विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.12
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf/३
104
86232
233376
226935
2026-07-20T12:40:03Z
सुबोध कुलकर्णी
1231
233376
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रकाशकाचे दोन शब्द'''}}}}
<Br>
{{gap}}श्री गुरुदेवांचा जन्म ३ जुलै १८८६ रोजी झाला. यंदा जन्म-शताब्दी चे वर्ष म्हणून साजरे करणेचे ठरले. त्यानिमित्त श्री गुरुदेवांचे विषयी एक लहानशी पुस्तिका तारीख ३ जुलै १९८६ रोजी प्रसिद्ध करावी असा विचार ठरला आणि आमचे ट्रस्ट बोर्डाने तसा आदेश दिला. डॉ. कृष्णानंद गोगटे, मिरज यांचेकडून काही लिखाण आले होते; पण ते अपुरे होते. म्हणून श्री वसंतराव देशपांडे याना एक लहानशी पुस्तिका तयार करणेस सांगितले. त्यांनी हे कार्य हाती घेवून वेळेवर पूर्ण करुन दिले. डॉ. गोगटे व श्री देशपांडे यांचे आम्ही आभारी आहोत. <BR>
{{gap}}विक्रांत प्रेसने ही पुस्तिका तत्परतेने छापून दिली आणि छपाई चांगली केली त्याबद्दलही आम्ही मालकांचे आभारी आहोत. <BR>
{{gap}}ही पुस्तिका वाचलेवर श्री गुरुदेवांचे भव्योदात्त व्यक्तिमत्व दिसून येईल आणि या शतकातील एका थोर साक्षात्कारी संताचे दर्शन घडेल अशी खात्री आहे.{{nop}}<noinclude></noinclude>
hpn8o2zrlmbl9h7cvm5kk0neoj1jsa8
पान:श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf/५
104
86233
233377
226937
2026-07-20T13:16:54Z
सुबोध कुलकर्णी
1231
233377
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="चंद्रकांत जाधव" /></noinclude>{{x-larger|{{center|'''श्री गुरुदेव रानडे'''}}}}<br>
{{gap}}गुरुदेव रामचंद्र दत्तात्रय रानडे यांचा जन्म ३ जुलै १८८६ रोजी जमखंडी एथे झाला. त्यांच्या मातुःश्रीनी सोळा सोमवारचे कडक व्रत आचरले; मनांत पुत्रप्राप्तीची इच्छा दृढ केली आणि त्याचे फळ म्हणूनच की काय त्यांच्या पोटी रामभाऊचा जन्म झाला. लहानपणापासून प्रकृती अशक्तच. पण मनाचा खंबीरपणा आणि तीव्र बुद्धीमत्ता यांच्या जोरावर त्यानी साक्षात्कारापर्यंत मजल मारली. तारुण्यांत पदार्पण करण्यापूर्वीच त्यांना श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्याकडून अनुग्रह मिळाला. ते मॅट्रिकमध्ये असताना त्यानी मनांत संकल्प केला की या अनुग्रहाचे सामर्थ्य खरे असेल तर आपणाला जगन्नाथ शंकरशेट स्कॉलरशिप मिळावी. त्यानी अभ्यासही झटून केला. आणि तितक्याच निष्ठेने गुरुनी दिलेल्या नामाचा जपही केला. आणि त्याना जेव्हां खरोखरच स्कॉलरशिप मिळाली तेव्हां आपल्या गुरुवर त्यांची निष्ठा पक्की झाली. ती दिवसें दिवस वाढत गेली आणि लवकरच ते स्वतः गुरुपदाला पोचले. पूर्वजन्माच्या सुकृतामुळे असो अगर गुरुकृपेने असो, ते स्वतः ज्ञानीच होते. तेव्हां शाळा कॉलेज मधून विद्यादान करणारे शिक्षक त्यांना कितीसे शिकविणार? ते एम्. एला असताना, एका परिक्षकाने तर त्यांच्या पेपरवर स्पष्ट लिहिले, की "The examinee knows more than the examiner". गुरुकडून अनुग्रह मिळण्याला प्रथम पात्रता पाहिजे. तो मिळाल्यावर त्याच्यावर निष्ठा ठेवून त्याचे नियमाने अनुष्ठान झाले पाहिजे. मग साधकाला ज्ञान प्राप्त होते. गुरुदेवांना ते प्राप्त झाले. म्हणून शालेय शिक्षण हे त्याना केवळ लौकीक दृष्ट्या डिग्री घेण्यासाठीच करावे लागले असे म्हणणे वावगे होणार नाही.<BR>
{{gap}}शिक्षणानंतर नोकरी धरतानाही त्यानी आपली साधना चालू राहील, तीत अडथळा येणार नाही अशीच नोकरी करायची व तशी मिळाली नाहीतर पोटा पाण्याचा भार परमेश्वरावरच टाकायचा अशी त्यांच्या मनाची तयारी होती. याचा अर्थ त्यांचे ध्येय आणि जीवनाची<noinclude></noinclude>
d9fsraby6j10oldb30y1hz83frfxh8h
अनुक्रमणिका:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf
106
104076
233400
212320
2026-07-21T09:48:34Z
कल्पनाशक्ती
3813
233400
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=समाजशास्त्रावरील व्याख्याने
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=नटेश अप्पाजी द्रविड
|Address=पुणे
|Year=1914
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist 6="समाजशास्त्राचा अभ्यास आणि त्याचं महत्व"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
ist9gs6rota8wrp32wjd1tby72gozat
233446
233400
2026-07-22T16:24:46Z
कल्पनाशक्ती
3813
233446
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=समाजशास्त्रावरील व्याख्याने
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=नटेश अप्पाजी द्रविड
|Address=पुणे
|Year=1914
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 6="समाजशास्त्राचा अभ्यास आणि त्याचं महत्व" 28="समाजशास्त्रांतील कांहीं प्रमेयें."/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
367cb4b6ag7b8vj78xvl7i2dqbuv88f
पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/५
104
107796
233418
222941
2026-07-21T12:48:44Z
कल्पनाशक्ती
3813
233418
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 5 बाळकोबा (बाळकृष्ण नारायण) नाटेकर.jpg|center|borderless|बाळकोबा (बाळकृष्ण नारायण) नाटेकर]]
{{rule}}
{{gap}}'''बाळकोबा (बाळकृष्ण नारायण) नाटेकर'''-- हे मूळचे पुण्यांतील प्रसिद्ध गवयी होते. मोरोबाप्रमाणें अण्णासाहेबांच्या संस्थेचे हे खांब होते व कांहीं दिवस यांनीही हजारों लोकांस आपल्या गायनाने व नाट्यकलेनें झुलविलें आहे. यांनी रंगभूमी सोडून पुष्कळ दिवस झाले तरी यांची कण्व व कृष्ण या भूमिका लोकांच्या डोळ्यासमोर आहेत. गायनवादनकलेंत हे निष्णात आहेत. यांनी रंगभूमी सोडून १५ वर्षं झालीं, तरी 'किर्लोस्कर' मंडळीचा अभिमान सोडला नाहीं. यामुळे यांना मंडळी फार मान देत आहे. हे हल्लीं पुण्यांतील ट्रेनिंग कालेजमध्यें गायनवर्गाचे शिक्षक आहेत.{{nop}}<noinclude>{{center|३}}</noinclude>
63a137nez3788h96qlolpmn6hui95fg
पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/४
104
107798
233417
222940
2026-07-21T12:36:25Z
कल्पनाशक्ती
3813
233417
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 4 मोरोबा बापुजी वाघुलीकर.jpg|borderless|center|मोरोबा बापुजी वाघुलीकर]]
{{rule}}
{{gap}}'''मोरोबा बापुजी वाघुलीकर'''- राहणार वाई प्रांतांतील वाघुली गांव हे मुळचे गवयी होते. अण्णासाहेबांच्या कल्पनेला यांचें साह्य मिळाल्यामुळेच “किर्लोस्कर संगीत मंडळी" ही संस्था उदयास येऊन उर्जीत अवस्थेला आली. सुमारे १८ वर्षे यांनी हजारों लोकांचें मनोरंजन केलें. हे उत्तमांतले नट होते. धंदा सोडल्यावर सुमारे १० वर्षेयांनीं स्नानसंध्येंत उत्तम काळ घालविला. किर्लोस्कर मंडळी त्यांच्या मेहनतीचे श्रेय त्यांस देत होती. ता० २० जानेवारी १९०८ रोजी वाई मुक्कामी हे परलोकवासी झाले. मरणसमयीं यांचे वय साठ पासष्ठ वर्षांचें होतें.{{nop}}<noinclude>{{rule}}
{{center|२}}</noinclude>
1rj1yie5uefd4kh34asgznkjcemsuic
पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/३
104
107799
233416
222939
2026-07-21T12:25:37Z
कल्पनाशक्ती
3813
233416
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><Br><br><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 3 अण्णासाहेब (बळवंत पांडुरंग) किर्लोस्कर.jpg|center|borderless|अण्णासाहेब (बळवंत पांडुरंग) किर्लोस्कर]]
{{gap}}'''अण्णासाहेब (बळवंत पांडुरंग) किर्लोस्कर'''- जन्म सन १८४३ मृत्यू १८८५. महाराष्ट्र संगीत नाट्यकलेचे उत्पादक, यांनी एक पांच वर्षांत नाट्यकलेत मोठी क्रांति करून सोडली; नाटकाचे पूर्वस्वरूप फार बदलून टाकलें; कवि, गाणारे व ग्रंथकार यांना उदयास आणलें; व समाजांत एक नवी करमणूक उत्पन्न केली. पूर्व वयांत 'अल्लाउद्दीनांची चितुर शहरावर स्वारी' व 'शंकरदिग्विजय' ह्रीं दोन गद्य नाटकें, नंतर शाकुंतल, सौभद्र, व रामराज्यवियोग, अशीं तीन अत्यंत लोकप्रिय झालेली संगीत नाटके लिहिली. यांचें चरित्र पुस्तक रूपानें प्रसिद्ध आहे.{{nop}}<noinclude>{{center|१}}</noinclude>
kdc8srql1fkjnwoi6fagtvmxm9qylbt
पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/६
104
107800
233419
222942
2026-07-21T12:56:10Z
कल्पनाशक्ती
3813
233419
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 6 भाऊराव (लक्ष्मण बापुजी) कोल्हटकर.jpg|center|borderless|भाऊराव (लक्ष्मण बापुजी) कोल्हटकर]]
<br>
{{gap}}'''भाऊराव [लक्ष्मण बापुजी] कोल्हटकर'''--नाट्यकलेत हे एक अद्वितीय रत्न व शिरोभूषण होऊन गेलें. नाटेकर, मोरोबा व कोल्हटकर या रंगभूमीवर जणूं मूर्तिमंत रंगदेवता असत. हे गावयास लागले म्हणजे नागाप्रमाणे लोकांस डुलवीत होते. अशा तऱ्हेनें अव्याहत १८ वर्षे यांनीं मंडळीची सेवा व लोकांचें रंजन केले आहे. हे उदर रोगानें ३८ वे वर्षी मृत्युमुखी पडले. यांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्र भाषा जाणणारा सर्व देश हळहळला. यांनी दोन हजार रुपये आपल्या नांवानें काढून ठेवले होते. त्यांच्या व्याजांत त्यांच्या ट्रस्टीनें बडोदा हायस्कुलांत म्याट्रिक्युलेशनच्या परिक्षेत पहिला येणाऱ्या उमेदवारास एक स्कालर्शिप ठेवली आहे. यांचें चरित्र प्रसिद्ध झाले आहे.{{nop}}<noinclude>{{center|४ }}</noinclude>
4vzlgrmhwlk02os0u3p5ad19gf5ys4e
पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/७
104
108184
233420
222943
2026-07-21T13:02:02Z
कल्पनाशक्ती
3813
233420
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 7 रामभाऊ (रामचंद्र विठ्ठल) किंजवडेकर.jpg|borderless|center|रामभाऊ (रामचंद्र विठ्ठल) किंजवडेकर]]
<Br>
{{gap}}'''रामभाऊ (रामचंद्र विठ्ठल) किंजवडेकर -''' हे प्रथम १८८४ त मंडळींत आले. अण्णासाहेबांचे पश्चात् मंडळीचे चालकांपैकी हे एक झाले; अण्णासाहेबांच्या सर्व भूमिका हे करीत असत. यांचें गाणें व अभिनय पद्धतशीर असे. मोरोबा व भाऊराव ही जुनी मंडळी कमी झाल्यावर यांनीही रंगभूमीवर काम करण्याचे सोडलें.
{{rule|10em}}{{nop}}<noinclude>{{center|५}}</noinclude>
ao5lzw187jto6l24dr7jmc9t18k9ru7
पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/८
104
108185
233421
222944
2026-07-21T13:06:11Z
कल्पनाशक्ती
3813
233421
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 8 गोविंद बल्लाळ देवल.jpg|borderless|center|गोविंद बल्लाळ देवल]]
<br>
{{gap}}'''गोविंद बल्लाळ देवल. -''' सांगलीजवळ हरीपूर येथील राहणारे महाराष्ट्र भाषेतील हे सुप्रसिद्ध व लोकप्रिय नाटककार आहेत. यांचीं दुर्गा, झुंझारराव, व फाल्गुनराव, हीं गद्य नाटके, व विक्रमोर्वशीय, मृच्छकटीक, शापसंभ्रम, व शारदा हीं संगीत नाटकें प्रसिद्ध आहेत. किर्लोस्कर मंडळी शारदा नाटकाचा प्रयोग करूं लागल्यापासून त्या नाटकानें समाजांत बरीच चळवळ उडवून दिली आहे; व जें काम वर्तमानपत्राच्या कित्येक दिवसांच्या ओरडीनें व लोकांच्या उपदेशानें झालें नाहीं तें काम यांच्या शारदा नाटकानें करून 'बालावृद्ध' विवाह हा रूढ प्रकार निंद्य व उपहासास्पद करून ठेवला आहे. यांची कविता साधी, रसाळ व सुबोध असते. यांनीं आपल्या कुटुंबाचे नांवानें तीनहजार रुपये अनाथबालिकाश्रमास दिले आहेत.
{{rule|7em}}<noinclude>{{center|६}}</noinclude>
4yourieay67c99zu36bqsjclados35b
पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/९
104
108186
233422
222945
2026-07-21T13:09:55Z
कल्पनाशक्ती
3813
233422
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 9 श्रीपाद कृष्ण कोल्हटकर.jpg|borderless|center|श्रीपाद कृष्ण कोल्हटकर]]
<br>
{{gap}}'''श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. बी. ए. एल. एल. बी. -''' यांचीं वीरतनय, मूकनायक, गुप्तमंजूष, मतिविकार इत्यादि संगीत नाटकें प्रसिद्ध आहेत. याशिवाय वि. ज्ञा. वि. व मासिक मनोरंजन इत्यादि मासिक पुस्तकांतून यांचे लेख व कविता प्रसिद्ध होत असतात. यांचे लेख फार मार्मिक व विनोदपर असतात. यांनी नाटकें व निबंध लिहिण्याची स्वतंत्र दिशा काढिली असून संविधानकवैचित्र्य, अभिनव कविकल्पना, व उदात्त विचार, या गुणांत यांचीं नाटकें अग्रगण्य आहेत. रसिक व विद्वान् लोक ह्यांची नाटकें फार पसंत करतात. यांनी आणखी एक पांचवें नाटक लिहिलें आहे, परंतु तें अद्याप प्रसिद्ध झालें नाहीं. यांनी आपल्या गुप्तमंजूष व मूकनायक नाटकांच्या पुस्तकांचें उत्पन्न अनाथबालिकाश्रमास दिले आहे.
{{rule|5em}}<noinclude>{{center|७}}</noinclude>
gwu8kfvfrc5gw3wtfvgwennte9cs6ay
पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/१०
104
108187
233430
222949
2026-07-22T08:25:16Z
कल्पनाशक्ती
3813
233430
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 10 पुरुषोत्तम भास्कर डोंगरे.jpg|borderless|left|पुरुषोत्तम भास्कर डोंगरे]]
{{gap}}'''पुरुषोत्तम भास्कर डोंगरे -''' यांची भीमसिंग व पद्मिनी व जरठोद्वाह हीं गद्य आणि चंद्रसेना व चंद्रहास ही दोन संगीत नाटके प्रसिद्ध आहेत. हे पूर्वी कुलाबा जिल्ह्यांत सरकारी नोकर होते; परंतु आपल्या हातून कांहींतरी देशसेवा घडावी म्हणून त्यांनी ती नोकरी सोडली. परंतु दुर्दैवानें त्यांच्या उद्देशाचें फळ त्यांना मिळालें नाहीं. हे गेल्या डिसेंबर महिन्यांत परलोकवासी झाले.<br><br><br><br><br><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 10 शंकर विष्णु कुळकर्णी.jpg|borderless|right|शंकर विष्णु कुळकर्णी]]
{{gap}}'''शंकर विष्णु कुळकर्णी. बी. ए.''' यांनी "सुमति" नांवाचें नाटक लिहिले असून नाटकाचें विषयास नवीन दिशा दिली आहे.<br><br><br>{{nop}}<noinclude>{{center|८}}</noinclude>
bywo5wr7vlo35vzkyvcsa3touaycdde
233431
233430
2026-07-22T08:25:40Z
कल्पनाशक्ती
3813
233431
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 10 पुरुषोत्तम भास्कर डोंगरे.jpg|borderless|left|पुरुषोत्तम भास्कर डोंगरे]]
{{gap}}'''पुरुषोत्तम भास्कर डोंगरे -''' यांची भीमसिंग व पद्मिनी व जरठोद्वाह हीं गद्य आणि चंद्रसेना व चंद्रहास ही दोन संगीत नाटके प्रसिद्ध आहेत. हे पूर्वी कुलाबा जिल्ह्यांत सरकारी नोकर होते; परंतु आपल्या हातून कांहींतरी देशसेवा घडावी म्हणून त्यांनी ती नोकरी सोडली. परंतु दुर्दैवानें त्यांच्या उद्देशाचें फळ त्यांना मिळालें नाहीं. हे गेल्या डिसेंबर महिन्यांत परलोकवासी झाले.<br><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 10 शंकर विष्णु कुळकर्णी.jpg|borderless|right|शंकर विष्णु कुळकर्णी]]
{{gap}}'''शंकर विष्णु कुळकर्णी. बी. ए.''' यांनी "सुमति" नांवाचें नाटक लिहिले असून नाटकाचें विषयास नवीन दिशा दिली आहे.<br><br><br>{{nop}}<noinclude>{{center|८}}</noinclude>
pf1tm6fpr5rn2oxi24emyejq1lhnloe
पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/११
104
108188
233432
222948
2026-07-22T08:32:14Z
कल्पनाशक्ती
3813
233432
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 11 नारायण दत्तात्रय जोगळेकर.jpg|borderless|center|नारायण दत्तात्रय जोगळेकर]]
<br>
{{gap}}'''नारायण दत्तात्रय जोगळेकर.--''' यांचे इंग्रजी शिक्षण व गायनाचे शिक्षण बरोबरच चाललें होतें. म्याट्रिक्युलेशनची परीक्षा उतरल्यावर हे वकीलीचा अभ्यास करण्याकरितां पुण्यास येऊन राहिले. याच सुमारास भाऊराव यांची प्रकृति बिघडून ते आजारी पडल्यामुळे किर्लोस्कर मंडळी लयास जाण्याची भीति होती. अशा वेळीं यांची मदत मिळाल्यामुळे किर्लोस्कर मंडळीची पुन्हां उभारणी झाली. सन १९०० मध्ये हे या मंडळींत आले. मंडळीचे हल्लीं हे एक चालक व मुख्य नायक आहेत.<Br>
{{rule|5em}}{{rule|5em}}{{nop}}<noinclude>{{center|९}}</noinclude>
30yx9umyfxc68o6b0mnxb4s4b6lb2ws
पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/१२
104
108189
233433
222965
2026-07-22T08:46:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233433
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 12 नारायण सदाशिव दडपे.jpg|center|borderless|नारायण सदाशिव दडपे]]
{{gap}}'''नारायण सदाशिव दडपे. --''' हे बऱ्यातले नट असून, यांनी अण्णासाहेबांच्या स्मारकाप्रीत्यर्थ अनाथ बालिकाश्रमास १०० रु० दिले आहेत. हे सुमारे २४ वर्षे या संस्थेत आहेत.<Br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 12 काशीनाथ वासुदेव परचुरे.jpg|center|borderless|काशीनाथ वासुदेव परचुरे]]
{{gap}}'''काशीनाथ वासुदेव परचुरे. --''' राहणार वांई. सुमारे २६ वर्षे किर्लोस्कर मंडळींतील विनोदी कामांतले हे प्रसिद्ध नट आहेत.{{nop}}<noinclude>{{center|१०}}</noinclude>
71v7c0uhp6dud2iitcwy9ysjevrwie3
पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/१३
104
108190
233434
222951
2026-07-22T08:56:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233434
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 13 गणेश गोविंद बोडस.jpg|center|borderless|गणेश गोविंद बोडस]]
'''गणेश गोविंद बोडस'''- हे या मंडळीत १३ वर्षे आहेत. श्रमाने व अभ्यासाने हे प्रस्तुत एक उत्तमांतले नट तयार झाले आहेत.
<br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 13 चिंतामण रामचंद्र दिवेकर.jpg|center|borderless|चिंतामण रामचंद्र दिवेकर]]
'''चिंतामण रामचंद्र दिवेकर''' - हे सासवडचे राहणारे. हे चांगल्यापैकी हरकामी नट असून प्रसंगी पाहिजे ती भूमिका योग्य रीतीनें वठवितात. हे सुमारें १६ वर्षे या संस्थेत आहेत.
{{nop}}<noinclude></noinclude>
av1ie8xexqnv6hgytdmhn1pfpd1u7p8
पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/१४
104
108191
233435
222952
2026-07-22T09:09:35Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233435
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 14 रामा बाळनाथ बेडगकर.jpg|center|borderless|रामा बाळनाथ बेडगकर]]
'''रामा बाळनाथ बेडगकर.''' हे ११ वर्षे किर्लोस्कर मंडळींत असून नायिका व उपनायिकेच्या भूमिका करीत असतात. यांचा आवाज संगिताला योग्य असा आहे.
<br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 14 नारायण श्रीपाद राजहंस (बालगंधर्व).jpg|center|borderless|नारायण श्रीपाद राजहंस (बालगंधर्व)]]
'''नारायण श्रीपाद राजहंस''' -यांचें गाणें शास्त्रोक्त व मोहक असून सौंदर्य व कंठमाधुर्यामुळें यांना बालपणापासून 'बालगंधर्व' असें म्हणतात. यांच्या सौभद्र, मूकनायक इत्यादि नाटकांतील नायि- केच्या भूमिका वाखाणण्यासारख्या होतात.
{{nop}}<noinclude>{{center|१२}}</noinclude>
qtizx02mcdznjos455jn6snovs0ldax
पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/१५
104
108193
233436
222957
2026-07-22T09:39:16Z
कल्पनाशक्ती
3813
233436
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 15 त्र्यंबक नारायण साठे.jpg|left|borderless|त्र्यंबक नारायण साठे]]
{{gap}}'''त्र्यंबक नारायण साठे. -''' मूळचे कर्जत तालुक्यांतील राहणारे. किर्लोस्कर मंडळीच्या पहिल्या भरभराटीत सुमारे ८ वर्षे हे सेक्रेटरी होते. मंडळीला सुव्यवस्थेचें वळण यांनीच लावून दिलें असें म्हणण्यास हरकत नाहीं. ह्यांच्या हुषारीमुळे ह्यांना मिरज संस्थानांत म्यु० सेक्रेटरीची जागा मिळून सांप्रत जमखिंडी संस्थानांत हे मामलतीवर आहेत.
<br><br><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 15 भास्कर रघुनाथ ऊर्फ भास्करबोवा बखले.jpg|right|borderless|भास्कर रघुनाथ ऊर्फ भास्करबोवा बखले]]
{{gap}}'''भास्कर रघुनाथ ऊर्फ भास्करबोवा बखले.-''' हे किर्लोस्कर मंडळाच्या पहिल्य दहा वर्षाच्या कारकीर्दीत प्रमुखांपैकी नट हाते. यांचा जन्म शके १७९१ मध्ये झाला असून हे बालवयांत सुमारें ४ वर्षे मंडळीत होते. नाटकांतून निघाल्यावर यांनी आवाज सुधारण्याची जीवापाड मेहनत करून बडोद्याचे प्रसिद्ध गवई फैजमहंमद यांच्या जवळ गाण्याचा अभ्यास केला; व हल्ली हे हिंदुस्थानांतल एक नामांकित गवई म्हणून उदयास आले आहेत. मुसलमान लोकांतच गाण्याची विद्या वसंते अशा समजुतीला यांनी अपवाद आणला आहे.{{nop}}<noinclude>{{center|१३.}}</noinclude>
tq4aj397i5oiut6vhyqpgacr5s9f1ud
पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/१६
104
108194
233437
222958
2026-07-22T09:40:29Z
कल्पनाशक्ती
3813
233437
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 16 विठ्ठल अच्युत जांभेकर.jpg|center|borderless|विठ्ठल अच्युत जांभेकर]]
<br>
{{gap}}'''विठ्ठल अच्युत जांभेकर --''' गोव्याकडचे राहणारे असून मंडळीच्या भरवशाचीं जीं माणसें आहेत, त्यांत हे प्रमुख होते. हजारों रुपयांचा कारभार मंडळीने ह्यांच्या हवाली केला होता; व तो उत्तम प्रकारें करून मंडळीचे हित पाहण्यांत त्यांनी आपल्या आयुष्याचीं वीस वर्षे खर्च केलीं. दोनवर्षाखाली हे क्षयाच्या आजाराने वयाच्या ३८ व्या वर्षी वारले.<br>
{{rule|5em}}
{{nop}}<noinclude>{{center|१४}}</noinclude>
m7nnzdvbm5u3zfiheci5iy4j8i8rbvu
पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/१७
104
108195
233438
222959
2026-07-22T09:43:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233438
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 17 गोविंद नारायण निपाणीकर.jpg|center|borderless|गोविंद नारायण निपाणीकर]]
'''गोविंद नारायण निपाणीकर''' - रंगभूमीकडच्या व्यवस्थेचे काम यांच्याकडे २२ वर्षे होतें. हल्ली हे मंडळीचे पेन्शनर आहेत.
<br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 17 कृष्णाजी रघुनाथ जोशी ऊर्फ कृष्णापा.jpg|center|borderless|कृष्णाजी रघुनाथ जोशी ऊर्फ कृष्णापा]]
कृष्णाजी रघुनाथ जोशी ऊर्फ कृष्णापा.- राहणार बार्शी. मंडळीत हे अत्यंत उपयोगी गृहस्थ आज २२ वर्षे आहेत.
{{nop}}<noinclude>{{center|१५}}</noinclude>
mp0tfdit3gw4fbxlx6uqnppwwlke25i
पान:किर्लोस्कर संगीत मंडळी.pdf/१८
104
108196
233439
222961
2026-07-22T09:51:03Z
कल्पनाशक्ती
3813
233439
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br>
[[File:किर्लोस्कर संगीत मंडळी 18 शंकर बापूजी मुजूमदार.jpg|center|borderless|शंकर बापूजी मुजूमदार]]
<Br>
{{gap}}'''शंकर बापूजी मुजूमदार-'''मोरोबा बाळकोबा यांच्या बरोबरच संस्थेच्या आरंभाला हेही अंशतः उपयोगी पडले असून हल्लीं मंडळीच्या सेक्रटरीचें काम करीत आहेत. अण्णासाहेब व भाऊराव यांची चरित्रे यांनीच लिहिली आहेत. प्रस्तुतच्या किर्लोस्कर संगीत मंडळींत अगदीं अव्वल कारकीर्दीतल्या मंडळीपैकीं हेच एक अवशेष राहिले आहेत.{{nop}}<noinclude>{{center|१६}}</noinclude>
1412xl4y50sk56mwev4bjynx8nj6xey
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९०
104
110604
233428
231907
2026-07-22T06:43:01Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
233428
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" />{{left|छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा}}{{right|४९}}</noinclude>
{{center|<poem>या क्षेत्राचे धनी कोणकोणी बुडविले ।
सांगते मुळीं कसें झालें ॥
क्षेत्रवासी ह्मणोन नांव क्षत्रिय धरले।
क्षेत्री सुखी राहिले ॥
अन्यदेशिचे दंगेखोर हिमालयीं आले।
होते लपून राहिले ।।
पाठीं शत्रुभौती झाडी किती उपासीं मेले ।
गोमासा भाजून धाले ।
पाला फळें खात आखेर ताडपत्रा नेसले ।
झाडी उल्लंघून आले ॥
लेखणीचा घड शीपाया सेनापति केलें ।
मुख्य ब्रह्मा नेमलें ॥
बेफाम क्षेत्रिय होते अचूक टोळ उतरले ।
कैदी सर्वास केलें ॥
सर्व देशी चाल त्याचें गुलाम बनीवले ।
डौलानें क्षुद्र म्हणाले ||
मुख्य ब्रम्ह राजा झाला जानें कायदे केले ।
त्याचे पुढे भेद केले ॥
ब्रम्हा मेल्यावर परशराम पुंड माजले ।
उरल्या क्षत्रिया पिडीले ॥
महारमांग झाले किती देशोधडी केले ।
ब्राह्मण चिरंजीव झाले ॥
देश निक्षत्रिय झाल्यामुळे यवना फावलें ।
सर्वांस त्यांही पिडीलें ॥</poem>}}<noinclude></noinclude>
s9f70lhg6uwuovrcul2d1djqgsgz6q7
233429
233428
2026-07-22T06:43:55Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
233429
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" />{{left|छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा}}{{right|४९}}</noinclude>{{Block center|<poem>
या क्षेत्राचे धनी कोणकोणी बुडविले ।
सांगते मुळीं कसें झालें ॥
क्षेत्रवासी ह्मणोन नांव क्षत्रिय धरले।
क्षेत्री सुखी राहिले ॥
अन्यदेशिचे दंगेखोर हिमालयीं आले।
होते लपून राहिले ।।
पाठीं शत्रुभौती झाडी किती उपासीं मेले ।
गोमासा भाजून धाले ।
पाला फळें खात आखेर ताडपत्रा नेसले ।
झाडी उल्लंघून आले ॥
लेखणीचा घड शीपाया सेनापति केलें ।
मुख्य ब्रह्मा नेमलें ॥
बेफाम क्षेत्रिय होते अचूक टोळ उतरले ।
कैदी सर्वास केलें ॥
सर्व देशी चाल त्याचें गुलाम बनीवले ।
डौलानें क्षुद्र म्हणाले ||
मुख्य ब्रम्ह राजा झाला जानें कायदे केले ।
त्याचे पुढे भेद केले ॥
ब्रम्हा मेल्यावर परशराम पुंड माजले ।
उरल्या क्षत्रिया पिडीले ॥
महारमांग झाले किती देशोधडी केले ।
ब्राह्मण चिरंजीव झाले ॥
देश निक्षत्रिय झाल्यामुळे यवना फावलें ।
सर्वांस त्यांही पिडीलें ॥
</poem>}}<noinclude></noinclude>
3y9965f8lq6s88poy5sg4w0m1y4j5gb
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१९
104
111034
233385
233345
2026-07-20T15:54:25Z
JayashreeVI
4058
233385
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(७)'''
ण्याचा संभव जास्त होतो. ''''व्रतानामुत्तमं व्रतम्'''' म्हणजे सर्वच उत्तम अशी भाविकांची दृष्टि जाऊन त्याचे ऐवजी मार्मिकपणा अंगीं बाणतो. सोनें कोणतें व बेगड कोणतें हैं पारखण्याची शक्ति अंगीं येऊ लागते, सर्वच उत्कृष्ट म्हटल्याने रसिकतेपेक्षा मनाचा कोमलपणा व समदृष्टीचा अतिरेक दिसतो, हें प्रत्ययास येऊं लागतें. प्रत्येक माणसांत दैविक अंश आहे, तेव्हां मोठेपणाहि प्रत्येकांत बीजरूपानें आहे, असें कोणी ह्मणतील; पण वाङ्मयात आम्हाला बीजरूपाशी कर्तव्य नसून पक्वफळाशीं, त्याच्या आस्वादाशीं आहे, हे ध्यानांत ठेवणे जरूरीचे आहे. बीजरूप जाऊन सुंदर, मोठा, वृक्ष झाला, आणि फळें आली नाहींत, किंवा जीं आलीं तीं बेचव आलीं, तर तीं त्याज्यच होत. मोठ्या भव्यवृक्षांचीं फळें म्हणून कोणी फळांची रुचि घेत नाहींत! त्याला फळांच्या अंगांत रस असावा लागतो. साध्या भाषेत सांगावयाचें म्हणजे अन्य व्यवसायांत नैपुण्य मिळविलें कीं, वाङ्मयांतहि मोठेपणा येतो, असें नाहीं. सर्वानांच चांगले म्हटल्यास खरोखर प्रतिभासंपन्न लेखकांची संभावना न होता हेळणाच होते. विद्याव्यासंगांत चिकित्साच अधिक पाहिजे. ''''नाऽत्र कार्या विचारणा'''' हे पुराणाचे फर्मान येथें लागू पडत नाहीं. अर्घ्यनैवेद्य हे पूजा- समारंभाकरिताच आहेत.
<br>{{gap}}ज्याप्रमाणे एका व्यवसायांतला मोठेपणा इतर ठिकाणीं उपयोगी पडत नाहीं, त्याचप्रमाणे, कोणाहि व्यक्तीला मोठेपणाचा मक्ता मिळालेला नाहीं, किंवा बहुजनसमाजाला त्याची दक्षिणाहि वांटलेली नाहीं. तो दुर्लभ आहे. तो दिक्काल यांनी मर्यादित नाही. एकाच देशांत भिन्नकाळी, भिन्नभिन्न जातींत, आणि एकाच काळी अनेक समाजांत व ज्ञातीत महात्मे उदयास येतात. विचार व कृति यांनीच उच्चनीचपणा वाङ्मयांतहि येतो. चिरायु करण्याचें सामर्थ्य काळाला नाहीं. यास्तव दोनचार शतकें अवधि गेल्यानंतरच लेखकांना मोठेपणा प्राप्त होतो, अशी जी बऱ्याच जणांची अस्पष्ट समजून असते, ती किती निराधार आहे, हें ऐतिहासिक पद्धतीनें सारस्वताचे अध्ययन केल्याशिवाय मनावर नीट ठसत नाहीं. तसेच, सौंदर्य किंवा रसमाधुर्य वाङ्मयाच्या ठराविक प्रकारांतच निष्पन्न होतें, असें नाहीं. काव्य प्रचुर, संस्मरणीय असे प्रसंग संसारांत अनेक असतात. त्यांनीं मोह पावून त्यांस योग्य शब्दरूप देणारा, इतरांना डोलविणारा, योजक पाहिजे असतो. जितके योजक तितक्या कृति, आणि तितकेच रसविशेष. रस-<noinclude></noinclude>
jplvkok6g1xdujeiz6c114c6x1dglvx
233386
233385
2026-07-20T15:55:06Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
233386
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(७)'''}}}}
ण्याचा संभव जास्त होतो. ''''व्रतानामुत्तमं व्रतम्'''' म्हणजे सर्वच उत्तम अशी भाविकांची दृष्टि जाऊन त्याचे ऐवजी मार्मिकपणा अंगीं बाणतो. सोनें कोणतें व बेगड कोणतें हैं पारखण्याची शक्ति अंगीं येऊ लागते, सर्वच उत्कृष्ट म्हटल्याने रसिकतेपेक्षा मनाचा कोमलपणा व समदृष्टीचा अतिरेक दिसतो, हें प्रत्ययास येऊं लागतें. प्रत्येक माणसांत दैविक अंश आहे, तेव्हां मोठेपणाहि प्रत्येकांत बीजरूपानें आहे, असें कोणी ह्मणतील; पण वाङ्मयात आम्हाला बीजरूपाशी कर्तव्य नसून पक्वफळाशीं, त्याच्या आस्वादाशीं आहे, हे ध्यानांत ठेवणे जरूरीचे आहे. बीजरूप जाऊन सुंदर, मोठा, वृक्ष झाला, आणि फळें आली नाहींत, किंवा जीं आलीं तीं बेचव आलीं, तर तीं त्याज्यच होत. मोठ्या भव्यवृक्षांचीं फळें म्हणून कोणी फळांची रुचि घेत नाहींत! त्याला फळांच्या अंगांत रस असावा लागतो. साध्या भाषेत सांगावयाचें म्हणजे अन्य व्यवसायांत नैपुण्य मिळविलें कीं, वाङ्मयांतहि मोठेपणा येतो, असें नाहीं. सर्वानांच चांगले म्हटल्यास खरोखर प्रतिभासंपन्न लेखकांची संभावना न होता हेळणाच होते. विद्याव्यासंगांत चिकित्साच अधिक पाहिजे. ''''नाऽत्र कार्या विचारणा'''' हे पुराणाचे फर्मान येथें लागू पडत नाहीं. अर्घ्यनैवेद्य हे पूजा- समारंभाकरिताच आहेत.
