विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.5
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२२
104
73475
230713
164453
2026-06-05T03:02:26Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230713
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|३९७|| मराठा काल}}</noinclude><br>'''शुद्धी'''<br>{{gap}}फलटणच्या बजाजी निंबाळकरला आदिलशाहीने बळाने बाटविले होते. त्याला शुद्ध करून घेऊन त्याच्या मुलाला आपली कन्या देऊन छत्रपतींनी शुद्धिकृतांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न कायमचा सोडवून टाकला. नेताजी पालकराला औरंगजेबाने असेच सक्तीने बाटविले होते. त्यालाही महाराजांनी शुद्ध करून पुन्हा आपल्या ज्ञातीत समाविष्ट करून घेतले.<br><br>'''गोवेकर पाद्री'''<br>{{gap}}पतितांच्या शुद्धीविषयी छत्रपतींचा किती कटाक्ष होता ते पोर्तुगीजांना त्यांनी जी दहशत बसविली तीवरून समजून येते. इंग्रजांच्या कागदपत्रात असे म्हटले आहे की शिवाजीचा व पोर्तुगीजांचा सदासर्वकाळ तंटा सुरू असतो, याचे मुख्य कारण हे की शिवाजीच्या ज्ञातीच्या पोरक्या मुलांना पोर्तुगीज बाटवून ख्रिस्ती करतात. त्या काळच्या गोव्याच्या व्हाइसरॉयने हिंदूंना बळाने बाटवून ख्रिश्चन करून टाकावे, असे घोषणापत्रकच काढले होते. महाराजांना त्यामुळे अतिशय संताप आला. आणि त्यांनी गोव्याजवळच्या बारदेश प्रदेशावर स्वारी करून तेथील चार पाद्रयांचा, त्यांनी बाटविलेल्या मराठा हिंदूंना परत देण्याचे नाकारल्याबद्दल, शिरच्छेद केला. यामुळे गोव्याचा व्हाइसरॉय इतका घाबरून गेला की त्याने तत्काळ आपले घोषणापत्र मागे घेतले. {{Block center|<poem>शस्त्रेण रक्षिते राज्ये, शास्त्रचिंता प्रवर्तते ॥ हेच खरे !</poem>}}<br><br>'''अवतारकार्य'''<br>{{gap}}शिवछत्रपतींनी जे क्रांतिकार्य केले त्यात धर्मक्रांतीला अग्रस्थान होते. त्यांचा अवतार धर्मरक्षणासाठी होता, हे येथवर केलेल्या विवेचनावरून ध्यानात येईल. त्यांचे समकालीन असे पंडित, कवी यांचाही अभिप्राय तसाच होता. अशा काही लोकांनी केलेला शिवगौरव पाहून हे प्रकरण संपवू. कवींद्र परमानंद याने आपल्या शिवभारतात शिवछत्रपती म्हणजे विष्णूचा अवतार असे म्हटले आहे. हा अवतार कशासाठी होता ? विष्णू म्हणतात, 'मी पृथ्वीवर येऊन यवनांचा उच्छेद करीन आणि शाश्वत धर्माची स्थापना करीन, देवांचे रक्षण करीन, यज्ञादी क्रिया पुन्हा सुरू करीन आणि गो-ब्राह्मणांचे पालन करीन.' महाराजांचा समकालीन हिंदी कवी भूषण याने म्हटले आहे, 'हे शिवाजी राजा, तुम्ही आपल्या खड्गाने हिंदुत्वाचे रक्षण केले आहे. पृथ्वीवर आपण धर्म राखला आहे. शिवाजी महाराज झाले नसते तर सर्व हिंदूंची सुनता झाली असती.'<br><br>'''रामेश्वर ते गोदावरी'''<br>{{gap}}कलियुगात देव आणि ऋषिमुनी यांनी हिंदुसमाजाला कलीच्या स्वाधीन केले आणि<noinclude></noinclude>
29529va4q6gxzybgfndfbw16v97aj0e
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२३
104
73476
230714
164479
2026-06-05T03:02:58Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230714
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||३९८}}</noinclude>स्वतः येथून ते निघून गेले असा जनमानसात रूढ समज होता. आता ते सर्व पालटले. आता मराठ्यांच्या राज्याला, स्वराज्याला परमेश्वराचा आशीर्वाद आहे, त्याचीच महाराजांच्यावर कृपा आहे, हे राज्य देवब्राह्मणांचे आहे, असे उद्गार सर्वत्र निघू लागले. रामचंद्रपंत आमात्य यांच्या आज्ञापत्रात, 'श्रीस राजाचा व स्वामींचा पूर्ण अभिमान', 'दिनप्रतिदिनी या राज्याची अभिवृद्धी व्हावी ही ईश्वरी इच्छा बलवत्तर', 'श्रीकृपाकटाक्षाने यवनांचे प्रयत्न निष्फळ झाले' अशी वचने ठायी ठायी आहेत. छत्रपती राजाराम आपल्या एका पत्रात म्हणतात, 'हे महाराष्ट्र राज्य म्हणजे देवाब्राह्मणांचे राज्य आहे.' शंकराजी नारायण सचिव म्हणतात, 'हे राज्य देवाब्राह्मणांचे आशीर्वादाचे आहे.' अनाजी जनार्दन सुभेदार-वाई यांनीही, 'हे मऱ्हाठे राज्य म्हणिजे देवाब्राह्मणांचे आहे,' असाच निर्वाळ दिला आहे. पेशव्यांच्या बखरीत, शंभर दीडशे वर्षांनीसुद्धा, हीच श्रद्धा दिसून येते. बखरकार म्हणतो, 'यवनांचे पारिपत्य करून हिंदुधर्म स्थापावा याजकरिता शिवाजी महाराज यांजवर श्रींचा कृपानुग्रह झाला. त्यांनी श्रीरामेश्वरापासून गोदावरीपर्यंत धर्मस्थापना केली.'<br>{{gap}}समर्थांचे वचन तर प्रसिद्धच आहे. या भूमंडळाचे ठायी, धर्म रक्षी ऐसा नाही, महाराष्ट्रधर्म राहिला काही, तुम्हांकरिता ॥ हे वचन किती खरे होते ? औरंगजेबाने आदिलशहाला लिहिले होते की शिवाजीचे पारिपत्य झाले नाही तर मुसलमानी राज्ये बुडतील !<br><br>'''धर्म म्हणजे...'''<br>{{gap}}शिवछत्रपतींनी धर्मक्रांती केली म्हणजे काय ते यावरून ध्यानात येईल. धर्म म्हणजे व्रतवैकल्ये, श्राद्धपक्ष, तीर्थयात्रा, भजनपूजन नव्हे, तर धर्म म्हणजे यवनांचे पारिपत्य म्लेंच्छांचा उच्छेद आणि स्वराज्याची स्थापना, धर्म म्हणजे समाजाच्या परंपरेचे, वैभवाचे रक्षण, लोकांचा उत्कर्ष-प्रभव. त्यासाठीच धर्माची स्थापना असते. धर्म म्हणजे मरगळलेल्या मनात चैतन्य निर्माण करणे, समाजाची आत्मश्रद्धा जागी करणे, आणि लोकांना पराक्रमाची, विश्वविजयाची प्रेरणा देणे. हे मानसिक परिवर्तन हीच खरी क्रांती होय. शिवछत्रपतींनी हे तिचे तत्त्वज्ञान मनाशी सिद्ध करून त्याला स्वतःच्या आचरणाने प्रत्यक्ष, मूर्त रूप दिले आणि या मराठ्यांच्या भूमीत जीवकळा निर्माण केली.<br>{{gap}}धर्मक्रांती हे मानसिक परिवर्तन होय. त्यामुळे चैतन्य निर्माण होते, नवा उत्साह येतो व माणसे पराक्रमाच्या कोटी करतात. पण त्या पराक्रमातून प्रत्यक्ष जीवनात सुखाचा लाभ झाला नाही तर त्या क्रांतीला अर्थ राहात नाही. अर्थमूलो हि धर्मः । असे चाणक्याने म्हटले आहे ते याच अर्थाने. शिवछत्रपतींनी हे निश्चित जाणले होते. म्हणूनच धर्मक्रांतीबरोबर आर्थिक क्रांतीचाही उद्योग त्यांनी आरंभिला होता. त्याचे स्वरूप आता पाहू.<br><br>{{center|■}}<noinclude></noinclude>
9vwysrterowi968dudszg7jgl1ya8en
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२४
104
73477
230715
164480
2026-06-05T03:04:06Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230715
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop
|Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf
|Page = 424
|bSize = 402
|cWidth = 290
|cHeight = 207
|oTop = 41
|oLeft = 44
|Location = center
|Description =
}}
<br><br>{{rh|'''<big>२०.</big>'''||'''<big>अर्थमूलो हि धर्मः ।</big>'''}}<br><br>{{gap}}श्री शिवछत्रपतींनी जी धार्मिक क्रान्ती महाराष्ट्रात केली तिचे स्वरूप आपण पाहिले. मुसलमानी राज्यात, उत्तरेत आणि दक्षिणेतही हिंदुधर्म आणि हिंदुप्रजा यांवर अत्यंत भयानक असे अत्याचार होत होते. आणि हिंदुधर्म समूळ नष्ट करून सर्वत्र इस्लामचा प्रसार करावयाचा अशी मुस्लिम सत्ताधाऱ्यांची प्रतिज्ञाच होती. अशा स्थितीत, एक पराक्रमी पुरुष हातात खङ्ग घेऊन हिंदुधर्माच्या रक्षणासाठी पाय रोवून उभा राहिला आहे, हे पाहताच हिंदु-प्रजाजनांना अपरिमित आनंद झाला, यात शंकाच नाही. आणि त्यामुळेच, सावंत, सुर्वे, मोहिते, घोरपडे, माने, निंबाळकर इ. मोठमोठे सरदार जरी छत्रपतींविरुद्ध होते तरी, सामान्य हिंदू जनता सत्वर त्यांच्या पाठीशी उभी राहिली, हे उघड आहे.<br><br>'''भाकरीचे रक्षण'''<br>{{gap}}पण एवढ्याने भागले नसते. स्वराजाची पायाभरणी करण्यात आणि त्यावर एका मागून एक चालून येणाऱ्या विजापुरी सरदारांना पराभूत करून हाकलून देण्यात छत्रपतींना जे अल्पावधीत यश आले ते केवळ धर्मप्रेरणेने आले असते असे वाटत नाही. सामान्य जनांना धर्माभिमान नसतो असे नाही. पण पोटापाण्याची, भाकरीची, पोराबाळांच्या संरक्षणाची त्यांना जास्त चिंता असते. आपल्या जातीचा, धर्माचा राजा असावा अशी मनोमन त्यांना इच्छा असते, आकांक्षा असते, हे खरे. पण<noinclude></noinclude>
dgpcnl0e98uujqpqvya7qsm4qhd3x10
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२५
104
73478
230716
164484
2026-06-05T03:04:21Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230716
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४००}}</noinclude>तो तरी कशासाठी ? तो आपले रक्षण करील, आपले घरदार, जमीन आपल्या जवळच राहील व सुखाने दोन घास खाता येतील, अशी राज्यव्यवस्था तो करील, ही त्यांना आशा असते. मुस्लिम राज्यात हे घडत नव्हते. अगदी दुष्काळाच्या काळात फक्त मुस्लिम प्रजेच्या अन्नपाण्याची व्यवस्था सत्ताधारी आधी करीत आणि हिंदूंना वाऱ्यावर सोडीत. मग एरवीच्या काळी काय असेल याची सहज कल्पना येईल. आपले भोगविलास निर्वेध चालविण्यासाठी लागणारे जे धन ते निर्माण करणारे गुलाम, हमाल, मजूर एवढ्याच दृष्टीने मुस्लिम सत्ताधारी हिंदुप्रजेकडे पाहत असत. त्यामुळे दैन्य, दारिद्र्य, दुःख, अन्नान्नदशा, जीवितवित्ताची अशाश्वती, स्त्रियांच्या अपहरणाची, विटंबनेची कायमची भीती हाच हिंदूंचा ललाटलेख मुस्लिम आमदानीत होऊन बसला होता. अशा स्थितीत हिंदूंना जो राजा हवा होता तो धर्मरक्षणाबरोबरच जीवित-वित्ताचे, घरादाराचे, भाकरीचे रक्षण करील असा हवा होता. शिवछत्रपतींनी आरंभापासून तेच कार्य करण्याचे धोरण अवलंबिले. म्हणूनच महाराष्ट्र त्यांना अवतारी पुरुष मानू लागला.<br><br>'''अर्थशास्त्र'''<br>{{gap}}मागे एकदा सांगितलेच आहे की शिवछत्रपतींनी ग्रंथ लिहिले नसले तरी क्रांतीचे तत्त्वज्ञान त्यांनी मनाशी पूर्णपणे निश्चित केले होते. अर्थमूलो हि धर्मः । हे चाणक्याचे वचन कधीही दृष्टिआड होऊ दिले नव्हते. शाइस्तेखानाच्या स्वारीच्या प्रसंगी एकदा आपल्या सचिवांना उद्देशून ते म्हणाले, 'अर्थामुळेच सर्व कामे साधतात आणि अर्थामुळेच धर्माची अभिवृद्धी होते. म्हणूनच पैशाची प्रशंसा करतात. कुल, शील, वय, विद्या, पराक्रम, सत्यवादित्व, गुणज्ञता, गांभीर्य ही सर्व पैशामुळेच प्राप्त होतात. अर्थामुळेच लोकांना इहलोक आणि परलोकही लाभतो. द्रव्यहीन पुरुष हा जिवंत असूनही नसल्यासारखाच असतो. ज्याच्याजवळ विपुल पैसा असतो त्यालाच मित्र लाभतात, ज्याच्याजवळ पैसा असतो तोच पराक्रमी होतो आणि ज्याच्याजवळ पैसा असतो त्यालाच सर्व लोक साह्य करतात.' (शिवभारत, २८, ३६-३९)<br>{{gap}}भारतातील प्राचीन ऋषिमुनींनी अर्थाचे हे माहात्म्य चांगले जाणले होते. चाणक्य तर यासाठीच प्रसिद्ध होता. पण महाभारतातही ठायी ठायी हे विचार निरनिराळ्या पुरुषांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतात. 'धन मिळवणे हाच श्रेष्ठ धर्म होय. धनावरच सर्व काही अवलंबून आहे, धनसंपन्न लोकच जगात जिवंत असतात, धनहीन लोक मेल्यातच जमा होत.' 'धनाच्या योगाने कुळाचा उत्कर्ष होतो. धन असेल तर धर्माची वाढ होते- धनात् धर्मः प्रवर्धते ।- निर्धनाला इहलोकही नाही आणि परलोकही नाही'. असे धनाचे तत्त्वज्ञान प्राचीन भारतात धर्मवेत्ते मुनीही सांगत असत. शिवछत्रपतींनी महाभारताचे उत्तम श्रवण केले होते. त्यामुळेच धर्मक्रांतीबरोबरच आर्थिक क्रांतीही केली पाहिजे, तीवाचून धर्मक्रांती दीर्घकाळ टिकणे शक्य नाही, हे मनाशी दृढपणे ठरवून त्यांनी पहिल्यापासूनच त्या दृष्टीने पावले टाकली होती.<br><noinclude></noinclude>
nexz9tg73vmv9652epw2fw8p1z0m368
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२६
104
73479
230717
164485
2026-06-05T03:09:55Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230717
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४०१|| अर्थमूलो हि धर्मः ।}}</noinclude>{{gap}}तशी पावले टाकून त्यांनी जी आर्थिक क्रांती घडविली तिचे रूप आता पहावयाचे आहे.<br><br>'''नवी अर्थव्यवस्था ?'''<br>{{gap}}मुस्लिम सत्ताधारी हिंदुप्रजेचा कमालीचा रक्तशोष करीत असत हे वर सांगितलेच आहे. पण अपहार, लूटमार एवढेच त्या शोषणाचे रूप नव्हते. मुस्लिमांची राज्यव्यवस्था, सर्व राज्यकारभार आणि सर्व अर्थव्यवस्था ही शोषणाच्या पायावरच उभारलेली होती. सरंजामी पद्धती, मनसबदारीचा कारभार, वतनदारी या नावांनी जी प्रसिद्ध आहे तीच ही राज्यव्यवस्था व अर्थव्यवस्था होती. शिवछत्रपतींनी ही सरंजामी वतनदारी अर्थव्यवस्था नष्ट केली, असे आज बरेच पंडित सांगतात. सभासदाची बखर आणि रामचंद्रपंत अमात्य यांचे आज्ञापत्र यांतील अनेक उताऱ्यांवरून त्यांचे हे म्हणणे पुष्कळ अंशी खरे आहे, असे दिसते. पण महाराजांनी वतनदारी नष्ट केली नाही, त्यांना तसे करणे शक्यही नव्हते, असाही एक पक्ष आहे. आणि या पक्षानेही भरपूर कागदपत्रे सादर केलेली आहेत. या दोन्ही पक्षांचे प्रतिपादन लक्षात घेऊन छत्रपतींनी कोणती अर्थव्यवस्था प्रस्थापित केली ते आता निश्चित करावयाचे आहे.<br><br>'''वतनदारी'''<br>{{gap}}राजाने आपल्या राज्याची अनेक सुभ्यांत किंवा परगण्यांत विभागणी करून ते परगणे निरनिराळ्या सरदारांच्या ताब्यात द्यावयाचे आणि त्या सरदारांनी वा मनसबदारांनी त्या त्या सुभ्यात जवळ जवळ स्वतंत्रपणे कारभार करून राजाला दरसाल ठराविक रक्कम महसूल म्हणून द्यावयाची आणि स्वतःच्या खर्चाने लष्कर नित्य तयार ठेवून युद्धाच्या प्रसंगी राजाच्या स्वारीबरोबर जातीने जाऊन लढाया करावयाच्या, असा ढोबळपणे सरंजामी पद्धतीचा अर्थ होतो. सरंजामदारी, मनसबदारी, वतनदारी या शब्दांचा तांत्रिक दृष्टीने काही भिन्न अर्थ असला तरी भावार्थ हाच आहे.<br><br>'''ग्रामसंस्था'''<br>{{gap}}मुसलमान पूर्व काळात भारतात सरंजामी पद्धती नव्हती. भारतातील राजनीति - निपुणांनी सर्वत्र शासनव्यवस्था उत्तम असावी या हेतूने ग्रामसंस्था निर्माण केली होती. ही ग्रामसंस्था म्हणजे प्रत्येक गावचे एक लहानसे प्रजासत्ताक असे आणि त्याचा कारभार ग्रामपंचायत नावाची सभा करीत असे. मध्ययुगात ही व्यवस्था थोडी पालटली आणि ग्रामीण भागात देशकसत्ता आली. देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी, चौगुला आणि प्रमुख ग्रामस्थ या सर्वांना मिळून देशक असे म्हणत. गावाच्या कारभारासाठी ज्या सभा भरत त्यांत बारा बलुतेदार, शेतकरी, जोशी या<noinclude><br>{{gap}}२६</noinclude>
isjs20bkdwh6dtxbcm8cvez4tbhrdtz
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२७
104
73480
230718
164486
2026-06-05T03:10:08Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230718
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४०२}}</noinclude>सर्व जानपदस्थ लोकांचा समावेश असे. यांतील बहुतेक सर्व लोक वतनदार असत. गावचा एकंदर कारभार सर्वांच्या अनुमतीने होत असे.<br><br>'''देशक'''<br>{{gap}}गावच्या जमिनीची सर्व व्यवस्था पाहणे, पडीक जमिनी लागवडीस आणणे, जंगलातून नव्या पिकाऊ जमिनी निर्माण करणे, चोराचिलटांपासून पिकांचे व गावाचे रक्षण करणे, दुष्काळ, लढाया, परचक्रे यांमुळे मुलूख उजाड होई, जमीन ओस पडे, वस्ती उठून जाई, ही सर्व वस्ती पुन्हा जागी आणणे आणि जमिनी पुन्हा लागवडीस आणण्याची व्यवस्था करणे हे देशकाचे काम होते. गावावर टोळखाद येई, रोगराई येई, दरवडे पडत, अतिवृष्टी- अनावृष्टी या आपत्ती येत. या प्रसंगी योग्य उपाय- योजना करून गावाचे रक्षण करणे हे काम देशकाचे असे. जमिनीवरून, गुराढोरा वरून व इतर अनेक कारणांनी गावात तंटे होत. ते सोडून न्याय करणे हेही देशकाचेच काम असे. याचाच अर्थ असा की प्रत्येक गाव हे एक लहानसे प्रजासत्ताक होते.<br><br>'''मिरासदारी'''<br>{{gap}}मुस्लिम सत्ताधाऱ्यांनी ही व्यवस्था मुळात बदलली नाही. पण आपल्या मुलखाचे निरनिराळे विभाग करून त्याचे मोकासे निरनिराळ्या मुस्लिम व मराठा सरदारांना देऊन टाकले. मोरे, सुर्वे, सावंत, मोहिते, निंबाळकर हे असेच सरदार किंवा मनसबदार होते. आपापल्या मुलखातून ठराविक रक्कम सुलतानांकडे भरली की आपल्या परगण्यात ते स्वतंत्र राजेच होते. मुस्लिम सुलतान, त्यांचा पैसा त्यांना मिळाल्यावर त्यांच्या कारभारात कधीच लक्ष घालीत नसत. अशा रीतीने अनियंत्रित सत्ता हाती आल्यावर हे मिरासदार किंवा वतनदार काय धुमाकुळ घालीत असतील याची कल्पना करणे फारसे अवघड नाही. सभासदाने या अंदाधुंद कारभाराचे वर्णन करताना म्हटले आहे, 'इदलशाही, निजामशाही, मोगलाई (यांनी) देश काबीज केला त्या देशात मुलकाचे पाटील, कुळकर्णी यांचे हाती व देशमुखांचे हाती कुलरयत यांनी कमाविशी करावी आणि मोघम टक्का द्यावा. हजार दोन हजार जे गावी मिरासदारांनी घ्यावे, ते गावी दोनशे तीनशे दिवाणात (सरकारला) खंड मक्ता द्यावा. त्यामुळे मिरासदार पैकेकरी होऊन गावास हुडे, वाडे, कोट बांधून, प्यादे बंदुकी ठेवून बळावले.' (सभासद बखर, कलम ३३) मक्तेदारीमुळे प्रजेवर केवढा जुलूम होत असेल याची यावरून कल्पना येईल. सुलतानाचा खंड दोनशे असला तर मिरासदार दोन हजार वसूल करणार. पण तो स्वतः केव्हाच वसुलीला जात नसे. त्याचे कामगार म्हणजे देशमुख आणि त्यांचे सेवक म्हणजे पाटील, कुळकर्णी तेव्हा प्रत्येकजण वसूल करताना आपली तुंबडी भरून घेणार हे उघडच आहे. सुबत्ता असो, दुष्काळ असो, सुलतानाला खंड दिलाच पाहिजे. नाहीतर मिरासदारांना पकडून नेऊन त्यांना<noinclude></noinclude>
j9ao71f6rtiv0asckzpi2udzk4p7kf1
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२८
104
73481
230719
164487
2026-06-05T03:11:00Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230719
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४०३|| अर्थमूलो हि धर्मः ।}}</noinclude>सुलतान यमयातना देत असे. त्यामुळे मिरासदारांना शेतकऱ्यांची दया आली तरी तिचा काही उपयोग नसे. तेच पाटील, देशमुख यांचे. अशा स्थितीत ग्रामसंस्था किंवा देशक या असून नसून सारख्याच झाल्या. यामुळे गावेच्या गावे ओस पडली. प्रजा परागंदा झाली आणि या भूमीवर खरा प्रलयान्त ओढवला.<br><br>'''अराजक'''<br>{{gap}}पण प्रजाजनांचे दुर्दैव एवढ्यावर संपत नसे. या मनसबदारांत, या देशमुखांत, जहागिरदारांत वतनासाठी नित्य मारामाऱ्या चालत, नित्य लढाया आणि रक्तपात चाले आणि त्यामुळे मुलखात कायमचे अराजक माजलेले असे. ज्याला आपले वतन वाढावे असे वाटे तो बेदरला किंवा विजापूरला जाऊन तशी सनद घेऊन येई. पण त्या सनदेची अंमलबजावणी कोण करणार ? तो स्वतः आणि त्याचे भाईबंद ! सुलतानांचे काम फक्त सनद देणे, पुढची व्यवस्था ज्याने त्याने पाहावयाची. याशिवाय कुलाभिमान, देशमुखांचे मानापमान, सण-उत्सवाच्या वेळी पहिल्या जागेविषयीचे मानापमान, सोयरिकीवरून होणारे मानापमान यामुळेही रक्तपात होत. शेजवलकरांनी या रक्तपातांची वर्णने दिली आहेत ती वाचून अंगावर काटा येतो. 'जेधे बेदराहून फर्मान घेऊन येत आहेत हे ऐकून खोपडे आधीच तयार होतात व त्यांना खिंडीत गाठून गारद करतात. त्यातून एखादा निसटतो तो माणसे जमवून आणतो आणि खोपड्यांची कत्तल करतो. या कत्तलीतून बायका, मुले, दाया, कुणबिणी याही सुटत नाहीत. खून व त्याचा बदला म्हणून प्रतिखून हे तर वंशपरंपरा चाले. काही वेळा उघड निरोप पाठवून व मोक्याच्या ठिकाणी रणखांब रोवून झुंजायाचा दिवसही ठरवीत. त्याप्रमाणे बांदलाचे साडेबाराशे लोक जेध्यांच्या सातशे लोकांशी लढले. या लढाईत काहींचा निर्वंश झाला. (संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, पृ. १५-१६)<br><br>'''राज्याचे दायाद'''<br>{{gap}}वतनदारी, मनसबदारी, मोकासा पद्धती, मक्तेदारी, सरंजामदारी या पद्धतीचा अर्थ काय ते यावरून ध्यानात येईल. यामुळेच आज्ञापत्रात अमात्यांनी त्यांना राज्याचे दायाद- शत्रू- म्हटले आहे. अमात्य म्हणतात, 'राज्यातील वतनदार, देशमुख, देश- कुळकर्णी, पाटील आदी करून यांस वतनदार म्हणावे. हे स्वतंत्र देशनायकच होत. सार्वभौमापासून बलन्यूनतेने उतरती परंपरा बळवंत राखोन, दुर्बल वर्ततच आहेत. परंतु त्यास साधारण गणावे असे नाही. हे लोक म्हणजे राज्याचे दायादच आहेत. आहे वतन इतकियावर कालक्रमणा करावी, राजाशी एकनिष्ठेने वर्तावे, कोणाचा अन्याय न करावा ही त्यांची बुद्धी नाही. जब तव नूतन संपादावे व बळकट व्हावे, बळकट झाले म्हणजे एकाचे घ्यावे, दावे परवडे करावे हा यांचा सहज हव्यास. परचक्र आले म्हणजे वतनाच्या आशेने अगोदर सलूख करतात, स्वतः भेटतात, तिकडील भेद इकडे, इकडील<noinclude></noinclude>
qct9ytno4falw1vas0898kvgw7mpsuf
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२९
104
73482
230720
164488
2026-06-05T03:11:12Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230720
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४०४}}</noinclude>भेद तिकडे करून राज्यात शत्रूचा प्रवेश करवितात, मग तेच राज्याचे अपायभूत होऊन दुःसाध्य होऊन जातात.' (प्रकरण ६ वे).<br>{{gap}}अशा या मनसबदारांच्या किंवा तर्फदारांच्या हाती शिवपूर्वकाली महाराष्ट्र होता. राजसत्ता जरी आदिलशहा, निजामशहा यांच्या हाती होती तरी आपापल्या मुलखात राज्य या तर्फदारांचे होते. सरदेसाई म्हणतात, 'हे तर्फावर नेमलेले अधिकारी एक प्रकारचे स्वतंत्र राजेच होते. दिवाणी, मुलकी, फौजदारी व लष्करी वगैरे सर्व अनियंत्रित अधिकार त्यांजकडे असत. तर्फदारास जहागिरी नेमून दिलेल्या असत. रोकड वेतन नसे. '<br><br>'''अर्थ आणि काम'''<br>{{gap}}वतनदार, तर्फदार यांची निरनिराळ्या ठिकाणी आलेली वर्णने वाचली म्हणजे हे स्पष्ट दिसते की त्यांना कोणतेही मूल्य, कोणतीही निष्ठा अशी नव्हतीच. धर्म नाही, स्वामी नाही, नीती नाही, स्त्री नाही, बाल नाही. ते फक्त वतन जाणीत. प्रजाजनांना पिळून अमाप पैसा वसूल करावयाचा आणि त्यातील ठरीव खंडमक्ता बादशहाला धाडून दिल्यानंतर बाकीच्या पैशावर भोगविलास करावयाचे हा त्यांचा मुख्य धंदा होता. अशा या देशनायकांच्या सत्तेखाली मुलखात काही अर्थव्यवस्था असू शकेल हे शक्यच नव्हते. लूटमार, शोषण हीच सर्व अर्थव्यवस्था तेव्हा होती. सरंजामी अर्थकारण ते हेच. हे शोषणप्रधान अर्थकारण समूळ नष्ट करून प्रजाजनांच्या भाकरीची निश्चित हमी देणारी अर्थव्यवस्था प्रस्थापिल्यावाचून स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नात कोणालाही यश येणे शक्य नव्हते. छत्रपतींनी तशी अर्थव्यवस्था निर्माण केली आणि हळूहळू सर्व मराठा समाज, अखिल महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा केला. 'धर्मात् अर्थश्च कामश्च ।' असे वेदव्यासांनी म्हटले आहे. छत्रपतींनी मराठ्यांना, शेतकऱ्यांना साळी, माळी, सुतार, कोष्टी सर्वांना दाखवून दिले की त्यांनी स्वधर्मसाधना केली तर धर्माबरोबरच अर्थ आणि काम हेही पुरुषार्थ त्यांना साधतील. हे दिसू लागताच, त्याचा प्रत्यय येताच, सर्व मराठा समाज मुस्लिम सत्तेशी प्राणपणाने लढण्यास सिद्ध झाला. (या विषयाचे सांगोपांग आणि समतोल विवेचन डॉ. अ. रा. कुलकर्णी यांनी आपल्या 'शिवकालीन महाराष्ट्र' या इंग्रजी प्रबंधात केले आहे. जिज्ञासूंनी ते अवश्य पहावे.)<br><br>'''दादोजी शहाणा'''<br>{{gap}}शिवछत्रपतींनी ही जी नवी अर्थव्यवस्था निर्माण केली तिचा पाया त्यांचे गुरुजी दादोजी कोंडदेव यांनी घातला होता. जुन्या बखरीत आणि कागदपत्रात, 'दादोजी शहाणा,' असा त्यांचा उल्लेख नेहमी येतो. आणि खरोखरच दादोजी अद्वितीय असा शहाणा पुरुष होता. पुणे जहागिरी व्यवस्था पाहण्यासाठी शहाजीराजांनी बंगरूळहून शिवाजीराजांच्याबरोबर त्यांना पाठविले, तेव्हा येताक्षणीच त्यांनी या आर्थिक परिवर्तनास प्रारंभ केला. त्यांनी पहिली गोष्ट केली ती ही की रयतेचा आणि राजाचा<noinclude></noinclude>
ixpnd8ctga9r97jbu0bpdo37f8fk4pw
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३०
104
73483
230721
164489
2026-06-05T03:12:49Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230721
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४०५|| अर्थमूलो हि धर्मः ।}}</noinclude>प्रत्यक्ष संबंध जोडून दिला. असा संबंध नसणे हेच जुन्या अर्थव्यवस्थेचे दुखणे होते. दादोजी शिवाजीराजांना घेऊन प्रथम पुणे आणि सुपे परगण्यात आणि नंतर सर्व मावळ खोऱ्यांतून गावोगाव हिंडले आणि जमिनीची पाहणी मोजणी करून व प्रतवारी लावून दरसाल पिकाचे मानाने वसूल घेण्याचा ठराव त्यांनी केला. प्रारंभी काही वर्षे तर त्यांनी साऱ्याची माफीच दिली, त्यामुळे शेतकऱ्यांना केल्या कष्टाचे फळ मिळेल, अशी खात्री वाटून परागंदा झालेली रयत परत आली आणि वसाहती करून भराभर शेतीची लागवड करू लागली. निजामशाहीतील वजीर मलिकंबर आणि दुसरा अधिकारी चतुर सावाजी यांनी याच पद्धतीने वऱ्हाडात व्यवस्था घडवून आणली होती. दादोजींनी ती स्वतः पाहिली होती. तिची उत्तम फळे त्यांच्या ध्यानात आली होती, म्हणूनच पुणे परगण्यात येताच त्यांनी त्याच पद्धतीने पुणे वसविले.<br><br>'''अभय दिले'''<br>{{gap}}पुणे प्रांती दादोजींना शहाजी राजांनी पाठविले, तेव्हा त्याच वेळी त्यांच्या तैनातीस एक हजाराची पागा बनवून दिली होती. शिवाय दादोजींनी स्वतः मावळे लोकांच्या बिनकवायती पलटणी तयार केल्या. कारण त्यावाचून त्यांना एक पाऊलही पुढे टाकता आले नसते. रयतेशी राजांचा साक्षात संबंध जोडणे याचा अर्थ देशमुख, पाटील, कुळकर्णी, देसाई, तर्फदार यांची सत्ता कमी करणे किंवा नष्ट करणे असा होता. याला सुखासुखी कोणीही कधीही तयार होत नाही. दादोजींनी लष्करी बळाने या सगळ्या मोकासावाल्यांना, मक्तेदारीला चटावलेल्या लोकांना, प्रथम नरम केले. कृष्णाजी बांदल हा भोर परगण्यातील देशमुख फारच पुंडाई करू लागला. दादोजींनी त्याला पकडून आणून त्याचे हात पाय तोडले. रामजी चोरघे, फुलाजी नाईक यांना त्यांनी ठार मारले. एका ब्राह्मणाने वसुलाचा भरणा करण्यात टाळाटाळ चालविली. त्यालाही दादोजींनी देहान्त शासन दिले. कास्मा दि गार्दा याने पोर्तुगीज भाषेत जे शिवचरित्र लिहिले त्यात म्हटले आहे की शिवाजीने प्रथम रयतेला अभय दिले. या अभयाचा हा अर्थ आहे. मिरासदार, तर्फदार, देशमुख हे रयतेचे काळच होते. त्यांच्या मुलखात रयतेला कशाचीही शाश्वती वाटत नसे. शेतीची लावगड करण्याचा तर लोकांना मुळीच उत्साह नसे. कारण उभ्या पिकाची किंवा धान्याची लूट केव्हा होईल याचा काही धरबंधच नव्हता. दादोजींनी प्रथम अनेक देशमुखांना दहशतीने आणि पुढे सौजन्याने वश करून घेतले आणि रयतेला निर्भय केले. तिच्या जीवित- वित्ताची शाश्वती निर्माण केली. त्यामुळे दहा वर्षाच्या काळात मुलखात अबादानी व भरभराट होऊन वसूल पुष्कळ येऊ लागला आणि दादोजींना द्रव्यसंचय करता आला. अमात्यांनी म्हटलेच आहे, 'खजिना म्हणजे राज्याचे जीवन' सभासद बखरीत दादोजींच्या कार्याचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे: 'शहाजी राजे यांनी दादाजीपंतास व राजे यांस पुण्यास रवाना केले. ते पुण्यास आले. येताच बारा मावळे<noinclude></noinclude>
438tvgzwrdbe3xpvhn6lftgmjggr70q
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३१
104
73484
230722
164490
2026-06-05T03:13:03Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230722
