विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.13
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
सज्जनगड व समर्थ रामदास
0
110815
233887
232672
2026-07-30T11:48:30Z
QueerEcofeminist
918
"[[सज्जनगड व समर्थ रामदास]]" ला ने संरक्षित केले: पुर्ण झालेले पुस्तक ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत))
232672
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = सज्जनगड व समर्थ रामदास
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील =
| पुढील =
| वर्ष = 1918
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="सज्जनगड व समर्थ रामदास.pdf" from=1 to=133 />
[[वर्ग:प्रवासवर्णन]]
[[वर्ग:धार्मिक साहित्य]]
rqtb282vhe7c8hd428pmp49c9sxoyye
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड
0
110859
233886
232716
2026-07-30T11:48:10Z
QueerEcofeminist
918
"[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]]" ला ने संरक्षित केले: पुर्ण झालेले पुस्तक ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत))
232716
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड
| साहित्यिक = न म कुल्कर्णी
| अनुवादक =
| विभाग =
| मागील =
| पुढील =
| वर्ष = 1922
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf" from=1 to=301/>
s3z1vlg3s7mekwm9lvgfyatkuf64qus
माझा जन्मभरचा एक उद्योग
0
110927
233885
233000
2026-07-30T11:47:29Z
QueerEcofeminist
918
"[[माझा जन्मभरचा एक उद्योग]]" ला ने संरक्षित केले: पुर्ण झालेले पुस्तक ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत))
233000
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = माझा जन्मभरचा एक उद्योग
| साहित्यिक = नरसिंह चिंतामण केळकर
| अनुवादक =
| विभाग =
| मागील =
| पुढील =
| वर्ष = 1959
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf" from=1 to=192 />
[[वर्ग:माझा जन्मभरचा एक उद्योग]]
s706xssplcq3xttmzaslwhgwmw9u65w
काशी-रामेश्वर यात्रा
0
111018
233884
233228
2026-07-30T11:46:49Z
QueerEcofeminist
918
"[[काशी-रामेश्वर यात्रा]]" ला ने संरक्षित केले: पुर्ण झालेले पुस्तक ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत))
233228
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = काशी-रामेश्वर यात्रा
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील =
| पुढील =
| वर्ष = 1936
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="काशी-रामेश्वर यात्रा.pdf" from=1 to=247 />
tuiqiapqftleezxk0c4ly1apwpz6l3h
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/७
104
111242
233865
2026-07-29T15:42:51Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ २ पृष्ठांक लेखांक ३ चालू- कथा कादंबरी .... ऐतिहासिक कादंबरी .... ३५ ३६-३७ .... ३७--४० .... लेखांक ४. .... .... ४१-६४ रूपांतर एक आक्षेप. .... सामाजिक कादंबरीची वाढ. ४१–४४ .... ४४-४५ .... ४५-४६ उदाहरणें दो..."
233865
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
२
पृष्ठांक
लेखांक ३ चालू-
कथा
कादंबरी
....
ऐतिहासिक कादंबरी
....
३५
३६-३७
....
३७--४०
....
लेखांक ४.
....
....
४१-६४
रूपांतर एक आक्षेप.
....
सामाजिक कादंबरीची वाढ.
४१–४४
....
४४-४५
....
४५-४६
उदाहरणें दोन वर्ग
....
....
४६-४७
व्यक्ति व समाज
उदाहरणें
....
पाश्चात्य कादंबरीकार
तीन लेखनपद्धती. तुलनात्मकपद्धती
लेखांक ५. विनोद. विनोदाचे उद्दिष्ट
....
अपरिचित...... अनपेक्षित
....
....
विसंगतपणा विसंगतपणाची जाणीव .... विनोदाची पूर्ण वाढ
.....
...
...
४८–५०
....
५१-५४
....
५४-५५
....
....
५५--५७
५८--६१
....
६१--६४
....
....
....
६५-१०५
....
५६ – ६९
६९–७२
....
७२-७३
....
७३–७६
....
७६ – ८२
८२ – ८५
८५-८६<noinclude></noinclude>
fvj5dg74t63bll3bqq2dtcdwlw2oi5m
233866
233865
2026-07-29T15:58:04Z
JayashreeVI
4058
233866
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>
{{center|{{larger|'''२'''}}}}
<center>
|}
|+
|-
| || ||पृष्ठांक
|-
|{{larger|'''लेखांक ३ चालू-'''}}
|-
|{{gap}} कथा || ३५
|-
{{gap}} कादंबरी || ३६-३७
|}
....
ऐतिहासिक कादंबरी
....
....
३७--४०
....
लेखांक ४.
....
....
४१-६४
रूपांतर एक आक्षेप.
....
सामाजिक कादंबरीची वाढ.
४१–४४
....
४४-४५
....
४५-४६
उदाहरणें दोन वर्ग
....
....
४६-४७
व्यक्ति व समाज
उदाहरणें
....
पाश्चात्य कादंबरीकार
तीन लेखनपद्धती. तुलनात्मकपद्धती
लेखांक ५. विनोद. विनोदाचे उद्दिष्ट
....
अपरिचित...... अनपेक्षित
....
....
विसंगतपणा विसंगतपणाची जाणीव .... विनोदाची पूर्ण वाढ
.....
...
...
४८–५०
....
५१-५४
....
५४-५५
....
....
५५--५७
५८--६१
....
६१--६४
....
....
....
६५-१०५
....
५६ – ६९
६९–७२
....
७२-७३
....
७३–७६
....
७६ – ८२
८२ – ८५
८५-८६<noinclude></noinclude>
9bq2u76bhsa373jp141lwzp4jfluxd9
233867
233866
2026-07-29T16:08:02Z
JayashreeVI
4058
233867
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>
{{center|{{larger|'''२'''}}}}
<center>
{|
|+
|-
| || ''' पृष्ठांक '''
|-
|'''लेखांक ३ चालू-'''{{gap}}{{gap}}{{gap}}|
|-
|{{gap}} कथा || ३५
|-
{{gap}} कादंबरी || ३६-३७
|}
....
ऐतिहासिक कादंबरी
....
....
३७--४०
....
लेखांक ४.
....
....
४१-६४
रूपांतर एक आक्षेप.
....
सामाजिक कादंबरीची वाढ.
४१–४४
....
४४-४५
....
४५-४६
उदाहरणें दोन वर्ग
....
....
४६-४७
व्यक्ति व समाज
उदाहरणें
....
पाश्चात्य कादंबरीकार
तीन लेखनपद्धती. तुलनात्मकपद्धती
लेखांक ५. विनोद. विनोदाचे उद्दिष्ट
....
अपरिचित...... अनपेक्षित
....
....
विसंगतपणा विसंगतपणाची जाणीव .... विनोदाची पूर्ण वाढ
.....
...
...
४८–५०
....
५१-५४
....
५४-५५
....
....
५५--५७
५८--६१
....
६१--६४
....
....
....
६५-१०५
....
५६ – ६९
६९–७२
....
७२-७३
....
७३–७६
....
७६ – ८२
८२ – ८५
८५-८६<noinclude></noinclude>
he5di4xuqlotbf40jwh4vyfv3mhgp62
233868
233867
2026-07-29T16:11:26Z
JayashreeVI
4058
233868
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''२'''}}}}
...
...
