विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.14 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/3 104 29112 235355 47849 2026-08-10T08:31:01Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ 235355 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br><Br><br><br> {{center|दिलीपराज प्रकाशनाची सर्व पुस्तके आता आपण Online खरेदी करू शकता.<br>आमच्या Website ला कृपया एकदा अवश्य भेट द्या. अथवा Email करा.<br> www.diliprajprakashan.in<br>Email - diliprajprakashan@yahoo.in}} {{rule|height=30px}}{{nop}}<noinclude></noinclude> pi5gog58f92dmhit1dqow7ab1276w7w 235356 235355 2026-08-10T08:41:13Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235356 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br><Br><br><br> [[File:दिलीपराज प्रकाशन TM.jpg|borderless|center|दिलीपराज प्रकाशन TM]] {{center|दिलीपराज प्रकाशनाची सर्व पुस्तके आता आपण Online खरेदी करू शकता.<br>आमच्या Website ला कृपया एकदा अवश्य भेट द्या. अथवा Email करा.<br> www.diliprajprakashan.in<br>Email - diliprajprakashan@yahoo.in}} {{rule|height=30px}}{{nop}}<noinclude></noinclude> my0rlgdbmy12zfiddut2ukzdh19fo00 पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/4 104 29113 235357 47850 2026-08-10T08:45:31Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235357 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><Br><Br><br><br><br> {{center|{{xxxx-larger|'''लक्षदीप'''}}}} {{center|{{xx-larger|'''निवडक लक्ष्मीकांत देशमुख'''}}}} <Br><Br><br><br><br> {{x-larger|{{center|'''संपादक : डॉ. रणधीर शिंदे'''}}}} <Br><Br><br><br><br> [[File:दिलीपराज प्रकाशन TM.jpg|center|borderless|दिलीपराज प्रकाशन TM]] {{center|{{x-larger|'''दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.'''}}}} {{center|'''२५१ क, शनिवार पेठ, पुणे -४११०३०'''}}{{nop}}<noinclude></noinclude> 742aetbldpf85u3kq5n8bxtn2a6tvj1 पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/5 104 29114 235358 47851 2026-08-10T08:59:14Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235358 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|'''लक्षदीप / LAKSHADEEP'''<br>(निवडक लक्ष्मीकांत देशमुख)<br>संपादक : डॉ. रणधीर शिंदे}}{{rule}} ♦{{gap}}प्रकाशक<br>{{gap}} राजीव दत्तात्रय बर्वे,<br>{{gap}} मॅनेजिंग डायरेक्टर,<br>{{gap}} दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.,<br>{{gap}} २५१ क, शनिवार पेठ, पुणे - ४११ ०३०.<br>{{gap}} दूरध्वनी क्रमांक (फॅक्ससहित)<br>{{gap}} २४४७१७२३ । २४४८३९९५ । २४४९५३१४<br>©{{gap}}'''लक्ष्मीकांत देशमुख'''<br>♦{{gap}}'''प्रथमावृत्ती - १४ फेब्रुवारी २०१५'''<br>♦{{gap}}'''प्रकाशन क्रमांक - २२०४'''<br>♦{{gap}}ISBN : 978 - 93 - 5117 - 042 - 6<br>♦{{gap}}'''मुद्रक'''<br>{{gap}} मधुराज प्रिंटर्स ॲण्ड पब्लिकेशन्स् प्रा. लि.<br>{{gap}} स. नं. २९/८-९, पारी कंपनीजवळ, धायरी, पुणे - ४११ ०४१<br>♦{{gap}}'''टाईपसेटिंग'''<br>{{gap}} का. वि. शिगवण,<br>{{gap}} अक्षरवेल<br>{{gap}} दत्तवाडी, पुणे ४११ ०३०<br>♦{{gap}}'''मुद्रित शोधन :''' एस. एम. जोशी<br>♦{{gap}}'''मुखपृष्ठ :''' सुहास चांडक<br>♦{{gap}}'''मूल्य -''' <s>र</s> पाचशे मात्र{{rule}} या पुस्तकातील कोणताही मजकूर, कोणत्याही स्वरूपात वा माध्यमात पुनःप्रकाशित अथवा संग्रहित करण्यासाठी लेखक व प्रकाशकाची लेखी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.{{nop}}<noinclude></noinclude> ja8a9eio3lyhz618itmt7rchshb5d2o पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/6 104 29115 235359 141161 2026-08-10T09:08:00Z कल्पनाशक्ती 3813 235359 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{xxxx-larger|■}}{{x-larger|'''प्रस्तावना'''}} {{gap}}लक्षदीप हा लक्ष्मीकांत देशमुख यांच्या निवडक साहित्याचा संपादित संग्रह. देशमुख यांनी १९८० नंतर विविधस्वरूपी लेखन केलेले आहे. सनदी अधिकारी म्हणून ते नुकतेच निवृत्त झाले आहेत. कथा, कादंबरी,ललित व वैचारिक असे त्यांच्या लेखनाचे स्वरूप आहे. देशमुख यांनी लिहिलेल्या विविध प्रकारातील प्रातिनिधिक स्वरूपात लेखनाचा समावेश या संपादनात केला आहे. कथा,नाटक,ललित व प्रवासवर्णन व वैचारिक लेखांचा अंतर्भाव या संपादनात आहे. कादंबरीचा अंश देण्यामुळे तिची एकात्मता नाहीशी होईल म्हणून कादंबरी संहिता दिलेली नाही. त्यामुळे या संपादनात कादंबरीलेखनाचा समावेश पृष्ठसंख्येमुळे केलेला नाही. मात्र प्रस्तावनेत त्यांच्या कादंबरीलेखनाचे वेगळेपण नोंदविले आहे.<br> {{gap}}एक लेखक म्हणून लक्ष्मीकांत देशमुख यांच्या घडणीमागे विविध ठिकाणचे प्रदेश व अनुभवक्षेत्र साहाय्यभूत ठरले आहेत. तसेच त्या घडणीच्या मागे असणाऱ्या कालधर्माचाही संबंध आहे. साधारणतः स्वातंत्र्यानंतरच्या तीनेक दशकाच्या काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व लेखकपणाची घडण झालेली आहे. स्वातंत्र्यानंतर समूहजीवनात आलेली नवी स्वप्नकांक्षा,या स्वप्नकांक्षेला सांस्कृतिक जगाने दिलेला प्रतिसाद त्या काळात देशमुख घडत होते. तसेच १९६० नंतरच्या मराठी साहित्यविश्वात अनुभवविश्वाचे काही उद्रेक घडत होते. त्याचेही सादपडसाद या काळातील व्यक्तींवर- लेखकांवर घडणे स्वाभाविक होते. मुरुम (जि. उस्मानाबाद) हे लक्ष्मीकांत देशमुख यांचे जन्मगाव,वडील शिक्षक होते. त्यांच्या विविध ठिकाणी बदल्यांमुळे त्यांचे शिक्षण वेगवेगळ्या गावी घडले. निजामी राजवटीच्या खाणाखुणा असणाऱ्या प्रदेशाचे संस्कार त्यांच्यावर झाले. वाचनाचा पहिला संस्कार त्यांना त्यांच्या आईकडून झाला. उस्मानाबाद, नांदेड येथे त्यांचे शिक्षण झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्र विषयात एम.एसस्सी. पदवी मिळवली. संशोधनाची आवड असल्यामुळे त्यांनी पीएच.डी.साठी नाव नोंदविले. मात्र विद्यापीठीय संशोधनाचा काच त्यांना सहन<noinclude>{{right|'''लक्षदीप ■ ५'''}}</noinclude> 0c649n6ed0uy7zpcsz869mc01lr5wu4 पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/7 104 29116 235360 141240 2026-08-10T09:12:31Z कल्पनाशक्ती 3813 235360 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>झाला नाही त्यामुळे ते तेथे रमले नाहीत. दरम्यान स्टेट बँक रिक्रूटमेंटद्वारे त्यांना नोकरी मिळाली. मात्र त्यांच्या मनात आयएएस अधिकाऱ्यांचे स्वप्न होते. बँकेत असताना स्पर्धापरीक्षेचा ते अभ्यास करू लागले व लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांना यश मिळाले. १९८३ मध्ये ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सर्वप्रथम आले लवकरच ते प्रशासन सेवेत दाखल झाले. आणि १९९६ साली त्यांना आय.ए.एस.चा दर्जा मिळाला. प्रशिक्षण कालावधीसाठी त्यांचे पोस्टिंग दहीवडी (जि. सातारा) येथे झाले. या प्रशिक्षण कालावधीत त्यांना व्ही.पी.राजा नावाचे आय.एस. अधिकारी लाभले. राजा यांच्या कार्यशैलीचा व श्रेष्ठ अशा उच्चतर नैतिक गुणांचा प्रभाव पडला, याचा ते वारंवार कृतज्ञतेने उल्लेख करतात. साधारणतः या काळातील सामाजिक अवकाश, देशमुख यांच्या घरातील वातावरण, संस्कार व वाचन याचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या लेखनावर आहे.<br> {{gap}}त्यानंतर त्यांची भूम (जि. उस्मानाबाद) येथे प्रांत म्हणून बदली झाली. भूम हे तसे आडवळणाचे दुष्काळी गाव. भूममध्ये त्यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली. त्यानंतर त्यांनी अकोला, नांदेड, परभणी, सांगली, पुणे व कोल्हापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी म्हणून काम केले. सप्टेंबर २०१४ साली मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीचे कार्यकारी संचालक म्हणून ते निवृत्त झाले. त्यांच्या प्रशासकीय कामाचा तपशील मुद्दाम दिला आहे. याचे कारण देशमुख यांच्या लेखनाचे विषय या प्रदेशांनी व तिथल्या अनुभवांनी पुरविलेले आहेत. परभणी, कोल्हापूर गावामध्ये त्यांच्या अनेक साहित्यकृतींची निर्मिती झालेली आहे. दीर्घकाळ त्यांनी ज्या प्रशासकीय व्यवस्थेत काम केले तेथील अनुभवाधारित चित्रणविषय आलेले आहेत. प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामांची आखणी करून त्याची परिपूर्ती केली. विविध ठिकाणच्या त्यांच्या कार्यकाळात सेव्ह द बेबी गर्ल, स्वस्त धान्य दुकानांचा काळाबाजार रोखण्यासाठी सुरू केलेली एम. डिस्ट्रीब्युशन व व्हीटीएस सेवा, प्रौढ साक्षरता अभियान प्रकल्प, ई-चावडी, अकोल्यातील बालमजुरांसाठीचा नवजीवन प्रकल्प व पुणे येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील अद्ययावत संकुल ही त्यांची काही लक्षणीय प्रशासकीय स्वरूपाची कामे होत. त्यांच्या लेखनाचे मुख्य केंद्र या जीवनातून उद्भवलेले आहे. एक सकारात्मक रचनात्मक दृष्टिकोनातून प्रशासन व्यवस्थेकडे पाहणारा अधिकारी आणि व्यक्तिमत्त्वातील संस्कार या दुहेरी गोफातून त्यांचे वाङ्मयविश्व अवतरलेले आहे. या विविध तऱ्हेच्या अनुभवांचा उपयोग त्यांनी लेखनासाठी केला. प्रशासकीय जीवनातील विविध रंगचित्रे त्याच्या भल्याबुच्यासह ललित साहित्यातून मांडली.