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४०६}}</noinclude>काबीज केली. मावळे देशमुख बांधून, दस्त करून, पुंड होते त्यांस मारिले. पुढे शिवाजी राजे कारभार करीत चालले.'<br>{{gap}}शिवाजी राजे यांनी दादोजींच्या मृत्यूनंतर स्वतःच कारभार हाती घेतला. पण धोरण तेच ठेवून दादोजींनी जी पायाभरणी केली होती तिच्यावरच नव्या अर्थव्यवस्थेची उभारणी केली. या अर्थव्यवस्थेचे पहिले लक्षण त्या मुलखात माजलेले अराजक, तेथला अंधेर कारभार, तेथली अंदाधुंदी मोडून काढून शेतकरी, कष्टकरी यांना दिलासा देणे व शेतीचा व कारागिरीचा उद्योग करण्यास प्रोत्साहन देणे हे होय. तसे केल्यानेच मुलूख समृद्ध होतो हे दादोजींनी दाखवून दिले होते.<br><br>'''वेध लावला'''<br>{{gap}}वतनदार देशमुख यांना वश करताना राजे प्रथम स्नेह, प्रेम, मधुर वाणी यांचा उपयोग करीत. बखरकार म्हणतात, 'मातबर चहू जागचे मराठे यांसी आप्तपणा करावा, पत्रे लिहावी, त्यांस आणून भेट घ्यावी, आपण त्यांजकडे जाऊन, आम्हांस अनुकूल असावे, असे बोलावे. असे करण्यात महाराजांचे बोलणे परम आदराचे व पराक्रमाचे. ऐकावे त्यांस वेध लागून वाटावे की हे परम थोर आहेत. यांचेच संमते चालावे. हे सांगतील तसे वागावे. प्राणही गेले तरी जावोत, परंतु सेवा करून यांचे आज्ञेत चालावे. अशी सर्वांची चित्त वेधून घेतली.' (सप्त प्रकरणात्मक चरित्र, चिटणीस)<br><br>'''अमानत केले'''<br>{{gap}}कान्होजी जेधे, बाजी पासलकर, चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना छत्रपतींनी या प्रकारे वश केले. आणि त्यांनीही आमरण त्यांची एकनिष्ठेने सेवा केली. त्यांनी स्वतःचा मुलूख तर स्वराज्यात सामील केलाच, पण इतर देशमुख, वतनदार यांनाही नरम करण्यात महाराजांना साह्य केले. जावळीच्या मोऱ्यांच्या बाबतीत छत्रपतींनी प्रथम समोपचारच केले होते. १६४८ च्या सुमारास दौलतराव मोरे वारले. तेव्हा त्यांच्या बायकोच्या मांडीवर दत्तक देऊन तिला कारभारात सर्वतोपरी साह्य केले. पण पुढे अफजलखानाची नेमणूक वाईस झाली, तेव्हा दत्तक यशवंत फितला. एवढेच नव्हे, तर हैबतराव सिलीमकर, कान्होजी जेधे यांनाही फितवू लागला आणि ते ऐकेनात, तेव्हा त्यांच्या मुलखावरही आपली सत्ता सांगू लागला. यातूनच जावळी प्रकरण उद्भवले व महाराजांना मोऱ्यांचा निःपात करावा लागला.<br>{{gap}}सुप्याचे संभाजी मोहिते हे शिवाजी राजे यांचे सावत्र मामा यांनी मोऱ्यांच्या प्रमाणेच पुंडाई चालविली होती. तेव्हा त्यांच्यावर एका रात्री छापा घालून राजांनी त्यांना कैद केले. आणि ते काहीच ऐकावयास तयार होईनात, तेव्हा त्यांना कर्नाटकात पाठवून दिले. राजमाची किल्ला विजापुरी सरदार मुल्ला महंमद याच्या ताब्यात होता.<noinclude></noinclude>
63zm5u9nv9aig54ho7meiszrsvqidtf
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३२
104
73485
230723
164491
2026-06-05T03:13:32Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230723
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४०७|| अर्थमूलो हि धर्मः ।}}</noinclude>लोहगडावर हिलाल हबशी होता. हिरडस मावळात बांदल देशमुख होते. पुरंदरावर निळो नीळकंठ होता. या सर्वांना अनेक युक्या प्रयुक्या करून राजांनी पदच्युत केले आणि तो मुलूख म्हणजे बारा मावळे स्वराज्यात आणली. सभासद म्हणतो, 'राजियाने देश काबीज करून हुडे, वाडे, कोट पाडिले. नामांकित कोट जाहाला तेथे आपले ठाणे ठेविले. आणि मिरासदारांचे हाती नाहीसे केले. असे करून, मिरासदार इनाम इजारतीने मनास मानेसारखे आपण घेत होते ते सर्व अमानत करून (जप्त करून) जमीनदारास गल्ला व नख्त गाव पाहून देशमुखांस व देशकुलकर्णी यांस व पाटील कुलकर्णी यांस हक्क बांधून दिले. जमीनदारांनी वाडा बुरजांचा बांधू नये, घर बांधून राहावे. ऐसा मुलकाचा बंदोबस्त केला.'<br>{{gap}}यानंतर पुढच्या काळात जेव्हा जेव्हा नवा मुलूख स्वराज्यात महाराज सामील करून घेत तेव्हा तेव्हा तेथे असाच बंदोवस्त करीत. रयत आणि राजसत्ता यांचा प्रत्यक्ष संबंध जोडणे, मोकासा किंवा मक्तेदारी नष्ट करून, शेतकऱ्याला अभय देऊन, त्याच्या कल्याणाची चिंता राजसत्तेने वाहणे हे नव्या अर्थव्यवस्थेचे प्रधान लक्षण होय. देशमुखी, वतनदारी, मिरासदारी, महाराजांनी समूळ नष्ट केली किंवा काय याचा विचार पुढे शेवटी करू. पण त्यांची अनियंत्रित सत्ता व तिच्यामुळे माजलेले अराजक त्यांनी नष्ट केले यात शंकाच नाही. ते नष्ट करून एकंदर व्यवस्था काय केली ते थोडक्यात पाहून पुढे जाऊ.<br><br>'''पुनरुज्जीवन'''<br>{{gap}}महाराजांनी पहिली गोष्ट केली ती ही की त्यांनी ग्रामसंस्थेचे पुनरुज्जीवन करून तिला तिचे पूर्वीचे स्थान मिळवून दिले. वर सांगितलेच आहे की मुसलमानी अमलात या ग्रामसंस्था टिकून राहिल्या असल्या तरी त्या नावापुरत्याच होत्या. वतनदारी, तर्फदारी या पद्धतीमुळे रयत पूर्णपणे नागवली गेली होती. देशमुख, देशपांडे, देश- कुलकर्णी हे फार प्रबळ झाले होते. त्यांच्यातलेच काही पातशाही सरदार झाले होते. त्यामुळे गावपंचायतीचे त्यांच्यापुढे काही चालत नसे. शिवाय पंचायतीच्या हुकमांची अंमलबजावणी पातशाही अधिकाऱ्यांमार्फत होत नसल्यामुळे त्या हुकमांना व पंचायतीच्या कारभाराला काही अर्थ उरला नव्हता. छत्रपतींनी प्राचीन काळच्या ग्रामसंस्थांना तो अर्थ पुन्हा प्राप्त करून दिला.<br><br>'''कुनबियाची खबर'''<br>{{gap}}गोतसभा आणि देशक अशा दोन ग्रामसंस्था त्या वेळी होत्या. गोतसभा ही एका गावापुरतीच असे. पाटील, कुळकर्णी, शेटे, महाजन, बलुतेदार, चौगुला हे सर्व मिळून गोतसभा होई. आणि एका देशमुखाच्या सत्तेखालच्या सर्व गावांचे म्हणजे देशात्य पाटील, कुळकर्णी, शेटे, महाजन, शिवाय देशमुख, देशपांडे, देस कुळकर्णी यांची<noinclude></noinclude>
3f1ccj8mvv1l9mxxsaervou2q7n3ipq
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३३
104
73486
230724
164492
2026-06-05T03:13:45Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230724
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४०८}}</noinclude>मोठी सभा ती देशक होय. या सभांना पुन्हा पहिले अधिकार देऊन आणि त्यांच्यावर आपले सुभेदार व इतर अधिकारी यांच्या मार्फत सक्त नजर ठेवून शिवछत्रपतींनी सर्व प्रांताचे पुनर्वसन घडवून आणले व या अर्थव्यवस्थेचा मूलाधार जो शेतकरी त्याला नवी संजीवनी दिली. प्रभानवल्लीच्या सुभेदारास १६७६ साली महाराजांनी एक पत्र लिहिले. त्याचा भावार्थ पुढे देतो. त्यावरून शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची कल्पना स्पष्ट होईल. 'इमाने इतबारे साहेब काम करावे. येक भाजीच्या देठासही मन न दाखविता रास्त वर्तणे, शेतीची लावणी, संचणी, उगवणी सर्व ठीक करून, रयतेचा वाटा रयतेस पावे आणि राजभाग आपणास येई, ते करणे. रयतेवरी काडीचे जाल (जुलूम) केलिया साहेब तुजवरी राजी नाहीत यैसे बरे समजणे. रयतेस तवाना (ताजे तवाने) करावे आणि कीर्द करवावी हे गोष्टीस इलाज साहेबी तुज फर्माविला आहे की कष्ट करून गावाचा गाव फिरावे. गावचे कुनबी गोला करावे. कुणब्यांजवळ सेत कराया बैल, दाणे, संच, असीला (असला) तर बरेच जाले. पण नसेल तर त्यास बैलाचे दाण्याचे पैके रोख द्यावे व पेरजर (पुढील साल) मूळ मुदल फक्त वाढी- दिढी न करता (व्याज वगैरे न घेता) हे पैके वसूल करावे. मात्र कुणब्याची तवानगी राहिली पाहिजे. नाही तर वसूल करू नये. या कलमास जरी दोन लाखपर्यंत खर्च करशील आणि कुणबियाकुनबियाची खबर घेऊन त्याला तवानगी येती ते करून कीर्द करशील आणि पडजमीन लाऊन दस्त (महसूल) जाजती (जास्त) करशील तरी साहेबा कबूल आहे. आकलेने व तजविजीने समजोन याप्रमाणे कारबार करीत जाणे.'<br><br>'''दुहेरी कैची'''<br>{{gap}}शिवकालीन पत्रसारसंग्रह, शिवचरित्रसाहित्य यांतून त्या काळची अनेक पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यांवरून हे स्पष्ट होते की देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी यांनी शेतकऱ्यायाची सर्व प्रकारची काळजी वाहिली पाहिजे आणि जमिनीचे उत्पन्न वाढवून त्या मार्गाने सरकारी महसूल वाढविला पाहिजे असा सक्त दंडक महाराजांनी घालून दिला होता. देशमुख, देशपांडे यांना वतने दिली, इनामे दिली ती लढाईत पराक्रम करण्यासाठी तर आहेतच, पण शेतकऱ्याचे संरक्षण करणे, त्याला संभाळणे, त्याला सर्वतोपरी साह्य करून जमिनीचे उत्पन्न वाढवून परगण्यात समृद्धी निर्माण करणे हेही वतनदारांचे कर्तव्य आहे. ही नवी समजावणी छत्रपतींनी त्या वतनदारांना दिली आणि वतनदारांनी, देशमुखांनी ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी म्हणून त्यांना महाराजांनी दुहेरी कैचीत धरले होते. वरून सरकारी अधिकारी त्यांवर सक्त नजर ठेवीत आणि रयतेकडून गोतसभा जागरूक असे. यासाठीच त्या ग्रामसंस्थेचे पुनरुज्जीवन केले होते. गोतसभा ही प्राचीन काळच्या पूग, कुल यांसारखीच समर्थ व कार्यक्षम व्हावी हा महाराजांचा हेतू होता हे पुढील उदाहरणांवरून दिसून येईल. एका गावचा पाटील गोतसभेला नको होता. छत्रपतींनी सभेचा निर्णय मान्य करून त्या पाटलाला गावावर<noinclude></noinclude>
mhktzq6m7ejwozrfa33b7ozetxu291v
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३४
104
73487
230725
164493
2026-06-05T03:15:21Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230725
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४०९|| अर्थमूलो हि धर्मः ।}}</noinclude>लादण्याचे नाकारले. दुसऱ्या एका गावच्या सभेने कुळकर्ण्याची नेमणूक आपली आपणच केली. छत्रपतींनी तिला मंजुरी दिली. पाटबंधारे बांधणे, विहिरी खोदणे, पडीत जमीन लागवडीस आणणे या कामी नाना कटकटी निरनिराळे लोक निर्माण करीत. पण या बाबतीत गोतसभेचा निर्णयच महाराज नेहमी उचलून धरीत. म्हणूनच मावळात आणि कोकणात अल्पकाळातच जमिनी फुलू लागल्या, आबादानी निर्माण झाली आणि स्वराज्याचा महसूल वाढला. फ्रेंच प्रवासी कॅरे याने कोकणातल्या अनेक खोऱ्यांत जमिनी सुपीक होऊन सुबत्ता कशी निर्माण झाली होती याचे वर्णन लिहून ठेविले आहे. छत्रपतींनी आर्थिक क्रांती घडविली तिचे स्वरूप असे आहे. शेतकऱ्याला पिळून नागवून पातशाही खजिना भरणे ही जुनी पद्धत होती. शेतकऱ्याला व रयतेला साह्य करून तिचे उत्पन्न वाढवून त्यातून स्वराज्याचा खजिना भरणे ही नवी पद्धत होय. क्रांती म्हणण्याइतकी ती निश्चितच भिन्न आहे.<br><br>'''वतनदारी आवश्यक'''<br>{{gap}}शिवछत्रपतींनी केलेल्या आर्थिक क्रांतीचे हे स्वरूप पाहिल्यानंतर आता त्यांनी वतनदारी, सरंजामदारी, तर्फदारी नष्ट केली काय या प्रश्नाचे उत्तर देता येईल. या विषयाचे उत्कृष्ट विवेचन शं. ना. जोशी यांनी 'अर्वाचीन महाराष्ट्रेतिहासकालातील राज्यकारभाराचा अभ्यास' (भाग १ ला) या पुस्तकात केले आहे. त्यांच्या मते महाराजांनी वतनदारी मुळीच नष्ट केली नाही, इतकेच नव्हे तर तसे करणे इष्टही नव्हते. तो काळ धामधुमीचा होता. लढाई झाली नाही, लष्कराने उच्छाद मांडला नाही, मोगल, विजापूर, सिद्दी यांपैकी कोणाची स्वारी आली नाही असे एक वर्षही जात नसे. अशा स्वाऱ्या आल्या की गावचे गाव बेचिराख होत, ओसाड पडत. वसती उठून जाई. जमिनीची लागवड, मशागत वर्षावर्षात होत नसे. शेतकऱ्यांची घरेदारे आणि त्याबरोबरच बैल, नांगर, औते, बीबियाणे हा शेतीचा सरंजाम नष्ट होऊन जाई. अशा स्थितीत या गावांची आणि परगण्यांची पुन्हा वसाहत कोणी करावयाची ? हे काम गोतसभेचे व देशकाचे म्हणजे देशमुख, देशपांडे, देसाई, देशकुळकर्णी, पाटील, कुळकर्णी, शेटे, महाजन, जमीनदार यांचे होते. गावचे परागंदा झालेले समस्त लोक पुन्हा जमा करून त्यांच्या मदतीने गावाची पुन्हा वसाहत करणे व जमिनीची कसणूक पुन्हा सुरू करणे हे कार्य ही वतनदार मंडळीच करीत. कोठल्याही राजसत्तेला हे शक्य झाले नसते. कारण एवढी माणसे उभी करणे हे त्या धामधुमीच्या, अदाधुंदीच्या काळात अशक्यच होते. ज्यांचे स्वहित त्यात गुंतलेले आहे, ज्यांचे भवितव्य या वसाहतीवर, शेतीवर अवलंबून आहे, जे त्या देशचे आहेत, ज्यांचा तो देश आहे तेच लोक हे काम करणे शक्य होते.<br>{{gap}}अराजक, अंदाधुंदी याविषयी हे झाले. पण गावावर व शेतीवर इतरही अनेक आपत्ती नेहमीच येत असतात. अवर्षण, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, रोगराई, टोळ-<noinclude></noinclude>
1qonuajwn7nwkcaqoka8z5u7hgryzht
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४२
104
73488
230733
164513
2026-06-05T03:18:32Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230733
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop
|Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf
|Page = 442
|bSize = 395
|cWidth = 335
|cHeight = 530
|oTop = 38
|oLeft = 17
|Location = center
|Description =
}}
<noinclude></noinclude>
qp6igvu1ufq7uz0dnrm0qqr1xqnxtev
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३५
104
73489
230726
164514
2026-06-05T03:15:32Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230726
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४१०}}</noinclude>धाड, दरवडेखोरी, लुटालूट, चोऱ्यामाऱ्या या आपत्ती नित्याच्याच होत्या. शिवाय पडीत जमीन लागवडीस आणणे, पाटबंधाऱ्यांची व्यवस्था करणे, रानटी जनावरांचा बंदोबस्त करणे हीही कामे नित्याचीच होती. प्राचीन काळापासून पूग, श्रेणी, कुल या ग्रामसंस्थाच ही कामे करीत. मुस्लिम रियासतीतही त्या नष्ट झाल्या नव्हत्या आणि छत्रपतींनाही त्या नष्ट करणे शक्य नव्हते आणि इष्टही नव्हते. त्यांच्या अभावी स्वराज्य ओसच झाले असते.<br>{{gap}}मग सभासद बखर, आज्ञापत्र यात या वतनदारांची इतकी निर्भर्त्सना का केली आहे ? त्यांना राज्याचे दायाद का म्हटले आहे ? याचे कारण हे की ते वतनदार मुस्लिम रियासतीत बेजबाबदार झाले होते, कर्तव्यच्युत झाले होते. गावाचा संभाळ करण्यासाठी आपल्याला वतने दिली आहेत, याचा त्यांना विसर पडला होता. ते चढेल, मुजोर झाले होते आणि परकी सत्तेखाली त्यांचे भोगविलास निर्बंध चालत असल्यामुळे त्यांना स्वराज्यस्थापना हे संकट वाटत होते. म्हणून स्वराज्याचे मुख्य शत्रू तेच झाले होते.<br>{{gap}}यासाठीच महाराजांना त्यांच्यावर हत्यार धरावे लागले. तसे हत्यार धरून त्यांच्यावर सत्ता प्रस्थापित होताच महाराजांनी त्यांचे गडकोट पाडून त्यांनी उभारलेली लष्करी पथके नष्ट करून त्यांना नरम केले, त्यांच्या कर्तव्याची जाणीव देऊन त्यांना पुन्हा स्वपदी प्रस्थापित केले आणि त्यांच्याकडून वर वर्णन केल्याप्रमाणे सेवा घेऊन महाराष्ट्रभूमी पुन्हा वसविली.<br><br>'''सेवेचा मुशाहिरा'''<br>{{gap}}शिवछत्रपतींचे वतनाविषयी काय धोरण होते, हे यावरून ध्यानात येईल. वतन ही मागे केव्हा एकदा केलेल्या पराक्रमाची बक्षिसी आहे असे ते मानीतच नव्हते. तर वर सांगितल्याप्रमाणे गाव किंवा देश- म्हणजे आपापला परगणा - संभाळणे ही जी कायमची सेवा तिचा तो मुशाहिरा होता; आणि म्हणूनच त्या कर्तव्यापासून जे च्युत होत त्यांना ते शिक्षा करून वठणीवर आणीत आणि पुन्हा वतनावर कायम करीत. वतने नष्ट करावी, वतनदारी पद्धतच नष्ट करावी असे त्याचे धोरण नव्हते.<br><br>'''कौलनाम'''<br>{{gap}}त्यांनी काही वतने अमानत म्हणजे जप्त केली हे खरे आहे. पण ती वतनदार फितूर झाले किंवा उद्दाम होऊन चढेलपणे वागू लागले किंवा देशाची कामगिरी करीनासे झाले तेव्हा जप्त केली. पुण्याच्या देसकुळकर्ण्याचे वतन त्यांनी अनामत केले. मुसे खोरे तरफेचे देशमुख व देशकुलकर्णी यांची वतने खालसा केली. रोहिडखोऱ्याचे देशमुख, रांजाचे पाटील यांना त्यांनी अशीच शिक्षा केली. पण या फितूर, भ्रष्ट, चढेल वतनदारांना केलेल्या शिक्षा होत्या. वतनदारी पद्धतीविरुद्ध ही मोहीम नव्हती. तशी मोहीम त्यांना करावयाचीच नव्हती. कारण गाव, देश, परगणा संभाळण्याचे,<noinclude></noinclude>
l7rakt6u3arkrwxdd05auqpwasqxjfo
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३६
104
73490
230727
164515
2026-06-05T03:15:42Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230727
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४११|| अर्थमूलो हि धर्मः ।}}</noinclude>उजाड झालेली गावे पुन्हा वसविण्याचे, सर्व भूमी सजल - सफल करण्याचे अत्यंत मह्त्त्वाचे कार्य हे वतनदार करीत असत या कार्याचे छत्रपतींना इतके महत्त्व वाटत असे की फितूर झालेले, बंडखोरी करून उठलेले वतनदार जर माफी मागून परत येण्यास तयार असतील, तर त्यांना कौलनामा देऊन म्हणजे अभय देऊन त्यांची वतने ते परत देत असत. केदारजी खोपडे हा अफजलखानास मिळाला होता. पुढे अफजलखान मेल्यावर परत येऊन तो गावाला त्रास देऊ लागला. त्या वेळी छत्रपतींनी अत्यंत कडक शब्दांत त्याची कान उघाडणी केली; पण शेवटी त्याचे वतन त्यास परत दिले. 'कोणे बाबे आंदेशा न करून आपल्या वतनास येणे आणि आपले देशमुखीचा हक्क व इनाम खाऊन खुशालीने राहणे, काही शक (भीती) न धरणे.' असा कौलनामा त्याला दिलेला आहे. पण त्यापूर्वी 'साहेबासी गैररुजू असावे आणि आपल्या हक्कास खलल करून घ्यावे हे अक्कल तुम्हांस कोणे दिधली आहे' अशी त्याची कठोर निर्भर्त्सनाही केलेली आहे. कानद खोऱ्याचा देशमुख झुंजारराव मरळ, गुंजन मावळाचा देशमुख हैबतराव सिलीमकर यांनाही असाच कौलनामा दिलेला आहे. झुंजारराव तर जयसिंगाकडे गेला होता. त्याला 'तुम्हांपासून जो गुन्हा झाला आहे तो माफ केला आहे, तुमच्या जिवास खता होणार नाही' असे अभय देऊन त्याची वतनाची मिरास त्याला परत दिली.<br><br>'''स्नेह व दंड'''<br>{{gap}}महाराजांच्या याच धोरणाचे वर्णन अमात्यांनी आज्ञापात्रात केले आहे. 'अनेक दोष या लोकांत आहेत. म्हणून त्यांचा केवळ द्वेष करावा, वतने बुडवावी म्हणता हाही परम अन्याय, समयविशेषे अनर्थाचे कारण. पण त्यास मोकळी वाग देईन म्हणता यांची निजप्रकृती तेव्हाच प्रगट होणार. या करिता या दोन्ही गोष्टी (वतने बुडविणे किंवा त्यांना बेलगाम राहू देणे ही दोन टोके) कार्यास येत नाहीत. म्हणून त्यास स्नेह व दंड या दोहोंमध्ये निक्षून ठेवावे लागतात. आहे वतन ते चालवून प्रजेवर त्यांची सत्ता चालू न द्यावी, हक्क इनाम आज्ञे विरहीत घेऊ न द्यावे आणि त्यांनी देशाधिकारी यांचे आज्ञेत वर्तावे.'<br><br>'''नवी वतने'''<br>{{gap}}ज्या अमात्यानी वतनदारांची अत्यंत निंदा केली त्यांनीच त्यांना संभाळून ठेवावे असा उपदेश केला आहे. याचे कारण हेच की देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी हे लोक त्या वेळच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ होते. त्यांच्या अभावी सर्व मुलूख उजाड पडून सर्व अर्थव्यवस्थाच नव्हे, तर अंती राज्यव्यवस्थाही कोसळून पडली असती. यामुळे महाराजांनी जुन्या वतनदारांना तर संभाळलेच, पण काही थोडी नवी वतनेही दिली. बकाजी फर्जंद यास पाटीलकी दिली. रामचंद्र नीलकंठ यास सबनिसी<noinclude></noinclude>
1r8ya95akacijibfydsl5pg60njaqnq
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३७
104
73491
230728
164516
2026-06-05T03:15:52Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230728
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४१२}}</noinclude>वतन दिले. कोणाला दूधभात म्हणून, कोणा स्त्रीला साडीचोळी म्हणून इनामेही दिलेली आहेत. याशिवाय धर्मार्थ जमिनी दिल्या त्या निराळ्याच. तशा त्या दिल्या पाहिजेत असा अमात्यांचा सुद्धा आग्रह आहे. ते म्हणतात, 'धर्मार्थ भूमिदान देणे याचे पुण्य अनंत आहे. श्रीची, वेदशास्त्रसंपन्न, सद्ब्राह्मण पाहून पर्वादी पुण्यकाळी ग्राम अथवा भूमी द्यावी. तशीच देवायतने, सत्पुरुषांचे मठ, समाधिस्थाने असे स्थळीही ग्राम अथवा भूमी द्यावी.' याप्रमाणे छत्रपतींनी दाने दिल्याची उदाहरणेही आहेत. समर्थांना अशी भूमी दिली होती हे तर प्रसिद्धच आहे. चाफळच्या मठास व उत्सवास महाराजांनी कायमचे उत्पन्न करून दिले होते. भोसल्यांचे पुरोहित राजोपाध्ये यांना सूर्यग्रहणाच्या वेळी एक चावर जमीन दिली होती. अशी आणखी काही उदाहरणे आढळतात. पण धर्मार्थ इनामे, वतने, अग्रहार दिले तरी त्यासंबंधातही महाराज सावध असत. गावाचा संभाळ करणे हे जसे देशमुखाचे कर्तव्य तसेच धर्मकार्य करणे हे ब्राह्मणांचे कार्य होय. ते त्यांच्याकडून होत नाही असे दिसताच महाराजांनी ब्राह्मणांची इनामे व अग्रहारही अमानत- जप्त- केले आहेत. राजाराम छत्रपती यांच्या एका सनदेत तसा उल्लेख आहे. 'मौजे माहुली हा गाव आदिलशाहीचे वेळेपासून इनाम चालत होता. पुढे हा देश राजश्री कैलासवासी स्वामीस हस्तगत झाला. त्या दिवसापासून ब्राह्मणाचे इनाम अनामत करून ब्राह्मणांच्या योग्यता व कुटुंबे पाहून त्या त्या योग्य ब्राह्मणांस धान्य देविले होते.' (सनदापत्रे पृ. १३६) <br><br>'''प्रजाभिमुख अर्थव्यवस्था'''<br>{{gap}}या सर्व विवेचनावरून शिवछत्रपतींचे वतनदारीविषयी धोरण काय होते ते ध्यानात येईल. रयत सुखी झाली पाहिजे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. तिला संभाळण्यासाठी देशमुख, देशपांडे, देसाई, पाटील, कुळकर्णी यांना वतने दिलेली असतात. हे वतनदार जोपर्यंत आपले कर्तव्य चोख पार पाडतात तोपर्यंत त्यांच्या वतानाला हात लावावा असे महाराजांना वाटत नसे. कारण त्या काळी तीच अर्थव्यवस्था फलप्रद होती. पण ते कर्तव्यच्युत होताच महाराज त्यांची वतने अमानत करीत किंवा त्यांना कडक शिक्षा करीत. याचा अर्थ असा की वतने ही पूर्वजांच्या पराक्रमासाठी दिलेली इनामे नसून प्रत्यक्ष राजसेवा करण्यासाठी दिलेला तो तनखा होता. दरमहा देण्याऐवजी तो कायमचा असे, एवढाच फरक. स्वराज्यापूर्वी या वतनांना स्वतंत्र, बेजबाबदार राज्यांचे स्वरूप आले होते व त्यात प्रजा नागविली जात होती. महाराजांनी ते स्वरूप पालटून टाकले आणि प्रजाभिमुख अर्थव्यवस्था निर्माण केली.<br>{{gap}}महाराजांच्या आर्थिक क्रांतीचे स्वरूप येथवर स्पष्ट केले. पण सभासदाची बखर आणि अमात्यांचे आज्ञापत्र यात थोडी निराळी तत्त्वे सांगितली आहेत. ती महाराजांची म्हणून सांगितली आहेत आणि तशी थोडी माहितीही दिली आहे. त्याविषयी थोडी तात्विक चर्चा करून हे विवेचन संपवू.<br><noinclude></noinclude>
7hw4r4ieys2kwc3znu2sm6xs0skfawn
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३८
104
73492
230729
164517
2026-06-05T03:16:05Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230729
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४१३|| अर्थमूलो हि धर्मः ।}}</noinclude><br>'''रोख पगार'''<br>{{gap}}वतनदारी पद्धत नष्ट करावी असे महाराजांचे धोरण नव्हते. पण आपल्या सेवकांना वतने किंवा इनामे न देता रोख पगार देण्याचे धोरण त्यांनी अवलंबिले होते. सभासदाने हे स्पष्ट केले आहे. तो म्हणतो, 'सरनौबत, मुजुमदार, कारकून हुजरातीतील लोक यास तनखे वराता (डिमांड ड्राफ्ट) देत. लष्करात व हशमास वगडास एकंदर मोकाशे महाल गाव दरोबस्त देणे नाही. जे देणे ते वरातेने द्यावे अगर पोत्यातून रोख ऐवज द्यावा. मोकाशी जहालियाने रयत अफरा (परागंदा) होईल किंवा बळावेल. कमाविशीची कैद राहणार नाही. ज्यास मोकाशे द्यावे तो व जमीदार एक जाहलियाने बेकैद होतील. म्हणून मोकाशे कोणास देणेच नाहीत.'<br>{{gap}}येथे छत्रपती कोणास वतन किंवा मोकासा देत नसत येवढेच सांगितलेले नाही. त्यामागे तत्त्व होते व ते सयुक्तिक होते असे सभासदाने सांगितले आहे. ही वतन पद्धतीवर मोठीच टीका आहे.<br><br>'''यवोदर प्रमाणही'''<br>{{gap}}आज्ञापत्राच्या ७ व्या प्रकरणात तर वतनपद्धतीवर मुले कुठारः असेच प्रतिपादन आहे. 'भूमी इनाम करून देणे हा परम अन्याय. राजास भूपती असे भूमिकरिता म्हणावे, ते भूमीच गेल्यावर राज्य कशाचे होणार ? पती कोणाचा होणार ? तेव्हा राजाने सर्वार्थी मोह न पावता यवोदर प्रमाण भूमी तीही इनाम देऊ नये !'<br>{{gap}}असे निक्षून का सांगितले ? यामागेही तत्त्व आहे. 'एक तर रयतेवर हक्क करून दिला तर रयतेवर जलाल (जुलूम) होऊन रयत पीडा पावते, श्रमी होते. तसेच ज्यांस वृत्ती द्यावी त्याजसारखे वंशज होतील असे नाही!' वतनपद्धतीवर यापेक्षा जास्त टीका ती काय असू शकते ? आणि शिवछत्रपतींची राजनीती म्हणून हे प्रतिपादन केले आहे. प्राचीन काळच्या शास्त्रवेत्त्यांनी कायमचा अधिकार कोणाला देण्यावर हीच टीका केली आहे. शुक्रनीतिकार म्हणतात, 'राजाने कोणत्याही अधिकारपदी कोणाचीही कायमची नेमणूक करू नये. कारण अधिकाराने कोणता मनुष्य मत्त होत नाही ? अधिकाऱ्याच्या मागे त्याच्या पुत्राच्या ठायी तसेच गुण असतील तरच त्याची नेमणूक करावी.' (शुक्रनीति, २, ११२- ११५)<br><br>'''ग्रंथकार नव्हते'''<br>{{gap}}यावरून वतनपद्धतीचे सर्व दोष शिवछत्रपतींच्या ध्यानी येऊन ती नष्ट केली पाहिजे, असे त्यांच्या मनात असले पाहिजे, असे वाटते. वर सांगितलेले काही अपवाद सोडले तर त्यांनी आपल्या तानाजी, नेताजी, प्रतापराव, मोरोपंत, अनाजी यांसारख्या थोरथोर सेवकांनाही वतने दिली नाहीत, रोख पगार दिले, यावरूनही हेच दिसते.<noinclude></noinclude>
47yopsovt18cijr1xhuoyf7ly0zyd7b
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३९
104
73493
230730
164518
2026-06-05T03:16:17Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230730
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४१४}}</noinclude>तरीही त्यांनी जुनी वतनदारी सर्वत्र चालू ठेवली याचे कारण एकच की एवढी प्रचंड आर्थिक क्रांती करणे त्या काळी शक्य नव्हते. गाव आणि देश संभाळण्याची जी कामगिरी देशक आणि गोतसभा करीत असत ती राजसत्तेकडून करून घेण्याइतके माणूसबळ त्या वेळी निर्माण करणे दुर्घट होते. ती कामगिरी ग्रामीण भागात स्थायिक झालेल्या लोकांकडून करवून घेण्यावाचून गत्यंतरच नव्हते आणि देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी यांच्याकडून हे कार्य करून घ्यावयाचे तर त्यांना वतन देणे अवश्यच होते. मराठ्यांची वतनासक्ती इतकी प्रबळ होती की वतनाची कायमी दिल्यावाचून हे लोक ती सेवा करण्यास तयार झालेच नसते. शिवाय दुसरी गोष्ट अशी की मोगल किंवा आदिलशाही मुस्लिम सत्ताधारी मराठ्यांचा हा वतनलोभ पूर्णपणे पुरवीत होते. वतने कायम राहून शिवाय त्या राज्यांत वतनदारांना अनियंत्रित सत्ताही चालविता येत असे. मोरे, भोंसले, निंबाळकर, मोहिते, सावंत, सुर्वे इ. मोठमोठे वतनदार छत्रपतींच्या विरुद्ध उभे टाकले होते याचे कारण हेच होते. वतनासक्ती! जनमानसातून ही आसक्ती समूळ नष्ट करून या सर्वांना स्वराज्याभिमुख करणे एका आयुष्यात कोणालाच शक्य झाले नसते. नवे आर्थिक व राजकीय तत्त्वज्ञान निर्माण करून त्याची शिकवण समाजाला दिली असती तरच हे घडून आले असते. पण ते करणारे ग्रंथकार, तत्त्ववेत्ते, पश्चिम युरोपात याच काळात जसे निर्माण झाले तसे, महाराष्ट्रात किंवा भारतात त्या काळी आणि पुढेही निर्माण झाले नाहीत. मराठ्यांच्या साम्राज्यसत्तेसाठी शेकडो रामदास हवे होते, असे राजवाड्यांनी म्हटले आहे. त्याचा हाच अर्थ आहे. शिवछत्रपतींना त्यांच्यासारखेच दोन-तीन समर्थ वारस लाभले असते तरी या वतनासक्तीचा बराच बीमोड करता आला असता. पण तसा एकही वारस त्यांना लाभला नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर वतनदारीचा विषवृक्ष पहिल्या एकदोन वर्षातच पुन्हा जोरावला आणि छत्रपतींनी प्रारंभिलेली आर्थिक क्रांती समूळ करपून गेली.<br><br>'''बहुजन अर्थशास्त्र'''<br>{{gap}}पण तरीही छत्रपतींनी जे आर्थिक धोरण प्रस्थापित केले त्याचे मराठ्यांच्या पराक्रमाच्या दृष्टीने व हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे यात शंका नाही. वतनदार वर्गाची बेजबाबदार जुलमी सत्ता त्यांनी नष्ट केली आणि देशकांचे पुनरुज्जीवन करून सर्व अर्थव्यवहार जनताभिमुख केला. शेतकरी, रयत, तिचा उत्कर्ष हे सर्व अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट आहे हे जे तत्त्व त्यांनी मराठ्यांना शिकविले ती खरी आर्थिक क्रांती होय. राजा आपल्या कल्याणाची चिंता वाहतो ही कल्पनाच, मुस्लिम काळात, मराठी जनता विसरून गेली होती. त्यामुळे हा राजा पित्यासारखी आपल्यावर माया करतो हे दिसताच अखिल बहुतजन हर्षनिर्भर झाले. त्यांच्यांत नवे चैतन्य निर्माण झाले आणि ते स्वराज्य कार्यार्थ सिद्ध झाले.<br>{{gap}}अर्थमूलो हि धर्मः । हे जाणून छत्रपतींनी धर्मप्रेरणेला अर्थप्रेरणेची जोड दिली.<noinclude></noinclude>
