विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.3
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:तीन तत्त्वज्ञानी.pdf
106
68408
230336
230266
2026-05-23T13:29:20Z
कल्पनाशक्ती
3813
230336
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[तीन तत्त्वज्ञानी]]
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=केशव रावजी गोंधळेकर
|Address=पुणे
|Year=1921
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 3="प्रस्तावना" 6 ="अनुक्रमणिका" 7="साक्रेटिस" 63="जॉर्ज बार्क्ले" 86="कँट"/>
|Volumes=
|Remarks={{scrollpane|border=1px dashed silver|height=600px|width=400px|
{{पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६}}}}
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
aa1avxkxghm67hsq9wllovcxnmn71j7
अनुक्रमणिका:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf
106
85681
230353
181842
2026-05-24T10:37:16Z
कल्पनाशक्ती
3813
230353
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=माधव रामचंद्र जोशी
|Address=पुणे
|Year=1920
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist 5="अनुक्रमणिका" 6="फोटो" 7="फोटो" 8="नैनिताल" />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
nijbb4pkbkjcvwf06bmevrlcrxcs80z
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६
104
109930
230341
229896
2026-05-23T13:39:56Z
कल्पनाशक्ती
3813
230341
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{xx-larger|'''अनुक्रमणिका.'''}}}}
{{center|---*****---}}
<center>
{|
|+
|-
| '''१''' || [[तीन तत्त्वज्ञानी/साक्रेटिस|'''साक्रेटिस''']] || १-५६
|-
| || {{gap}}१ इतिवृत्त || १
|-
| || {{gap}}२ साक्रेटिसावरील खटला व त्याचा निकाल || ११
|-
| || {{gap}}३ साक्रेटिसाचा तुरुंगवास || २३
|-
| || {{gap}}४ साक्रेटिसाचा मृत्यु || ३१
|-
| || {{gap}}५ फलश्रुति || ४६
|-
| '''२''' || [[तीन तत्त्वज्ञानी/जॉर्ज बार्क्ले|'''जॉर्ज बार्क्ले''']] || ५७-७९
|-
| || {{gap}}१ अल्प चरित्र || ५७
|-
| || {{gap}}२ बार्क्लेचें तत्त्वज्ञान || ७०
|-
| '''३''' || [[तीन तत्त्वज्ञानी/कँट|'''कँट''']] || ८०-११५
|-
| || {{gap}}१ जीवन-वृत्तांत || ८०
|-
| || {{gap}}२ कँटच्या पूर्वीचें तत्त्वज्ञान || ९४
|-
| || {{gap}}३ कँटचें तत्त्वज्ञान || १०१
|}
</center>
{{nop}}<noinclude></noinclude>
9jupnmb16a6mgli919npef7lrisgiys
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११२
104
110363
230323
230306
2026-05-23T12:13:24Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230323
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>{{gap}}वर दिल्याप्रमाणे थोडक्यांत कँटची मानवी ज्ञानाची मीमांसा आहे. तिचा विशेष हा होय की, संवेदनावादी व विवेकवादी या दोन्ही पंथांच्या तत्त्वज्ञान्यांच्या मतांतील सत्याच्या अंशाचा अंतर्भाव कँटने आपल्या मीमांसेंत केला आहे. संवेदना व विवेक या दोन्हीहि शक्ति मानवी ज्ञानाला आवश्यक आहेत असे त्याने प्रतिपादन केले आहे. व या मीमांसेच्या योगाने त्याने आधिभौतिक शास्त्रांची शक्यता शाबीत केली आहे. आधिभौतिक शास्त्रे गणितशास्त्राप्रमाणे काही तत्वें स्वयंसिद्ध अशी धरतात व त्या तत्वांवरच सर्व आधिभौतिक शास्त्रे अवलंबून आहेत. पण ही तत्वे मानवी ज्ञानाला विवेकज्ञानमीमांसेंत अंतर्भूत झालेल्या कल्पनांच्या द्वारेंच होतात. उ० सर्व ज्ञेय पदार्थाना अवकाश, काल, संख्या व परिमाण हे गुण असतात व म्हणूनच सर्व बाह्य ज्ञेय पदार्थ हे सावयव असून ते विभागतां येतात. आतां आधिभौतिक शास्त्रांतले हे गृहीत तत्त्व ज्ञानाच्या अटीपासून निष्पन्न होते हे उघड आहे. तसेच सर्व बाह्य ज्ञेय पदार्थांना कमीअधिक होणारे सांश गुण आहेत हे तत्त्व सुद्धा ज्ञानाच्या अटीपासून निष्पन्न होते. त्याप्रमाणेच प्रत्येक ज्ञेय वस्तु ही काही तरी कारणाचे कार्य असते हे तत्व सुद्धां ज्ञानाच्या अटीपासूनच निष्पन्न होते. तसेच बाह्य सृष्टि ज्या जड द्रव्याने बनलेली आहे तें जड तत्व अविनाशी आहे, त्याची जगांत नवी वाढ होत नाही किंवा त्याचा जगांत नाशही कधी होत नाही हे तत्व ज्ञानाच्या अटींतून निष्पन्न होते. सारांश, कँटच्या मताने त्याची एकदां ज्ञानमीमांसा गृहीत केली की, आधिभौतिक शास्त्रांचे त्यायोगें समर्थन होतें व ह्यूमची मानवी ज्ञानाबद्दलची व विशेषतः आधिभौतिक शास्त्राच्या शक्यतेची कुशंका नष्ट होते. <br>{{gap}}येथपर्यंत गणितशास्त्र व आधिभौतिक शास्त्रे यांची शक्यता शाबीत करून ह्यूमची चूक कँटने दाखवून दिली. त्याच्या पुस्तकाच्या पुढल्या भागांत मात्र ह्यूमचें व कँटचे एकमत असून त्यांत त्याने विवेकवादी तत्वज्ञान्यांचे तत्वज्ञानाच्या अस्तित्वाबद्दलचे मत खोडून काढले आहे व अज्ञेयवाद स्थापित केला आहे. विवेकवादी तत्वज्ञान्यांच्या मताने आप-<noinclude>{{center|१०६}}</noinclude>
9uc3ptx3u1r9ygtfr0eg1h6ddud7xw0
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११३
104
110364
230324
230307
2026-05-23T12:21:47Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230324
