विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.6 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk सदस्य:सुबोध कुलकर्णी/common.js 2 22584 232000 228002 2026-06-11T05:29:40Z सुबोध कुलकर्णी 1231 232000 javascript text/javascript mw.loader.load('//en.wikisource.org/w/index.php?title=User:Inductiveload/cleanup.js&action=raw&ctype=text/javascript'); //qrCodeGenerator//mw.loader.load('//meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Indic-TechCom/Script/qrCode.js&action=raw&ctype=text/javascript'); mw.loader.load('//commons.wikimedia.org/w/load.php?modules=ext.gadget.CropTool'); tiu0nplpej7g9w8uk6q37h3i39o86hd अनुक्रमणिका:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf 106 69225 231897 230807 2026-06-10T16:31:26Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[अनुक्रमणिका:Samagra Phule.pdf]] वरुन [[अनुक्रमणिका:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf]] ला हलविला: Misspelled title 218830 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=''[[महात्मा फुले समग्र वाङमय]]'' |Language=mr |Volume= |Author=[[Author:ज्योतिराव फुले|ज्योतिराव फुले]] |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher= |Address= |Year= |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=OCR |Pages=<pagelist 40to41="ToC" 1="Cover" 3="Publication information" 42="Tritiya Ratna" /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} 9rhswueu1irb8j2q3udxtupkfequ03p पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/४३ 104 69264 231920 230987 2026-06-10T16:51:36Z QueerEcofeminist 918 /* Without text */ 231920 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="QueerEcofeminist" /></noinclude><noinclude></noinclude> 6mlrg7ulygc335wsw2ucniib5cytmfy पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/४५ 104 69266 231921 230989 2026-06-10T16:52:01Z QueerEcofeminist 918 /* Without text */ 231921 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="QueerEcofeminist" /></noinclude><noinclude></noinclude> 6mlrg7ulygc335wsw2ucniib5cytmfy पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/४९ 104 69270 231922 230993 2026-06-10T16:53:28Z QueerEcofeminist 918 /* Validated */ 231922 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" /></noinclude>{{left|८}} {{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} '''जोशी''' : (काही हसल्यासारख करून) हँ! ह! असें आहे काय ? बाई तुला सर्व समजते (असे म्हणून कंबरेची तपकिरीची डबी काढून, मिशांवर ताव देऊन मोठ्या डौलाने नाकांत मोठे झटके मारमारून कोंदीत आहे, जसा का कोणी दयाराम आत्मारामाचा लेकच.) <br> '''बाई''' : (इतक्यात बाईनें कडसरीची पावली काढून जोशास म्हणाली) ही घ्या तुमच्या डाळ तांदुळास. जोशी थांब, मला तपकीर तर ओढू दे, तुझी बेटे सर्व कामाची घाईच.<br> '''विदूषक''' : जोशाला येवढी वेळ जलदी झाली होती, आणि आतां थांब म्हणू लागला, कारण बुवाजीची तुंबडी भरली ना ?<br> '''बाई''' : महाराज आता स्वस्थता होऊन समाधानी झाली ना ?<br> '''जोशी''' : (मान हालवून ) झाली खरी, पण आता वसूं नकों जलदी करून, एक पैसा आणि लहानशी सुपारी या मजजवळच्या पंचांगाला वाहा, म्हणजे मी तुझ्या होणाऱ्या मुलावर ग्रहाच्या येणाऱ्या पीडां दुर करण्याविषयी उपाय सांगतो. (इकडे या बाईजवळ सध्या पैसा नाही; म्हणून शेजारिणीपासून, हातउसना घेऊन, कडसरीची एक सुपारी काढून, जोशाचे पुढे ठेवून, मोठ्या नम्रतेने त्याच्या पाया पडून, जरा किंचित पलीकडे कपाळावर हात ठेवून मोठी उदास होऊन बसली, आणि सांगा महाराज असे म्हणाली.) विदूषक : महाराज, पोटाची आगच फार कठीण आहे बरे !<br> जोशी : बाई, तुझे नावराशीचे नाव काय ?<br> '''बाई''' : माझे नांव ? माझे नाव जोगाई. (नंतर जोशाने राशीचक्र आपल्यापुढे मांडून, काही वेळ उजव्या हाताच्या आंगठ्याच्या अग्राचे टोंक बाकीच्या बोटाच्या पेऱ्यांवर नाचवून, तोंडातल्या तोंडात पुटपुट करी, नंतर काही वेळ दांत (पुटपुट) ओठ खावून, बाईच्या तोंडाकडे वारोवार पाहिल्यासारखे करून)<br> "'जोशी"' : बाई तुझ्या नावाची मकर रास आहे. मकरराशीचा शनी तुझ्या मुलाला छळल्यावाचून राहणार नाही, हे खचित असें तू समज; याला उपाय तू सध्या नेहमी आजपासून, दर शनिवारी पंचमुख्या मारुतीवर एक रुईच्या फूलाची अथवा पानाची का होईना माळ करून घालीत जा; म्हणजे तेणेकरून तुझ्या जिवाला कांही समाधान वाटत जाईल, व दुसरे तूं जर, मारुतीस असे कबूल करशील की, जे (है) मारुतीराया माझ्या होणाऱ्या मुलावर ग्रहांनी पीडा करूं नयेत म्हणून सध्यां तूं त्यास कांही आटकाव करावास म्हणून मी तुझे तेवीस ब्राह्मण तूपपोळ्यांचे ह्या पुढल्या, श्रावणमासी घालीन, तरच तुमच्या मुलाला कांही दिवस बाधा होणार नाही.<br> '''विदूषक''' : ग्रहाच्या पीडा अगदी खोट्या आहेत. असे जोशाच्या बोलण्यावरून सिद्ध झाले; ते असें की जोशी आणि जोगाई या दोघांची एक रास असून शनीग्रह जोगाईला पोळ्या<noinclude></noinclude> gauaaj1yj5mfzepab0uz1du1v8pujm7 पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६३४ 104 73714 231933 164914 2026-06-11T03:10:55Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231933 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६०६}}</noinclude>आणि लोकही अभिमानाने तसे म्हणत असत. 'मराठा तितुका मेळवावा' हे तत्त्व समर्थांनी याच अर्थाने सांगितले होते. यामुळे सर्व महाराष्ट्रभर आपण मराठे आहो, ही एक नवीन अस्मिता निर्माण झाली आणि अल्पावधीत हे लोक पराक्रम करीत सर्व हिंदुस्थानभर पसरले. घराण्याच्या राज्याऐवजी लोकांचे राज्य व्हावे असा जो शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला, त्यातून हे सर्व चैतन्य निर्माण झाले होते.<br>{{gap}}दुर्दैवाने ती मूळ भावना त्यांच्या मृत्यूनंतर ढिली झाली. आणि शेवटपर्यंत आपण सर्व मराठे आहो, अशी भाषा सर्वाच्या तोंडी असली तरी, तिच्याशी निगडित असलेला आशय कोणाच्याही मनात नव्हता. त्यामुळे ते चैतन्य नष्ट झाले व मराठेशाहीचा अंत झाला.<br><br>'''विनाशाचे कारण'''<br>{{gap}}मराठेशाही कशाने बुडाली याची चर्चा न. चिं. केळकर, सरदेसाई, राजवाडे, खरेशास्त्री इत्यादी थोर इतिहास पंडितांनी केली आहे. राष्ट्रभावना नाही, शिस्त नाही, एकजूट नाही, ध्येयनिष्ठा नाही, हीच कारणे बहुतेकांनी सांगितली आहेत. त्याविषयी येथे चर्चा करण्याचा विचार नाही. कारण प्रत्येक प्रकरणात ती जागोजागी केलेलीच आहे आणि साहित्य, कला, विद्या, धर्म, अर्थ इ. संस्कृतीच्या अंगांची आणखी एकदोन लेखांत जी चर्चा करावयाची आहे तीत ते विवेचन पुनः पुन्हा येईलच. येथे फक्त तिचा सारार्थ वर दिला आहे. 'आम्ही मराठे' ही जी नवी अस्मिता शिवसमर्थांनी निर्माण केली होती, तिची जपणूक व जोपासना पुढे कोणी केली नाही, हे मराठेशाहीच्या नाशाचे प्रधान कारण आहे.<br><br>{{center|■}}<noinclude></noinclude> ngpzzaqu8ocrjypc8zjk85bgmaczbmw पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६३५ 104 73715 231934 164916 2026-06-11T03:14:24Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231934 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop |Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf |Page = 635 |bSize = 401 |cWidth = 312 |cHeight = 237 |oTop = 3 |oLeft = 26 |Location = center |Description = }} <br>{{rh|'''<big>३२.</big>'''||'''<big>साहित्य आणि कला</big>'''}}<br><br>'''साहित्यमहिमा'''<br>{{gap}}साहित्य हे मानवी संस्कृतीचे, धर्म, समाजरचनेची तत्त्वे, अर्थव्यवस्था यांइतकेच महत्त्वाचे अंग आहे, यात वाद नाही. 'जे न देखे रवी, ते देखे कवी,' असा कवीचा गौरव केलेला आहे. 'कविः क्रांतदर्शी-' असेही त्याच्याविषयीचे वचन प्रसिद्ध आहे. ही वचने अगदी सार्थ आहेत हे, रामायण व महाभारत ही दोन संस्कृत महाकाव्ये पाहिली असता, सहज ध्यानात येईल. भारतीय मनाला वळण लावण्याचे, त्याला स्फूर्ती, प्रेरणा देण्याचे महाकार्य आज हजारो वर्षे हे दोन ग्रंथ करीत आहेत.<br><br>'''मराठी साहित्य'''<br>{{gap}}मराठीच्या दृष्टीने पाहिले तर ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास यांनी मराठी मन कसे घडविले हे आपण पाहिलेच आहे. मुस्लिम आक्रमणाच्या काळात यांच्यामुळेच हिंदूंची स्वधर्मनिष्ठा जिवंत राहिली, असे म्हणण्यात मुळीच अतिशयोक्ती नाही. पण या संत कवींनी मुख्यतः आध्यात्मिक, तात्त्विक विवेचनपर ग्रंथ लिहिले. आत्मा, परमात्मा, मोक्ष, कर्म, पुनर्जन्म ही जी वेदांतातील तत्त्वे, त्यांच्या विवेचनावर त्यांचा भर होता. त्यांच्यानंतरच्या काळात मराठीत आख्यानकवी निर्माण झाले. मुक्तेश्वर, वामन, श्रीधर, मोरोपंत ही नावे प्रसिद्धच आहेत. त्यांनी रामायण, महाभारत व पुराणे यातील राम, कृष्ण, हरिचंद्र, ध्रुव यांच्या कथा मराठीत आणून व महापुरुषांचे आदर्श मराठी मनापुढे उभे करून त्याला नानाप्रकारच्या प्रेरणा दिल्या. काव्य लिहिताना 'आम्ही हे तरून जाण्यासाठीच लिहीत आहो,' असे त्यांनी<noinclude></noinclude> 1bcsy6ifa6x332xiwkr7s903j15ihzi पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६३६ 104 73716 231935 164918 2026-06-11T03:15:01Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231935 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६०८}}</noinclude>म्हटले असले तरी, प्राचीन थोर पुरुषांच्या कथा वर्णून त्यांनी मराठ्यांचे मन खंबीर व दृढ करून टाकले, यात शंका नाही. याच काळात महीपतीसारखे चरित्रकार उदयास आले आणि संतांची चरित्रे लिहून त्यांनीही धर्मजागृतीचे कार्य केले. यानंतर विचार करावयाचा तो शाहिरांचा. त्यांचे महत्त्व इतके आहे की त्यांचा काळ म्हणजेच 'मराठी काव्याची प्रभात' होय असे कोणी म्हणतात. हे झाले काव्याविषयी. पण याच काळात गद्य बखरवाङ्मयही लिहिले जात होते आणि मराठी मनाच्या घडणीच्या दृष्टीने या वाङ्मयाचेही तसेच महत्त्व आहे. शाहीर आणि बखरकार यांनी ऐहिक जीवनाकडे लक्ष देऊन स्वकालीन घडामोडींवर रचना केली हा त्यांचा विशेष होय. अशा रीतीने मराठा कालखंडातील साहित्याचा विचार करताना आख्यानकवी, चरित्रकार, शाहीर व बखरकार अशा चार प्रकारच्या साहित्यिकांचा आपल्याला विचार करावयाचा आहे.<br>{{gap}}हा विचार संस्कृतीचे साहित्य एक अंग म्हणून करावयाचा आहे. मराठ्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा त्याच दृष्टीने आपण विचार केला. त्यांचा इतिहास देणे हा आपला हेतू नव्हता. तेच धोरण येथे आहे. काही प्रमुख साहित्यिकांच्या महत्त्वाच्या कृतींचा येथे संस्कृतीच्या दृष्टीने परामर्श घ्यावयाचा आहे. आणि त्याच दृष्टीने त्यांचे महत्त्वमापन करावयाचे आहे.<br><br>'''आख्यानकवी'''<br>{{gap}}प्रथम आख्यानकवींचा विचार करू. त्यांतील पहिला मोठा कवी म्हणजे मुक्तेश्वर हा होय. हा एकनाथांच्या मुलीचा मुलगा. म्हणजे सतराव्या शतकाचा प्रारंभ हा याचा काळ होय. याची मुख्य ख्याती आहे ती महाभारत रचनेसाठी. मराठीतला सर्वश्रेष्ठ कवी, असे याच्या संबंधी, हरिभाऊ आपटे, कृष्णशास्त्री चिपळूणकर अशांसारख्या पंडितांनी म्हटलेले आहे. याने महाभारत मराठीत आणले. पण त्याची आदी, सभा, वन, विराट व सौप्तिक पर्व अशी पाचच पर्वे उपलब्ध आहेत. वि. ल. भावे यांच्या मते यातील आदिपर्व हे खरे श्रेष्ठ काव्य होय. आदिपर्व ही पौर्णिमा असून पुढे वद्य पक्ष लागतो, असे ते म्हणतात. काव्यसौंदर्याचे बहुतेक सर्व गुण याच्या काव्यात दिसून येतात. मनोविकारांची वर्णने, सृष्टीची वर्णने, युद्धांची वर्णने, शृंगार, वीर, करुणादी रस हे काव्यसौंदर्य याच्या भारतात कोठे कोठे उत्कटत्वाने दिसते. सभा पर्वातील द्रौपदीचा संताप, विराटपर्वातील कीचकाची मदोन्मत्तता, वन पर्वातील नलदमयंती विरह, शकुंतला, भीम, अर्जुन, सावित्री ही व्यक्तिचित्रे, यांची वर्णने विशेष उल्लेखनीय आहेत.<br><br>'''मुक्तेश्वर'''<br>{{gap}}मुक्तेश्वर हा विद्वान कवी होता. परिणामवाद, विवर्तवाद, जीवेश्वरवाद, मीमांसाशास्त्र यांविषयीही तो काव्यात प्रसंगविशेषी चर्चा करतो. पण त्याच्या काव्याचे महत्त्व<noinclude></noinclude> 4mut3a2umw3zwzt8gt17ptuv5p8hbgp पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६३७ 104 73717 231936 164919 2026-06-11T03:15:13Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231936 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६०९|| साहित्य आणि कला}}</noinclude>आहे ते त्यातील काव्यगुणांसाठी. भाषाप्रभुत्व, रचनाचातुर्य, प्रसाद, माधुर्य, अर्थ- गांभीर्य, उदात्त कल्पना या गुणांनी मराठी काव्याला त्याने सौंदर्य प्राप्त करून दिले आणि मराठी भाषेला अभिमानास्पद अशी देणगी दिली.<br><br>'''वामन पंडित'''<br>{{gap}}आख्यानकवीत काही कवी न्यायवेदान्तमीमांसादी शास्त्रांत पारंगत होते. त्यांना पंडित कवी म्हणत. संस्कृत महाकाव्याचे आदर्श पुढे ठेवून ते मराठीत रचना करीत अशा कवींत वामनपंडित हा अग्रणी होय. इ. स. १६३६ ते १६९५ असा त्याचा काळ मानला जातो. वामनपंडिताने शास्त्रीय विषयांवर ग्रंथरचना केली आहे आणि काव्यही लिहिले आहे. 'निगमसार' 'कर्मतत्त्व,' 'समश्लोकी गीता' आणि 'यथार्थदीपिका' इ. याचे तात्त्विक ग्रंथ होत. त्यांतील 'यथार्थदीपिका' हा फार प्रसिद्ध आहे. ती गीतेवर टीका आहे. ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असे ज्ञानेश्वरांनी प्रतिपादन केले आहे. ते वामनाला मान्य नाही म्हणून त्यावर आणि इतरही ज्ञानेश्वरांच्या मतांवर त्याने या दीपिकेत टीका केली आहे. पण वामन आज लोकांत प्रसिद्ध आहे तो त्याच्या कथाकाव्यामुळे. त्याने रामायण, महाभारत किंवा भागवत यांवर स्वतंत्रपणे मोठी अशी ग्रंथरचना केलेली नाही. प्रामुख्याने श्रीकृष्णाच्या गोकुळातल्या क्रीडा हा त्याचा विषय आहे. 'वनसुधा', 'वेणुसुधा', 'राधाविलास', 'कात्यायनी व्रत', 'उखळी बंधन', 'राधाभुजंग' ही त्याची प्रकरणे प्रसिद्ध आहेत. रामायणातील 'भरतभाव' आणि 'सीतास्वयंवर' हीही प्रकरणे उत्तम आहेत. भावमधुर कोमल रचना, उत्तम प्रत्ययकारी वर्णने, शब्दचित्रे, रसाविष्कार, मनोहर नादमधुर भाषा हे त्याच्या काव्याचे विशेष गुण आहेत. एकनाथांप्रमाणेच वामन हा विषयाला अध्यात्मरंग देतो. वसुदेवाने हरीला यशोदेपुढे ठेवले व तिची मुलगी आणली म्हणजे प्रत्यक्ष मायाच आणली. त्यामुळेच तो मग बद्ध झाला. रामाने शिवधनुर्भंग केला म्हणजे संसाराचाच भंग केला. वधू आणि वर म्हणजे शांती आणि आत्मा होत. अशी वर्णने हा करतो.<br>{{gap}}जगन्नाथ पंडिताच्या गंगालहरीचे आणि भर्तृहरीच्या शतकांचे वामनाने भाषांतर केले आहे. तेही अनेकांच्या वाचनात असते. पंडित कवींना यमकाची हौस फार. त्याला वामनही अपवाद नाही. म्हणूनच त्याला यमक्या 'वामन' असे नाव पडले आहे. पंडित कवी कोठे कोठे अत्यंत अश्लील लिहितात आणि ते सर्व हरी म्हणजे परमात्मा आणि राधा म्हणजे माया अशा वर्णनाने पचविण्याचा प्रयत्य करतात, पण हे अश्लाघ्य आहे असे वाटते. वामनाने काही ठिकाणी याचा अतिरेक केला अहो<br><br>'''रघुनाथ पंडित'''<br>{{gap}}वामनानंतर रघुनाथपंडित हा कवी येतो. अठराव्या शतकाच्या प्रारंभी हा होऊन गेला. 'नलदमयंतीस्वयंवराख्यान' हे याचे सुप्रसिद्ध काव्य होय. काहींच्या मते<noinclude><br>{{gap}}३९</noinclude> gzwdq4arhb2dlkq7xssnslsoumpyhph पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६३८ 104 73718 231937 164920 2026-06-11T03:15:30Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231937 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६१०}}</noinclude>मराठीतला हा सर्वश्रेष्ठ कवी होय. वि. ल. भावे यांनी रघुनाथ पंडितांचा खूप गौरव केला आहे. पण त्याचे काव्य करामतीचे, मेहनतीचे फल आहे, असे ते म्हणतात. मन वेडावून टाकण्याचे, नवे अनुभवविश्व पुढे उभे करण्याचे सामर्थ्य त्याच्या कवितेत, त्यांच्या मते नाही. एरवी मागे वर्णिलेले सर्व काव्यगुण त्याच्या या काव्यात आढळतात, हे त्यांनाही मान्य आहे.<br><br>'''सामराज'''<br>{{gap}}निरंजन माधव आणि सामराज हे दोन कवी काहीसे प्रसिद्ध आहेत. निरंजन माधव हा थोरले बाजीराव आणि नानासाहेब पेशवे यांच्या पदरी होता. 'संप्रदाय परिमळ' हा याचा ग्रंथ प्रसिद्ध असून, त्याने आपली गुरुपरंपरा आपल्या स्त्रीस सांगितली आहे. 'मंत्ररामचरित,' 'निर्वोष्ठ राघवचरित,' 'चिद्बोध रामायण', 'रामकर्णामृत' अशी रामकथेवर याने बरीच रचना केली आहे. हा सर्व देशभर हिंडत असे. आणि ज्या ज्या देवतांचे तो दर्शन घेई त्यांवर स्तोत्रे रचीत असे. क्षेत्रामधील उपाध्ये, वडवे, गयावळ यांच्या नीतिहीन लोभी वृत्तीवर याने आपल्या कवनात फार कडक टीका केली आहे. सामराज या कवीचे 'रुक्मिणीहरण' हे एकच काव्य प्रसिद्ध आहे. पण त्यामुळे त्याला फार मोठी कीर्ती मिळालेली आहे. याचे एकंदर ८ सर्ग असून ११०० श्लोक आहेत. रुक्मिणीला तिच्या आईने सासरी कसे वागावं याचा उपदेश केला आहे. तो त्या काळच्या मुलींच्या दृष्टीने उत्तम आहे, असे टीकाकार म्हणतात. (पण रुक्मिणी ही राजकन्या होती व महाराणी व्हावयाची होती. त्या दृष्टीने हा उपदेश हास्यास्पद वाटतो). एकंदर रुक्मिणीहरण काव्याविषयी लिहिताना डॉ. वाटवे म्हणतात, येथे प्राचीन मराठी पंडिती काव्य खऱ्या अर्थाने साकार झाले आहे.<br><br>'''श्रीधर'''<br>{{gap}}आख्यानकवींत श्रीधर कवीला फार महत्त्वाचे स्थान आहे. आधीच्या कवींनी स्फुट रचना पुष्कळ केल्या. मुक्तेश्वराने सर्व महाभारत रचण्यास प्रारंभ केला. पण पाचच पर्वे त्याच्या हातून झाली. या तुलनेने पाहता श्रीधराचे कार्य फार मोठे आहे. 'हरिविजय', 'रामविजय', 'पांडवप्रताप', 'जैमिनी अश्वमेध ', इ. मोठे ग्रंथ याने पूर्ण करून टाकले. कवी मोरोपंत याने अशीच मोठी रचना केली आहे. पण ती सर्व आर्यावृत्तात व संस्कृतप्रचुर भाषेत केल्यामुळे बहुजनसमाजाला दुर्बोध झाली. आख्यान कवींपैकी सर्व पंडित कवींची हीच वृत्ती आहे. अक्षरगणवृत्तांची त्यांना हौस फार. त्यामुळे व संस्कृतप्रचुतेरमुळे ते समाजापासून दूर गेले. श्रीधर कवीने आपली ही सर्व रचना ओवीवृत्तात व साध्या सोप्या नित्याच्या सुबोध भाषेत केली आहे. त्यामुळे खेड्या- पाड्यांतून घरोघर हरिविजय, रामविजय हे त्यांचे ग्रंथ अजूनही आवडीने वाचले जातात. रामकृष्णाच्या कथा सर्वजनांच्या मुखी करून टाकण्याचे मोठे श्रेय श्रीधराला आहे.<br><noinclude></noinclude> s74g5xqncj1p9omgdna2w24ybukjly0 पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६३९ 104 73719 231938 164923 2026-06-11T03:16:02Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231938 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६११|| साहित्य आणि कला}}</noinclude>{{gap}}साध्या सोप्या भाषेत लिहिल्यामुळे श्रीधराची कविता काव्यगुणात कमी पडली, असे मुळीच नाही. रस, अलंकार, वर्णनशैली, संवादरचना, संक्षेपविस्ताराचे कौशल्य, स्वभावलेखन या सर्व गुणांत श्रीधर कोठेही कमी नाही.<br>{{gap}}रामविजय, पांडवप्रताप इ. ग्रंथ श्रीधराने मूळ रामायण महाभारत यांवरूनच लिहिले. पण मध्यंतरीच्या काळात या मूळ ग्रंथांत भर पडत गेली व मूळ कथानकात त्या त्या कवींनी फेरफारही खूप केले. श्रीधराने या सर्वांतून थोडा थोडा भाग घेऊन आपली रचना केली आहे.<br>{{gap}}या मोठ्या रचनांशिवाय 'शिवलीलामृत', पांडुरंगमाहात्म्य' 'व्यंकटेश- माहात्म्य', 'ध्रुवचरित्र' अशी स्फुटरचनाही श्रीधराने केली आहे. त्यांतील 'शिवलीलामृत' हा ग्रंथ फार लोकप्रिय आहे. अनेकांच्या तो नित्यपाठात अजूनही आहे.<br>{{gap}}आपली सर्व रचना श्रीधराने इ. स. १७०२ ते १७२० या काळात केलेली आहे.<br>{{gap}}मध्वमुनी आणि त्याचा शिष्य अमृतराय हे, पहिला आपल्या पदरचेनेसाठी आणि दुसरा कटावरचनेसाठी, प्रसिद्ध आहेत. धनेश्वराची कथा व चोळराजाची कथा या मध्वमुनीच्या रचना आहेत. या दोघांपैकी मोठी ग्रंथरचना कोणी केलेली नाही. पण मध्वमुनीची पदरचना मधुर असल्यामुळे त्या पदांचा प्रसार घरोघरी झाला. आणि अमृतरायाला प्रसिद्धी मिळाली ती त्याच्या कटावांमुळे. हे कटाव प्रास, अनुप्रास, यमके यांचा पाऊस पाडतात. त्यामुळे ऐकणारा मोहून जातो. कीर्तनकारांनी यांचा विशेष उपयोग केला. स्वतः अमृतराय कीर्तनकार होता. त्यामुळे त्या वेळी हे कटाव ज्याच्या त्याच्या तोंडी झाले. दोघेही कवी अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेले.<br><br>'''मोरोपंत'''<br>{{gap}}आख्यानकवींमध्ये सर्वात विख्यात म्हणजे मोरोपंत. १७२९ ते १७९४ हा याचा काळ. बाबूजी नाईक बारामतीकर यांच्या पदरी ते पुराणिक होते. तेथेच त्यांनी आपली सर्व कविता केली. पंतांची एकंदर कविता पाऊण लक्ष आहे. आणि त्यातील निम्म्याच्या वर आर्यावृत्तात आहे. संस्कृत शास्त्र व काव्यनाटके यांचा पंतांनी कसून अभ्यास केला होता. त्यांची ९००० कविता प्रत्यक्ष संस्कृतातच आहे. यामुळे त्यांच्या भाषेत संस्कृतप्रचुरता फार आली आहे. 'कुशलवोपाख्यान', 'हरिश्चंद्राख्यान', प्रल्हाद- विजय', 'देवी माहात्म्य', 'सीतागीत', 'रुक्मिणीगीत' ही यांची स्फुटरचना होय. 'संशयरत्नमाला', 'केकावली' ही यांची स्तोत्रे महाराष्ट्रात फारच प्रसिद्ध आहेत. 'आर्याभारत', 'कृष्णविजय', 'मंत्रभागवत', 'हरिवंश' ही पंतांची मोठी काव्ये होत.<br>{{gap}}पंतांना त्यांच्या हयातीतच अमाप प्रसिद्धी मिळाली. रस, वर्णनशैली, अलंकार, स्वभावचित्रे, भाषाप्रभुत्व इ. सर्व गुणांनी मोरोपंतांची कविता सजलेली आहे. त्यांच्या आर्यांचा कीर्तनकारांना फार उपयोग होत असे. आणि त्या काळी, सर्व भारतभर मराठ्यांच्या ठाण्यांतून उत्सव-समारंभात कीर्तने होत असल्यामुळे, पंतांची कविता सर्वत्र पसरली.<br><noinclude></noinclude> 9eki089k8xwpn3ekt2a611dmaj7tn78 पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४० 104 73720 231939 164925 2026-06-11T03:16:13Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231939 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६११}}</noinclude>{{gap}}संस्कृतातले सर्व आख्यानभांडार राम, कृष्ण, पांडव या वीरपुरुषांची स्फूर्ति दायक चरित्रे, पुराणातील हरिश्चंद्र, ध्रुव, अंबरीष, इ. आदर्श राजपुरुष, सीता, सावित्री, दमयंती, अनसूया यांच्या अनमोल कथा मराठीत आणून या आख्यानकवींनी मराठीला व महाराष्ट्राला कायमचे ऋणी करून ठेविले, याविषयी दुमत नाही. पण ऐतिहासिक दृष्टीने यांचे मूल्यमापन करून त्याचे स्थान ठरविणे हे अवश्य आहे.<br><br>'''महाकवी'''<br>{{gap}}'प्राचीन मराठी पंडित काव्य' या नावाचा एक ग्रंथ डॉ. के. ना. वाटवे यांनी लिहिला आहे. त्यात मोरोपंतांविषयीचे आपले मत मांडले आहे. त्यांच्या काव्याचे सर्व गुणवर्णन वाटवे यांनी केले आहे. पण ते महाकवी होते काय या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणतात, 'संस्कृतातील माघ, भारवी, श्रीहर्ष, इ. विदग्ध कवींप्रमाणे, पंतांनी महाभारताचा एखादा सुटा कथाभाग घेऊन, त्यावर स्वतःची कलाकुसर केली असती, पांडित्य, कलात्मकता आणली असती, त्या कथेतून फलित होणारे विशिष्ट तत्त्व दर्शविले असते, आणि त्या स्वयंपूर्ण कथेवर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि स्वकालाच ठसा उमटविला असता, तर त्यांचे 'आर्याभारत' हे महाकाव्य झाले असते. पंतांनी काही ठिकाणी स्वतःच्या उपमा, उत्प्रेक्षा इत्यादी घातल्या आहेत; पण एवढ्याने काम भागण्यासारखे नाही. आर्ष महाकाव्याचे जुने कथानक नव्या संस्कृतीच्या, विद्याकलांच्या आणि विशिष्ट हेतूंच्या चौकटीत बसवावे, तेव्हाच ते विदग्ध महाकाव्य होते, एरवी नाही. त्यामुळे मुक्तेश्वरांच्या संक्षेप रामायणाप्रमाणे किंवा त्यांच्या भारताप्रमाणे, 'आर्याभारत' हेही महाकाव्य नाही.'<br>{{gap}}असेच मत ग्रंथाच्या शेवटी उपसंहारात एकंदर सर्व पंडित कवींविषयी त्यांनी मांडले आहे. काही तरी तत्त्व, काही ध्येयवाद कवीच्या मनापुढे असला पाहिजे; तो व्यक्त करण्यासाठी त्याने काव्यरचना केली तरच ते महाकाव्य होते. 'राजधर्म हा त्यागधर्म आहे' हे तत्त्व कालिदासाने 'रघुवंशा'त मूर्त केले आहे. भारवीने 'किरातार्जुनीया'तून एक नवा अर्थ काढला. संन्यासवृत्तीची मरगळ त्या वेळी समाजाला आली होती. ती मोडून काढून, अर्जुनाच्या तोंडून कवीने कणखर प्रवृत्तीची चढाई दाखविली. श्रीहर्षाने 'नैषधीयचरिता'त जयचंद आणि पृथ्वीराज यांच्यांतील कलहाचा घातकपणा सूचित केला. अशा तऱ्हेचा ध्येयवाद आणि स्वकालसमरसता पंडिती काव्यात प्रायः आढळून येत नाही. जुन्या कथांचा नवीन अर्थ ते सांगत नाहीत. विशिष्ट विचारसरणीचा पाठपुरावा ते करीत नाहीत. थोडक्यात म्हणजे ज्याला महाकाव्याचा विशिष्ट हेतू म्हणतात तो कुठेही दिसत नाही. मोरोपंत आणि वामन यांनी जे काही चांगले लिहिले आहे त्याची पूर्ण जाणीव बाळगून असे सांगावेसे वाटते की यांना संस्कृत महाकवींची बरोबरी नाही. डॉ. वाळिंबे यांनीही, पंडिती कवींचा अभिजातवाद हा बेगडी अभिजात वाद आहे, असे म्हटले आहे. विष्णुशास्त्री यांना मोरोपंतांचा फार<noinclude></noinclude> g05g33uidehc9u5511e7pfis2vr2wft पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४१ 104 73721 231940 164929 2026-06-11T03:16:27Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231940 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६१३|| साहित्य आणि कला}}</noinclude>अभिमान होता हे प्रसिद्धच आहे, पण त्यांनीही त्यांच्याविषयी व एकंदर मराठी कवीं विषयी हेच मत दिले आहे. 'आमच्या महाराष्ट्र कवींनी सामान्यतः पाहाता अर्थव्यंजनाच्या पलीकडे थोडेच लक्ष दिलेले आढळते. अर्थ शब्दांनी व्यक्त झाला की झाले.' असे त्यांनी मोरोपंतावरील विवेचनाच्या समारोपात म्हटले आहे.<br><br>'''स्वतंत्र तत्त्व'''<br>{{gap}}पण डॉ. वाटवे यांनी दाखविलेली उणीव ही खरी उणीव आहे. स्वतंत्र तत्व, स्वतंत्र ध्येय, स्वतंत्र विचारसरणी सांगण्यासाठी मराठी कवींनी काव्य लिहिले नाही. रघुवंश, किरातार्जुनीय, शाकुंतल, मृच्छकटिक यांसारख्या स्वतंत्र काव्यकृती मराठी कवींना साधल्या नाहीत. वरील काव्य, नाटके जगाला, पाश्चात्य जगालाही, मोह घालतात. तशी आख्यानकवितेत एकही रचना नाही.<br>{{gap}}तरीही वर सांगितले त्याप्रमाणे मराठे व महाराष्ट्र त्यांचा ऋणी आहे. मराठी भाषेला त्यांनी संपन्न केले. आणि प्राचीन कथा मराठीत आणून प्राचीन परंपरेचे व धर्माचे रक्षण केले हे खरेच आहे. एवढे ऋण आपण मान्य केलेच पाहिजे.<br><br>'''संप्रदाय'''<br>{{gap}}हा आख्यान कवितांचा विचार झाला. आता याच काळात महाराष्ट्रात जे भिन्नभिन्न संप्रदाय किंवा पंथ रूढ होते त्यांच्या वाङ्मयाची माहिती देऊन हे विवेचन पुरे करू. महानुभाव, नाथ, दत्त, वारकरी आणि रामदासी असे पाच पंथ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांतील महानुभाव पंथाचे विवेचन पूर्वी येऊन गेले आहे. बहामनी कालाच विचार करताना वारकरी आणि रामदासी संप्रदायांचा विचार विस्तृतपणे केला आहे. आता राहिले नाथ आणि दत्त संप्रदाय.<br><br>'''दत्तसंप्रदाय'''<br>{{gap}}दत्तसंप्रदाय हा फार प्राचीन आहे. पुराणात त्याची वर्णने येतात. महानुभावांचे दत्त हे दैवत आहे. पण तो त्रिमूर्ती दत्त नव्हे. तो एकमुखी दत्त असून, त्याचे माहात्म्य 'सैहाद्रवर्णनात' आले आहे, हे मागे सांगितलेच आहे. 'या मार्गासि आदिकारण दत्तगुरू' असे चक्रधरानेच म्हटले असल्यामुळे महानुभाव दत्तसंप्रदायच होय, असे कोणी म्हणतात. पण महाराष्ट्रात आज जो दत्तसंप्रदाय रूढ आहे तो त्रिमुखी दत्ताचा आहे. आणि त्याचे प्रवर्तक पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेले नरसिंह सरस्वती हे होत. त्यांचा स्वतःचा एकही ग्रंथ नाही. पण मागे उल्लेखिलेला 'गुरुचरित्र' हा सरस्वती गंगाधराचा ग्रंथ तो या पंथाचा प्रमुख ग्रंथ होय. यात काय प्रतिपाद्य आहे ते मागे सांगितलेच आहे. या पंथाने हिंदुमुसलमानांचे ऐक्य करण्याचा प्रयत्न केला होता, असे म्हणतात. आणि श्रीदत्त आपल्या भक्तांना मलंग<noinclude></noinclude> 1kqzejiuit05ez6vl6dh5f2zp73y0gm पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४२ 104 73722 231941 164930 2026-06-11T03:16:49Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231941 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६१४}}</noinclude>वेषात दर्शन देत असत, असे सांगतात. पण प्रत्यक्षात याची काही फलप्राप्ती झाली नाही हे उघडच आहे.<br><br>'''नाथपंथ'''<br>{{gap}}दुसरा पंथ म्हणजे नाथसंप्रदाय हा होय. हा संप्रदाय स्वतः श्रीशंकरानेच प्रस्थापित केला आहे. आदिनाथ, मत्स्येन्द्रनाथ, गोरखनाथ, गैनीनाथ, निवृत्तिनाथ, ज्ञाननाथ (ज्ञानेश्वर) अशी आपली परंपरा स्वतः ज्ञानेश्वरांनीच सांगितली आहे. पण ज्ञानेश्वर नाथपथी असले तरी, त्यांनी त्या संप्रदायाचे विवरण करणारे ग्रंथ लिहिले नाहीत, त्यांचे सर्व ग्रंथ वारकरी पंथाचे आहेत. त्यांच्या पूर्वीचे गोरक्षनाथ यांची काही पदे व गैनीनाथांची 'गोरक्षगीता' एवढेच त्या काळचे मराठी वाङ्मय आहे. पण नाथसंप्रदाय हा पुढे चालूच राहिला आणि त्याने मराठीला वाङ्मयही विपुल दिले. त्यापैकी दासोपंताचे वाङ्मय फार प्रसिद्ध आहे. गीतेवर त्याने चारपाच टीका लिहिल्या. त्यांपैकी 'गीतार्णव' ही टीका सव्वा लक्ष ओव्यांची आहे. याशिवाय याने सव्वा लक्ष पदेही रचली आहेत. 'गीतार्णव' हा ग्रंथ इतका व्यापक आहे की त्यात अमुक विषय आल नाही असे नाही. पण दासोपंताचे वाङ्मय हे नाथपंथाचे विवरण करीत नाही. तो नाथपंथी होता हे खरे. आणि हठयोग व एकांतिक गुरुभक्ती यांचे वर्णन तो ग्रंथात करतो. पण मुख्य विजय तो नाही. त्याच्या नंतर झालेला नाथपंथी म्हणजे सत्यामलनाथ हा होय. त्याचा 'सिद्धान्तरहस्य' हा ग्रंथ होय. गैनीनाथ, गुप्तनाथ, उद्बोधनाथ, केसरीनाथ व शिवदिननाथ अशी ही शिष्यपरंपरा आहे. यातील शिवदिननाथ किंवा 'शिवदिन केसरी' हा विशेष प्रसिद्ध आहे. याने 'विवेक दर्पण', 'ज्ञानप्रदीप' वगैरे ग्रंथ रचले. इ. स. १६९८ ते १७७४ हा याचा काल होय. परंपरेतल्या इतर लोकांनी पदे, अभंग वगैरे रचना केली. मोठा ग्रंथ असा रचला नाही.<br><br>'''जैन मराठी काव्य'''<br>{{gap}}दत्तसंप्रदाय व नाथपंथ यांच्याप्रमाणेच जैन पंथीय मराठी साहित्याचाही विचार करणे अवश्य आहे. मराठीत याचा अभ्यास पूर्वी फारसा झालेला नाही. मराठी वाङ्मयाच्या इतिहासात याचा विचार फारसा कोणी करीत नाही. पण तो केला पाहिजे इतके ते साहित्य विपुल आहे आणि महाराष्ट्रात राहणारे जैन हे महाराष्ट्राचा व मराठीचा इतरांइतकाच अभिमान धरतात, हे फार महत्त्वाचे कारण आहे. जैनांच्या 'तीर्थकल्पा'त सातवाहन राजाची कथा येते आणि तेथे पैठणचा 'महाराष्ट्र लक्ष्मीचे रत्न' असा उल्लेख आलेला आहे.<br>{{gap}}ब्रह्मजिनदास हा पंधराव्या शतकातील प्रसिद्ध गुजराथी साहित्यिक होय. त्याने आपल्या शिष्यांना मराठीत लेखन करण्याची प्रेरणा दिली. त्याने स्वतः मराठीत 'श्रेणिक चरित्र' हा ग्रंथ लिहिला आहे. शिशुनाग वंशातील श्रेणिक- बिंबिसार- यांचे<noinclude></noinclude> qy9yn48weiy2uq7fkltpuh6fk0sr1sn पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४३ 104 73723 231942 164931 2026-06-11T03:17:03Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231942 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६१५|| साहित्य आणि कला}}</noinclude>हे चरित्र आहे. त्यांचे शिष्य मेघराज, कामराज आणि सूरीजन यांनी अनुक्रमे 'यशोधरचरित्र', 'सुदर्शनचरित्र' व 'परमहंसकथा' असे ग्रंथ मराठीत रचले. ब्रह्मजिनदासाचा एक शिष्य ब्रह्मगुणदास हाच पुढे गुणकीर्ती आचार्य म्हणून प्रसिद्ध झाला. 'पद्मपुराण' हे जैनांचे रामायण त्याने रचले आहे. याशिवाय 'धर्मामृत', 'रुक्मिणीहरण', 'नेमिनाथ पाळणा' इ. अनेक ग्रंथ याने लिहिले आहेत. अभ्यासक या गुणकीर्तीला जैन मराठी साहित्यात आद्य स्थान देतात. चरित्र, भाष्य, टीका, गीत इ. सर्व प्रकारचे वाङ्मय याने लिहिले आहे.<br>{{gap}}मेघराजाचे 'यशोधरचरित्र' हे एक चांगले काव्य आहे. यशोधर व त्याची राणी अमृता यांची ही कथा आहे. यात शृंगार आणि वैराग्य यांचे सुंदर वर्णन केले आहे. याशिवाय 'पार्श्वनाथभवांतर', 'कृष्णगीत', 'गुजरी मऱ्हाठी गीत' अशी विविध रचना त्याने केली आहे. याचा गुरुबंधू पंडित सूरीजन याने 'परमहंसकथा' हा आध्यात्मिक रूपकात्मक ग्रंथ रचला आहे. प्रमाणबद्धता, नाट्य यांनी हा ग्रंथ संपन्न आहे.<br>{{gap}}१६५० च्या सुमारास दामा पंडित याने 'जंबुस्वामी-चरित्र' व 'दानशील तपभावना' असे दोन ग्रंथ रचले. जंबुस्वामी हे महावीरांनंतरचे तिसरे आचार्य. त्यांचे हे काव्यमय चरित्र फार महत्त्वाचे मानले जाते. 'दानशील तपभावना' हा ओवीबद्ध ग्रंथ आहे व त्यात या गुणांची महती संवादरूपाने वर्णिली आहे. सतराव्या शतकाच्या अखेरीस लातूर येथील भट्टारक महीचंद्र याने 'आदिनाथपुराण' या महाकाव्याची निर्मिती केली. आद्य तीर्थंकर ऋषभदेव यांचे हे चरित्र आहे. महीचंद्र याचे एक शिष्य देवेंद्रकीर्ती यांनी 'कालिकापुराण' हा ग्रंथ रचला. कष्टकरी जनतेची कालिका ही देवता आहे. तिचे हे पुराण आहे. कासार व बोगार समाजात याचे श्रद्धेने वाचक केले जाते.<br>{{gap}}जिनसागर हा जैन मराठी कवी अठराव्या शतकात होऊन गेला. 'जीवंधरपुराण' ही त्याची कथा शृंगार व वीररसाने ओथंबलेली आहे. जिनसागराने याशिवाय व्रतकथा, आरत्या, स्तोत्रे अशीही रचना केली आहे. याच शतकात जनार्दन याने 'श्रेणिकचरित्र' लिहिले. हा पुराणकाव्याचा आदर्श मानला जातो. या काव्यात त्याचा मराठीचा अभिमान प्रगट झाला आहे.<br>{{gap}}महतीसागर हा कवी एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी होऊन गेला. बारामती, फलटण या भागात त्याचे वास्तव्य असे. 'महती- काव्य-कुंज' या नावाने त्याचे काव्य प्रसिद्ध आहे. याच काळात १८१३ साली कवी रत्नकीर्ती याने 'उपदेशरत्नमाला' हा ग्रंथ लिहिला. त्यात सर्व जैन धर्माचे सार ग्रंथकर्त्याने आणले आहे.<br>{{gap}}या वर्णनावरून जैन मराठी साहित्याचे महत्त्व ध्यानात येईल. पुराण, चरित्र, आख्यान, धर्मकथा, खंडकाव्य, स्तोत्र, आरत्या, पदे, इ. सर्व प्रकारचे आणि विपुल वाङ्मय जैन मराठीत आहे. त्याचा एक विशेष म्हणजे त्यात कथानायक देव किंवा ऋषी नसून राजे, व्यापारी, अथवा शूद्रही असतात. त्यात चातुर्वर्ण्य संस्थेला महत्त्व नाही, यज्ञयागाला महत्त्व नाही, तर अहिंसादी गुणांचे वर्णन येते.<br><noinclude></noinclude> 3kv5ffl40wqtotuv18ys75jjd5qwykx पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४४ 104 73724 231943 164932 2026-06-11T03:17:16Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231943 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६१६}}</noinclude>{{gap}}पण स्वकालाशी समरस होऊन, काही विशिष्ट उद्दिष्ट, काही ध्येय डोळ्यांपुढे ठेवून रचना करणे हे जे महाकाव्याचे प्रधान लक्षण ते जैनपंथीय मराठी काव्यांतही दिसत नाही.<br><br>'''स्वकालविमुख'''<br>{{gap}}आख्यानकवी आणि दासोपंतापासून पुढे उल्लेखिलेले संप्रदायकवी हे पूर्णपणे स्वकालविमुख होते. महाराष्ट्रावर भयानक संकट कोसळत होती. प्रचंड संघर्ष चालू होते. पण यांनी, क्तचित काही अपवादभूत निर्देश वगळता, त्याची दखलही घेतली नाही. महाराष्ट्र समाजात अनंत घडामोडी चालू होत्या. त्याचा उत्कर्षापकर्ष चालू होता. त्यांविषयी काही सामाजिक, राजकीय, आर्थिक असा एखादा विचार घेऊन, तत्त्व घेऊन त्याला मूर्त रूप काव्यात द्यावे, असे कधी कोणास वाटले नाही. 'कविः क्रांतदर्शी', 'रवि न देखे ते कवी देखे', हे उद्गार सार्थ होतील असा एकही कवी या काळात झाला नाही. संस्कृत महाभारत वाचताना हे सर्व विशेष ध्यानात येते. स्वकालीन सर्वांगीण जीवनाविषयी त्या ग्रंथाचा कर्ता किती जागरूक होता हे पाहून, तशी जागृती एकाही मराठी कवीने दाखवू नये, याचे आश्चर्य वाटते.<br><br>'''वास्तवहीन'''<br>{{gap}}स्वकालाच्या राजकीय किंवा सामाजिक घडामोडी सोडून दिल्या तरी इतर जे वास्तव जीवन त्याचे अवलोकन तरी या कवींनी करावे. पण तेही त्यांनी केले नाही. निसर्गाचे वर्णन करताना त्या वनात साही ऋतू एकदम अवतरले, असे ते बिनदिक्कत लिहितात. ज्याला अप्रतिम रूप नाही असा पुरुष किंवा स्त्री यांच्या काव्यात आढळणार नाही. वस्त्रालंकारांच्या बाबतीत, पक्वान्नांच्या बाबतीत सर्वत्र हेच आहे. इहलोकात जे कधी कुठे आढळत नाही ते यांच्या काव्यात सदैव हात जोडून उभे आहे.<br><br>'''मूल्यमापन'''<br>{{gap}}दासोपंताविषयी विवेचन केल्यानंतर समारोपादाखल वि. ल. भावे यांनी जे लिहिले आहे तेच, थोड्याफार फरकाने, एकंदर वर निर्देशिलेल्या मराठी कवींविषयी खरे आहे, असे वाटते. दासोपंताचे वडील दिगंबरपंत हे नारायण पेठचे देशपांडे होते. एकदा दुष्काळ असल्यामुळे त्यांच्याकडून बादशहाकडे वेळेवर रसद पोचली नाही. तेव्हा त्याने दासोपंताला पकडून ओलीस म्हणून ठेवले आणि, रसद आली नाही तर त्याला बाटवून मुसलमान करू, अशी धमकी दिली. सुदैवाने पुढे रसद पोचली आणि दासोपंताची सुटका झाली. ह्याचा संदर्भ देऊन भावे लिहितात, दासोपंताची ही प्रचंड रचना पाहून कौतुक वाटते. पण एवढा मोठा विशाल बुद्धीचा पुरुष, सरकारी नोकरी सुटल्यानंतर, केवळ वेदांत कुटीत शांतपणे स्वस्थ राहावा, याबद्दल थोडे वाईटही<noinclude></noinclude> mvhpokjl4hhb1qg4ko61k0u83ao1n9q पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४५ 104 73725 231944 164933 2026-06-11T03:17:28Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231944 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६१७|| साहित्य आणि कला}}</noinclude>वाटते. ज्याने दुष्टपणाने आपल्याला छळले, व ज्याच्या अमलात आपल्या देशावर, आपल्या लोकांवर आपल्या मुलाबाळांवर असा जुलूम झाला, अशा बादशहाला काही अद्दल घडवावी, असे दासोपंताच्या मनात देखील आले नाही व त्याने तसा यत्नही केला नाही, याबद्दल मन खट्टू होते. आणि या शांत समाधानी वृत्तीबद्दल थोडा किळसही येतो. क्षणभर असेही मनात येते की ज्यांना इहलोकाची चाडच राहिली नाही ते इहलोकी राहण्याला थोडे अयोग्यच खरे.'<br><br>'''चरित्र वाङ्मय'''<br>{{gap}}आख्यान काव्यानंतर जुन्या मराठीतील चरित्र वाङ्मयाचा विचार करावयाचा. चरित्र लेखनपरंपरा तशी मराठीत जुनीच आहे. महीन्द्रभट याने 'लीळाचरित्र' हे चक्रधरांचे चरित्र लिहिले. नामदेवाने आदी, तीर्थावळी, समाधी असे भाग करून ज्ञानेश्वरांचे चरित्र लिहिले. नामदेव, तुकाराम, निरंजनमाधव यांनी लहान मोठी आत्मचरित्रे लिहिली. सरस्वती गंगाधरांच्या 'गुरुचरित्रा'चा उल्लेख मागे आलाच आहे. बखरीत काही चरित्रे आहेत. पण ती गद्य आहेत. त्यांचा विचार तेथे करू.<br><br>'''महीपती'''<br>{{gap}}वरील लेखकांनी एकेका पुरुषाचे चरित्र लिहिले. यापुढे अनेकांची चरित्रे लिहिणारे ग्रंथकार झाले. उद्धवचिद्घन, दासोदिगंबर आणि महीपतीबुवा ताहराबादकर हे प्रसिद्ध चरित्रकार होत. त्यातील महीपतीचे ग्रंथ हे सर्व महाराष्ट्रभर पसरले व गाजले. या लोकांनी देवादिकांची नाही, पण ज्ञानेश्वर, तुकाराम इ. साधुसंतांची चरित्रे लिहिली. ऐहिक पराक्रम करणाऱ्यांचे चरित्र त्यांनी एकही लिहिले नाही. 'भक्तविजय,' 'संत- लीलामृत', 'भक्तलीलामृत', व 'संतविजय' असे महीपतीचे चार चरित्रग्रंथ प्रसिद्ध आहेत. ते १७६२ ते १७७५ या काळात लिहिलेले आहेत. निजशांतिसुख, विवेक लाभावा, भक्तिमहिमा वाढावा, या हेतूने ही चरित्रे लिहिली, असे महीपती सांगतो.<br><br>'''चमत्कार प्रधान'''<br>{{gap}}सध्या ज्याला आपण चरित्र म्हणतो तशी ही चरित्रे नाहीत. स्थलकालाचा निश्चय यांत नाही. तसा प्रयत्न, तशी कल्पनाही, या चरित्रकारांच्या मनात नाही. आख्यानकवी ज्याप्रमाणे स्वकालापासून अलिप्त, तसेच हे चरित्रकार अलिप्त होते. राजकीय, आर्थिक घडामोडी करणारा माणूस यांना चरित्र लिहिण्यास योग्य वाटत नाही. ते फक्त साधुसंतांची चरित्रे लिहितात. आणि त्यातही चमत्कारांना प्राधान्य असते. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास यांचे तत्त्वज्ञान विवरून सांगावे असा यांचा हेतू नाही. भक्तांवर संकटे आली आणि देवाने चमत्कार करून किंवा त्यांनी स्वतः चमत्कार करून ती निवारली. हे वर्णन करून भक्तांचा व भक्तीचा महिमा वर्णावा, असा या चरित्रकारांचा हेतू आहे.<br><noinclude></noinclude> 50e0wd4r7f3tsn98t5kq6zgsgglysbe पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४६ 104 73726 231945 164934 2026-06-11T03:17:40Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231945 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६१८}}</noinclude>{{gap}}भाषेला सौंदर्य आणावे, असा सुद्धा यांचा प्रयत्न नसतो. आवेश, त्वेष, ध्वनी, उपरोध, कल्पनाप्रचुरता असे काही भाषासौंदर्य या ग्रंथात नाही. अगदी साध्या भाषेत महीपतीने आपली सर्व चरित्रे लिहिली आहेत.<br>{{gap}}महीपतीनंतर भीम स्वामी व राजाराम प्रासादी असे दोन चरित्रकार होऊन गेले. हे दोघेही समर्थ संप्रदायातले होते. यांनी समर्थांचे चरित्र लिहिले आहेच. पण पुढे महीपतीने सांगितलेली बरीच चरित्रे यांनी पुन्हा सांगितली आहेत.<br>{{gap}}इतिहास या दृष्टीने या चरित्रग्रंथांना फारसे महत्त्व नाही. यात स्थलकालनिश्चय नाही. दैवी चमत्कार सर्व असल्यामुळे कार्यकारणचिकित्सा नाही. आणि याच कारणामुळे स्वकालाचे दर्शनही नाही.<br><br>'''शाहीर'''<br>{{gap}}संत, आख्यानकवी आणि चरित्रकार यांहून शाहिरांचे काव्य अगदी वेगळे आहे. मुख्य म्हणजे ऐहिक जीवन, मराठ्यांचे पराक्रम हा त्यांचा विषय आहे. अफजलखानाचा वध, तान्हाजीचा पराक्रम, पानपतचा संग्राम, राक्षसभुवनची लढाई, नारायणरावाचा खून, तळेगावचा संग्राम, खर्ड्याची लढाई, खडकी, अष्टी या लढाया हे त्यांचे विषय लाहेत. लावण्यांमध्ये त्यांनी शृंगार वर्णिला तो मराठा स्त्रीपुरुषांचा शृंगार आहे. त्यांनी दुःखे वर्णिली ती मराठ्यांची आहेत. अशा रीतीने केवळ पारलौकिकात बुडून राहिलेली मराठी कविता त्यांनी इहलोकात आणली आणि म्हणूनच हीच खरी मराठी काव्याची प्रभात, असे कोणी म्हणतात.<br>{{gap}}अगीनदास-(अफजलखानाचा वध), व तुळशीदास- (सिंहगड) हे दोन प्रारंभीचे शाहीर. पण ज्यांची नावे विशेष गाजली ते सर्व शाहीर उत्तर पेशवाईत होऊन गेले. परशुराम, होनाजी, अनंत फंदी, राम जोशी, प्रभाकर, सगनभाऊ हे सहा शाहीर इ. स. १७५४ ते १८४० या काळातले आहेत.<br><br>'''उत्तरकालीन'''<br>{{gap}}परशुराम हा जातीने शिंपी होता. तरुण वयातच तमाशाचा धंदा याने सुरू केला व स्वतःच लावण्या रचून त्यात तो त्या म्हणू लागला. याची ध्रुवपदे ठाशीव असतात. 'सतीला नाही बत्ती, हत्ती आहे शिंदळीच्या धरी', अशी सुभाषिते तो सहज रचतो. मल्हारराव होळकर, फत्तेसिंग गायकवाड यांसारख्या सरदारांवर आणि मुंबईकर इंग्रजांवरही याने पोवाडा रचला आहे.<br><br>'''घनःशाम'''<br>{{gap}}होनाजी बाळा हा आपल्या 'घनःशाम सुंदरा' या अमर भूपाळीने फार प्रसिद्ध आहे. हा जातीने गवळी होता. [ संतकवींमध्ये जसे सर्व जातीचे संत होते तसेच<noinclude></noinclude> 4cpo9j2vyjvvvynq0om3j9r7dgfp89n पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४७ 104 73727 231946 164935 2026-06-11T03:17:51Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231946 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६१९|| साहित्य आणि कला}}</noinclude>शाहिरांत सर्व जातींचे शाहीर होते. तसे नव्हते फक्त पंडित कवींत. कारण ती रचना संस्कृतप्रचुर होती, वृत्तबद्ध होती आणि संस्कृत विदग्ध महाकाव्य हा तिचा आदर्श होता. असो. ] सवाई माधवराव आणि खर्ड्याची लढाई हे याचे दोन पोवाडे फार प्रसिद्ध आहेत. लावण्यांना याने रागदारीच्या चाली लावल्यामुळे याला मोठी कीर्ती मिळाली. 'शंकरपार्वतीसंवाद', 'श्रीकृष्णतुला', 'दमयंती विलाप', 'द्रौपदी- वस्त्रहरण' या व इतर त्याच्या कवनातून सवतीमत्सर, कारुण्य, वात्सल्य, वीररस इ. सर्व भाव प्रगट होतात. 'नूतन वय दोघांचे', 'पति प्रवासामध्ये' 'हार नव्हता साहत' या शृंगारिक लावण्या अजोड आहेत. महादजी शिंदे रंग खेळले, त्यावरही त्याने एक पोवाडा रचला आहे.<br><br>'''राम जोशी'''<br>{{gap}}राम जोशी वाला शाहिरांचा तुरा म्हणतात. लहानपणीच तो लावण्या रचून तमासगिरांना देऊ लागला. पुढे बयाबाई व चिमाबाई यांच्यासह त्याने स्वतःचाच तमाशा काढला. त्यात त्याने अमाप पैसा मिळवला आणि विलासी राहण्यात खर्चही केला. पुढे तो कीर्तनकारही झाला. मोरोपंतांच्या आर्या यानेच प्रथम कीर्तनात आणल्या. 'ब्राह्मणी राज्य जोरावर' या पोवाड्यात याने पुण्याच्या वैभवाचे वर्णन केले आहे. दुष्काळ, लूटमार अशा प्रसंगांवरही त्याने पोवाडे रचले आहेत. पण राम जोश्याची प्रसिद्धी त्याच्या शृंगारी लावण्यासाठी आहे. 'सुंदरा मनामध्ये भरली', 'कोण्या ग सुभगाची मंजरी', 'तुम्ही सजणा' या लावण्यांची गोडी अजूनही अवीट आहे.<br>{{gap}}शाहिरांचा वेदांत, अध्यात्म यांशी तसा काही संबंध नाही. त्यांची वृत्ती अगदी निराळी होती. पण त्यांतील अनेकांनी त्या विषयांवर लावण्या रचल्या आहेत. त्यांना भेदिक लावण्या असे म्हणतात. 'दो दिवसांची तनु ही साची', 'नरजन्मामधि नरा करुनि घे', या राम जोश्याच्या वेदांतपर लावण्या त्या काळी मान्यता पावल्या होत्या. आपल्या शेजारच्या एका ढोंगी बुबावर, 'हटातटाने पटा रंगवुनि' ही त्याने रचलेली लावणी तर सर्वांच्याच तोंडी झाली होती.<br><br>'''प्रभाकर'''<br>{{gap}}प्रभाकराचे नाव राम जोश्याइतकेच, आणि काहींच्या मते, त्यापेक्षाही मोठे आहे. हा गंगुहैबतीच्या प्रसिद्ध फडात असे. 'सवाई माधवराव- रंग', 'खर्ड्याची लढाई', 'दुसरा बाजीराव' हे त्याचे पोवाडे आहेत. 'मोहिनी जशी सुरसभेमधी', 'डुलत डुलत चाले', 'कंठ तुझा मंजूळ', 'नका जाउ दूर देशी' या त्याच्या लावण्या फार लोकप्रिय होत्या, 'धन्य वंश एकेक पुरुष कल्पवृक्ष पिकले', 'अपार दिधलिस संपत्ति सुख भोगायाला', 'यशस्वी झाले श्रीमंत पहिले लढायाला' या पोवाड्यांनी प्रभाकराचे नाव मराठ्यांच्या कायम ध्यानात राहिले आहे.<br><noinclude></noinclude> qnopwsh8ieteq8w3il8sf5fu4f2vm3r पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४८ 104 73728 231947 164936 2026-06-11T03:19:44Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231947 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६२०}}</noinclude><br>'''अनंत फंदी'''<br>{{gap}}अनंत फंदी हाही राम जोश्याप्रमाणेच प्रारंभी तमासगीर आणि पुढे कीर्तनकार झाला. होनाजी बाळाने याला 'कवनाचा सागर' म्हटले आहे. पण त्याची कविता फार थोडी उपलब्ध आहे. त्याने जे उपदेशपर फटके रचले, त्यामुळे त्याला मोठी कीर्ती मिळाली. या कवनांतून त्याची तडफ आणि मार्मिकता दिसून येते.<br>{{gap}}'खर्ड्याची लढाई', 'शेवटचे बाजीराव', 'यशवंतराव होळकर', 'फत्तेसिंग गायकवाड' हे त्याचे पोवाडे प्रसिद्ध आहेत. 'उलटा जमाना' ही त्याची दुष्काळावर रचलेली लावणी आहे. 'धन्य तुझे लावण्य', 'चंद्रावळ' या त्याच्या शृंगारी लावण्या आहेत.<br>{{gap}}शेवटचा मोठा शाहीर म्हणजे सगनभाऊ (१७७८- १८४०) हा होय. हा मुसलमान असून त्याचा शिकलगारीचा धंदा होता. पानपत, खडकी, दुसरा बाजीराव यांवर याने पोवाडे रचले आहेत.<br>{{gap}}या शाहिरी वाङ्मयाचे परीक्षण केले असता, अलंकार, कल्पना, रस, शब्दचित्रे, निसर्गवर्णने, उपहास, विनोद, निवेदनशैली इ. काव्याचे सर्व गुण त्यात ओतप्रोत भरलेले दिसतात. आणि शिवाय शाहिरांनी स्वकालीन ऐहिक जीवन वर्णिले, हा त्याचा आगळा वेगळा विशेष आहे. म्हणूनच मराठी साहित्यात त्यांना मोठे मानाचे स्थान. मिळाले आहे.<br><br>'''द्रष्टेकवी?'''<br>{{gap}}पण हे सर्व सांगितल्यावर क्रांतदर्शी कवी, द्रष्टे कवी अशा दृष्टीने त्यांचे परीक्षण करू लागताच, त्यांच्यात फार उणिवा दिसू लागतात. मराठ्यांच्या इतिहासाचे विवेचन मागे आलेच आहे. त्यांपैकी जे प्रसंग त्यांनी निवडले त्यांची काही मीमांसा यांनी काव्यात केली आहे काय ? दुही, फितुरी, स्वार्थ, राष्ट्राभिमानाचा व कोणत्याही निष्ठेचा अभाव या कारणांनी आपला पराभव झाला, याची, यांपैकी कोणाला जाणीव तरी दिसते काय ? मुळीच नाही. असे विवेचन करण्याचे सामर्थ्यच त्याच्या ठायी नव्हते.<br>{{gap}}हे पोवाडे केव्हा कोणी रचले हे पाहण्यातही मर्म आहे. एकंदर पोवाडे ३०० उपलब्ध आहेत. पैकी शिवाजी ते शाहू ७, पेशवे काल १५० आणि बाकीचे मराठेशाहीच्या अंतानंतरचे आहेत. हा काळ आणि ही संख्याच त्यांच्या कविप्रतिभेवर विदारक प्रकाश टाकतात. स्वातंत्र्ययुद्धप्रसंगी, जालीम कवने रचून, गिरिकंदरात फिरून, या कवींनी, औरंगजेबाशी निःस्वार्थीपणे, वतनलोभ न धरता लढावे, अशी स्फूर्ती दिली काय ? स्वकाल हा त्यांचा विषय होता. पण या काळावर एकही पोवाडा नाही. हिंदवी स्वराज्य, महाराष्ट्रराज्य, गनिमी कावा, आरमारी युद्ध, इंग्रजांची, पोर्तुगिजांची आक्रमक राजनीती, महाराष्ट्र धर्म, धर्म आणि स्वराज्य, अशा काही<noinclude></noinclude> pqq4eglnp6ezo1urc5ehngyr4hfc6uk पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४९ 104 73729 231948 164937 2026-06-11T03:19:59Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231948 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६२१|| साहित्य आणि कला}}</noinclude>विषयांची चिकित्सा यांनी भावमय केली आहे काय ? या विषयांना त्यांनी स्पर्शसुद्धा केला नाही.<br>{{gap}}थोरले बाजीराव, नानासाहेब, माधवराव, रघुनाथराव, महादजी, दत्ताजी, नाना फडणीस अशा पुरुषांची उत्तम व्यक्तिरेखा, त्यांच्या गुणावगुणासकट, त्यांच्या यशापयशासकट, कोणा शाहिराने रंगविली आहे काय ? एकही नाही.<br>{{gap}}हे सर्व कवी मनाने पुराण काळातच होते. पाप, कलियुग हीच त्यांच्या मते पराभवाची कारणे होती. ते मोठ्या माणसांना अवतारी पुरुषच मानीत. आणि भक्तांच्या चरित्रांसारखीच त्यांची चरित्रे लिहीत. वास्तवाशी, कार्यकारणाशी त्यांचा काही संबंधच नव्हता. ती चिकित्सा करण्याचे बळ त्यांच्या मनाला मुळीच नव्हते.<br>{{gap}}अगदी शेवटच्या दिवसांत तर जो कोणो पैसा देईल त्याच्या गौरवाची कवने शाहीर रचून देत असत. आणि अशा कवनांची संख्या जवळजवळ निम्मी आहे. तेव्हा द्रष्टा, क्रांतदर्शी असली विशेषणे कोणत्याही शाहीराला लाविता येणार नाहीत. मागे सांगितलेच आहे की मराठ्यांना सर्व भारतभर सुयंत्र साम्राज्यव्यवस्था स्थापण्याचे सामर्थ्य नव्हते. अशा वेळी खरा कालवेत्ता एखादा शाहीर उदयास आला असता, (इंग्रज, पोर्तुगीज, मुसलमान यांना जाणणारा, स्वकीयांना त्यांच्या सामर्थ्यांचे रहस्य उलगडून सांगणारा) आणि राष्ट्रीय भावनेचे, हिंदुपदपातशाहीचे तत्त्वज्ञान सर्वत्र विवरून सांगण्याचे कार्य त्याने केले असते, तर त्याला द्रष्टा कवी म्हणता आले असते. दुर्दैवाने तसा शाहीर येथे कोणी झाला नाही. तसे महाकाव्य रचण्याचे सामर्थ्यच मराठी मनाला त्या काळी नव्हते.<br>{{gap}}आख्यानकाव्य, चरित्र व लावण्या, पोवाडे यांचे विवेचन झाले. आता बखर या गद्य साहित्याचा विचार करावयाचा.<br><br>'''बखर वाङ्मय'''<br>{{gap}}शिवपूर्व काळात महिकावतीची बखर व राक्षसतागडीची बखर अशा दोन बखरी झाल्या. त्यांत विविध प्रकार आहेत. ९६ कलमी बखर, सभासदांची बखर, सप्त प्रकरणात्मक चरित्र ही शिवछत्रपतींची चरित्रे आहेत. पेशव्यांची बखर, मराठेशाहीची बखर, मराठी साम्राज्याची छोटी बखर हे समग्र वृत्तांत आहेत. हरिवंशाची बखर, होळकरांची कैफियत अशा काही कुळांच्या बखरी आहेत. पानपतची बखर, खर्ड्याची लढाई अशी काही विशिष्ट लढायांची वर्णने आहेत.<br>{{gap}}९६ कलमी बखर हे पुण्यश्लोक राजा (शिवाजी) याचे चरित्र आहे. दत्ताजीपंत वाकेनवीस याजपाशी तपशिलवार यादी लिहिली होती. तीपासून खंडो आबाजी मलकरे यांनी नक्कल करून घेतली. दुसरी बखर म्हणजे सभासदाची. कृष्णाजी अनंत सभासद याने ही इ. स. १८९४ साली राजाराम महाराजांचे सांगण्यावरून लिहिली. लेखकाने सर्व घडामोडी प्रत्यक्ष पाहिल्या असल्यामुळे ही बखर विश्वसनीय समजतात.<noinclude></noinclude> g5y7ihrhq7luc778o8g1r5qjja83bsb पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५० 104 73730 231949 164938 2026-06-11T03:20:12Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231949 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६२२}}</noinclude>'शिवछत्रपतींचे सप्त प्रकरणात्मक चरित्र' ही महाराजांच्या चरित्रावरची तिसरी महत्त्वाची बखर होय. लेखकाची शैली उत्तम आहे. पण महाराज गेल्यानंतर शंभर- सवाशे वर्षांनी ही लिहिली असल्यामुळे अनेक ठिकाणी विपर्यास झाला आहे. यानंतर महत्त्वाची बखर म्हणजे भाऊसाहेबांची बखर ही होय. कृष्णाजी शामराव या दिल्लीच्या एका गृहस्थाने ही लिहिली असून, कुंभेरीच्या वेढ्यापासून नानासाहेब पेशव्याच्या अंतापर्यंत हकीकत या बखरीत आहे. ही बखर सर्वात जास्त विश्वसनीय असून लेखकाची वर्णनशैली फार उत्कृष्ट म्हणून नावाजलेली आहे. मराठी साम्राज्याची छोटी बखर ही १८१७ साली लिहिलेली आहे. भोसल्यांचा मूळ पुरुष बाबाजीपासून प्रतापसिंहाअखेरपर्यंतची हकीकत हीत आहे. पेशव्यांची बखर ही कृष्णाजी विनायक सोहोनी यांनी लिहिली असून तीत पेशव्यांच्या कुळाचा सर्व वृत्तांत आला आहे.<br><br>'''इतिहास नव्हे'''<br>{{gap}}या सर्व बखरींचे मराठ्यांच्या दृष्टीने फार महत्त्व असले तरी, या बखरी म्हणजे इतिहास नव्हेत, हे ध्यानात ठेविले पाहिजे. हे सर्व लेखन पुराणांच्या धर्तीवर लिहिलेले आहे. इतिहासकाराची वस्तुनिष्ठ दृष्टी, सत्याची चिकित्सा, कार्यकारणमीमांसा यांपैकी यात काही नाही. स्थलकालनिश्रयाचा प्रयत्न नाही. कालविपर्यास भरपूर आहे आणि थोर व्यक्तींना अवतार मानण्याची पुराणवृत्ती लेखकांच्या ठायी आहे. मात्र साहित्य म्हणून त्यांना खूपच महत्त्व आहे. भाषेचा थाट, वर्णनशैली, संभाषणातील ऐट, व्यक्तिदर्शनाची हातोटी, निवेदनाची बहार, आणि विशेष म्हणजे शब्दाशब्दांतून व्यक्त होणारा स्वाभिमान ! यामुळे ऐतिहासिक काळ व त्या वेळचे वीर पुरुषांचे पराक्रम हे डोळ्यांसमोर उभे राहतात.<br>{{gap}}बखरीखेरीज नाना फडणिसाचे आत्मचरित्र, नारायण-व्यवहार-शिक्षा, फादर स्टीफन्स याने लिहिलेली ख्रिस्त पुराणाची प्रस्तावना, अमात्यांची राजनीती, पंचतंत्राचे मराठी भाषांतर असे काही गद्य लेखन या काळात झालेले आहे. यांतील 'राजनीती' किंवा 'आज्ञापत्र' याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण राजनीतीचे विवेचन करणारा मराठीतला तो एकुलता एक ग्रंथ आहे. त्याचा परिचय मागे येऊन गेलाच आहे. नाना फडणिसांच्या आत्मचरित्राची अशीच महती आहे. कारण तशी परंपराही मराठीत नव्हती. पानपतनंतर स्वतःवर ओढवलेल्या प्रसंगाचे वर्णन नानाने फार उत्कृष्ट केले आहे आणि जाता जाता जगाच्या रीतीचे वर्णनही केले आहे. 'नारायण- व्यवहार- शिक्षा' हा ग्रंथ बाल सवाई माधवराव याच्या शिक्षणासाठी लिहिलेला आहे. गोव्यातील ख्रिश्चन मिशनरी फादर स्टीफन्स याने 'ख्रिस्त पुराण' हा पद्य ग्रंथ लिहिला. पण त्याची प्रस्तावना गद्यात आहे. त्यात अर्थातच ख्रिश्चन धर्माची महती सांगितलेली आहे.<br>{{gap}}मराठी गद्याचा पसारा हा एवढाच आहे. (महानुभावीय गद्याचे वर्णन मागे<noinclude></noinclude> 8ibad9fan1nigbey9mh07sw1qif3d7d पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५१ 104 73731 231950 164939 2026-06-11T03:20:27Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231950 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६२३|| साहित्य आणि कला}}</noinclude>आलेच आहे.) त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बखरी. त्यांना ऐतिहासिक दृष्टीने फारसे महत्त्व नसले तरी साहित्याच्या दृष्टीने निःसंशय आहे. बखरीतले काही काही भाग अगदी काव्यमय आहेत, आणि मराठी राज्याचा अभिमान हा त्यात रस असल्यामुळे बखरींना आगळे महत्त्व आहे.<br><br>'''कलासौन्दर्य'''<br>{{gap}}मराठी काळातील साहित्यसौंदर्याचा विचार येथवर केला. आता कलासौंदर्याचा विचार करावयाचा. साहित्य- संगीत- कला ज्याला नाही तो पशु होय, असे एक सुभाषित आहे. यावरून मानवी संस्कृतीत कलेला काय स्थान आहे, हे ध्यानात येईल. मनुष्याचे ते प्रधान लक्षणच येथे मानलेले आहे.<br>{{gap}}संगीत, नृत्य, नाट्य, चित्र आणि शिल्प या पाच प्रमुख कला होत. या कलांचा विचार केला तर असे दिसेल की मानवाच्या जन्मापासून, त्याच्या वन्य अवस्थेच्या कालापासून, या कला, प्राथमिक, बोजड स्वरूपात का होईना, त्याच्या जीवनाशी निगडित आहेत. जंगली माणसांनीही गुहांमधून काही चित्रे रेखलेली आज आढळतात. भिल्ल, कातकरी, ठाकूर इ. आदिवासी लोकही नृत्य करताना व काही गाणी गाताना दिसतात. इतर कलांचे असेच काही अवशेष प्राचीन उत्खननात आढळून येतात. तात्पर्य असे की मानवाला उपजतच कलेची आवड आहे.<br><br>'''निकष'''<br>{{gap}}पण आपल्यासमोर वरील कलांची नावे घेताना या स्वरूपातल्या कला नाहीत. खरी कला म्हणजे नवनिर्मिती, आत्माविष्कार आणि साभिप्रायता या गुणांनी संपन्न असली पाहिजे. के. ना. काळे, रोहिणी भाटे या कलाकोविदांनी कलेची ही लक्षणे सांगितली आहेत. आदिवासींची नृत्ये ही खरी कला नव्हे, असे सांगताना त्यात वैयक्तिक आत्माविष्कार नसतो, ती ठरीव, साचेबंद असतात, असे रोहिणी भाटे यांनी म्हटले आहे. (महाराष्ट्र जीवन खंड २ रा, पृ. ३७०-७१)<br><br>'''संगीत'''<br>{{gap}}या दृष्टीने पाहिले तर महाराष्ट्रात संगीतकलेचा काहीसा विस्तार मराठा काळी झाला होता, इतकेच फार तर म्हणता येईल. संगीतावर आज जो सर्वमान्य ग्रंथ आहे तो म्हणजे 'संगीत रत्नाकर' हा होय. सिंघण यादवाच्या कारकीर्दीत शार्ङ्गदेव नावाच्या संगीतज्ञाने तो लिहिला. दक्षिणी व उत्तरी दोन्ही संगीतकला त्यालाच प्रमाण मानतात. त्याचाच समकालीन पार्श्वदेव याने 'संगीत समयसार' हा ग्रंथ लिहिला. हे दोन्ही ग्रंथ संस्कृत आहेत. पण यात अनेक मराठी संज्ञा आल्या असून मराठी पद्यांची उदाहरणेही दिली आहेत. रामदेवरावाच्या पदरी गोपालनायक नावाचा<noinclude></noinclude> pz0kg2mlh18491lsgwr7ty9iwnlocvt पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५२ 104 73732 231951 164943 2026-06-11T03:20:42Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231951 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६२४}}</noinclude>संगीतज्ञ होता. अल्लाउद्दिन खिलजीने यादवाचा पराभव केल्यावर त्याला सक्तीने दिल्लीस नेले आणि तेथे त्याने आणि अमीरखुश्रू याने आजची भारतीय संगीतपद्धती उदयास आणली. खुश्रू ती गोपाल नायकापासूनच शिकला आणि मग त्यानंतर तिचा उत्तर हिंदुस्थानात प्रसार झाला. आज आपण उत्तर हिंदुस्थानातून ती कला आली, असे म्हणतो. पण ती मूळची महाराष्ट्रीय आहे. पुढे स्वातंत्र्य नष्ट झाल्यावर येथे तिचा व्हावा तसा विकास झाला नाही हे निराळे.<br>{{gap}}महानुभाव पंडित दामोदर याची हिंदी भाषेतील रागतालबद्ध अशी काही पदे सध्या उपलब्ध झाली आहेत. त्यावरून दामोदर पंडित मोठा संगीततज्ज्ञ होता असे दिसते. पुढे नाव घेण्याजोगा संगीततज्ज्ञ म्हणजे मागे उल्लेखिलेला दासोपंत हा होय. (१५५१- १६१६) त्याच्या सवालक्ष पदांपैकी सोळाशे पदे राग-तालांत बद्ध असून त्यांत सुमारे पंचेचाळीस राग आले आहेत. रामदास तर 'धन्य ते गायनी कळा' असे म्हणत असत. समर्थांचा जो पदसंग्रह प्रसिद्ध आहे त्यात प्रत्येक पदास राग व ताल सांगितलेले आहेत. समर्थांचा शिष्यसंप्रदाय दक्षिणेत होता. त्यामुळे तिकडील हरिदासी गायकीवरही याचा प्रभाव पडलेला आहे. इब्राहिम आदिलशहा (२ रा) (१५८०- १६२७) हा कवी असून अनेक भाषाभिज्ञ होता. मराठी त्याला उत्तम येत असे. त्याने स्वतः निरनिराळ्या रागांत व तालांत धृपदे बांधली असून त्यांतील पहिली रचना गणपतीवर असून दुसरी सरस्वतीवर आहे. हा शिवपूर्व कालचा इतिहास झाला.<br><br>'''सामान्य'''<br>{{gap}}शिवकालानंतर पेशव्यांच्या वेळी दरबारी उत्सव, तमाशा, कीर्तने यातून संगीताचा प्रसार झाला. शाहू महाराजांनी उत्तरेतून काही पोरी आणून त्यांना नर्तकी व गायिका करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो सफल झाला नाही. पेशव्यांच्या दरबारात गणेशोत्सवात गवयांचे गायन होत असे. रघुनाथराव व बाजीराव पेशवे यांच्या पदरीही गवई असत. पण पुष्कळ वेळा मोठे गवई परप्रांतातून बोलाविलेले आढळतात. या सर्वांवरून एक गोष्ट दिसते की आज पलुसकर, वझे, भातखंडे अशांनी जो शास्त्रोक्त अभ्यास करून गायनकलेचा विकास केला आहे, तसा यादवांच्या विनाशानंतर मराठा कालात झाला नाही. गायनवादन याची हौस मराठा राज्यकर्त्यांना व सरदारांना होती. पण येथे कोणी असामान्य गवई उदयास आला, असे दिसून येत नाही. 'पेशवेकालीन महाराष्ट्र' या ग्रंथात वा. कृ. भावे यांनी मोठ्या कसोशीने माहिती जमा करून, 'गायन, वादन व नर्तन' या दहाव्या प्रकरणात ती दिली आहे. तीवरून हे अगदी स्पष्ट होते. त्यांनी काही कलावंत व कलावंतिणी यांची नावे दिली आहेत. पण ही सर्व मध्यम- अगदी प्राथमिक नव्हे- स्वरूपाची कला, एवढेच त्यांच्या कलेचे रूप दिसते. प्रारंभी दिलेल्या व्याख्येप्रमाणे श्रेष्ठ कला येथे अवतरली नव्हती, असेच म्हणावे लागते.<br><noinclude></noinclude> lu093w88e2kh3pla9xva82gmdz49v7v पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५३ 104 73733 231952 164944 2026-06-11T03:20:54Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231952 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६२५|| साहित्य आणि कला}}</noinclude><br>'''नृत्य !'''<br>{{gap}}नृत्यकलेबाबत असेच आहे. जानपद रूपात ही कला येथे होतीच. पण तीत वैयक्तिक आत्माविष्कार नसल्याने तिला कला म्हणता येत नाही. लेजीम, भलरी किंवा मुलींचे घुमा, आगोटा हे खेळ, यांत काही प्रमाणात सामुदायिक भावाविष्कार होत असल्याने, त्या प्रकाराच्या नृत्यांना, रोहिणी भाटे यांच्या मते, जरा वरचा दर्जा आहे. हे अगदी खेळ या प्रकारात गणता येणार नाहीत. तमाशात होणारे, लावणी गाताना होणारे नृत्य हे यापेक्षा आणखी वरच्या दर्जाचे. ते लयबद्ध, नियमबद्ध व काहीसे तंत्रबद्धही असते. काही ठराविक पद्धतीचा नैसर्गिक मुद्राभियनही या पद्धतीत आढळतो. तेव्हा हे नृत्यकलेच्या वाटेवरचे पुढचे पाऊल असे म्हणण्यास हरकत नाही.<br>{{gap}}पण पारतंत्र्यामुळे म्हणा किंवा अन्य कारणामुळे म्हणा महाराष्ट्रात नृत्यकलेचा विकास या पायरीच्यावर झाला नाही. भरतनाट्य, मणिपुरी, कथाकली आणि कथक या नृत्यपद्धतींचे नाव सुद्धा परवा-परवापर्यंत महाराष्ट्रात आले नव्हते. या सर्व पद्धतींचा अभ्यास महाराष्ट्रात गेल्या तीस चाळीस वर्षातला आहे. मराठा कालात महाराष्ट्राने त्याची अशी नृत्यपद्धती विकसित केली नाही.<br><br>'''जगाच्या दृष्टीतून'''<br>{{gap}}चित्र, मूर्ती, शिल्प या कलांत मराठा कालात महाराष्ट्र मागासलेलाच राहिला. स्वराज्याचे रूपांतर साम्राज्यात होऊ लागले, तसा येथील सरदार लोकांच्या हाती पैसा खेळू लागला. त्यातून त्यांनी आपापल्या गावी देवळे बांधली, वाडे बांधले, बागा तयार केल्या, तळी बांधून पाण्याची सोयही केली. पेशव्यांना वास्तू, चित्र, मूर्ती यांविषयी चांगली रसिकता होती. त्यांनी बांधलेल्या देवळांत व वाड्यांत उत्तम मूर्ती बसविल्या आणि भिंतींवर चित्रेही काढून घेतली. पण हे सर्व कारागिरी या सदरात येईल. वेरूळ, अजिंठा, घारापुरी ही महाराष्ट्रातलीच शिल्प आणि चित्रकला. पण वेरूळ- अजिंठ्याची इंग्रज येथे येईपर्यंत मराठ्यांना माहितीही नव्हती. मदुरा, कांची, विदिशा, कोणार्क येथील कला त्यांनी पाहिली होती. पण त्या दर्जाची कलाकार मंडळी मराठा कालात महाराष्ट्रात झाली नाहीत. पेशव्यांनी इंग्रज चित्रकार वेल्स याला नेमून एक चित्रकलेची शाळाही स्थापन केली होती आणि त्याच्याकडून व इतर इंग्रज चित्रकारांकडून नाना, महादजी, सवाई माधवरावाचा दरबार अशी चित्रेही काढून घेतली होती. पेशवे आणि त्यांचे सरदार हे चित्रसंग्रहही जवळ ठेवीत. नाना फडणिसाने पदरी चितारीही बाळगले होते. शिवाय विणकर, कुंभार, पाथरवट यांना ते उत्तेजनही देत. पण हा सगळा इतिहास पाहिल्यावर शेवटी निर्णय असाच होतो की दक्षिणेत, किंवा उत्तरेत किंवा पूर्वी महाराष्ट्रातच जी वास्तुकला, चित्रकला, मूर्तिकला होती, तशी मराठाकालात महाराष्ट्रात उदयास आली नाही. आजही विचार केला तरी असे दिसेल की कोणीही प्रवासी मराठाकालातली कला पाहण्यास महाराष्ट्रात येत नाही. कोणार्क,<noinclude><br>{{gap}}४०</noinclude> tvfpue0jr3kws7jrjgdc7by2wp23phu पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५४ 104 73734 231953 164945 2026-06-11T03:21:06Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231953 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६२६}}</noinclude>खजुराहो, वेरूळ, अजंठा, ताजमहाल, गोल घुमट यांसारखी कीर्ती मराठा कालात कोणत्याही कलाकृतीला मिळाली नाही.<br>{{gap}}राहता राहिली नाट्यकला. तिच्याविषयी काही लिहिण्याची गरजच नाही. भारुडे, तमाशा, लळिते, दशावतारी खेळ यापलीकडे येथली नाट्यकला त्या काळात कधी गेलीच नाही. शाकुंतल, मृच्छकटिक, उत्तर-रामचरित्र किंवा हॅम्लेट, ऑथेल्लो, डॉल्स हौस अशा दर्जाचे एकही नाटक मराठीत त्या काळी लिहिले गेले नाही. तमाशा, लळिते हे नाटयाचेच प्रकार होत. पण ते अगदी प्राथमिक रूपाचे. त्यांना कला म्हणणे कठीण आहे. बांधीव कथानक, सुंदर व्यक्तिरेखा, विकसत जाणारा समरप्रसंग, असले त्यात काही नाही. आदिवासींची जशी नृत्ये तशीच ही नाट्यकला. फार तर एखादे पाऊल पुढे, इतकेच.<br>{{gap}}मराठी साहित्य व कला याचा संसार हा असा आहे. यावरून असे दिसते की जे राजकीय पराक्रमाच्या बाबतीत, तेच कलेच्या बाबतीत घडले. मराठ्यांनी पराक्रम केला, मोठा पराक्रम केला. पण त्यामागे धर्म, राजकारण, समाजरचना, अर्थव्यवस्था किंवा एकंदर जीवन याविषयी तत्त्वदृष्टी अशी कोणतीच नव्हती. बाहुबलाने ते पराक्रम करीत गेले एवढेच. तेच साहित्याच्या आणि कलेच्या बाबतीत झाले. या दोन्ही कार्याच्या मागे तत्त्वदृष्टी काहीच नव्हती. काल जाणण्याची शक्ती जशी राजकीय वीर पुरुषांत नव्हती, तशीच ती कलाकारांतही नव्हती. त्यामुळे जगाच्या दृष्टीने पाहता जपान, इंग्लंड, रशिया यांसारखे अलौकिकत्व मराठ्यांना लाभले नाही.<br><br>{{center|■}}<noinclude></noinclude> 3je4dn5odeicpm01jiex919c4xesmw1 पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५५ 104 73735 231954 164947 2026-06-11T03:21:19Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231954 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop |Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf |Page = 655 |bSize = 398 |cWidth = 308 |cHeight = 198 |oTop = 39 |oLeft = 30 |Location = center |Description = }} <br><br>{{rh|'''<big>३३.</big>'''||'''<big>प्रबोधनाच्या अभावी</big>'''}}<br><br>{{gap}}साहित्य आणि कला यांच्याइतकीच धर्म, समाजरचना, अर्थव्यवस्था आणि विद्या ही संस्कृतीची अंगे आहेत. किंबहुना तीच अधिक महत्त्वाची आहेत. पण एक- तर आधीच्या कालखंडात त्यांच्या मूलतत्त्वांची चर्चा येऊन गेलेली आहे. आणि बहामनी व मराठा कालखंडातही वेळोवेळी त्या दृष्टीने विवेचन केलेले आहे. तेव्हा आता फक्त वर्तमाठी त्यांचे विवेचन येथे करावयाचे आहे.<br><br>'''धर्म-तत्त्वज्ञान'''<br>{{gap}}तत्त्वज्ञान, नीती, आणि आचार ही धर्माची तीन अंगे होत. यांपैकी तत्त्वज्ञानाचा विचार करता असे दिसते की मुकुंदराजापासून संत, पंडित, इतर सत्पुरुष आणि सामान्यजन यांनी शंकराचार्याचा अद्वैत वेदान्ताचा सिद्धांतच स्वीकारलेला आहे. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या-माया- आहे आणि जीव आणि ब्रह्म हे एकरूपच आहेत, हा तो सिद्धांत आहे. याबरोबर, कर्म, पुनर्जन्म, ज्ञान, मोक्ष याविषयीचे विचारही वेदान्त- पंथाचेच सर्वांनी स्वीकारलेले आहेत. ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवात मायावादाचे खंडन करून 'चिद्विलासवाद' मांडला आणि विश्व हे माया नसून सत्य आहे असे मत प्रस्थापित केले, असा एक पक्ष आहे. सोनोपंत दांडेकर, तर्कतीर्थ जोशी या पक्षाचे आहेत. पण रा. द. रानडे, डॉ. शं. दा पेंडसे यांसारख्या पंडिताना हे मत मान्य नाही. आणि हा वाद इतका जटिल आहे की त्याचा केव्हा निश्चित निर्णय लागेल असे वाटत नाही. दुसरे असे की ज्ञानेश्वरांच्या या सिद्धांतामुळे मराठा समाजावर काही परिणाम झाला आहे असे दिसत नाही. तसा काही निराळा सिद्धांत आहे, हे<noinclude></noinclude> g9tnel68kgoobhib3ibvssz4grwk8p0 पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५६ 104 73736 231955 164948 2026-06-11T03:21:33Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231955 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६२८}}</noinclude>अर्वाचीन काळी अभ्यासक सांगतात. ज्ञानेश्वरानंतरच्या संतपंडितांनी त्याचा परामर्श केलेला नाही. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीने मराठा समाजाचा जीवनौघच सर्व बदलला. वारकरी पंथाचा त्या ग्रंथाने पायाच रचला. तसा काही प्रकार चिद्विलासवादाने झाला नाही. तेव्हा मराठा समाजाने शंकराचार्याचा अद्वैत वेदांतच स्वीकारला यात शंका नाही.<br><br>'''नीती'''<br>{{gap}}नीतीच्या दृष्टीने पाहता सत्य, दया, परोपकार इ. जी नीतीची शाश्वत तत्त्वे तीच मराठा समाजाने स्वीकारलेली आहेत. त्यांचा आचार कोणी किती केला हा भाग निराळा. मराठा काळात, ब्रह्मेंद्र स्वामी, कायगावकर दीक्षित, ज्योतिपंत महाभागवत इ. सत्पुरुषांनी धर्मशाळा बांधणे, तलाव, विहिरी खणणे, देवालये बांधणे अशी समाजसेवेची बरीच कार्य केली आणि समाजाची सेवा करण्याचे शिक्षण मराठा समाजाला स्वोदाहरणाने दिले.<br><br>'''आचार'''<br>{{gap}}आचाराच्या दृष्टीने पाहता 'चतुर्वर्गचिंतामणी' इ. ग्रंथांत सांगितलेली सर्व प्रकारची व्रते- वैतल्ये, तीर्थयात्रा, अनुष्ठाने, ब्राह्मणपूजा व ब्राह्मणभोजने, देवपूजा व देवाचे उत्सवसमारंभ, पाठशाळा, स्नानसंध्या, अग्निहोत्र, इ. सर्व आचारधर्म महाराष्ट्रात सर्व समाजात चालू होता. त्याबरोबरच भुतेखेते, चेटुक, ग्रहदशा, ग्रहशांती यांवरही समाजाचा विश्वास होता आणि त्यामुळे त्या आपत्तींच्या निवारणासाठी ब्राह्मणांनी सांगितलेले उपायही समाज करीत असे.<br><br>'''वैयक्तिक धर्म'''<br>{{gap}}पण धर्माच्या बाबतीत मुख्य गोष्ट ध्यानात ठेवावयाची ती ही की मराठे आचारीत तो सर्व धर्म वैयक्तिक होता. समर्थांनी व शिवछत्रपतींनी समाजाच्या अभ्युदयासाठी जो धर्म सांगितला त्याचे आचरण महाराष्ट्रात कोणी केले नाही, हे वेळोवेळी मागे सांगितलेच आहे. नीलकंठ, भट्टोजी दीक्षित हरी दीक्षित. नागोजी भट्ट, नीळकंठ शास्त्री थत्ते असे अनेक शास्त्री या काळात होऊन गेले. पण स्वतंत्रपणे समाजाला नवा धर्म सांगण्याची, किंवा शिवसमर्थांनी सांगितलेल्या धर्माचे विवेचन करण्यासाठी ग्रंथ लिहिण्याची बुद्धी एकालाही झाली नाही. तशी कुवतच त्यांच्या ठायी नव्हती. परदेशगमन जे एकदा निषिद्ध ठरले, ते चालू करण्याचा प्रयत्न शिवछत्रपतींनी केला. पण पुढे तो चालला नाही. राघोबाला मुंबईहून सुरतेला बोटीने नेण्याचा इंग्रजांचा विचार होता. पण 'धर्म बुडतो म्हणून तो गेला नाही. अर्थातच या समजुतीमुळे परदेशी व्यापार हा चालू शकला नाही. शुद्धीबद्दल हेच. छत्रपतींनी धर्मातरितांची शुद्धी करण्याचा पायंडा पाडला. पुढे क्वचित् कोठे बाटलेल्यांना शुद्ध करून स्वधर्मात<noinclude></noinclude> q1c8dv00tr1o3rn25tfkzlthhrdycf6 पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५७ 104 73737 231956 164949 2026-06-11T03:21:45Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231956 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६२९|| प्रबोधनाच्या अभावी}}</noinclude>घेतल्याची उदाहरणे आढळतात. पण तशी कायम रूढी शास्त्री पंडितांनी पाडली नाही. नाहीतर लक्षावधी वाटलेले हिंदू स्वधर्मात देऊन पाकिस्तानचा प्रश्न निर्माणच झाला नसता. स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद आहे, असा काही सिद्धान्त शिवछत्रपतींनी सांगितला आहे, दुष्ट तुरूक यास साह्य करणे हा अधर्म होय, असे तत्त्व सांगितले आहे, याची मराठेशाहीत कधी कोणाला आठवणही झाली नाही. यामुळे गायकवाड, भोसले, सखाराम बापू इ. सरदार खुशाल शत्रूला जाऊन मिळतात. सामान्य जनांना याचा कसलाच विधिनिषेध नव्हता. मुसलमान, इंग्रज, पोर्तुगीज व आपण हिंदू असा भेदाभेद, वैयक्तिक क्षेत्र सोडून, त्यांनी कधीच केला नाही. सर्व पक्षांत मराठ्यांतील सर्व जातीचे लोक नेहमी असत. तेव्हा समष्टिधर्म हा महाराष्ट्रात नव्हताच असे म्हटले पाहिजे. ते सर्व हिंदू होते. त्या धर्माचा त्यांना अभिमानही होता. पण तो सोवळेओवळे, जातींचे अचार येवढ्यापुरताच. हिंदुधर्माला काही सामाजिक रूप आहे, अभ्युदयाचा व धर्माचा काही संबंध आहे, एकधर्मीय लोकांच्या संघटनेला काही महत्त्व आहे, याची जाणीव मराठयांना कधी झाली नाही. तशी असती तर मराठयांचे राज्य बुडाले नसते.