होतं कारण अलाहाबाद हा मोगल बादशाहीचा एक मोठा सुभा होता. या सुभ्याची मर्यादा दक्षिणेस यमुनानदी पलीकडील '''माणिकपुरा''' येथपर्यंत होती तर पूर्वेस बहार पर्यंत पसरली होती. यामुळे अलाहाबाद शहर व तेथला किल्ला हीं स्थानें दिल्ली-आग्ऱ्याच्या तोडीचीं<noinclude></noinclude> noki0f2eg5kyyklterw1qu8mxu9ivqt पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१७७ 104 110955 233130 2026-07-12T16:35:18Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233130 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१४१}}</noinclude>होतीं असें म्हटलें तरी चालेल. याच ठिकाणीं दुसऱ्या शहाअलम बादशाहानें बंगाल, बहार व ओरिसा प्रांतांची दिवाणी ईस्ट इंडिया कंपनी सरकारला सन १७६५ मध्ये दिली!<br>{{gap}}मग ईस्ट इंडिया कंपनीच्या पलटणीनीं अलाहाबाद किल्ल्यांत प्रवेश केला. तेव्हांपासून हा प्रांत व अलाहाबादचा किल्ला कंपनी सरकारच्या ताब्यांत आला. सन १८३३ मध्ये अलाहाबाद ही या प्रांतांची राजधानी करण्यांत आली; पण सन १८३४ मध्यें आग्रा ही प्रांताची राजधानी बनली. सन १८५७ सालाच्या शिपायांच्या बंडाच्या धामधुमत अलाहाबादचा किल्ला कांहीं काळ बंडवाल्यांच्या ताब्यांत गेला होता. पण मद्रास सरकारच्या कर्नल नील या सेनापतीच्या सैन्यानें हा किल्ला बंडवाल्यांकडून परत घेतला. या अलाहाबादच्या किल्ल्याच्या तटावरून १ नवंबर १८५८ मध्ये राणीचा प्रख्यात जाहीरनामा हिंदुस्थानचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग यानें वाचला व राणीचें राज्य सुरू झाले अशी- ग्वाही फिरविली. त्यानें आग्र्याहून प्रांताची राजधानी अलाहाबादेस आणिली. राणीच्या जाहीरनाम्यांतील धोरणाचे वाचकांना स्मरण व्हावे म्हणून तो जाहीरनामा येथे उतरून घेतों.<br> {{center|'''Proclamation by the Queen to the Princes, Chiefs, and the people of India, 1 November, 1858.'''}} {{gap}}Victoria, by the Grace of God of the United Kingdom of Great Britain and Ireland, and of the Colonies and Dependencies thereof in Europe, Asia, Africa, America, and Australasia, Queen, Defender of the Faith.<br>{{gap}}Whereas, for divers weighty reasons, we have resolved, by and with the advice and consent of the Lords Spiritual and Temporal, and Commons, in Parliament assembled, to take upon ourselves the government of the territories in India, heretofore administered in trust for क्ष by the Honourable East India Company,{{nop}}<noinclude></noinclude> q68ypmktugbmpnabn9hdaywm7c4ur5w पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१७८ 104 110956 233131 2026-07-12T16:40:18Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233131 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४२ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>{{gap}}Now, therefore, we do, by these presents notify and declare that, by the advice and consent aforesaid, we have taken upon ourselves the said government; and we hereby call upon all our subjects, within the said territories to be faithful, and to bear true allegiance to us, our heirs and successors, and to submit themselves to the authority of those whom we may hereafter, from time to time, see fit to appoint to administer the government of our said territories, in our name and on our behalf.<br>{{gap}}And we, reposing especial trust and confidence in the loyalty, ability, and judgment of our right trusty and well beloved cousin Charles John, Viscount Canning, do hereby constitute and appoint him Viceroy and Governer-General in and over our said territories, and to administer the government thereof in our name, and generally to act in our name and on our behalf, subject to such orders and regulations as he shall, from time to time, recive through one of our Principal Secretaries of State.