विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.4
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३९९
104
73448
230592
164410
2026-06-02T03:16:45Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230592
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||३७४}}</noinclude><br>'''ब्राह्मण्य'''<br>{{gap}}पण ब्राह्मण तरुणांना आवाहन करताना, त्यांचा त्यांच्या ब्राह्मणत्वावर भर नसून तो त्यांच्या ब्राह्मण्यावर होता. भक्ती-वैराग्य, ज्ञान, स्वाध्याय, तपश्चर्या, शुचिता, शांती या गुणांना समर्थ ब्राह्मण्य म्हणतात. (टाकळीला लिहिलेले पत्र, डॉ. पेंडसे, राजगुरू समर्थ रामदास, पृ. २९८) दासबोधात त्यांनी हाच भावार्थ सांगितला आहे. 'करिती ब्राह्मण्य निरुपण । जाणती ब्रहा संपूर्ण । तेचि जाणावे ब्राह्मण । ब्रह्मविद ॥' (६-४-२४) त्यांच्या काळच्या ब्राह्मणांच्या ठायी हे ब्राह्मण्य नव्हते, म्हणून समर्थांनी त्यांच्यावर कडक टीका केली आहे. ते म्हणतात, 'सध्याचे ब्राह्मण बुद्धीपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले । गुरुत्व सांडून जाले । शिष्य शिष्यांचे ॥' त्या ब्राह्मणांचा इतका अधःपात झाला होता की त्यांपैकी कित्येक आपल्या देवता टाकून मुसलमानाच्या देवतांना भजू लागले होते. 'कित्येक दावल मलकास जाती । कित्येक पीरासचि भजती । कित्येक तुरुक होती । आपल्या इच्छेने ॥' आणि असे असून त्यांना आपण श्रेष्ठ असा अभिमान मात्र मोठा होता. अशा ब्राह्मणांना समर्थांनी मूर्ख म्हटले आहे, याहीपुढे जाऊन मागच्या अनेक पिढ्यांचे ब्राह्मण भ्रष्ट होते अशीही टीका समर्थांनी केली आहे. ते दुःखाने म्हणतात, आम्ही त्याच जातीचे ब्राह्मण आहो- 'आम्हीही तेच ब्राह्मण । दुःखे बोलीले हे वचन । वडिल गेले ग्रामणी करून । आम्हा भोवते ॥' पण या पूर्वज ब्राह्मणांना बोलावे तरी कसे ? ब्राह्मणांचे नशीब असे, म्हणून गप्प बसावे हेच खरे (दास. १४-८).<br>{{gap}}असे म्हणून, पुढच्याच समासात ते म्हणतात, हे झाले ते होऊन गेले, पण आता तरी ब्राह्मणांनी शहाणपणाचा मार्ग धरावा. तो मार्ग कोणता ? तर प्राणिमात्राच्या ठायी जो परमेश्वर आहे त्याची भक्ती, त्याची पूजा करावी. 'देव वर्ततो जगदंतरी । तोचि आपुले अंतरी । त्रैलोकीचे प्राणिमात्री । बरे पहा ॥' असे सांगून येथे पुन्हा ब्राह्मण्याची लक्षणे समर्थांनी सांगितली आहेत.<br><br>'''आगंतुक गुण'''<br>{{gap}}वर्ण व जाती समर्थ मानीत असले तरी, प्रयत्नाने अंगी गुणसंपदा आणता येते, अशी त्यांची श्रद्धा होती. आणि गुणसंपदेने जो श्रेष्ठ कार्य करील तो श्रेष्ठ, हीन कार्य करील तो हीन, असे त्यांनी म्हटले आहे. काळा मनुष्य गोरा होऊ शकत नाही, मुका बोलू शकत नाही, कुरूप पालटता येत नाही; पण 'उत्तम गुण अभ्यासता येती, शहाणपण सिकता येते, कारभार करिता उमजते, सर्व काही.' असा अनुभव नित्य येत असताना, तुम्ही स्वहित का करीत नाही ? अंतर्कळा का शृंगारीत नाही ? कष्ट करून, प्रयत्न करून संपदा मिळवा आणि मग सावकाश तिचा उपभोग घ्या. प्रयत्नांनी मिळविलेल्या या गुणांनाच समर्थ 'आगंतुक' गुण म्हणतात. यांनाच ते चातुर्य<noinclude></noinclude>
stlpmfcw1c7l02f7wjhs4n4uaibaedj
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४००
104
73449
230593
164411
2026-06-02T03:17:01Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230593
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|३७५|| स्वराज्य आणि स्वधर्म}}</noinclude>म्हणतात. आणि ' चातुर्येवीण उंच पदवी कदापि नाही' असे बजावतात. (दास. १४.६) 'श्रेष्ठ कार्य करी तो श्रेष्ठ । कृत्रिम करी तो कनिष्ठ । कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले.' (दास. १५.१) असा त्यांचा सिद्धांत होता.<br><br>'''राजकारणात बहुतजन'''<br>{{gap}}वारकरी संतांप्रमाणेच परमार्थात, भक्तिमार्गात भेदाभेद मानणे अयुक्त होय. असेच समर्थांचे प्रतिपादन होते. 'ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे । शूद्राचे ब्रह्म ते वोवळे । ऐसे वेगळे आगळे! येथे असेचिना ॥' या मार्गात - 'उंचनीच नाही परी । राया रंका एकचि सरी । जाला पुरुष अथवा नारी । एकचि पद ॥ उंच ब्रह्म ते रायासी नीच ब्रह्म ते परिवारासी । ऐसा भेद तयापासी । मुळीच नाही ॥' (दास. ७-२) वर्ण- व्यवस्था, जातिव्यवस्था यांवर समर्थांची श्रद्धा असली तरी, भक्तिमार्गात त्यांचा विचार येता कामा नये, हे इतर संतांच्याप्रमाणे रामदासांनी सांगितलेच. पण आणखी पुढे जाऊन, राजकारणातही हा भेदाभेद नाही, असा सिद्धांत त्यांनी केला. म्हणून 'एक विचारे भरावे सर्व लोक', 'लोक राजी राखावे', 'जनी जनार्दन पहावा', 'कट्ट घालूनि राजकारणा लोक लावी', 'जग तिकडे जगन्नायक', 'राखावी बहुतांची अंतरे' असा घोष त्यांनी चालविला होता. त्यांना जो समुदाव करावयाचा होता, त्यात सर्वांना प्रवेश होता. 'शहाणे करावे बहुत जन' हे याच अर्थाने त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रधर्माचे वैशिष्ट्य ते हेच. 'यारे यारे भलते जन' अशी हाक त्याने ऐहिक ऐश्वर्याच्या मार्गातही, राजकारणातही दिली. कारण समर्थांना राज्य हवे होते ते व्यक्तीचे नसून महाराष्ट्राचे - महाराष्ट्र राज्य हवे होते. हाच राष्ट्रधर्म होय, मूलगामी क्रांती ती हीच. प्रत्येक व्यक्तीला, सामान्यातल्या सामान्य जनालाही चेतना देणे हेच राष्ट्रसंघटनेचे आद्य तत्त्व होय. 'बहुजनास मानला, बहुजनात शोभला', 'सर्वोसि राखणे राजी', 'सर्वत्र वोढती तेथे', 'सर्वासि नीववू जाणे, धन्य तो जाणता गुणी, जनाचे मन हे राखी, युक्तीने काम चालवी'- या वचनांतून समर्थांच्या मनातला हा भावार्थ स्पष्ट होतो. हा भावार्थ मनात असल्यामुळे, म्हणजे राष्ट्रसंघटनेची ही नवी विद्या सर्व जनतेत पेरावयाची असल्यामुळेच, परंपरेने विद्येची उपासना करणारे जे ब्राह्मण त्यांना समर्थांनी या कार्यासाठी आवाहन केले. 'ब्राह्मणी करावा स्वधर्म' असे म्हणताना ब्राह्मणांचा हा स्वधर्म त्यांना अभिप्रेत होता.<br><br>'''सेवकधर्म'''<br>{{gap}}महाराष्ट्र राज्य अथवा स्वराज्य व्हावयाचे तर समर्थांच्या मते राजांनी राजधर्म, क्षत्रियांनी क्षात्रधर्म, ब्राह्मणांनी ब्राह्मणधर्म आचरणे जितके आवश्यक तितकेच सेवकांनी सेवकधर्म आचरणे हेही आवश्यक होते. म्हणून त्यांनी 'सेवकधर्म' असे दोन<noinclude></noinclude>
ox7r3xtfgr00498zdp8sv9n39owuzz5
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०१
104
73450
230594
164412
2026-06-02T03:17:54Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230594
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||३७६}}</noinclude>समासी प्रकरण लिहून सेवकधर्माचे स्वरूप स्पष्ट केले आहे.<br>{{gap}}हा सेवक वर्ग म्हणजे पुन्हा बहुजन समाज आला. पाटील, चौगुला, कुळकर्णी, चिटणीस, फडणीस, खजिनदार, सामलेदार, सर्व प्रकारचे कारकून, पहारेकरी, टेहळे, हेजीब, कमाविसदार, तालुकदार, महालकरी, देशमुख, देशपांडे, सबनीस, कारखाननीसदार, हवालदार, जुमलेदार, सुभेदार, नालबंद, भिस्ती, बारगीर, शिलेदार, भोई, रामोशी, चौकीदार, नाकेदार, खलाशी, नावाडी, सुतार, लोहार, पाथरवट, गवंडी असा हा सेवक वर्ग बहुजनातूनच येतो, पण त्याच्यावर त्याच्या विशिष्ट कामाची जबाबदारी असल्यामुळे व राज्यकारभारात तो प्रत्यक्ष सहभागी असल्यामुळे त्याला त्याचा स्वधर्म समर्थांनी समजावून दिला आहे.<br><br>'''आज्ञापालन'''<br>{{gap}}हा सेवक प्रथमतः अतिशय आज्ञाधारक, नम्र, दक्ष आणि प्रामाणिक असला पाहिजे. 'पुढे पुढे निघू नये । आज्ञावेगळे वर्तू नये । न मनिता अपाय । नेमस्त आहे ॥' 'स्वामींनी जे जे बोलावे । तेचि सेवकी प्रतिष्ठावे ॥', 'समर्थांचे मनोगत । तैसेचि वर्तणे उचित । तेथे चुकता आघात । नेमस्त आहे ॥' अनेक सेवक फार गर्विष्ठ असतात. स्वामींना काय कळते, असे त्यांना वाटते. 'आम्हांप्रमाणे काय जाणे । प्रभू होय, परी काही नेणे । आम्हांवेगळे कोण शहाणे । आहे येथे !' असा तोरा ते मिरवतात. आणि प्रसंगी स्वामींनाच बुद्धी शिकवू लागतात. अशा सेवकांचा समर्थांनी कडक शब्दात निषेध केला आहे.<br><br>'''काही न मागे'''<br>{{gap}}काही सेवक स्वार्थी, लाचखाऊ असतात. त्यामुळे कामाचा नाश होतो. 'आपस्वार्थ उदंड करणे । आणि स्वामिकार्य बुडविणे । ऐसी नव्हेत की लक्षणे । सेवकाची ॥' थोडी बहुत लालूच करणे । आणि महत्कृत्य बुडविणे । महत्त्व जाता लाजिरवाणे । जनांमध्ये ॥' असे सेवक राज्याचा घात करतात. 'कार्य करिता काही न मागे । तयाची चिंता प्रभूसि लागे । ऐसे जाणूनि विवेक जागे । म्हणजे बरे ॥' अशा वृत्तीचा सेवक असला पाहिजे. असा सेवकच मोठा कार्यकर्ता होऊ शकतो. सेवक तोचि अडेना- तो कोठे अडत नाही. स्वतःची बुद्धी चालवून 'काम चुकले हे घडेना, कदा काळी ॥' अशी काळजी घेतो. 'धूर्तपणे अंतरसाक्षी । नानाप्रकारे परीक्षी । दूरी गेला तरी लक्षी । सर्व काही ॥' सेवकांमुळेच राज्यकारभार उत्तम चालतो.<br><br>'''स्वामिनिष्ठा'''<br>{{gap}}सेवकाचा सर्वात महत्त्वाचा स्वधर्म म्हणजे स्वामिनिष्ठा. आणि सर्वात मोठा दुर्गुण, सर्वात मोठे पाप म्हणजे फितुरी. समर्थ म्हणतात, सेवक विश्वास दाविती, वैरियाकडे<noinclude></noinclude>
ktjwfni85xcps70h2c5gspssyus0sif
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०२
104
73451
230595
164418
2026-06-02T03:18:27Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230595
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|३७७|| स्वराज्य आणि स्वधर्म}}</noinclude>मिळोनी जाती, त्या चांडाळासि गती, कोठेचि नाही ॥ त्या काळात सर्वत्र मुस्लिम सत्ता होती. आणि लोकांत राष्ट्रभावना नव्हती. त्यामुळे फितुरी करण्यात काही पाप आहे, असे त्यांना वाटतच नसे. एक स्वामी सोडून दुसऱ्या स्वामीकडे जाणे इतकाच अर्थ ते मानीत. पण हा राष्ट्रद्रोह आहे, मुस्लिम हे शत्रु आहेत, हे समर्थांना लोकांना शिकवावयाचे होते. 'अमर्याद फितवेखोर,' 'फितव्याने बुडती राज्ये', 'बुडाले भेदवाही ते,'- असा फितुरांचा उल्लेख समर्थ वारंवार करतात. सर्वच वर्गात असे फितवे त्या काळी होते. तसेच सेवकांतही. समर्थ म्हणतात, 'हे सेवक कठिण, वेळेसि मिळोनी जाती शत्रुकडे ॥'<br>{{gap}}राष्ट्रसंघटना याचा अर्थ मागे सांगितला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला राष्ट्राच्या उत्कर्षापकर्षास आपण जगाबदार आहोत अशी भावना असणे हा या संघटनेचा पाया आहे. म्हणूनच समर्थांनी राजा, सरदार, ब्राह्मण यांच्याप्रमाणेच राज्यातील सेवकांनाही स्वधर्माचा उपदेश केला आहे. कारण महाराष्ट्रराज्य व्हावे ही त्यांची आकांक्षा होती.<br><br>'''संघभावना'''<br>{{gap}}मुस्लिम सुलतानांची सत्ता, त्यांची राज्ये ही सुलतानी राज्ये, राजांची राज्ये होती. ती लोकांची नव्हती हे खरे. पण मुस्लिम समाजात संघभाव जास्त होता. आपल्या बादशहाची सत्ता ही इस्लामची सत्ता आहे. सर्व काफरांना इस्लामची दीक्षा देणे हे तिचे उद्दिष्ट आहे. त्याला साह्य करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे आद्य कर्तव्य आहे, अशी भावना प्रत्येक मुस्लिमात असते. त्या वेळी होती व आजही आहे. शिवाय ऐहिक ऐश्वर्य, सत्ता, धन, स्त्री यांचा आपल्या राज्यामुळे आपल्याला लाभ होतो, हेही मुस्लिमांना दिसत होते. त्यामुळे बादशाही सत्तेच्या मागे ते उभे असत. तशी स्थिती हिंदूंची नव्हती. वर्णव्यवस्थेमुळे, जातिव्यवस्थेमुळे क्षत्रियेतर लोकांना राज्यकारभाराशी आपला काही संबंध आहे, असे वाटतच नसे. त्यांच्या स्वधर्मात ते बसतच नसे. वर्णव्यवस्थेचे तत्त्वज्ञानच तसे होते. त्यात संत आणि आचार्य यांच्या निवृत्तिवादाची भर पडली. त्यामुळे स्वराज्याविषयी सर्व समाज उदासीन झाला आणि संघभाव जास्त दृढपणे जोपासणाऱ्या मुस्लिम आक्रमणाला बळी पडला. या समाजाला धर्म प्रिय होता. पण त्याचा स्वराज्याशी काही संबंध आहे अशी कल्पनाच त्याला नव्हती. हिंदुसमाजाच हा घातकी दोष जाणूनच त्याला राष्ट्रधर्माची दीक्षा द्यावयाची, स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद आहे हे तत्व त्याला शिकवावयाचे आणि ऐहिक ऐश्वर्याची आकांक्षा जागृत करून आपल्या राज्याचा मागे उभे राहण्याची प्रेरणा द्यावयाची, हे समर्थांनी ठरविले आणि नवे नेतृत्व निर्माण करून या कामी, राजकारणाच्या कामी, सर्व लोकांना वोढोनि आणिले. संतांनी परलोकाची, परमार्थाची, मोक्षाची द्वारे खुली करून सर्व मराठेजनांना ज्याप्रमाणे धर्माच्या कक्षेत वोढोनि आणिले, त्याप्रमाणे समर्थांनी<noinclude></noinclude>
17n0agtfe06709iwtiron07znaz6l7a
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०३
104
73452
230596
164419
2026-06-02T03:18:59Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230596
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||३७८}}</noinclude>राजकारणात, राष्ट्रकार्यात म्हणजेच राजकार्यात सर्वांना वोढोनि आणिले. यामुळेच महाराष्ट्रात समाजाचे सर्व थर जागे होऊन स्वराज्याभिमुख झाले. आणि त्यामुळे मराठ्यांच्या ठायी एक अद्भुत शक्ती निर्माण होऊन अखिल भारत यावनी आक्रमणापासून मुक्त करण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले.<br><br>'''शेकडो रामदास !'''<br>{{gap}}समर्थांच्या कार्याच्या महत्त्वाबद्दल सध्या खूप वाद चालू आहेत. शिवछत्रपतींना हाताशी धरून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असे समर्थांच्या अंध भक्तांनी लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे प्रामुख्याने हा वाद माजलेला आहे. समर्थांच्या या भक्तांना शिवछत्रपतींच्याच नव्हे, तर समर्थांच्याही कार्याचे आकलन करण्याची पात्रता नव्हती. 'या परमार्थिकांनी समर्थांचा पराभव केला,' असे प्रा. माटे यांनी लिहिले आहे, ते याच अर्थाने. लोकजागृती, लोकसंघटना, राष्ट्रधर्माचा प्रसार हे समर्थांचे जे कार्य त्याचे त्यांना आकलन झाले असते तर शिवछत्रपती हे काय तेज आहे, हा केवढा स्वयंप्रभ महापुरुष आहे, ते ईश्वराचे कसे देणे आहे, हे त्यांना कळले असते, आणि मग समर्थांना कर्ते वारस लाभून युरोपप्रमाणेच भारतात, सर्व प्रदेशांत राष्ट्रधर्माचा प्रसार झाला असता. मराठ्यांच्या यशापयशाची मीमांसा करताना, मराठा साम्राज्यात शेकडो रामदास व्हावयास हवे होते, असे राजवाडे यांनी म्हटले आहे, त्याचा भावार्थ हाच आहे. पण दुर्दैव असे की समर्थांना शेकडो काय, एकही तशा योग्यतेचा खरा वारस लाभला नाही आणि त्यामुळे राष्ट्रधर्माची तत्त्वे महाराष्ट्रात सुद्धा दृढमूल झाली नाहीत. समर्थ या भूमीत अवतरले हेच भाग्य, असे तो इतिहास पाहताना म्हणण्याची पाळी येते.<br><br>'''प्रथम भेट'''<br>{{gap}}शिवछत्रपती आणि समर्थ यांची प्रथम भेट केव्हा झाली, हाही एक वादविषय आहे. १६४९ च्या सुमारास भेट झाली असे मान्य केले तर स्वराज्याची प्रेरणा छत्रपतींना त्यांनी दिली, ते त्यांचे प्रारंभापासूनच राजकीय गुरू होते, हा पक्ष बलवत्तर होतो. म्हणून त्यांची १६७२ पर्यंत भेटच झाली नव्हती असा पक्ष मांडण्यात येतो. पण प्रा. माटे, डॉ. पेंडसे यांनी प्रतिपादिल्याप्रमाणे या दोन विभूती स्वयंप्रभ होत्या, हे मान्य केल्यानंतर, वादातला दंशच नाहीसा होतो. आणि हे प्रतिपादन आता सर्वमान्य झालेले आहे. तेव्हा या वादाचा निकाल केवळ कागदोपत्रीचा पुरावा पाहून करणे हे आता शक्य आहे. पण मला या बाबतीत अगदी निराळा विचार मांडावा असे वाटते. शिवछत्रपती अत्यंत जागरूक, अत्यंत सावध होते. महाराष्ट्रातच काय, पण दिल्लीपर्यंत कोठे काय चालले आहे, याची खडान् खडा वार्ता नित्य आणविण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. अशा परिस्थितीत महाराष्ट्रभर मठस्थापना, मंदिरस्थापना<noinclude></noinclude>
