विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.11
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf
106
1874
233237
233096
2026-07-17T11:47:56Z
कल्पनाशक्ती
3813
233237
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]]
|Language=mr
|Volume=
|Author=विवेकानंद
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=न. म. कुलकर्णी
|Address=
|Year=१९२२
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=V
|Pages=<pagelist 4="अनुक्रमणिका" 5="हिंदु देवालय फोटो" 6="एक उघडे रहस्य" 19="कैवल्याचा मार्ग" 32="याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी" 44="सांख्यविचार" 65="सांख्य आणि वेदान्त" 82="वेदान्त व हक्क" 107="हक्क" 118 ="अभ्यास" 141="भक्ति" 169 ="हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप" 201="हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते" 230="आपणांपुढील कार्य."/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
nktz17zht040h0m3hq9ekdk45jwkigo
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२५
104
66790
233232
154921
2026-07-17T11:34:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233232
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२२० |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|}}
{{rule}}</noinclude>'''वति'''' या आपल्या वचनाची पूर्तता पुनः एकवार त्याने केली. या वेळी हा अवतार हिंदुस्थानाच्या दक्षिण भागांत झाला. ब्राह्मणकुळांत जन्म घेतलेल्या या अवतारी पुरुषाने आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षी आपलें ग्रंथलेखन पुरे केले, असा लोकप्रवाद आहे. या अवतारी तरुणाचे नांव शंकराचार्य असें आहे. केवळ सोळा वर्षांच्या वयांत या बाल आचार्यांनी जी ग्रंथसंपत्ति निर्माण केली आहे, ती पाहून आश्चर्याने सारे जग थक्क होऊन जाते. पूर्व काली भरतभूमीनें जें धर्मकार्य केले आणि त्या वेळी ती पावित्र्याचे वसति स्थान होऊन राहिली होती तेंच पावित्र्य तिला पुन्हां प्राप्त करून द्यावे, असा या आचार्यांचा हेतु होता; पण हिंदुस्थानाची अवनति या वेळी कोणत्या थराला पोचली होती, याचा क्षणभर विचार केला म्हणजे हे कार्य किती दुष्कर होतें हे तेव्हांच दिसून येईल, या वेळेच्या परिस्थितीचे अल्पसें वर्णन मी तुम्हांस आधी सांगितलेंच आहे. आजमितीसहि जे भयंकर प्रकार हिंदु स्थानांत तुम्हांस आढळून येतात आणि जे नाहीसे करण्यासाठी तुम्ही इतकी धडपड करितां, त्यांची उत्पत्ति या परिस्थितीतूनच झाली आहे. अवनतीचें साम्राज्य त्या काळी अकुतोभय चालू होते. तार्तार, बलुची इत्यादि अनेक पशुतुल्य रानटी जाती हिंदुस्थानांत आल्या होत्या. येथे आल्यानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार त्यांनी केला. आमच्याशी त्यांची सरमिसळ होऊन गेली. त्यांच्या चालीरीतीहि आमच्यांत मिसळून गेल्या; आणि अशा रीतीने हिंदी राष्ट्रांत भयंकर चालीरिती आणि पशुतुल्य आचरण यांचा सुकाळ झाला. स्वतःच्या विनाशकाळी बौद्धधर्माने आपली वारसदारी म्हणून जो कांहीं ठेवा मागे ठेविला तो हाच; आणि शंकराचार्यांनाहि या ठेव्याचा स्वीकार करूनच आपला पुढील मार्ग चोखाळणे अवश्य होतें. आचार्यांच्या काळानंतर हिंदुस्थानाला जें स्वरूप प्राप्त झाले, तें वेदान्ताने बौद्ध अवनतीवर मिळविलेल्या विजयामुळेच होय. आचार्य गेले, तथापि हा झगडा अद्यापिहि पुरा झाला नसून तो तसाच पुढे चालू आहे. श्रीशंकराचार्य महान् तत्त्ववेत्ते होते. बौद्धधर्माची अंतिम तत्त्वे आणि वेदांत धर्म यांत फारसा फरक नाहीं हे आचार्यांनी सिद्ध केलें. बौद्ध भिक्षूंना स्वधर्माच्या आद्यप्रवर्तकाची तत्त्वं यथार्थपणे न समजल्यामुळेच भलत्या मार्गाने जाऊन त्यांची अवनति झाली. बुद्धदेवाच्या शिकवणीचे रहस्य त्यांच्या गळी न उतरल्यामुळे जीवात्मा<noinclude></noinclude>
5sd3mp5vqtyghgf91g5wma27gfdfham
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२६
104
66791
233233
154924
2026-07-17T11:37:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233233
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.|२२१ }}
{{rule}}</noinclude>आणि परमात्मा यांचे अस्तित्व विसरून जाऊन ते निरीश्वरवादी झाले, असेंहि आचार्यांनी सिद्ध केले आहे. आचार्याच्या या तत्त्वांचा प्रसार होऊन लोकांना ती पटतांच या लोकगंगेच्या प्रवाहाची दिशा बदलली. हिंदु लोक आपल्या प्राचीन धर्माकडे पुनः वळू लागले. पण पूर्वीच्या अनेक चाली त्यांच्या अंगी इतक्या पक्क्या खिळून गेल्या होत्या की, त्यांचा त्याग त्यांना सहसा करवेना.<br>{{gap}}यानंतर श्रीरामानुजांचा अवतार झाला. श्रीशंकराचार्य विशालबुद्धि होते, यांत शंका नाही. तथापि अंतःकरणाची आर्द्रता त्यांजपाशी नव्हती, असे मला म्हणावेसे वाटते. त्यांची बुद्धि जितकी विशाल होती तितकी विशालता अंतःकरणाला नव्हती. रामानुज या बाबींत त्यांच्याहून अधिक श्रेष्ठ होते. समाजाच्या तळी वावरणाऱ्या कनिष्ठ वर्गाबद्दल रामानुजांचे चित्त कळवळलें होते. या वर्गाबद्दल त्यांच्या चित्तांत अत्यंत सहानुकंपा होती. या वर्गाला धर्ममार्गाला लावावयाचें तर शुद्ध तत्त्वप्रधान धर्म त्यांना पटावयाचा नाही, ही गोष्ट रामानुजांच्या लक्षात आली. या वर्गाची बुद्धि जड, तत्त्वांचे आकलन करण्याचे सामर्थ्य तिला नाही, याकरितां ही परोक्षतत्त्वें प्रत्यक्ष विधि विधानांच्या रूपाने त्यांजपुढे मांडली पाहिजेत, हे लक्षात आणून रामानुजांनी जुने पूजाप्रकार शुद्ध करून ते पुनः चालू केले आणि त्यांत कांही नव्यांचीहि भर घातली. ज्यांना परोक्ष तत्त्वें पटविण्याचा दुसरा कोणताहि मार्ग उपयोगी नाही, त्यांच्याचकरितां ही तयारी रामानुजांनी केली होती. पण असे करीत असतांहि तत्त्वज्ञानमंदिराचे कवाड त्यांनी बंद केले नाही. ब्राह्मण आणि त्यांच्याचसारख्या दुसऱ्या उच्च वर्णाकरितां तत्त्वज्ञानाची सोपानपरंपरा निर्माण करून पूजनाचा उच्च प्रकारही त्यांनी सुरू केला. अशा रीतीने अगदी तळातल्या अंत्यजापासून तो थेट सर्वश्रेष्ठ ब्राह्मणापर्यंत सर्वांनाच धर्माचा मार्ग रामानुजाने मोकळा करून दिला. रामानुजांनी जें कार्य केलें त्याचे स्वरूप अशा प्रकारचे आहे. रामानुजांच्या या कार्याचा प्रसार उत्तरेकडेहि झाला. तथापि तेथे त्याचे स्वरूप परिणतावस्थेस येण्यास बराच काळ लोटावा लागला. मुसलमानांच्या स्वाऱ्या होऊं लागेपर्यंत उत्तरेतील धर्मग्लानि समूळ नाहींशी झाली नव्हती. यानंतर तेथे थोडेबहुत धर्मवीर निर्माण होऊ लागले आणि समाजसुधारणेचे बरेच कार्य त्यांनी केले. या सर्वांच्या मुकुटस्थानी योजना करण्यासारखें नांव म्हटलें म्हणजे श्रीचैतन्य यांचेच<noinclude></noinclude>
bdv99q9uwmieqac7gcxov6aj0h21tmi
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२७
104
66792
233234
154927
2026-07-17T11:40:01Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233234
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२२२ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|}}
{{rule}}</noinclude>होय. रामानुजांच्या काळापासून धर्मोन्नतीचा मार्ग सर्वांस सर्रास मोकळा झाला, ही गोष्ट विशेष लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे. रामानुजांनंतर जितके धर्मगुरू झाले, तितक्या साऱ्यांनी हा मुद्दा लक्ष्यांत ठेवला होता. श्रीशंकराचार्यांच्या काळापूर्वीचेही धर्मगुरु या बाबींत मागे नव्हते. खुद्द शंकराचार्यांनींहि खालच्या वर्गासाठी कांहींच केले नाही. अथवा त्यांच्या धर्मोन्नतीला विरोध केला असा आक्षेप त्यांजवर कां यावा हे मला समजत नाही. त्यांच्या साऱ्या ग्रंथभांडारांत अशा अर्थाचा एक शब्दही मला दिसत नाही. आता आचार्यांच्या कालानंतर त्यांची ग्रंथसंपत्ति एखाद्या विशिष्ट वर्गाच्या हातांत राहिली असेल तर तो त्यांचा अपराध नाही. भगवान् बुद्धाचीहि अशीच गोष्ट झाली. त्यांच्या तत्त्वांचे मूळरूप त्यांच्या शिष्यपरंपरेच्या हाती आल्यानंतर ते भ्रष्ट झाले. चैतन्य हे मुख्यतः भक्तिमार्गप्रवर्तक होते. गोपींची शुद्धभक्ति त्यांच्या ठिकाणी अवतीर्ण झाली होती. भक्तीचे वेड त्यांना लागले होते. त्यांचा जन्म अत्युच्च आणि शुद्ध बुद्धिमार्गी ब्राह्मणकुलांत झाला होता. न्यायशास्त्रांत ते स्वतः अत्यंत प्रवीण होते. प्रतिपक्षाबरोबर अनेक शब्दयुद्धे करून त्यांत ते विजयी झाले होते. अशा सभा जिंकणे हीच ब्राह्मण पंडिताच्या जन्माची इतिकर्तव्यता आहे असा समज त्या काळी होता, आणि चैतन्यांनाहि याच समाजाचे बाळकडू लहानपणापासून मिळाले होते; पण कोणा गुरूच्या प्रसादानें ही परिस्थिति पालटली. चैतन्यांचें सारें अंतरंग बदलून गेले. त्यांनी या शाब्दिक युद्धांचा त्याग केला. आपलें सारें तर्कशास्त्र ते विसरून गेले. त्यांचे मन पूर्ण परावृत्त होऊन तें शुद्ध भक्तिमार्गाकडे वळले. साऱ्या जगांत श्रीचैतन्यदेवासारखा भक्त आजपर्यंत कोणी झाला नाही. त्यांच्या भक्तीचा प्रवाह साऱ्या बंगालभर वाहिला; आणि अनेक जीवांना शांतिसुखाचा लाभ त्यांनी करून दिला. त्यांच्या भक्तीला मोजमाप नव्हते. कोणी साधु असो अथवा अत्यंत पातकी असो; हिंदु असो अथवा मुसलमान असो; स्त्री असो अथवा पुरुष असो; मोठा राव असो अथवा रस्त्यांत फिरणारा रंक असो; चैतन्यांच्या हृदयांत सर्वांना एकच स्थान मिळे. आज चैतन्यपंथाची अवनति झाली आहे ही गोष्ट खरी, आणि कालांतराने सर्वच धर्मांना ग्लानी येत असते हेही खरें; तथापि आजच्या मितीसही दीनदुबळ्यांचा पाठीराखा कोणता पंथ असेल तर तो चैतन्यपंथच होय. सर्व समा-<noinclude></noinclude>
