विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.3 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf 106 85681 230377 230353 2026-05-25T08:22:58Z कल्पनाशक्ती 3813 230377 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=माधव रामचंद्र जोशी |Address=पुणे |Year=1920 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist 5="अनुक्रमणिका" 6="फोटो" 7="फोटो" 8="नैनिताल" 24="फोटो" 25="फोटो"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} jjp33azussduhetabra30a2pgq4lq9l पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७० 104 85724 230354 181890 2026-05-24T12:22:45Z JayashreeVI 4058 230354 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|६५}} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>आळसें कार्य नासतें ! हें तो प्रत्ययास येतें । कष्टाकडे चुकविते । हीन जन ॥ आधीं कष्टाचें दुःख सोसिती । ते सुखाचें फळ भोगिती । आधीं आळसें सुखावती । त्यांसि पुढें दुःख ।|</poem>}} {{gap}}आठव्या समासांत निराकार ब्रह्म व सगुण ब्रह्म यांचा भेद सांगून लोक पाषाणाचे अनेक देव शोधतात व प्रतिमेस भजतात; पण त्यांना 'मूर्खास प्रतिमा देव' हे कळत नाहीं असें म्हटले आहे. <br>{{gap}}नवव्या व दहाव्या समासांत हरिकीर्तनाचे वेळीं लोक आळस व राग लोभ इत्यादि मनोवृत्तींच्या अंमलामुळे कसे वागतात याचें हास्यकारक वर्णन करून दशक संपविण्यांत आला आहे. <br>{{gap}}एकुणीसाव्या दशकाची रचना चवदाव्या दशकासारखी आहे. चवदाव्यांत दोन समास पारमार्थिक व वेदांतमतप्रतिपादी आहेत, इतकेही या दशकांत नाहींत. यांत व्यवहारपरिप्लुत असा उपदेश फार आहे; तसेंच रामदासीपंथाच्या लोकांना उपदेश केल्याप्रमाणें येथेंहि भास होतो. चवदाव्या दशकाप्रमाणें हा दशकहि अर्वाचीन काळाच्या मनुष्याचेंसुद्धां मन वेधणारा आहे. चवदाव्याप्रमाणे या दशकांतहि राजकारणाचा दोनचारदां उल्लेख आला आहे व रामदासांनी राजकारणाचें ध्येय लोकांपुढें अनुकरणीय म्हणून ठेविलें आहे; तसेंच या दशकांत म्लेंच्छ अंमलाचा उल्लेख आला आहे व शेवटी सार्वत्रिक शिक्षणाचें ध्येय रामदासांनी उच्च स्वराने प्रतिपादन केले आहे. <br>{{gap}}पहिल्या समासांत ब्राह्मणानें आपले अक्षर उत्तम घटवावें व चांगल्या पोथ्या लिहून त्यांची जतन करावी म्हणून सांगितले आहे. दुसऱ्या समासांत अक्षराप्रमाणें मनुष्यानें उत्तम ज्ञान मिळवावें व चातुर्य संपादन करावें असा उपदेश केला आहे. तिसऱ्या व चवथ्या समासांत अनुक्रमें करंट लक्षण व सदैव (दैववान्) लक्षण सांगितले आहे. यांमध्ये पूर्वीच्या मूर्ख लक्षण व उत्तम लक्षण या समासांची बरीच झाक मारते. <br>{{gap}}पाचव्या समासांत मनुष्यें हजारों प्रकारच्या देवाच्या प्रतिमा करून त्याचें भजन पूजन करतात असे सांगितले आहे. पण खरा देव एकच आहे व--<noinclude>{{left|स...५}}</noinclude> ldvkq3wcjtxli0y9tyldjtctxsfpgqd 230355 230354 2026-05-24T12:23:46Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230355 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|६५}} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>आळसें कार्य नासतें ! हें तो प्रत्ययास येतें । कष्टाकडे चुकविते । हीन जन ॥ आधीं कष्टाचें दुःख सोसिती । ते सुखाचें फळ भोगिती । आधीं आळसें सुखावती । त्यांसि पुढें दुःख ।|</poem>}} {{gap}}आठव्या समासांत निराकार ब्रह्म व सगुण ब्रह्म यांचा भेद सांगून लोक पाषाणाचे अनेक देव शोधतात व प्रतिमेस भजतात; पण त्यांना 'मूर्खास प्रतिमा देव' हे कळत नाहीं असें म्हटले आहे. <br>{{gap}}नवव्या व दहाव्या समासांत हरिकीर्तनाचे वेळीं लोक आळस व राग लोभ इत्यादि मनोवृत्तींच्या अंमलामुळे कसे वागतात याचें हास्यकारक वर्णन करून दशक संपविण्यांत आला आहे. <br>{{gap}}एकुणीसाव्या दशकाची रचना चवदाव्या दशकासारखी आहे. चवदाव्यांत दोन समास पारमार्थिक व वेदांतमतप्रतिपादी आहेत, इतकेही या दशकांत नाहींत. यांत व्यवहारपरिप्लुत असा उपदेश फार आहे; तसेंच रामदासीपंथाच्या लोकांना उपदेश केल्याप्रमाणें येथेंहि भास होतो. चवदाव्या दशकाप्रमाणें हा दशकहि अर्वाचीन काळाच्या मनुष्याचेंसुद्धां मन वेधणारा आहे. चवदाव्याप्रमाणे या दशकांतहि राजकारणाचा दोनचारदां उल्लेख आला आहे व रामदासांनी राजकारणाचें ध्येय लोकांपुढें अनुकरणीय म्हणून ठेविलें आहे; तसेंच या दशकांत म्लेंच्छ अंमलाचा उल्लेख आला आहे व शेवटी सार्वत्रिक शिक्षणाचें ध्येय रामदासांनी उच्च स्वराने प्रतिपादन केले आहे. <br>{{gap}}पहिल्या समासांत ब्राह्मणानें आपले अक्षर उत्तम घटवावें व चांगल्या पोथ्या लिहून त्यांची जतन करावी म्हणून सांगितले आहे. दुसऱ्या समासांत अक्षराप्रमाणें मनुष्यानें उत्तम ज्ञान मिळवावें व चातुर्य संपादन करावें असा उपदेश केला आहे. तिसऱ्या व चवथ्या समासांत अनुक्रमें करंट लक्षण व सदैव (दैववान्) लक्षण सांगितले आहे. यांमध्ये पूर्वीच्या मूर्ख लक्षण व उत्तम लक्षण या समासांची बरीच झाक मारते. {{gap}}पाचव्या समासांत मनुष्यें हजारों प्रकारच्या देवाच्या प्रतिमा करून त्याचें भजन पूजन करतात असे सांगितले आहे. पण खरा देव एकच आहे व--<noinclude>{{left|स...५}}</noinclude> 9gc3p934fnromazqy3hk93x4wbgnm8t पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७१ 104 85727 230357 181893 2026-05-24T12:33:00Z JayashreeVI 4058 230357 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|६६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>तो प्रत्येकाच्या अन्तर्यामीं आहे असे म्हणून अशा प्रकारचें ज्ञान सत्संगानें लाभतें व मग तें अनुभवासही येतें व त्या योगें सद्गति मिळते असें सांगितले आहे. <br>{{gap}}पांच ते दहा या सर्व समासांत अर्धवट व्यावहारिक व अर्धवट पार- मार्थिक उपदेश आहे. हा उपदेश रामदासीपंथाच्या लोकांना किंवा राम- दासांकडे वारंवार येणाऱ्या संसारी व प्रापंचिक माणसांना केलेला दिसतो; कथाकीर्तन करावें; ज्ञानी आणि विवेकी व्हावें; कथाकीर्तन विषयाचें ज्ञान चांगले मिळवावें; लोकांना राजी राखावें; जशास तसें वागावें वगैरे राज- कारणी व व्यावहारिक भासणारे नियम दिले आहेत. या पांचही समासां- तील कांहीं उतारे देऊन हा दशक संपवूं. {{block center|<poem>आपण तुरुक गुरु केला । शिष्यांचा भार मेळविला | नीच यातीनें नासला । समुदाय ॥ ब्राह्मण मंडळ्या मेळवाव्या | भक्त मंडळ्या मानाव्या | संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ उत्कृष्ट भव्य तेंचि घ्यावें । मळमळीत अवघेंचि टाकावें । निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं ॥ अक्षर बरें वाचणें । अर्थातर सांगणें बरें । गाणें नाचणें अवघेंचि बरें । पाठांतर ॥ दीक्षा बरी मैत्री बरी । तीक्ष्ण बुद्धि राजकारणीं बरी । आपणास राखे नाना परी । अलिप्तपणें ॥ अखंड हरिकथेचा छंद । सकळांस लागे नामवेध । प्रगट जयाचा प्रबोध | सूर्य जैसा ॥ दुर्जनासी राखों जाणे । सज्जनासी निववूं जाणे । सकळांचे मनींचें जाणे । ज्याचें त्यापरी ॥ संगतीचें मनुष्य पालटे । उत्तम गुण तत्काळ उठे । अखंड अभ्यासी लगटे | समुदाय || जो दुसऱ्यावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला | जो आपणचि कष्टत गेला । तोचि भला ||</poem><noinclude></noinclude> 8vk9oh9fht53rco9w4yyqpmqqqennzh 230358 230357 2026-05-24T12:33:58Z JayashreeVI 4058 230358 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|६६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>तो प्रत्येकाच्या अन्तर्यामीं आहे असे म्हणून अशा प्रकारचें ज्ञान सत्संगानें लाभतें व मग तें अनुभवासही येतें व त्या योगें सद्गति मिळते असें सांगितले आहे. <br>{{gap}}पांच ते दहा या सर्व समासांत अर्धवट व्यावहारिक व अर्धवट पार- मार्थिक उपदेश आहे. हा उपदेश रामदासीपंथाच्या लोकांना किंवा राम- दासांकडे वारंवार येणाऱ्या संसारी व प्रापंचिक माणसांना केलेला दिसतो; कथाकीर्तन करावें; ज्ञानी आणि विवेकी व्हावें; कथाकीर्तन विषयाचें ज्ञान चांगले मिळवावें; लोकांना राजी राखावें; जशास तसें वागावें वगैरे राज- कारणी व व्यावहारिक भासणारे नियम दिले आहेत. या पांचही समासां- तील कांहीं उतारे देऊन हा दशक संपवूं. {{block center|<poem>आपण तुरुक गुरु केला । शिष्यांचा भार मेळविला | नीच यातीनें नासला । समुदाय ॥ ब्राह्मण मंडळ्या मेळवाव्या | भक्त मंडळ्या मानाव्या | संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ उत्कृष्ट भव्य तेंचि घ्यावें । मळमळीत अवघेंचि टाकावें । निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं ॥ अक्षर बरें वाचणें । अर्थातर सांगणें बरें । गाणें नाचणें अवघेंचि बरें । पाठांतर ॥ दीक्षा बरी मैत्री बरी । तीक्ष्ण बुद्धि राजकारणीं बरी । आपणास राखे नाना परी । अलिप्तपणें ॥ अखंड हरिकथेचा छंद । सकळांस लागे नामवेध । प्रगट जयाचा प्रबोध | सूर्य जैसा ॥ दुर्जनासी राखों जाणे । सज्जनासी निववूं जाणे । सकळांचे मनींचें जाणे । ज्याचें त्यापरी ॥ संगतीचें मनुष्य पालटे । उत्तम गुण तत्काळ उठे । अखंड अभ्यासी लगटे | समुदाय || जो दुसऱ्यावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला | जो आपणचि कष्टत गेला । तोचि भला ||</poem>}}<noinclude></noinclude> 58eypeyv8d35iiwtbj6ygzfibreg1zi 230359 230358 2026-05-24T12:34:30Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230359 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|६६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>तो प्रत्येकाच्या अन्तर्यामीं आहे असे म्हणून अशा प्रकारचें ज्ञान सत्संगानें लाभतें व मग तें अनुभवासही येतें व त्या योगें सद्गति मिळते असें सांगितले आहे. <br>{{gap}}पांच ते दहा या सर्व समासांत अर्धवट व्यावहारिक व अर्धवट पार- मार्थिक उपदेश आहे. हा उपदेश रामदासीपंथाच्या लोकांना किंवा राम- दासांकडे वारंवार येणाऱ्या संसारी व प्रापंचिक माणसांना केलेला दिसतो; कथाकीर्तन करावें; ज्ञानी आणि विवेकी व्हावें; कथाकीर्तन विषयाचें ज्ञान चांगले मिळवावें; लोकांना राजी राखावें; जशास तसें वागावें वगैरे राज- कारणी व व्यावहारिक भासणारे नियम दिले आहेत. या पांचही समासां- तील कांहीं उतारे देऊन हा दशक संपवूं. {{block center|<poem>आपण तुरुक गुरु केला । शिष्यांचा भार मेळविला | नीच यातीनें नासला । समुदाय ॥ ब्राह्मण मंडळ्या मेळवाव्या | भक्त मंडळ्या मानाव्या | संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ उत्कृष्ट भव्य तेंचि घ्यावें । मळमळीत अवघेंचि टाकावें । निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं ॥ अक्षर बरें वाचणें । अर्थातर सांगणें बरें । गाणें नाचणें अवघेंचि बरें । पाठांतर ॥ दीक्षा बरी मैत्री बरी । तीक्ष्ण बुद्धि राजकारणीं बरी । आपणास राखे नाना परी । अलिप्तपणें ॥ अखंड हरिकथेचा छंद । सकळांस लागे नामवेध । प्रगट जयाचा प्रबोध | सूर्य जैसा ॥ दुर्जनासी राखों जाणे । सज्जनासी निववूं जाणे । सकळांचे मनींचें जाणे । ज्याचें त्यापरी ॥ संगतीचें मनुष्य पालटे । उत्तम गुण तत्काळ उठे । अखंड अभ्यासी लगटे | समुदाय || जो दुसऱ्यावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला | जो आपणचि कष्टत गेला । तोचि भला ||</poem>}}<noinclude></noinclude> aqhcrgbzay1qwo4mgoakr3u35eg3fmi पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७२ 104 85728 230361 181894 2026-05-24T12:44:30Z JayashreeVI 4058 230361 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.| }} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>अवघ्यांस अवघेंचि कळलें । तेव्हां तें रितें पडलें । याकारणें ऐसें घडलें । न पाहिजे कीं ॥ मुख्य सूत्र हातीं घ्यावें । करणें तें लोकांकरवीं करवावें । कित्येक खल्लक उगवावे | राजकारणामध्यें ॥ बोलके पहिलवान् कळकटे । तयांसींच घ्यावे झटे । दुर्जन राजकारणें दाटे । ऐसें न करावें ॥ ग्रामण्या वर्मी सांपडावें । रगडून पीठच करावें । करून मागुति सांवरावें बुडवूं नये ॥ खळ दुर्जनांसि भ्याले । राजकारण नाहीं राखिलें । तेणें अवघें प्रगट झालें | बरें वाईट || समुदाय पाहिजे मोठा । तरी तणावा असावा बळकट । मठ करून ताठा । धरूं नये ।। दुर्जन प्राणी समजवावे । परी ते प्रगट न करावे । सज्जनापरी आळवावे । महत्व देउनी ।। जनामध्यें दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटपट | या कारणें ते वाट । बुझवूनि टाकावी ॥ गलिमाच्या देखतां फौजा | रणशूराच्या फुरफुरती भुजा । ऐसा पाहिजे की राजा । कैंपक्षी परमार्थी । तयास देखतां दुर्जन धाके । बैसावे प्रचीतीचे तडाखे । बंड पाषांडाचे वाखे। सहजचि होती ॥ हीं धूर्तपणाची कामें | राजकारण करावें नेमें । ढिलेपणाच्या संभ्रमे । जाऊं नये ॥ * * * फड समजावणी करणें । गद्य पद्य सांगणें । परांतरासि राखणें । सर्वकाळ || ऐसा ज्याचा दंडक । अखंड पाहणें विवेक । सावधापुढें अविवेक | येईल कैंचा ॥</poem>}}<noinclude></noinclude> dsrth5pmza41hlvsi5qn918zllfo6t3 230362 230361 2026-05-24T12:46:26Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230362 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|६७}} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>अवघ्यांस अवघेंचि कळलें । तेव्हां तें रितें पडलें । याकारणें ऐसें घडलें । न पाहिजे कीं ॥ मुख्य सूत्र हातीं घ्यावें । करणें तें लोकांकरवीं करवावें । कित्येक खल्लक उगवावे | राजकारणामध्यें ॥ बोलके पहिलवान् कळकटे । तयांसींच घ्यावे झटे । दुर्जन राजकारणें दाटे । ऐसें न करावें ॥ ग्रामण्या वर्मी सांपडावें । रगडून पीठच करावें । करून मागुति सांवरावें बुडवूं नये ॥ खळ दुर्जनांसि भ्याले । राजकारण नाहीं राखिलें । तेणें अवघें प्रगट झालें | बरें वाईट || समुदाय पाहिजे मोठा । तरी तणावा असावा बळकट । मठ करून ताठा । धरूं नये ।। दुर्जन प्राणी समजवावे । परी ते प्रगट न करावे । सज्जनापरी आळवावे । महत्व देउनी ।। जनामध्यें दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटपट | या कारणें ते वाट । बुझवूनि टाकावी ॥ गलिमाच्या देखतां फौजा | रणशूराच्या फुरफुरती भुजा । ऐसा पाहिजे की राजा । कैंपक्षी परमार्थी । तयास देखतां दुर्जन धाके । बैसावे प्रचीतीचे तडाखे । बंड पाषांडाचे वाखे। सहजचि होती ॥ हीं धूर्तपणाची कामें | राजकारण करावें नेमें । ढिलेपणाच्या संभ्रमे । जाऊं नये ॥ * * * फड समजावणी करणें । गद्य पद्य सांगणें । परांतरासि राखणें । सर्वकाळ || ऐसा ज्याचा दंडक । अखंड पाहणें विवेक । सावधापुढें अविवेक | येईल कैंचा ॥</poem>}}<noinclude></noinclude> 7todwvqtjrvpoeqgnjsyihhkx3pdwpv पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७३ 104 85729 230365 181895 2026-05-24T12:58:59Z JayashreeVI 4058 230365 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh| |सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>जितुकें कांहीं आपणास ठावें । तितुकें हळुहळू शिकवावें । शाहणे करून सोडावे । बहुत जन ॥ परोपरी शिकविणें । अडणुकां सांगत जाणें । निवळ करून सोडणें । निस्पृहासी ।। होईल तें आपण करावे । न होतां जना करवावें । भगवद्भजनेंविण राहावें । हा धर्म नव्हे ॥ आपण करावें करवावें । आपण विवरावें विवरवावें । आपण धरावें धरवावें । भजन मार्गासी ॥</poem>}} {{gap}}विसावा दशक सर्व पारमार्थिक विवेचनाचा आहे व त्यांत थोडक्यांत वेदांततत्त्वाचें सार सांगितले आहे. <br>{{gap}}पहिल्या समासांत प्राण, मन, पृथ्वी, आप, तेज, वायु आकाश इत्यादि तत्वें व परब्रह्म हीं सर्व व्यापक आहेत तर ती एक आहेत की काय असा प्रश्न करून त्याचें समाधान केले आहे. परब्रह्माखेरीज बाकीचीं तत्त्वें खरीं व्यापक नव्हेत; कारण तीं एकदेशी आहेत; परब्रह्म व पर्वत या दोहोंस अचळ म्हणतात म्हणून ते एक होणार नाहींत; तर खरें व्यापकत्व व अचळत्व परब्रह्माचे ठायींच आहे असें विवेचन केले आहे. <br>{{gap}}दुसऱ्या समासांत परब्रह्माच्या स्वरूपाचेंच निरूपण पुढे चालविले आहे. दृश्य आणि परब्रह्म यांचा विरोध खालील ओव्यांत दाखविला आहे. {{block center|<poem>अधोर्ध्व पाहतां चहूंकडे । निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे । मन धांवेल कोणीकडे । अंत पाहावया ॥ दृश्य चळे ब्रह्म चळेना । दृश्य कळे ब्रह्म कळेना । दृश्य आकळे ब्रह्म आकळेना | कल्पनेसी ॥</poem>}} {{gap}}अशा ब्रह्मापासून मूळ माया झाली; तिच्यापासून अष्टधाप्रकृति माया झाली व त्यापासून सर्व दृश्य जग झालें असें या समासांत सांगितलें आहे. <br>{{gap}}तिसऱ्या समासांत मायेपासून पृथ्वी व पृथ्वीपासून सर्व चराचर प्राणि कसे झाले याचें निरूपण करून साधूला खरें ज्ञान प्रत्ययानें होतें व प्रपंचांत काय किंवा परमार्थात काय प्रचीति वांचून बडबड व्यर्थ आहे असें म्हटले आहे.<noinclude></noinclude> 6we8n63tl2c42f48ehscdi169kqlg1m 230366 230365 2026-05-24T13:00:19Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230366 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|६८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>जितुकें कांहीं आपणास ठावें । तितुकें हळुहळू शिकवावें । शाहणे करून सोडावे । बहुत जन ॥ परोपरी शिकविणें । अडणुकां सांगत जाणें । निवळ करून सोडणें । निस्पृहासी ।। होईल तें आपण करावे । न होतां जना करवावें । भगवद्भजनेंविण राहावें । हा धर्म नव्हे ॥ आपण करावें करवावें । आपण विवरावें विवरवावें । आपण धरावें धरवावें । भजन मार्गासी ॥</poem>}} {{gap}}विसावा दशक सर्व पारमार्थिक विवेचनाचा आहे व त्यांत थोडक्यांत वेदांततत्त्वाचें सार सांगितले आहे. <br>{{gap}}पहिल्या समासांत प्राण, मन, पृथ्वी, आप, तेज, वायु आकाश इत्यादि तत्वें व परब्रह्म हीं सर्व व्यापक आहेत तर ती एक आहेत की काय असा प्रश्न करून त्याचें समाधान केले आहे. परब्रह्माखेरीज बाकीचीं तत्त्वें खरीं व्यापक नव्हेत; कारण तीं एकदेशी आहेत; परब्रह्म व पर्वत या दोहोंस अचळ म्हणतात म्हणून ते एक होणार नाहींत; तर खरें व्यापकत्व व अचळत्व परब्रह्माचे ठायींच आहे असें विवेचन केले आहे. <br>{{gap}}दुसऱ्या समासांत परब्रह्माच्या स्वरूपाचेंच निरूपण पुढे चालविले आहे. दृश्य आणि परब्रह्म यांचा विरोध खालील ओव्यांत दाखविला आहे. {{block center|<poem>अधोर्ध्व पाहतां चहूंकडे । निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे । मन धांवेल कोणीकडे । अंत पाहावया ॥ दृश्य चळे ब्रह्म चळेना । दृश्य कळे ब्रह्म कळेना । दृश्य आकळे ब्रह्म आकळेना | कल्पनेसी ॥</poem>}} {{gap}}अशा ब्रह्मापासून मूळ माया झाली; तिच्यापासून अष्टधाप्रकृति माया झाली व त्यापासून सर्व दृश्य जग झालें असें या समासांत सांगितलें आहे. <br>{{gap}}तिसऱ्या समासांत मायेपासून पृथ्वी व पृथ्वीपासून सर्व चराचर प्राणि कसे झाले याचें निरूपण करून साधूला खरें ज्ञान प्रत्ययानें होतें व प्रपंचांत काय किंवा परमार्थात काय प्रचीति वांचून बडबड व्यर्थ आहे असें म्हटले आहे.