id8k71k2ppdwq07wsln82e5kqclbcyb
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४०
104
73494
230731
164519
2026-06-05T03:17:54Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230731
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४१५|| अर्थमूलो हि धर्मः ।}}</noinclude>म्हणूनच त्यांना असाध्य ते साध्य करता आले. या अर्थव्यवस्थेचे फल काय मिळाले?<br>{{gap}}शिवभारतकार कवींद्र परमानंद म्हणतो-
{{Block center|<poem>महाराष्ट्रो जनपदः तदानीं तत्समाश्रयात् ।
अन्वर्थतामन्वभवत् समृद्धजनतान्वितः ॥ १०-३२</poem>}}
शिवाजीच्या आश्रयाखाली महाराष्ट्राची जनता समृद्ध होऊन महाराष्ट्र नावाला सार्थत्वः प्राप्त झाले.<br><br>{{center|■}}<noinclude></noinclude>
lm5l5us3xa1j75kfouj927dsthd6u2j
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४१
104
73495
230732
164520
2026-06-05T03:18:09Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230732
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop
|Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf
|Page = 441
|bSize = 395
|cWidth = 308
|cHeight = 162
|oTop = 68
|oLeft = 53
|Location = center
|Description =
}}
<br><br>{{rh|'''<big>२१.</big>'''||'''<big>'मऱ्हाष्ट्र राज्य '</big>'''}}<br><br>'''(१) आम्ही मराठे'''<br>{{gap}}वतनदारी, तर्फदारी, मिरासदारी यांमुळे महाराष्ट्राची आर्थिक प्रगतीच फक्त खुंटली असे नाही, तर त्यामुळे मराठा समाज हा समाजच राहिला नाही अशी अवस्था झाली. बहुतेक सर्व देशमुख, सरदार, वतनदार यांचे एकमेकांत पिढ्यान पिढ्यांचे हाडवैर असे. आणि त्यांच्यात रक्तपात, कत्तली ही नित्याचीच स्थिती झाली होती. त्यामुळे सर्व समाज मिळून, मराठे काही कार्य करतील, त्यांच्यांत काही संघशक्ती निर्माण होईल हे शक्यच नव्हते.<br><br>'''वतनदारीचा रोग'''<br>{{gap}}पण याहीपेक्षा एक वाईट गोष्ट होती. दोन भिन्न तर्फदार किंवा देशमुख घराण्यामध्येच असे रक्तपात किंवा खून होत असे नाही. एकाच घराण्यातील भावाभावातही असेच प्रकार चालत. भिन्न घराण्यांतील हाडवैराची एकदोन उदाहरणे मागे दिलीच आहेत. आता भाऊबंदांच्या हाडवैराची उदाहरणे पाहा. मसूरच्या जगदाळे देशमुख घराण्यातील जगदेवराव यास चार मुलगे. बाबाजीराव हा पहिल्या बायकोचा आणि रामाजी, विठोजी व दयाजी हे तीन दुसऱ्या बायकोचे, जगदेवांनी केलेल्या मिळकतीच्या वाटण्या या भावांना पसंत पडल्या नाहीत; त्यामुळे एकमेकांवर मारेकरी घालणे सुरू झाले. त्यात रामाजी व दयाजी यांचे खून पडले, विठोजी पळून गेला. बाबाजीरावाच्या मुलांच्यावर हीच आपत्ती आली. त्यात त्याच्या एका मुलाचा खून पडला. त्याची बायको लपून राहिली म्हणून वाचली.<br><noinclude></noinclude>
3m8di4oo6brp3ya4gs27ixks09671ht
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४३
104
73496
230734
164521
2026-06-05T03:18:43Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230734
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४१७|| 'मऱ्हाष्ट्र राज्य'}}</noinclude>{{gap}}जेथे घराण्यातील भाऊबंदकीची कथा अशीच आहे. खेळोजीचा नातू कान्होजी यास सात मुलगे. सर्वात धाकटा नाईकजी यास अदिलशहाने देशमुखीचे वतन दिले. त्यामुळे दोघा वडील भावांनी नाईकजीस ठार मारले. तेव्हा नाईकजीच्या लोकांनी त्या भावांना ठार मारले. मग आदिलशहाने नाईकजीची बायको अनसवा हिच्या नावाने देशमुखी करून दिली. पण तिला मुलगा झाल्यावर त्या दोघांना मारण्यासाठी नाईकजीचे दुसरे दोघे वडील भाऊ चालून आले. अनसवा मारली गेली. पण मुलाला दाईने वाचविले. हा मुलगा म्हणजेच शिवाजीला मिळालेला कान्होजी जेधे होय.<br>{{gap}}वतनदारी हा केवढा भयानक रोग महाराष्ट्र समाजाला जडला होता ते यावरून कळून येईल. या लोकांना नीती, धर्म, आईबाप, स्त्री, बाल यांपैकी कशाचीच जाण राहिली नव्हती. फलटणच्या मुधोजी निंबाळकराला त्याच्या दोघा मुलांनीच ठार मारले. कारण त्याने त्यांच्या धाकट्या भावाला देशमुखी देण्याचा विचार केला होता. स्त्रीहत्या, पितृहत्या ही भारतीय संस्कृतीने महापातके मानली आहेत. पण वतनदार असा भेदाभेद मानीत नसत. सत्य, अहिंसा, दया हा धर्म संत तीनशे वर्षे या समाजाला शिकवीत होते. पण त्याचा कसलाही संस्कार वनतदार आपल्यावर होऊ देत नसत.<br>{{gap}}इत्यर्थ असा की महाराष्ट्र समाज हा समाजच राहिला नव्हता. माणसामाणसांमध्ये काहीतरी नीतिनियम, काही कर्तव्यबुद्धी, काही बंधने, कोठला तरी कायदा चालत असेल तरच त्या समूहाला समाज म्हणता येईल. तशी कसलीही बंधने, कसलीही नीती या समाजात राहिली नव्हती.<br><br>'''पातशाही किताब'''<br>{{gap}}देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी यांच्या या कथा झाल्या. यांच्या वरच्या पायरीवर असणारे जे मनसबदार, जहागीरदार, सरदार यांच्या कथा यांहून फारशा निराळ्या नाहीत. छत्रपतींच्या पूर्वी दोन-अडीचशे वर्षांच्या काळात, विशेषतः बहामनी राज्याची पाच शकले झाल्यानंतर, मोठमोठ्या अधिकारपदांवर अनेक मराठा सरदार चढले होते. कंवरसेन, अचलोजी जाधव, संभाजी चिटणीस (निजामशाही), मुरारराव जगदेवराव, रामराव, कदमराव, मादण्णा, आक्कण्णा (कुतुबशाही), मुरार जगदेव (आदिलशाही) ही नावे प्रसिद्धच आहेत. यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करून अनेक मराठ्यांना मोठ्या पदावर चढविले होते. यांतील काही इतके पराक्रमी होते की सुलतानाशी जरा बिनसताच ते बंडाळ्या माजवीत व सुलतानाला हैराण करीत. जगदेवरावाने तीनही पातशहांना त्रस्त केले होते आणि वाटेल त्यास राजपदावरून काढण्याची व स्थापण्याची त्याच्या ठायी शक्ती होती असे सरदेसायांनी म्हटले आहे. मनात प्रश्न असा येतो की यांनी ही शक्ती मराठा सरदार राज्यपदी आणण्यासाठी, स्वराज्यस्थापनेसाठी का उपयोगात आणली नाही ? जावळीचे वतन<noinclude><br>{{gap}}२७</noinclude>
oqb13gchgihp8dp0gi1phtm5uk5ffcp
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४४
104
73497
230735
164522
2026-06-05T03:21:31Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230735
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४१८}}</noinclude>मूळ शिर्क्यांचे. गुजर, मोहिते, महाडिक यांच्या मदतीने ते आदिलशहाला जुमानीनात. त्या वेळी मोरे कर्नाटकात होते. पातशाही हुकमावरून त्यांनी शिर्क्यांवर चालून जाऊन त्यांचा बंदोबस्त केला. पण शिर्के, गुजर, मोहिते, महाडिक यांनाच आपण मिळावे आणि सुलतानाला पदच्युत करून आपले राज्य स्थापावे असे त्यांच्या मनात आले नाही. 'आम्हांस पातशहाने राज्य दिले आहे' असा दिमाख ते मिरवीत. मोरे यांच्याप्रमाणेच घाटगे, घोरपडे, या घराण्यांतील पराक्रमी वीरांनी सर्जेराव, प्रतापराव, हिंदुराव, अमीर-उल-उमराव असे किताब निरनिराळ्या सुलतानांकडून मिळविले होते. या किताबात त्यांना भूषण वाटे आणि ते मिळविण्यासाठी ते स्वकीयांवर चालून जात, कत्तली करीत, जाळपोळ, विध्वंस करीत.<br>{{gap}}आणि इतके करून मिळविलेले किताबच नव्हे तर ती वतने, त्या मनसबी, आणि त्या मनसबदारांचे जीवितही सुलतानाच्या लहरीवर अवलंबून असे. लहर फिरताच आदिलशहाने मुरार जगदेवास ठार मारले. कुतुबशहाने रामरावास ठार मारले. त्यानेच कदमरावास ठार मारले. लखूजी जाधवरावांचा शेवट असाच झाला. पण त्यांना मारल्यावर, तशाच प्रकारे, त्यांच्या भाऊबंदांनी त्या सुलतानांवर कधी सूड उगवला नाही. त्या सुलतानांना मुसलमान सरदार केव्हाही पदच्युत करीत, ठार मारीत. पण मराठा सरदारांनी हे पाप कधी केले नाही. वतनासाठी आपल्या भाऊबंदांवर ते सूड उगवीत, त्यांच्या बायकामुलांची हत्या करीत. त्यात पाप नव्हते. पण मुस्लिम सुलतान किंवा कोणी सरदार यांवर ते कधी सूड उगवीत नसत.<br>{{gap}}अशा या समाजातून शिवछत्रपतींना आदिलशाही, पोर्तुगीजशाही, मोगलशाही या शाह्यांच्या विरुद्ध धैर्याने उभी टाकेल, त्यांच्यावर मात करील, अशी संघशक्ती उभी करायची होती. या समाजातून त्याना राष्ट्र निर्माण करावयाचे होते.<br><br>'''कान्होजी देशमुख'''<br>{{gap}}अफजलखान शिवाजी महाराजांवर चालून येत होता. त्या वेळी, मावळखोऱ्यातील सर्व देशमुखांना, अफजलखानास सामील व्हावे, अशी आदिलशहाची फर्माने निवाली होती. सर्व देशमुखांच्या पुढे मोठा बिकट प्रश्न आला. त्या वेळी कान्होजी जेधे ते फर्मान घेऊन महाराजांच्या कडे आले व सल्ला विचारू लागले. महाराज म्हणाले, 'शेजारचे केदारजी खोपडे व खंडोजी खोपडे खानास मिळाले तसे तुम्ही मिळावे. न गेलात तर वतन जाईल आणि प्राणावरही बेतेल.' यावर कान्होजी म्हणाले, 'शहाजीमहाराजांनी तुमचे साह्य करण्याविषयी आमच्याकडून शपथ घेवविली आहे. त्या शपथेला आम्ही जागणार. मग वतनाचे काही होवो.' हे उत्तर ऐकून महाराजांना आनंद झाला. मग त्यांनी कान्होजींना इतर देशमुखांची बैठक घेऊन सर्वांचा विचार घेण्यास सांगितले. त्या बैठकीला बांदल, सिलीमकर, पासलकर, मारणे, ढमाले, मरळ, डोहार असे अनेक देशमुख वतनदार आले होते. त्यांना कान्होजी जेधे म्हणाले, 'मुसलमान बेइमान आहेत.<noinclude></noinclude>
4c88eyb4xf8krermlk8lkfgwu6gg5sa
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४५
104
73498
230736
164523
2026-06-05T03:21:41Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230736
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४१९|| 'मऱ्हाष्ट्र राज्य'}}</noinclude>आपले काम झाल्यावर नसते निमित्त ठेवून नाश करतील. महाराजांचे हे मऱ्हाष्ट्र राज्य आहे, सर्वांनी हिम्मत धरून एकनिष्टेने सेवा करावी.' हे बोल ऐकून सर्वांना स्फूर्ती आली व ते महाराजांना मिळाले.<br>{{gap}}छत्रपतींनी लोकांना कोणते नवे तत्त्वज्ञान शिकविले असेल याची यावरून कल्पना येईल. वर जी वतनासक्ती वर्णिली आहे तिच्याहून अगदी ध्रुवभिन्न अशी ही वृत्ती आहे. कान्होजीच्या वरील उद्गारांत काही निष्ठा आहे, काही कर्तव्यबुद्धी आहे, शपथेला जागणे आहे, आणि विशेष म्हणजे त्यागाची, वतनाच्या त्यागाचीही, सिद्धता आहे. यांपैकी कोणतेही नीतितत्त्व त्या वेळी वतनदारांच्या ठायी शिल्लक राहिले नव्हते. महाराजांच्या वाणीमुळे आणि प्रत्यक्ष आदर्शामुळे ही नीती या देशमुखांच्या ठायी जागी झाली. पण याहीपेक्षा पलीकडची एक गोष्ट झाली. जे राज्य आता व्हावयाचे आहे, जे होत आहे, महाराज जे स्वराज्य म्हणत आहेत ते मऱ्हाष्ट्र- महाराष्ट्र- राज्य आहे, हा विचार या देशमुखांच्या मनीमानसी ठसला होता.<br><br>'''राष्ट्र - अर्थ'''<br>{{gap}}शिवछत्रपतींनी या भूमीत राष्ट्र निर्माण केले म्हणजे काय केले ? प्रथम काही थोर इतिहासपंडितांनी केलेले वर्णन देऊन मग त्याची थोडी मीमांसा करू. रियासतकार सरदेसाई म्हणतात, 'शिवाजीच्या राज्य स्थापनेचे स्वरूप अनेक दृष्टींनी ध्यानात ठेवण्यासारखे आहे. महाराष्ट्रीयांचे एक राष्ट्र बनून त्यास स्वतंत्रता प्राप्त झाली आणि जगाच्या इतिहासात मराठ्यांचे नाव प्रसिद्धीस आले. तसेच महाराष्ट्रीयांच्या अंगी असलेले गुण बाहेर प्रसिद्ध होण्याची संधी या राज्यस्थापनेने मिळाळी. तिसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रात परस्परविरोधी अनेक जाती असून शिवाजीचे पूर्वी लोक विस्कळित होते. शिवाजीने त्यांच्या ठिकाणी ऐक्य उत्पन्न केले, म्हणजे प्रत्येक इसमाचे स्वतःचे संबंधाने व समाजाचे संबंधाने असे दोन प्रकारचे कर्तव्य असून या दोन कर्तव्यांचा विरोध टाळून, दोन्ही कशी साधावी, हे शिवाजीने लोकांस शिकविले. ब्राह्मण, मराठे, प्रभू, वैश्य, शूद्र इत्यादी नाना जातींच्या लोकांनी, आपली जात, पाहिजे तर, आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आत खुशाल पाळावी; परंतु बाहेर आल्यावर कोणत्याही सार्वजनिक कामात सर्व लोक सारखे, सर्वांनी एकदिलाने राष्ट्रहित, समाजहित, सार्वजनिक हित साधलेच पाहिजे, अशा प्रकारे स्वकर्तव्य बजावण्याची अपरिहार्य जबाबदारी शिवाजीने प्रत्येक इसमाच्या मागे लावून दिली.' (शककर्ता शिवाजी, पृ. २१७)<br>{{gap}}या एका परिच्छेदात राष्ट्रीयत्वाचे सर्व घटक सांगून, राष्ट्रतत्त्वाची अतिशय सम्यक कल्पना नानासाहेबांनी दिली आहे. प्रत्येक व्यक्ती सार्वजनिक कार्यात सहभागी झाली पाहिजे. समाजहित, समाजाचा उत्कर्ष ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे, हा त्यातला प्रधान घटक होय सर्व जातींना समप्रतिष्ठा आहे, हा दुसरा घटक होय. आणि<noinclude></noinclude>
17il5e9ngy5v365nsh5pl6hpsghwupx
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४६
104
73499
230737
164524
2026-06-05T03:25:07Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230737
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४२०}}</noinclude>या सर्व समाजाला मराठा म्हणून एक अस्मिता निर्माण झाली, हा तिसरा घटक होय.<br>{{gap}}यदुनाथ सरकार यांनी महाराजांच्या बद्दल असेच धन्योद्गार काढले आहेत. ते म्हणतात, 'शिवाजी महाराजांपूर्वी मराठे हे अनेक दक्षिणी शाह्यांमधून पसरले होते. त्यांना एकत्र आणून त्यांनी त्यांचे एक प्रबळ राष्ट्र बनविले. मोगल, विजापूर, पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी यांच्या प्रतिकाराला न जुमानता त्यांनी ही गोष्ट घडवून आणली. मध्ययुगीन भारतात कोणाही हिंदूने अशी कर्तबगारी दाखविली नव्हती. विजापूर व दिल्ली यांच्या सत्तेला आव्हान देणारा शिवाजी हा पहिलाच वीर पुरुष होय. हिंदुसमाज राष्ट्र निर्माण करू शकतो, राज्य स्थापन करू शकतो, विद्या, कला यांना उत्तेजन देऊ शकतो, व्यापार, उदीम यांची भरभराट करू शकतो, या गोष्टी शिवाजी महाराजांनी सिद्ध करून दाखविल्या... त्यांच्या राज्यात सर्व धर्मांना समान वागणूक मिळाली, स्त्रियांचे रक्षण झाले, आणि प्रत्येक जातीच्या माणसास पुढे येण्यास वाव मिळाला. भारताची जनता अठरापगड जातीची आहे. महाराजांचे धोरण हेच अशा देशासाठी आवश्यक असलेले आदर्श धोरण होय.' (शिवाजी आणि त्याचा काल, सहावी आवृत्ती, पृ. ३८९, ३८५)<br>{{gap}}सेतुमाधवराव पगडी यांनी 'छत्रपती शिवाजी' या आपल्या चरित्रग्रंथात असाच भावार्थ सांगितला आहे. ते म्हणतात, 'शिवाजी हा राष्ट्रपुरुष होता. त्याच्या आधी मराठ्यांमध्ये राष्ट्रभावना मुळीच नव्हती. हा समाज जातिभेद गुस्त आणि वतनासक्त असा होता. छत्रपतींनी आपल्या वाणीने व कृतीने या लोकांना ध्येयवाद शिकविला.' (पृ. २८, २९) 'छत्रपतींनी मराठ्यांच्या सुप्त शक्ती जागृत केल्या. त्यांनी त्यांच्या ठायी आत्मविश्वास निर्माण केला. हेकट, धर्मांध अशा परकी शत्रूशी लढून, आपल्या उच्च नीतिमूल्यांची जपणूक करण्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याइतके उदात्त असे काहीच नाही, ही शिकवण त्यांनी समाजाला दिली. त्यांचे सेनादल सर्व जनसामान्यातून उभारलेले असून त्याच्या रोमरोमात राष्ट्रीयभावना भिनलेली होती. त्यांचे मंत्री, त्यांचे वकील, त्यांचे सेनापती, त्यांचे सर्व अधिकारी हे जनतेतून आलेले होते. असे हे छत्रपतींचे राष्ट्र राष्ट्रधर्मावर अधिष्ठित होते. न्याय, नीती, सहिष्णुता, प्रजापालन हा त्यांचा धर्म होता. यामुळेच भारताच्या महापुरुषांत छत्रपतींना अग्रमालिकेत स्थान मिळालेले आहे.' (पृ. ५२-५३)<br>{{gap}}शिवछत्रपतींनी महाराष्ट्रात राष्ट्र निर्माण केले म्हणजे काय केले हे पाहण्यासाठी आपण सरदेसाई, यदुनाथ सरकार व सेतुमाधवराव पगडी या पंडितांनी त्यांच्या कार्याचे केलेले वर्णन पाहिले. आता प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासाच्या आधारे काही मीमांसा करू.<br><noinclude></noinclude>
b7glzrvnf5a6w7uyv93a275yafjy9x9
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४७
104
73500
230738
164525
2026-06-05T03:25:32Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230738
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४२१|| 'मऱ्हाष्ट्र राज्य'}}</noinclude><br>'''व्याख्या'''<br>{{gap}}राष्ट्र ही अर्वाचीन कल्पना आहे. चौदाव्या पंधराव्या शतकात पश्चिम युरोपात तिचा उदय झाला. त्या वेळी व त्यानंतर अनेक पंडितांनी राष्ट्राची व्याख्या केली आहे. एका भूमीवरील निष्ठा, एका समाईक प्राचीन परंपरेचा अभिमान, एक भाषा, एकवंशीयत्वाची जाणीव, सर्वांनी मिळून केलेल्या पराक्रमांच्या व भोगलेल्या आपत्तींच्या स्मृती व स्वतंत्र सार्वभौम राजसत्ता या गुणांनी इतरांपासून भिन्न झालेला व अंतरात एकात्म झालेला समाज - असा त्या भिन्नभिन्न पंडितांनी केलेल्या व्याख्यांचा सारार्थ आहे. अशा तऱ्हेची राष्ट्रसंघटना जगात कोणत्याच देशात त्या आधी निर्माण झालेली नव्हती. प्राचीन भारतीयांचा तसा काहीसा प्रयत्न होता. अखिल भारत हा एक देश आहे ही भावना त्यांनी निर्माण केली होती. रामायण, महाभारत व पुराणे यांनी सर्व भारतीयांची एक परंपरा घडविली होती हे खरे. पण हे सर्व ग्रांथिक व वैचारिक पातळीवरचे होते. अखिल भारतीय समाजाने– सिंध ते आसाम आणि काश्मीर ते कन्याकुमारी येथील जनतेने- सहभागी होऊन काही पराक्रम केला, सहकार्याने काही महत्कार्य साधले, किंवा समान आपत्तींना तोंड देऊन, त्यांचे दुःख सर्वांनी भोगले असे कधीच घडले नाही. प्रादेशिक पातळीवर अशी भावना कधी निर्माण झाली नाही. महाराष्ट्रापुरते बोलावयाचे तर यादवांचे राज्य सर्व महाराष्ट्रावर होते. पण आपण सर्व मराठे आहो, आपण मराठा तितुका मेळविला पहिजे, आमची एक स्वतंत्र प्राचीन परंपरा आहे, हे राज्य आहे ते मराठ्यांचे राज्य असून त्याच्या उत्कर्षापकर्षाची चिंता वाहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, अशा प्रकारची भावना यादवांच्या प्रजाजनात कधीही निर्माण झालेली नव्हती. मागे वापरलेल्या परिभाषेत बोलावयाचे तर या प्रजाजनांचे नागरिकांत रूपांतर झाले नव्हते. हे जे घडलेले नव्हते ते शिवछत्रपतींनी घडविले.<br><br>'''नवी अस्मिता'''<br>{{gap}}आम्ही मराठे व आमचा देश महाराष्ट्र ही नवी अस्मिता शिवछत्रपतींनी या देशात निर्माण केली. कान्होची जेधे छत्रपतींच्या सहवासात राहिले होते. त्यामुळे त्यांना या नव्या अस्मितेचा बोध झाला होता. म्हणूनच मावळच्या देशमुखांना त्यांनी सांगितले की 'हे मऱ्हाष्ट्र राज्य' आहे. शेवटपर्यंत मराठ्यांना ही जाणीव कायम होती. छत्रपती राजाराम, शंकराजी नारायण सचीव, अनाजी जनार्दन सुभेदार, रामचंद्रपंत अमात्य, महादजी सामराज नामजाद व कारकून यांचे उतारे मागील एका प्रकरणात दिले आहेत. सर्वाचे उद्गार आहेत की हे महाराष्ट्र राज्य, हे मऱ्हाटे राज्य, हे देवाब्राह्मणांचे राज्य आहे. मराठी साम्राज्याच्या अखेरपर्यंत 'हे मऱ्हाष्ट्र राज्य आहे' याचा विसर कोणाला पडला नव्हता.<br>{{gap}}सभासदाने आवर्जून पुन्हा पुनः म्हटले आहे की 'मऱ्हाठा पातशहा एवढा<noinclude></noinclude>
7bmra8g2m0nfk38ou6cs6pkbl7jhqzu
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४८
104
73501
230739
164526
2026-06-05T03:25:44Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230739
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४२२}}</noinclude>छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य जाली नाही.' (कलम ९४, राज्याभिषेक.) 'आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मोगलशाही ह्या चारी पातशाह्या व समुद्रातील बेवीस पातशाह्या असे जेर जप्त करून नवेच राज्य साधून मराठा पादशहा सिंहासनाधीश छत्रपती झाला.' (कलम ११६, राजा अवतारी) शिवछत्रपतींनी हिंदुत्वाचे रक्षण केले, हिंदूचा तिलक राखला, असा त्यांचा गौरव भूषण कवीने केला आहे. तो करताना हा मराठ्यांचा पराक्रम आहे हेही त्याने सांगून टाकले आहे. 'भूषण सुकवि जीति हद्द मरहट्टन की' असे तो म्हणतो.<br>{{gap}}रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्रात 'शिवछत्रपतींनी नूतन सृष्टीच निर्माण केली' असे म्हटले आहे. ही नूतन सृष्टी कोणती ? राष्ट्र ही ती सृष्टी होय. अमात्यांनी 'नवे राज्य' असे तिचे वर्णन करून पुढे खूप तपशील दिला आहे. पण ते वर्णन त्या नूतन सृष्टीच्या बाह्यरूपाचे आहे. तिच्या अंतरातले चैतन्य म्हणजे मराठ्यांमध्ये छत्रपतींनी निर्माण केलेली राष्ट्रभावना हे होय. त्या चैतन्यावाचून यवनाक्रांत झालेला भारत संपूर्ण मुक्त करण्यात मराठ्यांना यश आलेच नसते.<br>{{gap}}आम्ही कोण या प्रश्नाचे उत्तर जो समाज देऊ शकतो आणि प्राण पणाला लावून त्या उत्तरामागे उभा राहतो तोच समाज पराक्रम करू शकतो. तोच समाज स्वराज्य- साम्राज्य स्थापू शकतो. शिवछत्रपतींनी महाराष्ट्रातील लोकांना, येथील जनतेला, 'आम्ही मराठे' हे उत्तर देण्याचे सामर्थ्य प्राप्त करून दिले. म्हणजेच त्यांनी मराठ्यांचे राष्ट्र निर्माण केले.<br><br>'''(२) ग्रामाचे नव्हे, राष्ट्राचे घटक'''<br>{{gap}}माणसे आपल्या मनानेच आपल्याभोवती लहान लहान परीघ निर्माण करतात आणि तेवढेच आपले जग, तेवढेच आपले कार्यक्षेत्र असे मानून मोठ्या जगाला, समाजाला विसरतात. समाजात विघटना होते, त्याची संघशक्ती क्षीण होते, तो या संकुचित परिघामुळेच होय. या संकुचित भावनेलाच कूपमंडूक वृत्ती म्हणातात. हिंदु- समाजाच्या नेत्यांनी ग्रामसंस्था, वतनदारी आणि जातिवर्णव्यवस्था असे परीघ किंवा कूप निर्माण करून सर्व हिंदुसमाज विस्कळित करून टाकला. राष्ट्र दृष्टीने तर नाहीच, पण धार्मिक दृष्टीने सुद्धा हा समाज संघटित राहिला नाही.<br><br>'''कूपमंडूक'''<br>{{gap}}वास्तविक या देशात प्राचीन काळी भूमिनिष्ठेचा उदय झाला होता. आणि अखिल भारत ही एक भूमी आहे, अशी भावनाही येथे हळूहळू पोसत होती. शिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी येथे जी लहान लहान प्राजके (प्रजासत्ताक राज्ये) होती, त्यांच्या ठायी राष्ट्रभावनेचा उदय होत होता, असे इतिहासावरून दिसते. ग्रामसंस्था हा त्या काळी या प्राजकांचा पाया मानला जात असे. पण हळूहळू ग्रामसंस्थांना विकृत रूप आले.<noinclude></noinclude>
d3wkja81v7edz0414vfqwl584pvtp93
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४९
104
73502
230740
164527
2026-06-05T03:25:56Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230740
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४२३|| 'मऱ्हाष्ट्र राज्य'}}</noinclude>त्यातूनच सरंजामदारी निर्माण झाली आणि त्याच काळात जातिभेद, वर्णभेद, अस्पृश्यता या रूढी बळावल्या. या सर्वांमुळे या समाजात भिन्नभिन्न परीघ, भिन्न कूप निर्माण झाले. सर्व हिंदुसमाज कूपमंडूक होऊन गेला. यातील वतनदारी, सरंजामदारी यांचा विचार वर केला आहे. आता ग्रामसंस्थांचा विचार करू.<br>{{gap}}भारतातील ग्रामसंस्थांचा खूप गौरव केला जातो, आणि एका काळी ग्रामसंरक्षण, ग्रामविकास या दृष्टीने या संस्थांनी चांगले कार्य केले यात शंका नाही. पण प्रारंभापासूनच विषय, भुक्ती, ग्राम अशा ज्या संस्था येथे होत्या, त्यांवरचे अधिकारी राजा नेमीत असे आणि तो अधिकारी वंशपरंपरेने नेमावा, असा शास्त्रकारांनी दण्डकच घालून दिला होता. या पद्धतीतूनच पुढे येथे सरंजामशाही सुरू झाली. शिवाय हळूहळू चातुर्वर्ण्य आणि जातिभेद यांचा जोर वाढू लागला, तेव्हा या संस्थांचे लोकायत्त रूप नाहीसे होऊन सभासदांत पराकाष्ठेची विषमता निर्माण झाली. न्यायाच्या दृष्टीने समता ही तर भारतात शास्त्रकारांनीच निषिद्ध मानली होती. अपराध तोच असला तरी शिक्षा वर्णाप्रमाणे व्हावी असे शास्त्र होते. त्यामुळे या संस्थांतून व्यक्तित्वाचा विकास कधीही झाला नाही आणि मग ग्रामापलीकडे दृष्टी नाही, आणि जातिपलीकडच्या हिताअहिताचा विचार नाही, आणि स्वतंत्र विचार करण्याचे सामर्थ्य नाही, असे होऊन भारतीय समाज हा समाजच राहिला नाही. (सातवाहन ते यादव या कालखंडाच्या विवेचनातील 'स्वायत्त संस्था व लोकसंघटना' या प्रकरणात, डॉ. आळतेकर, डॉ. वेणीप्रसाद, डॉ. रामशरण शर्मा यांच्या आधारे, या विषयाचे सविस्तर विवेचन केले आहे. म्हणून येथे तो अगदी संक्षेपाने सांगितला आहे.) यातच मुस्लिम कालात वतनदारीला अत्यंत घातकी रूप आल्यामुळे सामान्य माणूस ग्रामापलीकडे आणि देशमुख देशपांडे आपल्या वतनी मुलखापलीकडे पाहत नाहीसे झाले. अखिल समाज, अखिल देश, सर्व स्वधमींय समाज यांचे काही आपण लागतो ही भावनाच या भूमीतून नाहीशी झाली. अशा लोकांतून राष्ट्र ही संघटित शक्ती कशी निर्माण होणार ?<br><br>'''दिल्ली दर्शन'''<br>{{gap}}शिवछत्रपतींनी प्रथम केले ते हे की त्यांनी या लोकांना आपण हिंदू, आपण मराठे, आपले महाराष्ट्र राज्य, असा विशाल विचार करावयास शिकविले. हिंदू तो आपला मित्र, मराठा तो मित्र आणि दुष्ट तुरुक आपला समान शत्रू असा समशत्रुमित्रभाव त्यांनी लोकमानसात निर्माण केला. या समशत्रुमित्रभावातूनच राष्ट्रतत्त्वाचा परिपोष होतो हे मागे सांगितलेच आहे. आपण म्हणजे केवळ ग्रामाचे, तेथल्या गोतसभेचे एक सभासद, त्यापलीकडे आपल्यावर जबाबदारीच नाही, असला संकुचित भाव नष्ट करून छत्रपतींनी 'आपण मराठे' ही दृष्टी त्यांना दिली. परमार्थात आत्मज्ञानाची जितकी आवश्यकता असते तितकीच, किंबहुना त्यापेक्षा जास्त समाजाच्या ऐहिक जीवनात असते. जो कूपमंडूक कूप हेच जग मानतो, मी कूपाचाच मालक असे समजतो, त्याला<noinclude></noinclude>
3rah52837i0hde6o7j1olxp6k3r4hlm
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५०
104
73503
230741
164528
2026-06-05T03:26:10Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230741