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>ल्याला तत्वज्ञान साध्य आहे. त्यांचे मताप्रमाणे तत्वज्ञानाचे प्रश्न तीन. आत्म्याचे अस्तित्व व अमरत्व या बद्दलचा पहिला प्रश्न, सृष्टीचे यथार्थ व केवल स्वरूप याबद्दलचा दुसरा प्रश्न व परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दलचा तिसरा प्रश्न. हे तिन्ही प्रश्न आपल्या केवल विवेकाने सोडवितां येतात, असें विवेकवादीपंथाचे मत होते. कँटने असे दाखवून दिले की, विवेकवादी यांच्या यासंबंधीच्या विवेचनांत घोडचुका आहेत व या वस्तूंचे ज्ञान मानवी मनाला होणे शक्य नाही व म्हणून मानवी बुद्धीच्या द्वारे तरी हे पदार्थ अज्ञेय आहेत.<br>{{gap}}प्रथमतः आत्म्याच्या अस्तित्वाचा प्रश्न घ्या. आत्म्याची कल्पना आपल्या ज्ञानाला आवश्यक आहे हे कँटला कबूल आहे सर्व ज्ञानांत 'ज्ञाता' व 'ज्ञेय' हा संबंध आवश्यक असतो व म्हणूनच आत्म्याची जाणीव हे एक ज्ञानाचे आवश्यक अंग आहे, अस कँटने प्रतिपादन केले आहे. पण हे ज्ञान होण्यास आपल्याला संवेदना आवश्यक आहेत. संवेदना येतील तेव्हांच मला संवेदना भासतात असे ज्ञान होईल, सारांश, आत्म्याच्या जाणिवेचे ज्ञान हे सापेक्ष आहे. ते संवेदनांशी संलग्न आहे. म्हणजे विषय व विषयी किंवा ज्ञेय व ज्ञाता, किंवा बाह्य पदार्थ व आत्मा या दुकल सापेक्ष आहेत; त्या दोन्ही वस्तूंचे एकसमयावच्छेदेंकरून ज्ञान होते. अर्थात् दोन्हीही कल्पना आपल्या ज्ञानांत अंतर्भूत आहेत असे ज्ञानाच्या पृथक्करणावरून आपल्याला कळते. पण या आत्म्याचे मूळ स्वरूप काय; त्याचे गुण कोणते, तो अमर आहे काय, तो शरीराखेरीज बाहेर राहू शकतो काय? वगैरे प्रश्नांचे उत्तर मिळणें शक्य नाही. कारण हे अतींद्रिय ज्ञानाचे प्रश्न झाले व असें अतींद्रियज्ञान आपल्याला होणे शक्य नाही. कारण ज्ञान मीमांसेवरूनच कळते की संवेदना किंवा इंद्रियद्वारा अनुभव हा आपल्या ज्ञानाला आवश्यक आहे. अर्थात् आपल्या मानवी बुद्धीला अतींद्रियज्ञान शक्य नाही. कारण ती बुद्धि इंद्रियसंवेदनांनी मर्यादित आहे. ती स्वतंत्र शक्ति नाही, ती ज्ञान उत्पन्न करूं शकत नाही, तर संवेदना अनुभवल्यावर बुद्धि त्यावर संस्कार करूं शकते इतकेंच. पण मानवी ज्ञानाचा पाया<noinclude>{{center|१०७}}</noinclude>
f8xsys3fpcw5h8q441msixliuwqf8ca
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११४
104
110365
230325
230309
2026-05-23T12:25:44Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230325
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>संवेदना होय. व ह्यूमनें म्हटल्याप्रमाणे आत्म्याची आपल्याला संवेदना होत नाही. म्हणून तत्वज्ञानाचा हा भाग म्हणजे निवळ एक मानवी बुद्धीची घोडचूक होय. आपल्याला आत्मज्ञान नाही, म्हणून आत्म्याचें अमरत्व किंवा जडराहित्य किंवा अणुत्व वगैरे प्रश्न मानवी ज्ञानाच्या आटोक्याबाहेरचे आहेत.<br>{{gap}}बाह्य सृष्टीचे जे आपल्याला ज्ञान होतें तेंहि अर्थात् संवेदनात्मक असते म्हणून आपल्याला बाह्य सृष्टीचे केवल स्वरूप कळणे शक्य नाही. विवेकवादीपंथाने असें ज्ञान होते असे प्रतिपादन केले आहे खरे, पण संवेदनावादीपंथाने त्यांचे म्हणणे खोडून काढले आहे. कँटचे म्हणणे असे की, या परस्परविरोधी विधानांवरून हेहि ज्ञान मानवी बुद्धीच्या आटोक्याबाहेरचे आहे असे दिसून येते. उदाहरणार्थ बाह्य सृष्टि ही मर्यादित आहे किंवा अमर्यादित आहे ह्यासंबंधी वाद आहे. दोन्ही विधाने प्रमाणाने सिद्ध करतां येतात. परंतु कँटचे मते आपल्याला बाह्य सृष्टीचें निश्चित ज्ञान होणे शक्य नाही. कारण अवकाश ही जर सृष्टिज्ञानाची एक आवश्यक अट आहे तर आपल्याला बाह्य सृष्टीची मर्यादा संपली किंवा ती मर्यादा कधीहि संपणार नाही असे म्हणता येत नाही. या दोन्ही स्थिति अतींद्रिय आहेत व आपल्या बुद्धीला अतींद्रियज्ञान होऊ शकत नाही. तसेंच बाह्य सृष्टि विभाज्य आहे किंवा अविभाज्य आहे, म्हणजे तिचे परमाणू आहेत किंवा नाहीत हे निश्चयाने सांगता येत नाही. कारण ही स्थिति अतींद्रिय आहे. असो.<br>{{gap}}आतां परमेश्वराची कल्पनाही अतीन्द्रिय आहे. म्हणूनच तो मानवी बुद्धीला अज्ञेय आहे. कारण परमेश्वर म्हणजे सर्वगुणसंपन्न व कारणरहित सृष्टीचे कारण होय. पण गुण हे आपल्याला संवेदनांनी कळतात तेव्हां सर्वगुणसंपन्नता कळणे शक्य नाही. कारण ती अतीन्द्रिय आहे. तसेच आपल्या बुद्धीला कारणरहित कारण कळणे शक्य नाही. कारण आपल्या बुद्धीला जें जें कळते त्याला त्याला कार्यकारणभाव लागू<noinclude>{{center|१०८}}</noinclude>
d1c4xqwfy20z9lcaujmrsegvnhyzwg1
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११५
104
110366
230326
230310
2026-05-23T12:30:08Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230326
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>आहे. तेव्हां 'कारणरहित कारण' ही कल्पनाच मुळी बुद्धिदृष्टया विसंगत आहे. तेव्हां असा पदार्थ आपल्याला कळणारच नाही.<br>{{gap}}परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल विवेकवादी जी प्रमाणे पुढे आणतात तीही सदोष आहेत असें कँटने दाखविले आहे.<br>{{gap}}परमेश्वर पूर्ण किंवा सर्वगुणसंपन्न आहे. तेव्हां तो अस्तित्वात असलाच पाहिजे. कारण जर त्याला अस्तित्व हा गुण नसेल तर तो सर्वगुणसंपन्न होणार नाही. ईश्वराच्या अस्तित्वाचे हे प्रमाण सदोष आहे. कारण येथे आपण कल्पनेवरून अस्तित्वाकडे जातो. 'पूर्ण पदार्थाची' कल्पना आपल्या अपूर्ण पदार्थाच्या कल्पनेवरून सुचते खरी; पण कल्पना म्हणजे खरी सृष्टि नव्हे. कल्पना जर खरी सृष्टि असती तर कविकल्पना किंवा स्वप्नकल्पना खऱ्या मानाव्या लागतील. मानवी बुद्धि खऱ्या खोट्याचा निर्णय संवेदनावरून करते व परमेश्वराची कल्पना तशी संवेद्य नाही. तेव्हां तिचे अस्तित्व सिद्ध करणे अशक्य आहे.<br>{{gap}}परमेश्वराच्या अस्तित्वाच्या दुसऱ्या प्रमाणांचे विवेकवाद्यांनी असें विवेचन केले आहे. बाह्य जग व मानवी मन अस्तित्त्वांत आहेत यांना काही तरी कारण असलेच पाहिजे व ते कारण परमेश्वर होय. पण कँटचे मते हे प्रमाणही सदोष आहे. यांत जे तत्व आधिभौतिक शास्त्राला व ज्ञेय पदार्थांना लागू आहे ते तत्व अतीन्द्रिय पदार्थाला लागू केले आहे. म्हणूनच सृष्टीचे कारण परमेश्वर तर परमेश्वराचे कारण काय असा जडवादी रोखठोक जबाब विवेकवाद्यांना विचारतात व मग विवकवादी निरुत्तर होतात. कारण विवेकवादी व जडवादी यांमध्ये फारसा फरक राहत नाही. जडवादी 'जडा' शी थांबतात तर विवेकवादी एक पायरी पुढे जातात येवढेच. पण त्या पायरीच्या पुढे काय हा प्रश्न राहतोच. म्हणूनच कँटचे म्हणणे बुद्धीने हा प्रश्न सुटण्यासारखाच नाही.<br>{{gap}}परमेश्वराच्या अस्तित्वाचे तिसरे प्रमाण म्हणजे सृष्टीच्या रचना चातुर्याचे प्रसिद्ध प्रमाण होय. या प्रमाणाबद्दल कँटला नेहेमी आदर वाटत असे; पण बुद्धिदृष्टया या प्रमाणावरून परमेश्वर 'सृष्टीचा विश्वकर्मा'<noinclude>{{center|१०९}}</noinclude>
3m6j88q6m2zspvuaga8zd10mjupdv39
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११६
104
110367
230327
230029
