विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.5
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१६
104
73582
230882
164694
2026-06-08T02:48:14Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230882
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop
|Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf
|Page = 516
|bSize = 395
|cWidth = 290
|cHeight = 167
|oTop = 41
|oLeft = 57
|Location = center
|Description =
}}
<br><br>{{rh|'''<big>२५.</big>'''||'''<big>स्वातंत्र्ययुद्ध : प्रेरणांची सीमांसा</big>'''}}<br><br>'''विषम संग्राम'''<br>{{gap}}औरंगजेबासारख्या महाबलाढ्य शत्रूशी उणीपुरी पंचवीस सव्वीस वर्षे मराठ्यांनी जो संग्राम केला त्याचे वर्णन मागल्या प्रकरणात केले. केवळ मराठ्यांच्याच नव्हे, तर अखिल भारताच्या इतिहासातसुद्धा हा संग्राम अद्वितीय ठरतो, असे इतिहातपंडित सांगतात. त्यांचे ते मत अगदी यथार्थ आहे, असे वाटते. सेतुमाधवराव पगडी यांनी म्हटल्याप्रमाणे, मोगलांचे आक्रमण हे एका बादशहाचे आक्रमण होते, तर मराठ्यांचा लढा हा जनतेचा लढा होता. मोगलांचे सर्व सेनापती, सरदार, हे मोठ्या खानदानी घराण्यातले होते, तर मराठ्यांचे सेनापती, सरदार हे मराठा, ब्राह्मण, प्रभू येथपासून रामोशी, बेरड, कोळी येथपर्यंत सर्व जाती-जमातीतून आलेले होते. म्हणजे हा संग्राम मुळापासूनच विषम संग्राम होता. म्हणूनच मोगलांना त्यात संपूर्ण अपयश आले आणि त्यांच्या साम्राज्यसत्तेला पायापासून हादरा बसला.<br>{{gap}}अशा या स्वातंत्र्य-संग्रामाचा अवश्य तो सर्व तपशील मागल्या प्रकरणात दिला आहे. आता येथे त्याची सर्व दृष्टींनी मीमांसा करावयाची आहे.<br><br>'''नेतृत्व'''<br>{{gap}}प्रथम या पंचवीस वर्षातल्या काळातल्या मराठ्यांच्या नेतृत्वाचा विचार करू. येथे नेतृत्व या शब्दाचा अर्थ केवळ युद्धनेतृत्व असा नाही, तर सर्व राष्ट्रीय नेतृत्व अशा व्यापक अर्थाने येथे विचार करावयाचा आहे. देशाच्या उत्कर्षाला अवश्य अशी अर्थव्यवस्था काय असावी, याच दृष्टीने धर्माचे स्वरूप काय असावे, समाज- रचनेच्या दृष्टीने आपल्या राष्ट्रात कोणत्या उणिवा आहेत, जनतेच्या राजकीय<noinclude></noinclude>
5q4kp2mneakgpd94930ow5dyjs7dtc0
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१७
104
73583
230883
164695
2026-06-08T02:52:03Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230883
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४८९|| प्रेरणांची मीमांसा}}</noinclude>आकांक्षा कोणत्या असाव्या, अनेकविध विद्यांचे महत्त्व काय, या सर्वांचा विचार, या दृष्टीने समाजाला प्रेरणा देणारे नेतृत्व ते व्यापक नेतृत्व होय. शिवछत्रपतींचे नेतृत्व तसे होते; हे त्यांच्या कर्तृत्वाचे विवेचन मागे केले त्यावरून दिसून येईल. त्या दृष्टीने पाहिले तर असा नेता या पंचवीस वर्षात आणि पुढेही महाराष्ट्राला मिळाला नाही हे। स्पष्ट दिसते. या काळात छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम, महाराणी ताराबाई या राजघराण्यातील व्यक्ती आणि रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी, परशुराम त्रिंबक, खंडोजी बल्लाळ, असे मंत्री, सरदार हे मराठ्यांचे नेते होते. यांच्यात शिवछत्रपतींच्या तोडीचा तर कोणी नव्हताच, पण तसे त्या जातीचे सर्वांगीण नेतृत्व करणाराही कोणी नव्हता, हे ध्यानात घेतले पाहिजे. शिवछत्रपतींच्या- सारखा युगपुरुष वरचेवर होत नसतो. पण त्या जातीचे थोडे कमी दर्जाचे नेतृत्वही मराठ्यांना लाभले नाही. त्यांनी असामान्य शौर्य गाजवून स्वातंत्र्ययुद्ध जिंकले, याबद्दल त्यांचा गौरव केला पाहिजे, यात शंका नाही. पण राष्ट्रीय नेतृत्वाच्या दृष्टीने ते कोठे उणे पडले याचीही चिकित्सा केली पाहिजे.<br><br>'''नवे कर्तृत्व'''<br>{{gap}}यांतील शंभुछत्रपतींच्या नेतृत्वाविषयी वर विचार केलाच आहे. त्यांनी चौफेर नजर राखून सर्व आघाड्यांवर औरंगजेबाशी लढा दिला, ही त्यांची कर्तबगारी फार मोठी होय. शिवाय, एकदा ते मोगलांना मिळाले होते, तसा मोह त्यांना पुन्हा झाला नाही, हे महाराष्ट्राचे महद्भाग्य म्हटले पाहिजे. तसे झाले असते तर सगळाच ग्रंथ आटोपला होता. पण तसा विचार त्यांच्या स्वप्नातही आला नाही. राज्यारोहण केल्यापासून मृत्यू येईपर्यंत, अत्यंत निर्धाराने, त्यांनी मोगलांविरुद्ध लढा केला आणि स्वराज्याचे रक्षण केले. पण याच्याही वर जाऊन राष्ट्रधर्माची प्रेरणा देऊन नवे कर्ते पुरुष त्यांना निर्माण करता आले नाहीत. जुन्यापैकी अनेक कर्ते पुरुष त्यांनी मारून टाकले आणि हंबीरराव मोहित्यांसारखे जे त्यांच्याशी एकनिष्ठ होते ते कालवश होताच मराठ्यांचा लढा ढिला पडला. आणि १६८६ सालापासून एकेक गड ढासळू लागला. मोगलांनी पुढल्या दोन-तीन वर्षात बहुतेक गड फितुरीने घेतले. राष्ट्रधर्माची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य छत्रपतींच्या ठायी असते तर असे घडले नसते. पण याहीपेक्षा एक गोष्ट मनाला खटकते ती ही की त्यांच्या वधानंतर रामचंद्रपंत अमात्यादी जे पाचसहा थोर नेते उदयास आले ते, शिवकालापासून स्वराज्यकार्य करीत असूनही, शंभुछत्रपतींच्या वेळी पराक्रम करू शकले नाहीत. शंभुछत्रपती हे उग्रप्रकृती होते, असे इतिहास सागतो. त्यांच्या या प्रकृतीमुळे शिवकालात उदयास येत असलेले कर्ते पुरुष दबकून राहिले, असे दिसते. आणि त्या स्वभावामुळेच नवे कर्तृत्व त्यांना निर्माण करता आले नाही.<br><noinclude></noinclude>
pkjosiyyr1ni0gkgo5rff7easl5h613
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१८
104
73584
230884
164696
2026-06-08T02:52:40Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230884
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४९०}}</noinclude><br>'''रामचंद्रपंत'''<br>{{gap}}त्यानंतर छत्रपती राजाराम गादीवर आले. त्यांच्या ठायी फारसे कर्तृत्व नव्हते, पण आपल्या उदार व त्यागी वृत्तीमुळे कर्ती माणसे एकठाय आणून त्यांची जूट काही काळ टिकविण्यात त्यांना बरेच यश आले. पण वरील काळात, लोकांत खरे चैतन्य निर्माण झाले ते शंभुछत्रपतींच्या अलौकिक आत्मबलिदानामुळे, हे मागे सांगितलेच आहे. यावेळी ज्या पाचसहा पुरुषांनी देशाची धुरा सांभाळली त्यांच्यांत रामचंद्रपंत अमात्यांचे स्थान मोठे आहे. या काळाचा खरा शास्ता हाच होता. स्वराज्यरक्षणाच्या सर्व योजनांची आखणी करावयाची आणि सर्व गुणी माणसे एका बंधनात ठेवून त्यांना कार्यान्वित करावयाचे हे शासकाचे फार मोठे कार्य रामचंद्रपंताने या वेळी केले. शिवछत्रपतींचे तत्त्ज्ञान व धोरण काय होते हे त्याने पुरे आत्मसात केले होते. त्यावर तर 'आज्ञापत्र' हा छोटासा ग्रंथच याने लिहिला होता. ते सर्व तत्त्वज्ञान त्याला त्या परिस्थितीत प्रत्यक्षात आणता आले नाही. पण ते पुढे ठेवूनच त्याने राज्यकारभार चालविला. यामुळेच मोगलांना कडवा प्रतिकार करण्यात मराठ्यांना यश आले. राजाराम महाराजांनी त्यांचा हाच गौरव केला आहे. 'त्यांनीही- रामचंद्रपंतांनी- निष्ठापूर्वक वर्तोन स्वामींचे राज्य तांब्राक्रांत झाले होते ते संपूर्ण यथापूर्व हस्तगत केले,' असे त्यांनी म्हटले आहे.<br>{{gap}}शासकीय कारभारात याच प्रकारचे कार्य शंकराजी नारायण व परशुराम त्रिंबक यांनी केले. मावळ भाग आणि औंध पन्हाळा भाग ही यांची कार्यक्षेत्रे होत. हे दोघेही रामचंद्रपंत अमात्य याच्याच हाताखाली प्रारंभी होते आणि आताही त्याच्याच हाताखाली काम करीत होते. परशुराम त्रिंबकाविषयी लिहिताना, 'परशुरामपंताने लोकांचे ठिकाणी स्वराज्याभिमान जागृत करून मिरजेपासून रांगण्यापर्यंतचा प्रदेश मोगलांपासून सोडविला,' असे नानासाहेब सरदेसाई यांनी म्हटले आहे. याविषयी अधिक तपशील मिळता तर बरे होते. असो. हे दोघे प्रशासनाप्रमाणेच रणांगणावरही मर्दुमकी गाजवीत. यामुळे त्या काळी त्यांचा उपयोग विशेष झाला.<br><br>'''संताजी'''<br>{{gap}}रणांगणावरचा अग्रेसर नेता म्हणजे संताजी घोरपडे हा होय. त्याच्या पराक्रमाचे वर्णन मागे केलेच आहे. त्याच्या योग्यतेविषयी लिहिताना नानासाहेब म्हणतात, 'विस्तीर्ण भूप्रदेशावर प्रचंड फौजा नाचवून शत्रूस हटकून गोत्यात आणणारा संताजी- एवढा कुशल सेनानी बहुधा क्वचित आढळतो. त्याचे हुकूम असंदिग्ध व सुटसुटीत असत. अवज्ञा करणारास तो निष्ठुर शासन करी. तो शिवाजीच्या शिस्तीत मुरलेला असून, तिचेच अनुकरण करण्याचा तो प्रयत्न करी. परंतु त्याचे चीज करणारा शिवाजीसारखा धनी त्यास मिळाला नाही ही दुःखाची गोष्ट आहे.'<br><noinclude></noinclude>
m2m7ohb8uyluz8s3fbc15g6wf7adrsf
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१९
104
73585
230885
164697
2026-06-08T02:54:13Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230885
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४९१|| प्रेरणांची मीमांसा}}</noinclude><br>'''धनाजी'''<br>{{gap}}धनाजी जाधव हा असाच मोठा सेनापती होता. औरंगजेब मराठ्यांचे किल्ले घेण्याच्या उद्योगात असताना, मोगलांची रसद तोडणे, त्यांचा खजिना लुटणे, त्यांच्या वाटा रोखणे, त्यांच्या लहान लहान तुकड्या गारद करणे, त्यांना हुलकावीत नेऊन शेकडो कोसांची धावपळ करावयास लावणे, असे गनिमी युद्ध करून त्याने मोगलांना दे माय धरणी ठाय करून टाकले. संताजीच्या मृत्यूनंतर दहा वर्षे पर्यंत धनाजीनेच आपल्या रणकौशल्याने मराठ्यांना जय मिळवून दिला.<br>{{gap}}नेमाजी शिंदे, हणमंतराव निंबाळकर या दोन सरदारांनीही या स्वातंत्र्ययुद्धात संताजी- धनाजींच्या खालोखाल पराक्रम केला आहे. नेमाजी शिंदे, खानदेश, वऱ्हाड, माळवा या भागात सतत संचार करून, मोगली लष्करावर हल्ले चढवीत असे. सय्यद हसन अलीखान, शर्जाखान असे सरदार त्याने पाडाव केले आणि १७०४ मध्ये नर्मदा ओलांडून सिरोंजपर्यंत धडक मारली. हणमंतराव निंबाळकर प्रथम मोगलांच्या पदरी होता. १६९२ साली तो मराठ्यांना मिळाला. पण मग त्याने मोठाच पराक्रम केला. त्याचा मोगलांना इतका धाक होता की त्याचा मृत्यू (१७०५) हे मोगलांचे महद्भाग्य होय असे त्या काळचा इतिहासकार भीमसेन सक्सेना याने म्हटले आहे.<br><br>'''वतन लोभ'''<br>{{gap}}मराठ्यांनी असा हा असामान्य पराक्रम केला आणि स्वातंत्र्यसंग्राम जिंकला, याचा गौरव आपण वर केलाच आहे. पण आता याची दुसरी बाजू पाहिली पाहिजे. मराठ्यांनी हा जो पराक्रम केला त्याच्या मागे वतनाचा लोभ ही फार मोठी प्रेरणा होती. शिवछत्रपतींचे वतनाविषयी काय धोरण होते हे मागे सांगितलेच आहे. त्यांनी जुनी वतने फारशी खालसा केली नाहीत. पण नवा वतनदार वर्ग निर्माण होऊ द्यावयाचा नाही, असा कटाक्ष ठेवला होता. आणि त्यांनी केलेले बहुतेक कर्ते पुरुष रोख पगार घेऊनच कार्य करीत असत. स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रभक्ती हे भाव जागृत करून शिवछत्रपतींनी त्यांना वतनलोभ जिंकावयास शिकविले होते. पण या भावनांचा आदर्श समोरून नाहीसा होताच मराठ्यांच्या ठायींची सुप्त वतनासक्ती उफाळून वर आली. आणि राष्ट्रभक्ती वाऱ्यावर सोडून देऊन अनेक मराठे वतने वाचविण्यासाठी व मिळविण्यासाठी मोगलांना जाऊन मिळाले.<br>{{gap}}याविषयी लिहिताना सेतुमाधवराव पगडी म्हणतात, मोगलमराठा संघर्षकाळात देशमुख, देसाई, पाटील, कुळकर्णी इ. वतनदारांनी मोगलांच्या समोर माना वाकवून आपली वतने टिकविली; इतकेच नव्हे तर वतनापायी ते स्वकीयांशी लढलेही. मराठ्यांची सरशी झाली की त्याच्याकडे जाऊन आपल्या वतनाच्या सनदा ते बहाल करून घेत. आणि मोगलांची सरशी झाली की त्यांच्याकडून सनदा घेत. त्यांच्या<noinclude></noinclude>
9ryiy0jtcmmhgr12bswkd6h203j6kbi
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२०
104
73586
230886
164698
2026-06-08T02:54:25Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230886
