विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.12 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf 106 68398 233844 152369 2026-07-28T15:53:42Z QueerEcofeminist 918 name 233844 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=[[ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड]] |Language=mr |Volume= |Author= |Translator= |Editor=केशव सीताराम ठाकरे |Illustrator= |School= |Publisher=यशवंत शिवराम राजे |Address=मुंबई |Year=1919 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] 3dxmp5htvmjjl4tzw6t5d83zidq4mgi अनुक्रमणिका:जातिभेदविवेचन.pdf 106 68406 233846 211680 2026-07-28T15:58:01Z QueerEcofeminist 918 + 233846 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=[[जातिभेदविवेचन]] |Language=mr |Volume= |Author=बाबा पदमनजी |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=बॉम्बे ट्रॅक्ट अँड बुक सोसायटी |Address=बॉम्बे |Year=1890 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] [[वर्ग:समाजशास्त्र]] hyqmlf8iytp9t4hnkkpvbyz43kajsy0 अनुक्रमणिका:गुन्हेगार जाती.pdf 106 69976 233848 153969 2026-07-28T15:59:48Z QueerEcofeminist 918 + 233848 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=[[गुन्हेगार जाती]] |Language=mr |Volume= |Author=एम्. केनडी |Translator=त्रिंबक नारायण अत्रे |Editor= |Illustrator= |School= |Publisher=त्र्यंबक हरी आवटे |Address=पारनेर |Year=1911 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] lbl7n547utwtyq00gxd0lxbu0eja77n पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१ 104 84679 233818 180822 2026-07-28T15:43:12Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233818 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="2402:8100:3194:BDC:6BFC:9967:C5A2:2126" /></noinclude>॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ हें प्रचीतीचे बोलणें । विवेकें प्रचीत बाणें । State प्रचीत पाहतील ते शहाणे | अन्यथा नव्हे || श्रीसमर्थ. ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात् नोकरशाहीचें बंड. मुख्य संपादक केशव सीताराम ठाकरे ष (896) 9850 वक्तृत्वशास्त्र, कोदण्डाचा टणत्कार, कुमारिकांचे शाप, Life & Mission of Ramdas इ० पुस्तकांचे कर्ते. * मदतनीस संपादक १ विनायक सीताराम जयवंत. सन १९१९ ३०. प्रकाशक यशवंत शिवराम राजे लेडी जमशेटजी रोड, सोराब मिल लेन, मिरांडाची चाळ, दादर (मुंबई ). - किंमत ३ रुपये. किंमत किंमत ३ रुपये.<noinclude></noinclude> bj5b7zmd2v85l7pg22rrpl5r7249rpl पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/२ 104 108740 233819 225276 2026-07-28T15:43:34Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233819 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="2401:4900:ACA9:E055:BDDD:C5FA:B24B:698E" /></noinclude>उपोद्घात ... अनुक्रमणिका. ... ... ... ... ... ... ... ... ... ... १ चांद्रसेनीय कायस्थ प्रभू २ क्षत्रिय मराठे ... ... ३ पंचाल (दैवज्ञ ) ब्राह्मण ४ शु० यजुर्वेदी वाजसनेय ब्राह्मण परिशिष्ट. ५ चित्पावनांचा इतिहास ... ... : i.. : पृष्ट. १-५२ ... : ... १४७ ... ... ... १८३ ... : ... : १९८ : : : ... मुंबईः – खेतवाडी ब्याकरोड घर नंबर १-२ व ३ येथें ' तत्त्वविवेचक' - छापखान्यांत रा. श्रीधर विष्णु कामत यांनीं छापिलें तें रा. यशवंत शिवराम राजे यांनी मिरांडाची चाळ-दादर, मुंबई येथें प्रसिद्ध केलें.<noinclude></noinclude> 97ooch3dnxb1mh3mwvzyltbgv126h6x पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/६ 104 111162 233850 233785 2026-07-29T05:42:21Z JayashreeVI 4058 233850 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{x-larger|'''अनुक्रमणिका.'''}}}} .... .... <center> {| |+ |- | || '''पृष्ठांक''' |- |'''लेखांक १.'''{{gap}}{{gap}}{{gap}} || १ - १४ |- |{{gap}}प्रास्ताविक || १ - ३ |- |{{gap}}व्यासंग || ३ - ५ |- |{{gap}}ऐतिहासिक रीत || ५ - ८ |- |{{gap}}अलंकारशास्त्र || ८–११ |- |{{gap}}वाङ्मयांतील निर्णय || ११–१२ |- |{{gap}} तीन कोटी || १२–१३ |- |{{gap}} ऐतिहासिक पद्धतीचे गुणदोष || १३ – १४ |- |'''लेखांक २.'''{{gap}}{{gap}}{{gap}}|| १५---२५ |- |{{gap}} ऐतिहासिक व तुलनात्मक पद्धती. || १५ – १६ |- |{{gap}} ऐतिहासिक पद्धतीचा उपयोग - उदाहरणें ||१६ – १९ |- |{{gap}} ओंवी व अभंग. || १८–१९ |- |{{gap}} पोवाडा, व लावणी वगैरे. || २०-२२ |- {{gap}} तुलनात्मक पद्धती. || २२–२५ |- |'''लेखांक ३.'''{{gap}}{{gap}}{{gap}} || २६--४० |- |{{gap}} पद्य व गद्य.... || २६–२८ |- |{{gap}} कांही ठराविक प्रकार || २८ |- |{{gap}} अगत्याची सूचना || २९-३० |- |{{gap}} तुलनात्मक पद्धतीची उदाहरणें- ||- |- |{{gap}} चरित्र ( Biography ) || ३०-३५ |}<noinclude></noinclude> dp6v20dycl1mcghx65aoicfqmszbcnx 233851 233850 2026-07-29T05:48:08Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 233851 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{x-larger|'''अनुक्रमणिका.'''}}}} .... .... <center> {| |+ |- | || '''पृष्ठांक''' |- |'''लेखांक १.'''{{gap}}{{gap}}{{gap}} || १ - १४ |- |{{gap}}प्रास्ताविक || १ - ३ |- |{{gap}}व्यासंग || ३ - ५ |- |{{gap}}ऐतिहासिक रीत || ५ - ८ |- |{{gap}}अलंकारशास्त्र || ८–११ |- |{{gap}}वाङ्मयांतील निर्णय || ११–१२ |- |{{gap}} तीन कोटी || १२–१३ |- |{{gap}} ऐतिहासिक पद्धतीचे गुणदोष || १३ – १४ |- |'''लेखांक २.'''{{gap}}{{gap}}{{gap}}|| १५---२५ |- |{{gap}} ऐतिहासिक व तुलनात्मक पद्धती. || १५ – १६ |- |{{gap}} ऐतिहासिक पद्धतीचा उपयोग - उदाहरणें ||१६ – १९ |- |{{gap}} ओंवी व अभंग. || १८–१९ |- |{{gap}} पोवाडा, व लावणी वगैरे. || २०-२२ |- {{gap}} तुलनात्मक पद्धती. || २२–२५ |- |'''लेखांक ३.'''{{gap}}{{gap}}{{gap}} || २६--४० |- |{{gap}} पद्य व गद्य.... || २६–२८ |- |{{gap}} कांही ठराविक प्रकार || २८ |- |{{gap}} अगत्याची सूचना || २९-३० |- |{{gap}} तुलनात्मक पद्धतीची उदाहरणें- ||- |- |{{gap}} चरित्र ( Biography ) || ३०-३५ |}<noinclude></noinclude> 84p8qp8l164iy4euq1fd054n5g2e239 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/३ 104 111202 233820 2026-07-28T15:43:57Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233820 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>प्रकाशकाचे दोन शब्द. -:: जातिमत्सरानें महाराष्ट्राचें अपरिमित नुकसान केले आहे. हाच प्रकार या उप्पर तसाच चालूं रहाणें वरें नव्हे, म्हणून त्याचे खरेखुरें राक्षसी स्वरूप देशबांधवांपुढे मांडल्यास ते या निरर्थक वादापासून देशाचा बचाव करण्याचा कांहींतरी योग्य मार्ग शोधून काढतील, या आशेनें हैं ऐतिहासिक मह- त्वाचें पुस्तक प्रसिद्ध करण्यांत येत आहे. नातिमत्सराचा नायनाट होऊन आमच्या सर्व देशबंधूंचीं मनें एकदेशीयत्वाच्या उज्वल विचारांनी भरून जावीं; निर- निराळ्या जातींचीं सामाजिक व धार्मिक बाबतींतील मनुष्यकृत कृत्रिम बंधने शिथिल व्हावीं, निदान राष्ट्रीय कामगिरीत एका आईचीं सर्व लेकरें या नात्यानें प्रयत्न करण्याच्या कामांत त्यांचा अडथळा उत्पन्न होऊं नये इतकी तरी त्याची व्याप्ती संकुचित व्हावी आणि एन केन प्रकारेण परस्परांचा काया वाचा मनें द्वेष करण्याची कुबुद्धी अतःपर कोणांतहि उत्पन्न होऊं नये, हा या पुस्तकप्रकाश- नाचा मुख्य उद्देश आहे. या पुस्तकांत ऐतिहासिक सत्याचे निरूपण स्पष्टस्पष्ट केलेले आहे. रुचिभिन्नत्वानें तें कित्येकांस आवडेल, कित्येकांस आवडणार नाही, त्याला आमचा इलाज नाहीं. आम्हांला पुणे भारतइतिहास-संशोधक मंडळा- सारखा अहंपणाचा ताठा मिरविण्याचा अधिकार नाही किंवा इच्छाहि नाहीं. या पुस्तकांत नजरचुकीनें किंवा अन्य कारणानें इतिहास - विषयक कांहीं चुका - किंवा विधाने कोणी विद्वज्जनांनी सप्रमाण नजरेस आणून दिल्यास त्यांचा आम्ही साभार स्वीकार करूं व दुसऱ्या आवृत्तींत ती सुधारणा हि करूं प्रस्तुत पुस्तकावर नियतकालिकांतून टीका किंवा चर्चा करणारांनीं कृश करून त्या त्या पत्राचा अगर मासिकाचा अंक आमचेकडे अवलोकनार्थ पाठविण्याची मेहेरबानी करावी. वास्तवीक शिष्टसांप्रदायाप्रमाणे हें काम त्या त्या पत्रकाराचें असतें; पण इतकी उदारमनस्कता आमच्या पत्रकारांत मुळींच आढळून येत नाहीं ; फार काय पण अंक पाठविण्याबद्दल पत्राने विनंती केली असतांहि त्याचे उत्तर मिळत नाहीं. उपोद्घाताकरिता लिहिलेला बराच मजकूर पुस्तकाची पृटसंख्या अजमासा- बाहेर वाढल्यामुळे आयत्या वेळी बाजूस ठेवावा लागला, याबद्दल फार दिलगीर शोर<noinclude></noinclude> 5uigitac4vsahhwivuhck2z98ffmndn पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/४ 104 111203 233821 2026-07-28T15:44:24Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233821 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>[ २ ] आर्होत. मराठेशाहीतील व विशेषतः पेशवाईतील बऱ्याच मोठमोठ्या मुत्सद्यांचीं स्वभावचित्रे, त्यांचीं धोरणे, त्यांची परस्परांविषयींची स्पर्धा आणि त्यांचा राष्ट्रा- वर झालेला परिणाम याविषयीं रा. ठाकरे यांनीं केलेली साधार व सोपपत्तिक चर्चा वास्तविक याच पुस्तकांत यायला पाहिजे होती, परंतु नाइलाज आहे. हा मजकूर बराच मोठा असून त्याचे एक स्वतंत्र पुस्तक आम्ही लवकरच छापून प्रसिद्ध करणार आहोत. त्यांतून सध्यां ऐतिहासिक व्यक्त्यांच्या बाप्तिस्म्याचा धुमाकूळ सुरू झाला आहे. सावित्रीबाईं ठाणेदारणीला कोणी कायस्थ प्रभू ज्ञातींतून चित्पावन जातींत ढकलीत आहेत; कोणी तिला कादंबरींतील नायिका म्हणत आहेत; कोणी नाना फडणीसाच्या अंतःकरणाच्या खाणींतून कोहीनुरांचे ढीगच्या ढीग बाहेर काढीत आहेत; कोणी त्याच्या मनोमयभूमिकेवर नक्षीदार गालीचे पसरण्याच्या गडबडीत आहेत; कोणी गोपिनाथपंत बोकीलाला शिवाजीची चिटणीशी वतनी बहाल देण्याच्या धामधुमीत आहेत; कोणी हेमाडपंताला हि ब्राह्मणी पोषाख चढविण्याच्यां तजविजींत आहेत; तर कोणी मराठ्या आठवल्याला चित्पावनी बाप्तिस्मा देण्याच्या खटपटीत आहेत. असा मोठा ऐतिहासिक क्रांतीचा काळ आलेला आहे. तेव्हां या भानगडींत कायकाय उलाढाल्या होतील तें पाहिलें पाहिजे. न जाणो, उद्यां अफझुलखान हा शिवाजीचा मामा ठरण्याचा बराच संभव आहे; कारण कृष्णानें कंस मामाला ठार मारलें म्हणून; आणि मुरार बाजी हा चित्पावन असल्याचाहि दस्तऐवजी पुरावा सांपडणार नाहीं कशावरून ? ही सगळी धामधूम किंचित् शांत झाली म्हणजे निवांतीनें वरील पुस्तक आम्ही प्रसिद्ध करूं. सरतेशेवटीं ज्या ज्या विद्वान् मंडळींनीं या पुस्तकाच्या बाबतींत मदत केली त्यांचे, ज्या विद्वान ग्रंथकारांच्या ग्रंथांचा ठिकठिकाणीं पुरावा घेण्यांत आला आहे त्यांचे व तत्त्वविवेचक छापखान्यांतील मालक व सर्व कामगार लोक यांचे कृत- ज्ञतापूर्वक आभार मानतों. बुधवार आषाढी एकादशी, शके १८४१, ता. ९ जुलै १९१९३. दादर - मुंबई. सर्वांचा नम्र सेवक, यशवंत शिवराम राजे. प्रकाशक.<noinclude></noinclude> 7u39zot9oonp2fjpf1vda6620bkx5e8 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/५ 104 111204 233822 2026-07-28T15:44:43Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233822 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>ब ४९७ 9820 ॥ श्री ॥ * ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात् ज नोकरशाहीचें बंड. उपोद्घात लेखक : – केशव सीताराम ठाकरे. ভা गांतील कोणच्याहि धर्मात पश्चात्तापाचे महत्व फार आहे. कृतकर्माचा उच्चार होऊन त्याबद्दल पश्चात्ताप झाला, म्हणजे मनुष्य पुनित होतो, तो ते कर्म पुनश्च सहसा करीत नाहीं, आणि तो पश्चात्ताप जर खरोखर नाटकी नसेल तर कृतकर्माची व मनुष्याची पुन्हा यावज्जीव गांठ पडत नाहीं. परंतु पश्चात्ताप व्हायला तरी पदरीं कांहीं पुण्याई लागते म्हणतात. त्यांतून कृतकर्माच्या पात- कांची स्मृति होणें, हें देखिल मनाच्या शुद्धतेचे द्योतक समजलें जातें. कृतपापाची तंतोतंत मोजदाद ठेवून त्याची वारंवार आठवण देण्याचे पुण्य कृत्य गतकालाचा इतिहास निस्पृहपणाने करीत असतो. उत्क्रांत्यावस्थेच्या प्रवासांत मानवी पायांना एकाच पातकाच्या धोंड्यावर ठेचाळण्याचा वारंवार प्रसंग येऊ नये म्हणून हाच इतिहास गतानुभवाची दिवटी घेऊन मानवी सृष्टीच्या पुढे पुढे हुजन्याप्रमाण धांवत असतो. पारमेश्वरी दिव्य इच्छेचें गूढ तत्त्व बरोबरसें नीट न उमगल्यामुळे मनुष्यांच्या हांतून जीं घोर अमानुष कृत्ये घडतात, ती पुन्हा घडूं नयेत म्हणून हाच इतिहास वेळप्रसंग साधून मानवांच्या कृतपापाचा धडा त्यांच्या तोडांवर निर्भिडपणाने घडघडा वांचून दाखवून त्यांची कानउघडणी करतो. भूत- कालीं घडलेल्या क्षुल्लक चुकीचा भयंकर परिणाम वर्तमानकालीन् मानवांना स्पष्टस्पष्ट भाषेत सांगून त्यांच्या विचारयंत्राला नियंत्रित करण्याची कामगिरी हाच इतिहास करीत असतो. भूतकालांतील पापांचे पर्वत तुमच्या डोळयांपुढे मूर्तिमंत आणून MAJAN 1994<noinclude></noinclude> grxvurgapv2wy75dubw76n861ur8oqr पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/६ 104 111205 233823 2026-07-28T15:45:12Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233823 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>4 ( २ ) उभे करणारा आणि 'पहा, या उपर तुम्ही जर आपले वर्तन नीट सुधारलें नाहींत, तर हेच पर्वत मी साऱ्या जगाच्या प्रदर्शनांत मांडून तुमच्या बदनामीचा डंक पिटीत राहीन' म्हणून सडेतोड दम भरणाराहि इतिहासच. कृतपापावर जाणून बुजून पांघरूण घालणाऱ्या आणि डोळ्यांवर कातडे ओढून पुण्याईचा तोरा मिर- विणाऱ्या दांभिकाच्या मुस्कटांत भडकावून, 'चल चोरा ! पापाचें माप भरल्या- शिवाय पुण्याईच्या गप्पा मारतोस?' अशी खरमरीत तंबी बिनमुर्वत देणारा इतिहासच. खऱ्याला खोट्याचा आणि खोट्याला खऱ्याचा मुखवटा घालून आड- मार्गात ऐतिहासिक विश्वामित्री सृष्टीचें ठाणे देऊन वेळोवेळीं डाकेखोरपणा कर- ण्यास सवकलेल्या बिलंदाज ठगांचे राजवाडे हुडकून काढणारा पटाईत डिटेक्टीव इतिहासच पापांचे माप पदरांत बांधण्यांत इतिहास जितका निर्दय आणि निस्पृह आहे, तितकाच पुण्यांची गांठोडी घेऊन अडीअडचणीच्या वेळ मदतीस धविण्याइतका तो मनाचा उदारहि आहे. बिकट परिस्थितीच्या उलट्या लाटा नाकातोडांत पाणी कोंबून राष्ट्राचा जीव गुदमरून टाकूं लागल्या कीं प्राचीन संस्कृतीच्या पुण्याईचा " लाईफ बोय् " घेऊन इतिहास पाठीमार्गे त्यास हात देण्यास दत्त म्हणून उभाच असतो. राजकीय किंवा धार्मिक जुलमांची तात राष्ट्राच्या मानेला लागतांच प्राचीन संस्कृतीच्या व अनुभवाच्या तीव्र शस्त्रानें ती तात ताडकन् तोडून राष्ट्राचा कांसावीस झालेला जीव वांचविणारा कोण ! इति- हासच. पोटांत एक आणि ओठांत एक अशा दांभिक गारुड्याच्या चल्चल् मदारीच्या हातचलाखीने खोट्यानाट्या कल्पनांची धूळ डोळ्यांत गेल्यामुळे राष्ट्र जेव्हां डोळे चोळूं लागतें आणि आत्मविनाशक शाबरी मंत्रांच्या ' पासेस ' मुळे जेव्हां त्याची आत्मविश्वासशक्ती लंजूर होऊन त्याची प्राणज्योत मिणमिण करूं लागते, तेव्हां केसरीवत् गर्जना करून त्या डोंबाऱ्याच्या पातड्यावर झडप घालून त्याचीं हाडकै नरम करणारा आणि राष्ट्राच्या कानांत त्याच्या पूर्वसंचिताचा दिव्य मंत्र फुंकून त्याला निमिषार्धात सचैतन्य करणारा इतिहासाशिवाय दुसरा अश्विनी- कुमार कोण ? , * २. सत्कृत्यांचा योग्य तो अभिमान असणें आणि त्यांचा निरंतर उच्चार करून स्तुति करणें है जितके स्वाभाविक आहे, तितकेंच दुष्कृत्यांकडे कानाडोळा करणे<noinclude></noinclude> edilhjgu3h6k6hnuuvi7tc5kajeg5cc पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/७ 104 111206 233824 2026-07-28T15:45:44Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233824 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>. ( ३ ) (७) हि अस्वाभाविक नाहीं. हा मनुष्याचा स्वभावच पडला. परंतु उत्क्रांति- तत्त्वाला पातकांचा उच्चार आणि तत्संबंधीं पश्चात्ताप हीं जितकीं पथ्यकारक होतात, तितका सत्कृत्यांचा जयघोष उपयोगी पडत नाहीं. पुराणकालाबद्दल फाजील अभिमान बाळगून जुनें तितकें सोनें अशा प्रवृत्तीमुळे राष्ट्राच्या भूतकालीन् पातकांवर पांघरूण घालणे म्हणजे नव्या मन्वंतराच्या नव्या आशीर्वादांस आम्ही कुपात्र आहोत, अशी जबानी देणेच होय. प्राचीन ग्रीक व रोमन राष्ट्रांच्या वैभवाबद्दल, बुद्धिमत्तेबद्दल आणि संस्कृतीबद्दल योग्य तो आदर राखून, त्यांच्या हातून जाणूनबुजून अथवा नकळत घडलेल्या पातकांची शक्य त्या निस्पृहतेनें छाननी केल्यामुळेच आज पाश्चात्य राष्ट्रें लक्ष्मी सरस्वतीच्या प्रसादास पात्र झालीं आहेत. खुद्द इंग्लंडकडे जरी पाहिलें तरी तेथील लोकांच्या राष्ट्राभिमानाचीं मूळतत्व त्यांनी जरी अभंग ठेविलीं आहेत तरी सुद्धां त्यांच्या प्राचीन इतिहासांतील कृष्णकृत्यांचा खरमरीत निषेध करण्याला त्यांची मनोदेवता किंचित् सुद्धां कचरत नाहीं. एलीझाबेथ राणीच्या कारकीदाँत ब्रिटीशांच्या नव्या मन्वंतराचा उदय झाला, म्हणून तिच्या चरित्राकडे ब्रिटन लोक जितक्या अभिमानानें पहातात व - त्याचे स्तुतिपाठ गातात, तितक्याच किंबहुना अधिक तीव्रतेने त्याच राणीच्या अमदानीत बोकाळलेल्या ढोबळढोबळ अनीतिमूलक गोष्टींचे वाभाडे काढायला त्यांची सत्यप्रियता मुळींच मागेंपुढे पाहत नाहीं. प्रजासत्ताक राज्यपद्धतीचे उद्धारक म्हणून अग्रेसरत्वाचा धौशा चौखंडों गाजविणारे अमेरिकन लोक, गुलामगिरीच्या व्यापाराचा प्रश्न डोळयांपुढे येतांच त्याचा तितक्याच जोरानें निषेध करायला ते अझूनहि दिक्कत बाळगीत नाहींत ; उलटपक्षीं त्या काळ्याकुट्ट इतिहा- सांतील बारीकसारीक बाबतींचें संशोधन करण्यांत ते अझूनहि अविश्रांत श्रम करीत असतात. दिव्याखालीं अंधेर हा असावयाचाच. परंतु जेव्हां एखादें राष्ट्र दिव्याच्या उजेडाचाच इतिहास तेवढा पुढे आणते आणि अंधाराबद्दल जाणून- बुजून अज्ञान दाखवितें, तेव्हां तें राष्ट्र - त्याची प्राचीन संस्कृति कितीहि उज्वल असो - नवीन मन्वंतराच्या प्रसादाला पात्र होणें कधींहि शक्य नाहीं असें ठाम समजावें. * * * ३. महाराष्ट्राच्या इतिहासांतील ग्रामण्यांचा इतिहास हा एक काळाकुट्ट परंतु अत्यंत महत्वाचा भाग आहे. ग्रामण्यांचा इतिहास महाराष्ट्राच्या राष्ट्रीय, धार्मिक<noinclude></noinclude> k5ufzij0w0o6lvbjv7si0il3fvmotsy पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/८ 104 111207 233825 2026-07-28T15:46:19Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233825 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( 8 ) व सामाजिक दिव्याखालचा अंधार आहे. हा इतिहास हैं एक कटुतम सत्य. आहे. या सत्यावर मुद्दाम घालून ठेवलेलें अनुपलब्धतेचें आणि क्षुल्लकपणाचें पांघरूण आमच्या राष्ट्रीय आकांक्षांचे पाय मधूनमधून खोलवर ओढीत नेत असतात. आमच्या आकांक्षा रूपी गजेंद्राचा पाय या प्रामण्यांच्या नकार्ने पकडला आहे; परंतु आपला पाय कोण व कां ओढीत आहे याची जाणीव आम्ही नीट न ओळखल्यामुळे भगवंतालासुद्धां आमच्या हांका आरोळ्यांना उत्तर देण्याची पंचाईत पडली आहे. पाश्चात्य देशांतील गुलामांच्या व्यापाराचा इति- हास वाचणाऱ्या पुष्कळ महाराष्ट्रीय इतिहासवाचकांस कदाचित् कल्पनाहि नसेल की गुलामगिरीच्या अमदानीत सुधारकपणाची शेखी मिरविणाऱ्या पाश्चात्यांच्या हांतून जो अमानुष कृत्ये घडलीं, त्यापेक्षां अधिकपटीने हलकट पशुवृत्तीचे वर्तन आमच्या महाराष्ट्रांतील राष्ट्रधुरीणांच्या आणि धर्मसंरक्षक ( ? ) वर्गाच्या हांतून घडले आहे. अर्थात् या पातकाला चव्हाट्यावर बांधल्याशिवाय त्याच्या पुन- रावृत्तीचा बंदोबस्त करणारा " दवा " कोण कसा सांगूं शकेल ? म्हणून आम्हीं हा राष्ट्राच्या सडक्या भागाचा इतिहास — आमच्या महाराष्ट्राचें है राष्ट्रीय दुखर्णे आतां चव्हाट्यावर बांधण्याचा उपक्रम करीत आहोत. * * * ४. प्रामण्य शब्दाची व्युत्पत्ति जर शोधली तर हा शब्द धेडगुजरी दिसतो; म्हणून सर्वमान्य शब्दकोशांत असून त्यास मिळावें तें स्थान देण्यांत आलेले नाहीं. याचे कारण असें आहे की ' , प्रामण्य या शब्दाचा इतिहास जसा अतिव्यापी तसा त्याचा अर्थसुद्धां अतिव्यापी आहे. प्रामण्य म्हणजे बहिष्कार असा अर्थ एका मराठी कोशकाराने दिलेला आहे. परंतु बहिष्कार म्हणजेच ग्रामण्य जर मानले तर 'स्वदेशी चळवळीने इंग्रजी व्यापारावर प्रामण्य उभे केलें ' अशी वाक्यरचना करायला हरकत नसावी. पण त्याला कोणी ग्रामण्य म्हणत नाहीं. ग्रामण्य शब्द ऐकतांच मनांत ज्या ज्या कल्पना उद्भूत होतात, त्या त्या सर्व एक शब्दांत व्यक्त करून दाखविणारा शब्द प्रामण्याशिवाय खुद्द मराठीत नाहीं, मग इतर भाषांची तर गोष्टच नको । प्रामण्य म्हणजे ग्रामण्य ! !<noinclude></noinclude> louylclwy8drq9bn494xh53ysris6e9 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/९ 104 111208 233826 2026-07-28T15:46:39Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233826 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ५ ) , व्युत्पत्तीच्या काथ्याकुटांतून मोकळे होऊन आपण जर ग्रामण्याच्या प्रत्यक्ष स्वरूपाकडे दृष्टी फॅकली तर त्यांत 'वेदोक्ताचे बंड ' हें एक मूळ खूळ आहे, असे आपल्याला दिसेल. फार काय पण ग्रामण्याच्या एकंदर व्याप्तीची जर कसोशीनें आणि चौकस बुद्धीनें आपण पाहणी केली नाहीं, तर प्रामण्याच्या पितृव्याचा आरोप वेदोक्तावर करण्याचा कदाचित् आपणांस मोह पडेल. वेदोक्त आणि प्रामण्य हे दोन शब्द दुर्दैवानें इतके जवळ जवळ आणून भिडविले आहेत कीं ते परस्परांचे अनुषंगीच आहेत असाहि आपल्याला भास झाल्याशिवाय रहात नाहीं. वेदोक्ताचें बंड धार्मिक क्षेत्रांतलें आहे. मग प्रामण्याचे बंड शुद्ध धार्मिक बंड म्हणावें तरी पंचाईत आहेच ! कारण त्याच्या पायाचा शोध केला तर त्यांत कितीक तरी मोठमोठे चिरे सामाजिक आणि राजकीय खाणींतले दिसतात. बरें, ते सामाजिक म्हणावे तर धार्मिक क्षेत्रांतल्या सोवळ्या धाबळ्या, जान- व्यांची भेंडोळी आणि गोमुत्राचे घडे यांचा सांवळा गोंधळ पाहून तर्सेहि म्हणण्यास मनुष्य कचरतो. राजकीय बंड म्हणावें तर आजपर्यंत ग्रामण्याचा एकहि चळवळ्या छत्र मोर्चेले उडवीत सिंहासनाधिष्टित शककर्ता झाल्याचे इति- हासांत नमूद नाहीं. उलट राजकीय चबुतऱ्यावरून ग्रामण्यांच्या धुडगुसाकडे पाहूं लागले तर ही सारी भानगड सामाजिक स्पर्धेची आहे असें दिसतें - क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोन प्रमुख समाजांतला हा तंटा आहे, यांत राजकीय भानगडीचा शहि नाहीं, असेंहि दिसून येतें. राजकीय भानगड किंवा सत्ताधाऱ्यांची लुडबूड मुळींच नव्हती असेंहि विधान करणे धोक्याचे आहे; कारण प्रामण्यांच्या सणगांतून राजकीय रेशमी धागे इतर सामाजिक आणि धार्मिक धाग्यांच्या बरो- बरीने सरसहा गुंफलेले स्पष्ट दिसतात. एकूण ही प्रामण्याची भानगड अंजिरीरंगाच्या शालूसारखी आहे असे म्हणणें प्राप्त आहे. तिच्या हालचालीच्या प्रत्येक झुकण्याबरोबर निरनिराळे तऱ्हेतऱ्हेचे रंग प्रेक्षकाच्या नजरेस येतात; अर्थात् ती अमूकच एका विवक्षित रंगाची आहे असें धाडसी विधान न करितां, ती सर्वरंगपरिपूर्ण आहे, असें म्हणून आपण पुढें प्रयाण करावें हेंच बरें ! * * * ५. सांप्रत सर्व भरतखंडावर नव्या मन्वंतराचा उषःकालीन् प्रकाश पडला असून, राष्ट्र खडबडून जागे झाले आहे.<noinclude></noinclude> rs3dxiedkik9rkuikrhchihkxextbrk पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१० 104 111209 233827 2026-07-28T15:47:28Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233827 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ६ ) " प्रचलित मनु- संदेश ऐकुनी थरारला देश । 66 अझुनी आम्हीं कां न त्यजावा उदासीन वेष " ॥ " " अशा प्रकारचे जागृतीचे दिव्य संदेश देशाच्या कोनाकोपऱ्यांतसुद्धां आपल्या गंभीर ध्वनींचा पडसाद उमटवीत आहेत. या अवाढव्य हिंदी द्वीप-कल्पाच्या असंख्य प्रांतांतील नानाविध जातींचीं मनें एका व्यापक राष्ट्रीय ध्येयाच्या बिंदूवर अगदीं खिळून राहिलीं आहेत. हिंदु आणि मुसलमान, ख्रिस्ती आणि पारशी, जैन आणि लिंगायत अशा प्रकारची भाषा आतां पाठीमार्गे पडून तिचे ठाणें हिंदी देशबांधव या शब्दप्रयोगाने पटकाविलें आहे. जातिभेदाचे अभेद्य तट फोडण्यास कंबर कसून सरसावलेले पाथरवट व सुरुंग्ये तटाची क्षुल्लक कपरीहि फोडूं न शकल्यामुळे जरी हताशवदन झाले, तरी त्यांनीहि आतां या नवीन मन्वं- तरांत जातिभेदाच्या शनिवार वाड्याचा तट राहिला तर राहो, पण निदान तटाभ- वती जातिमत्सराच्या होळ्या पेटवून आपल्या असूयेचा शिमगा करून घेऊं नका, म्हणून जाहीरनामे काढिले आहेत. ज्या ज्या समाजांनी गेल्या दोन शतकांत असूये- च्या चुडी हातांत घेऊन महाराष्ट्राच्या महत्वाकांक्षेच्या टोलेजंग प्रासादास चोहीकडून आग लावण्याचा उपक्रम केला, तेच समाज आजच्या राष्ट्रीय उत्क्रांतीच्या महा- पर्वणींत सर्व राष्ट्राला वंदन करून " राष्ट्रायै स्वाहा इदंराष्ट्र इदन मम म्हणून आपल्या द्वैतभावाची आहुती राष्ट्रकार्याच्या कुंडांत देत आहेत. पाश्चि- मात्य राष्ट्रांत राजकीय क्रांतीचा थयथयाट सुरू असून, वातावरणाच्या लहरी त्यां कालिकानृत्याचा दणदणाट हिंदुस्थानाच्या किनाऱ्यावर हरघडी आणून आदळीत असल्यामुळे, इकडील मंडळींच्या वृत्ति चैतन्यपूर्ण होऊं लागल्यास आश्चर्य तें काय ? स्वयंनिर्णयासारखी सत्ययुगांतील तत्त्वें चालूं कलियुगांत सुद्धां अवतरलेलीं पाहून ' कली 'चें काळे करून त्याठिकाणीं ' सत्य ' शब्द कोणी घातल्यास या अदलाबदलीचा पुसट संशयसुद्धां कोणास येणार नाहीं. थोडक्यांत सांगायचे म्हणजे राष्ट्रीयत्वाचा खरा अर्थ हिंदुस्थानांतील यच्चावत् जनतेच्या खालच्या थरा- पर्यंत कोणाला समजो वा न समजो आजकाल राष्ट्रीयत्वाचा चौघडा वाटेल त्या कोपऱ्याला कान द्या तेथून ऐकूं येतच आहे. शूद्रातिशूद्रांच्याहि पंक्तीस बसायला आम्ही तयार आहोत, असे शेकडों सयांचे जाहीरनामे उच्चवर्णातील ( ? ) ब्राह्मणलोक आज फडकावीत आहेत. अशा परिस्थितीत हे तुमचें ग्राम- ण्याचं बंड कशाला उपस्थित करतां ? त्याचें आतांच काय नडलें आहे ? ही खाज-<noinclude></noinclude> 9jsakoxcupo9rdljmq47fsytx2zywmj पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/११ 104 111210 233828 2026-07-28T15:48:08Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233828 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ७ ) वून खरून काढण्यांत काय हशील आहे? अशा प्रकारचे प्रश्न आम्हांला विचार- ण्यांत येत आहेत व येतील हि. प्रश्न दिसण्यांत गॉडस आणि विचारक्षम दिसतात खरे आणि ते विचारणारांच्या सद्धेतूबद्दल साशंकता धरणे हॅ महत्पाप आहे, हे आम्हाला कळत आहे. परंतु विचारणारांनी एकंदर परिस्थितीचा करावा तितका विचार केलेला नसल्यामुळे, सद्विचारांच्या झटक्यासरसे हे प्रश्न त्यांना सुचणे फारसे अस्वाभाविक नाहीं. एकतर ऐतिहासिक दृष्टया या ग्रामण्यांच्या इतिहासाचें महत्व या पृच्छकांना नाकबूल करून तर चालायचेच नाहीं. दिव्याच्या उजेडाच्या इतिहासाबरोबरच त्याच्या अंधाराचाहि इतिहास पुढे आला पाहिजे, हें त्यांना मान्य केल्याविना सुटकाच नाहीं; नाहींतर आमच्या इतिहासाचे एक अंग अर्धांगवायूनें लुले पडलेले आहे इतकें तरी उघडपणे संकोच न धरितां इतिहासाच्या शिरोभागीं नमूद करून ठेवले पाहिजे! मग असला लुलापांगळा एकांगी इतिहास असला काय आणि नसला काय सारखाच !! चांगल्या गोष्टीपेक्षां वाईट गोष्टींच मनावर उपदेशाचा विशेष परिणाम करितात. कॉमेडीपेक्षां ट्रॅजेडीच जास्त परिणामकारक होते. आपल्या राष्ट्रीय इतिहासांतील चांगला भाग अधिकाधिक उज्वल करणें जसें आपले कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे त्यांतले वाईट भाग आपल्या प्रत्यक्ष वर्तनानें सुधारून त्याऐवजी चांगल्या शतकृत्यांची भर घालणें हेंहि आपलें अनिवार्य कर्तव्यच आहे. राष्ट्राचा किंवा समाजाचा इतिहास सर्वागसुंदर करण्याचा हाच एक मार्ग आहे; दोष लपवून सद्गुणांचाच नेहमी पाढा वाचणें हा नव्हे । गतकालांतील सामाजिक किंवा राजकीय पातकांना चव्हाट्यावर आणण्याचे नीतिधैर्य ज्या राष्ट्राला नाहीं, त्यानें आजन्म इतर सुधारक राष्ट्रांच्या कोपरखळ्या खातच कोठेतरी कोनाकोपऱ्यांत पडून राहिले पाहिजे. * * ६. वाईट गोष्टींचे उद्घाटन करण्यास कचरणारी मंडळी संस्कृतीच्या महत्वाचा मुद्दा नीटसा लक्षांत घेत नाहींत. कोणत्याहि राष्ट्राचा, त्यांतील निरनिराळ्या समाजांच्या संस्कृतीचा इतिहास पहावयाचा असेल तर त्या राष्ट्राच्या गुणदोषांची<noinclude></noinclude> bbwq55clegc3qx1i3a3ijz5nlxj6i79 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१२ 104 111211 233829 2026-07-28T15:48:22Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233829 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ८ ) काळाच्या प्रवाहामुळे राष्ट्र नवीन नवीन समप्रमाणांत छाननी झालीच पाहिजे. अनुभवानें कितीहि उन्नत झाले आणि दुसऱ्या अनेक राष्ट्रांच्या निकट परिचया- मुळे त्याच्या सर्व कल्पनांत कितीही क्रांति झाली, तरी त्याच्या भवितव्यतेचा ताळा पडताळून पहाण्यास त्याच्या मूळ संस्कृतीचा सर्व इतिहास नीट अवगाहन करावा लागतो. युरोप खंडांतील सुधारणेचा आणि शिक्षणाचा आशिया खंडांतील राष्ट्रांनी कितीहि पूर्णपणे स्वीकार केला, तरी त्यांचा परिणाम दोनहि खंडांतील राष्ट्रांवर सारख्याच प्रमाणावर होण शक्य नाहीं. औषध जरी एकच असले, तरी प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतिमानाप्रमाणेच त्याचा परिणाम घडून यायचा ! व्यक्तीची प्रकृति आणि राष्ट्राची संस्कृति हो जवळजवळ सारखीच. त्याचप्रमाणे बदललेल्या मनूप्रमाणे नव्या मन्वंतराचे संदेश जरी एकाच सांच्यांत आणि एकच स्वरांत सर्व समाजांच्या तोंडांतून एकसमयावच्छेदेकरून उमटत असले, तरी त्या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायच्या वेळीं प्रत्येक समाज आपापल्या बऱ्यावाईट पूर्व संस्कृतीच्या वळणावर गेल्याशिवाय खास रहात नाहीं. हा निसर्गाचा नियम असो वा नसो; इतिहासाचा अनुभव मात्र असा आहे खरा. * * * ७. प्रामण्याच्या इतिहासाने एक गोष्ट मात्र स्पष्ट रीतीनें सिद्ध केली जाईल, ती हीच कीं गतकाळच्या इतिहासांत ज्या ज्या समाजांनीं या देशाच्या राजकीय क्षेत्रांत कांहीं नांव कमाविलें, त्यांची वैयक्तिक प्रवृत्ति आणि विशेषतः संस्कृति काय होती, याची वाचकांना चांगली खात्री पटेल. सभ्यां एकदेशीयत्वाचे वारे आसेतुहिमाचल भरारा वाहत असतांना, वरवर पहाणाराला असा भास होणे शक्य आहे कीं हिंदु मुसल्मान वगैरे ठळक ठळक भेद तर आज समूळ नष्ट झाले आहेत, इतकेंच नव्हे तर खुद्द हिंदुहिंदूमधील जातिभेदमूलक कल्पनांचाहि नव्या मन्वंतराच्या रामरगाड्यापुढे चक्काचूर झाला आहे. परंतु ही भावना वरवर पहाणारांची झाली; आणि असे वरवरच पाहून हुरळून जाणारे लोक बहुशः बरेच असतात. वास्तविक स्थिति काय आहे, किंवा निदान कशी असावी, इतका पाँच ठेवून तारतम्याने विचार करणारी डोकीं फार थोडीं ! रस- भरीत व्याख्यानें देऊन किंवा वर्तमानपत्रांतून चुरचुरीत लेख लिहून देशभक्तीची स्वयंमान्यतेची पदवी पटकविणारे लोक बोलतात किंवा लिहितात तसेच<noinclude></noinclude> k7tcgbiyjyufyujwnzo05kfe23ifbum पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१३ 104 111212 233830 2026-07-28T15:48:37Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233830 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ९ ) खरोखर वर्तन करतात काय, हा प्रश्न आमच्यांतील शेकडा ८० लोकांस सुचत नाहीं; इतकी विचारशिथिलता अझून अस्तित्वांत आहे. दिसतें तसे नसतें ही साधी गोष्ट विचारांत घेण्याइतक्या विचारक्षमतेचा आमच्या गरीब श्रद्धाळु देश- बांधवांत अझून उदय व्हावयाचा आहे. श्रद्धाळुपणा हा गुण कांहीं वाईट नव्हे ! परंतु त्याला देखील कांहीं मर्यादा आहे. महाराष्ट्राच्या गतवैभवाचें आपण सिंहावलोकन केलें तर या श्रद्धाळुपणाच्या पायींच महाठी साम्राज्याचा सत्यानाश आपला आपण कसा करून घेतला, हैं चांगले ध्यानीं येईल. ज्या समाजांनीं श्रद्धाळुपणापेक्षा अधिक उच्च ध्येयावर नजर टाकून, क्रोधानें किंचित् अस्तन्या वर सारख्या असत्या तर राष्ट्रकांतीच्या वेळींसुद्धां विजयदेवतेनें धांवत येऊन त्याला माळ घातली असती, असे चांगले चांगले प्रबुद्ध समाज ऐनवेळीं श्रद्धेच्या फाजील स्तोमाच्या भरीं पडून आपले आपण वैरी कसे झाले, हें सिद्ध करणारीं स्थळें महाराष्ट्राच्या इतिहासांत अनेक दाखवितां येतील. चिकित्सक पाश्चिमात्यांचा आणि आमचा गेल्या शत- कभर इतका निकट परिचय होऊनसुद्धां आमच्यांतील बरेच सुशिक्षित लोक अझून या श्रद्धाळुपणाच्या इन्फ्ल्यूएंझापासून मुक्त होऊं नयेत आणि वाटेल त्या चलाख गारुड्यांच्या भजनीं हां हां म्हणतां लागण्याइतके हुरळून जावेत हें फार शोचनीय होय. थोडक्यांत सांगावयाचे तर कोणत्याहि गोष्टीवर एकदम विश्वास टाकण्यापूर्वी त्याच्या बाह्यांगाचें व अंतरंगाचे सूक्ष्म पृथ:करण करण्याची संवय असून पुष्कळांना लागावयाची आहे. * * * ८. बाजू आंगावर घसरूं लागली की सैतानसुद्धां बायबलाचा आधार घेतो, अशी एक इंग्रजीत म्हण आहे.. सैतानाने बायबलांतील वेदांताचा पाठ घड- घडा म्हणून दाखविण्यास सुरुवात केली म्हणून तो सैतानाचा साधू झाला असें मानणें बर्रेच धोक्याचे आहे, कदाचित् वेदपठनाच्या अनेक आवृत्यांमुळे त्याचे नैसर्गिक सतानीपणाचें पाणी निवळण्याचा संभव असतो खरा, तथापि वेदाची पोथी गुंडाळून ठेवल्यावर श्रोत्यांच्याच बोकांडीं तो सैतान बसणार नाहीं कशावरून ? ज्याची मूळ संस्कृतीच सैतानी, ज्याच्या सैतानी अत्याचाराचा इति- हास कित्येक शतकांच्या पृष्टांत खच्चून भरलेला आणि ज्याच्या सैतानी 3<noinclude></noinclude> 3ju0omto96h206d4g7dizbegh6j7sjn पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१४ 104 111213 233831 2026-07-28T15:49:01Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233831 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १७ ) तांडवनृत्याच्या दणक्याखालीं कित्येक साम्राज्ये चिरडून जमीनदोस्त झालीं, असला सैतान साधुत्वाचा मोठा आंव आणून वेदांताचीं प्रवचनें शो लागला म्हणून कां आम्ही त्याचीं स्तुतिस्तोत्रं गाण्यास एकदम प्रवृत्त व्हावें ! वेदांत आवडत नाहीं कोणाला ? सर्वांनाच तत्त्वज्ञान आवडते. परंतु त्यावरून तत्वज्ञानाचीं पुराणें झोडणारे सर्वच पुराणिक साधु समजावयाचें कीं काय ? ज्याला बोलतां येतें तो चांगलेंहि बोलतो आणि वाईटहि बोलतो. परंतु बोलणें आणि आचरण यांत बराच भेद असतो, हे मात्र विसरता कामा नये. बोलणाराच्या आचरणाचा गत इतिहास काळाकुट्ट असल्याचें प्रत्यंतर आपणाला जर धडधडीत प्रत्ययाला येत आहे, तर त्याच्या तोंडांतून बाहेर कोसळणाऱ्या वेदांत प्रवचनाच्या पांढयाफेक फेसाने त्याच्या अंतस्थ कारस्थानी वृत्तीचा नैसर्गिक काळेपणा स्वच्छ धुवून काढलाच असेल, असे मानण्यास काय आधार ? ग्रामण्यांच्या इतिहासांत महाराष्ट्रांतील बऱ्याच प्रमुख प्रमुख समाजांची अंतर्बाह्य संस्कृति ठळक रीतीनें चित्रित केलेली आढळते. राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रांतील या समा जांचा दर्जा काय होता, याचेंहि स्पष्ट चित्र या इतिहासफलकावर मुद्देसूद रेखा- टलेलें आपणांस पहावयास मिळतें. अर्थात् सध्यांच्या मन्वंतरांत जे जे तत्ववेत्ते पुराणीक राष्ट्रीय तत्वज्ञानांचीं पुराणें झोडण्यास पुढे सरसावलेले आहेत, त्यांची कुवत, त्यांची मूळ संस्कृति आणि त्यांच्या मनोवृत्तीची रचना काय आहे, या सर्व गोष्टींचीं पंचराशिर्के सोडविण्याच्या कामी आणि कोठें कोणतें प्रमाण व्यस्त येते किंवा सम येतें हैं बिनचूक दाखविण्याच्या काम ग्रामण्यांचा इतिहास हाच एक गुरु होय, यांत मुळींच संशय नाहीं. * * ९. प्रामण्यांचा इतिहास प्रसिद्ध झाल्यास जातिभेदाला विनाकारण चेतना येईल आणि राष्ट्रीय कामगिरींत सर्व समाजांचा मिळावा तसा एकोपा मिळणार नाहीं, असा दुसरा आक्षेप काढण्यांत येतो. हा आक्षेप सयुक्तिकतेच्या बाळशानें जरी गोंडस दिसत असला तरी वास्तविक तो तितका सशक्त नाहीं. जातिभेद असणारच आणि तो असावा हें मत नवीन नसून पुष्कळ विचारवंतांनी हिंदुसमा- जाचे सूक्ष्मरीत्या परीक्षण करून हा सिद्धांत काढला आहे. जातिभेद - म्हणजे चतुवर्णव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या विविध व्यवसायी समाजासमाजांतील .<noinclude></noinclude> okfdzi4b8j6kl7p0cv9ym31m7cbe04i पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१५ 104 111214 233832 2026-07-28T15:49:17Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233832 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ११ ) सामाजिक आणि धार्मिक बंधनांची जाणीव - ही नष्ट होणें जवळजवळ अशक्य कोटींतील आहे, असा आजतरी सर्व साधारण ग्रह आहे. जातिमत्सर मात्र मुळींच नसावा आणि तो अलीकडे नष्ट होण्याच्या पंथाला लागलेला आहे, ही फार समाधानाची गोष्ट होय. जातिभेदाबरोबरच जातिमत्सरानेंहि आपलें बि-हाड बाजर्ले कायमचे ठेवावें, हैं कोणीही मान्य करणार नाहीं. तथापि पुराणप्रियतेच्या फाजील अभिमानाच्या भरीं भरून जातिमत्सराच्या होळीत येन केन प्रकारेण तेल ओतणारे कित्येक राजवाडे धूमकेतूप्रमाणे मधूनमधून उपटतातच ! जाति- मत्सराची मुळे जातिभेदाइतकी खोलवर गेलेलीं नाहींत, है तरी एक दुःखांत सुख म्हटले पाहिजे. जातिमत्सराचा इतिहास अगदी अर्वाचीन आहे. प्राचीनकाळच्या चातुर्वण्य व्यवस्थेत चुरस नव्हती अशांतला प्रश्न नाहीं. चुरस होती, स्पर्धा सारखी चालू होती आणि परस्पर समाजांत अनेक युद्धेहि झाली. परंतु या स्पर्धेचा पाया दुष्मन् चाहि है लेकिन वोभि दाना दुष्मन् चाहि है या तत्त्वावरचा होता. म्हणून चारहि वर्णातील व्यक्तिनां आपापल्या वैयक्तिक संस्कृतीच्या जोरावर वाटेल त्या वर्णाच्या व्यक्तीबरोबर पराक्रमाची वरचढ करून त्याचा दर्जा पट- कविण्याची संधि मिळत असे; आणि याबद्दल कोणीहि त्या बहाद्दराचा उपहास न करितो सर्व जगाकडून त्याच्या उज्वल संस्कृतीचा सकौतुक गौरवच केला जात असे. त्यावेळच्या वर्णाभिमानाची कसोटी वैयक्तिक किंवा सामुदायिक संस्कृ- तीच्या परिणतेने सिद्ध होत होती. क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यांतील प्राचीन स्पर्धेचा इतिहास या दृष्टीने पाहिला म्हणजे सांप्रतचा जातिमत्सर हा अगदीं अर्वा- चीन आहे, हे सांगणे नको. कित्येक पंडित अर्वाचीन जातिमत्सर प्राचीन चतुर्वर्णस्पर्धेचें रूपांतर आहे असें म्हणतात; परंतु ही त्यांची निवळ वकिली थाटाची विचारसरणी आहे असें म्हणावें लागतें. 