2026-05-23T12:36:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230327
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>येवढेच फार तर सिद्ध होते; म्हणजे सृष्टीचे मूळ द्रव्य अनादि व स्वतंत्र मानावे लागते; परमेश्वर फक्त त्या जडद्रव्याची चतुराईने मांडणी करतो इतकेंच दिसून येते.<br>{{gap}}याप्रमाणे तत्त्वज्ञान मानवी बुद्धीच्या आटोक्याबाहेर आहे असें कँटनें दाखविले आहे. मानवी ज्ञानाच्या योगाने विवेकशक्तीला 'आत्मा, सृष्टीचे केवळ स्वरूप व परमेश्वर' या कल्पना सुचतात खऱ्या व या कल्पनांचा 'ज्ञानाचे ध्येय' म्हणून उपयोग आहे खरा. पण या कल्पना अतीन्द्रिय असल्यामुळे त्यांचे ज्ञान होणे शक्य नाही, या विवेचनालाच कँटचा बौद्धिक अज्ञेयवाद म्हणतात.<br>{{gap}}अर्थात् बुद्धीने तत्त्वज्ञान शक्य नाही असा कँटचा सिद्धांत आहे, पण बुद्धीखेरीज मानवी इतर शक्तीने या अतीन्द्रिय गोष्टीबद्दल डोळसश्रद्धा उत्पन्न होणे शक्य आहे. ती कशी उत्पन्न होते हे सांगणे म्हणजेच कँटच्या नव्या तत्त्वज्ञानाचा मथितार्थ सांगणे होय. तरी आतां शेवटी तिकडे वळू.<br>{{gap}}कँटच्या नव्या तत्वज्ञानाचा उल्लेख त्याच्या पहिल्या परीक्षणात्मक ग्रंथाचे शेवटी आला आहे खरा; व तेथे त्याने या तत्वज्ञानाची रूपरेखा दिली आहे खरी; तरी पण त्या तत्वज्ञानाचे त्याच्या पुढच्या परीक्षणात्मक ग्रंथांत सविस्तर विवरण आलेले आहे. त्याच्या पहिल्या परीक्षणात्मक ग्रंथाचा शेवट अज्ञेय वादांत होतो खरा; पण कँट येथेच थांबत नाही. आपल्या ज्ञानांने सूचित केलेले 'आत्मा' 'परमेश्वर' इत्यादि प्रश्न आपल्या बुद्धीला सुटले नाहीत तरी ते मानवी मनाच्या इतर शक्तींच्या आवाक्याबाहेरचे आहेत अशांतला भाग नाही; असें कँटचे म्हणणे आहे व हा मुद्दाच त्याने आपल्या पुढील परीक्षणात्मक ग्रंथांत प्रमुखपणे पुढे आणला आहे.<br>{{gap}}त्याच्या दुसऱ्या परीक्षणात्मक पुस्तकाचा विषय सद्सद्विवेकशक्ती हा होय. मनुष्याला पुष्कळ वासना आहेत; त्यामुळेच मनुष्य प्रवृत्तिपर बनून वर्तन करतो. पण पशुप्रमाणे मनुष्याचे वर्तन केवळ वासनावर<noinclude>{{center|११०}}</noinclude>
dn5vmn4dp5qbvz4jp8olyihuctkzttm
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११७
104
110368
230328
230030
2026-05-23T12:47:00Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230328
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>अवलंबून नसते. तेथेही मनुष्याची विवेकशक्ति पुढे येते व मनुष्याला आज्ञा करते. म्हणून त्या विवेकशक्तीला सद्सद्विवेकशक्ति म्हणतात. 'तूं अमूक मार्गानेच वागले पाहिजे, तुझें अमुक कर्तव्यकर्म आहे' अशी सद्सद्विवेकशक्ति आज्ञा करते. आतां, ही आज्ञा 'तुला लेखक व्हावयाचे असेल तर चांगले अक्षर कर; किंवा तुला सुख पाहिजे असेल तर वासनातृप्ति कर' अशा तऱ्हेची शर्तीची आज्ञा नसते. तर ती बिनशर्त आज्ञा असते. 'विवेकी मनुष्य म्हणून तूं हे केले पाहिजेस, तुझे कर्तव्यकर्म म्हणून हे केले पाहिजेस; फलाशा ठेवून कर्म करतां कामा नये' अशा तऱ्हेची ही आज्ञा असते. अर्थात् अशी आज्ञा पाळणे म्हणजे वासनांना बाजूस सारून केवळ विवेकाचे पाय धरणे होय. ही आज्ञाच सर्व नीतिनिर्बंधाचा मूळ पाया होय. या बिनशर्त आज्ञेपासूनच सर्व नीतीचे नियम निघालेले आहेत. आतां या आज्ञेचे स्वरूप तरी काय आहे? अर्थात् या आज्ञेत विशेष वासनांचा समावेश होत नाही, या आज्ञेत सुखाच्या कल्पनेचे ध्येय येत नाही. ही आज्ञा कर्तव्य म्हणून कर्तव्य करा इतकेच सांगते. तुमचे कर्तव्य कोणतें हे तुमच्या परिस्थितीवर व समाजांतील दर्जावर अवलंबून राहील. पण तुमचे कर्तव्यकर्म कर्तत्वकर्म म्हणून करा फलाशेने करूं नका इतकेच विवेकाचे म्हणणे आहे. अर्थात् ही आज्ञा सर्व माणसांना लागू आहे. ती सदा सर्वकाळ पाळावयाची आहे. ती एकाला आहे आणि दुसऱ्याला नाही अशांतला भाग नाही; तिला अपवाद ठाऊक नाही. एकाच परिस्थितीत जर एका मनुष्याचे एक कर्तव्यकर्म असले तर त्याच परिस्थितीत ते सर्व मनुष्यांचे कर्तव्य कर्म असले पाहिजे असे ती आज्ञा म्हणते. 'तूं अशा तऱ्हेने वाग की तुझ्या वागण्याचे तत्व तुझ्या इच्छेने सार्वत्रिक नियम करतां आल्यास तुझ्या विवेकाला तें तत्व आवडेल' असे या आज्ञेचे स्वरूप कँटने दिले आहे. याला त्याने नैतिक कायदा म्हटले आहे व सर्व नीतिनियम या कायद्यापासून निष्पन्न होतात असे कँटने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ सत्य बोलण्याचा<noinclude>{{center|१११}}</noinclude>
r4608grrbk7ed1wsl9kvch739e2na3s
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११८
104
110369
230329
230031
2026-05-23T12:50:39Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230329
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>नियम घ्या. खोटे बोलून दुसऱ्याला फसविण्याची आपल्याला इच्छा होते. तेव्हां जर खोटें बोलण्याचे तत्व रास्त आहे तर सर्वांनी अशा प्रसंगी खोटे बोलण्यास हरकत नाही असें ठरते. पण असा सार्वत्रिक नियम झाला तर कोणी कोणावर विश्वास ठेवणार नाही. व मग आपलें खोटें बोलण्याचा उपयोग नाही; तेव्हां खोटे बोलण्याची इच्छा म्हणजे अपवादात्मक आहे. आपण मात्र खोटे बोलावें व सर्वत्रांनी खरे बोलण्याचा नियम पाळावा असे आपल्याला वाटते. या विवेचनावरून खोटे बोलणे नैतिक कायद्याच्या विरुद्ध म्हणूनच अनीतीचे ठरते.<br>{{gap}}तसेंच एखाद्याला चोरीची इच्छा झाली तर ही वाईट की चांगली? जर चांगली तर सर्वांनी सर्वांच्या वस्तु न विचारतां घेणं रास्त होइल. पण मग चोरीचा उद्देश नाहीसा होईल. कारण आपल्याजवळ चोरलेली वस्तु कशी राहील? दुसरा आपल्यास न विचारतां ती घेऊन जाईल व न विचारतां घेऊन जाणे यांत कांहीं वावगे नाही असे आपल्या वर्तनाचें तत्व सांगते. पण अशी सार्वत्रिक अदाधुंदीची स्थिति आपल्या विवेकशक्तीला बरोबर वाटत नाही. येथेसुद्धां सामान्य नियम व आपल्यापुरतां अपवाद आपल्याला पाहिजे असतो व म्हणून अशी अपवादात्मक वर्तणुक नैतिक कायद्याविरुद्ध ठरते. आणखी एक उदाहरण घेऊ. एखादा गरजू आपल्याजवळ मदत मागावयास आला तर ती त्याला द्यावी किंवा नाही? आपली स्वार्थी इच्छा म्हणते देऊ नये. पण आपले करणे रास्त असेल तर कोणी कोणास संकटांत मदत करूं नये असा सार्वत्रिक नियम ठरतो. पण असा नियम व्हावा अशी आपली खरी इच्छा नसते. आपण संकटांत असलो म्हणजे दुसऱ्यांनी आपल्या मदतीला यावे असे आपणास वाटते तेव्हां येथे सुद्धा दुसऱ्याला मदत न करण्याची स्वार्थी बुद्धि ही अपवादात्मक असते. म्हणजे आपण मात्र दुसऱ्यास मदत करू नये, दुसऱ्याने मात्र आपल्या मदतीस धावावें असे आपले आपलपोटेपणाचे वर्तन असते व म्हणूनच आपलपोटेपणा हा नैतिक दुर्गुण ठरतो.{{nop}}<noinclude>{{center|११२}}</noinclude>