<br>{{gap}}ज्याप्रमाणे एका व्यवसायांतला मोठेपणा इतर ठिकाणीं उपयोगी पडत नाहीं, त्याचप्रमाणे, कोणाहि व्यक्तीला मोठेपणाचा मक्ता मिळालेला नाहीं, किंवा बहुजनसमाजाला त्याची दक्षिणाहि वांटलेली नाहीं. तो दुर्लभ आहे. तो दिक्काल यांनी मर्यादित नाही. एकाच देशांत भिन्नकाळी, भिन्नभिन्न जातींत, आणि एकाच काळी अनेक समाजांत व ज्ञातीत महात्मे उदयास येतात. विचार व कृति यांनीच उच्चनीचपणा वाङ्मयांतहि येतो. चिरायु करण्याचें सामर्थ्य काळाला नाहीं. यास्तव दोनचार शतकें अवधि गेल्यानंतरच लेखकांना मोठेपणा प्राप्त होतो, अशी जी बऱ्याच जणांची अस्पष्ट समजून असते, ती किती निराधार आहे, हें ऐतिहासिक पद्धतीनें सारस्वताचे अध्ययन केल्याशिवाय मनावर नीट ठसत नाहीं. तसेच, सौंदर्य किंवा रसमाधुर्य वाङ्मयाच्या ठराविक प्रकारांतच निष्पन्न होतें, असें नाहीं. काव्य प्रचुर, संस्मरणीय असे प्रसंग संसारांत अनेक असतात. त्यांनीं मोह पावून त्यांस योग्य शब्दरूप देणारा, इतरांना डोलविणारा, योजक पाहिजे असतो. जितके योजक तितक्या कृति, आणि तितकेच रसविशेष. रस-<noinclude></noinclude>
h8d58jrdjr9si5rz5bng2of0w4cfubo
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/२०
104
111035
233440
233346
2026-07-22T13:25:58Z
JayashreeVI
4058
233440
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''( ८ )'''}}}}
विशेषांची गणना, त्यांचें वर्गीकरण, त्यांची उत्पत्ति, त्यांचे निदान ठरविण्याचा
अलंकारशास्त्राचा आयास व्यर्थ आहे.
{{center|{{larger|'''अलंकारशास्त्र.'''}}}}
{{gap}}जसें शारीरिक शास्त्रांचें कितीहि अध्ययन केलें, शव फाडून आंतील रचनेचा कितीहि अभ्यास केला, किंबहुना या रचनेचा शरीराच्या क्रियेशी असणाऱ्या संबंधाचा पक्का शोध लावला, तरी मनुष्यप्राण्याचें पूर्ण ज्ञान झालें असें कोणालाहि ह्मणतां येत नाहीं, तद्वतच, अलंकारशास्त्राच्या पठणानें काव्याचे ज्ञान होते, असें म्हणतां येत नाहीं. इतकेंच नव्हे, तर ज्याप्रमाणें सूपशास्त्रांत निरनिराळ्या पक्वान्नांचे विधि देऊन अमुक केलें असतां अमुक पाकनिष्पत्ति होते, असे अनुभवसिद्ध आश्वासन दिलेलें असतें, त्याप्रमाणेच अलंकारशास्त्रांचं विवेचन
ह्मणजे रसनिष्पत्तीच्या विधींचा दुसरा एक अनुभवसिद्ध संग्रह, अशी समजूत होणें साहजिक नाहीं, असें कोण म्हणेल? अमुक शब्द, अमुक विशेषणें, अमुक प्रमाणांत एकत्र ठेविलीं, कीं, झाला अमुक रस तयार!
सूपशास्त्राचे विधि व अलंकारशास्त्राचे विधि यांत फरक काय, असें कां वाटू नये? तेजाळ व्यक्तींना अलंकारशास्त्राचा उपयोग न होतां त्यांच्या नैसर्गिक स्वातंत्र्यास अडथळा येत असला पाहिजे. पद्यरचनेची हातोटी साधलेल्यांनां मात्र काव्याची टांकसाळ काढण्यास मदत होते, व स्फूर्तियुक्त काव्याऐवजी
''''विटाळ्याची कविता'''' जास्त प्रचारांत येते.
<br>{{gap}}अलंकारशास्त्राचा निस्सीम अभ्यास प्रचारांत आल्यापासून संस्कृत काव्याला कशी समाधि मिळाली, तें नव्याने सांगण्याची जरूरी नाही. तसेंच अलीकडे प्रसिद्ध होत असलेलें मराठी काव्य वाचतांना अनेक वेळां स्फूर्तीच्या ऐवजीं रचनेचाच अनुभव जास्त येतो, असें म्हटल्यास अयोग्य होणार नाहीं. मग अलंकारशास्त्राचा कांहींच उपयोग नाहीं कीं काय, असा प्रश्न निघणें साहजिक आहे.
<br>{{gap}}प्रत्येक प्रसंगांत निरनिराळे रस कमी अधिक प्रमाणानें मिसळलेले असतात, असा नेहमींचा अनुभव आहे. आणि काव्य ह्मणजे जर अंतःसृष्टि किंवा बाह्यसृष्टि यांना लेखकाच्या प्रतिभेने मिळालेले मनोहर रूप, तर रसांच्या शुद्ध स्वरूपाचा निर्णय करण्यांत अर्थ तो काय? शृंगार, वीर, करुण इत्यादि रसांचे-<noinclude></noinclude>
fe2tdrrubrhnuhd7vwdv9lamv3mq4f9
233441
233440
2026-07-22T13:26:34Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
233441
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''( ८ )'''}}}}
विशेषांची गणना, त्यांचें वर्गीकरण, त्यांची उत्पत्ति, त्यांचे निदान ठरविण्याचा
अलंकारशास्त्राचा आयास व्यर्थ आहे.
{{center|{{larger|'''अलंकारशास्त्र.'''}}}}
{{gap}}जसें शारीरिक शास्त्रांचें कितीहि अध्ययन केलें, शव फाडून आंतील रचनेचा कितीहि अभ्यास केला, किंबहुना या रचनेचा शरीराच्या क्रियेशी असणाऱ्या संबंधाचा पक्का शोध लावला, तरी मनुष्यप्राण्याचें पूर्ण ज्ञान झालें असें कोणालाहि ह्मणतां येत नाहीं, तद्वतच, अलंकारशास्त्राच्या पठणानें काव्याचे ज्ञान होते, असें म्हणतां येत नाहीं. इतकेंच नव्हे, तर ज्याप्रमाणें सूपशास्त्रांत निरनिराळ्या पक्वान्नांचे विधि देऊन अमुक केलें असतां अमुक पाकनिष्पत्ति होते, असे अनुभवसिद्ध आश्वासन दिलेलें असतें, त्याप्रमाणेच अलंकारशास्त्रांचं विवेचन
ह्मणजे रसनिष्पत्तीच्या विधींचा दुसरा एक अनुभवसिद्ध संग्रह, अशी समजूत होणें साहजिक नाहीं, असें कोण म्हणेल? अमुक शब्द, अमुक विशेषणें, अमुक प्रमाणांत एकत्र ठेविलीं, कीं, झाला अमुक रस तयार!
सूपशास्त्राचे विधि व अलंकारशास्त्राचे विधि यांत फरक काय, असें कां वाटू नये? तेजाळ व्यक्तींना अलंकारशास्त्राचा उपयोग न होतां त्यांच्या नैसर्गिक स्वातंत्र्यास अडथळा येत असला पाहिजे. पद्यरचनेची हातोटी साधलेल्यांनां मात्र काव्याची टांकसाळ काढण्यास मदत होते, व स्फूर्तियुक्त काव्याऐवजी
''''विटाळ्याची कविता'''' जास्त प्रचारांत येते.
<br>{{gap}}अलंकारशास्त्राचा निस्सीम अभ्यास प्रचारांत आल्यापासून संस्कृत काव्याला कशी समाधि मिळाली, तें नव्याने सांगण्याची जरूरी नाही. तसेंच अलीकडे प्रसिद्ध होत असलेलें मराठी काव्य वाचतांना अनेक वेळां स्फूर्तीच्या ऐवजीं रचनेचाच अनुभव जास्त येतो, असें म्हटल्यास अयोग्य होणार नाहीं. मग अलंकारशास्त्राचा कांहींच उपयोग नाहीं कीं काय, असा प्रश्न निघणें साहजिक आहे.
<br>{{gap}}प्रत्येक प्रसंगांत निरनिराळे रस कमी अधिक प्रमाणानें मिसळलेले असतात, असा नेहमींचा अनुभव आहे. आणि काव्य ह्मणजे जर अंतःसृष्टि किंवा बाह्यसृष्टि यांना लेखकाच्या प्रतिभेने मिळालेले मनोहर रूप, तर रसांच्या शुद्ध स्वरूपाचा निर्णय करण्यांत अर्थ तो काय? शृंगार, वीर, करुण इत्यादि रसांचे-<noinclude></noinclude>
l2sf9dlyu86fx30idm7r4j1vhab3lzc
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/२१
104
111036
233442
233349
2026-07-22T13:42:15Z
JayashreeVI
4058
233442
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''( ९ )'''}}}}
निर्भेळ परिपोष करणारे संसारांतील खरेखुरे प्रसंग कुणाला दाखवितां येतील काय? उत्तररामचरितांत रामचंद्राच्या शोकाचें वर्णन केले आहे; पण नाटकांतील प्रसंग या दृष्टीनें पाहिलें, किंवा शुद्ध करुण रसाचा परिपोष म्हणून पाहिले तरी विरसच होतो. शोकावेग आला असतां तो अनेक पद्यरूपाने बाहेर पडणे असंभवित आहे. रामचंद्राच्या शोकापेक्षां कवीचें अस्थानीं कौशल्यच जास्त अनुभवास येतें. कालिदासाने शुद्धरसाचें वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला नाहीं. विक्रमोर्वशीयाचा एक अंक याला अपवाद नाहीं काय? असें कोणी ह्मणतील; पण राजा शोकामुळे भ्रमिष्टासारखा हिंडतो आहे व वेड्याप्रमाणे त्याचे मनोविकार कवीनें असंबद्ध दाखविले आहेत. ह्मणून रसहानि होत नाही. हा अंक निर्दोष आहे, असें ह्मणण्याचा हेतु नाहीं
थोडा लहान केला असता तर बरें झालें असतें खरें; पण हा दोष क्षुल्लक आहे. चांगल्या कृतींत देखील असे दोष सांपडतील. मिश्ररसांचा परिपोष व्हावा म्हणूनच कालिदास विदूषकाला नायकाजवळ ठेवितो. नायकाच्या उच्च मनोवृत्ति व विदूषकाची सामान्य प्रवृत्ति, यांची सांगड घातल्यामुळे प्रसंग जास्त खुलतात. विदूषक आपल्या राण्यांनां सांगेल या भीतीनें, शकुंतलेवर माझी प्रीति नाहीं, मी थट्टा केली, खरें मानूं नकोस, असें राजानें निक्षून सांगितलें, ह्मणून भोळा बिचारा विदूषक तें खरें मानतो, आंतला हेतु ओळखीत नाहीं, आणि धीवराकडून आंगठी परत मिळाल्यानंतर शकुंतलेची बिलकूल आठवण न काढल्याबद्दल राजा दोष देत असतांना, 'मला कां दोष लावितोस? 'शकुंतलेवर माझें खरें प्रेम नाहीं, थट्टा केली, असें तूंच सांगितलेंसना? असा विदूषकाचा जबाब ऐकून स्वतः केलेली फसवणूक स्वतःलाच नडली, हें जाणून राजाचा उद्वेग वाढत नाहीं काय? शेक्सपियरचीं नाटकें घेतलीं, तरी त्यांत एकच रसाचा परिपोष आढळणार नाहीं. लियर नाटकांतील प्रसंग घ्या. लियरला वेड लागून तो बरळत फिरतो, तेव्हां राजाच्या परिवारापैकीं खुषमस्क-याच काय तो बरोबर जातो. वेडांत राजा बरळू लागला, कीं, हा ( Fool) जगाच्या रहाटीविषयीं शहाण्यासारखा बोलतो, हें पाहून राजाची दैना जास्तच
भांसू लागत नाहीं काय? हॅम्लेटमधील कबर खणणारांचा प्रवेश घेतला तरी हेच तत्व दिसेल. नवीन कबर खणताना तो बिचारा गातो आहे! जुनी कवटी मातींतून निघते तेव्हां विशेष लक्ष न देतां ती तो कांठावर फेंकून देतो. स्मशा-<noinclude></noinclude>
ceku701csoihjuuqhhmyb9rwyk2g0cr
233443
233442
2026-07-22T13:43:04Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
233443
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''( ९ )'''}}}}
निर्भेळ परिपोष करणारे संसारांतील खरेखुरे प्रसंग कुणाला दाखवितां येतील काय? उत्तररामचरितांत रामचंद्राच्या शोकाचें वर्णन केले आहे; पण नाटकांतील प्रसंग या दृष्टीनें पाहिलें, किंवा शुद्ध करुण रसाचा परिपोष म्हणून पाहिले तरी विरसच होतो. शोकावेग आला असतां तो अनेक पद्यरूपाने बाहेर पडणे असंभवित आहे. रामचंद्राच्या शोकापेक्षां कवीचें अस्थानीं कौशल्यच जास्त अनुभवास येतें. कालिदासाने शुद्धरसाचें वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला नाहीं. विक्रमोर्वशीयाचा एक अंक याला अपवाद नाहीं काय? असें कोणी ह्मणतील; पण राजा शोकामुळे भ्रमिष्टासारखा हिंडतो आहे व वेड्याप्रमाणे त्याचे मनोविकार कवीनें असंबद्ध दाखविले आहेत. ह्मणून रसहानि होत नाही. हा अंक निर्दोष आहे, असें ह्मणण्याचा हेतु नाहीं
थोडा लहान केला असता तर बरें झालें असतें खरें; पण हा दोष क्षुल्लक आहे. चांगल्या कृतींत देखील असे दोष सांपडतील. मिश्ररसांचा परिपोष व्हावा म्हणूनच कालिदास विदूषकाला नायकाजवळ ठेवितो. नायकाच्या उच्च मनोवृत्ति व विदूषकाची सामान्य प्रवृत्ति, यांची सांगड घातल्यामुळे प्रसंग जास्त खुलतात. विदूषक आपल्या राण्यांनां सांगेल या भीतीनें, शकुंतलेवर माझी प्रीति नाहीं, मी थट्टा केली, खरें मानूं नकोस, असें राजानें निक्षून सांगितलें, ह्मणून भोळा बिचारा विदूषक तें खरें मानतो, आंतला हेतु ओळखीत नाहीं, आणि धीवराकडून आंगठी परत मिळाल्यानंतर शकुंतलेची बिलकूल आठवण न काढल्याबद्दल राजा दोष देत असतांना, 'मला कां दोष लावितोस? 'शकुंतलेवर माझें खरें प्रेम नाहीं, थट्टा केली, असें तूंच सांगितलेंसना? असा विदूषकाचा जबाब ऐकून स्वतः केलेली फसवणूक स्वतःलाच नडली, हें जाणून राजाचा उद्वेग वाढत नाहीं काय? शेक्सपियरचीं नाटकें घेतलीं, तरी त्यांत एकच रसाचा परिपोष आढळणार नाहीं. लियर नाटकांतील प्रसंग घ्या. लियरला वेड लागून तो बरळत फिरतो, तेव्हां राजाच्या परिवारापैकीं खुषमस्क-याच काय तो बरोबर जातो. वेडांत राजा बरळू लागला, कीं, हा ( Fool) जगाच्या रहाटीविषयीं शहाण्यासारखा बोलतो, हें पाहून राजाची दैना जास्तच
भांसू लागत नाहीं काय? हॅम्लेटमधील कबर खणणारांचा प्रवेश घेतला तरी हेच तत्व दिसेल. नवीन कबर खणताना तो बिचारा गातो आहे! जुनी कवटी मातींतून निघते तेव्हां विशेष लक्ष न देतां ती तो कांठावर फेंकून देतो. स्मशा-<noinclude></noinclude>
rz0lv0i5mnsxt2uxful0g7riv9vhk8e
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/२२
104
111037
233457
233350
2026-07-23T04:54:19Z
JayashreeVI
4058
233457
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(१०)'''}}}}
नातील गांभीर्य व खिन्नता कोणीकडे व त्या खणणाराचे श्रमपरिहार होण्याकरतां गाणे कोणीकडे! कुदळीला लागलेली कवटी फेंकून देणें कोणीकडे, आणि तीच कवटी पाहून हॅम्लेटच्या अंतःकरणांत उठणारे तात्विक विचारांचे काहूर कोणीकडे! या विविध गोष्टींचें चित्र पाहून संसाराचा उलटेपणा मनांत बिंबत नाहीं काय? 'As you like it' हें विनोदी नाटक घेतलें, तरी त्यांत विदूषक व झाक्, धनगर व त्याची प्रियकरी या पात्रांमुळे नाना रसाचें मिश्रण झालें आहे व तें शुद्ध हास्यरसापेक्षां आदरास अधिक योग्य झालें आहे. विनोदी नाटक ह्मणजे केवळ हास्यरसाचा ठेवा नव्हे. विनोद व बाष्कळपणा यांत फरक आहे. शुद्ध हास्यरस कोठेच आढळत नाहीं. प्रसिद्ध विनोदी नाटककारांच्या ग्रंथतिले उदाहरण घेऊन पाहू. इंग्रजांना जसा शेक्सपियर, तसा फिरंग्यांना (French) मोलियेर याचें 'स्वतःस खानदानी म्हणवूं पाहणारा वाणी (Le Bourgeois gentil-homme) हे नाटक घेतल्यास, साध्या भोळ्या पण महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे गायनाचार्य, नृत्याचार्य, अलंकारशास्त्रप्रवीण पंडित, यांचा निवळ पैसे उकळण्याचा हेतु लक्षांत न येऊन, त्यांचें उपरोधिक भाषण न समजून, नायकाचे सरळ व विश्वासपूर्ण वर्तन पाहिलें ह्मणजे विनोदरस उचंबळतो, यांत नवल नाहीं. पण त्याच वेळीं नायकाच्या अनायासानें फसण्याबद्दल त्याची कींव व दुसऱ्यांच्या दांभिकपणाविषयी किंचित् तिरस्कार ही रसिकांच्या मनांत येत नाहींत काय? आणि शेवटच्या प्रवेशांत स्वतःचा खुळेपणा स्वतःला पटून नायकाने केलेले वर्तन पाहून आपण हंसलों, त्याचेचबद्दल किंचित् आदर उत्पन्न होत नाहीं काय? मोलियेरचे कोणतेंहि नाटक घेतलें तरी त्यांत हरदासी विनोद
आढळणार नाहीं, मनुष्यमात्राची यथार्थ कल्पना यावी, एकमेकांच्या न्यूनांविषयी सहनशीलता, सहानुभूति उत्पन्न व्हावी, जीवनांतील सुखदायक प्रसंग वाढून कष्टमय जीवनयात्रा अधिक सत्य व्हावी, या उच्च हेतूनेंच मनुष्यमात्राचा विक्षिप्तपणा, किंबहुना व्यंगें दाखवून मोलियेर आम्हाला रिझवितो. त्याच्या कोणत्याहि पात्राबद्दल मनाला त्वेष येत नाहीं. सर्वामध्ये स्खलनशील मानवांची ओळख पटते. हास्यरस, गांभीर्य व खिन्नता यांनी मिश्रित आढळतो. डॉन क्विक्सोट (Don Quixote) हा जगन्मान्य विनोदी ग्रंथ घेतला, तरी नायक व त्याचा नोकर सॅन्कोपॅन्झा यांची दुकल जो-<noinclude></noinclude>
jha7pblex41kilwf3yh9jyq58lgel3v
233458
233457
2026-07-23T04:54:48Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
233458
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(१०)'''}}}}
नातील गांभीर्य व खिन्नता कोणीकडे व त्या खणणाराचे श्रमपरिहार होण्याकरतां गाणे कोणीकडे! कुदळीला लागलेली कवटी फेंकून देणें कोणीकडे, आणि तीच कवटी पाहून हॅम्लेटच्या अंतःकरणांत उठणारे तात्विक विचारांचे काहूर कोणीकडे! या विविध गोष्टींचें चित्र पाहून संसाराचा उलटेपणा मनांत बिंबत नाहीं काय? 'As you like it' हें विनोदी नाटक घेतलें, तरी त्यांत विदूषक व झाक्, धनगर व त्याची प्रियकरी या पात्रांमुळे नाना रसाचें मिश्रण झालें आहे व तें शुद्ध हास्यरसापेक्षां आदरास अधिक योग्य झालें आहे. विनोदी नाटक ह्मणजे केवळ हास्यरसाचा ठेवा नव्हे. विनोद व बाष्कळपणा यांत फरक आहे. शुद्ध हास्यरस कोठेच आढळत नाहीं. प्रसिद्ध विनोदी नाटककारांच्या ग्रंथतिले उदाहरण घेऊन पाहू. इंग्रजांना जसा शेक्सपियर, तसा फिरंग्यांना (French) मोलियेर याचें 'स्वतःस खानदानी म्हणवूं पाहणारा वाणी (Le Bourgeois gentil-homme) हे नाटक घेतल्यास, साध्या भोळ्या पण महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे गायनाचार्य, नृत्याचार्य, अलंकारशास्त्रप्रवीण पंडित, यांचा निवळ पैसे उकळण्याचा हेतु लक्षांत न येऊन, त्यांचें उपरोधिक भाषण न समजून, नायकाचे सरळ व विश्वासपूर्ण वर्तन पाहिलें ह्मणजे विनोदरस उचंबळतो, यांत नवल नाहीं. पण त्याच वेळीं नायकाच्या अनायासानें फसण्याबद्दल त्याची कींव व दुसऱ्यांच्या दांभिकपणाविषयी किंचित् तिरस्कार ही रसिकांच्या मनांत येत नाहींत काय? आणि शेवटच्या प्रवेशांत स्वतःचा खुळेपणा स्वतःला पटून नायकाने केलेले वर्तन पाहून आपण हंसलों, त्याचेचबद्दल किंचित् आदर उत्पन्न होत नाहीं काय? मोलियेरचे कोणतेंहि नाटक घेतलें तरी त्यांत हरदासी विनोद
आढळणार नाहीं, मनुष्यमात्राची यथार्थ कल्पना यावी, एकमेकांच्या न्यूनांविषयी सहनशीलता, सहानुभूति उत्पन्न व्हावी, जीवनांतील सुखदायक प्रसंग वाढून कष्टमय जीवनयात्रा अधिक सत्य व्हावी, या उच्च हेतूनेंच मनुष्यमात्राचा विक्षिप्तपणा, किंबहुना व्यंगें दाखवून मोलियेर आम्हाला रिझवितो. त्याच्या कोणत्याहि पात्राबद्दल मनाला त्वेष येत नाहीं. सर्वामध्ये स्खलनशील मानवांची ओळख पटते. हास्यरस, गांभीर्य व खिन्नता यांनी मिश्रित आढळतो. डॉन क्विक्सोट (Don Quixote) हा जगन्मान्य विनोदी ग्रंथ घेतला, तरी नायक व त्याचा नोकर सॅन्कोपॅन्झा यांची दुकल जो-<noinclude></noinclude>
dvf2gome2a3e25hhlmgvyxe1pfslt8p
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/२३
104
111038
233459
233351
2026-07-23T05:13:43Z
JayashreeVI
4058
233459
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(११)'''}}}}
ल्यामुळे प्रत्येक प्रसंग बहारीचा झाला आहे. हा ग्रंथ कोणतेंहि पान उघडून वाचला तरी सारखाच मनोवेधक वाटेल. अगदी अलीकडील पिक्विक पेपर्स हा ग्रंथ घेतला, तरी नायक व त्याचे जोडीदार व प्रत्येकाचा निरनिराळा स्वभाव, यांची सांगड घातल्यामुळे त्यांना अमरत्व प्राप्त झाले आहे, असें दिसेल, कोणतेहि सर्वमान्य विनोदी ग्रंथ घेतले, तरी त्यांत शुद्ध रसाचा परिपोष आढळणार नाहीं. भिन्न भिन्न रसांच्या ओतीव पुतळ्यांच्या ऐवजी चालतीं
बोलती माणसेंच आढळतील.
<br>{{gap}}दृश्यादृश्य सुष्टीचें आलोडन करीत असतांना स्फुरण पावून, कल्पनासूष्टींत लीन झाल्यामुळे, कवीनें निर्माण केलेली, चैतन्य दिलेलीं नाना रूपें म्हणजे काव्य होय. यास्तव ज्या प्रमाणांत रसविशेषांचे वस्तुतः मिश्रण झाले असेल, त्याच प्रमाणांत काव्यातही सांपडावयास पाहिजे. सूपशास्त्रांतील पदार्थांना लागणाऱ्या वस्तूंमध्ये जरी अंगचा रस असला तरी शब्दामध्ये अंगचा रस नाहीं. तो योजकाने स्वत:च्या कल्पनाशक्तीनेच ओतावयाचा असतो. निर्जीव शब्दरचना म्हणजे काव्य नव्हे. इतर जीवाप्रमाणें काव्यालाहि प्राण आहे. पृथक्करणावरच
विसंबून राहिल्यास कार्यातील चैतन्याची ओळख होत नाहीं. अलंकारशास्त्र म्हणजे पृथक्करणच नव्हे काय?
{{center|{{larger|'''वाङ्मयांतील निर्णय'''}}}}.
मग, चांगलें व वाईट, स्मरणीय व विस्मरणीय, ग्राह्य व त्याज्य यांचा वाङ्मयांत निर्णय कसा करावयाचा, हें सुचविणें भाग आहे. काव्य ही सजीव वस्तु आहे खरी, पण ती या आमच्या नीरस भासणाऱ्या सृष्टींतली नाहीं. गूढ सृष्टीतली आहे. या सृष्टीत प्रतिभेनेंच प्रवेश होतो. ह्मणून काव्याची माधुरी चाखण्यास प्रतिभेचे पोषण झाले पाहिजे, आणि प्रतिभेचे पोषण म्हणजे, सर्वकाळच्या, सर्वमान्य कवींच्या कृतींचे अनेकवार वाचन, मनन, निदिध्यास, हें होय. कधी कधी उत्तम मानिलेल्या कृति प्रथम तशा वाटत नाहींत, हा अनुभव बरेच जणांना येतो. ह्मणून स्वतःला प्रत्यय येईपर्यंत, किंवा वारंवार वाचून देखील प्रत्यय न आल्यास कां येत नाहीं याचें कारण उमजेपर्यंत-प्रयत्न सुरू ठेविला पाहिजे. काव्य, कृति उत्तम असल्यावर त्याचा प्रत्येकाला प्रत्यय का येऊं नये?
तसा आलाच पाहिजे; न आल्यास त्याचा दोष काव्याकडे नसून वाचकाच्या-<noinclude></noinclude>
ny5jdjmolgo8u60f5v78nlm8ta6b9s4
233460
233459
2026-07-23T05:15:14Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
233460
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(११)'''}}}}
डल्यामुळे प्रत्येक प्रसंग बहारीचा झाला आहे. हा ग्रंथ कोणतेंहि पान उघडून वाचला तरी सारखाच मनोवेधक वाटेल. अगदी अलीकडील पिक्विक पेपर्स हा ग्रंथ घेतला, तरी नायक व त्याचे जोडीदार व प्रत्येकाचा निरनिराळा स्वभाव, यांची सांगड घातल्यामुळे त्यांना अमरत्व प्राप्त झाले आहे, असें दिसेल, कोणतेहि सर्वमान्य विनोदी ग्रंथ घेतले, तरी त्यांत शुद्ध रसाचा परिपोष आढळणार नाहीं. भिन्न भिन्न रसांच्या ओतीव पुतळ्यांच्या ऐवजी चालतीं
बोलती माणसेंच आढळतील.
<br>{{gap}}दृश्यादृश्य सुष्टीचें आलोडन करीत असतांना स्फुरण पावून, कल्पनासूष्टींत लीन झाल्यामुळे, कवीनें निर्माण केलेली, चैतन्य दिलेलीं नाना रूपें म्हणजे काव्य होय. यास्तव ज्या प्रमाणांत रसविशेषांचे वस्तुतः मिश्रण झाले असेल, त्याच प्रमाणांत काव्यातही सांपडावयास पाहिजे. सूपशास्त्रांतील पदार्थांना लागणाऱ्या वस्तूंमध्ये जरी अंगचा रस असला तरी शब्दामध्ये अंगचा रस नाहीं. तो योजकाने स्वत:च्या कल्पनाशक्तीनेच ओतावयाचा असतो. निर्जीव शब्दरचना म्हणजे काव्य नव्हे. इतर जीवाप्रमाणें काव्यालाहि प्राण आहे. पृथक्करणावरच
विसंबून राहिल्यास कार्यातील चैतन्याची ओळख होत नाहीं. अलंकारशास्त्र म्हणजे पृथक्करणच नव्हे काय?
{{center|{{larger|'''वाङ्मयांतील निर्णय'''}}}}.
मग, चांगलें व वाईट, स्मरणीय व विस्मरणीय, ग्राह्य व त्याज्य यांचा वाङ्मयांत निर्णय कसा करावयाचा, हें सुचविणें भाग आहे. काव्य ही सजीव वस्तु आहे खरी, पण ती या आमच्या नीरस भासणाऱ्या सृष्टींतली नाहीं. गूढ सृष्टीतली आहे. या सृष्टीत प्रतिभेनेंच प्रवेश होतो. ह्मणून काव्याची माधुरी चाखण्यास प्रतिभेचे पोषण झाले पाहिजे, आणि प्रतिभेचे पोषण म्हणजे, सर्वकाळच्या, सर्वमान्य कवींच्या कृतींचे अनेकवार वाचन, मनन, निदिध्यास, हें होय. कधी कधी उत्तम मानिलेल्या कृति प्रथम तशा वाटत नाहींत, हा अनुभव बरेच जणांना येतो. ह्मणून स्वतःला प्रत्यय येईपर्यंत, किंवा वारंवार वाचून देखील प्रत्यय न आल्यास कां येत नाहीं याचें कारण उमजेपर्यंत-प्रयत्न सुरू ठेविला पाहिजे. काव्य, कृति उत्तम असल्यावर त्याचा प्रत्येकाला प्रत्यय का येऊं नये?
तसा आलाच पाहिजे; न आल्यास त्याचा दोष काव्याकडे नसून वाचकाच्या-<noinclude></noinclude>
rga6bz48q13kjpigag3ut91pf2b1791
233461
233460
2026-07-23T05:16:45Z
JayashreeVI
4058
233461
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(११)'''}}}}
डल्यामुळे प्रत्येक प्रसंग बहारीचा झाला आहे. हा ग्रंथ कोणतेंहि पान उघडून वाचला तरी सारखाच मनोवेधक वाटेल. अगदी अलीकडील पिक्विक पेपर्स हा ग्रंथ घेतला, तरी नायक व त्याचे जोडीदार व प्रत्येकाचा निरनिराळा स्वभाव, यांची सांगड घातल्यामुळे त्यांना अमरत्व प्राप्त झाले आहे, असें दिसेल, कोणतेहि सर्वमान्य विनोदी ग्रंथ घेतले, तरी त्यांत शुद्ध रसाचा परिपोष आढळणार नाहीं. भिन्न भिन्न रसांच्या ओतीव पुतळ्यांच्या ऐवजी चालतीं
बोलती माणसेंच आढळतील.
<br>{{gap}}दृश्यादृश्य सुष्टीचें आलोडन करीत असतांना स्फुरण पावून, कल्पनासूष्टींत लीन झाल्यामुळे, कवीनें निर्माण केलेली, चैतन्य दिलेलीं नाना रूपें म्हणजे काव्य होय. यास्तव ज्या प्रमाणांत रसविशेषांचे वस्तुतः मिश्रण झाले असेल, त्याच प्रमाणांत काव्यातही सांपडावयास पाहिजे. सूपशास्त्रांतील पदार्थांना लागणाऱ्या वस्तूंमध्ये जरी अंगचा रस असला तरी शब्दामध्ये अंगचा रस नाहीं. तो योजकाने स्वत:च्या कल्पनाशक्तीनेच ओतावयाचा असतो. निर्जीव शब्दरचना म्हणजे काव्य नव्हे. इतर जीवाप्रमाणें काव्यालाहि प्राण आहे. पृथक्करणावरच
विसंबून राहिल्यास कार्यातील चैतन्याची ओळख होत नाहीं. अलंकारशास्त्र म्हणजे पृथक्करणच नव्हे काय?
{{center|{{larger|'''वाङ्मयांतील निर्णय'''}}}}.
{{gap}}मग, चांगलें व वाईट, स्मरणीय व विस्मरणीय, ग्राह्य व त्याज्य यांचा वाङ्मयांत निर्णय कसा करावयाचा, हें सुचविणें भाग आहे. काव्य ही सजीव वस्तु आहे खरी, पण ती या आमच्या नीरस भासणाऱ्या सृष्टींतली नाहीं. गूढ सृष्टीतली आहे. या सृष्टीत प्रतिभेनेंच प्रवेश होतो. ह्मणून काव्याची माधुरी चाखण्यास प्रतिभेचे पोषण झाले पाहिजे, आणि प्रतिभेचे पोषण म्हणजे, सर्वकाळच्या, सर्वमान्य कवींच्या कृतींचे अनेकवार वाचन, मनन, निदिध्यास, हें होय. कधी कधी उत्तम मानिलेल्या कृति प्रथम तशा वाटत नाहींत, हा अनुभव बरेच जणांना येतो. ह्मणून स्वतःला प्रत्यय येईपर्यंत, किंवा वारंवार वाचून देखील प्रत्यय न आल्यास कां येत नाहीं याचें कारण उमजेपर्यंत-प्रयत्न सुरू ठेविला पाहिजे. काव्य, कृति उत्तम असल्यावर त्याचा प्रत्येकाला प्रत्यय का येऊं नये?
