विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.6
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अरे संसार संसार
0
47
232050
156906
2026-06-11T14:09:52Z
QueerEcofeminist
918
"[[अरे संसार संसार]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156906
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = अरे संसार संसार
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[सुगरणीचा खोपा]]
| पुढील = [[कशाला काय म्हणूं नही?]]
| टिपण =
}}
<poem>
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।
अरे संसार संसार, होटा कधी म्हनू नाही
राउळीच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नाही ।
अरे संसार संसार, नाही रडन कुढन
येड्या, गयांतला हार, म्हणू नकोरे लोढनं ।
अरे संसार संसार, खिरा येला वरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकि लागतो रे गोड ।
अरे संसार संसार, म्हनू नकोरे भिलावा,
त्याले गोड भिम फुल, मधी गोडंब्याचा ठेवा ।
देखा संसार संसार, शेंग वरतून काटे,
अरे वरतून काटे, मधी चिकणे सागर गोटे ।
एक संसार संसार, दोन्ही जिवांचा इचार,
देतो सुखाले नकार, अन् दुखाले होकार ।
देखा संसार संसार, दोन्ही जिवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुखःचा बेपार ।
अरे संसार संसार, असा मोठा जादुगर
माझ्या जिवाचा मंतर, त्यच्यावरती मदार ।
असा संसार संसार, आधी देवाचा इसर
माझ्या दैवाचा जोजर्, मग जिवाचा आधार ।
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[Category:मराठी कविता]]
[[Category:मराठी गीते]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
kuh7ezqaxcxvootga8ne4wvgt9c1uh1
आला पह्यला पाऊस
0
48
232054
156913
2026-06-11T14:09:58Z
QueerEcofeminist
918
"[[आला पह्यला पाऊस]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156913
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = अरे संसार संसार
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[सुगरणीचा खोपा]]
| पुढील = [[राजा शेतकरी]]
| टिपण =
}}
<poem>
आला पह्यला पाऊस
शिपडली भुई सारी
धरत्रीचा परमय
माझं मन गेलं भरी
आला पाऊस पाऊस
आतां सरीवर सरी
शेतं शिवारं भिजले
नदी नाले गेले भरी
आला पाऊस पाऊस
आतां धूमधडाख्यानं
घरं लागले गयाले
खारी गेली वाहीसन
आला पाऊस पाऊस
आला लल्करी ठोकत
पोरं निंघाले भिजत
दारीं चिल्लाया मारत
आला पाऊस पाऊस
गडगडाट करत
धडधड करे छाती
पोरं दडाले घरांत
आतां उगूं दे रे शेतं
आला पाऊस पाऊस
वर्हे येऊं दे रे रोपं
आतां फिटली हाऊस
येतां पाऊस पाऊस
पावसाची लागे झडी
आतां खा रे वडे भजे
घरांमधी बसा दडी
देवा, पाऊस पाऊस
तुझ्या डोयांतले आंस
दैवा, तुझा रे हारास
जीवा, तुझी रे मिरास
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[Category:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
bcdd34lf0wpou68cscfa3fe7l3bp3gk
उदासीनता (बालकवी)
0
49
232056
156916
2026-06-11T14:10:00Z
QueerEcofeminist
918
"[[उदासीनता (बालकवी)]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156916
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = उदासीनता
| साहित्यिक = बालकवी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[पाऊस]]
| पुढील = [[निराशा]]
| टिपण =
}}
कोठुनि येते मला कळेना</br>
:उदासीनता ही हृदयाला</br>
काय बोंचतें तें समजेना</br>
:हृदयाच्या अंतर्हृदयाला.</br>
येथें नाहीं तेथें नाहीं,</br>
:काय पाहिजे मिळवायाला?</br>
कुणीकडे हा झुकतो वारा?</br>
:हांका मारी जीव कुणाला?</br>
मुक्या मनाचे मुके बोल हे</br>
:घरें पाडिती पण हृदयाला.</br>
तीव्र वेदना करिती, परि ती</br>
:दिव्य औषधी कसली त्याला?</br>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[Category:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
h1rtpusamiobm839jgf95yaeprw6yyt
औदुंबर
0
50
232064
156917
2026-06-11T14:10:10Z
QueerEcofeminist
918
"[[औदुंबर]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156917
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = उदासीनता
| साहित्यिक = बालकवी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[मेघांचा कापूस]]
| पुढील = [[शून्य मनाचा घुमट]]
| टिपण =कवि दिवाकर
}}
<poem>
ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेउन
निळासावळा झरा वाहतो बेटांबेटांतुन.
चार घरांचे गांव चिमुकलें पैल टेकडीकडे;
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढें.
पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे;
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे.
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर;
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.
</poem>
{{ऐका|filename=Audumbar-Balkavi-Ganesh Dhamodkar.ogg|title=औदुंबर।औदुंबर या कवितेचे वाचन}}
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
pt2sqlmuc5sbrsc96v9nu6ek6yn0vs0
कशाला काय म्हणूं नही?
0
51
232059
156920
2026-06-11T14:10:04Z
QueerEcofeminist
918
"[[कशाला काय म्हणूं नही?]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156920
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = कशाला काय म्हणूं नही?
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[अरे संसार संसार]]
| पुढील = [[आला पह्यला पाऊस]]
| टिपण =
}}
<poem>
बिना कपाशीनं उले
त्याले बोंड म्हनूं नहीं
हरी नामाईना बोले
त्याले तोंड म्हनूं नहीं
नही वार्यानं हाललं
त्याले पान म्हनूं नहीं
नहीं ऐके हरिनाम
त्याले कान म्हनूं नहीं
पाटा येहेरीवांचून
त्याले मया म्हनूं नहीं
नहीं देवाचं दर्सन
त्याले डोया म्हनूं नहीं
निजवते भुक्या पोटीं
तिले रात म्हनूं नही
आंखडला दानासाठीं
त्याले हात म्हनूं नहीं
ज्याच्या मधीं नही पानी
त्याले हाय म्हनूं नहीं
धांवा ऐकून आडला
त्याले पाय म्हनूं नहीं
येहेरींतून ये रीती
तिले मोट म्हनूं नहीं
केली सोताची भरती
त्याले पोट म्हनूं नहीं
नहीं वळखला कान्ह
तीले गाय म्हनूं नहीं
जीले नहीं फुटे पान्हा
तिले माय म्हनूं नहीं
अरे, वाटच्या दोरीले
कधीं साप म्हनूं नहीं
इके पोटाच्या पोरीले
त्याले बाप म्हनूं नहीं
दुधावर आली बुरी
तिले साय म्हनूं नहीं
जिची माया गेली सरी
तिले माय म्हनूं नहीं
इमानाले इसरला
त्याले नेक म्हनूं नहीं
जल्मदात्याले भोंवला
त्याले लेक म्हनूं नहीं
ज्याच्यामधीं नहीं भाव
त्याले भक्ती म्हनूं नहीं
त्याच्यामधीं नहीं चेव
त्याले शक्ती म्हनूं नहीं
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[Category:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
av301xae4447xfmc07j5p68fsjcrjm5
तूं तर चाफेकळी!
0
55
232075
156952
2026-06-11T14:10:25Z
QueerEcofeminist
918
"[[तूं तर चाफेकळी!]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156952
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = तूं तर चाफेकळी!
| साहित्यिक = बालकवी
| वर्ष =
| विभाग =
| मागील =[[जीर्ण दुर्ग]]
| पुढील = [[प्रीति हवी तर]]
| टिपण =
}}
<poem>
"गर्द सभोंतीं रान साजणी तूं तर चाफेकळी!
काय हरवलें सांग शोधिसी या यमुनेच्या जळीं?"
ती वनमाला म्हणे "नृपाळा, हें तर माझे घ्रर;
पाहत बसतें मी तर येथें जललहरी सुंदर,
हरिणी माझी, तिला आवडे फारच माझा गळा;
मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा.
घेउनि हातीं गोड तिला त्या कुरणावरतीं फिरे--
भाऊ माझा, मंजुळवाणें गाणें न कधीं विरें"
"रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतिल रमणी! तुला;
तूं वनराणी, दिसे न भुवनीं तुझिया रूपा तुला.
तव अधरावर मंजुळ गाणीं ठसलीं कसलीं तरी;
तव नयनीं या प्रेमदेवता धार विखारी भरी!
क्रीडांगण जणुं चंचल सुंदर भाल तुझें हें गडे,
भुरु भुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे.
अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालावरी;
भुललें तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरीं."
सांज सकाळीं हिमवंतीचे सुंदर मोतीं धडें;
हात लावितां परि नरनाथा तें तर खालीं पडे.
ती वनबाला म्हणे नृपाळा "सुंदर मी हो खरी,--
</poem>
::::अपूर्ण<ref>बालकवींनी ही कविता अपुर्ण सोडली आहे. ''फुलराणी - बालकवींच्या निवडक कविता'' या मध्ये या कवितेसंबंधी संपादकीय टीपांमध्ये [[w:mr:कुसुमाग्रज | कुसुमाग्रजांनी]] ही कविता "अपूर्ण असली तरी ही अपूर्णता तिच्या रसास्वादाला बाधक होत नाही. कोठल्यातरी संकल्पित कथाकाव्याचा हा छोटा तुकडा आहे असे वाटते" असे मत मांडले आहे.</ref>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
l1vpymhky7kitabxj2ag0gisz3rcb17
देव अजब गारोडी
0
57
232077
156957
2026-06-11T14:10:27Z
QueerEcofeminist
918
"[[देव अजब गारोडी]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156957
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = देव अजब गारोडी
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[आला पह्यला पाऊस]]
| पुढील = [[मन]]
| टिपण =
}}
<poem>
धरत्रीच्या कुशीमधीं
बीयबियानं निजलीं
वर्हे पसरली माटी
जशी शाल पांघरली
बीय टरारे भुईत
सर्वे कोंब आले वर्हे
गह्यरलं शेत जसं
आंगावरतीं शहारे
ऊन वार्याशीं खेयतां
एका एका कोंबांतून
पर्गटले दोन पानं
जसे हात जोडीसन
टाया वाजवती पानं
दंग देवाच्या भजनीं
जसे करती कारोन्या
होऊं दे रे आबादानी
दिसामासा व्हये वाढ
रोप झाली आतां मोठी
आला पिकाले बहार
झाली शेतामधी दाटी
कसे वार्यानं डोलती
दाने आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी
देव अजब गारोडी !
<poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[Category:मराठी]]
[[Category:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
3twhymjomqbp4d81l9kqgsa41znf9b5
दोष आणि प्रीति
0
58
232079
156962
2026-06-11T14:10:29Z
QueerEcofeminist
918
"[[दोष आणि प्रीति]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156962
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = दोष आणि प्रीति
| साहित्यिक = बालकवी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[काळास (बालकवी)|काळास]]
| पुढील = [[जीर्ण दुर्ग]]
| टिपण =
}}
<poem>
दोष असती जगतांत किती याचें
नसे मजला सामर्थ्य गणायाचें;
दोष माझा परि हाच मला वाटे,
दोष बघतां सत्प्रेम कसें आटे?
दोष असती जगतांत--असायाचें;
मला त्यांशी तरि काय करायाचें?
प्रेमगंगेच्या शुद्धसिंचनेंही
शुद्ध होइ न जो, दोष असा नाहीं.
गड्या पूर्णा! मज आस तुझी नाहीं;
सख्या न्यूना! ये मार मिठी देहीं,
प्रीति माझ्या हृदयांत करी वास.
न्यूनतेला पूर्णत्व द्यावयास!
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[Category:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
168e4ms4oownmcxb7nqwsybokhjsx2s
निर्झरास
0
59
232080
156971
2026-06-11T14:10:30Z
QueerEcofeminist
918
"[[निर्झरास]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156971
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = निर्झरास
| साहित्यिक = बालकवी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[अरुण]]
| पुढील = [[मधुयामिनी]]
| टिपण =
}}
<poem>
गिरिशिखरे, वनमालाही दरीदरी घुमवित येई
कड्यावरुनि घेऊन उड्या खेळ लतावलयी फुगड्या
घे लोळण खडकावरती फिर गरगर अंगाभवती,
जा हळूहळू वळसे घेत लपत-छपत हिरवाळीत,
पाचूंची हिरवी राने झुलव गडे, झुळझुळ गाणे ।
वसंतमंडप - वनराई आंब्याची पुढती येई.
श्रमलासी खेळून खेळ नीज सुखे क्षणभर बाळ ।
हीं पुढची पिवळी शेतें सळसळती - गाती गीतें,
झोप कोठुनि तुला तरी, हास लाडक्या । नाच करी
बालझरा तूं बालगुणी, बाल्यचि रे । भरिसी भुवनी ।
बालतरू हे चोहिकडे
प्रेमभरे त्यावर तूहि
बुदबुद-लहरी फुलवेली
सौंदर्ये हृदयामधली
गर्द सावल्या सुखदायी
इवलाली गवतावरती
झुलवित अपुले तुरे-तुरे
जादूनेच तुझ्या बा रे?
सौंदर्याचा दिव्य झरा
या लहरीलहरीमधुनी ताल तुला देतात गडे!
मुक्त-मणि उधळून देई!
फुलव सारख्या भवताली.
हे विश्वी उधळून खुली
वेलीची फुगडी होई!
रानफुले फुलती हसती
निळी लव्हाळी दाट भरे.
वन नंदन बनले सारे!
बालसंतचि तू चतुरा;
स्फूर्ती दिव्य भरिसी विपिनी
***
आकाशामधुनी जाती
इंद्रधनूची कमान ती
रम्य तारका लुकलुकती
शुभ्र चंद्रिका नाच करी
ही दिव्ये येती तुजला
वेधुनि त्यांच्या तेजाने
धुंद हृदय तव परोपरी
त्या लहरीमधुनी झरती
नवल न, त्या प्राशायाला
गंधर्वा तव गायन रे मेघांच्या सुंदर पंक्ति;
ती संध्या खुलते वरती;
नीलारुण फलकावरती;
स्वर्गधरेवर एकपरी;
रात्रंदिन भेटायाला!
विसरुनिया अवघी भाने
मग उसळे लहरीलहरी
दिव्य तुझ्या संगीततति!
स्वर्गहि जर भूवर आला!
वेड लाविना कुणा बरे!
***
पर्वत हा, ही दरीदरी
गाण्याने भरली राने,
गीतमय स्थिरचर झाले!
व्यक्त तसे अव्यक्तहि ते
मुरलीच्या काढित ताना
धुंद करुनि तो नादगुणे
दिव्य तयाच्या वेणुपरी
गाउनि गे झुळझुळ गान
गोपि तुझ्या हिरव्या वेली
तुझ्या वेणुचा सूर तरी तव गीते भरली सारी.
वर-खाली गाणे गाणे!
गीतमय ब्रम्हांड झुले!
तव गीते डुलते झुलते!
वृंदावनि खेळे कान्हा;
जडताहि हसवी गाने;
तूहि निर्झरा! नवलपरी
विश्वाचे हरिसी भान!
रास खेळती भवताली!
चराचरावर राज्य करी
***
काव्यदेविचा प्राण खरा
या दिव्याच्या धुंदिगुणे
मी कवितेचा दास, मला
परि न झरे माझ्या गानी
जडतेला खिळुनी राही
दिव्यरसी विरणे जीव
ते जीवित न मिळे माते
दिव्यांची सुंदर माला
तूच खरा कविराज गुणी
अक्षय तव गायन वाहे तूच निर्झरा! कविश्वरा!
दिव्याला गासी गाणे.
कवी बोलती जगांतला,
दिव्यांची असली श्रेणी!
हृदयबंध उकलत नाही!
जीवित हे याचे नाव;
मग कुठुनि असली गीते?
ओवाळी अक्षय तुजला!
सरस्वतीचा कंठमणी
अक्षयात नांदत राहे!
शिकवी रे, शिकवी माते
फुलवेली-लहरी असल्या
वृत्तिलता ठायी ठायी
प्रेमझरी-काव्यस्फूर्ति
प्रगटवुनि चौदा भुवनी
अद्वैताचे रज्य गडे!
प्रेमशांतिसौंदर्याही
मम हृदयी गाईल गाणी
आणि असे सगळे रान
तेवि सृष्टीची सतार ही दिव्य तुझी असली गीते!
मम हृदयी उसळोत खुल्या!
विकसू दे सौंदर्याही!
ती आत्मज्योती चित्ती
दिव्य तिचे पसरी पाणी!
अविच्छिन्न मग चोहिकडे!
वेडावुनि वसुधामाई
रम्य तुझ्या झुळझुळ वाणी!
गाते तव मंजुळ गान,
गाईल मम गाणी काही!
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[Category:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
frgvrarwwwkilkumuqpsk64lnvvgmzk
फुलराणी
0
61
232083
156981
2026-06-11T14:10:33Z
QueerEcofeminist
918
"[[फुलराणी]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156981
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = फुलराणी
| साहित्यिक = बालकवी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[संध्यारजनी]]
| पुढील = [[मंगलमय प्रेमकवन]]
| टिपण =
}}
<poem>
हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती, फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात, अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रुलीला, अवगत नव्हत्या कुमारिकेला.
आईच्या मांडीवर बसुनी, झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनी ठावे काय तियेला, साध्या भोळ्या फुलराणीला?
पुरा विनोदी संध्यावात, डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हासत आला, चुंबून म्हणे फुलराणीला:-
"छानी माझी सोनुकली ती, कुणाकडे गं पहात होती?
कोण बरे त्या संध्येतून, हळूच पाहते डोकावून?
तो रविकर का गोजिरवाणा, आवडला अमुच्या राणींना?"
लाजलाजली या वचनांनी, साधी भोळी ती फुलराणी!
आंदोली संध्येच्या बसुनी, झोंके झोंके घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल, नभी चमकते ते ग्रहगोल!
जादूटोणा त्यांनी केला, चैन पडेना फुलराणीला;
निजली शेते, निजले रान, निजले प्राणी थोर लहान.
अजून जागी फुलराणी ही, आज कशी तळ्यावर नाही?
लागेना डोळ्याशी डोळा, काय जाहले फुलराणीला?
या कुंजातून त्या कुंजातून, इवल्याशा या दिवट्या लावून,
मध्यरात्रीच्या निवांत समयी, खेळखेळते वनदेवीही.
त्या देवीला ओव्या सुंदर, निर्झर गातो; त्या तालावर
झुलुनी राहिले सगळे रान, स्वप्नसंगमी दंग होऊन!
प्रणयचिंतनी विलीनवृत्ती, कुमारिका ही डोलत होती;
डुलता डुलता गुंग होऊनी, स्वप्ने पाही मग फुलराणी!
"कुणी कुणाला आकाशात, प्रणयगायने होते गात;
हळूच मागुनी आले कोण, कुणी कुणा दे चुंबनदान !"
प्रणयखेळ हे पाहुनी चित्ती, विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमाच्या प्रेमदेवता, वाऱ्यावरती फिरता फिरता
हळूच आल्या उतरून खाली, फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवूनी नयनी, त्या वदल्या ही अमुची राणी!
स्वर्गभूमीचा जुळवीत हात, नाचनाचतो प्रभातवात;
खेळूनी दमल्या त्या ग्रहमाला, हळूहळू लागती लपावयाला
आकाशीची गंभीर शांती, मंदमंद ये अवनीवरती;
विरू लागले संजयजाल, संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवूनी, हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती, तरीही अजुनी फुलराणी ती!
तेजोमय नव मंडप केला, लख्खं पांढरा दहा दिशाला,
जिकडे तिकडे उधळीत मोती, दिव्या वऱ्हाडी गगनी येती;
लाल सुवर्णी झगे घालूनी, हांसत हांसत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबी फेटा, झगमगणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला, हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे, साध्या भोळ्या फुलराणीचे!
गाऊ लागले मंगलपाठ, सृष्टीचे गाणारे भाट;
वाजवी सनई मारुतराणा, कोकीळ घे तानावर ताना!
नाचू लागले भारद्वाज, वाजविती निर्झर पखवाज!
नवरदेव सोनेरी रविकर, नवरीही फुलराणी सुंदर;
लग्न लागते सावध सारे, सावध पक्षी सावध वारे!
दवमय हा अंत:पट फिटला, भेटे रविकर फुलराणीला!
वधूवरांना दिव्य रवांनी, कुणी गाईली मंगलगाणी;
त्यात कुणीसे गुंफीत होते, परस्परांचे प्रेम!अहा ते!
आणिक तेथील वनदेवी ही, दिव्य आपुल्या उछ्वासांही
लिहित होत्या वातावरणी, फुलराणीची गोड कहाणी!
गुंततगुंतत कवि त्या ठायी, स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला, नवगीतांनी फुलराणीला!
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
mhroqgqkele1uqd2xh494lmarexb7xp
मन वढाय वढाय
0
63
232085
150511
2026-06-11T14:10:36Z
QueerEcofeminist
918
"[[मन वढाय वढाय]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
150511
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = मन वढाय वढाय
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[पेरनी पेरनी आले पावसाचे वारे]]
| पुढील = [[अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला]]
| टिपण =
}}
<poem>
मन वढाय वढाय
उभ्या पीकांतलं ढोर,
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर.
मन मोकाट मोकाट
त्याले ठायीं ठायीं वाटा,
जशा वार्यानं चालल्या
पान्यावर्हल्यारे लाटा.
मन लहरी लहरी
त्याले हातीं धरे कोन?
उंडारल उंडारलं
जसं वारा वाहादन.
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर,
आरे इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर !
मन पांखरू पांखरूं
त्याची काय सांगूं मात ?
आतां व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायांत.
मन चप्पय चप्पय
त्याले नहीं जरा धीर,
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर.
मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना,
मन केवढं केवढं ?
त्यांत आभाया मायेना.
देवा, कसं देलं मन
आसं नहीं दुनियांत !
आसा कसा रे यवगी
काय तुझी करामत !
देवा, आसं कसं मन ?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनीं तुले
आसं सपन पडलं !
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:बहिणाबाई चौधरी]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
8vz6tx65iswovy2o4vsz0vlf6wuykly
शून्य मनाचा घुमट
0
73
232095
157024
2026-06-11T14:10:45Z
QueerEcofeminist
918
"[[शून्य मनाचा घुमट]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
157024
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = शून्य मनाचा घुमट
| साहित्यिक = बालकवी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[औदुंबर]]
| पुढील = [[विश्वाचा प्रवास]]
| टिपण =
}}
<poem>
शून्य मनाच्या घुमटांत
कसलें तरि घुमतें गीत;
अर्थ कळेना कसलाही,
विश्रांती परि त्या नाहीं;
वारा वाही,
निर्झर गाई,
मर्मर होई.
परि त्याचे भीषण भूत
घोंघावत फिरतें येथ.
दिव्यरूपिणी सृष्टी जरी
भीषण रूपा एथ धरी;
जग सगळे भीषण होतें
नांदाया मग ये येथें;
न कळे असला,
घुमट बनविला,
कुणीं कशाला?--
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
7y09a9hzjldtx5hkvotcz6xvevkx2fn
सुगरणीचा खोपा
0
94
232099
157064
2026-06-11T14:10:49Z
QueerEcofeminist
918
"[[सुगरणीचा खोपा]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
157064
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = सुगरणीचा खोपा
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| वर्ष =
| विभाग =
| मागील =
| पुढील = [[अरे संसार संसार]]
| टिपण =
}}
<poem>
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला ||१||
पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामध्ये जीव
जीव झाडाले टांगला ||२||
खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे माणसा ||३||
तिची उलीशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुला देले रे देवान
दोन हात दहा बोटं ||४||
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[Category:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
69bwemwrc2e1qqzuhb7zurtlq2k43d2
सौंदर्याचा अभ्यास कर!
0
95
232100
157070
2026-06-11T14:10:50Z
QueerEcofeminist
918
"[[सौंदर्याचा अभ्यास कर!]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
157070
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = सौंदर्याचा अभ्यास कर!
| साहित्यिक = बालकवी
| विभाग =
| मागील = = [[प्रेमलेख]]
| पुढील = [[काल आणि जीवित]]
| वर्ष =
| टिपण =
}}
<poem>
गाणें हें रचिले असें जुळवुनी कोठून कांहींतरी,
वाणी सत्य तुझी असेल भरली द्वेषानलानें जरी;
रम्याकार चमत्कृतिप्रचुर हें ब्रह्मांड नेत्रीं दिसे.
खेळे कांहिंतरीं तयांतुनि, मनीं गाणें तदा होतसे.
सूर्याची किरणें, सुनिर्मल तशा त्या तारकामालिका,
संध्येचे रमणीय रंग, उदयीं सृष्टी मनोहारिका,
वृक्ष श्यामल पुष्पसंकुल चलद्दूर्वादलाच्छादिता,
वाहे शांतपथा सुरम्य सरिता कल्लोलमालायुता;
प्रेमाने अभिषिक्त चित्र मग त्या रामण्यविश्वीं दिसे;
चित्ताची रमणीयता उतरुनी संगीत होतें तसें
तें सौंदर्यच आणीलें जुळवुनी कोठून कांहीतरी.
तूंतें तें न दिसे म्हणून सखया अभ्यास याचा करी.
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[Category:मराठी]]
[[Category:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
k66y116j3pseace00juhef49jqpbq7d
कोठुनि येते मला कळेना
0
464
232063
156924
2026-06-11T14:10:09Z
QueerEcofeminist
918
"[[कोठुनि येते मला कळेना]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156924
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = कोठुनि येते मला कळेना
| साहित्यिक = बालकवी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[संध्यारजनी]]
| पुढील = [[घरटा]]
| टिपण =
}}
<poem>
कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला ।।
येथे नाही तेथे नाही,
काय पाहिजे मिळावयाला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हाका मारी जीव कुणाला?
मुक्या मनाचे मुके बोल हे
घरे पाडिती पण हृदयाला
तीव्र वेदना करिती, परि ती
दिव्य औषधी कसली त्याला !
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
tvdjjctles9iysodav4mgyhvb24jqai
घरटा
0
465
232068
156940
2026-06-11T14:10:19Z
QueerEcofeminist
918
"[[घरटा]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156940
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = घरटा
| साहित्यिक = बालकवी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[कोठुनि येते मला कळेना]]
| पुढील = [[दोष असती जगतात किती याचे]]
| टिपण =
}}
<poem>
घरटा
चिव चिव चिव रे
तिकडे तू कोण रे ?
कपिलामावशी कपिलामावशी
घरटा मोडून तू का जाशी ?
नाही गं बाई मुळीच नाही
मऊ गवत देईन तुशी
कोंबडीताई कोंबडीताई
माझा घरटा पाहिलास बाई ?
नाही गं बाई मुळीच नाही
तुझा माझा संबंध काही
कावळेदादा कावळेदादा
माझा घरटा नेलास बाबा ?
नाही गं बाई चिमणुताई
तुझा घरटा कोण नेई ?
आता बाई पाहू कुठे ?
जाऊ कुठे ? राहू कुठे ?
गरीब बिचाऱ्या चिमणीला
सगळे टपले छळण्याला
चिमणीला मग पोपट बोले
का गं तुझे डोळे ओले?
काय सांगू बाबा तुला
घरटा माझा कोणी नेला
चिऊताई चिऊताई
माझ्या घरट्यात येतेस बाई ?
पिंजरा किती छान माझा
सगळा शीण जाईल तुझा
जळो तुझा पिंजरा मेला
त्याचे नाव नको मला
राहीन मी घरट्याविना
चिमणी उडून गेली राना
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
ag3bl375i0qymdfin477g25opmi69fs
दोष असती जगतात किती याचे
0
466
232078
156961
2026-06-11T14:10:28Z
QueerEcofeminist
918
"[[दोष असती जगतात किती याचे]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156961
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = दोष असती जगतात किती याचे
| साहित्यिक = बालकवी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[घरटा]]
| पुढील = [[ती फुलराणी]]
| टिपण =
}}
<poem>
दोष असती जगतात किती याचे
नसे मजला सामर्थ्य गणायाचे,
दोष माझा परि हाच मला वाटे
दोष बघता सत्प्रेम कसे आटे?
दोष असती जगतात, असायचे
मला त्यांशी तरि काय करायाचे?
प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनेही
शुद्ध होई न जो -दोष असा नाही.
गड्या पुर्णा! मज आस तुझी नाही
सख्या न्युना, ये मार मिठी देही
प्रीति माझ्या ह्रदयात करी वास
न्युनतेला पुर्णत्व द्यावयास!!
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
qfomizdpugqbmssszjm54s0i556fm3d
ती फुलराणी
0
467
232071
156949
2026-06-11T14:10:22Z
QueerEcofeminist
918
"[[ती फुलराणी]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156949
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = ती फुलराणी
| साहित्यिक = बालकवी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[दोष असती जगतात किती याचे]]
| पुढील = [[अनंत]]
| टिपण =
}}
<poem>
हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती, फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात, अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला, अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी, झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला, साध्या भोळ्या फुलराणीला ?
पुरा विनोदी संध्यावात, डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हासत आला, चुंबून म्हणे फुलराणीला-
“छानी माझी सोनुकली ती, कुणाकडे ग पाहत होती ?
कोण बरे त्या संध्येतून, हळुच पाहते डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा, आवडला अमुच्या राणींना ?”
लाजलाजली या वचनांनी, साधी भोळी ती फुलराणी !
आन्दोली संध्येच्या बसुनी, झोके झोके घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल, नभी चमकती ते ग्रहगोल !
जादूटोणा त्यांनी केला, चैन पडेना फुलराणीला;
निजली शेते, निजले रान,, निजले प्राणी थोर लहान.
अजून जागी फुलराणि ही, आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा, काय जाहले फुलराणीला ?
या कुंजातुन त्या कुंजातुन, इवल्याश्या या दिवट्या लावुन,
मध्यरात्रिच्या निवान्त समयी, खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर, निर्झर गातो; त्या तालावर
झुलुनि राहिले सगळे रान, स्वप्नसंगमी दंग होउन!
प्रणयचिंतनी विलीनवृत्ति, कुमारिका ही डोलत होती;
डुलता डुलता गुंग होउनी, स्वप्ने पाही मग फुलराणी
“कुणी कुणाला आकाशात, प्रणयगायने होते गात;
हळुच मागुनी आले कोण, कुणी कुणा दे चुंबनदान !”
प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति, विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमीच्या प्रेमदेवता, वाऱ्यावरती फिरता फिरता -
हळूच आल्या उतरुन खाली, फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवुनि नयनी, त्या वदल्या ही अमुची राणी !
स्वर्गभूमीचा जुळ्वित हात, नाचनाचतो प्रभातवात;
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला, हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गंभीर शान्ती, मंदमंद ये अवनीवरती;
विरू लागले संशयजाल, संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि, हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती, तरीहि अजुनी फुलराणी ती!
तेजोमय नव मंडप केला, लख्ख पांढरा दहा दिशाला,
जिकडे तिकडे उधळित मोती, दिव्य वर्हाडी गगनी येती;
लाल सुवर्णी झगे घालुनी, हासत हासत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबि फेटा, झकमणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला, हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे, साध्या भोळ्या फुलराणीचे !
गाउ लागले मंगलपाठ, सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा, कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर, नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला, भेटे रविकर फुलराणीला !
वधूवरांना दिव्य रवांनी,, कुणी गाइली मंगल गाणी;
त्यात कुणीसे गुंफित होते, परस्परांचे प्रेम ! अहा ते !
आणिक तेथिल वनदेवीही, दिव्य आपुल्या उच्छवासाही
लिहीत होत्या वातावरणी, फुलराणीची गोड कहाणी !
गुंतत गुंतत कवि त्या ठायी, स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला, नवगीतांनी फुलराणीला !
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
mhesvz1sppk2jz5p0qwi50v8at4h6ub
अनंत
0
468
232048
156905
2026-06-11T14:09:50Z
QueerEcofeminist
918
"[[अनंत]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156905
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = अनंत
| साहित्यिक = बालकवी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[ती फुलराणी]]
| पुढील = [[प्रीति हवी तर]]
| टिपण =
}}
<poem>
अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात
अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशिसूर्य अनंत.
वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत,
माप कशाचे, कुणा मोजिता, सर्व अनंत अनंत.
कितेक मानव झटती, करिती हाडाचेही पाणी,
अनंत वसुधा आजवरी हो परी मोजली कोणी!
म्हणोत कोणी ‘आम्ही गणिला हा ग्रह- हा तारा,’
परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा?
विशाल वरती गगन नव्हे, हे विश्वाचे कोठार,
उदात्ततेचा सागर हा, चिच्छांतीचा विस्तार.
कुणी मोजिला, कुणास त्याची लांबीरूंदी ठावी?
फार कशाला दिग्वनिंताची तरी कुणी सांगावी?
अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन,
क्षुद्र मानवा, सांग कशाचा बाळगिसी अभिमान?
तव वैभव हे तुझे धनी ही, हे अत्युच्च महाल,
जातिल का गगनास भेदूनि? अनंत का होतील?
तुझ्या कीर्तिचे माप गड्या का काळाला मोजील!
ज्ञान तुझे तू म्हणशी ‘जाइल’, कोठवरी जाईल?
‘मी’ ‘माझे’ या वृथा कल्पना, तू कोणाचा कोण?
कितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून.
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
lu1eioxtrkr6oplc6mmy7e84bfgs0q0
प्रीति हवी तर
0
469
232082
156979
2026-06-11T14:10:32Z
QueerEcofeminist
918
"[[प्रीति हवी तर]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156979
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = प्रीति हवी तर
| साहित्यिक = बालकवी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[अनंत]]
| पुढील = [[गाणाऱ्या पक्ष्यास]]
| टिपण =
}}
<poem>
प्रीति हवी तर जीव आधि कर अपुला कुरबान,
प्रीति हवी तर तळहातावर घे कापुनि मान !
तलवारीची धार नागिणी लसलसती प्रीत,
याद ठेव अंगार जगाला लाविल निमिषांत !
प्रीति निर्मिली तुला वाटते का दुबळ्यासाठी?
प्रीतिदेवि जगदेकवीर जो जाय तयापाठी !
नव्हे प्रीतिला रंग लाविला लाल गुलाबांचा,
परि रुधिराचा, धडधडणाऱ्या जळत्या जीवाचा.
गुल गुल बोले प्रीति काय ती? काय महालांत?
प्रीति बोलते काळ घालिता कलिजाला हात !
स्त्रैणपणाच्या चार भावना नच पचती ज्याला
हीन जिवाने घेउ नये त्या जहरी प्याल्याला !
सह्य जिवाला होय जाहला जरि विद्युत्पात,
परी प्रीतिचा घात भयंकर दुसरा कल्पांत !
जीवंतपणी मरण घेउनी फिरणे जगतात;
साठविली ब्रम्हांडदाहिनी दाहकता यांत !
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
e0u1yp10daa2insrjfee7m56vrop8m5
गाणाऱ्या पक्ष्यास
0
470
232067
156932
2026-06-11T14:10:18Z
QueerEcofeminist
918
"[[गाणाऱ्या पक्ष्यास]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156932
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = गाणाऱ्या पक्ष्यास
| साहित्यिक = बालकवी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[प्रीति हवी तर]]
| पुढील = [[मेघांचा कापूस]]
| टिपण =
}}
<poem>
समय रात्रीचा कोण हा भयाण!
बळे गर्जे हे त्यांत घोर रान.
अशा समयी छबुकड्या पाखरा तू,
गात अससी; बा काय तुझा हेतू?
गिरी वरती उंच उंच हा गेला,
तमे केले विक्राळ किती याला.
दरी गर्जे, फूत्कार पहा येती,
किती झंझानिल घोर वाहताती.
दीर्घ करिती हे घूक शब्द काही;
क्रूर नादे त्या रान भरुनि जाई.
अशा समयी हे तुझे गोड गाणे
रम्य पक्ष्या, होईल दीनवाणे.
तुझ्या गानाचे मोल नसे येथे,
कुणी नाही संतुष्ट ऐकण्याते;
जगे अपुल्या कानास दिली टाळी,
वृथा मानवी हाव अशा वेळी.
तुझे गाणे हे शांत करी आता,
पहा, गर्जे वन घोर हे सभोंता.
किर्र करिती हे तीक्ष्ण शब्द कीट,
असे त्यांचा या समयि थाटमाट.
पुढे येईल उदयास अंशुमाली,
दिशा हसतील वन धरिल रम्य लाली.
हरिणबाळे फिरतील सभोवार,
तदा येवो गाण्यास तुझ्या पूर.
तुझे भ्राते दिसतील एक ठायी,
हरित कुंजी ज्या हास्य पूर्ण काही.
वदुनि त्यांच्या सह रम्य गीत बा रे,
मधुर नादे वन भरुनि टाक सारे.
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
5cbn1cbn5qx74uzl3ybvey7lyd387ru
स्फूर्ती
0
472
232101
157071
2026-06-11T14:10:51Z
QueerEcofeminist
918
"[[स्फूर्ती]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
157071
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = स्फूर्ती
| साहित्यिक = केशवसुत
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[साहित्यिक:केशवसुत]]
| पुढील = [[तुझे नाम मुखी]]
| टिपण =
}}
<poem>
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
प्राशन करिता रंग जगाचे कणोकणी ते बदलू द्या !
अमुच्या भाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची,
म्हणेल जग आम्हांस मद्यपि पर्वा कसली मग याची !
जिव्हेची बंधने तर ढिली करा तीव्र या पेयाने,
यदुष्णतेने द्यावापृथ्वी द्रवुनि मिसळती वेगाने !
होउनिया मग दंग मनी,
व्हावे ते आणा ध्यानी,
गा मग सुचतिल ती गाणी,
परिसुनी त्यांचे शब्द, रुढीचे द्यास झणी ते खवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
सोमाचा रस वेदकाळच्या ऋषिवर्यांनी उकळीला,
शेष तयाचा द्या तर लौकर पिपासु जे त्या आम्हाला !
औचित्याच्या फोल विवेका, जा निघ त्या दुरवस्थेने
अम्हा घेरिले म्हणुनी घेतो झिंगुनिया या पानाने !
क्लृप्तीची मग करुनी नौका व्योमसागरावरी जाऊ
उडुरत्ने ती गरीब धरेला तेथुन फेकुनिया देऊ !
अडवतील जर देव, तरी
झगडू त्यांच्याशी निकरी
हार न खाऊ रतीभरी !
देवदानवा नरे निर्मीले हे मत लोकां कवळू द्या !
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
पद्यपंक्तीची तरफ आमुच्या की विधीने दिली असे,
टेकुनि ती जनताशीर्षावरी जग उलथुन या देउ कसे !
बंडाचा तो झेंडा उभवुनी धामधूम जिकडे तिकडे.
उडवुनि देऊनि जुलुमाचे या करु पहा तुकडे तुकडे !
महादेव ! हरहर ! समराचा गर्जत तो वाऱ्यावरती
येउनि घुमतो अमुच्या कर्णी ..निजती ते ठारची मरती !
उठा उठा बांधा कमरा
मारा किंवा लढत मरा
सत्वाचा उदयोस्तु करा !
छंद फंद उच्छृंखल अमुचे स्तीमित जगाला ढवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
g689zomjhcixqkbluq5goec2sgujzoh
तुझे नाम मुखी
0
473
232073
156950
2026-06-11T14:10:23Z
QueerEcofeminist
918
"[[तुझे नाम मुखी]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156950
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = तुझे नाम मुखी
| साहित्यिक = केशवसुत
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[स्फूर्ती]]
| पुढील = [[तुतारी]]
| टिपण =
}}
<poem>
तुझे नाम मुखी ध्यान तुझे डोळा
व्रुत्ती या चंचळा स्थिरावल्या॥
चिंता भय दुःखे अवघी दूर झाली
अनाथांचा वाली जवळी केला॥
भिकार या जगी इच्छित न मिळे काही
म्हणुनी तुझे पायी भिक्शां-देहि॥
केशवसुत म्हणे देवा दीन-नाथा
तुझे पायी माथा वाहियेला॥
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
s7ph8qy0w0w513yxkmsgqgiqj54pt9w
तुतारी
0
474
232074
156951
2026-06-11T14:10:24Z
QueerEcofeminist
918
"[[तुतारी]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156951
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = तुतारी
| साहित्यिक = केशवसुत
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[तुझे नाम मुखी]]
| पुढील = [[रांगोळी घालतांना पाहून]]
| टिपण =
}}
<poem>
एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मज आणूनी
अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?
रुढी, जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने ह्या सावध व्हा तर!
चमत्कार! ते पुराण तेथुनी
सुंदर, सोज्वळ गोड मोठे
अलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी
जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!
धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!
धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थ्रिर
हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर
नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!
घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्न्तीचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!
पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
lum7lyqcwr0ok63mm0wrjq4a41lb3zq
रांगोळी घालतांना पाहून
0
475
232092
156998
2026-06-11T14:10:42Z
QueerEcofeminist
918
"[[रांगोळी घालतांना पाहून]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156998
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = रांगोळी घालतांना पाहून
| साहित्यिक = केशवसुत
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[तुतारी]]
| पुढील = [[सतारीचे बोल]]
| टिपण =
}}
<poem>
होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,
बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;
तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;
रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.
आधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,
मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;
पद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,
देवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.
होती मंजुळ गीत गात वदनी अस्पष्ट काही तरी,
गेला दाटुनी शांत तो रस अहा तेणे मदभ्यंतरी;
तीर्थे, देव, सती, मुनी, नरपती, देवी तशा पावना,
अंतर्दृष्टिपुढूनिया सरकल्या, संतोष झाला मना!
चित्रे मी अवलोकिली रुचिर जी, काव्ये तशी चांगली,
त्यांही देखिल न स्मरेच इतुकी मद्वृत्ति आनंदली;
लीलेने स्वकरे परंतु चतुरे! तू काढिल्या आकृती,
त्या या पाहुनि रंगली अतिशये आहे मदीया मति.
रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये! मला वाटतो,
स्पष्टत्वे इतुक्या अशक्य मिळणे काव्यात, चित्रात तो;
स्वर्भूसंग असा तयात इतुक्या अल्पावकाशी नसे
कोणी दाखविला अजून सुभगे! जो साधिला तू असे.
आदित्यादिक आकृती सुचविती दिव्यत्व ते उज्ज्वल,
तैसे स्वस्तिक सूचवी सफलता धर्मार्थकामांतिल;
पावित्र्याप्रत गोष्पदे, तुळसही, शोभेस ही सारसे,
पुष्पे प्रीतिस, चक्र हे सुचविते द्वारी हरी या असे!
तत्त्वे मंगल सर्वही विहरती स्वर्गी तुझ्या या अये!
आर्ये! तू उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वये.
नाते, स्नेह, निदान ओळख जरी येथे मला आणिती,
होतो मी तर पाद सेवुनी तुझे रम्य स्थळी या कृती!
चित्ती किल्मिष ज्याचिया वसतसे ऐशा जनालागुनी
या चिन्हांतुनि हा निषेध निघतो आहे गमे मन्मनी-
“जा मागे अपुल्या, न दृष्टि कर या द्वाराकडे वाकडी,
पापेच्छूवरि हे सुदर्शन पहा आणिल की साकडी!”
“आहे निर्मल काय अन्तर तुझे? मांगल्य की जाणसी?
लोभक्षोभजये उदात्त हृदयी व्हायास का इच्छिसी?
ये येथे तर, या शुभाकृति मनी घे साच अभ्यासुनी.”
आर्ये स्वागत हे निघे सरळ या त्वल्लेखनापासुनी.
साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणे तयी शाहणे,
कोठे स्वर्गसमक्षता प्रकटते ते नेहमी पाहणे!
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
ehz2h9axk60db9f3hxqfv04vtvrwkj8
सतारीचे बोल
0
476
232098
157055
2026-06-11T14:10:48Z
QueerEcofeminist
918
"[[सतारीचे बोल]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
157055
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = सतारीचे बोल
| साहित्यिक = केशवसुत
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[रांगोळी घालतांना पाहून]]
| पुढील = [[आम्ही कोण?]]
| टिपण =
}}
<poem>
काळोखाची रजनी होती
हदयी भरल्या होत्या खंती
अंधारातचि गढले सारे
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे
विमनस्कपणे स्वपदे उचलित,
रस्त्यातुन मी होतो हिंडत,
एका खिडकीतुनि सूर तदा
पडले…. दिड दा, दिड दा, दिड दा …..
जड हृदयी जग जड हे याचा,
प्रत्यय होता प्रगटत साचा
जड ते खोटे हे मात्र कसें
ते न कळे, मज जडलेच पिसे
काय करावे, कोठे जावे,
नुमजे मजला की विष खावे
मग मज कैसे रुचतील वदा
ध्वनि ते …. दिड दा, दिड दा, दिड दा …..
सोसाट्याचे वादळ येते
तरि ते तेव्हा मज मानवते
भुते भोवती जरी आरडती
तरि ती खचितचि मज आवडती
कारण आतिल विषण्ण वृत्ती
बाह्य भैरवी धरिते प्रीती,
सहज कसे तिज करणार फिदा
रव ते …. दिड दा, दिड दा, दिड दा …..
ऐकुनी तो मज जो त्वेष चढे
त्यासरशी त्या गवाक्षाकडे
मूठ वळुनि मी हात हिसकिला
पुटपुटलोही अपशब्दांला
महटले आटप आटप मूर्खा
सतार फोडुनि टाकिसी न का
पिरपिर कसली खुशालचंदा
करिसी …. दिड दा, दिड दा, दिड दा …..
सरलो पुढता चार पावले
तो मज न कळे काय जाहले
रुष्ट जरी मी सतारीवरी
गति मम वळली तरि माघारी
ध्वनिजाली त्या जणू गुंतलो
असा स्ववशता विसरुन बसलो..
एका ओट्यावरी स्थिर तदा
ऐकत …. दिड दा, दिड दा, दिड दा …..
तेथ कोपरे अंकी टेकुनि
करांजलीला मस्तक देउनि
बसलो, इतक्यामाजी करुणा…
रसपूर्ण गती माझ्या श्रवणा
आकर्षुनि घे, हदय निघाले
तन्मय झाले द्रवले, आले
लोचनातुनी तोय कितिकदा
ऐकत असता …. दिड दा, दिड दा …..
स्कंधी माझ्या हात ठेवुनी
आश्वासी मज गमले कोणी,
म्हणे.. खेद का इतुका करिसी
जिवास का बा असा त्राससी
धीर धरी रे धीरा पोटी
असती मोठी फळे गोमटी
ऐक मनीच्या हरितील गदा
ध्वनि हे ….दिड दा, दिड दा, दिड दा …..
आशाप्रेरक निघू लागले
सूर तधी मी डोळे पुशिले
वरती मग मी नजर फिरवली
नक्षत्रे तो अगणित दिसली
अस्तित्वाची त्यांच्या नव्हती
हा वेळवरी दादच मज ती
तम अल्प..द्युति बहु या शब्दा
वदती रव ते दिड दा, दिड दा …..
वाद्यातुनि त्या निघती नंतर
उदात्ततेचे पोषक सुस्वर
तो मज गमले विभूति माझी
स्फुरत पसरली विश्वामाजी,
दिक्कालांसह अतित झालो,
उगमी विलयी अनंत उरलो
विसरुनि गेलो अखिला भेदां
ऐकता असता …. दिड दा, दिड दा …..