2283dh8c1w9omjfquyh9b11glpd8qed
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११९
104
110370
230330
230032
2026-05-23T12:55:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230330
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>{{gap}}याप्रमाणे कँटने सदसद्विवेकशक्तीचे पृथक्करण करून नीतीनियमाची मीमांसा केली आहे. आतां या पृथक्करणावरून त्यांत कोणती गृहीततत्त्वे समाविष्ट झालेली आहेत, याचे विवेचन करणे क्रमप्राप्त आहे.<br>{{gap}}नीतिशास्त्रांतला पहिला सिद्धांत म्हणजे कर्तव्यकर्माची जाणीव होय. 'मी अमुक एक गोष्ट केलीच पाहिजे; ते माझे कर्तव्यकर्म आहे.' पण विधानामध्ये माझी स्वतंत्रताशक्ति गृहीत धरली आहे. (I ought therefore I can) माझें कर्तव्यकर्म आहे म्हणजे मला तसे वागण्याची स्वतंत्र शक्ति आहे. बाह्य सृष्टीला लागू असणारा कार्यकारणभाव मला लागू नाही. मी आपल्या सदसद्विवेकशक्तीप्रमाणे वागण्यास समर्थ आहे असें सिद्ध होते बाह्य सृष्टीतील गोष्टींच्या बाबतीत अमुक केले पाहिजे असें आज्ञापक विधाने निरर्थक होय, कारण बाह्य वस्तु सृष्टिनियमानी बद्ध आहेत, त्यांना निराळ्या तऱ्हेनें वागणे शक्य नाही; पण विवेकी मानवप्राण्याला स्वतंत्रता आहे व म्हणून त्याच्या विवेकशक्तीच्या आज्ञेला अर्थ व महत्त्व आहे. तेव्हां नीतिविषयक सदसद्विवेकशक्तीच्या आज्ञेपासून आत्म्याचे स्वतंत्र व कार्यकारणभावरहित अस्तित्व सिद्ध होते. आपली बुद्धि या आत्म्याच्याबद्दल असले विधान करू शकत नव्हती. कारण आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व ही कल्पनाच मुळी अतीन्द्रिय आहे व अशा कल्पनेचा प्रत्यय मानवी बुद्धीला होऊ शकत नाही. पण आतां आपल्या नैतिक अनुभवावरून आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व आपल्याला मानणे भाग आहे. कारण या अनुभवाने,हें एक गृहीत तत्व आहे, असे दिसून येते.<br>{{gap}}सदसद्विवेकशक्तीने दिलेल्या नैतिक कायद्यापासून दुसरें एक गृहीततत्व सिद्ध होते ते असें. आपली सदसद्विवेकशक्ति म्हणते की, आपले कर्तव्यकर्म फलाशेने किंवा वासनांनी किंवा भावनांनी प्रेरित होऊन करूं नका तर कर्तव्य म्हणून सदसद्विवेकाची आज्ञा म्हणून करा. सारांश कर्तव्यकर्म करतांना फलाशा वासना किंवा भावना यांचा लेशसुद्धां मनांत वावरू देऊ नका असें विवेक सांगतो. पण जोपयत मानवी आयुष्य<noinclude>{{center|११३}}</noinclude>
r38h4bd0lhw4wdem3byionqjapw4ioi
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१२०
104
110371
230331
230033
2026-05-23T13:03:03Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230331
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>देहाशी संलग्न आहे तोपर्यंत वासनाच्छेद, फलाशाछेद किंवा भावनाच्छेद सर्वांशी होणे शक्य नाही असा आपला अनुभव आहे. पण ही गोष्ट जर अशक्य असती तर विवेकशक्ति अशी निरर्थक व निरुपयोगी आज्ञा कशी करती? केवळ विवेकाची आज्ञा म्हणून वर्तन करणे आपल्याला साध्य झाले पाहिजे तर ती आज्ञा अन्वर्थक होईल, तेव्हां हा आज्ञा एका जन्मांत पाळण्यासारखी नसल्यास तिची पूर्तता पुढल्या जन्मांत होईल व अर्थात असे होण्यास आत्मा अमर असला पाहिजे असे मानण्यास आपण तयार झाले पाहिजे, म्हणजे नीतीच्या कायद्यावरून आत्म्याचे अमरत्व निष्पन्न होते. हे नीतिशास्त्रांतून निघणारे दुसरे गृहीत तत्व होय.<br>{{gap}}आतां नीतिशास्त्रांतून निघणारे तिसरे गृहीत तत्व परमेश्वराच्या अस्तिस्वाचे होय. कँटने हे तत्व खालील पद्धतीने सिद्ध केले आहे. आपण मनुष्याच्या पुरुषार्थाच्या कल्पनेचा विचार करूं लागलों म्हणजे श्रेयस व प्रेयस किंवा धर्म व काम किंवा हित व सुख या दुकलीची आठवण होते. म्हणजे या दुकलीपैकी दोन्ही गोष्टी जरी परस्पर भिन्न किंवा विरुद्ध आहेत, तरी त्या एकत्र असाव्या तरच मानवी आयुष्याचे खरे ध्येय साध्य झाले असे म्हणता येईल. सारांश, सद्गुणी मनुष्य नेहेमी सुखी असावा असे आपली विवेकशक्ति सांगते. केवळ सद्गुण किंवा केवळ सुख येवढ्याने मानवी आयुष्याची साफल्यता झाली असें विवेकशक्तीला वाटत नाही. तर खऱ्या आयुष्याच्या साफल्यतेला सद्गुण व सुख यांची सांगड पाहिजे असें विवेक कंठरवाने सांगतो. विवेकाची नैतिक आज्ञा तर निवळ सदगुणांबद्दल आहे, उलट सुखाकडे पाहूं नको असे त्याचे म्हणणे आहे. तरी पण अंती सद्गुणी माणसाला सुख व्हावे असे आपत्याला वाटते. तसेच दुर्गुणी माणूस दुःखांत असावासें आपल्या विवेक शक्तीला वाटते. पण आयुष्यांत तर नेहेमी याच्या उलट अनुभव येतो.<br>{{gap}}दुर्गुणी माणसें चैनीत व सुखांत आहेत असे आपण पाहतो तर सद्गुणी माणसें हालअपेष्टा व दुःख भोगीत आहेत असे आप-<noinclude>{{center|११४}}</noinclude>
43ns52er5nlqpe99kuo8mzpq1gjua2b
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१२१
104
110372
230332
230035
2026-05-23T13:10:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230332