<noinclude></noinclude> cdbhwuzqv6mnwnc4244odsmvkjga5je पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७४ 104 85730 230384 181896 2026-05-25T11:26:13Z JayashreeVI 4058 230384 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|६९}} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>प्रपंच अथवा परमार्थ । प्रचीतीवीण अवघे व्यर्थ । प्रत्ययज्ञानी तो समर्थ । सकळांमध्यें ||</poem>}} {{gap}}चवथ्या समासांत प्रत्यय ज्ञानाचेंच निरूपण पुढे चालविले आहे. {{block center|<poem>सकळ जनास प्रार्थना । उगेंच उदास करवना । निरूपण आणावें मना | प्रत्ययाचें ॥ प्रत्यय राहिला एकीकडे । आपण धांवतो भलतीकडे । तरी मग संसाराचे निवाडे । कैसे होती ॥ उगीच पाहतां सृष्टी । गलबला दिसतो दृष्टी । परी राजसत्तेची गोष्टी | वेगळीच || पृथ्वीमध्यें जितुकी शरीरें । तितुकीं भगवंताचीं घरें । नाना सुखें येणें द्वारें । प्राप्त होती ।। त्याचा महिमा कळेल कोणाला । मातेवांचून कृपाळू झाला । प्रत्यक्ष जगदीश जगाला । रक्षीतसे ॥</poem>}} {{center|* * * }} {{block center|<poem>वनावरी वनचरांची सत्ता । जलावरी चलचरांची सत्ता । भूमंडळीं भूपाळाची सत्ता । येणेंचि न्यायें ॥ सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥</poem>}} {{gap}}पांचव्या समासांत निर्गुण परब्रह्म हा एक जिन्नस त्रिगुण व माया यांची करणी हा दुसरा जिन्नस पंचमहाभूतें हा तिसरा जिन्नस व सजीव प्राणी हा चवथा जिन्नस अशी चार जिनसी पायऱ्यांनीं सृष्टीची उभारणी झाली आहे असे सांगितले आहे; व नंतर नरदेहाची दुर्लभता व त्या देहाला होणारें विशेष ज्ञान याचें गौरव करून या देहाचें सार्थक आळस टाकून विवेकानें वागण्यांत आहे, असे प्रतिपादन केले आहे. <br>{{gap}}सहाव्या समासांत चार लक्ष माणसें तीस लक्ष पशू व अकरा लक्ष काम दहा लक्ष पक्षी नऊ लक्ष जलचर प्राणी आणि वीस लक्ष स्थावर मिळून चवऱ्यायशी लक्ष जीवयोनी शास्त्रकारांनी मानल्या आहेत असे--<noinclude></noinclude> fah4xqav2wk6vgl6pelpbwgahjl7e52 230385 230384 2026-05-25T11:27:23Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230385 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|६९}} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>प्रपंच अथवा परमार्थ । प्रचीतीवीण अवघे व्यर्थ । प्रत्ययज्ञानी तो समर्थ । सकळांमध्यें ||</poem>}} {{gap}}चवथ्या समासांत प्रत्यय ज्ञानाचेंच निरूपण पुढे चालविले आहे. {{block center|<poem>सकळ जनास प्रार्थना । उगेंच उदास करवना । निरूपण आणावें मना | प्रत्ययाचें ॥ प्रत्यय राहिला एकीकडे । आपण धांवतो भलतीकडे । तरी मग संसाराचे निवाडे । कैसे होती ॥ उगीच पाहतां सृष्टी । गलबला दिसतो दृष्टी । परी राजसत्तेची गोष्टी | वेगळीच || पृथ्वीमध्यें जितुकी शरीरें । तितुकीं भगवंताचीं घरें । नाना सुखें येणें द्वारें । प्राप्त होती ।। त्याचा महिमा कळेल कोणाला । मातेवांचून कृपाळू झाला । प्रत्यक्ष जगदीश जगाला । रक्षीतसे ॥</poem>}} {{center|* * * }} {{block center|<poem>वनावरी वनचरांची सत्ता । जलावरी चलचरांची सत्ता । भूमंडळीं भूपाळाची सत्ता । येणेंचि न्यायें ॥ सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥</poem>}} {{gap}}पांचव्या समासांत निर्गुण परब्रह्म हा एक जिन्नस त्रिगुण व माया यांची करणी हा दुसरा जिन्नस पंचमहाभूतें हा तिसरा जिन्नस व सजीव प्राणी हा चवथा जिन्नस अशी चार जिनसी पायऱ्यांनीं सृष्टीची उभारणी झाली आहे असे सांगितले आहे; व नंतर नरदेहाची दुर्लभता व त्या देहाला होणारें विशेष ज्ञान याचें गौरव करून या देहाचें सार्थक आळस टाकून विवेकानें वागण्यांत आहे, असे प्रतिपादन केले आहे. <br>{{gap}}सहाव्या समासांत चार लक्ष माणसें तीस लक्ष पशू व अकरा लक्ष काम दहा लक्ष पक्षी नऊ लक्ष जलचर प्राणी आणि वीस लक्ष स्थावर मिळून चवऱ्यायशी लक्ष जीवयोनी शास्त्रकारांनी मानल्या आहेत असे--<noinclude></noinclude> 9fl8k37mmckitzby0vh4qtvsm100ctr पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७५ 104 85731 230386 181897 2026-05-25T11:38:53Z JayashreeVI 4058 230386 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|७०|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>सांगितले आहे व पुढे मागील समासांत ज्याप्रमाणें मनुष्य देहाचे विशेष गुण सांगितले आहेत त्याप्रमाणे येथे आत्म्याचे गुण सांगितले आहेत. <br>{{gap}}सातव्या समासांत आत्म्याच्या गुणाचें निरूपणच पुढे चालवून समासाचे शेवटीं पुन्हां अनुमानापेक्षां प्रत्ययज्ञान विशेष आहे व म्हणूनच प्रत्ययज्ञानाला जाणते पुरुष अधिक चाहतात असे म्हटले आहे. <br>{{gap}}आठव्या समासांत प्रपंचाला झाडाची उपमा देऊन त्या रूपकानें सर्व प्रपंचाचें मानवी देहाचें व सृष्टीरचनेचें वर्णन करून हा सर्व प्रपंच म्हणजे आत्म्याचे भेद आहेत असे सांगून अशा आत्म्याचें भेदरूप वर्णन करणें ही एक उपासना आहे असे प्रतिपादन केले आहे. <br>{{gap}नवव्या समासाच्या प्रारंभ मूर्तीपूजेच्या प्राकृत जनाच्या प्रवृत्तीचा उल्लेख करून खरा देव पूजन विसर्जन करण्यासारखा नाहीं खरा देव विवेकानेंच ओळखला पाहिजे व असा देव म्हणजे निर्गुण निर्विकारी सर्वव्यापी निष्कलंक असें परब्रह्मच आहे व म्हणून परब्रह्मच मनीं दृढ धरावें असा उपदेश केला आहे. <br>{{gap}}दहाव्या समासांत परब्रह्माच्या स्वरूप वर्णनापासून प्रारंभ करून हैं परब्रह्म मनांत बिंबलें म्हणजे जन्माचें व संसाराचें सार्थक झाले असे ह्मणून ग्रंथाची समाप्ति केली आहे. हा सर्व समासच येथें देणें इष्ट आहे.. {{block center|<poem>धरूं जातां धरतां नये । टाकूं जातां टाकितां नये । जेथें तेथें आहेच आहे । परब्रह्म तें ।। जिकडे तिकडे जेथें तेथें । विन्मुख होतां सन्मुख तें । सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्या ॥ बैसलें माणूस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिलें । आकाश चहूंकडे पाहिलें । तरी सन्मुखाचे आहे ॥ जिकडे प्राणी पळोन जातें । तिकडे आकाशची भोवतें । बळें आकाशाबाहेरी तें । कैचें जावें ॥ जिकडे तिकडे प्राणी आहे । तिकडे तें सन्मुखाचि आहे । समस्तांचे मस्तकीं राहे । मध्यान्हींचा मार्तंड जैसा ।</poem>}}<noinclude></noinclude> nn50rbdi0mg55t0xcdqlhp5l5gse9b1 230387 230386 2026-05-25T11:39:45Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230387 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|७०|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>सांगितले आहे व पुढे मागील समासांत ज्याप्रमाणें मनुष्य देहाचे विशेष गुण सांगितले आहेत त्याप्रमाणे येथे आत्म्याचे गुण सांगितले आहेत. <br>{{gap}}सातव्या समासांत आत्म्याच्या गुणाचें निरूपणच पुढे चालवून समासाचे शेवटीं पुन्हां अनुमानापेक्षां प्रत्ययज्ञान विशेष आहे व म्हणूनच प्रत्ययज्ञानाला जाणते पुरुष अधिक चाहतात असे म्हटले आहे. <br>{{gap}}आठव्या समासांत प्रपंचाला झाडाची उपमा देऊन त्या रूपकानें सर्व प्रपंचाचें मानवी देहाचें व सृष्टीरचनेचें वर्णन करून हा सर्व प्रपंच म्हणजे आत्म्याचे भेद आहेत असे सांगून अशा आत्म्याचें भेदरूप वर्णन करणें ही एक उपासना आहे असे प्रतिपादन केले आहे. <br>{{gap}}नवव्या समासाच्या प्रारंभ मूर्तीपूजेच्या प्राकृत जनाच्या प्रवृत्तीचा उल्लेख करून खरा देव पूजन विसर्जन करण्यासारखा नाहीं खरा देव विवेकानेंच ओळखला पाहिजे व असा देव म्हणजे निर्गुण निर्विकारी सर्वव्यापी निष्कलंक असें परब्रह्मच आहे व म्हणून परब्रह्मच मनीं दृढ धरावें असा उपदेश केला आहे. <br>{{gap}}दहाव्या समासांत परब्रह्माच्या स्वरूप वर्णनापासून प्रारंभ करून हैं परब्रह्म मनांत बिंबलें म्हणजे जन्माचें व संसाराचें सार्थक झाले असे ह्मणून ग्रंथाची समाप्ति केली आहे. हा सर्व समासच येथें देणें इष्ट आहे.. {{block center|<poem>धरूं जातां धरतां नये । टाकूं जातां टाकितां नये । जेथें तेथें आहेच आहे । परब्रह्म तें ।। जिकडे तिकडे जेथें तेथें । विन्मुख होतां सन्मुख तें । सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्या ॥ बैसलें माणूस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिलें । आकाश चहूंकडे पाहिलें । तरी सन्मुखाचे आहे ॥ जिकडे प्राणी पळोन जातें । तिकडे आकाशची भोवतें । बळें आकाशाबाहेरी तें । कैचें जावें ॥ जिकडे तिकडे प्राणी आहे । तिकडे तें सन्मुखाचि आहे । समस्तांचे मस्तकीं राहे । मध्यान्हींचा मार्तंड जैसा ।</poem>}}<noinclude></noinclude> 5t2kl7u2f1ypty14wxf1oa2pi5qfnox पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७६ 104 85828 230388 182017 2026-05-25T11:46:49Z JayashreeVI 4058 230388 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|७१}} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>परि तो आहे एक देशी । दृष्टांत न घडे वस्तूसी । कांहीं एक चमत्कारासी । देऊन पाहिला ॥ नाना तीथें नाना देशीं । कष्टत जावें पहावयासी । तैसें नलगे परब्रह्मासी । बैसले ठायीं ॥ प्राणी बैसोनीच राहतां । अथवा बहुत पळोन जातां । परब्रह्म तें तत्वतां | समागमें || पक्षी अंतराळी गेला । भोवतें आकाशचि तयाला ।. तैसें ब्रह्म प्राणियाला । व्यापून असे ॥ ब्रह्म पोकळ घनदाट । ब्रह्म शेवटाचा शेवट । ज्यासी त्यासी ब्रह्म नीट | सर्व काळ ॥ दृश्या सबाह्य अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं । अरे त्या निर्मळाची सरी । कोणास द्यावी ॥ वेकुंठ कैलास सत्यलोकीं । इन्द्रलोकीं चौदालोकीं । पन्नगादि पाताळलोकीं । तेथेंही आहे ॥ काशीपासून रामेश्वर । अवघें दाटलें अपार । पाहों जातां पारावार । त्यासी नाहीं ॥ परब्रह्म तें एकलें । एकदांचि सकळासि व्यापिलें । सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठायीं ॥ परब्रह्म पाऊसें भिजेना । अथवा चिखलानें भरना । पुरामध्यें परी वाहेना । पुरा समागमें ॥ एक सरें सन्मुख विन्मुख । वामसव्य दोहींकडे एक । अधरूर्ध्व प्राणी सकळिक । व्यापून आहे ॥ आकाशाचा डोहो भरला । कदापि नाहीं उचंबळला । असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे ॥ एक जिनसी गगन उदास । जेथें नाहीं दृश्यभास | भासेंवीण निराभास | परब्रह्म जाणावें ॥ संत साधु महानुभावां । देवदानवां मानवां । परब्रह्म सकळांस विसावा | विश्रांतिठाव ॥</poem>}}<noinclude></noinclude> 2j4vrlo71i3qrhz4fh7kggkdbsd4iso 230389 230388 2026-05-25T11:47:20Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230389 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|७१}} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>परि तो आहे एक देशी । दृष्टांत न घडे वस्तूसी । कांहीं एक चमत्कारासी । देऊन पाहिला ॥ नाना तीथें नाना देशीं । कष्टत जावें पहावयासी । तैसें नलगे परब्रह्मासी । बैसले ठायीं ॥ प्राणी बैसोनीच राहतां । अथवा बहुत पळोन जातां । परब्रह्म तें तत्वतां | समागमें || पक्षी अंतराळी गेला । भोवतें आकाशचि तयाला ।. तैसें ब्रह्म प्राणियाला । व्यापून असे ॥ ब्रह्म पोकळ घनदाट । ब्रह्म शेवटाचा शेवट । ज्यासी त्यासी ब्रह्म नीट | सर्व काळ ॥ दृश्या सबाह्य अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं । अरे त्या निर्मळाची सरी । कोणास द्यावी ॥ वेकुंठ कैलास सत्यलोकीं । इन्द्रलोकीं चौदालोकीं । पन्नगादि पाताळलोकीं । तेथेंही आहे ॥ काशीपासून रामेश्वर । अवघें दाटलें अपार । पाहों जातां पारावार । त्यासी नाहीं ॥ परब्रह्म तें एकलें । एकदांचि सकळासि व्यापिलें । सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठायीं ॥ परब्रह्म पाऊसें भिजेना । अथवा चिखलानें भरना । पुरामध्यें परी वाहेना । पुरा समागमें ॥ एक सरें सन्मुख विन्मुख । वामसव्य दोहींकडे एक । अधरूर्ध्व प्राणी सकळिक । व्यापून आहे ॥ आकाशाचा डोहो भरला । कदापि नाहीं उचंबळला । असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे ॥ एक जिनसी गगन उदास । जेथें नाहीं दृश्यभास | भासेंवीण निराभास | परब्रह्म जाणावें ॥ संत साधु महानुभावां । देवदानवां मानवां । परब्रह्म सकळांस विसावा | विश्रांतिठाव ॥</poem>}}<noinclude></noinclude> gqbiin4f9r17692s394kapko6myincl पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/७७ 104 85829 230390 182018 2026-05-25T11:54:13Z JayashreeVI 4058 230390 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|७२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>कोणीकडे शेवटास जावें । कोणी काय पहावें । असंभाव्य तें नेमावें । काय म्हणोनि ॥ स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं एकासारिखें नव्हे । ज्ञान दृष्टीविण नव्हे । समाधान | पिंड ब्रह्मांड निरास । मन तें ब्रह्म निराभास । येथून तेथवरी आकाश । भकाश रूपें ॥ ब्रह्मव्यापक हें तो खरें । दृश्य आहे तो उत्तरें । व्याप्येवीण कोण्या प्रकारें । व्यापक म्हणावें ॥ ब्रह्मीं शब्दचि लागेना । कल्पना कल्पूं शकेना । कल्पनातीत निरंजना | विवेकें ओळखावें ॥ शुद्ध सार तें श्रवण । शुद्ध प्रत्ययाचें मनन । विज्ञानी पावतां उन्मन । सहजचि होतें || झालें समाधानाचें फळ । संसार झाला सफळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं बिंबलें ॥ हिशेब झाला मायेचा | झाला निवाडा तत्वांचा | साध्य होतां साधनांचा । ठाव नाहीं ॥ स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें । सहजचि अनिर्वाच्य झालें । बोलतां नये ॥ ऐसें हें विवेकें जाणावें । प्रत्ययें खुणेसी बाणावें । जन्ममृत्यूच्या नांवें । शून्याकर ॥ भक्तांचेनि साभिमानें । कृपा केली दाशरथीनें । समर्थकृपेचीं वचनें । तो हा दासबोध ॥ वीस दशक दासबोध । श्रवणद्वारें घेतां शोध | मननकर्त्यास विशद | परमार्थ हो तो ॥ वीस दशक दोनशें समास । साधकें पहावे सावकाश । विवरतां विशेषाविशेष । कळों लागे ॥ ग्रंथाचें करावें स्तवन । स्तवनाचें काय प्रयोजन । तेथें प्रत्ययास कारण | प्रत्यया पहावा ॥</poem>}}<noinclude></noinclude> 6e9mcmtojas5oy1y1atcjffurey6au5 230391 230390 2026-05-25T11:54:40Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230391 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|७२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>कोणीकडे शेवटास जावें । कोणी काय पहावें । असंभाव्य तें नेमावें । काय म्हणोनि ॥ स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं एकासारिखें नव्हे । ज्ञान दृष्टीविण नव्हे । समाधान | पिंड ब्रह्मांड निरास । मन तें ब्रह्म निराभास । येथून तेथवरी आकाश । भकाश रूपें ॥ ब्रह्मव्यापक हें तो खरें । दृश्य आहे तो उत्तरें । व्याप्येवीण कोण्या प्रकारें । व्यापक म्हणावें ॥ ब्रह्मीं शब्दचि लागेना । कल्पना कल्पूं शकेना । कल्पनातीत निरंजना | विवेकें ओळखावें ॥ शुद्ध सार तें श्रवण । शुद्ध प्रत्ययाचें मनन । विज्ञानी पावतां उन्मन । सहजचि होतें || झालें समाधानाचें फळ । संसार झाला सफळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं बिंबलें ॥ हिशेब झाला मायेचा | झाला निवाडा तत्वांचा | साध्य होतां साधनांचा । ठाव नाहीं ॥ स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें । सहजचि अनिर्वाच्य झालें । बोलतां नये ॥ ऐसें हें विवेकें जाणावें । प्रत्ययें खुणेसी बाणावें । जन्ममृत्यूच्या नांवें । शून्याकर ॥ भक्तांचेनि साभिमानें । कृपा केली दाशरथीनें । समर्थकृपेचीं वचनें । तो हा दासबोध ॥ वीस दशक दासबोध । श्रवणद्वारें घेतां शोध | मननकर्त्यास विशद | परमार्थ हो तो ॥ वीस दशक दोनशें समास । साधकें पहावे सावकाश । विवरतां विशेषाविशेष । कळों लागे ॥ ग्रंथाचें करावें स्तवन । स्तवनाचें काय प्रयोजन । तेथें प्रत्ययास कारण | प्रत्यया पहावा ॥</poem>}}<noinclude></noinclude> sbwgbv1fczp3lh3zuqmz09i7944oqxx पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/११ 104 110396 230356 2026-05-24T12:29:54Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230356 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''प्रवास-वर्णन.'''</u></noinclude>बरेलीला जावयाचे व बरेलीहून कथगोडमला यावयाचें. या प्रवासाला तिसऱ्या क्लासाने २। रुपये पडतात. दुसरा मार्ग यापेक्षां जवळ आहे. परंतु गाडी दोन ठिकाणीं बदलावी लागते. मुरादाबादेहून रामपूरपर्यंत एक फांटा आहे. रामपूरचे आधीं काशीपूर म्हणून एक गांव लागतें. मुरादाबादेहून काशीपूर हे थेट उत्तरेला आहे. काशीपुराहून थेट पूर्वेकडे एक फांटा जातो. त्यानें लालकुवा जंक्शनला जावयाचे व लालकुव्यापासून कथगोडमला पोहोंचावयाचें, या मार्गानं तिसऱ्या क्लासचे भाडें सुमारे एक रुपया चार आणे पडते. आम्ही जातांना काशीपुराकडून गेलों व परत येतांना बरेलीच्या मार्गानें आलो.<br>{{gap}}ज्यांनी उत्तरहिंदुस्थानचा कांहीं भाग तरी पाहिला असेल त्यांना त्या प्रदेशाची सामान्य कल्पना असेलच. हा प्रदेश फार सपाट आहे. चारी बाजूंच्या क्षितिजांवर कोठेहि उंचवटा किंवा टेंकाड दृष्टीस पडावयाचें नाहीं. अशा तऱ्हेचा देखावा महाराष्ट्रांतही देशावर दिसतो. परंतु खानदेश, वऱ्हाड किंवा दक्षिण महाराष्ट्र इकडील सपाट प्रदेश काळ्या मातीचा आहे, तर गंगा व यमुना या नद्यांच्या कांठचा हा प्रदेश पांडुरक्या मातीचा आहे. इकडील दगडही पांढऱ्या मातीचे आहेत. मधून- मधून कालवे दृष्टीस पडतात व त्या ठिकाणची शेतें भर उन्हाळ्याच्या दिवसांतही हिरवी गार दिसतात. काशीपुरापर्यंत अशा तऱ्हेचा देखावा दिसतो. परंतु काशीपूर सोडून पूर्वेकडे लालकुव्याच्या मार्गाला वळलें म्हणजे तेव्हांपासून सर्व देखावा बदललेला दिसतो. आधीं झाडी फारच गर्दी होते. आगगाडी अत्यंत गर्द अशा रानांतून जाते व या झाडांचा विशेष म्हणजे त्यांच्या पानांची टवटवी व सतेजपणा हा होय. लालकुव्यापासून डोंगरांची रांग दूर दिसूं लागते. लालकुव्यापासून निघालें ह्मणजे हल्डवानी म्हणून एक स्टेशन लागतें. या ठिकाणचा व्यापार बराच मोठा आहे. हल्डवानीहून कथगोडमपर्यंतचा देखावा फारच मनोहर आहे. आधी जंगल खूप दाट व उंच असलेलें दिसतें व जमिनीचा रंग व विशेषतः दगडाचा रंग तर फारच बहारदारीचा दिसतो; येथें काळा दगड औषघाला सुद्धां मिळावयाचा नाहीं. येथील बहुतेक दगड<noinclude><br>{{gap}}४ ]</noinclude> slpn4ty7jff1bppi0zg7pn4tag2z3m6 पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१२ 104 110397 230360 2026-05-24T12:39:38Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230360 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''नैनिताल.'''</u>}}</noinclude>पांढरे, कांहीं निळसर पांढरे, व कांहीं तर तांबडे असतात. अशा तीन मिश्र रंगाच्या दगडांचे ढीगचे ढीग व ब्रासचे ब्रास आगगाडीच्या बाजूनें घातलेले दृष्टीस पडतात व ते दुरून फारच चांगले दिसतात. इकडील इमारती याच त्रिरंगी दगडांच्या केलेल्या असतात व यामुळे त्यांना कोणताही कृत्रिम रंग दिलेला नसतांना या छोट्या इमारती शहरांतील मोठमोठ्या सुंदर इमारतींपेक्षांही मनोहर दिसतात.