प्रेमरसाचे गोड बोल ते
वाद्य लागता बोलायाते
भुललो देखुनि सकलहि सुंदर
सुरांगना तो नाचति भूवर
स्वर्ग धरेला चुंबायाला
खाली लवला… मजला गमला
अशा वितरिती अत्यानंदा
ध्वनि ते …. दिड दा, दिड दा, दिड दा …..
शांत वाजली गती शेवटी,
शांत धरित्री शांत निशा ती
शांतच वारे, शांतच तारे
शांतच हृदयी झाले सारे
असा सुखे मी सदना आलो
शांतीत अहा झोपी गेलो
बोल बोललो परी कितिकदा
स्वप्नी …. दिड दा, दिड दा, दिड दा …..
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
9jds99ubtwn8jnvsc3iur6bkd66abx7
आम्ही कोण?
0
477
232052
156911
2026-06-11T14:09:55Z
QueerEcofeminist
918
"[[आम्ही कोण?]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156911
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = आम्ही कोण?
| साहित्यिक = केशवसुत
| वर्ष = १९०१
| विभाग =
| मागील = [[सतारीचे बोल]]
| पुढील = [[]]
| टिपण =
}}
<poem>
आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके
सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया-
सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!
शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!
आम्हांला वगळा – गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा – विकेल कवडीमोलावरी हे जिणे!
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
rpgylkq3xpcwp3uf44o29emx0x368xh
केशवसुत मेले?
0
478
232061
156922
2026-06-11T14:10:06Z
QueerEcofeminist
918
"[[केशवसुत मेले?]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156922
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = केशवसुत मेले?
| साहित्यिक = राम गणेश गडकरी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[]]
| पुढील = [[केशवसुतांची कविता वाचून]]
| टिपण =
}}
<poem>
जगतास जागवायाला केशवसुत गाउनि गेले !
इंग्लंद भूमि शेलेची माहेर जडाचें बनले,
सन्देश गूढ जे त्याचे तैसेच मानसीं जिरले,
तपोवना मानवतेच्या या बघतां मानस हंसले!
देवाचे हेतु न पुरले,
अर्धेच कार्य जे उरले,
ते येथे करुनी गेले,
अवतरुनी फिरुनी शेले ! केशवसुत गाउनि गेले!
एकेका शब्दें भरले काव्याचे अद्भुत पेले !
ज्यांसाठीं मानव झटले, ते सुधाकुंभ भरलेले–
वाग्देवी वरुनी टाकी केशवसुतहृदयी झेले!
अनुभवुनि निजानंदाने
मग त्यांचे के ले गाणे,
श्वासाच्या कारंज्याने
चहुंकडे उधळुनी दिधले! केशवसुत गाउनि गेले !
हे तुषार पडतां अंगी बिंदूंचे सिंधू झाले!
निजलेल्या जागृति आली, हो ताजें जें थकलेले!
मरणासचि आले मरणें, मग केले त्यानें काळे!
तों शब्द मुक्याला सुचले !
गूढास रूप सापडले !
स्वच्छंद अचेतन हाले !
नश्वर ते ईश्वर केले ! केशवसुत गाऊनि गेले !
भेदभाव विलया गेला, सूक्ष्मात स्थूल मिळाले !
गगनाचे फाटुनि पडदे दिसलें जें त्यापलिकडले !
मरणाचे मूळच तुटले, जन्माचे नाते सुटले !
वस्तुंत वस्तुपण भरलें,
जीवंत जीवही झाले,
आत्म्यास आत्मपद आले,
ब्रह्मही ब्रह्मसे ठरले ! केशवसुत गाऊनि गेले !
कळले की ‘आम्ही कोण !, ‘हरपले श्रेय ‘ सापडलें;
आत्मा हो ‘वेडापीर’, सृष्टीत ‘ भृंग ‘ सा रंगे;
मारुनिया ‘गोंफण’ काळा निज ‘निशाण’ नभिं फडकविंले !
ऐकताच विजयि ‘तुतारी’
हो चिरंजीव ‘म्हातारी’
मग वाजविताच ‘सतारी’
सर्वत्र ‘झपूर्झा ‘ झाले ! केशवसुत गाउनि गेले !
या स्थितीत त्या ब्रह्माची ब्रह्माशीं मिळणी घडली,
जे चिरंतनाच्यासाठी सांगता तयाची झाली.
परि जनता वेडी कुठली, ” केशवसुत मेले ” वदली !
परि जन्ममरण हे वारे
कल्पनाच नाचवि सारे !
मूर्खानों ! रडता का रे,
की ”केशवसुत ते मेले ! ” केशवसुत गाउनि गेले !
जे एकाठायी होते, ते सर्वांठायीं भरले;
सर्वांच्या हृदयीं भरले सर्वांच्या जीवी भिनले;
विश्व स्थिर ज्यांनी केले का वदता तेच निमाले?
लीलेनें त्यांनी गातां
ही सजीव केली जडता,
अणुरेणूंमधुनी आतां
निघतील तयांचे चेले ! केशवसुत गाउनि गेले !
सर्व ठायि सर्वही काळी सर्वांनी त्यास पहावें,
पाहतां पाहतां वाटे डोळयांनी ज्यास गिळावें,
तो विषय होई मरणाचा जन बोले काय करावें ?
जे चकव्यावाचुनि चकले,
जरि ते कुणि कांहीं भकले,
तरि ‘गोविंदाग्रज’ बोले
केशवसुत कसले मेले? केशवसुत गातचि बसले !
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
dl002pznv2xupq297n2jeq1aztlidyh
केशवसुतांची कविता वाचून
0
479
232062
156923
2026-06-11T14:10:07Z
QueerEcofeminist
918
"[[केशवसुतांची कविता वाचून]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156923
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = केशवसुतांची कविता वाचून
| साहित्यिक = राम गणेश गडकरी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[केशवसुत मेले?]]
| पुढील = [[रात्रीस ओरडणा-या घुबडास]]
| टिपण =
}}
<poem>
शिवरायाच्या मागें आम्ही लालमहालीं फिरणें
तसेंच तुमच्या मागें आम्ही नवीन कविता करणें
असेंच कांही कांही करुनी जीवित त्याला गणणें
'गोविंदाग्रज' म्हणे असे हे आम्हां लाजिरवाणें
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
01a5v6i83dr2sakx5hgqc8qrhvhqo80
आनंदी आनंद गडे
0
941
232051
156910
2026-06-11T14:09:53Z
QueerEcofeminist
918
"[[आनंदी आनंद गडे]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156910
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = [[आनंदी आनंद गडे]]
| साहित्यिक = बालकवी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[मंगलमय प्रेमकवन]]
| पुढील = [[औदुंबर]]
| टिपण =
}}
<poem>
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे || धृ.||
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे || १ ||
सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे || २ ||
नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे || ३ ||
वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे || ४ ||
स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे || ५ ||
<poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग: बालकवी यांचे साहित्य]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
siw2btj6hid4745yj40v3b5762ouzar
अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
0
1700
232049
150486
2026-06-11T14:09:51Z
QueerEcofeminist
918
"[[अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
150486
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| विभाग =
| मागील = [[मन वढाय वढाय]]
| पुढील = [[जीव देवानं धाडला]]
| टिपण =
}}
<poem>
अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला !
पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला !
सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर
तिले जाल्माचा संगती मिये गाण्य गम्प्या नर
खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा!!
तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ
तुला देले रे देवान दोन हात दहा बोटं ???
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:बहिणाबाई चौधरी]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
mha88y38e9f2joxdrfu6d8v208mj3s8
जीव देवानं धाडला
0
1701
232070
150489
2026-06-11T14:10:21Z
QueerEcofeminist
918
"[[जीव देवानं धाडला]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
150489
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| विभाग =
| मागील = [[अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला]]
| पुढील = [[माझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर]]
| टिपण =
}}
<poem>
जीव देवानं धाडला जल्म म्हणे 'आला आला'
जव्हा आलं बोलावणं मौत म्हणे 'गेला गेला'
दीस गेला कामामधी रात नीजमधी गेली
मरणाची नीज जाता जलमाची जाग आली
नही सरलं सरलं जीव तुझ येन जान
जसा घडला मुक्काम त्याले म्हनती रे जीन
आला सास, गेला सास जीव तुझं रे तंतर
अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर!
येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप
काम करता करता देख देवाजीच रूप
ऐक ऐक माझ्या जीवा पीडयेलाच कण्हणं?
देरे गांजल्याले हात त्याच ऐक रे म्हनन
अरे निमानतोंडयाच्या वढ पाठीवर्हे धांडा
नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झालझेंडा
हास हास माझ्या जीवा असा संसारात हास
इडा पीडा संकटाच्या तोंडावर्हे काय फास
जग जग माझ्या जीवा असा जगणं तोलाचं
उच्च गगनासारख धरीत्रीच्या रे मोलाचं
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:बहिणाबाई चौधरी]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
ozmxiv3r158l1zungvixrvwz3sn4wnr
माझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर
0
1702
232087
150514
2026-06-11T14:10:37Z
QueerEcofeminist
918
"[[माझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
150514
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| विभाग =
| मागील = [[जीव देवानं धाडला]]
| पुढील = [[माझी माय सरसोती]]
| टिपण =
}}
<poem>
माझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर
माझं इठ्ठल रखूमाई उभे इटेवर
टाय वाजे खनखन मुरदुंगाची धुन
तथे चाललं भजन गह्यरी गह्यरीसन
टायकर्यांचा जमाव दंगला दंगला
तुकारामाचा अभंग रंगला रंगला
तुम्ही करा रे भजन ऐका रे कीर्तन
नका होऊं रे राकेस सुद्ध ठेवा मन
आता सरला अभंग चालली पावली
जे जे इठ्ठल रखूमाई ईठाई माऊली
शेतामंदी गये घाम हाडं मोडीसनी
आतां घ्या रे हरीनाम टाया पीटीसनी
उभा भक्तीचा हा झेंडा हरीच्या नांवानं
हा झेंडा फडकावला झेंडूला बोवानं
आतां झाली परदक्षीना भूईले वंदन
हेचि दान देगा देवा आवरलं भजन
आतां फिरली आरती भजन गेलं सरी
बह्यना देवाचीया दारीं उभी क्षनभरी
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:बहिणाबाई चौधरी]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
9i1b78z73v733rf8k3h1eqzd9w3f4by
माझी माय सरसोती
0
1703
232088
150508
2026-06-11T14:10:38Z
QueerEcofeminist
918
"[[माझी माय सरसोती]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
150508
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| विभाग =
| मागील = [[माझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर]]
| पुढील = [[आशी कशी येळी व माये]]
| टिपण =
}}
<poem>
माझी माय सरसोती माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली !!
माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता --भागवत
पावात समावत आणि मातीमधी उगवत !!
आरे देवाचं दर्सन झालं झालं आपसुक
हिरीदात सुर्याबापा दाये अरूपाच रूप !!
तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी
देवा तुझ येनजान वारा सांगे कानामधी !!
फुलामधी समावला धरत्रीचा परमय
माझ्या नाकाले इचारा नथनीले त्याचं काय !!
किती रंगवशी रंग रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरिरंग रंग खेये आभायात !!
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:बहिणाबाई चौधरी]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
97rx2ulu4bz184uot3mgzf1w54ntmhq
आशी कशी येळी व माये
0
1704
232055
150488
2026-06-11T14:09:59Z
QueerEcofeminist
918
"[[आशी कशी येळी व माये]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
150488
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| विभाग =
| मागील = [[माझी माय सरसोती]]
| पुढील = [[मानूस मानूस मतलबी रे मानसा]]
| टिपण =
}}
<poem>
आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?
बारा गाडे काजळ कुंकू पुरल नहीं लेनं
साती समदुराचं पानी झालं नही न्हानं
आशी कशी येळी व माये, आशी कशी येळी?
धरतीवरलं चांदी सोनं डागीन्याची तूट
आभायाचं चोयी लुगडं तेभी झालं थिटं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
इडा पिडा संकटाले देल्हा तूनें टाया
झाल्या तुझ्या गयामंधीं नरोंडाच्या माया
आशी कशी येळी व माये , आशी कशी येळी?
बरह्मा इस्नू रुद्र बाळ खेळईले वटीं
कोम्हायता फुटे पान्हा गानं आलं व्होटीं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
नशीबाचे नऊ गिर्हे काय तुझ्या लेखीं?
गिर्ह्यानाले खाईसनी कशी झाली सुखी ?
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
नऊ झनासी खाउन गेली सहज एक्या गोष्टी
दहाव्याशी खाईन तेव्हां कुठें राहिन सृष्टीं
आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी?
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:बहिणाबाई चौधरी]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
4djmar9digtnxfzxnb85c0htj55iphd
मानूस मानूस मतलबी रे मानसा
0
1705
232089
150505
2026-06-11T14:10:39Z
QueerEcofeminist
918
"[[मानूस मानूस मतलबी रे मानसा]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
150505
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| विभाग =
| मागील = [[आशी कशी येळी व माये]]
| पुढील = [[लपे करमाची रेखा]]
| टिपण =
}}
<poem>
मानूस मानूस मतलबी रे मानसा,
तुले फार हाव तुझी हाकाकेल आशा मानसा मानसा,
तुझी नियत बेकार तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर भूलीसनी जातो सूद खाईसनी चारा
गायम्हैस देते दूध मतलबासाठीं मान मानूस डोलये
इमानाच्यासाठीं कुत्रा शेंपूट हालये मानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:बहिणाबाई चौधरी]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
cevlmpi1tpcki1xyk2hn7ht48c5u084
लपे करमाची रेखा
0
1706
232093
150502
2026-06-11T14:10:43Z
QueerEcofeminist
918
"[[लपे करमाची रेखा]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
150502
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| विभाग =
| मागील = [[मानूस मानूस मतलबी रे मानसा]]
| पुढील = [[दया नही मया नही]]
| टिपण =
}}
<poem>
लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली
पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली
देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला
धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला
बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या
नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या
अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले
नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले
राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन
त्यात आले रे नशीब काय सान्गे पंचागन
नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू
माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:बहिणाबाई चौधरी]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
g3yj7xk4j3ydxy7mrftmlfm838y52kb
दया नही मया नही
0
1707
232076
150498
2026-06-11T14:10:26Z
QueerEcofeminist
918
"[[दया नही मया नही]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
150498
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| विभाग =
| मागील = [[लपे करमाची रेखा]]
| पुढील = [[संसारबरा]]
| टिपण =
}}
<poem>
दया नही मया नही, डोयाले पानी
गोगलगायच्या दुधाचं काढा वो लोनी
केसावार रुसली फनी
एकदा तरी घाला माझी येनी
कर्याले गेली नवस
आज निघाली आवस
आग्या टाकीसनी चुल्हा पेटत नही
टाया पिटीसनी देव भेटत नही
पोटामधी घान, होटाले मलई
मिय्याच्या तांब्याले भाइरून कल्हई
तवा खातो भाकर, चुल्हा भुकेला
पव्हारा पेतो पानी, राहाट तान्हेला
मानसानं घडला पैसा
पैशासाठी जीव झाला कोयसा
मानूस मोठा हिकमती, याचं घोंगडं त्याच्यावर
दगडाचा केला देव शेंदूराच्या जीवावर
डोयाले आली लाली
चस्म्याले औसदी लावली
वडगन्याले ठान नही
घरकोंबड्याले ग्यान, नही घरजवायाले मान नही
म्हननारानं म्हन केली
जाननाराले अक्कल आली
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:बहिणाबाई चौधरी]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
81o7e9j5ddp4p1jjxh4tql4e2hld4an
खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी
0
1937
232066
156925
2026-06-11T14:10:17Z
QueerEcofeminist
918
"[[खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156925
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी
| साहित्यिक = कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
| वर्ष =
| विभाग =
| मागील =
| पुढील =
| टिपण =
}}
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (१८७२ - १९४८) ह्यांचा १९११ सालातल्या ''संगीत मानापमान'' मधील हे पद ज्यास गोविंदराव टेंभे ह्यांनी संगीतबद्ध केले आहे.
==पद==
<poem>
खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी ॥
नभि जनहितरत भास्कर तापत
विकसत पहा नलिनी ॥
पिडित जन देखता, स्वसुखा त्यागी दया
जनभयहरण हेचि सुख, सदया देवराया
दर्शन गुणवंताचे नाचवी प्रेमलहरी
गुणरसपान हेचि सुख, प्रेम तया नाव जनी ॥
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[Category:मराठी कविता]]
[[Category:मराठी गीते]]
[[वर्ग:नाट्यसंगीत]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
27biiu22tn9jczxjs7083596mlbajv0
रवि मी
0
1945
232091
156997
2026-06-11T14:10:41Z
QueerEcofeminist
918
"[[रवि मी]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156997
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = रवि मी
| साहित्यिक = कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
| वर्ष =
| विभाग =
| मागील =
| पुढील =
| टिपण =
}}
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (१८७२ - १९४८) ह्यांचा १९११ सालातल्या ''संगीत मानापमान'' मधील हे पद ज्यास गोविंदराव टेंभे ह्यांनी संगीतबद्ध केले आहे.
==पद==
<poem>
रवि मी, हा चंद्र कसा मग मिरवितसे लावित पिसे ॥
त्या जे न साधे गगनी, गमे ते साधेचि तव या वदनी ।
अबलाबल नव हे भासे ॥
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[Category:मराठी कविता]]
[[Category:मराठी गीते]]
[[वर्ग:नाट्यसंगीत]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
bwu5ggs3t34c3yab27uo4wrpwrdyyww
मला मदन भासे हा
0
1946
232086
222551
2026-06-11T14:10:37Z
QueerEcofeminist
918
"[[मला मदन भासे हा]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
222551
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = मला मदन भासे हा
| साहित्यिक = कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
| वर्ष =
| विभाग =
| मागील =
| पुढील =
| टिपण =
}}
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (१८७२ - १९४८) ह्यांचा १९११ सालातल्या ''संगीत मानापमान'' मधील हे पद ज्यास गोविंदराव टेंबे ह्यांनी संगीतबद्ध केले आहे.
==पद==
<poem>
मला मदन भासे हा मोही मना ।
मानी जना या भामामना ॥
करी सनाथा मज; तुडवी हा चरणरजासम, मानी मना ॥
प्रीतचि पाया रणप्रासादा; दे पदसेवा प्रेमीजना ॥
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[Category:मराठी कविता]]
[[Category:मराठी गीते]]
[[वर्ग:नाट्यसंगीत]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
adbhoixv2a3113wee6lun4t6to4nlja
शूरा मी वंदिले
0
1947
232096
157025
2026-06-11T14:10:46Z
QueerEcofeminist
918
"[[शूरा मी वंदिले]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
157025
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = शूरा मी वंदिले
| साहित्यिक = कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
| वर्ष =
| विभाग =
| मागील =
| पुढील =
| टिपण =
}}
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (१८७२ - १९४८) ह्यांचा १९११ सालातल्या ''संगीत मानापमान'' मधील हे पद ज्यास गोविंदराव टेंभे ह्यांनी संगीतबद्ध केले आहे.
==पद==
<poem>
शूरा मी वंदिले ।
धारातीर्थी तप जे आचरती ।
सेनापति यश याचि बले ॥
शिरकमला समरी अर्पिती ।
जनहित पूजन वीरा सुखशांती ।
राज्य सुखी या साधुमुळे, वंदिले ॥
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[Category:मराठी कविता]]
[[Category:मराठी गीते]]
[[वर्ग:नाट्यसंगीत]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
6ec8b8y2346xj96ee9jnel3py2wvxjp
युवतिमना दारुण रण
0
1948
232090
156996
2026-06-11T14:10:40Z
QueerEcofeminist
918
"[[युवतिमना दारुण रण]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
156996
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = युवतिमना दारुण रण
| साहित्यिक = कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
| वर्ष =
| विभाग =
| मागील =
| पुढील =
| टिपण =
}}
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (१८७२ - १९४८) ह्यांचा १९११ सालातल्या ''संगीत मानापमान'' मधील हे पद ज्यास गोविंदराव टेंभे ह्यांनी संगीतबद्ध केले आहे.
==पद==
<poem>
युवतिमना दारुण रण रूचिर प्रेमसे झाले ।
रणभजना संसारी असे अमर मी केले ॥
रमणिमनहंसा नर साहस सरसी रमवी;
शूर तोचि, विजय तोचि, हे शुभ यश मज आले ॥
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[Category:मराठी कविता]]
[[Category:मराठी गीते]]
[[वर्ग:नाट्यसंगीत]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]{{साचा:स्त्रोत नसलेली पाने}}
bnh59hms8950bxewtikxcgfzrxkzk1f
श्रावणमासी हर्ष मानसी
0
2013
232097
230512
2026-06-11T14:10:47Z
QueerEcofeminist
918
"[[श्रावणमासी हर्ष मानसी]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
230512
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = [[श्रावणमासी हर्ष मानसी]]
| साहित्यिक = बालकवी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[आनंदी आनंद गडे]]
| पुढील = [[मंगलमय प्रेमकवन]]
| टिपण =
}}
<poem>
श्रावणमासी हर्ष मानसी
__________________
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे.
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे.
झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर ऊंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे.
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रुप महा
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळची ते
उतरूनी येती अवनीवरती ग्रहगोलची की एकमते
फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पावा गाई तयाचा श्रावणमहिमा एक सुरे
सुवर्णचंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजात हि बघता भामा रोष मनीचा मावळला
सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला त्या फुलमाला रम्य फुलेपत्री खुडती
देव दर्शना निघती ललना हर्ष मावेना ह्रदयात
वदनी त्यांच्या वाचुन घ्य़ावे श्रावण महिन्याचे गीत
कवी: बालकवी. (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग: बालकवी यांचे साहित्य]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
nietzny1ld9e1ay15vui74t6jwsbe9w
कणा
0
2512
232047
124972
2026-06-11T13:28:50Z
Lily765458
6066
/* */
232047
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = कणा
| साहित्यिक = कुसुमाग्रज
| वर्ष = १९०१
| विभाग =
| मागील = [[आम्ही कोण?]]
| पुढील = [[]]
| टिपण =
}}
"ओळखलंत का सर मला?" पावसात आला कोणी,<br/>
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी,<br/>
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलाला वरती पाहून, <br/>
गंगामाई आली पाहुणी, गेली घरट्यात राहून, <br/>
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,<br/>
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली,<br/>
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले,<br/>
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले,<br/>
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे,<br/>
पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे,<br/>
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,<br/>
पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला,<br/>
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,<br/>
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. <br/>
... <br/>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
mkfapsk69d8sjckfrchvqls97kiwm9o
232058
232047
2026-06-11T14:10:02Z
QueerEcofeminist
918
"[[कणा]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
232047
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = कणा
| साहित्यिक = कुसुमाग्रज
| वर्ष = १९०१
| विभाग =
| मागील = [[आम्ही कोण?]]
| पुढील = [[]]
| टिपण =
}}
"ओळखलंत का सर मला?" पावसात आला कोणी,<br/>
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी,<br/>
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलाला वरती पाहून, <br/>
गंगामाई आली पाहुणी, गेली घरट्यात राहून, <br/>
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,<br/>
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली,<br/>
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले,<br/>
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले,<br/>
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे,<br/>
पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे,<br/>
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,<br/>
पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला,<br/>
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,<br/>
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. <br/>
... <br/>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
mkfapsk69d8sjckfrchvqls97kiwm9o
जन पळभर म्हणतील, हाय हाय
0
10313
232069
53586
2026-06-11T14:10:20Z
QueerEcofeminist
918
"[[जन पळभर म्हणतील, हाय हाय]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
53586
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = जन पळभर म्हणतील, 'हाय हाय
| साहित्यिक = भास्कर रामचंद्र तांबे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील =
| पुढील =
| टिपण =
| वर्ष =
}}
जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!'
मी जातां राहील कार्य काय।।
सूर्य तळपतील चंद्र झळकतील।
तारे अपुला क्रम आचरतील।।
असेच वारे पुढे वाहतील।
होईल कांहिं का अंतराय।।
मेघ वर्षतील शेतें पिकतील।
गर्वानें या नद्या वाहतील।।
कुणा काळजी कीं न उमटतील।
पुन्हा तटावर हेच पाय।।
सगे सोयरे डोळे पुसतील।
पुन्हा आपल्या कामी लागतील।।
उठतील बसतील हसुनि खिदळतील।
मी जातां त्यांचें काय जाय।।
राम कृष्णही आले गेले।
तयां विना हे जग ना अडले।।
कुणीं सदोदित सूतक धरिलें।
मग काय अटकलें मजशिवाय।।
अशा जगास्तव काय कुढावें ।
मोहिं कुणाच्या कां गुंतावें।।
हरिदूता कां विन्मुख व्हावें ।
कां जिरवुं नये शांतींत काय।।
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:भास्कर रामचंद्र तांबे]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
pov3qv63czqj3jv82xo51xj9d1fg51y
तीनी सांजा सखे, मिळाल्या, देई वचन तुला
0
10314
232072
40209
2026-06-11T14:10:22Z
QueerEcofeminist
918
"[[तीनी सांजा सखे, मिळाल्या, देई वचन तुला]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
40209
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = [[तीनी सांजा सखे, मिळाल्या, देई वचन तुला]]
| साहित्यिक = [[भास्कर रामचंद्र तांबे)]]
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[]]
| पुढील = [[]]
| टिपण =
}}
<poem>
तीनी सांजा सखे, मिळाल्या, देई वचन तुला <br>
आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला <br>
कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा <br>
चक्रवाल हे पवित्र, ये जी शांत गभीर निशा<br>
त्रिलोकगामी मारुत, तैशा निर्मल दाहि दिशा<br>
साक्षी ऐसे अमर करुनि हे तव कर करिं धरिला<br>
नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत<br>
गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षांत<br>
पाणि जसे मोत्यांत, मनोहर वर्ण सुवर्णांत<br>
हृदयीं मी साठवीं तुज तसा जीवित जो मजला<br>
<poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:भास्कर रामचंद्र तांबे]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
or3wejeuvpyvfpba8rbydk2n48gq0nn
भाऊ वाचे पोथी येऊं दे रे
0
22034
232084
150520
2026-06-11T14:10:34Z
QueerEcofeminist
918
"[[भाऊ वाचे पोथी येऊं दे रे]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
150520
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| विभाग =
| मागील = [[खटल्याच्या घरामधीं]]
| पुढील = [[आदिमाया - आशी कशी येळी व माये, आशी ...]]
| टिपण =
}}
<poem>
भाऊ वाचे पोथी
येऊं दे रे कानांवर
नको भूकू रे कुतर्या
तुले काय आलं जरं !
कधीं बाप जल्मामधीं
घडूं नहीं ते घडलं
जसं कंगूल्याचं लेंकरू
बंगल्यावरती चढलं !
गेला वांकडा तिकडा
दूर सगर दिसला
जसा शेताच्या मधून
साप सर्पटत गेला !
कडू बोलतां बोलतां
पुढें कशी नरमली
कडू निंबोयी शेंवटी
पिकीसनी गोड झाली !
'फाट आतां टराटर,
नहीं दया तुफानाले
हाले बाभयीचं पान
बोले केयीच्या पानाले !
उच्च्या खुज्या जोडप्याची
कशी जमली रे जोड
उगे ताडाखाली जसं
भुईरिंगनीचं झाड !
हिरवे हिरवे पानं
लाल फय जशी चोंच
आलं वडाच्या झाडाले
जसं पीक पोपटाचं !
पयसाचे लाल फुलं
हिर्वे पानं गेले झडी
इसरले लाल चोंची
मिठ्ठू गेले कुठें उडी ?
सोमवती आमावस
कशी आंधारली रात
देल्ही रातांध्याच्या हाती
पेटयेल काडवात !
कशी दाखईन रस्ता
आली आंधार्याची रात
कसा देईन रे दान
सांग बुझार्याचा हात ?
तुझी म्हईस ठांगय
नको रुसू लतखोर्या
माझी म्हईस दुभती
नको हुसूं रे शेजार्या
हिच्या तोंडात साकर
आन पोटांत निंबोनी
मोठी आली पट्टवनी
सार्या मुल्खाची लभानी !
अरे आरदटाकेला
तुले कशाचं हिरीत
तशी निझूर शेताले
काय सांगे बरसात?
नागरलं शेत
खूप केली मशागत
पेरल्या मुकन्या
मारे गानं गात गात !
फाटी गेलं पांघरून
नको बोचकूं रे चिंध्या
झालं गेलं पार पडी
नको काढूं आतां गिंध्या !
तुले परनलं पोरी
झाल्या जल्माच्याज भेटी
दिल्लीचं बिलूबांदर
आनी देलं तुझ्यासाठीं !
घरांमधी सर्वे गोरे
तूंच कशी कायीघूस
उज्या जवारींत आलं
जसं कान्हीचं कनूस !
माझं उघडे नशीब
पीकं शेतांत दाटलें
तुझे जवून शेजार्या
कसे डोये रे फूटले?
रुशी बसे वर माय
तिचा रुसवा रे केवढा?
"म्हने पापड वाढला
कसा वांकडा तिकडा?"
हाया समोरची शाया
पोरं शायेतून आले
हुंदडत हायाकडे
ढोरं पान्यावर गेले
पिको आराटी बोराटी
नको शेतामधी बांद
बरी बिरान्याची मया
होऊं नहीं भाऊबंद
शेतकर्या तुझे हाडं
शेतामधीं रे मुडले
मुडीसनी झाली राख
तापीमाईंत पडले
माझी कपीला तान्हेली
कशी पान्यावर गेली
तिले गार्यानें गियली
आन् पान्यानेज पेल्ही
रस्त्यानं चालली
मायबहीन आपली
मांघे फीरी पाह्यं
पाप्या, धरत्री कापली
घाम गायतां शेतांत
शेतकरी तरसला
तव्हां कुठें आभायांत
मेघूराया बरसला !
मेहेरूनचा तलाव
नहीं लहान सहान
आज त्यानं भागवली
जयगांवाची तहान
अरे, वाहत वाहत
आली नदी 'मेहेरूनी'
तिले म्हनूं नका लेंडी
भागवते धोनं पानी !
वटवट्या नारी
तुले वटक्याची सव
तुले देल्हा जल्म
कोन नितातेल देव?
वाटेचं वावर
काटीकुपाटीनं बंद
निस्सवली नार
काय करती भाऊबंद ?
सावकारा, तुझं मन
मन मोहरी एवढं
तुझं राकेसाचं डाच
तुझं पोट केव्हढं ?
देवा, घेनं जलमनं
खुटेनाज तुझ्या दारीं
तसं देनं न मरनं
सुटेनाज सवसारीं
अरे पांडुरंगा, तुझी
कशी भक्ती करूं सांग ?
तुझ्या रूपापुढे येतं
आड सावकाराचं सोंग
डोये लागले आभायीं
मेघा नको रे बरसूं,
केली नजर खालती
माझे शीपडले आंसू
भरली येहेर
मोट चाले भराभर
कशाले करतं
कनाचाक कुरकुरं
वसांडली मोट
करे धो धो थायन्यांत
हुंदडत पानी
जसं तान्हं पायन्यांत !
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:बहिणाबाई चौधरी]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
iusle6bj52siowe8v49rukug2asmq6a
खटल्याच्या घरामधीं
0
22035
232065
150501
2026-06-11T14:10:16Z
QueerEcofeminist
918
"[[खटल्याच्या घरामधीं]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
150501
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| विभाग =
| मागील =
| पुढील = [[भाऊ वाचे पोथी येऊं दे रे]]
| टिपण =
}}
<poem>
व्यक्तिचित्रें
१.
खटल्याच्या घरामधीं
देखा माझी सग्गी सासू
सदा पोटामधीं मया
तसे डोयामधीं आंसू
हिच्या अंगामधीं देव
सभावानं देवगाय
माले सासरीं मियाली
जशी जल्मदाती माय !
२.
माझी ननद 'कासाई'
हिचा लोभ सर्व्यावरी
रूप देवानं घडलं
जशी इंदराची परी
हिचं सरील नाजुक
चंबेलीच्या फुलावानी
देली सम्रीताच्या घरीं
सोभे राजाचीज रानी !
३.
माझी जेठानी 'पानाई'
कशी मनांतली गोट
हिरीतांत शिरीहारी
तोंडामधीं हरीपाठ
बोले तोंड भरीसनी
तसं हातभरी देनं
काम आंग मोडीसनी
सैपाकांत सुगडीन
भरतार देवध्यानीं
मनीं दुजाभाव नहीं
जसे वाड्यांत सोभती
पांडुरंग रूखमाई !
४.
माझी वाहारी 'सीताई'
हिचं मोठं मन देखा
देल्हा देवानं सभाव
खडीसाखरसारखा
तस रूपबी घडलं
जशी बोरांतली आयी
आन कामामंधी बाकी
त्याले कुठे तोड नहीं
असो सासरी माहेरीं
जशी आंब्याची सावली
झिजे आवघ्याच्यासाठीं
अशी लाखांत माउली !
५.
माझी सासू 'भिवराई'
कसं गंमतीचं बोलनं !
हाशीसन आवघ्याचं
पोट गेलं फुटीसन
नांव ठेये आवघ्याले
करे सर्व्याची नक्कल
हांसवता हांसवता
शिकवते रे अक्कल !
६.
पाहीसनी उंदराले
आंगामधी भरे हींव
चिमाबोय चिंव चिंव
आला बोक्या गेला जीव !
देखीसनी बेंडकोयी
कशी झाली धांवाधांव
आतां डरांव डरांव
आला साप गेला जीव !
देखा देखा 'ठमाबाई'
मोठी बोल्याले आगीन
डोये भोकराच्यावानी
जशी पाहाते वाघीन
कव्हां हाशीखुषीमधीं
आयाबायांत रमते
येतां डोक्यामधीं राग
जशी चढेल घुमते
८.
'भीमा' साजरी वाहारी
हिनं उजयलं घर
अरे वाड्यामंधी वागे
आवघ्याशीं आदबूशीर
आला मिर्गाचा पाऊस
पडे आंगावर्हे ईज
पडे धर्तीवर भीमा
लागे शेवटली नीज
९.
'मांगो' बोवाजी तुमचा
लोभ पोरांसोरांवरी
घेता कव्हांबी उचली
पटकन कढ्यावरी
खांद्यावरी आडी काठी
दोन्ही हात काठीवर
वाड्यांतून जाती येती
जसे घालत पाखर
१०.
'गनपत' 'गनपत'
गांवामधी मोतीदाना
याची जबान मोलाची
इमानाले इसरेना
खर्यासाठी झगड्याले
याची मोठी रे हिंमत
गनपत गनपत
सर्व्या गांवामधीं पत
आवघ्यालेज लह्यना
नही कोन्हाले पारखा
सग्यसायासाठीं झिजे
झिजे चंदनासारखा.
११.
'भानादाजी' 'भानादाजी'
घरामंधी लिखनार
कर्तेसवरते मोठे
यांच्या हातीं कारभार
अरे हातीं कारभार
गोड सम्द्याशीं बोलनं
डोईवरती पगडी
वानीबाह्यनी चालनं
घरामधीं दबदबा
तसं वागनं तोलाचं
सर्वे लोक देती मान
कसं बोलनं मोलाचं
भाईरूनी येतां घरीं
तांब्याभरी पानी पेल्हे
माझी 'काशी' व्हती तान्ही
तीले घीसनी बसले
तिले ठेवलं रे खाले
छातीमधीं कय आली
अरे कोन्ह्या दुस्मानानं
मूठ दाजीले मारली !
१२.
अरे 'मारोत्या' 'मारोत्या'
तुझं मराठं घरानं
असा कसा झाला तरी
बाटिसनी मुसनूमान
पोरासोरांमधी नाचे
काठी फिरये गर्गर
फेके दगडाचा गोया
फोडे कौल डोक्यावर
आला घरदार सोडी
तुले कशाची फिकीर
तुझ्या कर्मामधीं भीक
झाला दारचा फकीर
आज मोठी एकादशी
नको करूं दारीं गिल्ला !
जाय तुझ्या तक्क्यामधीं
तठी म्हन बिसमिल्ला !
१३.
सदा अंगावर बुरा
डोकं कुंभाराचा आवा
नहीं डोक्यांत अक्कल
पन बुचुबुचु जुवा
नहीं कामांत उरक
खुळबुळते चेंगट
करे आदयआपट
आल अंगांत खेंगटं
कधी कोनाचं ऐकेना
अशी आस्तुरी हाटेल
नहीं कोणाची जरब
भरतार गह्याटेल
नहीं लुगड्याले पानी
वर्स गेले निंघीसन
जशी घरामंधी नांदे
'कुसुंब्याची' घसोटीन
कोन्ही बोल्याच्याच आंघीं
करे बोंबलाबोंबल
हिले जल्म देतां देवा
काय हाताले झुंबलं !
१४.
'धुडाबोय' 'धुडाबोय'
धुडाबोय रे केवढी
म्हनूं नका रे केवढी
भूईरिंगनी एवढी !
एका हातांत काडुक
दुज्या हातांत भाकर
डोक्यामधीं नाकतोडे
हिच्या पायाले चक्कर
हिच्या पायाले चक्कर
तोंडामधीं किरकिर
दोन्ही डोयाले झांजर
नाकामधीं तपकीर
खिजवती सम्देझनं
'धुडाबोय' कोनी 'धुडी'
हिच्या आवतीभंवती
पोराटोराच्या झुंबडी
हिले पाहीसन देवा
जीव पडे भरमांत
कसा 'धुडीले, घडतां
तुझा आंखडला हात !
१५.
आला 'मुनीर, टेसांत
कमेटींतला शिपायी
डोये वट्टारत पाहे
रस्त्यामधली सफाई
आला मुनीर शिपायी
याची खुरटेल दाढी
याच्या हातामधी छडी
आन तोंडामधीं बिडी
याची नजर चेकानी
दोन्हीं बुबुयं कुखडे ?
एक 'आव्हान्याच्याकडे'
एक 'कान्हाकाई' कडे !
आला मुनीर शिपायी
याची पाहीसन छडी
पोरं गडरीवरले
घरामधीं गेले दडी
अशी मुनीर दादाची
सर्व्यावर दहसत
हातीं घेतला झाडना
भंगी पये घाबरत
खेकसनं दमदाटी
याचं काम जातां सरी
मंग मारतो बैठक
'इठू' सोनाराच्या दारीं
१६.
आली मुक्की पिंजारीन
आली कापूस पिंज्याले
हातामधीं धुनुकनी
तोंडीं वटवट चाले
हिले येयेना बोलतां
काय मुक्याचं बोलनं ?
समजनं समजी घ्या
जसं तातीचं वाजनं !
१७.
चाले गान गात गात
'भोजा' फुटका फुटका
जातां येतां वाड्यांतून
सदा करतो वटका
मोठं बोलनं गंमती
सांगे गानं गाईसन
आवघ्याले हांसाळतो
याचं सुरूं सदा गानं !
१८.
'छोटू भय्या' छोटू भय्या'
तुझी कानटोपी लाल
दिसे चाकीवानी तोंड
तुझे थुलथुले गाल
तुझे डोये सदा लाल
त्याच्यांतून गये पानी
तुझ्या नाकाची ठेवन
भज्या- गुलगुल्याच्यावानी
पोट माथनीसारखं
वर्हे बोंबीच झांकन
व्होट पोपटाची चोंच
पढे तुयशीरामायन
१९.
'लालू मिय्या' 'लालू मिय्या'
गांवामधी आवलिया
सदा अंगावर बुरा
पावसयांत आंघोया
दाढीमिशाचं जंगल
अंगीं फाटकी गोदडी
हातीं भल्ली मोठी काठी
पाठी चिंध्याची गाठोडी
तुले नही घरदार
सोतामधींच मगन
बारीमास भटकतो
नही खानं नहीं पेनं !
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:बहिणाबाई चौधरी]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
phpyxwpk4aql53o0qeqea8t5w7dfw29
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी
0
22036
232094
150509
2026-06-11T14:10:44Z
QueerEcofeminist
918
"[[वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
150509
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| विभाग =
| मागील =
| पुढील =
| टिपण =
}}
<poem>
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
नशीबीं दगड गोटे
काट्याकुट्याचा धनी
पायाले लागे ठेंचा
आलं डोयाले पानी
वरून तापे ऊन
आंग झालं रे लाही
चालला आढवानी
फोड आली रे पायीं
जानच पडीन रे
तुले लोकाच्या साठीं
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
दिवस ढयला रे
पाय उचल झट
असो नसो रे तठी
तुझ्या लाभाची गोट
उतार चढनीच्या
दोन्हि सुखादुखांत
रमव तुझा जीव
धीर धर मनांत
उघडूं नको आतां
तुझ्या झांकल्या मुठी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
'माझेज भाऊबंद
धाईसनी येतीन!'
नको धरूं रे आशा
धर एव्हढं ध्यान
तुझ्या पायानें जानं
तुझा तुलेच जीव
लावीन पार आतां
तुझी तुलेच नाव
मतलबाचे धनी
सर्वी माया रे खोटी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
वार्याचं वाहादन
आलं आलं रे मोठं
त्याच्यातं झुकीसनी
चुकुं नको रे वाट
दोन्ही बाजूनं दर्या
धर झुडूप हातीं
सोडूं नको रे धीर
येवो संकट किती
येऊं दे परचीती
काय तुझ्या ललाटीं
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:बहिणाबाई चौधरी]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
qbna965epgokd7cwyxo7nkum5ijmf5x
उपननी उपननी आतां घ्या रे
0
22037
232057
150494
2026-06-11T14:10:01Z
QueerEcofeminist
918
"[[उपननी उपननी आतां घ्या रे]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
150494
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| विभाग =
| मागील = [[आला आला शेतकर्या]]
| पुढील = [[वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी]]
| टिपण =
}}
<poem>
उपननी उपननी
आतां घ्या रे पाट्या हातीं
राहा आतां उपन्याले
उभे तिव्हारीवरती
चाल ये रे ये रे वार्या,
ये रे मारोतीच्या बापा
नको देऊं रे गुंगारा
पुर्या झाल्या तुझ्या थापा
नही अझून चाहूल
नको पाडूं रे घोरांत
आज निंघाली कोनाची
वार्यावरती वरात ?
ये रे वार्या घोंघावत
ये रे खयाकडे आधीं
आज कुठें रे शिरला
वासराच्या कानामधी !
भिनभिन आला वारा
कोन कोनाशीं बोलली ?
मन माझं हारखलं
पानं झाडाची हाललीं !
वारा आलारे झन्नाट्या
झाडं झुडपं डोललीं
धरा मदनाच्या पाट्या
खाले पोखरी चालली
देवा, माझी उपननी
तुझ्या पायी इनवनी
दैवा, तुझी सोपवनी
माझ्या जीवाची कारोनी
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:बहिणाबाई चौधरी]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
ex7z5xgoqgxdso8wp31jhfw0qw1h9c0
आला आला शेतकर्या
0
22038
232053
150487
2026-06-11T14:09:56Z
QueerEcofeminist
918
"[[आला आला शेतकर्या]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
150487
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| विभाग =
| मागील = [[केला पीकाचा रे सांठा जपी]]
| पुढील = [[उपननी उपननी आतां घ्या रे]]
| टिपण =
}}
<poem>
आला आला शेतकर्या
पोयाचा रे सन मोठा
हातीं घेईसन वाट्या
आतां शेंदूराले घोटा
आतां बांधा रे तोरनं
सजवा रे घरदार
करा आंघोयी बैलाच्या
लावा शिंगाले शेंदुर
लावा शेंदूर शिंगाले
शेंव्या घुंगराच्या लावा
गयामधीं बांधा जीला
घंट्या घुंगरू मिरवा
बांधा कवड्याचा गेठा
आंगावर्हे झूल छान
माथां रेसमाचे गोंडे
चारी पायांत पैंजन
उठा उठा बह्यनाई,
चुल्हे पेटवा पेटवा
आज बैलाले नीवद
पुरनाच्या पोया ठेवा
वढे नागर वखर
नहीं कष्टाले गनती
पीक शेतकर्या हातीं
याच्या जीवावर शेतीं
उभे कामाचे ढिगारे
बैल कामदार बंदा
याले कहीनाथे झूल
दानचार्याचाज मिंधा
चुल्हा पेटवा पेटवा
उठा उठा आयाबाया
आज बैलाले खुराक
रांधा पुरनाच्या पोया
खाऊं द्या रे पोटभरी
होऊं द्यारे मगदूल
बशीसनी यायभरी
आज करूं या बागूल
आतां ऐक मनांतलं
माझं येळीचं सांगन
आज पोयाच्या सनाले
माझं येवढं मांगन
कसे बैल कुदाळता
आदाबादीची आवड
वझं शिंगाले बांधतां
बाशिंगाचं डोईजड
नका हेंडालूं बैलाले
माझं ऐका रे जरासं
व्हते आपली हाऊस
आन बैलाले तरास
आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देनं
बैला, खरा तुझा सन
शेतकर्या तुझं रीन !
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:बहिणाबाई चौधरी]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
k0rwcimj8k5mydwj8lgb1vflilvzais
केला पीकाचा रे सांठा जपी
0
22039
232060
150491
2026-06-11T14:10:05Z
QueerEcofeminist
918
"[[केला पीकाचा रे सांठा जपी]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
150491
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| विभाग =
| मागील = [[पिलोक पिलोक आल्या पिलोका]]
| पुढील = [[आला आला शेतकर्या]]
| टिपण =
}}
<poem>
केला पीकाचा रे सांठा
जपीसन सर्व्याआधीं
शेत शिवाराचं धन
आतां आलं खयामधीं
खय झालं रे तैयार
सम्दी भूई सारवली
मधी उभारलं मेढ
पात बैलाची चालली
आतां चाल चाल बैला,
पात चाले गरगर
तसे कनूसामधून
दाने येती भरभर
आतां चाल चाल बैला,
आतां चाल भिरभिरा
व्हऊं दे रे कनुसाचा
तुझ्या खुराखाले चुरा
पाय उचल रे बैला,
कर बापा आतां घाई
चालूं दे रे रगडनं
तुझ्या पायाची पुन्याई !
पाय उचलरे बैला,
कनूसाचा कर भूसा
दाने एका एकांतून
पडतील पसा पसा
आतां चाल चाल बैला,
पुढें आली उपननी
वारा चालली रे वाया,
कसा ठेवू मी धरूनी
पात सरली सरली
रगडनी सुरूं झाली
आतां करूं उपननी
झट तिव्हार मांडली
आतां सोडी देल्ही पात
बैलं गेले चार्यावरी
डोयापुढें उपननी
जीव माझा वार्यावरी
रगडनी रगडनी
देवा, तुझीरे घडनी
दैवा तुझी झगडनी
माझी डोये उघडनी !