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४९२}}</noinclude>कैफियती पाहता, त्यांना फक्त आपल्या वतनाची काळजी होती, असे वाटल्यावाचून राहात नाही.<br><br>'''फितुरी'''<br>{{gap}}मसूरच्या जगदाळ्याचे उदाहरण प्रसिद्ध आहे. १६८७ साली महादजी जगदाळे याने संभाजी महाराजांच्याकडून मसूरची देशमुखी कायम करून घेतली. १६८९ साली त्या भागात मोगल येताच त्याने मोगलांची ताबेदारी पतकरली. १६९० साली संताजी घोरपडे याने महादजीला पकडले. पण तेथून सुटल्यावर त्याने जिंजीला जाऊन राजाराम महाराजांकडून देशमुखीची सनद परत मिळविली. आणि १६९९ साली अशाच कारणाने तो परत मोगलांना मिळाला. जेध्यांची गोष्ट अशीच आहे. १६८३ मध्ये बाजी सर्जेराव जेधे वतनरक्षणासाठी मोगलांना मिळाला. त्यावर संभाजी महाराजांनी रागावून त्याला पत्र लिहिले. तेव्हा तो परत नीळकंठ मोरेश्वर पेशवे यांपाशी रुजू झाला. पण महाराजांच्या मृत्यूनंतर खोपडे व वतनदारामागोमाग जेधेही मोगलांना मिळाला. नंतर १६९० साली पुन्हा मराठ्यांना आणि १७०२ साली पुन्हा मोगलांना मिळाला. म्हसवडचा नागोजी माने हा १६८३ पूर्वीच मोगलांना मिळाला. नंतर काही काळ मराठ्यांच्याकडे येऊन पुन्हा तो मोगलांकडे गेला.<br>{{gap}}वतनासक्तीमुळे झालेल्या फितुरीची ही ठळक उदाहरणे झाली. कान्होजी व गणोजी शिरके, यशवंतराव दळवी, रायभानजी भोसले, सखाजी डफळे, शंकराजी मल्हार ही अशीच आणखी उदाहरणे आहेत. १६८६ नंतर साल्हेर, रामसेज हे किल्ले मोगलांनी घेतले ते बहुतेक फितुरीने घेतले हे मागे सांगितलेच आहे या सर्वावर कळस चढविला तो सूर्याजी पिसाळाने. त्याने महाराणी येसूबाई, बालराजे शाहू यांसकट रायगड ही राजधानीच मोगलांच्या स्वाधीन केली आणि नंतर तो स्वधर्मत्याग करून मुसलमानही झाला.<br><br>'''विडी पेटते'''<br>{{gap}}पण फितुरीची ही साथ अशा ठळक उदाहरणांपुरतीच मर्यादित नव्हती. ती खोलवर भिनत गेली होती. औरंगजेबाचा मुक्काम तुळापुरास असताना त्याच्या महसूल अधिकाऱ्यांनी देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी इ. वतनदार मंडळींचा, दवंडी पिटून, जमावच छावणीत जमविला. खेड्यांचे, परगण्यांचे, प्रांतांचे वसुलीचे कागद, हक्कासंबंधीचे कागद, जमाबंदीचे कागद हे सर्व घेऊन ही वतनदार मंडळी बादशहाकडे आली आणि आपापले हक्क, वतने यांच्या सदना त्यांनी बादशहाकडून घेतल्या. याचा अर्थ असा की या वतनदारांनी मराठी राजाची सत्ता टाकून औरंगजेबाची सत्ता मान्य केली. आणि याच वेळी, याच छावणीत महाराणी येसूबाई व शाहू यांना कैद करून आणण्यात आले होते. त्या महाराणीची व बालराजांची- त्यांच्यावरील आपत्तीची- कसलीही लाज यांना नव्हती. म्हणूनच सेतुमाधवराव पगडी यांनी या<noinclude></noinclude>
4ez20qlzrkhvxvcp86h6rv1g26oa83i
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२१
104
73587
230887
164700
2026-06-08T02:55:02Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230887
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४९३|| प्रेरणांची मीमांसा}}</noinclude>मजकुराच्या परिच्छेदाला 'यांची पेटते विडी' असा मथळा दिला आहे. (इतिहासाच मागोवा, पृ. ५१)<br><br>'''अंदाधुंदी'''<br>{{gap}}बहुसंख्य वतनदारांची ही निष्ठाहीन स्वत्वशून्य वृत्ती पाहताच, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण आणि स्वतः छत्रपती राजाराम यांनी वतनाविषयीचे शिवछत्रपतींचे धोरण नाइलाजाने सोडून दिले. कारण या पेटत्या विडीने सर्व स्वराज्याचीच राख होण्याची वेळ येऊन ठेपली होती. म्हणून, जो पराक्रम करील त्याला वतन मिळेल, असे त्यांनी जाहीर करून टाकले. मराठ्यांनी पुढे जो पराक्रम केला त्याच्यामागे ही प्रमुख प्रेरणा होती. शिवाजी महाराजांनी ज्यांची वतने खालसा केली होती त्यांना ती रामचंद्रपंताने परत दिली आणि 'जो कोणी वतनदार एकनिष्ठा धरून गडकोट हस्तगत करून देईल, या राजाचे ठायी दृढनिष्ठा धरील आणि स्वामीकार्य करून देईल, त्यास इसाफती व वतनभाग चालला असेल तेणे प्रमाणे दुमाला करून लिहोन पाटविणे' असे धोरण ठेविले. यवोदरप्रमाण भूमीसुद्धा कोणाला वतन म्हणून देऊ नये, असे 'आज्ञापत्रा'त रामचंद्रपंताने लिहिले आहे. पण परिस्थितीपुढे त्यास वाकावे लागले. मराठ्यांच्या पराक्रमास उत्तेजन देण्यास तोच एक मार्ग होता. मोगल मुलखातील जो परगणा जो मराठा गडी जिंकील तो त्याला इनाम मिळेल, असे जाहीर झाल्यामुळे शेकडो, हजारो मराठे हातात तलवार घेऊन, घोड्यावर मांड टाकून, धावू लागले. असे करून, त्यांनी मोगलांना धुळीस मिळविले, हे खरे. पण स्वराज्यनिष्ठा ही त्यामागची प्रेरणा नसून वतनलोभ ही असल्यामुळे, प्रचंड गोंधळ उडाला आणि मराठी राज्यातली शिस्त, व्यवस्था कायमची नष्ट झाली.<br><br>'''शिस्त संपली'''<br>{{gap}}थोडी कोठे धनलाभाची अशा दिसू लागली तर लोक किती अनन्वित कृत्ये करतात, फसवणुकी, लबाड्या आणि अत्याचार करतात हे सर्वांना माहीतच आहे. येथे तर वंशपरंपरा मिळणाऱ्या वतनाचा प्रश्न होता. आणि कडक असे शासन कोठेच नव्हते. प्रत्यक्ष कारभार विशाळगडावरून रामचंद्रपंताने करावयाचा आणि वतने जागिरी, पदव्या यांच्या सनदा, फर्माने राजाराम महाराजांनी जिंजीहून द्यावयाची. त्यामुळे सर्वत्र अंदाधुंदी माजली. सरदेसाई लिहितात, कोणाची कोणास दाद राहिली नाही. पाहिजे त्याने उठावे, घटकेत बादशहाकडे जावे, घटकेत रामचंद्रपंत, शंकराजी नारायण यांच्याकडे, तर घटकेत जिंजीला ! खरे बोलावे, खोटे बोलावे, अडचण दाखवून कागद करून घ्यावे, स्वार्थ साधताना कोणतेही अपकृत्य करण्यास कचरू नये, असा अव्यवस्थित कारभाराचा मामला दहावीस वर्षे सारखा चालला. त्यामुळे जी शिस्त मराठी राष्ट्रात शिवाजीने निर्माण केली ती या अंदाधुंदीच्या काळात पार नाहीशी झाली.<br><noinclude></noinclude>
7whpwkoea7y4fkmuq4tsjkr28ynlry5
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२२
104
73588
230888
164701
2026-06-08T02:55:19Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230888
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४९४}}</noinclude><br><br>'''फक्त स्वार्थ'''<br>{{gap}}पण एवढ्याने भागले नाही. शंकराजी नारायण, सुंदर तुकदेव, संताजी घोरपडे, धनाजी जाधव हे सरदार या वतनांच्या बाबतीत मन मानेल तशी ढवळाढवळ करू लागले, एकाच वतनासाठी ते परस्परविरोधी पक्ष घेऊ लागले. त्यामुळे त्यांच्यात तट पडले. कलह माजले, काही वेळा तर खऱ्याखोट्याची लाज लोकांनी इतकी सोडली की एकाच वतनाच्या अनेकांना सनदा मिळू लागल्या. रामचंद्रपंतास काही सुचेनासे झाले. जिंजीहून सनदा येत, त्यांचा त्याला मेळच चालता येईना. बरे, छत्रपतींचा हुकुम तर मानला पाहिजे. मग काही तरी करून तो निभावणूक करू लागला. मिळून काय तर जागीर कोणास तोडून द्यावयाची नाही, असा शिवाजीचा कडक नियम लयास जाऊन, मराठी राज्याचे नुकसान झाले. मराठ्यांनी आपत्प्रसंगी बादशहात विरोध केला. पण तेवढ्याने खरी राष्ट्रीय भावना लोकांच्या मनात उत्पन्न झाली असे नाही. जो तो स्वार्थाकरिता धडपडत होता. महाराष्ट्रीयांचा हा स्वभावच बनला. लालुचीशिवाय ते हलत नाहीत. स्वदेश, स्वराज्य यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे, असे एकाच्याही मनात येत नव्हते. मोबदला घेतल्याशिवाय एकही इसम हालत नव्हता. शिवाजीच्या वेळची राष्ट्रीय भावना यावेळी अगदी मावळली. (स्थिरबुद्धी राजाराम, पृ. ९२- १००)<br><br>'''भालेराई'''<br>{{gap}}आणि यातूनच महाराष्ट्रात भालेराई म्हणतात ती निर्माण झाली. मोगलांनी एखादे ठाणे हस्तगत केले की चार मराठा गड्यांनी जमून, भाले घेऊन जमाव करावा आणि ते ठाणे परत घेऊन लूट करावी आणि पोट भरावे. ना कोणी विचारता, ना नियंता. या अरेरावीमुळे मोगलांस तात्पुरता आळा बसला, पण देशात निर्यायकी निर्माण झाली. रामचंद्रपंत, प्रल्हाद निराजी हे नेते मराठ्यांचा जम बसवू लागले, तेव्हा त्यांच्याच पक्षातील या बिनशिस्ती उपटसुंभांचा त्यांना मोठा उपद्रव होऊ लागला. भालेराई ती हीच. भालेराई म्हणजे अव्यवस्था, अराजक. वतनलोभामुळे ज्याप्रमाणे समाज विघटित झाला तसाच या भालेराईमुळेही झाला.<br><br>'''दुही-यादवी'''<br>{{gap}}वतनलोभ, त्यामुळे स्वत्वशून्यता, त्यातूनच उद्भवलेली फितुरी आणि बेशिस्त असे फार मोठे दुर्गुण मराठ्यांच्या ठायी या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात निर्माण झाले व मूळचे दबलेले फिरून उफाळून वर आले. पण याहीपेक्षा जास्त घातक असा दोष म्हणजे दुही आणि तीतूनच निर्माण झालेली यादवी हा होय वतनलोभावर छत्रपतींनी त्वरित उपाययोजना केली. वतने सर्रास देऊन त्यांनी मराठ्यांना प्रतिकाराला सिद्ध केले. हा उपाय दोषलिप्त होता हे खरे. पण त्यामुळे सर्व महाराष्ट्र मोगलांविरुद्ध उभा ठाकला<noinclude></noinclude>
6dz5r5alfhya88mfn6imx3hli5hiy4h
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२३
104
73589
230889
164713
2026-06-08T02:55:32Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230889
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४९५|| प्रेरणांची मीमांसा}}</noinclude>आणि त्याने स्वराज्य जिवंत ठेवले हा लाभ काही थोडा झाला नाही. पण दुहीमुळे आणि यादवीमुळे मराठ्यांचा प्रतिकारच मोडून पाडण्याची वेळ आली होती.<br><br>'''दुही हीच प्रकृती'''<br>{{gap}}जगाचा एकंदर इतिहास पाहता दुही, फुटीरपणा, विघटनवृत्ती हीच समाजाची मूल प्रकृती आहे असे दिसते. त्यामुळे जो समाज एकजूट, संघटना करतो तो सर्वत्र विजयी होतो. युरोपात ब्रिटन परमोत्कर्ष पावले त्याचे एक कारण म्हणजे त्याने केलेली एकतेची उपासना. ब्रिटनचे हे यश इतके अपूर्व आहे की इतिहासपंडित जगातला तो एक चमत्कार मानतात. अलीकडच्या काळात जपान हे तसे राष्ट्र आहे. पण एकंदर इतिहासात हे अपवादच मानावे लागतात. आपल्या चालू मध्ययुगीन काळातल्या भारताचा विचार केला तर काय दिसेल ? रजपूत एवढे पराक्रमी, ध्येयवादी, तेजस्वी; पण त्यांना संबंध राजस्थान संघटित करणे कधीही साध्य झाले नाही. त्यामुळे त्यांचे सर्व सद्गुण मातीमोल झाले. शिखांची तीच अवस्था. त्या मानाने विजयनगरला पुष्कळच यश आले. शिवछत्रपतींच्या आधी तीनशे वर्षे मराठे छिन्नभिन्न स्थितीत होते. छत्रपतींनी या समाजाला संघटित करताच महाराष्ट्रात स्वराज्य आले. ती संघटनवृत्ती त्यांच्या मागे त्या प्रमाणात टिकली नाही. म्हणून मराठ्यांना अपेक्षेइतके उज्वल यश आले नाही.<br><br>'''दोन पक्ष'''<br>{{gap}}शिवछत्रपती जाताच प्रथम सोयराबाई व संभाजी असे दोन पक्ष पडले. त्यामुळे अनेक कर्ती माणसे व्यर्थ प्राणास मुकली. संभाजी महाराजांनी फार अल्पावधीत प्रतिपक्ष निष्प्रभ करून टाकला. त्यामुळे पुष्कळच सावरले. पण ध्येयवाद, राष्ट्रभावना ही जी संघटनेची प्रेरक तत्त्वे त्यांचे संस्कार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नसल्यामुळे अल्पावधीतच विघटनेला सुरुवात झाली. पुढे त्यांच्या धीरोदात्त मृत्यूमुळे आणि महाराणी येसूबाई व छत्रपती राजाराम यांच्या विवेकी त्यागवृत्तीमुळे ऐक्यबंधन पुन्हा सजीव झाले. आणि रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी या कर्त्या पुरुषांनी एकजुटीने कार्य करून स्वराज्याचे रक्षण केले. १६९० ते १६९५ या सहा वर्षात मराठ्यांनी जो अद्भुत पराक्रम केला त्याचे श्रेय या नेत्यांच्या ऐक्यवृत्तीलाच आहे. पण दुर्दैवाने या ऐक्याला तडे जाऊ लागले आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होऊ लागले. संताजी व धनाजी हे जे स्वराज्याचा गाडा ओढणारे नरपुंगव, त्यांच्यांतच भेद पडला आणि या दोघा वीरांचे सामर्थ्य शत्रूच्या निर्दाळणास उपयोगी पडावयाचे ते एकमेकांशी झुंजण्यात वाया जाऊ लागले.<br>{{gap}}या दोघांमधे वितुष्ट येण्याचे मुख्य कारण म्हणजे सेनापतिपदाविषयीची दोघांची आकांक्षा हे होय. धनाजीला ते पद हवे असताना, राजाराम महाराजांनी ते संताजीला<noinclude></noinclude>
