विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.13 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk साचा:अलीकडे उपलब्ध झालेले साहित्य 10 257 234494 234202 2026-08-03T05:14:11Z कल्पनाशक्ती 3813 अलीकडे उपलब्ध झालेले साहित्य मध्ये भर 234494 wikitext text/x-wiki ==Instructions== * This is for newly completed works. * Add new items using {{new texts/item}}. No subst. See documentation for information to overwrite title. * Please use a descriptive edit summary of the work being added. Simple listing: <pre>{{new texts/item|LINK TO WORK|Author name|YYYY}}</pre> Advanced listing controlling aspects of display (nowiki=yes displays the author name without a wikilink): <pre>{{new texts/item|LINK TO WORK|Author name|YYYY|nowiki=yes|display=Preferred title to display}}</pre> Please limit the number of texts to a maximum of seven, so that it fits nicely on the page. # Insert a new text on the top, and move the bottom one to the "Older entries" section. # Try not to have two texts by the same author on this template at the same time, thanks. # Have a descriptive edit-summary of the work being added to help enable management of this page # Edit the New texts section ===New entries=== __NOEDITSECTION__ <onlyinclude> {{export| सज्जनगड व समर्थ रामदास}} {{new texts/item|सज्जनगड व समर्थ रामदास|display=सज्जनगड व समर्थ रामदास|गोविंद चिमणाजी भाटे|१९१८}} {{export| स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड)}} {{new texts/item|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड)|display=स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड)|स्वामी विवेकानंद|१९१२}} {{export| शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती}} {{new texts/item|शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती|display=शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती|शरद जोशी|२०१०}} {{export| शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख}} {{new texts/item|शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख|display=शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख|शरद जोशी|२००९}} {{export| अंगारमळा}} {{new texts/item|अंगारमळा|display=अंगारमळा|शरद जोशी|२०१५}} {{export| आमची संस्कृती}} {{new texts/item|आमची संस्कृती|display=आमची संस्कृती|इरावती कर्वे|१९६०}} {{export| व्यवस्थापनाची मूलतत्त्वे}} {{new texts/item|व्यवस्थापनाची मूलतत्त्वे|display=व्यवस्थापनाची मूलतत्त्वे|शरू रांगणेकर|१९६०}} {{export| पाणी! पाणी!!}} {{new texts/item|पाणी! पाणी!!|display=पाणी! पाणी!!|लक्ष्मीकांत देशमुख|२०११}} {{export| बळीचे राज्य येणार आहे!}} {{new texts/item|बळीचे राज्य येणार आहे!|display=बळीचे राज्य येणार आहे!|शरद जोशी|२०१०}} {{export| पोशिंद्याची लोकशाही}} {{new texts/item|पोशिंद्याची लोकशाही|display=पोशिंद्याची लोकशाही|शरद जोशी|२०१०}} {{export| भूमी आणि स्त्री }} {{new texts/item|भूमी आणि स्त्री|display=भूमी आणि स्त्री|Shaila Lohiya|२०००}} {{export| 'भारता'साठी}} {{new texts/item|'भारता'साठी|display='भारता'साठी|शरद जोशी|२०१०}} </onlyinclude> ===Older entries=== {{export| महाबळेश्वर}} {{new texts/item|महाबळेश्वर|display=महाबळेश्वर|दत्तात्रय कमलाकर दिक्षित|१९०२}} {{export| साथ}} {{new texts/item|साथ|display=साथ|जाई निंबकर|१९९०}} {{export| अर्थशास्त्राची मूलतत्वे}} {{new texts/item|अर्थशास्त्राची मूलतत्वे|display=अर्थशास्त्राची मूलतत्वे|गोविंद चिमणाजी भाटे|१९१०}} {{export| चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न}} {{new texts/item|चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न|display=चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न|शरद जोशी |2010}} {{export| केल्याने होत आहे रे}} {{new texts/item|केल्याने होत आहे रे|display=केल्याने होत आहे रे|सुवर्णा गोखले, बागेश्री पोंक्षे|२००४}} {{export| राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान}} {{new texts/item|राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान|display=राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान|हमीद दलवाई|२०१२ }} {{export| मी भरून पावले आहे}} {{new texts/item|मी भरून पावले आहे|display=मी भरून पावले आहे|मेहरुन्निसा दलवाई|१९९५}} {{export| अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची}} {{new texts/item|अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची|display=अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची|शरू रांगणेकर|२०१०}} <!--MOVE OLDER ENTRIES BELOW HERE--> pj2lx0ws2uojlhdg5sn8zbr5h5ifkob सदस्य चर्चा:Revi C. 3 1991 234476 234417 2026-08-02T14:31:14Z Pathoschild 78 global user pages ([[m:Synchbot|requested by Revi C.]]) 234476 wikitext text/x-wiki __NOINDEX__<div class="mw-content-ltr" lang="en" dir="ltr">[[File:Revi logo (pink).png|thumb|center|<span style="color:red">PLEASE DO NOT LEAVE MESSAGE HERE!</span>]] '''<span style="color:red"> BEFORE YOU BLOCK MY ACCOUNT: IF MY EDIT SUMMARY INCLUDE PREFIX </span>''(Script)''<span style="color:red">, DON'T BLOCK ME, JUST TELL ME TO SLOW DOWN AT COMMONS' TALK PAGE. IT IS AN AUTOMATED SCRIPT BEING USED ON COMMONS TO MOVE FILES.</span>''' Instead, please leave your message following site: <br /> [[File:Wikidata-logo-en.svg|45px|link=d:User talk:Revi C.]] [[d:User talk:Revi C.]] for Wikidata (Interwiki links) stuff <!--(I am {{int:Group-sysop}} there)--> <br /> [[File:Commons-logo.svg|45px|link=commons:User talk:Revi C.]] [[commons:User talk:Revi C.]] for renaming stuff or [[User:CommonsDelinker|CommonsDelinker]] action (I am {{int:Group-sysop}} there) <br /> [[File:Wikimedia Community Logo optimized.svg|45px|link=m:User talk:Revi C.]] [[meta:User talk:Revi C.]] for other stuff (User right notification, revert message, etc...) Messages left on this page may be reverted or moved without any response.</div> 5b8qtz4dnjnrhc9ts3mku14m3gujbq8 पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/102 104 26131 234499 142384 2026-08-03T05:35:06Z कल्पनाशक्ती 3813 234499 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude> '''भारतीय संस्कृती : प्रश्न व योगदान''' '''आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी : जीवन व साहित्य''' {{gap}}हिंदी भाषा आणि साहित्याच्या प्रांतात मोठी आचार्य परंपरा दिसून येते. आचार्य महावीरप्रसाद द्विवेदी, आचार्य रामचंद्र शुक्ल, आचार्य नंददुलारे वाजपेयी इ. नावे म्हणजे हिंदी विचारधारा नि समीक्षेची ओळख. या परंपरेतले ‘शेवटचे आचार्य' म्हणजे हजारीप्रसाद द्विवेदी. नंतर हिंदीत ‘डॉक्टर परंपरा दिसून येते. त्यातले अलीकडचे मोठे नाव म्हणजे डॉ. नामवर सिंह. ह्या दोघांनी मिळून दोन विचारधारा हिंदीत समृद्ध केल्या. पैकी पौर्वात्य विचारधारेचे मेरूमणी म्हणजे आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी तर पाश्चात्त्य परंपरेचे खंदे समर्थक डॉ. नामवर सिंह. आचार्य हजारीप्रसाद द्विवेदींनी बनारस हिंदू विद्यापीठ सांभाळले तर डॉ. नामवर सिंह यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली. दोघांना संस्कृत, इंग्रजीची चांगली जाण. त्यांचा हिंदी हा अभ्यास विषय असला तरी दोघांनी मिळून ‘पृथ्वीराज रासो' सारख्या महाकाव्याचे केलेले संपादन म्हणजे पूर्व पश्चिमेपलीकडे मानवतावाद हाच खरा विचारवाद असल्याचा पुरावा. {{gap}}आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी (१९०७-१९७९) हे हिंदी भाषा व साहित्य प्रांतातील समीक्षक, निबंधकार, कादंबरीकार, भाषांतरकार, संपादक म्हणून प्रसिद्ध होते. हिंदीशिवाय संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, बांगला या भाषांची त्यांना चांगली जाण होती. इंग्रजीचे त्यांचे वाचन व्यासंगी हाते. घरी ज्योतिष परंपरा लाभलेने हजारीप्रसाद द्विवेदी बनारस हिंदू विद्यापीठातून ज्योतिषाचार्य आणि इंटर उत्तीर्ण होऊन सन १९३० मध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनमध्ये हिंदी शिक्षक म्हणून दाखल झाले. सन १९४० ते १९५० या काळात हिंदी विभागप्रमुख म्हणून कार्य केले. इथे त्यांना रवींद्रनाथांच्या बरोबर क्षितिजमोहन सेन, विधु शेखर भट्टाचार्य, बनारसीदास चतुर्वेदी प्रभृतींचा<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१०१}}</noinclude> jc67y461mhpteug2vecgxnw4ipo3rhx पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/103 104 26132 234500 142385 2026-08-03T05:38:56Z कल्पनाशक्ती 3813 234500 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>सहवास लाभला. पुढे ते बनारस हिंदू विद्यापीठात विभागप्रमुख झाले. लखनऊ विद्यापीठाने त्यांना डी.लिट्. ही मानद पदवी त्यांच्या साहित्य, भाषा, शिक्षण कार्यातील योगदानाबद्दल १९४९ मध्ये बहाल केली. याच कार्याबद्दल भारत सरकारने सन १९५७ मध्ये ‘पद्मभूषण'ने गौरविले होते. साहित्य अकादमीने त्यांना 'रवींद्र सन्मान' दिला होता. नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी, नॅशनल बिब्लिओग्राफी, अभिनव भारती ग्रंथमालेतील त्यांचे कार्य व योगदान अविस्मरणीय. ते सन १९६० ते १९६७ मध्ये पंजाब विद्यापीठात होते. नंतर बनारस हिंदू विद्यापीठातून निवृत्त झाले. {{gap}}आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी हिंदी साहित्यात मानवतावादी साहित्यिक म्हणून ओळखले जातात. ‘हिंदी साहित्य की भूमिका' (१९४0) सारखा ग्रंथ त्यांनी शांतीनिकेतनमध्ये शिकवत असताना हिंदीतर भाषांना हिंदी साहित्याचा परिचय करून देण्यासाठी लिहिला. या लेखनात त्यांना बौद्ध धर्म अभ्यासक प्रो. विंटरनित्स आणि भदंत आनंद कौसल्यायन, संस्कृतपंडित नित्यानंद विनोद गोस्वामी, वेणीमाधव बरूआ प्रभृतींचे साहाय्य लाभले होते. आचार्य द्विवेदी हिंदीतील श्रेष्ठ निबंधकार होते. ‘अशोक के फूल' (१९४८), ‘कल्पलता' (१९५१), ‘विचार और वितर्क' (१९५४), ‘कुटज' (१९६७), 'आलोक-पर्व' (१९७२) आणि मरणोपरान्त त्यांच्या चिरंजीवांनी मुकुंद द्विवेदींनी संपादिलेला ‘भाषा, साहित्य और देश' हे त्यांचे निबंध संग्रह. ‘अशोक के फूल', 'नाखून क्यों बढते है?' सारखे निबंध त्यांच्या भाषा, शैली व विचार सामर्थ्याचे प्रतीक होत. 'बाणभट्ट की आत्मकथा' (१९४७) ही कादंबरी लिहून आपण उत्तम ललित लिहू शकतो हे दाखवून दिले. नंतर त्यांनी 'चारू चंद्रलेख' (१९६३), ‘पुनर्नवा' (१९७३), ‘अनामदास का पोथा' (१९७६) लिहून कादंबरीची एक वेगळी परंपरा विकसित केली. इतिहास व संस्कृती वर्णनातून मिथक चरित्रांचा अभ्यास असे सूत्र घेऊन ते कादंबऱ्या लिहीत. समीक्षक म्हणून लिहिलेल्या 'कबीर' (१९४२), ‘नाथ संप्रदाय' (१९५०), ‘साहित्य का मर्म' (१९४९), ‘लालित्य मीमांसा' (१९६२) ग्रंथांतून त्यांच्यातील विचारवंत स्पष्ट होतो तर ‘संदेश रासक' (१९६०), ‘पृथ्वीराज रासो' (१९५७) मधून संपादक. आचार्य द्विवेदी लिखित 'मृत्युंजय रवींद्र' (१९६३) चरित्र वाचनीय आहे. {{gap}}भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक असून आचार्य हजारीप्रसाद द्विवेदींनी ‘संस्कृती' विषयावर स्वतंत्र ग्रंथ न लिहावा याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. तथापि, त्यांनी संस्कृती विषयावर अनेक निबंध लिहिले आहेत.<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१०२}}</noinclude> lygnczy7j0jgy0220665aus903fi21j पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/104 104 26133 234501 142386 2026-08-03T05:51:53Z कल्पनाशक्ती 3813 234501 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>‘अशोक के फूल' मधील ‘भारतवर्ष की सांस्कृतिक समस्या' व 'भारतीय संस्कृति की देन'; ‘कल्पलता' संग्रहातील संस्कृतियों का संगम' सारखा निबंध; ‘विचार और वितर्क' संग्रहातील ‘हमारी संस्कृति और साहित्य का संबंध' आणि 'हिंदू संस्कृति के अध्यापन के उपादान'; ‘कुटज' मधला ‘भारतीय संस्कृति के मूलस्त्रोत-वेद'सारखे निबंध वाचताना आचार्यांचं भारतीय संस्कृतीविषयक आकलन स्पष्ट होते. आचार्यांना ‘संस्कृती पुरुष' का म्हटले जाते या निबंधावरून स्पष्ट होते. '''भारताची सांस्कृतिक समस्या''' {{gap}}‘भारतवर्ष की सांस्कृतिक समस्या' हा त्यांचा संस्कृती विषयावर लिहिलेला पहिला लेख. आचार्य हजारीप्रसादांनी या निबंधात एक प्रश्न उपस्थित केला आहे की इतक्या वर्षांच्या उलथापालथीनंतरही भारताची एक संस्कृती निर्माण का नाही होऊ शकली? आपण पाहतो की भारतात जितके प्रांत आहेत, त्यांचे स्वतःचे सण, पोषाख, अन्न पदार्थ, परंपरा, देव-दैवते, भाषा, साहित्य आहे. पण भारताचे सण, पोषाख, अन्नपदार्थ, परंपरा, साहित्य, भाषा याचे व्यवच्छेदक रूप वा वैशिष्ट्ये आपणास नाही सांगता येणार. याचे कारण आपल्या इतिहासात दडलेले दिसते. भारत देश आकाराला आला आर्यापासून. पण असे सांगितले जाते की इथे तत्पूर्वीही वस्ती होती. आर्यपूर्व भारतात मंगोल, ऑस्ट्रिक व द्रविडांची वस्ती असल्याचे सांगितले जाते. या देशात सात प्रकारच्या वंशाचे लोक आल्याचा उल्लेख आचार्यांनी आपल्या ‘हिंदू संस्कृति के अध्ययन के उपादान' शीर्षक निबंधात रिजली नामक इतिहासकाराच्या 'पीपल्स ऑफ इंडिया' ग्रंथाचा हवाला देऊन केला आहे. भारताची एक संस्कृती नसण्याच प्रमुख मूळ येथील जात, वंश वैविध्यात आहे. या जाती इथे आल्या तेव्हा त्यांच्यात संघर्ष होणे स्वाभाविक होते. असे असले, तरी कालौघात त्यांच्यात सामंजस्य निर्माण झाले. याचे उल्लेखनीय उदाहरण म्हणून आर्य व द्रविडांचे सांगता येईल. माणूस हा मूलतः तर्काधिष्ठित जीवन जगणारा प्राणी आहे. तो फार काळ संघर्ष, विरोधात नाही राहू शकत. संघर्ष त्याची वृत्ती, तशीच समझोतापण, असे नाही की मुसलमान आल्यानंतरच भारतात अशांतता सुरू झाली. त्यांच्या आगमनापूर्वीही इथे स्थानिकात मतभेद होते व मतमतांतरेही होती. विशेष म्हणजे जात वैविध्य असूनही सर्व स्वतःला 'हिंदू' मानत. वैविध्य असूनही एकत्वाचे हे खरे कारण होय. दुसरे<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१०३}}</noinclude> nuyd1wlijz62j352hlr9yotjfl3lewf पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/105 104 26134 234502 142387 2026-08-03T05:55:29Z कल्पनाशक्ती 3813 234502 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>असे की या विविध जात, वंशीय समाजात आपसात रोटी व्यवहारांबरोबर बेटी व्यवहारही झाले. परिणामी इथे संकरित समाज निर्माण झाला. आचार्यांनी यासाठी निबंधात ‘सांकर्य' शब्दाचा वापर केला आहे. ‘छुआछूत, अंतर्विवाह, हुक्कापानी आदि बातें इन जातियों के परस्पर सांकर्य में बाधा भी देती है और इनकी सामाजिक मर्यादा भी बताती है। पुराना साहित्य और इतिहास साक्षी है कि मुसलमानों के आने के पहले यह मर्यादा उतनी दुर्लघ्य नहीं बनी थी, जितनी बाद में हो गई।" (अशोक के फूल पृ. ६१)<br> {{gap}}भारतात त्या वेळी गवळी, चांभार, लोहार, सुतार, भंगी, कैकाडी (निवार) अशा व्यवसायवाचक जाती व समाज होते. ते सर्व आपलं जीवन कर्मफळाच्या सिद्धांतास प्रमाण मानून जगत. त्यामुळे इथे कधी संघर्ष वा विद्रोह झाला नाही. मध्य युगातील जागृतीनंतरही इथे सर्व वर्षीय एकत्र राहात होते. इथे केवळ जातभिन्नता वा वैविध्य होते असे नाही. तर इथे धर्म वैविध्यही होते. बौद्ध, वैश्य, जैन, मुसलमान, शीख, पारशी धर्माचे लोक आपला धर्म पाळत असत. तरी त्यांच्यात परस्पर ऐक्य होते. आचार्य द्विवेदी म्हणतात की याची तीन कारणे होती - एक- इथल्या विविध धर्म, पंथ, जातीच्या संतांनी जी शिकवण दिली ती एकात्मतेचीच होती. दाराशिकोहचे नाव या संदर्भात लक्षात घेण्यासारखे आहे. कुराण, गीता, बायबल, वेदांमधील भक्तीसाम्य दाखवणाच्या ऋचा, श्लोक, आयते, कलमांची आपणाकडे रेलचेल आहे. दुसरे असे की, येथील लौकिक जीवनातील नृत्य, गाणी, खेळ, तमाशे, कपडे, दागिने, यांच्यात देवाण-घेवाण होत आली आहे. तिसरे क्षेत्र म्हणजे, ज्योतिष, गणित, चिकित्सा इत्यादी. वैज्ञानिक क्षेत्रातही एकमेकांचा एकमेकांवर असलेला प्रभाव व साम्य. या साऱ्यांवर वैविध्य असून इथली एकता उभी आहे. त्याची मीमांसा करताना आचार्य द्विवेदींनी स्पष्ट केले आहे की, ‘साधारण जनता उच्च तर आध्यात्मिक अनुभूतियों की अपेक्षा धर्म की रूढियों को अधिक मानती है।" (अशोक के फूल - पृ. ६६). आचार्य हजारीप्रसाद द्विवेदींनी फसली सन, ईसवी सन, बगाब्द यांचे उदाहरण देऊन असे नमूद केले आहे की इतिहासात मुसलमान शासकांनी सौर वर्ष आणि हिजरी वर्ष यांच्यात समन्वय करून नवीन शक चालविल्याचे दिसते. त्यावरून ते असे सुचवू इच्छितात की, “शायद इतिहास में हमें यह सीखना अभी बाकी है की सांप्रदायिक मिलन की भूमि वैज्ञानिक मनोवृत्ति है। इसी को उत्तेजित करना वांछनीय (अपेक्षित) है।" (अशोक के फूल पृ. ६७) आपण आजही या दृष्टीने एकतेकडे पाहात नाही याची खंत वाटते.{{nop}}<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१०४}}</noinclude> p1p32uk0hqqn5yz4zsrfqrk5fcpyc7e पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/106 104 26135 234504 142388 2026-08-03T05:57:45Z कल्पनाशक्ती 3813 234504 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>{{gap}}आचार्य द्विवेदींनी प्रस्तुत निबंधात पुढे स्पष्ट केले आहे की, एवढ्यात क्षेत्रात नाही तर कला, तत्त्वज्ञान, धर्म, साहित्य या प्रांतांमध्येही सामंजस्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. आपण एकतेसाठी कार्यक्रमांचे जितके वैविध्य आणू, आपण तितके एकमेकांच्या जवळ येऊ. खरं पाहिलं तर एकता आपले लक्ष्य नव्हे. त्यापेक्षा व्यापक उद्देश घेऊन भविष्यकाळात आपण सक्रिय राहायला हवे. या निबंधातील पुढील विचार त्यांना व्यापक तत्त्वचिंतक बनवतो. ते मानवतावादी विचारवंत होते ही गोष्टही त्या विचारांनी अधोरेखित होते. ते म्हणतात, “वस्तुतः हिंदू-मुस्लीम एकता भी साधन है, साध्य नहीं। साध्य है मनुष्य को पशु-सामान्य स्वार्थी धरातल से ऊपर उठकर 'मनुष्यता' के आसन पर बैठना।"(अशोक के फूल - पृ. ६७). दादरी घटना आठवली की या विचारातील गांभीर्य अधिक ठळक होते. सदर निबंधाचा शेवट करताना त्यांनी म्हटले आहे की, “हिंदू-मुस्लीम मिलन का उद्देश्य है, मनुष्य को दासता, जड़िमा, मोह, कुसंस्कार और परमुखापेक्षिता (परावलंबन) से बचाना, मनुष्य को क्षुद्र स्वार्थ और अहमिका की दुनिया से ऊपर उठाकर सत्य, न्याय और औदार्य की दुनिया में ले जाना, मनुष्य द्वारा मनुष्य के शोषण को हटाकर परस्पर सहयोगिता के पवित्र बंधन में बाँधना। मनुष्य का सामूहिक कल्याण ही हमारा लक्ष्य हो सकता है। वही मनुष्य का सर्वोत्तम प्राप्य है।' (अशोक के फूल - पृ. ६८) ते आजही तंतोतंत खरे नि आवश्यक आहे. भारतीय सांस्कृतिक समस्येचे समूळ उच्चाटन करायचे तर या व्यापकतेस पर्याय नाही. '''भारतीय संस्कृतीचे योगदान''' {{gap}}‘अशोक के फूल' निबंध संग्रहात संस्कृतीविषयक आणखी एक निबंध आढळतो. त्याचे शीर्षक आहे, ‘भारतीय संस्कृति की देन'. आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी यांनी सदर निबंधातून भारतीय संस्कृतीने जगाला काय दिले, याचा आढावा घेतला आहे. त्यांच्या आकलनानुसार भारताने जगाला आणि त्यातल्या त्यात आशिया आणि युरोपला तीन गोष्टींची देणगी दिली - १) अहिंसा आणि मैत्रीचा संदेश २) व्यापक आध्यात्मिक अनुभूती ३) धर्म, विज्ञान, मूर्तिकला, मंदिर-शिल्प, तत्त्वज्ञान, काव्य, नाटक, चिकित्साशास्त्र, ज्योतिष इ. क्षेत्रातील अनेक मौलिक गोष्टी. प्रस्तुत निबंधातून आचार्यांनी संस्कृतीचे स्वरूप विशद करत तिच्या अंगोपांगांची चर्चा केली आहे. त्यामुळे या<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१०५}}</noinclude> 2urtiy8hop2ipw4l0avn4hu8jt1yp17 पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/107 104 26136 234505 142389 2026-08-03T06:03:51Z कल्पनाशक्ती 3813 234505 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>निबंधाची शैली वर्णनात्मक न राहता ती व्याख्या नि विश्लेषणाच्या जवळ जाणारी चिकित्सक व मीमांसा शैली बनवली आहे.<br> {{gap}}या निबंधाचा प्रारंभच मुळी आचार्यांनी संस्कृतीच्या व्याख्येने केला आहे. त्यामुळे त्यांना अभिप्रेत संस्कृतीचं रूप, स्वरूप कळण्यास मदत होते. ते म्हणतात, “नाना प्रकार की धार्मिक साधनाओं, कलात्मक प्रयत्नों और सेवा, भक्ति तथा योगमूलक अनुभूतियों के भीतर से मनुष्य उस महान सत्य के व्यापक और परिपूर्ण रूप को क्रमशः प्राप्त करता जा रहा है, जिसे हम ‘संस्कृति' शब्द द्वारा व्यक्त करते है।" (अशोक के फूल - पृ. ६८) धर्म साधना, कला, भक्ती आणि जीवनानुभवातून येणारी व्यापकता वा परिपूर्णता देणारे माध्यम म्हणजे संस्कृती. ही एक व्यक्ती व समाजाची संयुक्त प्रक्रिया आहे. तिचे नेमके रूप सांगणे कठीण. असे प्राचीन साहित्यात ईश्वर रूप चर्चा है। 'नेति नेति' चर्चेतून ईश्वराचे अनिर्वचनीय रूप प्रकटते तसे संस्कृतीचेही आहे. तिची प्रक्रिया व्यामिश्र खरी! संस्कृती मानव समाजास लाभलेले वरदान आहे. यातून एक दिवस मनुष्य युद्धसंघर्ष, कूटनीतिक डावपेच, शोषण, अत्याचार इत्यादीतून मुक्त होईल. आचार्यांचा हा आशावाद म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा विधायक दृष्टिकोणच होय. आचार्यांच्या म्हणण्यानुसार संस्कृती ही एका देश विशेषाची ओळख असतच नाही मुळी. संस्कृती असते एक वैश्विक चेहरा. ती असते माणसाची सर्वश्रेष्ठ तपस्या. संस्कृती आगळी वेगळी असते खरी, संत कबीरदास सांगून गेलेत, 'ऐसा लो नहिं तैसा लो, मैं केहि विधि अनुठा लो।' रवींद्रनाथांनी तर संस्कृतीला संगीत स्वरांची छेडलेली मंथर, मृदू तार, स्वर म्हटले होते. या सर्वांची आठवण करून देत आचार्य आपणास संस्कृतीचे स्वरूप समजावतात. {{gap}}जग हे भारताप्रमाणेच वैविध्याने भरलेले आहे नि भारलेलेपण! अशा भिन्न देश नि जातींनी एकमेकांच्या जवळ येण्यानेच आपण व्यापक विश्व सत्याचा शोध घेऊ शकू. आचार्यांवरील रवींद्रनाथ टागोरांचा प्रभाव इथे स्पष्ट होतो. हा निबंध शांतीनिकेतनच्या त्या शांत, निसर्ग समृद्ध वातावरणात स्वातंत्र्याची पहाट होताना लिहिला गेलाय याची मला तुम्हाला आठवण करून घ्यावीशी वाटते. संत रज्जबदासनी कधी काळी म्हटले होते, ‘सब साँच मिले तो साँच है, न मिले सो झूठ।' संस्कृती म्हणजे अंतिम सत्याचा, मानवाच्या अंतिम कल्याण, विकासाचाच शोध ना? निसर्गाप्रमाणे संस्कृतीही नित्य, निरंतर विकासमान असते. पृथ्वीवरील जीवन त्याचाच एक भाग होय.