nmgdilswpm5l6mwtjq731rjigkab1al
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०४
104
73453
230597
164420
2026-06-02T03:19:24Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230597
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|३७९|| स्वराज्य आणि स्वधर्म}}</noinclude>करून समर्थांनी जी चळवळ चालविली होती तिचा त्यांना पत्ता नसेल, आणि पत्ता असूनही आपल्या उद्दिष्टांना इतकी साह्यभूत होणारी चळवळ करणाऱ्या पुरुषाशी प्रारंभापासून त्यांनी संपर्क साधला नसेल, असे समजणे हे अत्यंत हास्यास्पद आहे. सिद्धेश्वर भट ब्रह्मे यांसारख्या केवळ पारमार्थिक अधिकारी असलेल्या सत्पुरुषाचा छत्रपती परामर्श घेतात आणि 'स्वामींच्या अनुष्ठानबळे राज्याधिकारी झालो' असे त्यांना नम्रपणे लिहितात (पत्र ता. १७– ७- १६५३). मग इह आणि पर या दोन्ही क्षेत्रांत ज्यांचा अधिकार त्यांना स्पष्ट दिसत होता त्या समर्थांची भेट त्यांनी प्रारंभीच्या काळात घेतली नसेल ही कल्पना टिकणे कसे शक्य आहे ? असो. पण हा विचार गौण वाटतो. शिवछत्रपतींच्या हातून स्वराज्य स्थापना करणे हे रामदासस्वामींचे कार्य नव्हतेच. त्यांनी महाराष्ट्रात लोकसंघटना केली व लोकांत राष्ट्रधर्माचा प्रसार करून लोकमानसात क्रांती घडवून आणली हे त्यांचे महत्त्वाचे कार्य होय. आणि ते त्यांनी कसे घडवून आणले याचेच विवेचन येथवर केले आहे.<br>{{gap}}[ समर्थांच्या ज्या साहित्याच्या आधारे त्यांच्या कार्याचे विवेचन आपण करतो त्याच्या विषयी एकदोन विचार येथे सांगणे अवश्य आहे असे वाटते. समर्थांनी प्रवृत्ति- धर्म सांगितला, शक्ती, धन, ऐहिक ऐश्वर्य यांचे महत्त्व सांगितले, त्यांनी राजकारण केले हे सर्व अगदी खरे आहे. पण त्यांनी निवृत्तिपरही पुष्कळ लिहिले आहे. त्यांनी भागवतधर्मीय संतांप्रमाणेच संसाराची अतिरेकी निंदाही केली आहे. प्रपंच आणि मोक्ष यात विरोध आहे, असे विचारही मांडलेले आहेत. आणि हे प्रतिपादन करणारे जे त्यांचे साहित्य त्याचे प्रमाणही कमी नाही. यामुळे इतर संतांहून ते निराळे कसे, असा पुष्कळांना प्रश्न पडतो. पण त्या प्रकारचे त्यांचे वाङ्मय विपुल प्रमाणात असले तरी संभ्रम पडावा अशी मात्र स्थिती नाही. कारण प्रवृत्तिधर्मीय जे विचार, जे तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले आहे ते अगदी स्पष्ट आणि अगदी निर्णायक आहे. त्याविषयी, त्यांच्या ऐहिक तत्त्वज्ञानाविषयी शंका घेण्यास अणुमात्र जागा नाही. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की मठस्थापना करून व महंताची संघटना घडवून समर्थांनी सर्व महाराष्ट्रात त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याची व्यवस्था केली. त्यांना ऐहिक प्रपंचाचे जे विज्ञान सांगावयाचे होते त्याविषयी त्यांनी लिहिलेल्या साहित्याचे प्रमाण थोडे असले तरी, शतमुखांनी जे प्रपंचविज्ञानाचे तत्त्वज्ञान त्यांनी वदविले त्याचे प्रमाण शतसहस्रपटीने जास्त आहे. तेव्हा लिखित साहित्याच्या त्यांच्या प्रवृत्तिधर्माच्या प्रतिपादनाचे प्रमाण कमी असले तरी, मौलिक साहित्याच्या दृष्टीने पाहता ते निवृत्तीच्या प्रतिपादनाच्या तुलनेने अनंतपटीने जास्त आहे. आणि म्हणूनच समर्थाच्या प्रवृत्ति परतेविषयी शंका घेण्यास जागा राहत नाही.<br>{{gap}}निवृत्तीचे अगदी उत्कट प्रतिपादन आणि प्रवृत्तीचेही तितकेच उत्कट प्रतिपादन असे करणे ही फार मोठी विसंगती आहे हे खरे आहे. पण अलीकडच्या डॉ. पेंडसे, प्रा. माटे इ. विद्वानांनी या विसंगतीचा परिहार करण्याचा कसा प्रयत्न केला आहे<noinclude></noinclude>
o71xkobijajuyloywv808fjw45ogh5d
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०५
104
73455
230598
164435
2026-06-02T03:19:42Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230598
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||३८०}}</noinclude>ते मागे सांगितलेच आहे. देशभर भ्रमंती करताना समर्थांना हिंदूंची जी दारुण अवस्था दृष्टीस पडली तिच्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन झाले असले पाहिजे, असे या पंडितांनी म्हटले आहे. अर्थात हे केवळ अनुमान आहे. पण आहे या स्थितीत तेच जास्तीत जास्त समाधानकारक आहे, असे मला वाटते.<br>{{gap}}दुसरा विचार समर्थांच्या साहित्याच्या रचनेविषयीचा आहे. हे साहित्य अत्यंत विस्कळित असे आहे. दासबोधातील समासाचे नाव व आतला विषय यांचा पुष्कळ वेळा मेळ बसत नाही. समसातील एका ओवीचा अनेक वेळा दुसरीशी संबंध नसतो. इतकेच नव्हे, तर एकाच ओवीतील पूर्वार्धाचा उत्तरार्थाशी संबंध नसतो. त्यांच्या इतर स्फुट प्रकरणांत इतका गोंधळ नाही. पण तरी ते सुव्यवस्थित, निर्वाचित, चांगले बांधलेले आहे, असे म्हणता येत नाही. समर्थांच्या वाङ्मयात हा फार मोठा दोष आहे यात शंका नाही आणि त्यामुळे त्यांच्या वचनांचा आधार घेताना मागचा पुढचा संदर्भ पाहणे याला काही अर्थच राहात नाही. पण असे असले तरी, त्यांच्या महाराष्ट्रधर्माचे जे सिद्धात येथे सांगितले आहेत, त्यांविषयी मात्र यतकिंचितही गोंधळ नाही. कारण त्या त्या समासातील व प्रकरणातील सिद्धान्त वादातीत आहेत. या सिद्धांताचे विवरण करताना इतर जी अनेक वचने दिलेली आहेत त्यातील काही विषयी संदर्भाच्या प्रश्नावरून वाद करता येईल हे खरे; पण त्यामुळे समर्थांच्या मूळ तत्वज्ञानाविषयी संदेह घेण्यास जागा निर्माण होते, असे मात्र नाही.<br>{{gap}}समर्थांच्या कार्याचे प्रस्तुततेचे विवेचन वाचताना हे दोन विचार वाचकांनी नित्य ध्यानात वागवावे अशी विनंती आहे. ]<br>{{gap}}समर्थांच्या महाराष्ट्रधर्माचे गेल्या व या प्रकरणात सविस्तर विवेचन केले. गेल्य प्रकरणात या महाराष्ट्रधर्माची चारपाच लक्षणे सांगितली. आणि 'स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद' हे जे सहावे लक्षण ते या प्रकरणात सांगून त्याचा सविस्तर ऊहापोह येथे केला. कारण स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद हा महाराष्ट्रधर्माचा आत्माच आहे. बाकीची लक्षणे ही त्याचीच अंगभूत लक्षणे होत. या लक्षणांवरून वारकरी संतांचा भागवतधर्म व समर्थांचा महाराष्ट्रधर्म यात काय भेद आहे हे स्पष्ट होईल.<br><br>'''तुलना'''<br>{{gap}}भागवतधर्माहून महाराष्ट्रधर्म वेगळा असला तरी ज्ञानेश्वर, तुकारामांनी प्रतिपादिलेल्या तत्त्वाच्या पायावरच आणि त्यांच्या आधारेच समर्थांचा महाराष्ट्रधर्म उभा आहे यात शंका नाही. वैदिक धर्माचा अभिमान समाजात जागृत ठेवून तीनशे वर्षे संतांनी महाराष्ट्रीयांची अस्मिता जिवंत ठेवली. नीतिनिष्ठा, भूतसेवा, परमेश्वरावरील श्रद्धा ही श्रेष्ठ धर्माची तत्त्वे सांगून समाजाचे मन उन्नत करून ठेवले, म्हणूनच समर्थांना महाराष्ट्रधर्माचा प्रसार द्रुतगतीने करता आला. स्वतः समर्थ हे भागवतधर्मीय संत होते हे प्रा. श्री. म. माटे यांचे मत या अर्थाने खरेच आहे. तरीही त्यांचा महा-<noinclude></noinclude>
p0tp6cgty1q9fzxfvdtbow48cja50xt
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०६
104
73456
230599
164436
2026-06-02T03:20:07Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230599
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|३८१|| स्वराज्य आणि स्वधर्म}}</noinclude>राष्ट्रधर्म भागवतधर्मापेक्षा खूपच भिन्न होता हेही खरे आहे.<br><br>'''अनन्य साधारण'''<br>{{gap}}ही भिन्नता कशात आहे हे डॉ. शं. दा. पेंडसे यांच्या शब्दांत प्रारंभीच सांगितले आहे. भागवतधर्माचे स्वरूप केवळ संरक्षक होते, ते धोरण टाकून देऊन महाराष्ट्रधर्माने चढाऊ व लढाऊ धोरण स्वीकारले, असे त्यांनी म्हटले आहे. दुसरे एक थोर पंडित साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांनी हा भेद जास्त विशद केला आहे. 'पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी' या आपल्या ग्रंथात (भाग १ ला प्रकरण १४ वे - श्री समर्थ रामदास) त्यांनी समर्थांच्या अनन्यसाधारण वैशिष्ट्यांचे स्वरूप चांगले स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, 'प्रत्यक्ष साऱ्या देशभर हिंडून व समाजनिरीक्षण करून लोकस्थितीचा अभ्यास करावा व नंतरच कार्याची पद्धती ठरवावी, असा सर्वंकष स्वरूपाचा विचार समर्थांपूर्वी, प्रत्यक्ष कोणाच्या आचरणातून तरी दिसत नाही.' (पृ. ३४४) 'परकीय यवन, पोर्तुगीजांसारखे लुटारू, स्वकीय पुंड, पाळेगार इ. तत्कालीन अत्याचाऱ्यांच्या अत्याचारांचे समर्थांनी जसे बारकाईने वर्णन केले आहे तसे कोणीही केलेले नाही.' (पृ. २४७) 'सामाजिक जीवनाची दुर्दशा व अधःपात थांबविता येत नसेल तर आपल्या साक्षात्कारी जीवनाचा व आध्यात्मिक विकसनाचा आपल्या राष्ट्राला लाभ कोणता, असे त्यांना (समर्थांना) वाटू लागले. प्रत्यक्ष निर्गुण निराकार परब्रहा सगुण साकार होऊन अवतार घेते तर ब्रह्मनिष्ठांना तरी संस्कृतीच्या, समाजाच्या व राष्ट्राच्या अधःपतनाच्या काळात केवळ निजानंदात निमग्न होऊन कसे राहता येईल ? परमेश्वरी नियमाचे ते उल्लंघनच नव्हे काय ? समाजजीवनाच्या या एका तपावर केलेल्या मनन- निरीक्षणाने त्यांची (समर्थांची) अशी धारणा झाली की स्वराज्यावाचून स्वधर्म व स्वराष्ट्र यांचे संरक्षण व विकसन केवळ अशक्य होय. सामर्थ्याच्या पार्श्वभूमीवाचून अध्यात्माला महत्त्व नाही, जीवनाला प्रतिष्ठा नाही व नीतिमूल्यांना स्थिरता नाही.' (पृ ३५१) 'या राष्ट्राला व धर्माला वैभवशाली व सामर्थ्यसंपन्न कसे करता येईल या एकाच विचारात समर्थ गढून गेले होते.' (पृ. ३५७) 'त्यांच्यापूर्वी राष्ट्रपुनरुत्थानाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून व त्यासाठी वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा आश्रय करून योजनाबद्ध कार्याची उभारणी करणारा अन्य कोणी आढळत नाही.' (पृ. ३५८).<br>{{gap}}समर्थांच्या अनन्यसाधारण कार्याचे स्वरूप असे विशद करून बाळशास्त्री यांनी श्री व्यासांनंतरचा महान लोकशिक्षक असा त्यांचा गौरव केला आहे.<br>{{gap}}(१) ऐहिक ऐश्वर्याची उत्कट आकांक्षा (२) आधी प्रपंच (३) लोकसंघटना (४) शक्ती प्रमाण हे (५) प्रयत्नवाद आणि (६) स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद ही जी महाराष्ट्रधर्माची सहा लक्षणे या दोन प्रकरणांत सांगितली तीच निराळ्या शब्दांत हरदास यांनी संकलितरूपाने आपल्या ग्रंथात सांगितली आहेत हे वरील अवतरणांवरून ध्यानात येईल. समर्थांच्या कार्याच्या विवेचनाचा याहून निराळा<noinclude></noinclude>
n94f5oyl8h6a7bkf6l6lnnzguxeg08v
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०७
104
73457
230600
164437
2026-06-02T03:20:45Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230600
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||३८२}}</noinclude>समारोप करण्याची आता गरज आहे असे वाटत नाही.<br><br>'''महान् लोकशिक्षक'''<br>{{gap}}'श्री वेदव्यासानंतरचा महान् लोकशिक्षक' यापेक्षा समर्थांचा जास्त गौरव काही असू शकेल असे मला वाटत नाही. समर्थांच्या सर्व कार्याचा आशय यात येतो. त्यांनी धर्मकारण व राजकारण लोकाभिमुख केले. स्वराज्य व स्वधर्म यांच्या संरक्षणाची व उत्कर्षाची जबाबदारी लोकावर आहे हे महान् सत्य त्यांनी मराठ्यांना शिकविले. यालाच राष्ट्रनिर्मिती म्हणतात.<br><br>{{center|■}}<noinclude></noinclude>
0diznbv0qznm2f1nctw862grkva4fea
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०८
104
73458
230601
164439
2026-06-02T03:21:29Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230601
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop
|Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf
|Page = 408
|bSize = 405
|cWidth = 290
|cHeight = 210
|oTop = 39
|oLeft = 53
|Location = center
|Description =
}}
<br>{{rh|'''<big>१९.</big>'''||'''<big>मराठा काल</big>'''}}<br><br>'''शिवछत्रपतींची स्वधर्मसाधना'''<br>{{gap}}महाराष्ट्रसंस्कृतीचा इतिहास पाहताना येथवर आपण बहामनी कालातील संस्कृतीचे स्वरूप पाहिले. प्रथम बहामनी सुलतानाची सत्ता कशी होती ते आपण न्याहाळले. नंतर त्या काळचे नेते जे मराठा सरदार आणि शास्त्रीपंडित यांच्या नेतृत्वाचे आणि कर्तृत्वाचे परीक्षण केले आणि नंतर भागवतधर्माचे प्रणेते ज्ञानेश्वर, नामदेव- एकनाथ व तुकाराम हे संत आणि महाराष्ट्रधर्माचे प्रणेते समर्थ रामदास यांच्या कार्याचे विवेचन केले. आता मराठाकालाचे - या कालखंडातील संस्कृतीचे स्वरूप पहावयाचे आहे. इ. स. १६४५ ते इ. स. १८०० असा सुमारे दीडशे वर्षांचा हा काळ आहे. १६४५-४६ च्या सुमारास प्रथम श्री शिवछत्रपतींनी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले आणि या 'स्वराज्याचे पुढे मराठा साम्राज्य होणार आहे' अशा भावार्थाची प्रतिपच्चंद्ररेखेव वर्धिष्णू अशी मुद्राही त्यांनी करून घेतली. तेथपासून इ. स. १७९५ पर्यंत म्हणजे खर्ड्याच्या विजयापर्यंत हे साम्राज्य वर्धिष्णू होते. हा एवढा काल म्हणजे मराठा काल होय. या कालातल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आता समीक्षण करावयाचे आहे.<br><br>'''खग्रास'''<br>{{gap}}शिवछत्रपतींनी स्वराज्याचा महासंकल्प केला आणि हजारो मावळ्यांसह स्वरा-<noinclude></noinclude>
rbqipebbek0kckfvu2imrtyhcjlv6aq
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०९
104
73459
230602
164440
2026-06-02T03:21:57Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230602
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||३८४}}</noinclude>ज्याची शपथ घेतली त्या वेळी हिंदुस्थान हा देश चहू बाजूंनी शत्रूंनी ग्रासलेला होता. मुस्लिम हे या देशाचे पहिले शत्रू. साडेसहाशे वर्षे ते या देशावर आक्रमण करीत होते. आणि १५६५ साली विजयनगरचा पाडाव झाल्यानंतर त्या सत्तेचा प्रतिकार करील अशी एकही शक्ती भारतात राहिलेली नव्हती. मुस्लिमांनी केवळ हिंदूंची राजसत्ताच नष्ट केली होती, असे नव्हे; तर हिंदुधर्म, हिंदुसंस्कृती, हिंदुपरंपरा आणि समस्त हिंदुजीवनच त्यांनी उध्वस्त करीत आणले होते. हिंदू आणि मुस्लिम यांचे वैर अगदी मूलगामी होते. हिंदुस्थान हा देश निर्हिंदु करून टाकण्याची मुस्लिमांची प्रतिज्ञा होती आणि अफगाणिस्थान, सिंधप्रांत, बंगाल, पंजाब या देशांत त्यांनी ती बरीचशी सिद्धीस नेली होती. सहजीवन ही कल्पना इस्लामला सर्वथा नामंजूर होती. इस्लामेतर समाज, इस्लामेतर धर्म, संस्कृती याचा संपूर्ण नाश करून सर्व जग इस्लामच्या कक्षेत आणून सोडणे हाच खरा इस्लामचा विजय, अशी मुसलमानांची धारणा होती.<br>{{gap}}अशा आकांक्षेने प्रेरित झालेला हा मुस्लिमसमाज तुलनेने पाहता त्या काळच्या हिंदुसमाजापेक्षा पुष्कळच बलशाली होता. मुस्लिम तेवढा एक ही निष्ठा त्यांच्यात तुलनेने खूपच जास्त प्रमाणात होती. त्यामुळे हा समाज लवकर संघटित होत असे. शिवाय व्यापार, धर्मप्रसार व साम्राज्य यासाठी मुस्लिम लोक सर्व जगभर फिरत असल्यामुळे त्यांचा आलोक हिंदूंच्यापेक्षा जास्त व्यापक होता. अरबस्तान, इराक, तुर्कस्थान, इराण, अफगणिस्थान, मध्य आशिया अशा लांबलांबच्या प्रदेशातून हजारो मुस्लिम हिंदुस्थानात दरसाल येत आणि देशभर राज्य करीत असलेल्या मुस्लिम सत्तांमध्ये वरिष्ठ, मानाची स्थाने मिळवून त्या त्या सत्तांचे बळ वाढवीत. मुस्लिमांचे दळणवळण युरोपशी नित्य चालू असल्यामुळे दारूगोळा, तोफा, बंदुका ही नवी शस्त्रास्त्रे त्यांच्या परिचयाची होती आणि ती त्यांनी हिंदुस्थानात आणल्यामुळे त्यांच्या लष्करी सामर्थ्यात सतत वाढ होत असे. अशा बहुविध बलांचा हिंदूंजवळ संपूर्ण अभाव होता. त्यामुळे आक्रमकांचा प्रतिकार करण्याची त्यांची शक्ती लुळीपांगळी होऊन गेली होती.<br><br>'''मूलगामी वैरे'''<br>{{gap}}पोर्तुगीज हा हिंदूंचा दुसरा शत्रू मुसलमानांच्या तुलनेने पोर्तुगीज हा शत्रू लहान होता. त्याचे सामर्थ्य कमी होते. पण हिंदूंचे, निदान महाराष्ट्रीयांचे जीवन उध्वस्त करून टाकण्याच्या दृष्टीने त्यांच्या ठायी पुरेसे सामर्थ्य होते. १४९८ साली त्यांनी या देशात प्रवेश केला. १५१० साली गोवा घेतला आणि दहावीस वर्षात आपला पाय महाराष्ट्राच्या या नंदनवनात पक्का रोवला. पोर्तुगीज हे मुस्लिमांप्रमाणेच हिंदूंशी मूलगामी वैर करणारे लोक होते. केवळ राजकीय सत्तेवर त्यांची तहान भागत नव्हती. आपले राज्य निर्हिंदू करून टाकणे हे त्यांचे ध्येय होते. मुसलमानांप्रमाणेच ते धर्म-<noinclude></noinclude>