pezydkgcdcurn5h1bh25u767wcuh72d
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२८
104
66793
233235
154929
2026-07-17T11:42:24Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233235
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.|२२३ }}
{{rule}}</noinclude>जानें ज्याला बहिष्कार घातला त्याला अद्यापिही येथे आश्रय मिळतो. केवळ तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने श्रीशंकराचार्याच्या मार्गाइतका उदार आणि व्यापक मार्ग दुसरा नाही. अनेक पंथांत आणि धर्मात वस्तुतः भेद नाही ही गोष्ट आचार्यांचे सारे अनुयायी कबूल करितात; तथापि हेच अनुयायी वर्ण भेद अत्यंत कठोरतेने पाळतात, हेही येथें अवश्य सांगितले पाहिजे. उलटपक्षी वैष्णवधर्म सर्वांना पोटाशी धरीत असतो; पण तत्त्वदृष्ट्या आपलाच मार्ग तेवढा खरा असा हटवादीपणाही करीत असतो.<br>{{gap}}श्रीमच्छंकराचार्य यांची बुद्धि जशी विशाल होती, त्याचप्रमाणे श्रीचैतन्यांचें अंतःकरण विशाल होते. यानंतर या दोन वस्तूंचा संगम जेथें एकत्र असेल अशी विभूति उत्पन्न होण्याची वेळ आली. ज्याच्या ठिकाणी बुद्धीचें विशालत्व आणि अंतःकरणाची आर्द्रता यांचा एकत्र वास असेल, अशा अवताराची आतां आवश्यकता उत्पन्न झाली होती. अनंत प्रकारच्या पंथांच्या द्वारे एकच परमेश्वर आपले कार्य करीत आहे, हे पाहण्याइतकी दिव्य दृष्टि ज्याला आहे, असा नवा अवतार आता हवा होता. वस्तुमात्राच्या ठिकाणी ज्याच्या दृष्टीला एकाच परमेश्वराचे स्वरूप दिसतें, दीन दुबळ्यांच्या आणि पतितांच्या दर्शनाने ज्याच्या अंतःकरणाला पाझर फुटतो; हा स्वकीय, हा परकीय, असा भेद ज्याच्या दृष्टीला दिसत नाही; आणि नाना पंथांतील रहस्ये ओळखून त्यांचे अंतर्गत ऐक्य जाणण्याइतकी ज्याची बुद्धि विशाल आहे; असा अवतार आता होणे इष्ट होते. सर्व मतमतांतरांचे ऐक्य करून सर्वव्यापी असा एकच धर्म निर्माण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या बुद्धीला आहे, असा अवतार आता हवा होता; आणि अशी वेळ आल्याबरोबर असा पुरुष उत्पन्न झाला. या श्रेष्ठ विभूतीच्या पायांजवळ कित्येक वर्षे बसण्याचे महद्भाग्य मला प्राप्त झाले होते. ही वेळच अशी होती की, असा पुरुष उत्पन्न व्हावा. पाश्चात्य आचारविचारांनी अगदीं गजबजून गेलेल्या एका शहरासन्निध या पुण्य पुरुषाचा जन्म झाला; आणि याचे मुख्य अवतारकार्यही याच ठिकाणी झाले. हे शहर अगदी बेभान होऊन पाश्चात्य कल्पनांमागे पळत सुटलें होतें. पाश्चात्य वस्तूचे वेड त्याला लागले होते. हिंदुस्थानांत दुसरे कोणतेंहि गांव याच्या इतके युरोपीय बनले नव्हते. अशा प्रकारच्या शहरासंनिध हा अवतार जन्मास आला, आणि या शहरांतच त्याचे कार्य सुरू होते. पुस्तकी<noinclude></noinclude>
gtb8ogj0irkwrf7iaombtfzzimtbsky
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२९
104
66794
233236
154940
2026-07-17T11:45:05Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233236
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२२४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|}}
{{rule}}</noinclude>ज्ञान याला मुळीच नव्हते; फार काय, पण स्वतःची सही करण्यापुरतीहि अक्षरओळख त्याला नव्हती असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. अशा प्रकारे हे श्रीरामकृष्ण परमहंस मोठे विचित्र गृहस्थ होते. यांचे समग्र चरित्र कथन करणे म्हणजे तो एक मोठा इतिहासच होईल. आजच्या प्रसंगी तसे करण्यास मला वेळ नाही. सध्या मी इतकेंच म्हणतों की, हिंदुस्थानांत जे जे अवतार आजपर्यंत होऊन गेले त्या सर्वांची ऐक्यमूर्ति श्रीरामकृष्ण परमहंस ही होय. पूर्वीचे सारे वेगवेगळे भाग या एका देहांत एकरूपाला आले. चोहोकडे विखरलेलें धर्मकार्य येथे एकत्र झालें, अपूर्णसें भासणारे कार्य येथे पूर्णत्वास आले. यामुळेच सध्याच्या अवनतस्थितीत हे अवतारकार्य अत्यंत उपयुक्त झाले. रामकृष्ण परमहंस यांचा जन्म एका दरिद्री भिक्षुकाच्या पोटी झाला. हा भिक्षुक एका बाजूच्या लहानशा खेड्यांत रहात होता. त्याच्या अस्तित्वाची खबरही कोणास नव्हती; आणि अशा परिस्थितीत जन्मल्यामुळे श्रीरामकृष्णहि अगदी अप्रसिद्ध होते; पण त्यांच्या पाठीमागे सारी विश्वशक्ति उभी होती. यामुळे आज युरोप, अमेरिका वगैरे साऱ्या जगांतील देशांत कोट्यवधि लोक या विभूतीचे पूजन आज करीत आहेत. परमेश्वराची लीला वर्णन करण्याचे सामर्थ्य कोणाला आहे? त्याची इच्छा काय असेल हे कोणी सांगावें? सांप्रतच्या काळी भगवान् रामकृष्ण यांचा जन्म व्हावा या गोष्टींत असलेला गूढ ईश्वरी संकेत आज आपणास दिसत नसेल तर तो दोष आपल्या डोळ्यांचा आहे. आपण आंधळे ह्मणून सूर्यप्रकाशहि आपणास दिसत नाही. मित्रहो, तुमच्या भेटीचा आणखी एखादा प्रसंग प्राप्त झाला तर या चरित्राची आणखीहि काही माहिती मी तुम्हांस सांगेन. आज मी इतकेंच म्हणतो की, माझ्या या साऱ्या बडबडीत जर एखादा शब्द सत्यपूर्ण असेल तर तो श्रीरामकृष्णांचा आहे. त्यांजवांचून दुसऱ्या कोणाचीहि मालकी त्याजवर नाही; आणि यांत जे काही फोल असेल, ज्या पुष्कळशा खोट्या गोष्टी मी बोललों असेन आणि मानवजातीला ज्यांचा कांहींच उपयोग नसेल, अशा साऱ्या वस्तू एकट्या माझ्याच असून त्यांची सारी जबाबदारी फक्त माझ्याच शिरावर आहे.<br>
{{rule|5em}} {{nop}}<noinclude></noinclude>
2vo5jki8eyu0ikgpwotwf65ue7dqtl4
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३०
104
66795
233238
154977
2026-07-17T11:50:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233238
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|{{xx-larger|'''आपणांपुढील कार्य.'''}}}}
{{rule|7em}}
{{gap}}जगाच्या व्यवहाराचा गाडा आपला मार्ग जो जो अधिक आक्रमीत जात आहे, तो तो मानवी जीवितापुढील प्रश्न अधिक खोल आणि अधिक विस्तृत होत आहे. मानवी जीविताचा अंतिम हेतु काय, या प्रश्नाची चर्चा फार प्राचीन काळी होऊन त्याचा निकालही तेव्हां लागला. 'सर्वं खल्विदं ब्रह्म' हे तत्त्व श्रुतीने प्रथम शोधून काढले त्याच वेळी या प्रश्नाचाही निकाल लागला. सृष्टीतील यच्चयावत् पदार्थ एकमेकांशी इतके पूर्ण बद्ध झालेले आहेत की, आपणाबरोबर दुसऱ्याला ओढल्यावांचून तींतील एक परमाणूहि कांहीं हालचाल करूं शकत नाही. सारे जग उन्नतीच्या मार्गाला लागल्या शिवाय एकाचाही प्रवास सुखरूपपणे होऊ शकत नाही. आतापर्यंत जो अनुभव आपणांस आला त्यावरून जगाच्या उन्नतीचा प्रश्न कोणत्याही एकतर्फी मार्गाने सुटण्यासारखा नाही हे उघड झाले आहे. जगाला सुधारण्याचा हक्क एखाद्या विशिष्ट मानववंशाकडे अथवा राष्ट्राकडे परमेश्वराने सोपविलेला नाही. असल्या आकुंचित भावनांच्या पायावर जगाची उन्नति व्हावयाची नाही. कोणताही सिद्धांत परोक्षतः कितीहि खरा असला, तरी त्याची सत्यता साऱ्या मानवजातीला पटली पाहिजे. प्रत्येक सद्भावनेचा विस्तार इतका झाला पाहिजे की, तिच्यांत सारे मानवकुल बुडून गेले पाहिजे. साऱ्या जीवितभर ही कल्पना व्यापून राहिली पाहिजे. प्राचीन काळी आपल्या देशाची जी स्थिति होती, ती गेल्या काही शतकांच्या अवधींत कां राहिली नाही याचे कारण या विवेचनावरून स्पष्ट होईल. <br>{{gap}}प्राचीन काळी दोन मानवकुले एकाच मुळापासून उत्पन्न झाली; पण या दोहोंची परिस्थिति भिन्न असल्यामुळे त्यांची वाढही वेगवेगळ्या दिशांनी झाली; आणि मानवी जीविताचे कूट प्रश्न ती आपापल्यापरी सोडवू लागली. ही दोन कुले हिंदु आणि ग्रीक ही होत. हिंदु आर्यांची वस्ती भरतभूमीत झाली. हिच्या उत्तरेला पर्वतराज हिमालय. या हिमनगराजापासून पुष्कळ मोठमोठ्या नद्यांचा उगम होऊन त्या खाली मैदानावर वहात येतां येतां त्यांचे स्वरूप समुद्राप्रमाणे विशाल झाले. या सपाट प्रदेशी जिकडेतिकडे<noinclude><br>{{gap}}स्वा० वि० खं०-९-१५.</noinclude>
79xit0jy1soy0juq9ujbbor2suho03r
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३१
104
66796
233239
154978
2026-07-17T11:53:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233239
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२२६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|}}
