विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.4
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८९
104
85847
230568
182036
2026-06-01T11:12:56Z
JayashreeVI
4058
230568
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|८४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>नाहीं आणि तुमचा नेम तर असा आहे तो चालणार नाहीं. या करितां जसा प्रसंग येईल तशी मसलत करून काम करीत असावें.” अशी समर्थांची आज्ञा होतांच साष्टांग प्रणिपात करून हस्त जोडून आनंदाश्रुयुक्त व
अष्टभावेंकरून पूर्ण होत्साते परम नम्रतेनें शिवाजीमहाराज बोलले कीं, "हा प्राण जावो अथवा राहो दौलतीचा तो विषय किती, आज्ञेवांचून पाऊलहि पुढे पडावयाचें नाहीं." अशी विनंति करतांच समर्थांनी हास्यवदन करून राजास पोटाशी धरून भाषण केलें कीं, “शिवाजी! तूं धन्य आहेस. या कलिकालीं तूं केवळ जनकराजाच आहेस. असो आतां आम्ही सांगतों याप्रमाणें वर्तावें. परमार्थदृष्टीनें पाहिले असतां आम्हीं सतत तुझांपाशीं नाहीं असा अर्थ नाहीं. परंतु लौकिकदृष्टीने पाहिले असतां जवळ नाहीं हाही भाव खरा. यास्तव जें समय कार्य प्राप्त होईल ते समयी श्रीदेवीस विनंति करून आज्ञा होईल त्याप्रमाणे करीत जावें.” हे ऐकून शिवाजी म्हणाला, “स्वामीमहाराज! देवी तर प्रत्यक्ष नाहीं. तेव्हां विनंति कोठें करावी आणि ही आज्ञा होईल कशी येविषयीं
आज्ञा करावी." असे म्हणतांच समर्थ बोलले, "हे राजा! शुचिर्भूत होऊन तूं व आप्त वर्गापैकी चांगला लिहिणारा एक व प्रश्न करणारा एक असे त्रिवर्गानीं एकांती बसून ज्या कार्याचा उद्देश असेल तो प्रश्न प्रश्न करणानें
करावा म्हणजे तुमचे अंगीं देवी संचारून तुमच्या मुखेकरून बोलेल. त्याप्रमाणें लिहिणारानें लिहावें, नंतर त्या लेखाचें तुम्ही अवलोकन करून त्यांत जशी आज्ञा झाली असेल त्याप्रमाणें करीत जावें."
<br>{{gap}}ही गोष्ट काय किंवा बखरींत वर्णिलेल्या दुसऱ्या गोष्टी काय एकाच मासल्याच्या आहेत. शिवाजी आला असतां व त्याला तहान लागली असतां त्याच्याकरितां कुबडीच्या आघातानें जमीनींत झरा उत्पन्न करून कुवडीतीर्थ निर्माण कर; दुसऱ्या खेपेस शिवाजीच्या दोन हजार सैन्यासकट त्याला डोंगरांत दगडा आड असलेल्या प्रचंड गुहेत पंचपक्कानांचें भोजन घालं; तिसऱ्यांदा शिवाजी भेटण्यास आला असतां त्याच्याशीं स्वस्थपणें बोलण्याकरितां आपल्या अंगांतील शीतज्वर आपल्या शेजारी असलेल्या छाटीत ठेवून ती छाटी हालत ठेव; असल्या तऱ्हेच्या दैवी-<noinclude></noinclude>
row33osy5fvk3h1hgtkphk4t5l2p10b
230569
230568
2026-06-01T11:13:34Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230569
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|८४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>नाहीं आणि तुमचा नेम तर असा आहे तो चालणार नाहीं. या करितां जसा प्रसंग येईल तशी मसलत करून काम करीत असावें.” अशी समर्थांची आज्ञा होतांच साष्टांग प्रणिपात करून हस्त जोडून आनंदाश्रुयुक्त व
अष्टभावेंकरून पूर्ण होत्साते परम नम्रतेनें शिवाजीमहाराज बोलले कीं, "हा प्राण जावो अथवा राहो दौलतीचा तो विषय किती, आज्ञेवांचून पाऊलहि पुढे पडावयाचें नाहीं." अशी विनंति करतांच समर्थांनी हास्यवदन करून राजास पोटाशी धरून भाषण केलें कीं, “शिवाजी! तूं धन्य आहेस. या कलिकालीं तूं केवळ जनकराजाच आहेस. असो आतां आम्ही सांगतों याप्रमाणें वर्तावें. परमार्थदृष्टीनें पाहिले असतां आम्हीं सतत तुझांपाशीं नाहीं असा अर्थ नाहीं. परंतु लौकिकदृष्टीने पाहिले असतां जवळ नाहीं हाही भाव खरा. यास्तव जें समय कार्य प्राप्त होईल ते समयी श्रीदेवीस विनंति करून आज्ञा होईल त्याप्रमाणे करीत जावें.” हे ऐकून शिवाजी म्हणाला, “स्वामीमहाराज! देवी तर प्रत्यक्ष नाहीं. तेव्हां विनंति कोठें करावी आणि ही आज्ञा होईल कशी येविषयीं
आज्ञा करावी." असे म्हणतांच समर्थ बोलले, "हे राजा! शुचिर्भूत होऊन तूं व आप्त वर्गापैकी चांगला लिहिणारा एक व प्रश्न करणारा एक असे त्रिवर्गानीं एकांती बसून ज्या कार्याचा उद्देश असेल तो प्रश्न प्रश्न करणानें
करावा म्हणजे तुमचे अंगीं देवी संचारून तुमच्या मुखेकरून बोलेल. त्याप्रमाणें लिहिणारानें लिहावें, नंतर त्या लेखाचें तुम्ही अवलोकन करून त्यांत जशी आज्ञा झाली असेल त्याप्रमाणें करीत जावें."