tp3o25auoynt38z2jgns4pfjrl1ji4e
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१०
104
73460
230603
164441
2026-06-02T03:22:15Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230603
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|३८५|| मराठा काल}}</noinclude>पिसाट होते आणि धर्मप्रसारासाठी वाटेल ते क्रौर्य करण्यास, कत्तली, विध्वंस, संहार, अमानुष छळ करण्यास ते मागेपुढे पहात नसत. हिंदूंचा सर्वनाश हेच मुस्लिमांप्रमाणेच त्यांचेही ध्येय होते. शिवाय ते स्वतःच पाश्चात्य देशातून आल्यामुळे नौकानयन, दुर्गांची उभारणी, नवी शस्त्रास्त्रे या दृष्टीने ते मुसलमानांपेक्षाही वरचढ होते. युरोपात त्या वेळी प्रबोधन युग सुरू झाले होते. त्यातून सर्वत्र पसरलेली भौतिक विद्या पोर्तुगीजांना अवगत होती. व्यापार हा तर भारतात येणाऱ्या पाश्चात्य सत्तांचा आत्माच होता. पोर्तुगीज या वेळी तर व्यापारात आघाडीवर होते. अरबांचा व्यापार पाहता पाहता त्यांनी हस्तगत केला आणि कोकण भागात अनेक बंदरे आणि किल्ले बांधून आपली राजसत्ता, धर्मसत्ता व आर्थिक सत्ता यांचा पाया त्यांनी भक्कम करून टाकला.<br><br>'''इंग्रज - अलिप्तता'''<br>{{gap}}इंग्रज हा हिंदूंचा आणि मराठ्यांचा तिसरा शत्रू. इंग्रज हे मुस्लिम किंवा पोर्तुगीज यांच्या इतके कडवे आणि मूलगामी वैरी नव्हते. पण जास्त धोरणी, जास्त राजनीति- निपुण, पाश्चात्य विद्येने जास्त संपन्न आणि म्हणूनच जास्त भयंकर असा हा शत्रू होता. प्रारंभी मराठी सत्तेशी त्यांनी उघड वैर केले नाही. पण हिंदुस्थानात मुस्लिम सत्ताच कायम राहावी, मराठी सत्तेचे निर्मूलन व्हावे, अशी त्यांची इच्छा व तसेच प्रयत्नही कायम चालू असत. आपण केवळ व्यापारी आहो, राजकारणापासून अलिप्त आहो, असे बाह्यतः ते सांगत आणि मराठ्यांना कधीही साह्य करीत नसत. पण त्यांचा शत्रू जो विजापूर किंवा मोगल याला मात्र ते अंतःस्थपणे विपुल साह्य करीत असत. इंग्रजांप्रमाणेच फ्रेंच आणि डच हेही मराठ्यांचे शत्रूच होते. पण ते फारसे प्रवळ कधीच झाले नाहीत. मराठ्यांशी त्यांचा सामना असा कधी झाला नाही. मात्र हिंदुस्थानात मुस्लिमांचे राज्यच असावे, मराठ्यांचा कधीही जय होऊ नये, ही त्यांचीही इंग्रजांप्रमाणेच वासना होती. शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेतून सुटत नाहीत, असे वृत्त जेव्हा सगळीकडे पसरले होते, तेव्हा 'शिवाजीपासून आता आपली मुक्तता झाली' असा आनंद मनोमन हे सर्व पाश्चात्य व्यापारी मानीत होते.<br><br>'''हाडवैरी'''<br>{{gap}}शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला त्या वेळी सर्व हिंदुस्थान हिंदूच्या हाडवैऱ्यांनी असा ग्रासलेला होता. हे सर्व शत्रू हिंदूंना नामशेषही राहू देण्यास तयार नव्हते. मुरुस्लिमांनी इराण, अफगणिस्तान, बलुचिस्तान या देशांत तद्देशीयांच्या बाबतीत हे केलेच होते. पोर्तुगीज जेथे जेथे गेले तेथे तेथे- आफ्रिकेत, लॅटिन अमेरिकेत, गोव्यात- त्यांनी हेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवले होते. गेल्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत सर्व हिंदुस्थान लवकरच ख्रिश्चन होऊन जाईल, अशी इंग्रज पंडितांनाही आशा होती.<noinclude><br>{{gap}}२५</noinclude>
rnurpl189sig52zytsk7iv2wc8888e0
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४११
104
73461
230604
164442
2026-06-02T03:22:33Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230604
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||३८६}}</noinclude>अशा तऱ्हेने हिंदुस्थान सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत अगदी खग्रास झाला होता.<br><br>'''आमूलाग्र क्रांती'''<br>{{gap}}शिवाजी राजे अकराव्या वर्षी बंगरुळहून महाराष्ट्रात आले आणि पुण्याच्या परिसरात राहून प्रथम दादोजी कोंडदेवांच्या हाताखाली आणि नंतर स्वतंत्रपणे आपल्या जहागिरीची व्यवस्था पाहू लागले. त्या वेळी भोवतालची परिस्थिती अशी होती : सगळीकडे अंधकार होता. खग्रास होता. आशेचा किरणही कोठे दिसत नव्हता. ते या परिस्थितीचे जेव्हा निरीक्षण करू लागले, अवलोकन करू लागले, आपले गुरुजी दादोजी कोंडदेव, शामराज नीलकंठ, सोनोपंत डबीर इ. इतर वडीलधारी माणसे, कंक, पासलकर, जेधे इ. सवंगडी यांच्याशी चर्चा विचारविनिमय करू लागले, महाभारत, रामायण, गीता यांचे श्रवण करू लागले, समर्थ रामदासस्वामी यांच्या कार्याची दिशा त्यांच्या ध्यानात येऊ लागली, त्या वेळी त्यांच्या बुद्धीचा एक निश्चय झाला की मराठी जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आमूलाग्र क्रांती केल्यावाचून हिंदूंना उत्कर्षाची कसलीही आशा धरता येणार नाही. शिवछत्रपती हे काही ग्रंथकार तत्त्ववेत्ते म्हणून प्रसिद्ध नाहीत. त्यांनी स्वतः एकही ग्रंथ लिहिला नाही. पण त्यांनी जे प्रत्यक्ष कार्य केले त्यावरून, त्यांची जी काही पत्रे उपलब्ध आहेत त्यावरून शिवभारतकारांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे जे वर्णन केले आहे त्यावरून, समर्थांनी त्यांचा जो गौरव केला आहे त्यावरून, आणि तत्कालीन पत्रव्यवहार, बखरी इ. साधनांवरून पाहता असे निश्चित म्हणता येते की क्रांतीच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहता हा महापुरुप तत्ववेत्त्यांचाही तत्त्ववेत्ता होता. क्रांतीचे तत्त्वज्ञान, काही सिद्धान्त, प्रारंभीच निश्चित केल्यावाचून त्यांनी केलेले कार्य त्यांना करताच आले नसते. वर सांगितलेल्या साधनांच्या आधारे, ते तत्त्वज्ञान पाहत पाहत, त्याशी त्यांच्या कार्याची संगती लावीत लावीत, छत्रपतींच्या चरित्राचे विवेचन आपल्याला करावयाचे आहे.<br><br>'''धर्मक्रांती'''<br>{{gap}}या दृष्टीने शिवछत्रपतींनी केलेल्या धर्मक्षेत्रातल्या क्रांतीचा प्रथम विचार करू. मनावर पुरातन काळापासून धर्माचीच सत्ता चालत आलेली आहे. आणि विज्ञानयुगानंतर आजही यात फारसा बदल झालेला नाही. समाजाचा उत्कर्ष करील तो धर्म, ज्याने धारण होते, संरक्षण होते तो धर्म, ज्याने लोकयात्रा संपन्न होते तो धर्म, अशा प्राचीनांनी धर्माच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्या पाहता आजही क्रांतिकारकांना प्रथम धार्मिक तत्त्वांचाच विचार करावा लागतो, असे दिसून येईल. मग छत्रपतींच्या काळी काय असेल हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच लोकांच्या मनातील धर्मकल्पना समूळ पालटल्यावाचून हिंदुसमाजाचा उत्कर्ष होणे शक्य नाही, अनसे ठरवू महाराजांनी तेथूनच प्रारंभ केला.<br><noinclude></noinclude>
gw9feyb4bt52pr935dcbf14yab6coln
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१२
104
73462
230605
164443
2026-06-02T03:22:49Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230605
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|३८७|| मराठा काल}}</noinclude><br>'''(१) शस्त्रेण रक्षिते राज्ये'''<br>{{gap}}या क्षेत्रातला त्यांचा पहिला क्रांतिकारक सिद्धान्त म्हणजे स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद आहे हा होय. या सिद्धान्ताला क्रांतिकारक असे म्हणण्याचे वास्तविक काही कारण नाही. भारतातील प्राचीन तत्त्ववेत्त्यांनी शतवार हा सिद्धान्त वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण या ग्रंथांत सांगितलेला आहे. राजधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय, असा त्यांचा सिद्धान्त होता, हे मागे सांगितलेच आहे. महाभारतात आणखी त्या अर्थाची कितीतरी वचने आहेत. धर्मे तिष्ठन्ति भूतानि धर्मो राजनिष्ठति ॥ राष्ट्रस्य एतत् कृत्यतमं राज्ञ एवाभिषेजनम् ॥ राजाला अभिषेक करणे म्हणजेच राजसंस्था टिकवून धरणे हे राष्ट्राचे, लोकांचे, सर्वात महत्त्वाचे कार्य होय. सर्वे धर्माः राजधर्म प्रधानाः । सर्वो हि लोको नृपधर्भमूलः ॥ या वचनांचा तोच भावार्थ आहे. शिवाय, 'शस्त्रेण रक्षिते राज्ये, शास्त्रचिंता प्रवर्तते ।' हे व्यासवचन अगदी निर्णायक आहे. शस्त्रबलाने राज्याचे रक्षण केले तरच तेथे शास्त्रे, विद्या, संस्कृती यांचा उदय व संरक्षण होते. 'सर्वा विद्या राजधर्मेषु युक्ताः । सर्वे लोका राजधर्मप्रविष्टाः ।' या वचनाचा तोच अर्थ आहे. दुर्दैवाने या ऋषिवचनांचा भारतातील राजपुरुषांना विसर पडला होता. पृथ्वीराजानंतरचे रजपूत सरदार, बहामनी काळातले मराठे सरदार, विजयनगरनंतरचे दक्षिणेतले राजपुरुष या सर्वांना हिंदू धर्माचा अभिमान नव्हता असे नाही. पण स्वराज्य स्थापून त्या धर्माचे रक्षण करणे हे अभिमानाचे पहिले लक्षण आहे, असे त्यांना कधीच वाटले नाही. तीर्थयात्रा, व्रते वैकल्ये, मंदिरे बांधणे, त्यांना जमिनी लावून देणे, साधुसंतांकडून उपदेश घेणे यातच त्यांचा हिंदुधर्म होता आणि हे आचार एकदा पाळले म्हणजे मुस्लिमांच्या साम्राज्याचा विकास करणे, त्यासाठी हिंदू सत्ता नष्ट करणे, देवळे पाडणाऱ्या, मूर्तिभंजन करणाऱ्या, हिंदू स्त्रियांची विटंबना करणाऱ्या आणि हिंदू संस्कृती नष्टांश करून टाकण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या बादशहांची सेवा करणे, यात आपण हिंदुधर्माशी द्रोह करतो आहो, असे त्यांच्या स्वप्नातही कधी येत नसे. स्वराज्य व स्वधर्म यांचे अद्वैत आहे, हे धर्माचे पहिले तत्त्व त्यांच्या गावीही नसल्यामुळेच भारतात मुस्लिमांच्या राज्यांचा, साम्राज्यांचा व एकंदर मुस्लिम सत्तेचा विकास होऊ शकला.<br><br>'''मातुःश्रींची आज्ञा'''<br>{{gap}}शिवछत्रपती हा सर्व प्रकार डोळ्यांनी पहात होते. पूर्वीच्या कथांवरून त्यांनी हेच जाणले होते; म्हणून स्वराज्याची स्थापना हे आपले धार्मिक कर्तव्य असा निश्चय त्यांनी केला. मातुःश्री जिजाबाई आणि समर्थ रामदासस्वामी यांनी आपल्याला हीच आज्ञा केली असे त्यांनी त्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे. इ. स. १६६४ साली बाजी घोरपडे यास त्यांनी ठार मारले. तशी मातुःश्रींची आज्ञाच होती. घोर-<noinclude></noinclude>
e9vctmvthkvg78k09hb9ytotweer2bj
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१३
104
73463
230606
164444
2026-06-02T03:23:07Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230606
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||३८८}}</noinclude>पड्यांचा अपराध काय होता ? जिजामाता म्हणतात, 'त्यांनी स्वधर्मसाधनता सोडून यवन दुष्ट तुरुक यांचे कृत्यास ते अनुकूल झाले !' १६७८ साली समर्थांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती लिहितात, 'आपण मला आज्ञा केली की तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करून धर्मस्थापना करणे ! हे व्रत संपादून त्यात परमार्थ करावा.' अर्थ स्पष्ट आहे. धर्मरक्षणासाठी राज्यसाधना केली पाहिजे. राजाचा तोच परमार्थ, तोच मोक्ष, अशी समर्थांची आज्ञा होती.<br><br>'''व्यंकोजीस उपदेश'''<br>{{gap}}छत्रपतींचे धाकटे भाऊ व्यंकोजी यांच्याशी त्यांचा जो पत्रव्यवहार झाला त्यावरूनही, धर्मरक्षणासाठी सर्वत्र स्वराज्याची स्थापना झाली पाहिजे, हा महाराजांचा सिद्धान्त स्पष्ट उमगून येतो. कर्नाटकच्या स्वारीवर जाण्यापूर्वी १६-६ साली त्यांनी व्यंकोजीला एक पत्र लिहिले होते. त्या आधी व्यंकोजीने तंजावरचे राज्य विजापूरकरांतर्फे जिंकून तेथे राजधानी केली होती. पण तंजावरास आधी राज्य होते ते विजयराघव या हिंदुराजाचे होते. मदुरेचा चोक्कनाथ नायक याचा व्यंकोजीने पराभव केला. हा राजाही हिंदूच होता आणि ही दोन्ही राज्ये व्यंकोजीने आदिलशाहीसाठी जिंकली होती. शिवछत्रपतींना यामुळे फार उद्वेग वाटला. म्हणून त्यांनी व्यंकोजीला पत्र लिहून उपदेश केला की चंदीला खवासखानाचा भाऊ नासिरखान आहे, त्याला मारून ते राज्य घ्यावे. विजापूरचा पठाण वजीर सरदार बहलोलखान याचा सेनापती शेरखान याचा पराभव करून बहलोलखानाचा तिकडचा मुलूख जिंकावा. त्याचप्रमाणे वेलोरचा किल्लाही जिंकावा. आणि असे करताना विजयनगरचे वारस असे तिकडचे नायक हिंदुराजे यांशी सख्य करावे.<br>{{gap}}पण स्वराज्य हे ध्येयच व्यंकोजीच्या मनापुढे नसल्यामुळे त्याने यातले काहीच केले नाही. आणि पुढे महाराज दक्षिणेत गेल्यावर त्यांच्याशीच त्याने लढाई केली. तेव्हा महाराजांना त्याचा पाडाव करणे भाग पडले. त्यानंतर जो तह झाला त्यातही 'हिंदुद्वेषी यांस आपले राज्यात ठेवू नये, विजापूरकरांचा व आमचा तह ठरला त्यात विजापूरकरांची चाकरी एकोजी करणार नाही, प्रसंग पडेल तेव्हा इमाने इतबारे मदत करू, इतकेच ठरले आहे. तरी चाकरी करणे, असे समजू नये' असे कलम त्यांनी घातले. कर्नाटकातही स्वतंत्र हिंदुसत्ता स्थापन झाली पाहिजे हे त्यांचे उद्दिष्ट यावरून स्पष्ट होते.<br><br>'''लखम सावंत'''<br>{{gap}}१६५८ साली कुडाळचा लखम सावंत याच्यावर विजापूरचा सरदार रुस्तुमजम चालून आला होता. त्या वेळी सावंताला साह्य करून शिवछत्रपतींनी त्याला वाचविले. त्या वेळी त्याच्याशी जो तह झाला त्यातले एक कलम असे आहे, 'स्वराज्यसाधनाच्या<noinclude></noinclude>
pdly4c07ir2lfizwb98ajo5urzjdkr5
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१४
104
73464
230607
164445
2026-06-02T03:23:23Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230607
