राहुल द्रविड
From Wikipedia
राहुल शरद द्रविड (जन्म जानेवारी ११, ई.स. १९७३, इंदूर, मध्य प्रदेश) हा भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचा वर्तमान कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला ई.स. १९९६ मध्ये सुरूवात केली. जगातील सर्वोत्तम फलंदाजांत एक गणला जातो. विजेता पेंढारकर या नागपूर स्थित डॉक्टरशी विवाहबद्ध.
राहुल द्रविड भारतीय क्रिकेट (भारत) |
कसोटी अनुक्रम: -- एक-दिवसीय अनुक्रम: -- |
|
Image:- | ||
बॅट धरायची पद्धत | XXXX | |
चेंडू टाकायची पद्धत | XXXX | |
कसोटी | एकदिवसीय सामने | |
सामने | १०४ | ३०० |
धावा | ९०४९ | ९६८१ |
सरासरी धावा | ५८.७५ | ३९.६७ |
शतक/अर्धशतक | २३/४६ | १२/७२ |
सर्वाधिक धावा | २७० | १५३ |
टाकलेली षटके | २० | ३१ |
बळी | १ | ४ |
दर बळीमागे दिलेल्या धावा | ३९.०० | ४२.५० |
१ डावात ५ बळी | XXXX | XXXX |
सामन्यात १० बळी | XXXX | --- |
सर्वोत्तम बॉलिंग | १/१८ | २/४३ |
झेल/यष्टीचीत | १४६/- | १८०/१४ |
ही माहिती ऑक्टोबर २९, इ.स. २००६ या दिवशीची आहे |
[संपादन] आंतरराष्ट्रीय कारकिर्द
राहुल द्रविडने आपल्या एकदिवसिय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९९६-९७ च्या मोसमात श्रीलंकेविरध्दच्या सामन्यात केली. विनोद कांबळीच्या स्थानावर द्रविडचा संघात समावेश केला गेला. सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये केवळ २१ धावांच्या कामगिरीमुळे द्रविडला एकदिवसिय संघातले आपले स्थान गमवावे लागले. संजय मांजरेकरच्या दुखापतीमुळे द्रविडला इंग्लंड दौऱ्याच्या दुसऱ्या कसोटीत संधी मिळाली. त्याने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात ९५ धावांची सुरेख खेळी केली. मांजरेकरच्या पुनरागमनानंतरही द्रविडने कसोटी संघातले आपले स्थान राखेल. १९९६-९७ च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात जोहान्सबर्गच्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना द्रविडने आपले पहिले कसोटी शतक झळकावले. या सामन्यात १४७ आणि ८१ धावांच्या बहारदार कामगिरीबद्दल त्यास सामनावीर घोषित केले गेले. याच मोसमात त्याने एकदिवसिय सामन्यात पाकिस्तानविरुध्द खेळताना आपले पहिले अर्धशतक फटकावले.
पहिल्या १८ महिन्यांत द्रविडने ५६.७ च्या सरासरीने ९६४ धावा जमवल्या. १९९९च्या सुरुवातीस न्यूझिलंडविरुध्दच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतकी खेळी करून विजय हजारे आणि सुनिल गावसकर यांच्यानंतर असा पराक्रम करण्याची कामगिरी केली. या सामन्यात द्रविडने तब्बल ६५३ मिनिटे किल्ला लढवून १९० आणि नाबाद १०३ धावा काढल्या आणि भारताला तो सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळाले. धावफलक
२००१ च्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील दुसऱ्या कसोटीतील १८० धावांची खेळी आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण बरोबर पाचव्या गड्यासाठीची भागिदारी भारताच्या विजयात अत्यंत मोलाची ठरली. त्या सामन्यात भारताने फॉलो-ऑन मिळाला असतानाही विश्वविजेत्या संघावर विजय मिळवला.
(अपूर्ण)
मागील: सौरव गांगुली |
भारतीय क्रिकेट संघाचे नायक ते |
पुढील: ' |
क्रिकेटच्या कसोटी सामन्यांत ५०च्या वर धावांची सरासरी असलेले भारतीय फलंदाज |
---|
राहुल द्रविड | सुनील गावसकर | विनोद कांबळी | वीरेंद्र सेहवाग | सचिन तेंडुलकर |