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४२४}}</noinclude>सर्व महाराष्ट्र, सर्व हिंदुस्थान हे तुझे जग आहे व या सर्व भूमीचा मालक तू आहेस, या सर्व भूमीची चिंता वहाणारा तू विशाल आत्मा आहेस, हे ज्ञान दिल्यावाचून महत् कार्य करण्याचे सामर्थ्य त्याला येणारच नाही. समर्थांनी अगदी लहानपणीच आईला, 'चिंता करितो विश्वाची' असे उत्तर दिले होते. अशीच विश्वाची चिंता पारमार्थिक व ऐहिक दोन्ही जीवनात करावयास त्यांनी महाराष्ट्रीयांना शिकविले. शिवछत्रपतींनी 'हिंदवी स्वराज्य' हा मंत्र त्यांना सांगून हेच विशाल ध्येय त्यांच्यापुढे उभे केले. प्रारंभापासूनच आपली मुद्रा विश्ववंदिता असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. केवळ आदिलशहा किंवा कुतुबशहा यांना संतुष्ट करण्यातच धन्यता मानणाऱ्या, आणि वतनाचे स्वामित्व हेच अंतिम उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवणाऱ्या मराठ्यांना हे विशाल दर्शन होताच त्यांना नवे स्फुरण आले; त्यांना दिल्ली दिसू लागली; आणि शेजारच्या वतनदारांची बायकामुले मारण्यात खरा पुरुषार्थ नसून दिल्लीवर चालून जाण्यातच तो आहे, हा भाव त्यांच्या मनात उदित झाला; आणि संतांची निवृत्ती, शास्त्रीपंडितांचे कलियुग यांनी क्षीण शक्ती झालेला हा समाज पराक्रमाच्या कोटी करण्यास सिद्ध झाला.<br><br>'''युद्धातून राष्ट्र'''<br>{{gap}}आग्र्याहून सुटून आल्यानंतर दोनतीन वर्षांत सर्व सिद्धता करून छत्रपतींनी पुन्हा १६७० साली रणसंग्राम सुरू केला व एका मागोमाग अभूतपूर्व असे विजय मिळविले. त्यांचे वर्णन करताना रियासतकार सरदेसाई लिहितात, 'याच युद्धात मराठ्यांचे राष्ट्र तयार झाले. या राष्ट्राचा मध्यवर्ती खांब शिवाजी होता. राष्ट्रावर जेव्हा असे चोहोंकडून आघात होऊ लागतात, तेव्हाच त्याचे ऐक्य होऊन त्याची संघशक्ती वाढत जाते. मराठे, ब्राह्मण, प्रभू, वगैरे शेकडो इसम जिवावर उदार होऊन राष्ट्रकार्य करू लागले, आपण सर्व या राष्ट्राचे घटक आहोत, राष्ट्रसेवेकरता सर्वस्व खर्ची घालणे हे आपले कर्तव्य आहे, अशा भावनेने त्या वेळी सर्वांनी उद्योग केला; म्हणूनच चारही दिशांस शिवाजीचे राज्य वृद्धिंगत झाले. विजापूर, गोवळकोंडा येथील सुलतान शिवाजीस खंडण्या देऊ लागले आणि बऱ्याच मोगल प्रदेशांतून त्यास चौथाई मिळू लागली. अशा प्रकारे शिवाजीचे राज्य व मराठ्यांचे राष्ट्र लौकिक दृष्ट्या सिद्ध झाले.' (शककर्ता शिवाजी, पृ. १४९, १५०)<br><br>'''उत्तम गमक'''<br>{{gap}}मराठ्यांचे राष्ट्र सिद्ध झाले याचे एक उत्तम गमक रियासतकारांनीच दिले आहे. छत्रपती आग्र्याला कैदेत असताना त्यांना ठार करावे असा औरंगजेबाचा विचार होता. त्याबद्दल जयसिंगाने त्याला लिहिले की 'शिवाजीला कैदेत टाकून किंवा ठार मारून आपणास काहीएक फायदा नाही. तो एकटा नाहीसा झाल्याने मराठयांचे<noinclude></noinclude>
c8zkgqw5j3n5vxoe6rjx3998ef7q9fn
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५१
104
73504
230742
164529
2026-06-05T03:26:23Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230742
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४२५|| 'मऱ्हाष्ट्र राज्य'}}</noinclude>राज्य मोडेल अशातला प्रकार बिलकुल नाही. इतकी त्याची व्यवस्था इकडे परिपूर्ण
झाली आहे.'<br>{{gap}}हे मऱ्हाष्ट्र राज्य आहे, एका शिवाजीचे किंवा भोसले घराण्याचे हे राज्य नाही, याचा भावार्थ यावरून स्पष्ट होईल.<br><br>'''(३) विशाल ध्येयवाद'''<br>{{gap}}शिवछत्रपतींनी येथे राष्ट्र निर्माण केले याचा अर्थ विशद करताना सरदेसाई, यदुनाथ सरकार व सेतुमाधवराव पगडी यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. 'महाराष्ट्रीयांच्या अंगच्या गुणांच्या विकासास संधी मिळाली,' 'प्रत्येक जातीच्या माणसास पुढे येण्यास वाव मिळाला,' 'मराठ्यांच्या सुप्त शक्ती जागृत झाल्या,' ही ती गोष्ट होय. ग्राम, वतन, जाती या कूपात अडकून पडलेल्या मंडुकांच्या ठायी अशा शक्ती जागृत होत नाहीत. राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा असा विशाल ध्येयवादच थोर कर्तृत्वाला प्रेरणा देऊ शकतो. छत्रपतींच्या प्रेरणेने असा विशाल ध्येयवाद मराठ्यांना लाभला आणि भिन्न भिन्न क्षेत्रांत येथे थोर पुरुष निर्माण होऊन त्यांच्या रूपाने राष्ट्रभावना मूर्त रूपाला आली.<br><br>'''विशाल अहंकार'''<br>{{gap}}बाजी प्रभू, मुरार बाजी, तान्हाजी मालुसरे यांनी केलेला आत्मयज्ञ हा आधीच्या तीनशे वर्षांत केव्हाही दिसला नव्हता. वतनासाठी खून, रक्तपात, आणि सुलतानांच्या सेवेत राहून हिंदुराज्यांचा नाश एवढाच देशमुख, देशपांडे, मनसबदार, सरदार यांचा उद्योग होता. हेच लोक आता वतनापलीकडे पाहू लागले होते. मावळातले एखादे खोरे, खानदेशातला एखादा परगणा यांवरून त्यांची दृष्टी अखिल महाराष्ट्रात, अखिल हिंदुसमाज येथपर्यंत पोचू लागली. अहंकार व्यापक करणे हेच परमार्थात उद्दिष्ट असते. 'अहं' म्हणजे मी एक व्यक्ती ही भावना टाकून 'अहं ब्रह्मास्मि' असा भाव मनात बाणवावा, असे तत्त्ववेत्ते सांगतात. राजकारणात हेच व्हावे लागते. मुरारबाजीला मी म्हणजे एक व्यक्ती, एका कुटुंबाचा प्रमुख, जावळीच्या मोऱ्यांच्या पदरी असलेला मोठा अधिकारी, एवढाच प्रथम अहंभाव होता. छत्रपतींच्या सेवेत आल्यावर त्याचा अहंकार विशाल होऊ लागला. आणि मऱ्हाष्ट्र राज्याशी तो एकात्म झाला. दृष्टी अशी अत्यंत व्यापक झाल्यावाचून, राष्ट्रीय अस्मितेशी वैयक्तिक अस्मितेचे तादात्म्य झाल्यावाचून, आत्मार्पण हा जो परमोच्च त्याग त्याला माणसाचे मन सिद्ध होत नाही. अशा त्यागाला मराठ्यांची मने छत्रपतींनी सिद्ध केली, हीच त्यांनी केलेली राष्ट्रीय किंवा राजकीय क्रांती होय.<br>{{gap}}मोरोपंत पिंगळे, अनाजी दत्तो, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, हरजी राजे महाडिक, रघुनाथपंत हणमंते, बाजी पासलकर, रामाजी पांगेरा, येसाजी<noinclude></noinclude>
h0exskifxucwlpv1zzx51otzb05j4ip
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५२
104
73505
230743
164530
2026-06-05T03:26:35Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230743
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४२६}}</noinclude>कंक, बाळाजी आवजी, संभाजी कावजी, रघुनाथ बल्लाळ कोरडे, कान्होजी जेधे, दादाजी नरस प्रभू, प्रल्हाद निराजी, आनंद मकाजी, आबाजी सोनदेव, रामचंद्र नीळकंठ अमात्य, त्र्यंबक भास्कर, दौलतखान, मायनाक भंडारी, निराजी रावजी, पंताजी गोपिनाथ, फिरंगोजी नरसाळा, बहिर्जी नाईक, भिमाजी पंडित, जिवा महाला या पुरुषांचे कर्तृत्व पाहून मन थक्क होते.<br><br>'''पारडे फिरले'''<br>{{gap}}मोरोपंत पिंगळे हा उत्तम प्रशासक तर होताच, पण तसाच मोठा सेनापतीही होता. आणि प्रतापगडाची उत्तम बांधणी करावी हे कसबही त्याच्याजवळ होते. तसाच अनाजी दत्तो. जमीन महसुलाची व्यवस्था त्याने बांधून दिली पण पन्हाळा, कोंडाणा काबीज करण्यातही तो अग्रभागी होता. अष्ट प्रधानांना भिन्न भिन्न खाती दिली होती, पण रणविद्या प्रत्येकाला आलीच पाहिजे असा महाराजांचा दंडक होता. आणि एक पंडितराव वगळता बाकीच्यांनी अनेक रणक्षेत्रांत तलवार गाजविलेलीही आहे. हंबीरराव मोहिते तर सेनापतीच होता. त्याने कोप्पळला जो संग्राम केला त्यावरून मुस्लिम आणि मराठे यांच्या सामर्थ्याचे, पराक्रमाचे पारडे कसे समूळ फिरले हे दिसून येते. कोप्पळला हुसेन मियाना हा मोठा कजाख विजापुरी सरदार होता. त्याची जमियत (सेना) मोठी होती. हंबीररावाची फौज थोडी होती. पण जसे वेणीचे केस दुभागून स्त्री वेणी घालते तशा रीतीने हंबीररावाने हत्यार चालविताच फळी फुटोन दुभांग केले. आणि मग मराठ्यांनी लांडगेतोड केली ती इतकी भयंकर होती की विजापुरी मुसलमानी फौज अल्लाची प्रार्थना करू लागली - 'मराठ्यांचे लढाईची गाठ पुहा घालू नको !'<br>{{gap}}आतापर्यंत मुसलमानी फौजांनी हिंदूंची दैना करावी असा इतिहासाचा रिवाज होता. आता युग पालटले. दोनशे दोनशे मराठे लाख दीड लाख फौजेच्या तळात मध्यभागी असलेल्या शायस्ते खानावर तुटून पडतात आणि त्याला नामोहरम करून दिल्लीला हाकलून देतात. नेताजी पालकर, प्रतापराव गुजर हे विजेसारखे कोकणातून घाटावर, बाटावरून बागलाणात, तेथून वऱ्हाडात, तेथून अकस्मात विजापुरावर असे चकाकत हिंडत असतात, आणि मुस्लिम सत्तेचा पाया हादरून टाकीत असतात !<br>{{gap}}रघुनाथ नारायण हणमंते हा प्रथम शहाजीचा आणि नंतर व्यंकोजीचा कारभारी. व्यंकोजीने तंजावरास राज्य स्थापिले. पण ते विजापूरचे मांडलीक राज्य होते. छत्रपतींचा उदय झालेला ऐकून, रघुनाथपंतांना तसेच स्वराज्य कर्नाटकात व्हावे, अशी उभारी आली. व्यंकोजीला ते मानवेना. तेव्हा नोकरी सोडून हा गृहस्थ गोवळकोंड्यास गेला आणि मादण्णाशी खलबत करून छत्रपतींच्या दक्षिण दिग्विजयाचे सर्व कारस्थान याने रचले आणि कर्नाटक प्रांत स्वराज्यात आणण्यात महाराजांना अनमोल साह्य केले. महाराजांना त्याच्याबद्दल किती आदर होता ? ते लिहितात, 'आपण आम्हां (शहाजी-) महाराजांचे ठायी. आम्ही चुकलो असता शासन करून सन्मार्गास लाव-<noinclude></noinclude>
18p2mjzw2riipkq2zyqpx2mbdpww5fb
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५३
104
73506
230744
164531
2026-06-05T03:26:56Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230744
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४२७|| 'मऱ्हाष्ट्र राज्य'}}</noinclude>णार, अशी योग्यता व उपमा दुसरियास येणे नाही.' पण हे सर्व मोठेपण छत्रपतींच्या प्रेरणेनेच निर्माण झाले होते. ते नसते तर रघुनाथपंत व्यंकोजीचे, व फार तर आदिलशाहीचे, एक मोठे दिवाण म्हणून गाजले असते ! छत्रपतींनी निर्माण केलेल्या ध्येयवादामुळे ते राष्ट्रनिर्मितीच्या कार्यातील एख प्रमुख शिल्पकार म्हणून गाजत राहिले.<br><br>'''नवे चैतन्य'''<br>{{gap}}वर जी नावे दिली आहेत ती त्यातल्या त्यात ज्यांनी विशेष कर्तबगारी केली त्यांची आहेत. पण या प्रत्येकाच्या मागे शेकडो, हजारो सामान्य जन उभे होते. त्या सर्वाच्याच ठायी काही नव्या चैतन्याचा संचार झाला होता. आणि यातच शिवछत्रपतींचे अनन्यसामान्यत्व आहे. हा राजा आपल्या धर्माचा आहे, हा आपल्या रामकृष्णशिवादी दैवतांचे, त्यांच्या देवळांचे रक्षण करील, या विचाराने बहुतजन आनंदले होते हे तर खरेच. शिवाय याच्या राज्यात आपल्या जमिनीचे, भाकरीचे, मुलाबाळांचे, बायकांचे रक्षण होईल असा दिलासा मिळाल्यामुळे ते छत्रपतींच्या पाठीशी उभे राहिले हेही खरे. पण यासाठी लढा करायला, प्राणपणाने झुंजायला, आत्मार्पण करायला ते इतके दिवस सिद्ध नव्हते. ती वृत्ती त्यांच्या ठायी महाराजांनी निर्माण केली होती. राष्ट्रीय वृत्ती ती हीच.<br><br>'''सर्व वर्ण, सर्व जाती'''<br>{{gap}}वरील नामावळींतून आणखी एक गोष्ट दिसून येते. छत्रपतींच्या अनुयायांत सर्व वर्णांचे, सर्व जातींचे, स्पृश्य, अश्पृश्य सर्व सर्व लोक होते. आणि प्रत्येक माणूस अंगावर येईल ते, साधेल ते, कोणत्याही वर्णाचे वा जातीचे, काम करीत होता. लढाईत तर जाति- वर्णनिरपेक्ष प्रत्येक मराठा उभा होता. तसा महाराजांचा दंडकच होता. पण कारभार, महसूल, जमीन मशागत, किल्ल्यांची बांधणी, जहाजांची उभारणी, जमिनीवरील व समुद्रावरील वाहतूक, परकी दरबारातील वकिली, हेरगिरी या सर्व क्षेत्रांत सर्व वर्णाचे व जातीचे लोक नेमलेले असत. आणि या सर्व नेमणुका अंगचे गुण पाहून केलेल्या असत. अनुवंशावर महाराजांचा मुळीच विश्वास नव्हता. बापाची जागा मुलाला मिळायची असा त्यांच्या राज्यात रिवाज नव्हता. मुलगा गुणी असला तरच त्याला ते पद प्राप्त होई. पण मुलगा गुणी निघेलच अशी केव्हाच खात्री नसते. वतनदारीविरुद्ध हाच तर फार मोठा आक्षेप होता. हे अमात्यांनी आज्ञापत्रात सांगितल्याचे मागे निर्देशिले आहेच. 'मिलिटरी सिस्टिम ऑफ दि मराठाज' या आपल्या ग्रंथात डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांनी आरंभीच हे स्पष्ट केले आहे, आणि तुकोजी, माणकोजी दहातोंडे, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते या छत्रपतींच्या पाच सरनोबतांचे- सेनापतीचे- उदाहरण दिले आहे. एक सरनोबत गेला किंवा बडतर्फ केला की त्याच्या जागी त्याचा मुलगा किंवा नातेवाईक केव्हाही नेमलेला नाही. दुसरा गुणी<noinclude></noinclude>
syrf5qcuf6hetvzekby6kkncw0kyyri
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५४
104
73507
230745
164532
2026-06-05T03:27:08Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230745
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४२८}}</noinclude>माणूस त्याच्या जागी नेमलेला आहे. तान्हाजीच्या जागी सूर्याजी आला तो त्याच्या गुणांमुळे, भाऊ म्हणून नव्हे, हे डॉ. सेन यांनी आवर्जून सांगितले आहे. (पृ. १८, १९) यावरून महाराजांची दृष्टी पूर्णतया राष्ट्रीय होती, हे दिसून येईल तशी ती असल्यामुळेच सर्व जातींच्या गुणविकासाला संधी मिळून राष्ट्रीय प्रपंचाला अवश्य ते सर्व कर्तृत्व उपलब्ध झाले.<br><br>'''यदुनाथ सरकार'''<br>{{gap}}असे असताना, 'शिवाजीच्या राज्यात कर्मठपणा आणि जातिभेद वाढीस लागले, त्याचे स्वराज्याचे ध्येय कर्मठपणावर आधारले होते' असे यदुनाथ सरकार यांनी म्हणावे याचा विस्मय वाटतो. पण रवींद्रनाथ टागोर तर यापुढे जातात आणि समाजातले हे भेद, या चिरा टिकवून धराव्या असा शिवाजीचा हेतू होता, असे म्हणतात. 'शिवाजीने महाराष्ट्रात राष्ट्र निर्माण केले' असे यदुनाथांनीच म्हटले आहे. इतरही अनेक प्रकारे महाराजांचा गौरव त्यांनी केला आहे. आणि तरीही वरील प्रकारची विधाने ते करतात आणि त्यांच्या पुष्टीसाठी टागोरांचे अवतरण देतात ! हा सर्वच प्रकार अत्यंत उद्वेगजनक आहे. डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांनी हे मत खोडून काढले आहे, हे वर सांगितलेच आहे.<br><br>'''मुलाहिजा नाही'''<br>{{gap}}आणि महाराजांची स्वतःची पत्रे या बाबतीत अगदी निर्णायक आहेत. १६७१ साली चिपळूण तालुक्यात लष्कराचा तळ पडला होता. तेव्हा जुमलेदार, हवालदार, कारकून यांनी एकंदर व्यवस्था कशी ठेवली पाहिजे, हे सांगण्यासाठी त्यांना महाराजांनी पत्र लिहिले, ते पत्र फार प्रसिद्ध आहे. त्यात सर्व तऱ्हेच्या ताकिदी देऊन झाल्यावर शेवटी बजावले आहे की 'या संबंधात ज्याचा गुन्हा होईल, येणेप्रमाणे वर्तणूक करिता ज्यापासून अंतर पडेल त्यास, मराठियाची तो इज्जत राहणार नाही. जास्ती (शिक्षा) केल्यावेगळ (केल्यावाचून) सोडणार नाही.'<br>{{gap}}ब्राह्मणांच्या बाबतीतही छत्रपतींची हीच वृत्ती होती. आपण श्रेष्ठ वर्णाचे, आपण ब्राहाण. त्यामुळे आपल्याला गुन्हे माफ होतील, आपल्याला कोणी काही करू शकणार नाही, असल्या समजुती त्यांना नष्ट करावयाच्या होत्या. प्रभावळीचा एक कारकुन जिवाजी विनायक सुभेदार याने हुकमाप्रमाणे काही ऐवज पोचवावयाचा होता तो पोचविला नाही. त्यामुळे महाराजांनी त्यास लिहिले, 'ऐसे नादान थोडे असतील. हबशियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हांला केले असतील ! त्याकरित ऐशी बुद्धी झाली असेल. ऐशा चाकरास ठीकेठीक केले पाहिजे.' अशी जरब देऊन शेवटी ते म्हणतात, 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहातो. गनीमाचे चाकर गनीम जालेस, ऐसे जाणून बरा नतीजा (शिक्षा) तुम्हांस पावेल.'<br><noinclude></noinclude>
o65zwd0fv4di7jer9i2dep7q4merz8p
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५५
104
73508
230746
164533
2026-06-05T03:27:20Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230746
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४२९|| 'मऱ्हाष्ट्र राज्य'}}</noinclude><br>'''विषाराचा नाश'''<br>{{gap}}जातिभेद, वर्णभेद, अस्पृश्यता हा भारताला मिळालेला शाप आहे. तो आहे तोपर्यंत हिंदुसमाज संघटित होणे शक्य नाही. हा रोग सर्वस्वी नष्ट करणे अजून कोणालाही शक्य झाले नाही. पण प्रत्येक युगात त्यातला विषार नष्ट करण्याचा प्रयत्न थोर पुरुष करीत आले आहेत. संतांनी धार्मिक क्षेत्रात या विषमतेला आळा घालण्याचा प्रयत्न केला. छत्रपतींनी राजकीय क्षेत्रात तसाच प्रयत्न केला. त्याला यश आले. म्हणूनच येथे राष्ट्रीय भावना रुजू शकली व सामान्य लोकांना गुणविकासाची संधी मिळून त्यांचे कर्तृत्व फुलारून आले. नव्या शक्ती, नवे सामर्थ्य, नवे तेज उदयास येणे हे क्रांतीचे एक फल म्हणून सांगितले जाते. महाराष्ट्रात तशी क्रांती छत्रपतींनी निश्चित घडविली होती. मराठा, ब्राह्मण, प्रभू, न्हावी, कोळी, भंडारी, कातकरी, हेटकरी सर्व जातींतून सर्व प्रकारचे कर्तृत्व बहरून आले. मायनाक भंडारी हा आरमाराचा अधिपती होऊ शकला, सामान्य कुणबी सरनोबत पदाला जाऊ शकला, याचा दुसरा अर्थ काय होतो ?<br><br>'''कुणब्याची चिंता'''<br>{{gap}}यासाठीच लोकजागृती, लोकसंघटना हे उद्दिष्ट महाराजांनी सतत डोळ्यांपुढे ठेविले होते. वर सांगितलेली महाराजांची पत्रे पाहिली तर अहोरात्र ते लोकांची चिंता कशी वहात असत ते कळून येते. चिपळूणच्या लष्करी तळावरील जुमलेदार, हवालदार यांना लिहिलेले वरील पत्रच पाहा. परदेशातून लष्कर संचारू लागले की लोकांवर जुलूम व्हावयाचा हे ठरलेलेच होते. लोकांची उभी पिके कापून नेणे, त्यांच्या घरांतून दाणावैरण लुटून नेणे, माल घेऊन पैसे न देणे, हे नित्याचेच प्रकार होते. याविषयी महाराजांनी फार कडक ताकीद वरील पत्रात दिली आहे. ते म्हणतात, 'जे कुणबी घर करून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील, म्हणजे त्यांस ऐसे होईल की मोगल मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही ! तेव्हा शिपाई हो, बहुत यादी करून वर्तणूक करणे. ज्यास जे पाहिजे ते विकावया येईल ते रास विकत घ्यावे. कोण्हावरी जुलूम ज्याजती करावयाची गरज नाही.' दुसऱ्या एका पत्रात, शायिस्तेखानाचे लष्कर सर्वत्र फिरत असताना, अधिकाऱ्यांनी अहोरात्र फिरत राहून रयतेचा संभाळ करण्याविषयी बजावले आहे. 'जेथे गनिमाचा आजार (त्रास) पहुचेना ऐशा जागियासी त्यास पाठविणे. गावाचा गाव हिंडून रातीचा दिवस करून लोकांना घाटाखाली जागा असेल तेथे पाठविणे. या कामात एक घडीचा दिरंग न करणे.'<br><br>'''मराठा तेवढा'''<br>{{gap}}कुणबी, शेतकरी यांची अशी सतत चिंता वाहिली जात असल्यामुळेच, हे आपले राज्य<noinclude></noinclude>
gxz762y66f5xtwudab8urox9756parc
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५६
104
73509
230747
164550
2026-06-05T03:27:57Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230747
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४३०}}</noinclude>आहे, असे महाराष्ट्र समाजाला जाणवू लागले. आणि महाराज स्वतः त्यांच्यांत मिसळून त्यांना हे त्यांचेच राज्य आहे अशी शिकवण देत राहिल्यामुळे हे 'मऱ्हाष्ट्र राज्य' आहे अशी अस्मिता त्यांच्या ठायी निर्माण झाली. हिंदुस्थानात ही अगदी असामान्य घटना घडली. आपण मराठे तेवढे निराळे, आपण मराठे तेवढे एक राष्ट्र, असा भाव भारतात अन्यत्र कोठेही निर्माण झाला नव्हता. बंगाली तेवढा मेळवावा, गुजराथी तेवढा मेळवावा, आपण पंजाबी, आपण आसामी, अशी पृथक् अहंकाराची जाणीव इतर प्रांतांत केव्हाही उदय पावली नाही. रजपूत येवढे पराक्रमी आपण रजपूत निराळे आहो, अशी भावनाही त्यांच्या ठायी होती. पण ती वंशनिष्ठा होती. भूमिनिष्ठा नव्हती. राजस्थानातील प्रत्येक माणूस रजपूत आहे असा आशय, 'आम्ही रजपूत' या भावनेत नव्हता. तेथल्या जोधपूर, जयपूर, चितोड अशा राजघराण्यांपुरतीच ती मर्यादित होती आणि तीही ऐक्यप्रेरक होऊ शकली नाही. कारण प्रत्येक घराणे दुसऱ्या घराण्याला तुच्छ लेखीत असे. मग सर्व जनतेला सम मानणे हे तर लांबच राहिले.<br><br>'''लोकांविषयी तुच्छता'''<br>{{gap}}भारतातच काय, पण अतिशय प्रगत अशा पश्चिम युरोपातही, राज्य लोकांचे असते, जनतेचे असते, लोक ही एक शक्ती आहे, या तत्त्वाचा परिपोष, चौदाव्या, पंधराव्या शतकात, तेथे राष्ट्रभावनेचा उदय झाला असूनही, एक इंग्लंडचा अपवाद सोडता, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत झाला नव्हता. १८४८ साली जर्मनीत अडतीस भिन्न स्वतंत्र संस्थाने होती. त्या वेळी प्रशियाचा राजा फ्रेडरिक विल्यम ४ था हा चांगला प्रबळ होता. त्याच्या आधिपत्याखाली सर्व जर्मनीचे ऐक्य करावे अशी लोकांची इच्छा होती. फ्रॅकफुर्टच्या लोकसभेने तसा ठराव केला व फेडरिकला सर्व जर्मनीचे सम्राटपद देऊ केले. पण ते त्याने अत्यंत तुच्छतापूर्वक नाकारले. कारण काय ? तो म्हणाला, 'लोकांनी दिलेले राजपद मी तुच्छ मानतो. झालो तर मी माझ्या बळावर राजा होईन.' चौदाव्या लुईच्या कारकीर्दीत (१६६१ ते १७१५) फ्रान्सचा मोठा उत्कर्ष होत होता. पण समाजात कमालीची विषमता होती. लोकांना कसलेही स्थान नव्हते आणि त्यांची कमालीची पिळणूक होत होती. फ्रेंच राज्यक्रांतीचा स्फोट त्यामुळेच झाला. इटली, स्पेन या देशांत अजूनही लोकशक्ती जागृत नाही व संघटितही नाही.<br><br>'''निस्तुल गोष्ट'''<br>{{gap}}अशा स्थितीत सतराव्या शतकात मराठ्यांच्या एका नेत्याच्या मनात लोकजागृतीची कल्पना उद्भवावी आणि त्याने लोकांत ती काही अंशी रुजवून त्यांच्या ठायी 'हे आपले मऱ्हाष्ट्र राज्य आहे' अशी अस्मिता निर्माण करावी ही एक अनन्यसामान्य, निस्तुल अशी गोष्ट आहे. त्या तत्त्वाचा परिपोष पुढे झाला नाही हे दुर्दैवच होय. तरी<noinclude></noinclude>
lax42hx43em86c8ooukyfvjw9jmitik
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५७
104
73510
230748
164551
2026-06-05T03:28:09Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230748
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४३१|| 'मऱ्हाष्ट्र राज्य'}}</noinclude>पण शंभर दीडशे वर्षांत सर्व भारतभर मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार करावा, एवढी प्रचंड शक्ती त्यातून निर्माण झाली असा इतिहासच आहे.<br><br>'''हिंदुपद पातशाही'''<br>{{gap}}छत्रपतींनी मराठ्यांचे राष्ट्र निर्माण करण्याचा उद्योग जन्मभर केला असला तरी, अखिल हिंदुस्थान, अखिल हिंदुसमाज, हिंदुपद पातशाही हे व्यापक ध्येय त्यांच्या नजरेसमोरून केव्हाही ढळले नव्हते. गो. स. सरदेसाई यांनी याविषयी उत्तम विवेचन केले आहे. ते म्हणतात, 'गोब्राह्मणप्रतिपालनाचे ब्रीद, अष्टप्रधानादी संस्था, राज्याभिषेकशकाची निर्मिती, चौथाई, सरदेशमुखीचा अवलंब इत्यादी प्रकारांवरून शिवाजीने इतका मजबूद व विस्तृत पाया रचलेला दिसतो की त्यावर समस्त हिंदुपद पातशाहीची इमारत सहज उभारता यावी. शिवाजीची ही महत्त्वाकांक्षा मराठेशाहीच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रमंडळाच्या नजरेसमोर सारखी वावरत होती. बाजीराव, मुरारराव घोरपडे, महादजी शिंदे, माधवराव पेशवे, रघूजी भोसले इत्यादी पुरुषांनी याच हेतूच्या सिध्यर्थ कष्ट केले.' (शककर्ता शिवाजी, पृ. २२१) छत्रपतींनी राजा छत्रसाल, राजसिंह, मादण्णा, यांना जी कार्याची प्रेरणा दिली तीवरून त्यांची अखिल भारतीय दृष्टीच स्पष्ट होते. एका तत्कालीन कवीने त्यांना 'दिल्लीन्दपदलिप्सु', दिल्लीपती होण्याची आकांक्षा असलेला, असे म्हटले आहे. त्यावरूनही त्यांच्या हिंदुपदपातशाहीच्या भव्य कल्पनेचाच प्रत्यय येतो. तेव्हा मराठ्यांचे त्यांनी राष्ट्र घडविले, यावरून अखिल हिंदुसमाजाच्या संघटनेचे व त्याच्या उत्कर्षाचे त्यांचे उद्दिष्ट बाधित झाले होते, असे मुळीच नाही. त्या उद्दिष्टाच्या सिद्धीसाठीच त्यांनी ही संघशक्ती निर्माण केली होती. <br><br>'''जातिधर्मनिरपेक्ष'''<br>{{gap}}हिंदुपदपातशाही हे महाराजांचे उद्दिष्ट असले तरी मुसलमानांचा उच्छेद करावा, असे त्यांच्या मनात मुळीच नव्हते. त्यांच्या मनातली राष्ट्र ही कल्पना अगदी शुद्ध स्वरूपातली होती. राष्ट्र ही जातिधर्मनिरपेक्ष संघटना आहे. महाराजांच्या मनातले मराठ्यांचे राष्ट्रही तसेच होते. अनेक पठाणांना त्यांनी लष्करात घेतले होते. दौलतखान हा मुसलमान त्यांच्या आरमाराचा अधिपती होता. मशिदी, कुराण ग्रंथ यांचा अवमान होऊ न देण्याची ते दक्षता बाळगीत. बाबा याकूबसारख्या मुसलमान साधुपुरुषावरही त्यांची भक्ती होती. तुलनेने पाहता जेथे राष्ट्रभावना प्रथम उदयास आली त्या पश्चिम युरोपातही त्या वेळी ती इतक्या शुद्ध स्वरूपात नव्हती. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली या देशांत प्रोटेस्टंट व कॅथॉलिक हे एकमेकांचे हाडवैरी होते. आणि प्रारंभी राज्यकर्त्यांनीही असहिष्णुतेचेच धोरण अवलंबिले होते. शिवछत्रपतींच्या मनाला धार्मिक असहिष्णुता कधीच शिवली नाही. या भूमीच्या, महाष्ट्राच्या सेवेला जे जे कोणी सिद्ध होते त्या सर्वांना जातिधर्मनिरपेक्ष दृष्टीने त्यांनी आपल्या कारभारात<noinclude></noinclude>
ml6s7sgw535vfk8e6rrwpa5fsibe5kw
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५८
104
73511
230749
164552
2026-06-05T03:28:21Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230749
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४३२}}</noinclude>सामावून घेतले. त्यांचा मऱ्हाष्ट्र असा व्यापक होता.<br>{{gap}}शिवछत्रपतींनी कोणती राजकीय क्रांती केली हे यावरून स्पष्ट होईल. 'आपण मराठे म्हणजे एक राष्ट्र आहो' ही भावना त्यांनी या लोकांत रुजविली व त्यांना जागृत आणि संघटित करून, पाचशे वर्षे भारताच्या मानेभोवती बसलेला मुस्लिम सत्तेचा फास तोडून टाकण्याइतके दुर्जेय सामर्थ्य या भूमीला प्राप्त करून दिले.<br>{{gap}}सिकंदर, हानिबॉल, सीझर यांच्याशी पाश्चात्य लोक त्यांची तुलना करतात. पण ती केवळ एकदेशीय होय. युद्धनेतृत्वात फार तर ते महाराजांच्या तुलनेला येतील. पण आपल्या भूमीला त्यांनी सामर्थ्य प्राप्त करून दिल्याचे इतिहास सांगत नाही. 'तयाचे गुण महत्त्वासी तुलना कैची ?' हेच खरे.<br><br>{{center|■}}<noinclude></noinclude>
44d6a3jz0i3p859b7gol099f6jr5ytz
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५९
104
73512
230750
164553
2026-06-05T03:28:32Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230750
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop
|Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf
|Page = 459
|bSize = 393
|cWidth = 303
|cHeight = 209
|oTop = 45
|oLeft = 35
|Location = center
|Description =
}}