{{rule}}</noinclude>प्रचंड अरण्ये पसरली होती. यांचा विस्तार इतका मोठा होता की, यांच्या पलीकडे जग म्हणून काही असूच नये असे एखाद्यास वाटावें. संस्कृतीच्या संपर्काचा नुसता वाराही लागण्याचा संभव येथे नव्हता. येथे राहणारास जगाच्या कोणत्याही उपाधीपासून बाधा होण्याजोगी नव्हती. यामुळे येथील रहिवाशांचा लौकिक संबंध आपोआप तुटून त्यांची वृत्ति स्वाभाविकपणेच अन्तर्मुख झाली. त्यांची दृष्टि बाह्य जग सोडून अंतःसृष्टीकडे पाहूं लागली. आर्यांना बुद्धीच्या विशालत्वाची जोड स्वाभाविकपणेच मिळाली होती. त्यांची उपजतबुद्धीच अंतस्थ विचारांकडे वळणारी होती. तशांतून त्यांचा वास ज्या स्थळी झाला तें नितांत रमणीय. प्रचंड नद्या, उत्तुंग गिरिशिखरें आणि अफाट वनराजी यांच्या साहचर्यात त्यांची उपजतबुद्धि जागृत होऊन ती अंतःसृष्टीचा विचार करू लागली यांत नवल नाही. मानसिक शक्तीचे पृथक्करण हा एकच विषय हिंदु आर्यांनी विचाराकरितां आपल्या हाती घेतला होता. ग्रीक लोकांची स्थिति याहून वेगळ्या प्रकारची झाली. जगाच्या ज्या भागांत त्यांनी वास केला, तो भाग सुंदर आणि रमणीय खरा पण त्यांत उदात्तपणा नव्हता. आजूबाजूची सृष्टि अत्यंत मोहक पण तिच्यांत कोणाचें चित्त अंतर्मुख करण्यापेक्षा बहिर्मुख करण्याचा गुण अधिक होता. सृष्टीने आपल्या साऱ्या सौंदर्याचा वर्षाव येथे सढळ हाताने केला होता. पण तेथील रहिवाशांची चित्तवृत्ति आपल्याच ठिकाणी गुंतवून ठेवावी असा गुण या सौंदर्यात होता. यामुळे तेथील ग्रीक कुलाचें मन या बाह्य सृष्टीकडे धाव घेऊ लागले; ही गोष्ट स्वाभाविकपणेच घडली. या बाह्यसृष्टीचे पृथक्करण करण्याकडे त्या मनाचा कल झाला. यामुळे हिंदुकुलाच्या द्वारे सारें पृथक्करण शास्त्र अवतीर्ण होऊन सृष्ट पदार्थांची शास्त्रे ग्रीक कुलांतून उद्भवली. हिंदु मन आपल्या दिशेने गेले आणि त्याने विश्वव्यापी सिद्धांत निर्माण केले. आजच्या काळीहि हिंदवासीयांची तर्कबुद्धि आणि त्यांच्या मेंदूचे विशालत्व ही साऱ्या जगांत अव्वल प्रतीची आहेत. आमच्या येथील तरुण कोठेही बाह्यदेशी गेले, तरी बुद्धीच्या बाबतीत दुसऱ्या कोणत्याही देशांतील तरुणांवर अद्यापि मात करितात, हा आपला नित्याचा अनुभव आहे. पण याच वेळी आणखीहि एक मुद्दा लक्ष्यात ठेविला पाहिजे. मुसलमानांनी हिंदुस्थान देश जिंकण्यापूर्वी एकदोन शतकें आमच्या अवनतिकालास सुरवात झाली. त्या वेळी या बुद्धि<noinclude></noinclude>
mayvo5yn5ybcmzxz9yffg6pjyv4uxyw
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३२
104
66797
233240
154979
2026-07-17T11:55:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233240
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|आपणांपुढील कार्य.|२२७ }}
{{rule}}</noinclude>वैभवाचे स्तोम अतिरेकास गेले होते. राष्ट्राची कर्तृत्वशक्ति हळू हळू लयास जात होती. बुद्धीच्या या अतिरिक्त आणि फाजील महत्वामुळे तिचा खरा जोम नाहीसा होऊन तीहि अवनतीच्या मार्गाला जाऊ लागली. ही अवनति कोणत्याही एका विशिष्ट वस्तू पुरतीच नसून तिचा व्याप हिंदुस्थानांतील साऱ्याच गोष्टींत थोडा फार आढळून येतो. साहित्यसंगीतादि कला घ्या, अथवा भौतिक शास्त्रे घ्या, तिचा प्रवेश कोठे नाही असे नाही. कलांत अवश्य असणारा दृष्टीचा चौफेरपणा कोठेच दिसेनासा झाला. सौन्दर्याच्या कल्पनांतील उदात्तपणा नाहीसा झाला. नुसत्या बाह्य आकारांतील रेखीवपणाची कल्पनाही नाहीशी झाली, आणि यांच्या जागी भपकेबाज बेडौल आणि अगडबंब अशी पद्धति प्रचारांत येऊ लागली. नव्या कल्पना उत्पन्न करण्याचा जिवटपणा हिंदूंच्या मेंदूत राहिला नाहीसे दिसते. प्राचीन संस्कृत संगीतांत हृदयाला हालवून सोडण्याची जी शक्ति होती, तिचा प्रत्यय या काळांतील संगीतांत कोठेही येईनासा झाला. प्रत्येक स्वराला जें स्वातंत्र्य म्हणून असावें तें नष्ट झाले. अर्वाचीन कालचे संगीत म्हणजे अनेक स्वरांची नुसती खिचडी होय. तानांच्या गिरक्यांत अनेक स्वर अशा रीतीने एकत्र गुरफटतात की, त्यांतील कोणाही एकाचा स्वतंत्र पत्ता लागत नाही. संगीताची ही अवनतावस्था आहे. केवळ कल्पनेच्या साम्राज्याकडे तुम्ही पाहिले तरी तेथेही हाच प्रकार तुम्हांस आढळून येईल. जुन्या पुराण्या आणि उष्ट्या कल्पना डामडौलाच्या आणि भपकेबाज भाषेच्या शृंगारांत मांडलेल्या तुम्हांस आढळतील. येथेही नुसत्या बाह्य शृंगाराच्या भपक्यावर तुमचे डोळे भारून टाकण्याचा हा यत्न असल्याचे तुमच्या प्रत्ययास येईल. या पोषखाच्या आंत कल्पनेचा नवीनपणा असा कोठेच आढळावयाचा नाही. धर्म विचार ही आपली खास हक्काची बाब आहे असें तुम्ही समजतां, पण या बाबींत झालेल्या अवनतीस कोठे तोडही सांपडावयाची नाहीं; आणि असे होणे हे युक्तच आहे. पाणी पितांना भांडे उजव्या हातांत असावें की डाव्या हातांत असावें, असल्या प्रकारच्या प्रश्नांना अत्यंत निकडीचे महत्त्व देऊन त्यांच्या चर्चेत शेकडो वर्षाच्या काळाचा अपव्यय ज्यांनी केला, असल्या तत्त्ववेत्त्यांच्या बुद्धीतून अधिक चांगली फलप्राप्ति ती काय होणार? ज्या देशांतील अत्यंत विशाल बुद्धीचे लोकही स्वयंपाक घरांतल्या गोष्टींची चर्चा करण्यांत शेंकडों वर्षे खर्च करि<noinclude></noinclude>
2pbcitogiv8hidubc0uc8szdi6x59og
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३३
104
66798
233241
155367
2026-07-17T11:58:21Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233241
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२२८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|}}
{{rule}}</noinclude>तात, त्यांच्या अवनतीबद्दल अधिक काही सांगण्याचे कारणही नाही. कोणी कोणाला स्पर्श करावा आणि कोणाचा स्पर्श झाला असता कसले प्रायश्चित्त असावें, असल्या श्रुष्क चर्चेला जेथें तत्त्वज्ञानाचे प्राधान्य मिळाले होते, तेथें अवनती कळसास पोंचावी यांत नवल नाही. असल्या शुष्क विचारांचे रान पुढे इतकें माजलें की, ज्यांचा प्रकाश साऱ्या जगाला पुरून उरावा असली वेदान्त तत्त्वरत्नेही अर्धी मुर्धी मलिन होऊन गेली. या माजलेल्या रानांत त्यांचे थोडें बहुत रक्षण काहीं संन्याशांनी केले, यामुळे आज ती आपल्या नजरेस तरी पडत आहेत. हे अरण्यवासी संन्यासी आपल्या पूर्वजांचे अमूल्य धन अशा रीतीने मोठ्या शर्थीने रक्षीत असतात. बाकीचा सारा देश स्पर्शास्पर्शविचार, सोंवळे ओवळे आणि अन्न यांच्या गोष्टी करीत बसला होता. या नंतर मुसलमानांच्या स्वाऱ्यांस लवकरच सुरवात झाली. मुसलमानांपासूनही आम्हांस कित्येक चांगल्या वस्तूची प्राप्ति झाली आहे. साऱ्या चांगल्या वस्तूंचा संग्रह कोणा एकाच्याच हाती असावा असा ताम्रपट परमेश्वरानें कोणालाही दिलेला नाही. एखाद्या अतिश्रेष्ठ मनुष्याला अत्यंत कनिष्ठापासूनही काहीच बोध घेतां येण्यासारखा नसतो असें नाहीं. मुसलमानांपासून काही चांगल्या वस्तू आम्हांस मिळाल्या खऱ्या, पण त्यांजपासून हिंदु वंशाला नव्या जोमाची प्राप्ति झाली नाही. यानंतर या देशाचा राजदंड ईश्वरसत्तेने इंग्रजांच्या हाती गेला. एक देश दुसऱ्याच्या ताब्यांत जाणे ही गोष्ट केव्हाही झालें तरी वाईटच. परकीय सरकार ही देशावरील मोठी आपत्ति आहे, यांत संशय नाही; पण वाइटांतूनहि चांगल्याची निपज होते हे विसरतां कामा नये. या नियमाला अनुसरून या परकीय सत्तेपासूनही हिंदुस्थानाला एक मोठा फायदा झाला आहे. इंग्लंडच्याच नव्हे तर साऱ्या युरोपाच्या अर्वाचीन संस्कृतीचे जनकत्व ग्रीक संस्कृतीकडे आहे. युरोपांतील प्रत्येक वस्तूच्या पोटी ग्रीक संस्कृतीचे बीज आहे. युरोपांतील प्रत्येक इमारत आणि घरांतील सामानसुमानाचा प्रत्येक तुकडा आपले मूलस्थान जगजाहीर करीत असतो. ग्रीक संस्कृतीचा छाप जीवर पडलेला नाही, अशी एकहि वस्तु साऱ्या युरोपांत तुम्हांस आढळावयाची नाही. युरोपांतील अर्वाचीन शास्त्रे आणि कला ही ग्रीक जननीचींच लेंकरें आहेत. अशा स्थितीत इंग्लंड आणि हिंदुस्थान यांचा संगम म्हणजे ग्रीक आणि हिंदुसंस्कृतीचा संगम होय.<noinclude></noinclude>
6owv1c1uhalc6ujlyg0o0qsumtzwn0t
अनुक्रमणिका:काशी-रामेश्वर यात्रा.pdf
106
104084
233227
232890
2026-07-16T16:37:42Z
कल्पनाशक्ती
3813
233227
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[काशी-रामेश्वर यात्रा]]
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=पुणे
|Year=1936
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=V
|Pages=<pagelist 3="फोटो" 5="प्रस्तावना" 8="अनुक्रमणिका" 10="नकाशा" 12="यात्रामार्ग व यात्राकाल" 17="रामेश्वर व सेतुरामेश्वर" 28 ="फोटो" 29="फोटो" 34="मदुरा" 42 ="फोटो" 43="फोटो" 46="फोटो" 51="कोडैकनाल" 55="फोटो" 56="फोटो" 65="फोटो" 66="फोटो" 69="डिंडिंगल आणि पालघाट" 76="पालघाट - कोइमतुर" 84="नीलगिरीवरील विलायत" 87="फोटो" 88="फोटो" 95="फोटो" 96="फोटो" 107="दक्षिण-काशी : श्रवणबेलगोला" 113="फोटो" 114="फोटो" 123="जबलपूर" 125="फोटो" 126="फोटो" 129="फोटो" 130="फोटो" 133="फोटो" 134="फोटो" 149="प्रयाग अथवा अलाहाबाद" 161="फोटो" 162="फोटो" 171="फोटो" 172="फोटो" 187="काशी अथवा बनारस" 203="फोटो" 204="फोटो" 207="फोटो" 208="फोटो" 212="गया व सारनाथ" 217 ="फोटो" 218="फोटो" 227 ="फोटो" 228 ="फोटो" 233 ="फोटो" 234 ="फोटो" 235="अयोध्या"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
