जालना जिल्हा

Wikipedia कडून

हा लेख जालना जिल्ह्याविषयी आहे. जालना शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
जालना जिल्ह्याचे स्थान
जालना जिल्ह्याचे स्थान

जालना जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मध्य भागात स्थित असून मराठवाडा विभागात येतो. आधी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२ रोजी वेगळा केला गेला. जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७६१२ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या १६,१२,३५७ इतकी आहे.

जिल्हा संकरीत बियाणे-प्रक्रिया, स्टिल रिरोलींग, बीडी व कृषी-आधारीत उद्योगांसाठी प्रसिध्द आहे. महिको, महिंद्रा, बेजो शितल या महत्वाच्या संकरीत बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत. शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास हे जालना जिल्ह्यातील आहेत. जालना जिल्ह्यातील तालुके- जालना, अंबड, भोकरदन, बदनापूर, घणसवंगी परतूर, मांथा व जाफराबाद. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६५०-७५० मी.मी इतके आहे. अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा गोदावरी नदीच्या खो-यात येतो. जिल्ह्याचा ७५% भाग खरिफ पीकांसाठी वापरला जातो ज्यातील ४०% रब्बी पीकांखाली येतो. ज्वारी, गहू व इतर धान्ये,कापूस ही प्रमुख पीके आहेत. जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जालना (शहर) असून ते महत्वाचे हॅंडलूम व पॉवरलूम हातमाग केंद्र आहे.

जिल्ह्यातील प्रसिध्द व्यक्ति- समर्थ रामदास स्वामी, जनार्दन मामा, बद्रीनारायण बारवळे, दासू वैद्य इत्यादी.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- राजूर येथील श्री गणेश मंदीर, अंबड येथील मत्स्योदारी देवी, जळीचा देव (जयदेववाडी).

[संपादन] संदर्भ

जालना एन.आय.सी

महाराष्ट्राचे निशाण महाराष्ट्र राज्य
जिल्हे नागपूरचंद्रपूरभंडारागोंदियागडचिरोलीअमरावतीअकोलावाशीमहिंगोलीनांदेडवर्धायवतमाळबुलढाणाठाणेमुंबई उपनगरमुंबई जिल्हारायगडरत्नागिरीसिंधुदुर्गनाशिकअहमदनगरपुणेसातारासांगलीकोल्हापूरनंदुरबारधुळेजळगावऔरंगाबादजालनापरभणीबीडलातूरउस्मानाबादसोलापूर
मुख्य शहरे औरंगाबादकोल्हापूरठाणेनवी मुंबईनाशिकनागपूरपुणेपिंपरी चिंचवडमुंबईसोलापूर
इतर भाषांमध्ये