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|३८९|| मराठा काल}}</noinclude>ठायी दक्ष राहून तुरूक लोकांचे साधन (साह्य) न करावे, तुरुकांना, मुस्लिमांना साह्य करणे हे पाप आहे. हा अधर्म आहे, हे तत्त्व महाराजांच्या मनात किती निश्चित होते, ते यावरून कळून येते.<br><br>'''जयसिंहास आवाहन'''<br>{{gap}}जयसिंह मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्यासाटी चालून आला होता, त्या वेळी त्याला छत्रपतींनी जे पत्र लिहिले त्यावरून त्यांचे ध्येय, त्यांच्या मनातील क्रांतितत्त्व, त्यासाठी अनुसरावयाचा मार्ग याचे पूर्ण चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभे राहते. ते म्हणतात, 'जयसिंहा, तू आपणहून दक्षिण देश जिंकण्यासाठी आला असतास तर मोठी सेना घेऊन मी तुझ्या पाठीशी आलो असतो आणि सर्व भूमी तुला जिंकून दिली असती. पण तू औरंगजेबाचा सरदार म्हणून आला आहेस... हाच क्रम पुढे आणखी काही दिवस चालत राहील तर आम्हां हिंदू लोकांचे चिन्ह देखील पृथ्वीवर राहणार नाही. आम्ही लोकांनी या वेळी हिंदू, हिंदुस्थान व हिंदुधर्म यांच्या संरक्षणासाठी फार जोराचे प्रयत्न केले पाहिजेत. जर तू मारवाडचा राजा जसवंतसिंह व मेवाडचा राजा राजसिंह यांच्याशी ऐक्य करशील तर फार मोठे काम होईल. तुम्ही उत्तरेतून उठावणी केली तर मी विजापूर व गोवळकोंडा या दोन्ही बादशहांना जिंकीन आणि सर्व दक्षिण देशच्या पटावरून इस्लामचे नाव किंवा चिन्ह धुऊन टाकीन.' (सारार्थ).<br>{{gap}}जयसिंहाला लिहिलेल्या पत्राचाही काही उपयोग झाला नाही हे उघडच आहे. हिंदुधर्माच्या रक्षणासाठी मुस्लिमांशी लढा केला पाहिजे, ही कल्पना त्याला कधी शिवलीही नाही.<br>{{gap}}आणि शिवछत्रपतींच्या धर्मतत्त्वातील हा तर पहिला सिद्धान्त होता. मुस्लिम आक्रमकांचा उच्छेद करून हिंदुराज्य प्रस्थापित केल्यावाचून हिंदुधर्माचे रक्षण होणार नाही. स्वराज्य आणि स्वधर्म यांचा असा अविभाज्य संबंध असल्यामुळे त्यांनी स्वतः स्वराज्यस्थापनेचे प्रयत्न तर आरंभिले होतेच. पण मुस्लिमांविरुद्ध अखिल भारतात सर्व प्रदेशात उठाव व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे मुस्लिमांच्या अधिसत्तेखाली राहून त्यांची सेवा करणाऱ्या सर्व हिंदू सरदारांना ते तशी प्रेरणा देत होते. व्यंकोजी, लखम सावंत व जयसिंह यांना त्यांनी लिहिलेली पत्रे तेच दर्शवितात. त्यांचा काही उपयोग झाला नाही हे खरे. पण 'हिंदवी स्वराज्य' या ध्येयासाठी महाराज केवढा प्रयत्न करीत होते ते त्यावरून दिसून येईल.<br><br>'''छत्रसाल'''<br>{{gap}}वरील सरदारांच्या बाबतीत त्यांना यश आले नाही. पण बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल याला दिलेली प्रेरणा बरीच यशस्वी झाली. बुंदेलखंडातील महोबा हे एक<noinclude></noinclude>
5u5vnauh2ucjmwfp8qm3t9lb14iqvbo
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१५
104
73468
230608
164446
2026-06-02T03:23:43Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230608
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||३९०}}</noinclude>छोटेसे स्वतंत्र राज्य होते. छत्रसालाचा पिता चंपतराय याने शहाजहानाशी लहून महोबाचे स्वातंत्र्य टिकविले होते. पुढे शहाजहानविरुद्ध औरंगजेब उठला, तेव्हा चंपतरायाचे साह्य त्याने मागितले व 'तुझे स्वातंत्र्य मी अबाधित राखीन,' असे त्या वेळी त्याने त्याला आश्वासनही दिले. पण सत्ता हाती आल्यावर त्याने महोबावर स्वारी केली. त्या वेळी चंपतराय रणांगणावर पडला. त्याचाच मुलगा छत्रसाल. तो औरंगजेबाचा नाइलाजाने मांडलिक झाला होता. पण त्याची स्वातंत्र्यलालसा मनात तशीच धगधगत होती. जयसिंहाने दक्षिणेवर स्वारी केली, तेव्हा दिलेरखानाच्या हाताखाली छत्रसाल आपले सैन्य घेऊन दाखल झाला होता. पुढील पाचसहा वर्षांत त्याने शिवाजी महाराजांचा पराक्रम डोळ्यांनी पाहिला आणि त्याची स्वातंत्र्यवृत्ती पुन्हा उफाळून आली. तेव्हा १६७१ साली गुप्तपणे तो महाराजांना येऊन भेटला आणि मला आपल्या सेवेत रुजू करून घ्या, अशी विनवणी त्याने केली. महाराजांना यामुळे फार आनंद झाला. पण त्यांनी छत्रसालला सांगितले की 'तू येथे माझ्या हाताखाली काम करण्यापेक्षा बुंदेलखंडात स्वतंत्रपणे उठाव कर. असा अनेक दिशांनी उठाव झाला तरच औरंगजेबाची सत्ता उलथून पडेल.' छत्रसालाला ते मानवले आणि बुंदेलखंडात परत जाऊन त्याने स्वतंत्रपणे हिंदुध्वज उभारला व बुंदेलखंडात स्वराज्याची स्थापना केली.<br><br>'''राजसिंह'''<br>{{gap}}औरंगजेबाने १६७६ साली हिंदूंवर जिझियाकर लादला, तेव्हा त्याच्या निषेधार्थ महाराजांनी त्याला जे पत्र लिहिले त्यात त्यांनी म्हटले आहे की 'गरीब, अनाथ लोकांना छळण्यात काय पुरुषार्थ आहे ? हिंदू लोकास पीडा करण्यातच धर्म आहे, असे मनामध्ये आले असल्यास, आधी राजा राजसिंह (मेवाडचा राणा, याने स्वराज्यासाठीच उठाव केला होता) याजपासून जिझिया घ्यावा.' महाराजांची दृष्टी भारतभर कशी चौफेर फिरत होती आणि हिंदवी स्वराज्याची त्यांची कल्पना किती व्यापक होती ते यावरून ध्यानात येईल.<br><br>'''मादण्णा'''<br>{{gap}}शिवछत्रपतींनी दक्षिणेवर स्वारी केली, त्यात व्यंकोजीला स्वातंत्र्याची प्रेरणा द्यावी हा तर हेतू होताच, पण आणखीही एक जास्त व्यापक हेतू होता. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाचा दिवाण मादण्णा हा हिंदुत्वाचा अभिमानी होता. आणि जुन्या हिंदवी तेलगू सिंहासनाचे पुनरुज्जीवन करावे, असा त्याचा प्रयत्न होता. शिवछत्रपती तेथे येण्यापूर्वीच त्याने स्थानिक ब्राह्मणांचे वर्चस्व वाढवून आणि मुसलमानी सरदारांची कुरघोडी थांबवून या गोष्टीचा पाया घातलाच होता. छत्रपती गोवळकोंड्यास आल्यावर मराठा सैन्याकडून तो मुलूख जिंकला जाईल आणि तेथे पुन्हा हिंदू राज्य प्रस्थापिता<noinclude></noinclude>
4ke42n1flp2vwlifws509y957lqezmd
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१६
104
73469
230609
164447
2026-06-02T03:24:02Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230609
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|३९१|| मराठा काल}}</noinclude>येईल, ही त्याला मोठी आशा होती. पुढे आठ वर्षांनी मोगलांची स्वारी गोवळकोंड्यावर झाली. त्या वेळी मोगलांच्या प्रोत्साहनाने, मादण्णाचा स्थानिक मुस्लिमांनी खून केला. त्याविषयी लिहिताना इंग्रज फ्रेंचादी परकी टीकाकार म्हणतात की 'त्याने गोवळकोंड्याच्या राज्यात सर्वत्र आपल्या जातीचाच कारभार सुरू केला होता.' त्र्यं.शं. शेजवलकरांच्या मते मादण्णाला हिंदुराज्यस्थापनेची ही प्रेरणा शिवछत्रपतींच्याकडूनच मिळाली होती (संकलित शिवचरित्राची प्रस्तावना, पृ. १७४, १७५).<br><br>'''पादशाही हिंदूंची'''<br>{{gap}}औरंगजेबाला छत्रपतींनी जिझिया कराच्या निषेधार्थ पाठविलेल्या पत्राचा उल्लेख वर आलाच आहे. आग्र्याहून महाराज सुटून आले म्हणून तो आधीच पिसाळला होता. त्यानंतर पुढच्या दहाबारा वर्षात छत्रपतींची सारखी चढती कमानच होती. आणि आता दक्षिणेतही हिंदवी स्वराज्याचे लोण त्यांनी पोचविले होते. उत्तरेत शिखांनी चालवलेल्या प्रतिकारालाही कडवी धार येत होती. त्यामुळे भडकून जाऊन हिंदूंवर जिझिया कर लावून, देवळे पाडणे, मूर्ती फोडणे, हिंदूंच्या कत्तली करणे हा धर्मच्छळ त्याने नव्या जोमाने फिरून सुरू केला आणि स्वराज्यावाचून हिंदुधर्माचे रक्षण होणार नाही, हे पुन्हा एकदा हिंदूंना दाखवून दिले. आजपर्यंत मुस्लिम पादशहांनी हे अनेक वेळा दाखवून दिलेच होते. पण सर्व हिंदू राजे, सरदार हे मूढ व स्वत्वशून्य झालेले असल्यामुळे त्यांना कोणी उत्तर दिले नव्हते. पण आता परिस्थिस्ती पालटली होती. शिवछत्रपतींचा उदय झाला होता. त्यांनी औरंगजेबाला खरमरीत पत्र लिहून 'पादशाही पुरातन हिंदूंची आहे, तुमची नाही' असे बजावले आणि या वाक्यामागे हिंदूचे खड्ग उभे केले.<br>{{gap}}आरंभापासून अखेरपर्यंत, हिंदूंची ती पुरातन पादशाही, ती हिंदूंची साम्राज्यसत्ता पुन्हा प्रस्थापित करणे आणि हिंदुधर्म, हिंदुसंस्कृती यांचे रक्षण करणे हाच महाराजांचा जीवनहेतू होता, हे यावरून स्पष्ट होईल. त्यातच त्यांची स्वधर्मसाधना होती, त्यातच त्यांचा मोक्ष होता.<br><br>'''(२) राजा - कालकारण'''<br>{{gap}}प्राचीन काळी स्वराज्याची, आसमुद्र साम्राज्याची अशी महती ऋषींनी तत्ववेत्त्यांनी गायिलेली असताना, सर्व धर्म राजधर्मप्रधान आहेत, असे सांगितलेले असताना, हिंदू राजांना, शास्त्रीपंडितांना स्वराज्याचा एवढा विसर पडावा याचे कारण काय, असा प्रश्न मनात येतो. कलियुगाचे तत्त्वज्ञान हे त्याचे कारण आहे.<br><br>'''कलियुग'''<br>{{gap}}कृत, त्रेता, द्वापार आणि कली अशी चार युगे आपल्याकडे मानलेली आहेत.<noinclude></noinclude>
qmczrf1sxec7u9q4819ixrr59z4nzux
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१७
104
73470
230610
164448
2026-06-02T03:26:00Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230610
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||३९२}}</noinclude>त्यांतील कलियुग या शेवटच्या युगात धर्म लयास जाणार, मानवाची प्रज्ञा, बुद्धिमत्ता, कर्तृत्व यांचा पूर्ण ऱ्हास होणार, असा सिद्धान्त या भूमीत रूढ झालेला आहे. या तऱ्हेची कलियुगकल्पना, हे कलियुगाचे तत्त्वज्ञान, प्रामुख्याने पुराणांनी प्रतिपादिलेले आहे. वायू, गरुड, लिंग इ. पुराणांत कलियुगाची, म्हणजे त्या युगात होणाऱ्या अधःपाताची भयानक वर्णने आहेत. वेदांत किंवा उपनिषदांत कलियुगतत्त्व नाही. स्मृतींतही नाही. महाभारताला कलियुग मान्य नाही. मानव हा कालवश नसून आत्मवश आहे, असाच व्यासमुनींचा सिद्धांत आहे. 'राजा आपल्या पराक्रमाने कृतयुग निर्माण करू शकतो, काल हा राजाचे कारण नसून राजा हाच कालकारण आहे. राजा एव युगमुच्यते ।' अशी वचने महाभारतात आढळतात. धर्म आणि राज्य यांचा विवेक करून, 'राजाच युग निर्माण करतो' असे शुक्रनीतीही म्हणते. पण हळूहळू पुराणांचा पगडा हिंदू मनावर बसू लागला, त्यांतील कलियुग कल्पनेचे विष समाजाच्या अंगात भिनू लागले आणि दहाव्या अकराव्या शतकाच्या सुमारास त्याची जीवशक्ती अगदी क्षीण होऊन गेली. यापुढे हिंदू राजा होणारच नाही, राजा मुसलमानच असणार, असाच सिद्धांत हिंदू मानसात रुतून बसला आणि हा समाज हतवीर्य झाला. प्राचीन काळी ऋषिमुनी पुण्यशील होते. देवाची या भूमीवर कृपा होती. पण तो काळ निराळा. आता कलियुग आले. आता ऋषिमुनी येथून निघून जाणार आणि देवही हिंदूंना प्रतिकूलच होणार, अशी अत्यंत घातकी श्रद्धा पुराणकारांनी, शास्त्रीपंडितांनी, भटभिक्षुकांनी, बुबागोसाव्यांनी रुजवून टाकली. महाराष्ट्रातून हिंदू राज्ये नष्ट झाली, याविषयी महिकावतीची बखर लिहिणारा लेखक म्हणतो, 'कलियुगात असा प्रकार होणार अशी भाक (वचन) लक्ष्मीनारायणाने कलीस दिली होती. ती शके १२७० (इ. स. १२४८)त खरी ठरली. हरिहर गुप्त झाले, ऋषि बद्रिकाश्रमी गेले, वसिष्ठही गेले, सूर्यवंशी, चंद्रवंशी क्षत्रिय यांची शस्त्रविद्या लुप्त झाली.'<br>{{gap}}विश्वाचे त्राते जे देव आणि ऋषिमुनी त्यांनीच आपल्याला कलीच्या स्वाधीन केले आहे, अशी श्रद्धा जो समाज जोपासतो त्याच्या हातून पराक्रम कसा होणार ? मुस्लिमांचे राज्य व्हावे, असे देवाच्या मनात असले, तर आपल्याला स्थापण्यात यश कसे येणार, अशी विपरीत बुद्धी ज्या लोकांची झाली त्यांच्या हातून परकीय आक्रमणाचा प्रतिकार कसा होणार ?<br><br>'''श्रींची इच्छा'''<br>{{gap}}कलियुगाचा हा फास हिंदूंच्या मानेभोवती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांच्या हातून स्वराज्याचा उद्योग होणार नाही हे शिवछत्रपतींनी जाणले आणि तो तोडण्यासाठी त्यांनी जाहीर घोषणा केली, 'हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे'. दादाजी नरस प्रभू यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, 'श्री रोहिरेश्वर याणी आम्हांस यश<noinclude></noinclude>
id9cfm35njsrx8ohxstzk50th32741t
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१८
104
73471
230611
164449
2026-06-02T03:26:15Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230611
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|३९३|| मराठा काल}}</noinclude>दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ, हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे. '<br>{{gap}}परमेश्वरच आपल्याला प्रतिकूल आहे, आपल्याविरुद्ध आहे हे कलियुगाचे तत्त्वज्ञान होते. त्याचा उच्छेद शिवछत्रपतींनी केला. 'हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींचीच इच्छा आहे' असा या रीतीने आत्मविश्वास त्यांनी मराठ्यांच्या ठायी निर्माण केला आणि त्यामुळेच मुस्लिम सत्तेचे निर्दालन करून मराठी साम्राज्य भारतात स्थापण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले. जावळीचे मोरे दिमाखाने म्हणत, 'आम्हांस पादशहाने, राजे किताब, मेहरबान होऊन दिधले.' महाराजांनी त्यांना बजावले की 'आम्हांस श्री शंभूने राज्य दिले आहे.'<br>{{gap}}परमेश्वरच हिंदुराजांना प्रतिकूल आहे. त्यानेच कलीला, त्यांच्या शत्रूंना, आशीर्वाद दिला आहे, या दुष्ट कल्पनेचे महाराजांना निर्मूलन करावयाचे होते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी, तसे काही नसून तो आपल्या पाठीशी सतत उभा आहे, असे ते सांगत असत. व्यंकोजीला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, 'तुम्ही असा विचार करावा होता की श्री देवाची व श्रीची कृपा त्यावरी (आम्हांवरी) पूर्ण झाली आहे. दुष्ट तुर्काला ते मारतात. तेव्हा आपल्या (व्यंकोजीच्या) सैन्यातही तुरुक लोकच असता जय कैसा होतो आणि तुरुक लोक कैसे वाचो पाहातात ?'<br>{{gap}}व्यंकोजीच्या ठायी शहाजी राजांच्या सारखाच काहीसा पराक्रम होता. पण विजापूरच्या पादशहाच्या कृपेने आपण राज्य मिळविले अशी त्याची श्रद्धा होती, स्वराज्याची उभारी त्याच्या मनाला पेलेचना. म्हणून 'स्वराज्यसाधनेला श्रीच अनुकूल आहेत. दुष्ट तुरुकांचा, देवच आमच्या हातून नाश करवीत आहेत' असा विचार छत्रपतींनी त्याला या पत्रात मुद्दाम सांगितला. पण दुर्दैवाने त्याचे मेलेले मन जिवंत झाले नाही.<br><br>'''पुरुष - प्रयत्न'''<br>{{gap}}कलियुगाचे तत्त्वज्ञान हे अपरिहार्यपणेच दैववादी आहे. मानव हा कालवश आहे हाच तर त्याचा मुख्य सिद्धांत. तेव्हा प्रयत्नवादाला काही अर्थच राहात नाही आणि प्रयत्नवादावाचून कोणत्याही समाजाचा अभ्युदय होणे शक्य नाही. 'यत्न तो देव जाणावा', असे समर्थांनी सांगितले ते याच अर्थाने, आणि शिवछत्रपती तर मूर्तिमंत प्रयत्नवाद. हिंदवी स्वराज्याला श्री अनुकूल आहेत हे खरे असले तरी, 'न ऋते श्रांतस्य सख्याय देवाः'–कष्ट केल्यावाचून देव कोणावर प्रसन्न होत नाहीत- हे वेदवचन त्यांनी चांगले जाणले होते. त्यामुळेच कलियुग कल्पनेवरोवरोच दैववादाचाही त्यांनी निषेध केला. मल्हारराव रामराव चिटणीस यांनी आपल्या सप्तप्रकरणात्मक चरित्रात महाराजांचे हे विचार चांगले व्यक्त केले आहेत. महाराजांनी विचार केला, 'आपण हिंदू, सर्व दक्षण देश म्लेंच्छांनी ग्रासिला, धर्म बुडविला. हा रक्षणार्थ प्राणही वेचून धर्म रक्षू व आपले पराक्रमाने नवीन दौलत संपादू. नवे साधावे हे या कुलात जन्म-<noinclude></noinclude>
q3oitwc6h6r6hu8twngfrut7q4sr3bl
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४१९
104
73472
230612
164450
2026-06-02T03:26:27Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230612
