विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.2
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:Paripurti.pdf/25
104
20847
230043
69901
2026-05-16T11:59:47Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230043
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / २७ }}</noinclude>काठावर आमच्या माणसांच्या बोलण्याचा आवाज मी जणू स्वप्नात ऐकत होते. "अक्कलदाढा आलेल्या दिसत नाहीत- फारच तरुण होती." ही नोंद मला नकळत मनात होत होती. पण माझे अंतःकरण काही विलक्षण हुरहुरीने औत्सुक्याने भरून गेले होते. त्या डोळ्यांच्या खाचात मला बुबुळे हालल्यासारखी वाटली. ते लखलखते दात मागल्या ओळखीने हसल्यागत भासले. माझी बोटे तिच्या अरुंद निमुळत्या हनुवटीशी गुंतली होती, पण हृदय आर्तपणे त्या सांगाड्याला विचारीत होते, "तू ती मीच का ग? तू ती मीच का ग?"<br>
{{right|{{xx-larger|☆}}}}{{nop}}<noinclude></noinclude>
lm7bvug0gvswy9iyqdnuyciz6e7mdtt
पान:Paripurti.pdf/26
104
20848
230044
69909
2026-05-16T12:06:10Z
कल्पनाशक्ती
3813
230044
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="जाधव प्रियांका" /></noinclude>
{{larger|'''४'''}}<br>
{{larger|'''स्त्री-व-संस्कृती'''}}
{{block right|काही वर्षांपूर्वीची गोष्ट मी थोडे दिवस<br>
वाईला राहिले होते. त्याच वाड्यात मराठ्याचे<br>
एक तरुण जोडपे होते. नवरा उत्तमपैकी गवंडी<br>
होता, व बायको-एक-दोन घरी मोलमजुरी करी.<br>
दोघेही देखणी, हसतमुख, नेहमी ठाकठीक<br>
पोशाक केलेली अशी असायची. मी ज्यांच्या<br>
घरी राहिले होते. त्यांना म्हटले, "कसा जोडा<br>
छान आहे, नाही?" वयस्क गृहस्थ व त्यांच्या<br>
पत्नी दोघेही एकदम म्हणाले "अहो, दिसायला<br>
छान असून काय उपयोग? तो माणूस फार निर्दय<br>
आहे. महिना-पंधरवड्यात एकदा तरी बायकोला<br>
मारतो." मी म्हटले, "ती तर चांगली आनंदी<br>
आणि अंगा-पिंडाने गुटगुटीत दिसते. तिला<br>
माराचं काही फारसं वाटेत नाहीसं दिसतं,"<br>
"छेः! छेः!" काका मान हलवून म्हणाले, "हे<br>
तुमचे उदगार फारच अनुदार आहेत. तिला म्हणे<br>
माराचं काही वाटत नाही! जणू-कोयं ही रीतच<br>
आहे नवरा-बायकोची!" मी ताबडतोब उत्तरले,<br>
"हे पाहा... आपण पुढचे चार दिवस तालुक्यात<br>
हिंडणार आहोत ना, तर मी माझं काम करीन<br>
आणि तुम्ही भेटेल त्या शेतकऱ्याला तो<br>
बायकोला कधी मारतो का नाही ते विचारा,"}}<noinclude></noinclude>
3l0qteep5wvkf21ebrbdim47pmi3ksx
पान:Paripurti.pdf/27
104
20849
230045
69915
2026-05-16T12:12:54Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230045
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| ३० / परिपूर्ती}}</noinclude>'हो ना' करता करता तसे करायचे ठरले व पुढचे चार दिवस काकांनी प्रत्येक शेतकऱ्याला विचारले, "काय हो, कधी बायकोला मारता का?" आणि त्यांना उत्तर मिळायचे, "हो रोजच नाही काय- कधीमधी लागतंच माराव." काका बिचारे सुधारक, त्यातून अमेरिकेचे पाणी चाखून आलेले; प्रत्येकाकडून हे उत्तर मिळालेले ऐकून त्यांचे हृदय कसे पिळवटून निघायचे! वाईला परत येताना एक खोल निःश्वास टाकून ते मला म्हणाले, "खरोखर, हिंदुस्थानातले पुरुष सुसंस्कृत कधी होणार कोण जाणे! शिक्षणानं ह्या कार्याला किती वर्षे लागतीलसं वाटतं तम्हाला?" काकांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे मी टाळले; कारण सुसंस्कृत काय आणि असंस्कृत काय, आणि कोण सुसंस्कृत ह्याबद्दल मला उमजच पडत नव्हता. मी समाजातील गोष्टी फक्त पाहात होते, आणि संस्कृतीची व्याख्या करणे दिवसेंदिवस जास्त जास्त अवघड वाटू लागले होते<br>{{gap}}असाच दुसरा एक अनुभव मला आठवला. बालगुन्हेगारांच्या न्यायालयातील गोष्ट. आमच्यापुढे एक तरुण जोडपे हजर झाले होते. नवऱ्याची फिर्याद होती की, बायको सासरी राहत नाही, सारा वेळ माहेरी पळून जाते. बायको म्हणे, नवरा मारतो. नवऱ्याबरोबर त्याचे आईबाप व बायकोबरोबर तिचे आईबाप आले होते आणि दोघेही आपापल्या लेकरांना भर देत होती. आम्ही बायकोला नवऱ्याच्या स्वाधीन केले, व त्याच्या कडून लिहून घेतले की, बायकोला मारणार नाही. ते जोडपे व त्यांच्याबरोबरचा परिवार निघून गेला, पण परत पंधरा दिवसांनी ही भांडणारी जोडी माघारी आली. परत त्यांच्या कटकटी चालू झाल्या. मी पाहिले तो नवरा-बायकोत खोड ठेवायला काही जागा नव्हती. तो चांगला जवान वीस वर्षाचा होता; ती शोभेशीच चांगली देखणी, धडधाकट, वयाने सुमारे १४-१५ ची अशी होती. मी विचारले, "काय रे, बायकोला मारतोस का?" तसे तो शरमेने म्हणाला, "मी कशाला मारतो जी? जवा तवा मला कोडताचा धाक दाखवते." तिच्या तोंडावर थोडे तुच्छतेचे व विजयाचे हसू झळकले. मी थोडा विचार करून बायकोच्या आईबापांना व नवऱ्याच्या आईबापांना ह्या जोडप्याच्या बिऱ्हाडी यायला बंदी केली. दोघांकडून जामीन लिहून घेतला आणि नवरा-बायकोला जायला सांगितले. माझा ऑफिसर मला विचारतो, नवऱ्याकडून न मारण्याबद्दल घेतलेला करार संपला आहे, तो परत लिहून घेतला पाहिजे. मी मानेनेच नकार देऊन त्या जोडप्याची बोळवण करून सहा<noinclude></noinclude>
g7k8rzt0goiuvohswwo4163p6h5sion
पान:Paripurti.pdf/28
104
20850
230046
70130
2026-05-16T12:16:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230046
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader||| परिपूर्ती / ३१ }}</noinclude>महिन्यांनी परत कोर्टात हजर राहण्याचा हुकूम दिला. ते प्रकरण गेल्यावर सगळ्यांनी मला विचारले, "आता त्यानं तिचा जीव घेतला तर?" मी म्हटले, "पाहू या काय होतं. तुम्ही लांबून नजर ठेवा, आणि सतरांदा जाऊन त्यांना सतावू नका." मी हे सर्व जवळजवळ विसरून गेले होते, तो सहा महिन्यांनी ऑफिसरने आणून दोघांनाही हजर केले. "काय रे, ठीक चाललं आहे ना?" नवरा ह्या कानापासून त्या कानापर्यंत हसत म्हणाला, "हां जी." बायकोला विचारले, "काय ग, तुझं म्हणणं काय आहे?" ती आज माझ्या डोळ्याला डोळा भिडवायला तयार नव्हती. तिचा बेगुमानपणा पार नाहीसा झाला होता. मी तिला परत विचारले, "नवरा मारतो का ग?" "फार नाही जी." तिने उत्तर दिले. दोघांनाही काहीतरी बोलायचे होते, पण ती घोटाळत उभी होती. इतक्यात तिची आई पुढे झाली व "मुलीला माहेराला न्यायचे आता दिवस आहेत, नेऊ का?" म्हणून विचारू लागली. मी मुकाट्याने दोघा व्याहीविहिणीवरची बंदी उठवली आणि 'शेवट समाधानकारक लागला.' असा शेरा मारून केस निकालात काढली. <br>{{gap}}आज ह्या पूर्वीच्या गोष्टी पुन्हा आठवल्या. गाडीत मनस्वी गर्दी होती दुसऱ्या वर्गातसुद्धा लोक उभे होते. मी माझ्या पेटीवर