lg4rxjnrdx00g7fdjksdkyq4pug8cfs
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२३५
104
110913
233208
232891
2026-07-16T12:09:52Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233208
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रकरण १३ वें.'''}}}}
{{rule|7em}}
{{center|'''अयोध्या'''}}
{{rule|5em}}
<br>
{{Block center|<poem>'''कोसलो नाम मुदितः स्फीतो जनपदो महान् ।'''
'''निविष्टः सरयूतीरे प्रभूतधनधान्यवान् ॥'''
'''अयोध्या नाम नगरी तत्रासील्लोकविश्रुता ।'''
'''मनुना मानवेन्द्रेण या पुरी निर्मिता स्वयम् ॥'''
'''आयता दश च द्वे च योजनानि महापुरी ।'''
'''श्रीमती त्रीणि विस्तीर्णा सुविभक्तमहापथा ॥'''
'''राजमार्गेण महता सुविभक्तेन शोभिता ॥'''
'''मुक्तपुष्पावकीर्णेन जलसिक्तेन नित्यशः ॥'''
'''तां तु राजा दशरथी महाराष्ट्रविवर्धनः ।'''
'''पुरीमावासयामास दिवि देवपतिर्यथा ॥'''</poem>}}
{{gap}}हिंदुस्थानांतील फार पुरातन काळपासून प्रख्यात असलेल्या सात नगरांपैकीं "अयोध्या मथुरामाया काशीकांची अवन्तिका । पुरी द्वारावती चैव सप्तैताः मोक्षदायिकाः ।" या सुभाषिताप्रमाणें अयोध्या हे पहिलें शहर होतें. वाल्मीकि रामायणांतील अवतरणावरून कोसल देशाच्या दशरथ राजाची ती राजधानी असून ती नगरी फारच सुंदर व संपन्न अशी होती. रामाचे काळीं तर तिचें वैभव अधिकच वाढलेलें होतें.<br>{{gap}}कालिदासानें रघुवंशामध्ये अयोध्येच्या नांवापलीकडे फारसें वर्णन केलें नाहीं. पण त्यानें रावणवधानंतर राम विमानांतून परत अयोध्येच्या नजीक आला तेव्हां दुरून दिसणाऱ्या शरयू नदीचें फारच सुंदर वर्णन केलें आहे व रामाला त्या नदीबद्दल किती विलक्षण प्रेम वाटत होतें हे<noinclude></noinclude>
0j9bsah0cjunis1jpgxgrqet1cd9n4s
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२३२
104
111004
233207
2026-07-16T12:01:50Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233207
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८८ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>तेव्हांपासून बाराव्या शतकापर्यंत सारनाथ येथें बौद्धधर्माचें वर्चस्व होतें व नवे नवे विहार बांधले जात होते. हिंदुधर्मी व जैनधर्मी लोकांनीं येथें देवळें बांधली. पण त्यांनीं बौद्ध विहारांचा नाश केला नाहीं. फे हायन व हुएन सग हे चिनी प्रवासी सारनाथ येथें येऊन गेले होते. फे हायन म्हणतो कीं, आपल्या काळीं चार स्तूप व दोन विहार होते; तर हुएन सँग म्हणतो कीं, आपल्या काळीं १५०० बुद्ध भिक्षू सारनाथ येथें रहात असत. यावरून हुएनसँगच्या काळीं सारनाथ चांगल्या भरभराटींत होतें असें दिसतें. सारनाथ या बोद्ध धर्माच्या पवित्रस्थानावर पुष्कळ वेळां पैशाच्या लोभानें स्वाऱ्या करण्यांत आल्या. पण सारनाथचा पुरा नायनाट महमद घोरीचा सेनापति कुतुबुद्दीन यानें काशीचा राजा जयचंद याच्या पराभवानंतर केला. तेव्हांपासून सारनाथ हे ठिकाण जाळपोळीच्या राखमातीमध्यें गडदून गेलें व अर्वाचीन काळापावेतों त्याचा मागमूसही लागला नव्हता. पण बनारसचा प्रख्यात राजा चेतसिंग याचा दिवाण बाबू जगत्सिंग याच्या हुकमावरून सारनाथ येथील जागा विटांकरितां खणीत असतांना कामकऱ्यांना शिलालेख व इतर वस्तु सांपडल्या. नंतर सन १८९५ मध्ये जमीन उकरण्यांत आली व त्यांत सुंदर मूर्ती सांपडल्या. हिंदुस्थान सरकारच्या पुराण-वस्तु-संशोधन खात्याचे पहिले डायरेक्टर जनरल सर अलेकझँडर कनिंगघाम यांनीं सन १८३४ पासून १८३६ पर्यंत सारनाथ येथे पुष्कळ उकरण्याचे काम केलें व सारनाथ स्थानाचें केवढे महत्त्व व विस्तार होता हे दाखवून दिलें. तेव्हांपासून मधून मधून उकरण्याचें काम चालू होतें. तें सर जॉन मार्शलच्या कारकीर्दीमध्ये पुरें होऊन तेथें मोठें पदार्थसंग्रहालय बांधण्यांत आलें. पुढें महाबोधी सभेनें नवें देऊळ बांधून व तेथें पालीचीं शाळा व वाचनालय काढून सारनाथ स्थानाला त्याचें पूर्ववैभव व पूर्वपावित्र्य आणून दिलें व म्हणून हल्लीं काशीस जाणारा प्रत्येक प्रवाशी सारनाथ पाहिल्याखेरीज राहात नाहीं.<br><br><br>{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
rcmgeqlw70u577fj012lzj8zrv7pj5k
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२४८
104
111005
233209
2026-07-16T12:11:00Z
कल्पनाशक्ती
3813
/* मजकुराविना */
233209
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
6pewiyyebyc8m42d8lu6xlv59f2mxdm
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२४७
104
111006
233210
2026-07-16T12:11:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ नाशिक त्र्यंबकेश्वर ९७ निलगिरी ६९-७६ पंचन ९ पायकारा ७७-७८ पालघाट ४,५४-५५, ५७-६० पालनी ३७ पिलर रॉक्स ४५ पेरियार (नदी) ३६ प्रयाग २,१३८ - १४० फर्नहिल ( स्टेशन ) ६७, ७१ फारचे ७७ बनारस..."
233210
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
नाशिक त्र्यंबकेश्वर ९७ निलगिरी ६९-७६ पंचन ९
पायकारा ७७-७८
पालघाट ४,५४-५५, ५७-६० पालनी ३७ पिलर रॉक्स ४५ पेरियार (नदी) ३६
प्रयाग २,१३८ - १४०
फर्नहिल ( स्टेशन ) ६७, ७१ फारचे ७७
बनारस हिंदू विश्वविद्यालय १६१-१६५ बनारसबाट १६६-१७१
अरशाला फॉल्स ४०
भद्रचाहू
भारतवर्ष ६
मद्रास काँग्रेस 3
मदुरा २२
मदुरा - इतिहास २४- २७
मदुरा - तलाव ३०-३२
रामेश्वर ३, ७, १२-१६ राजमल ८९ रानडे प्रो. ११९
राणीचा जाहिरनामा १४१-१५० लव्हडेल ( स्टेशन ) ६७ लक्ष्मीपतिया ८१ लिमये हरिभाऊ प्रो. २ विलिंगटन ( स्टेशन ) ६७ वुडस्टॉक ७९
| वेधशाळा ( कोडैकनाल ) ४५ शरयू (नदी) १९०, १९५-१९७ शारदा देवालय ११३ शोला ७०, ७६,८०
श्रवण चेलगोला ४, ८१, ८३-९६ सरोवर (कोडैकनाल ) ३९
संगमरवरी खडक (जबलपुर ) १०१-
१०३
साने ७३
सारनाथ १८१-१८८
सिल्व्हर फॉल ३८
मर्कटी ७६
महाराष्ट्र ६
मनोळकर ७३
मदनमहाल १०९
मंडपम् २१
मीनाक्षी २७-२८
मेटुपलायम् ६४-६५
मेदुर अंधारा ३६
रामायण ६
सुम्भय्या शास्त्रीजी ८५
सेतुरामेश्वर १६-१८ सेतुपती - रामनाद १९
| सेतुपती- उदयन १९ सेतुपती - तिरुमलाई १९ सेतुपती - पण्मुग नागनाथ २० स्पेन्स ट्रेनिंग कॉलेज १०७ हायस्कूल (महाराष्ट्र ) १०६ हिंगोजीराव ७७<noinclude></noinclude>
lx2i4feu53pfnhimvl6yxmziyg1mmrs
233226
233210
2026-07-16T16:33:37Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233226
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{|class="_class"
|-</noinclude>{{nopt}}
|-
|{{ts|br}}|नाशिक त्र्यंबकेश्वर ९७<br>निलगिरी ६९-७६<br>पंचन ९<br>पायकारा ७७-७८<br>पालघाट ४,५४-५५, ५७-६०<br>पालनी ३७<br>पिलर रॉक्स ४५<br>पेरियार (नदी) ३६<br>प्रयाग २,१३८ - १४०<br>फर्नहिल (स्टेशन) ६७, ७१<br>फारबे ७७<br>बनारस हिंदू विश्वविद्यालय १६१-१६५<br>बनारस-घाट १६६-१७१<br>बेअरशोला फॉल्स ४०<br>भद्रबाहू ८८<br>भारतवर्ष ६<br>मद्रास काँग्रेस 3<br>मदुरा २२<br>मदुरा - इतिहास २४- २७<br>मदुरा - तलाव ३०-३२<br>मर्कुटी ७६<br>महाराष्ट्र ६<br>मनोळकर ७३<br>मदनमहाल १०९<br>मंडपम् २१<br>मीनाक्षी २७-२८<br>मेटुपलायम् ६४-६५<br>मेटुर बंधारा ३६<br>रामायण ६
|| रामेश्वर ३, ७, १२-१६<br>राजमल्ल ८९<br>रानडे प्रो. ११९<br>राणीचा जाहिरनामा १४१-१५०<br>लव्हडेल (स्टेशन) ६७<br>लक्ष्मीपतिया ८१<br>लिमये हरिभाऊ प्रो. २<br>विलिंगटन (स्टेशन) ६७<br>वुडस्टॉक ७९<br>वेधशाळा (कोडैकनाल) ४२<br>शरयू (नदी) १९०, १९५-१९७<br>शारदा देवालय ११३<br>शोला ७०, ७६,८०<br>श्रवण बेलगोला ४, ८१, ८३-९६<br>सरोवर (कोडैकनाल) ३९<br>संगमरवरी खडक (जबलपुर) १०१-१०३<br>साने ७३<br>सारनाथ १८१-१८८<br>सिल्व्हर फॉल ३८सुम्भय्या शास्त्रीजी ८५<br>सेतुरामेश्वर १६-१८<br>सेतुपती - रामनाद १९<br>सेतुपती- उदयन १९<br>सेतुपती - तिरुमलाई १९<br>सेतुपती - षण्मुग नागनाथ २०<br>स्पेन्स ट्रेनिंग कॉलेज १०७<br>हायस्कूल (महाराष्ट्र) १०६<br> हिंगोजीराव ७७
|}
</center>
<br>
{{rule|3em}}<noinclude></noinclude>
o8090g134vxhft2mgiditav48qa8y0q
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२४६
104
111007
233211
2026-07-16T12:11:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ सूचि. अर्सिकेरी ४ अयोध्या ५,१८९, १९१-१९२ अष्टपुत्रे १० अनामलाई ४९ अरखंकडु (स्टेशन ) ६७ अलाहाबाद विश्वविद्यालय १२४ अलाहाबादचा किल्ला १२९-१३३ आर्यवर्त ६ उटकमंड ४,६८,७३ गया १७..."
233211
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
सूचि.