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:बहिणाबाई चौधरी]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
4hmx1yg7wjk3sp9hes1e6d0h2pr37r5
पिलोक पिलोक
0
22040
232081
150507
2026-06-11T14:10:31Z
QueerEcofeminist
918
"[[पिलोक पिलोक]]" ला ने संरक्षित केले: unsourced material ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत))
150507
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = {{लेखनाव}}
| साहित्यिक = बहिणाबाई चौधरी
| विभाग =
| मागील = [[आला पह्यला पाऊस]]
| पुढील = [[केला पीकाचा रे सांठा जपी]]
| टिपण =
}}
<poem>
पिलोक पिलोक
आल्या पिलोकाच्या गाठी
उजाडलं गांव
खयामयांमधीं भेटी
पिलोक पिलोक
जीव आला मेटाकुटी
भाईर झोंपड्या
गांवामधीं मसन्वटी
पिलोक पिलोक
कशाच्या रे भेठीगांठी !
घरोघरीं दूख
काखाजांगामधीं गांठी
पिलोक पिलोक
आतां नशीबांत ताटी
उचलला रोगी
आन् गांठली करंटी
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:बहिणाबाई चौधरी]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
84v7kb39wm81d3bv28seakgh0w9t8yj
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७५
104
73755
232108
164970
2026-06-12T02:54:22Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232108
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६४९|| नव्या प्रेरणा}}</noinclude>सुधारणा व्हावयाची तर त्यांना मुख्य म्हणजे विद्या हव्या. पण त्या पुराणातल्या विद्या नव्हत, संस्कृतातल्या नव्हत. तर ज्या विद्या त्या काळी प्रगट झाल्या होत्या, ज्या वास्तविक जग व व्यवहार यांच्या दर्शक होत्या त्या विद्या होत.<br><br>'''महात्मा फुले'''<br>{{gap}}जोतिबा फुले हे स्वतः फार शिकलेले नव्हते. पण पाश्चात्य ग्रंथकारांच्या ग्रंथांचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांना भौतिक विद्येची महती उत्तम समजली होती. म्हणून तर त्यांनी स्त्रियांसाठी व अस्पृश्यांसाठीही शाळा उघडल्या.<br>{{gap}}यानंतर भारतात विद्यापीठांची स्थापना झाली आणि इतिहास, भूगोल, तत्त्वज्ञान, पदार्थविज्ञान, जीवशास्त्र, गणित, इतर भाषा, भाषाशास्त्र, यांचा रीतसर अभ्यास सुरू झाला. न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर, विश्वनाथ नारायण मंडलीक, दादोबा पांडुरंग, आत्माराम पांडुरंग इ. विद्वान पुढे आले आणि त्यांनी आपल्या सर्व सुधारणांची या नव्या विद्येच्या पायावरच उभारणी केली. याच सुमारास जॉर्ज वॉशिंग्टन, नेपोलियन, कोलंबस इ. थोर पाश्चात्य पुरुषांची चरित्रे मराठीत लोक लिहू लागले. वर्तमानपत्रे निघू लागली आणि भौतिक ज्ञानाचा प्रसार सर्वत्र होऊ लागला.<br><br>'''ज्ञानाची देणगी'''<br>{{gap}}असे असूनही विष्णुशास्त्री, टिळक यांच्या काळापर्यंत पाश्चात्य ज्ञानाचे महत्त्व लोकांना पटवून देण्याचे महत्त्व लोकांना वाटत असे. 'वक्तृत्व' या निबंधात विष्णुशास्त्री म्हणतात, 'इंग्रज सरकारचा या देशावर सर्वात मोठा उपकार हा होय की ज्ञानाची अमोलिक देणगी त्याने या देशास दिली व अद्याप देत आहे. चाळीस वर्षांपूर्वी मेकॉलेने जी नवी पद्धत सुरू केली तिच्यामुळे ही विद्या प्रसार पावून त्यामुळे देशाची स्थिती आजवर एकंदर बदलून गेली आहे, असे म्हटले असता चालेल.' 'निबंधमाला' हे नवे मासिक पुस्तक काढताना त्यांनी म्हटले आहे की, 'इंग्लंड वगैरे देशात सामान्य माणसास जे ज्ञान असते ते येथील सुशिक्षितासही नसते.' आणखीही अनेक ठिकाणी, जेथे संधी सापडेल तेथे विष्णुशास्त्री यांनी पाश्चात्य विद्येचा असाच गौरव केला आहे.<br><br>'''पाश्चात्य शास्त्रे'''<br>{{gap}}लो. टिळकांचे असेच धोरण होते. पाश्चात्य विद्येशिवाय तरणोपाय नाही, याविषयी त्यांचे दुमत नव्हते. १९०७ साली बेळगावला, 'सरकारी शिक्षण व राष्ट्रीय शिक्षण ' या विषयावर बोलताना ते म्हणाले, 'तरुण पिढीने विद्वान, बुद्धिमान, निश्चयी व शरीरसामर्थ्याने युक्त व्हावे, एवढीच आमची इच्छा नाही, तर आमच्या तरुणांनी पाश्चात्य शास्त्रात पारंगत व्हावे, अशी आमची प्रबल इच्छा आहे. ही पाश्चात्य शास्त्रे<noinclude></noinclude>
2w9dpy942w9jentymbzg4bq2kctv0pm
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७६
104
73756
232109
164971
2026-06-12T02:54:50Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232109
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६५०}}</noinclude>आमच्या विद्यार्थ्यास शिकविण्यास ज्या दिवशी हरकत होईल त्या दिवशी हिंदुस्थानचा भाग्योदय सरला आहे असे मी म्हणेन.' यावरून हिंदुस्थानचा भाग्योदय या पाश्चात्य शास्त्रांवर अवलंबून आहे असे त्यांचे निश्चित मत होते, असे स्पष्ट दिसते. मोर्लेसाहेब म्हणत, 'हिंदुस्थानातील सुशिक्षित लोक हे आमचे शत्रू आहेत.' त्याला उत्तर देताना टिळक म्हणत की 'आम्ही त्यांचे शत्रू नसून आमचे ज्ञान हे त्यांचे शत्रू आहे.' शिक्षण या विषयावर बोलताना ते नेहमी म्हणत की 'इंग्लंड, अमेरिका यांसारख्या स्वतंत्र देशांत जे शिक्षण देतात ते शिक्षण आम्हांला पाहिजे. इंग्लंडने ज्या प्रकारच्या संस्था काढून आपली स्थिती सुधारली, तशा प्रकारच्या संस्था काढून आपण आपली स्थिती सुधारून घेतली पाहिजे.' टिळकांची ही विवेचने वाचताना एक गोष्ट स्पष्टपणे ध्यानात येते की समाजाला जिवंतपणा यावयास हवा असेल तर पाश्चात्यांप्रमाणे प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगक्षम, दृक्प्रत्ययशरण अशा शास्त्रांचा अनाग्रही बुद्धीने आपण अभ्यास केला पाहिजे, हा सिद्धांत त्यांच्या मनाशी निश्चित झाला होता.<br>{{gap}}लो. टिळकांच्या नंतर पाश्चात्य विद्येला कधी कोणी फारसा विरोध केला नाही. महात्माजींचा वैज्ञानिक सुधारणांना विरोध होता. पण एकतर मोटार, आगगाडी या यंत्रशक्ती ते स्वतः वापरीत असत आणि त्यांच्या या मताला कोणी फारसे महत्त्व दिले नाही.<br>{{gap}}तरी एक गोष्ट मनाला जाणवते की पाश्चात्य विद्या येथे आल्या. आता त्या बहुजनातही पसरत आहेत. पण त्यांच्यामुळे जी बुद्धिवादी, प्रयोगनिष्ठ, प्रत्यक्षनिष्ठ, कार्यकारणनिष्ठ अशी वृत्ती भारतीय समाजात निर्माण व्हावयास पाहिजे, ती अजून झालेली नाही आणि ती नाही तोपर्यंत जी खरी प्रगती व्हावयास हवी, ती येथे होणार नाही.<br><br>'''बुद्धिप्रामाण्य'''<br>{{gap}}या पाश्चात्य विद्येमुळे भारताला फार मोठी देणगी मिळाली, ती म्हणजे बुद्धिप्रामाण्य ही होय. शेकडो वर्षे येथे ग्रंथप्रामाण्याचे किंवा शब्दप्रामाण्याचे युग होते. सूत्रग्रंथांच्या काळापासून म्हणजे इ. सनपूर्व सातव्या आठव्या शतकापासून येथे शब्दप्रामाण्याला प्रारंभ झाला. पण तरीही इ. सनाच्या दहाव्या शतकापर्यंत त्याचा अमंल इतका जारी नव्हता. स्मृती या प्रमाण मानल्या जात, पण स्मृतिकार पूर्वीच्या स्मृतींवर टीका करून, मला हे मत मान्य नाही, असे निर्भयपणे सांगत असत. पण आठव्या शतकापासून नव्या स्मृती होण्याचेच बंद झाले आणि स्मृतींमध्ये कितीही परस्परभिन्नता असली तरी त्यांतील सर्व वचनांचा एकच अर्थ आहे, असे टीकाकारांनी लिहिले पाहिजे, असा कुमारिल भट्टाने दण्डक घालून दिला. तेव्हापासून हिंदुस्थानच्या विनाशास प्रारंभ झाला. ती प्रथा दहाव्या अकराव्या शतकापासून पूर्ण<noinclude></noinclude>
nuure0k2dtffj3fauazn5r5ccs38fkj
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७७
104
73757
232110
164972
2026-06-12T02:55:04Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232110
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६५१|| नव्या प्रेरणा}}</noinclude>रूढ झाली व चतुर्वर्गचिंतामणी, निर्णयसिंधू, धर्मसिंधू असे ग्रंथ तयार होऊ लागले आणि मानवी बुद्धीला अत्यंत अवजड अशा बेड्या पडल्या, स्वतंत्र विचार करणे हे येथे संपुष्टात आले.<br><br>'''रूढिप्रामाण्य'''<br>{{gap}}या शब्दप्रामाण्याच्या जोडीला रूढिप्रामाण्य आले. ब्राह्मण लोक संस्कृत ग्रंथ वाचीत. पण इतर जातींत श्रुतिस्मृतींकडे कोणी पाहात नसे. पण त्या प्रत्येक जातीच्या पंचायती असत. आणि ठरलेल्या रूढीबाहेर कोणी वागला तर त्या पंचायती त्याला व त्याच्या कुटुंबाला बहिष्कृत करीत. ही शिक्षा फाशीच्या शिक्षेपेक्षाही जास्त भयंकर होती, असे मागे सांगितलेच आहे. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य हे भारतातून अजिबात लुप्तच झाले. मागे अनेक शास्त्रांमध्ये आर्यभट्ट, नागार्जुन यांसारखे थोर पंडित येथे होऊन गेले. पण या पुढच्या काळात, काही अपवाद वजा जाता, तसे शास्त्रज्ञ झाले नाहीत, याचे हेच कारण होय.<br><br>'''शास्त्र म्हणजे काय ?'''<br>{{gap}}बुद्धीवरची ही बंधने ब्रिटिश कालात नष्ट होऊ लागली. या बुद्धिस्वातंत्र्याचा पहिला मोठा पुरस्कर्ता म्हणजे लोकहितवादी हा होय. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की 'मनूचे वचन असो, याज्ञवल्क्याचे असो, कोणाचे का असेना, ब्रह्मदेवाचे का असेना, 'बुद्धिरेव बलीयसी' असे आहे. तुम्ही उघड जे पाहता त्याचा बंदोबस्त, शास्त्रात नाही, म्हणून करीत नाही, हे योग्य नाही. शास्त्रास एकीकडे ठेवा, आपली बुद्धी चालवा, विचार करून पाहा', असा उपदेश त्यांनी पुनर्विवाहाचा पुरस्कार करताना केला आहे. परदेशगमनाविषयी त्यांनी असाच विचार सांगितला आहे. 'दुसरे मुल- खात जाऊ नये असा शास्त्राचा अर्थ नसेल असे वाटते आणि जर कदाचित असला तर ती शास्त्राज्ञा मानण्याची जरूर नाही.' ते म्हणतात, 'शास्त्र म्हणजे लोकांस सुख होण्याकरिता रीती घातली आहे. त्यातून जर काही विपरीत असेल तर एकीकडे ठेवण्यास चिंता काय आहे ?' बुद्धीवरील बंधनांना त्यांनी बेड्या म्हटले आहे. अलीकडे सावरकरांनी 'सप्त शृंखला' असा शब्द वापरला आहे. तोच शब्द शंभर वर्षापूर्वी लोकहितवादींनी वापरून शब्दप्रामाण्यावर घाव घातले, हे त्यांस विशेष भूषणावह आहे.<br>{{gap}}लोकहितवादींनी उपदेश केला. पण तो उपदेश प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने आचरणात आणल्यावाचून कोणत्याही सुधारकाला, ब्रिटिश कालातील नेत्याला एक पाऊलही पुढे टाकता आले नसते. वर बाळशास्त्री जांभेकर यांचा उल्लेख केला आहे. त्यांनी 'दर्पण' व 'दिग्दर्शन' ही नियतकालिके चालविली. त्यांतील कोणताही विचार त्यांना जुने शब्दप्रामाण्य मानून लिहिता आला नसता. त्यांना इतर भाषा शिकता आल्या नसत्या. स्त्रियांना शिक्षण द्यावे असे म्हणता आले नसते. शुद्धिकार्याचा पुरस्कार<noinclude></noinclude>
740mbt64qwbasud5xxyv44bir10endr
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७८
104
73758
232111
164973
2026-06-12T02:55:28Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232111
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६५२}}</noinclude>करता आला नसता. इतकेच नव्हे, तर वरील नियतकालिकांतून एकही लेख लिहिता
आला नसता.<br>{{gap}}जी गोष्ट बाळशास्त्री यांची तीच भाऊ महाजन, दादोबा पांडुरंग इ. लेखकांची होती. किंबहुना कोणत्याही सुधारकाची होती. शब्दप्रामाण्याचे बंधन पाळून त्यांना काहीही करता आले नसते. जोतिबा फुले यांचे कार्य तर विशेष अभिनंदनीय आहे. त्यांनी या शब्दप्रामाण्याचा क्षणभरही मुलाहिजा न बाळगता, ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वावर टीका केली, इतर वर्णांच्या समानतेचा पुरस्कार केला, आणि स्त्रियांना व अस्पृश्यांना शिक्षण देण्यासाठी शाळा काढल्या. त्यांचा आयुष्यातला प्रत्येक श्वासोच्छ्वास म्हणजे शब्दप्रामाण्यावर आघातच होता.<br><br>'''कार्यकारण नाही'''<br>{{gap}}जुन्या शास्त्रांतील बंधनांमध्ये आणखी एक घातक गोष्ट होती. त्यांत केवळ आज्ञा केलेल्या असत. त्यांच्या मागे तर्काचे, कार्यकारणाचे, सयुक्तिकतेचे कसलेही विवेचन केलेले नसे. मानवाला यामुळे त्यांनी सर्वस्वी गुलाम करून टाकले होते. त्याच्या मानवत्वाला कसली म्हणून प्रतिष्ठाच त्यांनी ठेवली नव्हती. पशूला जसे दाव्याने बांधून जखडून टाकतात, तसे त्यांनी मानवाला बांधून टाकले होते. न्या. मू. रानडे यांनी म्हटले आहे की अशा बंधनांमुळे आपला समाज हा बालच राहिला. त्याला प्रौढपणा आलाच नाही. मानवाला काही व्यक्तित्व असते, त्याला स्वतंत्र विचार करण्याची शक्ती असते, तिला काही अवसर दिला पाहिजे, याचा कसलाही विचार या जुन्या ग्रंथकारांनी केलेला नाही. जातींच्या आचारधर्मात तेच आहे. त्याच्या मागे विचारसरणी अशी काही नाही आणि व्यक्तीचा विचार तर मुळीच नाही. मागली सगळी शास्त्रबंधने, रूढीबंधने आणि जातिबंधने ही व्यक्तीला मुळी विचारातच घेत नाहीत. असले हे शब्दप्रामाण्य समाजाचा अधःपात न घडवील तरच नवल.<br><br>'''मानसिक स्वातंत्र्य'''<br>{{gap}}विष्णुशास्त्री यांनी इंग्रजांवर कडक टीका केली आहे. तरी त्यांच्या राज्यातील व्यक्तिस्वातंत्र्याचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. निबंधमालेच्या पहिल्या निबंधातच त्यांनी म्हटले आहे की 'वरच्या लिहिण्याने हल्लीच्या राज्याचा आम्ही द्वेष करतो किंवा त्यांनी आपल्या देशावर जे अपरिमित उपकार केले आहेत किंवा अजूनही करीत आहेत ते आम्ही जाणीत नाही असे नाही. आम्हांस तर वाटते की असे विचार करण्याची शक्ती आमचे अंगी आणून त्याचा उल्लेख उघडपणे करण्याची जी मोकळीक आमचे सरकार आम्हांस देत आहे त्यापरते औदार्य कोणतेही नाही.' 'आमच्या देशाची स्थिती' या शेवटच्या निबंधात त्यांनी हेच विचार व्यक्त केले आहेत. 'त्याचप्रमाणे मानसिक स्वातंत्र्य हाही या काळात झालेला सर्वात मोठा लाभ होय. मानसिक<noinclude></noinclude>
9k52jx18okz8bzih048hxn8y2m8vag3
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७९
104
73759
232112
164974
2026-06-12T02:55:52Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232112
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६५३|| नव्या प्रेरणा}}</noinclude>स्वातंत्र्य म्हणजे हवा तसा विचार करण्याची व ते विचार वाग्द्वारा किंवा लेखनद्वारा प्रसिद्ध करण्याची मोकळीक. हल्लीच्या राज्यात आम्हांस जे स्वातंत्र्य आहे, तितके यापूर्वी स्वदेशी राजांच्या उत्कृष्ट कारकीर्दीतही नव्हते.' असे धन्यवाद त्यांनी सरकारला दिले आहेत.<br>{{gap}}'ग्रंथावर टीका' या निबंधातही त्यांनी शब्दप्रामाण्यावर अशीच टीका केली आहे. 'आपणांहून जे थोर आहेत त्यांचे दोष काढण्याचा आपल्याला अधिकार नाही, अशी समजूत होती. असे म्हणणे म्हणजे चंद्रास कलंकी म्हणू नये किंवा सूर्यावर डाग आहेत असे म्हणू नये अशासारखेच आहे.' या तत्त्वाअन्वये विष्णुशास्त्री यांनी जुन्या शास्त्रीपंडितांवर किंवा खुद्द शंकराचार्यावरही कशी प्रखर टीका केली आहे ते प्रसिद्धच आहे.<br><br>'''आगरकर'''<br>{{gap}}आगरकरांच्याविषयी तर बोलावयासच नको. बुद्धिवादाचे त्यांना जनक मानतात, ते अगदी यथार्थ आहे. न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर हे बुद्धिवादी होते, सुधारक होते. पण नव्या सुधारणांना शक्यतो जुन्या श्रुतिस्मृतींच्या वचनांचा आधार शोधून काढण्याकडे त्यांची प्रवृत्ती होती. हा काहीसा शब्दप्रामाण्यवादच होय. आगरकरांनी यावर कडक टीका केली आहे. अशा रीतीने एका ऋषीविरुद्ध दुसरा ऋषी उभा करण्यात काही अर्थ नाही. शेकडो मनूंचे किंवा पाराशरांचे आधार तुम्ही दिलेत तरी 'आम्हांस इष्ट असेल ते आम्ही बोलणार आणि साध्य असेल ते करणार,' अशी त्यांची प्रतिज्ञाच होती. आणि त्यांनी केलेला स्त्रीस्वातंत्र्याचा व एकत्र शिक्षणाचा पुरस्कार, प्रवृत्तिवादाचे समर्थन, देव हे भूतपिशाच्च्यांपासून निर्माण झाले आहेत, हे त्यांचे प्रतिपादन, यावरून ती त्यांनी सार्थ करून दाखविली होती, यात शंकाच नाही. येथे इंग्रजांचे राज्य होते, म्हणून आगरकर सुरक्षित राहिले, नाही तर त्यांना वहिष्कारास बळी पडावे लागले असते. युरोपात तर शब्दप्रामाण्याविरुद्ध ब्र काढणाऱ्याला जिवंत जाळून मारण्याची शिक्षा होती. पण ती शिक्षा भोगूनही अनेक वीर पुरुषांनी तेथे बुद्धिप्रामाण्याची ज्योत जागती जिवंत ठेवली. म्हणूनच युरोपची प्रगती झाली. आणि हिंदुस्थानात तसे धैर्य एकानेही न दाखविल्यामुळे त्याचा अंधःपात झाला.<br><br>'''ब्रह्मवाक्यही-'''<br>{{gap}}लो. टिळकांचा बुद्धिवाद किंवा बुद्धिप्रामाण्य फार उद्बोधक आहे. पंचांग संशोधनाच्या बाबतीत त्यांची बुद्धिनिष्ठा अनेक वेळा प्रत्ययास आलेली आहे. एका लेखात त्यांनी म्हटले आहे की 'केरूनाना छत्रे, दीक्षित यांच्यावर आधुनिक यवनाचार्य म्हणजे युरोपीय ज्योतिर्गणिती यांच्या संशोधनाचा परिणाम झालेला आहे. स्वतः वेध घेऊन जुने शास्त्र सुधारले पाहिजे, असे त्यांचे मत होते. पूर्वी ब्रह्मगुप्ताची अशीच<noinclude></noinclude>
ezwe7cdbywc3cwkta25pidynyvgz96f
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८०
104
73760
232113
164975
2026-06-12T03:02:19Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232113
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६५४}}</noinclude>वृत्ती होती. त्याने आर्यभट्टाच्या गणितास दोष दिलेले आहेत. तो म्हणतो ब्रह्मदेवाने सांगितलेले ग्रहगणित महान् काळ गेल्यामुळे खिळखिळे झाले आहे. ते मी विष्णुसुत ब्रह्मगुप्त स्पष्ट करून सांगतो. यावरून असे दिसते की ब्रहादेवाचे वाक्यही जसेच्या तसे मानता येत नाही, हे सांगण्याचे धैर्य त्या काळी होते. अशी वृत्ती असल्यामुळेच प्राचीन काळी आमची शास्त्रे जिवंत राहिली. पण पुढे ही वृत्ती पालटली व त्यामुळे शास्त्रांची वाढ खुंटली.'<br><br>'''शास्त्रे खुंटली'''<br>{{gap}}हे पंचांग- संशोनाविषयी झाले. पण आपल्या सर्वच शास्त्रांची वाढ शब्दप्रामाण्यामुळे खुंटली असे अनेक ठिकाणी टिळकांनी सांगितले आहे. ते म्हणतात, 'पाश्चात्य राष्ट्रे अद्याप जिवंत आहेत आणि ती आपल्या शास्त्रांची वाढ करण्याच्या उद्योगात सतत मग्न असतात. प्राचीन काळी आमचे आचार्य असाच उद्योग करीत असत. पण पुढे ही वृत्ती सुटली व आमच्या शास्त्रांची वाढ खुंटली.' 'ख्रिस्ती शकानंतर काही शतकांनी आमच्या शास्त्रविद्येचा जिवंतपणा कमी होऊ लागला. आणि आमचे पंडित पूर्वाचार्यानी केलेले सिद्धान्तच खलीत बसले. हिंदुस्थानातील शास्त्रांची ही स्थिती, सदर शास्त्रे युरोपियन पंडितांच्या हातात पडल्यावर पालटली.' (केसरीतील लेख, खंड ४ था, पृ. ४८५, ४८६). पाश्चात्य विद्यांचा आग्रह टिळक धरीत त्याशी हे सुसंगतच होते.<br><br>'''महात्माजी'''<br>{{gap}}महात्माजी हे बुद्धिप्रामाण्यवादीच होते. त्यांना अंतर्ज्ञानशक्ती होती. 'आतला आवाज' असे या संदेशाला ते म्हणत. पण हे सर्व अपवादप्रसंग होत. आणि स्वतःला अंतर्ज्ञानी असले तरी श्रुतिस्मृतीप्रमाणे ते एखाद्या ग्रंथातले वचन प्रमाण मानीत, असे कधीच घडले नाही. त्यांचे सर्व व्यवहार व महत्त्वाचे निर्णय हे तर्क, अनुभव, बुद्धी यांनीच होत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बुद्धिप्रामाण्याबद्दल शंकाच नव्हती. त्यांची बुद्धिनिष्ठा व विज्ञाननिष्ठा जगजाहीर आहे. महात्माजींच्या आतल्या आवाजाला त्यांनी काही वेळा विरोधही केला आहे. तेव्हा त्यांच्या बुद्धिप्रामाण्याविषयी कशालाही वाद नाही.<br>{{gap}}अशा रीतीने ब्रिटिश कालातील सर्व नेते बुद्धिप्रामाण्यवादी होते. मागल्या काळातल्या प्रमाणे ग्रंथप्रामाण्य चुकूनसुद्धा या नव्या नेत्यांनी कधी अवलंबिले नाही. म्हणूनच आपापल्या क्षेत्रात चौफेर प्रयत्न त्यांना करता आले आणि ते भारताचा उत्कर्ष साधण्यात यशस्वी झाले.<br>{{gap}}ब्रिटिश कालामध्ये १९४७ पर्यंतच्या शंभर सवाशे वर्षात सर्वांगीण क्रान्ती घडवून स्वातंत्र्यप्राप्ती करून घेण्याइतकी प्रगती येथल्या नेत्यांना कशी घडविता आली याचा<noinclude></noinclude>
ousw6p8umzs4fukf8li7wzj4kabn7j5
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८१
104
73769
232114
164984
2026-06-12T03:02:29Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232114
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६५५|| नव्या प्रेरणा}}</noinclude>विचार आपण करीत आहो. पाश्चात्य विद्या हे त्याचे प्रधान कारण होय, हे आरंभी सांगितले. तीतूनच निर्माण झालेले बुद्धिप्रामाण्य हे दुसरे कारण होय. आणि यातूनच निर्माण झालेल्या भिन्नभिन्न क्षेत्रांतल्या अनेकविध संस्था हे तिसरे कारण होय. या तिसऱ्या कारणाचा म्हणजे महाराष्ट्रीयांच्या संस्थात्मक जीवनाचा आता विचार करावयाचा आहे.<br><br>'''संस्थात्मक जीवन'''<br>{{gap}}राष्ट्र हे सामुदायिक जीवन आहे. आणि सामुदायिक जीवनाचे मुख्य लक्षण म्हणजे संस्था हे होय. अशा तऱ्हेच्या संस्था प्राचीन काळात येथे मुळीच नव्हत्या. येथे ग्रामसंस्था होत्या, जातिसंस्था होत्या आणि कुटुंबसंस्था होत्या. पण वर उल्लेखिलेल्या संस्थांप्रमाणे त्यांतली एकही संस्था नव्हती. ग्रामसंस्था आपल्या गावापुरत्या पाहात आणि तेही दुष्काळ, महापूर, दरोडे इ. आपत्तींच्या प्रसंगी. जातिसंस्था या आचारधर्माचा भंग, बहिष्कार याच उद्योगात मग्न असत. सर्व राष्ट्राचा उत्कर्ष लांबच राहिला, पण आपल्या जातीसंबंधीसुद्धा, तिची औद्योगिक उन्नती, तिचे शिक्षण, तिचे समाजजीवनातले स्थान याविषयीसुद्धा, जातीच्या पंचायती कधी विचार करीत नसत.<br><br>'''व्यक्ती अभाव'''<br>{{gap}}ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी जवळजवळ हजार वर्षे सर्वत्र अशीच स्थिती होती. समाजाच्या भवितव्याची चिंता वहाणाऱ्या संस्था या देशात त्या काळात निर्माणच झाल्या नाहीत. कारण अशा तऱ्हेचे ध्येय डोळ्यांपुढे ठेवणाऱ्या व्यक्तीच येथे नव्हत्या. खरे म्हणजे येथील जीवन हे व्यक्तिजीवन नव्हतेच. कारण येथे व्यक्तीच नव्हत्या, जाती होत्या. त्या जातींत व्यक्तीच्या स्वतंत्र जीवनाला स्थानच नव्हते आणि त्यामुळे समाजाच्या उत्कर्षापकर्षाचे चिंतन करावे, घडलेल्या व घडणाऱ्या इतिहासाचे अनुभव जमेस धरून त्यावरून काही निष्कर्ष काढावे, आणि त्याअन्वये समाजाची नवी घडी बसवावी, हा जो समाजातील तत्त्ववेत्यांचा प्रधान उद्योग तो या भूमीतून प्रायः लुप्तच झाला होता. या काळात या भूमीवर शेकडो आक्रमणे झाली. पण ती मारून काढण्याचे सामर्थ्य आपल्या ठायी का नाही, आपली समाजरचनाच याला कारण आहे की काय, धनधान्यासाठी समृद्ध असा या देशाचा पूर्वी लौकिक असताना, सुवर्णभूमी म्हणून हा देश प्रतिद्ध असताना, आज येथे अन्नान्नदशा का झाली आहे, आपण व्यापारात मागे का पडलो, याची चिंता करणाऱ्या व्यक्तीच या समाजात नव्हत्या. खरे म्हणजे पूर्वीचा इतिहासच या लोकांना माहीत नव्हता. आपले पूर्वज धर्मप्रसारासाठी, व्यापारासाठी व साम्राज्ये स्थापन करण्यासाठी सर्व जगभर फिरत असत, याची या काळच्या लोकांना कल्पनाच नव्हती. स्वतःचा इतिहासच ज्यांना ठाऊक नाही ते लोक चिंतन कशाचे करणार आणि तसे चिंतन केल्यावाचून संस्था कशा निर्माण होणार ?'<br><noinclude></noinclude>
bzky2rmjdmpsztmgo76y4wxs9dw15d9
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८२
104
73770
232115
164985
2026-06-12T03:02:43Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232115
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६५६}}</noinclude>{{gap}}पाश्चात्य विद्येचा प्रसार येथे होऊ लागताच या सर्व जाणिवा येथल्या सुशिक्षित समाजातील व्यक्तींना झाल्या आणि त्यांनी या देशात धर्म, राजकारण, शिक्षण, संशोधन, व्यापार, उद्योग इ. सर्व क्षेत्रांत अनेकविध संस्था निर्माण केल्या. या संस्थांच्या पसाऱ्याची काहीशी कल्पना देऊन हे प्रकरण पुरे करू. प्रत्येक क्षेत्रातल्या त्यांच्या सांस्कृतिक कार्याचे विवेचन पुढे स्वतंत्रपणे करावयाचे आहेच.<br><br>'''धर्मसंस्था'''<br>{{gap}}धर्मक्षेत्रात नवीन धर्मकल्पनांचा प्रसार करण्यासाठी दादोबा पांडुरंग यांनी प्रथम 'मानवधर्मसभा' आणि नंतर 'परमहंससभा' अशा संस्था स्थापन केल्या. नंतर आत्माराम पांडुरंग, न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर यांच्या पुरस्काराने 'प्रार्थना समाजा'ची स्थापना झाली. प्रार्थना समाजाचे वळण काहीसे ख्रिश्चनधर्मीय होते. त्याच्या प्रतिकारार्थ स्वामी दयानंद यांनी मुंबईस 'आर्यसमाजा'ची स्थापना केली. त्याचा प्रसार मात्र प्रामुख्याने पंजाबात झाला. अलीकडच्या काळात म. म. काणे, तर्कतीर्थ कोकजे यांनी लोणावळे येथे 'धर्मनिर्णय मंडळ' स्थापन करून हिंदू धर्मात मोठे परिवर्तन घडवून आणण्याचे प्रयत्न केले. स्वामी केवलानंद यांनी वाईला 'प्राज्ञपाठशाला' याच हेतूने स्थापन केली.<br><br>'''शिक्षणसंस्था'''<br>{{gap}}शिक्षणक्षेत्रात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी अनेक शाळा काढल्या. सरकारनेही शाळा स्थापन केल्या होत्या. पण वर सांगितल्याप्रमाणे विशेष ध्येय डोळ्यांसमोर ठेवून म. ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी व स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा स्थापन केल्या. पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना झाली व न्यू इंग्लिश स्कूल, नू. म. विद्यालय, भावे स्कूल, फर्ग्युसन कॉलेज, न्यू पूना कॉलेज अशा संस्था त्यांनी काढल्या व पुढे महाराष्ट्रभर त्यांच्या शाखांचे जाळे विणले. महर्षी कर्वे यांनी हिंगणे अनाथ बालिकाश्रम, नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालय, कन्याशाळा व रमाबाई रानडे यांनी सेवासदन अशा संस्था स्थापून स्त्रीशिक्षणाचा प्रश्न धसास लाविला. वरील संस्थांच्या अनुकरणानेच पुढे सर्व महाराष्ट्रभर अनेक शिक्षणसंस्था निघाल्या.<br><br>'''राजकीय'''<br>{{gap}}पितामह दादाभाई, जगन्नाथ शंकरशेठ, भाऊ दाजी या मंडळींनी १८५२ साली मुंबईला 'बॉम्बे असोसिएशन' ही संस्था स्थापन करून अर्वाचीन राजकारणाचा पाया घातला. पुढे सार्वजनिक काकांच्या साह्याने न्यायमूर्ती रानडे यांनी सार्वजनिक सभा चालविली व शेतकऱ्यांत खेड्यापाड्यात हिंडून राजकीय जागृतीचा प्रारंभ केला.<noinclude></noinclude>
stof3i8qkewqa2c9ikfqaknm0islrjm
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८३
104
73771
232116
164986
2026-06-12T03:03:03Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232116
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६५७|| नव्या प्रेरणा}}</noinclude>१८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली आणि भारतीय राजकारण एका विशिष्ट दिशेने चालू लागले. लवकरच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात कॉंग्रेसच्या शाखांची स्थापना झाली.<br><br>'''सामाजिक'''<br>{{gap}}म. फुले यांनी स्थापिलेला 'सत्यशोधक समाज,' महर्षी शिंदे यांचे 'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ,' प्रथम काँग्रेसची एक उपसंस्था म्हणून स्थापन झालेली 'सामाजिक परिषद' या समाजक्षेत्रात काम करणाऱ्या संस्था होत. कामगार संघटना उभारण्याचे काम लोखंडे यांनी आणि शेतकरी संघटनेचे काम भालेकर यांनी सुरू केले. मुंबईला ट्रेड युनियन या संस्थेची बांधणी करण्याचे कार्य ना. म. जोशी, बॅ. बॅप्टिस्टा यांनी प्रारंभिले. मार्क्सवादी तत्त्वावर याच चळवळी डांगे, निमकर, जोगळेकर, इ. कम्युनिस्ट नेत्यांनी चालविल्या.<br>{{gap}}१९१० मध्ये 'भारत इतिहास संशोधक मंडळा' ची स्थापना झाली. 'भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था' ही इतिहास संशोधक संस्थाच आहे. धुळे येथील 'राजवाडे संशोधन मंदिर' या संस्थेने महाराष्ट्र इतिहास संशोधनाचे कार्य पुढे चालविले आहे.<br><br>'''औद्योगिक'''<br>{{gap}}औद्योगिक क्षेत्रात डोळ्यात भरण्याजोगे कार्य महाराष्ट्र करू शकला नाही. किर्लोस्कर, ओगले ही उदाहरणे अभिनंदनीय आहेत. पण ती त्या काळी अपवादात्मक होती. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांनी औद्योगिक क्षेत्रात संघटना निर्माण करण्याचे प्रयत्न नेटाने चालविले आहेत. सहकारी साखर कारखान्यांचा विशेष अभिमानाने उल्लेख केला पाहिजे. कारण महाराष्ट्राला जी काही थोडी समृद्धी लाभली आहे ती त्यांच्यामुळेच लाभली आहे.<br><br>'''नावीन्य'''<br>{{gap}}वरील संस्थांचे नुसते रूप डोळ्यांपुढे आणले तरी मागल्या काळच्या संस्थाहून या अगदी निराळ्या आहेत हे ध्यानात येईल. ग्रामस्थ म्हणून किंवा जात म्हणून या संस्थांत कोणी आलेले नाही. काही उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून नेत्यांनी संस्था काढल्या आणि ते ज्यांना पटले, मानवले त्या त्या व्यक्ती त्या संस्थांना जाऊन मिळाल्या नवे जीवन ते हेच होय. सार्वजनिक, राष्ट्रीय कार्य असे मागे नव्हतेच. ते आता य. संस्था करू लागल्या. त्यांना जाऊन मिळण्याचे जसे स्वातंत्र्य प्रत्येकाला होते, तसे न मिळण्याचे किंवा मतभेद झाल्यास ती संस्था सोडण्याचे स्वातंत्र्यही होते. ग्रामसंस्थांत किंवा जातिसंस्थांत असले स्वातंत्र्य कोणालाच नव्हते.<br>{{gap}}यावरून हे स्पष्ट होते की मानवाकडे मानव म्हणून आता समाज पाहू लागला.<noinclude><br>{{gap}}४२</noinclude>
4woulo8wkaa44t6ffl1z61q4af2qszy
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८४
104
73772
232117
164987
2026-06-12T03:03:31Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232117
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६५८}}</noinclude>हेच पूर्वी नव्हते. माणसाची ओळख जातीवरून व्हावयाची आणि जात म्हटली की अनेक कर्मकांडे व अनेक अर्थशून्य बंधने यांनी तो मनुष्य जखडलेला असे. म्हणजे तो एकपरी गुलामच होता. आता ती गुलामगिरी संपली. आता मानवाला महत्त्वाची प्रतिष्ठा आली. त्याच्या मनाला, बुद्धीला, प्रजेला स्वातंत्र्य आले, त्यांच्या विकासाला संधी मिळाली आणि तसा विकास झाल्यामुळेच येथे शंभर वर्षांत क्रांती होऊ शकली.<br><br>'''ऐहिक आकांक्षा'''<br>{{gap}}वरील संस्था पहिल्या म्हणजे भारतीयांच्या आणि त्याप्रमाणेच महाराष्ट्रीयांच्या ऐहिक आकांक्षा आता जागृत झाल्या होत्या हे स्पष्ट दिसते. निवृत्तिवाद, आचार्य, संत यांनी केलेली संसारनिंदा, मायावाद, कर्मविपाकवाद यामुळे या भूमीत ऐहिक वैभवाच्या, श्रीसमृद्धीच्या सर्व आकांक्षाच नष्ट झाल्या होत्या. परकीयांनी सर्व हिंदुस्थान जिंकला तो बहुतेक हिंदू सेनापती आणि हिंदू लष्कर यांच्या साह्यानेच जिंकला. हे कशाचे द्योतक आहे ? स्वराज्य, वैभव, सत्ता, समृद्धी, दिग्विजय यांच्या आकांक्षाच येथील लोकांच्या मनात नव्हत्या. किंवा असल्या तर त्या अत्यंत क्षीण अशा होत्या. 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' अशी येथल्या समाजाची वृत्ती झाली होती. पाश्चात्य विद्येमुळे ती पालटली व ऐहिक पराक्रमाची प्रेरणा हिंदी लोकांच्या ठायी निर्माण झाली. स्वातंत्र्यासाठी पुढे त्यांनी मरणमारणाचे संग्राम केले ते या प्रेरणेमुळेच.<br>{{gap}}ब्रिटिश कालाच्या शंभर सवाशे वर्षात महाराष्ट्रीय संस्कृतीत कोणते परिवर्तन झाले त्याचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. धर्म, समाजकारण, विज्ञान, अर्थव्यवस्था या सर्व क्षेत्रांचा विचार त्यात होईलच. पण या परिवर्तनामागे कोणत्या प्रबळ प्रेरणा होत्या पहाणे अवश्य वाटल्यावरून त्यांचे विवेचन प्रथम केले. आता वरील अंगांचा तपशिलाने विचार करणे सुलभ होईल.<br><br>{{center|■}}<noinclude></noinclude>
qh603ym10xdinfsh8ssnyvtt6tecyca
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८५
104
73773
232118
164988
2026-06-12T03:03:43Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232118
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop
|Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf
|Page = 685
|bSize = 396
|cWidth = 314
|cHeight = 164
|oTop = 47
|oLeft = 32
|Location = center
|Description =
}}
<br><br>{{rh|'''<big>३५.</big>'''||'''<big>धर्मक्रांती</big>'''}}<br><br>'''धर्माचा अर्थ'''<br>{{gap}}धर्म हे संस्कृतीचे सर्वात श्रेष्ठ अंग होय. येथे धर्म या शब्दाचा प्राचीन ऋषिमुनी- प्रणीत धर्म असा अर्थ अभिप्रेत आहे. ईश्वरभक्ती, मानवतेचे प्रेम, सत्य, न्याय, दया, क्षमा, शांती, त्याग, परोपकार, समाजसेवा, सत्त्व, स्वाभिमान, प्रवृत्तिवाद, वैभवाच्या, अभ्युदयाच्या, स्वराज्यसाम्राज्याच्या आकांक्षा, निर्लोभ वृत्ती, निर्मळ, विशुद्ध जीवन, औदार्य हा सगळा धर्माचा अर्थ आहे. श्रीकृष्ण, व्यास, संत, समर्थ, शिवछपती यांनी हाच अर्थ मानला होता, हे मागे अनेक प्रकरणांतून सांगितलेलेच आहे. त्याचे विवेचनही तेथे केलेले आहे. असा हा जो परम श्रेष्ठ धर्म, त्याचा हिंदुस्थानातून मराठ्यांच्या काळाच्या अखेरीस संपूर्ण लोप झाला होता. हेमाद्रीपासून या काळापर्यंत जे शास्त्रीपंडित झाले, त्यांचा धर्म म्हणजे कर्मकांड, व्रतवैकल्ये, श्राद्धपक्ष, उपास- तापास, सोवळे ओवळे, नाना प्रकारचे अर्थहीन आचार हा होता. खरा धर्म म्हणजे काय हे जाणण्याची पात्रताच त्यांच्या ठायी नव्हती.<br>{{gap}}पण मराठेशाहीचा अंत होऊन पाश्चात्य विद्येचा प्रसार येथे होताच धर्माचा खरा अर्थ येथल्या नेत्यांना अत्यंत अल्पावधीत कळू लागला आणि प्रथम बंगालमध्ये आणि मग महाराष्ट्रात धर्मसुधारणेची चळवळ सुरू झाली.<br>{{gap}}१८४८ साली लोकहितवादी यांनी 'प्रभाकर' पत्रात जी 'शतपत्रे' लिहिली, त्यांत धर्मसुधारणेची, खऱ्या धर्माची सर्व तत्त्वे सांगितली आहेत. पण त्याच्याही आधी बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग यांनी धर्मसुधारणेची चळवळ सुरू केली होती. तिचा परामर्श घेऊन मग लोकहितवादींचा विचार करू.<br><noinclude></noinclude>
hyuwqj3mw8ggw4v3i1kmkhevpatb87e
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८६
104
73774
232119
164990
2026-06-12T03:06:25Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232119
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६६०}}</noinclude><br>'''बाळशास्त्री'''<br>{{gap}}बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातल्या सर्वच सुधारणांचे आद्य प्रवर्तक होते. १८३२ साली त्यांनी 'दर्पण' हे पाक्षिक सुरू केले आणि ते बंद पडल्यावर १८४० साली 'दिग्दर्शन' या मासिकातून तेच कार्य पुढे चालविले. राजा राम मोहन राय यांचे ते अनुयायी असून पाश्चात्य विद्येचे पुरस्कर्ते होते. तिच्या प्रसाराने, या देशात फार दिवस व्यापून राहिलेला अज्ञानांधकार नाहीसा होईल, अशी त्यांची खात्री होती. ते आपल्या शिष्यांना शिकवीत की आपले पूर्वकाळचे ऋषिजन विद्यासंपन्न असून, सर्व जन्म विद्यादानात चालवीत. त्यांचेच अनुकरण करून आपण येथील प्रजेत स्वदेशाभिमान व स्वधर्माभिमान रुजविला पाहिजे. बाळशास्त्री केवळ उपदेश करूनच थांबले नाहीत. धर्मांतरितांची शुद्धी करून त्यांना स्वधर्मात परत घेतले पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्याप्रमाणे श्रीपाद शेषाद्री या ख्रिश्चनांनी बाटविलेल्या तरुणास शुद्ध करून त्यांनी स्वधर्मात घेतले. यासाठी त्यांना त्या वेळच्या शास्त्रीपंडितांचा कडवा विरोध सहन करावा लागला; पण तो सोसून त्यांनी महाराष्ट्राच्या बुद्धीला नवे वळण लावण्याचे महत्कार्य केले.<br><br>'''मिशनरी'''<br>{{gap}}ख्रिश्रन मिशनऱ्यांचे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे प्रयत्न दीर्घकाळ चालू होते. प्रारंभी कंपनी सरकारने आपल्या हद्दीत त्यांना बंदी घातली होती. कारण त्यामुळे लोकांत प्रक्षोम माजेल व राज्याला धोका निर्माण होईल, अशी त्याला भीती वाटत होती. पण १८१३ साली ब्रिटिश पार्लमेंटने मिशन यांना धर्मप्रसाराचे कार्य करण्यास परवानगी दिली. त्यामुळे त्यांचे कार्य दुप्पट जोमाने सुरू झाले. लोकांना औषधोपचार करणे व शाळा स्थापून त्यांना शिकविणे ही त्यांची धर्मप्रसाराची साधने होती. त्यांचे कार्य विशेषतः दीनदलितांत, हीनजातीयांत चाले. हे कार्य पाहून येथल्या सुशिक्षितांवरही त्याचा फार प्रभाव पडला. कारण रंजल्या गांजलेल्यांना आपले म्हणविणे, अशी संतांची शिकवण असूनही, प्रत्यक्षात हिंदुधर्मीयांनी ती कधीच अमलात आणली नव्हती. त्यामुळे लोकसेवेचा हा अभिनव प्रकार पाहून, हिंदूधर्म अत्यंत हीन आहे, त्याच्या ठायी असे उदात्त काही नाही, असे त्यांना वाटू लागले व त्यांच्यापैकी काहींनी प्रत्यक्ष धर्मांतरच केले. ते पाहून ख्रिचन मिशनऱ्यांना व मेकॉलेसारख्या पंडितांनाही, पाचपन्नास वर्षात येथे एकही मूर्तिपूजक शिल्लक राहणार नाही, असे वाटू लागले. पण आता हिंदू नेते सावध होऊन आत्मनिरीक्षण करू लागले होते. त्यामुळे त्यांनी हिंदुधर्माचे खरे स्वरूप लोकांना दाखवून तो अनर्थ टाळण्याचे यावत् शक्य प्रयत्न चालविले.<br><noinclude></noinclude>
offu0jjpvv1vo5ha6lpj0v5p8y0x0ji
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८७
104
73775
232120
164991
2026-06-12T03:06:40Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232120
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६६१|| धर्मक्रांती}}</noinclude><br>'''परमहंस सभा'''<br>{{gap}}बाळशास्त्री जांभेकर यांच्या नंतर धर्मसुधारणेचा प्रयत्न करणारे मोठे पंडित म्हणजे 'मराठीचे पाणिनी' म्हणून प्रसिद्ध असलेले दादोबा पांडुरंग हे होत. त्यांनी प्रथम सुरतेला १८४४ साली 'मानवधर्म सभा' नावाची संस्था स्थापन केली. ईश्वर एक असून तो निराकार आहे, नीतिपूर्वक ईश्वरभक्ती हाच खरा धर्म होय, नित्यनैमित्तिक कर्मे विवेकास अनुसरून करावी, सर्वांस ज्ञानशिक्षा असावी, प्रत्येक मनुष्यास विचार- स्वातंत्र्य आहे, अशी या सभेची मुख्य तत्त्वे होती. मूर्तिपूजा त्यांना वेडगळ वाटे व रविवारी एकत्र जमून ते ख्रिश्चन लोकांप्रमाणे निराकार परमेश्वराची प्रार्थना करीत. ही सभा फार दिवस टिकली नाही. तेव्हा १८४९ साली दादोबांनी 'परमहंस सभा' म्हणून दुसरी सभा स्थापन केली. हिची तत्त्वे पहिल्यासारखीच होती. शिवाय जातिभेद मोडण्याचे प्रत्यक्ष काम ते आरंभी करीत. म्हणजे प्रत्येक सभासदास ख्रिस्त्याच्या हातचा पाव, अस्पृश्याने शिजविलेले अन्न व मुसलमानाने आणलेले पाणी प्यावयास देत. हे स्वीकारल्यावाचून कोणासही सभासद होता येत नसे.<br>{{gap}}त्या काळच्या मानाने पाहता हा विचार व ही कृती अत्यंत क्रांतिकारक होती. तीत वैगुण्य एवढेच की हे सर्व काम गुप्तपणे चाले. वास्तविक ज्याला समाजसुधारणा करावयाची आहे त्याने मोठ्या धैर्याने पुढे येऊन समाजाला नवी तत्त्वे सांगितली पाहिजेत आणि त्यांचे आचरण केले पाहिजे. पण हे धैर्य यांपैकी कोणाच्याही अंगी नव्हते. दादोबांनी या सभेसाठी 'पारमहंसिक ब्राह्मधर्म' असे नाव देऊन वीस ओव्यांची एक पोथी रचली होती.