एका कोपऱ्यात बसले होते. तो माझे लक्ष पुढेच उभ्या राहिलेल्या एका तरुण बाईकडे गेले, व मी तिला माझ्याजवळ पेटीवर जागा करून बसायला बोलावले. गेला अर्धा तास स्टेशनवर इकडेतिकडे जाताना मी तिला पाहिले होते. आम्ही अगदी जवळजवळ खेटूनच माझ्या लहानशा पेटीवर बसलो. तिने थोड्या वेळाने विचारले, "तुम्ही आमक्या-अमक्या ना?" मी "होय" म्हणून अर्थातच तिला "तुम्ही कोण?" म्हणून प्रश्न केला. तिने आपले नाव सांगितले, मी म्हटले, "हां, तुमच्या कविता मी वाचल्या आहेत; त्याच ना तुम्ही?" तिचा काळासावळा पण मोहक चेहरा आनंदाने खुलला. मला तिचा चेहरा गोड व निर्व्याज वाटला. तिचे बोलणे सरळ व खुलास होते. बांधा ठेंगणाच होता. अंगापिंडानेही ती चांगली सशक्त दिसली. थोडक्यात सांगायचे म्हणजे चार महाराष्ट्रीय बाया असतात तशी ती होती. तिने मोठ्या उत्साहाने आपल्या कामाची माहिती दिली. आपले मुख्य कसे दिलदार आहेत- त्यांचे बोलणे- चालणे कसे मनमोकळे असते, काही चुकले तर ते कसे नीट समजावून सांगतात, वगैरे गोष्टी मला ऐकवल्या. तिच्या कचेरीतील मुख्य मला ठाऊक होते. कोणावरही चटकन छाप बसावी असे ते होते. त्यांचा देह धिप्पाड,<noinclude></noinclude>
tomqi6v8zomil9htyydd7psuzv39g29
पान:Paripurti.pdf/29
104
20851
230047
70146
2026-05-16T12:26:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230047
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| ३२ / परिपूर्ती}}</noinclude>त्याचे हसणे सति मजली त्यांचे बोलणे मोठ्यांदा; ज्याला मध्यम स्थितीतील लोंक पापभीरूपणा म्हणतात त्यांचा अभाव, स्वभावाने दुष्ट व क्षुद्र नव्हते, पण एकदा शत्रुत्व आले तर शाब्दिक व वेळ पडल्यासं शारीरिक हल्ला करण्यास मागेपुढे न पाहणारे असे होते. साहित्यगुणही त्यांच्यात होते. माझ्याशी बोलणाऱ्या बाईवर त्यांची छाप पडावी ह्यात काहीच नवल नव्हते. पण बायका बोलायला लागल्या म्हणजे गोष्टी निघायच्याच. ह्या गप्पा झाल्यावर तिने मला विचारले, "मुलं किती? केवढी आहेत? तुमच्याशिवाय राहतात का? मीही पण तीच चौकशी केली. बाई उत्तरली, "मला मुलं नाहीत" "खरंच, तमंचं लग्न झालं नसेल नाही!" "छे! माझं लग्न झाल्याला झाली चांगली सहा वर्ष!" ती म्हणाली, उगीच आपण मुलाबद्दल प्रश्न विचारले असे वाटून मी गप्प बसले. थोडा वेळ थांबून बाई आपणहूनच म्हणाली "मी माझ्या नवऱ्याबरोबर राहात नाही" तरीसुद्धा पुढे प्रश्न विचारण्यांचा धीर मला होईना. तिलाच काय वाटले कोणास ठाऊक, ती आपली हकीकत पुढे सांगू लागली, "माझे आई-वडील वारले व माझ्या एका चुलत्यान मला वाढवलं. मी मॅट्रिक झाल्यावर माझ्या मनात नसताना सुद्धा त्यांनी माझ लग्न करून दिल" तुमचे यजमान अशिक्षित आहेत होय? मी विचारले! छे! छे! चांगले एम. ए. पीएचडी आहेत, पण माझ मनच त्याच्याकडे ओढल जाईना. मी मनात म्हंटले, कालिदासानच मुळी तरुण मुलीनी मोकळीक दिली आहे. ना 'तो काही विलोभनीय नव्हता असे नाही- तिला काही समजत नव्हते असेही नाही. पण तिला तो नाही आवडला झाले! कारण व्यक्ती तितक्या प्रकृती' असे म्हणून त्याने नाही का इंदुमतीच्या स्वयंवराचे वर्णन केले? बाई त्या इंदुमतीच्याच परंपरेतील तू! तरीदेखील माझे चार पावसाळे जास्त झाले होते; नवऱ्याजवळ न राहणाऱ्या बाईचे जीवन किती कठीण ह्याची जाणीव मला होता. तिच्या आत्मविश्वासाचे थोडे कौतुक आणि तिच्या मुग्धपणाबद्दल थोडी करुणा वाटूनच मी विचारले, "लग्न मनाविरुद्ध झालं तरी नवरा जर सदगुणी व सुशिक्षित असेल तर त्यांचं आपलं पटत का नाही हे तरी तुम्ही निदान पहावयाच होत! कदाचित सहवासानं प्रेम उत्पन्न झालं असत!" "तोही प्रयत्न मी करून पाहिला" ती म्हणाली. "काय! त्यांचा स्वभाव चमत्कारिक आहे!" मी विचारले. "छे! तसं काही नाही, ते फार सुस्वभावी आहेत, शिकलेलें आहेत" ती थोडी थांबली, नंतर मान हलवून<noinclude></noinclude>
irj1qptrxc8w7p09zvlhaefzsdfr8n9
पान:Paripurti.pdf/30
104
20852
230048
70155
2026-05-16T12:29:38Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230048
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader||| परिपूर्ती / ३३ }}</noinclude>म्हणाली, "त्यांच्यात तडफ म्हणून नाहीच; ते फारच गरीब आहेत हो! मी त्यांच्याबरोबर बिऱ्हाड थाटून होते की- कधी एक अवाक्षर नाही की रागावणं नाही!" माझ्या डोक्यात लख्खन प्रकाश पडला. मला माझा वाईचा अनुभव आठवला, मला कोर्टातील केस आठवली, माझ्या ओळखीचे आणखी एक कुटुंब आठवले. गृहस्थ सुसंस्कृत, विद्वान व रसिक होता- त्याचे ते उदास, करुण डोळे, त्याच्या बायकोचा खुला उमदा चेहरा, त्याच्यावर दिसत असलेला आत्मविश्वास, किंचित पुरुषी उद्धटपणा हे आठवले. ते जगात दंपती होते, पण त्यांचे खरे नाते नवरा-बायकोचे नव्हते, मित्र-मैत्रिणीचे नव्हते, तर माता-पुत्राचे होते. कोर्टातील केस सोपी होती, तिचा निकाल समाधानकारकपणे लावता आला... तेथील मंडळी एकमेकांना ओळखून होती; पण मध्यम वर्गाचे सर्वच अर्धवट. माझ्या शेजारी बसलेली तरुण बाई मला विचारीत होती, "काय हो, आता घटस्फोटाचा कायदा झाला म्हणजे मला नीट काडीमोड मिळेल, नाही का!" पण माझे मन दुसरेच एक कोडे सोडविण्यात गुंतले होते— वरवर संस्कृतीची आवरणे असलेल्या, पण आतून रानटी पौरुषाची पूजा करणाऱ्या ह्या 'तडफदार' तरुणी आणि सुसंस्कृत, शिक्षणाने कोमल मनोवृत्ती झालेले अहिंसक तरुण ह्यांची जोडी एकत्र नांदणार कशी!<br>
{{right|{{xx-larger|☆}}}}{{nop}}<noinclude></noinclude>
l5wpbf48a4kcxq3lxc2zdpso38omync
पान:Paripurti.pdf/32
104
20854
230061
70187
2026-05-17T11:02:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230061
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| ३६ / परिपूर्ती}}</noinclude>भिंतीवर डोकं आपटलं. मग सासूबाई खूप बोलल्या व त्यांनी मारलं." मैनेने खालच्या मानेने सांगितले. "अग, पण तू त्याची आई. तुला नाही का त्याची काळजी? सांगावं असं सासूबाईंना." मैनेची मान वरती झाली, तिचे डोळे चमकले. भुवया रागाने आकुंचित झाल्या. तिने रुद्ध स्वरात उत्तर दिले, "मी तसं सासूबाईंना सांगितलं, तर त्या म्हणाल्या, "चूप-चूप, किती तोंड करतेस? म्हणे आई! तू त्याला सांभाळणारी दाई आहेस दाई! म्हणे 'पोसल माझ्या पोराला!' कुठचा तुझा पोर? तुझ्या कुणग्यात तो पोसला. कुळाच बीज रक्षण करायला दिलं. तुला खायला घातलं त्या अन्नावर तो पोसला. पहिल्यांदा आत पोसलास, आता बाहेर पोसतेस... दाई ती दाई, आणि वर मिजास पाहा!' पडल्या-पडल्याच मी तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला शांत केले. पण मनाच्या त्या त्रस्त परिस्थितीतही मला आठवण हा क्षणभर हसू लोटले.
