औरंगाबाद जिल्हा

Wikipedia कडून

हा लेख औरंगाबाद जिल्ह्याविषयी आहे. औरंगाबाद शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
औरंगाबाद जिल्ह्याचे स्थान
औरंगाबाद जिल्ह्याचे स्थान

औरंगाबाद जिल्हा (अनेकवेळा औरंगाबादेस संभाजीनगर म्हणून संबोधले जाते) महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद शहरात मा.उच्च न्यायालय आहे तर जगप्रसिध्द अजंठा-एलोरा गुफा, बीबी का मकबरा, दौलताबाद देवगिरी किल्ला याच जिल्ह्यात आहेत. औरंगाबाद जिल्हा हा भारतातील एकमेव जिल्हा आहे ज्यात २ जगप्रसिध्द हेरिटेज वास्तू आहेत. जिल्ह्यातील पैठण हे ऐतिहासीक शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिध्द आहे. तुघलकाने औरंगाबाद येथील दौलताबादेत आपली राजधानी वसवली होती (या मुळे औरंगाबाद हे एकेकाळी भारताची राजधानी होती असे म्हणण्यास हरकत नाही)[१]. औरंगाबाद हे मोगलांच्या अस्ताचे ठिकाण होते. औरंगजेब हा शेवटचा मोगल राजा होता.

बीबीका मकबरा
बीबीका मकबरा

जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या २८,९७,०१३ (२००१ जनगणना) इतकी आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीके- कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गोदावरी, तापी, पूर्णा औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके- औरंगाबाद (औरंगाबाद शहर २ विधानसभा क्षेत्रात विभागलेले आहे - पूर्व आणि पश्चिम), कन्नड , सिल्लोड, फुलंब्री, वैजापुर, गंगापुर, खुलताबाद, सोयगाव, पैठण

जिल्ह्याच्या पूर्वेस जालना जिल्हा, पश्चिमेस नाशिक जिल्हा, दक्षिणेस बीड जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा तर उत्तरेस जळगाव जिल्हा आहे.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- अजंठा- एलोरा लेण्या-५व्या-८व्या शतकात गुफेत साकारलेल्या लेण्या, दौलताबाद किल्ला-तुघलकाची राजधानी ,खुल्ताबाद- औरंगझेबाची कबर, बीबी का मकबरा-बेगम राबीया (औरंगझेबाच्या पत्नीची कबर, घृष्णेश्वर मंदीर- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, पानचक्की, पैठण, नाथसागरम, औरंगाबाद गुफा

हे सुध्दा पहा

[संपादन] संदर्भ

इतर भाषांमध्ये