बेळगांव

From Wikipedia

*दर २४ तासात एक पेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळा.

अनुक्रमणिका

[संपादन] बेळगांव शहर

बेळगांव हे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर-पश्चिमी कर्नाटक या सीमाभागातील मार्कंडेय नदी किनाऱयावरील एक सुंदर शहर आहे. बेळगाव समुद्र सपाटी पासुन २५०० फुट(७६२ मिटर) उंचीवर वसले आहे. कदाचित बेळगावचे जुने नाव वेणुग्राम (बांबुचे खेडे) असावे. १२ व्या शतकाच्या उत्तरर्धात राट्टां नी त्यांची राजधानी सौंदत्ती येथुन बेळगाव येथे हलविली. बेळगांव येथे १०० एकर परिसराचा एक किल्ला आहे. या किल्यात राट्टांचा अधिकारी बिचीराजा याने १२०४ मध्ये 'कमल बस्ती' या सुंदर वास्तुची निर्मिती केली. 'कमल बस्ती' वास्तुच्या आत छतास सुदंर कमळ आहे. 'नेमीनाथ तिर्थंकार' यांची प्रतिमा आहे. इतर ठिकाणी या किल्याचा बांधकामाचे वर्ष १५१९ असे आहे . (या वर्षा बद्दल तज्ञांनी योग्य दुरुस्ती करावी. या किल्यात काही जैन मंदीरे, मारुती मंदीर आहेत. चालुक्य बांधकामाचे वैशिष्ट्य सर्वत्र आढळते. शाहपुर हा शहराचा विभाग सांगली राज्याचा आणि वडगाव हे छोटे कुरुंदवाड या राज्यात होते .वडगाव जवळ सात्वाहन कालिन बुद्ध आवशेष मिळाले.

या भागात मराठी बोलली जाणारी प्रमुख भाषा असुन कन्नड हि शासकिय भाषा असली तरी महानगर पालिकेचे काम दोन्ही भाषात चालते.[1] बेळगाव हे क्षेत्र कर्नाटक राज्यात असले तरी स्थानिक जनता आणि महाराष्ट्रराज्य व समस्त मराठी मंडळींची इच्छा हे क्षेत्र महाराष्ट्र राज्यात असावे अशी आहे.बेळगांवाला इंग्रजीत Belgaum असे म्हणतात.

[संपादन] शैक्षणिक स्थान

महविद्यालये


[संपादन] काळरेषा (TimeLine)

  • ११९९ - किल्यात रट्ट राजा कार्तिविर्य ४था याचा कन्न्ड भाषा नागरी लिपी शिलालेख स्तंभ.
  • १२०० - राट्टांची राजधानी.
  • १२०४ - 'कमल्बस्ती'ची निर्मिती.
  • --- - सेवुनास(यादव) राज्य.
  • १२६१, किल्यात सेवुना(यादव)कृष्णा याचा कन्न्ड भाषा नागरी लिपी शिलालेख स्तंभ.
  • --- - विजयनगर चे आधिपत्य.
  • १४७४ - बहमनी सुलतान महमुद गावनने बेळगाव जिंकले
  • --- - फ़ारसी शिलालेखात बिजापुरच्या सरदार असदखानाने किल्यात 'साफ़ा मस्जीद' चे बांधकाम केल्याचा उल्लेख.'साफ़ा मस्जीद' ला ३ दरवाजे, प्रवेशद्वारास फुलाफुलांची आणि Calligraphy नक्षीकाम.
  • --- - आदीलशहा ने किल्याचे पुनरुज्जीवन केले.
  • १५८५-८६ शेरखानने किल्यात जामा मस्जीद बांधली. या मस्जीदी जवळ खंजर वली चा दर्गा आहे.
  • --- - मुघल राज्य. आझमनगर असे नाम:करण.
  • --- - मराठा राज्य
  • १८१८ - ब्रिटीश राज्य.
  • १९४७ - स्वतंत्र भारत गणराज्य १९४७-१९५६ बॉंबे प्रेसिडेंसीचा भाग.
  • १९५६ - कर्नाटक राज्याचा भाग

[संपादन] बेळगांव जिल्हा

बेळगांव हे जिल्हा केंद्र असून शहरासाठी महानगर पालिका आहे. जिल्ह्यात १० तालुके आहेत.