{{Block center|<poem>विश्वकुटुंबी जो । सर्वादिकारण । बापा त्या शरण । जावे तुम्ही
बंधूच्या नात्याने । वागा मानवाशी । उदार मनासी । ठेवूनिया
भूतदयेने । करा देवपूजा । हीच अधोक्षजा । आवडते
करा किंवा टाका । बाह्य धर्म साेंग । ठेवा अंतरंग । शुद्धतरी
दया भक्तिशील । मनाचे मवाळ । करिली हळहळ । देशाचिया
म्हणोनिया दावा । सदाचरणास । ज्ञानाचा तो अंत । दादोबा म्हणे</poem>}}
{{gap}}त्या त्यांच्या ओव्यांवरून 'सदाचार, शुद्ध अंतःकरण हाच खरा धर्म ', 'कर्मकांडाला महत्त्व नाही', 'भूतदया हीच देव पूजा', 'सर्व मानव एकच आहेत', स्वदेशसेवा ही धर्मसेवाच आहे, ही धर्मक्रांतीची सर्व तत्त्वे या पारमहंसिक ब्राह्मधर्मात होती, असे दिसून येईल. पण सर्व लोकांपुढे ती सांगण्याचे व आचरण्याचे धैर्य कोणातही नसल्याने, कोणी उपद्व्यापी पुरुषाने सभासदांची नावे प्रसिद्ध करताच सभेची वाताहात झाली. पण गुप्तपणे का होईना असले क्रांतिकारक विचार त्या वेळी काही लोकांच्या मनात आले व सभेत त्यांनी ते आचरले हेही कौतुकास्पद आहे.<br><noinclude></noinclude>
oa3oytbrmq7pxdapdtyvm0e0izrvmx8
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८८
104
73776
232121
164992
2026-06-12T03:07:19Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232121
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६६२}}</noinclude><br>'''नवी धर्मतत्त्वे'''<br>{{gap}}दादोबांच्या नंतरचे मोठे धर्मसुधारक म्हणजे लोकहितवादी हे होत. त्यांचा निर्देश वर केलाच आहे. नव्या धर्मतत्त्वांची सविस्तर मांडणी प्रथम त्यांनीच केली. ब्राह्मण हे त्या वेळी हिंदुधर्माचे गुरू मानले जात. पण ते अत्यंत हीन अशा कर्मकांडात्मक धर्माला कवटाळून बसले होते आणि त्यांच्या मनावर पुराणातील भाकडकथांचे फार वर्चस्व असे. वास्तव जगाकडे पाहण्याची कुवतच त्यांच्या ठायी नव्हती. पूर्वी अवतार घेऊन परमेश्वराने पृथ्वीचा भार हरण केला, तसाच आता इंग्रजांचा संहार करून तो करील, अशा जुनाट कल्पनांचे ते दास होते. त्यामुळे त्यांचे गुरुत्व नष्ट करण्यासाठी लोकहितवादींनी त्यांस विद्याशून्य, मूर्ख, बैल अशा कडक शिव्या देऊन त्यांची कमालीची निर्भत्सना केली. विचारस्वातंत्र्य, ईश्वरभक्ती, स्वदेशसेवा, स्त्रीपुंरुष समता, प्रवृत्तिमार्ग, गुणनिष्ट वर्णभेद, सत्याचरण, विद्यार्जन, सर्व मनुष्ये सारखींच आहेत, अशी त्यांची प्रमुख धर्मतत्त्वे होती. पाश्चात्य विद्येचा त्यांस फार अभिमान व संस्कृत विद्येचा त्यांना अत्यंत तिटकारा होता. प्राचीन काळच्या ऋषिमुनींना ते वंद्य मानीत. पण त्यांचे ग्रंथ प्रमाण मानावे, हे त्यांस मुळीच मान्य नव्हते. ते प्राचीन ब्राह्मण धर्मसुधारणेचा व लोकहिताचा विचार अहोरात्र करीत. पण तशा तऱ्हेचा एक तरी ब्राह्मण आज काशीपासून रामेश्वरापर्यंत आहे काय, असे ते विचारतात. रामशास्त्री प्रभुणे हे त्यांच्या मते खरे ब्राह्मण. ते होते तोपर्यंत राज्य कृतयुगासारखे चालले, असे ते म्हणतात. प्राचीन काळी असे ब्राह्मण होते. ते खरे विद्येचे व धर्माचे उपासक होते. पण पुढचे ब्राह्मण मूर्ख झाले व पाठांतर हीच विद्या असे मानू लागले. त्यामुळे हिंदुधर्माचा अधःपात झाला. लोकहितवादींनी कडक टीका केली आहे ती या ब्राह्मणांवर.<br>{{gap}}एक गोष्ट या धर्मप्रकरणी ध्यानात येते. स्वदेशसेवा हा धर्म आहे, हे बाळशास्त्री यांच्यापासून प्रत्येकाने सांगितले आहे. ब्रिटिश विद्या येऊन पुरती दहापंधरा वर्षे झाली नाहीत तोच पाश्चात्य विद्याविभूषितांना राष्ट्रधर्माची जाण आली. हे मागल्या कित्येक शतकांत घडले नाही. म्हणूनच या काळातला प्रत्येक पंडित हा पाश्चात्य विद्येचा महिमा गाताना दिसतो. 'देश ही मातोश्रीच आहे' असे 'स्वदेशप्रीती' या पत्रात लोकहितवादींनी म्हटले आहे. 'जसे आपण मातोश्रीस वंद्य मानतो, व तिच्या पोटी आलेले सर्व बंधू प्रीतीने वागतात, तद्वत् या जमिनीवर जे आपण आहोत, ते सर्व एकमेकांचे बंधू आहाेंत व हा देश आपणा सर्वांना मातोश्री आहे.' 'स्वदेशहितास झटावे,' हीच लोकहितवादींच्या मते खरी धर्मसुधारणा आहे. युरोप याच सुधारणेमुळे उन्नत झाला, हे सांगताना ते म्हणतात, 'आपले देशाचे हित करावे, हा मुख्य धर्म युरोपात समजतात.' लोकहितवादींच्या सर्व सुधारणांचे सारभूत तात्पर्य या उताऱ्यात आले आहे.<br><noinclude></noinclude>
0re18pio9ga0xckjj5a07y91lntz0fk
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६८९
104
73777
232122
164993
2026-06-12T03:07:36Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232122
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६६३|| धर्मक्रांती}}</noinclude><br>'''प्रार्थना समाज'''<br>{{gap}}दादोबा पांडुरंग यांच्या प्रारंभीच्या दोन सभा अपयशी झाल्या तरी त्यांनी चिकाटी सोडली नाही. १८६७ साली 'प्रार्थना समाजा'ची स्थापना झाली. तीत ते व त्यांचे बंधू आत्माराम पांडुरंग यांनी पुढाकार घेतला होता. न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर ही थोर मंडळी मागून येऊन त्यांस मिळाली. दादोबांनी सांगितलेलीच तत्त्वे बव्हंशी प्रार्थना समाजाला मान्य होती. परमेश्वर निर्गुण निराकार आहे, सत्य, सदाचार, भक्ती यांनीच तो प्रसन्न होतो, अशा तऱ्हेची विवेचने रानडे, भांडारकर यांनी केली आहेत. प्रार्थनासमाज निराकार परमेश्वराला भजत असला तरी तो समाज सभेत तुकारामाचे अभंग म्हणत असे. ब्रिटिश कालातील धर्मसुधारणांत प्रार्थनासमाजाला महत्त्वाचे स्थान आहे. पण ते, रानडे, भांडारकर, असे थोर पुरुष त्याला येऊन मिळाल्यामुळे आणि त्यांनी केलेल्या तात्त्विक विवेचनामुळे प्राप्त झाले होते. एरवी प्रत्यक्षात काही वरिष्ठ सुशिक्षित वर्गापलीकडे त्याचा प्रसार झाला नाही आणि पुणे, सातारा, कोल्हापूर, नगर, मुंबई अशा शहरांपलीकडे तो गेला नाही.<br><br>'''सत्यशोधक समाज'''<br>{{gap}}'प्रार्थना समाजा'चा जसा सुशिक्षित वर्गात प्रसार झाला तसा महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या (१८७३) 'सत्यशोधक समाजा'चा बहुजनसमाजात प्रसार झाला. ब्राहाणी वर्चस्व आणि कर्मकांडात्मक ब्राह्मणी धर्म यांवर बहुजन समाजातील धर्मसुधारकाने, इतका प्रखर हल्ला यापूर्वी कधी कोणी केला नव्हता. परमेश्वर आणि मनुष्य यांमध्ये भटजी हा जो दलाल त्याचा जोतिबांनी कडकडून निषेध केला आहे. सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्थी ॥ असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वीच जोतिबांनी स्त्रिया व अस्पृश्य यांसाठी शाळा स्थापून समाजक्षेत्रात मोठी क्रांती केली होती. त्यामुळे त्यांना सर्वत्र मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. त्यामुळे आणि ब्राह्मण- विरोधामुळे सत्यशोधक समाजाचा प्रसार त्या वेळी वेगाने झाला.<br><br>'''प्रतिक्रिया'''<br>{{gap}}याच सुमारास विष्णुबुवा ब्रहाचारी- गोखले- यांचा उदय झाला. हे ब्रह्मचारी संन्यासी असून त्यांना दत्ताचा साक्षात्कार झाला होता. प्राचीन परंपरा व वेद यांचा त्यांना कडवा अभिमान होता. लोकहितवादी, रानडे, भांडारकर यांना भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान नव्हता असे नाही. पण हे सर्व लोक इंग्रजांचे राज्य हे एक वरदान मानीत असत आणि त्यांच्या सभा, प्रार्थनापद्धती हे सर्व ख्रिस्ती वळणावर जात असे. प्रत्येक धर्मात काही तरी व्यंगे असतातच. पण ख्रिश्चन लोक हिंदुधर्मातील व्यंगावर बोट ठेवून त्याची निंदानालस्ती करीत. त्याला वरील लोकांनी<noinclude></noinclude>
aswcm47zscsyt8z2lsmrg3773u5h2q1
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९०
104
73778
232123
164994
2026-06-12T03:07:49Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232123
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६६४}}</noinclude>कधीच उत्तर दिले नाही. ब्राह्मो समाजाचे केशवचंद्रसेन हे तर संपूर्णपणे ख्रिस्तमय होऊन गेले होते. जोतिबांनी तर, महाराष्ट्रात प्रत्येक खेड्यात दोन मिशनरी ठेवावे, अशी इंग्रज सरकारला सूचना केली होती. या सर्वांमुळे हे लोक हिंदी समाजाला परके वाटत. याची प्रतिक्रिया म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी ही होय. ख्रिश्चन धर्मातील व्यंगे शोधून काढून, त्यावर ते कडाडून हल्ला चढवीत. त्यामुळे मुंबईच्या चौपाटीवर त्यांच्या सभा फार गाजत व ख्रिश्रनांच्या धर्मप्रसाराला तोडीस तोड मिळे. पण असे असले तरी विष्णुबुवांचा स्वधर्माभिमान आंधळा नव्हता. जन्मनिष्ठ जातिभेद व वर्णभेद त्यांना मान्य नव्हते. मनुष्य वयात आल्यावर त्याचे गुण पाहून त्याप्रमाणे त्याचा वर्ण ठरवावा व लग्ने त्या वर्णाप्रमाणे व्हावी, असे ते सांगत असत. दुसरा एक त्या काळच्या दृष्टीने अत्यंत आश्चर्यकारक असा विचार त्यांनी आपल्या 'सुखदायक राज्यप्रकरणी' या पुस्तकात सांगितला आहे. 'सर्व प्रजेने सर्व क्षेत्रांत कष्ट करावे आणि जे अन्नधान्य, कपडे निर्माण होतील ते राजाने एका कोठारात साठवून ठेवावे व तेथून ज्याला जो लागेल तो माल प्रत्येकाने न्यावा, सोन्यामोत्यांच्या दागिन्यांची सुद्धा अशीच व्यवस्था असावी.' हा अगदी अस्सल मार्क्सवादी विचार आहे. तो या संन्याशाने मार्क्सचा काडीमात्र अभ्यास नसताना येथे सांगितला होता, हे मोठे विस्मयजनक आहे. विष्णुबुवांच्या कोणत्याच विचाराचा समाजांत प्रसार झाला नाही, हे खरे. पण अगदी सनातनी म्हणविणाऱ्या मनातसुद्धा त्या वेळी धर्मक्रांती झाली होती. हे त्यांच्या उदाहरणावरून दिसून येईल.<br><br>'''थिऑसफी'''<br>{{gap}}'थिऑसफी' या धर्मपंथाचाही विचार जाता जाता केला पाहिजे. मॅडम ब्लॉव्हाट्स्की या रशियन बाईने १८७५ मध्ये अमेरिकेत 'थिऑसफी' पंथाची स्थापना केली आणि कर्नल ॲल्काट यांनी १८७९ साली हिंदुस्थानात येऊन मुंबईला पहिली 'थिऑसफिकल सोसायटी' स्थापन केली. या संस्थेत प्रमुख मंडळी महाराष्ट्रीय होती. श्री. मावळंकर, लोकहितवादी, डॉ. कुंटे, डॉ. भाटवडेकर, न्या. मू. गाडगीळ इ. प्रतिष्ठित लोक प्रारंभीच संस्थेला मिळाले. १८८२ साली मद्रासजवळ अड्यार येथे या संस्थेचे कार्यालय नेण्यात आले.<br>{{gap}}थिऑसफीची मूलतत्त्वे हिंदुधर्मासारखीच आहेत. परब्रह्म, आत्म्याचे अमरत्व, पुनर्जन्म, हे सर्व थिऑसफीला मान्य आहे. कर्मविपाकाचे तत्त्वही मान्य आहे. त्याचबरोबर विश्वबंधुत्वाचा प्रसार हे व्यापक अधिष्ठान संस्थेला असल्यामुळे हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, फारशी, बौद्ध अशा सर्व धर्मीयांचा समावेश या पंथात होतो.<br>{{gap}}थिऑसफीला भारतात विशेष उजळा मिळाला तो डॉ. ॲनी बेझंट या बाईंच्यामुळे. 'भरतभूमी ही माझी खरी मायभूमी' असे त्या मानीत. थोर महात्मे जगाला मार्गदर्शन करीत असतात, अशी थिऑसफिची श्रद्धा आहे. त्याच कारणामुळे बेझंटबाईंनी<noinclude></noinclude>
5bq4b2cszxfdrj7ai3ef6obhik1c9vp
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९१
104
73779
232124
164995
2026-06-12T03:08:02Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232124
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६६५|| धर्मक्रांती}}</noinclude>तेरा वर्षीच्या एका मुलाला, 'जगद्गुरूचा अवतार' असे मानून, त्याचा संभाळ केला व शिक्षण केले. सध्याचे जे. कृष्णमूर्ती ते हेच होत. ते आता थिऑसफीतून बाहेर पडले आहेत आणि, ज्याचा त्याने स्वतंत्र विचार करावा, असे सांगतात. थिऑसफीला जसे सुशिक्षित वर्गात अनेक निष्ठावंत अनुयायी मिळाले, तसे कृष्णमूर्तीनांही मिळाले आहेत. पण एवढे खरे आहे की काही मर्यादित सुशिक्षित वर्गापलीकडे या दोन्ही पंथांचा प्रसार महाराष्ट्रात केव्हाच झाला नाही.<br>{{gap}}बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, प्रार्थनासमाजातील रानडे, भांडारकर, सत्यशोधक म. फुले या सर्वांना हिंदुधर्माचे पुनरुज्जीवनच करावयाचे होते. पण त्यांपैकी बरेचसे पुरुष सरकारी नोकर होते. इंग्रजांचे राज्य हे दैवी वरदान असे ते मानीत असत. ख्रिश्चन धर्म अनेक कृष्णकारस्थाने करीत असूनही ते त्यांचा गौरव करीत असत. यामुळे सर्व भारतात नवचैतन्याची लाट निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले नाही. ते कार्य केले ते स्वामी विवेकानंदांनी. भरतभूमीच्या सुदैवाने हा महापुरुष त्या वेळी उदयाला आला आणि चित्कलेचा स्पर्श व्हावा तसा प्रकार होऊन सर्व भारतात नवचैतन्य निर्माण झाले व त्याची कोमेजलेली अस्मिता पुन्हा प्रफुल्ल झाली.<br><br>'''नवचैतन्य'''<br>{{gap}}ब्रिटिशांनी हिंदी लोकांना रणात पराभूत केले होते. त्यांच्या विज्ञानामुळे हिंदी लोक दिपून गेले होते. ख्रिश्चन लोक त्यांच्या धर्माची सारखी निंदा करीत होते. पाश्चात्य विद्येच्या अभ्यासामुळे आपल्या धर्मातील, समाजातील व एकंदर जीवनातील अनेक उणिवा त्यांना स्वतःलाच दिसू लागल्या होत्या. या सर्वांमुळे आपण, आपला समाज, आपला धर्म, हीन आहे, आपण हीन पातळीवरचे लोक आहोत, असा एक न्यूनगंड त्यांच्या ठायी निर्माण झाला होता. पण १८९३ साली शिकागो येथील सर्व-धर्मपरिषदेत भाषण करून, स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्म हा सर्व जगातील धर्मापेक्षा श्रेष्ठ धर्म आहे, असे सिद्ध केले आणि पाश्चात्य विद्वानही, त्यांना परमेश्वरी अवतार मानून, त्यांचे शिष्यत्व पत्करण्यास सिद्ध झाले, तेव्हा हिंदी लोकांच्या मनावर आलेले मालिन्य क्षणार्धात नष्ट झाले, त्यांचा न्यूनगंड नाहीसा झाला आणि त्यांच्या मनाला नवा जोम प्राप्त झाला. सर्व हिंदुस्थानवर त्याचा परिणाम झाला, तसा महाराष्ट्रावरही झाला; आणि येथील आधीच्या धर्मसुधारणांना तितकेसे महत्त्व राहिले नाही.<br><br>'''आपला माणूस'''<br>{{gap}}स्वामी विवेकानंद केवळ अध्यात्मवादी नव्हते. ते प्राचीन परंपरेचे अंध भक्त नव्हते. भौतिक विद्येचे महत्त्व त्यांनी पुरेपूर जाणले होते. त्याचप्रमाणे आपल्या समाजातील अनंत उणीवांचीही त्यांना जाणीव होती. पण शिकागो येथील भाषणामुळे, संन्यास<noinclude></noinclude>
96q84auqbog514bazh0hlhnckun4n5s
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९२
104
73780
232125
164996
2026-06-12T03:08:15Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232125
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६६६}}</noinclude>घेऊन धर्मसुधारणेला त्यांनी सर्वस्वी वाहून घेतल्यामुळे, आणि ते प्राचीन ऋषिमुनींच्या भाषेत बोलत असल्यामुळे हा आपला माणूस आहे, अशी हिंदू लोकांची मनोमन खात्री झाली आणि मग त्यांनी केलेली टीका ते आनंदाने ऐकण्यास तयार झाले.<br><br>'''आत्मनिरीक्षण'''<br>{{gap}}स्वामींनी हा विषय मोठ्या कौशल्याने हाताळला. त्यांच्या 'कोलंबो अल्मोरा व्याख्यानमालेवरून हे दिसून येईल. प्रारंभी प्राचीन परंपरेची, उपनिषद्धर्माची मुक्तकंठाने स्तुती करून नंतर ते भौतिक विद्येकडे वळले आणि आपण जगाचे गुरू आहाेत, हा वृथाभिमान आपण बाळगू नये, आपल्यालाही पाश्चात्यांकडून शिकण्यासारखे पुष्कळ आहे, असे सांगण्यास त्यानी प्रारंभ केला.<br>{{gap}}ते म्हणत, भौतिक ज्ञान, संघटनकौशल्य, सत्ता खेळविण्याचे सामर्थ्य हे गुण आपण पाश्चात्यांकडून घेतले पाहिजेत. असा प्रारंभ करून स्वामीजींनी आपल्या गेल्या हजार वर्षांच्या अधःपाताचे चित्र श्रोत्यांपुढे उभे केले. 'आमच्यावर मुसलमानांचे आक्रमण झाले, ख्रिस्त्यांचे झाले, आमच्यापैकी कोट्यवधी लोक धर्मच्युत झाले. पण आम्ही यावर काय उपाययोजना केली ? आमच्यांत जे दीनदलित होते त्यांना आम्ही निवृत्तीचे धडे देत बसलो. आमच्या पंडितांनी सगळा धर्म सोवळ्याओवळ्यात आणून ठेवला आणि ऐहिक वैभवाकडे दुर्लक्ष केले. त्याचे हे परिणाम आहेत. येथे पाश्चात्यांकडून भौतिकवाद आला आहे. त्याने आपला उद्धारच होईल. त्याच्यामुळे जन्मनिष्ठ उच्च- नीचता नष्ट होईल, बुद्धिप्रामाण्य निर्माण होऊन धर्मग्रंथांची ठेव सर्वांच्या हाती येईल व सुखी जीवनाचे दरवाजे सर्वांना खुले होतील. पश्चिम ही धनिकांच्या टाचेखाली चेंगरली असली तर पूर्व ही धर्ममार्तंडांच्या टाचेखाली चिरडली आहे, हे ध्यानात ठेवा. आता एकीने दुसरीवर नियंत्रण ठेवून समतोल राखला पाहिजे. केवळ अध्यात्माने जगाची प्रगती होणार नाही.'<br>{{gap}}हे एका हिंदू संन्याशाचे उद्गार आहेत, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. स्वामी भौतिकवादी, जडवादी कधीच नव्हते. पण भौतिकवादाचे, ऐहिक वैभवाचे स्वराज्य- स्वातंत्र्य याचे महत्त्व त्यांनी पुरेपूर जाणले होते. आधीच्या सुधारकांनी सांगितलेल्या सर्व सुधारणा त्यांना मान्य होत्या. ते म्हणतात, 'सुधारकांनाही झेपणार नाही इतकी सुधारणा व्हावी, अशा मताचा मी आहे. पण स्वकीयांचा तेजोभंग करून काही साधणार नाही. सुधारकांच्या अपयशाचे हे कारण आहे. त्यांनी अतिरिक्त आत्मनिर्भत्सना केली. अशा तेजोभंगाने कार्यभाग होत नसतो.'<br>{{gap}}त्या काळी आपल्या जुन्या रूढी, लोकभ्रम, कर्मकांड यांचे, नव्या शास्त्रीय ज्ञानातील कोठला तरी सिद्धांत घेऊन, समर्थन करण्याची चाल थोडी सुरू झाली होती. या प्रकाराची स्वामींना अत्यंत चीड असे. ते म्हणतात, 'या प्रकारे जुन्या रूढींचे समर्थन करणे हे अत्यंत लजास्पद आहे. असे भोळसट होण्यापेक्षा तुम्ही नास्तिक झाला तरी<noinclude></noinclude>
crnx42z0xnvvgfh6xdrz0b993foo128
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९३
104
73781
232126
164997
2026-06-12T03:08:31Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232126
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६६७|| धर्मक्रांती}}</noinclude>चालेल. कारण नास्तिक मनुष्य हा खरा जिवंत मनुष्य असतो. निरीश्वरवादात एक प्रकारचे सामर्थ्य आहे. अंधश्रद्धा हा मात्र मृत्यू आहे. म्हणून कुजट रूढींच्या समर्थनापेक्षा नास्तिकतेनेच राष्ट्र वर येण्याचा जास्त संभव आहे.'<br>{{gap}}त्यांच्या सर्व प्रतिपादनाचे तात्पर्य त्यांच्या पुढील उद्गारांवरून ध्यानात येईल. 'आम्ही हिंदुस्थानातील संन्याशांनी गरिबांसाठी काय केले ? आम्ही त्यांना अध्यात्म शिकविले ! भुकेल्या माणसाला परमार्थ सांगणे ही धर्माची शुद्ध चेष्टा आहे. आज लक्षावधी लोक अनान्न करीत आहेत. ही जनता हा परमेश्वर नव्हे काय ? भारताचे भवितव्य या जनतेवर अवलंबून आहे. तिला समतेचा व स्वातंत्र्याचा संदेश दिला पाहिजे. असे करताना आपण कट्टरांतले कट्टर पाश्चिमात्य झाले पाहिजे. मात्र त्याच वेळी आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या श्रेष्ठ धर्माचा आपणांस कधीही विसर पडता कामा नये.' धर्मक्रांतीचे स्वरूप यावरून स्पष्ट होईल.<br><br>'''बुद्धिवादाचे जनक'''<br>{{gap}}महाराष्ट्रात आगरकरांचे समाजसुधारणेच्या क्षेत्रातले स्थान अनन्यसाधारण असे आहे. ते बुद्धिवादाचे निःसीम पुरस्कर्ते होते. रानडे, भांडारकर इ. पंडित धर्मसुधारणेसाठी जुन्या वचनांचा आधार घेत. अशा रीतीने एका ऋषीविरुद्ध दुसरा ऋषी उभा करणे, हे आगरकरांना मान्य नव्हते. आजच्या इहवादाचा सर्व भावार्थ त्यांनी आपल्या प्रतिपादनात सांगितला होता. त्यामुळेच त्यांना, 'बुद्धिवादाचे जनक' असे सार्थतेने म्हणता येते. 'मनुष्यतेचे ऐहिक सुखवर्धन' हाच भावी काळात सार्वत्रिक धर्म व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. हा विचार जुन्या परंपरेच्या अगदी विरुद्ध आहे. त्याचप्रमाणे विषयसुखाचे त्यांनी जे महत्त्व वर्णिले आहे तेही जुन्या परंपरेत मुळीच बसत नाही. विषयसुखाची निंदा हेच जणू प्राचीन काळच्या सर्व धर्मवेत्त्यांचे प्रमुख तत्त्व होते. आगरकरांनी त्याला अत्यंत जोराने धक्का दिला. असा मनुष्य पूर्णपणे प्रवृत्तिवादी असेल यात कसलीच शंका नाही.<br>{{gap}}आगरकरांनी 'हे परम अमंगल अशा हिंदुधर्मा' अशी हिंदुधर्मावर टीका केली आहे; पण कर्मकांडात्मक विकृत धर्मावर, ध्येयवाद, सदाचार, नीतिनिष्ठा, लोकसेवा, सत्यनिष्ठा- ज्यामुळे समाजाचे धारण होते- तो धर्म, हे त्यांना पूर्णपणे मान्य होते. आणि तसे त्यांनी अनेक ठिकाणी म्हटलेही आहे.<br><br>'''कर्मयोग'''<br>{{gap}}अर्वाचीन कालातील महाराष्ट्रातील व भारतातील सर्वश्रेष्ठ धर्मसुधारक म्हणजे लो. टिळक हे होत. त्यांचा 'गीतारहस्य' हा ग्रंथ आणि त्यातील कर्मयोगाचे प्रतिपादन यामुळे जे धर्मपरिवर्तन झाले ते दुसऱ्या कशानेही झाले नसते. हजारबाराशे वर्षे शंकराचार्यांच्या संन्यासवादाची जी पकड हिंदुमनावर बसली होती ती तोडून टाकण्यास<noinclude></noinclude>
matdh30kae1dkhic4h5t0xlkd6slka3
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९४
104
73782
232127
164998
2026-06-12T03:08:44Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232127
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६६८}}</noinclude>तितकाच समर्थ पुरुष हवा होता. तो टिळकांच्या रूपाने अवतरला. गीतेतले प्रतिपादन सर्वश्रेष्ठ आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी सर्व पाश्चात्य तत्त्ववेत्यांचे आलोडन करून जो मोठा ग्रंथ लिहिला त्याला तोड नाही. समर्थ, शिवछत्रपती यांना जे सांगावयाचे होते तेच टिळकांनी सांगितले. 'देश आणि देव हे दोन मानणारे जे लोक आहेत, ते सर्व प्रकारचे धर्मभ्रष्ट आहेत, असे मी समजतो,' असे ते म्हणत. समर्थांच्या प्रतिपादनाचे विवेचन करताता त्यांनी हे जास्त स्पष्ट केले आहे. 'घराचे दार बंद करून उपासना केली की संपले, घराबाहेर कोणाचेही राज्य असो, बाहेर वाटेल त्या आपत्ती येवोत त्यांचा धर्माशी काही संबंध नाही, असा एक पूर्वी समज होता. पण रामदासांनी हिंदुधर्माचे पुनरुज्जीवन केले. या धर्मात असे तत्त्व आहे की ज्याला मोक्षप्राप्ती पाहिजे असेल त्यास, आपल्या देशबांधवांची काळजी घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. जे आपल्या देशाकडे पाहात नाहीत, ' रंजले गांजले' यांना आपले म्हणत नाहीत, आपले हजारो देशबांधव विपत्तीत असताना, जे नाक वरून घरात बसतात, ते ढोंगी आहेत, अशा प्रकारची बुद्धी लोकांत उत्पन्न करणे, म्हणजे राष्ट्र जिवंत करणे आहे.'<br><br>'''देशसेवा'''<br>{{gap}}देश, जनता यांची सेवा हा जसा धर्म, तसाच राष्ट्रीय ऐक्य, राष्ट्रीय जागृती हाही ते धर्म मानीत. एके ठिकाणी ते म्हणतात, 'उच्च कल्पना, अत्युच्च कल्पना लोकांस शिकवून जातीजातींतील भेद नाहीसे करून, आपण सारे एक आहो, असे वाटावयास लावणे, हे खरे धर्मशिक्षण होय. इंग्रजी तत्त्ववेत्त्यांनी ही तत्त्वे सांगितली आहेत; आणि ती आपल्या उपयोगाची आहेत. ही तत्त्वे पूर्वी आपल्यात होती. पण ती आपण विसरलो आहो.'<br><br>'''समता'''<br>{{gap}}टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवाजी उत्सव सुरू केले ते राष्ट्रीय ऐक्य या धर्मासाठीच. गणेशोत्सवात साळी, माळी, सुतार, रंगारी, ब्राह्मण, व्यापारी, मारवाडी, चांभार या सर्व जाती एकत्र मिसळतात, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तेच शिवाजी उत्सवाविषयी. 'शिवाजी महाराजांनी मराठे, ब्राह्मण, प्रभू, शेणवी असा भेद न करता सर्वास एकराष्ट्रीयत्वाच्या जाळ्यात आणले. त्यामुळे त्यांचे स्मरण सर्वास विशेष श्रेयस्कर होईल यात शंका नाही.'<br><br>'''होमरूल - धर्म'''<br>{{gap}}राष्ट्रीय चळवळीचे मुख्य उद्दिष्ट राष्ट्रीय ऐक्य हेच होय. म्हणून ती चळवळ हाच खरा धर्म होय, असे त्यांनी सांगितले आहे. 'बरीच वर्षे चळवळ करूनही यश येत<noinclude></noinclude>
cjt7bb9vu69k4fski0hcyyvvw1l0ayb
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९५
104
73783
232128
164999
2026-06-12T03:08:56Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232128
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६६९|| धर्मक्रांती}}</noinclude>नाही, तेव्हा या चळवळीत भगवंताचे अधिष्ठान नाही, हे तर कारण नसेल ना !' असे त्यांच्या एक-दोन मित्रांनी विचारले. तेव्हा लोकमान्य म्हणाले, 'चळवळीच्या कचेरीत एखादी मूर्ती बसविली म्हणजे भगवंताचे अधिष्ठान होते असे नाही. आमची होमरूलची चळवळ ही हिंदुस्थानची भूमी परकीय जुलमातून सोडविण्यासाठी व सनातन धर्म रक्षिण्यासाठी आहे. म्हणून तीत भगवंताचे अधिष्ठान आहेच आहे. ही चळवळ म्हणजे परमेश्वराची आराधनाच आहे. ईश्वरचिंतनात असताना जे सुख, जी शांती मिळते, त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला या चळवळीत घ्यावयास सापडतो.' पंढरपूरच्या वारकऱ्यांना 'तुम्ही राष्ट्रोन्नतिरूप मोक्ष मिळवा' असा उपदेश करीत. कोणत्याही धर्मकृत्याचे, लोकांचे दुःख अल्पांशाने तरी दूर करणे हे उद्दिष्ट असले पाहिजे, असा टिळकांचा आग्रह असे. साखरेबुवांना ते एकदा म्हणाले, 'तुम्ही आपल्या प्रवचनात ब्रहा सत्य जगन्मिथ्या, अशी नुसती बडबड केल्याने, पारतंत्र्याच्या दुःखात होरपळत असलेल्या हिंदुस्थानातील लोकांस त्यापासून यत् किंचित तरी गारवा येईल का ?' <br><br>'''बुद्धीला आवाहन'''<br>{{gap}}टिळकांना कोणते धार्मिक परिवर्तन, धार्मिक पुनरुज्जीवन अपेक्षित होते, ते यावरून कळून येईल. राष्ट्रधर्म हाच त्यांचा खरा कर्मयोग होता. आणि त्याचीच प्रवचने सर्वांनी करावी, असे ते सांगत असत. मात्र ही धर्मप्रवचने नव्या, शास्त्रीय, पाश्चात्य पद्धतीने झाली पाहिजेत, असे त्यांचे कटाक्षाने सांगणे असे. जुनी पद्धत केवळ सिद्धांतच सांगण्याची आज्ञा करण्याची होती. गीतारहस्याच्या उपसंहारात त्यांनी म्हटले आहे की 'मन्वादी स्मृतींतून, उपनिषदांतून, सत्य, अहिंसा याविषयीच्या आज्ञा स्पष्टपणे नमूद केलेल्या आहेत. पण मनुष्य हा ज्ञानवान प्राणी असल्यामुळे, वरच्यासारख्या नुसत्या विधानांनी त्याचे समाधान न होता, हे नियम घालून देण्याचे कारण काय, हे समजून घेण्याची त्याची स्वभावतःच इच्छा असते.' शिकलेल्या लोकांपुढे पाश्चात्य पद्धतीने धर्माचे विवेचन करून आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व त्यांच्या बुद्धीला पटवून दिले पाहिजे, असे त्यांनी पुनः पुन्हा सांगितले. जगद्गुरू शंकराचार्य यांच्या जागी हल्लीच्या काळी इंग्रजी शिकलेला मनुष्य आला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता, तो यासाठीच.<br><br>'''नवी मांडणी'''<br>{{gap}}१९०६ साली भारत धर्ममहामंडळापुढे त्यांचे जे व्याख्यान झाले, त्यात त्यांच्या सर्वधर्मविचारांचा भावार्थ आला आहे. ते म्हणतात, 'भारत धर्ममहामंडळ हे नाव केव्हा सार्थ होईल ? हिंदुधर्मातील सर्व शाखा, पंथोपपंथ यांचे दृढ ऐक्य मंडळ करील तेव्हा. धर्माची व्याख्याच मुळी, धारण करणारा तो धर्म, अशी आहे. सध्या आपल्या धर्माला वाईट कळा आली आहे. दुही, फूट, भेद, विभक्तता यांनी आपल्याला ग्रासले<noinclude></noinclude>
cdbsyuwa5fyoz5xpqfaccxy69v1vbq1
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९६
104
73785
232129
165002
2026-06-12T03:09:09Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232129
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६७०}}</noinclude>आहे. आपण अत्यंत आळशी व मूर्ख झालो आहो. हे सर्व दोष नष्ट करून आपल्या प्राचीन धर्माचे पुनरुज्जीवन धर्ममहामंडळाने केले पाहिजे. त्या धर्माची तच्चे किती उज्ज्वल होती हे, ऑलिव्हर लॉज, मेयर यांसारखे शास्त्रज्ञ आज सांगत आहेत. हे ध्यानी घेऊन आपण आपल्या प्राचीन धर्माचे नव्याने संपादन केले पाहिजे आणि विज्ञानाच्या नव्या प्रकाशात त्याची मांडणी केली पाहिजे.'<br>{{gap}}लो. टिळकांच्यानंतर महात्माजींचे आगमन झाले. विवेकानंद, टिळक यांच्या प्रमाणेच ते अखिल भारताचे गुरू होते. तेव्हा त्यांच्या धर्मविचारांची छाप मराठी मनावर बसावी, यात नवल असे काहीच नाही.<br>{{gap}}महात्माजींच्या धर्मतत्त्वांचा विचार करताना सत्य, अहिंसा, आतला आवाज याला नेहमी महत्त्व दिले जाते. आणि ते योग्यच आहे. पण या बाबतीत त्यांची काही मते एकांतिक असली, तरी ज्या धर्मक्रांतीचा विचार आपण करीत आहो, ब्रिटिशकालातील ज्या धार्मिक परिवर्तनाचा मागोवा घेत आहो, त्या दृष्टीने पाहिले तर वरील दोन महापुरुषांच्या मतांहून महात्माजींची मते फारशी निराळी होती, असे दिसत नाही.<br><br>'''परमेश्वर दलितांमध्ये'''<br>{{gap}}परमेश्वराचा साक्षात्कार हे धर्माचे अंतिम उद्दिष्ट असले, तरी तो परमेश्वर दीन- दलितांच्या ठायी असतो आणि त्यांची सेवा हीच परमेश्वराची खरी सेवा, असे ते सांगत. ते म्हणत, 'हिमालयाच्या गुहेत देव आहे असे मला कळले तर मी तेथे जाईन. पण तो तेथे नाही. मानवाच्या ठायीच तो असतो. म्हणून आपल्या बांधवांची सेवा हाच खरा धर्म होय.'<br>{{gap}}देव, अध्यात्म यांचे महत्त्व महात्माजी नाकारीत नाहीत. पण, 'भुकेल्या, दीन- दरिद्री कोट्यवधी जनतेला अध्यात्म सांगणे हे व्यर्थ आहे. त्यांना प्रथम काम देऊन भाकरी मिळवून देणे हेच माझे पहिले कर्तव्य होय. भरल्या पोटी वेदान्त सांगणे मोठे सुखाचे असते. पण ते सांगणाऱ्याला ! भुकेल्यांना भाकरी हाच परमेश्वर होय.'<br><br>'''राजकारण-धर्म'''<br>{{gap}}'मी सत्याचा शोध घेणारा एक नम्र पाईक आहे. सामाजिक, आर्थिक, नैतिक, राजकीय सर्व क्षेत्रांत मी काम करतो तो या शोधासाठीच. माझे राजकारण यासाठीच आहे. येथे कोट्यवधी लोक गुलामगिरीत खितपत पडले आहेत. राजकारणात पडल्यावाचून त्यांची सेवा करणेच शक्य नाही. म्हणून माझे राजकारण ही मानवसेवाच आहे. म्हणजेच तो सत्याचा शोध आहे.'<br>{{gap}}धर्मावाचून राजकारणाचा विचार करताच येत नाही, असे आत्मचरित्रात महात्माजींनी लिहिले आहे. तसे तुम्हांला अजूनही वाटते का, असे कोणी विचारल्यावरून ते म्हणाले, 'निश्चित वाटते. धर्मापासून अलग असा राजकारणाचा मी विचारच<noinclude></noinclude>
1ez0bzc6us434dd8hojk1pcmhamaazd
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९७
104
73786
232130
165003
2026-06-12T03:09:23Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232130
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६७१|| धर्मक्रांती}}</noinclude>करू शकत नाही. विश्वाच्या नियंत्यावर व त्याच्या नियमबद्धतेवर श्रद्धा, हा धर्माचा अंतिम अर्थ आहे. त्यामुळे हिंदुस्थानात अनेक धर्म असले तरी त्याची चिंता नाही. हे तत्त्व या सर्व धर्मात आहेच. त्यामुळे त्यांच्यांत भेद न माजता ऐक्यच होईल.'<br><br>'''व्यवहारी धर्म'''<br>{{gap}}महात्माजी नेहमी त्यागाचा उपदेश करीत व भोगविलासांचा निषेध करीत. पण मनुष्याला काही किमान सुखे व काही किमान वासनातृप्ती मिळालीच पाहिजे, असे त्यांचे मत होते. जगण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. तेव्हा त्यासाठी अन्न, वस्त्र, घर ही आवश्यकच आहेत. त्यांचाही त्याग करावा, असे धर्म सांगत नाही. धर्म आणि व्यवहार यांची सांगड सदैव असलीच पाहिजे. जो धर्म नित्याच्या व्यवहाराचा व त्यातील समस्यांचा विचार करीत नाही तो महात्माजींच्या मते धर्मच नव्हे. ते एकदा म्हणाले, 'मी काही आध्यात्मिक किंवा धार्मिक तत्त्व सांगितले आणि ते जर अव्यवहार्य ठरले तर ते माझे अपयश आहे. खरे धर्मतत्त्व हे संपूर्णपणे व्यावहारिक असले पाहिजे.'<br>{{gap}}महात्माजी अनेक वेळा अंतःसंदेशावर, आतल्या आवाजावर विसंबून असत. पण याचा अर्थ ते ग्रंथप्रामाण्य मानीत असत किंवा बुद्धिप्राणाण्याला त्यांचा विरोध होता असा नाही. त्यांनी स्वच्छ म्हटले आहे की 'जे बुद्धीला पटत नाही ते धर्मतत्त्व मी त्याज्य मानतो. बुद्धीलाही काही मर्यादा आहेत, हे मला मान्य आहे. त्या प्रत्येकाने ध्यानात घेतल्याच पाहिजेत. पण म्हणून प्रत्येक सिद्धांत आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून घेतला पाहिजे, हा आग्रह सोडता कामा नये.' (सर्व उतारे, सिलेक्शनस् फ्रॉम गांधी, निर्मलकुमार बोस)<br>{{gap}}हे सर्व पाहिल्यावर मोक्ष, ऐहिक उत्कर्ष, व्यवहार, ग्रंथप्रामाण्य, राष्ट्रधर्म, दलितसेवा, राजकारण आणि धर्म यांचे अद्वैत, इ. निनिरराळ्या धर्मतत्त्वांच्या बाबतीत लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांच्यांत भेद होता असे दिसत नाही. संन्यास, अध्यात्म, दीनदलितांची सेवा याविषयी स्वामी विवेकानंदांनीही अशाच तऱ्हेचे विचार मांडलेले आहेत, हे आपण वर पाहिलेच आहे.<br><br>'''धर्मनिर्णय मंडळ'''<br>{{gap}}ब्रिटिश कालात 'धर्मविचारमंथन झाले आणि सनातन हिंदुधर्मात परिवर्तन घडवून आणण्याचे प्रयत्न झाले त्यात लोणावळ्याचे 'धर्मनिर्णय मंडळ' याला महत्त्वाचे स्थान आहे. तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे हे त्याचे प्रवर्तक व कार्यवाह होते. आणि म. म. पां. वा. काणे, श्रीधरशास्त्री पाठक, नारायणशास्त्री मराठे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, वाईचे दिवेकर शास्त्री, नागपूरचे डॉ. के. ल. दप्तरी, सदाशिवशास्त्री भिडे, हे थोर पंडित त्यांच्या पाठीशी होते. जुन्या परंपरांचा, धर्म-<noinclude></noinclude>
bc155svl4z015z4oh7pjwsqzrmfkcin
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९८
104
73787
232131
165004
2026-06-12T03:09:35Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232131
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६७२}}</noinclude>ग्रंथांचा, सर्व मान सांभाळून मानवी बुद्धीने धर्मात परिवर्तन घडवून आणणे, हे मंडळाचे उद्दिष्ट होते.(स्थापना १९३८) . विवाहसंस्थेत सुधारणा, अस्पृश्यतानिवारण, जातिसमता, सर्व धर्मी समानत्व, मंदिरप्रवेश इ. सुधारणांविषयी व्याख्याने, परिषदा, पत्रके, पुस्तके या साधनांनी लोकमत तयार करण्याचे बहुमोल कार्य मंडळाने केले आहे. रघुनाथशास्त्री कोकजे यांनी 'धर्मस्वरूप निर्णय' (१९३३) व 'हिंदूंच्या अवनतीची मीमांसा ' (१९४४) हे दोन महत्त्वाचे ग्रंथ लिहून मंडळाच्या कार्याला स्थैर्य आणून दिले. वेदकालापासून आजपर्यंत वैदिक धर्मात कोणकोणती परिवर्तने झाली, कोणती तत्त्वे, कोणतं सिद्धांत, कोणते आचारविचार कोणत्या कालात प्रभावी होते आणि त्यांचे बरेवाईट परिणाम होऊन हिंदूंची उन्नती अवनती केव्हा कशी होत गेली, याचे साधार- सप्रमाण विवेचन या दोन ग्रंथांत कोकजेशास्त्री यांनी केले आहे. प्रस्तुत महाराष्ट्रसंस्कृतीच्या विवेचनात प्रत्येक कालखंडातील धर्मस्वरूपाचा विचार केलेला आहे. तशा स्वरूपाच्या धर्मविचारांचा सर्व इतिहास या वरील ग्रंथांत अखिल भारतासंबंधी आलेला आहे. पुढल्या काळात म. म. डॉ. काणे यांनी 'धर्मशास्त्राचा इतिहास' हा आपला प्रचंड ग्रंथ लिहिला. हिंदूंच्या उत्कर्षापकर्षाच्या इतिहासाच्या दृष्टीने या ग्रंथाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.<br><br>'''ब्रह्मचर्याश्रम'''<br>{{gap}}विनायक महाराज मसूरकर यांनी मसूरला स्थापन केलेला 'ब्रह्मचर्याश्रम' याने धर्मजागराचे केलेले कार्य उल्लेखनीय आहे. धर्मांतराची लाट थोपवून पतितांची शुद्धी करणे यावर विनायक महाराजांचा फार भर होता. त्यांच्या शिष्यांनी आज गोरेगावच्या मसुराश्रमात तेच महत्त्वाचे कार्य चालविले आहे.<br>{{gap}}शेवटी स्वातंत्र्यवीर सावकार यांनी धर्मक्रांतीच्या क्षेत्रात जे विचार मांडले, जे कार्य केले, त्याचा परामर्श घेऊन हे विवेचन संपवू.<br><br>'''सावरकर'''<br>{{gap}}सावरकर क्रांतिकारक होते, असे सांगताना, त्यांच्या राजकीय क्षेत्रातल्या कार्याचेच विवेचन केले जाते. पण स्वतः सावरकरच सांगत की 'राजकारण, समाजकारण, धर्म ही समाजपुरुषाची अंगे अविभाज्य आहेत. एक दुसऱ्यावाचून नेहमीच पंगू राहणार.' मनाशी हा सिद्धांत निश्चित झालेला असल्यामुळे धर्मक्रांतीची अनेक तत्त्वे त्यांनी आपल्या निबंधांतून विवरिली आहेत. 'दोन शब्दांत दोन संस्कृती' या निबंधात त्यांनी हिंदूंच्या शब्दप्रामाण्यावर, श्रुतिस्मृतिपुराणोक्तावर कडक टीका केली आहे आणि हिंदुराष्ट्राला काळाच्या तडाख्यातून वाचायचे असेल तर श्रुतिस्मृतिपुराणोक्ताची ही बेडी तोडून टाकली पाहिजे आणि हिंदुधर्माला प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगक्षम व विज्ञाननिष्ठ असे रूप दिले पाहिजे, असा इशारा दिला आहे.<br><noinclude></noinclude>
dq9dhxgnyb4mlj9oax4ftf1su71kkfs
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९९
104
73788
232132
165005
2026-06-12T03:10:12Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232132