<br> {{gap}}मराठवाडा हा त्यांच्या घडणीचा व प्रशासकीय सेवेचा दीर्घकाळ कालावधी राहिला. या परिसराशी ते आंतरिकरीत्या जोडले गेलेले आहेत. या प्रदेशाने व तिथल्या<noinclude>{{left|'''६ ■ लक्षदीप'''}}</noinclude> 15jyf2plncqnlb4ek2shi7dsosws47p पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/8 104 29117 235361 141241 2026-08-10T09:16:08Z कल्पनाशक्ती 3813 235361 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>लोकजीवनाने त्यांना लेखनाचे अनेक विषय दिले आहेत. लेखक म्हणून परिसराशी त्यांची जैव स्वरूपाची गुंतवणूक आहे.<br> {{center| '''२.'''}} {{gap}}देशमुख यांनी विविधस्वरूपी वाङ्मयाची निर्मिती केली आहे. कथांजली (१९८७), अंतरीच्या गूढगर्भी (१९९५), उदक (१९९७) (पुढील आवृत्तीचे शीर्षक - पाणी! पाणी! पाणी!), नंबर वन (२००८), अग्निपथ (२०१०) व सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी (२०१३) हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. सलोमी (१९९३), ऑक्टोपस (२००६), अंधेरनगरी (१९९४), होते कुरूप वेडे (१९९७), इन्किलाब विरुद्ध जिहाद (२००४) व हरवलेलं बालपण (२०१४) या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित आहेत. दूरदर्शन हाजीर हो (बालनाट्य, १९९७) व अखेरची रात्र (२०१४) ही त्यांची नाटके प्रकाशित आहेत. याशिवाय प्रशासननामा (२०१३) व बखर प्रशासनाची (२०११) ही त्यांची प्रशासनविषयावरील दोन पुस्तके प्रकाशित आहेत. शिवाय विविध नियतकालिकांतून त्यांनी वैचारिक,सामाजिक व प्रवासवर्णनपर लेखनही केले आहे. त्यांच्या काही कथांवर चित्रपटनिर्मिती होते आहे.<br> {{center|'''३.'''}} {{gap}}१९६५-६६ दरम्यान बालवयात साधना साप्ताहिकातील एका बालकथेने त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. पुढे काही रहस्यकथाही त्यांनी लिहिल्या. कथासाहित्यप्रकारात देशमुख यांनी विविधस्वरूपी लेखन केले आहे.'अंतरीच्या गूढगर्भी' पासून 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' असे त्यांचे सहा कथासंग्रह प्रकाशित आहेत. आरंभीच्या कथालेखनावर रोमँटिक आदर्शवादाची छाया आहे. कथांजली व अंतरीच्या गूढगर्भी या संग्रहातील कथाविश्व मध्यमवर्गीय भावविश्वाशी संबंधित आहे. स्त्रीपुरुष नात्यांचा शोध, मानवी वर्तनातील काही तणावांचे चित्र या कथाचित्रणात आहे. पुढे मात्र समस्याकेंद्री कथामालिका त्यांनी लिहिल्या. समकाळात भेडसावणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. एका आशयसूत्राच्या विविध परी चित्रित करण्याचा हा प्रयत्न केला आहे. पाणीसमस्या,खेळाडूंचे भावविश्व व स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न या जीवनाधारित कथांचे संग्रह पुढील काळात प्रसिद्ध झाले. एकेक प्रश्न घेऊन त्या प्रश्नांचे विविध कंगोरे धुंडाळण्याची ही रीत आहे. 'थीमबेस्ड कथा' असे त्यांना म्हटले आहे. सामाजिक समस्यांचे चित्रण करणाच्या या महत्त्वाच्या कथामाला आहेत.<br> {{gap}}या संग्रहात ‘मर्सी किलिंग' ही वेगळ्या विषयावरची कथा आहे. प्रियू नावाच्या कुटुंबवत्सल स्त्रीला मुलगा होतो. तो केवळ शरीराने वाढतो. मेंदू व बुद्धीने वाढ न होणारा तो मांसाचा गोळा होता. आपल्यानंतर त्याचे कसे होईल या भावनेने ती<noinclude>{{right|'''लक्षदीप ■ ७'''}}</noinclude> t30iloann2ufst6phgxs5zmq7pemury पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/9 104 29118 235362 141377 2026-08-10T09:19:32Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 235362 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>अनिच्छेने मस किलिंग करते, जगणे हे जेव्हा मरणाहून दुःसह होते. तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांच्या परवानगीने त्याचा मृत्यू घडविला जातो. त्याप्रमाणे कथानायिका आपल्या मुलाला नाहीसे करते. पुढे ती मनाला विरंगुळा वाटावा म्हणून बालवीरांच्या साहसकथा लिहिते. त्या कथा लोकप्रिय होतात. अनेक बालवाचकांची तिला पत्रे येतात. तिच्या लेखनाची वाचकप्रियता एका बाजूला उंचीवर आलेली असता तिच्या कथेतील मानसपुत्र नंदूचा ती शेवट करते. याचा तिला त्रास होतो. प्रत्यक्षातील जगणे आणि कलानिर्मिती यातला हा ताण आहे. कलानिर्मितीतील जीवनानुभवावर प्रत्यक्षातल्या जगण्यातले दाब असतात. या द्वंद्वातून या कथेची निर्मिती झाली आहे. 'अंतरीच्या गूढगर्भी' कथेत मानवी मनातील भावस्पंदनाचा विचार आकारला आहे. आत्मपर निवेदनातून उलगडलेली ही कथा आहे. कथेतील मी मानसशास्त्रज्ञ आहे. औरंगाबादला जया नावाच्या मुलीशी त्याचा विवाह झालेला. तिचे आधी मकरंद नावाच्या तरुणाशी लग्न ठरलेले; परंतु लग्नापूर्वीच एका अपघाताने तो मरण पावलेला. तिच्या मनात मकरंदविषयी एक घर असते. मात्र हळूहळू ती ते विसरते. मात्र लग्नापूर्वी नवऱ्याला हा विषय कधी न काढायच्या अटीवर ती लग्नास तयार होते. पुढे त्यांना मुलगा होतो. तो तिला अनाहूतपणे पत्राने मुलाचे नाव मकरंद ठेवायला सांगतो. त्याच्या मनातील मकरंदविषयीची मत्सरभावना वा त्याची अदृश्य छाया त्याला सतावत होती. स्वतःच्या सुखाला कुरतडणाच्या व्यथेमुळे कळत न कळत तो पत्रात उच्चार करतो. आपण केलेल्या उच्चाराबद्दल त्याच्या मनात कमालीचा अपराधभाव आहे. मात्र कथेचा शेवट सुखान्त स्वरूपाचा आहे. मानवी वर्तनात सुप्तपणे वसत असलेल्या अंतरीच्या भावनांचा आविष्कार या कथेत आहे.<br> {{gap}}‘पाणी! पाणी! पाणी!' या कथासंग्रहात महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनातील पाणी या विषयसूत्राभोवतीच्या कथा आहेत. मराठीतील अशा विषयावरच्या या लक्षणीय स्वरूपाच्या कथा आहेत. ‘भूकबळी' ही उल्लेखनीय कथा या संग्रहात आहे. महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त परिस्थितीवर भाष्य करणा या कथा या संग्रहात आहेत. मराठवाड्यातील एका दुष्काळी गावी रोजगार हमीवर काम न मिळाल्यामुळे ठकूबाई या स्त्रीचा उपासमार होऊन बळी जातो. त्या घटनेचे तहसीलदार शिंदे या संवेदनशील अधिकाऱ्याच्या नजरेतून हे वास्तव कथन केले आहे. तहसील कचेरीतील क्लार्क, तलाठी, मुकादम, मुनीम, कृषी सहायक व रेशनदुकानदार मालक; गरीब माणसांना कसे नाडतात, शोषण करतात याचे विदारक असे चित्र या कथेत आहे. काळगाव दिघी या मराठवाड्यातील एका छोट्या गावी गाडीलोहार कुटुंबातील स्त्रीच्या मृत्यूचे केविलवाणे व करुणास्पद चित्र या कथेत रेखाटले आहे. प्रशासनातील यंत्रणा सामान्याच्या शोषणाला व मरणाला कशी कारणीभूत ठरते याचे बारकाईने चित्रण या कथेत आहे. ‘दौरा' या कथेतही दुष्काळी अवर्षणग्रस्ताची पार्श्वभूमी आहे. मराठवाड्यातील रोटेगाव वैजापूर भागातील<noinclude>{{left|'''८ ■ लक्षदीप'''}}</noinclude> m1kg36i7j02ymxw5mtzcd87ece0b9mv पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/10 104 29119 235363 141379 2026-08-10T09:22:41Z कल्पनाशक्ती 3813 235363 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>दुष्काळी परिसरात पत्रकारांचा पाहणी दौरा आयोजित केला आहे.या पत्रकारांच्या गटात प्रदीप नावाचा संवेदनशील पत्रकार आहे. त्याच्या नजरेतून हा पाहणी दौरा टिपला आहे. सलगच्या दुष्काळाने हा परिसर काळवंडून गेलेला आहे. पत्रकारांचे एक जग या कथेत आहे. जे जग या पाहणी दौऱ्याकडे केवळ सहल म्हणून पाहते. मौजमजा व साइट सीइंग म्हणून ते याकडे पाहतात. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी व सद्यःस्थितीशी त्यांचे काहीही देणेघेणे नसते. न पिकलेली शेती, पिण्याच्या पाण्याची समस्या, रोजगार हमीची तुटपुंजी कामे, रेशन दुकानदाराची मनमानी यातून एका कडवट काळ्या, करड्या रंगाचे चित्र उभे केले आहे. एका बाजूला हिरवा सुपीक समृद्ध प्रदेश व दुसऱ्या बाजूला कोरडा भणंग प्रदेश या विषयीच्या भौगोलिक परिसराचे चित्र या कथेत आहे. प्रदीप आपला जुना कॉलेजचा मित्र तहसीलदार पाटील यांच्या बरोबर दुष्काळातील विविध ठिकाणची पाहणी करतो. या पाहणीदरम्यान चांगल्या शासकीय योजनांचा भ्रष्टाचार व लालफितीच्या कारभारामुळे कसा फज्जा उडतो याचे दृश्य प्रदीपला दिसते. प्रदीप मुंबईला आल्यानंतर या दुष्काळी भागावर फार चांगली स्टोरी करतो. मात्र ती वृत्तपत्रात छापली जात नाही.<br> {{gap}}'उदक' कथेत सामाजिक संदर्भाची अनेक परिमाणे आहेत. पाण्याविनाची तीव्रता किती खोलवरची असू शकते, पाणी हे बहिष्काराचे व शोषणाचे हत्यार असू शकते, आणि सत्ताधारी वर्ग त्याचा मुजोरपणे वापर करू शकतो याची जाणीव ही कथा देते. दलितांमधील नवजागृतीमुळे गावातील सवर्णांचा पोकळ स्वाभिमान दुखावला जातो व नवबौद्धांवर गाव बहिष्कार टाकतो. एका तांड्यावर त्यांना आश्रय घ्यावा लागतो. तो चढणीवर असल्यामुळे तिथे पाण्याची सोय नसते. बी.