Wikipedia:धूळपाटी/मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते?

Wikipedia कडून

विशिष्ट ठिकाणचे अशुद्धलेखन नजरेस आणावयाचे असेल तर 'विशिष्ट ठिकाणचे अशुद्ध लेखन' येथे जा व तशी नोंद करा किंवा शुद्धलेखनाचे महत्व येथे जा. खाली दिलेली तार्किक उत्तरे तुमच्या मनातील भावनिक उद्रेकाचे किती समाधान करतील याची शाश्वती नाही; आपल्याला ह्या प्रश्नाच्या तार्किक चर्चेपेक्षा जर आपण लेखनात दुरुस्ती करून शुद्ध करून देणारे उत्साही मराठी बांधव असाल आणि मराठी विकिपीडियाचा अशुद्धलेखनाचा भार हलका करावयास हातभार लावायचा असेल तर, आपल्याला मला मराठी विकिपीडियात अशुद्ध लेखन आढळते काय करावे? हा लेख वाचा.शुद्धलेखनविषयक मराठी विकिपीडियातील कोणताही लेख आपले समाधान करू शकला नसेल आणि आपल्याला काही वेगळे मांडायचे असेल तर ते 'माझ्या प्रश्नाचा रोख' येथे स्पष्ट करावे.

अनुक्रमणिका

[संपादन] मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते?

या लेखाचा उद्देश अशुद्धलेखनाचे समर्थन असा नाही तर अशुद्धलेखन का घडते आहे याच्या कारणांची मीमांसा करणे हा आहे. विकिपीडिया मूलत: हे गृहीत धरते की प्रत्येकाकडे काहीनाकाही ज्ञान आहे आणि विकिपीडिया हे प्रत्येकास सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने निश्चितपणे एक मुक्त स्थळ आहे.

समाजात तुमच्या अवतीभवती ज्या टक्केवारीने अशुद्धलेखन होते त्याच टक्केवारीने विकिपीडियात होते. विकिपीडिया हा अशुद्धलेखनाचा स्त्रोत नाही. मराठी विकिपीडियास शुद्धलेखन चांगले ठेवून दर्जा चांगला घडवून हवा आहे. विकिपीडियात दिसणारे अशुद्धलेखन हे मुख्यत: दोन प्रकारे होते. पहिले लेखनातील चुका, दुसरे मराठी लिहिणार्‍या संगणक प्रणालीशी वापरकर्त्याचा पूर्ण परिचय झालेला नसल्यामुळे काही सुविधा उपलब्ध असून त्यांची कल्पना नसणे, तसेच बर्‍याचदा काही संगणकप्रणाली हिंदी भाषेस समोर ठेवून बनलेल्या असल्यामुळे मराठीकरिता आवश्यक अश्या काही सुविधांची कमतरता असणे. अजून एक महत्त्वाची अडचण म्हणजे विकिपीडिया संपादनाकरिता विकिची एक स्वत:ची विकिभाषाप्रणाली आहे. तिच्यात कळफलकावरील विविध सोप्या चिन्हांचा उपयोग केला जातो. हीच चिन्हे मराठी लिहिणार्‍या सॉफ्टवेअरमध्ये वापरलेली असली तर तांत्रिक असुविधेमुळे किंवा त्याबद्दलच्या अनभिज्ञतेमुळेसुद्धा शुद्धलेखनाचे प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रश्नांचा सविस्तर ऊहापोह वेगवेगळ्या विभागातून करण्याचा प्रयत्न केला आहे.

[संपादन] अशुद्धलेखन म्हणजे काय?

अशुद्धलेखन म्हणजे काय? जे लेखन व्याकरणदृष्ट्या शुद्ध समजले जात नाही ते लेखन म्हणजे अशुद्धलेखन. मराठी शुद्धलेखनाचे काही टप्पे आहेत. मराठी शुद्धलेखन या संकल्पनेचे एक मूळ संस्कृतातील पाणिनी व्याकरणाला मानले जाते. पाणिनीच्या व्याकरणानंतर जे त्या व्याकरणाच्या नियमात बसते ते शुद्ध आणि बसत नाही ते अशुद्ध हा स्वाभाविक नियम बनला. अशा स्वरूपाच्या व्याकरण व्यवहाराला आदेशात्मक व्याकरण म्हणले जाते."मराठी व्याकरण"च्या व्याकरणकार लीला गोविलकर यांच्या मते शुद्धलेखनाचे सार्वजनिक व्यवहारात महत्त्व आहे, पण फक्त आदेशात्मक व्याकरण म्हणजे भाषेचे व्याकरण नव्हे; आणि व्याकरणविषयक नियम शिकून शुद्धलेखन जमतेच असेही नव्हे.