अर्सिकेरी ४
अयोध्या ५,१८९, १९१-१९२
अष्टपुत्रे १०
अनामलाई ४९
अरखंकडु (स्टेशन ) ६७
अलाहाबाद विश्वविद्यालय १२४
अलाहाबादचा किल्ला १२९-१३३
आर्यवर्त ६
उटकमंड ४,६८,७३
गया १७२-१८०
गंधमादन १५
गुडलूर ६९ गोमतेश्वर ९१-९३
गोंडवन ९८
गौरीशंकर (जबलपूर ) १०३ - १०४
चन्नरायपाटणा ८४
૮૭
चंद्रगुप्त (मौर्य) ८
चामुंडराय ८९
कलकत्ता काँग्रेस २
चायना पीक ७६
कर्नाटक ६
चेर ६
काशीरामेश्वर यात्रा १, ३
चोल ६
जाफना ७
काशी २, १५५-१५९
कालर (स्टेशन ) ६५
कानेटकर गंगूनाना प्रो. ९७
जॉन मिस्टर ३६ टोडा लोक ७२
कुन्नूर (स्टेशन ) ६५
डिंडिंगल ४९-५४ तलाई मानार ७
कुंडा ७६
केरल ६
दक्षिणापथ ६
केटी (स्टेशन ) ६७
कोडैकनाल ३५-४८
दक्षिण काशी दंडकारण्य ६
८३
कोइमतूर ६१-६३
कोकर्स चॉक ४४ कोट्टागिरी ७५ खुखूचाग १२७-१२८
गन्हा ९०
दादाभाई नवरोजी २
देशपांडे १०
दोडाबेटा ४९, ५४, ७३, ७५ · धनुष्कोडी ७
धबधबा (नर्मदेचा) १०० - १ १<noinclude></noinclude>
mfnel5fe494gvwtco752fwuh6w4ar40
233224
233211
2026-07-16T15:50:44Z
कल्पनाशक्ती
3813
233224
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{xx-larger|{{center|'''सूचि.'''}}}}
{{rule|3em}}
{|
|-
|अर्सिकेरी ४<br>अयोध्या ५,१८९, १९१-१९२<br>अष्टपुत्रे १०<br>अनामलाई ४९<br>अरवंकडु (स्टेशन) ६७<br>अलाहाबाद विश्वविद्यालय १२४<br>अलाहाबादचा किल्ला १२९-१३३<br>आर्यावर्त ६<br>उटकमंड ४,६८,७३
|| style="border-left:1px solid;"|गया १७२-१८०<br>गंधमादन १५<br>गुडलूर ६९<br>गोमतेश्वर ९१-९३<br>गोंडवन ९८<br>गौरीशंकर (जबलपूर) १०३ - १०४<br>चन्नरायपाटणा ८४<br>चंद्रगुप्त (मौर्य) ८७ <br>चामुंडराय ८९
|}
कलकत्ता काँग्रेस २
चायना पीक ७६
कर्नाटक ६
चेर ६
काशीरामेश्वर यात्रा १, ३
चोल ६
जाफना ७
काशी २, १५५-१५९
कालर (स्टेशन ) ६५
कानेटकर गंगूनाना प्रो. ९७
जॉन मिस्टर ३६ टोडा लोक ७२
कुन्नूर (स्टेशन ) ६५
डिंडिंगल ४९-५४ तलाई मानार ७
कुंडा ७६
केरल ६
दक्षिणापथ ६
केटी (स्टेशन ) ६७
कोडैकनाल ३५-४८
दक्षिण काशी दंडकारण्य ६
८३
कोइमतूर ६१-६३
कोकर्स चॉक ४४ कोट्टागिरी ७५ खुखूचाग १२७-१२८
गन्हा ९०
दादाभाई नवरोजी २
देशपांडे १०
दोडाबेटा ४९, ५४, ७३, ७५ · धनुष्कोडी ७
धबधबा (नर्मदेचा) १०० - १ १<noinclude></noinclude>
7s644i7688vzb44npu3hr2fs2f41ajg
233225
233224
2026-07-16T16:32:41Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233225
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{xx-larger|{{center|'''सूचि.'''}}}}
{{rule|3em}}
<center>
{| style="text-align:left; width:80%;"
|-
|{{ts|br}}|अर्सिकेरी ४<br>अयोध्या ५,१८९, १९१-१९२<br>अष्टपुत्रे १०<br>अनामलाई ४९<br>अरवंकडु (स्टेशन) ६७<br>अलाहाबाद विश्वविद्यालय १२४<br>अलाहाबादचा किल्ला १२९-१३३<br>आर्यावर्त ६<br>उटकमंड ४,६८,७३<br>कलकत्ता काँग्रेस २<br>कर्नाटक ६<br>काशीरामेश्वर यात्रा १, ३<br>काशी २, १५५-१५९<br>कालर (स्टेशन) ६५<br>कानेटकर गंगूनाना प्रो. ९७<br>कुन्नूर (स्टेशन) ६५<br>कुंडा ७६<br>केरल ६<br>केटी (स्टेशन) ६७<br>कोडैकनाल ३५-४८<br>कोइमतूर ६१-६३<br>कोकर्स चॉक ४४<br>कोट्टागिरी ७५<br>खुस्रूबाग १२७-१२८<br>गऱ्हा ९८<br>
|| गया १७२-१८०<br>गंधमादन १५<br>गुडलूर ६९<br>गोमतेश्वर ९१-९३<br>गोंडवन ९८<br>गौरीशंकर (जबलपूर) १०३ - १०४<br>चन्नरायपाटणा ८४<br>चंद्रगुप्त (मौर्य) ८७ <br>चामुंडराय ८९<br>चायना पीक ७६चेर ६<br>चोल ६<br>जाफना ७<br>जॉन मिस्टर ३६<br>टोडा लोक ७२<br>डिंडिंगल ४९-५४<br>तलाई मानार ७<br>दक्षिणापथ ६<br>दक्षिण काशी ४, ८३<br>दंडकारण्य ६<br>दादाभाई नवरोजी २<br>देशपांडे १०<br>दोडाबेटा ४९, ५४, ७३, ७५<br>धनुष्कोडी ७<br>धबधबा (नर्मदेचा) १०० - १ १<br><noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
50u1j5ekkeb1f2ej84kjtcnkodo5fs3
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२४५
104
111008
233212
2026-07-16T12:12:01Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ अयोध्या १९९ संपन्न जमीनदाराची एक तसबीर होती. तसेंच येथें संगमरवरी दगडावर कांहीं लेखही होता. कनक देवालय या नांवाला साजेल अशा तऱ्हेचें हे देवालय आहे यांत मात्र शंका नाहीं;..."
233212
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
अयोध्या
१९९
संपन्न जमीनदाराची एक तसबीर होती. तसेंच येथें संगमरवरी दगडावर कांहीं लेखही होता. कनक देवालय या नांवाला साजेल अशा तऱ्हेचें हे देवालय आहे यांत मात्र शंका नाहीं; कारण बांधकाम उच्च दर्जाचे असून देवळाच्या शिखराला सोन्याचा मुलामा दिलेला आहे.
झालें. माझें अयोध्येचे दृश्यदर्शन येवढंच. वाटाड्याला ठरलेले पैसे देऊन मी स्टेशननजीकच्या धर्मशाळेत आलों. मग लगेच स्टेशनवर आलों; व आगगाडीची वाट पहात बसलों. आगगाडी येतांच गाडीत बसून दिल्लीकडे रवाना झालों.
पहिल्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे माझी काशी - रामेश्वर यात्रा तीन हप्त्यांनीं पुरी झाली. रामेश्वर पाहिल्यापासून दोन वर्षांनीं मीं अयोध्या हैं शहर पाहिलें. वाल्मीकी रामायणांत वर्णिलेल्या किंवा कालिदासानें रघुवंशांत वर्णिलेल्या मार्गानें माझा प्रवास झाला नाहीं. अर्वाचीन काळच्या सुलभ प्रवास साधनांच्या अनुकूलतेनुरूप व माझ्या आवडीनुसार मी प्रवास मार्ग आखला. पण या माझ्या प्रवासवर्णनांत हिंदुस्थानांतील आम्हां हिंदूंचीं प्रमुख यात्रा स्थळें व पवित्र स्थानें यांचा अंतर्भाव झाला आहे. तसेंच जैनांना अत्यंत पवित्र अशा जैन काशी किंवा श्रवणबेलगोला नांवानें प्रसिद्ध असलेल्या निसर्गरमणीय व कलाकमनीय पवित्र स्थानाचा अंतर्भाव झाला आहे. तसेंच युरोपीयनांना प्रिय अशा दोन शीतल निवासस्थानांचा अंतर्भाव झाला आहे, तर इतिहासप्रिय लोकांना आव- डणाऱ्या दोन किल्यांचाही समावेश झाला आहे.
.
धार्मिक दृष्ट्या मला माझ्या यात्रेचें फळ मिळो अथवा न मिळो. पण आरोग्य दृष्ट्या, सृष्टिसौंदर्यदर्शनदृष्ट्या, नानाविधानुभवदृष्ट्या या माझ्या यात्रेचे मला सद्यः फळ मिळालें यांत शंका नाहीं. मला या याझ्या लांबच्या पण हप्त्याहप्त्यानें केलेल्या यात्रेचें राहून राहून स्मरण होतें व या स्मरणानें माझ्या मनाला करमणूक व विरंगुळा वाटतो. या पुस्त- काच्या वाचकांस माझ्या इतका नाहीं तरी दुय्यम दर्जाचा आनंद व करमणूक वाटल्यास माझ्या लेखन श्रमाचें सार्थक झालें असें मला वाटेल.<noinclude></noinclude>
kgbhdxorltq6q33wa2w1ysfvwqptgq4
233223
233212
2026-07-16T15:37:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233223
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||अयोध्या|१९९ }}</noinclude>संपन्न जमीनदाराची एक तसबीर होती. तसेंच येथें संगमरवरी दगडावर कांहीं लेखही होता. कनक देवालय या नांवाला साजेल अशा तऱ्हेचें हे देवालय आहे यांत मात्र शंका नाहीं; कारण बांधकाम उच्च दर्जाचे असून देवळाच्या शिखराला सोन्याचा मुलामा दिलेला आहे.<br>{{gap}}झालें. माझें अयोध्येचे दृश्यदर्शन येवढंच. वाटाड्याला ठरलेले पैसे देऊन मी स्टेशननजीकच्या धर्मशाळेत आलों. मग लगेच स्टेशनवर आलों; व आगगाडीची वाट पहात बसलों. आगगाडी येतांच गाडीत बसून दिल्लीकडे रवाना झालों.<br>{{gap}}पहिल्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे माझी काशी- रामेश्वर यात्रा तीन हप्त्यांनीं पुरी झाली. रामेश्वर पाहिल्यापासून दोन वर्षांनीं मीं अयोध्या हे शहर पाहिलें. वाल्मीकी रामायणांत वर्णिलेल्या किंवा कालिदासानें रघुवंशांत वर्णिलेल्या मार्गानें माझा प्रवास झाला नाहीं. अर्वाचीन काळच्या सुलभ प्रवास साधनांच्या अनुकूलतेनुरूप व माझ्या आवडीनुसार मी प्रवास मार्ग आखला. पण या माझ्या प्रवासवर्णनांत हिंदुस्थानांतील आम्हां हिंदूंचीं प्रमुख यात्रा स्थळें व पवित्र स्थानें यांचा अंतर्भाव झाला आहे. तसेंच जैनांना अत्यंत पवित्र अशा जैन काशी किंवा श्रवणबेलगोला नांवानें प्रसिद्ध असलेल्या निसर्गरमणीय व कलाकमनीय पवित्र स्थानाचा अंतर्भाव झाला आहे. तसेंच युरोपीयनांना प्रिय अशा दोन शीतल निवासस्थानांचा अंतर्भाव झाला आहे, तर इतिहासप्रिय लोकांना आवडणाऱ्या दोन किल्यांचाही समावेश झाला आहे.<br>{{gap}}धार्मिक दृष्ट्या मला माझ्या यात्रेचें फळ मिळो अथवा न मिळो. पण आरोग्य दृष्ट्या, सृष्टिसौंदर्यदर्शनदृष्ट्या, नानाविधानुभवदृष्ट्या या माझ्या यात्रेचे मला सद्यःफळ मिळालें यांत शंका नाहीं. मला या याझ्या लांबच्या पण हप्त्याहप्त्यानें केलेल्या यात्रेचें राहून राहून स्मरण होतें व या स्मरणानें माझ्या मनाला करमणूक व विरंगुळा वाटतो. या पुस्तकाच्या वाचकांस माझ्या इतका नाहीं तरी दुय्यम दर्जाचा आनंद व करमणूक वाटल्यास माझ्या लेखन श्रमाचें सार्थक झालें असें मला वाटेल.<Br>
{{rule|5em}}{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
i350g4v1rzrhx7kx2v8qra0u18shv5b
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२३६
104
111009
233213
2026-07-16T12:12:29Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ १९० काशी - रामेश्वर यात्रा सांगितलें आहे. तें वर्णन येथें उतरून घेण्यालायक आहे म्हणून तें येथें देतों:- पयोधरैः पुण्यजनाङ्गनानां निर्विष्टहेमांबुजरेणु यस्याः । ब्राह्म..."
233213
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
१९०
काशी - रामेश्वर यात्रा
सांगितलें आहे. तें वर्णन येथें उतरून घेण्यालायक आहे म्हणून तें येथें देतों:-
पयोधरैः पुण्यजनाङ्गनानां निर्विष्टहेमांबुजरेणु यस्याः । ब्राह्मं सरः कारणमाप्तवाचो बुद्धेरिवाव्यक्तमुदाहरन्ति ॥ जलानि या तीरनिखातयूपा वहत्ययोध्यामनु राजधानीम् । तुरंगमेधावभृथावतीर्णैरिक्ष्वाकुभिः पुण्यतरीकृतानि ॥
यां सैकतोत्सङ्गसुखोचितानां प्राज्यैः पयोभिः परिवर्धितानाम् । सामान्यधात्रीमिव मानसं मे संभावयत्युत्तरको सलानाम् ॥ सेयं मदीया जननीव तेन मान्येन राज्ञा सरयूर्वियुक्ता । दूरे वसन्तं शिशिरानिलैमी तरंगहस्तैरुपगूहतीव ॥
ज्याप्रमाणें सांख्यप्रक्रियेमध्यें अव्यक्त तत्त्व है बुद्धीचें उगमस्थान समजलें जातें, त्याप्रमाणेंच या सरय नदीचें मानस सरोवर-की जेथें यक्षस्त्रिया मनसोक्त जलविहार करतात - हैं उगमस्थान समजलें जातें.
जिच्या तीरावर ठिकठिकाणीं ग्रुप ( यज्ञस्तंभ ) उभारलेले आहेत आणि जिचें पाणी इक्ष्वाकु वंशातील राजांनीं अनेक अश्वमेध यज्ञ करून अवभृथस्नानें केल्यामुळे अत्यंत पवित्र झालेलें आहे अशी ही नदी अयोध्या नगरीच्या जवळून वहात जाते.
