विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.11
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf
106
1874
233274
233237
2026-07-18T07:33:48Z
कल्पनाशक्ती
3813
233274
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]]
|Language=mr
|Volume=
|Author=विवेकानंद
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=न. म. कुलकर्णी
|Address=
|Year=१९२२
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=V
|Pages=<pagelist 4="अनुक्रमणिका" 5="हिंदु देवालय फोटो" 6="एक उघडे रहस्य" 19="कैवल्याचा मार्ग" 32="याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी" 44="सांख्यविचार" 65="सांख्य आणि वेदान्त" 82="वेदान्त व हक्क" 107="हक्क" 118 ="अभ्यास" 141="भक्ति" 169 ="हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप" 201="हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते" 230="आपणांपुढील कार्य." 255="दानधर्म"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
75mvtubfipsl6brf4fipmk8hk5flf45
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३४
104
66799
233242
155375
2026-07-17T12:00:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233242
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|आपणांपुढील कार्य.|२२९ }}
{{rule}}</noinclude>अशा रीतीने प्राचीन हिंदु संस्कृतीला पुनः चालन मिळत आहे. या धक्क्याने आपली निद्रावस्था ती टाकीत आहे. ग्रीक संस्कृतीचे आगमन म्हणजे नव्या जिवटपणाचा प्रारंभ होय. आज हिंदुस्थानांत नव्या विचारांचा प्रसार दिसत आहे, नवी जागृती उत्पन्न झाली आहे, आणि अमूर्त कल्पनांना मूर्तरूप देण्याची धडपड सुरू झाली आहे, याचे कारण पाश्चात्य संस्कृतीचे येथे झालेलें आगमन हेच होय. मानवी जीविताबद्दलच्या आकुंचित कल्पना हळूहळू विराम पावत असून त्यांच्या जागी अधिक विस्तृत आणि अधिक उदार कल्पनांचा उदय होत आहे. ज्यांचा जन्म पूर्वी येथेच झाला, त्याच आतां येथे वाढीला लागल्या आहेत असे आपणांस आढळून येईल. आमच्या पूर्वजांनी त्यांना जन्म दिला पण दीर्घ काळपर्यंत त्या अमूर्तावस्थेत होत्या; आणि त्याच आतां मूर्तरूपास येऊ पहात आहेत. अधिक विस्तार पावणे, वाढीस लागणे, इतरांशी मिसळत जाणे, आणि अखेरीस विश्वरूप होणे, हे आपले अखेरचें साध्य आहे. पण हा आद्य हेतु दृष्टिआड करून दिवसेंदिवस आमचा परिघ आम्ही अधिक आकुंचित करू लागलो. जगांत मिसळण्याऐवजी त्यापासून आम्ही विभक्त होऊ लागलों आणि या विभक्तपणाबरोबरच श्रुति मातेने आम्हांस दिलेल्या ठेव्याच्या वारसदारीलाही आम्ही सोडचिट्ठी दिली.<br>{{gap}}या विस्तार पावण्याच्या मार्गात अनेक धोक्याची स्थळे आहेत; आणि यांपैकी प्रमुख म्हटलें म्हणजे आपणा स्वतःबद्दल फाजील घमेंड असणे हे होय. आम्ही परमेश्वराचे लाडके लोक आहो असें वाटणे ही या मार्गातील मोठी धोंड आहे. भारतभूमीवर माझें प्रेम अतिशय आहे, देशाभिमानांत मी कोणाला हार जाणार नाही, आणि पूर्वजांबद्दलची पूज्यबुद्धिहि अत्यंत जागृत आहे; पण असे असतांहि बाह्यदेशीयांकडून आपणांस शिकण्यासारखे असें पुष्कळ आहे असें म्हटल्यावांचून मला राहवत नाही. आपल्या ठिकाणी शिष्यभाव सदोदित जागा असावा. शिष्य म्हणून कोणाच्याहि पायांपाशी बसण्याची आपल्या चित्ताची तयारी असावी. कारण, ज्याच्यापासून आपणांस कोणताही मोठा बोध घेता येणार नाही, इतका मूढ प्राणी जगांत कोणीही नाही हे आपण लक्ष्यात ठेवले पाहिजे. अत्यंत क्षुद मनुष्यापासून आणि अंत्यजापासूनही सद्बोध घ्यावा, आणि सेवेच्या मार्गाने स्वर्गाचा पल्ला गांठावा असें मनूनेही म्हटले आहे. मनूचे खरे वंशज अशी संज्ञा स्वतःस न्यायाने लावून घेण्याची<noinclude></noinclude>
6cdy9fm56mbn5l40dkeaerhulmew70l
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३५
104
66800
233254
155377
2026-07-17T16:55:03Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233254
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२३० |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>आपली इच्छा असेल, तर त्याची आज्ञा आपण पाळली पाहिजे; आणि ज्या कोणापाशी आपणांस कांही देता येण्यासारखे असेल ते आपण मिळविले पाहिजे. सृष्टीचा हा विस्तृत ग्रंथ आपणांपुढे उघडलेला आहे. याच्या प्रत्येक पानांतून ज्ञान संपादन करणे हे आपले कर्तव्य कर्म आहे. तथापि येथे आणखीहि एक मुद्दा अवश्य लक्ष्यांत ठेविला पाहिजे. जगाला शिकविता येण्यासारखें आपणापाशीहि काही आहे हे विसरता उपयोगी नाही. स्वतःबद्दल फाजील अभिमान बाळगणे हे जसें अनिष्ट, तसेंच अभिमानशून्यता असणे हेहि अनिष्टच आहे. बाह्य जगाशी संबंध तोडून टाकून आपलें चालावयाचे नाही. बाह्य जगाशी आपणांस काही करावयाचें नाही, हा आपला जुना अभिमान मूर्खपणाचा होता, आणि या खोट्या अभिमानाला बळी पडल्या मुळेच आज हजार वर्षे गुलामगिरीची शिक्षा आपण भोगीत आहो. जगांत काय चालले आहे इकडे आपण लक्ष्य दिले नाही, आपण कोठे आहों आणि जग काय करीत आहे, याची तुलना आपल्या चित्ताशी आपण कधीच केली नाही. हिंदु मानसिक अवस्थेची जी दुर्दशा आज झालेली दिसत आहे, तिचे हे एक मोठे कारण आहे. असो; झालें तें होऊन गेले. आतां पुढला विचार तरी आपण नीट करूं या. परदेश गमन हे मोठे पातक आहे, असल्या प्रकारच्या बालिश कल्पना आपण टाकून दिल्या पाहिजेत. असल्या कल्पना पुऱ्या नष्ट करून टाकाव्या. बाह्य देशी तुम्ही जों जो अधिक प्रवास कराल, तो तो तुम्हांस आणि तुमच्या देशासहि तो अधिक हितकर होईल. गेली शेकडो वर्षे या मार्गाचा स्वीकार तुम्हीं केला असता तर आजची स्थिति तुम्हांस कधीच प्राप्त झाली नसती, आणि हिंदुस्थान देश आजच्याप्रमाणे कोणाच्याही हातचे खेळणे होऊन राहिला नसता. जेथें जिवटपणा म्हणून आहे तेथे विस्तार पावण्याची पात्रताहि अवश्यमेव असतेच. किंबहुना, विस्तार पावणे आणि वाढत जाणे हेच जिवंतपणाचे दृश्य चिह्न आहे. याकरितां, तुम्हांस जगावयाचे असेल तर विस्तार पावण्यावांचून दुसरा मार्गच तुम्हांस नाही. ज्या क्षणी ही विस्तार पावण्याची क्रिया बंद पडेल, त्याच क्षणीं मृत्यु तुम्हां वर झडप घालील. आपल्या डोळ्यांसमोर असलेले हे भयाचे स्थान नित्य ध्यानात ठेवूनच आपला पुढचा मार्ग आपण सुधारला पाहिजे. मी अमेरिकेचा आणि युरोपाचा प्रवास केला, याचाहि अर्थ हाच. भरतभू-<noinclude></noinclude>
el97azk0ie0dj8x5kllm5zpsqw7ru24
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३६
104
66801
233255
155381
2026-07-17T16:56:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233255
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|आपणांपुढील कार्य.|२३१ }}
{{rule}}</noinclude>मीच्या राष्ट्रीय पुनरुज्जीवनाचे हे पहिले चिह्न होते. जे पुनरुज्जीवन आंतून होऊ लागले होते, त्याला आता बाहेर पडण्यावांचून गत्यंतरच नव्हते. याकरितां, हा प्रवास मला टाळतां येण्यासारखाच नव्हता. जगाच्या ज्ञानांत जी कांहीं भर भरतभूमीने घालणें अवश्य होते ती घालण्याचा उपक्रम अशा रीतीने आतां सुरू झाला आहे. हिंदुस्थानांतील ज्ञानाचा प्रवाह बाह्यदेशी जाऊन वाहूं लागण्याची ही गोष्ट आजच प्रथम घडत आहे असें नाहीं. हिंदु लोक आपल्या सरहद्दीच्या चार भिंतींच्या आंत सदोदितचे कोंडलेले होते. असें तुम्हांपैकी कोणास वाटत असेल तर ती त्याची मोठी चूक आहे. विस्तृत ग्रंथभांडार न पाहिल्याचा हा परिणाम होय. कोणाला असे वाटते याचे कारण हेच की, त्याने हिंदुकुलाच्या संस्कृतीचा अभ्यासच केलेला नाही. तिचे बाल्य आणि तिची वाढ ही कशी झाली हे त्याला ठाऊक नसल्यामुळेच तो काही तरी बरळत सुटतो. कोणत्याही राष्ट्राला जगावयाचे असेल तर त्याने देवाण घेवाण केलीच पाहिजे. तुम्ही काही दिल्यावांचून तुम्हांस काही मिळावयाचें नाही, आणि तुम्हांस कोणाकडून कांहीं प्राप्त झाले तर त्याची वांटणी इतरांस तुम्ही दिलीच पाहिजे. ज्या अर्थी हिंदुस्थान धडधडीत जिवंत असलेला आपल्या डोळ्यांनी आपण पहातो, त्याअर्थी या गोष्टी त्याने केल्या असल्याच पाहिजेत हे कबूल करावयास नको काय? हिंदुस्थानांतून बाह्यदेशी ज्ञाननदीचा प्रवाह सदोदित वहात आहे, या गोष्टीची साक्ष हिंदुस्थानदेश जिवंत आहे हीच.<br>{{gap}}दुसऱ्यास देतां येण्याजोगी हिंदुस्थानाजवळील वस्तु धर्मज्ञान ही आहे. उच्च तत्त्वज्ञान, पराविद्या आणि धर्मज्ञान या वस्तू इतरांनी हिंदुस्थानापासून घेतल्या पाहिजेत; आणि यांत विशेष हा की, धर्माचा मार्ग साफसूफ करण्यास दुसऱ्या कोणाची मदत त्याला लागत नाही. पराविद्या आणि तत्त्वज्ञान यांना रक्ताची नदी पार होऊन जावे लागत नाही. माणसांची हाडें चुरडीत आपला प्रवास यांना करावा लागत नाही. स्वतःबरोबर तोफा बंदुका घेण्याचे कारण यांना पडत नाही. दंडनीतीचा आश्रय त्यांना करावा लागत नाही. प्रेम आणि शांति या दोन वस्तू बरोबर घेऊन या विद्या साऱ्या जगाचा प्रवास सुखरूप पणे करितात. हिंदुस्थानांतील धर्मविद्या आपले हे कार्य अशाच प्रकारे आज पर्यंत करीत आली आहे. मी लंडन येथे असता एका तरुणीने मला प्रश्न केला "तुम्ही हिंदूंनी आजपर्यंत काय केले आहे? एकहि देश आजपर्यंत<noinclude></noinclude>
hjyq65xapstjjjh7akau9m609eobwo9
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३७
104
66802
233256
155383
2026-07-17T16:59:36Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233256
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२३२ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>तुम्हीं जिंकिला नाही." ही गोष्ट अक्षरशः खरी आहे. पण ती इंग्रजांच्या दृष्टीने मात्र खरी आहे हे लक्ष्यात ठेविले पाहिजे. शूर, धाडसी आणि तरवार परजणाऱ्या क्षत्रियाच्या दृष्टीने देश जिंकणे हीच नरजन्माची इतिकर्तव्यता होय. त्याच्या दृष्टीने आम्ही निर्माल्यवत् दिसलों तर त्यांत नवल नाही; पण आमच्या दृष्टीने हीच परिस्थिति आम्हांस उलटी दिसते. हिंदुस्थानदेश सर्वश्रेष्ठ का, असा प्रश्न माझ्या चित्तांत उभा राहिला, तर त्याने कोणास जिंकलें नाही म्हणून, हेच उत्तर मला मिळतें. आमची मोठी प्रतिष्ठा हीच. हिंदुधर्म जेता नाही म्हणून तो दुबळा आणि त्याज्य आहे, अशी त्याची नालस्ती प्रत्यही तुमच्या कानी येते; आणि मोठ्या दुःखाची गोष्ट ही की, स्वतःस ज्ञानसंपन्न म्हणविणारी कांही चांगली माणसेंहि अशा प्रकारची नालस्ती करीत असतात. हिंदुधर्म जेता नाही हेच त्याच्या खरेपणाचे स्पष्ट लक्षण आहे असे मला वाटते. हिंदुधर्माने कधी तरवार परजिली नाही, आणि कधीं रक्तपातही केला नाही. याचे कारण हेच की, त्याच्या मुखांतून फक्त आशीर्वादाचे शब्द बाहेर पडतात. 'शांतिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु' या एकाच महामंत्राचा जप हिंदुधर्मानें आजवर केला आहे. सर्वांबद्दल सहानुकंपा आणि प्रेम एवढ्याच भावना त्याच्या चित्तांत आहेत. परमतसहिष्णुता प्रथम येथेच उदयास आली. तिचा वास साऱ्या जगांत दुसऱ्या कोठेहि नव्हता. प्रत्यक्ष व्यवहारांत तिचे स्वरूप प्रथम येथेच व्यक्त झालें. बाह्य देशी तिचें नांवही कोणास ठाऊक नव्हते. दुसऱ्या देशांत ही फक्त पुस्तकी विद्या आहे. लेख आणि भाषणे यांवाचून दुसऱ्या कोठेहि तिच्या अस्तित्वाचा प्रत्यय तुम्हांस यावयाचा नाही. ख्रिस्ती लोकांकरितां चर्चे आणि मुसलमानांकरितां मशिदी हिंदूंनी बांधाव्या ही गोष्ट फक्त हिंदुस्थानांतच शक्य आहे. अशा रीतीने हा धर्मसंदेश हिंदुस्थानांतून अनेक वेळां बाह्य देशी गेला आहे आणि त्याचे कार्य इतक्या शांतपणे चालले आहे की, ते कोणाच्या दृष्टिपथांतहि येत नाही. हिंदुस्थानाची मनोभूमिकाच अशा प्रकारची आहे. तिला गडबड आणि धडपड हीं खपायची नाहींत. हिंदुस्थानांतील धर्माची वाढ शुद्ध शांतीच्या साम्राज्यांत झाली आणि त्याच्यामागे जे सामर्थ्य आहे तें दंडाच्या रूपाने केव्हाही व्यक्तदशेला आले नाही. दुसऱ्यांची मनें हरण करून आपली छाप त्याने त्यांजवर पाडली. एखाद्या विदेशीयाने आमच्या<noinclude></noinclude>