<center>
{|
|+
|-
| || ''' पृष्ठांक '''
|-
|'''लेखांक ३ चालू-'''{{gap}}{{gap}}{{gap}}|
|-
|{{gap}} कथा || ३५
|-
{{gap}} कादंबरी || ३६-३७
|}
....
ऐतिहासिक कादंबरी
....
....
३७--४०
....
लेखांक ४.
....
....
४१-६४
रूपांतर एक आक्षेप.
....
सामाजिक कादंबरीची वाढ.
४१–४४
....
४४-४५
....
४५-४६
उदाहरणें दोन वर्ग
....
....
४६-४७
व्यक्ति व समाज
उदाहरणें
....
पाश्चात्य कादंबरीकार
तीन लेखनपद्धती. तुलनात्मकपद्धती
लेखांक ५. विनोद. विनोदाचे उद्दिष्ट
....
अपरिचित...... अनपेक्षित
....
....
विसंगतपणा विसंगतपणाची जाणीव .... विनोदाची पूर्ण वाढ
.....
...
...
४८–५०
....
५१-५४
....
५४-५५
....
....
५५--५७
५८--६१
....
६१--६४
....
....
....
६५-१०५
....
५६ – ६९
६९–७२
....
७२-७३
....
७३–७६
....
७६ – ८२
८२ – ८५
८५-८६<noinclude></noinclude>
sstlne94266i3hrga7ujy7i57jd0xfa
233869
233868
2026-07-29T16:19:04Z
JayashreeVI
4058
233869
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''२'''}}}}
...
...
<center>
{|
|+
|-
| || ''' पृष्ठांक '''
|-
|'''लेखांक ३ चालू-'''{{gap}}{{gap}}{{gap}}|
|-
|{{gap}} कथा || ३५
|-
{{gap}} कादंबरी || ३६-३७
-
|}
....
ऐतिहासिक कादंबरी
....
....
३७--४०
....
लेखांक ४.
....
....
४१-६४
रूपांतर एक आक्षेप.
....
सामाजिक कादंबरीची वाढ.
४१–४४
....
४४-४५
....
४५-४६
उदाहरणें दोन वर्ग
....
....
४६-४७
व्यक्ति व समाज
उदाहरणें
....
पाश्चात्य कादंबरीकार
तीन लेखनपद्धती. तुलनात्मकपद्धती
लेखांक ५. विनोद. विनोदाचे उद्दिष्ट
....
अपरिचित...... अनपेक्षित
....
....
विसंगतपणा विसंगतपणाची जाणीव .... विनोदाची पूर्ण वाढ
.....
...
...
४८–५०
....
५१-५४
....
५४-५५
....
....
५५--५७
५८--६१
....
६१--६४
....
....
....
६५-१०५
....
५६ – ६९
६९–७२
....
७२-७३
....
७३–७६
....
७६ – ८२
८२ – ८५
८५-८६<noinclude></noinclude>
bl3nmpbth9b1s21pv35ajq59q1lqcal
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१२९
104
111243
233870
2026-07-30T06:22:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233870
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१२४)}}</noinclude>{{gap}}जातिभेदाचा पहिला दोष म्हणजे त्याने समाजाचे तुकडे तुकडे पडतात हा होय. यासंबंधानें वर्गविशिष्टसमाज व जातिविशिष्टसमाज यांमधला फरक एका दाखल्याने दाखवितां येईल. वर्गविशिष्टसमाज हा थरावर थर ठेवल्याप्रमाणे असतो, सरदार लोकांचा थर सर्वांत वर असतो. त्याच्या खालचा थर मध्यम लोकांचा व शेवटचा थर सामान्य लोकांचा; अशा समाजरचनेनें समाजाचा एकजीवपणा कायम राहतो. कारण वरच्या थरांतून खालीं व खालच्या थरांतून वर असें परिवर्तन चालू असतें. सरदारांची मुले- बाळें मध्यम वर्गांत येत असतात, मध्यम वर्गांतील लोक सरदार बनत असतात; तसेच सामान्यवर्गातील मनुष्य मध्यम वर्गात जात असतो; तर मध्यम वर्गातील मनुष्य सामान्य वर्गात जात असतो. वर्गबद्ध समाजांत आज जो मनुष्य प्रत्यक्ष खाणींत काम करणारा मजूर आहे; तो पंधरा वीस वर्षांत आपल्या बुद्धिमत्तेनें व कर्तबगारीनें वरिष्ठ वर्गांत मोडूं लागतो. या सतत चालणाऱ्या परिवर्तनानें वर्गबद्ध समाजाचे तुकडे तुकडे कधीही होत नाहींत. तो समाज संबंध व एकजीव राहतो. पण जातिबद्ध समाजाची याच्या उलट स्थिति असते. हा समाज निरनिराळ्या पुडाप्रमाणे एकापुढे एक असतो; यांत एका पुडांतून दुसऱ्या पुडांत जाण्याची मुळींच वाट नसते, यामुळे असा समाज एकजीव व संबंध राहू शकत नाहीं; प्रत्येक पुडाची दृष्टि आपल्या पुडापुरतीच असते; त्याला सर्व समाजाकडे पाहण्याची दृष्टि नसते. अर्थात् अशा समाजरचनेत प्रत्येक पूड निराळें व स्वतंत्र होऊं पहातें व यामुळे अशा समाजाचे तुकडे तुकडे झालेले आहेत असें दिसतें. अशा समाजांत एका जातींत उत्पन्न झालेल्या माणसाचा दुसऱ्या जातींत कधींच प्रवेश होऊं शकत नाहीं.<br>{{gap}}या फाटाफुटीपेक्षांही जातिबद्धसमाजाचा दुसरा दोष मोठा आहे. जातिबद्धसमाजाची पुनरुज्जीवन शक्ति नष्ट झालेली असते.<noinclude></noinclude>
4klfe62xurbuba57yg7dr7ivcuo3e98
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१३०
104
111244
233871
2026-07-30T06:22:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्राणी व निर्जीव यंत्र यांमध्ये मोठा भेद असा आहे कीं, यंत्र किती- ही कौशल्यानें केलेले असले तरी यंत्राचें एक चाक मोडलें तर तें दुरुस्त करण्याची शक्ति यंत्रांत नसते. पण प्राण्यांच..."