<br><br>'''समाजरचना'''<br>{{gap}}समाजरचनेच्या दृष्टीने विचार करावयाचा तर चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, स्त्रीपुरुष संबंध आणि व्यक्ती व समाज यांचे संबंध येवढ्याचा विचार केला पाहिजे. यांपैकी चातुर्वर्ण्य हा शब्द हिंदूंच्या तोंडी रूढ आहे इतकेच. अगदी आरंभीचा काळ सोडला तर येथे विवाह व व्यवसाय या दृष्टीने चातुर्वर्ण्य कधीच नव्हते. वेदकाळी सुद्धा एकाच घरातले लोक भिन्नभिन्न व्यवसाय करताना दिसतात. याविषयी तपशील मागे येऊन गेलाच आहे. त्याची पुनरुक्ती येथे करण्याचे कारण नाही. मुख्य गोष्ट ही जातिधर्माच्या जंजाळातून मराठेशाहीत लोक कधीही मुक्त झाले नव्हते.<br><br>'''जातिभेद'''<br>{{gap}}मराठेशाही कशाने बुडाली याचा विचार करताना जातिभेद हे कारण मुळीच नव्हे, असे बहुतेक सर्व अभ्यासकांनी सांगितले आहे. आणि वरवर पाहता ते खरे आहे. जाती-जातींचे तट असे मराठा राजकारणात कधी पडलेले दिसत नाहीत. माधवराव व राघोबा हे उदाहरण नेहमी देतात. दोघेही कोकणस्थ ब्राह्मण. पण प्रत्येकाच्या पक्षाला ब्राह्मणातील सगळ्या पोटजाती होत्या. मराठे व इतर जातीचे लोकही दोन्ही पक्षांत होते. असेच सर्वत्र घडलेले दिसते. कोकणस्थ, देशस्थ, सारस्वत, कऱ्हाडे, मराठा शाण्णव कुळीचे व इतर यांच्यांत आकस नव्हते असे नाही. कधी कधी त्याचे परिणामही होत. पण मराठ्यांचे राजकारण यामुळे नासले, दुही फितुरी यांच्यामागे जातिभेद होता, असे कधी झाले नाही. त्यामुळे मराठेशाही जातिभेदामुळे बुडाली, असे म्हणता येत नाही.<br><noinclude></noinclude> soncrgbuelw9wkodokf3xrdg1qfbgfb पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५८ 104 73738 231957 164950 2026-06-11T03:21:57Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231957 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६३०}}</noinclude><br>'''कडक जातिनिर्बंध'''<br>{{gap}}पण हा वरवरचा विचार झाला. बाराव्या शतकानंतर विद्या, कला, व्यापार, साहित्य, या दृष्टींनी मराठ्यांची कसलीही प्रगती झाली नाही. याला अत्यंत कडक असे जातिनिर्बंध हे एक प्रधान कारण आहे, यात वादच नाही. कपडे कसे पेहेरावे, बांगड्या कसल्या घालाव्या, भांडी कसली वापरावी, लग्नात मिरवणुकी कशा काढाव्या, असल्या बाबतीत सुद्धा जातिबंधने कडक असत आणि याविषयी कज्जा झाला तर भागवत पुराण, विष्णू पुराण, चरणव्यूह, शूद्रकमलाकर, यातिनिर्णय यांसारखे ग्रंथ पाहून, किंवा पूर्वापार वहिवाट काय आहे ते पाहून निर्णय होत असे. म्हणजे ग्रंथ आणि रूढी यांच्या शृंखलांत हा समाज इतका जखडलेला होता की स्वतंत्र आचार तर राहोच, पण स्वतंत्र विचार करण्याची सुद्धा येथे सोय नव्हती. परदेश राहिला, परप्रांत राहिला, पण साधे मुंबईला राहून परत येणे हे सुद्धा कठीण होते. कारण इतर जातींचा अन्नोदक संसर्ग तेथे होण्याचा संभव ! तसा नुसता संशय आला की त्या माणसावर बहिष्कार पडे. आणि तुरुंगवास, फाशी यापेक्षाही बहिष्कार हे शस्त्र फार भयानक होते. मुलाबाळांसंकट मनुष्याचे जीवनच त्यामुळे उद्ध्वस्त होण्याचा प्रसंग येई. युरोपातही बाराव्या तेराव्या शतकापर्यंत धर्माचारांच्या बाबतीत अशीच स्थिती होती. पण तेथे जॉनहस, लूथर, काल्हिन, कोपरनिकस, केप्लर, गॅलिलिओ इ. वीरांनी पोपशी लढा करून त्याची सत्ता हाणून पाडली आणि प्रगतीचा मार्ग खुला केला. तसा मार्ग खुला करण्याचा प्रयत्नही भारतात व महाराष्ट्रात झाला नाही. आणि त्याला कारण येथले जातिनिर्बंध ! त्या निर्बंधांना आधार ग्रंथांचा किंवा वहिवाटीचा. मनुष्य एकदा स्वबुद्धीने विचार करीनासा झाला, तो वचनप्रामाण्याच्या आहारी गेला की त्याची सर्व प्रगती खुंटते. युरोपात त्या शतकात धर्मपीठांनी जी जखडबंदी केली होती तीच येथे जातिभेदाने केली होती. त्यामुळेच येथे कोणत्याही क्षेत्रात प्रगती झाली नाही आणि मुस्लिम, पोर्तुगीज, इंग्रज जो येईल त्याच्या आक्रमणास हा समाज बळी पडत गेला. महाराष्ट्रात प्रारंभी सांगितल्याप्रमाणे शिवछत्रपतींनी क्रांतीची बीजे पेरली होती. पण ती रुजली नाहीत.<br><br>'''अमंगळ भेद'''<br>{{gap}}प्रभुजातीचे उदाहरण पाहा. शिवछत्रपतींनी बाळाजी आवजी चिटणीस याला, त्याचा मुलगा खंडो बल्लाळ याची, मुंज वैदिक विधीने करण्याची परवानगी दिली होती. परंतु शंभू छत्रपतींनी तो बेत रद्द करविला. शाहू छत्रपतींच्या वेळी गोविंदराव चिटणीस यांनी प्रयोगाला आपल्या बंधूंच्या हस्ते ब्राह्मणांच्या मदतीने अतिरुद्राचे अनुष्ठान करविले. पण शाहू शत्रपतींनी ब्राह्मणांची सभा भरविली- प्रभू हे शूद्र आहेत, असा निर्णय सभेने दिला. नारायणराव पेशव्याच्या वेळी आणि पुढे नाना फडणिसांच्या वेळीही प्रभूंच्यासंबंधी ब्राह्मणांच्या सभेने असाच निर्णय दिला. या ब्राह्मणांना वेद कळत<noinclude></noinclude> nlm8u7pnxrj5x2ayrhl9216rnmj0r7v पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५९ 104 73739 231958 164951 2026-06-11T03:22:06Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231958 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६३१|| प्रबोधनाच्या अभावी}}</noinclude>असते, त्यांच्याविषयी आदर असता, तर जास्तीत जास्त लोकांना संस्कार करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले असते. कारण, 'ही कल्याणकारक वाणी शूद्रांनाही वर्ज्य नाही' असा वेदांचा निर्णय आहे आणि वेदांतील अनेक सूक्ते शूद्रांनी रचलेली आहेत. पण 'सूत्रकालापासूनच हा अमंगळ भेद सुरू झाला. दहाव्या शतकानंतर तो फारच जारी झाला. आणि वेदांचा आधार घेऊन, त्याविरुद्ध बंड करून उठण्याचे धैर्य येथे कोणीच दाखविले नाही. जातिभेदामुळे सर्वात जास्त वात झाला तो हा. क्रांती ही कल्पनाच भारतात रुजू शकली नाही आणि कित्येक प्रसंगी आमूलाग्र क्रांतीवाचून प्रगती ही अशक्य होऊन बसते. आजही हिंदू समाजाच्या प्रगतीच्या मर्गात पावलोपावली जातिभेद येत आहे. मग त्या वेळी काय असेल याची सहज कल्पना येईल.<br><br>'''क्षुद्र भेदापायी'''<br>{{gap}}कासार जातीचे लोक स्वतःला सोमवंशीय क्षत्रिय मानतात. लग्नकार्यात कलशासह मिरवणूक काढण्याचा त्यांचा प्रघात होता. पण वऱ्हाडच्या लिंगायत वाण्यांनी याविषयी कज्जा केला. पण या वेळी निकाल कासारांच्या बाजूने झाला. खानदेशात अभीर ब्राह्मण व यजुर्वेदी ब्राह्मण यांच्यांत तंटा निर्माण झाला. यजुर्वेदी अभीरांना कमी लेखीत. पण याही वेळी निकाल अभीरांच्या बाजूने झाला. पण यातली ध्यानात ठेवण्याजोगी गोष्ट ही की अशा क्षुद्र गोष्टीवरून त्याकाळी कज्जे चालत. आणि त्यावरून मारामाऱ्याही होत. वेदमंत्रांचा घोष करताना आधी ऋग्वेद की यजुर्वेद की वाजसनेयी संहिता असा तंटा पडून वाजसनेयी लोकांनी प्रत्यक्ष मारामारीच केली !<br><br>'''अर्थव्यवस्था'''<br>{{gap}}जातिसंस्थेमुळे अर्थव्यवस्था स्थिर राहिली, असे काही पंडित सांगतात. प्रत्येक जातीचा व्यवसाय बांधलेला होता. त्यामुळे प्रत्येकाला पोटाच्या उद्योगाची विवंचना या समाजात नव्हती, असे म्हणतात. पण याला फारसा अर्थ नाही. एकतर एवढ्या तेवढ्या कारणाने जातीत पोटजाती पडत आणि मग त्यांच्यांत धंद्यावरून तेढ माजे. शिवाय अनेक जाती एकच धंदा करीत हे प्रसिद्धच आहे. शिवाय व्यवसाय अगदी बांधून ठेवणे हे फार कठीण आहे. कारण सोनारकी, सुतारकी एवढ्या नावावरून काही ठरत नाही. त्या व्यवसायात पुष्कळ प्रकार आहेत व त्यावरून जातीत तेढ येते. पटवेकऱ्याचे काम रेशीम वळण्याचे, ते काम आपलेही आहे, असे जंगमांचे म्हणणे, त्यावरून तेढ निर्माण झाली. तेव्हा पटवेकऱ्यांचे काम रेशमाचे व जंगमांचे कापसाचे, असा निकाल झाला. आता या दोन व्यवसायांत जातिभेद करण्याजोगे काय आहे ? पण तेवढे कारण तेढीला पुरले. ब्राह्मण हा सेनापती होता, सावकार होता, मंत्री होता, शिपाई होता, आचारी होता, पाणक्या होता, पुजारी होता, भिक्षुक होता, गुरू होता. आता हे सर्व व्यवसाय काय एक आहेत ? यांची प्रतिष्ठा सारखी<noinclude></noinclude> 64hscjumur7imx38k2i2amhhblb4ict पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६० 104 73740 231959 164952 2026-06-11T03:22:39Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231959 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६३२}}</noinclude>आहे ? हेच इतर अनेक जातींचे होते. तेव्हा जातीमुळे अर्थव्यवस्थेला स्थैर्य आले, या म्हणण्यात काही अर्थ नाही. पण आचारविचारांच्या जखडबंदीमुळे, आणि व्यवसायांच्या तात्त्विक बंदीमुळे समाजातली स्पर्धा नष्ट झाली आणि त्याची प्रगती खुंटली हे मात्र निश्चित. जातीमुळे स्थैर्य आले असे सांगणारे पंडितही, या स्थिरावस्थेमुळे स्पर्धा नष्ट झाली आणि प्रगती खुंटली, हे मान्य करतातच.<br><br>'''स्त्रियांची दैन्यावस्था'''<br>{{gap}}आता स्त्रियांच्या स्थितीचा विचार करू. स्त्रियांना अनेक शतके शिक्षण बंद झाले होते. ती बंदी या काळातही होतीच. शिवाय बालविवाह हे मोठे अरिष्ट त्यांच्यावर होते. त्या काळी तर ते भयंकरच होते. लढाईत पुरुष मृत्यू पावणे हा नित्याचा क्रम होता. त्यामुळे एकेका घरात दहा दहा विधवा असत. त्यांच्या जीवनात कोणते सुख असेल, याची कल्पनाच केलेली बरी ! पण यापेक्षा भयंकर म्हणजे विषम विवाह ! अंबूजी इंगळे हा ८१ व्या वर्षी मृत्यू पावला. पण त्यापूर्वी एक महिना त्याचे लग्न ठरले होते. मुलगी अर्थातच ८/९ वर्षांची होती. नशीब तिचे म्हणून ते लग्न झाले नाही. नाना फडणिसाला नऊ बायका होत्या. तो साठाव्या वर्षी वारला तेव्हा त्याची सर्वात धाकटी बायको जिऊबाई नऊ वर्षांची होती. लग्न ही त्या वेळी पुरुषाला एक करमणूकच होती. सहज जाता जाता ते लग्न करीत. तेव्हा स्त्रीजीवनाची काय परवड असेल याची सहज कल्पना येईल. महादजी शिंदे याने दक्षिणेत आल्यावर मरण्यापूर्वी वर्ष दोन वर्षे, एक बालिका बरी दिसली म्हणून, तिच्याशी लग्न केले. त्याच्या मृत्युसमयी ती वयातही आली नव्हती. राधाबाई, अहल्याबाई, गौतमाबाई अशा काही स्त्रियांची नावे इतिहासात गाजली आहेत. पण तेवढ्यावरून स्त्रियांना समाजात काही प्रतिष्ठा होती, असे मानता येणार नाही. सतीची चाल हे कशाचे लक्षण आहे ? पुरुषामागे स्त्रीने जगणे हे पापच होय, अशी रूढी होती. त्यामुळे हजारो स्त्रिया- दहा बारा वर्षांच्या बालिका सुद्धा सती जात. या अनर्थाला, या क्रौर्याला, काही सीमा आहे काय ?<br>{{gap}}स्त्रियांची लग्ने आठव्या नवव्या वर्षी होत. मुलगे त्यावेळी फार तर बारातेरा वर्षांचे असत. पण अनेक घरांत मुलगे आडदांड मग्रूर असत आणि पत्नीला हर प्रयत्नाने जवळ घेण्याचा, त्यावेळीही, प्रयत्न करीत. दुसऱ्या बाजीरावाची गोष्ट वा. कृ. भावे यांनी दिली आहे. आई आनंदीबाई हिने मना करताच तो तिला वाटेल ते अभद्र बोलला. तेव्हा तिने त्याला लाथांनी तुडविले. पण असा प्रसंग पुरुषाने आणला तर त्यातून किती लहान बालिकांची सुटका होत असेल, ते एक परमेश्वरच जाणे.<br><br>'''कर्तृत्व खुंटले'''<br>{{gap}}अस्पृश्येविषयी त्या वेळी काय स्थिती असेल याची सहज कल्पना येईल. इंग्रजी राज्य शंभर दीडशे वर्षे झाले. त्यानंतर स्वराज्य पंचवीस वर्षे झाले. अनेक कायदे<noinclude></noinclude> nyl8h5s094p85ll0qv64eilpv1ord71 पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६१ 104 73741 231960 164953 2026-06-11T03:22:50Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231960 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६३३|| प्रबोधनाच्या अभावी}}</noinclude>झाले. तरी सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्याचा हक्कही अस्पृश्यांना मिळालेला नाही. मग त्या वेळी, तेव्हा यातले काहीच नव्हते तेव्हा, अस्पृश्यांची स्थिती कशी नरकासमान असेल, हे कशाला सांगायला पाहिजे ? काही अस्पृश्यांना सैन्यात प्रवेश मिळे. काही वरच्या पदाला क्वचित जात. पण एवढेच. मल्हारराव होळकर सेनापती झाला, राजा झाला. पण धनगर समाजाच्या स्थितीत अणुमात्र फरक पडला नाही. तीच स्थिती या देशात सर्व सुधारणांची होती. तेवढ्या तेवढ्या पुरते अपवाद होत. समाजही ते मान्य करी. पण सर्व जातींना सर्व क्षेत्रांत उत्कर्षाची संधी मिळत असे, असा त्याचा अर्थ नाही. आणि ती नाही म्हणजे समाजाच्या उत्कर्षाला पुरेसे कर्तृत्व निर्माण होणे कधीही शक्य नाही. मराठेशाही बुडण्याचे हे प्रधान कारण आहे. स्त्री, शूद्र, अस्पृश्य व कनिष्ठ जाती यांच्यावर आणि ब्राह्मण व मराठे या वरिष्ठ जातींवरही इतकी बंधने जखडलेली होती की सर्व प्रकारचे, राष्ट्राला अवश्य ते कर्तृत्व या समाजात फुलून येणे हे शक्यच नव्हते.<br><br>'''क्रांती अशक्य'''<br>{{gap}}हे सर्व सांगितल्यानंतर समाज आणि व्यक्ती यांच्या परस्पर संबंधाविषयी स्वतंत्र पणे काही सांगण्याची गरज नाही. समाजाने सर्वप्रकारच्या आचार-विचार-उच्चारां- वर अत्यंत कडक अशी बंधने घातलेली होती. त्यांचा भंग केल्यास जातिबहिष्काराची शिक्षा होत असे. त्यामुळे व्यक्तीला नवे काही करण्याची छाती होणेच शक्यच नव्हते. आणि ते नाही, म्हणजे क्रांती नाही, परिवर्तन नाही ! क्रांती नाही, मग उत्कर्ष कोठला ?<br><br>'''स्पर्धा नाही'''<br>{{gap}}धर्म आणि समाजरचना यांचा विचार केल्यानंतर आता तत्कालीन अर्थव्यवस्थेचे रूप पाहावयाचे. सर्व हिंदुस्थान आणि अर्थातच महाराष्ट्र, त्या वेळी ग्रामप्रधान होता. या ग्रामात म्हणजे खेड्यात पाटील हा राजा आणि कुळकर्णी हा त्याचा प्रधान होता. या खेड्यांची अर्थव्यवस्था ही शेतकरी, बलुतेदार आणि अलुतेदार यांच्यावर उभी होती. चौगुला, सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव, कोळी, महार आणि चांभार हे बलुतेदार आणि तेली, तांबोळी, साळी, शिंपी, माळी, सनगर, गाेंधळी, ठाकर, गोसावी, जंगम, मुलाणी, वाजंत्री, घडशी, तराळ हे अलुतेदार असत. बहुतेक सर्व खेडी स्वयंपूर्ण असत. सुतार, लोहार हे ज्या गावचे त्या गावास, तेथलेच काम त्यांनी करावयाचे आणि वर्षअखेर मळणीच्या वेळी खळ्यावर जाऊन शेतकऱ्याकडून आपल्या कामाबद्दल मोबदला म्हणून भात, नाचणी, ज्वारी असे धान्य घ्यावयाचे. असा हा सर्व कारभार असे. स्वयंपूर्णतेमुळे कारागिरीत प्रगतीचा प्रश्नच नव्हता. कारण स्पर्धा कशातच नव्हती. माल चांगला वाईट असाही प्रश्न नव्हता. कारागीर देईल तो माल सर्वांनी घ्यावयाचा. जातिबंधनांमुळे जशी स्पर्धा नव्हती तशीच या व्यवस्थेतही नव्हती.<br><noinclude></noinclude> dl1np8mllxv4mw9n8km0pjvcsxosjpa पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६२ 104 73742 231961 164954 2026-06-11T03:23:04Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231961 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६३४}}</noinclude><br>'''शेतीचे दारिद्र्य'''<br>{{gap}}गावचा मुख्य धंदा शेतीचा असे. पाटील, कुळकर्णी, इनामदार यांना जमिनी वतनदारीने मिळालेल्या असत. शास्त्री-पंडित, देवस्थाने यांनाही जमिनीची वतने असत. आणि राहिलेल्या कोणाच्या तरी मालकीच्या असत.<br>{{gap}}अशा या अर्थव्यवस्थेवर शेकडो वर्षे समाज गुजराण करीत राहिला होता. ही सर्व व्यवस्था अत्यंत निकृष्ट व दरिद्री होती, हे उघडच आहे. सर्व शेती बहुधा कोरडवाहू असल्यामुळे दोन वेळची बेगमी करणे, हेच मुळी शेतकऱ्याला अवघड होते. आणि अशा या शेतीवर त्याचा आणि राष्ट्राचा प्रपंच चालावयाचा ! मराठेशाहीत पूर्वीप्रमाणेच हा चालत राहिलाही असता. पण मराठ्यांच्या चित्तात अखिल भारतात साम्राज्य स्थापण्याची, हिंदुपदपातशाही स्थापण्याची, महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. त्यांची ही आकांक्षा या अर्थव्यवस्थेतून भागणे अशक्य होते.<br><br>'''व्यापार हा पाया'''<br>{{gap}}इंग्रज बाहेर पडले ते व्यापारासाठी. तात्यासाहेब केळकर यांनी आपल्या पुस्तकात हिशेब दिला आहे. तीस हजार रुपयांच्या लवंगा येथून नेल्या की इंग्लंडात त्याची तीन लक्ष साठ हजार रुपये किंमत येत असे. एका जहाजामागे ७-८ लक्ष रु. फायदा सहज होई. टॉमस रो याने आपल्या अहवालात लिहिले आहे की 'मोगलांची सधन बंदरे आम्ही भिकेस लावली, त्यांचा व्यापार बुडविला' इंग्रजांनी साम्राज्य स्थापण्याचा विचार केला तेव्हा, त्यांच्यामागे धनाचे असे सामर्थ्य होते. पुढे १७६० च्या सुमारास तेथे कारखानदारी मुरू झाली आणि तीतूनही इंग्लंडला अमाप पैसा मिळू लागला. तो व्यापार आणि ती कारखानदारी यांच्या बळावर इंग्रजांना हिंदुस्थानात साम्राज्याच्या उलाढाली करण्यास पैसा उपलब्ध होऊ शकला. उलट मराठ्यांनी आकांक्षा साम्राज्याची ठेवली, पण अर्थव्यवस्था मात्र जुनीच राहू दिली. तीत सुधारणा करण्याचे त्यांच्या मनातही आले नाही. त्यामुळे कर्ज, दारिद्र्य, दैन्य, दिवाळखोरी हीच येथल्या अर्थव्यवस्थेची कायमची लक्षणे होऊन बसली. यावर साम्राज्य कसे उभे राहाणार ?<br><br>'''आर्थिक पाया नाही'''<br>{{gap}}शेती हा हिंदुस्थानातील लोकांचा मुख्य व्यवसाय. 'पेशवेकालीन महाराष्ट्र' या आपल्या ग्रंथात वा. कृ. भावे यांनी त्याची माहिती दिली आहे. एकंदर दोन पृष्ठे ! सर्व अर्थव्यवस्थेच्या पायाची इतकीच प्रतिष्ठा ! पेशव्यांनी काही ठिकाणी पडलेले, फुटलेले बंधारे दुरुस्त करण्यास मंजुरी दिली; कोठे माळरानावर नवीन शेती करण्यास साह्य केले, एवढीच ही माहिती आहे. पण धरणे बांधली, कालवे काढले, असे कोठेही नाही. हा उद्योग वास्तविक भारतात वेदकालापासून चालू होता. महाभारतात नारदाने युधिष्ठिराला प्रश्न विचारला आहे की 'तुझ्या राज्यात शेती पावसाच्या पाण्यावर<noinclude></noinclude> otr1t0q8mt4h02rea3uctqnb8gln774 पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६३ 104 73743 231962 164955 2026-06-11T03:30:55Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231962 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६३५|| प्रबोधनाच्या अभावी}}</noinclude>अवलंबून नाहीना ?' विजयनगरच्या राज्यात कालवे होते. पंजाबात मुस्लिमांनी पाटबंधारे, कालवे यांकडे लक्ष दिले होते. मराठ्यांनी दिल्लीच्या बादशहाला ताब्यात घेण्याचा दरिद्री उद्योग सोडून, महाराष्ट्रात राज्यसत्ता प्रत्यक्ष स्थापण्याचे ठरविले असते, तर त्यांनाही इकडे लक्ष पुरविता आले असते. पण साम्राज्य- विस्तारासाठी आर्थिक पाया भक्कम करणे अवश्य आहे, हे मराठयांना कधी उमगलेच नाही !<br><br>'''येथले व्यापारी'''<br>{{gap}}जी गोष्ट शेतीची तीच व्यापाराची. पूर्वीप्रमाणे आमचे व्यापारी सर्व जगभर हिंडत असते, तर लाखो रुपयांचे धन त्यांनी मराठ्यांना पुरविले असते. पण समुद्रगमननिषेध हा दर ठिकाणी आडवा येत असे. देशातला व्यापार तरी मराठ्यांच्या हाती होता काय ? शून्य ! दुर्गादेवीच्या दुष्काळात येथला मराठा व्यापारी वर्ग जो बसला तो बसलाच. फिरून त्याने डोके वर काढले नाही. इतर प्रांतीयांच्या हाती सर्व व्यापार गेला. आणि त्यांतील अनेक इंग्रजांना, धनाचेच केवळ नव्हे, तर गुप्त बातम्या देण्याचेही साह्य करीत. युरोपात पंधराव्या सोळाव्या शतकात जी क्रांती झाली ती विद्यासंपन्न लोकांइतकीच व्यापाऱ्यांनीही केली आहे. आणि येथले व्यापारी, मराठा सरदारांप्रमाणेच इंग्रजांना सर्वतोपरी साह्य करीत होते ! कारागिरीतही महाराष्ट्र मागासलेलाच होता. कलाकुसरीच्या वस्तूंतील महाराष्ट्राची लंगडी बाजू नाना फडणिसाच्या काळातही फारशी सुधारली नाही. मुलाम्याची अत्तरदाणी, सतारी इ. अनेक वस्तू परप्रांतातून मागवाव्या लागत. जयपूरचे कारागीर पुण्यास आणण्याचा नाना फडणिसाचा प्रयत्न होता, पण तो जमला नाही (पेशवेकालीन महाराष्ट्र, पृ. ३१७).<br>{{gap}}येथला माल युरोपात नेणे हा व्यापार मराठ्यांनी केला नाही. पण साखर, सुका मेवा इ. अशिया खंडातून, चीन, अफगणिस्थान येथून येणारा माल आपण आणावा, असा उद्योगही त्यांना सुचला नाही. तोही उद्योग पाश्चात्यच करीत. लाखालाखाचे कर्ज देणारे पुण्यात शंभर दीडशे ब्राह्मण सावकार होते. ब्राह्मणांनी सावकारी करणे हे कुठले चातुर्वर्ण्य ! आणि ते धर्मात खपत असे, तर हे आशियातले व्यापार त्यांनी का नाही ताब्यात घेतले ? तेथे चातुर्वर्ण्य का आड आले ? कोणी हीन जाती वेदोक्त कृत्ये करीत आहेत की काय, यांवर नजर ठेवण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा ब्राह्मणांनी हा उद्योग केला असता तर साम्राज्याला पैसा तरी मिळाला असता.<br><br>'''आर्थिक आक्रमण'''<br>{{gap}}हे तर त्यांनी केले नाहीच. पण हळूहळू येथे होणाऱ्या वस्तू यंत्राच्या साह्याने जास्त सुबक करून, पाश्चात्य लोक येथला व्यापार मारू लागले, त्यालाही येथे कोणी आळा घातला नाही. व्यापार नाही, कारण परदेशगमन निषिद्ध. आणि यंत्रविद्या नाही, कारण न वदेत् यावनीं भाषां प्राणैः कंठगतैरपि । 'जीव गेला तरी परकी भाषा उच्चारू नये !'<noinclude></noinclude> plhfq1elod2awqynuja2w1pvuopq6w1 पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६४ 104 73744 231963 164956 2026-06-11T03:31:37Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231963 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६३६}}</noinclude>चाकू, मेणबत्त्या, कुलपे हे पदार्थ मुद्धा युरोपातून हळूहळू येथे येऊ लागले आणि खपू लागले. कनोज हे अत्तराविषयी प्रसिद्ध होते. पण तो हिंदी धंदाही हळूहळू पाश्चात्यांनी आक्रमिला. काच, कागद हे पदार्थ येथे होत असत. पण तेही युरोपातून येऊ लागले. १७६० साली नानासाहेबाच्या कारकीर्दीतच देशी कागदापेक्षा परदेशी कागद चांगला, असे ठरून गेले होते. हिंदुस्थान सुती वस्त्रांविषयी कार प्रसिद्ध. पण १७६० पासून इंग्लंडात कापसाची वस्त्रे विणण्यास प्रारंभ झाला. १७८२ साली वॅटने वाफेचा शोध लावला. त्यामुळे गिरण्या निघाल्या आणि मग येथला हातमागाचा धंदा इंग्रजांनी ठार मारला आणि येथल्या मालाच्या जगातल्या पेठाही हस्तगत गेल्या (पेशवेकालीन महाराष्ट्र, पृ. ३४२). इंग्रजांच्या साम्राज्याकांक्षेच्या मागे हे वाफेचे बळ सतत उभे होते. तसले काहीच बळ मराठ्यांजवळ नव्हते. त्यामुळे मुलूखगिरीपलीकडे त्यांना काहीच करता आले नाही.<br><br>'''लष्करी लूट'''<br>{{gap}}शेती, व्यापार आणि कारागिरी हे धनोत्पादनाचे मुख्य व्यवसाय. ते या देशात कोणत्या अवस्थेत होते ते येथवर सांगितले. आणि अशा स्थितीत दरसाल सर्व देशभर फिरत असलेल्या लष्कराने केलेली लूट आणि विध्वंस यांची भर, याविषयी मागे अनेक वेळा सांगितलेच आहे. वा. कृ. भावे यांनी 'पेशवेकालीन महाराष्ट्र' या आपल्या ग्रंथात 'लोकस्थिती' या प्रकरणात याची सविस्तार माहिती दिली आहे. 'मोगलांचा हायदोस', संकटांची सवय', 'कोणीही कोणास लुटावे' या मथळ्यांवरूनच सर्व कल्पना येईल. 'कुंपणाने शेत खाल्ले' असा एक मथळा आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की स्वतःच्या राजाची स्वारी आली तरी लोक भयभीत होत. कारण लुटालूट होणारच ! धारचा तुकोजी पवार याची फौज कासारघाट चढून साकोऱ्यास आली. तेथे खुद्द शाहू महाराजांची बागायत होती. तीतही हत्ती-घोडे घुसवून तुकोजीने तिची संपूर्ण नासाडी करून टाकली. छत्रपतींच्या शेतीची ही अवस्था ! मग सामान्य रयतेच्या शेतीचे काय होत असेल ? तिचा विध्वंस शत्रूची लष्करेच करीत असे नाही. छत्रपती, पेशवे आणि सरदार यांच्या सेनाही लुटालूट करीत. कुंपणच असे शेत खात असे. मग धनोत्पादन कसे होणार आणि साम्राज्याचा विस्तार करण्यास लागणारा पैसा कोठून मिळणार ! लोकांच्या जीवनाला काही प्रमाणात तरी स्थैर्य असल्यावाचून धनोत्पादन होत नाही. शिवछत्रपतींना याची काळजी किती होती, ते मागे सांगितलेच आहे. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा कोणी हात लावावयाचा नाही, असे त्यांचे हुकूम असत. पण त्यांच्यामागे हा विचार राहिलाच नाही. शेतकऱ्यांना, सावकारांना, व्यापाऱ्यांना, लमाणांच्या तांड्यांना लुटणे, हा नियमच होऊन बसला. त्यामुळे सर्व हिंदुस्थान दरिद्री होऊन बसला. आग्रा, दिल्ली, येथून सुबक कारागिरीचा माल पेशवे मागवीत. त्यांच्या तेथील मुनिमांनी कळविले की आता इकडे कारागीरच राहिले नाहीत. कारण त्यांना<noinclude></noinclude> pjn7biu5m49dj00xlqv4n4vxdbp6l3r पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६५ 104 73745 231964 164957 2026-06-11T03:32:55Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231964 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६३७|| प्रबोधनाच्या अभावी}}</noinclude>आता आश्रयदाते कोणी नाहीत. कारण तेही भिकेस लागले आहेत (पेशवेकालीन महाराष्ट्र, पृ. ३१८). लष्करी लुटालुटीचा परिणाम लोकांवर आणि अर्थव्यवस्थेवर काय होत असेल, हे यावरून ध्यानी येईल. म्हणूनच मनात वरचेवर येते की मराठ्यांनी दक्षिणेत निदान महाराष्ट्रात तरी स्थिर राज्य स्थापण्याचे धोरण अंगीकारावयास हवे होते.<br><br>'''आमची विद्या'''<br>{{gap}}विद्या हे मनुष्याच्या मनुष्यत्वाचे पहिले लक्षण. विद्येवाचून मनुष्य केवळ पशू होय. ही विद्या दोन प्रकारची असते. अध्यात्म विद्या आणि भौतिक विद्या. आत्मा, मोक्ष, ज्ञान, भक्ती, योग, माया, कर्म ही सर्व अध्यात्मविद्या आणि रसायन, पदार्थविज्ञान जीवनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, वैद्यक, गणित, इतिहास, भूगोल, ज्योतिष ही सर्व भौतिकविद्या होय. इ. सनाच्या सहाव्या सातव्या शतकापर्यंत या दोन्ही विद्यांचा अभ्यास भारतात होत असे. म्हणूनच भारताचा सर्व बाजूंनी उत्कर्ष होत होता. पुढे निवृत्ती आणि कर्मकांड ही बळावली आणि हळूहळू भौतिक विद्येचा येथे ऱ्हास होऊ लागला. संतांच्या कार्याच्या विवेचनात हे स्पष्ट केले आहे. आणि गौतम, नागार्जुन, आर्यभट्ट, वराहमिहीर यांसारखे शास्त्रज्ञ पुढे झाले नाहीत, यावरून हे स्पष्टच आहे. मुसलमानांच्या स्वाऱ्यांनंतर तक्षशिला, नालंदा, वलभी, विक्रमशीला ही विद्यापीठे नष्ट झाली आणि येथे सर्वत्र अंधार झाला. मराठ्यांच्या कारकीर्दीत येथील शास्त्री पंडितांनी महाराष्ट्रात एकही विद्यापीठ स्थापन केले नाही. या विद्येकडे त्यांनी लक्षच दिले नाही. मागील काळच्या पाणिनी, पतंजली, शंकराचार्य, रामानुज या सारख्यांच्या ग्रंथांवर टीका, त्या टीकेवर आणखी टीकाग्रंथ, आणि ते समजावे म्हणून आणखी प्रकाश, बोधिनी, अशा टीका, यातच शास्त्री- पंडितांचे आयुष्य खर्ची पडत असे. म. दा. साठे यांनी म्हटले आहे की गेल्या हजार बाराशे वर्षात म्हणजे मध्य- युगात, जुन्या ग्रंथांवर टीका लिहिण्यापलीकडे हिंदू विद्वानांच्या हातून विशेष काही झाले नाही (महाराष्ट्र जीवन, खंड २ रा, पृ. ११).<br><br>'''पुराणप्रिय'''<br>{{gap}}महाराष्ट्रात अभ्यास होत असे तो सर्व अध्यात्माचा आणि पुराणांचा. पेशवे आणि त्यांचे मोठमोठे सरदार यांना ग्रंथसंग्रहाचा आणि ग्रंथवाचनाचा नाद पुष्कळ होता. पण हे ग्रंथ कोणचे ? रामायण, महाभारत, गीता, पुराणे, मार्गशीर्ष माहात्म्य, वैशाख- माहात्म्य ! याच्या जोडीला फारतर बखरी, तवारिखा, कैफियती हे पुराणवजा ग्रंथ. ज्ञानेश्वरी, तुकारामाचे अभंग, एकनाथी भागवत, मुद्गल रामायण, पांडवप्रताप, महीपतीची संतचरित्रे यांचेही वाचन होत असे. पण हे सर्व ग्रंथ मोक्षदायक आहेत. ऐहिक उत्कर्षापकर्षाशी त्यांचा संबंध नाही. नाना फडणिसाने सवाई माधवरावाच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली होती. पण त्यासंबंधी लिहिताना सरदेसाई म्हणतात,<noinclude></noinclude> ga3pjkjy6wds3p5bhiciezi9nv4zmpi पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६६ 104 73746 231965 164958 2026-06-11T03:33:08Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231965 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६३८}}</noinclude>नानाची बुद्धी केवळ पुराणप्रिय असून कालाबरोबर धाव घेण्यास ती बिलकुल समर्थ नव्हती. स्नानसंध्या, पोथ्यापुराणे, परंपरेची नीती, दांडपट्टा, घोडदौड यांपलीकडे त्याची दृष्टी गेली नाही.' सवाई माधवरावाकरता एक भूगोलाचे पुस्तक तयार करावे, असे नानाच्या मनात आले. डॉ. फिंडले नावाच्या इंग्रजास त्याने हे काम सांगितले. त्याने त्या पुस्तकात काय लिहिले ? इंग्रजांची विलायत रूमशामनजीक आहे, रूमचा बादशहा मुख्य असून दिल्ली हा त्याचा सुभा आहे, इंग्रज हिंदुस्थानात आले ते दैवी योजनेनेच आले, अशा तऱ्हेचा बराच मजकूर त्याने दडपून लिहून ठेवला. मराठ्याच्या भौतिक विद्येची ही अवस्था होती.<br><br>'''सृष्टपदार्थ-संशोधन'''<br>{{gap}}योगायोग असा की ज्या काळी येथे विद्या लुप्त झाली त्या काळात, तिचा युरोपात उत्कर्ष होऊ लागला. शं. वा. दीक्षित यांनी आपल्या ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथात लिहिले आहे, 'कोपरनिकसाचा ग्रंथ शके १४६५ साली झाला. त्याच्या आधी आमच्या देशातील व युरोपातील ज्योतिष सारख्याच स्थितीत होते म्हटले तरी चालेल. कोपरनिकसाच्या आधी आमच्या देशातील शोधक पितापुत्र केशव दैवज्ञ व गणेश दैवज्ञ हे होऊन गेले. पण नंतर तसा शोधक येथे झाला नाही. युरोपात मात्र या लहान वृक्षाचा पुढे वटवृक्ष झाला.' हाच भावार्थ राजवाडे यांनी निराळ्या शब्दांत सांगितला आहे. ते म्हणतात, 'शहाजीच्या हयातीत युरोपात बेकन, डेकार्ट इत्यादी विचारवंत, सृष्टपदार्थ- संशोधन- कार्याचे वाली, पंचमहाभूतांचा शोध लावण्यास जारीने प्रोत्साहन देत होते. आणि आपल्याकडे एकनाथ, तुकाराम, दासोपंत, निपट निरंजन इ. संत पंचमहाभूतांना मारून ब्रह्मसाक्षात्कारात राष्ट्राला नेऊन, मुक्त करण्याच्या खटपटीत होते. अशांना स्क्रू, टाचणी, बंदूक व तोफ यांचा विचार वमनप्राय वाटल्यास नवल नाही (दीक्षित, राजवाडे यांचे उतारे, संस्कृतिसंगम, द. के. केळकर, पृ. ३७३).<br><br>'''ग्रंथ'''<br>{{gap}}विद्येचे प्रधान लक्षण म्हणजे ग्रंथनिर्मिती हे होय. मुकुंदराजापासून पेशवाईअखेर- पर्यंत येथे महाराष्ट्रात ग्रंथ विपुल निर्माण झाले. पण ते सर्व अध्यात्माचे ग्रंथ होत. भौतिक विद्येसंबंधी, ऐहिक उत्कर्षापकर्षाविषयी एकही ग्रंथ झाला नाही. आणि चमत्कार असा की पेशवाई संपून इंग्रजी राज्य येथे प्रस्थापित होताच पुढच्या पाऊणशे वर्षांत ऐहिक विषयांवर शेकडो ग्रंथ निर्माण झाले. बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी, जोतिबा फुले हे तर पंचवीस तीस वर्षांच्या आतच अशा प्रकारचे लेखन करू लागले. त्याआधी राजकारण, लोकशाही, कारखानदारी स्त्रीपुरुषसमता, व्यापारवृद्धी, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व, अस्पृश्यता, जातिभेद धर्मातील वचन- प्रामाण्य, जगातील थोर पुरुषांची वॉशिंग्टन, नेपोलियन, शिकंदर अशा पुरुषांची<noinclude></noinclude> mcnc6jooguj6p59ehhz7h59to9sl1fz पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६७ 104 73747 231966 164959 2026-06-11T03:33:21Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231966 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६३९|| प्रबोधनाच्या अभावी}}</noinclude>चरित्रे, इंग्लंडचा, फ्रान्सचा इतिहास, पुरातत्त्वसंशोधन, भारताचा प्राचीन इतिहास या व असल्या विषयांना, संत, पंडित, आख्यानकवी, चरित्रकार, आणि शाहीर सुद्धा, यांपैकी कोणी स्पर्शही केला नव्हता. याचा अर्थ काय ?<br>{{gap}}याचे कारण उघड आहे. ते सर्व या विषयांना वमनप्राय मानीत होते. वामन, श्रीधर, मोरोपंत यांच्या भोवतीच मराठ्यांचा इतिहास घडत होता. तरी त्याविषयी त्यांनी काहीच कसे लिहिले नाही, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. या विषयात त्यांना रस नव्हता, ते याविषयी सर्वस्वी उदासीन होते, म्हणून त्यांनी त्याविषयी लिहिले नाही, हे त्याचे उत्तर आहे.<br><br>'''बुद्धीला आवाहन'''<br>{{gap}}दुसरी गोष्ट अशी की ऐहिक विषयांवर निबंध, प्रबंध किंवा ग्रंथ लिहावयाचा म्हणजे त्यात बुद्धीला आवाहन करावे लागते. अध्यात्मात असे काही नाही. संतांनी सर्वसामान्य जनतेला अध्यात्माचे गहन सिद्धान्त समजावून दिले. बुद्धीला आवाहन करून पटवून देण्याचा तेथे प्रश्नच नव्हता. तसे करावयाचे तर स्वतःच्या व इतर देशातल्या इतिहासातील प्रमाणे, भोवतालच्या परिस्थितीचे विवेचन, घटनांची कार्य- कारणमीमांसा हे सर्व आले. पण प्राचीन मराठी साहित्याला याची मुळीच गरज नव्हती. कारण अध्यात्मातील आत्मा, परमात्मा, मोक्ष, कर्म इ. सर्व सिद्धान्त हे बुद्धीच्या पलीकडचे आहेत. ते फक्त उपमा-दृष्टान्तांनी समजावून द्यावयाचे असतात. प्राचीन मराठी साहित्यिकांनी तेच केले. पंडितांना याच्या जोडीला काव्य सौंदर्य निर्माण करावयाचे होते. तेथेही बुद्धीला आवाहन करण्याचा प्रश्न नव्हता. प्राचीन संस्कृत साहित्याचे उत्तम मराठीत रूपांतर त्यांना करावयाचे होते. ते त्यांनी केले. महाभारतात काही ठिकाणी राजधर्म, व्यापार, अर्थमाहात्म्य, इ. विषयांवर बौद्धिक विवेचन आहे. पण पंडितकवींनी तो विषय अजिबात गाळून टाकलेला आहे. कारण तो त्यांना त्याज्यच होता. भगवन्नामसंकीर्तन करावे, संसारातून तरून जाण्यासाठी गावे हा त्यांचा, लेखनामागचा हेतू होता. यामुळे त्यांनी ऐहिक विषयांवर ग्रंथ लिहिले नाहीत. पण मराठ्यांना ऐहिकप्रपंच करावयाचा होता, साम्राज्यविस्तार करावयाचा होता. त्यासाठी निबंध, ग्रंथ निर्माण करणे अवश्य होते. व्याख्यानांची आवश्यकता होती. पेशव्यांना व्याख्यानांचे महत्त्व समजले नव्हते, असे राजवाडे यांनी म्हटले आहे. ही फारच मोठी उणीव होती. तोफाबंदुकांपेक्षाही राष्ट्रभावना, देशाभिमान, पूर्वजांचा इतिहास, शत्रूचा इतिहास, त्याचे बलाबल, या विषयांवरील ग्रंथांचे महत्त्व जास्त आहे, हे पेशव्यांनी जाणले नाही. मराठेशाहीचा अंत होण्याच्या अनेक कारणांपैकी हे प्रधान कारण आहे.<br><noinclude></noinclude> 1kxwpltpx1qclbpzopzz03egdaf757p पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६८ 104 73748 231967 164962 2026-06-11T03:34:41Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231967 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६४०}}</noinclude><br>'''डेकार्ट'''<br>{{gap}}निबंध, ग्रंथ, ऐहिक प्रपंचाचे विवेचन यात बुद्धीला आवाहन करावे लागते, असे वर म्हटले आहे. ते करावयाचे म्हणजे शंका, आक्षेप, विरुद्ध पक्ष हे सर्व आलंच. पण अध्यात्मात याचे अगदी वावडे असते. श्रद्धा हा अध्यात्माचा, परमेश्वरप्राप्तीचा पाया आहे. त्यात मूलतत्त्वांच्या बाबतीत पूर्वपक्ष असले तरी, भक्तांना ते सर्व वर्ज्य आहे. आणि प्राचीन मराठी साहित्यात भक्ती हाच प्रधान विषय होता. आख्यानकवींच्या काव्यातही रोख सगळा भक्तीकडेच होता. त्यामुळे शंका, अश्रद्धा, आक्षेप हे ते पाप समजत. उलट युरोपात रेनी डेकार्ट याने युरोपीयांना शंका, आक्षेप घेण्यास शिकविले, म्हणून त्याला अर्वाचीन युरोपचा जनक मानतात. पण त्याच्या आधीच तेराव्या चौदाव्या शतकापासूनच मार्सिलियो, विल्यम ऑफ ओकहॅम, पीटर डुबाईस, वायक्लिफ, जॉन हस यांनीही आक्षेप घेण्याची, धर्मपीठाशी संग्राम करण्याची वृत्ती प्रगट केली होती. आणि हळूहळू ती सर्व युरोपात पसरली. त्यामुळेच तेथे सामान्यजनांना व्यक्तित्व प्राप्त झाले. भौतिक विद्येचे प्रधान कार्य मनुष्याला व्यक्तित्व प्राप्त करून देणे हे आहे. तसा भारतात- महाराष्ट्रात- प्रयत्न सुद्धा झाला नाही. अशा स्थितीत व्यक्तित्वसंपन्न असा जो इंग्रजी समाज, त्याच्याशी मराठ्यांची गाठ पडली. त्यात त्यांचा विजय होणे शक्यच नव्हते.<br><br>'''शाहीर त्यांतलेच'''<br>{{gap}}शाहिरांनी ऐहिक विषयांवर लिहिले. पण त्यांच्या मनोवृत्तीत इतर साहित्यिकांपेक्षा कसलाच फरक नव्हता. त्यांनी काही ग्रंथ लिहिले नाहीत. ज्या भौतिक विद्येची महती वर सांगितली आहे, ती त्यांच्याजवळ नव्हती. जयापजय हे पापपुण्यावर अवलंबून असतात, असेच ते मानीत असत. सवाई माधवरावाला ते अवतार मानीत असत. तो मृत्यू पावला तेव्हा, क्षीरसागरातून त्यांना तसे सांगितले गेले, म्हणून ते गेले, असे शाहीर म्हणतात. पेशव्यांचे राज्य बुडाले ते कलियुगामुळे बुडाले, असे शाहीर सांगत असत. ही भौतिकविद्या नव्हे. इतिहास, अनुभव, तर्क, परिस्थिती, कार्यकारणमीमांसा यांना भौतिक विद्येत महत्त्व असते. शाहिरी काव्यात यातले काहीच नाही. याची त्यांना कल्पनाही नव्हती. इतरांनी रामकृष्णांविषयी लिहिले. त्यांनी नाना, सवाई माधवराव यांच्यावर लिहिले. हा फरक, मागे सांगितल्याप्रमाणे, मोठा असला तरी आपल्या विषयाच्या दृष्टीने इतर कवी आणि शाहीर यांच्यांत कसलाही फरक नव्हता. त्यांच्याइतकाच भौतिक विद्येशी यांचा संबंध होता.<br><br>'''विचारही नाही'''<br>{{gap}}मराठ्यांना अखिल हिंदुस्थानात मराठा साम्राज्य स्थापावयाचे होते. हिंदुपदपात-<noinclude></noinclude> 3hxoxqf6pkvi5kgja65trwuq9oksvta पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६९ 104 73749 231968 164963 2026-06-11T03:34:53Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231968 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६४१|| प्रबोधनाच्या अभावी}}</noinclude>शाहीची स्थापना करावयाची होती. हे फार मोठे आणि अत्यंत दुष्कर असे ध्येय होते. दीर्घ काळ स्थापन झालेल्या मुस्लिम सत्तेचा समूळ उच्छेद करावयाचा आणि पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज हे जे पाश्चात्य आक्रमक त्यांची आक्रमणे मोडून काढावयाची असे हे दुहेरी कार्य होते. वर सांगितल्याप्रमाणे धर्म, समाजरचना, अर्थव्यवस्था या क्षेत्रांत समूळ क्रांती केल्यावाचून, हिंदुसमाजाची पुनर्घटना केल्यावाचून, एवढ्या कार्यासाठी अवश्य ते कर्तृत्व त्यांच्या ठायी निर्माण होणे शक्यच नव्हते. त्या कर्तृत्वासाठी भौतिक विद्येची पाश्चात्यांपेक्षाही जास्त उपासना करून वरील विषयांवर शेकडो ग्रंथ येथे निर्माण व्हावयास हवे होते. पण यातल्या कशाचाही प्रयत्न वा विचारही न करता मराठे साम्राज्यविस्तार करू लागले. या वेळी मुस्लिम हे त्यांच्यापेक्षाही मागासलेले व कर्तृत्वशून्य झाले होते. त्यांच्या सत्तेचा उच्छेद करणे मराठ्यांना जमले. पण हिंदुपदपातशाहीसाठी अखिल हिंदुसमाज, आसेतुहिमाचल राहणारा हिंदुसमाज, संघटित करणे अवश्य होते. म्हणजे शतकानुशतके उराशी बाळगलेली समाजरचनेची, धर्माची मूलतत्त्वे समूळ बदलावयास हवी होती. पण असे काही मराठ्यांच्या स्वप्नातही नव्हते, राज्यकर्त्यांच्या नव्हते आणि शास्त्री पंडित, कवी, तत्त्ववेत्ते यांच्याही नव्हते. ते राज्यकर्त्यांपेक्षा जास्त मागासलेले होते. तेव्हा साम्राज्यविस्तार करून हिंदुपदपातशाहीची स्थापना करण्यात मराठ्यांना यश आले नाही, यात नवल वाटण्याजोगे काहीच नाही. ज्या पातळीवरून ते हा प्रयत्न करीत होते, तेथून तसे यश येणे शक्यच नव्हते. चवदाव्या पंधराव्या शतकापासून युरोपात जे प्रबोधन युग सुरू झाले, त्यामुळे युरोपीय राष्ट्रे समर्थ झाली. तसे प्रबोधन हिंदुस्थानात घडणे अवश्य होते. निदान अखिल भारतीय साम्राज्य स्थापण्याची आकांक्षा धरणाऱ्या मराठ्यांनी तरी महाराष्ट्रात ते घडवावयास हवे होते. पण याची त्यांना कल्पनाही नव्हती. अशा स्थितीत हिंदुस्थानातच काय, महाराष्ट्रात सुद्धा स्थिर सत्ता स्थापन करणे त्यांना शक्य झाले नसते.<br><br>{{center|■}}<noinclude><br>{{gap}}४१</noinclude> 1qo4lgmuhgovikdcup9cvbyem9vhtbj पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७० 104 73750 231969 164964 2026-06-11T03:35:03Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231969 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude><br><br><br><br><br><br><br><br><br> {{center|'''विभाग तिसरा<br><br><br>{{x-larger|ब्रिटिश काल}}'''}} <br><br><br><br><br><br><br><br><br><noinclude></noinclude> 6cgrui27netzw7s924wdo9hn1vvxkwx पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७१ 104 73751 231970 164966 2026-06-11T03:35:48Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231970 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop |Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf |Page = 671 |bSize = 398 |cWidth = 315 |cHeight = 246 |oTop = 39 |oLeft = 26 |Location = center |Description = }} <br><br>{{rh|'''<big>३४.</big>'''||'''<big>नव्या प्रेरणा</big>'''}}<br><br>{{gap}}हिंदुपदपातशाही स्थापावी, सर्व हिंदुस्थानावर मराठ्यांचे साम्राज्य स्थापन करावे, अशी मराठ्यांची आकांक्षा होती. पण यासाठी धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक क्रांती करणे अवश्य होते, याची त्यांना कल्पनाही नव्हती. रणांगणातील पराक्रम, बाहुबल एवढ्यावरच हे सर्व भागेल असा त्यांना भ्रम होता. या दृष्टीने पाहता ते अगदी अडाणी होते. त्यांचा सर्वात मोठा जो शत्रू म्हणजे इंग्रज, त्याला त्यांनी जाणले नव्हते. म्हणून त्यांना त्यांच्या कार्यात यश आले नाही. येणे शक्यच नव्हते.<br><br>'''इंग्रजांनी जाणले'''<br>{{gap}}इंग्रजांनी मात्र मराठ्यांना आणि सर्व हिंदी जनांना चांगले जाणले होते. हिंदी राजे, संस्थानिक किंवा त्यांचे विद्वान- अविद्वान मुत्सद्दी हिंदुस्थानात राष्ट्रीयत्व निर्माण करू शकत नाहीत; कारण ते जगाच्या संस्कृतीत मागासलेले, अर्ध रानटी, आपसात भांडणारे, शिस्तीचे व कवायतीचे महत्त्व न ओळखणारे, परकीय प्रभुत्वाची चीड न बाळगणारे, धर्मवेडात गुरफटलेले, आधुनिक राष्ट्रनिर्मितीस पारखे, लोकसत्तेचे ज्ञान नसलेले, आणि जगातील घडामोडींविषयी पूर्ण अज्ञानी, असे आहेत, हे इंग्रजांनी<noinclude></noinclude> fkdfrhqox2sazoa0gec9mcmbrh9clxq पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७२ 104 73752 231971 164967 2026-06-11T03:36:47Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231971 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६४६}}</noinclude>चांगले ओळखले होते. त्यामुळे तेथील राजेरजवाड्यांना एका निशाणाखाली गोळा करून, आपल्या साम्राज्याचा कोणी पाडाव करील, अशी भीती त्या वेळी ब्रिटिश मुत्सद्दयांना मुळीच वाटत नव्हती. सर जॉन शोअर याने म्हटले आहे की 'आपल्या गावापलीकडे देशाचे प्रेम म्हणजे काय याचे ज्ञान हिंदी लोकांना नाही. एखाद्या अधिकाऱ्याविषयी किंवा स्वामीविषयी त्याला प्रेम किंवा निष्ठा वाटेल. पण एकंदर राज्यसंस्थेविषयी तो अगदी बेफिकीर असतो. जो पगार देईल त्याच्यासाठी तो लढेल आणि जर त्याला असे दिसून आले की आपण ज्या सरकारची नोकरी करीत अहोत त्याचा पाडाव होत आहे तर तो त्या सरकारची नोकरी सोडून देईल आणि चांगल्या पगाराच्या किंवा लुटीच्या आशेने तो शत्रुपक्षाला जाऊन मिळेल.'<br>{{gap}}माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन, सर जॉन मालकम यांसारख्या ब्रिटिश राज्यकर्त्यांना हे पक्के कळून चुकले होते, आणि आपल्या ग्रंथांत व खलित्यांत त्यांनी लिहिलेही होते की 'येथील सामान्य जनता राष्ट्रनिर्मितीच्या ज्ञानापासून अलिप्त आहे, येथील राज्यकर्ते व संस्थानिक परकियांविरुद्ध एकजुटीने लढून स्वातंत्र्य स्थापना करण्यास नालायक आहेत आणि येथील विद्वानांना, जगाचे, भौतिक शास्त्रांचे आणि सामाजिक विद्यांचे गाढ अज्ञान आहे.' तेव्हा यांच्यापासून साम्राज्याला धोका नाही अशी त्यांची निश्चिती होती.<br><br>'''उदार धोरण'''<br>{{gap}}पण असे असतानाही पाश्चात्य विद्यांचे ज्ञान हिंदी जनांना द्यावे याविषयी मात्र सर्व ब्रिटिश राज्यकर्त्यांचे एकमत होते. ही विद्या हिंदुस्थानात पसरली तर पुढे मागे आपल्या साम्राज्यास धोका आहे, राष्ट्रीयत्व जागृत होऊन हिंदी लोक आपणांस येथून घालवून देणे शक्य आहे, हे ते जाणत होते. तरीही त्यांना अर्ध रानटी ठेवून त्यांच्यावर दीर्घ काल राज्य करण्यापेक्षा त्यांना सज्ञान करून त्यांच्यांतून एकराष्ट्र निर्माण करणे हे आपल्या राष्ट्राच्या व मानवतेच्या दृष्टीने जास्त योग्य आहे व भूषणावह आहे, असे त्यांचे मत होते. सर जॉन मेटकाफ याने तर त्याकाळी हिंदी जनांना मुद्रणस्वातंत्र्यही दिले. त्यापायी त्याची नोकरी गेली. पण तरीही वरील मताचा आपला आग्रह त्याने सोडला नाही. या लोकांना विद्या देऊन आपण येथून जाणे हेच जास्त कीर्तीकर आहे, इंग्लंडला हितावह आहे, असेच तो म्हणत होता.<br><br>'''इंग्रजांच्या अपेक्षा'''<br>{{gap}}या संबंधात ब्रिटिशांना भीती एकच होती. त्यांनी येथे साम्राज्य स्थापिले होते ते सर्व हिंदी सैन्याच्या बळावर; आणि त्या सैन्यात प्रक्षोभ माजून तेच जर आपल्यावर उलटले तर मग मात्र आपली धडगत नाही, ही ती भीती होय. त्यांना आशा अशी होती की प्रथम पाश्चात्य विद्या व राष्ट्रीयत्व हे हिंदी जनतेत पसरेल, त्यांच्या अंगी<noinclude></noinclude> 1f8264iolkge92ctsef8k02bzode0he पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७३ 104 73753 231972 164968 2026-06-11T03:38:57Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231972 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६४७|| नव्या प्रेरणा}}</noinclude>बाणेल आणि तेथून ते हळूहळू सैन्यात पसरेल. तसे होऊन आपले साम्राज्य जाण्याची वेळ आली तरी त्याला त्यांची तयारी होती. कारण मग या देशात शांतता नांदेल, सर्व हिंदुस्थानचा कारभार यशस्वी करून दाखविणारे पुरुष येथे निर्माण होतील, ते देशात शिस्त व कायदा आणतील आणि मग आपला व्यापार तरी हिंदुस्थानात उत्तम चालेल. साम्राज्यापेक्षा त्यांना व्यापाराचीच काळजी जास्त होती. त्यामुळे प्रथम जनता व नंतर सैन्य यांच्यांत राष्ट्रीय वृत्ती निर्माण व्हावी व मग त्यांनी स्वातंत्र्य मिळवावे, याला त्यांची हरकत नव्हती. पण आहे या स्थितीत लोक व लष्कर अर्ध रानटी अवस्थेत असताना जर लष्कर उलटले व आपल्याला येथून जावे लागले तर मात्र साम्राज्यही जाईल व व्यापारही जाईल असा धोका होता आणि त्याला मात्र त्यांची तयारी नव्हती.<br>{{gap}}पुढल्या इतिहासावरून आपण हे जाणतोच की ब्रिटिशांची आशा व अटकळ अगदी खरी ठरली. प्रथम राष्ट्रभावना हिंदी जनतेत पसरली व तेथून ती सैन्यात शिरली. टिळक, गांधी यांनी पहिले कार्य केले व सुभाषचंद्रांनी दुसरे कार्य केले आणि सैन्य आपल्यावर उलटले आहे हे ध्यानात येताच, इंग्लंडचे मुख्य प्रधान मेजर ॲटली यांनी, इंग्लंडातून सैन्य आणून हिंदुस्थानात राज्य करणे अशक्य आहे, हे जाणून भारताला स्वातंत्र्य देऊन टाकले.<br>{{gap}}हे कसे घडत गेले तेच आता अपाणास पाहावयाचे आहे. मराठ्यांना जे साधले नाही, इ. सनाच्या अकराव्या शतकापासून आलेली अचेतन स्थिती नष्ट करण्यात कोणालाच यश आले नाही, ते यश अगदी अल्पावधीत, साधारण शंभर वर्षांत मिळवून स्वातंत्र्यप्राप्ती करून घेण्याइतके सामर्थ्य भारताला कसे प्राप्त झाले, त्याचाच आता विचार करावयाचा आहे.<br><br>'''भौतिक विद्या'''<br>{{gap}}भारतीयांनी सर्वांगीण क्रांती घडवून हे जे सामर्थ्य प्राप्त करून घेतले त्याचे पहिले साधन म्हणजे भौतिक विद्या, ऐहिक जगाचे ज्ञान हे होय. राजा राममोहन राय यांची याविषयीची मते प्रसिद्धच आहेत. येथे संस्कृत विद्येच्याच शाळा काढाव्या असा इंग्रजांचा विचार होता. पण बेकन, डेकार्ट यांच्या ज्या ज्ञानामुळे युरोपीय समाज सुधारला ते ज्ञान, ती भौतिक विद्या आम्हांला द्या असा आग्रह त्यांनी धरिला. प्रारंभी जे विवेचन केले आहे त्यावरून इंग्रज मुत्सद्द्यांचाही त्याला विरोध नव्हता, हे ध्यानात येईल.<br><br>'''बाळशास्त्री'''<br>{{gap}}महाराष्ट्रात असा पहिला प्रयत्न बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ साली दर्पण हे साप्ताहिक काढून केला. पहिल्या अंकात त्यांनी लिहिले आहे की 'वृत्तपत्रामुळेच युरोपास सज्ञानदशा प्राप्त होऊन त्याची प्रगती झाली. ज्या ज्या देशात अशा लेखांचा<noinclude></noinclude> dbahlr1ithbtm5fxwg2u9af9emb6syg पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७४ 104 73754 231973 164969 2026-06-11T03:42:26Z Priyanka Choudhari 4169 /* प्रमाणित */ 231973 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६४८}}</noinclude>(वृत्तपत्रातील) प्रचार झाला आहे, तेथे लोकांचे आंतर व्यवहारामध्ये व बाह्य व्यवहारामध्ये हित झाले आहे. यापासून बहुत वेळ विद्यांची वृद्धी झाली आहे. लोकांमध्ये नीती रूपास आली आहे. अलीकडे कित्येक देशांत धर्मरीती व राज्यरीती यांत जे चांगले व उपयोगी फेरफार झाले आहेत त्यांसही थोडेबहुत हे लेख उपयोगी पडले आहेत. बंगाल प्रांत इंग्रजांचे हाती जाऊन साठसत्तर वर्षेच झाली. परंतु तेवढ्यात तो आता निर्भयपणे स्वातंत्र्य भोगतो आणि तेथील लोकांस विद्याकलांचे विशेष ज्ञान होत आहे. सर्व हिंदुस्थानात जो अंधकार फार दिवस व्यापून राहिला होता तो जाण्यास आता प्रारंभ झाला आहे.'<br>{{gap}}बाळशास्त्री हे मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करीत असत. गणित, ज्योतिष व भौतिक शास्त्र हे त्यांचे विषय होते. पण त्यांना ग्रीक, लॅटिन, इंग्लिश, फ्रेंच, आरबी, फार्शी, हिंदी, बंगाली, गुजराथी व कानडी इतक्या भाषांचे ज्ञान होते. शिक्षणक्षेत्रात काम करून प्राचीन शिलालेखांवर संशोधनात्मक लेखही त्यांनी लिहिलेले आहेत. रॉयल एशियाटिक सोसायटीचे नियतकालिक १८४१ पासून सुरू झाले. त्यात त्यांचे लेख येत असत. 'दर्पण' साप्ताहिक १८४० साली बंद पडले. तेव्हा 'दिग्दर्शन' हे मासिक सुरू करून त्यांनी तोच उद्योग पुढे चालविला.<br>{{gap}}यावरून ध्यानात येईल की धार्मिक, सामाजिक, राजकीय कोणतीही सुधारणा वा क्रांती असो, तिचा पाया भौतिक विद्या हा आहे, हे अगदी प्रारंभापासून येथल्या विद्वानांच्या मनावर ठसले होते आणि त्याच हेतूने प्रेरित होऊन त्यांनी आपले उद्योग सुरू केले होते.<br><br>'''लोकहितवादी'''<br>{{gap}}या पाश्चात्य भौतिक विद्येचे दुसरे मोठे पुरस्कर्ते म्हणजे लोकहितवादी. अज्ञान ही हिंदुलोकांची, आणि ब्राह्मणांची महाव्याधी आहे, असे त्यांचे मत होते. त्यांची मने व बुद्धी सर्वस्वी पुराणात बुडालेली होती. विष्णू शेषावर निजतो, खांबातून नरसिंह निघाला, राहू-केतू चंद्रसूर्यांना ग्रासतात, हेच त्यांचे अजूनही ज्ञान आहे. जगाचा इतिहास, भूगोल, रसायन, गणित, शिल्प इ. शास्त्रांची त्यास काही कल्पना नाही. इंग्रजी ग्रंथात आहे काय दगड, असे ते म्हणतात. आणि विशेष नवल म्हणजे या अज्ञानातच त्यांस भूषण वाटते. लोकहितवादी म्हणतात, हे शास्त्री, भट, व संपूर्ण हिंदू लोक अजून मागल्या गोष्टीचे भरात आहेत. कोणी म्हणतो विलायत बेट लहान दोनचार कोसांचे आहे, कोणी म्हणतो कंपनी सरकार बायको आहे. ज्ञान म्हणजे काय हे त्यांस ठाऊकच नाही. इंग्लंडातील थोरली सनद, पार्लमेंट, फराशीस यांची राज्यक्रान्ती, रूमचे राज्याचा नाश, अमेरिका खंडात युरोपियांची वस्ती, लोकसत्तात्मक राज्य, या शब्दांचा अर्थही बहुतेक हिंदुलोकांस ठाऊक नसतो. तेव्हा हिंदू लोकांची<noinclude></noinclude> jusx51bt8zpu5nhyrytxm99nxewj0uc पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११९ 104 85883 231980 230950 2026-06-11T04:18:37Z JayashreeVI 4058 231980 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|११४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>जी नेमणूक केली होती ती सारखी चालू होती व चाफळच्या मठाची व्यवस्था अजूनही भिक्षेवरच चालू होती; हें या केशव गोसाव्याच्या पत्रावरून दिसतें, या पत्रांतील मजकुराचा विचार केला व मागे दिलेल्या पत्रांचा विचार केला तर शिवाजीची प्रथम भेट याच सालांत झाली याबद्दल मनाची बालंबाल खात्री होते. पण रा. देव व रा. राजवाडे या पत्रांतही भास्कर गोसाव्याच्या पत्राप्रमाणे क्लिष्ट कल्पना व व्यंग्यार्थ काढतात. राजवाड्यांच्या मतें प्रथम भेट याच्या आधीं ‘या मुलाखतीतील' असे शब्द गृहीत धरावे म्हणजे झालें! मग या पत्राचा असा अर्थ होतो कीं, महाराजांच्या व समर्थांच्या पूर्वी किती तरी मुलाखती झाल्या होत्या व अशा एका मुलाखतींतील ही प्रथम भेट होय. रा. राजवाडे यांची ही कल्पना वाचून या लेखकास पुनर्विवाहाच्या वेळच्या वादाची आठवण झाली. त्या वादाचे वेळीं' 'नष्टेमृते' या प्रसिद्ध श्लोकाचा पुनर्विवाहपर अर्थ खोडण्याकरितां 'पतीच्या' ठिकाणी 'अपति' असें रूप धरावें म्हणजे झाले अशी क्लिष्ट कल्पना जुन्याच्या अभिमान्यांनी काढली होती त्यासारखीच रा. राजवाडे यांचीहि कल्पना आहे. त्या वादाची त्यांना माहिती नसल्यामुळे त्या वेळची सोपी युक्ति त्यांना सुचली नसावी व म्हणून 'या मुलाखतीतील' इतकें लांबलचक पद गृहीत धरण्याची कल्पना त्यांना काढावी लागली! नाहींतर इतके जास्त शब्द घालण्या ऐवजी 'समर्थांचे' पाठीमागें 'अ' असें अक्षर आहे व म्हणून हें पत्र रामदास व शिवाजी यांच्या भेटीबद्दल मुळींच नाहीं; व अर्थात् या पत्रावरून भेटीचा काल मुळींच शाबीत होत नाहीं असें त्यांना म्हणतां आलें असतें! मन एकदां पूर्वग्रहदूषित झाले म्हणजे तें अर्थ लावण्यांत काय काय मौज करूं शकतें याचा या पत्राचा वरील प्रकारचा व्यंग्यार्थ हा उत्तम मासला आहे. <br>{{gap}}पण पूर्वग्रहविरहित माणसास हें केशव गोसाव्याचें पत्र रामदास व शिवाजी यांच्या भेटीच्या कालाचा प्रत्यक्ष पुरावा आहे हे उघड आहे. तेव्हां आतां हातच्या कांकणाला आरसा कशाला! पण रा. चांदोरकरांच्या कागदपत्रांत असलीं आरसेवजाही पत्रे आहेत; त्यावरून या प्रश्नावर काय-<noinclude></noinclude> 76s1ybuameat6102hbjoyzq5er7firh पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२० 104 85884 231977 182078 2026-06-11T04:15:02Z JayashreeVI 4058 231977 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|११६}} {{rule}}</noinclude>मचा उजेड पडून त्याचा निकाल झाला आहे असे म्हणावे लागेल असे वाटतें. पण पुढे जाण्यापूर्वी या पत्राच्या अनुरोधानें शिवाजीमहाराजांच्या व रामदासांच्या प्रथम भेटीचा नक्की काल ठरवू या. <br>{{gap}}केशव गोसाव्याच्या पत्राची तिथि चैत्र व॥ १ शके १५९४ (सन १६७२) अशी आहे. या सालाच्या संवत्सराचें नांव 'परिधावी' असे आहे. सांप्रदायिक कथेप्रमाणे शिवाजीला गुरुमंत्र गुरुवारी झाला असे आहे. या पत्राच्या मितीला बुधवार होता; तेव्हां दुसरेच दिवशीं भेटीचा दिवस नसला पाहिजे. कारण दूरच्या शिष्यांना येण्यास सवड सांपडे अशा तऱ्हेनें आगाऊ पत्र दिवाकर गोसाव्यानें पाठविली असली पाहिजेत. व केशव गोसावी याच पत्रांत दुसऱ्या शिष्यांस उदईक पाठवितों असे म्हणतात तेव्हां दुसऱ्या दिवशींचा भेटीचा दिवस नसावा. पण तो चैत्र वद्य प्रतिपदेपासून फारसा लांबही नसावा. अर्थात् तो चैत्र वद्य नवमी हा दिवस असावा हे उघड होतें. वैशाख शुद्ध नवमी हा या पत्राच्या तिथीपासून फार दूर आहे. शिवाय रा. चांदोरकर यांनी पंचांगावरून असे काढले आहे कीं, चैत्र वद्य नवमी परिधावीनाम संवत्सरे हा फार चांगल्या मुहूर्ताचा दिवस आहे. त्या दिवशीं अमृतसिद्धियोग आहे व उत्तराषाढा नक्षत्र आहे. त्या दिवशी अभिजित मुहूर्ती महाराजांस अनुग्रह झाला असला पाहिजे. (या मुहूर्ती महाराजांस अनुग्रह झाला असें कित्येक बखरींतून विधान आहे.) तेव्हां १२ एप्रिल सन १६७२ या दिवशीं शिवाजीची व रामदासांची प्रथम भेट झाली व बखरींत वर्णन केल्याप्रमाणे त्याच दिवशीं रामदासांनी महाराजांवर अनुग्रह केला व रामदासांनी त्यांना मेजवानी दिली असे निर्विवाद सिद्ध होते. या वेळीं रामदासांचें वय चौसष्ट वर्षंंचे होतें. अशा वयोवृद्ध, तपोनिष्ठ, पंथसंस्थापक, प्रासादिक कविसंताची ती भव्य, गंभीर व तेजःपुंज ब्रह्मचारी मूर्ति पाहून शिवाजी महाराजांची विलक्षण भक्ति रामदासांवर बसली यांत नवल काय? तेव्हांपासून त्यांचा गुरुशिष्यसंबंध झाला व तो दृढभक्तीचा व दृढ आदराचा झाला यांत शंका नाहीं. व याचें प्रत्यंतर पुढील हकीगतीवरून पटते. <br>{{gap}}शिवाजी व रामदास यांची प्रथमभेट त्या सालच्या उत्सवानंतर पंधरा<noinclude></noinclude> 7lxhf3llvpsk5g8179fo4se1loeku8t 231978 231977 2026-06-11T04:15:30Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 231978 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|११६}} {{rule}}</noinclude>मचा उजेड पडून त्याचा निकाल झाला आहे असे म्हणावे लागेल असे वाटतें. पण पुढे जाण्यापूर्वी या पत्राच्या अनुरोधानें शिवाजीमहाराजांच्या व रामदासांच्या प्रथम भेटीचा नक्की काल ठरवू या. <br>{{gap}}केशव गोसाव्याच्या पत्राची तिथि चैत्र व॥ १ शके १५९४ (सन १६७२) अशी आहे. या सालाच्या संवत्सराचें नांव 'परिधावी' असे आहे. सांप्रदायिक कथेप्रमाणे शिवाजीला गुरुमंत्र गुरुवारी झाला असे आहे. या पत्राच्या मितीला बुधवार होता; तेव्हां दुसरेच दिवशीं भेटीचा दिवस नसला पाहिजे. कारण दूरच्या शिष्यांना येण्यास सवड सांपडे अशा तऱ्हेनें आगाऊ पत्र दिवाकर गोसाव्यानें पाठविली असली पाहिजेत. व केशव गोसावी याच पत्रांत दुसऱ्या शिष्यांस उदईक पाठवितों असे म्हणतात तेव्हां दुसऱ्या दिवशींचा भेटीचा दिवस नसावा. पण तो चैत्र वद्य प्रतिपदेपासून फारसा लांबही नसावा. अर्थात् तो चैत्र वद्य नवमी हा दिवस असावा हे उघड होतें. वैशाख शुद्ध नवमी हा या पत्राच्या तिथीपासून फार दूर आहे. शिवाय रा. चांदोरकर यांनी पंचांगावरून असे काढले आहे कीं, चैत्र वद्य नवमी परिधावीनाम संवत्सरे हा फार चांगल्या मुहूर्ताचा दिवस आहे. त्या दिवशीं अमृतसिद्धियोग आहे व उत्तराषाढा नक्षत्र आहे. त्या दिवशी अभिजित मुहूर्ती महाराजांस अनुग्रह झाला असला पाहिजे. (या मुहूर्ती महाराजांस अनुग्रह झाला असें कित्येक बखरींतून विधान आहे.) तेव्हां १२ एप्रिल सन १६७२ या दिवशीं शिवाजीची व रामदासांची प्रथम भेट झाली व बखरींत वर्णन केल्याप्रमाणे त्याच दिवशीं रामदासांनी महाराजांवर अनुग्रह केला व रामदासांनी त्यांना मेजवानी दिली असे निर्विवाद सिद्ध होते. या वेळीं रामदासांचें वय चौसष्ट वर्षंंचे होतें. अशा वयोवृद्ध, तपोनिष्ठ, पंथसंस्थापक, प्रासादिक कविसंताची ती भव्य, गंभीर व तेजःपुंज ब्रह्मचारी मूर्ति पाहून शिवाजी महाराजांची विलक्षण भक्ति रामदासांवर बसली यांत नवल काय? तेव्हांपासून त्यांचा गुरुशिष्यसंबंध झाला व तो दृढभक्तीचा व दृढ आदराचा झाला यांत शंका नाहीं. व याचें प्रत्यंतर पुढील हकीगतीवरून पटते. <br>{{gap}}शिवाजी व रामदास यांची प्रथमभेट त्या सालच्या उत्सवानंतर पंधरा<noinclude></noinclude> dzhagwdz8bven9xrp9v3nywg4nsf8di 231979 231978 2026-06-11T04:17:53Z JayashreeVI 4058 231979 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|११५}} {{rule}}</noinclude>मचा उजेड पडून त्याचा निकाल झाला आहे असे म्हणावे लागेल असे वाटतें. पण पुढे जाण्यापूर्वी या पत्राच्या अनुरोधानें शिवाजीमहाराजांच्या व रामदासांच्या प्रथम भेटीचा नक्की काल ठरवू या. <br>{{gap}}केशव गोसाव्याच्या पत्राची तिथि चैत्र व॥ १ शके १५९४ (सन १६७२) अशी आहे. या सालाच्या संवत्सराचें नांव 'परिधावी' असे आहे. सांप्रदायिक कथेप्रमाणे शिवाजीला गुरुमंत्र गुरुवारी झाला असे आहे. या पत्राच्या मितीला बुधवार होता; तेव्हां दुसरेच दिवशीं भेटीचा दिवस नसला पाहिजे. कारण दूरच्या शिष्यांना येण्यास सवड सांपडे अशा तऱ्हेनें आगाऊ पत्र दिवाकर गोसाव्यानें पाठविली असली पाहिजेत. व केशव गोसावी याच पत्रांत दुसऱ्या शिष्यांस उदईक पाठवितों असे म्हणतात तेव्हां दुसऱ्या दिवशींचा भेटीचा दिवस नसावा. पण तो चैत्र वद्य प्रतिपदेपासून फारसा लांबही नसावा. अर्थात् तो चैत्र वद्य नवमी हा दिवस असावा हे उघड होतें. वैशाख शुद्ध नवमी हा या पत्राच्या तिथीपासून फार दूर आहे. शिवाय रा. चांदोरकर यांनी पंचांगावरून असे काढले आहे कीं, चैत्र वद्य नवमी परिधावीनाम संवत्सरे हा फार चांगल्या मुहूर्ताचा दिवस आहे. त्या दिवशीं अमृतसिद्धियोग आहे व उत्तराषाढा नक्षत्र आहे. त्या दिवशी अभिजित मुहूर्ती महाराजांस अनुग्रह झाला असला पाहिजे. (या मुहूर्ती महाराजांस अनुग्रह झाला असें कित्येक बखरींतून विधान आहे.) तेव्हां १२ एप्रिल सन १६७२ या दिवशीं शिवाजीची व रामदासांची प्रथम भेट झाली व बखरींत वर्णन केल्याप्रमाणे त्याच दिवशीं रामदासांनी महाराजांवर अनुग्रह केला व रामदासांनी त्यांना मेजवानी दिली असे निर्विवाद सिद्ध होते. या वेळीं रामदासांचें वय चौसष्ट वर्षंंचे होतें. अशा वयोवृद्ध, तपोनिष्ठ, पंथसंस्थापक, प्रासादिक कविसंताची ती भव्य, गंभीर व तेजःपुंज ब्रह्मचारी मूर्ति पाहून शिवाजी महाराजांची विलक्षण भक्ति रामदासांवर बसली यांत नवल काय? तेव्हांपासून त्यांचा गुरुशिष्यसंबंध झाला व तो दृढभक्तीचा व दृढ आदराचा झाला यांत शंका नाहीं. व याचें प्रत्यंतर पुढील हकीगतीवरून पटते. <br>{{gap}}शिवाजी व रामदास यांची प्रथमभेट त्या सालच्या उत्सवानंतर पंधरा<noinclude></noinclude> qx8b0vfuevyhjzbi18xkywc8gafmg6w पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२१ 104 85885 231981 182079 2026-06-11T04:30:42Z JayashreeVI 4058 231981 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|११६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule|</noinclude>दिवसांनींच झाली. तेव्हां उत्सवांत आपल्याला काय काय अडचणी येतात, लोक कसा त्रास देतात, चोरांचा कसा उपद्रव होतो आणि दोनशें होन कसे पुरत नाहींत, वगैरे हकीगत शिवाजी राजास रामदासांकडून कळली असावी आणि म्हणूनच परत गेल्यावर शिवाजीनें कऱ्हाड प्रांतीच्या आपल्या अधिकाऱ्यांस उत्सवाचे वेळी योग्य व्यवस्था व बंदोबस्त ठेवण्याविषयी आज्ञापत्र पाठविले आहे. (परिशिष्ट पहा.) दोनशें होन पुरत नाहींत म्हणून शिवाजी महाराजांनीं चाफळच्या मठाचा कच्चा खर्च संभाळला व त्याप्रमाणें तिकडील अधिकाऱ्यास तिजोरींतून सर्व खर्च देण्याचे आज्ञापत्र सन १६७४ मध्ये काढलें. (परिशिष्ट पहा.) नंतर दोन वर्षांनी इनाम गांव करून दिले. रामदासांचा निकटवास घडण्याकरितां त्यांना नुकत्याच घेतलेल्या परळी किल्ल्यावर रहावयास बोलाविलें. <br>{{gap}}अशा प्रकारें रामदासांचा व शिवाजीचा निकट संबंध सन १६७२ रात सुरू झाला. अर्थात् शिवाजीनें आपल्या राज्यारोहणाच्या बाबतीत बखरींत लिहिल्याप्रमाणें रामदासांची सल्ला मसलत व अनुमति घेतली असलीच पाहिजे. पुढे निरनिराळ्या वेळी चाफळ व सज्जनगड येथील मठांस गांव इनाम करून दिले आहेत. शिवाजी महाराज आपल्या अष्टप्रधानांसकट परळीच्या रामोत्सवांत भाग घेत असत अशाबद्दल सातारच्या राजाच्या दफ्तरांतील सन १६८० मधील एक यादी इतिहाससंग्रहांत रा. ब.पारसनीस यानी प्रसिद्ध केली आहे. तिचा या हकीगतीशी मेळ बसतो. शिवाजीच्या मरणानंतर संभाजी महाराजांनीं चाफळच्या व परळीच्या मठाला पुन्हां इनामाच्या सनदा करून दिल्या आहेत. त्यांवरून रामदासांच्या मठाचा व शिवाजीच्या घराण्याचा गुरुशिष्यसंबंध चालू राहिला असे होतें. यावरून रामदासांनी संभाजीला उपदेशपर लिहिलेले पत्र खरें असावें असे दिसतें. त्या पत्रांत रामदासांच्या मनांत शिवाजीबद्दल किती आदरबुद्धि वसत होती हे व्यक्त झाले आहे. शिवाजीलाही रामदासांबद्दल किती आदर व पूज्यभाव वाटत होता हे त्याच्या सन १६७२ पासून १६८० पर्यंतच्या म्हणजे मरेपर्यंतच्या वर्तनावरून व त्यानें रामदासांच्या संस्थानांस केलेल्या कायमच्या मदतीवरून दिसून येतें.{{nop}}<noinclude></noinclude> 7zgy01iegao5h6mh2cqw1pdcpl3n5t3 231982 231981 2026-06-11T04:31:39Z JayashreeVI 4058 231982 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|११६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule|}}</noinclude>दिवसांनींच झाली. तेव्हां उत्सवांत आपल्याला काय काय अडचणी येतात, लोक कसा त्रास देतात, चोरांचा कसा उपद्रव होतो आणि दोनशें होन कसे पुरत नाहींत, वगैरे हकीगत शिवाजी राजास रामदासांकडून कळली असावी आणि म्हणूनच परत गेल्यावर शिवाजीनें कऱ्हाड प्रांतीच्या आपल्या अधिकाऱ्यांस उत्सवाचे वेळी योग्य व्यवस्था व बंदोबस्त ठेवण्याविषयी आज्ञापत्र पाठविले आहे. (परिशिष्ट पहा.) दोनशें होन पुरत नाहींत म्हणून शिवाजी महाराजांनीं चाफळच्या मठाचा कच्चा खर्च संभाळला व त्याप्रमाणें तिकडील अधिकाऱ्यास तिजोरींतून सर्व खर्च देण्याचे आज्ञापत्र सन १६७४ मध्ये काढलें. (परिशिष्ट पहा.) नंतर दोन वर्षांनी इनाम गांव करून दिले. रामदासांचा निकटवास घडण्याकरितां त्यांना नुकत्याच घेतलेल्या परळी किल्ल्यावर रहावयास बोलाविलें. {{gap}}अशा प्रकारें रामदासांचा व शिवाजीचा निकट संबंध सन १६७२ रात सुरू झाला. अर्थात् शिवाजीनें आपल्या राज्यारोहणाच्या बाबतीत बखरींत लिहिल्याप्रमाणें रामदासांची सल्ला मसलत व अनुमति घेतली असलीच पाहिजे. पुढे निरनिराळ्या वेळी चाफळ व सज्जनगड येथील मठांस गांव इनाम करून दिले आहेत. शिवाजी महाराज आपल्या अष्टप्रधानांसकट परळीच्या रामोत्सवांत भाग घेत असत अशाबद्दल सातारच्या राजाच्या दफ्तरांतील सन १६८० मधील एक यादी इतिहाससंग्रहांत रा. ब.पारसनीस यानी प्रसिद्ध केली आहे. तिचा या हकीगतीशी मेळ बसतो. शिवाजीच्या मरणानंतर संभाजी महाराजांनीं चाफळच्या व परळीच्या मठाला पुन्हां इनामाच्या सनदा करून दिल्या आहेत. त्यांवरून रामदासांच्या मठाचा व शिवाजीच्या घराण्याचा गुरुशिष्यसंबंध चालू राहिला असे होतें. यावरून रामदासांनी संभाजीला उपदेशपर लिहिलेले पत्र खरें असावें असे दिसतें. त्या पत्रांत रामदासांच्या मनांत शिवाजीबद्दल किती आदरबुद्धि वसत होती हे व्यक्त झाले आहे. शिवाजीलाही रामदासांबद्दल किती आदर व पूज्यभाव वाटत होता हे त्याच्या सन १६७२ पासून १६८० पर्यंतच्या म्हणजे मरेपर्यंतच्या वर्तनावरून व त्यानें रामदासांच्या संस्थानांस केलेल्या कायमच्या मदतीवरून दिसून येतें.{{nop}}<noinclude></noinclude> iw5kk3u6f0ri1j4y3dsqe80d4od6wwb 231983 231982 2026-06-11T04:32:06Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 231983 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|११६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule|}}</noinclude>दिवसांनींच झाली. तेव्हां उत्सवांत आपल्याला काय काय अडचणी येतात, लोक कसा त्रास देतात, चोरांचा कसा उपद्रव होतो आणि दोनशें होन कसे पुरत नाहींत, वगैरे हकीगत शिवाजी राजास रामदासांकडून कळली असावी आणि म्हणूनच परत गेल्यावर शिवाजीनें कऱ्हाड प्रांतीच्या आपल्या अधिकाऱ्यांस उत्सवाचे वेळी योग्य व्यवस्था व बंदोबस्त ठेवण्याविषयी आज्ञापत्र पाठविले आहे. (परिशिष्ट पहा.) दोनशें होन पुरत नाहींत म्हणून शिवाजी महाराजांनीं चाफळच्या मठाचा कच्चा खर्च संभाळला व त्याप्रमाणें तिकडील अधिकाऱ्यास तिजोरींतून सर्व खर्च देण्याचे आज्ञापत्र सन १६७४ मध्ये काढलें. (परिशिष्ट पहा.) नंतर दोन वर्षांनी इनाम गांव करून दिले. रामदासांचा निकटवास घडण्याकरितां त्यांना नुकत्याच घेतलेल्या परळी किल्ल्यावर रहावयास बोलाविलें. {{gap}}अशा प्रकारें रामदासांचा व शिवाजीचा निकट संबंध सन १६७२ रात सुरू झाला. अर्थात् शिवाजीनें आपल्या राज्यारोहणाच्या बाबतीत बखरींत लिहिल्याप्रमाणें रामदासांची सल्ला मसलत व अनुमति घेतली असलीच पाहिजे. पुढे निरनिराळ्या वेळी चाफळ व सज्जनगड येथील मठांस गांव इनाम करून दिले आहेत. शिवाजी महाराज आपल्या अष्टप्रधानांसकट परळीच्या रामोत्सवांत भाग घेत असत अशाबद्दल सातारच्या राजाच्या दफ्तरांतील सन १६८० मधील एक यादी इतिहाससंग्रहांत रा. ब.पारसनीस यानी प्रसिद्ध केली आहे. तिचा या हकीगतीशी मेळ बसतो. शिवाजीच्या मरणानंतर संभाजी महाराजांनीं चाफळच्या व परळीच्या मठाला पुन्हां इनामाच्या सनदा करून दिल्या आहेत. त्यांवरून रामदासांच्या मठाचा व शिवाजीच्या घराण्याचा गुरुशिष्यसंबंध चालू राहिला असे होतें. यावरून रामदासांनी संभाजीला उपदेशपर लिहिलेले पत्र खरें असावें असे दिसतें. त्या पत्रांत रामदासांच्या मनांत शिवाजीबद्दल किती आदरबुद्धि वसत होती हे व्यक्त झाले आहे. शिवाजीलाही रामदासांबद्दल किती आदर व पूज्यभाव वाटत होता हे त्याच्या सन १६७२ पासून १६८० पर्यंतच्या म्हणजे मरेपर्यंतच्या वर्तनावरून व त्यानें रामदासांच्या संस्थानांस केलेल्या कायमच्या मदतीवरून दिसून येतें.{{nop}}<noinclude></noinclude> si4fsl18kwpo31zmk8zvo9huholr2ug पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२२ 104 85886 231987 182080 2026-06-11T04:40:11Z JayashreeVI 4058 231987 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|११७}} {{rule}}</noinclude>{{gap}}शिवाजी व रामदास यांच्या पश्चात् दिवाकर गोसावी हा रामदासांच्या . दोन्ही मठांची व्यवस्था पहात होता. त्याच्या वृद्धापकाळानंतर त्यांचा मुलगा बाहिरंभट हा कारभार पाहूं लागला. त्या वृद्धापकाळी लिहिलेली दोन पत्रे परिशिष्टांत छापलीं आहेत. त्या दोन्ही पत्रांत शिवाजीच्या प्रथम भेटीच्या सालाचा उल्लेख आहे. परिधावीनाम संवत्सरी शिवाजी महाराजांस रामदासांनीं परमार्थ सांगून अनुग्रह केला; तेव्हांपासून आपल्याकडे संस्थानचा कारभार रामदासस्वामींनी दिला आहे, याची आठवण सर्वास देण्यास पहिल्या पत्रांत आपल्या मुलाला लिहिले आहे व दुसऱ्या पत्रांत तीच आठवण देऊन आपल्या पश्चात् हा कारभार आपल्या मुलाकडे ठेवावा अशाबद्दल शिष्यवृंदाला दिवाकर गोसाव्यांनीं विनंति केली आहे. हीं दोन्हीं पत्र केशव गोसाव्याच्या पत्रांतील भेटीच्या कालाचा प्रत्यंतर पुरावा होत यांत शंका नाहीं. <br>{{gap}}वरील विवेचनावरून असे दिसून येईल की, रा. चांदोरकर यांना अचानकपणे सांपडलेल्या कागदपत्रांनी रामदास व शिवाजी यांच्या भेटीच्या वादग्रस्त प्रश्नाचा कायमचा व समाधानकारक रीतीनें निकाल लागतो. या पत्रव्यवहारानें रामदासांच्या अंधुक चरित्रावर इतका उत्तम प्रकाश पडतो कीं, तें चरित्र ढळढळीत डोळ्यापुढे दिसूं लागतें. मात्र अंधश्रद्धा किंवा पूर्वग्रह यांची डोळ्यांवर आलेली झापडें दूर सारून डोळे उघडून त्या प्रकाशाच्या साहाय्यानें रामदासचरित्राकडे पाहिले पाहिजे. पण झापडें न काढण्याचा हट्ट धरल्यास कितीही प्रकाश पडला तरी त्याचा काय उपयोग होणार! <br>{{gap}}आतां रामदास शिवाजीचे राजकारण गुरू होते किंवा मोक्षगुरु होते हा वादग्रस्त प्रश्न राहिला. व त्याचा निकालही सहज करतां येतो. शिवाजीच्या आयुष्यांतील राज्यस्थापनेचें जें मुख्य काम तें बहुतेक संपेपर्यंत जर शिवाजीची व रामदासांची भेटंच मुळी झाली नव्हती तर रामदासानें शिवाजीस राज्यस्थापनेला स्फूर्ति दिली व रामदास शिवाजीस राजकारणांत सल्लामसलत देत असे हे म्हणणें फोलच होतें. तेव्हां रामदास शिवाजीचे मोक्षगुरु किंवा धर्मगुरु होते असेच म्हणणे प्राप्त आहे. अर्थात्--<noinclude></noinclude> onbabudhuv3hqugv0nb74z1d5r9k0yt 231988 231987 2026-06-11T04:40:41Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 231988 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|११७}} {{rule}}</noinclude>{{gap}}शिवाजी व रामदास यांच्या पश्चात् दिवाकर गोसावी हा रामदासांच्या . दोन्ही मठांची व्यवस्था पहात होता. त्याच्या वृद्धापकाळानंतर त्यांचा मुलगा बाहिरंभट हा कारभार पाहूं लागला. त्या वृद्धापकाळी लिहिलेली दोन पत्रे परिशिष्टांत छापलीं आहेत. त्या दोन्ही पत्रांत शिवाजीच्या प्रथम भेटीच्या सालाचा उल्लेख आहे. परिधावीनाम संवत्सरी शिवाजी महाराजांस रामदासांनीं परमार्थ सांगून अनुग्रह केला; तेव्हांपासून आपल्याकडे संस्थानचा कारभार रामदासस्वामींनी दिला आहे, याची आठवण सर्वास देण्यास पहिल्या पत्रांत आपल्या मुलाला लिहिले आहे व दुसऱ्या पत्रांत तीच आठवण देऊन आपल्या पश्चात् हा कारभार आपल्या मुलाकडे ठेवावा अशाबद्दल शिष्यवृंदाला दिवाकर गोसाव्यांनीं विनंति केली आहे. हीं दोन्हीं पत्र केशव गोसाव्याच्या पत्रांतील भेटीच्या कालाचा प्रत्यंतर पुरावा होत यांत शंका नाहीं. <br>{{gap}}वरील विवेचनावरून असे दिसून येईल की, रा. चांदोरकर यांना अचानकपणे सांपडलेल्या कागदपत्रांनी रामदास व शिवाजी यांच्या भेटीच्या वादग्रस्त प्रश्नाचा कायमचा व समाधानकारक रीतीनें निकाल लागतो. या पत्रव्यवहारानें रामदासांच्या अंधुक चरित्रावर इतका उत्तम प्रकाश पडतो कीं, तें चरित्र ढळढळीत डोळ्यापुढे दिसूं लागतें. मात्र अंधश्रद्धा किंवा पूर्वग्रह यांची डोळ्यांवर आलेली झापडें दूर सारून डोळे उघडून त्या प्रकाशाच्या साहाय्यानें रामदासचरित्राकडे पाहिले पाहिजे. पण झापडें न काढण्याचा हट्ट धरल्यास कितीही प्रकाश पडला तरी त्याचा काय उपयोग होणार! <br>{{gap}}आतां रामदास शिवाजीचे राजकारण गुरू होते किंवा मोक्षगुरु होते हा वादग्रस्त प्रश्न राहिला. व त्याचा निकालही सहज करतां येतो. शिवाजीच्या आयुष्यांतील राज्यस्थापनेचें जें मुख्य काम तें बहुतेक संपेपर्यंत जर शिवाजीची व रामदासांची भेटंच मुळी झाली नव्हती तर रामदासानें शिवाजीस राज्यस्थापनेला स्फूर्ति दिली व रामदास शिवाजीस राजकारणांत सल्लामसलत देत असे हे म्हणणें फोलच होतें. तेव्हां रामदास शिवाजीचे मोक्षगुरु किंवा धर्मगुरु होते असेच म्हणणे प्राप्त आहे. अर्थात्--<noinclude></noinclude> 8eqpitdd6asb8y4jpv0mf2g86v6d65v पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९०५ 104 105155 231895 213182 2026-06-10T16:22:35Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/९०५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९०५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213182 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९०४ 104 105156 231894 213183 2026-06-10T16:22:34Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/९०४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९०४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213183 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९०३ 104 105157 231893 213185 2026-06-10T16:22:32Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/९०३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९०३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213185 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} {{left|८६२}} हनीबाल -- २९९.