मला वाटतें की ही सरयू नदी म्हणजे या उत्तरकोसल देशाची जननीच आहे. कारण हा उत्तरकोसल देश तिच्या तीररूपीं उत्संगावर ( मांडीवर ) मोठ्या सुखांत वसलेला असून, तिच्या जलरूपी दुधानें त्याचे पोषण व वर्धन होत आहे.
अशी ही सरयू नदी - त्या माझ्या परमपूज्य पित्याच्या ( दश- रथाच्या ) मृत्यूमुळें वियोगिनी झालेली जणूं कांहीं माझी माताच - फारा दिवसांनी घराकडे परत येणाऱ्या मला आपल्या तरंगरूपी हस्तांनी आलिंगन देत आहे असेंच मला वाटतें.<noinclude></noinclude>
o0zrqtzqcewfqts6j5nrd6w13vv76fa
233214
233213
2026-07-16T14:53:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233214
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१९० |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>सांगितलें आहे. तें वर्णन येथें उतरून घेण्यालायक आहे म्हणून तें येथें देतों:-
{{Block center|<poem>'''पयोधरैः पुण्यजनाङ्गनानां निर्विष्टहेमांबुजरेणु यस्याः ।'''
'''ब्राह्मं सरः कारणमाप्तवाचो बुद्धेरिवाव्यक्तमुदाहरन्ति ॥'''
'''जलानि या तीरनिखातयूपा वहत्ययोध्यामनु राजधानीम् ।'''
'''तुरंगमेधावभृथावतीर्णैरिक्ष्वाकुभिः पुण्यतरीकृतानि ॥'''
'''यां सैकतोत्सङ्गसुखोचितानां प्राज्यैःपयोभिः परिवर्धितानाम् ।'''
'''सामान्यधात्रीमिव मानसं मे संभावयत्युत्तरकोसलानाम् ॥'''
'''सेयं मदीया जननीव तेन मान्येन राज्ञा सरयूर्धियुक्ता ।'''
'''दूरे वसन्तं शिशिरानिलैमी तरंगहस्तैरुपगूहतीव ॥'''</poem>}}
{{gap}}ज्याप्रमाणें सांख्यप्रक्रियेमध्यें अव्यक्त तत्त्व हे बुद्धीचें उगमस्थान समजलें जातें, त्याप्रमाणेंच या सरयू नदीचें मानस सरोवर- की जेथें यक्षस्त्रिया मनसोक्त जलविहार करतात- हे उगमस्थान समजलें जातें.<br>{{gap}}जिच्या तीरावर ठिकठिकाणीं यूप (यज्ञस्तंभ) उभारलेले आहेत आणि जिचें पाणी इक्ष्वाकु वंशातील राजांनीं अनेक अश्वमेध यज्ञ करून अवभृथस्नानें केल्यामुळे अत्यंत पवित्र झालेलें आहे अशी ही नदी अयोध्या नगरीच्या जवळून वहात जाते.<br>{{gap}}मला वाटतें की ही सरयू नदी म्हणजे या उत्तरकोसल देशाची जननीच आहे. कारण हा उत्तरकोसल देश तिच्या तीररूपीं उत्संगावर (मांडीवर) मोठ्या सुखांत वसलेला असून, तिच्या जलरूपी दुधानें त्याचे पोषण व वर्धन होत आहे.<br>{{gap}}अशी ही सरयू नदी- त्या माझ्या परमपूज्य पित्याच्या (दशरथाच्या) मृत्यूमुळें वियोगिनी झालेली जणूं कांहीं माझी माताच- फारा दिवसांनी घराकडे परत येणाऱ्या मला आपल्या तरंगरूपी हस्तांनी आलिंगन देत आहे असेंच मला वाटतें.{{nop}}<noinclude></noinclude>
59w0w2fv5kdqvw4z748b95hk8hv2rly
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२३७
104
111010
233215
2026-07-16T15:04:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233215
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||अयोध्या|१९१ }}</noinclude>{{gap}}पण रामानंतर अयोध्या राजधानी राहिली नाहीं व तिचें वैभव नष्ट झाले. कारण रामाचा थोरला मुलगा कुश यानें नवीन नगरी वसविली व तेथें तो रहावयास गेला. तेव्हां अयोध्या नगरीची अधिदेवता स्त्रीरूपानें कुशास भेटावयास आली. या गोष्टीचें वर्णन कालिदासानें खालीलप्रमाणें केलें आहे.
{{Block center|<poem>'''अथार्धरात्रे स्तिमितप्रदीपे शय्यागृहे सुप्तजने प्रबुद्धः ।'''
'''कुशः प्रवासस्थकलत्रवेषामदृष्टपूर्वी वनितामपश्यत् ॥'''
'''सा साधुसाधारणपार्थिवर्ध्देः स्थित्वा पुरस्तात्पुरुहूतभासः ।'''
'''जेतुः परेषां जयशब्दपूर्वे तस्याञ्जलिं बन्धुमतो बबन्ध ॥'''
'''अथानपोढार्गलमप्यगारं छायामिवादर्शतलं प्रविष्टाम् ।'''
'''सविस्मयो दाशरथेस्तनूजः प्रोवाच पूर्वार्धविसृष्टतल्पः ॥'''
'''लब्धान्तरा सावरणेऽपि गेहे योगप्रभावो नच लक्ष्यते ते ।'''
'''विभर्षि चाकारमनिर्वृतानां मृणालिनी हैममिवोपरागम् ॥'''
'''का त्वं शुभे कस्य परिग्रहो वा किंवा मदभ्यागमकारणं ते ।'''
'''आचक्ष्व मत्वा वशिनां रघूणां मनः परस्त्रीविमुखप्रवृत्ति ॥'''
'''तमब्रवीत्सा गुरुणानवद्या या नीतपौरा स्वपदोन्मुखेन ।'''
'''तस्याः पुरः संप्रति वीतनाथां जानीहि राजन्नाधिदेवतां माम् ॥'''
'''वस्वौकसारामभिभूय साहं सौराज्यबद्धोत्सवया विभूत्या ।'''
'''समग्रशक्तौ त्वाय सूर्यवंश्ये सति प्रपन्ना करुणामवस्थाम् ॥'''</poem>}}
{{gap}}एकदा मध्यरात्रीच्या वेळीं, शय्यागृहामधील प्रदीप अत्यंत संथपणे तेवत असतां, व राजवाड्यांतील लोक गाढ झोपले असतां, कुश जागा झाला आणि त्याला एक अत्यंत दीन व निकृष्ट वेष धारण करणारी, पूर्वी कधीही न पाहिलेली अशी स्त्री दिसली.<br>{{gap}}इंद्राप्रमाणे तेजस्वी, आणि उदार व शूर अशा त्या कुश राजाचा जयजयकार करून ती स्त्री त्याच्यापुढे नम्रपणे हात जोडून उभी राहिली.<br>{{gap}}राजवाड्याची सर्व दारें बंद असून सुद्धां, आरशामध्यें प्रतिबिंब<noinclude></noinclude>
l6reek52qxja1w1tidx2odtp7vd85ip
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२३८
104
111011
233216
2026-07-16T15:10:37Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233216
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१९२ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>शिरावें त्याप्रमाणें आंत शिरलेल्या त्या स्त्रीला पाहून कुश हा आश्चर्यचकित झाला, आणि आपल्या बिछान्यावर कांहींसा उठून बसत तो तिला म्हणाला:<br>{{gap}}"हे स्त्रिये, राजवाडा बंद असतांना सुद्धां तूं आंत आलेली दिसतेस. बरं, तसें म्हटलें तर कांहीं योगशक्ति तुझ्याजवळ असावी असेही वाटत नाहीं. कारण एकादी कमलिनी हिमवृष्टीमुळे कोमेजून जावी त्याप्रमाणें तूं दुःखी कष्टी दिसत आहेत." "तर मग तूं आहेस तरी कोण? तूं कोणाची पत्नी आहेस? आणि माझ्याकडे येण्यांत तुझा कोणता बरें हेतु आहे? अगदीं मनमोकळे करून सर्व कांहीं मला सांग. कारण जितेन्द्रिय अशा आम्हां रघुवंशांतील पुरुषांची मनें परस्त्रीविषयीं अत्यंत शुद्ध आणि निरभिलाष असतात."<br>{{gap}}तेव्हां ती स्त्री त्याला म्हणाली: "हे राजा, तुझ्या परमपूज्य वडिलांनीं (रामचंद्रांनीं) जेव्हां स्वर्गगमन केलें, तेव्हां त्यांनी स्वतःबरोबर अयोध्येतील नागरीकही नेले. त्यामुळे ती अयोध्या नगरी सध्या अनाथ झाली आहे. व त्याच अयोध्यानगरीची मी अधिदेवता आहे."<br>{{gap}}"एके काळी रामराज्याचे वेळीं मी इतकी कांहीं समृद्ध होतें कीं, मीं कुबेराची नगरी जी अलका तिच्यावरही ताण केली होती. पण आतां मात्र सकल ऐश्वर्यसंपन्न असा तूं सूर्यवंशांतील राजा असून देखील मी अगदी विपन्न स्थितीस येऊन पोहोंचलें आहे."<br>{{gap}}अशा तऱ्हेनें अयोध्यानगरीने आपली दैन्यावस्था कुशाजवळ निवेदन केली व त्याला त्या नगरीची करुणा येऊन तो परत अयोध्येस आला असें कालिदासानें वर्णन केलें आहे. अर्थात् असें दिसतें कीं, इतिहासपूर्वकाळीं सुद्धां अयोध्यानगरीला चक्रनेमिक्रमाप्रमाणें कधीं उन्नतीचे व कधीं अवनतीचे दिवस येऊन गेले होते. ज्या नगरीचीं अशीं स्थित्यंतरे इतिहासपूर्वकाळी सुद्धां झालीं त्या नगरीच्या वैभवाला इतिहासकाळीं सुद्धां भरती ओहोटी लागावी हें स्वाभाविक आहे.{{nop}}<noinclude></noinclude>
0d8jy55qdvu089766fzoqn24ri6d5ob
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२३९
104
111012
233217
2026-07-16T15:14:34Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233217
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||अयोध्या|१९३ }}</noinclude>{{gap}}मुसलमानी अंमल उत्तर हिंदुस्थानांत सुरू झाल्यापासून अयोध्येचे महत्त्व व वैभव फार कमी झालें. कारण अयोध्येपासून तीन चार मैलावर फैजाबाद म्हणून नवें शहर मुसलमानी अंमलांत वसविण्यांत आलें व यामुळे अयोध्या ओस पडल्यासारखी झाली. जें काय शहर राहिलें त्याला सुद्धां सर्वस्वी मुसलमानी पेहेराव व स्वरूप आलें. यामुळें अर्वाचीन काळी माझ्यासारखा संस्कृत वाङ्मयाचा परिचय असलेला प्रवासी गेला व त्यानें हल्लीचें मुसलमानी पेहेरावाचें शहर पाहिलें म्हणजे त्याच्या तोंडांतून 'हीच का रामाची अयोध्या' असे खेदाचे उद्गार सहज बाहेर पडतात. माझी तीच गोष्ट झाली. तरी अयोध्येच्या पूर्वपीठिकेचा अधिक पाल्हाळ न लावतां माझ्या अयोध्येच्या दृश्यदर्शनवर्णनाकडे वळतो.<br>{{gap}}मागें सांगितल्याप्रमाणें ता. ८ एप्रिल सन १९३५ रोजी पहांटेस चार वाजतां मी काशी स्टेशनहून अयोध्येस जाण्यास निघालों. काशीपासून अयोध्या सुमारें १२० मैल दूर आहे व ती काशीच्या थेट वायव्येस आहे. प्रयागच्या थेट उत्तरेस अयोध्या आहे. म्हणजे प्रयाग काशी अयोध्या हा एक त्रिकोण बनतो व या त्रिकोणाच्या उत्तर टोकाशीं अयोध्या आहे. हा त्रिकोणाकृती भूमिभाग गंगानदी व शरयू किंवा गोग्रा या दोन नद्यांच्या दुबेळक्यामध्यें आहे. ज्याप्रमाणें गंगा यमुना नद्यांचा संगम प्रयाग येथे झाला आहे त्याप्रमाणे पाटणा किंवा पाटलीपुत्र या शहराच्या आसपास पूर्वेकडून आलेली गंगा, दक्षिणेकडून आलेली शोणनदी व वायव्येकडून आलेली शरयु किंवा गोग्रा नदी व उत्तरेकडून आलेली गंडक नदी अशा चार मोठमोठ्या नद्यांचा संगम झालेला आहे. आमची आगगाडी ज्या भागांतून जात होती तो भूमिभाग याप्रमाणें नद्यांनीं व्याप्त असल्यामुळे सुजल व सुपीक आहे. यामुळे जिकडे तिकडे हिरव्यागार बागा व शेतें सारखीं लागत रहातात व प्रवास करतांना मनाला फार उल्हास वाटतो. सभोंवार ती मनोहर सृष्टिशोभा पहात असतांना वेळाचें भान रहात नाहीं. सुमारें चाळीस मैल गेल्यावर आम्हांला जानपूर नांवाचें जंक्शन स्टेशन लागलें. हेंही एका<noinclude><br>{{gap}}१३</noinclude>