233871
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१२५)}}</noinclude>प्राणी व निर्जीव यंत्र यांमध्ये मोठा भेद असा आहे कीं, यंत्र किती- ही कौशल्यानें केलेले असले तरी यंत्राचें एक चाक मोडलें तर तें दुरुस्त करण्याची शक्ति यंत्रांत नसते. पण प्राण्यांच्या एखाद्या अवयवांत बिघाड झाला तरी दुसरे अवयव बिघडलेल्या अवयवाची कामे करतात व कार्लेकरून तो बिघडलेला अवयव प्राणी परत उत्पन्न करतो. वर्गबद्ध समाज हा सजीव प्राण्याप्रमाणें आहे व 1. जातिबद्ध समाज हा निर्जीव यंत्राप्रमाणे आहे. अशा समाजांत प्रत्येक जातीचा मनुष्य आपआपले काम बिनबोभाट यंत्राप्रमाणे करतो; पण त्याला दुसऱ्याचें काम करतां येत नाहीं. व यामुळेच पुष्कळ वेळां जातिबद्ध समाजरचना चांगली वाटते; व जाति- भेदाच्या समर्थनपर जी प्रमाणे आहेत; तीं या यंत्रासारख्या सुरळित- पणापासून निघालेलीं आहेत. पण यंत्र कितीही चांगले असले तरी समंजस माणसें सचेतन प्राण्याला यंत्रापेक्षां जास्त किंमत देतात. कारण प्राण्यांत पुनरुज्जीवन आणि स्वयंप्रेरणा असते व या दोन गुणांनी प्राण्याची योग्यता यंत्रापेक्षां जास्त आहे. हाच न्याय जातिबद्ध व वर्गबद्ध समाजरचनेस लागू आहे. जातिभेदसमाज यंत्राप्रमाणें त्रिघाड होईतोपर्यंत सुरक्षित व सुव्यवस्थेने चालतो, पण एकदां बिघाड झाला म्हणजे आटपले; हिंदुसमाजाचें असेंच झालें. आर्यलोक हिंदुस्थानांत आल्यावर ऐतिहासिक कालापर्यंत येथें परकीयांच्या स्वाऱ्या आल्या नाहींत. यामुळें येथें बनलेली जातिभेदरचना सुरळित चालली. पण परकीयांच्या स्वाप्या आल्या म्हणजे त्या निवारण्याचें काम एका क्षत्रियजातीचे असें ठरल्यामुळे या गोष्टीकडे दुसऱ्या जाती मुळींच पहात नाहींशा झाल्या. त्या जाती या स्वाऱ्यांबद्दल बेफिकीर असत. याचा परिणाम असा झाला कीं, एकावर एक स्वाऱ्या येत गेल्यामुळें व या प्रत्येक स्वारीशी क्षत्रियांना लढण्याचे प्रसंग वारंवार येऊ लागल्यामुळे या जातीची संख्या कमी कमी होत चालली. पण त्यांची जागा भरून काढ-<noinclude></noinclude>
3i4ayxkhnmbkfyve6nw7eihqplsx40t
233872
233871
2026-07-30T06:25:50Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233872
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१२५)}}</noinclude>प्राणी व निर्जीव यंत्र यांमध्ये मोठा भेद असा आहे कीं, यंत्र कितीही कौशल्यानें केलेले असले तरी यंत्राचें एक चाक मोडलें तर तें दुरुस्त करण्याची शक्ति यंत्रांत नसते. पण प्राण्यांच्या एखाद्या अवयवांत बिघाड झाला तरी दुसरे अवयव बिघडलेल्या अवयवाची कामे करतात व कालेकरून तो बिघडलेला अवयव प्राणी परत उत्पन्न करतो. वर्गबद्ध समाज हा सजीव प्राण्याप्रमाणें आहे व जातिबद्ध समाज हा निर्जीव यंत्राप्रमाणे आहे. अशा समाजांत प्रत्येक जातीचा मनुष्य आपआपले काम बिनबोभाट यंत्राप्रमाणे करतो; पण त्याला दुसऱ्याचें काम करतां येत नाहीं. व यामुळेच पुष्कळ वेळां जातिबद्ध समाजरचना चांगली वाटते; व जातिभेदाच्या समर्थनपर जी प्रमाणे आहेत; तीं या यंत्रासारख्या सुरळितपणापासून निघालेलीं आहेत. पण यंत्र कितीही चांगले असले तरी समंजस माणसें सचेतन प्राण्याला यंत्रापेक्षां जास्त किंमत देतात. कारण प्राण्यांत पुनरुज्जीवन आणि स्वयंप्रेरणा असते व या दोन गुणांनी प्राण्याची योग्यता यंत्रापेक्षां जास्त आहे. हाच न्याय जातिबद्ध व वर्गबद्ध समाजरचनेस लागू आहे. जातिभेदसमाज यंत्राप्रमाणें बिघाड होईतोपर्यंत सुरक्षित व सुव्यवस्थेने चालतो, पण एकदां बिघाड झाला म्हणजे आटपले; हिंदुसमाजाचें असेंच झालें. आर्यलोक हिंदुस्थानांत आल्यावर ऐतिहासिक कालापर्यंत येथें परकीयांच्या स्वाऱ्या आल्या नाहींत. यामुळें येथें बनलेली जातिभेदरचना सुरळित चालली. पण परकीयांच्या स्वाऱ्या आल्या म्हणजे त्या निवारण्याचें काम एका क्षत्रियजातीचे असें ठरल्यामुळे या गोष्टीकडे दुसऱ्या जाती मुळींच पहात नाहींशा झाल्या. त्या जाती या स्वाऱ्यांबद्दल बेफिकीर असत. याचा परिणाम असा झाला कीं, एकावर एक स्वाऱ्या येत गेल्यामुळें व या प्रत्येक स्वारीशी क्षत्रियांना लढण्याचे प्रसंग वारंवार येऊ लागल्यामुळे या जातीची संख्या कमी कमी होत चालली. पण त्यांची जागा भरून काढ-<noinclude></noinclude>
lipze7vnt8js2f4c695a8wd5jpnfep9
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१३१
104
111245
233873
2026-07-30T06:30:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233873
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१२६)}}</noinclude>ण्यास दुसऱ्या जातीचे लोक पुढे सरसावले नाहींत यामुळेच हिंदुस्थान देशाला प्रत्येक विजेत्यापुढे मान वांकवावी लागली आहे. अलेक्झांडरनें हिंदुस्थानच्या कांहीं भागास जिंकलें. सेमिरामीस राणीनें हिंदुस्थानचा कांहीं भाग काबीज केला. महमदानें आपल्या बारा स्वाऱ्यांनी हिंदुस्थानास जेरीस आणले व पुढें तर मुसलमानांची कायमची पादशाही येथें स्थापना झाली; व पूर्वीच्या आर्याप्रमाणें मुसलमान हे येथले कायमचे रहिवाशी झाले. शेवटी इंग्रजांनी सर्व देश पादाक्रांत करून सुधारलेली पाश्चात्य बादशाही येथें निर्माण केली. यावरून जातिभेद समाजरचना राजकीयदृष्ट्या किती सदोष आहे, हे वाचकांच्या लक्षांत आलेच असेल. मागें सांगितलेल्या पहिल्या दोषापासूनही राष्ट्रीयदृष्ट्या फार नुकसान होते. हिंदुसमाजांत राष्ट्रीय भावनेचा जो अभाव दृष्टोत्पत्तीस येतो त्याचें कारण ही समाजाची रचनाच होय. समाजाचा प्रत्येक तुकडा आपआपल्या पुरताच विचार करतो. ज्याप्रमाणें ग्रीक लोकांच्या नगर- कल्पनेच्या संकुचितपणामुळे ग्रीक लोकांत विस्तृत राष्ट्रीय भावना उत्पन्न झाली नाहीं. म्हणून त्यांस प्रथमतः मॅसिडोनियन लोकांच्या व नंतर रोमन लोकांच्या अंकित व्हावे लागलें, त्याचप्रमाणे हिंदुसमाजाची स्थिति झाली.<Br>{{gap}}पण जातिबद्ध समाजाचा सर्वांत मोठा दोष म्हणजे त्यायोगे व्यक्तीच्या सर्वाङ्गीण उन्नतीस अवसर न राहिल्यामुळे समाजाची विकासक्षमता नाहींशी होते हा होय. जातिभेदबद्ध समाजांत स्त्रीपुरुषांचें ध्येय, कर्तव्यकर्म, कार्यक्षेत्र वगैरे सर्व बाबी अगदीं वज्रलेप रंगांनी आंखल्यासारख्या असतात, समाजानें घालून दिलेल्या मार्गांनीं जावें, हेंच व्यक्तीचें इतिकर्तव्य बनतें यामुळे व्यक्तींतील विशिष्ट गुणाच्या वाढीस अवसर मिळत नाहीं. पण समाजांतील सर्व उन्नति व्यक्तीविशिष्ट गणविकासावर अव-<noinclude></noinclude>