auqenhbop1hhc8n6q91vvk9tddt154z
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३८
104
66803
233257
155402
2026-07-17T17:02:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233257
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|आपणांपुढील कार्य.|२३३ }}
{{rule}}</noinclude>तात्त्विक वाङ्मयाचा अभ्यास सुरू केला तर आरंभी त्याला तो कंटाळवाणा झाल्यावांचून राहणार नाही. अर्वाचीन वाङ्मयाप्रमाणे त्यांत चित्ताची गडबड उडविणारें विलक्षण उत्साहजनक अथवा विलक्षण क्रांतिकारक असें कांहींच त्याला आढळून यावयाचे नाही. वाचनास सुरवात केल्यावरोबर वाचकाचें चित्त एकदम आकर्षून जाऊन त्यांत मोठी खळबळ उडावी असे प्राचीन वाङ्मयांत कांहींच नाही. ख्रिस्ती धर्माचा इतिहास पाहिला तर त्याच्या नांवाखाली केवढे प्रचंड उत्पात युरोपांत घडून आले याचा विचार करा. याशी तुलना करण्यास आमच्या धर्माच्या इतिहासांत तुम्हांस कांहींच सांपडावयाचे नाही. यामुळे त्या वाङ्मयाचे वाचन आरंभापासूनच चित्तांत खळबळ उडवून देते. पण हा उत्साह अगदी क्षणिक असतो. पुस्तक मिटले की, त्याबरोबरच वाचकाचे चित्त कोरे होऊन जाते. आपण काय वाचलें याचीहि शुद्धि त्याला रहात नाही. हिंदुस्थानांतील धार्मिक वाङ्मय याहून अगदी वेगळ्या प्रकारचे आहे. ते शुद्ध शांततामय आणि अगदी थंड्या स्वभावाचे आहे. तुमच्या चित्तावर त्याचा पगडा तुम्हांस नकळत बसत असतो; पण तुमचा हा अभ्यास कांही काळ असाच चालू राहिला म्हणजे त्याचा पगडा तुमच्या चित्तावर इतका पक्का बसतो की, त्याचा मोह तुम्हांस अनिवार होतो. तुमच्या चित्तास बसलेली मिठी तुम्हांस सोडवत नाही. आमच्या वाङ्मयाच्या जाळ्यांत जो एकवार सांपडला त्याचे हातपाय त्यांत पक्के जखडले गेले ह्मणून समजावें.<br>{{gap}}रात्रीच्या प्रशांत समयीं दंव पडते, तेव्हा त्याचा आवाज कोणासहि ऐकू येत नाही अथवा ते कोणाच्या दृष्टिपथांतहि येत नाही. तथापि त्याच्या सिंचनाने अत्यंत परिमल युक्त अशी गुलाबाची फुलें हलतात हे मात्र खरें. जगाच्या विचारभांडारांत भरतभूमीने टाकलेली भर अशाच प्रकारची आहे. या विचारांचे आगमन ढोलांच्या आणि नगाऱ्यांच्या दणदणाटाने आगाऊ सुचविले गेले नव्हते. ते जगांत संचार करीत आहेत इतकीहि जाणीव कोणास उत्पन्न झाली नाही; पण असे असतांहि त्यांचा परिणाम साऱ्या जगावर चिरस्थायी झाला आहे. जगाच्या विचारांत त्यांनी क्रांति करून सोडली आहे. पण मौजेची गोष्ट ही की, ही क्रांति केव्हां झाली हेही कोणाच्या लक्ष्यांत आले नाही. एका गृहस्थाने सहज बोलता बोलतां मला म्हटले 'एखाद्या विशिष्ट ग्रंथाचा कर्ता कोण याचा शोध हिंदुस्थानांत लागणे हे मोठे बिकट कर्म आहे.'<noinclude></noinclude>
im505x9l5lxf121abx83wnnxpx6uwo7
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३९
104
66804
233258
155403
2026-07-17T17:05:05Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233258
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२३४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>यावर मी त्याला उत्तर दिले, 'हिंदुस्थानाची रीत अशीच आहे. हिंदुस्थानांतील ग्रंथकारांची सारीच पद्धत अर्वाचीन लेखकांहून अगदी वेगळी आहे. अर्वाचीन पद्धतीच्या ग्रंथकाराच्या लेखांत शेकडा नव्वद कल्पना दुसऱ्यांच्या चोरलेल्या असल्याचे तुम्हांस आढळून येईल; आणि ज्या शेंकडा दहा त्यांच्या स्वतःच्या असतात, त्या अस्मादिकांच्या स्वतःच्या आहेत असें प्रस्तावनेंत नमूद करण्यास ते सहसा चुकत नाहीत. आमच्या प्राचीन ग्रंथकारांचा प्रकार याहून अगदी वेगळा. साऱ्या मानवजातीच्या हृदयांत विचारांची क्रांति ज्यांच्या लेखांनी झाली ते आपले ग्रंथ लिहून मोकळे झाले. त्यांनी आपल्या लेखांवर नांवें घालण्याइतकीही खबरदारी घेतली नाही. ते जन्मले कोठे आणि मेले केव्हां याचाहि पत्ता कोणास लागला नाही. आपल्या वंशजांकरितां आपला अपूर्व ठेवा मागे ठेवून कोणास नकळत त्यांनी देहविसर्जन केलें. हिंदुस्थानांत तात्त्विक वाङ्मयाचे केवढे तरी भांडार आहे, पण त्या साऱ्यांच्या लेखकांची नांवें कोणास माहीत आहेत? आमची पुराणे कोणी लिहिली याचा शोध लागेना तेव्हां सारी व्यासांच्या गळ्यांत पडली. एखादा तात्त्विक ग्रंथाच्या कर्त्यांचा शोध लागला नाही ह्मणजे कपिल मुनींकडे खुशाल बोट दाखवावें. हे लेखक म्हणजे भगवान् श्रीकृष्णांचे अस्सल वंशज होत. गीतेची तत्त्वे त्यांनीच खरोखर पाळली. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या गीतावचनाचा अर्थ खरोखर त्यांनीच सांगितला.<br>{{gap}}अशा रीतीने हिंदुस्थानाचे कार्य साऱ्या जगांत चालू आहे; पण तें चालू राहण्यासाठी एका गोष्टीची आवश्यकता आहे. व्यापारी मालाची नेआण करण्यास ज्याप्रमाणे मनुष्याचे साहाय्य अवश्य आहे, त्याचप्रमाणे धर्मज्ञानाच्या प्रसारालाहि कोणातरी देहधाऱ्याच्या आश्रयाची आवश्यकता असते. आधी मार्ग तयार असल्यावांचून विचारांचाहि प्रवास होऊ शकत नाही. पूर्वीहि असेच प्रकार घडून आले आहेत. एखादें जगज्जेतें राष्ट्र जन्मास आले म्हणजे आपल्या क्षात्रतेजाच्या बळावर जगांतील दूरदूरची राष्ट्रे तें एकत्र करिते. त्या राष्ट्रांचा परस्परांशी संबंध जडतो. अशा रीतीने विचारविनियमाचा मार्ग तयार झाला म्हणजे त्याच्या द्वारें हिंदुस्थानांतील विचारपरंपरा साऱ्या जगाचा प्रवास करूं लागते; आणि अशा रीतीने जगांतील साऱ्या मानवकुलांत तिचा प्रवेश होतो. बौद्ध धर्म जन्मास सुद्धां आला नव्हता तेव्हांहि हिंदु तत्त्वज्ञानाचा<noinclude></noinclude>
9jt8tqyn4brckeumohz06b0sfmsqasc
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४०
104
66805
233259
155404
2026-07-17T17:07:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233259
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|आपणांपुढील कार्य.|२३५ }}
{{rule}}</noinclude>प्रवेश साऱ्या जगांत झाला असल्याचा पुरावा हल्ली निदर्शनास येत असून त्यांत आणखी नवी भर प्रत्यहीं पडत आहे. बौद्ध धर्माचा प्रवेश चिनांत होण्याच्या अगोदर वेदांत तत्त्वे तेथें शिरली होती. त्याचप्रमाणे इराण वगैरे देशांतहि त्यांचा प्रवेश झाला होता. पुढे ग्रीक साम्राज्याच्या वेळीहि असाच प्रकार घडून आला. त्यांच्या तरवारीच्या मागोमाग हिंदु तत्त्वज्ञान संचार करीत होते. ख्रिस्ताच्या तत्त्वज्ञानाचा केवढाहि गौरव तुम्हीं केला, आणि त्यामागोमाग झालेल्या संस्कृतीची कितीहि स्तोत्रे तुम्हीं गाइली, तरी हिंदु तत्त्वग्रंथांत इतस्ततः विखुरलेल्या अनेक रत्नांपैकी एका अल्पांशापासूनच ख्रिस्ताची ही सारी सृष्टि निर्माण झाली आहे, हे लक्षात ठेवणे भाग आहे. हिंदु धर्मांतूनच बौद्ध धर्म निर्माण झाला. बौद्ध धर्म हे हिंदु धर्माचेंच एक बंडखोर बालक आहे; आणि ख्रिस्ती धर्म हे बौद्ध धर्माचें गोधडीवजा अनुकरण आहे. अशा रीतीनें प्रत्येक शकांतराच्या वेळी हिंदु धर्मज्ञानाची लाट जगावर पसरली आहे; आणि आताही हा शकांतराचा काळ पुनः प्राप्त झाला आहे. इंग्रजी साम्राज्याखाली जगांतील दूरदूरची स्थलें एकत्र झाली आहेत; आणि त्यांतहि विशेष हा की, रोमन साम्राज्याप्रमाणे इंग्रजी साम्राज्याचे मार्ग केवळ जमिनीवरच आंखलेले नसून महासागरांचा पृष्ठभागहि त्यांनी व्यापला आहे. एका महासागरांतून दुसऱ्या कोणत्याहि महासागराकडे या रस्त्याने सुखरूप जाता येते, आणि सध्यांच्या काळी पूर्वीच्या दळणवळणाच्या साधनांत विद्युच्छक्तीनेंहि आणखी एक नवीच भर घातली आहे. अशा स्थितीत आपल्या जीवन हेतूच्या पूर्तीस्तव भरतभूमीनेंहि जागे व्हावें हें रास्तच आहे. जगाच्या संस्कृतीला आपल्यापरी तिनेंहि हातभार लावावा हे इष्ट आहे. माझ्यासारख्या मनुष्याने उठून इंग्लंडचा आणि अमेरिकेचा प्रवास करावा आणि तेथें धर्मप्रचाराचे कार्य करावें ही गोष्ट काकतालीय न्यायाने घडली असून पूर्वपरंपरेप्रमाणे पाहतां ती सृष्टिक्रमाला अनुसरूनच घडली. हिंदुस्थानाच्या कार्याचा प्रसार जगभर होण्याची वेळ आतां आली आहे, ही गोष्ट आपणांपैकी प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे. या कार्याच्या प्रसाराला अत्यंत अनुकूल असा सांप्रतचा काल आहे आणि या वेळी आपले जगज्जेत्याचे कार्य हिंदुस्थानाने पुनः केले पाहिजे. आपणांस केवळ आपल्याच देशाची उन्नति साधावयाची आहे असें नाही. आपल्या साऱ्या कार्यक्रमाचा तो लहानसा अंश मात्र आहे. कल्पनेच्या अत्यंत विस्तृ-<noinclude></noinclude>
flpwdghwc7401zgfy1ezxi6fd99daz1
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४१
104
66806
233260
155439
2026-07-17T17:10:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233260
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२३६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>ताकाशांत स्वच्छंदपणे भराऱ्या मारणे हा माझा जन्मस्वभाव आहे, आणि त्याला अनुसरून हिंदु कुलाची विजयपताका साऱ्या जगभर फडकत असल्याचे माझ्या कल्पनादृष्टीला दिसते.<br>{{gap}}इतर राष्ट्रांस जिंकण्याचा धंदा करणारी अनेक मानवकुले आजपर्यंत या पृथ्वीतलावर होऊन गेली. हे जेतृत्व आमच्याही अंगी पुष्कळ आहे. इतरांपेक्षा त्याचा प्रकार वेगळा, इतकेंच. पराविद्या आणि धर्म या बाबींत आम्ही जे महान् विजय मिळविले, त्यांचे वर्णन सम्राट अशोक याने केले आहे. आताही या जुन्या इतिहासाची पुनरावृत्ति पुनः होणे इष्ट आहे. आतां आणखीहि एक प्रचंड विजय हिंदुस्थानाने पुनः मिळविला पाहिजे. माझ्या आयुष्यभर हेच स्वप्न मला पडत आहे; आणि माझ्या आजच्या साऱ्या शब्दांत हेच स्वप्न यापुढे पडत राहावे अशी माझी इच्छा आहे; आणि हे स्वप्न प्रत्यक्ष सृष्टींत खरे करण्याकरितां तुम्हांपैकी प्रत्येक जण आपली शिकस्त करून अखेरचा विजय संपादीपर्यंत शस्त्र खाली ठेवणार नाही अशीहि मला आशा आहे. आधी घर सांभाळा आणि मग काय तें करा, असा उपदेश करणारी माणसें तुम्हांस दररोज हवीं तितकी भेटतील हे मला ठाऊक आहे. स्वतःचे घर सांवरल्यावर दुसऱ्याला मदत करावी असें पुष्कळ लोक तुम्हांस सांगतील; पण मी तुम्हांस निक्षून सांगतो की, स्वार्थ सोडून परार्थ साधणे हेच कार्य जेव्हा तुम्ही करूं लागतां, तेव्हांच तुमच्यांतील साऱ्या उच्च क्रियासामर्थ्याचा उदय होतो. जगांतील तुमचे अत्युत्कृष्ट कार्य म्हटले तर परार्थासाठी जे केले असेल तेच. परक्यांच्या देशी जाऊन परक्यांच्या भाषेत परक्यांच्या हितासाठी धर्मज्ञानाचा उपदेश तुम्हीं केला, तर त्याबरोबरच स्वदेशाचीहि चाकरी तुमच्या हातून किती घडते, याची साक्ष आजची ही सभाच तुम्हाला देईल. माझें तत्त्वोपदेशाचे कार्य याच देशी राहून मी केले असते, तर आज त्याचा जो प्रसार येथे झाला आहे त्याच्या चवथ्या हिशानेंहि तो येथे झाला नसता. इंग्लंडांत आणि अमेरिकेंत जें दृश्य कार्य माझ्या हातून घडलें तेंच येथेहि अदृश्यपणे घडले आहे. हिंदुस्थानाने सारे जग जिंकावें हे आपणा सर्वांचेच अखेरचे उद्दिष्ट आहे; आणि हे साधण्याकरितां आपणांपैकी प्रत्येकानें सदोदित सज्ज राहिले पाहिजे. याहून दुसरे कोणतेंहि कमी प्रतीचे कार्य आपल्या नजरेसमोर आपण राहूं देऊं नये आणि याच्या पूर्तीची तयारी करण्यांत<noinclude></noinclude>
aup71naubr0l0ieyz27yb0il8yu8ykb
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४२
104
66807
233261
155440
2026-07-17T17:13:34Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233261
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|आपणांपुढील कार्य.|२३७ }}