{{Block center|<poem>"भस्त्रा माता पितुः पुत्रः येन जातः स एव सः।
भरस्व पुत्रं दुष्यन्त मावमंस्थाः शकुन्तःलम् ॥"</poem>}}
{{gap}}"आई केवळ चामड्याची पिशवी आहे. मुलगा बापाचाच. बापच त्याच्या रूपे जन्म घेतो. हे दृष्यंत राजा, मुलाला सांभाळ, शकुंतलेचा धिक्कार करू नकोस."<br>
{{gap}}मैनाच्या सासूबाई आणि दुष्यंतराजा ह्यांच्यात किती बर अंतर. असेल. तीन-चार हजार वर्षांचे. पण हा चार हजार वर्षांच्या कालदरीने विभागलेले हे दोन जीव एकाच संस्कृतीने कसे अगदी जवळ बांधले गेले होते!<br>{{gap}}हाच तो बीजक्षेत्रन्याय. पण त्याचा उपयोग मात्र दुधारी शस्त्रासारखा दुहेरी होई. दुष्यंताच्या परिस्थितीत जेव्हा एखाद्या स्त्रीशी लग्न झाल्याचा पुरावा देता येत नसेल- किंबहुना लग्न झाले नसेल- तेव्हा ज्याचे बीज त्याचे संतान असा युक्तिवाद लढवून मुलावर हक्क सांगायचा आणि जेव्हा पुत्रोत्पत्तीची शक्ती नसेल तेव्हा क्षेत्रावर हक्क सांगून जे उगवेल ते शेताच्या धन्याचे म्हणून त्यावर हक्क सांगायचा व बऱ्यावाईट मार्गाने संतती मिळवायची असा पूर्वीचा राजमार्ग होता.<br>{{gap}}मातृत्व ही एक नैसर्गिक घटना आहे. पितृत्व हा एक सामाजिक संकेत आहे आणि समाजात नैसर्गिक घटनांपेक्षा सामाजिक संकेतानाच जास्त प्राधान्य असते- इतकेच नाही तर नैसर्गिक घटनांचा उपयोग सामाजिक<noinclude></noinclude>
fd896y8af6bgjixmk7rqzv1s710o2uf
पान:Paripurti.pdf/33
104
20855
230062
70189
2026-05-17T11:08:26Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230062
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / ३७ }}</noinclude>संकेतांना बळकटी आणण्यासाठी होतो. विवाह हाही एक अतिप्रभावी सामाजिक संकेत आहे. त्यात मालकीहक्क आहे, वारसा आहे, संपत्तीच्या सर्व कल्पना केंद्रीभूत झालेल्या आहेत. जिच्याशी लग्न झाले, तिच्यावर नवऱ्याची सर्वस्वी मालकी असते व तिची संतती नवऱ्याची होते. एकदा हा संकेत मान्य केला म्हणजे मूल कोणाच्या बीजाचे हा प्रश्न विवाहबंधनात झालेल्या संततीबद्दल उत्पन्न करून घोटाळा मात्र निर्माण होतो व पूर्वी ह्या प्रश्नाला फारसे महत्त्वही नव्हते. बायको लग्नाची नसली तरच कोणाचे बीज हा प्रश्न उदभवे. विवाहातील व विवाहबाह्य, औरस व अनौरस हे भेद हळूहळू निर्माण झाले.<br>{{gap}}दुष्यंताच्या कथानकात- म्हणजे कालिदासाचे शाकुंतल नव्हे, तर महाभारतातील आख्यान- घटना मोठी मजेदार आहे. दुष्यंत कोण हे समजून शकुंतला त्याच्या गळ्यात पडली. टाकून दिलेल्या, आश्रमात वाढलेल्या या अनाथ महत्त्वाकांक्षी मुलीने मोठा डाव रचला, मोठे धाडस केले, पण बिचारीला तोंडघशी पडायची पाळी आली होती. ती मुलगा घेऊन राजाच्या राजधानीत गेली, पण राजाने तिला ओळखूनही जणू काही आपण त्या गावचेच नाही असे दाखवले. राजाने तिच्या आईचे चारित्र्य बाहेर काढले, तर शकुंतलेने त्याला दुरुत्तरे केली. 'गाठ पडली ठकाठका' असा हा प्रकारे झाला. ती जीव तोडून त्याला दिलेल्या आणाभाकांची आठवण देत होती. ती म्हणे, "राजा, तू कितीही खोटं बोल. तुला कितीही वाटो की, त्यावेळी तर मी एकटा होतो, माझ्या कृत्याला साक्षी कोणी नव्हतं, पण सूर्य-चंद्र, जल आणि अग्नी, आकाश आणि पृथ्वी, तुझं स्वतःचं हृदय आणि यमधर्म, दिवस-रात्र, सकाळ आणि सांज ही सर्व मनुष्याच्या प्रत्येक कृत्याचे निरीक्षण करतात बरं!" पण ही सर्व विनवणी व्यर्थ होती. राजाने त्या वेळीच तिला राजधानीत आणले असते तर लग्न न होताही ती त्याच्या अंतःपुरात राहती. पण आता इतक्या वर्षांनी केवळ मुलाच्या आशेने राजाने एका स्वैरिणीचा स्वीकार केला हा ठपका त्याला नको होता. ती त्याच्या घरी राहून मग तिच्या पोटी कोणाचेही पोर असते तरी त्यावर त्याची सत्ता होती. पण केवळ एका वेळी काही वर्षांपूर्वी मी हिच्याशी संगत केली होती असे म्हणून मुलावरील त्याचे पितृत्व सिद्ध होत नव्हते. म्हणून आकाशवाणी व्हावी लागली व 'मुलगा तुझ्या बीजाचा' अशी खात्री पटवून शकुंतलेला त्याला स्वीकारता आली. त्याच्या बीजाची संरक्षक म्हणून तिचे चीज, एरवी नाही.<noinclude></noinclude>
0gyfovy3plpk3i4wsd7d2ep0b6475u4
पान:Paripurti.pdf/34
104
20856
230066
70207
2026-05-17T11:38:03Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230066
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||३८ । परिपूर्ती}}</noinclude>ह्याउलट विधिपूर्वक सर्वांच्या समक्ष लग्नाची बायको आणली म्हणजे तिच्या पोराच्या मालकीसाठी बीजकर्तृत्वाची मुळी गरजच लागत नव्हती. एकदा स्त्रीवर मालकी सिद्ध झाली म्हणजे मग तिला कुवारपणी, विधवापणी, आपणापासून वा इतरांपासून होणाऱ्या सर्व मुलांचे पितृत्व नवऱ्याकडे असे.<br>{{gap}}त्या वेळच्या स्त्रियांची कोण ही अनुकंपनीय अवस्था! छेः! आपल्या हल्लीच्या कल्पना त्या काळावर लादणे योग्य नाही. स्त्रीला आपला दीर म्हणजे हक्काचा प्रियकर वाटत असे. दिराबद्दल तिचे विचार काय असतील याची कल्पना हल्लीच्या काही लोकगीतांवरून चांगली करता येते. पुढे-पुढे हे नाते नाहीसे होऊन फक्त निपुत्रिक विधवेलाच संतती निर्माण करण्यासाठी दिराशी संबंध ठेवायची परवानगी होती-<br>{{gap}}येथर्यंत माझे विचार कसे यंत्रासारखे चालले होते! पण एकदम मला कसली तरी आठवण झाली. कसल्या तरी दुःखद विचाराने माझे हृदय थरारले. मला परत महाभारतातल्या ओळी दिसू लागल्या. त्या प्राचीन काळी एका स्त्रीवर एक भयंकर अत्याचार झाला होता व त्याचे चित्रण इतक जिवंत, इतके विदारक होते की, आजही नुसत्या आठवणीने माझे मन कस जळत होते! हा अत्याचार काही आताच्या मध्यमवर्गीय नीतिकल्पनाचे स्तोम माजवून मी मनाला भासवून घेतलेला नव्हता. त्या वेळच्या कवीलाही तो तसा वाटला होता.<br>{{gap}}मी ताडकन उठले. मैनेने विचारले, "बाई. काय झालं? काही नाही ते समोरचं लठ्ठ पुस्तक आणून दे." आदिपर्वातून तो भाग उघडून मी परत वाचला. म्हाताऱ्या शंतनूने आपल्या पराक्रमी मुलाच्या सुखाचा बळी देऊन एका शीलभ्रष्ट सुंदर पोरीशी लग्न केले होते. ती सत्यवती. तिला दोन मुलगे झाले. एक लग्नाच्या आधी मेला. दुसऱ्यासाठी भीष्माने काशीराजाच्या मुली आणल्या. त्यातली मोठी अंबा. तिने स्वतःला जाळून घेतले, व दुसऱ्या दोघींचे शंतनूच्या धाकट्या मलाशी- विचित्रवीर्याशी लग्न- लागले. म्हातारपणाचा हा मुलगाही संतती न होताच मेला. आता पुढे कुलक्षय होणार म्हणून सत्यवतीने, "भीष्मा, तू लग्न तरी कर, नाही तर भावजयीला संतती तरी निर्माण कर" म्हणून हट्ट धरला. त्या मानी राजपुत्राने ते ऐकले नाही. तेव्हा सत्यवतीने निर्लज्जपणे आपला कुवारपणाचा वृतान्त सागितला व आपल्या मुलाला- व्यासाला- बोलावण्याचा बेत सांगितला. भीष्माने ह्या बेताला मान डोलावली. ह्यापुढचा कथाभाग असा आहे; ही दुष्ट<noinclude></noinclude>
inqpr7v18xbj9tiemm6cn4ngeq0feoe
पान:Paripurti.pdf/35
104
20857
230069
70215
2026-05-17T11:44:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230069
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader||| परिपूर्ती / ३९ }}</noinclude>सासू आपल्या थोरल्या सुनेला बोलावून मायावीपणे म्हणते, "कौसल्ये- (काशीकोसलची राजकन्या)- बाई, माझं बोलणं ऐक. आपला कुलक्षयच होणार होता. पण भीष्मानं मला युक्ती सांगितली आहे. नाही म्हणून नकोस. तुझं कल्याण होईल. त्या युक्तीप्रमाणे वागून पुत्राला जन्म दे व वंशवर्धन आणि राज्यवर्धन कर." ह्या मोघम बोलण्यात सत्यवतीने भीष्माचे नाव मोठ्या खुबीने गोवले आहे. "भीष्माची युक्ती" ह्या शब्दाने सुनेला वाटावे की, सासू पुत्रोत्पत्तीसाठी माझ्या शूर दिराची निवड करते म्हणून, व तशी आशा बिचाऱ्या अंबिकेच्या मनात उत्पन्न झाली असे कवीने पुढे स्पष्टच केले आहे. पुढच्या अध्यायाच्या पहिल्या चार कविता म्हणजे मला काव्याची परिसीमाच वाटते. त्या वाचताना जुनी व न बुजलेली जखम परत वाहावी तसे मला होते. प्रत्येक चरणात किती चित्रे डोळ्यांपुढून जातात! आठच ओळींत एका पतित, भ्रष्ट वृद्धेचे कारस्थान, एका अभागी राजकन्येची सुंदर सुंदर स्वप्ने, तिची विटंबना व मानहानी इतक्या घटनांची हकीकत स्पष्ट मोजक्या शब्दांत, गूढपणाचे अवडंबर न माजवता दिलेली आहे. <br>
{{Block center|<poem>"ततः सत्यवती काले वधू स्नातां ऋतौ तदा ।
संवेशयन्ती शयने शनकैः वाक्यमब्रवीत ॥"</poem>}}
{{gap}}"नंतर योग्य वेळी ऋतुस्नात अशा वधूला शय्यागारात पोहोचवताना सत्यवती खालील शब्द बोलली."<br>
{{Block center|<poem>"कौसल्ये देवरः ते अस्ति सो अद्य त्वानुप्रवेक्ष्यति ।
अप्रमत्ता प्रतीक्ष्यैनं निशीय आगमिष्यति ॥'</poem>}}
{{gap}}"कौसल्ये, तुझा एक दीर आहे. आज तो तुझ्या ठायी येईल. विनयाने त्याची वाट पाहा, तो आज रात्री येईल."<br>
{{gap}}(नुसता 'दीर' असा मोघम शब्द आहे. अंबिकेला आपल्या सासूचे पूर्वचरित्र माहीत नव्हते. 'भीष्माने युक्ती सांगितली आहे' असे सर्वस्वी खोटे ती आधी बोललीच होती. शिवाय आपण जो दुष्ट बेत योजला होता तो जणू काय भीष्माचीच युक्ती असेही तिला जगाला भासवायचे होतेच.)<br>
{{Block center|<poem>"श्वश्व्रास्तद्वचनं श्रुत्वा शयाना शयने शुभे ।
सा चिन्तयत्तदा भीष्ममन्यांश्च कुरुपुङगवान ॥"</poem>}}
{{gap}}"सासूचे हे भाषण ऐकून सुंदर शय्येवर निजलेली ती मनात भीष्माचे व इतर कुरुवीरांचे चिंतन करू लागली."<br>
{{gap}}(पहिल्याने सर्व राजांसमक्ष आपल्याला हिरावून नेणाऱ्या भीष्माची<noinclude></noinclude>
6f84goq5kez72zcqnexewigeiiivsb6
पान:Paripurti.pdf/36
104
20858
230070
70222
2026-05-17T11:50:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230070
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| ४० / परिपूर्ती}}</noinclude>वीरमूर्ती तिच्या डोळ्यांपुढे आली. विचित्रवीर्यासारख्या रोगी नाजूक पुरुषाशी लग्न लागले त्या वेळचा मनोभंग. मनातील सुप्त आशा व आता ती पूर्ण होईल का? अशी सोत्कंठ हुरहूर.... नंतर लगेच त्याची ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा तिला आठवली असावी- छेः! तो कसचा येतो?- मग कोण बर? म्हणून कौरवांच्या दरबारातील इतर वीरकौरवांच्या मूर्ती ती आठवते.)