  • बेळगांव तालुका
  • हुक्केरी तालुका
  • चिक्कोडी तालुका
  • अथनी तालुका
  • रायबाग तालुका
  • गोकाक तालुका
  • रामदुर्ग तालुका
  • सौंदती तालुका
  • बैलहोंगल् तालुका
  • खानापुर तालुका

[संपादन] वृत्तपत्रे

दै. तरुण भारत

दै. पुढारी (बेळगांव आवृत्ती)

दै. सकाळ (बेळगांव आवृत्ती)


[संपादन] महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न

Stop! या विभागाच्या निःपक्षपातीपणाबद्दल वाद आहे.

बेळगाव जिल्हयात मराठी भाषिकांचे बाहुल्य असतानाही बेळगावास महाराष्ट्रा पासुन तोडल्यामुळे येथील जनतेच्या भावना तिव्र आहेत. पुर्वी बेळगांव तात्कालीन बॉम्बे या राज्यात होते. पण कर्नाटक राज्याच्या निर्मिती वेळी लोकमताचा आदर न करता कर्नाटकात विलीनीकरण करण्यात आले. त्या घटनेमुळे बेळगांवात संतापाची लाट उसळली, मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली.अनेकजन गोळीबारात ठार झाले. गेली ५० वर्षे बेळगांव ची जनता महराष्ट्रात जाण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे. तिथे महाराष्ट्र एकीकरण समीती नावाचा पक्ष आहे, जो या प्रश्नाचा नेहमी पाठपुरवठा करतो. सुरुवातीला या पक्षाची मजबूत पकड होती, त्यामूळे बऱ्याच वेळा विधानसभेसाठी ७ आमदार निवडून यायचे, सद्या ३-४ आमदार निवडून येतात. बेळगांव महानगर पालिकेवर नेहमी मराठीचे बहुमत आहे. तिथली जनता महाराष्ट्रात जाण्याची ईछा अनेक प्रकारे व्यक्त करते. कर्नाटक सरकार मराठी द्वेषी आहे, अशी तिथल्या लोकांची भावना आहे. २००५ मद्ये बेळगांव महाराष्ट्रात सामील असा ठराव केल्यानंतर, तिथली महानगर पालीका बरखास्त करण्यात आली. यामूळे परत आंदोलने होउन हा विषय परत चर्चेत आला. महाराष्ट्र सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्य नायालयात याचीका सादर केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने ह्याची द्खल घेतली असुन केंद्र सरकाराला या बाबतीत आपली बाजु मांडावयास सांगितली होती.केंद्र सरकारने कर्नाट्काची बाजू उचलून धरली आहे.केंद्राच्या या पवित्र्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असुन महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी यावर टीका केली आहे.[2]

[संपादन] ताज्या घडामोडी

केंद्र सरकारने कर्नाटकची बाजू उचलून धरल्याने महाराष्ट्रात तीव्र असंतोष निर्माण झाला व केंद्र व राज्य सरकार विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनले.या पार्श्वभूमीवर केंद्राने आपली बाजू बदलली असून सर्वोच्च न्यायालयात नव्याने बाजू मांडणार असल्याचे सांगितले आहे.

[संपादन] बेळगांव-वादाची काळरेषा

* पं. नेहरूंची घोषणेच्या तीव्र प्रतिक्रियेत महिलेसह पाच धारतीर्थी (१९५६)

* पहिल्याच विधानसभेत समितीचे तब्बल सात आमदार: म्हैसूर सरकार हादरले (१९५७)

* केंद्राला जाग आणण्यासाठी सीमावासियांचा सत्याग्रह (१९५८)

* मुख्यमंत्री निजलिंगप्पांची आश्वासने पण नंतर माघार

* साराबंदी आंदोलन (१९६०)

* दुसर्या निवडणुकीतही मराठी भाषींकांचा विजय

* सेनापती बापटांच्या उपोषणातून महाजन आयोगाची निर्मीती

* महाराष्ट्राने विसंगत महाजन अहवाल एकमताने फेटाळला

* कानडीकरणाविरूद्ध आंदोलन

* सीमाप्रश्नी केंद्रीय ग्रुहमंत्र्यांच्या उभय मुख्यमंत्र्याशी वाटाघाटी पण ...

* सद्द स्थिती

जास्त माहीतीसाठी..

  • दैनीक पुढारीवर डाव्या बाजूला "चर्चेचे विषय" मधील २८ नोवेंबर २००५ ते १६ डिसेंबर २००५ च्या वाय्.एन्.मजुकर यांचे लेख पहा.

[संपादन] संदर्भ

[संपादन] जास्त माहीतीसाठी

  • दैनीक पुढारीवर डाव्या बाजूला "चर्चेचे विषय" मधील २८ नोवेंबर २००५ ते १६ डिसेंबर २००५ च्या वाय्.एन्.मजुकर यांचे लेख पहा.