debmad5w4paoobj07pmvx36pi6ipp4u
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१३२
104
111246
233874
2026-07-30T06:36:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233874
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१२७)}}</noinclude>लंबून असते. अर्थात् जांतिबद्ध समाज डबक्यांत सांचलेल्या पाण्याप्रमाणे निस्सत्व व निर्जीव बनतात.<Br>{{gap}}जातिबद्ध समाजाच्या या दोषामुळे जातिभेद हा गत्यात्मक समाजाच्या दृष्टीने अत्यंत हानिकर आहे असे दिसून येईल. जातिxx हा स्थित्यात्मक समाजाच्या दृष्टीने इतका अनर्थावह नसेल, पण समाजाचें खरें ध्येय निव्वळ जिवंतपणा हें असून चालावयाचें नाहीं. 'कxxपि जीवति चिराय बलिं च भुंक्ते,' हे जसें व्यक्तीस तसेंच समाजासही भूषणावह नाही, आमचा हिंदु समाज आज हजारों वर्ष टिकला आहे एवढ्यातच समाधान न मानतां त्याची प्रगति व्हावी; त्याची सारखी भरभराट व्हावी, त्याचे पाऊल नेहमी पुढे पडावें व जगांतील सुधारलेल्या देशांच्या मालिकेंत त्यानें बसावे अशी जर हिंदु समाजास इच्छा असेल तर त्यानें प्रगतिविघातक जातिभेद रचनेस फांटा देण्यास तयार झालें पाहिजे. अशा प्रकारची भावना xx त्याप्रमाणें वागण्याचे धैर्य परमेश्वर आपणास देवो अशी इच्छा प्रदर्शित करून व माझे विचार आपल्यापुढे मांडण्याची संधि सोशल सर्व्हिस लीगने मला आणन दिली याबद्दल तिचे आभार मानन मी आपली रजा घेतों.<br><br><br>
{{border|{{center|'''समाप्त.'''}}}}{{nop}}<noinclude></noinclude>
787x1ocnkwbx72e5pgf5wtatqs0opay
पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१३३
104
111247
233875
2026-07-30T06:59:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233875
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{x-larger|'''व्याख्यानांतील नव्या शब्दांची यादी.'''}}}}
<center>
{|
|-
| Theological Stage || दैवी अवस्था.
|-
| Fetish Stage || वस्तुपूजेची मानसिक अव
|-
| Polytheistic Stage || अनेकेश्वरी मनोवस्था
|-
| Metaphysical Stage || तात्त्विक अवस्था
|-
| Thoretical Sociology || तात्त्विक समाजशास्त्र
|-
| Statical || स्थित्यात्मक.
|-
| Dynamical || गत्यात्मक.
|-
| Root idea || मुलभूत कल्पना.
|-
| Pas--- charity || बैठे दातृत्व.
|-
| Active charity || धांवतें दातृत्व
|-
| Incest || अगम्यगमन.
|-
| ||
|-
| Consciousness of kind || जातीची जाणीव.
|-
| Socialist || समाजवादी.
|-
| Individualist || व्यक्तिवादी
|-
| Utilitarianism || जनपदहितवाद
|-
| Relief map || निम्नोन्नतिदर्शक नकाशा.
|-
| Science of law || कायदेशास्त्र.
|-
| Dark age || तमोयुग.
|-
| Classical Political Economy || अभिमत अर्थशास्त्र.
|-
| Deductive Science || तार्किक शास्त्र
|-
| Eugenics || सुप्रजानिर्माणशास्त्र
|-
| Differentiation || विभक्तीकरण
|-
| Deductive method || आगामी पद्धति.
|-
| Inductive methed || निगामी पद्धति.
|-
| Prescientific period || प्राक्शास्त्र काल.
|-
| Scientific period || शास्त्रोत्तर काल
|-
| All-sided || सर्वांगीण.
|-
| Community of wives & children{{gap}} || दारासुत साधारण्य
|-
| City-State of Greece || नगर.
|-
| Hunting || मृगयावृत्ति.
|-
| Nomadic || गोपालवृत्ति.
|-
| Agricultural || कृषिवृत्ति.
|-
| Industrial || उद्यमवृत्ति.
|-
| Concrete Science || मूर्तशास्त्र.
|-
| Abstract Science || अमूर्तशास्त्र.
|-
| Sound || नादवत्ता.
|-
| Natural selection || स्वाभाविक निवड
|-
| Progressivness || विकासमयता
|}
</center>
<br>
{{rule|5em}}<noinclude></noinclude>
r9lpmnr8mcowq7815bqot73c46suqai
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/२७
104
111248
233876
2026-07-30T11:32:50Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
233876
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २३ )
नाहीं. पुढेंहि ( पृ० ११० वर ) ते म्हणतात, हल्लींच्या काळीं - म्हणजे
जो उठला तो ब्राह्मण होऊं पहातो, अशा काळींहि - परबु लोकांचा मगज
न फाटतां स्थिर राहिला आहे, हें विशेष अभिनंदनीय होय. आजपर्यंत
एकाहि चां. का. प्रभूने ब्राह्मणांच्या ब्राह्मण्याची नकल करण्याचा यत्न केलेला
नाहीं, स्वतःस चुकूनसुद्धां कधिं ब्राह्मण उपाधीचा कलंक लावून घेतलेला नाहीं,
फार काय पण ब्राह्मणाची मुख्य दीक्षा जी भिक्षा तिचाहि प्राणान्तीं अवलंब केलेला
नाहीं. या गोष्टीं रा. बोडसांसारख्या प्रच्छन्न विद्वानांस आम्हीं सांगाव्या असें थोडेंच
आहे ? अर्थात् का. प्रभूंनीं देशकालवर्तमानानुसार आपले असिजीवी मसिजीवी
क्षात्रवृत्तीचे व्रत अझूनहि कसें परिपालन केलें आहे, हें सिद्ध करण्याइतका भर-
पूर पुरावा त्यांचा इतिहास केव्हांहि देऊ शकेल. शंकेखोरांनी तो परिशीलन
करण्याची तसदी मात्र घेतली पाहिजे. चां. का. प्रभू यांचा इतिहास जोपर्यत
शाबूत आहे व तो त्यांच्या क्षात्रबीजाची साक्ष देण्याइतका खंबीर, मुद्देसूद आणि
सडेतोड आहे, तोपर्यंत ते वेदोक्त कर्माबद्दल आपला जन्मसिद्ध हक्क सांगणारच-
मग वेदोक्त कर्मों प्रचलित मन्वंतराच्या धांगडधिंग्यांत त्यांच्या हातून होवोत वा
न होवोत !