{{Block center|<poem>"ततो अम्बिकायां प्रथमं नियुक्तः सत्यवाग ऋषिः ।
दीप्यमानेषु दीपेषु शयनं प्रविवेश ह ॥</poem>}}
{{gap}}"नंतर अंबिकेसाठी योजलेला सत्यवाक ऋषी दिव्यांनी उजळलेल्या त्या शय्यागृहात आला."<br>
{{gap}}(शय्यागारात व अंबिकेच्या सोत्कंठ हृदयांत आशेचे दीप पाजळले होते.)
{{Block center|<poem>"तस्य कृष्णस्य कपिला जटा दीप्ते च लोचने ।
ब्रभ्रूणि चैव श्मश्रूणि ष्टवा देवी न्यमीलयत ॥"</poem>}}
{{gap}}"त्या काळ्या पुरुषाच्या तांबड्या जटा, अंगारासारखे डोळे व पिगट मिशा पाहून देवी अंधारली."<br>
{{gap}}(न्यमीलयत= निमिमील। (कालिदासः रघुवंश; आठवा सर्ग- "निमिमील नरोत्तमप्रिया हृच्चन्द्रा तमसेव कौमुदी।" "चन्द्र गेल्याने कौमुदी जशी अंधारात विलीन होते तशी चैतन्याने स्फुरणारी राणी काळोखली- मेली.") अंबिकेचे शय्यागृह व हृदय तसेच आशेने पाजळले होते- तिचे शरीर राहिले, पण हृदयाचे- आशेचे- कोळसे झाले.)<br>
{{gap}}आणि अजून माझे मन त्या अभागी जीवाच्या या भयंकर विटंबनेने बधिर होते. ही बीजक्षेत्रन्यायाची विटंबना आहे, 'दीर' शब्दाची विटंबना आहे, ही एका कोळ्याच्या पोरीने क्षत्रिय कुळाची केलेली विटंबना आहे, की-की भीष्माने आपल्या महत्त्वाकांक्षी, शीलभ्रष्ट सावत्र आईवर उगवलेला भयंकर सूड आहे?<br>
{{right|{{xx-larger|☆}}}}{{nop}}<noinclude></noinclude>
fu4g48vgenjp6v2gkvi97spb5z0e7bn
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५१
104
85705
230050
181871
2026-05-17T03:47:36Z
JayashreeVI
4058
230050
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|४६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>दीर्घ सूचना आधींच कळे । सावधपणें तर्क प्रबळे
जाण जाणोनि वळे । यथायोग्य ||
ऐसा जाणे जो समस्त । तोचि महंत बुद्धिवंत ।
या वेगळें अंतवंत । सकळ कांहीं ॥
तालवेळ तानमानें । प्रबंध कविता जाड वचनें ।
मजालसी नाना चिन्हें । सुचत जावीं ॥
जो एकांतास तत्पर । आधीं करी पाठांतर ।
अथवा शोधी अर्थांतर | ग्रंथगर्भाचें ॥
आधींच शिकोन जो शिकवी । तोचि पावे श्रेष्ठ पदवी ।
गुंतल्या लोकांस उगवी । विवेकबळें ॥
अक्षर सुंदर वाचणें सुंदर | बोलणें सुंदर चालणें सुंदर ।
भक्तिज्ञान वैराग्य सुंदर । करूनि दावी ॥
जयास प्रयत्नचि आवडे । नाना प्रसंगी पवाडे ।
धीटपणें प्रगटे दडे । ऐसा नव्हे |
सांकडींमध्ये वर्तो जाणे । उपाधीमध्ये मिळों जाणे ।
अलिप्तपणें राखों जाणे । आपणासी ॥
आहे तरी सर्वांठायीं । पाहों जातां कोठेंचि नाहीं ।
जैसा अंतरात्मा ठायींचा ठायीं । गुप्त जाहला ॥
त्या वेगळे कांहींच नसे । पाहों जातां तो न दिसे ।
न दिसोन वर्तवीतसे । प्राणी मात्रासीं ॥
तैसाचि हाहि नानापरी । बहुत जनांसी शाहणें करी ।
नानाविद्या त्या विवरी । स्थूळ सूक्ष्म ॥
आपणाकरितां शाहणे होती । ते सहजचि सोय धरिती ।
जाणतेपणाची महती । ऐसी असे ॥
राखों जाणें नीति न्याय । न करी न करवी अन्याय ।
कठिण प्रसंगी उपाय | करूं जाणे ॥
ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा ।
दास म्हणे रघुनाथाचा । गुण घ्यावा ॥</poem>}}<noinclude></noinclude>
0rlktpm14t79vlozbddwkysb94stmtv
230051
230050
2026-05-17T03:48:39Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230051
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|४६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>दीर्घ सूचना आधींच कळे । सावधपणें तर्क प्रबळे
जाण जाणोनि वळे । यथायोग्य ||
ऐसा जाणे जो समस्त । तोचि महंत बुद्धिवंत ।
या वेगळें अंतवंत । सकळ कांहीं ॥
तालवेळ तानमानें । प्रबंध कविता जाड वचनें ।
मजालसी नाना चिन्हें । सुचत जावीं ॥
जो एकांतास तत्पर । आधीं करी पाठांतर ।
अथवा शोधी अर्थांतर | ग्रंथगर्भाचें ॥
आधींच शिकोन जो शिकवी । तोचि पावे श्रेष्ठ पदवी ।
गुंतल्या लोकांस उगवी । विवेकबळें ॥
अक्षर सुंदर वाचणें सुंदर | बोलणें सुंदर चालणें सुंदर ।
भक्तिज्ञान वैराग्य सुंदर । करूनि दावी ॥
जयास प्रयत्नचि आवडे । नाना प्रसंगी पवाडे ।
धीटपणें प्रगटे दडे । ऐसा नव्हे |
सांकडींमध्ये वर्तो जाणे । उपाधीमध्ये मिळों जाणे ।
अलिप्तपणें राखों जाणे । आपणासी ॥
आहे तरी सर्वांठायीं । पाहों जातां कोठेंचि नाहीं ।
जैसा अंतरात्मा ठायींचा ठायीं । गुप्त जाहला ॥
त्या वेगळे कांहींच नसे । पाहों जातां तो न दिसे ।
न दिसोन वर्तवीतसे । प्राणी मात्रासीं ॥
तैसाचि हाहि नानापरी । बहुत जनांसी शाहणें करी ।
नानाविद्या त्या विवरी । स्थूळ सूक्ष्म ॥
आपणाकरितां शाहणे होती । ते सहजचि सोय धरिती ।
जाणतेपणाची महती । ऐसी असे ॥
राखों जाणें नीति न्याय । न करी न करवी अन्याय ।
कठिण प्रसंगी उपाय | करूं जाणे ॥
ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा ।
दास म्हणे रघुनाथाचा । गुण घ्यावा ॥</poem>}}<noinclude></noinclude>
euajnfaui9wekytphycvycafa60uaxm
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५२
104
85706
230052
181872
2026-05-17T04:13:23Z
JayashreeVI
4058
230052
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|४७}}
{{rule}}</noinclude>{{gap}}सातव्या समासांत संसाराला चंचल नदीची उपमा देऊन तिचें स्पष्टीकरण केलें आहे, व ज्ञानी लोकच ही नदी तरून जाऊं शकतात असे सांगितले आहे.
<br>{{gap}}आठव्या समासाचा प्रारंभ नवीन ग्रंथाच्या किंवा प्रकरणाच्या सुरुवाती सारखा आहे.
{{block center|<poem>आधी वंदू सकळकर्ता । समस्त देवांचा जो भर्ता ।
त्याचे भजनीं प्रवर्ता । कोणीतरी ॥
तेणेंविण कार्य न चले । पडिलें पूर्ण तेंहि न हाले ।
अवघें त्रैलोक्याचे चाले । जयाचेनि ||</poem>}}
{{gap}}दहाव्या समासांत पुन्हां व्यावहारिक उपदेश आहे. तो बहुतेक समास येथें अवतरणरूपानें घेणें बरें.