{{nop}}<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१०६}}</noinclude> 4qmlp4634pvn6kkwanqizv7zlbjv1np पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/108 104 26137 234506 142390 2026-08-03T06:05:43Z कल्पनाशक्ती 3813 234506 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>{{gap}}माणूस जगत असताना त्याला दोन प्रकारची कर्तव्ये पार पाडावी लागत असतात. एक म्हणजे स्थूल भौतिकाची जी त्यांच्या अंतर्यामी न संपणारी तहान असते त्यातून मुक्त होणे. म्हणजे चंगळवादी वृत्तीचा त्याग करणे. दुसरे म्हणजे सूक्ष्मतम अशा ऊर्ध्वगामी वृत्तीचा अंगीकार करणे. कबीरदासांनी या अवस्थेचे वर्णन करताना म्हटले होते की साधकास अनहत् नाद ऐकू यायला हवा. म्हणजे समजायचे की घर, संसाराच्या जंजाळातून मुक्त झाला. ही असते माणसाची विजय यात्रा! एकदा का माणसाची घडण प्रगल्भ झाली की मग तो सांघिक, सामाजिक जीवनाचा विचार करू लागतो. म्हणजेच तो सभ्य होऊ लागतो. {{gap}}मानवी सभ्यतेचा विकास काही एका रात्रीत झालेला नाही. ते माणसाच्या प्रयत्न सातत्याचे फळ होय. ही प्रक्रिया स्पष्ट करत आचार्यांनी सांगितले आहे की, “ज्यों-ज्यों मनुष्य संघबद्ध होकर रहने का अभ्यस्त होता गया, त्यों-त्यों उसे सामाजिक संघटन के लिए नाना प्रकार के नियम कानून बनाने पडे। इस संघटन को दोषहीन और गतिशील बनाने के लिए उसने दंडपुरस्कार की व्याख्या भी की, इन बातों को एक शब्द में ‘सभ्यता' कहते है। आर्थिक व्यवस्था, राजनैतिक संघटन, नैतिक परंपरा और सौंदर्यबोध तीव्रतर करने की योजना; ये सभ्यता के चार स्तंभ है। इन सबके सम्मिलित प्रभाव से 'संस्कृति' बनती है। सभ्यता मनुष्य के बाह्य प्रयोजनों को सहजलभ्य (सहजसाध्य) करने का विधान (पद्धति) है और संस्कृति प्रयोजनातीत (उपयोगितेपलीकडील) आंतर आनंद की अभिव्यक्ति। (अशोक के फूल - पृ. ७३). हे चिंतन म्हणजे आचार्यांच्या गंभीर चिंतनाचा आरसाच. {{gap}}माणसाची जी म्हणून कमेंद्रिये नि ज्ञानेंद्रिये होत, त्यांचा संबंध माणसाच्या बाह्य आचरणाशी असतो. हा व्यवहार स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा हवा. म्हणजेच सभ्यतेकडून संस्कृतीकडे जाणे होय. अन्न, प्राण, मन, विज्ञान आणि आनंदातून हा प्रवास होतो. बाह्यतेकडून अंतरंगाकडे जाण्याची शिकवण भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया होय. हे सारे असते विवेक नि वैराग्याचे द्वंद्व. विवेक एकपरी सहजशक्य असतो. पण वैराग्याला मोठे बळ लागते. वैराग्य म्हणजे सत्य व असत्यापैकी जे योग्य असेल त्याचा त्याग. माणूस इथेच हरतो नि हात टेकून सामान्य राहतो. माणूस जेव्हा देवऋण, ऋषीऋण, पितृऋणातून मुक्त होतो, तेव्हाच त्याला मोक्ष प्राप्ती होते, सांगणाऱ्या तत्त्वज्ञानावर भारतीय संस्कृती उभी आहे. हा कृतज्ञताभाव हे भारतीय संस्कृतीचं सार होय व तीच या संस्कृतीने जगाला दिलेली देणगी होय.{{nop}}<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१०७}}</noinclude> fcrao817q1tlbp8xnucunyb02vxbvqf पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/109 104 26138 234507 142391 2026-08-03T10:18:24Z कल्पनाशक्ती 3813 234507 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>{{gap}}या निबंधातून आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी यांनी भारतीय संस्कृतीच्या मूलभूत तत्त्वज्ञानाचा परिचय करून देत माणूस घडणीचे जे सूत्र विशद केले आहे, ते त्यांच्या भारतीय प्राचीन परंपरेच्या अभ्यास व चिंतनाचा परिपाक म्हणून पाहावा लागेल. आजही सारे जग इतक्या भौतिक संपन्नतेनंतर अशांत, अस्वस्थ का, याचा आपण शोध घेऊ लागतो, तेव्हा लक्षात येते की भौतिकाचा सारा संबंध बाह्य व्यवहाराशी असतो. माणसाचा खरा विकास म्हणजे सभ्यतेचा अंगीकार आणि त्यातून स्वतःचा शोध होय. भारतीय संस्कृतीतील अध्यात्म देवत्वाची चर्चा करत असले, तरी ती सारी प्रतीके होत. मूळ लक्ष्य सदाचार, सद्व्यवहार, मानवता, समता हेच त्या संस्कृतीचे मूळ संचित होय. मधल्या काळात भारतीय संस्कृतीत निर्माण वर्णाश्रम, कर्मकांड हे काही मूळ नव्हे. कालौघात झालेले ते बदल होत. त्यांच्या परिष्काराचा विवेक व वैराग्य व्यवहार म्हणजे माणसाचं सुसंस्कृत आचरण हे सूत्रबद्ध सांगणारा हा निबंध आचार्यांच्या साहित्यिक शब्द सामथ्र्याचा दृष्टान्त तसाच विचार वैभवाची साक्ष! '''संस्कृतींचा संगम''' {{gap}}‘कल्पलता' निबंध संग्रहातील ‘संस्कृतियों का संगम' निबंधातून आचार्य द्विवेदींनी भारतीय संस्कृतीच्या मुळाशी विविधतेचे जे सौंदर्य भरलेले आहे, त्याच्या रहस्याचा उलगडा केला आहे. आचार्यांचा इतिहासाचा व्यासंग यातून सिद्ध होतो. भारताचा मध्य व दक्षिण भाग (म्हणजे मध्य प्रदेशासह दक्षिण भारत) हा सर्वाधिक प्राचीन भूभाग. तो नंतर तयार झाला. त्यामुळे भारतातील पहिली वस्ती (संस्कृती) आपणास विंध्य पर्वताच्या दक्षिणेस आढळते. हा भूप्रदेश पूर्वी ऑस्ट्रेलिया, निकोबार, मलाक्का यांना जोडलेला होता. यातून आचार्यांनी केलेला भारताचा भौगोलिक अभ्यासही स्पष्ट होतो. इथे पूर्वी मुंडा आणि कोल जातीच्या माणसांची वस्ती होती. या संस्कृतीतील वृक्ष, कृषी अवजारे यांची नावे आपणास आर्य भाषांमध्ये आढळतात. भारतीय संस्कृतीत लिंग पूजेची परंपरा (शिवलिंग, लज्जागौरी इ.) या प्रारंभिक संस्कृतीतून आर्य संस्कृतीत आल्या. भारतीय संस्कृती स्थलांतरणास सुरुवात झाली ती अगस्त्य ऋषींच्या विंध्यपार पर्यटनाने. भारतीय संस्कृतीचा क्रमागत अभ्यास करायचा तर आपणास एकूणच मानवी संस्कृती विकासाचा म्हणजे अश्मयुग, लोह युग, ताम्रयुग इ. चा अभ्यास<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१०८}}</noinclude> 9vhtygpee5kd414zbaqzccjivboaupr पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/110 104 26139 234508 142392 2026-08-03T10:19:52Z कल्पनाशक्ती 3813 234508 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>करणे क्रमप्राप्त आहे. त्याशिवाय भारतीय संस्कृतीचा उगम आणि विकास आपणास समजणार नाही. {{gap}}भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने उजेडात आली ती मोहन-जो-दडो नि हडप्पा संस्कृतीच्या उत्खननातून. गंमत म्हणजे रामायण, महाभारताविषयी जे संशोधन झाले आहे त्यातून रावणाविषयी जी माहिती मिळते ती सर्वथा नवी तर आहेच, शिवाय ती रावणाच्या पारंपरिक प्रतिमेस छेद देणारी आहे. म्हणजे असे की "रावण हा मोठा शैव साधक होता. तो वेद व्याख्याता होता. शिल्प शाखेचा (कलेचा) त्याने विकास केला. तो आयुर्वेद आचार्य होता. इतकेच नव्हे तर आयुर्वेदावर त्यानी एक ग्रंथ लिहिल्याचे पण सांगितले जाते." आचार्य म्हणतात की इतिहास व संस्कृतीच्या संशोधन, अध्ययनात तुमच्या हाती अनेक गोष्टी कालपरत्वे येत असतात. परंतु त्यांचा स्वीकार, अस्वीकार हा समर्थित काय नि त्याज्य काय या सारासार विवेकावरच ठरत असतो. सर्वच समर्थनीय वा सर्वच त्याज्य असे असत नाही. खरा संशोधक कल्पनेतून काहीच आणत नसतो. मला हे सारे वाचत असताना इतिहास आणि संभाव्य सत्याविषयी मागे कुठेतरी ऐकल्या, वाचल्याचे आठवते. विशेषतः ऐतिहासिक चरित्रांचा अभ्यास वा त्यांच्या आधारे साहित्य कृतींची निर्मिती करत असताना संभाव्य सत्याचा परीघ नेहमीच कसोटी ठरत असतो. ते इथेही आचार्यांनी वेगळ्या अंगाने मांडलेले दिसून येते. {{gap}}द्रविड कोण होते? हे स्पष्ट करताना हजारीप्रसादांनी सांगितले आहे की द्रविड शब्द जातिवाचक नसून भाषा समूह वाचक आहे. द्रविड आणि कोल, मुंडा जमातीत विलक्षण साम्य आढळते. विशेष करून या सर्वांमध्ये वृक्षपूजा, नरबळी, जीवबळी (पशु), प्रेतपूजा इ. ‘वितर्क'मधील ‘हमारी संस्कृति और साहित्य का संबंध' हा प्रगल्भ निबंध. प्रारंभीच आचार्यांनी सांगून टाकलेले आहे की ‘सभ्यता' आणि संस्कृति' शब्द हिंदीस नवे आहेत. म्हणजे प्राचीन हिंदी साहित्यात ते आढळत नाहीत. त्याचे कारणही तर्कसंगत आहे. ते असे की या संकल्पना तशा प्रबोधन काळानंतरच्या म्हणजे ग्रीक, रोमन संस्कृतीनंतरच्या. रोमन बादशहा कॉन्स्टंटाईनने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतल्यापासून (इ.स. ३१२) ते सोळावे शतक असा काळ प्रबोधनकाळ (Renaissance) म्हणून ओळखला जातो. या काळात 'Civilization' आणि 'Culture' हे दोन शब्द संकल्पना म्हणून मान्य पावले. हिंदीत ते अनुक्रमे ‘सभ्यता’ आणि ‘संस्कृति' या रूपाने रूढ झाले. आचार्यांनी या निबंधाच्या पहिल्या भागात दोन्हीमधील फरक स्पष्ट केला आहे. त्यातून त्यांची वैचारिक पारदर्शिता लक्षात येते.{{nop}}<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१०९}}</noinclude> h9dq5chrlc882tt4kfqsqlp9l6kf1n1 पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/111 104 26140 234509 142393 2026-08-03T10:20:21Z कल्पनाशक्ती 3813 234509 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>{{gap}}आचार्यांच्या मतानुसार, सभ्यता चार खांबांवर उभी असते. - १) आर्थिक व्यवस्था २) राजकीय संगठन ३) नैतिक परंपरा ४) ज्ञान आणि कलेचे नियंत्रण. ज्या समाजात पूर्वापार चालत आलेली अव्यवस्था, अनागोंदी, साशंकता, असुरक्षितता यांचा अंत होतो, तिथे सभ्यता नांदू लागली असे आपण म्हणू शकू. समाजातील सामान्य माणसाच्या मनातील भय दूर होऊन कुतूहल, जिज्ञासेस वाव मिळणे हे सभ्य समाज लक्षण होय. सभ्य समाज व्यवस्थेत माणूस पशुसुलभ वर्तनातून मुक्त होऊन सामंजस्य आणि सहानुभूतीचे जीवन कंठू लागतो. एका अर्थाने आपण पाहू लागू तर सभ्यता ही बाह्यरचना आहे. ती माणसाच्या सुख, सुविधांची म्हणजेच खुशालीची काळजी घेते. संस्कृतीच्या तुलनेने सभ्यता निकट भविष्याचा किंवा अल्पकाळाचा विचार होय. ती एक व्यवस्था असते. कायदे, कानून, नियम, बंधन तिचा आधार असतो. सभ्यता बाह्य असल्याने चंचल म्हणजे परिवर्तनशील असते. सभ्यतेच्या कल्पनेत कालपरत्वे बदल होत असले, तरी मूळ मूल्ये कायम असतात. संस्कृती माणसाच्या ज्या आंतरिक विकासाची चिंता वाहते तिचा पायाभूत आधार असतो सभ्यता. {{gap}}उलटपक्षी संस्कृती एक अंतर्यामी प्रक्रियेतून आकारते. तिचा आधार इतिहास आणि भविष्य असते. म्हणजे ती इतिहासाच्या पायावर भविष्याची काळजी वाहात असते. संस्कृतीचे चिंतन हे दूरगामी परिणाम करणारे असते. ती सतत सिंहावलोकन करत भविष्यलक्ष्यी प्रवास करत असते. संस्कृती माणसास कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानत असते, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. (खरे तर ती माणसास कायद्याच्या कचाट्यातून सदैव मुक्त मानत असते.) संस्कृती आंतरिक असते, त्याचे मूळ कारण तिचे स्थायित्व होय. {{gap}}असे असले, तरी सभ्यता आणि संस्कृतीचा संबंध घनिष्ठ असतो, हे आपण विसरता नये. हे दोन्ही घटक विरोधी नसून परस्परपूरक असतात. जगात वेगवेगळ्या संस्कृती कार्यरत असतात. त्यातील अमूक एक श्रेष्ठ वा दुसरी कनिष्ठ असे असत नाही. खरे वैश्विक संस्कृतींचा विकास हाच आपला ध्यास असायला हवा. सर्व ज्ञान-विज्ञान शाखांचे प्रयत्न खरे तर याच दिशेने होत असतात. या सर्व चर्चेच्या पाश्र्वभूमीवर भारतीय संस्कृती कशी आहे, हे पाहणे रोचक (Interesting) ठरावे. पाश्चात्त्य निबंधकार फ्रान्सिस बेकन (इ.स.१५६१ ते १६२६) ने संस्कृतीसाठी ‘मानसिक शेती (Mental Harvesting) शब्दाचा वापर केला आहे. (त्याच्या ‘द एसेज' चे तीन खंड आहेत - १) काउन्सेल्स २) सिव्हिल ३) मॉरल.) यातील शंभराहून अधिक निबंधांमधून बेकननी प्रबोधन कालोत्तर समाज विकासात<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/११०}}</noinclude> bwdvdvs1a3yjpkp0zss7n0hg2e50xg1 पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/112 104 26141 234510 142394 2026-08-03T10:21:04Z कल्पनाशक्ती 3813 234510 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>मोठे साहाय्य केल्याचे दिसून येते.) या पार्श्वभूमीवर इंग्रज भारतात आले तेव्हा येथील समाज व्यवस्था कशी होती? तर त्याचे वर्णन ‘अर्ध-सभ्य असे करता येईल. म्हणजे देशात न्यायालय व सैन्य होते, पण जनता असुरक्षित होती. इथे विद्वान व धर्ममार्तंडांची कमतरता नव्हती. पण जनता मात्र अज्ञानी होती. समाजातील निम्न वर्गाचे लोक, तळागाळातील समाज अंधश्रद्ध होता. आर्थिक विषमता स्पष्ट होती. उद्योगधंद्यांचा अभाव होता. कला होती, पण तीवर समाजातील अभिजात वर्गाचे म्हणजे राजे, उमरावांचे वर्चस्व व नियंत्रण होते. तत्कालीन इंग्रज इतिहासकारांनी अर्धसभ्य भारताचं वर्णन अत्यंत सहानुभूतीपूर्वक करत एक मार्मिक शब्द वापरला होता Mistic भारत ‘रहस्यमय' देश आहे. इथल्या सर्वांगीण रहस्याचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये मॅक्स मुलर केलेला भाषिक अभ्यास महत्त्वाचा. त्यांनी आशियाई व युरोपियन भाषांतील दुवे शोधले व संस्कृत साहित्याचा अभ्यास केला. मानववंश शास्त्रज्ञांनी अभ्यास करून हे सिद्ध केले की येथील सर्व आर्य नव्हते. येथील संस्कृतीवरील विविध प्रभाव या अभ्यासातून पुढे आले. {{gap}}जी गोष्ट भारतीय संस्कृतीची तीच भारतीय कला व साहित्याचीही. आचार्य द्विवेदी यांनी प्रस्तुत निबंधातून सभ्यता, संस्कृती परिभाषित करून त्या कसोटीवर भारतीय संस्कृतीची चिकित्सा केली व पुढे संस्कृती व साहित्याचा अन्योन्याश्रित संबंध या निबंधाद्वारे रेखांकित केल्याचे दिसते. भारतीय धर्म, संस्कृतीवर असा बाह्य प्रभाव (स्थलांतरित जमाती व विदेशी आक्रमक दोघांचाही) दिसून येतो, तसाच तो तेथील साहित्य, कलांवरही झालेला आढळतो. अजंठ्याची लेणी, चित्रे याचे उदाहरण म्हणून पाहता येण्यासारखे आहे. कालिदास काव्य, नाट्यावरील आर्येतर प्रभाव स्पष्ट आहे. पण महाभारत शुद्ध भारतीय म्हणून सांगता येईल. भारतीय नाट्यशास्त्र ही काही आर्यकला नव्हे. भारतीय नाटक मूकनाटक होते. नाटकात भाषेचा वापर आर्यांच्या आगमनानंतरचा आहे. आर्य, द्रविड, यक्ष, नाग इ. जमाती, टोळ्यांनी इथली संस्कृती आकारली, बदलली तशी येथील साहित्य, कलांमध्येही बदल घडून आले. ग्रीक, बॅबिलोनियन, असेरियनांचा प्रभाव येथील ज्योतिषशास्त्रावर दिसून येतो. सुफींचा प्रभाव इथल्या भक्ती व देव स्वरूपावर आहे, साहित्यावर आहे, हे कोण नाकारेल? मुस्लिमांचा प्रभाव येथील वास्तुकलेवर केवढा मोठा आहे. क्षणभर विरोधी वाटल्या तरी वास्तव म्हणून हे सारे आपणास स्वीकारावंच लागेल. इतिहास व संस्कृती या अशा गोष्टी असतात की त्या आपणास नाकारता नाही येत. त्यांचा<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१११}}</noinclude> fy7ectm6w1fjnydteewqh4bdf5qivil पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/113 104 26142 234511 142396 2026-08-03T10:22:11Z कल्पनाशक्ती 3813 234511 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>प्रभाव साहित्य, कलांवर अटळ असतो. भारतातील साहित्य और संस्कृतीच्या अभिन्न संबंधाची मुळं इथल्या पारंपरिक मानसिकतेत आहे. समन्वय भारतीय साहित्य व संस्कृतीची वृत्तीही आहे. {{gap}}ही झाली प्राचीन काळची गोष्ट. आधुनिक काळ आणि त्याचे साहित्य म्हणजे पाश्चात्त्य प्रभावाची प्रतिक्रियाच. विशेषतः यंत्रयुगाने व सुधारणावादी विचारांनी गेल्या शतकात भारतीय समाज मन बदलून टाकले. राष्ट्रीयता विचार प्राचीन साहित्यात आढळणार नाही. ती आधुनिकतेची देणगी व फ्रेंच राज्यक्रांतीची प्रतिक्रिया म्हणून पहाता येईल. या राष्ट्रीयतेतून इथली समाजरचना बदलली. 'इस राष्ट्रीयता ने जनता की सुरक्षा का प्रबंध करना शुरु किया। सुरक्षितता का अर्थ है सभ्यता की समृद्धि। यह सुरक्षा नाना रूपों में लोगों को मिलने लगी - चिकित्साशास्त्र के द्वारा, पुलिस और कोर्ट के द्वारा, म्युनिसिपल व्यवस्थाओं के द्वारा, ज्ञान-प्रसार के वाहक प्रेसों के द्वारा और इसी प्रकार अन्य विभागों द्वारा।"(विचार और वितर्क - पृ. १६१) भारतीय संस्कृती व साहित्याचा बदलांच्या संदर्भात विचार करताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की युरोपीय समाजात ते बदल दीर्घकाळाच्या पल्ल्यात स्वीकारावे लागतात, तेच आपणास केवळ दशका-दोन दशकांच्या कालावधीत आत्मसात करावे लागतात. त्याचे प्रमुख कारण सुधारणांमधील अंतर व गती होय. {{gap}}भारतीय संस्कृती व साहित्याचा पूर्वीइतका संबंध वर्तमानात राहिला नाही. वर्तमान साहित्यावर पश्चिमेचा प्रभाव काही अंशी अनुकरणावर येऊन ठेपल्याचं दिसतं. याची समीक्षा करताना आचार्य द्विवेदींनी स्पष्ट केले आहे की पश्चिम शब्द दिशा वा देशवाचक नसून तो विचारवाचक आहे. पौर्वात्य देश रहस्यमय, आध्यात्मिक व धार्मिक. उलटपक्षी पाश्चिमात्य देश व्यवसायी, ‘मॅटर ऑफ फॅक्ट', म्हणजे भौतिक. पण आज एके काळी ‘पूर्व असलेले पूर्व जर्मनी, जपान, रशिया थोडेच पूर्व राहिले. आज पश्चिम शब्द ‘आधुनिकता' संकल्पनेचा पर्यायवाची शब्द बनून गेला आहे, हे आचार्यांनी ज्या तार्किकतेने व विस्ताराने विशद केले आहे, त्यातून व्यासंग दिसून येतो. {{gap}}आज जगात काय दिसते तर मनुष्य एकाच गोष्टीचा विचार करू लागला आहे. ती म्हणजे मानवी मनाची शाश्वत वृत्ती वा धारणा. त्यामुळे भारतीय संस्कृती, भारतीय साहित्य या गोष्टी तशा गैरलागूच म्हणायला हव्यात. (किंवा संकुचित!) व्यापक अर्थाने साहित्य, संस्कृतीकडे कसे पाहायला हवे, हे समजावत आचार्य द्विवेदींनी विधान केलेय की, “हमें पूर्व या पश्चिम, भारतीय या अभारतीय आदि कृत्रिम विभाजनों के अर्थहीन<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/११२}}</noinclude> nordk66ffa2redx5i4vnqeft8kyl5uo पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/114 104 26143 234512 142397 2026-08-03T10:23:32Z कल्पनाशक्ती 3813 234512 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>परिवेष्ठनों (आवरणों) से अपने को घेर नहीं रखना चाहिए। अगर जरूरत हों तथा कथित आध्यात्मिक आदि विशेषणों, विशिष्ट आचारों और मनोविकारों को अतिक्रमण करके भी विश्व जनीन सत्य को जानने की कोशिश करनी चाहिए।" (विचार और वितर्क - पृ. १६५). {{gap}}आचार्य द्विवेदींचे संस्कृती संबंधाचे आकलन संकीर्णतेकडून उदारमतवादाकडे होणे यातच त्यांचे आधुनिकीकरण सामावलेले आहे. ते निरंतर नावीन्याचा स्वीकार करत स्वतःला आधुनिक बनवत गेलेले दिसतात. यामागे त्यांचं विश्वभान आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. '''हिंदू संस्कृतीच्या अभ्यासाचे घटक''' {{gap}}‘विचार और वितर्क' निबंध संग्रहात संस्कृती या विषयावर लिहिलेला आणखी एक निबंध आढळतो, त्याचे शीर्षक आहे, 'हिंदू संस्कृति के अध्ययन के उपादान'. हिंदू संस्कृतीचा अभ्यास म्हणजे कशाचा तर येथील जात वास्तव, वर्णाश्रम व्यवस्था, वेदाभ्यास, ब्राह्मण ग्रंथ, महाभारत, पुराणादी ग्रंथांचा अभ्यास होय. या पूर्वीच्या निबंधांतून झालेल्या चर्चेशिवाय नव्या कोणत्या गोष्टींची विवेचना आचार्यांनी या निबंधातून केली आहे, ते पाहणे महत्त्वाचे. एक गोष्ट अशी की भारत व या महादेशाची, खंडप्राय देशाची संस्कृती, इतिहास, साहित्य, भाषा, समाज, परंपरा अभ्यासणे म्हणजे हिंदू संस्कृती समजून घेणे होय. या सर्वांचा पट कवेत घेणे देशाचा भौगोलिक विस्तार व प्रदेश वास्तव लक्षात घेता अशक्य नसले, तरी अवघड खचितच. {{gap}}हिंदू समाज म्हणून येथील जनसमूहांचा अभ्यास करायचा म्हटले तरी मानववंश शास्त्रज्ञांनी भारतात सात वंशाचे वा प्रकारचे जनसमूह असल्याचे लिहून ठेवले आहे. ते जगातल्या विविध देश, प्रांतांतून इथे आले नि स्थिर झाले. इथल्या माती नि मताशी एकरूप झाले. विशेष म्हणजे ते सर्व काही अपवाद वगळता स्वतःस आज हिंदू म्हणवून घेत आहेत. १) तुर्क व इराणी २) हिंदू आर्य ३) द्रविड ४) आर्य-द्रविड ५) मंगोल-द्रविड ६) मंगोल ७) द्रविड. भारतीय प्राचीन साहित्यात इथे कोणकोणत्या जाती होत्या, त्याचे वर्णन आढळते. त्यानुसार इथे असुर, दैत्य, दानव, नाग, सुपर्ण, यक्ष, किन्नर, गंधर्व, वानर, भालू (अस्वल), शकुनी, उलूक, (प्राचीन भारतातील एक प्रांत ‘उलूक' असल्याचा उल्लेख आढळतो.) मत्स्य, खस (गढवाली) जनसमूह वा जमातींचे उल्लेख आढळतात. या साऱ्यांची समन्वित संस्कृती हिंदू संस्कृती म्हणून ओळखली जाते. त्यांच्या भाषा भिन्न असल्या, तरी त्या<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/११३}}</noinclude> 5tewqbhi8zdlsu6il59kwd2nqgcumhx पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/115 104 26144 234513 142398 2026-08-03T10:29:19Z कल्पनाशक्ती 3813 234513 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>इंडो-युरोपियन कुळातल्या म्हणून हिंदुस्तानी वा भारतीय भाषा म्हणून ओळखल्या जातात. प्राचीन साहित्यात या सर्वांचे सर्वंकष उल्लेख आढळतातच असे नाही. कारण बऱ्याच जाती, जमाती, जनसमूह हे संपर्क व संबंध क्षेत्रांपासून वा मनुष्य वस्तींपासून दूर राहात व संपर्क करणे केवळ अशक्यप्राय होते. असा विस्तृत व वैविध्यपूर्ण समाज हिंदू म्हणून सर्वसाधारणपणे ओळखला जायचा. हिंदू संस्कृतीच्या अभ्यासाचे हे अनिवार्य घटक होत. {{gap}}हे जनसमूह जाती व वर्णात विभागल्याचे दिसून येते. 'जात' व 'वर्ण' दोन्ही शब्द भिन्न होत. जात शब्द वंशसूचक तर 'वर्ण' व्यवसाय वा सामाजिक स्थान सूचक होय. एका वर्णात अनेक जातीचे लोक आढळतात. यावरून वर्ण व्यापक अर्थाचा व आशयाचा शब्द असल्याचे स्पष्ट होते. ब्राह्मण ग्रंथात वा उपनिषदांत चार वर्णांचे (चातुर्वर्ण) उल्लेख आहेत - ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र. परंतु जात म्हणाल तर चांडाळ, पोल्कस, निषाद, दास, शबर, भिषज, रथकार, वृषल, इ. या सर्वांच्या अभ्यासाशिवाय हिंदू संस्कृतीचा अभ्यास पूर्ण होणार नाही. {{gap}}हिंदू संस्कृतीच्या अभ्यासाचे साधन घटक म्हणून वेद अनिवार्य ठरतात. चातुवर्ण्याप्रमाणे वेदही चार आहेत- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आचार्यांनी प्रस्तुत निबंधात यांचे विस्तृत विवेचन केले असले, तरी लेखाच्या विस्तारभयाने मी ते अशासाठी टाळतो की ती माहिती सर्वविदित आहे. म्हणजे किती ऋचा आहेत, वेदाचा वर्ण्यविषय काय इ. विशेष म्हणजे आपणापर्यंत वेद आणण्याचं जतन कार्य कुणी केले असेल तर ते कृष्ण द्वैपायन यांनी. त्यांना दुवा द्यावा तेवढा थोडा. हे वेद अनेक शाखांत लिहिल्याचे आढळते. काही शाखांचे उल्लेख आढळतात, पण संहिता उपलब्ध होत नाहीत असे अभ्यासाअंती लक्षात येते. {{gap}}हिंदू संस्कृतीच्या पारंपरिक अभ्यासाला नवी दिशा देण्याचे कार्य सन १९०७ च्या उत्खननाने केले. त्यातून विशेषतः आर्य भाषा परंपरेवर नवा प्रकाश पडल्याचे दिसून येते. प्रो. ह्यूगो विंकलरनी आणि मॅक्स मुलर वा ग्रियर्सन महोदयांनी इथल्या भाषांचे जे संशोधन, अभ्यास, संग्रह, वर्गीकरण केले, त्यानुसार हिटाईट व मित्तांती वर्गातील शब्दसमूह व हिंदू (आर्य) शब्दसमूह यात साम्य आढळते. त्यावरून इथले जनसमूह त्या प्रांतातून इथे स्थलांतरित झाल्याचे स्पष्ट होते. असाच अभ्यास शिल्प, अन्नपदार्थ, दागिने, पोषाख यांच्या नावांच्या अंगांनी झाला असून त्यातूनही सांस्कृतिक अंतःसंबंधाचे पक्के दुवे हाती येतात. त्यांच्या आधारे हिंदू संस्कृतीचा अभ्यास होत असताना नित्य नवे संशोधन म्हणजे पूर्व अभ्यासावर कालौघात जमलेली<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/११४}}</noinclude> 5s0vbo54d30w937vrauv4oh7ubjrdr8 पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/116 104 26145 234514 142399 2026-08-03T10:31:28Z कल्पनाशक्ती 3813 234514 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>धूळ झटकणे होय. माणूस नित्य संशोधन, अभ्यास करत असल्याने कोणतेही ज्ञान वा सिद्धांत अंतिम असत नाहीत, हेच खरे.