<br>{{gap}}And we do hereby confirm in their several offices, civil and military, all persons now employed in the service of the Honourable East India Company, subject to our future pleasure, and to such laws and regulations as may hereafter be enacted.<br>{{gap}}We hereby announce to the native princes of India, that all treaties and engagements made with them by or under the authority of the East India Company are by us accepted, and will be scrupulously maintained, and we look for the like observance on their part.<br>{{gap}}We desire no extension of our present territorial possessions and, while we will permit no aggression upon our dominions or our rights to be attempted with impunity, we shall sanction no encroachment on those of others.{{nop}}<noinclude></noinclude> 2w2m1azul1aj4j0oaivk5q05jjt1lns पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१७९ 104 110957 233132 2026-07-12T16:44:58Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233132 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१४३ }}</noinclude>{{gap}}We shall respect the rights, dignity and hononr of native princes as our own; and we desire that they, as well as our subjects, should enjoy that prosperity and that social advancement which can only be secured by internal peace and good government.<br>{{gap}}We hold ourselves bound to the natives of our Indian territories by the same obligations of duty which bind us to all our other subjects, and those obligations, by the blessing of Almighty God, we shall faithfully and conscientiously fill.<br>{{gap}}Firmly relying ourselves on the truth of Christianity and acknowledging with gratitude the solace of religion, we disclaim alike the right and desire to impose our convictions on any of our subjects. We declare it to be our royal will and pleasure that none be in anywise favoured none molested or disquieted, by reason of their religious faith or observances, but that all shall alike enjoy the equal and impartial protection of the law; and we do strictly charge and enjoin all those who may be in authority under us that they abstain from all interference with the religious belief or workship of any of our subjects on pain of our highest displeasure.<br>{{gap}}And it is our further will that, so far as may be, our subjects, of whatever race or creed, be freely and impartially admitted to office in our service, the duties of which they may be qualified by their education, ability, and integrity duly to discharge.<br>{{gap}}We know and respect, the feelings of attachment with which the natives of India regard the lands inherited by them from their ancestors, and we desire to protect them in all rights connected therewith, subject to the equitable demands of the State; and we will that generally, in framing and administering the law, due regard may<noinclude></noinclude> ti3r7d307552zl39koa799hmf7nwpa1 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१८० 104 110958 233133 2026-07-12T16:50:23Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233133 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४४ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>be paid to the ancient rights, usages, and customs of India.<br>{{gap}}We deeply lament the evils and misery which have been brought upon India by the acts, of ambitious men, who have deceived their countrymen by false reports, and led them into open rebellion. Our power has been shown by the suppression of that rebellion in the field; we desire to show our mercy by pardoning the offences of those who have been misled, but who desire to return to the path of duty.