at43mo60wts2t6yoph06yzur5b8f9fg
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२४
104
73590
230890
164714
2026-06-08T02:56:26Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230890
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४९६}}</noinclude>दिले आणि येथूनच दुराव्याला सुरुवात झाली. दुसरे कारण म्हणजे त्या दोघांचे स्वभाव. संताजी हा शिस्तीचा कडक भोक्ता होता. लष्करातली शिवछत्रपतींची स्त्रियांविषयीची, लुटीविषयीची शिस्त काटेकोरपणे पाळली पाहिजे, असा त्याचा कटाक्ष होता. बेशिस्त माणसाला तो कडक शिक्षा करी, केव्हा केव्हा हत्तीच्या पायाशी देई. या उलट धनाजी होता. तो शूर, पराक्रमी व कुशल सेनानी होता. पण शिस्तीच्या बाबतीत ढिला असे. याचा परिणाम असा झाला की संताजीचे लोक त्याच्यावर रुष्ट असत व त्याला सोडून धनाजीकडे येत. यामुळे वैमनस्य आणखी वाढे. वतने देण्याच्या बाबतीत संताजी व धनाजी पुष्कळदा दोन भिन्न वतनदारांचे पक्ष येत. त्यावरून वाकडेपणा जास्तच होई.<br>{{gap}}हे प्रकरण विकोपाला गेले. त्याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे संताजीचा एककल्ली व काहीसा उद्धट स्वभाव. राजाराम महाराजांशी सुद्धा तो भांडण करी, मतभेद तीव्रतेने बोलून दाखवी. 'स्वामींच्या समोर मुद्दे घालू नयेत' असे शंकराजी नारायण याने त्याला परोपरीने समजावून सांगितले, तेवढ्यापुरता तो दबे. पण पुन्हा मूळपदावर येई. राजाराम महाराजांना त्याचे ते वर्तन अगदी असह्य झाले आणि शेवटी त्यांनी त्याचे सेनापतिपद काढून धनाजीला दिले. यावेळी राजाराम महाराजांच्या मनात धनाजीने भरवून दिले की संताजी उद्दाम झाला आहे. त्याला मृत्यूची शिक्षा दिली पाहिजे. रामचंद्रपंताला लिहिलेल्या पत्रात राजारामांनी स्वच्छच लिहिले आहे की 'संताजी घोरपडे यांनी स्वामीचे पायाशी हरामखोरी केली आहे. यास्तव त्यास सेनापतिपदावरून दूर केले आहे.'<br><br>'''यादवी'''<br>{{gap}}याच प्रकरणाचा शेवटी विपरीत परिणाम होऊन संताजी व धनाजी यांची जिंजीच्या उत्तरेस आयेवारकुटी येथे प्रत्यक्ष लढाईच झाली. पुढे संताजीचे लोक त्याला हळू- हळू सोडून गेले. आणि तो रानोमाळ भटकू लागला. आणि अशातच नागोजी माने याने त्याचा खून केला. आणि त्याचे शिर बादशहाकडे पाठवून शाबासकी मिळविली. नागोजी मान्यांचा मेहुणा अमृतराव निंबाळकर याला संताजीने हत्तीच्या पायी दिले होते. म्हणून त्याचा त्याने असा सूड उगवला. पण या प्रकरणात एकटा तोच दोषी होता असे नाही. संताजीला पकडून आणावे असा राजारामांनी हुकूमच दिला होता. आणि संताजीचा धनाजी पाठलाग करीत होता. काही कागदपत्रातले उतारे देऊन सरदेसाई यांनी असे दाखवून दिले आहे की संताजीला नाहीसा करण्यात छत्रपती, धनाजी व इतर काही सरदार यांचाही हात होता.<br>{{gap}}मुकर्रबखान, लुत्फुल्लाखान, सर्जाखान, कामिमखान, झुल्फिकारखान, अलोमर्दाखान अशा मोठमोठ्या मोगल सेनापतींना ज्याने नामोहरम केले, मोगली लष्कर अनेकवार धुळीस मिळविले, औरंगजेबाचे सारे मनोरथ ढासळून टाकण्याचे बव्हंशी श्रेय ज्याला आहे, त्या थोर सेनापती संताजीचा स्वकीयांकडून खून व्हावा यापेक्षा<noinclude></noinclude>
gz0l24m9xg1osopixux3p1cf5k1u6q2
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२५
104
73591
230891
164715
2026-06-08T02:56:38Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230891
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४९७|| प्रेरणांची मीमांसा}}</noinclude>दुर्दैव ते काय ? मराठ्यांना ही अत्यंत लांछनास्पद गोष्ट झाली. याचे कारण पाहता एक गोष्ट स्पष्ट दिसते की या वेळी राष्ट्राला एक शास्ता असा नव्हता. सगळे मालक व सगळे नोकर अशी स्थिती होती. आणि राष्ट्रीय उत्कर्ष हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून कोणी वागत नव्हते. मानापमान, खाजगी द्वेष, सूडभावना, मत्सर, स्वार्थ याच प्रेरणांनी प्रमुख माणसे वागत होती. मोठ्या ध्येयासाठी या भावनांना आवर घालावा, आणि राष्ट्रीय ऐक्य अभंग राखावे हे संस्कार मराठी मनात कधी खोल रुजलेच नाहीत.<br>{{gap}}यामुळेच एक लढाई व खून होण्यावर हे प्रकरण संपले नाही. संताजीचे पुत्र, बंधू पुतणे यांचा धनाजीशी दावा चालूच राहिला. इ. स. १७०० साली घोरपडे व धनाजी यांची ब्रह्मपुरीनजीक लढाई होऊन घोरपड्यांचा मोड झाला. पुन्हा एक लढाई १७०१ साली नीरेजवळ होऊन तीत धनाजीचा पराभव झाला. सुदैव असे की या लढाईनंतर धनाजीने घोरपड्यांची भेट घेऊन सख्य केले. त्यामुळे मग संताजीचे पुत्र राणोजी व पिराजी यांनी पुढे स्वराज्यात चांगली कामगिरी केली.<br><br>'''मूळ स्वभावधर्म'''<br>{{gap}}पण विवेक, समंजसपणा, राष्ट्रहितबुद्धी यांचा प्रभाव पडून दुही सांधण्याचे असले प्रकार अपवादात्मकच होत. खालच्या बाजूला वाहात जाणे हा जसा पाण्याचा स्वभावधर्म तसाच विघटित होणे, फुटणे हा बहुतेक सर्व मानवी समूहांचा स्वभावधर्मच होय. या काळात मराठ्यांची तीच स्थिती होती. घोरपडे आणि जाधव यांनी आपली वैरे विसरून परस्परांत स्नेहभाव प्रस्थापित केला. पण त्याच सुमारास राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. आणि वारसाच्या प्रश्नावरून महाराणी ताराबाई यांनी भोसल्यांच्या राजघराण्यात दुहीची बीजे पेरून मराठ्यांच्या स्वराज्याची एकता कायमची भंगून टाकली. शाहूराजांचा गादीवर कसलाही हक्क नाही, माझा मुलगा शिवाजी यालाच गादी मिळाली पाहिजे, असा हट्टाग्रह तिने मांडला व त्यामुळे रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, परशुराम त्रिंबक, धनाजी यांच्यातच दोन तट पडले, हे मागे सांगितलेच आहे. धनाजी व रामचंद्रपंत यांना हे मान्य नव्हते. पण शंकराजी व परशुराम त्रिंबक यांना ताराबाईंनी आपल्या पक्षाला वळवून घेण्यात यश मिळविले. सुदैव एवढेच की रामचंद्रपंत व धनाजी यांनी सवतासुभा मांडला नाही, आणि राज्यरक्षणाच्या कामातून अंगही काढून घेतले नाही. पण रामचंद्रपंताचे कर्तृत्व पहिल्यासारखे पुन्हा केव्हाही दिसले नाही हे खरे आहे.<br><br>'''कपटपत्रे'''<br>{{gap}}अमात्य आणि परशुराम त्रिंबक यांच्यात दुरावा निर्माण होण्याचे आणखी एक कारण म्हणजे औरंगजेबाची कपटविद्या. बादशहाने या दोघांना स्वातंत्रपणे पत्रे लिहिली. त्यांत, 'तुम्ही आमच्या पक्षाला येण्याची इच्छा प्रगट केली, याचा आम्हांला संतोष<noinclude><br>{{gap}}३२</noinclude>
bzrablzzcvx7as1he1ts6atgziga8mb
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२६
104
73592
230892
164716
2026-06-08T02:56:51Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230892
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४९८}}</noinclude>आहे, यासंबंधीच्या तुमच्याअटी आम्हाला मान्य आहेत', असा मजकूर लिहून, एकाचे पत्र दुसऱ्याच्या हाती पडेल, अशी व्यवस्था केली. यामुळे या दोघांची मने काही काळ कलुषित झाली होती. ताराबाईच्या योजनेला रामचंद्रपंतांनी विरोध केला, तेव्हा तिने त्याच्यावर औरंगजेबाला सामील असल्याचा आरोप केला होताच. त्यात या पत्राची आणखी भर पडून त्या दोघांच्या मनावरचे तणावे वाढतच गेले. तरीही ही माणसे स्वराज्यनिष्ठ राहिली, पुढल्या सात वर्षांच्या काळात महाराणी ताराबाई यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाला सर्वतोपरी साह्य केले. म्हणूनच मराठ्यांना ते युद्ध जिंकता आले. पण तो संग्राम संपला, औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि अजमशहाने मुक्त केल्यावर शाहूराजे परत आले, त्या वेळी मात्र राजघराण्यातील व कर्त्या पुरुषांतील दुही सांधण्यास कोणीच समर्थ झाला नाही आणि मराठ्यांचे स्वराज्य कायमचे पंगू होऊन बसले.<br><br>'''राष्ट्रभाव शून्य'''<br>{{gap}}शाहू राजे परत आले, त्यानंतर मराठमंडळात जी दुही माजली ती फार भयंकर होती. तिच्यातून हे राज्य सावरेल असे त्या वेळी कोणासच वाटत नव्हते. कारण त्या दुहीतून फार घातक अशी फितुरी निर्माण झाली. धनाजी जाधवाच्या मागून त्याचा मुलगा चंद्रसेन जाधव हा काही काल ताराबाईकडे राहतोसे दाखवून पुढे मोगलांना जाऊन मिळाला. आणि त्याच्या मागोमाग दमाजी थोरात, रावरंभा निंबाळकर, घोरपडे, खटावकर असे बडेबडे मराठे सरदार मोगलांना जाऊन मिळाले. म्हणजे काही सरदार शाहूकडे व काही ताराबाईकडे अशा दुहीवर भागले नाही तर दोघांनाही सोडून सेनापतीसकट बहुतेक प्रमुख मराठे सरदार, स्वातंत्र्ययुद्ध जिंकलेले असतानाही, मोगलांना जाऊन मिळाले. आणि त्यांनी छत्रपतींनी निर्माण केलेली राष्ट्रभावना शून्यावर आणून ठेविली. स्वराज्य, स्वधर्म यांचे अद्वैत है समर्थांच्या व शिवछत्रपतींच्या धर्माचे मूलतत्त्व होते. त्याची अल्पसुद्धा, पुसटसुद्धा, जाणीव मराठ्यांना स्वातंत्र्ययुद्ध जिंकल्यावरही राहू नये ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट होय. असो. हा पुढचा स्वातंत्र्ययुद्धानंतरचा इतिहास आहे. त्याचे सविस्तर विवेचन पुढच्या कालखंडात येईलच. येथे आता स्वातंत्र्ययुद्धाच्या कालखंडातील संस्कृतीच्या इतर एकदोन अंगांचे विवेचन करून हे प्रकरण संपवू.<br>{{gap}}या युद्धकालातली मराठ्यांची युद्धविद्या आणि त्या वेळची वतनदारी व सरंजामदारी यांचे विवेचन वर सविस्तर केले आहे. आता त्या काळची राज्यव्यवस्था व धर्मव्यवस्था कोणत्या स्वरूपाची होती ते पाहू.<br><br>'''राज्यव्यवस्था'''<br>{{gap}}शंभुछत्रपतींनी शिवछत्रपतींची अष्टप्रधान व्यवस्था उधळून देऊन सर्व कारभार<noinclude></noinclude>
6l8qeye29xvee5n17opfc0sklm0n0ec
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२७
104
73593
230893
164717
2026-06-08T02:57:04Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230893
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४९९|| प्रेरणांची मीमांसा}}</noinclude>कलुषाच्या स्वाधीन केला असा एक रूढ समज आहे. पण तो खरा नाही. त्यांनी राजद्रोही अशा प्रधानांना देहांत शासन दिले हे खरे. पण अष्टप्रधान व्यवस्था त्यांनी मोडून टाकली, असा याचा अर्थ नाही. ती व्यवस्था त्यांनी पहिल्याप्रमाणेच पुढे चालविली होती. मोरोपंत पेशव्यांचा मुलगा निळो मोरेश्वर यास त्यांनी पित्याचे पेशवेपद दिले. त्या पदावर तो शाहूच्या आगमनापर्यंत होता. रघुनाथ नारायण हणमंते कर्नाटकातून आला. त्याला त्यांनी अमात्यपद दिले आणि त्यांच्यामागून त्यांचा मुलगा नारोपंत याची त्यावर नियुक्ती केली. रामचंद्रपंतास सचिवपदी नेमले. प्रल्हाद निराजी यालाच न्यायाधीशाची जागा दिली. दत्ताजी त्रिमळ यास मंत्रिपद दिले. हंबीरराव मोहिते हे सेनापती होतेच. त्याच्या मागून महादजी पानसंबळ त्या जागी आला आणि तोही अल्पावकाशात मृत्यू पावल्यामुळे संताजी घोरपडे यांची तेथे नेमणूक झाली. खंडो बल्लाळ यास चिटणिशी सांगण्यात आली. अगदी नवीन असे प्रधानपद म्हणजे छंदोगामात्याचे. त्या पदी कविकलश याची नेमणूक करण्यात आली.<br><br>'''कविकलश-वर्चस्व'''<br>{{gap}}यांतील कविकलश किंवा कवजी याच्याबद्दल अनेक प्रवाद आजपर्यंत रूढ होते. तो मोंगलाच्या तर्फेच आलेला होता, त्यांना तो आतून फितूर होता, मद्य व स्त्री ही व्यसने त्यानेच संभाजीराजांना लावली आणि शेवटी त्यांना पकडून देण्याची कामगिरीही त्यानेच केली, अशी त्याची प्रतिमा बखरीमुळे जनमानसात इतके दिवस उभी होती. पण या त्याच्या वर्णनात सत्यांश मुळीच नाही, तो छत्रपतींचा एकनिष्ठ सेवक होता, असे अलीकडच्या संशोधकांनी कागदपत्रांच्या साह्याने सिद्ध केले आहे.<br>{{gap}}पण अलीकडच्या संशोधकांनी त्याची केलेली वर्णने वाचून कविकलश हा कोणी विशेष कर्तबगार पुरुष होता, असे मुळीच दिसत नाही. मोरोपंत पिंगळे, अनाजी दत्तो, प्रतापराव गुजर, नेताजी पालकर इ. पुरुषांचे कर्तृत्व ठळकपणे डोळ्यांत भरते, तसे कविकलशाचे भरत नाही. आणि अशाही स्थितीत त्याला मोठा अधिकार दिला गेल्यामुळे आणि हळूहळू त्याचे वर्चस्व राज्यकारभारात वाढत गेल्यामुळे, रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी यांच्या कर्तबगारीला अवसर मिळाला नाही आणि इतर कोणी नवे कर्तबगार पुरुष उदयाला आले नाहीत. वर अनेक वेळा सांगितले आहे की शंभुछत्रपतींना नवे कर्ते पुरुष निर्माण करता आले नाहीत, त्याच्या अनेक कारणांपैकी हे एक मोठे कारण असावे, असे निश्चित वाटते. वर निर्देशिलेले सर्व कर्ते पुरुष शिवछत्रपतींच्या हाताखाली होते. राजारामांच्या काळी त्यांनी फारच मोठा पराक्रम केला, हे महशूरच आहे. तरी शंभुछत्रपतींच्या काळी ते निस्तेजच राहिले याचे, कविकलशाचे अवाजवी वर्चस्व, हे कारण असले पाहिजे, असे सहज मनात येते.<br>{{gap}}छत्रपती राजाराम यांनी अधिकारग्रहण केल्यानंतर जिंजीला अष्टप्रधानांची नव्याने नेमणूक करण्यात आली. त्यात प्रतिनिधी हे नवे पद निर्माण करण्यात येऊन<noinclude></noinclude>