<br>{{gap}}ही गोष्ट काय किंवा बखरींत वर्णिलेल्या दुसऱ्या गोष्टी काय एकाच मासल्याच्या आहेत. शिवाजी आला असतां व त्याला तहान लागली असतां त्याच्याकरितां कुबडीच्या आघातानें जमीनींत झरा उत्पन्न करून कुवडीतीर्थ निर्माण कर; दुसऱ्या खेपेस शिवाजीच्या दोन हजार सैन्यासकट त्याला डोंगरांत दगडा आड असलेल्या प्रचंड गुहेत पंचपक्कानांचें भोजन घालं; तिसऱ्यांदा शिवाजी भेटण्यास आला असतां त्याच्याशीं स्वस्थपणें बोलण्याकरितां आपल्या अंगांतील शीतज्वर आपल्या शेजारी असलेल्या छाटीत ठेवून ती छाटी हालत ठेव; असल्या तऱ्हेच्या दैवी-<noinclude></noinclude>
cyqu4i3lnk2kkk3d5q8yefy6zdcuwin
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९०
104
85848
230570
182037
2026-06-01T11:26:37Z
JayashreeVI
4058
230570
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|८५}}
{{rule}}</noinclude>चमत्कारांच्या या सर्व गोष्टी आहेत. शिवाजी व रामदास यांच्या संबंधाच्या आणखी दोन तीन दंतकथा येथे देणें आवश्यक आहे.
<br>{{gap}}रामदासाकडे चाफळास दूर जाण्याचा वारंवार त्रास होऊं नये म्हणून शिवाजीनें सन १६५० मध्ये रामदासांस परळीच्या किल्ल्यावर राहण्यास येण्यास विनंति केली व तदनुरूप अका, वेणू, व आणखी एक दोघे
शिष्य यांसह रामदास परळीच्या किल्ल्यावर राहण्यास आले; बाकीचे शिष्य चाफळास राहिले; याचवेळी शिवाजीनें चाफळाच्या मठास व परळीच्या मठास कित्येक गावें इनाम करून दिली.
<br>{{gap}}शिवाजी प्रत्येक वेळी रामदासांस भेटण्यास गेला म्हणजे स्वामींची सेवा कोणत्या तऱ्हेने करूं असें विचारीत असे. एका वेळी शिवाजीचें राज्य जिकडे नाहीं तिकडील गांवांची नावें घेऊन सनद करून द्यावी
म्हणून रामदासानी आज्ञा केली. तेव्हां शिवाजीनें विनंति केली कीं 'महाराज, तिकडे राज्य आपलें नाहीं; सबब तिकडील सनदा पत्रे कशी करून देऊं.' तेव्हां समर्थ बोलले की तुला या विचाराचें कारण काय.आम्ही सांगितल्याप्रमाणें सनदा पत्रे करून देणें. असें म्हटल्यावरून शिवाजीनें सनदा पत्र लिहून ठेवलीं. तीं पत्रें समर्थानीं घेऊन शिष्यांचे स्वाधीन करून त्या त्या गांवांस जावें, म्हणून आज्ञा केली, त्याप्रमाणें तेथें तेथे जाऊन शिष्य राहिले. ज्या ज्या गांवीं शिष्य जाऊन राहिले, त्या त्या गांवांपर्यंत शिवाजीमहाराजांचें राज्य होऊन त्यानें त्या त्या संस्थानाचा बंदोबस्त करून दिला.
<br>{{gap}}या गोष्टीचा मतलब इतकाच कीं रामदास अवतारी पुरुष. त्यांच्या इच्छेप्रमाणें आपोआप गोष्टी घडून येत असत. पण हें जर खरें तर सर्वच राज्य शिवाजीला रामदासांनीं एकदमच कां दिलें नाहीं. शिवाजीला खटपट करण्याचा त्रास कशास ठेवला. एका प्रसंगी शिवाजी रामदासांस भेटण्यास आला असतां रामदासांनी म्हटले, 'हल्लीं यवनी राज्य नसतां जोहार म्हणण्याचा पाठ आहे. हा ठीक नाहीं, तर इतःपर सर्वत्रांनीं एकमेकांस रामराम म्हणत जावें.' तेव्हांपासून शिवाजीनें आपल्या सर्व राज्यांत ही रामरामाची पद्धति सुरू केली.{{nop}}<noinclude></noinclude>
8qoeremddpggz8yi7zt5b8dox7p1xj6
230571
230570
2026-06-01T11:27:27Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230571
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|८५}}
{{rule}}</noinclude>चमत्कारांच्या या सर्व गोष्टी आहेत. शिवाजी व रामदास यांच्या संबंधाच्या आणखी दोन तीन दंतकथा येथे देणें आवश्यक आहे.
<br>{{gap}}रामदासाकडे चाफळास दूर जाण्याचा वारंवार त्रास होऊं नये म्हणून शिवाजीनें सन १६५० मध्ये रामदासांस परळीच्या किल्ल्यावर राहण्यास येण्यास विनंति केली व तदनुरूप अका, वेणू, व आणखी एक दोघे
शिष्य यांसह रामदास परळीच्या किल्ल्यावर राहण्यास आले; बाकीचे शिष्य चाफळास राहिले; याचवेळी शिवाजीनें चाफळाच्या मठास व परळीच्या मठास कित्येक गावें इनाम करून दिली.
<br>{{gap}}शिवाजी प्रत्येक वेळी रामदासांस भेटण्यास गेला म्हणजे स्वामींची सेवा कोणत्या तऱ्हेने करूं असें विचारीत असे. एका वेळी शिवाजीचें राज्य जिकडे नाहीं तिकडील गांवांची नावें घेऊन सनद करून द्यावी
म्हणून रामदासानी आज्ञा केली. तेव्हां शिवाजीनें विनंति केली कीं 'महाराज, तिकडे राज्य आपलें नाहीं; सबब तिकडील सनदा पत्रे कशी करून देऊं.' तेव्हां समर्थ बोलले की तुला या विचाराचें कारण काय.आम्ही सांगितल्याप्रमाणें सनदा पत्रे करून देणें. असें म्हटल्यावरून शिवाजीनें सनदा पत्र लिहून ठेवलीं. तीं पत्रें समर्थानीं घेऊन शिष्यांचे स्वाधीन करून त्या त्या गांवांस जावें, म्हणून आज्ञा केली, त्याप्रमाणें तेथें तेथे जाऊन शिष्य राहिले. ज्या ज्या गांवीं शिष्य जाऊन राहिले, त्या त्या गांवांपर्यंत शिवाजीमहाराजांचें राज्य होऊन त्यानें त्या त्या संस्थानाचा बंदोबस्त करून दिला.