डी.ओ. नी तिथे एका टॅकरची सोय केलेली असते. या बौद्धवाड्यातील दहावी झालेल्या विचारी प्रज्ञाची ही शोकान्त कथा आहे. प्रज्ञाची रमावहिनी गर्भवती आहे. ती तापाने फणफणलेली आहे. दवाखान्याची सोय नाही. ताप कमी व्हावा म्हणून अंग पाण्याने पुसून घ्यावे लागते. तेही नीट मिळत नाही. पाणी आणण्यासाठी ती टँकरकडे जाते, त्या वेळी इब्राहिम ड्रायव्हर तिच्यावर अत्याचार करतो. ती पाणी घेऊन येते त्यावेळी रमावहिनी व तिचे बाळ मरण पावलेले असते. एकाच वेळी जात आणि स्त्रीच्या लैंगिक शोषणाची जाणीव ही कथा करून देते. पाणी माणसाला बहिष्कृत करते. अनेक माणसे, स्त्रिया यात पिचतात, या जाणिवेचे सूचन करणारी ही महत्त्वाची कथा आहे.<br> {{gap}}थीम बेस्ड कथेचा आणखी एक आविष्कार म्हणजे 'नंबर वन' (२००८) हा कथासंग्रह. खेळाडूंमधील माणसांच्या कथा असे शीर्षकात त्यांनी म्हटले आहे. खेळाडूंमधील माणूसपण शोधण्याचा हा प्रयत्न आहे. देशमुख यांच्या लेखक म्हणून संवेदनशीलतेचे वेगळेपण म्हणजे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले; त्या त्या अनुभवक्षेत्राचा उपयोग त्यांनी आपल्या ललित लेखनात<noinclude>{{right|'''लक्षदीप ■ ९'''}}</noinclude> s8c8f9722nlhvwn0torwox9a3gzhx20 पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/11 104 29120 235364 136409 2026-08-10T09:25:15Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 235364 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>केला आहे. पुण्यातील क्रीडा व युवक सेवा विभागाचे संचालक म्हणून काही वर्षे ते कार्यरत होते. या काळातील खेळाडूंचे विश्व त्यांनी जवळून पाहिलेले असणार. त्यांच्या भावविश्वाच्या कथा ‘नंबर वन' मध्ये समाविष्ट आहेत. समाजजीवनात खेळाडूंच्या विशिष्ट प्रतिमा तयार झालेल्या असतात. या स्व-स्वप्नप्रेमात खेळाडू मश्गूल असतात. या खेळाडूंचे खाजगी आयुष्य कोणत्या प्रकारचे असते, स्वप्रतिमेच्या आहारी गेल्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांचे व्यक्तिगत आयुष्य कोलमडून पडते. माणूसपण आणि कलावंतखेळाडू यांच्यातील झगडा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात वसत असतो. या पेचाला देशमुखांच्या कथेने साकार केले आहे. समाजाचे रिअल हिरो असणाऱ्या खेळाडूंच्या भावविश्वाच्या या कथा आहेत. खेळाडूंच्या संघर्षाच्या विजिगीषा वृत्तीच्या या कथा आहेत. विजयासाठी झुंजणाऱ्या खेळाडूंच्या या कथा आहेत. जीवनातील अडथळे पार करून यशस्वी ठरलेल्या खेळाडूंच्या कथा या संग्रहात आहेत, पाथरवट समाजातील मीना आशियाई स्पर्धेत दुसरी येते. गुन्हेगारी जगतातील एका शार्प शूटरचे राष्ट्रीय खेळाडूत रूपांतर होते. तर मधुमेहासारख्या आजाराने त्रस्त असणारा बॅडमिंटनपटू यश संपादन करतो. पिचलेल्या समाजातील उपजत गुणवत्तेचा अन्वयार्थ या संग्रहातून प्रकटला आहे.<br> {{gap}}याबरोबरच या कथांमधून खेळाडूंच्या जीवनातील दुसऱ्या बाजूचेही चित्रण आहे. जिंकण्यासाठी ते वाट्टेल ते करत राहतात. असूया, जीवघेणी स्पर्धा आणि अपेक्षित यश ज्यावेळी मिळत नाही त्यावेळी ते प्रत्यक्ष कोलमडून पडतात. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षातले आपले सौंदर्य आणि खेळ यांच्या काचात अडकलेल्या प्रतिमा आहेत. तर ‘बंद लिफ्ट' सारख्या कथेत नजीकच्या काळातील भारतातील दोन महान खेळाडूंच्या विश्वावर आधारित कथा आहेत. या संग्रहातील कथासूत्रांना आणखी एक पदर आहे. तो म्हणजे महिला खेळाडूंच्या भावविश्वाच्या कथा. महिला खेळाडूंकडेही समाज भेददृष्टीने पाहतो. क्रीडाजगतातील 'रन बेबी रन' या कथेतील महिला ॲथलेटिक खेळाडू व तिच्या प्रशिक्षकाच्या अनोख्या विश्वाची, शोकात्म संवेदनेची कथा आहे. तिला मिळणाऱ्या दुय्यमत्वाची वागणूकच या कथांमधून साकारली आहे. या खेळाडू यशस्वी झाल्या तरी समाज त्यांच्याकडे मादी, पत्नी, प्रेयसी रूपातच पाहतो. या जाणीवविश्वाच्या या कथा आहेत.<br> {{gap}}‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' (२०१३) हा देशमुख यांचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार करणारा कथासंग्रह. स्त्रीभ्रूणहत्येविषयक जाणिवेचे सूत्र या संग्रहामध्ये आहे. समकालीन वास्तवातील एका महत्त्वाच्या गंभीर स्वरूपाच्या भयकारक विषयाकडे लक्ष वेधले आहे. सामाजिक जीवनातील या प्रश्नास कथांमधून सजीव केले आहे. भारतीय समाजात स्त्रीकडे नेहमीच गौणत्वाने पाहिले गेले आहे. आधुनिकीकरणाच्या टप्प्यावर या समाजाने एक विचित्र असे समाजवास्तव आकाराला आणले. समाजाने चुकीच्या धारणी तयार केल्या आहेत. मुलगा हा वंशाचा दिवा, कुलदीपक, म्हातारपणाची<noinclude>{{left|'''१० ■ लक्षदीप'''}}</noinclude> 8y2c2hzg2ylry0227wglroeqn4c2rmr पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/12 104 29121 235365 136410 2026-08-10T09:27:42Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 235365 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>काठी असे निरर्थक समज तयार झाले आहेत. लिंग-चाचणी ही चांगल्या कामासाठी निष्पन्न झालेली वैज्ञानिक गोष्ट. मात्र त्याआधारे असंख्य निरपराध मुलींची हत्या राजरोसे सुरू आहे. अशा विचित्र आकाराला आलेल्या समाजशास्त्र वास्तवाची कैफियत या कथांमधून मांडली आहे. पुरुषी श्रेष्ठत्वाच्या भावनेने हे आधुनिक ज्ञानाच्या आधारे हत्यासत्र चालू आहे. या विविध मालाकथांमधून स्त्रीभ्रूणहत्येविषयीचे चित्र केले आहे. वर्तमानात आणि भविष्यात अमानवी स्वरूपाचा विषम समाज आपण रचत आहोत याचे गंभीर भान या कथा देतात.<br> {{gap}}गर्भातच मारल्या गेलेल्या अनेक अनाम कळ्यांचे व त्यांच्या मातांचे आक्रोश या कथांमध्ये आहेत. 'लंगडा बाळकृष्ण' या कथेत प्रतीकात्मक स्वरूपात या स्त्रीभ्रूणहत्येच्या क्रौर्याची परिसीमा काय असू शकते याचे खोलवरचे भेदक असे चित्रण आहे. या कथाचित्रणाला समकाळातील सत्यघटनेचे संदर्भ आहेत. चिमण्या गर्भाला नाहीसे करण्यासाठी डॉक्टर पतीने दवाखान्यात दोन कुत्री बाळगलेली असतात. मात्र प्रत्यक्ष स्वतःच्याच मुलाचा लचका ही कुत्री तोडतात त्यावेळी डॉक्टर कुत्र्यांवर गोळ्या झाडतात. 'केस स्टडीज' या अनोख्या कथेत भविष्यात येऊ घातलेल्या सामाजिक समस्येचे चित्रण आहे.<br> {{gap}}१९९१ - कांद्यापोह्याची सेंचुरी, २०११ - नकाराचा सिक्सर पण मुलीकडून २०३१ - किंवा नंतरचं दशक गे-वरवधू सूचक मेळावा या क्रमाने विषम समाजरचना तयार होते आहे. विवाहसंस्थेचा प्रश्न किती बिकट होईल याची सूचना या कथेत आहे. भारतभूमी ही लँड विदाऊट डॉटर्स होते आहे याची जाणीव या सर्व कथा देतात. 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' कथेत पोटातल्या मुलीचा आपल्या आईबरोबरचा संवाद आहे. ती मुलगी आईला म्हणते, ममा, तू सावित्रीची लेक होतीस. आहेस, पण तुझा नवरा - माझा बाप-पपा ते कुठे ज्योतीरावाचे वारस आहेत? विचारानं ते तर जुन्या काळातले सरंजामवादी व आजच्या काळातले भांडवलदार आहेत. ज्यांच्या लेखी स्त्री ही एक क्रयवस्तू आहे आणि तिचं मूल्य नगण्य आहे. ती पुरुषांना हवी तेवढीच, तेवढ्या प्रमाणात, मालकी हक्कानं हवी बस, या विचारदृष्टीचा प्रभाव त्यांच्या या सबंध कथांवर आहे. या कथेतील मुलगी शेवटी म्हणते, 'ही कथा वाचून काही पुरुषांच्या डोळ्यात अंजन पडलं तरी माझ्या न जगलेल्या जन्माचं सार्थक होईल.' असा या सर्व कथेचा हेतू आहे. या समस्याप्रधान विचारकथा आहेत. देशमुख हे कोल्हापूरला जिल्हाधिकारी असताना 'सेव्ह द बेबी गर्ल' हे अभियान राबविले होते. या उपक्रमाद्वारे समाजात जाणीवजागृती होण्यास मदत झाली होती. या थीमबेस्ड कथांमधून स्त्रीभ्रूणहत्येची यंत्रणा, त्यातील बारकावे व समाजाची मानसिकता याचे बारकाईने चित्रण आले आहे. बदलत्या मानसिकतेतून व विकृत हव्यासाचा भयावह आलेख या कथांत आहे.{{nop}}<noinclude>{{right|'''लक्षदीप ■ ११'''}}</noinclude> lib0rxnq98gzihj5146fhvhgu9l7u6j पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/13 104 29122 235366 136411 2026-08-10T09:31:47Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 235366 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|'''४.'''}} {{gap}}लक्ष्मीकांत देशमुख यांचे कादंबरीवाङ्मय हे विविधस्वरूपी आहे. गेल्या दोनएक दशकात त्यांच्या सहा कादंबऱ्या प्रकाशित आहेत. समस्याचित्रण, राजकीय जाणिवा ते आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे चित्रण असे विविध विषय त्यांच्या कादंबऱ्यातून चित्रित झाले आहेत. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या सलोमी, अंधेरनगरी, होते कुरूप वेडे, ऑक्टोपस, इन्किलाब विरुद्ध जिहाद आणि हरवलेले बालपण या कादंबऱ्या प्रकाशित आहेत. या कादंबऱ्यातून विविध प्रकारची आशयसूत्रे व्यक्त झाली आहेत. दीर्घकाळ प्रशासकीय क्षेत्रात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. आपल्या अवतीभोवतीच्या जगातून आपल्या कादंबऱ्यांचे विषय त्यांनी निवडले आहेत. 