<br> हरिविजय--२७१, ३१४. <br> हातिमताई----७०.<br> हिरण्यकश्यपु -- १५५-१५६.<br> हिरण्याक्ष -- १५४-१५५.<br> हिरवे विठ्ठल तुळशीराम - २१७, २२०, २२८.०<br> हिस्टरी ऑफ पेरु अँड ब्राझील, खंड १ व खंड ३--२९६.<br> होमर - १२७.<br> ज्ञानगिरी बुवा -- ६७१. ज्ञानचक्षु-- ३५९, ३६१.<br> ज्ञानप्रकाश-- २१, २३७, २५९.<br> ज्ञानेश्वर-- १७५, २७६, ४९४, ४९७-५००, ५११.<br> ज्ञानेश्वरी - २७६, ४९५, ४९७-४९९, ५००.<br> ज्ञानोदय-- ३२, २३३, ३५५, ५६४, ६५७, ६५८, ७३०.<br> {{center|-समाप्त-}}<noinclude></noinclude> horsqvale6ptz5yfypmsl1mdy6jnjyj पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९०२ 104 105158 231892 213186 2026-06-10T16:22:30Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/९०२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९०२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213186 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|परिशिष्ट- ९ : निवडक संदर्भसूची}} सत्यदीपिका--३७, ९३, २१०, २२२.<br> सत्यनारायण -- ३११-३१२, ३१४, ५१२.<br> सय्यदबंधू--५६.<br> सरस्वती - - १५१.<br> ससाणे ग्यानोबा कृष्णाजी -- २०७, २१२, ५३० -५३१.<br> सह्याद्रिखंड--५९५.<br> सॉक्रेटिस-- ५५१, ५८२.<br> साकवळकर बळवंत हरी - ४५९, ४६१-४६२, ४६५, ४७२, ४८०.<br> सांख्यमुनी--१७५.<br> सालारजंग -- ३२०.<br> सावंत (वाडीकर)--६१.<br> सावित्री - - १५१.<br> साहाणे हणमंत बापूजी -- २१७.<br> सिद्दी जोहार -- ५८.<br> सिपियो -- २९९.<br> सीझर ज्युलियस--२९९-३००.<br> सीता (जानकी) -- १७०, ४८९.<br> सुदामन -- १७४.<br> सुबोधपत्रिका -- २१०, २२२.<br> सुलोचना--४९०.<br> सूरदास -- ४५८.<br> सूर्याजी (मालुसरे) -- ७२.<br> सेमीरेमी--३९३.<br> सोनार द्वारकानाथ त्रिंबक -- २२१.<br> सोमनाथ सोरटी--४९४.<br> स्त्रीपुरुष तुलना -- ३८७.<br> हंटर सर विल्यम विल्सन - २४१, २४३, २८८, ५२२, ५२३. ८६१<noinclude></noinclude> 4iwcep90qko4i3442e3dstoy9ydxckn पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९०१ 104 105159 231891 213187 2026-06-10T16:22:28Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/९०१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९०१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213187 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|८६०}}{{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} वैद्य लक्ष्मण जगन्नाथ-- ६११.<br> वेद--१७२-१७३, २९१, २९३, ४९३-४९५, ५०७-५१७, ५२४, ६०६, ६१४,<br> '''व्यंकटेशस्तोत्र''' -- ३२४.<br> व्यंकोजी-- ६१.<br> व्यास-- ३६७, ५५५.<br> '''व्हॉयेजिस राऊंड द वर्ल्ड''' (कॅप्टन जेम्स कुक ) -- २८९-२९०.<br> व्हिक्टोरिया (महाराणी राणीबाई) - - ८१, ८८, ११२, ११६, १८६, २३३, ५२३,५४३, ६१८.<br> शंकराचार्य -- १७४-१७५, १७८, २७५, ३६८, ३७४, ४०१.<br> शंखासुर--१५३.<br> शंबर--४९८.<br> शहाजी ४५, ५४, ६१, ६४.<br> शाइस्तेखान -- ६०.<br> शाळीग्राम शंकर तुकाराम -- ४२३-४२४.<br> शाहदावल (शादावल)-- १७८, ३१०. <br> शिंदे ताराबाई- - ३७९, ३८५, ३८७, ३८८.<br> शिंदे महादजी (ग्वाल्हेरकर पाटीलबुवा) -- २९९.<br> शिंदे रामचंद्र हरी -- २१९, २२७. शिंदे लक्ष्मण हरी -- २०५, २२३.<br> शिंपी दामोदर पापूजी -- २२१. <br> '''शिवलीलामृत'''--२७३.<br> शिवाजी ----३७-३८, ४३, ४५, ७५, ७७, १६८, २७१, २७६, ४२४, ४५२,४५८, ४९५, ५८९.<br> '''शिवाजीचा पवाडा'''--३७-३८, ४३, ४५, ७५, १७०. शिशुपाल--४९७.<br> शुभवर्तमानदर्शक व चर्चसंबंधी नानाविध संग्रह-- १९८.<br> शूर्पणखा --४८९.<br> शेषशायी - - १५१, १५३, ४७१, ४८४, ५९८.<br> शेषाद्री रे. नारायणराव --५१०.<br> सईबाई -- ३७, ५४.<br> सतीर ऋषी -- ५५५.<br><noinclude></noinclude> kmd1gmw07bi1yx8l2wotvqso3x4k6ef पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९०० 104 105160 231890 213189 2026-06-10T16:22:26Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/९००]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९००]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213189 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|परिशिष्ट-९ : निवडक संदर्भसूची}} रामायण-२७२, ४८८, ४९२, ५०६-५१२. <br> राम्युलस आणि रीमस-- २८९.<br> रावण--१६८, १७३, ४८८-४९०, ६००.<br> रिपन ( गव्हर्नर जनरल) --५२२-५२३, ४४७.<br> रीव्हज् ----१९२.<br> रुस्तुम जमाना ५७.<br> रेणुका - - १६८, ६१४.<br> लफेटे (लफायेत ) -- १८७.<br> • लिंगू जाया काराडी -- २२२-२२३.<br> लिंग जाया यल्लाप्पा -- २०९, २२३, २३४.<br> लिंगू पोलास राजन्ना-- २०७, २११, २१७, २२३. <br> ली वॉर्नर - ६१४. <br> लुम्सडेन-- २४३, ७६२. <br> लोककल्याणेच्छु--१९८.<br> • लोखंडे नारायण मेघाजी--२५७-२५८, ३७९, ४३१.<br> वडनाला नरसिंग सायबू-- २०६, २०९, २२८.<br> वंजारी राजू बाबाजी -- २२८.<br> वसिष्ट - - १७४, ३६७.<br> वामन - १६०-१६५, २९५, ४९१, ६०७-६०८.<br> वामन पंडित - ५११.<br> वाल्मिकी--५५५.<br> वॉशिंग्टन जॉर्ज - १८७, २८८.<br> वाळवेकर मोरो विठ्ठल--५६०, ५८३, ६५८-६५९, ६८० ७०९.<br> विठ्ठल--५९५.<br> विरोचन - - १५८.<br> विल्सन जॉन -- २९०, २९३ - २९५.<br> विल्सन होरेस हेमन --२९१, ५१२-५१३. <br> विविधज्ञानविस्तार (विविधज्ञानी) --१७१.<br> विवेकसिंधु -- २७६, ४९५.<br> विश्वनाथ दाजी -- ३०२.<br> वेडरबर्न सर विल्यम -- ३०४.<br> ८५९<noinclude></noinclude> 7uxg3f9epdk2w5rqnxuk4povysinfr3 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९९ 104 105161 231889 213191 2026-06-10T16:22:25Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८९९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213191 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|८५८}} {{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} '''महाभारत''' ( भारथ) -- ४८, ३२९, ४७१, ४९७.<br> महासुभा (म्हसोबा)----४४, ९९, १५९.<br> मॅक्समुल्लर फ्रेडरिक--३७९.<br> मॅकिआव्हेली निकोलो--१२९.<br> मारुती - २२, २३, १७६, ४८९.<br> मालशे स. गं.--२५७, ४२९, ५६३-५६४, ६५३.<br> मिचेल जेम्स-- ७३३.<br> '''मिस्तरीज ऑफ द कोर्ट ऑफ लंडन'''--२८७.<br> मीड हेन्री -- २८६, २९६, ३०६, ३१४, ३१७-३१८, ३१९, ३२१-३२२.<br> मुकुंदराज - १७५, २७६, ३२९, ४९४-४९५, ५११.<br> मुलाना अहमद (मुल्यान्या सुभेदार) --५३.<br> मेरियन - २८९.<br> मोरे चंद्रराव-- ५४.<br> मोरोपंत -- ५११.<br> मोरोबा (मोरोपंत पिंगळे) -- ७३.<br> मोहबतखान--७२-७४.<br> मोहिते हंबीरराव--७५, ७७-७८.<br> म्यूर डॉ. जॉन -- २९५.<br> म्हस्के गंगारामभाऊ --२०७, २२२, २२९, ६१२-६१३.<br> म्हाळसाई -- २६३.<br> येशवंतसिंग -- ६३.<br> रमाबाई (पंडिता) -- ३४१, ३५९, ३६१, ३६५, ३६८, ३७०, ३७९, ३८५-३८८.<br> राघवेंद्रराव रामचंद्रराव-- २१९.<br> राजन्नाबाळू (काँट्रॅक्टर) -- ३८२, ३८४.<br> राधा--२७४.<br> रानडे म. गो. (न्यायमूर्ती माधवराव रानडे) -- ३५५, ३८८,<br> ३९९. रानडे रमाबाई -- ३८८.<br> राम (रामचंद्र) --१७०, १७३, २७४, ४८८-४९०, ५८९, ६००.<br> रामदास - १७५, २७६, ३४१, ४५७-४५८, ४७६, ५००, ५०६-५०७, ५११, ५८९.<br> रामशिंग पुरणसिंग -- २१७.<br><noinclude></noinclude> qjl1iozdwa5gboy4cgk5xwpn20euc30 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९८ 104 105162 231888 213193 2026-06-10T16:22:23Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८९८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213193 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|परिशिष्ट - ९ : निवडक संदर्भसूची}} {{right|८५७}} ब्रह्मदेव (ब्रह्मा)--४३-४४, ४९-५०, १०८, १२९, १४९-१५१, १५५, १६५ - १६६, १६८, १८७, २८९, ४६१, ४७१, ५०५-५०६.<br> ब्रॅडलॉ (ब्रॉडला)--५९४.<br> ब्रूटस--३००, ५४९.<br> भंडारकर (भांडारकर) विनायक बापूजी -- १४६, २१०, ६४८, ७०४.<br> भागवत - - १५२ - १५३, १६५, १७४- १७५, २७६, ४८८, ४९०-४९१, ४९५, ५०६, ५१२.<br> भागवतमास्तर-- ४२४.<br> भालेकर कृष्णराव पांडुरंग -२०५, २१०, २१३, २१९-२२०, २५७, ३७९, ३९५. <br> भावे (शाळाचालक) -- २५२, ७७२.<br> भृगुऋषी - - १०८, १७२.<br> भोंगळे सखाराम सटवाजी -- २२३.<br> भोसले आप्पासाहेब - - ३२५.<br> भोसले चतुरसिंग--३१६.<br> भोसले दीपाबाई- -४७.<br> भोसले बाबाजी -- ४६.<br> भोसले मालोजी--४७.<br> भोसले विठोजी--४७.<br> भोसले संताजी--७७.<br> भोसले संभाजी- - ४८.<br> मचाले सखाराम -- २२३.<br> मनु-- २९, १४९, १५१, १५५, २९६, ३१८, ३६५-३६६, ५९८, ६०३, ६०८.<br> '''मनुस्मृति, मनुसंहिता''' -- २९, १४९, १६७, १७३ - १७४, १७९, २७५, २८९,<br> २९७, ४०३, ४७१, ५२४, ५५५, ५८४, ६०८.<br> मरी (इतिहासकार) --४३.<br> मरे मिचेल (मिसेस) -- २४३, ७३३, ७६२.<br> मलबारी बैरामजी मेरवानजी -- ३४७-३४८, ३५०.<br> मल्हारी - - १५९-१६०.<br> मस्तानी--४७२.<br> महंमद (पैगंबर)--२७६, ३००, ३२९, ५३०, ५५०, ५९६, ६०७-६०८.<br> महादेव श्रीधर (न्यायाधीश ) -- ४१९.<noinclude></noinclude> p5iq8cbs8v0ykgtjsk2g95tccmny6d3 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९७ 104 105163 231887 213195 2026-06-10T16:22:21Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८९७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213195 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|८५६}}{{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} बालहत्या प्रतिबंधक गृह--१९३.<br> ब्राह्मण सहकाऱ्यांशी मतभेद-- १९२-१९३.<br> '''ब्राह्मणांचे कसब''' --१९२, २१९.<br> मद्यपान निषेध--५८३, ५८५, ६२९.<br> मुलींसाठी शाळा-- ३३, १९२, २४३, ६५३, ६५५-६५६, ६६३-६७८,७२९-७३०.<br> युद्ध निषेध -- ३९२-३९३, ५९२.<br> युरोपियन हितचिंतकांची इतराजी -- १९३.<br> शिवाजीचा पवाडा--३७-३८, १७०, ४२४.<br> शेतकऱ्याचा असूड -- ४२४-४२५.<br> शैक्षणिक कार्याविषयी माहिती - - १९२-१९३, २४३-२४४, ७६२.<br> सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक--५६०.<br> साध्यसाधनविवेक--१९२.<br> फुले बाबाजी राणोजी--६४६.<br> फुले यशवंत जोतीराव - ३७१, ४४५, ४४७, ४४९, ४५७, ४६०, ४६३, ४७३, ४८१, ४८७, ५३८, ५४८, ६३५, ६४५, ६४६.<br> फुले राजाराम गोविंदराव--६४५-६४६.<br> फुले सावित्रीबाई जोतीराव - २०६, २११, २२९, ६३५, ६४८.<br> फ्रँकलिन बेंजामिन -- ३२७.<br> '''बडोदावत्सल''' - - ७२७.<br> बळी - - १२८-१२९, १५८-१६२, १६३-१६४, २७२, २९५, ४४६, ६०६, ६०७.<br> बाजीप्रभु देशपांडे--५८.<br> बाजी शामराज-५४.<br> बाणासुर -- १६१-१६२, १६६, १६९-१७०.<br> बानाबाई -- २६३.<br> बायबल -- २८९-२९०, ३२३, ५०७, ५३३.<br> बुवा नागेश्वरगीर कल्याणगीर--५६०.<br> बृहस्पती - ४७५, ४७९, ५५६-५५७. <br> बोकील पंताजी गोपीनाथ--५५-५६.<br> बोस प्रमथनाथ - - ५९८.<br><noinclude></noinclude> g2ei60he7o0lcx8uj1tv60pbvasgb84 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९६ 104 105164 231886 213198 2026-06-10T16:22:20Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८९६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213198 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude> {{left|परिशिष्ट- ९ : निवडक संदर्भसूची}} '''पांडवप्रताप'''-- २७३. <br> पारकर थिओडोर --२८९.<br> पालकर नेताजी -- ६०, ६३.<br> पासलकर बाजी -- ५१, ५८.<br> पिंजन तुकाराम हनमंत --२२८, ७१५, ७१७.<br> पेन थॉमस (टॉम पेन)--१७४, १८७, २८८, ३२७.<br> पेरी सर अस्किन - २४३.<br> ८५५ पेशवे नानासाहेब (बंडवाले) -- १७७, १८०, २९६, ३६८, ३९४, ४८१-४८२, ५०४, ५५०, ५६८, ५७३, ५९२, ५९४, ५९८, ६१३. पेशवे राघोबादादा (राघु भरारी) -- ३१२. पेशवे रावबाजी (दुसरा बाजीराव ) -- १७५, १७९, २७६, १०४, ५१२, ५६८.<br> पेशवे सवाई माधवराव --६.<br> प्रमोद सिंधु-- २१०.<br> प्रिचार्ड डॉ. (मानवशास्त्रज्ञ ) -- १२७.<br> प्रिन्स ऑफ वेल्स--२१९.<br> पुणे वैभव -- ३५९, ३६१, ३७९, ३८५.<br> फडके गंगाधरशास्त्री -- ४४.<br> फडके वासुदेव बळवंत -- २८६, ३०३, ३१६, ४८१-४८२, ५१२, ५४३.<br> फॉसेट हेन्री विल्यम -- ३२२.<br> फिरंगोजी नरसाळा--५२.<br> फुले गणपत राजाराम -- २०८, ६४७.<br> फुले गोविंदराव शेटीबा - - ६४७.<br> फुले जोतीराव गोविंदराव--अतिशुद्रांसाठी शाळा (महार, मांग इत्यादींसाठी शाळा )<br> १९२, २४३, २४७, ६५३-६५४, ६५७-६५९, ६७९, ७१०, ७१७, ७१९, ७२७, ७२९.<br> क्रांतिप्रवण विचारांत परिवर्तन--१८६-१८७.<br> गुलामगिरी -- २१९, ४४६, ७१५-७१६.<br> तृतीय रत्न - - १९१.<br> देवाविषयीचे मत -- ५००-५०२.<br> धर्मग्रंथांविषयीचे मत -- ४५९, ५३०-५३२.<br> परमेश्वराविषयीचे मत -- ४८४-४८७.<br><noinclude></noinclude> fu85by1lqmhi9tqdh4ubimu1grkbl5f पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९५ 104 105165 231885 213201 2026-06-10T16:22:18Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८९५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213201 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|८५४}}{{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} दातार सीताराम सखाराम -२१०, २२९.<br> दादोजी कोंडदेव -- ५२.<br> दासबोध -- ४९५.<br> दिलेरखान -- ६८.<br> दीनबंधु -- २५७-२५८, ४२९, ४३१-४३२.<br> दीनानाथ नारायणरांव - - २१७.<br> दुंदुभी (राक्षस)--४९१.<br> देव (महालकरी) ---२७४.<br> देशमुख गोपाळ हरी (लोकहितवादी) -- ३५५, ३७९, ६१४. धामणसकर रामचंद्र विठोबा- २२७, ७१५, ७१९, ७२२, ७२३.<br> धायरकर धर्माजी बाबूराव -- ३८२-३८४.<br> नगरकर नारायण तुकाराम - २०८, २१३, २१७.<br> नरकासुर - ४९८.<br> नवरंगे वासुदेव बाबाजी -- ३९.<br> नाईक शेषाप्पा - ४७.<br> नारद--१५१, १७४, १८२, ३९१, ५२२, ६०९.<br> नारसिंह - - १५६ - १५८.<br> निजाम--७४, ४०९.<br> नीरो -- १२९.<br> पटवर्धन हरी गणेश (आप्पासाहेब सांगलीकर) --२२२, २२९.<br> पडवळ तुकाराम तात्या--२१२, २२३, २२९.<br> पदमनजी रे. बाबा--४४, ९३, ९७, ७२७, ७३२.<br> परमानंद नारायण महादेव (मामा) -- ४२३, ४२४, ७१५, ७१९, ७२१-७२३.<br> परशुराम-- ४२-४३, १२९, १६८-१७१, २९५-२९६, ३९३, ४८९, ५५०, ५६८,<br> *५९८, ६०८, ६१४.<br> पराशर--५५५.<br> परांजपे सखाराम यशवंत-- ६५३, ६५८, ६८०.<br> पाटील कोंडाजी रावजी ( माळ्याचे कुरुळ) -- ३६९, ३७५.<br> पाटील रामप्पा ( पांचगणीचे) -- ४२५.<br> पाटील (मगर) मनाजी बोलूजी -- ४६४, ४६९.<br> पाटील (मगर) लक्ष्मण मनाजी- ५३७, ५४१.<br><noinclude></noinclude> smubxogs4rl9viihbx58bd6dpr70h0o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९४ 104 105166 231884 213205 2026-06-10T16:22:16Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८९४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213205 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|परिशिष्ट- ९ : निवडक संदर्भसूची}}{{right|८५३}} चिपळूणकर विष्णुशास्त्री - - १२२, २५२.<br> चिपळूणकर हरी-रावजी -- २११, २२२, २२९. <br> चोखामेळा -- ३१२.<br> जनक राजा -- १७०, ४८९.<br> जयकर (राणे) राम बाळकृष्ण -४०, ४१.<br> जयसिंग मिर्झा राजे -- ३८, ६७.<br> जर्व्हिस जॉर्ज - - १८१.<br> जिजाबाई - - ३८, ४५-४६, ४८, ६५.<br> जेकब कर्नल लिग्रँड--५१२, ५१३, ५१८. <br> जोतीबा (दैवत) - - १५८, १६०, ६०७.<br> जोन्स सर विल्यम -- २९६-२९७, ५१९.<br> जोशी ( भवाळकर) केशव शिवराम - ६५६, ६७३. <br> जोशी गणेश वासुदेव (सार्वजनिक काका)-- २७७. <br> ज्युलियस सीझर - २९९, ३००, ५४९.<br> झरक्सीस--२९९.<br> झाशीची राणी (लक्ष्मीबाई) - - ३९३. <br> टक्कर (साल्वेशन आर्मीचे ) -- २८८. <br> टरक्वांडसाहेब - - १७९.<br> टेंपल रिचर्ड -- ३२२.<br> टोपे तात्या -- १७७, ३०३.<br> डफरीन -- २६०.<br> डार्विन चार्लस -- २८९.<br> डेंगळे त्रिंबकजी -- ३२८.<br> ढमढेरे सरदार-- १७९.<br> ढवारे नाईक रामचंद्र मनसाराम - २२२, २७७.<br> ढेंगळे विनायक बाबाजी -- २१०, २१३, २२०, २२९.<br> तानसेन - ५९, १५९, ३००.<br> तानाजी (मालुसरे) -- ५१, ५६, ७१.<br> तुकाराम -- २७६.<br> थोरात गणपतराव दर्याजी- ५००, ५२६, ५३९.<br> दयानंद (स्वामी) सरस्वती--३१७.<br><noinclude></noinclude> 94uvxuqgiz3liydgd2n6kp80jwac2ly पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९३ 104 105167 231883 213207 2026-06-10T16:22:14Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८९३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213207 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|८५२}}{{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} कुराण - २७६, ४९३, ५०७, ६००, ६०७.<br> कुऱ्हाडे गणपत तुकाराम--२२१.<br> कृष्ण-- १७३, ४७९, ४९१-४९२, ४९८-५००, ५७२-५७३, ६००.<br> कोटकर गणपत भास्कर -२२०, २२७.<br> कोतवाल घाशीराम-- २८५.<br> कंक येसाजी--५२.<br> कँडी टॉमस (मेजर) -- २६, ६६३, ६७३, ६८१.<br> कँपबेल जॉर्ज -- १२७, २४६.<br> खंडोबा (खंडेराव ) -- १५८, १६०, २६३, २९५, ६०७.<br> खानजहान-७४.<br> ख्रिस्त येशू (यशवंत महासत्पुरुष, बळीराजा ) -- २८, १७४, १७६, ४७८, ४८७,५३०, ५६९, ५७०, ६२२.<br> गरुडपुराण -- ११५, २७५. ५५६.<br> गागाभट -- ७६, २७१, २७६.<br> गायकवाड सयाजीराव - २५७, २६५, ४०१, ५६०, ७१५.<br> गीता (श्रीमद्भगवद्गीता ) -- ४७७, ४९२, ४९५, ४९७.<br> गुजर प्रतापराव --७३, ७५.<br> गुरूचरित्र - - ६०१.<br> ग्रँट डफ -- ३७, ३८, ४३.<br> ग्लॅडस्टन--३२२.<br> गोडबोले परशुराम तात्या-- १८६.<br> गोवंडे, सदाशिव बल्ला-- ३४७, ३५०, ६५८, ६८०, ७०४, ७०९, ७११.<br> घोरपडे बाजी -- ५३, ६१.<br> घोले गोपाळ विश्राम -- २२१.<br> घोले डॉ. विश्राम रामजी -२०९, २१०, २१७, २१९-२२१, २२६, ४४५-४४६,५६०, ६४८.<br> चटफील्ड -- २२१.<br> चव्हाण तुकाराम विठूजी -- २२२.<br> चिपळूणकर अण्णासाहेब -- ६६७.<br> चिपळूणकर कृष्णशास्त्री (बृहस्पतीतुल्य विद्वान) - १५७, १८९, ६६३, ६६८,<br> ६७३.<noinclude></noinclude> mx5xb070fjudx04x5edf30q2n5snkp3 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९२ 104 105168 231882 213209 2026-06-10T16:22:13Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८९२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213209 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|परिशिष्ट- ९ : निवडक संदर्भसूची}}{{right|८५१}} सुशिक्षित शूद्रांचे वर्तन -- ३१५-३१६.<br> सूर्यपूजा--५१४.<br> सोमरस--१३४, १७२, ६१०.<br> {{gap}}(या सूचीमध्ये दैवतांच्या, व्यक्तींच्या, वृत्तपत्रांच्या व ग्रंथांच्या नावांचा समावेश केलेला आहे. वृत्तपत्रांची व ग्रंथांची नावे अधोरेखित केली आहेत.)<br> {{center|(ब) नाम सूची}} अ सिपॉय रिवोल्ट--३०३, ३०६, ३१४, ३१७-३१८, ३२१-३२२, ३३५. <br> अंकल टॉम्स केबिन--३९३.<br> अफझलखान ३७, ३८, ५५.<br> अमरकोश--१७५.<br> अय्यावारू स्वामी रामय्या व्यंकय्या--१२१, १२२, २०६, २२४, २२६, ५६४, ६२२. अलारिक-- १२९.<br> आढाव बाळाजी खंडेराव - २१७, २२०, २२७.<br> इंडिया थी थाऊजंड इयर्स अॅगो - - २९३ २९५.<br> इलायजा शालेमेन -- २१७, २२७.<br> इसापनीती - - १७४, ३८७, ४९२.<br> उदेभान -- ७२.<br> उमाजी (नाईक) (रामोशी) --१७७.<br> उरवणे रामचंद्र बापूशेट -२२०, २२१, २२७, २३०.<br> औरंगजेब- - ६०, ६७, ७१.<br> कडलक नारायण गोविंद-- २१०, २१७.<br> कबीर--७१७.<br> कबीर (ऋषी)--५५५.<br> कराडे निकोबा रामजी--२२१.<br> कालेवार व्यंकू बाळोजी -- २०६, २०९, २२४-२२५, २२७.<br> काशीबाई -- ३३७, ३५१, ३५२.<br> काळे गोविंद गणपत-- ५०७, ५५५, ६३०, ६३१.<br> कीर धनंजय - - ५६३.<br> कुंभार धोंडिराम नामदेव -- २१९, २२८.<br><noinclude></noinclude> p3lfw6dhvplnl9s69u3euwz9na2zlpa पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९१ 104 105169 231881 213210 2026-06-10T16:22:11Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८९१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213210 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude>/<noinclude></noinclude> 6vh26otokyiuayjnt70gow3sue0861y पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६६२ 104 105280 231651 213322 2026-06-10T16:06:21Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६६२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६६२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213322 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६६३ 104 105281 231652 213323 2026-06-10T16:06:22Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६६३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६६३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213323 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६६४ 104 105282 231653 213324 2026-06-10T16:06:24Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६६४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६६४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213324 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६६५ 104 105283 231654 213325 2026-06-10T16:06:26Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६६५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६६५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213325 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६६६ 104 105284 231655 213326 2026-06-10T16:06:27Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६६६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६६६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213326 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६६७ 104 105285 231656 213327 2026-06-10T16:06:29Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६६७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६६७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213327 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६६८ 104 105286 231657 213328 2026-06-10T16:06:31Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६६८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६६८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213328 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६६९ 104 105287 231658 213329 2026-06-10T16:06:32Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६६९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६६९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213329 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७० 104 105288 231659 213330 2026-06-10T16:06:34Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६७०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213330 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७१ 104 105289 231660 213331 2026-06-10T16:06:35Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६७१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213331 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७२ 104 105290 231661 213332 2026-06-10T16:06:37Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६७२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213332 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७३ 104 105291 231662 213333 2026-06-10T16:06:39Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६७३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213333 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७४ 104 105292 231663 213334 2026-06-10T16:06:40Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६७४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213334 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७५ 104 105293 231664 213335 2026-06-10T16:06:42Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६७५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213335 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७६ 104 105294 231665 213336 2026-06-10T16:06:44Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६७६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213336 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७७ 104 105295 231666 213337 2026-06-10T16:06:45Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६७७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213337 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७८ 104 105296 231667 213338 2026-06-10T16:06:48Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६७८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213338 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७९ 104 105297 231668 213339 2026-06-10T16:06:49Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६७९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६७९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213339 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८० 104 105298 231669 213340 2026-06-10T16:06:51Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६८०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213340 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८१ 104 105299 231670 213341 2026-06-10T16:06:53Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६८१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213341 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८२ 104 105300 231671 213342 2026-06-10T16:06:54Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६८२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213342 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८३ 104 105301 231672 213343 2026-06-10T16:06:56Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६८३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213343 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८४ 104 105302 231673 213344 2026-06-10T16:06:58Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६८४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213344 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८५ 104 105303 231674 213345 2026-06-10T16:07:00Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६८५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213345 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८६ 104 105304 231675 213346 2026-06-10T16:07:07Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६८६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213346 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८७ 104 105305 231676 213347 2026-06-10T16:07:09Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६८७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213347 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८८ 104 105306 231677 213348 2026-06-10T16:07:11Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६८८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213348 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८९ 104 105307 231678 213349 2026-06-10T16:07:12Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६८९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६८९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213349 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९० 104 105308 231679 213358 2026-06-10T16:07:14Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६९०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213358 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude> {{center|परिशिष्टे}}<noinclude></noinclude> drs13z1ynynd1nurf8um8gqdkxkq3d3 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९१ 104 105309 231680 213352 2026-06-10T16:07:16Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६९१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213352 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९२ 104 105310 231681 213353 2026-06-10T16:07:18Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६९२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213353 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९३ 104 105311 231682 213354 2026-06-10T16:07:19Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६९३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213354 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९४ 104 105312 231683 213357 2026-06-10T16:07:21Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६९४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213357 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude> {{center|परिशिष्ट १}} {{center|महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या}} {{center|शाळांसंबंधीचे कागदपत्र}}<noinclude></noinclude> mtzudg4fhbusm19ec15q5hq8qr2is66 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९५ 104 105313 231684 213356 2026-06-10T16:07:22Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६९५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213356 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९६ 104 105314 231685 213359 2026-06-10T16:07:24Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६९६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213359 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९७ 104 105315 231686 213360 2026-06-10T16:07:26Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६९७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213360 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९८ 104 105316 231687 213361 2026-06-10T16:07:28Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६९८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213361 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९९ 104 105317 231688 213362 2026-06-10T16:07:29Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/६९९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/६९९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213362 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०० 104 105318 231689 213363 2026-06-10T16:07:31Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७००]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७००]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213363 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०१ 104 105319 231690 213364 2026-06-10T16:07:33Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७०१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213364 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०२ 104 105320 231691 213365 2026-06-10T16:07:35Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७०२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213365 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०३ 104 105321 231692 213366 2026-06-10T16:07:37Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७०३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213366 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०४ 104 105322 231693 213367 2026-06-10T16:07:38Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७०४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213367 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०५ 104 105323 231694 213369 2026-06-10T16:07:40Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७०५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213369 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|६६४}} {{right|महात्मा फुले ः समग्र वाङ्मय}} {{gap}}The following Report was read by Bapoo Raojee Manday, one of the most active young men in the cause of Female Education :-<br> {{gap}}"LADIES AND GENTLEMEN.-We now beg to lay before you the Second Annual Report on the State of Female Education in Poona. Before, however entering into details regarding the seminaries whose design is to emancipate the fair portion of the Natives of this Country from the bonds of ignorance and superstition, a rapid glance of their foundation and growth will not be out of place; especially as there are many here to whom it will be new and interesting and as it will afford us an opportunity of publicly acknowledging the kind and liberal support which the Girls' Schools have received from our paternal and benevolent Government, and from private ladies and gentlemen."<br> {{gap}}2. "Impressed with the necessity and importance of Female Education to the cause of the improvement, progress and enlightenment of their countrymen, and resolved to make a beginning, a few educated natives established, in July 1851, the first Girls' School in Poona. The timely liberality of the Honourable Sir Erskine Perry, that philanthropic and disinterested friend of the Hindoos, whose departure from India is universally regretted, enabled them not only to provide it with what was indispensably necessary to its success, but also to establish another School, immediately. The number of girls under tuition at the time of the last annual examination which took place on the 17th February 1852, amounted to upwards of 50. The progress then exhibited by the girls, who had attended the Schools since their foundation, was far greater than that made in any of our Boys' Schools during the same period, and called forth unqualified commendation of the exertions of the teachers. Suffice it to say, and we say it with pride and pleasure, that Government took notice of the disinterested and patriotic exertions thus made, and at a public meeting held in this Hall but a short time ago, presented a pair of Shawls to Jotee Govindrow, to whom, and his colleagues Keshowrow Juggunnathjee and Anna, the first Girls' School owes its foundation."<br> {{gap}}3. "Some opposition was at first apprehended from a few native gentlemen, who took a wrong view of the change sought to be effected by Female Education in the condition of the Females of this Country. But this was put down, in some measure, by the independent spirit<noinclude></noinclude> 88ts8u70pwlgchap8jy2ie850coqmki पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०६ 104 105324 231695 213639 2026-06-10T16:07:42Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७०६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213639 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र ६६५ of the founders and friends of the Schools, and much more by the lively interest taken in them by many gentlemen and ladies, whose liberal support, and frequent visits, made the enemies of these Schools afraid of injuriously interfering with them." 4. The prejudices against teaching girls to read and write, which is all the natives understand by education, began to give way to the general desire of mothers to get rid, during the time of work, of the annoyance of their little ones, which was very easily done by sending them to School. The good conduct and honesty of the peons attached to every School. In conveying the Girls, who are generally loaded with valuable oranments, to and from School, removed every obstacle in the way and the really parental treatment and indulgent attention of the teachers, made the girls love the Schools and literally run to them with alacrity and joy." 5. "The approaching departure of Sir Erskine Perry made the Committee fear that the funds at their disposal would fall off. The ready and liberal response from the Duxna Committee to an appeal on behalf of the Schools removed every apprehension, and enabled the School Committee to establish a third School in Peit Vital, the southern quarter of the city." 6. "The total number of girls whose names are now on the School catalogues is 237; and the average attendance in the three Schools is little less than 200." 7. "Each School has been periodically examined by such of the members of our Committee as have a portion of their time at their own command; and the reports of the last private examinations, which took place a few days ago, speak very highly of the exertions of three of the teachers-Narayan Shastree, Gunesh Ramchunder and Bal Shastree Thakar, who are actuated by more than common feelings of duty in the discharge of the trust committed to them." 8. "With regard to the progress made in the Schools during the twelve months under review, and which is highly satisfactory and creditable to all the teachers, one fact deserves serious notice. Few of the girls who were then at the head of their respective Classes do now attend the Schools, most of them have ceased to attend in<noinclude></noinclude> euucvivrcxtrfjeyf8veotrxzg1u4du पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०७ 104 105325 231696 213640 2026-06-10T16:07:43Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७०७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213640 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>६६६ महात्मा फुले : समग्र वाङ्मय consequence of their marriage, and the whims and caprices of their fathers and mothers-in-law, few of whom are intelligent enough to know the benefits that would accrue to the country in general, and their families in particular, by permitting their little daughters-in-law to receive a good education. 22 9. "It will thus be seen that the custom of early marriage offers the strongest opposition to Female Education in this country; and it is of the utmost importance to do something by which the evils arising from this custom may be lessened and removed. The Committee, therefore, propose introducing into the Schools under their management, the system of stipendiary scholarships, to induce the poorer parents, or fathers and mothers-in-law, to allow their little girls to attend the Schools. This is, however, a partial remedy." 10. "We now beg to bring to your notice the success with which the labours of educated natives are attended in the districts. A man, named Gunput Row Bhiday, was appointed by the late Superintendent of Vernacular Schools, School-master at Gurada, in the Poorunder Talooka of the Poona Collectorate, and about 15 miles distant from this city. He convinced the leading villagers of the advantages of Female Education. Though anxious to have their girls educated, they had not sufficient means to support a School. The educated young men of Poona, when informed of this, at once took upon themselves to supply a School-master, and thus a Girls' School was established last September in the village. The means at the disposal of the Poona School Committee did not permit them to give any support to this School, owing to there being barely sufficient to cover the expenses of the Poona Schools." 11. "The superior instruction afforded in the Girls' Schools created a desire in many a father for similar School for small boys, and this was immediately taken advantage of by our enthusiastic colleague Keshew Shewram, who opened, in September last, an Infant School in his own house, at his own expense. The principle on which our friend proposes to conduct this School is, that it should be self-supporting. A collection of articles of all kinds, picture and toys, etc. appears to be indispensible to such a School."<noinclude></noinclude> 0zy2b8s93hnil7p65jss5tmmexfbpsi पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०८ 104 105326 231697 213373 2026-06-10T16:07:45Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७०८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213373 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र}} {{right|६६७}} {{gap}}12. "Having thus described what appears particularly worthy of notice regarding Female Education, the results of attempts to promote it, and its reaction upon the community, we beg, in conclusion, to offer our heartfelt thanks to Mr. and Mrs. Jones, Major and Mrs. Candy, Captain Willoughby, and other ladies and gentlemen, and to our native friends, among whom Venaik Rao Wasoodewjee stands prominent, for the lively interest, and the liberal support, which alone could have brought these Schools into existence and secured their prosperity in the face of the many difficulties which have hitherto continued insurmounatable in Poona."<br> {{gap}}The following address, in Marathi, was then read by Anna Sahib Chiplunkar, one of the wealthiest Soukars of Poona :-<br> {{gap}}पुण्यांतील बहुतेक राहाणाऱ्या लोकांस माहीत झालेच आहे की हल्ली काही दिवसांमागें या पुणे शहरांत काहीएक मंडळी स्त्रियांकडून विद्याभ्यास करविण्याच्या कामांत फार मेहनत करीत आहे. त्यांनी मला सांगितलें कीं आपण स्त्रियांस विद्याभ्यास शिकविण्यापासून काय फायदे आहेत हें कृपाकरून कळविल्यास फार उत्तम होईल त्याजवरून माझ्या शक्तीनुरूप दोन ओळी लिहिल्या आहेत त्या सर्वांस प्रेमपुर : सर विनंतीने कळवितों.<br> {{gap}}स्त्रियांस विद्या शिकवून त्यांची सुधारणूक करणें, त्यांस त्यांच्या योग्यतेप्रमाणें मान देणें व त्यांच्या कल्याणाची काळजी बाळगणें, हें हिंदु लोकांच्या विचारास विरुद्ध वाटेल आणि केवळ इतकेंच नाही, तर असें केलें असतां त्यांत अधर्म घडतो आसी त्यांची समजुत पडून गेली आहे त्यांच्यामतें स्त्रियांनी निरंतर दास्यत्वांत वागावें, त्यानी विद्या शिकूं नये, सुशिक्षित होऊं नये, धर्म जाणूं नये, पुरुषाच्या मंडळींत जाऊं नये, पुरुषाच्या विचारांत आपलें मत देऊं नये, सारांश कोणत्याहि गोष्टींत त्यांनी पुरुषाची बरोबरी करूं नये आणि या मूर्ख समजुतीच्या पुष्टीकरणार्थ ते, स्त्रियांची ज्यांत निंदा केली आहे, असी आपल्या शास्त्रांतील वाक्यें काढून दाखवितात, व म्हणतात कीं पूर्वी मोठमोठे विद्वान व ज्ञानसंपन्न ऋषी होऊन गेले त्यांनी जें लिहिलें आहे तें खोटे कीं काय ? परंतु असा वृथा अभिमान बाळगल्यामुळे आपल्या देशाची अवस्था खराबीस कसी मिळाली आहे ती त्यांच्या लक्षांत येत नाहीं त्यांच्या स्त्रिया अशिक्षित असल्यामुळे त्या किती नीचावस्थेत आहेत व आपल्यास त्यांजपासून किती संकटें प्राप्त होतात हें ते पाहात नाहींत, त्यांस कोणते उपायाने सुख प्राप्त होईल व त्या सर्व सुधारलेल्या<noinclude></noinclude> e87i5wmac61xq8s2e310rsp67ix4cq3 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०९ 104 105327 231698 213375 2026-06-10T16:07:47Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७०९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७०९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213375 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|६६८}} {{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} लोकांत सन्मान्य व योग्य कशा होतील, या कल्पना त्यांच्या स्वप्नी देखील येत नाहींत जे परोपकारी लोक या देशाचे कल्याणाची व सुखाची काळजी बाळगितात, त्यांस मात्र येथील स्त्रियांची दशा पाहून फार कळवळा येतो त्यांस वाटतें कीं हा देश उत्तमावस्थेत यावा, असी जर आपण इच्छा धरिली, तर हिकडील बायकांच्या स्थितीकडे अवश्य लक्ष्य दिल्हें पाहिजे, व हरयेक प्रयत्न करून त्यांस विद्या शिकविली पाहिजे, तरच ईश्वरकृपेने त्यांचें अज्ञान दूर होऊन त्या आपल्या पतीच्या चांगल्या साह्यकरत्या व आवडत्या होतील, आपल्या मुलांस उत्तम बोध व शिक्षा करतील, व आपला संसार दक्षतेने चालवितील तर या प्रकारची काळजी पाहून प्रयत्न करण्यास प्रथमता या कृत्यास जगन्नाथ सदाशीवजी व केशव शिवराम भवाळकर व दामोदर शिवराम ऊर्फ अण्णा सहस्त्रबुध्दे व जोतीबा व कृष्णशास्त्री प्रोफेसर व केरोलक्ष्मण प्रोफेसर व माहदेव शास्त्री येकझर बीशनर व राघोबा पांडुरंगजी व विष्णु मोरेश्वर भिडे इत्यादी मंडळींनी या कृत्यास आरंभ केला, त्याकाळीं त्यांस बहुत संकटें प्राप्त झालीं तीं असीं कीं कितीएक मोठमोठाले आपलें स्वदेशीय लोकांनी त्यांस दुषणे लाविली व द्रव्याच्या कमताईमुळे तर फारच अडचण पडली परंतु ईश्वरकृपेने काहीं दिवसांनी पुढें मुंबईचे ज्यडज्य सर एरस्कीन पेरी साहेब हे या मंडळींचें स्तुत्य वृत्त कळतांच त्यांनी तेथून दरमाहा रुपये पन्नास चालू केले मशारनिल्हे साहेब यांनी काहीं दिवस गेल्यानंतर शाळा पाहण्याच्या उद्देशाने मुंबईहून पुण्यास आले त्यावेळीं लमसडन साहेब ज्युडिशल खात्याचे सेक्रटारीही त्यांचे बरोबर होते त्यांनी या मंडळींचे स्तुत्य उद्योग पाहून शंभर रुपये मुलींचे शाळेस बक्षीस द्यावयाकरितां दिल्हे त्याजवरून सालगुदस्त फडक्यांचे वाड्यांत मोठा समुदाय या मंडळीने जमवून मुलींची परीक्षा घेतली त्यांत मुख्य स्थानी मेहेरबान ब्रोन साहेब माजी ज्यडज होते त्यांनी मुलींची परीक्षा घेऊन बहुत संतोषाने परीक्षा आटपल्यानंतर काही वेळपावेतों या देशास उत्कर्ष कोणकोणत्या गोष्टींनी येईल याजविषयीं संभाषण करून सदरीं लिहिल्या मंडळीस असें कळविलें कीं आजच्या प्रसंगास हे तुमचे स्तुत्य उद्योग पाहून मला तर फारच संतोष झाला तर माझ्या शक्तीनुरूप मी तुम्हांस शंभर रुपये देण्याचें कबूल करितों. हे रुपये मुलींस बक्षीस द्यावे बहुतकरून येथील मंडळीस या कामास मदत साहेब लोकांकडून आजपावेतों बहुत होत आली हें लिहिणें मला मोठें लज्जास्पद आहे कारण आपले स्वदेशीय लोक हेही येथे मोठमोठ्या पदव्यावर असून त्यांच्याने याविषयीं विचार करवत नाहीं हें त्यांस ईश्वराघरी शासनास पात्र होण्याजोगी जागा आहे कारण आपले<noinclude></noinclude> s49qk14f66xo2mqu459hpteutg5u4di पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१० 104 105328 231699 213641 2026-06-10T16:07:48Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७१०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213641 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र ६६९ स्वदेशांविषयी विचार न करणे हें तर मोठे अज्ञानच आहे कारण फक्त आपणच सन्मानाकडे लक्ष देऊन बसणें यांत मोठासा लाभ आहे असे नाहीं तर आपण श्रेष्ठ हो आपले पुढील नातवंडे पंतवंडे यांचे विचारांकडे किंचित लक्ष द्याल तर फार बरें होईल आता माझी इतकीच आपणास विनंती आहे कीं जे आपणास लिहून कळविले आहे त्याविषयी वास्तविकपणें विचार करून पूर्वी कांहीं दिवसांमागें आपण कोणत्या स्थितींत आहों आणि उत्तरोत्तर आपले देशास असे चांगले चांगले विचार न केल्याने आपणास संकटें कसी येतील याविषयीं पुरते पणी लक्षांत आणा - सालगुदस्त एकदंर मुली सुमारें ९० पावेतों होत्या हल्ली सुमारे पावणे तीनशे मुली आहेत हे काम जसजसें जास्ती वाढत चाललें तो खर्चहीं बहुत होऊ लागला याकारणाने सांप्रत शाळेकडील मंडळी यानी सरकारास अर्ज केल्यावरून त्यानी दोनशे रुपये पावेतों दरमहा देण्याचे कबूल करून दक्षणा फंडातून देण्यास हुकूम पाठविला ह्याप्रमाणे हाली पाऊणशे रुपये सरकारांतून मिळत आहेत. आणि जसजसें काम वाढेल त्याप्रमाणे त्यास जास्ती ही मिळतील - थोडे दिवसापूर्वी या मंडळीस एक मोठा लाभ झाला तो असा कीं राजमान्य राजश्री विनायक राव वासुदेव डिपुटी कलेक्टर आणि माजीस्त्रेट हे या मंडळींस विशेषेकरून बहुत साह्य होतात व पुढेहीं याप्रमाणे जास्ती उमेद देण्यास इच्छित आहेत तर आतां इतकीच सर्वांस विनंतीने कळवितों कीं सांप्रत स्थितीस एकीकडे ठेवून आपले स्वदेशास चांगलेपणांचे रूप येईल असें करा. The preliminaries concluded, the examination commenced. The Native Infant School made its debut on this occasion-a School consisting of infant boys, two or three years of age. The little philosophers displayed no little lore, and after creditably sustaining an examination in the vernacular, they passed as good an examination in the English Alphabet as a Bacon or a Newton could have done. The second and first classes of the Female Schools were then successively introduced, and the following is the programme of the studies in which they were examined :- SCHOOL No. 1 CLass I.—Aesop's Fables of the new edition, 50 pages. Rinunishedhuk (Evils of debt) ditto. Catechism on the History of the Marathas, 60 pages.<noinclude></noinclude> 8xthy9j0n2su8xi9mqzhy7ejys2qm0r पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७११ 104 105329 231700 213642 2026-06-10T16:07:50Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७११]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७११]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213642 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>६७० महात्मा फुले : समग्र वाङ्मय Rudimentary Lessons in Grammer; Parsing; General acquaintance with the Maps of India and Asia; Dictation; Arithmetic as far as the Rule of Three; Mental Arithmetic. CLASS II. Nitteebodhkutha (Moral Stories) the whole; Elementary lessons in Grammer, as far as verbs; General acquaintance with the Map of Europe; Numeration, and some Tables of Multiplication. CLASS III. Lipidhara, five lessons; Elementary Grammer, as far as definition of words; some Tables of Multiplication. CLASS IV. Simple and compound letters. SCHOOL No. 2 CLASS I.-Aesop's Fables, 48 pages; Catechism on the History of the Marathas; Rudimentary Lessons in Grammer; General acquaintance with the Maps of Asia, Europe and India; Arithmetic as far as Multiplication. CLASS II-Division I.-Nitteebodhkutha (Moral Stories) 15 lessons; Elementary Grammer as far as definition of words; Numeration. CLASS II-Division II.-Lipidhara, seven lessons. CLASS III. Acquaitance with simple and compound letters. CLASS IV. Simple letters. SCHOOL No. 3 CLASS I.-Nitteebodhkutha, the whole; The Catechism on the History of the Marathas; Simple Lessons in Grammer; as far as verbs; Addition, and twenty Tables of Multiplication. CLASS II.-Lipidhara, the whole; Nitteebodhkutha three lessons; ten Tables of Multiplication. CLASS III.-Lipidhara, four lessons; Elementary Grammer as far as definition of nouns. CLASS IV-Alphabet.<noinclude></noinclude> schd87b4d2wg1km7pz8vhqykcdy5231 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१२ 104 105330 231701 213643 2026-06-10T16:07:52Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७१२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213643 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र ६७१ The reading of the girls was admirable, and they evinced a very intelligent, if not extensive, acquaitance with Grammer. Geography, Arithmetic and Maratha History. Their acquirements, moreover, are not confined to their mother tounge. To their native charms and their vernacular accomplishments, their benevolent and zealous educators are determined they shall add the new grace, and the deeper and richer intellectual life of breathing the pure and etherial air which may be imbibed from the haunts of English Literature. Some of the girls have made considerable proficiency in English and one of them performed to the admiration of the audience, an arithmetical operation wholly in English. A little infant, daughter of Mana Shastree Apteh, and only three years of age, can translate her "lessons on objects" into English. When the examination was over, prizes of Sarees and Books were presented to the girls by Mrs. E. C. Jones, the Patroness of the Schools. One little girl, when informed that she was to receive prizes, said :- Don't give us prizes; give us a School Library." This same little girl sits up every night till twelve o'clock to study her Mahrathi and English lessons !!! After the examinations and presentation of prizes were over, the Chairman, Major Candy, requested Professor Fraser to acknowledge on the part of the directors and conductors of the Female Schools, the honor which the ladies had done them by their attendance on the present occasion, and by their encouragement and support of the Schools. As it was very late in the afternoon, Professor Fraser spoke very briefly, to the following effect :- "Ladies, allow me, in the name of my native friends, to thank you for another of those angel visits to their daughters, which they all feel to be, indeed, too short and too far between. We all thank you for the lively interest you have manifested on this auspcious occasion. It is not to be wondered at, ladies, that you should be interested in such a scene as this. In the efforts now made by the Government, the Missionaries, and the Natives themselves, in the cause of Female Education, we see the day-spring of India's social elevation and permanent civilization. You are not insensible to the inestimable blessings, personal and social, which education has conferred on you; nor need you be ignorant of the grand fact that the progress of human<noinclude></noinclude> kri8yay830ieq1saf777yrb6mfmtqmi पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१३ 104 105331 231702 213644 2026-06-10T16:07:53Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७१३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213644 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>६७२ महात्मा फुले : समग्र वाङ्मय civilization has only kept pace with the progress of Female Education, that the elevation of your sex is intimately, and essentially, associated with the elevation of a race. The degeneration of woman among the ancients, accounts, in part at least, for the instability of early civilization. It is impossible for society to be permanently elevated where woman is debased and servile. "Much has been done in our own country, in modern times, to elevate the standard of Female Education, and you are aware that in proportion as this standard has been elevated, female character has risen higher and higher. Previous to your day, ladies, the end kept in view in the education of females was to make them admired; but in the more recent and goodlier times in which your lot was cast, the end kept in view was to make them useful. Previous to your day, ladies, Female Education was of such a kind, that a fashionably educated woman was a mere budget of sympathies. To feed her fancy from the delicious pages of the latest novel, to go into convulsions over the corpse of her favorite canary, while she was insensible or even cruel towards the real sufferings of her own species, and thus to make it the end and glory of her life to be, as well as seem to be, a mere aggregate of ungovernable sympathies, was the height of her ambition. But I appeal to the gentlemen present if the lines have not fallen to us in pleasanter times, when the mind of woman has been developed by education, when education has descended into this neglected mine, which wise men regarded as not worth the working, and has brought up priceless gems, flashing with the light of intelligence, and glowing with the lively hue of the lovely female graces,-when woman, educated to be useful, is ineffably more to be admired. "Now, what I wish to say, ladies and gentlemen, is this, that there are as precious gems in the mine as any that were ever brought out of it, and that you cannot be engaged in a more noble enterprise, in a work more profitable to the community, to the nation, than the one which you have met this afternoon to encourage and promote. Again, we thank you all for the honour of your presence on this occasion. We assure you it will give a new impulse to native Female Education, and animate its philanthropic promoters in their labour of love." The assembly broke up about 6 o'clock. DOD<noinclude></noinclude> 7eugayl9eqxkvax6fab8t6b27l3wve3 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१४ 104 105332 231703 213645 2026-06-10T16:07:55Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७१४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213645 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र APPENDIX I ANNUAL EXAMINATION OF THE FEMALE SCHOOLS IN POONA During the Month of February, 1853. ६७३ As the time devoted to the public-examination of our Schools is too short to admit of all the Classes in the different Schools being carefully tested as to their acquirements, the Managing Committee thought it proper to institute a private examination, in order to ascertain satisfactorily the progress made by each School during the Session. And as all the members of the Committee had their respective public duties to discharge, they could engage in this labour of love only two hours each day. The three Schools were thus examined in six days. We are happy to say that the results of the examination were highly satisfactory, and speak favourably of the skill and diligence of the teachers, as well as the industry and talents of the pupils. The members that were generally present at the private examinations are:--Professor Krishna Shastree, Keshaw Row Bawalker, Professor Keru Luximon, Anna Saheb Suhusrabudhe. The Committee is very glad to be able to state that Major Candy, Professor Fraser, Mrs. Fraser, Mrs. Laing, and others who take great interest in the cause of native improvement, and who visited the Schools during the examinations, were highly pleased and expressed their gratification at the progress made by the girls during the past Session. We here submit, for the information of the public, the detailed account of the examination of all the Classes in each of the Schools. FEMALE SCHOOL, No. 1--BUDHWAR PAITH. 1st Class. Teacher - Narayan Shastree Tokeker. :-- Number in the Class Present at the Examination Studies.-Aesop's Fables, New Edition; Rinunishedhuk (Evils of Debt) 50 pages; Catechism of the History of the Marathas. 60 pages; Rudimentary Lessons in Grammar; Parsing; General acquaintance Le Maps of India And Asia; Dictation; Arithmetic as far as Rule of Three; Mental Arithmetic. In addition to these to Pupils had occassional lessons in sewing from Mrs. Candy's Tailor. एच-२२ ४६<noinclude></noinclude> 9spr624sahh2kfl442rx4e4w2r3u94v पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१५ 104 105333 231704 213646 2026-06-10T16:07:57Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७१५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213646 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>६७४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय Remarks by the Examiners - Reading very good; Explanation very good; History good; Grammar fair; Parsing fair; Maps good; Dictation good; Arithmetic fair; the first three however passed very good examinations. One of these could work examples in English. The ease and readiness with which the questions were answered by the pupils exhibits an unusual degree of talent and patience on part of the young pupils; and the progress made reflects great credit on the teachers. 2nd Class. Teachers: Number in the Class Present at the Examination Studies.- Niteebodkutha, the whole; Elementary Lessons ir. Grammer as far as Verbs; General acquaintance with the Maps of Europe; Numeration and some tables of Multiplication. Remarks by the Examiners -- Reading of some very good, of the rest fair; Explanation fair; Grammar fair; Maps tolerably good; Numeration good. 3rd Class. Teacher -- Venayek Punt. Number in the Class Present at the Examination 19 12 Studies.- Lipidhara, five lessons; Elementary Grammer as far as definition of words; Some Tables of Multiplication. Remarks by the Examiners - Reading of some good, of others fair; Explanation fair; Grammar of some fair; Multiplication Table fair; Definition in Geography middling. 4th Class. Teacher - Venayek Punt. Number in the Class .......... 19 Present at the Examination ...........12 Studies.-Simple and compound letters of the Alphabet. Remarks by the Examiners -- Two or three distinguish the letters very readily, rest middling.<noinclude></noinclude> 9y95q9i6tekus3oubgpo0zt8ciyzrt2 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१६ 104 105334 231705 213647 2026-06-10T16:07:59Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७१६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213647 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र FEMALE SCHOOL, No. 2.- -PAITH. ६७५ 1st Class. Teacher: Number in the Class Present at the Examination.... .11 .10 Me Studies.-Aesop's Fables 30; Rudimentary Grammar; Arithmetic as far as Multiplication; History of India, Catechism; and the Maps of Asia, Europe and India. Remarks by the Examiners - Reading very good; Explanation good; Grammar good; History very accurate; Arithmetic fair; Maps very good. The progress made by the students, during this Session, is very satisfactory; and creditable to the pupils. The teachers deserve commendation form the Committee for their skill and diligence. Time of the School.-About a year 2nd Class. Teacher: Gunesh Shastrie Velunker. This class is divided into two divisions. 1st Division.-Present Number on the Roll ......6 Present at the Examination.....6 Studies of the 1st Division.- Lipidhara, whole; Niteebodkutha, 15 Lessons; Elementary Grammar, as far as definition of words, Numeration. Remarks by the Examiners - Reading good; Explanation fair, Grammar fair; Tables of Multiplication fair. 2nd Division.- Present Number on the Roll....11 Present at the Examination ....10 Studies.- Lipidhara, 7 Lessons: Numeration. Remarks by the Examiners --Reading very good; Explanation good; Tables of Multiplication fair. 3rd Class. Teacher -Chinto Punt Parkhee. Number in the Class Present at the Examination 22 .......... 18 Studies.- Simple and compound letters of the Alphabet.<noinclude></noinclude> 7pv1f78iw87s8rcl10mu3k3rotf24em पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१७ 104 105335 231706 213648 2026-06-10T16:08:00Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७१७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213648 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>६७६ महात्मा फुले : समग्र वाङ्मय Remarks by the Examiners :- All the students of this Class distinguished the letters very nicely, and the progress is very creditablell to the pupils. 4th Class. Teacher :- Chinto Punt Parkhee. Number in the Class .22 Present at the Examination ............22 Studies.- Alphabet. Remarks by the Examiners - Some in the Class distinguish the letters very readily; others only middling. FEMALE SCHOOL, No.-3. 1st Class. Teacher :- Bal Shastrie. Number in the Class .9 -PAITH. Present at the Examination ...........8 Studies.- Niteebodkutha, the whole; The Catechism on the History of the Marathas; Simple Lessons on Grammar, as far as verbs: Addition, and Twenty Tables of Multiplication. :- Remarks by the Examiners - Reading of the three at the top of the class very good, of the rest pretty good; Explanation good; General acquaintance with History good; Grammar fair; Numeration and Multiplication fair. Upon the whole, the progress during the Session is quite satisfactory and creditable, both to the pupils and the teacher. Time of the School.- About ........ months. 2nd Class. Teacher: Vithul Bhaskar. Number in the Class ..........12 Present at the Examination ...........9 Studies.- Lipidhara, the whole; Niteebodkutha, 3 Lessons; Ten Tables of Multiplication. Remarks by the Examiners - Reading of some good; of others, fair; Explanation fair; Grammar fair; Tables of Multiplication middling.<noinclude></noinclude> 6ei99nao2ug3pwln7xy1hsws578sfsi पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१८ 104 105336 231707 213649 2026-06-10T16:08:02Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७१८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213649 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र 3rd Class. Teacher - Khusba bin Jotiba Phudturey. Number in the Class .......14 ६७७ Present at the Examination ...........9 Studies.-Lipidhara, 4 Lessons; Elementary Grammer, as far as definition of Nouns. :- Remarks by the Examiners - Reading good for the most part; Explanation fair; Grammar fair. 4th Class. Teacher :- Kushba bin Jotiba Phudturey. Number in the Class .37 Present at the Examination..... ..20 Studies.- Alphabet. Remarks by the Examiners - Three distinguished the letters very readily, the rest passed fair, the class has been formed only about a month ago. ㅁㅁㅁ<noinclude></noinclude> 1c9e8cq7424yj0tjfauo3htsa5uak3f पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१९ 104 105337 231708 213650 2026-06-10T16:08:03Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७१९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७१९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213650 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>६७८ महात्मा फुले : समग्र वाङ्मय APPENDIX II POONA NATIVE FEMALE SCHOOL FUND Abstract Account of Receipts and Disbursements, from 1st March 1852 to 28th February 1853. RECEIPTS Rs. A. P. DISBURSEMENTS Rs. A. P Balance of the 2 8 last year's Account. 