m58ghez86495tjeql03x7gnrjwowupj
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२८
104
73594
230894
164720
2026-06-08T02:57:17Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230894
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५००}}</noinclude>ते प्रल्हाद निराजी याला देण्यात आले. रामचंद्रपंत याला हुकमतपन्हा हा फार मोठा किताब देण्यात आला. शंकराजी नारायण हा सचिव आणि संताजी घोरपडे हा सेनापती झाला. इतरही प्रधानपदे त्या वेळी भरण्यात आली.<br><br>'''धरबंध नाही'''<br>{{gap}}व्यवहारात याप्रमाणे दोन्ही छत्रपतींच्या कारकीर्दीत अष्टप्रधानांच्या नेमणुका झाल्या, तरी प्रत्यक्ष राज्यकारभार व्यवस्थित चालणे त्या वेळी जवळ जवळ अशक्यच होते. कारण सर्व मुलूख मोगलांनी व्यापला होता आणि पंचवीस वर्षे सतत युद्ध चालू होत. शिवाय वतनलोभामुळे लोक वाटेल ती कृत्ये करीत असल्यामुळे कशाचाच काही धरबंध राहिला नव्हता आणि मुलखाचा राजा दूरदेशी जाऊन राहिला होता ! तेव्हा शेती, व्यापार यांचे संरक्षण, जीवितवित्ताचे रक्षण कायद्याचे पालन, न्यायदान, महसूल हा जो राज्यकारभार तो व्यवस्थित चालणे दुरापास्तच होते.<br><br>'''शुद्धी ?'''<br>{{gap}}धर्माच्या राजकीय व्यवस्थेतही सर्वत्र हीच स्थिती होती. देवळे, मठ, उत्सव यांना दिलेल्या जमिनी, वर्षासने यांची वजावट नेहमीप्रमाणे घालणे कठीणच होते. या क्षेत्रातील एका गोष्टीकडे विशेष लक्ष वेधणे अवश्य आहे, ती म्हणजे शुद्धी किंवा धर्मांतरितांचे परावर्तन. छत्रपतींनी शुद्धीचा पुरस्कार करून बजाजी निंबाळकर, नेताजी पालकर यांना स्वधर्मात परत घेतल्याचे मागे सांगितलेच आहे. शंभुछत्रपतीं नीही शुद्धीसंबंधी आज्ञा दिल्याचे कागदपत्र सापडतात. पण औरंगजेबाने जे फार मोठ्या प्रमाणावर धर्मांतर चालविले होते त्याकडे लक्ष देऊन त्या सर्वांचे परावर्तन करण्याचा कटाक्ष, पंडितराव हा जो प्रधान, याने बाळगलेला दिसत नाही. हे ठळकपणे दिसून येते ते शाहूच्या ऐवजी औरंगजेबाने वाढविलेले प्रतापराव गुजराचे जे खंडोजी व जगजीवन हे मुलगे त्यांना स्वधर्मात परत घेण्याची व्यवस्था कोणीच केली नाही यावरून. त्यांचे वंशज अद्यापही मुसलमानच आहेत ! औरंगजेबाने नेताजीशिवाय साबाजी घाटगे, जानोजी राजे यांना आणि अनेक ब्राह्मणांना सक्तीने बाटविले होते, हे राजवाडे खंड १५ यातील कागदपत्रांवरून दिसून येते. आणि त्याची कडवी धार्मिक वृत्ती पाहता त्याने आणखी शेकडो, हजारो लोकांना बाटविलेले असणार हे उघडच आहे. पण या सर्वांना परत स्वधर्मात घेण्याची व्यवस्था त्या काळी छत्रपती किंवा प्रधान यांनी केली नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट होय.<br><br>'''श्रींची इच्छा'''<br>{{gap}}पण एवढ्यावरच हे दुर्दैव थांबले नाही. शिवछत्रपतींनी जी धर्मक्रान्तीची तत्त्वे प्रत्यक्षात आचरिली त्या सर्वांचीच त्यांच्या मागून उपेक्षा झाली. स्वराज्य सेवा हा<noinclude></noinclude>
dl692clbbmtsrfnea1i8t3u5o0h6qh8
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२९
104
73595
230895
164721
2026-06-08T02:57:33Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230895
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५०१|| प्रेरणांची मीमांसा}}</noinclude>धर्मच होय, दुष्ट तुरुक यांची सेवा हा अधर्म आहे, कलियुग किंवा कृतयुग हे राजाच्या कर्तृत्वावरच अवलंबून असते, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे ही जी संजीवनीदायक तत्त्वे त्यांचा अखंड प्रचार करणे, त्यांचे सतत संस्कार जनमनावर करणे हे अवश्य होते. पण तसा प्रयत्नसुद्धा कोणी केल्याचे दिसत नाही. मोगली आक्रमण येताक्षणीच अनेक सरदार वतनदार दुष्ट तुरुक यांची सेवा करण्यास सिद्ध झाले. श्रींच्या इच्छेचा त्यांनी विचारही केला नाही. श्रींची इच्छा !<br><br>'''धार्मिक वतनदार'''<br>{{gap}}जी गत छत्रपतींच्या तत्त्वांची तीच समर्थांच्या उपदेशाची. बुडाला औरंग्या पापी, म्लेंछसंहार जाहला, मारता मारता मरावे, कष्टेकरूनि घसरावे म्लेंछावरी, वन्ही तो चेतवावा रे, रामकथा ब्रह्मांड भेदूनि पैलाड न्यावी, ही समर्थांची वचने छत्रपतींच्या काळी लोकांच्या कानावर सारखी पडत होती. सेवकधर्माचा केवढा उत्तम उपदेश समर्थांनी केला होता. आपस्वार्थ करून स्वामीकार्य बुडविणे ही सेवकांची लक्षणे नव्हत. 'फितव्याने बुडती राज्ये,' 'बुडाले ते भेदवाही ते,' 'कार्य करिता काही न मागे, तयाची चिंता प्रभूसि लागे,' हे संस्कार समर्थ व त्यांचे महंत सारखे करीत होते. पण समर्थ जाताच सर्व समर्थ संप्रदाय निष्प्रभ झाला. एवढ्या शेकडो शिष्यांतून त्यांचे कार्य चालविणारा एकही कर्ता महंत निघू नये हे केवढे दुर्दैव. या महंतांनी महाराष्ट्रधर्माचे कार्य तर केले नाहीच, उलट द्रव्यलोभाने ते आपसात तंटे करू लागले. आणि या शिष्यगणांत समर्थांचा पट्टशिष्य उद्धव गोसावी हाही होता. द्रव्यलोभाने देवस्थानच्या व्यवस्थेत भानगडी करणाऱ्या उद्भव गोसावी, गोविंद गंभीर राऊ, जिजोजी काटकर यांसारख्या लोकांना जरब भरणारी संभाजी महाराजांची अनेक पत्रे उपलब्ध आहेत (शिवपुत्र संभाजी, पृ. ४४४). म्हणजे वतनदारांनी वतनासाठी ज्याप्रमाणे तंटे सुरू केले त्याचप्रमाणे महंत, मठपती, पुजारी यांनीही सुरू केले. धार्मिक क्षेत्रातले हे वतनदारच झाले.<br><br>'''तत्त्वलोप'''<br>{{gap}}अशा रीतीने या स्वातंत्र्ययुद्धाच्या वीसपंचवीस वर्षांच्या काळात, राष्ट्रसंघटनेची जी नवी तत्त्वे शिवछत्रपतींनी प्रस्थापित केली होती, आणि ज्यांच्या बळावर त्यांनी नूतनसृष्टी निर्माण केली होती, त्या तत्त्वांचा मराठी मनातून बव्हंशी लोप झाला. हे मऱ्हाष्ट्र राज्य आहे आणि त्यासाठी आपण प्राणार्पणासही सिद्ध झाले पाहिजे ही निष्ठा येथे राहिलीच नाही. बाजीप्रभू, मुरारबाजी, तान्हाजी मालुसरे, प्रतापराव गुजर यांच्यासारखे धारातीर्थी पुण्यस्नान केल्याचे उदाहरण एवढ्या दीर्घकाळात एकही घडले नाही. प्रसंग येताच किल्लेदार भराभर किल्ले मोगलांच्या ताब्यात देऊन मोकळे होऊ लागले. राष्ट्रभावना नष्ट झाल्यामुळेच, औरंगजेब दक्षिणेत उतरल्यावर, वतनाला<noinclude></noinclude>
llau3fwaloh49l1gm08snqbuc9iht39
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३०
104
73596
230896
164722
2026-06-08T02:59:05Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230896
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५०२}}</noinclude>धक्का लागेल अशी शंका येताच, मराठा वतनदार मोगलांना मिळू लागले, म्हणजे बादशहाची सत्ता एकदमच त्यांनी मान्य केली. यामुळेच शिवछत्रपतींचे आर्थिक तत्त्व सोडून देऊन मराठा नेत्यांना लोकांचा वतनलोभ पुरा करावा लागला. यामुळे फितुरीला काहीसा आळा बसला, वतनदार मोगलांऐवजी छत्रपतींसाठी लढू लागले. पण काही दिवस जाताच फितुरी पुन्हा बळावली. या फितुरीमुळे आणि वैयक्तिक मानापमान, लोभ, मत्सर, सूडभावना यांमुळे मराठा संघटना फुटली आणि सर्वत्र दुही माजू लागली. आणि मराठ्यांचे सामर्थ्य आणखी खच्ची झाले. म्हणून द्विरुक्ती करून सांगावेसे वाटते की शिवछत्रपतींनी स्वराज्यस्थापना करताना राष्ट्रसंघटनेची जी महान तत्त्वे या भूमीत नव्याने प्रस्थापित केली होती त्यांचा या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात मराठी जीवनातून बव्हंशी लोप झाला. आणि त्यामुळे स्वातंत्र्ययुद्ध जिंकल्यानंतरही महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल सर्वत्र निराशाच दिसू लागली.<br>{{gap}}पण मग स्वातंत्र्ययुद्धाचे फळ अगदी शून्य झाले असे म्हणावयाचे की काय ?<br><br>'''फलश्रुती'''<br>{{gap}}तसे नाही. औरंगजेबासारख्या शत्रूला मराठ्यांनी धुळीस मिळविले हे मराठ्यांचे या इतिहासात जमा राहीलच. मागल्या प्रकरणात पूर्वीच्या मुस्लिमांच्या आक्रमणाच्या वेळची हिंदूंची स्थिती आणि आताची स्थिती यांची तुलना केली आहे. तिचा निष्कर्ष हा अबाधितच आहे. दरवेळी पराभव आणि मुस्लिम सत्तेची स्थापना हा इतिहास आता पालटला. सर्वात बलाढ्य मुस्लिम बादशहा, पंचवीस वर्षे पाय रोवून आक्रमण करून बसला असूनही, मराठ्यांनी अखेर त्याला संपूर्णपणे पराभूत केले आणि मराठ्यांचे स्वराज्य अबाधित राखले याचे श्रेय त्या लढवय्या वीरांना दिलेच पाहिजे. पुढच्या काळात पेशव्यांनी मराठा साम्राज्य स्थापन केले आणि गुजराथ, माळवा, पंजाब, बंगाल, बिहार, कर्नाटक इ. भारतातल्या सर्व प्रदेशांतील मुस्लिम सत्तेची पाळेमुळे खणून काढली. हे कार्य त्यांना करता आले ते मराठ्यांनी हे स्वातंत्र्ययुद्ध जिंकले आणि स्वराज्याचा पाया मजबूत राखला म्हणूनच.<br>{{gap}}शिवछत्रपतींनी प्रस्थापिलेली राष्ट्रनिष्ठेची तत्त्वे, धर्मक्रान्तीची तत्त्वे, नव्या अर्थव्यवस्थेची तत्त्वे, समाजपरिवर्तनाची तत्त्वे यांची त्यानंतरच्या काळात जोपासना झाली असती, ती तत्त्वे समाजात रुजली असती तर अखिल भारतात त्यांचा प्रसार झाला असता आणि मराठा साम्राज्याचे हिंदवी साम्राज्यात रूपांतर होऊन ते साम्राज्य अत्यंत दृढ पायावर उभे राहिले असते आणि मग त्याला पाश्चात्य आक्रमकांशीही यशस्वीपणे मुकाबला करता आला असता. पण त्या तत्त्वांची जोपासना स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात झाली नाही, इतकेच नव्हे, तर त्यांची सर्वांना विस्मृती झाली. त्यामुळे छत्रपतींचे भारतासंबंधीचे ते भव्य स्वप्न साकार झाले नाही.<br><noinclude></noinclude>
7ubxqmohg0cfck5k2azyfh93cvtplwr
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३१
104
73597
230897
164723
2026-06-08T02:59:21Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230897
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५०३|| प्रेरणांची मीमांसा}}</noinclude><br>'''परिवर्तन'''<br>{{gap}}पण एवढे साधले नाही तरी जे साधले ते साधले असे म्हटले पाहिजे. शिवछत्रपतींच्या आधी मराठे पराक्रमी होतेच. पण त्यांचा पराक्रम मुस्लिमांची राज्ये रक्षून वतने मिळविण्यात खर्ची होत होता. आता स्वराज्याचे रक्षण करून वतने मिळविण्यासाठी मराठे पराक्रम करू लागले. हे मानसिक परिवर्तन, ही क्रान्ती काही उपेक्षणीय नाही.<br><br>{{center|■}}<noinclude></noinclude>
3y8l05fx0u56lunvyhrn3wb8c5iz6x5
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३२
104
73598
230898
164724
2026-06-08T03:00:46Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230898
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop
|Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf
|Page = 532
|bSize = 402
|cWidth = 284
|cHeight = 234
|oTop = 51
|oLeft = 68
|Location = center
|Description =
}}