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||३९४}}</noinclude>ल्याचे सार्थक. पुरुषप्रयत्न बलवत्तर, दैव पंगू आहे. यास्तव प्रयत्ने अलबल करावे, त्यास दैव जसजसे सहाय्य होईल तसतसे अधिक करीत जावे. देव परिणामास नेणार समर्थ आहे.'<br>{{gap}}महाराजांच्या धर्मक्रांतीच्या तत्त्वज्ञानातील हा दुसरा सिद्धान्त होय. स्वराज्य आणि स्वधर्म यांचा अभेद हा पहिला आणि समाजाच्या उत्कर्षाचे काल हे कारण नसून राजा (मानव) हे कारण आहे, राजाच कृतयुग वा कलियुग निर्माण करतो हा दुसरा सिद्धनत होय.<br><br>'''(३) क्षत्रियकुलावतंस'''<br>'''दोनच वर्ण'''<br>{{gap}}कलियुगात धर्म लयास जाणारच, मानवी कर्तृत्व लोपणारच, असे पुराणे सांगत होती. त्यामुळे हिंदूंचा आत्मविश्वास नष्ट झाला होता. या युगात मुस्लिमच राजा होणार, हिंदू सरदार राजपदी येऊ शकणारच नाही, असा समज रूढ झाला होता. या युगात सत्ता यवनांची, म्लेंच्छांची होणार हा विचार हिंदू लोकांनी अगतिक होऊन स्वीकारला होता. याच्या भरीला शास्त्रीपंडितांनी आणखी एक विषबिंदू त्यांच्या जीवनात कालवून ठेवला होता. 'कलावाद्यंतयोः स्थितिः ।' कलियुगात पहिला म्हणजे ब्राह्मण वर्ण आणि अंतीचा म्हणजे शुद्र वर्ण हे दोन वर्ण आहेत. क्षत्रिय आणि वैश्य हे दोन्ही वर्ण या युगात नष्ट झालेले आहेत हा तो विषबिंदू होय. विष्णु पुराण, मत्स्य- पुराण यांनी सांगून टाकले, 'नंदांतम् क्षत्रियकुलम्' - नंदवंशाबरोबरच क्षत्रियकुळे सर्व नष्ट झाली. या नंदवंशाचा महाराज चंद्रगुप्त मौर्य यांनी उच्छेद करून स्वतःचे साम्राज्य स्थापिले होते आणि पुराणांच्या मते त्याच वेळी भारतातले सर्व क्षत्रियवंश नाहीसे झाले. महाराज चंद्रगुप्तांनी साम्राज्य स्थापन केले, अखिल भारतभर त्याचा विस्तार केला. पण पुराणांच्या मते ते शूद्र होते. वास्तविक कलियुगात क्षत्रिय नाहीत, हे मत कोणत्याही स्मृतिकाराने मान्य केलेले नाही. ज्यांना पुराणांनी शूद्र ठरविले त्या मौर्य आणि सातवाहन वंशातील थोर सम्राटांनी अश्वमेध यज्ञही केले होते आणि त्या वेळच्या ब्राह्मणांनी त्यांचे पौरोहित्यही केले होते. पण पुराणलेखकांनी आपला दुराग्रह सोडला नाही आणि दुर्दैवाने सातव्या आठव्या शतकापासून पुराणमतांची पकड समाजमनावर जास्त जास्त दृढपणे बसू लागली. हिंदूंच्या अधःपाताला तेथूनच प्रारंभ झाला. पुराणानंतर स्मृतींवर भाष्य लिहिणारे जे निबंधकार त्यांनी पण 'कलावाद्यंतयोः स्थितिः ।' हाच सिद्धान्त उचलून धरला. वास्तविक या मधल्या काळात अनेक क्षत्रिय राजघराणी उदयास आली होती आणि त्यांनी महापराक्रम करून साम्राज्येही स्थापिली होती. पण परिस्थिती पाहून, इतिहास पाहून, स्वतः अवलोकन करून, धर्मतत्त्वांचा निश्चय करावा, ही प्राचीनांची परंपराच पुराणानंतर भारतातून नष्ट होत चालली आणि<noinclude></noinclude>
e141xwsxoz2q2g2lkhiisspjqqwzia7
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२०
104
73473
230613
164451
2026-06-02T03:26:42Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230613
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|३९५|| मराठा काल}}</noinclude>मूढ, अविवेकी शास्त्रीपंडित समाजाला अधःपातास नेईल, असाच धर्म सांगत राहिले. 'शूद्रकमलाकर' हा ग्रंथ लिहिणारा कमलाकर भट्ट, शुद्धितत्त्वकार रघुनंदन, 'व्रात्य- प्रायश्चित्तचिंतामणी' लिहिणारा नागेश भट्ट हे धर्मशास्त्रकार याच वर्गातले होते. श्रीकृष्ण, व्यास, भीष्म यांच्या धर्माच्या व्याख्या वर दिल्या आहेत. त्याअन्वये पाहता धर्म हा शब्द उच्चारण्याची सुद्धा त्यांची पात्रता नव्हती. पण विनाशकाले विपरीत बुद्धिः । अशी हिंदुसमाजाची अवस्था होऊन या समाजाने या मूढांचे धर्मशास्त्रच वंद्य मानले. आणि ते जवळजवळ सहाशे वर्षे !<br><br>'''ब्रह्मक्षत्र'''<br>{{gap}}शिवछत्रपतींचे अलौकिकत्व हे की ते जसे महापराक्रमी होते तसेच, वर सांगितल्याप्रमाणे, तत्त्ववेत्तेही होते. म्हणून त्यांनी कलियुगात क्षत्रिय नाहीत या घातकी कल्पनेचा त्याग केला आणि स्वतःला 'क्षत्रियकुलावतंस' म्हणवून घेऊन राज्याभिषेकही करवून घेतला. त्यांनी केलेल्या धर्मक्रांतीतला हा तिसरा सिद्धान्त होय. 'हिंदुभूमीत या कालातही क्षत्रियवंश अखंड आहेत !' सुदैवाने गागाभट्टांसारखे थोर ब्राह्मण धर्मवेत्ते या विचाराला अनुकूल होते. त्यांनी महाराजांना साथ देऊन हे धर्मतत्त्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रकारे साह्य केले. महाभारतकारांच्या शब्दांत म्हणजे हा ब्रह्मक्षत्र योग होय.<br><br>'''(४) समुद्रगमन - आरमार'''<br>{{gap}}'समुद्रगमननिषेध' हे शास्त्रीपंडितांनी प्रचलित केलेले आणखी एक घातकी धर्मतत्त्व होय. 'कलिवर्ज्यप्रकरण' म्हणून एक धर्मग्रंथ दहाव्या अकराव्या शतकाच्या सुमारास लिहिला गेला आणि त्याने कलियुगात 'समुद्रगमन' हे वर्ज्य आहे, असे सांगितले. द्विजस्य अब्धौ तु नौ यातुः शोधितस्य अपि असंग्रहः । नावेतून समुद्रगमन करणाऱ्या द्विजाचा, त्याने प्रायश्चित्त घेतले तरी, परत स्वीकार करू नये, असा निर्बंध त्याने घालून दिला. प्रथम तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तीन द्विजवर्णापुरता होता. पुढे रूढीने तो सर्व वर्गांना लावून टाकला आणि त्यामुळे हा देश सर्व बाजूंनी दरिद्री झाला. दहाव्या शतकाच्या आधी धर्मप्रसारासाठी, साम्राज्यविस्तारासाठी आणि व्यापारासाठी हिंदू लोक सर्व जगभर फिरत होते. आग्नेय आशियातील जावा, सुमात्रा, सयाम, अनाम या देशांत हिंदू साम्राज्ये त्यांनी स्थापन केली होती आणि रामायण- महाभारताच्या संस्कृतीचा प्रसारही केला होता. अरब देश, इजिप्त, ग्रीस, रोम या देशांशी व्यापार करून अगणित संपत्ती ते स्वदेशी आणीत असत. हे सर्व आता थांबले. कारण समुद्रगमन, परदेशगमन हे धर्मशास्त्राने हिंदूंना वर्ज्य केले आणि समाजाने हा दंडक मानला. शिवछत्रपतींनी हा दंडक मानला असता तर त्यांना मराठा आरमार निर्माण करताच आले नसते. पण 'समाजाचा उत्कर्ष ज्याने होईल तो धर्म,' त्यांचा<noinclude></noinclude>
q8m6ycjfxx212bqnituk5fl6rgsjkb3
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२१
104
73474
230614
164452
2026-06-02T03:28:37Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230614
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||३९६}}</noinclude>असा बुद्धीनिश्रय असल्यामुळे त्यांनी शास्त्राचा हा आत्मघातकी निर्बंध मोडून काढला आणि कोकणात जलदुर्ग बांधून आरमाराची स्थापना केली. 'नवे करावे हे या कुलात जन्मल्याचे सार्थक,' अशी त्यांची धारणाच होती. त्यानी नुसते आरमार स्थापन केले एकढेच नव्हे, तर समुद्रगमनाचा पायंडा स्वतः घालून दिला. १६६५ साली ८५ शिवाडे व ३ गलबते घेऊन त्यांनी वेदनूरचे मुख्य बंदर जे बसरूर त्यावर जातीने स्वारी केली आणि सुरतेप्रमाणे तेथून अपार धन मिळविले. ही स्वारी करून समुद्रगमन, परदेशगमन हे हिंदुधर्मीयांना पूर्ण विहित आहे, असा सिद्धान्त पुन्हा नव्याने त्यांनी प्रस्थापित केला.<br><br>'''(५) पतितपरावर्तन'''<br>{{gap}}शास्त्रीपंडितांनी रूढविलेल्या आत्मघातकी (अ) धर्मशास्त्राचे निर्मूलन करून, शिवछत्रपती धर्माच्या सर्व क्षेत्रांत कसे पुरोगामी धोरण अवलंबीत होते, ते आपण पाहत आहो. पतितपरावर्तन किंवा धर्मांतरितांची शुद्धी हे असेच क्षेत्र किंवा धर्माचे अंग होते. कलिवर्ज्य प्रकरणाने ज्याप्रमाणे समुद्रगमन निषिद्ध ठरविले आणि हिंदूंचा अःधपात घडविला त्याचप्रमाणे, शुद्धिबंदीचा दंडक घालून देऊन, हिंदुधर्माला व हिंदुसमाजाला कायमचा क्षय लावून ठेविला.<br><br>'''स्मृतिकार देवल'''<br>{{gap}}इ. सनाच्या आठव्या शतकापूर्वी भारतावर अन्यधर्मीयांची आक्रमणे झाली नव्हती. शक, यवन, हूण, युएची इ. परकीयांची आक्रमणे झाली. पण एक तर त्यांना स्वतःच प्रगत विकसित असा धर्म नव्हता आणि दुसरे म्हणजे या सर्व आक्रमकांचे निर्दालन करून हिंदुधर्मीयांनी त्यांना हिंदुधर्माची दीक्षा दिली व पूर्णपणे आत्मसात करून टाकले. इ. स. ७११ मध्ये महंमद कासिमाने सिंध प्रांतावर स्वारी करून तो प्रदेश जिंकला व हजारों हिंदूंना बळाने वाढविले. तेव्हा पतितांच्या, बाटलेल्यांच्या शुद्धीचा, पतितपरावर्तनाचा प्रश्न येथे प्रथमच निर्माण झाला. पण त्या वेळी हिंदू धर्मशास्त्रज्ञ सावध होते. देवल ऋषींनी नव्या स्मृतीची रचना करून पतितांची शुद्धी करण्यास अनुकूल असे धर्मशास्त्र सांगितले आणि तशी शुद्धी अनेक ठिकाणी घडवूनही आणली. पण पुढे कलिवर्ज्याच्या कर्त्याने, वर सांगितल्याप्रमाणे, पतितपरावर्तन निषिद्ध मानले आणि बळाने धर्मांतरित झालेल्यांनाही हिंदुधर्माची द्वारे बंद करून टाकली. पुढे अनेक शतके धर्मक्रांती करण्याचे धैर्य व सामर्थ्य असलेला नेता हिंदुसमाजाला न मिळाल्यामुळे हिंदुसंख्येचा क्षय होतच राहिला. याने शेवटी या समाजाचा संपूर्ण विनाश ओढवेल हे जाणून महाराजांनी ते धर्मशास्त्र रद्द ठरवून पतितांना हिंदुधर्माची द्वारे पुन्हा मोकळी करून दिली.<br><noinclude></noinclude>
4e3d1khavg6ajicyvk0gz1lxujvp21z
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९२
104
85850
230574
182039
2026-06-01T11:59:22Z
JayashreeVI
4058
230574
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|८७}}
{{rule}}</noinclude>जीं जीं क्षेत्रे लागत त्या त्या ठिकाणच्या विद्वानांशी वादविवाद करून तो विजय पत्रे मिळवीत इंद्रायणीच्या तीरीं आला. तेव्हां एक ब्रह्मराक्षस ब्राह्मणाचें रूप घेऊन वामन पंडिताकडे आला व त्याला त्यानें एकांती सांगितलें कीं, विद्यामदानें व अहंपणाने मला ब्रह्मराक्षसत्व आलें; आपल्यलाहि तीच स्थिति येणार आहे व आपली येथल्या अश्वत्थवृक्षाच्या एका फांदीवर जागा नेमलेली आहे; ती आपण तेथें येईपर्यंत मला द्यावी; वामनानें ती जागा त्यास दिली व हें ब्रह्मराक्षसत्व चुकवावयास उपाय विचारला. त्या ब्राह्मणानें सांगितले कीं साधुकृपेवांचून हे होणे शक्य नाहीं. व तुम्ही देहूस तुकारामांकडे जा. तेव्हां वामन पंडितानें आपली सर्व संपत्ति बायकोच्या अनुमतीनें ब्राह्मणांस वांटून देऊन ती दोघें विनीत वेशानें तुकारामबाबांकडे-त्या वेळीं तुकारामबाबा आळंदीस होते-गेलीं. ते कीर्तन करीत असतां त्यांना प्रणिपात करून वामनपंडित म्हणाले, तुम्ही साधु व आम्ही मुमुक्षु यास्तव कृपा करावी. तुकारामबाबा बोलले, "मी शूद्र वर्ण आहे व तुम्ही ब्राह्मण वर्ण आहांत व वर्णाश्रम धर्म रक्षावा अशी ईश्वरी आज्ञा आहे. तेव्हां तुम्ही मारुती अवतार व प्रत्यक्ष ब्राह्मण असे रामदास त्यांना शरण जा." तदनुरूप वामनपंडित चाफळास रामदासांकडे आले. रामदासांनीं 'तुम्ही बदरिकाश्रमीं जाऊन बारा वर्षे तपश्चर्या करावी म्हणजे
ईश्वर साक्षात् दर्शन देईल' असे सांगितले. त्याप्रमाणें वामन पंडित बदरिकाश्रमी जाऊन त्यांनी बारा वर्षे तप केलें. पण ईश्वर साक्षात्कार झाला नाहीं. तेव्हां भागीरथीचे कांठीं येऊन पतिपत्नीनी भागीरथींत जीव देण्याचा बेत केला व डोळे बांधून उडी टाकणार तोंच विष्णूनें साक्षात् दर्शन देऊन वामनपंडितास वर मागण्यास आज्ञा केली.
वामनपंडितानें 'साधूस जें सुख प्राप्त होतें तें द्यावें' असें मागणें मागितलें. तेव्हां विष्णूनें म्हटले, 'आम्हीं वैकुंठ लोक देऊं. पण साधूचें सुख साधूस शरण गेल्याखेरीज मिळणार नाहीं तरी रामदासांस शरण जावें." या विष्णूच्या आज्ञेप्रमाणें वामनपंडित पत्नीसह पुन्हां रामदासांकडे आले. रामदासांनी त्यांना परत श्रीशैलपर्वती असलेल्या अवधूत महाराजांकडे पाठविले. तेथें त्या महाराजांची सेवा करीत असतां त्यांची समाधीची वेळ--<noinclude></noinclude>
e22pagvg8hhru25qwcie9swaek31ll2
230575
230574
2026-06-01T11:59:52Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230575
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|८७}}
{{rule}}</noinclude>जीं जीं क्षेत्रे लागत त्या त्या ठिकाणच्या विद्वानांशी वादविवाद करून तो विजय पत्रे मिळवीत इंद्रायणीच्या तीरीं आला. तेव्हां एक ब्रह्मराक्षस ब्राह्मणाचें रूप घेऊन वामन पंडिताकडे आला व त्याला त्यानें एकांती सांगितलें कीं, विद्यामदानें व अहंपणाने मला ब्रह्मराक्षसत्व आलें; आपल्यलाहि तीच स्थिति येणार आहे व आपली येथल्या अश्वत्थवृक्षाच्या एका फांदीवर जागा नेमलेली आहे; ती आपण तेथें येईपर्यंत मला द्यावी; वामनानें ती जागा त्यास दिली व हें ब्रह्मराक्षसत्व चुकवावयास उपाय विचारला. त्या ब्राह्मणानें सांगितले कीं साधुकृपेवांचून हे होणे शक्य नाहीं. व तुम्ही देहूस तुकारामांकडे जा. तेव्हां वामन पंडितानें आपली सर्व संपत्ति बायकोच्या अनुमतीनें ब्राह्मणांस वांटून देऊन ती दोघें विनीत वेशानें तुकारामबाबांकडे-त्या वेळीं तुकारामबाबा आळंदीस होते-गेलीं. ते कीर्तन करीत असतां त्यांना प्रणिपात करून वामनपंडित म्हणाले, तुम्ही साधु व आम्ही मुमुक्षु यास्तव कृपा करावी. तुकारामबाबा बोलले, "मी शूद्र वर्ण आहे व तुम्ही ब्राह्मण वर्ण आहांत व वर्णाश्रम धर्म रक्षावा अशी ईश्वरी आज्ञा आहे. तेव्हां तुम्ही मारुती अवतार व प्रत्यक्ष ब्राह्मण असे रामदास त्यांना शरण जा." तदनुरूप वामनपंडित चाफळास रामदासांकडे आले. रामदासांनीं 'तुम्ही बदरिकाश्रमीं जाऊन बारा वर्षे तपश्चर्या करावी म्हणजे
ईश्वर साक्षात् दर्शन देईल' असे सांगितले. त्याप्रमाणें वामन पंडित बदरिकाश्रमी जाऊन त्यांनी बारा वर्षे तप केलें. पण ईश्वर साक्षात्कार झाला नाहीं. तेव्हां भागीरथीचे कांठीं येऊन पतिपत्नीनी भागीरथींत जीव देण्याचा बेत केला व डोळे बांधून उडी टाकणार तोंच विष्णूनें साक्षात् दर्शन देऊन वामनपंडितास वर मागण्यास आज्ञा केली.
वामनपंडितानें 'साधूस जें सुख प्राप्त होतें तें द्यावें' असें मागणें मागितलें. तेव्हां विष्णूनें म्हटले, 'आम्हीं वैकुंठ लोक देऊं. पण साधूचें सुख साधूस शरण गेल्याखेरीज मिळणार नाहीं तरी रामदासांस शरण जावें." या विष्णूच्या आज्ञेप्रमाणें वामनपंडित पत्नीसह पुन्हां रामदासांकडे आले. रामदासांनी त्यांना परत श्रीशैलपर्वती असलेल्या अवधूत महाराजांकडे पाठविले. तेथें त्या महाराजांची सेवा करीत असतां त्यांची समाधीची वेळ--<noinclude></noinclude>
eu6r7ufkio3nrvp7mjrxcdpdthqlmvd
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९३
104
85851
230615
182040
2026-06-02T06:27:29Z
JayashreeVI
4058
230615
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|८८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>जवळ आली म्हणून त्यांनी रामदासांकडे जाऊन आपली संशयनिवृत्ति करून घ्यावी म्हणून वामनपंडितास सांगितले. म्हणून वामन पंडित तिस-यांदां रामदासांकडे आले व या खेपेस मात्र रामदासांच्या सहवासांत
वामनपंडित ज्ञानपूर्ण व निःसंशय झाले. तरी पण दासबोधांतील सातव्या दशकांतील चवदा ब्रह्मांच्या प्रश्नाचा उलगडा त्यांच्या मनाला बरोबर झाला नाहीं. म्हणून त्यांनीं 'दासबोधाचें मी स्वतः पारायण करतों व स्वामीनीं स्वमुखें त्यांचा अर्थ सांगावा' अशी विनंति केली. तेव्हां चवदा ब्रह्मांविषयीं वामनानीं प्रश्न केला व त्याचें उत्तर स्वामीनीं दिले पण त्यानें पंडिताचें समाधान झाले नाहीं; असें एकदोनदां झालें तरी वामन पंडिताची संशयनिवृत्ति होईना. तेव्हां समर्थ भुभुःकार करून शेपटाचा मोठा तडाखा देऊन बोल बोल असें वामनास म्हणूं लागले. तो त्यांच्या त्या स्वरूपाकडे पाहून वामनपंडित भयभीत होऊन 'स्वामी माझी समस्या पूर्ण झाली' असें बोलला. याप्रमाणें स्वामींनीं त्रिवार विचारलें व पंडितांनीं त्रिवार पूर्वी प्रमाणें उत्तर दिले. नंतर स्वामींनी पूर्वरूप धारण
करून वामनपंडितास विचारले, 'तुझी समस्या पूर्ण झाली किंवा नाहीं.' वामनांनीं नाहीं असें उत्तर करतांच स्वामी म्हणाले. 'इतक्यांत कबूल करून आतां कां फिरतोस.' वामनपंडित ह्मणालें, आपण आद्यरुद्ररूप
धारण केले त्याबरोबर बोलण्याचें सामर्थ्य कोणाचें आहे.' नंतर स्वामी हास्य करून बोलले, 'तुम्ही इतके ग्रंथ वाचले असतां चवदा ब्रह्मांचा प्रश्न कोणत्याही ग्रंथी पाहिला नाहीं म्हणतां याचें आश्चर्य वाटतें. 'आतां
वृहदारण्यांत चवदा ब्रह्मांची स्थापना करून उडविण्याचा प्रकार आहे तो पहा. त्यांत असल्यास आमच्या ग्रंथांत असूं द्यावा नाहीं तर काढून टाकावा! वामनपंडितांनी स्वामींनी सांगितल्या ठिकाणीं तें प्रकरण पाहून त्यांचें पूर्ण समाधान झालें. नंतर वामनपंडितांनीं स्वामींच्या सांगीवरून मराठींत बहुत ग्रंथ केले व त्यांतील सुंदर यमकें पाहून रामदासांनी वामनपंडिताचें 'यमक्या वामन' असें नांव ठेविलें.