तसा आलाच पाहिजे; न आल्यास त्याचा दोष काव्याकडे नसून वाचकाच्या-<noinclude></noinclude>
huqonygdy5ef95pprgqieie7a29acjp
पान:तुकारामवचनामृत.pdf/२८
104
111039
233369
2026-07-20T12:28:13Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तुकारामवचनामृत भाग पहिला तुकारामांचें आत्मचरित्र"
233369
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तुकारामवचनामृत
भाग पहिला
तुकारामांचें आत्मचरित्र<noinclude></noinclude>
ruwgqsllpoyr4sru4nyas066hotj2d6
पान:तुकारामवचनामृत.pdf/३०
104
111040
233370
2026-07-20T12:30:08Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तुकारामवचनामृत. गर्व होता ताठा । जातो यमपंथे वाटा ॥ तुका म्हणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥ ४. विठोबाचें नाम हेंच कल्पांतीचे बीज. पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्..."
233370
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तुकारामवचनामृत.
गर्व होता ताठा । जातो यमपंथे वाटा ॥
तुका म्हणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥
४. विठोबाचें नाम हेंच कल्पांतीचे बीज.
पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्रत ॥
व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहर्निशीं मुखीं नाम ॥
नाम विठोबाचे घेईन मी वाचे। बीज कल्पांतीचे तुका म्हणे ॥
५- ६. प्रपंचांतील वैराग्यामुळे विठ्ठलाचा शोध.
आतां काय खावें कोणीकडे जावें। गांवांत राहावें कोण्या बळें ॥
कोपला पाटील गांवींचे हे लोक । आतां मज भीक कोण घाली ॥
आतां येण चवी सांडिली म्हणती । निवाडा करिती दिवांणांत ॥
भल्या लोकांपासीं सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥
तुका म्हणे यांचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठला जाऊं आतां ॥
बरे झाले देवा निघाले दिवाळें । वरी या दुष्काळे पीडा केली ॥
अनुतापें तुझें राहिले चिंतन । झाला हा वमन संवसार ॥
बरे झाले देवा बाईल कर्कशा । बरी हे दुर्दशा जनामध्यें ॥
बरे झाले जगीं पावलो अपमान । बरें गेलें धन ढोरे गुरे ॥
बरे झाले नाहीं धरिली लोकलाज । बरा आलो तुज शरण देवा ॥
बरे झाले तुझे केले देबाईल । लेकरें बाईल उपेक्षिलीं ॥
तुका म्हणे बरे व्रत एकादशी । केलें उपवासी जागरण ॥
७- ८. घरी येणाऱ्या संतांबद्दल तुकारामाच्या बायकोचा संताप.
कोण घरा येते आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा
१ न्यायाची कचेरी. २ देऊळ,<noinclude></noinclude>
r1xxr9kkz5nk2teohrxt3jw5q76iv5c
पान:तुकारामवचनामृत.pdf/३१
104
111041
233371
2026-07-20T12:31:21Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "११] तुकारामांच्या चरित्रांतील ऐतिहासिक प्रसंग. देवासाठी झाले ब्रह्मांड सोइरें । कोवळ्या उत्तरे काय वेंचें ॥ मागे पाचारितां नव्हे आराणूक । ऐसें येती लोक प्रीतीसाठीं ॥ तुका म्हण..."
233371
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>११] तुकारामांच्या चरित्रांतील ऐतिहासिक प्रसंग.
देवासाठी झाले ब्रह्मांड सोइरें । कोवळ्या उत्तरे काय वेंचें ॥
मागे पाचारितां नव्हे आराणूक । ऐसें येती लोक प्रीतीसाठीं ॥
तुका म्हणे रांडे नावडे भूषण । कांतेलेसे श्वान लागे पाठी ॥
न करवे धंदा । आइता तोंडीं पडे लोंदा ||
उठितें तें कुटितें टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ||
जिवंतचि मेले । लाजा वाहूनियां प्याले ॥
संवसाराकडे । न पाहाती ओस पडे ॥
तळमळती यांच्या रांडा । घालिती जीवा नांवें धोंडा ॥
तुका म्हणे बरे झाले । घे गे बाइले लिहिलें ॥
९. जिवलग आप्तांच्या मृत्यूमुळे तुकारामांस झालेलें दुःख.
बाप मेला न कळतां । नव्हती संसाराची चिंता ॥
विठो तुझे माझें राज्य । नाहीं दुसऱ्याचे काज ॥
बाईल मेली मुक्त झाली | देवें माया सोडविली ॥
पोर मेले बरे झाले | देवें मायाविरहित केले ॥
माता मेली मज देखतां । तुका म्हणे हरली चिंता ॥
१० भक्ताबद्दलच्या प्रेमामुळे देव त्यास भाग्यवान् करीत नाहीं.
देव भक्तालागीं करूं नेदी संसार । अंगे वारावार करुनि ठेवी ॥
भाग्य द्यावे तरी अंगे भरे ताठा । म्हणोनि करंटा करुनि ठेवी ॥
स्त्री द्यावी गुणवंती तीर्पे' गुंते आशा । यालागी कर्कशा करुनि ठेवी ॥
तुका म्हणे मज साक्ष आली देखा। आणीक या लोका काय सांगों ॥
११. नामदेवाची तुकारामांस स्वप्नामध्यें कवित्वाबद्दल आज्ञा.
नामदेवे केले स्वप्नामाजी जागे । सर्वे पांडुरंगे येऊनियां ॥
१ समाधान. २ पिसाळलेलें. ३ तिच्याजवळ.<noinclude></noinclude>
8cofbvan7isrtwc5i8rmvd9nh8yebfa
पान:तुकारामवचनामृत.pdf/३२
104
111042
233372
2026-07-20T12:32:44Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "६ तुकारामवचनामृत. [ $ 99 सांगितलें काम करावें कवित्व । वाउगे निमित्य बोलो नको ॥ माप टाकी सळ' धरिली विठ्ठलें । थापटोनी केलें सावधान ॥ प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी । उरले ते शेवटीं ला..."
233372
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>६
तुकारामवचनामृत.
[ $ 99
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगे निमित्य बोलो नको ॥
माप टाकी सळ' धरिली विठ्ठलें । थापटोनी केलें सावधान ॥
प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी । उरले ते शेवटीं लावी तुका ॥
१२. नामदेवामुळे तुकारामांस देवाचें स्वप्नदर्शन.
द्याल ठाव तरी राहेन संगती। संतांचे पंगतीं पायांपाशीं ॥
आवडीचा ठाव आलोसे टाकून । आतां उदासीन न धरावें ॥
शेवटील स्थळ नीच माझी वृत्ति। आधारें विश्रांति पावईन ॥
नामदेवा पायीं तुझ्या स्वमीं भेटीं । प्रसाद हा पोटीं राहिलासे ॥
१३. तुकारामांची कवित्वाबद्दल अभिमानशून्यता.
करविली तैसी केली कटकट । वांकडी की नीट देव जाणे ॥
कोणाकारण है जालेसे निर्माण । देवाचें कारण देव जाणे ॥
तुका म्हणे मी या अभिमानावेगळा । घालूनि गोपाळा भार असें ॥
१४. कवित्व तरल्यासच पुढे कवित्व करण्याबद्दलची
तुकारामांची प्रतिज्ञा.
करूं कवित्व काय नाहीं आतां लाज । मज भक्तराज हांसतील ॥
आतां आला एका निवाड्याचा दिस । सत्याविण रस विरसला ॥
अनुभवाविण कोण करी पाप । रितेचि संकल्प लाज लावी ॥
तुका म्हणे आतां न धरवे धीर । नव्हे जीव स्थिर माझा मज ॥
१५. तुकारामांचा तेरा दिवसांचा निश्चक्र उपवास.
तेरा दिवस झाले निश्चक्रं करितां । न पवसी अनंता मायबापा ॥
पाषाणाची खोळं घेउनि बैसलासी । काय हृषीकेशी झाले तुज ॥
१ मापाची गणती. २ कडकडित उपवास ३ तोंडावरून पायापर्यंत घेत-
लेलें पांघरूण.<noinclude></noinclude>
fmup1wrc09bk6tfh3f8cuss2c6nxarr
पान:तुकारामवचनामृत.pdf/३३
104
111043
233373
2026-07-20T12:33:47Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "$ १८] तुकारामांच्या चरित्रांतील ऐतिहासिक प्रसंग. तुजवरी आतां प्राण मी त्यजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा ॥ फार विठाबाई धरिली तुझी आस । करीन जीवा नाश पांडुरंगा ॥ तुका म्हणे आतां मां..."
233373
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>$
१८] तुकारामांच्या चरित्रांतील ऐतिहासिक प्रसंग.
तुजवरी आतां प्राण मी त्यजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा ॥
फार विठाबाई धरिली तुझी आस । करीन जीवा नाश पांडुरंगा ॥
तुका म्हणे आतां मांडिले निर्वाण । प्राण हा सांडीन तुजवरी ॥
१६-२२. तुकारामांस देवाचें दर्शन.
तूं कृपाळू माउली । आम्हां दीनांची साउली ।
न संवत' आली । बाळवेशे जवळी ॥
माझे केले समाधान | रूप गोजिरें सगुण ।
निवविले मन । आलिंगन देऊनी ॥
कृपा केली जनाहातीं । पायीं ठाव दिला संतीं ।
कळों नये चित्तीं । दुःख कैसे आहे तें ॥
तुका म्हणे मी अन्यायी । क्षमा करीं वो माझे आई ।
आतां पुढे काई । तुज घालूं सांकडे ॥
थोर अन्याय केला । तुझा अंत म्यां पाहिला ।
जनाचिया बोला- | साठीं चित्त क्षोभविलें ॥
भागविलासी केला सीण । अधम मी यातिहीन ।
झांकूनी लोचन । दिवस तेरा राहिलों ॥
अव घालूनियां कोर्डे' । तानभुकेचें सांकडे ।
योगक्षेम पुढे । तुज करणे लागेल ॥
उदकीं राखिले कागद । चुकविला जनवाद |
तुका म्हणे ब्रीद । साच केले आपुले ॥
कापो कोणी माझी मान । सुर्खे पीडोत दुर्जन ।
तुज होय सीण । तें मी न करीं सर्वथा ॥
चुकी झाली एक वेळा । मजपासूनी चांडाळा ।
१ आपल्यास न लपवितां. २ संकट ३ जनापवाद.<noinclude></noinclude>
njfvrirj2ti45686mmzmwkrq0xlrivm
पान:तुकारामवचनामृत.pdf/३४
104
111044
233374
2026-07-20T12:34:47Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "८ तुकारामवचनामृत. उभे करोनियां जळा- माजी वह्या राखिल्या ॥ नाहीं केला हा विचार माझा कोण अधिकार । समर्थासी भार । न कळे कैसा घालावा ॥ गेलें होऊनियां मागें । नये बोलों तें वाउगे । पुढि..."
233374
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>८
तुकारामवचनामृत.
उभे करोनियां जळा- माजी वह्या राखिल्या ॥
नाहीं केला हा विचार माझा कोण अधिकार ।
समर्थासी भार । न कळे कैसा घालावा ॥
गेलें होऊनियां मागें । नये बोलों तें वाउगे ।
पुढिलिया प्रसंगें । तुका म्हणे जाणावें ॥
काय जाणें मी पामर । पांडुरंगा तुझा पार ।
धरिलीया धीर । काय एक न करिसी ॥
उताविळ जालों आधीं । मतिमंद हीनबुद्धि ।
परि तूं कृपानिधि | नाहीं केला अव्हेर ॥
तूं देवाचांही देव । अवध्या ब्रह्मांडाचा जीव ।
आम्हां दासां कीं । कां भाकर्णे लागली ॥
तुका म्हणे विश्वंभरा । मी तो पतितचि खरा ।
अन्याय दुसरा । दारीं धरणें बैसलों ॥
नव्हती आली सिसां' सुरी । अथवा घाव पाठीवरी ।
तो म्यां केला हरी । एवढा तुम्हां आकांत ॥
वाटिलासी दोहीं ठायीं । मजपाशीं आणि डोहीं ।
लागों दिला नाहीं । येथें तेथें आघात ॥
जीव घेती मायबापे । थोड्या अन्यायाच्या कोपें ।
है तो नव्हे सोपें । साहों त्यांचि जाणितलें ॥
तुका म्हणे कृपावंता । तुज ऐसा नाहीं दाता ।
काय वाणूं आतां । वाणी माझी कुंठली ॥
तूं माउलीहून मायाळ | चंद्राहूनी शीतळ ।
पाणियाहूनी पातळ | कल्लोळ प्रेमाचा ॥
१ शीर, मस्तक. २ सहन करणें.<noinclude></noinclude>
fbhoepkyjn1g9ox4vxkvjj7r7j2i64f
पान:तुकारामवचनामृत.pdf/३५
104
111045
233375
2026-07-20T12:35:30Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "२४] तुकारामांच्या चरित्रांतील ऐतिहासिक प्रसंग. ९ देऊं काशाची उपमा | दुजी तुज पुरुषोत्तमा । ओवाळूनि नामा | तुझ्यावरुनी टाकिलो ॥ तुवां केलें रे अमृता | गोड त्याही तूं परता । पांचां त..."
233375
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>२४] तुकारामांच्या चरित्रांतील ऐतिहासिक प्रसंग.
९
देऊं काशाची उपमा | दुजी तुज पुरुषोत्तमा ।
ओवाळूनि नामा | तुझ्यावरुनी टाकिलो ॥
तुवां केलें रे अमृता | गोड त्याही तूं परता ।
पांचां तत्त्वांचा जनिता । सकळ सत्तानायक ॥
कांहीं न बोलोनी आतां । उगाच चरणीं ठेवितो माथा ।
तुका म्हणे पंढरीनाथा । क्षमा करीं अपराध ॥
मी अवगुणी अन्यायी । किती म्हणोन सांगों काई ।
आतां मज पायीं । ठाव देई विठ्ठले ॥
पुरे पुरे हा संसार । कर्म बळिवंत दुस्तर ।
राहों नेदी स्थिर । एके ठायीं निश्चळ ||
अनेक बुद्धीचे तरंग | क्षणक्षणा पालटती रंग ।
धरूं जातां संग । तंव तो होतो बाधक ॥
तुका म्हणे आतां । तोडी माझी अवधी चिंता ।
येऊनीयां पंढरिनाथा । वास करी हृदयीं ॥
२३. कढत पाण्याच्या दाहामुळे तुकारामांनीं भाकिलेली
देवाची करुणा.
जळे माझी काया लागला वणवा । धांवरे केशवा मायबापा ॥
पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दद्दन जालें ॥
फुटोनियां दोन्ही भाग होऊं पाहे । पाहतोसी काय हृदय माझें ॥
घेऊनी जीवन धांवें लवलाहीं । कवणाचें कांहीं न चले येथे ॥
तुका म्हणे माझी तूं होसी जननी । आणीक निर्वाणीं कोण राखे।
२४. देवाच्या कृपेनें दाहशांति.
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्रही न खाती सर्प तया ॥
विष ते अमृत, आघात तें हित । अकर्तव्य नीतं होय त्यासी ॥
१ अभि. २ न्यायाचें.<noinclude></noinclude>
ibvw07ehmpya3pilzj869qo6fbbcqi2
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१
104
111046
233378
2026-07-20T14:11:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233378
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><center>
{{xxx-larger|'''समाजशास्त्रावरील व्याख्यानें'''}}<br>
'''अथवा'''<br>
'''हिंदुसमाजांतील कांहीं चालीरीतींचें<br>
{{x-larger|समाजशास्त्रदृष्ट्या विवेचन}}<br>'''
{{rule|7em}}<br>
'''व्याख्यानकार<br>
'''गोविंद चिमणाजी भाटे''', एम्. ए.,<br>लाईफमेंबर, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे.'''<br>
{{rule|5em}}<br>
'''हे पुस्तक पुणे येथे आर्यभूषण छापखान्यांत नटेश अप्पाजी<br>द्रविड यांनी छापून प्रसिद्ध केलें.'''<br>
{{rule|5em}}<br>
'''सन १९१४.'''<br>
{{rule|5em}}<br>
'''किंमत आठ आणे.'''
</center>
{{nop}}<noinclude></noinclude>
8ql7u64t5c2tck6fjrex4nrxmbp7sp4
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/२
104
111047
233379
2026-07-20T14:19:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233379
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{border|<br>
<center>
{{x-larger|'''आपल्या प्रतिभासंपन्न लेखांनीं व अद्वितीय'''<Br><Br>अध्यापन कौशल्यानें}}<Br><Br>
{{xx-larger|'''सुधारणेचीं तत्त्वे'''}}<Br><Br>
'''मनांत बिंबविणारे'''<Br><Br>
'''माझे परमपूज्य गुरुवर्य'''<Br><Br>
{{x-larger|'''कै. प्रि. गो. ग. आगरकर'''}}<Br><Br>
{{x-larger|यांचे चरणीं<Br><Br>
ही अल्पशी}}<Br><Br>
{{x-larger|'''व्याख्यानमाला'''<Br><Br>
अपर्ण केली आहे.}}<Br><Br>
::::'''व्याख्यानकार.'''
</center>}}
{{nop}}<noinclude></noinclude>
kee16tvzi564shqe9qn2rpgfgnl1rfm
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/३
104
111048
233380
2026-07-20T14:24:47Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233380
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|{{xx-larger|'''प्रस्तावना.'''}}}}
{{rule|5em}}
{{gap}}या व्याख्यानमालेवें प्रसिद्धीकरण म्हणजे एक त्रिवेणी संगमच आहे. ही व्याख्यानमाला प्रथमतः मुंबईच्या '''सोशल सर्व्हिस लीगच्या''' विद्यमानें मीं इंग्रजीत गुंफिली. तेव्हां त्या व्याख्यानांचा शब्दशः रिपोर्ट माझ्या मुंबईच्या दोघां लघुलेखक मित्रांनी देण्याचें कबूल केलें व त्या इंग्रजी रिपोर्टावरून त्याचें मराठीत भाषांतर करण्याचे काम माझे जुने मित्र रा. गोविंद्राव टिपणीस यांनी अंगावर घेतलें पण 'सर्वारंभास्तण्डुलाः प्रस्थमूलाः' या न्यायानें पुस्तकप्रकाशनास लागणारी द्रव्याची मदत कोठून व्हावी, हा प्रश्न होता, पण ही मदत माझे नवे मित्र रा. राघवेंद्रराव, हायकोर्ट वकील, गुलबर्गा, यांनी केली व यामुळेच या पुस्तकाच्या प्रकाशनाचा इतक्या लवकर सुयोग आला. या व्याख्यानमालेतील तीन व्याख्यानें हिंदुसमाजतील सामाजिक सुधारणेबद्दलच असल्यामुळे माझ्या वकील मित्रांनी 'हें पुस्तक सामाजिक परिषदेच्या सुमारास प्रसिद्ध होईल तर बरें' असे सुचविलें आणि म्हणूनच त्यांच्या इच्छेप्रमाणे मी पुस्तक प्रकाशित करविण्याचे कबूल करून तें छापण्यास प्रारंभही केला. माझे मित्र रा. गोविंदरावजी टिपणीस यांनी सहा व्याख्यानांपैकीं लघुलेखकांकडून मिळालेल्या तीन व्याख्यानांचें भाषांतर करून पाठविलें. इतक्यांत त्रिवेणीगंगेपैकी लघुलेखनरूपी गंगा गुप्त झाली किंवा कोरडी पडली. पुस्तक छापण्यास सुरुवात केली; त्याबद्दल जाहिरातही दिली. पण लघुलेखकांडून राहिलेल्या तीन व्याख्यानांचा रिपोर्ट येईना व पुढे तर तो रिपोर्ट मिळणें शक्य नाहीं असें झालें. याप्रमाणें या पुस्तकाच्या प्रकाशनांतली एक गंगा आटली व पुस्तक प्रकाशन दिरंगाईवर पडण्याची वेळ आली. तेव्हां माझ्या वकील मित्राचा हिरमोड न व्हावा म्हणून मीं ज्या सरस्वतीच्या कृपाप्रसादामुळे मला मूळ ही व्याख्यानमाला गुंफितां आली तिची आराधना करून दिलेल्या व्याख्यानांचे होईल तितकें स्मरण मी केलें आणि राहिलेलीं तीन व्याख्याने एकदमच मराठीत लिहून काढली. याप्रमाणें या व्याख्यानमालेच्या प्रकाशनाचा इतिहास आहे. यावरून हे पुस्तक किती घाईने व किती अडचणीनें प्रसिद्ध झालें आहे, हे वाचकांस समजून येईल. या पुस्तकाच्या प्रसिद्धीकरणाचें सर्व श्रेय माझ्या मित्रत्रयास आहे. माझ्या लघुलेखक मित्रांनी जर मला रिपोर्ट देण्याचें<noinclude></noinclude>
kjjla0oog9t1kisb2wysonkgmjbwo0k
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/४
104
111049
233381
2026-07-20T14:30:29Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233381
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|२}}</noinclude>कबूल केलें नसतें तर ही व्याख्यानमाला प्रसिद्ध करण्याचे माझ्या मनांत आलेच नसतें. पण या मनोरथाला मूर्त स्वरूप देण्याचे काम माझ्या वकील मित्राची मला झालेली मदत अमर्याद आहे. कारण द्रव्याच्या अभावी माझा हा मनोरथ जागच्याजागींच थबकून राहिला असता. माझे बालमित्र रा. गोविंदरावजी टिपणीस यांच्या भाषांतर करण्याच्या तत्परतेमुळे पुस्तक प्रकाशन शक्य झालें. म्हणून मी या तिघांही मित्रांचा फार आभारी आहे. इतकी पुस्तकप्रकाशनाबद्दल आवश्यक माहिती सांगून मी या व्याख्यानांच्या विषयाकडे वळतो.<Br>{{gap}}हल्ली पाश्चिमात्य देशांत समाजशास्त्राच्या अध्ययनाला फार महत्व देतात. ज्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाला अर्थशास्त्राच्या मूलतत्त्वांची माहिती असणे आवश्यक आहे असें तिकडे समजतात, त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाला समाजशास्त्राच्या मूलतत्त्वांचीही माहिती असणे जरूर आहे, असें तिकडे लोकमत होऊं लागलें आहे. हें शास्त्र जितकें मनोरंजक आहे, तितकेच ते अर्वाचीन काळी आवश्यक आहे. समाजांतील चालीरीती, त्यांची उत्पत्ति, वाढ, त्यांत होणारे फरक, यांची माहिती प्रत्येक समाजघटकास असणे श्रेयस्कर आहे. आपला हिंदुसमाज आज हजारों वर्षांचा जुना आहे, त्याचा सामाजिक इतिहास फारच मनोरंजक आहे व त्यासंबंधी आपल्याइकडे वाङ्मयही फार आहे. आमची श्रुति, स्मृति व पुराणें ही सामाजिक चालीरीतीच्या रत्नांचीं भांडारेंच आहेत. आमचे स्मृतिकार सर्वसंग्रही होते. त्यांनी आपल्या ग्रंथांत चमत्कारिक चालीरीतींची जणूं कांहीं जंत्रीच करून ठेविलेली आहे. पण आमच्या स्मृतिकारांना ऐतिहासिक दृष्टि नव्हती; त्यांची दृष्टि निवळ सर्वसंग्रही होती. यामुळेच आमच्या इकडे समाजशास्त्र बनूं शकलें नाहीं. परंतु पाश्चिमात्य लोकांच्या ऐतिहासिक दृष्टीमुळे त्यांनी निरानिराळ्या चालीरीतींचा संगतवार इतिहास तयार करून त्यापासून शास्त्रीय नियम शोधून काढिले. आमच्या स्मृतिकारांना ही ऐतिहासिक दृष्टि नसल्यामुळे त्यांच्या ग्रंथांतील ज्ञानरत्नें विस्खलित व कशीबशी कोंबून भरल्याप्रमाणे दिसतात. पण कोणी ऐतिहासिक दृष्टिरूपी धाग्याचा पुरवठा करून जर त्या रत्नांचा हार बनविला तर तो सर्व जगास दिपवून टाकणारा होईल. पण हे काम अर्वाचीन पद्धतीनें शिकलेले लोकच करूं शकतील. अशा दृष्टीनें आपल्या चालींकडे पाहण्याची बुद्धि आमच्या तरुण पिढीत उत्पन्न व्हावी, या बुद्धीनें मीं ही व्याख्यानमाला गुंफिली. पहिल्या तीन व्याख्यानांत मीं युरोपामध्यें या शास्त्राच्या झालेल्या वाढीचा आणि त्यांतील प्रमुख प्रमेयांचा<noinclude></noinclude>
l1gkj396fqqbkdc2ooydpo8frpsmrts
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/५
104
111050
233382
2026-07-20T14:35:57Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233382
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|३}}</noinclude>वृत्तांत दिला आहे. तो अर्थातच फार त्रोटक आहे. पण तो वाचून या विषयाची जर कोणास गोडी लागेल व जर कोणाला या विषयावरील प्रचंड वाङ्मय वाचण्याची बुद्धि होईल तर माझ्या श्रमाचें सार्थक झालें असें मी समजेन. पुढल्या तीन व्याख्यानांत मी समाजशास्त्रदृष्टया आपल्या कांहीं चालीरीतींचा थोडक्यांत विचार केला आहे. या ऊहापोहामध्ये आपल्या चालीरीतींकडे खऱ्या शास्त्रीय दृष्टीने कसें पाहावयाचें हें मी दाखविण्याचा प्रयत्न केला असून हिंदुसमाजशास्त्राला आपल्या वाङ्मयांत कसा पुष्कळ अवसर आहे, हें दाखविलें आहे. तसेंच आमच्यांतील सामाजिक सुधारणेच्या चळवळीचें समर्थन समाजशास्त्राने कसें करतां येतें, याचेंही दिग्दर्शन मी केलें आहे. या व्याख्यानापासून वाचकांच्या मनांत आमच्यांतील सामाजिक चळवळीबद्दल सहानुभूति उत्पन्न झाली तर या व्याख्यानत्रयीचे कार्य झालें असें मला वाटेल.<Br>{{gap}}वाचकांच्या सोईकरितां या व्याख्यानांत आलेल्या नव्या मराठी शब्दांची व ते शब्द मी ज्या मूळ इंग्रजी शब्दांकरितां योजिले आहेत त्यांची एक यादी या पुस्तकांत शेवटीं जोडिली आहे. त्यायोगें व्याख्यानें समजण्यास सुलभ जाईल, अशी मला आशा आहे.<br>
<br>
<center>
{| {{brace table parameters}}
|style="text-align:center;"|पुणे, नारायण पेठ घ. नं. २७७.{{gap}}||{{brace|r|t}}||
|-
|style="text-align:center;"|{{gap}}||{{brace|r|m}}||style="text-align:center;"|{{gap}}'''व्याख्यानकर्ता'''
|-
|style="text-align:center;"|ता. १५ मे १९१४.{{gap}}||{{brace|r|b}}||
|}
</center>
{{nop}}<noinclude></noinclude>
bu67q1e4f85a3om2n892cknvmwy5zlp
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/६
104
111051
233383
2026-07-20T14:36:47Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ प्रो. भाटे यांची समाजशास्त्रावरील व्याख्यानें. व्याख्यान ले. ( ता. ८ सप्टेंबर सन १९१३.) 12333 समाजशास्त्राचा अभ्यास आणि त्याचं महत्व. सद्गृहिणी अगण सद्गृहस्थ हो, आपणाला एकाद्य..."
233383
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
प्रो. भाटे यांची
समाजशास्त्रावरील व्याख्यानें.
व्याख्यान ले.
( ता. ८ सप्टेंबर सन १९१३.)
12333
समाजशास्त्राचा अभ्यास आणि त्याचं महत्व. सद्गृहिणी अगण सद्गृहस्थ हो, आपणाला एकाद्या प्रांताच्या अगर देशाच्या राजकीय आणि मृष्टिविषयक भूगोलविद्यचें ज्ञान करून घ्यावयाचे असल्यास आपण तो देश समक्षच पाहिला पाहिजे. अशा प्रत्यक्ष दर्शनानें पांस तेथील पर्वतांच्या रांगा, नद्यांचे प्रवाह, सुपीक प्रदेश, ओसाड मैदानें, आणि उंचसखल भाग, ह्यांचें ज्ञान होऊन त्या देशाचें सामान्य स्वरूप आपणांत जसें कळून येईल तसें तें तो देश न पाहतां कळून येणार नाहीं. तेव्हां कोणत्याही देशाची अशी माहिती मिळवावयाची असेल तर त्या देशाचा प्रवास अवश्य केला पाहिजे. पण असा प्रवास करण्यापूर्वी देशाचे राजकीय विभाग दाखविणारा सावा नकाशा व त्या देशाचा निम्नोन्नतिदर्शक नकाशा ( Relict map ) यांचा काळजीपूर्वक अभ्यान करणे जरूर आहे. पहिल्या नकाशाकडे पहाताच आप- णांस देशाच्या मर्यादा, चतु:सीमा, आणि त्याचे मुख्य विभाग कळून येतील. दुसन्या नकाशाकडे पाहतांच आपणांस त्या देशांच सामान्य स्वरूप त्यांतील पर्वताची आणि दयाखो-यांची व नंदा- नात्यांची व उंचनखल भागांची तेव्हांच कल्पना येईल. या दोन नकाशांचा आपणाला आपल्या प्रवासाच्या व त्या देशाविषय<noinclude></noinclude>
n9tdh3jlm5hjvfk93fohlwwd51eps2p
233399
233383
2026-07-21T09:48:01Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233399
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{x-larger|'''प्रो. भाटे यांची'''}}}}
{{center|{{xx-larger|'''समाजशास्त्रावरील व्याख्यानें.'''}}}}
{{rule|10em}}
{{center|{{x-larger|'''व्याख्यान १ ले.'''}}}}
{{center|( ता. ८ सप्टेंबर सन १९१३.)}}
{{rule|5em}}
{{center|'''समाजशास्त्राचा अभ्यास आणि त्याचं महत्व.'''}}
{{gap}}सद्गृहिणी आणि सद्गृहस्थ हो, आपणाला एकाद्या प्रांताच्या अगर देशाच्या राजकीय आणि सृष्टिविषयक भूगोलविद्यचें ज्ञान करून घ्यावयाचे असल्यास आपण तो देश समक्षच पाहिला पाहिजे. अशा प्रत्यक्ष दर्शनानें आपणांस तेथील पर्वतांच्या रांगा, नद्यांचे प्रवाह, सुपीक प्रदेश, ओसाड मैदानें, आणि उंचसखल भाग, ह्यांचें ज्ञान होऊन त्या देशाचें सामान्य स्वरूप आपणांत जसें कळून येईल तसें तें तो देश न पाहतां कळून येणार नाहीं. तेव्हां कोणत्याही देशाची अशी माहिती मिळवावयाची असेल तर त्या देशाचा प्रवास अवश्य केला पाहिजे. पण असा प्रवास करण्यापूर्वी देशाचे राजकीय विभाग दाखविणारा साधा नकाशा व त्या देशाचा निम्नोन्नतिदर्शक नकाशा (Relief map) यांचा काळजीपूर्वक अभ्यास करणे जरूर आहे. पहिल्या नकाशाकडे पहाताच आपणांस देशाच्या मर्यादा, चतुःसीमा, आणि त्याचे मुख्य विभाग कळून येतील. दुसऱ्या नकाशाकडे पाहतांच आपणांस त्या देशांच सामान्य स्वरूप त्यांतील पर्वताची आणि दऱ्याखोऱ्याची व नद्यानाल्यांची व उंचसखल भागांची तेव्हांच कल्पना येईल. या दोन नकाशांचा आपणाला आपल्या प्रवासाच्या व त्या देशाविषयी<noinclude></noinclude>
sudfu8o18x2w2tm8mhtlvwutq1rll9v
सदस्य चर्चा:सुनिता देसाई
3
111052
233384
2026-07-20T14:43:39Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
233384
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=सुनिता देसाई}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) २०:१३, २० जुलै २०२६ (IST)
kn1rq1fi11iidk3epzngtrxy199wpzs
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/२४
104
111053
233387
2026-07-20T15:55:47Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( १२ ) दूषित, किंवा निस्तेज कल्पनाशक्तीकडे आहे, असें कोणी म्हणतील. असेंहि होण्याचा संभव आहे. पण असा निष्ठुर आरोप एकदम करण्यापूर्वी काव्यकृति खरोखरच उत्कृष्ट आहेत, की त्यांना आगंतु..."
233387
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( १२ )
दूषित, किंवा निस्तेज कल्पनाशक्तीकडे आहे, असें कोणी म्हणतील. असेंहि
होण्याचा संभव आहे. पण असा निष्ठुर आरोप एकदम करण्यापूर्वी काव्यकृति
खरोखरच उत्कृष्ट आहेत, की त्यांना आगंतुक महत्त्व आलेलें आहे. म्हणून
प्रत्येकाला त्यांचा रसास्वाद मिळत नाहीं, हें पाहणे अवश्य आहे. कारण, नितांत
रम्य कृतींनी देखील न उचंचळणारे अभागी प्राणी फारच थोडे आढळतात.
तीन कोटी.
संसारांत घडामोड चालू आहे, स्थिर कांहीं नाहीं, निश्चलतेचा आभास आहे.
यास्तव, वडिलांनीं घालून दिलेलाच कित्ता गिरविण्याचा प्रयत्न कितीहि स्तुत्य
असला तरी, मनूच्या काळापासून रुळत आलेल्या मार्गातील चाकोऱ्यांपासून
बहुजनसमाजाला एक रेसभर देखील खसूं न देण्याची समाजसंरक्षकांनी कितीहि
प्रौढी मारली, कितीहि खबदारी घेतली, तरी कालानुसार, प्रसंगानुसार, आचार-
विचारांत बदल पडलेला आपणांला नेहमी दिसतो. विचार बदलले की रुचि
बदलते, आणि रुचि बदलली कीं मनुष्यमात्रहि बदलतें. शरीररचनेंत किंवा
अंतःकरणप्रवृत्तींत युगायुगांत फरक पडत नाहींत. ह्मणून मानवजाति एकरूपहि
आहे व भिन्नस्वरूपहि आहे. एकरूप नाहीं असें झटल्यास धर्म, नीति, ललित
कला, सारांश, संस्कृतिच लय पावेल; मनुष्य व इतर प्राणी यांमधील भेदच
नाहींसा होईल. पण भेद तर उघड आहे, ह्मणून मानवजाति एकरूप आणि
भिन्नस्वरूप दोन्हीहि आहे, असें मानणे सयुक्तिक दिसतें. आतां आचारविचा-
रांत बदल ह्मणजे ध्येयांत बदल, आणि ध्येयांचा चित्रपट ह्मणजे साहित्य.