'मी माणसं वाचणारा लेखक आहे' असे त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. तद्वत आपल्या दीर्घकाळाच्या प्रशासकीय सेवाकार्यकाळात त्यांना जे अनुभव आले त्या अनुभवाधारित या कादंबऱ्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यातून प्रशासनातील व राजकारणातील महत्त्वाच्या जाणिवांचे प्रकटीकरण झाले आहे.<br> {{gap}}त्यांच्या या कादंबऱ्यांच्या आशयसूत्रांचे तीन सूत्रात विवरण करता येईल. सलोमी व हरवलेलं बालपण या कादंबऱ्यातून सामाजिक समस्येचे चित्रण मांडले आहे. ऑक्टोपस व अंधेरनगरी या दोन कादंबऱ्या समकालीन प्रशासन विषयावरच्या आहेत. तर एक वेगळ्या आणि अनोख्या विषयाची मांडणी करणाऱ्या बृहद कादंबरीत वेगळा विषय 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मध्ये मांडला आहे. मराठी कादंबरीत राजकीय जीवनाचे चित्रण फारसे प्रभावीपणे आलेले नाही. वास्तविक पाहता राजकीय जाणिवा ह्या मानवी जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहेत. सामाजिक जीवनातील राजकारणाचे ताणेबाणे, त्यातील सूक्ष्मता कादंबरीत मराठी लेखकांना फारशी आणता आलेली नाही आणि आली तरी ती पृष्ठस्तरावरून कादंबरीचे नेपथ्य वा पार्श्वभूमी म्हणून आलेली आहे. राजकारणाचा खोलवरचा वेध घेणाऱ्या कादंबऱ्या मराठीत अपवादानेच आढळतात.<br> {{gap}}सलोमी आणि दौलत (१९९०) या त्यांच्या दोन लघुकादंबऱ्या. या दोनही कादंबऱ्यांतून देशमुख यांनी वेगळे विषय मांडले आहेत. सलोमी या साठेक पृष्ठांच्या लघुकादंबरीत एका मुस्लीम बंडखोर तरुण स्त्रीच्या वाताहतीची कहाणी सांगितली आहे. मराठीतील लोकप्रिय लेखक बाबा कदम यांची छोटेखानी स्वरूपाची प्रस्तावना या कादबरीस आहे. सलोमीची शोकान्त करुण अशी ही कहाणी आहे. आधुनिक काळातही मुस्लीम स्त्रियांना स्वातंत्र्याचा अवकाश उपलब्ध नाही. स्वतःच्या मनासारखे निर्णय त्यांना घेता येत नाहीत. अशा वेळी त्यांच्या मनाची होणारी पराकोटीची कुचंबणा हा या कादंबरीचा विषय आहे. सलोमीच्या २८ वर्षातील पूर्वकाळातील नोंदी या कादंबरीत आहेत. धर्मांध, रूढी रिवाजांचे चित्रण आहे. तर त्याच काळातील नव्या सामाजिक जागरणाच्या अवकाशाचेही चित्रण तीमध्ये आहे. पितृसत्तेची दहशत आणि<noinclude>{{left|'''१२ ■ लक्षदीप'''}}</noinclude> j5xl8p72khlr3zmmf0kx4aeowdza90a अनुक्रमणिका:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf 106 104087 235374 235226 2026-08-10T11:56:00Z कल्पनाशक्ती 3813 235374 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=गोविंद चिमणाजी भाटे |Address=कुलाबा |Year=1936 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist 8="अनुक्रमणिका" 10="विषयप्रवेश" 14="सिंधु नदी व सिंध प्रांत" 19 ="कराची शहर व बंदर" 29="फोटो" 30="फोटो" 37="फोटो" 38="फोटो" 44="जुनीं तीन प्रख्यात शहरें" 55="फोटो" 56="फोटो"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] 99k65q3bvruwl3dfqamq3xktkdkicq3 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/४५ 104 111148 235367 235248 2026-08-10T11:04:00Z कल्पनाशक्ती 3813 235367 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(३३)'''}}}} नसतें. सामुग्री, लेखी पुरावा, भरपूर नसतांनादेखील शास्त्रीय पद्धतीने पायाशुद्ध चरित्र लिहिणे कसे शक्य होतें, तें पुढच्या यादीतील काही चरित्रे वाचल्यानें- गौतमबुद्ध व येशू ख्रिस्त-लक्षात येईल. <center> {| |+ |- |१ || ओल्डनबर्ग.{{gap}}{{gap}} {{gap}} ||गौतमबुद्ध. |- | ||( Oldenberg.){{gap}}{{gap}}{{gap}} ||Life of Buddha.) |- |२ || रनी. {{gap}}{{gap}}{{gap}} ||येशू ख्रिस्त, |- | || (Renan.) {{gap}}{{gap}}{{gap}} || (Life of Jesus Christ.) |- |३ ||मार्गोलियूथ.{{gap}}{{gap}}{{gap}} || महंमद. |- | || (Margoliuth.){{gap}}{{gap}}{{gap}} || (Life of Mahomed.) |- |४ || जे. सी. मॉरिसन.{{gap}}{{gap}}{{gap}} || सेन्ट बर्न |- | || (J. Cotter Morrison.){{gap}}{{gap}}{{gap}} ||(St. Bernard.) |- |५ || ली. {{gap}}{{gap}}{{gap}} || शेक्सपियर. |- | || (Sydney Lee) {{gap}}{{gap}}{{gap}} || (Life of Shakespeare.) |- |६ || सी. एच. फर्थ. {{gap}}{{gap}}{{gap}} || ऑलिव्हर क्रॉम्बेल. |- | || (C. H. Firth.) {{gap}}{{gap}}{{gap}} || (Oliver Cromwell.) |- |७ ||लॉर्ड मॉर्ले. {{gap}}{{gap}}{{gap}} || (अ) ग्लॅड्स्टन. |- | ||(Lord Morley.) {{gap}}{{gap}}{{gap}} || (Gladstone.)<br> |- | || --{{gap}} {{gap}} {{gap}} || ( ब ) क्राम्बेल. |- | || -- {{gap}}{{gap}}{{gap}} || (Cromwell.) |- | || || (क) व्हाल्टेअर |- | || || (Voltaire.) |- | || || (ड) दीदरो. |- | || || ( Diderot.) |- | || || ( इ ) रूसो |- | || ||(Rousseau. ) |- |८ || बॉवेल.|| सॅम्युएल जॉनसन. |- | ||( Boswell. )|| (Dr. Johnson. ) |- |९ || इक्स्ले. || हयूम.<noinclude>{{nopt}} |}</noinclude> mxe2fz7k0pi7067pbzg0giysazrzdp1 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/४६ 104 111149 235368 235246 2026-08-10T11:04:10Z कल्पनाशक्ती 3813 235368 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(३४)'''}}}} {| |-</noinclude>{{nopt}} |- |( Huxley.) ||(Hume.) |- |१० जे. एच. रोज ||नेपोलियन बोनापार्ट. |- |(J. Holland Rose.) ||(Life of Nepolean Bonaparte. |- |११ एडवर्ड केअर्ड. || हेगल. |- |( Edward Caird. ) ||( Hegel. ) |- |१२ लेस्ली स्टीफन.|| सर जेम्स फिटझजेम्स स्टीफन. |- |(Leslie Stephen.) ||(Sir James Fitz James Stephen.) |- |१३ मेट्लंड. || लेस्ली स्टीफन. |- |( F. W. Maitland.}||(Life & Letters of Sir Leslie Stephen) |- | १४ व्हिन्सेन्ट स्मिथ || अशोक. |- |(Vincent Smith.) || (Life of Ashoka.) |} {{gap}}नुसती नामावळी सांगत गेल्यास पानेच्या पाने भरतील; पण नुसता नामोच्यारणाचा येथें उद्देश नाहीं. इंग्रजी भाषेतल्या कांहीं नाणावलेल्या चरित्रांचीं नांवें मासल्याकरतां वर दिलीं आहेत. चरित्र चांगलें वठण्यास सामग्री शिवाय नायक योग्य पाहिजे खरा; पण त्याबरोबर लेखकहि चतुर, बहुश्रुत, रसिक, अनुभवी व विद्वान् असा पाहिजे. चरित्र लिहिणें ही एक कला आहे. ती इतर कलांप्रमाणे पाहूनपाहून शिकावयाची असते. लेस्ली स्टीफन यांच्या देखरेखीखालीं प्रथम सुरू झालेला "राष्ट्रीय चरित्रकोश" (Dictionary of National Biography) व त्याचे अनेक भाग पाहिले, ह्मणजेचरित्र लिहिण्याची कला इंग्लंडमध्ये किती वाढली आहे, हें सहज लक्षांत येईल. शेक्सपियरच्या प्रसिद्ध चरित्राचे लेखक सिडने ली, यांना लेस्ली स्टीफन यांच्या हाताखालीं वरील कोश तयार करविण्यांत तालीम मिळाली होती, व लेस्ली स्टीफन यांनी संबंध सोडल्यानंतर यांनीच तो पुरा करविला, व अजूनहि सूत्र यांच्याच हातांत आहेत, हे येथे सांगितल्यास वावगे होणार नाहीं. या कोशाकरतां नुकतेच त्यांनी माजी बादशहा सातवे एडवर्ड यांचे चरित्र लिहिलें आहे. हे वाचकांना आठवत असेलच.{{nop}}<noinclude></noinclude> 360cajbkeei4927m27atnuayjvv3cou पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/४७ 104 111392 235348 235239 2026-08-10T07:15:22Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235348 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जुनीं तीन प्रख्यात शहरें|३३}}</noinclude>कडून मोटारीनें विजापूर शहराकडे जाऊं लागलें म्हणजे ज्याप्रमाणे मोडक्या तोडक्या इमारती व थडगीं जागोजाग दिसतात तसाच या ठठ्ठा शहराच्या मकली टेंकडीचा देखावा दिसतो. '''मकली टेकडी''' ही टेकडी कसची! पण म्हणतात ना '''निरस्तपादपे देशे एरंडोपिद्रुमायते''' त्याप्रमाणें '''निरस्त पर्वते देशे शिल्लोचयो पर्वतायते''' असें नवें सुभाषित माझ्या तोंडून सहज बाहेर पडलें! ही क्षुद्र टेंकडी- नव्हे टेंकडीवजा उंचवठा टाकल्यावर डाव्या हातास एक उथळे व गवताळ पाण्याचा तलाव लागला. आणखी एक मैलभर आमची मोटरटॅक्सी पुढे गेली तरी शहराचा मागमूस लागेना. मात्र हा भाग सखल व थोडाफार हिरवागार दिसला. तेव्हां पूर्वी या भागाला नदीच्या पुराचे पाणी मिळत असावें असें वाटलें. शेवटी एकदां गांव लागले व आम्ही मोटारगाडीच्या अड्ड्याशी येऊन पोहोंचलों.<br>{{gap}}ठठ्ठा हे एका काळीं राजधानीचे शहर व महत्त्वाचें बंदर म्हणून आम्ही मोठ्या उत्सुकतेनें पहाण्यास आलों. पण प्रत्यक्ष पाहतां तें एक खेडेगांववजा गांव दिसलें व आमची मोठी निराशा झाली. उगाच या गांव येण्याच्या भरीस पडलों असें मला वाटलें. त्यांतल्या त्यांत गांव पहाण्याकरितां केलेल्या तजवीजी फुकट गेल्या. आम्ही ठठ्ठाच्या दोन लोकांना दोन पत्रे आणली होतीं. एक तेथल्या पब्लिकवर्क्सच्या सुपरवायझरला व दुसरें मराठी भाषा जाणणाऱ्या एका दुकानदाराला. आम्ही जंगशाही स्टेशनवर आमचें सामान ठेवण्याची तजवीज केली होती म्हणून बरें झालें. तेव्हां मोटारस्टँडवर आल्यावर आम्ही लागलीच ओव्हरसीयरच्या घराची चवकशी केली. दोनचार ठिकाणीं विचारल्यावर त्यांच्या घराचा पत्ता लागला. पण घराला कुलूप असल्यामुळें ते बाहेर गेले असावे असें समजून आम्ही दुकानदाराची चौकशी करीत गांव बरेंच हिंडलों. या गांवांतील बहुतेक घरें पांढऱ्या मातीचीं व कच्या विटांची दिसलीं व जरा बऱ्यांपैकी घरे तांबड्या भाजलेल्या विटांची<noinclude><br>{{gap}}सिं. प्रा.