<br>{{gap}}Already, in one province, with a desire to stop the further effusion of blood, and to hasten the pacification of our Indian dominions, our Vice-roy and Governer- General has held out the expectation of pardon, on certain terms, to the great majority of those who, in the late unhappy disturbances, have been guilty of offences against our Government, and has declared the punishment which will be inflicted on those whose crimes place them beyond the reach of forgiveness. We approve and confirm the said act of our Viceroy and Governor- General, and do further announce and proclaim as follows:-<br>{{gap}}Our clemency will be extended to all offenders, save and except those who have been, or shall be, convicted of having directly taken part in the murder of British subjects. With regard to such the demands of justice forbid the exercise of mercy.<br>{{gap}}To those who have willingly given asylum to murderers, knowing them to be such, or who may have acted as leaders or instigators of revolt, their lives alone can be guaranteed; but, in apportioning the penalty due to such persons, full consideration will be given to the circumstances under which they have been induced to<noinclude></noinclude> 4bkn1284fs93ez232lvflkyib6m2hkj पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१८१ 104 110959 233134 2026-07-12T16:56:30Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233134 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१४५ }}</noinclude>throw off their allegiance; and large indulgences will be shown to those whose crimes may appear to have originated in too credulous acceptance of the false reports circulated by designing men.<br>{{gap}}To all others in arms against the Government we hereby promise unconditional pardon, amnesty and oblivion of all offences against ourselves, our crown and dignity, on their return to their homes and peaceful pursuits.<br>{{gap}}It is our royal pleasure that these terms of grace and amnesty should be extended to all those who comply with these conditions before the first day of January next.<br>{{gap}}When, by the blessing of Providence, internal tranquillity shall be restored, it is our earnest desire to stimulate the peaceful industry of India, to promote works of public utility and improvement, and to administer the government for the benefit of all our subjects resident therein. In their prosperity will be our strength, in their contentment our security and in their gratitude our best reward. And may the God of all power grant to us, and to those in authority under us, strength to carry out these our wishes for the good of our people.<br> {{center|'''राजे, संस्थानाधिपति, व हिंदुस्थानचे प्रजाजन यांस राणीचा जाहीरनामा (१ नोव्हेंबर १८५८)'''}} {{gap}}व्हिक्टोरिया, ईश्वरकृपेनें असणारी आयर्लंड व ग्रेटब्रिटन या संयुक्त राज्याची व त्या राज्याच्या युरोप, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलेशिया खंडांतील वसाहती व अवलंबित संस्थानें यांची सम्राज्ञी आणि धर्मरक्षिका-<br>{{gap}}ज्या अर्थी, अनेक महत्त्वाच्या कारणांमुळे, आजपर्यंत ज्यांचा कारभार आमचे करितां सन्मान्य ईस्ट इंडिया कंपनीने चालविला<noinclude><br>{{gap}}१०</noinclude> 0jnyfo21fe5aeshu924f5s29uelwz43 233135 233134 2026-07-12T16:56:57Z कल्पनाशक्ती 3813 233135 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१४५ }}</noinclude>throw off their allegiance; and large indulgences will be shown to those whose crimes may appear to have originated in too credulous acceptance of the false reports circulated by designing men.