'मराठी लेखन-कोशा'त कोशकार अरुण फडके पान ४४ वर दाखवून देतात की महामंडळाने घालून दिलेले शुद्धलेखनविषयक नियमही सर्वबाजूने परिपूर्ण नाहीत. ते म्हणतात "शुद्धलेखन आणि आजची परिस्थिती: शिक्षण, लेखन आणि मुद्रितशोधन या तीन घटकांचा शुद्धलेखनविषयक परिस्थितीचे बरे-वाईट करण्यात मोठा वाटा असतो..., महामंडळाच्या शुद्धलेखन नियमांपैकी मर्यादित नियमच शाळा व महाविद्यालय स्तरावर शिकवले जातात...,मुळात महामंडळाचे हे १८ नियम अपुरे पडतात,त्यात पुन्हा जे आहेत ते सगळे शैक्षणिक आयुष्यात कधी शिकवले जात नाहीत. अशा परिस्थितीत समाजाकडून शुद्धलेखनाची अपेक्षा करणेच चुकीचे आहे..लेखन आणि मुद्रितशोधन या दोन बाबींचा विचार एकत्रितपणे करता येईल..लेखक व मुद्रितशोधक दोघेही गेल्या विसेकवर्षात शिक्षण घेतलेले असतील तर या दोघांचे शुद्धलेखन चांगले नसण्याचीच शक्यता जास्त असते... या परिस्थितीत 'दोष ना कुणाचा' हे मान्य केले तरी 'पराधीन' मात्र आत्ताची आणि येणारी पिढी आहे."(संदर्भ:मराठी लेखन-कोश -कोशकार अरुण फडके; पान १९)

डॊ.लीला गोविलकर पुढे म्हणतात "मराठी भाषा ही इंग्रजी-संस्कृत पेक्षा वेगळी भाषा आहे‌. संस्कृत-इंग्रजी व्याकरणांचा प्रभाव मराठी भाषेच्या व्याकरणाचे वेगळे व्यक्तिमत्त्व दाबून टाकू पहातो."*...व्याकरणाने भाषेतील एकाच रूपाला मान्यता देणे म्हणजे भाषेच्या विविधतेला,तिच्या स्वाभाविक विकासाला अडथळा करण्या सारखे आहे....त्यामुळे धड ना आदेशात्मक, धड ना वर्णनात्मक अशी मधली-मधली स्थिती या व्याकरणांची झाली आहे व त्यामधूनच शुद्धाशुद्धबद्दल मते मांडली गेली आहेत.

शुद्ध व अशुद्ध हे शब्द या गोंधळात भर घालणारे आहेत....प्रत्येक भाषेमध्ये नियम तयार होत असतात...पाळले जात असतात...वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावीत की उजव्या यांच्या संबधीच्या नियमांसारखे आपणच ठरवलेले असतात... 'ने' हा शुद्ध 'णे' हा प्रत्यय वाईट असे नसून त्याचा प्रसार किती व कोणत्या समाजामध्ये या गोष्टी लक्षात घेतलेल्या असतात... शुद्धाशुद्धाचा विचार करताना डॉ. ग्रामोपाध्ये म्हणतात,की भारतामध्ये व्याकरणशास्त्राची सुरुवात झाली, ती अपभ्रष्ट शब्दांपासून संस्कृत शब्द वेगळे ठेवण्याच्या कल्पनेमधून; म्हणजे शुद्धाशुद्धाच्या दृष्टिकोनातून होय..(पान३४) (ह्या ग्रंथातील ऊहापोह अत्यंत सविस्तर आणि वाचनीय आहे. मराठी व्याकरणविषयाची गोडी असलेल्या व्यक्तींनी वाचावाच असा ग्रंथ आहे)