वृ.३</noinclude> ek52x0gw1h558buzxg3dp5l88rercfb पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/५४ 104 111397 235332 235256 2026-08-09T12:06:11Z JayashreeVI 4058 235332 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(४2)''' केली? का हल्लीं जसे हिमालयस्थ थोर गुरुदेव, गुहेत ध्यानस्थ बसून, देश सेवा व देशोन्नति झपाट्याने करीत आहेत, असें गुह्यविद्येचे भगत सांगत असतात, तशापैकीं कांहीं प्रकार होता? राजकारणांत शिवाजीवर छाप पाडण्याइतकी लोकस्थिति, व्यवहार, मराठे सरदारांचं वळण, विशेषतः आदिलशाहीचे सामर्थ्य याविषयी खडानखडा माहिती ब्रह्मचारी रामदासांनां होती काय! रामदासांना शिवाजीनें गुरु केव्हां केलें? भवानीचें कळसूत्री बाहुले, व रामदासांचं राज्यस्थापनेचें चालतें बोलतें साधन म्हणजे शिवाजी, अशी ही कादंबरी वाचतांना जी कल्पना होते, ती कितपत इतिहासाला धरून आहे? त्याचप्रमाणे तानाजी जर शिवाजीचा मावळांतला शूर विश्वासू, पण अडाणी सोबती होता, तर तो विजापुरला वेषांतर करून गेल्यानंतर बेमालूम ऊर्दु कसा बोलतो? अडाणी माणसाला देखील मावळांत उत्तम बोलतां येण्याइतका या दरबारी भाषेचा प्रचार त्याकाळी झाला होता काय? तो विजापुरला गेल्यानंतर शिकला असें ह्मणावे, तर तो फारच थोड्या वेळांत तरबेज झाला ह्मणावयाचा! तो अडाणी खरा, पण जात्या तैलबुद्धीचा असला पाहिजे. तसेच कथानकाच्या काळच्या स्थितीचें वर्णन वाचून, मुसलमान लोक ह्मणजे रानवट, क्रूर व शिरजोर, ह्मणूनच त्यांचा सालस हिंदूंवर अंमल बसला, अशी जी पुसट समजूत होते, ती कितपत न्याय्य आहे? वर्णन केलें आहे, तितका सर्व ठिकाणीं जर मुसलमानांचा खरोखर जुलूम असता, तर शहाजी व इतर मराठे सरदार, ज्यांच्यावर विजापुर दरबाराची भिस्त असे, ते हिंदु असून देखील नोकरी खुशीनें कशी बजावीत होते? त्यांना देशाभिमान कदाचित् नसेल, पण धर्माभिमान देखील नव्हता काय? मराठे सरदार असंतुष्ट होते, असें कोठेंहि कादंबरीत दाखविल्याचें आह्माला स्मरत नाही. उलट रंगरावासारखा पाणीदार, धर्मनिष्ठ किल्लेदार अति स्वामिनिष्ठ होता असें दाखविलें आहे. मावळ हा डोंगराळ प्रदेश होता; आणि घाटाच्या पायथ्याच्या दऱ्याखोऱ्यांत पुंडाई चालत असेल; पण त्यावरून आदिलशाहीची पारख करणें, ह्मणजे वायव्य सरहद्दीवर पठाणांची दांडगाई बहुतक नेहमीं चालूच असते, व पेशावर व इतर सरहद्दीच्या गांवांतल्या व्यापायांवर-हिंदूंवर-हल्ले होतात, म्हणून ब्रिटिश अमलांत चोहीकडे असें होतें, अंदाधुंदी असते, असें म्हणण्यासारखे आहे. खुद्द विजापुर शहरांत हिंदूंचा छळ होत असे, अशा रोंखाचें जें-<noinclude></noinclude> 9089voiovh0wuo73w76jcjr024tsaeb 235333 235332 2026-08-09T12:06:52Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235333 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(४2)'''}}}} केली? का हल्लीं जसे हिमालयस्थ थोर गुरुदेव, गुहेत ध्यानस्थ बसून, देश सेवा व देशोन्नति झपाट्याने करीत आहेत, असें गुह्यविद्येचे भगत सांगत असतात, तशापैकीं कांहीं प्रकार होता? राजकारणांत शिवाजीवर छाप पाडण्याइतकी लोकस्थिति, व्यवहार, मराठे सरदारांचं वळण, विशेषतः आदिलशाहीचे सामर्थ्य याविषयी खडानखडा माहिती ब्रह्मचारी रामदासांनां होती काय! रामदासांना शिवाजीनें गुरु केव्हां केलें? भवानीचें कळसूत्री बाहुले, व रामदासांचं राज्यस्थापनेचें चालतें बोलतें साधन म्हणजे शिवाजी, अशी ही कादंबरी वाचतांना जी कल्पना होते, ती कितपत इतिहासाला धरून आहे? त्याचप्रमाणे तानाजी जर शिवाजीचा मावळांतला शूर विश्वासू, पण अडाणी सोबती होता, तर तो विजापुरला वेषांतर करून गेल्यानंतर बेमालूम ऊर्दु कसा बोलतो? अडाणी माणसाला देखील मावळांत उत्तम बोलतां येण्याइतका या दरबारी भाषेचा प्रचार त्याकाळी झाला होता काय? तो विजापुरला गेल्यानंतर शिकला असें ह्मणावे, तर तो फारच थोड्या वेळांत तरबेज झाला ह्मणावयाचा! तो अडाणी खरा, पण जात्या तैलबुद्धीचा असला पाहिजे. तसेच कथानकाच्या काळच्या स्थितीचें वर्णन वाचून, मुसलमान लोक ह्मणजे रानवट, क्रूर व शिरजोर, ह्मणूनच त्यांचा सालस हिंदूंवर अंमल बसला, अशी जी पुसट समजूत होते, ती कितपत न्याय्य आहे? वर्णन केलें आहे, तितका सर्व ठिकाणीं जर मुसलमानांचा खरोखर जुलूम असता, तर शहाजी व इतर मराठे सरदार, ज्यांच्यावर विजापुर दरबाराची भिस्त असे, ते हिंदु असून देखील नोकरी खुशीनें कशी बजावीत होते? त्यांना देशाभिमान कदाचित् नसेल, पण धर्माभिमान देखील नव्हता काय? मराठे सरदार असंतुष्ट होते, असें कोठेंहि कादंबरीत दाखविल्याचें आह्माला स्मरत नाही. उलट रंगरावासारखा पाणीदार, धर्मनिष्ठ किल्लेदार अति स्वामिनिष्ठ होता असें दाखविलें आहे. मावळ हा डोंगराळ प्रदेश होता; आणि घाटाच्या पायथ्याच्या दऱ्याखोऱ्यांत पुंडाई चालत असेल; पण त्यावरून आदिलशाहीची पारख करणें, ह्मणजे वायव्य सरहद्दीवर पठाणांची दांडगाई बहुतक नेहमीं चालूच असते, व पेशावर व इतर सरहद्दीच्या गांवांतल्या व्यापायांवर-हिंदूंवर-हल्ले होतात, म्हणून ब्रिटिश अमलांत चोहीकडे असें होतें, अंदाधुंदी असते, असें म्हणण्यासारखे आहे. खुद्द विजापुर शहरांत हिंदूंचा छळ होत असे, अशा रोंखाचें जें-<noinclude></noinclude> l07wk0beox61vt52i8i44schy6xhkcc पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/५५ 104 111399 235334 2026-08-09T12:18:21Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{center|{{larger|'''(४3)'''}}}} वर्णन आहे, त्याला कांहीं पुरावा आहे काय? त्याकाळच्या हिंदूंची तशी समज होती, असें जरी थोडा वेळ मानिलें, तरी कादंबरीकारानें अशी उलटी समजूत होण्याची कारणे ओघाओघाने सा..." 235334 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(४3)'''}}}} वर्णन आहे, त्याला कांहीं पुरावा आहे काय? त्याकाळच्या हिंदूंची तशी समज होती, असें जरी थोडा वेळ मानिलें, तरी कादंबरीकारानें अशी उलटी समजूत होण्याची कारणे ओघाओघाने सांगावयास नको होती काय? बरें, मुसलमान जर इतके रानटी, त्यांचा धर्म जर सर्वथैव त्याज्य, तर रणदुल्लाखानाचा दिलदार स्वभाव, कृतज्ञता, शुद्धवर्तन, त्याच्या बहिणीचा कनवाळूपणा, यांची उपपत्ति कशी लावावयाची? त्यांचे पूर्वज हिंदु होते, व त्या संस्कारांचीं हीं फळें आहेत, महंमदी संस्कारांचीं नव्हेत, असें ह्मटल्यास धर्माभिमानाचा अतिरेकच होईल. असले कल्पनेचे चोचले इतिहासाला मान्य होणार नाहींत. <br>{{gap}}श्रीधरस्वामी, सांवळ्या, रंगराव किल्लेदार, नानासाहेब व त्यांची पत्नी, सूर्याजी व त्याची बायको इत्यादि इतर पात्रे आहेत. या नांवांच्या व्यक्ति त्या काळीं होत्या कीं नाहीं, हा प्रश्न विशेष महत्त्वाचा नाहीं; पण त्यांच्यासारख्या व्यक्ति त्या काळी होत्या कीं नाहीं, कादंबरीत दाखविलेले प्रसंग त्याकाळी त्यांच्यावर गुदरण्यासारखे होते की नाहीं, हे प्रश्न मुद्याचे आहेत. <br>{{gap}}अशा अनेक गोष्टींकडे लक्ष्य पुरवावयाचे असल्यामुळे ऐतिहासिक कादंबरी लिहिण्यास विस्तृत वाचन, शोध, व सतेज कल्पनाशक्ति यांची जरूर भासते यांत नवल नाहीं. आणि इतका आयास करून देखील इतिहास या दृष्टीने कादंबरीची फारशी मोठी किंमत होत नाहीं ती नाहीं! ह्मणून कादंबरी जरी असली, तरी स्कॉट आपल्या गोष्टींनां इतिहासाच्या आधाराचीं टाचणे जोडीत असे-दंतकथेवर आधार ठेविला असल्यास त्याप्रमाणे स्पष्ट दर्शवीत असे. ' Peveril of the Peak' या कादंबरीचा उपोद्घात व प्रास्ताविक पत्र, इच्छा असणारांनीं अवश्य वाचून पहावीत. बहुतेक प्रत्येक कादंबरीला उपोद्घात व टाचणे (Notes) स्कॉटने जोडिलीं आहेत. ऐतिहासिक कादंबरीच्या जनकाला देखील आपण कोणत्या माहितीवर आधार ठेविला आहे, तें दाखविणें अवश्य वाटलें. मग मराठी भाषेंतल्या पहिल्या नांवारूपास आलेल्या कादंबरीकारानें असेंच करावयाला नको होते काय? असे न केल्यानें, ऐतिहासिक किती, व काल्पनिक ह्मणजे कथानक सजविण्यासाठी पदरचें घातलेले किती, हें न समजल्यामुळे गोंधळ होत नाहीं काय? जुने दुराग्रह बळावत नाहींत काय? मुसलमानांविषयी भलतेच ग्रह असलेले महाराष्ट्रीय शेंकडों निघतील.