विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.11
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf
106
1874
233326
233290
2026-07-19T17:21:05Z
कल्पनाशक्ती
3813
233326
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]]
|Language=mr
|Volume=
|Author=विवेकानंद
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=न. म. कुलकर्णी
|Address=
|Year=१९२२
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=V
|Pages=<pagelist 4="अनुक्रमणिका" 5="हिंदु देवालय फोटो" 6="एक उघडे रहस्य" 19="कैवल्याचा मार्ग" 32="याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी" 44="सांख्यविचार" 65="सांख्य आणि वेदान्त" 82="वेदान्त व हक्क" 107="हक्क" 118 ="अभ्यास" 141="भक्ति" 169 ="हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप" 201="हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते" 230="आपणांपुढील कार्य" 255="दानधर्म" 257 ="हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त" 284 ="हिंदुतत्त्वज्ञानाचा इंग्लंडावर घडलेला परिणाम" 292 ="संन्याशाचे ध्येय आणि त्याचा अभ्यास"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
bt4wunak44c1qoyjsmf4xqhxgpo4zc8
233360
233326
2026-07-20T09:22:15Z
कल्पनाशक्ती
3813
233360
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]]
|Language=mr
|Volume=
|Author=विवेकानंद
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=न. म. कुलकर्णी
|Address=
|Year=१९२२
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=V
|Pages=<pagelist 4="अनुक्रमणिका" 5="हिंदु देवालय फोटो" 6="एक उघडे रहस्य" 19="कैवल्याचा मार्ग" 32="याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी" 44="सांख्यविचार" 65="सांख्य आणि वेदान्त" 82="वेदान्त व हक्क" 107="हक्क" 118 ="अभ्यास" 141="भक्ति" 169 ="हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप" 201="हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते" 230="आपणांपुढील कार्य" 255="दानधर्म" 257 ="हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त" 284 ="हिंदुतत्त्वज्ञानाचा इंग्लंडावर घडलेला परिणाम" 292 ="संन्याशाचे ध्येय आणि त्याचा अभ्यास" 296="मी काय शिकलों."/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
izntf0qnod08vkyxegy3dzljrfdyjy3
233368
233360
2026-07-20T10:28:39Z
कल्पनाशक्ती
3813
233368
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]]
|Language=mr
|Volume=
|Author=विवेकानंद
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=न. म. कुलकर्णी
|Address=
|Year=१९२२
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=T
|Pages=<pagelist 4="अनुक्रमणिका" 5="हिंदु देवालय फोटो" 6="एक उघडे रहस्य" 19="कैवल्याचा मार्ग" 32="याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी" 44="सांख्यविचार" 65="सांख्य आणि वेदान्त" 82="वेदान्त व हक्क" 107="हक्क" 118 ="अभ्यास" 141="भक्ति" 169 ="हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप" 201="हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते" 230="आपणांपुढील कार्य" 255="दानधर्म" 257 ="हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त" 284 ="हिंदुतत्त्वज्ञानाचा इंग्लंडावर घडलेला परिणाम" 292 ="संन्याशाचे ध्येय आणि त्याचा अभ्यास" 296="मी काय शिकलों."/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
os5t83tzrb6v34se9evqppo111kgpzs
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७५
104
66840
233317
156809
2026-07-19T16:50:02Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233317
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२७० |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>{{gap}}याकरितां दुसऱ्यांचे दोष शोधू जाण्यापूर्वी आपल्या स्वतःच्या स्थितीचा विचार आपण आधी करावा. दुसऱ्यांची धडपड झाली तरी ती सत्यवस्तूच्या शोधासाठीच असते. सत्यवस्तूचा अनुभव आपण प्रत्यक्ष घ्यावा यासाठीच यांची सारी खटपट असते. याकरिता त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊं देणे अधिक बरें; आणि त्यांना सत्यवस्तूची भेट झाली म्हणजें वेगवेगळा प्रत्येक मार्ग वस्तुतः हेच सांगत होता असा अनुभव त्यांना येईल. पद्धत वेगळी झाली तरी प्रत्येक मंत्रद्रष्टा अखेरीस येथेच पोहोचला असें त्याला कळून येईल. अशा स्थितीत प्रेममय वाणीवांचून दुसरा शब्द त्यांच्या तोंडून बाहेर येणार नाही. कारण शुद्ध प्रेममयाचा प्रकाश त्यांच्यांत ओतप्रोत भरून गेलेला असतो. फक्त याच स्थितीत रागद्वेषादि विकार पूर्ण विलयास जातात; आणि येथेच श्रेष्ठत्व कनिष्ठत्वाचा वाद कायमचा विराम पावतो. येथे फार झाले तर फक्त हिंदु इतकीच संज्ञा कायम उरते. हिंदु मात्र आपला बंधु असें आपणांस वाटू लागते. अशी स्थिति तुम्हांस प्राप्त झाली तरच हिंदु हे तुमचें नांव यथार्थ होईल. हिंदु या शब्दाच्या नुसत्या उच्चारा बरोबर अनंत शक्तीचे वारे तुमच्या अंगांत अशा स्थितीतच संचरेल. हिंदुस्थानांतील यच्चयावत् रहिवासी आपला सखासोयरा आहे, असें तुम्हांस वाटू लागेल. भाषाभेद, प्रांतभेद अथवा जातिभेद असल्या क्षुल्लक कृत्रिम वस्तूंना तुमच्या चित्तांत थारा मिळणार नाही. कोणाहि हिंदूवर संकट आले तर तें आपणावरच आले आहे असें ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणाला वाढू लागेल, त्याच दिवशी हिंदु या नांवाला तुम्ही खरोखर पात्र व्हाल. हिंदुमात्राच्या सुखासाठी गुरु गोविंदसिंगाप्रमाणे आपल्या सर्वस्वाची आहुति देण्याची तुमची तयारी ज्या दिवशी होईल, त्याच दिवशी तुमचें हिंदु हें नांव यथार्थ होईल. गुरु गोविंदसिंगाला देशत्याग करावा लागला. जुलमाविरुद्ध प्रचंड युद्ध करावे लागले; स्वतःच्या रक्ताची तिलांजली त्याला द्यावी लागली; स्वतःची संतति रणभूमीवर अखेरची निद्रा घेत असलेली त्याला पहावी लागली; आणि हे सर्व ज्यांच्यासाठी त्याने केले तेहि अखेरीस त्याला सोडून गेले. असले देखावे स्वतःच्या डोळ्यांनी पाहून हा सिंह रणांगण सोडून एकांताच्या आश्रयाला गेला. आणि देहविसर्जन करीपर्यंत कोणाविरुद्ध एक शब्दहि आपल्या मुखाने त्याने उच्चारला नाही. जे त्याच्याशी कृतघ्नपणे वागले त्यां-<noinclude></noinclude>
46moy8djbclbgyhqjdxgh6y2uuncstt
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७६
104
66841
233318
156810
2026-07-19T16:54:26Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233318
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.|२७१ }}
{{rule}}</noinclude>नाहि त्याने शाप दिला नाही. तुम्हांला खरोखर कांहीं देशसेवा करावयाची असेल तर तुम्हांपैकी प्रत्येकाने साक्षात् गुरु गोविंदसिंग बनले पाहिजे. आपल्या देशबांधवांत हजारों दोष तुम्हांस दिसत असतील, पण त्यांपैकी प्रत्येक हिंदुवंशांतला आहे हे ध्यानात ठेवा. यांपैकी प्रत्येक जण तुमचा चालता बोलता ईश्वर आहे. प्रत्येकाची पूजा तुम्ही केली पाहिजे. त्यांच्यापासून तुम्हाला अनेक प्रकारे उपद्रव होत असला, तरी तो सगळा गिळून त्यांच्या सेवेला तुम्ही स्वतःस वाहून घेतले पाहिजे. त्यांपैकी प्रत्येक जण तुम्हांस शाप देत असला, तरी तुम्ही प्रत्येकाची भक्तिच केली पाहिजे. तुम्हांस त्यांनी हांकून दिले तर एकांतवासांत देहविसर्जन करण्यास जा. गुरु गोविदसिंगाचे अनुकरण तुम्ही करा. असाच मनुष्य हिंदु या संज्ञेला पात्र आहे. आपणा सर्वाच्या पुढे हे एकच ध्येय पाहिजे. भांडणांचें सारें मूळ विसरून जाऊन केवळ प्रेमाचे प्रवाह आपल्या अंतःकरणांतून बाहेर पडले पाहिजेत.<br>{{gap}}भरतभूमीच्या पुनरुज्जीवनाच्या गोष्टी अनेक लोक बोलतात. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना वाटेल तें बोलू द्या. पण तुम्ही धर्ममार्गावर आरूढ होईपर्यंत हिंदुस्थानाचे पुनरुज्जीवन होणार नाही, हे मी तुम्हांस पुनःपुन्हा बजावून सांगतो. माझा सारा जन्म याच उद्योगांत मी घालविला. निदान तसा उद्योग करण्याचा यत्न तरी मी केला; आणि या खटपटीत असतां जो अनुभव मला आला; त्याच्याच अनुरोधाने हे माझे मत मी तुम्हांस सांगत आहे. केवळ हिंदुस्थानाचेच नव्हे तर साऱ्या जगाचे कल्याण तुम्ही धर्मज्ञ होण्यावर अवलंबून आहे. आता मी तुम्हांस अगदी उघडपणे सांगतो की, पाश्चात्य संस्कृति आतां अगदी खालच्या पायापासून हादरली आहे. तो पाया केव्हां उखडेल याचा भरंवसा नाही. वाळूच्या पायावर केवडीही भव्य इमारत तुम्ही उठविली तरी तिची गति अकस्मात् काय होईल, हे सांगण्यास कोणी भविष्यवादी पाहिजे काय? पाश्चात्य संस्कृतीची सारी उभारणी शुद्ध जडवादाच्या पायावर झाली आहे; आणि ती कितीहि भव्य आणि बळकट दिसत असली तरी एखादे दिवशी ती अवश्य धुळीला मिळेल. कोणत्या दिवशी तिचा पूर्ण निःपात होईल हे सांगता येत नाही. या गोष्टीची साक्ष साऱ्या जगाचा इतिहास देत आहे. राष्ट्रामागून राष्ट्र उदयास आले पण त्याची सारी भव्यता आणि त्याचे सौन्दर्य शुद्ध जडवादाच्या पायावर अवलंबून होते. मनुष्यप्राणी म्हणजे<noinclude></noinclude>
t8obvcczlue4jrjf959ivb93r5jo2j4
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७७
104
66842
233319
156811
2026-07-19T16:57:06Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233319
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२७२ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>शुद्ध हाडामांसाचा गोळा यापेक्षा अधिक उच्च प्रतीची भावना त्यांच्या ठिकाणी नव्हती. मनुष्य मेला म्हणजे पाश्चात्य भाषेत 'त्याने आपला आत्मा सोडला' अस म्हणतात. उलट पक्षी 'त्याने देह सोडला' असे आम्ही म्हणतो. पाश्चात्यांच्या दृष्टीने देह आधी आणि मग साऱ्या गोष्टी. मनुष्याला आत्मा आहे की नाही, याचा विचार ते मागून करतील. याच्याच अगदी उलट आमचे मत आहे. आत्मा आधी असून मग तो देह धारण करतो. या पहिल्या मतांतरामुळे पुढच्या साऱ्या इमारतींत जमीनअस्मानाचा फरक उत्पन्न झाला आहे. पाश्चात्यांच्या संस्कृतीची उभारणी या वाळूच्या पायावर झाली असल्यामुळे आणि तींत सारे प्राधान्य देहसौख्याला असल्यामुळे, ती प्राचीन राष्ट्रे एका मागून एक विलयास गेली. उल्कापाताप्रमाणे क्षणभर चमकावे आणि पुढच्याच क्षणी त्याचा मागमूसहि राहूं नये अशी त्यांची गत झाली. जगांत ती होती की नाही हीसुद्धा जणूं काय शंकेची गोष्ट होऊन बसली. उलट पक्षी हिंदुस्थानची संस्कृति अनेक उत्पातांतून आजपर्यंत टिकली आहे. हिंदुस्थानाचीच काय, पण त्याचे पादवंदन करून ज्यांनी त्याचा उपदेश घेतला ती चीन आणि जपान ही राष्ट्रही आज जिवंत आहेत, एवढेच नव्हे तर ती आज उदयोन्मुखही झाली आहेत. त्यांच्या पुनरुज्जीवनाची चिन्हें आजही स्पष्ट दिसत आहेत. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुनःपुन्हां मृत्युवश झाली तरी ती पुनः पुन्हां जिवंत होऊन उठतात; आणि पहिल्यापेक्षाही अधिक तेजाने तळपूं लागतात; पण ज्या राष्ट्राची संस्कृति शुद्ध जडवादाच्या पायावर झाली आहे, त्यांनी एक वेळ राम म्हटला की कायमचीच नाहीशी होतात. याकरितां आजची अवनता पाहून धीर सोडूं नका. तुम्हांला घाबरे होण्याचे काही कारण नाही. सारा भविष्यत्काल आपलाच आहे हे निश्चित समजा; घाबरून जाऊन भलभलते उपाय योजू नका. उगीच कोणाचे तरी अनुकरण करीत सुटण्यांत फायदा नाही. आपणांस जो मुख्य धडा शिकावयाचा तो हाच की, अनुकरण म्हणजे संस्कृति नव्हे. एखाद्या बादशहाच्या पोषाखाने उद्या मी आपणांस सजविलें म्हणजे मी खरोखरच बादशाह झालों काय? सिंहाचे कातडें पांघरलेला गाढव सिंह होत नाही. केवळ भीतीने दुसऱ्याचे अनुकरण करून तुमचे पाऊल पुढे पडेल, ही गोष्ट मनांतसुद्धां आणू नका. दुसऱ्याचें अनुकरण करण्याची बुद्धि हेच खऱ्या अधःपाताचे लक्षण आहे. हा अधःपात<noinclude></noinclude>
qio65yxn7s7qlvnr492pp0v4exm00yd
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७८
104
66843
233320
156816
2026-07-19T17:02:03Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233320
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.|२७३ }}
{{rule}}</noinclude>सर्वांत भयंकर होय. मी कःपदार्थ अशी भावना ज्याच्या चित्तांत उत्पन्न झाली, त्याच्या मस्तकावर तो वज्रपातच झाला आहे, असे समजा, त्यांतून तो पुनः उठेल अशी आशाच नको. 'पै अमृतही नावडे । ऐसें जिव्हेसि जै अरोचक पडे । तै मरण आले रोकडे । हैं सांगावें काई ॥' आपल्या पूर्वजांची लाज ज्याला एक वार वाटू लागली त्याचे मरण पाठीशी येऊन ठेपलें आहे असे समजा. मी त्या उज्ज्वल हिंदुवंशांतला एक रजःकण आहे, पण त्या वंशाचा अभिमान मला आहे. माझ्या पूर्वजांबद्दल माझ्या मनांत अत्यंत पूज्यबुद्धि आहे. मी हिंदु आहे असे सांगण्यांत मला धन्यता वाटते. तुम्हां हिंदुवंशजांच्या पायाचा एक क्षुद्रसा चाकर म्हणवून घेण्यांत मला महदानंद होतो. तुमचा मी देशबंधु आहे. असें म्हणविण्याहून अधिक कशांतच मला धन्यता वाटत नाही. तुम्ही मंत्रद्रष्टयांचे वंशज, तुम्ही महर्षीचे कुलदीपक, जगानें पूर्वी कधीहि न पाहिलेली संस्कृति ज्यांनी आकाराला आणली त्यांच्या कुलांत तुम्ही जन्म घेतला. त्या तुमचा दासानुदास म्हणवून घेण्यापेक्षा अधिक अभिमानास्पद तें काय असणार? आपल्या पूर्वजांकडे पहा आणि त्यांच्या कृति ध्यानांत आणून स्वतःच्या कर्तबगारीवर तुमची श्रद्धा असू द्या. त्यांची कृति तुम्हांस लाजविण्यासारखी आहे की अभिमान बाळगण्यासारखी आहे, याचा विचार आपल्या मनाशी करून पहा. कांहीं झालें तरी दुसऱ्यांचे अनुकरण करूं नका, ही माझी तुम्हांस हात जोडून विनंति आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या टाचेखाली गेला, म्हणजेच खरोखर तुमचे स्वातंत्र्य नष्ट होते; आणि दुसऱ्यांच्या अनुरोधाने कोणतेही कार्य- धर्मकार्य सुद्धा- करण्याची दुष्ट खोड तुम्हांला लागली की, तुम्हांला स्वतंत्रपणे विचारसुद्धां करता येत नाही. याकरितां तुमचे स्वतःचे म्हणून जे काही आहे तेंच स्वप्रयत्नाने प्रत्यक्ष सृष्टीत आणा. दुसऱ्याचे काही चांगलें तुम्हांस दिसले तर त्याचाहि संग्रह करा, पण कोणाचे अनुकरण मात्र करूं नका. परक्यांपासून आपणांस कांहींच शिकावयाचें नाहीं असें नाहीं; पण शिकणे वेगळे आणि परावलंबी बुद्धीचे अनुकरण वेगळे. आपण बी पेरलें, त्याला खत घातले आणि पाणी दिले म्हणजे कालेंकरून त्याला अंकुर फुटूं लागतात. कालांतराने त्या बाल अंकुराचा महावृक्ष होतो. शाखापल्लवांनी तो मनोहर दिसूं लागतो; आणि अनेकांचें तो विश्रामस्थान होतो. पण त्याची वर्धनाची क्रिया<noinclude><br>{{gap}}स्वा० वि० खं०-९-१८.</noinclude>
gorv5ctn2e1z2x76w1ydnuj2hbxif9k
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७९
104
66844
233321
157233
2026-07-19T17:05:06Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233321
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२७४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>चालू असतां ज्या मातीतून तो उगवला, तिच्यासारखा तो होत नाहीं; ज्या खताने त्याला पोसलें त्याच्या सारखा तो होत नाहीं; जे पाणी तो प्याला, त्या पाण्यासारखाहि तो नसतो आणि ज्या हवेत तो वाढला, त्या हवेसारखेंहि त्याचें स्वरूप नसते. तो आत्मभाव सोडीत नाही, तो स्वस्वभावानुरूप वाढतो. जमिनींतील, खतांतील, पाण्यातील आणि हवेतील पोषक द्रव्ये तो घेतो; पण त्यांपैकी कोणासारखाहि स्वतः न होता तो आत्मरूप कायम ठेवूनच वाढतो. या वृक्षाचे अनुकरण तुम्ही करा. दुसऱ्यापासून शिकण्यासारखें असेल तें अवश्य शिका. ते आपण शिकलेच पाहिजे. मी सर्वज्ञ अशी घमेंड ज्याला झाली, तो जिवंत असतांच मेला आहे असे समजा. याकरितां दुसऱ्यापासून शिकण्याची बुद्धि सदोदित कायम ठेवा पण कोणाचे अनुकरण मात्र करूं नका.<br>{{gap}}'आददीत परां विद्या प्रयत्नादवरादपि । अंत्यादपि परं धर्म स्त्रीरत्नं दुष्कुलादपि!' असें भगवान् मनूंचे वचन आहे. ज्ञान कोणापासूनहि घ्यावें. चांडालाचीहि सेवा करून मुक्तिमार्ग मोकळा करून घेण्यास हरकत नाही. या वचनाला अनुसरून जे जे काही चांगले असेल ते परक्यांपासून आपण अवश्य घ्यावें; पण त्याच्या प्राप्तीसाठी परक्यांच्या मागे न जातां तें ज्ञान आपण आपल्या घरी आणावें, आणि आपल्याच पद्धतीने त्याचे ग्रहण करावें. तें ज्ञान आपण आपल्या ठिकाणी मुरू द्यावें. तथापि असें करीत असतां आपल्या मूळ भावांत फरक होऊ देऊ नये. आपण दुसऱ्यासारखे होऊ नये. आपला जुना जीवितक्रम सोडून कोणी फरफटत ओढल्यासारखे दुसऱ्याच्या मागे जाऊ नये. उद्या साऱ्या हिंदी लोकांनी परकीयांसारखा पोषाख केला, त्यांचे भक्ष्यपेय उचलले आणि त्यांच्या चालीरीतींचे अनुकरण केले, तर हिंदुस्थानाचे कोटकल्याण होईल हा भ्रम आधी सोडून द्या. तुमच्या रक्तांत किती हजार वर्षांचे ज्ञान खेळत आहे हे एका परमेश्वरालाच ठाऊक! एका विशिष्ट प्रणालीतून आज हजारों वर्षे ते तुमच्या धमन्यांतून वहात आहे. या परंपरेला प्रारंभ केव्हां झाला तें देव जाणे! अशा प्रकारचा हा प्राचीन आणि प्रचंडतम प्रवाह आतां महासागराला मिळाला असतां तो परत हिमाचलाच्या शिखराला जाईल अशी अपेक्षा तुम्ही कशी धरितां? ही गोष्ट सर्वथा अशक्य आहे. असें करण्याचा यत्न निष्फळ आहे, एवढेच नव्हे. तर त्यांत तुमचें<noinclude></noinclude>
b73pkmn48jtn9129w1m3a07a42pqlhr
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८०
104
66845
233322
157234
2026-07-19T17:07:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233322
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.|२७५ }}
{{rule}}</noinclude>नुकसानहि आहे. तुमच्या असल्या खटपटीने तो प्रवाह शतधा विदीर्ण मात्र होईल. याकरितां, हा जीवनप्रवाह आपल्या नियुक्तमार्गाने अविरत चालेल, असे करणे इतकेंच तुमचे काम आहे. या प्रचंड ओघाच्या मार्गात जे मोठे शिलाखंड आडवे पडले आहेत ते दूर करून त्याचे पात्र निष्कंटक करणे इतकेंच तुमचे काम आहे. हा मार्ग स्वच्छ करण्याचे काम तुम्हीं केलें म्हणजे तो प्रवाह अगदी स्वाभाविकपणे आपल्या मार्गाने जाईल; आणि असे होण्यातच तुमचे आणि तुमच्या भावी पिढीचे कल्याण आहे. उन्नतीच्या मार्गात आपले पाऊल दिवसेंदिवस पुढे पडावें असें तुम्हांस वाटत असेल, तर पूर्वोक्त मार्गाने जाण्यावांचून तुम्हांस गत्यंतर नाही.<br>{{gap}}हिंदुस्थानांत आपणांस जे धर्मकार्य करावयाचे आहे, त्याची ही थोडीशी रूपरेषा तुम्हांस मी दर्शविली आहे. आपले कार्य फार प्रचंड आहे. आपणांस जी महत्कार्ये करावयाची आहेत, त्यांची चर्चा वेळाच्या अभावी आज मला करितां येत नाही. उदाहरणार्थ जातिभेद हा एक मोठाच प्रश्न आपणां पुढे आहे. याचा सांगोपांग विचार मी आज सारा जन्मभर करीत आलों आहे. हिंदुस्थानांतील बहुधा प्रत्येक प्रांतांत या प्रश्नांतील अडचणींचे स्वरूप काय आहे हेहि मी पाहिले आहे; आणि इतके करूनहि यांतील रहस्याचा उलगडा मला अद्यापि झालेला नाही. जातिभेदाच्या पोटांत वस्तुतः काय आहे, हे माझ्या बुद्धीला अद्यापि जाणतां आलें नाही. याचा विचार मी जों जो अधिक करितों, तो तो माझी बुद्धि अधिकाधिक भांबावून मात्र जाते. आतां इतके करून मला जो थोडा फायदा झाला तो हाच की, या विषयाची अंधुक अंधुक दिशा मात्र माझ्या लक्षात आली आहे. जातिभेदाप्रमाणेंच अन्नोदकव्यवहाराचा प्रश्नहि आपणांस महत्त्वाचा आहे; आणि तोहि तितकाच अवघड आहे. तेंहि एक मोठे कोडें आहे. यांत मोठा महत्त्वाचा मुद्दा नाही असे समजून आपण थट्टेवारी तो उडवून देत असतो, पण आपणांस वाटते तितका तो निरुपयोगी नाही आणि सोपाहि नाही. सध्या मला इतकेंच म्हणता येईल, की या बाबींत जी रूढि म्हणून आपण अनुसरतों, ती मात्र खरोखर विक्षिप्तपणाची आहे. ती शास्त्राच्या रहस्याविरुद्ध आहे. अन्नोदकाची शुद्धि वस्तुतः कशी असावी यासंबंधी जे निर्बंध शास्त्राने घातले आहेत, ते लक्षात न आणितां आणि त्यांचे अंतःस्वरूप न पाहतां केवळ त्या<noinclude></noinclude>
eqkmnebtd342ib1m3pie2gb0jw8q03b
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८१
104
66846
233323
157425