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>ल्याला दिसते. पण ही वस्तुस्थिति आपल्या विवेकाला पटत नाही. तेव्हां आपली सहज भावना होते की, या जगांत परमेश्वर आहे व जरी हल्लीच्या जगांत अशी वस्तुस्थिति असली तरी ती क्षणीक आहे निरंतरची नाही; परमेश्वराच्या घरी सद्गुणाला सुख लाभलेच पाहिजे व दुर्गुणाला शासन झालेच पाहिजे व जगाचा कर्ता तो न्यायी परमेश्वर येथे नाही तर स्वर्गात तरी सदगुणांची व सुखाची सांगड घालून देईल. तेव्हां या सर्व न्यायी परमेश्वराच्या अस्तित्वाच्या कल्पनेने आपल्या नैतिक आकांक्षाचे समाधान होते व असा न्यायी परमेश्वर नैतिक कल्पना असणाऱ्या जगाच्या मूळाशी असलाच पाहिजे अशी आपली विवेकवाणी सांगते व आपल्या नैतिक अनुभवावरून तो आपल्याला श्रद्धेय आहे असेंही वाटते.<br>{{gap}}सारांश, बुद्धीला ज्या गोष्टी शास्त्रीयदृष्टया म्हणजे संवेदनात्मक ज्ञानदृष्टया सिद्ध करता येत नाहीत, त्या गोष्टी आपल्या नैतिक अनुभवाने सिद्ध करतां येतात व म्हणून तत्वज्ञान हे बौद्धिक अनुभवाच्या पायावर न उभारतां-कारण तेथें अज्ञेयवाद व जडवाद आपल्याला निरुत्तर करतात- नैतिक अनुभवाच्या पायावर उभारावे असे कँटच्या प्रतिपादनाचें सार आहे व यालाच तो आपले नवे तत्वज्ञान म्हणतो; मात्र आत्मा, परमेश्वर वगैरे अतींद्रिय गोष्टींचे ज्ञान झाले असें न म्हणतां याबद्दल आपली विवेकी श्रद्धा उत्पन्न झाली असे तो म्हणतो. अर्थात् ही तडजोड कँटनें जडवाद्यांचे व अज्ञेयवाद्यांचे तोंड बंद करण्याकरितां सुचविली आहे असे दिसते.<br>{{gap}}कँटच्या तिसऱ्या परीक्षणात्मक पुस्तकाचा विषय जडाजड जगांत दिसून येणारे सौंदर्य, भव्यता, प्रयोजन व रचनाचातुर्य इत्यादि गोष्टींचें विवेचन करण्याचा आहे. व या विवेचनावरून या जगाला कोणी तरी चिन्मय कर्ता आहे असे मानवी मनाला वाटावयाला लागते, तेव्हां ज्याप्रमाणे आपल्या नैतिक अनुभवावरून मनुष्यामध्ये परमेश्वराच्या अस्तिस्वाबद्दल श्रद्धा उत्पन्न होते त्याप्रमाणेच मनुष्याच्या सौंदर्यविषयक अनु-<noinclude>{{center|११५}}</noinclude>
8acgxsaudy7tiaekh4t2lcrzr8fan8i
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१२२
104
110373
230333
230036
2026-05-23T13:16:26Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230333
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>भवावरून परमेश्वरविषयक भावना मनांत उत्पन्न होते असे कँटने या ग्रंथांत प्रतिपादन केले आहे.<br>{{gap}}तात्पर्य, कँटचे नवे तत्वज्ञान जरी अज्ञेयवादी आहे असे प्रथमदर्शनी वाटले तरी त्या तत्वज्ञानाचा सर्व रोख परमेश्वराचे व आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करण्याकडे आहे यात शंका नाही. कँटचे म्हणणे थोडक्यांत असें सांगतां येईल; परमेश्वर किंवा आत्मा आपल्याला दृष्टीने दिसत नाही. कारण हे पदार्थ उघड उघड अतींद्रिय आहेत, तेव्हां परमात्मा व जीवात्मा बुद्धिगम्य आहेत व बाह्य जगाप्रमाणे आपल्याला त्यांचे अस्तित्व कळते अशा तऱ्हेचा आग्रह धरण्यांत अर्थ नाही. येथें अज्ञेयवादच पतकरणे श्रेयस्कर आहे. कारण, परमेश्वर आम्हांला कळत नाही. आमच्या आटोक्याबाहेरचा तो विषय आहे इतकें सिद्ध झाले तर निदान जडवाद्यांचे किंवा नास्तिक्यवाद्यांचे तोंड बंद होते. याप्रमाणे दोघांची तोंडे बंद केल्यावर आपल्याला नीतिशास्त्राचा व नैतिक अनुभवाचा आश्रय करावयास सांपडतो. या नैतिक अनुभवावरून आपली परमेश्वराच्या व आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल सकारण व विवेकी श्रद्धा उत्पन्न होते; नव्हे सौंदर्यविषयक भावनांनी तर परमेश्वर साक्षात् आपल्याला भासमान होतो, म्हणजे जरी परमेश्वर मानवी मनाला कळत नाही; तरी त्यावर श्रद्धा बसते व जणू कांहीं तो आपल्यापुढेच उभा आहे असा भासतो. इतकेच आपल्याला परमात्म्याबद्दल समजते. पण हे समजणे काही थोडे नाही. त्याने आपण धर्मपरायण व नीतिपरायण होण्यास हरकत नाही व अशा तऱ्हेनें तत्वज्ञानाचा विकास केल्यास नास्तिक्याचा व जडवादाचा जगातून नायनाट व्हायला हरकत नाही. हे कँँटच्या शिकवणीचे सार होय व म्हणूनच कँटचे तत्वज्ञान सर्व युरोपभर पसरले व कँट हा तत्वज्ञानांतील क्रांतिकर्ता बनला.<br>
{{center|{{xx-larger|समाप्त}}}}{{nop}}<noinclude>{{center|११६}}</noinclude>
e61w77m38h644e9xcabeuw5ju4b1woz
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१२३
104
110374
230334
230037
2026-05-23T13:24:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230334
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|'''प्रो०. गोविंद चिमणाजी भाटे''' यांची}}
{{center|{{x-larger|'''विक्रीस तयार पुस्तकें.'''}}}}<br>
<br>
<center>
{|
|+
|-
| १ || अर्थशास्त्राची मूलतत्त्वे || २ σ८
|-
| २ || समाजशास्त्रावरील व्याख्याने || σ८
|-
| ३ || सज्जनगड व समर्थ रामदास || σ१२
|-
| ४ || माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास<br>किंवा हरिद्वार-मथुरा-वृंदावनादि<br>स्थळांची सचित्र वर्णनें || σ१२
|-
| ५ || माझा अटकेपार प्रवास- सचित्र || σ१२
|-
| ६ || हिंदुस्तानचे नंदनवन- सचित्र || σ१२
|-
| ७ || कार्लाईल व हिंदूचालीरीति || १
|-
| ८ || चरित्र-पंचक- सचित्र (छापत आहे){{gap}} || σ१२
|}
</center>
<br>
{{center|{{x-larger|'''आर. आर. आणि मंडळी,'''}}<Br>'''केतकर यांचा बंगला, सांगली'''}}<noinclude></noinclude>
bbtutn8shoh1wz3rbtki79wwyg9m0ns
230335
230334
2026-05-23T13:25:19Z
कल्पनाशक्ती
3813
230335
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><Br><br>
{{center|'''प्रो०. गोविंद चिमणाजी भाटे''' यांची}}
{{center|{{x-larger|'''विक्रीस तयार पुस्तकें.'''}}}}<br>
<br>
<center>
{|
|+
|-
| १ || अर्थशास्त्राची मूलतत्त्वे || २ σ८
|-
| २ || समाजशास्त्रावरील व्याख्याने || σ८
|-
| ३ || सज्जनगड व समर्थ रामदास || σ१२
|-
| ४ || माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास<br>किंवा हरिद्वार-मथुरा-वृंदावनादि<br>स्थळांची सचित्र वर्णनें || σ१२
|-
| ५ || माझा अटकेपार प्रवास- सचित्र || σ१२
|-
| ६ || हिंदुस्तानचे नंदनवन- सचित्र || σ१२
|-
| ७ || कार्लाईल व हिंदूचालीरीति || १
|-
| ८ || चरित्र-पंचक- सचित्र (छापत आहे){{gap}} || σ१२
|}
</center>
<br>
{{center|{{x-larger|'''आर. आर. आणि मंडळी,'''}}<Br>'''केतकर यांचा बंगला, सांगली'''}}<noinclude></noinclude>
9mtymvhl46y11b46oyu5frunqwpzx0h
तीन तत्त्वज्ञानी
0
110382
230337
2026-05-23T13:32:50Z
कल्पनाशक्ती
3813
नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = तीन तत्त्वज्ञानी | साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = [[तीन तत्त्वज्ञानी/साक्रेटिस|साक्रेटिस]] | वर्ष = 1921 | टिपण = | वर्ग =..."