<br>{{gap}}To all others in arms against the Government we hereby promise unconditional pardon, amnesty and oblivion of all offences against ourselves, our crown and dignity, on their return to their homes and peaceful pursuits.<br>{{gap}}It is our royal pleasure that these terms of grace and amnesty should be extended to all those who comply with these conditions before the first day of January next.<br>{{gap}}When, by the blessing of Providence, internal tranquillity shall be restored, it is our earnest desire to stimulate the peaceful industry of India, to promote works of public utility and improvement, and to administer the government for the benefit of all our subjects resident therein. In their prosperity will be our strength, in their contentment our security and in their gratitude our best reward. And may the God of all power grant to us, and to those in authority under us, strength to carry out these our wishes for the good of our people.<br> {{center|'''राजे, संस्थानाधिपति, व हिंदुस्थानचे प्रजाजन यांस<br>राणीचा जाहीरनामा (१ नोव्हेंबर १८५८)'''}} {{gap}}व्हिक्टोरिया, ईश्वरकृपेनें असणारी आयर्लंड व ग्रेटब्रिटन या संयुक्त राज्याची व त्या राज्याच्या युरोप, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलेशिया खंडांतील वसाहती व अवलंबित संस्थानें यांची सम्राज्ञी आणि धर्मरक्षिका-<br>{{gap}}ज्या अर्थी, अनेक महत्त्वाच्या कारणांमुळे, आजपर्यंत ज्यांचा कारभार आमचे करितां सन्मान्य ईस्ट इंडिया कंपनीने चालविला<noinclude><br>{{gap}}१०</noinclude> oj5rbufel45gm7swysn9i466sq1w4f8 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१८२ 104 110960 233136 2026-07-12T17:00:16Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233136 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४६ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>होता त्या हिंदुस्थानामधील प्रदेशांचा राज्यकारभार आमचेकडे घेण्याचा निश्चय आम्ही पार्लमेंट सभेत उपस्थित असलेल्या लॉर्डस व कॉमन्स यांच्या सल्ल्यानें व अनुमतीनें केला आहे.<br>{{gap}}त्याअर्थी आतां या जाहीरनाम्यान्वयें, आम्हांस मिळालेला उपरिनिर्दिष्ट सल्ला व संगति यांचे अनुरोधानें आज आम्ही सर्वांस असें कळवितों व जाहीर करतों कीं, सदरहु राज्यकारभार आम्ही आमचेकडे घेतला आहे, आणि या जाहीरनाम्याचे द्वारें (वरील) प्रदेशांतील प्रजाजनांस आज्ञा करितों कीं, त्यांनीं, आम्ही, आमचे वारस व आमचे पाठीमागून गादीवर येणारे यांचेशीं इमानानें वागावें व यांचेवर खरी राजनिष्ठा ठेवावी; तसेच यापुढे या प्रदेशाचा राज्यकारभार आमचे नांवानें व आमचे वतीने चालविण्यासाठी योग्य वाटतील त्या ज्या कोणांस आम्ही नेमूं त्यांचे अधिकारांत रहावें.<br>{{gap}}तसेच आमचे अत्यंत विश्वासू व प्रियतम नातलग, चार्लस् जॉन व्हायकाऊंट कॅनिंग यांची राजनिष्ठा, कर्तबगारी व विवेक यांवर आमचा विशेष विश्वास व भरवसा असल्यानें या जाहिरनाम्यान्वयें त्यांस वरील प्रदेशाचे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल करून आमच्या मुख्य स्टेट् सेक्रेटरीपैकी कोणा एकाच्या मार्फत वेळोवेळी मिळणाऱ्या आज्ञा व नियम यांचे अविरोधानें आमच्या नांवानें व वतीने काम करण्यासाठी नियुक्त करीत आहोत.<br>{{gap}}आणखी, या जाहीरनाम्याचे द्वारें सन्मान्य ईस्ट इंडिया कंपनीचे नोकरीमधील निरनिराळ्या लष्करी व मुलकी जागांवरील अधिकाऱ्यांस त्यांचे जागीं यापुढे होतील ते कायदे व कानू आणि आमची मर्जी यांचे अविरोधेकरून, कायम करीत आहोत.<br>{{gap}}या जाहीरनाम्याचे द्वारें हिंदुस्थानांतील राजेरजवाड्यांस आम्ही आणखी असें जाहीर करितों कीं ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारांत किंवा स्वतः कंपनीनें आपल्या बरोबर जे तहनामे केले असतील वा ज्या<noinclude></noinclude> cx3ht3q3sj2i934y254zrp296mprl26 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१८३ 104 110961 233137 2026-07-12T17:03:13Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233137 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१४७ }}</noinclude>अटी टरविल्या असतील त्या अटी व ते तहनामे आमचेकडून मान्य केले गेले आहेत, व त्यांचे पालन आमचेकडून कसोशीनें केलें जाईल व आपलेकडूनहि तशाच रीतीनें ते पाळिले जातील अशी आमची अपेक्षा आहे.