0 Salary of the Masters. 508 0 0 35 of the Clerk 32 0 0 Daxana Prize 900 0 0 35 of the Peons 218 8 0 Committee. Private Subscrip- 1072 tions. 0 0 House Rent 52 52 Books, Stationery, 177 00 0 12 0 & C. Chairs, Benches, 208 00 0 Stools, & c. Books, & c., 177 60 awarded as Prizes. Contingent Expen 33 00 8 0 ses. 1438 Balance 536 26 2 0 6 0 00 Total Rupees.. 1974 8 0 Total Rupees. 1974 со 0 Poona, 16th February, 1853. Audited and found correct. समाप्त KERU LAXUMAN, C. KRISHNA SHASTREE, C.<noinclude></noinclude> 23mn5h9zncmjiy1wmifup2lyh7yp9d7 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२० 104 105338 231709 213651 2026-06-10T16:08:05Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७२०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213651 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>General Department [ Vol. No. 38/1858 PUBLIC EXAMINATION OF THE POONAH MAHAR AND MANG SCHOOLS 2nd FEBRUARY 1858 *** BOMBAY PRINTED AT GUNPUT CRUSHNAJI'S PRESS 1858<noinclude></noinclude> 8uzw2q44paho45nfn2l86pkzy3snzcy पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२१ 104 105339 231710 213652 2026-06-10T16:08:07Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७२१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213652 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>६८० महात्मा फुले : समग्र वाङ्मय THE SOCIETY FOR PROMOTING THE EDUCATION OF MAHARS MANGS & CA. Mr. SUDASHEO BULLAL, President Mr. JOTEE GOVINDROW, Founder and Member Mr. MORO WITTUL, Member and Secretary Mr. SUKHARAM YESHWUNT, Member and Treasurer Mr. WAMUN PPUBHAKUR, Member and Joint Secretary Mr. DEOROW KRISHNAJEE Mr. BABAJEE MUNAJEE Mr. VENAYUK BAPOOJEE Mr. BALLAJEE MAHADEO Mr. WAMUN GOPALL Members ㅁㅁㅁ<noinclude></noinclude> 8dh0mxrph6giagbdqp9gv28hqv92285 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२२ 104 105340 231711 213653 2026-06-10T16:08:09Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७२२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213653 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र ६८१ PUBLIC EXAMINATION OF THE POONAH MAHAR AND MANG SCHOOLS The Public Examination of the Poonah Mahar and Mang Schools under the Superintendence of the Society for promoting the Education of Mahars, Mangs and ca, was held at Babajee Munajee's Coach Factory, opposite to the Queen's Hotel, near the Civil Hospital on Tuesday the 2nd February, 1858, in the evening at half past four o'clock. Among the individuals assembled to witness the examination, the following European Ladies and European and Native Gentlemen were present, Mrs. Arnold; Miss Griffith; Mrs. Dods; C. M. Harrison, Esquire, Judge of Poonah; Lieutenant C. J. Griffith, Inam Commissioner; E. Arnold, Esquire, Principal of the Poonah College; Lieutenant P. Dods, Assistant Inam Commissioner, H. Coke, Esquire, Executive Engineer, C. B. Ker, Esquire, of the Railway Department; Major T. Candy; the Reverend J. Mitchell; the Reverend J. W. Gardner, M. Roonan, Esquire; Bapoo Rowjee, Esquire; Framjee Nesserwanjee, Esquire; Sukharam Balkrishna, Esquire; Gunput Shreekrishn, Esquire; Kesheo Sheoram, Esquire; Anna Saheb, Esquire; Vishnoodas Hurrikissundas, Esquire; Noorkhan, Esquire; and Others. C. M. Harrison, Esquire took the chair. The exhibition opened with the examination in Reading, Explanation, Grammer and ca of the first class of School No. 3. The following Report, describing the operations of the Society; the progress made by the Mahar and Mang children from September 1856 to January 1858 and ca, was then read by the Joint Secretary, Mr. Wamun Prubhakur. "Ladies and Gentlemen, I beg most respectfully to lay before this meeting an account of the operations of the Society in promoting the Education of Mahars, Mangs and ca, during the period intervening between 29th August 1856, the date on which the last examination of the Mahar and Mang Schools took place, and the present time. In doing this, it is necessary that I should detail the progress the schools have made, the difficulties the Society have met in prosecuting their object; the assistance which the Society have received from European Ladies, European and Native Gentlemen and the means by which and these difficulties may be altogether removed.<noinclude></noinclude> 8076rnzsyl7hcevemon33t6ttxs0kue पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२३ 104 105341 231712 213654 2026-06-10T16:08:10Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७२३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213654 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>६८२ महात्मा फुले : समग्र वाङ्मय 2. The course of study pursued in the schools embraces Reading and Explanation; Grammer including Dictation and Parsing, Geography with the use of Maps; the History of the Marathas; Arithmetic and Balbodh and Modee Penmanship. The progress, which the scholars have made since the last examination, allowing for the disadvantages under which these schools labour, is on the whole satisfactory as the advanced pupils read Balbodh well and Modee tolerably with a good understanding of the subject; know the principles of Grammer well, write from dictation correctly, parse fairly; write good Balbodh and Modee hands; know the History of the Marathas tolerably well; are acquainted with Geography and point out places in the Maps of Asia, Europe and Hindoostan with accuracy, and work Arithmetical questions sharply. The studies gone through by the scholars during the last seventeen months have been given at length in Appendix No. I. A few of the advanced scholars of one of the schools were very kindly permitted by the Free Church Mission to attend their English Institution; but from causes which it would be tedious to detail here most of the scholars have discontinued their attendance at that seminary. 3. Although the progress made by the scholars during the last seventeen months is not inconsiderable, it has not fully come up to the Society's expectations. This deficiency in the amount of progress has arisen from several causes. Mahar and Mang families go on pilgrimages and attend certain meetings peculier to their castes and thereby thin the attendance of children at the schools for weeks together. The children, moreover, having no means of protecting themselves against the inclemencies of the weather, their attendance likewise during the rainy and the cold seasons of the year is very precarious. The practice observed by school going children of high Hindoo Castes who appreciate the benefits of Education is to prepare the lessons prescribed for them at home. The Mahar and Mang children on the contrary usually prepare their lessons at school during school hours as they have for the most Part no friends willing or competent to encourage or compel them to learn their tasks at home. The short period of attendance and the preparation of lessons at schools in addition to the difficulties mentioned in my last Report will appear sufficient to retard the progress of any institution.<noinclude></noinclude> lzlnrpcwqt4hjr4u4qntfci14pg268f पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२४ 104 105342 231713 213655 2026-06-10T16:08:12Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७२४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213655 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र ६८३ 4. To remove the barriers which I have mentioned as obstructing the progress of Education among Mahars, Mangs and ca, it is necessary - First that scholarships of a higher amount than are now given and an increased number of such scholarships should be created and the holders of them formed into a Normal Class in which the higher branches of study should be taught and its members fitted to fill teacherships or take Government employments. This will pave the way for other children to get on and hold out an inducement for parents to send their children to school cheerfully and not grudgingly as they now do in the absence of such a provision; And secondly, that an industrial department should be attached to the schools in which children would learn useful trades and crafts and be able on leaving school to maintain themselves comfortably and independently. 5. The funds by which the schools are supported have now to be considered. The sources of these funds are the Government and private individuals. The latter give the greater portion, while the former give only Rupees (300) three hundred per annum through the Duxina Prize Committee. The Government have also sanctioned the grant of a liberal sum of Rupees (5,000) five thousand for the erection of a new school, the building of which will erelong be commenced. They have also kindly made over to the Society a site to build the school. Several European and Native Gentlemen have of late withdrawn their monthly subscriptions and these have now fallen so low that it will be the painful duty of the Society to shut up at least one of the three schools under their direction. The Society therefore earnestly appeal to Government and benevolent European Ladies and European and Native Gentlemen to come forward with a liberal hand and prevent this extreme step. I call it extreme because the Mahars and Mangs who were at first perfectly indifferent to the education of their children in reading and writing now appear alive to its utility and have begun to request the Society to give them better teachers while the Society can only now respond to their call by shutting up the School altogether !!! 6. A List of those who have been kind enough to assist the school either by monthly Subscriptions or Donations, is given at the end as Appendix No. 2. An account of Receipts and Disbursement will also appear at the end as Appendix No. 3.<noinclude></noinclude> najvbe47jew1zfz61t3xu893d8paicg पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२५ 104 105343 231714 213656 2026-06-10T16:08:14Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७२५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213656 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>६८४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय 7. The Society take this opportunity of giving their heartfelt thanks to the Duxina Prize Committee and to those European Ladies and European and Native Gentlemen, who have kindly assisted their operations either by monthly Subscriptions or Donations. They also feel highly obliged to the Bombay Government for their making over to them the piece of ground on which a School Room is to be erected. The Society likewise feel themselves under great obligations to Captain Cowper for the grant of a Map of India; to the Editors of Bodhamrit, Jugunmitra, Purushoo, Sumitra, Chandrika and Ooduyuprubha for the grants of Newspapers and pamphlets and to the Duxina Prize Committee for their kind grant of the copies of the Books newly published under their auspices. 8. In conclusion the Society desire to express their highest gratitude to that Giver of all good through whose Grace they have been enabled to proceed thus far in the path of doing good to their fallen and ignorant fellowmen !! MORO WITTUL, Secretary. EVL 000<noinclude></noinclude> nll3jfck4dgfvrnxbe5ugm5ji5l42em पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२६ 104 105344 231715 213657 2026-06-10T16:08:16Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७२६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213657 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र ६८५ APPENDIX No. I. Programme of the Mahar and Mang Schools SCHOOL No. 1. NUMBER OF SCHOLARS 106. FIRST CLASS--NUMBER OF SCHOLARS 18 Teacher, VISHNOO MORESHWUR READING--History of India by Bal Shastree, Modee Reading, Grammar, Writing from Dictation and Parsing, Geography, Maps of Europe, Asia and India, Writing Balbodh and Modee hands, Arithmetic as far as Single Position. SECOND CLASS--NUMBER OF SCHOLARS 18 Teacher, RAMCHUNDER MORESHWER READING-Shalopuyogee Grunth, 30 pages, Modee Reading, Grammar as far as Adjective, Geography, Definitions, Arithmetic Numeration. THIRD CLASS--NUMBER OF SCHOLARS 16 Teacher, RAGHO SUKHARAM READING--Lipidhara, know the figures from 1 to 100 FOURTH CLASS--NUMBER OF SCHOLARS 54 The alphabet. Teacher, DHOORAJEE APAJEE SCHOOL No. 2. NUMBER OF SCHOLARS 83. FIRST CLASS--NUMBER OF SCHOLARS 15 Teacher, KESO TRIMBUK READING--Balmitra, Part-1, 100 pages, Modee Reading, Grammar, Writing from Dictation and Parsing, Geography, Map of Asia and India, Abridgment of the History of the Marattas, Arithmetic as far as the Rule of Three. SECOND CLASS--NUMBER OF SCHOLARS 18 Teacher, VITTOBA BIN BAPOOJEE READING--Neeti Durpun, 28 pages, Modee Reading, Jagtijot, 30 pages, Grammar as far as Adjective, Geography, Map of Asia, Arithmetic Numeration.<noinclude></noinclude> 5yng42tlx843opbqtv1hv768tcym7kn पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२७ 104 105345 231716 213658 2026-06-10T16:08:18Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७२७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213658 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>६८६ महात्मा फुले : समग्र वाङ्मय THIRD CLASS--NUMBER OF SCHOLARS 50 Teacher, VENAYEK GUNNESH READING--Lipidhara, 20 pages, Know the figures from 1 to 100, The Alphabet. SCHOOL No. 3. NUMBER OF SCHOLARS 69 FIRST CLASS--NUMBER OF SCHOLARS 18 Teacher, DHONDO SUDASHEO READING--Esop's fables, 70 stories, Modee Reading, Description of Animals, Grammar, Writing from Dictation and Parsing, Geography, Map of Asia, Arithmetic--Multiplication. SECOND CLASS--NUMBER OF SCHOLARS 18 Teacher, GUNNOO BIN RAZOOJEE READING--Neeti Durpun, 80 pages, Grammar as far as Cases. Geography as far as the Capitals of Asia, Arithmetic--Numeration. THIRD CLASS--NUMBER OF SCHOLARS 33 Teacher, GYANOO SHEOJEE READING--Lipidhara, 24 pages, Know the figures from 1 to 100, The Alphabet. 000 椎<noinclude></noinclude> fd9sty1qlw1f2c3lidzhdxhvibl8p7m पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२८ 104 105346 231717 213659 2026-06-10T16:08:19Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७२८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213659 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>APPENDIX No. 2. A List of Subscribers and Donors to the Mahar and Mang School परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र Names Monthly Subscription Donation Remarks Duxina Prize Committee 25 0 0 0 0 0 The Honourable H. W. Reeves Esquire 20 0 0 0 0 0 C. M. Harrison Esquire 10 0 0 0 0 0 S. Mansfield Esquire 10 0 0 0 0 0 Discontinued Brigadier J. Hale 5 0 0 0 0 0 Discontinued C. G. Kemball Esquire Captain T. A. Cowper 5 0 0 0 0 0 3 0 0 0 0 0 Discontinued C. B. Ker Esquire 2 0 0 0 0 0 Discontinued Lieutenant C. J. Griffith 2 0 0 0 0 0 Professor J. McDougall 2 0 0 0 0 0 Discontinued Lieutenant Peter Dods 2 0 0 0 0 0 W. M. Coghlan Esquire C. R. Ovans Esquire I. Dracup Esquire Moro Rughoonath Esquire 2 0 0 0 0 0 2 0 0 89 0 0 0 Ι 0 0 0 0 0 4 0 0 0 0 0 Sudasheo Bullal Esquire 3 0 0 0 0 0 Nana Morojee Esquire 2 0 0 Wamunrow Jugunnath Esquire 1 0 0 O O 0 0 0 0 0 0 ६८७<noinclude></noinclude> a399apyy549mjq7ignoqczzkz49fnzz पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२९ 104 105347 231718 213660 2026-06-10T16:08:21Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७२९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७२९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213660 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>६८८ HETCHI YO : समग्र वाङ्मय Names Gopallrow Hurry Esquire Bapoo Rowjee Esquire Vishnoo Moreshwur Esquire Pandoorung Balkrishna Esquire Krishnrow Wittul Esquire Mahadeo Govind Esquire Bhaskur Damodhur Esquire John Anding Esquire Sukharam Balkrishn Esquire Raghoba Pandoorung Esquire Gunput Shreekrishn Esquire Venayek Bapoojee Esquire Babajee Munajee Esquire Narayan Bhaee Esquire Moro Wittul Esquire Krishnrow Sudasheo Esquire Professor Krishn Shastree Professor Kero Luximun Nana Shastree Esquire Razaram Ootumram Esquire H. B. Goodall Esquire Gunnesh Wittul Esquire : : : : : APPENDIX No. 2.--contd. : : : Monthly Subscription Donation Remarks 1 0 0 0 0 0 Discontinued 0 0 0 0 0 0 0 0 0 0 Discontinued 1 0 0 0 0 0 0 8 0 0 0 0 0 8 0 0 0 0 0 8 0 0 0 0 Discontinued 0 8 0 0 0 0 8 0 0 0 0 Discontinued 0 8 0 0 0 0 0 8 0 0 0 0 Discontinued 0 8 0 0 0 0 0 8 0 0 0 0 Discontinued 0 8 0 0 0 0 0 8 0 0 0 0 0 4 0 0 0 Discontinued 0 4 0 0 0 0 0 4 0 0 0 0 0 4 0 0 0 0 0 4 0 0 0 0 Discontinued 0 4 0 0 0 0 Discontinued 0 4 0 0 0 0 44444<noinclude></noinclude> cergbgc2afrai8d1goz86om9batq8xp पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३० 104 105348 231719 213661 2026-06-10T16:08:23Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७३०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213661 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र Names APPENDIX No. 2--contd. Monthly Subscription Donation Remarks Amritrow Shreeput Esquire 0 4 0 0 0 0 N. Gillespie Esquire John Shamrow Esquire 0 0 44 0 0 0 0 Discontinued 0 0 0 0 Discontinued Kesheo Sheoram Esquire 0 4 0 0 0 Deorow Krishnajee Esquire 0 4 Vishnoo Purushuram Pundit Esquire 0 4 44 0 0 0 0 0 0 0 0 Discontinued Sukharam Yeshwunt Esquire 0 4 0 0 0 0 Ballajee Mahadeo Esquire 0 0 Discontinued Ramchundur Venkuitesh Esquire 0 0 0 Govind Gunnesh Esquire Govind Ramkrishn Esquire Wamun Gopall Esquire Sukharam Ramchundur Esquire Shreekrishn Baboodeo Esquire Narayen Bujajee Esquire Bulvunt Gungadhur Esquire Duncan Davidson Esquire J. T. Molesworth Esquire W. E. Frere Esquire J. Bray Esquire Major General F. Schuler A. Bettington Esquire 0 : : 0 0 : : B : : 0 0 4422222 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 Discontinued 0 0 0 0 Discontinued 0 : : 0 Discontinued 0 0 0 80 0 0 0 0 55 0 0 0 50 0 0 0 50 0 0 0. 50 0 0 0 50 88888 0 0 0 0 0 0 एच २२ ४७ ६८९<noinclude></noinclude> eh863vy1pthjo8ighqwpgff5clq2mku पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३१ 104 105349 231720 213662 2026-06-10T16:08:24Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७३१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213662 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>Remarks ६९० Dikosti Wen Names D. C. R. Leighton Esquire The Lord Bishop of Bombay B. H. Ellis Esquire E. I. Howard Esquire C. Gonne Esquire Captain J. F. Lester Captain J. Willoughby A. Layard Esquire M. P. Major General Clerk Brigadier C. Stuart Colonel F. Wells H. Coke Esquire Mana Major T. Candy APPENDIX No. 2.--contd. Monthly Subscription Donation 0 0 0 0 0 0 0 : : : : 0 20 0 0 0 0 0 0 0 0 0 20 8 8 8 8 8 8 30 0 0 25 0 0 0 20 0 20 0 0 0 0 0 15 0 0 0 0 10 0 0 0 Brigadier Trydell Dr. C. Morehead Captain Beale Lieutenant F. Scrivener Captain Graham Lieutenant Hobson R. White Esquire Professor Valentine Green : : : : : : : : 0 10 0 0 0 0 10 0 0 0 0 0 10 0 0 0 0 0 10 0 0 0 0 0 10 0 0 0 0 5 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 The Reverend H. H. Ererton 0 0 0 55555555 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 महात्मा फुले : समग्र वाङ्मय<noinclude></noinclude> 1owaozx9l5jo41d7cjfigbs5hrzy84l पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३२ 104 105350 231721 213663 2026-06-10T16:08:26Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७३२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213663 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र REME APPENDIX No. 2--contd. Names Monthly Subscription Donation Remarks Dadoba Pandoorung Esquire 0 0 0 Framjee Nesserwanjee Esquire 0 0 0 Bhavoo Dajee Esquire 0 0 0 Atmaram Bapsetjee Esquire 0 0 0 Anundrow Poonacotee Aya Esquire.. 0 0 0 The Reverend J. W. Gardner 0 0 0 Mrs. McCudden 0 0 04 H. Victor Esquire 0 0 0 3 Major Hills Dr. J. Faithful Mrs. C. W. Nepean A. Parsee Friend Gopall Krishn Esquire Gunnesh Narayen Esquire 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 Krishnajee Nurseo Esquire 0 0 555554402222-00 0 0 500 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 200 0 0 0 0 推書 2 0 0 17 20 0 302 12 1 0 0 138 4 0 4 0 Shitaram Narayen Esquire 0 0 0 0 2 0 Wishwunath Moreshwur Esquire 0 0 0 0 2 0 Wasoodeo Sukharam Esquire 0 0 002 2014 ounce g Naro Govind Esquire 0 00 2 0 Krishnajee Trimbuk Esquire 0 0 0 0 1 0 m 9<noinclude></noinclude> o713yw1ecpz4p3j9ony06sh8wks99gk पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३३ 104 105351 231722 213664 2026-06-10T16:08:28Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७३३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213664 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>APPENDIX No. 3 MAHAR AND MANG SCHOOLS Abstract Account of Receipts and Disbursements from the 1st September 1856 to the 31st January 1858 m 9 P महात्मा फुले : समग्र वाङ्मय Receipt Balance of last Account.. Subscriptions Donations Miscellaneous Disbursements Rs. As. Ps. Rs. As. Ps. 508 0 8 Salaries of Teachers 966 5 9 1702 14 0 Ditto Paid Scholars 128 12 636 2 0 Ditto Peons 204 15 106 11 12 5 0 Secretary and Treasurer's Office 117 00 Establishment. House Rent 245 0 0 Books, Slates and ca. 175 14 Total Rupees 2859 5 8 00 Prizes 82 Contingent Expenses 220 I 391 31 Total Rupees 2140 4 9 Balance 719 0 11 00 02 Grand Total Rupees 2859 5 8 Examined and found correct. SUDASHEO BULLAL, President. MORO WITTUL, Secretary. on 05 Errors Excepted SUKHARAM YESHWUNT, 3-coniter. Treasurer.<noinclude></noinclude> 7pvaq8hcd9jcxze8ef0b317vtkf8ws8 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३४ 104 105352 231723 213665 2026-06-10T16:08:29Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७३४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213665 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र ६९३ On the conclusion of the Report, the Joint Secretary at the President's request read the following Result of the Private examination of the three Mahar and Mang Schools recorded by Captain Lester Educational Inspector of the Deccan Division. MEMORANDUM 26th December 1857 Poonah Mahar and Mang School No. 1 Examined by Captain Lester Educational Inspector D. D. on the 21st December 1857. 1st CLASS--18 BOYS ON THE REGISTER 16 Present at the Examination Examined in the following Subjects Excellent Good Moderate Indifferent Failure Reading Grammar 10 2 Writing Dictation :23 2 Grammar Arithmetic History of India (Introductory) : : 3 16 48 :585 : 6653 4 5 5 :7 : 2:3 1 I 6 Geography Mental Arithmetic .. 16 10 669 : 6 2nd CLASS--18 BOYS ON THE REGISTER 17 Present at the Examination Examined in the following Subjects Excellent Good Moderate Indifferent Failure : : : Reading Spelling Grammar Mental Arithmetic Geography : : : : 17 17 17 10 17 7 :<noinclude></noinclude> 55c26m82cta3yooualfkzg78qh8vrhv पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३५ 104 105353 231724 213666 2026-06-10T16:08:31Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७३५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213666 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>६९४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय 3rd CLASS--16 BOYS ON THE REGISTER shabd sr-20 nodents way16 Present at the Examination pa Mul on to Examined in the following Subjectsnuit anpitoubs Excellent Good Moderate Indifferent Failure MUKIM HOMEM Reading Arithmetic Reading Spelling 4 8 3 1 Able to distinguish figures only 4th CLASS--54 BOYS ON THE REGISTER RIG 24 Present at the Examination All engaged in learning the Alphabet Poonah Mahar and Mang School No. 2 Examined 22nd December 1857 Вафлая aminants 1st CLASS-17 BOYS ON THE REGISTER nonstic 16 Present at the Examination Examined in the following Subjects oralH Excellent Good Moderate Indifferent Failure 5 7 3 1 3 6 6 3 oll 6 16 : Writing from Dictation 3 Grammar Arithmetic Mental Do. History of India Geography : 16 15 55 : 1 15 : 2 5 9 3 7 1506<noinclude></noinclude> mw16pv8b4ed2jc3erj6xeatikbhdbl5 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३६ 104 105354 231725 213667 2026-06-10T16:08:33Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७३६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213667 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र ६९५ 2nd CLASS--18 BOYS ON THE REGISTER 15 Present at the Examination Examined in the following Subjects Excellent Good Moderate Indifferent Failure : : Reading Spelling a Dictation Grammar Mental Arithmetic Geography : : 5 7 3 3 3 12 15 15 55 B 93 : : 3rd CLASS--60 BOYS ON THE REGISTER 50 Present at the Examination Only 6 of this number were able to read a little of the Lipidhara, which they did moderately well. The rest were learning the Alphabet. Und M Hos of shipl gift to Jana Poonah Mahar and Mang School No. 3 Examined 23rd December 1857 nolų du 1st CLASS--18 BOYS ON THE REGISTER 14 Present at the Examination looded to Mismaeem Sell and abum evad Examined in the following Subjects Т Reading Spelling Excellent Good Moderate Indifferent Failure 12 2 4 Dictation Grammar Mental Arithmetic Geography 2 223 8 8 43 3 3 : 11 14 95<noinclude></noinclude> jt0yud77okc3re0831270tigen6h2de पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३७ 104 105355 231726 213668 2026-06-10T16:08:34Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७३७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213668 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>६९६ Reading Spelling Dictation महात्मा फुले : समग्र वाङ्मय 2nd CLASS--18 BOYS ON THE REGISTER 14 Present at the Examination Examined in the following Subjects Grammar Mental Arithmetic Geography Excellent Good Moderate Indifferent Failure : 11 3 3 3 3 7 10 4 14 : 3rd CLASS--33 BOYS ON THE REGISTER REGISTER VIDO 31 Present at the Examination glove bib com the Only (4) four out of this number were able to read a little. The rest were learning the Alphabet. en The foregoing tabulated statements give the result of the Examination of these Schools. I have been very much pleased with Masters and Scholars, as well as with the general arrangements which the Society have made for the management of these Schools. The buildings are clean in open and healthy localities and well distributed. The instruction given in these Schools is quite elementary and of a character adopted to the wants of the children. The aggregate number on the Registers is 270 while the average attendance during the year is found to be 200. The children are for th the most part, remarkably quick and intelligent. I particularly mention the following boys who give much promise of future excellence, if they can be taken care of, and the means of carrying on their Education can be afforded them.<noinclude></noinclude> 9figgt8g9uexwtw2yhpip8792vkfscu पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३८ 104 105356 231727 213669 2026-06-10T16:08:36Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७३८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213669 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र ६९७ SCHOOL No. I DHONDEE BIN HUNMUNTAH, Mang. aupante SUDOO BIN MAHADOO, Mahar 族 MUNNOO BIN WEETULNATH, Mahar WITTOO BIN PANDOOJEE, Mang. GUNOO BIN WITTOO, Chambhar SCHOOL No. II SUKKA LUXIMUN, Mahar. PURWATA MUHEEPUTEE. SCHOOL No. III IBRAHIM WULLUD KASIM, Mahomedan. KONDEE BIN KALLOO, Mang. TOOKARAM BIN BAPPOO, Chambhar MAHADOO BIN KANOO, Mang. NAMA BIN LIMBA, Mang. N BABIA BIN ITOJEE, Koonbee. LUKHA BIN KISUN, Mochee. oe ky We than (Signed) J. F. LESTER, CAPTAIN Educational Inspector D.D. Poonah, 26th December 1857.<noinclude></noinclude> 65v15nt9qqdlqqdrq98k8l4e86o7rhq पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३९ 104 105357 231728 213670 2026-06-10T16:08:38Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७३९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७३९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213670 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>६९८ महात्मा फुले : समग्र वाङ्मय MARATHI REPORT १. महारमांग इत्यादि लोकांच्या मुलांकरतां घातलेल्या शाळांची परीक्षा गतवर्षी तारीख २९ माहे आगस्त सन इसवी १८५६ रोजी झाली तेव्हांपासून आजपावेतों सत्रा महिन्यांत त्या शाळांतील विद्यार्थी यांचा अभ्यास काय झाला, त्यांचे शिक्षण चालविण्यास शाळांवरील अधिकारी मंडळीस कोणत्या अडचणी पडल्या व त्या दूर करण्यास उपाय कोणते व त्या शाळांस विलायती व ह्या देशांतील लोकांनी सहाय काय दिल्हें हें सर्व सभासदांस विनयपूर्वक कळवितों. २. वाचणें व अर्थ सांगणें व्याकरण शुद्ध लिहिणें व ग्रंथावरून व्याकरण करणें भूगोल व नकाशावर शहरें इत्यादि दाखविणें महाराष्ट्र देशाची बखर गणित मोडी व बाळबोध अक्षर वळवणें याप्रमाणें शिक्षाक्रम शाळेंत चालतो. विद्याभ्यास सुरळीत चालण्यास ज्या अडचणी येतात त्या मनांत आणल्या असतां शाळांतील विद्यार्थी यांचा अभ्यास चांगला झाला असें दिसेल कारणकीं तरबेज झालेली मुलें मोडी व बाळबोध चांगले वाचतात जें वाचतात त्याचा अर्थ बरा समजतात. व्याकरण चांगलें समजतात शुद्ध लिहितात व ग्रंथावरून व्याकरण बरें करतात त्यांचे मोडी व बाळबोध अक्षरास वळण चांगलें लागलें आहे त्यांस महाराष्ट्र देशाची बखर मध्यम येत्ये भूगोल चांगला येतो व एशिया युरोप व हिंदुस्थान या देशांचे नकाशांवर शहरें इत्यादि चांगली दाखवितां येतात व त्यांस गणितांतील उदाहरणें लवकर करतां येतात. वर लिहिलेला अभ्यास कोणत्या ग्रंथांवरून किती झाला हें शेवटी अंक १ यांत लिहिलें आहे. फार अभ्यास झालेली कांहीं मुलें फ्रीचर्च मिशनानें आपल्या विद्यालयांत इंग्रजी शिकण्याकरतां घेतली होती परंतु कांही कारणामुळे त्यांतून एक दोन मात्र सध्या त्या विद्यालयांत जात असतात. ३. गेल्या सत्रा महिन्यांत मुलांचा अभ्यास थोडा झाला असें नाहीं परंतु जितका व्हावा तितका झाला नाहीं ह्यांची कारणें बहुत आहेत. महारमांग इत्यादि लोक जत्रा करतां व जातींतील पंचायतींकरतां मुलांमाणसांसुद्धां जातात त्याजमुळे कितीएक दिवस मुले शाळेत येत नाहीत. पावसाळ्यांत व हिवाळ्यांत थंडी न लागण्याजोगीं चिरगुटें मुलांजवळ नसतात म्हणून त्या ऋतूंत तीं तुरळूक येतात. इतर लोक विद्याभ्यासाचे लाभ ओळखून मुलांकरवीं धडे घरीं पाठ करवितात. तसे हे महारमांग इत्यादि लोक<noinclude></noinclude> j2xa8p8c7herhek10crgn4d2evagw0l पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४० 104 105358 231729 213671 2026-06-10T16:08:39Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७४०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213671 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>६९९ परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र आपल्या मुलांकडून करवीत नाहींत कारणकीं त्यांस विद्याभ्यासापासून लाभ व सुखें काय आहेत तीं कळत नाहींत म्हणून मुलांस नेमून दिल्हेले धडे शाळेतील वेळेंत पाठ करावे लागतात. गतवर्षी या शाळांच्या परीक्षेविषयीं जी हकीकत लिहिली आहे त्यांत ज्या अडचणी दाखविल्या आहेत त्या व वर लिहिलेल्या अडचणीं यांमुळे मुलांचा अभ्यास कमी होतो. ४. वर लिहिलेल्या अडचणी दूर करण्यांस उपाय आहेत - एक उपाय असा आहे कीं या शाळांत सध्या जितक्या पगारी विद्यार्थ्यांच्या जागा आहेत त्यांहून अधिक जागा नेमून व त्या जागा अधिक पगाराच्या करून त्य पगारी विद्यार्थ्यांचा एक वर्ग करावा आणि त्यांस थोर थोर विद्या म्हणजे पदार्थ विज्ञान शास्त्र, ज्योतिष व रसायन शास्त्र इत्यादि शिकवाव्या म्हणजे ह्या वर्गांतील विद्यर्थ्यांस शिक्षकांच्या व सरकारी काम करण्यांच्या असाम्या मिळण्याची योग्यता येईल. असे केल्याने इतर मुलांस शाळेंत येण्याची चव लागून त्यांचे आई बापही पुढे मुलांस शाळेंत आस्थेनें पाठवतील. दुसरा उपाय असा आहे की या शाळांच्या संबंधानें एक कारखाना असावा त्या कारखान्यांत मुलांस सुतार, लोहार, पाथरवट इत्यादि ले कांचीं कसबें शिकवावी म्हणजे तीं मुलें पुढे मोठी झाल्यावर सरकारावर अथवा इतर लोकांवर आपले उपजीविकेकरितां भार न घालतां स्वतंत्रतेनें व सुखानें आपला प्रपंच चालवतील. ५. ह्या शाळांचा खर्च चालण्याकरितां सरकाराकडून व विलायतीय बाया व विलायतीय व ह्या देशांतील गृहस्थ यांजकडून पैसा येतो त्यापैकी बहुतेक पैसा गृहस्थांकडूनच येतो. दक्षिणाकमिटीद्वारा सरकार दरमहा रुपये पंचवीस देतें. सरकारनें बहुत उदारपणें करून महारमांग इत्यादि जातींचे मुलांसाठीं नवीन शाळा बांधण्यास पांच हजार रुपये देण्याचें कबूल केलें आहे. शाळा बांधण्याकरतां सरकारने या शाळांवरील अधिकारी मंडळींचे स्वाधीन जागा केली आहे व शाळा बांधण्याचें काम लवकरच सुरू करावें असा मंडळींचा मानस आहे. थोडे दिवसांपूर्वी किती एक विलायती गृहस्थांनीं दरमहा वर्गणी देण्याचें बंद केलें तेणेंकरून पैसा फारच कमी येऊ लागला तो इतका की मंडळींचे अधिकाराखाली तीन शाळा हल्लीं आहेत त्यांतून निदान पक्ष एक तरी बंद केली पाहिजे. ही दुःखकारक गोष्ट आपल्यास करावयास पडूं नये म्हणून मंडळी उदार गृहस्थांस व सरकारास बहुत विनवणी करत्ये कीं अशा वेळी आपण<noinclude></noinclude> l2l8cfnxvgpebw09a2qqjhkowl7gcu9 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४१ 104 105359 231730 213672 2026-06-10T16:08:41Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७४१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213672 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>७०० महात्मा फुले : समग्र वाङ्मय सहाय्य करावेंच कारणकीं पूर्वी महारमांग लोक यांस विद्याभासाची अगदीं चाड नव्हती ती आतां अंमळशी उत्पन्न होऊन ते लोक आमच्या मुलांस शिकविण्याकरिता सध्यापेक्षां चांगले शिक्षक द्यावेत अशी मंडळींची प्रार्थना करीत आहेत त्यांस तुमच्या मुलांकरतां घातलेली शाळा आम्ही मुळींच बंद करणार असें उत्तर सांगण्याचें तीस भाग आलें आहें तें न येवो असें कांहीं झाल्यास उत्तम आहे. ६. ज्या गृहस्थांनी ह्या धर्म कृत्यास सहाय दिल्हें आहे त्यांची नावनिशी शेवटी अंक २ यास दाखल आहे व या शाळांकडे जमा व खर्च गेल्या सत्रा महिन्यांत काय झाला त्याचा हिशोब शेवटीं अंक ३ यांत दाखविला आहे. ७. सरकारने दक्षिणाप्राइज कमिटीचेद्वारा व विलायती बाया व विलायती व ह्या देशांतील गृहस्थ यांनी दरमहा वर्गणी व एकवेळ दिल्हेला पैसा याप्रमाणें दिल्ह्यामुळें व सरकारने शाळा बांधण्याकरतां जागा दिल्ह्यामुळें व कपतान कौपर साहेब यांनी शाळांचे उपयोगाकरतां हिंदुस्थानचा नकाशा दिल्ह्यामुळें व बोधामृत, परशु, सुमित्र, चंद्रिका व उदयप्रभा यापत्रांचे कर्ते यांनी पत्रें दिल्ह्यामुळे व दक्षिणाकमिटी यांचे हुकुमावरून तयार होऊन प्रसिद्ध केलेली पुस्तकें सदर कमिटीने शाळांकरतां दिल्ह्यामुळें त्यां सर्वांचे गरीब महारमांग इत्यादि लोक व या शाळांचे अधिकारी यांजवर फार उपकार झाले आहेत. ८. आपले देशांतील अज्ञानी लोकांवर उपकार करण्याचे कामांत मंडळीस एथ म्हणून सर्व सुख देणाऱ्या ईश्वराचे उपकार मंडळीने मनःपूर्वक पावेतों आणून पोंचविलें मानावे हा तिचा धर्म होय.<noinclude></noinclude> ft426xadqyfquzrq5cjpuuyj7b24bd3 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४२ 104 105360 231731 213673 2026-06-10T16:08:43Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७४२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213673 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र नंबर १ महारमांग शाळांतील अभ्यासक्रम शाळा नंबर १ यांत विद्यार्थी १०६ वर्ग पहिला - यांत विद्यार्थी १८ शिक्षक विष्णू मोरेश्वर ७०१ वाचन. - बाळशास्त्रीकृत हिंदुस्थानचा इतिहास, मोडी वाचणें, व्याकरण, शुद्ध लिहिणें व ग्रंथावरून व्याकरण करणें, भूगोल, युरोप, एशिया व हिंदुस्थानचे नकाशे, बाळबोध व मोडी अक्षर वळविणें, एकेरी इष्टराशिक पावेतों गणित. वर्ग दुसरा- यांत विद्यार्थी १८ शिक्षक रामचंद्र मोरेश्वर वाचन. - शालोपयोगी ग्रंथ, ३० पानें, मोडी वाचणे, विशेषण पावेतों व्याकरणशास्त्र, भूगोलविद्या व्याख्यांपावेतों, गणित संख्यापरिमाणपर्यंत. वर्ग तिसरा - यांत विद्यार्थी १६ शिक्षक राघो सखाराम वाचन. - लिपिधारा, एकापासून शंभर पावेतों अंक. मूलाक्षरें वर्ग चवथा - यांत विद्यार्थी ५४ शिक्षक धुराजी आणजी चांभार शाळा नंबर २ यांत विद्यार्थी ८३ वर्ग पहिला - यांत विद्यार्थी १५ शिक्षक केसो त्र्यंबक वाचन. - बाळमित्र भाग पहिला यांची १०० पानें, मोडी वाचणें, व्याकरणशास्त्र, शुद्ध लिहिणें व ग्रंथावरून व्याकरण करणें, भूगोल, एशिया व हिंदुस्थानचे नकाशे, महाराष्ट्र बखरेचा संक्षप, त्रैराशिकपर्यंत गणित. वर्ग दुसरा - यांत विद्यार्थी १८ शिक्षक विठोबा बिन बापूजी<noinclude></noinclude> 2amxnt7zu5v7nxwdjp6y4ixrple13u8 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४३ 104 105361 231732 213674 2026-06-10T16:08:44Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७४३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213674 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>७०२ महात्मा फुले : समग्र वाङ्मय वाचन. - नीतिदर्पण २८ पानें, मोडी वाचणें-जागती जोत ३० पानें, विशेषणपर्यंत व्याकरणशास्त्र, भूगोलविद्या, एशियाचा नकाशा, गणित संख्यापरिमाणपर्यंत. वर्ग तिसरा - यांत विद्यार्थी ५० शिक्षक विनायक गणेश वाचन- लिपिधारा, २० पानें, एकापासून शंभरपर्यंत अंक, मूलाक्षरें. शाळा नंबर ३ यांत विद्यार्थी ६९ वर्ग पहिला - यांत विद्यार्थी १८ शिक्षक धोंडो सदाशिव शाले वाचन. - इसापनिती ७० गोष्टी, मोडी वाचणें, जनावरांचें वर्णन, व्याकरणशास्त्र, शुद्ध लिहिणें व ग्रंथावरून व्याकरण करणें-भूगोल विद्या, एशियाचा नकाशा, गणित, गुणाकार. वर्ग दुसरा - यांत विद्यार्थी १८ ह शिक्षक गणोजी बिन राजोजी वाचन. - नीतिदर्पण ८० पानें, विभक्तींपर्यंत व्याकरणशास्त्र, भूगोल, एशियाच्या राजधान्यांपर्यंत, संख्यापरिमाण पावेतों गणित. वर्ग तिसरा - यांत विद्यार्थी ३३ शिक्षक गणु शिवजी मांग वाचन- लिपिधारा २४ पानें, एकापासून १०० पर्यंत अंक, मूलाक्षरें. कहने की TETS<noinclude></noinclude> e77gazynymhwc6jgc5ao9qjuedurogy पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४४ 104 105362 231733 213675 2026-06-10T16:08:46Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७४४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213675 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>० ० ० ० ० ०० परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र ० ० ० ० ० बंद केलें. बद केलें. बंद केलें. बंद केलें. बंद केलें. नंबर २ महारमांग लोकांच्या शाळांस दरमहा वर्गणी व एक वेळ द्रव्य देणाऱ्या गृहस्थांची यादी नावे एक वेळ दिल्हेलें द्रव्य शेरा दक्षिणा प्राइज कमिटी हनराबल. एच. डब्ल्युरीव्ज एस्क्वायर सि. एम. हारिसन एस्क्वायर ० ० O दरमहा वर्गणी २५ ० २० १० १० ० ० ० ० : ST ० एस. मान्सफील्ड एस्क्वायर ब्रिगेडियर. जे. हेल. सी. जी. केंबाल एस्क्वायर टी. ए. कौपर एस्क्वायर सी. बी. केर एस्क्वायर लेफ्टनेंट सी. जे. ग्रिफिन प्रोफेसर जे. माक्डूगल लेफ्टनेंट. पी. डाड्स डब्ल्यु. एम. कागूलन एस्क्वायर सी. आर. ओवन्स एस्क्वायर आइ. ड्रेकप् एस्क्वायर मोरो रघुनाथ एस्क्वायर ० 0 ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० 0 ० ० ० ० ० ० ० Lo ० o ० ० ० ० १ ४ ० ० ० ० ० 0 0 ० ० ० 0 ० ० ० 0 0 ० ० ० ० ७०३<noinclude></noinclude> dmtrdifh8a96cn4y03zrs5s4kuf1lfj पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४५ 104 105363 231734 213676 2026-06-10T16:08:48Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७४५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213676 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>दरमहा वर्गणी m ० ० ० एक वेळ दिल्हेलें द्रव्य शेरा ० 0 ० ० ० ०. ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० 0 ० ७०४ बंद केलें. बंद केले. ० ० ० ० 0 ० ० : समग्र वाङ्मय महात्मा फुले : ० ० ० ० ० ० ० ० बंद केलें. बंद केलें. बंद केलें. बंद केलें. बंद केलें. 0 ० ० o ० o ० ० ० ० ८ ८ ० ८ ० ८ ० し ० ८ नावें सदाशिव बल्लाळ एस्क्वायर नाना मोरोजी एस्क्वायर वामनराव जगन्नाथ एस्क्वायर गोपाळराव हरी एस्क्वायर बापूरावजी एस्क्वायर विष्णु मोरेश्वर एस्क्वायर पाडुरंग बाळकृष्ण एस्क्वायर कृष्णराव विठ्ठल एस्क्वायर महादेव गोविंद एस्क्वायर भास्कर दामोदर एस्क्वायर जे. आडिंग एस्क्वायर सखाराम बाळकृष्ण एस्क्वायर राघोबा पांडुरंग एस्क्वायर गणपत श्रीकृष्ण एस्क्वायर विनायक बापूजी एस्क्वायर बाबाजी मनाजी एस्क्वायर नारायण भाई एस्क्वायर मोरो विठ्ठल एस्क्वायर कृष्णराव सदाशिव एस्क्वायर ० ० : ८ ० ० o ० ० ० ० 0 0 ० ० ० 0 ० ० ० ० ० ८ ८ ८ 0 ० ० ४<noinclude></noinclude> 7bhiciclshda831s3gul5jaozl3lzsi पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४६ 104 105364 231735 213677 2026-06-10T16:08:50Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७४६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213677 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>एच-२२ 28 एक वेळ दिल्हेलें द्रव्य ० ० ० ० O ० ० ० ० o ० > > ४ नावें दरमहा वर्गणी प्रोफेसर कृष्णशास्त्री ० ४ प्रोफेसर केरू लक्ष्मण ० ४ नानाशास्त्री एस्क्वायर ० ४ राजाराम उत्तमराम एस्क्वायर ४ एच. बी. गुडाल एस्क्वायर ० ४ ० ४ ० ४ गणेश विठ्ठल एस्क्वायर अमृतराव श्रीपत एस्क्वायर एन. गिलेस्पी एस्क्वायर जॉन शामराव एस्क्वायर केशव शिवराम एस्क्वायर देवराव कृष्णाजी एस्क्वायर विष्णु परशुरामशास्त्री एस्क्वायर सखाराम यशवत एस्क्वायर बाळाजी माधव एस्क्वायर ० ० ० ० ० ० शेरा परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र ० ० ० ० बंद केलें. बंद केलें. बंद केलें. बंद केलें. 0 ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ४ ४ ० ० ० ० ४ So ० ४ ० ४ ० ४ रामचंद्र व्यकटेश एस्क्वायर गोविंद गणेश एस्क्वायर गोविंद रामकृष्ण एस्क्वायर वामन गोपाळ एस्क्वायर सखाराम रामचंद्र एस्क्वायर ० ० ० ० ० ० ० ० ० ० O २० 0 ० ० ० ४ ४ > > ० ० ४ ० २ ०० ० ० ० ० ० O ० बंद केलें. बंद केले. ० ० ० ० 0 ० 0 ० ० ० ० O ० ७०५<noinclude></noinclude> r1tv86hi6fwjt39x3uxepb3wsdzfc8o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४७ 104 105365 231736 213678 2026-06-10T16:08:51Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७४७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213678 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>नावें ७०६ एक वेळ दिल्हेलें द्रव्य O ० O ० ० ० ०० O बंद केलें. बंद केलें. बंद केलें. शेरा ०० दरमहा वर्गणी २ २ ० ० ० 0 ० ० ० ० ० २ ० ० ० ० ० ८० ० ५५ ० ० 55 ५० ५० ० ० ५० ० ० ५० o ० ० ० ० श्रीकृष्ण बाबू एस्क्वायर नारायण बजाजी एस्क्वायर बळवंत गंगाधर एस्क्वायर डी. डेविडसन् एस्क्वायर जे. टी. मोल्सवर्थ एस्क्वायर डब्ल्यु. ई. फ्रीयर एस्क्वायर जे. ब्रे. एस्क्वायर मेजर जनरल एफ. शूलर ए. वेटिंगटन एस्क्वायर डी. सी. आर. लाइटन् एस्क्वायर मुंबईचे लॉर्डशिप बी. एच. एलिस एस्क्वायर ई. आइ. हौअर्ड एस्क्वायर सी. गान एस्क्वायर क्यापटन जे. एफ. लेस्टर क्यापटन जे. विलबी एलेअर्ड एस्क्वायर, एम. पी. मेजर जनरल क्लार्क ब्रिगेडियर सी स्टुअर्स ० ० ० ० ३० २५. ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० २० ० ० २० ० २० ० ० ० २० ० ० ० ० ० ७ ० ० ० c 0 ० ० ००० ० ov ० O १५ १० १० १० ० ० महात्मा फुले . : समग्र वाङ्मय<noinclude></noinclude> mfh2pa799nsbv4abq74zr8tpo0ymey5 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४८ 104 105366 231737 213679 2026-06-10T16:08:53Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७४८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213679 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>कर्नल एफ. वेल्स एच. कोक एस्क्वायर नावें मेजर टी. क्यांडि दरमहा वर्गणी ० शेरा परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र एक वेळ दिल्हेलें द्रव्य १० १० १० RSS ० ० ० 0 ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० о ० ० ० ० ० 0 ० ० O ० O ० ० ० ० ० ० ० ० ० ० ५ ० ० ० ० ० ० 0 ० ० ० ० O ० ० ० ० ० ० ० ५ Q ० ० ० ० 5 O ० ० ० ०० ० ० ० ० ५ ४ ४ 又只 0 ०० ० ० ० ० ० ० ० ० ० ब्रिगेडियर त्राइदेल डाकतर सी. मोरहेड क्यापटन बील लेफटेनेंट एफ. स्क्रीवेनर क्यापटन ग्रेहम लेफटेनेंट हाब्सन् आर व्हाइट एस्क्वायर रेवरेंड एच. एच. ब्रेरेटन् दादोबा पांडुरंग एस्क्वायर प्रोफेसर वालेंटाइन ग्रीन फ्रामजी नेसरवानजी एस्क्वायर भाउदाजी एस्क्वायर आत्माराम बापसेटजी एस्क्वायर आनंदराव पूनाकोटींआया एस्क्कायर रेवरेंड जे. डब्ल्यु. गार्डनर मिसिस माक्कडन ०. O ० ७०७<noinclude></noinclude> i9rrlmzxollerjf3we613t78rt5u5rr पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४९ 104 105367 231738 213680 2026-06-10T16:08:55Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७४९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७४९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213680 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>2060 शेरा एक वेळ दिल्हेलें द्रव्य ३ my २ ० ० ० ० दरमहा वर्गणी 0 0 ० P о २ ० २ Ο ० ० o ० ० ० ० ० ० 0 to ० ० 0 ० ० ० ० १ ० o ४ O ० ०० 0 ४ 0 0 ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० 0 ० ० a ० ० ० 00 ० महात्मा फुले : समग्र वाङ्मय ० २ २ १ ००० ० ० ० ०० नावें एच. विक्टर एस्क्वायर मेजर हिल्स डाकतर जे. फेथफुल मिसिस सी. डब्ल्यु. निपियन् एक पार्सी मित्र गोपाळ कृष्ण एस्क्वायर गणेश नारायण एस्क्वायर कृष्णाजी नरसिंह एस्क्वायर शीताराम नारायण एस्क्वायर विश्वनाथ मोरेश्वर एस्क्वायर वासुदेव सखाराम एस्क्वायर नारी गोविंद एस्क्वायर कृष्णाजी त्र्यबक एस्क्वायर ०<noinclude></noinclude> t0dpep02xs15eq4y3t9vgi6xusjwlqp पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५० 104 105368 231739 213681 2026-06-10T16:08:56Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७५०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213681 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>अंक ३ महारमांग शाळांचा जमा खर्च तारिख १ माहे सप्टेंबर सन १८५६ पासून तारिख ३१ माहे जानेवारी सन १८५८ पावेतो परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र जमा रक्कम खर्च रक्कम रुपये आणे पैसे रुपये आण पैसे मागील हिशेबाप्रमाणे शिल्लक दरमहा वर्गणी ५०८ १,७०२ १४ एक वेळ दिल्हेले द्रव्य ६३६ किरकोळ Mov २ १२ ५ ० ७०० ० शिक्षकांचा पगार ९६६ ५. पगारी विद्यार्थ्यांचा पगार १२८ १२ V ० शिपाई यांचा पगार २०४ १५ ११ चिटनवीस, खजिनदार यांजकडील ११७ ० कारकून, शिपाई इत्यादी घरभाडे २४५ ० बुके, स्लेटी इत्यादि १७५ १४ OM बक्षीस मुलांस परीक्षेचे ८२ ३ किरकोळ २२० १ mov २,१४० ४ ९ शिल्लक ७१९ ११ २,८५९ ८ एकूण रुपये २,८५९ ५. ८ एकूण रुपये सदरहु हिशेब तपासला असे सदाशिव बल्लाळ सभानायक, मोरो विठ्ठल चिटनवीस सखाराम यशवत खजिनदार ७०९<noinclude></noinclude> t8frg16e367494pb2vv2ouozcr05oha पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५१ 104 105369 231740 213682 2026-06-10T16:08:58Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७५१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213682 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>-७१० महात्मा फुले : समग्र वाङ्मय The first Classes of Scools Nos. 2nd 1 respectively were then Examined in the different subjects enumerated in the Appendix No. 1. At the conclusion of the examination the Chairman distributed Prizes of Books and Clothes to the children and then rising up delivered the following speech. "I rise to express the gratification afforded me by what we have just witnessed and I doubt not all here present have been also well pleased. We are aware that Public Examinations are necessarily cursory and do not fully show the advancement of the Scholars and the attention that has been bestowed upon them by their instructors, but on the present occasion, we have not been left in any doubt on the subject for Captain Lester's opinion formed after a strict and careful Examination of the Schools, which we have just heard read by the Secretary, is a most satisfactory one. There is only one matter connected with the day's proceedings which is not a subject of congratulation. I allude to the falling off of subscriptions referred to in the Committee's Report, which may, they fear, render it necessary to close one of the three Schools. I most sincerely hope that this will not be necessary. The subscriptions of Europeans must necessarily fluctuate with the Society; but those of the Native supporters of the schools should not fall off, but increase both in number and amount with the advance of that liberal and enlightened spirit which is inseparable from a cultivated intellect. To prevent such a Catastrophy as the closing of one of the Schools. I shall be happy either by calling a public meeting on behalf of these Schools or in any other way the Committee will point out to aid them. I would now briefly notice the suggestion of the Committee that an industrial institution should be attached to these Schools with a view to instruct the boys attending them, in trades which will, on leaving them, enable at once to provide for themselves. This proposition appears to me well worthy of consideration with a view to its adoption as soon as the funds of the society will admit. The disinterested efforts of the Founder of these schools and of the Native Gentlemen who are acting with him and who form the Committee are, I consider, worthy of all praise. They have my entire<noinclude></noinclude> ka1b7u7vj5allo3czmpfa2eqc5x2qcu पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५२ 104 105370 231741 213683 2026-06-10T16:09:00Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७५२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213683 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>७११ परिशिष्ट १ : महात्मा फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळांसंबंधीचे कागदपत्र sympathy and they shall have all the countenance and support it is in any power to afford them." The President of the Society Mr. Sudasheo Bullal then thanked the Chairman Mr. Harrison for his able conduct in the Chair and the European Ladies and the European and Native Gentlemen for their having honoured the Society by their presence. The meeting was then dissolved. समाप्त ㅁㅁㅁ<noinclude></noinclude> l4lvxtzyzmc20394uilyc9fvjrlnv5p पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५३ 104 105371 231742 213684 2026-06-10T16:09:01Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७५३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213684 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="QueerEcofeminist" /></noinclude><noinclude></noinclude> 6mlrg7ulygc335wsw2ucniib5cytmfy पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५४ 104 105372 231743 213685 2026-06-10T16:09:03Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७५४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213685 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट २ महात्मा फुले यांच्याविषयीचा पत्रव्यवहार<noinclude></noinclude> ny4sxvsawmhpfabqy7fyq06ey0v6l8m पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५५ 104 105373 231744 213686 2026-06-10T16:09:05Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७५५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213686 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="QueerEcofeminist" /></noinclude><noinclude></noinclude> 6mlrg7ulygc335wsw2ucniib5cytmfy पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५६ 104 105374 231745 213687 2026-06-10T16:09:06Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७५६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213687 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>७१५ परिशिष्ट २ महात्मा फुले यांच्याविषयीचा पत्रव्यवहार या परिशिष्टात महात्मा फुले यांच्याविषयीची चार पत्रे छापली आहेत. जोतीरावांनी सत्यशोधक समाजाची स्थापना का केली आणि त्या समाजात सभासद म्हणून प्रवेश देताना काय केले जात असे याची माहिती देणारे पत्र तुकाराम हनमंत पिंजन यांचे आहे. “पुरोगामी सत्यशोधक" या त्रैमासिकाच्या (वर्ष ३, अंक १ ) जानेवारी ते मार्च १९७७ च्या अंकात ते प्रथम प्रसिद्ध झाले आहे. (पृ. ४८-४९ ) श्री. पिंजन यांनी हे पत्र ११ जुलै, १९२३ रोजी लिहिलेले आहे आणि त्याची मूळ प्रत डॉ. आर. एम. पाटील यांनी त्यांच्या संग्रहातून डॉ. बाबा आढाव यांना उद्धृत करण्यास अनुमती दिली होती. नारायण महादेव ऊर्फ मामा परमानंद यांनी बडोद्याचे दिवाण रामचंद्र विठोबा धामणसकर यांना जोतीरावांसंबंधी लिहिलेली तीन पत्रे मामा परमानंदांचे चरित्रकार श्री. पु. बा. कुलकर्णी यांच्या “मामा परमानंद आणि त्यांचा कालखंड” या १९६३ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातून (पृ. ४८३-४८७) घेतलेली आहेत. जोतीराव पक्षघाताने आजारी असताना त्यांनी चाळीस वर्षे सातत्याने केलेल्या सार्वजनिक कार्याबद्दल त्यांना बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दरमहा तीस रुपये द्यावेत असे मामा परमानंदांनी बडोद्याचे दिवाण रामचंद्र विठोबा धामणसकर यांना लिहिलेले आढळते. एका समकालीन सुधारकाने जोतीरावांच्या कार्याबद्दल व्यक्त केलेले मत या दृष्टीने मामा परमानंदांचे ३१ जुलै, १८९० चे पत्र महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने मामा परमानंदांनी केलेली सूचना सयाजीराव गायकवाडांच्या विचाराधीन असतानाच जोतीरावांचे निधन झाले. जोतीरावांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाई हयात असेपर्यंत आणि यशवंतराव फुले यांचे शिक्षण पुरे होईपर्यंत सयाजीराव गायकवाड दरमहा काही रक्कम सावित्रीबाईंना पाठवीत असत.<noinclude></noinclude> qvndfpexie4uepcxoyxlhiynxnf075o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५७ 104 105375 231746 213688 2026-06-10T16:09:14Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७५७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213688 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="QueerEcofeminist" /></noinclude><noinclude></noinclude> 6mlrg7ulygc335wsw2ucniib5cytmfy पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५८ 104 105376 231747 213689 2026-06-10T16:09:16Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७५८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213689 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>सत्यशोधक समाजाची स्थापना २४-९-१८७३ तुकाराम हनमंत पिंजन वाचून सत्यशोधक समाज स्थापन होण्यापूर्वी काही महिने अगोदर जुना गंज पुणे येथे बाणेकराचे तालमीच्या दक्षिण बाजूचे चौकात तुकाराम नाईकाच्या दुमजली घर नं. ५२७ यांत कैलासवासी धर्मतत्त्वज्ञ जोतीराव गोविंदराव फुल्यांच्या मुशी विकण्याचे दुकानात दीवे लागल्यावर पुष्कळ मंडळी जमत असे. त्यातून रामशेट उरवणे (आडते), विठोबा गुठाळ (आडते ), कुशाबा माळी, नानाच्या पेठेतील कबीरपंथी मठातील ज्ञानगिरी बुवा, धोंडीराम कुंभार, ग्यानोबा झगडे माळी (मीस्त्री), रामचंद्र व कृष्णराव भालेकर, विनायकराव बाबाजी (ब्राह्मणेतर म्याट्रीक), बाबाजी मनाजी (कोच बिल्डर), तुकाराम हनमंत पिंजन ( विद्यार्थी) हे नित्य रविवारी येत असत. ज्ञानगिरी कबीराने केलेल्या बीजक ग्रंथातील बीप्रमती भाग जमलेल्या मंडळीस बुवा दाखवीत. बीजक ग्रंथ ब्रीज भाषेत असल्यामुळे बीप्रमती भागाचा ज्ञानगिरी बुवा मराठीत तर्जुमा करून मंडळीस सांगत असत. त्यात ब्राह्मणाच्या स्वार्थाचे, स्वभावाचे, वर्तणूक वगैरेचे फार वर्णन आहे. हे ब्राह्मणाचे गुण जोतीरावांस चांगले अवगत होते. अगोदर त्यांनी स्त्री शिक्षणाच्या व महारामांगाच्या शाळा घातल्या होत्या. ब्राह्मणात पुनर्विवाहाची चाल त्यांच्याकडून सुरू झाली. सुतीकागृह तर त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात त्यांच्या घरी होते. ब्राह्मण विधवेपासून झालेला चारपाच वर्षाचा शांताराम नावाचा मुलगा त्यांचेजवळ होता. तो मयत झाल्यावर ब्राह्मण विधवेचा यशवंतराव नावाचा दुसरा मुलगा त्यांचेजवळ होता. त्यास, ससाण्याने आपली मुलगी सत्यशोधक समाज स्थापन झाल्यावर काही दिवसांनी दिली. या संस्था त्यांनी उदयास आणल्या तरी त्यांची मनोवृत्ती स्वस्थ राहिली नाही. ते हमेशा म्हणत कीं, ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांचे अतिशय नुकसान केले, त्यातून बीप्रमतीतील ब्राह्मणांच्या गुणवर्णनाची त्यास पुष्टी मिळाल्यावर ब्राह्मणांपासून ब्राह्मणेतरांची सुटका कशी होईल, हे विचार त्यांच्या मनांत खेळू लागले. ते म्हणत की, माझ्या एकट्याच्याने ब्राह्मणेतरांची ब्राह्मणांपासून सुटका होणार नाही. मला मंडळी साह्य होईल तर काही करता येईल. त्यावरून जमत<noinclude></noinclude> 1w3pcfur4uj8vfb2o7gojaf6rvj7icy पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५९ 104 105377 231748 213690 2026-06-10T16:09:17Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७५९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७५९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213690 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>७१८ महात्मा फुले : समग्र वाङ्मय असलेल्या मंडळीने त्यास साह्य करण्याचे आश्वासन दिले. नंतर त्याने विवक्षित मंडळ स्थापन करून त्या मंडळास एक नाव द्यावे असे सर्वानुमताने ठरविले. या मंडळीस कोणते नाव द्यावे असेबद्दल मंडळीत बरीच वाटाघाट झाली. शेवटी सत् = खरे, शोधक = तपास करणारा, मंडळ = समाज, म्हणजे सत्याचा तपास करणारा समाज असे नाव देण्याचे ठरून तारीख २४ माहे सप्तंबर सन १८७३ रोजी सत्यशोधक समाज स्थापन झाला. त्याची प्रतिज्ञा म्हणजे तळी उचलून त्यातील भंडार व गुलाल कपाळास लावण्याचा संस्कार - जो कोणी समाजीयन होई त्याचे नाव रजिस्टर ( नोंदणी) बुकात दाखल करीत असत. समाज स्थापन झाला त्या दिवशी माडीवर फार गर्दी झाली होती व पुष्कळ लोक समाजीयन झाले होते. त्यानंतर मंडळीने समाजाचा झेंडा मिरविला व कार्तीकमाशी जोतीरावाने व समाजीयन लोकांनी ब्राह्मणाशिवाय तुळशीची लग्ने लावली. F<noinclude></noinclude> bnntxtcib0ri8f3dicb9dvaz3m0d577 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६० 104 105378 231749 213691 2026-06-10T16:09:19Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७६०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213691 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट - २ : महात्मा यांच्याविषयीचा पत्रव्यवहार Private. ७१९ MAMA'S LETTERS (1) Bombay, 31st July 1890. Dear Ramchandrarao, I duly. received your last. If I had not been overtaken by this relapse the letters would probably have appeared in reprint by this time. But as it is, I regret some more delay must occur as I have to write one more letter and to revise some of the old ones. For translating lawbooks I would recommend Mr. Laxman Krishnaji Nulkar, B.A., L.L. B. eldest son of Hon. Nulkar now practising in the Poona Courts. Being a junior, he will be able to give the work better time and attention than older people and as I think he is also competent, he may be tried on one of the books to begin with. For terms his father may be written to. I enclose petition of Jotiba for support of his family. Please read it and if you think it requires change in any portion or as to form please return it with the suggestion when it will be revised and sent back for submission to H. H. personally by yourself. I suppose it will do as it stands. The bare statement of public objects to which Jotiba has devoted his life is not calculated to present an impressive picture of the earnest and troublous period through which he passed or the disinterested nature of his labours. But I trust His Highness will appreciate them as they deserve for a Maratha to have educated his wife and attempted through her to instruct the daughters of Brah- mins and that too at their headquarters was a venturous task enough. But to have opened schools for Mahars and Mangs and to treat them as members of society in the same quarters was like bearding the lion in his own den. Yet Jotiba did it with the aid of two Brah- min friends one of whom turned a renegade and has died but the other is living and still faithful to him and his views; and it is he who though himself in poor circumstances is printing in his press Jotiba's book at his own cost simply to gratify the last wish of his old friend. Jotiba might have, if he had not thus neglected his worldly interests, made money and by this time would have been indepen-<noinclude></noinclude> j2jd0feksok1ai9sjhcl4tjdxkyp085 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६१ 104 105379 231750 213692 2026-06-10T16:09:20Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७६१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213692 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>७२० महात्मा फुले : समग्र वाङ्मय dent and comfortable. But he chose otherwise and served public in- terest at the cost of his own. There was another rare virtue which he showed. Young, healthy, handsome-looking and of an agreeable presence, he became an object of unhallowed desire to some women of easy virtue who trust themselves on him; but the old adage runs and like a true hero, he cast them aside and remained pure in the presence of so much temptation. His fatherly care for years of erring high caste widows and generous relief and rescue from the crime of child murder was also a work of self-sacrificing humanity. His last and greatest public service is connected with what he calls the eman- cipation of the Maratha mind. To this he devoted his later life and for it he wrote, preached, spoke, sang and voted as he preached and it is to his single exertions, I believe that the Maratha element in the Deccan and elsewhere shows that consciousness of its wrongs, its desire for amelioration and freedom from implicit submission to the higher castes merely as such which did not exist before. If you rec- ollect and compare what you heard and saw 25 years ago, with what you do now regarding this matter I think you will agree with me. The creation of such a spirit ought to be welcomed in these days of a general desire for progress; but it is just this part of J.'s work which has served to discredit him with the higher classes and led to a for- getfulness of all his previous good offices. This was partly natural but unluckily J. aggravated it by the use of harsh language. He had some excuse, however, in his higher caste friends and fellow-Advo- cates of reform turning their back on it and also in invidius advice proceeding from a different quarter. A few of his followers too with- out his excuses or his powers have copied his mistakes and thus thrown dirt on his life's good work. But in questions involving party interests and feelings this kind of thing is unavoidable and most of J.'s critics are doing just what he did where they think they are simi- larly situated. J.'s fault then is not quite inexcusable and it cannot be held to nullify all his good work or justify his neglect in his day of suffering indigence and old age when he deserves the gratitude of the public. He has however, no opulent friends to support him and he cannot go about begging for aid from the public when in his prostration he is forgotten by it nor indeed would he seek help even in high places where there is no intelligent appreciation of his work, but has appealed to the only quarter where such appreciation exists and this is no longer age of flattery. Of course, I cannot and do not wish H. H. to be, much less to appear a partisan on any side but he<noinclude></noinclude> nd67671b6ynkkb9fmtptd1wgox0lncc पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६२ 104 105380 231751 213693 2026-06-10T16:09:22Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७६२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213693 