<br>{{gap}}आतां रामदासांच्या चरित्रांतील इतर बाबींकडे वळू. चाफळास व
परळीस मठ स्थापन करून जागजागीं मारुतीचीं देवळें बांधल्यानंतर--<noinclude></noinclude>
4rtz521r66m0ig1bn1uvw57p6zzhfa2
230616
230615
2026-06-02T06:27:55Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230616
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|८८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>जवळ आली म्हणून त्यांनी रामदासांकडे जाऊन आपली संशयनिवृत्ति करून घ्यावी म्हणून वामनपंडितास सांगितले. म्हणून वामन पंडित तिस-यांदां रामदासांकडे आले व या खेपेस मात्र रामदासांच्या सहवासांत
वामनपंडित ज्ञानपूर्ण व निःसंशय झाले. तरी पण दासबोधांतील सातव्या दशकांतील चवदा ब्रह्मांच्या प्रश्नाचा उलगडा त्यांच्या मनाला बरोबर झाला नाहीं. म्हणून त्यांनीं 'दासबोधाचें मी स्वतः पारायण करतों व स्वामीनीं स्वमुखें त्यांचा अर्थ सांगावा' अशी विनंति केली. तेव्हां चवदा ब्रह्मांविषयीं वामनानीं प्रश्न केला व त्याचें उत्तर स्वामीनीं दिले पण त्यानें पंडिताचें समाधान झाले नाहीं; असें एकदोनदां झालें तरी वामन पंडिताची संशयनिवृत्ति होईना. तेव्हां समर्थ भुभुःकार करून शेपटाचा मोठा तडाखा देऊन बोल बोल असें वामनास म्हणूं लागले. तो त्यांच्या त्या स्वरूपाकडे पाहून वामनपंडित भयभीत होऊन 'स्वामी माझी समस्या पूर्ण झाली' असें बोलला. याप्रमाणें स्वामींनीं त्रिवार विचारलें व पंडितांनीं त्रिवार पूर्वी प्रमाणें उत्तर दिले. नंतर स्वामींनी पूर्वरूप धारण
करून वामनपंडितास विचारले, 'तुझी समस्या पूर्ण झाली किंवा नाहीं.' वामनांनीं नाहीं असें उत्तर करतांच स्वामी म्हणाले. 'इतक्यांत कबूल करून आतां कां फिरतोस.' वामनपंडित ह्मणालें, आपण आद्यरुद्ररूप
धारण केले त्याबरोबर बोलण्याचें सामर्थ्य कोणाचें आहे.' नंतर स्वामी हास्य करून बोलले, 'तुम्ही इतके ग्रंथ वाचले असतां चवदा ब्रह्मांचा प्रश्न कोणत्याही ग्रंथी पाहिला नाहीं म्हणतां याचें आश्चर्य वाटतें. 'आतां
वृहदारण्यांत चवदा ब्रह्मांची स्थापना करून उडविण्याचा प्रकार आहे तो पहा. त्यांत असल्यास आमच्या ग्रंथांत असूं द्यावा नाहीं तर काढून टाकावा! वामनपंडितांनी स्वामींनी सांगितल्या ठिकाणीं तें प्रकरण पाहून त्यांचें पूर्ण समाधान झालें. नंतर वामनपंडितांनीं स्वामींच्या सांगीवरून मराठींत बहुत ग्रंथ केले व त्यांतील सुंदर यमकें पाहून रामदासांनी वामनपंडिताचें 'यमक्या वामन' असें नांव ठेविलें.
<br>{{gap}}आतां रामदासांच्या चरित्रांतील इतर बाबींकडे वळू. चाफळास व
परळीस मठ स्थापन करून जागजागीं मारुतीचीं देवळें बांधल्यानंतर--<noinclude></noinclude>
thbdpdjd3r343hlptdhzatboq7uafvl
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९४
104
85852
230618
182041
2026-06-02T06:43:33Z
JayashreeVI
4058
230618
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|८९}}
{{rule}}</noinclude>पुन्हां एकदां रामदास रामेश्वराच्या यात्रेस जाऊन आले. नंतर जांबास घरच्या मंडळीस भेटण्यास गेले. व त्यावेळी दोन वर्षे इकडे तिकडे हिंडून पुन्हां एकदां जांबास येऊन मग चाफळास परत आले.
<br>{{gap}}रामदासांची आई सन १६५५ मध्ये वारली. तेव्हां रामदास भावास भेटण्यास गेले व आईचें औध्वर्दोहक झाल्यावर पंधरा दिवसांनी परत परळीस आले.
<br>{{gap}}सन १६५९ मध्ये शिवाजीनें अफजूलखानास मारलें व त्यानंतर शिवाजी परळीस रामदासांस भेटण्यास गेला व रामदासांनी दासबोधाच्या अठराव्या दशकांतील सहाव्या समासांतील बोध त्यास केला. त्या प्रसंगी शिवाजीनेंही रामदासानी स्थापन केलेल्या अकरा मारुतींस इनाम गांव करून दिले.
<br>{{gap}}पुढें एकदां रामदास पंढरपुरास गेले व तेथे विठ्ठलाची मूर्ति रामदासांच्या प्रभावानें कांहीं वेळ रामरूप झाली.
<br>{{gap}}कर्नाटकाच्या स्वारीहून परत आल्यावर रामदासांच्या सल्ल्यानें आपत्याला राज्याभिषेक करवून घेण्याचा शिवाजीनें निश्चय केला. व तदनंतर गागाभट्टाच्या हस्ते सन १६७४ मध्ये हा समारंभ रायगडीं मोठ्या थाटाने साजरा करण्यांत आला. या निमित्तानें शिवाजीनें परळीच्या मठास आणखी कांहीं गांव इनाम करून दिले.
<br>{{gap}}रामदासांचे थोरले बंधु श्रेष्ठ हे सन १६७७ मध्यें परधामास गेले. त्यांना रामजीबाबा व श्यामजीबाबा असे दोन पुत्र होते. रामदासांनी आपल्या शिष्यांकडून या दोन मुलांना आपल्यापाशीं परळीस आणून वर्षभर ठेऊन मग जांबास आपल्या घरी परत पाठविलें.
<br>{{gap}}सन १६७८ मध्ये शिवाजीनें चाफळमठास पुन्हां एकदां बरेच गांव इनाम करून दिले व त्याच्या सनदा दिवाकर गोसावी यांजपाशीं दिल्या.
<br>{{gap}}शिवाजीमहाराज सन १६८० सालीं रायगडावर मयत झाले. ही वार्ता ऐकून रामदासस्वामींस अत्यंत दुःख झालें. तेव्हांपासून स्वामींनी फारसें कोठें जाण्याचें सोडले व त्यांनीं अन्नही वर्जिले व निवळ दुधावर राहू लागले. तेव्हां स्वामींचाही काळ जवळ आला असे शिष्यमंडळींनी ताडलें. म्हणून चाफळच्या मठाची व एकंदर पंथाची व्यवस्था व कारभार कोणी करा-<noinclude></noinclude>
5r3ameo1xohyxfaw7lvq2jj18pz199n
230619
230618
2026-06-02T06:43:57Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230619
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|८९}}
{{rule}}</noinclude>पुन्हां एकदां रामदास रामेश्वराच्या यात्रेस जाऊन आले. नंतर जांबास घरच्या मंडळीस भेटण्यास गेले. व त्यावेळी दोन वर्षे इकडे तिकडे हिंडून पुन्हां एकदां जांबास येऊन मग चाफळास परत आले.
<br>{{gap}}रामदासांची आई सन १६५५ मध्ये वारली. तेव्हां रामदास भावास भेटण्यास गेले व आईचें औध्वर्दोहक झाल्यावर पंधरा दिवसांनी परत परळीस आले.
<br>{{gap}}सन १६५९ मध्ये शिवाजीनें अफजूलखानास मारलें व त्यानंतर शिवाजी परळीस रामदासांस भेटण्यास गेला व रामदासांनी दासबोधाच्या अठराव्या दशकांतील सहाव्या समासांतील बोध त्यास केला. त्या प्रसंगी शिवाजीनेंही रामदासानी स्थापन केलेल्या अकरा मारुतींस इनाम गांव करून दिले.
<br>{{gap}}पुढें एकदां रामदास पंढरपुरास गेले व तेथे विठ्ठलाची मूर्ति रामदासांच्या प्रभावानें कांहीं वेळ रामरूप झाली.
<br>{{gap}}कर्नाटकाच्या स्वारीहून परत आल्यावर रामदासांच्या सल्ल्यानें आपत्याला राज्याभिषेक करवून घेण्याचा शिवाजीनें निश्चय केला. व तदनंतर गागाभट्टाच्या हस्ते सन १६७४ मध्ये हा समारंभ रायगडीं मोठ्या थाटाने साजरा करण्यांत आला. या निमित्तानें शिवाजीनें परळीच्या मठास आणखी कांहीं गांव इनाम करून दिले.
<br>{{gap}}रामदासांचे थोरले बंधु श्रेष्ठ हे सन १६७७ मध्यें परधामास गेले. त्यांना रामजीबाबा व श्यामजीबाबा असे दोन पुत्र होते. रामदासांनी आपल्या शिष्यांकडून या दोन मुलांना आपल्यापाशीं परळीस आणून वर्षभर ठेऊन मग जांबास आपल्या घरी परत पाठविलें.
<br>{{gap}}सन १६७८ मध्ये शिवाजीनें चाफळमठास पुन्हां एकदां बरेच गांव इनाम करून दिले व त्याच्या सनदा दिवाकर गोसावी यांजपाशीं दिल्या.
<br>{{gap}}शिवाजीमहाराज सन १६८० सालीं रायगडावर मयत झाले. ही वार्ता ऐकून रामदासस्वामींस अत्यंत दुःख झालें. तेव्हांपासून स्वामींनी फारसें कोठें जाण्याचें सोडले व त्यांनीं अन्नही वर्जिले व निवळ दुधावर राहू लागले. तेव्हां स्वामींचाही काळ जवळ आला असे शिष्यमंडळींनी ताडलें. म्हणून चाफळच्या मठाची व एकंदर पंथाची व्यवस्था व कारभार कोणी करा-<noinclude></noinclude>
3mc0i3pd8smzf0igeskdseswjjl0ys3
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९५
104
85853
230620
182042
2026-06-02T06:55:03Z
JayashreeVI
4058
230620
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh| |सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>वयाचा याबद्दल स्वामींनीं आज्ञा करावी म्हणून शिष्यांनी वारंवार विनंति केली. तेव्हां एकदां स्वामींनी सांगितलें कीं, जांबेहून श्रेष्ठांचा ज्येष्ठ पुत्र रामचंद्रबाबा यांना आणवून त्यांचे आज्ञेनें सर्व कारभार चालवावा. खरोखरी रामदासांची हीच आज्ञा होती किंवा शिष्यापैकी योग्य शिष्यानें मठाधिपति व्हावें अशी होती हे समजणें कठीण आहे. इतकें खरें कीं, रामदासांच्या पश्चात् रामचंद्रबाबा या संस्थानाकडे आले नाहीत व मठाची सर्व व्यवस्था कांहीं काळपर्यंत तरी शिष्यांकडे होती. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत रामचंद्रबाबांचे चिरंजीव गंगाधरबाबा यांना परळी व चाफळ येथील अधिकार देण्यांत आला व पुढें तो अधिकार गंगाधरबाबांच्या वंशजाकडे कायमचा आला, हें खरें; परंतु ही व्यवस्था शिष्यमंडळींतील व्यवस्थेसंबंधाचा तंटा कायमचा नाहींसा करण्याकरितां शाहू महाराजांनीं रामदासांच्या शिष्यांच्याच मदतीनें घडवून आणलेली दिसते.
<br>{{gap}}शिवाजीमहाराजांच्या मरणानंतर संभाजी राजे राज्यावर बसले. त्यांनीं चालविलेली अनन्वित कृत्ये ऐकून व शिष्यमंडळीच्या आग्रहावरून स्वामींनी संभाजीमहाराजांस उपदेशपर एक पत्र लिहिलें व आपल्या
शिष्याबरोबर तें त्यांजकडे पाठवून दिलें, हें पत्र या पुस्तकाच्या कलम दोन याचें शेवटीं समग्र दिले आहे. त्यावरून रामदासांची शिवाजीबद्दल केवढी आदरबुद्धि होती हे व्यक्त होतें.
<br>{{gap}}याच सुमारास परळीच्या देवालयाकारतां चंदावराहून चार मूर्ति आल्या होत्या. त्या रामदासांनी सिंहासनावर बसवून घेतल्याने त्यांना फार समाधान झालें. पुढें रामदासांनीं या मूर्तीची व चाफळच्या श्रीची पूजाअर्चा करून संस्थान संभाळून उपासनामार्ग चालवावा अशी अक्कास व इतर शिष्यमंडळीस आज्ञा केली. यानंतरं रामदास फार दिवस राहिले नाहींत. त्यांचें देहावसान सन १६८१ माघ वद्य नवमी रोजी झालें. स्वामींच्या देहाचें यथाविधि दहन करून उत्तर कार्य उद्धव गोसावी यांनी केलें. व त्या जागीं स्वामींची समाधि बांधून त्यावर लहानसें देवालय बांधून त्यांत रघुपतीच्या मूर्ति स्थापून त्यांची पूजाअर्चा सुरू केली व संस्थानचा कारभार आक्का व दिवाकर गोसावी पाहू लागले.
{{nop}}<noinclude></noinclude>
mb5khaygdum2zmyw14xpskceffmu2fw
230621
230620
2026-06-02T06:55:54Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230621
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|९०|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>वयाचा याबद्दल स्वामींनीं आज्ञा करावी म्हणून शिष्यांनी वारंवार विनंति केली. तेव्हां एकदां स्वामींनी सांगितलें कीं, जांबेहून श्रेष्ठांचा ज्येष्ठ पुत्र रामचंद्रबाबा यांना आणवून त्यांचे आज्ञेनें सर्व कारभार चालवावा. खरोखरी रामदासांची हीच आज्ञा होती किंवा शिष्यापैकी योग्य शिष्यानें मठाधिपति व्हावें अशी होती हे समजणें कठीण आहे. इतकें खरें कीं, रामदासांच्या पश्चात् रामचंद्रबाबा या संस्थानाकडे आले नाहीत व मठाची सर्व व्यवस्था कांहीं काळपर्यंत तरी शिष्यांकडे होती. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत रामचंद्रबाबांचे चिरंजीव गंगाधरबाबा यांना परळी व चाफळ येथील अधिकार देण्यांत आला व पुढें तो अधिकार गंगाधरबाबांच्या वंशजाकडे कायमचा आला, हें खरें; परंतु ही व्यवस्था शिष्यमंडळींतील व्यवस्थेसंबंधाचा तंटा कायमचा नाहींसा करण्याकरितां शाहू महाराजांनीं रामदासांच्या शिष्यांच्याच मदतीनें घडवून आणलेली दिसते.
<br>{{gap}}शिवाजीमहाराजांच्या मरणानंतर संभाजी राजे राज्यावर बसले. त्यांनीं चालविलेली अनन्वित कृत्ये ऐकून व शिष्यमंडळीच्या आग्रहावरून स्वामींनी संभाजीमहाराजांस उपदेशपर एक पत्र लिहिलें व आपल्या
शिष्याबरोबर तें त्यांजकडे पाठवून दिलें, हें पत्र या पुस्तकाच्या कलम दोन याचें शेवटीं समग्र दिले आहे. त्यावरून रामदासांची शिवाजीबद्दल केवढी आदरबुद्धि होती हे व्यक्त होतें.
<br>{{gap}}याच सुमारास परळीच्या देवालयाकारतां चंदावराहून चार मूर्ति आल्या होत्या. त्या रामदासांनी सिंहासनावर बसवून घेतल्याने त्यांना फार समाधान झालें. पुढें रामदासांनीं या मूर्तीची व चाफळच्या श्रीची पूजाअर्चा करून संस्थान संभाळून उपासनामार्ग चालवावा अशी अक्कास व इतर शिष्यमंडळीस आज्ञा केली. यानंतरं रामदास फार दिवस राहिले नाहींत. त्यांचें देहावसान सन १६८१ माघ वद्य नवमी रोजी झालें. स्वामींच्या देहाचें यथाविधि दहन करून उत्तर कार्य उद्धव गोसावी यांनी केलें. व त्या जागीं स्वामींची समाधि बांधून त्यावर लहानसें देवालय बांधून त्यांत रघुपतीच्या मूर्ति स्थापून त्यांची पूजाअर्चा सुरू केली व संस्थानचा कारभार आक्का व दिवाकर गोसावी पाहू लागले.
{{nop}}<noinclude></noinclude>
pf6wpaf49etxe6jd921suz238kxfy0b
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९६
104
85854
230630
182043
2026-06-02T08:29:17Z
JayashreeVI
4058
230630
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|९१}}
{{rule}}</noinclude>याप्रमाणे रामदासांच्या चरित्रांतील परंपरागत आलेली हकीकत आहे. रामदासांचें वय निधनसमयीं बहात्तर वर्षांचे होतें. त्यांच्या आयुष्याचे छत्तीस छत्तीस वर्षांचे समसमान असे दोन भाग पडतात. त्यांची पहिली छत्तीस वर्षे बालपण, विद्याभ्यास, तपश्चर्या व तीर्थाटन यांत गेलीं असें दिसतें. या सर्व काळीं ते बहुतेक महाराष्ट्राच्या बाहेरच होते म्हटलें तरी चालेल.
<br>{{gap}}नंतर त्यांनी कृष्णाकांठीं दोनचार वर्षे घालवून आपला रामदासीपंथ काढण्याचा विचार करून तदनुरूप १६४८ मध्यें चाफळास रामाचें देवालय बांधून उत्साहास सुरवात केली. येथून त्यांच्या आयुष्यांतील दुसऱ्या भागास प्रारंभ झाला. ही बत्तीसतेहतीस वर्षे त्यांनी आपल्या पंथाचा प्रासार करण्यांत, त्या पंथाची शिष्यशाखा वाढविण्यांत, हरिकथाकीर्तनांत, व सर्वजनांना उपदेश करण्यांत घालविलीं असे दिसतें. रामदासांच्या
बद्दल त्यांच्या शिष्यसमुदायांत विलक्षण आदरबुद्धि वसत होती व त्यांच्या या उद्योगामुळे व आयुष्यांतील इतर अलौकिक गोष्टींमुळे त्यांना लोक अवतार मानूं लागले होते असे दिसतें. रामदासांची शिष्यशाखा फार मोठी होती; त्यांनी जागोजाग आपल्या पंथाचे मठ स्थापन केले होते; तसेंच राम व मारुती यांची पुष्कळ देवळें बांधलीं होतीं; या गोष्टी सत्कार्योत्तेजक सभेच्या उद्योगानें व त्यांनी छापलेल्या कागदपत्रांनी शाबीत झाल्या आहेत येवढें खरें. पण त्यायोगें रामदासांच्या चरित्रांतील हकीकतीवर व शिवाजी-रामदास यांच्या संबंधावर फारसा प्रकाश पडला आहे
असें मात्र वाटत नाहीं. शिवाजीचा व रामदासांचा संबंध केव्हां आला व तो कशा प्रकारचा होता या वादग्रस्त प्रश्नाचा विचार या पुस्तकाच्या शेवटच्या कलमांत स्वतंत्रपणे करावयाचा आहे. तेव्हां तूर्त रामदासांच्या चरित्रांतील परंपरया आलेली हकीकत ऐतिहासिक पुराव्याशी कितपत जुळते व या परंपरागत हकीकतींत धडधडीत खोट्या व बनावट गोष्टी कोणत्या आहेत त्या आतां पाहूं.
<br>{{gap}}हनुमानस्वामींच्या बखरींत शिवाजीचा व रामदासांचा अत्यंत निकट संबंध होता व शिवाजी वारंवार रामदासांची सल्लामसलत विचारीत असे.{{nop}}<noinclude></noinclude>
2g56unr5lpnpven9bpkepnf0sqphfis
230631
230630
2026-06-02T08:30:09Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230631
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|९१}}
{{rule}}</noinclude>याप्रमाणे रामदासांच्या चरित्रांतील परंपरागत आलेली हकीकत आहे. रामदासांचें वय निधनसमयीं बहात्तर वर्षांचे होतें. त्यांच्या आयुष्याचे छत्तीस छत्तीस वर्षांचे समसमान असे दोन भाग पडतात. त्यांची पहिली छत्तीस वर्षे बालपण, विद्याभ्यास, तपश्चर्या व तीर्थाटन यांत गेलीं असें दिसतें. या सर्व काळीं ते बहुतेक महाराष्ट्राच्या बाहेरच होते म्हटलें तरी चालेल.