वस्तुत: मराठी भाषेच्या आद्य मोडी लिपीत अक्षरांच्या गोलाकार सुबकतेला महत्त्व होते परंतु र्‍हस्व-दीर्घ आणि व्याकरणशुद्धतेबद्दल फारसे महत्त्व नव्हते. छपाईयंत्राच्या वापरापासून देवनागरी लिपीचा वापर सुरू झाला. मराठीचे शालेय शिक्षण व छपाईकरिता लागणारी ब्रिटिश शासनाची मान्यता देणारा ब्रिटिश आधिकारी मेजर कँडी हा शुद्धलेखनाच्या नियमांबद्दल आत्यंतिक आग्रही होता. पुण्यातील उच्चभ्रू किंवा सभ्य व्यक्तींचे मराठी उच्चार ती प्रमाण मराठी असे त्याचे मत होते. तत्कालीन प्रसिद्ध व्याकरणकार दादोबा पांडुरंग यांनासुद्धा भिन्न मते असलेले स्वत:चे मराठी व्याकरणविषयक पुस्तक फक्त स्वत:च्याच खर्चाने नव्हे तर शासकीय रोषाची भीती स्वीकारून प्रसिद्ध करावे लागले होते.


[संपादन] मराठी शुद्ध/अशुद्धलेखनाचा इतिहास

...पेशवे कालापर्यंत आणि नंतरही मराठीचे गद्यलेखन मोडी लिपीत करण्याचा प्रघात होता.मोडी लिपीत विरामचिन्हांचा वापर करण्याची पद्धतच नव्हती....'ई'काराचे लेखन दीर्घ करायचे आणि 'उ'काराचे लेखन र्‍हस्व करायचे असा संकेत होता....मुद्रण सुरू झाल्यापासून पहिल्या वीस-पंचवीस वर्षांमध्ये लेखकांनी बरेच स्वातंत्र्य घेतलेले दिसते.पण इ.स. १८४७ मध्ये मेजर कँडी हा ब्रिटिश अधिकारी शिक्षणखात्याचा प्रमुख बनल्यापासून सर्वच चित्र पालटले...सर्व अधिकार मेजर कँडीकडेच असल्यामुळे तो सांगेल त्या प्रमाणे लेखकांना आपल्या पुस्तकात लेखनाच्या व व्याकरणाच्या दुरुस्त्या कराव्या लागत, ज्यांना हे मान्य नव्हते त्यांची पुस्तके मंजूर होत नसत. त्यामुळे कित्येक लेखकांनी आपल्या मनाविरुद्ध मेजर कँडीचे आदेश निमूटपणे पाळले असे दिसून येते.... मेजर कँडीने १८४७ ते १८७७ असे तीस वर्षे काम केले. शुद्धलेखन आणि व्याकरणविषयक सर्वच बाबतीत तो दक्ष असे. त्याने निर्माण केलेली नियमबद्धता शालेय पाठ्यपुस्तकातून अंमलात आल्यामुळे नव्याने शिकणार्‍या प्रत्येकावर मेजर कँडीकृत नियमांचाच पगडा बसू लागला. एखादी व्यक्ती अधिकारपदाच्या जोरावर भाषेला कसे वळण देऊ शकते याचे मेजर कँडी हे एक उत्तम उदाहरण होय. मराठीच्या व्याकरणाची व लेखनाची भाषा निश्चित करताना मेजर कँडीने पुणे प्रांतात बोलली जाणारी मराठी हीच प्रमाण मानली होती तरी मराठी भाषेने त्याचे म्हणणे काही प्रमाणात स्वीकारले, तर काही प्रमाणात नाकारले.... बरोबर काय, चूक काय हे ठरवताना त्याने हडेलहप्पी केली असे म्हणणे अन्यायाचे ठरेल.

(संदर्भ: मराठी भाषेचा इतिहास डॉ. ग. ना. जोगळेकर (पान १८८))

[संपादन] शुद्धलेखनाच्या आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे

मराठीतील शुद्धलेखनाचा भर 'इ' आणि 'उ' ह्यांच्या र्‍हस्व- दीर्घ लेखनावरच अधिक आहे,हे शुद्धलेखनाचे नियम पाहता स्पष्ट होते... व्यावहारिक पातळीवर अडचण म्हणजे जर लेखनातून ही (दीर्घ ई दीर्घ ऊ) चिन्हे घालवून टाकली,तर वीहीर किंवा विहिर ,नदि,मि,तु असे पाहण्याची सवय करावी लागेल. ती सवय करण्यापेक्षा ही चिन्हे कायम ठेवावीत पण त्यासाठी त्यांना वर्ण म्हणण्याचा आग्रह मात्र शास्त्रपूत नव्हे, असे गोविलकरांचे मत आहे.[संदर्भ: मराठीचे व्याकरण-डॉ.लीला गोविलकर:(पृष्ठ ६१-६७)]. (ही चर्चा खूपच प्रदीर्घ आहे, संपूर्ण देणे अवघड आहे, त्यामुळे हा विभाग अपूर्ण आहे. शक्य झाल्यास पूर्ण करण्यास मदत करा).