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट-२ : महात्मा यांच्याविषयीचा पत्रव्यवहार ७२१ can, while disclaiming any sympathy with misguided or sectarian views. or offensive language and simply in recognition of his disinterested and self sacrificing work, bestow a maintenance for life on J. and his wife for the woman deserves even more than the man for co-operat- ing with her husband and suffering with him in that work in a man- ner not yet witnessed in the highest educated of the higher castes. Services like theirs indeed deserve well of the State; but the British Government is foreign and cannot be expected to put their hands to such matters. But an example is not wanting. When the late Dr. Bhau Daji was prostrated by illness he was given a pension of Rs. 100 a month by the First Sir Salar Jung; yet the Doctor had always fol- lowed his own business and devoted his leisure and spare means to public affairs and his want of means was due to share mania even then his conduct was rare and creditable; but the Hyderabad State owed him no special debt. The pension however, was robly given to a worthy man of public spirit; and I submit this example may well be followed here; what is wanted is an allowance say of Rs. 30 per month to be begun now and continued during the lifetime of J. and his wife, to be reduced on the death of either and stopped on the decease of the survivor and the completion of their son's education. None of these events can now be postponed indefinitely and so the expenditure will neither be heavy nor continued very long. This then is all that is desired. One word more and I have done. Dr. Vishram Ghole, who attends free of charge, and being a friend is acquainted with his condition, appeared to have written to Mr. Pestonji on behalf of him. What he wrote and what he asked I do not know, but I am told of this reply being sent. "H. H. said there are many such applicants and he cannot promise any thing just yet. He might do some time hence". I trust however this will be reconsidered and what is intended to be done would be done at once after what I have said above. I hope, it will be seen that there are not many appli- cants like J. In fact there is not a second and delay in his case, prostrated as he is, might frustrate intended kindness. I have trusted to dictation in writing the above as I cannot look at paper, so you must overlook any slips therein and scorings and interlineations since I am not accustomed to dictate. Yours sincerely, N. M. Paramanand. एच-२२ ४९ (2)<noinclude></noinclude> lzqai5o1b14lxdf2ffe1t8ve0kyidik पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६३ 104 105381 231752 213694 2026-06-10T16:09:24Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७६३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213694 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>७२२ Private. महात्मा फुले : समग्र वाङ्मय My dear Ramchandrarao, Bombay, 19th August 1890. Dr. Babu has already sent you Jotiba's petition and the first part of my letter about it. I now enclose completion of the letter and will thank you for a line in acknowledgement and say when you are likely to go to Baroda. I suppose you consider the petition to be all right. If any remarks in my letter about it appear objectionable, please score them out. I have written the letter because I think it needful to explain the full value of J.'s services but part of the remarks may be misconstrued by some people and so I have marked it Private. This slip, however, is only between us. The petition is inoffensively worded and its prayer can be granted on the simple ground of the man's self- sacrificing work of many years and his present needs which are real. There is thus no cause for party feeling and I am anxious that compliance with the prayer should not give the slightest ground for anybody to interpret such a concession as being due to H. H.'s leaning towards any class because the applicant in this case happens to be a Maratha. But otherwise Baroda, which has lavished its money, the fruit of the ryots toil on all sorts of Brahmans, good, bad and indifferent, may well spare some of it, on a deserving non-Brahman and one of the producing class. I plead for J. because with all his faults I think he richly deserves help. But for my premature break down I might probably have given him some small regular help, but it is no use mentioning an intention which cannot be carried out. However, the next best service I can do is to procure help for him and this is the reason why I have taken the liberty of thus interesting myself on his behalf. Private friends as I have already told you in the letter sent to you by Dr. Babu can only give temporary help. So I look to H.H. for a regular provision for the worthy pair. We are sorry to learn that Fattesing Maharaj is unwell and hope that change to Bombay will do him good. Yours sincerely, N. M. Paramanand. (3)<noinclude></noinclude> 6rjh3p8n6zc0jaq1yvny7rsptcss0o3 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६४ 104 105382 231753 213695 2026-06-10T16:09:26Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७६४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213695 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट-२ : महात्मा यांच्याविषयीचा पत्रव्यवहार ७२३ 1890. Dear Ramchandrarao, In my long letter to you about poor Jotiba's petition of July, I stated that if compliance was long deferred, it might prove too late, but even I did not then fear his end would come so soon as it has as you must have seen in yesterday's Subodh Patrika. However, as the good soul did not care its own comfort but that of his devoted wife and the adopted boy, there is yet time for giving relief if H. H. could be induced to do it. If there be no other means what might be done is that the petition with both my letters to you might be shown to H. H. the shorter one in the strictest confidence as early as pos- sible. But I fancy this cannot be before Vinayakrao rejoins his duty. If any other course is posible please think of it. Meantime, an at- tempt would be made to collect another small sum for the family's use. The object of Jotiba as stated above must be specially explained verbally. Yours sincerely, N. M. Paramanand. समाप्त<noinclude></noinclude> jszhq1w70638r3qktizpqutdc2xsz7e पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६५ 104 105383 231754 213696 2026-06-10T16:09:27Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७६५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213696 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="QueerEcofeminist" /></noinclude><noinclude></noinclude> 6mlrg7ulygc335wsw2ucniib5cytmfy पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६६ 104 105384 231755 213697 2026-06-10T16:09:29Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७६६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213697 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट ३ महात्मा जोतीराव फुले यांच्यासंबंधीचे मृत्युलेख<noinclude></noinclude> ae43fleitub3zaa1hhstv08si7lp29h पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६७ 104 105385 231756 213698 2026-06-10T16:09:31Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७६७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213698 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="QueerEcofeminist" /></noinclude><noinclude></noinclude> 6mlrg7ulygc335wsw2ucniib5cytmfy पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६८ 104 105386 231757 213699 2026-06-10T16:09:32Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७६८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213699 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट ३ महात्मा जोतीराव फुले यांच्यासंबंधीचे मृत्युलेख जोतीरावांच्या मृत्यूनंतर समकालीनांनी त्यांच्या जीवनकार्याचे कसे मूल्यमापन केले हे जाणण्याचे प्रस्तुत आवृत्तीच्या संपादकाला कुतूहल होते. गेल्या शतकातील वृत्तपत्रांच्या संचिका चाळताना “केसरी” व “सुधारक" या विख्यात साप्ताहिकांनी जोतीरावांच्या मृत्यूची दखलही घेतली नाही असे दिसले. मुंबईच्या इंदुप्रकाशने जोतीरावांच्या मृत्यूनंतर काही आठवड्यांनी एक स्फुटलेख लिहिला. "बडोदावत्सल" हे सत्यशोधक विचारसरणीचे साप्ताहिक होते. त्यातील तसेच ज्ञानोदयातील मृत्युलेखात जोतीरावांच्या कार्याचा गौरव केलेला आढळतो. जोतीरावांचे स्नेही बाबा पदमनजी यांनी जोतीराव पक्षघाताने आजारी असताना त्यांची भेट घेतली होती. त्या भेटीची आठवण त्यांनी मृत्युलेखात सांगितली आहे DOO<noinclude></noinclude> 9s99ydssvs8t6enck4wnvhufbz6ylms पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६९ 104 105387 231758 213700 2026-06-10T16:09:34Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७६९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213700 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="QueerEcofeminist" /></noinclude><noinclude></noinclude> 6mlrg7ulygc335wsw2ucniib5cytmfy पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७० 104 105388 231759 213701 2026-06-10T16:09:35Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७७०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213701 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>बडोदावत्सल : ७ डिसेंबर १८९० मे. जोतीराव गोविंदराव फुले यांचा मृत्यू पुणे येथील प्रसिद्ध मे. जोतीराव गोविंदराव फुले यांस ता. २७ नोव्हेंबर गुरुवार रोजी रात्रौ दोन वाजता देवाज्ञा झाली. हे वर्तमान ऐकून त्यांच्या इष्टमित्रांस, हितचिंतकांस व मुख्यत्वेकरून सत्यशोधक समाजाचे सर्व अनुयायांस फार वाईट वाटणार आहे. मे. जोतीराव हे पक्षघाताच्या व्याधीने आज बरेच दिवसांपासून आजारी होते व शेवटी त्यातच त्यांचा अंत झाला. जोतीरावांचे नाव या जगात त्यांच्यामागे चिरकाल राहील अशी त्यांनी अनेक परोपकाराची वगैरे कृत्ये करून ठेविली आहेत व हल्ली ती मोठ्या झपाट्याने वृद्धीही पावत आहेत. पुण्यास स्त्री शिक्षणास प्रथम आरंभ जोतीरावांनी केला. त्या कामात त्याजवर जरी अनेक संकटे आली तरी बिलकुल न डगमगता दीर्घ प्रयत्न करून स्त्री शिक्षणाचे काम पुढे आबाद चालेल अशी व्यवस्था लावून दिली. त्याचप्रमाणे महार-मांग, चांभार वगैरे वर्गातील लोकांस शिक्षण देण्यास प्रथमतः जोतीरावांनीच आरंभ केला. दीनबंधु वर्तमानपत्र सुरू करण्यात जे कित्येक पुढारी होते त्यात जोतीराव हे एक मुख्य होत. यांनी कित्येक ब्राह्मण मंडळींवर आपला पगडा बसविण्याकरिता "सत्यशोधक समाज" स्थापन केला. या समाजाच्या आज शेकडो शाखा सर्व देशभर स्थापन झाल्या असून या समाजाने आपले इच्छित काम आजमितीस जितके केले आहे तितके इतर कोणत्याही समाजाने केलेले नाही असे त्याच्या चालू स्थितीवरून वाटते. जोतीराव हे चांगले लेखक असून कवित्वाचे अंगही त्यांस बरेच होते. त्यांनी निरनिराळ्या विषयांवर अनेक अखंड लिहिले आहेत. त्यांची सर्व कवने एकत्र करून जर "जोतीबाची गाथा" या नावाने एक ग्रंथ कोणी बाहेर पाडील तर जोतीरावांचे लेख कायम राहून लोकांसही फार उपयोग होणार आहे. जोतीराव यांस एक मुलगा आहे. तो हल्ली इंग्रजी शिकत आहे. जोतीरावांनी आपल्या हयातींत जी एकंदर कृत्ये करून ठेविली आहेत त्यावरून त्यांस हिंदुस्थानातील लुथर म्हणण्यास हरकत नाही. मरणसमयी त्यांचे वय ६५ वर्षांचे होते. या दृढनिश्चयी पुरुषाने शेवटपर्यंत आपले व्रत एकनिष्ठपणे चालविले याबद्दल त्यांचे द्वेष्टेच त्यांची स्तुती करू लागले आहेत. “निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेचि फळ" या साधोक्तीनुरूप सज्जनांकडून त्यांची स्तुती होणेच अवश्य आहे. ईश्वर जोतीरावांच्या आत्म्यास शांती देवो. DOO<noinclude></noinclude> 349bjr2to2gqn9mfvoun4fn8l8osn3c पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७१ 104 105389 231760 213702 2026-06-10T16:09:37Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७७१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213702 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>७३० २. ज्ञानोदय १८ डिसेंबर १८९० महात्मा फुले : समग्र वाङ्मय रा. रा. जोतीराव गोविंदराव फुले यांचा मृत्यू THE LATE JOTIRAO GOVINDRAO PHOOLE सुबोध पत्रिकेवरून असे कळते की, रा. रा. जोतीराव गोविंदराव फुले हे गेल्या शुक्रवारी रात्री पहाटेस दोन वाजता परलोकवासी झाले. हे वर्तमान ऐकून त्यांच्या इष्ट मित्रांस व इतर पुष्कळ लोकांस वाईट वाटल्यावाचून राहणार नाही. त्यांचा जन्म पुण्यास होऊन त्यांनी आपले आयुष्यही पुण्यातच घालविले. मरणसमयी त्यांचे वय सुमारे ६५ वर्षांवर होते. रा. रा. जोतीराव हे जातीचे माळी असून त्यांचे फुले घराणे त्यांच्या जातीत श्रीमान, वजनदार व प्रमुख मानिले जात होते. त्यांच्या वडिलांनी रा. रा. जोतीराव यास प्रथम मराठी शिक्षण देऊन पुण्यातील इंग्रजी शाळेत इंग्रजी शिकावयास घातले. त्यांच्या योगाने त्यांचे विचार व ज्ञान बरेच वाढले व त्यांच्या मनात आपल्या देशाविषयी व देशबांधवांविषयी कळकळ उत्पन्न झाली. आपल्या देशाचे हित कधी होणे असले तर ते स्त्रियास व शेतकरी वगैरे खालच्या प्रतीच्या बहुजन समाजास शिक्षण मिळाल्यावाचून व्हावयाचे नाही. असा त्यांचा विचार ठरून त्यांनी या कामास सन १८४८ साली आरंभ करून बुधवार पेठेत मुलींकरिता एक शाळा स्थापन केली. त्या शाळेत मुली येतील असे करून त्यास शिकविण्याकरिता ते आपण स्वत: जाऊन आपल्या कुटुंबासही पाठवीत असत. या शाळेच्या स्थापनेने गावात लोक अगदी खवळून गेले. रा. रा. जोतीराव यांची पत्नी शाळेत जात असता त्या बाईस लोकांनी खडे व दगड मारावे. गावातील ब्राह्मण मंडळी येथेच न थांबता त्यांनी जोतीराव यांच्या वडिलांस कळवून तो उद्योग बंद पाडण्याच्या हेतूने आपल्या मुलास त्यांच्याकडून घरातून घालवून देण्याचा प्रयत्न केला. गोविंदराव यांनी लोकांच्या आग्रहामुळे जोतीराव व त्यांचे कुटुंब यास फक्त अंगावरच्या वस्त्रानिशी घरातून घालवून दिले. तथापि तो पुरुष डगमगला नाही. त्या शाळेचा खर्च आरंभी त्यांचे मित्रमंडळांनी चालविला. पुढे त्यांनी या स्त्री शिक्षणाच्या कामाकरिता युरोपियन व एतद्देशीय गृहस्थांस पत्रे लिहून त्याजकडून द्रव्य साहाय्य मिळविले. शेवटी नुकतीच स्थापन झालेली दक्षणा प्राईज कमिटी या मंडळीकडून दरमहा पाऊणशे रुपये मिळू लागले. हे काम सरासरी नीट चाललेसे पाहून त्यांनी आपले लक्ष थोडे कमी करून दुसऱ्या उद्योगास हात घातला.<noinclude></noinclude> anl52e0v7rfd29oc3gyf4wgbua1xkpv पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७२ 104 105390 231761 213703 2026-06-10T16:09:39Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७७२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213703 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट-३ : महात्मा जोतीराव फुले यांच्यासंबंधीचे मृत्युलेख ७३१ स्त्रीशिक्षणाप्रमाणेच इतर नीच मानिलेल्या लोकांच्या शिक्षणाची त्यांस आस्था वाटत असे म्हणून त्यांनी अगदी खालच्या प्रतीचे महार, मांग, चांभार वगैरे लोकांच्या शिक्षणाच्या कामीही बरीच खटपट सुरू केली. त्यावरून महार, मांगाच्या मुलांस व मुलीस शिकविण्याचे काम बरेच सुरू झाले. रा. रा. जोतीराव यांस सन १८५२ साली पुण्यात सभा भरवून विश्रामबागच्या वाड्यांत समारंभाने दोनशे रुपयांची शालजोडी बक्षीस दिली. नंतर पुण्यातील मिशनरीनी त्यांस आपल्या ख्रिस्ती मुलींच्या शिक्षणाच्या कामावर पगार देऊन नेमिले. येथे कामावर असता त्यांनी मिशनरी लोकांच्या सूचनेवरून ख्रिस्तीधर्माकडे विशेष लक्ष पुरविले. ते स्वर्गीय राज्याच्या अगदी जवळ पोहोचले. पण त्यांनी सत्याचा प्रकाश सर्वस्वी स्वीकारला नाही ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. ब्राह्मण आयते खाणारे व धर्म व्यवहारासंबंधाने त्रास देणारे असे वाटून त्यांचे मन त्यांजविषयी नाखूष होत जाऊन अखेरीस त्यांनी सत्य समाज म्हणून एक स्वतंत्र पंथ स्थापन करण्याचा उद्योग सुरू केला. अलिकडे त्यांनी काही पुस्तके लिहिली व कवने केली. त्यांत त्यांच्या मताचा कडकपणा नजरेस पडतो. शेणवी जातीत जो पहिला पुनर्विवाह झाला तो प्रथम पुण्यात केवळ रा र जोतीराव यांच्या मदतीनेच झाला. तसेच ब्राह्मण विधवा स्त्रियांचे पाऊल वाकडे पडून जे अनाचार होत असत ते होऊं न्येत म्हणून त्यांनी आपल्या येथे कित्येक दिवस स्वत:च्या खर्चाने अशा बायांची गुप्तपणे सर्व प्रकारची तजवीज व्हावी अशी योजना केली होती. याप्रमाणे रा. जोतीराव यांनी आपले आयुष्य आपल्या समजुतीप्रमाणे स्वदेशसेवेत सरकारी चाकरांची किंवा लोकांच्या विरोधाची पर्वा न करिता घालविले. असे निश्चयाचे व कळकळीचे पुरुष आपल्यांत हल्ली क्वचितच सांपडतील. मयत रा. रा. जोतीराव गोविंदराव फुले यांच्या अंत्यक्रियेविषयी दीनबंधूवरून असे कळते की, 'तीन वर्षामागे त्यांस अर्धांगवायूचा जरी आजार झाला होता तरी दीन झालेल्या मानव बांधवांचे कल्याणार्थ उद्योग करण्याचे काम त्यांनी हातातून सोडले नाही.' परंतु अलिकडे तीन महिन्यांत त्यांस एक प्रकारचे मोठे गोळे येऊन त्यांच्या योगाने जे श्रम झाले त्यामुळे त्यांचे प्रकृतीचे मान फारच बिघडले होते. तथापि ते सर्व सहन करीत व मधून मधून आम्हा सर्वांस फार धीर देत. ही सर्व स्थिती ता. २६ पर्यंत चालली; परंतु त्यादिवशी त्यांनी सुमारे बारावर पाच वाजता घरातील सर्व मंडळीस बोलावून त्यांच्या तोंडावरून हात फिरविला व नंतर ईश्वराने मला ह्या आजारातून सत्वर सोडवून जल्दी जवळ घ्यावे ह्याविषयी मनात प्रार्थना केली. नंतर आपल्या पत्नीस थोडा हितोपदेश सांगून रात्री बारावर दोन वाजता प्राणोत्कमण केले. प्रेत नदीवर नेले.<noinclude></noinclude> ffvz3priubmvj0hgqzli1b9u2ixawiz पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७३ 104 105391 231762 213704 2026-06-10T16:09:40Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७७३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213704 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>७३२ महात्मा फुले : समग्र वाङ्मय त्यावेळी रा. रा. भाऊ कोंडाजी पाटील डुमरे यांनी जमलेल्या लोकांसमोर असे भाषण केले की, “मित्रहो, आज हजारो वर्षे पीडित असलेल्या आपणां दीन, शूद्रादी अतिशूद्र बंधूस मानवी अधिकार मिळावा यास्तव ज्या परम आणि थोर गृहस्थाने काया, वाचा, मने आदीकरून श्रम केले; ज्याने आपल्या लोकांसाठी आपले सर्व आयुष्य खर्ची घातले त्या गृहस्थाचा सृष्टी नियमाप्रमाणे आज अंत झाला खरा." परंतु त्यांची किर्तीरूपी ध्वजा फारच फडकली आहे. “मित्रहो ! सृष्टी नियमाप्रमाणे आपणापैकी काही जणास यांच्या कर्तृत्वाचे माहात्म्य व यांचे उपकार जरी अज्ञान अंध:कारामुळे सध्या काही वाटत नाहीत तरी ते 'लोक' जेव्हा सत्यशोध करू लागतील तेव्हा खरोखर त्यांची त्याविषयी पक्की खात्री होईल. त्यांच्या डोळ्यातून अश्रुपातही होतील. तर आपण यांचे हे उपकार नित्य स्मरणात ठेवावे. इतके सांगून मी पुरे करतो." प्रार्थना आटोपल्यानंतर बारा वाजता प्रेतदहन केले. तद्नंतर 'ज्याचे होते त्याने नेले' ही तुकोक्ती सत्य मानून मंडळी घरी परतली. नंतर तिसऱ्या दिवशी अस्थी काढून आणून त्या मोठ्या समारंभाने वाजत-गाजत पालखीत आणल्या व त्यांच्या इच्छेप्रमाणे घरात जी समाधी स्थापन केली होती तीत त्या ठेवून सरतेशेवटी सत्यशोधक समाजाचा जयघोष करून मंडळी घरोघर गेली. ३. अनुभव संग्रह (१८९५) बाबा पदमनजी मि. जोतीबा फुले ह्यांचे मरण : * ३१ नोवेंबर १८९० पुण्यांतील प्रसिद्ध रा. जोतीबा फुले हे या महिन्याच्या २८ व्या तारखेस मरण पावले. गेल्या ऑक्टोबर महिन्यांत मी पुण्यास असता त्यांस भेटायास गेलो होतो. त्यांनी मनापासून माझा आदरसत्कार केला. त्याला पक्षवायु झाला असून स्वत: उठून बसण्याची शक्ति नव्हती. मी त्यांस त्यांच्या आत्मिक स्थितीविषयी विचारले. ते म्हणाले की, मी कोणाचे काही वाईट केले नाही; देव मला जवळ घेईल. मी जे काही केले ते त्यास संतोष होण्याजोगे होते, असंतुष्ट होण्यासारखे काही नव्हते. मी त्याला देवाची पवित्रता व न्यायीपण याविषयी बोललो आणि न्यायाच्या दिवशी देव जेव्हा आम्हांस हजार प्रश्न विचारील तेव्हा त्यांतील एकाचेही उत्तर आमच्याने देववणार * हा मुद्रण दोष असावा. येथे ३० असे असावयास पाहिजे.<noinclude></noinclude> kaesudsyq1y17shrac1iuggvpx0mhlz पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७४ 104 105392 231763 213705 2026-06-10T16:09:42Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७७४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213705 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट-३ : महात्मा जोतीराव फुले यांच्यासंबंधीचे मृत्युलेख ७३३ नाही. आणि ख्रिस्ताच्या द्वारे देव आमच्या पापाची क्षमा कशी करतो हेहि सांगितले. त्यांस ख्रिस्ती धर्माविषयी पुष्कळ ज्ञान होते, ते त्यास त्यांचे जुने मित्र रे. जेम्स मिचेल वा डॉ. मरे मिचेल व त्यांची पत्नी ह्यांपासून प्राप्त झाले होते. डॉ. मिचेलसाहेब ह्यांनी तर थोड्या महिन्यामागे स्कॉटलंडातून त्यांस एक पत्र पाठवून त्यात त्यांच्या आत्म्याच्या कल्याणाची कळकळ दर्शविली होती. मी आपल्या बायकोच्या मरणाविषयी एक ट्राक्ट छापले आहे असे त्यांनी ऐकल्यावरून ते त्यांनी मजपाशी मांगितले व ते मी त्याला पाठविले. ते वाचून त्यांच्या मनावर काय परिणाम झाला हे सांगवत नाही, परंतु ह्या शेवटच्या भेटीच्या वेळेस आपणांस ते फार आवडले असे त्यांनी बोलून दाखविले. हे गृहस्थ पुष्कळ वर्षामागे महार, मांग लोकांच्या सुधारणुकीचे मोठे पुढारी होते. नंतर त्यांस सोडून शूद्र वगैरे जातीचे कैवारी झाले. ते ब्राह्मणांचे अत्यंत द्वेष्टे होते. त्यांनी त्यांच्याविरुद्ध कित्येक पुस्तकेही लिहिली आहेत. ४. इंदु प्रकाश DOO २९ डिसेंबर १८९० : स्फुट : रा. रा. जोती गोविंदराव फुले हे निवर्तले हे ऐकून आम्हांला फार वाईट वाटते. हे मोठे उद्योगी होते आणि बुद्धिवानही होते. पण त्यांच्या बुद्धित असे वेड शिरले होते की ह्या देशांतल्या ब्राह्मणांनी आपल्या कल्याणाकरिता अन्य जातीच्या लोकांस अज्ञानांत ठेवून बुडविले आहे; आणि अन्य जातीचे लोक सर्व प्रकारी जे फार मागासले आहेत त्यांस कारण ब्राह्मणांचे कपट आहे. पण हा भ्रम होता. ह्या भ्रमाने त्यांचे मन भ्रमिष्ट झाले होते; आणि त्यामुळे ते ब्राह्मणाकडे द्वेषबुद्धीने पाहत असत, आणखी ब्राह्मणांस शिव्याशाप देणे हे मोठे पुण्य मानीत असत. आणखी एका वर्तमानपत्रकर्त्याने असे म्हटले आहे की, सध्या ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यामध्ये जे काय वैमनस्य दिसत आहे ते उत्पन्न होण्यास आणि वाढण्यास कारण हे फुले होत. हे सगळे म्हणणे आम्हांस संमत नाही. लोकांची फूटाफूट करून ठेवावी; म्हणजे त्याजवर राज्य चालविण्यास सोपे जाते असा जो एक सिद्धांत सध्याच्या राज्यकर्त्यांच्या शास्त्रांत बसलेला आढळतो त्याचेही कर्तृत्व ह्यामध्ये बरेच असावे असा आमचा अजमास आहे. पण हे सगळे कृत्य गुप्तपणे चालले असावे आणि बिचारे फुले हे उघड कारण झाले असावे. असो, इतर जरी कोणतीही गोष्ट ह्या फुल्यांच्या चरित्रापासून दिसली नाही तरी हाती धरलेल्या कामांत दृढनिश्चयाने परिश्रम कसे करावे<noinclude></noinclude> 78mfxtnaj5796wd012zv3b4gmx9cyto पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७५ 104 105393 231764 213706 2026-06-10T16:09:44Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७७५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213706 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>७३४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय ह्याबद्दलचा त्यांचा कित्ता फार चांगला आहे. शिवाय 'निंदकाचे घर असावे शेजारी' असे जे एका नामांकित कवीने म्हटले आहे त्याचा विचार केला म्हणजे एका पक्षी यांच्या मरणाने ब्राह्मण लोकांचे मोठे नुकसान झाले आहे असे आम्ही समजावे. आपल्या जातीच्या हितार्थ हे फुले जसे कायावाचामने करून झटत होते तसे जर इतर जातीचे लोक आपापल्या जातीच्या हितार्थ झटतील आणि त्यांत दुराग्रहाचे काही चालू देणार नाहीत तर त्यापासून अनेक लाभ होण्याची आशा आहे. समाप्त -<noinclude></noinclude> 1xca4p8q4aqgmgh2kpz7ebguvp0r5vf पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७६ 104 105394 231765 213707 2026-06-10T16:09:46Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७७६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213707 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट ४ अस्पृश्यांची कैफियत<noinclude></noinclude> t86g297663v6tjblhri8n5q5o7jukgk पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७७ 104 105395 231766 213708 2026-06-10T16:09:47Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७७७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213708 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="QueerEcofeminist" /></noinclude><noinclude></noinclude> 6mlrg7ulygc335wsw2ucniib5cytmfy पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७८ 104 105396 231767 213709 2026-06-10T16:09:49Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७७८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213709 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट ४ अस्पृश्यांची कैफियत "अस्पृश्यांची कैफियत" या नावाचे एक पुस्तक महात्मा फुल्यांनी लिहिले होते असे फुल्यांचे चरित्रकार पंढरीनाथ पाटील आणि धनंजय कीर यांनी म्हटले आहे. पंढरीनाथ पाटील यांनी फुल्यांचे चरित्र लिहिण्यासाठी जमवलेल्या साधनसामग्रीत 'अस्पृश्यांची कैफियत' चे अपुरे हस्तलिखित आढळले. ते प्रथम प्रा. सीताराम रायकर यांनी “पुरोगामी सत्यशोधक" त्रैमामिकाच्या [ वर्ष ५, अंक २, ३, ४] एप्रिल ते डिसेंबर १९८० च्या अंकात प्रसिद्ध केले. त्यानंतर त्यांचा "महात्मा फुले : समग्र वाङ्मय या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीत समावेश करण्यात आला. ज्यांनी “अस्पृश्यांची कैफियत” चा तृतीयावृत्तीत समावेश केला त्यांनी मुळात प्रा. सीताराम रायकर यांनी या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना नेमकी गाळली. “अस्पृश्यांची कैफियत" जरी प्रा. रायकरांनी प्रथम प्रकाशात आणली तरी ती त्यांना जोतीराव फुल्यांनी लिहिलेली वाटत नाही हे प्रस्तावनेच्या अखेरीस त्यांनी तो लिहिला आहे यावरून स्पष्ट होते. प्रस्तुत आवृत्तीच्या संपादकाचेही प्रा. सीताराम रायकर यांच्या प्रमाणेच मत झाले असल्यामुळे "अस्पृश्यांची कैफियत" चा समावेश चौथ्या आवृत्तीत परिशिष्टात केलेला आहे. प्रा. रायकरांनी प्रस्तावनेच्या अखेरीस लिहिलेला मजकूर खालीलप्रमाणे :- मजकूर "अस्पृश्यांची कैफियत” नावाचे पुस्तक महात्मा जोतीराव फुले यांनी लिहिले होते याबद्दल पाटील आणि कीर यांनी केलेल्या विधानांवर विसंबून प्रस्तुत पुस्तक महात्मा पुस्तक येथे फुले यांनीच लिहिले आहे असे म्हणणे धाष्टर्यांचे होईल. आम्ही हे अभ्यासकांच्या अवलोकनार्थ ठेवीत आहोत. आमच्या मते या पुस्तकाच्या पहिल्या भागात आर्यांच्या आगमनानंतर त्यांनी येथे काय केले, याबद्दलचा मजकूर फुल्यांच्या इतर लिखाणाशी तुलना करता बराचसा विसंगत वाटतो. पुस्तकातील पुनरुक्ती ही कंटाळवाणी व विषय पुढे कसा न्यावा या विवंचनेतून निर्माण झाल्यासारखी वाटते. फुल्यांच्या लिखाणात पुनरुक्ती खूपच आहे. पण एकच मुद्दा अनेक वेळा अनेक ठिकाणी मांडताना ज्या ठाशीवपणे आणि आक्रमकतेने फुले आपला मुद्दा मांडतात त्यांचा अभाव या पुस्तकात आढळतो. येथे आलेले शिक्षणाविषयक विचारही हंटर कमिशनपुढे फुल्यांनी केलेल्या निवेदनाच्या संदर्भात खूपच विसविशीत वाटतात. महात्मा फुले यांच्या नावावर जमा असलेले एक पुस्तक चिकित्सेसाठी आम्ही येथे प्रस्तुत करीत आहोत. एच-२२ ५०<noinclude></noinclude> 7vtj2h39qo3u5s1fg2h5cqwxabi0tt1 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७९ 104 105397 231768 213710 2026-06-10T16:09:51Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७७९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213710 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>७३८ महात्मा फुले : समग्र वाङ्मय "अस्पृश्यांची कैफियत" ज्यांनी तृतीयावृत्तीत समाविष्ट केली त्यांनी प्रा. रायकरांचा नामनिर्देशही केलेला नाही. मग त्यांनी रायकरांनी दिलेल्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले त्यात काहीच नवल नाही. मात्र " महात्मा फुले : समग्र वाङ्मय" या ग्रंथाच्या केवळ तृतीयावृत्तीवर विसंबून राहणाऱ्या वाचकांची त्यामुळे फसगत होण्याची शक्यता त्यांनी लक्षात घेतली नाही. "अस्पृश्यांची कैफियत' या पुस्तकाचे कर्ते महात्मा फुले नसावेत असा निष्कर्ष काढल्यास तो चुकीचा ठरणार नाही. 000<noinclude></noinclude> 1w9rnnehvd12jqafnancha8pvlv2c2y पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८० 104 105398 231769 213711 2026-06-10T16:09:52Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७८०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213711 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>अस्पृश्यांची कैफियत पहिल्या चार परिच्छेदातील मजकूर अगदी तुटक स्वरूपात उपलब्ध आहे. तो येथे शक्य तितका सलग मांडला आहे.) संपादक इत्यादी गोष्टीने राणीसाहेबांचे ह्या देशींचे येणे अशक्य वाटेल खरे; परंतु इतक्याही गोष्टी न जुमानून राणीसाहेब आमच्या भाग्योदयेकरून आल्या असे मानू. ...... राणीसाहेबांचे ह्या देशी आगमन झाल्यावर ते येथे थोडेच ( दिवस राहतील) व तेवढ्या अल्प काळामध्ये त्यात ह्या देशाचे मांडलिक, (सर) दार, नबाब, अमीर, उमराव, आदि करून बडे लो [कांकडून रितीप्रमाणे नजरा ] णे घेऊन त्यांस परत नजराणे देण्याचे काम असतेच. (क) रिता अगोदरच त्यांच्याकरिता रुंद व सुरेख... प्रवास करण्याकरिता आगगाडीचा.. ... आम्हा शूद्र लोकांच्या घरावरून जाऊन. ही गोष्ट फार लांबची मानली पाहिजे.... देशी येतील हे जसे शक्य मानिले तसे......... ....... थोडे दिवस वास्तव करतील. तेवढ्या.उमराव, राजे, मानकरी, इत्यादिका (बरोबर) बोलून त्यांची मने तोषावण्यापुरतादेखील त्यांना नाही मग महार-मांगांच्या गलिच्छ झोपड्यांपुढे एकाएकी गाडी उभी करून युरोपियन व एतद्देशीय अधिकाऱ्यांशी बोलणे टाकून महार-मांगाशी बोलून ते आपल्या थोरपणास बट्टा लावतील असे कदापि घडणे नाहीच. सरदारापासून तो महारांपेक्षाही नीच मनुष्यांशी बोलावे, त्यांची दु:खे समजून घ्यावी, त्यांची वास्तविक स्थिती काय आहे त्याचा शोध करावा, पूर्वजांच्या चालीस अनुसरून असल्यामुळे, त्यांस ह्या राज्यव्यवस्थेमध्ये असूनही काही त्रास व अडचणी सोसावी लागतात किंवा कसे इत्यादी गोष्टींचा विचार करून योग्य उपाय योजावे हे राजाचे किंवा राणीचे कर्तव्य आहे व ह्याच नात्याने आपले कृपाळू राणीसाहेब एका शहरातील महार वाड्यापुढून जात असताना त्यांनी आपली गाडी व आपला सर्व लवाजमा थांबविला आहे व इतक्यात त्या जाग्याच्या आसपास जमलेल्या मोळक्यापैकी दोघे एक महार व एक मांग असे पुढे येतात, त्याचवेळी महाराणीसाहेब व एक स्वदेशभक्त अशा एतद्देशीय कामगारास आपल्यापुढील देखाव्यासंबंधी प्रश्न करीत आहेत व ते त्यांची उत्तरे यथायोग्य व यथाशक्ति देत आहेत अशी आपल्या विषय रचनेकरिता<noinclude></noinclude> 3bkwbh5lfe7n3os51s0zz9uov5z1rvd पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८१ 104 105399 231770 213712 2026-06-10T16:09:54Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७८१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213712 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>७४० महात्मा फुले : समग्र वाङ्मय घटकाभर कल्पना करू. ते दोघेही (महार व मांग) इंग्रेज सरकारच्या दयेने विद्यारूप अलंकाराने भूषविलेले आहेत व त्यास आपल्या योग्यतेप्रमाणे राणीपुढे बोलता येते, हेही आपल्या वरच्या कल्पनेस शोभविण्याकरिता गृहित घेतले पाहिजे. सतत पाश्चिमिक कलेनुरूप बांधलेल्या राजवाड्यात रहात असल्याकारणाने व ह्या देशी आल्यापासून नेहमी त्यांच्या योग्यतेप्रमाणे नेमलेल्या राजमंदिरात रहाणे असल्याकारणाने महार वाड्याचा देखावा पाहून राणीसाहेबांच्या मनात व त्यांच्या बरोबर असणाऱ्या मंडळींच्या मनात काही चमत्कारीक भावना उत्पन्न होईल, व ह्या अशा हलकट, गावापासून निराळे राहणाऱ्या लोकांबद्दल काही हकिगत विचारण्याची उत्कंठा त्यास प्राप्त होईल हे साहजिक आहे. गवताची लहान लहान खोपटी, त्यामध्ये एखादे कौलारु लहानसे घर, प्रत्येक खोपटीच्या पुढे किंवा घराच्या ओमरीवर बसून काम करणारे महार, मांग व त्यांची पोरे, महारणी, मांगणी व त्यांची अज्ञान इकडून तिकडे फिरणारी बालके, इकडून तिकडे काही पंख फडफडीत करून मौजेकरिता फिरणारी व काही भक्ष्य शोधार्थ फिरणारी कोंबडी, धन्याच्या घरापुढे बसलेली व इकडे तिकडे फिरणारी धन्याच्या स्थितीचे वाटेकरी व तद्दर्शक अशी रोड व विश्वासू कुत्री, एखादी म्हैस, एखादी गाय, इकडे तिकडे पडलेले कातड्याचे तुकडे, वाळत घातलेली शिंदीची पाने, काही तयार केलेल्या केरसुणी इत्यादी गोष्टी वस्तूपासून ह्या भागात रहाणारे लोक अगदी दरिद्री असूनही उद्योग करणारे असावेत असा भास सहजच होणार आहे. मागे लिहिल्याप्रमाणे राणीसाहेब वर सांगितलेल्या देखाव्याकडे पाहून त्याबद्दल आपल्या दुभाष्यास प्रश्न करीत आहेत तोच दोघे मोळके आपल्या लाकड्याच्या मोळ्या खाली ठेवून पुढे येतात. त्यांची एकाएकी पुढे जाण्याची छाती होत नाही, तरी वेळ फार थोडी आहे व राणीसाहेब लवकरच निघून जातील असे मनात येऊन ते लवकर पुढे होण्यास झटतात पुढे जाण्यास इच्छितात तोच त्यांची नजर राणीसाहेबांच्या व त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांच्या पोषाखाकडे जाते आणि तशीच आपल्या अनाच्छादित शरीराकडे जाते. आम्ही असे नागवे, आमच्या डोक्यास असे फडके गुंडाळलेले आहे तर आम्ही आमच्या दुर्गंधी शरीराने कसे राणीसाहेबांपुढे उभे रहावे. असे त्यांस काही वेळ वाटू लागले. परंतु आम्ही राणीसाहेबांपाशी जाऊन त्यांच्यापुढे आमचे दुःख निवेदन केल्यास आमच्या सर्व जातीचे कल्याण होण्याचा मंभव आहे, अशा थोर बुद्धीने ते राणीस हेबांच्या काही जवळ जातात तोच त्यास दुभाषी गृहस्थ जवळ येण्यास सांगतात मग ते पुढे जातात तोच त्यास ते गृहस्थ, फुरसतीच्या वेळी<noinclude></noinclude> cw41y2gtmfgp64dak87now5zqaibb2v पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८२ 104 105400 231771 213713 2026-06-10T16:09:55Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७८२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213713 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परिशिष्ट- ४ : अस्पृश्यांची कैफियत ७४१ 'तुम्ही आला तेणे करून बरे झाले. आम्हास तुमची गरज आहे. मेहेरबानगी करून अमची गरज पुरवा. असे त्यास धीर देण्याजोगते शब्द एतद्देशीय मनुष्याच्या तोंडातून ऐकून त्यांस अंमळ धीर येतो व आपले कर्तव्य साधण्याची चांगली संधी आहे असे समजून एक पुढे येऊन उत्तर करितो, "महाराज, आमच्या गरीबाकडून आपले काय होणार आहे ? उलटे आम्ही आपले सहाय्य मागण्याकरिता आलो आहो. आम्ही राणीसाहेबांस आमच्या धर्मापासून कोणते तोटे झाले व धर्माच्या योगाने आमची सध्या कशी स्थिती आहे व पुढे कशी स्थिती होईल याची हकिकत कळविण्याकरिता आलो आहो. आम्ही जे जे सांगू ते ते आपण कृपा करून चक्रवर्ती दयाळू राणीसाहेबांस त्यांच्या भाषेमध्ये कळवावे, त्यांच्या अमूल्य शब्दांनी आम्हा गरीबावर तर काय परंतु हिंदुस्थान देशातल्या सर्व लोकांवर आपले महत् उपकार होतील. ' दुभाषी -- 'ह्यातच आमचे हित आहे. महाराणीसाहेब एथल्या देखाव्याबद्दल काही प्रश्न विचारीत होत्या, त्यांना काही गोष्टी सांगण्याकरिता मला तुमची मदत पहिजे होती. तोच तुम्ही वेळेवर आला. आता मी तुमचे मनोगत कृपाळू चक्रवर्ती महाराणी साहेबांस कळवीन व त्यावर त्यांची मर्जी कशी आहे हे तुम्हास नंतर कळवीन.' दुभाषी ह्यांच्या भाषणात दर्शविल्याप्रमाणे झाल्यावर राणीसाहेब दुभाषी ह्यांस म्हणतात, बादशहाजादी--'आमची मर्जी ह्या दारिद्र्याने ग्रासलेल्या लोकांस स्वतः कळविता येत नाही. म्हणून आम्ही दिलगीर आहो, तरी (दुभाषी ह्याकडे वळून) तुम्ही त्यास आमचे विचार कळविण्याकरिता आहा म्हणून आम्हास आनंद वाटतो. त्यास निर्भयाने त्यांच्या मनातून जो अर्थ करावयाचा किंवा जे काही सांगावयाचे असेल ते यथेष्ट सांगावे, अशा प्रकारचा त्यास आमचा हेतू कळवा. दुभाषी - तुम्ही आता आपला अर्ज सांगण्यास प्रारंभ करा. महार-किंवा मांग-परम कृपाळू, थोर, दयित अशा ह्या आपल्यापुढे मी पामर आपले दुःख वर्णन करण्यास धजतो, तिकडे कळवळीत अंत:करणाने कान द्यावे. महान् महान् विद्वज्जनांनी हिंदुस्थानचे इतिहास लिहिले आहेत. त्यामध्ये त्यांनी आमच्या पूर्व वृत्तांताची कच्ची हकीकत लिहिलीच आहे, महाराणीसाहेबांनी<noinclude></noinclude> hr3o0lps01zlz2ua1wgj9ncjelmdwx5 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८३ 104 105401 231772 213714 2026-06-10T16:09:57Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७८३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213714 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>७४२ महात्मा फुले : सम्ग्र वाङ्मय फुरसतीच्या वेळी जिज्ञासू बुद्धीने ते वाचले असतील. परंतु ज्या लोकांचे तेथे वर्णन केले आहे त्या आम्हास प्रत्यक्ष न पाहिल्या कारणाने, तसेच त्या ठिकाणी आमच्या स्थितीचे पूर्ण वर्णन न दिल्या कारणाने किंवा त्या ठिकाणी आमच्य स्थितीचा खरेपणाच्या भ्रांतीने फार नवल वाटले नसावे व आमच्या खऱ्या हकीकतीचे पूर्ण स्वरूप न दर्शविल्या कारणाने ते स्वरूप आपल्यास समजून घेण्याची आपल्याला उत्कंठा झाली नसेल. आमच्या सुदैवाने व भाग्योदयाने आपण राजमंदिरात विसावा घेण्याचा टाकून राजे लोक व मोठमोठे अधिकारी ह्यांच्याशी राजकारभारासंबंधी मसलत व विचार करणे टाकून, सुंदर रस्त्याने जाणे व नेमलेल्या मंदिरी जाणे टाकून, आपण आम्हा अति दरिद्र्यांच्या भिकार झोपड्यांपुढे उभे राहून आमच्या स्थितीबद्दल दोन शब्द ऐकण्यास तयार झाला. अहाहा ! काय आमचा भाग्योदय, काय प्रत्यक्ष ईश्वरच आमच्यापुढे उभा आहे ? किंवा राणीसाहेब नव्हेत, दुसऱ्या कोणी त्यांचा वेष धारण करून करणाऱ्या असतील, छे ! तसे व्हावयाचे नाही, त्यांचा वेष धारण करून त्यांच्या लवाजम्यानिशी येण्याची कोणाची ताकद व्हावयाची नाही. ह्या आपल्या मलिकाए- आझमा कैसर इ. हिंद व्हिक्टोरिया राणीसाहेबच खास आहेत. काय ही थोर बुद्धी, काय हे औदार्य, काय ही प्रजेची स्थिती विचारून घेण्याची उत्कंठा. कोण हा मोठेपणाच्या मानाचा परित्याग, की ज्याच्या योगे करून आपण एवढे उत्कंठित होत्साते आमची स्थिती ऐकून घेण्यास तयार आहा. आता मी आपला अर्ज सुरू करितो : इतिहासकर्त्यांनी पूर्वेकडून कोणी लोकांनी फार प्राचीन काळी ह्या देशावर स्वारी केली असे वर्णन केले आहे, त्या स्वारी केलेल्या लोकांनी आपणांस 'आर्य' म्हणजे श्रेष्ठ म्हणवून घेतले, त्यांनी आपला अंमल प्रथम उत्तर हिंदुस्थानात चालविला. हे उघडच आहे की, त्यांस ह्या देशाच्या मूळच्या रहिवाश्यांनी येथे काही काळपर्यंत टिकू दिले नसावे. व स्वस्थही राहू न देता त्यांस जर्जर केले असावे परंतु त्यांचा उत्कर्ष काही कारणामुळे व काही काळानंतर झाला. त्यांनी आपल्या वर्णाचे आणखी लोक ह्या देशात आणविले व सर्वप्रकारे विजय पावलेल्या लोकांप्रमाणे वागू लागले. त्यांनी उत्तरोत्तर आपला अंमल व आपले राज्य वाढविण्याचा उपक्रम चालू केला. त्यांचा बेत काही काळाने सिद्धीस गेला व ते आणि त्यांचे वंशज ह्या देशाचे पुष्कळ दिवस राज्य करीत होते. इत्यादी गोष्टीस इतिहास साक्ष देते. एखाद्या देशावर स्वारी करून विजय मिळाल्यावर ते विजयी लोक कोणत्या प्रकारे आपल्या जिंकलेल्या प्रजेवर आपला अंमल बसवितात आणि चालवतात, हे प्रत्येक<noinclude></noinclude> 9bbbu0qcx4p9n0w97yy1r9kgyoqdseg पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८४ 104 105402 231773 213451 2026-06-10T16:09:59Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७८४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213451 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८५ 104 105403 231774 213452 2026-06-10T16:10:01Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७८५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213452 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८६ 104 105404 231775 213453 2026-06-10T16:10:02Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७८६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213453 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८७ 104 105406 231776 213456 2026-06-10T16:10:04Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७८७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213456 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८८ 104 105407 231896 213457 2026-06-10T16:28:22Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७८८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213457 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८९ 104 105408 231777 213458 2026-06-10T16:10:06Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७८९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213458 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९० 104 105409 231778 213459 2026-06-10T16:10:08Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७९०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213459 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९१ 104 105410 231779 213460 2026-06-10T16:10:09Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७९१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213460 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९२ 104 105411 231780 213461 2026-06-10T16:10:11Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७९२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213461 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९३ 104 105412 231781 213462 2026-06-10T16:10:13Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७९३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213462 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९४ 104 105413 231782 213463 2026-06-10T16:10:14Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७९४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213463 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९५ 104 105414 231783 213464 2026-06-10T16:10:16Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७९५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213464 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९६ 104 105415 231784 213465 2026-06-10T16:10:18Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७९६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213465 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९७ 104 105416 231785 213466 2026-06-10T16:10:19Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७९७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213466 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९८ 104 105417 231786 213467 2026-06-10T16:10:21Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७९८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213467 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९९ 104 105418 231787 213468 2026-06-10T16:10:23Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/७९९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213468 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०० 104 105419 231788 213469 2026-06-10T16:10:25Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८००]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८००]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213469 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०१ 104 105420 231789 213470 2026-06-10T16:10:26Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८०१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213470 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०२ 104 105421 231790 213471 2026-06-10T16:10:28Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८०२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213471 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०३ 104 105422 231791 213472 2026-06-10T16:10:30Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८०३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213472 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०४ 104 105423 231792 213473 2026-06-10T16:10:32Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८०४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213473 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०५ 104 105424 231793 213474 2026-06-10T16:10:33Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८०५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213474 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०६ 104 105425 231794 213475 2026-06-10T16:10:35Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८०६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213475 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०७ 104 105426 231795 213476 2026-06-10T16:10:36Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८०७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213476 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०८ 104 105427 231796 213477 2026-06-10T16:10:38Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८०८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213477 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०९ 104 105428 231797 213478 2026-06-10T16:10:40Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८०९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213478 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१० 104 105429 231798 213479 2026-06-10T16:10:41Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८१०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213479 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८११ 104 105430 231800 213480 2026-06-10T16:19:56Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८११]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८११]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213480 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१२ 104 105431 231801 213481 2026-06-10T16:19:57Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८१२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213481 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१३ 104 105432 231802 213482 2026-06-10T16:19:57Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८१३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213482 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१४ 104 105433 231803 213483 2026-06-10T16:19:59Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८१४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213483 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१५ 104 105434 231804 213484 2026-06-10T16:20:00Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८१५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213484 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१६ 104 105435 231805 213485 2026-06-10T16:20:02Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८१६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213485 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१७ 104 105436 231806 213486 2026-06-10T16:20:04Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८१७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213486 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१८ 104 105437 231807 213487 2026-06-10T16:20:06Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८१८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213487 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१९ 104 105438 231808 213488 2026-06-10T16:20:08Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८१९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८१९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213488 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२० 104 105439 231809 218827 2026-06-10T16:20:09Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८२०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 218827 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude>परिशिष्ट ६ महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या चरित्राचा कालपट (१८२७ -१८९०) घटना वर्ष जन्म १८२७ पंतोजीच्या शाळेत मराठी शिक्षण १८३४-३८ कावडी येथील झगडेपाटील यांच्या कन्येशी विवाह १८४० मिशनरी शाळेंतील माध्यमिक (इंग्रजी) शिक्षण १८४१–४७ लहुजीबुवाकडे तालीम आणि क्रांतिकारक विचार १८४७ टॉमस पेनकृत 'राइट्स् ऑफ मॅन' या ग्रंथाचे मनन १८४७ उच्चवर्णीय लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा १८४८ १८४८ शूद्रादिकांना शिक्षणदान करण्याचे व्रत घेतल्याने १८४९ सौभाग्यवतीसह करावा लागलेला गृहत्याग. मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी १८४९ करणाऱ्या सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण. चिपळूणकरांच्या वाड्यांतील व रास्तापेठेतील १८५१ मुलींच्या शाळांची स्थापना. मे. कँडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणकार्याबद्दल १६ नोव्हेंबर १८५२ सरकारी विद्याखात्याकडून सत्कार. स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी १८५४ 'तृतीय रत्न' नाटकाचे लेखन १८५५ रात्रीच्या शाळेची स्थापना १८५५<noinclude></noinclude> onh192wl57mu48pyd4uzuyc5cvi4tgf पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२१ 104 105440 231810 218828 2026-06-10T16:20:11Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८२१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 218828 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude>७८० महात्मा फुले : समग्र वाङ्मय घटना मारेकऱ्यांकडून हत्येचा प्रयत्न वर्ष १८५६ शाळांच्या व्यवस्थापक मंडळातून निवृत्ती १८५८ विधवा-पुनर्विवाहास साहाय्य १८६० बालहत्या-प्रतिबंधकगृहाची स्थापना १८६३ तुकाराम तात्या पडवळकृत 'जातिभेदविवेकसार' या ग्रंथाच्या १८६५ द्वितीयावृत्तीचे प्रकाशन. वडील गोविंदराव यांचा मृत्यू घरचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करणे "छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा' 'ब्राह्मणांचे कसब' 'पवाडा-विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी' 'गुलामगिरी' 'सत्यशोधक समाजाची स्थापना' दयानंद सरस्वतींची मिरवणूक १८६८ १८६८ जून १८६९ १८६९ १८६९ १ जून १८७३ २४ सप्टेंबर १८७३ १८७५ सत्यशोधक समाजाच्या तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकीगत २४ सप्टेंबर १८७६ पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट २० मार्च १८७७ पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ १२ एप्रिल १८७७ दुष्काळविषयक विनंती पत्र पुणे नगरपालिकेचे सदस्यत्व दारूची दुकाने उघडण्यास नवे परवाने देऊ नयेत, म्हणून पत्र 'हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन' 'शेतकऱ्याचा असूड' मराठी ग्रंथकार सभेस पत्र 'सत्सार क्र. १ ' १७ मे १८७७ १८७६-८२ १८ जुलै १८८० १९ ऑक्टोबर १८८२ १८ जुलै १८८३ ११ जून १८८५ १३ जून १८८५<noinclude></noinclude> 9bvnm9h3839x8tdvcy0nqi7z8yqdpl8 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२२ 104 105441 231811 218829 2026-06-10T16:20:13Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८२२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 218829 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude>कालपट : घटना 'सत्सार क्र. २' "इशारा ' ग्रामजोश्यांच्या हक्कासंबंधी जुन्नर कोर्टाचा निर्णय मामा परमानंद यांस पत्र 'सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी' मृत्युपत्र तयार केले ड्यूक ऑफ कनॉटचा सत्कार आणि फुलेकृत दंभस्फोट जनतेकडून सत्कार आणि 'महात्मा' ही पदवी अर्पण 'सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक' या मरणोत्तर ( स. १८९१ ) प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचे लेखन. मृत्यू वर्ष ऑक्टोबर १८८५ १ ऑक्टोबर १८८५ २९ मार्च १८८६ २ जून १८८६ ७८१ जून १८८७ १० जुलै १८८७ २ मार्च १८८८ ११ मे १८८८ १ एप्रिल १८८९ २८ नोव्हेंबर १८९० -समाप्त-<noinclude></noinclude> knwqnquh00f79brsqueqy2eroz3pd1i पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२३ 104 105442 231812 213492 2026-06-10T16:20:14Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८२३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213492 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२४ 104 105443 231813 213493 2026-06-10T16:20:16Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८२४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213493 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२५ 104 105444 231814 213494 2026-06-10T16:20:17Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८२५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213494 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२६ 104 105445 231815 213495 2026-06-10T16:20:19Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८२६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213495 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२७ 104 105446 231816 213496 2026-06-10T16:20:21Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८२७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213496 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२८ 104 105447 231817 213497 2026-06-10T16:20:22Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८२८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213497 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२९ 104 105448 231818 213498 2026-06-10T16:20:24Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८२९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213498 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३० 104 105449 231819 213499 2026-06-10T16:20:26Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८३०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213499 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३१ 104 105450 231820 213500 2026-06-10T16:20:27Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८३१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213500 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३२ 104 105451 231821 213501 2026-06-10T16:20:29Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८३२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213501 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३३ 104 105452 231822 213502 2026-06-10T16:20:31Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८३३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213502 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३४ 104 105453 231823 213503 2026-06-10T16:20:32Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८३४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213503 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३५ 104 105454 231824 213504 2026-06-10T16:20:34Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८३५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213504 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३६ 104 105455 231825 213505 2026-06-10T16:20:36Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८३६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213505 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३७ 104 105456 231826 213506 2026-06-10T16:20:38Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८३७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213506 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३८ 104 105457 231827 213507 2026-06-10T16:20:40Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८३८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213507 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३९ 104 105458 231828 213508 2026-06-10T16:20:42Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८३९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213508 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४० 104 105459 231829 213509 2026-06-10T16:20:43Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८४०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213509 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४१ 104 105460 231830 213510 2026-06-10T16:20:45Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८४१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213510 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४२ 104 105461 231831 213511 2026-06-10T16:20:47Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८४२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213511 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४३ 104 105462 231832 213512 2026-06-10T16:20:48Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८४३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213512 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४४ 104 105463 231833 213513 2026-06-10T16:20:50Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८४४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213513 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४५ 104 105464 231834 213514 2026-06-10T16:20:52Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८४५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213514 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४६ 104 105465 231835 213515 2026-06-10T16:20:54Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८४६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213515 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४७ 104 105466 231836 213516 2026-06-10T16:20:55Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८४७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213516 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४८ 104 105467 231837 213517 2026-06-10T16:20:57Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८४८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213517 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४९ 104 105468 231838 213518 2026-06-10T16:20:59Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८४९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213518 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५० 104 105469 231839 213519 2026-06-10T16:21:00Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८५०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213519 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५१ 104 105470 231840 213520 2026-06-10T16:21:02Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८५१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213520 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५२ 104 105471 231841 213521 2026-06-10T16:21:04Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८५२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213521 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५३ 104 105472 231843 213564 2026-06-10T16:21:05Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८५३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213564 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|८१२}} {{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} १८८१ साली त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. भालेकरांनी पुण्यात सुरू केलेले “दीनबंधु” वृत्तपत्र नारायणराव लोखंड्यांनी मुंबईतून प्रसिद्ध करण्यास प्रारंभ केला. १८८४ साली त्यांनी मिलहँड्स असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन केली. लोखंडे भारतातील कामगार चळवळीचे प्रवर्तक होते. १८९० साली त्यांनी फॅक्टरी कमिशनचे सदस्य म्हणून काम केले, १८९३ साली मुंबईत उसळलेली हिंदु- मुसलमानामधील जातीय दंगल मिटविण्यासाठी त्यांनी फार परिश्रम घेतले. १८९५ साली सरकारने रावबहादूर पदवी देऊन लोखंड्यांचा गौरव केला. ९ फेब्रुवारी, १८९७ रोजी ठाणे येथे प्लेगच्या साथीला ते बळी पडले.<br> {{gap}}'''(१४) कृष्णाजी पांडुरंग भालेकर :--''' पृ. २०५, २१०, २१३, २१९, २५७, ३७९, ३९५. (जन्म १८५० - मृत्यू ७ मे, १९१०). - भालेकरांचा जन्म माळी जातीतील कुटुंबात पुण्याजवळील भांबुर्डे (आता शिवाजीनगर) येथे झाला. १८६४ मध्ये ते पुण्यातल्या रविवार पेठेतील मिशनच्या शाळेमध्ये शिकत होते. विद्यार्थी दशेतच त्यांना जंगलीमहाराज या प्रसिद्ध साधुपुरुषाचा सहवास लाभला. १८७१ मध्ये त्यांनी भांबुर्ज्या स एक वाचनालय सुरू केले. जोतीराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करताच भालेकर त्यात सामील झाले. १८७४ पर्यंत जिल्हा न्यायालयात कारकून म्हणून काम करणाऱ्या भालेकरांनी नोकरी सोडून कंत्राटे घेण्यास सुरुवात केली. १८७७ साली त्यांनी “ दीनबंधु " पत्र सुरू केले. हे पत्र वर्गणीदारांच्या आश्रयाच्या अभावी तोटा सोसून चालवावे लागत असे. १८७९ पर्यंत भालेकरांनी पुण्यात हे पत्र चालवले आणि नंतर ते मुंबईत लोखंड्यानी चालवले. भालेकर चांगले वक्ते होते तसेच ते फर्डे लेखकही होते. १ जून, १८८३ साली त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सत्यशोधक समाजाच्या झेंड्याची मिरवणूक काढली. १८८४-८५ मध्ये भालेकर आणि फुले यांच्यामधील मतभेद विकोणला गेले होते. १८८८ साली त्यांनी मोफत शिक्षण देणारी शाळा काढली. १८८८ मध्ये त्यांच्या मदतीने त्यांचे भाचे गणपत सखाराम पाटील यांनी “दीनमित्र” मासिक सुरू केले. १८९३ साली भालेकरांच्या संपादकत्वाखाली “शेतकऱ्यांचा कैवारी” पत्र पुन्हा सुरू झाले. त्यावर्षी लोखंडे व भालेकर यांच्यामधील वितुष्ट वाढले आणि दोघांनीही परस्परांवर कडक टीका करणारे लेख लिहिले. १८९५ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पुण्यात भरले असताना मंडपासमोर २२ फूट उंचीचा शेतकऱ्याचा पुतळा उभा करून भालेकरांनी १९ कोटी शेतकऱ्यांपैकी १९ शेतकरी तरी काँग्रेसमध्ये आहेत काय असा प्रश्न विचारला. भालेकरांनी आयुष्यभर शेतकऱ्यांची गाऱ्हाणी मांडली व त्यांच्या दुःखाला वाचा फोडली. १९०८ च्या सुमारास त्यांनी विठ्ठल रामजी शिंद्यांचे सहकारी म्हणून काम केले.<noinclude></noinclude> 15ws18hkfztsknhr2fcushfgfjw97q1 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५४ 104 105473 231844 213567 2026-06-10T16:21:07Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८५४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213567 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|परिशिष्ट-७ : संदर्भ-टिपा}}{{right|८१३}} '''{{left|तृतीय रत्न}} :''' '''{{left|कारंज्यावर उडी मारून मेलेल्या पेशव्याविषयी :--'''पृ. ६.}} {{gap}}हा उल्लेख सवाई माधवराव पेशव्यांविषयीचा आहे. सवाई माधवरावांचा जन्म १८ एप्रिल, १७७४ रोजी झाला. त्यांचे वडील नारायणराव पेशवे यांचा ३० ऑगस्ट, १७७३ रोजी गारद्यांनी खून केल्यानतर सखाराम बापू, नाना फडणीस, हरिपंत फडके वगैरे मुत्सद्यांनी नारायणरावांची गरोदर पत्नी गंगाबाई हिला पुरंदरास पोचविले. तेथे ती प्रसूत होऊन तिला मुलगा झाल्यावर त्याला सवाई माधवराव या नावाने पेशवा म्हणून गादीवर बसवण्यात आले. २७ ऑक्टोबर, १७९५ रोजी उडी मारल्यामुळे कारंजावर पडून त्याला मृत्यू आला. सवाई माधवरावाने आत्महत्या केली असे म्हटले जाते. <br> {{right|'''छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा : टिपा'''}} '''{{right|मूळ बाबाजी :}}''' {{right|शिव शिवछत्रपतींचे पणजोबा बाबाजी.}} '''{{right|पंधराशे एकूणपन्नास साल :--''' पृ. ४५.}} {{gap}}(इ. स. १६२७) इतिहासकारांमध्ये शिवजन्मतिथीबद्दल अद्याप एकमत झालेले नाही. मल्हार रामराव चिटणीस या बखरकाराप्रमाणे शिवदिग्विजय, मराठी साम्राज्यांची छोटी बखर, शिवप्रताप, पंतप्रतिनिधी बखर, न्यायशास्त्री पंडितराव यांची बखर वगैरे बखरींचे कर्ते शिवाजी राजांचा जन्म शके १५४९ मध्ये झाला असे सांगतात. बखरीतील विसंगत तिथी ज्योतिर्गणितशास्त्राधारे तपासून लोकमान्य टिळकांनी २४ एप्रिल १९०० च्या केसरीच्या अंकात शिवछत्रपतींचा जन्म शके १५४९ मध्ये वैशाख शुद्ध प्रतिपदेस (म्हणजे ६ एप्रिल १६२७ रोजी) झाला असे म्हटले होते. महात्मा फुल्यांनीही शिवछत्रपतींचे जन्मवर्ष १६२७ मानलेले दिसते. १९१४ साली जेधे शकावली उपलब्ध झाली. तिचा कर्ता, तसेच शिवछत्रपतींची कुंडली तयार करणारा ज्योतिषी शिवराम आणि शिवभारतकर्ता कवींद्र परमानंद हे तिघे मात्र शिवछत्रपतींचा जन्म शके १५५१ मध्ये फाल्गुन वद्य तृतीयेस (म्हणजे १९ फेब्रुवारी १६३०) झाला असे म्हणतात. अर्थात रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी म्हटल्याप्रमाणे या दोहोंपैकी कोणतीही तिथी स्वीकारली तरी शिवछत्रपतींच्या मोठेपणाला त्यामुळे बाधा पोचत नाही.<noinclude></noinclude> dem99whhsm6e7i71tgfphbwv87dav2c पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५५ 104 105474 231845 213592 2026-06-10T16:21:08Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८५५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213592 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|८१४}} {{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} '''{{left|थोर विठोजी सान मालोजी :''' -- पृ. ४७.}} {{gap}}बाबाजी भोसल्यांचा मोठा मुलगा विठोजी आणि धाकटा मुलगा मालोजी.<br> '''{{left|दीपाबाई :--''' पृ. ४७.}} मालोजी राजांची पत्नी.<br> '''{{left|शेशाप्पा नाईक :--''' पृ. ४७.}} {{gap}}शेष नाईक पुंडे या चांभारगोंदा येथील सावकाराकडे मालोजी राजांनी आपणास मिळालेले. द्रव्य ठेव म्हणून ठेवले होते असे ग्रँट डफने लिहिले आहे.<br> '''{{left|वडील बंधु संभाजी :--''' पृ. ४८.}} शिवछत्रपतींचे वडील बंधू संभाजी यांचा जन्म इ. स. १६१९ साली झाला असे रियासतकार सरदेसाई सांगतात. (पृ. ६० न्यू हिस्टरी ऑफ द मराठाज, तिसरे पुनर्मुद्रण, १९७१) १६५४ मध्ये कनकगिरी येथील पाळेगाराशी लढताना संभाजीस मृत्यू आला असे सरदेसाई म्हणतात. वेढ्यात सापडलेल्या संभाजीस अफझलखानाने सहाय्य करण्यात कुचराई केल्यामुळे संभाजी मारला गेला असे जिजाबाईस वाटत असे. <br> '''{{left|तान्हाजी मालुसरे :--''' पृ. ५१, ५६, ७१.}} {{gap}}शिवाजी राजांचा हा बालमित्रं अफझलखानाच्या वधाच्या वेळीही त्यांच्याबरोबर होता असे ग्रँट डफने म्हटले आहे. ४ फेब्रुवारी १६७० रोजी तानाजीने कोंढाणा काबीज केला पण तो स्वतः मात्र त्या लढाईत मरण पावला.<br> '''{{left|बाजी पासलकर :--पृ.''' ५१, ५८.}} {{gap}}मुसे खोऱ्याचा देशमुख. शिवाजीच्या बालपणीच्या मित्रांपैकी एक. १६६० मध्ये सावंताबरोबर लढताना त्याला मृत्यू आला असे बखरकार सांगतात.<br> '''{{left|दादोजी कोंडदेव :--'''पृ. ५२.}} {{gap}}मलठणचा कुलकर्णी. शहाजींच्या जहागिरीतील हिंगणी बुरडी व देऊळगाव परगण्यांची देखभाल करीत असे. प्रशासन कसे करावे याचे शिक्षण शिवाजी राजांनी दादोजी कोंडदेवाकडून घेतले आणि बालपणी जिजाबाईप्रमाणेच दादोजीचाही शिवाजीवर फार प्रभाव होता असे सर्वसामान्यतः मानले जाते. मात्र जोतीराव फुल्यांना दादोजीचे निष्कारण स्तोम माजवले जात आहे असे वाटत असे.<noinclude></noinclude> l2giyjpye7ljornoip6hes7wofrc2tw पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५६ 104 105475 231846 213602 2026-06-10T16:21:10Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८५६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213602 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|परिशिष्ट-७ : संदर्भ-टिपा}}{{right|८१५}} '''{{left|चाकणचा फिरंगोजी :--'''पृ. ५२.