kgaxca5q396jizv5301kezr7kmuwnto
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२४०
104
111013
233218
2026-07-16T15:20:22Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233218
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१९४ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>नदीचें कांठीं आहे असे दिसले. येथून प्रयागला एक आगगाडीचा फांटा जाऊन मिळतो. आणखी वीस मैलावर शहागंज जंक्शन स्टेशन लागलें. येथून पूर्वेकडे पाटणाकडे आगगाडीचा फांटा जातो. पुढें आणखी तीस मैल गेल्यावर अकबरपूर जंक्शन स्टेशन लागलें. येथून टांगा या गांवापुरता दहा मैलांचा एक फाटा फुटतो. आणखी एकदोन मैल गेल्यावर एकदांचे अयोध्या स्टेशन आलें. सुमारें १२० मैलांत तीनचार आगगाडीचे फाटे लागले. यावरून या भागांत आगगाड्यांचें जाळे पसरलेलें आहे असें दिसून आलें. मी अयोध्या स्टेशनला सव्वा नऊ वाजतां पोहोंचलों. स्टेशन व आगगाडीचा रस्ता थोड्या उंचवट्यावर आहे. पण अयोध्येच्या आसपास इतकी दाट झाडी आहे कीं, शहरांतील घरें व इमारती मुळींच दिसत नाहींत. यांपैकीं पुष्कळशीं झाडे ताडामाडाचीं आहेत. ताडमाड हे समुद्रकाठीं वाळवंटी जमिनींत होणारे वृक्ष आहेत. त्यांची या हिमालयाच्या पायथ्याच्या नजीकच्या भागांत विपुलता पाहून मला प्रथम फार नवल वाटलें. पण पुढे शहराच्या आसपासचा भूमिभाग विशेषतः शरयू नदी पाहिल्यावर तें नवल नाहींसें झालें. कारण हा सर्वभाग वाळवंटी पांढऱ्या शुभ्र जमिनीचाच आहे व अशा वाळवंटी व विपुल पाण्याच्या भागांत ताडामाडांची झाडी व्हावी हें स्वाभाविक आहे. असो. स्टेशनसमोर पुष्कळच खुली जागा असून ती हरळीनें हिरवीगार राखण्यांत आली आहे. पांढरी वाळवंटी जमीन व त्यावर हिरवळ व आसपास हिरव्यागार झाडांच्या रांगा हा देखावा नयनमनोहर दिसला व त्यामुळे अयोध्या शहराचा प्रथमच मनावर अनुकूल परिणाम झाला. स्टेशनच्या नजीक आगबोटीच्या धक्क्यावरील छोट्या तिकिट घरासारखें घर दिसलें. अयोध्येस यात्रेकरू येतात त्यावेळी खूप गर्दी जमते म्हणून हे एक खुल्या जागेवर यात्रेच्या प्रसंगी उपयोगाकरितां जादा तिकिट घर केलेलें आहे असें कळलें. ही योजना यात्रेकरूंना सोयीची आहे व ती कंपनीनें केलेली आहे हे पाहून मला सानंद आश्चर्य वाटलें.{{nop}}<noinclude></noinclude>
mdmf4z3brtslpe6dfbsmlnl8hhfsq00
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२४१
104
111014
233219
2026-07-16T15:23:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233219
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||अयोध्या|१९५ }}</noinclude>{{gap}}स्टेशन नजीक एका दुमजली व स्वच्छ अशा धर्मशाळेत एका खोलींत मी आपलें सामान हमालामार्फत आणून टाकविलें व मग जवळच असलेल्या मिठाईवाल्याकडून पुरीभाजी आणून आधीं पोटोबाची पूजा केली. मग खोलीला कुलूप लावून मी अयोध्येच्या दृश्यदर्शनास निघालों.<br>{{gap}}रामानें ज्या शरयूचें आपली आई म्हणून प्रेमानें वर्णन केलें तीच प्रथम पाहण्याचा मी बेत केला. शरयू नदी शहराच्या उत्तरेस आहे. हें ठाऊक असल्यामुळें टांगा करून मी प्रथम नदीकडे जाण्यास निघालों. अर्थात् शहराच्या हमरस्त्यामधूनच गेलों. हा रस्ता चांगला प्रशस्त असून तो निर्धूळ डामरी केलेला होता. उत्तर हिंदुस्थानांतील व विशेषतः संयुक्त प्रांतांतील मोठमोठ्या शहरांतील रस्ते अलीकडे डामरी करण्यांत आल्यामुळे या सर्व शहरांना पुष्कळ स्वच्छतेचें स्वरूप आलेले दिसलें. अयोध्या शहरामधून जातांना इतिहासपूर्व काळापासून प्रख्यात अशा सप्तशहरांपैकीं तें एक आहे असें म्हणण्यासारखें एकही चिन्ह मला दिसलें नाहीं. सर्व शहर मुसलमानी धाटणीचें व राहणीचें दिसलें. आधीं मशीदीसारखीं सर्व घरें, दुकानें व इमारती पांढऱ्या शुभ्ररंगी दिसत होत्या. शिवाय सार्वजनिक इमारतींना मुसलमानी पद्धतीचे मनोरे, सज्जे व गच्च्या आहेत असें दिसून आलें. सारांश, सध्याची अयोध्या तरी मुसलमानी अंमलांत वसलेली असावी व हिंदू काळच्या किंवा इतिहास पूर्वकाळच्या शहराचा नायनाट झाला असला पाहिजे असें पदोपदी दिसून येत होतें. शहराच्या शेवटीं डाव्या हातास राणीच्या संगमरवरी पुतळ्यानें शोभायमान झालेली छोटीशी खुली व हिरवळीनें आच्छादलेली बाग दृष्टीस पडली. राणीचा शुभ्र संगमरवरी हुबेहुब पुतळा पाहून तर मी थक्क झालों व या बागेसमोर क्षणभर उभा राहून तिच्या सौंदर्याचा आस्वाद घेतल्याखेरीज माझ्याच्याने राहावेना. मुंबईतील प्रख्यात राणीच्या पुतळ्यापेक्षां सुद्धां हे काम जास्त कलाकौशल्याचें आहे असे मला वाटलें. तो पांढराशुभ्र व सुंदर संगमरवरी पुतळा, व त्यावरील ती संगमरवरी<noinclude></noinclude>
20dlmq9ksstkv54gz739ivgamg50ajd
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२४२
104
111015
233220
2026-07-16T15:26:17Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233220
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१९६ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>मेघडंबरी, तिचे ते छोटे पण सुबक चार मनोरे हे सर्व पांढरेशुभ्र दिसत होते. सभोवारच्या सर्व मोकळ्या जागेवर हिरवीगार हरळी लावलेली असून ती यंत्रानें सारखी कापलेली होती. यामुळें दुरून ती हिरव्यागार लोकरीच्या गालिच्यासारखी थेट दिसत होती. पांढऱ्या हिरव्या रंगाचा तो मिलाफ फार मनोहर दिसत होता यांत शंका नाहीं. ज्याप्रमाणें उत्तर हिंदुस्थानांतील मोठमोठ्या शहरांमध्ये मी हल्लीं जिकडे तिकडे डामरी निर्धूळ व स्वच्छ रस्ते पाहिले त्याचप्रमाणे या सर्व शहरांमधून राणीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त निर्माण केलेलीं सुंदर स्मारके व राणीचे पुतळे पाहिले. यावरून आमच्या महाराष्ट्रापेक्षां गंगायमुनाकाठचे प्रदेश जास्त सुपीक व सधन असले पाहिजेत असे सहजच वाटलें. याप्रमाणें राणीचा पुतळा व स्मारक पाहून माझ्या मनांत विचार येत आहेत तोंच डामरी रस्ता संपला व माझ्यासमोर पांढरा शुभ वालुकामय अफाट प्रदेश जणूं कांहीं उभा ठाकला. तो पाहून मी आश्चर्यानें थक्कच झालों. टांगेवाल्यानें सांगितलें कीं, शरयू नदी आली व आतां नदी प्रवाहापर्यंत चालत गेलें पाहिजे! या नदीला नेहेमीचे नदीचें स्वरूप मुळींच नाहीं. या नदीला नदीचा कांठ किंवा नदीची दर नाहीं; नदीला पाणी दिसलें नाहीं; नदीच्या काठी झाडें नाहींत. रस्ता सरला की लागलीच वाळवंट लागते. इतकें नदीचें पात्र उथळ व पसरट आहे. येथें मला सेतु रामेश्वरची आठवण झाली. कारण दोन्ही ठिकाणच्या देखाव्यामध्यें विलक्षण साम्य आहे! ती पांढरी शुभ्र, स्वच्छ व मऊ मऊ वाळू तुडवीत व सभोवार पांढऱ्या शुभ्र देखाव्याचें कौतुक करीत मी पुढे पुढे चाललों. तेव्हां वाळूत केलेल्या छोट्या झोंपड्या व त्यांत बसावयास केलेली तक्तपोशी दिसली व तेथे पंडये दिसले. यात्राविधी करण्याबद्दल त्यांनी हिंदीमध्यें माझ्याजवळ रदबदली वजा चौकशी केली. मी यात्रा करण्याकरितां आलों नाहीं; फक्त देश पाहण्याकरितां आलों आहे असें मोडक्या तोडक्या हिंदी भाषेंत मी त्यांना सांगितलें. इतक्यांत एक तरुण वाटाड्या भेटला. त्याला आठ आणे<noinclude></noinclude>
tc6mqwxkd9bhn7riqh3noceyn8h5cpk
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२४३
104
111016
233221
2026-07-16T15:29:25Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233221
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||अयोध्या|१९७ }}</noinclude>देण्याचे कबूल करून गांवांतील देवालयें दाखविण्याकरितां बरोबर घेतला. शेवटीं एकदां आम्ही नदीचे प्रवाहाजवळ आलो. फल्गू किंवा शोणनदीप्रमाणें ही नदी निर्जला दिसली नाहीं. पाण्याचा प्रवाह बराच रुंद पण फार उथळ असावा असें वाटलें. शेजारींच तराफ्याचा प्रवाहासरसा एक तात्पुरता पूल दिसला (Pontoon bridge). हा पूल फक्त आठमाही करतात. या नदीला कायमचा पूल नाहीं; कारण पावसाळ्यामध्यें नदीचें पाणी थेट रस्त्यापर्यंत येतें व तेव्हां नदीचे पात्र अफाट रुंद होतें व येवढा मोठा पूल करणे कठीण आहे असें वाटाड्यानें सांगितलें. या नदीचें समुद्रासारखें अफाट वाळवंट पाहिलें म्हणजे गंगा यमुना नदीकाठचा प्रदेश फार पुरातनकाळीं जलमय असून तेथें समुद्र होता हा भूगर्भ शास्त्राचा शोध खरा असावा असे मनाला पटतें यांत शंका नाहीं. याप्रमाणें शरयू नदीचा तो चिरस्मरणीय देखावा व कालिदासानें केलेल्या त्या नदीच्या वर्णनाचा हुबेहुबपणा यांचे आश्चर्य करीत उशीर होईल म्हणून मी परतलों व टांग्याशीं आलों. मग वाटाड्यासकट टांग्यांत बसून शहरांतील हिंदू देवळें पाहण्यास परत शहराकडे गेलों.<br>{{gap}}अयोध्या शहरांत इतर हिंदू पवित्र स्थानांप्रमाणें देवळे पुष्कळ आहेत. तीं सर्व पाहण्यांत अर्थ नाहीं. म्हणून मी वाटाड्यास मुख्य व मोठीं देवळें दाखविण्यास सांगितलें. त्याप्रमाणें त्यानें शहराच्या निरनिराळ्या भागांत असलेलीं पांच सात देवळें दाखविलीं. एक हनुमानाचे देवालय जरा उंचवट्यावर आहे. त्याची बांधणी प्रेक्षणीय वाटली. तसेंच दोन तीन रामाची देवळेंही पाहण्यासारखी आहेत. पण काशी, मथुरा, वृंदावनाप्रमाणें बांधकला दृष्टीनें उच्च दर्जाचीं अशीं देवळें अयोध्येमध्ये दिसली नाहींत. हिंदुस्थानभर ज्या प्रकारचीं देवळें असतात त्याच प्रकारचीं हीं देवळें दिसली. रामाचें जन्मस्थान म्हणून एक ठिकाण दाखविण्यांत आलें. तेथें जाण्यास थोड्या पायऱ्या चढाव्या लागल्या. पण वर जाऊन पाहतों तों तेथें एक मोठी मशीद, तिचे मनोरे व भिंत दिसली व त्या पुढील खुल्या जागेत एक झोंपडीवजा छोटीशी इमारत<noinclude></noinclude>