ह्मणून त्यांत या फेरफारांचें, रूपांतराचें, प्रतिबिंव पडते. यास्तव प्रत्येक काळचे
साहित्यसेवक, मग ते पद्यांत लिहोत कीं गयांत लिहोत, सर्वांना मान्य होत
नाहीत. साहित्यसेवकांच्या तीन कोटि आहेत. स्वतःच्या वेळच्या अव्यक्त,
अस्पष्ट, ध्येयांस व्यक्त, सुंदर, मूर्तस्वरूप देणारांची एक कोटि. भाविसूर्योद-
याचे कोंवळे किरण ज्याप्रमाणे उंच उंच पर्वतांच्या माथ्यांवर प्रथम दिसूं लाग•
तात, त्याप्रमाणे भविष्यत्काळी आदरास पात्र होणाच्या ध्येयांचा हृदयांत प्रकाश
पडून त्यांनां शब्दरूप प्रथम देणारांची दुसरी कोटि; व समकालिन आचारविचा-
रोनां सर्व काळीं रसिकांनां पटण्यासारखें अजरामर शब्दरूप देणारे, कल्पनासृष्टीचे
प्रतिईश्वर, अशा महाभागांची तिसरी कोटि, पहिल्या दोन कोटींतील लेखकांचें<noinclude></noinclude>
k12qv2lbpjoncppie35is8n1rcdq0u4
233462
233387
2026-07-23T05:28:34Z
JayashreeVI
4058
233462
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(१२)'''}}}}
दूषित, किंवा निस्तेज कल्पनाशक्तीकडे आहे, असें कोणी म्हणतील. असेंहि होण्याचा संभव आहे. पण असा निष्ठुर आरोप एकदम करण्यापूर्वी काव्यकृति खरोखरच उत्कृष्ट आहेत, की त्यांना आगंतुक महत्त्व आलेलें आहे. म्हणून प्रत्येकाला त्यांचा रसास्वाद मिळत नाहीं, हें पाहणे अवश्य आहे. कारण, नितांत रम्य कृतींनी देखील न उचंचळणारे अभागी प्राणी फारच थोडे आढळतात.
{{center|{{larger|'''तीन कोटी.'''}}}}
{{gap}}संसारांत घडामोड चालू आहे, स्थिर कांहीं नाहीं, निश्चलतेचा आभास आहे. यास्तव, वडिलांनीं घालून दिलेलाच कित्ता गिरविण्याचा प्रयत्न कितीहि स्तुत्य असला तरी, मनूच्या काळापासून रुळत आलेल्या मार्गातील चाकोऱ्यांपासून बहुजनसमाजाला एक रेसभर देखील खसूं न देण्याची समाजसंरक्षकांनी कितीहि प्रौढी मारली, कितीहि खबरदारी घेतली, तरी कालानुसार, प्रसंगानुसार, आचारविचारांत बदल पडलेला आपणांला नेहमी दिसतो. विचार बदलले की रुचि बदलते, आणि रुचि बदलली कीं मनुष्यमात्रहि बदलतें. शरीररचनेंत किंवा अंतःकरणप्रवृत्तींत युगायुगांत फरक पडत नाहींत. ह्मणून मानवजाति एकरूपहि आहे व भिन्नस्वरूपहि आहे. एकरूप नाहीं असें म्हटल्यास धर्म, नीति, ललित कला, सारांश, संस्कृतिच लय पावेल; मनुष्य व इतर प्राणी यांमधील भेदच नाहींसा होईल. पण भेद तर उघड आहे, ह्मणून मानवजाति एकरूप आणि भिन्नस्वरूप दोन्हीहि आहे, असें मानणे सयुक्तिक दिसतें. आतां आचारविचारांत बदल ह्मणजे ध्येयांत बदल, आणि ध्येयांचा चित्रपट ह्मणजे साहित्य. ह्मणून त्यांत या फेरफारांचें, रूपांतराचें, प्रतिबिंब पडते. यास्तव प्रत्येक काळचे
साहित्यसेवक, मग ते पद्यांत लिहोत कीं गद्यांत लिहोत, सर्वांना मान्य होत नाहीत. साहित्यसेवकांच्या तीन कोटि आहेत. स्वतःच्या वेळच्या अव्यक्त, अस्पष्ट, ध्येयांस व्यक्त, सुंदर, मूर्तस्वरूप देणारांची एक कोटि. भाविसूर्योदयाचे कोंवळे किरण ज्याप्रमाणे उंच उंच पर्वतांच्या माथ्यांवर प्रथम दिसूं लागतात, त्याप्रमाणे भविष्यत्काळी आदरास पात्र होणा-या ध्येयांचा हृदयांत प्रकाश पडून त्यांनां शब्दरूप प्रथम देणारांची दुसरी कोटि; व समकालिन आचारविचारांनां सर्व काळीं रसिकांनां पटण्यासारखें अजरामर शब्दरूप देणारे, कल्पनासृष्टीचे
प्रतिईश्वर, अशा महाभागांची तिसरी कोटि. पहिल्या दोन कोटींतील लेखकांचें-<noinclude></noinclude>
f3t8gdr3ml5bhg3tbrwtj0pz0s7cyh5
233463
233462
2026-07-23T05:28:58Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
233463
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(१२)'''}}}}
दूषित, किंवा निस्तेज कल्पनाशक्तीकडे आहे, असें कोणी म्हणतील. असेंहि होण्याचा संभव आहे. पण असा निष्ठुर आरोप एकदम करण्यापूर्वी काव्यकृति खरोखरच उत्कृष्ट आहेत, की त्यांना आगंतुक महत्त्व आलेलें आहे. म्हणून प्रत्येकाला त्यांचा रसास्वाद मिळत नाहीं, हें पाहणे अवश्य आहे. कारण, नितांत रम्य कृतींनी देखील न उचंचळणारे अभागी प्राणी फारच थोडे आढळतात.
{{center|{{larger|'''तीन कोटी.'''}}}}
{{gap}}संसारांत घडामोड चालू आहे, स्थिर कांहीं नाहीं, निश्चलतेचा आभास आहे. यास्तव, वडिलांनीं घालून दिलेलाच कित्ता गिरविण्याचा प्रयत्न कितीहि स्तुत्य असला तरी, मनूच्या काळापासून रुळत आलेल्या मार्गातील चाकोऱ्यांपासून बहुजनसमाजाला एक रेसभर देखील खसूं न देण्याची समाजसंरक्षकांनी कितीहि प्रौढी मारली, कितीहि खबरदारी घेतली, तरी कालानुसार, प्रसंगानुसार, आचारविचारांत बदल पडलेला आपणांला नेहमी दिसतो. विचार बदलले की रुचि बदलते, आणि रुचि बदलली कीं मनुष्यमात्रहि बदलतें. शरीररचनेंत किंवा अंतःकरणप्रवृत्तींत युगायुगांत फरक पडत नाहींत. ह्मणून मानवजाति एकरूपहि आहे व भिन्नस्वरूपहि आहे. एकरूप नाहीं असें म्हटल्यास धर्म, नीति, ललित कला, सारांश, संस्कृतिच लय पावेल; मनुष्य व इतर प्राणी यांमधील भेदच नाहींसा होईल. पण भेद तर उघड आहे, ह्मणून मानवजाति एकरूप आणि भिन्नस्वरूप दोन्हीहि आहे, असें मानणे सयुक्तिक दिसतें. आतां आचारविचारांत बदल ह्मणजे ध्येयांत बदल, आणि ध्येयांचा चित्रपट ह्मणजे साहित्य. ह्मणून त्यांत या फेरफारांचें, रूपांतराचें, प्रतिबिंब पडते. यास्तव प्रत्येक काळचे
साहित्यसेवक, मग ते पद्यांत लिहोत कीं गद्यांत लिहोत, सर्वांना मान्य होत नाहीत. साहित्यसेवकांच्या तीन कोटि आहेत. स्वतःच्या वेळच्या अव्यक्त, अस्पष्ट, ध्येयांस व्यक्त, सुंदर, मूर्तस्वरूप देणारांची एक कोटि. भाविसूर्योदयाचे कोंवळे किरण ज्याप्रमाणे उंच उंच पर्वतांच्या माथ्यांवर प्रथम दिसूं लागतात, त्याप्रमाणे भविष्यत्काळी आदरास पात्र होणा-या ध्येयांचा हृदयांत प्रकाश पडून त्यांनां शब्दरूप प्रथम देणारांची दुसरी कोटि; व समकालिन आचारविचारांनां सर्व काळीं रसिकांनां पटण्यासारखें अजरामर शब्दरूप देणारे, कल्पनासृष्टीचे
प्रतिईश्वर, अशा महाभागांची तिसरी कोटि. पहिल्या दोन कोटींतील लेखकांचें-<noinclude></noinclude>
o3nri2tp0lgdamy4abswlnamsi3k4gh
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/२५
104
111054
233388
2026-07-20T15:56:09Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( १३ ) ग्रंथ जर सर्वमान्य झाले नाहीत, तर रुचिवैचित्र्य हेंच त्याचें कारण होय. पण तिसऱ्या कोटीतल्या महाभागांच्या कृतींचा आस्वाद घेता आला नाहीं, तर मात्र तो प्राणी खरोखर अभागी असें ह..."
233388
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( १३ )
ग्रंथ जर सर्वमान्य झाले नाहीत, तर रुचिवैचित्र्य हेंच त्याचें कारण होय. पण
तिसऱ्या कोटीतल्या महाभागांच्या कृतींचा आस्वाद घेता आला नाहीं, तर मात्र
तो प्राणी खरोखर अभागी असें ह्मणणे भाग आहे. या तिसऱ्या कोटीतल्या
महाभागांच्या सर्वच कृति वंदनीय असतात, असें नाहीं. दोषयुक्त कृतींचे
दुराप्रद्दानें समर्थन न करितां त्यांच्या सर्वांगसुंदर कृतींचे नम्रभावाने मनन करणें-
हेच सहृदयत्वाचें लक्षण आहे. देव्हारें माजविणें पुजाऱ्यांनांच शोभतें.
तीन्ही कोटीतल्या साहित्यसेवकांचे ग्रंथ लक्षपूर्वक वाचले असतां, कल्पना-
शक्तीचे योग्य पोषण होऊन रुचीला चांगलें वळण मिळेल; नव्या नव्या कृतींचा
वास्तविक सन्मान करण्याची शक्ति अगांत येईल; अपरिचित वाङ्मयविशेषांनी
सहज उत्पन्न होणारा बुजरेपणा जाऊन दृष्टि स्थिर होईल; मनाचा सम-
तोलपणा वाढेल; गुणग्राहकता वाढेल; लेखकाला स्वातंत्र्य मिळेल; वेगवेगळ्या
प्रसंगविशेषांनां कल्पनासृष्टीतले शक्याशक्य, सौंदर्य, व अनुरूप शब्दयोजना,
याविषयींचेच भिन्नभिन्न निर्बंध लागू राहतील; जिकडे पहावे तिकडे काव्य, अशी
जरी कोणाची वृत्ति झाली नाहीं, तरी वाङ्मयाचे क्षेत्र बरेंच वाढेल.
ऐतिहासिक पद्धतीचे गुणदोष.
परंपरेने चालत आलेली वाचनाची पद्धत जशी विवक्षित मर्यादेतच फलदायक
होते, तशीच या ऐतिहासिक पद्धतीची गोष्ट आहे. या रीतीनें लेखक व
त्यांचे ग्रंथ यांचा पूर्वापार व समकालीन संबंध जोडता येतो व समाजाचे ऋण
किती हे ठरवितां येतें. काहीं लेखकांचा आदर को झाला, अनादर को झाला,
क्वचित् प्रसंग हेळणा पण को झाली, कांहीं लेखक खगोलांत चमकणाऱ्या
ताऱ्याप्रमाणे थोडावेळ प्रकाश देऊन मग कायमचे पतन को पावतात, समाजाचें
चैतन्य वाढविणारे प्रतिसूर्य अशाही महाकवींपेक्षां त्यांच्याच तेजाचें परावर्तन
करणारे दीन निशापति जास्त आनंददायक कां भासतात, व शीतल चंद्रप्रकाशांत
इकडे तिकडे भटकल्यानंतर दिनमणीच्या प्रकाशाची थोरवा, त्यांच्या तेजाची
जीवनास आवश्यकता पुन्हां का जाणवते, इत्यादि अनेक बोधक प्रश्नांचे उत्तर या
पद्धतीने देतां येईल; पण हें सर्व नंतरचें पांडित्य आहे. विभूतींचा अवतार
केव्हा, कसा व कां होतो, त्यांच्यांतील असामान्य शक्ति कशी, कोठून येते,
त्यांच्या कृतीत उतरलेला विशिष्टपणा कसा उकलावयाचा, हे प्रश्न इतिहासाला<noinclude></noinclude>
3zi8ieh9sh3ntlotblxvyv6pujw3wal
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/२६
104
111055
233389
2026-07-20T15:56:34Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( १४ ) सुटत नाहींत अवतारयोग जगत अनेक येत असले तरी, जनसमूहानें आकाशाकडे उत्सुकतेनें डोळे लाविले असले तरी, दैविक शक्तीचीं माणसें यदृच्छयाच जन्मास कां येतात, जितके प्रसंग तितके अवता..."
233389
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( १४ )
सुटत नाहींत अवतारयोग जगत अनेक येत असले तरी, जनसमूहानें
आकाशाकडे उत्सुकतेनें डोळे लाविले असले तरी, दैविक शक्तीचीं माणसें
यदृच्छयाच जन्मास कां येतात, जितके प्रसंग तितके अवतार, अर्से को होत
नाहीं, तें इतिहासाला सांगतां यावयाचे नाहीं. घडलेल्या, फार झालें तर घडत
असलेल्या गोष्टींचा सोपपत्तिक अभ्यास करणे, कार्यकारणसंबंध जोडणें, एवढेच
इतिहासाचे काम आहे. भविष्य वर्तविण्याचें त्याचें काम नाहीं. समाजाची,
पूर्वजांची, सहाध्यायांची, संस्कारांची किंवा संस्कृतींची देखील चिकित्सा
केली, तर विभूतींच्या सामान्य गुणांचा शोध लागेल, विशिष्ट गुणांचा
लागणार नाही. उदाहरणार्थ, सतराव्या शतकांतील वाणीज्ञातीचा एक गृहस्थ
झणून जे गुणदोष, जे आचारविचार, ज्या समजुती, जीं ध्येयें तुकारामाचीं
असतील, त्या सर्वोचें आकलन होईल. पण साधु तुकाराम व त्याचे भक्तिरसानें
ओथंबलेले अभंग इतिहासाला भज्ञेयच राहतील. व्यक्तींचें, जीवात्म्यांचं गूढ
इतिहासालाच काय, पण कोणत्याहि इतर शास्त्राला पूर्णपणे सोडवितां येणें शक्य
दिसत नाहीं. त्याला समानरूपच बनावयाला पाहिजे. श्रवण, मनन, निदिध्यास
केला पाहिजे. जुन्या व नव्या दोन्ही पद्धतींची सांगड घातली पाहिजे.
ह्मण ग्रंथ व वास्मय दोहोंचेहि ज्ञान साद्यंत होईल. तेजोराशी भास्कराकडे देखील
डोळे न दिपतां पाहण्याचे खगेंद्राचे सामर्थ्य अंगीं येईल.<noinclude></noinclude>
2tad4s0qsg2vy98tups7981o8p4v1sw
पान:तुकारामवचनामृत.pdf/३६
104
111056
233390
2026-07-21T04:09:57Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "१० तुकारामवचनामृत. [२४ दुःख तें देईल सर्व सुख फळ । होतील शीतल अग्निज्वाळा ॥ आवडेल जीवा जिवाचिये परी । सकळां अंतरीं एक भाव ॥ तुका म्हणे कृपा केली नारायणे । जाणिजेत येणें अनुभवें ॥ २..."
233390
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>१०
तुकारामवचनामृत.
[२४
दुःख तें देईल सर्व सुख फळ । होतील शीतल अग्निज्वाळा ॥
आवडेल जीवा जिवाचिये परी । सकळां अंतरीं एक भाव ॥
तुका म्हणे कृपा केली नारायणे । जाणिजेत येणें अनुभवें ॥
२५. रामेश्वरभट्टास ज्ञानेश्वरांचें स्वप्न.
माझी मज आली रोकडी प्रचीत । होऊनि फजित दुःख पावे ॥
कांहीं द्वेष त्याचा करितां अंतरीं । व्यथा या शरीरीं बहुत झाली ॥
ज्ञानेश्वरे मज केला उपकार । स्वप्नीं सविस्तर सांगितलें ॥
तुका सर्वो श्रेष्ठ प्रिय आम्हां थोर । कां जो अवतार नामयाचा ॥
त्याची तुज कांहीं घडली रे निंदा । म्हणूनि हे बाधा जडली तूज ॥
आतां एक करी सांगेन ते तुला । शरण जाई त्याला निश्चयैशी ॥
दर्शनेंचि तुझ्या दोषा परिहार । होय तो विचार सांगितला ॥
तोचि हा विश्वास धरोनि मानसीं । जाय कीर्तनासी नित्यकाल ॥
म्हणे रामेश्वर त्याच्या समागमें । झाले हे आराम देह माझें ॥
२६. रामेश्वरभट्टानें केलेलें तुकारामाचें वर्णन.
पंडित वैदिक अथवा दशग्रंथी । परी सरी न पवती तुकयाची ॥
शास्त्रही पुराणे गीता नित्यनेम । वाचिताती वर्म न कळे त्यांसी ॥
कर्म अभिमाने वर्ण अभिमानें । नाडेले ब्राह्मण कलियुगीं ॥
तैसा नव्हे तुका वाणी व्यवसायी । भाव त्याचा पायीं विठोबाचे
अमृताची वाणी वरुषला शुद्ध । करी त्या अशुद्ध ऐसा कोण ॥
चहूं वेदांचे हे केले विवरण । अर्थही गहन करूनियां ॥
उत्तम मध्यम कनिष्ठ वेगळे | करूनि निराळे ठेविले ते ॥
भक्तिज्ञाने आणि वैराग्ये आगळा । ऐसा नाहीं डोळां देखियेला ॥
जपतप यज्ञे लाजविलीं दानें । हरिनामकीर्तने करूनियां ॥
१ अडले.<noinclude></noinclude>
c6zxqaoew5ibo60qolget9t6kcwit9b
पान:तुकारामवचनामृत.pdf/३७
104
111057
233391
2026-07-21T04:10:30Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "$ २७] तुकारामांच्या चरित्रांतील ऐतिहासिक प्रसंग. मार्गे कवीश्वर झाले थोर थोर । नेलें कलेवर कोणी सांगा ॥ भ्हणे रामेश्वर सकळा पुसोनि । गेला तो विमानीं बैसोनियां ॥ २७-२९. तुकारामांच..."
233391
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>$
२७]
तुकारामांच्या चरित्रांतील ऐतिहासिक प्रसंग.
मार्गे कवीश्वर झाले थोर थोर । नेलें कलेवर कोणी सांगा ॥
भ्हणे रामेश्वर सकळा पुसोनि । गेला तो विमानीं बैसोनियां ॥
२७-२९. तुकारामांचें संतांस स्वचरित्रकथन.
पांडुरंगा करूं प्रथम नमना । दुसरें चरणा संतांचिया ॥
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारु । बाबाजीसद्गुरुदास तुका ॥
काय माझी वाणी मानेल संतांशी । रंजनूं चित्तासीं आपुलिया ॥
या मनासी लागो हरिनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥
सीण झाला मज संसारसंभ्रमें । सीतळ या नामे झाली काया ॥
या सुखा उपमा नाहीं द्यावयासी । आले आकार (सी निर्विकार ॥
नित्य धांवे तेथे नामाचा गजर । घोष जयजयकार आईकतां ॥
तांतडी ते काय हरिगुण गाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥
मूळ नरकाचे राज्य मर्दे माते । अंतरे बहुत देव दुरी ॥
दुरी अंतरला नामनिंदकासी । जैसे गोचिडासी क्षीर राहे ॥
हे वाट गोमटी वैकुंठासी जातां । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥
जाणते तयांनी सांगितले करा । अहंतेसी वारा आडूनियां ॥
यांसी आहे ठावे परी अंध होती। विषयांची खंती वाटे जना ॥
नाहीं त्या सूटली द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥
चित्त ज्याचें पुत्रपत्नीबंधूवरी । सुटेल हा परी कैसें जाणा ॥
जाणते नेणते करा हरिकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥
माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥
कोणीतरी कांहीं केले आचरण । मज या कीर्तनेवीण नाहीं ॥
नाहीं भय भक्ता तराया पोटाचें । देवासी तयाचें करणें लागे ॥
लागे पाठोवाटी पाहे पायांकडे । पीतांबरें खडे वाट झाडी ॥
डिकोनियां काय राहिले हे लोक । हेंचि कवतुक वाटे मज ॥
१ शरीर. २ वीणा. ३ विश्वासून, समजून, चिकटून.<noinclude></noinclude>
rgt9y50mzg72t5ad7d8s5xctzod0ovm
पान:तुकारामवचनामृत.pdf/३८
104
111058
233392
2026-07-21T04:11:12Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "१२ तुकारामवचनामृत. जयाने तारिले पाषाण सागरीं । तो ध्यारे अंतरीं स्वामी माझा ॥ माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळू हा ॥ ऐका वचन हे संत । मी तों आगळा पतित । काय कार्जे प्रीत..."
233392
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>१२
तुकारामवचनामृत.
जयाने तारिले पाषाण सागरीं । तो ध्यारे अंतरीं स्वामी माझा ॥
माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळू हा ॥
ऐका वचन हे संत । मी तों आगळा पतित ।
काय कार्जे प्रीत । करीतसां आदरें ।।
माझे चित्त मज ग्वाही । सत्य तरलों मी नाहीं ।
एकांचिये वाहीं'। एक देखी मानिती ॥
बहु पीडिलों संसारे । मोडी पुंसे पिटी ढोरें ।
न पडतां पुरै । या विचारे राहिलों ॥
सहज सरलें होतें कांहीं । द्रव्य थोडे बहु तेही ।
त्याग केला नाहीं । दिले द्विजा याचकां ॥
प्रियापुत्र बंधु । यांचा तोडिला संबंधु ।
सहज जालों मंदु | भाग्यहीन करंटा ॥
तोंड न दाखवे जना । शिरें सौंदीं भरे राना ।
एकांत तो जाणा । तयासाठीं लागला ॥
पोर्ट पिटिले काहारें । दया नाहीं या विचारें ।
बोलावितां बरें । सहज म्हणे यासाठीं ॥
सहज वडिलां होती सेवा । म्हणोनि पूजितों या देवा ।
तुका म्हणे भावा । साठीं झणीं घ्या कोणी ॥
याती शूद्र वंश केला वेवसाँव । आदि तो हा देव कुळपूज्य ॥
नये बोलो परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुम्हीं संतीं ॥
संवसारें जालों अति दुःखे दुःखी । मायबाप सेखीं ऋमिलियाँ |
दुष्काळे आटिलें द्रव्य नेला मान । स्त्री एकी अन्न अम्न करितां मेली ।
लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखे । वेवसाव देखे तुटी येतां ॥
१ प्रवाह, गति. २ पुछ, शेपूट. ३ फट, कॉपरा. ४ काहुर, भय, भ्रांति.
५ कुलाचा धंदा. ६ दिवंगत झाल्यावर.<noinclude></noinclude>
ozjcoep6pvkcucpmwf0mwwvg4hgy90m
पान:तुकारामवचनामृत.pdf/३९
104
111059
233393
2026-07-21T04:11:51Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "३१] तुकारामांच्या चरित्रांतील ऐतिहासिक प्रसंग. १३ देवाचे देऊळ होते, ते भंगले । चित्तासी जे आले करावेसे ॥ आरंभी कीर्तन करी एकादशी । नव्हते अभ्यासीं चित्त आधीं ॥ कांहीं पाठ केली सं..."
233393
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>३१] तुकारामांच्या चरित्रांतील ऐतिहासिक प्रसंग.
१३
देवाचे देऊळ होते, ते भंगले । चित्तासी जे आले करावेसे ॥
आरंभी कीर्तन करी एकादशी । नव्हते अभ्यासीं चित्त आधीं ॥
कांहीं पाठ केली संतांची उत्तरें । विश्वासे आदरें करोनियां ॥
गाती पुढे त्यांचे धरावें ध्रुपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥
संतांचे सेविले तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥
ठाकला तो कांहीं केला उपकार । केलें है शरीर कष्टवूनी ॥
वचन मानिले नाहीं सुहृदांचे । समूळ प्रपंचे वीट आला ॥
सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेले नाहीं बहुमत ॥
मानियेला स्वामी गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥
यावरी या झाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥
निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्ये चित्त दुखावलें ॥
बुडविल्या वह्या बैसलों धरणें केले नारायणें समाधान ॥
विस्तारी सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे ॥
आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥
भक्तां नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळो आले ॥
तुका म्हणे माझे सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगे ॥
३०. देवास आपलें सामर्थ्य दाखविण्याबद्दल तुकारामांची विनंति.
अशक्य तें तुम्हां नाहीं नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥
मार्गे काय जाणों स्वामीचे पवाडे । आतां कां रोकडे दाखूं नये ॥
थोर भाग्य आम्ही समर्थाचे कांसे । म्हणवितों दास काय थोडे ॥
तुका म्हणे माझे निववावे डोळे । दावूनि सोहळे सामर्थ्याचे ॥
३१-३३. परचक्राच्या आकांतांत केलेली देवाची करुणा.
न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होतें ॥
काय तुम्ही येथे नसालसें जालें । आम्ही न देखिलें पाहिजे है ॥
१ चरणोदक. २ सांपडला, घडला. ३ हल्ला.<noinclude></noinclude>
qwmhjr7ovw4vopp5gzjw0dd6d2fk9s5
पान:तुकारामवचनामृत.pdf/४०
104
111060
233394
2026-07-21T04:12:38Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "१४ तुकारामवचनामृत. परचक्र कोठें हरिदासाच्या वासें । न देखिजेत देश रहातिया । तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणे देवा जिणें जालें ॥ भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दुःखी होतां जन..."
233394
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>१४
तुकारामवचनामृत.
परचक्र कोठें हरिदासाच्या वासें । न देखिजेत देश रहातिया ।
तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणे देवा जिणें जालें ॥
भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दुःखी होतां जना न देखवे ॥
आमन्त्रीत जाती ऐसी परंपरा । कां तुम्ही दातारा नेणां ऐसें ॥
भजनीं विक्षेप तेची पैं मरण । न वजावा क्षण एक वायां ॥
तुका म्हणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव मागे॥
काय म्यां मानावे हरिकथेचे फळ । तरिजे सकळ जन ऐसे ॥
उच्छेद तो असे हा गे आरंभिला । रोकडे विठ्ठला परचक्र ॥
पापाविण नाहीं पाप येत पुढे । साक्षीसी रोकडे साक्ष आले ॥
तुका म्हणे जेथे वसतील दास । तेथे तुझा वास कैसा आतां ॥
३४. साधूची समलोष्टाश्मकांचनता.
मुंगी आणि राव । आम्हां सारखाचि जीव ॥
गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फांसा ॥
सोने आणि माती । आम्हा समान है चित्तीं ॥
तुका म्हणे आले । घरा वैकुंठ सगळे ॥
३५-४१. ज्ञानेश्वरांच्या दृष्टांतामुळे आलेल्या ब्राह्मणास
तुकारामांचा उपदेश.
नको कांहीं पडो ग्रंथाचिये भरीं । शीघ्र व्रत करीं हेंचि एक ॥
देवाचिये चाडे आळवावे देवा । ओस देहभावा पाडोनियां ॥
साधने घालिती काळाचिये मुखीं । गर्भवास सेखीं न चुकती ॥
उधाराचा मोक्ष होय नोहे ऐसा । पतनासी इच्छा आवश्यक ॥
१ आघात, अंतराय. २ पाश.<noinclude></noinclude>
ftpkcc9lho41tcuzt8lojaidhuuzo79
पान:तुकारामवचनामृत.pdf/४१
104
111061
233395
2026-07-21T04:13:32Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "१५ ४०] तुकारामांच्या चरित्रांतील ऐतिहासिक प्रसंग. रोकडी पातली अंगसंगे जरा। आतां उजगरा' कोठवरी ॥ तुका म्हणे घालीं नामासाठी उडी । पांडुरंग थडी पाववील ॥ नाहीं देवापाशीं मोक्षाच गा..."
233395
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>१५
४०] तुकारामांच्या चरित्रांतील ऐतिहासिक प्रसंग.
रोकडी पातली अंगसंगे जरा। आतां उजगरा' कोठवरी ॥
तुका म्हणे घालीं नामासाठी उडी । पांडुरंग थडी पाववील ॥
नाहीं देवापाशीं मोक्षाच गांठोडे । आणूनी निराळे द्यावे हातीं ॥
इंद्रियांचा जय साधूनियां मन । निर्विषय कारण असे तेथे ॥
उपास पारणी अक्षरांची अटी । सत्कर्मी शेवटीं असे फळ |
आदरे संकल्प वारी अतिशय सहज त काय दुःख जाण ॥
स्वप्नींच्या घायें विवळसी वायां । रडे रडतियासर्वे मिथ्या ॥
तुका म्हणे कळ आहे मुळापाशीं । शरण देवासी जाय वेगीं ॥
त्यजिलै भेटवी आणूनी वासना । दाविल्याचे जना काय काज ॥
आळवाव देवा भाकूनी करुणा । आपुलिया मना साक्ष करीं ॥
नाहीं जावे यावे दुरुनी लागत । आहे साक्षभूत अंतरींच ॥
तुका म्हणे हा आहे कृपासिंधु । तोडी भवबंधु तात्काळिक ॥
गोविंद गोविंद | मना लागलिया छंद ॥
मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥
आनंदल मन । प्रेमें पाझरती लोचन ॥
तुका म्हणे आळी । जैवीं नुरोच वेगळी ॥
संकोचोनि काय झालासी लहान । घेई आपोशन ब्रम्हांडाचे ॥
करोनी पारणे आंचवे संसारा । उशीर उशिरा लावू नको ॥
घरकुलाने होता पडिला अंधार । तेणें केले फार कासावीस ॥
झुगारूनी दुरी लपविल काखे । तुका म्हणे वाखे कौतुकाचे ॥
ज्ञानियांचा राजा गुरु महाराज । म्हणती ज्ञानदेव ऐसें तुम्हां ॥
मज पामरा है काय थोरपण । पायींची वहाण पायीं बरी ॥
१ जागृति. २ खटपट, श्रम. ३ वर्म. ४ चमत्कार, चेष्टा.<noinclude></noinclude>
2mp66n55ktqeotbuavp0imm8gu0a6sn
पान:तुकारामवचनामृत.pdf/४२
104
111062
233396
2026-07-21T04:15:42Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "ब्रम्हादिक जेथे तुम्हां वोळगणे । इतर तुळणे काय पुरे ॥ तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली । म्हणोनि ठेविली पायीं डोई। बोलिली लेकुरे । वेडी वांकुडी उत्तरे ॥ करा क्षमा अपराध । महाराज..."
233396
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{rh|१६|तुकारामवचनामृत.|[§ ४०}}</noinclude>ब्रम्हादिक जेथे तुम्हां वोळगणे । इतर तुळणे काय पुरे ॥
तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली । म्हणोनि ठेविली पायीं डोई।
बोलिली लेकुरे । वेडी वांकुडी उत्तरे ॥
करा क्षमा अपराध । महाराज तुम्हीं सिद्ध ॥
नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला ॥
तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायां किंकरा ॥
४२. निर्याणप्रसंगीं गरुडासमवेत देवाचें दर्शन.
पैल आले हरि । शंखचक्र शोभे करीं ॥
गरुड येतो फडत्कारै। ना भी ना भी म्हणे त्वरे ॥
मुगुटकुंडलांच्या दीप्ति । तेजें लोपला गभस्ति ॥
मेघश्यामवर्ण हरि । मूर्ति डोळस साजिरी ॥
चतुर्भुज वैजयंती । गळां माळ हे रुळती ॥
पीतांवर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥
तुका झालासे संतुष्ट | घरा आले वैकुंठपीठ ॥
४३. तुकारामांचें निर्याण.
आम्ही जातों तुम्हीं । कृपा असो द्यावी ।
सकळां सांगावी | विनंती माझी ॥
वाढवेळ झाला । उभा पांडुरंग ।
वैकुंठा श्रीरंग । बोलावितो ॥
अंतकाळीं विठो । आम्हांसी पावला ।
कुडीसहित झाला । गुप्त तुका ॥
सेवा करणारे, आश्रय करणारे. २ पायांशी. ३ शोभा देत हालणें.<noinclude></noinclude>
hkcq5t04x9v224b0j4y109fbvk40wry
पान:तुकारामवचनामृत.pdf/४३
104
111063
233397
2026-07-21T04:17:01Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान " २ तुकारामांची साधकदशा. ४४. आळसाला व लज्जेला येथून रामराम . आतां येथे झाली जीवा संवसांदी होते तैसे पोटीं फळ आले ॥ आतां धरिले ते न सोडी चरण । सांपडले धन निज ठेवा ॥ आतां हा आळस असो परता..."
233397
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{rh|§ ४६ ]|तुकारामांची साधकदशा.|१७}}</noinclude>
२ तुकारामांची साधकदशा.
४४. आळसाला व लज्जेला येथून रामराम .
आतां येथे झाली जीवा संवसांदी होते तैसे पोटीं फळ आले ॥
आतां धरिले ते न सोडी चरण । सांपडले धन निज ठेवा ॥
आतां हा आळस असो परता दुरी । नेदावी ते उरी उरों कांहीं ॥
आतां याचा मज न व्हावा विसर । भरोनि अंतर राहों रूप ॥
आतां लोकलाज नयो येथे आड । बहु झाला गोड ब्रम्हरस ॥
तुका म्हणे आतां जन्म हा सफळ । अंतरीं गोपाळ स्थिरावला ॥
४५. निंदा व स्तुति यांची समता.
फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मार्गे मागें ॥
स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठुर है जगीं प्रेमसुख ॥
निंदास्तुति कोणी करो दयामाया । न धरीं चाड या सुखदुःखा ॥
योगिराज कां रे न राहती बैसोनी । एकिये आसनीं याचि गुणे ॥
तुका म्हणे मना पाहे विचारून । होई रे कठीण वज्राऐसे ॥
४६. उपचाराचा कंटाळा.
उपचाराशी वाजं जालों । नका बोलो यावरी ॥
असेल ते असो तैसे । भेटीसरिसे नमन ॥
दुसन्यामध्ये कोण मिळे । छंद चाळे बहु मर्ते ॥
एकाएकीं आतां तुका । लौकिका या बाहेरी ॥
१ मोबदला. २ कंटाळलों, त्रासलों. ३ नाद. ४ वेड.
तु. २<noinclude></noinclude>
kqvjtrek5efd5cnzl8xdbruse2mtlh7
पान:तुकारामवचनामृत.pdf/४४
104
111064
233398
2026-07-21T04:17:36Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "१८ तुकारामवचनामृत. ४७. फकीराच्या स्थितीतच देवाची आठवण होते. नको देऊं देवा पोटीं है संतान । मायाजाळे जाण नाठवसी ॥ नको देऊं देवा द्रव्य आणि भाग्य । तो एक उद्वेगं होय जीवा ॥ तुका म्हण..."
233398
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{rh|§ ४६ ]|तुकारामांची साधकदशा.|१७}}</noinclude>१८
तुकारामवचनामृत.