<br><br>{{rh|'''<big>२६.</big>'''||'''<big>पेशवाईचा उदय</big>'''}}<br><br>'''कारणे'''<br>{{gap}}मराठ्यांनी स्वातंत्र्ययुद्ध जिंकले आणि मराठ्यांच्या इतिहासाचा दुसरा कालखंड समाप्त झाला आणि थोड्याच म्हणजे पाचसहा वर्षात पेशवाई हा तिसरा कालखंड सुरू झाला. वर सांगितलेच आहे की युद्धसमाप्तीनंतर मराठ्यांच्यातील दुही संपली नाही. शाहू राजे दक्षिणेत आल्यानंतर तर ती जास्तच तीव्र झाली. पण एवढ्यावर हे भागले नाही. चंद्रसेन जाधव, रावरंभा निंबाळकर, दमाजी थोरात, हिंदुराव घोरपडे, इ. प्रमुख मराठा सरदार कधी ताराबाईच्या तर कधी शाहूराजांच्या पक्षाला असे करीत करीत शेवटी मोगलांना जाऊन मिळाले. मोगल उत्तरेत निघून गेले तरी त्यांचे दाऊदखान, निजाम हे सुभेदार दक्षिणेत होतेच. आणि मराठा सरदारांच्यांत फूट पाडून त्यांना आपल्या बाजूला वळविण्यात ते यशस्वी होत होते. यामुळे १७१३-१४ च्या सुमारास एक वेळ अशी आली होती की मराठ्यांचे स्वराज्य आता राहात नाही. वरील सरदारांनी ताराबाई किंवा शाहू यांपैकी कोणाचाही पक्ष घेऊन एकजूट केली असती तर असा प्रसंग आला नसता; उलट मोगली सत्ता त्याच वेळी संतुष्टात आली असती. त्यांच्यांत केवळ दुफळी माजली असती तरी स्वराज्य नष्ट होण्याचा प्रसंग आला नसता. पण ते सरदार मोगलांनाच मिळाले. खटावकरांसारखे काही सरदार<noinclude></noinclude>
ihii6hapszaykeppuz5jd8hb5lnsm23
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३३
104
73599
230899
164725
2026-06-08T03:05:53Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230899
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५०५|| पेशवाईचा उदय}}</noinclude>आधीपासूनच मोगलांचे मनसबदार होते, तेही त्यांना सामील झाले. आणि सर्व शून्याकार होण्याची वेळ आली. अशा वेळी हे बुडते जहाज, नानाप्रयत्नाने त्याच्या फटी सांधून, छिद्रे बुजवून, बाळाजी विश्वनाथ, शाहू छत्रपतींचा पेशवा, याने प्रथम तरते केले, मग त्याच्यावर सर्व प्रकारचा सरंजाम भरून त्याला भक्कमपणा आणला, आणि ते पैलतीराला नेऊन स्वराज्याचे रक्षण केले.<br><br>'''स्वराज्याचे रूप'''<br>{{gap}}स्वराज्याचे रक्षण झाले हे खरे, त्याचे पुढे साम्राज्य झाले हेही खरे; पण हे स्वराज्य शिवछत्रपतींच्या स्वराज्याहून फार निराळे होते. त्याचे वैभव, त्याचे उज्ज्वल रूप याला नव्हते, आणि पुढे तसे केव्हाही आले नाही, पुढल्या शंभर वर्षात मराठ्यांनी मोठा गौरवास्पद इतिहास घडविला. पण हिंदवी स्वराज्य, अखिल भारताचे एकसंघ साम्राज्य, सर्व भरतभूवर एकछत्री सत्ता, या थोर उद्दिष्टांच्या आसपासही ते कधी येऊ शकले नाहीत. शिवसमर्थांनी शिकवलेली धर्मनिष्ठा, त्यांनी उपदेशिलेली राष्ट्रभक्ती मराठ्यांनी अंगी बाणविली असती तर ते स्वप्नही साकार झाले असते. पण या महाप्रेरणा त्यांच्याबरोबर लुप्त झाल्या. आणि वतनासक्ती, स्वार्थ, दुही, फितुरी या व्याधींनी मराठ्यांना ग्रासले. यांतून काही संघटित शक्ती निर्माण करून पेशव्यांनी मराठा राज्याचे रक्षण केले हेच जास्त. हे राज्य म्हणजेच पेशवाई. अशी ही जी पेशवाई तिचे स्वरूप आता न्याहाळावयाचे आहे.<br><br>'''मुक्तता'''<br>{{gap}}औरंगजेब मृत्यू पावला आणि त्याचा मुलगा अजमशहा याने अहमदनगर येथे तख्तावर आरोहण केले, आणि फौजफाटा, सरंजाम घेऊन तो दिल्लीकडे निघाला. जाताना शाहू राजे, मातुःश्री येसूबाई, राजांच्या स्त्रिया, आणि इतर लवाजमा यांना त्याने बरोबरच नेले. शाहू राजांना मुक्त करावे असे त्याच्या मनात नव्हते. पण नर्मदा पार झाल्यावर झुल्पिकारखानादी सरदारांनी राजांना सोडल्यास मराठ्यांच्यात दुफळी माजेल आणि पुढे मागे त्यांना जिंकणे सोपे होईल, असा विचार अजमशहाला सांगितला. तो त्याला पटून त्याने शाहू राजांना मुक्त केले. त्या वेळी मोगलांच्या ताबेदारीत राहून शाहू राजांनी राज्य करावे, आणि स्वराज्य, चौथाई, सरदेशमुखीचे हक्क त्यांनी वसूल करावे, असा उभयतांत करार झाला. पण सनदा मात्र त्या वेळी बादशहाने दिल्या नाहीत. पण मुक्तता झाली हेच पुष्कळ असे मानून राजे छावणीतून दोनशे स्वार बरोबर घेऊन निघाले व १७०७ सालच्या जून महिन्यात दक्षिणेत येऊन पोचले.<br><br>'''पुण्याई'''<br>{{gap}}शाहू राजे दक्षिणेत आले, तेव्हा येताना वाटेत आणि पुढे अहमदनगरपर्यंत,<noinclude></noinclude>
92fmv52wfmi2thnnhszulczpkh2j9pt
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३४
104
73600
230900
164726
2026-06-08T03:08:30Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230900
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५०६}}</noinclude>त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी त्यांचे जे उत्स्फूर्त स्वागत झाले त्यावरूनच त्यांचे आणि महाराष्ट्राचे भवितव्य ठरून गेले. आत्मबलिदान करणाऱ्या शंभुछत्रपतींचा हा मुलगा आहे, हाच खरा आपला राजा आहे, कैदेत त्याचे फार हाल झाले आहेत, त्याची आता आपण भरपाई केली पाहिजे, आपल्या निष्ठा त्याच्या चरणी वाहिल्या पाहिजेत, अशीच महाराष्ट्रात सर्वत्र भावना होती. परसोजी व कान्होजी भोसले, मानसिंग मोरे, अमृतराव कदमबांडे, नेमाजी शिंदे, हैबतराव निंबाळकर, केसो चिमल पिंगळे, हणमंते मंडळी, रायाजी, कृष्णाजी प्रभू, बोकील, पुरंदरे हे सर्व त्यांना मिळाले. पुढे ताराबाईने आणि वर निर्देशिलेल्या मराठा सरदारांनी द्वैत माजविले, त्यामुळे शाहूराजांना आपले आसन स्थिर करण्यास अतिशय प्रयास पडले, हे खरे. पण त्यातून निभावून ते स्थिरपद झाले ते त्यांच्या पाठीशी ही जी सर्व महाराष्ट्राची पुण्याई उभी राहिली तिच्यामुळेच होय यात शंका नाही.<br><br>'''दोन पक्ष'''<br>{{gap}}शाहू राजे दक्षिणेत आल्यावर त्यांनी ताराबाईंना पत्र पाठवून कळविले की 'आम्ही स्वदेशी आलो आहोत, आता आम्ही राज्य करू, आपला आशीर्वाद असावा.' पण हे न मानता शाहूराजांचा सर्वतोपरी नायनाट करण्याचा उद्योग त्यांनी आरंभिला. त्यांनी प्रथम, हा शाहू खरा नव्हे, तोतया आहे, असा पुकारा केला. पण हे टिकण्याजोगे नव्हते. राजांना शेकडो मराठा सरदारांनी औरंगजेबाच्या छावणीत ते असतानाही, अनेक वेळा स्वतः पाहिले होते. त्यामुळे ताराबाईचा पुकारा कोणीच मानला नाही. मग त्यांनी दुसरा मुद्दा मांडला. शंभूराजांनी राज्य चालविले ते राजाराम महाराजांनी रक्षिले. तेव्हा त्यांच्याच मुलाचा गादीवर हक्क आहे. तात्त्विक दृष्टीने या मुद्दयाला काहीतरी अर्थ होता. पण व्यवहारात मुळीच नव्हता. कारण राजारामांचा मुलगा धाकटा शिवाजी हा अगदीच नाकर्ता होता. त्याचे वागणे पुष्कळ वेळा वेडसरच असे. १७१४ साली ताराबाईंना व त्याला, त्याचा सावत्र भाऊ, राजसबाईचा मुलगा संभाजी याने कैदेत डांबले, तेव्हा तो अठरा वर्षांचा होता. त्याच्या अंगी काही कर्तृत्व असते तर त्याने त्याच्या पक्षाच्या मराठा सरदारांच्या मदतीने आकाशपाताळ एक करून, शाहू व संभाजी यांना बाजूस सारून, स्वतः राज्य घेतले असते. पण तसे त्याने काहीच केले नाही. १७१४ पासून बारा वर्षे कैदेत राहून १७२६ साली तो मृत्यू पावला. अंगात पाणी असते तर कैदेतून त्याने अनेक उलाढाली केल्या असत्या व तो निसटून तरी गेला असता. पण त्याच्या ठायी हे पौरुष नव्हतेच. तेव्हा ताराबाईंचा पक्ष खरा की शाहू राजांचा खरा या वादात काडीचाही अर्थ नाही. शाहू राजे हेच एकमेव मराठी राज्याचे धनी होते, आणि स्वार्थी मराठा सरदार वगळता अखिल महाराष्ट्राने तोच निर्णय ते परत येताक्षणीच दिला.<br><noinclude></noinclude>
r23ryxar02xqqq8285w19zosde9g37y
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३५
104
73601
230901
164727
2026-06-08T03:08:51Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230901
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५०७|| पेशवाईचा उदय}}</noinclude><br><br>'''शाहू छत्रपती'''<br>{{gap}}पण ताराबाईंनी तो न मानल्यामुळे शाहूराजांना प्रत्यक्ष रणांगणात उतरून या वादाचा निकाल लावावा लागला. पहिली लढाई भीमेच्या काठी खेड येथे झाली. ताराबाईचे सैन्य चालून आले, थोडी चकमक झाली. पण तेवढ्यात सेतापती धनाजी जाधव यांनी राजांना पाहून, घोड्यावरून उतरून त्यांना मुजरा केला व आपल्या लोकांनिशी ते राजांना जाऊन मिळाले. लढाई पूर्वीच खंडो बल्लाळ, नारोराम आणि बाळाजी विश्वनाथ यांनी भेद करून ताराबाईच्या अनेक सरदारांना वळवून घेतले होते. परशुराम त्रिंबक हा मात्र ताराबाईशी एकनिष्ठ होता. तो पळून साताऱ्यावर गेला व ती राजधानी लढविण्याचा विचार त्याने केला. पण लवकरच किल्ल्याला वेढा घालून शाहूराजांनी मोठ्या तडफेने तो घेतला. आणि १२ जानेवारी १७०८ रोजी स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. लगेच त्यांनी अष्टप्रधानांच्या नेमणुकाही केल्या आणि क्षत्रियकुलावतंस श्री शाहू छत्रपती यांची कारकीर्द सुरू झाली.<br><br>'''अंकित राज्य'''<br>{{gap}}शाहूराजे यांनी शिवछत्रपतींच्या सारखीच पदवी धारण केली तरी ते शिवछत्रपतींच्या सारखे स्वतंत्र राजे झाले नाहीत. ते दक्षिणेत आले ते बादशाही मनसबदार म्हणून, एक अंकित म्हणून. आणि चौथाई सरदेशमुखीबरोबरच त्यांनी स्वराज्याच्याही सनदा बादशहाकडूनच घेतल्या होत्या. राज्याभिषेकसमयी त्यांच्या हाती त्या आल्या नव्हत्या, तरी बादशहाने जे तोंडी आश्वासन दिले होते त्याच्या आधारावरच ते राज्य करीत होते. १७०९ साली मोगल बादशहा बहादूरशहा (मूळचा शहा आलम) दक्षिणेत आला असताना शाहू छत्रपतींनी सरदेशमुखीच्या सनदांसाठी फिरून अर्ज केला. पण त्याच वेळी ताराबाईनींही आपला वकील धाडून तसाच अर्ज केला. तेव्हा तुम्ही आपसात लढून तंटा मिटवा, मग सनदा देऊ, असा बादशहाने निर्णय दिला. या वेळीही चौथाईच्या व स्वराज्याच्या सनदा बादशहाने दिल्या नाहीतच. त्या पुढे १७१९ साली बाळाजी विश्वनाथाने दिल्लीहून आणल्या. याचा अर्थ असा होतो की औरंगजेबाने मराठ्यांचे राज्य जिंकले ते त्यांनी लढून परत मिळविले नाही, तर बादशाही सनदेने त्यांना ते परत मिळाले; आणि शाहू छत्रपती प्रारंभापासूनच तसे मानून त्या आधारावरच स्वराज्यावर आपला हक्क सांगत होते.<br><br>'''सनदांचा आधार'''<br>{{gap}}शाहूछत्रपतींचे हे सांगणे केवळ कागदोपत्री नव्हते. तसे करण्यावाचून त्यांना गत्यंतरच नव्हते. बादशहा दिल्लीला परत गेला तरी त्याचे दाऊदखान, निजाम असे सुभेदार दक्षिणेतच होते. त्याचे सरदारही अनेक ठाण्यांवर आपल्या जागा धरून<noinclude></noinclude>
pbnbm07zbc40rg7lvtqk4hin01d751b
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११२
104
85876
230875
182070
2026-06-07T12:00:22Z
JayashreeVI
4058
230875
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१०७}}
{{rule }}</noinclude>पुन्हां आपले कागदपत्र बाहेर जाऊं नयेत म्हणून आमचे कारकुनाचे वृद्ध वडिलांनी याप्रमाणें ते बंदोबस्तांत ठेविले. आमचे कारकुनाचे मातोश्रीस वाईट वाटूं नये म्हणून अशा गुप्त रीतीनें ते कागदपत्र देण्यास ते गृहस्थ
तयार आहेत." अर्थात् ठरल्याप्रमाणें चांदोरकरांनीं रातोरात तो कागदपत्रांचा संग्रह घेऊन ते धुळ्यास परत आले. या संग्रहांत दोनअडीचशें कागदपत्रे आहेत. मालेगांवचे उपाध्ये हे रामदासस्वामींच्या हयातीपासून व त्यांचे पश्चात् चाफळ व सज्जनगड या मठांची व्यवस्था पाहणारे दिवाकर गोसावी यांचे वंशज होत. तेव्हां या कागदांच्या अस्सलपणाबद्दल शंका घेण्याचे कारण नाहीं. या लेखकानें हे अस्सल कागदपत्र स्वतः काळजीपूर्वक पाहिले आहेत व या कागदपत्रांत कोठेंही मागाहून दुरुस्त्या किंवा संशयास्पद आकडे वगैरे नाहींत; कागदपत्रांतील मजकूर स्पष्ट व सुवाच्य आहे. या कागदपत्रांवरून या वादावर कसा प्रकाश पडतो तें पाहू.
<br>{{gap}}प्रकृत विषयास लागू अशीं पत्र दिवाकर गोसावी यांना त्यांच्या आप्तांकडून किंवा शिष्यशाखेतील बंधुवर्गाकडून आलेली किंवा त्यांनीं दुसऱ्यांस पाठविलेलीं आहेत.