{{gap}}या गोष्टीचा मतलब इतकाच कीं रामदास अवतारी पुरुष. त्यांच्या इच्छेप्रमाणें आपोआप गोष्टी घडून येत असत. पण हें जर खरें तर सर्वच राज्य शिवाजीला रामदासांनीं एकदमच कां दिलें नाहीं. शिवाजीला खटपट करण्याचा त्रास कशास ठेवला. एका प्रसंगी शिवाजी रामदासांस भेटण्यास आला असतां रामदासांनी म्हटले, 'हल्लीं यवनी राज्य नसतां जोहार म्हणण्याचा पाठ आहे. हा ठीक नाहीं, तर इतःपर सर्वत्रांनीं एकमेकांस रामराम म्हणत जावें.' तेव्हांपासून शिवाजीनें आपल्या सर्व राज्यांत ही रामरामाची पद्धति सुरू केली.{{nop}}<noinclude></noinclude>
j5ah58v4rrr3wf9yocxl8qkdgxupx3w
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९१
104
85849
230572
182038
2026-06-01T11:42:28Z
JayashreeVI
4058
230572
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|८६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{gap}}एकदां शिवाजी सातारच्या किल्ल्यावर असतांना रामदासस्वामी माहुलीहून सातारच्या माचीस भिक्षा मागावयास आले होते. शिवाजी किल्ल्यावरून खालीं राजवाड्यांत येतात तोंच रामदासस्वामीही राजवाड्यांत येऊन भिक्षा मागूं लागले. हे ऐकून शिवाजीनें स्वामींस नमस्कार करून बाळाजी आवजी चिटणीस यांचें हस्तें चिठ्ठी लिहून तिचेवर आपले हातची धाकटी मुद्रा करून ती चिठ्ठी स्वामींच्या झोळींत टाकली. वाचून पहातां राज्याची भिक्षा शिवाजीनें स्वामींस अर्पण केली आहे असे कळलें. तेव्हां स्वामींनी शिवाजीस 'पुढे काय करणार असा प्रश्न विचारला व त्यानें स्वामीसेवा करणार असें उत्तर दिलें. तेव्हां रामदास स्वामींनी आपली झोळी शिवाजीच्या खांद्यावर टाकली व पुढे आपण व मागें शिवाजी असे भिक्षेस निघाले व दोन प्रहरपर्यंत घरोघर भिक्षा मागून वेण्येचे कांठीं जाऊन तेथे शिष्यांकडून पानगे करवून ते सर्वत्रांनी खाल्ले. व मग स्वामीनीं शिवाजीस आज्ञा केली की, 'जरी तूं मला राज्य अर्पण केले आहेस तरी माझे राज्य तूं चालव' असें म्हणून स्वामी सकाळी झोळींत घातलेली राज्यदानाची चिठ्ठी परत करूं लागले. परंतु शिवाजी ती चिठ्ठी परत घेईना. तेव्हां रामदासांनी ती चिठ्ठी दिवाकर गोसावी याजपाशीं दिली व शिवाजीच्या विनंतिवरून आपल्या पादुका शिवाजीस दिल्या व मग शिवाजीनें राज्य चालविण्याचे कबूल करून त्याप्रमाणें तो वागूं लागला.
<br>{{gap}}येथपर्यंत शिवाजी व रामदास यांच्या भेटीच्या प्रसंगांपैकीं मुख्य प्रसंगांचे वर्णन केलें. आणखी एकच दंतकथा सांगून हा बखरींतील दंतकथा भाग आटपूं. ही दंतकथा बखरकारांच्या हेतूंपैकी दोन हेतु–रामदासांचें सर्वतोपरी श्रेष्ठत्व व त्यांचा हनुमानावतारीपणा-सिद्ध करण्याकरितां लिहिलेली आहे. शिवाय ज्याला इंग्रजी तर्कशास्त्रांत 'दंडुकेशाईचें प्रमाण' म्हणतात त्याचेंहि ही दंतकथा एक मजेदार उदाहरण आहे असे दिसून येईल.
<br>{{gap}}मराठीतील प्रसिद्ध कवि वामन पंडित यानें काशीस बारा वर्षे अध्ययन करून उत्तम शास्त्रज्ञान संपादन केलें; व गुरूचाहि शास्त्रज्ञानांत पराभव केला. नंतर तो आपल्या स्त्रीसह आपल्या गांवीं येण्यास निघाला. वाटेत--<noinclude></noinclude>
pb2ojs44x6vxajvz99rb8mtt8fqfeij
230573
230572
2026-06-01T11:43:02Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230573
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|८६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{gap}}एकदां शिवाजी सातारच्या किल्ल्यावर असतांना रामदासस्वामी माहुलीहून सातारच्या माचीस भिक्षा मागावयास आले होते. शिवाजी किल्ल्यावरून खालीं राजवाड्यांत येतात तोंच रामदासस्वामीही राजवाड्यांत येऊन भिक्षा मागूं लागले. हे ऐकून शिवाजीनें स्वामींस नमस्कार करून बाळाजी आवजी चिटणीस यांचें हस्तें चिठ्ठी लिहून तिचेवर आपले हातची धाकटी मुद्रा करून ती चिठ्ठी स्वामींच्या झोळींत टाकली. वाचून पहातां राज्याची भिक्षा शिवाजीनें स्वामींस अर्पण केली आहे असे कळलें. तेव्हां स्वामींनी शिवाजीस 'पुढे काय करणार असा प्रश्न विचारला व त्यानें स्वामीसेवा करणार असें उत्तर दिलें. तेव्हां रामदास स्वामींनी आपली झोळी शिवाजीच्या खांद्यावर टाकली व पुढे आपण व मागें शिवाजी असे भिक्षेस निघाले व दोन प्रहरपर्यंत घरोघर भिक्षा मागून वेण्येचे कांठीं जाऊन तेथे शिष्यांकडून पानगे करवून ते सर्वत्रांनी खाल्ले. व मग स्वामीनीं शिवाजीस आज्ञा केली की, 'जरी तूं मला राज्य अर्पण केले आहेस तरी माझे राज्य तूं चालव' असें म्हणून स्वामी सकाळी झोळींत घातलेली राज्यदानाची चिठ्ठी परत करूं लागले. परंतु शिवाजी ती चिठ्ठी परत घेईना. तेव्हां रामदासांनी ती चिठ्ठी दिवाकर गोसावी याजपाशीं दिली व शिवाजीच्या विनंतिवरून आपल्या पादुका शिवाजीस दिल्या व मग शिवाजीनें राज्य चालविण्याचे कबूल करून त्याप्रमाणें तो वागूं लागला.
