अलंग

Wikipedia कडून

किल्ला
नाव अलंग
उंची ४५०० फुट
प्रकार
चढाईची श्रेणी अत्यंत अवघड
ठिकाण नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव ईगतपुरी / कसारा
डोंगररांग कळसुबाई
सध्याची अवस्था



नाशिक जिल्ह्यातील अत्यंत अवघड असा हा किल्ला. घनदाट जंगल व विरळ वस्तीमुळे हा परिसर जरा त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हा किला तसा उपेक्षितच आहे. कळसुबाईच्या रांगेत असणारे अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले लक्ष वेधक आहेत.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास


[संपादन] छायाचित्रे

[संपादन] गडावरील ठिकाणे

किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची ११ टाकी आहेत. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष व एक छोटेसे मंदिर आहे. पुर्वेला कळसुबाई, औंढचा किल्ला, पटटा, बितनगड, उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबागड, खुट्टा सुळका, रतनगड, कात्राबाई चा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात.


[संपादन] गडावर जाण्याच्या वाटा

घाटघर मार्गे: किल्ल्यावर जाण्यासाठी ही दुसरी वाट आहे. पहिली आंबेवाडी मार्गे आहे.

घोटी - भंडारदरा मार्गे घाटघरला जावे. तेथुन अडिच तासात किल्ल्याच्या तीस-या घळीत ठेवलेल्या लाकडी बेचक्यापाशी पोहचतो. या बेचक्यातुन थोडे वर गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण करावे लागले. पुढे थोडी सपाटी पार केल्यानंतर डावीकडे कड्यालगत जणारी वाट पकडावी. १० - १५ मि. आपण किल्ल्यावरील गुहेत पोहचतो. खिंडीतून डावीकडील वाटेने पुढे गेल्यावर काही पय-या लागतात. या पय-या चढुन गेल्यावर ८० - ९० फुटाचा तुटलेला एक कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरुन किल्ल्यावर प्रवेश करता येतो. मात्र, प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करु नये. या वाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.


[संपादन] बाह्यदुवे