<br>{{gap}}या पत्रांवरून रामदासांनीं दिवाकर गोसावी यांस आपल्या हयातीत चाफळ संस्थानची सर्व व्यवस्था करण्यास व राजदरबारचें काम करण्यास अधिकार दिला होता व आपल्या पश्चातही हा अधिकार त्यांजकडे असावा अशी समर्थांची आज्ञा होती असे दिसते. पण रामदासांच्या पश्चात् उद्धव गोसावी यांना आपल्या हातांत सत्ता असावी अशी महत्वाकांक्षा उत्पन्न होऊन उद्धव गोसावी व दिवाकर गोसावी यांचेमध्यें कटकट उत्पन्न झाली व ती कटकट संभाजी महाराजांकडे जाऊन त्यांनी दिवाकर गोसाव्यासारखा निकाल दिला. याला कल्याणस्वामींची अनुमती होती. या बाबतींतील कल्याणस्वामींचें एक पत्र परिशिष्टांत छापले आहे. रामदासांच्या शिष्यांमध्यें संस्थानच्या व्यवस्थेसंबंधी पुनरपि तंटे उत्पन्न होऊं नयेत म्हणून शाहूच्या कारकीर्दीत रामदासांच्या शिष्यमंडळीच्या अनुमतीनें रामदासांच्या वडील बंधूंच्या घराण्यांतील पुरुषाकडे संस्थानची व्यवस्था वंशपरंपरेनें--<noinclude></noinclude>
1btz5643xrrzmkazumcsnlc0jwzkf7e
230876
230875
2026-06-07T12:00:51Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230876
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१०७}}
{{rule }}</noinclude>पुन्हां आपले कागदपत्र बाहेर जाऊं नयेत म्हणून आमचे कारकुनाचे वृद्ध वडिलांनी याप्रमाणें ते बंदोबस्तांत ठेविले. आमचे कारकुनाचे मातोश्रीस वाईट वाटूं नये म्हणून अशा गुप्त रीतीनें ते कागदपत्र देण्यास ते गृहस्थ
तयार आहेत." अर्थात् ठरल्याप्रमाणें चांदोरकरांनीं रातोरात तो कागदपत्रांचा संग्रह घेऊन ते धुळ्यास परत आले. या संग्रहांत दोनअडीचशें कागदपत्रे आहेत. मालेगांवचे उपाध्ये हे रामदासस्वामींच्या हयातीपासून व त्यांचे पश्चात् चाफळ व सज्जनगड या मठांची व्यवस्था पाहणारे दिवाकर गोसावी यांचे वंशज होत. तेव्हां या कागदांच्या अस्सलपणाबद्दल शंका घेण्याचे कारण नाहीं. या लेखकानें हे अस्सल कागदपत्र स्वतः काळजीपूर्वक पाहिले आहेत व या कागदपत्रांत कोठेंही मागाहून दुरुस्त्या किंवा संशयास्पद आकडे वगैरे नाहींत; कागदपत्रांतील मजकूर स्पष्ट व सुवाच्य आहे. या कागदपत्रांवरून या वादावर कसा प्रकाश पडतो तें पाहू.
<br>{{gap}}प्रकृत विषयास लागू अशीं पत्र दिवाकर गोसावी यांना त्यांच्या आप्तांकडून किंवा शिष्यशाखेतील बंधुवर्गाकडून आलेली किंवा त्यांनीं दुसऱ्यांस पाठविलेलीं आहेत.
<br>{{gap}}या पत्रांवरून रामदासांनीं दिवाकर गोसावी यांस आपल्या हयातीत चाफळ संस्थानची सर्व व्यवस्था करण्यास व राजदरबारचें काम करण्यास अधिकार दिला होता व आपल्या पश्चातही हा अधिकार त्यांजकडे असावा अशी समर्थांची आज्ञा होती असे दिसते. पण रामदासांच्या पश्चात् उद्धव गोसावी यांना आपल्या हातांत सत्ता असावी अशी महत्वाकांक्षा उत्पन्न होऊन उद्धव गोसावी व दिवाकर गोसावी यांचेमध्यें कटकट उत्पन्न झाली व ती कटकट संभाजी महाराजांकडे जाऊन त्यांनी दिवाकर गोसाव्यासारखा निकाल दिला. याला कल्याणस्वामींची अनुमती होती. या बाबतींतील कल्याणस्वामींचें एक पत्र परिशिष्टांत छापले आहे. रामदासांच्या शिष्यांमध्यें संस्थानच्या व्यवस्थेसंबंधी पुनरपि तंटे उत्पन्न होऊं नयेत म्हणून शाहूच्या कारकीर्दीत रामदासांच्या शिष्यमंडळीच्या अनुमतीनें रामदासांच्या वडील बंधूंच्या घराण्यांतील पुरुषाकडे संस्थानची व्यवस्था वंशपरंपरेनें--<noinclude></noinclude>
hnx8nq7kz6vyg4ga1bvznmhd6jhtn3e
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११३
104
85877
230877
182071
2026-06-07T12:15:33Z
JayashreeVI
4058
230877
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१०८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>देण्यांत आली. दिवाकर गोसाव्यांच्या घराण्यांत हीं अस्सल पत्रे कां राहिली हे कळण्याकरितां ही माहिती सांगितली.
<br>{{gap}}या लेखकाच्या बुद्धीप्रमाणें रा. चांदोरकर यांना सांपडलेले कागदपत्र म्हणजे रामदासस्वामींच्या चरित्रासंबंधींच्या अंधारांत वाटोवाट लावलेल्या कंदिलाप्रमाणे आहेत. या पत्राच्या अनुरोधानें रामदासांच्या चरित्राची
वाट न ठेचळतां चालून जाणें शक्य झाले आहे. तरी आतां आपण ही वाट पुन्हां एकदां चालूं.
<br>{{gap}}रामदासांनीं चाफळीस राम व मारुती यांचें देऊळ बांधून आपल्या दासपंथी सांप्रदायास सन १६४८ मध्ये सुरुवात केली ही गोष्ट निर्विवाद असून सर्व पक्षांस कबूल आहे.
<br>{{gap}}या पंथाचा व सांप्रदायाचा प्रसार करण्यास रामदासांस पांच सहा वर्षे तरी लागलीं. पंथाचा प्रसार झाल्यावर या पंथाला कायमचें व निश्चित स्वरूप येण्याकरितां रामदासांनी आपल्या पंथाच्या तत्वांचें अधिकारवाणीनें
विवेचन करणारा ग्रंथ लिहिण्याचें मनांत आणिलें व मठासारख्या गडबडीच्या व शिष्यांनी गजबजलेल्या ठिकाणीं ग्रंथ लिहिण्यास लागणारी शांतता मिळणार नाहीं म्हणून रामदास ग्रंथ लिहिण्याकरितां शिवतरच्या घळींत राहण्यास गेले. ते केव्हां गेले व तेथें ते किती दिवस होते या गोष्टी दिवाकर गोसाव्याच्या खालील पत्रावरून स्पष्ट दिसून येतात.
{{center|श्री.}}
{{gap}}चिरंजीव राजेश्री बहिरंभट गोसावी यासि प्रति दिवाकर गोसावी मु||
चाफल अनेक आसीर्वाद.
<br>{{gap}}तुम्ही पत्र पाठविल्ले ते वाचोन लेखनार्थ अवगत झाले तुम्ही अम्हास येण्याविशी लिहिले तर श्रीसमर्थ दहा संवत्सरपर्यंत कोठे न जाता सर्व ग्रंथास आरंभ केला आणि सांगितले की श्रीकडिल हरयेक विशि बोभाट येउ नये म्हणुन आम्हा सांगितले आणी सर्व महळीस आज्ञा की तुम्ही श्रीचे उत्सवाची भी(क्षा) करून आमचे स्वाधीन करावी म्हणून सर्वास सांगीतले त्याप्रमाणे सर्व मंडळी निघोन गेली आणि अपण व कल्याण गो|| व--<noinclude></noinclude>
fzbmbnbelob1v6zs48fc8z9fyp71tyg
230878
230877
2026-06-07T12:16:10Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230878
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|१०८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>देण्यांत आली. दिवाकर गोसाव्यांच्या घराण्यांत हीं अस्सल पत्रे कां राहिली हे कळण्याकरितां ही माहिती सांगितली.
<br>{{gap}}या लेखकाच्या बुद्धीप्रमाणें रा. चांदोरकर यांना सांपडलेले कागदपत्र म्हणजे रामदासस्वामींच्या चरित्रासंबंधींच्या अंधारांत वाटोवाट लावलेल्या कंदिलाप्रमाणे आहेत. या पत्राच्या अनुरोधानें रामदासांच्या चरित्राची
वाट न ठेचळतां चालून जाणें शक्य झाले आहे. तरी आतां आपण ही वाट पुन्हां एकदां चालूं.
<br>{{gap}}रामदासांनीं चाफळीस राम व मारुती यांचें देऊळ बांधून आपल्या दासपंथी सांप्रदायास सन १६४८ मध्ये सुरुवात केली ही गोष्ट निर्विवाद असून सर्व पक्षांस कबूल आहे.
<br>{{gap}}या पंथाचा व सांप्रदायाचा प्रसार करण्यास रामदासांस पांच सहा वर्षे तरी लागलीं. पंथाचा प्रसार झाल्यावर या पंथाला कायमचें व निश्चित स्वरूप येण्याकरितां रामदासांनी आपल्या पंथाच्या तत्वांचें अधिकारवाणीनें
विवेचन करणारा ग्रंथ लिहिण्याचें मनांत आणिलें व मठासारख्या गडबडीच्या व शिष्यांनी गजबजलेल्या ठिकाणीं ग्रंथ लिहिण्यास लागणारी शांतता मिळणार नाहीं म्हणून रामदास ग्रंथ लिहिण्याकरितां शिवतरच्या घळींत राहण्यास गेले. ते केव्हां गेले व तेथें ते किती दिवस होते या गोष्टी दिवाकर गोसाव्याच्या खालील पत्रावरून स्पष्ट दिसून येतात.
{{center|श्री.}}
{{gap}}चिरंजीव राजेश्री बहिरंभट गोसावी यासि प्रति दिवाकर गोसावी मु||
चाफल अनेक आसीर्वाद.
<br>{{gap}}तुम्ही पत्र पाठविल्ले ते वाचोन लेखनार्थ अवगत झाले तुम्ही अम्हास येण्याविशी लिहिले तर श्रीसमर्थ दहा संवत्सरपर्यंत कोठे न जाता सर्व ग्रंथास आरंभ केला आणि सांगितले की श्रीकडिल हरयेक विशि बोभाट येउ नये म्हणुन आम्हा सांगितले आणी सर्व महळीस आज्ञा की तुम्ही श्रीचे उत्सवाची भी(क्षा) करून आमचे स्वाधीन करावी म्हणून सर्वास सांगीतले त्याप्रमाणे सर्व मंडळी निघोन गेली आणि अपण व कल्याण गो|| व--<noinclude></noinclude>
ocwr87dwwm7ogmvat2jt69hgeax0659
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११४
104
85878
230879
182072
2026-06-07T12:28:33Z
JayashreeVI
4058
230879
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास|१०९}}
{{rule}}</noinclude>चिमणाबाई अका व अनंत कवी यास बराबर घेऊन एकांत स्थानि शिवथरचे घळीत जाउन बसले तुम्ही श्री महालेश्वरचे देवालयाचे काम चांगले रीतीनें करवावे भास्कर गो। आल्ले म्हणजे मी येक दीवसाचे अवकाशे
येतो कळावे मिति मार्गशीर्ष वद्य ५ शके १५७६ लोभ करावा हे आसीर्वाद. (१८ डिसेंबर १६५४ सोमवार.)
<br>{{gap}}हें पत्र सन १६५४ सालांत लिहिलेले आहे. समर्थ दहा वर्षे चाफळीं येणार नाहींत व मठाची व देवस्थानाची व्यवस्था त्यानीं शिष्यांवर व विशेषतः दिवाकर गोसाव्यावर सोपविली होती; या काळीं मठाचा खर्च निवळ भिक्षेवर चालू होता; त्याला कांहीं इनाम किंवा नेमणूक नव्हती या गोष्टी निर्विवाद सिद्ध होतात. यावरून रामदास सन १६५४ पासून १६६४ पर्यंत ग्रंथ लिहिण्यांत गुंतले होते असे सिद्ध होतें. व या दिवाकर गोसाव्याच्या पत्राला प्रत्यंतर पुरावा दासबोधांत आहे. कारण सन १६५९ मध्ये म्हणजे ग्रंथ लिहिण्यास एकांतांत राहण्यास गेल्यावर चार वर्षांनी सहाव्या दशकापर्यंत ग्रंथ आला होता; ही गोष्ट मागें दाखविली आहे.
<br>{{gap}}दहा वर्षीत रामदास केव्हांही बाहेर गेले नसतील असें नाहीं. तेव्हां जरी पुढें मागें रामदास दुसरीकडे होते अशा आशयाचें पत्र पुढे आले तरी त्यानें दिवाकर गोसाव्याच्या या पत्रांतील मजकूर खोटा ठरणार नाहीं. कारण दिवाकर गोसाव्याच्या पत्राचा अर्थ इतकाच कीं, मठाकडे व त्याचे व्यवस्थेकडे ग्रंथ पुरा होईपर्यंत लक्ष द्यावयाचें नाहीं, असें रामदासांनी ठरविलें होतें. अर्थात् रामदासांच्या या एकांतवासाचे काळांत मठाच्या व्यवस्थेची सर्व जबाबदारी शिष्यमंडळीवर पडली व त्याकरितां शिष्यमंडळी त्या प्रांतांत फिरून भिक्षेवर मठाचा खर्च चालवीत असत. ही गोष्ट दिवाकर गोसाव्यास आलेल्या भास्कर गोसाव्याच्या पत्रावरून स्पष्टपणे दिसून येते.
{{block center|<poem>श्रीगुरुभक्तपरायण मोक्षश्रीया विराजित दिवाकर गोसावि या प्रती
भास्कर गोसावि नमस्कार विनंती उपरि श्रीचे उछाहा * होनु पनास-</poem>}}<noinclude></noinclude>
q4ng80him4jl1rji3b46wvh4p4rf72y
230880
230879
2026-06-07T12:29:07Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230880
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास|१०९}}
{{rule}}</noinclude>चिमणाबाई अका व अनंत कवी यास बराबर घेऊन एकांत स्थानि शिवथरचे घळीत जाउन बसले तुम्ही श्री महालेश्वरचे देवालयाचे काम चांगले रीतीनें करवावे भास्कर गो। आल्ले म्हणजे मी येक दीवसाचे अवकाशे
येतो कळावे मिति मार्गशीर्ष वद्य ५ शके १५७६ लोभ करावा हे आसीर्वाद. (१८ डिसेंबर १६५४ सोमवार.)
<br>{{gap}}हें पत्र सन १६५४ सालांत लिहिलेले आहे. समर्थ दहा वर्षे चाफळीं येणार नाहींत व मठाची व देवस्थानाची व्यवस्था त्यानीं शिष्यांवर व विशेषतः दिवाकर गोसाव्यावर सोपविली होती; या काळीं मठाचा खर्च निवळ भिक्षेवर चालू होता; त्याला कांहीं इनाम किंवा नेमणूक नव्हती या गोष्टी निर्विवाद सिद्ध होतात. यावरून रामदास सन १६५४ पासून १६६४ पर्यंत ग्रंथ लिहिण्यांत गुंतले होते असे सिद्ध होतें. व या दिवाकर गोसाव्याच्या पत्राला प्रत्यंतर पुरावा दासबोधांत आहे. कारण सन १६५९ मध्ये म्हणजे ग्रंथ लिहिण्यास एकांतांत राहण्यास गेल्यावर चार वर्षांनी सहाव्या दशकापर्यंत ग्रंथ आला होता; ही गोष्ट मागें दाखविली आहे.
<br>{{gap}}दहा वर्षीत रामदास केव्हांही बाहेर गेले नसतील असें नाहीं. तेव्हां जरी पुढें मागें रामदास दुसरीकडे होते अशा आशयाचें पत्र पुढे आले तरी त्यानें दिवाकर गोसाव्याच्या या पत्रांतील मजकूर खोटा ठरणार नाहीं. कारण दिवाकर गोसाव्याच्या पत्राचा अर्थ इतकाच कीं, मठाकडे व त्याचे व्यवस्थेकडे ग्रंथ पुरा होईपर्यंत लक्ष द्यावयाचें नाहीं, असें रामदासांनी ठरविलें होतें. अर्थात् रामदासांच्या या एकांतवासाचे काळांत मठाच्या व्यवस्थेची सर्व जबाबदारी शिष्यमंडळीवर पडली व त्याकरितां शिष्यमंडळी त्या प्रांतांत फिरून भिक्षेवर मठाचा खर्च चालवीत असत. ही गोष्ट दिवाकर गोसाव्यास आलेल्या भास्कर गोसाव्याच्या पत्रावरून स्पष्टपणे दिसून येते.