{{block center|<poem>मूर्ख एकदेशी होतो । चतुर सर्वत्र पाहतो ।
जैसा बहुधा होऊनि भोगितो | नाना सुखें ॥
तोचि अंतरात्मा महंत । तो कां होईल संकोचित ।
प्रशस्त जाणतां समस्त । विख्यात योगी ॥
कर्ता भोक्ता तत्वता | भूमंडळीं सर्व सत्ता ।
त्या वेगळा त्यास ज्ञाता । पाहेसा कवण ||
ऐसें महंतें असावें । सर्व सार शोधूनि घ्यावें ।
पाहों जातां न सांपडावें । एकाएकीं ।।
कीर्तिरूपें उदंड ख्यात । जाणती लहान थोर समस्त ।
वेष पाहतां शाश्वत । एकहि नाहीं ॥
प्रगट कीर्ति ते ढळेना । बहुत जनांस कळेना ।
पाहों जातां आढळेना । काय कैसें ॥
वेषभूषण तें दूपण | कीर्तिभूषण तें भूपण ।
चालणेविण एक क्षण | जाऊंच नेदी ॥
त्यागी ओळखीचे जन । सर्वकाळ नित्य नूतन |
लोक शोधून पाहती मन । परी इच्छा दिसेना ||<noinclude></noinclude>
siipuhbkjd6vu5o9lgz8yy94xzjxve5
230053
230052
2026-05-17T04:14:20Z
JayashreeVI
4058
230053
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|४७}}
{{rule}}</noinclude>{{gap}}सातव्या समासांत संसाराला चंचल नदीची उपमा देऊन तिचें स्पष्टीकरण केलें आहे, व ज्ञानी लोकच ही नदी तरून जाऊं शकतात असे सांगितले आहे.
<br>{{gap}}आठव्या समासाचा प्रारंभ नवीन ग्रंथाच्या किंवा प्रकरणाच्या सुरुवाती सारखा आहे.
{{block center|<poem>आधी वंदू सकळकर्ता । समस्त देवांचा जो भर्ता ।
त्याचे भजनीं प्रवर्ता । कोणीतरी ॥
तेणेंविण कार्य न चले । पडिलें पूर्ण तेंहि न हाले ।
अवघें त्रैलोक्याचे चाले । जयाचेनि ||</poem>}}
{{gap}}दहाव्या समासांत पुन्हां व्यावहारिक उपदेश आहे. तो बहुतेक समास येथें अवतरणरूपानें घेणें बरें.
{{block center|<poem>मूर्ख एकदेशी होतो । चतुर सर्वत्र पाहतो ।
जैसा बहुधा होऊनि भोगितो | नाना सुखें ॥
तोचि अंतरात्मा महंत । तो कां होईल संकोचित ।
प्रशस्त जाणतां समस्त । विख्यात योगी ॥
कर्ता भोक्ता तत्वता | भूमंडळीं सर्व सत्ता ।
त्या वेगळा त्यास ज्ञाता । पाहेसा कवण ||
ऐसें महंतें असावें । सर्व सार शोधूनि घ्यावें ।
पाहों जातां न सांपडावें । एकाएकीं ।।
कीर्तिरूपें उदंड ख्यात । जाणती लहान थोर समस्त ।
वेष पाहतां शाश्वत । एकहि नाहीं ॥
प्रगट कीर्ति ते ढळेना । बहुत जनांस कळेना ।
पाहों जातां आढळेना । काय कैसें ॥
वेषभूषण तें दूपण | कीर्तिभूषण तें भूपण ।
चालणेविण एक क्षण | जाऊंच नेदी ॥
त्यागी ओळखीचे जन । सर्वकाळ नित्य नूतन |
लोक शोधून पाहती मन । परी इच्छा दिसेना ||</poem><noinclude></noinclude>
8zaw84kzbj6vw7v5ek73gztuxsid769
230054
230053
2026-05-17T04:15:30Z
JayashreeVI
4058
230054
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|४७}}
{{rule}}</noinclude>{{gap}}सातव्या समासांत संसाराला चंचल नदीची उपमा देऊन तिचें स्पष्टीकरण केलें आहे, व ज्ञानी लोकच ही नदी तरून जाऊं शकतात असे सांगितले आहे.
<br>{{gap}}आठव्या समासाचा प्रारंभ नवीन ग्रंथाच्या किंवा प्रकरणाच्या सुरुवाती सारखा आहे.
{{block center|<poem>आधी वंदू सकळकर्ता । समस्त देवांचा जो भर्ता ।
त्याचे भजनीं प्रवर्ता । कोणीतरी ॥
तेणेंविण कार्य न चले । पडिलें पूर्ण तेंहि न हाले ।
अवघें त्रैलोक्याचे चाले । जयाचेनि ||</poem>}}
{{gap}}दहाव्या समासांत पुन्हां व्यावहारिक उपदेश आहे. तो बहुतेक समास येथें अवतरणरूपानें घेणें बरें.
{{block center|<poem>मूर्ख एकदेशी होतो । चतुर सर्वत्र पाहतो ।
जैसा बहुधा होऊनि भोगितो | नाना सुखें ॥
तोचि अंतरात्मा महंत । तो कां होईल संकोचित ।
प्रशस्त जाणतां समस्त । विख्यात योगी ॥
कर्ता भोक्ता तत्वता | भूमंडळीं सर्व सत्ता ।
त्या वेगळा त्यास ज्ञाता । पाहेसा कवण ||
ऐसें महंतें असावें । सर्व सार शोधूनि घ्यावें ।
पाहों जातां न सांपडावें । एकाएकीं ।।
कीर्तिरूपें उदंड ख्यात । जाणती लहान थोर समस्त ।
वेष पाहतां शाश्वत । एकहि नाहीं ॥
प्रगट कीर्ति ते ढळेना । बहुत जनांस कळेना ।
पाहों जातां आढळेना । काय कैसें ॥
वेषभूषण तें दूपण | कीर्तिभूषण तें भूपण ।
चालणेविण एक क्षण | जाऊंच नेदी ॥
त्यागी ओळखीचे जन । सर्वकाळ नित्य नूतन |
लोक शोधून पाहती मन । परी इच्छा दिसेना ||</poem>}}<noinclude></noinclude>
ik4v1jwvcitorw2x4z5k1hccjstehmd
230055
230054
2026-05-17T04:16:06Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230055
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|४७}}
{{rule}}</noinclude>{{gap}}सातव्या समासांत संसाराला चंचल नदीची उपमा देऊन तिचें स्पष्टीकरण केलें आहे, व ज्ञानी लोकच ही नदी तरून जाऊं शकतात असे सांगितले आहे.
<br>{{gap}}आठव्या समासाचा प्रारंभ नवीन ग्रंथाच्या किंवा प्रकरणाच्या सुरुवाती सारखा आहे.
{{block center|<poem>आधी वंदू सकळकर्ता । समस्त देवांचा जो भर्ता ।
त्याचे भजनीं प्रवर्ता । कोणीतरी ॥
तेणेंविण कार्य न चले । पडिलें पूर्ण तेंहि न हाले ।
अवघें त्रैलोक्याचे चाले । जयाचेनि ||</poem>}}
{{gap}}दहाव्या समासांत पुन्हां व्यावहारिक उपदेश आहे. तो बहुतेक समास येथें अवतरणरूपानें घेणें बरें.
{{block center|<poem>मूर्ख एकदेशी होतो । चतुर सर्वत्र पाहतो ।
जैसा बहुधा होऊनि भोगितो | नाना सुखें ॥
तोचि अंतरात्मा महंत । तो कां होईल संकोचित ।
प्रशस्त जाणतां समस्त । विख्यात योगी ॥
कर्ता भोक्ता तत्वता | भूमंडळीं सर्व सत्ता ।
त्या वेगळा त्यास ज्ञाता । पाहेसा कवण ||
ऐसें महंतें असावें । सर्व सार शोधूनि घ्यावें ।
पाहों जातां न सांपडावें । एकाएकीं ।।
कीर्तिरूपें उदंड ख्यात । जाणती लहान थोर समस्त ।
वेष पाहतां शाश्वत । एकहि नाहीं ॥
प्रगट कीर्ति ते ढळेना । बहुत जनांस कळेना ।
पाहों जातां आढळेना । काय कैसें ॥
वेषभूषण तें दूपण | कीर्तिभूषण तें भूपण ।
चालणेविण एक क्षण | जाऊंच नेदी ॥
त्यागी ओळखीचे जन । सर्वकाळ नित्य नूतन |
लोक शोधून पाहती मन । परी इच्छा दिसेना ||</poem>}}<noinclude></noinclude>
cht44u2mgxlsb5yunmyyuzntpbgcuag
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५३
104
85707
230056
181873
2026-05-17T04:24:51Z
JayashreeVI
4058
230056
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|४८|सज्जनगड व समर्थ रामदास.}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>पुर्ते कोणाकडे पाहेना । पुर्ते कोणासी बोलेना ।
पुर्तें एके स्थळीं राहेना । उठोन जातो ॥
जातो स्थळ तें सांगेना । सांगितलें तरी तेथें जाईना ।
आपली स्थिति अनुमाना | येऊंच नेदी ||
लोकीं केलें तें चुकवी । लोकीं भाविलें तें उलथवी ।
लोकीं तर्किलें तें दावी | निष्फळ करूनी ॥
लोकांस पाह्याचा आदर । तेथें याचा अनादर ।
लोक सर्वकाळ तत्पर । तेथें याची अनिच्छा |
एवं कल्पितां कळेना । तर्कितांहि तर्केना ।
कदापि भावितां भावेना | योगेश्वर ||
ऐसें अंतर सांपडेना । शरीर ठायीं पडेना ।
क्षण एक विसंवेना । कथाकीर्तन ॥
लोक संकल्प विकल्प करिती । ते अवघेच निष्फळ होती ।.