}} {{gap}}फिरंगोजी नरसाळा हा चाकणचा किल्लेदार असून शहाजीच्या विश्वासू सेवकांपैकी एक होता. ऑगस्ट १६६० मध्ये शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला काबीज केला. शिवछत्रपतींनी फिरंगोजीस भुपाळगडाचा किल्लेदार नेमले. १३ डिसेंबर १६७८ रोजी संभाजी राजे वडिलांवर रुसून मोगलांना जाऊन मिळाले. त्यांनी दिलेरखानाच्या साथीने भुपाळगडाला वेढा दिला तेव्हा युवराजांविरुद्ध तोफा डागावयाच्या नाहीत असे फिरंगोजीने ठरवले. २ एप्रिल १६७९ रोजी भुपाळगड दिलेरखानाच्या हाती पडल्यावर शिवछत्रपतींनी फिरंगोजीस संभाजीस दया दाखविल्याबद्दल दोष दिला.<br> '''{{left|मुलान्या सुभेदार : --''' पृ. ५३.}} {{gap}}कल्याणचा सुभेदार मुलाना अहमद. त्याने विजापूरला पाठवलेला खजिना शिवाजी राजांच्या फौजेने वाटेत लुटला. आबाजी सोन्देवाने मुलाना अहमदला कैद केले असता शिवाजी राजांनी त्याची व त्याच्या बायकामुलांची विजापूरला सन्मानाने रवानगी केली.<br> '''{{left|बाजी घोरपडे''' :-- पृ. ५३, ६१.}} {{gap}}मुधोळचा बाजी घोरपडे हा विजापूरकरांचा मांडलिक असून शहाजीशी त्याचे शत्रुत्व होते. २५ जुलै १६४८ रोजी पहाटे त्याने जिंजी येथे शहाजीराजे गाढ झोपले असताना छापा घालून त्यांना पकडले आणि विजापूरला दरबारात हजर केले. १६६४ च्या नोव्हेंबरमध्ये शिवछत्रपतींनी मुधोळवर अचानक धाड घातल्यामुळे उडालेल्या चकमकीत बाजी घोरपडे मारला गेला.<br> '''{{left|चंद्रराव मोरे :--''' पृ. ५४.}} {{gap}}चंद्रराव हा किताब असलेले आणि जावळीची देशमुखी उपभोगणारे मोरे घराणे शिवाजी राजांना जुमानीत नसे. आपण सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे वंशज असून भोसले हे दर्जाने आपल्याबरोबरीचे नाहीत असे मोऱ्यांना वाटत असे. त्यांची आदिलशाहीवर निष्ठा होती. सामोपचाराला यशवंतराव व हणमंतराव मोरे दाद देत नाहीत हे पाहून शिवाजीराजांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी कावजी व रघुनाथ बल्लाळ कोरडे यांना पाठवले. त्यानंतर जावळीजवळ झालेल्या लढाईत हणमंतराव मोरे मारले गेले तर यशवंतराव मोरे रायरीच्या किल्यात लपून बसले. मोऱ्यांचा संपूर्ण पाडाव करण्यासाठी खुद्द शिवछत्रपतींनी जावळीत दोन महिने तळ दिला. रायरी किल्याच्या<noinclude></noinclude> 7okynaxjf74u282hg8co5rw11kg3dc0 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५७ 104 105476 231847 213613 2026-06-10T16:21:12Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८५७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213613 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|८१६}} {{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} पायथ्याशी शिवाजी राजांना भेटावयास आलेल्या यशवंतराव मोऱ्यांना ठार मारण्यात आले आणि त्यांचे दोन मुलगे कृष्णराव व बाजीराव हे दोघे कैदेत असताना विजापूरकरांशी संधान बांधीत असलेले पाहून त्यांनाही ठार मारण्यात आले. <br> '''{{left|गोपीनाथ :--''' पृ. ५५, ५६.}} {{gap}}(पंताजी गोपीनाथ बोकील) हा सासवडजवळच्या हिवरे गावचा कुलकर्णी. ग्रँट डफच्या म्हणण्यानुसार हा अफझलखानाचा वकील होता. त्याला शिवाजी राजांनी वश केले आणि त्याच्यामार्फत अफझलखानाबरोबर प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरविली. याउलट बहुतेक इतिहासकारांच्या मते अफझलखानाने आपला वकील म्हणून वाईच्या कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यास शिवाजी राजांकडे पाठविले होते. पंताजी गोपीनाथ बोकील हा शिवाजी राजांचा चिटणीस होता. कृष्णाजी भास्करबरोबर अफझलखानाकडे जाऊन पंताजी गोपीनाथने भेटीची जागा व अन्य तपशील ठरविला होता. जोतीरावांची ग्रँट डफच्या इतिहासावर भिस्त असल्यामुळे त्यांनी पोवाड्यात कृष्णाजी भास्करचा नामोल्लेखही केलेला नाही.<br> '''“{{left|सरनौबती डंका हुकूम पालेकराचा" :--''' पृ. ६०, ६३.}} {{gap}}या चरणात नेताजी पालकरांचा उल्लेख केलेला आहे. सरनौबत माणकोजी दहातोंडे हे लढाईत मारले गेल्यानंतर शिवाजी राजांनी १६५९ मध्ये नेताजी पालकरांची सरनोबतपदी नेमणूक केली. १६६६ मध्ये शिवछत्रपती व नेताजी यांच्यात वितुष्ट आल्याने नेताजी मोगलांना जाऊन मिळाला. औरंगजेबाने त्यास मुसलमान व्हावयास लावले असा उल्लेख आलमगीरनाम्यात आहे. शिवाजी राजांचा पराभव करण्यासाठी औरंगजेबाने दिलेरखानाबरोबर नेताजीस पाठवले तेव्हा नेताजी पुन्हा शिवाजी राजांना जाऊन मिळाला. १९ जून १६६७ रोजी नेताजीने प्रायश्चित घेऊन पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला.<br> {{left|'''“गुजर उडी घाली सामना शत्रूचा केला" :--''' पृ. ७३, ७५.}} {{gap}}या चरणात जोतीरावांनी प्रतापराव गुजर यांचा उल्लेख केला आहे. त्यांचे मूळ नाव कडतोजी. मे १६६० मध्ये अदिलशाही फौजांनी पन्हाळ्यास वेढा घातला तेव्हा कडतोजीने शिवाजी राजांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्याचा बचाव केला. १६७२ च्या फेब्रुवारीत त्याने साल्हेर येथे मोगलांच्या फौजांचा पराभव केला. १५ एप्रिल १६७३ रोजी ऊंबराणीच्या लढाईत प्रतापरावाने आदिलशाही सरदार बहलोलखानास पराभूत केले पण त्यास दया दाखवून सोडून दिल्यावर खान उलटला. शिवाजी राजांनी<noinclude></noinclude> 5uasz6889oioto05t82bah2qd23bcwk पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५८ 104 105477 231848 213629 2026-06-10T16:21:14Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८५८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213629 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|परिशिष्ट-७ : संदर्भ-टिपा}} {{right|८१७}} प्रतापरावांच्या अकारण औदार्याबद्दल त्याची खरमरीत शब्दात पत्र पाठवून हजेरी घेतली. त्यामुळे प्रक्षुब्ध झालेल्या मन:स्थितीत २४ फेब्रुवारी १६७४ रोजी प्रतापरावाने अवघ्या सात सैनिकांसह गडहिंग्लजजवळच्या नेसरीच्या खिंडीत बहलोलखानावर तुटून पडून प्राणार्पण केले. जोतीरावांनी पोवाड्यात प्रतापरावांच्या या पराक्रमाचे वर्णन केले आहे.<br> '''{{left|"काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा" :-'}}'' पृ. ७६. {{gap}}या चरणात जोतीरावांनी शिवछत्रपतींना राज्याभिषेक करणाऱ्या गागाभट्ट या काशिच्या पंडिताचा उल्लेख केला आहे. त्याचे मूळ नाव विश्वेश्वर. गागाभट्टाला शिवछत्रपतींनी रायगडाला येण्याचे आमंत्रण दिले की तो आपण होऊन आला याबद्दल वाद आहे. त्याने शिवाजी राजे राजपूतवंशातील क्षत्रिय असून त्यांना राज्याभिषेक करवून घेण्याचा पूर्ण हक्क आहे हे मान्य केले.<br> '''{{left|दासीपुत्र संताजी बंधु होता शिवाजीला :--'''पृ. ७७}}. {{gap}}संभाजी, शिवाजी व एकोजी या औरस पुत्रांखेरीज शहाजी राजांना उपस्त्रियांपासून झालेले चार पुत्र होते. त्यापैकी संताजी हा एक होता. कर्नाटकाच्या मोहिमेत तो शिवाजी राजांना येऊन मिळाला.<br> '''{{left|गुलामगिरी :}}''' '''{{gap}}अरे ज्या भट शिरोमणीने केलेली गीतें एकंदर सर्व समाजामध्ये गाण्याचा कित्ता घेतला आहे : पृ. १९५.''' {{gap}}येथे जोतीरावांचा रोख “नवनीत" कार परशुराम तात्या गोडबोले यांच्यावर असावा. परशुराम बल्लाळ गोडबोले (१७९९-१८७४) यांचा जन्म वाई येथे झाला. मराठी कोश व मराठी पुस्तके तयार करण्याच्या कामात त्यांनी मेजर कँडीस मदत केली. त्या काळातील मराठी क्रमिक पुस्तकांतल्या सगळ्या नव्या कविता परशुराम तात्या गोडबोल्यांनी रचलेल्या होत्या. त्यांनी संस्कृत नाटकांचे मराठीत भाषांतर केले. प्राचीन मराठी कवींच्या कवितांचे संग्रह प्रसिद्ध केले. तसेच वृत्तदर्पणसारखी नवी पुस्तके लिहिली. एच-२२ ५५<noinclude></noinclude> 8k5sxf4txlwkleepshlyz19104w9zfs पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५९ 104 105478 231849 213635 2026-06-10T16:21:15Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८५९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213635 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|८१८}}{{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} '''{{center|शेतकऱ्याचा असूड : टिपा}}''' '''पुरातन मूर्तिपूजोत्तेजक ब्रह्मवृंदातील काका व सार्वजनिक सभेचे पुजारी जोशीबुवा.- पृ. २७७.''' {{gap}}'''गणेश वासुदेव जोशी. -''' [ १८२९-१८८०] हे "सार्वजनिक काका” म्हणून ओळखले जात असत. मराठी शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विसाव्या वर्षी त्यांनी पुण्याच्या नाझर कचेरीत नोकरी धरली. ती सात-आठ वर्षे केल्यावर कुभांड आल्याने नोकरी सोडली, त्यानंतर कायद्याचा अभ्यास करून त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. जोतीराव फुल्यांचे बालमित्र सदाशिवराव गोवंडे हे सार्वजनिक काकांचे एक निकटचे सहकारी होते. डिसेंबर १८७२ मध्ये न्यायमूर्ती रानड्यांचे स्वदेशी व्यापारासंबंधीचे व्याख्यान ऐकून सार्वजनिक काका इतके प्रभावित झाले की, त्यांनी १८७३ सालच्या जानेवारीपासून स्वदेशी वस्त्रे व वस्तू वापरण्याचे व्रत घेतले १८७४ च्या अखेरीस बडोद्याचे महाराज मल्हारराव गायकवाड यांनी विषप्रयोग केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यांना पदच्युत करून २३ एप्रिल १८७५ रोजी मद्रासला अटकेत ठेवण्यात आले. सार्वजनिक सभेच्या वतीने जोशीबुवांनी मल्हारराव गायकवाडांना न्याय मिळावा अशी मागणी केली. “दक्षिणचे दंगे” म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी केलेल्या दंग्याबद्दल सविस्तर अर्ज पाठवण्यात तसेच १८७७ च्या भयंकर दुष्काळाच्या वेळी लोकांची गाऱ्हाणी सरकारसमोर मांडण्यात सार्वजनिक काकांनी पुढाकार घेतला. कलकत्त्यात व मुंबईत वृत्तपत्रकारांचे संमेलन त्यांनीच भरवले. १८७९ च्या जुलैमध्ये वासुदेव बळवंत फडक्यांना कैद करण्यात आले तेव्हा कोणीही त्यांचे वकीलपत्र घ्यावयास तयार नाही हे पाहून सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले. २५ जुलै १८८० रोजी सार्वजनिक काकांचे निधन झाले. <br> '''आमचे दयाळू गव्हर्नर जनरलसाहेब. -''' पृ. २७७. हा उल्लेख लॉर्ड रिपनबद्दलचा आहे.<br> {{gap}}'''घाशीराम कोतवाल.''' - पृ. २७७. माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत १८ फेब्रुवारी १७६४ रोजी पुणे शहराच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र कोतवाल नेमण्यात आला. ८ फेब्रुवारी १८७७ रोजी नाना फडणविसांनी घाशीरामाची त्या पदावर नेमणूक केली. तो देखणा, बुद्धिमान, निर्दय व गोड बोलणारा असून त्याच्या गुप्त हेरांकडून मिळणाऱ्या बातम्यांवरून नानांनी फंदफितुरी करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवले, त्याने चोरीच्या आरोपावरून २५ तेलंगी ब्राह्मणांना एका भुयारात कोंडून ठेवले त्यांच्यापैकी २१ ब्राह्मण गुदमरून मेल्यामुळे पुण्यातील ब्रह्मवृंद खवळला. त्यांनी घाशीरामास हत्तीच्या पायी द्यावे अशी मागणी केली. ३१ ऑगस्ट १८७८ रोजी ब्राह्मणांनी त्याला धोंडे मारून ठार केले.<noinclude></noinclude> 1x68l3ockm5zs5ppjy9n4vwpzc85glv पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६० 104 105479 231850 213636 2026-06-10T16:21:17Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८६०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213636 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|परिशिष्ट-७ : संदर्भ-टिपा}} {{right|८१९}} '''"हत्यारबंद पोलिसांच्या उरावर दरवडे घालणाऱ्या भट फडक्या रामोशास" (पृ. २८६) तळटीप : भूदेव वासुदेव फडक्याच्या नादी लागून बहुतेक अज्ञानी शूद्र रामोसी काळ्यापाण्यास व कित्येक तर फाशी गेले. पृ. ३१६.<br> {{gap}}'''वासुदेव बळवंत फडके :-''' पृ. ४६०-४६१. [१८४५-१८८३] पनवेल तालुक्यातील शिरढोण हे त्यांचे मूळ गाव. मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजात शिक्षण घेत असताना ते सोडून त्यांना सरकारी नोकरी पत्करावी लागली. सरकारी नोकरीत कटू अनुभव आल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली. वासुदेव बळवंत फडके देशभक्त होते. त्यांनी ठिकठिकाणी व्याख्याने देऊन लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला. लहुजी मांग यांच्याकडे तलवार, भाला चालविण्याचे शिक्षण घेताना वासुदेव बळवंतांचा व जोतीरावांचा प्रथम परिचय झाला असावा. २० फेब्रुवारी १८७९ ते मे १८७९ पर्यंत आपल्या ३०० ब्राह्मण, रामोशी, कोळी, मांग, महार व मुसलमान साथीदारांच्या मदतीने वासुदेव बळवंत फडक्यांनी ठिकठिकाणी दरोडे घातले. “युरोपियनांची, आपण ते सापडतील तेथे कत्तल करू आणि १८५७ च्या बंडासारखे दुसरे बंड उभारू" असे त्यांनी १८७९ च्या मे महिन्यात जाहीर केले. आपले विश्वासू सहकारी दौलतराव नाईक, मेजर डॅनियल बरोबरच्या चकमकीत मारले गेल्यानंतर वासुदेव बळवंत गाणगापुरला गेले. त्यांचा शोध घेत आलेल्या मेजर डॅनियलने २० जुलै १८७९ च्या रात्री देवरनावडगी येथे छापा घालून त्यांना पकडले. त्यांना ७ नोव्हेंबर १८७९ रोजी जन्मठेप काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि एडनला कारावास भोगीत असताना १७ फेब्रुवारी १८८३ रोजी त्यांचे निधन झाले.<br> {{gap}}'''एखाद्या अक्षरशून्य शूद्र कंट्राक्टरांच्या टोलेजंग दिवाणखान्यात मोठमोठ्या सभा करून त्यांमध्ये त्यांसही मानपत्र देतात.''' - (पृ. २८७.) जोतीरावांनी येथे रामचंद्र मनसाराम ढवारे नाईक या “अक्षरशून्य शूद्र" कंत्राटदाराच्या वेताळ पेठेतील घरात असलेल्या टोलेजंग दिवाणखान्याचा निर्देश केलेला दिसतो. सत्यशोधक समाजाच्या सभाही या दिवाणखान्यात होत असत.<br> '''ग्वाल्हेरकर पाटीलबुवा म्हणजे महादजी शिंदे.''' - (पृ. २९९) हे राणोजी शिंद्यांचे चिरंजीव होते. १७६८ मध्ये त्यांना माधवराव पेशव्यांनी ग्वाल्हेरच्या गादीचे वारस म्हणून मान्यता दिली आणि उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीवर जाण्यास सांगितले. त्यानंतर १७८९ पर्यंतच्या काळात महादजींनी दिल्लीच्या राजकारणात आपले आसन स्थिर केले आणि बादशाही तख्तावर व राज्यावर हुकमत चालवली. उत्तर हिंदुस्थानातील कारभाराची<noinclude></noinclude> a6osphxgna131qnl7ic4f2fc28u8j2g पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६१ 104 105480 231851 213637 2026-06-10T16:21:19Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८६१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213637 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|८२०}} {{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} व्यवस्था लावून महादजी शिंदे १७९२ च्या जूनमध्ये पुण्यास आले आणि २१ जून १७९२ रोजी भरलेल्या दरबारात अनवाणी उभे राहून महादजींनी सवाई माधवराव पेशव्यांचे जोडे आपल्या छातीशी धरले. एप्रिल १७९३ मध्ये नाना फडणीस व महादजी शिंदे याचा समेट झाला. १ जून १७९३ रोजी लाखेरीच्या खिंडीत महादजी शिंद्यांच्या सैन्याने होळकरांच्या फौजेचा पराभव केला. त्यानंतर जवळजवळ आठ महिने तापाने आजारी असलेले महादजी शिंदे १२ फेब्रुवारी १७९४ रोजी वानवडी येथे निवर्तले.<br> {{gap}}'''(पृ. २९९) “इंदूरकर लाख्या बारगीर यशवंतराव व विठोजीराव होळकरांसारख्या बडेबडे रणशूर राजेरजवाड्यांविषयी''' वगैरे या वाक्यात ज्यांचा जोतीराव फुल्यांनी नामोल्लेख केलेला आहे ते यशवंतराव व विठोजीराव होळकर हे दोघे १५ ऑगस्ट १७९७ रोजी मृत्यू पावलेल्या तुकोजी होळकरांच्या चार पुत्रांपैकी दोन पुत्र होते. या दोघांचे सर्वात मोठे बंधु काशिराव होळकर इंदूरच्या गादीवर आल्यानंतर त्यांना महादजी शिंद्यांच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेरच्या गादीवर आलेल्या महादजींच्या दतक पुत्राने, दौलतराव शिंद्यांनी हाताशी धरले. शिंद्यांनी होळकरांवर हल्ला करून काशीरावांचे धाकटे भाऊ मल्हारराव यास ठार मारले. तेव्हा त्यांच्या पश्चात विठोजीराव व यशवंतराव होळकर यांनी पेशव्यांच्या मुलुखात जाऊन लुटालुट व जाळपोळ केली. पेशव्यांचे सेनापती असलेल्या बापू गोखल्यांनी विठोजीराव होळकरास कैद करून पुण्यास पाठविल्यानंतर दुसऱ्या बाजीरावाने १६ एप्रिल १८०१ रोजी विठोजीरावास हत्तीच्या पायी देऊन ठार मारले. तेव्हा निसटलेल्या यशवंतराव होळकरांनी सैन्य जमवून २५ ऑक्टोबर १८०२ रोजी हडपसर येथे दौलतराव शिंद्यांच्या फौजेचा पराभव केला. तेव्हा पुणे सोडून पळालेल्या दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांच्या स्वाधीन होऊन ३१ डिसेंबर १८०२ रोजी वसईचा तह केला. यावेळी राघोबादादांचे दत्तकपुत्र अमृतराव हे यशवंतराव होळकरांच्या तंत्राने पुण्याचा कारभार पहात होते. त्यांच्याकडे यशवंतरावानी एक कोट रुपये मागितल्यामुळे पुण्यातील लोकांना मारहाण करून चार महिन्यांत त्यांच्याकडून जबरदस्तीने पन्नास लाख रुपये गोळा करण्यात आले. दौलतराव शिंदे व नागपूरकर रघुजी भोसले यांना पराभूत केल्यानंतर इंग्रजांनी यशवंतराव होळकरांशी १६ एप्रिल १८०४ रोजी युद्ध पुकारले. २४ डिसेंबर १८०५ रोजी यशवंतरावास इंग्रजांनी तह करण्यास भाग पाडले. इंग्रजांशी पुन्हा युद्ध करण्याच्या इराद्याने यशवंतराव होळकरांनी १८०७ मध्ये भावपुऱ्यास तोफा ओतविण्याचा कारखाना सुरू केला. १८०८ मध्ये ते भ्रमिष्ट झाले आणि त्यांचे वेड वाढत गेले. २७ ऑक्टोबर १८११ रोजी भावपुरा येथे त्यांना मृत्यू आला.<noinclude></noinclude> chnz9e4luxuzp4ft3f57yh6pk5n1heg पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६२ 104 105481 231852 213638 2026-06-10T16:21:20Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८६२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213638 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|परिशिष्ट-७ : संदर्भ-टिपा}} {{right|८२१}} '''(पृ. ३१२) तुमच्यातील राघू भरारीने प्रथम इंग्रजांस उलटे दोन आणे लिहून देऊन त्यास तळेगावास आणिले''' येथे जोतीरावांनी पंजाबात अटकेपलीकडे जाऊन आलेल्या आणि त्यामुळे "राघो भरारी” नावाने ओळखल्या जाणाऱ्या रघुनाथराव ऊर्फ राघोबादादाचा निर्देश केला आहे. १७ फेब्रुवारी १७७५ रोजी गुजरातमध्ये हरीपंत फडक्यांनी राघोबादादांचा पराभव केल्यानंतर राघोबादादा इंग्रजांच्या आश्रयास गेले आणि ६ मार्च १७७५ रोजी त्यांनी इंग्रजांशी तह केला. पुढे १ मार्च १७७६ रोजी सवाई माधवराव पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये पुरंदरला तह झाला, तरी त्याबाबत मतभेद झाल्यामुळे १७७६ च्या अखेरीस मुंबईकर इंग्रजांनी राघोबादादास पुन्हा आश्रय दिला. २४ नोव्हेंबर १७७८ रोजी राघोबादादाने इंग्रजांशी नवीन करार केला. त्यानंतर पुण्याकडे निघालेल्या चार हजार इंग्रज सैनिकांचा ८ जानेवारी १७७९ रोजी महादजी शिंद्यांनी तळेगावात पराभव केला.<br> {{gap}}'''(पृ. ३१७) “गावोगाव वेदांवर पांडित्य करणाऱ्या गृहस्थांपैकी एखाद्या स्वामीने"''' हे लिहिताना जोतीरावांचा रोख आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावर आहे हे उघड दिसते.<br> {{gap}}'''स्वामी दयानंद सरस्वती.''' - (१८२४-८३) यांचे पाळण्यातले नाव “मूळशंकर" सौराष्ट्रातील मोरवी येथे एका औदीच्य ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडिलांनी त्यांचे लग्न ठरवले पण विवाहाची तयारी सुरू असतानाच ते घरातून पळून गेले. त्यांनी संन्यास घेऊन “ दयानंद" हे नाव धारण केले. स्वामी विरजानंद या संन्याशाच्या मार्गदर्शनाखाली योग, वेद, धर्मशास्त्र वगैरेंचे अध्ययन केल्यानंतर दयानंदांनी मूर्तीपूजेच्या प्रघाताविरूद्ध प्रचार सुरू केला. त्यांनी उत्तर भारतात ठिकठिकाणी शास्त्री - पंडितांशी वाद केले. १८७५ च्या सुरुवातीस ते मुंबईला आले आणि त्यांनी एप्रिल १८७५ मध्ये मुंबईत आर्य समाजाची स्थापना केली. दयानंद वेद प्रमाण मानीत असत आणि वेदांचे अध्ययन करण्याचा सर्वांना अधिकार आहे असे त्यांचे मत होते. वेदकाळात गुणकर्माधिष्ठित चातुर्वर्ण्य व्यवस्था होती पण जन्माधिष्ठित जातिभेद नव्हता, अस्पृश्यता नव्हती असे त्यांचे म्हणणे होते. स्त्री शिक्षणाला, विधवा-विवाहाला त्यांचा पाठिंबा होता तर बालविवाहाला त्यांचा विरोध होता. न्यायमूर्ती रानडे, महादेव मोरेश्वर कुंटे वगैरेंच्या आमंत्रणावरून ते २० जून १८७५ रोजी पुण्याला गेले. तेथे ४ जुलै ते ४ ऑगस्ट १८७५ पर्यंत त्यांनी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात हिंदी भाषेत पंधरा व्याख्याने दिली. पुण्याच्या पूर्व भागातही गंगारामभाऊ म्हस्के यांनी स्वामीजींची ३५ व्याख्याने आयोजित केली होती. श्रोत्यांमध्ये रानडे, "लोकहितवादी” गोपाळ हरी<noinclude></noinclude> tuxgc97wyrjmp2264u48m5i5ve7p889 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६३ 104 105482 231853 213715 2026-06-10T16:21:22Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८६३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213715 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|८२२}} {{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} देशमुख यांच्याबरोबर जोतीराव फुलेही असत. दयानंदांनी चालवलेला वैदिक धर्माचा पुरस्कार, होमहवनाला दिलेले महत्त्व जोतीरावांना पसंत नव्हते. मात्र पुण्यातील दोन- अडीच महिन्यांचा मुक्काम आटोपून दयानंद निघाले त्याआधी त्यांची ५ सप्टेंबर १८७५ रोजी हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली तेव्हा जोतीराव त्या मिरवणुकीत सामील झाले होते. या मिरवणुकीच्या वेळी सनातन्यांनी दयानंदांची टर उडविण्यासाठी “गर्दभानंदाची” मिरवणूक काढली आणि चिखलफेक करून धुमाकूळ घातला. त्यांचे रसभरीत व उपहासपूर्ण वर्णन विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी निबंधमालेत केलेले आहे. (पहा निबंधमालेची चित्रशाळे काढलेली आवृत्ती : १९१७ : पृ. ३३९-३४८). “सत्यार्थप्रकाश” या स्वामी दयानंदांच्या मूळ हिंदी ग्रंथांचा दुर्गाप्रसादांनी इंग्रजीत अनुवाद केलेला आहे. महाराष्ट्रात आर्य समाजाचा प्रभाव फारसा पडलेला दिसला नाही. “लोकहितवादी” गोपाळराव देशमुखांप्रमाणे कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपती हे आर्य समाजाचे सदस्य होते. स्वामी दयानंदांचे १८८३ मध्ये निधन झाले.<br> '''{{left|बडोद्याचे दिवाण लक्ष्मण जगन्नाथ यांना पत्र. -''' पृ. ६६१.}} {{gap}}जोतीरावांनी या कवितेत ज्यांचा निर्देश केलेला आहे ते लक्ष्मण जगन्नाथ वैद्य १८८६ ते १८९० पर्यंत बडोदा संस्थानचे दिवाण होते. १८८६ साली काजी शहाबुद्दीन हे दिवाण म्हणून निवृत्त झाल्यांनतर लक्ष्मणराव वैद्यांची त्यांच्या जागी नेमणूक करण्यात आली. एप्रिल १८८९ मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी निवृत्त होण्याची इच्छा दर्शविली तेव्हा सयाजीराव महाराजांनी त्यांना कळविले की, राज्यकारभाराच्या प्रमुख जागेवर जोरदार मनुष्याची जरुरी असल्यामुळे आणि असा मनुष्य मिळणे कठीण असल्यामुळे वैद्यांनी निवृत्त व्हावे अशी परवानगी देण्यास महाराज तयार नव्हते (पहा पृ. ७०६, दा. ना. आपटे, '''श्री महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांचे चरित्र : १९३६).'''<br> '''संकीर्ण''' '''{{gap}}लोकल फंड.''' - पृ. २८०, ३२५, ३३५, ५५४, ५९१, ६०३. “गुलामगिरी", “शेतकऱ्याचा असूड”, “सार्वजनिक सत्य धर्म" वगैरे पुस्तकांत तसेच काही अखंडांत महात्मा फुल्यांनी लोकल फंडाचा निर्देश केलेला आढळतो.<br> {{gap}}सर बार्टल फ्रिअर हे मुंबई इलाख्याचे गव्हर्नर असताना १८६३ साली कॅप्टन डेव्हिडसन, जे. डी. इन्व्हेॉरिटी आणि सर जॉर्ज विंगेट यांच्या सूचनेवरून लोकल फंड सेस [ स्थानिक निधी उपकर] प्रथमच लादण्यात आला. ग्रामीण भागात शिक्षण<noinclude></noinclude> 481oili5gdnv6t2hp9el6nkwhwh98jx पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६४ 104 105483 231854 213716 2026-06-10T16:21:24Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८६४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213716 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|परिशिष्ट- ७ : संदर्भ-टिपा}} {{right|८२३}} प्रसार करण्यासाठी तसेच अंतर्गत दळणवळणाची साधने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रथम तो उपकर वसूल करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या स्थानिक निधीचा विनियोग कसा करावा हे ठरवण्यात करदात्यांचा वाटा मोठा असेल असे १६ सप्टेंबर, १८६३ च्या शासकीय प्रस्तावात म्हटले होते. पण १८६९ साली त्याबाबतचा कायदा मंजूर होईपर्यंत कायद्याची मान्यता न घेताच जिल्ह्यातील प्रशासक या निधीची वसुली व विनियोग करीत असत. १८६९ च्या कायद्यान्वये प्रथमच जिल्हावार लोकल फंड कमिट्या (स्थानिक निधी समित्या) स्थापन करण्यात आल्या. प्रत्येक जिल्ह्यासाठी असलेल्या समितीत ७ सभासद असत आणि जिल्हाधिकारी समितीचा अध्यक्ष असे. १८७८ साली मध्यविभागाचा आयुक्त इ. पी. रॉबर्टसन याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून वसूल केलेल्या करामुळे उपलब्ध होणारा निधी प्रत्यक्षात प्राथमिक शिक्षणासाठी, रस्ते किंवा धर्मशाळा बांधण्यासाठी, विहिरी खोदण्यासाठी खर्च केला जात नसून जातीवंत घोड्यांच्या पैदाशीसारख्या अन्य कार्यावर खर्च होत असल्याची कबुली दिली. त्यामुळेच फुल्यांनीही हा निधी मुळात ज्या कारणामुळे गोळा करण्यात आला त्या कारणासाठीच तो खर्च केला जावा असा आग्रह धरलेला दिसतो. ज्या लोकांकडून कर वसूल केला जातो त्यांच्या हितासाठीच त्याचा विनियोगही केला जावा यावर जोतीरावांनी भर दिलेला आहे. लोकल फंड समित्यांचे रूपांतर पुढे जिल्हा लोकल बोर्डात करण्यात आले.<br> '''{{gap}}सार्वजनिक पोकळ नावाच्या समाजात, एकतरी मांगमहार शेतक-यास त्या समाजाचा सभासद करून त्यास आपल्या शेजारी कधीतरी घेऊन बसले होते काय? पृ. ३१४, ३७२, ५२०, ६१४.'''<br> {{gap}}येथे जोतीराव फुल्यांनी सार्वजनिक सभा या संस्थेवर टीका केलेली आहे. “सत्सार" च्या पहिल्या अंकातही “भटब्राह्मणांनी उपस्थित केलेल्या टोलेजंग समाजात" असे लिहिताना फुल्यांच्या डोळ्यापुढे सार्वजनिक सभा तसेच प्रार्थना समाजासारख्या संस्था आहेत. “सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकात" फुल्यांनी सार्वजनिक सभेचा स्पष्ट नामनिर्देश करून तिच्यावर टीका केलेली आहे. सार्वजनिक सभा बोधी सरकारास । सर्व । वम् । फुस || ब्रह्मकुट || असे एका अखंडातही म्हटलेले आढळते.<br> {{gap}}'''सार्वजनिक सभा.''' - पर्वती देवस्थानच्या पंचांच्या गैरकारभाराला आळा घालण्यासाठी गणेश वासुदेव जोशी ऊर्फ "सार्वजनिक काका” यांनी काही संस्थानिक, सरदार- इनामदार, सावकार, व्यापारी यांच्या वतीने सार्वजनिक सभेची स्थापना केली तरी सभेची सूत्रे मुख्यतः न्या. रानड्यांच्या हाती होती. १८७५ सालापर्यंत महाराष्ट्रातील<noinclude></noinclude> ohjwxs284hc8z26iyvtotmdlboecfwi पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६५ 104 105484 231855 213717 2026-06-10T16:21:26Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८६५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213717 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude>{{left|८२४}} {{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} अनेक गावांत सार्वजनिक सभेच्या शाखा स्थापन झाल्या होत्या. सभेचे राजकारण अर्ज-विनंत्यांचेच होते. इंग्रज राज्यकर्त्यांना लोकांच्या गाहाण्यांची व मागण्यांची कल्पना देऊन त्यांच्या धोरणात बदल व्हावेत यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न सार्वजनिक सभा करीत असे. सभेचे प्रतिनिधी ग्रामीण भागात ठिकठिकाणी जाऊन माहिती गोळा करीत. तिला आकडेवारीची जोड देऊन अहवाल तयार केला जात असे आणि तो सरकारला सादर केला जात असे. १८७५ चे शेतकऱ्यांचे दंगे, १८७७ चा दुष्काळ, मल्हारराव गायकवाडांची पदच्युती वगैरे प्रकरणांत सार्वजनिक सभेने बरेच लक्ष घातले होते. सार्वजनिक सभेतर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या त्रैमासिकात विविध विषयांवरचे अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध केले जात असत. सीताराम हरी चिपळूणकर, शिवराम हरी साठे, गोपाळ कृष्ण गोखले वगैरेंनी सार्वजनिक काकांच्या निधनानंतर रानड्यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे कार्य निष्ठेने चालवले होते. १८९६ नंतर लोकमान्य टिळकांच्या जहाल गटाने ही संस्था काबीज केली.<br> {{center|समाप्त}}<noinclude></noinclude> e8us4y9uaogrdzcx8qsicv6xiqse2z7 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६६ 104 105485 231856 213718 2026-06-10T16:21:27Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८६६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213718 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Vaishu Lokhande" /></noinclude> {{center|परिशिष्ट ८}} {{center|निवडक शब्दांचा कोश}}<noinclude></noinclude> gb7apvbenkfamuq2a0siairr4gt2lmk पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६७ 104 105486 231857 213536 2026-06-10T16:21:29Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८६७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213536 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६८ 104 105487 231858 213537 2026-06-10T16:21:31Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८६८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213537 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६९ 104 105488 231859 213538 2026-06-10T16:21:32Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८६९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213538 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७० 104 105489 231860 213539 2026-06-10T16:21:34Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८७०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213539 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७१ 104 105490 231861 213540 2026-06-10T16:21:36Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८७१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213540 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७२ 104 105491 231862 213541 2026-06-10T16:21:37Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८७२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213541 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७३ 104 105492 231863 213542 2026-06-10T16:21:39Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८७३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213542 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७४ 104 105493 231864 213543 2026-06-10T16:21:41Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८७४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213543 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७५ 104 105494 231865 213544 2026-06-10T16:21:48Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८७५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213544 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७६ 104 105495 231866 213545 2026-06-10T16:21:50Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८७६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213545 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७७ 104 105496 231867 213546 2026-06-10T16:21:52Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८७७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213546 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७८ 104 105497 231868 213547 2026-06-10T16:21:54Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८७८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213547 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७९ 104 105498 231869 213548 2026-06-10T16:21:55Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८७९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213548 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८० 104 105499 231870 213549 2026-06-10T16:21:57Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८८०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213549 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८१ 104 105500 231871 213550 2026-06-10T16:21:59Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८८१]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८१]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213550 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८२ 104 105501 231872 213551 2026-06-10T16:22:01Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८८२]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८२]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213551 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८३ 104 105502 231873 213552 2026-06-10T16:22:02Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८८३]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८३]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213552 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८४ 104 105503 231874 213553 2026-06-10T16:22:03Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८८४]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८४]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213553 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८५ 104 105504 231875 213554 2026-06-10T16:22:03Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८८५]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८५]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213554 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८६ 104 105505 231876 213555 2026-06-10T16:22:04Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८८६]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८६]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213555 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८७ 104 105506 231877 213556 2026-06-10T16:22:05Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८८७]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८७]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213556 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८८ 104 105507 231878 213557 2026-06-10T16:22:06Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८८८]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८८]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213557 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८९ 104 105508 231879 213558 2026-06-10T16:22:08Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८८९]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८९]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213558 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९० 104 105509 231880 213559 2026-06-10T16:22:10Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[पान:Samagra Phule.pdf/८९०]] वरुन [[पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९०]] ला हलविला: surce file name changed. (By [[meta:Indic-TechCom/Tools|MassMover]]) 213559 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Vaishu Lokhande" /></noinclude><noinclude></noinclude> bxh7m22qzabkfdmojyd3kozksils07o अनुक्रमणिका चर्चा:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf 107 110528 231898 230821 2026-06-10T16:31:26Z QueerEcofeminist 918 QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[अनुक्रमणिका चर्चा:Samagra Phule.pdf]] वरुन [[अनुक्रमणिका चर्चा:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf]] ला हलविला: Misspelled title 230821 wikitext text/x-wiki == ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे == @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], फाइलचे नाव हे कोणत्याही वाचकास कधीच दिसत नाही ते कोणत्याही भाषेत असेल तर त्याने कोणतीही अडचण येत नाही. मी अनेकदा विरोध करुनही आपण पुन्हा पुन्हा, फाइलचे नाव मराठीत हवे असा आग्रह धरता आणि तसे करता सुद्धा, त्यामुळे अनेकानी केलेले काम पुढे नेण्यास अडचणी येतात. आता ह्या पानांचे झालेले ओसीआर उपयोगात आणणे शक्य नाही कारण मुळ फाईलचे नाव बदलले आहे. [[Special:Diff/1022996291]] येथे तुम्ही फाइलचे नाव बदलुन घेतले आणि आता ह्या अनुक्रमाणिकेवर मी केलेले काम पुढे नेणे अशक्य आहे. . काय करावे ते सुचवा आणि कृपा करुन असे नाव पुन्हा बदलु नका, किमान कुणाला तरी विचारात घ्या. धन्यवाद [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] २२:०३, १ जून २०२६ (IST) :होय, आपले म्हणणे योग्य आहे. मी येथे झालेले काम न तपासता नाव बदलण्याची विनंती केली. क्षमस्व. येथील काम सुसूत्रपणे करण्यासाठी पुन्हा नाव पूर्ववत करण्यासाठी विनंती करावी असे वाटते. आपले मत द्यावे. [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ११:४९, ३ जून २०२६ (IST) ::@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], इथे समस्या हिच आहे आता ते उलटवुन पुन्हा परत पहिल्यासारखे होत् नाही, आधी एकदा हेच झालेले आहे, तेव्हाही मी तुम्हाला हीच विनंती केली होती, आपण पुन्हा पुन्हा फक्त मराठी नावाचा आग्रह धरुन रहाणे योग्य नाही हे मी अनेकदा तांत्रिक समस्यांमुळे सांगितले आहे. [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:१२, ६ जून २०२६ (IST) :::सध्या मी अनुक्रमाणिका आणि सगळी काम झालेली पाने नविन नावावर् हलवत आहे त्याने काम भागेल. अशी आशा. @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:२३, ६ जून २०२६ (IST) ::::@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], सगळी पाने नवीन नावावर हलवली जातील तेव्हा काम होईल सध्या फक्त नवीन नावावर घेत आहे, ती पूर्ण झाली की अनुक्रमणिका सुद्धा घेईन काम होईल. कृपया पुन्हा नाव बदलताना निदान त्यावर काम झाले आहे की नाही हे तपसा, नाव बदलले नाही गेले तरी चालेल पण हे जास्तीचे काम खूप किचकट आणि वैताग आणणारे आहे. [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:४४, ६ जून २०२६ (IST) k8jh8asuhra3r0qwjm9m4lm7p2hsga1 231910 231898 2026-06-10T16:40:47Z QueerEcofeminist 918 /* ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे */ Reply 231910 wikitext text/x-wiki == ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे == @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], फाइलचे नाव हे कोणत्याही वाचकास कधीच दिसत नाही ते कोणत्याही भाषेत असेल तर त्याने कोणतीही अडचण येत नाही. मी अनेकदा विरोध करुनही आपण पुन्हा पुन्हा, फाइलचे नाव मराठीत हवे असा आग्रह धरता आणि तसे करता सुद्धा, त्यामुळे अनेकानी केलेले काम पुढे नेण्यास अडचणी येतात. आता ह्या पानांचे झालेले ओसीआर उपयोगात आणणे शक्य नाही कारण मुळ फाईलचे नाव बदलले आहे. [[Special:Diff/1022996291]] येथे तुम्ही फाइलचे नाव बदलुन घेतले आणि आता ह्या अनुक्रमाणिकेवर मी केलेले काम पुढे नेणे अशक्य आहे. . काय करावे ते सुचवा आणि कृपा करुन असे नाव पुन्हा बदलु नका, किमान कुणाला तरी विचारात घ्या. धन्यवाद [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] २२:०३, १ जून २०२६ (IST) :होय, आपले म्हणणे योग्य आहे. मी येथे झालेले काम न तपासता नाव बदलण्याची विनंती केली. क्षमस्व. येथील काम सुसूत्रपणे करण्यासाठी पुन्हा नाव पूर्ववत करण्यासाठी विनंती करावी असे वाटते. आपले मत द्यावे. [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ११:४९, ३ जून २०२६ (IST) ::@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], इथे समस्या हिच आहे आता ते उलटवुन पुन्हा परत पहिल्यासारखे होत् नाही, आधी एकदा हेच झालेले आहे, तेव्हाही मी तुम्हाला हीच विनंती केली होती, आपण पुन्हा पुन्हा फक्त मराठी नावाचा आग्रह धरुन रहाणे योग्य नाही हे मी अनेकदा तांत्रिक समस्यांमुळे सांगितले आहे. [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:१२, ६ जून २०२६ (IST) :::सध्या मी अनुक्रमाणिका आणि सगळी काम झालेली पाने नविन नावावर् हलवत आहे त्याने काम भागेल. अशी आशा. @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:२३, ६ जून २०२६ (IST) ::::@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], सगळी पाने नवीन नावावर हलवली जातील तेव्हा काम होईल सध्या फक्त नवीन नावावर घेत आहे, ती पूर्ण झाली की अनुक्रमणिका सुद्धा घेईन काम होईल. कृपया पुन्हा नाव बदलताना निदान त्यावर काम झाले आहे की नाही हे तपसा, नाव बदलले नाही गेले तरी चालेल पण हे जास्तीचे काम खूप किचकट आणि वैताग आणणारे आहे. [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:४४, ६ जून २०२६ (IST) :::::@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], झाले, सगळे पूर्ववत करायला जवळपास ९१५ संपादने करावी लागली, ती अवजारे वापरुन केली असली तरी खूप किचकट होते. बाकी पुढे तुम्ही परस्पर नाव बदलणार नाही अशी आशा. [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] २२:१०, १० जून २०२६ (IST) ja5mx9dd6wv52dqqstnshznkkrbp35m 231911 231910 2026-06-10T16:42:51Z QueerEcofeminist 918 /* ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे */ info 231911 wikitext text/x-wiki == ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे == @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], फाइलचे नाव हे कोणत्याही वाचकास कधीच दिसत नाही ते कोणत्याही भाषेत असेल तर त्याने कोणतीही अडचण येत नाही. मी अनेकदा विरोध करुनही आपण पुन्हा पुन्हा, फाइलचे नाव मराठीत हवे असा आग्रह धरता आणि तसे करता सुद्धा, त्यामुळे अनेकानी केलेले काम पुढे नेण्यास अडचणी येतात. आता ह्या पानांचे झालेले ओसीआर उपयोगात आणणे शक्य नाही कारण मुळ फाईलचे नाव बदलले आहे. [[commons:Special:Diff/1022996291]] येथे तुम्ही फाइलचे नाव बदलुन घेतले आणि आता ह्या अनुक्रमाणिकेवर मी केलेले काम पुढे नेणे अशक्य आहे. . काय करावे ते सुचवा आणि कृपा करुन असे नाव पुन्हा बदलु नका, किमान कुणाला तरी विचारात घ्या. धन्यवाद [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] २२:०३, १ जून २०२६ (IST) :होय, आपले म्हणणे योग्य आहे. मी येथे झालेले काम न तपासता नाव बदलण्याची विनंती केली. क्षमस्व. येथील काम सुसूत्रपणे करण्यासाठी पुन्हा नाव पूर्ववत करण्यासाठी विनंती करावी असे वाटते. आपले मत द्यावे. [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ११:४९, ३ जून २०२६ (IST) ::@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], इथे समस्या हिच आहे आता ते उलटवुन पुन्हा परत पहिल्यासारखे होत् नाही, आधी एकदा हेच झालेले आहे, तेव्हाही मी तुम्हाला हीच विनंती केली होती, आपण पुन्हा पुन्हा फक्त मराठी नावाचा आग्रह धरुन रहाणे योग्य नाही हे मी अनेकदा तांत्रिक समस्यांमुळे सांगितले आहे. [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:१२, ६ जून २०२६ (IST) :::सध्या मी अनुक्रमाणिका आणि सगळी काम झालेली पाने नविन नावावर् हलवत आहे त्याने काम भागेल. अशी आशा. @[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:२३, ६ जून २०२६ (IST) ::::@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], सगळी पाने नवीन नावावर हलवली जातील तेव्हा काम होईल सध्या फक्त नवीन नावावर घेत आहे, ती पूर्ण झाली की अनुक्रमणिका सुद्धा घेईन काम होईल. कृपया पुन्हा नाव बदलताना निदान त्यावर काम झाले आहे की नाही हे तपसा, नाव बदलले नाही गेले तरी चालेल पण हे जास्तीचे काम खूप किचकट आणि वैताग आणणारे आहे. [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ०९:४४, ६ जून २०२६ (IST) :::::@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], झाले, सगळे पूर्ववत करायला जवळपास ९१५ संपादने करावी लागली, ती अवजारे वापरुन केली असली तरी खूप किचकट होते. बाकी पुढे तुम्ही परस्पर नाव बदलणार नाही अशी आशा. [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] २२:१०, १० जून २०२६ (IST) 9lj26ybeia3uflqv82a3v1bz3ltp859 पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/१ 104 110591 231925 231648 2026-06-10T17:09:14Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 231925 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{center|'''योगसोपान-पूर्वचतुष्क.'''}} {{center|( यम, नियम, आसन आणि प्राणायाम ह्यांच्या परिपूर्ण विवेचनासहित ऋषिप्रणीत योगशास्त्र )}} {{center|'''संस्कृत श्लोक, मराठी भाषान्तरासहित.'''}} {{center|'''अस्सल फोटोंवरून ३७ आसनाकृति ह्यांत दिल्या आहेत.'''}} {{center|––––––––––}} {{center|हें पुस्तक}} {{center|स्वानुभवानें आणि योगशास्त्राच्या माहितीनें युक्त असें}} {{center|'''{{large|हरिभक्तिपरायण नारायणबुवा घमंडे योगी}}'''}} {{center|ह्यांनीं}} {{center|'''लोककल्याणार्थ केलें.'''}} {{center|––––––––––}} सन १८४७ चा आक्ट २० आणि सन १८६७ चा आक्ट २५ प्रमाणें कै. जनार्दन महादेव गुर्जर यांनीं रजिस्टर केलेले या पुस्तकाचे कॉपी राईट, आसनाकृति, पुनर्मुद्रण, भाषांतर वगैरे सर्व हक्क त्यांच्या मुलांपासून प्रकाशक '''तुकाराम पुंडलीक शेट्ये''' यांनीं विकत घेऊन आपले स्वाधीन ठेविले आहेत. {{center|––––––––––}} {{center|'''किंमत १ रुपया.'''}} {{left|'''द्वितीयावृत्ति ]'''}} {{right|'''[ सन १९२७.'''}} {{center|🝔 🝔 🝔}}<noinclude></noinclude> 91vfciq62zkdl4iosm9mgcimv3v3reg 231991 231925 2026-06-11T05:14:46Z Annni07 6055 231991 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{center|{{xxxx-larger|'''योगसोपान-पूर्वचतुष्क.'''}}}} {{rule}} {{center|( यम, नियम, आसन आणि प्राणायाम ह्यांच्या परिपूर्ण विवेचनासहित<br> ऋषिप्रणीत योगशास्त्र )}} {{center|'''संस्कृत श्लोक, मराठी भाषान्तरासहित.'''}} {{center|'''अस्सल फोटोंवरून ३७ आसनाकृति ह्यांत दिल्या आहेत.'''}} {{dhr|1em}} {{rule}} {{center|हें पुस्तक}} {{center|स्वानुभवानें आणि योगशास्त्राच्या माहितीनें युक्त असें}} {{center|{{large|'''हरिभक्तिपरायण नारायणबुवा घमंडे योगी'''}}}} {{center|ह्यांनीं}} {{center|{{large|'''लोककल्याणार्थ केलें.'''}}}} {{rule}} {{gap}}सन १८४७ चा आक्ट २० आणि सन १८६७ चा आक्ट २५ प्रमाणें कै. जनार्दन महादेव गुर्जर यांनीं रजिस्टर केलेले या पुस्तकाचे कॉपी राईट, आसनाकृति, पुनर्मुद्रण, भाषांतर वगैरे सर्व हक्क त्यांच्या मुलांपासून प्रकाशक '''तुकाराम पुंडलीक शेट्ये''' यांनीं विकत घेऊन आपले स्वाधीन ठेविले आहेत. {{dhr|1em}} {{center|'''किंमत १ रुपया.'''}} {{center|* * *}} {{left|द्वितीयावृत्ति ]}} {{right|[ सन १९२७. }}<noinclude></noinclude> 7b49ykd8bc76d5bmt8pvugzdnmpwcbd 231992 231991 2026-06-11T05:15:30Z Annni07 6055 231992 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{center|{{xxxx-larger|'''योगसोपान-पूर्वचतुष्क.'''}}}} {{rule}} {{center|( यम, नियम, आसन आणि प्राणायाम ह्यांच्या परिपूर्ण विवेचनासहित<br> ऋषिप्रणीत योगशास्त्र )}} {{center|'''संस्कृत श्लोक, मराठी भाषान्तरासहित.'''}} {{center|'''अस्सल फोटोंवरून ३७ आसनाकृति ह्यांत दिल्या आहेत.'''}} {{dhr|1em}} {{rule}} {{center|हें पुस्तक}} {{center|स्वानुभवानें आणि योगशास्त्राच्या माहितीनें युक्त असें}} {{center|{{large|'''हरिभक्तिपरायण नारायणबुवा घमंडे योगी'''}}}} {{center|ह्यांनीं}} {{center|{{large|'''लोककल्याणार्थ केलें.'''}}}} {{rule}} {{gap}}सन १८४७ चा आक्ट २० आणि सन १८६७ चा आक्ट २५ प्रमाणें कै. जनार्दन महादेव गुर्जर यांनीं रजिस्टर केलेले या पुस्तकाचे कॉपी राईट, आसनाकृति, पुनर्मुद्रण, भाषांतर वगैरे सर्व हक्क त्यांच्या मुलांपासून प्रकाशक '''तुकाराम पुंडलीक शेट्ये''' यांनीं विकत घेऊन आपले स्वाधीन ठेविले आहेत. {{rule}} {{center|'''किंमत १ रुपया.'''}} {{center|* * *}} {{left|द्वितीयावृत्ति ]}} {{right|[ सन १९२७. }}<noinclude></noinclude> s9qx6app1pqqyov4a1xy3etv2pj63ad पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/५ 104 110592 231649 2026-06-10T15:56:24Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 231649 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude><center>'''श्रीलक्ष्मीव्यंकटेश प्रसन्न.'''</center> <center>'''प्रस्तावना.'''</center> <center>⸻⸻⸻</center> <center> '''नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं ।<br />''' '''प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् ॥<br />''' '''मयानुकूलेन नभस्वतेरितं ।<br />''' '''पुमान् भवाब्धिं न तरेत् स आत्महा ॥ १ ॥''' '''</center> <div style="text-align:right;">( श्रीमद्भागवत )</div> चौन्यायशी लक्ष योनीमध्ये श्रेष्ठ अशी नृदेहरूप नौका पुरुषास मिळाली असून शिवाय जिचा नावाडी श्रीगुरु व माझी अनुकूलतारूप जिला वारा आहे, अशा नौकेतून जर पुरुष भवसमुद्र पार गेला नाहीं तर त्यास आत्मघातकी म्हणावें, असें शुक्राचार्यांनी राजा परीक्षितीस सांगितलें आहे. तर आत्मघाताचा दोष आपल्यावर न येण्यासाठी प्रत्येक मनुष्याने प्रयत्न करणें आवश्यक आहे; व त्यास शास्त्राचा अभ्यास करण्यावांचून दुसरें साधन नाहीं. तथापि मनुष्यानें सर्व शास्त्रें अवगत करून घेण्याची इच्छा केल्यास ती दुःसाध्य आहे. कारण, <center> अनन्तपारं किल शब्दशास्त्रं ।<br /> स्वल्पं तथाऽयुर्बहवश्च विघ्नाः ॥<br /> सारं ततो ग्राह्यमपास्य फल्गु ।<br /> हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात् ॥ १ ॥ </center> अनन्त विघ्नांनी युक्त अशा थोड्याशा आयुष्यांत ज्याचा पार नाहीं अशा शब्द- शास्त्राचा अभ्यास होणें अशक्य आहे; ह्मणून हंसक्षीरन्यायानें सर्व शास्त्रांत श्रेष्ठ व सारभूत अशाच शास्त्राचा अभ्यास करावा, असें शिवसंहितेंत सांगितलें आहे.<noinclude></noinclude> qxanvccwm3cxhc6sx9ib4hlmops8qpe 232001 231649 2026-06-11T05:36:19Z Annni07 6055 232001 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||श्रीलक्ष्मीव्यंकटेश प्रसन्न.}}</noinclude><center>'''प्रस्तावना.'''</center> {{rule}} <center> '''नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं ।<br />''' '''प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् ॥<br />''' '''मयानुकूलेन नभस्वतेरितं ।<br />''' '''पुमान् भवाब्धिं न तरेत् स आत्महा ॥ १ ॥''' '''</center> {{right|( श्रीमद्भागवत )}} चौन्यायशी लक्ष योनीमध्ये श्रेष्ठ अशी नृदेहरूप नौका पुरुषास मिळाली असून शिवाय जिचा नावाडी श्रीगुरु व माझी अनुकूलतारूप जिला वारा आहे, अशा नौकेतून जर पुरुष भवसमुद्र पार गेला नाहीं तर त्यास आत्मघातकी म्हणावें, असें शुक्राचार्यांनी राजा परीक्षितीस सांगितलें आहे. तर आत्मघाताचा दोष आपल्यावर न येण्यासाठी प्रत्येक मनुष्याने प्रयत्न करणें आवश्यक आहे; व त्यास शास्त्राचा अभ्यास करण्यावांचून दुसरें साधन नाहीं. तथापि मनुष्यानें सर्व शास्त्रें अवगत करून घेण्याची इच्छा केल्यास ती दुःसाध्य आहे. कारण, <center> अनन्तपारं किल शब्दशास्त्रं ।<br /> स्वल्पं तथाऽयुर्बहवश्च विघ्नाः ॥<br /> सारं ततो ग्राह्यमपास्य फल्गु ।<br /> हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात् ॥ १ ॥ </center> अनन्त विघ्नांनी युक्त अशा थोड्याशा आयुष्यांत ज्याचा पार नाहीं अशा शब्द- शास्त्राचा अभ्यास होणें अशक्य आहे; ह्मणून हंसक्षीरन्यायानें सर्व शास्त्रांत श्रेष्ठ व सारभूत अशाच शास्त्राचा अभ्यास करावा, असें शिवसंहितेंत सांगितलें आहे.<noinclude></noinclude> ppznaq9d1vg2gup03tzeop8prq7di7h पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/६ 104 110593 231650 2026-06-10T16:04:40Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 231650 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{rh|६|योगसोपान-प्रस्तावना.}} <center> येन ज्ञातमिदं सर्वं ज्ञातं भवति निश्चितम् ॥<br /> तस्मिन् परिश्रमः कार्यः किमन्यच्छास्त्रभाषितम् ॥ १ ॥ </center> ज्याच्या ज्ञानाने सर्व जाणितां येतें अशा शास्त्राविषयीं श्रम करावे. परंतु असें शास्त्र कोणतें हें समजलें पाहिजे, तर या विषयींही शिवसंहितेत शंकरांनी पार्वतीस असें स्पष्ट सांगितलें आहे कीं— <center> आलोक्य सर्वशास्त्राणि विचार्य च पुनः पुनः ॥<br /> एकमेव सुनिष्पन्नं योगशास्त्रं परं मतम् ॥ १ ॥ </center> अर्थः—सर्व शास्त्रे पाहून व वारंवार विचार करून पाहतां एक योगशास्त्रच मला परम मान्य असे दिसून आले; आणि ह्मणूनच हें प्रपंच व परमार्थसुखेच्छुकांस परम आवश्यक आहे. तर मग या शास्त्राविषयीं प्रस्तुत बरीच वर्षे सर्व लोकांत मोठी उदासीनता येण्याचे कारण काय, याचा विचार केला ह्मणजे या उदासीनतेस बरींच कारणें आहेत असें दिसून येतें. त्यांतः— १ पहिले कारण—लोकांचा असा समज झाला आहे कीं, हें शास्त्र केवळ पार- मार्थिक आहे आणि बहुतेक नव्हे, सर्व समाज प्रपंचाचे मार्गी लागला आहे, ह्मणून समाजांत या शास्त्राबद्दल उदासीनता दिसून येत असावी. २ दुसरें कारण—या शास्त्रापासून उत्पन्न होणारी फळे असंभवनीय अशी बाह्यतः दिसतात. ह्मणजे या शास्त्रापासून पाण्यावर फुलासारखें तरतां येतें. पक्ष्यासारखें आकाशांत उडतां येतें. देहांतर करतां येतें. एके ठिकाणी बसून जगांत कोठें काय चाललें आहे तें समजतें. अशा कित्येक गोष्टींची सिद्धि योगाभ्यासानें होते ह्मणून सांगितलें आहे, व हें सर्व खरें आहे. यास श्रीमच्छंकराचार्यांचें स्पष्ट प्रमाण आहे. ह्मणजे श्रीमच्छंकराचार्य मंडणमिश्राचे येथे गवाक्षांतून गेले; तसेंच मंडणमिश्राशीं (त्यानें पडद्याआड कुंभावर श्रीसरस्वतीचें आवाहन केलें <references /> <ref>‘आलोच्य’ असाही पाठ आहे व त्यांत विशेष अर्थ उत्पन्न होतो.</ref><noinclude></noinclude> ht88gbr1712lzgghoo4ipej2uc7i6wr 232002 231650 2026-06-11T05:39:43Z Annni07 6055 232002 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|६|योगसोपान-प्रस्तावना.}}</noinclude><center> '''येन ज्ञातमिदं सर्वं ज्ञातं भवति निश्चितम् ॥<br /> '''तस्मिन् परिश्रमः कार्यः किमन्यच्छास्त्रभाषितम्''' ॥ १ ॥''' </center> ज्याच्या ज्ञानाने सर्व जाणितां येतें अशा शास्त्राविषयीं श्रम करावे. परंतु असें शास्त्र कोणतें हें समजलें पाहिजे, तर या विषयींही शिवसंहितेत शंकरांनी पार्वतीस असें स्पष्ट सांगितलें आहे कीं— <center> '''आलोक्य सर्वशास्त्राणि विचार्य च पुनः पुनः ॥<br /> '''एकमेव सुनिष्पन्नं योगशास्त्रं परं मतम्''' ॥ १ ॥''' </center> {{gap}}अर्थः—सर्व शास्त्रे पाहून व वारंवार विचार करून पाहतां एक योगशास्त्रच मला परम मान्य असे दिसून आले; आणि ह्मणूनच हें प्रपंच व परमार्थसुखेच्छुकांस परम आवश्यक आहे. {{gap}}तर मग या शास्त्राविषयीं प्रस्तुत बरीच वर्षे सर्व लोकांत मोठी उदासीनता येण्याचे कारण काय, याचा विचार केला ह्मणजे या उदासीनतेस बरींच कारणें आहेत असें दिसून येतें. त्यांतः— {{gap}}१ पहिले कारण—लोकांचा असा समज झाला आहे कीं, हें शास्त्र केवळ पार- मार्थिक आहे आणि बहुतेक नव्हे, सर्व समाज प्रपंचाचे मार्गी लागला आहे, ह्मणून समाजांत या शास्त्राबद्दल उदासीनता दिसून येत असावी. {{gap}}२ दुसरें कारण—या शास्त्रापासून उत्पन्न होणारी फळे असंभवनीय अशी बाह्यतः दिसतात. ह्मणजे या शास्त्रापासून पाण्यावर फुलासारखें तरतां येतें. पक्ष्यासारखें आकाशांत उडतां येतें. देहांतर करतां येतें. एके ठिकाणी बसून जगांत कोठें काय चाललें आहे तें समजतें. अशा कित्येक गोष्टींची सिद्धि योगाभ्यासानें होते ह्मणून सांगितलें आहे, व हें सर्व खरें आहे. यास श्रीमच्छंकराचार्यांचें स्पष्ट प्रमाण आहे. ह्मणजे श्रीमच्छंकराचार्य मंडणमिश्राचे येथे गवाक्षांतून गेले; तसेंच मंडणमिश्राशीं (त्यानें पडद्याआड कुंभावर श्रीसरस्वतीचें आवाहन केलें {{rule}}<noinclude><ref>‘आलोच्य’ असाही पाठ आहे व त्यांत विशेष अर्थ उत्पन्न होतो.</ref></noinclude> 7g5hwtj43x9jnwio427c8i3wk228utn 232008 232002 2026-06-11T05:53:20Z Annni07 6055 232008 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|६|योगसोपान-प्रस्तावना.}}</noinclude><center> '''येन ज्ञातमिदं सर्वं ज्ञातं भवति निश्चितम् ॥<br /> '''तस्मिन् परिश्रमः कार्यः किमन्यच्छास्त्रभाषितम्''' ॥ १ ॥''' </center><br> ज्याच्या ज्ञानाने सर्व जाणितां येतें अशा शास्त्राविषयीं श्रम करावे. परंतु असें शास्त्र कोणतें हें समजलें पाहिजे, तर या विषयींही शिवसंहितेत शंकरांनी पार्वतीस असें स्पष्ट सांगितलें आहे कीं—<br> <center> '''आलोक्य सर्वशास्त्राणि विचार्य च पुनः पुनः ॥<br /> '''एकमेव सुनिष्पन्नं योगशास्त्रं परं मतम्''' ॥ १ ॥''' </center><br> {{gap}}अर्थः—सर्व शास्त्रे पाहून व वारंवार विचार करून पाहतां एक योगशास्त्रच मला परम मान्य असे दिसून आले; आणि ह्मणूनच हें प्रपंच व परमार्थसुखेच्छुकांस परम आवश्यक आहे.<br> {{gap}}तर मग या शास्त्राविषयीं प्रस्तुत बरीच वर्षे सर्व लोकांत मोठी उदासीनता येण्याचे कारण काय, याचा विचार केला ह्मणजे या उदासीनतेस बरींच कारणें आहेत असें दिसून येतें. त्यांतः—<br> {{gap}}१ पहिले कारण—लोकांचा असा समज झाला आहे कीं, हें शास्त्र केवळ पार- मार्थिक आहे आणि बहुतेक नव्हे, सर्व समाज प्रपंचाचे मार्गी लागला आहे, ह्मणून समाजांत या शास्त्राबद्दल उदासीनता दिसून येत असावी.<br> {{gap}}२ दुसरें कारण—या शास्त्रापासून उत्पन्न होणारी फळे असंभवनीय अशी बाह्यतः दिसतात. ह्मणजे या शास्त्रापासून पाण्यावर फुलासारखें तरतां येतें. पक्ष्यासारखें आकाशांत उडतां येतें. देहांतर करतां येतें. एके ठिकाणी बसून जगांत कोठें काय चाललें आहे तें समजतें. अशा कित्येक गोष्टींची सिद्धि योगाभ्यासानें होते ह्मणून सांगितलें आहे, व हें सर्व खरें आहे. यास श्रीमच्छंकराचार्यांचें स्पष्ट प्रमाण आहे. ह्मणजे श्रीमच्छंकराचार्य मंडणमिश्राचे येथे गवाक्षांतून गेले; तसेंच मंडणमिश्राशीं (त्यानें पडद्याआड कुंभावर श्रीसरस्वतीचें आवाहन केलें {{rule}}<noinclude><ref>‘आलोच्य’ असाही पाठ आहे व त्यांत विशेष अर्थ उत्पन्न होतो.</ref></noinclude> guktsmcatz4mdkrwt0bt04hof86y2tq 232009 232008 2026-06-11T05:54:42Z Annni07 6055 232009 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|६|योगसोपान-प्रस्तावना.}}</noinclude><center> '''येन ज्ञातमिदं सर्वं ज्ञातं भवति निश्चितम् ॥<br /> '''तस्मिन् परिश्रमः कार्यः किमन्यच्छास्त्रभाषितम्''' ॥ १ ॥''' </center><br> ज्याच्या ज्ञानाने सर्व जाणितां येतें अशा शास्त्राविषयीं श्रम करावे. परंतु असें शास्त्र कोणतें हें समजलें पाहिजे, तर या विषयींही शिवसंहितेत शंकरांनी पार्वतीस असें स्पष्ट सांगितलें आहे कीं—<br><center> '''आलोक्य सर्वशास्त्राणि विचार्य च पुनः पुनः ॥<br /> '''एकमेव सुनिष्पन्नं योगशास्त्रं परं मतम्''' ॥ १ ॥''' </center> {{gap}}अर्थः—सर्व शास्त्रे पाहून व वारंवार विचार करून पाहतां एक योगशास्त्रच मला परम मान्य असे दिसून आले; आणि ह्मणूनच हें प्रपंच व परमार्थसुखेच्छुकांस परम आवश्यक आहे.<br> {{gap}}तर मग या शास्त्राविषयीं प्रस्तुत बरीच वर्षे सर्व लोकांत मोठी उदासीनता येण्याचे कारण काय, याचा विचार केला ह्मणजे या उदासीनतेस बरींच कारणें आहेत असें दिसून येतें. त्यांतः—<br> {{gap}}१ पहिले कारण—लोकांचा असा समज झाला आहे कीं, हें शास्त्र केवळ पार- मार्थिक आहे आणि बहुतेक नव्हे, सर्व समाज प्रपंचाचे मार्गी लागला आहे, ह्मणून समाजांत या शास्त्राबद्दल उदासीनता दिसून येत असावी.<br> {{gap}}२ दुसरें कारण—या शास्त्रापासून उत्पन्न होणारी फळे असंभवनीय अशी बाह्यतः दिसतात. ह्मणजे या शास्त्रापासून पाण्यावर फुलासारखें तरतां येतें. पक्ष्यासारखें आकाशांत उडतां येतें. देहांतर करतां येतें. एके ठिकाणी बसून जगांत कोठें काय चाललें आहे तें समजतें. अशा कित्येक गोष्टींची सिद्धि योगाभ्यासानें होते ह्मणून सांगितलें आहे, व हें सर्व खरें आहे. यास श्रीमच्छंकराचार्यांचें स्पष्ट प्रमाण आहे. ह्मणजे श्रीमच्छंकराचार्य मंडणमिश्राचे येथे गवाक्षांतून गेले; तसेंच मंडणमिश्राशीं (त्यानें पडद्याआड कुंभावर श्रीसरस्वतीचें आवाहन केलें {{rule}}<noinclude><ref>‘आलोच्य’ असाही पाठ आहे व त्यांत विशेष अर्थ उत्पन्न होतो.</ref></noinclude> 6xxno0e7gv2mzbzbumv9gqnsnhtn0wi 232010 232009 2026-06-11T05:56:46Z Annni07 6055 232010 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|६|योगसोपान-प्रस्तावना.}}</noinclude><center> '''येन ज्ञातमिदं सर्वं ज्ञातं भवति निश्चितम् ॥<br /> '''तस्मिन् परिश्रमः कार्यः किमन्यच्छास्त्रभाषितम्''' ॥ १ ॥'''<br> </center> ज्याच्या ज्ञानाने सर्व जाणितां येतें अशा शास्त्राविषयीं श्रम करावे. परंतु असें शास्त्र कोणतें हें समजलें पाहिजे, तर या विषयींही शिवसंहितेत शंकरांनी पार्वतीस असें स्पष्ट सांगितलें आहे कीं— <center> '''आलोक्य सर्वशास्त्राणि विचार्य च पुनः पुनः ॥<br /> '''एकमेव सुनिष्पन्नं योगशास्त्रं परं मतम्''' ॥ १ ॥''' </center> {{gap}}अर्थः—सर्व शास्त्रे पाहून व वारंवार विचार करून पाहतां एक योगशास्त्रच मला परम मान्य असे दिसून आले; आणि ह्मणूनच हें प्रपंच व परमार्थसुखेच्छुकांस परम आवश्यक आहे.<br> {{gap}}तर मग या शास्त्राविषयीं प्रस्तुत बरीच वर्षे सर्व लोकांत मोठी उदासीनता येण्याचे कारण काय, याचा विचार केला ह्मणजे या उदासीनतेस बरींच कारणें आहेत असें दिसून येतें. त्यांतः—<br> {{gap}}१ पहिले कारण—लोकांचा असा समज झाला आहे कीं, हें शास्त्र केवळ पार- मार्थिक आहे आणि बहुतेक नव्हे, सर्व समाज प्रपंचाचे मार्गी लागला आहे, ह्मणून समाजांत या शास्त्राबद्दल उदासीनता दिसून येत असावी.<br> {{gap}}२ दुसरें कारण—या शास्त्रापासून उत्पन्न होणारी फळे असंभवनीय अशी बाह्यतः दिसतात. ह्मणजे या शास्त्रापासून पाण्यावर फुलासारखें तरतां येतें. पक्ष्यासारखें आकाशांत उडतां येतें. देहांतर करतां येतें. एके ठिकाणी बसून जगांत कोठें काय चाललें आहे तें समजतें. अशा कित्येक गोष्टींची सिद्धि योगाभ्यासानें होते ह्मणून सांगितलें आहे, व हें सर्व खरें आहे. यास श्रीमच्छंकराचार्यांचें स्पष्ट प्रमाण आहे. ह्मणजे श्रीमच्छंकराचार्य मंडणमिश्राचे येथे गवाक्षांतून गेले; तसेंच मंडणमिश्राशीं (त्यानें पडद्याआड कुंभावर श्रीसरस्वतीचें आवाहन केलें {{rule}}<noinclude><ref>‘आलोच्य’ असाही पाठ आहे व त्यांत विशेष अर्थ उत्पन्न होतो.</ref></noinclude> f6023akmur9w4hl4sta5gocqqi4gc3y पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/७ 104 110594 231799 2026-06-10T16:17:51Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 231799 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{rh||योगसोपान—प्रस्तावना.|७}} होतें व ती प्रश्न करीत होती) वाद चालला असतां श्रीमच्छंकराचार्य पराजित होत नाहींत असें पाहून आंतून मुद्दाम शृंगारशास्त्राचा प्रश्न आला, व त्यास उत्तर देण्याबरोबर आंतून ध्वनि निघाला कीं, गोष्ट खोटी आहे; तूं ८ वें वर्षीं संन्यासी झालास आणि अनुभवावांचून पोकळ उत्तर देतोस. तेव्हां श्रीमच्छंकराचार्यांनी ६ महिन्यांची मुदत घेऊन त्या मुदतींत अमरु राजाचे मृत शरीरांत प्रवेश करून, सर्व उपभोग घेऊन नंतर सर्व उत्तरें दिलीं. ह्या गोष्टी जर खऱ्या आहेत, तर आतां मात्र या शास्त्रापासून ह्या गोष्टी होणार नाहींत असें मानणें कोत्या विचाराचें होणार आहे. ३ तिसरें कारण—योगाचीं (हठाचीं) साधनें कठीण. ह्मणजे धौति, बस्ति आदिकरून षट्कर्में, ८४ आसनें आणि विपरीत करणी आदिकरून मुद्रा ही करण्यास फारच कठिणशीं वाटतात. ह्मणूनही लोकांत याविषयीं उदासीनता दिसत असावी. ४ चवथें कारण—ह्या शास्त्राचा गुप्तपणा ह्मणजे प्रत्येक ठिकाणी हें परम गुप्त ठेवावें असें सांगितलें आहे. परंतु कोणापासून व किती गुप्त ठेवावें हें न पाहतां सर्वांपासूनच गुप्त ठेवितात, तेणेंकरूनही याविषयीं उदासीनता उत्पन्न होत असावी. ५ पांचवें कारण—या शास्त्राचे खरे व पूर्ण ज्ञाते पुरुष फारच थोडे आहेत व ते जनसमाजाचा त्याग करून गिरिकंदरीं राहणारे असल्यामुळे प्रसंगोपात्त एखाद्या मनुष्यास एखाद्या चमत्कारावांचून दुसरा लाभ होत नाहीं. दुसरें, ढोंगी अल्प स्वल्प ज्ञान असणारे मोठ्या डौलानें राहून लोकांची वंचना करणारे असल्यामुळे त्यांजकडूनही लोकसमाजास कोणत्याही प्रकारचा लाभ होणें शक्य नाहीं. एवंच दोघांपासून लोकसमाजास या शास्त्राचा लाभ न झाल्यामुळे लोकसमाजांत याबद्दल उदासीनता आली असावी. ६ सहावें कारण—अव्यवस्थितपणानें केलेल्या कृति (आसनें, मुद्रा, प्राणायाम, अथवा षट्कर्में) व त्यांपासून झालेले भयंकर परिणाम हे होत. परंतु ही गोष्ट<noinclude></noinclude> q27owbndg45vvze4uki5lzucwblovyt 232003 231799 2026-06-11T05:42:55Z Annni07 6055 232003 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||योगसोपान—प्रस्तावना.|७}}</noinclude>होतें व ती प्रश्न करीत होती) वाद चालला असतां श्रीमच्छंकराचार्य पराजित होत नाहींत असें पाहून आंतून मुद्दाम शृंगारशास्त्राचा प्रश्न आला, व त्यास उत्तर देण्याबरोबर आंतून ध्वनि निघाला कीं, गोष्ट खोटी आहे; तूं ८ वें वर्षीं संन्यासी झालास आणि अनुभवावांचून पोकळ उत्तर देतोस. तेव्हां श्रीमच्छंकराचार्यांनी ६ महिन्यांची मुदत घेऊन त्या मुदतींत अमरु राजाचे मृत शरीरांत प्रवेश करून, सर्व उपभोग घेऊन नंतर सर्व उत्तरें दिलीं. ह्या गोष्टी जर खऱ्या आहेत, तर आतां मात्र या शास्त्रापासून ह्या गोष्टी होणार नाहींत असें मानणें कोत्या विचाराचें होणार आहे.<br> {{gap}}३ तिसरें कारण—योगाचीं (हठाचीं) साधनें कठीण. ह्मणजे धौति, बस्ति आदिकरून षट्कर्में, ८४ आसनें आणि विपरीत करणी आदिकरून मुद्रा ही करण्यास फारच कठिणशीं वाटतात. ह्मणूनही लोकांत याविषयीं उदासीनता दिसत असावी.<br> {{gap}}४ चवथें कारण—ह्या शास्त्राचा गुप्तपणा ह्मणजे प्रत्येक ठिकाणी हें परम गुप्त ठेवावें असें सांगितलें आहे. परंतु कोणापासून व किती गुप्त ठेवावें हें न पाहतां सर्वांपासूनच गुप्त ठेवितात, तेणेंकरूनही याविषयीं उदासीनता उत्पन्न होत असावी.<br> {{gap}}५ पांचवें कारण—या शास्त्राचे खरे व पूर्ण ज्ञाते पुरुष फारच थोडे आहेत व ते जनसमाजाचा त्याग करून गिरिकंदरीं राहणारे असल्यामुळे प्रसंगोपात्त एखाद्या मनुष्यास एखाद्या चमत्कारावांचून दुसरा लाभ होत नाहीं. दुसरें, ढोंगी अल्प स्वल्प ज्ञान असणारे मोठ्या डौलानें राहून लोकांची वंचना करणारे असल्यामुळे त्यांजकडूनही लोकसमाजास कोणत्याही प्रकारचा लाभ होणें शक्य नाहीं. एवंच दोघांपासून लोकसमाजास या शास्त्राचा लाभ न झाल्यामुळे लोकसमाजांत याबद्दल उदासीनता आली असावी.<br> {{gap}}६ सहावें कारण—अव्यवस्थितपणानें केलेल्या कृति (आसनें, मुद्रा, प्राणायाम, अथवा षट्कर्में) व त्यांपासून झालेले भयंकर परिणाम हे होत. परंतु ही गोष्ट<noinclude></noinclude> o1xa6xsf0gjwpb0ygkv9ryouuemc3km 232007 232003 2026-06-11T05:52:19Z Annni07 6055 232007 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||योगसोपान—प्रस्तावना.|७}}</noinclude>होतें व ती प्रश्न करीत होती) वाद चालला असतां श्रीमच्छंकराचार्य पराजित होत नाहींत असें पाहून आंतून मुद्दाम शृंगारशास्त्राचा प्रश्न आला, व त्यास उत्तर देण्याबरोबर आंतून ध्वनि निघाला कीं, गोष्ट खोटी आहे; तूं ८ वें वर्षीं संन्यासी झालास आणि अनुभवावांचून पोकळ उत्तर देतोस. तेव्हां श्रीमच्छंकराचार्यांनी ६ महिन्यांची मुदत घेऊन त्या मुदतींत अमरु राजाचे मृत शरीरांत प्रवेश करून, सर्व उपभोग घेऊन नंतर सर्व उत्तरें दिलीं. ह्या गोष्टी जर खऱ्या आहेत, तर आतां मात्र या शास्त्रापासून ह्या गोष्टी होणार नाहींत असें मानणें कोत्या विचाराचें होणार आहे.<br> {{gap}}३ तिसरें कारण—योगाचीं (हठाचीं) साधनें कठीण. ह्मणजे धौति, बस्ति आदिकरून षट्कर्में, ८४ आसनें आणि विपरीत करणी आदिकरून मुद्रा ही करण्यास फारच कठिणशीं वाटतात. ह्मणूनही लोकांत याविषयीं उदासीनता दिसत असावी.<br> {{gap}}४ चवथें कारण—ह्या शास्त्राचा गुप्तपणा ह्मणजे प्रत्येक ठिकाणी हें परम गुप्त ठेवावें असें सांगितलें आहे. परंतु कोणापासून व किती गुप्त ठेवावें हें न पाहतां सर्वांपासूनच गुप्त ठेवितात, तेणेंकरूनही याविषयीं उदासीनता उत्पन्न होत असावी.<br> {{gap}}५ पांचवें कारण—या शास्त्राचे खरे व पूर्ण ज्ञाते पुरुष फारच थोडे आहेत व ते जनसमाजाचा त्याग करून गिरिकंदरीं राहणारे असल्यामुळे प्रसंगोपात्त एखाद्या मनुष्यास एखाद्या चमत्कारावांचून दुसरा लाभ होत नाहीं. दुसरें, ढोंगी अल्प स्वल्प ज्ञान असणारे मोठ्या डौलानें राहून लोकांची वंचना करणारे असल्यामुळे त्यांजकडूनही लोकसमाजास कोणत्याही प्रकारचा लाभ होणें शक्य नाहीं. एवंच दोघांपासून लोकसमाजास या शास्त्राचा लाभ न झाल्यामुळे लोकसमाजांत याबद्दल उदासीनता आली असावी.<br> {{gap}}६ सहावें कारण—अव्यवस्थितपणानें केलेल्या कृति (आसनें, मुद्रा, प्राणायाम, अथवा षट्कर्में) व त्यांपासून झालेले भयंकर परिणाम हे होत. परंतु ही गोष्ट<noinclude></noinclude> 588yf5bxixw94pb7ce25daisgf2xm01 पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/८ 104 110595 231842 2026-06-10T16:21:05Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 231842 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{rh|८|योगसोपान—प्रस्तावना.}} प्रथमच शास्त्रकारांनी सांगितली आहे कीं, “प्राणायामादियुक्तेन सर्वरोगक्षयो भवेत् । अयुक्ताभ्यासयोगेन सर्वरोगसमुद्भवः” ॥ १ ॥ अर्थ—प्राणायामादि सर्व क्रिया युक्त रीतीनें केल्यास सर्व रोग दूर होतात, परंतु त्याच अयुक्त रीतीनें केल्यास सर्व रोग उत्पन्न होतात. ह्मणून त्या क्रिया व्यवस्थितपणानेंच झाल्या पाहिजेत. परंतु त्या व्यवस्थितपणानें करण्यास सांगणारे लोक थोडे व क्रिया करणारे लोकही त्या गोष्टीचा योग्य तितका विचार करीत असतील असें ह्मणतां येत नाहीं; कारण आधीं या कार्यास प्रवृत्त होणारे थोडे व त्यांत जे प्रवृत्त होतात त्यांजकडून, विशेष हव्यासानें ह्मणा अगर कोत्या विचारानें ह्मणा युक्तायुक्त विचाराची न्यूनता झाल्यामुळे परिणाम भयंकर होतात. परंतु या आंतील बारीक सारीक गोष्टी लोकसमाजापुढे न येतां फक्त भयंकर झालेले परिणाम मात्र स्पष्ट दिसतात, व तेणेंकरून योगशास्त्राविषयीं समाजांत उदासीनता उत्पन्न होते ती दूर होऊन लोकांत या शास्त्राविषयीं स्वरूप तरी अभिरुचि उत्पन्न व्हावी या हेतूनें हें पुस्तक लिहिलें आहे. यांत यम, नियम, आसन व प्राणायाम यासंबंधींच ज्या त्या विषयामध्यें खुलासेवार माहिती दिली आहे. आसनांच्या पुढें कांहीं मुद्रा व बंध यांचीही माहिती दिली आहे. मुद्रा- संबंधानें हठयोगप्रदीपिका आदिकरून ग्रंथांत दशमुद्रांचें वर्णन केलें आहे. परंतु घेरण्डानें २५ मुद्रा सविस्तर व फलांसह सांगितल्या आहेत. तथापि या पुस्तकांत आवश्यक अशा पांच सहा मुद्रा व पांच बंध, विधि व फळें यांसह कथन केले आहेत. आतां योगशास्त्राची अंगें कोणी ६ व कोणी ८ अशीं जरी वर्णन केली आहेत, तरी खरोखर योगास प्रारंभ प्राणायामापासून होतो. त्या पूर्वींच योगांगें ह्मणजे यम, नियम व आसनें हीं केवळ प्राणायामास पात्रता येण्यासाठी आहेत. कारण शरीरांतील नाडी मलांनी युक्त असतां त्यामध्यें वायूचा प्रवेश होत नाहीं, ह्मणून नाडीशुद्धि प्रथम झाली पाहिजे. कारण—“नाडीसंशोधनं कुर्याद्युक्तमार्गेण<noinclude></noinclude> edhfg9nnp9bns2r8vb1x9h6xzfo4aav 232004 231842 2026-06-11T05:45:17Z Annni07 6055 232004 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|८|योगसोपान—प्रस्तावना.