2026-07-19T17:10:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233323
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२७६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>शब्दांच्या मार्गाने मात्र आपण जात असतो. त्यांतील खरा जीवभाव सोडून देऊन बाकी उरलेल्या कलेवराला मात्र आपण मिठी मारली आहे.<br>{{gap}}ही व अशाच प्रकारची दुसरी अनेक कोडी लक्षात घेण्यासारखी आहेत. यांतील रहस्य जाणून ते प्रत्यक्ष आचारांत कसे आणावें आणि या कोड्यांचा उलगडा कसा करावा, यासंबंधी माझे विचार तुम्हांस सांगण्याची माझी मोठी इच्छा होती. पण दुर्दैवाने वेळाच्या अभावी आज मला तसे करितां येत नाही; याकरितां, अशाच प्रकारच्या पुढे दुसऱ्या एखाद्या संधीची वाट पाहून आज हा विषय येथेच सोडणे मला प्राप्त आहे.<br>{{gap}}जातां जातां आणखी एकाच विषयासंबंधानें चार शब्द सांगून मी आपली रजा घेतो. आज दीर्घकाळ धर्मज्ञानाला आपल्या या भूमीत संचालन मिळाले नसल्यामुळे तें स्तब्धतेच्या स्थितीला आलेले आहे. तुमच्या ठिकाणी कर्मप्रवणता उत्पन्न करण्याचे सामर्थ्य त्याला राहिलेले नाही. तें सामर्थ्य त्याला पुनः प्राप्त करून देणे हे आपले कर्तव्य आहे. आपणांपैकी प्रत्येकाच्या रोजच्या व्यवहारांत धर्मज्ञान मूर्तिमंत दिसेल असे करण्याचा यत्न आपण केला पाहिजे. धर्माचा संचार पूर्वी जसा राजवाड्यापासून झोपडीपर्यंत होता, त्याचप्रमाणे तीच स्थिति आतांहि आपण प्राप्त करून घेतली पाहिजे. अत्यंत दरिद्री शेतकऱ्यालाहि धर्मज्ञानाची वाण पडूं देतां उपयोगी नाही. धर्मज्ञान हा साऱ्या हिंदु कुलाचा वारसदारीचा हक्क आहे. या कुलाचे वंशज या वारशांत सारखेच भागीदार आहेत; आणि त्यांच्या हक्काची ही बाब त्यांच्या घराच्या दारापर्यंत पोचविविण्याचे कार्य आपण केले पाहिजे. वस्तुतः हक्काने मिळणाऱ्या या वस्तूला आज ते पारखे झाले आहेत; पण ही स्थिति आपण बदलली पाहिजे. परमेश्वरनिर्मित हे वातावरण जितक्या मोकळेपणे वावरते आणि ते जसे सर्वांच्या उपभोगास सारखेंच पात्र होते, तसें धर्मज्ञानहि आपण सर्वांस उपलब्ध करून दिले पाहिजे. आज आपणांस येथें कांहीं कार्य म्हणून असेल तर ते हेच आहे; पण नवे नवे पंथ काढून आणि आपसांत मारामाऱ्या करून मात्र हे कार्य होणार नाही. क्षुल्लक मतभेदांचा वारंवार उच्चार केल्याने आणि त्यांवरच जोर दिल्याने मतैक्य होत नाही. मतभेदाच्या बाबी बाजूला सोडून जेथें मतैक्य आहे, तेवढ्यांचा प्रचार तरी आपण जारीने करूं या. क्षुल्लक मतभेद बाजूला सोडल्याने कालांतराने ते आपोआपच मरून जातील. आज<noinclude></noinclude>
1lb9h3tdbbo96z9i90pp4i3cn3s5n7k
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८२
104
66847
233324
157426
2026-07-19T17:13:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233324
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.|२७७ }}
{{rule}}</noinclude>सर्वत्र अंधार पसरला असला तर भांडणे करून आणि एकमेकांस शिव्या देऊन तो नाहीसा होणार नाही. एखाद्या अंधाऱ्या जागेत जाऊन अंधार अंधार म्हणून नुसता कंठशोष आपण कितीहि केला तरी तेवढ्यानें तो नाहीसा होणार आहे काय? अशी आरडाओरड करण्याऐवजी निमूटपणे तेथे एखादी काडी तुम्ही ओढली, की ती जागा ताबडतोब प्रकाशित होईल. माणसांना सुधारण्याचा खरा मार्ग हाच आहे. लोकांपुढे उच्चतर ध्येये मांडून त्यांची आकांक्षा जागृत करा. प्रत्येकाला आत्मविश्वास हा प्रथम पाहिजे. स्वतःच्या कर्तवगारीवर त्याचा भरवसा पाहिजे. मनुष्य हा स्वस्थाननष्ट आणि पतित प्राणी आहे, असें आधीच गृहीत धरून कां चालावें. एखादा मनुष्य कितीहि बाईट असला तरी त्याच्यात काही तरी कर्तबगारी असते हा माझा विश्वास केव्हाही ढळला नाही; आणि अशा प्रकारची कर्तबगारी प्रत्येकाच्या ठिकाणी मला आढळूनहि आलेली आहे. आरंभी कित्येक वेळा एखाद्या मनुष्यांत कर्तृत्वशक्तीचा अभाव आढळून आला, तथापि अखेरीस त्याच्या पौरुषाचा विजय होतो असेंच मला आढळून आले. कोणी विद्वान् असो अगर अगदी मूढ असो, त्याच्यात काही तरी कर्तबगारी आहे हे नित्य ध्यानात ठेवा. कोणी देवाप्रमाणे सात्विक दिसत असला अथवा दुसरा एखादा राक्षसाप्रमाणे तमोगुणी दिसत असला, तरी त्या दोघांतहि पौरुष आहे हे लक्षात आणा. अशा प्रकारचा विश्वास आधी पाहिजे. मग एखाद्याच्या ठिकाणी काही उणीवा दिसत असल्या, अथवा त्याच्या हातून चुका घडत असल्या, तथापि त्या स्वभावजन्य नाहीत. त्याच्यापुढे अधिक उच्च ध्येय नाही म्हणूनच भलभ लत्या मतांना आणि हटवादाला चिकटून बसून तो चुका करीत असतो हा मुद्दा केव्हाही विसरू नये. असत्याकडे मनुष्याचे मन धांव घेते याचे कारण हेच की, सत्य वस्तूची कल्पना त्याच्या चित्ताला नसते. याकरितां खोट्या मार्गापासून त्याला परावृत्त करण्याचा उपाय खरा मार्ग त्याला दाखविणे हाच होय. हा मार्ग तुम्ही त्याला दाखवून दिला म्हणजे तुमचे काम संपले. मग त्या दोन मार्गाचा बरेपणा अथवा वाईटपणा त्याचा तोच पाहील. सत्य मार्ग एकवार त्याला दाखवून देणे इतकेंच तुमचे काम आहे. आपल्या पूर्वीच्या मार्गात कमीपणा कोठे होता आणि नव्या मार्गात चांगलेपणा कोठे आहे, हे शोधून काढण्यास त्याला तुम्ही मोकळा सोडून द्या. तुम्ही दाखविलेला मार्ग<noinclude></noinclude>
rcbpqq8rzpzy00slytfob9avl5uyo39
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८३
104
66848
233325
157429
2026-07-19T17:15:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233325
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२७८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>खरोखरच सत्य वस्तूकडे जाणारा असेल, तर त्याचा विजय झालाच पाहिजे. दिवा पेटविल्यानंतर अंधार नाहीसा व्हावा यांत नवल काय? आपल्या देशांतील लोकांना खरें धर्मज्ञान मिळावे अशी तुमची वास्तविक इच्छा असेल, तर ती याच मार्गानें तृप्त होईल. तुम्ही करितां तें वाईट आहे असे त्यांना सांगून त्यांच्यावर वेळी अवेळी तोंड टाकून अथवा त्यांच्याशी भांडणे करून इष्टकार्यसिद्धि केव्हाही होणार नाही. सत्याला केव्हांच मरण नाही. सत्याचा प्रकाश प्रत्येकाच्या ठिकाणी जिवंत आहे. सत्यवस्तूला आनंदाने मिठी मारण्याची त्याची नेहमीच तयारी असते. ती वस्तु त्याच्या नजरेसमोर तुम्ही येऊ देत नाही हा तुमचा दोष.<br>{{gap}}त्या सनातन स्वरूपाचा आशीर्वाद तुम्हांवर सदा असो. तो उत्पत्तिस्थितिलयकर्ता तुम्हांवर सदा संतुष्ट असो. ज्याने हिंदु कुलाचे आजवर रक्षण केले, ज्याला विष्णु, शिव, शक्ति, गणपति इत्यादि अनेक नांवें आहेत, ज्याची सगुण अथवा निर्गुण उपासना तुम्ही करिता, 'एकं सत् विप्रा बहुधा वदंति' असें ज्याचे वर्णन आपल्या पूर्वजांनी केले, त्याचा प्रकाश आपणां सर्वांच्या हृदयांत प्रवेश करो. स्वार्थत्यागपूर्वक आणि अत्यंत प्रेमाने परस्परांस साहाय्य करण्याची बुद्धि आपणांस तो देवो. मोठे नांव, पुष्कळ पैसा अथवा वैयक्तिक थोरवी यांचा वासहि आपल्या चित्तास न लागो. केवळ भरतभूमीच्या पुनरुज्जीवनाकडे आमच्या सर्व कार्यांचा ओघ वळो अणि त्याजवर त्या मंग लमयाचा पूर्ण आशीर्वाद असो.{{nop}}<noinclude></noinclude>
brd1v9r3exu76qyf2dya9j4o8o25zti
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८४
104
66849
233327
157430
2026-07-19T17:25:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233327
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|{{xx-larger|'''हिंदुतत्त्वज्ञानाचा इंग्लंडावर घडलेला परिणाम.'''}}}}
{{rule|7em}}{{rule|7em}}
<br>
सभ्य स्त्रीपुरुषहो!<br>{{gap}}आशियाच्या पूर्वभागांतून मी प्रवास करीत असतां एक गोष्ट विशेषेकरून माझ्या ध्यानात आली. पूर्व आशियातील देशांत हिंदुतत्त्वज्ञानाचा प्रसार सर्वत्र झाला असल्याचे मला आढळून आले. चिनी आणि जपानी देवळांच्या भिंतींवर काहीं सुप्रसिद्ध संस्कृत मंत्र मी पाहिले, तेव्हा मला किती नवल वाटले असेल, याची कल्पना तुम्हीच करा. विशेषतः हे मंत्र जुन्या बंगाली लिपीत लिहिलेले आहेत, हे ऐकून तुम्हांला थोडाबहुत आनंदही होईल. स्वधर्माचा प्रसार करण्याकरिता आमचे पूर्वज केवढ्या उत्साहाने आणि मनोभावाने यत्न करीत, याची ढळढळीत साक्ष हे लेख आज देत आहेत.<br>{{gap}}आशियांतील देश वगळले तर पाश्चात्य देशांतहि आमच्या तत्त्वविचारांचा प्रसार इतक्या विस्तृत प्रमाणावर आणि इतक्या स्पष्ट रीतीने झाला आहे की, त्यांची छटा त्या देशांत अद्यापिही मला आढळून येते. मात्र ही गोष्ट लक्षात येण्यास आपली मजल थोडी अधिक तीव्र करून पाश्चात्य समाजाच्या बुडापर्यंत ती पोंचविली पाहिजे. आमच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार अत्यंत प्राचीन काळी पूर्व आणि पश्चिम या दोन्ही देशांकडे झाला होता ही गोष्ट आतां इतिहासप्रसिद्ध आहे. हिंदु धर्माचे ऋण एकंदर जगावर किती आहे, हे आता सर्वांना ठाऊक झाले आहे. त्याचप्रमाणे हिंदुस्थानांतील तत्त्वविचारांचा पगडा प्राचीन आणि अर्वाचीन समाजावर किती पडला होता आणि त्याने काय कार्य केलें हेहि सर्वांस ठाऊक आहे. या प्राचीनकाळच्या गोष्टी झाल्या. सांप्रतकाळी अँग्लोसाक्सन वंशाने समाजरचनेंत आघाडी मारून संस्कृतीच्या मार्गात मनुष्याचे पाऊल पुढे पडण्यांत फार मोठे कार्य केलें आहे, ही गोष्ट तिकडे प्रवास करीत असतां माझ्या लक्षात आली. फार काय, पण या वंशाने केलेले कार्य घडून आले नसते, तर आज जशा प्रकारें या गोष्टींची चर्चा आपण करीत आहों, तसे करण्याची सवड आपणांस मिळाली नसती असेंही मी म्हणेन. पाश्चात्य देशांतला प्रवास पुरा करून मी पूर्वेकडे<noinclude></noinclude>
3imk5rfa4wbhom8uvescfl7r5aplzph
233328
233327
2026-07-19T17:25:38Z
कल्पनाशक्ती
3813
233328
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|{{x-larger|'''हिंदुतत्त्वज्ञानाचा इंग्लंडावर घडलेला परिणाम.'''}}}}
{{rule|7em}}{{rule|7em}}
<br>
सभ्य स्त्रीपुरुषहो!<br>{{gap}}आशियाच्या पूर्वभागांतून मी प्रवास करीत असतां एक गोष्ट विशेषेकरून माझ्या ध्यानात आली. पूर्व आशियातील देशांत हिंदुतत्त्वज्ञानाचा प्रसार सर्वत्र झाला असल्याचे मला आढळून आले. चिनी आणि जपानी देवळांच्या भिंतींवर काहीं सुप्रसिद्ध संस्कृत मंत्र मी पाहिले, तेव्हा मला किती नवल वाटले असेल, याची कल्पना तुम्हीच करा. विशेषतः हे मंत्र जुन्या बंगाली लिपीत लिहिलेले आहेत, हे ऐकून तुम्हांला थोडाबहुत आनंदही होईल. स्वधर्माचा प्रसार करण्याकरिता आमचे पूर्वज केवढ्या उत्साहाने आणि मनोभावाने यत्न करीत, याची ढळढळीत साक्ष हे लेख आज देत आहेत.<br>{{gap}}आशियांतील देश वगळले तर पाश्चात्य देशांतहि आमच्या तत्त्वविचारांचा प्रसार इतक्या विस्तृत प्रमाणावर आणि इतक्या स्पष्ट रीतीने झाला आहे की, त्यांची छटा त्या देशांत अद्यापिही मला आढळून येते. मात्र ही गोष्ट लक्षात येण्यास आपली मजल थोडी अधिक तीव्र करून पाश्चात्य समाजाच्या बुडापर्यंत ती पोंचविली पाहिजे. आमच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार अत्यंत प्राचीन काळी पूर्व आणि पश्चिम या दोन्ही देशांकडे झाला होता ही गोष्ट आतां इतिहासप्रसिद्ध आहे. हिंदु धर्माचे ऋण एकंदर जगावर किती आहे, हे आता सर्वांना ठाऊक झाले आहे. त्याचप्रमाणे हिंदुस्थानांतील तत्त्वविचारांचा पगडा प्राचीन आणि अर्वाचीन समाजावर किती पडला होता आणि त्याने काय कार्य केलें हेहि सर्वांस ठाऊक आहे. या प्राचीनकाळच्या गोष्टी झाल्या. सांप्रतकाळी अँग्लोसाक्सन वंशाने समाजरचनेंत आघाडी मारून संस्कृतीच्या मार्गात मनुष्याचे पाऊल पुढे पडण्यांत फार मोठे कार्य केलें आहे, ही गोष्ट तिकडे प्रवास करीत असतां माझ्या लक्षात आली. फार काय, पण या वंशाने केलेले कार्य घडून आले नसते, तर आज जशा प्रकारें या गोष्टींची चर्चा आपण करीत आहों, तसे करण्याची सवड आपणांस मिळाली नसती असेंही मी म्हणेन. पाश्चात्य देशांतला प्रवास पुरा करून मी पूर्वेकडे<noinclude></noinclude>
nyunf6zv6cycro1ro40m517p7rfqg4a
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८५
104
66850
233329
157432
2026-07-19T17:30:13Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233329
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२८० |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>आलो आणि येथेही त्याच वंशाची शक्ति अद्यापिही कार्यकारी स्थितीत आहे, असे मला आढळून आले. या सत्तेत पुष्कळ दोष आहेत ही गोष्ट खरी, तथापि तिच्यांतले सद्गुण अद्यापि अगदी लुप्त झाले नाहीत असें माझ्या प्रत्ययास आले. ब्रिटिश वंशाच्या अंगी पुढे पाऊल टाकण्याचा जो गुण आहे, त्याचें कार्य हिंदुस्थानांत सुरू असल्यामुळे अनिवार्यपणे आमचेंहि पाऊल उन्नतीच्या मार्गात पुढे पडत आहे. सांप्रतची पाश्चात्य संस्कृति मूळ ग्रीक संस्कृतीतून निघाली असून, तिचंच ती प्रत्यक्ष अपत्य आहे ही गोष्ट तुम्हांस ठाऊक असेलच. परोक्ष तत्त्वे प्रत्यक्षत्वास आणणे हा ग्रीक संस्कृतीचा विशेष होता; आणि अर्वाचीन पाश्चात्य संस्कृतींत अद्यापिहि तो शिल्लक राहिला आहे. हिंदु लोकांत विचारशीलता अधिक आहे, पण दुर्दैवाने पुष्कळ वेळां विचार करता करता आपण इतके शिथिल होतो की, आचाराचे बळ आपल्या ठिकाणी उरत नाही. सारी कर्तृत्वशक्ति विचारांतच खर्च होऊन जाते, आणि आचाराच्या वेळी आपणांस शैथिल्य येते. यामुळे आमची विचारपरंपरा केवळ पुस्तकांत राहून तिची स्पष्ट क्रिया जगाच्या निदर्शनास आली नाही. याचा परिणाम असा झाला की, आपले विचार दडवून ठेवण्याची खोड आम्हांस लागली. आरंभी ही खोड फक्त व्यक्तीपुरतीच होती. हातून क्रिया घडत नाही तर बोलावें तरी कसे? या विचाराने विचार लपविण्याची इच्छा व्यक्तींना होऊ लागली. हळूहळू ही इच्छा स्वभावधर्मात शिरून ती दृढ झाली; आणि अखेरीस तिचा प्रसार साऱ्या राष्ट्रदेहांत होऊन, ती आमच्या चरित्रक्रमाचा एक भागच होऊन बसली. विचार आणि आचार यांत आमच्या ठिकाणी सांप्रत इतका विसंगतपणा आहे की, आमचा आचार पाहून आमची गणना जग मृतराष्ट्रांत करूं लागले. विचारांचे कोणतेंहि स्पष्ट स्वरूप आमच्या आचारांत राहिलेले नाही. आमचे विचार सदोदित असेच अस्पष्ट स्थितीत रहात गेले तर आम्ही जगणार तरी कसे? विचारांचे आचारांत रूपांतर आणि त्यामुळे उत्पन्न होणारी प्रगमनशीलता आणि कर्तृत्वशक्ति हा पाश्चात्य समाजाचा पाया आहे. पाश्चात्यांची सारी संस्कृती या दोन तत्त्वांच्याच आधाराने उभी राहिली आहे; आणि याच दोन तत्त्वांचा जो प्रसार हा अँग्लो सॅक्सन वंश आपल्या देशांत करीत आहे, त्यामुळे आम्हीहि झोपेतून जागे होत असून आपल्या विचारांना मूर्त-<noinclude></noinclude>
06lmzvuf6o1qax2pvdbz1ntvxwpkr7a
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८६
104
66851
233330
157433
2026-07-19T17:34:08Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233330
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड ]|हिंदुतत्त्वज्ञानाचा इंग्लंडावर घडलेला परिणाम|२८१ }}
{{rule}}</noinclude>स्वरूप देण्याची इच्छा आमच्या ठिकाणी वाढत आहे. त्याचप्रमाणे या अँग्लो सॅक्सनवंशाने साऱ्या जगाचे दळणवळणाचे मार्ग आम्हांस खुले करून दिल्यामुळे आजपर्यंत लपवून ठेवलेला आमचा विचारनिधि जगापुढे आणण्याची इच्छा आम्हांस होऊ लागली आहे. या अँग्लो सॅक्सनवंशाने हिंदुस्थानाच्या भवितव्यतेचा मार्ग मोकळा केला आहे. पूर्वी कधीहि नव्हता एवढया विस्तृत प्रमाणावर आमच्या प्राचीन तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याची संधि सध्या आपणांस मिळाली आहे. आपल्या प्राचीन पूर्वजांनी सत्याचा आणि मुक्तीचा मार्ग जगाला उघडा करून दाखविला, तेव्हा हे कार्य त्यांनी कोणत्या परिस्थितीत केले? सर्वत्र बंधुभावाचा उपदेश बुद्धाने जगाला केला तेव्हाही परिस्थिति कशा प्रकारची होती? त्या वेळीहि या मार्गात पुष्कळ सवड होती. त्या वेळींहि जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्या तत्त्वांचा प्रसार करणे सुलभ होते. आता येथे अँग्लो साक्सनवंशाचे राज्य झाले आहे, आणि अशा रीतीने जेथे आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रसार पूर्वी झाला नव्हता, तेथें तो आतां होऊ लागला आहे, एवढेच नव्हे तर त्याचे ग्रहणहि तेथे उत्सुकतेने होत आहे. आमच्या या तत्त्वप्रसाराच्या कार्यांत खुद्द इंग्लंडांतील अनेक बुद्धिमान् पंडित आम्हांस मदत करीत आहेत. मूल्लरबाईचे नांव आतां पुष्कळांच्या कानीं असेलच. आज त्या स्वतःच येथे हजर आहेत. यांचा जन्म एका चांगल्या आणि सुशिक्षित कुटुंबांत झाला आहे; आणि हिंदुस्थानाच्या प्रेमाने प्रेरित होऊन आपले उर्वरित आयुष्य या देशाच्या सेवेत घालवावें, अशा हेतूने त्या येथे आल्या आहेत. यापुढे आपला मातृदेश म्हणजे हिंदुस्थान आणि हिंदी लोक हेच आपले कुटुंब, असें मानून त्या येथे कायमची वस्ती करणार आहेत. मिसेस् बेझंट यांचे नांव ऐकले नाही असा मनुष्य आपणांत बहुधा कोणी नसेल. या इंग्रज स्त्रीने आपले सारे आयुष्य उदारपणे हिंदुस्थानाच्या सेवेला वाहिले आहे. त्याचप्रमाणे आपल्या आजच्या सभेत आणखी दोन अमेरिकन स्त्रिया हजर आहेत. त्यांचाहि उद्देश या देशाची सेवा करण्याचा आहे. आपल्या या गरीब देशाला थोडी तरी मदत करावी एवढीच त्यांची इच्छा आहे. त्याचप्रमाणे आपल्या एका देशबांधवाचे स्मरण तुम्हांस करून देणे माझे कर्तव्य आहे. या गृहस्थाचें नांव मोहिनीमोहन चतरजी असे आहे. पाश्चात्य देशांत यांनी पुष्कळ प्रवास केला<noinclude></noinclude>
rjufukr9f5c6e66pj0ba725fikqbcpd
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८७
104
66852
233331
157434
2026-07-19T17:36:39Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233331
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२८२ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>असून आतां मातृभूमीच्या सेवेसाठी ते येथे परत आले आहेत. कसलाहि गाजावाजा न करितां शांतपणे आणि मनःपूर्वक आपले कार्य करीत रहावें अशी त्यांची रीत आहे. त्यांच्याबद्दल माझ्या चित्तांत मोठा आदर आणि प्रेम वसत आहे. या उदारचरित स्त्रीपुरुषांच्या यादीत आणखीहि एक नांव आज मी गोंवणार आहे. मिस् मार्गारेट नोबल ऊर्फ भगिनी निवेदिता या जातीने इंग्रज असून त्यांनीहि आपला देह या देशाच्या चरणीं वाहिला आहे. त्यांच्या हातून पुष्कळ कार्य घडेल असा भरंवसा बाळगण्यास हरकत नाही.<br>{{gap}}(यानंतर भगिनी निवेदिता यांचे भाषण झाल्यावर उपसंहार करितांना स्वामीजी म्हणाले,)<br>{{gap}}मला आतां दोनच शब्द बोलावयाचे आहेत. आपणा हिंदु लोकांनाहि काही तरी करितां येण्यासारखं आहे, इतकी कल्पना आतां आम्हांस आली आहे. तथापि इतकी कल्पनाहि न पटलेले लोक अद्यापि पुष्कळ आहेत. विशेषतः आपल्या बंगाली लोकांना कदाचित् याचे हसूहि येईल; पण मला मात्र तसे वाटत नाही. तुम्हां सर्वांच्या चित्तांत खळबळ करून सोडणे, हाच माझ्या जीविताचा आदिहेतु आहे. तुम्ही द्वैती आहात किंवा अद्वैती आहांत अथवा दुसऱ्या कोणत्या पंथाचे आहांत, या गोष्टीचा विचार मला कर्तव्य नाही. कोणत्याही पंथाचे तुम्ही असला तरी ती गोष्ट आपल्या कार्याच्या आड येणारी नाही. मुद्याची अशी एकच गोष्ट तुम्हांस सांगावयाची आहे. या गोष्टीचा उच्चार वारंवार करावा लागणे हेहि खरोखर दुर्दैव आहे; पण ती पुनःपुन्हां सांगितल्याशिवाय उपाय नाही, अशीच आपली आजची कृती आहे. आत्मविश्वास धरा असा उपदेश पूर्वी कित्येक वेळां मी केला आहे आणि आजहि पुनः मी तेंच करीत आहे. परमेश्वराची भक्ति तुमच्या चित्तांत उत्पन्न होण्याला आत्मश्रद्धा प्रथम पाहिजे. ती असेल तरच ईश्वराची ओळख तुम्हांस पटेल. तुमचा विश्वास आचार्यांच्या अद्वैत मतावर असो, मध्वाच्या द्वैतावर असो, अथवा पतंजलीच्या योगाभ्यासावर असो; आत्मविश्वास तुम्हांला नसेल तर हा विश्वास निरुपयोगी आहे. तुम्ही व्यासांचे उपासक असा अथवा विश्वामित्राचे उपासक असा; आत्मविश्वासाशिवाय तुमची कोणतीहि उपासना निरर्थक होईल. या आत्मश्रद्धेच्या तत्त्वासंबंधी पाश्चात्यांच्या व आमच्या धर्मविचारांत भेद आहे. प्रत्येक जीवात्म्यांत<noinclude></noinclude>
cupanjfrsx7y02r8g320gl9z6j1j843
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८८
104
66853
233332
157435
2026-07-19T17:38:29Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233332