<br>{{gap}}येथपर्यंत शिवाजी व रामदास यांच्या भेटीच्या प्रसंगांपैकीं मुख्य प्रसंगांचे वर्णन केलें. आणखी एकच दंतकथा सांगून हा बखरींतील दंतकथा भाग आटपूं. ही दंतकथा बखरकारांच्या हेतूंपैकी दोन हेतु–रामदासांचें सर्वतोपरी श्रेष्ठत्व व त्यांचा हनुमानावतारीपणा-सिद्ध करण्याकरितां लिहिलेली आहे. शिवाय ज्याला इंग्रजी तर्कशास्त्रांत 'दंडुकेशाईचें प्रमाण' म्हणतात त्याचेंहि ही दंतकथा एक मजेदार उदाहरण आहे असे दिसून येईल.
<br>{{gap}}मराठीतील प्रसिद्ध कवि वामन पंडित यानें काशीस बारा वर्षे अध्ययन करून उत्तम शास्त्रज्ञान संपादन केलें; व गुरूचाहि शास्त्रज्ञानांत पराभव केला. नंतर तो आपल्या स्त्रीसह आपल्या गांवीं येण्यास निघाला. वाटेत--<noinclude></noinclude>
cgbk9x8tyqpstr8cari83defsskdq5b
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१११
104
110362
230556
230303
2026-06-01T05:07:21Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
230556
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>खेरीज ज्ञानाला प्रारंभच होणार नाही. तेव्हां मानवी ज्ञानाचे पहिले अग संवेदना होत; पण या संवेदना अवकाश व काल यांखेरीज शक्य नाहीत; म्हणून अवकाश व काल हीही ज्ञानाची अंगें होत. शिवाय ज्ञानाला एकत्व किंवा संबद्धत्व आणणाऱ्या कल्पना म्हणजे संख्या, गुण, संबंध व संभवनीयता या होत व या सर्वांच्या मूळाशी आत्म्याच्या जाणीवेची कल्पना. कोणतेही ज्ञान तुम्ही घ्या; त्यांत या सर्व अंगांचा अन्तर्भाव झालेला आहे असे आपल्यास दिसून येईल. एका दाखल्याने हे स्पष्ट करता येईल. समजा एखादा मनुष्य गाढ निद्रेतून जागा झाला तर प्रथमतः त्याच्या मनावर त्याच्या इंद्रियांकडून संवेदनांचा जणू काही मारा होईल, या सर्व संवेदनांचा त्याच्या मनांत घोटाळा माजलेला असेल. मला संवेदना होत आहेत येवढेच आधी त्याला कळेल. व बुद्धीच्या व्यापाराच्या योगे या सर्व विस्कळीत व म्हणूनच संदिग्ध संवेदनांचे बुद्धीने दिलेल्या स्वयंसिद्ध कल्पनांनुरूप वर्गीकरण होईल व त्या संवेदनांना स्पष्ट व सविकल्प ज्ञानाचे स्वरूप प्राप्त होईल. हे सर्व परिवर्तन मानवी मनाला न कळत अशा तऱ्हेने मनांत होत असते व मगच मानवी ज्ञान तयार होते. म्हणजे संवेदनारूपी ज्ञानाच्या कच्च्या मालावर बुद्धीचे व्यापार घडून ज्ञानरूपी पक्का माल तयार होतो असें उपमेने सांगतां येते.<br>{{gap}}थोडक्यांत कँटची ज्ञानमीमांसा वरील तऱ्हेची आहे. त्याने संवेदनावादी व विवेकवादी ह्या दोघां तत्वज्ञांची ज्ञानमीमांसा कशी एकतर्फी व म्हणून चुकीची आहे हे आपल्या नव्या परीक्षणात्मक तत्वज्ञानांत दाखविलें आहे. कँटच्या मताप्रमाणे मानवी ज्ञानाला खालील गोष्टी अवश्यक आहेत.<br>
{{gap}}६ संवेदना.<br>{{gap}}२ अवकाश व काल.<br>{{gap}}३ संख्या, परिमाण, भावरूपी व अभावरूपी गुण, कार्यकारणभाव, अन्योन्याश्रयभाव, पदार्थाचे अविनाशित्व व शक्याशक्यता वगैरे बारा स्वसंसिद्ध कल्पना.<br>{{gap}}४ सर्व ज्ञानाला एकसूत्रता आणणारी आत्म्याची जाणीव.{{nop}}<noinclude>{{center|१०५}}</noinclude>
gyi4g3u4iss6etdxk9m6h57qq5xfel5
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११२
104
110363
230557
230323
2026-06-01T05:08:27Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
230557
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>{{gap}}वर दिल्याप्रमाणे थोडक्यांत कँटची मानवी ज्ञानाची मीमांसा आहे. तिचा विशेष हा होय की, संवेदनावादी व विवेकवादी या दोन्ही पंथांच्या तत्त्वज्ञान्यांच्या मतांतील सत्याच्या अंशाचा अंतर्भाव कँटने आपल्या मीमांसेंत केला आहे. संवेदना व विवेक या दोन्हीहि शक्ति मानवी ज्ञानाला आवश्यक आहेत असे त्याने प्रतिपादन केले आहे. व या मीमांसेच्या योगाने त्याने आधिभौतिक शास्त्रांची शक्यता शाबीत केली आहे. आधिभौतिक शास्त्रे गणितशास्त्राप्रमाणे काही तत्वें स्वयंसिद्ध अशी धरतात व त्या तत्वांवरच सर्व आधिभौतिक शास्त्रे अवलंबून आहेत. पण ही तत्वे मानवी ज्ञानाला विवेकज्ञानमीमांसेंत अंतर्भूत झालेल्या कल्पनांच्या द्वारेंच होतात. उ० सर्व ज्ञेय पदार्थाना अवकाश, काल, संख्या व परिमाण हे गुण असतात व म्हणूनच सर्व बाह्य ज्ञेय पदार्थ हे सावयव असून