66 * * " * १०. ज्यावेळी एखादा समाज वर्णनीय राष्ट्रीय कामगिरी करून तद्देशीय इतिहासाला व भाटकवींना आपल्या विविधसद्गुणांचे स्तुतिपाठक बनवितो आणि जेव्हां परकीय इतिहासकारसुद्धां त्या स्तुतिगायनाच्या जलशांत स्वतःच्या रसि कतेला पुनित करण्याच्या अहमहमिकेनॅ येऊन सामील होतात, तेव्हां सहाजीकच त्या समाजाच्या प्राचीन संस्कृतीच्या परंपरेचा शोध लावण्याची तीव्र जिज्ञासा •<noinclude></noinclude> 7mizi0dcjrs7tczz31ugiocc9ar2mdp पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१६ 104 111215 233833 2026-07-28T15:49:30Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233833 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १२ ) समंजस विद्वानांत उत्पन्न होते. जुनीं ऐतिहासिक कागदपत्रे हुडकिणाऱ्या संशो- धकांची संशोधन - दृष्टि दस्तऐवजी दिवटीच्या अभाव भूतकालाच्या निबिड अंध:- काराला पाहून जरी बाचकून जाते; डोळस इतिहासशाख्यांच्या कालपटलभेदक दुर्बिणी अज्ञात काळच्या तटबंदी भिंतींचा छेद करून जरी पलीकडे जाऊं शकल्या नाहीत आणि भूतकाळाच्या अंधाराला अधिकच संशयप्रस्त करण्यासाठीं मत्सराच्या काजळीचे डॉगरच्या डोंगर जरी कोणी विश्वामित्राने मध्यंतरीं आणून उभे केले, तरीसुद्धां जेव्हां त्याच अज्ञात आणि काळ्याकुट्ट कालपटलांतून एखादा समाज वर्तमानकालीन् इतर समाजांना दिपवून टाकण्याइतक्या स्वयंभू तेजानें फोफावत बाहेर पडतो, तेव्हां त्याच्या पराक्रमाबरोबरच त्याच्या नैसर्गिक शीलाचा आणि प्राचीन संस्कृतीचा इतिहास स्पष्ट दृग्गोचर होऊं लागतो. हा इतिहास विशेषसा दुव्वेबाज नसल्यामुळे अर्वाचीन दृष्टीला जरी किंचित् गौण भासण्याचा संभव आहे आणि आधुनिक विचक्षण पद्धतीनें जरी त्याची छाननी यथातथ्य होण शक्य नाहीं — आणि कोणत्याहि प्राचीन इतिहासावर हे आक्षेप आल्याशिवाय रहातच नाहींत ! – तथापि त्याच्या उपलब्ध विस्कळीत दुव्यांवरूनहि विवक्षित व्यक्तीच्या, समाजाच्या किंवा संबंध राष्ट्राच्याहि तत्कालीन् शीलाबद्दल किंवा संस्कृतिबद्दल निश्चयात्मक निर्णय काढतां येणे शक्य नाहीं असें मात्र मुळींच नाहीं. या कामी पाश्चिमात्य संस्कृतीचा आणि संशोधन-प्रवृत्तीचा पूर्ण संस्कार झालेली भारतीय शोधकबुद्धि अलिकडे बरीच कुशाग्र बनलेली आहे, यांत तिळमात्र संदेह नाहीं. इतिहाससंशोधन आणि संगोपन या दिव्य मंत्राचा गुरूपदेश जरी पश्चिम दिशेनें पूर्वेच्या कानांत फुंकला आहे, तरी गुरूसे चेला सवाई या सार्थ म्हणीचें प्रत्यंतर पौर्वात्य इतिहास - शाख्यांनीं आपल्या वर्णनीय कर्तबगारीनें दाखविलें आहे, असें म्हणण्यांत अतिशयोक्ति होईलसें आम्हांस वाटत नाहीं. विशेषतः महाराष्ट्रीय कित्येक इतिहास-संशोधकांनीं महाराष्ट्राच्या इतिहासाच्या बाबतीत अलीकडे जो सेवा केली आहे ती केव्हांहि प्रशंसनीयच म्हटली पाहिजे. वास्तविक पाहिले तर महाराष्ट्राचा अर्वाचीन म्हणजे १७ व्या शतकापासूनचा इंति- हास जतन करण्याची कामगिरी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू बखरकारांनींच बजावलेली आहे. शिवाजीच्या स्वराज्योपक्रमाच्या अंतस्थ स्फूर्तीच्या ठिणगीवर याच जातीने आपल्या अलौकिक कर्तबगारीचे तेल ओतून ती प्रज्वलीत केली. शिव- शाहीच्या भव्य प्रासादाचा पाया खणतांना याच जातीच्या अनेक नरनारींनी भोर<noinclude></noinclude> o9isn6hp90vi9xz50iv2wizfq3vmwg9 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१७ 104 111216 233834 2026-07-28T15:49:45Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233834 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>, ( १३ ) केवळ आत्मस्फूर्तीनें आपल्या प्राणांच्या आहुती त्यांत टांकून, त्यांतील प्रत्येक चिऱ्याचिन्यांत कायस्थ प्रभू - रक्ताचें सिमेंट ठासून भरलें. 'हिंदवी स्वरा- ज्याचा सूर्योदय होणार ! ' असा आत्मविश्वासपूर्ण कर्णा शिवाजीनें फुंकतांच खडबडून जागे झालेलें महाराष्ट्र तरुण शिवाजीच्या निशाणाखालीं येऊन दाखल होण्याच्या आधीं हाच समाज त्याच्या पाठीमार्गे येऊन उभा राहिला. राजपु- तान्यांतील शौर्यसागर रजपुतांचें रक्त नसांनसांतून खेळत असणाऱ्या मराठे क्षत्रिय वीरांच्या दणकट तलवारींच्या तिखट पात्यांना चकित करून सोडणारी तलवारबहाद्दरी स्वराज्याच्या उषःकालापासून तों त्याच्या हतभागी अस्तापर्यंत याच समाजानें गाजविली आहे. मनगटांतल्या जोरावर क्षात्रवीर्याचा प्रताप गाजवीत असतांनाच कलमबहाद्दरीनें आणि मुत्सद्देगिरीनें बुद्धिकौशल्याची शिकस्त करणारा समाज हाच; म्हणजे शिवाजीच्या स्वराज्यस्थापनेच्या कर्म- योगाला आपल्या निसर्गजात भक्तियोगाचें व ज्ञानयोगाचे पाठबळ देऊन, महा- राष्ट्रांत महाठी पातशाहीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा आद्यमान चांद्रसेनीय कायस्थप्रभू समाजानेंच मिळविला आहे, अर्थात् शिव उदयापूर्वीचा काळ दुब्वे- बाज इतिहासाच्या अनुपलब्धतेमुळे जरी कितीहि अंधःकारमय असा भासत असला, किंवा ऐतिहासिक संशोधनाच्या क्षेत्रांत कडाक्याची थंडी पडल्यामुळे उत्पन्न झालेल्या संशयाच्या धुक्यांनीं दाही दिशा जरी आज कोंदाटलेल्या दिसत असल्या, तरी एक गोष्ट निर्विवाद सिद्ध होत आहे कीं ज्या अर्थी "आपली सेवा करण्याकरितां या घटकेला कोण तयार आहेत ? " अशी राष्ट्रानें हांक मारतांच जो समाज एकदम आपल्या अज्ञात दशेचें कवच पार फेंकून देऊन, त्याच्या हांकेला हांक देऊन राष्ट्रीय निशाणाखालीं धांवून आला; इतकेंच नव्हे तर त्यानें आपल्या वर्णनीय पराक्रमानें राष्ट्राची स्वराज्यस्थापनेची महत्वाकांक्षा रंगा- रूपासहि आणली, त्याअर्थी त्या समाजाची प्राचीन संस्कृति अर्थात् तितकीच बलवत्तर असली पाहिजे. अर्वाचीन डोळस इतिहास - शाख्यांच्या चष्म्यांना या प्राचीन संस्कृतीचें स्वरूप नीट अवगाहन करतां येत नसेल तर तो दोष त्यांचा नसून त्यांच्या चष्म्यांचा आहे, ही गोष्ट केव्हांहि सिद्ध करून दाखविण्यास 'अडचण पडणार नाहीं. 2.<noinclude></noinclude> 14k5kufgnhnczqpekrm8bxkqf24c19e पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१८ 104 111217 233835 2026-07-28T15:50:02Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233835 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १४ ) ११. शिवाजीचा अवतार होण्यापूर्वीचा चां. का. प्रभू समाजाचा इतिहास पाहिला तरीहि इतकें सिद्ध होत आहे कीं तत्कालीन मुसलमानी रियासतींत त्यांची स्थिति म्हणण्यासारखी खालावलेली नव्हती. त्यांची कलमबहाद्दरी, मुत्सद्देगिरी त्यांचें सुप्रसिद्ध इमान, त्यांची क्षात्रवृत्ति यांचा योग्य तो परामर्ष मुसलमानी संस्था- नांतले शहा ठिकठिकाणीं घेतच होते. गडावरचे गडकरी आणि किल्ल्यांचे किल्ले- दार होण्याचा मान व अधिकार विशेषतः कायस्थ प्रभूंकडेच असे. मुसलमानी रियासतीत वरिष्ठ सरदाऱ्या भोगणारे शहाजीराजे जाधवराव आदिकरून मराठे सरदारांचे सलामसलतगार, दळपति आणि सुभेदार कायस्थ प्रभूच असत आणि तत्कालीन मोहिमांचे डांवपेंच ठरविण्याच्या कामांत याच गडकरी किल्लेदार वगैरे सरदारांच्या सल्लामसलतींचा उपयोग मुसलमान सत्ताधारी करून घेत असत. याशिवाय जंजिरा वगैरे संस्थानांकडे पाहिले तर तेथें चां. का. प्रभू केवळ सर- दारक्या, गडकरीपणा किंवा किल्लेदारी याच हुद्यांचा उपभोग घेत होते असें नव्हे, तर दिवाणगिरीच्या जागांवरहि हे लोक वंशानुवंश अधिकार गाजवीत होते. परंतु नुसत्या दिवाणगिया केल्या किंवा सरदाय गाजविल्या एवय्याच मुद्यावर हा समाज मराठी स्वराज्यस्थापनेच्या प्रत्यक्ष कार्यभागांत पडण्याइतका स्वयं- स्फूर्तीनें अवचित उद्युक्त कसा झाला ? मराठी स्वराज्याची स्थापना प्रस्तुतच्या स्वराज्याच्या 'मागणी' इतकीच सरळ आणि सोपी होती काय? सांप्रतच्या सनदशीर मागणी ला जेवढे म्हणून आज अडथळे आहेत, जितके प्रतिरोध करणारे संघ आहेत आणि जनतेच्या मनाची 'सनदशीर तयारी ' आहे, त्यापेक्षां सहस्रपट अधिक तीव्र विरोधाला तोंड देऊन, शिवाजीनें धुळीच्या कणां- तून एवढे प्रचंड स्वराज्यमंदीर निर्माण केलें, ही गोष्ट प्रत्येक इतिहासज्ञाला कबू- लच केली पाहिजे. शिवाजीच्या स्वराज्योपक्रमाचें जहाज हांकारण्यास सध्यांच्या नामधारी - किंवा नामदार म्हणा वाटेल तर - देशभक्तांपेक्षां अधिक कसदार नावा- ड्यांची अवश्यकता होती, यांत संशय नाहीं. सध्यांहि सरदाय किंवा दिवा. णगिय गाजविणारे कायस्थेतर कोणी नाहीत किंवा शिवकालीं नव्हते असे नाहीं. परंतु शिवाजीच्या देशकालवर्तमानाचा सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर नुसत्या सरदार किंवा दिवाण -परंपरेच्या लोकांच्या हांतून तो स्वराज्यस्थापनेचा विश्व. व्याप खात्रीनें तडीला जाणें शक्य नव्हतें. चां. का. संस्कृति शिवकालापर्यंत नुसत्या सरदारी -" , , प्रभू समाजाची प्राचीन दिवाणगिरी किंवा किल्लेदारी येवढ्याच<noinclude></noinclude> qmjh27y4jpe74b66epym8iw7qosaff1 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१९ 104 111218 233836 2026-07-28T15:50:16Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233836 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १५ ) दर्जापर्यंत उन्नत झालेली होती, यापेक्षां अधिक उंचीपर्यंत तिची भरारी गेलेलीच नव्हती, असें जर गृहीत धरलें तर स्वराज्यस्थापनेच्या कार्यात त्यांनीं जी मुत्सद्देगिरी दाखविली, जीं धाडसाचीं अनेक पराक्रमी कामें केलीं आणि शिवाजीच्या प्रत्येक महत्वाकांक्षेच्या उत्साहाला प्रत्यक्ष दृश्य स्वरूप आणण्याच्या कामी त्यांनी जी कल्प- नातीत समयसूचक धोरणें लढविलीं, तीं सारी 'अवचित घडून आलेला चमत्कार' तरी मानला पाहिजे एक, किंवा तो सारा इतिहासच्या इतिहास कादंबरीवजा सम- जला पाहिजे एक; याशिवाय या प्रश्नाचा उलगडा लागणे शक्य नाहीं. आज- लाहि हिंदुस्थानाच्या चारी भागांवर दृष्टी टाकली आणि निरनिराळ्या प्रांतांतील निरनिराळ्या समाजांची आधुनिक उन्नति व मनोधर्म यांचें नोट निरीक्षण केलें तर असें दिसून येईल कीं पाश्चात्य विद्येचा मुलामा जरी सर्व ठिकाणीं सारख्याच प्रमा- णांत चढलेला दिसत आहे, तरीसुद्धां प्रत्यक्ष कार्याचा प्रसंग येतांच जो तो आपापल्या पूर्वसंस्कृत्यनुरूप अशाच क्षेत्रांत काय तो बहाद्दरी गाजवू शकतो. ज्या ज्या समाजांनी पूर्वी राज्यें केलीं किंवा प्राचीन राज्यकारभारांत ज्यांचे पूर्वज प्रत्यक्ष पडत होते, त्या त्या समाजांतील लोकच सांप्रतच्या राजकीय वातावरणांत टिकाव धरीत आहेत. पिढ्यान् पिढ्या ज्यांनीं नुसता व्यापार केला, अशा समा- जांतील मंडळी जरी आजकाल राजकीय उलाढालींत पडत आहेत, तरी राजकीय तलवारीच्या मुठीचा आणि त्यांच्या हाताचा यावज्जन्म कधीं संयोगच घडून न आल्यामुळे राजकीय क्षेत्रांतलें त्यांचे वर्तन विशेषसें दणकट किंवा अधिकारी होत नाहीं. इतकेंच नव्हे तर त्यांना त्या बाबतीत आत्मसंतोषानें म्हणा अथवा लोक- मताच्या विरोधानें म्हणा केव्हांतरी माघार घ्यावीच लागते, अशीं अनुभवाचीं उदाहरणें शेंकडों दाखवितां येतील. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे पूर्वसं- स्कृतीच्या अभावीं एखादी व्यक्ती अगर समाज राष्ट्रीय पुनर्घटनेसारखें जगड्व्याळ कार्य घडवून आणील हैं शक्यच दिसत नाहीं. संस्कृतीचा संस्कार कितीहि मलीन झालेला असो, पण त्यालाहि अवसर मिळतांच तो आपला पराक्रम गाज- विल्याशिवाय कधींहि रहाणार नाही. उलटपक्षी संस्कृतीच्या प्रश्नाकडे कानाडोळा करून भलत्याच क्षेत्रांत बहाद्दरी मिळवूं पाहाणान्यांची स्थिति किती शोकजनक होते, याचीं उदाहरण आज प्रत्यहीं आपल्या नजरेसमोर शेंकडों घडत आहेत,' शिवाजीला ही संस्कृति - परिक्षणाची कला, प्राचीन इतिहासाच्या अभ्यासानें असो अथवा निसर्गदत्त असो, फार चांगली अवगत झाली होती, यांत संशय नाहीं.