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|खंड ]|हिंदुतत्त्वज्ञानाचा इंग्लंडावर घडलेला परिणाम|२८३ }}
{{rule}}</noinclude>कोणत्या तरी स्वरूपाचे स्वतंत्र सामर्थ्य आहे, या मुद्याकडे हिंदुस्थानाशि वाय बाकीच्या साऱ्या जगाने कानाडोळा केला आहे. जीवात्मा अशक्त आणि जवळ जवळ क्रियाहीन आहे, असाच बाकीच्या जगाचा समज आहे. उलट पक्षी तो अनंतरूप आणि सदापूर्ण आहे व तो असाच नेहमी राहणार असें आमचे तत्त्वज्ञान आम्हांस सांगते. आमच्या उपनिषदांनी शिकविलेला हा घडा आपण नेहमी लक्षांत बाळगिला पाहिजे. <br>
{{gap}}आपल्या जन्माचा हेतु काय आहे याचे नित्य स्मरण करीत जावें. आम्हा हिंदु लोकांच्या डोक्यांत आणि विशेषतः बंगाल्यांच्या डोक्यांत विदेशीय कल्पनांचा सुळसुळाट झाला आहे आणि या कल्पना राष्ट्रधर्म पोखरून टाकीत आहेत. अलीकडे आपण इतके कशाने मागसलो आहोत? आमच्यापैकी शेकडा नव्याण्णव लोकांच्या डोक्यात विदेशी कल्पना तुडुंब भरून राहिल्या आहेत. असे का झाले? राष्ट्रमालिकेत आपणांस कांहीं उच्चस्थान प्राप्त करून घ्यावयाचे असेल, तर या परदेशी कल्पनांचा त्याग आपण प्रथम केला पाहिजे. त्याचप्रमाणे पाश्चात्यांपासून आपणांस शिकण्यासारख्या अशा पुष्कळ गोष्टी आहेत, हेहि ध्यानात ठेवले पाहिजे. पाश्चात्यांची आदिभौतिक शास्त्रे आणि त्यांच्या कला, ही आपण आपलीशी केली पाहिजेत. या गोष्टी शिकण्यासाठी आपण जसे पाश्चात्यांकडे जातो, त्याचप्रमाणे धर्म आणि तत्त्वज्ञान शिकण्या करितां ते आपणांकडे आले आहेत. या गोष्टीत आम्ही हिंदु लोक सा-या जगाचे गुरु आहों हे कधीहि विसरू नका. राजकीय हक्क आणि अशाच जातीच्या दुसऱ्या वस्तू मिळविण्याकरितां आपण मोठी ओरड चालविली आहे. ठीक आहे. पण असे हक्क मैत्रींतून उत्पन्न होत असतात; आणि खरा मित्रभाव अगदी बरोबरीच्या दोन माणसांत मात्र उत्पन्न होऊ शकतो. या दोन माणसांपकी एक भिकारी असेल तर त्याची व त्याच्या दात्याची मैत्री कधी काळी तरी जमेल काय? हे सारे बोलणे सोपे आहे, पण त्याप्रमाणे कृति घडणे मात्र फार कठीण आहे. परस्परसाहाय्यावांचून आपणांस जरूर असलेली शक्ति कधीहि उत्पन्न व्हावयाची नाही. याकरितां इंग्लंडांत अथवा अमेरिकेंत जातांना भिक्षेकरी या नात्याने नव्हे, तर धर्मगुरु या नात्याने तुम्ही जावे अशी माझी इच्छा आहे. देवाण घेवाण हा साऱ्या जगाचा कायदा आहे. दिल्यावांचून काही मिळत नाही आणि मिळाले असेल त्याची परत<noinclude></noinclude>
syqvyl2qoiix99dnqoop0jmgskpukff
233352
233332
2026-07-20T06:01:00Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233352
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड ]|हिंदुतत्त्वज्ञानाचा इंग्लंडावर घडलेला परिणाम|२८३ }}
{{rule}}</noinclude>कोणत्या तरी स्वरूपाचे स्वतंत्र सामर्थ्य आहे, या मुद्याकडे हिंदुस्थानाशिवाय बाकीच्या साऱ्या जगाने कानाडोळा केला आहे. जीवात्मा अशक्त आणि जवळ जवळ क्रियाहीन आहे, असाच बाकीच्या जगाचा समज आहे. उलट पक्षी तो अनंतरूप आणि सदापूर्ण आहे व तो असाच नेहमी राहणार असें आमचे तत्त्वज्ञान आम्हांस सांगते. आमच्या उपनिषदांनी शिकविलेला हा धडा आपण नेहमी लक्षांत बाळगिला पाहिजे.<br>{{gap}}आपल्या जन्माचा हेतु काय आहे याचे नित्य स्मरण करीत जावें. आम्हा हिंदु लोकांच्या डोक्यांत आणि विशेषतः बंगाल्यांच्या डोक्यांत विदेशीय कल्पनांचा सुळसुळाट झाला आहे आणि या कल्पना राष्ट्रधर्म पोखरून टाकीत आहेत. अलीकडे आपण इतके कशाने मागसलो आहोत? आमच्यापैकी शेकडा नव्याण्णव लोकांच्या डोक्यात विदेशी कल्पना तुडुंब भरून राहिल्या आहेत. असे का झाले? राष्ट्रमालिकेत आपणांस कांहीं उच्चस्थान प्राप्त करून घ्यावयाचे असेल, तर या परदेशी कल्पनांचा त्याग आपण प्रथम केला पाहिजे. त्याचप्रमाणे पाश्चात्यांपासून आपणांस शिकण्यासारख्या अशा पुष्कळ गोष्टी आहेत, हेहि ध्यानात ठेवले पाहिजे. पाश्चात्यांची आदिभौतिक शास्त्रे आणि त्यांच्या कला, ही आपण आपलीशी केली पाहिजेत. या गोष्टी शिकण्यासाठी आपण जसे पाश्चात्यांकडे जातो, त्याचप्रमाणे धर्म आणि तत्त्वज्ञान शिकण्या करितां ते आपणांकडे आले आहेत. या गोष्टीत आम्ही हिंदु लोक साऱ्या जगाचे गुरु आहों हे कधीहि विसरू नका. राजकीय हक्क आणि अशाच जातीच्या दुसऱ्या वस्तू मिळविण्याकरितां आपण मोठी ओरड चालविली आहे. ठीक आहे. पण असे हक्क मैत्रींतून उत्पन्न होत असतात; आणि खरा मित्रभाव अगदी बरोबरीच्या दोन माणसांत मात्र उत्पन्न होऊ शकतो. या दोन माणसांपैकी एक भिकारी असेल तर त्याची व त्याच्या दात्याची मैत्री कधी काळी तरी जमेल काय? हे सारे बोलणे सोपे आहे, पण त्याप्रमाणे कृति घडणे मात्र फार कठीण आहे. परस्परसाहाय्यावांचून आपणांस जरूर असलेली शक्ति कधीहि उत्पन्न व्हावयाची नाही. याकरितां इंग्लंडांत अथवा अमेरिकेंत जातांना भिक्षेकरी या नात्याने नव्हे, तर धर्मगुरु या नात्याने तुम्ही जावे अशी माझी इच्छा आहे. देवाण घेवाण हा साऱ्या जगाचा कायदा आहे. दिल्यावांचून काही मिळत नाही आणि मिळाले असेल त्याची परत<noinclude></noinclude>
jb6easka2qg2unywlww0gjb4yp3z2p7
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८९
104
66854
233333
157436
2026-07-19T17:38:38Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233333
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|२८४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>फेड केल्यावांचूनहि चालत नाही. आपल्या शक्तीप्रमाणे या नियमाची अम्म लबजावणी आपण नेहमी करीत राहिले पाहिजे. या लोकांत रहात असतां येथे सुखी कसे व्हावें, ही कला पाश्चात्यांपासून आपणांस शिकावयाची असेल तर चिरंतन सुखाची प्राप्ति ज्या मार्गाने होते, तो मार्ग पाश्चात्यांस आपण अवश्य दाखवावा. कोणतेंहि कार्य करितांना केवळ आपल्यापुरताच विचार करूं नये. साऱ्या मानवजातीच्या सुखाकरितां झटणे हेच आपले कर्तव्य आहे. केवळ आपल्यापुरतेंच पाहाण्याचे आपले जुने आकुंचित मार्ग आपण आतां टाकून दिले पाहिजेत. आपणा प्रत्येकाच्या मागे मृत्यु सदोदित उभा आहे, हे जाणून असल्या क्षुदपणाचा त्याग आपण करावा. अध्यात्मज्ञाना साठी साऱ्या जगाने भरतभूमीच्या पायाशीच धाव घेतली पाहिजे, हे ऐति हासिक सत्य कधींहि विसरू नका. परमेश्वराच्या सृष्टिरचनेत भरतभूमीचें स्थान अशा प्रकारचे असल्यामुळे तिला कधीहि मरण प्राप्त होणार नाही. चिरंतन सत्य जेथें सांठविले आहे, तेथे मरण कोठचें? चीन देश मरणार नाहीं अथवा जपानहि मरणार नाही. आपल्या जीविताचा आधार काय, या गोष्टीचे स्मरण आपण नित्य बाळगिले पाहिजे. <br>
{{gap}}याकरितां धर्मज्ञान हाच आपला मुख्य जीवनहेतु आहे, ही गोष्ट आपण ध्यानांत ठेविली पाहिजे आणि हे साधण्याकरितां आपणाला कोणी तरी मार्गदर्शक पाहिजे. आपला धर्म म्हणजे शुद्ध अध्यात्म ज्ञान नव्हे, असें ज्या हिंदूला वाटतें तो खरोखर हिंदूच नव्हे. असें न वाटणारे एखादें लहान पोरहि आपणांस असेल असे मला वाटत नाही. काश्मिरांत असतां एके वेळी एका मुसलमान स्त्रीला मी म्हटले, बाई, तुमचा धर्म कोणता? तेव्हां तिने आपल्या भाषेत मला उत्तर दिले, ईश्वराच्या दयेबद्दल त्याचे मोठे उपकार मी मानते, मी ख-या मुसलमानी धर्माची आहे ही त्याचीच कृपा. पुढे एका हिंदु मुलाला असाच प्रश्न मी केला, तेव्हां मी हिंदु आहे इतकाच साधा जबाब त्याने मला दिला. कठोपनिषदांत असलेला अत्यंत महत्त्वाचा असा एकच शब्द मला नेहमी स्मरतो. हा शब्द श्रद्धा असा आहे. नाचिकेताची गोष्ट तुम्ही वाचली तर श्रद्धा या शब्दाचा खरा अर्थ काय आहे, हे तुम्हांस कळेल. आत्मश्रद्ध व्हा, एवढा एकच उपदेश करणे, हे माझें जीवितकार्य आहे. सर्व धर्मात हाच एक मुख्य मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे. {{nop}}<noinclude></noinclude>
9x19bkupgjhdm9vlp5xngj26x4q7cm4
233353
233333
2026-07-20T06:04:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233353
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२८४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>फेड केल्यावांचूनहि चालत नाही. आपल्या शक्तीप्रमाणे या नियमाची अम्मलबजावणी आपण नेहमी करीत राहिले पाहिजे. या लोकांत रहात असतां येथे सुखी कसे व्हावें, ही कला पाश्चात्यांपासून आपणांस शिकावयाची असेल तर चिरंतन सुखाची प्राप्ति ज्या मार्गाने होते, तो मार्ग पाश्चात्यांस आपण अवश्य दाखवावा. कोणतेंहि कार्य करितांना केवळ आपल्यापुरताच विचार करूं नये. साऱ्या मानवजातीच्या सुखाकरितां झटणे हेच आपले कर्तव्य आहे. केवळ आपल्यापुरतेंच पाहाण्याचे आपले जुने आकुंचित मार्ग आपण आतां टाकून दिले पाहिजेत. आपणा प्रत्येकाच्या मागे मृत्यु सदोदित उभा आहे, हे जाणून असल्या क्षुद्रपणाचा त्याग आपण करावा. अध्यात्मज्ञानासाठी साऱ्या जगाने भरतभूमीच्या पायाशीच धाव घेतली पाहिजे, हे ऐतिहासिक सत्य कधींहि विसरू नका. परमेश्वराच्या सृष्टिरचनेत भरतभूमीचें स्थान अशा प्रकारचे असल्यामुळे तिला कधीहि मरण प्राप्त होणार नाही. चिरंतन सत्य जेथें सांठविले आहे, तेथे मरण कोठचें? चीन देश मरणार नाहीं अथवा जपानहि मरणार नाही. आपल्या जीविताचा आधार काय, या गोष्टीचे स्मरण आपण नित्य बाळगिले पाहिजे.<br>{{gap}}याकरितां धर्मज्ञान हाच आपला मुख्य जीवनहेतु आहे, ही गोष्ट आपण ध्यानांत ठेविली पाहिजे आणि हे साधण्याकरितां आपणाला कोणी तरी मार्गदर्शक पाहिजे. आपला धर्म म्हणजे शुद्ध अध्यात्म ज्ञान नव्हे, असें ज्या हिंदूला वाटतें तो खरोखर हिंदूच नव्हे. असें न वाटणारे एखादें लहान पोरहि आपणांस असेल असे मला वाटत नाही. काश्मिरांत असतां एके वेळी एका मुसलमान स्त्रीला मी म्हटले, बाई, तुमचा धर्म कोणता? तेव्हां तिने आपल्या भाषेत मला उत्तर दिले, ईश्वराच्या दयेबद्दल त्याचे मोठे उपकार मी मानते, मी खऱ्या मुसलमानी धर्माची आहे ही त्याचीच कृपा. पुढे एका हिंदु मुलाला असाच प्रश्न मी केला, तेव्हां मी हिंदु आहे इतकाच साधा जबाब त्याने मला दिला. कठोपनिषदांत असलेला अत्यंत महत्त्वाचा असा एकच शब्द मला नेहमी स्मरतो. हा शब्द श्रद्धा असा आहे. नाचिकेताची गोष्ट तुम्ही वाचली तर श्रद्धा या शब्दाचा खरा अर्थ काय आहे, हे तुम्हांस कळेल. आत्मश्रद्ध व्हा, एवढा एकच उपदेश करणे, हे माझें जीवितकार्य आहे. सर्व धर्मात हाच एक मुख्य मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे.<noinclude></noinclude>
msgzuok0xcjo0g87g1eqz4pjp11vac9
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९०
104
66855
233334
157437
2026-07-19T17:38:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233334
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|खंड ]|हिंदुतत्त्वज्ञानाचा इंग्लंडावर घडलेला परिणाम|२८}}
{{rule}}</noinclude>मानवी मनोरचनेत या एका गुणाला अढळस्थान असले पाहिजे हे आपण कधीहि विसरू नका. हा शब्द अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळेच त्याचा उच्चार मला पुनःपुन्हां करावा लागतो. प्रत्येकाला आत्मश्रद्धा प्रथम पाहिजे. महा सागरांतील एखादा तरंग क्षुद्र वुडबुडा असला आणि दुसरा प्रचंड डोंगर एवढा असला, तरी त्या दोहोंच्या सामान्य अधिष्ठानाच्या जागी तोच महा सागर असतो. त्या दोहोंचे अधिष्ठान सारखेच अनंतरूप असते. याकरिता आपण क्षुद्र म्हणून निराश होण्याचे कोणासहि कारण नाही. मुक्तीचा मार्ग सर्वांस सारखाच मोकळा आहे. आपणांपैकी प्रत्येक जण हे मायावरण आज ना उद्या अवश्य फेकून देईल. याकरितां ही आत्मश्रद्धा नेहमी जवळ असू द्या. केव्हाही निराश होऊ नका. आशा दीर्घ असली म्हणजे दीर्घ प्रयत्नांस ती उत्तेजन देते. आशा जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याहि गोष्टीच्या सिद्धीसाठी तुम्ही भगीरथ प्रयत्न केल्यावांचून राहणार नाही. मी वाटेल ते करूं शकेन अशी आत्मश्रद्धा आपणांपैकी प्रत्येकाच्या हृदयांत उत्पन्न झाली, तर व्यास आणि अर्जुन यांचा काळ आजहि आपणांस पुनः दिसेल. ज्या काळी सा-या मनुष्यजातीला उपयुक्त अशी तत्त्वरत्ने बाहेर पडली, तो काळ आज पुनः प्राप्त होईल, अध्यात्म विचारांच्या बाबतींत आज आपण फार मागसलेले आहो. अध्यात्म विचारांना वास्तविक हिंदुस्थानांत तोटा नाही. जगांतील सा-या मानवकुलांत हिंदु कुल श्रेष्ठ पदवीला चढले, तें याच ज्ञानाच्या जोरावर चढलें; आणि तेच पूर्वीचे दिवस आजहि आपणांस पुनः प्राप्त करून घेता येण्यासारखे आहेत. आपली पूर्वपरंपरा आणि पूर्वेतिहास यांचे अवलोकन केले, तर अशी आशा बाळगणे अन्याय्य आहे असे कोणीहि म्हणणार नाही. पण असे दिवस येणे अथवा न येणे ही गोष्ट तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. बंगाली तरुणांनो, या मार्गात आपणांस काही मदत मिळेल या आशेनें श्रीमंतांच्या आणि थोरामोठ्यांच्या तोंडाकडे केव्हाही पाहूं नका. त्यांच्या हातून अशा प्रकारची कार्ये केव्हाही घडलेली नाहीत. जगांतील सारी महत्कार्ये आजपर्यंत गरीब दुबळ्यांनीच केली आहेत. बंगाल्यांतील अकिंचन तरुणांनो, तुम्हांला अशक्य असे काही नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्याने होण्यासारखी आहे आणि ती तुम्हीं केलीच पाहिजे. तुम्ही एकवार पुढे पाऊल टाकले की शेकडों अनुयायी तुमच्या मागे धावत सुटतील. तुम्ही गरीब आहां, दुबळे आहां, असा<noinclude></noinclude>
lh4phrwp6lpct697h8d4ev9s82dxlpl
233354
233334
2026-07-20T06:07:18Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233354
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड ]|हिंदुतत्त्वज्ञानाचा इंग्लंडावर घडलेला परिणाम|२८}}
{{rule}}</noinclude>मानवी मनोरचनेत या एका गुणाला अढळस्थान असले पाहिजे हे आपण कधीहि विसरू नका. हा शब्द अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळेच त्याचा उच्चार मला पुनःपुन्हां करावा लागतो. प्रत्येकाला आत्मश्रद्धा प्रथम पाहिजे. महासागरांतील एखादा तरंग क्षुद्र बुडबुडा असला आणि दुसरा प्रचंड डोंगर एवढा असला, तरी त्या दोहोंच्या सामान्य अधिष्ठानाच्या जागी तोच महासागर असतो. त्या दोहोंचे अधिष्ठान सारखेच अनंतरूप असते. याकरिता आपण क्षुद्र म्हणून निराश होण्याचे कोणासहि कारण नाही. मुक्तीचा मार्ग सर्वांस सारखाच मोकळा आहे. आपणांपैकी प्रत्येक जण हे मायावरण आज ना उद्या अवश्य फेकून देईल. याकरितां ही आत्मश्रद्धा नेहमी जवळ असू द्या. केव्हाही निराश होऊ नका. आशा दीर्घ असली म्हणजे दीर्घ प्रयत्नांस ती उत्तेजन देते. आशा जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याहि गोष्टीच्या सिद्धीसाठी तुम्ही भगीरथ प्रयत्न केल्यावांचून राहणार नाही. मी वाटेल ते करूं शकेन अशी आत्मश्रद्धा आपणांपैकी प्रत्येकाच्या हृदयांत उत्पन्न झाली, तर व्यास आणि अर्जुन यांचा काळ आजहि आपणांस पुनः दिसेल. ज्या काळी साऱ्या मनुष्यजातीला उपयुक्त अशी तत्त्वरत्ने बाहेर पडली, तो काळ आज पुनः प्राप्त होईल, अध्यात्म विचारांच्या बाबतींत आज आपण फार मागसलेले आहो. अध्यात्म विचारांना वास्तविक हिंदुस्थानांत तोटा नाही. जगांतील साऱ्या मानवकुलांत हिंदु कुल श्रेष्ठ पदवीला चढले, तें याच ज्ञानाच्या जोरावर चढलें; आणि तेच पूर्वीचे दिवस आजहि आपणांस पुनः प्राप्त करून घेता येण्यासारखे आहेत. आपली पूर्वपरंपरा आणि पूर्वेतिहास यांचे अवलोकन केले, तर अशी आशा बाळगणे अन्याय्य आहे असे कोणीहि म्हणणार नाही. पण असे दिवस येणे अथवा न येणे ही गोष्ट तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. बंगाली तरुणांनो, या मार्गात आपणांस काही मदत मिळेल या आशेनें श्रीमंतांच्या आणि थोरामोठ्यांच्या तोंडाकडे केव्हाही पाहूं नका. त्यांच्या हातून अशा प्रकारची कार्ये केव्हाही घडलेली नाहीत. जगांतील सारी महत्कार्ये आजपर्यंत गरीब दुबळ्यांनीच केली आहेत. बंगाल्यांतील अकिंचन तरुणांनो, तुम्हांला अशक्य असे काही नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्याने होण्यासारखी आहे आणि ती तुम्हीं केलीच पाहिजे. तुम्ही एकवार पुढे पाऊल टाकले की शेकडों अनुयायी तुमच्या मागे धावत सुटतील. तुम्ही गरीब आहां, दुबळे आहां, असा<noinclude></noinclude>
g72llckm78x4labpgwhd9jl9dkhttgl
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९१
104
66856
233335
157438
2026-07-19T17:38:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233335
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|२८६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>विचार कोणीहि करणार नाही. मात्र तुमची आत्मश्रद्धा दृढ पाहिजे. तुमचें वर्तन पवित्र असले पाहिजे; आणि प्रत्येक कार्यात तुमचे अंतःकरण पूर्णपणे गुंतले पाहिजे. हे कार्य साधण्याकरितांच आपला जन्म आहे, अशी श्रद्धा बाळगा. बंगाली तरुणांनो, हिंदुस्थानाचा उद्धार तुमच्याच हातून होणार आहे. तुम्हांला हे खरे वाटो अगर न वाटो; पण हे मी निश्चयाने सांगतो की, हे उद्धाराचे कार्य तुमच्याच हातून होणार आहे. मला देह आहे आणि आत्मा आहे, हे जितके खरें, तितकेंच तुम्ही भावी उन्नतीचे कारागीर आम्हां, हेहि खरें आहे. याकरितांच तुम्हां बंगाली तरुणांकडे माझें अंतःकरण नेहमी ओढ घेतें. तुम्ही निद्रव्य आहां, हीच माझ्या आशेची जागा आहे. तुम्ही दरिद्री आहां म्हणूनच कार्यकर्ते होऊ शकाल. तुम्ही अकिंचन आहां म्हणूनच या कार्याला आपले सारें अंतःकरण वाहाल. तुम्ही भिकारी आहां, म्हणून सर्वसंगपरि त्यागी होऊ शकाल. तुम्ही भिकारी आहां म्हणूनच हा उपदेश वारंवार मी तुम्हांला करितो. हा जसा माझा जीवनहेतु तसाच तो तुमचाहि आहे. तुम्ही द्वैती की अद्वैती की दुसऱ्याच कांहीं पंथाचे आहां, हा विचार मी करीत नाही. हिंदुस्थानांत शेकडों मतें प्रचलित असली, तरी त्या सर्वांच्या पोटी एकच सामान्य सूत्र आहे; आणि याच सूत्राने आपण सारे बद्ध झालेले आहों, हा मुद्दा साऱ्या हिंदी राष्ट्राला पटेल असे करणे हे तुमचे कार्य आहे. {{nop}}
{{center|***********}}<noinclude></noinclude>
2saqg0q42rdecqr3h0uwu55contxuyi
233355
233335
2026-07-20T06:09:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233355
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२८६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>विचार कोणीहि करणार नाही. मात्र तुमची आत्मश्रद्धा दृढ पाहिजे. तुमचें वर्तन पवित्र असले पाहिजे; आणि प्रत्येक कार्यात तुमचे अंतःकरण पूर्णपणे गुंतले पाहिजे. हे कार्य साधण्याकरितांच आपला जन्म आहे, अशी श्रद्धा बाळगा. बंगाली तरुणांनो, हिंदुस्थानाचा उद्धार तुमच्याच हातून होणार आहे. तुम्हांला हे खरे वाटो अगर न वाटो; पण हे मी निश्चयाने सांगतो की, हे उद्धाराचे कार्य तुमच्याच हातून होणार आहे. मला देह आहे आणि आत्मा आहे, हे जितके खरें, तितकेंच तुम्ही भावी उन्नतीचे कारागीर आम्हां, हेहि खरें आहे. याकरितांच तुम्हां बंगाली तरुणांकडे माझें अंतःकरण नेहमी ओढ घेतें. तुम्ही निर्द्रव्य आहां, हीच माझ्या आशेची जागा आहे. तुम्ही दरिद्री आहां म्हणूनच कार्यकर्ते होऊ शकाल. तुम्ही अकिंचन आहां म्हणूनच या कार्याला आपले सारें अंतःकरण वाहाल. तुम्ही भिकारी आहां, म्हणून सर्वसंगपरित्यागी होऊ शकाल. तुम्ही भिकारी आहां म्हणूनच हा उपदेश वारंवार मी तुम्हांला करितो. हा जसा माझा जीवनहेतु तसाच तो तुमचाहि आहे. तुम्ही द्वैती की अद्वैती की दुसऱ्याच कांहीं पंथाचे आहां, हा विचार मी करीत नाही. हिंदुस्थानांत शेकडों मतें प्रचलित असली, तरी त्या सर्वांच्या पोटी एकच सामान्य सूत्र आहे; आणि याच सूत्राने आपण सारे बद्ध झालेले आहों, हा मुद्दा साऱ्या हिंदी राष्ट्राला पटेल असे करणे हे तुमचे कार्य आहे.<br><br><br>{{rule|5em}}{{rule|5em}}{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
rdf43133n0whwsgkr8hffq1wke6z6g4
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९२
104
66857
233336
157439
2026-07-19T17:39:10Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233336
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{large|'''संन्याशाचें ध्येय आणि त्याचा अभ्यास.'''}}
{{center|**********}}
(बेलूर मठांतील तरुण संन्याशांनी दिलेल्या मानपत्रास उत्तर.)