<br>{{gap}}हें आपण पहाण्यांत गर्क झालेले असतांनाच आपल्याला आश्चर्यान चकित करून सोडण्यासारखा देखावा दिसूं लागतो. हिमालयाच्या पायथ्याच्या पहिल्या हिरव्यागार टेंकड्या आपल्या अगदी समोर दिसूं लागतात व त्या टेंकड्यांना लागून एक स्फटिकाप्रमाणें शुभ्र अशा नदींचें रुंद पात्र दिसूं लागतें. वरच्या बाजूस हिरवेगार रान, त्याच्या पायथ्याशी पांढऱ्या शुभ्र दगडांनीं भरलेली नदी, हा देखावा फारच आश्चर्यकारक भासतो. दुरून पाहणाराला तर प्रथमतः हा एक मोठा समुद्रच आहे की काय, असा भास होतो. ही नदी फार उथळ परंतु अत्यंत रुंद आहे. हिचे नांव गोला नदी. कथगोडम याच नदीच्या किनाऱ्याला आहे. ही नदी म्हणजे या पांढऱ्या, निळ्या व तांबूस रंगाच्या दगडांची मोठी खाणच आहे. उन्हाळ्याचे दिवसांत नदीमध्ये पाणी मुळींच नसतें. परंतु सर्व नदी अशा चित्रविचित्र रंगाच्या गोट्यांनी भरलेली असते. हा देखावा म्हणजे नैनिताल व हिमालय या सृष्टिसौंदर्याच्या आगरांचे प्रसादचिन्हच वाटतें व कथगोडमचा हा देखावा पाहून मनुष्याचें मन फार प्रसन्न होतें व लवकरच आपल्याला सृष्टिसौंदर्याचें मूलस्थानच पहावयास सांपडणार आहे हे पाहून मन जास्त उल्लसित होतें.<br>{{gap}}आम्ही कथगोडम येथें सायंकाळी ७ वाजतां पोचलों. इकडल्या भागाला आल्यावर आपल्याला दिवस किती तरी मोठा झाला आहे असें दिसून येते. येथें हल्लीच्या दिवसांत पहाटेस ४॥ वाजल्यापासून संधिप्रकाश पडतो व पांच साडेपाच वाजतां तर अगदीं फटफटीत उजाडते. तसेच सायंकाळी सुमारें ८ वाजेपर्यंत संधिप्रकाश रहातो. कथगोडमहून नैनिताल २२ मैल आहे हें मागे सांगितलेच आहे. टांगे, व एक्के हे रात्रीचे प्रवास<noinclude>{{right|[ ५}}</noinclude> k2x0e2zfb6cxz91b70ptebva14ry0zr पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१३ 104 110398 230363 2026-05-24T12:48:09Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230363 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''प्रवास-वर्णन.'''</u></noinclude>करीत नाहींत. म्हणून आह्मांला रात्रभर कथगोंडमच्या धर्मशाळेंत रहावें लागलें, परंतु या प्रांताला धर्मशाळेची सोय फार चांगली असते. आधी प्रत्येकाला स्वतंत्र खोली मिळू शकते. यामुळे सामान ठेवून खोलीला कुलूप लावून बाहेर जातां येतें. तसेंच प्रत्येक धर्मशाळेला एक रखवालदार असतो. ह्मणून धर्मशाळाहि स्वच्छ राहतात. तसेंच या प्रांतांत पुरी व भाजी हीं सर्व ठिकाणीं व बहुतेक सर्व स्टेशनवर मिळतात व हे पदार्थ एकंदरींत चांगलेही असतात. अतएव इकडे प्रवास करणें सोईचें होतें. मात्र पुरी व भाजी या पदार्थावर राहण्याची संवय पाहिजे.<br>{{gap}}कथगोडमहून आम्हीं घोड्याचा एक्का केला. टांग्याला इकडे फार पैसे पडतात. सबंध तीन माणसांच्या टांग्याला १२ रुपये पडतात, तर दोन माणसांच्या एक्याला फक्त ३॥ रुपये पडतात. एक्याचें वाहन इकडे फार स्वस्त दिसतें. हा एक्का फारच हलका असतो व त्याला पूर्वीच्या रथासारखे चार बारीक खांब व त्यावर एक घुमट असतो व पाहिजे तर बाजूनें पडदे टाकता येतात. हे एक्के एका तासांत पांच सहा मैल जाऊं शकतात. कथगोडमपासून बीरभट्टी (ब्रुअरीपर्यंत) टांगे व एक्के जातात. ही वीरभट्टी कथगोडमपासून तेरा मैल आहे. पुढे सामानाच्या गाड्या जाण्यासारखा ९ मैलांचा रस्ता आहे. परंतु त्यानें माणसें जात नाहींत. माणसें जवळच्या रस्त्यानें पायीं, घोड्यावर किंवा दांडीने जातात. वीरभट्टीपासून नैनिताल या पायवाटेने सुमारें तीन मैल आहे. दांडी हे एक इकडील विशेष प्रकारचें माणसांनी नेण्याचें वाहन आहे. मुंबईच्या बाजूला ज्याप्रमाणे सिंहगडास किंवा माथेरानला जावयाला खुर्च्या असतात त्याप्रमाणें xx दांड्या असतात. परंतु त्यापेक्षां या बसावयास सोईच्या असतात, व xx योगे माणसांनाही उचलून नेण्यास फार सुलभ जातें. या दांडीचें भाडें, xxx उचलणारांची मजुरी व म्युनसिपल टॅक्स मिळून दर माणशी २॥ रुपये पडतात. आम्ही कथगोडमहून साडेपाच वाजतां निघालो ते बीरभट्टीला ८॥ वाजतां आलों. तेथून पायीच वर गेलों. वर जाण्यास सुमारें १॥ तास लागतो. नैनितालास नैनिहाटेल आणि रेसहाटेल या नांवाचीं हिंदूकारितां दोन हाटेलें आहेत. येथे फक्त उतरण्यास जागा<noinclude><br>{{gap}}६ ]</noinclude> 4rbuq6vqvex9mwpqcf3bt2q6z24di22 पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१४ 104 110399 230364 2026-05-24T12:56:12Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230364 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''नैनिताल.'''</u>}}</noinclude>मिळते. जेवण्याखाण्याची व्यवस्था स्वतः स्वयंपाक करून किंवा बाजारांतील पुऱ्या व भाजी आणून करावी लागते. येथें दूधही चांगले मिळते. प्रत्येक खोलीस आठ आण्यांपासून दीड दोन रुपयेपर्यंत रोजचे भाडे पडतें.<br>{{gap}}नैनिताल व इतर थंड हवेची ठिकाणे यांमध्ये पुष्कळ बाबतींत फरक आहे. आपल्या इकडील महाबळेश्वर घ्या, माथेरान घ्या, किंवा तिकडील मसुरी घ्या किंवा सिमला घ्या, ह्रीं ठिकाणे फक्त उन्हाळ्याच्या दिवसांतचं गजबजलेलीं असावयाचीं. पावसाळ्यांत किंवा हिवाळ्यांत तीं बहुतेक शुक्कच असतात. कारण, तीं वास्ताविक खेडींच असतात. नेहेमींच्या राज्यव्यवस्थेचा महत्त्वाचा कार्यभाग तेथे घडत नसतो. परंतु नैनितालची गोष्ट तशी नाहीं. नैनिताल हे नैनिताल जिल्ह्याचें मुख्य ठिकाण आहे व शिवाय संयुक्त प्रांताच्या सरकारचें उन्हाळ्यांतील थंड वसतिस्थानही आहे. यामुळे येथें बाराही महिने वस्ती असते. जिल्ह्याच्या पोलीसचें हें मुख्य ठाणें आहे. तसेच येथें गुरख्या शिपायांची एक, इतर हिंदी शिपायांची एक, व युरोपियन शिपायांची एक अशा तीन पलटणी कायमच्या रहातात. आणखी येथें फॉरेस्टच्या डिव्हिजनचे कायमचेंच ऑफीस असतें. यामुळे नैनिताल हे एका लहानशा जिल्ह्याच्या शहराप्रमाणें दिसतें व वस्तिही शहराप्रमाणे वसलेली आहे.<br>{{gap}}इतर थंड हवेची ठिकाणें व नैनिताल यांमधील दुसरा फरक म्हणजे त्याची रचना. मुंबईकडील दोन्ही थंड हवेची ठिकाणें हीं पर्वताच्या पठारावर वसलेलीं आहेत. आपण वाईहून महाबळेश्वराकडे चढूं लागलों म्हणजे पर्वताच्या राजीच्या राजी चढून आपण अगदीं वरवर जातों व महाबळेश्वर अगदीं वर चढून जाईपर्यंत मुळींच दिसत नाहीं. माथेरानचीही तीच स्थिति आहे. एखाद्या माणसाला डोळे बांधून किंवा पूर्वीच्या कादंबऱ्यांत वर्णन केल्याप्रमाणें नकळत एकदम महाबळेश्वरी मालकम पेठेत नेऊन उभे केलें तर आपण एखाद्या सपाट प्रदेशावर आहों, असें त्याला वाटेल. त्याच्या सभोंवार त्याला तांबड्या मातीची सपाट जमीनच जमीन दृष्टीस पडेल, व आपण सह्याद्रि पर्वताच्या एका प्रचंड टेकाडाच्या माथ्यावर आहों अशी शंकासुद्धां त्याला येणार नाहीं. परंतु त्या मनुष्याला<noinclude>{{right|[ ७}}</noinclude> 7hk9wvyugxetsyi4nij1q09vo9e43zh पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१५ 104 110400 230367 2026-05-24T13:05:08Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230367 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''प्रवास-वर्णन.'''</u></noinclude>मालकम पेठेपासून दूर असलेल्या एखाद्या पॉइंटच्या टोकाशीं आणिलें म्हणजे त्याला सह्याद्रि पर्वताची शोभा व आपण उभे असलेल्या पर्वतराजीची उंची व भव्यता दृग्गोचर होईल. परंतु नैनितालची तशी गोष्ट नाहीं, नैनिताल हे शहर दोन टेकड्यांच्या उतारावर वसलेलें आहे. यामुळे नैनितालच्या कोणत्याही ठिकाणी उभे राहिलें तरी तेथून सर्व पर्वताची व शहराची शोभा दिसल्यावांचून रहात नाहीं. या वसतिस्थानाला म्हणण्यासारखी सपाट जागा मुळींच नाहीं. येथे घरें व बंगले हे एकाच्या डोकीवर दुसरा अशा तऱ्हेने बांधलेले आहेत. यामुळे शहरांत या बंगल्यावरून त्या बंगल्यावर जाण्याचे वाहन म्हणजे दांडी हेंच होय. येथें एकही गाडी किंवा बायसिकल दृष्टीस पडावयाची नाहीं व येथे सपाट रस्तेही नाहींत.<br>{{gap}}नैनितालच्या रचनेचा तिसरा विशेष ह्मणजे येथील तलाव किंवा सरोवर हे होय. या तलावावरूनच या ठिकाणाला हें नांव मिळालेले आहे. नैनादेवीचा तलाव हा नैनिताल या शब्दाचा अर्थ आहे. हा तलाव पूर्वपश्चिम जाणाऱ्या दोन समांतर टेंकड्यांच्या मिलाफानें झालेला आहे. या दोन टेंकड्या पश्चिमेस अगदी एकमेकांनां भिडलेल्या आहेत व पूर्व बाजूला त्या दोन रांगा सारख्या कथगोडमपर्यंत गेल्या आहेत असें ह्मटलें तरी चालेल व या दोन दरींमधूनच तलावांतील फाजील पाणी वाहत जाऊन त्याची बालिया नदी बनून ती कथगोडमच्या किंचित् वर गोला नदीला मिळालेली आहे. याच नदीच्या कांठावर कथगोडम आहे हें मागें सांगितलेच आहे. नैनितालची सर्व वस्ति या तलावासभोवार टेंकड्यांच्या उतारावर दक्षिणोत्तर आहे व पश्चिमेकडच्या टोकाला बडा बझार, युरोपियन लोकांची वस्ति, त्यांची दुकानें व त्यांच्या खेळण्याच्या जागा आहेत. खेळण्याची जागा तर तलावाचा थोडासा भाग बुजवून कृत्रिम तऱ्हेनें बनविलेली आहे. नैनादेवीचें लहानसें देऊळ तलावाच्या याच कांठावर आहे. पूर्वेच्या बाजूला हिंदु- लोकांची वस्ति व बाजार आहे. याच टोंकाला गंधकाचा पाचक पाण्याचा एक चांगला स्वच्छ झरा आहे. या झऱ्याचें पाणी फार गार आहे. बहुधा गंधकाच्या पाण्याचे झरे हे उष्ण पाण्याचे झरे असून त्यांना उन्हाळीं म्हणतात. परंतु हा झरा. अत्यंत गार पाण्याचा असून हे पाणी<noinclude><br>{{gap}}८ ]</noinclude> kwyw9xkg0skfqxkq7omeb1ko84jwrci पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१६ 104 110401 230368 2026-05-24T13:09:10Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230368 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''नैनिताल.'''</u>}}</noinclude>पिण्यास फार चांगलें लागतें. पहिल्यांदाच पिणाराला थोडा गंधकाचा वास येतो; परंतु एकदोन दिवसांच्या सवईनेंसुद्धां तो वास भासत नाहीसा होतो.