230337
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = तीन तत्त्वज्ञानी
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील =
| पुढील = [[तीन तत्त्वज्ञानी/साक्रेटिस|साक्रेटिस]]
| वर्ष = 1921
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="तीन तत्त्वज्ञानी.pdf" from="1" to="6" />
bjqh91pifa0f12tujuo5ylfzpz5evtt
तीन तत्त्वज्ञानी/साक्रेटिस
0
110383
230338
2026-05-23T13:34:26Z
कल्पनाशक्ती
3813
नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = तीन तत्त्वज्ञानी | साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे | अनुवादक = | विभाग = | मागील = [[तीन तत्त्वज्ञानी/साक्रेटिस|साक्रेटिस]] | पुढील = तीन तत्त्वज्ञानी/जॉर्ज बा..."
230338
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = तीन तत्त्वज्ञानी
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[तीन तत्त्वज्ञानी/साक्रेटिस|साक्रेटिस]]
| पुढील = [[तीन तत्त्वज्ञानी/जॉर्ज बार्क्ले|जॉर्ज बार्क्ले]]
| वर्ष = 1921
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="तीन तत्त्वज्ञानी.pdf" from="7" to="62 " />
q6ru25sbirm3d8qz1engqyk0da3bzt9
तीन तत्त्वज्ञानी/जॉर्ज बार्क्ले
0
110384
230339
2026-05-23T13:36:05Z
कल्पनाशक्ती
3813
नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = तीन तत्त्वज्ञानी | साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे | अनुवादक = | विभाग = | मागील = [[तीन तत्त्वज्ञानी/साक्रेटिस|साक्रेटिस]] | पुढील = [[तीन तत्त्वज्ञानी/कँट|कँट]] |..."
230339
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = तीन तत्त्वज्ञानी
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[तीन तत्त्वज्ञानी/साक्रेटिस|साक्रेटिस]]
| पुढील = [[तीन तत्त्वज्ञानी/कँट|कँट]]
| वर्ष = 1921
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="तीन तत्त्वज्ञानी.pdf" from="63 " to="85 " />
049cam4qtvqslrqdgnzfhr6eymsjqdw
तीन तत्त्वज्ञानी/कँट
0
110385
230340
2026-05-23T13:37:15Z
कल्पनाशक्ती
3813
नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = तीन तत्त्वज्ञानी | साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे | अनुवादक = | विभाग = | मागील = [[तीन तत्त्वज्ञानी/जॉर्ज बार्क्ले|जॉर्ज बार्क्ले]] | पुढील = | वर्ष = 1921 | टिपण..."
230340
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = तीन तत्त्वज्ञानी
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[तीन तत्त्वज्ञानी/जॉर्ज बार्क्ले|जॉर्ज बार्क्ले]]
| पुढील =
| वर्ष = 1921
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="तीन तत्त्वज्ञानी.pdf" from="86 " to="123 " />
bm0468m2qfn2t5hmv3uwseloauwftx3
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१
104
110386
230342
2026-05-23T13:56:08Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230342
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Css image crop
|Image = माझा_उत्तरहिंदुस्तानचा_प्रवास.pdf
|Page = 1
|bSize = 498
|cWidth = 446
|cHeight = 599
|oTop = 2
|oLeft = 5
|Location = center
|Description =
}}<noinclude></noinclude>
k36w5iijqt95v6q4ba1w5quiai1099b
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/२
104
110387
230343
2026-05-23T13:56:40Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ माझा उत्तर हिंदुस्तानचा प्रवास ग्रंथकार गोविंद चिमणाजी भाटे, एम्. ए. प्रिन्सिपॉल - बिलिंगडन कॉलेज, सांगली. प्रकाशक - माधव रामचंद्र जोशी, बी. ए., ६, नारायण पेठ, पुणे शहर. मुद्रक -..."
230343
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
माझा उत्तर हिंदुस्तानचा प्रवास
ग्रंथकार
गोविंद चिमणाजी भाटे, एम्. ए. प्रिन्सिपॉल - बिलिंगडन कॉलेज, सांगली.
प्रकाशक - माधव रामचंद्र जोशी, बी. ए., ६, नारायण पेठ, पुणे शहर.
मुद्रक - केशव रावजी गोंधळेकर, 'जगद्धितेच्छु प्रेस', ५०७ शनवार पेठ, पुणे शहर.