लांबलचक भाषण करण्याचा हा प्रसंग नव्हे. संन्यासधर्म योग्य रीतीने पाळण्याकरितां तुमचा प्रत्यक्ष आचार कसा असावा याचे वर्णन मी थोड क्यांत करणार आहे. संन्यासमार्गाचे ध्येय काय आहे हे प्रथम समजणे अवश्य आहे. हे साध्य समजल्यानंतर त्याची सिद्धि कोणत्या मागीने होईल हेहि जाणले पाहिजे. तुमच्यापैकी जे संन्यासी असतील त्यांनी परहितावि षयीं नेहमी दक्ष राहिले पाहिजे. कारण, खरा संन्यासधर्म तोच. संन्यास अथवा त्याग म्हणजे काय याचे लांबलचक विवरण करण्यास आज मला वेळ नाही, तेव्हां हा अर्थ अगदी थोडक्यात सांगावयाचा म्हटले तर तो 'मृत्यूविषयी प्रेम' या शब्दांनी सांगता येईल. संसारी माणसें जगण्याची हांव धरितात, लांबलचक आयुष्य आपणांस कसे प्राप्त होईल या गोष्टीचा विचार ती नित्य करीत असतात. संन्यासधर्म याच्या उलट आहे. संन्या शाने मृत्यूवर प्रेम केले पाहिजे. तर मग आम्ही आत्महत्या करावी की काय असा प्रश्न तुम्ही कराल त्याला नकारात्मकच उत्तर मला दिले पाहिजे. आत्महत्या ही मृत्यूच्या प्रेमाची निदर्शक नाही. मृत्यूला कडकडून भेटावें म्हणून कोणी आत्महत्या करीत नाही. एखाद्याने आत्महत्या करण्याचा यत्न केला आणि तो फसला तर या फंदांत तो पुनः पडत नाही, असा अनुभव शेंकडों वेळां आला आहे. तर मग मृत्यूविषयी प्रेम म्हणजे काय? सत्का -यासाठी देहदानाचीहि तयारी असणे हेच मृत्यूविषयीं खरें प्रेम होय. आ पल्या प्रत्येक कृतींत त्याग असणे हा स्वतःस मृत्यूकडे नेण्याचा मार्ग आहे. जी बुद्धि आज देहाला चिकटून बसली आहे ती पूर्ण नष्ट करणे हेच खरें मरण. आपल्या खाण्यापिण्यांत आणि इतर बारीकसारीक कर्मातसुद्धा त्यागाची भावना आपण सदोदित जागी ठेविली पाहिजे. शरीर पुष्ट व्हावे म्हणून तुम्ही अन्न भक्षण करितां पण परहितासाठी त्याचा होम करण्याची तुमच्या चित्ताची तयारी नसेल तर तें शरीर पुष्ट केल्याचा उपयोग काय? अनेक ग्रंथ वाचून आपले मन तुम्ही पुष्ट करितां, पण जगाच्या हितासाठी त्याचा<noinclude></noinclude>
dz4wnizmdnkpajd0bouuhnzflnpjfnv
233356
233336
2026-07-20T09:13:40Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233356
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|{{x-larger|'''संन्याशाचें ध्येय आणि त्याचा अभ्यास.'''}}}}
{{rule|7em}}{{rule|7em}}
<br>
{{center|'''(बेलूर मठांतील तरुण संन्याशांनी दिलेल्या मानपत्रास उत्तर.)'''}}
{{gap}}लांबलचक भाषण करण्याचा हा प्रसंग नव्हे. संन्यासधर्म योग्य रीतीने पाळण्याकरितां तुमचा प्रत्यक्ष आचार कसा असावा याचे वर्णन मी थोडक्यांत करणार आहे. संन्यासमार्गाचे ध्येय काय आहे हे प्रथम समजणे अवश्य आहे. हे साध्य समजल्यानंतर त्याची सिद्धि कोणत्या मार्गाने होईल हेहि जाणले पाहिजे. तुमच्यापैकी जे संन्यासी असतील त्यांनी परहिताविषयीं नेहमी दक्ष राहिले पाहिजे. कारण, खरा संन्यासधर्म तोच. संन्यास अथवा त्याग म्हणजे काय याचे लांबलचक विवरण करण्यास आज मला वेळ नाही, तेव्हां हा अर्थ अगदी थोडक्यात सांगावयाचा म्हटले तर तो 'मृत्यूविषयी प्रेम' या शब्दांनी सांगता येईल. संसारी माणसें जगण्याची हांव धरितात, लांबलचक आयुष्य आपणांस कसे प्राप्त होईल या गोष्टीचा विचार ती नित्य करीत असतात. संन्यासधर्म याच्या उलट आहे. संन्याशाने मृत्यूवर प्रेम केले पाहिजे. तर मग आम्ही आत्महत्या करावी की काय असा प्रश्न तुम्ही कराल त्याला नकारात्मकच उत्तर मला दिले पाहिजे. आत्महत्या ही मृत्यूच्या प्रेमाची निदर्शक नाही. मृत्यूला कडकडून भेटावें म्हणून कोणी आत्महत्या करीत नाही. एखाद्याने आत्महत्या करण्याचा यत्न केला आणि तो फसला तर या फंदांत तो पुनः पडत नाही, असा अनुभव शेंकडों वेळां आला आहे. तर मग मृत्यूविषयी प्रेम म्हणजे काय? सत्कार्यासाठी देहदानाचीहि तयारी असणे हेच मृत्यूविषयीं खरें प्रेम होय. आपल्या प्रत्येक कृतींत त्याग असणे हा स्वतःस मृत्यूकडे नेण्याचा मार्ग आहे. जी बुद्धि आज देहाला चिकटून बसली आहे ती पूर्ण नष्ट करणे हेच खरें मरण. आपल्या खाण्यापिण्यांत आणि इतर बारीकसारीक कर्मातसुद्धा त्यागाची भावना आपण सदोदित जागी ठेविली पाहिजे. शरीर पुष्ट व्हावे म्हणून तुम्ही अन्न भक्षण करितां पण परहितासाठी त्याचा होम करण्याची तुमच्या चित्ताची तयारी नसेल तर तें शरीर पुष्ट केल्याचा उपयोग काय? अनेक ग्रंथ वाचून आपले मन तुम्ही पुष्ट करितां, पण जगाच्या हितासाठी त्याचा<noinclude></noinclude>
gpwux7c71kkg03tom16teco3g2uachq
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९३
104
66858
233337
157440
2026-07-19T17:39:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233337
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|२८८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>होम न होईल तर त्या मनःपुष्टीचा काय उपयोग? तुमचा देह आणि तुमचे मन यांचा व्यय जगत्कार्यासाठी न होईल तर त्यांचे लालनपालन फुकट केलें असें होईल. या एका क्षुद्र देहाला महत्त्व आणण्यासाठी धडपड करण्या पेक्षा लक्षावधि बांधवांच्या कल्याणासाठी त्याचे बलिदान करणे तुम्हांस श्रेयस्कर आहे. संन्यासधर्माचें हैं ध्येय आहे, आणि हे साधण्याकरिता आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुम्ही मरत राहिले पाहिजे. अशा प्रका रच्या मृत्यूंतच मुक्ति आहे. सर्व कल्याण त्यांत सांठविले आहे. आणि याविरुद्ध असलेला मार्ग म्हणजे अधोगतीचा मार्ग होय. संन्यासधर्माचें साध्य काय याचा विचार येथवर झाला. आता ते कोणत्या मार्गाने सिद्ध होईल याचाहि विचार केला पाहिजे. साध्य असाध्य कोटीतले असूं नये हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. राष्ट्रापुढे अत्युच साध्य ठेवले तर ते सिद्ध न होतां राष्ट्र उलट दुबाळे होऊन अधोगतीच्या मागीला लागते. बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसार हिंदुस्थानांत झाल्यानंतर येथे असाच प्रकार घडून आला. याकरितां आपलें साध्य अत्युच्च कोटींतले असूं नये. पण याबरोबरच आणखोहि एक गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे ती ही की आपली दृष्टि निवळ व्यवहारीहि असू नये. कल्पनेची थोडीशीहि भरारी तुमच्याजवळ नसेल आणि विशेषेकरून अवश्य असे एखादें साध्य तुमच्या मार्गदर्शकाच्या जागी नसेल तर तुमची किंमत पशुहून अधिक नाहीं असें होईल. केवळ देहपरिचर्या चालविण्याचे काम पशुहि करितो. याकरिता आपल्या नजरेपुढे काही उच्च साध्य सदोदित असले पाहिजे आणि त्याबरो बरच व्यवहारहि पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा इतकाच की, कोणत्याहि बाबीचा अतिरेक होऊ देऊ नये. आमच्या जुन्या दृष्टीने पाहतां आमचे साध्य म्हटले म्हणजे पर्वताच्या गुहेत ध्यानस्थ होऊन बसावें आणि एके दिवशी मरून जावें हेच होते. पण हा मार्ग चुकीचा आहे. सर्वांना मागे टाकून आपण एकटेंच पुढे जाऊं पहाणे चुकीचे आहे. फार काय, पण अशा रीतीने चाल ण्यांत अखेरीस यशहि येत नाही असा अनुभव प्रत्येकाला पुढे येतो. दुस न्याच्या मुक्तीसाठी धडपड करण्यांतच आपणांसहि मुक्ति लाभ होतो हे तत्त्व केव्हांना केव्हां तरी प्रत्येकाच्या अनुभवास आल्यावांचून राहणार नाही. याकरितां व्यवहार सोडूं नका. व्यवहाराचा सारा खटाटोप करीत,<noinclude></noinclude>
2yufey0my2s7d2oe2425db7m3y3r8pt
233357
233337
2026-07-20T09:16:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233357
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२८८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>होम न होईल तर त्या मनःपुष्टीचा काय उपयोग? तुमचा देह आणि तुमचे मन यांचा व्यय जगत्कार्यासाठी न होईल तर त्यांचे लालनपालन फुकट केलें असें होईल. या एका क्षुद्र देहाला महत्त्व आणण्यासाठी धडपड करण्यापेक्षा लक्षावधि बांधवांच्या कल्याणासाठी त्याचे बलिदान करणे तुम्हांस श्रेयस्कर आहे. संन्यासधर्माचें हे ध्येय आहे, आणि हे साधण्याकरिता आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुम्ही मरत राहिले पाहिजे. अशा प्रकारच्या मृत्यूंतच मुक्ति आहे. सर्व कल्याण त्यांत सांठविले आहे. आणि याविरुद्ध असलेला मार्ग म्हणजे अधोगतीचा मार्ग होय. संन्यासधर्माचें साध्य काय याचा विचार येथवर झाला. आता ते कोणत्या मार्गाने सिद्ध होईल याचाहि विचार केला पाहिजे. साध्य असाध्य कोटीतले असूं नये हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. राष्ट्रापुढे अत्युच साध्य ठेवले तर ते सिद्ध न होतां राष्ट्र उलट दुबाळे होऊन अधोगतीच्या मार्गाला लागते. बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसार हिंदुस्थानांत झाल्यानंतर येथे असाच प्रकार घडून आला. याकरितां आपलें साध्य अत्युच्च कोटींतले असूं नये. पण याबरोबरच आणखीहि एक गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे ती ही की आपली दृष्टि निवळ व्यवहारीहि असू नये. कल्पनेची थोडीशीहि भरारी तुमच्याजवळ नसेल आणि विशेषेकरून अवश्य असे एखादें साध्य तुमच्या मार्गदर्शकाच्या जागी नसेल तर तुमची किंमत पशुहून अधिक नाहीं असें होईल. केवळ देहपरिचर्या चालविण्याचे काम पशुहि करितो. याकरिता आपल्या नजरेपुढे काही उच्च साध्य सदोदित असले पाहिजे आणि त्याबरोबरच व्यवहारहि पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा इतकाच की, कोणत्याहि बाबीचा अतिरेक होऊ देऊ नये. आमच्या जुन्या दृष्टीने पाहतां आमचे साध्य म्हटले म्हणजे पर्वताच्या गुहेत ध्यानस्थ होऊन बसावें आणि एके दिवशी मरून जावें हेच होते. पण हा मार्ग चुकीचा आहे. सर्वांना मागे टाकून आपण एकटेंच पुढे जाऊं पहाणे चुकीचे आहे. फार काय, पण अशा रीतीने चालण्यांत अखेरीस यशहि येत नाही असा अनुभव प्रत्येकाला पुढे येतो. दुसऱ्याच्या मुक्तीसाठी धडपड करण्यांतच आपणांसहि मुक्ति लाभ होतो हे तत्त्व केव्हांना केव्हां तरी प्रत्येकाच्या अनुभवास आल्यावांचून राहणार नाही. याकरितां व्यवहार सोडूं नका. व्यवहाराचा सारा खटाटोप करीत,<noinclude></noinclude>
nxfjo1bfhfz7j92r5bemoqw28kkplrk
233358
233357
2026-07-20T09:16:52Z
कल्पनाशक्ती
3813
233358
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२८८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>होम न होईल तर त्या मनःपुष्टीचा काय उपयोग? तुमचा देह आणि तुमचे मन यांचा व्यय जगत्कार्यासाठी न होईल तर त्यांचे लालनपालन फुकट केलें असें होईल. या एका क्षुद्र देहाला महत्त्व आणण्यासाठी धडपड करण्यापेक्षा लक्षावधि बांधवांच्या कल्याणासाठी त्याचे बलिदान करणे तुम्हांस श्रेयस्कर आहे. संन्यासधर्माचें हे ध्येय आहे, आणि हे साधण्याकरिता आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुम्ही मरत राहिले पाहिजे. अशा प्रकारच्या मृत्यूंतच मुक्ति आहे. सर्व कल्याण त्यांत सांठविले आहे. आणि याविरुद्ध असलेला मार्ग म्हणजे अधोगतीचा मार्ग होय. संन्यासधर्माचें साध्य काय याचा विचार येथवर झाला. आता ते कोणत्या मार्गाने सिद्ध होईल याचाहि विचार केला पाहिजे. साध्य असाध्य कोटीतले असूं नये हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. राष्ट्रापुढे अत्युच साध्य ठेवले तर ते सिद्ध न होतां राष्ट्र उलट दुबाळे होऊन अधोगतीच्या मार्गाला लागते. बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसार हिंदुस्थानांत झाल्यानंतर येथे असाच प्रकार घडून आला. याकरितां आपलें साध्य अत्युच्च कोटींतले असूं नये. पण याबरोबरच आणखीहि एक गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे ती ही की आपली दृष्टि निवळ व्यवहारीहि असू नये. कल्पनेची थोडीशीहि भरारी तुमच्याजवळ नसेल आणि विशेषेकरून अवश्य असे एखादें साध्य तुमच्या मार्गदर्शकाच्या जागी नसेल तर तुमची किंमत पशुहून अधिक नाहीं असें होईल. केवळ देहपरिचर्या चालविण्याचे काम पशुहि करितो. याकरिता आपल्या नजरेपुढे काही उच्च साध्य सदोदित असले पाहिजे आणि त्याबरोबरच व्यवहारहि पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा इतकाच की, कोणत्याहि बाबीचा अतिरेक होऊ देऊ नये. आमच्या जुन्या दृष्टीने पाहतां आमचे साध्य म्हटले म्हणजे पर्वताच्या गुहेत ध्यानस्थ होऊन बसावें आणि एके दिवशी मरून जावें हेच होते. पण हा मार्ग चुकीचा आहे. सर्वांना मागे टाकून आपण एकटेंच पुढे जाऊं पहाणे चुकीचे आहे. फार काय, पण अशा रीतीने चालण्यांत अखेरीस यशहि येत नाही असा अनुभव प्रत्येकाला पुढे येतो. दुसऱ्याच्या मुक्तीसाठी धडपड करण्यांतच आपणांसहि मुक्ति लाभ होतो हे तत्त्व केव्हांना केव्हां तरी प्रत्येकाच्या अनुभवास आल्यावांचून राहणार नाही. याकरितां व्यवहार सोडूं नका. व्यवहाराचा सारा खटाटोप करीत<noinclude></noinclude>
3q3g6ibeigsnp1maccn17p2cpqbybt2
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९४
104
66859
233338
157441
2026-07-19T17:39:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233338
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|खंड ]|संन्याशाचे ध्येय आणि त्याचा अभ्यास|२८९ }}
{{rule}}</noinclude>असतांहि आपल्या नजरेसमोर उच्च साध्य असावें. उच्च साध्य आणि संसार या दोहोंचा एकत्र परिपाक करण्याचा यत्न तुम्ही करावा. एखाद्या क्षणी अचल ध्यानस्थ होण्याची जशी तुमच्या चित्ताची तयारी असावी त्याच प्रमाणे दुसऱ्या क्षणी शेतांत जाऊन नांगर धरण्याचीहि तुमच्या चित्ताची तयारी असली पाहिजे. एका क्षणीं विद्वत्ताप्रचुर शास्त्रार्थ चर्चा करीत असतां, दुसऱ्या क्षणी भाजीची टोपली डोक्यावर घेऊन बाजारांत घासाघीस घाल ण्याची तुमच्या चित्ताची तयारी असली पाहिजे. एके क्षणी अत्युच्च विचा रांत मन दंग होऊन एखाद्या पृथ्वीपतीसारखे जग तुच्छ करून तुम्ही बस लेले असतां दुसऱ्याच क्षणीं केराची टोपली उचलण्याची तुमच्या चित्ताची तयारी असली पाहिजे. मठांतल्या केराची टोपलीच नव्हे, तर कोणाच्याही घरची टोपली उचलण्यांत तुम्हांला कमीपणा वाटू नये.<br>{{gap}}तुमच्या या मठाचा उद्देश पुरुषार्थी माणसें निर्माण करण्याचा आहे, हे विसरूं नका. पूर्वकालीन ऋषींनी लिहिलेल्या ग्रंथाचें अध्ययन करणे, एवढयाने तुमचा खरा कार्यभाग संपला असें नाही. ते ऋषि कालाच्या उदरांत नाहीसे झाले आणि त्यांजबरोबरच त्यांची मतेंहि अस्तंगत झाली. आतां ती जुनी मते नुसती पठण करण्यांत अर्थ नाही. त्या ऋषींनी काय म्हटले, हे पहात न बसतांना, तुम्ही स्वतःच ऋषि व्हा. पूर्वकालीन ऋषि महापुरुष होते हे खरें; पण तेहि मनुष्यच होते हेहि खरे आहे. आणि तुम्हीहि मनुष्येच आहां, मग त्यांचे ऋषिपण तुमचे अंगीं कां येऊं नये? नुसत्या पुस्तकी विद्येनें कोणता कार्यभाग होणार? फार काय, पण नुसत्या ध्यानानेंहि कांहीं कार्यभाग होणार नाही. मंत्रतंत्राचे नुसते पठणहि तसेंच निरुपयोगी आहे. या पुस्तकी विद्येच्या मागे न लागतां तुम्ही स्वतंत्र विचारवान् व्हा. बुद्धिमार्गातहि परावलंबी न होतां स्वावलंबी व्हा, पुरुषार्थी कसे व्हावें हे तुम्ही शिका. विश्वचालक शक्तीइतकें ज्याचे अंतःकरण शक्तिवान् असते, आणि त्याबरोबरच तेथे एखाद्या स्त्रीच्या अंतःकरणाची कोमलता असते, तोच खरा पुरुष होय. आपणाभोंवतीं पसरलेल्या कोट्यवधी जीवांपैकी प्रत्येक जीव तुम्हांस आत्मवत् वाटला पाहिजे; पण त्याबरो बरच एक रतिभरहि कंपायमान होणार नाही, असें तुमचे अंतःकरण असावें. या गोष्टी तुम्हांस परस्परविरोधी वाटतील, पण हा विरोधाभास तुमच्या ठिकाणी असल्याशिवाय तुम्ही पुरुषार्थी होऊ शकणार नाही. साऱ्या विश्वावर हुकमत<noinclude><br>{{gap}}स्वा०वि० खं०-९-१९.</noinclude>
c8kk596r55fqllg8ml9uxzry8of3uvz
233359
233338
2026-07-20T09:19:54Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233359
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड ]|संन्याशाचे ध्येय आणि त्याचा अभ्यास|२८९ }}