<br> {{center|'''भारतीय संस्कृतीचे मूलस्त्रोत : वेद'''}} {{gap}}‘कुटज' निबंध संग्रहातील ‘भारतीय संस्कृति के मूलस्रोत : वेद' हा निबंध यापूर्वी चर्चिलेल्या 'हिंदू संस्कृती के अध्ययन के उपादान' प्रमाणेच वर्णनात्मक वा माहितीपर होय. असं असलं तरी आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी माहितीचं जे विश्लेषण करतात, जे पुरावे देतात, ते मात्र विचारणीय असतं खरे. आता या निबंधाचेच पहा ना. रोजच्या व्यवहारात हे उभय शब्द स्थूलरूपाने आपणास एकच वाटल्याने आपण समानार्थी म्हणून वापरतो. त्यातील फरक स्पष्ट करत आचार्य सांगतात की 'मूढ' म्हणजे समजून उमजून चुकीच्या गोष्टी ग्रहण करणारा वा आचरणारा. तर 'मूर्ख' म्हणजे अजाणतेपणी चुकीची गोष्ट करणारा. राजा दिलीपचे उदाहरण देऊन द्विवेदींनी समजावले आहे की तो 'विचार मूढ राजा' होता. गायीसाठी जीव देतो हे माहीत असून त्याग करणारा. त्याला विवेकही माहीत नव्हता नि वैराग्यही. {{gap}}'वेद' माणसाला काही शिकवत असतील तर ‘सत्’ आणि ‘असत्' मधील फरक. योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य साहित्य देत असते. म्हणून त्याचं वाचन, मनन करायचे. ते द्वंद्व दाखवते नि निर्णय शिकवते. मन निर्मळ ठेवून शुद्ध निर्णयाचे बळ साहित्य देते. प्राचीन साहित्यातील बोधकथा, पात्रे, मिथके ही सर्व या दृष्टीने महत्त्वाची. वेद म्हणजे अशा गोष्टींचा संग्रह, खजिना. दृष्टांत संग्रह म्हणून त्यांचे महत्त्व असाधारण. माणूस छोट्या छोट्या प्रलोभनांना बळी पडतो, कारण त्याला व्यापक, उन्नत माहीत नसते म्हणून. वेदांमध्ये ते सामर्थ्य पुरेपूर भरलेलं आहे. जे अनुचित आहे, त्याची जाण आपणास साहित्य देते. वैराग्य व स्मशान वैराग्यातला फरकही ते सांगतं, समजावतं म्हणून वाचायचे. वेद म्हणजे आस्तिक तत्त्वज्ञानाचे ग्रंथ होत. 'वेद' शब्दातला अर्थच मुळी ज्ञान आहे, हे फार कमी लोक जाणत असावेत. वेदांमुळे भारतीय सांस्कृतिक परंपरेचे भान येते. प्रो. विंटरनित्सनी वेदांचे वर्णन 'Whole Great Literature' असे केले आहे, ते वेदांच्या व्यापक आशयाचे निदर्शक आहे. एका ठिकाणी वेदांचा उल्लेख 'Family Sagas' केल्याचेही मला आठवते. त्याचा उल्लेख या निबंधात आचार्यांनी 'Family Books' असा केला आहे. वेद अपौरुषेय आहेत, याचा अर्थ इतकाच की त्याचा रचयिता अज्ञात आहे. ऋषींनी पठणाने ते जपले इतकेच.{{nop}}<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/११५}}</noinclude> 48dxbpzadkuurl3hld066c7epmfu5yu पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/117 104 26146 234515 142788 2026-08-03T10:33:07Z कल्पनाशक्ती 3813 234515 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>{{gap}}प्रस्तुत निबंधातील उर्वरित अंश म्हणजे वेदांचे विवरण होय. द्विरुक्ती भयापोटी मी ते इथे देत नाही, त्याचं कारण वेदांची सर्वसाधारण माहिती ही सर्वश्रुत आहे. {{gap}}प्रस्तुत लेखाचा उद्देश आचार्य हजारीप्रसादांच्या साहित्य संपदेतील भारतीय संस्कृतीविषयक आकलन निवेदन करणे व त्या अनुषंगाने भारतीय संस्कृतीच्या विविधांगांची आचार्यांनी केलेली मीमांसा स्पष्ट करणे आहे. हजारीप्रसाद द्विवेदी भारतीय संस्कृतीचे द्रष्टे समीक्षक होत. या निबंधांमधून त्यांचा साहित्य, भाषा, कला, संस्कृती, इतिहास, ज्योतिष, वास्तुकला, प्राचीन ग्रंथ, मानववंशशास्त्र इ. विषयीचे वाचन व व्यासंग लक्षात येतो, तो स्तिमित करणारा आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते प्राचीनतेकडे पोथीनिष्ठ पद्धतीने पाहात नाही तर मानव कल्याणाचे अंतिम साधन व विश्व संस्कृतीची निर्मिती म्हणून या सर्वांकडे ते आस्थेवाईकपणे पाहतात. शिवाय ‘मनुष्यता' केंद्री ठेवून ते सारी मीमांसा करतात. मनुष्यता की निरंतर प्रवाहमान धारा, नाना मूल्यों से शक्तिसंग्रह करती हुई आगे बढ़ती आ रही है। (विचारप्रवाह पृ. १७४) सारख्या सकारात्मक विचारावर त्यांची असलेली श्रद्धा मला लाख मोलाची वाटते. दुसरे असे की समग्र विवेचनात ते मनुष्य चरित्रास व मूल्यांना असाधारण महत्त्व देताना दिसतात. साहित्यास ते माणूस घडणीचे सूत्र म्हणून मांडतात, हेही विशेष होय. मानवतावादी चिंतक म्हणून या निबंधांतून उभी राहणारी प्रतिमाही अधिक आश्वासक आहे. संस्कृतीकडे समाज वास्तव म्हणून वस्तुनिष्ठपणे पाहणारा हा विचारवंत तुम्हाला देश आणि परंपरांकडे पाहण्याची जात, धर्मनिरपेक्ष दृष्टी देतो, म्हणून त्यांचे विचार शब्दशः एकदा वाचायला हवेत. ज्यांना आपली समज अभिनिवेश मुक्ततेने रुंदावायची असेल त्यांना आचार्य हजारी प्रसाद द्विवेदींचं लेखन एक अनुकरणीय वस्तुपाठ म्हणून पाहता येईल. {{rule}} {{gap}}'''टीप :''' वरील लेख आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी यांच्या संस्कृती विषयक निबंधांच्या आधारे त्यांच्या संस्कृती चिंतनाचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने लिहिलेला आहे. या विषयावर त्यांचा स्वतंत्र ग्रंथ नसला, तरी स्फुट निबंध ग्रंथांइतकेच महत्त्वाचे होत. '''संदर्भित निबंध संग्रह - १) अशोक के फूल २) कल्पलता ३) विचार और वितर्क ४) कुटज.''' {{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/११६}}</noinclude> nv85hv7qftkksdmkzkv07hwr6pjejsx पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/118 104 26147 234516 142400 2026-08-03T10:34:27Z कल्पनाशक्ती 3813 234516 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude> '''मध्ययुगीन सांस्कृतिक विकास आणि सामंजस्य''' '''गजानन माधव मुक्तिबोध''' {{gap}}प्रारंभीच्या शतकामध्ये मुस्लीम धर्मविचार एक तत्त्व म्हणून विदेशीच होता, परंतु हळूहळू त्याचे भारतीयकरण होत गेले. एकीकडे संकुचित मनोवृत्ती तर दुसरीकडे उदारमतवादी प्रवृत्ती या दोहोंमधील संघर्षात उदारवादी आदान प्रदानाचीच सरशी होत गेली. इस्लामी विचारांच्या संपर्क आणि संस्पर्शामुळे जनजागृती घडून आली. भक्ती आंदोलन देशभर पसरले. प्रगल्भ, समजदार संतांनी सर्वसामान्य मानवधर्म रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मागासवर्गीय समाजात महान संत, साधू आणि कवी उदयाला आले. ते मुस्लीम आणि हिंदू - दोन्ही समाजातील सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान बनले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच, मागासवर्गीय समाजास प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यांनी तत्कालीन सांस्कृतिक, सामाजिक समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले. हिंदू-मुसलमान एकमेकांच्या जवळ आले. प्रांतिक मुस्लीम शासकांनी वेळोवेळी या एकता आंदोलनात समन्वयकाची भूमिका निभावली, वठवली. अत्युच्च मानवीय एकतेच्या भावनेचे पारडे जड झाले. तिने जातीधर्माच्या भिंती पाडल्या. भारताच्या या आध्यात्मिक मानवी समन्वय युगाने अनेक महापुरुषांना जन्म दिला. '''* इस्लामचा भारतीय संस्कृती संपर्क आणि तत्कालीन प्रश्न''' {{gap}}विदेशी मुस्लीम आक्रमक भारतात स्थायिक होण्याच्या इराद्याने आले होते. प्रारंभीच्या काळात ते विदेशीच होते. मग कालौघात मुस्लीम प्रशासनात भारतीयांचा चंचुप्रवेश झाला. अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारातील मलिक काफूर हा मुसलमान भारतीयच होता. गुजरातचा सुलतान धर्मांतरित मुसलमान<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/११७}}</noinclude> tsw7ai6c7okxom2shz1th2rwjol4dig पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/119 104 26148 234517 142402 2026-08-03T10:38:34Z कल्पनाशक्ती 3813 234517 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>असला तरी तो मुळात तक्षक जातीय हिंदूच होता. मुस्लीम आमदनीच्या शेवटच्या कालखंडात ज्याने बहामनी राज्याची मुहूर्तमेढ रोवली तो हसन गंगू हिंदूचा मुसलमान झालेलाच होता. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर मुस्लीम प्रशासनात भारतीयांचा दबदबा होता. {{gap}}दिल्लीच्या पठाणी साम्राज्यात हुद्देदार मुसलमान असले, तरी हिंदूच्याशिवाय त्यांचं पान हलायचे नाही. हाताखालचे अधिकारी आणि कर्मचारी हिंदूच असायचे. अशा हिंदू कर्मचाऱ्यांकरवीच ते शेतसारा व राज्याचा महसूल ते गोळा करीत. यातूनच हिंदू-मुसलमानांत परस्पर संपर्क येत राहायचा. कालांतराने हे संबंध घनिष्ठ झाले.<br> {{gap}}चौदाव्या शतकाच्या अंतिम दशकात ज्या मुस्लीम राज्यांचा उदय झाला, त्यात तर हिंदू-मुसलमान एकमेकांच्या आणखी जवळ आले. मुस्लीम साम्राज्यात उच्च पदांवर तर हिंदू अधिकारी असतच, पण अंमलबजावणीच्या पातळीवरील सर्व कामे हिंदूंकरवीच होत रहायची. माळव्याच्या सुलतानाने चंदेरीचा राजा मेदिनी रायला नि त्यांच्या मित्रांना महत्त्वाचे अधिकार दिले होते. बंगालचा सुलतान हुसेन शहाने तर अनेक हिंदू अधिकाऱ्यांवर राज्य चालविण्याची जबाबदारी सोपवलेली होती. अशा उच्चपदस्थांत सनातन, पुरंदर, रूप नामक व्यक्तींचा भरणा अधिक होता. {{gap}}मुस्लीम शासक हिंदूची मंदिरे आणि समाध्यांना दान द्यायचे. बिहारच्या मुहम्मद शहा नामक जहागीरदाराने आपल्या जहागिरीतील मोठा हिस्सा बौद्ध गयेतील मंदिरांना दिला होता. काश्मीरचा सुलतान जैनुलाबदीन शारदादेवी आणि अमरनाथ मंदिराच्या दर्शनासाठी नित्यनियमाने जात राहायचा. त्यांनी भक्तांसाठी धर्मशाळा बांधल्या होत्या. मोहम्मद तुघलकसारखा सुलतानही आपल्या सुप्त आकांक्षापूर्तीच्या हेतूने अनेक हिंदू योगी आणि साधूकडे आशीर्वाद घ्यायला जायचा. रजपुतांचे अनुकरण करत मुसलमानांनी 'जोहर' प्रथा अंगीकारल्याचे उल्लेख इतिहासात दिसून येतात. तैमूरलंगाचे सैन्य आपला किल्ला नष्ट करणार या शंकेने भटनेरचा मुस्लीम शासक कमालुद्दीन व त्याच्या अनुयायांच्या सौभाग्यवतींनी जोहर प्रथा पाळल्याचे (चितेत आत्माहुती) दिल्याचे उल्लेख वाचायला मिळतात. ते सुभेदार मात्र तैमूरलंगाशी दोन हात करत युद्धात कामी आले. त्या काळातली हिंदू पगडी मुसलमानांत प्रिय होती. मुस्लीम स्त्रियांत बांगड्या भरायची प्रथा रूढ होती. इतकेच नव्हे, तर हिंदू नगरिक मुस्लीम पोषाख वापरत.{{nop}}<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/११८}}</noinclude> oi275l60lcz9fmluq0se9ilhdd8pdvb पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/120 104 26149 234518 142403 2026-08-03T10:40:24Z कल्पनाशक्ती 3813 234518 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>{{gap}}हेच काय, विजापूरच्या मुस्लीम दरबाराचा कारभार मराठी भाषेत व्हायचा. विजापूरचे सुलतान आदिलशहा होते. इब्राहिम आदिलशहा इतका विद्वान नि लोकप्रिय होता की प्रजा त्याला ‘जगदगुरु' म्हणायची. बहामनी साम्राज्यातही प्रशासकीय व्यवहारात हिंदूंना वाव होता. तिकडे विजयनगर साम्राज्यात अनेक सेनाध्यक्ष मुसलमान होते. सैन्यात मुस्लीम शिपाई असणे ही काही नवलाईची गोष्ट नव्हती. {{gap}}भारतात मुस्लीम साम्राज्य दृढ होण्यापूर्वीच मुस्लीम फकीर या देशात येऊन स्थिरावले होते. सूफी संत, कवी यासंदर्भात उदाहरण म्हणून सांगता येईल. मुस्लीम देशात त्या वेळी सूफी-संतांना ‘काफिर' मानले जायचे. या पार्श्वभूमीवर हे लक्षात घेण्यासारखे आहे. परिणामतः अनेक सूफी फकिरांनी भारतात येणे पसंत केले होते.<br> {{gap}}अकराव्या शतकापर्यंत तरी भारतात मुस्लीम राजवट स्थापन झालेली नव्हती. त्या काळात मुस्लीम फकीर नि साधु, संत, सिद्धांना राजकीय वरदहस्त लाभलेला नव्हता. परंतु त्यांचे चारित्र्य-बल उच्च होते. त्याचे विचार नि सिद्धांत उपनिषद आणि वेदात्ताशी मिळते-जुळते होते. अकराव्या शतकात शेख इस्माइल यांनी, तर बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात नूर सतागर इराणींनी अनेक शूद्रवर्णीयांना मुसलमान बनवले होते. मागास जातीतील अनेक मुसलमान झाले खरे पण त्यांच्यावर पूर्वसंस्कार नि परंपरांचा पगडा इतका मोठा होता की, ते तो सोडून मुस्लीम रीतीरिवाज आत्मसात करू शकले नाहीत. {{gap}}या जाती गरीब होत्या. त्यातील गरीब मुसलमान गरीब हिंदूंबरोबर आपोआप मिसळत. एक गरीब दुसऱ्या गरिबाच्या भावना लगेच समजून घेतो. अशा जातींपैकी एक ‘योगी' जात होती. मुसलमानांनी ती धर्मांतरित केली होती. ती जात कधीकाळी ब्रह्मचारी असायची. त्या जातीने नंतर गृहस्थाश्रम स्वीकारला. हे जोगीच पुढे गोसावी म्हणून ओळखले जाऊ लागले. या जातीनं इस्लाम धर्म स्वीकारला खरा, पण त्यांच्यावरील पूर्वापार हिंदू संस्कार तसेच राहिले. थोडक्यात सांगायचे तर, मुस्लीम नि हिंदू सर्वसाधारण जनतेत दृढ संबंध निर्माण झाले. त्यातही निम्नवर्गीय गरीब जनतेच्या पातळीवर हे संबंध अधिक दृढ व आत्मीय होते, हे आपण लक्षात घ्यायला हवे. {{gap}}परंतु उच्चवर्णीय अभिजनांत मात्र संघर्षाचे वातावरण होते. विशेषतः राज्यसत्ता गमावलेल्या सवर्णात हा संघर्ष शिगेला पोहोचला होता. विशेषकरून<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/११९}}</noinclude> cldqi2xyz9sj0uvgkmd76zcdet0q5fy पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/121 104 26150 234519 142404 2026-08-03T10:41:35Z कल्पनाशक्ती 3813 234519 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>मुस्लीम शासक नि त्यांचे उच्च राजकीय हुद्देदार, सेनाध्यक्ष धर्माच्या नावाखाली राजनैतिक व आर्थिक स्वार्थ साधत होते. अनेकदा या स्वार्थापोटी मुस्लीम साम्राज्यात धर्मभावना भडकावल्या जात. मुस्लीम सामन्त आपली भूक हिंदू सामंतांच्या समूळ उच्चाटनाने भागवत. इस्लामनी त्याच्या धर्मगुरु, मुल्लामौलवींनी सुलतानांना तर शिकवण देऊन पटवून दिले होते की, 'हिंदूकाफिरांना मुसलमान बनवणे हे पवित्र धर्मकृत्य आहे. हिंदूची जात-संस्कृती प्राचीन काळापासून चालत आलेली होती. तीत धर्मगौरवाची भावना तीव्र होती. त्यांच्याकडे ज्ञानाचा वारसा होता. परंतु त्यांच्यात राजकीय वारशाची पोकळी होती. ती भरून काढण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत राहायचे. {{gap}}मुस्लीम सामंत शासक तर हिंदू सामंत, महाजन, जमीनदार शासित होते. अनेक मुस्लीम सामंत, सरदारांनी हिंदूंवर अनन्वित व अमानुष अत्याचार केल्याची नोंद इतिहासात आढळते. {{gap}}परंतु हे सत्य अस्तित्वात येण्याचे मूळ कारण आपण शोधू लागलो तर असं दिसून येतं की लोक जे मध्य आशियातून आलेले होते, ते सभ्य गणले जात असले, तरी मूलतः सभ्य नव्हते. त्यांच्या रोमारोमांत, कणाकणांत भटकं, आक्रमक योद्धा रक्त वाहात होतं. हे जेव्हा मध्य पूर्वेतील पठारावर फिरत होते, तेव्हा ते बौद्ध बनवले गेले. सम्राट अशोकाच्या उपदेशांनी आणि कनिष्काच्या धर्म प्रचारांनी त्यांना जरी बौद्ध बनवले असले, तरी तो कायाकल्प नव्हता. होता तो बाह्य बदल, ते वरवरचे सभ्य बनले होते. ते जेव्हा हिंसक आक्रमण करत पश्चिम आशियात घुसले तेव्हा शासनाच्या संपर्कात आले. आणि आपला पूर्व बौद्ध धर्म विसरले नि झटक्यात त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. {{gap}}एका विशिष्ट देश, काल, परिस्थितीच्या संदर्भात अरब जातींच्या एकीकरणाच्या उद्देशाने महंमद पैगंबरांनी धर्मयुद्ध अर्थात ‘जिहाद' महत्त्वपूर्ण मानला होता. महंमद पैगंबरांनी ज्या ज्या धर्मांचा अभ्यास केला होता त्या धर्मातील ऋषींना त्यांनी संतच मानले होते. मुस्लीम विजयी आक्रमकांनी मात्र राजकीय स्वार्थापोटी त्याला धर्माचा मुलामा चढवला. {{gap}}प्रत्येक देश नि काळात मानव जातीने एकाच वेळी दोन परस्परविरोधी वृत्ती प्रकट केल्या आहेत. १) संकुचित वृत्ती २) उदारमतवादी वृत्ती. इस्लाम धर्मात कुराण प्रमाण मानणाच्या नि ईश्वरभक्तीत लीन झालेल्या सूफी संतांना फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली. मुल्ला-मौलवी आणि सुलतानांनी अशांना ‘काफिर' संबोधून त्यांची टर उडवली.{{nop}}<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१२०}}</noinclude> 6a971ph018f55fu8shz2x9icqxkem21 पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/122 104 26151 234520 142405 2026-08-03T10:43:24Z कल्पनाशक्ती 3813 234520 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>{{gap}}जेव्हा तुर्क मुसलमान झाले तेव्हा तर त्यांना ही संकुचित वृत्ती सोयीचीच ठरली. मुस्लीम धर्मगुरुंचा प्रभावच असा होता की ही वृत्ती दृढ व्हायला वेळ लागला नाही. मग तर तुर्क जातींना आपल्या पूर्वापार रक्तपिपासू वृत्तीस धार्मिक अधिष्ठानच प्राप्त झालं. राजनैतिक, आर्थिक स्वार्थसिद्धीसाठी धार्मिक उन्माद साधनच बनून गेलं. मुल्ला-मौलवींची चलती अस्तित्वात आली. लुटेरे धर्मयोद्धे समजले जाऊ लागले. जे लुटेरेपण भारताने शक, हुणांसारख्या विदेशी जातीत अनुभवले होते, तेच त्यापेक्षा भयंकर रूपात त्यांच्याच उत्तर पिढ्यांत अनुभवायला मिळाले. हे तुर्क तेच होते ज्यांनी ज्या मानव जातींनी पूर्व आशियात हिंसक आक्रमण, हत्यासत्र अवलंबत पूर्व युरोपीय मैदानी प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या होत्या. {{gap}}मंदिर आणि मूर्त्या उद्ध्वस्त करणारे हे रक्तपिपासू राजनैतिक, स्वार्थार्थ धर्माच्या नावावर आपल्या अनुयायांना प्रोत्साहन देत होते. जर त्यांनी लूट केली नसती तर आपल्या सैनिकांना ते वेतन देऊ शकले नसते. शिवाय सैन्याचा खर्च चालवणे त्यांना कठीण होऊन गेले असते. पैशाच्या तजविजीसाठी धर्म अनिवार्य बनून गेला होता. युद्ध व्यवसाय झाला होता. रजपूत, क्षत्रियांची स्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती. {{gap}}अतिप्राचीन काळापासून भारतात युद्ध करणाच्या जाती नि त्यांचे समर्थन आणि पोषण करणाच्या पुरोहित जाती अस्तित्वात होत्या. म्हणून एकीकडे सतत लढाया होत राहायच्या. कोणतीही केंद्रीय सत्ता अधिक काळ राज्य करू शकायची नाही. तर दुसरीकडे पुरोहित वर्ग आपल्या धार्मिक विधींच्या माध्यमातून युद्ध व्यवसायींना प्रोत्साहन देत राहायची. भारत सुसभ्य नि सुसंस्कृत देश असल्यामुळेच त्यांनी धर्मयुद्धा आणि धर्म-नियम, युद्धकैद्यांशी अपेक्षित मानवी वागणूक, शत्रूशी केला जाणारा सद्भावनापूर्ण व्यवहार, तसेच दया, क्षमा आणि करुणेसंबंधी असलेले सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजकीय महत्त्व विशद केले आहे. {{gap}}असे असले, तरी भारतात पहिल्यापासूनच एका मोठ्या युद्ध व्यवसायी जातीच्या (क्षत्रिय) प्राबल्यामुळे लढाया होतच राहिल्या. त्यामुळे जनमानसात असा समज दृढ झाला होता की लढाईत मृत्युमुखी पडले की स्वर्गप्राप्ती होते. फरक इतकाच होता की क्षत्रियांना अशा अर्धसभ्य, रक्तपिपासू युद्ध व्यवसायी जातींना तोंड द्यावे लागे की ज्यांची युद्ध पद्धती सर्वथा भिन्न होती. ते भय पसरवत, अराजकता निर्माण करत, आपल्या नृसंशतेचा धाक घालत आणि धर्माचा पुकारा करीत युद्धाच्या मैदानात उतरत. ते विदेशी होते. इथे ते नवेच होते. दहशत पसरवणे हेच त्यांचे प्रमुख तंत्र नि अस्त्र होते.{{nop}}<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१२१}}</noinclude> osdr7caimfn2fyvd1blf2ld6855lwgd पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/123 104 26152 234521 142406 2026-08-03T10:44:22Z कल्पनाशक्ती 3813 234521 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>{{gap}}परंतु येथील वातावरणाने त्यांना बदलले. त्यांनी येथील अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप नाही केला. शेती व अन्य जीवनावश्यक वस्तूंसाठी ते भारतीयांवर अवलंबून होते. भारतीय जनतेतील काही लोक आपले असणे ही त्यांची अनिवार्य गरज होती. म्हणून त्यांचे धर्मप्रसारक शूद्रवर्णीयांना धर्मांतराने मुसलमान करीत. दुसरीकडे अभिजन वर्गातील हिंदू भीती व स्वार्थापोटी इस्लाम धर्म स्वीकारत. {{gap}}प्रारंभी मुस्लीम शासक विदेशी होते, पण त्यांच्यात भारतीय मिसळत राहिले. विदेशी आक्रमक भीती व धाकदपटशा दाखवूनच सभ्य व स्वाभिमानी जातींवर राज्य करत रहायचे. परिणामतः त्यांच्या नृशंसतेच्या नि अनन्वित अत्याचारांच्या आठवणी हिंदूना विसरणे अशक्यप्राय होऊन गेले होते. परंतु पुढे हळूहळू धर्माभिमानी हिंदू संपर्काने त्यांना ओळखून होते. मुस्लीम शासकांचे नि त्यांचे घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले; तसेच भारतीय भाव नि विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडू लागला. अशा प्रकारे मुस्लीम शासक वर्गात दोन प्रवृत्ती दिसू लागल्या. एक संकुचित तर दुसरी उदारवादी. या दोन भिन्न प्रवृत्तीत मतैक्य अशक्य होते. {{gap}}हिंदू सामंती सभ्यतेतही या दोन प्रवृत्ती प्रकट झाल्या. पैकी एक प्रवृत्ती भारतीय धर्माच्या नावावर रूढी व जातीय संकुचित दृष्टिकोनासच धर्म मानत विकसित होत राहिली तर दुसरीकडे या विरुद्धची वृत्ती मानवासाठी सामान्य धर्म शोधत राहिली. तिने हिंदू-मुसलमान, ब्राह्मण-शूद्र, अशा सर्व प्रकारच्या भेदभावांना मूठमाती देत, ईश्वर भक्तीत लीन राहात मानवधर्म स्थापनेचे प्रयत्न केले. {{gap}}अशा मानव धर्माचे समर्थक समाजातील मागासवर्गीय होते. त्यांच्यात हिंदू व मुस्लीम गरीबांचा समावेश होता. निर्गुण उपासक संत आणि सूफीसाधक याच विचाराचे होते. {{gap}}याच्याविरुद्ध ब्राह्मण प्रभावाचा आग्रही, कर्मकांडप्रधान व जातीधर्म समर्थक हिंदू धर्म दिवसेंदिवस कट्टर होत गेला. वेदान्त आणि ईश्वरीय सत्ता प्रमाण मानणाच्या ब्राह्मण वर्गासाठी जाती-उपजातीचे नियम ब्रह्मवाक्य होते. दक्षिण भारतात हिंदू हे सामन्त आणि शासक असल्यामुळे ब्राह्मणांचे फावले. परिणामस्वरूप तिथे कट्टरतेस टोक आले. {{gap}}आज दक्षिण भारतात ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसा तो प्राचीन प्रश्न होय, परंतु मध्ययुगात त्यास टोक आले. या प्रश्नाचा शोध घेताना लक्षात येते की ज्या जाती वा वर्ण शूद्र समजले जातात,<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१२२}}</noinclude> nk97pxmum337unh6qwgiiewm3nb5ey3 पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/124 104 26153 234522 142407 2026-08-03T10:45:11Z कल्पनाशक्ती 3813 234522 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>अशांमधून साधू-संत जन्माला आले. परिणामतः दक्षिण भारतातील सर्वसामान्य भक्तांना समाजाकडून मोठा त्रास सहन करावा लागला. हे सर्व साधु-संत मानव-धर्मावर विश्वास ठेवणारे होते. त्यांना याद्वारे जगातील सर्व मानवांत एकता आणि बंधुभाव निर्माण करायचा होता. म्हणून तर कबीराने पंडित आणि मौलवी दोघांना फटकारले होते. त्यांनी या दोघांच्याही अंधविश्वासावर प्रहार केला होता. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की हा विचार समाजाच्या निम्न समजल्या जाणाच्या वर्ग, वर्ण नि जातीतून आलेला होता. हा समाज हिंदू नि मुसलमान दोन्ही धर्मातील तळागाळाचा होता, हे विशेष. तसं पाहिलं तर बौद्ध आणि जैन धर्मीयांनी, त्यांच्या साधु-संतांनी प्राचीन काळापासूनच शील, सदाचार, प्रेम, करुणा इत्यादीवर भर दिलेला होता. ते यापूर्वीच जातिभेदाचा विरोध करत आले होते. परंतु नव्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मागासवर्गीय संतांच्या विचार नि आवाहनांना असाधारण महत्त्व होतं. नाथ संप्रदायांनी अकराव्या शतकातच उत्तर-पश्चिम भारतात अशा विचारांचा श्रीगणेशा केलेला होता. दक्षिण आणि उत्तर भारतातील निर्गुण उपासक असाच प्रचार, प्रसार करत आले होते. दक्षिण भारतात लिंगायत, महाराष्ट्रात महानुभाव पंथीयांनी अशीच धर्मनीती अवलंबिली होती. या उदारवादी नि व्यापक विचारधारांचा विरोध ब्राह्मणशाहीकडून मोठ्या प्रमाणात झाला होता. {{gap}}जेव्हा धर्म आणि ईश्वराच्या नावावर समाजात परस्परविरोधी प्रचार होत राहायचा, तेव्हा धर्म आणि ईश्वराच्याच नावावर मानवी एकता, प्रेम, सामंजस्याचा प्रचार शक्य होता. यात काहीच आश्चर्य नव्हते की त्या काळी अनेक हिंदू सूफी झाले होते नि अनेक मुसलमान कृष्णभक्त! अगणित मुसलमान आणि अस्पृश्य नानक नि कबीरांचे अनुयायी होते. राजा भर्तृहरीची गीते गात कितीतरी मुस्लिम फकीर त्या काळी भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनले होते. {{gap}}चौदाव्या शतकाच्या अखेरच्या कालखंडात हिंदू-मुस्लीम मैत्री नि एकतेच्या वातावरणात अनेक प्रांतीय संस्थानांतून, राजवटींतून परस्पर विश्वास निर्माण झाला होता. परिणामी एकमेकांचे प्रतिस्पर्धी समजल्या जाणाच्या वर्गातूनही आत्मीयतेचे दर्शन घडायचे. यात अविश्वसनीय असे काहीच नव्हते. उलटपक्षी तो त्या काळचा रिवाज बनून गेला होता, असे म्हटले तर ते अतिशयोक्त ठरू नये नि आश्चर्यही! {{gap}}आज भारतात राजकीय स्वार्थापोटी जातीयवाद, प्रांतवाद डोके वर<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१२३}}</noinclude> a1yn9y0hebzchk6ap6x0070bhi76trt पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/125 104 26154 234523 142408 2026-08-03T10:47:34Z कल्पनाशक्ती 3813 234523 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>काढत आहे. अशा पार्श्वभूमीवर मध्ययुगीन संत नि फकीरांनी, प्रगल्भ नि समजदार, शहाण्या-सुरत्या कवींनी, सूफींनी नामस्मरणाद्वारे हृदय पवित्र होऊ शकते हे सांगत जात, धर्म, वर्ण, प्रदेश इ. संकुचित विचारांपलीकडे जात विशाल मानव धर्माची केलेली प्राणप्रतिष्ठा, त्यासाठी वेचलेले आयुष्य नि कष्ट लाख मोलाचे ठरतात. {{gap}}अशा वातावरणात शेवटचा श्वास घेणारे मुस्लीम व हिंदूचे सामंतसरदार प्रभावित झाले नसते तरच आश्चर्य! बंगालचा सुलतान हुसेन (१४९३ - १५१८) यांने ‘सत्यपीर' नामक संप्रदाय स्थापन केला होता. 