<br>{{gap}}आमच्या अधिकाराखाली आलेल्या सध्यांच्या प्रदेशमर्यादेत वाढ करण्याची आमची इच्छा नाहीं, आणि ज्याप्रमाणे आमचा प्रदेश किंवा आमचे अधिकार यांवरील दुसऱ्याचें आक्रमण आम्ही चालू देणार नाहीं, त्याप्रमाणें दुसऱ्यांच्या प्रदेशावर किंवा अधिकारावर आक्रमण करण्यास आम्ही संमती देणार नाहीं.<br>{{gap}}एतद्देशीय संस्थानिकांचे हक्क, मान व पदवी यांचेबद्दल आमची वृत्ति आमचे स्वतःचे हक्कांइतकीच आदरयुक्त राहील, आणि त्यांस व आमचे प्रजाजनांसहि अन्तर्गत शांतता व सुराज्य यांमुळेच लाभ होऊं शकणारी सामाजिक प्रगति आणि भरभराट यांचा उपभोग घेतां यावा अशी आमची इच्छा आहे.<br>{{gap}}हिंदुस्थानांतील आमचे प्रजाजनांस आमचें असें सांगणे आहे कीं, आमचे इतर सर्व प्रजाजनांचे बाबतींत ज्या कर्तव्यबंधनांनी आम्ही बांधले गेलों आहोत त्यांनीच आपलेहि बाबतींत बद्ध आहों व हीं बंधनें सर्वशक्तिमान परमेश्वराचे आशीर्वादकरून आम्ही आमचे सदसद्विवेक बुद्धीस स्मरून निष्ठेनें पाळू.<br>{{gap}}आमची स्वतःची ख्रिस्ती धर्मातील सत्यावर संपूर्ण श्रद्धा असल्यामुळे व धर्मापासून मिळणाऱ्या समाधानाबद्दल आमची वृत्ति कृतज्ञतेची असल्यानें, आमचे प्रजाजनांवर आमचे धर्मविचार लादण्याची आमची इच्छा नाहीं अथवा तसा अधिकारहि आम्ही आमचेकडे घेत नाहीं. आम्ही असे जाहीर करितों कीं, केवळ धार्मिक आचार विचार यामुळेच कोणास कोणत्याहि प्रकारची मर्जी दाखविणें, कोणास त्रास व उपसर्ग देणे या गोष्टी केव्हांहि होऊं नयेत, आणि सर्वांना कायद्याचें समान<noinclude></noinclude> 9qutwypmwvsjh8qqporvwrp20ubn7dd पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१८४ 104 110962 233138 2026-07-12T17:05:10Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233138 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४८ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>व पक्षपातरहित असें संरक्षण लाभावें अशीच आमची खास इच्छा असून यांतच आम्हांस आनंद आहे. तसेंच आम्ही आमचे हाताखालीं जे कोणी अधिकारपदस्थ असतील त्यांस निक्षून अशी आज्ञा करितों कीं, त्यांनीं आमचे प्रजाजनांची धर्मश्रद्धा व धर्मपालन यांमध्यें कोणत्याहि प्रकारची ढवळाढवळ करतां कामा नये, तसे केल्यास आमची त्यांचेवर अत्यंत गैरमर्जी होईल.<br>{{gap}}आणि आमची आणखीहि अशी इच्छा आहे की, शिक्षण, कर्तबगारी व इमान या गुणांमुळे आमचे नोकरींतील ज्या ज्या जागांचीं कामें योग्य तऱ्हेने करण्यास आमचे प्रजाजन लायक असतील त्या त्या अधिकारावर त्यांचा वर्ण किंवा पंथ मनांत न आणतां त्यांना विनानिर्बंध व निःपक्षपातीपणानें घेण्यांत यावे.<br>{{gap}}हिंदुस्थानांतील जनतेस पूर्वापार वारसाहक्कानें आपलेकडे आलेल्या जमिनीबद्दल किती आपलेपणाची भावना असते ही गोष्ट आम्हांस माहीत असून संमत आहे, व राज्यसंस्थेच्या न्याय्य मागण्या न सोडतां या त्यांच्या जमिनीवरील सर्व हक्कांचे संरक्षण करण्याची आमची इच्छा आहे, आणि आम्ही असे इच्छितों कीं, नवीन कायदे किंवा त्यांचा अंमल करतांना हिंदुस्थानांतील वहिवाट, परंपरा व जुने हक्क यांना योग्य मान देण्यांत यावा.<br>{{gap}}ज्या कांहीं आततायी व्यक्तींनी खोट्या बातम्यांनी आपल्या देशबांधवांस फसवून उघड बंड करावयास लाविलें त्यांच्या कृत्यांनी हिंदुवर संकटें व दुःखें ओढवलीं त्याबद्दल आम्हांस अत्यंत वाईट वाटत आहे. त्या बंडाचा बीमोड रणमैदानावर झाल्याने आमचें सामर्थ्य स्पष्ट झालेच आहे; जे फसले, परंतु ज्यांची इच्छा सन्मार्गावर येण्याची आहे अशांचे अपराध माफ करून आम्ही आमची दयाबुद्धि प्रकट करूं इच्छितों.