<br>{{gap}}नंतर त्यांनी कृष्णाकांठीं दोनचार वर्षे घालवून आपला रामदासीपंथ काढण्याचा विचार करून तदनुरूप १६४८ मध्यें चाफळास रामाचें देवालय बांधून उत्साहास सुरवात केली. येथून त्यांच्या आयुष्यांतील दुसऱ्या भागास प्रारंभ झाला. ही बत्तीसतेहतीस वर्षे त्यांनी आपल्या पंथाचा प्रासार करण्यांत, त्या पंथाची शिष्यशाखा वाढविण्यांत, हरिकथाकीर्तनांत, व सर्वजनांना उपदेश करण्यांत घालविलीं असे दिसतें. रामदासांच्या
बद्दल त्यांच्या शिष्यसमुदायांत विलक्षण आदरबुद्धि वसत होती व त्यांच्या या उद्योगामुळे व आयुष्यांतील इतर अलौकिक गोष्टींमुळे त्यांना लोक अवतार मानूं लागले होते असे दिसतें. रामदासांची शिष्यशाखा फार मोठी होती; त्यांनी जागोजाग आपल्या पंथाचे मठ स्थापन केले होते; तसेंच राम व मारुती यांची पुष्कळ देवळें बांधलीं होतीं; या गोष्टी सत्कार्योत्तेजक सभेच्या उद्योगानें व त्यांनी छापलेल्या कागदपत्रांनी शाबीत झाल्या आहेत येवढें खरें. पण त्यायोगें रामदासांच्या चरित्रांतील हकीकतीवर व शिवाजी-रामदास यांच्या संबंधावर फारसा प्रकाश पडला आहे
असें मात्र वाटत नाहीं. शिवाजीचा व रामदासांचा संबंध केव्हां आला व तो कशा प्रकारचा होता या वादग्रस्त प्रश्नाचा विचार या पुस्तकाच्या शेवटच्या कलमांत स्वतंत्रपणे करावयाचा आहे. तेव्हां तूर्त रामदासांच्या चरित्रांतील परंपरया आलेली हकीकत ऐतिहासिक पुराव्याशी कितपत जुळते व या परंपरागत हकीकतींत धडधडीत खोट्या व बनावट गोष्टी कोणत्या आहेत त्या आतां पाहूं.
{{gap}}हनुमानस्वामींच्या बखरींत शिवाजीचा व रामदासांचा अत्यंत निकट संबंध होता व शिवाजी वारंवार रामदासांची सल्लामसलत विचारीत असे.{{nop}}<noinclude></noinclude>
tq0b1yu4akm06aavdnkuweq9eqekhu9
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९७
104
85855
230632
182044
2026-06-02T08:51:54Z
JayashreeVI
4058
230632
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|९२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>असें वर्णन आहे. आतां याचें प्रत्यंतर शिवाजीच्या बखरींत कितपत आहे असे पाहूं लागलें म्हणजे या हकीकतीच्या सत्यतेबद्दल संशय उत्पन्न होऊं लागतो.
<br>{{gap}}शिवाजीच्या पूर्व काळी लिहिलेल्या तीन चार बखरी आहेत. पहिली सभासदाची, दुसरी चित्रगुप्ताची तिसरी शिर्वादग्विजय नांवाची बखर व चवथी चिटणिसाची; या कालानुक्रमानें एकामागून एक झालेल्या आहेत व आश्चर्याची गोष्ट अशी कीं, सभासदाच्या बखरींत-जी बखर शिवाजीच्या मरणानंतर १४च वर्षांनी लिहिलेली आहे-रामदासांचा नुसता नामनिर्देशही नाही! मग त्यांच्या भेटीच्या किंवा गुरुशिष्यपणाच्या गोष्टींचा उल्लेख नाहीं हें
सांगावयास नको. यानंतर लिहिलेली बखर म्हणजे चित्रगुप्त विरचित बखर. या बखरींत रामदासांचें नांव दोनदांच आले आहे. पहिला उल्लेख खालील वाक्यांत आहे.
<br>{{gap}}"या कलियुग श्री ईश्वराच्या विभूति श्री रामदासस्वामी व महाराज औरंगझेब पादशाहास ज्ञानवंत जाणविलें." येथें शिवाजी व रामदासांच्या निकट संबंधाचा उल्लेख मुळींच नाहीं.
<br>{{gap}}दुसरा उल्लेख खालील वाक्यांत आहे.
<br>{{gap}}"जैशी श्री रामदासस्वामींनी महाराज सिंहासनाधीश्वर जहालिया नंतर कृपा करून राज्यनीति स्वतः मजसाठी शास्त्रसंमतें कृता त्रेता द्वापारीं जे जे धर्मपरायण पुण्यश्लोक सोमसूर्यवंशींचे राजे वर्तत आले त्याप्रमाणें
राज्याधिकार या कलियुगी करणे."
<br>{{gap}}येथें रामदासांनी शिवाजीस राज्याभिषेकानंतर राजनीति सांगितली असें म्हटले आहे. यापेक्षां चित्रगुप्ताच्या बखरींत रामदासांच्या व शिवाजीच्या संबंधाबद्दलचा उल्लेख नाहीं. शिवादेग्विजय या बखरींत पहिला उल्लेख खालील वाक्यांत आहे.
<br>{{gap}}"ब्रह्म विद्या आध्यात्मज्ञान प्रौढपणीं श्रीमत् सज्जनगड निवासी श्री- रामदासस्वामी यांजपासोन (शिवाजीमहाराज ) अधीत झाले."
<br>{{gap}}पुढें या बखरीत शिवाजीच्या व रामदासांच्या प्रथम भेटीची व अनुग्रहाची सविस्तर हकीगत दिली आहे. ती बहुतेक शब्दशः हनुमानस्वामीं--<noinclude></noinclude>
20csre9j52784f27h791rjp00q9goft
230633
230632
2026-06-02T08:52:25Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230633
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|९२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>असें वर्णन आहे. आतां याचें प्रत्यंतर शिवाजीच्या बखरींत कितपत आहे असे पाहूं लागलें म्हणजे या हकीकतीच्या सत्यतेबद्दल संशय उत्पन्न होऊं लागतो.
<br>{{gap}}शिवाजीच्या पूर्व काळी लिहिलेल्या तीन चार बखरी आहेत. पहिली सभासदाची, दुसरी चित्रगुप्ताची तिसरी शिर्वादग्विजय नांवाची बखर व चवथी चिटणिसाची; या कालानुक्रमानें एकामागून एक झालेल्या आहेत व आश्चर्याची गोष्ट अशी कीं, सभासदाच्या बखरींत-जी बखर शिवाजीच्या मरणानंतर १४च वर्षांनी लिहिलेली आहे-रामदासांचा नुसता नामनिर्देशही नाही! मग त्यांच्या भेटीच्या किंवा गुरुशिष्यपणाच्या गोष्टींचा उल्लेख नाहीं हें
सांगावयास नको. यानंतर लिहिलेली बखर म्हणजे चित्रगुप्त विरचित बखर. या बखरींत रामदासांचें नांव दोनदांच आले आहे. पहिला उल्लेख खालील वाक्यांत आहे.
<br>{{gap}}"या कलियुग श्री ईश्वराच्या विभूति श्री रामदासस्वामी व महाराज औरंगझेब पादशाहास ज्ञानवंत जाणविलें." येथें शिवाजी व रामदासांच्या निकट संबंधाचा उल्लेख मुळींच नाहीं.
<br>{{gap}}दुसरा उल्लेख खालील वाक्यांत आहे.
<br>{{gap}}"जैशी श्री रामदासस्वामींनी महाराज सिंहासनाधीश्वर जहालिया नंतर कृपा करून राज्यनीति स्वतः मजसाठी शास्त्रसंमतें कृता त्रेता द्वापारीं जे जे धर्मपरायण पुण्यश्लोक सोमसूर्यवंशींचे राजे वर्तत आले त्याप्रमाणें
राज्याधिकार या कलियुगी करणे."
<br>{{gap}}येथें रामदासांनी शिवाजीस राज्याभिषेकानंतर राजनीति सांगितली असें म्हटले आहे. यापेक्षां चित्रगुप्ताच्या बखरींत रामदासांच्या व शिवाजीच्या संबंधाबद्दलचा उल्लेख नाहीं. शिवादेग्विजय या बखरींत पहिला उल्लेख खालील वाक्यांत आहे.
<br>{{gap}}"ब्रह्म विद्या आध्यात्मज्ञान प्रौढपणीं श्रीमत् सज्जनगड निवासी श्री- रामदासस्वामी यांजपासोन (शिवाजीमहाराज ) अधीत झाले."
<br>{{gap}}पुढें या बखरीत शिवाजीच्या व रामदासांच्या प्रथम भेटीची व अनुग्रहाची सविस्तर हकीगत दिली आहे. ती बहुतेक शब्दशः हनुमानस्वामीं--<noinclude></noinclude>
32o75mm07pizlkatx1nswpppuq59y6s
अनुक्रमणिका:काशी-रामेश्वर यात्रा.pdf
106
104084
230628
212329
2026-06-02T08:26:58Z
कल्पनाशक्ती
3813
230628
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=काशी-रामेश्वर यात्रा
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=पुणे
|Year=1936
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist 5="प्रस्तावना" 8="अनुक्रमणिका" 10="नकाशा" 12="यात्रामार्ग व यात्राकाल"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
fp7c0ezu3lf00tl4wqyxwzhz405lvgs
माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
0
110510
230588
230548
2026-06-01T14:50:57Z
QueerEcofeminist
918
"[[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास]]" ला ने संरक्षित केले: completed ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
230548
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील =
| पुढील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/नैनिताल|नैनिताल.]]
| वर्ष = 1920
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf" from="1" to="5 " />
[[वर्ग:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास]]
8im1qemv9wly5nt6iz3gs49u4ueovg0
माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/नैनिताल
0
110511
230585
230549
2026-06-01T14:50:53Z
QueerEcofeminist
918
"[[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/नैनिताल]]" ला ने संरक्षित केले: completed ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
230549
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/नैनिताल|नैनिताल.]]
| पुढील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/ग्वालेर|ग्वालेर.]]
| वर्ष = 1920
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf" from="6" to="28 " />
[[वर्ग:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास]]
bh4jmdhxdo5w3pw6ebstxb5x5h970no
माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/ग्वालेर
0
110512
230584
230550
2026-06-01T14:50:52Z
QueerEcofeminist
918
"[[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/ग्वालेर]]" ला ने संरक्षित केले: completed ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
230550
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/नैनिताल|नैनिताल.]]
| पुढील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/हरिद्वार किंवा गंगाद्वार|हरिद्वार किंवा गंगाद्वार.]]
| वर्ष = 1920
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf" from="29" to="47 " />
[[वर्ग:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास]]
8vaavr3pj3b6o81ivdv4s785s6c8aov
माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/हरिद्वार किंवा गंगाद्वार
0
110513
230587
230551
2026-06-01T14:50:56Z
QueerEcofeminist
918
"[[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/हरिद्वार किंवा गंगाद्वार]]" ला ने संरक्षित केले: completed ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
230551
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/ग्वालेर|ग्वालेर.]]
| पुढील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/गुरुकुल|गुरुकुल.]]
| वर्ष = 1920
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf" from="48" to="64" />
[[वर्ग:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास]]
dedhga7xtuubnadg314rny391966vda
माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/गुरुकुल
0
110514
230583
230552
2026-06-01T14:50:51Z
QueerEcofeminist
918
"[[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/गुरुकुल]]" ला ने संरक्षित केले: completed ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
230552
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/हरिद्वार किंवा गंगाद्वार|हरिद्वार किंवा गंगाद्वार.]]
| पुढील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/मथुरावृंदावन|मथुरावृंदावन.]]
| वर्ष = 1920
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf" from="65" to="84" />
[[वर्ग:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास]]
hj8xhosl8qvc0ljcqlq6249z5ek5clg
माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/मथुरावृंदावन
0
110515
230586
230553
2026-06-01T14:50:54Z
QueerEcofeminist
918
"[[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/मथुरावृंदावन]]" ला ने संरक्षित केले: completed ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
230553
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/गुरुकुल|गुरुकुल.]]
| पुढील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/कृष्णकथा व वैष्णवपंथ|कृष्णकथा व वैष्णवपंथ.]]
| वर्ष = 1920
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf" from="85" to="102" />
[[वर्ग:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास]]
m1sxt927geqhukqgl25qzxhoukfstta
माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/कृष्णकथा व वैष्णवपंथ
0
110516
230582
230554
2026-06-01T14:50:50Z
QueerEcofeminist
918
"[[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/कृष्णकथा व वैष्णवपंथ]]" ला ने संरक्षित केले: completed ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
230554
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/मथुरावृंदावन|मथुरावृंदावन.]]
| पुढील =
| वर्ष = 1920
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf" from="103" to="122" />
[[वर्ग:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास]]
7mh0cp9sdu0f2qwms6ismbhcbnmn64f
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/५
104
110521
230617
230567
2026-06-02T06:41:57Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230617
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|{{xx-larger|'''प्रस्तावना.'''}}}}
{{rule|5em}}
{{gap}}माझ्या प्रवास-वृत्त-मालेच्या संकल्पक्रमानुसार '''सहावे''' पण लिहिण्याच्या व छापण्याच्या क्रमाने शेवटचें पुष्प याची प्रस्तावना लिहितांना माझ्या मनाला मनस्वी समाधान होत आहे. तीन वर्षाखाली मी डे. ए. सोसायटींतून सेवानिवृत्त झालों. तेव्हां मला जास्त स्वास्थ्य व सवड मिळाली. त्यामुळे लवकरच मला लंकेचा प्रवास करण्याचा सुयोग आला. तेव्हांपासून माझ्या सर्व प्रवासवृत्तांची एक संकलित सचित्र व एकसाची आवृत्ति काढावी असा अंधुक विचार माझ्या मनांत घोळत होता. लंकेच्या प्रवासाहून परत आल्यावर त्या प्रवासार्थे वृत्त छापण्याच्या निमित्तानें दोन वर्षांखाली मी आपल्या प्रवास वृत्तांची '''दशपुष्प माला''' छापण्याची योजना मुकर केली व तदनुरूप एक योजनापत्रक मी प्रसिद्ध केलें. ही योजना म्हणजे एक मोठें वाङ्मयसाहस होय याची मला पूर्ण जाणीव होती. कारण या साहसामध्ये '''दहा''' पुष्पांच्या मुद्रणप्रती (Press copies) तयार करणे, प्रुफे तपासून छपाईचीं भुतें (Printer's devils) काढून टाकणे व पैशाचा पुरवठा करणें इतक्या मानसिक व आर्थिक जबाबदाऱ्या मी आपल्या अंगावर घेत होतो. माझ्या सेवानिवृत्तीमुळे व माझ्या चाळीस वर्षांच्या मानसिक व्यवसायांतून मोकळीक मिळाल्यामुळे मानसिक जबाबदारी पार पाडण्यास मी समर्थ होईन असा मला भरंवसा होता. तसेंच मराठी वाङ्मयाच्या वाढत्या वाचकवर्गाच्या सक्रिय सहानुभूतीनें व मराठी वाङ्मयाची अभिवृद्धि व्हावी असें वाटणाऱ्या आश्रयदात्यांच्या सढळ हाताच्या मदतीने आर्थिक जबाबदारीतून मी पार पडेन अशी मला आशा होती.<br>{{gap}}योजनेच्या वेळी केलेल्या कामाच्या मोठेपणाच्या कल्पनेचें प्रत्यंतर आतां काम पुरे झाल्यावर मोजमापी माहिती (statistical information) देऊन पटवितां येत आहे. '''दश'''पुष्प प्रवास वृत्त मालेची '''दोन''' हजारावर पाने गेली आहेत, त्यांतील चित्रें '''सवातीनशे'''च्यावर आहेत व सर्व मालेचा खर्च '''सात हजार''' रुपयांच्यावर झाला आहे!{{nop}}<noinclude></noinclude>
6d8txhyh17ieyt5lv6f2j7x5aru3cud
सदस्य चर्चा:Yogita salvi
3
110522
230576
2026-06-01T12:37:33Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
230576
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Yogita salvi}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १८:०७, १ जून २०२६ (IST)
23esmxt9aaxntq6f51ydtghrz672r5l
पान:केशवसुत यांची कविता.pdf/१
104
110523
230577
2026-06-01T14:21:49Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान " केशवसुत यांची कविता संग्राहक हरि नारायण आपटे किंमत १२ आणे"
230577
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>
केशवसुत यांची कविता
संग्राहक
हरि नारायण आपटे
किंमत १२ आणे<noinclude></noinclude>
rn5lo71wejm6edkqx76usk5n1ej7vot
पान:केशवसुत यांची कविता.pdf/२
104
110524
230578
2026-06-01T14:21:58Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "केशवसुत यांची कविता. संग्राहक हरि नारायण आपटे. आवृत्ति पहिली. आर्यभूषण प्रेस, पुणे. इ. स. १९१७ किंमत १२ आणे."
230578
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>केशवसुत यांची कविता.
संग्राहक
हरि नारायण आपटे.
आवृत्ति पहिली.
आर्यभूषण प्रेस, पुणे.
इ. स. १९१७
किंमत १२ आणे.<noinclude></noinclude>
or50051cowj5m9l2uiqyl8nf3yj4na6
पान:केशवसुत यांची कविता.pdf/३
104
110525
230579
2026-06-01T14:22:11Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "हे पुस्तक पुणे येथे आर्यभूषण छापखान्यांत रा० रा० अनंत विनायक पटवर्धन यांनी छापिलें व रा. रा. हरि नारायण आपटे यांनी बुधवार पेठ, घ. नं. १९, पुणे येथें प्रसिद्ध केलें."
230579
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>हे पुस्तक पुणे येथे आर्यभूषण छापखान्यांत रा० रा०
अनंत विनायक पटवर्धन यांनी छापिलें
व
रा. रा. हरि नारायण आपटे यांनी बुधवार पेठ,
घ. नं. १९, पुणे येथें प्रसिद्ध केलें.<noinclude></noinclude>
ft6lynuq65xablj4qg5g0t4dpc5ougl
पान:केशवसुत यांची कविता.pdf/४
104
110526
230580
2026-06-01T14:28:00Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "<center> '''अनुक्रमणिका''' </center> {| class="wikitable" style="width:100%; margin:auto;" |- ! अ.क्र. !! कवितेचे नाव !! पान क्र. |- | १ || अढळ सौंदर्य || १० |- | २ || अपर कविता - दैवत || १५ |- | ३ || खिडकीकडे मौज पहावयास || १० |- | ४ || सृष्टी आणि कवि || १५ |}"
230580
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude><center>
'''अनुक्रमणिका'''
</center>
{| class="wikitable" style="width:100%; margin:auto;"
|-
! अ.क्र. !! कवितेचे नाव !! पान क्र.
|-
| १ || अढळ सौंदर्य || १०
|-
| २ || अपर कविता - दैवत || १५
|-
| ३ || खिडकीकडे मौज पहावयास || १०
|-
| ४ || सृष्टी आणि कवि || १५
|}<noinclude></noinclude>
5z9xn39k6vy8t99qyjkucqg7ke2vju9
पान:केशवसुत यांची कविता.pdf/१२
104
110527
230581
2026-06-01T14:32:16Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "मरणकाल. कवळुनि करजालें भूमिलागूनि, लाल विलसितरुचिभार्से फेंकितां तूं गुलाल विकसिततरुमालाकेशपंक्तींत तीचे, स्तवुनि फिरुनि तूतें वन्दितों मी मरीचे ! अनुकरण करीं मी गाउनी या खगा..."
230581
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>मरणकाल.
कवळुनि करजालें भूमिलागूनि, लाल
विलसितरुचिभार्से फेंकितां तूं गुलाल
विकसिततरुमालाकेशपंक्तींत तीचे,
स्तवुनि फिरुनि तूतें वन्दितों मी मरीचे !
अनुकरण करीं मी गाउनी या खगांचें,
तादव सुमनांचें वन्दुनी या लतांचें,
अनुसरत असें मी हांसुनी पद्मिनींस,
शरण तुजसि आलों मी असा नम्र दास !
डिसेंबर, १८८५.
[ याचें
मूळ
[ ३ ]
मरणकाल.
४
The Death Bed हैं काव्य Thomas Hood यानें आप-
ल्या एका बहिणीच्या मरणसमयीं लिहिलें. ]
श्वसन
साकी.