{{rule}}</noinclude>आपल्या शक्तीचा प्रत्येक अंश खर्च करण्याची तयारी आपण ठेविली पाहिजे. परदेशीयांनी आपली हजारों सैन्ये येथे आणून उतरविली तर ते त्यांना खुशाल करू द्या. त्यांच्या सशस्त्र सैन्यांचा महापूर येथे लोटला तरी त्याकडे तुम्ही मुळीच लक्ष्य देऊ नका. भरतभूमीच्या लेकरांनों! जागे व्हा, उठा; आणि जग जिंकण्यासाठी कंबरा बांधा. प्रेमाने आम्ही द्वेष जिंकू, या तत्त्वाचा जयघोष याच भूमीत प्रथम ऐकू आला. द्वेष स्वतःला जिंकू शकत नाही, पण प्रेम त्याला जिंकते. जडवादाचा भयंकर धिंगाणा आज साऱ्या जगावर चालू आहे. त्याचा पराभव दुसरा जडवाद पुढे करून होणार नाही. एक जडवाद दुसऱ्याला जिंकील ही गोष्ट त्रिकाळांत घडणे नाही. कारण ते दोघेही तुल्यबळ आहेत. एक सैन्य दुसऱ्या सैन्याला जिंकण्यासाठी धडपडूं लागते, तेव्हां माणुसकी मरून मनुष्याच्या अंगी पशुत्वाचा संचार होऊ लागतो. मनुष्याचा पशु बनविणे हे मानवी बुद्धीच्या कर्तृत्वशक्तीचे विजयचिह्न आहे काय? जडवादाचा पराजय करण्यास एक अतींद्रिय ज्ञानच समर्थ आहे. या अतींद्रिय ज्ञानाने पश्चिम दिशेला तुम्ही जिंका. राष्ट्र म्हणून आपणांस जगावयाचे असेल, तर या पराविद्येची जोड आपण मिळविली पाहिजे. या तत्त्वाचे सत्यत्व पाश्चात्य लोकांस आता हळूहळू पटू लागले आहे. हे ज्ञान आतां कोठून येते हे पाहण्यासाठी ते उत्सुक होऊन बसले आहेत. ते दृष्टीस पडतांच त्याला निर्भरालिंगन देण्यासाठी आपले बाहु पसरून ते उभे राहिले आहेत. आतां त्यांची ही इच्छा कोण तृप्त करणार? हिंदुस्थानांतील अवतारी पुरुषांचा संदेश त्यांच्यापर्यंत नेऊन पोचविण्यास कोण तयार आहे? जगांतील प्रत्येक कोनाकोपऱ्यांत या संदेशाचा दुंदुभि वाजविण्याकरितां आपल्या सर्वस्वावर पाणी सोडण्यास कोण तयार आहे? सत्याचा प्रसार करण्याकरितां असली अलोट छातीची माणसें आतां हवीं आहेत. वेदांतधर्माची विजयपताका जगांतील प्रत्येक कोनाकोपऱ्यांत रोवण्याकरितां तयार असलेले शूर वीर आज हवे आहेत. जगाला याच गोष्टीची आज जरूर आहे. इतकी की, तिच्या अभावी जगाचा नाश होईल. झोंपी गेलेल्या ज्वालामुखीच्या शिखरावर आज सारे पाश्चात्य जग बसले आहे. हा भस्मासुर केव्हां जागा होईल याचा नेम नाही. तो जागा झाला की, क्षणार्धात साऱ्या पाश्चात्य जगाची राखरांगोळी करील. वेळ अशी आणीबाणीची आली आहे की, आपले कार्य थांबविण्यास<noinclude></noinclude>
sz45l02udbqe62yhsqxi2qnu6ejhnwk
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४३
104
66808
233262
155441
2026-07-17T17:16:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233262
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२३८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>आता एका दिवसाचाहि अवधि राहिला नाही. युरोपचा नाश उद्या होणार नाही इतकीहि खातरजमा कोणी देणार नाही. तृष्णेच्या मागे लागून तिच्या तृप्तीसाठी साऱ्या जगाचा कोनाकोपरा पाश्चात्यांनी धुंडाळून पाहिला. या तृष्णेच्या शांतीसाठी शोध करण्यांत जगांतील एकहि स्थळ त्यांनी शिल्लक उरूं दिले नाही. पण शांतीचा मागमूससुद्धा त्यांना कोठे लागला नाही. इंद्रियजन्य सुखाचे पेले कांठोकाठ भरून त्यांचे आकंठ पान त्यांनी केले, पण पोटांतील आगीचा उपशम त्यामुळे झाला नाहीं; तृप्तीची ढेकर त्यामुळे अद्यापि आली नाही. याकरिता पाश्चात्यांत तुमच्या धर्मज्ञानाचा प्रसार करण्याची ही अत्युत्कृष्ट संधि तुमच्या घरी चालून आली आहे. म्हणून हिंदवासीय तरुणांनो, तुम्हांपुढे आज कोणते कार्य आहे हे डोळे उघडून पहा. जगज्जेते म्हणून अखंड कीर्ति संपादन करण्याचा योग सुदैवाने तुम्हांस आज प्राप्त झाला आहे. आता हे कार्य साधा अथवा त्यांत प्राण तरी द्या. तुम्हांला कांहीं जागृति आतां खरोखरच आली असेल आणि आपल्या राष्ट्रीय जीवनांत थोडा तरी नवा जोम भरावा अशी थोडी तरी इच्छा तुमच्या चित्तांत उत्पन्न झाली असेल तर हिंदु तत्त्वज्ञानाचा झेंडा साऱ्या जगभर नाचविल्या वाचून राहूं नका.<br>{{gap}}आपल्या धर्मज्ञानाचे साम्राज्य साऱ्या जगावर गाजवावयाचे असें मी म्हटले, पण याचा भलताच अर्थ कोणी समजू नये. ज्या विलक्षण भोळसर समजुतींना कित्येक शतकेंपर्यंत आपण उराशी बाळगले आहे त्यांचा अंतर्भाव तत्त्वज्ञानांत होत नाही हे लक्ष्यात ठेवले पाहिजे. असल्या खुळ्या कल्पनांचा प्रसार जगभर करावयाचा हे आपले कार्य नसून, जगाला नव्या जीवनाची प्राप्ति होईल, असें तत्त्वज्ञान त्याला आपणांस द्यावयाचे आहे. आपल्या भोळ्या कल्पनांचा प्रसार बाह्यदेशी होऊ द्यावयाचा नाहीं; इतकेंच नव्हे, तर त्यांचा उच्छेद आपल्या देशांतूनहि करणे आपणांस अवश्य आहे. त्यांना आतां कायमची मूठमाती मिळाली पाहिजे. त्यांच्या अस्तित्वामुळेच हिंदुकुलाला अवनति प्राप्त झाली, आणि आता यापुढे ती जगली तर तुमचा मेंदूहि ती सडवून टाकतील. ज्या मेंदूला उच्च आणि उदार विचार निर्माण करण्याचे सामर्थ्य नाही, ज्यांतून अस्सल कल्पनाशक्ति नष्ट झाली आहे, ज्याला कसलाहि जोम उरलेला नाही आणि धर्म म्हणून क्षुद्र भोळसट कल्प-<noinclude></noinclude>
pk8tk05oif5nbisbry5v8klppswmqx2
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४४
104
66809
233263
155442
2026-07-17T17:18:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233263
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|आपणांपुढील कार्य.|२३९ }}
{{rule}}</noinclude>नांना चिकटून बसून आपलें सारें अस्तित्व जो विषदिग्ध करितो, असला मेंदू तुमच्या डोक्यांत उत्पन्न होऊ न देण्याविषयी तुम्ही खबरदारी घ्या. हिंदुस्थानाच्या उन्नतिमार्गात दोन मोठी भयावह स्थलें आज आपल्या नजरेसमोर आहेत. जडवाद अत्यंत मोहकरूपाने आपणांसमोर उभा ठाकला आहे; आणि त्याबरोबरच जुन्यापुराण्या खुळ्या कल्पनाहि आपणांस चिकटून बसल्या आहेत. एका बाजूला आड आणि दुसऱ्या बाजूला विहीर अशी आजची आपली स्थिति आहे. या दोन्ही भयांना चुकवून आपला पुढील रस्ता आपण सुधारला पाहिजे. पाश्चात्य विद्येच्या आकंठपानाने आपले डोके धुंद करून घेऊन स्वतःस सर्वज्ञ समजणारा असा प्राणी आज निर्माण होऊ लागला आहे. आपल्या प्राचीन ऋषिवर्यांचे ज्ञान त्याला तुच्छ वाटते. त्यांची थट्टा उडवून स्वतःची क्षणभर करमणूक करून घेण्यासहि तो मागेपुढे पहात नाही. आपले सारे जुनें तत्त्वज्ञान म्हणजे निवळ अर्थशून्य भारुड, धर्मज्ञान ही शुद्ध बालिश बडबड आणि हिंदुधर्म म्हणजे गाढवांचा गोंधळ असें त्याला वाटते. याच्या अगदी उलट असा दुसराहि एक नमुना आढळून येतो. हा दुसरा गृहस्थ सुशिक्षित पण एकविषयभ्रांत असतो. पहिला जसा एका टोकाला तसाच हा दुसरा दुसऱ्या टोकाला जाऊन बसलेला असतो. पालीची कारिका, शिंकेचें फळ, आणि काक शब्दाचें फळ काय आहे, हेच तो शोधीत असतो. आपल्या प्रत्येक वेडामागे धर्मज्ञान उभे आहे; आणि तत्त्वमीमांसेचे पाठबळ त्याला आहे, असे त्याला वाटत असते. आपल्या खेड्यांतला म्हसोबा हाच त्याचा देवाधिदेव. आपल्या खेड्यांतील प्रत्येक चालरीत हीच त्याची वेदाज्ञा; आणि यांतील एखाद्यांत थोडीशीहि चूक होऊ न देण्याविषयीं तो दक्ष असतो. आपली ही व्रतें तंतोतंत पाळणे हाच राष्ट्रोद्धाराचा मार्ग आहे असे त्याला वाटते. ह्या दोन्ही नमुन्यांवर फार सावधगिरीची नजर आपण ठेविली पाहिजे. शुद्ध निरीश्वरवादी बनून चार्वाकाचे कट्टे शिष्य तुम्ही झाला तरीहि एकवार मला पुरवेल, पण बालिश कल्पनांना धर्म म्हणून तुम्ही चिकटून बसला तर ते मला नको. निरीश्वरवादी कितीहि वाईट झाला तरी तो जिवंत प्राणी असतो. स्वतःच्या कर्तबगारीवर त्याचा काही तरी विश्वास असतो. अशा माणसाचा थोडाबहुत तरी उपयोग तुम्हांस करून घेतां येण्यासारखा आहे. पण धर्म म्हणून शुद्ध मूर्खत्वाला ज्याने मिठी मारली, त्याचा मेंदू कामां-<noinclude></noinclude>
72kd55jkjtlp3h7o5lufz8jhjtfjxei
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४५
104
66810
233264
155443
2026-07-18T07:03:25Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233264
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२४० |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>तून गेला असें तुम्ही समजा. तो खराखुरा अवनतीच्या मार्गाला लागला असून त्याचा उपयोग कोणासहि होण्यासारखा नाही. ही दोन्ही भयावह स्थलें आपण टाळली पाहिजेत. आपणांस आज शूरांची गरज आहे. ताज्या दमाने ज्याचे रक्त सळसळत आहे अशी माणसे आपणांस हवीत. लोहमय स्नायु आणि पोलादी ज्ञानतंतु असलेली माणसें आज आपणांस हवीत. हवें तेथें वांकणाऱ्या विळविळीत प्राण्यांची आपणांस गरज नाही. असल्या प्राण्यांचे आधी उच्चाटन होऊ द्या. धर्म हा मोठा गहन विषय आहे असे म्हणून धर्मज्ञान अंधारांत लपवू पाहणाऱ्या माणसांचीहि गरज आपणांस नाही. धर्ममार्गात कसलीहि लपवाछपवी नको. वेदांतांत असला लपंडाव तुम्हांस कोठे आढळतो काय? श्रुति, संहिता, पुराणे यांत त्याचा मागमूस तुम्हांस कोठे लागला आहे काय? आपल्या प्राचीन ऋषिवर्यांनी तत्त्वज्ञानाच्या शोधासाठी गुप्त मंडळ्या स्थापन केल्या होत्या हे माझ्या तरी ऐकिवात नाही. ते काही हातचलाखी करीत होते, असें कोठे नमूद केल्याचे तुम्हांस ठाऊक आहे काय? आपलें ज्ञान जगासमोर मांडण्यासाठी ऐंद्रजाल त्यांना करावे लागले, असा इतिहास तुम्ही कोठे वाचला आहे काय? धर्मज्ञान सात पडद्यांत लपवून ठेवू पहाणे आणि वेडगळ गोष्टींना चिकटून बसणे हे दुबळेपणाचे चिन्ह आहे. अवनतीच्या आणि मृत्यूच्या या आगामी निशाण्या होत. याकरितां त्यांपासून तुम्ही फार सावध रहा. बलवान् व स्वावलंबी होणे हा आपल्या पुढील मार्गातील पहिला मुक्काम आहे. स्वावलंबी होणे ही गोष्ट खरोखरच अत्यंत महत्वाची आहे. स्वावलंबित्वाचा उपयोग आपणास किती प्रकारे करून घेता येतो, याची पुरती कल्पनाही करवणार नाही. आपला जो काही स्वभाव सध्या बनला आहे, त्याला अनुसरून या दोन वस्तू आपणांस अप्राप्यसुद्धा वाटतील इतक्या त्या मोठ्या आहेत; पण वस्तुस्थिति अशी नाही. त्यांत कांहीं गौप्य नाही. प्रत्येकाला त्या साधून घेतां येण्यासारख्या आहेत. हिमालयाच्या हिमस्नात शिखरावर बसलेल्या गुप्त महात्म्यांच्या स्वाधीन ही तत्त्वे कोणीहि केली नाहीत. कोणाहि गुप्तमंडळ्यांनी त्यांचा कुणगा करून ठेवलेला नाही. धर्मतत्त्वे ही गुप्त ठेवण्यासारखी वस्तु आहे, या शब्दांचा उच्चार या भूमीत पूर्वी केव्हांहि झालेला नव्हता. हिमालयाचा प्रवास मी स्वतः केलेला आहे. तुम्ही गृहस्थाश्रमी आणि हिमाचल<noinclude></noinclude>
tr2et3vpm2ylbnvkx1sap4bdzyj1qux
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४६
104
66811
233265
155444
2026-07-18T07:08:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233265
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|आपणांपुढील कार्य.|२४१ }}
{{rule}}</noinclude>फार दूर यामुळे तुम्ही तेथे गेला नसाल; पण मी बोलून चालून संन्यासी. गेली चवदा वर्षे मी एकसारखा भटकत आहे. सारा हिमालय पर्वत मी धुंडाळून पाहिला, पण गुप्त मंडळ्या कोठे असल्याचा सुगावा मला लागला नाही. याचे कारण हेच की, अशा मंडळ्या अस्तित्वातच नाहीत. याकरितां असल्या मृगजळाच्या मागे धावत सुटूं नका. असली खुळे डोक्यात घेण्यापेक्षा तुम्ही नितांत जडवादी बनला तरी तुमचे आणि साऱ्या हिंदुकुलाचें अधिक कल्याण होईल. तुम्हीं शुद्ध नास्तिक बनला तर किमान पक्षी तुम्ही स्वावलंबी आणि आत्मप्रत्ययी तरी व्हाल. प्रत्येक गोष्टींत दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहण्याची तुमची दुष्ट खोड तरी नाहीशी होईल; पण असल्या खुळसट कल्पनांमागे वेड्यासारखें धावत सुटणे हे मात्र अवनतीचे आणि विनाशाचें निश्चित चिह्न आहे. या कल्पना उघड उघड इतक्या वेडगळ आहेत की, त्यांचा नुसता विचार करण्यांत काळाचा अपव्यय काही चांगले लोकसुद्धा कसा करितात याचे मला मोठे नवल वाटते. ज्या समाजांत असली माणसें निर्माण होतात त्याला धिक्कार असो. चांगल्या माणसांनी सुद्धा असली खुळे निर्माण करण्याच्या नादी लागावें आणि त्यांचा शास्त्रोक्त अर्थ लावण्याचाहि यत्न करावा हे माणुसकीला मोठे लांछन आहे. साऱ्या जगाच्या वाड्मयभांडारांत इतका सडका माल दुसऱ्या कोठेहि नसेल. तुम्हांस आतां कांहीं करावयाचे असेल तर प्रथम धैर्यवंत व्हा. असल्या वेडगळ कल्पनांना शास्त्राधार शोधू नका. आमच्यांत असल्या खुळसटपणाचा भरणा आधीच कांहीं थोडा नाही. मग त्यांत यांची भर कशाला? ज्या आहेत त्यांचेच उच्चाटन आधी झाले पाहिजे. आपल्या शरिरावर आधीच असलेले व्रण प्रथम बरे केले पाहिजेत. ते न करता त्यांहून अधिक जाज्वल्य आणि प्राणघातक काळपुळ्या निर्माण करणे शहाणपणाचें होईल काय? काही झाले तरी आमचे पहिले व्रण बिचारे गरीब स्वभावाचे आहेत; ते प्राणघातक नाही इतकेंतरी खास. हे व्रण बरे झाले म्हणजे आमच्या धर्मतत्त्वांचा देह तप्तकांचनासारखा उज्ज्वल आणि सुशोभित होईल. या तत्त्वांचे शोधन करा आणि त्यांनाच चिकटून रहा.<br>{{gap}}आपलाच धर्म सार्वलौकिक होण्याच्या योग्यतेचा आहे, असे प्रत्येक धर्माचे अनुयायी म्हणतांना तुम्ही ऐकतां; पण तुम्ही ही गोष्ट लक्ष्यांत ठेवा की, सारे जग कोणत्याहि एकाच धर्माचे अनुयायी बनेल, ही गोष्ट कधीच<noinclude><br>{{gap}}स्वा०वि० ख०-९-१६.</noinclude>