<br><br>{{rh|'''<big>२२.</big>'''||'''<big>शिवछत्रपतींची युद्धविद्या</big>'''}}<br><br>'''महत्त्व'''<br>{{gap}}समाजाच्या संस्कृतीच्या अभ्यासात त्या समाजाची धर्मनिष्ठा, त्याची अर्थव्यवस्था, त्याचे स्वातंत्र्यप्रेम या घटकांचा जसा समावेश होतो तसाच युद्धविद्येचाही होतो, झाला पाहिजे. कारण ही विद्या नसेल तर संस्कृतीचे इतर सर्व घटक फोल ठरतात. 'शस्त्रेण रक्षिते राज्ये शास्त्रचिंता प्रवर्तते ।' हे व्यासवचन मागे दिले आहे. त्याचा अर्थ हाच आहे. शस्त्रबलाने राज्याचे, समाजाचे रक्षण होत असेल तरच त्या समाजात शास्त्रे, विद्या, धर्म यांचा विजय होतो आणि तसे रक्षण झाले नाही तर विकसित झालेली शास्त्र, प्रौढ झालेला धर्म यांचाही लय होतो. शिवछत्रपतींच्या आधीच्या तीनशे वर्षांच्या कालात महाराष्ट्रात हेच घडत होते. मराठ्यांना शस्त्राने आपल्या राज्याचे- स्वराज्याचे- रक्षण करता येत नव्हते. आणि त्यामुळे येथला धर्म, येथली लक्ष्मी, येथल्या विद्या, कला, येथली शास्त्रे यांचा लोप होण्याची वेळ आली होती. संतांनी आपल्या वाणीने धर्मरक्षणाची पराकाष्ठा चालविली होती. पण सरदारांनी, मुत्सद्दयांनी युद्धविद्येची साथ तिला दिली नाही. म्हणून संतांच्या प्रयत्नांना यावे तसे यश येत नव्हते. शिवाजी महाराजांनी हे जाणले आणि युद्धविद्येची जोपासना करून महाराष्ट्र संस्कृतीचे रक्षण केले.<br>{{gap}}सरदारांनी युद्धविद्येची साथ दिली नाही, असे वर म्हटले आहे. त्या सरदारांच्याजवळ ती विद्या नव्हतीच. ते सरदार युद्धे करीत होते, युद्धात पराक्रम गाजवीत होते; पण याला युद्धविद्या म्हणत नाहीत. महाभारतात म्हटले आहे की 'ज्या उपायाने<noinclude><br>{{gap}}२८</noinclude>
aa1o35igcy012cd4gvwgw2uovw6sxba
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६०
104
73513
230751
164554
2026-06-05T03:29:14Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230751
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४३४}}</noinclude>शत्रूचा नाश होतो त्या उपायालाच शस्त्र (म्हणजे शस्त्रविद्या व युद्धविद्या) असे म्हणतात. नुसते हातपाय तोडणे किंवा माना कापणे याला शस्त्र म्हणत नाहीत. 'न शस्त्रं छेदनं स्मृतम्।' (२,५५,९) मराठा सरदार शत्रूचा नाश करण्याचे उद्दिष्टही मनापुढे ठेवीत नव्हते. उलट ते त्याच्या राज्याचा विकास घडवीत होते. तेव्हा त्यांचा पराक्रम म्हणजे युद्धविद्या नव्हे. आणि त्यांचा धर्म हा क्षात्रधर्मही नव्हे. तो लुप्त झालेला क्षात्रधर्म महाराजांनी जागृत केला आणि युद्धविद्येची जोपासना करून हिंदुधर्म, हिंदुसंस्कृती, हिंदुपरंपरा यांचे रक्षण केले.<br><br>'''मोठी प्रेरणा'''<br>{{gap}}अशी ही जी युद्धविद्या तिचे पहिले लक्षण म्हणजे ध्येयवाद हे होय. थोर, उदात्त अशा ध्येयवादावाचून लष्कराच्या हातून अद्भुत असे पराक्रम होत नाहीत. युद्ध हा मरणमारणाचा संग्राम आहे. दरघडीला त्यात मृत्यू समोर उभा असतो. तो मृत्यू पत्करूनही मिळविण्याजोगे काही आहे, असे वाटल्यावाचून, तशी निष्ठा, तशी श्रद्धा असल्यावाचून, माणसे अंतिम त्यागाला सिद्ध होत नाहीत. धर्मनिष्ठा, स्वामिनिष्ठा, राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्यप्रेम अशी कोणती तरी प्रेरणा मागे असल्यावाचून बलाढ्य शत्रूवर विजय मिळविणे शक्य होत नाही. वॉशिंग्टनच्या लढाया, गॅरीबाल्डीच्या लढाया, माओत्से तुंगच्या लढाया, जपान-चीन, जपान - रशिया या लढाया, परवाच्या व्हिएटनाममधील लढाया यांचा इतिहास हेच सांगतो. डॉ. सुरेन्द्रनाथ सेन यांनी असा सिद्धांतच सांगितला आहे. ते म्हणतात, 'लष्कर कार्यक्षम व्हावे यासाठी, प्रथम त्यात शिस्त असली पाहिजे; पण त्यापेक्षाही त्या लष्करापुढे काही ध्येय असले पाहिजे, ज्यासाठी लढावे असे उदात्त उद्दिष्ट असले पाहिजे. असे ध्येय मराठा वतनदार, सरदार यांच्यापुढे नव्हते. ते स्वार्थी, वतनासक्त होते. अशा वेळी लोकांच्यापुढे शिवाजी महाराजांनी 'हिंदवी स्वराज्य' हे ध्येय ठेवले. त्यामुळेच मराठी जनतेच्या अंगी नवे तेज आले आणि स्वराज्याच्या कार्याला ती सिद्ध झाली.' (मिलिटरी सिस्टिम ऑफ दि मराठाज्, प्रकरण १ ले, शिवाजी व त्याचे अनुयायी )<br>{{gap}}'हिंदवी स्वराज्य' हे छत्रपतींचे ध्येय होते आणि मुख्यतः त्यांना धर्मराज्य स्थापावयाचे होते असे डॉ. सेन यांनी म्हटले आहे. गो. स. सरदेसाई, डॉ. बाळकृष्ण या इतिहासपंडितांचे हेच मत आहे; आणि आता हे सर्वमान्य झाले आहे.<br><br>'''मुद्गल रामायण'''<br>{{gap}}शिवछत्रपती म्हणजे मूर्तिमंत ध्येयवाद होते ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. हिंदुधर्माचे रक्षण, हिंदुसंस्कृतीचे पुनरुज्जीवन हे त्यांचे ध्येय तेराव्या चौदाव्या वर्षीच निश्चित झाले होते, याविषयी आजच्या सर्व इतिहासपंडितांचे एकमत आहे. हाच जाज्ज्वल्य ध्येयवाद मराठी सामान्य जनांच्या चित्तात रुजवून त्यांनी त्यांना, 'मारता<noinclude></noinclude>
6pwugo64qesxeafbgyjijzqtdppn0o0
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६१
104
73514
230752
164555
2026-06-05T03:30:37Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230752
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४३५|| शिवछत्रपतींची युद्धविद्या}}</noinclude>मारता मरावे, मारूनी आपण उरावे,' यासाठी सिद्ध केले. महाराजांना या क्षात्रधर्माची स्फूर्ती रामायण-महाभारतापासून झाली. म्हणूनच या ग्रंथांचे पठण गडागडावर, आणि लष्करातही व्हावे, अशी योजना त्यांनी केली होती. गो. स. सरदेसाई म्हणतात, महाराष्ट्रात जी राज्यस्थापना झाली तिचे बीज ऐतिहासिक कवींनी पेरले, असे म्हणण्यास चिंता नाही. असे कळते की शिवाजीच्या प्रत्येक किल्ल्यावर मुद्गल कवीचे रामायण असे. या कवीने मुसलमान व मराठे यांची कित्येक चित्रे काढिली आहेत. प्रत्येक किल्ल्यावर रात्री भोजन झाल्यावर हे रामायण वाचीत. तसेच फौजेतही मुद्दाम वाचवीत.' (नेताजी सुभाषचंद्र हे आझाद हिंद सेनेत सावरकरांचे 'सत्तावनचे स्वातंत्र्यसमर' असेच वाचीत असत.) हा मुद्गल कवी म्हणजे सतराव्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेलेला कृष्णदास मुद्गल होय. त्याने फक्त युद्धकांडच रचले आहे. त्याच्या या युद्धकांडाची पारायणे मराठेशाहीत किल्ल्यांकिल्ल्यांवरून नेहमी होत. (असे वि. ल. भावे व ल. रा. पांगारकर यांनी म्हटले आहे.) यामुळेच मराठ्यांचा क्षात्रधर्म जागृत झाला.<br><br>'''कठोर शिस्त'''<br>{{gap}}अत्यंत कडक, कठोर, चोख शिस्त हे महाराजांच्या युद्धविद्येचे दुसरे लक्षण होय. त्या शिस्तीचे स्वरूप आपण पाहिले तर, वरील प्रकारच्या ध्येयवादावाचून असल्या शिस्तीचे पालन करून घेणे सर्वथा अशक्य आहे, हे आपल्या ध्यानात येईल. लष्कराचा तळ पडेल त्याच्या भोवतालचा परिसर उजाड, उद्ध्वस्त होणे हा मागल्या काळी नियमच होता. मुस्लिम लष्करातील शिपाई उभी पिके कापून नेत. घराच्या छपरातील गवत उपसून नेत, धनधान्याची लूट करीत, गावकऱ्यांना वेठीला धरीत आणि स्त्रियांची वाटेल ती विटंबना करीत. त्यांच्या लष्करी छावणीत दासी, बटकी, नर्तकी वारांगना शेकड्यांनी असत, नाचरंग, भोग, धुंदी हेच त्या लष्कराचे नित्याचे जीवन होते. मराठा सरदारांनी सुलतानासाठी लष्करे उभारली त्यांचीही हीच रीत होती. असा भोवतालचा रीतिरिवाज, आणि नित्यक्रम असताना लष्करात, स्त्री केव्हाही दिसता कामा नये, कोणीही बरोबर स्त्री आणता कामा नये, असा दण्डक घालून तो कसून अमलात आणणे हा विचार कोणालाही वेडेपणाचा, विपरीत आणि दुर्घट असाच वाटला असता. पण मोगलांच्या बलाढ्य सत्तेला नामोहरम करून स्वराज्याची स्थापना करण्याचे अती दुर्घट कार्य शिरी घेतल्यानंतर अशा अनंत दुर्घट गोष्टी महाराजांना कराव्या लागल्या आणि त्या त्यांनी करून दाखविल्या. त्यांनी निर्माण केलेली धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, स्वराज्यप्रेम यांमुळेच ते शक्य झाले.<br><br>'''लष्कराची रीत'''<br>{{gap}}महाराजांचे लष्कर पावसाळा सोडून राहिलेले आठ महिने स्वराज्याबाहेर मुलख-<noinclude></noinclude>
pwfxhiw88sptx30wy7amdqyf1ilz90b
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६२
104
73515
230753
164556
2026-06-05T03:31:04Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230753
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४३६}}</noinclude>गिरीवर असे. सभासद लिहितो, 'दसरा होताच छावणीहून लष्कर कूच करून जावे. आठ महिने बाहेर लष्करांनी परमुलखात पोट भरावे. खंडण्या घ्याव्या. लष्करात बायको, बटकी, कलावंतीण नसावी. जो बाळगील त्याची गर्दन मारावी. परमुलखात पोर, बायको न धरावी. मर्दाना सापडला तरी धरावा. गाई न धरावी. बैल ओझ्यास मात्र धरावा. ब्राह्मणांस उपद्रव न द्यावा. खंडणी केल्या जागा बोलीप्रमाणे पैका घ्यावा. कोणी बदअंमल न करावा. आठ महिने परमुलखात स्वारी करावी. वैशाख मासी परतोन छावणीस येताच आपले मुलखाचे सरदेस (सरहद्दीवर) कुल लष्कराचा झाडा घ्यावा. पूर्वील बिशादीचे (लुटीतील सामानाचे) जायते रुजू घालावे. कोणी वस्तू चोरून ठेवील आणि दाखल सरदारांस जाहलियाने शासन करावे अशी लष्कराची रीत.' (सभासद बखर, कलम २९)<br>{{gap}}लष्करातील लुटीसंबंधीचा हा नियम दासी-बटकीसंबंधीच्या नियमाप्रमाणेच कटोर आणि विपरीत (!) होता. स्त्री आणि धन यासाठीच माणसे लष्करात जातात. आणि ही नेमकी विलोभनेच छत्रपतींनी नष्ट करून टाकली. मग मराठा माणूस त्यांच्या लष्करात का आला? मराठा मनाची सांस्कृतिक उंची महाराजांनी वाढविली होती. क्षुद्र वासनांच्या पलीकडे त्यांना दृष्टी फेकण्यास शिकविले म्हणून!<br><br>'''कडक राहणी'''<br>{{gap}}काटक, कडक जीवन, ऐषआरामशून्य राहणी, अत्यंत मर्यादित गरजा हे छत्रपतींच्या युद्धविद्येचे तिसरे लक्षण होते. मराठा शिपायाजवळ बोजा, लवाजमा असा मुळी नसेच. त्यामुळेच लष्कराच्या हालचाली अत्यंत चपलतेने होत असत. भाला, धनुष्यवाण, तलवार आणि फार तर बंदुक ही त्याची हत्यारे. अवजड तोफखाना मराठा लष्कर प्रारंभी कधी ठेवीत नसे. कारण मावळी डोंगरी मुलखात त्याचा तसा उपयोगही नसे. या हत्यारांशिवाय मराठा शिपायांचे सामान म्हणजे थोडीशी भाकरी, घोड्याच्या तोबऱ्याचे हरभरे आणि एखादे घोंगडे ! जमिनीवरच ते घोंगडे खालीवर घेऊन ते निजत. घोड्याचा लगाम मनगटालाच बांधून ठेवीत. स्वारी मोठी असली तरी महाराजांसाठी व मंत्र्यांसाठी एक दोन तंबू असत. बाकी सर्व लष्कर उघड्यावरच राहात, झोपत असे. त्यामुळे विद्युत् वेगाने वाटेल तशा हालचाली करून शत्रूला गाठणे, झोडपणे आणि क्षणार्धात नाहीसे होणे हे मराठ्यांना सहज शक्य होत असे.<br><br>'''मोगल मिजास'''<br>{{gap}}या उलट मोगल लष्कराची ऐषआरामी मिजास पाहा. प्रत्येक मोगल शिपायावरोवर एक उंटभर सामान असे. म्हणजे एका मोगल शिपायाच्या सामानातून मराठ्यांच्या एका तुकडीचा निर्वाह व्हावयाचा. मोगल छावणी म्हणजे एक वैभवनगरच असे. सरदारांचा जनानखाना नेहमी बरोबरच असावयाचा. त्यांना हत्यारे नेण्यास माणसे<noinclude></noinclude>
epowmj1eh8pbqluz7471bld78rhw9wl
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६३
104
73516
230754
164557
2026-06-05T03:31:18Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230754
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४३७|| शिवछत्रपतींची युद्धविद्या}}</noinclude>लागत. छापा घालण्यापेक्षा त्यांना जेवणाची काळजी जास्त असे. नाचरंग, विलास हा त्यांचा नित्यक्रम होता. यामुळे मराठे एका दिवसात जी दौड करीत तितकी करण्यास मोगल लष्करास तीन दिवस लागत. (फॉरिन बायॉग्रफीज् ऑफ शिवाजी, या ग्रंथात ही वर्णने आलेली आहेत.) यामुळे मराठ्यांच्या व मोगलांच्या कार्यक्षमतेत जमीन-अस्मानाचा फरक पडे.<br>{{gap}}मराठ्यांचे सामर्थ्य कशात होते ते यावरून कळेल. प्रत्यक्ष युद्धातले डावपेच, रणनीती, त्यांचा गनिमी कावा यांचा विचार आपल्याला करावयाचा आहेच, पण त्यांना जे यश मिळाले त्याचे बव्हंशी श्रेय त्यांचा ध्येयवाद, त्यांची करडी शिस्त आणि त्यांची कडक राहणी यांना आहे, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.<br><br>'''एकहुकमी सेना'''<br>{{gap}}शिवछत्रपतींनी शेवटपर्यंत लष्करात उत्तम शिस्त राखता आली याचे महत्त्वाचे कारण हे की त्यांची सेना ही, डॉ. सेन यांच्या म्हणण्याप्रमाणे, राष्ट्रीय सेना होती. ती वतनदारांची किंवा सरंजामदारांची सेना नव्हती. पेशवाईत तिला तसे रूप आले. शिंदे, होळकर, पवार, पटवर्धन अशा भिन्न सरदारांच्या सेना मिळून मराठ्यांचे लष्कर होई. अगदी प्रारंभीच्या काळी काही दिवस महाराजांनीही देशमुख, वतनदार यांच्या सेना जमा करून काम चालविले. पण लवकरच त्यांनी सेनेचे रूप पालटून ती सर्व एका हुकमतीखाली चालणारी राजसेना करून टाकली. त्यामुळे भिन्न हुकमतीमुळे जो घोळ पडावयाचा तो त्यांच्या लष्करात कधीही पडला नाही. प्रारंभी शिलेदारांचे प्रमाण लष्करात बरेच मोठे होते. मराठा लष्करात दोन प्रकारचे घोडेस्वार असत. बारगीर आणि शिलेदार. शिलेदाराजवळ स्वतःच्या मालकीचा घोडा, हत्यारे व सामान असे. बारगिराचा घोडा व सामान सरकारी असे. या फरकामुळे शिलेदार थोडा स्वतंत्र वृत्तीचा सहजच होई. आणि हेच छत्रपतींना नको होते. त्यामुळे थोड्या प्रमाणात तरी एकमुखी हुकमतीला बाध येई. म्हणून शिलेदारांचे प्रमाण त्यांनी कमी करण्याचे धोरण ठेवले. प्रारंभी सरनोबत माणकोजी दहातोडे यांच्या सेनेत तीन हजारांपैकी दोन हजार शिलेदार होते. पण १६५९ सालापर्यंत दहा हजारांत तीन हजार येथवर ते प्रमाण खाली आणण्यात आले. सरकारी घोडदळाला पागा म्हणत. सभासद लिहितो की राजांनी पागेचे प्रमाण हळूहळू वाढविले आणि शिलेदारांना पागेच्या हुकमतीत कायम ठेवले. त्यामुळे लष्कर एकहुकमी झाले आणि करडी शिस्त संभाळणे अगदी सोपे झाले. मोगली किंवा विजापुरी सैन्यात अशी शिस्त कधीच नसल्यामुळे महाराजांना भराभर विजय मिळत गेला.<br>{{gap}}युद्धविद्येतल्या मानवी गुणांचा, मनोबलाचा, अंतःसामर्थ्याचा असा विचार झाल्यावर आता मराठ्यांच्या प्रत्यक्ष रणनीतीचा, प्रत्यक्ष युद्धपद्धतीचा विचार करावयाचा.<br><noinclude></noinclude>
ft3dchwbe75ptpy0czwnpr47oi15wj7
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६४
104
73517
230755
164558
2026-06-05T03:31:37Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230755
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४३८}}</noinclude><br>'''वृकयुद्ध'''<br>{{gap}}शिवदिग्विजयकारांनी महाराजांच्या युद्धपद्धतीस वृकयुद्ध असे म्हटले आहे. मराठ्यांचा सुप्रसिद्ध गनिमी कावा तो हाच. त्याला कूटयुद्ध किंवा वृकयुद्ध असे भारतातील प्राचीन नीतिशास्त्रज्ञ म्हणत असत. शुक्रनीती या ग्रंथात कूटयुद्धाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. शुक्रमुनी म्हणतात, 'शत्रूचा नाश करण्यास युक्त असे कूटयुद्धासारखे दुसरे युद्ध- म्हणजे युद्धपद्धती- नाही. विजयेच्छू राजाने शत्रूशी गोड बोलावे, आपल्या अपराधाची कबुली द्यावी, सेवा, स्तुती इ. उपायांनी त्याचा विश्वास संपादावा आणि मग त्याचा संहार करावा. प्रबळ राजाने शत्रूस पाणी, दाणागोटा, घास कडबा मिळण्याचे बंद करून त्याला अडचणीचे प्रदेशात घालावा आणि मग त्याचा नाश करावा. शत्रुपक्षातील लोकांना देणग्या द्याव्या, सोनेरुपे द्यावे आणि ते गाफील होऊन निद्रावश झाल्यावर त्यांच्यावर छापा घालावा. नेहमी युद्ध एकाकी अकस्मात मुरू करावे. शत्रूवर एकदम हल्ला करावा आणि क्षणार्धात नाहीसे व्हावे.' (शुक्रनीती अ. ४) शिवदिग्विजयकारांनी वृकयुद्धाचे किंवा गनिमी काव्याचे असेच वर्णन केले आहे, 'वृकयुद्ध म्हणजे पाचचार फौजेच्या टोळ्या कराव्या, शत्रुस समजो न देता, संकेतांनी चालावे, एकाने तोंड लावावे. तो परसैन्य अल्पसैन्यावर घे घे मार करीत उठते, मग त्या लोकांनी पळ काढावा, म्हणजे सैन्य मोडले म्हणून पाठी लागणारांस इतर टोळ्यांनी चहूकडून घेरावे. अल्पसैन्य मोठे सैन्यास मारते होऊन, मोठे सैन्यास किती फौज आहे तिची गणती न सापडता, हतवीर्य होते. तेणे करून फत्तेह वृकयुद्धी जाणावी.'<br>{{gap}}शिवछत्रपतींच्या रणनीतीचे हे उत्कृष्ट वर्णन आहे. त्यांना या रणनीतीचा आश्रय करण्याखेरीज गत्यंतरच नव्हते. आदिलशाही किंवा मोगल यांचे सेनाबल इतके अफाट होते की त्यांच्या समोरासमोर युद्ध करणे, प्रारंमीच नव्हे तर, पुढेही मराठ्यांना अशक्य होते. साल्हेर किंवा वणीदिंडोरी ही युद्धे त्यांनी मैदानात समोरासमोर केली आणि मोठे विजयही मिळविले हे खरे, पण ते अपवाद होत. बाकी सर्वत्र शिवछत्रपती गनिमी काव्यानेच लढले. कारण मोगलांइतके माणूसबल त्यांच्याजवळ नव्हते आणि तितके सैन्य उभारण्यास पुरेल इतका पैसाही त्यांच्याजवळ नव्हता. शिवाय सह्याद्रीची दऱ्याखोरी त्यांच्या पाठीशी उभी होती. वृकयुद्धाला अत्यंत अनुकूल असा हा भू- प्रदेश असल्याने महाराजांनी त्याच पद्धतीचा आश्रय करण्याचे ठरवून अनेक शत्रूंना तेथेच गारद केले.<br>{{gap}}नम्र बोलून, भ्यालोसे दाखवून अफजलखानाचा विश्वास त्यांनी संपादन केला आणि हव्या त्या ठिकाणी आणून, त्याचा वध केला. आणि मग सह्याद्रीच्या दऱ्यांत लपून बसलेल्या मराठा सैन्याच्या अनेक टोळ्यांनी खानाच्या सैन्यावर अचानक हल्ला करून, त्याची लांडगेतोड केली. शास्ताखानाचा सरदार उंबर खिंडीतून<noinclude></noinclude>
035t8jfrf3rkow0zlgbxac8vzd805qm
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६५
104
73518
230756
164559
2026-06-05T03:31:51Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230756
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४३९|| शिवछत्रपतींची युद्धविद्या}}</noinclude>कोकणात उतरत असताना मराठ्यांनी त्यांची अशीच लांडगेतोड केली. प्रथम हेराकरवी त्याची सर्व माहिती छत्रपतींनी आणवली, मग त्याच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडीत लष्कर लपवून ठेवले आणि तो अडचणीच्या जागी येताच त्याच्यावर एकदम हल्ला केला आणि त्याचे सर्व सामान, घोडे, तोफखाना लुटून घेऊन त्याची शरणागती पतकरून त्याला हाकलून दिले. पन्हाळ्याला सिद्दी जोहार याने वेढा घातला होता. महाराजांनी किल्ला खाली करतो व स्वतः स्वाधीन होतो, असे त्याला प्रत्यक्ष भेटून सांगितले. त्यामुळे बेटा गाफील झाला आणि महाराज निसटून गेले. शास्ताखानावरील हल्ला हा वृकयुद्धाचाच प्रकार. छावणीत शिरण्यास सशस्त्र मराठ्यांना बंदी होती. तेव्हा दोन ब्राह्मण पाठवून छत्रपतींनी सर्व बातमी काढली; आणि मग, आम्ही पहारेकरी पहारा बदलीत आहोत, अशी थाप देऊन चारशे (केवळ चारशे) लोकांनिशी ते आत शिरले व खानावर त्यांनी हल्ला केला. 'महत्समुदायाशी किंचित् समुदाय सैन्यानी लढून यश संपादावे, हाही प्रकार असाच.' असे शिवदिग्विजयकारांनी म्हटले आहे, ते या शास्ताखानाच्या प्रसंगावरूनच म्हटले असेल. उंबराणीच्या लढाईत प्रतापराव गुजर याने बदलोकखानाचा असाच पाडाव केला.<br>{{gap}}मैदानी लढाया, समोरासमोरचे युद्ध छत्रपतींनी केलेच नाही असे नाही. पण तशी उदाहरणे फार थोडी. बव्हंशी ते कूटयुद्धाचाच अवलंब करीत. त्याची कारणे वर दिलीच आहेत. मात्र मैदानी लढाईस त्यांची तयारी मात्र केव्हाही असे. उत्तर- काळात, सभासद, मल्हारराव रामराव यांच्या मते, छत्रपतींचे लष्कर लाखापर्यंत गेले होते. त्याचा सरंजामही खूप वाढला होता. लष्करी शिक्षणाची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. त्यामुळे मैदानी लढाईचा प्रसंग आला, तेव्हा त्यांनी बेधडक तशी लढाईही केली.<br><br>'''साल्हेर'''<br>{{gap}}मैदानी लढायांत साल्हेरचा संग्राम फार प्रसिद्ध आहे. १६७० च्या ऑक्टोबरात मोरोपंत पिंगळे पेशवा हा बागलाणात शिरला आणि त्याने त्रिंबक, रावळा जवळा हे किल्ले घेतले. प्रतापराव गुजर याने वऱ्हाडात शिरूर, बहादरपुरा व कारंजा इ. शहरे लुटून बऱ्हाड प्रांत साफ नागविला. या आधी सुरतेची लूट झालीच होती आणि ती घेऊन महाराज रायगडास जात असताना दाऊदखान खुरेशी याने त्यांना वणी-दिंडोरीपाशी गाठले. तेव्हा तेथे मोठी लढाई होऊन औरंगजेबाचा हा नामांकित सरदार सपशेल पराभव पावला. यामुळे धास्ती घेऊन बादशहाने महाबतखान, दिलीरखान आणि बहादुरखान असे तीन मोठे सरदार दक्षिणेत पाठविले. १६७१ च्या जानेवारीत मराठ्यांनी साल्हेरचा किल्ला घेतला होता. तो उठविण्यासाठी जूनमध्ये महाबतखान व दिलीखान यांनी त्याला वेढा घातला. त्यावर मोरोपंत पिंगळे व प्रतापराव गुजर चालून आले, तेव्हा १६७२ च्या फेब्रुवारीत घनघोर संग्राम होऊन<noinclude></noinclude>
clr4bfyncec9z1w8r1onjav1xwmcq7p
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६६
104
73519
230757
164560
2026-06-05T03:32:04Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230757
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४४०}}</noinclude>मोगलांचा पार धुव्वा झाला. त्यांचे तीस सरदार व दहा हजार लोक कामास आले. आणि मराठ्यांना सहा हजार घोडे, हजारो उंट, सवाशे हत्ती, मालमत्ता, जवाहीर, कापड अशी अगणित लूट मिळाली. या वेळी मोगलांचे चार मातब्बर सरदार चालून आले असून मोरोपंत पिंगळ्याने उत्कृष्ट व्यूह रचून त्यांना नामोहरम केले. यामुळे या संग्रामाचे मह्त्त्व फार मानले जाते. मराठे ही एक नवी मोठी शक्ती दक्षिणेत उदयास आली, हे या लढाईमुळे औरंगजेबाला आणि इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज या पाश्चात्यांनाही कळून आले. आणि हेही कळून आले की मैदानी लढायांतही मराठे भारी सामान असलेल्या शत्रूला पराभूत करू शकतात.<br><br>'''आक्रमण (पर-आक्रम)'''<br>{{gap}}शिवछत्रपतींच्या रणनीतीचा आपण विचार करीत आहो. त्यांच्या वृकयुद्धपद्धतीचा वर विचार केला. अलीकडे, 'आक्रमण हेच संरक्षण', या तत्त्वाची बरीच चर्चा सर्वत्र चालते. महाराजांच्या रणनीतीत या तत्त्वाचा निश्चित समावेश केलेला होता. एका लहानशा जहागिरीपासून हिंदवी स्वराज्यापर्यंत त्यांना पल्ला गाठावयाचा होता. अबे कॅरेने म्हटल्याप्रमाणे, सिंधू ते गंगा या विस्तीर्ण भूभागात छत्रपतींना स्वराज्य स्थापावयाचे होते. तेव्हा सतत, अखंड, आक्रमण या धोरणाचा अवलंब करण्यावाचून त्यांना गत्यंतरच नव्हते. शिवाय, या धोरणामुळे उपक्रम आपल्या हाती राहून, युद्धाची भूमी व युद्धाची वेळ आपल्याला ठरविता येते, हे नेहमीचे फायदे आहेतच. अर्थात यासाठी कमालीचे साहस, समयज्ञता, कुशल नेतृत्व इ. दुर्मिळ गुण यांची गरज असते. पण ते गुण घेऊनच महाराज जन्माला आले होते. चौदाव्या पंधराव्या वर्षी आपली मुद्रा विश्ववंदिता करण्याची आकांक्षा आणि हिंदवी स्वराज्याची घोषणा या गोष्टी साहसी वृत्तीवाचून शक्यच झाल्या नसत्या.<br><br>'''साहसे श्रीः ।'''<br>{{gap}}१३५७ च्या एप्रिलात छत्रपतींनी जुन्नर, अहंमदनगर या मोगली मुलखावर हल्ला केला. हे साहस म्हणजे इतिहासपंडितांच्या मते अगदी वेडेपणाच होता. कोकणातील कल्याण, भिवंडी या विजापुरी मुलखावर महाराजांचे छापे घालण्याचे काम चालूच होते. अशा वेळी आदिलशाहीपेक्षा शतपट बलिष्ठ अशा मोगलांशी त्यांनी वैर ओढवून घेतले, आणि तसे काही कारण नसताना, हा वेडेपणा नाही तर काय ? डॉ. देवपुजारी यांनी 'शिवाजी अँड दि मराठा आर्ट ऑफ वॉर' या आपल्या ग्रंथात, तसे स्पष्ट शब्दांत म्हटलेही आहे. (पृ. ६३, ७०). पण आपण हे ध्यानात ठेवले पाहिजे की अशा वेड्या साहसावाचून छत्रपतींना काहीच साध्य झाले नसते. चारशे स्वारांनिशी लाख दीडलाख लष्कर असलेल्या शास्ताखानाच्या तळावर छापा घालणे हा कोणत्या दृष्टीने शहाणपणा होता ? सुरतेची स्वारी ही कोणत्या सावधगिरीच्या हिशेबात बसते ?<noinclude></noinclude>
fgxy1kdl7ijiqxpzh2occ9bpdiyyvt9
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६७
104
73523
230758
164570
2026-06-05T03:32:39Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230758
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४४१|| शिवछत्रपतींची युद्धविद्या}}</noinclude>महाराष्ट्रात स्वराज्याचा बंदोबस्त पुरता लागलेला नसताना जिंजीवेलोर इकडे स्वारी करण्याचे काय कारण होते ? महाराजांच्या आयुष्यातील एकही मुकाबला असा नाही की जेव्हा मृत्यू त्यांना चाटून गेलेला नाही. आणि हे महाराजांच्याच जीवनातले आहे असे नाही. नेपोलियन, वॉशिंग्टन, चर्चिल, लेनिन, सन्यत सेन, कोणताही थोर क्रांतिकारक किंवा राज्यकर्ता घ्या. वेड्या साहसावाचून त्याला मिळाले ते यश कधीच मिळाले नसते.<br><br>'''राजनीतीची जोड'''<br>{{gap}}जुन्नरवर छत्रपतींनी छापा घातला, तेव्हा औरंगजेब विजापूरची आदिलशाही खलास- करण्याच्या उद्योगात गुंतला होता. बिदर, कल्याणी, परिंडा हे किल्ले त्याने घेतले होते आणि हा संग्राम बरेच दिवस चालणार होता. ही संधी छत्रपतींनी साधली. इतक्यात शहाजहानचा हुकूम आला आणि विजापूर- मोगलयुद्ध थांबले. त्यामुळे त्यांच्यावर बाका प्रसंग आला होता. दोन शत्रू- दोन बलाढ्य शत्रू- एकदम दुखवले गेले होते. तेव्हा रणनीतीला राजनीतीची जोड देऊन, त्यांनी औरंगजेबाकडे वकील धाडून, माफीची याचना केली. बादशहांच्या सेवेत येण्यास आपण तयार आहोत, असे कळविले आणि माघार घेतली. तरीही या वेळी एवढ्याने भागले नसते. शिवाजीचा नायनाट करून टाका, अशी आपल्या अधिकाऱ्यांना औरंगजेबाने पत्रे लिहिली होती. इतक्यात शहाजहान आजारी पडला आणि गादी बळकावण्यासाठी त्याला तिकडे जावे लागले आणि महाराजांना श्वास टाकायला वेळ मिळाला. मोगल- विजापूर युद्ध थांबले. त्यामुळे फासा प्रतिकूल पडला. पण शहाजहान आजारी पडल्यामुळे तो सुलटा झाला आणि औरंगजेब पंचवीस वर्ष दक्षिणेत येऊ शकला नाही. तोपर्यंत महाराजांनी त्यालाही दुर्जय अशी शक्ती महाराष्ट्रात निर्माण करून ठेवली होती.<br><br>'''चौफेर चढाई'''<br>{{gap}}अफजलखानाला मारल्यावर आदिलशाहीवर महाराजांनी सर्व दिशांनी आक्रमण सुरू केले, हे मागे सांगितलेच होते. याच वेळी शास्ताखान दक्षिणेत आला व पुण्याला तळ ठोकून बसला. तरी महाराजांनी आक्रमणाचे धोरण सोडले नाही. मोगलांच्या तोंडावर नेताजीस ठेवून ते स्वतः दक्षिण कोकणात उतरले. तेथे पालवणचा राजा यशवंतराव, शृंगारपूरचा राजा सुर्वे यांना नामोहरम करून त्या प्रांतावर त्यांनी आपली सत्ता वसविली. मग राजापूरच्या इंग्रजांकडे ते वळले. पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी त्यांनी सिद्दी जोहाराला दारूगोळ्याची मदत केली होती. याची त्यांना चांगली अद्दल घडवून महाराज परत आले. १६६३ च्या एप्रिलात शास्ताखानावर छापा घातल्यावर सर्व मुस्लिम विश्वाला क्षणभर घेरी आल्यासारखे झाले. ती संधी साधून छत्रपतींनी चहूकडे चढाई सुरू केली. कोकणात उतरून त्यांनी कुडाळ प्रांत परत<noinclude></noinclude>
28iz3714oga4irsd0zwtpzdknh7y4ln
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६८
104
73524
230759
164571
2026-06-05T03:32:51Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230759