}}</noinclude>प्रथमच शास्त्रकारांनी सांगितली आहे कीं, “प्राणायामादियुक्तेन सर्वरोगक्षयो भवेत् । अयुक्ताभ्यासयोगेन सर्वरोगसमुद्भवः” ॥ १ ॥ अर्थ—प्राणायामादि सर्व क्रिया युक्त रीतीनें केल्यास सर्व रोग दूर होतात, परंतु त्याच अयुक्त रीतीनें केल्यास सर्व रोग उत्पन्न होतात. ह्मणून त्या क्रिया व्यवस्थितपणानेंच झाल्या पाहिजेत. परंतु त्या व्यवस्थितपणानें करण्यास सांगणारे लोक थोडे व क्रिया करणारे लोकही त्या गोष्टीचा योग्य तितका विचार करीत असतील असें ह्मणतां येत नाहीं; कारण आधीं या कार्यास प्रवृत्त होणारे थोडे व त्यांत जे प्रवृत्त होतात त्यांजकडून, विशेष हव्यासानें ह्मणा अगर कोत्या विचारानें ह्मणा युक्तायुक्त विचाराची न्यूनता झाल्यामुळे परिणाम भयंकर होतात. परंतु या आंतील बारीक सारीक गोष्टी लोकसमाजापुढे न येतां फक्त भयंकर झालेले परिणाम मात्र स्पष्ट दिसतात, व तेणेंकरून योगशास्त्राविषयीं समाजांत उदासीनता उत्पन्न होते ती दूर होऊन लोकांत या शास्त्राविषयीं स्वरूप तरी अभिरुचि उत्पन्न व्हावी या हेतूनें हें पुस्तक लिहिलें आहे.<br> {{gap}}यांत यम, नियम, आसन व प्राणायाम यासंबंधींच ज्या त्या विषयामध्यें खुलासेवार माहिती दिली आहे.<br> {{gap}}आसनांच्या पुढें कांहीं मुद्रा व बंध यांचीही माहिती दिली आहे. मुद्रा- संबंधानें हठयोगप्रदीपिका आदिकरून ग्रंथांत दशमुद्रांचें वर्णन केलें आहे. परंतु घेरण्डानें २५ मुद्रा सविस्तर व फलांसह सांगितल्या आहेत. तथापि या पुस्तकांत आवश्यक अशा पांच सहा मुद्रा व पांच बंध, विधि व फळें यांसह कथन केले आहेत.<br> {{gap}}आतां योगशास्त्राची अंगें कोणी ६ व कोणी ८ अशीं जरी वर्णन केली आहेत, तरी खरोखर योगास प्रारंभ प्राणायामापासून होतो. त्या पूर्वींच योगांगें ह्मणजे यम, नियम व आसनें हीं केवळ प्राणायामास पात्रता येण्यासाठी आहेत. कारण शरीरांतील नाडी मलांनी युक्त असतां त्यामध्यें वायूचा प्रवेश होत नाहीं, ह्मणून नाडीशुद्धि प्रथम झाली पाहिजे. कारण—“नाडीसंशोधनं कुर्याद्युक्तमार्गेण<br><noinclude></noinclude> iq7sq4uh9zusxyehbq8es6puf7acotk 232006 232004 2026-06-11T05:51:42Z Annni07 6055 232006 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|८|योगसोपान—प्रस्तावना.}}</noinclude>प्रथमच शास्त्रकारांनी सांगितली आहे कीं, “प्राणायामादियुक्तेन सर्वरोगक्षयो भवेत् । अयुक्ताभ्यासयोगेन सर्वरोगसमुद्भवः” ॥ १ ॥ अर्थ—प्राणायामादि सर्व क्रिया युक्त रीतीनें केल्यास सर्व रोग दूर होतात, परंतु त्याच अयुक्त रीतीनें केल्यास सर्व रोग उत्पन्न होतात. ह्मणून त्या क्रिया व्यवस्थितपणानेंच झाल्या पाहिजेत. परंतु त्या व्यवस्थितपणानें करण्यास सांगणारे लोक थोडे व क्रिया करणारे लोकही त्या गोष्टीचा योग्य तितका विचार करीत असतील असें ह्मणतां येत नाहीं; कारण आधीं या कार्यास प्रवृत्त होणारे थोडे व त्यांत जे प्रवृत्त होतात त्यांजकडून, विशेष हव्यासानें ह्मणा अगर कोत्या विचारानें ह्मणा युक्तायुक्त विचाराची न्यूनता झाल्यामुळे परिणाम भयंकर होतात. परंतु या आंतील बारीक सारीक गोष्टी लोकसमाजापुढे न येतां फक्त भयंकर झालेले परिणाम मात्र स्पष्ट दिसतात, व तेणेंकरून योगशास्त्राविषयीं समाजांत उदासीनता उत्पन्न होते ती दूर होऊन लोकांत या शास्त्राविषयीं स्वरूप तरी अभिरुचि उत्पन्न व्हावी या हेतूनें हें पुस्तक लिहिलें आहे.<br> {{gap}}यांत यम, नियम, आसन व प्राणायाम यासंबंधींच ज्या त्या विषयामध्यें खुलासेवार माहिती दिली आहे.<br> {{gap}}आसनांच्या पुढें कांहीं मुद्रा व बंध यांचीही माहिती दिली आहे. मुद्रा- संबंधानें हठयोगप्रदीपिका आदिकरून ग्रंथांत दशमुद्रांचें वर्णन केलें आहे. परंतु घेरण्डानें २५ मुद्रा सविस्तर व फलांसह सांगितल्या आहेत. तथापि या पुस्तकांत आवश्यक अशा पांच सहा मुद्रा व पांच बंध, विधि व फळें यांसह कथन केले आहेत.<br> {{gap}}आतां योगशास्त्राची अंगें कोणी ६ व कोणी ८ अशीं जरी वर्णन केली आहेत, तरी खरोखर योगास प्रारंभ प्राणायामापासून होतो. त्या पूर्वींच योगांगें ह्मणजे यम, नियम व आसनें हीं केवळ प्राणायामास पात्रता येण्यासाठी आहेत. कारण शरीरांतील नाडी मलांनी युक्त असतां त्यामध्यें वायूचा प्रवेश होत नाहीं, ह्मणून नाडीशुद्धि प्रथम झाली पाहिजे. कारण—“नाडीसंशोधनं कुर्याद्युक्तमार्गेण<br><noinclude></noinclude> 6yvz1pvvm3569suiym51fvn4hx7gcd2 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२ 104 110596 231899 2026-06-10T16:32:16Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231899 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>कैलासवासी रावबहादूर रामचंद्र बाळकृष्णजी राणे परमहंस समेचे अध्यक्ष, कस्टम खात्याचे माजी असिस्टंट कमिशनर, आणि मुंबईचे जस्टिस भाफ दीप ह्याच्या स्मरणार्थ हा लहानसा पवाडा त्यांच्या कर्त्याने परमप्रीतीने व आदराने अर्पण केला असे. मुक्काम पुणे, ज्यून सन १८६९ [पहिल्या आवृत्तीच्या अर्पणपत्रिकेची छायाप्रत ]<noinclude></noinclude> no3ak6euo01b6qdshkqq2sgf8yjkkik पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३ 104 110597 231900 2026-06-10T16:33:05Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231900 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude> अभंग अति महारथी क्षत्रियाचा बाळ ।। यवनाचा काळ त्रेतायुगीं ॥१॥ भूर रणीं भीडणार | लढे अनिवार देशासाठीं ||२|| परशरामासीं झोंवें महाबळी || एकवीस वेळीं लागोपाठ || ३ || अशा महावीरा ह्मणे महाअरी || धार्के बरथरी द्विजसूत ॥४॥ बोधी शिऊं नका मोड झाल्यावर ॥ म्हणा महाअरी मांग त्यास ॥५॥ मित्रा सूड पेई जिंकिल्या शत्रूचा ॥ पूत कृतप्नाचा सर्प जैसा ||६|| चिरंजीव आहे आणा पाचारुनी । पाहा तपासूनी जोतीपुढे ॥७॥<noinclude></noinclude> j4zpqatbw6e2cyxvp9ry6m9dnv04wbs पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४ 104 110598 231901 2026-06-10T16:33:48Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231901 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>प्रस्तावना शिवाजी राजाच्या हथा पवाड्याचे आठ भाग केले आहेत. दरएक भागांत विषयांतर होऊं नये हवा भयास्तव सर्व भाग एकसारखे केले नाहीत. अति जुनाट यवनी व मेसर्स ग्रॉडफ, मरी वगैरे इंग्रज लोकांच्या बहुतेक लेखी आधारावरून हा पवाडा केला आहे. कुणबी, माळी, माहार, मांग वगैरे पाताळी घातलेल्या क्षेव्यांच्या उपयोगी हा पवाडा पडावा असा माझा हेतु आहे. लांबच लांब मोठाले संस्कृत शब्द मुळीच घातले नाहीत व जेथें माझा उपाय चालेना तेथें मात्र लहानसहान शब्द निर्वाहापुरते घेतले आहेत. माळी कुणब्यांस समजण्याजोगी सोपी भाषा होण्याविषयीं फार श्रम करून त्यांस आवडण्याजोग्या चालीनें रचना केली आहे. जगत्कर्ता भगवान सर्व जगाचा चाळक आणि तोच सर्वांचा बुद्धिदाता आहे. त्यालाच आम्हा शूद्रांची दया आल्यावरून त्यानें आपल्या परमप्रिय इंग्रज लेकरास राजा करून आम्हां क्षत्रियांस ब्रह्मराक्षसाच्या दाढेतून ओढून काढण्याकरिता हिंदुस्थानांत पाठविलें आहे व हे दयाळु इंग्रज लोक आम्हा गांजलेल्या अज्ञानी लोकांस खरें ज्ञान शिकयूं लागल्यामुळे ब्राह्मणांनी बनविलेल्या मतलबी कूटापासून स्वतंत्र होण्याचे नेहमी आमच्या मनात डोहळे होऊ लागले आहेत. ब्राह्मणाच्या कूटाविषयी थोडासा येथे मासला लिहितों: तो येणेंप्रमाणे या जगांतील सर्व देशांचे इतिहास एकमेकांसीं ताडून पाहातां या हिंदुस्थानांत मात्र ब्राह्मणांनी आपल्यास मोठ्या दिमाखाने उंच मानून परभू, कुणबी, माळी, मांग आणि महार इत्यादि, जातीचे हाडवैरी असल्याप्रमाणे त्यांचा मनापासून द्वेष करून त्यांस इतकें नीच मानण्यांचें कारण काय असावें असें माझ्या मनांत नेहमी घोळत होते. याविषयी इतर भाषेतील ग्रंथांवरून व ब्राह्मणाच्या एकंदर शूद्रांसी आचरणावरून असे सिद्ध होते की, ब्राह्मण लोकांचा या देशासी काहीच संबंध नसतां ब्राह्मणांनी केवळ लोभानें या देशांत एकाएकी लागोपाठ हल्ले करून ज्या ज्या वेळी जे जे लोक या क्षेत्री हल्ल्यामध्ये सांपडले त्यांस कैद करून ब्रह्मराजानें त्या सर्वांचे दास केले व त्यांनी तसेच चिरकाळ ब्राह्मणांच्या दास्यत्वांत रहावें म्हणून पुन्हा त्याच ब्रह्मयानें सत्तेच्या मदानें कायदे करून त्यांची अनेक पुस्तकें करून त्यांत अनेक तऱ्हेचे भेद करून ठेवले. नंतर काही दिवसांनी वेळ पाहून त्यांस भेद म्हणण्याचे सोडून वेद म्हणण्याचा प्रचार घातला असावा. ब्रह्मराजा मरताच बाकीच्या उरल्या क्षत्रियांनी ब्राह्मणांच्या हाती सांपडलेल्या बांधवांस ब्राह्मणांच्या दास्यत्वापासून सोडविण्याविषयीं परशरामाशी एकवीस वेळा इतके निकराने लढले की त्यांचे अखेर महाअरी असें नांव पडलें व त्या शब्दाचा पुढे महार असा अपभ्रंश झाला व त्या महाअरी क्षत्रियांसीं लढता लढतां परशरामाचे इतके लोक मारले गेले की, ब्राह्मणांपेक्षा ब्राह्मण विधवा यांचा इतका भरणा वाढला की त्यांची नीट रीतीनें व्यवस्था कसी ठेवावी याची मोठी पंचाईत येऊन पडली. शेवटी खेरीस ब्राह्मण स्त्रियांचा पुनर्विवाह अगदीच बंद केला<noinclude></noinclude> 9kavd7qtk46fsfjs0zmri77nzuczbdh पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५ 104 110599 231902 2026-06-10T16:34:07Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231902 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>४४ महात्मा फुले समग्र वाङ्मय तेव्हां थोडेसे लागी लागल्यासारखें झाले. नंतर दास केलेल्या व महाअरी क्षत्रियांचा अमर्याद द्वेष करून पहिल्यास भेद वाचून पाहाण्याची मनाई व दुसऱ्याचा स्पर्श होऊ न देण्याची वहिवाट चालू करून मनूसारख्या इतर क्रूर राजानी मनास मानेल तसी सूड घेण्याजोगी ज्यात ब्राह्मणांचे फक्त हित असीं नवी नवी कलमे घरांतल्या घरांत बनवून ग्रंथांचे पोटांत कोंबून काही कालानंतर दास केलेल्या सर्व क्षत्रियांस लटकेच उठविले की, हे ग्रंथ स्वतां देवाने लिहून ठेविले असे दाखवून मोटा धार्मिकपणाचा डील घालून त्या दासांच्या मनांतच उत्तरोत्तर बिंबविण्याची सुरुवात केली. एवढेच करून स्वस्थ राहिले असें नाही, पण त्यांनी अखेरीस राहिलेल्या शेषद्वेषाचा सर्प कल्पून त्याचा बिछाना करून त्यावर सच्चिदानंद नारायणाच्या मूर्तीस उताणें पाडून त्याचे बेंबीचा देठ बाहेर ओढून काढून त्यांचे शेवटी कमळ करून त्यावर चार तोंडाचा ब्रम्हा बसवून हा देवाचा लेक त्याने हे सर्व भेद केले. देवाच्या लेकापुढे कोणाचे काय चालणार अशा नाना प्रकारच्या थोतांडी खोट्या गोष्टी बनवून दास केलेल्या क्षत्रियांस हळुहळु हे ईश्वरदत्त आहेत म्हणून, भासवून शिकवून त्या सर्व क्षत्रियांची धर्माच्या थापीनें असी मानसाची कणसें करून टाकली आहेत हैं सर्वास माहीतच आहे. यापुढे जनाची तर नाहीच, परंतु मनाचीसुद्धां काडीमात्र लाज न धरितां शुद्र ब्रह्मयांच्या पायापासून जन्म पावले असें कोठें कोठें ग्रंथांत कोंबून लिहिले आहे. काय पायापासून शुद्र पुत्र प्रसविणें ही गोष्ट लहान अचंब्याची आहे असे माझ्यानें म्हणवत नाही! परंतु जन्म देणें हा स्त्रियांचा धर्म असून शुद्ध ब्रह्मपुरुषाच्या पायापासून मूल जन्मविण्यानें या जगात सर्वत्र जो सुष्टिक्रम चालत आला आहे त्याला बाध येतो. तसेंच चालण्याचे काम पायांचे असून त्या पायापासून शुद्र पुत्र जन्मविला व त्याचप्रमाणे ब्रयाच्या मुखापासून ब्राह्मण जन्मविला असे जर खरं आहे तर ब्रह्मयाचे मुख इतर दुसरे ततसंबंधी व्यापार करीत होते असे त्याच्या शिष्यमंडळीस कबूल करायें लागेल. यावरून असें साफ सिद्ध होतें की चार घरच्या चार पोरी मिळून घरांतल्या घरकुंडांत बराच लटक्यामुटक्यांचा खेळ खेळल्या. असो, याविषयी जास्ती चिकित्सा करून फटफजीती करीत बसणें त्यापेक्षा त्यांची क्षमा करून बाकीचें सर्व सुज्ञ वाचकांकडे सोपितों. हा लहानसा प्रयत्न सुझ जनांस आवडल्यास आणखी याच मासल्याचे, पातळी घातल्यापूर्वी क्षत्रियांमध्ये महासुभ्या (म्हसोबा सारखे महावीर होऊन गेले यांचे पवाडे मोठ्या उल्हासानें सादर केले जातील. हा पवाडा एकंदर तयार करते वेळी माझे लहानपणाचे मित्र भंडारकर यांनी इतर दुसऱ्याया लोकांसारखा पायांत पाय न घालता मला या कामांत नेहमी हिंमत देऊन वारंवार माझ्या कल्पना नीट जुळाव्यात म्हणून बरीच मदत दिली. यास्तव मी त्यांचा ऋणी आहे. व रे. बाबा पदमनजी व गंगाधरशास्त्री या उभयतानी शुद्ध करण्याविषयी मदत केली सबब त्यांचा आभारी आहे. ***<noinclude></noinclude> 5mb2gztf6hdr4o0ousq6lp3bb5huzom पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६ 104 110600 231903 2026-06-10T16:34:28Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231903 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>शिवाजीचा पवाडा कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा | लंगोट्यांस देई जानवीं पोषींदा कूणब्यांचा । काळ तो असे यवनांचा ॥ शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा । असे तो डौल जाहगिरीचा || पंधराशे एकूणपन्नास साल फळलें । जुन्नर ते उदयांशी आलें । शिवनेरी किल्ल्यामध्यें बाळ शिवाजी जन्मलें । जिजीबाइस रत्न सांपडलें ॥ हातापायांचीं नख बोट शुभ्र प्याजी रंगीलें । ज्यानीं कमळा लाविलें ॥ वर खालीं टिया पोटऱ्या गांठी गोळे बांधले । स्फटिकापरि भासले | सान कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें । नांव शिवाजी शोभलें ॥ राजहौंसी उंच मान माघे मांदे दोंदीलें। जसा का फणीवर डोले ॥ एकसारखे शुभ्र दंत चमकूं लागले । मोतीं लड़ीं गुतिवलें ॥ रक्तवर्ण नाजूक होटीं हासूं छपिवलें । म्हणोन बोबडे बोले | सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले । विषावें मृग बनीं गेले ॥ ४५<noinclude></noinclude> 8kzji74nitehmvk4zlxjdap53bjfsbv पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८७ 104 110601 231904 2026-06-10T16:34:46Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231904 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>४६ नेत्र तीखे बाणी भवया कमठे ताणीले। ज्यांनी चंद्रा हाटिवलें ॥ सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबलें। कुरळे केंस मोघीले ॥ आजानबाहू पायांपेक्षां हात लांबलेले । चिन्ह गादिचें दिसलें | महात्मा फुले समग्र वाङ्मय जडावाचीं कहीं तोडे सर्व अलंकार केले। धाकट्या बाळा लेविवले ॥ किनखावी टंकोचें मोतीं घोसानें जडले। कलावतुचे गोडे शोभले ॥ लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले । डाग लाळीचे पडलेले ॥ हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे । पायीं घुगरुं खुळखुळे || मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले । खेळण्यावर डोळे फिरवले ॥ मजवर हा कसा खेळणा नाहीं आवडलें । चिन्ह पाळण दिसलें || टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले । पाळण्या हालवू लागले ॥ धन्य जिजाबाई जिनें जो जो जो जो जो केले । गातों गीत तिनें केलें ॥ ॥ चाल ॥ जो जो जो जो जो जो गाऊं, जी जी जी जी जी जिजी गाऊं। चला वेरुळास जाऊं, दौलतबादा पाहूं ॥ मूळ बाबाजीस ध्याऊं, किर्ती आनंदाने गाऊं । सरदारांत उमराऊ, सोबतीस जाधवराऊ ॥<noinclude></noinclude> nexan8sx7r30ba3t3lf17tgrn7ng232 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८८ 104 110602 231905 2026-06-10T16:35:11Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231905 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा पाटील होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ। थोर विठोजी नांव घेऊं, सान मालोजी त्याचा भाऊ । दीपाबाई त्यास देऊ, छंदाजोगा गिती गाऊं ॥ ॥ चाल ॥ मालोजी राजा । तुवा वा आजा ॥ sund ए यवनी काजा। पाळिल्या फौजा ।। लाविल्या ध्वजा मारिल्या मौजा ॥ | वेळेस मुक्का सापल्या बुक्का ॥ विचरी पक्का जाधवा धक्का ॥ शेशाप्पा नायका ठेविचा पैका ॥ द्रव्याची गर्दी चांभारगोंदी || | देवळें बांधी तळीं ती खांदी ॥ आगळी बुद्धि । गुणानें निधी ॥ लिहिलें विधी लोकांस बोधी ॥ संधान साधी जसा पारधी ॥ भविषी भला । कळलें त्याला ॥ सांगोनी गेला गादी वा तुला ।। उपाय नाहीं जाणोन चाकर झाला यवनाचा। शिपाई होता बाणीचा || खोट्या देवा कोण खोडी बेत देवाजीचा। पवाडा गातो शिवाजीचा || कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा छत्रपती शिवाजीचा ||१|| 2 ४७.<noinclude></noinclude> hav6e9b0xr36dyvvnn4ljssj1vlxyve पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८९ 104 110603 231906 2026-06-10T16:35:28Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231906 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>महात्मा फुले समग्र वाङ्मय ४८ वडील बंधु संभाजीनें लळे पुरवीले । धाकट्यासवें खेळले || उभयतांचे एकचित्त तालमींत गेले। फरीगदग्या शिकले ॥ आवडीनें खमकोठी कुस्ती पेंचानें खेळे पवित्रे दस्तीचे केले | द्वादशवर्षी उमर आली नाहीं मन धालें। घोडी फिरवूं लागले || आट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शीकले। गोळी निशाण साधले ॥ कन्या वीर जाधवाची जिने भारथ लावलें। पुत्रा नीट ऐकिवलें ॥ अल्पवयाचे असतां शिकार करूं लागले। माते कौतुक वाटलें । नित्य पतीचा आठव डोंगर दुःखाचे झाले । घर सवतींने घेतले || छाती कोट करून सर्व होतें साटिवलें । मुखमुद्रेने फसविले ॥ चतुर शिवाजीनें आईचें दुःख ताडिले । पित्यास मनीं त्यागिले ॥ पुत्राचे डोळे फिरले मातें भय पडलें । हीत उपदेशा योजिले | मनीं पतिभक्ति पुता बागेमधीं नेलें । वृक्षाछायी बसीवलें ॥ पूर्वजांचे स्मरण करून त्यास न्याहाळीलें । नेत्री पाणी टपटपलें |<noinclude></noinclude> 7o7e4818hl27kilqcdfylwb503tgu71 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९० 104 110604 231907 2026-06-10T16:35:45Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231907 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा एच २२ या क्षेत्राचे धनी कोणकोणी बुडविले । सांगते मुळीं कसें झालें ॥ क्षेत्रवासी ह्मणोन नांव क्षत्रिय धरले। क्षेत्री सुखी राहिले ॥ अन्यदेशिचे दंगेखोर हिमालयीं आले। होते लपून राहिले ।। पाठीं शत्रुभौती झाडी किती उपासीं मेले । गोमासा भाजून धाले । पाला फळें खात आखेर ताडपत्रा नेसले । झाडी उल्लंघून आले ॥ लेखणीचा घड शीपाया सेनापति केलें । मुख्य ब्रह्मा नेमलें ॥ बेफाम क्षेत्रिय होते अचूक टोळ उतरले । कैदी सर्वास केलें ॥ सर्व देशी चाल त्याचें गुलाम बनीवले । डौलानें क्षुद्र म्हणाले || मुख्य ब्रम्ह राजा झाला जानें कायदे केले । त्याचे पुढे भेद केले ॥ ब्रम्हा मेल्यावर परशराम पुंड माजले । उरल्या क्षत्रिया पिडीले ॥ महारमांग झाले किती देशोधडी केले । ब्राह्मण चिरंजीव झाले ॥ देश निक्षत्रिय झाल्यामुळे यवना फावलें । सर्वांस त्यांही पिडीलें ॥ ४९<noinclude></noinclude> 91zzr68prc3azcozbj1obenzv9g44gk पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९१ 104 110605 231908 2026-06-10T16:36:01Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231908 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>५० महात्मा फुले समग्र वाङ्मय शुद्र म्हणती तुम्हा हृदयीं बाण टोचले । आज बोधाया फावलें ॥ गाणे गाते ऐक बाळा तुझ्या आजोळीं शिकले बोलीं नाहीं मन धालें । क्षेत्र क्षत्रियांचे घर, ॥ चाल ॥ तुझे पितृ माहावीर । सुखा नसे त्यांच्या पार, आल्यागेल्याचें माहेर ॥ शीखराकार डोंगर, नानावल्ली तरूवर ॥ दरीं खोरीं वाहे नीर खळखळे निरंतर । झाडा फुलें झाला भार, सुंगधी वाहे लहर । पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर । नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार । भूमी अती काळसर, क्षेत्र देई पीका फार ॥ धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियास मार दास केले निरंतर, ब्रम्हा झाला मनीं गार ।। लोभी मेले येथें फार, विध्वा झाल्या घरोघर । उपाय नाहीं लाचार, स्त्रिया बंदी पाटावर ।। दुसरा झाला शिरजोर, परशा तोबा कठोर। मार त्याचा अनीवार, केला क्षत्रियां संव्हार ॥ क्षत्रिय केले जरजर, भयें कांपे थरथर । दुःखा नाहीं त्यांच्या पार, ठाव नाहीं निराधार ॥ बहु केले देशापार, बाकी राहि मांगमाहार । निःक्षेत्री झाल्यावर, म्लेंच्छ केलें डोकें वर ।। आले सिंधुनदीवर, स्वाच्या केल्या बारोंवार । गातें कटावांत सार, लक्ष देई अर्थावार ॥<noinclude></noinclude> fvnjotxzy0zg16363ydu5khxhtt7dxs पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९२ 104 110606 231909 2026-06-10T16:36:18Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231909 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा ॥ चाल ॥ काबुला सोडी । नदांत उडी । ५१ ठेवितो दाढी | हिंदूस पीडी ॥ बामना ओडी इंद्रिये तोडी ॥ पींडीस फोडी । देऊळें पाडी ॥ चित्रास तोडी लेण्यास छेडी ॥ गौमांसी गोडी । डुकरां सोडी || खंड्यात ताडी । जेजुरी गडीं ॥ भुंग्यास सोडी । खोडीस मोडी | मूर्तीस काढी । काबूला धाडी ॥ झाडीस तोडी । लुटलीं खेडीं ॥ गडांस बेढी लावली शीडी ॥ । हिंदुस झोडी । धर्मास खोडी ॥ राज्यास बेडी । कातडी काठी || गर्दना मोडी । कैलासा धाडी ॥ देऊळें फोडी बांधीतो माडी ॥ | उडवी घोडी । कपाळा आढी ॥ मीजास बडी ताजीम खडी ॥ बुरखा सोडी। पत्नीस पीडी ।। गायनीं गोडी । थैलीतें सोडी | माताबोध मनीं ठसतां राग आला यवनांचा ॥ बेत मग केला लढण्याचा ॥ तान्हाजी मालुसरे बाजी पासलकराचा ॥<noinclude></noinclude> hmqm3niwcw75b93l1ych8qka01033hy पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९३ 104 110607 231912 2026-06-10T16:47:17Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231912 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>महात्मा फुले समग्र वाड्मय स्नेह यशजी कंकाचा | मित्रां आधीं ठेवी जमाव केला मावळयाचा ॥ पूर करी हत्यारांचा ॥ मोठ्या युक्तिनें सर केला किल्ला तोरण्याचा ॥ रोवला झेंडा हिंदूचा ॥ राजगड नवा बांधला ऊंच डोंगराचा ॥ भ्याला मनीं विजापुराचा ।। दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा ॥ दादोजी कोंडदेवाचा ॥ मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा । पवाडा गातो शिवाजीचा | . कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ||२॥ जाहागीरवा पैसा सार लावी खर्चास चाकरी ठेवी लोकांस || थाप देऊन हातीं घेई चाकण किल्ल्यास । मुख्य केले फिरंगोजीस || थोड्या लोकांसहीत छापा घाली सुप्यास। कैद पाहा केलें मामास ॥ सुप्या सोबत हातीं घेतलें तीनशे घोड्यास । करामत केली रात्रीस ॥ मुसलमानां लांच देई घेई कोंडाण्यास । सिंहगड नांव दिले त्यास ॥<noinclude></noinclude> cp385sarp3a1xxi0kce8bp3w62p8elf पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९४ 104 110608 231913 2026-06-10T16:47:33Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231913 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा पुरंधरी जाईं जसा भला माणूस न्यायास । कैद पाहा केलें सर्वास | गांव इनाम देऊन सर्वा ठेवी चाकरीस । मारलें नाहीं कोणास ॥ वाटेमधीं छापा घालून लुटी खजीन्यास । सांठवी राजगडास ॥ राजमाचीं लोहगडीं लढे घेई तिकोण्यास बाकी चार किल्ल्यांस ॥ मावळयांस घाडी कोकणीं गांव लुटायास । धूर्त योजी फितूरास ॥ सन्मान कयां देई पाठवि बीजापुरास ॥ मुलान्या सुभेदारास ॥ विजापुरी मुसलमाना झाला बहु त्रास । योजना केली कपटास ॥ करनाटक पत्र पाठवी बाजी घोरपड्यास कैद तुम्ही करा शहाजीस ॥ भोजनाचे निमित्य केलें नेलें भोसल्यास । दग्याने कैद केलें त्यास ॥ थेट शहाजी कैदी आणिला बिजापूरास खुशी मग झाली यवनास ॥ चिरेबंदी कोठडीमध्ये बंद केले त्यास । ठेविलें भोक वान्यास ।। शहाजीला पिडा दीली कळलें शिवाजीस । ऐकूण भ्याला बातमीस ॥ पिताभक्ति मनीं लागला शरण जायास । विचारी आपल्या स्त्रियेस ॥<noinclude></noinclude> rxj4b2kxq5n25dk229m90ax8056wlck पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/९ 104 110609 231914 2026-06-10T16:47:45Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 231914 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{rh||योगसोपान—प्रस्तावना.|९}} यतः । वृथा क्लेशो भवेत्तस्य तच्छोधनमकुर्वतः” ॥ १ ॥ अर्थ—योग्य मार्गानें नाडीशोधन न करितां जर योगास आरंभ केला तर व्यर्थ त्रास होऊन सिद्धि होत नाहीं. ह्मणून नाडीशुद्धि झाली पाहिजे, आणि त्यास ग्रंथांमध्ये ३ उपाय सांगितले आहेत. पहिला धौति बस्ति आदिकरून षट्कर्में; दुसरा आसनें व तिसरा प्राणायाम (हा प्राणायाम निराळ्या प्रकारचा आहे). यांतून कोणता उपाय कोणी व केव्हां आणि कसा करावा यासंबंधानें थोडें सांगणें भाग आहे. ज्याच्या अंगांत मेद व कफ अधिक असेल त्यास षट्कर्माची आवश्यकता आहे असें ह० प्र० त सांगितलें आहे. “मेदश्लेष्माधिकः पूर्व षट्कर्माणि समाचरेत् । अन्यस्तु नाचरेत्तानि दोषाणां समभावतः ॥ १ ॥” ज्यांच्या अंगांत मेद व कफादि दोषांचें आधिक्य नाहीं त्याला षट्कर्में करण्याचे कारण नाहीं. दुसरें साधन आसनें. ज्यांच्या अंगांत विशेष आळस, जडपणा व अंशतः रोगोद्भव झाला असेल त्यांस आसनें फार हितावह आहेत. आसनांमध्यें विशेष गुण आहेत, व आसनांचीं फलें सांगितलीं आहेत तीं अशीं “आसनस्य फलान्वक्ष्ये प्रथमं नाडिशोधनम् । द्वितीयं शरीरारोग्यं तृतीयं चाङ्गलाघवम्” ॥ १ ॥ आसनापासून नाडीशुद्धि, शरीरास आरोग्य व अंगांत चपलता येऊन प्राणायाम करण्यास पात्रता येते. तिसरें साधन प्राणायाम. यास प्रमाण “प्राणायामैरेव सर्वे प्रशुष्यन्ति मलाः इति” । केवल प्राणायामानेंही नाडीतील मलांचे शोषण होतें, परंतु त्यास काळ फार लागतो. शिवाय प्राणायामास कोणत्या तरी आसनाची अपेक्षा आहेच, आणि नाडीशोधनावांचून प्राणसंग्रहशक्ति येत नाहीं. “शुद्धिमेति यदा सर्वं नाडीचक्रं मलाकुलम् ॥ तदैव जायते योगी प्राणसंग्रहणे क्षमः” ॥ १ ॥ अर्थ— जेव्हां सर्व नाडी मलरहित होईल तेव्हांच योगी प्राणसंग्रहणास समर्थ होतो. यावरून नाडीशुद्धि आधीं झाली पाहिजे आणि ती होण्यास पूर्वी सांगितलेल्या तीन साधनांतून आसनें हें साधन प्रशस्त आहे. <references /> <ref>‘सर्वे’ असाही पाठ आहे व हाच प्रशस्त दिसतो.</ref><noinclude></noinclude> 93g6px7cs6tuoron34id4l4k2v8dsqv 232005 231914 2026-06-11T05:51:13Z Annni07 6055 232005 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||योगसोपान—प्रस्तावना.|९}}</noinclude>-यक्तः । वृथा क्लेशो भवेत्तस्य तच्छोधनमकुर्वतः” ॥ १ ॥ अर्थ—योग्य मार्गानें नाडीशोधन न करितां जर योगास आरंभ केला तर व्यर्थ त्रास होऊन सिद्धि होत नाहीं. ह्मणून नाडीशुद्धि झाली पाहिजे, आणि त्यास ग्रंथांमध्ये ३ उपाय सांगितले आहेत. पहिला धौति बस्ति आदिकरून षट्कर्में; दुसरा आसनें व तिसरा प्राणायाम (हा प्राणायाम निराळ्या प्रकारचा आहे). यांतून कोणता उपाय कोणी व केव्हां आणि कसा करावा यासंबंधानें थोडें सांगणें भाग आहे.<br/> {{gap}}ज्याच्या अंगांत मेद व कफ अधिक असेल त्यास षट्कर्माची आवश्यकता आहे असें ह० प्र० त सांगितलें आहे. “मेदश्लेष्माधिकः पूर्व षट्कर्माणि समाचरेत् । अन्यस्तु नाचरेत्तानि दोषाणां समभावतः ॥ १ ॥” ज्यांच्या अंगांत मेद व कफादि दोषांचें आधिक्य नाहीं त्याला षट्कर्में करण्याचे कारण नाहीं.<br/> {{gap}}दुसरें साधन आसनें. ज्यांच्या अंगांत विशेष आळस, जडपणा व अंशतः रोगोद्भव झाला असेल त्यांस आसनें फार हितावह आहेत. आसनांमध्यें विशेष गुण आहेत, व आसनांचीं फलें सांगितलीं आहेत तीं अशीं “आसनस्य फलान्वक्ष्ये प्रथमं नाडिशोधनम् । द्वितीयं शरीरारोग्यं तृतीयं चाङ्गलाघवम्” ॥ १ ॥ आसनापासून नाडीशुद्धि, शरीरास आरोग्य व अंगांत चपलता येऊन प्राणायाम करण्यास पात्रता येते.<br/> {{gap}}तिसरें साधन प्राणायाम. यास प्रमाण “प्राणायामैरेव सर्वे प्रशुष्यन्ति मलाः इति” । केवल प्राणायामानेंही नाडीतील मलांचे शोषण होतें, परंतु त्यास काळ फार लागतो. शिवाय प्राणायामास कोणत्या तरी आसनाची अपेक्षा आहेच, आणि नाडीशोधनावांचून प्राणसंग्रहशक्ति येत नाहीं. “शुद्धिमेति यदा सर्वं नाडीचक्रं मलाकुलम् ॥ तदैव जायते योगी प्राणसंग्रहणे क्षमः” ॥ १ ॥ अर्थ— जेव्हां सर्व नाडी मलरहित होईल तेव्हांच योगी प्राणसंग्रहणास समर्थ होतो. यावरून नाडीशुद्धि आधीं झाली पाहिजे आणि ती होण्यास पूर्वी सांगितलेल्या तीन साधनांतून आसनें हें साधन प्रशस्त आहे.<br/> {{rule}}<noinclude><ref>‘सर्वे’ असाही पाठ आहे व हाच प्रशस्त दिसतो.</ref></noinclude> 8ocfizm6wkwbd795rmydr4ar6hddwvd पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९५ 104 110610 231915 2026-06-10T16:47:51Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231915 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>साजे नांव सईबाई स्त्री सुचवी पतीस ताडा दंडी दुसमानास || महात्मा फुले समग्र वाङ्मय स्त्रीची सुचना सत्य भासली लिहिलें पत्रास । पाठवी दिल्ली मोगलास ॥ चाकर झालों तुमचा आतां येतों चाकरीस सोडवा माझ्या पित्यास ॥ मोगल थैली गेली थेट मुसलमानास । ठेविले किल्ल्यावर त्यास । बाजी शामराज कां लाजला जात सांगायास । धरूं पाही शिवाजीस | धेड ह्मणावा नाक नाहीं यावा कोणास । अडचण झाली बखरीस | सिद्धिस बेत गेला नाहीं अंतीं भ्याला जिवास । काळे केलें महाडास ॥ शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस । हा पाजी मुकला जातीस || करनाटकीं आज्ञा झाली शाहाजीस । यवन भ्याला सिंहास | वर्षे चार झालीं शिवला नाहीं कबजास। पिताभक्ति पुत्रास ॥ चंद्रराव मोन्यास मारी घेई जावळीस । दुसरे वासोट्या किल्ल्यास ।। प्रतापगड बांधी पेशवा केला एकास। नवे योजी हुद्यास || आपली बाकी काढी धाडी पत्र तगाद्यास । चलाखी दावी मोंगलास ।।<noinclude></noinclude> hnku9wvywjqkfphecc5jif7p0pxh9ko पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९६ 104 110611 231916 2026-06-10T16:48:07Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231916 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा रात्रीं जाऊन एकाएकीं लुटी जुन्नरास। पाठवि गडी लुटीस ॥ आडमार्ग करी हळूच गेला नगरास । लुटी हत्तीघोड्यांस ॥ उंच वस्त्रे, रत्नें होन कमती नाहीं द्रव्यास । चाकरी ठेवि बारगिरांस || समुद्रतीरीं किल्ले घेई पाळी गलबतांस । चाकरी ठेवि पठाणास ॥ सिद्दि पेशव्या आपेश देई घेई यशास । उदासी लाभ शिवाजीस ॥ आबजूलखान शूर पठाण आला बांईस । शोभला मोठा फौजेस ॥ हत्ती बारा हजार घोडा त्याचे दिमतीस । कमी नाहीं दारूगोळीस ॥ कारकुनाला वचनीं दिलें हिंबरें बक्षीस । फितिवले लोभी ब्राह्मणांस || गोपीनाथ फसवी पटाणा आणि एकांतास । चुकला नाहीं संकेतास ॥ माते पायीं डोई ठेवी, लपवी हत्यारास । बरोबर आला बेतास ॥ समीप येतां शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास । कमी करी आपल्या चालीस ॥ गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनास । भ्याला तुमच्या शिपायांस | त्या अधमाचें ऐकुन शिपाई केला बाजूस । लागला भेटू शिवाजीस || वर भेटभाव वाघनख मारीं पोटास । भयभित केलें पठाणास ॥<noinclude></noinclude> qzpyee3vgvb1r97lqjjnpsk1vsvb3we पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९७ 104 110612 231917 2026-06-10T16:48:23Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231917 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>महात्मा फुले समग्र वाङ्मय पोटीं जखम सोसी केला वार शिवाजीस । झोंबती एकमेकांस || हातचलाखी केली विचवा मारी शत्रूस । पठाण मुकला प्राणास ॥ स्वामीभक्त धाव घेई कळले शिपायास । राहिला उभा लढण्यास ॥ त्याची घोप घेई शिवाजी बचवी आपल्यास । तान्हाजी भिडे बाजूस || दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास । घावरें केलें दोघांस || नांव सय्यदबंधू साजे शोभा आणी बखरीस । लाथाळी जीवदानास | तान्हाजिला हूल देई मारी हात शिवाजीस । न्याहाळी प्रेतीं धण्यास ॥ उभयतांसीं लढतां मुकला आपल्या प्राणास । गेला जन्नत स्वर्गास ॥ छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस । पठाणपुत्र खाशा स्त्रियेस । चार हजार घोडा लूट कमी नाही द्रव्यास । दुसऱ्या सरंजावास ॥ अलंकार वस्त्रे देई सर्व कैदी जखम्यांस । पाठवि विजापूरास ।। वचनीं साचा शिवाजी देई हिबरें बक्षीस । फितुऱ्या गोपीनाथास ।। नाचत गात सर्व गेले प्रतापगडास । उपमा नाहीं आनंदास ॥<noinclude></noinclude> orhl9yfep5j8dq9e8gghhpwi9smksfx पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९८ 104 110613 231918 2026-06-10T16:48:39Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231918 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा ॥ चाल ॥ ॥ शिवाचा गजर जयनामाचा झेंडा रोविला ॥ ॥ क्षेत्र्याचा मेळा मावळ्याचा शिकार खेळला ॥ माते पायीं ठेवी डोई गर्व नाहीं काडीचा । आशिर्वाद घेई आईचा ॥ आलाबला घेई आवडता होतो जिजीचा । पवाडा गातो शिवाजीचा || कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥ ३ ॥ लढे रांगणी विशालगडीं घेई पन्हाळ्यास । केले मग शुरू खंडणीस || रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापूरास । नेमिला कोल्हापूरास ॥ स्वार तीन हजार घेई थोड्या पायदळास आला थेट पन्हाळ्यास ॥ मार देत शिवाजी पिटी कृष्णा पैलतडीस । अती जेर केलें त्यास | खंडणी घेत गेला भिडला विजापुरास । परत मग आला गडास ॥ राजापुर दाभोळ लुटी भरी खजीन्यास । मात गेली विजापुरास ॥ सिद्दी जोहरा नेमी मोठी फौज दिमतीस । सावंत सिद्दी कुमकेस || बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास । करी मग जमा बेगमीस ॥ ५७<noinclude></noinclude> d69dj1o6kwp82on5z7pr692dcj6tqtg पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९९ 104 110614 231919 2026-06-10T16:49:04Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 231919 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>५८ महात्मा फुले समग्र वाङ्मय वारंवार छापे घाली लुटी भौंती मुलखास । केले महाग दाण्यास | त्रासानें खवळून वेढा घाली शिवाजीस । कोंडिलें गडीं फौजेस ॥ चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढ्यास । योजना करी उपायास । कोंकणामधीं सिद्दी झोडी रघुनाथास । उपद्रव झाला रयतेस | पासलकर बाजीराव पडले वाडीस । दुःख मग झालें शिवाजीस || सिद्दी जोहरा निरोपानें गोंवी वचनास । खुशाल गेला भेटीस | वेळ करून गेला उरला नाहीं आवकास । कच्चा मग ठेवी तहास ॥ सिद्दीस लाडीगोडी मधीं मान डुकलीस। गेला थाप देऊन गडास ॥ सिट्या पोटीं खुष्याली जाई झोपीं सावकास । हयगय झाली जप्तीस ॥ तो शिवाजी पळून गेला घेई पाठी रात्रीस । फसविलें मुसलमानास || सिद्दी सकाळीं खाई मनीं लाडू चुरमुन्यास । स्वारदळ लावी पाठीस || चढत होता खींड शिवाजी गांठले त्यास । बंदुका लावी छातीस ॥ 'बाजीपरभु मुख्य केला देवि मावळयास । एकटा गेला रांगण्यास ||<noinclude></noinclude> s2v9d1si9cl62el1gbla8ly7fv38mrv पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/१० 104 110615 231923 2026-06-10T16:56:13Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 231923 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{rh|१०|योगसोपान—प्रस्तावना.|}} :आतां षट्कर्में, ज्याच्या अंगांत मेद व कफ अधिक असेल, त्यानेंच करावी ह्मणून स्पष्ट सांगितलें आहे. तथापि हें पुस्तक वाचणारे सर्वच मेद व कफरहित असतील असें नाहीं, ह्मणून षट्कर्माची थोडक्यात माहिती पुढें दिली आहे; व शेवटी प्राणायामासंबंधीं माहिती, अष्टविधकुंभक, त्यांची कृति व फलें देऊन हा भाग पुरा केला आहे. :एकंदरीनें स्वशक्त्यनुसार हें पुस्तक जितकें करवलें तितकें सुलभ केलें आहे; तरी मूळचा विषयच गहन असल्यामुळे त्यास सौलभ्य आणणें हें काम किती कठीण आहे हें जाणत्या मनुष्यास सांगावयास नकोच. :यांत लिहिलेल्या गोष्टी क्रमानें व विचारानें केल्यास पुस्तकांत लिहिल्याप्रमाणें अनुभव येईल असे ग्रंथकर्ता स्वानुभवानें खात्रीपूर्वक सांगत आहे. यांत प्रसंग- विशेष एखादी शंका आल्यास ती समक्ष अगर पत्रद्वारें विचारली असतां योग्यायोग्य पाहून समाधान करण्यास हरकत होणार नाहीं. भेट घ्यावयाची असल्यास पूर्वी पत्र पाठवून उत्तर मागवावें. पत्ता—मु० संगम माहुली, ता० व जि० सातारा. :आपला अमूल्य वेळ खर्चून हें पुस्तक तपासणारे वे. शा. सं. वैद्यवर्य कृष्ण- शास्त्री नवरे आणि आयुर्वेदभूषण महोपाध्याय वासुदेवशास्त्री ऐनापुरे यांचा ग्रंथकर्ता कृतज्ञतापूर्वक आभारी आहे. :शेवटी जगन्नियंत्या परमेश्वरापाशीं अनन्यभावानें अशी प्रार्थना आहे की, यावेळी सर्व लोकांत परम श्रेष्ठ व अत्यावश्यक अशा योगशास्त्रासंबंधानें अभि- रूचि उत्पन्न होऊन त्याचे अभ्यासानें उभय लोकींच्या सुखाचे त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होवोत. इति शुभम्. :मुंबई. मि० पौष वद्य ६. :शके १८२६. <div style="text-align:right;">पुस्तककर्ता.</div> <center>————————</center><noinclude></noinclude> bs2kpgmadsxgxfyzli4jq4urzs292ib 231924 231923 2026-06-10T16:57:26Z Annni07 6055 231924 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{rh|१०|योगसोपान—प्रस्तावना.|}} :आतां षट्कर्में, ज्याच्या अंगांत मेद व कफ अधिक असेल, त्यानेंच करावी ह्मणून स्पष्ट सांगितलें आहे. तथापि हें पुस्तक वाचणारे सर्वच मेद व कफरहित असतील असें नाहीं, ह्मणून षट्कर्माची थोडक्यात माहिती पुढें दिली आहे; व शेवटी प्राणायामासंबंधीं माहिती, अष्टविधकुंभक, त्यांची कृति व फलें देऊन हा भाग पुरा केला आहे. :एकंदरीनें स्वशक्त्यनुसार हें पुस्तक जितकें करवलें तितकें सुलभ केलें आहे; तरी मूळचा विषयच गहन असल्यामुळे त्यास सौलभ्य आणणें हें काम किती कठीण आहे हें जाणत्या मनुष्यास सांगावयास नकोच. :यांत लिहिलेल्या गोष्टी क्रमानें व विचारानें केल्यास पुस्तकांत लिहिल्याप्रमाणें अनुभव येईल असे ग्रंथकर्ता स्वानुभवानें खात्रीपूर्वक सांगत आहे. यांत प्रसंग- विशेष एखादी शंका आल्यास ती समक्ष अगर पत्रद्वारें विचारली असतां योग्यायोग्य पाहून समाधान करण्यास हरकत होणार नाहीं. भेट घ्यावयाची असल्यास पूर्वी पत्र पाठवून उत्तर मागवावें. पत्ता—मु० संगम माहुली, ता० व जि० सातारा. :आपला अमूल्य वेळ खर्चून हें पुस्तक तपासणारे वे. शा. सं. वैद्यवर्य कृष्ण- शास्त्री नवरे आणि आयुर्वेदभूषण महोपाध्याय वासुदेवशास्त्री ऐनापुरे यांचा ग्रंथकर्ता कृतज्ञतापूर्वक आभारी आहे. :शेवटी जगन्नियंत्या परमेश्वरापाशीं अनन्यभावानें अशी प्रार्थना आहे की, यावेळी सर्व लोकांत परम श्रेष्ठ व अत्यावश्यक अशा योगशास्त्रासंबंधानें अभि- रूचि उत्पन्न होऊन त्याचे अभ्यासानें उभय लोकींच्या सुखाचे त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होवोत. इति शुभम्. :मुंबई. मि० पौष वद्य ६.<div style="text-align:right;">पुस्तककर्ता.</div> :शके १८२६. <center>————————</center><noinclude></noinclude> bzqf0i8ulgdmf6b2g13eh6kcpg9f2jv 231976 231924 2026-06-11T04:13:12Z सुबोध कुलकर्णी 1231 231976 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|१०|योगसोपान—प्रस्तावना.|}}</noinclude>{{gap}}आतां षट्कर्में, ज्याच्या अंगांत मेद व कफ अधिक असेल, त्यानेंच करावी ह्मणून स्पष्ट सांगितलें आहे. तथापि हें पुस्तक वाचणारे सर्वच मेद व कफरहित असतील असें नाहीं, ह्मणून षट्कर्माची थोडक्यात माहिती पुढें दिली आहे; व शेवटी प्राणायामासंबंधीं माहिती, अष्टविधकुंभक, त्यांची कृति व फलें देऊन हा भाग पुरा केला आहे.<br> {{gap}}एकंदरीनें स्वशक्त्यनुसार हें पुस्तक जितकें करवलें तितकें सुलभ केलें आहे; तरी मूळचा विषयच गहन असल्यामुळे त्यास सौलभ्य आणणें हें काम किती कठीण आहे हें जाणत्या मनुष्यास सांगावयास नकोच.<br> :यांत लिहिलेल्या गोष्टी क्रमानें व विचारानें केल्यास पुस्तकांत लिहिल्याप्रमाणें अनुभव येईल असे ग्रंथकर्ता स्वानुभवानें खात्रीपूर्वक सांगत आहे. यांत प्रसंग- विशेष एखादी शंका आल्यास ती समक्ष अगर पत्रद्वारें विचारली असतां योग्यायोग्य पाहून समाधान करण्यास हरकत होणार नाहीं. भेट घ्यावयाची असल्यास पूर्वी पत्र पाठवून उत्तर मागवावें. पत्ता—मु० संगम माहुली, ता० व जि० सातारा. :आपला अमूल्य वेळ खर्चून हें पुस्तक तपासणारे वे. शा. सं. वैद्यवर्य कृष्ण- शास्त्री नवरे आणि आयुर्वेदभूषण महोपाध्याय वासुदेवशास्त्री ऐनापुरे यांचा ग्रंथकर्ता कृतज्ञतापूर्वक आभारी आहे. :शेवटी जगन्नियंत्या परमेश्वरापाशीं अनन्यभावानें अशी प्रार्थना आहे की, यावेळी सर्व लोकांत परम श्रेष्ठ व अत्यावश्यक अशा योगशास्त्रासंबंधानें अभि- रूचि उत्पन्न होऊन त्याचे अभ्यासानें उभय लोकींच्या सुखाचे त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होवोत. इति शुभम्. :मुंबई. मि० पौष वद्य ६.<div style="text-align:right;">पुस्तककर्ता.</div> :शके १८२६. {{center|{{rule|6em}}}}<noinclude></noinclude> mbbwrmstqy6jowqyps6bywlqmo4mw3t 232011 231976 2026-06-11T06:04:00Z Annni07 6055 232011 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|१०|योगसोपान—प्रस्तावना.|}}</noinclude>{{gap}}आतां षट्कर्में, ज्याच्या अंगांत मेद व कफ अधिक असेल, त्यानेंच करावीं ह्मणून स्पष्ट सांगितलें आहे. तथापि हें पुस्तक वाचणारे सर्वच मेद व कफरहित असतील असें नाहीं, ह्मणून षट्कर्मांची थोडक्यांत माहिती पुढें दिली आहे; व शेवटीं प्राणायामासंबंधीं माहिती, अष्टविधकुंभक, त्यांची कृति व फलें देऊन हा भाग पुरा केला आहे.<br>{{gap}}एकंदरीनें स्वशक्त्यनुसार हें पुस्तक जितकें करवलें तितकें सुलभ केलें आहे; तरी मूळचा विषयच गहन असल्यामुळें त्यास सौलभ्य आणणें हें काम किती कठीण आहे हें जाणत्या मनुष्यास सांगावयास नकोच. <br>{{gap}}यांत लिहिलेल्या गोष्टी क्रमानें व विचारानें केल्यास पुस्तकांत लिहिल्याप्रमाणें अनुभव येईल असें ग्रंथकर्ता स्वानुभवानें खात्रीपूर्वक सांगत आहे. यांत प्रसंगविशेषीं एखादी शंका आल्यास ती समक्ष अगर पत्रद्वारें विचारली असतां योग्यायोग्य पाहून समाधान करण्यास हरकत होणार नाहीं. भेट घ्यावयाची असल्यास पूर्वी पत्र पाठवून उत्तर मागवावें. पत्ता—मु० संगम माहुली, ता० व जि० सातारा.<br>{{gap}}आपला अमूल्य वेळ खर्चून हें पुस्तक तपासणारे वे. शा. सं. वैद्यवर्य कृष्णशास्त्री नवरे आणि आयुर्वेदाचार्य महोपाध्याय वासुदेवशास्त्री ऐनापुरे ह्यांचा ग्रंथकर्ता कृतज्ञतापूर्वक आभारी आहे.<br>{{gap}}शेवटीं जगन्नियंत्या परमेश्वरापाशीं अनन्यभावानें अशी प्रार्थना आहे कीं, यावेळेीं सर्व लोकांत परम श्रेष्ठ व अत्यावश्यक अशा योगशास्त्रासंबंधानें अभिरुचि उत्पन्न होऊन त्याचे अभ्यासानें उभय लोकींच्या सुखाचे त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होवोत. इति शम्.<br> <br> {| width="100%" style="background:transparent;" | width="50%" valign="top" | मुंबई. मि० पौष वद्य ६ {{gap|3.5em}} शके १८२६. | width="50%" valign="top" align="right" | '''पुस्तककर्ता.''' |} {{rule}}<noinclude></noinclude> s2o3x1yhcx3jrvhagqp7abs94gtz0ld 232012 232011 2026-06-11T06:04:37Z Annni07 6055 232012 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|१०|योगसोपान—प्रस्तावना.|}}</noinclude>{{gap}}आतां षट्कर्में, ज्याच्या अंगांत मेद व कफ अधिक असेल, त्यानेंच करावीं ह्मणून स्पष्ट सांगितलें आहे. तथापि हें पुस्तक वाचणारे सर्वच मेद व कफरहित असतील असें नाहीं, ह्मणून षट्कर्मांची थोडक्यांत माहिती पुढें दिली आहे; व शेवटीं प्राणायामासंबंधीं माहिती, अष्टविधकुंभक, त्यांची कृति व फलें देऊन हा भाग पुरा केला आहे.<br>{{gap}}एकंदरीनें स्वशक्त्यनुसार हें पुस्तक जितकें करवलें तितकें सुलभ केलें आहे; तरी मूळचा विषयच गहन असल्यामुळें त्यास सौलभ्य आणणें हें काम किती कठीण आहे हें जाणत्या मनुष्यास सांगावयास नकोच. <br>{{gap}}यांत लिहिलेल्या गोष्टी क्रमानें व विचारानें केल्यास पुस्तकांत लिहिल्याप्रमाणें अनुभव येईल असें ग्रंथकर्ता स्वानुभवानें खात्रीपूर्वक सांगत आहे. यांत प्रसंगविशेषीं एखादी शंका आल्यास ती समक्ष अगर पत्रद्वारें विचारली असतां योग्यायोग्य पाहून समाधान करण्यास हरकत होणार नाहीं. भेट घ्यावयाची असल्यास पूर्वी पत्र पाठवून उत्तर मागवावें. पत्ता—मु० संगम माहुली, ता० व जि० सातारा.<br>{{gap}}आपला अमूल्य वेळ खर्चून हें पुस्तक तपासणारे वे. शा. सं. वैद्यवर्य कृष्णशास्त्री नवरे आणि आयुर्वेदाचार्य महोपाध्याय वासुदेवशास्त्री ऐनापुरे ह्यांचा ग्रंथकर्ता कृतज्ञतापूर्वक आभारी आहे.<br>{{gap}}शेवटीं जगन्नियंत्या परमेश्वरापाशीं अनन्यभावानें अशी प्रार्थना आहे कीं, यावेळेीं सर्व लोकांत परम श्रेष्ठ व अत्यावश्यक अशा योगशास्त्रासंबंधानें अभिरुचि उत्पन्न होऊन त्याचे अभ्यासानें उभय लोकींच्या सुखाचे त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होवोत. इति शम्.<br> {| width="100%" style="background:transparent;" | width="50%" valign="top" | मुंबई. मि० पौष वद्य ६ {{gap|3.5em}} शके १८२६. | width="50%" valign="top" align="right" | '''पुस्तककर्ता.''' |} {{rule}}<noinclude></noinclude> cjx0l1dw0no1dcugp36hycujlph4ane पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/२ 104 110616 231926 2026-06-10T17:16:34Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 231926 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{center|प्रकाशक}} {{center|'''{{large|तुकाराम पुंडलीक शेट्ये,}}'''}} {{center|'''बुकसेलर,'''}} {{center|'''माधवबाग, मुंबई नं. ४'''}} {{center|[[File:पुस्तकातील बोधचिन्ह/झाडाचे चित्र]]}} {{right|मुद्रक}} {{right|'''{{large|विनायक बाळकृष्ण परांजपे,}}'''}} {{right|'''नेटिव ओपिनियन प्रेस,'''}} {{right|'''गिरगांव, मुम्बई.'''}}<noinclude></noinclude> hfvjqs0hq6g8jjxlui7ueta43xk9mrh 231993 231926 2026-06-11T05:19:40Z Annni07 6055 231993 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{left|{{center|प्रकाशक}} {{center|'''{{large|तुकाराम पुंडलीक शेट्ये,}}'''}} {{center|'''बुकसेलर,'''}} {{center|'''माधवबाग, मुंबई नं. ४'''}}}} {{right|मुद्रक}} {{right|'''{{large|विनायक बाळकृष्ण परांजपे,}}'''}} {{right|'''नेटिव ओपिनियन प्रेस,'''}} {{right|'''गिरगांव, मुम्बई.'''}}<noinclude></noinclude> 3bvzkdbk41wp5fpluz09mw7j57ymuc1 231994 231993 2026-06-11T05:20:02Z Annni07 6055 231994 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{left|{{center|प्रकाशक}} {{center|'''{{large|तुकाराम पुंडलीक शेट्ये,}}'''}} {{center|'''बुकसेलर,'''}} {{center|'''माधवबाग, मुंबई नं. ४'''}}}} {{dhr|6em}} {{right|मुद्रक}} {{right|'''{{large|विनायक बाळकृष्ण परांजपे,}}'''}} {{right|'''नेटिव ओपिनियन प्रेस,'''}} {{right|'''गिरगांव, मुम्बई.'''}}<noinclude></noinclude> fiuh8p7mvo6m0dmwwfrl38cidkceyqp 231995 231994 2026-06-11T05:20:20Z Annni07 6055 231995 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{left|{{center|प्रकाशक}} {{center|'''{{large|तुकाराम पुंडलीक शेट्ये,}}'''}} {{center|'''बुकसेलर,'''}} {{center|'''माधवबाग, मुंबई नं. ४'''}}}} {{dhr|15em}} {{right|मुद्रक}} {{right|'''{{large|विनायक बाळकृष्ण परांजपे,}}'''}} {{right|'''नेटिव ओपिनियन प्रेस,'''}} {{right|'''गिरगांव, मुम्बई.'''}}<noinclude></noinclude> b9vxve4zipm88u1v2zekl0a51bvmffp 231996 231995 2026-06-11T05:20:42Z Annni07 6055 231996 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{left|{{center|प्रकाशक}} {{center|'''{{large|तुकाराम पुंडलीक शेट्ये,}}'''}} {{center|'''बुकसेलर,'''}} {{center|'''माधवबाग, मुंबई नं. ४'''}}}} {{dhr|30 em}} {{right|मुद्रक}} {{right|'''{{large|विनायक बाळकृष्ण परांजपे,}}'''}} {{right|'''नेटिव ओपिनियन प्रेस,'''}} {{right|'''गिरगांव, मुम्बई.'''}}<noinclude></noinclude> i6uy95mary3qwvdo1ab2alhht4moo1o 231997 231996 2026-06-11T05:20:59Z Annni07 6055 231997 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{left|{{center|प्रकाशक}} {{center|'''{{large|तुकाराम पुंडलीक शेट्ये,}}'''}} {{center|'''बुकसेलर,'''}} {{center|'''माधवबाग, मुंबई नं. ४'''}}}} {{dhr|30em}} {{right|मुद्रक}} {{right|'''{{large|विनायक बाळकृष्ण परांजपे,}}'''}} {{right|'''नेटिव ओपिनियन प्रेस,'''}} {{right|'''गिरगांव, मुम्बई.'''}}<noinclude></noinclude> jpeoowjcmph7vx3cvfemq2f7rys5jfy 232035 231997 2026-06-11T07:24:54Z सुबोध कुलकर्णी 1231 232035 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{left|{{center|प्रकाशक}} {{center|'''{{large|तुकाराम पुंडलीक शेट्ये,}}'''}} {{center|'''बुकसेलर,'''}} {{center|'''माधवबाग, मुंबई नं. ४'''}}}} {{dhr|15em}} [[File:योगसोपान-पूर्वचतुष्क (page 2 crop).jpg|योगसोपान-पूर्वचतुष्क (page 2 crop)|center]] {{dhr|15em}} {{right|मुद्रक}} {{right|'''{{large|विनायक बाळकृष्ण परांजपे,}}'''}} {{right|'''नेटिव ओपिनियन प्रेस,'''}} {{right|'''गिरगांव, मुम्बई.'''}}<noinclude></noinclude> ndzks7ctwzpeny1vipiis8xy9qojhtu पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/३ 104 110617 231927 2026-06-10T17:20:15Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 231927 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude> {{center|'''{{large|योगसोपान–पूर्वचतुष्क.}}'''}} {{center|🝔 🝔}} {{center|'''ह्या पुस्तकाचा अभ्यास करणाऱ्या'''}} {{center|प्रिय, धार्मिक, सद्गृहस्थ, आस्तिक, सुशील, सात्त्विक, हितेच्छु,}} {{center|श्रेष्ठ व भक्तिमान् तरुण, मध्यम व वृद्ध पुरुषांना}} {{center|ममतेच्या आशीर्वादरूपाची}} {{center|'''सूचना आहे कीं,'''}} {{center|शारीरिक व मानसिक उत्कर्षासाठीं}} {{center|हें पुस्तक त्यांनीं सबंध वाचावें, स्वस्थ मनानें ह्याचा विचार करावा,}} {{center|आणि मग ह्यांतील कृतींच्या अभ्यासास लागावें.}} {{right|'''पुस्तककर्ता.'''}}<noinclude></noinclude> l9v9fwyibrie4sh1q28orr9qzb8go8z 231998 231927 2026-06-11T05:22:07Z Annni07 6055 231998 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{border| {{center|'''{{large|योगसोपान–पूर्वचतुष्क.}}'''}} {{center|🝔 🝔 🝔}} {{center|'''ह्या पुस्तकाचा अभ्यास करणाऱ्या'''}} {{center|प्रिय, धार्मिक, सद्गृहस्थ, आस्तिक, सुशील, सात्त्विक, हितेच्छु,}} {{center|श्रेष्ठ व भक्तिमान् तरुण, मध्यम व वृद्ध पुरुषांना}} {{center|ममतेच्या आशीर्वादरूपाची}} {{center|'''सूचना आहे कीं,'''}} {{center|शारीरिक व मानसिक उत्कर्षासाठीं}} {{center|हें पुस्तक त्यांनीं सबंध वाचावें, स्वस्थ मनानें ह्याचा विचार करावा,}} {{center|आणि मग ह्यांतील कृतींच्या अभ्यासास लागावें.}} {{right|'''पुस्तककर्ता.'''}}}}<noinclude></noinclude> c9czmo2j89e8lletj1cdnxrlfclcokk 231999 231998 2026-06-11T05:22:28Z Annni07 6055 231999 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{center|{{border| {{center|'''{{large|योगसोपान–पूर्वचतुष्क.}}'''}} {{center|🝔 🝔 🝔}} {{center|'''ह्या पुस्तकाचा अभ्यास करणाऱ्या'''}} {{center|प्रिय, धार्मिक, सद्गृहस्थ, आस्तिक, सुशील, सात्त्विक, हितेच्छु,}} {{center|श्रेष्ठ व भक्तिमान् तरुण, मध्यम व वृद्ध पुरुषांना}} {{center|ममतेच्या आशीर्वादरूपाची}} {{center|'''सूचना आहे कीं,'''}} {{center|शारीरिक व मानसिक उत्कर्षासाठीं}} {{center|हें पुस्तक त्यांनीं सबंध वाचावें, स्वस्थ मनानें ह्याचा विचार करावा,}} {{center|आणि मग ह्यांतील कृतींच्या अभ्यासास लागावें.}} {{right|'''पुस्तककर्ता.'''}}}} }}<noinclude></noinclude> 66ree3g8g2l6illex7p6ffae17lsq68 पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/४ 104 110618 231928 2026-06-10T17:32:49Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 231928 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{center|'''{{large|ह्या पुस्तकांत घेतलेल्या आधारभूत ग्रंथांचीं नांवें व संकेत.}}'''}} {| width="100%" style="background:transparent;" | width="50%" | १ '''हठयोगप्रदीपिका''' {{gap|3em}} = {{gap|1em}} ह० प्र० | width="50%" | ९ '''योगतत्त्वप्रकाश''' {{gap|3em}} = {{gap|1em}} यो० प्र० |- | २ '''याज्ञवल्क्यसंहिता''' {{gap|2em}} = {{gap|1em}} या० सं० | १० '''श्री० भगवद्गीता''' {{gap|3.3em}} = {{gap|1em}} भ० गी० |- | ३ '''घेरंडसंहिता''' {{gap|4.3em}} = {{gap|1em}} घे० सं० | ११ '''लिंगपुराण''' {{gap|5.2em}} = {{gap|1em}} लिं० पु० |- | ४ '''गोरक्षसंहिता''' {{gap|4.1em}} = {{gap|1em}} गो० सं० | १२ '''योगबीज''' {{gap|5.8em}} = {{gap|1em}} यो० बी० |- | ५ '''गोरक्षपद्धति''' {{gap|4.2em}} = {{gap|1em}} गो० प० | १३ '''गरुडपुराण''' {{gap|5.5em}} = {{gap|1em}} ग० पु० |- | ६ '''योगकल्पद्रुम''' {{gap|4.1em}} = {{gap|1em}} यो० क० | १४ '''अत्रिसंहिता''' {{gap|5.3em}} = {{gap|1em}} अ० सं० |- | ७ '''शिवसंहिता''' {{gap|5.2em}} = {{gap|1em}} शि० सं० | १५ '''स्कंदपुराण''' {{gap|5.6em}} = {{gap|1em}} स्कं० पु० |- | ८ '''पातंजलयोगसूत्र''' {{gap|3.1em}} = {{gap|1em}} पा० यो० | १६ '''कूर्मपुराण इत्यादि''' {{gap|3.1em}} = {{gap|1em}} कू० पु० |} {| width="100%" style="background:transparent;" | valign="top" width="50%" | १ '''मेढ्र'''—जननेंद्रिय. २ '''खोड'''—टाच. ३ '''गुल्फ'''—घोटा. ४ '''ऊरु'''—मांडी. ५ '''शिवण'''—गुद व वृषण ह्यांमधील उभी शीर. ६ '''जंघा'''—पोटरी. | valign="top" width="50%" style="border-left: 1px dotted #000; padding-left: 10px;" | ७ वामसव्य​}—डावा. ८ दक्षयाम्य​}—उजवा. ९ '''चुचुक'''—स्तनकुडी. १० '''क्षिति'''—गुडघा. ११ '''पायु'''—गुदेंद्रिय. १२ '''द्विज'''—ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. |} १ नेहमीं नासाग्रीं किंवा भ्रूमध्यावर दृष्टि असावी. २ विशेष सांगितलें असेल तेथें व कुंभकाचे वेळीं जालंधर बंध करावा. ३ अंगुष्ठादि अवयव धरावयाचे ते ( चिमटींत ) अंगठा व तर्जनी यांनीं धरावे. ४ रेचक केव्हांही तोंडानें करूं नये; नाकानें सावकाश करावा. ५ श्वासोच्छ्वासाची क्रिया नेहमींच होईल तितकी सावकाश करावी. ६ केव्हांही धापा देण्यासारखें कृत्य करूं नये. ७ अभ्यासारंभीं मिताहाराचा नियम केला पाहिजे.<noinclude></noinclude> pf1mq9912dbvp1qi2m1pbdkg9fopuy6 231929 231928 2026-06-10T17:34:49Z Annni07 6055 231929 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{center|'''{{large|ह्या पुस्तकांत घेतलेल्या आधारभूत ग्रंथांचीं नांवें व संकेत.}}'''}} {| width="100%" style="background:transparent;" | width="50%" | १ '''हठयोगप्रदीपिका''' {{gap|3em}} = {{gap|1em}} ह० प्र० | width="50%" | ९ '''योगतत्त्वप्रकाश''' {{gap|3em}} = {{gap|1em}} यो० प्र० |- | २ '''याज्ञवल्क्यसंहिता''' {{gap|2em}} = {{gap|1em}} या० सं० | १० '''श्री० भगवद्गीता''' {{gap|3.3em}} = {{gap|1em}} भ० गी० |- | ३ '''घेरंडसंहिता''' {{gap|4.3em}} = {{gap|1em}} घे० सं० | ११ '''लिंगपुराण''' {{gap|5.2em}} = {{gap|1em}} लिं० पु० |- | ४ '''गोरक्षसंहिता''' {{gap|4.1em}} = {{gap|1em}} गो० सं० | १२ '''योगबीज''' {{gap|5.8em}} = {{gap|1em}} यो० बी० |- | ५ '''गोरक्षपद्धति''' {{gap|4.2em}} = {{gap|1em}} गो० प० | १३ '''गरुडपुराण''' {{gap|5.5em}} = {{gap|1em}} ग० पु० |- | ६ '''योगकल्पद्रुम''' {{gap|4.1em}} = {{gap|1em}} यो० क० | १४ '''अत्रिसंहिता''' {{gap|5.3em}} = {{gap|1em}} अ० सं० |- | ७ '''शिवसंहिता''' {{gap|5.2em}} = {{gap|1em}} शि० सं० | १५ '''स्कंदपुराण''' {{gap|5.6em}} = {{gap|1em}} स्कं० पु० |- | ८ '''पातंजलयोगसूत्र''' {{gap|3.1em}} = {{gap|1em}} पा० यो० | १६ '''कूर्मपुराण इत्यादि''' {{gap|3.1em}} = {{gap|1em}} कू० पु० |} {| width="100%" style="background:transparent;" | valign="top" width="50%" | १ '''मेढ्र'''—जननेंद्रिय. २ '''खोड'''—टाच. ३ '''गुल्फ'''—घोटा. ४ '''ऊरु'''—मांडी. ५ '''शिवण'''—गुद व वृषण ह्यांमधील उभी शीर. ६ '''जंघा'''—पोटरी. | valign="top" width="50%" style="border-left: 1px dotted #000; padding-left: 10px;" | ७ वामसव्य​}—डावा. ८ दक्षयाम्य​}—उजवा. ९ '''चुचुक'''—स्तनकुडी. १० '''क्षिति'''—गुडघा. ११ '''पायु'''—गुदेंद्रिय. १२ '''द्विज'''—ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. |} १ नेहमीं नासाग्रीं किंवा भ्रूमध्यावर दृष्टि असावी. २ विशेष सांगितलें असेल तेथें व कुंभकाचे वेळीं जालंधर बंध करावा. ३ अंगुष्ठादि अवयव धरावयाचे ते ( चिमटींत ) अंगठा व तर्जनी यांनीं धरावे. ४ रेचक केव्हांही तोंडानें करूं नये; नाकानें सावकाश करावा. ५ श्वासोच्छ्वासाची क्रिया नेहमींच होईल तितकी सावकाश करावी. ६ केव्हांही धापा देण्यासारखें कृत्य करूं नये. ७ अभ्यासारंभीं मिताहाराचा नियम केला पाहिजे.<noinclude></noinclude> nayxeh4kezqy271uy0i1v0dfot8xc68 231930 231929 2026-06-10T17:36:58Z Annni07 6055 231930 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{| width="100%" style="background:transparent; line-height: 1.6;" | width="50%" | १ '''हठयोगप्रदीपिका''' {{gap|3em}} = {{gap|1em}} ह० प्र० | width="50%" | ९ '''योगतत्त्वप्रकाश''' {{gap|3em}} = {{gap|1em}} यो० प्र० |- | २ '''याज्ञवल्क्यसंहिता''' {{gap|2em}} = {{gap|1em}} या० सं० | १० '''श्री० भगवद्गीता''' {{gap|3.3em}} = {{gap|1em}} भ० गी० |- | ३ '''घेरंडसंहिता''' {{gap|4.3em}} = {{gap|1em}} घे० सं० | ११ '''लिंगपुराण''' {{gap|5.2em}} = {{gap|1em}} लिं० पु० |- | ४ '''गोरक्षसंहिता''' {{gap|4.1em}} = {{gap|1em}} गो० सं० | १२ '''योगबीज''' {{gap|5.8em}} = {{gap|1em}} यो० बी० |- | ५ '''गोरक्षपद्धति''' {{gap|4.2em}} = {{gap|1em}} गो० प० | १३ '''गरुडपुराण''' {{gap|5.5em}} = {{gap|1em}} ग० पु० |- | ६ '''योगकल्पद्रुम''' {{gap|4.1em}} = {{gap|1em}} यो० क० | १४ '''अत्रिसंहिता''' {{gap|5.3em}} = {{gap|1em}} अ० सं० |- | ७ '''शिवसंहिता''' {{gap|5.2em}} = {{gap|1em}} शि० सं० | १५ '''स्कंदपुराण''' {{gap|5.6em}} = {{gap|1em}} स्कं० पु० |- | ८ '''पातंजलयोगसूत्र''' {{gap|3.1em}} = {{gap|1em}} पा० यो० | १६ '''कूर्मपुराण इत्यादि''' {{gap|3.1em}} = {{gap|1em}} कू० पु० |} {| width="100%" style="background:transparent; line-height: 1.8;" | valign="top" width="50%" | १ '''मेढ्र'''—जननेंद्रिय. २ '''खोड'''—टाच. ३ '''गुल्फ'''—घोटा. ४ '''ऊरु'''—मांडी. ५ '''शिवण'''—गुद व वृषण ह्यांमधील उभी शीर. ६ '''जंघा'''—पोटरी. | valign="top" width="50%" style="border-left: 1px dotted #000; padding-left: 15px;" | ७ वामसव्य​}—डावा. ८ दक्षयाम्य​}—उजवा. ९ '''चुचुक'''—स्तनकुडी. १० '''क्षिति'''—गुडघा. ११ '''पायु'''—गुदेंद्रिय. १२ '''द्विज'''—ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. |}<noinclude></noinclude> 63d9zyoyr9ontzb7s3qdcanyqqb957g 231931 231930 2026-06-10T17:40:27Z Annni07 6055 231931 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{| width="100%" style="background:transparent;" | width="50%" | १ '''हठयोगप्रदीपिका''' {{gap|3em}} = {{gap|1em}} ह० प्र० | width="50%" | ९ '''योगतत्त्वप्रकाश''' {{gap|3em}} = {{gap|1em}} यो० प्र० |- | २ '''याज्ञवल्क्यसंहिता''' {{gap|2em}} = {{gap|1em}} या० सं० | १० '''श्री० भगवद्गीता''' {{gap|3.3em}} = {{gap|1em}} भ० गी० |- | ३ '''घेरंडसंहिता''' {{gap|4.3em}} = {{gap|1em}} घे० सं० | ११ '''लिंगपुराण''' {{gap|5.2em}} = {{gap|1em}} लिं० पु० |- | ४ '''गोरक्षसंहिता''' {{gap|4.1em}} = {{gap|1em}} गो० सं० | १२ '''योगबीज''' {{gap|5.8em}} = {{gap|1em}} यो० बी० |- | ५ '''गोरक्षपद्धति''' {{gap|4.2em}} = {{gap|1em}} गो० प० | १३ '''गरुडपुराण''' {{gap|5.5em}} = {{gap|1em}} ग० पु० |- | ६ '''योगकल्पद्रुम''' {{gap|4.1em}} = {{gap|1em}} यो० क० | १४ '''अत्रिसंहिता''' {{gap|5.3em}} = {{gap|1em}} अ० सं० |- | ७ '''शिवसंहिता''' {{gap|5.2em}} = {{gap|1em}} शि० सं० | १५ '''स्कंदपुराण''' {{gap|5.6em}} = {{gap|1em}} स्कं० पु० |- | ८ '''पातंजलयोगसूत्र''' {{gap|3.1em}} = {{gap|1em}} पा० यो० | १६ '''कूर्मपुराण इत्यादि''' {{gap|3.1em}} = {{gap|1em}} कू० पु० |} {| width="100%" style="background:transparent;" | valign="top" width="50%" | १ '''मेढ्र'''—जननेंद्रिय. २ '''खोड'''—टाच. ३ '''गुल्फ'''—घोटा. ४ '''ऊरु'''—मांडी. ५ '''शिवण'''—गुद व वृषण ह्यांमधील उभी शीर. ६ '''जंघा'''—पोटरी. | valign="top" width="50%" style="border-left: 1px dotted #000; padding-left: 10px;" | ७ वामसव्य​}—डावा. ८ दक्षयाम्य​}—उजवा. ९ '''चुचुक'''—स्तनकुडी. १० '''क्षिति'''—गुडघा. ११ '''पायु'''—गुदेंद्रिय. १२ '''द्विज'''—ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. |} १ नेहमीं नासाग्रीं किंवा भ्रूमध्यावर दृष्टि असावी. २ विशेष सांगितलें असेल तेथें व कुंभकाचे वेळीं जालंधर बंध करावा. 傷 अंगुष्ठादि अवयव धरावयाचे ते ( चिमटींत ) अंगठा व तर्जनी यांनीं धरावे. ४ रेचक केव्हांही तोंडानें करूं नये; नाकानें सावकाश करावा. ५ श्वासोच्छ्वासाची क्रिया नेहमींच होईल तितकी सावकाश करावी. ६ केव्हांही धापा देण्यासारखें कृत्य करूं नये. ७ अभ्यासारंभीं मिताहाराचा नियम केला पाहिजे.<noinclude></noinclude> rxesmkq8lgzmzhzwzd1e9boq3lm004d 232037 231931 2026-06-11T07:46:35Z सुबोध कुलकर्णी 1231 232037 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{| width="100%" style="background:transparent;" | width="50%" | १ '''हठयोगप्रदीपिका''' {{gap|3em}} = {{gap|1em}} ह० प्र० | width="50%" | ९ '''योगतत्त्वप्रकाश''' {{gap|3em}} = {{gap|1em}} यो० प्र० |- | २ '''याज्ञवल्क्यसंहिता''' {{gap|2em}} = {{gap|1em}} या० सं० | १० '''श्री० भगवद्गीता''' {{gap|3.3em}} = {{gap|1em}} भ० गी० |- | ३ '''घेरंडसंहिता''' {{gap|4.3em}} = {{gap|1em}} घे० सं० | ११ '''लिंगपुराण''' {{gap|5.2em}} = {{gap|1em}} लिं० पु० |- | ४ '''गोरक्षसंहिता''' {{gap|4.1em}} = {{gap|1em}} गो० सं० | १२ '''योगबीज''' {{gap|5.8em}} = {{gap|1em}} यो० बी० |- | ५ '''गोरक्षपद्धति''' {{gap|4.2em}} = {{gap|1em}} गो० प० | १३ '''गरुडपुराण''' {{gap|5.5em}} = {{gap|1em}} ग० पु० |- | ६ '''योगकल्पद्रुम''' {{gap|4.1em}} = {{gap|1em}} यो० क० | १४ '''अत्रिसंहिता''' {{gap|5.3em}} = {{gap|1em}} अ० सं० |- | ७ '''शिवसंहिता''' {{gap|5.2em}} = {{gap|1em}} शि० सं० | १५ '''स्कंदपुराण''' {{gap|5.6em}} = {{gap|1em}} स्कं० पु० |- | ८ '''पातंजलयोगसूत्र''' {{gap|3.1em}} = {{gap|1em}} पा० यो० | १६ '''कूर्मपुराण इत्यादि''' {{gap|3.1em}} = {{gap|1em}} कू० पु० |} {{center|'''आसनादिकात येणाऱ्या पारिभाषिक शब्दांचा कोश'''}} {| width="100%" style="background:transparent;" | valign="top" width="50%" | १ '''मेढ्र'''—जननेंद्रिय. २ '''खोड'''—टाच. ३ '''गुल्फ'''—घोटा. ४ '''ऊरु'''—मांडी. ५ '''शिवण'''—गुद व वृषण ह्यांमधील उभी शीर. ६ '''जंघा'''—पोटरी. | valign="top" width="50%" style="border-left: 1px dotted #000; padding-left: 10px;" | ७ वामसव्य​}—डावा. ८ दक्षयाम्य​}—उजवा. ९ '''चुचुक'''—स्तनकुडी. १० '''क्षिति'''—गुडघा. ११ '''पायु'''—गुदेंद्रिय. १२ '''द्विज'''—ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. |} १ नेहमीं नासाग्रीं किंवा भ्रूमध्यावर दृष्टि असावी. २ विशेष सांगितलें असेल तेथें व कुंभकाचे वेळीं जालंधर बंध करावा. ३ अंगुष्ठादि अवयव धरावयाचे ते ( चिमटींत ) अंगठा व तर्जनी यांनीं धरावे. ४ रेचक केव्हांही तोंडानें करूं नये; नाकानें सावकाश करावा. ५ श्वासोच्छ्वासाची क्रिया नेहमींच होईल तितकी सावकाश करावी. ६ केव्हांही धापा देण्यासारखें कृत्य करूं नये. ७ अभ्यासारंभीं मिताहाराचा नियम केला पाहिजे.<noinclude></noinclude> 2sx9oqbkamknexe07vi5tlfqh4djsoj पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/११ 104 110619 231932 2026-06-10T17:53:32Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 231932 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{center| '''योगसोपान–आभारप्रदर्शन.'''}} {{right|'''११'''|योगसोपान-प्रस्तावना.}} {{center|'''{{large|आभारप्रदर्शन.}}'''}} {{gap|2em}}हें पुस्तक प्रसिद्ध करण्याचें कामीं, आह्मांस ज्यांनीं पुष्कळ परिश्रम घेऊन साह्य केलें, त्यांचे दोन गौरवपर शब्दांनीं आभार मानल्यावांचून आमच्यानें राहवत नाहीं. {{gap|2em}}१ पहिले आभार ह्मणजे रा. रा. पुरुषोत्तम सदाशिव जोशी, फोटोग्राफर ॲन्ड मेडालिस्ट, ह्यांचे होत. हे प्रसिद्ध राजा रविवर्मा ह्यांचे एजन्ट ‘ए. के. जोशी आणि कंपनी’ चे चीफ क्लार्क आहेत. ह्यांस फोटोग्राफीचा फार शोक असून त्या कलेंत त्यांनीं चांगलेंच कुशलत्व साधलें आहे. हरिभक्तिपरायण रा. रा. घमंडे बोवा, ह्यांनीं जसजसें एक एक आसन करून दाखविलें तसतसें रा. जोशी ह्यांनीं त्याचा एकेक फोटो घेऊन, ह्या पुस्तकांतील सर्व आसनांच्या फोटोंचें काम आह्मांस अत्यंत परिश्रमानें व काळजीपूर्वक करून दिलें, याबद्दल आह्मी त्यांचे अत्यंत आभारी आहोंत. तसेंच—— {{gap|2em}}ॐची आकृति ह्या पुस्तकांत जोडली आहे तिचेंही हस्तकौशल्य रा. जोशी ह्यांचें आहे. त्यांनीं आपल्या कल्पनेनें सर्व ४७ योगासनांचे फोटो ॐ आकारांत बसवून त्याचा मोठा सुरेख तक्ता मुंबईंतील प्रदर्शनांत ठेविला होता. त्याचाच फोटो घेऊन तो त्यांनीं अति उत्सुकतेनें आमचे पुस्तकास जोडण्यास दिला, त्याबद्दलही आह्मी त्यांचे अत्यंत आभारी आहोंत. {{gap|2em}}२ दुसरे आभार, मेसर्स वैद्य ब्रदर्स, प्रसिद्ध एन्ग्रेव्हर्स, ह्यांचे होत. सदरहू वैद्यबंधु वुडकद् कोरण्याच्या कामीं किती कुशल आहेत, हें सर्वत्र महशूर आहे. आज सुमारें दीड तपपर्यंत एन्ग्रेव्हिंगचें काम करून, ह्यांनीं त्यांत उत्तम प्रावीण्य संपादिले आहे. ह्यांचें हस्तकौशल्य पाहून मार्मिक लोक खूप झाले आहेत व होत आहेत. युरोपियन लोक सुद्धां ह्यांच्या कामाची तारीफ करितात. हे उद्योगकुशल, सुस्वभावी व धार्मिक बुद्धीचे आहेत; ह्मणूनच हे आपल्या धंद्यांत मोठा उत्कर्ष पावत आहेत. सदरील सर्व आसनांचे फोटो त्यांच्या हवाली करून आह्मीं<noinclude></noinclude> 5kbxlo9ddisas4nlcd8vgj6xanrcd6t 231975 231932 2026-06-11T04:13:05Z Annni07 6055 231975 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{center| '''योगसोपान–आभारप्रदर्शन.'''}}{{right|'''११'''|योगसोपान-प्रस्तावना.}} {{center|'''{{large|आभारप्रदर्शन.}}'''}} {{gap|2em}}हें पुस्तक प्रसिद्ध करण्याचें कामीं, आह्मांस ज्यांनीं पुष्कळ परिश्रम घेऊन साह्य केलें, त्यांचे दोन गौरवपर शब्दांनीं आभार मानल्यावांचून आमच्यानें राहवत नाहीं. {{gap|2em}}१ पहिले आभार ह्मणजे रा. रा. पुरुषोत्तम सदाशिव जोशी, फोटोग्राफर ॲन्ड मेडालिस्ट, ह्यांचे होत. हे प्रसिद्ध राजा रविवर्मा ह्यांचे एजन्ट ‘ए. के. जोशी आणि कंपनी’ चे चीफ क्लार्क आहेत. ह्यांस फोटोग्राफीचा फार शोक असून त्या कलेंत त्यांनीं चांगलेंच कुशलत्व साधलें आहे. हरिभक्तिपरायण रा. रा. घमंडे बोवा, ह्यांनीं जसजसें एक एक आसन करून दाखविलें तसतसें रा. जोशी ह्यांनीं त्याचा एकेक फोटो घेऊन, ह्या पुस्तकांतील सर्व आसनांच्या फोटोंचें काम आह्मांस अत्यंत परिश्रमानें व काळजीपूर्वक करून दिलें, याबद्दल आह्मी त्यांचे अत्यंत आभारी आहोंत. तसेंच—— {{gap|2em}}ॐची आकृति ह्या पुस्तकांत जोडली आहे तिचेंही हस्तकौशल्य रा. जोशी ह्यांचें आहे. त्यांनीं आपल्या कल्पनेनें सर्व ४७ योगासनांचे फोटो ॐ आकारांत बसवून त्याचा मोठा सुरेख तक्ता मुंबईंतील प्रदर्शनांत ठेविला होता. त्याचाच फोटो घेऊन तो त्यांनीं अति उत्सुकतेनें आमचे पुस्तकास जोडण्यास दिला, त्याबद्दलही आह्मी त्यांचे अत्यंत आभारी आहोंत. {{gap|2em}}२ दुसरे आभार, मेसर्स वैद्य ब्रदर्स, प्रसिद्ध एन्ग्रेव्हर्स, ह्यांचे होत. सदरहू वैद्यबंधु वुडकद् कोरण्याच्या कामीं किती कुशल आहेत, हें सर्वत्र महशूर आहे. आज सुमारें दीड तपपर्यंत एन्ग्रेव्हिंगचें काम करून, ह्यांनीं त्यांत उत्तम प्रावीण्य संपादिले आहे. ह्यांचें हस्तकौशल्य पाहून मार्मिक लोक खूप झाले आहेत व होत आहेत. युरोपियन लोक सुद्धां ह्यांच्या कामाची तारीफ करितात. हे उद्योगकुशल, सुस्वभावी व धार्मिक बुद्धीचे आहेत; ह्मणूनच हे आपल्या धंद्यांत मोठा उत्कर्ष पावत आहेत. सदरील सर्व आसनांचे फोटो त्यांच्या हवाली करून आह्मीं<noinclude></noinclude> 0iho3mwxgl7r80b538qj3hor4zw8xft 231986 231975 2026-06-11T04:37:18Z सुबोध कुलकर्णी 1231 231986 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||योगसोपान–आभारप्रदर्शन.|११}}</noinclude>{{center|'''{{large|आभारप्रदर्शन.}}'''}} {{gap}}हें पुस्तक प्रसिद्ध करण्याचें कामीं, आह्मांस ज्यांनीं पुष्कळ परिश्रम घेऊन साह्य केलें, त्यांचे दोन गौरवपर शब्दांनीं आभार मानल्यावांचून आमच्यानें राहवत नाहीं.<br> {{gap}}१ पहिले आभार ह्मणजे रा. रा. पुरुषोत्तम सदाशिव जोशी, फोटोग्राफर ॲन्ड मेडालिस्ट, ह्यांचे होत. हे प्रसिद्ध राजा रविवर्मा ह्यांचे एजन्ट ‘ए. के. जोशी आणि कंपनी’ चे चीफ क्लार्क आहेत. ह्यांस फोटोग्राफीचा फार शोक असून त्या कलेंत त्यांनीं चांगलेंच कुशलत्व साधलें आहे. हरिभक्तिपरायण रा. रा. घमंडे बोवा, ह्यांनीं जसजसें एक एक आसन करून दाखविलें तसतसें रा. जोशी ह्यांनीं त्याचा एकेक फोटो घेऊन, ह्या पुस्तकांतील सर्व आसनांच्या फोटोंचें काम आह्मांस अत्यंत परिश्रमानें व काळजीपूर्वक करून दिलें, याबद्दल आह्मी त्यांचे अत्यंत आभारी आहोंत. तसेंच——<br> {{gap}}ॐची आकृति ह्या पुस्तकांत जोडली आहे तिचेंही हस्तकौशल्य रा. जोशी ह्यांचें आहे. त्यांनीं आपल्या कल्पनेनें सर्व ४७ योगासनांचे फोटो ॐ आकारांत बसवून त्याचा मोठा सुरेख तक्ता मुंबईंतील प्रदर्शनांत ठेविला होता. त्याचाच फोटो घेऊन तो त्यांनीं अति उत्सुकतेनें आमचे पुस्तकास जोडण्यास दिला, त्याबद्दलही आह्मी त्यांचे अत्यंत आभारी आहोंत.<br> {{gap}}२ दुसरे आभार, मेसर्स वैद्य ब्रदर्स, प्रसिद्ध एन्ग्रेव्हर्स, ह्यांचे होत. सदरहू वैद्यबंधु वुडकद् कोरण्याच्या कामीं किती कुशल आहेत, हें सर्वत्र महशूर आहे. आज सुमारें दीड तपपर्यंत एन्ग्रेव्हिंगचें काम करून, ह्यांनीं त्यांत उत्तम प्रावीण्य संपादिले आहे. ह्यांचें हस्तकौशल्य पाहून मार्मिक लोक खूप झाले आहेत व होत आहेत. युरोपियन लोक सुद्धां ह्यांच्या कामाची तारीफ करितात. हे उद्योगकुशल, सुस्वभावी व धार्मिक बुद्धीचे आहेत; ह्मणूनच हे आपल्या धंद्यांत मोठा उत्कर्ष पावत आहेत. सदरील सर्व आसनांचे फोटो त्यांच्या हवाली करून आह्मीं<noinclude></noinclude> 4fc5rvn4y6yvljg552cl4st9fm9zdx1 पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/१२ 104 110620 231974 2026-06-11T04:08:10Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 231974 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>'''{{rh|१२|योगसोपान–विद्वदभिप्राय.