{{block center|<poem>श्रीगुरुभक्तपरायण मोक्षश्रीया विराजित दिवाकर गोसावि या प्रती
भास्कर गोसावि नमस्कार विनंती उपरि श्रीचे उछाहा * होनु पनास-</poem>}}<noinclude></noinclude>
lft0yjn3u5hhsazwm8ofofgbjf6l6cy
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११५
104
85879
230881
182073
2026-06-07T12:43:33Z
JayashreeVI
4058
230881
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|११०|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>
भिक्षेस मिळाले ते भानजी गोसावि वरावर पाठविले पावतील शिवाजी राजे यांच्याकडे भिक्षेस गेलो त्यानी विचारिले तुम्ही कोठील कोण कोणा ठिकाणी असता त्यावरून आम्ही बोललो की आम्ही रामदासी श्रीसमर्थाचे शिष्य चाफळास हों मग ते बोलले कीं ते कोठें राहतात व मुळगांव कोण त्याजवरून मी सांगितले की गंगातिरिचें जांबचे राहणो प्रस्तुत चाफळास मठ करून श्री देवाची स्थापना करून उत्साव मोहोत्सव चालु करून आम्हा सर्वास आज्ञा की तुम्ही भिक्षा करून उत्साह करीत जावा सांगितल्यावरून अम्ही हिंडत आहो असे बोलता राजेश्रीनी दत्ताजीपंत वाकेनिविस यास प्रतिवर्षि श्री उत्साहास दोनशे होनु देत जाणे म्हणून पत्र पाठविले ते होस येतील कळावे फालगुन शु० २ शके १५८०. हे विनंति. {{right|( १३ फेब्रुवारी रविवार १६५८.)}}
<br>{{gap}}हे पत्र सन १६५८ मधलें आहे. म्हणजे या पत्राचा मेळ पूर्वीच्या दिवाकर गोसाव्याच्या पत्राशी पूर्णपणें मिळतो. रामदासांच्या एकांतवासाच्या काळी शिष्य भिक्षा मागून संस्थानचा खर्च चालवीत होते. अशी भिक्षा मागत असतां भास्कर गोसावी हे शिवाजीराजे भोसले यांचे कडे भिक्षेकरितां गेले असतां शिवाजी मठाची हकीकत त्यांस विचारतात. त्या मठाबद्दल व रामदास साधूबद्दल त्यांचा अनुकूल ग्रह होऊन ते वर्षास दोनशें होन देऊं करतात. या गोष्टी किती सरळ व स्वाभाविक रीतीने या पत्रांत आल्या आहेत, हे पहा. या पत्रावरून रामदासांची माहिती शिवाजीला या सालापूर्वी नव्हती असे निःसंशयपणें ठरतें व म्हणून भेटीचा सांप्रदायिक काल खोटा ठरतो.
<br>{{gap}}या पत्राची एक नक्कल रा. देव यांना रा. चांदोरकर यांचे आधींच सांपडली होती व नंतर अस्सल पत्र रा. चांदोरकरांना सांपडलेल्या कागदपत्रांत सांपडलें. यावरून या पत्राच्या खरेपणाबद्दल शंका रहात नाहीं.
या पत्राचा शांतपणे विचार करणारास त्यांत संदिग्धपणा कोठेंच दिसणार नाहीं. त्याचा अर्थ सरळ व स्पष्ट आहे.
<br>{{gap}}पण आपल्या आवडत्या भावनेला धक्का बसतो हाणून रा. राजवाडे व--<noinclude></noinclude>
qz4x9f6s5iri5y232d63n1v2llyiqq8
230902
230881
2026-06-08T05:45:09Z
JayashreeVI
4058
230902
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|११०|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>भिक्षेस मिळाले ते भानजी गोसावि बराबर पाठविले पावतील शिवाजी राजे यांच्याकडे भिक्षेस गेलो त्यानी विचारिले तुम्ही कोठील कोण कोणा ठिकाणी असता त्यावरून आम्ही बोललो की आम्ही रामदासी श्रीसमर्थाचे शिष्य चाफळास हों मग ते बोलले कीं ते कोठें राहतात व मुळगांव कोण त्याजवरून मी सांगितले की गंगातिरिचें जांबचे राहणो प्रस्तुत चाफळास मठ करून श्री देवाची स्थापना करून उत्साव मोहोत्सव चालु करून आम्हा सर्वास आज्ञा की तुम्ही भिक्षा करून उत्साह करीत जावा सांगितल्यावरून अम्ही हिंडत आहो असे बोलता राजेश्रीनी दत्ताजीपंत वाकेनिविस यास प्रतिवर्षि श्री उत्साहास दोनशे होनु देत जाणे म्हणून पत्र पाठविले ते होस येतील कळावे फालगुन शु० २ शके १५८०. हे विनंति. (१३ फेब्रुवारी रविवार १६५८.)
<br>{{gap}}हे पत्र सन १६५८ मधलें आहे. म्हणजे या पत्राचा मेळ पूर्वीच्या दिवाकर गोसाव्याच्या पत्राशी पूर्णपणें मिळतो. रामदासांच्या एकांतवासाच्या काळी शिष्य भिक्षा मागून संस्थानचा खर्च चालवीत होते. अशी भिक्षा मागत असतां भास्कर गोसावी हे शिवाजीराजे भोसले यांचे कडे भिक्षेकरितां गेले असतां शिवाजी मठाची हकीकत त्यांस विचारतात. त्या मठाबद्दल व रामदास साधूबद्दल त्यांचा अनुकूल ग्रह होऊन ते वर्षास दोनशें होन देऊं करतात. या गोष्टी किती सरळ व स्वाभाविक रीतीने या पत्रांत आल्या आहेत, हे पहा. या पत्रावरून रामदासांची माहिती शिवाजीला या सालापूर्वी नव्हती असे निःसंशयपणें ठरतें व म्हणून भेटीचा सांप्रदायिक काल खोटा ठरतो.
<br>{{gap}}या पत्राची एक नक्कल रा. देव यांना रा. चांदोरकर यांचे आधींच सांपडली होती व नंतर अस्सल पत्र रा. चांदोरकरांना सांपडलेल्या कागदपत्रांत सांपडलें. यावरून या पत्राच्या खरेपणाबद्दल शंका रहात नाहीं.
या पत्राचा शांतपणे विचार करणारास त्यांत संदिग्धपणा कोठेंच दिसणार नाहीं. त्याचा अर्थ सरळ व स्पष्ट आहे.
<br>{{gap}}पण आपल्या आवडत्या भावनेला धक्का बसतो हाणून रा. राजवाडे व--<noinclude></noinclude>
efcn4qjcop5hljbfl9a931mzvnpd7x9
230903
230902
2026-06-08T05:47:06Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230903
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|११०|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>भिक्षेस मिळाले ते भानजी गोसावि बराबर पाठविले पावतील शिवाजी राजे यांच्याकडे भिक्षेस गेलो त्यानी विचारिले तुम्ही कोठील कोण कोणा ठिकाणी असता त्यावरून आम्ही बोललो की आम्ही रामदासी श्रीसमर्थाचे शिष्य चाफळास हों मग ते बोलले कीं ते कोठें राहतात व मुळगांव कोण त्याजवरून मी सांगितले की गंगातिरिचें जांबचे राहणो प्रस्तुत चाफळास मठ करून श्री देवाची स्थापना करून उत्साव मोहोत्सव चालु करून आम्हा सर्वास आज्ञा की तुम्ही भिक्षा करून उत्साह करीत जावा सांगितल्यावरून अम्ही हिंडत आहो असे बोलता राजेश्रीनी दत्ताजीपंत वाकेनिविस यास प्रतिवर्षि श्री उत्साहास दोनशे होनु देत जाणे म्हणून पत्र पाठविले ते होस येतील कळावे फालगुन शु० २ शके १५८०. हे विनंति. {{right|(१३ फेब्रुवारी रविवार १६५८.)}}
<br>{{gap}}हे पत्र सन १६५८ मधलें आहे. म्हणजे या पत्राचा मेळ पूर्वीच्या दिवाकर गोसाव्याच्या पत्राशी पूर्णपणें मिळतो. रामदासांच्या एकांतवासाच्या काळी शिष्य भिक्षा मागून संस्थानचा खर्च चालवीत होते. अशी भिक्षा मागत असतां भास्कर गोसावी हे शिवाजीराजे भोसले यांचे कडे भिक्षेकरितां गेले असतां शिवाजी मठाची हकीकत त्यांस विचारतात. त्या मठाबद्दल व रामदास साधूबद्दल त्यांचा अनुकूल ग्रह होऊन ते वर्षास दोनशें होन देऊं करतात. या गोष्टी किती सरळ व स्वाभाविक रीतीने या पत्रांत आल्या आहेत, हे पहा. या पत्रावरून रामदासांची माहिती शिवाजीला या सालापूर्वी नव्हती असे निःसंशयपणें ठरतें व म्हणून भेटीचा सांप्रदायिक काल खोटा ठरतो.
<br>{{gap}}या पत्राची एक नक्कल रा. देव यांना रा. चांदोरकर यांचे आधींच सांपडली होती व नंतर अस्सल पत्र रा. चांदोरकरांना सांपडलेल्या कागदपत्रांत सांपडलें. यावरून या पत्राच्या खरेपणाबद्दल शंका रहात नाहीं.
या पत्राचा शांतपणे विचार करणारास त्यांत संदिग्धपणा कोठेंच दिसणार नाहीं. त्याचा अर्थ सरळ व स्पष्ट आहे.
<br>{{gap}}पण आपल्या आवडत्या भावनेला धक्का बसतो हाणून रा. राजवाडे व--<noinclude></noinclude>
f69fayq3n410d6u0yjfnjat5u0z145z
230904
230903
2026-06-08T05:47:51Z
JayashreeVI
4058
230904
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|११०|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>भिक्षेस मिळाले ते भानजी गोसावि बराबर पाठविले पावतील शिवाजी राजे यांच्याकडे भिक्षेस गेलो त्यानी विचारिले तुम्ही कोठील कोण कोणा ठिकाणी असता त्यावरून आम्ही बोललो की आम्ही रामदासी श्रीसमर्थाचे शिष्य चाफळास हों मग ते बोलले कीं ते कोठें राहतात व मुळगांव कोण त्याजवरून मी सांगितले की गंगातिरिचें जांबचे राहणो प्रस्तुत चाफळास मठ करून श्री देवाची स्थापना करून उत्साव मोहोत्सव चालु करून आम्हा सर्वास आज्ञा की तुम्ही भिक्षा करून उत्साह करीत जावा सांगितल्यावरून अम्ही हिंडत आहो असे बोलता राजेश्रीनी दत्ताजीपंत वाकेनिविस यास प्रतिवर्षि श्री उत्साहास दोनशे होनु देत जाणे म्हणून पत्र पाठविले ते होस येतील कळावे फालगुन शु० २ शके १५८०. हे विनंति. {{right|(१३ फेब्रुवारी रविवार १६५८.)}}
{{gap}}हे पत्र सन १६५८ मधलें आहे. म्हणजे या पत्राचा मेळ पूर्वीच्या दिवाकर गोसाव्याच्या पत्राशी पूर्णपणें मिळतो. रामदासांच्या एकांतवासाच्या काळी शिष्य भिक्षा मागून संस्थानचा खर्च चालवीत होते. अशी भिक्षा मागत असतां भास्कर गोसावी हे शिवाजीराजे भोसले यांचे कडे भिक्षेकरितां गेले असतां शिवाजी मठाची हकीकत त्यांस विचारतात. त्या मठाबद्दल व रामदास साधूबद्दल त्यांचा अनुकूल ग्रह होऊन ते वर्षास दोनशें होन देऊं करतात. या गोष्टी किती सरळ व स्वाभाविक रीतीने या पत्रांत आल्या आहेत, हे पहा. या पत्रावरून रामदासांची माहिती शिवाजीला या सालापूर्वी नव्हती असे निःसंशयपणें ठरतें व म्हणून भेटीचा सांप्रदायिक काल खोटा ठरतो.
<br>{{gap}}या पत्राची एक नक्कल रा. देव यांना रा. चांदोरकर यांचे आधींच सांपडली होती व नंतर अस्सल पत्र रा. चांदोरकरांना सांपडलेल्या कागदपत्रांत सांपडलें. यावरून या पत्राच्या खरेपणाबद्दल शंका रहात नाहीं.
या पत्राचा शांतपणे विचार करणारास त्यांत संदिग्धपणा कोठेंच दिसणार नाहीं. त्याचा अर्थ सरळ व स्पष्ट आहे.
<br>{{gap}}पण आपल्या आवडत्या भावनेला धक्का बसतो हाणून रा. राजवाडे व--<noinclude></noinclude>
g1s6v4qs8bzf19h9c360gi4dvyxqmsb
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११६
104
85880
230905
182074
2026-06-08T06:05:16Z
JayashreeVI
4058
230905
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१११}}
{{rule}}</noinclude>रा. देव या पत्रांत व्यंग्यार्थ काढतात! त्यांचे म्हणणें हें कीं, शिवाजीनें भास्कर गोसाव्यास जे रामदासांसंबंधी अनोळख्यासारखे प्रश्न विचारले ते भास्कर गोसाव्याची परीक्षा पाहण्याकरितां व जाणून बुजून खोटे विचारले.
पण या पत्राचा असा अर्थ करण्यापासून किती विपरीत कल्पना मानाव्या लागतात? शिवाजी महाराजांची व रामदासांची भेट सन १६४९ मध्यें झाली होती असे धरलें तर १६४९ पासून १६५८ म्हणजे नऊ वर्षेपर्यंत शिवाजीनें या मठास कांहींच मदत केली नाहीं असें होतें. कारण अशी मदत चालू असती तर ती भिक्षा मागावयास जाणाऱ्या शिष्यास अवश्य ठाऊक असती, व हें ठाऊक असतां, तो शिष्य शिवाजीकडे भिक्षा मागण्यास गेला असता कसा? शिवाय दुसराही एक असंभवनीय प्रकार या व्यंग्यार्था वरून निघतो. शिवाजी प्रत्यक्ष रामदासाला भेटल्यावर व त्याजपासून अनुग्रह घेतल्यावर मठास कांहीं नेमणूक करून देत नाहीं व भास्कर गोसाव्या सारख्या शिष्याच्या तोंडी माहितीवरून वार्षिक दोनशें होनांची भिक्षा देतो, हें किती विचित्र वर्तन आहे! यावरून रामदासांपेक्षां भास्कर गोसावीच जास्त अलौकिक कर्तबगारीचा पुरुष दिसतो! सारांश, हा व्यंग्यार्थाचा खटाटोप बुडत्या माणसानें काडीचा आश्रय करण्यासारखा आहे.
<br>{{gap}}या पत्रावरून भेटीचा सांप्रदायिक कालनिर्णय पार ढांसळतो हे उघड आहे व म्हणून व्यंग्यार्थाचा व्यर्थ खटाटोप सांप्रदायिक काळाच्या पुरस्कर्त्यांना करावा लागतो.
<br>{{gap}}सन १६६४ मध्ये ग्रंथ समाप्त करून रामदास परत चाफळी आले त्या वेळी किंवा शिष्यांच्या सांगीवरून आधीसुद्धां त्यांना शिवाजीच्या दोनशे होनांच्या नेमणुकीची हकीगत कळली असली पाहिजे. तेव्हांपासूनच रामदासांचें लक्ष शिवाजीच्या चरित्राकडे, त्याच्या उद्योगाकडे व त्याच्या उद्योगानें लोकांच्या स्थितीत पडलेल्या फरकाकडे लागले असावें.