{{rule}}</noinclude>असतांहि आपल्या नजरेसमोर उच्च साध्य असावें. उच्च साध्य आणि संसार या दोहोंचा एकत्र परिपाक करण्याचा यत्न तुम्ही करावा. एखाद्या क्षणी अचल ध्यानस्थ होण्याची जशी तुमच्या चित्ताची तयारी असावी त्याचप्रमाणे दुसऱ्या क्षणी शेतांत जाऊन नांगर धरण्याचीहि तुमच्या चित्ताची तयारी असली पाहिजे. एका क्षणीं विद्वत्ताप्रचुर शास्त्रार्थ चर्चा करीत असतां, दुसऱ्या क्षणी भाजीची टोपली डोक्यावर घेऊन बाजारांत घासाघीस घालण्याची तुमच्या चित्ताची तयारी असली पाहिजे. एके क्षणी अत्युच्च विचारांत मन दंग होऊन एखाद्या पृथ्वीपतीसारखे जग तुच्छ करून तुम्ही बसलेले असतां दुसऱ्याच क्षणीं केराची टोपली उचलण्याची तुमच्या चित्ताची तयारी असली पाहिजे. मठांतल्या केराची टोपलीच नव्हे, तर कोणाच्याही घरची टोपली उचलण्यांत तुम्हांला कमीपणा वाटू नये.<br>{{gap}}तुमच्या या मठाचा उद्देश पुरुषार्थी माणसें निर्माण करण्याचा आहे, हे विसरूं नका. पूर्वकालीन ऋषींनी लिहिलेल्या ग्रंथाचें अध्ययन करणे, एवढ्याने तुमचा खरा कार्यभाग संपला असें नाही. ते ऋषि कालाच्या उदरांत नाहीसे झाले आणि त्यांजबरोबरच त्यांची मतेंहि अस्तंगत झाली. आतां ती जुनी मते नुसती पठण करण्यांत अर्थ नाही. त्या ऋषींनी काय म्हटले, हे पहात न बसतांना, तुम्ही स्वतःच ऋषि व्हा. पूर्वकालीन ऋषि महापुरुष होते हे खरें; पण तेहि मनुष्यच होते हेहि खरे आहे. आणि तुम्हीहि मनुष्येच आहां, मग त्यांचे ऋषिपण तुमचे अंगीं कां येऊं नये? नुसत्या पुस्तकी विद्येनें कोणता कार्यभाग होणार? फार काय, पण नुसत्या ध्यानानेंहि कांहीं कार्यभाग होणार नाही. मंत्रतंत्राचे नुसते पठणहि तसेंच निरुपयोगी आहे. या पुस्तकी विद्येच्या मागे न लागतां तुम्ही स्वतंत्र विचारवान् व्हा. बुद्धिमार्गातहि परावलंबी न होतां स्वावलंबी व्हा, पुरुषार्थी कसे व्हावें हे तुम्ही शिका. विश्वचालक शक्तीइतकें ज्याचे अंतःकरण शक्तिवान् असते, आणि त्याबरोबरच तेथे एखाद्या स्त्रीच्या अंतःकरणाची कोमलता असते, तोच खरा पुरुष होय. आपणाभोंवतीं पसरलेल्या कोट्यवधी जीवांपैकी प्रत्येक जीव तुम्हांस आत्मवत् वाटला पाहिजे; पण त्याबरोबरच एक रतिभरहि कंपायमान होणार नाही, असें तुमचे अंतःकरण असावें. या गोष्टी तुम्हांस परस्परविरोधी वाटतील, पण हा विरोधाभास तुमच्या ठिकाणी असल्याशिवाय तुम्ही पुरुषार्थी होऊ शकणार नाही. साऱ्या विश्वावर हुकमत<noinclude><br>{{gap}}स्वा०वि० खं०-९-१९.</noinclude>
sdv2hmac603moyhqxjav4hu6rjnxvgg
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९५
104
66860
233361
157442
2026-07-20T09:27:10Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233361
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२९० |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>चालविण्यास समर्थ असें मन आणि त्याबरोबरच अत्यंत नम्रता, विनय आणि आज्ञाधारकता हीहि अवश्य असली पाहिजेत. तुमच्या मठपतीने नदीत उडी टाकण्याची आणि सुसर धरून आणण्याची आज्ञा तुम्हांस दिली, तर तिची अंमलबजावणी प्रथम करून तिच्या युक्तायुक्ततेची चर्चा तुह्मी पाठीमागून करा. आज्ञा अयुक्त असली, तरी तिचे पालन प्रथम आणि बुद्धिवादाचा विरोध नंतर, असा क्रम तुह्मीं स्वीकारला पाहिजे. आमच्या देशांत आणि विशेषतः बंगाल्यांत प्रत्येक मतवाला आपला निराळाच पंथ स्थापू पहातो. आपली मतें आणखी कोणाशी मिळत आहेत की नाही, हे पाहाण्यासाठी तो क्षणभरहि थांबावयाचा नाही. यामुळे व्यक्ति तितके पंथ असा प्रकार होऊन पुरुषार्थी माणसांची निपज होणे अशक्य झाले आहे. याकरितां आपल्या संघाचा अभिमान तुह्मांला असला पाहिजे. संघाची आज्ञा म्हणजें परमेश्वराचा हुकूम, अशी तुमच्या चित्ताची मान्यता असावी. कसलाहि हुकूम तुम्ही केव्हांहि सोडूं नये. असल्या उद्दाम वृत्तीचे बीज जागच्या जागींच करपवून टाकलें पाहिजे. असा एखादा मनुष्य तुमच्यांत आढळल्यास त्याला ताबडतोब हद्दपार करा. आपल्या छावणीत असले हेर केव्हांहि राहूं देऊ नका. ही हवा जितकी स्वतंत्र तितकीच तुमची वृत्ति स्वतंत्र असतां या झाडासारखी अथवा त्या कुत्र्यासारखी ती आज्ञाधारकहि असावी.<br><br><br>{{rule|7em}}{{rule|7em}}{{rule|7em}}{{nop}}<noinclude></noinclude>
eviqxdiq5l0qrv13u5c7b7gi2kfuh8o
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९६
104
66861
233362
157444
2026-07-20T09:31:47Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233362
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|{{x-larger|'''मी काय शिकलों.'''}}}}
{{rule|7em}}{{rule|7em}}
<br>
{{gap}}पूर्व बंगाल्यांत येण्याची जी संधि मला मिळाली, तीबद्दल मला होत असलेला आनंद प्रथम व्यक्त केला पाहिजे. पाश्चात्य देशांतील अनेक ठिकाणी मी भटकलों आणि तेथील संस्कृतीहि मी पाहिली; पण घरा शेजारील या भागांत येण्याची संधि पूर्वी मला मिळाली नाही. आतां येथे प्रत्यक्ष फिरून कांहीं नवा ज्ञानलाभ मला करून घेता येईल, याबद्दल मला आनंद वाटतो. पूर्व बंगाल्यांतील विशाल नद्या, विस्तीर्ण आणि सुपीक प्रदेश आणि चित्रासारखी लहान लहान खेडी, ही पाहून माझे नेत्र तृप्त होतील. वास्तविक पाहिले तर बंगाल ही माझी जन्मभूमि; पण असे असतांहि या प्रदेशांतील सृष्टिसौंदर्य उपभोगण्याचे सुदैव यापूर्वी मला प्राप्त झाले नाही. माझ्या या मातृभूमीत इतके सौंदर्य आणि मनोहारित्व असेल, अशी कल्पना यापूर्वी मला झाली नाही. येथील भूपृष्ठ पहा अथवा जलपृष्ठ पहा; दोन्ही ठिकाणी सृष्टिदेवी सारखीच रमणीय असल्याचे दृष्टोत्पत्तीस येईल. जगांतील अनेक देश हिंडून आल्यानंतर माझ्या मातृभूमीची यात्रा मला घडली, हेहि एकपरी बरेंच झालें, असे मला वाटते. कारण, त्यामुळे येथील सृष्टिसौंदर्यांची माधुरी मला अधिक रसिकतेनें चाखता येईल. इतर देशांतील सृष्टिसौंदर्याची तुलना येथल्या सौंदर्याशी मला आतां करितां यईल. आणि यामुळे माझा आनंदहि द्विगुणित होईल. अशा रीतीनें भटकत फिरत असतां, नाना धर्माची आणि पंथांची माहिती मला झाली. यांत कांहीं अर्वाचीन पंथ पाश्चात्यानुगामीही आहेत. पाश्चात्यांचे ध्येय त्यांनी आपलेसे केले आहे. मी दारोदार हिंडत असतां दुसरेहि कित्येक पंथ माझ्या पाहाण्यांत आले. पण त्यावेळी आमच्या राष्ट्रीय धर्मात आणि येथील सृष्टीत इतकें सौंदर्य भरले असेल, अशी कल्पनाहि माझ्या चित्तांत शिरली नाही. साऱ्या जगांत मनुष्यजातीची पारलौकिक आकांक्षा तृप्त करणारा जर कोणता धर्म असेल, तर तो फक्त हिंदुधर्मच आहे. अशी माझ्या चित्ताची खात्री आज पुष्कळ वर्षांपासून झाली आहे. आणि यामुळेच या अद्वितीय धर्माचे अनुयायी स्वधर्माबद्दल इतके उदासीन आहेत, हे पाहून माझ्या अंतःकरणांत वारंवार खेद उत्पन्न होतो. ही उदासीनता देशाच्या एखाद्या भागापुरतीच नसून हा प्रकार मला सर्वत्र आढळून आला. आतां सांप्रतची परि<noinclude></noinclude>
78qbw7kfdmmwzx9i1a8l0dc3k5tk40i
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९७
104
66862
233363
157445
2026-07-20T10:03:13Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233363
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२९२ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>स्थिति अत्यंत कष्टप्रद आहे आणि आपणांभोवती जडवादाचा घेरा चोहोंकडून पडला आहे, हे खरे. तथापि अशा स्थितीतही स्वधर्माबद्दल इतकी उदासीनता असणे चांगले नव्हे. आमच्या या मातृभूमीत युरोपीय पद्धतीचे आचारविचार सर्वत्र फैलावून आमचा सारा संसार त्यांनी व्यापून टाकला आहे. अशा विपरीत अवस्थेत आमचें सारें आयुष्य काढणे आम्हांस भाग झाले आहे. पण असे असतांहि स्वधर्माचा विचार आपण अगदीच सोडून द्यावा, हे रास्त नव्हे.<br>{{gap}}हिंदी राष्ट्राच्या पुनरुज्जीवनाकरितां आपल्या धर्मात सुधारणा करावी अथवा खरे म्हणावयाचें तर तो सगळाच उलथापालथा करावा, असे कित्येक सुधारकांस अलीकडे वाटू लागले आहे. यांत कित्येक खरे विचारवंत गृहस्थ आहेत हे खरे. तथापि, पुष्कळसे शुद्ध आंधळे आहेत, हेहि खोटे नाही. स्वतः काही विचार न करितां डोळे मिटून दुसऱ्याच्या मागे ते जात असतात. आपण काय करीत आहों, याचेंहि भान त्यांस नसते. सुधारकांतील हा आंधळा वर्ग पाश्चात्यांच्या कल्पना आमच्या धर्मात घुसविण्यास अत्यंत उत्सुक झाला आहे. मूर्तिपूजा हा शब्द त्यांनी सध्या उराशी धरला आहे. हिंदु धर्मात मूर्तिपूजा असल्यामुळेच तो धर्म खरा नाही, असें हे बरळत सुटतात. पण मूर्तिपूजा हे प्रकरण तरी काय आहे, हे शोधून काढण्याची खटपट ते कधीच करीत नाहीत. मूर्तिपूजा खरोखर वाईट की चांगली आहे, हेहि त्यांस कळत नाही. पाश्चात्य लोक मूर्तिपूजा त्याज्य समजतात, म्हणून त्यांच्या तोंडचा हा एक शब्द उचलून हेहि हिंदु धर्म खोटा आहे, अशी ओरड सुरू करितात. आतां आणखीहि एक वर्ग आपल्या लोकांत उत्पन्न झाला आहे. हिंदुस्थानांतील प्रत्येक चालरीत व प्रत्येक आचारविचार शास्त्रदृष्ट्या समर्थनीय आहे, असें हे म्हणतात. विद्युतशक्ति, आकर्षण, वातावरणाचे स्फंद आणि अशाच प्रकारचे दुसरे कांहीं शास्त्रीय शब्द उच्चारून कोणत्याही मूर्खपणाच्या चालीचे मंडन ते करितात. काय सांगावें? परमेश्वर म्हणजे विद्युत्स्पंदांचा गोळा आहे, असेहि उद्या ते म्हणतील! असो. परमेश्वर त्यांचेंहि कल्याण करो. नाना प्रकारच्या स्वभावविशेषांच्या द्वारे नाना युक्तींनी आणि अनेक हस्तांनी परमेश्वर आपला कार्यभाग करीत असतो. भले बुरे सारेच लोक त्याचे हस्तक होत.{{nop}}<noinclude></noinclude>
rdz88tiekwyegdztdehjbd046nwru37
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९८
104
66863
233364
157447
2026-07-20T10:05:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233364
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड ]|मी काय शिकलों.|२९३}}
{{rule}}</noinclude>{{gap}}आतां याहूनहि वेगळा असा आणखी एक तिसरा वर्ग फार प्राचीनकाळापासून आमच्या देशांत अस्तित्वात आहे. 'मला हे वादविवाद समजत नाहीत, ते समजण्याची माझी इच्छाहि नाही, इतकी डोकेफोड करून बुद्धीचा कीस पाडण्याची माझी इच्छा नाही, मला आत्मलाभ हवा, ज्या ठिकाणी या दृश्याचे वारे नाही, ज्या ठिकाणी सुख आणि दुःख ही दोन्ही नाहीत आणि ज्या ठिकाणी केवळ आनंदरूप मात्र आहे, अशा ठिकाणी मला जावयाचें आहे. गंगास्नान करून हे ठिकाण प्राप्त होईल, असें मी म्हणत नाही. शिवाची, रामाची अथवा विष्णूची पूजा करून हे ठिकाण मिळेल, असेंहि मला सांगवत नाही पण कोणाचीहि पूजा, तो एकच विश्वमूर्ति आहे, या एकनिष्ठभावनेने केली, तर मोक्ष मिळेल, असे मला वाटते.' हा वर्ग आमच्या देशांत फार प्राचीनकाळापासून आहे, आणि मी स्वतः याच वर्गापैकी आहे, असें मी मोठ्या अभिमानाने म्हणतो. परमेश्वराची सेवा करावी, पण संसारहि सोडूं नये, असा उपदेश कांहीं लोक आम्हांस करीत असतात. पण हे लोक विचारवंत नसतात. आपण काय बोलतो, हे त्यांस कळत नाही. जी गोष्ट ते तोंडाने बोलत असतात, तिला त्याच्याच अंतःकरणाची ग्वाही नसते. ज्या ठिकाणी राम आहे तेथे काम नाही, असे आपले जुने महात्मे म्हणत असत. राम आणि काम यांचा वास एकत्र असू शकत नाही. जेथें काम आहे तेथे राम येणार नाही; आणि राम आल्यावर काम राहूं शकणार नाही. कामकांचनाचा पूर्ण त्याग केल्याशिवाय परमात्मलाभ होऊ शकणार नाही, असें आमच्या जुन्या सत्पुरुषांनी तार स्वराने ओरडून सांगितले आहे. हा सारा संसार मिथ्या आहे. तो पाण्याच्या बुडबुड्यासारखा पोकळ आहे. त्याच्या आंत कांहीं सत्त्व शोधू जाणे मूर्खपणाचे आहे. तो सोडून दिल्याशिवाय तुम्हीं कांहीं केलें, तरी आत्मलाभ तुम्हांस व्हावयाचा नाही. संसारावर लाथ मारण्याचे धैर्य तुमच्या अंगी नसेल, तर तसे स्पष्ट सांगा आणि आपला दुबळेपणा कबूल करा. पण आपले ध्येय उच्चासनावरून ढळवू नका. सडक्या प्रेताला सोन्यामोत्यांच्या अलंकारांखाली झांकून टाकण्यांत काय मतलब आहे? तुम्हांला परमेश्वर हवा असेल, तर हा लपंडावीचा खेळ बंद केल्या शिवाय गत्यंतर नाही. मी हे सोडणार नाही आणि तेंहि धरीन, असली तुमची असंभाव्य आकांक्षा कधीहि तृप्त व्हावयाची नाही. स्वतःच्याच<noinclude></noinclude>
e3kjbt8bi2bylr69hmi1zmc320piwfx
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९९
104
66864
233365
157764
2026-07-20T10:08:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233365
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२९४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>मनाशी असला लपंडाव करणे, हा शुद्ध अप्रामाणिकपणा आहे. असे करण्यांत आपल्या अंतःकरणाच्या रत्नभांडारांत शिरून तुम्ही चोरी करितां, असें आपले महानुभाव पूर्वज आपणांस सांगतात.<br>{{gap}}या प्राचीन पंथापासून मला कोणत्या ज्ञानाची प्राप्ती झाली? मी शिकलों तें हे. 'दुर्लभं त्रयमेवैतद्देवानुग्रहहेतुकं । मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुषसंश्रयः ॥' मनुष्यजन्म, मुमुक्षा आणि सद्गुरूचा आश्रय या तीन वस्तु मिळण्यास अत्यंत दुर्लभ असून, त्या फक्त परमेश्वराच्या प्रसादाच्या द्वारेंच मिळतील. पहिली दुर्लभ गोष्ट मनुष्याचा जन्म प्राप्त होणे, ही होय. कारण, मुक्तिलाभ मनुष्यदेहाशिवाय दुसऱ्या कोणत्याहि देहाच्या आश्रयाने होणे शक्य नाही. यानंतर दुसरी दुर्लभ वस्तु मुमुक्षत्वही आहे. अगोदर मुक्तीची इच्छा पाहिजे, ती असल्याशिवाय तिच्या साधनांचा विचारच कोणी करणार नाही. व्यक्तिपरत्वें मुक्तीचे मार्ग भिन्नभिन्न असू शकतील. नानापंथ आपलाच मार्ग श्रेष्ठ, असेंहि कदाचित् म्हणतील. अशा रीतीने येथे मतांतर दिसले, तरी मुमुक्षा प्रथम असल्याशिवाय मुक्ति मिळणार नाही, हे म्हणणे कोणीहि नाकबूल करणार नाही. मुक्तीची अत्युत्कट इच्छा म्हणजे मुमुक्षा. लौकिक संसाराबद्दल ज्याच्या चित्ताला पूर्णविषाद उत्पन्न झाला असेल आणि सुखदुःखादि द्वंद्वांच्या बाहेर जाण्याची इच्छा ज्याच्या चित्तांत अत्यंत तीव्र झाली असेल, तो मुमुक्षु. इतकी उत्कट इच्छा जेव्हां तुमच्या चित्तांत उत्पन्न होईल आणि ऐहिक जगाचे वारेंहि तुम्हांस असह्य होऊ लागेल, तेव्हां आत्मलाभाच्या मार्गाला लागण्यास तुम्हांस अधिकार प्राप्त होईल.<br>{{gap}}यानंतर महापुरुषाचा आश्रय ही तिसरी महत्त्वाची बाब आहे. ज्याने स्वतः परमात्मलाभ मिळविला आहे, अशा सद्गुरूची संगति घडल्याशिवाय मुक्तिलाभासाठी काय करणे अवश्य आहे, हेहि आपणांस समजावयाचें नाहीं. जगाबद्दल आपल्या चित्तांत कितीहि तिटकारा उत्पन्न झाला आणि मुक्तिलाभाची इच्छा कितीहि तीव्र झाली, तरी सत्संगाशिवाय ती इच्छा फलद्रूप व्हावयाची नाही. हे होण्यास गुरुकृपेचीच आवश्यकता आहे. अशी आवश्यकता का असावी? ती असण्याचे कारण हेच की, अत्यंत प्राचीन काळा पासून महाशक्तीशी संयोग करून देण्याचे कार्य गुरुपरंपरेच्या द्वारेंच आजपर्यंत घडून आले आहे. आणि या मूलशक्तीची भेट तुम्हांस घ्यावयाची<noinclude></noinclude>
6b0irmf8tcg25fdj8rhegp6bjtwjfh0
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/३००
104
66865
233366
157450
2026-07-20T10:11:17Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233366
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड ]|मी काय शिकलों.|२९५}}
{{rule}}</noinclude>असेल, तर तिच्या द्वाररक्षकांच्या कृपेनेंच तुमचे कार्य होईल. गुरु म्हणजे आपले सर्वस्व असें तुमच्या मनाने तुम्हांस सांगितले पाहिजे. तोच उपदेष्टा, तत्त्ववेत्ता, मित्र आणि तोच आपला मार्गदर्शक असें तुम्हांस वाटले पाहिजे. या मार्गात तुम्हांस पुढे पाऊल टाकावयाचे असेल, तर गुरूशिवाय दुसरें गत्यंतरच नाही. हा गुरु कसा असावा याची व्याख्याहि आमच्या प्राचीन पंथाने करून ठेविली आहे 'श्रोत्रियोऽवृजिनोऽकामहतो यो ब्रह्मवित्तमः' तो श्रोत्रिय श्रुतिविद्या पारंगत असावा, तो निष्पाप असावा, निरिच्छ असावा आणि आत्मानुभवीहि असावा. श्रोत्रिय म्हणजे पुष्कळ पठण केलेला इतकाच अर्थ समजू नये. पुष्कळ शास्त्रांचे पठण एखाद्याने केले, तर तेवढ्यानेच श्रोत्रिय ही संज्ञा त्याला प्राप्त होत नाही. ज्याच्या बुद्धीने शास्त्रांच्या रहस्याचें आकलन केले असेल, तो श्रोत्रिय. या रहस्यांचा प्रत्यक्ष व्यावहारिक अर्थ काय आहे, याचा अनुभव आपल्या जीवनचरितांत ज्याने घेतला असेल, तो श्रोत्रिय. तोंडाने अनेक शास्त्रे म्हणणे पण त्यांचे रहस्य न जाणणे, ही पोपटविद्या झाली. अशाला पंडित म्हणता येणार नाही. शास्त्रांतील एखादाहि शब्द जाणून ज्याच्या चित्तांत ईश्वरभक्तीचा कल्लोळ उठत असेल, तोच खरा पंडित. नुसते पुस्तकी पंडित तुमच्या उपयोगी पडावयाचे नाहीत. अलीकडे गुरु फार स्वस्त झाले आहेत. उठला सुटला तो आपणांस गुरु म्हणविण्याची इच्छा करितो. अंगावर चिंध्या पांघरून कवडी कवडी मागत फिरणारा भिकारीहि लक्ष रुपयांचें गोप्रदान सोडण्याची इच्छा करितो. गुरु ही चीज इतकी सोपी नाही. गुरु निष्कलंक असला पाहिजे. तसेंच तो अकामहत म्हणजे कोणत्याहि इच्छेनें घायाळ न झालेला, असा असला पाहिजे. कोणाचेंहि बरें करावें याशिवाय दुसरी कोण तीहि इच्छा ज्याच्या चित्ताला शिवत नाही, तोच अकामहत. ज्याच्या ठिकाणी दया सागरासारखी परिपूर्ण असते; आणि जिच्यात कोणत्याहि कारणाने कधी उणीव येत नाही, तो अकामहत. कीर्तीसाठी, पैशासाठी अथवा दुसऱ्या कोणत्याहि हेतूसाठी आपल्या ज्ञानाचा विक्रय जो कधीहि करीत नाही, तो अकामहत. त्याचप्रमाणे गुरु ब्रह्मनिष्ठहि असला पाहिजे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे आत्मानुभवी. करतलागवकवत् ज्याला आत्मानुभव झाला असेल, तोच ब्रह्मनिष्ठ. गुरूची व्याख्या श्रुतींनी याप्रमाणे केली आहे. अशा गुरूचा आश्रय तुम्हांस झाला, तरच ईश्वराचे दर्शन तुम्हांस होईल. असा आश्रय मिळाला, म्हणजे तुमचा मुक्तिमार्ग सुलभ होईल.{{nop}}<noinclude></noinclude>