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६७३|| धर्मक्रांती}}</noinclude><br>'''माकड-भाकड'''<br>{{gap}}अपरिवर्तनीयता हा आपल्या धर्मातला दुसरा महादोष. 'माकड महासंमेलन व भाकड महासंमेलन' या लेखात या दोषाचे स्वरूप त्यांनी स्पष्ट केले आहे. परिस्थिती- प्रमाणे आपले आचार आपण पालटले पाहिजेत, हे माकडांच्या संमेलनात मंजूर झाले. पण काशीच्या शास्त्रीपंडितांनी 'परिस्थिती, पालट हे लक्षात घेऊन धर्मात परिवर्तन घडविणे हे पाखंड होय,' असा ठराव केला. म्हणूनच त्याला सावरकरांनी भाकड महासंमेलन म्हटले आहे.<br>{{gap}}शुद्धी आणि संघटन यांना सावरकरांच्या हिंदुराष्ट्रवादात फार महत्त्वाचे स्थान होते. शुद्धिबंदीमुळे केवढा अनर्थ झाला आहे याचे त्यांनी अनेक ठिकाणी विवरण केले आहे. बाटलेल्या व परत स्वधर्मात येऊ इच्छिणाऱ्या हिंदूंना, हिंदुराज्यातसुद्धा, मुसलमान म्हणूनच राहावे लागे. हा हिंदुधर्म !' हे त्यांचे उद्गार अगदी भेदक असे आहेत.<br><br>'''सप्तशृंखला'''<br>{{gap}}सावरकरांचा सप्तशृंखलांचा सिद्धांत प्रसिद्धच आहे. वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धिबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी या त्या सात शृंखला- बेड्या होत आणि दुर्दैव असे की त्या आपणच आपल्या पायात ठोकून घेतल्या आहेत. याचा अर्थ असा की हिंदूंच्या अधःपाताला त्यांचे तेच जबाबदार आहेत आणि या बेड्या आपण होऊन तोडून टाकीत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही, आणि मिळाले तरी ते टिकणार नाही, असे सावरकरांनी स्पष्टपणे म्हटले आहे.<br>{{gap}}बाळशास्त्री जांभेकरांपासून सावरकरांपर्यंत महाराष्ट्रात धर्माच्या क्षेत्रात कोणी कोणती तत्त्वे सांगितली व काय कार्य केले त्याचे विवेचन येथवर केले. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होईल की या धर्मक्रांतीमुळे जो नवा जोम व सामर्थ्य भारतात निर्माण झाले, त्यामुळेच या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. या थोर नेत्यांनी याबरोबरच सामाजिक क्रांतीचे तत्त्वज्ञानही सांगितले व काही प्रमाणात तीही घडवून आणली. तिचे महत्त्व धर्मक्रांतीइतकेच आहे. वर सांगितलेच आहे की ही दोन्ही अंगे आणि तशीच राजकारण व अर्थकारण हीही अंगे अविभाज्य आहेत. विवेचनाच्या सोयीसाठी त्यांचा पृथकपणे विचार करावयाचा इतकेच. येथून पुढे क्रमाने तो करावयाचाच आहे. येथे धर्मक्रांतीचा समारोप करताना मनात येणारा एक विचार सांगतो. म. म. काणे, म. म. पाठक, तर्कतीर्थ जोशी, दिवेकर शास्त्री यांच्या योग्यतेचे काही पंडित मराठेशाहीच्या काळात किंवा त्या अगोदरच्या कालखंडात झाले असते तर महाराष्ट्राचे आणि भारताचेही स्वातंत्र्य गेले नसते आणि हिंदूंची अवनती झाली नसती. या शास्त्री पंडितांनी केलेल्या धर्मक्रांतीचे महत्त्व यावरून ध्यानात येईल.<br><br>{{center|■}}<noinclude><br>{{gap}}४३</noinclude>
j1c58q34m60ejtrueyg0w0tcdyglpbo
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७००
104
73789
232133
165007
2026-06-12T03:11:07Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232133
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop
|Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf
|Page = 700
|bSize = 399
|cWidth = 324
|cHeight = 218
|oTop = 48
|oLeft = 53
|Location = center
|Description =
}}
<br><br>{{rh|'''<big>३६.</big>'''||'''<big>समाज परिवर्तन</big>'''}}<br><br>'''नवयुग- लक्षण'''<br>{{gap}}समाजरचनेच्या दृष्टीने येथे ब्रिटिश कालात जे नवयुग निर्माण झाले त्याचे पहिले लक्षण हे की आपले पंडित या समाजातल्या घडामोडींची, उत्कर्षापकर्षाची, यशापयशाची भौतिक दृष्टीने कारणमीमांसा करू लागले. आणि वर्णभेद, जातिभेद, अस्पृश्यता, स्त्रीचे दास्य, व्यक्तीवरची अर्थशून्य बंधने, ही सर्व कारणे आपल्या अधःपाताच्या बुडाशी आहेत हे त्यांच्या ध्यानात येऊन तसे ते उघडपणे सांगू लागले. वरील प्रकारचे समाजाच्या भिन्न घटकांतले जे भेद, त्यांनी पराकाष्ठेची विषमता हिंदुसमाजात निर्माण होऊन तो समाज विघटित झालेला आहे, एकजिनसीपणा, एकसंधपणा असा त्याच्यात राहिलेलाच नाही, हा सर्व एक समाज आहे असे म्हणण्याजोगे कोणतेच लक्षण त्याच्या ठायी दिसत नाही, तेव्हा समाजसुधारणा करावयाची तर प्रथम हे भेद नष्ट करून सर्व जातिवर्णाना, स्त्री, शूद्र, अस्पृश्य यांना समपातळीवर आणले पाहिजे, हे त्यांनी जाणले व त्या उद्योगास ते लागले.<br><br>'''बाळशास्त्री'''<br>{{gap}}या क्षेत्रातही बाळशास्त्री जांभेकर यांचेच नाव पुढे येते. ' 'महाराष्ट्राचे आद्य ऋषी' म्हणून त्यांचा गौरव केला जातो तो अगदी सार्थ आहे. 'लोकस्थिती, धर्मरीती, आणि राज्यरीती यांत चांगले व उपयोगी फेरफार घडवून आणणे' हे नियत-<noinclude></noinclude>
cvxoy8x9g8sip3664f7m3fsr8urrtbr
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०१
104
73790
232134
165272
2026-06-12T03:11:56Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232134
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६७५|| समाज परिवर्तन}}</noinclude>कालिकांचे कर्तव्य आहे हे 'दर्पण'च्या पहिल्या अंकातच त्यांनी सांगून टाकले आहे आणि त्या दृष्टीने राम मोहन राय यांचा गौरव करताना, 'जशी त्यास विद्येची आवड, तशीच धर्मविचाराची होती. तो विचार करून शेवटी त्याने आपला मूळचा वर्णाश्रमादी धर्म, ब्राह्मण धर्म सोडला आणि वेदान्तमत स्वीकारले.' वरील एक दोन वाक्यांवरूनच पाश्चात्य विद्येमुळे येथल्या पंडितांच्या मनात केवढी क्रांती झाली होती ते ध्यानात येईल. लोकरीती, धर्मरीती यांत फेरफार घडविणे हे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन करणे आणि वर्णाश्रमादी ब्राह्मणधर्म सोडल्याबद्दल गौरव करणे, हे गेल्या हजार वर्षाच्या काळात कोणी केले नव्हते. हे बौद्धिक सामर्थ्य त्या काळात कोणाच्याही ठायी नव्हते. भौतिक विद्येच्या अध्ययनाने या अर्वाचीन पंडितांना ते प्राप्त झाले होते.<br><br>'''नवे तत्त्वज्ञान'''<br>{{gap}}तसे सामर्थ्य प्राप्त झाल्यामुळे बाळशास्त्री यांच्यानंतर येथे सुधारकांची एक परंपराच निर्माण झाली. आणि समाजरचनेविषयी श्रुतिस्मृतींनी सांगितलेले नियम अगदी घातक असून पाश्चात्यांनी प्रतिपादिलेल्या समता, व्यक्तिस्वातंत्र्य इ. तत्त्वांचा अंगीकार करून आपण आपल्या समाजाची त्या तत्त्वांवर पुनर्घटना केली पाहिजे, असे निर्भयपणे सांगण्यास त्यांनी सुरुवात केली. व्यक्तीला विचार-उच्चार-आचारराचे पूर्ण स्वातंत्र्य असावे, वर्णभेद, जातिभेद ही व्यवस्था हानिकारक असून व्यक्तीची योग्यता तिच्या जन्मावरून न ठरविता तिच्या गुणांवरून ठरवावी, स्त्रीपुरुषांत पूर्ण समता असली पाहिजे, बालविवाह, पुनर्विवाहबंदी या रूढी नष्ट झाल्या पाहिजेत, पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही शिक्षण दिले पाहिजे, व्यक्तीला आपल्या इच्छेप्रमाणे कोणताही व्यवसाय करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे, हे व या तऱ्हेचे विचार हाच बहुतेकांच्या प्रतिपादनाचा सारार्थ होता. दादोबा पांडुरंग, लोकहितवादी, जोतिबा फुले, विष्णुबुवा ब्रम्हचारी, न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर हे या प्रारंभीच्या काळातले प्रमुख पंडित आणि समाजसुधारक होत.<br><br>'''जुनी दृष्टी'''<br>{{gap}}भौतिक विद्येचा अभ्यास येथे झाला नसता तर, आपला अधःपात झाला, पारतंत्र्य आले, दारिद्र्य आले हे कलियुगामुळे आले, पापाचरणाची ही फळे आहेत, पृथ्वीला हा सर्व भार झाला आहे, अशी कार्यकारणमीमांसा करून लघुरुद्र, महारुद्र, ब्राम्हण- भोजने, शतकोटी नामजप, गीता-ज्ञानेश्वरीची अखंड पारायणे, भागवताचे सप्ताह ही उपाययोजना येथल्या शास्त्रीपंडितांनी सांगितली असती !<br>{{gap}}वरील सर्व समाजसुधारकांचा निर्देश मागल्या प्रकरणात धर्मपरिवर्तनाचा इतिहास सांगताना केलेलाच आहे. त्या क्षेत्रातले जे नेते तेच याही क्षेत्रात नेतृत्व करीत होते. आणि समाजाची ही दोन्ही अंगे अविभाज्य असल्यामुळे तसे होणे अपरिहार्यच होते.<br><noinclude></noinclude>
prstwos88mh2ccy67o81btdl42l8e0j
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०२
104
73814
232135
165273
2026-06-12T03:12:38Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232135
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६७६}}</noinclude><br>'''दादोबा'''<br>{{gap}}दादोबा पांडुरंग यांनी स्थापिलेल्या 'मानवधर्म सभा,' आणि 'परमहंस सभा' यांची माहिती मागे दिलीच आहे. धर्मसुधारणा हे जसे त्यांचे उद्दिष्ट होते तसे जातिभेदनाश हेही उद्दिष्ट होते. आणि त्याला पहिल्याइतकेच किंबहुना थोडे जास्तच महत्त्व होते. ख्रिस्त्याच्या हातचा पाव व मुसलमानाच्या हातचे पाणी घेतले पाहिजे हे नियम त्यासाठीच होते. पण सभेची सर्व कामे गुप्तपणे चालविल्यामुळे या क्रांतिकारक कृत्यांचा समाजपरिवर्तनाला फारसा उपयोग झाला नाही. शिवाय, 'असो कृष्णगीता किंवा ख्रिस्तगीता, महम्मदाची वार्ता असे ना का' असा उपदेश ते करीत. कृष्णाच्या बरोबरीने ख्रिस्त व महम्मद यांचा उल्लेख करणे त्या वेळी कोणालाही पटण्याजोगे नव्हते. प्रार्थनासमाजाची एकंदर चालवणूक केवळ चर्चमधल्या ख्रिश्चनांच्या उपासने- सारखी होती, एवढे कारण, समाज त्यांच्यापासून दुरावायला, पुरले. मग येथे तर ख्रिस्ताला मोठे पद दिलेले होते. ते समाजाला कसे मानवणार ?<br><br>'''लोकहितवादी'''<br>{{gap}}१८४८ साली लोकहितवादींची 'शतपत्रे' प्रसिद्ध होऊ लागली. समाजसुधारणेचा सर्वांगीण विचार त्यात केलेला दिसतो. वर्ण किंवा जाती ही जन्मावरून न ठरविता गुणांवर ठरवावी असे सांगताना ते म्हणतात, 'कर्मकरून जातीचा आणि वर्णाचा निश्चय करावा. ब्राह्मण असून नीच कर्म करील तर ब्राह्मण नव्हे. तसेच क्षत्रियाने ब्राह्मण कर्म केले तर तो ब्राह्मण व्हावा.' त्यांच्या मते प्राचीन काळी अशीच व्यवस्था होती. 'ब्राम्हण कुळात जन्मून कित्येक राजे झाले व कित्येक क्षत्रिय कुळात जन्मून ब्राम्हण झाले, असे पुराणातील कथांवरून दिसते. वाल्मीक हा प्रथम कोळी होता व नंतर ऋषी झाला. पराशराने शूद्र स्त्री केली. तिचाच मुलगा व्यास. इतर देशातही समाजात भेद आहेत. पण तेथे ते वंशपरंपरा नाहीत. हिंदुस्थानात तसे आहेत. हेच आपल्या अधःपाताचे कारण होय.'<br><br>'''ब्राह्मण- अर्थशत्रू'''<br>{{gap}}ब्राह्मणांवर लोकहितवादींनी इतकी कडक टीका केली आहे की तितकी जोतिबांनी सुद्धा केली नसेल. हे ब्राह्मण अर्थशत्रू असून पाठांतरालाच विद्या समजतात. आपली वृत्ती अविच्छिन्न चालावी म्हणून त्यांनी आपले माहात्म्य वाढवून ठेवले आहे. आणि दुर्दैव हे की हिंदुस्थानातील सर्व जातींची ब्राह्मणांवर श्रद्धा आहे. कित्येक ब्राह्मण हीन, भ्रष्टाचारी, लोभी असे असतात. तरी आपण सर्व वर्णांचे गुरू आहो, असा तोरा ते मिरवितातच.<br>{{gap}}ब्राह्मण व इतर जाती यांत लोकहितवादी मुळीच फरक मानीत नाहीत. ते म्हणतात,<noinclude></noinclude>
4o7ge2955l4brnqlsi5vt7my44u8zrc
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०३
104
73815
232136
165274
2026-06-12T03:12:51Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232136
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६७७|| समाज परिवर्तन}}</noinclude>भटांत व अतिशूद्रांत मला इतकेच अंतर दिसते की एक बोलता राघू व एक न बोलता राघू, परंतु ज्ञान एकच. अतिशूद्र गरीब, ते आपला लहानपणा जाणतात; पण भट मूर्ख असून स्वतःला ज्ञानी समजतात व गर्व करतात.' असे हे ब्राह्मण हिंदु समाजाचे नेतृत्व करतात हे त्याचे दुर्दैव होय असे सांगून, इंग्रजी राज्यात ब्राह्मणांचे महत्त्व नाहीसे होत आहे याबद्दल लोकहितवादींनी समाधान व्यक्त केले आहे.<br><br>'''सरदार तसेच'''<br>{{gap}}लोकहितवादींनी ब्राह्मणांवर जशी टीका केली तशीच राजे लोक, सरदार यांच्यावरही प्रखर टीका केली आहे. 'हे राजे व सरदार इंग्रजांपुढे लाचार होऊन त्यांना म्हणतात की तुम्ही देवासारखे आहात. रयतेच्या कल्याणाची चिंता ते कधीच करीत नाहीत. पुण्यात लायब्ररी केली, पण ग्रंथ वाचवयास सरदार कोणी येत नाही. आम्ही थोर, चार शिपाई, घोडे, अबदागीर घेतल्यावाचून ते बाहेर पडत नाहीत. कुळंबी नांगर धरून मेहनत करतात आणि जहागिरदार किंवा इनामदार त्यास फक्त कोंडा ठेवून त्यांचे दाणे घेतो व आपण रेशीमकाठी धोतरे नेसतो व कामकाज काही करीत नाही.'<br>{{gap}}सारांश असा की वंशपरंपरेवरून योग्यता ठरवितात. गुण कर्म पाहात नाहीत. हिंदुस्थानच्या सर्व अधःपाताचे हे मुख्य कारण आहे.<br><br>'''स्त्री-सुधारणा'''<br>{{gap}}स्त्री-जीवनाविषयीही लोकहितवादींनी असेच पुरोगामी विचार मांडले आहेत. 'सांप्रत हिंदू लोकांत फारच मूर्खपणा आहे. यास्तव स्त्रियांची दुर्दशा फार आहे. प्राचीन काळी असे नव्हते. तेव्हा स्त्रियांना मान फार होता. पण पुढे मुसलमानांच्या अनुकरणाने त्यांच्या चाली हिंदू लोकांस लागल्या. आणि स्त्रियांचा अपमान होऊ लागला. कन्या झाली की लोक नाक मुरडतात. स्त्रियांची जनावरासारखी अवस्था झाली आहे. आता तरी हिंदू लोकांस उमज पडो व जसे पुरुष तशा स्त्रिया हे त्यांस समजो. आणि जे सुधारक हिंदू असतील त्यांनी निर्भयपणे कामास प्रारंभ करावा.'<br>{{gap}}स्त्रियांच्या सुधारणेविषयी आपली तळमळ याप्रमाणे अनेक पत्रांत लोकहितवादींनी व्यक्त केली आहे. सतीची चाल, बालविवाहपद्धती, विधवाविवाहास बंदी, आणि स्त्रीला अज्ञानात ठेवण्याची प्रथा ही स्त्रियांच्या दुःस्थितीची, त्यांच्या मते, मुख्य कारणे होत. या सर्व रूढींवर व त्यांना आधारभूत असलेल्या शास्त्रावर त्यांनी फार प्रखर टीका केली आहे. ते म्हणतात 'मनू जर ईश्वरांश असेल तर कोणे एके स्त्रीचा नवरा आधी मरणार नाही. असे का केले नाही ? पण स्त्रियांवरील या आपत्तींचा बंदोबस्त मनूच्याने होत नाही, तर त्याचे शास्त्र फिरविण्यास काय चिंता आहे ?'<br><noinclude></noinclude>
3j64sj8gx7pv0p3uph84vgn0kt4y8wk
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०४
104
73816
232137
165275
2026-06-12T03:13:07Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232137
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६७८}}</noinclude><br>'''स्त्री-शिक्षण'''<br>{{gap}}स्त्रियांची दुःस्थिती नाहीशी होण्यास स्त्रीशिक्षण हा उपाय लोकहितवादींनी सांगितला आहे. ते म्हणतात, 'स्त्रिया सुशिक्षित होतील तेव्हा आपला अधिकार स्थापतील. आणि संसार सुखास हानी करणाऱ्या पंडितांपासून असा तहनामात्र करून घेतील.' जर स्त्रियांस थोडे ज्ञान असते तर त्यांनी पंडितांच्या जुलमाचा विचार काढून, जे पुनर्विवाह करू नये म्हणतात त्यांचे श्रीमुखात दिली असती. पण अज्ञान व भोळसरपणा यामुळे सर्वत्र जुलूम चालतो असा नेम आहे.' यातील शेवटचे वाक्य हिंदुस्थानच्या गेल्या हजार वर्षांच्या इतिहासाचे सूत्र आहे. ज्ञानाचा, भौतिक विद्येचा अभाव, अज्ञान व भोळसटपणा यामुळे सर्वत्र जुलूम चालू शकला व या देशाला पारतंत्र्य आले. त्याची सर्व संपत्ती गेली आणि हा सर्व समाज शतधा भंगून गेला. सामर्थ्य असे कसलेही त्याच्याजवळ राहिले नाही.<br><br>'''जोतिबा'''<br>{{gap}}म. जोतिबा फुले यांनी नेमके हेच वर्म जाणले होते आणि त्यांनी अस्पृश्यांसाठी व स्त्रियांसाठी शाळा स्थापून प्रत्यक्ष कार्याला प्रारंभही केला. त्यांचे असामान्यत्व यातच आहे. गेल्या शतकात समाजसुधारणेचे तत्त्वज्ञान अनेक थोर पंडितांनी सांगितले; पण प्रत्यक्ष कृती करणारे अपवादात्मकच होते. त्यांमध्ये म. फुले हे अग्रणी होत. त्यातही विशेष असे की त्यांनी आपल्या स्त्रीला शिक्षण देऊन शिक्षिका केले आणि त्या साध्वीनेही घरचा विरोध, कुटाळांची टवाळी याची परवा न करता आपल्या पतीच्या कार्यात अखंड सहकार्य केले. जोतिबांनी यानंतर एक पाऊल आणखी पुढे टाकून आपल्या समोरचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. यानंतर दहावीस वर्षांनी १८७३ साली जोतिबांनी 'सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ब्राह्मणांच्या वर्चस्वातून बहुजन समाजाला सोडविणे, हे जोतिबांचे प्रमुख उद्दिष्ट होते. आणि ते बहुजन समाजातील असल्यामुळे त्यांच्या कामाला वेग आला. पण ब्राह्मणांच्या वर्चस्वामागे काय तत्त्वज्ञान आहे, बहुजन समाज ब्राह्मणांच्या आहारी जाण्याची ऐतिहासिक कारणे कोणती आहेत, याचा कसलाही अभ्यास न करता जोतिबांनी वाटेल त्या काल्पनिक उपपत्ती मांडल्या. त्यामुळे त्यांच्या चळवळीमागची उदात्त प्रेरणा, थोर ध्येयनिष्ठा, असामान्य धैर्य यांचा जोतिबांच्या बरोबरच लोप झाला आणि ब्राह्मणद्वेष एवढेच रूप त्या चळवळीला राहिले. त्यामुळे केशवराव जेधे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्यांनाही सत्यशोधक समाजावर टीकास्त्र चालवावे लागले व त्या चळवळीपासून दूर व्हावे लागले. पण हे काही असले तरी जोतिबांचे समाजसुधारणेच्या क्षेत्रातले स्थान आजही अढळ आहे यात शंका नाही.<br><noinclude></noinclude>
ch3lxi6l1yljnxie85yq831304t93he
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०५
104
73817
232138
165276
2026-06-12T03:14:21Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232138
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६७९|| समाज परिवर्तन}}</noinclude><br>'''सुधारणेचे तत्त्वज्ञान'''<br>{{gap}}जोतिबांचे कार्य चालू असतानाच न्या. मू. रानडे यांचा उदय झाला आणि लोकोत्तर बुद्धिमत्तेने व पांडित्याने त्यांनी समाजसुधारणेचे सर्व तत्त्वज्ञान सांगून महाराष्ट्रात समाजसुधारणेचा पाया भक्कम करून टाकला.<br><br>'''अविभाज्य'''<br>{{gap}}सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक या सर्व सुधारणा अविभाज्य आहेत, हा त्यांचा पहिला सिद्धांत होता. या चारही क्षेत्रांतील सुधारणांमुळे ज्यावर परिणाम व्हावयाचा ते मानवी मन एकच असल्यामुळे या सर्व सुधारणांचा सामग्ऱ्यानेच विचार व्हावयास हवा. हा विचार लेख, व्याख्याने, प्रवचने याद्वारा रानडे यांनी समाजमनावर बिंबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.<br><br>'''मानवी प्रतिष्ठा'''<br>{{gap}}'मानवी प्रतिष्ठेचे उज्जीवन' हा त्यांचा दुसरा सिद्धांत होता. आजपर्यंत भारतात मानवी मनावर अनंत बंधने घातली गेल्यामुळे ते कायमचे दुबळे व पंगू होऊन गेले आहे. स्वतंत्र विचार करण्याची कुवतच त्याच्या ठायी राहिलेली नाही. त्यामुळे येथल्या मानवाचे मन सदैव बालच राहून आत्मनियंत्रणाचे सामर्थ्य त्याला कधी प्राप्तच झाले नाही. स्वयंशासनाने येणारी प्रौढता, प्रतिष्ठा, येथल्या समाजाला व मानवाला कधी प्राप्तच झाली नाही. तेव्हा या मानवी शक्तीचे, मानवाच्या बुद्धीचे, प्रज्ञेचे, व्यक्तित्वाचे उज्जीवन केल्यावाचून कोणतीही सुधारणा होणे शक्य नाही, हे माधवरावांनी परोपरीने सांगितले आहे.<br>{{gap}}स्त्रीशिक्षण, प्रौढविवाह, पुनर्विवाह, समता, इ. बहुतेक सर्व सुधारणांचा रानडे यांनी पुरस्कार केला आहे आणि स्त्रियांच्या उन्नतीसाठी निर्माण झालेल्या प्रत्येक संस्थेत व चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांचा पिंड क्रांतिकारकाचा नव्हता. ते विकासवादी होते. भारताच्या प्राचीन परंपरेचा त्यांना अतिशय अभिमान होता आणि कोणतीही सामाजिक सुधारणा करावयाची असली तरी आपल्याला आपल्या प्राचीन ऋषींचा आधार निःसंशय मिळेल, आजच्या सुधारणा म्हणजे त्यांनी प्रतिपादिलेल्या तत्त्वांची परिणतीच होय, असे ते म्हणत असत. पण असे असले तरी अंधश्रद्धेचा लवलेशही त्यांच्या ठायी नव्हता. पूर्वजांचा आधार मिळत नसेल तर नवा मार्ग आखू नये, असे त्यांनी कधीच म्हटले नाही. पण नवा मार्ग आखताना विध्वंस, उच्छेद, प्रलय, असल्या आततायी प्रकारांचा आश्रय करणे त्यांस मान्य नव्हते.<br><noinclude></noinclude>
2aj4yi9od588unrr3wkfz7lxe8imc6i
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०६
104
73818
232139
165277
2026-06-12T03:14:35Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232139
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६८०}}</noinclude><br>'''विसंगती'''<br>{{gap}}डॉ. भांडारकर, विष्णुशास्त्री पंडित यांसारखे सहकारी त्यांना लाभल्यामुळे त्यांच्या कार्याला चांगली गती मिळाली. पण या त्यांच्या कार्याला कृतीची जोड न मिळाल्यामुळे त्याला यावा तसा जोम आला नाही. प्रथम पत्नी निवर्तल्यावर त्यांनी स्वतः उपदेशिल्याप्रमाणे विधवाविवाह केला नाही. आणि पंचहौद मिशन प्रकरणी आपल्या विवेकाविरुद्ध जाऊन त्यांनी प्रायश्चित्त घेतले. या व अशा प्रकारच्या विसंगतींमुळे एकंदर समाजसुधारणेच्या कार्याची फार हानी झाली.<br><br>'''धोंडो केशव'''<br>{{gap}}धोंडो केशव कर्वे यांचे या बाबतीतले उदाहरण मोठे लक्षणीय आहे. स्वतःच्य बोलाप्रमाणे कृती करून त्यांनी विधवाविवाह केला आणि स्त्रीशिक्षणसंस्था स्थापून त्या कार्याला सर्वस्वी वाहून घेतले. त्यामुळे आज महाराष्ट्रात स्त्रीशिक्षण म्हणजे कर्वे असे समीकरणच होऊन बसले आहे. तत्त्वज्ञान आणि कृती यांचे सामर्थ्य असे अद्वितीय आहे. त्याच्या अभावी आज अनेक विधवा, मुली घरीदारी, जुन्या काळाप्रमाणे पिचत पडल्या असत्या आणि अनेक कर्तबगार स्त्रियांना व संस्थांना महाराष्ट्र मुकला असता<br><br>'''आगरकर - जातिभेद'''<br>{{gap}}'बुद्धिवादाचे जनक' असा आगरकरांचा मागे उल्लेख केलाच आहे. आणि महाराष्ट्राला बुद्धिवाद शिकविणे हेच त्यांचे सर्वात मोठे कार्य होय. बुद्धिवादाचे सर्व तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या लेखांतून मांडून सामाजिक व धार्मिक क्षेत्रातल्या प्रत्येक चळवळीला प्रोत्साहन व पाठिंबा दिला आहे. जातिभेदामुळे झालेले सर्व अनर्थ त्यांनी पुढील परिच्छेदात अगदी स्पष्टपणे मांडले आहेत. ते म्हणतात, 'जातीमुळे आपला देशाभिमान संकुचित झाला आहे. जातीमुळे ज्ञान, कला, शास्त्रे, ही जेथल्या तेथे कोंडल्यासारखी झाली आहेत; जातीमुळे धर्मविचारांत व आचारांत मतभेद उत्पन्न होऊन तो परस्परवैरास, छळास व मत्सरास कारण झाला आहे. जातीमुळे देशातल्या देशात किंवा परदेशी प्रवास करणे कठीण झाले आहे. जातीमुळे परद्वीपस्थ व परधर्मीय लोकांपासून अलग रहावे लागल्यामुळे, फार नुकसान झाले आहे व होत आहे. या जातीमुळे आमची भूतदया, आमचे बंधुप्रेम, आमची उदारता, आमची धर्मबुद्धी, आमची परोपकाररती, यांचे क्षेत्र अतिशय मर्यादित झाले आहे. सारांश, ज्या अनेक विपत्ती आपण भोगीत आहो, त्यांपैकी ज्यांचे जनन जातिभेदामुळे झाले नाही अशा फारच थोड्या असतील.'<br><noinclude></noinclude>
3xxc1jjffdbayjuhiaypru0hpgcl558
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०७
104
73819
232140
165278
2026-06-12T03:14:48Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232140
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६८१|| समाज परिवर्तन}}</noinclude><br><br>'''वर्णसंकर अवश्य'''<br>{{gap}}जातिभेदावर अशी प्रखर टीका करून आगरकरांनी वर्णसंकराचा हिरीरीने पुरस्कार केला आहे. ते म्हणतात, 'त्यांच्या (सनातनी शास्त्री- पंडितांच्या) धर्मग्लानीच्या बऱ्याच भागास आम्ही धर्मग्लानी न मानता धर्मोत्कर्ष समजतो. मूर्तिपूजा नाहीशी होणे, वर्णसंकर होऊन पाहिजे त्याला पाहिजे त्याशी अन्नोदकव्यवहार वा लग्न करण्याची सदर परवानगी असणे, पाहिजे त्याने पाहिजे त्या शास्त्राचा किंवा धर्मग्रंथाचा अभ्यास करणे वगैरे गोष्टी प्रचारात आल्यास कोणत्याही प्रकारची धर्मग्लानी होणार आहे, असे आम्हांस वाटत नाही. त्या जुन्या प्रकारच्या आचारांनी हिताहून अहितच अधिक होत आहे, असा आमचा समज आहे.' अस्पृश्यतेविषयी आगरकरांनी फारसे लिहिलेले नाही. पण त्याविषयी त्यांची मते अशीच क्रांतिकारक होती. ग्रामण्य प्रकरणाविषयी लिहिताना त्यांनी म्हटले आहे की 'ब्राह्मणेतराच्या हातचा चहा पिण्यास आम्हांस दोष वाटत नाही. इतकेच नव्हे, तर नीच मानलेल्या महारांची स्थिती सुधारून त्यांची व वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांची एक पंगत झालेली जर आम्हांस पाहता येती तर आम्ही स्वतःस मोठे कृतार्थ मानले असते.'<br><br>'''स्त्री-पुरुष समता'''<br>{{gap}}सर्व सामाजिक सुधारणांमध्ये स्त्री-सुधारणेला आगरकरांनी अग्रस्थान दिले आहे. कारण त्यांच्या मते समाजस्थिती ही गृहस्थितीवर अवलंबून असते आणि ही गृहस्थिती स्त्रीचे कुटुंबातील स्थान, तिची प्रतिष्ठा, तिचे अधिकार, तिचे स्वातंत्र्य यांवर अवलंबून असते, असे सांगून प्रौढविवाह, पुनर्विवाह, स्त्रीशिक्षण या सर्व सुधारणांचा त्यांनी पुरस्कार केला आहे. प्रौढविवाहाचा विचार मांडताना त्यांनी स्वयंवराचे किंवा आजच्या भाषेत प्रेमविवाहाचे समर्थन केले आहे. त्यांच्या मते तो व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. ज्यांना दुसऱ्या कोणी पसंत केलेल्या बायका चालतात आणि ज्यांना रत्युपभोगासाठी दुसऱ्यांनी कोंडून घालावे लागते, त्यांच्या हातून कसलेही राष्ट्रकार्य होण्याचा संभव नाही, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. स्त्री-शिक्षणाविषयी लिहिताना स्त्री- पुरुषांना एकच शिक्षण, आणि तेही एकत्र दिले पाहिजे, असे त्यांनी आग्रहाने सांगितले आहे. यात स्त्री-जीवनाचा उत्कर्ष तर आहेच, पण शिवाय प्रसंग आला तर शिक्षण हे स्त्रीला चरितार्थसाधन म्हणून उपयुक्त ठरण्याचा संभव आहे, हाही विचार त्या काळी त्यांनी सांगितला आहे.<br>{{gap}}स्त्रीसुधारणाविषयक आगरकांनी जे लिहिले आहे ते अत्यंत आवेशाने, त्वेषाने, आणि तीव्र भाषेत लिहिले असून त्यामागे पांडित्य, तत्त्वचिकित्सा व तळमळ हीही तितकीच आहे. जातिभेद, अस्पृश्यता इ. सर्वच सुधारणांच्या बाबतीत त्यांची लेखणी अशीच जहाल आहे आणि विद्वत्तेने भूषविलेली आहे. आगरकरांना या क्षेत्रात<noinclude></noinclude>
s1mbxofphdjwy5flgdroapi2smj3z03
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०८
104
73820
232141
165279
2026-06-12T03:15:02Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232141
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६८२}}</noinclude>अजूनही मोठा मान मिळतो तो यामुळेच.<br>{{gap}}बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून सुरू झालेला महाराष्ट्रातील हा समाजसुधारणेचा प्रवाह मोठा सकस आणि जोमदार होता. आणि तो तसाच चालला असता तर आज महाराष्ट्र समाजसुधारणेच्या दृष्टीने अग्रस्थानी राहिला असता. पण तसे व्हावयाचे नव्हते. एका अगदी अनपेक्षित अशा कारणाने तो येथे कुंठित झाला.<br><br>'''विषमता'''<br>{{gap}}वर अनेक ठिकाणी सांगितलेच आहे की येथल्या धार्मिक, सामाजिक, राजकीय सर्व प्रकारच्या सुधारणांमागे पाश्चात्य भौतिक विद्या ही प्रमुख प्रेरणा होती. पण या विद्येचे अध्ययन व उपासना महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी जशी केली तशी ब्राह्मणेतर समाजाने केली नाही. त्यामुळे या दोन समाजांच्या उत्कर्षांमध्ये फार मोठी तफावत पडून त्यांच्यांत समता प्रस्थापित होण्याऐवजी विषमताच निर्माण झाली आणि ती दिवसेंदिवस रुंदावत चालली.<br><br>'''ब्राह्मणांची मक्तेदारी ?'''<br>{{gap}}ब्राह्मणेतरांनी भौतिक विद्येची उपासना केली नाही एवढेच नव्हे, तर ब्राह्मणांनी आम्हांला विद्येपासून वंचित केले, असा सतत आक्रोश चालू ठेवला. वास्तविक जोतिबा फुले अपृश्यांसाठीसुद्धा शाळा स्थापू शकले. त्यांचे सहकारी अनेक ब्राह्मण होते. असे असताना मराठ्यांना विद्येपासून दूर ठेवणे ब्राह्मणांच्या मनात असते तरी त्यांना ते शक्य नव्हते. वास्तविक प्राचीन काळी सुद्धा क्षत्रिय व वैश्य यांना वेदाध्ययनाचा अधिकार होता. संतांच्या काळात तर निम्याहून अधिक संत ब्राह्मणेतर होते. काहीतर शुद्रही होते. तरी सर्व हिंदुस्थानात ते धर्मोपदेशकाचे कार्य (जी ब्राह्मणांची मक्तेदारी असे मानलेले होते) करीत असत. आणि अनेक ब्राह्मण त्यांचे शिष्यत्वही पत्करीत असत. पण हे मागल्या काळचे सोडून दिले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की फ्रेजर नावाच्या इंग्रज पंडिताने म्हटल्याप्रमाणे, इंग्रजी राज्य प्रस्थापित होताच विद्येच्या क्षेत्रातील ब्राह्मणांची मक्तेदारी संपली आणि विद्या सर्वांना सुलभ झाली. मिशनऱ्यांनी तर हिंदूंमधील हीनवर्णीयांच्या साठी अनेक ठिकाणी शाळा उघडल्या होत्या. बडोद्याचे सयाजीराव महाराज, कोल्हापूरचे शाहू छत्रपती, ग्वाल्हेरचे शिंदे महाराज यांनी मराठ्यांमध्ये विद्याप्रसार करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. पण त्यांना शेवटी निराश व्हावे लागले. मराठ्यांना विलायतेला जाण्यासाठीसुद्धा त्यांनी निधी ठेविले होते. पण त्याचा कोणी फायदा घेतला नाही. बंगालमध्ये रॉय, चतर्जी, बॅनर्जी, टागोर या ब्राह्मण घराण्यांप्रमाणेच घोष, बोस, पाल, दत्त हीही घराणी विद्यासंपन्न झाली. आणि लालमोहन, आनंद मोहन, रासबिहारी, अरविंद, बारींद्रकुमार घोष, रमेशचंद्र दत्त, विवेकानंद, जगदीशचंद्र सुभाषचंद्र असे एकेक रथी-महारथी या ब्राह्मणेतर घराण्यांत<noinclude></noinclude>
nm656nq0nxuvk7w56v9hlbug8zjks05
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०९
104
73821
232142
165280
2026-06-12T03:15:14Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232142
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६८३|| समाज परिवर्तन}}</noinclude>निर्माण झाले. महाराष्ट्रात हेच व्हावयास पाहिजे होते. याला ब्राह्मण केव्हाही बंदी घालू शकले नसते. विलायतेला आपली मुले धाडू शकतील अशी शंभर संपन्न घराणी शहाण्णव कुळीच्या मराठ्यांत सहज होती. पण त्यांनी हे मनातही आणले नाही आणि ब्राह्मणांनी आम्हांला विद्याविन्मुख केले असे मराठा समाजाचे प्रा. लठ्ठे, श्री. काशीराव देशमुख इ. ग्रंथकार म्हणतच राहिले. हा ब्राम्हणांचा नसता बडेजाव आहे. त्यांच्या हाती काडीचीही सत्ता नसताना, ती आहेच, असे ब्राह्मणेतरांनी प्रतिपादिले. आणि उत्कर्षाचा जो राजमार्ग सर्वांना खुला होता तो म्हणजे भौतिक विद्येचा मार्ग त्यांनी अनुसरला नाही.<br><br>'''कायमची अढी'''<br>{{gap}}ब्राम्हणेतर समाजाने विद्याधनाची उपेक्षा केल्यामुळे ब्राह्मण व ब्राह्मणेतर समाजात फार मोठी विषमतेची दरी निर्माण झाली. डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक या समाजातल्या प्रतिष्ठेच्या जागा आणि कुळकर्णी, कारकून, मामलेदार, पोलीस अधिकारी, न्यायाधीश या व इतर सरकारी प्रतिष्ठेच्या सर्व जागा ब्राह्मण, प्रभू, इ. विद्यासंपन्न लोकांनी व्यापल्या. यामुळे ब्राह्मणेतर समाज अत्यंत असंतुष्ट होऊन गेला आणि ब्राह्मण हा आपला शत्रू आहे, वैरी आहे, अशी कायमची अढी त्याच्या मनात बसली.<br><br>'''इंग्रज मित्र'''<br>{{gap}}यामुळे एक घातक परिणाम झाला. ब्राह्मण हेच फक्त आर्य आहेत व इतर सर्व समाज शूद्र आहे असे जोतिबांनी सांगितले होते. इंग्रज हे सुद्धा त्यांच्या मते शूद्र होते. तेव्हा ब्राम्हण या आपल्या शत्रूपासून आपले रक्षण व्हावयाचे असेल, तर इंग्रजांचे राज्यच येथे कायम राहिले पाहिजे, असा सिद्धान्त त्यांनी मांडला. आणि ब्राहाणेतर चळवळीतल्या लोकांनी तो मनोभावे उचलला. जोतिबांनी सांगितलेली विद्येची महती आणि सर्व ब्राह्मणेतर समाज शूद्र म्हणजे एकाच रक्ताचा, म्हणजेच समपातळी- वरचा आहे हा त्यांचा सिद्धान्त कोणीही मानला नाही. ब्राह्मण हा आपला वैरी व इंग्रज हा आपला मित्र व रक्षणकर्ता आहे, हा विचार मात्र त्यांनी स्वीकारला आणि जवळजवळ पन्नास वर्षे ते स्वातंत्र्याच्या चळवळीपासून अलिप्त राहिले. महाराष्ट्राची त्यामुळे फार मोठी हानी झाली.<br>{{gap}}विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांच्यापासून महाराष्ट्रात आणि भारतात स्वातंत्र्याच्या चळवळीचे एक नवे युग सुरू झाले. या चळवळीत त्याच वेळी ब्राह्मणेतर समाज सामील झाला असता तर त्याच वेळी त्याचा उत्कर्ष होऊन त्या समाजातून मोठे मोठे कर्ते पुरुष निर्माण झाले असते. स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि भौतिकविद्या यांचा गुणच असा आहे. आणि ब्राह्मणेतर समाज रक्तातल्या गुणांच्या दृष्टीने पाहता ब्राह्मणांच्या पेक्षा रतीभरही कमी नाही. पण ते गुण विकसित होण्यासाठी<noinclude></noinclude>
7rekwx1vz5ycmlz8v1qavdp5q6ofgfv
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१०
104
73822
232143
165281
2026-06-12T03:15:38Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232143
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६८४}}</noinclude>जे वर सांगितलेले प्रयत्न करावयास हवे ते त्यांनी केले नाहीत.<br><br>'''मराठे-वर्णश्रेष्ठत्व'''<br>{{gap}}पण एवढ्यावर हे भागले नाही. वर्णश्रेष्ठत्वाचा अभिमान ब्राह्मणांइतकाच मराठ्यांनाही आहे. त्यामुळे ब्राह्मणब्राह्मणेतर एवढेच या चळवळीला रूप न राहता मराठा- मराठेतर असे रूप तिने धारण केले. ब्राह्मणब्राह्मणेतर या चळवळीचे मूळ रूप अगदी गेले. ते राहिले असते तर ब्राह्मणेतर सर्व समाज एक झाला असता. पण सर्व हिंदुमात्र एक हे जसे ब्राह्मणांना मान्य नाही तसेच सर्व ब्राह्मणेतर एक हे मराठ्यांनाही मान्य नाही. ब्राह्मण हा ईश्वर आणि मनुष्य यांच्यातील दलाल म्हणून तो निंद्य, ब्राह्मण म्हणून नव्हे, अशी जोतिबांची भूमिका होती. पण छत्रपती शाहू महाराजांनी, क्षात्रजगद्गुरू हे पीठ निर्माण करून ते तत्त्व सोडले. कारण पुन्हा दलालाचीच प्रतिष्ठापना त्या योगे झाली. श्री. ठाकरे यांनी मराठ्यांच्या या वृत्तीवर कडक टीका केली आहे (के. सी. ठाकरे, शेतकऱ्यांचे स्वराज्य, प्रकरण ६). महर्षी शिंदे यांनी ब्राह्मणेतर चळवळीला राष्ट्रनिष्ठ वळण लावण्याचा फार प्रयत्न केला होता. मराठ्यांनी सरकार किंवा ब्राह्मण चळवळ्ये यांच्या पंखाखाली न जाता आपला स्वतंत्र संघ काढावा व राष्ट्रसेवा करावी असे ते म्हणत. त्याप्रमाणे त्यांनी स्वतः १९१७ साली मराठा राष्ट्रीय संघ स्थापन केला; पण ते अस्पृश्यांसाठी चळवळ करतात म्हणून मराठ्यांचा त्यांच्यावर राग होता. म्हणून त्या संघात सामील न होता त्यांनी 'मराठा लीग' ही स्वतंत्र संस्था स्थापिली आणि महर्षीचा प्रयत्न अयशस्वी झाला.<br><br>'''केशवराव जेधे'''<br>{{gap}}ब्राह्मणेतर चळवळीला राष्ट्रीय वळण लावण्याचे कार्य दे. भ. केशवराव जेधे यांनी केले. बारा वर्षे प्रथम या चळवळीत ते होते. पण त्यांना राष्ट्रीयत्व कोठे दिसेना म्हणून श्री. ठाकरे यांच्यापेक्षाही कडक टीका करून ते तीतून बाहेर पडले. ते लिहितात, 'ब्राह्मणेतर चळवळीत राष्ट्रीय वृत्तीला वाव नव्हता; ती सर्वस्वी सरकारची मर्जी राखणारी चळवळ होती. बारा वर्षे मी ब्राह्मणेतर चळवळीत काढली, पण आपण देशाची सेवा करावी, असे मला कधीही वाटले नाही. या चळवळीच्या पुढाऱ्यांची दृष्टी अराष्ट्रीय व मतलबी होती. स्वार्थापलीकडे ते पाहात नव्हते' (प्रसाद, दिवाळी अंक, १९५५). हे सर्व घडले ते १९३० च्या नंतर. महात्माजींच्यापासून अनेक मराठ्यांना स्फूर्ती प्राप्त झाली. इंग्रज हा आपला खरा शत्रू हे जाणून ते सत्याग्रहाच्या राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. आणि त्यामुळे स्वातंत्र्याचा लढा यशस्वी ठरला.<br><br>'''गुणविकासाचे तत्त्व'''<br>{{gap}}विष्णुशास्त्री, टिळक व एकंदर काँग्रेस यांनी जो राष्ट्रीय लढा सुरू केला त्याच<noinclude></noinclude>
9v76xyxp9rxfpkrjh66z8knd05buzr2
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७११
104
73823
232144
165282
2026-06-12T03:15:50Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232144