{{nop}}<noinclude></noinclude> sa7xprucsnscbebknwii13nv5cuj9tp 235335 235334 2026-08-09T12:19:10Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235335 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(४3)'''}}}} वर्णन आहे, त्याला कांहीं पुरावा आहे काय? त्याकाळच्या हिंदूंची तशी समज होती, असें जरी थोडा वेळ मानिलें, तरी कादंबरीकारानें अशी उलटी समजूत होण्याची कारणे ओघाओघाने सांगावयास नको होती काय? बरें, मुसलमान जर इतके रानटी, त्यांचा धर्म जर सर्वथैव त्याज्य, तर रणदुल्लाखानाचा दिलदार स्वभाव, कृतज्ञता, शुद्धवर्तन, त्याच्या बहिणीचा कनवाळूपणा, यांची उपपत्ति कशी लावावयाची? त्यांचे पूर्वज हिंदु होते, व त्या संस्कारांचीं हीं फळें आहेत, महंमदी संस्कारांचीं नव्हेत, असें ह्मटल्यास धर्माभिमानाचा अतिरेकच होईल. असले कल्पनेचे चोचले इतिहासाला मान्य होणार नाहींत. <br>{{gap}}श्रीधरस्वामी, सांवळ्या, रंगराव किल्लेदार, नानासाहेब व त्यांची पत्नी, सूर्याजी व त्याची बायको इत्यादि इतर पात्रे आहेत. या नांवांच्या व्यक्ति त्या काळीं होत्या कीं नाहीं, हा प्रश्न विशेष महत्त्वाचा नाहीं; पण त्यांच्यासारख्या व्यक्ति त्या काळी होत्या कीं नाहीं, कादंबरीत दाखविलेले प्रसंग त्याकाळी त्यांच्यावर गुदरण्यासारखे होते की नाहीं, हे प्रश्न मुद्याचे आहेत. {{gap}}अशा अनेक गोष्टींकडे लक्ष्य पुरवावयाचे असल्यामुळे ऐतिहासिक कादंबरी लिहिण्यास विस्तृत वाचन, शोध, व सतेज कल्पनाशक्ति यांची जरूर भासते यांत नवल नाहीं. आणि इतका आयास करून देखील इतिहास या दृष्टीने कादंबरीची फारशी मोठी किंमत होत नाहीं ती नाहीं! ह्मणून कादंबरी जरी असली, तरी स्कॉट आपल्या गोष्टींनां इतिहासाच्या आधाराचीं टाचणे जोडीत असे-दंतकथेवर आधार ठेविला असल्यास त्याप्रमाणे स्पष्ट दर्शवीत असे. ' Peveril of the Peak' या कादंबरीचा उपोद्घात व प्रास्ताविक पत्र, इच्छा असणारांनीं अवश्य वाचून पहावीत. बहुतेक प्रत्येक कादंबरीला उपोद्घात व टाचणे (Notes) स्कॉटने जोडिलीं आहेत. ऐतिहासिक कादंबरीच्या जनकाला देखील आपण कोणत्या माहितीवर आधार ठेविला आहे, तें दाखविणें अवश्य वाटलें. मग मराठी भाषेंतल्या पहिल्या नांवारूपास आलेल्या कादंबरीकारानें असेंच करावयाला नको होते काय? असे न केल्यानें, ऐतिहासिक किती, व काल्पनिक ह्मणजे कथानक सजविण्यासाठी पदरचें घातलेले किती, हें न समजल्यामुळे गोंधळ होत नाहीं काय? जुने दुराग्रह बळावत नाहींत काय? मुसलमानांविषयी भलतेच ग्रह असलेले महाराष्ट्रीय शेंकडों निघतील.{{nop}}<noinclude></noinclude> 38ujgvm84wfzdu0sdlu0mpi0wjowpjh पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/५६ 104 111400 235336 2026-08-10T05:17:33Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ४४ ) ह्मणून कधी काळी उत्पन्न झालेले ग्रह तसेच पुढे न चालू देण्यास ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या शेवटीं टांचणे अवश्य पाहिजेत. इंग्लंड व स्कॉटलंड या दोन देशांमध्यें वैमनस्य कम..." 235336 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ४४ ) ह्मणून कधी काळी उत्पन्न झालेले ग्रह तसेच पुढे न चालू देण्यास ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या शेवटीं टांचणे अवश्य पाहिजेत. इंग्लंड व स्कॉटलंड या दोन देशांमध्यें वैमनस्य कमी नव्हते. पण तें वैमनस्य को उत्पन्न झालें होतें, तें कथाप्रसंगानें स्कॉटनें दाखवून दिलें आहे. Presbyterians व High Churchmen यांचा एकमेकांबद्दलचा तिरस्कार, त्वेष, यत्किंचितहि कमी न दाखवितो, अशा विपरीत भावनांचें कारण स्कॉटनें कसें कथानकांतच दाखविलें आहे, तें पहावयाचे असल्यास 'Peveril of the Peak यासारखा अप्रसिद्ध कादंबरी देखील वाचल्यास कळून येईल. ऐतिहासिक कादंबरीच्या अशा अनेक नडवणुकींमुळे फार जुन्या काळचीं कथानकें सोडून, भरपूर माहिती मिळण्यासारख्या काळांतली कथानके पसंत करण्याकडे लेखकांचा कल होऊं लागतो. जितका अलीकडचा काळ घ्यावा, तितके वाचन व शोध दोन्ही हि बेताचींच पुरी होतात. अलीकडच्या काळर्चे वर्णन करितां करितां, स्वतःच्या हयातीच्या काळचे वर्णन करण्याची कल्पना लेखकानां सुचण्यास वेळ लागत नाहीं. आणि गतकाळाकडून हयातीच्या काळा- कडे लक्ष लागले, की सामाजिक कादंबरीचा जन्म झाला, ऐतिहासिक कादं- बरीचे सामाजिक कादंबरीत रूपांतर झाले, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. एक आक्षेप. आता कोणी असा आक्षेप घेतील, कीं ऐतिहासिक कादंबरी व सामाजिक कादंबरी यांमध्यें खरोखर फरक नसून विनाकारण भेद दाखविला आहे. ता- त्त्विक दृष्टीनें विचार केला, तर गलेला आणि येणारा, एवढाच काय तो काळा- मध्यें भेद दाखवितां येतो. सध्यांचा काळ, ह्मणजे वर्तमानकाळ, नाहींसाच होतो. वर्तमान काळ अशी भावना होते न होते, तोच तो भूतकाळ बनतो. अनुभवास आलेला काळ झणजे भूतकाळ व अनुभवास येणारा व अपेक्षित झणजे भवि- ष्यकाळ, अशी जर वास्तविक स्थिति आहे, तर ज्याला अस्तित्वच नाहीं, अशा वर्तमानकाळाला अनुलक्षून केलेला ऐतिहासिक व सामाजिक कादंबरी हा भेद भ्रामक आहे. भूत व भविष्य हे दोनच काळ खरे आहेत, वर्तमानकाळ हा भास आहे, हैं आह्याला नाकबूल नाहीं. झणुनच ऐतिहासिक कादंबरीचे रूपांतर किती<noinclude></noinclude> cku22g95440xe4gj99qcvfuwi0zer48 235337 235336 2026-08-10T05:28:22Z JayashreeVI 4058 235337 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(४४)'''}}}} ह्मणून कधी काळी उत्पन्न झालेले ग्रह तसेच पुढे न चालू देण्यास ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या शेवटीं टांचणे अवश्य पाहिजेत. इंग्लंड व स्कॉटलंड या दोन देशांमध्यें वैमनस्य कमी नव्हते. पण तें वैमनस्य का उत्पन्न झालें होतें, तें कथाप्रसंगानें स्कॉटनें दाखवून दिलें आहे. Presbyterians व High Churchmen यांचा एकमेकांबद्दलचा तिरस्कार, त्वेष, यत्किंचितहि कमी न दाखविता, अशा विपरीत भावनांचें कारण स्कॉटनें कसें कथानकांतच दाखविलें आहे, तें पहावयाचे असल्यास 'Peveril of the Peak' यासारखी अप्रसिद्ध कादंबरी देखील वाचल्यास कळून येईल. <br>{{gap}}ऐतिहासिक कादंबरीच्या अशा अनेक नडवणुकींमुळे फार जुन्या काळचीं कथानकें सोडून, भरपूर माहिती मिळण्यासारख्या काळांतली कथानके पसंत करण्याकडे लेखकांचा कल होऊं लागतो. जितका अलीकडचा काळ घ्यावा, तितके वाचन व शोध दोन्ही हि बेताचींच पुरी होतात. अलीकडच्या काळचे वर्णन करितां करितां, स्वतःच्या हयातीच्या काळचे वर्णन करण्याची कल्पना लेखकानां सुचण्यास वेळ लागत नाहीं. आणि गतकाळाकडून हयातीच्या काळाकडे लक्ष लागले, की सामाजिक कादंबरीचा जन्म झाला, ऐतिहासिक कादंबरीचे सामाजिक कादंबरीत रूपांतर झाले, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. {{center|{{larger|'''एक आक्षेप.'''}}}} {{gap}}आता कोणी असा आक्षेप घेतील, कीं ऐतिहासिक कादंबरी व सामाजिक कादंबरी यांमध्यें खरोखर फरक नसून विनाकारण भेद दाखविला आहे. तात्त्विक दृष्टीनें विचार केला, तर गेलेला आणि येणारा, एवढाच काय तो काळामध्यें भेद दाखवितां येतो. सध्यांचा काळ, ह्मणजे वर्तमानकाळ, नाहींसाच होतो. वर्तमानकाळ अशी भावना होते न होते, तोच तो भूतकाळ बनतो. अनुभवास आलेला काळ म्हणजे भूतकाळ व अनुभवास येणारा व अपेक्षित म्हणजे भविष्यकाळ, अशी जर वास्तविक स्थिति आहे, तर ज्याला अस्तित्वच नाहीं, अशा वर्तमानकाळाला अनुलक्षून केलेला ऐतिहासिक व सामाजिक कादंबरी हा भेद भ्रामक आहे. <br>{{gap}}भूत व भविष्य हे दोनच काळ खरे आहेत, वर्तमानकाळ हा भास आहे, हे आम्हाला नाकबूल नाहीं. म्हणुनच ऐतिहासिक कादंबरीचे रूपांतर किती-<noinclude></noinclude> 2xnf7vc35o9h6r35qaoy4zixd0dmnzl 235338 235337 2026-08-10T05:28:47Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235338 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(४४)'''}}}} ह्मणून कधी काळी उत्पन्न झालेले ग्रह तसेच पुढे न चालू देण्यास ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या शेवटीं टांचणे अवश्य पाहिजेत. इंग्लंड व स्कॉटलंड या दोन देशांमध्यें वैमनस्य कमी नव्हते. पण तें वैमनस्य का उत्पन्न झालें होतें, तें कथाप्रसंगानें स्कॉटनें दाखवून दिलें आहे. Presbyterians व High Churchmen यांचा एकमेकांबद्दलचा तिरस्कार, त्वेष, यत्किंचितहि कमी न दाखविता, अशा विपरीत भावनांचें कारण स्कॉटनें कसें कथानकांतच दाखविलें आहे, तें पहावयाचे असल्यास 'Peveril of the Peak' यासारखी अप्रसिद्ध कादंबरी देखील वाचल्यास कळून येईल. <br>{{gap}}ऐतिहासिक कादंबरीच्या अशा अनेक नडवणुकींमुळे फार जुन्या काळचीं कथानकें सोडून, भरपूर माहिती मिळण्यासारख्या काळांतली कथानके पसंत करण्याकडे लेखकांचा कल होऊं लागतो. जितका अलीकडचा काळ घ्यावा, तितके वाचन व शोध दोन्ही हि बेताचींच पुरी होतात. अलीकडच्या काळचे वर्णन करितां करितां, स्वतःच्या हयातीच्या काळचे वर्णन करण्याची कल्पना लेखकानां सुचण्यास वेळ लागत नाहीं. आणि गतकाळाकडून हयातीच्या काळाकडे लक्ष लागले, की सामाजिक कादंबरीचा जन्म झाला, ऐतिहासिक कादंबरीचे सामाजिक कादंबरीत रूपांतर झाले, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. {{center|{{larger|'''एक आक्षेप.'''