kat91aazd6vxjhdkrsptw8mmqd0qmx6
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/३०१
104
66866
233367
157766
2026-07-20T10:13:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233367
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२९६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>{{gap}}ज्याला सत्याची भेट हवी असेल, त्याला अध्यासही आवश्यक आहे. गुरूपदिष्ट मार्गाने जाण्याचा हव्यास त्याच्या चित्ताला असला पाहिजे. गुरूने सांगितलेले सत्य प्रत्यक्ष गोचर कसे होईल असा निदिध्यास त्याच्या चित्ताला असावा. अभ्यासाकडे चित्त सदोदित राहून संसारापासून ते परांमुख करण्याचा यत्न त्याने सतत केला पाहिजे. ईश्वर दर्शनाची इच्छा कितीहि प्रबळ असली आणि भाग्याने गुरूचीहि प्राप्ति झाली, तरी तुमच्या चित्ताला अध्यास नसेल आणि गुरुपदिष्ट मार्गाचा अभ्यास तुमच्याकडून दृढनिश्चयाने आणि सतत न होईल, तर तुम्हांस आत्मानुभवहि होणार नाही. ही सारी जेव्हां एकवटतील, तेव्हांच तुमचें साध्य सिद्ध होईल.<br>{{gap}}तुम्ही उज्वलयश आर्यांचे वंशज आहां. त्यांनी काय केले, हे तुम्ही विसरू नका. आपल्या धर्माने केवढे मोठे साध्य आपणापुढे ठेविलें आहे, हे ध्यानांत आणा. संसारातीत होणे हेच प्रत्येक हिंदूचे ध्येय असले पाहिजे. केवळ ऐहिकाचाच त्याग आपणांस करावयाचा नसून स्वर्गसुखाचीहि इच्छा आपण नाहींशी केली पाहिजे. केवळ दुर्गुणच त्याज्य नसून अखेरीस सद्गुणहि आपणास टाकावयाचे आहेत, हे विसरू नका. अशा रीतीने बरे आणि वाईट या दोहोंच्याहि पलीकडे आपणांस जावयाचे आहे. आपणांस दृश्यजगापली कडे जावयाचे आहे. 'सच्चिदानंद ब्रह्म' हा आपला अखेरचा मुक्काम आहे.<Br><br><br>{{rule|7em}}{{rule|7em}}{{rule|7em}}<noinclude></noinclude>
2nlbhtx6z7u4n0vy57dy6scmvxk6svd
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१४
104
111025
233310
233284
2026-07-19T13:40:32Z
JayashreeVI
4058
233310
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|'''(2)'''}}
कल्पना मावळत असून ते समाजाचे शिक्षक किंबहुना धुरीण होत आहेत, व त्यांच्या रामबाण उपायांचा वर्षाव सारखा होत असल्यामुळे बावरण्याचा संभव वाढून वाचकांवर विशेष जबाबदारी पडली आहे. गहन पण व्यवहाराला उपयोगी अशा प्रश्नांचा ऊहापोह सुरू असताना लेखकानें नेहमीं पुरता अभ्यास करून, मनन करून, जबाबदारी ओळखून लेख लिहावेत, हें सांगणे जितके सोपे आहे, तितकें करणें सोपें नाहीं. रोज पुढे येणाऱ्या प्रश्नांवर, मग ते कितीहि कठीण असोत, लोकमताला वळण लावण्याचा धंदा करणारांना मत देणे अवश्य आहे. पण वाचकांची अशी स्थिति नाही. त्यांनां विचार करण्यास अवकाश मिळतो. निरनिराळ्या विद्वानांनीं लिहिलेले लेख वाचून मग स्वतःची दिशा ठरविणें शक्य असतें. प्रयत्न मात्र केला पाहिजे व वाचन
पद्धतशीर झाले पाहिजे. कारण, अव्यवस्थित वाचनापेक्षां मुळींच न वाचलेंतरी एकपक्षी पुरवलें, असें वाटण्याचा बरेच वेळा प्रसंग येतो. वेळ घालविण्याकरितां कांहींतरी वाचावयाचें, इतकीच उमेद वाचकांची असली तर लेखकही विशेष तसदी न घेतां काहीतरी लिहील, पांढऱ्यावर काळे करील. कारण, इतर धंदेवाल्यांप्रमाणे वाचकांना आवडेल तसें, किंवा फारतर विशेष कठिण किंवा कडू न वाटेल असें, लिहिणें लेखकाला भाग आहे. पारखणारा न मिळाल्यास चांगल्या लेखांची किंमतहि बेताचीच होणार हे उघड आहे. म्हणून वाचक चिकित्साखोर पाहिजेत, थोडक्यानें समाधान न पावणारे पाहिजेत, विषयांचा पुरा खल करविणारे, स्वतःचे विचार स्वतःचे अंतरंगांतच न सांचविणारे पाहिजेत. वाचक मार्मिक नसल्यास प्रश्नांचा खल न होतां चुथडा होतो, यांत नवल
कोणतें! जसे वाचक तसे लेखक. एकांत मार्मिकपणा आला कीं, दुसऱ्यांतहि येईल, लेखकांना हुरूप येईल, धंद्यांत शिरण्यापूर्वी ते बरीच तयारी करतील. विशेषतः या लोकमत तयार करणारांची व पुढाऱ्यांची, अज्ञजनांनां उपदेशामृत पाजण्याची नेहमीं आवडती पद्धत जाऊन सर्वांना समजेल अशी वादविवादाची पद्धत सुरू होईल. स्वतःची जबाबदारी पुढाऱ्यांच्या वारंवार प्रत्ययास येईल, विषयांचा योग्य ऊहापोह होऊन लोकशिक्षणांत भर पडेल. सारांश, कठिण विषयांवर योग्य मत देण्यास, किंवा त्याविषयीं मत ठरविण्यास जी लायकी, जी
पूर्वतयारी लागते, ती व्यवस्थित, कष्टमय, वाचनाशिवाय होणे अशक्य आहे. म्हणून ज्यांना इतके कष्ट करावयाचे असतील त्यांना थोडीबहुत मदत व्हावी,-<noinclude></noinclude>
10xdoo07pa1g6m8i09uh8148cklxurs
233311
233310
2026-07-19T13:41:35Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
233311
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(2)'''}}}}
कल्पना मावळत असून ते समाजाचे शिक्षक किंबहुना धुरीण होत आहेत, व त्यांच्या रामबाण उपायांचा वर्षाव सारखा होत असल्यामुळे बावरण्याचा संभव वाढून वाचकांवर विशेष जबाबदारी पडली आहे. गहन पण व्यवहाराला उपयोगी अशा प्रश्नांचा ऊहापोह सुरू असताना लेखकानें नेहमीं पुरता अभ्यास करून, मनन करून, जबाबदारी ओळखून लेख लिहावेत, हें सांगणे जितके सोपे आहे, तितकें करणें सोपें नाहीं. रोज पुढे येणाऱ्या प्रश्नांवर, मग ते कितीहि कठीण असोत, लोकमताला वळण लावण्याचा धंदा करणारांना मत देणे अवश्य आहे. पण वाचकांची अशी स्थिति नाही. त्यांनां विचार करण्यास अवकाश मिळतो. निरनिराळ्या विद्वानांनीं लिहिलेले लेख वाचून मग स्वतःची दिशा ठरविणें शक्य असतें. प्रयत्न मात्र केला पाहिजे व वाचन
पद्धतशीर झाले पाहिजे. कारण, अव्यवस्थित वाचनापेक्षां मुळींच न वाचलेंतरी एकपक्षी पुरवलें, असें वाटण्याचा बरेच वेळा प्रसंग येतो. वेळ घालविण्याकरितां कांहींतरी वाचावयाचें, इतकीच उमेद वाचकांची असली तर लेखकही विशेष तसदी न घेतां काहीतरी लिहील, पांढऱ्यावर काळे करील. कारण, इतर धंदेवाल्यांप्रमाणे वाचकांना आवडेल तसें, किंवा फारतर विशेष कठिण किंवा कडू न वाटेल असें, लिहिणें लेखकाला भाग आहे. पारखणारा न मिळाल्यास चांगल्या लेखांची किंमतहि बेताचीच होणार हे उघड आहे. म्हणून वाचक चिकित्साखोर पाहिजेत, थोडक्यानें समाधान न पावणारे पाहिजेत, विषयांचा पुरा खल करविणारे, स्वतःचे विचार स्वतःचे अंतरंगांतच न सांचविणारे पाहिजेत. वाचक मार्मिक नसल्यास प्रश्नांचा खल न होतां चुथडा होतो, यांत नवल
कोणतें! जसे वाचक तसे लेखक. एकांत मार्मिकपणा आला कीं, दुसऱ्यांतहि येईल, लेखकांना हुरूप येईल, धंद्यांत शिरण्यापूर्वी ते बरीच तयारी करतील. विशेषतः या लोकमत तयार करणारांची व पुढाऱ्यांची, अज्ञजनांनां उपदेशामृत पाजण्याची नेहमीं आवडती पद्धत जाऊन सर्वांना समजेल अशी वादविवादाची पद्धत सुरू होईल. स्वतःची जबाबदारी पुढाऱ्यांच्या वारंवार प्रत्ययास येईल, विषयांचा योग्य ऊहापोह होऊन लोकशिक्षणांत भर पडेल. सारांश, कठिण विषयांवर योग्य मत देण्यास, किंवा त्याविषयीं मत ठरविण्यास जी लायकी, जी
पूर्वतयारी लागते, ती व्यवस्थित, कष्टमय, वाचनाशिवाय होणे अशक्य आहे. म्हणून ज्यांना इतके कष्ट करावयाचे असतील त्यांना थोडीबहुत मदत व्हावी,-<noinclude></noinclude>
9r9mx4q2yd9vdiwrhnuqgk6kk999pjc
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१५
104
111026
233312
233285
2026-07-19T13:51:52Z
JayashreeVI
4058
233312
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''( ३ )'''}}}}
पद्धतशीर वाचनाची संवय लागण्यास किती प्रयास पडतात त्याची कल्पना यावी, लेखकाच्या धंद्यास लागणाऱ्या सामुग्रीचा योग्य विचार व्हावा, या हेतूनें बऱ्याच वर्षाच्या अनुभवानें सुचलेले विचार मनोरंजनाच्या वाचकांकरितां सादर करण्याचा हा प्रयत्न आहे.
{{center|{{larger|'''व्यासंग.'''}}}}
{{gap}}वाचन हा शब्द दोन अर्थी वापरतात. एक वाचनाची क्रिया व दुसरा विद्याव्यासंग. अमक्या गृहस्थाचें वाचन जबर आहे म्हटलें ह्मणजे तो मोठ्याने वाचतो असा अर्थ न होता त्याचा परिश्रम सतत आहे, असाच होतो. या लेखांत वाचनाच्या क्रियेविषयीं, ध्वनींच्या आरोहावरोहाविषय लिहिण्याचा माझा उद्देश नाहीं. 'शुद्ध कसे लिहावें व शुद्ध कसे बोलावें हें व्याकरण शिकल्याने समजतें' असे ह्मणतात. तसेंच शाळेतील पंतोजीच्या कवाइतीप्रमाणे एक सुरांत आवाज किती चढवावा व किती उतरवावा ह्मणजे मस्तकशूल उत्पन्न होऊन अर्थाचा साक्षात्कार होतो, हें अचूक सांगण्यास कदाचित् गायनशास्त्राचे अंग वाढवावें लागेल. आवेश, शोक, क्षोभ, निराशा, गांभीर्य, मार्दव, प्रेम इत्यादि मनोविकार श्रोत्यांचे मनावर ठसविण्यास, मानस व नाट्य या शास्त्रांशी परिचय करण्याची
पाळी येईल. कारण, समूहापुढे वाचन किंवा भाषण यांत फारसा फरक नाहीं पण मनोरंजनांतील जागा व विशेषतः वाचकांचा धीर, यांना मर्यादा असल्यामुळे फक्त वाचन ह्मणजे विद्याव्यासंग याविषयी लिहिण्याचा विचार आहे.
{{gap}}विद्येचा व्यासंग म्हणजे विषयांचा व्यासंग, ही गोष्ट उघड आहे. व्यासंगाचा विचार करितांना भाषेचा प्रश्न विशेष महत्त्वाचा नाहीं. कोणतीहि भाषा घेतली तरी अभ्यास करितांना सर्वत्र लागू पडणारी अशींच तत्त्वें अंगिकारावी लागतात ; पण आह्मी सर्वजण इंग्रजी भाषेच्या द्वारें विद्यादान घेत असल्यामुळे विशेषत: त्या वाङमयास अनुसरून हा लेख आहे.
{{gap}}परभाषेच्या द्वारे आह्मी शिकत असल्यामुळे आमच्या वाचनांत दोन निराळ्या प्रकारच्या अडचणी येतात. पहिली भाषेची. ही अडचण स्वभाषेत नसते. जोपर्यंत असते तोपर्यंत विद्याव्यासंगास सुरुवात झाली, असें ह्मणतां येत नाहीं. ह्मणूनच विश्वविद्यालयातील अभ्यासक्रमास भावी परिश्रमाची पूर्वतयारी समजण्यांत येते व चरितार्थसच उपयोगी पडणाऱ्या विषयांशिवाय अन्य विषयांची ओळख करून-<noinclude></noinclude>
keeniglc9wmguiswtsp746rilkoyuct
233313
233312
2026-07-19T13:53:00Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
233313
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''( ३ )'''}}}}
पद्धतशीर वाचनाची संवय लागण्यास किती प्रयास पडतात त्याची कल्पना यावी, लेखकाच्या धंद्यास लागणाऱ्या सामुग्रीचा योग्य विचार व्हावा, या हेतूनें बऱ्याच वर्षाच्या अनुभवानें सुचलेले विचार मनोरंजनाच्या वाचकांकरितां सादर करण्याचा हा प्रयत्न आहे.
{{center|{{larger|'''व्यासंग.'''}}}}
{{gap}}वाचन हा शब्द दोन अर्थी वापरतात. एक वाचनाची क्रिया व दुसरा विद्याव्यासंग. अमक्या गृहस्थाचें वाचन जबर आहे म्हटलें ह्मणजे तो मोठ्याने वाचतो असा अर्थ न होता त्याचा परिश्रम सतत आहे, असाच होतो. या लेखांत वाचनाच्या क्रियेविषयीं, ध्वनींच्या आरोहावरोहाविषय लिहिण्याचा माझा उद्देश नाहीं. 'शुद्ध कसे लिहावें व शुद्ध कसे बोलावें हें व्याकरण शिकल्याने समजतें' असे ह्मणतात. तसेंच शाळेतील पंतोजीच्या कवाइतीप्रमाणे एक सुरांत आवाज किती चढवावा व किती उतरवावा ह्मणजे मस्तकशूल उत्पन्न होऊन अर्थाचा साक्षात्कार होतो, हें अचूक सांगण्यास कदाचित् गायनशास्त्राचे अंग वाढवावें लागेल. आवेश, शोक, क्षोभ, निराशा, गांभीर्य, मार्दव, प्रेम इत्यादि मनोविकार श्रोत्यांचे मनावर ठसविण्यास, मानस व नाट्य या शास्त्रांशी परिचय करण्याची
पाळी येईल. कारण, समूहापुढे वाचन किंवा भाषण यांत फारसा फरक नाहीं पण मनोरंजनांतील जागा व विशेषतः वाचकांचा धीर, यांना मर्यादा असल्यामुळे फक्त वाचन ह्मणजे विद्याव्यासंग याविषयी लिहिण्याचा विचार आहे.
<br>{{gap}}विद्येचा व्यासंग म्हणजे विषयांचा व्यासंग, ही गोष्ट उघड आहे. व्यासंगाचा विचार करितांना भाषेचा प्रश्न विशेष महत्त्वाचा नाहीं. कोणतीहि भाषा घेतली तरी अभ्यास करितांना सर्वत्र लागू पडणारी अशींच तत्त्वें अंगिकारावी लागतात ; पण आह्मी सर्वजण इंग्रजी भाषेच्या द्वारें विद्यादान घेत असल्यामुळे विशेषत: त्या वाङमयास अनुसरून हा लेख आहे.
<br>{{gap}}परभाषेच्या द्वारे आह्मी शिकत असल्यामुळे आमच्या वाचनांत दोन निराळ्या प्रकारच्या अडचणी येतात. पहिली भाषेची. ही अडचण स्वभाषेत नसते. जोपर्यंत असते तोपर्यंत विद्याव्यासंगास सुरुवात झाली, असें ह्मणतां येत नाहीं. ह्मणूनच विश्वविद्यालयातील अभ्यासक्रमास भावी परिश्रमाची पूर्वतयारी समजण्यांत येते व चरितार्थसच उपयोगी पडणाऱ्या विषयांशिवाय अन्य विषयांची ओळख करून-<noinclude></noinclude>
gxdu51wpmivabxyxgkoof0bd3chciyg
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१६
104
111030
233314
2026-07-19T13:56:05Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ४ ) दिली जाते. परभाषेमुळे युनिव्हर्सिटीतला अभ्यास संपला तरी भाषेची अडचण दूर होत नाहीं. इतकेच नाहीं, तर भाषेचेच ज्ञान अपुरे राहिल्यामुळे विचारांची योग्य वाढ होत नाहीं; ते कच्चे रा..."
233314
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( ४ )
दिली जाते. परभाषेमुळे युनिव्हर्सिटीतला अभ्यास संपला तरी भाषेची अडचण
दूर होत नाहीं. इतकेच नाहीं, तर भाषेचेच ज्ञान अपुरे राहिल्यामुळे विचारांची
योग्य वाढ होत नाहीं; ते कच्चे राहातात; एककल्लीपणाचा संभव जास्त वाढतो;
व्यासंग अधिक कठीण होतो व वाचनांत येणाऱ्या दुसऱ्या अडचणीत भर पडते.
ही अडचण झणजे निरनिराळ्या विषयांचा पूर्ण अभ्यास ही होय. स्वभाषेत जरी
वाचले, तरी विषय सुगम होत नाहींत. विषय सुगम किंवा कठिण वाटणें हें ज्या
त्या विषयावर अवलंबून असतें, हैं जरी खरे असले, तरी परभाषेमुळे सोपा वि-
षय देखील कठिण वाटतो, हे बऱ्याच जणांच्या अनुभवास आलें असेल. मग
नवे नवे विचार, परिचित कल्पनांना येणारी नवीं नवीं रूपें कधीं न ऐकलेली
शास्त्रे, अर्वाचीन शोधपद्धति, व शास्त्रपुराणे यांनीं सनातन ठरविलेल्या आचार-
विचारांवर त्यांचा आघात, इत्यादि गोष्टीचें बरोबर आकलन होण्यास फारच
सायास पडणें साहजिक वाटेल.
'
,
विद्याव्यासंग ह्मणजे चौदा विद्या व चौसष्ट कला यांचे अध्ययन नव्हे. प्राचीन
काळीं चौदा विद्या व चौसष्ट कला शिकविणारे गुरु व शिकणारे शिष्य असत,
अशा कथा सांगतात. असतील कदाचित् ! पण या कालांत एक विद्या व एक
कला जर कोणाला पुरतेपण आली तर त्याचें मोठें भाग्यच समजलें पाहिजे.
ज्ञानाची जुनी व नवी कल्पना यांमध्यें जमीनअस्मानाचें अंतर आहे. जुन्या सम-
जुतीप्रमाणें ज्ञान विशिष्ट ग्रंथांत साचविलेले आढळते. या ग्रंथाचें सांगोपांग अ-
ध्ययन केलें कीं, झाला मनुष्य पारंगत. आमच्या शास्त्रीपंडितांचे शिकणें व
शिकवर्णे यांकडे लक्ष दिल्यास वरील विधानाची खात्री होईल. पाश्चात्यांची दे-
खील जुनी कल्पना आमच्यासारखीच होती. पण त्यांच्याकडे जुना मनु तीनशें वर्षो -
पासून पालटू लागला व नव्या मनूस प्रारंभ झाला. या मन्वंतराचा पूर्ण प्रताप
गेल्या शतकांत जाणवू लागला; विशिष्ट ग्रंथांचे महत्त्व कमी होऊं लागलें.
ग्रंथाबरोबर ग्रंथकाराचेहि महत्त्व कमी झाले. हौदांत सांचविलेल्या पाण्याप्रमाणें
ज्ञान मर्यादित नसून महासागराप्रमाणे अमर्याद आहे, कष्टसाध्य आहे, अशी
भावना वाढूं लागली. ज्ञानसागरांत साधारण निर्भयपणे वावरण्यास, दिशाभूल
न होता उद्दिष्ट सफल होण्यास, नव्या कार्यक्षम साधनांची योजना व उपयोग
सर्वत्र होऊ लागला; विषयांनां व त्यांनां लागू पडणाऱ्या पद्धतींनां योग्य
मान मिळू लागला; आणि विद्याव्यासंग म्हणजे शास्त्रीय पद्धतीनें निरनिराळ्या<noinclude></noinclude>
f9t0a6mzzkmq0iytt1bqc2u9pi7oeg8
233339
233314
2026-07-20T04:34:46Z
JayashreeVI
4058
233339
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(४)''''}}}}
दिली जाते. परभाषेमुळे युनिव्हर्सिटीतला अभ्यास संपला तरी भाषेची अडचण दूर होत नाहीं. इतकेच नाहीं, तर भाषेचेच ज्ञान अपुरे राहिल्यामुळे विचारांची योग्य वाढ होत नाहीं; ते कच्चे राहातात; एककल्लीपणाचा संभव जास्त वाढतो; व्यासंग अधिक कठीण होतो व वाचनांत येणाऱ्या दुसऱ्या अडचणीत भर पडते. ही अडचण म्हणजे निरनिराळ्या विषयांचा पूर्ण अभ्यास ही होय. स्वभाषेत जरी वाचले, तरी विषय सुगम होत नाहींत. विषय सुगम किंवा कठिण वाटणें हें ज्या त्या विषयावर अवलंबून असतें, हैं जरी खरे असले, तरी परभाषेमुळे सोपा विषय देखील कठिण वाटतो, हे बऱ्याच जणांच्या अनुभवास आलें असेल. मग नवे नवे विचार, परिचित कल्पनांना येणारी नवीं नवीं रूपें कधीं न ऐकलेली शास्त्रे, अर्वाचीन शोधपद्धति, व शास्त्रपुराणे यांनीं सनातन ठरविलेल्या आचार- विचारांवर त्यांचा आघात, इत्यादि गोष्टीचें बरोबर आकलन होण्यास फारच
सायास पडणें साहजिक वाटेल.