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६८५|| समाज परिवर्तन}}</noinclude>वेळी हे व्हावयास हवे होते. कष्टकरी जनतेची उन्नती हेच टिळकांच्या चळवळीने सूत्र होते. अन्यायाचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य हेच सर्व मानवी गुणांच्या विकासाचे तत्त्व आहे, हे त्यांनी जाणले होते. म्हणून शेतकरी व कामकरी यांच्या जागृतीसाठीच त्यांनी आयुष्य वाहिले होते.<br><br>'''राष्ट्रीय पक्ष - विरोध'''<br>{{gap}}पण राष्ट्रीय चळवळीत समाजसुधारणेला विरोध हे व्यंग पहिल्यापासूनच होते. त्यातल्या कोणत्याही नेत्याला वर्णविषमता, जातीयता मुळीच मान्य नव्हती. पण रानडेप्रभृती जे जे समाजसुधारक त्यांची काँग्रेसमधला राष्ट्रीय पक्ष नेहमी चेष्टा करीत असे. त्यांच्या आचरणातील विसंगतीमुळे ही टीका होती हे खरे. पण तेवढाच दोष दाखवून राष्ट्रीय पक्षाने समाजसुधारणेचा जोराने पुरस्कार करावयास हवा होता. तो न केल्यामुळे सामाजिक समतेच्या व एकंदर समाजसुधारणेच्या चळवळीची फार मोठी हानी झाली हे खरेच आहे. टिळकांनी वेदोक्त चळवळीच्या वेळी आणि पटेल बिलाच्या वेळी सनातन्यांची बाजू घेतली. तसे करण्याचे खरोखर काही कारण नव्हते. पण मानवी अपूर्णता ध्यानी घेऊन आपण कोणत्याही नेत्याचे मूळ कार्य लक्षात घेतले पाहिजे. टिळकांचे मुख्य कार्य वर सांगितल्याप्रमाणे अन्यायाचा प्रतिकार करण्याचे सर्व समाजाचे सामर्थ्य जागृत करणे हे होय. हे जाणून सर्व ब्राह्मणेतर समाज त्याच वेळी खडा झाला असता तर फार मोठी प्रगती झाली असती. पण दुर्दैव असे की आजही स्वातंत्र्यप्राप्ती नंतर ती झालेली नाही. 'एक गाव एक पाणवठा' या डॉ. बाबा आढाव यांच्या चळळीचे जे वृत्तांत पाहावयास मिळतात, त्यावरून असे दिसते की वर्णविषमतेची भावना हिंदुसमाजात अजून जशीच्या तशी कायम आहे.<br><br>'''ब्राह्मणांच्या जागी मराठे'''<br>{{gap}}ती जशी ब्राह्मणांत आहे, तशीच मराठ्यांतही आहे. ब्राह्मणांजवळ आता पूर्वीची विद्या नाही, तप नाही, वेदाध्ययन नाही; तरी आम्ही सर्व वर्णाचे गुरू ही भावना खेड्यापाड्यांतून अजून जिवंत आहे. 'जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तीन्ही लोकीं श्रेष्ठ', ही तुकारामांच्या वेळची वृत्ती अजून अनेक ब्राम्हणांत कायम आहे. जे ब्राह्मणांचे तेच मराठ्यांचे. त्यांच्यांतही जुन्या क्षत्रियांचे पराक्रम राहिलेले नाहीत. तरी आपला वर्ण सर्वात श्रेष्ठ ही भावना आहे. त्यामुळेच मराठामराठेतर चळवळ सुरू झाली. सत्तास्थानी सर्वत्र शहाण्णव कुळीचे मराठे असले पाहिजेत, अशी धडपड मराठ्यांची आहे. ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप या अस्पृश्य पुढाऱ्यांनी हेच लिहिले आहे. 'मराठ्यांनी ब्राम्हणांना हाकलून देऊन त्यांच्या जागा आपण घेतल्या आहेत. अस्पृश्यांनी आपली मुले शाळेत पाठवू नयेत म्हणून, घरादारांचा नाश करू, अशा धमक्या त्यांनी दिल्या.'<br><noinclude></noinclude>
2tifljtc6dirj03or9gmpzd1w0usfu7
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१२
104
73824
232145
165283
2026-06-12T03:16:27Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232145
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६८६}}</noinclude><br>'''विधायक कार्य-दिशा'''<br>{{gap}}ब्राह्मणांचे समाजमनावरील वर्चस्व नष्ट करणे हे ब्राह्मणेत्तर चळवळीचे उद्दिष्ट खरोखर फार चांगले होते. पण त्या दृष्टीने फार मोठे विधायक कार्य त्यांनी करावयास हवे होते. बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा, प्रयत्नवाद, यांची शिकवण ग्रामीण समाजाला देणे अवश्य होते. ब्राह्मणेतरांनी लोकजागृतीसाठी जे तमाशे सुरू केले होते त्यांतून ही शिकवण त्यांना देता आली असती. त्याचप्रमाणे कुळकर्णी, वकील असा एक वर्ग निर्माण करावयास हवा होता. या तमाशांच्या द्वारा, धर्माला आलेले कर्मकांडाचे रूप नष्ट करून खऱ्या भगवद्भक्तीचा, समतेचा, लोकसेवेचा धर्म प्रसृत करणे हे कार्य व्हावयास हवे होते. तसे झाले असते तर ग्रामीण भागात फार मोठी मानसिक क्रांती होऊन ब्राह्मणेत्तर समाज स्वातंत्र्याभिमुख झाला असता. त्याच्या ठायी राष्ट्रीय भावना निर्माण झाली असती. पण हे कार्य त्या तमाशांनी केले नाही. ब्राह्मणद्वेष एवढेच उद्दिष्ट त्यांनी डोळ्यांपुढे ठेवले होते. त्यामुळे पुढे पुढे त्यांना अत्यंत ओंगळ रूप प्राप्त झाले.<br>{{gap}}वर्णभेद, जातिभेद, त्यातून निर्माण झालेली जन्मनिष्ठ श्रेष्ठ-कनिष्ठता या सर्वांच्या मागे हजारो वर्षांच्या रूढी, अज्ञान, भौतिकविद्येचा अभाव, धर्माला आलेले विकृत रूप, निवृत्ती, दैववाद, परलोकनिष्ठा, ऐहिक उत्कर्षाविषयी उदासीनता हे सर्व रोग आहेत. आणि त्यांचे समूळ उच्चाटन केल्याखेरीज जातिभेद, जातीय अहंकार नष्ट होणार नाहीत. जे वर्णभेद, जातिभेद यांच्याबद्दल आहे ते अस्पृश्यतेबद्दल शतपटीने खरे आहे.<br>{{gap}}अस्पृश्य आणि आदिवासी मिळून भारताचा जवळजवळ एकचतुर्थांश समाज होतो. एवढी प्रचंड लोकसंख्या जोपर्यंत माणुसकीच्या पातळीवर येत नाही, त्यातील प्रत्येक व्यक्तीला व्यक्तित्वाची, मानवत्वाची प्रतिष्ठा लाभत नाही, तोपर्यंत भारताच्या लोकशाहीला खरा अर्थ येणार नाही.<br><br>'''कांबळे'''<br>{{gap}}तो अर्थ प्राप्त होण्याच्या दृष्टीने, अस्पृश्यासाठी शाळा काढून म. फुले यांनी पहिला प्रयत्न केला, हे मागे सांगितलेच आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य असेच महत्त्वाचे आहे. १९०६ साली 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' ही संस्था त्यांनी स्थापन केली आणि पुढील पंचवीस वर्षात सर्व हिंदुस्थानभर तिच्या शाखा प्रसृत केल्या. कोल्हापूरचे शाहू छत्रपती, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, म्हैसूरचे महाराज यांनीही अस्पृश्यांसाठी शाळा, वसतिगृहे स्थापणे, त्यांना अधिकाराच्या जागा देणे, अशा तऱ्हेचे बहुमोल कार्य केले. साधारण १९०० सालापासून अस्पृश्य वर्गात जागृती होऊन त्या वर्गातून त्यांचे स्वतःचे नेते व कार्यकर्ते निर्माण होऊ लागले. त्यांपैकी शिवराव जानवा कांबळे यांचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. १९०३ साली त्यांनी<noinclude></noinclude>
64igl6fqcrkmm5yceygaenp2cuhmj6o
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१३
104
73825
232146
165284
2026-06-12T03:17:02Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232146
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६८७|| समाज परिवर्तन}}</noinclude>सासवड येथे एक मोठी सभा भरविली व अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात असा अर्ज सरकारकडे केला. स्वजातीच्या उत्कर्षासाठी अशा रीतीने जमून चर्चा व विचारविनिमय करण्याचा पायंडा कांबळे यांनी पाडला, म्हणून या सभेचे विशेष महत्त्व आहे.<br><br>'''कलंक'''<br>{{gap}}यानंतर महात्माजींच्या कार्यास प्रारंभ झाला. अस्पृश्यता हा हिंदुधर्मावरील कलंक आहे एवढेच सांगून ते थांबले नाहीत; तर राजकीय चळवळीचे अस्पृश्यता निवारण हे एक अविभाज्य अंग आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या कार्याला फार मोठी चालना मिळाली. स्वातंत्र्याचा संदेश घेऊन खेडोपाडी फिरणाऱ्या हजारो तरुणांनी अस्पृश्यांत मोठी जागृती निर्माण केली. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीला त्यायोगे फार मोठे साह्य झाले.<br><br>'''डॉ. आंबेडकर- शिकवण'''<br>{{gap}}याच सुमाराला डॉ. आंबेडकरांचा उदय झाला आणि ते स्वतः अस्पृष्ट वर्गातील असल्यामुळे त्या वर्गाच्या अस्मितेला फार मोठा उजळा मिळाला. आपल्यातलाच एक माणूस पाश्चात्य देशात जाऊन मोठया पदव्या मिळवून अत्यंत उच्च स्थान प्राप्त करून घेऊ शकतो, या भावनेमुळे अस्पृश्यांना आत्मविश्वास आला आणि त्यांच्या कर्तृत्वाला चालना मिळाली. महाडचा व नाशिकचा असे जे दोन सत्याग्रह डॉ. आंबेडकरांनी घडवून आणले त्यांचे महत्त्व अगदी अनमोल असे आहे. उच्च ध्येयासाठी मनुष्य जेव्हा आत्मार्पण करण्यास सिद्ध होतो, तेव्हाच त्याच्या बुद्धीचा, प्रज्ञेचा खरा विकास होतो. डॉ. आंबेडकरांनी ही शिकवण या सत्याग्रहांच्या द्वारे दिली, म्हणून अस्पृश्यसमाज व एकंदर हिंदुसमाज त्यांचा कायमचा ऋणी राहील.<br><br>'''परागती'''<br>{{gap}}या सत्याग्रहाप्रमाणेच १९३० सालच्या सत्याग्रहात आणि १९४२ च्या चळवळीत अस्पृश्यांनी भाग घेतला असता तर त्यांच्या कर्तबगारीचा याच्या दसपटीने विकास झाला असता. पण तसे घडले नाही. याला कारणे दोन. महात्माजींचा जन्मनिष्ठ वर्णभेद व जातिभेद यावर विश्वास होता. जातिपोटजातीसुद्धा आत्म्याच्या विकासाला अवश्य आहेत असे ते म्हणत असत (यंग इंडिया, ६-१०-२७). ही फार मोठी विसंगती होती. वर्ध्याच्या आश्रमात ते स्पृश्य व अस्पृश्य यांचे विवाह घडवीत असत. स्वतःच्या घरात त्यांनी जातींचा विचार न करता सोयरीक केली. ते स्वतः वैश्य असून त्यांनी राजकारण हा क्षत्रियांचा उद्योग केला. असे असूनही जातिभेदावर आपला विश्वास आहे, असे ते म्हणत असत. शिवाय पुढे त्यांनी अस्पृश्यांच्या विभक्त<noinclude></noinclude>
0rsfw55xkkl6ocqemk2f5oxcchrjmjc
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१४
104
73826
232147
165285
2026-06-12T03:17:27Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232147
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६८८}}</noinclude>मतदारसंघाला प्राणपणे विरोध केला. यामुळे डॉ. आंबेडकर व एकंदर अस्पृश्य समाज महात्माजींवर चिडून गेला आणि स्वातंत्र्याच्या चळवळीपासून दूर राहिला. प्रारंभी डॉ. आंबेडकर ब्रिटिशांच्या विरुद्ध होते; पण पुढे स्वातंत्र्य आले तर सवर्ण हिंदुसमाज अस्पृश्यांचा छळ करील, असे ते म्हणू लागले. वास्तविक याही वेळी मानवाची अपूर्णता जाणून, महात्माजींची व पं. नेहरूंसारख्या इतर नेत्यांची उदार दृष्टी ध्यानी घेऊन, अस्पृश्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उतरावयास हवे होते. त्यांनी स्वतंत्रपणे ब्रिटिशांशी लढा केला असता तरी चालले असते. पण इंग्रज हा आपला उद्धारकर्ता आहे ही दुबळी व परावलंबी भूमिका त्यांनी स्वीकारली. त्यामुळे त्यांचे व देशाचे फार नुकसान झाले.<br><br>'''भविष्य'''<br>{{gap}}आज स्वातंत्र्यानंतर पंचवीस तीस वर्षांनी पाहता, अस्पृश्यांच्या स्थितीत पुष्कळ पालट झाला आहे, हे जरी खरे असले तरी, वर्णजातिभेदावरची, जन्मनिष्ठ श्रेष्ठ- कनिष्ठतेवरची हिंदुसमाजाची श्रद्धा गेली आहे, असे दिसत नाही. एका पाणवठ्यावर पाणी भरणे ही साधी गोष्ट करण्यास अजून हा समाज तयार नाही. राजकारणात सर्वत्र जातीयतेचाच आश्रय केला जातो. तेव्हा नजीकच्या भविष्य काळात जातिभेदाचा वा अस्पृश्यतेचा प्रश्न पूर्णपणे सुटेल अशी आशा करण्यास फारशी जागा नाही. अस्पृश्यांना आता शिक्षणाची संधी मिळत आहे आणि सर्व क्षेत्रांत उत्कर्षाला अवसर मिळत आहे. त्यामुळे त्यांच्यातून थोर शास्त्रज्ञ, नेते, राजकारणी, संशोधक, साहित्यिक, मोठे ग्रंथकार, स्थापत्यविशारद, प्रशासक असे थोर पुरुष निर्माण झाले तरच हा प्रश्न सुटू शकेल. पण तशीही फारशी आशा दिसत नाही. तेव्हा विषम समाजरचना नष्ट होऊन हिंदुसमाज एकरूप केव्हा होईल हे सांगणे फार कठीण आहे.<br><br>'''आदिवासी'''<br>{{gap}}अस्पृश्यांप्रमाणेच आदिवासींचा प्रश्न अत्यंत निकडीचा व जिव्हाळ्याचा आहे. वंजारी, भिल्ल, कातकरी, ठाकर, रामोशी, गोंड, वारली, बेलदार, भामटा, मंगेला इ. अनेक जमाती या वर्गात येतात. त्यांची लोकसंख्या अस्पृश्यांइतकीच आहे. यावरून ही समस्या केवढी बिकट आहे ते ध्यानात येईल.<br><br>'''प्राचीन काळी'''<br>{{gap}}हिंदुसमाजात वर्णभेद व जातिभेद दीर्घकाळ आहेत. प्राचीन काळी सुद्धा होते. पण त्यांना असा कडकपणा आलेला नव्हता. शिकंदराच्या काळापासून हर्षवर्धनाच्या अखेरपर्यंत, शक, यवन, युएची, हूण इ. जमातींनी भारतावर नऊ वेळा आक्रमणे केली. भारतीयांनी ती सर्व मोडून काढली, इतकेच नव्हे, तर या सर्व जमातींना हिंदु-<noinclude></noinclude>
9hk9bulnr2is6xno7nxv5sf1w40po93
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१५
104
73827
232148
165286
2026-06-12T03:17:50Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232148
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६८९|| समाज परिवर्तन}}</noinclude>समाजात सामावून घेतले. त्यांतील कित्येक जमातींना तर क्षत्रिय, ब्राह्मण अशा श्रेष्ठ वर्णातही त्यांनी प्रवेश दिला. त्यामुळेच हिंदुसमाज सातव्या आठव्या शतकापर्यंत पुष्कळ अंशी एकरूप व बलाढ्य झाला. वर उल्लेखिलेल्या आदिवासी जमातींना त्याकाळीच असे आपल्यात समाविष्ट करून घेतले असते तर आज ही समस्या निर्माणच झाली नसती आणि हिंदुसमाजाला दौर्बल्य आले नसते.<br><br>'''अखंड सेवा'''<br>{{gap}}स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने आदिवासींच्या उद्धारार्थ एक स्वतंत्र खाते निर्माण केले आहे. त्याशिवाय, ठाणे, खानदेश, नाशिक या जिल्ह्यांत आदिवासी मंडळ, भिल्लसुधारणा मंडळ, भिल्लसुधारसमिती, डांग सेवामंडळ अशी मंडळे हेच कार्य करीत आहेत. विश्वहिंदुपरिषदेनेही जागोजागी केंद्रे निर्माण करून आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. यातून त्यांच्यामध्ये हिंदुधर्माचा आणि भारताचा अभिमान निर्माण झाला आणि भौतिक विद्या त्यांना सुलभ झाली तर त्या समाजातून मोठमोठे कार्यकर्ते व नेते निर्माण होतील आणि मग त्या कार्याला खरी गती येईल. पण यासाठी या कार्याला वाहून घेणारे शेकडो तरुण पुढे आले पाहिजेत. मिशनरी हे धर्मांतर घडवितात याची आपल्याला चीड येते. ते स्वाभाविक आहे. पण घरदार स्वदेश सोडून, सर्व आयुष्य परक्या जमातीत राहून त्यांची अखंड सेवा करीत राहणे हा जो त्याग आहे तसा त्याग करणारे सहस्रावधी तरुण हिंदुसमाजात निर्माण झाल्यावाचून वर्ण, जाती, अस्पृश्यता आणि वन्यत्व यांनी शतधा भंगलेला हा समाज एकरूप होणे अशक्य आहे, आणि तसा तो एकरूप झाल्यावाचून त्याला सामर्थ्य प्राप्त होणे त्याहून अशक्य आहे.<br>{{gap}}वर्णभेद, जातिभेद, अस्पृश्यता इ. हिंदुसमाजातील भेदांचा विचार येथवर केला. आता कुटुंबसंस्था हा जो समाजाचा प्रमुख घटक त्याचा विचार करून हे प्रकरण संपवू.<br><br>'''कुटुंबसंस्था'''<br>{{gap}}मानवाच्या सर्व उत्कर्षाचा पाया कुटुंब हा आहे. याविषयी आता जगात दुमत नाही. पण ही संस्था आज सर्वत्र ढासळत चालली आहे. त्यामुळेच सर्व जगातले समाजशास्त्रज्ञ तिचा अभ्यास करीत आहेत, तसा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी एकमुखाने निर्णय दिला आहे की या संस्थेवाचून समाज जगणेच शक्य नाही. त्याग, सेवावृत्ती, प्रेम, भक्ती, उदारदृष्टी, विवेक, संयम इ. अनेक सद्गुणांचे शिक्षण व संवर्धन या संस्थेत होत असते. व्यक्ती ही समाजाची मूल घटक आहे. तिचे हित, तिचा विकास हेच समाजाचे अंतिम उद्दिष्ट आहे; पण या व्यक्तीचा विकास कुटुंबसंस्थेवाचून अशक्य असल्यामुळे कुटुंबसंस्था हाच पाया मानून, सर्व बळ एकवटून, समाजाने तिची जपणूक केली पाहिजे.<br><noinclude><br>{{gap}}४४</noinclude>
kdq4i05q2l6rdx25fifovao760s24rb
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१६
104
73828
232149
165292
2026-06-12T03:26:57Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232149
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६९०}}</noinclude><br>'''ढासळली'''<br>{{gap}}पण आज या संस्थेला विघातक अशा अनेक शक्ती निर्माण झाल्या आहेत. मुंबई, सोलापूर अशी अनेक गिरणगावे निर्माण झाल्यामुळे कोकण, मावळ, खानदेश येथल्या शेतकऱ्यांचे कौटुंबिक जीवन संपुष्टात आले आहे. बायकामुळे गावी ठेवून त्याला एकट्याला मुंबईस राहावे लागते, कुटुंबाचे दर्शन त्याला सटी सहामासीच घडते. हळूहळू समाजाचे दारिद्र्य वाढत आहे. त्यामुळे मध्यम वर्गीय कुटुंब असेच मोडकळीस आले आहे. एकट्या पुरुषाच्या कमाईत कुटुंबाचा खर्च भागत नाही. त्यामुळे स्त्रीलाही द्रव्यार्जन करण्यासाठी दिवसभर बाहेर राहावे लागते. त्यामुळे अपत्य संगोपन ही कल्पनाच हळूहळू नाहीशी होत चालली आहे. दिवसभर आईबाप बाहेर राहत असल्यामुळे मुलांना कोठे तरी राखोळी घालावे लागते. त्यांना 'आई' अत्यंत दुर्मिळ झाली आहे. मग कशाचे संगोपन आणि कशाचे संस्कार ! मध्यम वर्ग हा राष्ट्राचा कणा आहे. नवे तत्त्वज्ञान निर्माण करणे, नवे ग्रंथ रचणे, समाजाला नवी दिशा देणे हे या विद्यासंपन्न वर्गाचे कार्य आहे. पण समाजातून कुटुंबसंस्थेच्या अभावी हा वर्गच नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्याची ती दशा झाली, मध्यम वर्गाची ही दशा झाली. मग तरुण पिढीवर संस्कार व्हावयाचे तरी कोठे?<br><br>'''स्त्रीचे व्यक्तित्व'''<br>{{gap}}याशिवाय स्त्रीशिक्षणामुळे स्त्रीच्या व्यक्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊन, त्या बाजूनेही कुटुंबसंस्थेवर आघात होऊन, तिला तडे जाऊ लागले आहेत. इतके दिवस घरात पुरुष हाच एकमेव कर्ता व सत्ताधारी होता. पण शिक्षणामुळे, द्रव्यार्जनशक्तीमुळे स्त्रीला आपल्यालाही समप्रतिष्ठा प्राप्त व्हावी अशी आकांक्षा निर्माण झाली आहे आणि ती योग्यही आहे. पण त्यामुळे एक शास्ता व बाकी सर्व शासित अशी जी व्यवस्था होती, आणि जिच्यामुळे कुटुंबसंस्था टिकून होती, ती भंगली आहे आणि कुटुंबात अराजक माजण्याची वेळ आली आहे. एक शास्ता व बाकी सर्व त्याचे अंकित ही पद्धत व्यवस्थेच्या, शांततेच्या दृष्टीने योग्य असली तरी तीमुळे शासितांच्या व्यक्तित्वाचा नाश होतो. म्हणूनच लोकसत्तेचा विचार उद्भवला. सर्वाच्या व्यक्तित्वाला अवसर देऊनही शिस्त व स्थैर्य पूर्वीप्रमाणेच टिकवून धरणे ही लोकशाहीपुढची बिकट समस्या आहे. आणि सर्व पक्ष विवेकी असूनही लोकशाही शासन टिकत नाही. हा विवेक, हा समंजसपणा फार दुर्मिळ आहे. त्यामुळेच जगात गेल्या पन्नास वर्षात नव्याने स्थापन झालेल्या लोकसत्ता भराभर कोसळून पडत आहेत. आणि आता तर जुन्या व स्थिर झालेल्या इंग्लंड, अमेरिकेतील लोकसत्ता तरी टिकतील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. कुटुंबसंस्थेचे तेच होत आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही व्यक्तित्वाला अवसर द्यावयाचा, पुरुष शास्ता व स्त्री शासित ही पद्धत टाकून देऊन दोघांनाही<noinclude></noinclude>
6t6cqw8dz6i5tceri4cl5wloi1yb6ik
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१७
104
73829
232150
165293
2026-06-12T03:27:11Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232150
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६९१|| समाज परिवर्तन}}</noinclude>समप्रतिष्ठा द्यावयाची आणि तरीही दोघांनीही जुळते घेऊन कुटुंबसंस्था टिकवावयाची हे फार अवघड आहे. इंग्लंड-अमेरिकेत इतके दिवस लोकसत्ता टिकविण्यात यश आले होते, पण कुटुंबसंस्था टिकविण्याला तेथले स्त्री-पुरुषही अयशस्वी झाले आहेत. दर तीन कुटुंबामागे एक घटस्फोट अशी तेथे अवस्था झाली आहे आणि आता हे प्रमाण इतके वाढत चालले आहे की लग्नसंस्था आणि कुटुम्बसंस्था मोडूनच टाकावी असा विचारप्रवाह तेथे सुरू झाला आहे. पण यामुळे तेथे मुले वाऱ्यावर सोडल्यासारखी झाली आहेत आणि त्यांच्यांत व्यसने, गुन्हेगारी, अत्याचार, स्वैराचार यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. म्हणजे स्त्रीच्या व्यक्तित्वाला अवसर द्यावा तर समाजातल्या सर्वांच्याच व्यक्तित्वाचा नाश होत आहे असा याचा अर्थ आहे. जगातील सर्व समाजात विवेक, समंजसपणा, दूरदृष्टी, आत्मसंयमन, जुळते घेण्याची वृत्ती यांचा अभाव आहे, अशा स्थितीत लोकशाही टिकणार नाही आणि कुटुंबसंस्थाही टिकणार नाही. भारतीय स्त्रीपुरुषांनी याचा गंभीरपणे विचार करून या गुणांची जोपासना केली पाहिजे आणि आपली लोकसत्ता व कुटुंबसंस्था टिकवून धरण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. ती टिकली तरच समाज टिकेल आणि सामाजिक क्रांतीच्या आपल्या कल्पना साकार होतील.<br><br>'''सावरकर'''<br>{{gap}}स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी धर्मक्रांतीप्रमाणेच सामाजिक क्रांतीचाही तितक्याच आवेशाने पुरस्कार केला आहे. तेव्हा त्यांचीच अवतरणे देऊन या विवेचनाचा समारोप करणे उचित होईल. सहभोजनाचा पुरस्कार करताना ते म्हणतात, 'शतवार सांगितले तरी फिरून एकदा सांगतो की हिंदू राष्ट्राच्या अभ्युत्थानास्तव राजकारण नि समाजकारण ही दोन्ही साधने अत्यावश्यक आहेत. राजकारण ही एका हातातील चढती तलवार तर समाजकारण ही दुसऱ्या हातातील बचावती ढाल! यांपैकी कोणतेही एक दुसऱ्यावाचून पंगू आहे' (जात्युच्छेदक निबंध, पृ. ३२४). भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा विचारही याच दृष्टिकोणातून ते मांडतात. 'जे हिंदुराष्ट्राचे स्वातंत्र्य आपणांस मिळवावयाचे, ते जातिभेदजर्जर झालेल्या या आपल्या राष्ट्रपुरुषास जरी मिळविता आले, तरी रोगाचे निर्मूलन झाले नाही तोपर्यंत, ते पुन्हा गमावण्याचा पाया भरत जाणार आहे' (उक्त ग्रंथ, पृ. १०).<br>{{gap}}'जर आम्ही हिंदू या जन्मजात जातिभेदाचा समूळ उच्छेद करू तरच तरू व राष्ट्र म्हणून, धर्म म्हणून यापुढे जगू शकू. जोवर या जातिभेदास आम्ही आमच्याच इच्छेने आमच्या राष्ट्राच्या कंठास नख लावू देत आहो, तोवर आम्हांस मारण्याचे काम शत्रूस करावयास नकोच. आम्ही आपण होऊनच मरत आहो. मद्रासमध्ये इस्लाम व इसाई दोहो हातांनी आमचे संख्याबळ लुटीत आहेत यात काय आश्चर्य ! जी दु:स्थिती मद्रासची तीच सर्वत्र.'<br><noinclude></noinclude>
daf36858hkuuci358i8y8tcoo7ets9w
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१८
104
73830
232151
165294
2026-06-12T03:27:31Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232151
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६९२}}</noinclude><br>'''रत्नागिरी'''<br>{{gap}}अस्पृश्यतेच्या बाबतीत, रत्नागिरी जिल्ह्यात, ते नुसते तत्त्वज्ञान सांगून थांबले नाहीत, तर त्यांनी प्रत्यक्ष मोठे परिवर्तन घडवून आणले. १९२५ साली स्थानबद्धतेत असताना त्यांनी तेथे प्रथम लोकांचे मतपरिवर्तन घडवून आणले. त्या वेळी सवर्ण समाज तेथे महाराच्या सावलीचा सुद्धा विटाळ मानीत असे. अशी स्थिती असताना सावरकरांच्या उपदेशामुळे स्पृश्य लोक महारवाड्यात भजनकीर्तनास जाऊ लागले. नंतर क्रमाने अस्पृश्य हे स्पृश्य वस्तीत भजन कीर्तनास येऊ लागले. पुढे शाळांतून मुले सरमिसळ बसू लागली आणि २-४ वर्षांत स्पृश्यांच्या घरात दसऱ्याचे सोने देण्यासाठी, हळदीकुंकवासाठी अस्पृश्यांचा प्रवेश होऊ लागला. पुढे सहभोजनेही होऊ लागली. याच सुमारास श्री. कीर या धनिकाने पतितपावन हे मंदिर बांधले व तेथे स्पृश्य एकत्र उत्सवसमारंभ करू लागले. सावरकर पुढे मुक्त झाल्यावर मुंबईस गेले. आणि हिंदुमहासभेच्या कार्यास त्यांनी वाहून घेतले. पण त्याला प्राधान्याने राजकीय स्वरूप आल्यामुळे रत्नागिरीचे कार्य इतरत्र कोठे झाले नाही. हिंदुमहासभेने अखिल भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यात हे कार्य चालविले असते तर हिंदुसमाज तिचा कायमचा ऋणी झाला असता.<br><br>'''संकरमहत्त्व'''<br>{{gap}}वर्णभेद, जातिभेद, अस्पृश्यता यांवर मुळीच विश्वास नसल्यामुळे आगरकरांप्रमाणेच सावरकरांनीही वर्णसंकराचा पुरस्कार केला आहे. व्यासांचे उदाहरण देऊन 'संकरः स्वर्गायैव' असा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. पराशर हा ब्राम्हण व सत्यवती ही कोळीण यांच्या संकरातून वेदव्यास जन्माला आले. त्याचप्रमाणे चंद्रगुप्त मौर्य, महादजी शिंदे हे संकरजन्यच होते. हे सांगून अशा संकराचा निषेध कसा करावा, असे ते विचारतात. संकराचा असा गौरव करून, आज सर्व हिंदुसमाज हा एक रक्ताचाच आहे, असा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. ते म्हणतात, पूर्वी स्मृतींनीच ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्या अनुलोम विवाहांस संमती दिली होती आणि प्रतिलोम विवाह इतके होत असत की कोणत्या संकरातून कोणती जात निर्माण झाली हे सांगताना स्मृतिकारांची पुरेवाट होत असे. त्यामुळे आजचा हिंदुसमाज एकरक्ताचा आहे या विधानावर कसलाच आक्षेप घेता येणार नाही. ('हिंदुत्व', आणि 'मनुस्मृतीतील महिला' यांत याचे सविस्तर विवेचन आहे.)<br>{{gap}}समाजपरिवर्तनाच्या सर्व तत्त्वज्ञानाचा हा सारार्थ आहे.<br><br>{{center|■}}<noinclude></noinclude>
051xj2et1h08c0vfftl57bfog3cavvc
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१९
104
73831
232152
165296
2026-06-12T03:27:49Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232152
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop
|Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf
|Page = 719
|bSize = 402
|cWidth = 306
|cHeight = 230
|oTop = 45
|oLeft = 42
|Location = center
|Description =
}}
<br><br>{{rh|'''<big>३७.</big>'''||'''<big>आर्थिक साम्राज्यशाही</big>'''}}<br><br>'''रक्तशोष'''<br>{{gap}}धार्मिक क्रांती व समाजपरिवर्तन यांचा गेल्या दोन प्रकरणांत विचार केला. आता ब्रिटिश कालातील अर्थव्यवस्थेचा विचार करावयाचा. ही अर्थव्यवस्था कशी होती हे 'आर्थिक साम्राज्यशाही' हे जे प्रकरणाला नाव दिले आहे त्यावरूनच कळून येईल. ब्रिटिशांचे येथे राजकीय साम्राज्य तर होतेच, पण त्यापेक्षाही जास्त विघातक असे आर्थिक साम्राज्य त्यांनी प्रस्थापित केले होते. हरएक मार्गाने येथल्या प्रजेची लूट करून भारताचा रक्तशोष त्यांनी चालविला होता. धर्म, समाजकरण आणि राजकारण ही सर्व अंगे अविभाज्य आहेत, असे मागे वारंवार सांगितलेच आहे. अर्थकारणाच्या बाबतीत ते दसपट खरे आहे. येथल्या धनाची नानाप्रकारे लूट करून ब्रिटिशांनी भारताचे शोषण कसे चालविले आहे, याचे सशास्त्र विवेचन राष्ट्रपितामह दादाभाई नौरोजी यांनी केले. पन्नास वर्षे या विषयाचे सतत मनन, चिंतन, अभ्यास, लेखन, प्रवचन केल्यानंतर त्यांनी स्वराज्यावाचून हा रक्तशोष थांबावयाचा नाही, असा सिद्धांत १९०६ सालच्या काँग्रेसपुढे मांडला. ही दोन अंगे किती अभिन्न आहेत ते यावरून कळून येईल.<br><noinclude></noinclude>
eznky6m8q60kmysc62wj15c1uv8w2q0
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७२०
104
73832
232153
165297
2026-06-12T03:28:34Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232153
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||६९४}}</noinclude><br>'''दारिद्र्य-कारणे'''<br>{{gap}}धर्म आणि समाजकारण या क्षेत्रांप्रमाणेच याही क्षेत्रात लोकहितवादी यांनी पुढील शंभर वर्षाला पुरतील असे विचार आपल्या शतपत्रांतून सांगितले आहेत. व्यापार, उद्योग, कारखाने, स्वदेशी, बहिष्कार, सर्व, सर्व विषय त्यांनी हाताळले असून त्या सर्व विषयांत द्रष्ट्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन केले आहे.<br>{{gap}}बंगालमधील राजाराम मोहन राय व त्यांचे सहकारी यांनी धर्म व समाजरचना या बाबतींत अत्यंत पुरोगामी विचार सांगितले आहेत. पण ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाचे त्यांना मुळीच आकलन झाले नव्हते. त्यांच्या कारखान्यामुळे वस्तू स्वस्त मिळू लागल्या व मजुरांना जास्त मजुरी मिळू लागली, याबद्दल ते इंग्रजांना धन्यवाद देत असत. ब्रिटिशांच्या कारभाराची केवढी भुलावण तेव्हा पडली होती, हे यावरून दिसून येईल. लोकहितवादी ब्रिटिश राज्याचे चाहते होते, तरी त्यांच्या अर्थव्यवस्थेचे मर्म त्यांनी बरोबर जाणले होते.<br>{{gap}}हिंदू लोक दरिद्री का झाले याची कारणे सांगताना ते म्हणतात, 'तूर्त दरिद्र मोडण्यास उपाय असा की ब्राह्मण लोकांनी आपल्या मूर्खपणाच्या समजुती सोडून कारकून व भट हे दोनच रोजगार आम्ही करू, असे म्हणू नये. तर काच, कापड, सुरी, कात्री, लाकडी सामान, घड्याळे इ. पुष्कळ इंग्रज इकडे खपवितात, ही सर्व आपले लोकांनी करावयास शिकावे व येथे जो माल खपणार नाही तो दुसऱ्या देशात नेऊन खपवावा. इंग्रजांचे देशचे सामान बंद करावे, किंबहुना आपले सामान त्यांस द्यावे, परंतु त्यांचे आपण घेऊ नये. यास्तव आपणांस जाडी, मोठी धोतरे नेसावयास लागली तर काय चिंता आहे? परंतु आपले देशाचे रक्षण करावे. असे झाले म्हणजे बहुत रोजगार होतील' (पत्र क्र. ६०). स्वदेशी व बहिष्कार या चळवळी १९०५ नंतर सुरू झाल्या. त्या आधी पन्नास वर्षे लोकहितवादींनी तसा उपदेश लोकांना केला होता.<br><br>'''व्यापार बुडाला'''<br>{{gap}}'हिंदू लोकांचा व्यापार' या पत्रात हाच विषय त्यांनी जास्त स्पष्टपणे मांडला आहे. 'सांप्रत हिंदू लोक भिकारी होत चालले आहेत. याचे कारण मला असे दिसते की या लोकांचा व्यापार अगदी बुडाला. इंग्रज व दुसरे देशचे लोक फार शहाणे होऊन या लोकांस सर्व जिनसा पुरवितात. आणि हे मुकाट्याने स्वस्ताईमुळे खरेदी करतात. म्हणून आपल्या लोकांनी कट करावा की दुसऱ्या मुलखाचा जिन्नस घ्यावयाचा नाही. आपल्या देशात पिकेल तेवढाच माल घ्यावा. आपले लोक कापडे जाडी काढतात. परंतु तीच नेसावी. इकडे छत्र्या करतात त्याच घ्याव्या. अजून दाणे (धान्य) परदेशातून येऊ लागले नाहीत. बाकी सर्व कपडे, छत्री, घड्याळ, गाडी, बुके, सर्व<noinclude></noinclude>
t08w5qqc5wluu4k7rwhgfwz0ruawdoa
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७२१
104
73833
232154
165298
2026-06-12T03:28:54Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
232154
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|६९५|| आर्थिक साम्राज्यशाही}}</noinclude>परदेशातील आहे. यामुळे व्यापार बुडाला. उमदी, मजूर, कसबी, कारागीर, घरी बसले. यास्तव सर्वांनी असा कट करावा की जे आपल्या देशात पिकेल तेच नेसू, तेच वापरू. कापूस विकणारांनी असा बेत करावा की इंग्रजांना कापूस देऊ नये, इकडे तयार केलेली कापडे द्यावी. असे झाले म्हणजे लोक सुखी होतील. सध्या परदेशच्या भुलावणीने हाहाकार झाला आहे. तेव्हा पुराणिक, हरदास यांनी लोकांस या गोष्टी समजावून सांगाव्या. पण त्या टाकून दुसऱ्या गोष्टी सांगतात ' (पत्र क्र. ५७).<br><br>'''परदेशी जावे'''<br>{{gap}}अर्थकारणातील आणखी एक दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी लोकहितवादींनी सांगितल्या आहेत. 'येथल्या लोकांना पैशाचा उपयोग माहीत नाही. ते पैसा दागिन्यांत घालतात किंवा ब्राह्मणभोजने करतात. त्याऐवजी त्यांनी व्यापारात पैसा घालावा. पण लोक मूर्ख आहेत. त्यांस हे कळत नाही की द्रव्य ही चालती वस्तू, जितकी अधिक फिरेल तितकी चांगली.' 'आपल्या लोकांनी परदेशात जाऊन राहावे व तेथे व्यापार करावा. परदेशी न जाण्याचे शास्त्र मोडावे. युगपरत्वे शास्त्र फिरविले पाहिजे. असे केल्याने लोक बलवान होतील.' नव्या अर्थशास्त्राची सर्व तत्त्वे यात सूत्ररूपाने आली आहेत.<br><br>'''दादाभाई'''<br>{{gap}}पण या क्षेत्रात खरे मोठे कार्य केले ते पितामह दादाभाई यांनी. १८७१ साली फिनान्स कमिटी पुढे इंग्लंडात त्यांनी साक्ष दिली. तीत, इंग्रजांनी अनेक मार्गांनी हिंदुस्थानचा रक्तशोष कसा चालविला आहे, ते अगदी निर्भयपणे स्पष्ट करून सांगितले. येथले युरोपीय अधिकारी येथे पैसा साठवून विलायतेस पाठवितात. इंग्लंडात नेमलेल्या लोकांना पगार आणि पेन्शन मिळतात ती हिंदुस्थानच्याच पैशातून. येथल्या संपत्तीला गळती लागली तिचा हा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार म्हणजे हाच पैसा भांडवलरूपाने भारतात आणून येथल्या व्यापाराचा व उद्योगाचा त्यांनी मक्ताच मिळविला आहे. या मार्गाने येथल्या द्रव्याचे ते किती हरण करतात त्याला गणतीच नाही. दादाभाईच्या मते सर्व अधिकारांच्या जागांवर हिंदी माणसाची नेमणूक केली पाहिजे. परकी माणसाला दिलेली प्रत्येक पै राष्ट्रीय दृष्ट्या तोटा आहे. इंग्रज लोक आपल्याला भांडवल पुरवितात, म्हणून आपण त्यांचे ऋणी असले पाहिजे, असे न्या. मू. रानडे यांचे मत होते. पण दादाभाई म्हणत, हे भांडवल त्यांनी हिंदुस्थानातूनच मिळविलेले असते. तेव्हा त्यात उपकार वगैरे काही नाही. तेव्हा हा पैशाचा ओघ प्रथम थांबला पाहिजे. हे रक्तशोषण एकदा थांबले की हिंदुस्थान आपली नैसर्गिक संपत्ती, आपले श्रम, आपले भांडवल यांच्या साह्याने इंग्लंडप्रमाणेच श्रीमंत होईल.<br><noinclude></noinclude>
6tl97sdpqmr5dvd5dakp98if35u6mhf
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२३
104
85887
232104
182081
2026-06-11T15:06:41Z
JayashreeVI
4058
232104
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|११८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>सन १६७२ पासून म्हणजे शिवाजीमहाराजांच्या आयुष्याच्या शेवटल्या आठ वर्षांत त्यांनी रामदासांची राजकीय कामांतही सल्लामसलत घेतली असेल, राज्यारोहाणाच्या बाबतीत तर अशी सल्लामसलत घेतली होती याला स्पष्ट दाखलाच आहे; तेव्हां ऐतिहासिक दृष्ट्या शिवाजीमहाराजांचा व समर्थ रामदासांचा प्रत्यक्ष संबंध दोघांच्या उतार वयांत घडून आला हें उघड आहे. प्रत्यक्ष भेटीपूर्वी या दोघांनाही एकमेकांची ऐकून माहिती सन १६५८ पासून झाली होती हेंही तितकेंच उघड आहे. कारण १६५८ पासून शिवाजीनें चाफळच्या मठास दरसाल दोनशें होनांची
भिक्षा दिली होती व ही गोष्ट समर्थांना त्यांच्या शिष्याकडून कळली असलीच पाहिजे. एव्हांपासून रामदासांच्या आध्यात्मिक कल्पनांना राजकीय कल्पनांची जोड झाली असावी व त्याची छटा त्यांच्या कवनांत दिसूं येऊं लागली असावी हें पूर्वी दाखविले आहे.
<br>{{gap}}याप्रमाणे या वादाचा निकाल लागतो. व त्यांत असमाधान वाटण्यासारखें कांहीं नाहीं. पण रामदास शिवाजीपेक्षां मोठे होते; रामदासांवांचून शिवाजीच्या हातून जें राष्ट्रीय कार्य झालें तें झालें नसतें अशी मनाची
दृढ समजूत ज्यांनी करून घेतली आहे त्यांना हा निकाल पसंत पडत नाहीं. हल्लींच्या निकालावरून शिवाजीनें किंवा निदान शिवाजीच्या यशस्वी कार्याने रामदासांना राजकीय व व्यावहारिक कल्पना सुचल्या निदान त्यांचा कंठरवानें उपदेश करण्याची स्फूर्ति झाली व ह्मणून शिवाजी रामदासांपेक्षा मोठे असे विधान कोणी केलें तर तें अगदींच चुकीचे ठरणार नाहीं.
<br>{{gap}}पण निरनिराळ्या व्यवसायांत आयुष्य घालविलेल्या विख्यात विभूतीबद्दल एकापेक्षां दुसरा मोठा अशी तारतम्याची तुलना करणेंच चुकीचे आहे. त्या दोन्हीही विभूति आपआपल्या परी मोठ्याच होत असे म्हणणेंच
रास्त आहे.
<br>{{gap}}रामदास शिवाजीपेक्षा मोठे किंवा शिवाजी रामदासांपेक्षां मोठे हा वाद गंगा यमुनेपेक्षा जास्त पवित्र किंवा यमुना गंगेपेक्षा जास्त पवित्र या उत्तर हिंदुस्थानांतील या नद्यांच्या महत्त्वासंबंधींच्या वादासारखा आहे. (दूरदूरच्या प्रांतांत गंगेस महत्त्व दिले गेलें आहे म्हणजे या पक्षापैकी एकाचा--<noinclude></noinclude>
nv6yiu74r54oi5c7ptotbg58ojnhlkr
232105
232104
2026-06-11T15:07:23Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
232105
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|११८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>सन १६७२ पासून म्हणजे शिवाजीमहाराजांच्या आयुष्याच्या शेवटल्या आठ वर्षांत त्यांनी रामदासांची राजकीय कामांतही सल्लामसलत घेतली असेल, राज्यारोहाणाच्या बाबतीत तर अशी सल्लामसलत घेतली होती याला स्पष्ट दाखलाच आहे; तेव्हां ऐतिहासिक दृष्ट्या शिवाजीमहाराजांचा व समर्थ रामदासांचा प्रत्यक्ष संबंध दोघांच्या उतार वयांत घडून आला हें उघड आहे. प्रत्यक्ष भेटीपूर्वी या दोघांनाही एकमेकांची ऐकून माहिती सन १६५८ पासून झाली होती हेंही तितकेंच उघड आहे. कारण १६५८ पासून शिवाजीनें चाफळच्या मठास दरसाल दोनशें होनांची
भिक्षा दिली होती व ही गोष्ट समर्थांना त्यांच्या शिष्याकडून कळली असलीच पाहिजे. एव्हांपासून रामदासांच्या आध्यात्मिक कल्पनांना राजकीय कल्पनांची जोड झाली असावी व त्याची छटा त्यांच्या कवनांत दिसूं येऊं लागली असावी हें पूर्वी दाखविले आहे.
<br>{{gap}}याप्रमाणे या वादाचा निकाल लागतो. व त्यांत असमाधान वाटण्यासारखें कांहीं नाहीं. पण रामदास शिवाजीपेक्षां मोठे होते; रामदासांवांचून शिवाजीच्या हातून जें राष्ट्रीय कार्य झालें तें झालें नसतें अशी मनाची
दृढ समजूत ज्यांनी करून घेतली आहे त्यांना हा निकाल पसंत पडत नाहीं. हल्लींच्या निकालावरून शिवाजीनें किंवा निदान शिवाजीच्या यशस्वी कार्याने रामदासांना राजकीय व व्यावहारिक कल्पना सुचल्या निदान त्यांचा कंठरवानें उपदेश करण्याची स्फूर्ति झाली व ह्मणून शिवाजी रामदासांपेक्षा मोठे असे विधान कोणी केलें तर तें अगदींच चुकीचे ठरणार नाहीं.