65fsfqoq2w7t13ytejni8sjsj1zuwti
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४७
104
66812
233266
155461
2026-07-18T07:10:32Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233266
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२४२ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>घडून येण्यासारखी नाही; पण तसे कधी काळी होणार असलेच तर असा सार्वलौकिक धर्म होण्याची योग्यता फक्त आपल्याच धर्माच्या अंगी आहे. त्यावांचून दुसरा कोणताहि धर्म सर्व जगाचा धर्म होणे शक्य नाही; आणि याचे कारणहि अगदी उघड आहे. आपल्या धर्मावांचून जगांतील दुसरा कोणताहि धर्म कोणा ना कोणा व्यक्तीपासून निर्माण झाला आहे. त्याचे जीवित कोणा ना कोणा व्यक्तीवर अवलंबून आहे. त्याच्या रचनेत एखादी ऐतिहासिक समजली जाणारी व्यक्ति मध्यवर्ती असून तिच्याच भोंवतीं त्या धर्माच्या साऱ्या इमारतीची उभारणी झाली आहे. असा एकच मध्यबिंदु असणे ही गोष्ट त्या धर्माच्या अस्तित्वाला विशेष बळकटी आणते असे त्यांना वाटतें; पण वास्तविक या गोष्टीने बळकटी येत नसून तो धर्म परावलंबी आणि दुबळा बनतो. ज्या मध्यवर्ती पुरुषाच्या भोंवतीं हे सारे जाळे विणलेले असते त्याचे अस्तित्वच नव्हते असे कोणी सिद्ध केले की, या साऱ्या धर्माचीहि इतिश्री झालीच; आणि असा प्रकार आजच घडूहि लागला आहे. अशा धर्मप्रवर्तकांपैकी निम्याशिम्यांची वाट आजच लागली असून बाकीचेहि हळूहळू तोच मार्ग आक्रमीत आहेत. यामुळे ज्या धर्मतत्त्वांना केवळ त्यांच्याच शब्दाचा पाठिंबा होता, ती तत्त्वेंहि हवेत उडून जाऊ लागली आहेत. आमच्या धर्माची गोष्ट अशी नाही. आमची धर्मतत्त्वें सनातन आहेत. त्यांचे अस्तित्व कोणाहि एका व्यक्तीच्या शब्दावर अवलंबून नाही; ती स्वयंभू आहेत. आमच्यांतहि अवतारी पुरुष शेकडों होऊन गेले, तथापि त्यांपैकी कोणीहि आपला स्वतंत्र असा धर्म उभारला नाही. त्या साऱ्यांनी एकाच सनातन धर्माची तत्त्वे वेगवेगळ्या रीतींनी विशद केली. कृष्ण हा कृष्ण म्हणून मोठा नव्हे; अथवा तो विशिष्ट धर्माचा प्रवर्तक म्हणूनहि चिरस्मरणीय नव्हे. वेदांतधर्माचे स्पष्टीकरण अत्यंत उज्ज्वल रीतीने त्याने केलें म्हणून तो मोठा. हे कार्य कृष्णाने केले नसते तर बुद्धाप्रमाणेच तोहि काळाच्या पोटांत गडप झाला असता. बुद्ध हा काही कमी मोठा होता असें नाही. तथापि जें कार्य कृष्णाने केलें तें त्याने न केल्यामुळे हिंदुस्थानांत आज त्याचें नांवहि उरले नाही. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते ती ही की, कोणी कितीहि मोठा झाला तरी त्याला भुलून त्याच्यामागे आम्ही जात नाही. आम्ही व्यक्तींचे उपासक नसून तत्त्वांचे उपासक आहो. ज्याच्या ठिकाणी<noinclude></noinclude>
t2zut5elztbbn9fn6ozdbmlct5lqjaa
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४८
104
66813
233267
155459
2026-07-18T07:13:50Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233267
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|आपणांपुढील कार्य.|२४३ }}
{{rule}}</noinclude>आमची ही तत्त्वे प्रत्यक्षत्वास येतील तो आम्हांस पूज्य; आणि तो मोठा म्हणून पूज्य नव्हे, तर आमची तत्त्वे आम्हांस तेथे दिसतात म्हणून तो पूज्य. ही तत्त्वे तेथे दिसू लागतांच कोट्यवधि हिंदू लोक तेथे धावत येतात. आमची ही तत्त्वे सुरक्षित आहेत तोवर एकच काय पण हजारों बुद्ध जन्मास येतील. पण ही तत्त्वे नष्ट झाली आणि त्यांची विस्मृति आम्हांस पडली, तर मात्र आमच्या धर्माची काय वाट लागेल हे सांगता येत नाही. तत्त्वांना सोडून ऐतिहासिक व्यक्तींच्या झेंड्याभोवती आम्ही गोळा होऊ लागलों, की आमचा धर्महि आम्हांस सोडून जाण्याच्या पंथास लागेल. कोणत्याहि व्यक्तीला इतकें प्राधान्य न देणारा धर्म जगांत एखादा असेल तर तो आमचाच धर्म होय; पण असे असतांहि आम्ही सारे अवतारी पुरुष अगदी बाद केले आहेत असेंहि नाही. अशा शेंकडों पुरुषांना आमच्या धर्मात अवकाश आहे. आजपर्यंत असे शेंकडों पुरुष होऊन गेले आणि उद्या दुसरे शेकडों येणार असले तर त्यांनाहि आम्हांपाशी स्थळ आहे. मुद्दा इतकाच की, त्यांच्या द्वारे आमची तत्त्वे आम्हांस दिसली पाहिजेत. कोणत्या तरी उच्च तत्त्वांचे स्पष्टीकरण त्यांच्या द्वारे झाले पाहिजे इतकीच आमची अट आहे. आमच्या धर्माचा हा विशेष आपण लक्षात ठेविला पाहिजे. आजपर्यंत जशी ही तत्त्वे सुरक्षित राहिली तशीच ती पुढेहि ठेवण्याची जबाबदारी आपणांपैकी प्रत्येकाच्या शिरावर आहे. त्याचप्रमाणे कालांतराने त्यांजवर वाढणारी बांडगुळे छाटून टाकून मूळचे उज्ज्वल रूप कायम राखणे, हेहि आपणा प्रत्येकाचे कर्तव्य आहे. भरतभूमीवर आजपर्यंत अनेक घोरपडी आल्या, हिंदुकुलाची भयंकर अवनति झाली, तथापि तशा स्थितींतहि वेदांत तत्त्वे मलिन झाली नाहीत हें आश्चर्य नव्हे काय? त्यांना मलिन करण्याची छातीच कोणास झाली नाही. श्रुतिग्रंथांइतकें अबाधित राहिलेलें धार्मिक वाङ्मय जगाच्या इतिहासांत एकहि नाही. जगांतील बाकीच्या वाङ्मयाशी तुलना करून पाहतां श्रुतिग्रंथ अगदी सोवळे राहिले आहेत असें आपणांस दिसून येईल. त्यांत कोणी क्षेपक भाग घुसडला नाही; मूळ संहितेची ओढाताण अथवा छाटाछाट कोणी केली नाही आणि त्यांतील विचारांचे मर्महि आजतागाईत पूर्वीसारखेंच राहिले आहे. उत्पत्तिकाली श्रुति ग्रंथांनी जें मार्गदर्शकाचे कार्य केलें तेंच कार्य ते आजहि करीत आहेत.{{nop}}<noinclude></noinclude>
erojnlpvfgkovireczvk0y4mgwimbju
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४९
104
66814
233268
155463
2026-07-18T07:19:21Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233268
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२४४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>{{gap}}या मूळ संहितेवर निरनिराळ्या टीकाकारांनी आपापल्यापरी अनेक प्रकारच्या टीका केल्या आहेत, हे तुम्हांस ठाऊक आहेच. अवतारी पुरुषांनी याच तत्त्वांचे प्रत्यक्ष विशदीकरण केले. या अनेक प्रकारच्या स्पष्टीकरणांस अनुसरून अनेक पंथहि अस्तित्वात आले. या श्रुतिग्रंथांतील कित्येक सिद्धांतांत आपणांस विरोधहि आढळून येतो. यांतील कांहीं ग्रंथ शुद्ध द्वैतपर असून दुसरे कांहीं शुद्ध अद्वैतपर आहेत. एखादा टीकाकार द्वैतवादी असला म्हणजे अद्वैतपर मते खोडून काढणे हे आपले कर्तव्य आहे असे त्याला वाटते. त्याच्या बुद्धीचा पल्ला द्वैतापलीकडे गेलेला नसतो; यामुळे अद्वैतपर वचनेंहि द्वैतपर लावण्याचा यत्न तो करितो; आणि अशाच रीतीने अद्वैत वादीहि त्याला प्रत्युत्तर देत असतात. अशा रीतीने दोन तट पडून त्यांत युद्ध सुरू होतात. पण हा कांहीं वेदग्रंथांचा अपराध नव्हे. सारे श्रुतिग्रंथ शुद्ध द्वैतपर आहेत असे सिद्ध करूं पाहणे जितकें मूर्खपणाचे आहे, तितकेंच ते अद्वैतपर मानणे चुकीचे आहे. ते द्वैतपर आहेत आणि अद्वैतपरही आहेत. अर्वाचीन काळी नव्या कल्पनांचा उदय होऊन त्यांच्या दृष्टीने श्रुतिग्रंथांच्या रहस्याचा उलगडा करणे सुकर झाले आहे. मानवी मनाची स्थिति पाहतां या दोन्ही मतांचे अस्तित्व अवश्य आहे असे आपणांस आढळून येईल. या दोहोंच्या अस्तित्वावांचून त्याची उत्क्रांति सुलभपणे घडून येणार नाही; आणि याकरितांच वेदग्रंथांनी या दोहोंचेंहि विवरण केले आहे, अखेरची मजल सुखरूपतेनें गांठता यावी म्हणून श्रुतिमातेने या मार्गाला क्रमशः चढत्या अशा पायऱ्यांची योजना केली आहे, हे तिचे मोठे उपकार होत. परस्परविरोधी वचने योजून तट उपस्थित करावे आणि अशा रीतीने भावी युद्धाचे बीजारोपण करावे असा श्रुतींचा हेतु नाही. आपल्या मुलांना अशा रीतीने भुलवून भलत्याच मार्गाला नेण्याचे कार्य श्रुतींनी केलेले नाही. आपल्या लहानग्या लेकरांकरितांच नव्हे तर काही तरुणांकरितांहि या पायऱ्यांची योजना श्रुतींनी केली आहे. लहान मुलांना तर त्यांची आवश्यकता आहेच, पण पुष्कळशा मोठ्या माणसांनाहि त्यांची गरज आहे. आम्हाला देह आहे आणि देह हाच मी अशी आमची भावना आहे तोपर्यंत व्यक्तिविशिष्ट परमेश्वराचीहि जरूर आम्हांला आहे. आम्हाला पांच इंद्रिये आहेत आणि त्यांच्या द्वारे आम्हांहून वेगळ्या अशा बाह्यजगाचा अनुभव आह्मांस होतो<noinclude></noinclude>
4pvfx2b723wf9tjmj464kkibotan82y
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५०
104
66815
233269
155466
2026-07-18T07:22:21Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233269
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|आपणांपुढील कार्य.|२४५ }}
{{rule}}</noinclude>अशी आमची समजूत आहे, तोवर व्यक्तिविशिष्ट परमेश्वरावांचून आह्मांस तरणोपाय नाही. या साऱ्या कल्पना आमच्या चित्तांत शिल्लक आहेत तोपर्यंत आत्मा, परमात्मा आणि बाह्य सृष्टि असें तीन स्वरूपांचे अस्तित्व कबूल करण्यावांचून आपणांस गत्यंतर नाही, हे श्रीरामानुजांनी उत्तम प्रकारे सिद्ध केले आहे. याकरितां बाह्य जग जोपर्यंत वेगळेपणाने भासत आहे, तोपर्यंत आत्मा आणि परमात्मा एकरूप आहेत असे म्हणणे ही पोकळ बडबड आहे. यांचें द्वैत प्रत्यक्ष भासत असतां तोंडाने एकरूपतेच्या गोष्टी सांगणे हा शुद्ध वेडेपणा नव्हे काय? सामान्य मानवी मनाची घटनाच अशा प्रकारची आहे की, एकंदर अस्तित्वरूपाचा प्रत्यय त्याला वेगवेगळ्या स्वरूपांनीच व्हावा. आतां जे महापुरुष मनातीत स्थितीला जातात ते अर्थात् सृष्टिपलीकडेहि उड्डाण करितात. 'यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह' अशा शून्यावस्थेपलीकडेहि त्यांची मजल गेलेली असते. या ठिकाणी जीवात्म्याच्या सर्व बंधनांचा उच्छेद झालेला असतो आणि केवळ याच स्थितीत 'सोहम्' 'सर्व खल्विदं ब्रह्म' या वचनांचा अनुभव त्याला होतो. हा अनुभव होण्यास ज्ञान, विज्ञान आणि भक्ति या तिन्ही मार्गाचा उपयोग होतो. कृष्ण मध्येच अदृश्य झाला तेव्हां त्याच्या नांवाने टाहो फोडून गोपी आक्रंदन करूं लागल्या. 'कृष्ण, कृष्ण' यावांचून दुसरा उच्चार त्यांच्या तोंडाने होईना. सर्वत्र कृष्णरूप त्यांना दिसू लागले. अखेरीस आपणहि कृष्णच आहों अशी भावना होऊन कृष्णाप्रमाणेच त्यांनी वस्त्रे परिधान केली आणि कृष्णाप्रमाणेच त्या क्रीडा करूं लागल्या. त्या कृष्णरूप बनून गेल्या. भागवतांत हे वर्णन केलेले आहे. यांत शुद्ध भक्तीने अद्वैतापर्यंत कसे जाता येते हे उत्तम प्रकारें दाखविले आहे. अशाच प्रकारची एक हकीकत सुफी मताच्या एका कवीनें फारसी भाषेत सांगितली आहे.<br>{{gap}}आपल्या उद्दिष्टाकडे पोचण्याचे मार्ग अनेक आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांत पायऱ्याहि अनेक आहेत. याकरितां, त्यांजसंबंधी युद्धे करण्याचे कांहींच प्रयोजन आम्हांस नाही. आतां पुराणकालींच्या निरनिराळ्या टीकाकारांनी आपापल्या दृष्टीने वेगवेगळी मतें प्रकट केली असली तरी त्या साऱ्यांसच आपण नमन करूं या. कारण, ज्ञान ही मर्यादित चीज नाही. त्याचप्रमाणे तिचा सर्व सांठा कोणा एकापाशींच आहे असेंहि नाही. तिच्या<noinclude></noinclude>