'सत्यपीर' म्हणजे परमेश्वर! त्याची हिंदू-मुसलमान दोन्ही धर्मीय उपासना करीत. पुढे पंधराव्या शतकात ‘सतनामी’ आणि ‘नारायणी' संप्रदायांची स्थापना झाली. त्यांच्या विकास काळात त्या संप्रदायात हिंदू-मुसलमान दोन्ही धर्माचे लोक अनुयायी म्हणून सामील झाले होते.<br> {{gap}}थोडक्यात सांगायचे तर मुघल कालखंडापर्यंत जनतेतील सांस्कृतिक एकता, मैत्री, बंधुभावाद्वारे आदर्श मानवधर्म अस्तित्वात आल्याचे चित्र प्रत्यक्षात अवतरले होते. मुघल सम्राट अकबराला वारसा म्हणून हे वातावरण लाभलं. अकबराने ते वातावरण राजकीय व सामाजिक क्षेत्रात परिवर्तित करून एक नवा वस्तुपाठ कायम केला. {{gap}}ही संप्रदायांची गोष्ट झाली. मुस्लीम साधु-संतांनी वेदान्त आणि वैष्णव धर्माच्या अनेक गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत. इस्लामच्या सूफी धर्म साधनेत योगाचा अंतर्भाव आहे. मुस्लीम साधु-संतांबद्दल हिंदूमध्ये आदरभाव दिसून येतो. दोन्ही धर्मातील सामंजस्यामुळे नि सहकार्यामुळेही हिंदू मानस नि मनीषेत परिवर्तन झाल्याचे दिसून येते. हिंदू धर्म, कला आणि ज्ञान-विज्ञानात मुस्लीम तत्त्वांचा प्रवेश आढळतो. ईश्वरीय नि मानवीय प्रेमभावनेने दोघांना एक केले आहे. पीर नि फकिरांना हिंदू आपले मानतात, हे कशाचे निदर्शक आहे? {{gap}}मुस्लीम कबरींवर हिंदू मिठाईचा प्रसाद ठेवतात नि कुराणातील आयते ऐकतात. ते कुराणाला देववाणी मानतात. तिकडे मुसलमान कवी भारतीय भाषात कृष्णभक्तीपर पदे रचतात. आता तर हिंदू आपल्या घरात संकटमोचनार्थ, अपशकुनांपासून वाचण्यासाठी कुराण ठेवू लागले. इतकेच काय, ते आपल्या घरी मुसलमानांना खाऊ-पिऊ घालू लागले. पंजाबच्या अब्दुल कादिल जिलानी, बहराईचच्या सैयद सालार महमूद, रावळपिंडीच्या अनेक ब्राह्मणांचे भक्त हे दोन्ही धर्म, जातींचे होते. अजमेरच्या शेख मुईनुद्दीन<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१२४}}</noinclude> i9sd1pdlol2aqefi100c7i13zf4krmp पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/126 104 26155 234524 142409 2026-08-03T10:49:29Z कल्पनाशक्ती 3813 234524 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>चिश्तीच्या उपासकांत शेकडो हिंदू होते. त्याचप्रमाणे बंगाल प्रांतात मुसलमान लोक हिंदूच्या शीतलादेवी, कालिमाता, धर्मराज, वैद्यनाथ इत्यादी देवदेवतांची पूजा करू लागले. त्यांच्या स्वतःच्या धर्मात मूर्तिपूजेस असलेला विरोध पाहता हे लोकविलक्षण मानावे लागेल. त्याचप्रमाणे मुसलमानांनी आपल्या नवनव्या देवी-देवतांची निर्मिती केली. उदाहरणच द्यायचे झाले तर सांगता येईल की नद्यांचे दैवत ख्वाजा खिज्र, सिंहवाहिनी वनदेवी आणि तिचा प्रेमी आणि अंगरक्षक जिंदा गाजी. ही सारी नवी मुस्लीम दैवते होत. आम्ही एकमेकांच्या वाईट चालीरीतींचेही अनुकरण केले. जसे की हिंदू स्त्रिया पर्दापद्धती पाळू लागल्या. मुसलमानांत जाती प्रथा अस्तित्वात आली. धार्मिक उत्सवात देवघेव सुरू झाली. आपल्याकडील शिवरात्रीप्रमाणे मुसलमानांत 'शबे बरात' सुरू झाली. आपल्याकडील ‘आरती' प्रमाणे त्यांच्यात ‘उतारा' उतरून घेण्याची प्रथा सुरू झाली. {{gap}}इस्लाम धर्मात भक्ती भावनेचा उगम झाला. त्या धर्मात मृदुता आली. एक प्रकारची रसार्द्रता निर्माण झाली. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात परस्परपूरक घनिष्ठ संबंध निर्माण होऊ लागले. हिंदू-मुसलमानांत आन्तरजातीय, आंतरधर्मीय प्रेम-प्रणयाची उदाहरणे समोर येऊ लागली. हिंदू आपल्या मुसलमान प्रेमिकेस घरी ठेवू लागले. प्रसिद्ध साहित्यशास्त्री पंडितराज जगन्नाथांची प्रेमिका मुसलमान स्त्री असल्याचे ऐकिवात आहे. असेच संबंध हिंदू-मुस्लीम सामंतात दिसून येण्यात आश्चर्य नाही. पण एक गोष्ट निश्चित की सामान्य जनतेत असे सबंध फार पूर्वीपासून दिसून येतात. अकबरांनी राजपुतांत असे संबंध निर्माण केले. खरे तर ते भारतीय जनमानसात पूर्वापार आढळतात. राजकीय क्षेत्रात हिंदू-मुसलमानांचे मांडलिक झाले, त्याचप्रमाणे हिंद राजांच्या घरी मुस्लीम नबाब, जहागीरदार, सरदार असत. {{gap}}भारतीय जनता आपल्या परीने या सर्व परिस्थितीचे आकलन, विश्लेषण करत होती. हिंदूचे मुसलमानांशी तसेच मुसलमानांचे हिंदूंशी प्रेमाचे संबंध निर्माण होत होते. परंतु त्या काळात औरंगजेबासारख्या धर्मांध शासकांची शक्ती नि वृत्ती काही क्षीण नव्हती. मुगल दरबारात एकीकडे शहाजहान उदार तर दुसरीकडे त्याचा मुलगा दारा अनुदार तसाच संकुचित वृत्तीचा त्याचा भाऊ औरंगजेब! अशाच परस्पर विरुद्ध संघर्षशील वृत्ती हिंदूतही दिसून यायच्या. {{gap}}या प्रवृत्ती आजही आहेत. त्यामुळेच भारतात सामाजिक सांस्कृतीचा विकास होऊ शकत नाही.{{nop}}<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१२५}}</noinclude> 1v0ti201g05xel4fpd5k96fvlx68idu पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/127 104 26156 234525 142410 2026-08-03T10:51:12Z कल्पनाशक्ती 3813 234525 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude> {{center|'''आर्थिक, सामाजिक स्थिती'''}} {{gap}}हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे की युद्ध-व्यवसायी जातींसाठी युद्ध अनिवार्य असते, कारण तो त्यांच्या जगण्याचे साधन असते. त्यामुळे ते भांडण्याचे कारण मिळाले नाही तर कुरापती काढते. मग राज्यविस्ताराचे कारण काढून वैर, शत्रुत्व, संघर्षात गुंतून राहणे हा एक प्रकारे त्यांचा जीवनक्रम बनून गेलेला होता. विशेषतः हे तेव्हा घडायचे जेव्हा राज्यकारभार क्षत्रिय पाहात असायचे नि जनता निद्रिस्त असायची. {{gap}}हूण, मंगोल, मराठे इत्यादी युद्धखोर जातीत लूट करून सेनेचा खर्च भागविण्याची वृत्ती दिसून येत असे. अशा काळात साहसी, वीर लोक पैशाच्या प्रलोभनाने सैन्यात भरती व्हायचे. दिल्लीचे तख्त चालविणाऱ्या काळात म्हणजे जेव्हा देशभर केंद्रीय सत्ता असायची अशा वेळी स्वतंत्र संस्थाने, राज्ये जिंकून लुटीद्वारे सेनेचा उदरनिर्वाह करण्याची वृत्ती असायची. जेव्हा दिल्लीवर पठाणांचे राज्य होते तेव्हा त्यांनी आर्थिक सुधारणांकडे कानाडोळा केल्याचे दिसून येते. {{gap}}आणि दुसरीकडे पठाणांनी आर्थिक व्यवस्थेत हस्तक्षेप केला असे दिसत नाही. व्यवसायी व व्यापारी यांच्या संघटना होत्या. कारागीर आपल्यावर सोपवलेलं काम करत राहायचे. एक गोष्ट मात्र होती. सैनिक आणि सरदारांच्या वस्त्र नि शस्त्रांच्या गरजा असायच्या. त्यामुळे दिल्लीच्या सुलतानांनी त्यांचे कारखाने सुरू केले होते. दिल्ली दरबारामार्फत सुरू असलेल्या रेशमी कापडाच्या कारखान्यात त्या वेळी ४००० विणकर काम करत असायचे. हे रेशमी कापड दरबारातील अभिजनांसाठी निर्मिले जायचे. लोकरी व साधे कापड विणणारे कारखाने सरकारी असायचे. अन्य अनेक वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने पण सरकारीच असायचे. परंतु यांचा प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत नसायचा. शिल्पकार, कलाकारांच्या वस्तू उत्पादनांचेही कारखाने होते. ते लोकांच्या गरजा भागवण्याचे कार्य आपापल्या परीने, पद्धतीने करत रहायचे. {{gap}}सततच्या युद्धांमुळे शेतकऱ्यास शांत डोक्याने आणि निश्चिंततेने शेती करणे कठीण होऊन बसले होते. देशात कुणाचा पायपोस कुणाला नव्हता. सर्वत्र अंधाधुंदीचा कारभार होता. त्याचाही प्रतिकूल परिणाम शेतीवर व्हायचा. परिणामतः जलालुद्दीन खिलजी नि मुहम्मद तुघलकाच्या काळात मोठा दुष्काळ पडला होता. पुन्हा त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसला.<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१२६}}</noinclude> ed1t55l6ysoe26vsfgjqyc2m1p8b4p4 पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/128 104 26157 234526 142411 2026-08-03T10:52:55Z कल्पनाशक्ती 3813 234526 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>माथेफिरू समजल्या गेलेल्या मुहम्मद तुघलकाच्या कार्यकालात सन १३४० मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. सतत सात वर्षे पावसाळा कोरडा गेला. दिल्लीच्या या वेड्या समजल्या जाणाऱ्या सुलतानाने सहा महिने पुरेल इतक्या धान्याची तजवीज जनतेसाठी केली होती. त्याच्या जेव्हा हे लक्षात आले की दुष्काळाच्या झळा काही केल्या कमी होत नाहीत, तेव्हा त्याने अयोध्येच्या जवळील कोरा इथे एक नवे नगरच उभारले नि तिथे दिल्लीतील दुष्काळग्रस्तांसाठी छावणी चालवली. ती पण एक दोन नव्हे चांगली सहा वर्षे. {{gap}}असे का झाले? तर सुलतानानी साम्राज्य विस्तार तर केला पण सुखसोयींकडे आवश्यक ते लक्ष दिले नाही. रस्ते नव्हते. मंदिर, मशिदी उभारल्या पण रस्त्यांचे जाळे नाही विणलं. {{gap}}असं असलं तरी व्यापार, उलाढाली होत राहायच्या. विशेषतः अमीर, उमराव, सरदारांना लागणाऱ्या चीजवस्तूंचा व्यापार व्हायचा. अशा वस्तूंची निर्यात व्हायची. विदेशी निर्यात होणाऱ्या वस्तुंचा तुटवडा असायचा. त्या वस्तू महाग विकल्या जात. चीन, मलाया, अरबस्तान, युरोपात समुद्रमार्गे व्यापार चालायचा. त्या काळात कालिकत आणि भडोच ही बंदरे प्रमुख होती. मध्य आशिया, इराण, भूतानशी रस्त्याच्या मार्गाने व्यापार होत असे. मसाल्याचे पदार्थ, कपडे, धान्य, अफूची निर्यात व्हायची. बदल्यात सोने आयात व्हायचे. {{center|'''सामाजिक स्थिती'''}} {{gap}}हिंदूच्या सामाजिक जीवनास उतरती कळा आली होती. मुसलमान साम्राज्यात हिंदूचा दर्जा दुय्यम नागरिकाचा होता. दिल्ली सुलतानाच्या दरबारात हिंदूना तुच्छतेने वागवले जायचे. अल्लाउद्दीन खिलजीने तर आपल्या आमदनीत त्यांना हीन-दीन बनवण्याचा विडाच उचललेला होता. त्याने हिंदूवर अनेक जुलमी कर लादले होते.<br> {{gap}}दिल्लीत मुसलमानी अमलात गुलाम प्रथा जोरदार होती. विदेशातून गुलामांची आयात केली जायची. गुलामात भारतीयांचाही भरणा असायचा. अमीर, उमराव, सरदारांना गुलाम बाळगायचा नाद होता. या गुलामांकडून सैन्य सेवा, राज सेवा, व्यक्तिगत सेवा करून घेतली जायची. ज्या गुलामांमध्ये प्रतिभा, चुणूक दिसायची त्यांना गुलामीतून मुक्त करून उच्च पदांवर नियुक्त<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१२७}}</noinclude> p32q59fotbonzugmpgonjxusg4582wn पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/129 104 26158 234527 142412 2026-08-03T10:54:48Z कल्पनाशक्ती 3813 234527 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>केलं जायचं. युद्धकैद्यांना गुलाम बनवायचा रिवाज होता. स्त्रियांनाही गुलाम, दासी बनवलं जायचं. सुंदर दासींचे मोल अधिक असायचे. {{gap}}मुसलमानांच्या या गुलाम प्रथेचं अनुकरण हिंदू सामंत करीत. राजस्थानच्या राजमहालात ही प्रथा आजही आढळते. तिथे आजही अमीर, उमराव, सरदारांमध्ये हुंड्याच्या रूपात दासी देण्याचा प्रघात आहे. मध्ययुग पूर्व काळातील वाईट चालीरीती आजही हिंदू समाजात दिसून येतात. पर्दा प्रथा हे त्याचं मार्मिक उदाहरण होय. जीवनाची असुरक्षितता, भविष्याची अशाश्वती असतानाही बालविवाह प्रथा चालू आहे. {{center|'''साहित्य'''}} {{gap}}या युगातील सांस्कृतिक क्षेत्रातील दोन ठळक घटना म्हणजे १) भक्ती आंदोलनाचा उगम आणि विकास २) देशी भाषांचा विकास नि त्यांच्या साहित्याचा उत्कर्ष. या सर्वांची इथे तपशीलवार चर्चा अशक्य आहे. {{gap}}साहित्य विकास तीन केंद्रातून झाला - १) राज दरबार (हिंदू मुसलमान) २) जनता ३) व्यक्तिगत {{center|'''राजदरबारातील साहित्य विकास'''}} {{gap}}राजदरबारात साहित्यिक नि विद्वान यांचे मानाचे स्थान असणे हे आशियाई संस्कृतीचं व्यवच्छेदक लक्षण होतं. मग इराणचा राजदरबार असो की बगदादचा, राजसभेची शोभा सरदार-दरकदारांशिवाय ती साहित्यकार नि विद्वानांच्या उपस्थितीनेच ती वाढायची. आपल्या भारतातही हाच प्रघात होता. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही की विदेशी विजेता मुहम्मद घोरीच्या दरबारात केशवदास नामक हिंदी कवी होता अशी नोंद हिंदीचे प्रकांड पंडित डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी यांनी करून ठेवली आहे. बहुधा तो दरबारातील भाट कवी (प्रशंसक) होता. पृथ्वीराव चौहानच्या अजमेर नि दिल्लीच्या दरबारात त्याचा जिवलग मित्र चंदबरदाईला राजकवीचा बहुमान होता. त्या कवीने पृथ्वीराव चौहानवर लिहिलेल्या ‘पृथ्वीराज रासो' महाकाव्यात प्रेम, शृंगार, वीरता, उद्यान, प्रासाद इत्यादीचे मनोरम वर्णन आहे. पृथ्वीराज बरोबर त्याचा शत्रू असलेल्या मुहम्मद घोरीच्या दरबारातही कवी असण्यातून मध्ययुगीन ही परंपरा अधोरेखित होते. आज आपणाला हे विचित्र वाटणं स्वाभाविक आहे, कारण आपले जीवनच बदलून गेलंय. परंतु जर आपण ऐतिहासिक सत्य शोधू लागलो तर आपणास दिसून येईल की<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१२८}}</noinclude> brm57yz2szcvr1tion9ruzfrlz0sly2 पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/130 104 26159 234528 142413 2026-08-03T10:57:14Z कल्पनाशक्ती 3813 234528 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>अफगाणिस्तान, बलुचिस्तान, बल्खपर्यंतचा प्रदेश हा भारतात समाविष्ट होता, तिथे भारतीय संस्कृती नांदत होती. कनिष्क आपल्या नाण्यांवर, मुद्रांवर ‘शाहनुशाहि' अर्थात शहंशाह अशी बिरुदावली कोरत असे. हे लेखन इराणी असलं, तरी त्याची विभक्ती संस्कृत असायची. त्याचप्रमाणे महंमद गझनीने आणि त्याच्यानंतर त्याच्या उत्तराधिकारी राजांनीही आपल्या मुद्रांवर इस्लामी संदेशांचे संस्कृत भाषांतर कोरलेले आढळते. महंमद गझनीच्या दरबारात अनेक भारतीय विद्वानांना आश्रय दिला गेला होता. गजनी आणि त्याच्यापुढे दूरवर असलेल्या उत्तर पश्चिमेकडील अनेक राज्यांवर ब्राह्मणांचे राज्य होते. पुढे या ब्राह्मणांनी इस्लाम धर्म स्वीकारला ही गोष्ट अलाहिदा. असेही काही लोक त्या काळात होते की धर्मांतर न करता, ते आपला धर्म नि जात टिकवून धरून जगत राहिले. ज्यांनी धर्मांतर केले नव्हते त्यापैकी अनेक धर्मांतरितांच्या चाकरीत होते. पूर्वपरांचा प्रभाव असा असतो की तो एका रात्रीत संपतही नसतो नि सोडताही येत नसतो. महंमद घोरीच्या दरबारातील प्राकृत-अपभ्रंश कवी केशवदास बहुधा अशांपैकीच एक असावा. {{gap}}प्रत्यक्षात हे सर्व आश्रित कवी असत. काहींत प्रखर प्रतिभा असायची तर काही सुमार कवींचाही भरणा असायचा. हिंदी साहित्य इतिहासाच्या पूर्व मध्यकालीन कालखंडात दरबारी आश्रित कवी (चारणकवी) नी लिहिलेले विपुल काव्य आढळते. हे काव्य वीरगाथा काव्य म्हणून ओळखले जाते. या सर्व कवींनी वर्णनपर काव्यांची रचना केल्याचे दिसून येते. पृथ्वीराज चौहानचा समकालीन राजा जयचंद राठोडच्या दरबारात विद्याधर नामक कवी होता. त्याने जयचंदाच्या पराक्रमांचे वर्णन आपल्या काव्यात केले होते असे सांगितले जाते. परंतु हा काव्यग्रंथ मात्र आज अनुपलब्ध आहे. 'पृथ्वीराज रासो' ही वीरगाथा पुढे दीर्घकाळ त्याच्या प्रशंसकांत प्रिय राहिली. त्या काव्यात वेळोवेळी प्रशंसक कवींनी भर घातल्याचे सांगितले जाते. परिणामी आज ‘पृथ्वीराज रासो' काव्यग्रंथाची प्रत उपलब्ध आहे, ती मौलिक (मूळ) मानली जात नाही. कारण ते प्रक्षिप्त काव्य समजलं जातं. कवी जगनिक कृत ‘आल्हा खंड' काव्य हे प्रबंध काव्य आहे. ते कविता नि गीत यामधील काव्यप्रकाराचा नमुना म्हणून पाहिले, अभ्यासले जाते. या काव्याचीही जी प्रत आज उपलब्ध आहे, ती प्रक्षिप्त मानली जाते. ती मूळबरहुकूम नाही. नंतरच्या भर घालणाऱ्या कवींनी तर त्याची भाषाच बदलून टाकल्याचे सांगितले जाते. शारंगधर कवी कृत ‘हम्मीर रासो' असंच प्रसिद्ध वीरकाव्य आहे. त्यात राज हमीर आणि अल्लाउद्दीन खिलजीमध्ये झालेल्या महासंग्रामाचे<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१२९}}</noinclude> poud0064aczeffidrpe13yhf6ijidh2 पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/131 104 26160 234529 142414 2026-08-03T11:04:48Z कल्पनाशक्ती 3813 234529 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>ओजस्वी वर्णन आहे. याच परंपरेतलं ‘बिसलदेव रासो' काव्यही उल्लेखनीय मानले जाते. {{gap}}राजदरबारी कवीत विद्यापतीचे स्थान सर्वोच्च होते. ते मैथिली भाषेचे राजकवी मानले जातात. त्यांनी मिथिला भाषेत सुंदर शृंगाररसपूर्ण काव्यं लिहिली आहेत. मिथिलेचा राजा शिवसिंह आपल्या दरबारात संस्कृत भाषेसही प्रोत्साहन द्यायचा. त्याच्या राजदरबारातील वाचस्पती मिश्रसारख्या पंडितांनी अनेक संस्कृत काव्यं रचली होती. मिथिला राजसभेने संस्कृतला आपल्या दरबारात मानाचे स्थान देऊन मोठे पाठबळ दिले होते. {{gap}}खिलजी आणि तुघलक घराण्याची सत्ता दिल्लीवर असण्याच्या कालखंडात दिल्ली दरबाराने अमीर खुसरोसारख्या कवीला आश्रय दिला होता. या दरबारात पर्शियन भाषेस प्रथमच भारतीय राजकारभारात स्थान मिळाले. तत्कालीन मुस्लीम शासक भारतीय ज्ञान-विज्ञान, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, चिकित्सा शास्त्र, ज्योतिर्विद्येने विशेष प्रभावित झाले होते. महंमद तुघलक स्वतः प्रकांड पंडित होताच, पण तो मोठा जिज्ञासू असल्याचे सांगितले जायचं. तो आपल्या काळातील प्रकांड पंडित, मनीषी मानला जायचा. त्यांच्या दरबारात तत्त्वज्ञान, अन्य ज्ञान-विज्ञानविषयक चर्चा विद्वानांच्या उपस्थितीत होत राहायच्या. वेडा समजला जाणारा महंमद तुघलक मात्र या चर्चेमध्ये सहभागी होत राहायचा हे विशेष. {{gap}}त्याचा उत्तराधिकारी म्हणून गादीवर आलेला फिरोज तुघलकाने भारतीय तत्त्वज्ञान, ज्योतिष, तसेच अन्य अनेक विषयांवरील ग्रंथांची भाषांतरे करून घेतली होती. सिकंदर लोदीच्या काळात त्याने भारतातील अनेक आयुर्वेदासंबंधी, ग्रंथांची भाषांतरे करवून घेतली होती. खिलजी आणि तुघलक घराण्याच्या राजदरबारातील कवी अमीर खुसरो ज्याचा यापूर्वी उल्लेख करण्यात आला आहे, तो बहुमुखी प्रतिभेचा कवी पर्शियन भाषेचा चांगला जाणकार, विद्वान, संगीततज्ज्ञ तसेच जिज्ञासू, ज्ञानपिपासू होता. अमीर खुसरोने ब्रज आणि खडीबोलीसारख्या भाषांत उत्तमोत्तम काव्यरचना केल्या होत्या. त्याची कोडी, रुखवतं, मुकरे प्रसिद्ध आहेत. तो जन्मतः मुसलमान असला तरी हिंदू ज्ञान, संस्कृती, भाषा, तत्त्वज्ञान, संगीताचा जाणकार, निसर्गप्रेमी व प्रशंसक होता. त्याची ब्रजभाषा लालित्यपूर्ण होती. {{gap}}जौनपूरचे स्वतंत्र प्रांतिक मुस्लीम राज्य विद्वानांसाठी तर हक्काचे आश्रयस्थान होते. तिथे विद्वानांचा मानसन्मान प्रतिष्ठा वाढवणारा असायचा. जौनपूर साम्राज्याची दरबारी भाषा पर्शियन असली, तरी अरबी पांडित्य,<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१३०}}</noinclude> akmjivghjk7dohfv8brfp643pxi2fbn पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/132 104 26161 234530 142415 2026-08-03T11:05:57Z कल्पनाशक्ती 3813 234530 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>इस्लामी तत्त्वज्ञान, साहित्य यांचं ते प्रमुख केंद्र होते. तेथील राजा इब्राहिम शर्डीचे या संदर्भातील योगदान अविस्मरणीय होतं. {{gap}}असे, असले तरी त्या वेळच्या बंगालच्या मुस्लीम दरबारांनी आपली वेगळी ओळख जनमानसात रूढ केली होती. त्या दरबारात बंगाली भाषेचा सन्मान केला जायचा. बंगाली विद्वानांना राजाश्रय मिळायचा. बंगाली सुलतानांनी 'रामायण', 'महाभारत'सारख्या संस्कृत ग्रंथांची बंगाली भाषांतरे घडवून आणण्यासाठी अनेक पंडितांना राजदरबाराच्या सेवेत सामावून घेतलेले होते. बंगालच्या गौड प्रांताचा सुलतान नसरत शहाने महाभारताचा बंगाली अनुवाद करून घेतला होता. बंगालचे प्रसिद्ध कवी कृत्तिवासला बंगालच्या सुलतानाने आपल्या राजदरबारात नियुक्त केले होते. मलधर बसू या बंगाली कवीने अनेक गीतांची बंगाली भाषांतरे केल्याचे दिसून येते. त्या कवीस सुलतान हुसेन शहाने आपल्या दरबारात आश्रय दिला होता. बंगालच्या मुस्लीम राजदरबाराने बंगाली भाषेच्या विकासासाठी जे काही करणे शक्य होते, ते सारे केले होते. {{gap}}दक्षिणेकडील विजयनगर साम्राज्याचा अधिपती कृष्णदेवराय स्वतः कवी होता. त्याने तेलुगू भाषा, साहित्याचं सुवर्णयुग निर्माण केले. त्याच्या राजदरबाराच्या प्रोत्साहनामुळेच तेलुगूचा चतुर्दिक विकास झाला. {{gap}}राजदरबाराच्या आश्रयामुळेच खडीबोली हिंदीपासून उर्दूचा जन्म शक्य झाला. हिंदी आणि उर्दू दोन्ही भाषा त्या काळात दक्षिणी (दकनी) नावाने ओळखल्या जायच्या. त्यांना दक्षिणी राज्यांचे पाठबळ लाभल्यानेच त्या विकसित होऊ शकल्या. तिला बाळसे धरल्यावरच ती (दख्खिनी) उत्तरेत जाऊन स्थिरावली. {{gap}}तत्कालीन राजे नि सुलतान आपल्या दरबारी प्रकांड पंडित, कवींच्या सहवासाने सुखावत नि स्वतः गौरवान्वित झाल्याची प्रचिती त्यांना येत असे. वस्तुस्थिती मात्र अशी होती की साहित्याचे उत्कर्ष केंद्र खऱ्या अर्थाने जनतेत होतं. प्रतिभावंत जन्मतः सर्वसाधारण घरात, जनतेत. शिक्षित-अशिक्षित दीन-दलित समजल्या जाणाऱ्या जनतेत ते जन्मत. त्यांचे जीवन हे एखाद्या उत्स्फूर्त आंदोलनासारखं असायचं. त्यांच्यातूनच भक्ती आंदोलनाची धारा उगम पावली. साधू, संत, फकीर, प्रगल्भ ज्ञानींच्या सत्संगाने या जनतेच्या मनात ज्ञान नि प्रेमाची अजस्त्र धारा, प्रवाह निर्माण होत होता. अशा प्रतिभासंपन्न सुपुत्रांत कबीर, नामदेव, रोहिदास, पलटू, नानक, दादूदयाल, तुकाराम, नरसिंह मेहता, चंडिदास, ज्ञानेश्वरसारख्या कितीतरी प्रज्ञापुत्रांची<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१३१}}</noinclude> dg9qs8b7r2ky1r6qya4r07w0uzwhsan पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/133 104 26162 234531 142416 2026-08-03T11:07:28Z कल्पनाशक्ती 3813 234531 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>नावे सांगता येतील. पैकी ज्ञानेश्वर तर भारतीय प्रज्ञापुत्रांपैकी एक होत. त्यांच्या रसार्द्र वाणीने ज्ञान आणि भक्ती, योग आणि प्रेमाची अजस्त्र धारा विशाल जनसमुदायात प्रवाहित होत राहिली होती. महाराष्ट्रातील संत तुकारामांचे अभंग वाचून आजही तिथला सामान्य माणूस आपले मन पवित्र झाल्याचा अनुभव आस्वादत मानव प्रेमात बुडून जातो. नरसी मेहतांची वाणी आजही गुजरातच्या झोपडी-झोपडीत गुंजत असते. असा भारतीय शोधूनही सापडणार नाही ज्याचं मन मीरेची पद ऐकून विकल नाही झाले. जरी ती राजाराणी असली, तरी तिची शब्दकळा