<br>{{gap}}पण निरनिराळ्या व्यवसायांत आयुष्य घालविलेल्या विख्यात विभूतीबद्दल एकापेक्षां दुसरा मोठा अशी तारतम्याची तुलना करणेंच चुकीचे आहे. त्या दोन्हीही विभूति आपआपल्या परी मोठ्याच होत असे म्हणणेंच
रास्त आहे.
<br>{{gap}}रामदास शिवाजीपेक्षा मोठे किंवा शिवाजी रामदासांपेक्षां मोठे हा वाद गंगा यमुनेपेक्षा जास्त पवित्र किंवा यमुना गंगेपेक्षा जास्त पवित्र या उत्तर हिंदुस्थानांतील या नद्यांच्या महत्त्वासंबंधींच्या वादासारखा आहे. (दूरदूरच्या प्रांतांत गंगेस महत्त्व दिले गेलें आहे म्हणजे या पक्षापैकी एकाचा--<noinclude></noinclude>
hgjju6c32ijapv2c5d4hls20x30ddmv
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२४
104
85888
232106
182082
2026-06-11T15:15:21Z
JayashreeVI
4058
232106
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|११९}}
{{rule}}</noinclude>अंगीकार करण्यांत आला आहे.) पण हिंदुस्थानाच्या नकाशाकडे पाहणारास हा वाद चुकीचा वाटतो. या दोन्हीही नद्या एकाच हिमालयाला भेदून हिंदुस्थानच्या सपाट प्रदेशावर वाहात येतात; त्या दोन्ही नद्या आपआपल्या बाजूच्या हजारों मैलांच्या प्रदेशास आपल्या प्रवाहानें आपल्या पुरानें व पुरा बरोबर उत्तम वनस्पतींच्या खताच्या गाळानें सुपीकता आणतात व बऱ्याच प्रदेशापर्यंत जवळ जवळ समांतर वाहात जाऊन मग प्रयागास एकमेकींशीं संगत होऊन एकजीव बनून एकरूपानें आपला पुढला मार्ग आक्रमण करतात. त्याप्रमाणे शिवाजी व रामदास या दोन विभूति एकाच उदयोन्मुख महाराष्ट्रांत समकाळी जन्म घेतात व आपआपल्या परीनें एक प्रत्यक्ष राज्यस्थापनेच्या उद्योगास सुरवात करून व तो यशस्वी करून, दुसरी आध्यात्मिक व व्यावहारिक उपदेशानें जनमनाची सुधारणा करून-राष्ट्रकार्य बऱ्याच काळपर्यंत एकमेकांस न कळतां व स्वतंत्रपणे करीत राहतात व आयुष्याच्या शेवटल्या भागांत गुरुशिष्य या नात्याने त्यांचा संगम होतो. तेव्हां अशा दोन विभूतींसंबंधीं तारतम्यानें मोठेपणाचा वाद करणें हें संकुचित बुद्धीचें लक्षण आहे. तरी असल्या शुष्क वादांत न पडतां महाराष्ट्रांत समकालीन उदयास आलेल्या या दोन विख्यात विभूतींच्या चरित्रापासून हल्लींच्या परिस्थितीला अनुरूप अशा तऱ्हेची देशसेवा करण्याची स्फूर्ति महाराष्ट्रीयांस होवो अशी आशा प्रदर्शित करून वाचकांची रजा घेतों.
{{center|{{larger|{{larger|'''समाप्त.'''}}}}}}<noinclude></noinclude>
ixnvhi2h45r9cwvdez8ecn492v5mh9q
232107
232106
2026-06-11T15:15:53Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
232107
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|११९}}
{{rule}}</noinclude>अंगीकार करण्यांत आला आहे.) पण हिंदुस्थानाच्या नकाशाकडे पाहणारास हा वाद चुकीचा वाटतो. या दोन्हीही नद्या एकाच हिमालयाला भेदून हिंदुस्थानच्या सपाट प्रदेशावर वाहात येतात; त्या दोन्ही नद्या आपआपल्या बाजूच्या हजारों मैलांच्या प्रदेशास आपल्या प्रवाहानें आपल्या पुरानें व पुरा बरोबर उत्तम वनस्पतींच्या खताच्या गाळानें सुपीकता आणतात व बऱ्याच प्रदेशापर्यंत जवळ जवळ समांतर वाहात जाऊन मग प्रयागास एकमेकींशीं संगत होऊन एकजीव बनून एकरूपानें आपला पुढला मार्ग आक्रमण करतात. त्याप्रमाणे शिवाजी व रामदास या दोन विभूति एकाच उदयोन्मुख महाराष्ट्रांत समकाळी जन्म घेतात व आपआपल्या परीनें एक प्रत्यक्ष राज्यस्थापनेच्या उद्योगास सुरवात करून व तो यशस्वी करून, दुसरी आध्यात्मिक व व्यावहारिक उपदेशानें जनमनाची सुधारणा करून-राष्ट्रकार्य बऱ्याच काळपर्यंत एकमेकांस न कळतां व स्वतंत्रपणे करीत राहतात व आयुष्याच्या शेवटल्या भागांत गुरुशिष्य या नात्याने त्यांचा संगम होतो. तेव्हां अशा दोन विभूतींसंबंधीं तारतम्यानें मोठेपणाचा वाद करणें हें संकुचित बुद्धीचें लक्षण आहे. तरी असल्या शुष्क वादांत न पडतां महाराष्ट्रांत समकालीन उदयास आलेल्या या दोन विख्यात विभूतींच्या चरित्रापासून हल्लींच्या परिस्थितीला अनुरूप अशा तऱ्हेची देशसेवा करण्याची स्फूर्ति महाराष्ट्रीयांस होवो अशी आशा प्रदर्शित करून वाचकांची रजा घेतों.
{{center|{{larger|{{larger|'''समाप्त.'''}}}}}}<noinclude></noinclude>
igxgne9i080wm93vjnz59q3giwkdnk8
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२५
104
85889
232171
182083
2026-06-12T06:30:58Z
JayashreeVI
4058
232171
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{center|{{larger|{{larger|'''परिशिष्ट.'''}}}}}}
{{center|---*---}}
{{right|लेख नं. १}}
{{center|श्रीरामवरद.}}
{{center|समर्थस्वामी.}}
{{gap}}श्रीगुरुभक्तपरायेण मोक्षश्रीयांवीराजीत विराजमान दिवाकर गोसाविं यां प्रतिकल्याणनाम्ने कृतानेक नमस्कार. विनंति उपेरि तुम्ही पत्र पाठविलें तें पावोन लेखनार्थ अवगत जाहालें सर्व प्रकारें विस्तारें ल्याहावें तरि श्री याचीं
अज्ञाप्रमाणें वर्तावें हें उचित तेहि सुज्ञ असेत वडीलपणाची नीति जे परंपरागत उपासना स्थापना जे केलि आहे तें भजन चालावें. तेथें कलहास कारण नाहि आपण श्रीच्या अज्ञेप्रमाणे देवाचा कार्यभाग चालुं देणें श्रीशिवथरचे घळीस आस्तां तुम्हांवर संतोष होउन नलनाम सवत्सरिं अज्ञा सर्वत्रांस केलि जे हा महाबळेश्वरकर आहे बुद्धिहि महाबळ आहे राजद्वारि कित्येक प्रसंगी पाठवायास योग्य आसे प्रस्थान पारपत्या योग्य याच्या हस्तें श्रीचे संस्थान जोपर्यंत तो कार्य कर्तव्य वंशपरंपरेनें घ्यावें ऐसे बोलोन तुम्हांस श्रीनि तांबुल दिधला ते समयि तो उद्धव गोसावि व विठ्ठल गोसावि व आह्मी आणीक कित्येक समुदायि होते. अज्ञा स्मरोन अभिमान अक्रोध होऊन भजनास प्रवर्तल्यानें श्री दया करितिल तुम्ही धैर्य न टाकणे यांच्या कलहामुळे श्रीच्या धर्मस्थापनेसि अंतर पडे ऐसें न करणें त्यांचा संतोषरूप आशिर्वाद आसे. सर्वहि यश देतिल राजेश्री उद्धव गोसावी यांसहि पत्र लिहिलें आसे त्या वरून विदित होईल. आम्हींहि लवकरच येतों बहुत काय लिहिणे धैर्य श्रीभजनाचें न टाकणें हे विनंति.
{{center|__________}}<noinclude></noinclude>
61celvai4ldp0lrbrwvn334gtnf0pu6
232172
232171
2026-06-12T06:31:42Z
JayashreeVI
4058
232172
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{center|{{larger|{{larger|'''परिशिष्ट.'''}}}}}}
{{center|---*---}}
{{right|लेख नं. १}}
{{center|श्रीरामवरद.}}
{{center|समर्थस्वामी.}}
{{gap}}श्रीगुरुभक्तपरायेण मोक्षश्रीयांवीराजीत विराजमान दिवाकर गोसाविं यां प्रतिकल्याणनाम्ने कृतानेक नमस्कार. विनंति उपेरि तुम्ही पत्र पाठविलें तें पावोन लेखनार्थ अवगत जाहालें सर्व प्रकारें विस्तारें ल्याहावें तरि श्री याचीं
अज्ञाप्रमाणें वर्तावें हें उचित तेहि सुज्ञ असेत वडीलपणाची नीति जे परंपरागत उपासना स्थापना जे केलि आहे तें भजन चालावें. तेथें कलहास कारण नाहि आपण श्रीच्या अज्ञेप्रमाणे देवाचा कार्यभाग चालुं देणें श्रीशिवथरचे घळीस आस्तां तुम्हांवर संतोष होउन नलनाम सवत्सरिं अज्ञा सर्वत्रांस केलि जे हा महाबळेश्वरकर आहे बुद्धिहि महाबळ आहे राजद्वारि कित्येक प्रसंगी पाठवायास योग्य आसे प्रस्थान पारपत्या योग्य याच्या हस्तें श्रीचे संस्थान जोपर्यंत तो कार्य कर्तव्य वंशपरंपरेनें घ्यावें ऐसे बोलोन तुम्हांस श्रीनि तांबुल दिधला ते समयि तो उद्धव गोसावि व विठ्ठल गोसावि व आह्मी आणीक कित्येक समुदायि होते. अज्ञा स्मरोन अभिमान अक्रोध होऊन भजनास प्रवर्तल्यानें श्री दया करितिल तुम्ही धैर्य न टाकणे यांच्या कलहामुळे श्रीच्या धर्मस्थापनेसि अंतर पडे ऐसें न करणें त्यांचा संतोषरूप आशिर्वाद आसे. सर्वहि यश देतिल राजेश्री उद्धव गोसावी यांसहि पत्र लिहिलें आसे त्या वरून विदित होईल. आम्हींहि लवकरच येतों बहुत काय लिहिणे धैर्य श्रीभजनाचें न टाकणें हे विनंति.
{{center|__________}}<noinclude></noinclude>
t2oupucrnesdoapkl4ll8hk85sse3zw
232173
232172
2026-06-12T06:32:19Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
232173
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|{{larger|'''परिशिष्ट.'''}}}}}}
{{center|---*---}}
{{right|लेख नं. १}}
{{center|श्रीरामवरद.}}
{{center|समर्थस्वामी.}}
{{gap}}श्रीगुरुभक्तपरायेण मोक्षश्रीयांवीराजीत विराजमान दिवाकर गोसाविं यां प्रतिकल्याणनाम्ने कृतानेक नमस्कार. विनंति उपेरि तुम्ही पत्र पाठविलें तें पावोन लेखनार्थ अवगत जाहालें सर्व प्रकारें विस्तारें ल्याहावें तरि श्री याचीं
अज्ञाप्रमाणें वर्तावें हें उचित तेहि सुज्ञ असेत वडीलपणाची नीति जे परंपरागत उपासना स्थापना जे केलि आहे तें भजन चालावें. तेथें कलहास कारण नाहि आपण श्रीच्या अज्ञेप्रमाणे देवाचा कार्यभाग चालुं देणें श्रीशिवथरचे घळीस आस्तां तुम्हांवर संतोष होउन नलनाम सवत्सरिं अज्ञा सर्वत्रांस केलि जे हा महाबळेश्वरकर आहे बुद्धिहि महाबळ आहे राजद्वारि कित्येक प्रसंगी पाठवायास योग्य आसे प्रस्थान पारपत्या योग्य याच्या हस्तें श्रीचे संस्थान जोपर्यंत तो कार्य कर्तव्य वंशपरंपरेनें घ्यावें ऐसे बोलोन तुम्हांस श्रीनि तांबुल दिधला ते समयि तो उद्धव गोसावि व विठ्ठल गोसावि व आह्मी आणीक कित्येक समुदायि होते. अज्ञा स्मरोन अभिमान अक्रोध होऊन भजनास प्रवर्तल्यानें श्री दया करितिल तुम्ही धैर्य न टाकणे यांच्या कलहामुळे श्रीच्या धर्मस्थापनेसि अंतर पडे ऐसें न करणें त्यांचा संतोषरूप आशिर्वाद आसे. सर्वहि यश देतिल राजेश्री उद्धव गोसावी यांसहि पत्र लिहिलें आसे त्या वरून विदित होईल. आम्हींहि लवकरच येतों बहुत काय लिहिणे धैर्य श्रीभजनाचें न टाकणें हे विनंति.
{{center|__________}}<noinclude></noinclude>
o0m0kt1oysyy6t6hbzh46pmmnzy5kbi
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२७
104
85891
232174
182085
2026-06-12T07:24:52Z
JayashreeVI
4058
232174
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१२२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>पासून तगाईत सालगुदस्ता पावत आले आहे. हालीही पेशजी मोईनप्रमाणें सालमजकुरी इ|| (इस्तकबिल) अवल सालापासून देविलें असे साल दरसाल देत जाणे प्रतिवर्षी ताजे सनदेचा उजूर करीत नव जाणे.
तालीक लेहोन घेऊन असल पत्र वेदमूर्ती राजश्री दिवाकर गोसावी यापासी फिराऊन देणे व देवांच्या सेवकास मुशाहिरा देणे तो निवल देत जाणे.
{{Block center|<poem>रवाना छ २४ मास मार्गशीर्ष वद्य ११ लेखनालंकार
तेरीख ४ माहे सौवाल
सौवाल सन इहिदे सुरुसुदवार मर्यादेयं
समानीन बारसुद छ २९ जिल्काद </poem>}} विजयते
{{gap|{{gap|लेखन सीमा}}
{{gap|{{gap|समुल्लसति}}
{{right|रुजू सुरु नीवीस.}}
{{center|_________}}
{{right|लेख नं. ३}}
{{center|श्रीरघुनाथ}}
{{gap}}मश हुरल हजरत राजमान्य राजश्री दत्ताजीपंत वाकेनिवीस प्रति राजश्री शिवाजी राजे दंडवत उपरि कसबे चाफल येथे रामदास गोसावी आहेत श्रीचे देवालय केले आहे यात्रा भरते व सर्वदा हि मोहछाये चालता तार तथ कटकींचे सिपाही लोक व बाजे लोक राहताती ते देवाची मर्यादा चालवीत नाहींत यात्रस लोक येताती त्यास तसवीस देताती यात्र करू लोकासी दिवाण बले कलागती करीतात म्हणोनु कलो आले तरि तुम्ही लाकास ताकीद करून तेथे यात्रेमधे हो अगर हमेशा हि कोण्हाचा उपद्रव होउ न दणे व यात्रेस लाक यताति त्यास चोराचिरटियाहि उपद्रव
होऊं न दणे सालाबाद यात्रा राखतात तैसे याचे (त्रे)चे दिवसांत ता मजकूरचे कारकून व लाक जाउनु संगीनातीने यात्रा राखेती व सुखरूप--<noinclude></noinclude>
oofp34qdfwxwrnxi7gnq4lynlawn7jk
232175
232174
2026-06-12T07:26:51Z
JayashreeVI
4058
232175
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१२२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>पासून तगाईत सालगुदस्ता पावत आले आहे. हालीही पेशजी मोईनप्रमाणें सालमजकुरी इ|| (इस्तकबिल) अवल सालापासून देविलें असे साल दरसाल देत जाणे प्रतिवर्षी ताजे सनदेचा उजूर करीत नव जाणे.
तालीक लेहोन घेऊन असल पत्र वेदमूर्ती राजश्री दिवाकर गोसावी यापासी फिराऊन देणे व देवांच्या सेवकास मुशाहिरा देणे तो निवल देत जाणे.
{{gap}}रवाना छ २४ मास मार्गशीर्ष वद्य ११ लेखनालंकार
{{gap}}तेरीख ४ माहे सौवाल
{{gap}}सौवाल सन इहिदे सुरुसुदवार मर्यादेयं
{{gap}}समानीन बारसुद छ २९ जिल्काद विजयते
{{gap|{{gap|लेखन सीमा}}
{{gap|{{gap|समुल्लसति}}
{{right|रुजू सुरु नीवीस.}}
{{center|_________}}
{{right|लेख नं. ३}}
{{center|श्रीरघुनाथ}}
{{gap}}मश हुरल हजरत राजमान्य राजश्री दत्ताजीपंत वाकेनिवीस प्रति राजश्री शिवाजी राजे दंडवत उपरि कसबे चाफल येथे रामदास गोसावी आहेत श्रीचे देवालय केले आहे यात्रा भरते व सर्वदा हि मोहछाये चालता तार तथ कटकींचे सिपाही लोक व बाजे लोक राहताती ते देवाची मर्यादा चालवीत नाहींत यात्रस लोक येताती त्यास तसवीस देताती यात्र करू लोकासी दिवाण बले कलागती करीतात म्हणोनु कलो आले तरि तुम्ही लाकास ताकीद करून तेथे यात्रेमधे हो अगर हमेशा हि कोण्हाचा उपद्रव होउ न दणे व यात्रेस लाक यताति त्यास चोराचिरटियाहि उपद्रव
होऊं न दणे सालाबाद यात्रा राखतात तैसे याचे (त्रे)चे दिवसांत ता मजकूरचे कारकून व लाक जाउनु संगीनातीने यात्रा राखेती व सुखरूप--<noinclude></noinclude>
sxeo5mffujb2tmiu0q66u1whwezpwgf
232176
232175
2026-06-12T07:29:13Z
JayashreeVI
4058
232176
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१२२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>पासून तगाईत सालगुदस्ता पावत आले आहे. हालीही पेशजी मोईनप्रमाणें सालमजकुरी इ|| (इस्तकबिल) अवल सालापासून देविलें असे साल दरसाल देत जाणे प्रतिवर्षी ताजे सनदेचा उजूर करीत नव जाणे.
तालीक लेहोन घेऊन असल पत्र वेदमूर्ती राजश्री दिवाकर गोसावी यापासी फिराऊन देणे व देवांच्या सेवकास मुशाहिरा देणे तो निवल देत जाणे.<br>
{{gap}}रवाना छ २४ मास मार्गशीर्ष वद्य ११ लेखनालंकार<br>
{{gap}}तेरीख ४ माहे सौवाल<br>
{{gap}}सौवाल सन इहिदे सुरुसुदवार<br> मर्यादेयं<br>
{{gap}}समानीन बारसुद छ २९ जिल्काद विजयते<br>
{{gap|{{gap|लेखन सीमा}}<br>
{{gap|{{gap|समुल्लसति}}<br>
{{right|रुजू सुरु नीवीस.}}
{{center|_________}}
{{right|लेख नं. ३}}<br>
{{center|श्रीरघुनाथ}}
{{gap}}मश हुरल हजरत राजमान्य राजश्री दत्ताजीपंत वाकेनिवीस प्रति राजश्री शिवाजी राजे दंडवत उपरि कसबे चाफल येथे रामदास गोसावी आहेत श्रीचे देवालय केले आहे यात्रा भरते व सर्वदा हि मोहछाये चालता तार तथ कटकींचे सिपाही लोक व बाजे लोक राहताती ते देवाची मर्यादा चालवीत नाहींत यात्रस लोक येताती त्यास तसवीस देताती यात्र करू लोकासी दिवाण बले कलागती करीतात म्हणोनु कलो आले तरि तुम्ही लाकास ताकीद करून तेथे यात्रेमधे हो अगर हमेशा हि कोण्हाचा उपद्रव होउ न दणे व यात्रेस लाक यताति त्यास चोराचिरटियाहि उपद्रव
होऊं न दणे सालाबाद यात्रा राखतात तैसे याचे (त्रे)चे दिवसांत ता मजकूरचे कारकून व लाक जाउनु संगीनातीने यात्रा राखेती व सुखरूप--<noinclude></noinclude>
t9fcfgefx262kcychy7qv3tp3t7rfoq
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१३१
104
85896
232188
182090
2026-06-12T11:57:41Z
JayashreeVI
4058
232188
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१२६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{right|लेख नं. ६}}
{{center|श्रीरघुनाथो जयति}}
{{right|श्री रामदासस्वामी}}
<br>{{gap}}श्री रघुनाथ भक्तिपरायण उत्तम गुणालंकरण स्वधर्मैक निरत सात्विक
भाव भूषित समस्त श्रीसमुदाइ बंधुवर्ग यां प्रति
<br>{{gap}}प्रीतिपूर्वक दिवाकर गोसांविं कृतानेक नमस्कार विज्ञप्ति उपरि आमचे शरिर बहुता आसक्त जाहलें श्रीच्या दर्शनास यावें ऐसे होते व तुमचें समस्तांचे दर्शन होतें तुमचा व आमचा कित्येक प्रकारें पुढें श्रीचा कार्यभाग अल्पमात्र स्वबुधीनसार समर्थाच्या दयेकरून संपादिला होता व श्रीनी सर्व पारपत्य दया करून मज दीनास दिलेह तें आज पावेतों चालिलें व राजेश्री शिवाजी राजे भोसले याणी श्रीस पुजा समर्पिली तो काभार माझे स्वाधीन केला तोहि आज पावेतों चालिला पुढे काळगति प्रधान आहे परंतु समस्ताप्रति विनति कीं श्रीच्या इमारती चाफळी व गडीं लागल्या आहेत त्यांस ऐवज नाहीं स ऐसे ऐकिलें माझें शरीर तो परम अशक्त जाहलें कांहीं यत्न न चले तरि तेथे चिरंजीव भैरवभट आहे त्यास (विनं) ती केलि आहे जे जो श्रीचे उत्पन्न होईल तें निमे ऐवज चाफलीच्या इमारतीस नीमे गडिच्या इमारतीस देवविला आहे तो लाविल त्यास (तो) स्ताली दोघे व्यापारी बरे लिणार व दोघे आफराद त्याचें वेतन (व) ऐवज पैकीं पावेल उभयताची व भैरवभट व गोपाळ वृदोस्त दि * दूरील ते प्रत्यह श्री चा नैवेद्य व नित्य दिपास तेल आ छ ** च शक्तीनें बाहेरून मेळउन आणिली व रुद्राभिषेक करून मंत्रयुक्त पुजा करिलिल तरि श्री चे आहे ते दोन वर्षे इमारतीस ऐवज दिल्हा आहे तो दो स्तळीं लावितील त्यास जो समर्थानि नेमुन व्रति दिली आ (से) ते खेरीज करून देवाचा रूका शिवस्व व समुदाइ यास हि शिवस्व व ते च्छळी पूर्वी समुदाय होता त्यास हि शिवश्व ऐसे आहे तरि चिरंजीव आमचे सर्व पारपत्य करितिल ते
ऐवज आणून इमारतीस लावितील त्यांशी द्रव्यलोभे करून अथवा सर्व पारपत्यबळेच करूं ह्मणतील न्याय सोडुन अन्याई प्रवर्ततिल व आमचे निशाण--<noinclude></noinclude>
7krtnxurcijlv58ajafvp7xn61o0c2z
232190
232188
2026-06-12T11:58:32Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
232190
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|१२६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{right|लेख नं. ६}}
{{center|श्रीरघुनाथो जयति}}
{{right|श्री रामदासस्वामी}}
<br>{{gap}}श्री रघुनाथ भक्तिपरायण उत्तम गुणालंकरण स्वधर्मैक निरत सात्विक
भाव भूषित समस्त श्रीसमुदाइ बंधुवर्ग यां प्रति
<br>{{gap}}प्रीतिपूर्वक दिवाकर गोसांविं कृतानेक नमस्कार विज्ञप्ति उपरि आमचे शरिर बहुता आसक्त जाहलें श्रीच्या दर्शनास यावें ऐसे होते व तुमचें समस्तांचे दर्शन होतें तुमचा व आमचा कित्येक प्रकारें पुढें श्रीचा कार्यभाग अल्पमात्र स्वबुधीनसार समर्थाच्या दयेकरून संपादिला होता व श्रीनी सर्व पारपत्य दया करून मज दीनास दिलेह तें आज पावेतों चालिलें व राजेश्री शिवाजी राजे भोसले याणी श्रीस पुजा समर्पिली तो काभार माझे स्वाधीन केला तोहि आज पावेतों चालिला पुढे काळगति प्रधान आहे परंतु समस्ताप्रति विनति कीं श्रीच्या इमारती चाफळी व गडीं लागल्या आहेत त्यांस ऐवज नाहीं स ऐसे ऐकिलें माझें शरीर तो परम अशक्त जाहलें कांहीं यत्न न चले तरि तेथे चिरंजीव भैरवभट आहे त्यास (विनं) ती केलि आहे जे जो श्रीचे उत्पन्न होईल तें निमे ऐवज चाफलीच्या इमारतीस नीमे गडिच्या इमारतीस देवविला आहे तो लाविल त्यास (तो) स्ताली दोघे व्यापारी बरे लिणार व दोघे आफराद त्याचें वेतन (व) ऐवज पैकीं पावेल उभयताची व भैरवभट व गोपाळ वृदोस्त दि * दूरील ते प्रत्यह श्री चा नैवेद्य व नित्य दिपास तेल आ छ ** च शक्तीनें बाहेरून मेळउन आणिली व रुद्राभिषेक करून मंत्रयुक्त पुजा करिलिल तरि श्री चे आहे ते दोन वर्षे इमारतीस ऐवज दिल्हा आहे तो दो स्तळीं लावितील त्यास जो समर्थानि नेमुन व्रति दिली आ (से) ते खेरीज करून देवाचा रूका शिवस्व व समुदाइ यास हि शिवस्व व ते च्छळी पूर्वी समुदाय होता त्यास हि शिवश्व ऐसे आहे तरि चिरंजीव आमचे सर्व पारपत्य करितिल ते
ऐवज आणून इमारतीस लावितील त्यांशी द्रव्यलोभे करून अथवा सर्व पारपत्यबळेच करूं ह्मणतील न्याय सोडुन अन्याई प्रवर्ततिल व आमचे निशाण--<noinclude></noinclude>
h8n9cdf1i6sjan66g7l8q366m3wy40x
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१३२
104
85897
232185
182091
2026-06-12T11:35:32Z
JayashreeVI
4058
232185
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१२७}}
{{rule}}</noinclude>व शेवक लोक ठेवणें व काढणें व गा (वा) ची देखरेख व खर्च व दास्तान कोण्ही करूं ह्मणतील त्यास करून दिल्हे पाहिजे पूर्वापार चालत आले आहे सर्वास विदितचि आहे राजग्रह संमधी जे येइल व व श्री समुदाइ जे आणितिल त्याचा खर्च चिरंजीव च करितिल दो स्छि (दो स्थलि) चा इमारतीस दोनी वर्षे सर्व ऐवज निमेनिम नेमुन दिल्हा आहे ते लावितिल आमचा परत्यात (पारपत्यांत ) कोण्हा संमध नाही आतां आधिक नवें देऊन दिल्हे न पाहिजे आमचा ये समईचा संकल्प सर्वानि सिधीस पाविला पाहिजे दोनी वर्षे जालिया वरि जो ऐवज येल (येईल) त्याणे नित्य नैमित्य व महोछव होतिल तो वरि देवाचा एैवज स्ताळचा, निव बाहेर जे श्रीचे लोक आहेत त्ये यांत लोक घरिल उदरासाठी त्यांस तुही समस्तानि निष्ठुरतेनें सांगावे व वंशपरंपरेने आमचे सर्व पा***(रिपत्य) आहे तें चालविले पालि (हि) जे आमचे शरीर अशक्त जाहले ह्मणउन लेखन करविले 'देशकाळ वर्तमान कलत नाहीं रुणानुबंध प्रमाण समस्त हरिभक्ताप्रति दिवाकराचा नमस्कार पूर्वी सहवास बरे अथवा
वाइट बोलिलो आसेन कारभार मुळें बोलावे लागतें शरीरें वेगळाली प्रकृति भिन्न भिन्न आहेत आत्मा येकाचे आहे सुज्ञाप्रति विशेष काय ल्याहवें, धर्म मोडून अधर्म स्छापू नये ह ज्ञप्ति (विज्ञति)
<br>{{gap}}हेंच पत्रीं राजश्री भानजी गोसावीस नमस्कार चिमाआकाचा सांगावा तुम्हांस दत्ताजीपंतांनी मजकुर पूर्वी सांगितला तो ध्यानांत असेल सुचनार्थ लिहिले आहे, परिधावी संवत्सरी राजेश्रीनी पवला? त्या समई परमार्थ घेतला ते समई चे द्रवय (द्रव्य ) अश्वथ टपौरे मसुरकर यांचे जवळ आहे, त्यातले अर्ध द्रव्य देवाच्या इमारतीकडे घ्यावे व अरधेचे दीपमाला कराव्या ह्मणुन कैलासवासी समर्थाची अदना (आज्ञा ) अहे, रामचंद्रपंता अमात्य यास कळउ नये.
{{center|{{larger|'''संपूर्ण.'''}}}}<noinclude></noinclude>
gptuejbknd6qquhnlef9zec4xq5aeol
232186
232185
2026-06-12T11:35:59Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
232186
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१२७}}
{{rule}}</noinclude>व शेवक लोक ठेवणें व काढणें व गा (वा) ची देखरेख व खर्च व दास्तान कोण्ही करूं ह्मणतील त्यास करून दिल्हे पाहिजे पूर्वापार चालत आले आहे सर्वास विदितचि आहे राजग्रह संमधी जे येइल व व श्री समुदाइ जे आणितिल त्याचा खर्च चिरंजीव च करितिल दो स्छि (दो स्थलि) चा इमारतीस दोनी वर्षे सर्व ऐवज निमेनिम नेमुन दिल्हा आहे ते लावितिल आमचा परत्यात (पारपत्यांत ) कोण्हा संमध नाही आतां आधिक नवें देऊन दिल्हे न पाहिजे आमचा ये समईचा संकल्प सर्वानि सिधीस पाविला पाहिजे दोनी वर्षे जालिया वरि जो ऐवज येल (येईल) त्याणे नित्य नैमित्य व महोछव होतिल तो वरि देवाचा एैवज स्ताळचा, निव बाहेर जे श्रीचे लोक आहेत त्ये यांत लोक घरिल उदरासाठी त्यांस तुही समस्तानि निष्ठुरतेनें सांगावे व वंशपरंपरेने आमचे सर्व पा***(रिपत्य) आहे तें चालविले पालि (हि) जे आमचे शरीर अशक्त जाहले ह्मणउन लेखन करविले 'देशकाळ वर्तमान कलत नाहीं रुणानुबंध प्रमाण समस्त हरिभक्ताप्रति दिवाकराचा नमस्कार पूर्वी सहवास बरे अथवा
वाइट बोलिलो आसेन कारभार मुळें बोलावे लागतें शरीरें वेगळाली प्रकृति भिन्न भिन्न आहेत आत्मा येकाचे आहे सुज्ञाप्रति विशेष काय ल्याहवें, धर्म मोडून अधर्म स्छापू नये ह ज्ञप्ति (विज्ञति)
<br>{{gap}}हेंच पत्रीं राजश्री भानजी गोसावीस नमस्कार चिमाआकाचा सांगावा तुम्हांस दत्ताजीपंतांनी मजकुर पूर्वी सांगितला तो ध्यानांत असेल सुचनार्थ लिहिले आहे, परिधावी संवत्सरी राजेश्रीनी पवला? त्या समई परमार्थ घेतला ते समई चे द्रवय (द्रव्य ) अश्वथ टपौरे मसुरकर यांचे जवळ आहे, त्यातले अर्ध द्रव्य देवाच्या इमारतीकडे घ्यावे व अरधेचे दीपमाला कराव्या ह्मणुन कैलासवासी समर्थाची अदना (आज्ञा ) अहे, रामचंद्रपंता अमात्य यास कळउ नये.
{{center|{{larger|'''संपूर्ण.'''}}}}<noinclude></noinclude>
kf8o0sl5y0oib598i2a5p1dpvwdoig9
सदस्य चर्चा:Lily765458
3
110634
232046
2026-06-11T13:27:43Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
232046
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Lily765458}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १८:५७, ११ जून २०२६ (IST)
opjzfxts4600x51m4r2c98u32le4chf
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/३४८
104
110635
232102
2026-06-11T14:21:46Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
232102
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>शेतकऱ्याचा असूड
३०७
दोन वाजल्यावर घरी पोहचल्यावर जेवण झाल्यानंतर थोडासा आराम करण्याचे इराद्याने
माजघराचे खोलीत जाऊन तेथें वलणीवरील बुरणूस घेऊन त्यानें जमिनीवर अंथरला आणि
त्यावर उशाखालीं घोंगडीची वळकटी घेऊन तोंडवर अंगवस्त्र टाकून निजला. परंतु सकाळीं
उठून कलेक्टरसाहेबांची गांठ घेतली व ते आपल्या चहापाण्याच्या व खाण्यापिण्याच्या
नादांत गुंग असल्यामुळे, त्यांच्यानें माझी खरी हकिगत ऐकून घेऊन, त्याजपासून मला
हप्ता पुढे देण्याविषयीं मुदत मिळाली नाहीं. या काळजीनें त्यास झोंप येईना. तेव्हां त्यानें
उताणे पडून आपले दोन्ही हात उरावर ठेवून आपण आपल्याच मनाशीं बावचळल्यासारखें
बोलू लागला-
"इतर गांवकन्यांसारखा मी पैमाष करणान्या भटकामगारांची मूठ गार केली नाहीं
यास्तव त्यांनी टोपीवाल्यास सांगून मजवर शेतसारा दुपटीचे वर वाढविला व त्याच वर्षी
पाऊस अळमटळम पडल्यामुळे एकंदर सर्व माझ्या शेत व बागायती पिकास धक्का बसला,
इतक्यांत बाप वारला. व याच्या दिवसमासाला बराच खर्च झाला, यामुळे पहिले वर्षी
शेतसारा वारण्यापुरतें कर्ज ब्राह्मण सावकारापासून काढून त्यास मळा गहान देऊन रजिस्टर
करून दिला. पुढे त्यानें मन मानेल तसें, मुद्दल कर्जावरील व्याजाचे कच्च्यांचे बच्चे करून
माझा बारवेचा मळा आपल्या घशांत सोडला. त्या सावकाराच्या आईचा भाऊ
रेव्हेन्यूसाहेबांचा दफ्तरदार, चुलता कलेक्टरसाहेबांचा चिटणीस, थोरल्या बहिणीचा नवरा
मुनसफ आणि बायकोचा बाप या तालुक्याचा फौजदार, याशिवाय एकंदर सर्व सरकारी
कचेऱ्यांत त्यांचे जातवाले ब्राह्मणकामगार अशा सावकारांबरोबर वाद घातला असता, तर
त्यांच्या सर्व ब्राह्मण आप्तकामगारांनी हस्तेंपरहस्ते भलत्या एखाद्या क्षुल्लक कारणावरून
माझा सर्व उन्हाळा केला असता. त्याचप्रमाणे दुसरे वर्षी घरांतील बायकामुलांच्या
अंगावरील किडुकमिडुक शेतसाऱ्यांचे भरीस घालून नंतर पुढे दरवर्षी शेतसारा अदा
करण्याकरितां गांवातील गुजर-मारवाडी सावकारांपासून कर्जाऊ रकमा काढिल्या आहेत,
त्यांतून कित्येकांनी हल्ली मजवर फिर्यादी ठोकल्या आहेत व ते कज्जे कित्येक वर्षापासून
कोडतांत लोळत पडले आहेत. म्या कधीं कधीं कामगार व वकिलांचे पदरी आवळण्याकरितां
मोठमोठाल्या रकमा देऊन, कारकून, चपराशी, लेखक व साक्षीदार यांस भत्ते भरून
चिन्यामिन्या देतां देतां माझ्या नाकास नळ आले आहेत. त्यांतून लांच न खाणारे सरकारी
कामगार कोठें कोठें सांपडतात. परंतु लांच खाणाऱ्या कामगारांपेक्षा, न लांच खाणारे
कामगार फारच निकामी असतात. कारण ते बेपर्वा असल्यामुळे त्यांजवळ गरीब
शेतकऱ्यांची दादच लागत नाहीं व त्यांच्या पुढे पुढे करून जिवलग गड्याचा भाव
दाखविणारे हुषार मतलबी वकील, त्यांच्या नांवाने आम्हां दुबळ्या शेतकऱ्यांजवळून
कुत्र्यासारखे, लांचांचे मागें लाचांचे लचके तोडून खातात आणि तसे न करावें तर सावकार
सांगतील त्याप्रमाणे आपल्या बोडक्यांवर त्यांचे हुकुमनामे करून घ्यावेत. यावरून कोणी
सावकार आत मला आपल्या दांरापाशी उभे करीत नाहींत! तेव्हां गतवर्षी लग्न झालेल्या<noinclude></noinclude>
18lqi1myhhf6e0jmpdc87095a7ey0hr
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७
104
110636
232103
2026-06-11T14:29:48Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232103
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>[[चित्र:महात्मा फुले समग्र वाङ्मय (page 7 crop).jpg|विनाचौकट|मध्यवर्ती]]<noinclude></noinclude>
ngecki0viwjgqjqgy2dlmdfeatu92up
अनुक्रमणिका:आमचा जगाचा प्रवास.pdf
106
110637
232155
2026-06-12T04:17:32Z
FailedEngineer2027
6067
नवीन पान ""
232155
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=''[[आमचा जगाचा प्रवास]]''
|Language=mr
|Volume=
|Author=[[Author:पार्वतीबाई चिटनवीस|पार्वतीबाई चिटनवीस]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=पार्वतीबाई चिटनवीस
|Address=मुंबई
|Year=1915
|Key=आमचा जगाचा प्रवास
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
nirglfwz6sepd23sao4i0e8ubxn6hzq
232165
232155
2026-06-12T05:39:51Z
FailedEngineer2027
6067
232165
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=''[[आमचा जगाचा प्रवास]]''
|Language=mr
|Volume=
|Author=[[Author:पार्वतीबाई चिटनवीस|पार्वतीबाई चिटनवीस]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=पार्वतीबाई चिटनवीस
|Address=मुंबई
|Year=1915
|Key=आमचा जगाचा प्रवास
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist
1=-
2=-
3=-
4=-
5=9
6=10
/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
ab9jeps9gx3uhi5nyqk85s847po4ech
232166
232165
2026-06-12T05:43:14Z
FailedEngineer2027
6067
232166
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=''[[आमचा जगाचा प्रवास]]''
|Language=mr
|Volume=
|Author=[[Author:पार्वतीबाई चिटनवीस|पार्वतीबाई चिटनवीस]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=पार्वतीबाई चिटनवीस
|Address=मुंबई
|Year=1915
|Key=आमचा जगाचा प्रवास
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist
1=-
2=-
3=-
4=-
5=9
6=10
/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
2n9al333iiwdc9mrmsmwvxnzbi2va4y
232170
232166
2026-06-12T06:12:45Z
FailedEngineer2027
6067
232170
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=''[[आमचा जगाचा प्रवास]]''
|Language=mr
|Volume=
|Author=[[Author:पार्वतीबाई चिटनवीस|पार्वतीबाई चिटनवीस]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=पार्वतीबाई चिटनवीस
|Address=मुंबई
|Year=1915
|Key=आमचा जगाचा प्रवास
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
2fvtqdysdrxiff28jj21458sq9kh043
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/१
104
110638
232156
2026-06-12T04:19:09Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232156
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude>आमचा जगाचा प्रवास.
हें
पुस्तक
सौ. पार्वतीबाई चिटनवीस,
छिंदवाडा, (सी. पी.)
यांनी लिहिलें व प्रसिद्ध केलें.
मुंबई येथें "मनोरंजन" छापखान्यांत छापिलें.
१९१५.
किंमत रु-४-०<noinclude></noinclude>
j8qukovr4fyjbg5tv1uc3gik61saj7m
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/२
104
110639
232157
2026-06-12T04:20:21Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232157
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude>सौ. पार्वतीबाई चिटनवीस<noinclude></noinclude>
sa4pxziucemfsk04qpwcfcgvsebqemj
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/३
104
110640
232158
2026-06-12T04:20:42Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232158
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude>प्रस्तावना.
पहिल्यानें आम्हांला सन १९०१ मध्यें विलायतेला जाण्याचा प्रसंग आला. त्या वेळीं आम्ही इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्स, बेलज्यम, जर्मनी, इटली आणि इजिप्त हे देश पाहिले. या प्रवासाचें वृत्त लिहिण्याचा मीं प्रयत्न केला होता; पण कांहीं कारणांमुळे तो अपुराच राहिला. पुढें सन १९१० च्या शेवटीं एक वर्षाची रजा घेण्यांत आली. तींत जगाचा प्रवास करण्याचें आम्ही योजिलें व ईश्वरकृपेनें ते निर्विघ्नपणें पार पडलें.
आमच्या या जगाच्या प्रवासाचें वृत्त माझ्या अल्पमतीला सुचलें तसें या पुस्तकांत लिहिलें आहे. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे व इतर घरगुती अडचणींमुळे तें पुरें करण्याला फार अवकाश लागला, व त्यामुळे ते प्रसिद्ध करूं नये, असेंहि एकवार वाटत होतें; परंतु ‘कांहींच न करण्यापेक्षा उशिरां झालें तरी हरकत नाहीं,’ या वचनाप्रमाणें किंचित उशिरां कां होईना, आज तें प्रकाशित करीत आहें.
पुस्तक लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग असून माझ्या प्रवास-वृत्तांत पुष्कळ उणिवा राहिल्या आहेत,हें मी पुपुरतेपणे जाणून आहें. विस्तारभयास्तव लोकस्थितीविषयी माझे स्वतःचे विचार मीं दिले नाहीत, व वृत्त फार त्रोटक झालें आहे. तरी सुज्ञ वाचक यांतील उणिवींकडे दुर्लक्ष्य करितील अशी आशा करितें.
मु. छिंदवाडा. पार्वतीबाई चिटणवीस.<noinclude></noinclude>
9qhvd25ml0ivmfkbk06ixwe5xa56fbe
232159
232158
2026-06-12T04:22:21Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232159
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude>'''प्रस्तावना'''.