ihk6mcyd6ebwmfs45jka3rpoo8kwomq
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५१
104
66816
233270
155469
2026-07-18T07:24:50Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233270
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२४६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>प्रकटीकरणाचे मार्ग अनेक असून स्वरूपहि भिन्नभिन्न असू शकतात. याकरितां अर्वाचीन अथवा प्राचीन पंडितांपैकी कोणा एकाचीच बाजू धरण्याचे आपणांस कारण नाही. प्राचीनकाळी ज्याप्रमाणे अनेक मंत्रद्रष्टे आणि ऋषि होऊन गेले, त्याचप्रमाणे ते चालू काळी असून पुढेही ते निर्माण होणार आहेत याविषयी शंका बाळगू नका. फार काय, पण प्राचीनकाळी ज्याप्रमाणे व्यास, वाल्मीक आणि शंकराचार्य होऊन गेले, त्याचप्रमाणे त्यांची योग्यता स्वतःच्या अंगी तुम्हांसहि आणता येईल. तुम्हीं शंकराचार्य होऊ नये असे कोणतेंहि कारण अस्तित्वात नाही.<br>{{gap}}आमच्या धर्माचा हाहि एक विशेष आहे. आपलें ज्ञान ईश्वरदत्त होते असें इतर धर्माचे प्रवर्तक म्हणत, यामुळे त्यांच्या मतांना जो अधिकार प्राप्त झाला तो खुद्द ईश्वरापासून आलेला आहे, असे त्याचे सर्व अनुयायी म्हणत आले आहेत. ईश्वराशी इतकें साहचर्य फारच थोड्यांच्या नशिबी असणार हे उघड आहे; आणि फक्त त्यांच्याच मार्फत आपणांसारख्या सामान्य जनांची गांठ ज्ञानाशी पडणार असें दुसरे धर्मानुयायी म्हणतात. यामुळे आद्य धर्मप्रवर्तकाने जें कांही सांगितले असेल त्याचे ग्रहण डोळे मिटून आपण केलें पाहिजे असा इतर धर्माचा हट्ट आहे. नॅझारेथच्या येशूला अशाच ज्ञानाची प्राप्ति झाली होती आणि याकरितां आपण सर्वांनी त्याची आज्ञा शिरसावंद्य मानली पाहिजे असा ख्रिस्तानुयायांचा हट्ट असतो. पण आमच्या धर्माची गोष्ट तशी नाही. हे ज्ञान कोणा एखाद्यालाच प्राप्त होण्यासारखे आहे, असे आम्ही कधीच म्हटले नाही. पूर्वकाळच्या मंत्रद्रष्टयांना ते जसें प्राप्त झाले, तसेंच तें भविष्यकालच्या मंत्रदृष्टयांनाही प्राप्त होईल. आतां इतकें मात्र खरें की, वाक्पंडितांना, पुस्तकी विद्वानांना अथवा प्राचीनभाषाकोविदांना तें प्राप्त होणार नाही. त्यासाठी द्रष्टेपणच अंगी आले पाहिजे. सूक्ष्मविचार प्रत्यक्ष पाहण्याचे सामर्थ्य ज्याच्या अंगी असेल, त्याला तें अवश्य प्राप्त होईल. मोठ मोठे वादविवाद दीर्घकाळपर्यंत करीत बसलात तरी त्यामुळे आत्मानुभव तुम्हांस होणार नाही, तुमची बुद्धि कितीहि विशाल झाली तरी आत्म्याचे आकलन ती करूं शकत नाहीं; आणि सारे श्रुतिग्रंथ तुम्हीं मुखोद्गत केले तरी त्यानेंहि या ज्ञानाची प्राप्ति तुम्हांस होणार नाही. खुद्द श्रुतींचेही असेंच वचन आहे. अशा अर्थाचे वचन जगांतील दुसऱ्या कोणत्याही धर्मग्रंथांत<noinclude></noinclude>
o8c72izx8raxuqm92gex2h04ddz7qa3
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५२
104
66817
233271
155961
2026-07-18T07:27:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233271
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|आपणांपुढील कार्य.|२४७ }}
{{rule}}</noinclude>तुम्हांस आढळले आहे काय? नियमाने 'चर्चात' जाऊन ईश्वर प्रार्थना केल्याने ईश्वरप्राप्ति होणार नाही. पवित्र नद्यांची स्नाने करून आणि गंधभस्माचे पट्टे ओढूनहि ईश्वरप्राप्ति होणार नाही. त्याचप्रमाणे काळे, पिवळे अथवा भगवे कपडे घालूनही तो तुम्हांस मिळावयाचा नाही. इंद्रधनुष्याच्या साऱ्या रंगांनी तुम्ही स्वतःस सुशोभित केले तरी ईश्वर तुम्हांस दिसावयाचा नाही. जोपर्यंत अंतःकरणाचे कपाट उघडले नाही आणि जोपर्यंत तें विस्तृत होऊन विश्वाकार झाले नाही, तोपर्यंत हे बाहेरचे सारे देखावे व्यर्थ होत. अन्तःकरण रंगले पाहिजे; मग बाहेरचा रंग असो वा नसो. अंतःकरण रंगणे हाच खरा धर्म; आणि तोच खरा आत्मप्रत्यय. बाह्यरंगांची थोडीबहुत मदत या मार्गात तुम्हांस होत असेल, तर ती तुम्ही खुशाल घ्या; पण या रंगांची गुलामगिरी तुम्ही करूं नका. त्यांतच काही विशेष आहे, असें तुमच्या चित्ताने एकवार घेतले, की तुमच्या मार्गात तुम्हांस मदत करण्याऐवजी तुमच्या पायांत ते श्रृंखलांसारखे होऊन पडतील. मग हे रंग म्हणजे धर्म असें तुम्हांस वाटू लागेल. देवळांत एकदां देहाला नेऊन आणले की, धर्मकार्य संपलें असें तुम्हांस वाटू लागेल. भिक्षुकाला घरी बोलावून आणि त्याची बडबड ऐकून दक्षिणा दिली की, स्वतःस धार्मिक म्हणवून घेण्यास तुम्हांस हरकत दिसेनाशी होईल. याकरितां या बाह्य वस्तूंच्या नांगींत जें विष आहे त्यापासून तुम्हीं सावध राहिले पाहिजे. ज्याच्या अंतःकरणांत अनुराग उत्पन्न झाला, त्याला बाहेरच्या रंगरागाची जरूर नाही. हाच खरा धर्म होय. जो मनुष्य बाह्य उपाधींत धर्म सांठविला आहे असें खरोखर समजत असतो, तो अवनतावस्थेस गेला आहे असे समजावें. बाह्य इंद्रियांच्या द्वारे सृष्टपदार्थांचें ज्ञान करून घेणे हेहि खरें ज्ञान नव्हे आणि ईश्वराप्रत पोहचण्याचाहि तो मार्ग नव्हे. आमच्या शास्त्रांनी हा मुद्दा वारंवार बजावून सांगितला आहे. क्षणोक्षणी बदलणाऱ्या या विश्वाच्या मागे जे नित्य एकरूप आहे, त्याचा अनुभव ज्यायोगें होईल तो धर्म. सर्वांचा खरा धर्म हा एकच. आभासमय विश्वाच्या मागे असलेले सत्यरूप ज्याने ओळखले, आपल्या स्वतःच्या ठिकाणी असलेलें आत्मरूप ज्याच्या अनुभवास आलें, जो परमेश्वराला प्रत्यक्ष समोरासमोर भेटला आणि वस्तुमात्रांत ज्याला परमेश्वर दिसू लागला, तोच एक 'ऋषि' या पदवीला योग्य झाला असे समजावें. हे ऋषित्व प्राप्त होईपर्यंत<noinclude></noinclude>
hau3n2kncm8pvwt3iqe9f1k30v9tm9x
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५३
104
66818
233272
155975
2026-07-18T07:30:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233272
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२४८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>तुम्ही धर्मज्ञ झाला असे म्हणतां येत नाही. तुम्ही तसे झाला म्हणजेच धर्माच्या खऱ्या मार्गाला तुम्ही लागला असे होईल. आता तुम्ही जे काही करीत असतां ती केवळ पूर्वतयारी आहे. ऋषित्व प्राप्त होईपर्यंत ज्या नाना विध गोष्टी तुम्ही करितां त्यांनी फारतर तुमच्या बुद्धीला तालीम मिळेल; किंवा तुमच्या क्रिया शुद्ध जडदेहापुरत्या असल्या तर त्याला कष्टविण्यापुरताच त्यांचा उपयोग होईल. या क्रिया सोडून ऋषित्वाच्या मार्गाकडे तुम्ही वळला म्हणजेच धर्ममार्गावर तुम्ही चालू लागला असें होईल.<br>{{gap}}याकरितां, येथें जो एक मुद्दा विशेषेकरून सांगितला आहे, तो आपण सर्वांनीच लक्षांत बाळगण्याजोगा आहे. तो इतकाच की, ज्याला मुक्तीची खरी लालसा असेल, त्याला ऋषित्व प्राप्त करून घेण्यावांचून दुसरा मार्गच नाही. मंत्रवक्ता नव्हे, तर मंत्रद्रष्टा त्याने झाले पाहिजे. परमेश्वराची प्रत्यक्ष भेट त्याने घेतली पाहिजे. आमच्या श्रुतींनी घालून दिलेला हा नियम सनातनस्वरूपाचा आहे. हा मुख्य मुद्दा ध्यानात ठेविला म्हणजे श्रुतींचे रहस्य समजून घेणे सोपे होते. आपल्या मनश्चक्षुवरील पटल नाहीसे होऊन आपल्याच डोळ्यांनी तेथील अर्थ आपण पाहूं शकतो. आपण कोणत्या अवस्थेत आहों आणि आपणांस जरूर कशाची आहे हे आपण जाणूं शकतों; आणि हेच करणे आपणांस अवश्य आहे. पूर्वी होऊन गेलेल्या टीकाकारांनी केलेल्या टीकांचा अनादर करण्याचे कारण आपणांस नाही. त्यांच्याबद्दल पूर्ण पूज्य बुद्धि आपण बाळगावी. ते सारेच थोर पुरुष होते; पण आतां आपणांस त्यांच्याहूनहि अधिक थोर व्हावयाचे आहे. एक मोठे कार्य त्यांनी केले पण आपणांस त्यांच्याहून मोठे कार्य करावयाचे आहे. त्यांना नमन करून या अधिक मोठ्या कार्याला आपण लागू या. हिंदुस्थानांत पूर्वी शेंकडों ऋषि होऊन गेले. आता असे लक्षावधि ऋषि आपण निर्माण करूं या, असा मनाचा कृतनिश्चय करून तुम्हांपैकी प्रत्येकजण जेव्हां कार्याला लागेल, तेव्हां मातृभूमीच्या उन्नतीचा क्षण अगदी जवळ होईल. यांत एकट्या हिंदुस्थानाचेंच नव्हे तर साऱ्या जगाचेहि कल्याण आहे. तुमच्या बुद्धीचा निश्चय मात्र झाला पाहिजे. जो तुमचा निश्चय तसेंच तुमचे स्वरूपहि होईल. आपण धैर्यशाली आहों असा निश्चय तुम्हीं केला, तर तुम्ही धैर्यशाली व्हाल. आपण ऋषि आहों हेच चिंतन तुम्ही सदोदित केले तर तुम्ही उद्यांच ऋषि व्हाल. तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. अनेक<noinclude></noinclude>
kpxxim09q2zp3i1aen6mrry3jhkyafy
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५४
104
66819
233273
155976
2026-07-18T07:32:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233273
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|आपणांपुढील कार्य.|२४९ }}
{{rule}}</noinclude>टीकाकारांच्या अनेक प्रकारच्या मतांत कितीहि विरोध आढळत असले तरी एका सिद्धांताबद्दल सर्वांचे एकमत आहे. आत्मा हा स्वभावतःच पूर्ण पवित्र आणि सच्चिदानंद स्वरूप आहे यावद्दल कोणाचाच वाद नाही. यांत फरक इतकाच की, त्याचे आकुंचन आणि विकसन परिस्थित्यनुरूप होतें असें श्रीरामानुज म्हणतात आणि मायावरणामुळे तसे झाल्याचा भास उत्पन्न होतो असें श्रीशंकराचार्य म्हणतात. या बारीकसारीक मतांतराकडे आपण काना डोळा करावा. व्यक्त अथवा अव्यक्त स्थितीत आत्म्याचे मूलरूप एक आहे याबद्दल कोणाचा वाद नाही. या एका आद्य सिद्धांताला तुह्मी निश्चयाने चिकटून रहा. विश्वांतील सारी शक्ति तुमच्या ठिकाणी एकवटली आहे, तुह्मांला करण्यास अशक्य असे काही नाही. दौर्बल्य येऊ न देतां असा आत्मविश्वास धरा. मी दुबळा आहे, मी अर्धवेडा आहे अथवा मला अमुक गोष्ट समजत नाही असे म्हणण्याची खोड आज आपणांस आहे. ही दुष्ट खोड प्रथम टाकून द्या. कोणाच्याहि मदतीवांचून वाटेल ती गोष्ट मी करीन असें ह्मणत चला. विश्वांतील सर्व शक्ति तुमच्या ठिकाणी गुप्तरूपाने आहे ती व्यक्तदशेला आणणे इतकेंच तुमचे कार्य आहे.<Br><br><br>
{{rule|7em}}{{rule|7em}}{{rule|7em}}{{nop}}<noinclude></noinclude>
alkdz0ysiizobs4lt5s3uv4v2dt8odt
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/९
104
111020
233251
233230
2026-07-17T12:33:01Z
~2026-40244-45
6111
233251
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="117.198.30.170" /></noinclude>{{center|{{larger|'''प्रस्तावना.'''}}}}
{{gap}}'''विकासवाद''' हा प्रथम डार्विन साहेबांनी जीवनशास्त्राला (Biology) अनुलक्षून सप्रमाण प्रतिपादन केला. '''परमाणुजीवाचा''' किंवा '''जीवतत्वाचा''' (Protoplasm) '''परिस्थितीला अनुरूप विकास''' हा त्यांचा सिद्धांत होता.
परिस्थितीप्रमाणे उमलत जाणें हें सृष्टांचं इंगित आहे, अशी भावना वाढतांच सृष्टीमध्यें '''खंड''' (Break or Discontinuity ) नसून सर्वत्र '''रूपांतर'''
(Transformation) आहे असें दिसूं लागलें; सृष्टीमध्यें समूळ '''नाश''' नसून '''परंपरा व अवशेष''' आहेत अशी खात्री वाटू लागली. विकासवाद जसजसा विद्वानांना मान्य होऊं लागला तसतसा जीवनशास्त्राच्या बाहेर त्याचा परिणाम होऊं लागून इतर सर्व विद्यांची पाहणी सुरू झाली. विद्वानांना विकासवादाने नवी दृष्टी दिल्याने जुन्या शास्त्रांना चालन मिळाले, व नवीं उत्पन्न झाली.
<br>{{gap}}आतां '''परंपरा, परिस्थिती,''' व '''अवशेष '''ह्मणजे मागचा व आजचा संबंध; आणि मागचा व आजचा संबंध ह्मणजे इतिहास हे उघड आहे. यास्तव विकासवाद व त्याच्या अंतर्भूत कल्पना यांचा पहिला परिणाम असा झाला कीं, शास्त्रांच्या परंपरेकडे व वाढीकडे लोकांचे विशेष लक्ष जाऊं लागलें; त्यांचे इतिहास प्रसिद्ध झाले; शास्त्रीयपद्धतीचे '''ऐतिहासिक पद्धती''' हे एक अंग आहे अशी खात्री होऊं लागली. इतर शास्त्रांबरोबर, समाजशास्त्रालाही ही पद्धती लागू झाल्यामुळे '''समाजाच्या जीवनाचा, चैतन्याचा, आदर्श''' अशा दृष्टीनें वाङ्मयाचा अभ्यास सुरू झाला: '''समाज''' व '''सारस्वत''' यांचा संबंध ध्यानांत येऊं लागला.