{{nop}}<noinclude></noinclude> ag0vb5t8rqteog438o4cttw4vw8ww7q पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१८५ 104 110963 233139 2026-07-12T17:07:47Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233139 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१४९ }}</noinclude>{{gap}}या आधींच, अधिक रक्तपात न व्हावा व आमचे हिंदुस्थानांतील राज्यांत शांतता लवकर सुरू व्हावी म्हणून एका प्रांतांत आमचे व्हॉइसरॉय व गव्हर्नर-जनरल यांनी गेल्या अनिष्ट घालमेलींत आमचे राज्याविरुद्ध ज्यांनीं गुन्हे केले त्यांतील पुष्कळशा लोकांस कांहीं अटींवर दयेचें आश्वासन दिलें आहे व ज्यांचे अपराध अक्षम्य स्वरूपाचे आहेत त्यांस शिक्षा सांगितली आहे. आमचे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल यांच्या उपरिनिर्दिष्ट कृत्यांस आमची संमति असून ती आम्ही कायम करितों आणि आणखीहि पुढीलप्रमाणें जाहीर उद्घोषणा करितों.<br>{{gap}}ब्रिटिश प्रजाजनांपैकी कोणाच्याहि प्राणहानीत प्रत्यक्षपणें भाग घेतल्याच्या आरोपावरून ज्यांस शिक्षा झाली असेल किंवा होईल त्यांचे शिवाय इतर सर्व अपराध्यांस आमच्या क्षमेचा फायदा मिळेल. उपरिनिर्दिष्ट लोकांचे बाबतींत मात्र न्यायदेवतेच्या वचनापुढें दयाबुद्धीचा अधिकार चालू शकत नाहीं.<br>{{gap}}ज्यांनीं आपण होऊन जाणूनबुजून खुनी लोकांस आश्रय दिला, किंवा ज्यांनी बंडास प्रवृत्त करण्याचें अगर पुढारीपणाचें काम केलें अशांच्या फक्त प्राणरक्षणाविषयींच हमी देणे शक्य आहे, पण अशा लोकांस योग्य ती शिक्षा देतांना ज्या परिस्थितीत त्यांस आमचे विषयींची निष्ठा सोडून देण्याचा मोह झाला तिचा पूर्णपणें विचार करण्यांत येईल, व मतलबी लोकांच्या खोट्या थापांवर फारच भोळेपणानें विश्वास ठेवल्यामुळे ज्यांचे हातून अपराध घडले अशांना पुष्कळ दया दाखविण्यांत येईल.<br>{{gap}}सरकारविरुद्ध उठलेल्या इतर सर्वांस आम्ही किंवा आमची सत्ता किंवा आमची इभ्रत यांविरुद्ध केलेल्या अपराधांबद्दल, स्वगृही परत येऊन शांततेचा व्यवसाय सुरू केल्यास, या जाहीरनाम्याचे द्वारें बिनशर्त माफी व क्षमा करून ते विसरून जाण्याचे आम्ही अभिवचन देतों.{{nop}}<noinclude></noinclude> j89r69w7zn8nb6gaxb8q53lfg4x0csd पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१८६ 104 110964 233140 2026-07-12T17:11:32Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233140 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५० |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>{{gap}}क्षमेच्या व कृपेच्या या सवलती येत्या जान्युआरीच्या पहिल्या तारखेपर्यंत जे लोक या अटीनुसार वर्तन करतील त्यांना मिळाव्यात अशी आमची खास इच्छा आहे.<br>{{gap}}परमेश्वरी आशीर्वादेकरून पुनः अन्तर्गत शांतता प्रस्थापित झाल्यावर, हिंदुस्थानांतील शांतताप्रधान उद्योगास चालना द्यावी, सार्वजनिक उपयुक्तता व सुधारणा या बाबतच्या कार्यास उत्तेजन द्यावें व आमच्या राज्यांतील सर्व प्रजाजनांचे हितानुरूप राज्यव्यवस्था चालावी अशी आमची कळकळीची इच्छा आहे. त्यांची भरभराट हेंच आमचें सामर्थ्य, त्यांचें समाधान हीच आमची सुरक्षितता व त्यांची कृतज्ञता हाच आमचा श्रेष्ठ लाभ होय. या आमच्या साऱ्या आकांक्षा आमचे प्रजाजनांचे हितार्थ कृतींत आणण्याचे सामर्थ्य सर्वसमर्थ परमेश्वर आम्हांस व आमचे अधिकाऱ्यांस देवो.<br>{{gap}}या जाहीरनाम्यांत जाहीर केलेल्या ब्रिटिश राज्याच्या धोरणाला, ब्रिटिश नोकरशाहीनें या गेल्या पाऊणशे वर्षांत कितपत कृतिरूप दिलें व नव्या सुधारणाघटनेमध्यें या जाहीरनाम्यांतील धोरण कितपत पाळले जात आहे हे वाचकांना आपल्या सध्यांच्या ब्रिटिश अमलाच्या अनुभवावरून सहज ठरवितां येईल. पण या धोरणांत फरक झाला आहे याचे बाह्य व दृश्य निदर्शन म्हणजे अलाहाबाद किंवा प्रयाग या पुरातन काळापासून हिंदु लोकांच्या पवित्र व प्रख्यात शहरामधून '''राजधानीचे उच्चाटन''' होऊन तिची स्थापना मुसलमानांना प्रिय '''लखनौ''' शहरी करण्यांत आली आहे हे होय.!<br>{{gap}}अलाहाबाद शहरी चार आठ दिवस राहणान्या माझ्यासारख्या प्रवाशाला अलाहाबाद हे '''टाकलेल्या राजधानीसारखें''' भासतें. येथला तो शहराचा अफाट विस्तार, शहराचे ते प्रशस्त व सुंदर रस्ते, येथल्या त्या विस्तीर्ण बागा व त्या मोठमोठ्या इमारती या राजधानीच्या गमिष्यमाण वैभवाची आठवण करून देतात. कारण शहराच्या विस्ताराच्या मानानें येथें माणसांचा शुकशुकाट दिसतो.{{nop}}<noinclude></noinclude> es3tzvuzdmg7qqz7tnkd5nk2wzt6yuf