पहिल्यानें आम्हांला सन १९०१ मध्यें विलायतेला जाण्याचा प्रसंग आला. त्या वेळीं आम्ही इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्स, बेलज्यम, जर्मनी, इटली आणि इजिप्त हे देश पाहिले. या प्रवासाचें वृत्त लिहिण्याचा मीं प्रयत्न केला होता; पण कांहीं कारणांमुळे तो अपुराच राहिला. पुढें सन १९१० च्या शेवटीं एक वर्षाची रजा घेण्यांत आली. तींत जगाचा प्रवास करण्याचें आम्ही योजिलें व ईश्वरकृपेनें ते निर्विघ्नपणें पार पडलें.<br>
आमच्या या जगाच्या प्रवासाचें वृत्त माझ्या अल्पमतीला सुचलें तसें या पुस्तकांत लिहिलें आहे. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे व इतर घरगुती अडचणींमुळे तें पुरें करण्याला फार अवकाश लागला, व त्यामुळे ते प्रसिद्ध करूं नये, असेंहि एकवार वाटत होतें; परंतु ‘कांहींच न करण्यापेक्षा उशिरां झालें तरी हरकत नाहीं,’ या वचनाप्रमाणें किंचित उशिरां कां होईना, आज तें प्रकाशित करीत आहें.<br>
पुस्तक लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग असून माझ्या प्रवास-वृत्तांत पुष्कळ उणिवा राहिल्या आहेत,हें मी पुपुरतेपणे जाणून आहें. विस्तारभयास्तव लोकस्थितीविषयी माझे स्वतःचे विचार मीं दिले नाहीत, व वृत्त फार त्रोटक झालें आहे. तरी सुज्ञ वाचक यांतील उणिवींकडे दुर्लक्ष्य करितील अशी आशा करितें.<br>
मु. छिंदवाडा. '''पार्वतीबाई चिटणवीस.'''<noinclude></noinclude>
8nh2sqp51wlgn05iso99fwj73c9u5qb
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/४
104
110641
232160
2026-06-12T04:33:27Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232160
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude>शंकर माधव चिटनवीस.<noinclude></noinclude>
i19pl8dmkyu2ttpt4vc4xoscf9sf7th
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/५
104
110642
232161
2026-06-12T04:52:07Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232161
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude>'''आमचा जगाचा प्रवास.'''<br>
प्रकरण पहिलें.<br>
'''मुंबईहून प्रयाण.'''<br>
इसवी सन १९०१ सालीं आम्हीं पहिल्याप्रथम इंग्लंडचा प्रवास केला, आणि तो दूरचा पहिलाच प्रवास ह्मणून आह्मांला बराच कठिण वाटला; परंतु तेव्हांपासून पुनः एकदां जपान, अमेरिका वगैरेंकडून फिरून यावें, असें आमच्या मनांत घोळत होतें. त्याप्रमाणें तारीख १८ नोव्हेंबर १९९० पासून एक वर्षाची रजा घेण्यांत आली, आणि जपान वगैरे जगाच्या पाठीवरील दुसरे देश पाहून येण्याचा विचार आम्हीं कायम केला.<br>
तारीख २६ फेब्रुआरी रोजी सकाळीं १० वाजतां आह्मी बॅलर्डपायरवर आलों. त्यापूर्वी पंधरा दिवस आह्मी आमच्या लांबच्या प्रवासाचे कपडे वगैरेंची तयारी करण्याकरितां मुंबईला येऊन राहिलों होतों. तरी पण आयत्या वेळी थोडीशी गडबड झालीच! आमचें सामान लवकर जावें, आणि आह्मांला त्रास होऊं नये, ह्मणून निघण्यापूर्वी सुमारें अर्धा तास आधीं सामान रवाना केलें; पण आमच्या नोकरांनां आणि गाडीवाल्याला काय वाटले कोण जाणे, त्यांनी आमचें सामान भलतीकडेच नेलें. आम्हीं
व आम्हांला पोहोंचवावयाला आलेली मंडळी बंदरावर आलों, तरी आमच्या सामानाचा ठिकाण नाहीं! आतां काय करावें? सामान गेलें तरी कोठें? सर्व पॅसेंजर आले व सर्वोचें सामानहि भराभर जाऊं लागलें. डॉक्टरची तपासणी सुरू झाली-तरी आमच्या सामानाचा ठिकाण नाहीं! सामान वेळेवर नाहीं आलें, तर आह्मी जाणार कशी? आह्मी दोघेंहि एकमेकांवर रागावूं लागलों. मी ह्मणूं लागलें "नोकराला बरोबर सांगितलें कां नाहीं? तो अडाणी मनुष्य हैं माहीत का नव्हतें?” ते ह्मणूं लागले "तुह्मींच त्याला अपालो बंदरवर नेण्याला सांगितलें असेल!"<br>
९<noinclude></noinclude>
6eapn78wc7kc1mfjvy2xl3vr321jgf8
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/६
104
110643
232162
2026-06-12T05:09:41Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232162
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude><u>'''आमचा जगाचा प्रवास'''</u><br>
शेवटीं आमचा पुतण्या, जांवई आणि पोहोंचवावयाला आलेले दुसरे एक गृहस्थ व्हिक्टोरियांत बसून चौकशी करूं लागले. एकदांचें सामान आलें. तें येऊन इतर पॅसेंजर मंडळीबरोबर आह्मी लहान बोटींत जाऊन बसलों; परंतु त्या घाईत पोहोंचवावयाला आलेल्या मंडळीचा आह्मांला निरोप घेतां आला नाहीं. कारण, आमच्या सामानाचा पत्ता लावावयाला गेलेली मंडळी आह्मी निघण्याच्या वेळीं परत आली नव्हती. निघतांना त्यांचा निरोप घेतां आला नाहीं, याबद्दल फार वाईट वाटलें. ते परत आले, तेव्हां त्यांनां बोटीजवळ येण्याची मनाई झाली होती. ती मंडळी दूर उभी राहून हातांनीं आह्मांला खुणा करीत होती. आमचे मित्र तात्यासाहेब खारकर यांनी चांगले सुवासिक फुलांचे दोन हार आमच्याकरितां आणले होते, तेहि आमच्या सामानाच्या गडबडीत त्यांनां देतां आले नाहींत, ह्मणून ते त्यांनी एका शिपायाबरोबर आमच्याकडे बोटीवर पाठवून दिले. आमची बोट धक्क्याजवळ बराच वेळ उभी होती,
पण इतरांना बोटीजवळ येण्याची परवानगी मिळेना. शेवटीं आमचा पुतण्या व जांवई एका लहान होडींत बसून आमच्या बोटीजवळ आले; तोंपण तितक्यांत बोट दोनतीन मिनिटांनी निघणार तों सर्वांनांच बोटीजवळ येण्याची परवानगी मिळाली, व आमच्या दोघी भाच्या व इतर मंडळी सर्वच धक्क्याजवळ आली. आमची फार जुनी मोलकरीण कुशी फारच रडूं लागली, आणि आमच्या भाच्याहि रडूं लागल्या. मलाहि पण त्या सर्वांना सोडून जाणें मोठें कठिण वाटूं लागलें, व एकसारखेंयेऊं डोळ्यांनां
पाणी येऊं लागलें. मी आमच्या पुतण्याला सर्वांचा सांभाळ करण्याबद्दल व पत्र पाठविण्याबद्दल सांगत आहें, इतक्यांत बोट निघाली.<br>
आतां आमचें लक्ष्य मोठ्या बोटीकडे लागलें. ही बोट धक्क्यापासून अर्ध्याएक मैल अंतरावर उभी होती. मोठमोठे दोर घेऊन खलाशीलोक
तयारच होते. त्यांनी आमची लहान बोट मोठ्या बोटीला बांधली आणि
लांकडी शिड्या लावून जिना तयार केला. डॉक्टरचा पास दाखवून<br>
१०<noinclude></noinclude>
054xr42f3bgjgms2gnk5tfgpvpz4d1j
232163
232162
2026-06-12T05:11:18Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232163
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude><u>'''आमचा जगाचा प्रवास'''</u><br>
शेवटीं आमचा पुतण्या, जांवई आणि पोहोंचवावयाला आलेले दुसरे एक गृहस्थ व्हिक्टोरियांत बसून चौकशी करूं लागले. एकदांचें सामान आलें. तें येऊन इतर पॅसेंजर मंडळीबरोबर आह्मी लहान बोटींत जाऊन बसलों; परंतु त्या घाईत पोहोंचवावयाला आलेल्या मंडळीचा आह्मांला निरोप घेतां आला नाहीं. कारण, आमच्या सामानाचा पत्ता लावावयाला गेलेली मंडळी आह्मी निघण्याच्या वेळीं परत आली नव्हती. निघतांना त्यांचा निरोप घेतां आला नाहीं, याबद्दल फार वाईट वाटलें. ते परत आले, तेव्हां त्यांनां बोटीजवळ येण्याची मनाई झाली होती. ती मंडळी दूर उभी राहून हातांनीं आह्मांला खुणा करीत होती. आमचे मित्र तात्यासाहेब खारकर यांनी चांगले सुवासिक फुलांचे दोन हार आमच्याकरितां आणले होते, तेहि आमच्या सामानाच्या गडबडीत त्यांनां देतां आले नाहींत, ह्मणून ते त्यांनी एका शिपायाबरोबर आमच्याकडे बोटीवर पाठवून दिले. आमची बोट धक्क्याजवळ बराच वेळ उभी होती,
पण इतरांना बोटीजवळ येण्याची परवानगी मिळेना. शेवटीं आमचा पुतण्या व जांवई एका लहान होडींत बसून आमच्या बोटीजवळ आले; तोंपण तितक्यांत बोट दोनतीन मिनिटांनी निघणार तों सर्वांनांच बोटीजवळ येण्याची परवानगी मिळाली, व आमच्या दोघी भाच्या व इतर मंडळी सर्वच धक्क्याजवळ आली. आमची फार जुनी मोलकरीण कुशी फारच रडूं लागली, आणि आमच्या भाच्याहि रडूं लागल्या. मलाहि पण त्या सर्वांना सोडून जाणें मोठें कठिण वाटूं लागलें, व एकसारखेंयेऊं डोळ्यांनां
पाणी येऊं लागलें. मी आमच्या पुतण्याला सर्वांचा सांभाळ करण्याबद्दल व पत्र पाठविण्याबद्दल सांगत आहें, इतक्यांत बोट निघाली.<br>
आतां आमचें लक्ष्य मोठ्या बोटीकडे लागलें. ही बोट धक्क्यापासून अर्ध्याएक मैल अंतरावर उभी होती. मोठमोठे दोर घेऊन खलाशीलोक
तयारच होते. त्यांनी आमची लहान बोट मोठ्या बोटीला बांधली आणि
लांकडी शिड्या लावून जिना तयार केला. डॉक्टरचा पास दाखवून<br>
१०<noinclude></noinclude>
jmwn8ez70yh1xhmm8djvjb3y8qje97u
232164
232163
2026-06-12T05:12:13Z
FailedEngineer2027
6067
232164
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude><u>'''आमचा जगाचा प्रवास'''</u><br>
शेवटीं आमचा पुतण्या, जांवई आणि पोहोंचवावयाला आलेले दुसरे एक गृहस्थ व्हिक्टोरियांत बसून चौकशी करूं लागले. एकदांचें सामान आलें. तें येऊन इतर पॅसेंजर मंडळीबरोबर आह्मी लहान बोटींत जाऊन बसलों; परंतु त्या घाईत पोहोंचवावयाला आलेल्या मंडळीचा आह्मांला निरोप घेतां आला नाहीं. कारण, आमच्या सामानाचा पत्ता लावावयाला गेलेली मंडळी आह्मी निघण्याच्या वेळीं परत आली नव्हती. निघतांना त्यांचा निरोप घेतां आला नाहीं, याबद्दल फार वाईट वाटलें. ते परत आले, तेव्हां त्यांनां बोटीजवळ येण्याची मनाई झाली होती. ती मंडळी दूर उभी राहून हातांनीं आह्मांला खुणा करीत होती. आमचे मित्र तात्यासाहेब खारकर यांनी चांगले सुवासिक फुलांचे दोन हार आमच्याकरितां आणले होते, तेहि आमच्या सामानाच्या गडबडीत त्यांनां देतां आले नाहींत, ह्मणून ते त्यांनी एका शिपायाबरोबर आमच्याकडे बोटीवर पाठवून दिले. आमची बोट धक्क्याजवळ बराच वेळ उभी होती,
पण इतरांना बोटीजवळ येण्याची परवानगी मिळेना. शेवटीं आमचा पुतण्या व जांवई एका लहान होडींत बसून आमच्या बोटीजवळ आले; तोंपण तितक्यांत बोट दोनतीन मिनिटांनी निघणार तों सर्वांनांच बोटीजवळ येण्याची परवानगी मिळाली, व आमच्या दोघी भाच्या व इतर मंडळी सर्वच धक्क्याजवळ आली. आमची फार जुनी मोलकरीण कुशी फारच रडूं लागली, आणि आमच्या भाच्याहि रडूं लागल्या. मलाहि पण त्या सर्वांना सोडून जाणें मोठें कठिण वाटूं लागलें, व एकसारखेंयेऊं डोळ्यांनां
पाणी येऊं लागलें. मी आमच्या पुतण्याला सर्वांचा सांभाळ करण्याबद्दल व पत्र पाठविण्याबद्दल सांगत आहें, इतक्यांत बोट निघाली.<br>
आतां आमचें लक्ष्य मोठ्या बोटीकडे लागलें. ही बोट धक्क्यापासून अर्ध्याएक मैल अंतरावर उभी होती. मोठमोठे दोर घेऊन खलाशीलोक
तयारच होते. त्यांनी आमची लहान बोट मोठ्या बोटीला बांधली आणि
लांकडी शिड्या लावून जिना तयार केला. डॉक्टरचा पास दाखवून<br>
१०<noinclude></noinclude>
054xr42f3bgjgms2gnk5tfgpvpz4d1j
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/७
104
110644
232167
2026-06-12T05:50:35Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232167
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude><ul>'''मुंबईहून प्रयाण'''.</ul><br>
आह्मी मोठ्या बोटीवर चढलों. ही पी. ऍड् ओ. कंपनीची 'देवाना' नांवाची बोट चांगल्या आणि मोठ्या बोटीपैकी एक होती. मुंबईपासून आमच्याबरोबर फारसे पॅसेंजर दिसले नाहींत. फक्त दोनतीन पारशी जोडपी, आणि पंचवीसतीस यूरोपियन पुरुषबायका मिळून असतील. त्यांच्यापैकी बहुतेक सेकंडक्लास पॅसेंजरच होते. एकच यूरोपियन बाई व सातआठ पुरुष मंडळी व आह्मी उभयतां इतकींच काय तीं फर्स्ट क्लासमध्ये होतों. आमचें कॅबिन मधल्या मजल्यावर असून लहानसेंच होतें. फारसें हवाशीरहि नव्हतें. तीनचार बिछान्यांची कॅबिन्स जिकडेतिकडे रिकामी पडलेली दिसत होती. हीं सर्व रिकामी कॅबिन्स पाहून आह्मांला मोठे आश्चर्य वाटलें. कारण, कुक कंपनीनें कितीतरी गप्पा मारल्या होत्या. 'फार गर्दी आहे - तुह्मांला खरोखरच जावयाचें असेल तर लवकर आह्मांला पक्कें सांगा, नाहींतर मागाहून जागा मिळणार नाहीं!' त्यांच्या या सांगण्याप्रमाणें आह्मी नोव्हेंबरपासूनच तिकिटें घेऊन ठेविली होतीं. असो. या रिकाम्याखोल्या पाहून आह्मांला वाटलें कीं, एकादें तीन बिछान्यांचें
कॅबिन आह्मांला दिलें असतें, तर काय झालें असतें? उगीच रिकामी तर
पडली आहेत! आह्मांला पुढील भविष्य कोठें माहीत होतें, कीं, सध्याचें
मिळालेले कॅबिनहि लवकरच जाणार आहे ह्मणून! कॅबिनमध्ये सामान वगैरे
बरोबर आले किंवा नाहीं तें पाहून आह्मी खालीं लंच घेण्याला गेलों,
इतक्यांत आमची बोट निघाली.<br>
समुद्र चांगला शांत होता आणि त्यामुळे बोट म्हणण्यासारखी कांहीं हलत नव्हती. तथापि माझें डोकें सारखें भणभण करीत होतें. मग हे पहिलेच दोनतीन दिवस होते, आणि बोटीची चांगली सवय झाली नव्हती, म्हणून की काय कोण जाणे. डेक्वर, ड्रॉइंगरूममध्ये किंवा कॅबिनमध्यें कोठेंच चैन म्हणून पडेना. जीवाला बरें नसले म्हणजे मनामध्ये नाना तऱ्हेच्या कल्पना उठतात, व डोकें अधिक भणाणून जातें, त्याप्रमाणे माझी स्थिति झाली होती. एवढ्या मोठ्या फर्स्ट क्लासमध्ये काय<br>
११<noinclude></noinclude>
7yk7nlal5mv8qe95qr1qyovk6zuoz10
232168
232167
2026-06-12T05:51:46Z
FailedEngineer2027
6067
232168
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude><u>'''मुंबईहून प्रयाण'''.</u><br>
आह्मी मोठ्या बोटीवर चढलों. ही पी. ऍड् ओ. कंपनीची 'देवाना' नांवाची बोट चांगल्या आणि मोठ्या बोटीपैकी एक होती. मुंबईपासून आमच्याबरोबर फारसे पॅसेंजर दिसले नाहींत. फक्त दोनतीन पारशी जोडपी, आणि पंचवीसतीस यूरोपियन पुरुषबायका मिळून असतील. त्यांच्यापैकी बहुतेक सेकंडक्लास पॅसेंजरच होते. एकच यूरोपियन बाई व सातआठ पुरुष मंडळी व आह्मी उभयतां इतकींच काय तीं फर्स्ट क्लासमध्ये होतों. आमचें कॅबिन मधल्या मजल्यावर असून लहानसेंच होतें. फारसें हवाशीरहि नव्हतें. तीनचार बिछान्यांची कॅबिन्स जिकडेतिकडे रिकामी पडलेली दिसत होती. हीं सर्व रिकामी कॅबिन्स पाहून आह्मांला मोठे आश्चर्य वाटलें. कारण, कुक कंपनीनें कितीतरी गप्पा मारल्या होत्या. 'फार गर्दी आहे - तुह्मांला खरोखरच जावयाचें असेल तर लवकर आह्मांला पक्कें सांगा, नाहींतर मागाहून जागा मिळणार नाहीं!' त्यांच्या या सांगण्याप्रमाणें आह्मी नोव्हेंबरपासूनच तिकिटें घेऊन ठेविली होतीं. असो. या रिकाम्याखोल्या पाहून आह्मांला वाटलें कीं, एकादें तीन बिछान्यांचें
कॅबिन आह्मांला दिलें असतें, तर काय झालें असतें? उगीच रिकामी तर
पडली आहेत! आह्मांला पुढील भविष्य कोठें माहीत होतें, कीं, सध्याचें
मिळालेले कॅबिनहि लवकरच जाणार आहे ह्मणून! कॅबिनमध्ये सामान वगैरे
बरोबर आले किंवा नाहीं तें पाहून आह्मी खालीं लंच घेण्याला गेलों,
इतक्यांत आमची बोट निघाली.<br>
समुद्र चांगला शांत होता आणि त्यामुळे बोट म्हणण्यासारखी कांहीं हलत नव्हती. तथापि माझें डोकें सारखें भणभण करीत होतें. मग हे पहिलेच दोनतीन दिवस होते, आणि बोटीची चांगली सवय झाली नव्हती, म्हणून की काय कोण जाणे. डेक्वर, ड्रॉइंगरूममध्ये किंवा कॅबिनमध्यें कोठेंच चैन म्हणून पडेना. जीवाला बरें नसले म्हणजे मनामध्ये नाना तऱ्हेच्या कल्पना उठतात, व डोकें अधिक भणाणून जातें, त्याप्रमाणे माझी स्थिति झाली होती. एवढ्या मोठ्या फर्स्ट क्लासमध्ये काय<br>
११<noinclude></noinclude>
40qt2o0m3tx2oxpzqwkziskzkda1v6x
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/८
104
110645
232169
2026-06-12T06:09:50Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232169
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude><u>'''आमचा जगाचा प्रवास.'''</u><br>
ती मी एकटीच स्त्री ! बाकीची सर्व पुरुषमंडळी. एक यूरोपियन बाई होती, पण ती आपलें खाणेपिणें वगैरे कॅबिनमध्येच करीत असे. ह्मणून बोटीवर कांहींच करमणूक नव्हती. माझ्या मनामध्ये असा विचार येई, कीं, एवढा मोठा जगाचा प्रवास करावयाचें आह्मीं डोक्यावर घेतलें आहे, पण तें कसें काय ईश्वर पार पाडील कोण जाणे!<br>
या 'देवाना' बोटीवरील आमची स्टुअर्डेस फार चांगली बाई होती. मी बोटीवर आलें तों ती मजकडे येऊन झणाली "मॅडम, तुह्माला कांहीं लागलेंसवरलें तर मला सांगा, व कपडे वगैरे घालतांना मदत पाहिजे असल्यास हांक मारा; आणि तुमची इच्छा असेल तर तुमचें खाणेपिणें तुमच्या खोलींतच आणून देईन." हें तिचें कामच होतें ह्मणा; पण एकंदरींत ती चांगल्या स्वभावाची दिसली. सकाळी साडेसात झाले, कीं, दरवाज्यावर ठक् ठक् ठोके बसावयाचे, व 'कम् इन्' ह्यटलें, कीं, ही बाई आंत येऊन एक कप चहा, कांहीं फळें आणि चारपांच बिस्किटें आणून ठेवावयाची. तो चहा व बिस्किटें पाहिलीं, कीं, माझे डोके तर अधिकच दुखावयाला लागे! कारण, तोंड धुणे नको कांहीं नको-तसा तो बिछान्यांतल्या बिछान्यांत चहा घेणें कोणाला बरें वाटेल? तशी साहेब-लोकांनां सवय असते. ते जागे झाले, कीं, बिछान्यांतच चहा घेऊन मग बिछान्याबाहेर पाय टाकतात. चहा तुम्ही घ्या कीं नका घेऊं, ती विचारी
आपले काम करीत असे.<br>
आतां उद्यां कोलंबो येणार, आणि मग एकदोन दिवस तरी जमिनीवर रहावयाला मिळेल, या आशेनें मनाला थोडें समाधान वाहूं लागलें. संध्याकाळचे सुमारें पांच वाजले होते, व समुद्र अगदीं शांत दिसत होता. सूर्यबिंब हळुहळू अस्त पावत होतें, त्र तीं सूर्याचीं मावळतीं किरणें मंदमंद होत चाललीं होतीं. बोटीच्या पुढच्या टोकाकडे डेकवर आह्मी दोघें आणि आमचा एक अमेरिकन पॅसेंजर सोबती ती संध्याकाळची सूर्यास्तसमयाची समुद्राची शोभा पहात उभी होतों. बोट आपला<br>
१२<noinclude></noinclude>
oue3pe4uobikxepnvcmd1o0e9uhzov7
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/९
104
110646
232177
2026-06-12T08:28:07Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232177
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude><u>'''मुंबईहून प्रयाण.'''</u><br>
मार्ग क्रमीतच होती. बोटीच्या खालील पंख्याच्या जोरानें समुद्राचें पाणी सारखें घुसळले जात होतें, आणि त्याच्या पांढऱ्या शुभ्र फेसाळ लाटा बोटीच्या दोन्ही बाजूंनीं बाहेर येत होत्या. नंतर त्यांचे रंग पांढरे, निळे, भुरके असे होतहोत समुद्रांत मिसळत होते. या टोंकाकडेच तिसरा क्लास होता. त्यांत सुमारे शंभरदीडशे पॅसेंजर होते. हे बहुतेक गोव्याकडील मुसलमान व कांहीं गरीब ख्रिश्चन लोक होते. हे लोक कोलंबो, सिंगापूर वगैरेंकडे जात असावेत. या वेळीं त्यांची संध्याकाळची जेवणें
चालली होती. प्रत्येकाच्या पुढें एकएक लहान जस्ताचें ताट व तसेंच पाणी पिण्याचें एक टमरेल होतें. ताटामध्यें भाताचा ढीग आणि त्याच्या डोक्यावर दोनदोन पळ्या मांसाची आमटी. पण बिचारे आनंदानें हंसत खेळत जेवीत होते. तो एक मोठा विलक्षण देखावा दिसत होता.<br>
आमचा अमेरिकन सोबती हिंदुस्तान वगैरेंकडून प्रवास करून परत चालला होता. त्याला कांहीं हिंदुस्तान आवडलें नाहीं, असें दिसलें. त्याचें ह्मणणें, अमेरिकेसारखा सुखसोईचा जगांत दुसरा देशच नाहीं! "आमच्या आगगाड्या किती सोईच्या व आरामाच्या असतात! बोटींतून किती उत्तम व्यवस्था असते! हॉटेलें किती चांगलीं! तुमच्या हिंदुस्तानच्या आगगाड्या अगदीं भिकारड्या! इकडील पहिल्या क्लासच्या डब्यां-
सारखे आमच्याकडे तर कुत्रे भरण्याचे डबे असतात!" या अमेरिकन-बुवांच्या गोष्टी ऐकून आह्मांला मोठे आश्चर्य वाटे, व मनाला एकप्रकारचें समाधान वाटे, कीं, असा चांगला देश पाहण्याला आपण जात आहों.<br>
असें आमचें बोलणें चाललें आहे, इतक्यांत बोटीचा कॅप्टन तेथें आला, व " तुमच्या प्रकृति कशा काय आहेत, तुह्माला जलप्रवास आवडतो किंवा नाहीं, आतां आपण कोलंबोजवळ आलों आहोंत; उद्यां सकाळी आठनऊ वाजतां कोलंबोला बोट जाईल, एकदोन दिवस तेथें राहील," असें झणाला. हा कॅप्टन फार चांगला मनुष्य होता;
सर्व पॅसेंजर्सशीं चार गोड शब्द बोलून तो सर्वांचा समाचार घेत असे.<br>
१३<noinclude></noinclude>
bgr3jlopghcz96fy49vruzc2g59wpqq
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/१०
104
110647
232178
2026-06-12T08:35:35Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232178
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude><u>'''आमचा जगाचा प्रवास..'''</u><br>
जेवण वगैरे आटोपल्यावर नवांच्या सुमाराला आह्मी आमच्या कॅबिनकडे गेलों, तों तेथें दरवाज्याशींच आमचा स्टुअर्ड उभा होता. तो पुढें येऊन ह्मणाला "महाराज, आपल्याला उद्यांपासून हे कॅबिन बदलावें लागेल."<br>
"कां बरें?" आह्मी दोघांनीहि आश्चर्याने विचारलें. "कुकनीं तर कधीपासूनच हे कॅबिन आमच्या नांवावर पक्के केलें आहे, व आमच्या तिकिटावरहि याच कॅबिनचा नंबर आहे. असे असतांना मध्येच हा काय घोटाळा? बरें, आह्मांला दुसरें कॅबिन द्याल तें यापेक्षां वाईट नका देऊ ह्मणजे झाले. मग आमची कांहीं तक्रार नाहीं."<br>
त्या बिचायला तरी या गडबडीची काय माहिती असणार? तो आपला हुकमाचा ताबेदार. तो म्हणाला "माझ्याकडून होईल तितकें करून तुमच्याकरितां हेंच कॅबिन ठेवण्याचा प्रयत्न करीन. उद्यां इंग्लंडकडून मंगोलिया बोट येणार आहे, आणि त्या बोटीवरील शंभरदीडशें पॅसेंजर्स या बोटीवर येतील. त्यामुळें येथें फार गर्दी होईल व आपल्याला या कॅबिनपेक्षां चांगलें कॅबिन मिळणें कठिण आहे."<br>
'''कोलंबो.'''<br>
तारीख ३ मार्च १९११ रोजी सकाळी आठ वाजतां आमची 'देवाना' बोट कोलंबो बंदरांत आली. बोटीवर आह्मी थोडेच पॅसेंजर्स असल्यामुळे फारशी गडबड दिसत नव्हती. ब्रेकफास्टनंतर आह्मी फर्स्टक्लास व सेकंडक्लासचे पॅसेंजर वरती ड्रॉइंगरूममध्ये जमा झालों. नंतर डॉक्टरनी येऊन सर्वाकडे पाहिले व सर्वांनां एक एक पास दिला, व किनाऱ्यावर जाण्याची मोकळीक केली. आह्मीं आपले थोडेसे- एक दिवसापुरते कपडे वगैरे घेऊन बाकीचें सामान स्टुअर्डच्या स्वाधीन केलें, व कुकच्या लहान बोटींतून किनाऱ्यावर गेलों. तेथें बरेचसे रिकशॉ उभे होते. या रिकशांमध्ये एकाला बसण्यापुरती जागा असते, व एक किंवा दोन मनुष्यें तो ओढीत
नेतात. अशा गाड्या आपल्याकडे मुंबई, पुणे, कलकत्ता वगैरे शहरी<br>
१४<noinclude></noinclude>
35bdvnrx4l5w08xru8k95cei8eunx3q
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/११
104
110648
232179
2026-06-12T10:49:41Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232179
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude><u>'''कोलंबो.'''</u><br>
बिलकूल दिसत नाहींत. दार्जिलिंग, सिमला, मद्रासइकडे मात्र बऱ्याच आहेत. आह्मी या रिकशांत बसून किनाऱ्याजवळील एकदोन हॉटेलमध्ये गेलों, परंतु तेथें एकहि खोली रिकामी नव्हती, म्हणून रिकशावाल्यांनीं आह्मांला ब्रिस्टल हॉटेलमध्ये नेलें. हें हॉटेल समुद्रकिनाऱ्यापासून अर्थ्याएक मैलावर आहे. या हॉटेलमध्ये क्लार्क वगैरे बरेच सिंगालियन नोकर दिसले. हे लोक मद्रासी लोकांसारखेच काळे असून यांचा पोषाखहि कांहींसा तसाच असतो; परंतु यांची सिंगालियन भाषा वेगळीच आहे. येथील हमाल, कुली, रिक्शावाले, गाडीवाले वगैरे अशिक्षित लोकसुद्धां मोडकीतोडकी इंग्रजी भाषा बोलून आपले काम चालवीत असतात. मग हॉटेलच्या ऑफिसमधील एक क्लार्क आह्मांला पाहून म्हणाला "दोघांची खोली आहे, परंतु पंचवीस रुपये रोज द्यावा लागेल! बरें, पण तुझी आमचे देशबांधव दिसतां, तेव्हां तुमच्या ह्मणण्याप्रमाणें तुह्मांला वीस रुपयांलाच देतों!"<br>
या त्याच्या गप्पा आह्मांला समजल्या; परंतु रूढीप्रमाणें त्याला थँक्स देऊन आह्मी आपल्या खोलींत गेलों.<br>
दुपारचे दोन वाजण्याचा सुमार झाला होता. बाहेर ऊन कडक पडलें होते. परंतु आह्मांला समुद्रांत बोटीपेक्षां येथें जमिनीवरच कितीतरी बरें वाटलें. कपडे वगैरे अस्ताव्यस्त टाकून आणि बारीक साधे कपडे घालून आह्मी विजेच्या पंख्याखालीं पलंगावर पडलों. या वेळीं उन्हाळ्याला नुकताच कोठें प्रारंभ झाला होता, व एव्हांपासूनच इकडे इतकी उष्णता असावी, याचें आह्मांला आश्चर्य वाटूं लागलें.<br>
आह्मी कांहींशी झोपेच्या गुंगीत व कांहींशीं आळसांत होतों, तों दरवाज्यावर ठक्ठक् ठोके ऐकू आले. “या आंत,” अशी परवानगी मिळतांच एक साहेब आमच्या दोन्ही पलंगांच्यामध्ये येऊन उभा राहिला. त्याला पाहून मला तर कसेंसेंच वाटलें. कारण, दरवाज्यावर ठोठावलें तेव्हां आह्मांला वाटलें कीं, कोणीतरी हॉटेलचा नोकर असेल, ह्मणून<br>
१५<noinclude></noinclude>
rdkfzzghrri190si5hfievg1h1o2b9i
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/१२
104
110649
232180
2026-06-12T10:58:54Z
FailedEngineer2027
6067
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "<u>'''आमचा जगाचा प्रवास.'''</u><br> त्याला आंत येण्याची आह्मीं परवानगी दिली; परंतु पहातों तों हा साहेब! तो कायसें इंग्लिशमध्ये सांगून निघून गेला. पंख्याच्या घरघरण्यामुळे मला तें नीटसें ऐक..."
232180
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="FailedEngineer2027" /></noinclude><u>'''आमचा जगाचा प्रवास.'''</u><br>
त्याला आंत येण्याची आह्मीं परवानगी दिली; परंतु पहातों तों हा साहेब! तो कायसें इंग्लिशमध्ये सांगून निघून गेला. पंख्याच्या घरघरण्यामुळे मला तें नीटसें ऐकूं आलें नाहीं. तो निघून गेल्यावर हेहि पण लागलीच उठले,
व गडबडीनें कपडे घालूं लागले. हें आहे तरी काय गौडबंगाल-मला कांहींच समज पडेना! मी आपली एकसारखी विचारूं लागलें "कोण हा मनुष्य! काय त्यानें सांगितलें? एवढ्या गडबडीनें कोठें चाललांत?"<br>
"तो आपला कॅबिनचा स्टुअर्ड. त्यानें मला येऊन सांगितलें, कीं, 'पहिल्या क्लासमध्ये आपल्याकरितां कांहीं कॅबिन राहिलें नाहीं, तेव्हां आपल्याला दुसऱ्या क्लासच्या कॅबिनमध्यें जावें लागेल.' ह्मणून त्या बिचाऱ्याने येऊन सूचना दिली, कीं, 'येथें पी. अँड ओ. कंपनीचें ऑफिस आहे, तर त्यांच्याकडे जाऊन पहा कांहीं होईल तर, आणि कुक कंपनीच्याहि ऑफिसमध्ये जाऊन पहा.'"<br>
"असे का? हा त्याचा मोठा चांगुलपणा समजला पाहिजे, कीं, दोन-तीन हॉटेले शोधीत येऊन त्यानें आपल्याला खबर दिली. नाहींतर त्याला काय एवढी जरूर पडली होती?"<br>
मी अशी कांहीं बोलत आहें, तों तितक्यांत ते निघूनहि गेले. सुमारें
पाऊणएक तासाने परत आले; परंतु चेहऱ्यावर राग, तिरस्कार वगैरेंची
चिन्हें स्पष्ट दिसत होतीं. काय झालें, काय नाहीं, हें जाणण्याची जरी
मला अत्यंत उत्कंठा लागली होती, तरी चर्येवरील तीं रागाची चिन्हें
पाहून एकदम विचारण्याला मी धजलें नाहीं. मनाला थोडासा धीर
आणला, कीं, कांहीं वेळाने आपोआप कळेलच! पण माझ्या उतावळ्या
स्वभावाला कोठला फार वेळ धीर निघायला? मी आपली हळुहळू
विचारण्यास सुरुवात केलीच "मग काय-आपणांला सेकंड क्लासच्याच
कॅबिनमध्ये गेलें पाहिजे वाढतें?"<br>
“होय! गेलें पाहिजे, नाहीं तर काय करणार? तुमाला येथें
रहावयाचें असेल तर रहा आणखी पंधरा दिवस दुसरी बोट येईपर्यंत.<br>
१६<noinclude></noinclude>
28wp3so9kpvxu5m23jmbbz3r2w2dz5g
232181
232180
2026-06-12T10:59:08Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232181
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude><u>'''आमचा जगाचा प्रवास.'''</u><br>
त्याला आंत येण्याची आह्मीं परवानगी दिली; परंतु पहातों तों हा साहेब! तो कायसें इंग्लिशमध्ये सांगून निघून गेला. पंख्याच्या घरघरण्यामुळे मला तें नीटसें ऐकूं आलें नाहीं. तो निघून गेल्यावर हेहि पण लागलीच उठले,
व गडबडीनें कपडे घालूं लागले. हें आहे तरी काय गौडबंगाल-मला कांहींच समज पडेना! मी आपली एकसारखी विचारूं लागलें "कोण हा मनुष्य! काय त्यानें सांगितलें? एवढ्या गडबडीनें कोठें चाललांत?"<br>
"तो आपला कॅबिनचा स्टुअर्ड. त्यानें मला येऊन सांगितलें, कीं, 'पहिल्या क्लासमध्ये आपल्याकरितां कांहीं कॅबिन राहिलें नाहीं, तेव्हां आपल्याला दुसऱ्या क्लासच्या कॅबिनमध्यें जावें लागेल.' ह्मणून त्या बिचाऱ्याने येऊन सूचना दिली, कीं, 'येथें पी. अँड ओ. कंपनीचें ऑफिस आहे, तर त्यांच्याकडे जाऊन पहा कांहीं होईल तर, आणि कुक कंपनीच्याहि ऑफिसमध्ये जाऊन पहा.'"<br>
"असे का? हा त्याचा मोठा चांगुलपणा समजला पाहिजे, कीं, दोन-तीन हॉटेले शोधीत येऊन त्यानें आपल्याला खबर दिली. नाहींतर त्याला काय एवढी जरूर पडली होती?"<br>
मी अशी कांहीं बोलत आहें, तों तितक्यांत ते निघूनहि गेले. सुमारें
पाऊणएक तासाने परत आले; परंतु चेहऱ्यावर राग, तिरस्कार वगैरेंची
चिन्हें स्पष्ट दिसत होतीं. काय झालें, काय नाहीं, हें जाणण्याची जरी
मला अत्यंत उत्कंठा लागली होती, तरी चर्येवरील तीं रागाची चिन्हें
पाहून एकदम विचारण्याला मी धजलें नाहीं. मनाला थोडासा धीर
आणला, कीं, कांहीं वेळाने आपोआप कळेलच! पण माझ्या उतावळ्या
स्वभावाला कोठला फार वेळ धीर निघायला? मी आपली हळुहळू
विचारण्यास सुरुवात केलीच "मग काय-आपणांला सेकंड क्लासच्याच
कॅबिनमध्ये गेलें पाहिजे वाढतें?"<br>
“होय! गेलें पाहिजे, नाहीं तर काय करणार? तुमाला येथें
रहावयाचें असेल तर रहा आणखी पंधरा दिवस दुसरी बोट येईपर्यंत.<br>
१६<noinclude></noinclude>
51pwgwjt54tu9blqpptam9fjriij98c
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/१३
104
110650
232182
2026-06-12T11:16:19Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232182
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude><u>'''कोलंबो.'''</u><br>
ते ह्मणतात 'दुसऱ्या बोटींतहि पहिल्या क्लासचें कॅबिन मिळेलच, अशी आह्मी खात्री देऊं शकत नाहीं. त्यांच्या दोन अटी आहेत. 'एक तर तुह्मीं सेकंड क्लासच्या कॅबिनमध्ये निजण्यापुरतें जावें; बाकी तुमचें जेवण-खाण, बसणेंउठणें सर्व फर्स्ट क्लासमध्ये करावें; किंवा तुह्मांला हें कबूल नसेल व फर्स्ट क्लासचेंच कॅबिन पाहिजे असेल, तर तुमच्या बायकोनें इतर बायांबरोबर एकाद्या कॅबिनमध्यें जावें, व तुझीं पुरुषांच्या कॅबिनमध्यें जावें. कारण, फर्स्ट क्लासमध्ये स्वतंत्र कॅबिन तुह्मां दोघांनां आह्मी देऊं शकत नाहीं, याबद्दल आह्मांला फार वाईट वाटतें. अथवा तुमची इच्छा असेल, तर तुझीं सेकंडक्लास पॅसेंजर व्हावें; तुमचे फर्स्ट क्लासचे पैसे परत मिळतील. तुमच्यासारखे आणखी दोघेतिघे फर्स्टक्लास पॅसेंजर आह्मांला सेकंड क्लासमध्ये पाठवावे लागले. तर आतां तुह्मांला काय कबूल आहे तें कळवा, ह्मणजे त्याप्रमाणें व्यवस्था करूं.' कुकच्या ऑफिसांतहि मी गेलों होतों, पण ते बेटे कानावर साफ हात ठेवितात, व म्हणतात, कीं, 'मुंबईच्या ऑफिसवाल्यांनी काय केलें तें आह्मांला माहीत नाहीं. आह्मी आतां कांहीं करूं शकत नाहीं. तुह्मींच परभारें त्यांनां लिहा!' सांगा आतां काय करावयाचें तें? ह्मणजे त्याप्रमाणें त्यांनां कळवितों. कारण, तुमचा पूर्वीपासून हेका आहे, कीं, तुह्मी बोटीच्या सेकंड क्लासमधून कधीं जाणार नाहीं, ह्मणून एवढा विचार. मला तर सेकंड क्लासमधून जाण्याला कांहीं हरकत वाटत नाहीं!"<br>
मी झटलें "माझा हेका ह्मणून कांहीं नाहीं! पण मी ऐकिलें आहे, कीं, सेकंड क्लासचीं कॅबिनस् अगदीं लहान बिळासारखी असतात, व खाण्यापिण्याची वगैरे चांगली व्यवस्था नसते. तसेंच सेकंड क्लास, बोटीच्या मागच्या टोकावर असल्यामुळे तो भाग बराच हलतो, समुद्रप्रवासाला आधींच मी कच्ची आहें, आणखी या हलण्यानें अधिकच त्रास होणार; पण आतां प्रसंगच आला आहे तर काय करावयाचें? येथें तरी आठपंधरा दिवस राहून काय करणार? आणखी येथे दिवस<br>
१७<noinclude></noinclude>
akm7r2ah2kx4qp2a3fvi8n2xbcfg63b
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/१४
104
110651
232183
2026-06-12T11:26:39Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232183
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude><u>'''आमचा जगाचा प्रवास.'''</u><br>
मोडल्यानें आपला पुढील कार्यक्रम बिघडेल. ह्मणून आपल्याला आतां ही बोट गमावितां उपयोगी नाहीं. ज्याअर्थी आपण एवढ्या दूरच्या प्रवासाला निघालोंच आहों, त्याअर्थी आतां जे जे कांहीं प्रसंग येतील, त्यांनां सादर झालेच पाहिजे! आतां सेकंड क्लास असो, की थर्ड क्लास असो, आपल्याला गेलें तर पाहिजेच."<br>
अशा कांहीं धीराच्या व समाधानाच्या गोष्टी मी सांगितल्या, तेव्हां राग थोडासा शांत झाल्यासारखा दिसला. नंतर आह्मीं ठरविलें, कीं, उद्या लवकरच बोटीवर जाऊन सेकंड क्लासची कशी काय व्यवस्था असते ती स्वतः पाहून यावें, आणि मग आपल्याला जें सोईस्कर वाटेल तें ठरवावें.<br>
नंतर स्नानें वगैरे करून संध्याकाळी सुमारें पांच वाजतां हॉटेलच्या मार्फत एक घोड्याची गाडी ठरविली, व कोलंबोमध्ये ज्या कांही पाहण्याजोग्या जागा असतील तिकडे आह्मांला घेऊन जाण्याविषयीं गाडीवाल्याला सांगून आह्मी निघालों. कोलंबोमध्यें पाहण्याजोगें विशेष असें फारसें कांहीं नाहीं. सिलोनमध्ये दालचिनी, लवंगा वगैरेंचे मोठमोठे बगीचे असल्याचें आह्मीं ऐकिलें होतें. तेव्हां येथेंहि तसं कांहीं असतील, असें
वाटून आह्मांला दालचिनीच्या बगीच्यांत नेण्याविषयी आमच्या गाडीवाल्याला आह्मीं सांगितलें. त्याप्रमाणें गाडीवाल्याने आह्मांला एका मोठ्या थोरल्या मैदानांत नेलें, आणि "हाच दालचिनीचा बगीचा." असें तो ह्मणाला. "येथेंच कांहीं वर्षापूर्वी मोठी दालचिनीची राई होती; परंतु सरकाराने अलीकडे सर्व झाडे तोडून टाकिलीं आहेत. तुम्हांला दालचिनी, लवंगा यांची राने पहावयाची असतील, तर कोलंबोच्या बाहेर दहावीस मैलांवर गेलें पाहिजे, ह्मणजे सिलोनची कांहींतरी शोभा दिसेल. निदान तुम्हीं कँडीला तरी गेलें पाहिजे, ह्मणजे तुह्मांला सिलोनची थोडीबहुत कल्पना होईल."<br>
कांहीं वेळ समुद्रकिनाऱ्यानें इकडेतिकडे फिरून गाडीवाल्यानें आह्मांला दुकानांच्या ओळींत आणलें. तेथें भाजीपाला, फळफळावळ,<br>
१८<noinclude></noinclude>
pylxp9cshakethf9w85ocidjc7es9dp
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/१५
104
110652
232184
2026-06-12T11:27:36Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232184
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude>कोलंबा येथील सिलोनी लोकांच्या झोंपडीचा देखावा.<noinclude></noinclude>
fvs8x26c2s45h8u7u7kf0esr1noa2wm
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/१६
104
110653
232187
2026-06-12T11:41:54Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232187
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude><u>'''कोलंबो.'''</u><br>
पानतंबाकू, वाणीउदमी वगैरेंचीं दुकानें होतीं. तेथील एका दुकानांत तीं हिरवींचार ताजीं विड्याची पानें, ती पांढरी शुभ्र, बारीक कातरलेली नवी रोठी सुपारी वगैरे पाहून ती विकत घेण्याचा मला मोठा मोह पडला, व त्याला आमच्या गाडीवाल्यानेंहि भर घातली, कीं, "सिलोनी विड्याची पानें फारच रुचकर असतात. ती दिसावयाला हिरवीं दिसतात इतकेंच, पण खाण्याला फार स्वादिष्ट असतात." आह्मीं तीं एक आण्याची विकत घेतलीं तीं बरींच आली. शिवाय त्यांबरोबर कात, चुना, सुपारी, लवंग वगैरे मसालाहि खूब मिळाला. कोलंबोमध्ये नारळींचीं, सुपारींचीं, केळींचीं वगैरे कोंकणी झाडेंहि रस्त्याच्या आजूबाजूंनी बरीच दिसली.<br>
आमच्या हॉटेलमध्ये दुपारपासूनच नोटिस लागली होती, कीं, "देवाना बोट उद्यां रात्री दहा वाजतां कोलंबो बंदरांतून निघेल."<br>
दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टनंतर हॉटेलजवळील कांहीं दुकानें पाहिलीं, व पंखे, उशा वगैरे किरकोळ सामान खरेदी केलें. हॉटेलच्या आंतमध्येच पुष्कळशी जवाहिरांचीं व कापड वगैरेंचीं दिल्ली, आग्रा, बनारस इकडील व्यापाऱ्यांची दुकानें होतीं. कोलंबोमध्ये या मालाची बरीच विक्री होत असावी, असें वाटतें. कांहीं बारीकसारीक जवाहीर आह्मी विकत घेतलें, आणि तेथेंच पुढच्या हॉटेलमध्ये येणारा-जाणारांची गंमत पहात बसलों.<br>
आज सकाळीं ह्मणा, कीं, काल सकाळीं ह्मणा, बऱ्याचशा बोटी कोलंबो बंदरांत आल्या असाव्या. कारण, सेलर्स लोकांच्या व पॅसेंजर्स लोकांच्या झुंडीच्याझुंडी सोडावॉटर, लेमोनेड, चहा वगैरे पिण्यासाठीं हॉटेलमध्ये येत होत्या. हें हॉटेल आपलें कांहींसें रेस्टॉरांसारखेंच होतें. या मंडळीमध्यें एक जपानी बाई होती. तिनें एका जर्मन की इटालियन इसमाशी लग्न केलें होतें. या बाईनें इंग्लिश पोषाख केला होता; परंतु तो जपानी चेहरा कुठे लपावयाचा नाहीं. या जोडप्याचा एक लहानसा गुटगुटीत गोजीरवाणा मुलगाहि बरोबर होता. ती जपानी बाई माझ्या-<br>
१९<noinclude></noinclude>
12excj0cpa434q3y4nxricwrutmu0r7
पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/१७
104
110654
232189
2026-06-12T11:57:52Z
FailedEngineer2027
6067
/* मुद्रितशोधन */
232189
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude><u>'''आमचा जगाचा प्रवास.'''</u><br>
जवळ येऊन बसली, आणि जर्मन भाषेमध्ये माझ्याशी बोलू लागली. मीं तिला इंग्लिशमध्यें सांगितलें, कीं, मला जर्मन, इटालीयन, फ्रेंच वगैरे भाषा येत नाहींत. साधारण आपले मोडकेंतोडकें इंग्रजी येते. पण तिला इंग्लिश येत नव्हतें. त्यामुळे तिचें मला व माझें तिला समजेना!<br>
'''देवाना बोटीचा सेकंड क्लास.'''<br>
संध्याकाळी सुमारें पांच वाजतां आह्मी 'देवाना' बोटीवर पुनःचढलो. या वेळी आमच्याशिवाय दुसरे कोणी पॅसेंजर्स बोटीवर आलेले दिसत नव्हते; परंतु सामान वगैरे चढविण्याची गडबड चालली होती. आमचें कॅबिन बदलल्यामुळे आमच्या मनाला स्वस्थता नव्हती, आणि बोटीवर आलो तरी मनाचा कांहींच निश्चय होईना. एकदां वाटे कीं, अडचणी सोसून फर्स्ट क्लासमध्येच रहावें. पुनः एकदां वाटे, आपले पैसे परत घ्यावे, व सेकंड क्लासमध्यें जावें. यांनां पुनः रागाची लहर आली, आणि "आतां मुंबईच्या कुकच्या ऑफिसला चांगलेच खडखडीत पत्र लिहितों. त्यांनीं मला मध्येंच असा धोका दिला. असें होतें तर आह्माला मुंबईलाच कळवायचें होतें!" असें ह्मणाले. नंतर परसरकडे (या मनुष्याकडे बोटीवरील व्यवस्थेचें काम असतें) गेले, व त्याला विचारले "अशी कशी हो तुमची व्यवस्था? इतर लोकांनीं पैसे दिले तसे आह्मीहि दिले आहेत, आणि त्यांचा जसा हक्क आहे तसा आमचाहि आहे." वगैरे वगैरे.<br>
परसर ह्मणाला "माझ्या व कॅप्टनच्या हातीं कांहीं नाहीं! मला फार वाईट वाटतें-पण मी काय करूं? आमच्या ऑफिसांतून लिहून येईल तसें आह्मांला केलें पाहिजे. परंतु सिंगापूर अथवा पिनँग येथे कोणी उतरले, कीं, लागलेंच तुह्मांला चांगले कॅबिन देऊ."<br>
मग त्याच्याबरोबर आह्मी सेकंड क्लास पहावयाला गेलों. तेथें डायनिंग रूम चांगली स्वच्छ, सामान वगैरे चांगलें नीटनेटके, आणि एकंदर व्यवस्था फर्स्ट क्लाससारखीच दिसली. कॅबिनहि फर्स्ट क्लास-प्रमाणेच होतें. उगीच थोडेंसें वीत दोन विती लहान असेल, एवढेच.<br>
२०<noinclude></noinclude>
hldqq4ams7zzc9x0bmns7uiut6nu320