<br>{{gap}}ऐतिहासिकपद्धतीनें वाङ्मयाची पाहणी Henri Taine या प्रसिद्ध फ्रेंच विद्वानाने प्रथम केली. यांचा सन १८६३ साली लिहिलेला '''आंग्लवाङ्मयाचा इतिहास"''' प्रत्येकाच्या ऐकिवात आहे. हा ग्रंथ आतां पाठीमागे पडण्याचें कारण एवढेच की, त्यांत विवेचन केलेली पद्धती सर्वत्र मान्य झाली आहे, नवीन असें त्यांत कांहीं उरलें नाहीं, आणि ग्रंथाचे कार्य पुरतेपणी तडीस गेलें आहे. मात्र ऐतिहासिक पद्धतीशिवाय इतर टाकाऊ अशी जी Taine यांची वृत्ती होती ती इतरांना मान्य झाली नाही. कारण सारस्वताचा-<noinclude></noinclude>
hbek0zx1kfeq2h8f8quo7z37jecz38e
233252
233251
2026-07-17T12:36:33Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
233252
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''प्रस्तावना.'''}}}}
{{gap}}'''विकासवाद''' हा प्रथम डार्विन साहेबांनी जीवनशास्त्राला (Biology) अनुलक्षून सप्रमाण प्रतिपादन केला. '''परमाणुजीवाचा''' किंवा '''जीवतत्वाचा''' (Protoplasm) '''परिस्थितीला अनुरूप विकास''' हा त्यांचा सिद्धांत होता.
परिस्थितीप्रमाणे उमलत जाणें हें सृष्टांचं इंगित आहे, अशी भावना वाढतांच सृष्टीमध्यें '''खंड''' (Break or Discontinuity ) नसून सर्वत्र '''रूपांतर'''
(Transformation) आहे असें दिसूं लागलें; सृष्टीमध्यें समूळ '''नाश''' नसून '''परंपरा व अवशेष''' आहेत अशी खात्री वाटू लागली. विकासवाद जसजसा विद्वानांना मान्य होऊं लागला तसतसा जीवनशास्त्राच्या बाहेर त्याचा परिणाम होऊं लागून इतर सर्व विद्यांची पाहणी सुरू झाली. विद्वानांना विकासवादाने नवी दृष्टी दिल्याने जुन्या शास्त्रांना चालन मिळाले, व नवीं उत्पन्न झाली.
<br>{{gap}}आतां '''परंपरा, परिस्थिती,''' व '''अवशेष '''ह्मणजे मागचा व आजचा संबंध; आणि मागचा व आजचा संबंध ह्मणजे इतिहास हे उघड आहे. यास्तव विकासवाद व त्याच्या अंतर्भूत कल्पना यांचा पहिला परिणाम असा झाला कीं, शास्त्रांच्या परंपरेकडे व वाढीकडे लोकांचे विशेष लक्ष जाऊं लागलें; त्यांचे इतिहास प्रसिद्ध झाले; शास्त्रीयपद्धतीचे '''ऐतिहासिक पद्धती''' हे एक अंग आहे अशी खात्री होऊं लागली. इतर शास्त्रांबरोबर, समाजशास्त्रालाही ही पद्धती लागू झाल्यामुळे '''समाजाच्या जीवनाचा, चैतन्याचा, आदर्श''' अशा दृष्टीनें वाङ्मयाचा अभ्यास सुरू झाला: '''समाज''' व '''सारस्वत''' यांचा संबंध ध्यानांत येऊं लागला.
<br>{{gap}}ऐतिहासिकपद्धतीनें वाङ्मयाची पाहणी Henri Taine या प्रसिद्ध फ्रेंच विद्वानाने प्रथम केली. यांचा सन १८६३ साली लिहिलेला '''आंग्लवाङ्मयाचा इतिहास"''' प्रत्येकाच्या ऐकिवात आहे. हा ग्रंथ आतां पाठीमागे पडण्याचें कारण एवढेच की, त्यांत विवेचन केलेली पद्धती सर्वत्र मान्य झाली आहे, नवीन असें त्यांत कांहीं उरलें नाहीं, आणि ग्रंथाचे कार्य पुरतेपणी तडीस गेलें आहे. मात्र ऐतिहासिक पद्धतीशिवाय इतर टाकाऊ अशी जी Taine यांची वृत्ती होती ती इतरांना मान्य झाली नाही. कारण सारस्वताचा-<noinclude></noinclude>
elbhr80iar2p3buswfnpl7nx6ald54c
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१०
104
111021
233275
233231
2026-07-18T08:12:08Z
JayashreeVI
4058
233275
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="~2026-40197-51" /></noinclude>{{center|५ }}
समाजाशी जरी संबंध जोडला तरी त्याचा '''व्यक्तींशीं''' असलेला संबंध कायम राहतोच. सारस्वत जरी समाजाच्या चैतन्याचा आदर्श असले तरी तें '''प्रतिभासंपन्न लेखकांच्या चिरस्मरणीय व सुंदर शब्दकृतींचा संग्रह'''ही आहे हे विसरणें शक्य नाहीं.
<br>{{gap}}परिस्थितीप्रमाणें उगवणें, बदलणें, उमलणें हा विकासवादाचा मुख्य सिद्धांत असल्यामुळे, एका देशांत जी परिस्थिती, जी परंपरा, आढळून आली, जे अवशेष राहिले, तीच परिस्थिती, तीच परंपरा, व तेच अवशेष इतरत्र आढळले पाहिजेत अशी ऐतिहासिक पद्धतीने होणारी समजुत चुकीची आहे, असा प्रत्यय येऊं लागला. "आपण तसे इतर" हैं जितके खरें आहे तितकेंच “नवी परिस्थिती व नवी सृष्टी" हेही खरें आहे, असा अनुभव येऊं लागला. अनेक देशांतल्या परंपरा व अवशेष यांची तुलना करण्याची जरूर भासूं लागली. अनेक परंपरा व अवशेष यांची तुलना करून '''जगांतला सारखेपणा व फरक दोन्हींही उघड करणें हें तुलनात्मक पद्धतीचे उद्दिष्ट बनले.''' ह्मणून Taine यांनीं ऐतिहासिकपद्धतीनें वाङ्मयाचा अभ्यास प्रचारांत आणल्यानंतर तुलनात्मक पद्धतीची त्याला जोड देणे भाग पडलें. आणि आतां तर वाङ्मयाचा पद्धतशीर अभ्यास ह्मणजे ऐतिहासिक व तुलनात्मक पद्धतींनीं त्याचें परिशीलन असा अर्थ होऊं लागला आहे. ऐतिहासिक व तुलनात्मक पद्धतींची जुन्या पद्धतीला मदत मिळाल्यामुळे पाश्चात्यांच्या अध्ययनांत नवीन जोम आला आहे, वाड्मयांत जीवंतपणा कायम राहिला आहे, व राष्ट्राच्या विस्ताराबरोबर सारस्वताचाही विस्तार वाढत आहे.
<br>{{gap}}अशी सुस्थिती आपल्या इकडेही यावी, आपली भाषा, आपले वाङ्मय वाढीस लागावें, शिक्षणाचा सर्वत्र प्रसार व्हावा, असें सुशिक्षितांना अलीकडे वाटू लागले आहे. पण आमचे बहुतेक सर्व शिक्षण परभाषेंतून होत असल्यामुळे पाश्चात्यांच्या वाङ्मयाचा आस्वाद घेऊन कार्यभाग होत नाही. ज्या उपायांनी त्यांनी स्वतःच्या भाषांचें, वाड्मयांचें, पुनरुज्जीवन केलें, त्यांचा जोम कायम ठेवला, तेच किंवा तसले उपाय आपणही योजणें अवश्य झालें आहे. पाश्चात्यांचे अगदी अलीकडले उपाय ह्मणजे '''ऐतिहासिक व तुलनात्मकपद्धती यांचा वाङ्मयांत उपयोग''' हे होत. या दोन पद्धती विकासवादाच्या परिणामाची फळें आहेत हे वर दर्शविलेच आहे.{{nop}}<noinclude></noinclude>
ahvzsp63mpebc2aqkqoi0o3l5as3h1e
233276
233275
2026-07-18T08:12:53Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
233276
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|५ }}
समाजाशी जरी संबंध जोडला तरी त्याचा '''व्यक्तींशीं''' असलेला संबंध कायम राहतोच. सारस्वत जरी समाजाच्या चैतन्याचा आदर्श असले तरी तें '''प्रतिभासंपन्न लेखकांच्या चिरस्मरणीय व सुंदर शब्दकृतींचा संग्रह'''ही आहे हे विसरणें शक्य नाहीं.
<br>{{gap}}परिस्थितीप्रमाणें उगवणें, बदलणें, उमलणें हा विकासवादाचा मुख्य सिद्धांत असल्यामुळे, एका देशांत जी परिस्थिती, जी परंपरा, आढळून आली, जे अवशेष राहिले, तीच परिस्थिती, तीच परंपरा, व तेच अवशेष इतरत्र आढळले पाहिजेत अशी ऐतिहासिक पद्धतीने होणारी समजुत चुकीची आहे, असा प्रत्यय येऊं लागला. "आपण तसे इतर" हैं जितके खरें आहे तितकेंच “नवी परिस्थिती व नवी सृष्टी" हेही खरें आहे, असा अनुभव येऊं लागला. अनेक देशांतल्या परंपरा व अवशेष यांची तुलना करण्याची जरूर भासूं लागली. अनेक परंपरा व अवशेष यांची तुलना करून '''जगांतला सारखेपणा व फरक दोन्हींही उघड करणें हें तुलनात्मक पद्धतीचे उद्दिष्ट बनले.''' ह्मणून Taine यांनीं ऐतिहासिकपद्धतीनें वाङ्मयाचा अभ्यास प्रचारांत आणल्यानंतर तुलनात्मक पद्धतीची त्याला जोड देणे भाग पडलें. आणि आतां तर वाङ्मयाचा पद्धतशीर अभ्यास ह्मणजे ऐतिहासिक व तुलनात्मक पद्धतींनीं त्याचें परिशीलन असा अर्थ होऊं लागला आहे. ऐतिहासिक व तुलनात्मक पद्धतींची जुन्या पद्धतीला मदत मिळाल्यामुळे पाश्चात्यांच्या अध्ययनांत नवीन जोम आला आहे, वाड्मयांत जीवंतपणा कायम राहिला आहे, व राष्ट्राच्या विस्ताराबरोबर सारस्वताचाही विस्तार वाढत आहे.
{{gap}}अशी सुस्थिती आपल्या इकडेही यावी, आपली भाषा, आपले वाङ्मय वाढीस लागावें, शिक्षणाचा सर्वत्र प्रसार व्हावा, असें सुशिक्षितांना अलीकडे वाटू लागले आहे. पण आमचे बहुतेक सर्व शिक्षण परभाषेंतून होत असल्यामुळे पाश्चात्यांच्या वाङ्मयाचा आस्वाद घेऊन कार्यभाग होत नाही. ज्या उपायांनी त्यांनी स्वतःच्या भाषांचें, वाड्मयांचें, पुनरुज्जीवन केलें, त्यांचा जोम कायम ठेवला, तेच किंवा तसले उपाय आपणही योजणें अवश्य झालें आहे. पाश्चात्यांचे अगदी अलीकडले उपाय ह्मणजे '''ऐतिहासिक व तुलनात्मकपद्धती यांचा वाङ्मयांत उपयोग''' हे होत. या दोन पद्धती विकासवादाच्या परिणामाची फळें आहेत हे वर दर्शविलेच आहे.{{nop}}<noinclude></noinclude>
k3cv34h3owf0ksoczewewzac59ji5xn
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/४
104
111022
233243
2026-07-17T12:02:38Z
~2026-40244-45
6111
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "" My pen is my fountain-The key of me; and I give myself, I do not sell. I write when I have matter in me and in the direction it presses for, other. wise not one word." 58. " Sigismund Alvan- Tragic Comedians." By George Meredith."
233243
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="117.217.21.120" /></noinclude>"
My pen is my fountain-The key of me; and
I give myself, I do not sell. I write when I have
matter in me and in the direction it presses for, other.
wise not one word." 58.
"
Sigismund Alvan-
Tragic Comedians."
By George Meredith.<noinclude></noinclude>
7y6amlukr5m4r6farkyxzzx5hmjl6al
233244
233243
2026-07-17T12:10:58Z
~2026-40244-45
6111
233244
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="117.217.21.120" /></noinclude><br><br><br><br><br><br>
{{gap}}"''My pen is my fountain-The key of me; and I give myself, I do not sell. I write when I have matter in me and in the direction it presses for, otherwise not one word." 58.''
{{right|Sigismund Alvan-
"Tragic Comedians."
By {{large|{large|George Meredith.}}}}<noinclude></noinclude>
m1qyks34qbo4uix9bkh3daf6wcbjbvo
233245
233244
2026-07-17T12:12:37Z
~2026-40244-45
6111
233245
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="117.217.21.120" /></noinclude><br><br><br><br><br><br>
{{gap}}"''My pen is my fountain-The key of me; and I give myself, I do not sell. I write when I have matter in me and in the direction it presses for, otherwise not one word." 58.''
{{right|Sigismund Alvan-<br>
"Tragic Comedians."<br>
By {{large|{{large|George Meredith.}}}}<noinclude></noinclude>
80yl8jgzqpoaonh5sjdptdgh454lr1b
233246
233245
2026-07-17T12:14:17Z
~2026-40244-45
6111
233246
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="117.217.21.120" /></noinclude><br><br><br><br><br><br>
{{gap}}"''My pen is my fountain-The key of me; and I give myself, I do not sell. I write when I have matter in me and in the direction it presses for, otherwise not one word." 58.''
{{right|Sigismund Alvan-}}<br>
{{right|"Tragic Comedians."}}<br>
{{right|By {{large|{{large|George Meredith.}}}}}}<noinclude></noinclude>
l1ex788y4hgzne073hxfvc3c6rg6cnq
233247
233246
2026-07-17T12:15:17Z
~2026-40244-45
6111
233247
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="117.217.21.120" /></noinclude><br><br><br><br><br><br>
{{gap}}"''My pen is my fountain-The key of me; and I give myself, I do not sell. I write when I have matter in me and in the direction it presses for, otherwise not one word." 58.''
{{right|Sigismund Alvan-}}
{{right|"Tragic Comedians."}}
{{right|By {{large|{{large|George Meredith.}}}}}}<noinclude></noinclude>
glc3o4wxr83pa1mpe172tghidj2p1y8
233248
233247
2026-07-17T12:18:05Z
~2026-40244-45
6111
233248
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="117.217.21.120" /></noinclude><br><br><br><br><br><br>
{{gap}}"''My pen is my fountain-The key of me; and I give myself, I do not sell. I write when I have matter in me and in the direction it presses for, otherwise not one word." 58.''
{{right|Sigismund Alvan-
|"Tragic Comedians."}}
{{right|By {{large|{{large|George Meredith.}}}}}}<noinclude></noinclude>
nv60jx9pnla4jg9y9giujrblkg7uaa2
233249
233248
2026-07-17T12:18:51Z
~2026-40244-45
6111
233249
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="117.217.21.120" /></noinclude><br><br><br><br><br><br>
{{gap}}"''My pen is my fountain-The key of me; and I give myself, I do not sell. I write when I have matter in me and in the direction it presses for, otherwise not one word." 58.''
{{right|Sigismund Alvan-
"Tragic Comedians."}}
{{right|By {{large|{{large|George Meredith.}}}}}}<noinclude></noinclude>
qc5bj713v8dj6df88htlprh0gf1i6gz
233250
233249
2026-07-17T12:19:47Z
~2026-40244-45
6111
233250
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="117.217.21.120" /></noinclude><br><br><br><br><br><br>
{{gap}}"''My pen is my fountain-The key of me; and I give myself, I do not sell. I write when I have matter in me and in the direction it presses for, otherwise not one word." 58.''