४७. फकीराच्या स्थितीतच देवाची आठवण होते.
नको देऊं देवा पोटीं है संतान । मायाजाळे जाण नाठवसी ॥
नको देऊं देवा द्रव्य आणि भाग्य । तो एक उद्वेगं होय जीवा ॥
तुका म्हणे करी फकिराचे परी । रात्रंदिवस हरि येईल वाचे ॥
४८. आपदः सन्तु नः शश्वद्यासु संस्मर्यते हरिः
न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥
ऐशी माझी वाचा मन उपदेशी । आणीक लोकांसी हैचि सांगे ॥
विटंबो शरीर होत कां विपत्ती । परि राहो चित्तीं नारायण ॥
तुका म्हणे नाशिवंत है सकळ । आठवे गोपाळ तेंचि हित ॥
४९. देहावर उदासीनता.
पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान । विलास मिष्टान्न करूनियां ॥
शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयांचिया ।।
क्षणभंगुर है जाय न कळतां । ग्रास गिळी सत्ता नाहीं हातीं ॥
कर्वतिली देहे कापियेलें मांसा । गेले वनवासा शुकादिक ॥
तुका म्हणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाव जळे ॥
५०. जरा व मृत्यूचें भय .
जरा कर्णमूळ सांगों आली गोष्टी । मृत्याचिये भेटी जवळी आली ॥
आतां माझ्या मना होई सावधान। ॐ पुण्याची जाण कार्यसिद्धि ॥
शेवटील घडी बुडतां नलगे वेळ । साधाया तो काळ जवळी आला ॥
तुका म्हणे चिंती कुळींची देवता । वारावा भोवता शब्द मिथ्या ॥
१ संतति, मुलें. २काळजी. ३फजिती होणे. ४शरीर. ५ कर्वतीने कापणें. ६ कानाशी.<noinclude></noinclude>
r42bbj2jwjp96rq5gu540lixblyf28c
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/७
104
111065
233401
2026-07-21T09:56:07Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233401
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(२)}}</noinclude>माहिती मिळविण्याच्या कामी चांगलाच उपयोग होईल, हे नव्यानें सांगण्याची जरूरी नाहीं. देशाचे ज्ञान मिळविण्याला जी गोष्ट लागू आहे तीच शास्त्राच्या ज्ञानाला लागू आहे. एखाद्या विषयाचे पूर्ण ज्ञान करून घ्यावयाचे असल्यास त्या विषयांत प्रावीण्य संपादिलेल्या सुप्रसिद्ध लेखकांचीं पुस्तकें आपण स्वतः वाचून तीं नीट समजून घेतली पाहिजेत. असे केल्यावांचून आपणास त्या विषयांत प्रावीण्य संपादन करतां येणार नाहीं. परंतु प्रवासाच्या कामी आतांच सांगितलेले दोन प्रकारचे नकाशे ज्याप्रमाणे मार्गदर्शक होतात त्याप्रमाणेंच ज्या विषयाचा आपणांस अभ्यास करावयाचा असेल त्या विषयाचा परिचय करून देणारे उपोद्घातात्मक व प्रस्तावनात्मक लेख आपणांस आपल्या अभ्यासाच्या कामी मार्गदर्शक होतात. मी येथें जीं व्याख्यानें देणार आहें तीं समाजशास्त्रासारख्या गहन आणि व्यापक विषयाच्या अभ्यासाला केवळ उपोद्धाताप्रमाणे मार्गदर्शक व्हावींत अशीच माझी इच्छा आहे. मी एकंदर सहा व्याख्यानें देणार आहे. त्यांपकी पहिल्या तीन व्याख्यानांत मी समाजशास्त्राची उत्पत्ति व वाढ आणि त्या शास्त्रांतील प्रमेये यांची माहिती सांगून पुढील तीन व्याख्यानांत ह्या शास्त्रांचीं तत्त्वें आमच्या चालीरीतीस कशी लागू पडतात, हें सांगणार आहे. आतां प्रत्येक व्याख्यान फार झालें तर तास सवा तास होईल. तेव्हां इतक्या थोड्या अवकाशांत मला आपणांस ह्या शास्त्राची पूर्ण माहिती व ज्ञान करून देतां येणार नाहीं. तसे होण्यास शास्त्रीय वाङ्मय स्वतः वाचलें पाहिजे. हीं व्याख्यानें ज्यांना ह्या शास्त्राचा अभ्यास करावयाचा असेल त्यांना केवळ मार्गदर्शकाप्रमाणें उपयोगीं पडलीं म्हणजे बस्स आहे. भूगोलज्ञानाला जसा साधा नकाशा तसें माझे पहिले व्याख्यान समाजशास्त्रज्ञानाला होय. यांत मी फक्त या शास्त्राची व्याख्या देऊन याला शास्त्रीय स्वरूप केव्हां<noinclude></noinclude>
29054e2gdsdxkh2801rddvzxdguk4lv
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/८
104
111066
233402
2026-07-21T10:03:06Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233402
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(३)}}</noinclude>व कसे प्राप्त झाले आणि ह्या शास्त्रांतील तत्त्वांचा शोध कसकसा लागला हे दाखवून ह्या समाजशास्त्राचे महत्व काय आहे ते सांगणार आहे; आणि यापुढील दोन व्याख्यानांत ह्या शास्त्रांतील महत्वाचीं प्रमेये सांगावी असा माझा विचार आहे. म्हणून माझें दुसरें व तिसरे व्याख्यान हीं निम्नोन्नतिदर्शक नकाशाप्रमाणे आहेत असें म्हटले तरी चालेल, ह्यापेक्षां जास्त माहिती ह्या शास्त्राचा अभ्यास करूं इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतः मिळवून तिचें मनन केलें पाहिजे. या व्याख्यानमालेपासून समग्र शास्त्राचें पूर्ण ज्ञान आपल्यास होणें दुरापास्त आहे. ही व्याख्यानमाला समाजशास्त्राला प्रस्तावनेदाखल झाली म्हणजे पुरे आहे.<br>{{gap}}आतां प्रथम आपण या शास्त्राच्या नांवाचा विचार करूं, शब्दापुरतें पाहूं गेलें तर ह्या शब्दाची उत्पत्ति अगदी अलीकडची आहे. विख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ कॉम्ट यानें स. १८३९ च्या सुमारास ह्या विषयावर जी व्याख्याने दिली त्याने ह्या शब्दाची प्रथम योजना केली. इंग्रजीमध्ये ह्या शास्त्राला Sociology (सोशिऑलजी) अशी संज्ञा आहे. सोशिऑलजी हा शब्द, एक लॅटिन आणि एक ग्रीक अशा दोन भाषांतील दोन शब्दांच्या योगानें झालेला एक धेडगुजरी सामासिक शब्द असल्यामुळे आरंभी ह्या शब्दावर बरीच टीका झाली. लॅटिन शब्द 'सोसिअस' असा असून त्याचा अर्थ मित्र किंवा सोबती असा आहे आणि ग्रीक शब्द 'लोगस' असा असून त्याचा अर्थ ज्ञान किंवा शास्त्र असा आहे. एकंदरींत ह्या व्युत्पत्तीवरून पाहिलें तर 'सोशिऑलजी' म्हणजे, मैत्रीचें, संगतीचें अथवा समाजाचें शास्त्र, किंवा पद्धतशीर ज्ञान असा अर्थ होतो. धेडगुजरी म्हणून भाषाशास्त्राच्या दृष्टीने जरी हा शब्द कांहीं विद्वानांस टाकाऊ वाटला, तरी ज्या शास्त्रामध्यें युरोपांतील देशांच्या सामाजिक सुधारणेच्या<noinclude></noinclude>
gfjn4pnedczs4tzoafhoavj0ajudz8x
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/९
104
111067
233403
2026-07-21T10:11:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233403
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|४}}</noinclude>उत्पत्तीचा आणि वाढीचा इतिहास सांगण्यांत आला आहे त्या शास्त्रास, ही पाश्चात्य सुधारणा प्रामुख्येंकरून ग्रीक आणि रोमन राष्ट्रांच्या सुधारणेपासूनच वाढीस लागली असल्यामुळे, ह्या दोन राष्ट्रांच्या भाषांतील दोन शब्दांच्या समासाने झालेले नावच असणे योग्य आहे असें पुष्कळ विद्वानांस वाटत आहे. 'सोशिऑलजी' शब्दाच्या उपपत्तीसंबंधानें केलें इतकें विवेचन पुरें आहे.<br>{{gap}}आतां आपण ह्या शास्त्राच्या प्रतिपाद्य विषयाचा विचार करू. ह्या दृष्टीने पाहिलें असतां हे शास्त्र नवीन आहे, असें म्हणतां येणार नाहीं. याचें हें नांव जरी आतांच सांगितल्याप्रमाणे नवें आहे. तरी याचा विषय नवा नाहीं. तो फार जुनाच आहे. प्लेटो आणि ॲरिस्टॉट्ल यांना 'सोसिऑलजी' हा शब्द जरी माहिती नसला तरी त्यांनी ह्या शास्त्रांतील अनेक तत्वांचा ऊहापोह आपल्या ग्रंथांतून ठिकठिकाणी केला आहे. समाजशास्त्र स्वतंत्र समजून त्यांनी ह्या शास्त्राची निराळी चर्चा केलेली नाहीं इतकेंच!<br>{{gap}}'रेपब्लिक,' अथवा 'लोकसत्तात्मक राष्ट्र' नावाच्या आपल्या सर्वोत्कृष्ट ग्रंथांत, प्लेटोने समाजशास्त्र, राजनीतिशास्त्र आणि नीतिशास्त्र ह्या तीनही शास्त्रांवरील आपले विचार इतक्या सुंदर रीतीनें एकत्र ग्रथित केले आहेत कीं, तेथें हीं तीन शास्त्रे निरनिराळी आहेत असें वाटतच नाहीं. आतां ॲरिस्टॉटलचे नीति आणि राजनीतिशास्त्रावरील ग्रंथ पहा. हीं दोन शास्त्रे स्वतंत्र आहेत असे प्रथम ॲरिस्टॉट्लनेच ग्रीक भाषेत सिद्ध केलें. पण त्याच्या ह्या दोनही ग्र ग्रंथांत समाजशास्त्राचीही पुष्कळ तत्वें त्यानें गोविलीं आहेत. एकंदरीत पहातां प्राचीनकाळी समाजशास्त्राला स्वतंत्र नांव आणि स्वतंत्र अस्तित्व जरी नव्हतें, त्याचा जरी पद्धतशीरपणाने कोणी विचार केलेला नव्हता, तरी ग्रीक लोकांनी त्यातील सिद्धांताचा अंशतः विचार केलेला आहे, ही निर्विवाद गोष्ट आहे.{{nop}}<noinclude></noinclude>
ktirw8ar8lbty5gy4m00h8bqm8puq02
233404
233403
2026-07-21T10:12:12Z
कल्पनाशक्ती
3813
233404
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(४)}}</noinclude>उत्पत्तीचा आणि वाढीचा इतिहास सांगण्यांत आला आहे त्या शास्त्रास, ही पाश्चात्य सुधारणा प्रामुख्येंकरून ग्रीक आणि रोमन राष्ट्रांच्या सुधारणेपासूनच वाढीस लागली असल्यामुळे, ह्या दोन राष्ट्रांच्या भाषांतील दोन शब्दांच्या समासाने झालेले नावच असणे योग्य आहे असें पुष्कळ विद्वानांस वाटत आहे. 'सोशिऑलजी' शब्दाच्या उपपत्तीसंबंधानें केलें इतकें विवेचन पुरें आहे.<br>{{gap}}आतां आपण ह्या शास्त्राच्या प्रतिपाद्य विषयाचा विचार करू. ह्या दृष्टीने पाहिलें असतां हे शास्त्र नवीन आहे, असें म्हणतां येणार नाहीं. याचें हें नांव जरी आतांच सांगितल्याप्रमाणे नवें आहे. तरी याचा विषय नवा नाहीं. तो फार जुनाच आहे. प्लेटो आणि ॲरिस्टॉट्ल यांना 'सोसिऑलजी' हा शब्द जरी माहिती नसला तरी त्यांनी ह्या शास्त्रांतील अनेक तत्वांचा ऊहापोह आपल्या ग्रंथांतून ठिकठिकाणी केला आहे. समाजशास्त्र स्वतंत्र समजून त्यांनी ह्या शास्त्राची निराळी चर्चा केलेली नाहीं इतकेंच!<br>{{gap}}'रेपब्लिक,' अथवा 'लोकसत्तात्मक राष्ट्र' नावाच्या आपल्या सर्वोत्कृष्ट ग्रंथांत, प्लेटोने समाजशास्त्र, राजनीतिशास्त्र आणि नीतिशास्त्र ह्या तीनही शास्त्रांवरील आपले विचार इतक्या सुंदर रीतीनें एकत्र ग्रथित केले आहेत कीं, तेथें हीं तीन शास्त्रे निरनिराळी आहेत असें वाटतच नाहीं. आतां ॲरिस्टॉटलचे नीति आणि राजनीतिशास्त्रावरील ग्रंथ पहा. हीं दोन शास्त्रे स्वतंत्र आहेत असे प्रथम ॲरिस्टॉट्लनेच ग्रीक भाषेत सिद्ध केलें. पण त्याच्या ह्या दोनही ग्र ग्रंथांत समाजशास्त्राचीही पुष्कळ तत्वें त्यानें गोविलीं आहेत. एकंदरीत पहातां प्राचीनकाळी समाजशास्त्राला स्वतंत्र नांव आणि स्वतंत्र अस्तित्व जरी नव्हतें, त्याचा जरी पद्धतशीरपणाने कोणी विचार केलेला नव्हता, तरी ग्रीक लोकांनी त्यातील सिद्धांताचा अंशतः विचार केलेला आहे, ही निर्विवाद गोष्ट आहे.{{nop}}<noinclude></noinclude>
e6gclu1qfbpw1u052kg4pwvbucef3ec
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१०
104
111068
233405
2026-07-21T10:16:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233405
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(५)}}</noinclude>{{gap}}कोणत्याही समाजाकडे जर आपण लक्ष्यपूर्वक पाहूं लागलों तर हा समाज कसा उत्पन्न झाला असेल, त्यांत दिसून येणारे भेद कसे अस्तित्वात आले असतील, याच्या चालीरीती कां व कशा पडल्या असतील आणि याच्या कायदेकानूंची घटना कोणीं कधीं व कशी केली असेल, सारांश, ही आश्चर्यकारक समाजघटना कोणी देवानें केली किंवा हें सर्व मनुष्यनिर्मित आहे; वगैरे अनेक प्रश्न विचारी मनुष्याच्या मनांत- मग तो मनुष्य कोणत्याही काळांत आणि कोणत्याही देशांत जन्मास आलेला असो- आल्यावांचून रहातच नाहीं. अशी गोष्ट असल्यामुळे ग्रीक तत्वज्ञानांच्या ग्रंथांत या प्रश्नांचा थोडाफार ऊहापोह झालेला असावा हें, स्वाभाविकच आहे.<Br>{{gap}}पुढें ग्रीक लोकांच्या संस्कृतीला उतरती कळा लागली. आणि रोमन लोकांच्या संस्कृतीस प्रारंभ झाला. परंतु रोमन लोकांनीं मोठे साम्राज्य संपादन केलें व त्यांचें सर्व लक्ष युद्धकला व राजकारण यांमध्ये गुंतल्यामुळे त्याच्यामध्ये तत्वज्ञानाचा व तदङ्गभूत समाजशास्त्राचा उदय झाला नाहीं व ग्रीक तत्वज्ञान्यांचे विचारही लोकांचा स्मृतींतून गेले म्हटले तरी चालेल. रोमन लोकांनी राजकारणाच्या अनुषंगाने कायदेशास्त्राची वाढ बरीच केली. कायदेशास्त्र ही समाजशास्त्राची एक शाखाच आहे. कशी तें आपणांस मागाहून कळेल. असो.<Br>{{gap}}सर्व ज्ञान बायबलांत भरलें आहे. मनुष्याला आपली बुद्धि चालवून नवीन शोध लावण्यास जागाच राहिलेली नाहीं, म्हणून त्याने फक्त बायबलांतील ज्ञानाचा प्रसार करावा; फार झालें तर त्याने बायबलांतील ज्ञान लोकांना समजावून देण्याकरितां त्यावर सुबोध टीका लिहावी; पण स्वतंत्रपणे आपली बुद्धि चालवून कोणत्याही विषयावर काहीं लिहू नये; असल्या मतांचा प्रसार ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराबरोबर<noinclude></noinclude>
ai14w2z5bghan0egca9xzr6k5b6r1ew
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/११
104
111069
233406
2026-07-21T10:21:37Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233406
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(६)}}</noinclude>युरोपांत सर्वत्र होऊं लागल्यामुळे मानसिक आणि नैतिक शास्त्रांची वाढ खुंटली, इतकेंच नव्हे तर आधिभौतिक शास्त्रेही जागच्याजागींच पडून राहिली. धार्मिक उपदेशाच्या आड येणाऱ्या कोणत्याही मताचा प्रसार ख्रिस्तीधर्मानें होऊं दिला नाहीं. युरोपांत ज्या काळीं असें घडलें त्या काळाला युरोपांतील 'तमोयुग' असें म्हणतात. परंतु शोधाच्या कामांत आलेला हा अडथळा, ज्ञानाच्या प्रगतीला झालेलें हें विघ्न, मनुष्याच्या बुद्धिमत्तेची ही गुलामगिरी, फार दिवस टिकली नाहीं. युरोपच्या पुनरुज्जीवनाबरोबर मानवी बुद्धीच्या गुलामगिरीचा अंत होऊन ती स्वतंत्रपणे विहार करूं लागली. मानवी बुद्धीस या वेळीं मुक्त करण्याचे पहिले श्रेय ज्योतिषशास्त्राला आहे. सुप्रसिद्ध ज्योतिर्विद टॅकोब्राही आणि गॅलिलिओ यांनी तत्कालीन पाद्र्यांच्या मताविरुद्ध असणारे ज्योतिषशास्त्रांतील सत्यसिद्धांत लोकांस सांगितल्यामुळे त्यांना जबर शिक्षा भोगाव्या लागल्या. पण पुढे असें झालें कीं, ह्या धार्मिक शिक्षांना न जुमानतां वेडगळ धर्मसमजुताच्या किल्ल्यांत कुजत पडलेलीं शास्त्रे शोधकांनी एकामागून एक बाहेर काढली. लोक स्वतंत्रपणें त्यांचा अभ्यास करूं लागले. त्यांवर विचारपरिप्लुत ग्रंथ होऊं लागले आणि विचारदृष्टीने त्यांचे निरीक्षण होऊं लागलें. सारांश, शास्त्राच्या प्रगतीला आतां ईश्वरकृतत्वाच्या कल्पनेची अथवा वेडगळ धर्मसमजुतींची आडकाठी राहिली नाहीं. पदार्थविज्ञान, गणित आणि नैतिक शास्त्रांची वाढ जोराने होऊं लागली आणि समाजरचना मनोधर्म वगैरेसारखे अनेक विषय लोकांच्या विचारप्रांतांत उभे राहून इतर शास्त्राबरोबरच समाजशास्त्राची वाढही आपोआप होऊं लागली. राजाचे, अधिकार ईश्वरदत्त आहेत, अशा धर्मसमजुतीमुळें राजनीतिशास्त्राच्या पुरस्कर्त्यांस मात्र आपल्या शास्त्राच्या प्रगतीकरितां बरेंच झगडावें लागले. त्यांनी "राजा हा समाजाचा नोकर असून<noinclude></noinclude>
02hsewk4ghaskn0p8feneggc68qc7fs
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१२
104
111070
233407
2026-07-21T10:26:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233407
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(७)}}</noinclude>राजाचे हक्क आणि राजकीय संस्था मनुष्यनिर्मित आहेत; धर्माशीं त्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाहीं" ह्या तत्वाचें नेटानें प्रतिपादन करून पुष्कळ लोकांचें लक्ष्य राजनीतिशास्त्राच्या अभ्यासाकडे वळविलें. पूर्व काळीं नीतिशास्त्र हें धर्मशास्त्राच्या अंकित आहे असें समजले जात होतें. पण आतां तें एक स्वतंत्र शास्त्र होऊन लोक त्याचा अभ्यास करूं लागले. समाजशास्त्र कॉम्टनें स्वतंत्र केलें हें मीं पूर्वी एकदां सांगितलेंच आहे. अडॅम स्मिथ हा जसा अर्वाचीन अर्थशास्त्राचा जनक समजला जातो त्याप्रमाणेच कॉम्टला अर्वाचीन समाजशास्त्राचा जनक समजण्यात काही हरकत नाहीं. समाजशास्त्राचा विषय स्वतंत्र रीतीनें संशोधन करण्यासारखा असून फार महत्वाचा आहे; समाजाची उत्पत्ति त्याची वाढ आणि प्रगति ज्या नियमांना आणि सिद्धांतांना अनुसरून होते त्यांचा शोध लावणें अवश्य आहे आणि सामाजिक संस्था, चालीरीति, नीतिविषयक कल्पना आणि धर्मसमजुती यांचे ज्ञान व्हावे अशी इच्छा असल्यास समाजाचे व सामाजिक कारणपरंपरेचे शास्त्रीय ज्ञान मिळविले पाहिजे, असें कॉम्टनेंच प्रथम प्रतिपादन केलें. अर्थात् कॉम्टचें समाजशास्त्र म्हणजे समाज, त्याच्या चालीरीति आणि नैतिक कल्पना ईश्वरदत्त आणि म्हणूनच सनातन आणि अविनाशी आहेत असल्या वेडगळ धर्म समजुतींचा जोरानें निषेध करणारें एक शास्त्र होते. कॉम्टनें ह्या सर्व गोष्टी सामाजिक कारणांनीं उत्पन्न झाल्या आहेत, असे प्रतिपादन करून ईश्वरदत्तपणाच्या धर्मसमजुतींच्या मूळावरच घाव घातला. समाजसंस्था, सामाजिक रीतिभाती आणि समाजाच्या अंधश्रद्धामुलक समजुती यांची कारणे शोधून काढणें हेंच समाजशास्त्राचें कर्तव्य आहे, असें कॉम्टचें म्हणणें होतें.{{nop}}<noinclude></noinclude>
axv1u968yhkeov50p003p6uz7sirwf0
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१३
104
111071
233408
2026-07-21T11:31:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233408
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(८)}}</noinclude>{{gap}}कॉम्टची दृष्टि संकुचित नव्हती. त्याने तत्कालिन सर्व शास्त्रांचा अभ्यास केला होता व म्हणून एखाद्या तत्त्वज्ञान्याप्रमाणें व्यापक दृष्टीने त्याने सर्व शास्त्रांचे सिंहावलोकन केलें व त्याने तत्कालीन शास्त्रांचे ऐतिहासिक पद्धतीने विवेचन केले. तसेच शास्त्रांचे वर्गीकरण करून प्रत्येक शास्त्राची मूलतत्त्वें व सिद्धांत यांचे दिग्दर्शन केलें. त्याच्या वर्गीकरणांत, संख्या आणि परिमाण ह्या सर्व वस्तुमात्राच्या ठायी असलेल्या सर्वसाधारण अशा दोन गुणांची उत्पत्ति करणारें गणितशास्त्र याला शेवटचें स्थान देण्यांत आले असून अत्यंत भानगडीच्या व गुंतागुंतीच्या प्रमेयांनी भरलेल्या समाजशास्त्रास श्रेष्ठस्थान दिलेलें होतें. कॉम्टने अशा रीतीने ह्या समाजशास्त्राचा पाया घातला आणि युरोपियन सामाजिक इतिहासावरून त्याने आरंभी ह्या शास्त्रासंबंधाचे कांहीं महत्वाचे सामान्य सिद्धांतही शोधून काढले. ह्यानंतर हर्बर्ट स्पेन्सर यानें "समाजशास्त्राचा अभ्यास" नांवाचा एक ग्रंथ प्रसिद्ध करून कॉम्टच्या पुढे पाऊल टाकले. स्पेन्सरपूर्वी निरनिराळ्या विद्वानांनी ह्या शास्त्रास निरनिराळी नांवें सुचविल्यामुळे 'सोशिऑलजी' हें नांव मागे पडल्यासारखे झाले होते; पण स्पेन्सरनें आपल्या पहिल्याच ग्रंथाला हे नांव देऊन समाजशास्त्राचें 'सोशिऑलजी' असें कायमचें नामकरण केलें. नंतर त्यानें स्थित्यात्मक समाजशास्त्रावर बरीच ग्रंथरचना करून "समाजशास्त्राची मूलतत्वे" ह्या नांवाच्या ग्रंथाच मोठमोठे तीन भाग प्रसिद्ध केले. ह्या शास्त्रावरील त्याचा शेवटचा ग्रंथ म्हणजे 'निरानिराळ्या राष्ट्रांचे वर्णनात्मक समाजशास्त्र,” हा होय. इतकी विस्तृत ग्रंथरचना करून स्पेन्सरनें हें शास्त्र लोकांस अत्यंत आवडतें करून सोडलें. विद्वानांना त्याच्या अध्ययनाची फार गोडी लागली आणि लोकांस त्या शास्त्राच्या अभ्यासाचें एक प्रकारचे वेडच लागून राहिलें.{{nop}}<noinclude></noinclude>
8ilz1s1fsbiwuxksc7my8az5vd97nlb
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१४
104
111072
233409
2026-07-21T11:36:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233409
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(९)}}</noinclude>{{gap}}ह्याचा परिणाम असा झाला की, स्पेन्सरनंतर शेकडा विद्वान् ग्रंथकार ह्या शास्त्राचें परिशीलन करूं लागले. ह्या शास्त्रांतला एक एक प्रश्न एकेका ग्रंथकाराने हातीं घेऊन ऐतिहासिक पद्धतीनें त्याची शहानिशा करण्याचे काम केलें. अशा रीतीने गेल्या वीस वर्षांत ह्या शास्त्रावर बरेंच वाङ्मय तयार झाले आहे. युरोप आणि अमेरिका खंडांतील पुष्कळ देशांत ह्या शास्त्राच्या अध्ययनाला उच्च शिक्षणांत महत्वाचे स्थान मिळाले असून या शास्त्रांतील प्रमेयांचा सोपपत्तिक व पद्धतशीर शोध लावण्याकरितां विश्वविद्यालयांत या विषयाच्या स्वतंत्र शिक्षकाच्या जागा निर्माण करण्यांत आल्या आहेत.<Br>{{gap}}आतापर्यंत केलेल्या ऐतिहासिक विवेचनावरून आपणांस ह्या शास्त्राची पूर्वपीठिका कळून चुकली असेल. आतां आपण त्याच्या सद्यःस्वरूपाकडे व लक्षणाकडे वळूं. निरनिराळे लोक सामाजिक बंधनांनी एकत्र होऊन त्यांचा समाज कसा तयार झाला; त्याची वाढ कशी झाली; त्या लोकांमध्ये एकाच प्रकारच्या समजुती, एकाच प्रकारचे रीतिरिवाज आणि पुष्कळ ठिकाणीं एकाच प्रकारची राज्यव्यवस्था कशी रूढ झाली; ते सर्व एकच भाषा कशी बोलू लागले; आणि त्यांच्यामध्ये एकसारख्याच धर्मकल्पना कशा प्रचारांत आल्या, इत्यादि प्रश्नांचें उत्तर देऊन समाजाचें अंतिम ध्येय काय असावें व त्याचा विकास कसकसा होतो, हें सांगणे समाजशास्त्राचे काम आहे. समाजाची वाढ कशी झाली हे सांगतांना ती कोणत्या दिशेनें, क्रमानें आणि मार्गाने झाली, हेही ह्या शास्त्राच्या परिशीलनाने ठरवितां आलें पाहिजे. कोणत्याही एका समाजाची स्थित्यंतरें कसकशीं झालीं; त्या समाजाचें कार्य कसे चाललें आहे; त्याचे सामान्य स्वरूप व लक्षणे कोणती आहेत व त्याचे विशेष काय आहेत, इत्यादि प्रश्नांप्रमाणेच<noinclude></noinclude>
1ir50tbgcvnejd0mzotddwe6t7dn5j2
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१५
104
111073
233410
2026-07-21T11:39:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233410
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१०)}}</noinclude>जन्मावरून अथवा सांपत्तिक स्थितीवरून पडलेले समाजांतले निरनिराळे भेद, निरनिराळ्या जाती, पोटजाती, वर्ण अथवा वर्ग कसे व कां उत्पन्न झाले, ह्या प्रश्नाची मीमांसाही याच शास्त्रानें करावयाची आहे. समाजाची उन्नति म्हणजे काय, ती कोठपर्यंत होणे शक्य आहे, या उन्नतीचे ध्येय काय असावें, जे समाज आपणांपुढे एखादें ध्येय ठेवन आपल्या उन्नतीचे प्रयत्न करीत असतील त्यांचे ते प्रयत्न खरोखरच त्यांना उन्नतीला पोहचवीत आहेत किंवा अवनतीला नेत आहेत, इत्यादि प्रश्नांचा उलगडाही याच शास्त्राने केला पाहिजे. असे अनेक प्रश्न जरी ह्या शास्त्राच्या मदतीनें आपणांस सोडवितां येण्यासारखे आहेत, तरी ह्या शास्त्राच्या कार्यक्षेत्रास कांहींतरी मर्यादा ही असलीच पाहिजे. समाजशास्त्र हें जरी अत्यंत लोकप्रिय शास्त्र झालें आहे तरी त्याच्या कार्यक्षेत्राची मर्यादा अजून कायमची ठरली नाहीं. कांहीं लेखक ह्या शास्त्राची मर्यादा अत्यंत विस्तृत आहे असें मानितात, तर दुसरे कांहीं ती फारच संकुचित आहे असें समजतात; आणि कित्येक लेखक तर अशा प्रकारचें एखादे स्वतंत्र शास्त्र असणेंच संभवनीय नाहीं असें म्हणतात. म्हणून ह्या म्हणण्यांत तथ्य तरी काय आहे, हें ह्या शास्त्राच्या पोटविभागांचा आणि ह्याशी संलग्न असलेल्या इतर शास्त्रांचा विचार करून आपण ठरविले पाहिजे.<Br>{{gap}}प्राचीन ग्रीक लोकांच्या वेळीं ह्या शास्त्राला स्वतंत्र अस्तित्व नसून याचा समावेश नीति आणि राजनीति या शास्त्रांतच झालेला होता, असें मी पूर्वी एकदां आपणांस सांगितलेच आहे. हा संयोग ग्रीक लोकांच्या विशेष प्रकारच्या राज्यव्यवस्थेमुळे झालेला होता. समाज आणि राजकीय संस्था या एकच आहेत, असें ग्रीक लोक मानीत. कारण प्रत्येक ग्रीक व्यक्ती तिच्या राजकीय संस्थेची घटक<noinclude></noinclude>
56h2z82mw220xwkijcfu87f2sjaicsh
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१६
104
111074
233411
2026-07-21T11:47:52Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233411
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(११)}}</noinclude>होत असे. तिला अधिकारी वर्गाला निवडण्याचा अधिकार होता, इतकेच नव्हे तर ती स्वतः त्यांच्या कायदे करणाऱ्या मंडळांत सभासद म्हणून बसत असे. सारांश, ग्रीस देशांत त्या वेळी पूर्ण लोकसत्तात्मक राज्यव्यवस्था असल्यामुळे तत्कालीन ग्रीक मनुष्य जसा समाजाचा तसाच राजकीय संस्थेचाही घटक मानिला जात होता. अशा रीतीनें ग्रीक समाज आणि ग्रीस देशांतील राजकीय संस्था एकच होती आणि म्हणूनच समाज आणि राजकीय संस्था यांची उपपत्तिही ते भिन्न समजत नमत. 'मनुष्य म्हणजे एक राजकीय अथवा सामाजिक प्राणी' अशी ॲरिस्टॉट्लनें मनुष्य शब्दाची व्याख्या केलेली आहे. तीवरून ग्रीक लोकांच्या मतें तरी समाज आणि राष्ट्र या दोन संस्थांवांचून मनुष्याला स्वतंत्र अस्तित्व नव्हते; याचा समावेश ह्या दोन संस्थांमध्येंच होत होता ही गोष्ट आपल्या लक्षांत आलीच असेल.<br>{{gap}}ग्रीक लोकांच्या राज्यव्यस्थेमुळे जसें त्यांचें राजनीतिशास्त्र आणि समाजशास्त्र एकजीव झालें होतें, तसेंच व्यक्तीचें स्वतंत्र अस्तित्वच त्यांत अमान्य असल्यामुळे त्यांचे समाजशास्त्र, व्यक्तीचें सद्वर्तन हेंच ज्याचें ध्येय त्या नीतिशास्त्रामध्ये समाविष्ट झालें होतें. एकंदरीत ग्रीक लोकांच्या राज्यव्यवस्थेमुळें, राजनीतिशास्त्र, समाजशास्त्र आणि नीतिशास्त्र ही तिन्हीही शास्त्रे त्यांनी एकच करून टाकिलीं होतीं.<br>{{gap}}यापुढील काळांत एकंदर समाजाची प्रगति होऊन एकाच राजसत्तेखालीं अनेक प्रांत आणि देश आल्यानें जसजशी राष्ट्राची वाढ झाली तसतसा दोनही शास्त्रांशीं असलेला आपला संबंध तोडून राजनीतिशास्त्र स्वतंत्र झालें. कोणत्याही एखाद्या देशांतील राजकीय संस्थेच्या रचनेचा तात्विक दृष्ट्या विचार करणें, हें ह्या शास्त्राचें ध्येय आहे. अर्थात् हें शास्त्र म्हणजे समाजशास्त्राची एक<noinclude></noinclude>
cjldy3nyd2jcn3q71nf06art85ji2gd
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१७
104
111075
233412
2026-07-21T11:51:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233412
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१२)}}</noinclude>शाखाच आहे. ही शाखा अशा रीतीने वेगळी झाली आणि लोक हिचा स्वतंत्रपणे अभ्यास करून तिच्या तत्त्वांचा शोध करूं लागले.<br>{{gap}}ज्योतिषशास्त्र व राजनीतिशास्त्र यांच्यानंतर नीतिशास्त्र धर्मापासून स्वतंत्र झाले. नीतिशास्त्र धर्मापासून वेगळे पडून त्याचा स्वतंत्र अभ्यास सुरू झाला. या शास्त्रानें मनुष्याच्या नैतिक ध्येयाची दिशा ठरविण्याचें व मनुष्याची इतिकर्तव्यता सांगण्याचे काम हातीं घेतलें व निव्वळ विचाराच्या कसोटीनें मानवी कल्याणाचे निदान करण्याचा प्रयत्न चालविला.<br>{{gap}}पण मनुष्य ज्या समाजांत असेल त्या समाजाच्या नैतिक कल्पनांचा, विचारांचा आणि वर्तनाचा पगडा त्याजवर बसून त्याप्रमाणें त्याच्या कल्पना विचार आणि वर्तन होत असते; सामान्यतः स्वतंत्रपणे तो आपली प्रगति करून घेण्यास असमर्थ असतो, ही गोष्ट विद्वानांस मान्य होऊन स्वतंत्र झालेलें नीतिशास्त्र आतां समाजशास्त्राची एक शाखाच आहे असे मानण्यांत येऊ लागलें आहे. सारांश राजनीति आणि नीति हीं दोन स्वतंत्र झालेलीं शास्त्रं म्हणजे समाजशास्त्राशीं निकट संबंध असलेल्या पण त्या शास्त्राच्याच दोन निरनिराळ्या शाखा असें समजतात; व ह्या दृष्टीनें सांप्रत त्या शास्त्राचा अभ्यास विद्वान् लोक करूं लागले आहेत.<br>{{gap}}आतां सामाजिक संपत्तीची चिकित्सा करणाऱ्या अर्थशास्त्राविषयी आपण विचार करूं. अभिमत अर्थशास्त्राचा जनक अडॅम स्मिथ यानें आपला 'राष्ट्रीय संपत्ति' नामक उत्कृष्ट ग्रंथ लिहितांना समाजशास्त्राचीं अनेक तत्चे दृष्टीसमोर ठेविला होता, असें म्हणण्यास हरकत नाहीं. त्यानंतरच्या अर्थशास्त्रावरील कांहीं लेखकांनीं मात्र, संपत्ति मिळविणें हेंच मनुष्याचें इतिकर्तव्य आहे, अशा भ्रामक कल्पनेनें अर्थशास्त्रास भूमितीप्रमाणे तार्किक शास्त्र ठरवून समाज-<noinclude></noinclude>
erdmxjpb9hr7v9woe198z361u19p5t9
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१८
104
111076
233413
2026-07-21T11:55:41Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233413