सर्वसामान्यांची असायची. ‘गिरिधर के आगे नाचूँगी' म्हणणारी संत मीराबाई युगे युगे भारतीयांच्या हृदयाला प्रेमाने आकंठ स्नान घालत राहील. चंडीदासांची दुःखपूर्ण भक्तिपदे आजही बंगाली जनतेचे डोळे साश्रू होत भक्तीत लीन होत राहात असतात. हृदयाला पाझर फोडणारी, भक्तांचे साश्रू नयन नित्यनत करणारी अशी भक्तिधारा भारत सोडता अन्य देशांत आढळणे अशक्यप्राय! सूरदास, तुलसीदास, रसखान, जायसी तर त्या काळची ज्वलंत नक्षत्रेच होती. {{gap}}कबीराचे कवित्व हा केवळ साहित्यिक महत्त्वाचा विषय नसून त्याचे ऐतिहासिक स्थान अक्षुण्ण असे आहे. निर्भय, स्पष्टवादी, निष्पक्ष, भीडभाड न ठेवणारा कबीर स्वतः मात्र मानवी प्रेमाचा न आटणारा झरा होता. त्यांचे दोहे आपल्यात प्राणाहुती देण्याची ऊर्जा निर्माण करतात. नानक वाणी म्हणजे ईश्वरीय प्रेरणा, ती आपल्यात ज्ञानप्रकाश तेवत ठेवते नि भावनेचा ओलावा जागवते. रोहिदासाच्या विनम्र हृदयात सर्वजण ओलेचिंब होऊन जातात. सेना असो की पलटू ईश्वरीय आभा धारण करत ते प्रेषित होऊन अवतरतात. परंतु त्यांची वृत्ती न अलौकिक होती न राहणीमान! पलटूचे राहणे तर इतके साधे होतं की जर चुकून तो आपल्या घराच्या ओसरीवर आला तर त्याचा अवतार पाहून आपण कदाचित त्याला हाकलून देऊ. {{gap}}त्यामुळेच असेल कदाचित त्या काळात ईश्वरीय रूपाचं वर्णन ‘दरिद्री नारायण' असे केले जायचे. लोकांना वाटायचे की अशा अनवाणी, अकिंचन रूपातच ईश्वर अवतरत असतो. {{gap}}दिल्ली राजवटीतील अनेक राजकीय घटना अनुभवून लोक निराश, उदास होत. परंतु भारतीय प्रतिभांनी, प्रज्ञापुत्रांनी तत्कालीन राजकीय कारकिर्दीकडे लक्ष ठेवले असते तर अशी दुर्दशा झाली नसती. भारतीय धर्मापुढे इतकी आव्हाने उभारली नसती तर कदाचित त्या काळचा अजस्त्र विकास, इतक्या उलथापालथी घडल्या नसत्या. त्या आठवल्या की वर्तमान<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१३२}}</noinclude> oueljmwjrnbn5leoayt09r88s3ujted पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/134 104 26163 234532 142418 2026-08-03T11:08:28Z कल्पनाशक्ती 3813 234532 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>आधुनिक युग त्यापुढे फिके पडते. अन् लक्षात येते की कदाचित त्यामुळेच भारतीय धर्मापुढे हृदयाची आर्द्रता, मानव-प्रेम, जीवनप्रकाश सामावलेला आढळतो. रूढीग्रस्त नि भेदांनी घेरलेला भारतीय माणूस ईश्वराच्या समोर आला की म्हणूनच भेदातीत होऊन जातो. इस्लामचे भारतीयीकरण नि हिंदू धर्माचे इस्लाम प्रभावी रूप या एकमेकांचीच प्रतिबिंबे होत. {{gap}}राजसभांतून निर्माण झालेल्या साहित्यात पांडित्य प्रचुरता, अलंकार प्रियता आणि विलासी वृत्ती दिसून येते. या विरुद्ध सर्वसामान्यांच्या झोपडीत जे काव्य जन्मले ते मात्र छंदमुक्त होते. त्यात काव्यातले जीवन वास्तविक आहे, त्यात सरळ, थेट प्रहार करण्याचे सामर्थ्य आहे. त्या नवोन्मेषी पुकारा आहे, संघर्षशील आक्रोश आणि घर्षणशील आव्हानेही त्यात पुरून उरली आहेत. त्या साहित्यात असलेली माता-बालकांची कारत-करुणा हृदय पिळवटून टाकते. तसेच त्यात एक कृतज्ञ प्रेमही सामावलेले आहे. त्यामुळे आधुनिक काळात ईश्वर भक्तीचा महिमा नसला म्हणून फार काही बिघडेल असे नाही पण त्या साहित्यात थोडीशी हार्दिकता, संवेदना असायला हवी जी आपलं जीवन सुसह्य, आर्द्र, आल्हाददायक नि सरस करेल. {{gap}}त्या काळात संगीत, चित्रकला, वास्तुशास्त्राने विकासाची नवी शिखरे पार केली होती. मोठमोठ्या किल्ल्यांच्या कमानींना या नवकलेमुळे नाजूक नजाकत निर्माण झाली होती. संगीत क्षेत्रात नवी रागदारी निर्माण झाली. कलेला भव्यतेबरोबर कोमलतेचा स्पर्श लाभला. मुसलमानांनी या कलेत आत्मीयता ओतून तिच्यात नव रसांची निर्मिती केली. संगीत कधी हिंद, मुसलमान असतं का? कलेत असा भेद करणे कठीण असते, कारण ती माणसाच्या हृदयाचा सहजोद्गार असते. कलेतून निर्माण होणाऱ्या हास्यास अथवा अश्रूस हिंदू-मुसलमान कसे मानता येणार? मुस्लीम अश्रू, हिंदू हास्य असे कधी असते काय? का नाही? तर कला ही कोण्या हिंदू सरदाराने वा मुस्लीम सुलतानाने निर्माण केलेली नसते. ती जन्मते जनतेतील सर्वसामान्य म्हणून जन्मलेल्या कलाकारातून. कारण ती आपल्या जनतेची सहज अपत्ये होती. म्हणून तर त्यांच्या हृदयात सहज आल्हाददायकता, मानवी एकता, भेदातीतता उपजत होती. त्या काळचे हे योगदान आजच्यापेक्षा काय वेगळं होते? कोणती कमतरता होती का त्यात? ती आजच्यापेक्षा श्रेष्ठ व अमर कला होती. कारण ती काळाच्या विकराळ कसोटीवर तावून-सुलाखून खरी म्हणून जन्मलेली होती. ती अस्सल होती.{{nop}}<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१३३}}</noinclude> tldkjtrky4so80je6ui97bvp1ac3363 पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/135 104 26164 234533 142783 2026-08-03T11:12:53Z कल्पनाशक्ती 3813 234533 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>{{gap}}मध्य आणि पश्चिम आशियाला सुंदर बनवणारे घुमट नि मिनार भारतीय कलाकारांच्या हस्तस्पर्शानी उजळून निघाले. त्यातले निःसंग कोरडेपण केव्हा निघून गेले ते कळलंसुद्धा नाही. त्यात एकप्रकारचं लालित्य आणि कोमलता आपसूक येऊन गेली, पण मजबुती अटळ राहिली. हिंदू-मुस्लिमांच्या संयुक्त प्रयत्नांनी भवन-निर्माण शैलीत एक नवा अध्याय, शैली विकसित झाली.<br> {{gap}}कमानीतून हृदयाची कोमलता डोकावू लागली. बागेत निर्माण केलेल्या हरतऱ्हेच्या झऱ्या कालव्याच्या खुदाईनंतर रचलेल्या बांधकामातील देवळी, कोनशिलांवर कोरण्यात आलेल्या लता-वेली, फुले-पाने, नक्षी साच्यांतून ओघळणारा आनंद, उल्हास, सौंदर्य, कोमलता, कमनीयता या सा-यांनी एका विशाल कलात्मक संवेदनेला जन्म दिला. {{gap}}मध्ययुगाचे हे वैविध्यपूर्ण योगदान अन्य युगांच्या उपलब्धींपेक्षा खचितच आगळे नि सर्वश्रेष्ठ होते. {{rule}} {{gap}}• (टीप : गजानन माधव मुक्तिबोध लिखित ‘भारत : इतिहास और संस्कृति' ग्रंथातील भाग १८- ‘मध्ययुगीन संस्कृति अभ्युत्थान तथा मानव सामंजस्य की प्रतिक्रियाएँ' चे भाषांतर) {{rh|||'''• मुक्तिबोध रचनावली भाग - ६'''<Br>'''भारत : इतिहास और संस्कृति'''<br>राजकमल प्रकाशन प्रा. लि.,<br>नवी दिल्ली- ११०००२<br>प्रथम आवृत्ती - १९८०<br>मूल्य रु. ३०/}}<br><br><br> {{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/१३४}}</noinclude> tu63sk3ma3bqz05smmiilinlcr6cfn7 अनुक्रमणिका:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf 106 68603 234496 232749 2026-08-03T05:17:40Z कल्पनाशक्ती 3813 234496 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=[[सज्जनगड व समर्थ रामदास]] |Language=mr |Volume= |Author=[[गोविंद चिमणाजी भाटे]] |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=गोविंद चिमणाजी भाटे |Address=पुणे |Year=1918 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=T |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] 5b3guoerm7cqp286461hw1ve3kqkn7d 234497 234496 2026-08-03T05:25:53Z कल्पनाशक्ती 3813 234497 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=[[सज्जनगड व समर्थ रामदास]] |Language=mr |Volume= |Author=[[गोविंद चिमणाजी भाटे]] |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=गोविंद चिमणाजी भाटे |Address=पुणे |Year=1918 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=T |Pages=<pagelist 6 ="पुण्याहून सज्जनगडचा प्रवास" 19="सज्जनगडाचे सद्यःकालीन व पूर्वकालीन स्वरूप" 27="रामदासांच्या महातीबद्दलची भिन्न मतें" 31="दासबोधाच्या १ ते ७ दशकांचा सारांश" 42="आठवा ज्ञानदशक" 44="दशक ९ ते १५" 64="दशक १६ ते २०" 78="समग्र दासंबोधाचे सिंहावलोकन" 85="रामदासांचे संक्षिप्त चरित्र" 102="रामदास व शिवाजी यांचा संबंध" 125="परिशिष्ट" /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] mwihil1y3ww4yfyvif7so32m61ky2pr पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९९ 104 85863 234455 234452 2026-08-02T12:02:57Z कल्पनाशक्ती 3813 234455 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>महाराष्ट्रांतील मोरया देव व इतर साधुसंत यांची ज्याप्रमाणें या बाबतींत अनुमति घेतली त्याप्रमाणें रामदासांचीहि घेतली होती असें वर्णन केले आहे.<br>{{gap}}१६७८ मध्ये शिवाजी रामदासास भेटावयास गेले होते. तेव्हां रामदासांनी महाराजांस लोक जो 'जोहार' करतात त्या ऐवज 'राम राम' म्हणत जावें असें म्हटलें. तेव्हांपासून रामरामाची पद्धति सुरू झाली. याच प्रसंगी शिवाजीनें रामदासांस परळी किल्ल्यावर रहाण्यास येण्यास विनंति केली. त्या वेळी रामदासांनीं चाफळचे रामजीचे उत्साहाचा बंदोबस्त करावा असें शिवाजीस सांगितले व त्यानें चाफळच्या मठास गांव इनाम करून दिलें.<br>{{gap}}इतक्याच दोन तीन प्रसंगाचें चिटणिसांनी आपल्या बखरींत वर्णन केले आहे. हनुमान स्वामीच्या बखरींत रामदास शिवाजीच्या विनंतीवरून १६५० मध्यें परळीस राहावयास गेले असे वर्णन आहे. अर्थात् हे विधान ऐतिहासिकदृष्टया खोटें (कारण शिवाजीच्या सर्व बखरींप्रमाणें परळी किल्ला चंदनवंदन व साताऱ्या किल्याबरोबरच १६७३ मध्ये शिवाजीच्या ताब्यात आला) म्हणून चिटणीसानीं आपल्या बखरींतून वगळले आहे व ऐतिहासिक गोष्टींशी जुळे अशा तऱ्हेनेंच रामदासांच्या सज्जनगडनिवासाची हकीकत दिली आहे.<br>{{gap}}अफजूलखानाच्या वधानंतर शिवाजीमहाराज रामदासांस परळीस भेटावयास गेले व त्या वेळी त्यांनीं कांहीं गांव इनाम करून दिले ही आख्यायिका; त्याचप्रमाणें शिवाजीनें रामदासांस राज्यदान केल्याची आख्यायिका या विश्वसनीय नाहीत म्हणून चिटणिसांना सोडून दिल्या असाव्यात. यावरून चिटणिसांनीं शिवाजीची बखर लिहितांना बरीच ऐतिहासिक दृष्टि ठेविली होती असे दिसतें. अर्थात् अशी दृष्टि आपल्या आराध्य दैवताचें देव्हारें माजविण्याकरितां लिहिलेल्या हनुमानस्वामींच्या बखरींत नाहीं हे उघड आहे. त्यांतील किती तरी गोष्टी अशक्य असंभाव्य व ऐतिहासिक सत्यास न जुळणाऱ्या अशा आहेत. त्यांची येथें चर्चा करण्याचें प्रयोजन नाहीं. पण त्या गोष्टी रामदासांचें महत्त्व वाढविण्याकरितां<noinclude></noinclude> imqevtjg2p8gn2wayhtlp2cnt8pq9jr पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०० 104 85864 234453 230650 2026-08-02T11:59:28Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234453 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|९५}} {{rule}}</noinclude>बनावट केलेल्या आहेत व शिवाजीच्या चरित्रांतील गोष्टी समाजांत प्रचलित झाल्यानंतर त्यांना जुळतील अशा तऱ्हेनें त्या बनविलेल्या आहेत हे मागें दिलेल्या रामदासांनीं भवानी देवीस शिवाजीच्या अंगांत येण्यास सांगितल्याबद्दलच्या आख्यायिकेच्या खालील विवेचनावरून दिसून येईल.<br>{{gap}}शिवाजीवर भवानी देवीची कृपादृष्टि होती व बिकट प्रसंगी ती शिवाजीच्या अंगांत येऊन त्याला सल्लामसलत देत असे व शिवाजी तदनुरूप वर्तन करीत असे ही गोष्ट शिवाजीच्या आयुष्यांतील एक अलौकिक गोष्ट होती. तिचें वर्णन शिवाजीच्या सर्व बखरकारांनी सारख्याच तऱ्हेनें केलेले आहे. ही शिवाजी बद्दलची गोष्ट शिवाजीच्या काळापासून समाजांत प्रचलित असावी. शिवाजीचा व रामदासस्वामींचा गुरुशिष्यसंबंध होता व त्या संबंधाप्रमाणें शिवाजी रामदासांस सर्व बाबतीत सल्लामसलत विचारी व त्यांची आज्ञा पाळी अशा प्रकारची दंतकथा रामदासांच्या पंथांत प्रचलित झाली किंवा प्रचलित केली गेली; तेव्हां शिवाजीच्या आयुष्यांतील भवानीच्या आख्यायिकेशीं तिचा विरोध येऊं लागला. बरें जनमनांत मुरलेली भवानीच्याबद्दलची आख्यायिका बदलणे शक्य नव्हते. तेव्हां या जुन्या आख्यायिकेला बाध न येई अशा तऱ्हेनेंच रामदासांना महत्त्व देणारी आख्यायिका रचण्यांत आली असे म्हणणें प्राप्त आहे. कारण अशी कल्पना करा की शिवाजीच्या आयुष्यांत अशी आख्यायिका नव्हती व शिवाजीची निस्सीम शिष्यभक्ति व रामदासांचें महत्त्व दाखविण्याकरितांच ही आख्यायिका रचावयाची असती तर ती खालीलप्रमाणें रचणें स्वाभाविक व कल्पकतेला अनुरूप होतें.<br>{{gap}}शिवाजीचा निश्चय कीं, स्वामींची आज्ञा झाल्याखेरीज कोणतेंहि काम सर्वथैव कर्तव्य नाहीं. गलीम लढाई करून आला असें तर संकट प्राप्त झालें. शिवाजी तर कारभाऱ्याचें ऐकेना; तेव्हां रामदास एकदम प्रगट होऊन शिवाजीस म्हणाले, "तूं हा राज्यकारभार करतोस, यांत कोणेंसमयी कसा प्रसंग येईल याचा नेम नाहीं. आम्हीं तर तुम्हांपाशीं सतत नसणार व तुमचा नेम तर असा आहे; तो चालणार नाहीं. या करितां जसा प्रसंग येईल तशी मसलत करून काम करीत असावें." यावर शिवाजी<noinclude></noinclude> 1zi7dayonwnathbooieoxqbswrlyfo0 पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०१ 104 85865 234454 230652 2026-08-02T12:01:21Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234454 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>महाराज बोलले कीं प्राण जावो अथवा राहो दौलतीचा तो विषय किती आज्ञेवांचून पाऊल हीं पुढें पडावयाचें नाहीं.<br>{{gap}}शिवाजीचा याप्रमाणें निश्चय पाहून रामदासांनी म्हटलें, "माझें परम दैवत राम किंवा हनुमान हा तुझ्या अंगांत येऊन तुझ्या अडचणीच्या प्रसंगी तुला सल्लामसलत देईल ती माझीच आज्ञा समजून तूं तदनुरूप वर्तन कर."<br>{{gap}}स्वतंत्रपणे आख्यायिका रचावयाची असती तर ती अशा तऱ्हेची नसती काय? या आख्यायिकेंत शिवाजीची शिष्यभक्ति व रामदासांची महती दिसून आली नसती काय? शिवाय बखरींप्रमाणे पहातां रामदासांला आपल्या आराध्य दैवताचा फार अभिमान असे, इतका कीं तो पंढरपुर/ सारख्या तीर्थास राम नाहीं म्हणून कित्येक काळपर्यंत गेला नाहीं. या एकाच गोष्टींत रामदासांस भवानी देवीचाच उमाळा कां आला तर याचा अर्थ इतकाच कीं शिवाजीच्या जुन्या आख्यायिकेस टाकून देणें शक्य नव्हतं म्हणून त्या आख्यायिकेला धरून ही रामदासांच्या महत्त्वाबद्दलची आख्यायिका रचावी लागली. असो.<br>{{gap}}वरील विवेचनावरून हनुमानस्वामींची बखर ऐतिहासिकदृष्ट्या ग्राह्य नाहीं; ती व्रतमाहात्म्य किंवा देवतामाहात्म्य याप्रमाणें दंतकथांनी व भाकडकथानीं भरलेली आहे. तेव्हां अवांतर ऐतिहासिक पुराव्यावांचून त्यांतील हकीकतीवर विश्वास ठेवणें रास्त नाहीं हें उघड आहे. तरी शिवाजीचा व रामदासांचा संबंध खरोखरी कशा प्रकारचा होता व तो केव्हांपासून घडून आला या वादग्रस्त प्रश्नाचा ऐतिहासिकदृष्ट्या आतां ऊहापोह करूं.<br><br>{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> 7salpx1m93n3m5fkag58ymgbqhnot98 पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०२ 104 85866 234456 230655 2026-08-02T12:41:31Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234456 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|९७}} {{rule}}</noinclude><br>{{center|{{larger|'''१०'''}}}} {{gap}}'''शि'''वाजी महाराज व समर्थ रामदास यांचा संबंध कशा प्रकारचा होता-म्हणजे रामदास हे शिवाजीचे स्फूर्तिदाते राजकारण गुरु होते किंवा निव्वळ गुरुमंत्र देणारे मोक्षगुरु होते, हा पहिला वादग्रस्त प्रश्न आहे व तो संबंध केव्हां घडला हा दुसरा वादग्रस्त प्रश्न आहे. पण पहिल्या प्रश्नाचा आस्तिकपक्षी निकाल केला म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचा निर्विकार मनानें विचार करणे कठीण जाते. कारण मग शिवाजी व रामदास यांची भेट पूर्ववयांतच झाली असली पाहिजे असे मानण्याकडे मनाचा ओढा होतो; इतकेच नव्हे तर दुसऱ्या प्रश्नाच्या पुराव्याची ओढाताण करून व क्लिष्ट कल्पना काढून तो पहिल्या प्रश्नाच्या निकालाशी जुळता करून घेण्याचा मोह उत्पन्न होतो. म्हणून या दोन्ही प्रश्नांच्या समाधानकारक निकालाकरितां दुसऱ्या प्रश्नाची चर्चा आधी करणें इष्ट आहे. ती निर्विकार मनानें झाल्यावर मग पहिला प्रश्न सोडविण्याचें काम कठीण नाहीं. करितां रामदास व शिवाजी यांच्या प्रथमभेटीच्या कालाच्या प्रश्नाकडे वळू.<br>{{gap}}रामदासाच्या शिष्यसांप्रदायाच्या श्रद्धाळू दृष्टीनेंच पहावयाचे असल्यास हा प्रश्न वादग्रस्तच नाहीं. कारण हनुमानस्वामींनीं शिवाजीची व रामदासांची शिंगणवाडीस शके १५७१ विरोधीनाम संवत्सरे (सन १६४९) वैशाख शु० नवमी गुरुवार रोजीं भेट झाली व तेव्हांच त्यांनी शिवाजी महाराजांना त्रयोदशाक्षरी मंत्र दिला असे विधान केलें आहे. पण ऐतिहासिक दृष्टीनें हनुमानस्वामींची बखर असत्योक्ति व अतिशयोक्ति या दोषद्वयानें दूषित असल्यामुळे या निव्वळ सांप्रदायी पुराव्यावर भरंवसा ठेवून भेटीचा काल निश्चित आहे असें म्हणणे बरोबर नाहीं. पण हा कालनिर्णय रामदास शिवाजीचा राजकारण गुरु होता या मतास अनुकूल असल्यामुळे सत्कार्योत्तेजक सभेचे उत्साही चिटणीस रा. देव व प्रसिद्ध इतिहास संशोधक रा. राजवाडे यानीं तो स्वीकारून त्या निर्णयाच्या पुष्टीकरितां ऐति-<noinclude><br>{{gap}}स...७</noinclude> l527egfgzdc6ugjbtzrn7zbp1yda9fb पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०३ 104 85867 234457 230769 2026-08-02T12:44:39Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234457 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>हासिक पुरावा पुढे आणण्याचा किंवा पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुराव्याचा भर मुख्यतः चार कागदपत्रांवर आहे; त्यापैकी एक पत्र जुनें सांप्रदायिक आहे; व दुसरीं तीन ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध करतांना अलीकडे सांपडलेली आहेत. पहिले तुकारामाचें शिवाजीस ओवीबद्ध पत्र; दुसरें शिवाजीचें सनदवजा रामदासांस पत्र; तिसरें शिवाजीच्या रामदासांशीं रायगडीं एकांतांत झालेल्या भेटीच्या उल्लेखाचें पत्र व शेवटचें व रा. राजवाडे यांच्या मती या वादाचें निर्णायक असे रामदासांच्या मरणानंतर लिहिलेले चाफळ मठांतील एक कच्चे टिपण. आतां या पत्रांचा क्रमानें विचार करूं.<br>{{gap}}तुकारामानें शिवाजीस लिहिलेले हें पत्र हनुमानस्वामींच्या बखरीप्रमाणें शिवाजीस रामदासांचा अनुग्रह झाल्यानंतर बऱ्याच काळानें लिहिलेले आहे, असे बखरीवरून दिसतें. पत्रांतील खालील ओव्यांवरूनही ही गोष्ट स्पष्ट दिसते.<br> {{block center|<poem>सद्गुरु श्रीरामदासाचें भूषण । तेथें घाली मन चळो नको ॥ बहतां ठायीं वृत्ति चाळविली जेव्हां। रामदास्य तेव्हां घडे कैचें ॥ राया छत्रपति ऐकावें वचन । रामदासी मन लावी वेगें ॥ रामदासस्वामी सोयरा सज्जन । त्याशीं तनमन अर्पी बापा ॥ मारुती अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुज लागी ॥</poem>}} {{gap}}परंतु तुकाराममहाराज सन १६४९ फार तर १६५१ मध्यें वैकुंठवासी झाले असें ऐतिहासिक पुराव्यावरून ठरले आहे. तेव्हां हे पत्र तुकारामांनी लिहिलेले दिसत नाहीं. तुकारामांच्या हयातींत हे पत्र खरोखरी लिहिलेले आहे असे मानल्यास रामदास व शिवाजीची भेट सन १६४९ पूर्वीच पुष्कळ काळ झाली असली पाहिजे, असें अनुमान करावें लागतें. सारांश हें पत्र सांप्रदायिक हकीकतीतीलच असल्यामुळे भेटीच्या कालनिर्णयाच्या वादांत स्वतंत्र ऐतिहासिक पुरावा म्हणून ग्राह्य धरतां येत नाहीं.<br>{{gap}}आतां शिवाजीच्या सनदवजा पत्राकडे वळूं. त्यांतील या वादासंबंधाचा मजकूर असा आहे.{{nop}}<noinclude></noinclude> irdmwgy33fju0ndfkb4uzbhn4unwkxo पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०४ 104 85868 234458 230772 2026-08-02T12:47:47Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234458 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|९९}} {{rule}}</noinclude>{{gap}}"चरणरज शिवाजी राजे यांनी चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे मजवर कृपा करूनु सनाथ केलें आज्ञा केली कीं तुमचा मुख्य धर्म राज्य साधन करुनु धर्म स्थापना देव-ब्राह्मणांची सेवा प्रजेची पीडा दूर करून पाळण रक्षण करावें हें व्रत संपादून त्यांत परमार्थ करावा तुम्हीं जें मनीं धराल तें श्री सिद्धीस पाववील त्याजवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक लोकांचा नाश करावा विपुल द्रव्य करुनु राज्यपरंपरा अक्षई चालेल ऐशीं स्थळे दुर्घट करावी ऐसें जें जें मनीं धरलें तें तें स्वामीनीं आशीर्वादप्रतापें मनोरथ पूर्ण केलें या उपरि राज्य संपादिलें तें चरणीं अर्पण करुनु सर्वकाळ सेवा घडावी ऐसा विचार मनीं आणिला तेव्हां आज्ञा झाली कीं तुम्हांस पूर्वी धर्म सांगितले तेच करावे तीच सेवा होय ऐसें आज्ञापिलें यावरून निकट वास घडुनु वारंवार दर्शन घडावें श्रीची स्थापना कोठें तरी होऊनु सांप्रदाय शिष्य व भक्ति दिगंत विस्तीर्ण घडावी ऐशी प्रार्थना केली तेही आसमंतात गिरिगव्हरीं वास करुनु चाफळी श्री ची स्थापना करुनु सांप्रदाय शिष्य दिगंत विस्तीर्णता घडली."<br>{{gap}}हें पत्र सन १६७९ मधलें आहे हे ध्यानांत ठेविले म्हणजे या पत्राचा पुरावा प्रथम भेटीच्या प्रश्नासंबंधानें शून्य आहे हें सहज समजेल. कारण शिवाजीसारखा शिष्य रामदासांची भेट केव्हांही झाली असली तरी आपल्याच आशीर्वादाने सर्व झालें असें सौजन्यानें म्हणेल हे उघड आहे. शिवाजीनें राज्य अर्पण केल्यावर रामदासांनी राज्य करण्याचाच उपदेश केला हा उल्लेखही पुढल्या गोष्टीला लागू आहे. निकटवासाचा उल्लेख परळीकडे स्वाभाविकपणें जातो. कारण चाफळच्या मानानें परळी प्रतापगडास जवळ आहे. पुढल्या वाक्यांत रामदासांनी चाफळीं श्रीची स्थापना करून शिष्य सांप्रदाय वाढविल्याचें विधान आहे. निकट-वासाची विनंति आहे व चाफळबद्दलचें विधान आहे. पण रा. देव यानीं या पत्राचा अर्थ करतांना या दोन वाक्यांत कार्यकारणभावाचा अर्थ लावला आहे. व असा अर्थ लावण्याकरितां पत्रांतील 'तेही' या शब्दाचा 'तेव्हां म्हणून' असा अर्थ घरला आहे. पण 'तेही' याचा खरा अर्थ 'त्यांनी' असा आहे. व हा खरा अर्थ घेतला म्हणजे निकटवासाची विनंति व<noinclude></noinclude> hu38t72rv4jmjpmo0jlmiuczbifuk3r पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०५ 104 85869 234459 230774 2026-08-02T12:50:22Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234459 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१००|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>मठस्थापनेचें विधान असा सरळ अर्थ लागतो. पण 'तेही' चा 'तेव्हां' असा अर्थ करून निकटवास घडण्याकरितां चाफळास रामदासस्वामींनीं शिवाजीच्या विनंतिवरून मठ स्थापना केली असा रा. देव अर्थ करतात. परंतु असा अर्थ केल्यास 'निकट' या सापेक्ष शब्दाला अन्वर्थकत्व राहत नाहीं. व चाफळचा मठ स्थापन होण्यापूर्वी शिवाजीची व रामदासांची भेट झाली होती व त्यानें रामदासांस आपले सर्व राज्य अर्पण केलें होतें असा सांप्रदायिक हकीकतीचेही पलीकडे जाणारा विचित्र अर्थ निष्पन्न होतो. सारांश या पत्राचा शिवाजीच्या व रामदासांच्या भेटीच्या कालनिर्णयाला काडीचाही उपयोग नाहीं.<br>{{gap}}रा. राजवाडे यांनी प्रसिद्ध केलेले तिसरें पत्र याची हीच अवस्था आहे. शिवाजी व रामदासाची रायगडी राज्याभिषेक झाल्यावर एकांतीं भेट होते या उल्लेखावरून त्यांच्या प्रथम भेटीच्या कालनिर्णयाच्या प्रश्नावर कांहींच उजेड पडत नाहीं.