<br>{{gap}}नैनितालच्या तलावाचा पृष्ठभाग समुद्रसपाटीपासून ६३५० फूट आहे व सभोवारच्या टेकड्यांची, सरासरी उंची १००० फूट आहे. यावरून येथले बंगले ६५०० पासून ७००० फूट उंचीवर आहेत असें दिसून येईल. तलाव लंबवर्तुळाकार आहे. परंतु तलावाच्या मधोमध एका टेकडीचा भाग जरा पुढे आला आहे व या ठिकाणी तलावाची रुंदी बरीच कमी आहे. यामुळे या तलावाला कांहींसा दोन डोळ्यांचा किंवा त्यावर घालण्याच्या आरशीचा आकार आला आहे असें म्हणणें शोभेल. या तलावाची सर्वात जास्त लांबी १५६७ यार्ड आहे व सर्वात जास्त रुंदी ५०६ यार्ड आहे. या तलावाचा परिघ दोन मैल आहे व यानें व्यापिलेली जागा १२० एकर आहे. सर्व तलावासभोंवतीं एक सुंदर रस्ता आहे. दक्षिणेच्या बाजूला टेंकडी अगदी तलावाला लागलेली आहे व रस्ता टेकडीची टोके फोडून करावा लागलेला आहे. उत्तरेच्या बाजूला टेकडी किंचित् कमी भिडलेली आहे व यामुळे या बाजूनें एकाखाली एक असे दोन समांतर रस्ते नेलेले आहेत. या तलावाची सर्वांत जास्त खोली ९३ फुटांची आहे तर सर्वात उथळ भाग २० फूट पाणी आहे. तलावामध्येसुद्धां एक गंधकाच्या पाण्याचा झरा आहे. या तलावाला पाण्याचा पुरवठा करणारा मोठा पाट पश्चिमेला आहे. परंतु दोन्ही समांतर टेंकड्यांचें सर्व पाणी लहान लहान पाटांनीं याच तलावांत सोडण्याची व्यवस्था केली आहे.<br>{{gap}}खरोखरी हा तलाव म्हणजे या ठिकाणचें एक अद्वितीय भूषण होय यांत शंका नाहीं. या तलावाच्या सभोवती हिंडलें म्हणजे सर्व शहराची निरनिरनिराळ्या ठिकाणांहून निरनिराळी शोभा दिसते. लोकांचा सहल करण्याचा हाच एक रस्ता होय. यामुळे संध्याकाळीं या रस्त्यानें बरीच गर्दी दिसते व त्या वेळचा देखावा फारच प्रेक्षणीय असतो. बाकी शहरांत कोठेंहि चार पावलेंसुद्धां सपाट रस्ता नाहीं. सारखी चढउतार आहे.{{nop}}<noinclude>{{right|[ ९}}</noinclude> mqiyrry6wdq6ur6awnytmm9izaz7t2f पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१७ 104 110402 230369 2026-05-25T07:44:40Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230369 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''प्रवास-वर्णन.'''</u></noinclude>{{gap}}या सुंदर तलावाचा व्यायामप्रिय युरोपियन लोकांनीं व्यायामाकडेही उपयोग करून घ्यावा हें उचितच आहे. येथे पुष्कळ बोट क्लबस् आहेत. एक खुद्द लेफ्टनेंट गव्हर्नरचें बोट हौस आहे. दोन युरोपियन लोकांचे बोट क्लबस् आहेत. शिवाय यंग मेन्स क्रिश्चन असोशिएशनचाही एक बोटक्लब आहे. युरोपियन ऑफिसरांच्याही सहल करावयाच्या व व्यायामाच्या होड्या आहेत. रामपुरच्या नबाबाचें एक बोट हौस आहे. सकाळीं व सायंकाळी बोटी वलवीत जाताना पुष्कळ लोक दृष्टीस पडतात. या तलावात संध्याकाळीं मासेमारी करण्यामध्येही पुष्कळ लोक गुंतलेले दिसतात. शिडें लावून वाऱ्याच्या जोरानें चालणाऱ्या बोटीही पुष्कळ असतात. अशी व्यायामाची व सहल करावयाची सोय थोड्याच ठिकाण असते व त्यांतल्या त्यांत उंच थंड ठिकाणी तर बहुतेक अशक्यच आहे. आपल्या इकडे मुंबईस व डेक्कन कॉलेजांतच फक्त बोटींच्या व्यायामाची सोय आहे. ज्यांना त्या व्यायामाची मौज व आनंद ठाऊक असेल त्यांना नैनितालच्या या विशेषाचें महत्त्व कळून येईल. माझें शिक्षण चार वर्षे डेक्कन कॉलेजांत झाल्यामुळे व त्या सर्व काळांत दररोज बोटीचा व्यायाम घेण्याचा मला सराव असल्यामुळे या ठिकाणची ही व्यवस्था पाहून मनाला फारच आनंद झाला व या सरोवरांत बोटींत बसून सहल करण्यास सांपडेल तर काय बहार होईल असें वाटलें. परंतु येथले सर्व क्लब सभासदांकरितां असून बोटी भाड्याने मिळण्याची येथे मुळींच सोय नाहीं, असें समजलें. यामुळे बोटींत बसून वल्हविण्याची प्रबल इच्छा मनांतल्या मनांत दाबावी लागली.<br>{{gap}}वरील वर्णनावरून नैनितालच्या रचनेची साधारण कल्पना वाचकांस येईल. हें ठिकाण वस्तीने वाढणें शक्य नाहीं. कारण, आणखी घरे किंवा बंगले बांधावयास येथे सोय नाहीं. एकंदर ठिकाण स्वाभाविक चतुःसीमांनीं मर्यादित झालेलें आहे. तसेच येथें दूर दूर जाऊन सृष्टिसौंदर्य पहाण्यासारखे पाइंट्सही ह्मणण्यासारखे नाहींत. कारण, वर लिहिल्याप्रमाणें शहराची रचना या ठिकाणचें सर्व सौंदर्य एकदम दृग्गोचर करणारी<noinclude><br>{{gap}}१० ]</noinclude> qmt32kzoq5lj1xhnq7674s1v4s5q1w8 पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१८ 104 110403 230370 2026-05-25T07:49:20Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230370 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''नैनिताल.'''</u>}}</noinclude>अशीच आहे. तरीपण येथील कांहीं थोड्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणे आवश्यक आहे.<br>{{gap}}हे ठिकाण पूर्वपश्चिम जाणाऱ्या समांतर अशा दोन टेकड्यांच्या रांगांनी झालेले आहे. टेकड्यांपैकीं दक्षिणेकडील टेकडीवरून हल्लीं कथगोडमपासूनचा रस्ता आहे. हा रस्ता पूर्वी उत्तरेकडील टेंकडीकरून होता. उत्तरेकडील टेकडीकडून हल्लीं आलमोऱ्याला जाण्याचा रस्ता आहे व या रस्त्याने जरा पुढे गेलें म्हणजे कथगोडमपर्यंतची अवर्णनीय शोभा दिसते, डोंगरांच्या सारख्या रांगाच्या रांगा अगदीं सपाटीपर्यंत गेलेल्या दिसतात व त्यांवरून आपण किती उंच ठिकाणावर उभे आहों याची चांगली कल्पना येते. नागमोडीसारखा वांकणें वांकणे घेऊन गेलेला शुभ्र रस्ताही फार रमणीय दिसतो.<br>{{gap}}येथील दुसरी प्रेक्षणीय गोष्ट म्हणजे शिपाईधारा ही होय. हा एक उत्तम पाण्याचा झरा आहे. तो दक्षिणेकडील टेंकडीच्या टोकाला बैलगाडीच्या रस्त्यावर शहरापासून थोड्याच अंतरावर आहे. या ठिकाणी मनुष्य गेला म्हणजे त्याला कल्पनातीत आनंद होतो. या झऱ्याच्या पाण्याच्या मुसळधारा सारख्या वाहतांना दृष्टीस पडतात. पाणी स्फटिकाप्रमाणें स्वच्छ व निर्मल आहे व तें इतकें थंड आहे, कीं, आपण बर्फाचेच पाणी पितों आहों कीं काय, असा भास होतो. पाणी मधुरही फार आहे. हें पाणी बारा महिने तेरा काळ सारखें वहात असतें. हें पाणीच या ठिकाणच्या सर्व पाण्यांत उत्तम होय. पुष्कळ लोक प्यावयास हेंच पाणी वापरतात. या झऱ्याचें पाणी खालीं सर्व रस्त्यांच्या बाजूनें खेळविलेलें आहे व यामुळे घाटाच्या सर्व रस्त्यावर फारच कमी खर्चानें पाणी शिंपडतां येतें. बीरभट्टीपासून दीड मैल चढत आल्यावर या मोठ्या वाहत्या झऱ्याचें प्रथम दर्शन होते. येथे झाडी फार आहे व येथें एक संगमरवरी गायमुख बांधले आहे. बीरभट्टीहून चढून दमून मनुष्य वर येत असतांनाच या झऱ्याचें एकदम त्याला दर्शन घडते व गायमुखांतलें तें अमृततुल्य पाणी पिऊन मनुष्याचा सर्व थकवा नाहींसा होऊन त्याला वर चढण्यास जास्त<noinclude>{{right|[ ११}}</noinclude> ldmc5lv442bukat7wzfbfa25sh9hdzi पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१९ 104 110404 230371 2026-05-25T07:54:21Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230371 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''प्रवास-वर्णन.'''</u></noinclude>उमेद व हुशारी वाटते व नैनितालच्या सौंदर्याची व सुखदायकत्वाची चांगली कल्पना येते.<br>{{gap}}परंतु नैनितालमधील सर्वात अत्यंत प्रेक्षणीय स्थळ म्हटले म्हणजे चायनापीक हे होय. हे नैनितालच्या उत्तरेस आहे व त्याची उंची समुद्रसपाटीपासून ८५६८ फूट आहे. म्हणजे नुसत्या तलावाच्या सपाटीपासूनच ते २२शे फुटांच्या वर आहे. आजुबाजूच्या सर्व डोंगरांत हेंच सर्वात उंच ठिकाण होय. येथे जाऊन परत येण्यास सुमारें पांच तास लागतात. दांडीवाले जाण्यायेण्याचे अडीच रुपये घेतात. या टोकावर सकाळचें जाणें सोईचें असें आम्हाला कळलें होतें. म्हणून आम्हीं एका सकाळी जाण्याचा विचार केला होता. परंतु आदल्या दिवशी सायंकाळीं फार मोठें वादळ झालें. मृच्छकटिक नाटकांत वर्णन केल्याप्रमाणें 'जलधरसंघें नभ भरलें तें!' अशी आकाशाची स्थिति झाली. विजाही लवू लागल्या. यामुळे आमचा चायनापीकवर जाण्याचा बेत रहित करावा लागतो कीं काय अशी भीति पडली. परंतु सुदैवानें कांहीं तासांनीं आकाश निरभ्र झाले व ठरल्या बेताप्रमाणें आम्हांला पहाटेस चायनापीकला जाण्यास सांपडलें. चायनापीकला जाण्याचा रस्ता तलावाच्या पूर्वेकडील टोकापासूनच निघतो व तो सारखा चढत चढत जातो व जसजसे आपण वरवर जावें तसतता त्याच तलावाचा व शहराचा देखावा 'नवोनवोऽयमक्ष्णोः' याप्रमाणे प्रत्येक उंचीच्या रस्यावरून निरनिराळा दिसतो. चायनापीकचा रस्ता जुन्या गव्हर्मेंट हौसच्या बाजूनें जातो व पुढें अलाहाबादचे ऑनरेबल मुनशी माधवलाल यांचा बंगला लागतो. हा बंगला बहुतेक नैनितालमध्ये सर्वात उंच जागी आहे. बंगला छोटासा असून टुमदार आहे. चायनापीकचा रस्ता थेट या बंगल्यावरून जातो व येथे तो टेंकडीच्या मागे वळल्यामुळे नैनिताल दिसेनासें होतें येथपासून चढ बराच कठीण व बिकट आहे. कांहीं ठिकाणी रस्ता सरासरी दोन मनुष्यें जाण्याइतकाच आहे. एका बाजूला उंच सुळक्यासारखे टेकाड, तर दुसऱ्या बाजूला भयंकर खोल दरी, असाच बहुतेक हा मार्ग आहे. यामुळें चालतांनासुद्धां मनुष्याला पडण्याची भीति वाटते. इकडे रानही फार दाट आहे व वृक्ष<noinclude><br>{{gap}}१२ ]</noinclude> 83c6jarsqq2n8ajltlo9q3qpvdcs7pw पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/२० 104 110405 230372 2026-05-25T08:07:14Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230372 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''नैनिताल.'''</u>}}</noinclude>खरोखरीच गगनचुंबी आहेत की काय असें वाटतें. या ठिकाण इंग्लंडच्या थंड प्रदेशांत होणारे सायप्रस वृक्ष पुष्कळ आहेत. आम्ही नैनितालहून निघाल्यापासून बरोबर १॥ तासाने चायनापीकवर आलो. वर जाऊन पोहोंचतों तों विलक्षण थंडी वाजूं लागली. वाराही फार सुटला होता. तास दीड तासाच्या पूर्वीच्या हवेतील व येथे येतांच लागणाऱ्या हवेंतील फरक आश्चर्यजनक होता. पुण्यांत गुदस्त सालीं ज्या दिवशीं बर्फ पडलें होतें त्या दिवशी जितकी थंडी वाजली तितकी थंडी वर वाजूं लागली. अगदीं हुडहुडी भरल्यासारखी झाली. आवाज कांपरा कांपरा येऊं लागला म्हणून तेथे वाळलेल्या पानांची शेकोटी करण्याचा प्रयत्न केला परंतु पानांवर दंव पडलेलें असल्यामुळे पानें लवकर पेट घेईनात व शिवाय येथें विस्तव पेटविण्याची मनाई आहे असें दांडीवाल्यांकडून कळल्यामुळे शेकोटी करण्याचा प्रयत्न आम्ही सोडून दिला. इतक्यांत सूर्यनारायणही क्षितिजाच्या बराच वर आला व वाराही कमी झाला. यामुळे थंडी कमी झाली व आमचें लक्ष्य येथील सृष्टिसौंदर्याकडे वेधूं लागलें. आम्ही गेलेल्या दिवशी धुकें फार पसरलेलें होतें, व म्हणून आमच्या सभोंवती सर्व समुद्र असून आम्हीं एखाद्या लहानशा बेटावर उभे आहों कीं काय असा भास होत होता. परंतु सूर्यकिरणांनीं धुकें वितळू लागले. आम्ही फारच उंचावर उभे असल्यामुळे धुकें व ढग आमच्या खालीं आहेत असे दिसत व धुक्याचे लोटच्या लोट दरींतून बाहेर पडतांना अवर्णनीय शोभा दिसे. चायनापीक हें एक अगदी अरुंद पण थोडें लांबट असें पर्वताचें टोंक आहे व तें दक्षिणोत्तर आहे. आम्ही प्रथमतः दक्षिणेच्या टोंकाला आलों व तेथून नैनितालची सर्व शोभा दिसते. परंतु वर लिहिल्याप्रमाणें धुक्याचे सारखे लोटच्या लोट वर येत असल्यामुळे क्षणार्धात सर्व नैनिताल स्पष्ट दिसत असे तर पुन्हां क्षणार्धात तें अदृश्य होऊन जाई. जणूं कांहीं एखादा जादुगार आपल्या भारलेल्या कांडीनें तें शहर गुप्त करीत आहे व पुन्हां ते प्रगट करीत आहे! आम्ही या चायनापीकवर पुरे दोन तास घालविले. त्या दिवशीं सर्वत्र धुकें फार पसरलेलें असल्यामुळे सभोवारचा प्रदेश जितका स्पष्टपणे दिसावयास पाहिजे तितका<noinclude>{{right|[ १३ }}</noinclude> b4es2ows29xz5iiaroaab0995gs3z44 पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/२१ 104 110406 230373 2026-05-25T08:11:25Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230373 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''प्रवास-वर्णन.'''</u></noinclude>दिसला नाहीं. तरी पण येथून आलमोरा, राणीखेट, भीमतलाव वगैरे उत्तरेकडील ठिकाणें किंचित् दृग्गोचर झाली व प्रत्यक्ष हिमालयाचा बर्फाच्छादित भागही एक दोनदां स्पष्टपणे दिसला. या टेकाडावर उभे राहिलें म्हणजे चारी बाजूला पहाडचे पहाड व पर्वतांच्या राजींच्या राजी यांखेरीज कांहींही दृष्टीस पडत नाहीं. येथून प्रत्यक्ष हिमालयाच्या प्रचंडतेची त्याच्या भव्यतेची व त्यावरील सृष्टिसौंदर्याची बरीच चांगली कल्पना मनांत येते व विश्वकर्त्या परमेश्वराच्या अगाध सामर्थ्याचें स्मरण झाल्याखेरीज रहात नाहीं. एकीकडे दृष्टि फेंकावी तो स्फटिकासारख्या शुभ्र बर्फमय हिमालयाची रांगच्या रांग दृग्गोचर होते, तर दुसरीकडे हिरव्या हिरव्या गर्द झाडीने आच्छादित पर्वत दृष्टीस पडतात. एकीकडे भयंकर खोल अशी दरी दिसते तर दुसरीकडे उघडा बोडका एकच सुळका नजरेस येतो. एकीकडे पहाडापहाडामधून नागमोडीप्रमाणे जाणारी नदी नजरेस येते, तर दुसरीकडे अगदी दूर सपाट मैदान दृग्गोचर होतें. या ठिकाणावरून दृष्टीस पडणारा देखावा खरोखरीच अद्वितीय आहे. कारण येथून निकटच्या हिमालयाची नैसर्गिक शोभा व शेजारच्या शहराची कृत्रिम शोभा या दोन्ही एकसमयावच्छेदें करून दृग्गोचर होतात. "बाह्यसृष्टीतील तारकायुक्त आकाश व मनःसृष्टीतील सद्सद्विवेकबुद्धि यांनीं माझें मन सदोदित आनंदित होऊन जातें." प्रसिद्ध जर्मन तत्ववेत्ता कँट याच्या वरील उद्गारांतील भावनेसारखी भावना येथल्या देखाव्यानें मनांत उद्भवते. येथील अलौकिक सृष्टिशोभा पाहून ईश्वराचें अचाट कर्तृत्व मनांत येऊन त्याच्याबद्दल आदर व पूज्यबुद्धि उत्पन्न होते तोच मनुष्याच्या कर्तृत्वाबद्दलहि कौतुक वाटतें. कोठें पुणे अगर मुंबई, व कोठें बर्फाच्छादित हिमालय! परंतु हा बर्फाच्छादित हिमालय मुंबईहून दोनअडीच दिवसांच्या प्रवासानें प्रत्यक्ष दृग्गोचर होतो हे पाहून मनुष्याच्या कर्तृत्वाबद्दल साभिमान आश्चर्य वाटतें. या पीकवरून नैनिताल पाहिले म्हणजेही असाच विचार मनांत येतो. ज्या ठिकाण थोड्या काळापूर्वी किर्र रान होतें, जे ठिकाण व्याघ्रादि हिंस्त्र पशूंचें वसतिस्थान होतें, जेथें मनुष्यें दिवसासुद्धां यायला भीत होतीं, जेथें एक झोंपडीही नव्हती, अशा निर्जन ठिकाणीं एक मनुष्यांनीं गजबजलेले<noinclude><br>{{gap}}१४ ]</noinclude> jy173rr45rraajk8hgm298mn2ez4kwq पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/२२ 104 110407 230374 2026-05-25T08:15:00Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230374 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''नैनिताल.'''</u>}}</noinclude>शहर दृष्टीस पडलें म्हणजे मनुष्याच्या कृतीचें कौतुक वाटल्याखेरीज रहात नाहीं. व ज्या राज्यपद्धतीमुळे, ज्या सुधारणेमुळे व ज्या शास्त्रीयज्ञानामुळें हें सर्व शक्य झाले त्या राज्यव्यवस्थेबद्दल, त्या सुधारणेबद्दल व त्या ज्ञानसामर्थ्याबद्दल निःपक्षपाती माणसाच्या मनांत अभिमान जागृत होतो. अशा प्रकारचे विचार मनांत येत असतांना आह्मी मोठ्या कष्टानें उशीर झाला म्हणून चायनापीक उतरूं लागलों व सुमारें एका तासानें आमच्या ठाण्याला आलो.<br>{{gap}}नैनिताल हा जिल्हा कोमान डिव्हिजनमधील आहे. पुष्कळ काळपर्यंत हा प्रांत हिंदुराजांकडे होता. कांहीं काळ तो रोहिले लोकांच्या ताब्यांत होता व १७९१ पासून १८१५ पर्यंत नेपाळी लोकांच्या ताब्यांत होता. १८१५ च्या नेपाळी लढाईनंतर हा प्रांत इंग्रजांच्या ताब्यांत आला. पूर्वी आलमोरा व नैनिताल मिळून एकच जिल्हा होता. परंतु १८९१ पासून हा स्वतंत्र जिल्हा केला गेला व तेव्हांपासूनच या शहराला जास्त महत्त्व आलें.<br>{{gap}}नैनिताल हा तलाव फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे असें दिसतें. स्कंदपुराणांत याला त्रिरिखि सरोवर अथवा त्रिसेश्वर असें नांव दिलेलें आहे. याचा अर्थ तीन ऋषींचा तलाव असा आहे. दंतकथा अशी आहे, कीं, अत्रि, पुलस्त्य व पुलह हे तीन ऋषि यात्रेस जात असतां चायना टेंकडीवर आले व तेथें पाणी मुळींच नाहीं असें त्यांना आढळून आलें. हणून त्यांनी तेथें मोठा खाडा खणला व तो लागलाच पाण्याने भरून गेला व तेव्हांपासून त्या तलावाला त्रिरिखि सरोवर हें नांव मिळालें, नैनिताल हे सध्याचें नांव नैना नांवाच्या या तळ्याच्या कांठावर असलेल्या देवीच्या देवळावरून मिळालेलें आहे. हें देऊळ १८८० च्या धरकोसळी मध्यें (Land slip) नाहींसें झालें. हल्लीं तळ्याच्या कांठावरील देऊळ नवीन बांधलेले आहे. १८३९ पर्यंत नैनिताल हे ठिकाण दाट झाडीनें आच्छादिले असून हिंस्र पशूंचे निवासस्थान असे. शेजारच्या खेड्यापाड्यांतील धनगर व शेतकरी उन्हाळ्यांत व पावसाळ्यांत आपली गुरेढोरें चारण्याकरितां येथें येत असत. परंतु या ठिकाणाबद्दल या खेडवळांच्या<noinclude>{{right|[ १५ }}</noinclude> 1zaquba7al86zzhdu6x99qawpf4hhwc पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/२३ 104 110408 230375 2026-05-25T08:20:20Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230375 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''प्रवास-वर्णन.'''</u></noinclude>मनांत फार भीति असे. कारण, हे ठिकाण भूताखेतांचं ठिकाण आहे अशी समजूत होती. यामुळे शेतकरी एका ठरलेल्या दिवशीं त्या ठिकाणीं आपल्या कळपासकट जमत. कारण, एकट्याला तेथें जाण्याची छाती नसे. मध्ये आपली झोंपडी व सभोवार गुरांचा गोठा अशा तऱ्हेनें ते रहात. तरी सुद्धां पुष्कळ गुरें व केव्हां केव्हां माणसेंहि व्याघ्रमुखी पडत असत. तेथे आल्यावर शेतकरी पहिल्या प्रथम नैना देवीला संतुष्ट करीत असत. वर्षातून पर्वणीच्या दिवशीं या तलावांत लोक स्नानास येत. परंतु यापलीकडे या ठिकाणची मुळींच माहिती नव्हती. १८३९ च्या मार्च महिन्यांत आपले मेहुणे बॅरन यांच्याबरोबर मिस्टर बॅटन नांवाचे साहेब हल्डवानी येथे शिकार करीत होते. ते वाटाड्यांना घेऊन भीमतालला गेले व तेथुन नैनितालला आले व रामनगरच्या बाजूनें परत आले. १८४१ मध्ये नैनिताल या तलावाच्या शोधाबद्दल व त्याच्या सौंदर्याबद्दल व त्याच्या भावी वसतिस्थानक्षमतेबद्दल वर्तमानपत्रांत एक पत्र प्रसिद्ध झाले. त्या ह्मणण्याची पुष्टी मिस्टर बॅरन यांनी केली. लगेच बारा बंगल्यांबद्दल कान्ट्रॅक्टरला कंत्राट दिलें गेलें. १८४२ मध्ये लोकांना वार्षिक कर घेऊन जमिनीवर घरें बांधण्यासंबंधाचे सरकारी नियम प्रसिद्ध झाले. कमिशनरनें एक बंगला आपल्याकरितां बांधला. बाजार व इतर सार्वजनिक इमारती यांची जागा आखण्यांत आली. बंगल्याचे काम पुरें होतांच त्यांत लोक राहू लागले. पहिले पहिले बंगले तलावाच्या पूर्व बाजूस बांधले गेले. १८४९ पर्यंत हल्लींच्या बड्या बाजाराच्या ठिकाणी अजून जंगलच होतें. या तलावांत पहिली होडी मिस्टर बॅरन यांनीं वल्हविली. १८४६ मध्ये १५ हजार रुपये वर्गणी करून युरोपियन रहिवाशांनी पहिले ख्रिस्ति देऊळ बांधलें व त्याचें 'जंगलांतील सेंटजॉन' असें अन्वर्थक नांव ठेविलें. १८५७ सालच्या बंडाच्या वर्षी नैनितालची थंड हवेचे ठिकाण ह्मणून ख्याति झाली होती व त्या धामधुमीत बरेली व त्याच्या आसपासचे भाग येथील पुष्कळ लोक आश्रयाकरितां नैनितालाला जाऊन राहिले होते. नंतर लौकरच नैनिताल हे संयुक्त प्रांताच्या सरकारचें उन्हाळ्यांतील विश्रांतिस्थान बनलें. १८६५ मध्ये त्या वेळच्या लेफ्टनेंट गव्हरनरनें आपल्याकरितां<noinclude><br>{{gap}}१६ ]</noinclude> hwpt1ut8mqz23ntxj5tvdq6vxx2ty06 पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/२४ 104 110409 230376 2026-05-25T08:22:05Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230376 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Css image crop |Image = माझा_उत्तरहिंदुस्तानचा_प्रवास.pdf |Page = 24 |bSize = 498 |cWidth = 402 |cHeight = 435 |oTop = 105 |oLeft = 50 |Location = center |Description = }} {{center|'''नैनिताल- तळ्याचा देखावा'''}}<noinclude></noinclude> cysuhzp5vei20rdi2vhew8h214ui3wl 230379 230376 2026-05-25T08:24:36Z कल्पनाशक्ती 3813 230379 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Css image crop |Image = माझा_उत्तरहिंदुस्तानचा_प्रवास.pdf |Page = 24 |bSize = 498 |cWidth = 402 |cHeight = 435 |oTop = 105 |oLeft = 50 |Location = center |Description = }} {{center|'''नैनिताल- तळ्याचा देखावा'''}}{{nop}}<noinclude></noinclude> sl7osifvpmn0x50yvg45gd7857frpqy पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/२५ 104 110410 230378 2026-05-25T08:24:16Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230378 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Css image crop |Image = माझा_उत्तरहिंदुस्तानचा_प्रवास.pdf |Page = 25 |bSize = 498 |cWidth = 396 |cHeight = 432 |oTop = 90 |oLeft = 53 |Location = center |Description = }} {{center|'''नैनिताल- दांडी वाहन'''}}{{nop}}<noinclude></noinclude> 58mos6chc29tux9ae146f0fgglsvvdv पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/२६ 104 110411 230380 2026-05-25T08:29:22Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230380 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''नैनिताल.'''</u>}}</noinclude>उत्तरेच्या टेकडीच्या पूर्वटोंकाला एक बंगला बांधविला व आपण पेनशन घेतल्यावर तो बंगला एका मनुष्यास विकला व तेव्हांपासून पुढे झालेले लेफ्टनेंट गव्हरनर हे तो बंगला दरवर्षास ३६०० रुपये भाड्याने घेत असत. १८९५ पर्यंत लेफ्टनेंट गव्हरनरचें राहण्याचें ठिकाण याच टेकडीवर होतें. परंतु १८८० च्या धरकोसळीनंतर ही टेकडी धोक्याची आहे असें ठरलें म्हणून सरकारने समोरच्या टेकडीवर मोठी जागा घेतली व तेथे हल्लींचा भव्य व सुंदर राजवाडा बांधला. हा वाडा १९०० मध्ये पुरा झाला. या सर्व वर्षात नैनितालची सारखी भरभराट होत होती व जिकडे तिकडे वस्ति वाढत होती. यामुळे शाळा, दुकानें, खाणावळी, घरें, बंगले सारखे वाढत चालले. प्रथमतः या ठिकाणाला येण्यास चांगले रस्ते नसून मुरादाबादेवरूनच्या लांबच्या रस्त्यानें यावें लागे. परंतु पुढे बरेलीहून एक सरळ रस्ता झाला. १८८२ मध्ये कथगोडमपर्यंत रेलवे झाली. तेव्हांपासून तर हे ठिकाण जास्त महत्त्वाचें झालें व त्याला शहराचे स्वरूप आलें. मागें सांगितलेच आहे कीं, १८९१ मध्ये हे जिल्ह्याचे ठिकाण बनले. तेव्हां येथील वस्ति हंगामी न राहतां कायमचीच झाली. या शहराची वस्ति कमजास्त होणारी आहे. परंतु येथें कायमची वस्ति १० हजारां जवळजवळ आहे व उन्हाळ्यांत तर ती १६/१७ हजारपर्यंत वाढते.<br>{{gap}}नैनितालबद्दलची सांगण्यासारखी सर्व हकीकत आतां सांगून झालीच. परंतु इकडील पर्वताच्या भूगर्भविषयक स्थितीचा व त्यापासून घडलेल्या अनर्थाचा उल्लेख केल्यावांचून हें वर्णन अपुरें राहील ह्मणून तेवढें देणें येथे वावगे होणार नाहीं.<br>{{gap}}इकडील पर्वतांच्या टेकड्या या फार ढिसूळ अशा दगडाच्या झालेल्या आहेत. सह्याद्रि पर्वताचा कणखर काळाभोर खडक इकडे मुळींच नाहीं. येथला खडक पांढऱ्या रंगाचा मुरमासारखा भुसभुशीत आहे व कांहीं ठिकाण स्लेटीच्या दगडासारखा पत्र्यापत्र्याचा झालेला आहे व थरथरामधून माती आहे. या कारणानें येथें पावसाळ्यांत पाणी खडकांत मुरतें व असें पुष्कळ पाणी मुरलें म्हणजे कडेच्या कडे कोसळून पडतात. अशा प्रकारची कडेकोसळ अगर धरकोसळ या टेकड्यांवरून पुष्कळ वेळां<noinclude>{{right|[ १७ }}</noinclude> a3mycrgyqi1yrf0nmbc2ltt9havno3n पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/२७ 104 110412 230381 2026-05-25T08:35:55Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230381 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''प्रवास-वर्णन.'''</u></noinclude>झालेली आहे. १८६६ मध्ये एक मोठा कडा कोसळला होता. पुढें १८६९ मध्ये ती धरकोसळ जास्त मोठी झाली. परंतु सर्वात भयंकर व हानिकर धरकोसळ १८८० मध्ये झाली. ही धरकोसळ प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसानं तिचें खालीलप्रमाणें वर्णन केलें आहे.<br>{{gap}}"१६ सप्टेंबर गुरुवार १८८० या दिवशी सारखा अहोरात्र मुसळधार पाऊस पडूं लागला. शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांतच ३३ इंचांवर पाऊस पडला. पाणी जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले. सर्व टेकडी पाण्याने डुबडबून गेली व पाणी टेकड्यांच्या भेगांतून शिरून टेकडीच्या कांहीं भागाचा धर सुटला. शनिवारी दहा वाजतां पहिली धरकोसळ झाली व तिनें व्हिक्टोरिया हॉटेलची बाहेरची घरें व हॉटेलच्या पश्चिमेचा भाग ढांसळून खाली आला. त्या नंतर यापेक्षां फारच मोठ्या भागाचा धर कोसळला व त्यायोगे सर्व हॉटेल, असेंबली रूम्स व इतर आणखी पुष्कळ घरें यांसकट सर्व टेकडी धाडकन् तलावांत येऊन कोसळली. या धरकोसळींत एकंदर १५१ मनुष्यें दगावली व कित्येक इमारती अजिबात नाहीशा झाल्या."<br>{{gap}}ही धरकोसळ झाल्यावर सरकारने हजारों रुपये खर्च करून संरक्षक कामें बांधिली. जागोजाग पावसाचें पाणी टेकडींत न मुरतां खाली निघून जाण्याकरितां मोऱ्या बांधल्या व कोसळलेल्या भागाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी खेळाची मोठी जागा तयार केली. या धरकोसळींत जुन्या नैनादेवीच्या देवालयालाही जलसमाधि मिळाली होती. हल्लींचें देवालय हें त्यानंतर बांधलेले आहे. १८९८ साली पूर्वेकडील टेकड्यांची वीरभट्टीच्या बाजूला धरकोसळ झाली व त्यानें जुना रस्ता बहुतेक वाहून गेला. म्हणून हल्लींचा रस्ता दक्षिणबाजूच्या टेकडीवरून नेलेला आहे. उत्तरेकडील टेकड्यांपेक्षां दक्षिणेकडील टेकड्या कमी धोक्याच्या आहेत असा तज्ज्ञांनीं अंदाज केलेला आहे. यामुळे हल्ली लोकवस्ती व बंगले वगैरे दक्षिणेच्या बाजूला जास्त होत आहेत.<br>{{gap}}परंतु सरकारने या थंड हवेच्या ठिकाणाच्या महत्त्वाच्या मानानें अतोनात पैसा खर्च करून या ठिकाणाला मानवी प्रयत्नांनीं जितकी<noinclude><br>{{gap}}१८ ]</noinclude> 4qn866v5znepn98exw0c4sm6zmq6sfc पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/२८ 104 110413 230382 2026-05-25T08:43:23Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230382 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''नैनिताल.'''</u>}}</noinclude>सुरक्षितता आणणें शक्य आहे तितकी सुरक्षितता आणिली आहे व याचे निदर्शन कथगोडम स्टेशन सोडल्यापासून वाटोवाट दृष्टीस पडतें. जेथें तेथे बांधकाम केलेले आहे; पावसाचें पाणी भरकन् निघून जाण्याच्या सोयी जागोजाग केल्या आहेत. सर्व रस्त्यावर नेहमी देखरेखीला माणसें ठेविली आहेत. तीं माणसें रस्ता साफ ठेवितात व रस्त्यावर पाणी शिंपडतात. यामुळें कथगोडमपासूनच आपण एकाद्या सुंदर शहराच्या रस्त्यावरून जात आहों असा भास होतो.<br>{{gap}}नैनितालच्या हवेबद्दल व पाण्याबद्दल फार प्रख्याति आहे. नैनितालच्या विशेष रचनेमुळे शहरांत व तळ्याच्या बाजूने फारसा वारा नसतो. परंतु एकंदर हवा फारच थंड आहे व त्या ठिकाणीं केव्हांही उन्हाळा भासत नाहीं किंवा घामही सुटत नाहीं. सकाळ संध्याकाळी तर चांगली थंडी वाजते. येथील पाणी फार पाचक आहे असें आमच्या चारपांच दिवसांच्या अनुभवावरूनही आम्हांला आढळून आलें. आह्मांला जास्त दिवस राहण्यास सवड नव्हती, यामुळें आह्मी मोठ्या कष्टानें या सुंदर ठिकाणाची रजा घेऊन परत येतांना बरेलीकडून मुरादाबादेस आलों.{{nop}}<noinclude>{{right|[ १९ }}</noinclude> jew6g76jsjmuoui1opr653xgwdjm4ac पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/२९ 104 110414 230383 2026-05-25T08:43:53Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ - आ 66 ग्वालेर. तुझ्या मधुर गानाच्या नादें वेडावुनि हा गेला पहा भूप दुष्यंत कसा हा हरिणें ओदुनि अणिला ! " 7 मच्या संगीत कविकुलगुरु किर्लोस्करांनीं वरील पद्यांत वर्णिलेल्या द..." 230383 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ - आ 66 ग्वालेर. तुझ्या मधुर गानाच्या नादें वेडावुनि हा गेला पहा भूप दुष्यंत कसा हा हरिणें ओदुनि अणिला ! " 7 मच्या संगीत कविकुलगुरु किर्लोस्करांनीं वरील पद्यांत वर्णिलेल्या दुष्यंताच्या स्थितीप्रमाणें, माझी उत्तर- हिंदुस्थानांतील प्रवासाने स्थिति करून टाकिली, हें कबूल केलें पाहिजे. मी या प्रांतांत प्रथमतः दीड वर्षापूर्वी आलो. पण येथील सृष्टिसौंदर्यानें, येथील , प्रेक्षणीय स्थळांनी येथील हवापाण्यानें, इकडील शहरें व इमारती आणि 'इतर देखावे यांनी मला इतकें वेडावून सोडिलें कीं, अवघ्या दीड वर्षोत मी इकडे हा तिसऱ्यांदा आलों ! यंदा माझ्याबरोबर माझे बंधूही आल्यानें या प्रवासाच्या आनंदांत ज्यास्तच भर पडली. माझ्या पहिल्या प्रवासांत हा प्रदेश मला अगदीं अदृष्टपूर्व होता; व येथील सृष्टिकृत मनुष्यकृत सौंदर्यात माझें मन इतकें रमलें कीं, मला दुसऱ्या कशाचेंही भान राहिलें नाहीं, व 'ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहातें सांभाळी' अशी माझी स्थिति झाली. दुसऱ्यांदा जेव्हां मी या प्रांतीं आलों तेव्हां मला सृष्टिसौंदर्याचा शांत मनाने आस्वाद घेण्यास सवड सांपडली व माझी चित्तवृत्ति अगदींच बावरून गेली नाहीं. म्हणून आपण अनुभवि - लेल्या अपूर्व आनंदाचा थोडासा वांटा वाचकांस द्यावा अशी इच्छा होऊन मी नैनितालची माहिती एका लेखांत त्यांना सादर केली, व आमच्या वाचकांस तो लेख आवडला असें समजल्यामुळे यंदा मला २० ]<noinclude></noinclude> h14rmeknmlfppo6xsygf14y9dkukd89