जनाची जना लाजवी वृत्ती । तेव्हां योगेश्वर ।।
बहुत शोधून पाहिलें । बहुतांच्या मनास आलें ।
तरी मग जाणावें साधिलें । महत्कृत्य ॥
अखंड एकांत सेवावा । अभ्यासचि करीत जावा ।
काळ सार्थकचि करावा । जनासहित ॥
उत्तम गुण तितुके घ्यावे । घेऊन जनास शिकवावे ।
उदंड समुदाय करावे । परी गुप्तरूपें ॥
अखंड कामाची लगबग । उपासनेस लावावें जग ।
लोक समजोन मग । आज्ञा इच्छिती ।।
आधीं कष्ट मग सुफळ । कष्टचि नाहीं तें निष्फळ ।
साक्षेपेंविण केवळ | वृथा पुष्ट ॥
लोक बहुत शोधावे । त्यांचे अधिकार जाणावे ।
जाणजाणोनि धरावे । जवळी दुरी ॥
अधिकारपरत्वे कार्य होतें । अधिकार नसतां व्यर्थ जातें ।
जाणून शोधावीं चित्तें । नानाप्रकारें ।।</poem>}}<noinclude></noinclude>
mc3j1hywgt5gtfdkap8ewp0absyir8c
230057
230056
2026-05-17T04:25:20Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230057
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|४८|सज्जनगड व समर्थ रामदास.}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>पुर्ते कोणाकडे पाहेना । पुर्ते कोणासी बोलेना ।
पुर्तें एके स्थळीं राहेना । उठोन जातो ॥
जातो स्थळ तें सांगेना । सांगितलें तरी तेथें जाईना ।
आपली स्थिति अनुमाना | येऊंच नेदी ||
लोकीं केलें तें चुकवी । लोकीं भाविलें तें उलथवी ।
लोकीं तर्किलें तें दावी | निष्फळ करूनी ॥
लोकांस पाह्याचा आदर । तेथें याचा अनादर ।
लोक सर्वकाळ तत्पर । तेथें याची अनिच्छा |
एवं कल्पितां कळेना । तर्कितांहि तर्केना ।
कदापि भावितां भावेना | योगेश्वर ||
ऐसें अंतर सांपडेना । शरीर ठायीं पडेना ।
क्षण एक विसंवेना । कथाकीर्तन ॥
लोक संकल्प विकल्प करिती । ते अवघेच निष्फळ होती ।.
जनाची जना लाजवी वृत्ती । तेव्हां योगेश्वर ।।
बहुत शोधून पाहिलें । बहुतांच्या मनास आलें ।
तरी मग जाणावें साधिलें । महत्कृत्य ॥
अखंड एकांत सेवावा । अभ्यासचि करीत जावा ।
काळ सार्थकचि करावा । जनासहित ॥
उत्तम गुण तितुके घ्यावे । घेऊन जनास शिकवावे ।
उदंड समुदाय करावे । परी गुप्तरूपें ॥
अखंड कामाची लगबग । उपासनेस लावावें जग ।
लोक समजोन मग । आज्ञा इच्छिती ।।
आधीं कष्ट मग सुफळ । कष्टचि नाहीं तें निष्फळ ।
साक्षेपेंविण केवळ | वृथा पुष्ट ॥
लोक बहुत शोधावे । त्यांचे अधिकार जाणावे ।
जाणजाणोनि धरावे । जवळी दुरी ॥
अधिकारपरत्वे कार्य होतें । अधिकार नसतां व्यर्थ जातें ।
जाणून शोधावीं चित्तें । नानाप्रकारें ।।</poem>}}<noinclude></noinclude>
nl9zc0rpu471d5j2ch0kf8l5kk9jl1h
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५४
104
85708
230058
181874
2026-05-17T04:35:14Z
JayashreeVI
4058
230058
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|४९ }}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>अधिकार पाहोन कार्य सांगणें । साक्षेप पाहोन विश्वास धरणें ।
आपला मगज राखणें । कांहीं तरी ॥
हें प्रचीतीनें बोलिलें । आधीं केलें मग सांगितलें ।
मानेल तरी पाहिजे घेतलें । कोणी एकें ।
महंतें महंत करावे | युक्ति बुद्धीनें भरावे ।
जाणते करीत विचरावे | नाना देशीं ॥</poem>}}
{{gap}}बाराव्या दशकाच्या पहिल्या समासांत रामदासांनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घातली आहे; व प्रपंचाशिवाय परमार्थ साधणार नाहीं असेंहि म्हटले आहे. प्रपंच व संसार हे शब्द एकाच अर्थी योजले आहेत
असे वाटतें. रामदासांच्या अभिमान्यांच्या मतें संसार व प्रपंच यांत रामदासांनी अत्यंत भेद मानला आहे. प्रपंच म्हणजे राष्ट्रप्रपंच किंवा व्यक्तिप्रपंच व संसार म्हणजे बायकामुलें. अशा तऱ्हेचा हा फरक आहे असें त्यांचे म्हणणे आहे पण ती या समासावरून उगाच क्लिष्ट कल्पना आहे असें म्हणावें लागतें.
{{block center|<poem>आधीं प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थ विवेका ।
येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥
प्रपंच सोडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल ।
प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ।।
प्रपंच सोडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला ।
मग तया करंट्याला । परमार्थ कैंचा ॥
संसारी असतां मुक्त । तोचि जाणावा सुयुक्त |
आखंड पाहे युक्तायुक्त । विचारणा हे ||
प्रपंचीं जो सावधान । तो परमार्थ करील जाण ।
प्रपंचीं जो अप्रमाण । तो परमार्थी खोटा ॥
ह्मणोन सावधानपणें । प्रपंच परमार्थ चालविणें ।
ऐसें न करितां भोगणें । नाना दुःखें ।।
परनारी पाहोन उचंबळे । जीव सृष्टि विवेकें चाले ।
आणि पुरुष होऊन भ्रमले। यासि काय म्हणावें ॥</poem>}}<noinclude>{{स...४}}</noinclude>
hdvf4tdgdh9gzmu4id2mwodqekjy0kl
230059
230058
2026-05-17T04:36:04Z
JayashreeVI
4058
230059
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|४९ }}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>अधिकार पाहोन कार्य सांगणें । साक्षेप पाहोन विश्वास धरणें ।
आपला मगज राखणें । कांहीं तरी ॥
हें प्रचीतीनें बोलिलें । आधीं केलें मग सांगितलें ।
मानेल तरी पाहिजे घेतलें । कोणी एकें ।
महंतें महंत करावे | युक्ति बुद्धीनें भरावे ।
जाणते करीत विचरावे | नाना देशीं ॥</poem>}}
{{gap}}बाराव्या दशकाच्या पहिल्या समासांत रामदासांनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घातली आहे; व प्रपंचाशिवाय परमार्थ साधणार नाहीं असेंहि म्हटले आहे. प्रपंच व संसार हे शब्द एकाच अर्थी योजले आहेत
असे वाटतें. रामदासांच्या अभिमान्यांच्या मतें संसार व प्रपंच यांत रामदासांनी अत्यंत भेद मानला आहे. प्रपंच म्हणजे राष्ट्रप्रपंच किंवा व्यक्तिप्रपंच व संसार म्हणजे बायकामुलें. अशा तऱ्हेचा हा फरक आहे असें त्यांचे म्हणणे आहे पण ती या समासावरून उगाच क्लिष्ट कल्पना आहे असें म्हणावें लागतें.
{{block center|<poem>आधीं प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थ विवेका ।
येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥
प्रपंच सोडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल ।
प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ।।
प्रपंच सोडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला ।
मग तया करंट्याला । परमार्थ कैंचा ॥
संसारी असतां मुक्त । तोचि जाणावा सुयुक्त |
आखंड पाहे युक्तायुक्त । विचारणा हे ||
प्रपंचीं जो सावधान । तो परमार्थ करील जाण ।
प्रपंचीं जो अप्रमाण । तो परमार्थी खोटा ॥
ह्मणोन सावधानपणें । प्रपंच परमार्थ चालविणें ।
ऐसें न करितां भोगणें । नाना दुःखें ।।
परनारी पाहोन उचंबळे । जीव सृष्टि विवेकें चाले ।
आणि पुरुष होऊन भ्रमले। यासि काय म्हणावें ॥</poem>}}<noinclude>{{left|स...४}}</noinclude>
1f8wm6tpa83tw31jcgpz2wcbb04bg8g
230060
230059
2026-05-17T04:36:46Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230060
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|४९ }}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>अधिकार पाहोन कार्य सांगणें । साक्षेप पाहोन विश्वास धरणें ।
आपला मगज राखणें । कांहीं तरी ॥
हें प्रचीतीनें बोलिलें । आधीं केलें मग सांगितलें ।
मानेल तरी पाहिजे घेतलें । कोणी एकें ।
महंतें महंत करावे | युक्ति बुद्धीनें भरावे ।
जाणते करीत विचरावे | नाना देशीं ॥</poem>}}
{{gap}}बाराव्या दशकाच्या पहिल्या समासांत रामदासांनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घातली आहे; व प्रपंचाशिवाय परमार्थ साधणार नाहीं असेंहि म्हटले आहे. प्रपंच व संसार हे शब्द एकाच अर्थी योजले आहेत
असे वाटतें. रामदासांच्या अभिमान्यांच्या मतें संसार व प्रपंच यांत रामदासांनी अत्यंत भेद मानला आहे. प्रपंच म्हणजे राष्ट्रप्रपंच किंवा व्यक्तिप्रपंच व संसार म्हणजे बायकामुलें. अशा तऱ्हेचा हा फरक आहे असें त्यांचे म्हणणे आहे पण ती या समासावरून उगाच क्लिष्ट कल्पना आहे असें म्हणावें लागतें.