<noinclude></noinclude> oak25pcvigxm3ta8iig6l144r3am2xx पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/२० 104 111219 233837 2026-07-28T15:50:38Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233837 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १६ ) हिच्या सहाय्यानेंच त्यानें महाराष्ट्रीय इतर समाजांकडे आपली नजर फेंकण्यापूर्वी चां. का. प्रभू समाजाला त्याने पोटाश धरलें. 'मनुष्याची पारख करण्यांत त्याचा हात किती , शिवाजीच्या एकंदर चरित्रावरून खंडा होता, हें चांगलेच व्यक्त होत आहे. अर्थात् चां. का. प्रभूंना प्रथम जवळ करण्यांत त्याची रसिकता आणि दूरदृष्टी जरी व्यक्त होत असली तरी ती रसिकता निवळ काकतालीय न्यायाच्या भुसक्या पायावरची खास नसून, ती शिवाजीच्या संस्कार- परीक्षणाच्या अंतर्वेध - • दृष्टीवरच उभारली गेली होती. पूर्वसंस्कृतीच्या बलवत्तर तेजाची साक्ष पटल्या- शिवाय नुसत्या भिडेसाठीं किंवा कार्याची निकड म्हणून रिक्रूटांची खोगीरभरती करणारे शिवाजीमहाराज तरी खास नव्हते ! * * * १२. चां. का. प्रभू समाजाची अशी पूर्वसंस्कृति तरी काय होती, कीं तिकडे शिवाजीचें लक्ष एकदम धांवून गेलें ? शिवाजीच्या मनांतील जन्मजात स्वराज्य- स्थापनेकरितां मदतगार म्हणून त्याची दृष्टी याच विवक्षित समाजानें कां वेधून घेतली ? काय त्या वेळीं खुद्द शिवाजीचे नातलग आणि जातभाई मराठे शूर नव्हते ? स्वतःचें जरी स्वराज्य नव्हतें तरी परराज्याची यंत्रे तेच हालवीत होते ना ? मग घरच्यांना वगळून दारच्यांकडेच शिवाजी कां वळला ? ही प्रश्नमालिका निःपक्षपणानें सोडविणारालाच चां. का. प्रभूंच्या प्राचीन इतिहासाची ओळख पटणें शक्य होईल. इतर कोणी कितीहि जाडा व्युत्पन्न असला किंवा ऐतिहासिक जुनीं कागदपत्रे हुडकणारा सूक्ष्म दृष्टीचा संशोधक उंदीर असला तरी त्याच्या दृष्टीला अंधाराशिवाय आणखी कांहीं दिसेल, असा आम्हांस भरंवसा वाटत नाहीं. चां. का. प्रभू समाज संख्येच्या मानानें जितका लहान आहे, त्याच्यापेक्षां त्याच्या पराक्रमाचा इतिहास अत्यंत विस्तृत आणि मोठा आहे. अल्पसंख्यांक समाजानें राष्ट्राच्या मोठमोठ्या उलाढालीच्या इतिहासांत प्रामुख्याने झळकत राहि- ल्याचे उदाहरण निदान भरतखंडाच्या इतिहासांत तरी याच समाजाचें होय. शिवावतारापूर्वीच्या चारदोन शतकांचा इतिहास पाहिला तरी त्याच्याहि उपलब्ध विस्कळीत आणि संकीर्ण पृष्टांत चां. का. प्रभूंची राजकीय क्षेत्रांतील कर्तबगारी बिनचूक आढळून आल्याशिवाय रहात नाहीं. संख्येच्या प्रचंडत्वानें पूर्वी व आतांहि जगाची छाति दडपून टाकणारे असे अनेक समाज आजलाहि दाखवितां<noinclude></noinclude> eddkcvdu6ayr0oy9w6f5dexnd6samft पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/२१ 104 111220 233838 2026-07-28T15:50:56Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233838 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १७ ) येतील कीं ज्यांच्या प्राचीन इतिहासाचें संशोधन करूं लागल्यास कित्येक शतकांचीं पार्ने जरी डोळे फाडफाडून चाळली तरी त्या संबंधी एक अक्षरसुद्धां कोठें धड सांपडण्याची मारामार पडते आणि या दृष्टीनें विचार केला तर चां. का. प्रभु समाज हा लोकसंख्येच्या दृष्टीनें अल्पतम असतांहि त्याचा पराक्रम प्रत्येक स्वकीय किंवा परकीय " शाही " च्या इतिहासांत प्रामुख्यानें दृग्गोचर व्हावा, ही एकच गोष्ट त्याच्या राष्ट्रीय महत्वाची साक्ष देण्यास पुरेशी आहे. * , * * १३. चां. का. प्रभूंचा प्राचीन इतिहास आजलाहि बराच उपलब्ध आहे; परंतु तो सांप्रत संकीर्णावस्थेत असल्यामुळे आणि आधुनिक इतिहासकारांनीं तो अर्वा - चीन पद्धतींत संकलित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न न केल्यामुळें, खुद्द या ज्ञातींतील एखाद्या जाड्या इतिहासशाख्यास जर प्रश्न केला की ' तुमचा इतिहास काय व कोठें आहे तो दाखवा पाहूं ?' तर त्याला देखिल एका विवक्षितं 'स्टँडर्ड ' ग्रंथाकडे बोट दाखवितां येत नाहीं. कांहीं मजकूर या पुस्तकांत, त्याच्या पुढचा दुसऱ्या पुस्तकांत, आणखी राहिला तो तिसऱ्या पुस्तकांत, अशा स्थितींत तो इतिहास पांगलेला आहे. बरें, ज्यांनी ज्यांनीं स्वज्ञातीच्या इतिहासाचा ठाव पहाण्याचा कांहीं यत्न केला, त्यांना 'मायथॉलजी 'च्या भोळसट प्रेमाने इतकें कांहीं ग्रस्त केलें कीं त्यांच्या विवेचनानें जी एकदां ब्रह्मदेवाच्या नाभिकमलाच्या मुळाशीं दडी मारली, तेथून त्यांची धडपणें अझूनहि सुटका झाल्याचे दिसत नाहीं. पौराणिक काथ्याकुटाच्या सांबायचे भुरके मारण्यांत ही इतिहासकार मंडळी एकदां गुंग झाली की मग त्यांना ऐतिहासिक सृष्टींतील घडामोडीकडे दृष्टी फेंका- यला फुरसदच रहात नाहीं; आणि एकदां कां ही पुराणप्रिय मंडळी शब्दांच्या व्युत्पत्यांचा कीस काढू लागली की " हैहय कुलोत्पन्न क्षत्रिय " म्हणजे 'घोड्यांचे वंशज' येथपर्यंतच त्यांची मजल न जातां श्रीविष्णूला एखाद्या घोड्याचा अवतार घ्यावयास भाग पाडून मातोश्री लक्ष्मीलाहि घोडी बनविण्यास चुकत नाहीत. इतिहास - संशोधनाची धमक असूनसुद्धां आमच्यांतील पुष्कळ चांगले चांगले संशोधक या पुराणप्रियतेच्या फाजील आवडीमुळे इतिहास - सेवनाच्या बाबतींत कुचकामाचे ठरले आहेत, यापासून आमच्या आधुनिक विद्वानांनी पुष्कळ धंडा घेण्यासारखा आहे. **<noinclude></noinclude> r055tifx81mdt9mz6d6a69vj1oud1bg पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/२२ 104 111221 233839 2026-07-28T15:51:16Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233839 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १८ ) १४. आजपर्यंत ऐतिहासिक संशोधनाकडे दुर्लक्ष करून पुराणांतल्या वंशावळी आणि भाकडकथांचा कीस काढण्याकडे आमच्यांतील बऱ्याच विद्वानांची पुराणप्रियता फार्जाल प्रमाणांत गुंगल्यामुळे मध्यंतरींच्या अनेक शतकांतील इतिहासाचे दुब्वे आज निष्काळजीपणाच्या अंधारांत हुडकणे फार बिकट होऊन राहिलें आहे. पाश्चिमात्य शोधक आणि मेहनती युरोपियन इतिहासकारांनीं आणि फिरस्त्यांनीं जर या विस्कळित दुव्यांचीं नीट जोपासना केली नसती, तर आजला चां. का. प्रभूंच्या प्राचीन इतिहासाचें तोंड उजळ करण्याची कोणत्याहि महत्वाकांक्षी अर्वाचीन इतिहासकाराला धडगतच नव्हती. आधुनिक चिकित्सक, संशयखोर आणि मनस्वी मार्मिक विचक्षण वृत्तीला निरुत्तर करण्याच्या कामी पौराणिक विवेचनाची पुराणांतलीं वांगी कितपत उपयोगी पडतील, याचा आमच्या १९ व्या व २० व्या शतकांतील विद्वान् पुराणाभिमान्यांनीं किंचित् पोक्त विचार करावयास नको होता काय? या बाबतींत त्यांच्या हांतून इतिहासाची जी हेळसांड झाली, ती भरून यावयास त्यांची पौराणिक काथ्याकुटांची बार्डे काडी- मात्र उपयोगी पडत नाहींत. अर्थात त्यांच्या सान्या ग्रंथलेखनाची किंमत आजच्या पिढीच्या दृष्टीनें मातीमोलच ठरत आहे, याबद्दल कोणाहि सहृदयांस खचित वाईट वाटल्याशिवाय रहाणार नाहीं. स्वज्ञातीच्या इतिहासाकडे अर्से दुर्लक्ष झाल्यामुळे आणि प्राचीन इतिहासाचे सर्व दुव्वे इतस्ततः अनेक ग्रंथांत विखरून पडल्यामुळे, आज आमच्या हाडवैयांना आणि हितशत्रूंना आमच्या प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासावर वाटेल तसे घाणेरडे आरोप करण्यास बरेंच फावलें आहे! आणि याबद्दल जर खरोखर कोणी जबाबदार असतील तर आम-- चेच आधुनिक चां. का. प्रभू इतिहासकार होत, यांत मुळींच संशय नाहीं. * * * १५. शिवाजीमहाराजांच्या जगड्व्याळ कार्यव्यापृत्वाच्या मानाने त्यांच्या कारकीर्दीतील उपलब्ध कागदपत्रांची संख्या अत्यंत क्षुल्लक आहे. असें कां व्हावें ? रा. राजवाड्यासारख्या एकनिष्ट व एकमार्गी इतिहास-संशोधकाची मति- सुद्धां अगदीं गुंग होऊन गेली असून, त्यांनीं या बाबतींत अगदीं दीर्घ निराशेचे उद्गार वेळोवेळीं काढले आहेत. शिवाजीमहाराजांच्या वेळच्या महत्वाच्या शें सवाशें पत्रांखेरीज अधिक कांहींहि कागदपत्रे उपलब्ध होऊं नयेत, ही गोष्ट सर्व बाजूंनी अत्यंत शोकजनक आहे. खुद्द शिवाजीमहाराजांच्या रिकार्डाचाच जेथें समूळ<noinclude></noinclude> l9kbjfbs5rh43bonxir4q4py0j0u6zg पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/२३ 104 111222 233840 2026-07-28T15:51:35Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233840 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १९ ) बेपत्ता, तेथें ज्या चां. का. प्रभूंचाहि इतिहास खुद्द महाराजांच्या इतिहासांतच निगडित झालेला, त्यांच्या तरी इतिहासाचा आणखी पत्ता लागणार कसा ? हाँ सर्व कागदपत्रे एकाकीं नाहींशीं झालीं कशी ? काय मध्यंतरीं मोठाथोरला धरणी- कंप होऊन त्यांत तीं गडप झालीं, कीं अवचित तीं आपणच होऊन जळून फस्त झालीं ? अशा प्रकारच्या धरणीकंपाचा किंवा अग्निप्रळयाचा इतिहासांत तर कोहि नामनिर्देश आढळत नाहीं. या कोड्याचा उलगडा व्हावा म्हणून शोध करीत असतांना छत्रपतीच्या चिटणीसाच्या एका पत्राची नक्कल उपलब्ध झाली. त्यांत चिटणीसांनीं स्पष्ट लिहिलें आहे कीं आम्हांला तुरुंगांत टाकल्यावर चिंतामणराव पटवर्धनाच्या चिथावणीवरून बाळाजीपंत नातून आमचें घरदार लुटविलें आणि अठरा उंट भरून घरांतील सर्व कागद पत्र नेऊन जाळून पोळून फस्त केले. यावरून इतकें सिद्ध होत आहे कीं ( १ ) छत्रपति प्रतापसिंहाच्या कारकीर्दीपर्यंत भोंसले राजघराण्याचे सर्व कागदपत्र चिटणीसांच्या संग्रहीं जिवंत शाबूद होते; ( २ ) सरकारी दप्तराचे अधिकारी चिटणीस व चिटणीसांच्या हस्ताक्षराखेरीज सरकारी फर्मानांची 'वॅलिडिटी ' ( सत्यता ) अखिल भरतखंडांत कोणीहि मान्य करीत नसे. अर्थात् मराठेशाहीच्या अव्वल पासून अखेरपर्यंतचे महत्वाचे सर्व कागदपत्र चिटणीसांच्याच संग्रहीं असत. ( ३ ) त्यांचीच बाळाजीपंत नातूसाहे- बांनी होळी केल्यावर रा. राजवाड्यांनीं काय आम्ही काय किंवा इतर कोणी काय कितीहि शंख केला तरी निष्पन्न काय होणार ? राघोबादादा आणि आनं- दीबाई या हतभागी जोडप्याला नाटकें कादंब-यांतून राक्षसी पेहराव चढवि- णा-यांनी पटवर्धन नातू प्रभृतीने महाराष्ट्राचा सर्वतोपरी घात करण्यांत किती चिळस आणणारें निघृण वर्तन केलें, इकडे लक्ष पुरविल्यास अस्तनोंतले निखारे बरे पण झग्यांत वावरणारे हे देशद्रोही विंचू नकोत, असें त्यांस वाटल्याशिवाय रहाणार नाहीं. १६. आम्हांला स्वतः या वेदोक्त आणि पुराणोक्ताला वाजवीपेक्षां फाजील महत्व द्यावें असें वाटत नाहीं. कारण सध्याचा मनूच तसा आहे. प्रचलीत कालमानाचा आणि मतस्वातंत्र्याचा विचार केला तर हें वेदोक्तपुराणोक्ताचें बंड महाराष्ट्रांत इतःपर पुनश्च जीव धरील असे वाटत नाहीं. आत्राम्हणचांडाळांच्या<noinclude></noinclude> s2wai2qggskghqb37o1cx9jh1dsgulo पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/२४ 104 111223 233841 2026-07-28T15:51:56Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233841 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २० ) धर्मविषयक कल्पना नवीन मन्वंतराच्या भट्टींतून तावून सुलाखून बाहेर पडत आहेत, भूतकालीन् पौराणिक धुडगुसाचा धार्मिक कल्पनांवरील शेंकडों शतकांचा मळ जळून खाक होत आहे व हिन्दुधर्माचें खरें व्यापक व शुद्ध स्वरूप सर्वांना दृग्गोचर होऊं लागलें आहे; इतकेंच नव्हे, तर एकराष्ट्रीयत्वाच्या शुद्ध तत्त्वांचा उदय होऊन स्वराज्याच्या उषःकालाच्या साखरझोपेंत विश्वबंधुत्वाचीं गोडगोड स्वप्ने पडत आहेत. अशा आशापूर्ण स्थितींत हैं वेदोक्तं पुराणोक्ताचं बंड पुनः उपस्थित व्हावे किंवा होईल असे वाटत नाहीं. आज हिंदु मुसल्मान, हिंदु- पारशी, हिंदु यहुदी असे भिन्न भिन्न समाज जेथें यदृच्छेनें हातांत हात घालून राष्ट्रीय सौभाग्याकरितां झगडण्यास किंवा प्रयत्न करण्यास सिद्ध झाले आहेत, तेथें हा जुनापुराणा फोलकट वाद कितपत उपस्थित होईल व यदाकदाचित् झालाच तर कितपत जीव धरील याची आम्हांस फार शंका आहे. खरोखर म्हटलें तर या वादाचीच अतः पर कांहीं आवश्यकता नाहीं. हा नुसता आतां विशिष्ट हक्कांचा प्रश्न आहे. ते हक्क यथाविधि पाळण्याची किंवा नेहमीं यथा- सांग बजावण्याची कुवत चतुर्वर्णापैकीं एकहि समानांत उरलेली नाहीं. व्यवहार पहा. ब्राह्मण सदराखालीं मोडणाऱ्या समाजाची दिनचर्या पाहिली तर पौराणिक परशुरा- माच्या ‘सेवा सर्वत्र कर्तारं' या शापाप्रमाणे तेहि शूद्रवत् आचरण करूं लागले आहेत. कांहींनों वैश्यवृत्ति पत्करलेली आहे व क्वचित् क्षात्रधर्माचाहि अवलंब करीत आहेत.. थोडक्यांत सांगायचे म्हणजे 'ब्राह्मण' या नामाभिदानापेक्षां ब्राम्हण्याचे अधिक विशेष चिन्ह किंवा पुरावा त्यांच्यापाशीं मुळींच उरलेला नाहीं. अर्थात् वेदोक्त कशाशी खातात आणि पुराणोक्त विधि अळणी झाल्यास त्यांत किती मीठ घाला- यचे याची दख्खल त्यांना कोठली ? सध्यां तर ब्राह्मण म्हणविणाऱ्या समाजाची दिनचर्या इतकी