*
*
Q
*
are
१८. पुढें रा. बोडस म्हणतात " मराठे क्षत्रिय की शूद्र हा वाद शिवा-
जीच्या वेळेपासून चालला आहे व नुकतेच तंजावरच्या कोर्टानें कोल्हा-
पूरच्या महाराजांस शूद्र ठरविलें तरी तेवढ्यानें लोकांचें समाधान होत
नाहीं. " आमच्या बोडसांचें मात्र आकंठ समाधान झालें आहे. कारण काय ?
तर तंजावरच्या कोर्टाने हा निकाल दिला म्हणून. बिचारा गागाभट्ट आणि
आजपर्यंतचे शंकराचार्य शहाणे कीं मूर्ख याचा निवाडा करणारा बृहस्पति अखेरीस
तंजावरला उपटला ! आतां हिन्दुसमाजांतील निरनिराळ्या जातींनीं आपापली
धार्मिक रडगाणीं या बोडसमान्य बृहस्पतीच्या दरबारी घेऊन जाऊन त्यांचा
अक्षयीचा निर्णय लावून घ्यावा. याउप्पर शंकराचार्याच्या मिथा करण्याचें कांहीं
कारण नाहीं आणि त्यांच्या पीठांचा फाजील मान राखण्याचेहि कांहीं प्रयोजन नाहीं-
नव्हे या संस्थाहि जीवंत राहू देण्यांत आतां कांहीं पुण्यांश राहिला नाहीं. आतां
चतुर्वर्णाच्या ठरवाठरवीचा मामला तंजावरच्या कोर्टाकडे गेलेला आहे; मग या
जगद्गुरूंच्या दिवट्यांना तेलाचे बुधले ओतून उगाच जळत ठेवण्यांत काय अर्थ ?<noinclude></noinclude>
a8lxpbsebtsbqfzta3qtkjda2u4vopw
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/२८
104
111249
233877
2026-07-30T11:35:53Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
233877
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २४ )
*
..
तंजावरच्या कोर्टाचे हे न्यायाधीश काळे आहेत कीं गोरे आहेत, हैं आम्हांला
माहीत नाहीं, हा खटला कोणत्या स्वरूपाचा होता हें समजण्याचें साधन अगर
निवाड्याची नक्कल यांपैकीं कांहींहि आम्ही पाहिलें नाहीं व पहाण्याची पर्वाहि
नाही. उपलब्ध इतिहासाचा धि:कार करून दिलेला निर्णय बोडसपंथी मूठभर
कुत्सितांशिवाय इतर कोणाहि समंजस माणसास मान्य होणार नाहीं. परंतु जे
व्रणार्थ पशुच्या शिरावर वनीं उभे काकसे त्यांना त्या निकालाचेंच मोठे कौतुक
वाटावे यांत आश्चर्य नाहीं. वेळीअवेळी एखाद्या अविश्वसनीय उद्गारांच्या तुटक्या
दोरीच्या आश्रयाने चित्पावनेतरांची निंदा करण्याचें वरिकंकण हात बांधणाऱ्यांना
आमचा असा सवाल आहे कीं चातुर्वण्यव्यवस्थेचे व महाराष्ट्रांतील निरनिराळ्या
जातींच्या इतिहासाचें अकटोविकटो ज्ञान असलेल्या अर्वाचीन काळ्या किंवा
गोऱ्या न्यायाधीशाचा निकाल जर तुम्हांला वेदतुल्य प्रमाण आहे तर विलाय-
तेतल्या कोर्टाच्या लो. टिळकांच्या खटल्याच्या निकालावर मनगटें चावण्याचा
इतका उपद्व्याप करतां कां ? कां ही देखिल एक वकीली सृष्टीतील मयचेष्टाच आहे ?
आमचे बोडससाहेब तंजावरच्या कोर्टातल्या निकालानें हुरळून जाऊन कोल्हापुरचे
महाराज शूद्र ठरल्याबद्दल मोठ्या समाधानानें टाळ्या वाजवितात; परंतु टाळ्यांच्या
त्या कडकडाटांत जगद्गुरूंच्या पीठावरील अर्धा डझन स्वामी आणि काशीकर्नाटक
प्रांतातले असंख्य शास्त्रज्ञ पंडीत अप्रत्यक्ष रीतीनें गाढव ठरले जातात याची त्यांना
शुद्ध राहिली नाहींसें दिसतें ! यावरून इतकाच निष्कर्ष निघतो कीं मनुष्य
कितीही जाडा विद्वान असला तरी त्याला एकदां मत्सराने ग्रासलें कीं तोसुद्धां
माथेफिरूलाहि साजणार नाहींत अशी भलभलतीं विधानें बरळू लागतो. सर्व
राष्ट्राची एकी करण्याची घमेंड मारणारे विद्वान अतःपर हा परनिंदेचा नीच मार्ग
सोडून देतील तर त्यांच्या विद्वत्तेवर फार उपकार होतील. विद्वत्तेचीं आणि
सत्यशोधनाचीं प्रदर्शनें करतांना इतरांची निंदा केल्याशिवाय विद्यादेवी प्रसन्न
*
लोकमान्यांबद्दलचा आमचा वैयक्तिक आदर ( पहा आमचें ' वक्तृत्वशास्त्र' पृ. ९७,
१०२,१७२,२३१ पुरवणी पृ. ३) जरी बाजूला ठेवला तरी प्रस्तुत खटल्याच्या निकालावर
- सर्व समंजस जगाचा जो अभिप्राय पडला आहे. त्यांत आम्हीहि वांटेकरी आहोंतच. अर्धा-
तच तंजावरच्या कोर्टाच्या निकालावर हुरळून जाऊन रा. बोडस जसे टिप्या कुटूं लागले,
तसे टिळक- खटल्याच्या निकालाच्या बाबतींत कोणी करील, तर तो शुद्ध अधमपणा होय,
व्मसें मात्र आम्ही बोडसपंथीं मंडळींना बजावून ठेवत.<noinclude></noinclude>
p11tbuzuoqj49q0uxvg7q6s9ha0m2hr
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/२९
104
111250
233878
2026-07-30T11:36:10Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
233878
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २५ )
होत नाहीं किंवा सत्याचा शिंपला हातीं लागत नाहीं असें थोडेंच आहे ? पण
सुंभ जळला तरी पीळ कायमच राहतो. छत्रपतीच्या राजगादीची निंदा करतां -
करतांच पेशवे निजधामास गेले. सातारकर छत्रपतींना शूद्र शूद्र संबोधानानें
जिव्हा विटाळविणारे पटवर्धन नाना नातू अॅन्ड को. चे सगळे भागीदार निमक-
हरामीचा डिप्लोमा घेऊन परधामास गेले. आतां त्याच कंपनीचे आधुनिक
वंशज कोल्हापूर सरकारची हाडें चघळण्यांत धन्यता मानीत आहेत ! कोल्हापूरचे
महाराज निर्भेळ शुद्र असोत नाहींतर अळणी क्षत्रिय असोत, ते आज
छत्रपतीच्या क्षत्रिय सिंहासनावर विराजमान असून क्षात्रकर्माताही त्यांचा
हात धरणारा मायचा पूत पुण्यास किंवा मुंबईस जोपर्यंत पुढे येत
नाहीं तोंपर्यंत शेंकडों बोडसांनी तंजावर कोर्टाच्या निकालाची दंवडी
घरोंघर पिटली तरी त्यांचा कोणीहि क्षत्रिय मराठा हात धरणार नाहीं.