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१३)}}</noinclude>शास्त्राशी असलेला त्याचा संबंध तोडिला आणि स्वतंत्रपणे त्याची वाढ करण्याचे प्रयत्न चालविले. पण ते सर्व निष्फल ठरले. यावरून अर्थशास्त्रही पूर्वनिर्दिष्ट शास्त्रांप्रमाणेच समाजशास्त्राची शाखा असून तिचें कार्यक्षेत्र फार संकुचित आहे, ही गोष्ट आपल्या लक्षांत आलीच असेल.<br>{{gap}}असो अशा रीतीनें अनेक संलग्न शास्त्रांचे परस्पर संबंध सुटून विद्वान् लोक त्यांचा स्वतंत्रपणे विचार करीत आहेत. सुप्रजानिर्माणशास्त्र, नांवाच्या अगदी अलीकडेच बनत चाललेल्या शास्त्राचा आणि कायदेशास्त्राचा संबंधही आपल्या ह्या समाजशास्त्राशी त्याच्या शाखांप्रमाणें असून ती हल्लीं स्वतंत्र शास्त्रे म्हणून विद्वानांच्या अध्ययनाचा विषय झाली आहेत. धर्मशास्त्राचीही अशीच अवस्था झाली आहे. त्याचाही स्वतंत्र शास्त्र म्हणून अभ्यास चालू आहे. पण धार्मिक संस्कार, आचार, कल्पना वगैरेंची उन्नति किंवा ऱ्हास ही समाजाच्या स्थित्यंतरावर अवलंबून आहेत, असे निदर्शनात आल्यामुळे आतां हें शास्त्र समाजशास्त्रापासून अगदींच अलग होऊन रहाण्याचा मुळीच संभव नाहीं. उपरिनिर्दिष्ट विविध शास्त्राप्रमाणेच हेंही समाजशास्त्राची एक शाखा, असें मानण्यांत येईल. श्रमविभागाच्या तत्त्वावर जरी ह्या सर्व शास्त्रांचा अभ्यास लोकांनी स्वतंत्रपणे केला तरी हीं शास्त्रे समाजशास्त्राच्या शाखा आहेत ही गोष्ट आपण विसरता कामा नये.<br>{{gap}}समाजशास्त्राच्या अंगभूत असलेल्या निरनिराळ्या शास्त्रांचा अशा रीतीने स्वतंत्रपणे अभ्यास होऊं लागल्यामुळे कित्येक ग्रंथकार असे म्हणूं लागले आहेत की "आतां समाजशास्त्राला काहींच कार्य उरलें नाहीं म्हणून स्वतंत्रपणे ते मानण्याचे कांहीं प्रयोजन नाहीं. पूर्वकाळी जेव्हां शास्त्रांचे विभक्तीकरण बरोबर झालेले नव्हते, तेव्हा समाज शास्त्राची तत्ते अत्यंत उपयागीं होती हे खर आहे.<noinclude></noinclude>
stcxsw7g7ooule6vr5k7jbzxwe1gy8n
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१९
104
111077
233414
2026-07-21T11:58:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233414
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१४)}}</noinclude>पण आतां हें विभक्तीकरण बरेंच होऊन प्रत्येक शास्त्राचे सिद्धांत स्वतंत्रपणे सोडविण्याचे कार्यास आरंभ झाला आहे. हीं सर्व शास्त्र मिळूनच जर एक समाजशास्त्र आहे, तर आतां असल्या त्या संघभूत शास्त्राचे काय काम आहे? तत्त्वज्ञानासंबंधानें जशा प्रकारचा आक्षेप घेण्यांत येतो, तशा प्रकारचाच हा आक्षेप आहे. ह्या दृश्य जगाच्या मुळाशीं असलेले गूढ सत्य शोधून काढणें हें तत्त्वज्ञानाचे काम आहे, सबब निरनिराळी शास्त्रे जगांत समाविष्ट झालेले निरनिराळे विषय घेऊन त्यांचा स्वतंत्रपणे विचार करीत असतां तत्त्वज्ञान म्हणून निराळें शास्त्र मानण्याचें कारणच नाहीं, असें आक्षेपकांचे म्हणणे आहे. ज्योतिषी आकाशांतील ग्रहतारानक्षत्रादिकांचें निरीक्षण करून निरनिराळी अनुमानें बांधीत आहेत आणि सिद्धांत ठरवीत आहेत; कीटकादि जंतूंपासून मनुष्यापर्यंत सर्व प्राणिमात्रांचा आणि वनस्पतींचा पद्धतशीर अभ्यास प्राणिशास्त्रज्ञ आणि वनस्पतिशास्त्रज्ञ करीत आहेत; जडसृष्टीचा अभ्यास करण्याचे काम पदार्थविज्ञान, रसायन, भूगर्भ वगैरे शास्त्रे मोठ्या नेटाने करीत आहेत; अशा स्थितीत तत्त्वज्ञान्याने कशाचा अभ्यास करावयाचा? तत्त्वज्ञानाला आता विषयच उरला नाहीं, असे ते म्हणतात. ह्या आक्षेपावर तत्त्वज्ञानी जें उत्तर देतात तेंच समाजशास्त्राला आपल्या आक्षेपकांस देता येईल असे वाटतें. म्हणून तत्त्वज्ञ आपल्या आक्षेपकांस काय उत्तर देतात हें आपण पाहूं. ते म्हणतात निरानिराळ्या शास्त्रांत प्रगति होऊन जगांतील अनेक गूढें उकललीं जात आहेत हे जरी खरें आहे, तरी त्यामुळे तत्त्वज्ञानाला कांहींच कर्तव्य उरलें नाहीं असें मात्र नाहीं. तत्त्वज्ञान हे समालोचन करणारें शास्त्र आहे. त्याला जगाच्या मुळाशीं असणारें सत्य व्यापकदृष्टीने शोधून काढावयाचे आहे. निरनिराळ्या शास्त्रांचा अभ्यास करणारे लोक आपआपल्या शास्त्रांत नव्या नव्या शोधांची भर घालीत<noinclude></noinclude>
3tnu5olja31js0jg2rwtudzpth5uk9v
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/२०
104
111078
233415
2026-07-21T12:02:00Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233415
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१५)}}</noinclude>आहेत हे खरें, तरी पण ते आपल्या शास्त्रापुरताच विचार करीत असल्यामुळे त्यांची दृष्टि संकुचित होते आणि जगांतील सत्याकडे त्यांना व्यापक दृष्टीने पहातां येत नाहीं. तें कामफक्त तत्त्वज्ञानीच करूं शकतो यावरून तुमच्या लक्षांत आलेंच असेल कीं, इतर शास्त्रे आणि तत्वज्ञान हीं एकमेकांचीं पूरक असून त्या शास्त्रांच्या प्रगतीवर तत्त्वज्ञानाची वाढ अवलंबून आहे. इतर शास्त्रांची माहिती जसजशी अधिक होईल तसतसे तत्त्वज्ञानाचे समालोचन अधिक विस्तृत आणि अधिक निश्चित होईल आणि याच्या उलट तत्त्वज्ञानाचें समालोचन जसजसें विस्तृत आणि अधिक निश्चित होईल तसतसें त्याच्या प्रकाशानें इतर शास्त्रें अधिक अधिक विशद होऊन एकाच योग्येतेच्या अनेक शास्त्रांची एक सुंदर माला गुंफली जाईल.<br>{{gap}}तत्त्वज्ञानी हा एखाद्या प्रेक्षकाप्रमाणे असून त्याला जगद्रूपी भूप्रदेशाचें निरीक्षण करावयाचें आहे, असें समजा. कोणताही प्रदेश सपाटीवरून नीट पहातां येत नाहीं. अधिक अधिक उंचीवरून तो पाहतां त्याचें सौंदर्य जसें जास्त जास्त दृग्गोचर होते तसेच जगद्रूपी प्रदेशाचें होतें; अनेक शास्त्रीय शोधांच्या पायऱ्या चढून त्याचें निरीक्षण करणाऱ्या तत्त्वज्ञानास तो अधिक स्पष्ट दिसूं लागतो. अशा रीतीने पाहतां इतर शास्त्रं आणि तत्त्वज्ञान यांचा अत्यंत निकट संबंध आहे. शास्त्रं जगद्विषयक आपल्या नियमित क्षेत्राचे निरीक्षण करून विशिष्ट सिद्धांत ठरवितात आणि तत्त्वज्ञान त्या सिद्धांताचा फायदा घेऊन जगत्संबंधी व्यापक सत्याचा विचार करतें. जगांतील घडामोडी ज्या विशेष नियमांनीं चालल्या आहेत ते नियम शोधून काढण्याचे काम इतर शास्त्रांचे असून ते नियम परस्परविरोधी नसून एकरूप आहेत, असें दाखविणें हें तत्त्वज्ञानाचे काम आहे.{{nop}}<noinclude></noinclude>
cvbk3kbu2edxjmftnq4j6kzvhn6epau
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/२१
104
111079
233423
2026-07-22T05:22:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233423
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१६)}}</noinclude>तत्वज्ञानाला स्वतंत्र असें कार्यक्षेत्र कोणतें आणि तत्त्वज्ञान व इतर शास्त्रे हीं एकमेकांचीं कशी पूरक आहेत, ही गोष्ट आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून आपल्या लक्षांत आलीच असेल, इतिहासदृष्ट्या विचार केला असताही आपणांस याचे सत्यत्त्व दिसून येईल. अर्वाचीन तत्वज्ञानाचा जनक डेकार्ट याची तत्त्वज्ञानविषयक मतें भूमितीच्या सिद्धांतावरून काढलेली आहेत. कारण तो स्वतः मोठा गणिती होता. लब्नीटस नांवाचा एक जर्मन तत्त्वज्ञानी होता, त्याला निरनिराळ्या विषयाची अभिरुचि असून निरनिराळ्या शास्त्रांतील सर्व शोधांचे याला चांगले ज्ञान होतें, सृष्टीतील पदार्थांमध्यें जड आणि सचेतन असा जो भेद करण्यांत येतो तो बरोबर नाहीं, ते एकरूपच असून फक्त त्यामध्यें वसत असलेल्या गूढ सत्याचे परिमाण मात्र जास्ती कमी आहे इतकेच. "सृष्टीमध्ये कोठेही अलगपणा नसून तीमधील अखिल वस्तुजात एकमेकांशी संलग्न आहे; सृष्टि परिणत होत आहे आणि दिवसानुदिवस तिची अशीच प्रगति होत जाणार," अशा तऱ्हेचें तत्त्वज्ञान त्याने सर्वांस सांगितले आणि त्याच कांहीं शास्त्रांवर बराच मोठा परिणाम झाला. तत्त्वज्ञान आणि इतर शास्त्रे यांची नेहमीच अशी परस्परांवर क्रियाप्रतिक्रिया घडत असते. अलीकडे ज्याची कीर्ति सर्वतोमुखी झाली आहे, त्या बर्गेसनचेंच उदाहरण आपण घेऊ. त्यानें तत्त्वज्ञानाला एक अगदीं नवी दिशा लाविली. अगदी अलीकडे लागलेल्या सर्व शास्त्रीय शोधांचा फायदा घेऊन त्याने आपणास सृष्टीचे विशेष व्यापक असे अगदी निराळेच स्वरूप दाखविलें.<Br>{{gap}}असो. अशा रीतीने इतर शास्त्रे आणि तत्त्वज्ञान यांचा जसा संबंध आहे तसाच समाजशास्त्र व त्याच्या स्वतंत्र झालेल्या शाखा यांचा संबंध आहे. या शाखांची प्रगतेि झाली आहे आणि होत<noinclude></noinclude>
5cmfpaj463g79mhpnjcq2frii2coqkj
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/२२
104
111080
233424
2026-07-22T05:26:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233424
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१७)}}</noinclude>आहे, हे जरी खरें तरी समाजासंबंधानें त्यांचे विचार फारच कोते आहेत. उदाहरणार्थ आपण अर्थशास्त्रच घेऊं. त्याच्या वाढीबरोबर त्याचा एकतर्फीपणा इतका वाढला कीं, त्यानें शेवटीं पैसा मिळविणें, हेंच मनुष्याचें इतिकर्तव्य ठरविलें. कोणत्याही गोष्टीचा विचार करितांना तो एका वेळी एका दृष्टीनेच करावा ही गोष्ट जशी खरी आहे तशीच असा विचार पुष्कळ वेळां एकतर्फी असतो हीही पण खरी आहे हें विसरता कामा नये. कोणतीही एखादी गोष्ट जी घडते ती घडण्याचे एकच कारण जरी आपणांस समजलें, तरी तेवढ्याच एका कारणानें ती घडते असें नसून ती घडण्यास एकदम अनेक कारणांचा योग जमून आलेला असतो. या तत्वाप्रमाणें आतां सांगितलेलें अर्थशास्त्राचे तत्व असेच एकतर्फी आहे. इतर शास्त्रांचा विद्याभ्यास करणारांच्या हातून अशी एकतर्फीपणाची चूक घडूं न देणें, हें एक तत्त्वज्ञानाप्रमाणें समाजशास्त्राचेही काम आहे. समाजशास्त्राशी संलग्न असलेली शास्त्रे प्रत्येकीं समाजाचा एक एक विभाग विचारांत घेऊन त्याविषयीं शोध करीत आहेत हें ठीकच आहे. पण ह्या सर्व शास्त्रांचा परस्परांमधील संबंध स्पष्ट करून त्यांची एक माला बनविणाऱ्या समाजशास्त्राचें जें महत्वाचें कार्य आहे तें त्यांना करतां येणें केवळ अशक्यच आहे. समाजाच्या निरनिराळ्या विभागांचा शोध हीं शास्त्रे करितात आणि त्या शोधांचा फायदा घेऊन त्या विभागांनी बनलेल्या समाजाच्या मूळ कारणांचा त्याच्या वाढीच्या व प्रगतीच्या सिद्धांतांचा शोध समाजशास्त्र करते. समाजशास्त्राला इतर शास्त्रांपासून जसा हा लाभ होतो तसा इतर शास्त्रांस म्हणजे अर्थात् त्यांचा अभ्यास करणारांत समाजशास्त्राचा स्वतंत्रपणें अभ्यास केल्यानें आपल्या विचारांचा आणि सिद्धांतांचा एकतर्फी-<noinclude><br>{{gap}}२</noinclude>
sowqh1bhc308j33on5a30y1imiet11m
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/२३
104
111081
233425
2026-07-22T05:29:54Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233425
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१८)}}</noinclude>पणा कळून लाभ होतो. हे शास्त्रज्ञ पुष्कळ वेळां एकमेकांविरुद्ध सिद्धांत काढीत असतात, पण समाजशास्त्री त्यांची तपासणी करून त्यांच्या चुका दाखवितो आणि मर्व शास्त्रीय सिद्धांतांचा मेळ घालून देतो. हा कांहीं समाजशास्त्राच्या अध्ययनापासून होणारा लहानसहान लाभ नाहीं.<br>{{gap}}समाजशास्त्राचा मानवशास्त्राशीं कांहींसा निराळा संबंध आहे. वस्तुतः हें शास्त्र फक्त मनुष्य प्राण्याविषयीं विचार करणारे आहे; पण कांहीं ग्रंथकारांनी याची मर्यादा वाढवून समाजशास्त्राचाही यांत समावेश केला आहे. पण माझ्या मतें तें शास्त्र अगदी मर्यादित आहे. या शास्त्राचें काम मनुष्यप्राण्याचा स्वतंत्रपणे विचार करून त्याचा पूर्वेतिहास देणें इतकेंच आहे. पृथ्वीवर मनुष्यप्राणी कसा उत्पन्न झाला आणि ऐतिहासिक कालापर्यंत त्याला कोणकोणत्या अवस्थांतून जावे लागलें हे ह्या शास्त्रांच्या शोधकांनी ठरवावयाचें असून यापुढील कामगिरी समाजशास्त्राच्या शोधकांनी करावयाची आहे. सारांश, मानवशास्त्र हा पहिला थर असून समाजशास्त्र हा त्यावरील दुसरा थर आहे. समाज बनण्याच्या पूर्वीच्या स्वतंत्र मानवी प्राण्याची माहिती देणें हें मानवशास्त्राचें काम आहे, आणि समाज कसा बनला हे सांगून त्या पुढील मानवी प्राण्याची माहिती देणें हें समाजशास्त्राचें काम आहे; अर्थातच व्यक्तिशः मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक वाढीची मीमांसा करणारे मानवशास्त्र जुने आणि संकुचित आहे; मनुष्यप्राण्यांचा समाज बनल्यानंतर समाज आणि मनुष्य या दोहोंच्या परस्परसंबंधानें उत्पन्न होणाऱ्या नानाविध प्रश्नांची मीमांसा करणारे समाजशास्त्र नवें आणि विस्तृत असे आहे. आणि म्हणूनच कित्येक मानवशास्त्रज्ञांनीं आपल्या शास्त्राची मर्यादा वाढवून जरी त्यांत समाजशास्त्राचे प्रश्न घुसडले आहेत तरी ह्या दोन शास्त्रांची काय-<noinclude></noinclude>
3eyinoi7ovpuicchju1yxwjyr5yh6is
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/२४
104
111082
233426
2026-07-22T05:33:03Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233426
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१९)}}</noinclude>क्षेत्र अगदी भिन्न आहेत. त्यांचा असा घोंटाळा करणं बरोबर नाहीं. मानवशास्त्र ही खालची आणि समाजशास्त्र ही त्यावरील पायरी आहे.<br>{{gap}}समाजशास्त्र, त्याच्या बरोबरीचीं शास्त्रे आणि त्याजवर अवलंबून असणारी शास्त्रे यांजबद्दल आतां अधिक विचार न करितां समाजशास्त्राचे शोध ज्या पद्धतीनें लावितात, त्या पद्धतीसंबंधानें आपण थोडा विचार करूं. शास्त्रीय शोध करण्याच्या सामान्यतः ज्या दोन पद्धति आहेत त्यांस आगामी आणि निगामी अशीं नांवें देतां येतील. आगामी पद्धतीलाच भौमितिक पद्धति असें दुसरें नांव देतां येईल. कांहीं गोष्टी गृहीत धरून त्यांपासून केवळ विचारशक्तीच्या साहाय्यानें सिद्धांत शोधून काढण्याची जी पद्धत तिला आगामी अथवा भौमितिक पद्धत असें म्हणतात. भूमितीचीं प्रमेयें अशींच केवळ व्याख्या आणि गृहीत गोष्टी यांच्या साहाय्यानें काढिलेलीं असतात. ती काढण्यास इतर गोष्टींच्या मदतीची अवश्यकता नसते. पैसा मिळविणें हेंच मनुष्याचें इतिकर्तव्य आहे हे सत्य, तसेंच सार्वत्रिक चढाओढीचे तत्व, व प्रत्येक मनुष्य आपलें हितानहित जाणतो हे तत्व, ही सर्व गृहीत धरून कांहीं अर्थशास्त्रज्ञांनीं आपलीं प्रमेयें सिद्ध केलीं. व म्हणून अर्थशास्त्राच्या सिद्धांतांचा पडताळा व्यवहारांत पडेना. तेव्हां प्रत्यक्ष समाजांत दृष्टीस न पडणाऱ्या गोष्टी गृहीत धरून अर्थशास्त्री जेव्हां मनुष्याच्या वर्तनासंबंधाने अगदींच चमत्कारिक सिद्धांत काढू लागले, तेव्हां ही पद्धत अगदी कुचकामाची ठरली. लौकरच सदर शास्त्राचे शोध निगामी अथवा ऐतिहासिक पद्धतीने करण्याचा उपक्रम झाला. ह्या पद्धतीनें कोणत्याही एका कार्याची मीमांसा करावयाची म्हणजे तें कार्य ज्या ज्या कारणांमुळे घडून आले असेल त्या सर्व कारणांचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करून आणि पूर्व कालीं तसल्याच कारणांनी<noinclude></noinclude>
1f61sxz6yi9tzyw5mlcsqd1bet48cji
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/२५
104
111083
233427
2026-07-22T05:36:51Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233427
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(२०)}}</noinclude>तेच कार्य घडल्याचा पडताळा पाहून उपपत्ति बसवावयाची आणि एखादा सिद्धांत काढावयाचा असें असतें. प्रमेयें याच निगामी अथवा ऐतिहासिक पद्धतीनें काढतात.<br>{{gap}}आतां ह्या शास्त्राच्या योग्यतेविषयींचा शेवटचा प्रश्न आपण विचारांत घेऊं. कोणत्याही गोष्टीची योग्यता तिच्या उपयुक्ततेवर ठरविणाऱ्या ह्या काळांत समाजशास्त्राची योग्यता ठरवितांना त्याचा उपयोग काय हें आपण पाहिलें पाहिजे. अर्थात् समाजशास्त्राचा अभ्यास केल्यापासून काय फायदे आहेत. हे आपण पाहिलें पाहिजे. तत्वज्ञानासंबंधानें एकदां हाच प्रश्न ॲरिस्टॉटलला विचारण्यांत आला होता; तेव्हां तो म्हणाला, "समजा कीं, तत्वज्ञान शिकल्यापासून कांहीं फायदा नाहीं; तरी पण मानवी बुद्धीचें एक सुंदर फळ आणि सृष्टीचें गूढ तत्व शोधून काढल्याबद्दल मानवी मनाचे समाधान करणारें एक साधन या दृष्टीने असणारी त्याची स्वाभाविक योग्यता कांहीं कमी नाहीं." "व्यवहारामध्यें तत्वज्ञानाचा काय उपयोग आहे?" असा दुसरा एक प्रश्न एकानें त्याला विचारला, तेव्हां तो म्हणाला - "मनुष्याच्या मनांत स्वतःसंबंधानें आणि सृष्टीसंबंधानें जे अनेक प्रश्न उद्भवतात त्यांचें समाधानकारक उत्तर त्यास मिळणें जरूर आहे. तत्वज्ञान हे उत्तर देतें म्हणून त्याची अवश्यकता आहे. शिवाय जगाचीं गूढ तत्वें उकलून आपला व त्याचा कसा संबंध आहे तें आपणांस कळलें म्हणजे त्याचा परिणाम आपल्या वर्तनावर घडतो." हा तत्वज्ञानापासून होणारा विशेष महत्वाचा व्यावहारिक उपयोग आहे. समाजशास्त्रासंबंधानेंही आपणांस असेंच म्हणतां येईल. व्यावहारिक दृष्टीने त्याचा कांहींच उपयोग नाहीं असें मानिलें तरी अंतःकरणांत विचारशक्ति जागृत होऊन जे अनेक प्रश्न उद्भवतात त्यांचे विचारपूर्वक उत्तर देण्याचे काम समाजशास्त्र करीत<noinclude></noinclude>
7wqcmfj4lsd5qpbzmdp9gdwf3tmfsko
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/२६
104
111084
233444
2026-07-22T16:20:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233444
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|२१}}</noinclude>असल्यामुळे शास्त्र ह्या दृष्टीनें त्याचे महत्व त्याला आहेच. पण व्यवहारांतही या शास्त्राचा मोठा उपयोग आहे. विशेषतः आम्हां हिंदी लोकांना तर सध्यां समाजशास्त्राचा जास्तच उपयोग आहे.<br>{{gap}}कारण गेल्या शंभर वर्षांत ह्या देशाच्या एकंदर परिस्थितीत भराभर किती तरी महत्वाचे बदल झाले आहेत व होत आहेत. तसेंच राजसत्तेत केवढी उलटापालट झाली आहे हें आपण सर्व जाणतच आहां. ह्या विस्तीर्ण देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोंकापर्यंत सुधारलेल्या ब्रिटिशसरकारचें एकछत्री राज्य झाल्यामुळें राजकीय दृष्ट्या तरी आतां हा प्रचंड देश, एक होऊन येथील समाजापुढे अगदीं नवीनच प्रश्न येऊन उभे राहिले आहेत. तारायंत्र, पोस्टाची पद्धति, आगगाड्या वगैरेसारख्या शेंकडा अर्वाचीन दळणवळणाच्या साधनांनीं ह्या देशांतील मोठमोठाल्या नद्या आणि अवाढव्य पर्वत यांच्या आडकाठ्या पार नाहींशा होऊन हा देश निव्वळ नांवानें नव्हे तर आतां परमार्थतः एक झाला आहे. अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत आम्हाला ह्याच्या एका टोकापासून निघून दुसऱ्या टोकाला सहज जातां येतें. ह्या दृश्य बदलाप्रमाणेंच पण त्याहून विशेष महत्वाचे असे अनेक अदृश्य बदलही आमच्या मानसिक स्थितींत झालेले आहेत. आम्हांला पाश्चात्य शिक्षणाची जोड बहुतेक कायमचीच झाल्यामुळे आम्हांमध्यें नवे विचार, नव्या कल्पना, नवीन भावना आणि नवी दृष्टि यांचा प्रादुर्भाव होऊन आमच्या समाजाची जुनी घडी मोडत चालली आहे. नवीन प्राप्त झालेल्या ह्या अंतर्बाह्य सुधारणेचा ओघ इतका जबरदस्त आहे कीं, आमची इच्छा असो वा नसो त्यामुळें आमची अंतर्बाह्य सामाजिक परिस्थिति सारखी बदलत चालली आहे. अशा वेळीं आपणाला जर सामाजिक स्थित्यंतराची कारणें, नियम आणि त बरोबर माहिती नसतील; सामाजिक ध्येय काय<noinclude></noinclude>
bcei99eb7el9m7xnn9vj41g6h54t8w4
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/२७
104
111085
233445
2026-07-22T16:23:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233445
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(२२)}}</noinclude>असावें याची जर बरोबर कल्पना नसेल, दुसऱ्या देशांत अशा प्रकारच्या स्थित्यंतराचे परिणाम काय झाले आहेत याचें जर आपण लक्षपूर्वक अवलोकन केलेले नसेल तर हा जबरदस्त ओघ आपणाला झपाट्यानें वाहून नेऊन आपली दिशाभूल करील आणि आपणाला भलतीकडेच नेईल. म्हणून आपण सामाजिक विषयाची सोपपत्तिक मीमांसा करणाऱ्या समाजशास्त्राचा अभ्यास विचारपूर्वक केला पाहिजे. एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखविल्याने त्या उभयतांनाही खाड्यांत पडण्याचा प्रसंग येतो हें नव्याने सांगण्याची जरूरी नाहीं. असा प्रसंग येऊन जगांत आपलें हंसें होऊं नये अशी जर इच्छा असेल, तर आपल्या समाजाची योग्य वेळी काळजी घेण्याकरितां समाजशास्त्राच्या तत्वांचें अध्ययन आपण केलें पाहिजे आणि नंतर त्याला अनुसरून वागले पाहिजे म्हणजे आमची फसगत न होतां योग्य मार्गानें आमची प्रगतिच होईल, ज्या सुधारणेच्या ओघांत तूर्त आपण सांपडलों आहोंत तो ओघ आपण चुकीच्या मार्गाकडे ओढीत आहे असें जर समाजशास्त्र सांगेल तर त्याचा वेळीच प्रतिकार करून आपणांसच योग्य दिशा स्वीकारतां येईल. तेव्हां समाजशास्त्राची तत्वे समजावून घेऊन आणि सुधारणेच्या ओघाला इष्ट वळण देऊन हे सर्व बदल आपल्या कल्याणाकरितांच होतील असे करणे इष्ट आहे. जसा एखादा माळी, पाटाचें पाणी हवें तसें वळवून आपली बाग सर्वांग सुंदर करितो त्याचप्रमाणें आपण हा सुधारणेचा ओघ समाजशास्त्राच्या नियमांचें योग्य निरीक्षण करून आपणांस हवा तसा वळवून घेतला पाहिजे व त्याच्या द्वाराने आपली आणि आपल्या समाजाची उन्नति करून घेतली पाहिजे. विचारी माणसे या नात्यानें आपलें हेंच खरे कर्तव्य आहे हें कोणीही कबूल करील, आणि तें योग्य वेळीं बजावण्यास परमश्वेर आपणांला बुद्धि देवो असें इच्छून मी आपले आजचें व्याख्यान पुरे करतो.<br><br>{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
5815hxvzfo1m361pqa67bglg2z5k792
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/२८
104
111086
233447
2026-07-22T16:28:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233447
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{x-larger|'''व्याख्यान २ रे.'''}}}}
{{center|( ता. १५ सप्टेंबर सन १९१३.)}}
{{rule|5em}}
{{center|'''समाजशास्त्रांतील कांहीं प्रमेयें.'''}}
{{gap}}आज समाजशास्त्रांतील कांहीं प्रमेयांचा विचार करण्याचा बेत आहे. या दृष्टीने पाहिले म्हणजे प्राक्शास्त्रकाल व शास्त्रोत्तरकाल असे प्रथमतः दोन भाग पडतात व शास्त्रोत्तर कालांत स्पेन्सरपर्यंतच्या काळाचा एक विभाग व स्पेन्सरपासून आजतागाईत काळाचा एक विभाग असे दोन विभाग पडतात. या तीन भागांपैकी आजच्या व्याख्यानांत पहिल्या दोन कालांत ज्ञात झालेल्या प्रमेयांचा व सिद्धांतांचा विचार करावयाचा आहे. प्रथमतः आपण ग्रीक तत्त्वज्ञान्यांकडे वळू.<br>{{gap}}प्लेटोच्या 'प्रजासत्तात्मक राज्य' या ग्रंथांत प्लेटोनें समाजशास्त्रांतील एक मूलभूत प्रश्नच उपस्थित केला आहे. 'समाज हा कसा अस्तित्वांत आला?' या प्रश्नाचं उत्तर देतांना प्लेटोनें समाजांतील एका महत्वाच्या तत्वाचा उल्लेख केला आहे. हें तत्व म्हणजे श्रमविभागाचें तत्व होय. प्लेटोचें म्हणणें असें आहे कीं, मनुष्यप्राण्याला पुष्कळ गरजा व वासना असतात. या सर्व गरजा व वासना त्याला एकट्याला भागविणें अशक्य असतें. पण एक मनुष्य जर एकाच व्यवसायांत गुंतन काम करूं लागला तर तो पुष्कळांच्या गरजा व वासना भागवू शकतो. याप्रमाणे निरनिराळ्या व्यवसायांच्या व्यक्ती एकत्र होऊन समाज बनतो. अर्थात् निवळ शेतकऱ्यांचा, निवळ चांभारांचा, निवळ सुतारांचा. समाज बनूं शकत नाहीं; तर हे<noinclude></noinclude>
r9rp7myagwkif35udb42g19504wjmzl
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/२९
104
111087
233448
2026-07-22T16:33:09Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "निरनिराळे व्यवसायबंधु मिळून समाज अस्तित्वांत येतो. याप्रमाणें मानवी वासना व परस्परसहायकारिता या कारणांनी समाज बनतो. यालाच प्लेटोनें श्रमविभाग असे म्हटलें आहे. याच तत्वाचा अर्..."
233448
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{center|(२४)}}</noinclude>निरनिराळे व्यवसायबंधु मिळून समाज अस्तित्वांत येतो. याप्रमाणें मानवी वासना व परस्परसहायकारिता या कारणांनी समाज बनतो. यालाच प्लेटोनें श्रमविभाग असे म्हटलें आहे. याच तत्वाचा अर्वाचीन काळांत ॲडॅमस्मिथने अर्थशास्त्रांतील संपत्तीचें एक प्रमुख कारण म्हणून शोध लावला. पण प्लेटोला हें तत्व पूर्णपणे माहीत होतें व त्या तत्वाचा उपयोग त्याने निवळ संपत्तीच्या उत्पत्तीकडे न दाखवितां त्याचा उपयोग समाजस्थापनेंत कसा होतो हें दाखविलें आहे. प्लेटोनें ज्या आदर्शरूप समाजाचें चित्र आपल्या ग्रंथांत दिले आहे त्या समाजाची रचनाच या श्रमविभागाच्या पायावर केली आहे. समाज व्यवस्थित रीतीने चालण्यास समाजांतील निरनिराळीं कामें त्या त्या कामाला अनुरूप गुण असणाऱ्या लोकांनीं केली पाहिजेत व ज्याचे काम जो तो आस्थेने व कर्तव्यनिष्ठेनें करूं लागला म्हणजे सर्व समाज सुरळित चालेल व अशा समाजाचा कधीही नाश होणार नाहीं व तो आदर्शवत् उत्तम समाज राहील असें प्लेटोने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या विवेचनांत प्लेटोनें आपली चतुर्वर्णाची कल्पना आणिली आहे. पण याचा उल्लेख पुढील एका व्याख्यानांत करावयाचा आहे, तेव्हां सध्यां येथें जास्त विस्तार नको. प्लेटोनें उपस्थित केलेला प्रश्न समाजशास्त्रांतील एक प्रमुख प्रश्न असून त्यानें स्थापित केलेले श्रमविभागाचें तत्व हे एक फार महत्वाचें सामाजिक तत्व आहे यांत कांहींएक शंका नाहीं. वा तत्वाच्या समाजशास्त्राच्या एका शाखेत- अर्थशास्त्रांत- फारच मोठा उपयोग आहे हें सर्व विश्रुतच आहे. तसेंच जातिभेद, वर्णभेद किंवा वर्गभेद या ज्या समाजरचनेच्या निरनिराळ्या घटना त्यांमध्येही या तत्वाचा उपयोग आहे हें आपल्या ध्यानांत येईल. पण प्लेटोला समाजघटनेस कुटुंबाची किती अवश्यकता आहे याची चांगलीशी कल्पना नव्हती. यामुळे<noinclude></noinclude>
18rxcfxvgqvgvtddfm4jsx4sf42hk3q
233449
233448
2026-07-22T16:34:00Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233449
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(२४)}}</noinclude>निरनिराळे व्यवसायबंधु मिळून समाज अस्तित्वांत येतो. याप्रमाणें मानवी वासना व परस्परसहायकारिता या कारणांनी समाज बनतो. यालाच प्लेटोनें श्रमविभाग असे म्हटलें आहे. याच तत्वाचा अर्वाचीन काळांत ॲडॅमस्मिथने अर्थशास्त्रांतील संपत्तीचें एक प्रमुख कारण म्हणून शोध लावला. पण प्लेटोला हें तत्व पूर्णपणे माहीत होतें व त्या तत्वाचा उपयोग त्याने निवळ संपत्तीच्या उत्पत्तीकडे न दाखवितां त्याचा उपयोग समाजस्थापनेंत कसा होतो हें दाखविलें आहे. प्लेटोनें ज्या आदर्शरूप समाजाचें चित्र आपल्या ग्रंथांत दिले आहे त्या समाजाची रचनाच या श्रमविभागाच्या पायावर केली आहे. समाज व्यवस्थित रीतीने चालण्यास समाजांतील निरनिराळीं कामें त्या त्या कामाला अनुरूप गुण असणाऱ्या लोकांनीं केली पाहिजेत व ज्याचे काम जो तो आस्थेने व कर्तव्यनिष्ठेनें करूं लागला म्हणजे सर्व समाज सुरळित चालेल व अशा समाजाचा कधीही नाश होणार नाहीं व तो आदर्शवत् उत्तम समाज राहील असें प्लेटोने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या विवेचनांत प्लेटोनें आपली चतुर्वर्णाची कल्पना आणिली आहे. पण याचा उल्लेख पुढील एका व्याख्यानांत करावयाचा आहे, तेव्हां सध्यां येथें जास्त विस्तार नको. प्लेटोनें उपस्थित केलेला प्रश्न समाजशास्त्रांतील एक प्रमुख प्रश्न असून त्यानें स्थापित केलेले श्रमविभागाचें तत्व हे एक फार महत्वाचें सामाजिक तत्व आहे यांत कांहींएक शंका नाहीं. वा तत्वाच्या समाजशास्त्राच्या एका शाखेत- अर्थशास्त्रांत- फारच मोठा उपयोग आहे हें सर्व विश्रुतच आहे. तसेंच जातिभेद, वर्णभेद किंवा वर्गभेद या ज्या समाजरचनेच्या निरनिराळ्या घटना त्यांमध्येही या तत्वाचा उपयोग आहे हें आपल्या ध्यानांत येईल. पण प्लेटोला समाजघटनेस कुटुंबाची किती अवश्यकता आहे याची चांगलीशी कल्पना नव्हती. यामुळे<noinclude></noinclude>
n7dwshgrch4ecem86cys0qrrndzwzuj
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/३०
104
111088
233450
2026-07-22T16:35:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ (२४) निरनिराळे व्यवसायबंधु मिळून समाज अस्तित्वांत येतो. याप्र- माणें मानवी वासना व परस्परसहायकारिता या कारणांनी समाज बनतो. यालाच प्लेटोनें श्रमविभाग असे म्हटलें आहे. याच..."