ते विभागतां येतात. आतां आधिभौतिक शास्त्रांतले हे गृहीत तत्त्व ज्ञानाच्या अटीपासून निष्पन्न होते हे उघड आहे. तसेच सर्व बाह्य ज्ञेय पदार्थांना कमीअधिक होणारे सांश गुण आहेत हे तत्त्व सुद्धा ज्ञानाच्या अटीपासून निष्पन्न होते. त्याप्रमाणेच प्रत्येक ज्ञेय वस्तु ही काही तरी कारणाचे कार्य असते हे तत्व सुद्धां ज्ञानाच्या अटीपासूनच निष्पन्न होते. तसेच बाह्य सृष्टि ज्या जड द्रव्याने बनलेली आहे तें जड तत्व अविनाशी आहे, त्याची जगांत नवी वाढ होत नाही किंवा त्याचा जगांत नाशही कधी होत नाही हे तत्व ज्ञानाच्या अटींतून निष्पन्न होते. सारांश, कँटच्या मताने त्याची एकदां ज्ञानमीमांसा गृहीत केली की, आधिभौतिक शास्त्रांचे त्यायोगें समर्थन होतें व ह्यूमची मानवी ज्ञानाबद्दलची व विशेषतः आधिभौतिक शास्त्राच्या शक्यतेची कुशंका नष्ट होते. <br>{{gap}}येथपर्यंत गणितशास्त्र व आधिभौतिक शास्त्रे यांची शक्यता शाबीत करून ह्यूमची चूक कँटने दाखवून दिली. त्याच्या पुस्तकाच्या पुढल्या भागांत मात्र ह्यूमचें व कँटचे एकमत असून त्यांत त्याने विवेकवादी तत्वज्ञान्यांचे तत्वज्ञानाच्या अस्तित्वाबद्दलचे मत खोडून काढले आहे व अज्ञेयवाद स्थापित केला आहे. विवेकवादी तत्वज्ञान्यांच्या मताने आप-<noinclude>{{center|१०६}}</noinclude>
msgdk8jo4xfj6i07k1euv57e1gppahk
230559
230557
2026-06-01T05:09:45Z
सुबोध कुलकर्णी
1231
230559
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" /><u>'''तीन तत्त्वज्ञानी.'''</u></noinclude>{{gap}}वर दिल्याप्रमाणे थोडक्यांत कँटची मानवी ज्ञानाची मीमांसा आहे. तिचा विशेष हा होय की, संवेदनावादी व विवेकवादी या दोन्ही पंथांच्या तत्त्वज्ञान्यांच्या मतांतील सत्याच्या अंशाचा अंतर्भाव कँटने आपल्या मीमांसेंत केला आहे. संवेदना व विवेक या दोन्हीहि शक्ति मानवी ज्ञानाला आवश्यक आहेत असे त्याने प्रतिपादन केले आहे. व या मीमांसेच्या योगाने त्याने आधिभौतिक शास्त्रांची शक्यता शाबीत केली आहे. आधिभौतिक शास्त्रे गणितशास्त्राप्रमाणे काही तत्वें स्वयंसिद्ध अशी धरतात व त्या तत्वांवरच सर्व आधिभौतिक शास्त्रे अवलंबून आहेत. पण ही तत्वे मानवी ज्ञानाला विवेकज्ञानमीमांसेंत अंतर्भूत झालेल्या कल्पनांच्या द्वारेंच होतात. उ० सर्व ज्ञेय पदार्थाना अवकाश, काल, संख्या व परिमाण हे गुण असतात व म्हणूनच सर्व बाह्य ज्ञेय पदार्थ हे सावयव असून ते विभागतां येतात. आतां आधिभौतिक शास्त्रांतले हे गृहीत तत्त्व ज्ञानाच्या अटीपासून निष्पन्न होते हे उघड आहे. तसेच सर्व बाह्य ज्ञेय पदार्थांना कमीअधिक होणारे सांश गुण आहेत हे तत्त्व सुद्धा ज्ञानाच्या अटीपासून निष्पन्न होते. त्याप्रमाणेच प्रत्येक ज्ञेय वस्तु ही काही तरी कारणाचे कार्य असते हे तत्व सुद्धां ज्ञानाच्या अटीपासूनच निष्पन्न होते. तसेच बाह्य सृष्टि ज्या जड द्रव्याने बनलेली आहे तें जड तत्व अविनाशी आहे, त्याची जगांत नवी वाढ होत नाही किंवा त्याचा जगांत नाशही कधी होत नाही हे तत्व ज्ञानाच्या अटींतून निष्पन्न होते. सारांश, कँटच्या मताने त्याची एकदां ज्ञानमीमांसा गृहीत केली की, आधिभौतिक शास्त्रांचे त्यायोगें समर्थन होतें व ह्यूमची मानवी ज्ञानाबद्दलची व विशेषतः आधिभौतिक शास्त्राच्या शक्यतेची कुशंका नष्ट होते. <br>{{gap}}येथपर्यंत गणितशास्त्र व आधिभौतिक शास्त्रे यांची शक्यता शाबीत करून ह्यूमची चूक कँटने दाखवून दिली. त्याच्या पुस्तकाच्या पुढल्या भागांत मात्र ह्यूमचें व कँटचे एकमत असून त्यांत त्याने विवेकवादी तत्वज्ञान्यांचे तत्वज्ञानाच्या अस्तित्वाबद्दलचे मत खोडून काढले आहे व अज्ञेयवाद स्थापित केला आहे. विवेकवादी तत्वज्ञान्यांच्या मताने आप-<noinclude>{{center|१०६}}</noinclude>
c8vaoag8fzpj9pjrjroe8q5p3vj4l1u
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११३
104
110364
230558
230324
2026-06-01T05:09:19Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
230558