मात्र तंजावरच्या किंवा विलायतच्या कोर्टानें निकाल देण्याच्या पूर्वी खुद्द चित्पावन
जातींतले बरेच लोक उघडउघड शुद्रवत् आचार करूं लागले आहेत, त्याचा मात्र
ब्राह्मण्याभिमान्यांनीं वेळींच बंदोबस्त करावा, इतकी मात्र कळकळीची शिफारस
करणें आम्हांला भाग आहे..
कां ४१५
१९. वर्णव्यवस्थेची वाटाघाट करतांना आणि हिंदुस्थानातील निरनिराळ्या
जातींच्या नांवांचा इतिहास सांगतांना आमचे मित्र बोडस साहेब पुढे म्हणतात:-
अमुक जातीचा इतकें म्हटल्यानें कोणाचे समाधान होत नाहीं तर ब्राह्मण
क्षत्रिय वैश्य शूद्र या चारीपैकी कोणत्या तरी एका वर्गांत आपला समावेश
झाला पाहिजे असें प्रत्येकांस वाटतें. अलीकडे इंग्रजी विद्येनें तर ही
इच्छा अधिकच प्रबळ होत चाललेली दिसते. सोमवंशी, सूर्यवंशी, चांद्र-
सेनीय, दैवज्ञ, त्वष्टाकासार, विश्वकर्मा वगैरे नवीन नवीन नांवें प्रचारांत
येत आहेत त्यांतील बीज हेंच. नुसते सोनार किंवा कायस्थ म्हणून
चालत नाहीं; तर अमुक विशेषणयुक्त ब्राह्मण किंवा क्षत्रिय म्हटले पाहिजे.
ही महत्वाकांक्षा इंग्रजी शिकलेल्यांत तर अधिकच आढळते. अहाहा,
केवढा अचाट ऐतिहासिक शोध, किती दांडगी ही सूक्ष्मविवेचक दृष्टी, केवढी
अवाढव्य सत्यप्रियता आणि ह्यूमन् सायकॉलजीचें केवढें विस्तृत ज्ञानभांडार हैं !<noinclude></noinclude>
k2tg344kpsyjxhpyhhmtiw4slrw3hcu
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/३०
104
111251
233879
2026-07-30T11:36:30Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
233879
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २६ )
वरील उद्गार काढतांना आम्हांला असें वाटर्ते, रा. बोडस साहेबांच्या विचार- दुर्बि
णीपुढे त्यांच्या चित्पावन जातीचा गतेतिहास मूर्तिमंत उभा ठाकलेला असावा
आणि ब्राह्मणपणा प्राप्त करून घेण्यासाठीं व चतुर्वर्णाच्या एक उच्चवर्गात आपली
कायमची वर्णी लावून टाकण्यासाठीं चित्पावनांनीं ज्या हालचाली उर्फ उलाढाली
केल्या त्यांचेच प्रतिबिंब वरील उद्गारांत उमटविण्याची त्यांना प्रेरणा झाली असावी.
चांद्रसेनीय किंवा देवज्ञ इ. नांवें नवीन आहेत कीं प्राचीन आहेत है
ठरवायला रा. बोडसांची कांहीं जरूर नाहीं; परंतु चित्पावन संज्ञेचा कर्मसंन्यास
करून कोंकणस्थ या स्थलवाचक अभिधानाचा बाप्तिस्मा १९ व्या शतकांत
चित्पावनांनी कां घेतला * आणि भरतखंडांतील दशविध ब्राह्मणांच्या यादीत
या जातीचें नांव कोठें व कोणत्या नंबरावर आहे, हें रा. बोडसांनी दाखविण्याचा
यत्न केल्यास तो कांहींतरी श्लाध्य होईल. चित्पावनांनीं पेशवे नोकरशाहीच्या
दमधाटीवर स्वतःच्या जातीस कोंकणस्थ या स्थलवाचक शब्दापुढे ब्राह्मण हा
नवीन शब्द जोडून संबोधण्याचा उपक्रम सुरू करतांच बिचाऱ्या प्राचीन महाराष्ट्र
ब्राह्मणांनाहि देशस्थ संज्ञेच्या बुरख्याची ओढणी घ्यावी लागली. चित्पावनांनीं
ब्राह्मण बनण्याकरितां केलेल्या घालमेलींचा इतिहास फार विस्तृत आहे. त्याची
थोडीफार कल्पना परिशिष्टांत दिलेल्या त्यांच्याविषयींच्या अनेक उताऱ्यांवरून
येईल. चांद्रसेनीयादि इतर जातींच्या नांवाच्या आर्वाचीनत्वावर टीका करण्यापेक्षां
रा. बोडसांसारखे इतिहास पंडित स्वज्ञातीच्या इतिहासाचें संशोधन करतील
तर 'मी हांसे लोकाला आणि शेंबूड माझ्याच नाकाला' असा आत्मपरिचय त्यांना
आल्याशिवाय खास रहाणार नाहीं.
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हैं ज्या जातीचें नांव आहे त्या जातीचा इतिहास
या नांवांत आहे. हें नांव " कोंकणस्थ " संज्ञेप्रमाणे सुटसुटीत नाहीं, माल-
गाडीप्रमाणे लांबलचक आहे, त्याला इलाज नाहीं.
दस्तऐवजी पुराव्यांच्या भानगडीत न पडतां प्रस्तुत पुस्तकांतील चां. का. प्रभूंवरील
दुसऱ्या ग्रामण्याचा इतिहास पाहिला तरी त्यांतील दस्तऐवजांतसुद्धां या लांबलचक
अगदीं प्राचीन काळच्या
आतां तर ही मंडळी तेंहि नामाभिधान सोडून 'दक्षिणी ब्राह्मण' ह्मणवू लागले आहेत.
कांहीं दिवसांनीं उत्तरी, पश्चिमी, ईशान्यी ब्राह्मणांचेहि अवतार हिंदुस्थानावर स्वाऱ्या
करणारसें दिसतें.<noinclude></noinclude>
a9upetevhmvn9d2vbbm6ajid7ycw603
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/३१
104
111252
233880
2026-07-30T11:43:40Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
233880
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २७ )
नांवाचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळून येईल. सदहू ग्रामण्य १५व्या शतकांतलें आहे.