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४४२}}</noinclude>घेतला आणि तो पुन्हा परत घेण्यासाठी खवासखान व मुधोळकर बाजी घोरपडे चालून येतात असे कळताच त्यांनी स्वतःच मुधोळवर चाल केली, बाजी घोरपड्यास ठार मारले आणि खवासखान पुढे येताच त्यास खराब करून विजापूरकडे पळवून लावले. या निरनिराळ्या चढायांतूनच मध्ये वेळ काढून जाने. १६६४ मध्ये त्यांनी सुरतेवर छापा घालून अपार द्रव्य रायगडला आणले.<br><br>'''राजे - किताब'''<br>{{gap}}आग्र्याहून सुटून आल्यावर दोन-अडीच वर्षे ते स्वस्थ बसले होते. त्या काळात औरंगजेबाला ते आर्जवाची, माफीची, शरणागतीची पत्रे पाठवीतच होते. औरंगाबादेस त्यांनी संभाजीला मनसबदार म्हणून ठेवले. त्याला पाच हजाराची मनसबदारी होती. त्याच्या दिमतीला प्रतापराव गुजर व आनंदराव यांना ठेवले होते. ही राजनीती इतकी यशस्वी झाली की औरंगजेबाने महाराजांना 'राजे' असा किताब देऊन मराठ्यांच्या स्वतंत्र राज्यास जवळजवळ मान्यताच दिली. तीन एक वर्षे तयारी करण्यात घालविल्यानंतर महाराजांनी पुन्हा चढाई आक्रमण सुरू केले. या वेळी आक्रमणे सिद्धीस जातील अशी परिस्थितीच निर्माण झाली होती.<br>{{gap}}अफगाणयुद्धात औरंगजेब गुंतला होता. त्यातच १६६९ साली त्याने रजपुतांशी युद्ध सुरू केले आणि समस्त राज्यातील हिंदूंची मंदिरे पाडण्याचा एकसहा हुकूम जारी केला. याच सुमारास शहाजादा मुअज्जम हा दक्षिणचा सुभेदार आणि त्याचा सरदार दिलेरखान यांच्यात सडकून वाकडे आले. इतके की खानाला पकडण्यासाठी शहाजादा व जसवंतसिंह चालूनही गेले. स्वातंत्र्याची आकांक्षा धरणाऱ्या वीरपुरुपाला यापेक्षा मोठी संधी ती काय असणार ? महाराजांनी पूर्वी जशी आदिलशाहीवर चढाई केली होती तशीच आता मोगली मुलखावर चढाई सुरू केली. प्रथम सिंहगड, मग सुरत, मग बागलाण- साल्हेर, मुल्हेर- बऱ्हाड, पन्हाळा, आणि राज्याभिषेकानंतर फाेंडा किल्ला, सांधे, बिदनूर आणि मग कर्नाटक ! या आक्रमक लढायांतूनच मराठ्यांचे राष्ट्र तयार झाले, असे सरदेसाई यांनी म्हटल्याचे मागे सांगितलेच आहे.<br><br>'''चौथाई'''<br>{{gap}}शत्रूच्या प्रदेशातील व्यापारी पेठांवर, धनाढ्य शहरांवर स्वारी करून, धाड घालून, त्यांच्याकडून चौथाई वसूल करणे हा शिवछत्रपतींच्या युद्धपद्धतीतला आणखी एक महत्त्वाचा विशेष होता. यालाच इंग्रज, पोर्तुगीज, मुस्लिम इतिहासकारांनी लूट म्हटले आहे, आणि याचसाठी छत्रपतींना ते लुटारू म्हणत असत. पण महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या योजनेतली ही पहिली पायरी होती. शत्रूंनी आक्रमिलेल्या प्रदेशातून चौथाई वसूल करणे याचा अर्थ, शत्रूची सत्ता तेथून नष्ट करण्यास आरंभ करणे, असा होतो. आणि तेच महाराजांना करावयाचे होते. शिवाय स्वराज्यस्थापनेच्या<noinclude></noinclude>
4kz8opu5jmx1b0ed874jtecs10xyh4p
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६९
104
73525
230760
164572
2026-06-05T03:33:14Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230760
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४४३|| शिवछत्रपतींची युद्धविद्या}}</noinclude>कार्यासाठी लागणारा पैसा मिळविण्याचा तो एक राजमार्ग होता. महाभारत आणि शुक्रनीती यांत राजाने हा मार्ग अवलंबिणे अवश्य आहे, असे स्पष्टपणे सांगितले आहे. महाभारतकार म्हणतात, 'सैन्य हे धर्माच्या प्रवृत्तीस मुख्य आधार असून धर्म हाच प्रजेचा आधार आहे. आणि कोश (धन) हा तर सैन्याचा आधारस्तंभ होय. हा कोश शत्रूला पीडा दिल्यावाचून कधी समृद्ध होत नाही. म्हणून प्रजापालनाच्या कामी द्रव्य संपादण्यासाठी हिंसा करावी लागली तरी राजाला त्यामुळे दोष लागत नाही.' (शांति. अ. १३०) शुक्रनीतीतही म्हटले आहे की 'राजाने वाटेल ती भयंकर कर्मे करून आपले गेलेले राज्य परत मिळवावे. आणि यासाठी शत्रूची सर्व संपत्ती लुटून आणावी.' (शुक्र. अ. १)<br><br>'''द्रव्यसंचय'''<br>{{gap}}ही प्राचीन राजनीती अनुसरूनच महाराजांनी शत्रुप्रदेशातील धनाढ्य शहरांवर छापे घालून अपार द्रव्यसंचय केला. असे छापे घालण्यापूर्वी, त्या त्या शहरातील अधिकाऱ्यांना, व्यापाऱ्यांना, सावकारांना ते पत्रे धाडून कळवीत असत की तुम्ही आम्हांस सरकारी वसुलाच्या चौथ्या हिश्शाइतकी रक्कम, म्हणजेच चौथाई, जर बिनतक्रार दिली तर तुम्हांला आम्ही कसलाच त्रास देणार नाही. 'इंग्लिश रेकॉर्डस ऑन शिवाजी' या ग्रंथात सुरत, हुबळी, नंदुरबार येथील अधिकाऱ्यांना शिवाजीने अशी पत्रे पाठविली होती, हे नमूद केलेले आहे. ज्या शहरचे लोक त्यास चौथाई देण्याचे कबूल करतात, त्या शहरांना शिवाजी कधीही उपसर्ग देत नाही, असेही तेथे सांगितलेले आहे (भाग १, पृ. २१९, २२१. भाग २, पृ. २९७). मोगल, आदिलशाही यांनी आक्रमिलेला जो मुलूख सोडवून महाराज तेथे स्वतःची सत्ता स्थापन करीत तेथे तत्काळ उत्तम राज्यकारभार चालू करण्याची ते व्यवस्था करीत. कल्याण-भिवंडी या परगण्यांत त्यांनी तसे केल्याचे पाश्चात्य लेखकांनीच नमूद केले आहे. आणि जे त्यांनी कल्याण-भिवंडी येथे केले तेच सर्व महाराष्ट्रात आणि पुढे सर्व हिंदुस्थानात करावयाचे हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट होते. याचाच अर्थ हिंदवी स्वराज्य ! अशा महत्कार्यासाठी सर्व प्रकारे साह्य करणे हे सर्व नागरिकांचे, व्यापाऱ्यांचे, सावकारांचे आद्य कर्तव्य होते. ते ज्यांनी केले नाही, त्यांच्याकडून बळाने धन वसूल करणे हे प्राप्तच होते. १६६४ साली महाराजांनी सुरतेतून प्रथम अशी वसुली केली आणि पुढच्या पंधरा वर्षात बऱ्हाणपूर, कारंजा, कारवार, हुबळी, नासिक, अथणी, धरणगाव, औरंगाबाद अशा सुमारे वीस शहरांवर छापे घालून स्वराज्यस्थापनेसाठी त्यांनी अपार धन मिळविले. आणि त्या धनाच्या साह्याने मोठी सेना उभारून स्वराज्याची स्थापना केली.<br><noinclude></noinclude>
80itx2vykli9wzu1eiitqb3bsl30thx
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७०
104
73526
230761
164573
2026-06-05T03:34:16Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230761
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४४४}}</noinclude><br>'''लुटारू कोण ?'''<br>{{gap}}हे उदात्त उद्दिष्ट ज्यांचे नव्हते त्यांनी जो द्रव्याचा अपहार केला, तो मात्र शुद्ध लुटारूपणा होता. पोर्तुगीज, इंग्रज, आदिलशाही, मोगल या सत्ता या कायमच असा लुटारूपणा करीत असत. आदिलशाही किंवा मोगल यांना सैन्य ठेवण्यासाठी इतका पैसा लागत नसे. कारण ते सरदारांना सरंजाम देत आणि त्यांना सैन्य उभारावयास सांगत. ते सरदार स्वतःच्याच प्रजेची कशी लूट करीत असत हे मागे सांगितलेच आहे. याचा अर्थ असा की या सत्ता परकी मुलखात तर लुटारूपणा करीतच, पण स्वतःच्या प्रजेलाही लुटून सैन्याचा खर्च भागवीत असत. या तुलनेने छत्रपतींनी सुरू केलेली चौथाईची पद्धत ही फारच सोज्ज्वळ व न्याय्य दिसते. याच दृष्टीने, प्राचीन राजनीति- शास्त्रज्ञांनी कोश या रीतीने समृद्ध करणे हा राजाचा धर्मच होय, असे म्हटले आहे.<br><br>'''रजपूत - तुलना'''<br>{{gap}}महाराजांच्या रणनीतीचे स्वरूप वरील वर्णनावरून कळून येईल. रजपूत राणे- महाराणे यांनी जी युद्धपद्धती अवलंबिली होती, तिच्याशी तुलना करताना युद्धविद्येत शिवछत्रपतींनी केवढी क्रांती केली होती हे कळून येईल. रणात माघार घ्यावयाची नाही, शत्रूला पाठ दाखवावयाची नाही हे रजपूतांचे मुख्य तत्त्व. त्यामुळेच त्यांचा नाश झाला. कारण खिलजीच्या लष्कराइतके प्रचंड लष्कर त्यांना कधीच उभारता आले नाही. तेव्हा दर वेळी रणांगणात हजारो वीरांचा नाश, आणि हजारो रजपूत रमणींचा जोहार, हाच तेथे नियम होऊन बसला. महाराजांनी ती धर्मयुद्धपद्धती अवलंबिली असती तर त्यांना कधीच विजय मिळाला नसता. मायावी शत्रूशी जे मायावी पद्धतीने वागत नाहीत ते मूढ लोक पराभूत होतात असे, भारवीने म्हटले आहे. कपटनीती, कूटयुद्ध यांचा आश्रय केल्यावाचून विजय मिळत नसतो, असे श्रीकृष्णांनी अनेक वेळा सांगितले आहे. रजपुतांनी या प्राचीन तत्त्वाकडे, नसत्या मोठेपणाच्या कल्पनेमुळे, दुर्लक्ष केले आणि स्वतःचा आणि भारताचा नाश करून घेतला.<br><br>'''पडत्या प्रसंगी'''<br>{{gap}}रजपूत ठकाशी कधी ठक झाले नाहीत आणि पडता प्रसंग ओळखून शरणागती पत्करावी, हेही त्यांनी केले नाही. जयसिंगाची स्वारी आली तेव्हा महाराजांनी रजपुती अभिमान धरून रणात धारातीर्थी आत्मबलिदान केले असते तर ते हिंदुधर्म, हिंदुसंस्कृती व हिंदुसमाज यांचेच बलिदान ठरले असते. रजपुतांच्या तसल्या अभिमानामुळे ती वेळ आलीच होती. सर्व राजस्थान परतंत्र झाला, प्रत्येक रजपूत राजाला मोगलांचा चाकर व्हावे लागले आणि आपल्या मुलीबाळी मोगलांना अर्पण कराव्या लागल्या. छत्रपतींनी श्रीकृष्णप्रणीत युद्धनीतीचा अवलंब केला नसता तर महाराष्ट्राच्या, आणि नंतर सर्व हिंदुस्थानाच्या कपाळी हेच आले असते.<br><noinclude></noinclude>
lexwipba3ny96whyvw1499k3erbjkam
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७१
104
73527
230762
164574
2026-06-05T03:34:33Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230762
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४४५|| शिवछत्रपतींची युद्धविद्या}}</noinclude><br>'''आक्रमणाअभावी'''<br>{{gap}}पण रजपुतांच्या अंगचे खरे क्षात्रतेज, गझनीच्या महंमदाच्या स्वाऱ्यांपासून लोपले होते, हेच खरे. ठकाशी ठक होणे, पडता काळ ओळखून तात्पुरती शरणागती पत्करणे, हे त्यांच्या धर्मयुद्धात बसत नसेल, पण शत्रूवर आक्रमण हे तर त्यात बसत होते ना ? पण रजपूत राजांनी एकट्याने किंवा मिळून दिल्लीवर आक्रमण असे कधी केलेच नाही. दिल्लीला मुस्लिमसत्ता स्थापन झाल्यानंतर पुढल्या चारशे वर्षांत किती तरी वेळा भाऊबंदकीमुळे, वायव्येकडच्या स्वाऱ्यांमुळे, सुलतानाच्या नालायकीमुळे दिल्ली अगदी दुबळी झालेली होती. कोणीही येऊन दिल्लीला राज्य स्थापावे असे अशी स्थिती अनेक वेळा झालेली होती; आणि तसे अनेक वेळा घडतही होते. पण असा पराक्रम रजपुतांनी एकदाही केला नाही. रजपूत आपल्या संस्थानी डबक्यातून बाहेर कधी पडलेच नाहीत. उलट शिवाजी महाराजांनी पहिल्यापासून जहागिरीच्या बाहेरच दृष्टी टाकलेली होती. आणि पुढील काळात, वर सांगितल्याप्रमाणे, आक्रमण हीच रणनीती त्यांनी अंगीकारलेली होती. ते आणखी जगते तर दिल्लीवरहीगे ले असते. या आक्रमक रणनीतीमुळेच त्यांना विजय मिळत गेले. रजपुतांनी हीच नीती अनुसरली तसती तर अफगाणिस्थानातच मुस्लिमांना पायबंद बसून दिल्लीपर्यंत मुस्लिम पोचलेच नसते. पण त्यासाठी हिंदवी स्वराज्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवावे लागते !<br><br>'''संस्थानी डबकी'''<br>{{gap}}आणि रजपुतांच्या युद्धविद्येतली खरी उणीव हीच होती. असा विशाल ध्येयवाद त्यांच्या ठायी केव्हाच नव्हता. मराठे सरदार जसे वतनासक्त होते तसेच रजपूतही होते. जोधपूर, बिकानेर, जेसलमीर, चितोडं अशी निरनिराळी संस्थाने राजस्थानात होती. त्यांच्या राजांना आपल्या संस्थानापलीकडे सर्व 'राजस्थान' पाहण्याची दृष्टी कधी आलीच नाही. सर्व राजस्थान राष्ट्र एकछत्री करण्याचा तेथे कोणी कधी प्रयत्नही केला नाही. ज्याला त्याला आपल्या अल्पशा जयपूर, जोधपूरचा अभिमान आणि आपलेच कुल श्रेष्ठ, हा दुरभिमान. जयपूर हे जोधपूर वंशापुढे वाकणार नाही, जोधपूर हे बिकानेरपुढे वाकणार नाही. मात्र हे सर्व वंश मुस्लिमांपुढे वाकण्यास कमीपणा मानीत नसत. भूषणच मानीत असत. ते अल्प अभिमान आणि हे वृथा वंशाभिमान त्यांनी टाकले असते, 'रजपूत तेवढा मिळवावा' हे उदात्त ध्येय डोळ्यापुढे ठेवले असते, आणि मऱ्हाष्ट्र राज्याप्रमाणे 'राजस्थान राज्य' स्थापिले असते तर दिल्लीला मुस्लिम सत्ता प्रस्थापित झालीच नसती. ती तशी होऊन अगदी दृढमूल झाल्यावरही ती समूळ नष्ट करण्यात मराठ्यांना यश आले, त्याचे कारण म्हणजे शिवछत्रपती प्रणीत युद्धविद्या हे होय.<br><noinclude></noinclude>
9r5j7ssgg88v1f41wlvmiky0mhmc6qw
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७२
104
73528
230763
164575
2026-06-05T03:34:44Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230763
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४४६}}</noinclude><br>'''गिरिदुर्ग'''<br>{{gap}}शिवछत्रपतींच्या युद्धविद्येतले आणखी दोन महत्त्वाचे भाग म्हणजे त्यांचे गिरिदुर्ग, किल्ले आणि आरमार हे होत. त्यांचा विचार करून हे प्रकरण संपवू. स्वराज्याची स्थापना, त्याचे संरक्षण आणि त्याचा विस्तार या दृष्टीने रामचंद्रपंत अमात्य यांनी या दोहींचे उत्तम विवेचन केले आहे. त्यांच्या मते, 'गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी ! संपूर्ण राज्याचे सार म्हणजे दुर्ग; दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रभाभग्न, उद्ध्वस्त होतो.' प्राचीन राज्यशास्त्रज्ञांनीही दुर्गाचे असेच महत्त्व सांगितले आहे. 'दुर्गाच्या आश्रयाने एक सशस्त्र मनुष्य शंभरांशी लढूशक तो. शंभर माणसे दहा हजारांशी लढू शकतात. यास्तव राजाने किल्ल्यांचा आश्रय करावा.' असे शुक्रनीतीत म्हटले आहे.<br><br>'''तीनशे साठ'''<br>{{gap}}किल्ल्यांचे हे महत्त्व जाणूनच महाराजांनी त्यावर अमाप पैसा खर्च केला. आदिलशाही, निजामशाही, सुलतान सरदारांना जहागिरी देत. पण त्या जहागिरीतील किल्ले स्वतःच्या ताब्यात ठेवीत. यातील मर्म ध्यानात घेऊन महाराजांनी प्रथम सिंहगड, तोरणा, पुरंदर, हे किल्ले हस्तगत करण्याचा उद्योग आरंभिला; आणि कल्याण, भिवंडी, चिपळूण असा कोणताही नवा प्रदेश हाती आला की प्रथम ते तेथील किल्ले ताब्यात घेत, मोडलेले किल्ले पुन्हा बांधून काढीत आणि मोक्याची ठिकाणे हेरून, तेथे नवे किल्ले बांधीत. यावर इतका अमाप पैसा खर्च होई की मोरोपंत पेशवे, निराजीपंत मुजुमदार यांना सुद्धा चिंता वाटू लागली. तसे त्यांनी महाराजांना सांगितलेही. त्यावर महाराज म्हणाले, 'जे करवणे ते समजोनच करीत आहो. आपणांस धर्मस्थापना करणे व राज्य संपादणे. सर्वांस अन्न लावून शत्रुप्रवेश न होय ते किल्ल्यामुळे होते. दिल्लीद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे जुने तीनशेसाठ किल्ले हजरीस आहेत. एकेक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी तीनशे साठ वर्षे पाहिजेत.' (शिवदिग्विजय, पृ. १९०)<br><br>'''स्थापत्यकला'''<br>{{gap}}चित्रगुप्ताने महाराजांच्या एकंदर किल्ल्यांची संख्या अशीच दिली आहे. डोंगरी दुर्ग २४०, मैदानी १०८ आणि जलदुर्ग १३. हे सर्व किल्ले दुर्भेद्य करून टाकण्यासाठी, अगणित पैसा तर अवश्य होताच; पण असामान्य असे शिल्पज्ञानही आवश्यक होते. आणि अत्यंत आश्चर्याची गोष्ट अशी की महाराज स्वतःच अगदी असामान्य असे स्थापत्यविशारद म्हणजे इंजिनियर होते, असे पाश्चात्यांनीच लिहून ठेवले आहे. जिंजी किल्ला घेतल्यावर त्याची नवी बांधणी करण्यासाठी त्यांना इंजिनियर हवे होते, ते त्यांनी<noinclude></noinclude>
sjqi0a9o0ydlogd4o2v1g2lodelrur4
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७३
104
73529
230764
164576
2026-06-05T03:38:27Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230764
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४४७|| शिवछत्रपतींची युद्धविद्या}}</noinclude>इंग्रज, फ्रेंच यांच्याकडे मागितले. ते त्यांनी दिले नाहीत, तेव्हा स्वतःच आखणी व देखरेख करून, छत्रपतींनी तो किल्ला इतका उत्तम बांधला की तसा पाश्चात्य इंजिनियरांनाही बांधता आला नसता, असे फ्रेंच कागदपत्रांत म्हटले आहे. मोरोपंत, अनाजी दत्तो हेही पुढे या स्थापत्यविद्येत निष्णात झाले.<br>{{gap}}रामचंद्र पंत म्हणतात, 'हे राज्य तर तीर्थरूप कैलासवासी थोरले स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशासनवश न होय त्या त्या देशी स्थल विशेष पाहून गड बांधले, तसेच जलदुर्ग बांधले. त्यावरून आक्रम करीत करीत सालेरी अहिवंतापासून कावेरीतीरपर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. औरंगजेबासारखा महाशत्रू चालून आला असताना...राज्यात किल्ले होते म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहिले.'<br><br>'''आरमार'''<br>{{gap}}गडकोट किल्ल्याप्रमाणेच नौदल किंवा आरमार हेही एक महत्त्वाचे राज्यांग आहे. 'ज्यांच्याजवळ आरमार त्यांचा समुद्र' असे अमात्यांनी म्हटले आहे आणि त्याचा प्रत्यय छत्रपतींना हरघडीस येत होता. इ. स. १५०० पासून पोर्तुगीजांची अप्रतिहत सत्ता पश्चिम समुद्रावर स्थापन झाली होती. निजामशाही, आदिलशाही एवढेच नव्हे, तर दिल्लीचे मोगलसुद्धा त्या सत्तेला आव्हान देऊ शकत नव्हते. त्यांची व्यापारी आणि यात्रेकरू जहाजे यांना समुद्रात शिरताना पोर्तुगिजांचा परवाना काढावा लागे. हे फार अपमानास्पद होते. पण त्या मोठ्या सत्तांचाही काही इलाज चालत नव्हता. याच किनाऱ्यावर राजापूरच्या समोर, जंजिरा किल्ल्यात सिद्दीने हळूहळू जम बसविला. आणि थोड्याच अवधीत इंग्रज व डच यांनीही आपल्या वखारी तेथे घालून त्यांच्या संरक्षणासाठी लहानशी आरमारेही सज्ज केली. यामुळे कारवारपासून सुरतेपर्यंतचा समुद्रकिनारा पाश्चात्यांच्या ताब्यात गेला.<br>{{gap}}व्यापारी व यात्रेकरू जहाजे यांना अडवणे, त्रास देणे एवढाच पोर्तुगीज आणि सिद्दी यांचा उपद्रव नव्हता. सर्व कोकणपट्टीत ते हिंदूंचा अनन्वित छळ करीत. ते घरेदारे लुटीत स्त्रियांवर अत्याचार करीत, हजारो लोकांना पकडून अरबस्थानात नेऊन गुलाम म्हणून विकीत आणि हजारोंना सक्तीने बाटवीत. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची घोषणा केली, तेव्हा कोकणची स्थिती अशी होती. साहजिकच आपले स्वतंत्र नौदल स्थापण्याचा त्यांनी तेव्हापासूनच निश्चय केला होता. सरदेसाई यांच्या मताप्रमाणे १६५३ सालीच महाराजांनी पद्मदुर्ग बांधला आणि त्यांनी स्वतःच एका पत्रात म्हटल्याप्रमाणे, 'पद्मदुर्ग बसवून राजापुराच्या उरावरी दुसरी राजापुरी केली.' पुढे मालवण येथे सिंधुदुर्ग बांधला. त्याचे वर्णन चित्रगुप्ताने असेच केले आहे, 'चौऱ्याऐंशी बंदरांत हा जंजिरा मोठा. अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला.'<br><noinclude></noinclude>
1ahrafu8cre5bre1co63tenj9h2md2c
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७४
104
73530
230765
164577
2026-06-05T03:40:07Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230765
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४४८}}</noinclude><br>'''सिद्दी'''<br>{{gap}}साधारणपणे १६५७ पासून सिद्दीवर चढाई करण्यास महाराजांनी प्रारंभ केला. पहिली मोहीम यशस्वी झाली नाही. पण १६५८ साली रघुनाथ बल्लाळ याने सिद्दीचा पराभव केला आणि त्याच्या अत्याचारांना आळा घातला. अफजलखानाच्या वधानंतर महाराज कोकणात कल्याण-भिवंडी येथे उतरले. तो प्रदेश त्यांनी काबीज केला आणि लगेच आरमाराच्या उभारणीस त्यांनी प्रारंभ केला. सिद्दी हा मराठ्यांचा मोठा वैरी. त्याच्यावर स्वाऱ्या करून १६६० पर्यंत व्यंकोजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे यांनी दंडा किल्ला काबीज केला आणि जमिनीवरची सिद्दीची सर्व सत्ता नष्ट केली. जंजिरा फक्त त्याच्याकडे राहिला. तो मात्र मराठ्यांना कधीच घेता आला नाही आणि त्यामुळे सिद्दीचा उपद्रव काही प्रमाणात चालूच राहिला. तो छत्रपतींच्या मुलखात शिरून वाटेल ते अत्याचार करी. त्याला मोगल, पोर्तुगीज, इंग्रज यांचा पाठिंबा असे. एकदा त्याने राजापुरी परत घेतली होती. पण मराठ्यांनी ती पुन्हा जिंकली. सिद्दीचा संपूर्ण पाडाव केव्हाच झाला नाही, पण त्याच्यावर वचक बसला हे निश्चित.<br><br>'''पोर्तुगीज'''<br>{{gap}}पोर्तुगीज हे शिवछत्रपतींचे खरे शत्रू. पश्चिम समुद्रावर आपली सार्वभौम सत्ता आहे, असा ते अभिमान बाळगीत आणि वर सांगितल्याप्रमाणे परवान्यावाचून येथे कोणाला फिरकू देत नसत. पण महाराजांनी कोकणातील कल्याण-भिवंडी हे प्रदेश जिंकले, माहुली, तळे घोसाळे, चौल हे किल्ले घेतले आणि आरमारही बांधले; तेव्हा परिस्थिती ओळखून त्यांनी होऊन छत्रपतींच्याकडे वकील पाठविला आणि तह केला. त्यांनी पोर्तुगीज मुलखात उपद्रव देऊ नये आणि पोर्तुगीजांनी छत्रपतींना तोफा, दारूगोळा वगैरे सामान पुरवावे, अशा तहाच्या अटी होत्या. आरमाराच्या केवळ स्थापनेमुळे हा पहिला विजय मिळाला. पुढे लखम सावंत, केशव नाईक, केशव प्रभू हे कोकणचे देसाई पोर्तुगीज प्रदेशात राहून महाराजांच्या मुलखात उपद्रव करीत. तेव्हा १६६७ साली त्यांनी बारदेशावर स्वारी करून पोर्तुगिजांची खोड मोडली आणि पुन्हा एकदा हवा तसा तह करून घेतला. १६७२ साली रामनगरचे राज्य मोरोपंत पिंगळे याने खालसा केले. त्या कोळी राजाला पोर्तुगीज चौथाई देत असत. आता छत्रपतींनी तीच मागणी त्यांच्याकडे केली. पोर्तुगिजांनी खळखळ फार केली पण शेवटी १६७९ साली त्यांना ती मागणी मान्य करावी लागली. परवानापद्धती त्यांना आधीच रद्द करावी लागली होती.<br><br>'''इंग्रज'''<br>{{gap}}मुंबई बंदर इंग्रजांच्या ताब्यात गेले. तेव्हा त्यांच्यावर वचक बसविण्यासाठी, छत्र-<noinclude></noinclude>
8o607k2ldi5fdt64tkds0p4a4i42kpo
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७५
104
73531
230766
164578
2026-06-05T03:42:22Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230766
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४४९|| शिवछत्रपतींची युद्धविद्या}}</noinclude>पतींनी खांदेरी व उंदेरी या बेटांवर तटबंदी उभारून तेथे आपले ठाणे १६७९ साली निर्माण केले. इंग्रजांचा याला सक्त विरोध होता. त्यांनी खांदेरीवर आरमारी हल्लाही केला. पण मराठा आरमाराने त्यांचा व त्यांच्या मदतीस आलेल्या सिद्दीचा निखालस पराभव केला. तेव्हा शरणागती पत्करून इंग्रजांनी छत्रपतींशी तह केला.<br><br>'''फलश्रुती'''<br>{{gap}}अशा रीतीने जलदुर्ग बांधून आणि नौदलाची उभारणी करून महाराजांनी स्वराज्याचा पाया भक्कम केला. पोर्तुगीज, सिद्दी व इंग्रज यांना ते अजिबात नष्ट करू शकले नाहीत. पण त्यांच्यावर वचक बसवून कोकणातील हिंदूचे जीवन त्यांनी पुष्कळ सुरक्षित केले आणि कारवारपासून सुरतेपर्यंतच्या प्रदेशापैकी निम्म्यावर प्रदेश स्वराज्यात आणला. याखेरीज आणखी एक मोठा फायदा म्हणजे समुद्रपार मराठ्यांचा व्यापार सुरू झाला. बाराव्या शतकानंतर हिंदूंची राज्ये बुडाली आणि समुद्रगमन बंद झाल्यामुळे व्यापारही बुडाला. शिवछत्रपतींनी हिंदवी राज्य स्थापन केले आणि व्यापारालाही चालना दिली. इ. स. १६६४ मध्ये कोकण किनाऱ्यावरची आठनऊ बंदरे त्यांच्या ताब्यात होती. त्या प्रत्येक बंदरातून दोनतीन व्यापारी जहाजे इराण, बसरा, मक्का, मोचा, एडन या ठिकाणी माल घेऊन जात. या व्यापाराचे महत्त्व अमात्यांनी उत्तम वर्णिले आहे. आपला व्यापार चालवून, इतर देशांच्या व्यापारालाही उत्तेजन द्यावे, त्याचे संरक्षण करावे, म्हणजे त्यापासून जकातीचे विपुल उत्पन्न मिळते, असे ते म्हणतात. छत्रपतींनी त्याच धोरणाचा अवलंब करून स्वराज्याचा खजिना पुष्कळच समृद्ध केला, ही फलश्रुती लहान नाही.<br><br>'''सेना संघटना'''<br>{{gap}}पायदळ, घोडदळ आणि नौदल अशी तीन दले छत्रपतींनी उभारली आणि त्या तीनही दलांना अत्यंत बांधीव असे रूप देऊन टाकले. पायदळात दहा शिपायांची एक तुकडी असे. तिच्या मुख्याला नाईक म्हणत. पाच नाइकांवर एक हवालदार, दोन हवालदारांवर एक जुमलेदार, दहा जुमलेदारांवर एक एकहजारी आणि पाच एकहजारींवर म्हणजे पाच हजार फौजेवर एक सरनौबत असे. अष्टप्रधान मंडळातील सेनापतीच्या हुकमतीखाली असे अनेक सरनौबत असत. घोडदळाची बांधणी साधारण अशीच असे. पंचवीस घोडेस्वारांच्या तुकडीवर हवालदार, पाच हवालदारांवर एक जुमलेदार, दहा जुमलेदारांवर एक सुभेदार व दहा सुभेदारांवर एक पंचहजारी असे चढत्या श्रेणीचे अंमलदार असत. नौदलातही अशीच श्रेणी होती. त्या दलाच्या मुख्याला दर्यासारंग म्हणत.<br><noinclude></noinclude>
2l2ejmpqmgm1097ijxr7u5oav2421rd
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७६
104
73534
230767
164581
2026-06-05T03:43:11Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230767
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४५०}}</noinclude><br>'''नवी पद्धत'''<br>{{gap}}पायदळ, घोडदळ, नौदल आणि गडकोट असे महाराजांचे चतुरंग दल होते. पहिल्या तीन अंगांची बांधणी कशी होती ते वर सांगितले. गडकोटांची व्यवस्थाही अशीच आखीवरेखीव होती, मुख्य गडकरी किल्लेदार त्याला हवालदार म्हणत. तो नेहमी मराठा असे. दुसरा अधिकारी सबनीस. मुलकी जमाखर्च तो पाही. हा जातीने ब्राह्मण असे. कारखानीस हा तिसरा अधिकारी. किल्ल्यावरील घासदाणा, दारूगोळा यांचा पुरवठा आणि तटबंदीची डागडुजी हे काम त्याच्याकडे असे- हा जातीने प्रभू असे. सभासद म्हणतो असे तीन जातीचे अधिकारी 'एकास एक प्रतिमेळ ठेवावे. एका हवालदाराचे हाती किल्ला नाही. जो कारभार करणे तो तीघानी एका प्रतीचा करावा. ये रीतीने बंदोबस्तीने गडकोटाचे मामले केले. नवी पद्धत घातली.'<br>{{gap}}लष्करातील शिपायापासून सरनौबतापर्यंत सर्वांना रोख पगार असे आणि तो भरपूर असे. डॉ. सेन यांनी त्या वेळचे मोगल, आदिलशाही लप्कर आणि पोर्तुगीज व इंग्रज लष्कर यांची तुलना करून म्हटले आहे की मराठा लष्करातील पगार निश्चितच जास्त असत.<br><br>'''हद्द झाली'''<br>{{gap}}शिवछत्रपतींची युद्धविद्या ही अशी होती. त्यांनी ध्येयवादाचे संस्कार करून मराठा समाजात नवचैतन्य निर्माण केले. पायदळ, घोडदळ, नौदल आणि किल्ले असे चतुरंग दल उभारले. आणि वृकयुद्धपद्धतीचा अवलंब करून आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगल यांच्या सत्ता पायासकट हादरून टाकल्या. प्रारंभी शिवाजीला नेस्तनाबूत करण्याच्या वल्गना या सत्ता करीत असत. पण अखेरीस त्या शिवछत्रपतींना खंडणी देऊ लागल्या. आदिलशहा आणि कुतुबशहा तर प्रत्यक्षच खंडणी देऊ लागले. मोगलांनी खंडणी दिली नाही. पण ती वेळ येणार ही धास्ती त्यांच्या मनात निर्माण झाली. महाराज सिंहासनारूढ झाल्याची बातमी दिल्लीस पोचली, तेव्हा औरंगजेबाची स्थिती काय झाली ? सभासद लिहितो, 'पातशहा तक्तावरून उतरून अंतःपुरात गेले आणि दोन्ही हात भुईस घासून, आपले देवाचे नाव घेऊन, परम खेद केला. दोन दिवस अन्न, उदक घेतले नाही. आणि बोलले की 'खुदाने मुसलमानांची पादशाही दूर करून तक्त बुडवून मराठीयास तक्त दिले. आता हद्द जाली !' विजापूरचे पादशहास व भागापूरचे पादशहास असा खेद झाला. रूमशाम, इराण, दुराण व दर्यातील पातशहा खबर कळून मनात खेद करू लागले. ये जातीचे वर्तमान जाहाले.'<br>{{gap}}या शेवटच्या वाक्यात छत्रपतींच्या अवतारकार्याचे स्वरूप नेमके सांगितलेले आहे. त्यांनी प्रथम महाभारतप्रणीत धर्माचे पुनरुज्जीवन केले, अर्थव्यवस्थेत फार मोठे परिवर्तन घडवून आणले, मराठ्यांना राष्ट्रतत्त्वावर संघटित केले आणि त्यांना नवी<noinclude></noinclude>
djb5dm3m9t3ns2ct4yqit8rrpx4trn4
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०३
104
85867
230768
182061
2026-06-05T05:10:17Z
JayashreeVI
4058
230768
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|९८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>हासिक पुरावा पुढे आणण्याचा किंवा पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुराव्याचा भर मुख्यतः चार कागदपत्रांवर आहे; त्यापैकी एक पत्र जुनें सांप्रदायिक आहे; व दुसरीं तीन ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध करतांना अलीकडे सांपडलेली आहेत. पहिले तुकारामाचें शिवाजीस ओवीबद्ध पत्र; दुसरें शिवाजीचें सनदवजा रामदासांस पत्र; तिसरें शिवाजीच्या रामदासांशीं रायगडीं एकांतांत झालेल्या भेटीच्या उल्लेखाचें पत्र व शेवटचें व रा. राजवाडे यांच्या मती या वादाचें निर्णायक असे रामदासांच्या मरणानंतर लिहिलेले चाफळ मठांतील एक कच्चे टिपण. आतां या पत्रांचा क्रमानें विचार करूं.