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>ल्याला तत्वज्ञान साध्य आहे. त्यांचे मताप्रमाणे तत्वज्ञानाचे प्रश्न तीन. आत्म्याचे अस्तित्व व अमरत्व या बद्दलचा पहिला प्रश्न, सृष्टीचे यथार्थ व केवल स्वरूप याबद्दलचा दुसरा प्रश्न व परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दलचा तिसरा प्रश्न. हे तिन्ही प्रश्न आपल्या केवल विवेकाने सोडवितां येतात, असें विवेकवादीपंथाचे मत होते. कँटने असे दाखवून दिले की, विवेकवादी यांच्या यासंबंधीच्या विवेचनांत घोडचुका आहेत व या वस्तूंचे ज्ञान मानवी मनाला होणे शक्य नाही व म्हणून मानवी बुद्धीच्या द्वारे तरी हे पदार्थ अज्ञेय आहेत.<br>{{gap}}प्रथमतः आत्म्याच्या अस्तित्वाचा प्रश्न घ्या. आत्म्याची कल्पना आपल्या ज्ञानाला आवश्यक आहे हे कँटला कबूल आहे सर्व ज्ञानांत 'ज्ञाता' व 'ज्ञेय' हा संबंध आवश्यक असतो व म्हणूनच आत्म्याची जाणीव हे एक ज्ञानाचे आवश्यक अंग आहे, अस कँटने प्रतिपादन केले आहे. पण हे ज्ञान होण्यास आपल्याला संवेदना आवश्यक आहेत. संवेदना येतील तेव्हांच मला संवेदना भासतात असे ज्ञान होईल, सारांश, आत्म्याच्या जाणिवेचे ज्ञान हे सापेक्ष आहे. ते संवेदनांशी संलग्न आहे. म्हणजे विषय व विषयी किंवा ज्ञेय व ज्ञाता, किंवा बाह्य पदार्थ व आत्मा या दुकल सापेक्ष आहेत; त्या दोन्ही वस्तूंचे एकसमयावच्छेदेंकरून ज्ञान होते. अर्थात् दोन्हीही कल्पना आपल्या ज्ञानांत अंतर्भूत आहेत असे ज्ञानाच्या पृथक्करणावरून आपल्याला कळते. पण या आत्म्याचे मूळ स्वरूप काय; त्याचे गुण कोणते, तो अमर आहे काय, तो शरीराखेरीज बाहेर राहू शकतो काय? वगैरे प्रश्नांचे उत्तर मिळणें शक्य नाही. कारण हे अतींद्रिय ज्ञानाचे प्रश्न झाले व असें अतींद्रियज्ञान आपल्याला होणे शक्य नाही. कारण ज्ञान मीमांसेवरूनच कळते की संवेदना किंवा इंद्रियद्वारा अनुभव हा आपल्या ज्ञानाला आवश्यक आहे. अर्थात् आपल्या मानवी बुद्धीला अतींद्रियज्ञान शक्य नाही. कारण ती बुद्धि इंद्रियसंवेदनांनी मर्यादित आहे. ती स्वतंत्र शक्ति नाही, ती ज्ञान उत्पन्न करूं शकत नाही, तर संवेदना अनुभवल्यावर बुद्धि त्यावर संस्कार करूं शकते इतकेंच. पण मानवी ज्ञानाचा पाया<noinclude>{{center|१०७}}</noinclude>
llnjl4kkm77gdp5vtuxnhzo470sx1px
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११४
104
110365
230560
230325
2026-06-01T05:10:37Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
230560
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" /><u>'''तीन तत्त्वज्ञानी.'''</u></noinclude>संवेदना होय. व ह्यूमनें म्हटल्याप्रमाणे आत्म्याची आपल्याला संवेदना होत नाही. म्हणून तत्वज्ञानाचा हा भाग म्हणजे निवळ एक मानवी बुद्धीची घोडचूक होय. आपल्याला आत्मज्ञान नाही, म्हणून आत्म्याचें अमरत्व किंवा जडराहित्य किंवा अणुत्व वगैरे प्रश्न मानवी ज्ञानाच्या आटोक्याबाहेरचे आहेत.<br>{{gap}}बाह्य सृष्टीचे जे आपल्याला ज्ञान होतें तेंहि अर्थात् संवेदनात्मक असते म्हणून आपल्याला बाह्य सृष्टीचे केवल स्वरूप कळणे शक्य नाही. विवेकवादीपंथाने असें ज्ञान होते असे प्रतिपादन केले आहे खरे, पण संवेदनावादीपंथाने त्यांचे म्हणणे खोडून काढले आहे. कँटचे म्हणणे असे की, या परस्परविरोधी विधानांवरून हेहि ज्ञान मानवी बुद्धीच्या आटोक्याबाहेरचे आहे असे दिसून येते. उदाहरणार्थ बाह्य सृष्टि ही मर्यादित आहे किंवा अमर्यादित आहे ह्यासंबंधी वाद आहे. दोन्ही विधाने प्रमाणाने सिद्ध करतां येतात. परंतु कँटचे मते आपल्याला बाह्य सृष्टीचें निश्चित ज्ञान होणे शक्य नाही. कारण अवकाश ही जर सृष्टिज्ञानाची एक आवश्यक अट आहे तर आपल्याला बाह्य सृष्टीची मर्यादा संपली किंवा ती मर्यादा कधीहि संपणार नाही असे म्हणता येत नाही. या दोन्ही स्थिति अतींद्रिय आहेत व आपल्या बुद्धीला अतींद्रियज्ञान होऊ शकत नाही. तसेंच बाह्य सृष्टि विभाज्य आहे किंवा अविभाज्य आहे, म्हणजे तिचे परमाणू आहेत किंवा नाहीत हे निश्चयाने सांगता येत नाही. कारण ही स्थिति अतींद्रिय आहे. असो.<br>{{gap}}आतां परमेश्वराची कल्पनाही अतीन्द्रिय आहे. म्हणूनच तो मानवी बुद्धीला अज्ञेय आहे. कारण परमेश्वर म्हणजे सर्वगुणसंपन्न व कारणरहित सृष्टीचे कारण होय. पण गुण हे आपल्याला संवेदनांनी कळतात तेव्हां सर्वगुणसंपन्नता कळणे शक्य नाही. कारण ती अतीन्द्रिय आहे. तसेच आपल्या बुद्धीला कारणरहित कारण कळणे शक्य नाही. कारण आपल्या बुद्धीला जें जें कळते त्याला त्याला कार्यकारणभाव लागू<noinclude>{{center|१०८}}</noinclude>