या एकाच मुद्यावरून असे सिद्ध होतें कीं, रा. बोडसांच्या कल्पनेप्रमाणें हें नांव
इंग्रजी झाल्यावर कोणा मतलबी शहाण्याच्या टाळक्यांतून बाहेर पडलेलें नाहीं
किंवा चित्पावनांप्रमार्णे चां. का. प्रभूनों कांहीं सामाजिक अगर राजकीय स्वार्था-
साठीं नवीन लावून घेतलेलें नाहीं. वर्णाश्रमव्यवस्थेची पाळेमुळे हुडकिणारांनीं
व इतर ज्ञातीच्या निंदेवर स्वज्ञातीचें स्तोम माजविणारांनीं, ज्या परजातींच्या
इतिहासावर त्यांना टीका करावयाची असते तो इतिहास मुळींच अभ्यासून न
पहातां, मनःपूतं समाचरेत् मल्लीनाथी करणे म्हणजे आपल्या विद्वत्तेला अधम
ठरविण्यासारखे आहे. बोडसपंथी अष्टपैलू विद्वान् एखाद्या वादग्रस्त विषयावर
लेखनपाटव गाजविण्यापूर्वी त्याचा सांगोपांग अभ्यास करण्यांची तसदी घेतील,
तर त्यांच्या विद्वत्तेस न शोभणारे उपरिनिर्दिष्ट वादविषयक मुद्दे लिहिण्यास
त्यांची शुद्ध मनोदेवता कधींच प्रेरणा करणार नाहीं. र्चा. का. प्रभूंचा इतिहास
व तद्विषयक शेंकडों पौर्वात्य व पाश्चिमात्य इतिहास - शाख्यांनी ठरविलेले त्यांच्या
संज्ञेबद्दलचे एथ्नॉग्राफिकल सिद्धांत रा. बोडसांनीं मुद्दाम अवलोकन करून आपल्या
विचारसरणीत सुधारणा करावी अशी विनंति आहे.
सरतेशेवटीं रा. बोडसवर्गीय विद्वज्जनांस एक अत्यंत कळकळीची प्रार्थना आहे.
त्यांच्या बहुश्रुतपणाचें, विद्याव्यासंगाचें आणि विद्वत्तेचें आम्हांला कौतुक वाटतें.
ते आमचे देशबंधू म्हणून आम्हांला मोठा अभिमान वाटतो. आज चित्पावन
समाज बुद्धिमत्तेच्या बाबतींत सर्व हिंदु समाजाच्या आग्रेसर भागी उभा आहे हैं
आम्हीं प्रांजळपणे कबूल करतो. परंतु या मंडळींनी वारंवार जुन्या वादांचीं
थडगीं उकरून सिद्ध झालेल्या सिद्धांताचीं हाडकें पुनःपुन्हा धूत बसण्याचा
अव्यापारेषू व्यापार करण्यापेक्षां आपल्या विद्वत्तेचा सत्कारणी उपयोग केला तर
या महाराष्ट्रावर फारफार उपकार होतील. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर किंवा
वेदोक्त आणि पुराणोक्त हा वाद आजपर्यंत खोडसाळ ब्राह्मणांनींच - विशेषतः
चित्पावनांनींच—— उपस्थित केल्याची साक्ष इतिहास देत आहे. याउप्पर हा
राष्ट्रविघातक व आत्मविनाशी धंदा ते सोडून देतील तर फार बरें ! ब्राह्मणेतर
किंवा चित्पावनेतर जातींची कुचाळी केल्याशिवाय नॅशनॅलिझमचा यज्ञ जर
विधिपूर्वक झाल्यासारखं वाटत नसेल, तर मग खुशाल बालूं या तुमचा परनिंदेचा
शिमगा. परस्पराच्या होळांत महाराष्ट्राचे सरपुर्ण पडतच रहावे अशी जर
भोर<noinclude></noinclude>
0o17xtfq442unn09y7sh9xf3v0bqpi7
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/३२
104
111253
233881
2026-07-30T11:43:56Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
233881
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २८ )
परशुरामाची इच्छाच असेल, तर त्याला तुम्हीं तरी काय करणार ? परंतु
राष्ट्रैक्याची पुराणें झोडणाऱ्या तुमच्यासारख्या पुराणिकांचा मेंदू अझूनहि मत्सराच्या
डबल न्यूमोनियांतून मोकळा होईल, अशी आशा प्रदर्शित करून या वादाला
आम्ही येथेंच मुक्ती देतों.
66
*
*
*
२०. निरनिराळ्या जातींत फूट फाड्न राष्ट्रीय स्वातंत्र्याचा नाश ब्राह्मणांनीच
कसा केला, या बाबतींतले कै० प्रो० भागवत यांचे कांहीं स्पष्टोद्गार अलीकडच्या मॅदु
भडकलेल्या ब्राह्मणांना शुद्धीवर आणण्यास उपयोगी पडतील म्हणून खालीं देत
आहोत. “ ब्राह्मणांचे जातिभेद संबंधों स्तोम वाढलें, खरोखर पेशवाईपासून.
रस्त्यावर थुंकल्यास रस्ता बाटेल, म्हणून गळ्यांत थुंकण्यासाठी एक मडकें बांधून
अतिशूद्रांनीं शहरांतून फिरावें, हा हुकूम, पहिल्यानें फिरविला पेशव्यांनीं धर्मगुरूंच्या
हातीं निरंकुश धर्मसत्ता पहिल्यानें असतेंच. तींत आणखी निरंकुश
राजसत्ता मिळाली, म्हणजे इतर लोकांस ते अगदीं दुःसह होतात. जस-
जशीं वर्षे लोटतील, तसतसा निदान आमच्या या प्रियदेशांत ब्राह्मण व
क्षत्रिय या दोहोंमधील विरोध ब्राह्मणांनीं अधिक शहाणपणा न दाखविल्यास
ढेंगांनीं वाढत जाण्याचा संभव दिसतो. कोल्हापुरकरांचें नुकसान सर्वस्वीं
केलेलें पेशव्यांनीं; पेशव्यांनी पटवर्धनांस दक्षिण महाराष्ट्रांत जहागिरी दिल्या त्याचें
मुख्य कारण शिवाजीच्या वंशास डोके वर उचलूं न द्यायाचें हैं; जी सातारची गादी
क्षत्रियांनीं स्थापिली, तिचा सर्व अधिकार हळूहळू बळकावून छत्रपतीस बाहुलें
करून ठेविलें पेशव्यांनींच; पुढे खडकीच्या लढाईत महाराष्ट्राचें व त्याच्यांबरोबर
मऱ्हाठ्यांचें स्वातंत्र्य सर्वस्वीं घालविणारे पेशवेच; परदेशीयांस आंत पहिल्यानें
आणणारे पेशवेच; शिंदे व होळकर यांच्या शहाणपणाच्या मसलतीचा तिरस्कार करून
पाणिपतास महाठ्यांचा सत्यानास करून टाकला पेशव्यांनींच, ज्या पेशव्याने शाहूच्या
बायकोस गांजिलें व साक्षात् शिवाजीची सून ताराबाई हिचा पदोपदीं अपमान केला,
त्याच्याच चुलत बंधूनें; बडोदेकर व नागपूरकर हे दोघे खुद्द शाहू छत्रपतीनें वाढविलेले,
त्यामुळे पेशव्यांचा व त्यांचा प्रायः विरोधच असे; शिंद्यावर पहिल्यानें पेशव्यांचे उप-
कार होते, पण नाना फडणिसानें ब्राह्मणांची सत्ता वाढविण्यासाठीं व क्षत्रियांची
अजिबात मानहानि करून टाकण्यासाठी, शिंद्याबरोबर विरोध माजविला
महादजी जर त्यावेळी नसता तर शिंद्याचैहि सर्वस्व घेण्यास नाना न चुकता;<noinclude></noinclude>
px8bu5e9e3e5o2ovl4dgrepy11yjd1a
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/३३
104
111254
233882
2026-07-30T11:44:09Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
233882
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २९ )
अहल्याबाईस बुडविण्याच्याहि पेशव्यांच्या मसलती चालल्याच होत्या; व अखेरीस
इंदुरकरास बुडविण्यासाठी पेशव्यांनीं कावा करून शिंद्यास आपणाकडेस ओढिलें,
पण यशवंतरावाने पुण्याच्या लढाईची मात्रा दिली, तिच्या ठसक्यानें पेशव्यांचा
दुष्ट ज्वर लागलाच नरम पडला. जसजसा मन्हाठ्यांच्या इतिहासाचा
फैलावा होत जाईल, तसतशा या ठळक गोष्टीं महाराष्ट्र क्षत्रियांच्या मनांत
विशेष वागतील, व त्यामुळे जर ते ब्राह्मणांचा द्वेष अधिक करूं लागले,
तर निदान आम्हीं तरी त्यांस दोष लाविणार नाहीं. ज्यांचें सर्वस्व
आम्हीं बुचाटून घेतलें किंवा ज्यांस सर्वस्वीं बुडविलें किंवा बुडविण्यासाठीं
यत्न केला, त्यांनी जर आमचा द्वेष करूं नये, तर करावा तरी कोणाचा ?