( सर्व हक्क स्वाधीन. )
सन १९२०
आवृत्ति २ री
किंमत १२ आणे.<noinclude></noinclude>
7jsuopco9wrfi73k7joscisns9bhtch
230344
230343
2026-05-24T09:43:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230344
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><center>
{{xxx-larger|'''माझा उत्तर हिंदुस्तानचा प्रवास'''}}<Br>
{{rule|15em}}
<Br><br>
'''ग्रंथकार'''<br>
{{xx-larger|'''गोविंद चिमणाजी भाटे,'''}}{{x-larger|एम्. ए.<Br>प्रिन्सिपॉल - विलिंगडन् कॉलेज, सांगली.}}<br>
{{rule|5em}}<br>
{{x-larger|प्रकाशक - माधव रामचंद्र जोशी, बी. ए.,<br>६, नारायण पेठ, पुणे शहर.}}<Br>
{{rule|5em}}<br>
मुद्रक - केशव रावजी गोंधळेकर,<br>'जगद्धितेच्छु प्रेस', ५०७ शनवार पेठ, पुणे शहर.<Br>
{{rule|5em}}
(सर्व हक्क स्वाधीन.)<Br>
{{rule|5em}}
'''सन १९२०'''<Br>
{{rule|5em}}
'''आवृत्ति २ री'''
{{rule|5em}}
{{x-larger|'''किंमत १२ आणे.'''}}
</center>
{{nop}}<noinclude></noinclude>
hqu5gu3k598k1t3va0j54nkxgikn22z
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/३
104
110388
230345
2026-05-24T09:48:22Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230345
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><Br><Br><br><br>
{{center|{{xx-larger|'''कै० सौ० गजराबाई गोविंद भाटे'''}}<Br>यांस<Br>त्यांच्या अकाल निधनाबद्दल अहर्निश हळहळणाऱ्या<Br>व<Br>त्यांच्या अंगच्या गुणशीलसंनिपाताचें सतत चिंतन करणाऱ्या<Br>त्यांच्या हतभागी पतीनें त्यांच्या समवेत केलेल्या<Br>प्रवासाचें हें वर्णनात्मक पुस्तक<Br>'''सप्रेम अर्पण केलें आहे.'''}}
<Br><Br><br><br>{{nop}}<noinclude></noinclude>
1cgqxreiqai9svn50dx1l3sbnu4ll2q
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/४
104
110389
230346
2026-05-24T10:01:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230346
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><Br>
{{center|{{x-larger|'''पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना.'''}}}}<br>
{{gap}}ज्या माझ्या दूरदूरच्या प्रवासाची सचित्र वर्णनें मी मासिक मनोरंजनांत लिहिली त्या माझ्या प्रवासांना प्रारंभ केल्यास आज विजयादशमीस बरोबर आठ वर्षे झाली. प्रथमतः जेव्हां हे वर्णनात्मक लेख त्या मासिकांत येऊ लागले तेव्हां ते बरेच लोकप्रिय झाले व याचें एक प्रत्यंतर म्हणजे असल्या लेखांचे अनुकरण होऊन सचित्र-प्रवास- वृत्तपर लेख हे हल्लीं मराठी मासिक पुस्तकांचें एक अवश्यक अंग होऊन बसले आहे. माझे लेख कांहीं लोकांस तरी उपयुक्त झाले हे मला खालील तऱ्हेनें अचानकपणे समजून आलें. मी एकदां मुंबईस सरदारगृहांत उतरलों असतांना एक गृहस्थ आमच्या खोलींत रहावयास आले. कोठून आलां म्हणून चौकशी करतां ते म्हणाले, "मी नुकताच हरिद्वार- मथुरानृन्दावनादि यात्रा करून आलो. मला हीं तीर्थे पाहण्याची स्फूर्ति मासिकमनोरंजनाच्या लेखांवरून झाली व लेखांच्या योगानें मला पंड्यांची गरज लागली नाहीं किंवा वाटाड्याची जरूर भासली नाहीं. प्रो० भाटे यांनी खरोखर फार हुबेहूब वर्णनें लिहिल्यानें व माहिती बरोबर दिल्याच्या योगाने प्रवासाची फार सोय झाली आहे." मीच त्या लेखांचा लेखक आहें, हे अर्थात् त्या गृहस्थाला कळविणें मला भाग पडले व त्यांनी माझे फार आभार मानले.<br>{{gap}}हे प्रवासवृत्तपर लेख लागलीच स्वतंत्र पुस्तकरूपानें छापण्याचा माझा मानस होता. पण तेव्हांपासून लढाईची बिकट परिस्थिति उत्पन्न झाली. आणि माझा मनोदय मनांतल्यामनांतच राहिला. त्याला मूर्तस्वरूप देण्याचें श्रेय अंमळनेरचे अध्यात्मविद्याव्यासंगी, दानशूर व पुढारी व्यापारी श्रीमंत प्रतापशेट यांच्या उत्तेजनपर आश्वासनाला आहे. तेव्हां या पुस्तक प्रकाशनाचे काम प्रथमतः मला श्री० प्रतापशेट यांचे आभार मानिले पाहिजेत. त्यानंतर मासिकमनोरंजनाचे मालक रा० मित्र यांनीं आपल्या मासिकांत प्रसिद्ध झालेले लेख स्वतंत्र पुस्तकरूपानें छापण्यास परवानगी दिली व आपल्या जवळचे चित्रांचे छापही या पुस्तकाच्या उपयोगाकरितां दिले, याबद्दल त्यांचेही आभार मानणे आवश्यक आहे.
<center>
{| {{brace table parameters}}
|२७७, नारायण पेठ, पुणे शहर.||{{brace|r|t}}||
|-
|||{{brace|r|m}}||{{gap}}'''गोविंद चिमणाजी भाटे.'''
|-
|ता. १४ आक्टोबर १९१८.||{{brace|r|b}}||
|}
</center>
{{nop}}<noinclude></noinclude>
pgtv325ykvfgbn18cf6e2i1pw0n5era
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/६
104
110390
230347
2026-05-24T10:02:31Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230347
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Css image crop
|Image = माझा_उत्तरहिंदुस्तानचा_प्रवास.pdf
|Page = 6
|bSize = 498
|cWidth = 393
|cHeight = 495
|oTop = 57
|oLeft = 50
|Location = center
|Description =
}}<noinclude></noinclude>
4za2frvqvyrvcjuws3mnjjcx96f47km
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/५
104
110391
230348
2026-05-24T10:12:35Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230348
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><Br>
{{center|{{x-larger|'''दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना.'''}}}}<br>
{{gap}}इंग्रजी शाळांतील शेवटची परीक्षा घेणाऱ्या संयुक्त बोर्डाने माझ्या प्रवासवृत्तांपैकी हा पहिला भाग १९२१ सालच्या परीक्षेकरितां नेमला, म्हणूनच या भागाची दुसरी आवृत्ति इतक्या लवकर काढण्याचे कारण पडलें. माझ्या प्रवासवर्णनाचा प्रथमप्रयत्न बोर्डाच्या मेंबरांस पसंत पडून त्यांनीं हें पुस्तक मराठी विषयाकरितां नेमून माझ्या पुस्तकाचें गौरव केलें याबद्दल संयुक्त बोर्डाचा मी आभारी आहे. या आवृत्तीत आठ चित्रे घातली आहेत व किरकोळ चुक्या नजरेस आल्या त्या दुरुस्त केल्या आहेत. आतां हे पुस्तक पुष्कळ शिक्षकांच्या नजरेखालून अवश्यमेव जाईल. तरी त्यांनी या पुस्तकांत दिसून येणारे दोष मला कळविले तर मजवर त्यांचे उपकार होतील.
<center>
{| {{brace table parameters}}
|वुइलिंगडन कॉलेज, सांगली,||{{brace|r|t}}||
|-
|||{{brace|r|m}}||{{gap}}'''गोविंद चिमणाजी भाटे.'''