<br>{{gap}}रा. राजवाडे यांनी रामदासांच्या चरित्रांतील प्रसंगाचें जें टिपण छापले आहे तें अनुक्रमणिका वजा आहे. ती हकीकत हनुमानस्वामींनीं वर्णिलेल्या दंतकथांच्या हकीकतीशीं बहुतेक तंतोतंत जुळते. यावरून हनुमानस्वामींनी आपले रामदासांचें चरित्र लिहितांना ज्या पूर्व चरित्रांचा उपयोग केला होता अशा एखाद्या चरित्राची हें टिपण अनुक्रमणिका असावें. रा. राजवाडे यांनी हें टिपण रामदासांच्या मरणानंतर थोड्याच दिवसांनी लिहिलेले आहे या गोष्टीवर बराच जोर दिला आहे. शिवाय ज्या अर्थी तें टिपण इतके जुनें आहे त्याअर्थी त्यांत दिलेले शक खरेच असले पाहिजेत व ज्या अर्थी हनुमानस्वामीनी दिलेला व या टिपणांत दिलेला काल अगदी तंतोतंत जमतो त्या अर्थी हनुमानस्वामींच्या बखरींतील काल हा ऐतिहासिक सत्य ठरतो; असें रा. राजवाडे यांनी कंठरवानें सांगितलें आहे. पण हें टिपण चाफळ मठांतले आहे व त्यांत समर्थ सांप्रदायांत रामदासासंबंधी प्रचलित असलेल्या सर्व दैवी चमत्कारांच्या अशक्य व असंभाव्य गोष्टींचा हनुमानस्वामींच्या बखरीप्रमाणेंच उल्लेख आहे. म्हणजे असत्योक्ति व अतिशयोक्ति हे दोष या टिपणावरही येतात. सारांश, हें टिपण सांप्र-<noinclude></noinclude> dyjo5pmzydderbsm190om5qp9iep27j पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०६ 104 85870 234460 230779 2026-08-02T12:54:07Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234460 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१०१}} {{rule}}</noinclude>दायिक पुराव्यांतील आहे. त्याला स्वतंत्र ऐतिहासिक कागदोपत्री पुरावा मानतां येणार नाहीं. शिवाय हनुमानस्वामींच्या बखरीतील भेटीच्या कालनिर्देशाला जे ऐतिहासिक आक्षेप आहेत ते या टिपणांतील कालनिर्देशालाही तितकेच लागू आहेत. तेव्हां आतां सांप्रदायिक कालनिर्देश चुकीचा कां व कसा आहे याच्या विचारास लागूं.<br>{{gap}}हनुमानस्वामींच्या बखरींत या भेटीच्या प्रसंगाचें सविस्तर वर्णन दिलें आहे तें असें.<br>{{gap}}शिवाजी महाराज रायगडाखालीं असतां त्यांनी एका साधूचें कीर्तनांत 'सद्गुरुवांचून सद्गति नाहीं' हें तत्व ऐकलें. तेव्हांपासून त्यांना सद्गुरुं शोधण्याचा नाद लागला. तेथून प्रतापगडावर आल्यावर श्रीभवानी देवी शिवाजीच्या स्वप्नांत येऊन तिनें रामदासाला शरण जा अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे महाराज चाफळास गेले. पण रामदासांची भेट झाली नाहीं. मात्र तेथल्या शिष्यांनी देवस्थापनेची हकीगत सांगतांना महाराजांकडून तीनशें होन मिळाळे आहेत असे सांगितलें, महाराजांनी देवळाशेजारचा ओढा देवळास इजा करण्यासारखा आहे असे पाहून सातशें होन तो ओढा वळवून देण्याकरितां तेथल्या अधिकाऱ्याच्या स्वाधीन केले व प्रतापगडास सचिंत मानसें परत आले. पण त्यांना रामदासांचा निजध्यास लागला. तेव्हां एकदां रामदासांनी शिवाजीला स्वप्नांत दर्शन देऊन प्रसाद म्हणून नारळ अर्पण केला. पुन्हां भेटीचा प्रयत्न करण्याचा निश्चय करून शिवाजी प्रतापगडाहून महाबळेश्वरीं आले. तेथून वांईस येऊन माहुलीस त्यांनी दोन दिवस मुक्काम केला. इतक्यांत रामदासांकडून खालील आशयाचें ओवीबद्ध पत्र शिवाजीस आलें:- {{block center/s}}निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसि आधारू ।<br> अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥<br> परोपकाराचिया राशी । उदंड घडती जयाशी ।<br> जयाचे गुण महत्त्वाशी । तुलना कैंची ॥<br> नरपती, गजपती, हयपती । गडपती, भूपती, जलपती ।<br> पुरंदर आणि शक्ती | पृष्ठभागीं ॥<br><noinclude>{{block center/e}}</noinclude> jyoqg84nffwndoyqe5q4hwqbifbgmx8 234461 234460 2026-08-02T12:54:33Z कल्पनाशक्ती 3813 234461 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१०१}} {{rule}}</noinclude>दायिक पुराव्यांतील आहे. त्याला स्वतंत्र ऐतिहासिक कागदोपत्री पुरावा मानतां येणार नाहीं. शिवाय हनुमानस्वामींच्या बखरीतील भेटीच्या कालनिर्देशाला जे ऐतिहासिक आक्षेप आहेत ते या टिपणांतील कालनिर्देशालाही तितकेच लागू आहेत. तेव्हां आतां सांप्रदायिक कालनिर्देश चुकीचा कां व कसा आहे याच्या विचारास लागूं.<br>{{gap}}हनुमानस्वामींच्या बखरींत या भेटीच्या प्रसंगाचें सविस्तर वर्णन दिलें आहे तें असें.<br>{{gap}}शिवाजी महाराज रायगडाखालीं असतां त्यांनी एका साधूचें कीर्तनांत 'सद्गुरुवांचून सद्गति नाहीं' हें तत्व ऐकलें. तेव्हांपासून त्यांना सद्गुरुं शोधण्याचा नाद लागला. तेथून प्रतापगडावर आल्यावर श्रीभवानी देवी शिवाजीच्या स्वप्नांत येऊन तिनें रामदासाला शरण जा अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे महाराज चाफळास गेले. पण रामदासांची भेट झाली नाहीं. मात्र तेथल्या शिष्यांनी देवस्थापनेची हकीगत सांगतांना महाराजांकडून तीनशें होन मिळाळे आहेत असे सांगितलें, महाराजांनी देवळाशेजारचा ओढा देवळास इजा करण्यासारखा आहे असे पाहून सातशें होन तो ओढा वळवून देण्याकरितां तेथल्या अधिकाऱ्याच्या स्वाधीन केले व प्रतापगडास सचिंत मानसें परत आले. पण त्यांना रामदासांचा निजध्यास लागला. तेव्हां एकदां रामदासांनी शिवाजीला स्वप्नांत दर्शन देऊन प्रसाद म्हणून नारळ अर्पण केला. पुन्हां भेटीचा प्रयत्न करण्याचा निश्चय करून शिवाजी प्रतापगडाहून महाबळेश्वरीं आले. तेथून वांईस येऊन माहुलीस त्यांनी दोन दिवस मुक्काम केला. इतक्यांत रामदासांकडून खालील आशयाचें ओवीबद्ध पत्र शिवाजीस आलें:- {{block center/s}}निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसि आधारू ।<br> अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥<br> परोपकाराचिया राशी । उदंड घडती जयाशी ।<br> जयाचे गुण महत्त्वाशी । तुलना कैंची ॥<br> नरपती, गजपती, हयपती । गडपती, भूपती, जलपती ।<br> पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागीं ॥<br><noinclude>{{block center/e}}</noinclude> jd6li22pzy3rqqde7c2kgryiksiwkxn पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०७ 104 85871 234462 230823 2026-08-02T13:00:16Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234462 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}} {{block center/s}}</noinclude>यशवंत, कीर्तिवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत ।<br> पुण्यवंत आणि जयवंत । जाणता राजा ॥<br> आचारशील, विचारशील । दानशील, धर्मशील ।<br> सर्वज्ञपणें सुशील । सर्वांठायी ॥<br> धीर उदार सुंदर । शूर क्रियेशि तत्पर ।<br> सावधपणेंचि नृपवर । तुच्छ केले ॥<br> तीर्थक्षेत्रें तीं मोडिलीं । ब्राह्मणस्थानें बिघडिली ।<br> सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥<br> देवधर्म गोब्राह्मण । करावयासी रक्षण ।<br> हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥<br> उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक ।<br> धूर्त तार्किक सभानायक । तुमचे ठायीं ॥<br> या भूमंडळाचे ठायीं । धर्म रक्षी ऐसा नाहीं ।<br> महाराष्ट्र धर्म राहिला कांहीं । तुम्हांकरितां ॥<br> आणखी कांहीं धर्म चालती । श्रीमंत होऊनि कितेक असति ।<br> धन्य धन्य तुमची कीर्ति । विश्वीं विस्तारली ॥<br> कितेक दुष्ट संहारिला । कितेकांस धाक सुटला ।<br> कितेकांसि आश्रय जाहला । शिव कल्याण राजा ॥<br> तुमचे देशीं वास्तव्य केलें । परंतु वर्तमान नाहीं घेतलें ।<br> ऋणानुबंधे विस्मरण जहालें । बा काय नेणुं ॥<br> सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति । सांगणें काय तुम्हां प्रती ।<br> घर्मस्थापनेची कीर्ति । सांभाळिली पाहिजे ॥<br> उदंड राजकारण नटलें । तेथें चित्त विभागले ।<br> प्रसंग नसतां लिहिलें । क्षमा केली पाहिजे ॥{{block center/e}} {{gap}}या पत्राचें उत्तर त्याच शिष्याबरोबर पाठवून शिवाजी चाफळास आले. व तेथून शिंगणवाडीचे मारुतीजवळ गेले. शिवाजीचें पत्र आणि शिवाजी बहुतेक बरोबरच पोंचले. शिवाजीची व रामदासांची तेथे भेट झाली व शिवाजीनें अनुग्रह मागितला. कल्याण गोसाव्याच्या सम्मतीनें रामदासांनी-<noinclude></noinclude> ett1ue44cft2u140uj3sw8nbsrmm7pe पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०८ 104 85872 234463 230825 2026-08-02T13:02:32Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234463 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१०३}} {{rule}}</noinclude>अनुग्रह देण्याचे ठरविलें. शिवाजी महाराजांस दिवाकर गोसावी यानें पूजा सांगितली. रामदासांनी महाराजांस त्रयोदशाक्षरी मंत्रानुग्रह केला व दासबोधांतील तेराव्या दशकांतील सहाव्या समासांत सांगितलेला लघुबोध केला. नंतर शिवाजीनें रामदासांस पुष्कळ गुरुदक्षिणा दिली आणि रामदासांनी शिवाजी महाराजांस मेजवानी दिली. ही भेट शके १५७१ (सन १६४९) विरोधीनाम संवत्सरे वैशाख शुद्ध ९, गुरुवारी झाली.<br>{{gap}}याप्रमाणे बखरींतील वर्णन आहे. यावरून भेटीच्या वेळी शिवाजीनें प्रतापगड बांधून तेथें श्रीभवानीची स्थापना केली होती, त्याच्या ताब्यांत कोंकणपट्टी आली होती; तसेच सातारा-माहुली-वाई हा प्रांतही त्याच्या ताब्यांत आला होता, असे म्हणणें सहजच प्राप्त आहे. पण या सर्व गोष्टी शके १५८३|८४ म्हणजे सन १६६२ नंतरच्या आहेत. रामदासांनी शिवाजीस लिहिलेले पत्रही विचार करण्यासारखे आहे. त्यांत विशेषतः शिवाजीला जलपति असे म्हटले आहे. हें विशेषण शिवाजीनें समुद्रकांठी किल्ले बांधून आरमार तयार केल्यानंतर त्याला अन्वर्थक होईल. इतिहासाप्रमाणे शिवाजीने किल्ले व आरमार शके १५८५|८६ म्हणजे सन १६६३/६४ त बांधलें हेंहि निर्विवाद आहे.<br>{{gap}}तेव्हां शिवाजीच्या व रामदासांच्या भेटीच्या वेळची बखरींत लिहिलेली परिस्थिति व सन १६४९ हा भेटीचा काळ यांचा मेळ मुळींच बसत नाहीं व म्हणून हा सांप्रदायिक कालनिर्देश चुकीचा आहे असे म्हणणें प्राप्त आहे.<br>{{gap}}हीच गोष्ट दासबोधावरूनही सिद्ध होते. समग्र दासबोधाचें जें मागें सिंहावलोकन केले आहे, त्यांत असे दाखविले आहे कीं, रामदासांनीं प्रथमतः आठच दशक दासबोध लिहिला असावा व या आठ दशकांत केवळ आध्यात्मिक उपदेश असल्यामुळे या ग्रंथाचे पूर्वी रामदास आणि शिवाजी यांची भेट झाली असेल हें शक्य दिसत नाहीं. कारण अशी भेट जर खरोखरी झाली असती तर त्यांच्या भेटीचा रामदासांच्या मनावर परिणाम झाला असता. निदान शिवाजीच्या राजकारणाच्या उद्योगाची रामदासांस महती वाटूं लागून त्यांच्या उपदेशांत या उद्योगाची छटा अवश्यमेव उमटली असती. व ती दासबोधांत प्रथमपासूनच दिसली<noinclude></noinclude> czymjkmfblwxsllswte1260dd2hzjpe पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०९ 104 85873 234464 230827 2026-08-02T13:05:01Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234464 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>असती. पण दासबोधावरून तसें दिसत नाहीं. आतां दासबोधाचा रचनाकाल आनुषंगिक रीतीनें दासबोधांत आला आहे.<br>{{gap}}दासबोधाच्या सहाव्या दशकाच्या चवथ्या समासाचे प्रारंभी युगाची कालगणना सांगितली आहे त्यांत खालील ओवी आहे:- {{block center|<poem>चार सहस्र सातशें साठी । इतुकी कलियुगाची राहाटी । उरल्या कलियुगाची गोष्टी । ऐसी असे ॥</poem>}} {{gap}}म्हणजे हा दशक लिहितांना कलीयुगाचीं चार हजार सातशें साठ वर्षे झालीं होतीं. ही कलियुगाची कालगणना वराहमिहिरापासून चालत आली असून आपल्या हल्लींच्या पंचागांत गतकली दिलेला असतो. त्यावरून रामदास ज्यासाली दासबोधाचा सहावा दशक लिहीत होते तें साल शके १५८१ (सन १६५९) होतें असें म्हणणें भाग आहे. बखरींतील हकीकतीत तर सन १६४९ मध्ये म्हणजे प्रथमभेटीचे वेळीं रामदासांनी शिवाजीला तेराव्या दशकांतील लघुबोध नांवाच्या समासांतील उपदेश केला असे म्हटलें आहे. म्हणजे बहुतेक दासबोध रामदासांनी १६४९ पूर्वीच पुरा केला असला पाहिजे असा बखरीतील हकीकतीवरून तर्क होतो. अर्थात बखरींतील भेटीचा कालनिर्देश चुकीचाच असला पाहिजे असे या दासबोधाच्या अन्तःप्रमाणावरून ठरतें.<br>{{gap}}बखरीतील कालनिर्देश चुकीचा आहे हे म्हणणे आणखी एका ऐतिहासिक गोष्टीनें सिद्ध होतें. शिवाजी व रामदास यांची भेट जर सन १६४९ मध्ये खरोखरी झाली असती व त्यावेळी शिवाजीने जर अनुग्रह घेतला असता तर आपल्या गुरूच्या देवळास व मठास कांहीं तरी कायमचें उत्पन्न त्यानें हटकून करून दिले असते. पण शिवाजीनें चाफळच्या मठास किंवा परळीच्या मठास सन १६७४ पूर्वी नक्त किंवा गांवें इनाम दिल्याचा दाखला सांपडत नाहीं. सर्व सनदा १६७४ पासून १६८० पर्यंतच्या व पुढे संभाजी महाराजांच्या वेळच्या आहेत. (परिशिष्ट पहा.) दोनशें होन व सातशें होन दिले ही बखरींतील हकीगत स्वतंत्र सनदांसारखा पुरावा नव्हे हे उघड आहे.<br>{{gap}}भेटीचा सांप्रदायिक शक चुकीचा आहे असें अर्वाचीन इतिहासका-<noinclude></noinclude> 4g6q2xtqwfio35e5584vrugtw3tpp46 पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११० 104 85874 234465 230830 2026-08-02T13:07:05Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234465 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१०५}} {{rule}}</noinclude>रास दिसून येऊं लागल्यामुळे व हनुमानस्वामींच्या बखरींत एका ठिकाणी संवत्सराचें नांव 'विकारी' असें दिल्यामुळे व बखरांतील तीथ व वार ही या 'विकारी' संवत्सराशीं जुळत असल्यामुळे शक १५८१ हा भेटीचा खरा शक असला पाहिजे अशी कांहीं जणांनी कल्पना काढली. कारण शक १५८१ सन १६५९ याच वर्षी शिवाजीनें (या सालाचा संवत्सर 'विकारी' नांवाचा आहे.) अफजूलखानास मारिलें व अफजूलखानास मारल्यावर शिवाजी रामदासांस भेटावयास गेला व त्या वेळीं शिवाजीला उद्देशून आठराव्या दशकांतील सहाव्या समासांतील उत्तम पुरुषलक्षणाचा समास रामदासांनी सांगितला अशी दंतकथा आहे. तेव्हां सन १६५९ हाच भेटीचा काळ असला पाहिजे असे प्रतिपादन करण्यांत येऊं लागलें. पण या म्हणण्याला खरोखरी जुना कोणताच पुरावा नाहीं. अफझुलखानाच्या वधानंतर लागलीच शिवाजीमहाराज रामदासांस भेटले ही दंतकथा मागें दिलेल्या रचनाकालावरून उघड खोटी ठरते. कारण याच साली रामदास दासबोधाचा साहावा दशक लिहीत होते ही गोष्ट निर्विवाद आहे. साहांपासून अठरा दशक त्यांनी पांचसात महिन्यांत लिहिले असतील असे संभवत नाहीं. तेव्हां हा उत्तम पुरुषलक्षण समास रामदासांनी शिवाजीच्या त्या प्रसंगाला अनुसरून मागून केव्हां तरी लिहिलेला असावा व तो पुढे मोठ्या दासबोधांत अन्तर्भूत केला गेला असावा. शिवाय 'विकारी' हें नांव हनुमानस्वामींच्या बखरींत अगदी नजरचुकीनें पडलें आहे यांत शंका नाहीं. कारण हनुमानस्वामींनीं प्रथम भेटीचा शक १५७१ धरून पुढील सर्व विवेचन केले आहे. म्हणजे रामदास परळीस १५७२ शकांत आले असे म्हटले आहे. खेरीज प्रथम भेटीचा काळ शके १६८१ धरला तरी भेटीच्या वेळीं बखरींत वर्णिलेल्या शिवाजीच्या परिस्थितीशीं या शकाचाही मेळ बसत नाहीं. तेव्हां सन १६५९ हा भेटीचा खरा काळ असे मानतां येत नाहीं. कारण त्याला सांप्रदायिक किंवा ऐतिहासिक कोणताच पुरावा नाहीं.<br>{{gap}}तेव्हां शिवाजी महाराजांची व समर्थ रामदासांची प्रथम भेट खरोखरी केव्हां झाली हा प्रश्न शिल्लक राहतोच.{{nop}}<noinclude></noinclude> d5gj4pkiorxwi4qufccpiz44knzz2ni पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१११ 104 85875 234466 230874 2026-08-02T13:10:35Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234466 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>{{gap}}या प्रश्नावर प्रकाश पाडणारा व या प्रश्नाचें निश्चित उत्तर देणारा पुरावा महाराष्ट्र इतिहासाचा व महाराष्ट्रीय जुन्या वाङ्मयाचा मोठ्या आस्थेनें व कळकळीनें शोध करणारे व त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करणारे धुळ्यांचे रा. चांदोरकर<ref>रा. चांदोरकर यांच्या जवळचे सर्व अस्सल कागदपत्र व त्यांनीं जमविलेली सर्व माहिती या लेखकाला त्यांनी मोठ्या आनंदानें दिली व त्या कागदपत्राचा व माहितीचा या पुस्तकांत उपयोग करण्याची परवानगी दिली याबद्दल लेखक त्यांचा फार ऋणी आहे. या कागदपत्रांचें व माहितीचे अभावीं या लेखांतलें हें शेवटचें कलम इतक्या निश्चित स्वरूपांत लिहितां आलेंच नसतें.</ref> यांना सांपडल्यावर त्यांनीं तो अंशतः केसरींत प्रसिद्ध केला आहे. या पुराव्याचा निर्विकार व शांत मनानें विचार केला असतां रामदासांच्या व शिवाजीच्या भेटीच्या कालाचा वाद शिल्लक रहातच नाहीं. पण रामदास व शिवाजी यांचा संबंध कशा प्रकारचा होता याबद्दल आधच एक ठाम मत बनविल्यामुळे रा. देव व रा. राजवाडे यांनी हा वाद चालू ठेवला आहे किंवा आपल्या पहिल्या प्रश्नावरील मताला अनुरूप असा पुरावा पुढें सांपडेल अशा भरंवशावर ते सांप्रदायिक कालालाच चिकटून राहिले आहेत.<br>{{gap}}रा. चांदोरकरांना या कागदपत्रांचा शोध कसा लागला ही हकीकत मनोरंजक असल्यामुळे ती येथे देणें अप्रस्तुत होणार नाहीं.<br>{{gap}}रा. चांदोरकरांच्या मालेगांवच्या एका एंजिनीयर मित्राची त्यांना एकाएकीं मालेगांवास ताबडतोब निघून या ह्मणून तार आली. त्याप्रमाणें ते मालेगांवास गेले. तेथे त्यांच्या मित्राने सांगितलें कीं, माझ्या कचेरीतील उपाध्ये नांवाच्या कारकुनाच्या घरीं जुने कागद आहेत व ते आपल्याला कागदपत्र देण्यास तयार आहेत. पण आपणास त्यांचे घरी रात्रीं बारा वाजतां गेलें पाहिजे. कारण हे कागदपत्र एका जस्ती पेटींत असून ती पेटी जमिनीत पुरलेली आहे. मागें हे कागद हाती लागण्याची कै. रानड्यांनी खटपट केली होती. पण त्यांना त्या वेळीं यश आलें नाहीं व<noinclude><hr>{{reflist}}</noinclude> 3qgzq2h11dmy742ht81q0sa8ked6nel पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११२ 104 85876 234467 230876 2026-08-02T13:12:49Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234467 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१०७}} {{rule }}</noinclude>पुन्हां आपले कागदपत्र बाहेर जाऊं नयेत म्हणून आमचे कारकुनाचे वृद्ध वडिलांनी याप्रमाणें ते बंदोबस्तांत ठेविले. आमचे कारकुनाचे मातोश्रीस वाईट वाटूं नये म्हणून अशा गुप्त रीतीनें ते कागदपत्र देण्यास ते गृहस्थ तयार आहेत." अर्थात् ठरल्याप्रमाणें चांदोरकरांनीं रातोरात तो कागदपत्रांचा संग्रह घेऊन ते धुळ्यास परत आले. या संग्रहांत दोनअडीचशें कागदपत्रे आहेत. मालेगांवचे उपाध्ये हे रामदासस्वामींच्या हयातीपासून व त्यांचे पश्चात् चाफळ व सज्जनगड या मठांची व्यवस्था पाहणारे दिवाकर गोसावी यांचे वंशज होत. तेव्हां या कागदांच्या अस्सलपणाबद्दल शंका घेण्याचे कारण नाहीं. या लेखकानें हे अस्सल कागदपत्र स्वतः काळजीपूर्वक पाहिले आहेत व या कागदपत्रांत कोठेंही मागाहून दुरुस्त्या किंवा संशयास्पद आकडे वगैरे नाहींत; कागदपत्रांतील मजकूर स्पष्ट व सुवाच्य आहे. या कागदपत्रांवरून या वादावर कसा प्रकाश पडतो तें पाहू.<br>{{gap}}प्रकृत विषयास लागू अशीं पत्र दिवाकर गोसावी यांना त्यांच्या आप्तांकडून किंवा शिष्यशाखेतील बंधुवर्गाकडून आलेली किंवा त्यांनीं दुसऱ्यांस पाठविलेलीं आहेत.<br>{{gap}}या पत्रांवरून रामदासांनीं दिवाकर गोसावी यांस आपल्या हयातीत चाफळ संस्थानची सर्व व्यवस्था करण्यास व राजदरबारचें काम करण्यास अधिकार दिला होता व आपल्या पश्चातही हा अधिकार त्यांजकडे असावा अशी समर्थांची आज्ञा होती असे दिसते. पण रामदासांच्या पश्चात् उद्धव गोसावी यांना आपल्या हातांत सत्ता असावी अशी महत्वाकांक्षा उत्पन्न होऊन उद्धव गोसावी व दिवाकर गोसावी यांचेमध्यें कटकट उत्पन्न झाली व ती कटकट संभाजी महाराजांकडे जाऊन त्यांनी दिवाकर गोसाव्यासारखा निकाल दिला. याला कल्याणस्वामींची अनुमती होती. या बाबतींतील कल्याणस्वामींचें एक पत्र परिशिष्टांत छापले आहे. रामदासांच्या शिष्यांमध्यें संस्थानच्या व्यवस्थेसंबंधी पुनरपि तंटे उत्पन्न होऊं नयेत म्हणून शाहूच्या कारकीर्दीत रामदासांच्या शिष्यमंडळीच्या अनुमतीनें रामदासांच्या वडील बंधूंच्या घराण्यांतील पुरुषाकडे संस्थानची व्यवस्था वंशपरंपरेनें<noinclude></noinclude> 14uyvu82m4h8mqzmvaj2ympjolnfbud पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११३ 104 85877 234468 230878 2026-08-02T13:16:08Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234468 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>देण्यांत आली. दिवाकर गोसाव्यांच्या घराण्यांत हीं अस्सल पत्रे कां राहिली हे कळण्याकरितां ही माहिती सांगितली.<br>{{gap}}या लेखकाच्या बुद्धीप्रमाणें रा. चांदोरकर यांना सांपडलेले कागदपत्र म्हणजे रामदासस्वामींच्या चरित्रासंबंधींच्या अंधारांत वाटोवाट लावलेल्या कंदिलाप्रमाणे आहेत. या पत्राच्या अनुरोधानें रामदासांच्या चरित्राची वाट न ठेचळतां चालून जाणें शक्य झाले आहे. तरी आतां आपण ही वाट पुन्हां एकदां चालूं.<br>{{gap}}रामदासांनीं चाफळीस राम व मारुती यांचें देऊळ बांधून आपल्या दासपंथी सांप्रदायास सन १६४८ मध्ये सुरुवात केली ही गोष्ट निर्विवाद असून सर्व पक्षांस कबूल आहे.<br>{{gap}}या पंथाचा व सांप्रदायाचा प्रसार करण्यास रामदासांस पांच सहा वर्षे तरी लागलीं. पंथाचा प्रसार झाल्यावर या पंथाला कायमचें व निश्चित स्वरूप येण्याकरितां रामदासांनी आपल्या पंथाच्या तत्वांचें अधिकारवाणीनें विवेचन करणारा ग्रंथ लिहिण्याचें मनांत आणिलें व मठासारख्या गडबडीच्या व शिष्यांनी गजबजलेल्या ठिकाणीं ग्रंथ लिहिण्यास लागणारी शांतता मिळणार नाहीं म्हणून रामदास ग्रंथ लिहिण्याकरितां शिवतरच्या घळींत राहण्यास गेले. ते केव्हां गेले व तेथें ते किती दिवस होते या गोष्टी दिवाकर गोसाव्याच्या खालील पत्रावरून स्पष्ट दिसून येतात.<br> {{center|श्री.}} {{gap}}चिरंजीव राजेश्री बहिरंभट गोसावी यासि प्रति दिवाकर गोसावी मु॥ चाफल अनेक आसीर्वाद.<br>{{gap}}तुम्ही पत्र पाठविल्ले ते वाचोन लेखनार्थ अवगत झाले तुम्ही अम्हास येण्याविशी लिहिले तर श्रीसमर्थ दहा संवत्सरपर्यंत कोठे न जाता सर्व ग्रंथास आरंभ केला आणि सांगितले की श्रीकडिल हरयेक विशि बोभाट येउ नये म्हणुन आम्हा सांगितले आणी सर्व मडळीस आज्ञा की तुम्ही श्रीचे उत्सवाची भी(क्षा) करून आमचे स्वाधीन करावी म्हणून सर्वास सांगीतले त्याप्रमाणे सर्व मंडळी निघोन गेली आणि अपण व कल्याण गो॥ व<noinclude></noinclude> a3hlw32p8yqvwm1tnk3armwmzkwlqfm 234471 234468 2026-08-02T13:26:45Z कल्पनाशक्ती 3813 234471 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>देण्यांत आली. दिवाकर गोसाव्यांच्या घराण्यांत हीं अस्सल पत्रे कां राहिली हे कळण्याकरितां ही माहिती सांगितली.<br>{{gap}}या लेखकाच्या बुद्धीप्रमाणें रा. चांदोरकर यांना सांपडलेले कागदपत्र म्हणजे रामदासस्वामींच्या चरित्रासंबंधींच्या अंधारांत वाटोवाट लावलेल्या कंदिलाप्रमाणे आहेत. या पत्राच्या अनुरोधानें रामदासांच्या चरित्राची वाट न ठेचळतां चालून जाणें शक्य झाले आहे. तरी आतां आपण ही वाट पुन्हां एकदां चालूं.<br>{{gap}}रामदासांनीं चाफळीस राम व मारुती यांचें देऊळ बांधून आपल्या दासपंथी सांप्रदायास सन १६४८ मध्ये सुरुवात केली ही गोष्ट निर्विवाद असून सर्व पक्षांस कबूल आहे.<br>{{gap}}या पंथाचा व सांप्रदायाचा प्रसार करण्यास रामदासांस पांच सहा वर्षे तरी लागलीं. पंथाचा प्रसार झाल्यावर या पंथाला कायमचें व निश्चित स्वरूप येण्याकरितां रामदासांनी आपल्या पंथाच्या तत्वांचें अधिकारवाणीनें विवेचन करणारा ग्रंथ लिहिण्याचें मनांत आणिलें व मठासारख्या गडबडीच्या व शिष्यांनी गजबजलेल्या ठिकाणीं ग्रंथ लिहिण्यास लागणारी शांतता मिळणार नाहीं म्हणून रामदास ग्रंथ लिहिण्याकरितां शिवतरच्या घळींत राहण्यास गेले. ते केव्हां गेले व तेथें ते किती दिवस होते या गोष्टी दिवाकर गोसाव्याच्या खालील पत्रावरून स्पष्ट दिसून येतात.<br> {{center|श्री.}} {{gap}}चिरंजीव राजेश्री बहिरंभट गोसावी यासि प्रति दिवाकर गोसावी मु॥ चाफल अनेक आसीर्वाद.