km40yll1qyhqaof07fer82orxw8e171
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११५
104
110366
230561
230326
2026-06-01T05:11:17Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
230561
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>आहे. तेव्हां 'कारणरहित कारण' ही कल्पनाच मुळी बुद्धिदृष्टया विसंगत आहे. तेव्हां असा पदार्थ आपल्याला कळणारच नाही.<br>{{gap}}परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल विवेकवादी जी प्रमाणे पुढे आणतात तीही सदोष आहेत असें कँटने दाखविले आहे.<br>{{gap}}परमेश्वर पूर्ण किंवा सर्वगुणसंपन्न आहे. तेव्हां तो अस्तित्वात असलाच पाहिजे. कारण जर त्याला अस्तित्व हा गुण नसेल तर तो सर्वगुणसंपन्न होणार नाही. ईश्वराच्या अस्तित्वाचे हे प्रमाण सदोष आहे. कारण येथे आपण कल्पनेवरून अस्तित्वाकडे जातो. 'पूर्ण पदार्थाची' कल्पना आपल्या अपूर्ण पदार्थाच्या कल्पनेवरून सुचते खरी; पण कल्पना म्हणजे खरी सृष्टि नव्हे. कल्पना जर खरी सृष्टि असती तर कविकल्पना किंवा स्वप्नकल्पना खऱ्या मानाव्या लागतील. मानवी बुद्धि खऱ्या खोट्याचा निर्णय संवेदनावरून करते व परमेश्वराची कल्पना तशी संवेद्य नाही. तेव्हां तिचे अस्तित्व सिद्ध करणे अशक्य आहे.<br>{{gap}}परमेश्वराच्या अस्तित्वाच्या दुसऱ्या प्रमाणांचे विवेकवाद्यांनी असें विवेचन केले आहे. बाह्य जग व मानवी मन अस्तित्त्वांत आहेत यांना काही तरी कारण असलेच पाहिजे व ते कारण परमेश्वर होय. पण कँटचे मते हे प्रमाणही सदोष आहे. यांत जे तत्व आधिभौतिक शास्त्राला व ज्ञेय पदार्थांना लागू आहे ते तत्व अतीन्द्रिय पदार्थाला लागू केले आहे. म्हणूनच सृष्टीचे कारण परमेश्वर तर परमेश्वराचे कारण काय असा जडवादी रोखठोक जबाब विवेकवाद्यांना विचारतात व मग विवकवादी निरुत्तर होतात. कारण विवेकवादी व जडवादी यांमध्ये फारसा फरक राहत नाही. जडवादी 'जडा' शी थांबतात तर विवेकवादी एक पायरी पुढे जातात येवढेच. पण त्या पायरीच्या पुढे काय हा प्रश्न राहतोच. म्हणूनच कँटचे म्हणणे बुद्धीने हा प्रश्न सुटण्यासारखाच नाही.<br>{{gap}}परमेश्वराच्या अस्तित्वाचे तिसरे प्रमाण म्हणजे सृष्टीच्या रचना चातुर्याचे प्रसिद्ध प्रमाण होय. या प्रमाणाबद्दल कँटला नेहेमी आदर वाटत असे; पण बुद्धिदृष्टया या प्रमाणावरून परमेश्वर 'सृष्टीचा विश्वकर्मा'<noinclude>{{center|१०९}}</noinclude>
dhn32ik7i30h0sfshf2byoy19xog0su
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१
104
110517
230562
2026-06-01T10:46:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230562
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><center>
<br><br>
{{xx-larger|'''प्रि. भाटे यांची प्रवासवृत्तमाला'''<br>'''पुष्प ६ वें'''<br>}}
{{xxxx-larger|'''काशी - रामेश्वर यात्रा'''}}
{{rule|11em}}<br>
लेखक व प्रकाशक :<br>{{x-larger|'''गोविंद चिमणाजी भाटे'''}}<br>
पुणे डे. ए. सोसायटीचे सेवानिवृत्त आजीव सभासद
<br><br>
{{rule|5em}}
<br><br>
( सर्व हक्क स्वाधीन ठेविले आहेत )
{{rule|5em}}<br>
'''किंमत १॥ रुपाया'''{{nop}}
</center><noinclude></noinclude>
amij5m4bsphx77gtc9xqr8lngh7ongp
230563
230562
2026-06-01T10:46:48Z
कल्पनाशक्ती
3813
230563
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><center>
<br><br>
{{x-larger|'''प्रि. भाटे यांची प्रवासवृत्तमाला'''<br>'''पुष्प ६ वें'''<br>}}
{{xxxx-larger|'''काशी - रामेश्वर यात्रा'''}}
{{rule|11em}}<br>
लेखक व प्रकाशक :<br>{{x-larger|'''गोविंद चिमणाजी भाटे'''}}<br>
पुणे डे. ए. सोसायटीचे सेवानिवृत्त आजीव सभासद
<br><br>
{{rule|5em}}
<br><br>
( सर्व हक्क स्वाधीन ठेविले आहेत )
{{rule|5em}}<br>
'''किंमत १॥ रुपाया'''{{nop}}
</center><noinclude></noinclude>
sealocnvhw38q01s42m1ytkuu9z3kjr
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२
104
110518
230564
2026-06-01T10:53:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230564
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br>