233450
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
(२४)
निरनिराळे व्यवसायबंधु मिळून समाज अस्तित्वांत येतो. याप्र- माणें मानवी वासना व परस्परसहायकारिता या कारणांनी समाज बनतो. यालाच प्लेटोनें श्रमविभाग असे म्हटलें आहे. याच तत्वाचा अर्वाचीन काळांत अॅडॅमस्मिथने अर्थशास्त्रांतील संपत्तीचें एक प्रमुख कारण म्हणून शोध लावला. पण प्लेटोला हें तत्व पूर्णपणे मा- हीत होतें व त्या तत्वाचा उपयोग त्याने निवळ संपत्तीच्या उत्पत्तीकडे न दाखवितां त्याचा उपयोग समाजस्थापनेंत कसा होतो हें दाख- विलें आहे. प्लेटोनें ज्या आदर्शरूप समाजाचें चित्र आपल्या ग्रंथांत दिले आहे त्या समाजाची रचनाच या श्रमविभागाच्या पायावर केली आहे. समाज व्यवस्थित रीतीने चालण्यास समाजांतील निरनिराळीं कामें त्या त्या कामाला अनुरूप गुण असणाऱ्या लोकांनीं केली पाहिजेत व ज्याचे काम जो तो आस्थेने व कर्तव्य- निष्ठेनें करूं लागला म्हणजे सर्व समाज सुरळित चालेल व अशा समाजाचा कधीही नाश होणार नाहीं व तो आदर्शवत् उत्तम समाज राहील असें प्लेटोने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या विवेचनांत प्लेटोनें आपली चतुर्वर्णाची कल्पना आणिली आहे. पण याचा उल्लेख पुढील एका व्याख्यानांत करावयाचा आहे, तेव्हां सध्यां येथें जास्त विस्तार नको. प्लेटोनें उपस्थित केलेला प्रश्न समाजशास्त्रांतील एक प्रमुख प्रश्न असून त्यानें स्थापित केलेले श्रमविभागाचें तत्व हैं एक फार महत्वाचें सामाजिक तत्व आहे यांत कांहींएक शंका नाहीं. वा तत्वाच्या समाजशास्त्राच्या एका शाखेत- ८. अर्थशास्त्रांत फारच मोठा उपयोग आहे हें सर्व विश्रुतच आहे. तसेंच जातिभेद, वर्गभेद किंवा वर्गभेद या ज्या समाजरचनेच्या निरनिराळ्या घटना त्यांमध्येही या तत्वाचा उपयोग आहे हें आपल्या ध्यानांत येईल. पण प्लेटोला समाजघटनेस कुटुंबाची किती अवश्यकता आहे याची चांगलीशी कल्पना नव्हती. यामुळे
-<noinclude></noinclude>
ajzlr8h5ng9njm3ggxmnwvt5zs6hep7
233452
233450
2026-07-22T16:42:44Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233452
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(२५)}}</noinclude>त्यानें आपल्या आदर्शरूप समाजांत श्रमविभागांवर समाजाची घटना केली खरी; तरी पण त्यानें कुटुंब ही संस्थाच नाहींशी केली. च त्याच्या मनानें असें घेतलें होतें कीं, माणसें समाजहिताकडे जें दुर्लक्ष करतात तें त्यांचें लक्ष कुटुंबाकडे जाते म्हणून होय. तेव्हां जर आपण मनुष्याच्या प्रेमस्थानाला कुटुंब हा विषय राहूंच दिला नाहीं तर मनुष्याची वृत्ति 'वसुधैव कुटुंबकम्' अथवा ग्रीक कल्पनेप्रमाणें 'नगरेव कुटुंबकम्' अशी बनेल; व अशी अकुटुंब माणसे आपलें सर्व तनमनधन नगराकरितां किंवा देशाकरितां अर्पण करतील. अशा समजुतीनें प्लेटोनें आपल्या आदर्शरूप समाजाचे श्रमविभागाच्या व गुणकर्माच्या तत्वावर चारच वर्ग केले व अशी समाजघटना उत्तम असे दाखविण्याचा प्रयत्न केला व आपआपल्या कर्तव्याप्रमाणें जर सर्व वर्गांतील लोक वागतील तर समाज सुव्यवस्थितपणानें चालेल व समाजाची घडी केव्हाही बिघडणार नाहीं. तरी याप्रमाणे समाजांतील वर्गांनीं वागावें असें प्लेटोनें मोठ्या कंठरवानें सांगितलें आहे. प्लेटोने आपल्या प्रजासत्ताक राज्यांत कुटुंब या संस्थेस फांटा दिला आहे. पण समाज चालण्यास प्रजाजनन अवश्यक आहे. या प्रजाजननाची त्यानें 'दारासुतसाधारण्याच्या' कल्पनेने सोय केलेली आहे. तसेंच ज्याला अर्वाचीनकाळीं सुप्रजानिर्माणशास्त्र म्हणतात त्याच्या तत्वाचाही प्लेटोनें या ठिकाणी विचार केला आहे व तो करीत असतांना स्त्रीपुरुषाच्या लग्नाची योग्य मर्यादा ठरविली आहे. ती विवाहाच्या आपल्या समाजांतील वादग्रस्त प्रश्नाच्या दृष्टीनें ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. प्लेटोच्या मतें स्त्रीपुरुषांच्या शरीराची व मनाची पूर्ण वाढ झाल्यानंतरच त्यांनी प्रजाजननाच्या कामाला लागावें व ही वयाची मर्यादा म्हणजे पुरुषास २५ व बायकांस २० ही होय. या वयांत त्यांची सर्वाङ्गीण वाढ पुरी होते व या वयानंतर स्त्रीपुरुषाचा विवाह होणें योग्य आहे. सारांश, प्लेटोच्या<noinclude></noinclude>
iofsh8ie529i9vct7ihze4epk1h94uk
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/३१
104
111089
233451
2026-07-22T16:35:52Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ (२४) निरनिराळे व्यवसायबंधु मिळून समाज अस्तित्वांत येतो. याप्र- माणें मानवी वासना व परस्परसहायकारिता या कारणांनी समाज बनतो. यालाच प्लेटोनें श्रमविभाग असे म्हटलें आहे. याच..."
233451
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
(२४)
निरनिराळे व्यवसायबंधु मिळून समाज अस्तित्वांत येतो. याप्र- माणें मानवी वासना व परस्परसहायकारिता या कारणांनी समाज बनतो. यालाच प्लेटोनें श्रमविभाग असे म्हटलें आहे. याच तत्वाचा अर्वाचीन काळांत अॅडॅमस्मिथने अर्थशास्त्रांतील संपत्तीचें एक प्रमुख कारण म्हणून शोध लावला. पण प्लेटोला हें तत्व पूर्णपणे मा- हीत होतें व त्या तत्वाचा उपयोग त्याने निवळ संपत्तीच्या उत्पत्तीकडे न दाखवितां त्याचा उपयोग समाजस्थापनेंत कसा होतो हें दाख- विलें आहे. प्लेटोनें ज्या आदर्शरूप समाजाचें चित्र आपल्या ग्रंथांत दिले आहे त्या समाजाची रचनाच या श्रमविभागाच्या पायावर केली आहे. समाज व्यवस्थित रीतीने चालण्यास समाजांतील निरनिराळीं कामें त्या त्या कामाला अनुरूप गुण असणाऱ्या लोकांनीं केली पाहिजेत व ज्याचे काम जो तो आस्थेने व कर्तव्य- निष्ठेनें करूं लागला म्हणजे सर्व समाज सुरळित चालेल व अशा समाजाचा कधीही नाश होणार नाहीं व तो आदर्शवत् उत्तम समाज राहील असें प्लेटोने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या विवेचनांत प्लेटोनें आपली चतुर्वर्णाची कल्पना आणिली आहे. पण याचा उल्लेख पुढील एका व्याख्यानांत करावयाचा आहे, तेव्हां सध्यां येथें जास्त विस्तार नको. प्लेटोनें उपस्थित केलेला प्रश्न समाजशास्त्रांतील एक प्रमुख प्रश्न असून त्यानें स्थापित केलेले श्रमविभागाचें तत्व हैं एक फार महत्वाचें सामाजिक तत्व आहे यांत कांहींएक शंका नाहीं. वा तत्वाच्या समाजशास्त्राच्या एका शाखेत- ८. अर्थशास्त्रांत फारच मोठा उपयोग आहे हें सर्व विश्रुतच आहे. तसेंच जातिभेद, वर्गभेद किंवा वर्गभेद या ज्या समाजरचनेच्या निरनिराळ्या घटना त्यांमध्येही या तत्वाचा उपयोग आहे हें आपल्या ध्यानांत येईल. पण प्लेटोला समाजघटनेस कुटुंबाची किती अवश्यकता आहे याची चांगलीशी कल्पना नव्हती. यामुळे
-<noinclude></noinclude>
ajzlr8h5ng9njm3ggxmnwvt5zs6hep7
233453
233451
2026-07-22T16:48:13Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233453
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(२६)}}</noinclude>मतानें शरीरानें व मनाने बळकट अशी प्रजा समाजाच्या सुस्थितीस अवश्यक आहे व समाजांतील चाली व निर्बंध अशा वाढीस अनुकूल असेच पाहिजेत. प्लेटोच्या समाजशास्त्रांतील मतांचें एवढें दिग्दर्शन पुरे आहे. आतां ॲरिस्टॉटलच्या मतांकडे वळू.<br>{{gap}}प्लेटोनें समाजाच्या उत्पत्तीचा प्रश्न उपस्थित केला तर ॲरिस्टॉटलने समाजाच्या उत्क्रांतीचा व वाढीचा प्रश्न उपस्थित केला व या प्रश्नाचें उत्तर ॲरिस्टॉटलनें आपल्या विकासतत्वाच्या अनुरोधानें दिलें. ॲरिस्टॉटलच्या मतें सर्व विश्वांत विकासतत्व दृष्टोत्पत्तीस येतें. म्हणजे बीजापासून ज्याप्रमाणें वृक्ष व्हावा त्याप्रमाणे सर्व विश्व मूलतत्वापासून विकास पावून सद्यःस्थितीला आलेले आहे. हे तत्व ॲरिस्टॉट्लनें मनुष्य व समाज यांसंबंधींच्या प्रश्नाला लागू केलें आहे. ॲरिस्टॉटलचे यासंबंधींचे विचार त्याच्या राजनीति या ग्रंथांत आलेले आहेत. प्रथमतः ॲरिस्टॉलट्नें प्लेटोच्या 'दारासुतसाधारण्याच्या' कल्पनेवर कडक टीका केली आहे. ॲरिस्टॉटलच्या मतें मनुष्य हा कुटुंब करून रहणारा प्राणी आहे. तेव्हां कुटुंब या संस्थेचा नाश करून कधींही चालणार नाहीं. समाजाचे घटक व्यक्ति नव्हेतच. निवळ व्यक्ति मिळून समाज कधींच होऊं शकणार नाहीं. तेव्हां कुटुंब समाजाचें बीज आहे.<br>{{gap}}आतां कुटुंबाचे घटकावय व म्हणजे मुख्यतः पतिपत्नी हे होत. पण या संबंधापासून अपत्यलाभ होतो व ह अपत्यें सज्ञान होईपर्यंत कुटुंबांतच असतात व तींही कुटुंबाच्या अवश्यक घटकापैकींच आहेत. तसेंच ग्रीक कुटुंबांत घरकामाला कमी जास्ती गुलाम हे नेहमी असत; म्हणून गुलामही कुटुंबाचे एक प्रकारचे घटकायवच आहेत असें ॲरिस्टॉटलनें म्हटलें आहे; सारांश, कुटुंब म्हटलें कीं, त्यांत पतिपत्नी, पितापुत्र व सेव्यसेवक, असे संबंध<noinclude></noinclude>
8eba2mbjzdj1syvggpaj5jj8qugnc20
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/३२
104
111090
233454
2026-07-22T16:51:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233454
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(२७)}}</noinclude>दृष्टोत्पत्तीस येतात. अर्थात् कुटुंबही एक समाजाचें सूक्ष्म स्वरूप आहे व म्हणून ॲरिस्टॉलट्नें त्याला बीजरूप समाज म्हटलें आहे. तेव्हां कुटुबाचा नाश करणें म्हणजे समाजाच्या बीजाचाच नाश करण्यासारखे आहे. नंतर ॲरिस्टॉटलनें समाजाचा विकास कोणत्या पायऱ्यांनी होतो याबद्दल ऊहापोह केला आहे. त्याचे मतें मनुष्यप्राणी हा कुटुंब करून राहणारा प्राणी आहे. तेव्हां तो एकटा कधींच राहत नाहीं. याच दृष्टीनें मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे अशी ॲरिस्टॉटलने मनुष्याची व्याख्या केली आहे. या ॲरिस्टॉट्लच्या मताचें प्रत्यंतर अर्वाचीन समाजशास्त्रज्ञाच्या ऐतिहासिक शोधावरून झालेले आहे. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ वेस्टरमार्क यानें असें सिद्ध केलें आहे कीं, अत्यंत रानटी समाजांत सुद्धां लग्न ही संस्था सुरू असते. मनुष्यप्राणी हा स्त्रीपुरुष संबंधाच्या बाबतींत पशूंप्रमाणें स्वैरव्यवहारी कधींही नसतो; तर त्याच्यामध्यें लग्नाची चाल सर्वत्र दिसून येतं. असो.<br>{{gap}}ॲरिस्टॉटलच्या मताने समाजाची उत्क्रांति खालील पायऱ्यांनी झालेली आहे. समाजाची पहिली व अपृथक्ककरणीय पायरी म्हणजे कुटुंब होय. दुसरी पायरी खेडें होय. कारण खेडें म्हणजे निरनिराळ्या कुटुंबांचा समुदाय मिळून होतें. पुष्कळशी कुटुंबे एकत्र राहूं लागलीं व त्यांचा परस्परांशी संबंध येऊन जो एक समाज तयार होतो त्याला खेडे किंवा गांव म्हणतात. कुटुंबांत पतिपत्नी पितापुत्र व सव्यसेवक इतके तीन संबंध अस्तित्वांत असतात; पण गांवांत यापेक्षां पुष्कळच जास्त संबंध अस्तित्वांत येतात. येथें श्रमविभाग उत्पन्न होतो. निरनिराळीं कुटुंबे निरनिराळे धंदे करतात; कांहीं शेतकी करतात; कांहीं सुतारकी करतात; कांहीं चांभार होतात. असे निरनिराळे धंदे अस्तित्वांत येतात व या समाजांत संपत्ति उत्पन्न होऊं लागते व राज्यव्यवस्था उत्पन्न होते. यालाच<noinclude></noinclude>
r3gqm8hywkxk7flyp0rzgielx7fm57j
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/३३
104
111091
233455
2026-07-22T16:54:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233455
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(२८)}}</noinclude>ग्रामसंस्था म्हणतात. याच्या पुढली व ॲरिस्टॉटलच्या मते समाजाच्या वाढीची शेवटची पायरी म्हणजे नगर ही होय. आतां नगर म्हणजे पुष्कळ गांवांचा समुदाय होय. या नगरांत समजांतील सर्व व्यवस्था उत्पन्न होतात. राजा किंवा प्रजा हा संबंध उत्पन्न होतो. नगर हे एक स्वतंत्र राष्ट्रच असावें व या नात्यानें कायदेकानु, सैन्य, आरमार, शिक्षणसंस्था, न्यायाची पद्धति, व्यापार-धंदा, कलाकौशल्य या सर्वांचा प्रादुर्भाव होतो; सारांश, गुंतागुंतीच्या व्यवहाराचा समाज अस्तित्वांत येतो. ग्रीक तत्वज्ञान्यांची काय किंवा ग्रीसमधील सामान्य जनाची काय मजल नगरसंस्थांच्या पलीकडे गेली नव्हती. हल्लींच्या राष्ट्राची किंवा देशाची कल्पना ग्रीक लोकांस नव्हती. त्यांचें राजकीय ध्येय नगराच्या पलीकडे गेलें नाहीं. यामुळें ग्रीस देशाचें एकीकरण कधीही झालें नाहीं. ग्रीक देशांतील प्रत्येक नगर म्हणजे एक स्वयंसत्ताक राज्यच होतें व या नगरांच्या नेहमीं एकमेकांशी लढाया होत असत. यावरून राजकीय बाबतींत ॲरिस्टॉटलची कशी संकुचित दृष्टि होती हे दिसून येईल.<br>{{gap}}ॲरिस्टॉटलच्या समाजव्यवस्थेच्या कल्पनांत गुलामगिरी या संस्थेला कायमचें स्थान मिळालेलें होतें. त्याचे मताने मनुष्याची पूर्ण वाढ नगरसमाजांखेरीज व्हावयाची नाहीं व मनुष्याची मानसिक व शारीरिक वाढ होण्यास व त्याचे हातून समाजाचीं कामें योग्य प्रकारे होण्यास मनुष्यास पुष्कळ वेळ व फुरसत पाहिजे. अर्थात् मनुष्याच्या आवश्यक गरजा भागविण्याकरितां समाजांत गुलाम पाहिजेत व देवानेंही ग्रीकेतर लोकांमध्यें गुलामगिरीला योग्य अशाच प्रकारचे कनिष्ठ दर्जाचे गुण ठेविले आहेत. बुद्धिमत्ता, कर्तृत्व, कारभार करण्याची व देखरेख ठेवण्याची शक्ति; सारांश मनुष्यामधील जे उच्च दर्जाचे बौद्धिक व नैतिक<noinclude></noinclude>
t1xas4auti1lizocqy82mhh4skn7yn7
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/३४
104
111092
233456
2026-07-22T16:57:50Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233456
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(२९)}}</noinclude>गुण आहेत ते फक्त ग्रीक लोकांत आहेत व म्हणूनच ग्रीक लोक मात्र नागरिक- नगराचे घटक- होण्यास योग्य आहेत. बाकीचे जन्मतः गुलाम होत व गुलामगिरी ही ईश्वरकृत व म्हणूनच स्वाभाविक अशी संस्था आहे असे ॲरिस्टॉटलचे म्हणणे आहे. ग्रीक व रोमन समाजाच्या घटनेचा विशेष म्हणजे गुलामगिरीचा सार्वत्रिक प्रसार होय. सर्व खालच्या दर्जाचीं कामें, शेतीचीं कामें तसेंच कुटुंबांतील गृहकृत्यें हीं सर्व कामें गुलामांचीं असत व अशा तऱ्हेनें ही चाल सर्वव्यापी असल्यामुळे ॲरिस्टॉटलसारख्या तत्वज्ञान्यालासुद्धां ती स्वाभाविक व नित्य वाटली व म्हणून त्यानें गुलाम हा एक कुटुंबाच्या घटनेपैकीं एक अवश्य भागच आहे असें प्रतिपादन केलें. असो.<br>{{gap}}रोमन लोकांनीं वाङ्मय व शास्त्र यांच्या बाबतींत ग्रीक लोकांच्यापलीकडे मुळींच मजल मारिली नाहीं. त्यांच्या कायदेकारांनी फक्त कायदेशास्त्राची वाढ केली व त्यामध्ये नागरिक किंवा व्यक्ति व त्याचें नियंत्रण करणारी राजकीय संस्था यांचे परस्पर हक्क ठरविण्याचा प्रयत्न केला. परंतु यापलीकडे समाजशास्त्रासंबंधीं विशेष सांगण्यासारखे त्यांचे हातून झालें नाहीं. मागें सांगितलेच आहे की, युरोपांत ख्रिस्ति धर्माचा प्रसार झाल्यानंतर कोणत्याही विचारनिर्मित शास्त्राला वावच राहिला नाहीं. धर्म, कायदेकानु, नीतिबंधने, राजकीय संस्था या सर्व ईश्वरकृत असून नित्य आहेत व त्या पाळणे येवढेच मनुष्याचे कर्तव्य आहे असा सर्वत्र समज पसरल्यामुळे समाजशास्त्राचा विचार होणें अशक्यच झालें.<br>{{gap}}समाजशास्त्राची स्वतंत्रपणानें अस्तित्वांत आलेली व स्वतंत्र झालेली. शाखा जी अर्थशास्त्र तिचा जनक ॲडॅमस्मिथ यांच्या ग्रंथांत समाजाच्या स्थित्यंतरासंबंधी एक प्रमेय आलेलें आहे, त्याचा उल्लेख<noinclude></noinclude>
4e65hrubxxoovg34e4jw17mpt0b40pc
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/२७
104
111093
233464
2026-07-23T05:29:35Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( १५ ) लेखांक २. फलश्रुति सांगतांना तुलनात्मक पद्धतीचा विसर पडला कीं काय ! खगेंद्राचे सामर्थ्य अंगीं येईल, असा आशीर्वाद देखील दिल्यावर अधिक काय राहिलें १ राहिले असल्यास अत्युक्ती..."
233464
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( १५ )
लेखांक
२.
फलश्रुति सांगतांना तुलनात्मक पद्धतीचा विसर पडला कीं काय ! खगेंद्राचे
सामर्थ्य अंगीं येईल, असा आशीर्वाद देखील दिल्यावर अधिक काय राहिलें १
राहिले असल्यास अत्युक्तीचा दोष कबूल केल्यासारखे होत नाहीं काय ? अशा
अनेक शंका वाचकांच्या मनांत निःसंशय येतील. ह्मणून ऐतिहासिक पद्धति व
तुलनात्मक पद्धति यांच्या दृष्टीमधला भेद पहिल्याने स्पष्ट करून दाखविणें
अगत्याचे आहे.
ऐतिहासिक व तुलनात्मक पद्धती.
वाङ्मयाचे प्रकार किती, ते केव्हा व कसे उत्पन्न होतात, एकाच वेळीं
सर्व प्रकार का उत्पन्न होत नाहीत; त्यांनां अनुकूल व प्रतिकूल काळ
कोणते; उत्पत्ति, वाढ, पूर्णावस्था, स्थिति, लय, किंवा रूपांतर हे
हे दशांचे फेरे या प्रकारांना लागू पडतात की काय पडत असल्यास कितीसे,
व कां लागू पडतात; इत्यादि अनेक बोधक गोष्टींकडे ऐतिहासिक पद्धतिचें लक्ष
असते; व ज्याप्रमाणे वनस्पतिशास्त्राच्या चिकित्सेनें फुलांच्या सौंदर्यात, सुवासांत
मोहकपणांत कमतरता न येता उलट त्यांत भर पडते, त्याचप्रमाणे ऐतिहासिक
पद्धतीने वास्त्रयाची गोडी कमी न होतां ती जास्त वाढते. एकाच देशांत सर्व
प्रकारची सुंदर फुलें आढळणे अशक्य आहे. जगातील सर्व सुंदर फुले पहाव-
याची इच्छा बाळगल्यास ज्याप्रमाणें जग धुंडाळावें लागेल, त्याचप्रमाणे वास्य-
याची गोष्ट आहे. साहित्याच्या सर्व प्रकारांची पूर्ण आणि रमणीय स्वरूपें पहा-
ण्याची उमेद धरल्यास अनेक भाषांतील साहित्य चाळलें पाहिजे. जितकी हांव
असेल तितका प्रयत्न पाहिजे. सारांश, वाङ्मयाचा अभ्यास करण्यास तुलना-
त्मक पद्धति आवश्यक नाहीं. ज्याच्यात्याच्या आवडीवर अवलंबून आहे. पण
ज्यानां सारस्वताचे कट्टे भक्त व्हावयाचे असेल, ज्यांना आपली दृष्टि, आपले
विचार, विस्तृत करावयाची इच्छा असेल, या बहुरूपी जगत मानवांच्या
एकरूपतेचा थोडाबहुत अनुभव घेऊन विश्वबंधुत्वाची जाणीव उत्पन्न करावयाची
असेल, त्यांनमात्र तुलनात्मक पद्धतीचा अंगीकार केल्याशिवाय गत्यंतर नाहीं.<noinclude></noinclude>
h7du99x20zl5agxy455t7x0u7b3jhqi
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/२८
104
111094
233465
2026-07-23T05:29:54Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( १६ ) तुलनात्मक पद्धतीचा विचार करण्यापूर्वी ऐतिहासिक पद्धतीचा उपयोग करून दाखविणें अवश्य आहे. मराठी वाङ्मयाला ही पद्धत लावून दाखविल्यास कदाचित् ती वाचकांच्या मनावर चांगली ठसेल,..."
233465
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( १६ )
तुलनात्मक पद्धतीचा विचार करण्यापूर्वी ऐतिहासिक पद्धतीचा उपयोग करून
दाखविणें अवश्य आहे. मराठी वाङ्मयाला ही पद्धत लावून दाखविल्यास कदाचित्
ती वाचकांच्या मनावर चांगली ठसेल, ह्मणून त्याचेंच उदाहरण
घेऊन पाहू.
ऐतिहासिक पद्धतीचा उपयोग -- उदाहरणें.
मराठी वास्मय अजून जरी बाल्यावस्थेतच आहे, तरी आज तितके
प्रकार आपल्याला दिसतात, तितके पूर्वी नव्हते, हैं उघड आहे; कांहीं जुने, तर
कांहीं नवे आहेत. मराठी वाङ्मयाची सुरुवात केव्हांपासून झाली, हें जरी अजून
नक्की सांगतां येत नाहीं, तरी ज्ञानेश्वरी हा पहिला ग्रंथ मानण्यांची वहिवाट
आहे. हा ग्रंथ पर्यातहि नाहीं व गद्यांताई नाहीं. तो ओवीत लिहिलेला आहे
व धर्मविषयक आहे. आतां ज्ञानेश्वर चांगले विद्वान् असतांना त्यांनी गीतेवर
ओव्यांत टीका का लिहिली, याचा थोडातरी उलगडा करण्यास त्या वेळच्या
समाजाकडे, व त्यांच्या स्वतःच्या स्थित किड लक्ष देणें अवश्य आहे.
आद्य शंकराचार्यांनी बौद्धधर्माचा पाडाव केला, चार दिशांना चार मठांची
स्थापना केली, खालावलेल्या ब्राह्मणधर्मोत सुधारणा करून तो पुनः प्रचारांत
आणिला, पण त्यांच्यामागें परंपरा राहिली नाहीं. चार मठ झाल्यामुळे मूळापा.
सूनज धर्मव्यवस्था विस्कळित राहिली. एकाच्या ऐवजी चार आचार्य झाल्या-
मुळे धर्मगुरूचा अधिकार संकुचित झाला इतकेंच नव्हे, तर आज्ञेचा अंमल
करणारे मठांचे स्वतंत्र सेवक नसल्यामुळे, धर्मकृत्यें करविण्याचा अधिकार देण्या-
ची, किंवा काढून घेण्याची, सत्ता मठात नसल्यामुळे, व ब्राह्मणत्व जन्मानेंच मि-
ळत असल्यामुळे, आचार्योच्या सत्तेस जबरदस्त आळा बसत जाऊन
ब्रह्मवृंदांना फावलें. शिवाय, शंकराचार्यांच्या अद्वैतमताहून भिन्न व विरोधी
मर्ते प्रतिपादन करणारे सांप्रदाय त्यांच्या पश्चात् जोरावले. अंगचे
दोष, ब्राह्मणत्वाचा वारसाचा हक, यांनी मठांची व्यवस्था आधींच
कच्ची राहिलेली, आणि त्यांत या नव्या सांप्रदायांची भर पडली; ह्मणून
व्यवहारांत कोणत्याही मतांचा अंमल न होऊ देण्याचा सोईस्कर विचार
ब्राह्मणांना सुचला असावा, असें दिसतें. कसेंहि असो 'विप्रोऽयं श्वपचोऽ-
यमित्यपि महान्कोऽयं विभदभ्रमः ' ही गजनी त्यांनां ऐकूं येत नव्हती.<noinclude></noinclude>
fz93y94p9olmca9s2awpi6idfv2nc0o
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/२९
104
111095
233466
2026-07-23T05:30:19Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( १७ ) धर्माचा विसर पडून कर्म जास्त प्रिय होऊं लागलें होतें. जैन व बौद्ध या दोन्ही धर्मानी शिकविलेल्या धड्यांचा विसर पडत चालला होता कर्मठपणाचा पुनः अतिरेक झाला होता. बुद्धदेवांनी..."
233466
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( १७ )
धर्माचा विसर पडून कर्म जास्त प्रिय होऊं लागलें होतें. जैन व बौद्ध या दोन्ही
धर्मानी शिकविलेल्या धड्यांचा विसर पडत चालला होता कर्मठपणाचा पुनः
अतिरेक झाला होता.
बुद्धदेवांनीं आपला उपदेश संस्कृतभाषेत न करतां लोकांच्या जीवंत भाषेत,
प्राकृतांत केला होता. स्त्रीशूद्रांचा अव्हेर न करता त्यांना सारखेच अधिकार
मानिले होते. धर्मोपदेशाची भाषा नित्यव्यवहारांतलीच असल्यामुळे शिक्षणांत कृत्रिम
व्यत्यय नव्हते. पालीभाषेला मोठी योग्यता आली होती. बुद्धदेवांच्या मार्गे
त्यांची परंपरा बरीच कायम राहिल्यामुळे धर्मग्रंथ त्याच भाषेत झाले होते. देशभर
धर्मप्रसारासाठीं, शिक्षणप्रसारासाठी विहारांचें जाळे पसरलें होते; पण बुद्धधर्मा-
च्या लोपाबरोबर या सुस्थितीचाहि लोप झाला होता. शंकराचार्यांच्या सुधारणेनंतर
ब्राह्मणांनीं पुनः डोके वर उचलले. त्यांची आवडती वर्णव्यवस्था पुनः जोरावूं
लागली. स्त्रीशूद्रांचे समान अधिकार पुनः नाहींसे झाले. ब्राह्मणधर्माची भाषा
संस्कृत, म्हणून तिला पुनः विशेष महत्त्व आलें. लोकांची व धर्माची भाषा या
दोन झाल्यामुळे शिक्षण महाग झाले. नित्यव्यवहारांतली भाषा हलकी ठरली.
त्या भाषेत लिहिणे धाडसाचे होऊन बसलें.
अशी परिस्थिति असतांना देखील ज्ञानेश्वरांनी मराठीत ग्रंथ को लिहिला, यार्चे
कारण शोधुं लागल्यास, समाजाच्या अन्यायाचा व निष्ठुरपणाचा त्यांनां स्वतः-
लाच आलेला अनुभव, यांत सांपडेल. एकदा संन्यास घेतल्यानंतर त्यांच्या
वडिलांनी पुनः गृहस्थाश्रम स्वीकारला होता; व मग त्यांना संतति झाली होती.
पैठण त्याकाळी संस्कृत विद्येत नाणावलेले शहर असल्यामुळे, संन्याशाच्या
संततीने सर्वांना लागणारा काळिमा ब्राह्मणांनी धुवून टाकावयाचा होता, म्हणून
ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे यांनां त्यांनी वाळीत टाकलें होतें. त्यांना बराच जाच
सोसावा लागला होता. पुनः गृहस्थाश्रमांत येण्यापूर्वी त्यांच्या वडिलांनी गुरूची
परवानगी घेतली होती, तरी त्यानें धर्मकेसरीचे समाधान झालें नव्हतें. बापाच्या
कृत्यांबद्दल मुलांनां होणारा दंड पाहून, हा अन्याय आहे असें वाटून, नाडल्या
जाणान्या समाजांतील इतर व्यक्तीविषयीं, इतरवर्गांविषयीं, ज्ञानेश्वरांच्या मनांत
कळकळ उत्पन्न झाली असावी. शिवाय, या सुमारास पुनः कर्मठपणाचा कळस
झाला असल्यामुळे, नेहमींच्या धर्मकमौनी अंतःकरणाची भूक भागत बसल्यामुळे
मनाचा हुरहुर शांत करण्याचा एकादा उपाय पाहण्याकडे भाविकांचें लक्ष
२<noinclude></noinclude>
g4mulnn7hau1go44mgx1xndl5fasbw6
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/३०
104
111096
233467
2026-07-23T05:30:42Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( १८ ) लागलें होतें. भागवतधर्माचा प्रसार होऊं लागला होता. ह्मणून व्यवहारा- च्या भाषेत धर्मग्रंथांचें रूपांतर करण्याचा एक उपाय ज्ञानेश्वरांना सुचला असला पाहिजे. ह्मणूनच गीतेसारख..."