<br>{{gap}}तुम्ही पत्र पाठविल्ले ते वाचोन लेखनार्थ अवगत झाले तुम्ही अम्हास येण्याविशी लिहिले तर श्रीसमर्थ दहा संवत्सरपर्यंत कोठे न जाता सर्व ग्रंथास आरंभ केला आणि सांगितले की श्रीकडिल हरयेक विशि बोभाट येउ नये म्हणुन आम्हा सांगितले आणी सर्व मडळीस आज्ञा की तुम्ही श्रीचे उत्सवाची भी(क्षा) करून आमचे स्वाधीन करावी म्हणून सर्वास सांगीतले त्याप्रमाणे सर्व मंडळी निघोन गेली आणि अपण व कल्याण गो॥ व<noinclude></noinclude> lu7r4u7wxtvqrjt8z2johy5mzjm1dy9 पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११४ 104 85878 234469 230880 2026-08-02T13:20:27Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234469 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास|१०९}} {{rule}}</noinclude>चिमणाबाई अका व अनंत कवी यास बराबर घेऊन एकांत स्थानि शिवथरचे घळीत जाउन बसले तुम्ही श्री महालेश्वरचे देवालयाचे काम चांगले रीतीनें करवावे भास्कर गो। आल्ले म्हणजे मी येक दीवसाचे अवकाशे येतो कळावे मिति मार्गशीर्ष वद्य ५ शके १५७६ लोभ करावा हे आसीर्वाद.{{gap}}{{gap}}{{gap}} (१८ डिसेंबर १६५४ सोमवार.)<br>{{gap}}हें पत्र सन १६५४ सालांत लिहिलेले आहे. समर्थ दहा वर्षे चाफळीं येणार नाहींत व मठाची व देवस्थानाची व्यवस्था त्यानीं शिष्यांवर व विशेषतः दिवाकर गोसाव्यावर सोपविली होती; या काळीं मठाचा खर्च निवळ भिक्षेवर चालू होता; त्याला कांहीं इनाम किंवा नेमणूक नव्हती या गोष्टी निर्विवाद सिद्ध होतात. यावरून रामदास सन १६५४ पासून १६६४ पर्यंत ग्रंथ लिहिण्यांत गुंतले होते असे सिद्ध होतें. व या दिवाकर गोसाव्याच्या पत्राला प्रत्यंतर पुरावा दासबोधांत आहे. कारण सन १६५९ मध्ये म्हणजे ग्रंथ लिहिण्यास एकांतांत राहण्यास गेल्यावर चार वर्षांनी सहाव्या दशकापर्यंत ग्रंथ आला होता; ही गोष्ट मागें दाखविली आहे.<br>{{gap}}दहा वर्षात रामदास केव्हांही बाहेर गेले नसतील असें नाहीं. तेव्हां जरी पुढें मागें रामदास दुसरीकडे होते अशा आशयाचें पत्र पुढे आले तरी त्यानें दिवाकर गोसाव्याच्या या पत्रांतील मजकूर खोटा ठरणार नाहीं. कारण दिवाकर गोसाव्याच्या पत्राचा अर्थ इतकाच कीं, मठाकडे व त्याचे व्यवस्थेकडे ग्रंथ पुरा होईपर्यंत लक्ष द्यावयाचें नाहीं, असें रामदासांनी ठरविलें होतें. अर्थात् रामदासांच्या या एकांतवासाचे काळांत मठाच्या व्यवस्थेची सर्व जबाबदारी शिष्यमंडळीवर पडली व त्याकरितां शिष्यमंडळी त्या प्रांतांत फिरून भिक्षेवर मठाचा खर्च चालवीत असत. ही गोष्ट दिवाकर गोसाव्यास आलेल्या भास्कर गोसाव्याच्या पत्रावरून स्पष्टपणे दिसून येते.<br>{{gap}}श्रीगुरुभक्तपरायण मोक्षश्रीया विराजित दिवाकर गोसावि या प्रती<br>{{gap}}भास्कर गोसावि नमस्कार विनंती उपरि श्रीचे उछाहा * होनु पनास<noinclude></noinclude> qax6l568suee70kj0liy5jsyf5qteqp पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११५ 104 85879 234470 230904 2026-08-02T13:25:09Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234470 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११०|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>भिक्षेस मिळाले ते भानजी गोसावि बराबर पाठविले पावतील शिवाजी राजे यांच्याकडे भिक्षेस गेलो त्यानी **रिले तुम्ही कोठील कोण कोणा ठिकाणी असता त्यावरून आम्ही बोललो की आम्ही रामदासी श्रीसमर्थाचे शिष्य चाफळास हों मग ते बोलले कीं ते कोठें राहतात व मुळ गांव कोण त्याजवरून मी सांगितले की गंगातिरिचें जांबचे राहणो प्रस्तुत चाफळास मठ करून श्री देवाची स्थापना करून उत्साव मोहोत्सव चालु करून आम्हा सर्वास आज्ञा की तुम्ही भिक्षा करून उत्साह करीत जावा सांगितल्यावरून अम्ही हिंडत आहो असे बोलता राजेश्रीनी दत्ताजीपंत वाकेनिविस यास प्रतिवर्षि श्री उत्साहास दोनशे होनु देत जाणे म्हणून पत्र पाठविले ते हो * * स येतील कळावे फालगुन शु० २ शके १५८०. हे विनंति.{{right|(१३ फेब्रुवारी रविवार १६५८.)}} {{gap}}हे पत्र सन १६५८ मधलें आहे. म्हणजे या पत्राचा मेळ पूर्वीच्या दिवाकर गोसाव्याच्या पत्राशी पूर्णपणें मिळतो. रामदासांच्या एकांतवासाच्या काळी शिष्य भिक्षा मागून संस्थानचा खर्च चालवीत होते. अशी भिक्षा मागत असतां भास्कर गोसावी हे शिवाजीराजे भोसले यांचे कडे भिक्षेकरितां गेले असतां शिवाजी मठाची हकीकत त्यांस विचारतात. त्या मठाबद्दल व रामदास साधूबद्दल त्यांचा अनुकूल ग्रह होऊन ते वर्षास दोनशें होन देऊं करतात. या गोष्टी किती सरळ व स्वाभाविक रीतीने या पत्रांत आल्या आहेत, हे पहा. या पत्रावरून रामदासांची माहिती शिवाजीला या सालापूर्वी नव्हती असे निःसंशयपणें ठरतें व म्हणून भेटीचा सांप्रदायिक काल खोटा ठरतो.<br>{{gap}}या पत्राची एक नक्कल रा. देव यांना रा. चांदोरकर यांचे आधींच सांपडली होती व नंतर अस्सल पत्र रा. चांदोरकरांना सांपडलेल्या कागदपत्रांत सांपडलें. यावरून या पत्राच्या खरेपणाबद्दल शंका रहात नाहीं. या पत्राचा शांतपणे विचार करणारास त्यांत संदिग्धपणा कोठेंच दिसणार नाहीं. त्याचा अर्थ सरळ व स्पष्ट आहे.<br>{{gap}}पण आपल्या आवडत्या भावनेला धक्का बसतो ह्मणून रा. राजवाडे व<noinclude></noinclude> 8fsiggxrh9t7uphezekdnacqc5jld4j 234472 234470 2026-08-02T13:27:50Z कल्पनाशक्ती 3813 234472 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११०|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>भिक्षेस मिळाले ते भानजी गोसावि बराबर पाठविले पावतील शिवाजी राजे यांच्याकडे भिक्षेस गेलो त्यानी **रिले तुम्ही कोठील कोण कोणा ठिकाणी असता त्यावरून आम्ही बोललो की आम्ही रामदासी श्रीसमर्थाचे शिष्य चाफळास हों मग ते बोलले कीं ते कोठें राहतात व मुळ गांव कोण त्याजवरून मी सांगितले की गंगातिरिचें जांबचे राहणो प्रस्तुत चाफळास मठ करून श्री देवाची स्थापना करून उत्साव मोहोत्सव चालु करून आम्हा सर्वास आज्ञा की तुम्ही भिक्षा करून उत्साह करीत जावा सांगितल्यावरून अम्ही हिंडत आहो असे बोलता राजेश्रीनी दत्ताजीपंत वाकेनिविस यास प्रतिवर्षि श्री उत्साहास दोनशे होनु देत जाणे म्हणून पत्र पाठविले ते हो * * स येतील कळावे फालगुन शु० २ शके १५८०. हे विनंति.{{gap}}{{gap}}{{gap}}(१३ फेब्रुवारी रविवार १६५८.)<br>{{gap}}हे पत्र सन १६५८ मधलें आहे. म्हणजे या पत्राचा मेळ पूर्वीच्या दिवाकर गोसाव्याच्या पत्राशी पूर्णपणें मिळतो. रामदासांच्या एकांतवासाच्या काळी शिष्य भिक्षा मागून संस्थानचा खर्च चालवीत होते. अशी भिक्षा मागत असतां भास्कर गोसावी हे शिवाजीराजे भोसले यांचे कडे भिक्षेकरितां गेले असतां शिवाजी मठाची हकीकत त्यांस विचारतात. त्या मठाबद्दल व रामदास साधूबद्दल त्यांचा अनुकूल ग्रह होऊन ते वर्षास दोनशें होन देऊं करतात. या गोष्टी किती सरळ व स्वाभाविक रीतीने या पत्रांत आल्या आहेत, हे पहा. या पत्रावरून रामदासांची माहिती शिवाजीला या सालापूर्वी नव्हती असे निःसंशयपणें ठरतें व म्हणून भेटीचा सांप्रदायिक काल खोटा ठरतो.<br>{{gap}}या पत्राची एक नक्कल रा. देव यांना रा. चांदोरकर यांचे आधींच सांपडली होती व नंतर अस्सल पत्र रा. चांदोरकरांना सांपडलेल्या कागदपत्रांत सांपडलें. यावरून या पत्राच्या खरेपणाबद्दल शंका रहात नाहीं. या पत्राचा शांतपणे विचार करणारास त्यांत संदिग्धपणा कोठेंच दिसणार नाहीं. त्याचा अर्थ सरळ व स्पष्ट आहे.<br>{{gap}}पण आपल्या आवडत्या भावनेला धक्का बसतो ह्मणून रा. राजवाडे व<noinclude></noinclude> iss5spvpc2yf36srr0963fsq9zkjn9d पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११६ 104 85880 234473 230906 2026-08-02T13:30:04Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234473 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१११}} {{rule}}</noinclude>रा. देव या पत्रांत व्यंग्यार्थ काढतात! त्यांचे म्हणणें हें कीं, शिवाजीनें भास्कर गोसाव्यास जे रामदासांसंबंधी अनोळख्यासारखे प्रश्न विचारले ते भास्कर गोसाव्याची परीक्षा पाहण्याकरितां व जाणून बुजून खोटे विचारले. पण या पत्राचा असा अर्थ करण्यापासून किती विपरीत कल्पना मानाव्या लागतात? शिवाजी महाराजांची व रामदासांची भेट सन १६४९ मध्यें झाली होती असे धरलें तर १६४९ पासून १६५८ म्हणजे नऊ वर्षेपर्यंत शिवाजीनें या मठास कांहींच मदत केली नाहीं असें होतें. कारण अशी मदत चालू असती तर ती भिक्षा मागावयास जाणाऱ्या शिष्यास अवश्य ठाऊक असती, व हें ठाऊक असतां, तो शिष्य शिवाजीकडे भिक्षा मागण्यास गेला असता कसा? शिवाय दुसराही एक असंभवनीय प्रकार या व्यंग्यार्था वरून निघतो. शिवाजी प्रत्यक्ष रामदासाला भेटल्यावर व त्याजपासून अनुग्रह घेतल्यावर मठास कांहीं नेमणूक करून देत नाहीं व भास्कर गोसाव्या सारख्या शिष्याच्या तोंडी माहितीवरून वार्षिक दोनशें होनांची भिक्षा देतो, हें किती विचित्र वर्तन आहे! यावरून रामदासांपेक्षां भास्कर गोसावीच जास्त अलौकिक कर्तबगारीचा पुरुष दिसतो! सारांश, हा व्यंग्यार्थाचा खटाटोप बुडत्या माणसानें काडीचा आश्रय करण्यासारखा आहे.<br>{{gap}}या पत्रावरून भेटीचा सांप्रदायिक कालनिर्णय पार ढांसळतो हे उघड आहे व म्हणून व्यंग्यार्थाचा व्यर्थ खटाटोप सांप्रदायिक काळाच्या पुरस्कर्त्यांना करावा लागतो.<br>{{gap}}सन १६६४ मध्ये ग्रंथ समाप्त करून रामदास परत चाफळी आले त्या वेळी किंवा शिष्यांच्या सांगीवरून आधीसुद्धां त्यांना शिवाजीच्या दोनशे होनांच्या नेमणुकीची हकीगत कळली असली पाहिजे. तेव्हांपासूनच रामदासांचें लक्ष शिवाजीच्या चरित्राकडे, त्याच्या उद्योगाकडे व त्याच्या उद्योगानें लोकांच्या स्थितीत पडलेल्या फरकाकडे लागले असावें.<br>{{gap}}या गोष्टीकडे एकदां लक्ष लागल्यापासून त्यांच्या आध्यात्मिक दृष्टीला व्यावहारिक व राजकारणी दृष्टीची जोड झाली असावी व त्या दृष्टीची छटा त्यांच्या पुढील कवनांत उमटली असावी. दासबोधांतील उपदेशभेदाची<noinclude></noinclude> t6qzl0ukctq74fqysusrjaf4ut5fbja पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११७ 104 85881 234474 230908 2026-08-02T13:32:53Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234474 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>हीच उपपत्ति या लेखकास पटते. उपदेशभेदाचा व त्याच्या उपपत्तीचा विषय हा अमूर्त असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष कागदोपत्रीं पुरावा सांपडणें अशक्य आहे. असो.<br>{{gap}}रामदास चाफळास परत आले, तो काळ शिवाजीच्या आयुष्यांतील अत्यंत आणीबाणीचा व अत्यंत संकटाचा होता. औरंगजेब बादशहानें शिवाजीचा बीमोड करण्याकरितां भगीरथ प्रयत्न सुरू केले होते व त्यावेळी शिवाजीला माघार खाऊन औरंगजेबाशीं तह करून दिल्लीस जावें लागलें. दिल्लीहून सुटका होऊन देशीं परत येण्यास शिवाजीस २।२॥ वर्षे लागलीं. परत आल्यावर शिवाजीनें गेलेलें राज्य पुन्हां परत मिळविण्याचा अटोकाट प्रयत्न केला व त्याच्या प्रयत्नाला यशही आलें. पण या धांदलीच्या गडबडीच्या व मानसिक अस्वस्थतेच्या काळीं रामदासांची हकीगत सन १६५८ सालीं कानांवर गेली असतांना रामदासांस भेटावयास शिवाजी महाराजांस सवड झाली नसावी हे उघड आहे.<br>{{gap}}पण १६७२ मध्ये शिवाजी सातारा व कऱ्हाड या प्रांतांत येऊन हा मुलुख त्याच्या ताब्यांत आला तेव्हां रामदासांची भेट घ्यावी अशी त्यालाही इच्छा झाली असावी व शिवाजी आता आपल्या मठाच्या आसपास आलेला आहे असें पाहून रामदासांनींही बखरींतील प्रसिद्ध पत्र शिवाजीस पाठविले असावें. कारण १६७२ या सालीं या पत्रांत दिलेली सर्व विशेषणें व शिवाजीचा केलेला गौरव व विशेषतः 'नृपवर तुच्छ केले' हे म्हणणें योग्य होतें. तेव्हां रामदासांचें असें पत्र आल्यावर शिवाजीनें रामदासांस भेटण्याचा निश्चय केला; ही गोष्ट दिवाकर गोसाव्यास केशव गोसाव्यांनीं लिहिलेल्या खालील पत्रावरून स्पष्ट होतें.<br> {{center|श्रीराम}} {{right|श्रीरामदासस्वामी.}} {{gap}}श्रीगुरुभक्तपरायण राजमान्य राजेश्री दिवाकर गोसाबी यासी<br>{{gap}}प्रतिपूर्वक के + (श) व गोसावि नमस्कार उपरि येथील कुशल + (आ) पण पत्र पाठविले ते पावले मजकूर समजला राजेश्री शीवराजे भोसले हे समर्थांचे भेटीस येणार म्हणोन लिहिले ते समजले मी येणार<noinclude></noinclude> n3q5bm4827q4lpz5e9ciiumd5ctvudx पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११८ 104 85882 234475 230910 2026-08-02T13:39:41Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234475 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|११३}} {{rule}}</noinclude>होतो परंतु माझी प्रकृति फार बिघडली येणें होत नाहीं मी इकडून अकास येणेसाठी लिहिले परंतु अकाचेही येणे व्हावयाचे नाही गावी भानजी गोसावी तेथे असतील राजे यांची पहिलीच भेट आहे वाडीचे लोकास खटपटेस अणावे उपयोग होईल झाडी बहुत आहे इकडून उदईक त्रिंबक गो। व विट्टल गो। व दत्तात्रय गो। उदइक पाठउन देतो श्रीचे उत्सवास भीक्षेचे धान्य जे मिळाले ते अश्वत्थ भट मसुरकर या समागमे पाठविले दत्ताजीपंताकडु x (न) दोनशे होनु उत्सावास पाठविले ते अले असतील लोभ करावा मीती चैत्र व॥ १ शके १५९४ हे विज्ञप्ति.{{gap}}{{gap}}(४ एप्रिल बुधवार १६७२.)<br>{{gap}}हे पत्र या लेखकानें दोनतीन वेळां लक्षपूर्वक पाहिले आहे. तें अस्सल पत्र आहे यांत शंका नाहीं. त्या पत्रावरील शक अगदीं स्पष्ट आहे. रा. देव नवांच्या आंकड्याबद्दल संशय व्यक्त करतात. पण त्यांत मुळींच हंशील नाहीं. नऊ मोडी लिहितांना एक टांकी लिहितात तसा हा नवांचा आंकडा न लिहितां पूज्य काढून त्याला नवांचा रफार जोडला आहे इतकाच फरक आहे. पण अशा तऱ्हेची नऊ काढण्याची रीत या लेखकानें कित्येक पत्रांत पाहिली आहे. तेव्हां या पत्रासंबंधी असले कुतर्क व्यर्थ आहेत. या पत्रांतील अर्थही स्पष्ट व सरळ आहे. शिवाजीराजे भोसले हे रामदासास प्रथमच भेटावयाचे असल्यामुळे दिवाकर गोसाव्याने सर्व शिष्यमंडळीस त्या समारंभास आग्रहानें बोलावावें हें रास्त आहे. केशवगोसावी प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे आपणाला व आकास येण्यास होत नाहीं असे लिहितात. दुसऱ्या शिष्यास पाठवून देण्याचेंही लिहितात, व शिवराजाची ही समर्थांशी पहिली भेट असल्यामुळे गांवकरी बोलावून सर्व व्यवस्था उत्तम तऱ्हेची करण्यास दिवाकर गोसाव्यास सांगतात. शिवाय ज्याप्रमाणें दिवाकर गोसाव्याचे समर्थांच्या एकांतवासाबद्दलच्या पत्राचा व भास्कर गोसाव्याच्या पत्राचा मेळ बसतो त्याचप्रमाणें या केशव गोसाव्याच्या पत्राचा भास्कर गोसाव्याच्या पत्राशीं पूर्ण मेळ बसतो. कारण शिवाजीनें रामदासाबद्दलच्या व मठाबद्दलच्या भास्कर गोसाव्याच्या तोंडी हकीकतीवरून दर वर्षास दोनशें होन देण्याची<noinclude><br>{{gap}}स...८</noinclude> 8rhzaofwdtku8oq8hoxzjgeefv8pait पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११९ 104 85883 234477 231980 2026-08-02T15:07:12Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234477 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>जी नेमणूक केली होती ती सारखी चालू होती व चाफळच्या मठाची व्यवस्था अजूनही भिक्षेवरच चालू होती; हें या केशव गोसाव्याच्या पत्रावरून दिसतें, या पत्रांतील मजकुराचा विचार केला व मागे दिलेल्या पत्रांचा विचार केला तर शिवाजीची प्रथम भेट याच सालांत झाली याबद्दल मनाची बालंबाल खात्री होते. पण रा. देव व रा. राजवाडे या पत्रांतही भास्कर गोसाव्याच्या पत्राप्रमाणे क्लिष्ट कल्पना व व्यंग्यार्थ काढतात. राजवाड्यांच्या मतें प्रथम भेट याच्या आधीं 'या मुलाखतीतील' असे शब्द गृहीत धरावे म्हणजे झालें! मग या पत्राचा असा अर्थ होतो कीं, महाराजांच्या व समर्थांच्या पूर्वी किती तरी मुलाखती झाल्या होत्या व अशा एका मुलाखतींतील ही प्रथम भेट होय. रा. राजवाडे यांची ही कल्पना वाचून या लेखकास पुनर्विवाहाच्या वेळच्या वादाची आठवण झाली. त्या वादाचे वेळीं 'नष्टेमृते' या प्रसिद्ध श्लोकाचा पुनर्विवाहपर अर्थ खोडण्याकरितां 'पतीच्या' ठिकाणी 'अपति' असें रूप धरावें म्हणजे झाले अशी क्लिष्ट कल्पना जुन्याच्या अभिमान्यांनी काढली होती त्यासारखीच रा. राजवाडे यांचीहि कल्पना आहे. त्या वादाची त्यांना माहिती नसल्यामुळे त्या वेळची सोपी युक्ति त्यांना सुचली नसावी व म्हणून 'या मुलाखतीतील' इतकें लांबलचक पद गृहीत धरण्याची कल्पना त्यांना काढावी लागली! नाहींतर इतके जास्त शब्द घालण्या ऐवजी 'समर्थांचे' पाठीमागें 'अ' असें अक्षर आहे व म्हणून हें पत्र रामदास व शिवाजी यांच्या भेटीबद्दल मुळींच नाहीं; व अर्थात् या पत्रावरून भेटीचा काल मुळींच शाबीत होत नाहीं असें त्यांना म्हणतां आलें असतें! मन एकदां पूर्वग्रहदूषित झाले म्हणजे तें अर्थ लावण्यांत काय काय मौज करूं शकतें याचा या पत्राचा वरील प्रकारचा व्यंग्यार्थ हा उत्तम मासला आहे.<br>{{gap}}पण पूर्वग्रहविरहित माणसास हें केशव गोसाव्याचें पत्र रामदास व शिवाजी यांच्या भेटीच्या कालाचा प्रत्यक्ष पुरावा आहे हे उघड आहे. तेव्हां आतां हातच्या कांकणाला आरसा कशाला! पण रा. चांदोरकरांच्या कागदपत्रांत असलीं आरसेवजाही पत्रे आहेत; त्यावरून या प्रश्नावर काय-<noinclude></noinclude> h17tjkkcpm7wr8pm9yqs4g3frouoxuu पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२० 104 85884 234479 231979 2026-08-02T15:11:56Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234479 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|११५}} {{rule}}</noinclude>मचा उजेड पडून त्याचा निकाल झाला आहे असे म्हणावे लागेल असे वाटतें. पण पुढे जाण्यापूर्वी या पत्राच्या अनुरोधानें शिवाजीमहाराजांच्या व रामदासांच्या प्रथम भेटीचा नक्की काल ठरवू या.<br>{{gap}}केशव गोसाव्याच्या पत्राची तिथि चैत्र व॥ १ शके १५९४ (सन १६७२) अशी आहे. या सालाच्या संवत्सराचें नांव 'परिधावी' असे आहे. सांप्रदायिक कथेप्रमाणे शिवाजीला गुरुमंत्र गुरुवारी झाला असे आहे. या पत्राच्या मितीला बुधवार होता; तेव्हां दुसरेच दिवशीं भेटीचा दिवस नसला पाहिजे. कारण दूरच्या शिष्यांना येण्यास सवड सांपडे अशा तऱ्हेनें आगाऊ पत्र दिवाकर गोसाव्यानें पाठविली असली पाहिजेत. व केशव गोसावी याच पत्रांत दुसऱ्या शिष्यांस उदईक पाठवितों असे म्हणतात तेव्हां दुसऱ्या दिवशींचा भेटीचा दिवस नसावा. पण तो चैत्र वद्य प्रतिपदेपासून फारसा लांबही नसावा. अर्थात् तो चैत्र वद्य नवमी हा दिवस असावा हे उघड होतें. वैशाख शुद्ध नवमी हा या पत्राच्या तिथीपासून फार दूर आहे. शिवाय रा. चांदोरकर यांनी पंचांगावरून असे काढले आहे कीं, चैत्र वद्य नवमी परिधावीनाम संवत्सरे हा फार चांगल्या मुहूर्ताचा दिवस आहे. त्या दिवशीं अमृतसिद्धियोग आहे व उत्तराषाढा नक्षत्र आहे. त्या दिवशी अभिजित मुहूर्ती महाराजांस अनुग्रह झाला असला पाहिजे. (या मुहूर्ती महाराजांस अनुग्रह झाला असें कित्येक बखरींतून विधान आहे.) तेव्हां १२ एप्रिल सन १६७२ या दिवशीं शिवाजीची व रामदासांची प्रथम भेट झाली व बखरींत वर्णन केल्याप्रमाणे त्याच दिवशीं रामदासांनी महाराजांवर अनुग्रह केला व रामदासांनी त्यांना मेजवानी दिली असे निर्विवाद सिद्ध होते. या वेळीं रामदासांचें वय चौसष्ट वर्षंंचे होतें. अशा वयोवृद्ध, तपोनिष्ठ, पंथसंस्थापक, प्रासादिक कविसंताची ती भव्य, गंभीर व तेजःपुंज ब्रह्मचारी मूर्ति पाहून शिवाजी महाराजांची विलक्षण भक्ति रामदासांवर बसली यांत नवल काय? तेव्हांपासून त्यांचा गुरुशिष्यसंबंध झाला व तो दृढभक्तीचा व दृढ आदराचा झाला यांत शंका नाहीं. व याचें प्रत्यंतर पुढील हकीगतीवरून पटते.<br>{{gap}}शिवाजी व रामदास यांची प्रथमभेट त्या सालच्या उत्सवानंतर पंधरा<noinclude></noinclude> baycmv58l6cylob44t6wr67daxwzrvo पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२१ 104 85885 234480 231983 2026-08-02T15:15:34Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234480 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule|}}</noinclude>दिवसांनींच झाली. तेव्हां उत्सवांत आपल्याला काय काय अडचणी येतात, लोक कसा त्रास देतात, चोरांचा कसा उपद्रव होतो आणि दोनशें होन कसे पुरत नाहींत, वगैरे हकीगत शिवाजी राजास रामदासांकडून कळली असावी आणि म्हणूनच परत गेल्यावर शिवाजीनें कऱ्हाड प्रांतीच्या आपल्या अधिकाऱ्यांस उत्सवाचे वेळी योग्य व्यवस्था व बंदोबस्त ठेवण्याविषयी आज्ञापत्र पाठविले आहे. (परिशिष्ट पहा.) दोनशें होन पुरत नाहींत म्हणून शिवाजी महाराजांनीं चाफळच्या मठाचा कच्चा खर्च संभाळला व त्याप्रमाणें तिकडील अधिकाऱ्यास तिजोरींतून सर्व खर्च देण्याचे आज्ञापत्र सन १६७४ मध्ये काढलें. (परिशिष्ट पहा.) नंतर दोन वर्षांनी इनाम गांव करून दिले. रामदासांचा निकटवास घडण्याकरितां त्यांना नुकत्याच घेतलेल्या परळी किल्ल्यावर रहावयास बोलाविलें.<br>{{gap}}अशा प्रकारें रामदासांचा व शिवाजीचा निकट संबंध सन १६७२ त सुरू झाला. अर्थात् शिवाजीनें आपल्या राज्यारोहणाच्या बाबतीत बखरींत लिहिल्याप्रमाणें रामदासांची सल्ला मसलत व अनुमति घेतली असलीच पाहिजे. पुढे निरनिराळ्या वेळी चाफळ व सज्जनगड येथील मठांस गांव इनाम करून दिले आहेत. शिवाजी महाराज आपल्या अष्टप्रधानांसकट परळीच्या रामोत्सवांत भाग घेत असत अशाबद्दल सातारच्या राजाच्या दफ्तरांतील सन १६८० मधील एक यादी इतिहाससंग्रहांत रा. ब. पारसनीस यानी प्रसिद्ध केली आहे. तिचा या हकीगतीशी मेळ बसतो. शिवाजीच्या मरणानंतर संभाजी महाराजांनीं चाफळच्या व परळीच्या मठाला पुन्हां इनामाच्या सनदा करून दिल्या आहेत. त्यांवरून रामदासांच्या मठाचा व शिवाजीच्या घराण्याचा गुरुशिष्यसंबंध चालू राहिला असे होतें. यावरून रामदासांनी संभाजीला उपदेशपर लिहिलेले पत्र खरें असावें असे दिसतें. त्या पत्रांत रामदासांच्या मनांत शिवाजीबद्दल किती आदरबुद्धि वसत होती हे व्यक्त झाले आहे. शिवाजीलाही रामदासांबद्दल किती आदर व पूज्यभाव वाटत होता हे त्याच्या सन १६७२ पासून १६८० पर्यंतच्या म्हणजे मरेपर्यंतच्या वर्तनावरून व त्यानें रामदासांच्या संस्थानांस केलेल्या कायमच्या मदतीवरून दिसून येतें.{{nop}}<noinclude></noinclude> hr4uykrh0ud09hxz77m9pjma8rafqx4 पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२२ 104 85886 234481 231988 2026-08-02T15:20:41Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234481 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|११७}} {{rule}}</noinclude>{{gap}}शिवाजी व रामदास यांच्या पश्चात् दिवाकर गोसावी हा रामदासांच्या दोन्ही मठांची व्यवस्था पहात होता. त्याच्या वृद्धापकाळानंतर त्यांचा मुलगा बाहिरंभट हा कारभार पाहूं लागला. त्या वृद्धापकाळी लिहिलेली दोन पत्रे परिशिष्टांत छापलीं आहेत. त्या दोन्ही पत्रांत शिवाजीच्या प्रथम भेटीच्या सालाचा उल्लेख आहे. परिधावीनाम संवत्सरी शिवाजी महाराजांस रामदासांनीं परमार्थ सांगून अनुग्रह केला; तेव्हांपासून आपल्याकडे संस्थानचा कारभार रामदासस्वामींनी दिला आहे, याची आठवण सर्वास देण्यास पहिल्या पत्रांत आपल्या मुलाला लिहिले आहे व दुसऱ्या पत्रांत तीच आठवण देऊन आपल्या पश्चात् हा कारभार आपल्या मुलाकडे ठेवावा अशाबद्दल शिष्यवृंदाला दिवाकर गोसाव्यांनीं विनंति केली आहे. हीं दोन्हीं पत्र केशव गोसाव्याच्या पत्रांतील भेटीच्या कालाचा प्रत्यंतर पुरावा होत यांत शंका नाहीं.