[संपादन] अगदीच उच्चारणानुसार केलेल्या लेखनामुळे होणार्‍या चुका

बर्‍याचदा नियम माहीत नसल्यामुळे अगदी उच्चारणानुसारी लेखन करून लोक मोकळे होतात. तर काही वेळा महामंडळाच्या नियमाबाबत मतभेद असल्यामुळेपण वेगळे लेखन केले जाते. काही वेळा बदलेल्या नियमांची दखल न घेता जुन्या नियमांनुसार लेखन केले जाते. सध्याच्या नियमांमध्ये पूर्वीपेक्षा अनुनासिकांचा वापर कमी केला आहे, याची कल्पना नसल्यामुळे तसेच कोकणीसारख्या बोलीभाषेतील उच्चारणाच्या आग्रहामुळेही वेगळे लेखन केले जाते.

[संपादन] प्रमाणभाषा मराठी ही बोलीभाषेतील मराठी नसल्यामुळे होणार्‍या चुका

असंख्य लोक उच्चारणानुसार लेखनाकरिता आग्रही नसतात परंतु त्यांच्या भागात बोलल्या जाणार्‍या बोलीत प्रमाणभाषेपेक्षा उच्चार वेगळे असतात.

[संपादन] शुद्धलेखनाचा आग्रह धरणार्‍या व्यक्तीनाच प्रमाण नियमांची कल्पना नसल्यामुळे होणार्‍या चुका

[संपादन] मराठी भाषातज्ज्ञांमध्ये असलेल्या असहमतीमुळे होणार्‍या चुका

[संपादन] संस्कृतातून येणारे तत्सम शब्द कोणते याची कल्पना नसल्याने होणार्‍या चुका

[संपादन] मराठेतर भाषकांकडून लेखनात होणार्‍या चुका

[संपादन] मराठी मुले अमराठी शाळातून शिकल्यामुळे होणार्‍या चुका

अमराठी शाळांतून सहसा मराठी ही प्रथम भाषा म्हणून शिकवली जात नाही. तिला दुय्यम भाषेचा दर्जा दिला गेल्याने समग्र मराठी व्याकरण मुलांना शिकवले जात नाही व शुद्धलेखनाच्या चुका होतात.

[संपादन] परभाषेतील शब्द मराठीत होणार्‍या चुका

[संपादन] नियमांच्या कक्षेबाहेरील शब्द व त्यांची रूपे

"परंतु या कोशात दाखवलेले शब्द व त्यांची रूपे यांचे संपूर्ण नियमन करण्यास महामंडळाचे हे अठरा नियम अपुरे पडतात.त्यांमुळे नियमांच्या कक्षेबाहेरील शब्द व त्यांची रूपे यांकरिता विचारात घ्याव्या लागलेल्या बाबी पुढीलप्रमाणे:-

१) रेफापूर्वीचे(रफारापूर्वीचे) इकार व उकार.

२) 'इक','य','त्य' हे प्रत्यय लागून तयार होणारे काही साधित शब्द/

३) अ-कारान्त,आ-कारान्त,ई-कारान्त,ऊ-कारान्त,ए-कारान्त,ऐ-कारान्त आणि ओ-कारान्त अशा पुल्लिंग, स्त्रिलिंगी, व नपुसकलिंगी नामांचे एकवचनाचे सामान्यरूप, अनेकवचन आणि अनेकवचनाचे सामान्यरूप करण्याची सर्वसाधारण पद्धत, यांतील उदाहरणात्मक अपवाद.

४) तृतीयेचा 'ए',पंचमीचा 'ऊन', आणि सप्तमीची 'ई' हे विभक्तिप्रत्यय काही अ-कारान्त,आ-कारान्त नामांना लावणे.

५) काही अ-कारान्त नामांची - विशेषतः ग्रामनामांची - आणि स्वीकृत इंग्रजी शब्दांची - एकवचनी सामान्यरूपे.

६) दीर्घान्त मराठी शब्दांचे उभयवचनी सामान्यरूप व अनेकवचन.

७) य-कारान्त मराठी शब्दांचे उभयवचनी सामान्यरूप व अनेकवचन.