<br>{{gap}}तुकारामानें शिवाजीस लिहिलेले हें पत्र हनुमानस्वामींच्या बखरीप्रमाणें शिवाजीस रामदासांचा अनुग्रह झाल्यानंतर बऱ्याच काळानें लिहिलेले आहे, असे बखरीवरून दिसतें. पत्रांतील खालील ओव्यांवरूनही ही गोष्ट स्पष्ट दिसते.<br>
{{block center|<poem>सद्गुरु श्रीरामदासाचें भूषण । तेथें घाली मन चळो नको ॥
बहतां ठायीं वृत्ति चाळविली जेव्हां। रामदास्य तेव्हां घडे कैचें ।
राया छत्रपति ऐकावें वचन । रामदासी मन लावी वेगें ।
रामदासस्वामी सोयरा सज्जन । त्याशीं तनमन अर्पी बापा ॥
मारुती अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुज लागी ॥</poem>}}
{{gap}}परंतु तुकाराममहाराज सन १६४९ फार तर १६५१ मध्यें वैकुंठवासी झाले असें ऐतिहासिक पुराव्यावरून ठरले आहे. तेव्हां हे पत्र तुकारामांनी लिहिलेले दिसत नाहीं. तुकारामांच्या हयातींत हे पत्र खरोखरी लिहिलेले आहे असे मानल्यास रामदास व शिवाजीची भेट सन १६४९ पूर्वीच पुष्कळ काळ झाली असली पाहिजे, असें अनुमान करावें लागतें. सारांश हें पत्र सांप्रदायिक हकीकतीतीलच असल्यामुळे भेटीच्या कालनिर्णयाच्या वादांत स्वतंत्र ऐतिहासिक पुरावा म्हणून ग्राह्य धरतां येत नाहीं.
<br>{{gap}}आतां शिवाजीच्या सनदवजा पत्राकडे वळूं. त्यांतील या वादासंबंधाचा मजकूर असा आहे.
{{nop}}<noinclude></noinclude>
6zr1lq7lz0e9sfnh2nufex8qvoyjwg6
230769
230768
2026-06-05T05:10:51Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230769
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|९८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>हासिक पुरावा पुढे आणण्याचा किंवा पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुराव्याचा भर मुख्यतः चार कागदपत्रांवर आहे; त्यापैकी एक पत्र जुनें सांप्रदायिक आहे; व दुसरीं तीन ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध करतांना अलीकडे सांपडलेली आहेत. पहिले तुकारामाचें शिवाजीस ओवीबद्ध पत्र; दुसरें शिवाजीचें सनदवजा रामदासांस पत्र; तिसरें शिवाजीच्या रामदासांशीं रायगडीं एकांतांत झालेल्या भेटीच्या उल्लेखाचें पत्र व शेवटचें व रा. राजवाडे यांच्या मती या वादाचें निर्णायक असे रामदासांच्या मरणानंतर लिहिलेले चाफळ मठांतील एक कच्चे टिपण. आतां या पत्रांचा क्रमानें विचार करूं.
<br>{{gap}}तुकारामानें शिवाजीस लिहिलेले हें पत्र हनुमानस्वामींच्या बखरीप्रमाणें शिवाजीस रामदासांचा अनुग्रह झाल्यानंतर बऱ्याच काळानें लिहिलेले आहे, असे बखरीवरून दिसतें. पत्रांतील खालील ओव्यांवरूनही ही गोष्ट स्पष्ट दिसते.<br>
{{block center|<poem>सद्गुरु श्रीरामदासाचें भूषण । तेथें घाली मन चळो नको ॥
बहतां ठायीं वृत्ति चाळविली जेव्हां। रामदास्य तेव्हां घडे कैचें ।
राया छत्रपति ऐकावें वचन । रामदासी मन लावी वेगें ।
रामदासस्वामी सोयरा सज्जन । त्याशीं तनमन अर्पी बापा ॥
मारुती अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुज लागी ॥</poem>}}
{{gap}}परंतु तुकाराममहाराज सन १६४९ फार तर १६५१ मध्यें वैकुंठवासी झाले असें ऐतिहासिक पुराव्यावरून ठरले आहे. तेव्हां हे पत्र तुकारामांनी लिहिलेले दिसत नाहीं. तुकारामांच्या हयातींत हे पत्र खरोखरी लिहिलेले आहे असे मानल्यास रामदास व शिवाजीची भेट सन १६४९ पूर्वीच पुष्कळ काळ झाली असली पाहिजे, असें अनुमान करावें लागतें. सारांश हें पत्र सांप्रदायिक हकीकतीतीलच असल्यामुळे भेटीच्या कालनिर्णयाच्या वादांत स्वतंत्र ऐतिहासिक पुरावा म्हणून ग्राह्य धरतां येत नाहीं.
<br>{{gap}}आतां शिवाजीच्या सनदवजा पत्राकडे वळूं. त्यांतील या वादासंबंधाचा मजकूर असा आहे.
{{nop}}<noinclude></noinclude>
3t8a5z5z7cll1cost6ubmg8np7kqbwt
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०४
104
85868
230770
182062
2026-06-05T05:18:27Z
JayashreeVI
4058
230770
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|९९}}
{{rule}}</noinclude>"चरणरज शिवाजी राजे यांनी चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे मजवर कृपा करूनु सनाथ केलें आज्ञा केली कीं तुमचा मुख्य धर्म राज्य साधन करुनु धर्म स्थापना देव-ब्राह्मणांची सेवा प्रजेची पीडा दूर करून
पाळण रक्षण करावें हें व्रत संपादून त्यांत परमार्थ करावा तुम्हीं जें मनीं धराल तें श्री सिद्धीस पाववील त्याजवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक लोकांचा नाश करावा विपुल द्रव्य करुनु राज्यपरंपरा अक्षई चालेल ऐशीं स्थळे दुर्घट करावी ऐसें जें जें मनीं धरलें तें तें स्वामीनीं आशीर्वादप्रतापें मनोरथ पूर्ण केलें या उपरि राज्य संपादिलें तें चरणीं अर्पण करुनु सर्वकाळ सेवा घडावी ऐसा विचार मनीं आणिला तेव्हां आज्ञा झाली कीं तुम्हांस पूर्वी धर्म सांगितले तेच करावे तीच सेवा होय ऐसें आज्ञापिलें यावरून निकट वास घडुनु वारंवार दर्शन घडावें श्रीची
66
पापना कोठें तरी होऊनु सांप्रदाय शिष्य व भक्ति दिगंत विस्तीर्ण घडावी
ऐशी प्रार्थना केली तेही आसमंतात गिरिगव्हरीं वास करुनु चाफळी
श्री ची स्थापना करुनु सांप्रदाय शिष्य दिगंत विस्तीर्णता घडली.”
हें पत्र सन १६७९ मधलें आहे हे ध्यानांत ठेविले म्हणजे या पत्राचा
पुरात्रा प्रथम भेटीच्या प्रश्नासंबंधानें शून्य आहे हें सहज समजेल. कारण
शिवाजीसारखा शिष्य रामदासांची भेट केव्हांही झाली असली तरी आप
त्याच आशीर्वादाने सर्व झालें असें सौजन्यानें म्हणेल हैं उघड आहे.
शिवाजीनें राज्य अर्पण केल्यावर रामदासांनी राज्य करण्याचाच उप-
देश केला हा उल्लेखही पुढल्या गोष्टीला लागू आहे. निकटवासाचा
उल्लेख परळीकडे स्वाभाविकपणें जातो. कारण चाफळच्या मानानें परळी
प्रतापगडास जवळ आहे. पुढल्या वाक्यांत रामदासांनी चाफळीं श्रीची
स्थापना करून शिष्य सांप्रदाय वाढविल्याचें विधान आहे. निकट-वासाची
विनंति आहे व चाफळबद्दलचें विधान आहे. पण रा. देव यानीं या
पत्राचा अर्थ करतांना या दोन वाक्यांत कार्यकारणभावाचा अर्थ लावला
आहे. व असा अर्थ लावण्याकरितां पत्रांतील 'तेही' या शब्दाचा 'तेव्हां
झणून' असा अर्थ घरला आहे. पण 'तेही' याचा खरा अर्थ 'त्यांनी'
असा आहे. व हा खरा अर्थ घेतला म्हणजे निकटवासाची विनंति व<noinclude></noinclude>
cs9dyvtg6ud9mzee5q7zahao3lnwhpn
230771
230770
2026-06-05T11:03:22Z
JayashreeVI
4058
230771
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|९९}}
{{rule}}</noinclude>{{gap}}"चरणरज शिवाजी राजे यांनी चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे मजवर कृपा करूनु सनाथ केलें आज्ञा केली कीं तुमचा मुख्य धर्म राज्य साधन करुनु धर्म स्थापना देव-ब्राह्मणांची सेवा प्रजेची पीडा दूर करून
पाळण रक्षण करावें हें व्रत संपादून त्यांत परमार्थ करावा तुम्हीं जें मनीं धराल तें श्री सिद्धीस पाववील त्याजवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक लोकांचा नाश करावा विपुल द्रव्य करुनु राज्यपरंपरा अक्षई चालेल ऐशीं स्थळे दुर्घट करावी ऐसें जें जें मनीं धरलें तें तें स्वामीनीं आशीर्वादप्रतापें मनोरथ पूर्ण केलें या उपरि राज्य संपादिलें तें चरणीं अर्पण करुनु सर्वकाळ सेवा घडावी ऐसा विचार मनीं आणिला तेव्हां आज्ञा झाली कीं तुम्हांस पूर्वी धर्म सांगितले तेच करावे तीच सेवा होय ऐसें आज्ञापिलें यावरून निकट वास घडुनु वारंवार दर्शन घडावें श्रीची
स्थापना कोठें तरी होऊनु सांप्रदाय शिष्य व भक्ति दिगंत विस्तीर्ण घडावी ऐशी प्रार्थना केली तेही आसमंतात गिरिगव्हरीं वास करुनु चाफळी श्री ची स्थापना करुनु सांप्रदाय शिष्य दिगंत विस्तीर्णता घडली.”
<br>{{gap}}हें पत्र सन १६७९ मधलें आहे हे ध्यानांत ठेविले म्हणजे या पत्राचा पुरावा प्रथम भेटीच्या प्रश्नासंबंधानें शून्य आहे हें सहज समजेल. कारण शिवाजीसारखा शिष्य रामदासांची भेट केव्हांही झाली असली तरी आपल्याच आशीर्वादाने सर्व झालें असें सौजन्यानें म्हणेल हे उघड आहे. शिवाजीनें राज्य अर्पण केल्यावर रामदासांनी राज्य करण्याचाच उपदेश केला हा उल्लेखही पुढल्या गोष्टीला लागू आहे. निकटवासाचा उल्लेख परळीकडे स्वाभाविकपणें जातो. कारण चाफळच्या मानानें परळी प्रतापगडास जवळ आहे. पुढल्या वाक्यांत रामदासांनी चाफळीं श्रीची स्थापना करून शिष्य सांप्रदाय वाढविल्याचें विधान आहे. निकट-वासाची विनंति आहे व चाफळबद्दलचें विधान आहे. पण रा. देव यानीं या पत्राचा अर्थ करतांना या दोन वाक्यांत कार्यकारणभावाचा अर्थ लावला आहे. व असा अर्थ लावण्याकरितां पत्रांतील 'तेही' या शब्दाचा 'तेव्हां म्हणून' असा अर्थ घरला आहे. पण 'तेही' याचा खरा अर्थ 'त्यांनी' असा आहे. व हा खरा अर्थ घेतला म्हणजे निकटवासाची विनंति व--<noinclude></noinclude>
6lqjhybuopy9rjbkxlkhtjak8ority8
230772
230771
2026-06-05T11:03:48Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230772
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|९९}}
{{rule}}</noinclude>{{gap}}"चरणरज शिवाजी राजे यांनी चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे मजवर कृपा करूनु सनाथ केलें आज्ञा केली कीं तुमचा मुख्य धर्म राज्य साधन करुनु धर्म स्थापना देव-ब्राह्मणांची सेवा प्रजेची पीडा दूर करून
पाळण रक्षण करावें हें व्रत संपादून त्यांत परमार्थ करावा तुम्हीं जें मनीं धराल तें श्री सिद्धीस पाववील त्याजवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक लोकांचा नाश करावा विपुल द्रव्य करुनु राज्यपरंपरा अक्षई चालेल ऐशीं स्थळे दुर्घट करावी ऐसें जें जें मनीं धरलें तें तें स्वामीनीं आशीर्वादप्रतापें मनोरथ पूर्ण केलें या उपरि राज्य संपादिलें तें चरणीं अर्पण करुनु सर्वकाळ सेवा घडावी ऐसा विचार मनीं आणिला तेव्हां आज्ञा झाली कीं तुम्हांस पूर्वी धर्म सांगितले तेच करावे तीच सेवा होय ऐसें आज्ञापिलें यावरून निकट वास घडुनु वारंवार दर्शन घडावें श्रीची
स्थापना कोठें तरी होऊनु सांप्रदाय शिष्य व भक्ति दिगंत विस्तीर्ण घडावी ऐशी प्रार्थना केली तेही आसमंतात गिरिगव्हरीं वास करुनु चाफळी श्री ची स्थापना करुनु सांप्रदाय शिष्य दिगंत विस्तीर्णता घडली.”
<br>{{gap}}हें पत्र सन १६७९ मधलें आहे हे ध्यानांत ठेविले म्हणजे या पत्राचा पुरावा प्रथम भेटीच्या प्रश्नासंबंधानें शून्य आहे हें सहज समजेल. कारण शिवाजीसारखा शिष्य रामदासांची भेट केव्हांही झाली असली तरी आपल्याच आशीर्वादाने सर्व झालें असें सौजन्यानें म्हणेल हे उघड आहे. शिवाजीनें राज्य अर्पण केल्यावर रामदासांनी राज्य करण्याचाच उपदेश केला हा उल्लेखही पुढल्या गोष्टीला लागू आहे. निकटवासाचा उल्लेख परळीकडे स्वाभाविकपणें जातो. कारण चाफळच्या मानानें परळी प्रतापगडास जवळ आहे. पुढल्या वाक्यांत रामदासांनी चाफळीं श्रीची स्थापना करून शिष्य सांप्रदाय वाढविल्याचें विधान आहे. निकट-वासाची विनंति आहे व चाफळबद्दलचें विधान आहे. पण रा. देव यानीं या पत्राचा अर्थ करतांना या दोन वाक्यांत कार्यकारणभावाचा अर्थ लावला आहे. व असा अर्थ लावण्याकरितां पत्रांतील 'तेही' या शब्दाचा 'तेव्हां म्हणून' असा अर्थ घरला आहे. पण 'तेही' याचा खरा अर्थ 'त्यांनी' असा आहे. व हा खरा अर्थ घेतला म्हणजे निकटवासाची विनंति व--<noinclude></noinclude>
5sm11jn2zyk9bdtm0dt6nb9jb8tw7dg
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०५
104
85869
230773
182063
2026-06-05T11:14:07Z
JayashreeVI
4058
230773
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१००|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>मठस्थापनेचें विधान असा सरळ अर्थ लागतो. पण 'तेही ' चा 'तेव्हां' असा अर्थ करून निकटवास घडण्याकरितां चाफळास रामदासस्वामींनीं शिवाजीच्या विनंतिवरून मठ स्थापना केली असा रा. देव अर्थ करतात. परंतु असा अर्थ केल्यास 'निकट' या सापेक्ष शब्दाला अन्वर्थकत्व राहत नाहीं. व चाफळचा मठ स्थापन होण्यापूर्वी शिवाजीची व रामदासांची भेट झाली होती व त्यानें रामदासांस आपले सर्व राज्य अर्पण केलें होतें असा सांप्रदायिक हकीकतीचेही पलीकडे जाणारा विचित्र अर्थ निष्पन्न होतो. सारांश या पत्राचा शिवाजीच्या व रामदासांच्या भेटीच्या कालनिर्णयाला काडीचाही उपयोग नाहीं.
<br>{{gap}}रा. राजवाडे यांनी प्रसिद्ध केलेले तिसरें पत्र याची हीच अवस्था आहे. शिवाजी व रामदासाची रायगडी राज्याभिषेक झाल्यावर एकांतीं भेट होते या उल्लेखावरून त्यांच्या प्रथम भेटीच्या कालनिर्णयाच्या
प्रभावर कांहींच उजेड पडत नाहीं.
<br>{{gap}}रा. राजवाडे यांनी रामदासांच्या चरित्रांतील प्रसंगाचें जें टिपण छापले आहे तें अनुक्रमणिका वजा आहे. ती हकीकत हनुमानस्वामींनीं वर्णिलेल्या दंतकथांच्या हकीकतीशीं बहुतेक तंतोतंत जुळते. यावरून हनुमानस्वामींनी आपले रामदासांचें चरित्र लिहितांना ज्या पूर्व चरित्रांचा उपयोग केला होता अशा एखाद्या चरित्राची हें टिपण अनुक्रमणिका असावें. रा. राजवाडे यांनी हें टिपण रामदासांच्या मरणानंतर थोड्याच दिवसांनी लिहिलेले आहे या गोष्टीवर बराच जोर दिला आहे. शिवाय ज्या अर्थी तें टिपण इतके जुनें आहे त्याअर्थी त्यांत दिलेले शक खरेच असले पाहिजेत व ज्या अर्थी हनुमानस्वामीनी दिलेला व या टिपणांत दिलेला काल अगदी तंतोतंत जमतो त्या अर्थी हनुमानस्वामींच्या बखरींतील काल हा ऐतिहासिक सत्य ठरतो; असें रा. राजवाडे यांनी कंठरवानें सांगितलें आहे. पण हें टिपण चाफळ मठांतले आहे व त्यांत समर्थ सांप्रदायांत रामदासासंबंधी प्रचलित असलेल्या सर्व दैवी चमत्कारांच्या अशक्य व असंभाव्य गोष्टींचा हनुमानस्वामींच्या बखरीप्रमाणेंच उल्लेख आहे. म्हणजे असत्योक्ति व अतिशयोक्ति हे दोष या टिपणावरही येतात. सारांश, हें टिपण सांप्र--<noinclude></noinclude>
fs2q0l64gymoqhg5c9l5gv4y6q3tf1g
230774
230773
2026-06-05T11:14:47Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230774
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|१००|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>मठस्थापनेचें विधान असा सरळ अर्थ लागतो. पण 'तेही ' चा 'तेव्हां' असा अर्थ करून निकटवास घडण्याकरितां चाफळास रामदासस्वामींनीं शिवाजीच्या विनंतिवरून मठ स्थापना केली असा रा. देव अर्थ करतात. परंतु असा अर्थ केल्यास 'निकट' या सापेक्ष शब्दाला अन्वर्थकत्व राहत नाहीं. व चाफळचा मठ स्थापन होण्यापूर्वी शिवाजीची व रामदासांची भेट झाली होती व त्यानें रामदासांस आपले सर्व राज्य अर्पण केलें होतें असा सांप्रदायिक हकीकतीचेही पलीकडे जाणारा विचित्र अर्थ निष्पन्न होतो. सारांश या पत्राचा शिवाजीच्या व रामदासांच्या भेटीच्या कालनिर्णयाला काडीचाही उपयोग नाहीं.
<br>{{gap}}रा. राजवाडे यांनी प्रसिद्ध केलेले तिसरें पत्र याची हीच अवस्था आहे. शिवाजी व रामदासाची रायगडी राज्याभिषेक झाल्यावर एकांतीं भेट होते या उल्लेखावरून त्यांच्या प्रथम भेटीच्या कालनिर्णयाच्या
प्रभावर कांहींच उजेड पडत नाहीं.
<br>{{gap}}रा. राजवाडे यांनी रामदासांच्या चरित्रांतील प्रसंगाचें जें टिपण छापले आहे तें अनुक्रमणिका वजा आहे. ती हकीकत हनुमानस्वामींनीं वर्णिलेल्या दंतकथांच्या हकीकतीशीं बहुतेक तंतोतंत जुळते. यावरून हनुमानस्वामींनी आपले रामदासांचें चरित्र लिहितांना ज्या पूर्व चरित्रांचा उपयोग केला होता अशा एखाद्या चरित्राची हें टिपण अनुक्रमणिका असावें. रा. राजवाडे यांनी हें टिपण रामदासांच्या मरणानंतर थोड्याच दिवसांनी लिहिलेले आहे या गोष्टीवर बराच जोर दिला आहे. शिवाय ज्या अर्थी तें टिपण इतके जुनें आहे त्याअर्थी त्यांत दिलेले शक खरेच असले पाहिजेत व ज्या अर्थी हनुमानस्वामीनी दिलेला व या टिपणांत दिलेला काल अगदी तंतोतंत जमतो त्या अर्थी हनुमानस्वामींच्या बखरींतील काल हा ऐतिहासिक सत्य ठरतो; असें रा. राजवाडे यांनी कंठरवानें सांगितलें आहे. पण हें टिपण चाफळ मठांतले आहे व त्यांत समर्थ सांप्रदायांत रामदासासंबंधी प्रचलित असलेल्या सर्व दैवी चमत्कारांच्या अशक्य व असंभाव्य गोष्टींचा हनुमानस्वामींच्या बखरीप्रमाणेंच उल्लेख आहे. म्हणजे असत्योक्ति व अतिशयोक्ति हे दोष या टिपणावरही येतात. सारांश, हें टिपण सांप्र--<noinclude></noinclude>
q9vo5jpn1u2u216sf2i0b4dw3gelotc
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०६
104
85870
230778
182064
2026-06-05T11:26:21Z
JayashreeVI
4058
230778
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१०१}}
{{rule}}</noinclude>दायिक पुराव्यांतील आहे. त्याला स्वतंत्र ऐतिहासिक कागदोपत्री पुरावा मानतां येणार नाहीं. शिवाय हनुमानस्वामींच्या बखरीतील भेटीच्या कालनिर्देशाला जे ऐतिहासिक आक्षेप आहेत ते या टिपणांतील कालनिर्देशालाही तितकेच लागू आहेत. तेव्हां आतां सांप्रदायिक कालनिर्देश चुकीचा कां व कसा आहे याच्या विचारास लागूं.
<br>{{gap}}हनुमानस्वामींच्या बखरींत या भेटीच्या प्रसंगाचें सविस्तर वर्णन दिलें आहे तें असें.
<br>{{gap}}शिवाजी महाराज रायगडाखालीं असतां त्यांनी एका साधूचें कीर्तनांत 'सद्गुरुवांचून सद्गति नाहीं' हें तत्व ऐकलें. तेव्हांपासून त्यांना सद्गुरुं शोधण्याचा नाद लागला. तेथून प्रतापगडावर आल्यावर श्रीभवानी देवी
शिवाजीच्या स्वप्नांत येऊन तिनें रामदासाला शरण जा अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे महाराज चाफळास गेले. पण रामदासांची भेट झाली नाहीं. मात्र तेथल्या शिष्यांनी देवस्थापनेची हकीगत सांगतांना महाराजांकडून तीनशें होन मिळाळे आहेत असे सांगितलें, महाराजांनी देवळाशेजारचा ओढा देवळास इजा करण्यासारखा आहे असे पाहून सातशें होन तो ओढा वळवून देण्याकरितां तेथल्या अधिकाऱ्याच्या स्वाधीन केले व प्रतापगडास सचिंत मानसें परत आले. पण त्यांना रामदासांचा निजध्यास लागला. तेव्हां एकदां रामदासांनी शिवाजीला स्वप्नांत दर्शन देऊन प्रसाद म्हणून नारळ अर्पण केला. पुन्हां भेटीचा प्रयत्न करण्याचा निश्चय करून शिवाजी प्रतापगडाहून महाबळेश्वरीं आले. तेथून वांईस येऊन माहुलीस त्यांनी दोन दिवस मुक्काम केला. इतक्यांत रामदासांकडून खालील आशयाचें ओवीबद्ध पत्र शिवाजीस आलें:-
{{block center|<poem>निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसि आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥
परोपकाराचिया राशी। उदंड घडती जयाशी ।
जयाचे गुण महत्त्वाशी । तुलना कैंची ॥
नरपती, गजपती, हयपती। गडपती, भूपती, जलपती ।
पुरंदर आणि शक्ती | पृष्ठभागीं ॥</poem>}}<noinclude></noinclude>
c81r5xxdm79gt5id3tluxlbd2iohc89
230779
230778
2026-06-05T11:27:32Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230779
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१०१}}
{{rule}}</noinclude>दायिक पुराव्यांतील आहे. त्याला स्वतंत्र ऐतिहासिक कागदोपत्री पुरावा मानतां येणार नाहीं. शिवाय हनुमानस्वामींच्या बखरीतील भेटीच्या कालनिर्देशाला जे ऐतिहासिक आक्षेप आहेत ते या टिपणांतील कालनिर्देशालाही तितकेच लागू आहेत. तेव्हां आतां सांप्रदायिक कालनिर्देश चुकीचा कां व कसा आहे याच्या विचारास लागूं.