{{right|Sigismund Alvan-<br>
"Tragic Comedians."}}
{{right|By {{large|{{large|George Meredith.}}}}}}<noinclude></noinclude>
962a9y0r289o29i0wbr26u966k8mgac
233253
233250
2026-07-17T12:38:04Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
233253
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude><br><br><br><br><br><br>
{{gap}}"''My pen is my fountain-The key of me; and I give myself, I do not sell. I write when I have matter in me and in the direction it presses for, otherwise not one word." 58.''
{{right|Sigismund Alvan-<br>
"Tragic Comedians."}}
{{right|By {{large|{{large|George Meredith.}}}}}}<noinclude></noinclude>
qmtmq8a2y7l1n2v1sjpflzjbvvxnpsv
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/११
104
111023
233277
2026-07-18T08:31:12Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{center|६}} व्यासंग–वाचन-हें ज्ञानवृद्धीचं मुख्य साधन आहे. व्यासंग 'कोणता करावा' 'कसा करावा' या दोन प्रश्नापैकी फक्त 'कसा करावा' या एकाचेंच विवेचन पुढे छापलेल्या सहा निबंधांत केलें आहे...."
233277
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|६}}
व्यासंग–वाचन-हें ज्ञानवृद्धीचं मुख्य साधन आहे. व्यासंग 'कोणता करावा' 'कसा करावा' या दोन प्रश्नापैकी फक्त 'कसा करावा' या एकाचेंच विवेचन पुढे छापलेल्या सहा निबंधांत केलें आहे. ऐतिहासिक व तुलनात्मकपद्धतींनी व्यासंग करावयाचा आपल्या इकडे प्रघात नाहीं. तो पडावा, व आमच्या लेखकांत स्वतंत्र रचना करण्याची शक्ति व धमक यावी, आमच्या वाङ्मयाचा पंगूपणा दूर व्हावा, या हेतूनें '''“वाचन"''' या ओळखीच्या विषयावर निबंध लिहिण्यास सुरुवात केली. '''मनोरंजना'''च्या गेल्या वर्षीच्या आक्टोबरच्या
अंकात, व या वर्षीच्या सुरवातीपासून तो जुलाई पर्यंतच्या अंकांत ते प्रसिद्ध झाले.
{{gap}}प्रथम दोनच निबंध लिहिण्याचा उद्देश होता. पण दोहोंच्या ऐवजीं ते सहा झाले. लेख प्रसिद्ध होत असतांना व झाल्यावर, ते एकत्र छापल्यास वाचकांस व विशेषतः कॉलेजमधल्या विद्यार्थयास त्यांचा विशेष उपयोग होईल असें कांहीं मित्रांचे आग्रहाचें ह्मणणें पडल्यामुळे लेख एकत्र छापविले आहेत. मूळांत व यांत महत्वाचे फेरफार नाहींत. वाचकांना सोपें जावें ह्मणून मोठ्या अक्षरांचे मथाळे ठिकठिकाणी घालून त्यांची एक अनुक्रमणिकाही जोडली आहे. महत्वाचे शब्द व वाक्यें यांनाही मोठा टाईप घातला आहे.
{{gap}}'''विविधज्ञानविस्तारच्या''' आगष्ट १९१३ च्या अंकांत या लेखांचे परीक्षण प्रसिद्ध झालें आहें. त्यांत या निबंधांचा मोठा ग्रंथ करावा अशी एक सूचना आहे. पण निबंध व ग्रंथ यांच्या विवेचनांत फार मोठा फरक असल्यामुळे
तितका खटाटोप करण्यापूर्वी साहित्यसेवकांना या लेखांचा खरोखर उपयोग होतो आहे अशी खात्री होणें अवश्य आहे. विद्वानांच्या व विद्यार्थ्यांच्या कसोटीस हे लेख उतरल्यास त्यांचा एक ग्रंथ करण्यास उमेद येईल.
{{gap}}लेखांचा एक हेतू वाद व विवेचन हा असतो. म्हणून प्रस्तुत लेखांचा जितका खल होईल तितका इष्टच आहे, व वाचकांनी तो करण्यास अनमान करूं नये अशी विनंती आहे.<noinclude>
{{gap}}कडी,
{{gap}}'उत्तरगुजराथ' {{right|{{large|'''ग. स. भाटे.'''}}}}
{{gap}}४-११-१३.</noinclude>
41owcmop8tuei73ooffwli2mhuxjhln
233278
233277
2026-07-18T08:33:13Z
JayashreeVI
4058
233278
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|६}}
व्यासंग–वाचन-हें ज्ञानवृद्धीचं मुख्य साधन आहे. व्यासंग 'कोणता करावा' 'कसा करावा' या दोन प्रश्नापैकी फक्त 'कसा करावा' या एकाचेंच विवेचन पुढे छापलेल्या सहा निबंधांत केलें आहे. ऐतिहासिक व तुलनात्मकपद्धतींनी व्यासंग करावयाचा आपल्या इकडे प्रघात नाहीं. तो पडावा, व आमच्या लेखकांत स्वतंत्र रचना करण्याची शक्ति व धमक यावी, आमच्या वाङ्मयाचा पंगूपणा दूर व्हावा, या हेतूनें '''“वाचन"''' या ओळखीच्या विषयावर निबंध लिहिण्यास सुरुवात केली. '''मनोरंजना'''च्या गेल्या वर्षीच्या आक्टोबरच्या
अंकात, व या वर्षीच्या सुरवातीपासून तो जुलाई पर्यंतच्या अंकांत ते प्रसिद्ध झाले.
<br>{{gap}}प्रथम दोनच निबंध लिहिण्याचा उद्देश होता. पण दोहोंच्या ऐवजीं ते सहा झाले. लेख प्रसिद्ध होत असतांना व झाल्यावर, ते एकत्र छापल्यास वाचकांस व विशेषतः कॉलेजमधल्या विद्यार्थयास त्यांचा विशेष उपयोग होईल असें कांहीं मित्रांचे आग्रहाचें ह्मणणें पडल्यामुळे लेख एकत्र छापविले आहेत. मूळांत व यांत महत्वाचे फेरफार नाहींत. वाचकांना सोपें जावें ह्मणून मोठ्या अक्षरांचे मथाळे ठिकठिकाणी घालून त्यांची एक अनुक्रमणिकाही जोडली आहे. महत्वाचे शब्द व वाक्यें यांनाही मोठा टाईप घातला आहे.
<br>{{gap}}'''विविधज्ञानविस्तारच्या''' आगष्ट १९१३ च्या अंकांत या लेखांचे परीक्षण प्रसिद्ध झालें आहें. त्यांत या निबंधांचा मोठा ग्रंथ करावा अशी एक सूचना आहे. पण निबंध व ग्रंथ यांच्या विवेचनांत फार मोठा फरक असल्यामुळे
तितका खटाटोप करण्यापूर्वी साहित्यसेवकांना या लेखांचा खरोखर उपयोग होतो आहे अशी खात्री होणें अवश्य आहे. विद्वानांच्या व विद्यार्थ्यांच्या कसोटीस हे लेख उतरल्यास त्यांचा एक ग्रंथ करण्यास उमेद येईल.
<br>{{gap}}लेखांचा एक हेतू वाद व विवेचन हा असतो. म्हणून प्रस्तुत लेखांचा जितका खल होईल तितका इष्टच आहे, व वाचकांनी तो करण्यास अनमान करूं नये अशी विनंती आहे.<noinclude>
{{gap}}कडी,
{{gap}}'उत्तरगुजराथ' {{right|{{large|'''ग. स. भाटे.'''}}}}
{{gap}}४-११-१३.</noinclude>
r74fbqux89stikf2mpl9a6jphgly2qa
233279
233278
2026-07-18T08:34:20Z
JayashreeVI
4058
233279
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|६}}
व्यासंग–वाचन-हें ज्ञानवृद्धीचं मुख्य साधन आहे. व्यासंग 'कोणता करावा' 'कसा करावा' या दोन प्रश्नापैकी फक्त 'कसा करावा' या एकाचेंच विवेचन पुढे छापलेल्या सहा निबंधांत केलें आहे. ऐतिहासिक व तुलनात्मकपद्धतींनी व्यासंग करावयाचा आपल्या इकडे प्रघात नाहीं. तो पडावा, व आमच्या लेखकांत स्वतंत्र रचना करण्याची शक्ति व धमक यावी, आमच्या वाङ्मयाचा पंगूपणा दूर व्हावा, या हेतूनें '''“वाचन"''' या ओळखीच्या विषयावर निबंध लिहिण्यास सुरुवात केली. '''मनोरंजना'''च्या गेल्या वर्षीच्या आक्टोबरच्या
अंकात, व या वर्षीच्या सुरवातीपासून तो जुलाई पर्यंतच्या अंकांत ते प्रसिद्ध झाले.
<br>{{gap}}प्रथम दोनच निबंध लिहिण्याचा उद्देश होता. पण दोहोंच्या ऐवजीं ते सहा झाले. लेख प्रसिद्ध होत असतांना व झाल्यावर, ते एकत्र छापल्यास वाचकांस व विशेषतः कॉलेजमधल्या विद्यार्थयास त्यांचा विशेष उपयोग होईल असें कांहीं मित्रांचे आग्रहाचें ह्मणणें पडल्यामुळे लेख एकत्र छापविले आहेत. मूळांत व यांत महत्वाचे फेरफार नाहींत. वाचकांना सोपें जावें ह्मणून मोठ्या अक्षरांचे मथाळे ठिकठिकाणी घालून त्यांची एक अनुक्रमणिकाही जोडली आहे. महत्वाचे शब्द व वाक्यें यांनाही मोठा टाईप घातला आहे.
<br>{{gap}}'''विविधज्ञानविस्तारच्या''' आगष्ट १९१३ च्या अंकांत या लेखांचे परीक्षण प्रसिद्ध झालें आहें. त्यांत या निबंधांचा मोठा ग्रंथ करावा अशी एक सूचना आहे. पण निबंध व ग्रंथ यांच्या विवेचनांत फार मोठा फरक असल्यामुळे
तितका खटाटोप करण्यापूर्वी साहित्यसेवकांना या लेखांचा खरोखर उपयोग होतो आहे अशी खात्री होणें अवश्य आहे. विद्वानांच्या व विद्यार्थ्यांच्या कसोटीस हे लेख उतरल्यास त्यांचा एक ग्रंथ करण्यास उमेद येईल.
<br>{{gap}}लेखांचा एक हेतू वाद व विवेचन हा असतो. म्हणून प्रस्तुत लेखांचा जितका खल होईल तितका इष्टच आहे, व वाचकांनी तो करण्यास अनमान करूं नये अशी विनंती आहे.<noinclude>
<br>{{gap}}कडी,
<br>{{gap}}'उत्तरगुजराथ' {{right|{{large|'''ग. स. भाटे.'''}}}}
<br>{{gap}}४-११-१३.</noinclude>
t7l9i6jra41iest69cq9wsefabpm2wr
233280
233279
2026-07-18T08:35:13Z
JayashreeVI
4058
233280
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|६}}
व्यासंग–वाचन-हें ज्ञानवृद्धीचं मुख्य साधन आहे. व्यासंग 'कोणता करावा' 'कसा करावा' या दोन प्रश्नापैकी फक्त 'कसा करावा' या एकाचेंच विवेचन पुढे छापलेल्या सहा निबंधांत केलें आहे. ऐतिहासिक व तुलनात्मकपद्धतींनी व्यासंग करावयाचा आपल्या इकडे प्रघात नाहीं. तो पडावा, व आमच्या लेखकांत स्वतंत्र रचना करण्याची शक्ति व धमक यावी, आमच्या वाङ्मयाचा पंगूपणा दूर व्हावा, या हेतूनें '''“वाचन"''' या ओळखीच्या विषयावर निबंध लिहिण्यास सुरुवात केली. '''मनोरंजना'''च्या गेल्या वर्षीच्या आक्टोबरच्या
अंकात, व या वर्षीच्या सुरवातीपासून तो जुलाई पर्यंतच्या अंकांत ते प्रसिद्ध झाले.
<br>{{gap}}प्रथम दोनच निबंध लिहिण्याचा उद्देश होता. पण दोहोंच्या ऐवजीं ते सहा झाले. लेख प्रसिद्ध होत असतांना व झाल्यावर, ते एकत्र छापल्यास वाचकांस व विशेषतः कॉलेजमधल्या विद्यार्थयास त्यांचा विशेष उपयोग होईल असें कांहीं मित्रांचे आग्रहाचें ह्मणणें पडल्यामुळे लेख एकत्र छापविले आहेत. मूळांत व यांत महत्वाचे फेरफार नाहींत. वाचकांना सोपें जावें ह्मणून मोठ्या अक्षरांचे मथाळे ठिकठिकाणी घालून त्यांची एक अनुक्रमणिकाही जोडली आहे. महत्वाचे शब्द व वाक्यें यांनाही मोठा टाईप घातला आहे.
<br>{{gap}}'''विविधज्ञानविस्तारच्या''' आगष्ट १९१३ च्या अंकांत या लेखांचे परीक्षण प्रसिद्ध झालें आहें. त्यांत या निबंधांचा मोठा ग्रंथ करावा अशी एक सूचना आहे. पण निबंध व ग्रंथ यांच्या विवेचनांत फार मोठा फरक असल्यामुळे
तितका खटाटोप करण्यापूर्वी साहित्यसेवकांना या लेखांचा खरोखर उपयोग होतो आहे अशी खात्री होणें अवश्य आहे. विद्वानांच्या व विद्यार्थ्यांच्या कसोटीस हे लेख उतरल्यास त्यांचा एक ग्रंथ करण्यास उमेद येईल.
<br>{{gap}}लेखांचा एक हेतू वाद व विवेचन हा असतो. म्हणून प्रस्तुत लेखांचा जितका खल होईल तितका इष्टच आहे, व वाचकांनी तो करण्यास अनमान करूं नये अशी विनंती आहे.<br><noinclude>
{{gap}}कडी,
<br>{{gap}}'उत्तरगुजराथ' {{right|{{large|'''ग. स. भाटे.'''}}}}
<br>{{gap}}४-११-१३.</noinclude>
dazufof6u5fp6eneniyuds1edejuq50
233281
233280
2026-07-18T08:37:46Z
JayashreeVI
4058
233281
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|६}}
व्यासंग–वाचन-हें ज्ञानवृद्धीचं मुख्य साधन आहे. व्यासंग 'कोणता करावा' 'कसा करावा' या दोन प्रश्नापैकी फक्त 'कसा करावा' या एकाचेंच विवेचन पुढे छापलेल्या सहा निबंधांत केलें आहे. ऐतिहासिक व तुलनात्मकपद्धतींनी व्यासंग करावयाचा आपल्या इकडे प्रघात नाहीं. तो पडावा, व आमच्या लेखकांत स्वतंत्र रचना करण्याची शक्ति व धमक यावी, आमच्या वाङ्मयाचा पंगूपणा दूर व्हावा, या हेतूनें '''“वाचन"''' या ओळखीच्या विषयावर निबंध लिहिण्यास सुरुवात केली. '''मनोरंजना'''च्या गेल्या वर्षीच्या आक्टोबरच्या
अंकात, व या वर्षीच्या सुरवातीपासून तो जुलाई पर्यंतच्या अंकांत ते प्रसिद्ध झाले.
<br>{{gap}}प्रथम दोनच निबंध लिहिण्याचा उद्देश होता. पण दोहोंच्या ऐवजीं ते सहा झाले. लेख प्रसिद्ध होत असतांना व झाल्यावर, ते एकत्र छापल्यास वाचकांस व विशेषतः कॉलेजमधल्या विद्यार्थयास त्यांचा विशेष उपयोग होईल असें कांहीं मित्रांचे आग्रहाचें ह्मणणें पडल्यामुळे लेख एकत्र छापविले आहेत. मूळांत व यांत महत्वाचे फेरफार नाहींत. वाचकांना सोपें जावें ह्मणून मोठ्या अक्षरांचे मथाळे ठिकठिकाणी घालून त्यांची एक अनुक्रमणिकाही जोडली आहे. महत्वाचे शब्द व वाक्यें यांनाही मोठा टाईप घातला आहे.