बेफाम भडकून गेलेली आहे कीं शूद्रांनाहि लाज वाटेल असे कितीक तरी हलके धंदे करण्यांत त्याला लवमात्र दिक्कत वाटेनाशी झाली आहे. आजपर्यंत चांभाराचीं दुकानें काढण्यापर्यंत, पुण्याच्या मंडईत कोंबड्या विकण्यापर्यंत मजल गेली होती; परंतु परवां मुंबईत एका ब्राह्मणानें प्रेतसंस्कारविधीचें साहित्य विकण्याचें दुकान उघडलेलें पाहून मन खेदानें व आश्चर्याने थक्क झालें ! आज मितीला असा एकहि बरा वाईट धंदा शिल्लक राहिलेला नाहीं कीं ज्यांत ब्राह्मणांनी हात घातलेला नाहीं. उच्चत्वाचा किंवा नीचत्वाचा तिळमात्र विचार न करतां वाटेल ते धंदे करणारांची संख्या ज्या समाजांत दिवसेंदिवस वाढत आहे, त्या<noinclude></noinclude> da0qlt8srowthn9l11adbzftbtbw6d4 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/२५ 104 111224 233842 2026-07-28T15:52:13Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233842 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २१ ) - समाजाला ब्राम्हण्याचा तोरा मिरविण्याचा अधिकार कोणत्या स्मृतीत सांपडतो ? क्रियालोपामुळे जर प्राचीन शूद्रांची त्रैवर्णिकांच्या उच्च वर्गातून हकालपट्टी होऊन त्यांना निराळ्याच खालच्या वर्गात बसावें लागलें, तर सध्यांच्या क्रियानंष्ट ब्राह्म- णांनीं आपल्याकरितां कोणत्या वर्गाची जागा झाडून सारवून तयार केली आहे ? यंदाच्या (सन १९१९) पुणे येथील वसंत व्याख्यान मार्लेतल्या ६ व्या व्याख्या- नाच्या वेळीं एक वक्ते म्हणाले " जोश्याच्या वंशपरंपरा ( ? ) वृत्तीवर जर तुमचा डोळा तर बापजाद्यांनीं कधीं तरवार गाजविली असेल पण तेवढ्यावरच पिळाच्या पगड्यां घालून तुम्ही तरी कां मिरवावें ? " होय. आम्हीसुद्वां हेंच म्हणतों. क्षत्रियांच्या वेदोक्तावर जर तुम्ही एवढा मोठा घागरीएवढा परशुरामी डोळा वटारतां आणि त्यांना शुद्राधम वगैरे शेलक्या शिव्यांनीं नेहमीं प्रहार करतां, तर तुमच्या बापजाद्यांनी कधि कोकाळांत जानव्याची ब्रह्मगांठ हातांत धरून जग- स्पालक श्रीविष्णूच्या छाताडावर कोकणी पायतणाचा लत्ताप्रहार केल्याची कादंबरी जरी खरी मानली, तरी तेवढ्यावरच तुम्ही ब्राह्मण्याचा कोरडा दिमाख कां मिर- वावा ? जोडेपायतणें, भजींकडबोळीं, तिरडीचें सामान विकण्याचे शूद्रवत् राजरोस धंदे करूनसुद्धां जर एखादा ब्राह्मण ब्राह्मण्यापासून च्युत होत नसेल, तर ब्राह्म- ण्यानें रेडियम धातूच्यावरसुद्धां सरशी केली म्हणायची ! रा. रा. महादेव राजाराम बोडस म्हणतात ( चित्रमयजगत् जाने. १९१९ - वर्णव्यवस्था ) शिवाजी क्षत्रिय म्हणून मलाहि क्षत्रिय म्हणा असा एकादा नांगऱ्या हट्ट धरून बसला तर त्याला आपण काय म्हणूं ? बाजीप्रभू रणवीर योद्धा होता म्हणून कोर्टातील एकादा सेक्शन रायटर किंवा टायपिस्ट जर क्षात्र- जातीचा डौल घालूं लागला तर हास्यास्पद होणार नाहीं काय ? नाहीं कोण म्हणतो ? गुणकर्मावरूनच जाती किंवा वर्ण ठरवायची बोडससाहेब जर एखादी राष्ट्रीय चळवळ सुरू करतील तर आम्ही त्यांना मनःपूर्वक यथामति व यथाशक्ति हातभार लावण्यास एका पायावर तयार आहोंत. तथापि ही चळवळ सुरू कर- ण्यापूर्वी त्यांच्याच ब्राह्मणवर्गातील । || बंधू गुणकर्माचा कस लागतांच शूद्राच्या वर्गात खाडकन् 'ट्रॅन्सफर' होतील आणि अखेरीस ज्या वर्गाला सध्यां लाथां- खालीं तुडविण्यांत सध्यांच्या नामधारी ब्राह्मणांच्या ब्राह्मण्याची सार्थकता होत आहे तो शूद्र वर्ग संख्येच्या दृष्टीनें अफाट व अवाढव्य होऊन तो 'डिस्टिल्ड् ' - गाळीव शुद्ध ब्राह्मणांचीच हार्डे वरवंट्याखाली ठेवूं लागेल, याचा मात्र आमच्या बोडस साहे-<noinclude></noinclude> qvmy8hen263hlpnim61gvav2vgicx00 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/२६ 104 111225 233843 2026-07-28T15:52:30Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233843 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २२ ) बांनी नीट विचार करावा. परंतु गुणकर्मविभागशः जाति ठरविण्याची, निदान मानण्याची, प्राचीन पद्धती जर आतां प्रचलित नांहीं आणि ब्राह्मण म्हणविणान्य आईबापाचा मुलगा ब्राम्हणच असें जोपर्यंत समजण्यांत येत आहे तोपर्यंत वरचे बाष्कळ प्रश्न पुढे आणणें म्हणजे आपल्या खोडसाळपणाची कमाल करणें होय. एखाद्या चां. का. प्रभूला तो सेक्शन रायटर किंवा शॉर्टहॅन्ड टायपिस्ट आहे एवढ्यावरूनच, रा. बोडस साहेबांच्या मताप्रमाणे, त्याला जर क्षात्र जातीचा डौल घालण्याचा अधिकार पोहचत नाहीं, तर आज रा. बोडसांच्याच जातीचीं जीं हजारों मंडळी सेक्शनरायटर्स, टायपिस्ट, पोस्टमन, हाटेलवाले, कोळसेवाले, जोडेबूटपायतणवाले, आचारी, भुसारी, रंगारी, धोबी वगैरे धंदे करीत आहेत त्यांना तरी ब्राह्मण्याची शेखी मिरविण्याचा अधिकार कोणत्या स्मृतींत सांपडतो ? ग्रामण्यांच्या इतिहासांत जीं अनेक शास्त्रग्रंथांगत प्रमेय व श्रीशंकराचार्यादि धर्मगुरूंची आणि शास्त्रीपंडितांची संमतपत्रे दाखल झालेलीं आहेत, तीं आमच्या बोडस साहेबांनी पहावीं. म्हणजे त्यांना समजून येईल कीं जोपर्यंत चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणविणारा आपल्या पिढिजात लेखन- वृत्तीपासून च्युत झाला नाहीं, मग तें लेखन जुन्या पद्धतीप्रमाणे बोरूच्या लेख- णीचें असो, प्लाइंग डचमनच्या पोलादी टांकाचें असो किंवा सुधारलेल्या टाईप- रायटिंग् यंत्रावरचें असो, तो क्षात्रधर्मापासून च्युत झाला किंवा त्याला क्षात्र- जातीचा डौल मिरवितां यावयाचा नाहीं, असें प्रतिपादन करण्याची कोणाचीहि - मग तो महामहोपाध्याय असो अगर प्रत्यक्ष श्रीशंकराचार्य असो त्याची मुळींच छाती नाहीं. असिजीवि मसिजीवि हेंच चां. का. प्रभूचें खरें व्रत आहे. लेखनवृत्ती हेंच कायस्थप्रभुंच्या क्षात्रवृत्तीचें द्योतक आहे. तें त्यांनी आजदिनतागायत अस्खलीत जतन केलें आहे आणि योग्य वेळीं त्यांनी असि- जीवि आज्ञेप्रमाणें रणांगणांत तरवारहि गाजविली आहे. रा. बोडस साहेबांच्या विधानप्रवृत्तीप्रमाणे विचार केला तर ब्राह्मण म्हणविणारांना मात्र लेखनवृत्तीचा अधिकार कोणत्या शृतीनें वा स्मृतीने दिला ते समजत नाहीं. कै. राजारामशास्त्री भागवत ( उद्वार पृ० १०१ वर ) म्हणतात, जर परबूं- मध्यें कालज्ञता नसती, तर सगळे महाराष्ट्रमंडळ हिशोबाच्या संबंधानें केवळ ब्राह्मणमय होऊन जातें. पण परबु मूळचे लेखक असून कालज्ञ पडले, त्यामुळे ब्राह्मणांचा पगडा महाराष्ट्र देशांत सर्वच ठिकाणीं पडला ,<noinclude></noinclude> eyl6wwywodenhqwhz4jb19u3uuoohp0 ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड 0 111226 233845 2026-07-28T15:56:58Z QueerEcofeminist 918 index 233845 wikitext text/x-wiki <pages index="ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf" from=1 to=284/> ndzn2ein6dekxao5afpohg89knktbsb जातिभेदविवेचन 0 111227 233847 2026-07-28T15:59:10Z QueerEcofeminist 918 + 233847 wikitext text/x-wiki <pages index="जातिभेदविवेचन.pdf" from=1 to=74/> 5xrisbpnauqs6qb2ad3s5uvqudx2rn0 गुन्हेगार जाती 0 111228 233849 2026-07-28T16:01:06Z QueerEcofeminist 918 ++ 233849 wikitext text/x-wiki <pages index="गुन्हेगार जाती.pdf" from=1 to=186/> 2txm1k4fxrs50zca4c78d1z83rikztz पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/११९ 104 111229 233852 2026-07-29T05:51:11Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233852 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(११४)}}</noinclude>उपाय नाहीं. असला समज विचारप्रांताच्या बाहेरचा आहे. पण वर्णभेद व जातिभेद हा ईश्वरकृत आहे, ही कल्पना विचाराच्या कसोटीने व प्रमाणांनीं सिद्ध करण्याचा जेथें प्रयत्न असतो तेथे ती कल्पना खोडून काढणें शक्य आहे. या उपपत्तीचे कांहीं प्रवर्तक असे प्रतिपादन करतात कीं, वर्णव्यवस्था ही कल्पना इतकी उत्तम च इतकी अपूर्व आहे की ती मानवी मनांतून निघणें शक्य नाहीं व म्हणून आम्ही वर्णभेद ईश्वरकृत मानतो. या प्रमाणाला उत्तर थोडें आहे. ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो यानें आपल्या आदर्शरूप प्रजासत्ताक राज्यांत वर्णव्यवस्थेसारखीच हुबेहूब कल्पना घातली आहे; तसेंच समाजशास्त्राचा जनक कॉम्ट याच्या ग्रंथांतही वर्णभेदाची कल्पना आहे. ज्याअर्थी वर्णव्यवस्थेसारख्या कल्पना इतर देशांत कांहीं व्यक्तींनीं काढल्या आहेत त्याअर्थी हिंदुसमाजांतील ही तसली कल्पना सुद्धां एखाद्या माणसाच्या डोक्यांतीलच असली पाहिजे, असे म्हणणे भाग आहे. वर्णभेदाचे कांहीं समर्थक असे म्हणतात की, वर्णभेद हा सनातन आहे; हा सर्व देशांत सर्व काळांत असतो व असलाच पाहिजे व म्हणूनच ही संस्था ईश्वरकृत आहे असें ठरतें. याला उत्तर अगदीं सोपें आहे. सर्व सृष्टीतील चमत्कार हेही सनातनच आहेत; वारा, पाऊस, थंडी, उष्णता, व इतर सृष्टींतील गोष्टी नियमितपणें सर्वत्र घडतात म्हणून त्या आपण इश्वरकृत मानीत नाहीं. सर्व शास्त्रे या सृष्टिचमत्कारांची शास्त्रीय उपपत्ति लावतात. त्यांची स्वाभाविक कारणपरंपरा शोधून काढतात. प्रत्येक गोष्ट देवाने केलेली आहे असें म्हणणें कमी परिणत मनःस्थितीचे द्योतक आहे. तेव्हां तोच न्याय याही गोष्टीला लागू आहे.<br>{{gap}}वर्णभेद व जातिभेद हा मनुष्यकृतच भेद आहे, असें म्हणणें परिणत मनाच्या माणसाला भाग आहे. तेव्हां आतां हा जातिभेद व वर्णभेद हिंदुसमाजांत कसा व केव्हां आला, हा प्रश्न राहिला.<noinclude></noinclude> df1uu1uonr00mp96311727e5mv22xxk पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/४४ 104 111230 233853 2026-07-29T05:51:54Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ३२ ) याप्रमार्णे जरी चरित्राचें मूळ थेट वाङ्मयाच्या सुरुवातीपर्यंत पोचलेले आढ ळतें, तरी अगदी अलीकडच्या काळापर्यंत व्यक्ति ह्मणजे देव, किंवा देवाचे लद्दानमोठे अवतार, अश..." 233853 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ३२ ) याप्रमार्णे जरी चरित्राचें मूळ थेट वाङ्मयाच्या सुरुवातीपर्यंत पोचलेले आढ ळतें, तरी अगदी अलीकडच्या काळापर्यंत व्यक्ति ह्मणजे देव, किंवा देवाचे लद्दानमोठे अवतार, अशी भावना प्रबळ असल्यामुळे, त्यांच्या जीवनवृत्तांताला पुराण, माहात्म्य, किंवा विजय, असली नांवें जास्त शोभतात. कारण, यांत दरएका विषय 'न भूतो न भविष्यति' असें सिद्ध करण्याची प्रवृत्ति दि- सत असते. यांनां या प्रकारांची पूर्वरूपें मानण्यास हरकत नाहीं. चरित्र हें नांव हाडामासाच्या, मानवी प्राण्याच्या जीवनवार्तेला जास्त शोभतें. चरित्र या प्रकाराचे पूर्ण रूप शास्त्रीय काळांत दिसतें. आमच्या इकडे शास्त्रीय काळाला सुरुवात अजून चांगली झालेली नाहीं, तेव्हां आमच्या भाषांत चरित्र या नांवा- खालीं पुराणे, माद्दात्म्यें, विजय हृींच पहावयास सांपडतात, यांत नवल नाहीं. व्यक्तीच्या आयुष्यांत घडलेल्या गोष्टींची नामावळी झणजे चरित्र नन्हे. आनु- षंगिक व इतर संस्कार, कल्पना, विचार, ध्येयें, नित्यव्यवसाय, मत व कृति यांचा मेळ, किंवा त्यांमधील फेर, स्वभावाचा विकास, आयुष्यांतील कार्य, इत्यादि व्यक्तीसंबंधींच्या गोष्टींचे सोपपत्तिक विवेचन ह्मणजे चरित्र, असें झट- ल्यास शोभेल. तसेच, चरित्राच्या मिषानें नायकाच्या काळचा लिहिलेला इति- हास याला चरित्र ह्मणतां येत नाहीं. समाजाशिवाय व्यक्ति नाहीं, हें खरें आहे. पण व्यक्ति ह्मणजे कळसूत्री बाहुलें नव्हे. समाजाला स्वतंत्र प्राण नाहीं. व्यक्तीशिवाय समाज, ही कल्पना समजण्यास देखील कठिण आहे. व्यक्तीचें किती व समाजाचे किती, हैं बरोबर सांगणे दूरापास्त आहे, तरी एकाकडे लक्ष व दुसऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठा प्रमाद होईल. चांगलीं चरित्रे वारंवार वाचून व्यक्ति व समाज या दोहोंचीहि योग्य संभावना करण्याची पात्रता अंग येईल. ती भाराभर विवेचनाने फारशी येणार नाहीं. यास्तव यूरोपियन भाषांकडे धांव घेणें अनिवार्य आहे. आतांपर्यंत चरित्राची शहानिशा बरीच केलेला असल्या- मुळे यथें चरित्रे व त्यांचे लेखक, यांचीं नावेंच दिलीं असतां पुरे होईल, ज्यांना उत्साह असेल, त्यांनी वाचून अनुभव घेतल्यास आमच्या विधानांविषयी खात्री होईल. सर्वच वाचली पाहिजेत असें नाहीं. इच्छेप्रमाणे निवड केली तरी कार्यभाग होईल. चरित्र चांगले वठण्यास सामुग्री - पुरावा - भरपूर पाहिजे, हें उघड आहे. लेखकाला सामुग्रीच्या अभावी, आपल्या पदरचे फारसें घालणें शक्य नसतें. ह्मणून अलीकडच्या काळच्या पुरुषांचीं चरित्रे लिहिणे फारसें मुष्किलीचें नसतें.