<br>{{gap}}या गोष्टीकडे एकदां लक्ष लागल्यापासून त्यांच्या आध्यात्मिक दृष्टीला व्यावहारिक व राजकारणी दृष्टीची जोड झाली असावी व त्या दृष्टीची छटा त्यांच्या पुढील कवनांत उमटली असावी. दासबोधांतील उपदेशभेदाची--<noinclude></noinclude>
rlg8pv4t8bguz20cmn2xfhyitlugbsk
230906
230905
2026-06-08T06:05:41Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230906
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१११}}
{{rule}}</noinclude>रा. देव या पत्रांत व्यंग्यार्थ काढतात! त्यांचे म्हणणें हें कीं, शिवाजीनें भास्कर गोसाव्यास जे रामदासांसंबंधी अनोळख्यासारखे प्रश्न विचारले ते भास्कर गोसाव्याची परीक्षा पाहण्याकरितां व जाणून बुजून खोटे विचारले.
पण या पत्राचा असा अर्थ करण्यापासून किती विपरीत कल्पना मानाव्या लागतात? शिवाजी महाराजांची व रामदासांची भेट सन १६४९ मध्यें झाली होती असे धरलें तर १६४९ पासून १६५८ म्हणजे नऊ वर्षेपर्यंत शिवाजीनें या मठास कांहींच मदत केली नाहीं असें होतें. कारण अशी मदत चालू असती तर ती भिक्षा मागावयास जाणाऱ्या शिष्यास अवश्य ठाऊक असती, व हें ठाऊक असतां, तो शिष्य शिवाजीकडे भिक्षा मागण्यास गेला असता कसा? शिवाय दुसराही एक असंभवनीय प्रकार या व्यंग्यार्था वरून निघतो. शिवाजी प्रत्यक्ष रामदासाला भेटल्यावर व त्याजपासून अनुग्रह घेतल्यावर मठास कांहीं नेमणूक करून देत नाहीं व भास्कर गोसाव्या सारख्या शिष्याच्या तोंडी माहितीवरून वार्षिक दोनशें होनांची भिक्षा देतो, हें किती विचित्र वर्तन आहे! यावरून रामदासांपेक्षां भास्कर गोसावीच जास्त अलौकिक कर्तबगारीचा पुरुष दिसतो! सारांश, हा व्यंग्यार्थाचा खटाटोप बुडत्या माणसानें काडीचा आश्रय करण्यासारखा आहे.
<br>{{gap}}या पत्रावरून भेटीचा सांप्रदायिक कालनिर्णय पार ढांसळतो हे उघड आहे व म्हणून व्यंग्यार्थाचा व्यर्थ खटाटोप सांप्रदायिक काळाच्या पुरस्कर्त्यांना करावा लागतो.
<br>{{gap}}सन १६६४ मध्ये ग्रंथ समाप्त करून रामदास परत चाफळी आले त्या वेळी किंवा शिष्यांच्या सांगीवरून आधीसुद्धां त्यांना शिवाजीच्या दोनशे होनांच्या नेमणुकीची हकीगत कळली असली पाहिजे. तेव्हांपासूनच रामदासांचें लक्ष शिवाजीच्या चरित्राकडे, त्याच्या उद्योगाकडे व त्याच्या उद्योगानें लोकांच्या स्थितीत पडलेल्या फरकाकडे लागले असावें.
<br>{{gap}}या गोष्टीकडे एकदां लक्ष लागल्यापासून त्यांच्या आध्यात्मिक दृष्टीला व्यावहारिक व राजकारणी दृष्टीची जोड झाली असावी व त्या दृष्टीची छटा त्यांच्या पुढील कवनांत उमटली असावी. दासबोधांतील उपदेशभेदाची--<noinclude></noinclude>
qzegz65i5bmynw3djrgis4u2xycicmv
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११७
104
85881
230907
182075
2026-06-08T06:16:33Z
JayashreeVI
4058
230907
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|११२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>हीच उपपत्ति या लेखकास पटते. उपदेशभेदाचा व त्याच्या उपपत्तीचा विषय हा अमूर्त असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष कागदोपत्रीं पुरावा सांपडणें अशक्य आहे. असो.
<br>{{gap}}रामदास चाफळास परत आले, तो काळ शिवाजीच्या आयुष्यांतील अत्यंत आणीबाणीचा व अत्यंत संकटाचा होता. औरंगजेब बादशहानें शिवाजीचा बीमोड करण्याकरितां भगीरथ प्रयत्न सुरू केले होते व त्यावेळी शिवाजीला माघार खाऊन औरंगजेबाशीं तह करून दिल्लीस जावें लागलें. दिल्लीहून सुटका होऊन देशीं परत येण्यास शिवाजीस २|२॥ वर्षे लागलीं. परत आल्यावर शिवाजीनें गेलेलें राज्य पुन्हां परत मिळविण्याचा अटोकाट प्रयत्न केला व त्याच्या प्रयत्नाला यशही आलें. पण या धांदलीच्या गडबडीच्या व मानसिक अस्वस्थतेच्या काळीं रामदासांची हकीगत सन १६५८ सालीं कानांवर गेली असतांना रामदासांस भेटावयास
शिवाजी महाराजांस सवड झाली नसावी हैं उघड आहे. <br>{{gap}}पण १६७२ मध्ये
शिवाजी सातारा व कऱ्हाड या प्रांतांत येऊन हा मुलुख त्याच्या ताब्यांत आला तेव्हां रामदासांची भेट घ्यावी अशी त्यालाही इच्छा झाली असावी व शिवाजी आता आपल्या मठाच्या आसपास आलेला आहे असें पाहून रामदासांनींही बखरींतील प्रसिद्ध पत्र शिवाजीस पाठविले असावें. कारण १६७२ या सालीं या पत्रांत दिलेली सर्व विशेषणें
व शिवाजीचा केलेला गौरव व विशेषतः 'नृपवर तुच्छ केले' हे म्हणणें योग्य होतें. तेव्हां रामदासांचें असें पत्र आल्यावर शिवाजीनें रामदासांस भेटण्याचा निश्चय केला; ही गोष्ट दिवाकर गोसाव्यास केशव गोसाव्यांनीं लिहिलेल्या खालील पंत्रावरून स्पष्ट होतें.
{{center|श्रीराम}}
{{right|श्रीरामदासस्वामी.}}
<br>{{gap}}श्रीगुरुभक्तपरायण राजमान्य राजेश्री दिवाकर गोसाबी यासी
प्रतिपूर्वक के + (श) व गोसावि नमस्कार उपरि येथील कुशल + (आ) पण पत्र पाठविले ते पावले मजकूर समजला राजेश्री शीवराजे भोसले हे समर्थांचे भेटीस येणार म्हणोन लिहिले ते समजले मी येणार--<noinclude></noinclude>
ox6a36uca2ux7l642ms7kgtabfstc90
230908
230907
2026-06-08T06:17:39Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230908
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|११२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>हीच उपपत्ति या लेखकास पटते. उपदेशभेदाचा व त्याच्या उपपत्तीचा विषय हा अमूर्त असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष कागदोपत्रीं पुरावा सांपडणें अशक्य आहे. असो.
<br>{{gap}}रामदास चाफळास परत आले, तो काळ शिवाजीच्या आयुष्यांतील अत्यंत आणीबाणीचा व अत्यंत संकटाचा होता. औरंगजेब बादशहानें शिवाजीचा बीमोड करण्याकरितां भगीरथ प्रयत्न सुरू केले होते व त्यावेळी शिवाजीला माघार खाऊन औरंगजेबाशीं तह करून दिल्लीस जावें लागलें. दिल्लीहून सुटका होऊन देशीं परत येण्यास शिवाजीस २|२॥ वर्षे लागलीं. परत आल्यावर शिवाजीनें गेलेलें राज्य पुन्हां परत मिळविण्याचा अटोकाट प्रयत्न केला व त्याच्या प्रयत्नाला यशही आलें. पण या धांदलीच्या गडबडीच्या व मानसिक अस्वस्थतेच्या काळीं रामदासांची हकीगत सन १६५८ सालीं कानांवर गेली असतांना रामदासांस भेटावयास
शिवाजी महाराजांस सवड झाली नसावी हैं उघड आहे. <br>{{gap}}पण १६७२ मध्ये
शिवाजी सातारा व कऱ्हाड या प्रांतांत येऊन हा मुलुख त्याच्या ताब्यांत आला तेव्हां रामदासांची भेट घ्यावी अशी त्यालाही इच्छा झाली असावी व शिवाजी आता आपल्या मठाच्या आसपास आलेला आहे असें पाहून रामदासांनींही बखरींतील प्रसिद्ध पत्र शिवाजीस पाठविले असावें. कारण १६७२ या सालीं या पत्रांत दिलेली सर्व विशेषणें
व शिवाजीचा केलेला गौरव व विशेषतः 'नृपवर तुच्छ केले' हे म्हणणें योग्य होतें. तेव्हां रामदासांचें असें पत्र आल्यावर शिवाजीनें रामदासांस भेटण्याचा निश्चय केला; ही गोष्ट दिवाकर गोसाव्यास केशव गोसाव्यांनीं लिहिलेल्या खालील पंत्रावरून स्पष्ट होतें.
{{center|श्रीराम}}
{{right|श्रीरामदासस्वामी.}}
{{gap}}श्रीगुरुभक्तपरायण राजमान्य राजेश्री दिवाकर गोसाबी यासी
प्रतिपूर्वक के + (श) व गोसावि नमस्कार उपरि येथील कुशल + (आ) पण पत्र पाठविले ते पावले मजकूर समजला राजेश्री शीवराजे भोसले हे समर्थांचे भेटीस येणार म्हणोन लिहिले ते समजले मी येणार--<noinclude></noinclude>
plcwqxzh32i7jmo8ylylrk79ozgpgkc
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११८
104
85882
230909
182076
2026-06-08T06:33:01Z
JayashreeVI
4058
230909
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|११३}}
{{rule}}</noinclude>होतो परंतु माझी प्रकृति फार बिघडली येणें होत नाहीं मी इकडून अकास येणेसाठी लिहिले परंतु अकाचेही येणे व्हावयाचे नाही गावी भानजी गोसावी तेथे असतील राजे यांची पहिलीच भेट आहे वाडीचे लोकास खटपटेस अणावे उपयोग होईल झाडी बहुत आहे इकडून उदईक त्रिंबक गो। व विट्टल गो। व दत्तात्रय गो। उदइक पाठउन देतो श्रीचे उत्सवास भीक्षेचे धान्य जे मिळाले ते अश्वत्थ भट मसुरकर या समागमे पाठविले दत्ताजीपंताकडु x (न) दोनशे होनु उत्सावास पाठविले ते अले असतील लोभ करावा मीती चैत्र व|| १ शके १५९४ हे विज्ञप्ति.{{right|(४ एप्रिल बुधवार १६७२.)}}
{{gap}}हे पत्र या लेखकानें दोनतीन वेळां लक्षपूर्वक पाहिले आहे. तें अस्सल पत्र आहे यांत शंका नाहीं. त्या पत्रावरील शक अगदीं स्पष्ट आहे. देव नवांच्या आंकड्याबद्दल संशय व्यक्त करतात. पण त्यांत मुळींच हंशील नाहीं. नऊ मोडी लिहितांना एक टांकी लिहितात तसा हा नवांचा आंकडा न लिहितां पूज्य काढून त्याला नवांचा रफार जोडला आहे इतकाच फरक आहे. पण अशा त-हेची नऊ काढण्याची रीत या लेखकानें कित्येक पत्रांत पाहिली आहे. तेव्हां या पत्रासंबंधी असले कुतर्क व्यर्थ आहेत. या पत्रांतील अर्थही स्पष्ट व सरळ आहे. शिवाजीराजे भोसले हे रामदासास प्रथमच भेटावयाचे असल्यामुळे दिवाकर गोसाव्याने सर्व शिष्यमंडळीस त्या समारंभास आग्रहानें बोलावावें हें रास्त आहे. केशवगोसावी प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे आपणाला व आकास येण्यास होत नाहीं असे लिहितात. दुसऱ्या शिष्यास पाठवून देण्याचेंही लिहितात, व शिवराजाची ही समर्थांशी पहिली भेट असल्यामुळे गांवकरी बोलावून सर्व व्यवस्था उत्तम तऱ्हेची करण्यास दिवाकर गोसाव्यास सांगतात. शिवाय ज्याप्रमाणें दिवाकर गोसाव्याचे समर्थांच्या एकांतवासाबद्दलच्या पत्राचा व भास्कर गोसाव्याच्या पत्राचा मेळ बसतो त्याचप्रमाणें या केशव गोसाव्याच्या पत्राचा भास्कर गोसाव्याच्या पत्राशीं पूर्ण मेळ बसतो. कारण शिवाजीनें रामदासाबद्दलच्या व मठाबद्दलच्या भास्कर गोसाव्याच्या तोंडी हकीकतीवरून दर वर्षास दोनशें होन देण्याची--<noinclude>स...८</noinclude>
43rrlziwsslteurq5iryqyhkiieuksr
230910
230909
2026-06-08T06:33:31Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230910
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|११३}}
{{rule}}</noinclude>होतो परंतु माझी प्रकृति फार बिघडली येणें होत नाहीं मी इकडून अकास येणेसाठी लिहिले परंतु अकाचेही येणे व्हावयाचे नाही गावी भानजी गोसावी तेथे असतील राजे यांची पहिलीच भेट आहे वाडीचे लोकास खटपटेस अणावे उपयोग होईल झाडी बहुत आहे इकडून उदईक त्रिंबक गो। व विट्टल गो। व दत्तात्रय गो। उदइक पाठउन देतो श्रीचे उत्सवास भीक्षेचे धान्य जे मिळाले ते अश्वत्थ भट मसुरकर या समागमे पाठविले दत्ताजीपंताकडु x (न) दोनशे होनु उत्सावास पाठविले ते अले असतील लोभ करावा मीती चैत्र व|| १ शके १५९४ हे विज्ञप्ति.{{right|(४ एप्रिल बुधवार १६७२.)}}
{{gap}}हे पत्र या लेखकानें दोनतीन वेळां लक्षपूर्वक पाहिले आहे. तें अस्सल पत्र आहे यांत शंका नाहीं. त्या पत्रावरील शक अगदीं स्पष्ट आहे. देव नवांच्या आंकड्याबद्दल संशय व्यक्त करतात. पण त्यांत मुळींच हंशील नाहीं. नऊ मोडी लिहितांना एक टांकी लिहितात तसा हा नवांचा आंकडा न लिहितां पूज्य काढून त्याला नवांचा रफार जोडला आहे इतकाच फरक आहे. पण अशा त-हेची नऊ काढण्याची रीत या लेखकानें कित्येक पत्रांत पाहिली आहे. तेव्हां या पत्रासंबंधी असले कुतर्क व्यर्थ आहेत. या पत्रांतील अर्थही स्पष्ट व सरळ आहे. शिवाजीराजे भोसले हे रामदासास प्रथमच भेटावयाचे असल्यामुळे दिवाकर गोसाव्याने सर्व शिष्यमंडळीस त्या समारंभास आग्रहानें बोलावावें हें रास्त आहे. केशवगोसावी प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे आपणाला व आकास येण्यास होत नाहीं असे लिहितात. दुसऱ्या शिष्यास पाठवून देण्याचेंही लिहितात, व शिवराजाची ही समर्थांशी पहिली भेट असल्यामुळे गांवकरी बोलावून सर्व व्यवस्था उत्तम तऱ्हेची करण्यास दिवाकर गोसाव्यास सांगतात. शिवाय ज्याप्रमाणें दिवाकर गोसाव्याचे समर्थांच्या एकांतवासाबद्दलच्या पत्राचा व भास्कर गोसाव्याच्या पत्राचा मेळ बसतो त्याचप्रमाणें या केशव गोसाव्याच्या पत्राचा भास्कर गोसाव्याच्या पत्राशीं पूर्ण मेळ बसतो. कारण शिवाजीनें रामदासाबद्दलच्या व मठाबद्दलच्या भास्कर गोसाव्याच्या तोंडी हकीकतीवरून दर वर्षास दोनशें होन देण्याची--<noinclude>स...८</noinclude>
5zw50i6alo1352r18ccrkw7ev078omc