{{rh|{{center|मुद्रक :<br>'''रा. रा. अनंत विनायक पटवर्धन, बी. ए.,'''<Br>आर्यभूषण प्रेस, भांबुर्डा पेठ, घर नं. ९३६/३<br>पुणे, नं. ४<br>■{{gap}}■{{gap}}■{{gap}}■}}||}}
<br><br><br><br><br><br><br><br><br>
{{rh|||{{center|प्रकाशक :<br>'''गोविंद चिमणाजी भाटे,'''<br>महाड, जिल्हा कुलाबा.}}}}
{{nop}}<noinclude></noinclude>
5u66nx5p1h2h7ut9o8ifakmitqtvn7w
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/३
104
110519
230565
2026-06-01T10:55:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230565
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Css image crop
|Image = काशी-रामेश्वर_यात्रा.pdf
|Page = 3
|bSize = 518
|cWidth = 404
|cHeight = 449
|oTop = 56
|oLeft = 48
|Location = center
|Description =
}}
{{center|'''विनायक कृष्ण सखदेव'''<br>काँट्रॅक्टर व कारखानदार, मिरज.}}<noinclude></noinclude>
a17tv20e5vjsvwevap5piur8213c0f0
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/४
104
110520
230566
2026-06-01T11:04:47Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230566
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|{{xx-larger|'''श्रीयुत विनायक कृष्ण सखदेव,'''}}}}<br>
{{center|काँट्रॅक्टर व लाकडाचे कारखानदार, मिरज<br><br>यांस<br><br>
{{x-larger|त्यांच्या अंगच्या कामाची धडाडी, प्रसंगी<br>धैर्य व नानाविध कार्यांतील योजकता<br>या त्रिगुणांबद्दल त्यांचें कौतुक<br>करणाऱ्या लेखकानें बारा<br>वर्षांच्या स्नेहाची खूण<br>म्हणून "काशी - रामेश्वर<br>यात्रा" हे पुस्तक<br>सप्रेम अर्पण<br>
{{x-larger|केलें आहे.}}}}}}
{{right|{{xx-larger|'''गो. चि. भाटे.'''}}}}<noinclude></noinclude>
7w807nc8f6b4q8kasqfi3ahd56hegsl
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/५
104
110521
230567
2026-06-01T11:07:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ प्रस्तावना. माझ्या प्रवास - वृत्त मालेच्या संकल्पक्रमानुसार सहावे पण लिहिण्याच्या व छापण्याच्या क्रमाने शेवटचें पुष्प याची प्रस्तावना लिहितांना माझ्या मनाला मनस्वी स..."
230567
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
प्रस्तावना.
माझ्या प्रवास - वृत्त मालेच्या संकल्पक्रमानुसार सहावे पण लिहिण्याच्या व छापण्याच्या क्रमाने शेवटचें पुष्प याची प्रस्तावना लिहितांना माझ्या मनाला मनस्वी समाधान होत आहे. तीन वर्षाखाली मी डे. ए. सोसायटींतून सेवानिवृत्त झालों. तेव्हां मला जास्त स्वास्थ्य व सवड मिळाली. त्यामुळे लवकरच मला लंकेचा प्रवास करण्याचा सुयोग आला. तेव्हांपासून माझ्या सर्व प्रवासवृत्तांची एक संकलित सचित्र व एकसाची आवृत्ति काढावी असा अंधुक विचार माझ्या मनांत घोळत होता. लंकेच्या प्रवासाहून परत आल्यावर त्या प्रवासार्थे वृत्त छापण्याच्या निमित्तानें दोन वर्षाखाली मी आपल्या प्रवास वृत्तांची दृशपुष्प माला छापण्याची योजना मुकर केली व तदनुरूप एक योजनापत्रक म प्रसिद्ध केलें. ही योजना म्हणजे एक मोठें वाङ्मयसाहस होय याची मला पूर्ण जाणीव होती. कारण या साहसामध्ये दहा पुष्पांच्या मुद्रणती ( Press copies ) तयार करणे, प्रुर्के तपासून छपाईचीं भुतें ( Printer's devils ) काढून टाकर्णे व पैशाचा पुरवठा करणें इतक्या मानसिक व आर्थिक जबाबदान्या मी आपल्या अंगावर घेत होतो. माझ्या सेवानिवृत्तीमुळे व माझ्या चाळीस वर्षांच्या मानसिक व्यक- सायांतून मोकळीक मिळाल्यामुळे मानसिक जबाबदारी पार पाडण्यास मो समर्थ होईन असा मला भरंवसा होता. तसेंच मराठी वाङ्मयाच्या वाहत्या वाचकवर्गाच्या सक्रिय सहानुभूतीनें व मराठी वाङ्मयाची अभिवृद्धि व्हावी असें वाटणान्या आश्रयदात्यांच्या सढळ हाताच्या मदतीने आर्थिक जबाबदारीतून मी पार पडेन अशी मला आशा होती.
योजनेच्या वेळी केलेल्या कामाच्या मोठेपणाच्या कल्पनेचें प्रत्यंतर आतां काम पुरे झाल्यावर मोजमापी माहिती ( statistical information देऊन पटवितां येत आहे. दशपुष्प प्रवास वृत्त मालेची दोन हजारावर पाने गेली आहेत, त्यांतील चित्रें सवातीनशेच्यावर आहेत व सर्व मालेचा खर्च सात हजार रुपयांच्यावर झाला आहे !<noinclude></noinclude>
esiucenrwvhb7j4uz5jn21b69efkaqc