<noinclude></noinclude> lgk6j8jsyxmd3nhrn4nthjyfndg0qst पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/४७ 104 111231 233854 2026-07-29T05:52:43Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ३५ ) आत्मचरित्र हा एक उपप्रकार आहे; पण त्याकडे लक्ष न देतां कथा या साहित्याच्या दुसऱ्या प्रकाराकडे वळू. कथा. या प्रकाराचें देखील मूळ जवळजवळ सारस्वताच्या उगमापर्यंत गेलेल..." 233854 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ३५ ) आत्मचरित्र हा एक उपप्रकार आहे; पण त्याकडे लक्ष न देतां कथा या साहित्याच्या दुसऱ्या प्रकाराकडे वळू. कथा. या प्रकाराचें देखील मूळ जवळजवळ सारस्वताच्या उगमापर्यंत गेलेलें आढळते. याचीं पूर्वरूपे, व चरित्राची पूर्वरूपे, यामध्यें प्रथम फारच थोडा फरक दाखवितां येतो; पण कांही काळानंतर तो स्पष्ट होऊं लागतो. काल्प- निक व्यक्तीविषयीं चरित्र या संज्ञेचा उपयोग करीत नाहींत. ऐतिहासिक, किंवा ऐतिहासिक मानलेल्या, पण खरोखर पौराणिक, व्यक्तीसंबंधी जास्त करितात. कथेचा उपयोग वेळ आनंदांत घालविण्याकरितां, केवळ गमतीकरितां जास्त होत असल्यामुळे, हा प्रकार क्षुल्लक वाटून याच्यावर अलंकारशास्त्राची कृपादृष्टि झालेली नाहीं. काव्य किंवा नाटक, यांच्याप्रमाणे याला निर्बंध लागू झालेले नाहींत. ह्मणून सुदैवाने याची स्वतंत्र, कालमानाला अनुसरून, वाढ होणें शक्य झाले आहे. येथें इतकेंच सांगून कादंबरी या महत्त्वाच्या उपप्रकाराकडे वळू. कथेसंबंधी थोडेंसें अधिक विवेचन, विनोदी वाङ्मय या सदराखालीं पुढे येईल. कादंबरी. कादंबरी हे नांव फारसे सोयीचें नाहीं. बाणभट्टानें लिहिलेल्या प्रसिद्ध नवलकथेचें हें नांव आहे; पण हल्ली याचा उपयोग फक्त नवलकथा ( Rom- ance ) या अर्थी न करता इंग्रजीत ज्याला सामान्यपणें कल्पितकथा ( Fiction ) ह्मणतात, त्याअर्थी करितात. नांव सोयीचें जरी नसले, तरी- तें भाषेत रूढ झाल्यामुळे वरच्याप्रमाणें इशारा देऊन वापरण्यास हरकत नाहीं. कादंबरीचे भाग अमुक आहेत, असें सांगतां येत नाहीं. ज्याप्रमाणें हेतु असेल, त्याप्रमाणे भाग पडतील. आपण येथें तीन भाग कसोटीस जरी कदाचित् ते उतरले नाहींत तरी ते सोयीचे आहेत. करूं. तर्कशास्त्राच्या कादंबरी. सर्वकालीन. ( नवलकथा बंगेरे.) गतकालीन. (ऐतिहासिक. ) • समकालीन. ( सामाजिक.)<noinclude></noinclude> 53ok7jn1q018751ygozag7lhtt1xy92 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/४८ 104 111232 233855 2026-07-29T05:53:17Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ३६ ) यांपैकी पहिल्याचे स्पष्टीकरण थोडेसें करणे जरूरीचे आहे. बाणभट्टाच्या कथेचें नांव या सबंध उपप्रकाराला लावण्याचा प्रघात पडला नसता, तर तिकडे बोट दाखविणें पुरे झालें अ..." 233855 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ३६ ) यांपैकी पहिल्याचे स्पष्टीकरण थोडेसें करणे जरूरीचे आहे. बाणभट्टाच्या कथेचें नांव या सबंध उपप्रकाराला लावण्याचा प्रघात पडला नसता, तर तिकडे बोट दाखविणें पुरे झालें असतें; पण तशी वस्तुस्थिति नाहीं. सर्वकालीन कादंबरीमधलीं पात्रे निवळ कल्पनासृष्टीतलीच असल्यामुळे, कोणत्याहि काळांत, कोणत्याहि देशांत तीं सारखीच प्रिय भासतात. अद्भुतकथा किंवा नवलकथा, हें नांव बरेच अंशीं या कादंबरीला लागू पडते. यांत लेखकाचा उद्देश केवळ मनोरंजन करण्याचा असतो. अरेबियन नाईट्स् हा ग्रंथ असल्या कथांचा एक अत्युत्तम, सदैव रमणीय संग्रह आहे. पर्शियन भाषेत गुलबकावली, छातीमताई, वगैरे असल्या कथांचे मासले आहेत. इतर मासले वाचकांना सहज काढतां येतील. ( Alice in Wonderland, Alice in the Looking- Glass, या गोष्टी याच सदरांत येतील. ) कादंबरीला पुरतेपणी लागू न लेखक रूसो यानें एक विशेष नवल, किंवा अद्भुतकथा हें नांव, सर्वकालीन पडण्याचे कारण असें आहे, कीं, प्रसिद्ध फ्रेंच प्रकारची कादंबरी-कथा लिहिण्याचा प्रघात यूरोपांत पाडला होता, व या कादं- बरीचा सर्वकालीन या सदरांत समावेश करणें भाग आहे. आमच्याकडे याप्रकारची कादंबरी नाहीं. हिचा विशेष हा होता कीं, कथानकाच्या ऐवज, पात्रांच्या स्वतंत्र व्यापाराऐवजी, पात्रांकडून स्वतःचे विचार, आशा, आकांक्षा, ध्येये हीच वदविण्याची लेखकाची सारी खटपट असे. काल्पनिक का होईना, पण स्वतंत्र, व्यक्ति ह्मणजे पात्रे, ( Characters ) ही कल्पना या कादंबरीत नसे. र्ती लेखकाची कळसूत्री बाहुली असत, असें झटल्यास फारशी अतिश- योक्ति होणार नाहीं. कादंबरी ह्मणजे जणूं काय एकप्रकारचें आत्मनिवेदन ( Personal Confession ) अमें रूमानें जनांना भासविलें होतें. त्याच्या ' ला नुव्हेल एलोईझ ' ( La Nouvelle Heloise ) या कादंबरीचे अनु- करण 'मदाम दस्ताएल' ( Madame de Stael) शातोत्रियाँ ( Cha- teau-briand ) व गअट ( Goethe ) या तीन प्रसिद्ध लेखकांनी अनुक्रमें कॉरीन, रने, वर्टर ( Corinne, Rene, Sorrows of Werther ) या कादंबऱ्यांत केलें. मूळ जनक रूसो व हे तीन निरीक्षणापेक्षा स्वतःच्या अंतरंगातील उमाळ्यांवर बया यांच्यानंतर कोणीं लिहिलेल्या दिसत नाहींत. अनुयायी, यांचा भर यांत विशेष आहे. अशा कादं- पण रूसोच्या कादंबरीत<noinclude></noinclude> 9zy5583qbzsw3cqqfy3gqqzm20pua2b पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१२० 104 111233 233856 2026-07-29T05:55:15Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233856 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(११५)}}</noinclude>त्याचें सविस्तर उत्तर देण्याइतकी ऐतिहासिक माहिती अझून उपलब्ध नाहीं पण आहे त्या माहितीवरून जातिभेदाचा आनुमानिक इतिहास थोडक्यांत मी आपल्याला सांगतों.<br>{{gap}}हल्लींचा हिंदुसमाज हा वेदकालीन आर्यलोकांपासून आलेला आहे, ही गोष्ट निर्विवाद आहे. तेव्हां त्या काळच्या समाजांत काय स्थिति होती, हे पाहिले पाहिजे. सर्व वेदांत ऋग्वेद हा सर्वांत जुना आहे. ऋग्वेदकाळी आर्यसमाजांत वर्णभेद नव्हता. आर्यलोक ही एक समाजाची टोळी होती. त्यांची एक शाखा प्रथम हिंदुस्थानांत आली व त्यांनी पंजाबांत वसाहत केली. या वेळी त्यांचा समाज एकजीव होता. ऋग्वेदकाळीं आर्यांमध्ये जातिभेद नव्हता. पण आर्यलोक हिंदुस्थानांत आल्यानंतर आर्य आणि अनार्य असा भेद स्वाभाविकच उत्पन्न झाला. अनार्य हे येथले मूळचे रहिवाशी! हे काळ्या वर्णाचे लोक होते. व आर्य हे गोऱ्या वर्णाचे लोक होते. आर्य लोकांचे पाऊल सुधारणेंत पुढे पडलेलें होतें. अनार्य हे अगदींच रानटी होते, आर्य हे जेते होते अनार्य हे जित होते; म्हणून स्वाभाविकपणेंच जेते आर्य हे आपल्यास रानटी जितांपेक्षां जास्त सुधारलेले आणि वरचढ समजत. शिवाय दोघामध्ये लढाया व तंटे चालूच होते. आर्यलोक या मूळच्या रहिवाशांना अनार्य किंवा दस्यु म्हणत. हे दस्यु आर्यांच्या छावणीवर रात्रीचे छापे घालीत म्हणून आर्यांना त्यांची मोठी भीति वाटे. याप्रमाणें आर्यलोकांची टोळी येथें आल्याबरोबर आर्य आणि अनार्य असे भेद समाजांत पडले. सारांश, या दोन लोकांचा रंग वेगळा होता; दोघांमध्ये शत्रुत्वभाव उत्पन्न झाला होता, आर्यलोक अनार्यांपेक्षा थोडे जास्त सुधारलेले होते. या सर्व सामाजिक परिस्थितिरूप कारणांनी समाजांत दोन भेद झाले. यांत कांहीं ईश्वराचा प्रत्यक्ष संबंध नव्हता. जेते आणि जित यामध्ये असल्या परिस्थितींत असा भेद सर्वत्र झालेला दिसतो. ग्रीक लोकांत असा भेद होता. ग्रीक लोक आप-<noinclude></noinclude> rrs8z6kfdog263lpk0yzejla2hpa4lp पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१२१ 104 111234 233857 2026-07-29T05:58:45Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233857 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(११६)}}</noinclude>ल्याला जास्त सुधारलेले समजत, आपल्यामध्ये स्वसंरक्षणाचे व कर्तबगारीचे गुण आहेत असे म्हणत व सर्व ग्रीकेतरांना रानटी मानीत. ग्रीक आणि रानटी ही शब्दाची जोडी हिंदुसमाजांतील आर्य आणि अनार्य किंवा दस्यु या शब्दांच्या जोडीसारखीच आहे.<br>{{gap}}या दोन जोड शब्दांनी व्यक्त केलेला भेदही सारखाच आहे व तोही सारखाच सामाजिक कारणांनी उत्पन्न झालेला आहे. दोन निरनिराळ्या रंगाचे व निरनिराळ्या संस्कृतीचे लोक एकत्र आले व त्यांचेमध्ये जित व जेते असा संबंध उत्पन्न झाला म्हणजे समाजांत श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेदभाव उत्पन्न होतो. अशा स्थितींत जेते जितांपासून वेगळे राहतात; जितांशी दळणवळण ठेवणें किंवा रोटीबेटीव्यवहार करणें व सारख्या दर्जाने वागणे, हें जेत्यांना कमीपणाचे वाटतें. अशा रीतीनें येथें बीजरूप जातिभेद उत्पन्न होतो, असा सार्वत्रिक अनुभव आहे. अमेरिकेंत नवीन वसाहती झाल्या तेव्हां काळा गोरा किंवा युरोपियन व नीग्रो असा भेद तेथें झाला व अझूनही हा भेद तेथें आहे. सध्यां आफ्रिकेंत काळा गोरा किंवा आशिआटिक व युरोपियन असा तीव्र भेद आहे. इंग्लंडच्या इतिहासांत नॉर्मन लोकांनी इंग्लंड जिंकल्यावर नॉर्मन व सॅक्सन असा तीव्र भेद एक दोन पिढ्यांपर्यंत राहिला, असें स्पष्टपणे सांगितलें आहे. सारांश, निरनिराळ्या परिस्थितीतील दोन लोक जित व जेते या नात्याने एकत्र झाले म्हणजे त्या समाजांत भेदभाव उत्पन्न होतो. अशा तऱ्हेचा भेद वेदकाळी प्रथमतः झाला. अर्थात् आर्य व अनार्य असे दोन समाज एकत्र राहूं लागले. हल्लीचा हिंदुसमाज प्रमुखतः या दोन लोकांच्या व पुढे वेळोवेळी आलेल्या दुसऱ्या लोकांच्या मिश्रणानें झालेला आहे, ही गोष्ट निर्विवाद आहे. आर्यलोक पंजाबातील सुपीक प्रदेशांत आल्यापासून त्यांच्या समाजाला व्यवस्थित स्वरूप येत चाललें व समाजशास्त्राच्या नियमाप्रमाणे तो कृषिवृत्ति<noinclude></noinclude> mxs3oowh0ytsxr7owk4zkwov6aiqyhl पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१२२ 104 111235 233858 2026-07-29T06:02:47Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233858 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(११७)}}</noinclude>बनत चालला. पुढे जसजसे श्रमविभागाचे तत्त्व त्या समाजांत अमलात येऊ लागले तसतसे स्थूल मानानें त्यांचे तीन वर्ग बनले; एक देवांची प्रार्थना करणारा, यज्ञ करणारा व मंत्र म्हणणारा; दुसरा वर्ग राजांचा किंवा समाजांचें संरक्षण करणारांचा व तिसरा वर्ग सामान्य लोकांचा. असे आर्यांच्या या समाजांत स्वाभाविक कारणांनी तीन वर्ग पडत चालले. त्यांना ब्राह्मण राजन्य किंवा क्षत्रिय व विट् किंवा वैश्य म्हणूं लागले. ऋग्वेदांत हे शब्द धंद्याचे वाचक दिसतात. तेथें ब्राह्मण शब्द पुष्कळ वेळां आला आहे. ब्रह्म जाणणारा, यज्ञ करणारा, वेद म्हणणारा, येवढाच त्याचा अर्थ आहे. याचाच पर्याय शब्द विप्र असाही तेथें आलेला आहे. विप्र याचा अर्थ विद्वान् किंवा ज्ञानी इतकाच आहे. राजन्य शब्द वेदांत आढळतो, तसाच क्षत्रिय शब्दही आढळतो. म्हणजे ब्राह्मण व विप्र शब्दाप्रमाणे ते एकाच अर्थी पर्यायशब्द आहेत व राज्यकर्ता, संरक्षणकर्ता, तारणारा इत्यादि अर्थ या राज्यन्य वगैरे शब्दांचे आहेत. विट् शब्द वेदांत पुष्कळ ठिकाणी सामान्यजन किंवा सर्वसाधारण लोक अशा अर्थी वापरलेला दिसतो पण पुढें त्याचा अर्थ व्यापार किंवा दुसरां औद्योगिक धंदा करणारा असा झाला. सारांश, ऋग्वेदांत हे तिन्ही शब्द निव्वळ धंद्याच्या अर्थी वापरलेले आहेत, असें दिसतें. त्यांना अझून विशिष्ट जातिवाचक किंवा वर्णवाचक अर्थ आलेला नव्हता. आर्यलोकांमध्ये धंद्यावरून हे तीन वर्ग नडत चालले होते व सामान्यतः एकाच घराण्यांतील किंवा गोत्रांतील पुरुष आपला वंशपरंपरागत धंदा करूं लागले असावे असें होतें तरी ह्या काळापर्यंत आर्यांचा समाज एकजीव होता. हे तिन्ही वर्ग आपल्याला आर्य म्हणत किंवा द्विज म्हणत. कारण सर्वांना मुंजीबंधन अथवा उपनयन- गुरूजवळ वेद शिकावयास जाण्याचा विधि- समान होता. आर्यसमाजांतील प्रत्येक व्यक्तीचा मग तो स्त्री असो पुरुष असो हा<noinclude></noinclude> mkecbgugbb6su3rsabokrlsmi1trq9k पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१२३ 104 111236 233859 2026-07-29T06:05:50Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233859 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(११८)}}</noinclude>उपनयनविधि होत असे. सर्वांना वेदाध्ययनाचा अधिकार होता. सर्व सृष्टि-देवतांचे भक्त होते. खाण्यापिण्यासंबंधी निर्बंध किंवा अडथळे नव्हतं. सारांश, सर्व तऱ्हेनें एकजीव, एकराष्ट्र असा हा आर्यसमाज होता. व यापासून अगदी वेगळा असा अनार्यांचा किंवा दस्यूंचा समाज होता. या दोघांमध्यें वैर होतें. या समाजाचे सारखे तंटे होत असत. परंतु या कलहाचा कालेकरून दोन्ही समाजांच्या लोकांना कंटाळा येऊन तडजोड करण्याची दोन्ही पक्षांची इच्छा बलवत्तर झाली असावी व आर्यलोकांनीं जित अनार्यांना आपल्या आर्यसमाजाचा एक वर्ग म्हणून घेण्याचें कबूल केलें असावें असें दिसतें. हें जें या दोन भिन्न भिन्न समाजांचें सामाजिक एकीकरण झाले त्याचाच परिणाम आमच्यांतील चातुर्वर्ण्याची कल्पना होय. मीं मागें सांगितलेच आहे कीं, श्रमविभागाच्या योगानें आर्यसमाजांत स्थूल मानानें तीन वर्ग झाले होते; त्यांतच या अनार्यांचा चवथा शूद्र वर्ग म्हणून गणना होऊ लागली असावी. हे अनार्य लोक आर्यांपेक्षां सुधारणेंत कमी होते. त्यांच्यामध्यें बुद्धिमत्तादि गुण, आपल्याइतके नसलेच पाहिजेत अशी आर्यांची ठाम समजूत; तेव्हां समाजांत यांचा अंतर्भाव केल्यानंतर समाजातील खालच्या दर्जाचीं कामें किंवा वरच्या वर्गाची सेवा करण्याची कामगिरी या शूद्रवर्गाला सांगण्यांत आली. प्रत्येक देशामध्ये जेत्यांनीं अधिकाराचीं व वरच्या दर्जाचीं कामें करावीं व जितांनीं गुलामगिरीची व वरच्या वर्गांतील लोकांची सेवाचाकरी करण्याचीं कामें करावीं, हा श्रमविभाग सर्वत्र दृष्टीस पडतो. तोच प्रकार वेदकाळीं आमच्या देशांत झाला व चातुर्वर्ण्याच्या व्यवस्थेची कल्पना निघाली. पुरुषसूक्ताने या कल्पनेला धार्मिक स्वरूप दिलें. हें सूक्त म्हणजे आमच्या जातिभेदाच्या कल्पनेचा एक आधारस्तंभच आहे म्हणून येथें त्याचें थोडें विवेचन करणें अप्रासंगिक होणार नाहीं.