|-
|ता. १४/११/१९.||{{brace|r|b}}||
|}
</center>
<br>
{{rule|5em}}<br>
{{center|{{xx-larger|'''अनुक्रमणिका.'''}}}}
{{rule|5em}}<br>
<center>
{|
|+
|-
| १ {{gap}} || नैनिताल. || १
|-
| २ || ग्वालेर. || २०
|-
| ३ || हरिद्वार किंवा गंगाद्वार.{{gap}} || ३७
|-
| ४ || गुरुकुल. || ५२
|-
| ५ || मथुरावृंदावन. || ७२
|-
| ६ || कृष्णकथा व वैष्णवपंथ. || ९०
|}
</center>
{{nop}}<noinclude></noinclude>
od8g6bip5gbyo2fmvu3kovcu64974jd
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/७
104
110392
230349
2026-05-24T10:14:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230349
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Css image crop
|Image = माझा_उत्तरहिंदुस्तानचा_प्रवास.pdf
|Page = 7
|bSize = 498
|cWidth = 402
|cHeight = 438
|oTop = 86
|oLeft = 47
|Location = center
|Description =
}}
{{center|'''नैनिताल'''}}{{nop}}<noinclude></noinclude>
rb1vtcapm14ewbvlzgbltcqb01da7t2
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/८
104
110393
230350
2026-05-24T10:20:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230350
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Css image crop
|Image = माझा_उत्तरहिंदुस्तानचा_प्रवास.pdf
|Page = 8
|bSize = 498
|cWidth = 414
|cHeight = 153
|oTop = 32
|oLeft = 38
|Location = center
|Description =
}}
{{xx-larger|{{center|'''माझा उत्तर हिंदुस्थानचा प्रवास.'''}}}}
{{rule|15em}}
{{x-larger|{{center|'''{{bar|1}}१{{bar|1}}<br>नैनिताल.'''}}}}
{{rule|5em}}
{{gap}}'''क'''विकुलगुरू कालिदास यानें आपल्या कुमारसंभव व मेघदूत या काव्यांत हिमालय पर्वत आणि त्याच्या आसपासचा व अलीकडलापलीकडला प्रदेश यांच्या वर्णनाचे प्रसंग आणिले आहेत, व त्याचीं हीं वर्णन मोठ मनोहर व बहारदारीचीं आहेत हें त्या काव्यांचा परिचय असलेल्यांना नव्यानें सांगण्याची जरूरी नाहीं. शिवाय तीं वर्णनें बरीच हुबेहूबही आहेत. यावरून कालिदासानें हिमालय पर्वत प्रत्यक्ष पाहिला होता किंवा नाहीं हें जरी खात्रीनें सांगता येणार नाहीं तरी इतकें खास, कीं, कालिदासानें हीं वर्णनें रचण्यापूर्वी हिमालयाबद्दल उपलब्ध माहिती मिळविली असली पाहिजे. हिमालय पर्वताच्या प्रचंडतेची, त्याच्या भव्यतेची व तेथील एकंदर सृष्टिसौंदर्याची कालिदासास<noinclude>{{right|[ १}}</noinclude>
29awovwfndavqik2iunn2na8231gvkb
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/९
104
110394
230351
2026-05-24T10:26:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230351
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''प्रवास वर्णन.'''</u></noinclude>बरोबर कल्पना झालेली होती हें त्यानें कुमारसंभवाच्या प्रारंभींच केलेल्या हिमाचलाबद्दलच्या एका विधानावरून स्पष्ट होतें. '''"पूर्वापरौ तोयनिधीवगाह्य स्थितःपृथिव्या इव मानदण्डः"''' हिमालयाचें हें वर्णन खरोखरीच यथार्थ आहे. हिमालय हा हिंदुस्थानचाच नव्हे तर सर्व पृथ्वीचाच मानदण्ड होय. हा पर्वत ही एक अद्वितीय चीज आहे यांत शंका नाहीं. आर्यलोक उत्तरध्रुवाकडून ह्मणा, किंवा कास्पीयन समुद्राच्या किनाऱ्यावरून ह्मणा, खालीं दक्षिणेकडे आले. त्यांना या पर्वताची सर्व शोभा व तेथील सृष्टिसौंदर्य हें प्रत्यक्ष डोळ्यांनी पहावयास सांपडलें. या पर्वताच्या बाजूनेंच ते प्रथमतः उत्तर हिंदुस्थानांत आले व तेथच्या सपाट प्रदेशावर त्यांनी कायमच्या वसाहती केल्या. तरी पण उत्तरप्रदेशाबद्दल व हिमालयाबद्दल त्यांचें प्रेम व आदर कायमच राहिला. म्हणूनच त्यांनीं हिमालयाला सृष्टिसौंदर्यप्रिय शिवाचें वसतिस्थान बनविलें; हिमालयाच्या पलीकडे देवगंधर्वयक्षादिक मनुष्यापेक्षां श्रेष्ठ जीवकोटीचें वसतिस्थान आहे अशी त्यांनी कल्पना केली; हिमालयाच्या पलीकडे असलेले मानस सरोवर, हे सर्व सौंदर्याचें, सर्व सुखविलासांचें, सर्व प्रेक्षणीय वस्तूंचें आगर आहे असे त्यांनी वर्णन केलें; व हिमालयावर जाऊन तेथे तपश्चर्या करून ब्रह्मानंदी विलीन होणें हेंच सर्व आयुष्याचें इतिकर्तव्य आहे असें त्यांनी प्रतिपादन केलें.<br>{{gap}}अशा या अद्वितीय व अपूर्व पर्वताचें व त्याच्या आसपासच्या प्रदेशाचे प्रत्यक्ष दर्शन घडणें हें पूर्वकाळी फारच दुर्घट काम होतें व म्हणूनच त्या दर्शनाला इतकें धार्मिक पावित्र्य आलें होतें. परंतु अर्वाचीन काळीं आगगाड्यांच्या प्रसारानें सर्व हिंदुस्थानवासीयांना हा दर्शनलाभ सुलभ झालेला आहे. हिमालयाच्या दक्षिणेकडील पायथ्याच्या बाजूच्या पर्वतराजीवर इंग्रज सरकारने या गेल्या शंभर वर्षांत निरनिराळी थंड हवेची ठिकाणे शोधून काढून तेथें वस्ति वसविली आहे. अशीं ठिकाणें म्हणजे सिमला, मसूरी, नैनिताल व दार्जिलिंग हीं होत हे सर्वश्रुतच आहे. जरी ही सर्व ठिकाणे हिमालयाच्या मानानें त्याच्या पायथ्याशींच आहेत तरी तीं समुद्रसपाटीपासून फारच उंच आहेत. सिमला समुद्र-<noinclude><br>{{gap}}२ ]</noinclude>
tc14nd5zoro97h8ffd3vfxldih7g8bg
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१०
104
110395
230352
2026-05-24T10:35:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230352
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''नैनिताल.'''</u>}}</noinclude>सपाटीपासून सात हजार फूट उंच आहे. मसूरी व नैनिताल सहा हजार फूट उंच आहेत. यावरून हीं हवेची ठिकाणे महाराष्ट्रांतील हवेच्या ठिकाणांपेक्षां अधिक उंच आहेत, असें दिसून येईल. कारण मुंबई प्रांतांतील सर्वात उंच ठिकाण म्हणजे महाबळेश्वर हें होय; परंतु त्याची उंची फार तर पांच हजार फूट असेल. या उत्तर हिंदुस्थानांतील चार प्रसिद्ध ठिकाणांपैकी नैनिताल हे ठिकाण या मे महिन्यांत पाहण्याचा आह्मांस सुदैवानें योग आला. तेव्हां या सुंदर ठिकाणांची माहिती वाचकांना या माझ्या उत्तर हिंदुस्थानच्या प्रवासवर्णनांत प्रथमतः देण्याचें योजिले आहे.<br>{{gap}}मुंबई इलाख्यांतील लोकांना हिमालयांतील हवाशीर ठिकाणांपैकीं नैनिताल हेंच सर्वात जवळचें ठिकाण आहे. हल्ली मुंबईहून नैनितालला दोन मार्गांनीं जातां येतें. सर्वात जवळचा मार्ग म्हणजे बांबे-बडोदा लाईननें आहे. ह्या लाईननें कुलाब्याहून निघालें म्हणजे पंजाब एक्सप्रेस गाडीनें मुंबई, बडोदा, गोध्रा, रतलाम, नागडा या ठिकाणांवरून थेट मथुरेस गाडी येते. मुंबईहून मथुरा या लाईनने सातशे सत्याहत्तर मैल आहे. येथून पुढे नॅरोगेज लाईन आहे. ती हथरस, कासगंज बरेलीवरून कथगोडमपर्यंत जाते. मथुरेपासून कथगोडम १९३ मैल आहे. नैनितालचे रेलवेस्टेशन हेंच होय. तेथून नैनिताल २२ मैल आहे. म्हणजे या मार्गानें मुंबईहून नैनिताल ९९२ मैल होतें. दुसरा मार्ग जी. आय्. पी. रेलवेकडून आहे. या मार्गानें आग्र्यास पंजाबमेलनें जावयाचे. मुंबईहून आग्रा ८३५ मैल आहे. व तेथून आग्रा-कथगोडम पॅसेंजर निघते. आग्र्यापासून कथगोडम सुमारें अडीचशे मैल आहे. अर्थात् या मार्गानें नैनिताल हे सुमारे शंभर मैल जास्त लांब आहे. मेलच्या तिसऱ्या वर्गानें सर्व प्रवास केल्यास जी.आय्. पी. मार्गानें सुमारे वीस रुपये पडतात. साध्या तिसऱ्या वर्गानें बारा रुपये पडतात. बांबे-बडोदा मार्गानें आल्यास मेलनेंच जी.आय्. पी. च्या तिसऱ्या वर्गाइतक्या खर्चानें कथगोडमला पोचतां येतें.<br>{{gap}}आह्मी मुंबई-बडोद्याकडून नागडा-मथुरा-मार्गानें मुरादाबादेस आलो. मुरादाबादेहून नैनितालला दोन मार्गानीं जातां येतें. मुरादाबादेहून<noinclude>{{right|[ ३}}</noinclude>
ohmy5netu5cyrwsu6u194f7ji4zj7ad