ब्राह्मण जात

Wikipedia कडून

ब्राह्मण हा हिंदू समाजातील चातुर्वर्णातील एक वर्ण किंवा जात आहे. पूर्वी ज्या लोकांनी धार्मिक ग्रम्थ आणि वेदांचा अभ्यास करून त्यातील ज्ञान ग्रहण केले अशा लोकांना ब्राह्मण ही उपाधी दिली जात असे. त्यावेळी ब्राह्मण बनण्यासाठी कोणावरही बंदी नव्हती फक्त धर्मोपदेशक म्हणुन त्यांना स्वत:चे कर्तृत्व दाखवावे लागे.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

ब्राह्मणांचा इतिहास प्राचीन काळतील वेदिक धर्मापासुन सुरू होतो. मनुस्मृतीमध्ये आर्यावर्त हे वेदिक लोकांचे स्थान होते अशी नोंद आहे. ब्राह्मणांच्या दिनचर्येचे वेद प्राथमिक स्त्रोत आहेत. ब्राह्मणांतील सर्व संप्रदाय वेदांपासुन प्रेरणा घेतात. असे मानण्यात येते की वेद हे अपुरूषेय आणि अनादि असुन ते अंतिम सत्यांवर प्रकाश टाकतात. वेदांना श्रुती असे संबोधले जाते कारण परंपरेनुसार पाठांतराने वेद जतन केले गेले. श्रुतींमध्ये चार वेदांशिवाय त्यांची "ब्राह्मणे" ही आहेत.

[संपादन] गोत्रे आणि प्रवरे

गोत्र एका पुर्वजापासून सुरू होणारी (पुरुषांची) अखंडित वंशावळ दाखवते. पाणिनीने संस्कृतमध्ये गोत्राचे वर्णन "अपत्यम् पौत्रप्रभृती गोत्रम्" असे केले आहे. म्हणजे "मुलाच्या मुलापासून सुरु झालेलई वंशावळ". गोत्रे म्हणजे सहसा ऋषींची नावे असतात. उदा. कश्यप गोत्र म्हणजे कश्यप ऋषींपासून सुरू झालेल्या वंशातील लोक होत.बौद्धायनसुत्रानुसार विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, वसिष्ठ, कश्यप आणि अगस्त्य या ८ ऋषींपासून ८ प्राथमिक गोत्रे तयार होतात.

गोत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. अश्वलायन-श्रौतसुत्रानुसार वसिष्ठ गणामध्ये चार उपविभाग आहेत: उपमन्यू, पराशर, कुंदिन आणि वसिष्ठ(पहिल्या तीन मध्ये नसलेले). या चारांमध्ये पुन्हा उप-उपविभाग आहेत. ज्यांना गोत्र असे म्हणातात. म्हणजे वर्गीकरण प्रथम गणांत, नंतर पक्षांत नंतर गोत्रांत होते. आजही भृगू आणि अंगिरस गण अस्तित्वात आहेत. बौदानुसार मुख्य ८ गोत्रांचे पक्षांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. उपमन्यूंची प्रवरे वसिष्ठ, भारद्वसू, इंद्रप्रमाद; पराश्र गोत्रातील प्रवरे वसिष्ठ, शाक्त्य, पाराशर्य; कुंदिना गोत्राची वसिष्ठ, मैत्रवरूण, कौंडिण्य ही होत.

प्रवरे दोन प्रकारची असतात: १> शिष्य-प्रशिष्य-ऋषी-परंपरा आणि २> पुत्रपरंपरा.

[संपादन] ऋषी आणि पंथ

धर्म, सांस्कृतिक परंपरा व आचार, वैदीक विचार यांच्यातील विविधतेमुळे ब्राह्मणांच्यात पुन्हा पोटजाती निर्माण झाल्या. सुत्र काळातील ब्राह्मण वेगवेळ्या वेंदाच्या शिकवणीनुसार वेगळे झाले. एकाच शाखेतील विद्वान ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली विविध पंथ निर्माणा झाले. या विद्वान ऋषींनी दिलेल्या शिकवणीला सुत्रे असे म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतःचे सुत्र आहे. सामाजिक, नैतिक व कायदे यांच्या सुत्रांना धर्म सुत्रे, विविध धार्मिक विधींच्या सुत्रांना श्रौत सुत्रे तर घरगुती विधींशी संबंधित सुत्रांना ग्रुह्य सुत्रे असे म्हणतात.

अनेक ब्राह्मणांनी विविध नियम तयार केले. उदा: अंगिरस, अपस्थंभ, अत्री, बृहस्पती, बौधायन, दक्ष, गौतम, हरित, कात्यायन, लिखित, मनू, पराशर, संवर्त, शंख, शतताप, उषानस, वसिष्ठ, विष्णू, व्यास, यज्ञवल्क्य आणि यम. या २१ ऋषींनी स्मृतींची सुरूवात केली. यातील अपस्थंभ, बौधायन, गौतम आणि वसिष्ठ यांच्या स्मृती सर्वात जुन्या आहेत.

[संपादन] ब्राह्मणाची कर्तव्ये

यस्काच्या निरुक्तात म्हटले आहे की "ब्रह्मम् जानति इति ब्राह्मणम्". म्हणजेच ज्याला अंतिम सत्य माहिती आहे तो म्हणजे ब्राह्मण. परंपरेनुसार ब्राह्मण हिंदू समाजातील पुजारी आणि पंडित म्हणून काम करत आले आहेत. आज मात्र ब्राह्मण विवीध क्षेत्रात गुंतलेले दिसतात व त्यांचे धार्मिक परंपरा आणि संस्कृती हे दैनंदिन जीवनात फार कमी प्रमाणात वापरले जातात.

खालील श्लोकात ब्राह्मणांची सहा कर्तव्ये दिली आहेत.

अध्यापनं अध्यययनम् यज्ञम् याज्ञम् तथा दानम् प्रतिग्रहम् चैव ब्राह्मणानामकल्पयात

शिकणे, शिकवणे, यज्ञ-याज्ञ करणे, दान घेणे, दान देणे ही ब्राह्मणांची सहा कर्तव्ये आहेत.

[संपादन] ब्राह्मण समाज

[संपादन] सध्याच्या समाजातील ब्राह्मणांचे स्थान