८) अभ्यस्त शब्द आणि जोडशब्द अशा नामांचे उभयवचनी सामान्यरूप आणि अनेकवचन

९) अभ्यस्त शब्द आणि जोडशब्द अशा विशेषणांचे सामान्यरूप आणि त्यांची विशेष्यानुसार बदलणारी रूपे.

१०) विशेषणांची सामान्यरूपे आणि विशेष्यानुसार बदलणारी रूपे.

११) 'ईय'(कुटुंबीय,परकीय) असा शेवट असलेल्या शब्दांचे उभयवचनी सामान्यरूप आणि अनेकवचन.

१२) सर्वनामांची विभक्तिरूपे." ( संदर्भ : मराठी लेखन-कोश -कोशकार अरुण फडके; पान ४४)

[संपादन] अयोग्य न्याहाळक(ब्राउजर) वापरल्यामुळे दिसणार्‍या आभासी चुका

आपला न्याहाळक(ब्राउजर) योग्य नसेल किंवा योग्य तांत्रिक पद्धतीने सज्ज नसेल तरीही आपल्याला येथील शुद्धलेखन पण अशुद्ध असल्याचा आभास घडू शकतो. खास करून आपल्याला सर्वच अपेक्षित जोडाक्षरे तुटक दिसतात तर र्‍हस्व वेलांटी अपेक्षित अक्षराऐवजी भलतीकडेच दिसते.

[संपादन] मराठी लेखनाच्या संगणक प्रणालीतील त्रुटी आणि वापरणार्‍यांची अनभिज्ञता

काही वेळा मराठी लेखनाच्या संगणक प्रणालीत त्रुटी असतात तर काही वेळा वापर करणार्‍यास एखादे अक्षर त्या प्रणालीत कसे लिहावे याची कल्पना नसते. त्याशिवाय अचानक नवीन संगणकप्रणाली वापरताना मराठीत एकूणच भारतीय भाषांकरिता कळफलकांचे प्रमाणीकरण नसल्यामुळेही समस्या उद्भवतात जसे, बराहा मध्ये ज्ञ हे अक्षर j~J असे लिहिले जाते. हेच अक्षर गमभन प्रणालीत द+न+य ने येते, तर हिंदी भाषक तज्ज्ञ प्रणाली बनवताना द+न+य चे 'ग्य' करतात व 'ज्ञ'करिता अक्षरच उरत नाही. मराठीत संगणकावर प्रथमच लिहिणार्‍यांना रफार कसे लिहावेत याची कल्पना नसते. उदाहरणार्थ, या लेखाची सुरूवात करताना वापरलेल्या प्रणालीत एक रफार मिळालाच नाही. चुकांची खालील यादी पहा व आपल्या अनुभवातून तीत भर घाला.


  • व्यंजनानंतर घाईत अ अक्षर टंकित न केल्याने चुका उद्भवतात.
  • 'र्‍ह', तसेच 'र्‍य' कसे टंकित करावे हे माहीत नसेल तर डॅश चे चिन्ह देऊन '-ह', व'-य' सारखा चुकीचा प्रयत्न केला जातो.
  • चुकीने हिंदीकरिता असलेले नुक्तायुक्त अक्षर वापरले जाते.
  • दंडचिन्ह | तसेच विसर्ग चिन्ह : मराठी संगणक प्रणाली व विकिपीडियाच्या विकिप्रणालीत दोन्हीकडे वेगवेगळ्या कारणांसाठी वापरली जातात त्यामुळे चुका उद्भवतात.
  • डोक्यावर चंद्र असलेला 'अ' act सारखे शब्द टंकताना चुकीचा प्रयत्न केला जातो.
  • पाऊण 'य' न मिळाल्याने ट्य...ढ्यसारखी जोडाक्षरे लिहिता येत नाहीत.

[संपादन] माझ्या प्रश्नाचा रोख

कृपया केवळ भावनिकतेपेक्षा व्यावहारिक दृष्टिकोण ठेवून उपाययोजना कशा स्वरूपाच्या असाव्यात याबद्दलच्या सूचनांचे स्वागत असेल. आपण मराठी विकिपीडियावर नवीन असाल तर आपला स्वत:चा विकिपीडियाचा अनुभव जसा जसा वाढेल आणि नवीन जे काही सुचेल ते या विभागात नोंदवण्यास विसरू नये.

[संपादन] हे सुद्धा पहा