अहमदनगर जिल्हा

Wikipedia कडून

हा लेख अहमदनगर जिल्ह्याविषयी आहे. अहमदनगर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
अहमदनगर जिल्ह्याचे स्थान
अहमदनगर जिल्ह्याचे स्थान

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. आजच्या परीस्थीतीत अहमदनगर जिल्हा हा सर्वात पुढारलेला आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात कोपरगांव तालुक्यात आहे.जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिली सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. 'राळेगणसिध्दी' द्वारे जिल्ह्याने जलव्यवस्थानाचा एक आदर्श निर्माण केला तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारुपास आले.

अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ चौ.कि.मी. तर लोकसंख्या ४०,८८,००० इतकी आहे.

जिल्ह्या्तील तालुके- नगर, पारनेर, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर, शेवगांव, राहुरी, रहाटा, संगमनेर, कोपरगांव, अकोले, श्रीगोंदा, जामखेड व कर्जत.

र्जिल्ह्याचे नाव अहमद शाह निझाम शाह या अहमदनगर शहराच्या संस्थापकावरुन पडले आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हाऔरंगाबाद जिल्हा, पूर्वेस बीडउस्मानाबाद जिल्हा, दक्षिणेस पुणे जिल्हासोलापूर जिल्हा तर पश्चिमेस पुणे जिल्हाठाणे जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री घाट असून घाटातील कळसुबाई हे सर्वोच्च टोक याच जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या भीमा प्रवरा, सीना व गोदावरी ह्या आहेत. जिल्ह्यातील हवामान विशेषत: उष्ण व कोरडे आहे तर वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०१.८ मी.मी इतके आहे.जिल्ह्यात अनेक छोटे व मोठे उद्योग आहेत परंतू जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने देखिल आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी येथे आहे.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे: साईबाबा मंदिर,शिर्डी, चिंकारा व माळढोक अभयारण्य, रेणुकामाता मंदिर (केडगांव), अहमदनगर किल्ला, सिध्दटेक, शनी-शिंगणापूर, हरिश्चंद्रगड, चांदबीबी महल

[संपादन] संदर्भ



महाराष्ट्राचे निशाण महाराष्ट्र राज्य
जिल्हे नागपूरचंद्रपूरभंडारागोंदियागडचिरोलीअमरावतीअकोलावाशीमहिंगोलीनांदेडवर्धायवतमाळबुलढाणाठाणेमुंबई उपनगरमुंबई जिल्हारायगडरत्नागिरीसिंधुदुर्गनाशिकअहमदनगरपुणेसातारासांगलीकोल्हापूरनंदुरबारधुळेजळगावऔरंगाबादजालनापरभणीबीडलातूरउस्मानाबादसोलापूर
मुख्य शहरे औरंगाबादकोल्हापूरठाणेनवी मुंबईनाशिकनागपूरपुणेपिंपरी चिंचवडमुंबईसोलापूर
इतर भाषांमध्ये