जरुळ

Wikipedia कडून

जरुळ (Jarul) महाराष्ट्र राज्यातील आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यात एक छोटेसे खेडेगांव आहे. ते वैजापुर पासुन साधारणतः ५ कि. मी. अंतरावर सारंगी नदीकिनारी वसलेले आहे.

जरुळ
जिल्हा औरंगाबाद
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या २,४४२
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२४३६
टपाल संकेतांक ४२३७०१
वाहन संकेतांक MH-२०
निर्वाचित प्रमुख श्री. शेषराव पाटील मतसागर
(सरपंच)
प्रशासकीय प्रमुख मतसागर
(तलाठी)
संकेतस्थळ नकाशातील जरुळचे स्थान


अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

हे एक जुने छोटेसे खेडे असून, येथील रहिवासी राजेरजवाड्यांच्या आठवणी सांगतात. असे मानले जाते की सूर्यवंशी राजा निकमवंशीय पिढ्या येथे नांदत आहेत. कालांतराने, मुळचे निकम हे आडनांव बदलून त्याचे मतसागर असे बनले.

[संपादन] उद्योगधंदे

महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळाने येथे नवीन औद्यौगिक वसाहत निर्माण करण्याचे काम हाती घेतले असून, काही छोटे प्रकल्प येथे होऊ घातले आहेत.

[संपादन] दळणवळण

येथील सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक रोटेगाव आहे. हे उत्तर मध्य रेल्वेवर आहे. औरंगाबाद ते मुंबई हा राज्य महामार्ग येथुन पुढे नासिककडे जातो व त्याची दुसरी शाखा शिर्डी या पौराणिक शहराकडे जाते.

काही महत्वाची वैशिष्ट्ये -

  • लघु पाटबंधारे प्रकल्प
  • रोटेगांव रेल्वे स्थानक
  • महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळाची औद्यौगिक वसाहत
  • राज्य महामार्ग
  • शिर्डी - साई बाबा मंदिरला जाण्यासाठीच्या प्रवासादरम्यान विसावा

[संपादन] शिक्षण संस्था

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ यांची ईयत्ता दहावीपर्यंत शाळा येथे आहे. तसेच दहावीच्या परिक्षांचे केंद्रही येथे आहे.

[संपादन] प्रसिध्द व्यक्ति

हैदराबाद मुक्तीसंग्राममध्ये सहभागी स्वातंत्र्य सैनिक.

[संपादन] बाह्य दुवे