{{block center|<poem>आधीं प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थ विवेका ।
येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥
प्रपंच सोडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल ।
प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ।।
प्रपंच सोडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला ।
मग तया करंट्याला । परमार्थ कैंचा ॥
संसारी असतां मुक्त । तोचि जाणावा सुयुक्त |
आखंड पाहे युक्तायुक्त । विचारणा हे ||
प्रपंचीं जो सावधान । तो परमार्थ करील जाण ।
प्रपंचीं जो अप्रमाण । तो परमार्थी खोटा ॥
ह्मणोन सावधानपणें । प्रपंच परमार्थ चालविणें ।
ऐसें न करितां भोगणें । नाना दुःखें ।।
परनारी पाहोन उचंबळे । जीव सृष्टि विवेकें चाले ।
आणि पुरुष होऊन भ्रमले। यासि काय म्हणावें ॥</poem>}}<noinclude>{{left|स...४}}</noinclude>
c9mik2h1mkvq1ja1eieiqz5g3uum5m2
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५५
104
85709
230063
181875
2026-05-17T11:21:49Z
JayashreeVI
4058
230063
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh| |सज्जनगड व समर्थ रामदास.}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>जगदीशा परता लोभ नाहीं । कार्य कारण सर्व कांहीं ।
संसार करीत असतांही । समाधान ||
यत्नाप्रपंचाच्या वाढी । नानासंकटें सांकडीं ।
संसार सांडून देश घडी । होय तेणें ॥
उत्तम पदार्थ दुस-यास द्यावा । शब्द निवडून बोलावा ।
सावधपणे करीत जावा । संसार आपुला ॥</poem>}}
{{gap}}वरील उताऱ्यावरून प्रपंच व संसार हे शब्द एकाच अर्थी योजले आहेत असे दिसतें.
{{gap}}दुसऱ्या समासांत प्रयत्नवाद सांगितला आहे. मनुष्यानें आपले अंगीं असलेले गुण बाहेर आणले पाहिजेत तरच त्याचें चीज होणार; नाहींतर सर्व सारखे.
{{block center|<poem>जंववरी चंदन झिजेना । तंववरी सुगंध कळेना ।
चंदन आणि वृक्ष नाना | सगट होती ॥</poem>}}
{{gap}}समासाचे शेवटीं हरिकथा व राजकारण या दोन पुरुषार्थीचा मागल्या एका समासाप्रमाणें उल्लेख केला आहे.
{{gap}}याप्रमाणे या दशकांतले पहिले दोन समास व्यावहारिक उपदेशपर आहेत व त्यांत मनुष्यानें प्रयत्न करून आपला संसार-प्रपंच करून मग परमार्थ साधावा असा सामान्य जनाला उपदेश केला आहे.
{{gap}}तीन समासापासून आठ समासापर्यंत पुनः निवळ पारमार्थिक निरूपण आहे. त्यांत पूर्वी पुष्कळ वेळां आलेले निरूपण निराळ्या शब्दांनी वनिराळ्या उपमांनी सांगितलें आहे. पण सर्व समासांचें सार म्हणजे सृष्टिरचना, ब्रह्म व माया, ब्रह्म व भक्त, विवेक व वैराग्य वगैरे वेदांतपर व निवृत्तिपर विषयांचें विवरण रामदासांनी केले आहे. त्यांत एका ओवीत तत्कालीन हिंदुराजाचा उल्लेख आहे पण ते कित्येक आहेत; असे म्हटलें आहे. यावरून तो फक्त शिवाजी महाराजांबद्दलचा आहे असे खात्रीने म्हणतां येत नाहीं.
{{block center|<poem>मागां होते जनकादिक । राज्य करितही अनेक ।
तैसेचि आतां पुण्यश्लोक | कित्येक असती ॥</poem>}}<noinclude></noinclude>
bx44xugk27g85isrexdwm6l2dkj255g
230064
230063
2026-05-17T11:22:21Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230064
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh| |सज्जनगड व समर्थ रामदास.}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>जगदीशा परता लोभ नाहीं । कार्य कारण सर्व कांहीं ।
संसार करीत असतांही । समाधान ||
यत्नाप्रपंचाच्या वाढी । नानासंकटें सांकडीं ।
संसार सांडून देश घडी । होय तेणें ॥
उत्तम पदार्थ दुस-यास द्यावा । शब्द निवडून बोलावा ।
सावधपणे करीत जावा । संसार आपुला ॥</poem>}}
{{gap}}वरील उताऱ्यावरून प्रपंच व संसार हे शब्द एकाच अर्थी योजले आहेत असे दिसतें.
{{gap}}दुसऱ्या समासांत प्रयत्नवाद सांगितला आहे. मनुष्यानें आपले अंगीं असलेले गुण बाहेर आणले पाहिजेत तरच त्याचें चीज होणार; नाहींतर सर्व सारखे.
{{block center|<poem>जंववरी चंदन झिजेना । तंववरी सुगंध कळेना ।
चंदन आणि वृक्ष नाना | सगट होती ॥</poem>}}
{{gap}}समासाचे शेवटीं हरिकथा व राजकारण या दोन पुरुषार्थीचा मागल्या एका समासाप्रमाणें उल्लेख केला आहे.
{{gap}}याप्रमाणे या दशकांतले पहिले दोन समास व्यावहारिक उपदेशपर आहेत व त्यांत मनुष्यानें प्रयत्न करून आपला संसार-प्रपंच करून मग परमार्थ साधावा असा सामान्य जनाला उपदेश केला आहे.
{{gap}}तीन समासापासून आठ समासापर्यंत पुनः निवळ पारमार्थिक निरूपण आहे. त्यांत पूर्वी पुष्कळ वेळां आलेले निरूपण निराळ्या शब्दांनी वनिराळ्या उपमांनी सांगितलें आहे. पण सर्व समासांचें सार म्हणजे सृष्टिरचना, ब्रह्म व माया, ब्रह्म व भक्त, विवेक व वैराग्य वगैरे वेदांतपर व निवृत्तिपर विषयांचें विवरण रामदासांनी केले आहे. त्यांत एका ओवीत तत्कालीन हिंदुराजाचा उल्लेख आहे पण ते कित्येक आहेत; असे म्हटलें आहे. यावरून तो फक्त शिवाजी महाराजांबद्दलचा आहे असे खात्रीने म्हणतां येत नाहीं.
{{block center|<poem>मागां होते जनकादिक । राज्य करितही अनेक ।
तैसेचि आतां पुण्यश्लोक | कित्येक असती ॥</poem>}}<noinclude></noinclude>
3lt57liwh5eg4lb7sbk2qc1359s3rkx
230065
230064
2026-05-17T11:24:24Z
JayashreeVI
4058
230065
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|५०|सज्जनगड व समर्थ रामदास.}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>जगदीशा परता लोभ नाहीं । कार्य कारण सर्व कांहीं ।
संसार करीत असतांही । समाधान ||
यत्नाप्रपंचाच्या वाढी । नानासंकटें सांकडीं ।
संसार सांडून देश घडी । होय तेणें ॥
उत्तम पदार्थ दुस-यास द्यावा । शब्द निवडून बोलावा ।
सावधपणे करीत जावा । संसार आपुला ॥</poem>}}
{{gap}}वरील उताऱ्यावरून प्रपंच व संसार हे शब्द एकाच अर्थी योजले आहेत असे दिसतें.
{{gap}}दुसऱ्या समासांत प्रयत्नवाद सांगितला आहे. मनुष्यानें आपले अंगीं असलेले गुण बाहेर आणले पाहिजेत तरच त्याचें चीज होणार; नाहींतर सर्व सारखे.
{{block center|<poem>जंववरी चंदन झिजेना । तंववरी सुगंध कळेना ।
चंदन आणि वृक्ष नाना | सगट होती ॥</poem>}}
{{gap}}समासाचे शेवटीं हरिकथा व राजकारण या दोन पुरुषार्थीचा मागल्या एका समासाप्रमाणें उल्लेख केला आहे.
{{gap}}याप्रमाणे या दशकांतले पहिले दोन समास व्यावहारिक उपदेशपर आहेत व त्यांत मनुष्यानें प्रयत्न करून आपला संसार-प्रपंच करून मग परमार्थ साधावा असा सामान्य जनाला उपदेश केला आहे.
{{gap}}तीन समासापासून आठ समासापर्यंत पुनः निवळ पारमार्थिक निरूपण आहे. त्यांत पूर्वी पुष्कळ वेळां आलेले निरूपण निराळ्या शब्दांनी वनिराळ्या उपमांनी सांगितलें आहे. पण सर्व समासांचें सार म्हणजे सृष्टिरचना, ब्रह्म व माया, ब्रह्म व भक्त, विवेक व वैराग्य वगैरे वेदांतपर व निवृत्तिपर विषयांचें विवरण रामदासांनी केले आहे. त्यांत एका ओवीत तत्कालीन हिंदुराजाचा उल्लेख आहे पण ते कित्येक आहेत; असे म्हटलें आहे. यावरून तो फक्त शिवाजी महाराजांबद्दलचा आहे असे खात्रीने म्हणतां येत नाहीं.
{{block center|<poem>मागां होते जनकादिक । राज्य करितही अनेक ।
तैसेचि आतां पुण्यश्लोक | कित्येक असती ॥</poem>}}<noinclude></noinclude>
mka13y0pm9joy1tu7rbzq5d842lf8zb
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५६
104
85710
230067
181876
2026-05-17T11:41:16Z
JayashreeVI
4058
230067
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|५१}}
{{rule}}</noinclude>{{gap}}या दशकाचे शेवटचे दोन समास पहिल्या दोहोंप्रमाणें प्रवृत्तिपर व व्यवहारविषयक आहेत. नवव्या समासांत मनुष्यानें रोजचें वर्तन कशा तऱ्हेनें ठेवावें हें सांगितले आहे व शेवटल्या समासांत मनुष्यानें दुसऱ्यावर
परोपकार करावा, त्याच्याशीं सलोख्यानें वागावें; त्याला दुरुत्तरें देऊं नयेत, व नेहमी चांगले काम करीत रहावे असे सांगितले आहे व 'बोले तैसा चाले त्याचीं वंदावीं पाऊलें' या तुकारामाच्या प्रसिद्ध उक्तीचा अनुवाद केला आहे.