<br>{{gap}}वरील विवेचनावरून असे दिसून येईल की, रा. चांदोरकर यांना अचानकपणे सांपडलेल्या कागदपत्रांनी रामदास व शिवाजी यांच्या भेटीच्या वादग्रस्त प्रश्नाचा कायमचा व समाधानकारक रीतीनें निकाल लागतो. या पत्रव्यवहारानें रामदासांच्या अंधुक चरित्रावर इतका उत्तम प्रकाश पडतो कीं, तें चरित्र ढळढळीत डोळ्यापुढे दिसूं लागतें. मात्र अंधश्रद्धा किंवा पूर्वग्रह यांची डोळ्यांवर आलेली झापडें दूर सारून डोळे उघडून त्या प्रकाशाच्या साहाय्यानें रामदासचरित्राकडे पाहिले पाहिजे. पण झापडें न काढण्याचा हट्ट धरल्यास कितीही प्रकाश पडला तरी त्याचा काय उपयोग होणार!<br>{{gap}}आतां रामदास शिवाजीचे राजकारण गुरू होते किंवा मोक्षगुरु होते हा वादग्रस्त प्रश्न राहिला. व त्याचा निकालही सहज करतां येतो. शिवाजीच्या आयुष्यांतील राज्यस्थापनेचें जें मुख्य काम तें बहुतेक संपेपर्यंत जर शिवाजीची व रामदासांची भेटच मुळी झाली नव्हती तर रामदासानें शिवाजीस राज्यस्थापनेला स्फूर्ति दिली व रामदास शिवाजीस राजकारणांत सल्लामसलत देत असे हे म्हणणें फोलच होतें. तेव्हां रामदास शिवाजीचे मोक्षगुरु किंवा धर्मगुरु होते असेच म्हणणे प्राप्त आहे. अर्थात्<noinclude></noinclude> pgg5k4kmhl8rq6g3cydqdzyozo09efl पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२३ 104 85887 234482 232105 2026-08-02T15:25:07Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234482 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>सन १६७२ पासून म्हणजे शिवाजीमहाराजांच्या आयुष्याच्या शेवटल्या आठ वर्षांत त्यांनी रामदासांची राजकीय कामांतही सल्लामसलत घेतली असेल, राज्यारोहाणाच्या बाबतीत तर अशी सल्लामसलत घेतली होती याला स्पष्ट दाखलाच आहे; तेव्हां ऐतिहासिक दृष्ट्या शिवाजीमहाराजांचा व समर्थ रामदासांचा प्रत्यक्ष संबंध दोघांच्या उतार वयांत घडून आला हें उघड आहे. प्रत्यक्ष भेटीपूर्वी या दोघांनाही एकमेकांची ऐकून माहिती सन १६५८ पासून झाली होती हेंही तितकेंच उघड आहे. कारण १६५८ पासून शिवाजीनें चाफळच्या मठास दरसाल दोनशें होनांची भिक्षा दिली होती व ही गोष्ट समर्थांना त्यांच्या शिष्याकडून कळली असलीच पाहिजे. एव्हांपासून रामदासांच्या आध्यात्मिक कल्पनांना राजकीय कल्पनांची जोड झाली असावी व त्याची छटा त्यांच्या कवनांत दिसूं येऊं लागली असावी हें पूर्वी दाखविले आहे.<br>{{gap}}याप्रमाणे या वादाचा निकाल लागतो. व त्यांत असमाधान वाटण्यासारखें कांहीं नाहीं. पण रामदास शिवाजीपेक्षां मोठे होते; रामदासांवांचून शिवाजीच्या हातून जें राष्ट्रीय कार्य झालें तें झालें नसतें अशी मनाची दृढ समजूत ज्यांनी करून घेतली आहे त्यांना हा निकाल पसंत पडत नाहीं. हल्लींच्या निकालावरून शिवाजीनें किंवा निदान शिवाजीच्या यशस्वी कार्याने रामदासांना राजकीय व व्यावहारिक कल्पना सुचल्या निदान त्यांचा कंठरवानें उपदेश करण्याची स्फूर्ति झाली व ह्मणून शिवाजी रामदासांपेक्षा मोठे असे विधान कोणी केलें तर तें अगदींच चुकीचे ठरणार नाहीं.<br>{{gap}}पण निरनिराळ्या व्यवसायांत आयुष्य घालविलेल्या विख्यात विभूतीबद्दल एकापेक्षां दुसरा मोठा अशी तारतम्याची तुलना करणेंच चुकीचे आहे. त्या दोन्हीही विभूति आपआपल्या परी मोठ्याच होत असे म्हणणेंच रास्त आहे.<br>{{gap}}रामदास शिवाजीपेक्षा मोठे किंवा शिवाजी रामदासांपेक्षां मोठे हा वाद गंगा यमुनेपेक्षा जास्त पवित्र किंवा यमुना गंगेपेक्षा जास्त पवित्र या उत्तर हिंदुस्थानांतील या नद्यांच्या महत्त्वासंबंधींच्या वादासारखा आहे. (दूरदूरच्या प्रांतांत गंगेस महत्त्व दिले गेलें आहे म्हणजे या पक्षापैकी एकाचा<noinclude></noinclude> 410qte813o42umjsmvc64fj6x7yqfsj पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२४ 104 85888 234483 232107 2026-08-02T15:27:55Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234483 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|११९}} {{rule}}</noinclude>अंगीकार करण्यांत आला आहे.) पण हिंदुस्थानाच्या नकाशाकडे पाहणारास हा वाद चुकीचा वाटतो. या दोन्हीही नद्या एकाच हिमालयाला भेदून हिंदुस्थानच्या सपाट प्रदेशावर वाहात येतात; त्या दोन्ही नद्या आपआपल्या बाजूच्या हजारों मैलांच्या प्रदेशास आपल्या प्रवाहानें आपल्या पुरानें व पुरा बरोबर उत्तम वनस्पतींच्या खताच्या गाळानें सुपीकता आणतात व बऱ्याच प्रदेशापर्यंत जवळ जवळ समांतर वाहात जाऊन मग प्रयागास एकमेकींशीं संगत होऊन एकजीव बनून एकरूपानें आपला पुढला मार्ग आक्रमण करतात. त्याप्रमाणे शिवाजी व रामदास या दोन विभूति एकाच उदयोन्मुख महाराष्ट्रांत समकाळी जन्म घेतात व आपआपल्या परीनें- एक प्रत्यक्ष राज्यस्थापनेच्या उद्योगास सुरवात करून व तो यशस्वी करून, दुसरी आध्यात्मिक व व्यावहारिक उपदेशानें जनमनाची सुधारणा करून- राष्ट्रकार्य बऱ्याच काळपर्यंत एकमेकांस न कळतां व स्वतंत्रपणे करीत राहतात व आयुष्याच्या शेवटल्या भागांत गुरुशिष्य या नात्याने त्यांचा संगम होतो. तेव्हां अशा दोन विभूतींसंबंधीं तारतम्यानें मोठेपणाचा वाद करणें हें संकुचित बुद्धीचें लक्षण आहे. तरी असल्या शुष्क वादांत न पडतां महाराष्ट्रांत समकालीन उदयास आलेल्या या दोन विख्यात विभूतींच्या चरित्रापासून हल्लींच्या परिस्थितीला अनुरूप अशा तऱ्हेची देशसेवा करण्याची स्फूर्ति महाराष्ट्रीयांस होवो अशी आशा प्रदर्शित करून वाचकांची रजा घेतों. <br><br> {{border|{{border|{{center|{{xx-larger|'''समाप्त.'''}}}}}}}}{{nop}}<noinclude></noinclude> 45n5dpdau75czb211jqxifb1pdswinz पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२५ 104 85889 234484 232173 2026-08-02T15:36:57Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234484 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>{{center|{{larger|{{larger|'''परिशिष्ट.'''}}}}}} {{center|---*---}} {{right|{{x-larger|लेख नं. १}}}} {{center|श्रीरामवरद.}} {{center|समर्थस्वामी.}} {{gap}}श्रीगुरुभक्तपरायेण मोक्षश्रीयांवीराजीत विराजमान दिवाकर गोसाविं यां प्रतिकल्याणनाम्ने कृतानेक नमस्कार विनंति उपेरि तुम्ही पत्र पाठविलें तें पावोन लेखनार्थ अवगत जाहालें सर्व प्रकारें विस्तारें ल्याहावें तरि श्री याचीं अज्ञाप्रमाणें वर्तावें हें उचित तेहि सुज्ञ असेत वडीलपणाची नीति जे परंपरागत उपासना स्थापना जे केलि आहे तें भजन चालावें. तेथें कलहास कारण नाहि आपण श्रीच्या अज्ञेप्रमाणे देवाचा कार्यभाग चालुं देणें श्रीशिवथरचे घळीस आस्तां तुम्हांवर संतोष होउन नलनाम सवत्सरिं अज्ञा सर्वत्रांस केलि जे हा महाबळेश्वरकर आहे बुद्धिहि महाबळ आहे राजद्वारि कित्येक प्रसंगी पाठवायास योग्य आसे प्रस्थान पारपत्या योग्य याच्या हस्तें श्रीचे संस्थान जोपर्यंत तो कार्य कर्तव्य वंशपरंपरेनें घ्यावें ऐसे बोलोन तुम्हांस श्रीनि तांबुल दिधला ते समयि तो उद्धव गोसावि व विठ्ठल गोसावि व आह्मी आणीक कित्येक समुदायि होते. अज्ञा स्मरोन अभिमान अक्रोध होऊन भजनास प्रवर्तल्यानें श्री दया करितिल तुम्ही धैर्य न टाकणे यांच्या कलहामुळे श्रीच्या धर्मस्थापनेसि अंतर पडे ऐसें न करणें त्यांचा संतोषरूप आशिर्वाद आसे. सर्वहि यश देतिल राजेश्री उद्धव गोसावी यांसहि पत्र लिहिलें आसे त्या वरून विदित होईल. आम्हींहि लवकरच येतों बहुत काय लिहिणे धैर्य श्रीभजनाचें न टाकणें हे विनंति.<br><br>{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> mrbtvwux26c31g7m9kch96agpagvx65 234485 234484 2026-08-02T15:37:52Z कल्पनाशक्ती 3813 234485 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>{{center|{{xx-larger|'''परिशिष्ट.'''}}}} {{center|---*---}} {{right|{{x-larger|लेख नं. १}}}} {{center|श्रीरामवरद.}} {{center|समर्थस्वामी.}} {{gap}}श्रीगुरुभक्तपरायेण मोक्षश्रीयांवीराजीत विराजमान दिवाकर गोसाविं यां प्रतिकल्याणनाम्ने कृतानेक नमस्कार विनंति उपेरि तुम्ही पत्र पाठविलें तें पावोन लेखनार्थ अवगत जाहालें सर्व प्रकारें विस्तारें ल्याहावें तरि श्री याचीं अज्ञाप्रमाणें वर्तावें हें उचित तेहि सुज्ञ असेत वडीलपणाची नीति जे परंपरागत उपासना स्थापना जे केलि आहे तें भजन चालावें. तेथें कलहास कारण नाहि आपण श्रीच्या अज्ञेप्रमाणे देवाचा कार्यभाग चालुं देणें श्रीशिवथरचे घळीस आस्तां तुम्हांवर संतोष होउन नलनाम सवत्सरिं अज्ञा सर्वत्रांस केलि जे हा महाबळेश्वरकर आहे बुद्धिहि महाबळ आहे राजद्वारि कित्येक प्रसंगी पाठवायास योग्य आसे प्रस्थान पारपत्या योग्य याच्या हस्तें श्रीचे संस्थान जोपर्यंत तो कार्य कर्तव्य वंशपरंपरेनें घ्यावें ऐसे बोलोन तुम्हांस श्रीनि तांबुल दिधला ते समयि तो उद्धव गोसावि व विठ्ठल गोसावि व आह्मी आणीक कित्येक समुदायि होते. अज्ञा स्मरोन अभिमान अक्रोध होऊन भजनास प्रवर्तल्यानें श्री दया करितिल तुम्ही धैर्य न टाकणे यांच्या कलहामुळे श्रीच्या धर्मस्थापनेसि अंतर पडे ऐसें न करणें त्यांचा संतोषरूप आशिर्वाद आसे. सर्वहि यश देतिल राजेश्री उद्धव गोसावी यांसहि पत्र लिहिलें आसे त्या वरून विदित होईल. आम्हींहि लवकरच येतों बहुत काय लिहिणे धैर्य श्रीभजनाचें न टाकणें हे विनंति.<br><br>{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> ixkw21ywv43mhxwm620c55vp76mhbzc पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२६ 104 85890 234486 232581 2026-08-02T15:38:42Z कल्पनाशक्ती 3813 234486 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१२१}} {{rule}}</noinclude>{{right|{{x-larger|लेख नं. २}}}} {{center|श्री.}} {{rh|श्री रघुनाथ देव.||राजेश्री रामदास गोसावी.}} {{gap}}स्वस्तिश्री राज्याभिषेक शक ७ रौद्रसवत्सर कार्तीक शस्टी इंदुवासरे क्षत्रिय कुलावतंस श्रीराजाशंभू छत्रपती यांणी राजेश्री कासी रंगनाथ देशाधिकारी व देशलेखक प्रांत जाउळी यांस आज्ञा केली यैसा जे राजेश्री--- -गोसावी. ::: यांस श्री-- देव वास्तव्ये कसबे चांफल यास प्रतीहि पूजेनिमित्य व नवेदास व देवाच्या सेवकास मोईन इ॥। (इस्तकबिल) सनद राजेश्री कैलासवासी स्वामी छ. २९ जिल्हेज सन खमससनैन (मंगळवार १६ मार्च सन १६७४.) <center> {| |+ |- | {{gap}}येकूण मोईन || |- | {{gap}}मुशाहिरे देवाच्या सेवकास{{gap}} ||देवाच्या नवेदास प्रतिही सामग्री |- | {{gap}}दर माहे होनु पातशाही ||वजन टकबंदी |- |३ पारपत्यगार १ ||σσ६।. तांदुळ बारीक सडीक |- |४ पुराणीक २ दर २<Br>पुराणीक १ उपाध्या १ ||σσ६।. कणीक<br>σσ२॥. दाळी |- |५ हरिदास ४ दर १।. ||σσ१।. तूप |- |७ वाजंत्रीस दर १ यक ||σσ.॥. तूप रु॥ मीठ |- |४ पूजारे २ बी ता॥ ||_______ |- |{{gap}}श्रीरघुनाथ १ श्रीहणुमंतास १ ||σ। ६॥। ९ |- |१ माली १ यक. ||दीपास तेल श्रीहनुमतास |- |१ झाडी फेडी करावयास १ यक || प्रतिही वजन टक σσ ॥।. |- |__<br>२५ || देवाच्या पंचामृतास व परिमलद्रव्या-<br>कारणें दररोज नक्थ खुर्दा १ टका. |} </center> <br>{{gap}}येकूण दरमाहे होनु पातशाही पंचवीस व दरोज मोईन वजन टकबंदी साडेसात पासरे नवटांक व नक्थ खुर्दा टका येक रास येणेप्रमाणें पेशजी<noinclude></noinclude> 95z2ies1rbswiou2yx7xuhvqqep6vfc पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२७ 104 85891 234487 232582 2026-08-02T15:39:19Z कल्पनाशक्ती 3813 234487 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>पासून तगाईत सालगुदस्ता पावत आले आहे. हालीही पेशजी मोईनप्रमाणें सालमजकुरी इ॥ (इस्तकबिल) अवल सालापासून देविलें असे साल दरसाल देत जाणे प्रतिवर्षी ताजे सनदेचा उजूर करीत नव जाणे. तालीक लेहोन घेऊन असल पत्र वेदमूर्ती राजश्री दिवाकर गोसावी या पासी फिराऊन देणे व देवांच्या सेवकास मुशाहिरा देणे तो निवल देत जाणे.<br> <center> {| |+ |- |रवाना छ २४ मास || मार्गशीर्ष वद्य ११ || {{gap}}लेखनालंकार |- |तेरीख ४ || {{gap}}माहे सौवाल|| |- |सौवाल सन इहिदे || {{gap}}सुरुसुदवार || {{gap}}मर्यादेयं |- |समानीन बारसुद || {{gap}}छ २९ जिल्काद || {{gap}}विजयते |- | || लेखन सीमा || {{gap}}रुजू सुरु नीवीस. |- | ||समुल्लसति || |} </center> {{rule|5em}} {{right|{{x-larger|लेख नं. ३}}}} {{center|श्रीरघुनाथ}} {{gap}}मश हुरल हजरत राजमान्य राजश्री दत्ताजीपंत वाकेनिवीस प्रति राजश्री शिवाजी राजे दंडवत उपरि कसबे चाफल येथे रामदास गोसावी आहेत श्रीचे देवालय केले आहे यात्रा भरते व सर्वदा हि मोहछाये चालता तरि तथ कटकींचे सिपाही लोक व बाजे लोक राहताती ते देवाची मर्यादा चालवीत नाहींत यात्रस लोक येताती त्यास तसवीस देताती यात्र करू लोकासी दिवाण बले कलागती करीतात म्हणोनु कलो आले तरि तुम्ही लाकास ताकीद करून तेथे यात्रेमधे हो अगर हमेशा हि कोण्हाचा उपद्रव होउ न दणे व यात्रेस लाक यताति त्यास चोराचिरटियाहि उपद्रव होऊं न दणे सालाबाद यात्रा राखतात तैसे याचे (त्रे)चे दिवसांत ता॥ मजकूरचे कारकून व लाक जाउनु संगीनातीने यात्रा राखेती व सुखरूप<noinclude></noinclude> 8vkuq9fqmu0wm1bqtkcwii9jv6m9vaw पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२८ 104 85892 234489 232401 2026-08-02T15:49:57Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234489 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१२३}} {{rule}}</noinclude>यात्रा भरे ते करणे तुरकाचा अगर अगर हर कोण्हाचा उपद्रव न लगे यैसे करून व रामदास गोसावी याचा हि हरयेक विसी परामृश करीत जाणे देवाकरितां व गोसावियाकरिता ब्राम्हण येउनु तेथे घरे नवी बांधुनु राहताती त्याचा हि परामर्श करीत अंतर पडो ने दणे बहुत लिहीणे तरी तुम्ही सूज्ञ असा छ ७ रविलाखर शुहुर सन सला सबैन व अलफ प हुजुर {{center|(२३ जुलै १६७२ मंगल)}} {{rule|5em}} {{right|मर्यादेयं<br>विराजते}} {{right|{{x-larger|लेख नं. ४}}}} {{center|श्री}} {{rh|श्रीरघुनाथ||श्रीरामदास स्वामी.}} :::राजमान्य राजेश्री वेकाजी रुद्र सुभेदार व कारकूनानी महाला<br>निये ताा तपे कोले गोसावी यास<br> {{gap}}सेवक दत्ताजी त्रिमल नमस्कार शहुर सन समान सबैन अलफ राजेश्री छत्रपति साहेबी सनद सति सबैनमध्ये लिहिली ती पैवस्ता (?) छ ११ माहे रविलावल सन सबामध्यें पावली तेथें अज्ञा केली होती की आपण श्री सिवतरी असतां त्याचे भेटीस गेलो होतों ते समई ते हि अज्ञा केली कीं श्री देव यास अकरा गाव इनाम देणें त्यावरून आम्ही त्याचे आज्ञेप्रमाणें ती गोष्टी मान्य केली मागुती यानें स्वामीने चि आज्ञा केली ते गाउ इनामी ह्मणोन देवाचे नावे लिहोन त्या गावीचे उत्पन्न होईल ते देवाचा प्रसाद ह्मणोन तुम्ही राजग्रहीं जमा करणें तुम्ही राजे तुम्हास देवाचा प्रसाद असावा या करितां दिल्हें आहे त्यापैकी दर गावासी अकरा बिघेप्रमाणें इनाम बागा करविल्या त्यामध्यें कांहीं बाग व काही बागा माडावियास खर्च लागेल त्या कारणे सेत यैसे करावे त्यास अवल जमीन पाणिया खालील यैसी पाहोन देवणे वरकड गावांतील प्रज राज राहोन<noinclude></noinclude> bxlz4mplqc2yw0fep4f4d6psll0qpr2 पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१३० 104 85894 234490 232565 2026-08-02T15:58:42Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234490 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१२५}} {{rule}}</noinclude>बारमाला ताजे सनदेचा उजुर न करणे छ १५ माहे रजवु सदरहू इनामाचे खटपटे करणे येक ब्राह्मण राजेश्री साहेबी हुजुरुन दिला आहे त्याचे सनद आलाहिदा चालिलि आहे तेणे प्रमाणे त्याचे वेतन सालायाचे सालायास निवळ पाठवित जाणे प॥ हुजुर {{right|मातेर्ब सुद}} {{center|(३ सप्टेंबर, सोमवार १६७७.)}} {{rule|5em}}<br> {{right|{{x-larger|लेख नं. ५}}}} {{center|श्री रघुनाथ}} {{gap}}सहस्रायु चिरंजीव भैरव भटासि प्रि (ति) पूर्वक दिवाकर गोसावी आसिर्वाद * चे (ते) थेचें वर्तमान ऐकिलें तेणें करून व्याकुलता बहुतचि जालों उपाय तो कर्तव्य आमचे हातीं ये समई कांहींच नाहीं क्लेशी मात्र जालों क्षेम जालें ऐसे वर्तमान ये ** (ईल) तेव्हां स्वस्थता वाटेल आमचे शरीर * (तो) गळीत जाले आहे परंत आल्प मात्र वेथा बरि जाली आणी आह्मासाठी येऊ म्हणाल तरी वेथा बदल होईल ऐसें न करणे पुरते बरे होउ देणे हे आसिर्वाद<br>{{gap}}हेच पत्री अनंत गोसावी याचा अनेक आसीर्वाद पूर्वी कैलासवासी सीवाजी राजे भोसले यासी परिधावी संवत्सरी शिंगणवाडीचे मटी श्री हनुमंतासमोर परमार्थ झाला ते समई मंडळी होती ते स (म) ई रामचंद्र पंत अमात्य व दत्ताजी पंत वाकेनिवीस यानी सर्वास जो सांगीतला त्याचें स्मरण सर्वास देत जाणे उत्धव गोसावी यानी समर्था अज्ञेची अवज्ञा केली (ह्म) णुन कलो अलें तुझी समयी अज्ञेप्रमाणे राहटी करणे हे असिर्वाद<br> {{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> eeur7888mkjwzsguig0wcbsow7is1za पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१३१ 104 85896 234491 232190 2026-08-02T16:07:02Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234491 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude><br>{{right|{{x-larger|लेख नं. ६}}}} {{center|श्रीरघुनाथो जयति}} {{right|श्री रामदासस्वामी}} <br>{{gap}}श्री रघुनाथ भक्तिपरायण उत्तम गुणालंकरण स्वधर्मैक निरत सात्विकभाव भूषित समस्त श्रीसमुदाइ बंधुवर्ग यां प्रति<br>{{gap}}प्रीतिपूर्वक दिवाकर गोसांविं कृतानेक नमस्कार विज्ञप्ति उपरि आमचे शरिर बहुता आसक्त जाहलें श्रीच्या दर्शनास यावें ऐसे होते व तुमचें समस्तांचे दर्शन होतें तुमचा व आमचा कित्येक प्रकारें पुढें श्रीचा कार्यभाग अल्पमात्र स्वबुधीनसार समर्थाच्या दयेकरून संपादिला होता व श्रीनी सर्व पारपत्य दया करून मज दीनास दिलेह तें आज पावेतों चालिलें व राजेश्री शिवाजी राजे भोसले याणी श्रीस पुजा समर्पिली तो काभार माझे स्वाधीन केला तोहि आज पावेतों चालिला पुढे काळगति प्रधान आहे परंतु समस्ताप्रति विनति कीं श्रीच्या इमारती चाफळी व गडीं लागल्या आहेत त्यांस ऐवज नाहीं स ऐसे ऐकिलें माझें शरीर तो परम अशक्त जाहलें कांहीं यत्न न चले तरि तेथे चिरंजीव भैरवभट आहे त्यास (विनं) ती केलि आहे जे जो श्रीचे उत्पन्न होईल तें निमे ऐवज चाफलीच्या इमारतीस नीमे गडिच्या इमारतीस देवविला आहे तो लाविल त्यास (तो) स्ताली दोघे व्यापारी बरे लिणार व दोघे आफराद त्याचें वेतन (व) ऐवज पैकीं पावेल उभयताची व भैरवभट व गोपाळ वृदोस्त दि * दूरील ते प्रत्यह श्री चा नैवेद्य व नित्य दिपास तेल आ छ ** च शक्तीनें बाहेरून मेळउन आणिली व रुद्राभिषेक करून मंत्रयुक्त पुजा करिलिल तरि श्री चे आहे ते दोन वर्षे इमारतीस ऐवज दिल्हा आहे तो दो स्तळीं लावितील त्यास जो समर्थानि नेमुन वृति दिली आ (से) ते खेरीज करून देवाचा रूका शिवस्व व समुदाइ यास हि शिवस्व व ते च्छळी पूर्वी समुदाय होता त्यास हि शिवश्व ऐसे आहे तरि चिरंजीव आमचे सर्व पारपत्य करितिल ते ऐवज आणून इमारतीस लावितील त्यांशी द्रव्यलोभे करून अथवा सर्व पारपत्यबळेच करूं ह्मणतील न्याय सोडुन अन्याई प्रवर्ततिल व आमचे निशाण<noinclude></noinclude> 8y231920qitgmpo1e4ku55hkih44gbo पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१३२ 104 85897 234492 232186 2026-08-02T16:14:58Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234492 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१२७}} {{rule}}</noinclude>व शेवक लोक ठेवणें व काढणें व गा (वा) ची देखरेख व खर्च व दास्तान कोण्ही करूं ह्मणतील त्यास करून दिल्हे पाहिजे पूर्वापार चालत आले आहे सर्वास विदितचि आहे राजग्रह संमधी जे येइल व व श्री समुदाइ जे आणितिल त्याचा खर्च चिरंजीव च करितिल दो स्छि (दो स्थलि) चा इमारतीस दोनी वर्षे सर्व ऐवज निमेनिम नेमुन दिल्हा आहे ते लावितिल आमचा परत्यात (पारपत्यांत) कोण्हा संमध नाही आतां आधिक नवें देऊन दिल्हे न पाहिजे आमचा ये समईचा संकल्प सर्वानि सिधीस पाविला पाहिजे दोनी वर्षे जालिया वरि जो ऐवज येल (येईल) त्याणे नित्य नैमित्य व महोछव होतिल तो वरि देवाचा एैवज स्तळिचा, निव बाहेर जे श्रीचे लोक आहेत त्ये यांत लोक घरिल उदरासाठी त्यांस तुही समस्तानि निष्ठुरतेनें सांगावे व वंशपरंपरेने आमचे सर्व पा***(रिपत्य) आहे तें चालविले पालि (हि) जे आमचे शरीर अशक्त जाहले ह्मणउन लेखन करविले देशकाळ वर्तमान कलत नाहीं रुणानुबंध प्रमाण समस्त हरिभक्ताप्रति दिवाकराचा नमस्कार पूर्वी सहवासे बरे अथवा वाइट बोलिलो आसेन कारभार मुळें बोलावे लागतें शरीरें वेगळाली प्रकृति भिन्न भिन्न आहेत आत्मा येकाचे आहे सुज्ञाप्रति विशेष काय ल्याहवें, धर्म मोडून अधर्म स्छापू नये ह ज्ञप्ति (विज्ञति)<br>{{gap}}हेंच पत्रीं राजश्री भानजी गोसावीस नमस्कार चिमाआकाचा सांगावा तुम्हांस दत्ताजीपंतांनी मजकुर पूर्वी सांगितला तो ध्यानांत असेल सुचनार्थ लिहिले आहे, परिधावी संवत्सरी राजेश्रीनी पवला? त्या समइ परमार्थ घेतला ते समइ चे द्रवय (द्रव्य) अश्वथ टपौरे मसुरकर यांचे जवळ आहे, त्यातले अर्ध द्रव्य देवाच्या इमारतीकडे घ्यावे व अरधेचे दीपमाला कराव्या ह्मणुन कैलासवासी समर्थाची अदना (आज्ञा) अहे, रामचंद्रपंता अमात्य यास कळउ नये.<br><br> {{center|{{x-larger|'''संपूर्ण.'''}}}}{{nop}}<noinclude></noinclude> 6nm0xmkuo1r2jbvp8sbpklsh1ypm99d पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१३३ 104 85898 234493 182092 2026-08-02T16:15:18Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 234493 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Css image crop |Image = सज्जनगड_व_समर्थ_रामदास.pdf |Page = 133 |bSize = 404 |cWidth = 404 |cHeight = 597 |oTop = 3 |oLeft = 2 |Location = center |Description = }}<noinclude></noinclude> az4opz821yc1w9d5n88m6t8xpjjf5tw सदस्य चर्चा:-revi 3 104185 234488 210076 2026-08-02T15:43:52Z Pathoschild 78 global user pages ([[m:Synchbot|requested by Revi C.]]) 234488 wikitext text/x-wiki #REDIRECT [[User talk:Revi C.]] o9z79lcc9a9pfmqmrod5w3eyk4q9i0o सदस्य:-revi 2 104186 234478 210077 2026-08-02T15:08:08Z Pathoschild 78 global user pages ([[m:Synchbot|requested by Revi C.]]) 234478 wikitext text/x-wiki #REDIRECT [[User:Revi C.]] 88g0cv17whfgb1wkeh281mptujwtlut मिडियाविकी:Gadget-markAdmins-data.js 8 111269 234503 234415 2026-08-03T05:56:16Z QueerEcofeminist 918 data 234503 javascript text/javascript mw.hook('userjs.script-loaded.markadmins').fire({ "QueerEcofeminist": ["interface-admin","sysop"], }); h71e9v4s2c2lqc39fknlecb0hfvn7pq चर्चा:सज्जनगड व समर्थ रामदास 1 111271 234495 2026-08-03T05:16:11Z कल्पनाशक्ती 3813 /* पुस्तक संरक्षित करणे */ नवीन विभाग 234495 wikitext text/x-wiki == पुस्तक संरक्षित करणे == @[[सदस्य:QueerEcofeminist|QueerEcofeminist]] हे पुस्तक पूर्ण झाले आहे . कृपया ते संरक्षित करावे. [[सदस्य:कल्पनाशक्ती|कल्पनाशक्ती]] ([[सदस्य चर्चा:कल्पनाशक्ती|चर्चा]]) १०:४६, ३ ऑगस्ट २०२६ (IST) 5biqmqutape5agaq2213eqvyut8xs4s 234498 234495 2026-08-03T05:28:31Z QueerEcofeminist 918 /* पुस्तक संरक्षित करणे */ Reply 234498 wikitext text/x-wiki == पुस्तक संरक्षित करणे == @[[सदस्य:QueerEcofeminist|QueerEcofeminist]] हे पुस्तक पूर्ण झाले आहे . कृपया ते संरक्षित करावे. [[सदस्य:कल्पनाशक्ती|कल्पनाशक्ती]] ([[सदस्य चर्चा:कल्पनाशक्ती|चर्चा]]) १०:४६, ३ ऑगस्ट २०२६ (IST) :@[[सदस्य:कल्पनाशक्ती|कल्पनाशक्ती]], ते आधीच सुरक्षित आहे. [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] १०:५८, ३ ऑगस्ट २०२६ (IST) 8onlz70lv0mlvcj14kz2lbt8d49j6nv