}}''' त्यांस उत्तम कट कोरून देण्याविषयीं विनंति केली. तीस मान देऊन त्यांनीं तैयार करून देण्याचें आश्वासन दिलें, आणि त्याप्रमाणें——त्यांच्यामागें कामांची गर्दी फार, वेळ वांट्यास येणें कठीण, असें असतांही——त्यांनीं आह्मांकरितां मुद्दाम त्यांतल्या त्यांत सवड करून मनापासून हें काम उत्तम रीतीनें करून दिलें. त्याबद्दल मेसर्स वैद्य ब्रदर्स, ह्यांचे फार फार आभार मानतों. सदरहू पुस्तकांतील 'कट्स्' मध्यें ‘लाइकनेस्’ अगदीं फोटोबरहुकूम उतरला आहे. ह्यावरून मेसर्स वैद्यबंधूंचें हस्तकौशल्य कसें आहे तें दिसून येतें. {{gap|2em}}३ आतां, सरतेशेवटीं, तिसरे आभार मानावयाचे ह्मणजे रा. रा. शेट तुकराम जावजी, सुप्रसिद्ध निर्णयसागर छापखान्याचे मालक, ह्यांचे होत. छापखान्यास प्रुफांसंबंधानें फार तसदी पडली असतांही त्यांनीं अत्यंत श्रम घेऊन छपाईचें काम मनःपूर्वक व सुंदर करून दिलें, ह्याबद्दल आह्मी त्यांचेही फार आभारी आहोंत. {{right|'''जनार्दन महादेव गुर्जर,'''<br>'''प्रकाशक.'''}} ---- {{center|'''{{large|विद्वदभिप्राय.}}'''}} {{gap|2em}}हरिभक्तिपरायण रा. रा. घमंडे बोवा यांनीं प्राचीन महर्षिग्रंथांच्या आधारानें योगाभ्यासाविषयीं हा लहानसा ‘योगसोपान’ नांवाचा ग्रंथ रचला आहे. योगशास्त्र फार मोठें आहे. त्याचे प्रवर्तक याज्ञवल्क्य, पतंजलि इत्यादिक महर्षि आहेत. भगवद्गीता——“यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते” अर्थात् योगापासून मुक्ति मिळते. यावरून योगाची महती सांगावयास नको आहे. असें असून सद्यःफल शरीरास आरोग्य होणें हें आहे, आणि योग प्राणायामानें सिद्ध होणारा आहे. प्राणायाम केल्यानें मोठमोठीं पापें जातात. ज्या प्राजापत्याच्या ऐवजीं १०००० गायत्रीजप सांगितला आहे, त्याचें कार्य दोनशें<noinclude></noinclude> 95n56x2ns0a7epc5pi3u6erfdvdidhg 232013 231974 2026-06-11T06:07:37Z Annni07 6055 232013 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>'''{{rh|१२|योगसोपान–विद्वदभिप्राय.}}''' त्यांस उत्तम कट कोरून देण्याविषयीं विनंति केली. तीस मान देऊन त्यांनीं तैयार करून देण्याचें आश्वासन दिलें, आणि त्याप्रमाणें——त्यांच्यामागें कामांची गर्दी फार, वेळ वांट्यास येणें कठीण, असें असतांही——त्यांनीं आह्मांकरितां मुद्दाम त्यांतल्या त्यांत सवड करून मनापासून हें काम उत्तम रीतीनें करून दिलें. त्याबद्दल मेसर्स वैद्य ब्रदर्स, ह्यांचे फार फार आभार मानतों. सदरहू पुस्तकांतील 'कट्स्' मध्यें ‘लाइकनेस्’ अगदीं फोटोबरहुकूम उतरला आहे. ह्यावरून मेसर्स वैद्यबंधूंचें हस्तकौशल्य कसें आहे तें दिसून येतें.<br>{{gap|2em}}३ आतां, सरतेशेवटीं, तिसरे आभार मानावयाचे ह्मणजे रा. रा. शेट तुकराम जावजी, सुप्रसिद्ध निर्णयसागर छापखान्याचे मालक, ह्यांचे होत. छापखान्यास प्रुफांसंबंधानें फार तसदी पडली असतांही त्यांनीं अत्यंत श्रम घेऊन छपाईचें काम मनःपूर्वक व सुंदर करून दिलें, ह्याबद्दल आह्मी त्यांचेही फार आभारी आहोंत. {{right|'''जनार्दन महादेव गुर्जर,'''<br>'''प्रकाशक.'''}} {{center|_____________________}} {{center|'''{{large|विद्वदभिप्राय.}}'''}} {{gap|2em}}हरिभक्तिपरायण रा. रा. घमंडे बोवा यांनीं प्राचीन महर्षिग्रंथांच्या आधारानें योगाभ्यासाविषयीं हा लहानसा ‘योगसोपान’ नांवाचा ग्रंथ रचला आहे. योगशास्त्र फार मोठें आहे. त्याचे प्रवर्तक याज्ञवल्क्य, पतंजलि इत्यादिक महर्षि आहेत. भगवद्गीता——“यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते” अर्थात् योगापासून मुक्ति मिळते. यावरून योगाची महती सांगावयास नको आहे. असें असून सद्यःफल शरीरास आरोग्य होणें हें आहे, आणि योग प्राणायामानें सिद्ध होणारा आहे. प्राणायाम केल्यानें मोठमोठीं पापें जातात. ज्या प्राजापत्याच्या ऐवजीं १०००० गायत्रीजप सांगितला आहे, त्याचें कार्य दोनशें<noinclude></noinclude> qwl9k93nn1o3tr6rcphnbfx49f3xszu 232014 232013 2026-06-11T06:08:10Z Annni07 6055 232014 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|१२|योगसोपान–विद्वदभिप्राय.}}</noinclude>त्यांस उत्तम कट कोरून देण्याविषयीं विनंति केली. तीस मान देऊन त्यांनीं तैयार करून देण्याचें आश्वासन दिलें, आणि त्याप्रमाणें——त्यांच्यामागें कामांची गर्दी फार, वेळ वांट्यास येणें कठीण, असें असतांही——त्यांनीं आह्मांकरितां मुद्दाम त्यांतल्या त्यांत सवड करून मनापासून हें काम उत्तम रीतीनें करून दिलें. त्याबद्दल मेसर्स वैद्य ब्रदर्स, ह्यांचे फार फार आभार मानतों. सदरहू पुस्तकांतील 'कट्स्' मध्यें ‘लाइकनेस्’ अगदीं फोटोबरहुकूम उतरला आहे. ह्यावरून मेसर्स वैद्यबंधूंचें हस्तकौशल्य कसें आहे तें दिसून येतें.<br>{{gap|2em}}३ आतां, सरतेशेवटीं, तिसरे आभार मानावयाचे ह्मणजे रा. रा. शेट तुकराम जावजी, सुप्रसिद्ध निर्णयसागर छापखान्याचे मालक, ह्यांचे होत. छापखान्यास प्रुफांसंबंधानें फार तसदी पडली असतांही त्यांनीं अत्यंत श्रम घेऊन छपाईचें काम मनःपूर्वक व सुंदर करून दिलें, ह्याबद्दल आह्मी त्यांचेही फार आभारी आहोंत. {{right|'''जनार्दन महादेव गुर्जर,'''<br>'''प्रकाशक.'''}} {{center|_____________________}} {{center|'''{{large|विद्वदभिप्राय.}}'''}} {{gap|2em}}हरिभक्तिपरायण रा. रा. घमंडे बोवा यांनीं प्राचीन महर्षिग्रंथांच्या आधारानें योगाभ्यासाविषयीं हा लहानसा ‘योगसोपान’ नांवाचा ग्रंथ रचला आहे. योगशास्त्र फार मोठें आहे. त्याचे प्रवर्तक याज्ञवल्क्य, पतंजलि इत्यादिक महर्षि आहेत. भगवद्गीता——“यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते” अर्थात् योगापासून मुक्ति मिळते. यावरून योगाची महती सांगावयास नको आहे. असें असून सद्यःफल शरीरास आरोग्य होणें हें आहे, आणि योग प्राणायामानें सिद्ध होणारा आहे. प्राणायाम केल्यानें मोठमोठीं पापें जातात. ज्या प्राजापत्याच्या ऐवजीं १०००० गायत्रीजप सांगितला आहे, त्याचें कार्य दोनशें<noinclude></noinclude> dm5z3fo1p1k5ihpjdl5g2jkw8ujr339 पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/१३ 104 110621 231984 2026-06-11T04:33:34Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 231984 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{rh||योगसोपान–महानुभावदर्शन.|१३}} {{gap}}प्राणायामांनीं होतें असें धर्मान्विसारांत सांगितलें आहे. तात्पर्य–प्राणायाम केल्यानें पातकें नष्ट होतात इतकेंच नव्हे तर शरीरांतील वात, पित्त, कफ इत्यादि दोषही विनाश पावतात. याविषयीं ( श्रीमद्भागवत–तृतीय स्कंध ) ‘प्राणायामैर्दहेद्दोषान् धारणाभिश्च किल्विषम्’ असें कपिलमहामुनींनीं मातृश्रीस ( देवहुतीस ) सांगितलें आहे. असे प्राणायामाचे गुण असल्यामुळें, ते प्राणायाम सर्वांनीं नित्य अवश्य करावे, अशा हेतूनं मनु, याज्ञवल्क्य इत्यादिकांनीं दररोज करावयाच्या संध्योपासनेंत ते मुख्यत्वानें गोंवलेले आहेत. पण हल्लींची शोचनीय स्थिति अशी आहे कीं, त्या बापड्या संध्येकडे पाहतो कोण ! ह्मणजे संध्या करीत नाहींत असें नाहीं, तर संध्येंत मुख्य करावयाच्या गोष्टींकडे लोकांचें लक्ष असावें तितकें नाहीं. प्राणायामांची माहिती असलेले लोक फारच कमी आढळतील असें ह्यटलें तरी चालेल. तर ते प्राणायाम कसे करावेत, त्याला आसनें कशीं असावींत, मुद्रा, बंध हे कोणते असावे, इत्यादि प्रकार ह्या लहानशा ग्रंथांत, सरळ व लोकांची समजूत पटण्यासारख्या भाषेत रा. रा. घमंडे बोवा यांनीं आणिलें आहेत. आसनांचे व मुद्रांचे फोटो दिले आहेत, त्याप्रमाणें त्यांतील बरेच विषय त्यांनीं कृपा करून मला प्रत्यक्ष करून दाखविले त्यामुळें मी त्यांचा फार आभारी आहें. हें पुस्तक जे कोणी विचारपूर्वक वाचतील व त्यांतील होण्यासारख्या विषयांचा अभ्यास करितील त्यांना फायदा झाल्यावांचून राहणार नाहीं, असा माझा समज आहे. योगावर चढण्याकरितां हें पुस्तक फारच उत्तम आहे. <br /> <br /> {{Block center| मुंबई मार्गशीर्ष कृ० ९ {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} वैद्य कृष्णशास्त्री नवरे.<br> शके १८२६. }} {{dhr|3em}} {{center|महानुभावदर्शन.}} {{gap}}प्रत्येक मनुष्य श्रीमंत नाहीं. प्रत्येक मनुष्य पुण्यवान्ही नाहीं. पुण्याईच्या जोरावर श्रीमंती येत असते. पवित्र अंतःकरणाच्या विचारी कर्मानें पुण्य जोडलें जातें. पुण्य जोडणें महाकर्म कठिण आहे. अंतःकरण पवित्र, बुद्धि निर्मत्सरी,<noinclude></noinclude> 8dhg3fy3rziivqj3l8mj77mucltqdhv 231985 231984 2026-06-11T04:34:10Z Annni07 6055 231985 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{rh||योगसोपान–महानुभावदर्शन.|१३}} {{gap}}प्राणायामांनीं होतें असें धर्मान्विसारांत सांगितलें आहे. तात्पर्य–प्राणायाम केल्यानें पातकें नष्ट होतात इतकेंच नव्हे तर शरीरांतील वात, पित्त, कफ इत्यादि दोषही विनाश पावतात. याविषयीं ( श्रीमद्भागवत–तृतीय स्कंध ) ‘प्राणायामैर्दहेद्दोषान् धारणाभिश्च किल्विषम्’ असें कपिलमहामुनींनीं मातृश्रीस ( देवहुतीस ) सांगितलें आहे. असे प्राणायामाचे गुण असल्यामुळें, ते प्राणायाम सर्वांनीं नित्य अवश्य करावे, अशा हेतूनं मनु, याज्ञवल्क्य इत्यादिकांनीं दररोज करावयाच्या संध्योपासनेंत ते मुख्यत्वानें गोंवलेले आहेत. पण हल्लींची शोचनीय स्थिति अशी आहे कीं, त्या बापड्या संध्येकडे पाहतो कोण ! ह्मणजे संध्या करीत नाहींत असें नाहीं, तर संध्येंत मुख्य करावयाच्या गोष्टींकडे लोकांचें लक्ष असावें तितकें नाहीं. प्राणायामांची माहिती असलेले लोक फारच कमी आढळतील असें ह्यटलें तरी चालेल. तर ते प्राणायाम कसे करावेत, त्याला आसनें कशीं असावींत, मुद्रा, बंध हे कोणते असावे, इत्यादि प्रकार ह्या लहानशा ग्रंथांत, सरळ व लोकांची समजूत पटण्यासारख्या भाषेत रा. रा. घमंडे बोवा यांनीं आणिलें आहेत. आसनांचे व मुद्रांचे फोटो दिले आहेत, त्याप्रमाणें त्यांतील बरेच विषय त्यांनीं कृपा करून मला प्रत्यक्ष करून दाखविले त्यामुळें मी त्यांचा फार आभारी आहें. हें पुस्तक जे कोणी विचारपूर्वक वाचतील व त्यांतील होण्यासारख्या विषयांचा अभ्यास करितील त्यांना फायदा झाल्यावांचून राहणार नाहीं, असा माझा समज आहे. योगावर चढण्याकरितां हें पुस्तक फारच उत्तम आहे. <br /> <br /> {{Block center| मुंबई मार्गशीर्ष कृ० ९ {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} वैद्य कृष्णशास्त्री नवरे.<br> शके १८२६. }} <br> {{center|महानुभावदर्शन.}} {{gap}}प्रत्येक मनुष्य श्रीमंत नाहीं. प्रत्येक मनुष्य पुण्यवान्ही नाहीं. पुण्याईच्या जोरावर श्रीमंती येत असते. पवित्र अंतःकरणाच्या विचारी कर्मानें पुण्य जोडलें जातें. पुण्य जोडणें महाकर्म कठिण आहे. अंतःकरण पवित्र, बुद्धि निर्मत्सरी,<noinclude></noinclude> qrp5rzsmmyasffh2vijoc0qzhcmas5i 231989 231985 2026-06-11T04:43:25Z Annni07 6055 231989 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{rh||योगसोपान–महानुभावदर्शन.|१३}} {{gap}}प्राणायामांनीं होतें असें धर्मान्विसारांत सांगितलें आहे. तात्पर्य–प्राणायाम केल्यानें पातकें नष्ट होतात इतकेंच नव्हे तर शरीरांतील वात, पित्त, कफ इत्यादि दोषही विनाश पावतात. याविषयीं ( श्रीमद्भागवत–तृतीय स्कंध ) ‘प्राणायामैर्दहेद्दोषान् धारणाभिश्च किल्विषम्’ असें कपिलमहामुनींनीं मातृश्रीस ( देवहुतीस ) सांगितलें आहे. असे प्राणायामाचे गुण असल्यामुळें, ते प्राणायाम सर्वांनीं नित्य अवश्य करावे, अशा हेतूनं मनु, याज्ञवल्क्य इत्यादिकांनीं दररोज करावयाच्या संध्योपासनेंत ते मुख्यत्वानें गोंवलेले आहेत. पण हल्लींची शोचनीय स्थिति अशी आहे कीं, त्या बापड्या संध्येकडे पाहतो कोण ! ह्मणजे संध्या करीत नाहींत असें नाहीं, तर संध्येंत मुख्य करावयाच्या गोष्टींकडे लोकांचें लक्ष असावें तितकें नाहीं. प्राणायामांची माहिती असलेले लोक फारच कमी आढळतील असें ह्यटलें तरी चालेल. तर ते प्राणायाम कसे करावेत, त्याला आसनें कशीं असावींत, मुद्रा, बंध हे कोणते असावे, इत्यादि प्रकार ह्या लहानशा ग्रंथांत, सरळ व लोकांची समजूत पटण्यासारख्या भाषेत रा. रा. घमंडे बोवा यांनीं आणिलें आहेत. आसनांचे व मुद्रांचे फोटो दिले आहेत, त्याप्रमाणें त्यांतील बरेच विषय त्यांनीं कृपा करून मला प्रत्यक्ष करून दाखविले त्यामुळें मी त्यांचा फार आभारी आहें. हें पुस्तक जे कोणी विचारपूर्वक वाचतील व त्यांतील होण्यासारख्या विषयांचा अभ्यास करितील त्यांना फायदा झाल्यावांचून राहणार नाहीं, असा माझा समज आहे. योगावर चढण्याकरितां हें पुस्तक फारच उत्तम आहे. <br /> <br /> {{Block center| मुंबई मार्गशीर्ष कृ० ९ {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} '''वैद्य कृष्णशास्त्री नवरे.''' <br> शके १८२६. }} {{rule}} {{center|'''महानुभावदर्शन.'''}} {{gap}}प्रत्येक मनुष्य श्रीमंत नाहीं. प्रत्येक मनुष्य पुण्यवान्ही नाहीं. पुण्याईच्या जोरावर श्रीमंती येत असते. पवित्र अंतःकरणाच्या विचारी कर्मानें पुण्य जोडलें जातें. पुण्य जोडणें महाकर्म कठिण आहे. अंतःकरण पवित्र, बुद्धि निर्मत्सरी,<noinclude></noinclude> rp5h8xrcsyuv5a334u2h7qp0o82sagf 231990 231989 2026-06-11T04:54:45Z सुबोध कुलकर्णी 1231 231990 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||योगसोपान–महानुभावदर्शन.|१३}}</noinclude>{{gap}}प्राणायामांनीं होतें असें धर्मान्विसारांत सांगितलें आहे. तात्पर्य–प्राणायाम केल्यानें पातकें नष्ट होतात इतकेंच नव्हे तर शरीरांतील वात, पित्त, कफ इत्यादि दोषही विनाश पावतात. याविषयीं ( श्रीमद्भागवत–तृतीय स्कंध ) ‘प्राणायामैर्दहेद्दोषान् धारणाभिश्च किल्विषम्’ असें कपिलमहामुनींनीं मातृश्रीस ( देवहुतीस ) सांगितलें आहे. असे प्राणायामाचे गुण असल्यामुळें, ते प्राणायाम सर्वांनीं नित्य अवश्य करावे, अशा हेतूनं मनु, याज्ञवल्क्य इत्यादिकांनीं दररोज करावयाच्या संध्योपासनेंत ते मुख्यत्वानें गोंवलेले आहेत. पण हल्लींची शोचनीय स्थिति अशी आहे कीं, त्या बापड्या संध्येकडे पाहतो कोण ! ह्मणजे संध्या करीत नाहींत असें नाहीं, तर संध्येंत मुख्य करावयाच्या गोष्टींकडे लोकांचें लक्ष असावें तितकें नाहीं. प्राणायामांची माहिती असलेले लोक फारच कमी आढळतील असें ह्यटलें तरी चालेल. तर ते प्राणायाम कसे करावेत, त्याला आसनें कशीं असावींत, मुद्रा, बंध हे कोणते असावे, इत्यादि प्रकार ह्या लहानशा ग्रंथांत, सरळ व लोकांची समजूत पटण्यासारख्या भाषेत रा. रा. घमंडे बोवा यांनीं आणिलें आहेत. आसनांचे व मुद्रांचे फोटो दिले आहेत, त्याप्रमाणें त्यांतील बरेच विषय त्यांनीं कृपा करून मला प्रत्यक्ष करून दाखविले त्यामुळें मी त्यांचा फार आभारी आहें. हें पुस्तक जे कोणी विचारपूर्वक वाचतील व त्यांतील होण्यासारख्या विषयांचा अभ्यास करितील त्यांना फायदा झाल्यावांचून राहणार नाहीं, असा माझा समज आहे. योगावर चढण्याकरितां हें पुस्तक फारच उत्तम आहे. <br> <br> {{Block center| मुंबई मार्गशीर्ष कृ० ९ {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} '''वैद्य कृष्णशास्त्री नवरे.''' <br> शके १८२६. }} {{rule|6em}}<br> {{center|'''महानुभावदर्शन.'''}} {{gap}}प्रत्येक मनुष्य श्रीमंत नाहीं. प्रत्येक मनुष्य पुण्यवान्ही नाहीं. पुण्याईच्या जोरावर श्रीमंती येत असते. पवित्र अंतःकरणाच्या विचारी कर्मानें पुण्य जोडलें जातें. पुण्य जोडणें महाकर्म कठिण आहे. अंतःकरण पवित्र, बुद्धि निर्मत्सरी,<noinclude></noinclude> shpxk62daysk9ehiywrwnbt1dq6cd9a 232015 231990 2026-06-11T06:14:09Z Annni07 6055 232015 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||योगसोपान–महानुभावदर्शन.|१३}}</noinclude>{{gap}}प्राणायामांनीं होतें असें धर्मान्विसारांत सांगितलें आहे. तात्पर्य–प्राणायाम केल्यानें पातकें नष्ट होतात इतकेंच नव्हे तर शरीरांतील वात, पित्त, कफ इत्यादि दोषही विनाश पावतात. याविषयीं ( श्रीमद्भागवत–तृतीय स्कंध ) ‘प्राणायामैर्दहेद्दोषान् धारणाभिश्च किल्विषम्’ असें कपिलमहामुनींनीं मातृश्रीस ( देवहुतीस ) सांगितलें आहे. असे प्राणायामाचे गुण असल्यामुळें, ते प्राणायाम सर्वांनीं नित्य अवश्य करावे, अशा हेतूनं मनु, याज्ञवल्क्य इत्यादिकांनीं दररोज करावयाच्या संध्योपासनेंत ते मुख्यत्वानें गोंवलेले आहेत. पण हल्लींची शोचनीय स्थिति अशी आहे कीं, त्या बापड्या संध्येकडे पाहतो कोण ! ह्मणजे संध्या करीत नाहींत असें नाहीं, तर संध्येंत मुख्य करावयाच्या गोष्टींकडे लोकांचें लक्ष असावें तितकें नाहीं. प्राणायामांची माहिती असलेले लोक फारच कमी आढळतील असें ह्यटलें तरी चालेल. तर ते प्राणायाम कसे करावेत, त्याला आसनें कशीं असावींत, मुद्रा, बंध हे कोणते असावे, इत्यादि प्रकार ह्या लहानशा ग्रंथांत, सरळ व लोकांची समजूत पटण्यासारख्या भाषेत रा. रा. घमंडे बोवा यांनीं आणिलें आहेत. आसनांचे व मुद्रांचे फोटो दिले आहेत, त्याप्रमाणें त्यांतील बरेच विषय त्यांनीं कृपा करून मला प्रत्यक्ष करून दाखविले त्यामुळें मी त्यांचा फार आभारी आहें. हें पुस्तक जे कोणी विचारपूर्वक वाचतील व त्यांतील होण्यासारख्या विषयांचा अभ्यास करितील त्यांना फायदा झाल्यावांचून राहणार नाहीं, असा माझा समज आहे. योगावर चढण्याकरितां हें पुस्तक फारच उत्तम आहे. <br> <br> {{Block center| मुंबई मार्गशीर्ष कृ० ९ {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} '''वैद्य कृष्णशास्त्री नवरे.''' <br> शके १८२६. }} {{center|________________________________}} {{center|'''महानुभावदर्शन.'''}} {{gap}}प्रत्येक मनुष्य श्रीमंत नाहीं. प्रत्येक मनुष्य पुण्यवान्ही नाहीं. पुण्याईच्या जोरावर श्रीमंती येत असते. पवित्र अंतःकरणाच्या विचारी कर्मानें पुण्य जोडलें जातें. पुण्य जोडणें महाकर्म कठिण आहे. अंतःकरण पवित्र, बुद्धि निर्मत्सरी,<noinclude></noinclude> pqw11sbdjjjnudm4ppdef4zovdo1w4n 232016 232015 2026-06-11T06:14:32Z Annni07 6055 232016 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||योगसोपान–महानुभावदर्शन.|१३}}</noinclude>{{gap}}प्राणायामांनीं होतें असें धर्मान्विसारांत सांगितलें आहे. तात्पर्य–प्राणायाम केल्यानें पातकें नष्ट होतात इतकेंच नव्हे तर शरीरांतील वात, पित्त, कफ इत्यादि दोषही विनाश पावतात. याविषयीं ( श्रीमद्भागवत–तृतीय स्कंध ) ‘प्राणायामैर्दहेद्दोषान् धारणाभिश्च किल्विषम्’ असें कपिलमहामुनींनीं मातृश्रीस ( देवहुतीस ) सांगितलें आहे. असे प्राणायामाचे गुण असल्यामुळें, ते प्राणायाम सर्वांनीं नित्य अवश्य करावे, अशा हेतूनं मनु, याज्ञवल्क्य इत्यादिकांनीं दररोज करावयाच्या संध्योपासनेंत ते मुख्यत्वानें गोंवलेले आहेत. पण हल्लींची शोचनीय स्थिति अशी आहे कीं, त्या बापड्या संध्येकडे पाहतो कोण ! ह्मणजे संध्या करीत नाहींत असें नाहीं, तर संध्येंत मुख्य करावयाच्या गोष्टींकडे लोकांचें लक्ष असावें तितकें नाहीं. प्राणायामांची माहिती असलेले लोक फारच कमी आढळतील असें ह्यटलें तरी चालेल. तर ते प्राणायाम कसे करावेत, त्याला आसनें कशीं असावींत, मुद्रा, बंध हे कोणते असावे, इत्यादि प्रकार ह्या लहानशा ग्रंथांत, सरळ व लोकांची समजूत पटण्यासारख्या भाषेत रा. रा. घमंडे बोवा यांनीं आणिलें आहेत. आसनांचे व मुद्रांचे फोटो दिले आहेत, त्याप्रमाणें त्यांतील बरेच विषय त्यांनीं कृपा करून मला प्रत्यक्ष करून दाखविले त्यामुळें मी त्यांचा फार आभारी आहें. हें पुस्तक जे कोणी विचारपूर्वक वाचतील व त्यांतील होण्यासारख्या विषयांचा अभ्यास करितील त्यांना फायदा झाल्यावांचून राहणार नाहीं, असा माझा समज आहे. योगावर चढण्याकरितां हें पुस्तक फारच उत्तम आहे. <br> {{Block center| मुंबई मार्गशीर्ष कृ० ९ {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} '''वैद्य कृष्णशास्त्री नवरे.''' <br> शके १८२६. }} {{center|________________________________}} {{center|'''महानुभावदर्शन.'''}} {{gap}}प्रत्येक मनुष्य श्रीमंत नाहीं. प्रत्येक मनुष्य पुण्यवान्ही नाहीं. पुण्याईच्या जोरावर श्रीमंती येत असते. पवित्र अंतःकरणाच्या विचारी कर्मानें पुण्य जोडलें जातें. पुण्य जोडणें महाकर्म कठिण आहे. अंतःकरण पवित्र, बुद्धि निर्मत्सरी,<noinclude></noinclude> 004k34vscjwkatj7c7x298kihy9z1wr 232017 232016 2026-06-11T06:15:05Z Annni07 6055 232017 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||योगसोपान–महानुभावदर्शन.|१३}}</noinclude>{{gap}}प्राणायामांनीं होतें असें धर्मान्विसारांत सांगितलें आहे. तात्पर्य–प्राणायाम केल्यानें पातकें नष्ट होतात इतकेंच नव्हे तर शरीरांतील वात, पित्त, कफ इत्यादि दोषही विनाश पावतात. याविषयीं ( श्रीमद्भागवत–तृतीय स्कंध ) ‘प्राणायामैर्दहेद्दोषान् धारणाभिश्च किल्विषम्’ असें कपिलमहामुनींनीं मातृश्रीस ( देवहुतीस ) सांगितलें आहे. असे प्राणायामाचे गुण असल्यामुळें, ते प्राणायाम सर्वांनीं नित्य अवश्य करावे, अशा हेतूनं मनु, याज्ञवल्क्य इत्यादिकांनीं दररोज करावयाच्या संध्योपासनेंत ते मुख्यत्वानें गोंवलेले आहेत. पण हल्लींची शोचनीय स्थिति अशी आहे कीं, त्या बापड्या संध्येकडे पाहतो कोण ! ह्मणजे संध्या करीत नाहींत असें नाहीं, तर संध्येंत मुख्य करावयाच्या गोष्टींकडे लोकांचें लक्ष असावें तितकें नाहीं. प्राणायामांची माहिती असलेले लोक फारच कमी आढळतील असें ह्यटलें तरी चालेल. तर ते प्राणायाम कसे करावेत, त्याला आसनें कशीं असावींत, मुद्रा, बंध हे कोणते असावे, इत्यादि प्रकार ह्या लहानशा ग्रंथांत, सरळ व लोकांची समजूत पटण्यासारख्या भाषेत रा. रा. घमंडे बोवा यांनीं आणिलें आहेत. आसनांचे व मुद्रांचे फोटो दिले आहेत, त्याप्रमाणें त्यांतील बरेच विषय त्यांनीं कृपा करून मला प्रत्यक्ष करून दाखविले त्यामुळें मी त्यांचा फार आभारी आहें. हें पुस्तक जे कोणी विचारपूर्वक वाचतील व त्यांतील होण्यासारख्या विषयांचा अभ्यास करितील त्यांना फायदा झाल्यावांचून राहणार नाहीं, असा माझा समज आहे. योगावर चढण्याकरितां हें पुस्तक फारच उत्तम आहे. <br> {{Block center| मुंबई मार्गशीर्ष कृ० ९ {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} '''वैद्य कृष्णशास्त्री नवरे.''' <br> शके १८२६. }} {{center|________________________________}} {{center|'''महानुभावदर्शन.'''}} '''{{gap}}प्रत्येक मनुष्य श्रीमंत नाहीं. प्रत्येक मनुष्य पुण्यवान्ही नाहीं. पुण्याईच्या जोरावर श्रीमंती येत असते. पवित्र अंतःकरणाच्या विचारी कर्मानें पुण्य जोडलें जातें. पुण्य जोडणें महाकर्म कठिण आहे. अंतःकरण पवित्र, बुद्धि निर्मत्सरी,'''<noinclude></noinclude> iaw4j2lfr9u7ezlq71jp6ws9awyr84c 232018 232017 2026-06-11T06:16:15Z Annni07 6055 232018 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||योगसोपान–महानुभावदर्शन.|१३}}</noinclude>{{gap}}प्राणायामांनीं होतें असें धर्मान्विसारांत सांगितलें आहे. तात्पर्य–प्राणायाम केल्यानें पातकें नष्ट होतात इतकेंच नव्हे तर शरीरांतील वात, पित्त, कफ इत्यादि दोषही विनाश पावतात. याविषयीं ( श्रीमद्भागवत–तृतीय स्कंध ) ‘प्राणायामैर्दहेद्दोषान् धारणाभिश्च किल्विषम्’ असें कपिलमहामुनींनीं मातृश्रीस ( देवहुतीस ) सांगितलें आहे. असे प्राणायामाचे गुण असल्यामुळें, ते प्राणायाम सर्वांनीं नित्य अवश्य करावे, अशा हेतूनं मनु, याज्ञवल्क्य इत्यादिकांनीं दररोज करावयाच्या संध्योपासनेंत ते मुख्यत्वानें गोंवलेले आहेत. पण हल्लींची शोचनीय स्थिति अशी आहे कीं, त्या बापड्या संध्येकडे पाहतो कोण ! ह्मणजे संध्या करीत नाहींत असें नाहीं, तर संध्येंत मुख्य करावयाच्या गोष्टींकडे लोकांचें लक्ष असावें तितकें नाहीं. प्राणायामांची माहिती असलेले लोक फारच कमी आढळतील असें ह्यटलें तरी चालेल. तर ते प्राणायाम कसे करावेत, त्याला आसनें कशीं असावींत, मुद्रा, बंध हे कोणते असावे, इत्यादि प्रकार ह्या लहानशा ग्रंथांत, सरळ व लोकांची समजूत पटण्यासारख्या भाषेत रा. रा. घमंडे बोवा यांनीं आणिलें आहेत. आसनांचे व मुद्रांचे फोटो दिले आहेत, त्याप्रमाणें त्यांतील बरेच विषय त्यांनीं कृपा करून मला प्रत्यक्ष करून दाखविले त्यामुळें मी त्यांचा फार आभारी आहें. हें पुस्तक जे कोणी विचारपूर्वक वाचतील व त्यांतील होण्यासारख्या विषयांचा अभ्यास करितील त्यांना फायदा झाल्यावांचून राहणार नाहीं, असा माझा समज आहे. योगावर चढण्याकरितां हें पुस्तक फारच उत्तम आहे. <br> {{Block center| '''मुंबई मार्गशीर्ष कृ० ९''' {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} '''वैद्य कृष्णशास्त्री नवरे.''' <br> शके १८२६. }} {{center|________________________________}} {{center|'''महानुभावदर्शन.'''}} '''{{gap}}प्रत्येक मनुष्य श्रीमंत नाहीं. प्रत्येक मनुष्य पुण्यवान्ही नाहीं. पुण्याईच्या जोरावर श्रीमंती येत असते. पवित्र अंतःकरणाच्या विचारी कर्मानें पुण्य जोडलें जातें. पुण्य जोडणें महाकर्म कठिण आहे. अंतःकरण पवित्र, बुद्धि निर्मत्सरी,'''<noinclude></noinclude> erzwrkxl4x2rj3byye0wnym2qjva5kg 232019 232018 2026-06-11T06:16:33Z Annni07 6055 232019 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||योगसोपान–महानुभावदर्शन.|१३}}</noinclude>{{gap}}प्राणायामांनीं होतें असें धर्मान्विसारांत सांगितलें आहे. तात्पर्य–प्राणायाम केल्यानें पातकें नष्ट होतात इतकेंच नव्हे तर शरीरांतील वात, पित्त, कफ इत्यादि दोषही विनाश पावतात. याविषयीं ( श्रीमद्भागवत–तृतीय स्कंध ) ‘प्राणायामैर्दहेद्दोषान् धारणाभिश्च किल्विषम्’ असें कपिलमहामुनींनीं मातृश्रीस ( देवहुतीस ) सांगितलें आहे. असे प्राणायामाचे गुण असल्यामुळें, ते प्राणायाम सर्वांनीं नित्य अवश्य करावे, अशा हेतूनं मनु, याज्ञवल्क्य इत्यादिकांनीं दररोज करावयाच्या संध्योपासनेंत ते मुख्यत्वानें गोंवलेले आहेत. पण हल्लींची शोचनीय स्थिति अशी आहे कीं, त्या बापड्या संध्येकडे पाहतो कोण ! ह्मणजे संध्या करीत नाहींत असें नाहीं, तर संध्येंत मुख्य करावयाच्या गोष्टींकडे लोकांचें लक्ष असावें तितकें नाहीं. प्राणायामांची माहिती असलेले लोक फारच कमी आढळतील असें ह्यटलें तरी चालेल. तर ते प्राणायाम कसे करावेत, त्याला आसनें कशीं असावींत, मुद्रा, बंध हे कोणते असावे, इत्यादि प्रकार ह्या लहानशा ग्रंथांत, सरळ व लोकांची समजूत पटण्यासारख्या भाषेत रा. रा. घमंडे बोवा यांनीं आणिलें आहेत. आसनांचे व मुद्रांचे फोटो दिले आहेत, त्याप्रमाणें त्यांतील बरेच विषय त्यांनीं कृपा करून मला प्रत्यक्ष करून दाखविले त्यामुळें मी त्यांचा फार आभारी आहें. हें पुस्तक जे कोणी विचारपूर्वक वाचतील व त्यांतील होण्यासारख्या विषयांचा अभ्यास करितील त्यांना फायदा झाल्यावांचून राहणार नाहीं, असा माझा समज आहे. योगावर चढण्याकरितां हें पुस्तक फारच उत्तम आहे. <br> {{Block center| '''मुंबई मार्गशीर्ष कृ० ९''' {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} '''वैद्य कृष्णशास्त्री नवरे.''' <br> '''शके १८२६.''' }} {{center|________________________________}} {{center|'''महानुभावदर्शन.'''}} '''{{gap}}प्रत्येक मनुष्य श्रीमंत नाहीं. प्रत्येक मनुष्य पुण्यवान्ही नाहीं. पुण्याईच्या जोरावर श्रीमंती येत असते. पवित्र अंतःकरणाच्या विचारी कर्मानें पुण्य जोडलें जातें. पुण्य जोडणें महाकर्म कठिण आहे. अंतःकरण पवित्र, बुद्धि निर्मत्सरी,'''<noinclude></noinclude> b35mlm3zzebktgf9pppbc3yy9om4hzx 232020 232019 2026-06-11T06:17:41Z Annni07 6055 232020 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||योगसोपान–महानुभावदर्शन.|१३}}</noinclude>{{gap}}प्राणायामांनीं होतें असें धर्मान्विसारांत सांगितलें आहे. तात्पर्य–प्राणायाम केल्यानें पातकें नष्ट होतात इतकेंच नव्हे तर शरीरांतील वात, पित्त, कफ इत्यादि दोषही विनाश पावतात. याविषयीं ( श्रीमद्भागवत–तृतीय स्कंध ) ‘प्राणायामैर्दहेद्दोषान् धारणाभिश्च किल्विषम्’ असें कपिलमहामुनींनीं मातृश्रीस ( देवहुतीस ) सांगितलें आहे. असे प्राणायामाचे गुण असल्यामुळें, ते प्राणायाम सर्वांनीं नित्य अवश्य करावे, अशा हेतूनं मनु, याज्ञवल्क्य इत्यादिकांनीं दररोज करावयाच्या संध्योपासनेंत ते मुख्यत्वानें गोंवलेले आहेत. पण हल्लींची शोचनीय स्थिति अशी आहे कीं, त्या बापड्या संध्येकडे पाहतो कोण ! ह्मणजे संध्या करीत नाहींत असें नाहीं, तर संध्येंत मुख्य करावयाच्या गोष्टींकडे लोकांचें लक्ष असावें तितकें नाहीं. प्राणायामांची माहिती असलेले लोक फारच कमी आढळतील असें ह्यटलें तरी चालेल. तर ते प्राणायाम कसे करावेत, त्याला आसनें कशीं असावींत, मुद्रा, बंध हे कोणते असावे, इत्यादि प्रकार ह्या लहानशा ग्रंथांत, सरळ व लोकांची समजूत पटण्यासारख्या भाषेत रा. रा. घमंडे बोवा यांनीं आणिलें आहेत. आसनांचे व मुद्रांचे फोटो दिले आहेत, त्याप्रमाणें त्यांतील बरेच विषय त्यांनीं कृपा करून मला प्रत्यक्ष करून दाखविले त्यामुळें मी त्यांचा फार आभारी आहें. हें पुस्तक जे कोणी विचारपूर्वक वाचतील व त्यांतील होण्यासारख्या विषयांचा अभ्यास करितील त्यांना फायदा झाल्यावांचून राहणार नाहीं, असा माझा समज आहे. योगावर चढण्याकरितां हें पुस्तक फारच उत्तम आहे. {{Block center| '''मुंबई मार्गशीर्ष कृ० ९''' {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} '''वैद्य कृष्णशास्त्री नवरे.''' <br> '''शके १८२६.''' }} {{center|________________________________}} {{center|'''महानुभावदर्शन.'''}} '''{{gap}}प्रत्येक मनुष्य श्रीमंत नाहीं. प्रत्येक मनुष्य पुण्यवान्ही नाहीं. पुण्याईच्या जोरावर श्रीमंती येत असते. पवित्र अंतःकरणाच्या विचारी कर्मानें पुण्य जोडलें जातें. पुण्य जोडणें महाकर्म कठिण आहे. अंतःकरण पवित्र, बुद्धि निर्मत्सरी,'''<noinclude></noinclude> adzopu3h2zxdt67p1it1evq7pzqnayq 232021 232020 2026-06-11T06:18:02Z Annni07 6055 232021 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||योगसोपान–महानुभावदर्शन.|१३}}</noinclude>{{gap}}प्राणायामांनीं होतें असें धर्मान्विसारांत सांगितलें आहे. तात्पर्य–प्राणायाम केल्यानें पातकें नष्ट होतात इतकेंच नव्हे तर शरीरांतील वात, पित्त, कफ इत्यादि दोषही विनाश पावतात. याविषयीं ( श्रीमद्भागवत–तृतीय स्कंध ) ‘प्राणायामैर्दहेद्दोषान् धारणाभिश्च किल्विषम्’ असें कपिलमहामुनींनीं मातृश्रीस ( देवहुतीस ) सांगितलें आहे. असे प्राणायामाचे गुण असल्यामुळें, ते प्राणायाम सर्वांनीं नित्य अवश्य करावे, अशा हेतूनं मनु, याज्ञवल्क्य इत्यादिकांनीं दररोज करावयाच्या संध्योपासनेंत ते मुख्यत्वानें गोंवलेले आहेत. पण हल्लींची शोचनीय स्थिति अशी आहे कीं, त्या बापड्या संध्येकडे पाहतो कोण ! ह्मणजे संध्या करीत नाहींत असें नाहीं, तर संध्येंत मुख्य करावयाच्या गोष्टींकडे लोकांचें लक्ष असावें तितकें नाहीं. प्राणायामांची माहिती असलेले लोक फारच कमी आढळतील असें ह्यटलें तरी चालेल. तर ते प्राणायाम कसे करावेत, त्याला आसनें कशीं असावींत, मुद्रा, बंध हे कोणते असावे, इत्यादि प्रकार ह्या लहानशा ग्रंथांत, सरळ व लोकांची समजूत पटण्यासारख्या भाषेत रा. रा. घमंडे बोवा यांनीं आणिलें आहेत. आसनांचे व मुद्रांचे फोटो दिले आहेत, त्याप्रमाणें त्यांतील बरेच विषय त्यांनीं कृपा करून मला प्रत्यक्ष करून दाखविले त्यामुळें मी त्यांचा फार आभारी आहें. हें पुस्तक जे कोणी विचारपूर्वक वाचतील व त्यांतील होण्यासारख्या विषयांचा अभ्यास करितील त्यांना फायदा झाल्यावांचून राहणार नाहीं, असा माझा समज आहे. योगावर चढण्याकरितां हें पुस्तक फारच उत्तम आहे. {{Block center| '''मुंबई मार्गशीर्ष कृ० ९''' {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} '''वैद्य कृष्णशास्त्री नवरे.''' <br> '''शके १८२६.''' }} {{rule}}{{center|________________________________}} {{center|'''महानुभावदर्शन.'''}} '''{{gap}}प्रत्येक मनुष्य श्रीमंत नाहीं. प्रत्येक मनुष्य पुण्यवान्ही नाहीं. पुण्याईच्या जोरावर श्रीमंती येत असते. पवित्र अंतःकरणाच्या विचारी कर्मानें पुण्य जोडलें जातें. पुण्य जोडणें महाकर्म कठिण आहे. अंतःकरण पवित्र, बुद्धि निर्मत्सरी,'''<noinclude></noinclude> ao0reacsc9ve2l1b1qlwqzaqqf8kr0d 232022 232021 2026-06-11T06:18:19Z Annni07 6055 232022 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||योगसोपान–महानुभावदर्शन.|१३}}</noinclude>{{gap}}प्राणायामांनीं होतें असें धर्मान्विसारांत सांगितलें आहे. तात्पर्य–प्राणायाम केल्यानें पातकें नष्ट होतात इतकेंच नव्हे तर शरीरांतील वात, पित्त, कफ इत्यादि दोषही विनाश पावतात. याविषयीं ( श्रीमद्भागवत–तृतीय स्कंध ) ‘प्राणायामैर्दहेद्दोषान् धारणाभिश्च किल्विषम्’ असें कपिलमहामुनींनीं मातृश्रीस ( देवहुतीस ) सांगितलें आहे. असे प्राणायामाचे गुण असल्यामुळें, ते प्राणायाम सर्वांनीं नित्य अवश्य करावे, अशा हेतूनं मनु, याज्ञवल्क्य इत्यादिकांनीं दररोज करावयाच्या संध्योपासनेंत ते मुख्यत्वानें गोंवलेले आहेत. पण हल्लींची शोचनीय स्थिति अशी आहे कीं, त्या बापड्या संध्येकडे पाहतो कोण ! ह्मणजे संध्या करीत नाहींत असें नाहीं, तर संध्येंत मुख्य करावयाच्या गोष्टींकडे लोकांचें लक्ष असावें तितकें नाहीं. प्राणायामांची माहिती असलेले लोक फारच कमी आढळतील असें ह्यटलें तरी चालेल. तर ते प्राणायाम कसे करावेत, त्याला आसनें कशीं असावींत, मुद्रा, बंध हे कोणते असावे, इत्यादि प्रकार ह्या लहानशा ग्रंथांत, सरळ व लोकांची समजूत पटण्यासारख्या भाषेत रा. रा. घमंडे बोवा यांनीं आणिलें आहेत. आसनांचे व मुद्रांचे फोटो दिले आहेत, त्याप्रमाणें त्यांतील बरेच विषय त्यांनीं कृपा करून मला प्रत्यक्ष करून दाखविले त्यामुळें मी त्यांचा फार आभारी आहें. हें पुस्तक जे कोणी विचारपूर्वक वाचतील व त्यांतील होण्यासारख्या विषयांचा अभ्यास करितील त्यांना फायदा झाल्यावांचून राहणार नाहीं, असा माझा समज आहे. योगावर चढण्याकरितां हें पुस्तक फारच उत्तम आहे. {{Block center| '''मुंबई मार्गशीर्ष कृ० ९''' {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} {{gap}} '''वैद्य कृष्णशास्त्री नवरे.''' <br> '''शके १८२६.''' }} {{rule}} {{center|'''महानुभावदर्शन.'''}} '''{{gap}}प्रत्येक मनुष्य श्रीमंत नाहीं. प्रत्येक मनुष्य पुण्यवान्ही नाहीं. पुण्याईच्या जोरावर श्रीमंती येत असते. पवित्र अंतःकरणाच्या विचारी कर्मानें पुण्य जोडलें जातें. पुण्य जोडणें महाकर्म कठिण आहे. अंतःकरण पवित्र, बुद्धि निर्मत्सरी,'''<noinclude></noinclude> i41j3wrsvri278pega45p8tceqnezuo पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/१४ 104 110622 232023 2026-06-11T06:23:55Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 232023 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|१४|योगसोपान—महानुभावदर्शन.|}}</noinclude>{{gap}}मन शुद्ध आणि शांत होत गेलें ह्मणजे त्याप्रमाणें इंद्रियांचीं कर्मेही चांगलीं घडत जातात. कर्में शुद्ध घडूं लागलीं ह्मणजे पुण्यसंचय होत जातो. कर्में शुद्ध व सात्विक होण्याला शरीराची व मनाची शुद्धि करावी लागते. शरीराची खरी शुद्धि स्नानानें किंवा रेचकानें होत नाहीं. सशास्त्र आसनांची सिद्धि झाली ह्मणजे तीच शरीराची शुद्धि. आवश्यक तेवढीं आसनें साधलीं तरी हरकत नाहीं. सशास्त्र आसनांचे अभ्यासानें शरीर शुद्ध होऊन तें निरोगी रहातें, अशी आसनांमध्यें सिद्धि आहे. आसनांच्या सिद्धीनें प्राणायाम साधतो, प्राणायामानें अंतःकरण पवित्र रहातें, बुद्धि स्थिर होते, चंचलपणा मोडतो, धैर्य वाढतें, व अंगीं तेज चढतें. मग जें जें करावें तें तें यशस्वी होतें. ह्याचें नांव योग.<br>{{gap}}घरोघर याचना करून द्रव्य मिळविणें आणि राजाकडून जहागिरी मिळणें, ह्यांमध्यें जसें अंतर आहे, तितकेंच इतर कर्मीनीं पुण्य जोडणें आणि गुरूपदिष्ट योगमार्गानें पुण्य जोडणें ह्यांत अंतर आहे. योगमार्गांतील पुण्यवानाची कधीं पीछेहाट होत नाहीं. त्याचें पाऊल विचाराशिवाय पुढें पडत नाहीं. त्याचीं सर्व कर्में निर्मळ असतात. तो गंभीर व निधड्या मनाचा होतो. तो दुःखांत विरत नाहीं व सुखांत फुगतही नाहीं. तो सरळ व नाजूक मनाचा असतो, तरी तो विषयलोभांत फार कठोर असतो. त्याच्या मनावर गर्वाची लहर उठत नाहीं, पण तो पराक्रमांत पुढें असतो. कर्तव्यांत तो सतत जागा असतो. ह्याचें नांव योग.<br> {{gap}}{{gap}}'''तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।'''<br> {{gap}}{{gap}}'''कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥'''<br>{{gap}}श्रीमद्भगवद्गीतेंत श्रीभगवंतांनीं नरवीर अर्जुनास, तूं योगी हो, असा उपदेश केला आहे व सहाव्या अध्यायांत आसनांची माहिती त्याला सांगितली आहे. अर्थात् आसनांनीं शरीरशुद्धि होऊन प्राणायामास आरंभ करितां येतो. योगी होणें हें भिकार चिन्ह नव्हे. हल्लीं, तो जोगी झाला ह्मणजे अगदीं निरुपयोगी झाला असा लोकांचा समज झाला आहे, तशांतला हा योगी नव्हे. अर्जुन हा श्रेष्ठ राजकुमार, नरवीर, श्रीकृष्णाचा प्रियभक्त; त्याला पुरुषार्थ साधून देण्या-<noinclude></noinclude> 5fofi0f60nt8pl7ioxo2g8hiikkpxb4 पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/१५ 104 110623 232024 2026-06-11T06:28:57Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 232024 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||योगसोपान—महानुभावदर्शन.|१५}}</noinclude>{{gap}}करितां, तो जगांत अजिंक्य होण्याकरितां, त्याचे अंगीं धैर्यशौर्य येण्याकरितांच योगासनें, प्राणायामादि योग भगवंतांनीं त्याला शिकविला. तो त्याचे कसा उपयोगी पडला हें आजपर्यंत लोक जाणत आहेत. श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवान्, अर्जुन त्याचा प्राणसखा, दोघेही मोठेच. त्यांनां तें साधलें, आह्माला कसें येणार, अशी कोणी शंका घेतील. त्यावर राजा राज्यसूत्रे चालवितो ह्मणजे राज्यसूत्रांच्या रूपाने जगाचा संसार करितो. आपण आपल्या घरचा संसार करितों. दोन्हींची रीत सारखीच. मोठे योगी महापराक्रमी झाले, आपण थोडे तरी होऊं, हीच उमेद धरून योगासनांच्या अभ्यासास लागावें व प्राणायाम शिकावा. ह्याचें नांव योग.<br>{{gap}}युवा वृद्धोतिवृद्धो वा व्याधिष्ठो दुर्बलोपि वा । अभ्यासात्सिद्धिमाप्नोति—<br>{{gap}}योगासनांचा अभ्यास करणारा तरुण असो, वृद्ध असो, अतिवृद्ध असो, व्याधिष्ठ असो कीं दुर्बल असो; ह्यांनां अभ्यासानेंच आसनें साधतात. द्विजाति ह्मणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तसेंच स्त्रिया आणि शूद्र ह्या सर्वांना आसनप्राणायामादि योगसाधनाचा अधिकार दयालु योगशास्त्रानें आदरानें दिला आहे.<br>{{gap}}स्वर्गगा जाह्नवी भागीरथी, सर्व जगाला पवित्र करण्यासाठीं अहोरात्र सारखी वहात आहे, तसेंच उदार योगशास्त्रही आहे. दूरदूरचे अनंत लोक भागीरथीच्या स्नानपानानें पुनीत होताहेत. योगशास्त्रानेही असेच दिव्यज्ञानानें सायुज्यतेस जाताहेत. हें तत्त्वज्ञानी जाणतात. ह्याचें नांव योग.<br>{{gap}}घरदार टाकूं नका, बायकामुलें सोडूं नका, उद्योगधंदा रीतशीर करा आणि योगशास्त्र मनांत धरा. उद्योगधंद्याचा वेळ व्यवस्थित करून पहांटे, उत्तररात्रीं आसनादिकांचा नियमित अभ्यास चांगला करतां येतो. आळस मात्र थोडा दूर लोटला पाहिजे. कर्मे करावीं आणि त्यांचीं फळें कधींतरी भोगावीं किंवा पुढच्या जन्मावर आशा धरून ठेवावी, असलें उधार खातें योगशास्त्राचे घरीं नाहीं. येथें क्रिया करावी आणि त्याचा रोकडा अनुभव घ्यावा, असें योगशास्त्र सिद्ध आहे.<noinclude></noinclude> 5lrzqu4edxwnf54pbzctizuq0nl79zl पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/१६ 104 110624 232025 2026-06-11T06:38:12Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 232025 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|१६|योगसोपान—महानुभावदर्शन.|}}</noinclude>आपण योगासनांपैकीं हवें तें एखादें आसन सिद्ध करून पहा व प्राणायामाचा अनुभव घ्या.<br>{{gap}}आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जें जें कांहीं करितों त्यांत मन बुद्धि घालून तें बरोबर आहे कीं नाहीं एवढी तपासणी मात्र केली पाहिजे. ह्याचें नांव योग.<br>{{gap}}आपले नित्य क्रम सरळ व शांत ठेवावेत. आहार विहार नियमित ठेवावेत, मन शुचिर्भूत असावें. सतत पवित्रपणानें वागावें. काळजी कशाची वाहूं नये. पण कर्तव्य सोडूं नये. नेमस्तपणा असावा. अतिरेक कशाचाच करूं नये. ह्याचें नांव योग.<br>{{gap}}अंतःकरणानें व कृतीनेंही जो दुष्ट, क्षुल्लकावरूनही ज्याला क्रोध येतो, विश्वास भक्ति ज्याचे मनास ठाऊकच नाहीं, पूज्यस्थानींही स्त्रीविषयांत जो अति नीच अर्थात् धैर्यहीन, दुराचाराची ज्याला खंती नाहीं व जो दुर्लोभी आणि ढोंगी, अशाला योगज्ञानाचा लाभ होत नाहीं. <br>{{gap}}आचारसंपन्न, शांत, शुद्ध, गुरुभक्ति ज्याचे अंतःकरणांत सतत खेळते, निश्चयानें जो बळकट, कृतज्ञ व बुद्धिमान्, अशाला योगज्ञान प्राप्त होत असतें. <br>{{gap}}व्याख्याकोविद—हरिभक्तिपरायण नारायण बुवा घमंडे योगी ह्यांना कोणी कदाचित् पाचारण केल्यास ते सवडीप्रमाणें येण्यासही मागें घेणार नाहींत. त्यांचा पत्ता—मुं. संगम माहुली, ता. व जि. सातारा.<br> {{right|'''प्रकाशक.'''}}<br> {{rule}}<noinclude></noinclude> 9tmlxv2ptl7345pxqmdeqqu1qa0rkmx 232026 232025 2026-06-11T06:38:42Z Annni07 6055 232026 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|१६|योगसोपान—महानुभावदर्शन.|}}</noinclude>आपण योगासनांपैकीं हवें तें एखादें आसन सिद्ध करून पहा व प्राणायामाचा अनुभव घ्या.<br>{{gap}}आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जें जें कांहीं करितों त्यांत मन बुद्धि घालून तें बरोबर आहे कीं नाहीं एवढी तपासणी मात्र केली पाहिजे. ह्याचें नांव योग.<br>{{gap}}आपले नित्य क्रम सरळ व शांत ठेवावेत. आहार विहार नियमित ठेवावेत, मन शुचिर्भूत असावें. सतत पवित्रपणानें वागावें. काळजी कशाची वाहूं नये. पण कर्तव्य सोडूं नये. नेमस्तपणा असावा. अतिरेक कशाचाच करूं नये. ह्याचें नांव योग.<br>{{gap}}अंतःकरणानें व कृतीनेंही जो दुष्ट, क्षुल्लकावरूनही ज्याला क्रोध येतो, विश्वास भक्ति ज्याचे मनास ठाऊकच नाहीं, पूज्यस्थानींही स्त्रीविषयांत जो अति नीच अर्थात् धैर्यहीन, दुराचाराची ज्याला खंती नाहीं व जो दुर्लोभी आणि ढोंगी, अशाला योगज्ञानाचा लाभ होत नाहीं. <br>{{gap}}आचारसंपन्न, शांत, शुद्ध, गुरुभक्ति ज्याचे अंतःकरणांत सतत खेळते, निश्चयानें जो बळकट, कृतज्ञ व बुद्धिमान्, अशाला योगज्ञान प्राप्त होत असतें. <br>{{gap}}व्याख्याकोविद—हरिभक्तिपरायण नारायण बुवा घमंडे योगी ह्यांना कोणी कदाचित् पाचारण केल्यास ते सवडीप्रमाणें येण्यासही मागें घेणार नाहींत. त्यांचा पत्ता—मुं. संगम माहुली, ता. व जि. सातारा.<br> {{right|'''प्रकाशक.'''}} {{rule}}<noinclude></noinclude> rilz166l4i6v02psnbd68c719yl018k 232027 232026 2026-06-11T06:39:58Z Annni07 6055 232027 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|१६|योगसोपान—महानुभावदर्शन.|}}</noinclude>आपण योगासनांपैकीं हवें तें एखादें आसन सिद्ध करून पहा व प्राणायामाचा अनुभव घ्या.<br>{{gap}}आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जें जें कांहीं करितों त्यांत मन बुद्धि घालून तें बरोबर आहे कीं नाहीं एवढी तपासणी मात्र केली पाहिजे. ह्याचें नांव योग.<br>{{gap}}आपले नित्य क्रम सरळ व शांत ठेवावेत. आहार विहार नियमित ठेवावेत, मन शुचिर्भूत असावें. सतत पवित्रपणानें वागावें. काळजी कशाची वाहूं नये. पण कर्तव्य सोडूं नये. नेमस्तपणा असावा. अतिरेक कशाचाच करूं नये. ह्याचें नांव योग.<br>{{gap}}अंतःकरणानें व कृतीनेंही जो दुष्ट, क्षुल्लकावरूनही ज्याला क्रोध येतो, विश्वास भक्ति ज्याचे मनास ठाऊकच नाहीं, पूज्यस्थानींही स्त्रीविषयांत जो अति नीच अर्थात् धैर्यहीन, दुराचाराची ज्याला खंती नाहीं व जो दुर्लोभी आणि ढोंगी, अशाला योगज्ञानाचा लाभ होत नाहीं. <br>{{gap}}आचारसंपन्न, शांत, शुद्ध, गुरुभक्ति ज्याचे अंतःकरणांत सतत खेळते, निश्चयानें जो बळकट, कृतज्ञ व बुद्धिमान्, अशाला योगज्ञान प्राप्त होत असतें. <br>{{gap}}व्याख्याकोविद—हरिभक्तिपरायण नारायण बुवा घमंडे योगी ह्यांना कोणी कदाचित् पाचारण केल्यास ते सवडीप्रमाणें येण्यासही मागें घेणार नाहींत. त्यांचा पत्ता-मुं. संगम माहुली, ता. व जि. सातारा.<br> {{right|'''प्रकाशक.'''}} {{rule}}<noinclude></noinclude> ii6m99ua6uvx6j5tyisnvq19356r2nf पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/१७ 104 110625 232028 2026-06-11T06:46:41Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 232028 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{center|{{large|'''चार शब्द.'''}}}}<br> {{center|* * *}}<br>{{gap}}मनुष्याच्या ऐहिक व पारमार्थिक सुखाशीं कारणरूपानें पूर्ण निगडित असणाऱ्या योगशास्त्राचें महत्त्व विशेष वर्णावयाला पाहिजे असें नाहीं. मूळ विस्तृत प्रस्तावनेंत तें येऊन चुकलेंच आहे. योगशास्त्राच्या अंगभूत अशा योगासनांची प्रामुख्यानें सचित्र व सानुभव अशी थोडक्यांत मुद्देसूद माहिती देणारें हें पुस्तक प्रथमतः कै० ज. म. गुर्जर यांनीं प्रसिद्ध केल्यानंतर थोडक्याच काळांत त्याच्या सर्व प्रति संपून गेल्या व पुढें तें दुर्मिळ झालें. हें महत्त्वाचें पुस्तक अशा दुर्मिळ स्थितींत रहावें व योगशास्त्रांत प्रवेष्टूंची अडचण व्हावी हें आम्हाला बरें वाटेना. ह्मणून कै० रा. ज. म. गुर्जर यांच्या मुलांस या पुस्तकाच्या एकंदर सर्व प्रकारच्या कॉपी राइट्सबद्दल भरपूर मोबदला देऊन हें पुस्तक आह्मी त्यांजजवळून विकत घेतलें व तें आतां छापून प्रसिद्ध करीत आहों. रा. गुर्जर यांचा आतां या पुस्तकाच्या एकंदर हक्कांशी कोणताच संबंध राहिलेला नाहीं.<br>{{gap}}या पुस्तकांत आसनारंभीं दिलेलें कुंडलिनी शक्तीचें चित्र रा. कै० गुर्जर यांनीं प्रकाशित केलेल्या प्रतीत नव्हतें; पण पुस्तकांतील विषयाशीं अत्यंत सदृश असल्यामुळें तें आह्मी मुद्दाम घातलें आहे. बाकी त्यांच्या प्रतीत कोठें कांहींही फरक केलेला नाहीं. जशीच्या तशीच ती छापिली आहे.<br>{{gap}}ही कुंडलिनी मनुष्याच्या शरीरांत सुषुप्तावस्थेंत असते. योगासनद्वारा प्राणायाम—योगसिद्धि झाल्यानंतर ती जागृत होऊन योग्याला तिजपासून अमृत मिळावयाला लागतें व त्यामुळें त्याची तहानभूक हरपते. सुख दुःख लाभ हानि वगैरे द्वंद्वें नष्ट होऊन तो सदा आनंदी बनतो. असे अनेक अद्भुत व अतर्क्य चमत्कार कुंडलिनी जागृत झाल्यामुळें घडत असतात. त्यांचें वर्णन येथें कोठवर करावें ! जिज्ञासूंनीं त्यासाठीं ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय वाचावा, अशी आमची त्यांना आग्रहाची विनंति आहे.<br>{{gap}}शेवटीं हें पुस्तक छापण्याचा सुयोग प्राप्त झाल्याबद्दल भगवान् योगिनाथ चंद्रमौलि श्रीशंकराला मनःपूर्वक हात जोडून हे ‘ चार शब्द ’ पुरे करितों. {{right|'''विद्वज्जननम्र,'''<br> '''तुकाराम पुंडलिक शेट्ये,'''<br> '''बुकसेलर आणि पब्लिशर, माधवबाग—मुंबई.'''}}<noinclude></noinclude> chskdqgm2c8nda7expve3w7awb1xb3v 232029 232028 2026-06-11T06:47:02Z Annni07 6055 232029 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{center|{{large|'''चार शब्द.'''}}}} {{center|* * *}}<br>{{gap}}मनुष्याच्या ऐहिक व पारमार्थिक सुखाशीं कारणरूपानें पूर्ण निगडित असणाऱ्या योगशास्त्राचें महत्त्व विशेष वर्णावयाला पाहिजे असें नाहीं. मूळ विस्तृत प्रस्तावनेंत तें येऊन चुकलेंच आहे. योगशास्त्राच्या अंगभूत अशा योगासनांची प्रामुख्यानें सचित्र व सानुभव अशी थोडक्यांत मुद्देसूद माहिती देणारें हें पुस्तक प्रथमतः कै० ज. म. गुर्जर यांनीं प्रसिद्ध केल्यानंतर थोडक्याच काळांत त्याच्या सर्व प्रति संपून गेल्या व पुढें तें दुर्मिळ झालें. हें महत्त्वाचें पुस्तक अशा दुर्मिळ स्थितींत रहावें व योगशास्त्रांत प्रवेष्टूंची अडचण व्हावी हें आम्हाला बरें वाटेना. ह्मणून कै० रा. ज. म. गुर्जर यांच्या मुलांस या पुस्तकाच्या एकंदर सर्व प्रकारच्या कॉपी राइट्सबद्दल भरपूर मोबदला देऊन हें पुस्तक आह्मी त्यांजजवळून विकत घेतलें व तें आतां छापून प्रसिद्ध करीत आहों. रा. गुर्जर यांचा आतां या पुस्तकाच्या एकंदर हक्कांशी कोणताच संबंध राहिलेला नाहीं.<br>{{gap}}या पुस्तकांत आसनारंभीं दिलेलें कुंडलिनी शक्तीचें चित्र रा. कै० गुर्जर यांनीं प्रकाशित केलेल्या प्रतीत नव्हतें; पण पुस्तकांतील विषयाशीं अत्यंत सदृश असल्यामुळें तें आह्मी मुद्दाम घातलें आहे. बाकी त्यांच्या प्रतीत कोठें कांहींही फरक केलेला नाहीं. जशीच्या तशीच ती छापिली आहे.<br>{{gap}}ही कुंडलिनी मनुष्याच्या शरीरांत सुषुप्तावस्थेंत असते. योगासनद्वारा प्राणायाम—योगसिद्धि झाल्यानंतर ती जागृत होऊन योग्याला तिजपासून अमृत मिळावयाला लागतें व त्यामुळें त्याची तहानभूक हरपते. सुख दुःख लाभ हानि वगैरे द्वंद्वें नष्ट होऊन तो सदा आनंदी बनतो. असे अनेक अद्भुत व अतर्क्य चमत्कार कुंडलिनी जागृत झाल्यामुळें घडत असतात. त्यांचें वर्णन येथें कोठवर करावें ! जिज्ञासूंनीं त्यासाठीं ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय वाचावा, अशी आमची त्यांना आग्रहाची विनंति आहे.<br>{{gap}}शेवटीं हें पुस्तक छापण्याचा सुयोग प्राप्त झाल्याबद्दल भगवान् योगिनाथ चंद्रमौलि श्रीशंकराला मनःपूर्वक हात जोडून हे ‘ चार शब्द ’ पुरे करितों. {{right|'''विद्वज्जननम्र,'''<br> '''तुकाराम पुंडलिक शेट्ये,'''<br> '''बुकसेलर आणि पब्लिशर, माधवबाग—मुंबई.'''}}<noinclude></noinclude> gzcmz3tv236l1bh9e8d4gp5r1q1hd0p पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/१८ 104 110626 232030 2026-06-11T06:52:45Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 232030 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{center|{{large|'''विषयानुक्रमणिका.'''}}}} {{rule}} {| width="100%" style="background:transparent; line-height:1.6em;" | valign="top" width="48%" | {| width="100%" style="background:transparent;" | '''विषयानुक्रम.''' || style="text-align:right;" | '''पृष्ठ.''' |- | १ मंगल ... ... ... || style="text-align:right;" | ... १ |- | २ योगशास्त्राचें महत्त्व ... || style="text-align:right;" | ... १ |- | ३ योगशास्त्रास पात्र ... ... || style="text-align:right;" | ... ४ |- | ४ योगाभ्यासास पात्रता ... || style="text-align:right;" | ... ४ |- | ५ योगविद्या कोणास द्यावी || style="text-align:right;" | ... ४ |- | ६ योगाला विघ्नें कोणतीं ... || style="text-align:right;" | ... ५ |- | ७ योगनाशक गोष्टी ... ... || style="text-align:right;" | ... ५ |- | ८ योगसाधक गोष्टी ... ... || style="text-align:right;" | ... ६ |- | ९ योगारंभीं पाळावयाचे नियम || style="text-align:right;" | ... ६ |- | १० योगसिद्धि कोणास होते. ... || style="text-align:right;" | ... ६ |} {{center|'''योगाचें प्रथमांग—यम.'''}} {| width="100%" style="background:transparent;" | ११ अहिंसा ... ... ... || style="text-align:right;" | ... ७ |- | १२ सत्य ... ... ... ... || style="text-align:right;" | ... ७ |- | १३ अस्तेय ... ... ... || style="text-align:right;" | ... ८ |- | १४ ब्रह्मचर्य ... ... ... || style="text-align:right;" | ... ८ |- | १५ क्षमा ... ... ... ... || style="text-align:right;" | ... १० |- | १६ धृति ... ... ... ... || style="text-align:right;" | ... १० |- | १७ दया ... ... ... ... || style="text-align:right;" | ... १० |- | १८ आर्जव ... ... ... ... || style="text-align:right;" | ... ११ |- | १९ मिताहार ... ... ... || style="text-align:right;" | ... ११ |- | २० शौच ... ... ... ... || style="text-align:right;" | ... ११ |} {{center|'''योगाचें द्वितीयांग—नियम.'''}} {| width="100%" style="background:transparent;" | २१ तप ... ... ... ... || style="text-align:right;" | ... १२ |} | style="border-left: 1px solid #000; padding-left: 15px;" valign="top" width="48%" | {| width="100%" style="background:transparent;" | '''विषयानुक्रम.''' || style="text-align:right;" | '''पृष्ठ.''' |- | २२ संतोष ... ... ... || style="text-align:right;" | ... १३ |- | २३ आस्तिक्य ... ... ... || style="text-align:right;" | ... १३ |- | २४ दान ... ... ... ... || style="text-align:right;" | ... १३ |- | २५ ईश्वरपूजन ... ... ... || style="text-align:right;" | ... १४ |- | २६ सिद्धांतश्रवण ... ... ... || style="text-align:right;" | ... १४ |- | २७ ह्री ... ... ... ... || style="text-align:right;" | ... १४ |- | २८ मति ... ... ... ... || style="text-align:right;" | ... १४ |- | २९ जप ... ... ... ... || style="text-align:right;" | ... १५ |- | ३० हुत ... ... ... ... || style="text-align:right;" | ... १७ |- | ३१ योगाभ्यासास वर्ज्यस्थानें ... || style="text-align:right;" | ... १६ |- | ३२ योगाभ्यासास योग्यस्थानें ... || style="text-align:right;" | ... १६ |- | ३३ योगारंभास उक्तकाल ... || style="text-align:right;" | ... १८ |- | ३४ योग्याला प्रशस्त अन्न ... || style="text-align:right;" | ... १८ |- | ३५ योग्याला अप्रशस्त अन्न ... || style="text-align:right;" | ... १९ |- | ३६ योगाभ्या० भोजन, शयन ... || style="text-align:right;" | ... १९ |} {{center|'''योगाचें तृतीयांग—आसन.'''}} {| width="100%" style="background:transparent;" | ३७ सिद्धासन १* ... ... ... || style="text-align:right;" | ... २१ |- | ३८ बद्धपद्मासन २ ... ... ... || style="text-align:right;" | ... २३ |- | ३९ वज्रासन ३ ... ... ... || style="text-align:right;" | ... २४ |- | ४० स्वस्तिकासन ४ ... ... ... || style="text-align:right;" | ... २५ |- | ४१ सिंहासन ५ ... ... ... || style="text-align:right;" | ... २६ |- | ४२ गोमुखासन ६ ... ... ... || style="text-align:right;" | ... २८ |- | ४३ वीरासन ७ ... ... ... || style="text-align:right;" | ... २९ |} |}<noinclude></noinclude> 1j8fpof9p9kt1cgvr2oc3ekoe3kcype पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/१९ 104 110627 232031 2026-06-11T06:54:27Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 232031 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||( ३ )|}}</noinclude>{| width="100%" style="background:transparent; line-height:1.6em;" | valign="top" width="48%" | {| width="100%" style="background:transparent;" | '''विषयानुक्रम.''' || style="text-align:right;" | '''पृष्ठ.''' |- | ४४ धनुरासन ८ ... ... || style="text-align:right;" | ... ३० |- | ४५ मृतासन ९ ... ... || style="text-align:right;" | ... ३२ |- | ४६ मत्स्यासन १० ... ... || style="text-align:right;" | ... ३३ |- | ४७ मत्स्येंद्रासन ११ ... ... || style="text-align:right;" | ... ३४ |- | ४८ गोरक्षासन १२ ... ... || style="text-align:right;" | ... ३६ |- | ४९ पश्चिमोत्तानासन १३ ... || style="text-align:right;" | ... ३७ |- | ५० उत्कटासन १४ ... ... || style="text-align:right;" | ... ३८ |- | ५१ संकटासन १५ ... ... || style="text-align:right;" | ... ३९ |- | ५२ मयूरासन १६ ... ... || style="text-align:right;" | ... ४० |- | ५३ कुक्कुटासन १७ ... ... || style="text-align:right;" | ... ४१ |- | ५४ कूर्मासन १८ ... ... || style="text-align:right;" | ... ४२ |- | ५५ उत्तान कूर्मासन १९ ... || style="text-align:right;" | ... ४३ |- | ५६ मंडूकासन २० ... ... || style="text-align:right;" | ... ४४ |- | ५७ उत्तान मंडूकासन २१ ... || style="text-align:right;" | ... ४५ |- | ५८ वृक्षासन २२ ... ... || style="text-align:right;" | ... ४६ |- | ५९ वृषासन २३ ... ... || style="text-align:right;" | ... ४७ |- | ६० शलभासन २४ ... ... || style="text-align:right;" | ... ४८ |- | ६१ मकरासन २५ ... ... || style="text-align:right;" | ... ४९ |- | ६२ उष्ट्रासन २६ ... ... || style="text-align:right;" | ... ५० |- | ६३ भुजंगासन २७ ... ... || style="text-align:right;" | ... ५१ |- | ६४ योगासन २८ ... ... || style="text-align:right;" | ... ५२ |- | ६५ योगमुद्रा व योगबंध ... || style="text-align:right;" | ... ५३ |- | ६६ महामुद्रा २९ ... ... || style="text-align:right;" | ... ५४ |- | ६७ विपरीत करणी ३० ... || style="text-align:right;" | ... ५५ |- | ६८ षण्मुखीमुद्रा ३१ ... ... || style="text-align:right;" | ... ५७ |- | ६९ अश्विनीमुद्रा ... ... || style="text-align:right;" | ... ५८ |} | style="border-left: 1px solid #000; padding-left: 15px;" valign="top" width="48%" | {| width="100%" style="background:transparent;" | '''विषयानुक्रम.''' || style="text-align:right;" | '''पृष्ठ.''' |- | ७० काकीमुद्रा ३२ ... ... || style="text-align:right;" | ... ५९ |- | ७१ महावेधबंध ... ... || style="text-align:right;" | ... ६० |- | ७२ उड्डीयानबंध ३३ ... ... || style="text-align:right;" | ... ६१ |- | ७३ जालंधरबंध ... ... || style="text-align:right;" | ... ६२ |- | ७४ मूलबंध ... ... ... || style="text-align:right;" | ... ६२ |- | ७५ महाबंध ... ... ... || style="text-align:right;" | ... ६३ |- | ७६ धनुरासन ३४ ... ... || style="text-align:right;" | ... ६४ |- | ७७ सर्वांगासन ३५ ... ... || style="text-align:right;" | ... ६५ |- | ७८ अर्धवृक्षासन ३६ ... ... || style="text-align:right;" | ... ६६ |- | ७९ कूर्मासन ३७ ... ... || style="text-align:right;" | ... ६७ |- | ८० नाडीशुद्धिलक्षण ... ... || style="text-align:right;" | ... ६८ |- | ८१ षट्कर्मविधि ... ... || style="text-align:right;" | ... ६८ |- | ८२ जलधोति ... ... ... || style="text-align:right;" | ... ६९ |- | ८३ वासधोति ... ... ... || style="text-align:right;" | ... ६९ |- | ८४ वस्ति ... ... ... ... || style="text-align:right;" | ... ६९ |- | ८५ नेतिकर्म ... ... ... || style="text-align:right;" | ... ७० |- | ८६ त्राटक ... ... ... || style="text-align:right;" | ... ७१ |- | ८७ नौली ... ... ... ... || style="text-align:right;" | ... ७१ |- | ८८ कपालभाति ... ... ... || style="text-align:right;" | ... ७२ |- | ८९ प्राणायाम केव्हां करावा ... || style="text-align:right;" | ... ७२ |} {{center|'''योगाचें चतुर्थांग—प्राणायाम.'''}} {| width="100%" style="background:transparent;" | ९० पूरकादिलक्षण ... ... || style="text-align:right;" | ... ७५ |- | ९१ प्राणायामाचीं फलें ... ... || style="text-align:right;" | ... ७६ |- | ९२ अंतःकरणस्थि० प्राणायाम || style="text-align:right;" | ... ७६ |- | ९३ आयुष्य वा० प्राणायाम ... || style="text-align:right;" | ... ७७ |- | ९४ स्थान व आसनप्रकार ... || style="text-align:right;" | ... ७७ |- | ९५ पूरक, कुंभक रेचक क० ... || style="text-align:right;" | ... ७८ |} |}<noinclude></noinclude> hmcb21ph3vl9q2oo08zrszf806mj4dn पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/२० 104 110628 232032 2026-06-11T06:56:56Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 232032 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh||( ४ )|}}</noinclude>{| width="100%" style="background:transparent; line-height:1.6em;" | valign="top" width="48%" | {| width="100%" style="background:transparent;" | '''विषयानुक्रम.''' || style="text-align:right;" | '''पृष्ठ.''' |- | ९६ उभय नाकपुड्यांचें धारण ... || style="text-align:right;" | ... ७८ |- | ९७ प्राणायामांतील मात्रा ... ... || style="text-align:right;" | ... ७८ |- | ९८ प्राणा० प्रणव ... ... ... || style="text-align:right;" | ... ७९ |- | ९९ प्राणाया० व्याहृति ... ... || style="text-align:right;" | ... ७९ |- | १०० प्राणा० कुंभक ... ... ... || style="text-align:right;" | ... ७९ |- | १०१ सूर्यभेदन ... ... ... ... || style="text-align:right;" | ... ८० |- | १०२ उज्जायी ... ... ... ... || style="text-align:right;" | ... ८० |- | १०३ सीत्कारी ... ... ... ... || style="text-align:right;" | ... ८० |} | style="border-left: 1px solid #000; padding-left: 15px;" valign="top" width="48%" | {| width="100%" style="background:transparent;" | '''विषयानुक्रम.''' || style="text-align:right;" | '''पृष्ठ.''' |- | १०४ शीतली ... ... ... ... || style="text-align:right;" | ... ८० |- | १०५ भस्त्रिका ... ... ... ... || style="text-align:right;" | ... ८० |- | १०६ भ्रामरी ... ... ... ... || style="text-align:right;" | ... ८१ |- | १०७ मूर्च्छा ... ... ... ... || style="text-align:right;" | ... ८१ |- | १०८ प्लाविनी ... ... ... ... || style="text-align:right;" | ... ८१ |- | १०९ प्राणायामसिद्धि ... ... ... || style="text-align:right;" | ... ८१ |- | ११० इडापिंगलादिनाडी ... ... || style="text-align:right;" | ... ८२ |- | १११ कुंडलिनी ... ... ... ... || style="text-align:right;" | ... ८२ |} |} {{dhr|4em}} {{rule}}<noinclude></noinclude> t2vo9jrhnvtr7hmmyqgykqx0pwhl90m पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/२१ 104 110629 232033 2026-06-11T06:57:22Z Annni07 6055 /* मजकुराविना */ 232033 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="Annni07" /></noinclude><noinclude></noinclude> t85jv3liciafmc4719qmc2q3piz83ym 232038 232033 2026-06-11T07:48:21Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 232038 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>[[File:योगसोपान-पूर्वचतुष्क (page 21 crop).jpg|योगसोपान-पूर्वचतुष्क (page 2 crop)|center]]<noinclude></noinclude> 7n8nby175swnyi6u6js8vj4dc7iamto 232040 232038 2026-06-11T07:50:46Z Annni07 6055 232040 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{dhr|15em}} [[File:योगसोपान-पूर्वचतुष्क (page 21 crop).jpg|योगसोपान-पूर्वचतुष्क (page 2 crop)|center]] {{dhr|15em}}<noinclude></noinclude> 73fuwfcl6yldljemu7opfv7hkrgiptj 232043 232040 2026-06-11T08:14:06Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 232043 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>[[File:योगसोपान-पूर्वचतुष्क (page 21 crop).jpg|thumbnail|center]]<noinclude></noinclude> q0rqej7ucheqz19vvv4mailyfmy4mnd पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/२२ 104 110630 232034 2026-06-11T06:57:35Z Annni07 6055 /* मजकुराविना */ 232034 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="Annni07" /></noinclude><noinclude></noinclude> t85jv3liciafmc4719qmc2q3piz83ym 232039 232034 2026-06-11T07:50:20Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 232039 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{dhr|15em}} [[File:योगसोपान-पूर्वचतुष्क (page 22 crop).jpg|योगसोपान-पूर्वचतुष्क (page 2 crop)|center]] {{dhr|15em}}<noinclude></noinclude> lky1he2gly617fhax1e1y2jzf8p0yt6 232044 232039 2026-06-11T08:15:07Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 232044 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>[[File:योगसोपान-पूर्वचतुष्क (page 22 crop).jpg|thumbnail|center]]<noinclude></noinclude> 43jo7ru93flf7jvf07vz3oynv0atmwl पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/२३ 104 110631 232036 2026-06-11T07:27:00Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 232036 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{center|{{xxxx-larger|'''योगसोपान.'''}}}} {{rule}} {{center|{{large|'''पूर्वचतुष्क.'''}}}} {{center|'''( यम, नियम, आसन व प्राणायाम )'''}} {{center|'''मंगलम्.'''}} {{center|वंदे मायादिसंसृष्टं पुराणपुरुषं हरिम् ।<br> प्रकृत्या सीतया जुष्टं, योगेशं योगदायिनम् ॥ १ ॥<br> पतंजलिं सूत्रकृतं प्रणम्य व्यासं मुनिं भाष्यकृतं च भक्त्या ।<br> सन्मार्गदान् मध्वगुरूंश्च नत्वा योगस्य सोपानमहं तनोमि ॥ २ ॥<br> }} {{gap}}योगशास्त्रासारख्याचें महत्त्व स्वकपोलकल्पित लिहिण्यापेक्षां, आपले पूर्वऋषींनीं या शास्त्राचा पूर्ण विचार करून, तसाच त्याचा अनुभव घेऊन त्याजविषयीं जे लेख लिहून ठेविले आहेत तेच लोकांपुढें ठेविल्यास विशेष आल्हाद देतील; असें समजून आपणांस परमपूज्य अशा अनेक ऋषिवर्यांचीं प्रमाणें याखालीं दिलीं आहेत.<br> {{center|'''योगशास्त्राचें महत्त्व.'''}} {{center|योगात्संप्राप्यते ज्ञानं योगो धर्मस्य लक्षणम् ।<br> योगः परं तपो ज्ञेयस्तस्माद्योगं समभ्यसेत् ॥ १ ॥<br> न च तीव्रेण तपसा न स्वाध्यायैर्न चेज्यया । गतिं गंतुं द्विजाः शक्ता योगात्संप्राप्नुवंति याम् ॥ २ ॥ ( अत्रिसंहिता. )}} {{dhr|2em}}<noinclude>{{center|३}}</noinclude> 102f46u1waud67g567lhi0eyopab0ku पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/२४ 104 110632 232041 2026-06-11T07:52:55Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 232041 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|२|योगसोपान—पूर्वचतुष्क.|}}</noinclude>{{gap}}अर्थ—योगापासून ज्ञान प्राप्त होतें व योग हेंच धर्मलक्षण असून, योग हेंच परम तप आहे; ह्मणून असा जो योग त्याचा अभ्यास करावा. मोठ्या तीव्र तपानें, सर्वकाळ वेदशास्त्राध्ययनानें, व ज्योतिष्टोमादि यज्ञानेंही न मिळणारी गति द्विजास योगाभ्यासानें मिळते. {{dhr|1em}} {{gap|5em}}भवतापेन तप्तानां योगो हि परमौषधम् । ( गरुडपुराण ) {{dhr|1em}} {{gap}}अर्थ—संसारतापापासून तापलेल्या मनुष्यास योग हेंच परम औषध आहे. {{dhr|1em}} {{gap|5em}}आत्मज्ञानेन मुक्तिः स्यात्तच्च योगाहते नहि । {{gap|5em}}स च योगश्चिरं कालमभ्यासादेव सिद्ध्यति ॥१॥ ( स्कंदपुराण ) {{dhr|1em}} {{gap}}अर्थ—आत्मज्ञानानें मुक्ति मिळते, पण तें आत्मज्ञान योगाशिवाय होत नाहीं. आणि तो योग चिरकाळ अभ्यास केल्यानेंच सिद्ध होतो. {{dhr|1em}} {{gap|5em}}योगाग्निर्दहति क्षिप्रमशेषं पापपंजरम् । {{gap|5em}}प्रसन्नं जायते ज्ञानं ज्ञानान्निर्वाणमृच्छति ॥ १ ॥ ( कूर्मपुराण ) {{dhr|1em}} {{gap}}अर्थ—तो योगाग्नि तत्काल सर्व पापें भस्म करून उत्तम प्रकारच्या ज्ञानास विकसित करितो, व त्याच्या द्वारें मुक्ति मिळते ह्मणजे मुक्तीला कारण योग होय. असें ऐकून शंकरास पार्वती ह्मणते. {{dhr|1em}} {{gap|3em}}पार्वत्युवाच । ज्ञानादेव हि मोक्षं च वदंति ज्ञानिनः सदा । {{gap|5.7em}}न कथं सिद्धियोगेन योगः किं मोक्षदो भवेत् ॥ १ ॥ {{gap|3em}}शिव उवाच । ज्ञानेनैव हि मोक्षं च तेषां वाक्यं तु नान्यथा । {{gap|5.7em}}सर्वे वदंति खङ्गेन जयो भवति तर्हि किम् ॥ २ ॥ {{gap|5.7em}}विना युद्धेन वीर्येण कथं जयमवाप्नुयात् । {{gap|5.7em}}तथा योगेन रहितं ज्ञानं मोक्षाय नो भवेत् ॥ ३ ॥ {{gap|5.7em}}ज्ञाननिष्ठो विरक्तो वा धर्मज्ञोपि जितेंद्रियः । {{gap|5.7em}}विना योगेन देवोपि न मोक्षं लभते प्रिये ॥ ४ ॥ ( योगबीज )<noinclude></noinclude> giplqezwx6hwu8ls9i0gos5we513ota 232042 232041 2026-06-11T08:05:19Z Annni07 6055 232042 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" />{{rh|२|योगसोपान—पूर्वचतुष्क.|}}</noinclude>{{gap}}योगसोपान - पूर्व चतुष्क. अर्थ-योगापासून ज्ञान प्राप्त होतें व योग हेंच धर्मलक्षण असून, योग हेंच परम तप आहे; हाणून असा जो योग त्याचा अभ्यास करावा. मोठ्या तीव्र तपानें, सर्वकाळ वेदशास्त्राध्ययनानें, व ज्योतिष्टोमादि यज्ञानेही न मिळणारी गति द्विजास योगाभ्यासाने मिळते.<br>{{gap}}{{gap}}भवतापेन तप्तानां योगो हि परमौषधम् । (गरुडपुराण)<br>अर्थ संसारतापापासून तापलेल्या मनुष्यास योग हैंच परम औषध आहे.<br>{{gap}}{{gap}}आत्मज्ञानेन मुक्तिः स्यात्तच्च योगाहते नहि ।<br>{{gap}}{{gap}}स च योगश्चिरं कालमभ्यासादेव सिद्ध्यति ॥ १॥ (स्कंदपुराण)<br>{{gap}}{{gap}}अर्थ - आत्मज्ञानानें मुक्ति मिळते, पण तें आत्मज्ञान योगाशिवाय होत नाही. आणि तो योग चिरकाळ अभ्यास केल्यानेंच सिद्ध होतो.<br>{{gap}}{{gap}}योगाग्निर्दहति क्षिप्रमशेषं पापपंजरम् ।<br>{{gap}}{{gap}}प्रसनं जायते ज्ञानं ज्ञानानिर्वाणमृच्छति ॥ १ ॥ ( कूर्मपुराण)<br>{{gap}}अर्थ - तो योगाग्नि तत्काल सर्व पापें भस्म करून उत्तम प्रकारच्या ज्ञानास विकसित करितो, व त्याच्या द्वारे मुक्ति मिळते झणजे मुक्तीला कारण योग होय. असे ऐकून शंकरास पार्वती झणते.<br>{{gap}}{{gap}}पार्वत्युवाच । ज्ञानादेव हि मोक्षं च वदंति ज्ञानिनः सदा ।<br>{{gap}}{{gap}}न कथं सिद्धियोगेन योगः किं मोक्षदो भवेत् ॥ १ ॥ <br>{{gap}}{{gap}}शिव उवाच । ज्ञानेनैव हि मोक्षं च तेषां वाक्यं तु नान्यथा ।<br>{{gap}}{{gap}}सर्वे वदंति खङ्गेन जयो भवति तहिं किम् ॥ २ ॥<br>{{gap}}{{gap}}विना युद्धेन वीर्येण कथं जयमवामुयात् ।<br>{{gap}}{{gap}}तथा योगेन रहितं ज्ञानं मोक्षाय नो भवेत् ॥ ३ ॥<br>{{gap}}{{gap}}ज्ञाननिष्ठो विरक्तो वा धर्मज्ञोपि जितेंद्रियः ।<br>{{gap}}{{gap}}विना योगेन देवोपि न मोक्षं लभते प्रिये ॥ ४ ॥ ( योगबीज )<noinclude></noinclude> 9i9q2a9y2akz805x0pi6c9y8bpcrskf पान:योगसोपान-पूर्वचतुष्क.pdf/२५ 104 110633 232045 2026-06-11T09:28:03Z Annni07 6055 /* मुद्रितशोधन */ 232045 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Annni07" /></noinclude>{{gap}}{{gap}}'''ब्रह्मादयोपि त्रिदशाः पवनाभ्यासत्पराः ।'''<br>{{gap}}{{gap}}'''अभूवन्नंतकभयात्तस्मात्पवनमभ्यसेत् ॥ ५ ॥'''<br>{{gap}}अर्थ—मोठमोठे ज्ञानी, ज्ञानानेंच मोक्ष होतो, असें सर्वकाल ह्मणत असून, तुझी योग हेंच मुक्तीचें साधन आहे असें ह्मणतां, तर ज्ञान्यांचें ह्मणणें खोटें कीं काय ? शंकर ह्मणतात, ज्ञानी ज्ञानानेंच मोक्ष मिळतो, असें ह्मणतात तें खोटें नव्हे, व मी योगानें मोक्ष मिळतो असें ह्मणतों तेंही खोटें नाहीं. पहा, कीं व्यवहारांत सर्व लोक, तलवारीनें जय मिळतो, असें ह्मणतात हें खोटें नाहीं. परंतु शूर पुरुषानें मोठ्या धैर्यानें व युक्तीनें लढाई करावी, तेव्हांच त्याला जय मिळतो. तसेंच, योगरहित कितीही ज्ञान असलें तरी तें मोक्ष देणारें होत नाहीं. पार्वति ! फार काय सांगूं ? मोठा ज्ञानी, तसाच अतिविरक्त असून धर्मज्ञ व जितेंद्रिय जरी पुरुष असला, तरी तो मोक्षाधिकारी होत नाहीं. देवालाही योगावांचून मोक्ष मिळत नाहीं. ह्मणून ब्रह्मादिक देवही योगाभ्यासत्पर झाले. यासाठीं, मनुष्यानें यमाचें भय निवारण होण्यासाठीं—मोक्षप्राप्तीसाठीं—योगाभ्यासच केला पाहिजे असें मी तुला सांगतों.<br>{{gap}}{{gap}}'''वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव, दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।'''<br>{{gap}}'''अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥१॥'''<br>{{right|( भगवद्गीता )}}<br>{{gap}}अर्थ—सर्व वेद, सर्व यज्ञ, सर्व तपें, दानें हीं जें फळ देतात तें सर्व जाणून त्या सर्वांत श्रेष्ठ अशा उत्कृष्ट पदाप्रत योगी पावतो.<br>{{gap}}{{gap}}'''आलोड्य सर्वशास्त्राणि विचार्य च पुनः पुनः ।'''<br>{{gap}}{{gap}}'''एकमेव सुनिष्पन्नं योगशास्त्रं परं मतम् ॥ १ ॥''' {{right|( शि० सं० )}}<br>{{gap}}अर्थ—सर्व शास्त्रें पाहून व वारंवार विचार करून पाहिलें, पण त्यांत परममान्य व निश्चयानें सर्व फल देणारें एक योगशास्त्रच मला आढळलें.<noinclude></noinclude> 9gier60acsqolqhdabfyocpy1wtagg8