<br>{{gap}}हनुमानस्वामींच्या बखरींत या भेटीच्या प्रसंगाचें सविस्तर वर्णन दिलें आहे तें असें.
<br>{{gap}}शिवाजी महाराज रायगडाखालीं असतां त्यांनी एका साधूचें कीर्तनांत 'सद्गुरुवांचून सद्गति नाहीं' हें तत्व ऐकलें. तेव्हांपासून त्यांना सद्गुरुं शोधण्याचा नाद लागला. तेथून प्रतापगडावर आल्यावर श्रीभवानी देवी
शिवाजीच्या स्वप्नांत येऊन तिनें रामदासाला शरण जा अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे महाराज चाफळास गेले. पण रामदासांची भेट झाली नाहीं. मात्र तेथल्या शिष्यांनी देवस्थापनेची हकीगत सांगतांना महाराजांकडून तीनशें होन मिळाळे आहेत असे सांगितलें, महाराजांनी देवळाशेजारचा ओढा देवळास इजा करण्यासारखा आहे असे पाहून सातशें होन तो ओढा वळवून देण्याकरितां तेथल्या अधिकाऱ्याच्या स्वाधीन केले व प्रतापगडास सचिंत मानसें परत आले. पण त्यांना रामदासांचा निजध्यास लागला. तेव्हां एकदां रामदासांनी शिवाजीला स्वप्नांत दर्शन देऊन प्रसाद म्हणून नारळ अर्पण केला. पुन्हां भेटीचा प्रयत्न करण्याचा निश्चय करून शिवाजी प्रतापगडाहून महाबळेश्वरीं आले. तेथून वांईस येऊन माहुलीस त्यांनी दोन दिवस मुक्काम केला. इतक्यांत रामदासांकडून खालील आशयाचें ओवीबद्ध पत्र शिवाजीस आलें:-
{{block center|<poem>निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसि आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥
परोपकाराचिया राशी। उदंड घडती जयाशी ।
जयाचे गुण महत्त्वाशी । तुलना कैंची ॥
नरपती, गजपती, हयपती। गडपती, भूपती, जलपती ।
पुरंदर आणि शक्ती | पृष्ठभागीं ॥</poem>}}<noinclude></noinclude>
96foizn33z9fcl47xnafuzf0r1xdggu
अनुक्रमणिका:काशी-रामेश्वर यात्रा.pdf
106
104084
230775
230688
2026-06-05T11:23:00Z
कल्पनाशक्ती
3813
230775
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=काशी-रामेश्वर यात्रा
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=पुणे
|Year=1936
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 3="फोटो" 5="प्रस्तावना" 8="अनुक्रमणिका" 10="नकाशा" 12="यात्रामार्ग व यात्राकाल" 17="रामेश्वर व सेतुरामेश्वर" 28 ="फोटो" 29="फोटो" 42 ="फोटो" 43="फोटो" 46="फोटो" 55="फोटो" 56="फोटो" 65="फोटो" 66="फोटो" 87="फोटो" 88="फोटो" 95="फोटो" 96="फोटो"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
ellg9jr33l9ilormhpgg7x42oalc69x
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१८
104
110541
230692
230647
2026-06-04T12:09:38Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230692
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||रामेश्वर व सेतुरामेश्वर|७ }}</noinclude>{{gap}}पूर्वीच्या काळच्या प्रांतमर्यादा कांहींही असोत, त्यांचीं नांवेंही कांहीं असोत, सध्यां दक्षिण हिंदुस्थान हें नांव या सर्व भागाला मिळाल्यासारखे आहे. याच भागांत साऊथ इंडियन रेलवेच्या रस्त्यांचें जाळें पसरलेलें आहे.<br>{{gap}}या प्रांताच्या दक्षिण टोकांस रामेश्वर बेट आहे. तें मीं १९३३ च्या नाताळच्या सुटींत प्रथम पाहिलें. मुंबई पुण्याकडून दक्षिण हिंदुस्थानाला जाणारे प्रवासी बहुधा आगगाडीनें या भागांत येत असल्यामुळे रामेश्वर हे त्यांना प्रवासाच्या शेवटीं लागतें. माझा प्रवास मात्र याच्या उलट झाला असल्यामुळे माझ्या प्रेक्षणीय स्थळांचें वर्णन उलट्या क्रमानें झाल्यासारखे वाचकांस वाटेल. पण अशा वर्णनाच्या योगें 'लंकेकर' लोक दक्षिण हिंदुस्थानचा प्रवास कसा करीत असतील व त्यांना दक्षिण हिंदुस्थान कसें वाटत असेल हे वाचकांस कळून येईल. कारण मी मुंबईहून आगबोटीनें प्रथम लंकेस गेलों व मग तिकडून उत्तर दिशेकडे प्रवास करीत दक्षिण हिंदुस्थानांत प्रवेश केला. तेव्हां प्रेक्षणीय स्थळे पाहिलेल्या क्रमानेच त्यांचें वर्णन करणें बरें.<br>{{gap}}मी ख्रिश्चन लोकांच्या नाताळच्या सणाच्या दिवशीं म्हणजे २५ डिसेंबर सन १९३३ रोजी रात्रीं सात वाजतां लंकेच्या उत्तर प्रांताचे मुख्य शहर जाफना येथून आगगाडीनें दुसऱ्या वर्गानें धनुष्कोडीचे तिकीट काढलें. धनुष्कोडी हे दक्षिण हिंदुस्थानच्या रामेश्वर बेटाचें समुद्रांत घुसलेलें दक्षिण टोक होय. आगगाडी दुसरे दिवशी सकाळी बरोबर साहा वाजतां '''तलाईमानार'''च्या- लंका बेटाचें उत्तर टोंक- धक्क्यावर आली व मी लागलींच आगबोटीवर चढलों तलाईमानारचा धक्का इतका मोठा व समुद्रांत खोलपर्यंत गेला आहे. कीं सबंध लांबलचक आगगाडी धक्क्यावरील रूळावर येते व समोरच आगबोट धक्क्याला लागलेली असते. यामुळे प्लॅटफार्मच्या दोन बाजूंस समोरा समोर उभ्या असलेल्या दोन आगगाड्यांमध्यें ज्याप्रमाणें एका<noinclude></noinclude>
jv44vclc9zc2hjvhmicqwfh8qcac1ju
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१९
104
110542
230693
230648
2026-06-04T12:14:03Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230693
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|८ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>आगगाडींतून दुसऱ्या आगगाडीत बसतां येतें तितक्याच सहज व व सुलभ रीतीनें येथें आगगाडींतून आगबोटीत व आगबोटीतून आगगाडीत बसतां येतें. अशी सोय आपल्या इकडे नसल्यामुळे मला येथल्या सोयीचें नवल वाटलें. हल्लींच्या काळीं प्रवासाची किती विलक्षण सोय झाली आहे असे कौतुकाचे उद्गार माझ्या तोंडून सहज निघाले. आगबोट कोकणांत जाणाऱ्या मोठ्या बोटीप्रमाणे होती व ती बरोबर साहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी निघाली. पाल्कच्या आखाताच्या पाण्याचा रंग पोपटी असून सध्या समुद्र अगदीं शांत होता. सुमारें एकतासपर्यंत मला लंकेचा किनारा दिसत होता. कारण आगबोटीवरचा बहुतेक सर्व वेळ मी बोटीच्या मागच्या टोकापासून पुढच्या टोकापर्यंत- बोटीच्या सुकाणूपासून नाळेपर्यंत- येरझारा करण्यांत घालविला. नंतर लंकेचा किनारा दिसेनासा झाला व हिंदुस्थानचा किनाराही दिसेना. पण सुमारें अर्ध्या तासाच्या आतच हिंदुस्थानचा धनुष्कोडीच्या आसपासचा किनारा दिसूं लागला व थोड्याच वेळांत मंगलोरी कवलांच्या त्या रेलवे व कस्टम या खात्यांच्या तांबंड्यालाल इमारती दिसूं लागल्या. आमचे डाव्या हातास आरबी समुद्राचें तें मोरपिशीरंगी नीळसर पाणी, उजव्या हातास बंगालच्या उपसागराचें तें पोपटीरंगी हिरवट पाणी, पुढे समोरच दिसणारी लांबच लांब हिंदुस्थानच्या किनाऱ्याची पांढऱ्या शुभ्र रेतीची ती किनार व तिच्या मध्ये मध्ये त्या तांबड्यालाल रंगाच्या इमारती व दुरंगी समुद्रावर येणाऱ्या लाटांचा तो शुभ्ररंगी फेस, मध्यें मध्ये ढग आल्यानें समुद्राच्या पाण्याच्या छटा क्षणोक्षणीं बदलल्यामुळे नानारंगांचा पाण्यावरील जणूं कांहीं तो चित्रपट, हा सर्व देखावा एकसमयावच्छेदेंकरून दृष्टीस पडल्यामुळे माझे मन त्या विलक्षण देखाव्यांत इतके गढून गेलें कीं आगबोट धक्याला लागली हें माझ्या ध्यानांत आलें नाहीं. पण काळ्या डगल्याचे पोलीस शिपायी व पगड्यावजा तयार केलेल्या रुमालांनी अलंकृत झालेले मद्रासी कस्टमचे अंमलदार<noinclude></noinclude>
dumlnd901k8lhv7bi4mbzqmbv9ob2pp
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२१
104
110544
230690
230659
2026-06-04T12:01:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230690
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|१०|'''काशी-रामेश्वर यात्रा'''|}}</noinclude>दोन्ही बाजूंस संथ पाण्याचीं उथळ खारीं सरोवरें लागलीं; फक्त रस्त्याची लांब व चिंचोळी पट्टी तेवढीच काय ती मध्यें जमीन! दोन तीन मैलांनंतर सरोवरें जाऊन त्यांची जागा वाळूच्या मैदानांनीं घेतली. आतां जिकडे पहावें तिकडे पांढरीशुभ्र वाळूच वाळू दिसली. मध्ये मध्ये वाळूचे ढिगारे झालेले दिसत. त्यावर कोठें मोगऱ्याची वेल व त्यावर तुरळक फुलें, दिसत. पंबन स्टेशनच्या नजीकपासून मात्र सर्व देखावा पार बदलला. आतां नारळांच्या बागा लागल्या. मधून मधून एक एक किंवा टोळ्या- टोळ्यांनीं पसरलेले '''पालमिरा पामवृक्ष''' दिसले. '''पंबन''' स्टेशनला उतरून रामेश्वरच्या गाडींत तास दीडतास तिष्ठत बसावें लागलें. कारण धनुष्कोडीहून आलेली गाडी गेल्यावर धनुष्कोडीला जाणारी गाडी पंबनला येते. मग दोन्हीं गाड्यांचे उतारू घेऊन रामेश्वरची गाडी निघते. म्हणून मी जरी सकाळीं नऊ वाजतांच हिंदुस्थानाच्या किनाऱ्याला लागलों तरी सोळा सतरा मैलांच्या प्रवासाला चार पांच तास लागून मी रामेश्वर स्टेशनला बरोबर एक वाजतां पोहोंचलों. रामेश्वरास धर्मशाळा व छत्रें पुष्कळच आहेत. तेव्हां उतरण्याची मोठी पंचाईत वाटावयाची खरी पण लंकेच्या आगगाडींत भेटलेल्या एका गृहस्थानें सांगितलें होतें कीं "समोर दोन मोठाले हत्ती असलेली नवीन धर्मशाळा एका श्रीमंत मारवाड्यानें बांधली आहे त्या धर्मशाळेंत जा." त्यामुळें स्टेशन बाहेर आल्यावर मला पंचाईत पडली नाहीं. हमालानें मला त्या छत्रांत बरोबर नेलें. मी त्या इमारतींत शिरतों तोंच एका गृहस्थांनीं मला मराठींत विचारलें कीं, आपण प्रो. भाटे काय? मी होय म्हणतांच त्यांनीं "आपण पुण्याचे असून या धर्मशाळेची व्यवस्था व अष्टपुत्रे नांवाच्या रामेश्वरच्या बऱ्याच उपाध्येगिरीचा मालक असलेल्या अज्ञान मुलांच्या मालमत्तेची व्यवस्थाही आपल्याकडे आहे" असें सांगितलें. ज्याप्रमाणें माझ्या उत्तर हिंदुस्थानच्या प्रवासांत मला हरिद्वारला मराठी बोलणारे गृहस्थ भेटून हरिद्वारास माझी उत्तम सोय झाली, त्याप्रमाणें रामेश्वरास पुण्याचे देशपांडे हे महाराष्ट्रस्थ गृहस्थ भेटून त्यांच्या घरींच<noinclude></noinclude>
p5t6xmlt99az7w6lm1tw6ft48mydmnu
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२२
104
110545
230691
230661
2026-06-04T12:04:59Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230691
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader||'''रामेश्वर व सेतुरामेश्वर'''|११}}</noinclude>माझी जेवणाची सोय झाली. परकी देशांतील परक्या अन्नाचें एक महिनाभर सेवन केल्यानंतर प्रथमच पुण्याच्या पद्धतीचें दोन दिवस जेवण मिळाल्यानें रामेश्वरचा माझा दोनदिवसाचा निवास फार सुखसमाधानाचा झाला. रा. अष्टपुत्रे ह्यांचें घराणें कित्येक पिढ्या रामेश्वरास कायमचें राहिलेले आहे. हल्लींच्या अज्ञान मुलाचे वडील रामेश्वरींच जन्मले व त्यांनी ५८ वर्षांची आपली सर्व हयात येथेंच घालविली. हे मोठे कर्तबगार पुरुष असावे. कारण रामेश्वराच्या बऱ्याच उपाध्येगिऱ्या त्यांनीं मिळविलेल्या असून त्यांचें काम मोठ्या खात्याप्रमाणें चालतें. त्यांचे घरीं वह्यांचे ढीगच्या ढीग दिसले. रा. देशपांडे म्हणाले, येथें दीडशें वर्षांच्या तरी वह्या व्यवस्थितपणें ठेवलेल्या आहेत. हिंदुस्थानच्या कोनाकोपऱ्यांतून येणाऱ्या लोकांची माहिती अष्टपुत्र्यांच्या संग्रहीं आहे. काश्मीर, बलुचिस्तान, सिंध, पंजाब व बंगाल अशा दूरदूरच्या ठिकाणचे यात्रेकरू येथें येतात. नुसत्या अनुक्रमणिकेच्या एकशेंवीस वह्या आहेत. अनुक्रमणिका प्रांतवार, जिल्हावार व मग गांववार केलेली आहे. मी दोन दिवस अष्टपुत्रे यांचे घरीं सकाळ संध्याकाळ जात होतों तों तेथें यात्रेकरूंची सारखी गर्दी असे. आपल्या पूर्वजांपैकी कोणी त्यांचेकडे आले होते कीं काय अशी चौकशी हे दूरचे यात्रेकरू करीत; व अशी माहिती मिळाली म्हणजे अष्टपुत्रे यांना आपले उपाध्ये समजून धर्मकृत्यें त्यांचेकडून करून घेत. माझें मूळ गांव कुलाबा जिल्ह्यांतील बोरवाडी हें असल्यामुळें मी बोरवाडी गांवचे यात्रेकरूंची चौकशी केली. तेव्हा बोरवाडी गांवापैकीं गंगाबाई या नांवाची नोंद अष्टपुत्रे यांचे येथें सांपडली. अष्टपुत्रे यांचे येथील एकंदर व्यवस्थित कारभार पाहून या यात्रेच्या ठिकाणच्या पंड्यांच्या कारभाराची मला चांगली कल्पना आली. जरी मीं धार्मिक यात्रा केली नाहीं तरी सेतुरामेश्वराहून आणलेला सेतू म्हणजे तेथली वाळू एका नारळी वाटोळ्या बेल्यांत मंत्रयुक्तविधीनें अष्टपुत्रे यांचेकडून भरून घेतली व त्यांचा रामेश्वराचा<noinclude></noinclude>
lf0a4t9ejablifpy85puqxzzunx9sqr
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/५६
104
110561
230694
2026-06-04T12:16:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
230694
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan
230701
230694
2026-06-04T13:16:32Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230701
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 56-1 कोडैकनाल टपालघरापासून दिसणारा देखावा.jpg|frameless|center|Kodaikanal view from the post office]]
{{center|'''कोडैकनाल टपालघरापासून दिसणारा'''<br>नं ९ ]{{gap}}'''देखावा'''{{gap}}[ पान ३९}}
<br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 56-2 कोडैकनाल कोकर्स वॉक.jpg|frameless|center|Kodaikanal Koker's walk]]
{{center|नं १० ]{{gap}}'''कोडैकनाल कोकर्स वॉक (सहलवाट)'''{{gap}}[ पान ३९}}{{nop}}<noinclude></noinclude>
nu2wr5fk5dxyj2ropinxd4pyd9wktnm
230702
230701
2026-06-04T13:16:56Z
कल्पनाशक्ती
3813
230702
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><Br><Br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 56-1 कोडैकनाल टपालघरापासून दिसणारा देखावा.jpg|frameless|center|Kodaikanal view from the post office]]
{{center|'''कोडैकनाल टपालघरापासून दिसणारा'''<br>नं ९ ]{{gap}}'''देखावा'''{{gap}}[ पान ३९}}
<br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 56-2 कोडैकनाल कोकर्स वॉक.jpg|frameless|center|Kodaikanal Koker's walk]]
{{center|नं १० ]{{gap}}'''कोडैकनाल कोकर्स वॉक (सहलवाट)'''{{gap}}[ पान ३९}}{{nop}}<noinclude></noinclude>
ob9epau6e4axb683xmucjbjn8etyoal
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/६५
104
110562
230695
2026-06-04T12:21:34Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
230695
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan
230703
230695
2026-06-04T13:19:10Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230703
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><Br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 65- कोडैकनाल तलाव.jpg|frameless|center|Kodaikanal lake]]
{{center|नं ११ ]{{gap}}'''कोडैकनाल : तलाव'''{{gap}}[पान ४६}} {{nop}}<noinclude></noinclude>
0qcm6fagf0fwbqrog370iy5y0kkl54j
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/६६
104
110563
230696
2026-06-04T12:30:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
230696
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan
230704
230696
2026-06-04T13:21:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230704
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 66-पिलर रॉक्स.jpg|frameless|center|Kodaikanal Pillar Rocks]]
{{center|नं १२ ]{{gap}}'''कोडैकनाल : खांब खडक (पिलर-रॉक्स)'''{{gap}}[ पान ४७}}{{nop}}<noinclude></noinclude>
5sxgqo2ekijz32sv3m3ozo169o3vlrh
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/८७
104
110564
230697
2026-06-04T12:38:05Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
230697
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan
230705
230697
2026-06-04T13:24:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230705
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 87-1 नीलगिरी डोंगरी रेल्वेचा दातेरीरुळी रस्ता.jpg|thumb|Ooty- Nilgiri Mountain Railway track]]
{{center|नं १३ ]{{gap}}'''नीलगिरी : डोंगरी रेल्वेचा दातेरीरुळी रस्ता'''{{gap}}[ पा. ६६}}
<br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 87-2 नीलगिरी पर्वतामधून वाहणारी नदी.jpg|thumb|Ooty Nilgiri mountains and river]]
{{center|नं १४ ]{{gap}}'''नीलगिरी : पर्वतामधून वाहणारी नदी'''{{gap}}[ पा. ६६}}{{nop}}<noinclude></noinclude>
lo0y6vy9yoh99g4k3sus67mqpf6dfq2
230706
230705
2026-06-04T13:25:25Z
कल्पनाशक्ती
3813
230706
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 87-1 नीलगिरी डोंगरी रेल्वेचा दातेरीरुळी रस्ता.jpg|frameless|center|Ooty- Nilgiri Mountain Railway track]]
{{center|नं १३ ]{{gap}}'''नीलगिरी : डोंगरी रेल्वेचा दातेरीरुळी रस्ता'''{{gap}}[ पा. ६६}}
<br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 87-2 नीलगिरी पर्वतामधून वाहणारी नदी.jpg|frameless|center|Ooty Nilgiri mountains and river]]
{{center|नं १४ ]{{gap}}'''नीलगिरी : पर्वतामधून वाहणारी नदी'''{{gap}}[ पा. ६६}}{{nop}}<noinclude></noinclude>
0zl4ji9n4x9efsdfiian26jd3gpsi32
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/८८
104
110565
230698
2026-06-04T12:43:04Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
230698
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan
230707
230698
2026-06-04T13:28:51Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230707
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 88-1 कुनूर शहराचा देखावा.jpg|frameless|center|Coonoor city]]
{{center|नं १५ ]{{gap}}'''कुनूर : शहराचा देखावा'''{{gap}}[ पा. ६७}}
<br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 88-2 नीलगिरी खडकाच्या गुहेतील देवालय.jpg|frameless|center|Ooty Cave Temple]]
{{center|नं १६ ]{{gap}}'''नीलगिरी : खडकाच्या गुहेतील शिवालय'''{{gap}}[ पा. ६७}}{{nop}}<noinclude></noinclude>
bskkaxb8ybohnex1i26onzbu6782uqd
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/९५
104
110566
230699
2026-06-04T12:47:54Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
230699
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan
230708
230699
2026-06-04T13:34:26Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230708
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><Br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 95-1 नीलगिरी गोल्फ मैदान व लिंक्स.jpg|frameless|center|Ooty Golf course]]
{{center|नं १७ ]{{gap}}'''नीलगिरी : गोल्फ मैदान व लिंक्स'''{{gap}}[ पा. ७२}}
<Br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 95-2 नीलगिरी सरकारी बागेचें फाटक.jpg|frameless|center|Ooty Garden entrance]]
{{center|नं १८ ]{{gap}}'''नीलगिरी : सरकारी बागेचें फाटक'''{{gap}}[ पा. ७२}}{{nop}}<noinclude></noinclude>
8hawjqzplflona47wbg67vee7vab8xi
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/९६
104
110567
230700
2026-06-04T12:51:40Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
230700
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan
230709
230700
2026-06-04T13:36:54Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230709
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
<Br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 96-1 नीलगिरी गव्हर्नरांचा बंगला.jpg|frameless|center|Ooty Governar bunglow]]
{{center|नं १९ ]{{gap}}'''नीलगिरी : गव्हर्नरांचा बंगला'''[पा. ७३}}
<Br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 96-2 नीलगिरी रानटी टोडा लोक व त्यांची झोपडी.jpg|frameless|center|Ooty Toda people and their house]]
{{center|नं १९ ]{{gap}}'''नीलगिरी : रानटी टोडा लोक व त्यांची झोपडी'''[पा. ७३}}{{nop}}<noinclude></noinclude>
1bogcea69o9pweueu9xms3y2n45fi0t
230710
230709
2026-06-04T13:37:12Z
कल्पनाशक्ती
3813
230710
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
<Br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 96-1 नीलगिरी गव्हर्नरांचा बंगला.jpg|frameless|center|Ooty Governar bunglow]]
{{center|नं १९ ]{{gap}}'''नीलगिरी : गव्हर्नरांचा बंगला'''[पा. ७३}}
<Br><br>
[[File:काशी-रामेश्वर यात्रा pdf 96-2 नीलगिरी रानटी टोडा लोक व त्यांची झोपडी.jpg|frameless|center|Ooty Toda people and their house]]
{{center|नं २० ]{{gap}}'''नीलगिरी : रानटी टोडा लोक व त्यांची झोपडी'''[पा. ७३}}{{nop}}<noinclude></noinclude>
gq8vi3bzpdld8oqsgllmpq26cu4inn4
अनुक्रमणिका:सचित्र शारीरशास्त्र व आरोग्यशास्त्र.pdf
106
110568
230711
2026-06-04T14:40:26Z
सुबोध कुलकर्णी
1231
New page
230711
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=सचित्र शारीरशास्त्र व आरोग्यशास्त्र
|Language=mr
|Volume=
|Author=नीळकंठ गणेश गोखले
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=नीळकंठ गणेश गोखले
|Address=बडोदा
|Year=1924
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:Marathi]]
gv8xke01r0ppuywtldz09q7bmos06is
पान:सचित्र शारीरशास्त्र व आरोग्यशास्त्र.pdf/२०
104
110569
230712
2026-06-04T14:46:21Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "दायाने तयार झालेला असतो. कोषांस जीव असतो व त्यांची उत्पत्ति कोषांपासूनच होते; कारण कोणत्याहि प्रकारचा जिवंत प्राणी घेतला तर त्याची उत्पत्ति त्याच जातीच्या प्राण्यापासून झालेल..."
230712
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{center|(३)}}</noinclude>दायाने तयार झालेला असतो. कोषांस जीव असतो व त्यांची उत्पत्ति कोषांपासूनच होते; कारण कोणत्याहि प्रकारचा जिवंत
प्राणी घेतला तर त्याची उत्पत्ति त्याच जातीच्या प्राण्यापासून झालेली आढळते. ह्याकरतां कोषांची उत्पत्ति निर्जीव द्रव्यांपासून
केव्हांहि होणार नाहीं है प्रथम आपण चांगले लक्षांत ठेविलें पाहिजे. एक कोषी जीव जेव्हां द्विधा होतो तेव्हां एकाचे दोन असे जिवंत कोष निर्माण होतात. अनेक कोषांचा जर जीव असेल तर तो जीव द्विधाझाल्यानंतर सुद्धां ते कोष एकत्र असे आढळतात. मोठ्या प्राण्यांची शरीरें म्हणजे कोट्यवधि कोषांचे समुदाय होत. मनुष्यप्राण्याच्या शरीरांतील प्रत्येक कोष हा एककोपी जीवासारखाच असतो; आणि म्हणून त्यास अन्न आणि प्राणवायु हीं अवश्य पाहिजेत, व निरुपयोगी असे उरलेले जिन्नस त्यांतून बाहेर घालवून देणे हे पण अत्यंत जरूरीचें काम होय.<br>
{{gap}}शरीरांतील काम सुरळीतपणे चालावें म्हणून हे कोष आपआपसांत कामाची वांटणी करून घेतात. ज्याअर्थी कोपास एकट्यास आपल्या सर्व गरजा भागवितां येत नाहींत, त्याअर्थी त्यास एकमेकांशी सहकार करणे भाग पडते. अशा रीतीनें कामाची वांटणी केली असतांना काम सुलभ होते हे आपल्या समाजाच्या रोजच्या व्यवहारावरून आपणांस कळते; परंतु त्यांत एक धोका आहे तो असा कीं ह्या कोषांपैकी थोडयांनी जरी आपले काम करण्याचे नाकारले तरी त्याचा परिणाम सर्व शरीरास भोंवतो.<noinclude></noinclude>
9dtdvna9yogfiwc6sfcbqmzatkv8y98
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१०७
104
110570
230776
2026-06-05T11:24:26Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ प्रकरण ८ वें दक्षिण-काशी : श्रवणबेलगोला म्हैसूर व त्यालगतचा मलबार या प्रांतांत प्राचीनकाळीं जैन- धर्माचा पुष्कळच प्रसार झालेला होता. पण पुढे शंकराचार्य रामानुजाचार्य य..."
230776
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
प्रकरण ८ वें
दक्षिण-काशी : श्रवणबेलगोला
म्हैसूर व त्यालगतचा मलबार या प्रांतांत प्राचीनकाळीं जैन- धर्माचा पुष्कळच प्रसार झालेला होता. पण पुढे शंकराचार्य रामानुजाचार्य यांच्यासारखे वैदिकधर्माचे पुरस्कर्ते व प्रवर्तक आचार्य या प्रांतांत उदयास आले आणि विजयानगराच्या मोठ्या वैदिकधर्मी साम्राज्याचा या प्रांतावर ताबा झाला. यामुळे जैनधर्माला अवनत काळ आला व या प्रांतांतील त्याचे वर्चस्व नाहींसें झालें. परंतु जैनधर्मांच्या भरभराटीच्या काळांत या प्रांतांत जिकडे तिकडे जैन वस्ती, तीर्थ- करांच्या मूर्ती व धार्मिक इमारती बांधण्यांत आल्या. या सर्वांचे अव- शेष अजून म्हैसूर व मलबार या प्रांतांत तगून राहिले आहेत. सध्यां हे अवशेषच प्रवाशांचे मुख्य दर्शनविषय झाले आहेत. या जैनधर्मी दर्शन विषयामध्यें श्रवणबेलगोला हैं अत्यंत पवित्र स्थान मानतात. जैन लोक तर या स्थानाला काशी इतकें धार्मिक महत्त्व देतात व म्हणून त्याला ते दक्षिण काशी म्हणतात. धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र असें हें स्थान निसर्ग व शिल्पकला या दोन्ही दृष्टीनींही अत्यंत प्रेक्ष- णीय आहे. म्हणून थोडेसे आडवाटेवर असतांना सुद्धां मी आपल्या काशीरामेश्वर यात्रा योजनेमध्यें या स्थानाचा अन्तर्भाव केला होता. तदनुरूप आम्हीं हैं स्थान पाहण्यास मोठ्या उत्सुक व उतावीळ मनानें ता. ६ मार्च सन १९३६ रविवार रोजी सकाळी साडेसात वाजतां म्हैसूरहून मोटारमार्गे व मोटारींतून निघालों.
श्रवणबेलगोला है म्हैसूरच्या थेट उत्तरेस असून सुमारें पन्नास मैल अंतरावर आहे. म्हैसूरपासून फ्रेंच रॉक्स या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणा- पर्यंतचा रस्ता फार चांगला आहे. दुतर्फा सुंदर हिरव्यागार वृक्षांची<noinclude></noinclude>
1w81bpr5r6un9f4jx898zfnmt60avih
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/११३
104
110571
230777
2026-06-05T11:25:34Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
230777
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/११४
104
110572
230780
2026-06-05T11:28:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
230780
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१२३
104
110573
230781
2026-06-05T11:32:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ प्रकरण ९ वें जबलपूर काशी-रामेश्वर यात्रेची योजना व त्याची पूर्तता याबद्दल मी मना मध्यें जो दृश्यदर्शनक्रम धरला होता त्याप्रमाणें श्रवणबेलगोला किंवा दक्षिण काशी पाहिल..."
230781
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
प्रकरण ९ वें
जबलपूर
काशी-रामेश्वर यात्रेची योजना व त्याची पूर्तता याबद्दल मी मना मध्यें जो दृश्यदर्शनक्रम धरला होता त्याप्रमाणें श्रवणबेलगोला
किंवा दक्षिण काशी पाहिल्यावर माझा विचार हनुमानी मोठे उड्डाण मारून एकदम उत्तर हिंदुस्थानचें नाकेँ व मध्य प्रांतांतलें दुसरें मोठें शहर जबलपूर येथें जाण्याचा होता. कारण म्हैसूर संस्थानांतील प्रेक्षणीय स्थळांचें मीं एका स्वतंत्र पुस्तकांत वर्णन केलेच होतें; तसेंच वाटेंत लाग- •णाऱ्या नाशीक त्र्यंबकेश्वराचेही वर्णन मी आधींच केलें होतें. तेव्हां त्या प्रवासाच्या बाबतींत मारुतीची मोठी मंडूकप्लुती करून मुंबईहून बा. १९ मार्च सन १९३५ रोजी कलकत्ता मेलनें रात्री सव्वानवाला निघून दुसरे दिवशीं सव्वा दोन वाजतां मी जबलपुरास आलों व तेथे माझे विद्यार्थी मित्र प्रो. गंगू नाना कानेटकर यांचें येथें राहिलों.
जबलपूर हें हल्लीं एक मोठे वाढतें व भरभराटीचें शहर आहे. ते मध्य प्रांतांतील नागपुरच्या खालोखाल शहर असून त्याची लोकवस्ती दीड लाखाचे वर आहे. हैं शहर मी प्रथम सन १९०६ मध्यें पाहिलें होतें व नंतर आतां २९ वर्षांनीं त्याचें पुनर्दर्शन मला घडलें. या काळांत शह- राची किती तरी वाढ झालेली दिसली. जबलपुरच्या अर्वाचीन महत्त्वा प्रमाणें त्याचें पुरातन महत्त्वही मोठें आहे.
अमरकंटक पर्वताच्या पायथ्यापासून निघणारी नर्मदा नदी व बैतुल जिल्ह्यांतील मुलताई सरोवरांतून निघणारी तापी नदी या दोन नद्या एकमेकींना समांतर अशा पश्चिमेकडे वाहत जाऊन आरबी समुद्राला मिळतात. नर्मदा नदी विंध्य पर्वताच्या दक्षिण पायथ्याजवळून वहात जाते, तर तापी नदी सातपुडा पर्वताच्या दक्षिण पायथ्याजवळून वहात जाते.<noinclude></noinclude>
0j9h17af29p12ph65uyxm952pw3bsdk
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१२५
104
110574
230782
2026-06-05T11:34:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
230782
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
9wefuw01a447dkes16euz7nchbuqfan