<br>{{gap}}विद्याव्यासंग ह्मणजे चौदा विद्या व चौसष्ट कला यांचे अध्ययन नव्हे. प्राचीन काळीं चौदा विद्या व चौसष्ट कला शिकविणारे गुरु व शिकणारे शिष्य असत, अशा कथा सांगतात. असतील कदाचित् ! पण या कालांत एक विद्या व एक कला जर कोणाला पुरतेपण आली तर त्याचें मोठें भाग्यच समजलें पाहिजे. ज्ञानाची जुनी व नवी कल्पना यांमध्यें जमीनअस्मानाचें अंतर आहे. जुन्या समजुतीप्रमाणें ज्ञान विशिष्ट ग्रंथांत साचविलेले आढळते. या ग्रंथाचें सांगोपांग अध्ययन केलें कीं, झाला मनुष्य पारंगत. आमच्या शास्त्रीपंडितांचे शिकणें व
शिकवणे यांकडे लक्ष दिल्यास वरील विधानाची खात्री होईल. पाश्चात्यांची देखील जुनी कल्पना आमच्यासारखीच होती. पण त्यांच्याकडे जुना मनु तीनशें वर्षोपासून पालटू लागला व नव्या मनूस प्रारंभ झाला. या मन्वंतराचा पूर्ण प्रताप गेल्या शतकांत जाणवू लागला; विशिष्ट ग्रंथांचे महत्त्व कमी होऊं लागलें. ग्रंथाबरोबर ग्रंथकाराचेहि महत्त्व कमी झाले. हौदांत सांचविलेल्या पाण्याप्रमाणें ज्ञान मर्यादित नसून महासागराप्रमाणे अमर्याद आहे, कष्टसाध्य आहे, अशी भावना वाढूं लागली. ज्ञानसागरांत साधारण निर्भयपणे वावरण्यास, दिशाभूल न होता उद्दिष्ट सफल होण्यास, नव्या कार्यक्षम साधनांची योजना व उपयोग सर्वत्र होऊ लागला; विषयांनां व त्यांनां लागू पडणाऱ्या पद्धतींनां योग्य मान मिळू लागला; आणि विद्याव्यासंग म्हणजे शास्त्रीय पद्धतीनें निरनिराळ्या-<noinclude></noinclude>
5umnb5l2e5j0ymyjydf7rd6fziu1b84
233340
233339
2026-07-20T04:35:13Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
233340
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(४)''''}}}}
दिली जाते. परभाषेमुळे युनिव्हर्सिटीतला अभ्यास संपला तरी भाषेची अडचण दूर होत नाहीं. इतकेच नाहीं, तर भाषेचेच ज्ञान अपुरे राहिल्यामुळे विचारांची योग्य वाढ होत नाहीं; ते कच्चे राहातात; एककल्लीपणाचा संभव जास्त वाढतो; व्यासंग अधिक कठीण होतो व वाचनांत येणाऱ्या दुसऱ्या अडचणीत भर पडते. ही अडचण म्हणजे निरनिराळ्या विषयांचा पूर्ण अभ्यास ही होय. स्वभाषेत जरी वाचले, तरी विषय सुगम होत नाहींत. विषय सुगम किंवा कठिण वाटणें हें ज्या त्या विषयावर अवलंबून असतें, हैं जरी खरे असले, तरी परभाषेमुळे सोपा विषय देखील कठिण वाटतो, हे बऱ्याच जणांच्या अनुभवास आलें असेल. मग नवे नवे विचार, परिचित कल्पनांना येणारी नवीं नवीं रूपें कधीं न ऐकलेली शास्त्रे, अर्वाचीन शोधपद्धति, व शास्त्रपुराणे यांनीं सनातन ठरविलेल्या आचार- विचारांवर त्यांचा आघात, इत्यादि गोष्टीचें बरोबर आकलन होण्यास फारच
सायास पडणें साहजिक वाटेल.
<br>{{gap}}विद्याव्यासंग ह्मणजे चौदा विद्या व चौसष्ट कला यांचे अध्ययन नव्हे. प्राचीन काळीं चौदा विद्या व चौसष्ट कला शिकविणारे गुरु व शिकणारे शिष्य असत, अशा कथा सांगतात. असतील कदाचित् ! पण या कालांत एक विद्या व एक कला जर कोणाला पुरतेपण आली तर त्याचें मोठें भाग्यच समजलें पाहिजे. ज्ञानाची जुनी व नवी कल्पना यांमध्यें जमीनअस्मानाचें अंतर आहे. जुन्या समजुतीप्रमाणें ज्ञान विशिष्ट ग्रंथांत साचविलेले आढळते. या ग्रंथाचें सांगोपांग अध्ययन केलें कीं, झाला मनुष्य पारंगत. आमच्या शास्त्रीपंडितांचे शिकणें व
शिकवणे यांकडे लक्ष दिल्यास वरील विधानाची खात्री होईल. पाश्चात्यांची देखील जुनी कल्पना आमच्यासारखीच होती. पण त्यांच्याकडे जुना मनु तीनशें वर्षोपासून पालटू लागला व नव्या मनूस प्रारंभ झाला. या मन्वंतराचा पूर्ण प्रताप गेल्या शतकांत जाणवू लागला; विशिष्ट ग्रंथांचे महत्त्व कमी होऊं लागलें. ग्रंथाबरोबर ग्रंथकाराचेहि महत्त्व कमी झाले. हौदांत सांचविलेल्या पाण्याप्रमाणें ज्ञान मर्यादित नसून महासागराप्रमाणे अमर्याद आहे, कष्टसाध्य आहे, अशी भावना वाढूं लागली. ज्ञानसागरांत साधारण निर्भयपणे वावरण्यास, दिशाभूल न होता उद्दिष्ट सफल होण्यास, नव्या कार्यक्षम साधनांची योजना व उपयोग सर्वत्र होऊ लागला; विषयांनां व त्यांनां लागू पडणाऱ्या पद्धतींनां योग्य मान मिळू लागला; आणि विद्याव्यासंग म्हणजे शास्त्रीय पद्धतीनें निरनिराळ्या-<noinclude></noinclude>
dkrx7x1c57ze073ya3ka5imrn4azb24
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१७
104
111032
233341
2026-07-20T04:35:46Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ५ ) विषयांचें आलोचन, ही कल्पना मान्य होऊं लागली. मग ते विषय आध्यात्मिक शास्त्रें असोत, आधिभौतिक शास्त्रें असोत की सामाजिक शास्त्रें असोत. शोधपद्धतीचीं अवलोकन, तुलना, प्रयोग, मापन..."
233341
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( ५ )
विषयांचें आलोचन, ही कल्पना मान्य होऊं लागली.
मग ते विषय
आध्यात्मिक शास्त्रें असोत, आधिभौतिक शास्त्रें असोत की सामाजिक शास्त्रें
असोत. शोधपद्धतीचीं अवलोकन, तुलना, प्रयोग, मापन इत्यादि जीं अंतर्भूत
तत्त्वें त्यांमध्ये विषयाला अनुसरून फेरफार जरी करावा लागला, तरी अभ्या-
साचा मार्ग व दिशा दी स्पष्ट झाली.
या दिशेने अभ्यास केल्यास विशेष काय फळ मिळते, तें पाहणे अवश्य
आहे. वाचकांमर्थ्ये वास्मयावर भर असणारे लोक अधिक असल्यामुळे तोच विषय
निरूपणाकरितां घेऊन पाहू.
वाङ्मय.
वाङ्मयाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास, हे शब्द बऱ्याच जणांनां चमत्कारिक
लागतील, यांत शंका नाहीं. शास्त्रीय पद्धति इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र
यांना लागेल;ती वाङ्मयाला कशी लागेल ? वाङ्मय हैंहि एक शास्त्र आहे की काय,
असें कोणी विचारल्यास वावगे होणार नाहीं. पण वास्त्रय म्हणजे काय, याचा
विचार केल्यास शंकेचें बरेंच समाधान होईल. उज्ज्वल कल्पनाशक्ति असलेल्या
व्यक्तींच्या चिरस्मरणीय व सुंदर शब्दकृतींचा संग्रह म्हणजे वाङ्मय, अर्से
झणतां येईल. तसेच विवक्षित समाजाचे आचारविचार, ध्येयें, आशा,
आकांक्षा, पूज्य पुरुष, विभूति, यांचा चित्रपट ह्मणजे वाङ्मय असें म्हणत
येईल. पहिल्या दृष्टीनें व्यक्तीला प्राधान्य मिळतें, इतकेंच नव्हे, तर समाजाची
आठवण देखील क्वचितच होते. पण समाजाशिवाय व्यक्ति नाहीं. समाजाचे
ऋण वाङ्मयांत देखील दिसून येते. म्हणून समाजास वाजवी महत्त्व देऊन
व्यक्तींचा लोप होऊ न देतां “ समाजाच्या जीविताचा आरसा " अशा
ऐतिहासिक दृष्टीने सारस्वताचा अभ्यास करावा लागतो. ऐतिहासिक पद्धतीनें
सारस्वताचा अभ्यास ही शास्त्रीय पद्धतीची एक बाजू होय.
जगति अनेक समाज आहेत, अनेक भाषा आहेत; पण
चित्र्य असले तरी मनुष्यत्वामुळे जगत एकरूपता आहे.
स्वतांपैकीं एक, ही जाणीव धरून तुलनात्मक दृष्टीनें त्याचे
पद्धतीची दुसरी बाजू होय.
समाज व भाषावै-
ह्मणून भिन्न सार
अध्ययन ही शास्त्रीय<noinclude></noinclude>
s9n8ryo3z0hmhz5gu45gjo1dt8rm03o
233342
233341
2026-07-20T04:53:36Z
JayashreeVI
4058
233342
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(५)'''}}}}
विषयांचें आलोचन, ही कल्पना मान्य होऊं लागली. मग ते विषय आध्यात्मिक शास्त्रें असोत, आधिभौतिक शास्त्रें असोत की सामाजिक शास्त्रें असोत. शोधपद्धतीचीं अवलोकन, तुलना, प्रयोग, मापन इत्यादि जीं अंतर्भूत तत्त्वें त्यांमध्ये विषयाला अनुसरून फेरफार जरी करावा लागला, तरी अभ्यासाचा मार्ग व दिशा ही स्पष्ट झाली.
<br>{{gap}}या दिशेने अभ्यास केल्यास विशेष काय फळ मिळते, तें पाहणे अवश्य आहे. वाचकांमध्ये वाङ्मयावर भर असणारे लोक अधिक असल्यामुळे तोच विषय निरूपणाकरितां घेऊन पाहू.
{{center|{{larger|'''वाङ्मय.'''}}}}
{{gap}}वाङ्मयाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास, हे शब्द बऱ्याच जणांनां चमत्कारिक लागतील, यांत शंका नाहीं. शास्त्रीय पद्धति इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र यांना लागेल;ती वाङ्मयाला कशी लागेल? वाङ्मय हेहि एक शास्त्र आहे की काय, असें कोणी विचारल्यास वावगे होणार नाहीं. पण वाङ्मय म्हणजे काय, याचा विचार केल्यास शंकेचें बरेंच समाधान होईल. उज्ज्वल कल्पनाशक्ति असलेल्या व्यक्तींच्या चिरस्मरणीय व सुंदर शब्दकृतींचा संग्रह म्हणजे वाङ्मय, असे म्हणतां येईल. तसेच विवक्षित समाजाचे आचारविचार, ध्येयें, आशा, आकांक्षा, पूज्य पुरुष, विभूति, यांचा चित्रपट ह्मणजे वाङ्मय असें म्हणता येईल. पहिल्या दृष्टीनें व्यक्तीला प्राधान्य मिळतें, इतकेंच नव्हे, तर समाजाची आठवण देखील क्वचितच होते. पण समाजाशिवाय व्यक्ति नाहीं. समाजाचे ऋण वाङ्मयांत देखील दिसून येते. म्हणून समाजास वाजवी महत्त्व देऊन व्यक्तींचा लोप होऊ न देतां '''“समाजाच्या जीविताचा आरसा"''' अशा ऐतिहासिक दृष्टीने सारस्वताचा अभ्यास करावा लागतो. ऐतिहासिक पद्धतीनें सारस्वताचा अभ्यास ही शास्त्रीय पद्धतीची एक बाजू होय.
<br>{{gap}}जगांत अनेक समाज आहेत, अनेक भाषा आहेत; पण समाज व भाषावैचित्र्य असले तरी मनुष्यत्वामुळे जगांत एकरूपता आहे.ह्मणून भिन्न सारस्वतांपैकीं एक, ही जाणीव धरून तुलनात्मक दृष्टीनें त्याचे अध्ययन ही शास्त्रीय पद्धतीची दुसरी बाजू होय.{{nop}}<noinclude></noinclude>
gpop4brdm92mf0k492uw6msccyv4i0c
233343
233342
2026-07-20T04:54:34Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
233343
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(५)'''}}}}
विषयांचें आलोचन, ही कल्पना मान्य होऊं लागली. मग ते विषय आध्यात्मिक शास्त्रें असोत, आधिभौतिक शास्त्रें असोत की सामाजिक शास्त्रें असोत. शोधपद्धतीचीं अवलोकन, तुलना, प्रयोग, मापन इत्यादि जीं अंतर्भूत तत्त्वें त्यांमध्ये विषयाला अनुसरून फेरफार जरी करावा लागला, तरी अभ्यासाचा मार्ग व दिशा ही स्पष्ट झाली.
<br>{{gap}}या दिशेने अभ्यास केल्यास विशेष काय फळ मिळते, तें पाहणे अवश्य आहे. वाचकांमध्ये वाङ्मयावर भर असणारे लोक अधिक असल्यामुळे तोच विषय निरूपणाकरितां घेऊन पाहू.
{{center|{{larger|'''वाङ्मय.'''}}}}
{{gap}}वाङ्मयाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास, हे शब्द बऱ्याच जणांनां चमत्कारिक लागतील, यांत शंका नाहीं. शास्त्रीय पद्धति इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र यांना लागेल;ती वाङ्मयाला कशी लागेल? वाङ्मय हेहि एक शास्त्र आहे की काय, असें कोणी विचारल्यास वावगे होणार नाहीं. पण वाङ्मय म्हणजे काय, याचा विचार केल्यास शंकेचें बरेंच समाधान होईल. उज्ज्वल कल्पनाशक्ति असलेल्या व्यक्तींच्या चिरस्मरणीय व सुंदर शब्दकृतींचा संग्रह म्हणजे वाङ्मय, असे म्हणतां येईल. तसेच विवक्षित समाजाचे आचारविचार, ध्येयें, आशा, आकांक्षा, पूज्य पुरुष, विभूति, यांचा चित्रपट ह्मणजे वाङ्मय असें म्हणता येईल. पहिल्या दृष्टीनें व्यक्तीला प्राधान्य मिळतें, इतकेंच नव्हे, तर समाजाची आठवण देखील क्वचितच होते. पण समाजाशिवाय व्यक्ति नाहीं. समाजाचे ऋण वाङ्मयांत देखील दिसून येते. म्हणून समाजास वाजवी महत्त्व देऊन व्यक्तींचा लोप होऊ न देतां '''“समाजाच्या जीविताचा आरसा"''' अशा ऐतिहासिक दृष्टीने सारस्वताचा अभ्यास करावा लागतो. ऐतिहासिक पद्धतीनें सारस्वताचा अभ्यास ही शास्त्रीय पद्धतीची एक बाजू होय.
{{gap}}जगांत अनेक समाज आहेत, अनेक भाषा आहेत; पण समाज व भाषावैचित्र्य असले तरी मनुष्यत्वामुळे जगांत एकरूपता आहे.ह्मणून भिन्न सारस्वतांपैकीं एक, ही जाणीव धरून तुलनात्मक दृष्टीनें त्याचे अध्ययन ही शास्त्रीय पद्धतीची दुसरी बाजू होय.{{nop}}<noinclude></noinclude>
pb27xjmclhlmawcvbby7gmrt0x12y0h
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१८
104
111033
233344
2026-07-20T04:55:04Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ६ ) ऐतिहासिक रीत. आजपर्यंत सारस्वताचा अभ्यास कोणी केला नाहीं कीं काय ? ग्रंथाचे ज्ञान होण्यास परंपरेने चालत आलेली पद्धत पुरत नाहीं कीं काय ? अशा अनेक शंका मनांत येतात. जुन्या रीतीन..."
233344
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( ६ )
ऐतिहासिक रीत.
आजपर्यंत सारस्वताचा अभ्यास कोणी केला नाहीं कीं काय ? ग्रंथाचे ज्ञान
होण्यास परंपरेने चालत आलेली पद्धत पुरत नाहीं कीं काय ? अशा अनेक
शंका मनांत येतात. जुन्या रीतीने प्रथांचे अध्ययन होत नाहीं असें नाहीं, तें पूर्ण
होत नाहीं इतकेच. प्रथांचें पूर्ण ज्ञान होण्यास सारस्वताचे ज्ञान यथार्थ पाहिजे, व
तें संपादन करण्यास
समाजाच्या चैतन्याचें शब्दचित्र " या दृष्टीनें
"C
सारस्वताचा अभ्यास करावयास पाहिजे.
केवळ स्वतःचें समाधान करण्याकरितां कोणी लिहीत नाहींत. कारण, खरो-
खर तसें असतें, तर त्यांच्या स्फूर्तीनां फक्त उद्गारांचे विनाशी रूपच मिळालें
कोणी दिलें नसतें, व निरनिराच्या
अस्तित्वांत आलें नसतें. ज्या अर्थी
असतें; चिरकाळ टिकणाऱ्या कृतीचं रूप
काळच्या कृतींचा संग्रह होऊन वाङ्मयच
वाङ्मय अस्तित्वांत आहे, त्या अर्थी आपले ग्रंथ इतरांनी वाचावेत, त्यांचे -
मनन व्हावें, त्यांचा लोकांच्या वर्तनावर परिणाम व्हावा, निदान प्रवाहांत बीं
पसरल्याप्रमाणें आपले विचार निष्फळ होऊं नयेत, अशी इच्छा किंवा उमेद धरून
तेजाळ व्यक्ति लेखनाचा खटाटोप करीत असल्या पाहिजेत. तसेंच, निवळ
स्वतःचेच असे विचार फार थोडे. ज्या काळीं, ज्या ठिकाणीं, जन्म झाला
असेल त्या वेळच्याच कल्पनांचा नव्हे, तर पूर्वी होऊन गेलेल्या महानुभावांच्या
विचारांचा संस्कार लेखकाला झालेला असतो, व प्रौढवयांत हे संस्कार लुप्तप्राय
होऊन परदेशी संस्कारांचा पगडा जरी त्याचे मनावर बसला, तरी त्यांच्या
कृतींचें ज्ञान पूर्ण होण्यास वर सांगितलेल्या आनुषंगिक गोष्टींचा विचार करणें
अवश्य होतें. लॉर्ड मॉर्ले यांच्या प्रेरणेनें व त्यांच्या नजरेखालीं सुरू झालेल्या
‘आंग्ल वाङ्मयाचे सेवक' “English Men of Letters” या चरित्र-
मालेपैकी कोणतेंहि पुस्तक घ्या, त्यांत पहिल्यानें पूर्वज, नंतर मातापितर, नंतर
बाळपण, शिक्षण, खेळगडी, यांची हकीकत देऊन मग राजकीय व सामाजिक
परिस्थिति, समकालीन लेखकांची माहिती, चरित्रनायकांचे ग्रंथ, वाङ्मयाची
स्थिति, इत्यादि अप्रस्तुत भासणाऱ्या गोष्टींचा उल्लेख करून, नायकाचा वाय-
यांतील दर्जा, याविषयीं विवेचन केलेलें असतें. याप्रमाणे पाठीमागचा पुढचा,
व समकालीन संबंध लाविल्यामुळे वेगवेगळ्या लेखकानां योग्य सन्मान मिळ-<noinclude></noinclude>
s2513ikgskyeas4qgn4l3dik4jop1fj
233347
233344
2026-07-20T05:08:50Z
JayashreeVI
4058
233347
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(६)'''}}}}
{{center|{{larger|'''ऐतिहासिक रीत.'''}}}}
{{gap}}आजपर्यंत सारस्वताचा अभ्यास कोणी केला नाहीं कीं काय? ग्रंथाचे ज्ञान होण्यास परंपरेने चालत आलेली पद्धत पुरत नाहीं कीं काय? अशा अनेक शंका मनांत येतात. जुन्या रीतीने प्रथांचे अध्ययन होत नाहीं असें नाहीं, तें पूर्ण होत नाहीं इतकेच. प्रथांचें पूर्ण ज्ञान होण्यास सारस्वताचे ज्ञान यथार्थ पाहिजे, व तें संपादन करण्यास '''"समाजाच्या चैतन्याचें शब्दचित्र"''' या दृष्टीनें सारस्वताचा अभ्यास करावयास पाहिजे.
<br>{{gap}}केवळ स्वतःचें समाधान करण्याकरितां कोणी लिहीत नाहींत. कारण, खरोखर तसें असतें, तर त्यांच्या स्फूर्तीनां फक्त उद्गारांचे विनाशी रूपच मिळालें असतें; चिरकाळ टिकणाऱ्या कृतीचं रूप कोणी दिलें नसतें, व निरनिराच्या काळच्या कृतींचा संग्रह होऊन वाङ्मयच अस्तित्वांत आलें नसतें. ज्या अर्थी वाङ्मय अस्तित्वांत आहे, त्या अर्थी आपले ग्रंथ इतरांनी वाचावेत, त्यांचे मनन व्हावें, त्यांचा लोकांच्या वर्तनावर परिणाम व्हावा, निदान प्रवाहांत बीं पसरल्याप्रमाणें आपले विचार निष्फळ होऊं नयेत, अशी इच्छा किंवा उमेद धरून
तेजाळ व्यक्ति लेखनाचा खटाटोप करीत असल्या पाहिजेत. तसेंच, निवळ स्वतःचेच असे विचार फार थोडे. ज्या काळीं, ज्या ठिकाणीं, जन्म झाला असेल त्या वेळच्याच कल्पनांचा नव्हे, तर पूर्वी होऊन गेलेल्या महानुभावांच्या
विचारांचा संस्कार लेखकाला झालेला असतो, व प्रौढवयांत हे संस्कार लुप्तप्राय होऊन परदेशी संस्कारांचा पगडा जरी त्याचे मनावर बसला, तरी त्यांच्या कृतींचें ज्ञान पूर्ण होण्यास वर सांगितलेल्या आनुषंगिक गोष्टींचा विचार करणें अवश्य होतें. लॉर्ड मॉर्ले यांच्या प्रेरणेनें व त्यांच्या नजरेखालीं सुरू झालेल्या ‘आंग्ल वाङ्मयाचे सेवक' “English Men of Letters” या चरित्रमालेपैकी कोणतेंहि पुस्तक घ्या, त्यांत पहिल्यानें पूर्वज, नंतर मातापितर, नंतर बाळपण, शिक्षण, खेळगडी, यांची हकीकत देऊन मग राजकीय व सामाजिक परिस्थिति, समकालीन लेखकांची माहिती, चरित्रनायकांचे ग्रंथ, वाङ्मयाची स्थिति, इत्यादि अप्रस्तुत भासणाऱ्या गोष्टींचा उल्लेख करून, नायकाचा वाङ्मयातील दर्जा, याविषयीं विवेचन केलेलें असतें. याप्रमाणे पाठीमागचा पुढचा,
व समकालीन संबंध लाविल्यामुळे वेगवेगळ्या लेखकानां योग्य सन्मान मिळ-<noinclude></noinclude>
ajx6hdtutv6z6faxkpb9qg9dxf5m6im
233348
233347
2026-07-20T05:09:39Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
233348
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(६)'''}}}}
{{center|{{larger|'''ऐतिहासिक रीत.'''}}}}
{{gap}}आजपर्यंत सारस्वताचा अभ्यास कोणी केला नाहीं कीं काय? ग्रंथाचे ज्ञान होण्यास परंपरेने चालत आलेली पद्धत पुरत नाहीं कीं काय? अशा अनेक शंका मनांत येतात. जुन्या रीतीने प्रथांचे अध्ययन होत नाहीं असें नाहीं, तें पूर्ण होत नाहीं इतकेच. प्रथांचें पूर्ण ज्ञान होण्यास सारस्वताचे ज्ञान यथार्थ पाहिजे, व तें संपादन करण्यास '''"समाजाच्या चैतन्याचें शब्दचित्र"''' या दृष्टीनें सारस्वताचा अभ्यास करावयास पाहिजे.