{{nop}}<noinclude></noinclude> 7camc0ljdtjtl2fyklr0g5can84a3n9 पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१२४ 104 111237 233860 2026-07-29T06:10:39Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233860 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(११९)}}</noinclude>{{gap}}पुरुषसूक्त ऋग्वेदांतील पुष्कळ सूक्तापेक्षां बरेंच अर्वाचीन आहे, ही निर्विवाद गोष्ट आहे. त्यांत वसंत, ग्रीष्म वगैरेसारख्या बऱ्याच अर्वाचीन कल्पना आलेल्या आहेत. ऋग्वेदांतील नेहमींचे इंद्र, वरुण, अग्नि वगैरे सृष्टिदेवतांच्यापेक्षां जास्त पुढची ताश्विक अशी आदिदेवाची किंवा आदिपुरुषाची कल्पनाही त्यांत आहे. हें सूक्तच एकंदर अलंकारिक व तात्त्विक आहे. सर्व जग व या जगांतील चराचर सजीव, निर्जीव वगैरे सर्व वस्तुजात एका आदिपुरुषापासून उत्पन्न झालेले आहे, या आदिपुरुषापासून झालेल्या या यादीत ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद व छंदःशास्त्र या गोष्टींचा उल्लेख आहे. यावरून असें स्पष्ट होतें. की, ज्या वेळीं हें सूक्त रचण्यांत आलें त्या वेळीं मंत्रांचें या तीन वेदांमध्ये वर्गीकरण झाले होते. तसेच वेदांच्या षडंगापैकीं छंदःशास्त्राचाही त्या काळीं उदय झाला होता अलंकारिक रीतीनें वर्णन करतांना या सूक्ताच्या कवीनें ज्याप्रमाणें सृष्टींतील चमत्कार चंद्र, सूर्य, पृथ्वी, आकाश इत्यादि आदिपुरुषापासून निर्माण झाले असे वर्णन केलें आहे त्याचप्रमाणें समाजांतील वर्गरूपी चमत्कारही त्याच आदिपुरुषापासून निर्माण झाले असें वर्णन केलें आहे. आतां या सूक्तावरून ज्याप्रमाणें ज्योतिषशास्त्राचे चंद्र, सूर्य, पृथ्वी इत्यादि गोलांच्या उत्पत्तीबद्दल शास्त्रीय सिद्धांत हल्लीचे सुशिक्षित लोक टाकून देत नाहींत त्याचप्रमाणे या सूक्तांतील ब्राह्मण-क्षत्रियांच्या उत्पत्तीच्या वर्णनावरून समाजशास्त्रानें ठरविलेल्या या सामाजिक चमत्काराची शास्त्रीय उपपत्ति सुशिक्षित माणसांनी टाकून देतां कामा नये. या सूक्तांत आलेली चार वर्णांची कल्पना त्या काळच्या आर्य व अनार्य समाजाच्या एकीकरणाची द्योतक आहे; हें शूद्र या शब्दाच्या अपूर्वत्वावरून सिद्ध होते. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य हं शब्द ऋग्वेदांत धंद्याचे वाचक म्हणून बरेच वेळां आलेले आहेत; पण शूद्र हा शब्द सर्व ऋग्वेदांत फक्त या सूक्तांत आला आहे, ही गोष्ट फार अन्वर्थक आहे.<noinclude></noinclude> gbb6kjc03lfhvqqwxyj51js5sz2y5gz पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१२५ 104 111238 233861 2026-07-29T06:14:11Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233861 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१२०)}}</noinclude>माझ्या मतें हा शब्द आर्यभाषेतीलही नसावा व ज्या वेळीं आर्यलोकांनी अनार्यांना आपल्या समाजांत मिसळून घेतलें त्या वेळीं हा शब्द त्यांनी संस्कृतांत घेतला असावा. तेव्हां हें सूक्त या दोन समाजांच्या मिसळीच्या काळानंतरचें असून त्या भेसळीला धर्माचे स्वरूप देण्याकरितां लिहिलेलें असावें असें वाटतें व आमच्या हिंदुसमाजांत ज्या स्वरूपाचा जातिभेद दृष्टीस पडतो, त्या स्वरूपाचें सूक्ष्म बीज या सूक्तांत आहे. या सूक्तांत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे आदिपुरुषाचे वरच्या दर्जाचे अवयवच मानले आहेत. पण शूद्रांना 'आदिपुरुषाच्या पायापासून निर्माण झालेले' या म्हणण्यांत दुहेरी कमीपणा दिलेला आहे. एक ते आदिपुरुषाचे अंगभूत नाहीत; तर त्यापासून अलग-वेगळे आहेत असें ध्वनित केलें आहे व त्यांची उत्पत्ति उत्तमांगापासून न सांगतां अधमांगापासून सांगितली आहे. अर्थात् या लाक्षणिक वर्णनांत आर्यांनी आपला जेत्याचा अभिमान व जिताबद्दल तुच्छताबुद्धि या स्वाभाविक भावना ग्रथित करून ठेविल्या आहेत. सारांश, पुरुषसूक्तावरून असें अनुमान काढतां येतें कीं, या काळी आर्य व अनार्य या दोन भिन्नवर्णी व भिन्नस्थिति समाजांचें उच्चनीचभावनामूलक एकीकरण झालें हेंच आमच्या सध्यांच्या जातिभेदाचें मूळ होय. कारण जरी आर्यांनी येथल्या रानटी लोकांना आपल्यांत सामील करून घेतलें तरी त्यांचा स्वाभिमान कमी झाला नाहीं. ते अनार्यांपासून तुटकपणानेंच रहात; अनार्यांना तुच्छ व कमी दर्जाचे मानीत, आर्यांचा व अनार्यांचा रोटीबेटीव्यवहार होत नसे. अर्थात् ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य हे तीन वर्ग सामाजिकदृष्ट्या एकीकडे व शूद्र एकीकडे असा प्रकार होता. पण एकदां समाजांत याप्रमाणें उच्चनीचपणाच्या व त्यापासूनच उत्पन्न झालेल्या तुटकपणाच्या कल्पनेला थारा मिळत गेल्यामुळे त्याचा प्रसार वरच्या द्विजवर्गातही होऊं लागला व शूद्राच्या व वैश्याच्या धंद्यांत पुष्कळ साम्य<noinclude></noinclude> hkdzqoxtynuf0k4qrqre1ozhkxllhqo पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१२६ 104 111239 233862 2026-07-29T06:17:39Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233862 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१२१)}}</noinclude>असल्यामुळे शूद्राबद्दल जी तुच्छताबुद्धि, त्यांच्याबद्दल जो अनादर तोच आर्यवर्गातील वैश्यांबद्दल वाटू लागला. ब्राह्मण व क्षत्रिय हे श्रेष्ठ व वैश्य व शूद्र हे कनिष्ठ अशी समजूत होऊ लागली. ही स्थिति पुराणकाळी दिसून येते.<br>{{gap}}या काळी ब्राह्मणक्षत्रिय या भेदाला अझून धंद्याचेंच स्वरूप होतें; शूद्राप्रमाणें जन्मावर हा भेद झाला नव्हता म्हणून या काळांत जनकासारखे क्षत्रिय ब्रह्मवादी दिसतात; आणि द्रोणासारखे ब्राह्मण क्षात्रविद्यापारंगत दिसतात व या दोन वर्गांमध्ये उच्च-नीच भाव दिसून येत नाहीं. पण येथेही ब्राह्मणांना आपल्या वर्गाबद्दल जास्त अभिमान वाटू लागला होता व वशिष्ट - विश्वामित्राचें भांडण हें ब्राह्मण-क्षत्रियांच्या उच्चनीचपणाबद्दलचे भांडण होय. शेवटीं वैश्यशूद्रांप्रमाणेच क्षत्रियांनाही हार खावी लागली व ब्राह्मण सर्व समाजांत श्रेष्ठ, शूद्र सर्वात कनिष्ठ व क्षत्रिय व वैश्य हे या दोहोंच्यामध्यें, असा प्रकार झाला व या वेळेपासून या चार वर्गांना हल्लींच्या जातीचे स्वरूप आलें; म्हणजे त्या धंद्यावरून न ठरतां जन्मावरून ठरूं लागल्या; प्रत्येक जातीचें दुसऱ्याशी सामाजिक दळणवळण संकुचित होऊं लागलें; व वर्णसंकराचे आणि स्पर्शास्पर्शाचे निर्बंध वाढत चालले.<br>{{gap}}अशा स्थितींत आर्यलोकांनी सर्व हिंदुस्थान देश आक्रमिला व यामुळे मागे सांगितल्याप्रमाणे स्थलभेद, भाषाभेद, वर्णसंकर इत्यादि कारणांनी व परिस्थितींनी चार जातींच्या चार हजार जाति झाल्या, याप्रमाणे या हिंदुसमाजाच्या जातिभेद घटनेचा थोडक्यांत इतिहास आहे.<br>{{gap}}यावरून हा जातिभेद ईश्वरनिर्मित नाहीं तर तो स्वाभाविक सामाजिक कारणांनीं घडून आलेला असून वर्ण व जाति असाही त्यांत भेद करतां येत नाहीं. वर्ण व जाति या एकाच कारणांनी उत्पन्न झालेल्या आहेत. प्रथमतः जित व जेते यांसंबंधानें दोन<noinclude></noinclude> ojzlmgtf8tcvbqd9i3aqbrgxh33hx01 पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१२७ 104 111240 233863 2026-07-29T06:23:50Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233863 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१२२)}}</noinclude>जाति झाल्या; त्यांमध्यें श्रमविभागामुळे चार जाति झाल्या व त्यांना इतर कारणांची जोड मिळून चार हजार जाति झाल्या. तेव्हां वर्ण ईश्वरनिर्मित व जाति मनुष्यनिर्मित असा भेद करणें शास्त्रदृष्ट्या युक्त नाहीं. असो.<br>{{gap}}आता आपण या संस्थेच्या गुणदोषविवेचनाकडे वळू. या संस्थेच्या गुणदोषाबद्दल वाद चालला असतांना वर्ग किंवा दर्जा व जाति यांमधील भेद ध्यानांत न ठेवण्याची चूक नेहमीं होत असते. जातिभेदाविरुद्ध कोणीही मनुष्य बोलू लागला कीं, त्याला पुराणाभिमान्याचे ठरलेले उत्तर म्हणजे 'अहो जातिभेद नाहीं कोठें? इंग्लंडांत लॉर्ड लोक मजुरांबरोबर आहारादि व्यवहार करणार नाहींत; मग लग्नसंबंधाची गोष्ट कशाला; त्यांच्यामध्यें सरदार, मध्यम वर्गाचे लोक, सामान्य जनसमूह असे तीन वर्ग आहेतच कीं नाहीं? आमच्यांत चार वर्ण आहेत. मग यांत वावगे काय?' पण आतां दर्शविल्याप्रमाणे आमच्या इकडील वर्ण काय किंवा जाति काय, या जन्मावर ठरलेल्या आहेत; व त्यांच्या मर्यादा लवचिक नाहींत, त्यांच्या तिकडे या दर्जावर ठरलेल्या आहेत व त्यांच्या मर्यादा लवचिक आहेत. तेव्हां अशी तुलना अगदीं भ्रामक आहे.<br>{{gap}}जातिभेदाच्या समग्र वादविवादांत शिरणें येथें शक्य नाहीं. पण जातिभेदाच्या समर्थकांच्या निरनिराळ्या प्रमाणांचा विचार केला तर त्यांचीं जातिभेदसमर्थक अशीं तीन प्रमाणें आहेत असें दिसतें.<br>{{gap}}जातिभेद हा श्रमविभागाच्याच तत्वाचा परिपाक आहे व ज्याप्रमाणे श्रमविभाग हे तत्त्व सामाजिक बाबतीत व अर्थशास्त्रांत उपयोगी आहे त्याप्रमाण जातिभेदही उपयोगी आहे. त्याच्यायोगानें देशांत निरनिराळे धंदे कायम रहातात. बापापासून लेकाला याप्रमाणें धंद्यांचं ज्ञान पिढ्यानुपिढ्या देशांत राहते. म्हणून देशाला जातिभेद श्रेयस्कर आहे.{{nop}}<noinclude></noinclude> gswx8l8g270ogr953rdsamqsyr35fa4 पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१२८ 104 111241 233864 2026-07-29T06:27:49Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233864 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१२३)}}</noinclude>{{gap}}तसेंच जातिभेदाच्या योगानें समाजांत सुव्यवस्था व स्थैर्य हीं उत्पन्न होतात. प्रत्येक जातीचा मनुष्य आपआपले काम दक्षतेनें करतो व यामुळे समाजाचा गाडा सुरळित चालतो व जातिभेदबद्ध समाज फार स्थिर असतो. शेवटीं जातिभेदाच्यायोगानें समाजांतील व्यक्तींमध्यें समाधान असतें व सर्व लोक गुण्यागोविंदानें व सुखानें राहतात. कारण जन्माने ठरलेले आपले काम करण्याचा मनुष्य कंटाळा करीत नाहीं, त्याचेमध्यें असंतोष व असमाधान नसतें. सारांश, जातिभेद हा समाजाच्या अस्तित्वास, स्थैर्यास व सुखशांतीस सर्वस्वी कारणीभूत आहे व म्हणूनच ही समाजरचना चांगली, असा जातिभेदसमर्थकांच्या म्हणण्याचा मथितार्थ आहे.<br>{{gap}}आतां या प्रमाणांत थोड्या फार अंशाने तथ्यांश आहे हें कबूल करणे भाग आहे. जातिभेदरचनेत एखादाही गुण नसता तर ती समाजांत इतक्या दिवस टिकलीच नसती. उत्क्रांतितत्वाप्रमाणें परिस्थितीला अयोग्य गोष्ट राहू शकणार नाहीं हें उघड आहे. हिंदुसमाजांत आज इतक्या काळपर्यंत जातिभेद राहिला त्याअर्थी तो त्या समाजाच्या परिस्थितीला योग्य होता असे कबूल केले पाहिजे. जातिभेदाच्या रचनेच्या समर्थकांच्या सर्व प्रमाणांचे पर्यवसान पाहिलें कीं, जातिभेद समाज चालू ठेवण्यास अनुकूल आहे असें दिसतें. स्थित्यात्मक समाजशास्त्राच्या विरुद्ध जातिभेद नाहीं. जातिभेदानें समाज आहे त्या स्थितीत राहू शकेल इतकेंच त्यावरून सिद्ध होते, पण एवढ्यावरून तो गत्यात्मक समाजशास्त्रालाही संमत आहे असें नाहीं.<br>{{gap}}आतांपर्यंत मी आपणांपुढे जातिभेदसमर्थकांचे म्हणणें व त्यांतील तथ्यांश याचें विवचन केलें. एका इंग्रजी आख्यायिकेंतील ढालीच्या पांढऱ्या रंगाचें हें वर्णन झाले. पण ढालीला दुसरी काळी बाजू आहे व ती फारच काळीकुट्ट आहे असें आपल्या ध्यानांत आल्यावांचून राहणार नाहीं.{{nop}}<noinclude></noinclude> cuyf153rldd8e348elbddu7u7p46dls