}}}} {{gap}}आता कोणी असा आक्षेप घेतील, कीं ऐतिहासिक कादंबरी व सामाजिक कादंबरी यांमध्यें खरोखर फरक नसून विनाकारण भेद दाखविला आहे. तात्त्विक दृष्टीनें विचार केला, तर गेलेला आणि येणारा, एवढाच काय तो काळामध्यें भेद दाखवितां येतो. सध्यांचा काळ, ह्मणजे वर्तमानकाळ, नाहींसाच होतो. वर्तमानकाळ अशी भावना होते न होते, तोच तो भूतकाळ बनतो. अनुभवास आलेला काळ म्हणजे भूतकाळ व अनुभवास येणारा व अपेक्षित म्हणजे भविष्यकाळ, अशी जर वास्तविक स्थिति आहे, तर ज्याला अस्तित्वच नाहीं, अशा वर्तमानकाळाला अनुलक्षून केलेला ऐतिहासिक व सामाजिक कादंबरी हा भेद भ्रामक आहे. <br>{{gap}}भूत व भविष्य हे दोनच काळ खरे आहेत, वर्तमानकाळ हा भास आहे, हे आम्हाला नाकबूल नाहीं. म्हणुनच ऐतिहासिक कादंबरीचे रूपांतर किती-<noinclude></noinclude> poc2ltr1gmp323m5hsgav1kky3q5lp2 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/५७ 104 111401 235339 2026-08-10T05:29:19Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ४५ ) - सहज, किती नकळत झटलें तरी चालेल — होतें तें दाखविण्याचा वर प्रयत्न केला आहे. पण साधनांच्या भेदाकडे लक्ष देऊन, वाचन, दंतकथा, शोध इत्यादि साधनांनी झालेली कादंबरी ह्मणजे..." 235339 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ४५ ) - सहज, किती नकळत झटलें तरी चालेल — होतें तें दाखविण्याचा वर प्रयत्न केला आहे. पण साधनांच्या भेदाकडे लक्ष देऊन, वाचन, दंतकथा, शोध इत्यादि साधनांनी झालेली कादंबरी ह्मणजे ऐतिहासिक कादंबरी, व स्वतःचाच अनुभव, माहिती, निरीक्षण इत्यादि साधनांनी रचलेली कादंबरी ह्मणजे सामाजिक कादं- बरी, असा भेद आह्मीं केला आहे. या दृष्टीनें विचार केला, ह्मणजे आक्षेपाचें निरसन होण्यास अडचण पडत नाहीं. भाषेचे ज्ञान व कल्पनाशक्ति हीं दोन्हीला सारखीच आवश्यक आहेत, हे उघड आहे. सामाजिक कादंबरीची वाढ. ऐतिहासिक कादंबरी व सामाजिक कादंबरी यांच्यामध्ये सुरुवातीला साध- नाशिवाय दुसरा भेद दाखवितां येत नाहीं. लिहिण्याची पद्धत व वर्णनाची तन्हा हीं दोन्ही प्रकारांत सारखीच आहेत, असें पहिल्याने वाटूं लागतें. हया- तीचा काळ असल्यामुळे समाजाच्या स्थितीपेक्षा पात्रांच्या स्वभावाकडे लेख- काचें कधीं कधी लक्ष जास्त लागलेले दिसतें, इतकेच. पण एकदां मनुष्य- स्वभावाकडे लक्ष जाऊं लागलें, कीं, थोड्या वेळाने ते तिकडेच वेधते. मनु- व्यस्वभावाचा अंत लावण्याचा नाद लागला कीं, जितका प्रयत्न करावा तितका थोडा, असें होऊन बसतें. लेखकांत व त्याच्या कृतींत मार्मिकपणा अधिका- धिक येऊ लागतो. ऐतिहासिक कादंबरी व सामाजिक कादंबरी यांमध्ये दुसरा फरक दिसू लागतो. इतकेंच नव्हे तर खुद्द सामाजिक कादंबरीच्या दोन अवस्था ( Stages) आहेत, हे प्रत्ययास येऊ लागते. Maria Edgeworth व Jane Austen यांच्या कृतीचें अवलोकन केल्यास आमच्या ह्मणण्यास दुजोरा मिळेल. पहिलीचे साधे वर्णन पहा, व दुसरीचें कलाकुसरीचें वीणकाम पहा, ह्मणजे फरक लक्षांत येईल. मात्र Jane Austen ची ' Pride & Prejudice ' वाचून समाधान न पावतो Mansfield Park' व विशे- षत: ' Emma ' यांचा योग्य परामर्ष घ्यावा, असे सुचविणे जरूरीचं आहे. पहिल्या अवस्थेत समाजस्थितीच्या वर्णनावर भर असतो. दुसऱ्या अवस्थेत मनुष्यमात्रांचे हृद्गत शोधून काढण्याकडे लक्ष असतें. समाजवर्णन गौण होऊन बसतें. आतां, मुलगा लहानाचा मोठा केव्हा झाला, हे जसें नक्की सांगता येत नाहीं, पण मोठा झाला हे सर्वांना दिसतें; त्याचप्रमाणे कादंबरीच्या या दोन<noinclude></noinclude> apv9plvslbbfbriqeykb7kpsfcxwdwc 235340 235339 2026-08-10T05:38:25Z JayashreeVI 4058 235340 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(४५)'''}}}} - सहज, किती नकळत म्हटलें तरी चालेल—होतें तें दाखविण्याचा वर प्रयत्न केला आहे. पण साधनांच्या भेदाकडे लक्ष देऊन, वाचन, दंतकथा, शोध इत्यादि साधनांनी झालेली कादंबरी ह्मणजे ऐतिहासिक कादंबरी, व स्वतःचाच अनुभव, माहिती, निरीक्षण इत्यादि साधनांनी रचलेली कादंबरी ह्मणजे सामाजिक कादंबरी, असा भेद आह्मीं केला आहे. या दृष्टीनें विचार केला, ह्मणजे आक्षेपाचें निरसन होण्यास अडचण पडत नाहीं. भाषेचे ज्ञान व कल्पनाशक्ति हीं दोन्हीला सारखीच आवश्यक आहेत, हे उघड आहे. {{center|{{larger|'''सामाजिक कादंबरीची वाढ.'''}}}} {{gap}}ऐतिहासिक कादंबरी व सामाजिक कादंबरी यांच्यामध्ये सुरुवातीला साधनाशिवाय दुसरा भेद दाखवितां येत नाहीं. लिहिण्याची पद्धत व वर्णनाची त-हा हीं दोन्ही प्रकारांत सारखीच आहेत, असें पहिल्याने वाटूं लागतें. हयातीचा काळ असल्यामुळे समाजाच्या स्थितीपेक्षा पात्रांच्या स्वभावाकडे लेखकाचें कधीं कधी लक्ष जास्त लागलेले दिसतें, इतकेच. पण एकदां मनुष्यस्वभावाकडे लक्ष जाऊं लागलें, कीं, थोड्या वेळाने ते तिकडेच वेधते. मनुमनुष्यस्वभावाचा अंत लावण्याचा नाद लागला कीं, जितका प्रयत्न करावा तितका थोडा, असें होऊन बसतें. लेखकांत व त्याच्या कृतींत मार्मिकपणा अधिकाधिक येऊ लागतो. ऐतिहासिक कादंबरी व सामाजिक कादंबरी यांमध्ये दुसरा फरक दिसू लागतो. इतकेंच नव्हे तर खुद्द सामाजिक कादंबरीच्या दोन अवस्था (Stages) आहेत, हे प्रत्ययास येऊ लागते. Maria Edgeworth व Jane Austen यांच्या कृतीचें अवलोकन केल्यास आमच्या ह्मणण्यास दुजोरा मिळेल. पहिलीचे साधे वर्णन पहा, व दुसरीचें कलाकुसरीचें वीणकाम पहा, ह्मणजे फरक लक्षांत येईल. मात्र Jane Austen ची 'Pride & Prejudice' वाचून समाधान न पावता 'Mansfield Park' व विशेषत: 'Emma' यांचा योग्य परामर्ष घ्यावा, असे सुचविणे जरूरीचं आहे. पहिल्या अवस्थेत समाजस्थितीच्या वर्णनावर भर असतो. दुसऱ्या अवस्थेत मनुष्यमात्रांचे हृद्गत शोधून काढण्याकडे लक्ष असतें. समाजवर्णन गौण होऊन बसतें. आतां, मुलगा लहानाचा मोठा केव्हा झाला, हे जसें नक्की सांगता येत नाहीं, पण मोठा झाला हे सर्वांना दिसतें; त्याचप्रमाणे कादंबरीच्या या दोन-<noinclude></noinclude> jlx60q2g13659p86u2fqwrff8c2g3g0 235341 235340 2026-08-10T05:39:06Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235341 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(४५)'''}}}} सहज, किती नकळत म्हटलें तरी चालेल—होतें तें दाखविण्याचा वर प्रयत्न केला आहे. पण साधनांच्या भेदाकडे लक्ष देऊन, वाचन, दंतकथा, शोध इत्यादि साधनांनी झालेली कादंबरी ह्मणजे ऐतिहासिक कादंबरी, व स्वतःचाच अनुभव, माहिती, निरीक्षण इत्यादि साधनांनी रचलेली कादंबरी ह्मणजे सामाजिक कादंबरी, असा भेद आह्मीं केला आहे. या दृष्टीनें विचार केला, ह्मणजे आक्षेपाचें निरसन होण्यास अडचण पडत नाहीं. भाषेचे ज्ञान व कल्पनाशक्ति हीं दोन्हीला सारखीच आवश्यक आहेत, हे उघड आहे. {{center|{{larger|'''सामाजिक कादंबरीची वाढ.'''}}}} {{gap}}ऐतिहासिक कादंबरी व सामाजिक कादंबरी यांच्यामध्ये सुरुवातीला साधनाशिवाय दुसरा भेद दाखवितां येत नाहीं. लिहिण्याची पद्धत व वर्णनाची त-हा हीं दोन्ही प्रकारांत सारखीच आहेत, असें पहिल्याने वाटूं लागतें. हयातीचा काळ असल्यामुळे समाजाच्या स्थितीपेक्षा पात्रांच्या स्वभावाकडे लेखकाचें कधीं कधी लक्ष जास्त लागलेले दिसतें, इतकेच. पण एकदां मनुष्यस्वभावाकडे लक्ष जाऊं लागलें, कीं, थोड्या वेळाने ते तिकडेच वेधते. मनुमनुष्यस्वभावाचा अंत लावण्याचा नाद लागला कीं, जितका प्रयत्न करावा तितका थोडा, असें होऊन बसतें. लेखकांत व त्याच्या कृतींत मार्मिकपणा अधिकाधिक येऊ लागतो. ऐतिहासिक कादंबरी व सामाजिक कादंबरी यांमध्ये दुसरा फरक दिसू लागतो. इतकेंच नव्हे तर खुद्द सामाजिक कादंबरीच्या दोन अवस्था (Stages) आहेत, हे प्रत्ययास येऊ लागते. Maria Edgeworth व Jane Austen यांच्या कृतीचें अवलोकन केल्यास आमच्या ह्मणण्यास दुजोरा मिळेल. पहिलीचे साधे वर्णन पहा, व दुसरीचें कलाकुसरीचें वीणकाम पहा, ह्मणजे फरक लक्षांत येईल. मात्र Jane Austen ची 'Pride & Prejudice' वाचून समाधान न पावता 'Mansfield Park' व विशेषत: 'Emma' यांचा योग्य परामर्ष घ्यावा, असे सुचविणे जरूरीचं आहे. पहिल्या अवस्थेत समाजस्थितीच्या वर्णनावर भर असतो. दुसऱ्या अवस्थेत मनुष्यमात्रांचे हृद्गत शोधून काढण्याकडे लक्ष असतें. समाजवर्णन गौण होऊन बसतें. आतां, मुलगा लहानाचा मोठा केव्हा झाला, हे जसें नक्की सांगता येत नाहीं, पण मोठा झाला हे सर्वांना दिसतें; त्याचप्रमाणे कादंबरीच्या या दोन-<noinclude></noinclude> m3e1mclj7qa2lbazw2pakh2y60i4nqn पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/५८ 104 111402 235342 2026-08-10T05:39:40Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ४६ ) अवस्थांची स्थिति आहे. एक जातां जातां दुसरी येते. दुसरी अवस्था आली, ह्मणजे या कादंबरीचें तेज फांकूं लागतें. प्रतिभासंपन्न लेखकांच्या हातांत ही कादंबरी एक ' शक्ति '–अन -..." 