<br>{{gap}}केवळ स्वतःचें समाधान करण्याकरितां कोणी लिहीत नाहींत. कारण, खरोखर तसें असतें, तर त्यांच्या स्फूर्तीनां फक्त उद्गारांचे विनाशी रूपच मिळालें असतें; चिरकाळ टिकणाऱ्या कृतीचं रूप कोणी दिलें नसतें, व निरनिराच्या काळच्या कृतींचा संग्रह होऊन वाङ्मयच अस्तित्वांत आलें नसतें. ज्या अर्थी वाङ्मय अस्तित्वांत आहे, त्या अर्थी आपले ग्रंथ इतरांनी वाचावेत, त्यांचे मनन व्हावें, त्यांचा लोकांच्या वर्तनावर परिणाम व्हावा, निदान प्रवाहांत बीं पसरल्याप्रमाणें आपले विचार निष्फळ होऊं नयेत, अशी इच्छा किंवा उमेद धरून
तेजाळ व्यक्ति लेखनाचा खटाटोप करीत असल्या पाहिजेत. तसेंच, निवळ स्वतःचेच असे विचार फार थोडे. ज्या काळीं, ज्या ठिकाणीं, जन्म झाला असेल त्या वेळच्याच कल्पनांचा नव्हे, तर पूर्वी होऊन गेलेल्या महानुभावांच्या
विचारांचा संस्कार लेखकाला झालेला असतो, व प्रौढवयांत हे संस्कार लुप्तप्राय होऊन परदेशी संस्कारांचा पगडा जरी त्याचे मनावर बसला, तरी त्यांच्या कृतींचें ज्ञान पूर्ण होण्यास वर सांगितलेल्या आनुषंगिक गोष्टींचा विचार करणें अवश्य होतें. लॉर्ड मॉर्ले यांच्या प्रेरणेनें व त्यांच्या नजरेखालीं सुरू झालेल्या ‘आंग्ल वाङ्मयाचे सेवक' “English Men of Letters” या चरित्रमालेपैकी कोणतेंहि पुस्तक घ्या, त्यांत पहिल्यानें पूर्वज, नंतर मातापितर, नंतर बाळपण, शिक्षण, खेळगडी, यांची हकीकत देऊन मग राजकीय व सामाजिक परिस्थिति, समकालीन लेखकांची माहिती, चरित्रनायकांचे ग्रंथ, वाङ्मयाची स्थिति, इत्यादि अप्रस्तुत भासणाऱ्या गोष्टींचा उल्लेख करून, नायकाचा वाङ्मयातील दर्जा, याविषयीं विवेचन केलेलें असतें. याप्रमाणे पाठीमागचा पुढचा,
व समकालीन संबंध लाविल्यामुळे वेगवेगळ्या लेखकानां योग्य सन्मान मिळ-<noinclude></noinclude>
09p5v0coj94x1cr0p3lpjj8y9n2oxta
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१९
104
111034
233345
2026-07-20T04:55:28Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ७ ) ण्याचा संभव जास्त होतो. 'व्रतानामुत्तमं व्रतम्' म्हणजे सर्वच उत्तम अशी भाविकांची दृष्टि जाऊन त्याचे ऐवजी मार्मिकपणा अंगीं बाणतो. सोनें कोणतें व बेगड कोणतें हैं पारखण्याची शक..."
233345
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( ७ )
ण्याचा संभव जास्त होतो. 'व्रतानामुत्तमं व्रतम्' म्हणजे सर्वच उत्तम
अशी भाविकांची दृष्टि जाऊन त्याचे ऐवजी मार्मिकपणा अंगीं बाणतो. सोनें
कोणतें व बेगड कोणतें हैं पारखण्याची शक्ति अंगीं येऊ लागते, सर्वच उत्कृष्ट
झटल्याने रसिकतेपेक्षा मनाचा कोमलपणा व समदृष्टीचा अतिरेक दिसतो,
हें प्रत्ययास येऊं लागतें. प्रत्येक माणसांत दैविक अंश आहे, तेव्हां मोठेपणाहि
प्रत्येकांत बीजरूपानें आहे, असें कोणी ह्मणतील; पण वाङ्मयति आमाला
बीजरूपार्शी कर्तव्य नसून पक्वफळाशीं, त्याच्या आस्वादाशीं आहे, हे ध्यानांत
ठेवणे जरूरीचे आहे. बीजरूप जाऊन सुंदर, मोठा, वृक्ष झाला, आणि फळें
आलों नाहींत, किंवा जीं आलीं तीं बेचव आलीं, तर तीं त्याज्यच होत.
मोठ्या भव्यवृक्षांचीं फळें म्हणून कोणी फळांची रुचि घेत नाहींत ! त्याला
फळांच्या अंगांत रस असावा लागतो. साध्या भाषेत सांगावयाचें म्हणजे अन्य
व्यवसायांत नैपुण्य मिळविलें कीं, वाङ्मयांतहि मोठेपणा येतो, असें नाहीं.
सर्वानांच चांगले म्हटल्यास खरोखर प्रतिभासंपन्न लेखकांची संभावना न होता
ळणाच होते. विद्याव्यासंगांत चिकित्साच अधिक पाहिजे. 'नाऽत्र कार्या-
विचारणा' हे पुराणाचे फर्मान येथें लागू पडत नाहीं. अर्घ्यनैवेद्य हे पूजा-
समारंभाकरिताच आहेत.
,
ज्याप्रमाणे एका व्यवसायांतला मोठेपणा इतर ठिकाणीं उपयोगी पडत
नाहीं, त्याचप्रमाणे, कोणाहि व्यक्तीला मोठेपणाचा मक्ता मिळालेला नाहीं, किंवा
बहुजनसमाजाला त्याची दक्षिणाहि वांटलेली नाहीं. तो दुर्लभ आहे. तो दिक्काल
यांनी मर्यादित नाही. एकाच देशांत भिन्नकाळी, भिन्नभिन्न जातींत, आणि
एकाच काळी अनेक समाजांत व ज्ञातीत महात्मे उदयास येतात. विचार व कृति
यांनीच उच्चनीचपणा वाङ्मयांतहि येतो. चिरायु करण्याचें सामर्थ्य काळाला
नाहीं. यास्तव दोनचार शतकें अवधि गेल्यानंतरच लेखकांना मोठेपणा प्राप्त
होतो, अशी जी बऱ्याच जणांची अस्पष्ट समजून असते, ती किती निराधार
आहे, हें ऐतिहासिक पद्धतीनें सारस्वताचे अध्ययन केल्याशिवाय मनावर नीट ठसत
नाहीं. तसेच, सौंदर्य किंवा रसमाधुर्य वाङ्मयाच्या ठराविक प्रकारतिच निष्पन्न
होतें, असें नाहीं. काव्य प्रचुर, संस्मरणीय असे प्रसंग संसारति अनेक असतात.
त्यांनीं मोह पावून त्यांस योग्य शब्दरूप देणारा, इतरांना डोलविणारा, योजक
पाहिजे असतो. जितके योजक तितक्या कृति, आणि तितकेच रसविशेष. रस-<noinclude></noinclude>
skngrgosvf5u7b3ce1ggd8ocgcssyou
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/२०
104
111035
233346
2026-07-20T04:55:56Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ८ ) विशेषांची गणना, त्यांचें वर्गीकरण, त्यांची उत्पत्ति, त्यांचे निदान ठरविण्याचा अलंकारशास्त्राचा आयास व्यर्थ आहे. अलंकारशास्त्र. जसें शारीरिक शास्त्रांचें कितीहि अध्ययन केल..."
233346
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( ८ )
विशेषांची गणना, त्यांचें वर्गीकरण, त्यांची उत्पत्ति, त्यांचे निदान ठरविण्याचा
अलंकारशास्त्राचा आयास व्यर्थ आहे.
अलंकारशास्त्र.
जसें शारीरिक शास्त्रांचें कितीहि अध्ययन केलें, शव फाडून आंतील रचनेचा
कितीहि अभ्यास केला, किंबहुना या रचनेचा शरीराच्या क्रियेशी असणाऱ्या
संबंधाचा पक्का शोध लावला, तरी मनुष्यप्राण्याचें पूर्ण ज्ञान झालें असें कोणा-
लाहि ह्मणतां येत नाहीं, तद्वत्च, अलंकारशास्त्राच्या पठणानें काव्याचे ज्ञान होते,
असें म्हणतां येत नाहीं. इतकेंच नव्हे, तर ज्याप्रमाणें सूपशास्त्रांत निरनिराळ्या
पक्वान्नांचे विधि देऊन अमुक केलें असतां अमुक पाकनिष्पत्ति होते, अर्से
अनुभवसिद्ध आश्वासन दिलेलें असतें, त्याप्रमाणेच अलंकारशास्त्रांचं विवेचन
ह्मणजे रसनिष्पत्तीच्या विधींचा दुसरा एक अनुभवसिद्ध संग्रह, अशी
समजूत होणें साहजिक नाहीं, असें कोण झणेल ? अमुक शब्द, अमुक
विशेषर्णे, अमुक प्रमाणांत एकत्र ठेविलीं, कीं, झाला अमुक रस तयार !
सूपशास्त्राचे विधि व अलंकारशास्त्राचे विधि यांत फरक काय, असें कां वाटू
नये ? तेजाळ व्यक्तींना अलंकारशास्त्राचा उपयोग न होतां त्यांच्या नैसर्गिक
स्वातंत्र्यास अडथळा येत असला पाहिजे. पद्यरचनेची हातोटी साधलेल्यांनां
मात्र काव्याची टांकसाळ काढण्यास मदत होते, व स्फूर्तियुक्त काव्याऐवज
'विटाळ्याची कविता जास्त प्रचारांत येते.
"
अलंकारशास्त्राचा निस्सीम अभ्यास प्रचारांत आल्यापासून संस्कृत काव्याला
कशी समाधि मिळाली, तें नव्याने सांगण्याची जरूरी नाही. तसेंच अलीकडे
प्रसिद्ध होत असलेलें मराठी काव्य वाचतांना अनेक वेळां स्फूर्तीच्या ऐवजीं
रचनेचाच अनुभव जास्त येतो, असें झटल्यास अयोग्य होणार नाहीं.
मग अलंकारशास्त्राचा कांहींच उपयोग नाहीं कीं काय, असा प्रश्न निघणें
साहजिक आहे.
प्रत्येक प्रसंगांत निरनिराळे रस कमी अधिक प्रमाणानें मिसळलेले असतात,
असा नेहमींचा अनुभव आहे. आणि काव्य ह्मणजे जर अंतःसृष्टि किंवा बाह्य-
सृष्टि यांना लेखकाच्या प्रतिभेने मिळालेले मनोहर रूप, तर रसांच्या शुद्ध स्व-
रूपाचा निर्णय करण्यांत अर्थ तो काय ? शृंगार, वीर, करुण इत्यादि रसांचे<noinclude></noinclude>
p7u7jvk4h3k3etdtllnxnuygdf2zf1x
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/२१
104
111036
233349
2026-07-20T05:10:11Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ९ ) असें ह्मणण्याचा हेतु नाहीं; पण हा दोष क्षुल्लक आहे. निर्भेळ परिपोष करणारे संसारांतील खरेखुरे प्रसंग कुणाला दाखवितां येतील काय ? उत्तररामचारतांत रामचंद्राच्या शोकाचें वर्णन..."
233349
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( ९ )
असें ह्मणण्याचा हेतु नाहीं;
पण हा दोष क्षुल्लक आहे.
निर्भेळ परिपोष करणारे संसारांतील खरेखुरे प्रसंग कुणाला दाखवितां येतील
काय ? उत्तररामचारतांत रामचंद्राच्या शोकाचें वर्णन केले आहे; पण नाट-
कांतील प्रसंग या दृष्टीनें पाहिलें, किंवा शुद्ध करुण रसाचा परिपोष म्हणून
पाहिले तरी विरसच होतो. शोकावेग आला असतां तो अनेक पद्यरूपार्ने
बाहेर पडणे असंभवित आहे. रामचंद्राच्या शोकापेक्षां कवीचें अस्थानीं
कौशल्यच जास्त अनुभवास येतें. कालिदासाने शुद्धरसाचें वर्णन करण्याचा
प्रयत्न केलेला नाहीं. विक्रमोर्वशीयाचा एक अंक याला अपवाद नाहीं
काय ? असें कोणी ह्मणतील; पण राजा शोकामुळे भ्रमिष्टासारखा हिंडतो
आहे व वेड्याप्रमाणे त्याचे मनोविकार कवीनें असंबद्ध दाखविले आहेत.
ह्मणून रसहानि होत नाही. हा अंक निर्दोष आहे,
थोढा लहान केला असता तर बरें झालें असतें खरें;
चांगल्या कृतींत देखील असे दोष सांपडतील. मिश्ररसांचा परिपोष व्हावा -
णूनच कालिदास विदूषकाला नायकाजवळ ठेवितो. नायकाच्या उच्च मनोवृत्ति
व विदूषकाची सामान्य प्रवृत्ति, यांची सांगड घातल्यामुळे प्रसंग जास्त खुल-
तात. विदूषक आपल्या राण्यांनां सांगेल या भीतीनें, शकुंतलेवर माझी प्रीति
नाहीं, मी थट्टा केली, खरें मानूं नकोस, असें राजानें निक्षून सांगितलें, ह्मणून
भोळा बिचारा विदूषक तें खरें मानतो, आंतला हेतु ओळखीत नाहीं, आणि
धीवराकडून आंगठी परत मिळाल्यानंतर शकुंतलेची बिलकूल आठवण न काढ-
ल्याबद्दल राजा दोष देत असतांना, 'मला कां दोष लावितोस ? 'शकुंत-
लेवर माझें खरें प्रेम नाहीं, थट्टा केली, असें तूंच सांगितलेंसना ?
असा वि-
दूषकाचा जबाब ऐकून स्वतः केलेली फसवणूक स्वतःलाच नडली, हें जाणून
राजाचा उद्वेग वाढत नाहीं काय ? शेक्सपियरचीं नाटकें घेतलीं, तरी त्यांत
एकच रसाचा परिपोष आढळणार नाहीं. लियर नाटकांतील प्रसंग घ्या. लिय-
रला वेड लागून तो बरळत फिरतो, तेव्हां राजाच्या परिवारापैकीं खुषमस्क-
याच काय तो बरोबर जातो. वेडांत राजा बरळू लागला, कीं, द्दा ( Fool )
जगाच्या रहाटीविषयीं शहाण्यासारखा बोलतो, हें पाहून राजाची दैना जास्तच
भां लागत नाहीं काय ? हॅम्लेटमधील कबर खणणारांचा प्रवेश घेतला तरी
हेच तत्व दिसेल. नवीन कबर खणताना तो बिचारा गातो आहे : जुनी कवटी
मातींतून निघते तेव्हां विशेष लक्ष न देतां ती तो कांठावर फेंकून देतो. स्मशा
6
,,<noinclude></noinclude>
peoqizocmp1f48tjqm1mcfd60mocf7l
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/२२
104
111037
233350
2026-07-20T05:10:41Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( १० ) नातील गांभीर्य व खिन्नता कोणीकडे व त्या खणणाराचे श्रमपरिहार होण्याकरतां गाणे कोणीकडे ! कुदळीला लागलेली कवटी फेंकून देणें कोणीकडे, आणि तीच कवटी पाहून हॅम्लेटच्या अंतःकरणां..."
233350
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( १० )
नातील गांभीर्य व खिन्नता कोणीकडे व त्या खणणाराचे श्रमपरिहार होण्याकरतां
गाणे कोणीकडे ! कुदळीला लागलेली कवटी फेंकून देणें कोणीकडे, आणि तीच
कवटी पाहून हॅम्लेटच्या अंतःकरणांत उठणारे तात्विक विचारांचे काहूर
कोणीकडे ! या विविध गोष्टींचें चित्र पाहून संसाराचा उलटेपणा मनांत बिंबत
नाहीं काय ? As you like it ' हें विनोदी नाटक घेतलें, तरी त्यांत
विदूषक व झाकू, धनगर व त्याची प्रियकरी या पात्रांमुळे नाना रसाचें मिश्रण
झालें आहे व तें शुद्ध हास्यरसापेक्षां आदरास अधिक योग्य झालें आहे.
विनोदी नाटक ह्मणजे केवळ हास्यरसाचा ठेवा नव्हे. विनोद व बाष्कळपणा यांत
फरक आहे. शुद्ध हास्यरस कोठेच आढळत नाहीं. प्रसिद्ध विनोदी नाटक-
कारांच्या ग्रंथतिले उदाहरण घेऊन पाहू. इंग्रजांना जसा शेक्सपियर, तस्रा
फिरंग्यांना ( French ) मोलियेर याचें 'स्वतःस खानदानी झणवूं पाह-
णारा वाणी ( Le Bourgeois gentil-homme ) हैं नाटक घेत-
ल्यास, साध्या भोळ्या पण महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे गायनाचार्य, नृत्याचार्य,
अलंकारशास्त्रप्रवीण पंडित, यांचा निवळ पैसे उकळण्याचा हेतु लक्षांत न येऊन,
त्यांचें उपरोधिक भाषण न समजून, नायकाचे सरळ व विश्वासपूर्ण वर्तन पाहिलें
ह्मणजे विनोदरस उचंबळतो, यांत नवल नाहीं. पण त्याच वेळीं नायकाच्या
अनायासानें फसण्याबद्दल त्याची कींव व दुसऱ्यांच्या दांभिकपणाविषयी किं-
चित् तिरस्कार ही रसिकांच्या मनांत येत नाहींत काय ? आणि शेवटच्या
प्रवेशांत स्वतःचा खुळेपणा स्वतःला पटून नायकाने केलेले वर्तन पाहून
आपण हंसलों, त्याचेचबद्दल किंचित् आदर उत्पन्न होत नाहीं
काय ? मोलियेरर्चे कोणतेंहि नाटक घेतलें तरी त्यांत हरदासी विनोद
आढळणार नाहीं, मनुष्यमात्राची यथार्थ कल्पना यावी, एकमेकांच्या
न्यूनांविषयी सहनशीलता, सहानुभूति उत्पन्न व्हावी, जीवनांतील सुखदायक
प्रसंग वाढून कष्टमय जीवनयात्रा अधिक सत्य व्हावी, या उच्च हेतूनेंच
मनुष्यमात्राचा विक्षिप्तपणा, किंबहुना व्यंगें दाखवून मोलियेर आमाला
रिझवितो. त्याच्या कोणत्याहि पात्राबद्दल मनाला त्वेष येत नाहीं. सर्वामध्ये
स्खलनशील मानवांची ओळख पटते. हास्यरस, गांभीर्य व खिन्नता यांनी
मिश्रित आढळतो. डॉन क्विक्सोट ( Don Quixote ) हा जगन्मान्य वि-
नोदी ग्रंथ घेतला, तरी नायक व त्याचा नोकर सॅन्कोपॅन्झा यांची दुकल जो-
ज्याला<noinclude></noinclude>
n6h11acb7xmd034u8alj918t5bdwdhm
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/२३
104
111038
233351
2026-07-20T05:11:06Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ११ ) ल्यामुळे प्रत्येक प्रसंग बहारीचा झाला आहे. हा ग्रंथ कोणतेंहि पान उघडून वाचला तरी सारखाच मनोवेधक वाटेल. अगदी अलीकडील पिक्विक् पेपर्स हा ग्रंथ घेतला, तरी नायक व त्याचे जोडीदार..."
233351
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( ११ )
ल्यामुळे प्रत्येक प्रसंग बहारीचा झाला आहे. हा ग्रंथ कोणतेंहि पान उघडून
वाचला तरी सारखाच मनोवेधक वाटेल. अगदी अलीकडील पिक्विक् पेपर्स
हा ग्रंथ घेतला, तरी नायक व त्याचे जोडीदार व प्रत्येकाचा निरनिराळा
स्वभाव, यांची सांगड घातल्यामुळे त्यांना अमरत्व प्राप्त झाले आहे, असें
दिसेल, कोणतेहि सर्वमान्य विनोदी ग्रंथ घेतले, तरी त्यांत शुद्ध रसाचा परि-
पोष आढळणार नाहीं. भिन्न भिन्न रसांच्या ओतीव पुतळ्यांच्या ऐवजी चालतीं
बोलती माणसेंच आढळतील.
दृश्यादृश्य सुष्टीचें आलोडन करीत असतांना स्फुरण पावून, कल्पनासूष्टींत
लीन झाल्यामुळे, कवीनें निर्माण केलेली, चैतन्य दिलेलीं नाना रूपें झणजे
काव्य होय. यास्तव ज्या प्रमाणांत रसविशेषांचे वस्तुतः मिश्रण झाले असेल,
त्याच प्रमाणांत कार्ध्याताद्दै सांपडावयास पाहिजे. सूपशास्त्रांतील पदार्थोंना लाग-
णाऱ्या वस्तूंमध्ये जरी अंगचा रस असला तरी शब्दामध्ये अंगचा रस नाहीं.
तो योजकाने स्वत: च्या कल्पनाशक्तीनेच ओतावयाचा असतो. निर्जीव शब्दरचना
झणजे काव्य नव्हे. इतर जीवाप्रमाणें काव्यालाहि प्राण आहे. पृथकरणावरच
विसंबून राहिल्यास कार्यातील चैतन्याची ओळख होत नाहीं.
झणजे पृथक्करणच नव्हे काय ?
वाङ्मयांतील निर्णय.
अलंकारशास्त्र
मग, चांगलें व वाईट, स्मरणीय व विस्मरणीय, ग्राह्य व त्याज्य यांचा
वाङ्मयांत निर्णय कसा करावयाचा, हें सुचविणें भाग आहे. काव्य ही सजीव
वस्तु आहे खरी, पण ती या आमच्या नीरस भासणाऱ्या सृष्टींतली नाहीं. गूढ
सृष्टीतली आहे. या सृष्टीत प्रतिभेनेंच प्रवेश होतो. ह्मणून काव्याची माधुरी
चाखण्यास प्रतिभेचे पोषण झाले पाहिजे, आणि प्रतिभेचे पोषण म्हणजे, सर्व-
काळच्या, सर्वमान्य कवींच्या कृतींचे अनेकवार वाचन, मनन, निदिध्यास,
हें होय. कधी कधी उत्तम मानिलेल्या कृति प्रथम तशा वाटत नाहींत, हा अनुभव
बरेच जणांना येतो. ह्मणून स्वतःला प्रत्यय येईपर्यंत, किंवा वारंवार वाचून देखील
प्रत्यय न आल्यास कां येत नाहीं याचें कारण उमजेपर्यंत- - प्रयत्न सुरू ठेविला
पाहिजे. काव्य, कृति उत्तम असल्यावर त्याचा प्रत्येकाला प्रत्यय का येऊं नये ?
तसा आलाच पाहिजे; न आल्यास त्याचा दोष काव्याकडे नसून वाचकाच्या<noinclude></noinclude>
n6mvk9ltcub1xpnns9gs474kog5a03h