{{block center|<poem>बोलण्यासारखें चालणें । स्वयें करून बोलणें ।
तयांचीं वचनें प्रमाणें । मानिती जनीं ॥</poem>}}
{{gap}}तेराव्या दशकाच्या पहिल्या चार समासांत आध्यात्मिक विषयाची मांडणी व्यवस्थेशीर आहे. पहिल्या समासांत मानवी आत्म्याचें वर्णन आहे. शरीराच्या सर्व हालचालीचा, इन्द्रियांच्या प्रवृत्तीचा, मानसिक गुणदोषंचा व कृत्यांचा आत्मा देहाच्या संयोगानें चालक आहे असे प्रतिपादन केले आहे.
{{gap}}दुसऱ्या समासांत या आत्म्यानें सारासार विचार केला म्हणजे 'सोहं तत्वमसि' या तत्वाचें ज्ञान आत्म्यास होते असे सांगितले आहे. तिसऱ्या व चवथ्या समासांत ब्रह्मापासून मायेच्या द्वारें, सृष्टीची रचना कशी होते ती वर्णिली आहे व पुढे ती सृष्टि प्रलयकाळ कशी नाश पावते तें निवेदन केले आहे.
{{gap}}मागें ज्याप्रमाणें सबंध दशकांत एका माणसाचा जीवनवृत्तांत निवेदन केला आहे त्या सारखीच पांचव्या एका समासांत लहानशी कहाणी सांगितली आहे. मात्र मानवी आयुष्याची दुःखरूप काळी बाजू येथें भडक रंगांत रंगविली नाहीं.
{{gap}}साहाव्या समासांत थोडक्यांत पंच महाभूतें यांच्या व्याख्या, त्यांचा नाशवंतपणा, आत्म्याचा शाश्वतपणा, विवेकानें परमात्म्याचें व जीवात्म्याचें समजणारें ऐक्य व शेवटीं ज्ञानी माणसाची थोरवी इतक्या गोष्टी वर्णिल्या आहेत व म्हणून या समासास लघुबोध असें अन्वर्थक नांव दिले आहे. शिवाजीमहाराजास शिंगणवाडी येथें समर्थ रामदासांनी हा लघुबोध केला अशी आख्यायिका आहे.<noinclude></noinclude>
9cz2vyrebx2tis28plauinj51imrzxc
230068
230067
2026-05-17T11:43:00Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230068
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|५१}}
{{rule}}</noinclude>{{gap}}या दशकाचे शेवटचे दोन समास पहिल्या दोहोंप्रमाणें प्रवृत्तिपर व व्यवहारविषयक आहेत. नवव्या समासांत मनुष्यानें रोजचें वर्तन कशा तऱ्हेनें ठेवावें हें सांगितले आहे व शेवटल्या समासांत मनुष्यानें दुसऱ्यावर
परोपकार करावा, त्याच्याशीं सलोख्यानें वागावें; त्याला दुरुत्तरें देऊं नयेत, व नेहमी चांगले काम करीत रहावे असे सांगितले आहे व 'बोले तैसा चाले त्याचीं वंदावीं पाऊलें' या तुकारामाच्या प्रसिद्ध उक्तीचा अनुवाद केला आहे.
{{block center|<poem>बोलण्यासारखें चालणें । स्वयें करून बोलणें ।
तयांचीं वचनें प्रमाणें । मानिती जनीं ॥</poem>}}
{{gap}}तेराव्या दशकाच्या पहिल्या चार समासांत आध्यात्मिक विषयाची मांडणी व्यवस्थेशीर आहे. पहिल्या समासांत मानवी आत्म्याचें वर्णन आहे. शरीराच्या सर्व हालचालीचा, इन्द्रियांच्या प्रवृत्तीचा, मानसिक गुणदोषंचा व कृत्यांचा आत्मा देहाच्या संयोगानें चालक आहे असे प्रतिपादन केले आहे.
<br>{{gap}}दुसऱ्या समासांत या आत्म्यानें सारासार विचार केला म्हणजे 'सोहं तत्वमसि' या तत्वाचें ज्ञान आत्म्यास होते असे सांगितले आहे. तिसऱ्या व चवथ्या समासांत ब्रह्मापासून मायेच्या द्वारें, सृष्टीची रचना कशी होते ती वर्णिली आहे व पुढे ती सृष्टि प्रलयकाळ कशी नाश पावते तें निवेदन केले आहे.
<br>{{gap}}मागें ज्याप्रमाणें सबंध दशकांत एका माणसाचा जीवनवृत्तांत निवेदन केला आहे त्या सारखीच पांचव्या एका समासांत लहानशी कहाणी सांगितली आहे. मात्र मानवी आयुष्याची दुःखरूप काळी बाजू येथें भडक रंगांत रंगविली नाहीं.
<br>{{gap}}साहाव्या समासांत थोडक्यांत पंच महाभूतें यांच्या व्याख्या, त्यांचा नाशवंतपणा, आत्म्याचा शाश्वतपणा, विवेकानें परमात्म्याचें व जीवात्म्याचें समजणारें ऐक्य व शेवटीं ज्ञानी माणसाची थोरवी इतक्या गोष्टी वर्णिल्या आहेत व म्हणून या समासास लघुबोध असें अन्वर्थक नांव दिले आहे. शिवाजीमहाराजास शिंगणवाडी येथें समर्थ रामदासांनी हा लघुबोध केला अशी आख्यायिका आहे.<noinclude></noinclude>
te1khvndf7h4l3cur5by83peupthvjl
पान:अफजलखानाचा वध अथवा श्री शिवाजी महाराजांचा एक अद्भुत पराक्रम.pdf/८
104
110375
230049
2026-05-16T13:51:25Z
~2026-29531-92
6022
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "मक्का सौ., . ६ ”रंध्वच्क्का र्मं" याप्रभाणें सर्वेमर शिवाजोला वाढतच गेला. जावलाँर्वे कर्बी गडबड होईल, राज्य व त्याचा मुळुखहृळो तेव्हां कदाचित तेथें पुन्हां यैश घेत गेले फार..."
230049
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="2401:4900:AB81:2A66:E018:479:DAA0:B5AA" /></noinclude>मक्का सौ., [[. ६ ”रंध्वच्क्का र्मं"
याप्रभाणें
सर्वेमर
शिवाजोला
वाढतच गेला.
जावलाँर्वे
कर्बी गडबड होईल,
राज्य
व त्याचा
मुळुखहृळो
तेव्हां कदाचित
तेथें पुन्हां
यैश
घेत गेले
फार
जुने
असें जाणून जावळीच्या वरच्या आंगाला एक उंच
‘ढोपऱ्या’ न[व[च[ र्डेप्गर होता त्यावर शिवाजीने एक किल्ला ब[वला.हूं[ बाव-
ण्याचें काम शिवाजीने आपला इमानीं व मेद्देनतळो नोकर मोरो [वमल पिंगळे
यांस सांगितले. जावलळोस पैसा, खजिना व सरंजामहृळो मुबलक मिळाला होता.
तेव्हां मोंरापेतानेही हें काम फार मेहृनतीने व उत्कृष्ट केलेऔंकल्लऱयावर पुरातन
काळचै श्री केदळिरश्वराचँ देऊळ होते तेही नीट बांग्बले; व जवळच शिवाजी
राजास राहृण्यायोंग्य असा टुम’रार लहानसा एक वाडा बांधला. मोंरापेताने
बांधलेल्या या भव्य किव्हृयास शिवाजीने प्रतापगड असें नाव दिले. यावर
हृजार पेंघराशें शिय'दळो ठेंवलोवगव्तोकरतांठिंकाँठकळार्णी अनेक पांहृरँहृळो ठेवले.
प्रतापगडचें काम पुरे' झाल्यावर, हूस्तगत केलेल्या प्रांताचा नीट बेदळोबस्त
केला व मग प्रथम जुनराकडे आणि नंतर अहृमदनगरकर्डे शिवाजीने
घुमाळी महिला. या सर्वे प्र[त[त औरंगजेबाने आपले सरदार ठेवले होते व
त्यांस शिवाजींचे मुलसांत शिक्का मुलुख _,बळोचैराख करावा, गविं लुटून जाळूनफस्त करार्वी, व मन[त ’द्घेचा लेशही न येऊं दैतां गळावकऱ्गांना मारून टाकावे
असें सक्त हुकूम [दले होते. तेव्हां या सरद[र[न[ ते आपले मुलखांत येंप्यापुह्र्गे ताड
देणें अवश्य होते. शकेभ् ५७ ९च्य[ जेष्ठांत [शवाजीने अह्रमदनगरच्या नासिरखान
नावाच्या तुमैदळाराशा युद्ध मांडले. पण हा डाव साधावा तसा सानला नाही.
किछे'राराने बंदोबस्त चांगला ठेंवला होता. यामुळे शिवाजास तेथून माघार
घेऊन परत फिरावै लागले. या झठापर्टीत मराठघांचें‘ बरेंच नुकसान होण्याचाहो संमव होत[.पर॰तु आषाठांत पावसाळा झपाट्याने सुरू झळाज्यामुळें आंगावर
चाळून आलेले मुसलमान अमाळरार परत फिरले व _शिवाजळोस आपले मुळखाँत
निघून येण्यास चांगला अवसर सापडला. परत देंर्शी आल्यावर शिवाजीने
रघुनाथ बल्लाले यास नौळिसरखानार्शी तह्यवै बोलणें लावण्यास पाठविले व
घेडि दिवसांनी रपुनाथपत वकील यास हँष्णार्जा भास्कर पंडित यांचे पना‘
श्जेपें १८४
२ सरकार ६५
३ कृष्णाजी भास्कराचें पत्र अशासाठीं फॉं अँळा’रगजेंबावै मनांत अट्वट्रॅशां
राहू नये व इतबाराप्वेषर्मी
खात्री पटावा.
पुढेंचाळू
या पनावर छ १ माहे जन्मदि-<noinclude></noinclude>
0l95oo1b3qt9by8n2dw66rqqxc3v2eg