आम्ही तीचें श्वसन रात्रभर सचिंत हो निरखियलें,
तिचें मृदु मन्द मन्द जें अमुच्या कानीं पडलें-
अम्हां त्यामुळे, तीचे वक्षीं आयुष्याची लाट
हेलकावते खालवर, असें समजायाला वाट.
तेव्हां आम्ही कितीतरी पण हलक्यानें बोलावें,
सावकाशही तसें भोंवती फिरतांना चालावें !
जाणों तीचें लांबवावया आयुष्य अम्हीं अपुल्या
अर्ध्या किम्बहुना सगळ्याही शक्ति तिला अर्पियल्या.
अमुच्या आशांनी भीतीला खोटसाळ हो म्हटलें,
तसें आमच्या भीतींनींही आशांला ठरवियलें !<noinclude></noinclude>
kh76okc4715syoki204vs141wbmffth
अनुक्रमणिका चर्चा:Samagra Phule.pdf
107
110528
230589
2026-06-01T16:33:01Z
QueerEcofeminist
918
/* ह्या पुस्तकाच्या फाइलनेमचे नाव बदलणे */ नवीन विभाग
230589
wikitext
text/x-wiki
== ह्या पुस्तकाच्या फाइलनेमचे नाव बदलणे ==
@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]],
मी अनेकदा विरोध करुनही आपण पुन्हा पुन्हा, फाइलचे नाव मराठीत हवे असा आग्रह धरता आणि तसे करता सुद्धा, त्यामुळे अनेकानी केलेले काम पुढे नेण्यास अडचणी येतात. आता ह्या पानांचे झालेले ओसीआर उपयोगात आणणे शक्य नाही कारण मुळ फाईलचे नाव बदलले आहे. [[Special:Diff/1022996291]] येथे तुम्ही फाइलचे नाव बदलुन घेतले आणि आता ह्या अनुक्रमाणिकेवर मी केलेले काम पुढे नेणे अशक्य आहे. .
काय करावे ते सुचवा आणि कृपा करुन असे नाव पुन्हा बदलु नका, किमान कुणाला तरी विचारात घ्या. धन्यवाद [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] २२:०३, १ जून २०२६ (IST)
4aiedxekdisw6trrqd01qwycv27950v
230590
230589
2026-06-01T16:33:21Z
QueerEcofeminist
918
/* ह्या पुस्तकाच्या फाइलनेमचे नाव बदलणे */
230590
wikitext
text/x-wiki
== ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे ==
@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]],
मी अनेकदा विरोध करुनही आपण पुन्हा पुन्हा, फाइलचे नाव मराठीत हवे असा आग्रह धरता आणि तसे करता सुद्धा, त्यामुळे अनेकानी केलेले काम पुढे नेण्यास अडचणी येतात. आता ह्या पानांचे झालेले ओसीआर उपयोगात आणणे शक्य नाही कारण मुळ फाईलचे नाव बदलले आहे. [[Special:Diff/1022996291]] येथे तुम्ही फाइलचे नाव बदलुन घेतले आणि आता ह्या अनुक्रमाणिकेवर मी केलेले काम पुढे नेणे अशक्य आहे. .
काय करावे ते सुचवा आणि कृपा करुन असे नाव पुन्हा बदलु नका, किमान कुणाला तरी विचारात घ्या. धन्यवाद [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] २२:०३, १ जून २०२६ (IST)
ogo3ua4qmhspbhd9jdscw5x69g3cefa
230591
230590
2026-06-01T16:35:03Z
QueerEcofeminist
918
/* ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे */
230591
wikitext
text/x-wiki
== ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे ==
@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]],
फाइलचे नाव हे कोणत्याही वाचकास कधीच दिसत नाही ते कोणत्याही भाषेत असेल तर त्याने कोणतीही अडचण येत नाही.
मी अनेकदा विरोध करुनही आपण पुन्हा पुन्हा, फाइलचे नाव मराठीत हवे असा आग्रह धरता आणि तसे करता सुद्धा, त्यामुळे अनेकानी केलेले काम पुढे नेण्यास अडचणी येतात. आता ह्या पानांचे झालेले ओसीआर उपयोगात आणणे शक्य नाही कारण मुळ फाईलचे नाव बदलले आहे. [[Special:Diff/1022996291]] येथे तुम्ही फाइलचे नाव बदलुन घेतले आणि आता ह्या अनुक्रमाणिकेवर मी केलेले काम पुढे नेणे अशक्य आहे. .
काय करावे ते सुचवा आणि कृपा करुन असे नाव पुन्हा बदलु नका, किमान कुणाला तरी विचारात घ्या. धन्यवाद [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] २२:०३, १ जून २०२६ (IST)
n0vnrfspranq9u2yn231p7b0ut2je0x
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/६
104
110529
230622
2026-06-02T07:04:34Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230622
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|२}}</noinclude>{{gap}}कालावधीनें पुरे होणाऱ्या माझ्या वाङ्मयसाहसामध्ये तीन विघ्नें आलीं व म्हणून माला पुरी होण्यास संकल्पित दीड वर्षापेक्षां अर्धवर्ष जास्त लागलें.<br>{{gap}}मालेची चारपांच पुस्तकें पुरी होत आहेत तोच आमच्या कुटुंबावर आकाशाची कुऱ्हाड पडली. यामुळे मला पुणे सोडून आमच्या गांवी राहावें लागलें व पुस्तकाच्या छपाईला फाजील वेळ लागू लागला. पुढे माझ्या आजाराचीच अडचण उपस्थित झाली. तो माझा आजार, त्याच्या प्रतिकारार्थ करून घ्यावी लागलेली शस्त्रक्रिया व तदनंतरची शुश्रूषा यांमध्यें तीन चार महिने गेले. शेवटीं वर्गणीदारांनी व आश्रयदात्यांनी देऊ केलेल्या मदतीमध्यें दिरंगाई कुचराई व नाकबुली केल्यामुळे पैशाची थोडीशी अडचण भासली. असो.<br>{{gap}}पण ही सर्व विघ्नें विघ्नहर्त्या गणेशाच्या कृपेनें (मालेचें लंकावर्णनाचे पुष्प दोन वर्षांपूर्वी गणेशचतुर्थीला प्रसिद्ध केलें होतें म्हणून न कळत गणेशकृपा झाली की काय न कळे) नाहींशी होऊन सबंद माला पुरी झाली याबद्दल मला आनंद वाटत आहे.<br>{{gap}}येवड्या मोठ्या कामामध्यें मला माझ्या मुलांची व मित्रांची वेळोवेळीं मदत झाली. सिंध प्रांताचे वर्णन व काशी-रामेश्वर यात्रा या दोन पुष्पांची सूचि श्रीयुत ग.द.टिल्लू, एम. ए., हेड मास्तर कोकण एजुकेशन सोसायटीचे हायस्कूल, महाड यांनीं तयार केली. शिवाय दशपुष्पमालेत वर्णिलेल्या स्थळांची स्वतंत्र सर्वसंग्रही सूचि त्यांनीच केली. या सूचीची कल्पनाही त्यांचीच आहे. तसेंच चित्रे व मजकूर छापणाऱ्या छापखान्याचें साहाय्य झालें; म्हणून हे कठीण काम तडीस गेलें. तेव्हां या सर्वांचे आभार मानणें योग्य आहे व मी ते आनंदानें मानतो.<br>{{gap}}ही प्रवासवृत्तमाला गुंफतांना मी दोन उद्देश आपल्या डोळ्यांपुढे ठेविले होते. हल्ली इंग्रजी शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये मराठीला आवश्यक स्थान मिळाले आहे. तेव्हां विद्यार्थ्यांना मराठी भाषेमध्यें प्रवीणता मिळविण्याकरितां वर्गातील मराठीच्या अभ्यासापलीकडे जलद वाचावयाचीं पुस्तकें (Rapid reading texts) व अभ्यासक्रमाबाहेरचीं पुस्तकें (Extra reading books) लागणार, अशा पुस्तकांमध्ये माझी प्रवासवृत्तमाला अन्तर्भूत होऊन ती विद्यार्थ्यांनीं वाचावी हा माझा एक उद्देश. माझ्या प्रवासवृत्तमालेच्या वाचनानें सामान्य वाचकांमध्ये प्रवासप्रेम, चौकसपणा, व बहुश्रुतपणा यावा हा माझा<noinclude></noinclude>
rum9y1fmwba3qxftkwlusw3wl8pdwx3
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/७
104
110530
230623
2026-06-02T07:19:29Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230623
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|३ }}</noinclude>दुसरा उद्देश. पण हे उद्देश सिद्धीस जाण्यास माझी ही प्रवासवृत्तमाला शाळेतील विद्यार्थ्यांच्या व सामान्य वाचकांच्या हाती पडली पाहिजे. ते कितपत घडून येतें हे पहाणे आहे.<br>{{gap}}माझे मित्र कांहीं कौतुकानें कांहीं विनोदानें व कांहीं कुचेष्टेनें मला विचारतात कीं, माझे प्रवास आतां तरी संपले किंवा नाहीं! त्यांना मी त्यांच्याच प्रश्नाच्या झोंकानुरूप भवभूतीच्या शब्दांनीं उत्तर देतों की '''कालोह्यऽयं निरवधिर्विपुला च पृथ्वी.''' पृथ्वी विपुल असल्यामुळे प्रवासही तिच्याप्रमाणे विपुल आहे. पण एकंदर काल निरवधि असला तरी मनुष्याचा आयुष्यकाल मात्र निरवधि नाहीं. तरी पण माझे हातून- नव्हे- पायानें आणखी प्रवास होणार नाही कशावरून व तसें घडून आल्यास आणखी एखादी प्रवारावृत्तमाला माझ्या हातून गुंफली जाणार नाहीं कशावरून? पण सध्यां गुंफलेली माला सरस्वतीच्या चरणी अर्पण करून मी ही शेवटची प्रस्तावना पुरी करतो व लेखणीला तूर्त विश्रांति देतो.
<br>
<center>
{| {{brace table parameters}}
|style="text-align:center;"|महाड, जि. कुलाबा,{{gap}}||{{brace|r|t}}||
|-
|style="text-align:center;"|ता. ९ ऑगस्ट सन १९३६,{{gap}}||{{brace|r|m}}||style="text-align:center;"|{{gap}}'''गो. चि. भाटे.'''
|-
|style="text-align:center;"|गोकुळ अष्टमी.{{gap}}||{{brace|r|b}}||
|}
</center>
{{nop}}<noinclude></noinclude>
qiffmlp29osyu16fy38opxikc2jbq9j
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१०
104
110531
230624
2026-06-02T07:21:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230624
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Css image crop
|Image = काशी-रामेश्वर_यात्रा.pdf
|Page = 10
|bSize = 468
|cWidth = 447
|cHeight = 596
|oTop = 5
|oLeft = 3
|Location = center
|Description =
}}{{nop}}<noinclude></noinclude>
3gww0p70t0a2gaxp5z3694l3zqc6z7v
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/११
104
110532
230625
2026-06-02T07:22:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* मजकुराविना */
230625
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
6pewiyyebyc8m42d8lu6xlv59f2mxdm
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/८
104
110533
230626
2026-06-02T07:55:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230626
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|{{xx-larger|'''अनुक्रमणिका'''}}}}
{{rule|5em}}
<center>
{|
|+
|-
! प्रकरण !! नांव !! पान
|-
| १ || यात्रामार्ग व यात्राकाल || १-५
|-
| २ || रामेश्वर व सेतुरामेश्वर || ६-२०
|-
| ३ || मदुरा || २१-३४
|-
| ४ || कोडैकनाल || ३५-४८
|-
| ५ || डिंडिंगल व पालघाट || ४९-५५
|-
| ६ || पालघाट - कोइमतुर || ५६-६३
|-
| ७ || नीलगिरीवरील विलायत || ६४-८२
|-
| ८ || दक्षिणकाशी - श्रवणबेलगोला || ८३-९६
|-
| ९ || जबलपूर || ९७-११६
|-
| १० || प्रयाग अथवा अलाहाबाद || ११७-१५०
|-
| ११ || काशी अथवा बनारस || १५१-१७१
|-
| १२ || गया व सारनाथ || १७२-१८८
|-
| १३ || अयोध्या || १८९-१९९
|}
</center>
{{rule|5em }}
<br>
{{center|{{xx-larger|'''चित्रांची अनुक्रमणिका'''}}}}
{{rule|5em}}
<center>
{|
|+
|-
! नंबर !! नांव !! पान !! style="border-left:1px solid"|नंबर !! नांव !! पान
|-
| || श्रीयुत विनायक कृष्ण सखदेव || प्रारंभी || style="border-left:1px solid"|४ || मदुरा : मीनाक्षी देवळाचे पूर्व गोपुर || २८
|-
| || काशी विश्वेश्वर यात्रेचा नकाशा || १ || style="border-left:1px solid"|५ || मदुरा : तिरुमल नाईकाचा वाडा || २९
|-
| १ || धनुष्कोडी : आगगाडीचा आगबोटीचा धक्का || १६ || style="border-left:1px solid"|६ || मदुरा : तलाव व जलमंदिर || ३०
|-
| २ || सेतुरामेश्वर : समुद्रसंगम व पवित्रस्थानविधी || १६ || style="border-left:1px solid"|७ || कोडैकनाल : सिलव्हर कॅसकेड || ३८
|-
| ३ || रामेश्वर गंधमादन पर्वतावरील देऊळ || १७ || style="border-left:1px solid"|८ || कोडैकनाल : बेअरशोला फॉल्स || ३८
|-
| || || || style="border-left:1px solid"|९ || कोडैकनाल : टपाल-घरापासून दिसणारा देखावा || ३९
|}
</center><noinclude></noinclude>
sl5y027pm12u5aujdt5ojqy9go9l5ou
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/९
104
110534
230627
2026-06-02T08:26:14Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230627
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><center>
{|
|+
|-
! नंबर !! नांव !! पान !! style="border-left:1px solid"|नंबर !! नांव !! पान
|-
| १० || कोडैकनाल : कोकर्सवॉक || ३९ || style="border-left:1px solid"|२९ || अलाहाबाद : शहराचा विहंगम देखावा || १२८
|-
| ११ || कोडैकनाल : तलाव || ४६ || style="border-left:1px solid"|३० || अलाहाबाद : संगमावरील किल्ला || १२८
|-
| १२ || कोडैकनाल : खांब - खडक|| ४७ || style="border-left:1px solid"|३१ || अलाहाबाद : मिंटो बागेतील जाहीरनाम्याचा स्मारक खांब || १२९
|-
| १३ || नीलगिरी : डोंगरी रेल्वेचा दातेरी रुळाचा रस्ता || ६६ || style="border-left:1px solid"|३२ || अलाहाबाद : म्यूर सेंट्रल कॉलेज || १३६
|-
| १४ || नीलगिरी पर्वतामधून वाहणारी नदी || ६६ || style="border-left:1px solid"|३३ || अलाहाबाद : प्रयागचा माघ मेळा || १३७
|-
| १५ || कुनूर : शहराचा देखावा || ६७ || style="border-left:1px solid"|३४ || काशी : मनकर्णिका घाट || १६६
|-
| १६ || नीलगिरी : खडकाच्या गुहेतील देवालय || ६७ || style="border-left:1px solid"|३५ || काशी : पंचगंगा घाट व औरंगझेबाची मशीद || १६७
|-
| १७ || नीलगिरी : गोल्फ मैदान व लिंक्स || ७२ || style="border-left:1px solid"|३६ || काशी : देशाश्वमेध घाट || १६७
|-
| १८ || नीलगिरी : सरकारी बागेचें फाटक || ७२ || style="border-left:1px solid"|३७ || काशी : काशीविश्वेश्वराचें देऊळ
|-
| १९ || नीलगिरी: गव्हर्नरांचा बंगला || ७३ || style="border-left:1px solid"|३८ || काशी : हिंदु विश्वविद्यालयाची विद्यार्थी वसतिगृहे || १६९
|-
| २० || नीलगिरी : रानटी टोडा लोक व त्यांची झोपडी || ७४ || style="border-left:1px solid"|३९ || बुद्धगया : महाबोधी वृक्ष || १७६
|-
| २१ || श्रवणबेलगोला : विंध्यगिरी || ८४ || style="border-left:1px solid"|४० || बुद्धगया : बुद्ध देवालय || १७७
|-
| २२ || श्रवणबेलगोला : गोमतेश्वराचा पुतळा || ८९ || style="border-left:1px solid"|४१ || सारनाथ : चौखंडी स्तूप || १८४
|-
| २३ || श्रवणबेलगोला : चन्द्रगिरी || ९४ || style="border-left:1px solid"|४२ || सारनाथः स्तूप व विहारांचे अवशेष || १८४
|-
| २४ || श्रवणबेलगोला : जैनमंदिर || ९५ || style="border-left:1px solid"|४३ || सारनाथ : ध्यानी बुद्ध || १८५
|-
| २५ || जबलपूर : खडकाच्या टोकावर टेकलेली धोंड || १०० || style="border-left:1px solid"|४४ || सारनाथ : अशोकस्तंभावरील सिंह || १८५
|-
| २६ || जबलपूर : लष्करी छावणी || १०१ || style="border-left:1px solid"|४५ || सारनाथ : नवा विहार || १८८
|-
| २७ || जबलपूर : संगमरवरी खडकावरील नर्मदेचा धबधबा || १०२ || style="border-left:1px solid"|४६ || अयोध्या : महाराजांचे देऊळ || १८९
|-
| २८ || जबलपूर : संगमरवरी खडक || १०३ || style="border-left:1px solid"| || ||
|}
</center>
{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
j4lgp96r8xfpvkybo32kkdks2a3y07z
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१२
104
110535
230629
2026-06-02T08:27:13Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ काशी - रामेश्वर यात्रा प्रकरण १ लें 00000 यात्रामार्ग व यात्राकाल. मी केव्हांही मोठाभाविक हिंदु नव्हतों व नाहीं. तरी पण भाविक हिंदूच्या प्रमाणें माझ्या बहुतेक यात्रा झाल्या..."
230629
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
काशी - रामेश्वर यात्रा
प्रकरण १ लें
00000
यात्रामार्ग व यात्राकाल.
मी केव्हांही मोठाभाविक हिंदु नव्हतों व नाहीं. तरी पण भाविक हिंदूच्या प्रमाणें माझ्या बहुतेक यात्रा झाल्या आहेत, इतकेंच नाही तर त्या कधीं कधीं यथासांग व यथाक्रम झाल्या आहेत. जिचें वर्णन या पुस्तकांत देण्याचा विचार आहे त्या काशीरामेश्वर यात्रे - चीच गोष्ट घ्याना. जुन्या पद्धतीप्रमाणें यथासांग काशीरामेश्वर यात्रा करावयाची म्हटली म्हणजे ती दिडकी यात्रा होते. कारण आपल्या प्रांतांतला मनुष्य प्रथम काशीस जातो. तेथली गंगा घेऊन तो सेतु रामेश्वरीं नेऊन टाकतो व तेथला सेतु ( सेतु रामेश्वरच्या समुद्र-संग- माच्या ठिकाणची वाळू ) घेऊन परत काशीस जाऊन तो सेतू गंगेंत टाकतो म्हणजे यथासांग काशीरामैश्वर यात्रा झाली असा समज आहे. अर्थात् या यथासांग यात्रेत काशीस दोनदां जाणें पढतें व रामे- श्वरास एकदां जाणें पडतें. माझी काशी रामेश्वराची यात्रा थेट या क्रमानें झाली. मात्र अशी यथासांग यात्रा मीं पुण्यप्राप्तीकरितां केली नाहीं हें मला प्रांजलपणें कबूल केलें पाहिजे. माझ्या हातून ज्या सर्व यात्रा घडल्या त्या माझ्या प्रवासप्रियतेमुळें व माझ्या सृष्टिसौंदर्य- प्रेमामुळे घडल्या व म्हणूनच माझा यात्रामार्ग वाचकांस पुष्कळ वेळ वेडावाकडा वाटण्याचा संभव आहे. तेव्हां या उपोद्घातरूपी प्रकरणांत मी माझ्या काशीरामेश्वर यात्रा मार्गाचं व यात्रा कालाचें दिग्दर्शन करणार' आहे.<noinclude></noinclude>
q83uue1nmt2oqwaczwsdvrwwat5vfs4