i21v89bf3ztv9n2qxm01326lb67e582
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२४४
104
111017
233222
2026-07-16T15:34:40Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233222
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१९८ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>दाखविण्यांत आली व हे रामाचें जन्मस्थान म्हणून मला सांगण्यांत आलें! उत्तरकोसलासारख्या मोठ्या राज्याचा राजा दशरथ. त्याच्या मुलाचा जन्म अशा जागेंत व अशा इमारतींत झाला हे ऐकून मला हसू आले व आमच्या हिंदू लोकांच्या भाविकपणाची कीव आली पंडे लोकांच्या लुच्चेगिरीचा राग आला. मथुरेंत ज्याप्रमाणें निरनिराळीं ठिकाण दाखवून कृष्णाचा जन्म येथे झाला; या कुंडांत कृष्णाचीं चिरगुटें धुतलीं; अमुक ठिकाणीं कृष्णाला यशोदेनें उखळीशी बांधून ठेवलें इत्यादि गप्पा सांगून पंडे व यमुनादास यात्रेकरूंकडून पैसे उकळतात त्याप्रमाणे येथला प्रकार दिसला. आधीं सर्व शहर मुसलमानी धर्तीचें व मुसलमानी काळचें दिसतें. रामाच्या काळच्या इतिहासपूर्व काळचा येथें मागमूसही दिसत नाहीं. तरी भाविक यात्रेकरूंना कांहीं तरी थापा मारून त्यांचेकडून दक्षिणा मिळविण्याचा सपाटा चालूंच आहे हें पाहून माझ्या मनाला खेद वाटला! हे खेदजनक विचार कनक देवालय नांवाचे नवेंच देवालय पाहून नाहींसे झाले. कारण सर्व अयोध्येमध्यें इतकें सुंदर व सुबक बांधणीचें दुसरें देवालय मी पाहिलेंच नाहीं. या देवळाचें पुढें खुला चौक आहे. यामुळे देवालयाची इमारत उठावांत दिसते. पुढे कमानदार असा मोठा व्हरांडा आहे व सभामंडप बराच लांब पण किंचित् अरुंद आहे. हिंदू देवळाच्या सभा मंडपासारखा न दिसतां तो मुसलमानी मशीदी सारखा वाटला. तेव्हां या प्रांतांतील हिंदू बांधकलापद्धती सुद्धां मुसलमानी धर्तीवर गेली आहे असे मला वाटलें. ज्या प्रमाणें काश्मीरांत हिंदूचा पोशाखही मुसलमान धर्तीचा झालेला आहे व म्हणून तेथले पंडित दुरून ओळखणे कठीण पडतें तसाच येथें बांधकलापद्धतीचा प्रकार झाला आहे असें हें सुंदर देऊळ पाहून मला वाटलें. देऊळ सुंदर खरें पण त्याची बांधणी, त्याचा पांढरा रंग व एकंदर ठेवण मशीदीसारखी पाहून मला आश्चर्य वाटलें. या देवळाच्या सभामंडपांत तसबिरा टांगल्या होत्या; त्यांत देऊळ बांधणाऱ्या<noinclude></noinclude>
0d66ou2q60yrcx4va9qnnssc05c1olf
काशी-रामेश्वर यात्रा
0
111018
233228
2026-07-16T16:39:25Z
कल्पनाशक्ती
3813
नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = काशी-रामेश्वर यात्रा | साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = | वर्ष = 1936 | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="काशी-रामेश्वर यात्र..."
233228
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = काशी-रामेश्वर यात्रा
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील =
| पुढील =
| वर्ष = 1936
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="काशी-रामेश्वर यात्रा.pdf" from=1 to=247 />
tuiqiapqftleezxk0c4ly1apwpz6l3h
सदस्य चर्चा:Rohan Karvande
3
111019
233229
2026-07-16T18:19:53Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
233229
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Rohan Karvande}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) २३:४९, १६ जुलै २०२६ (IST)
5b4kfkd8yxt5u3hwyqyolo6909oxlbx
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/९
104
111020
233230
2026-07-17T06:42:48Z
~2026-40197-51
6110
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{center|{{larger|'''प्रस्तावना.'''}}}} {{gap}}'''विकासवाद''' हा प्रथम डार्विन साहेबांनी जीवनशास्त्राला (Biology) अनुलक्षून सप्रमाण प्रतिपादन केला. '''परमाणुजीवाचा''' किंवा '''जीवतत्वाचा''' (Protoplasm) '''परिस्थितीला अन..."
233230
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="117.198.30.170" /></noinclude>{{center|{{larger|'''प्रस्तावना.'''}}}}
{{gap}}'''विकासवाद''' हा प्रथम डार्विन साहेबांनी जीवनशास्त्राला (Biology) अनुलक्षून सप्रमाण प्रतिपादन केला. '''परमाणुजीवाचा''' किंवा '''जीवतत्वाचा''' (Protoplasm) '''परिस्थितीला अनुरूप विकास''' हा त्यांचा सिद्धांत होता •
परिस्थितीप्रमाणे उमलत जाणें हें सृष्टांचं इंगित आहे, अशी भावना वाढतांच
सृष्टीमध्यें '''खंड''' (Break or Discontinuity ) नसून सर्वत्र रूपांतर
( Transformation ) आहे असें दिसूं लागलें; सृष्टीमध्यें समूळ नाश
नसून परंपरा व अवशेष आहेत अशी खात्री वाटू लागली. विकासवाद
जसजसा विद्वानांना मान्य होऊं लागला तसतसा जीवनशास्त्राच्या बाहेर त्याचा
परिणाम होऊं लागून इतर सर्व विद्यांची पाहणी सुरू झाली. विद्वानांना विकास-
वादाने नवी दृष्टी दिल्याने जुन्या शास्त्रांना चालन मिळाले, व नवीं उत्पन्न
झाली.
आतां परंपरा, परिस्थिती, व अवशेष ह्मणजे मागचा व आजचा
संबंध; आणि मागचा व आजचा संबंध ह्मणजे इतिहास हैं उघड आहे.
यास्तव विकासवाद व त्याच्या अंतर्भूत कल्पना यांचा पहिला परिणाम असा
झाला कीं, शास्त्रांच्या परंपरेकडे व वाढीकडे लोकांचे विशेष लक्ष जाऊं लागलें;
त्यांचे इतिहास प्रसिद्ध झाले; शास्त्रीयपद्धतीचे ऐतिहासिक पद्धती हैं एक
अंग आहे अशी खात्री होऊं लागली. इतर शास्त्रांबरोबर, समाजशास्त्रालाही ही
पद्धती लागू झाल्यामुळे समाजाच्या जीवनाचा, चैतन्याचा, आदर्श
अशा दृष्टीनें वाङ्मयाचा अभ्यास सुरू झाला: समाज व सारस्वत यांचा
संबंध ध्यानांत येऊं लागला.
ऐतिहासिकपद्धतीनें वाङ्मयाची पाहणी Henri Taine या प्रसिद्ध
फ्रेंच विद्वानाने प्रथम केली. यांचा सन १८६३ साली लिहिलेला आंग्ल-
वाङ्मयाचा इतिहास" प्रत्येकाच्या ऐकिवात आहे. हा ग्रंथ आतां पाठीमागे
पडण्याचें कारण एवढेच की, त्यांत विवेचन केलेली पद्धती सर्वत्र मान्य
झाली आहे, नवीन असें त्यांत कांहीं उरलें नाहीं, आणि ग्रंथाचे कार्य पुरतेपणी
तडस गेलें आहे. मात्र ऐतिहासिक पद्धतीशिवाय इतर टाकाऊ अशी जी
Taine यांची वृत्ती होती ती इतरांना मान्य झाली नाही. कारण सारस्वताचा<noinclude></noinclude>
7wxlup87yyjz1rbctjn7sxfseiq5ql1
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१०
104
111021
233231
2026-07-17T06:43:46Z
~2026-40197-51
6110
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "समाजाशी जरी संबंध जोडला तरी त्याचा व्यक्तींशीं असलेला संबंध कायम राहतोच. सारस्वत जरी समाजाच्या चैतन्याचा आदर्श असले तरी तें प्रतिभा- संपन्न लेखकांच्या चिरस्मरणीय व सुंदर शब्द..."
233231
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="~2026-40197-51" /></noinclude>समाजाशी जरी संबंध जोडला तरी त्याचा व्यक्तींशीं असलेला संबंध कायम
राहतोच. सारस्वत जरी समाजाच्या चैतन्याचा आदर्श असले तरी तें प्रतिभा-
संपन्न लेखकांच्या चिरस्मरणीय व सुंदर शब्दकृतींचा संग्रहही
आहे हैं विसरणें शक्य नाहीं.
परिस्थितीप्रमाणें उगवणें, बदलणें, उमलणें हा विकासवादाचा मुख्य
सिद्धांत असल्यामुळे, एका देशांत जी परिस्थिती, जी परंपरा, आढळून आली,
जे अवशेष राहिले, तीच परिस्थिती, तीच परंपरा, व तेच अवशेष इतरत्र
आढळले पाहिजेत अशी ऐतिहासिक पद्धतीने होणारी समजुत चुकीची आहे,
असा प्रत्यय येऊं लागला. " आपण तसे इतर " हैं जितके खरें आहे तितकेंच
“ नवी परिस्थिती व नवी सृष्टी" हेही खरें आहे, असा अनुभव येऊं लागला.
अनेक देशांतल्या परंपरा व अवशेष यांची तुलना करण्याची जरूर भासूं लागली.
अनेक परंपरा व अवशेष यांची तुलना करून जगांतला सारखेपणा व
फरक दोन्हींही उघड करणें हें तुलनात्मक पद्धतीचे उद्दिष्ट बनले.
ह्मणून Taine यांनीं ऐतिहासिकपद्धतीनें वाङ्मयाचा अभ्यास प्रचारांत
आणल्यानंतर तुलनात्मक पद्धतीची त्याला जोड देणे भाग पडलें. आणि
आतां तर वाङ्मयाचा पद्धतशीर अभ्यास ह्मणजे ऐतिहासिक व तुलनात्मक
पद्धतींनीं त्याचें परिशीलन असा अर्थ होऊं लागला आहे. ऐतिहासिक व
तुलनात्मक पद्धतींची जुन्या पद्धतीला मदत मिळाल्यामुळे पाश्चात्यांच्या
अध्ययनांत नवीन जोम आला आहे, वाड्मयांत जीवंतपणा कायम राहिला
आहे, व राष्ट्राच्या विस्ताराबरोबर सारस्वताचाही विस्तार वाढत आहे.
अशी सुस्थिती आपल्या इकडेही यावी, आपली भाषा, आपले वाङ्मय
वाढीस लागावें, शिक्षणाचा सर्वत्र प्रसार व्हावा, असें सुशिक्षितांना अलीकडे
वाटू लागले आहे. पण आमचे बहुतेक सर्व शिक्षण परभाषेंतून होत असल्या-
मुळे पाश्चात्यांच्या वाङ्मयाचा आस्वाद घेऊन कार्यभाग होत नाही. ज्या
उपायांनी त्यांनी स्वतःच्या भाषांचें, वाड्मयांचें, पुनरुज्जीवन केलें, त्यांचा जोम
कायम ठेवला, तेच किवा तसले उपाय आपणही योजणें अवश्य झालें आहे.
पाश्चात्यांचे अगदी अलीकडले उपाय ह्मणजे ऐतिहासिक व तुलना-
त्मकपद्धती यांचा वाङ्मयांत उपयोग हे होत. या दोन पद्धती विकास-
वादाच्या परिणामाची फळें आहेत हे वर दर्शविलेच आहे.<noinclude></noinclude>
5lq52kros8c6zt91k93as602cj5yfjj