आतां झाली गोष्ट झाली, हें खरें आहे. पण तशी गोष्ट पुनः न होऊं देण्या-
विषयों आम्हां ब्राह्मणांस फार जपलें पाहिजे; व शाहूस अभिषेक होईपर्यंत महा-
ठ्यांनी केलेल्या महापराक्रमांवर झांकण टांकून, शुद्ध जात्यभिमानानें पेशव्यांस
यश आलेल्या क्षुद्र लढायांच्या फुशारक्या मारण्याचें सोडून दिले पाहिजे.
ब्राह्मणांविषयीं इतर जातींची पूज्यबुद्धि असते, ती, जर आम्हां धर्मगुरूमध्ये ते
अलीकडेस यत्किंचित् कांहीं उणीव पहातील तर, समूळ धुऊन जाईल व आमच्या
पाठीमागच्या उखाळ्या पाखाळ्या निघून, आम्हांस तोंड दाखविण्यास देखील
जागा रहाणार नाहीं. जितकें आम्हांस जपून वागलें पाहिजे, तितकें जपून इत-
रांनों वागण्याची गरज नाहीं, कारण बोलून चालून ते धर्मगुरू नव्हत. आज-
पर्यंत आम्हीं धर्मगुरूंनीच जपून वागून जर सदुदाहरण घालून दिलें नाहीं, तर
ज्यांचे आम्ही धर्मगुरू त्यांनी कित्ता तरी कोणता वळवावा ? पेशव्यांनी जें
उदाहरण घालून दिलें, तें तसें घालून देण्यापेक्षां जर मुळींच घालून दिले
नसतें, तर बरें झालें असतें.
देतील, अशी आशा बाळगतो.
व घडून येत आहेत, त्यावरून
निराळे " लोक " किंवा "
रीतीनें ब्राह्मणांनी भेद माजविणें शहाणपणाचे काम नव्हे, असें म्हटल्याशिवाय
( उद्गार पृ० १८० - - १८१. )
आतां तरी ब्राह्मण चांगलें उदाहरण घालून
पण अलीकडेस ज्या सर्व गोष्टी घडून आल्या
विचार करितां ब्राह्मणांचा आपण स्वतः
"
जन समजण्याचा विचार दिसतो. अशा
आमच्याने रहावत नाहीं.
"
3<noinclude></noinclude>
e8v0u2m9cqfzq9tfj5pdjk47xi6i9x3
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/३४
104
111255
233883
2026-07-30T11:44:23Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
233883
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ३० )
२०. लोकशिक्षणनामक मासिक पुस्तकाच्या पहिल्या वर्षाच्या १२ व्या अंकांत
रा. वि. का. राजवाडे यांनी महाराष्ट्रांतील बुद्धिमान् प्रतिभावान् व कर्त्या लोकांची
मोजदाद केली असून शके १७३९ ते शके १८३५ (सन १८१७ - १९१२) पर्यंतच्या
[ लोकोत्तर ? ] पुरुषांची यादी दिली आहे. प्रत्येकाने समाजहित काय केलें
आहे तें त्याच्या नांवापुढे दर्शविलें आहे. रा. राजवाड्यांनीं प्रस्तुत यादीच्या अग्र-
स्थानीं चिंतामणराव आप्पा सांगलीकर यांचें नांव दाखल केलें आहे. आपल्या
यादीत अग्रमान दिलेल्या या बुद्धिमान प्रतिभावान व कर्त्या पुरुषानें समाजहित
काय केलें,
याबद्दल आमचे राजवाडे म्हणतातः - बरा संस्थानिक, परभु ग्रामण्य.
दिग्विजयीपणा व लोकोत्तरपणा प्राप्त व्हायला येवढे भांडवल पुरेसें असतें, हा एक
नवीन शोधच लागला म्हणायचा ! मथळ्यावर रा. राजवाडे स्वतःच म्हणतात
" विचार सामाजिक आहे तेव्हां कोणत्याही प्रकारें समाजाच्या हिताला
ज्यांनी थोडा किंवा फार हातभार लाविला अशाच व्यक्तींचा तेवढा या
मोजदादीत समावेश होतो. एखादा माणूस मोठा बुद्धिमान किंवा प्रति-
भावान असला, परंतु समाजाच्या उपयोगी तो यत्किंचितही पडला नाहीं,
तर त्याची गणना समाजहितेच्छूच्या मोजदादींत करितां येत नाहीं......
तसेंच कोणी बुद्धिमान माणूस एखाद्या समाजांत जन्मला व तो समाजाचें
अनहित करूं लागला, तर त्याची गणना समाजहितेच्छ्रत करितां येत
नाहीं. सबब बुद्धिमान परंतु आत्मसंतुष्ट संन्याशी व समाजहितनाशक
माणसें ह्यांना वगळून बाकी जेवढ्या बुद्धिमान, कर्तृत्ववान व प्रतिभा-
शाली व्यक्ती गेल्या शंभर वर्षांत मराठा (?) समाजांत झाल्या त्यांची याद
देण्याचा प्रयत्न करितों "
चिंतामणराव आप्पा पटवर्धनांनीं ' परभु ग्रामण्य' यज्ञ करून त्यांत बऱ्याच चां.
का. प्रभूंच्या आहुति दिल्या ही गोष्ट इतिहास नाकबूल करीत नाहीं. इतिहास
संशोधन करण्याचें जरी कोणी नाकारलें तरीहि आप्पांची ही दिग्विजयी कामगिरी
कच्च्या पाऱ्याच्या रसायनाप्रमाणे महाराष्ट्रेतिहासाच्या आंगावर फुटून निघाल्या-
शिवाय रहाणार नाहीं, इतकी जालीम आहे. श्रीमंत सांगलीकर बुद्धिमान् होते,
कर्तृत्ववान् होते, प्रतिभावान् होते, चित्पावन होते व ब्राह्मणदि बनले होते. परंतु
या त्यांच्या सर्व भांडवलाचा व्यय सातारकर छत्रपतीच्या गादीची होळी करण्या-<noinclude></noinclude>
934utduxgy1tdjgmptpraf2np12nsfm
वर्ग:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
14
111256
233888
2026-07-30T11:54:21Z
QueerEcofeminist
918
+
233888
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1