233467
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( १८ )
लागलें होतें. भागवतधर्माचा प्रसार होऊं लागला होता. ह्मणून व्यवहारा-
च्या भाषेत धर्मग्रंथांचें रूपांतर करण्याचा एक उपाय ज्ञानेश्वरांना सुचला
असला पाहिजे. ह्मणूनच गीतेसारखा सारभूत, सर्वमान्य ग्रंथ रूपांतराकरितां
त्यांनी पसंत केला असला पाहिजे. गीतेंत जरी फक्त भक्तियोगाचीच महती
गाइली नसली, तरी त्याला बरीच उंच पायरी दिली आहे. इतर ग्रंथांच्या मानानें
ाइतां, यज्ञयाग, मंत्रतंत्र यांना फार कमी महत्त्व दिलें आहे. व त्यामुळे
कर्मठपणाला आळा घालण्यास ज्ञानेश्वरांच्या मराठी टीकेनें बरीच मदत झाली
असली पाहिजे. सतराव्या शतकांत देखील, ह्मणजे ज्ञानेश्वरानंतर जवळ जवळ
चारशे वर्षांनंतर देखील भक्तिमार्गाचें मूळ गीतेंत पाहण्याची कशी रूढि होती,
हें रामदासांचा दासबोध वाचल्यास लक्षांत येईल. पहिल्याच दशकांत, आठव्या
समासांत, सभास्तवनाच्या आरंभी त्यांनी गीतेंतलें पुढील वचन आधार
म्हणून घेतलें आहे.--
6
नाऽहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ ।
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ||
नाहीं वैकुठींच्या ठाई। नाहीं योगियांच्या हृदई ।
माझे भक्त गाती ठाई ठाई । तेथें मी तिष्ठतु नारदा ॥ १ ॥
याकारणें सभाश्रेष्ठ । भक्त गाती तें वैकुंठ ।
नामघोषें घडघडाट । जयजयकारें गर्जति ॥ २ ॥
,
भक्त गाती तें बैकुंठ असे म्हटल्यानंतर अधिक काय राहिलें १ येथे
'सभा' याचे भाषांतर Congregation असें करायाचे, हे इंग्रजी जाणणारांस
सुचविल्यास वावगे होणार नाहीं. असो.
गीतेसारख्या सर्वमान्य ग्रंथाची निवड केल्यामुळे, आक्षेपकांची तोंडें बऱ्याच
अंशीं बंद झालीं असली पाहिजेत. ज्ञानेश्वरांनी संस्कृत ग्रंथ मराठीत आणण्याची
सुरवात एकदां केल्यावर पुराणादि इतर ग्रंथांची भाषांतरें हळुहळू होऊं लागलीं.
मराठी भाषेला मान मिळू लागला. शूद्रांनां पुनः थोडेसे अधिकार मिळू लागले.
समाजांत जोम दिसूं लागला. भागवतधर्म वाहू लागला. ज्ञानेश्वरांची भाषा जुनी
असल्यामुळे, त्यांची टीका थोडीशी समजावयाला कठिण होऊं लागली. पण
कनाथांच्या भागवतामुळे ही अडचण दूर झाली; इतकेंच नव्हे, तर हल्ली देखील<noinclude></noinclude>
g3ddea1buec67n3i2f5g8dv6o3oota5
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/३५
104
111097
233468
2026-07-23T05:36:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233468
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|३०}}</noinclude>करून समाजशास्त्राचा जनक कॉम्ट याने प्रतिपादित केलेल्या तत्वाकडे वळू.<Br>{{gap}}धनोत्पादक धंद्याची वाढ कसकशी होत जाते याचे प्रतिपादन करतांना ॲडम स्मिथने समाजाच्या विकासाची एक सांखळी तयार केली आहे ती अशी :- अत्यंत रानटी समाज हा मृगयावृत्ति समाज असतो. म्हणजे या समाजांतील सर्व व्यक्ति रानांतील पशु- पक्षी किंवा समुद्रांतील जलचर अशा प्राण्यांची शिकार करून आपली उपजीविका करतात. याच्या पुढची पायरी म्हणजे गोपालवृत्तिसमाज होय. या स्थितीत मनुष्य रानटी जनावरांना माणसाळण्याची कला अवगत करून घेतो व शेळ्यामेंढ्या, गाईम्हशी अशांसारख्या जनावरांचे कळप बाळगून त्यांवर आपली उपजीविका करतो. या दोन्ही समाजांच्या अवस्थांत लोकांना घरेदारें स्थावर इष्टेट यांची कल्पना नसते. शिकार करणाऱ्या माणसाला शिकार सांपडेल तिकडे भटकावें लागतें हे उघड आहे. तसेंच गोपालवृत्ति समाजांतही लोकांची एके ठिकाणीं स्थाईक वस्ति असू शकत नाहीं. एका ठिकाणीं गवत-चारा मुबलक आहे तेथपर्यंत असा समाज एके ठिकाणी असतो व तंबूसारख्या तात्पुरत्या व उचलून नेतां येण्यासारख्या घरात राहतो व तेथलें कुरण संपले कीं तेथली वस्ति हलवून दुसऱ्या कुरणांत जातो. म्हणूनच अशा समाजांना भटकणारे समाज अशीही संज्ञा आहे. समाजाची याच्या पुढली पायरी म्हणजे कृषिवृत्ति समाजाची होय. मनुष्याला शिकारीपेक्षां, दूधदुभत्यापेक्षांही चांगल्या व स्थिर अशा उपजीविकेच्या साधनाचा- शेतीचा- शोध लागतो व मग माणसें शेती करून धान्य पिकवूं लागतात. समाज कृषिवृत्ति झाला म्हणजे तो एका ठिकाणीं स्थाईक होतो. कारण थोड्या जमिनीमधून पुष्कळ धान्य काढतां येते व जमिनीचें हें उत्पन्न वार्षिक होते. अर्थात्<noinclude></noinclude>
ocgcu3bwyqgi9tmgliza2f0455o2kyy
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/३७
104
111098
233469
2026-07-23T05:42:24Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233469
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(३२)}}</noinclude>देशाच्या विशिष्ट परिस्थितीप्रमाणे हे धंदे कमीजास्त प्रमाणांत असतात इतकेंच व समाजांचे सामान्यस्वरूप बहुविध उद्योगाचें असतें. तेव्हां समाजाच्या स्थित्यंतराच्या या पायऱ्या सजीव निर्जीव यांच्या व सजीवांच्या पायऱ्याप्रमाणे असतात. पदार्थांची सर्वात खालची पायरी निर्जीव पदार्थांची त्याच्यावरची पायरी वनस्पतीची. पण वनस्पतीचे घटकावयव निर्जीव मूलतत्त्वेच असतात. मात्र जीव हा विशेष गुण वनस्पतीमध्ये उत्पन्न होतो. याच्यावरची पायरी पशूंची होय. अर्थात् चेतना व हालचाल करण्याची शक्ति प्राण्यांत वनस्पतीच्यापेक्षां जास्त असते; पण जीवंतपणाचें गुण नाहींसे होत नाहींत. त्यानंतर सर्वांत श्रेष्ठ मनुष्यप्राण्याची पायरी यामध्ये विचारशक्ति सदसद्विवेक बुद्धि, अभिरुचि वगैरे असामान्य गुण दृष्टोत्पत्तीस येतात. पण पशूचे गुण चेतना व हालचाल करण्याची शक्ति हे मनुष्यांतून नाहींसे होतात असें नाहीं. ही जी या वस्तुमात्राच्या पायऱ्यांना गोष्ट लागूं आहे, तीच ॲडॅमस्मिथच्या समाजाच्या स्थित्यंतराच्या पायऱ्यांना लागू आहे. व अशा दृष्टीने ॲडॅम स्मिथने प्रतिपादन केलेल्या तत्वांत बरेंच तथ्यांश आहे. ऐतिहासिक काळांतील प्रत्येक समाज या प्रत्येक पायरीवरून गेलाच पाहिजे असाही या तत्त्वाचा अर्थ नाहीं. ज्याप्रमाणें एखादा सदृढ माणूस जिन्याच्या मधल्या एक दोन पायऱ्या एकदम ओलांडून जातो किंवा एखादा हुशार मुलगा एक इयत्ता मध्ये टाकून वर जाऊं शकतो त्याप्रमाणें एखादा समाज कांहीं विशिष्ट कारणांनीं व विशिष्ट परिस्थितीत एकदम समाजाच्या अत्यंत वरच्या पायरीवर येऊ शकेल. पण सामान्यतः समाजाचा विकास या पायऱ्यांच्या अनुरोधानें होतो असें म्हणण्यास हरकत नाहीं.{{nop}}<noinclude></noinclude>
f6ytkgks8azu5uk54b8ehmt28r8jswl
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/३८
104
111099
233470
2026-07-23T05:47:44Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233470
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(३३)}}</noinclude>{{gap}}कॉम्टने समाजशास्त्रावर दोन मोठमोठे ग्रंथ लिहिले आहेत. त्यांचा थोडक्यांत सारांश देणें देखील या व्याख्यानांत अशक्य आहे. तेव्हां त्या भानगडीत न पडतां त्यांच्या एक दोन प्रमुख सिद्धांतांचाच येथें उल्लेख करून पुढें जाणें भाग आहे. युरोपीयन ऐतिहासिक कालाचे अवलोकन करून निगामी पद्धतीनें कॉम्टनें हें सिद्धांत शोधून काढले. पण ते इतर समाजांसही पुष्कळ अंशांनी लागू आहेत असे दिसून येईल. कॉम्टचें म्हणणें असें आहे की, समाजाची सर्वाङ्गीण प्रगति- सामाजिक औद्योगिक धार्मिक, वाङ्मयात्मक, राजकीय- होते तिचें आदिकारण समाजांतील व्यक्तीच्या बुद्धीची कमीजास्त वाढ व त्याच्यायोगाने समाजांत प्रचलित झालेलें अयथार्थ किंवा यथार्थ ज्ञान होय. यासंबंधानें त्याने दोन प्रमेयें स्थापित केली आहेत. पहिले प्रमेय ज्ञान किंवा त्याचें उच्चतम स्वरूप जे शास्त्र त्यासंबंधी आहे. व हे प्रमेय म्हणजे शास्त्रांची एक प्रकारची मीमांसा होय. म्हणून कॉम्टच्या या प्रमेयाला त्याची शास्त्रीय मीमांसा असेही म्हणतात. त्यानें प्रथम शास्त्राचे मूर्त व अमूर्त असे दोन भेद केले आहेत. जगांतील प्रत्यक्ष मूर्तिमान् वस्तूंची उपपत्ति करणारी शास्त्रें तीं मूर्तशास्त्रे होत; उ.- भूगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, मानवशास्त्र, खनिजशास्त्र. ही सर्व शास्त्रे सृष्टींतील प्रत्यक्ष, दृष्य व स्वतंत्रपणे राहणाऱ्या द्रव्याची सोपपत्तिक माहिती सांगतात.<Br>{{gap}}ही शास्त्रे अझून पूर्णतेस आलीं नाहींत व तीं दिवसेंदिवस वाढत जाणार म्हणून त्यांचे वर्गीकरण व सिंहावलोकन हल्लीच्या स्थितींत होणे फारसे इष्ट नाहीं. अमूर्तशास्त्रे प्रत्यक्ष दृश्य द्रव्यगत गुणांची किंवा अवस्थेची उपपत्ति करतात. उ. -गणित, रसायनशास्त्र, जीवनशास्त्र, वगैरे. कॉम्टने याच शास्त्रांचें वर्गीकरण करून त्यांची शास्त्रीय परंपरा लावण्याचा प्रयत्न आपल्या प्रमेयांत केला आहे. त्याचे मताप्रमाणे या शास्त्रीय परंपरेचा प्रारंभ गणितशास्त्राने होतो. गणितशास्त्राचे<noinclude><Br>{{gap}}३</noinclude>
eqjdugreupk8tuynxslhvi79zx5g83v
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/३९
104
111100
233471
2026-07-23T05:55:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ३४ ) सिद्धांत सर्व वस्तुजातास लागतात. कारण गणितशास्त्राचा विषय संख्या, परिमाण व दिग् हीं होत. हे सर्वव्यापी गुण असून ते मनु- प्यास सहज समजून येतात, इतकेंच नव्हे तर ते समजण्..."
233471
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
( ३४ )
सिद्धांत सर्व वस्तुजातास लागतात. कारण गणितशास्त्राचा विषय संख्या, परिमाण व दिग् हीं होत. हे सर्वव्यापी गुण असून ते मनु- प्यास सहज समजून येतात, इतकेंच नव्हे तर ते समजण्यास दुसऱ्या कोणत्याही ज्ञानाची जरूर लागत नाहीं. म्हणून गणितशास्त्र हे व्या- पक व सर्वसामान्य असें शास्त्र आहे. या शास्त्राचे सिद्धांत आगामी पद्धतीने काढतां येतात व ते सर्व ज्ञेय पदार्थांस लागू पडतात. याच्या पुढलें शास्त्र ज्योतिषशास्त्र अगर गुरुत्वाकर्षणशास्त्र. या शास्त्राचा विषय गुरुत्वाकर्षण आहे. हाही सर्वव्यापी गुण आहे. प्रत्येक पर- माणु दुसा परमाणूस आपल्याकडे ओढीत असतो. या शक्तीसच गुरुत्वाकर्षण म्हणतात. आतां गुरुत्वाकर्षणाचें शास्त्र गणितशास्त्रा- पुढचे व त्या शास्त्रावर अवलंबून असणारे शास्त्र आहे. याचीं प्रमेयें अवलोकनाने व आगामी पद्धतीने सिद्ध करतात. यापुढचे शास्त्र म्हणजे पदार्थविज्ञानशास्त्र. यामध्ये उष्णता, प्रकाश, विद्युत्, लोहचुंबकत्व, आणि नादवत्ता इत्यादि स्वरूपानी उद्भूत होणारी शक्ति किंवा गति या पदार्थातील अमूर्त गुणाची उपपत्ति केली जाते. आतां हे शास्त्र गुरुत्वाकर्षण व गणित या शास्त्रावर अवलंबून आहे. या शास्त्राचा विषयभूत गुण संख्या किंवा गुरुत्वाकर्षण यांपेक्षां जास्त संकीर्ण व कमी विस्तृत असा आहे. य शास्त्राचे सिद्धांत प्रयोग व अवलोकन या दोन साधनांनी सिद्ध करतात. गणितशास्त्राचाही यांत थोडा फार उपयोग होतो. याच्यापुढचें शास्त्र रसायनशास्त्र होय. याचा विषय पदार्थविज्ञानशास्त्राच्या विषयापेक्षांही जास्त संकीर्ण व भानगडीचा आहे. निरनिराळ्या मूलतत्वांची एकमेकांशी संयोग होण्याची शक्ति हा या शास्त्रांचा विषय आहे. हें शास्त्र पदार्थविज्ञानशास्त्रावर अवलंबून आहे. याचें सिद्धांत काढण्याचे मुख्य साधन प्रयोग होय. याच्या- पुढलें शास्त्र जीवनशास्त्र होय. याचा विषय खालच्या चारही शास्त्रांपेक्षां फारच संकीर्ण असून गुंतागुंतीचा आहे. तो विषय जीवन किंवा सजीवपणा हा गुण होय. हा गुण वस्तुजातापैकीं<noinclude></noinclude>
ocvvsq8zfwobx2szarsfqvenh61fhdi
233472
233471
2026-07-23T08:27:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233472
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(३४)}}</noinclude>सिद्धांत सर्व वस्तुजातास लागतात. कारण गणितशास्त्राचा विषय संख्या, परिमाण व दिग् हीं होत. हे सर्वव्यापी गुण असून ते मनुष्यास सहज समजून येतात, इतकेंच नव्हे तर ते समजण्यास दुसऱ्या कोणत्याही ज्ञानाची जरूर लागत नाहीं. म्हणून गणितशास्त्र हे व्यापक व सर्वसामान्य असें शास्त्र आहे. या शास्त्राचे सिद्धांत आगामी पद्धतीने काढतां येतात व ते सर्व ज्ञेय पदार्थांस लागू पडतात. याच्या पुढलें शास्त्र ज्योतिषशास्त्र अगर गुरुत्वाकर्षणशास्त्र. या शास्त्राचा विषय गुरुत्वाकर्षण आहे. हाही सर्वव्यापी गुण आहे. प्रत्येक परमाणु दुसऱ्या परमाणूस आपल्याकडे ओढीत असतो. या शक्तीसच गुरुत्वाकर्षण म्हणतात. आतां गुरुत्वाकर्षणाचें शास्त्र गणितशास्त्रापुढचे व त्या शास्त्रावर अवलंबून असणारे शास्त्र आहे. याचीं प्रमेयें अवलोकनाने व आगामी पद्धतीने सिद्ध करतात. यापुढचे शास्त्र म्हणजे पदार्थविज्ञानशास्त्र. यामध्ये उष्णता, प्रकाश, विद्युत्, लोहचुंबकत्व, आणि नादवत्ता इत्यादि स्वरूपानी उद्भूत होणारी शक्ति किंवा गति या पदार्थातील अमूर्त गुणाची उपपत्ति केली जाते. आतां हे शास्त्र गुरुत्वाकर्षण व गणित या शास्त्रावर अवलंबून आहे. या शास्त्राचा विषयभूत गुण संख्या किंवा गुरुत्वाकर्षण यांपेक्षां जास्त संकीर्ण व कमी विस्तृत असा आहे. या शास्त्राचे सिद्धांत प्रयोग व अवलोकन या दोन साधनांनी सिद्ध करतात. गणितशास्त्राचाही यांत थोडा फार उपयोग होतो. याच्यापुढचें शास्त्र रसायनशास्त्र होय. याचा विषय पदार्थविज्ञानशास्त्राच्या विषयापेक्षांही जास्त संकीर्ण व भानगडीचा आहे. निरनिराळ्या मूलतत्वांची एकमेकांशी संयोग होण्याची शक्ति हा या शास्त्रांचा विषय आहे. हें शास्त्र पदार्थविज्ञानशास्त्रावर अवलंबून आहे. याचें सिद्धांत काढण्याचे मुख्य साधन प्रयोग होय. याच्यापुढलें शास्त्र जीवनशास्त्र होय. याचा विषय खालच्या चारही शास्त्रांपेक्षां फारच संकीर्ण असून गुंतागुंतीचा आहे. तो विषय जीवन किंवा सजीवपणा हा गुण होय. हा गुण वस्तुजातापैकीं<noinclude></noinclude>
lgw4abzxdddf0sreqt4z4w23bjf9ei0
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/४०
104
111101
233473
2026-07-23T08:33:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233473
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(३५)}}</noinclude>फक्त सचेतन वस्तूंमध्येच दिसतो. या शास्त्राची सिद्धांत काढण्याची पद्धति अवलोकनाची आहे. या शास्त्रांत प्रयोगाला फारसा वाव नाहीं. कारण जीव हा गुण प्रयोगशाळेंत प्रयोगाने उत्पन्न करतां येत नाहीं. म्हणून सृष्टिनियमांनीं स्वाभाविकपणें उत्पन्न होणाऱ्या सजीव वस्तूंच्या अवलोकनाने जीवनाची उपपत्ति करावयाची असते. याच्यापुढले शास्त्र समाजशास्त्र होय. याचा विषय मनुष्यप्राण्यांनी बनलेल्या सामाजिकपणाच्या गुणाचा होय. हें शास्त्र जीवनशास्त्रावर अवलंबून आहे. व याचे सिद्धांत ऐतिहासिक तुलनात्मक पद्धतीने काढतात. याच्यापुढली व शेवटची पायरी म्हणजे नीतिशास्त्राची होय. केव्हां केव्हां कॉम्ट हा नीतिशास्त्र स्वतंत्र शास्त्र मानीत नाहीं व केव्हां केव्हां तो त्याला स्वतंत्र स्थान देतो. यावरून कॉम्टच्या मनाची धरसोड दिसून येते; त्यायोगें मागच्या व्याख्यानांत सांगितल्याप्रमाणें समाजशास्त्र व नीतिशास्त्र यांचा कसा व किती निकट संबंध आहे ते दिसून येतें. कॉम्टची शास्त्रीय परंपरा अशी बनते.
{{Block center|<poem>गणितशास्त्र
ज्योतिषशास्त्र अगर गुरुत्वाकर्षणशास्त्र
पदार्थविज्ञानशास्त्र
रसायनशास्त्र
जीवनशास्त्र
समाजशास्त्र
नीतिशास्त्र</poem>}}
{{gap}}ही शास्त्रसप्तकाची परंपरा समाजाच्या प्रगतीमध्यें दिसून येते. म्हणून या परंपरेचा समाजशास्त्राशी निकट संबंध आहे. कोणत्याही राष्ट्रामध्ये ज्ञानवृद्धि होते ती याच परंपरेनें होते. समाजांत प्रथमतः शास्त्रीय कल्पना उत्पन्न होतात त्या गणिताच्या होतात; मग ज्योतिषशास्त्राच्या कल्पना उत्पन्न होतात; समाजशास्त्र व नीतिशास्त्र यासंबंधाच्या<noinclude></noinclude>
67mbdfwiutnxgrm44eohkaojg683lpn
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/४१
104
111102
233474
2026-07-23T08:38:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233474
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(३६)}}</noinclude>कल्पना अगदी शेवटी समाजाच्या परिणतावस्थेच्या काळीं उत्पन्न होतात तेव्हां या प्रमेयावरून व समाजांतील शास्त्रीय प्रगतीवरून कोणता समाज कोणत्या समाजस्थितींत आहे हे शोधून काढतां येईल, असें कॉम्टचें म्हणणे आहे. पण समाजाची स्थित्यंतरें दाखविण्यास या पहिल्या प्रमेयापेक्षांसुद्धां कॉम्टचें दुसरें प्रमेय जास्त उपयोगी आहे व त्यावरच कॉम्टचा जास्त भर आहे. कॉम्टच्या मताने रानटी समाजापासून अत्यंत सुधारलेल्या समाजाची जी वाढ होते तिचें कारण मानवी मनाचें कमीअधिक उन्नत स्वरूप होय. कारण या मनःस्वरूपावर समाजांतलें ज्ञान अवलंबून असतें व ज्ञानावर सर्व प्रगति अवलंबून असते.<br>{{gap}}रानटी स्थितीतील मनुष्याला जे जे सृष्टिचमत्कार दृग्गोचर होतात ते ते सर्व देवाने केलेले आहेत असें वाटतें. ज्याप्रमाणें लहान मुलाचें मन श्रद्धावान् असतें त्याप्रमाणेच रानटी माणसाचें असतें. मुलानें चंद्रसूर्य पाहिले किंवा झाडे वनस्पति पाहिल्या व 'ही कोणी केली' असे त्याने विचारलें, म्हणजे मोठी माणसें 'देवबापाने हीं केलीं' असे सांगतात व जसें त्याचें समाधान होतें, त्याप्रमाणेच रानटी मनुष्याच्या मनाची स्थिति असते, त्या मनामध्यें अझून विचारशक्ति व सयुक्तिकपणाची जाणीव उत्पन्न झालेली नसते. या मनाच्या अवस्थेला कॉम्टनें 'दैवी' असे नांव दिले आहे. या मनःस्थितीचे आणखी तीन प्रकार. त्याने मानले आहेत. पण त्या तिन्ही प्रकारांचा सामान्य विशेष हाच की, या मनःस्थितीमध्ये कोणत्याही गोष्टीचें कारण देव आहे असें सांगितलें म्हणजे मनुष्याचें समाधान होतें. अत्यंत रानटी स्थितींतील मनुष्य दगडमाती, नदीनाला, दरीखोरी इत्यादि निर्जीव व सामान्य पदार्थ; वडपिंपळ, आंबाफणस इत्यादि सजीव सामान्य वनस्पती; गायबैल, कोंबडा कावळा इत्यादि सामान्य पशुपक्षी; सारांश, नेहेमी दृष्टीस पडणाऱ्या व त्याच्या जवळपास<noinclude></noinclude>
mtdzymc7smlvzrmd2nlcx5ao3p6nzun
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/४२
104
111103
233475
2026-07-23T08:42:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233475
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(३७)}}</noinclude>असणाऱ्या सर्व सजीव-निर्जीव कोटींतील वस्तुजातास तो देव मानतो. मग आकाशस्थ गोलांची व इतर अदृश्य पदार्थांची गोष्टच बोलायला नको. यांपुढे तर रानटी मनुष्य थरथर कांपतो. यालाच 'वस्तुपूजेची मानसिक अवस्था' असें कॉम्टनें म्हटलें आहे. या मनःस्थितीत प्रत्येक वस्तु देवानें निर्माण केली आहे अशी त्याची समजूत असते, इतकेंच नव्हे तर प्रत्येक वस्तु प्रत्यक्ष देवच आहे अशी त्याची समजूत असते व म्हणून अशा स्थितीत मनुष्यें हव्या त्या वस्तूची पूजाअर्चा करतात; त्यांना आळवतात; त्यांना नवस करतात; देव नवसास पावला नाहीं तर त्याला मारतात, झोडतात सुद्धा; किंवा नवसास पावल्यास देवाला बळी वगैरे अर्पण करतात. त्याच्यापुढल्या पायरीला कॉम्टने अनेकेश्वरी मनोवस्था असें म्हटलें आहे. या मनःस्थितीत मनुष्य प्रत्येक प्रत्यक्ष वस्तूला देव मानीत नाहीं, तर प्रत्येक समानधर्म वस्तूच्या जातीवर अंमल चालविणारा एक एक देव तो मानतो. नदीनाल्यालाच देव न समजतां तो आतां सर्व पाण्यावर अंमल चालविणारी एक जलदेवताच मानतो व सर्व जलसंचन तिचें निवासस्थान आहे असें समजतो. याप्रमाणें या मनःस्थितींत जलदेवता, वायुदेवता, नगदेवता, वनदेवता अशा हजारों देवता तो मानतो व त्यांची पूजाअर्चा करतो. याच्यापुढची पायरी एकेश्वरी अवस्थेची होय. या मनःस्थितींत अनेक देव किंवा देवता न मानतां सर्व वस्तुजाताला निर्माण करणारा एकच परमेश्वर आहे असें मनुष्य मानूं लागतो. तेव्हां वस्तुपूजात्मक, अनेकेश्वरात्मक व एकेश्वरात्मक असे 'दैवी' अवस्थेचे तीन प्रकार आहेत. 'दैवी' मनःस्थितीच्यापुढील पायरी 'तात्त्विक अवस्थेची' पायरी होय. या मनःस्थितीमध्यें प्रत्येक वस्तूचें कारण म्हणजे एक अमूर्त तत्त्व आहे अशी मनुष्य आपल्या मनाशी समजूत करून घेतो व त्यानें त्याचें समाधान होते. सजीव-निर्जीवामधला भेद कशामुळे आहे, तर सजीवामध्यें जीवत्व असतें; द्रवरूप पदार्थ कां होतात, तर त्यांत द्रवत्व<noinclude></noinclude>
h50xl56v51aa6cb3xuc10ei6qihyczi
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/४३
104
111104
233476
2026-07-23T08:47:39Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233476
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(३८)}}</noinclude>असतें; पाणी थंड कां, तर त्यांत शीतत्व असते; पृथ्वी अशी कां तर तिच्यांत पृथ्वीत्व असतें म्हणून. सारांश, प्रत्येक वस्तूचें कारण त्याच नांवाच्या भाववाचक नामानें व्यक्त करण्याची या मनःस्थितींत प्रवृत्ति होते व या मीमांसेने अशा मनःस्थितींत समाधानही होतें. कॉम्टच्या मताप्रमाणे याच्यापुढची व कायमची मनःस्थिति म्हणजे 'शास्त्रीय' होय. या मनःस्थितींत मनुष्य आला म्हणजे त्याला दैवी किंवा तात्विक ज्ञानानें खरें समाधान होत नाहीं, या मनःस्थितीत 'चक्षुर्वैसत्यं' अशी मनाची भावना होते. निर्गुण- निराकार परमेश्वरावरील भरंवसा उडतो; अद्वितीय तत्त्वावरील भरंवसा उडतो व इंद्रियगोचर गोष्टीच फक्त मनुष्याला जाणता येतात, ही भावना दृढ होते व शास्त्रामध्ये शोधून काढावयाचे नियम म्हणजे दृश्य चमत्कारामधील साहचर्य किंवा परंपरा होय, अशी खात्री होते. ढगानंतर पाऊस येतो; वीज चमकल्यावर गडगडतें; मनुष्याने इच्छा केल्याबरोबर त्याचे हातपाय हालतात; जेथें जेथे सोनें आहे तेथें तेथें पिवळेपणा, घनवत्ता, वर्धनीयता आहे; जेथे जेथें मनुष्यत्व आहे तेथें तेथें मर्त्यव आहे. सारांश, कॉम्टच्या मतानें शास्त्रीय मनःस्थितींतील शास्त्रीय ज्ञान साहचर्य व परंपरा या दोन स्वरूपाचेंच असतें! या तीन मनःस्थितींमध्ये असणाऱ्या मनुष्याच्या वर्तनांत कसा फरक होतो, हे दोन तीन व्यावहारिक उदाहरणांनी स्पष्ट करतां येईल. एखादा माणूस एकाएकीं तापानें आजारी पडला आहे अशी कल्पना करा. अशा माणसाला एखाद्या रानटी किंवा 'दैवी' मनःस्थितीतील माणसाने पाहिलें की लागलीच त्याला 'झपाटण्याचें' 'भुताखेताचें' 'मूठ मारल्याचे' स्मरण होईल; अर्थात् हा आजार देवी असल्याचा त्याचा ताबडतोब समज होईल; व तो जादूटोण्याच्या, नवसाच्या, बीरमंत्राच्या व देव-देवांच्या उपायाला लागेल. असा मनुष्य त्या आजारी माणसाला तसाच टाकून असल्या उपायाच्या मागें धांवेल. तात्त्विक मनःस्थितींत<noinclude></noinclude>
hs18sz6blpso2vx1j4mhftjl8s9mum6
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/४४
104
111105
233477
2026-07-23T08:54:29Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233477
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(३९)}}</noinclude>असलेला माणूस तप्तता किंवा वातापित्तकफादि तत्वे किंवा असलेच कसले तरी ज्वरतत्व यांच्याशी त्या तापाचा संबंध लावील. वज्रारि, वातारि किंवा तप्तारि यासारख्या अरीच्या तपासाला वैदूकडे जाईल, पण शास्त्रीय मनःस्थितींतील माणूस खऱ्या शास्त्रीय वैद्याकडे जाईल व कोणत्या कारणांनी ताप आला त्याचे निदान करवून घेऊन त्या कारणांच्या निरासाच्या तजविजीला लागेल व रोग्याची शुश्रूषा करून अस्तित्वांत आलेल्या कारणांचा स्वाभाविक रीतीनें उपशम करण्याचा शास्त्रीय प्रयत्न करील. खग्रास सूर्यग्रहण लागल्याबरोबर 'दैवी' मनःस्थितींतील माणूस 'दे दान सुटलें गिराण' म्हणून देवाचा धांवा करील, राहूनें सूर्याला गिळल्याच्या संकटाबद्दल स्नान करील, पाण्यांत बसेल; व सूर्याची लवकर सुटका व्हावी म्हणून हवालदिल होईल. तात्त्विक मनःस्थितींतील मनुष्य या ठिकाणी समवायी संबंध आहे, की असमवायी संबंध आहे; सूर्यचंद्रसंयोग आहे किंवा चंद्रसूर्यसंयोग आहे; येथें अंधार अभावरूपी तत्व आहे किंवा भावरूपी तत्त्व आहे, यांची खटपट करीत बसेल. 'शास्त्रीय' मनःस्थितींतील मनुष्य उत्तमशी दुर्बीण मिळवून ग्रहणकाळचे शक्य तितके फोटो घेईल; उष्णतामापक यंत्राने उष्णता मोजील व त्या ग्रहणाची शक्य ती शास्त्रीय माहिती मिळविण्याचा प्रयत्न करील. समाजांत जातिभेद कसा उत्पन्न झाला, असा प्रश्न निघाल्यात दैवी मनःस्थितीतील मनुष्य 'या सर्व जाती देवाने निर्माण केल्या' असें सांगेल; तात्त्विक मनःस्थितीतील मनुष्य 'चार वर्ग व सत्व, रज, तम या वैगुण्याच्या योगानें झाल्या' असे सांगेल किंवा 'ब्रह्मतेज, क्षत्रतेज, विट्तेज व शूद्रतेज या चतुर्तेजानें उत्पन्न झाल्या' असें सांगेल. शास्त्रीय मनःस्थितींतील मनुष्य त्या समाजाच्या पूर्वेतिहासाचें अवलोकन करून एका सजातीय समाजांत हे दुर्भेद्य भेद कसे अस्तित्वांत आले असावे यांचा वाङ्मयातील दाखल्यावरून व उल्ले-<noinclude></noinclude>
n1dl9o073xv7bfox02b2zyrf4xk7eo8
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/४५
104
111106
233478
2026-07-23T08:58:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233478
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(४०)}}</noinclude>खावरून निकाल करील व हे भेद स्वाभाविक सामाजिक परिस्थितीमुळे अस्तित्वांत आले असावेत असे सांगेल.<Br>{{gap}}वरील आपल्याकडल्या दोन तीन उदाहरणांवरून कॉम्टच्या प्रमेयाची साधारण कल्पना तरी आपल्याला होईल, अशी मला आशा आहे. या प्रमेयाच्या योगानें कॉम्टनें एकंदर समाजाची व समाजांतील चालीरीतीची प्रगति कशी होत जाते, याचें विवरण केलें आहे. वस्तुपूजेच्या अवस्थेत समाज अगदीं बाल्यावस्थेत असतो. त्यांत अझून धर्मोपदेशक किंवा उपाध्यायाचा वर्ग अस्तित्वांत आलेला नसतो. प्रत्येक मनुष्य आपली सर्व कामे आपणच करतो, या समाजस्थितींत कलांची किंवा ज्ञानाची उत्पत्ति झालेली नसते. यांत अजून नैतिक कल्पना उद्भूत झालेल्या नसतात. शत्रूला किंवा परक्याला मारून टाकण्याची क्रूर प्रवृत्ति या समाजांत दिसून येते. सारांश, या अवस्थेत मनुष्य बहुतेक पशूप्रमाणे राहतो व वागतो; व यामुळेच अशा समाजाला रानटी समाज म्हणतात. प्रत्येक सुधारलेला समाज या अवस्थेंतून गेलेला असला पाहिजे, असें कॉम्टचें मत आहे. अनेकेश्वरी अवस्थेत ललितकलांची विलक्षण वाढ होते. देव पुष्कळ असल्यामुळे ज्याला त्याला आपआपल्या कल्पनेप्रमाणें देवाला स्वरूप देण्याची मुभा असते. यामुळे मूर्तिकलेला उत्तेजन मिळतें. तसेच देवादिकांचीं देवळें करण्याच्या प्रवृत्तीमुळे वास्तुकलेलाही उत्तेजन मिळतें. तसेच देवाची आराधना करतांना प्रार्थना करण्याचा प्रघात पडतो व संगीत कलेलाही उत्तेजन मिळते. या समाजाच्या अवस्थेत उपाध्यायाचा वर्ग अस्तित्वांत येतो. गुलामगिरीचा प्रघात सुरू होतो. काव्य वाङ्मय याची वाढ झपाट्याने होते. कारण देवादिकांचीं चरित्रे ऐकण्याची व वाचण्याची गोडी लागते व महाकाव्यांचा विषय म्हणचे हाच होय. पण शास्त्रीय वाङ्मय मात्र मागसलेल्या स्थितीत असतें. अशा समाजांत ल लष्करी पेशाला फार महत्व असतें. एकेश्वरी अवस्थेत ललित-<noinclude></noinclude>
ilvmt0k60yq3e9ijs5rmrv666iai1aw