<br>{{gap}}'''विविधज्ञानविस्तारच्या''' आगष्ट १९१३ च्या अंकांत या लेखांचे परीक्षण प्रसिद्ध झालें आहें. त्यांत या निबंधांचा मोठा ग्रंथ करावा अशी एक सूचना आहे. पण निबंध व ग्रंथ यांच्या विवेचनांत फार मोठा फरक असल्यामुळे
तितका खटाटोप करण्यापूर्वी साहित्यसेवकांना या लेखांचा खरोखर उपयोग होतो आहे अशी खात्री होणें अवश्य आहे. विद्वानांच्या व विद्यार्थ्यांच्या कसोटीस हे लेख उतरल्यास त्यांचा एक ग्रंथ करण्यास उमेद येईल.
<br>{{gap}}लेखांचा एक हेतू वाद व विवेचन हा असतो. म्हणून प्रस्तुत लेखांचा जितका खल होईल तितका इष्टच आहे, व वाचकांनी तो करण्यास अनमान करूं नये अशी विनंती आहे.<br><br><br><noinclude>
{{left|कडी,
'उत्तरगुजराथ' {{right|{{large|'''ग. स. भाटे.'''}}}}
४-११-१३.}}</noinclude>
byft5osb00cbrkbugbuf94gudy1f1ol
233282
233281
2026-07-18T08:38:39Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
233282
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|६}}
व्यासंग–वाचन-हें ज्ञानवृद्धीचं मुख्य साधन आहे. व्यासंग 'कोणता करावा' 'कसा करावा' या दोन प्रश्नापैकी फक्त 'कसा करावा' या एकाचेंच विवेचन पुढे छापलेल्या सहा निबंधांत केलें आहे. ऐतिहासिक व तुलनात्मकपद्धतींनी व्यासंग करावयाचा आपल्या इकडे प्रघात नाहीं. तो पडावा, व आमच्या लेखकांत स्वतंत्र रचना करण्याची शक्ति व धमक यावी, आमच्या वाङ्मयाचा पंगूपणा दूर व्हावा, या हेतूनें '''“वाचन"''' या ओळखीच्या विषयावर निबंध लिहिण्यास सुरुवात केली. '''मनोरंजना'''च्या गेल्या वर्षीच्या आक्टोबरच्या
अंकात, व या वर्षीच्या सुरवातीपासून तो जुलाई पर्यंतच्या अंकांत ते प्रसिद्ध झाले.
<br>{{gap}}प्रथम दोनच निबंध लिहिण्याचा उद्देश होता. पण दोहोंच्या ऐवजीं ते सहा झाले. लेख प्रसिद्ध होत असतांना व झाल्यावर, ते एकत्र छापल्यास वाचकांस व विशेषतः कॉलेजमधल्या विद्यार्थयास त्यांचा विशेष उपयोग होईल असें कांहीं मित्रांचे आग्रहाचें ह्मणणें पडल्यामुळे लेख एकत्र छापविले आहेत. मूळांत व यांत महत्वाचे फेरफार नाहींत. वाचकांना सोपें जावें ह्मणून मोठ्या अक्षरांचे मथाळे ठिकठिकाणी घालून त्यांची एक अनुक्रमणिकाही जोडली आहे. महत्वाचे शब्द व वाक्यें यांनाही मोठा टाईप घातला आहे.
<br>{{gap}}'''विविधज्ञानविस्तारच्या''' आगष्ट १९१३ च्या अंकांत या लेखांचे परीक्षण प्रसिद्ध झालें आहें. त्यांत या निबंधांचा मोठा ग्रंथ करावा अशी एक सूचना आहे. पण निबंध व ग्रंथ यांच्या विवेचनांत फार मोठा फरक असल्यामुळे
तितका खटाटोप करण्यापूर्वी साहित्यसेवकांना या लेखांचा खरोखर उपयोग होतो आहे अशी खात्री होणें अवश्य आहे. विद्वानांच्या व विद्यार्थ्यांच्या कसोटीस हे लेख उतरल्यास त्यांचा एक ग्रंथ करण्यास उमेद येईल.
<br>{{gap}}लेखांचा एक हेतू वाद व विवेचन हा असतो. म्हणून प्रस्तुत लेखांचा जितका खल होईल तितका इष्टच आहे, व वाचकांनी तो करण्यास अनमान करूं नये अशी विनंती आहे.<br><br><br><noinclude>
कडी,
'उत्तरगुजराथ' {{right|{{large|'''ग. स. भाटे.'''}}}}
४-११-१३.}}</noinclude>
77k7m5ctzgndj2xtb1w1ci7mqijt434
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१३
104
111024
233283
2026-07-18T08:39:46Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "वाचन. लेखांक १. २०४३ चों हीकडे चळवळ सुरू आहे. ज्ञातींच्या परिषदा भरत आहेत, पूर्वी कधीं लक्ष न दिलेल्या प्रश्नांचा खल होऊं लागला आहे; स्त्री- शिक्षण, प्रौढविवाह, विधवांची उन्नति, रोट..."
233283
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>वाचन.
लेखांक
१.
२०४३
चों
हीकडे चळवळ सुरू आहे. ज्ञातींच्या परिषदा भरत आहेत, पूर्वी
कधीं लक्ष न दिलेल्या प्रश्नांचा खल होऊं लागला आहे; स्त्री-
शिक्षण, प्रौढविवाह, विधवांची उन्नति, रोटीबेटीव्यवहार,
अंत्यजोद्धार, परदेशगमन, संक्षेपानें सांगावयाचें म्हणजे, समता
व स्वातंत्र्य या अस्पृश्य मानलेल्या कल्पना आपल्या समा-
जति पुन्हां डोकावूं लागल्यामुळे भ्रष्टाकार, सबगोलंकार,
इत्यादि ब्रह्मवृंदांच्या आरोळ्या फारशा ऐकू येत नाहीत;
कधीं काळी
ऐकू आल्याच तर कलमबहादुरांचे बाहू स्फुरण पावत नाहींत. पावा-
त्यांच्या संसर्गामुळे शास्त्रें, पुराणे, यांचे मंथन होऊं लागलें आहे; जुनीं बंधनें
शिथिल झाल्यामुळे आचारविचारांत गोंधळ माजला आहे; जो तो आपापल्या-
परी उपाय योजण्याचा प्रयत्न करीत आहे व स्वतःच्या कुटुंबालाच नव्हे तर
समाजाला वळण लावण्याची उमेद अथवा हांव बाळगणारे, व लिहिण्याची हौस
असलेले लोक, स्वतःचे उपाय लेखांचेद्वारें प्रगट करीत आहेत; राजकारण
आणि वाङ्मय यांच्याशी असलेला लेखकांचा एकनिष्ठ संबंध सुटून नित्य
व्यवहाराशीं जिव्हाळ्याचा संबंध लागल्यामुळे वाचक वर्ग वाढला आहे;
उत्साह वाढला आहे; उत्साहामुळे आवड वाढली आहे व लेखकाचा एक
स्वतंत्र धंदाच निघाला आहे. लेखक हे केवळ मनोरंजन करणारे समाजसेवक ही<noinclude></noinclude>
c4d2j9byzstnvzlig4h9ruid9rmmrri
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१४
104
111025
233284
2026-07-18T08:40:17Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "(2) कल्पना मावळत असून ते समाजाचे शिक्षक किंबहुना धुरीण होत आहेत, व त्यांच्या रामबाण उपायांचा वर्षाव सारखा होत असल्यामुळे बावर- ण्याचा संभव वाढून वाचकांवर विशेष जबाबदारी पडली आहे...."
233284
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>(2)
कल्पना मावळत असून ते समाजाचे शिक्षक किंबहुना धुरीण होत आहेत,
व त्यांच्या रामबाण उपायांचा वर्षाव सारखा होत असल्यामुळे बावर-
ण्याचा संभव वाढून वाचकांवर विशेष जबाबदारी पडली आहे. गहन पण
व्यवहाराला उपयोगी अशा प्रश्नांचा ऊहापोह सुरू असताना लेखकानें नेहमीं
पुरता अभ्यास करून, मनन करून, जयादारी ओळखून लेख लिहावेत, हें
सांगणे जितके सोपे आहे, तितकें करणें सोपें नाहीं. रोज पुढे येणाऱ्या प्रश्नांवर,
मग ते कितीहि कठीण असोत, लोकमताला वळण लावण्याचा धंदा करणारांना
मत देणे अवश्य आहे. पण वाचकांची अशी स्थिति नाही. त्यांनां विचार कर-
ण्यास अवकाश मिळतो. निरनिराळ्या विद्वानांनीं लिहिलेले लेख वाचून मग
स्वतःची दिशा ठरविणें शक्य असतें. प्रयत्न मात्र केला पाहिजे व वाचन
पद्धतशीर झाले पाहिजे. कारण, अव्यवस्थित वाचनापेक्षां मुळींच न वाचलें
तरी एकपक्षी पुरवलें, असें वाटण्याचा बरेच वेळा प्रसंग येतो. वेळ घालविण्याक-
रितां कांहींतरी वाचावयाचें, इतकीच उमेद वाचकांची असली तर लेखकही
विशेष तसदी न घेतां काहीतरी लिहील, पांढऱ्यावर काळे करील. कारण, इतर
धंदेवाल्यांप्रमाणे वाचकांना आवडेल तसें, किंवा फारतर विशेष कठिण किंवा
कडू न वाटेल असें, लिहिणें लेखकाला भाग आहे. पारखणारा न मिळाल्यास
चांगल्या लेखांची किंमतहि बेताचीच होणार दें उघड आहे. म्हणून वाचक चिकि-
त्साखोर पाहिजेत, थोडक्यानें समाधान न पावणारे पाहिजेत, विषयांचा पुरा
खल करविणारे, स्वतःचे विचार स्वतःचे अंतरंगांतच न सांचविणारे पाहिजेत.
वाचक मार्मिक नसल्यास प्रश्नांचा खल न होतां चुथडा होतो, यांत नवल
कोणतें । असे वाचक तसे लेखक. एकांत मार्मिकपणा आला कीं, दुसऱ्यांतहि
येईल, लेखकांना हुरूप येईल, धंद्यांत शिरण्यापूर्वी ते बरीच तयारी करतील.
विशेषतः या लोकमत तयार करणारांची व पुढाऱ्यांची, अज्ञजनांनां उपदेशामृत
पाजण्याची नेहमीं आवडती पद्धत जाऊन सर्वांना समजेल अशी वादविवादाची
पद्धत सुरू होईल. स्वतःची जबाबदारी पुढाऱ्यांच्या वारंवार प्रत्ययास येईल,
विषयांचा योग्य ऊहापोह होऊन लोकशिक्षणांत भर पडेल. सारांश, कठिण
विषयांवर योग्य मत देण्यास, किंवा त्याविषयीं मत ठरविण्यास जी लायकी, जी
पूर्वतयारी आागते, ती व्यवस्थित, कष्टमय, वाचनाशिवाय होणे अशक्य आहे.
,
नयन इतके कष्ट करावयाचे असतील त्यांना थोडीबहुत मदत व्हावी,<noinclude></noinclude>
mykx80hx9z9nz9hwc7xqrlry8m1wk9t
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१५
104
111026
233285
2026-07-18T08:40:58Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ३ ) पद्धतशीर वाचनाची संवय लागण्यास किती प्रयास पडतात त्याची कल्पना यावी, लेखकाच्या धंद्यास लागणाऱ्या सामुग्रीचा योग्य विचार व्हावा, या हेतूनें बऱ्याच वर्षाच्या अनुभवानें सुचल..."
233285
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( ३ )
पद्धतशीर वाचनाची संवय लागण्यास किती प्रयास पडतात त्याची कल्पना
यावी, लेखकाच्या धंद्यास लागणाऱ्या सामुग्रीचा योग्य विचार व्हावा, या हेतूनें
बऱ्याच वर्षाच्या अनुभवानें सुचलेले विचार मनोरंजनाच्या वाचकांकरितां सादर
करण्याचा हा प्रयत्न आहे.
व्यासंग.
वाचन हा शब्द दोन अर्थी वापरतात. एक वाचनाची क्रिया व दुसरा विद्या-
व्यासंग. अमक्या गृहस्थाचें वाचन जबर आहे झटलें ह्मणजे तो मोठ्याने वाचतो
असा अर्थ न होता त्याचा परिश्रम सतत आहे, असाच होतो. या लेखांत वा-
चनाच्या क्रियेविषयीं, ध्वनींच्या आरोहावरोहाविषय लिहिण्याचा माझा उद्देश
नाहीं. ' शुद्ध कसे लिहावें व शुद्ध कसे बोलावें हें व्याकरण शिकल्याने समजतें'
अर्से ह्मणतात. तसेंच शाळेतील पंतोजीच्या कवाइतीप्रमाणे एक सुरांत आवाज
किती चढवावा व किती उतरवावा ह्मणजे मस्तकशूल उत्पन्न होऊन अर्थाचा
साक्षात्कार होतो, हें अचूक सांगण्यास कदाचित् गायनशास्त्राचे अंग वाढवावें
लागेल. आवेश, शोक, क्षोभ, निराशा, गांभीर्य, मार्दव, प्रेम इत्यादि मनोविकार
श्रोत्यांचे मनावर ठसविण्यास, मानस व नाट्य या शास्त्रांशी परिचय करण्याची
पाळी येईल. कारण, समूहापुढे वाचन किंवा भाषण यांत फारसा फरक नाहीं
पण मनोरंजनांतील जागा व विशेषतः वाचकांचा धीर, यांना मर्यादा असल्यामुळे
फक्त वाचन ह्मणचे विद्याव्यासंग याविषयी लिहिण्याचा विचार आहे.
विद्येचा व्यासंग झणजे विषयांचा व्यासंग, ही गोष्ट उघड आहे. व्यासंगाचा
विचार करितांना भाषेचा प्रश्न विशेष महत्त्वाचा नाहीं. काणतीहि भाषा घेतली
तरी अभ्यास करितांना सर्वत्र लागू पडणारी अशींच तत्त्वें अंगिकारावी लागतात ;
पण आह्मी सर्वजण इंग्रजी भाषेच्या द्वारें विद्यादान घेत असल्यामुळे विशेषत:
त्या वाङमयास अनुसरून हा लेख आहे.
परभाषेच्या द्वारे आह्मी शिकत असल्यामुळे आमच्या वाचनांत दोन निराळ्या
प्रकारच्या अडचणी येतात. पहिली भाषेची. ही अडचण स्वभाषेत नसते. जोपर्यंत
असते तोपर्यंत विद्याव्यासंगास सुरुवात झाली, असें ह्मणतां येत नाहीं. ह्मणूनच
विश्वविद्यालयातील अभ्यासक्रमास भावी परिश्रमाची पूर्वतयारी समजण्यांत येते
व चरितार्थसच उपयोगी पडणाऱ्या विषयांशिवाय अन्य विषयांची ओळख करून<noinclude></noinclude>
e97yuxfgnixsyni0h4pcey905bq6iu9
सदस्य चर्चा:Bhatu kashinath Patil
3
111027
233286
2026-07-18T10:53:55Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
233286
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Bhatu kashinath Patil}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १६:२३, १८ जुलै २०२६ (IST)
gv939zh83khyoakz0ho2uid8nlapj5d
सदस्य:Bhatu kashinath Patil
2
111028
233287
2026-07-18T10:58:12Z
Bhatu kashinath Patil
6113
/* */
233287
wikitext
text/x-wiki
हे माझे नवीन पेज आहे
5ycng7laee7ryfcri06z6lq85pr7cgv