235342 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ४६ ) अवस्थांची स्थिति आहे. एक जातां जातां दुसरी येते. दुसरी अवस्था आली, ह्मणजे या कादंबरीचें तेज फांकूं लागतें. प्रतिभासंपन्न लेखकांच्या हातांत ही कादंबरी एक ' शक्ति '–अन - बनते. कशी ती उदाहरणे घेऊन पाहूं. उदाहरणें. १. अमेरिकेत नीग्रो लोकांच्या गुलामगिरीचा प्रश्न बरेच दिवस धुमसत होता. पण Mrs. H. B. Stowe यांनी 'Uncle Tom's Cabin' हें आपलें अन जपून समाजावर फेकल्याबरोबर, सहृदय वाचकांना कळवळा येऊन, धुमसणें बंद होऊन, वादाने पेट घेतला. अमेरिकेबाहेर देखील या गोष्टीचा परिणाम होऊन, अन्य राष्ट्रांतल्या जनसमूहांमध्यें सहानुभूति उत्पन्न झाली. तेवीस भाषांत भाषांतरें होण्याइतकी ही कांदबरी लोकप्रिय झाली. United Statesच्या उत्तर व दक्षिण या दोन भागांमध्ये शेवटी निकराचे युद्ध झालें. उत्तरेच्या संस्था- नांचा जय झाला. नीग्रो लोकांची कायदेशीर गुलामगिरीतून सुटका होऊन त्यांनी प्रगतीचा मार्ग मोकळा झाला. हल्लीं ते हळुहळू आपली सुधारणा करून घेत आहेत. पहिल्यापेक्षां आतां त्यांची स्थिति सुधारली आहे, असें दिसेल. ( वाचकांनी Booker T. Washington यांचे 'Up From Slavery' हें पुस्तक अवश्य वाचावें. Nelsons Library या मार्लेत हैं पुस्तक थोडक्या किंम- ताँत मिळेल ). २. डिकन्स यांनी अशीच अत्रें जपून भिक्षुकगृहें-Pauper Asylums & work-houses अनाथगृहें - Orphanages देणेकऱ्यांचे तुरंग-Deb- tors ' Prisons यांच्यावर सोडिलीं व समाजाचे डोळे उघडून या संस्थांची सुधारणा करविली असें झटल्यास चालेल. शिवाय यांनी आपल्या कादंब- यांच्या मालेनें गरीब, अपंग, अनाथ व कष्टी अशा लोकांविषयीं वाचकांच्या मनांत दया उत्पन्न केली. ३. डिकन्सच्या कादंबऱ्यांइतकी जरी नाहीं, तरी त्यांच्यासारखीच खळबळ Thomas Hardy यांच्या कादंब-यांमुळे सुरू झाली, यांच्या कादंबऱ्या डिकन्सइतक्या सोप्या नसल्यामुळे, ज्याच्यात्याच्या तोंडी यांचे नांव झालें नाहीं खरें; पण सुशिक्षित वर्गोत, व विशेषेकरून धर्मभोळ्या व धार्मिक लोकांच्या<noinclude></noinclude> sdkelz4dwcdrg9rjq4zm31ghecor8x4 235343 235342 2026-08-10T05:52:34Z JayashreeVI 4058 235343 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(४६)'''}}}} अवस्थांची स्थिति आहे. एक जातां जातां दुसरी येते. दुसरी अवस्था आली, ह्मणजे या कादंबरीचें तेज फांकूं लागतें. प्रतिभासंपन्न लेखकांच्या हातांत ही कादंबरी एक 'शक्ति'–अस्त्-बनते. कशी ती उदाहरणे घेऊन पाहूं. {{center|{{larger|'''उदाहरणें.'''}}}} {{gap}}१. अमेरिकेत नीग्रो लोकांच्या गुलामगिरीचा प्रश्न बरेच दिवस धुमसत होता. पण Mrs. H.B. Stowe यांनी 'Uncle Tom's Cabin' हें आपलें अस्त्र जपून समाजावर फेकल्याबरोबर, सहृदय वाचकांना कळवळा येऊन, धुमसणें बंद होऊन, वादाने पेट घेतला. अमेरिकेबाहेर देखील या गोष्टीचा परिणाम होऊन, अन्य राष्ट्रांतल्या जनसमूहांमध्यें सहानुभूति उत्पन्न झाली. तेवीस भाषांत भाषांतरें होण्याइतकी ही कांदबरी लोकप्रिय झाली. United Statesच्या उत्तर व दक्षिण या दोन भागांमध्ये शेवटी निकराचे युद्ध झालें. उत्तरेच्या संस्थानांचा जय झाला. नीग्रो लोकांची कायदेशीर गुलामगिरीतून सुटका होऊन त्यांनी प्रगतीचा मार्ग मोकळा झाला. हल्लीं ते हळुहळू आपली सुधारणा करून घेत आहेत. पहिल्यापेक्षां आतां त्यांची स्थिति सुधारली आहे, असें दिसेल. (वाचकांनी Booker T. Washington यांचे 'Up From Slavery' हें पुस्तक अवश्य वाचावें. Nelsons Library या मालेत हे पुस्तक थोडक्या किंमतींत मिळेल). {{gap}}२. डिकन्स यांनी अशीच अस्त्रें जपून भिक्षुकगृहें-Pauper Asylums & work-houses अनाथगृहें - Orphanages देणेकऱ्यांचे तुरंग-Debtors' Prisons यांच्यावर सोडिलीं व समाजाचे डोळे उघडून या संस्थांची सुधारणा करविली असें म्हटल्यास चालेल. शिवाय यांनी आपल्या कादंबयांच्या मालेनें गरीब, अपंग, अनाथ व कष्टी अशा लोकांविषयीं वाचकांच्या मनांत दया उत्पन्न केली. {{gap}}३. डिकन्सच्या कादंबऱ्यांइतकी जरी नाहीं, तरी त्यांच्यासारखीच खळबळ Thomas Hardy यांच्या कादंब-यांमुळे सुरू झाली. यांच्या कादंबऱ्या डिकन्सइतक्या सोप्या नसल्यामुळे, ज्याच्यात्याच्या तोंडी यांचे नांव झालें नाहीं खरें; पण सुशिक्षित वर्गात, व विशेषेकरून धर्मभोळ्या व धार्मिक लोकांच्या-<noinclude></noinclude> 9ql2cz140t0touk4tus5bxm7e4gcohf 235344 235343 2026-08-10T05:53:41Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235344 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(४६)'''}}}} अवस्थांची स्थिति आहे. एक जातां जातां दुसरी येते. दुसरी अवस्था आली, ह्मणजे या कादंबरीचें तेज फांकूं लागतें. प्रतिभासंपन्न लेखकांच्या हातांत ही कादंबरी एक 'शक्ति'–अस्त्-बनते. कशी ती उदाहरणे घेऊन पाहूं. {{center|{{larger|'''उदाहरणें.'''}}}} {{gap}}१. अमेरिकेत नीग्रो लोकांच्या गुलामगिरीचा प्रश्न बरेच दिवस धुमसत होता. पण Mrs. H.B. Stowe यांनी 'Uncle Tom's Cabin' हें आपलें अस्त्र जपून समाजावर फेकल्याबरोबर, सहृदय वाचकांना कळवळा येऊन, धुमसणें बंद होऊन, वादाने पेट घेतला. अमेरिकेबाहेर देखील या गोष्टीचा परिणाम होऊन, अन्य राष्ट्रांतल्या जनसमूहांमध्यें सहानुभूति उत्पन्न झाली. तेवीस भाषांत भाषांतरें होण्याइतकी ही कांदबरी लोकप्रिय झाली. United Statesच्या उत्तर व दक्षिण या दोन भागांमध्ये शेवटी निकराचे युद्ध झालें. उत्तरेच्या संस्थानांचा जय झाला. नीग्रो लोकांची कायदेशीर गुलामगिरीतून सुटका होऊन त्यांनी प्रगतीचा मार्ग मोकळा झाला. हल्लीं ते हळुहळू आपली सुधारणा करून घेत आहेत. पहिल्यापेक्षां आतां त्यांची स्थिति सुधारली आहे, असें दिसेल. (वाचकांनी Booker T. Washington यांचे 'Up From Slavery' हें पुस्तक अवश्य वाचावें. Nelsons Library या मालेत हे पुस्तक थोडक्या किंमतींत मिळेल). <br>{{gap}}२. डिकन्स यांनी अशीच अस्त्रें जपून भिक्षुकगृहें-Pauper Asylums & work-houses अनाथगृहें - Orphanages देणेकऱ्यांचे तुरंग-Debtors' Prisons यांच्यावर सोडिलीं व समाजाचे डोळे उघडून या संस्थांची सुधारणा करविली असें म्हटल्यास चालेल. शिवाय यांनी आपल्या कादंबयांच्या मालेनें गरीब, अपंग, अनाथ व कष्टी अशा लोकांविषयीं वाचकांच्या मनांत दया उत्पन्न केली. <br>{{gap}}३. डिकन्सच्या कादंबऱ्यांइतकी जरी नाहीं, तरी त्यांच्यासारखीच खळबळ Thomas Hardy यांच्या कादंब-यांमुळे सुरू झाली. यांच्या कादंबऱ्या डिकन्सइतक्या सोप्या नसल्यामुळे, ज्याच्यात्याच्या तोंडी यांचे नांव झालें नाहीं खरें; पण सुशिक्षित वर्गात, व विशेषेकरून धर्मभोळ्या व धार्मिक लोकांच्या-<noinclude></noinclude> 7n8wwg4rmzs1wtsltgplhqw2e8mfce2 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/५९ 104 111403 235345 2026-08-10T05:54:11Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ४७ ) गोटांत मोठा हाहा:कार उडाला. याला 'Tess of the D' Urbervi- les - A Pure Woman' ही कादंबरी मुख्य कारण झाली. याम अपघात होऊन कोणाला इजा झाली, कीं तो वेदना सोसून काळांतरानें हिंडूं फिरू लागतो, पुनः धडध..." 235345 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ४७ ) गोटांत मोठा हाहा:कार उडाला. याला 'Tess of the D' Urbervi- les - A Pure Woman' ही कादंबरी मुख्य कारण झाली. याम अपघात होऊन कोणाला इजा झाली, कीं तो वेदना सोसून काळांतरानें हिंडूं फिरू लागतो, पुनः धडधाकड होतो. ऋतुमानाला अनुसरून सृष्टीच्या रूपांत वसं- तांत उत्साही, तर ग्रीष्मांत फक्त आनंदी; शरहतूंत किंचित् निस्तेन, तर हेमं- तांत अगदीं प्रेतकळा, असे फेरफार होतात; नियमाला अनुसरून पुनः सृष्टीला जन्म मिळतो, ती हसू लागते, नाचू लागते, पहा र्की, अचला व तिचे प्रमाद यांना मात्र, येणारा पुनर्जीवनाचा नियम समाज लागू करीत अबलेचें एकदा वांकडे पाऊल पडलें, मग तें झाला तिचा अधःपात, असें समाज मानितो. पण पुरुषाविषयीं तसें मानित नाहीं. चराचर सृष्टीला लागू असणारा, लागू होणारा, पुनर्जीवनाचा नियम फक्त नारीच्या आत्म्यालाच लागू नाहीं काय ? तो आहे, असला पाहिजे, केला पाहिजे. असा या कादंबरीचा रोख असल्यामुळे धर्ममार्तंडांची व त्यांची तळी उचलणारांची कोल्हेकुई अर्थातच सुरू झाली. बागडते. पण काय चमत्कार हा सृष्टीमध्ये सर्वत्र प्रत्ययास नाहीं, लागू होऊं देत नाहीं ! तिला नकळत का असेना, की ४. अशाच प्रकारची खळबळ Mrs. Humphry Ward यांच्या 'Robert Elsmere' या कादंबरीनें उडविली. धर्ममतामुळे व त्यांत पालट झाल्यामुळे ओढवणारी संकटपरंपरा हा या कादंबरीचा विषय आहे. आधुनिक शास्त्रां- च्या प्रगतीमुळे जुने विचार कसे कमजोर होऊं लागतात; धर्ममतें देखील कश बदलतात; तीं बदललीं ह्मणजे प्रामाणिक माणसाला स्वतःचीं खरीं मतें लप- वून, आपला जुना जीवनक्रम चालू ठेवणें कसें असह्य होतें; धर्ममतें पालटली, कीं, स्वतःच्या धर्मनिष्ठ पत्नीपासून तीं चोरून ठेवणे किती कठिण होतें; मर्ते पालटल्याचा संशय येऊ लागतांच पतिनिष्ठ गृहिणीला अतोनात दुःख होऊन पतिप्रेम व धर्मप्रेम - विशिष्ट मतांविषय प्रेम-यांचा कलह कसा सुरू होतो; पूर्वीच्या धर्मबांधवांकडून छळ कसा होतो; इत्यादि अनेक प्रसंगांचें रसभरित वर्णन या कादंबरीत आहे. याशिवाय आणखी उदाहरणे देतां येतील. पण मराठी भाषेंत अस्त्राची उपमा शोभणाऱ्या कादं- बऱ्या अजून झाल्या नाहींत, ह्मणून इतर वाङ्मयांतली उदाहरणें घेणें भाग पडलें आहे. इतकी येथे पुरे आहेत.<noinclude></noinclude> nq9rcdgy1zxqh8m3kd8kbbz29758up2 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/६० 104 111404 235346 2026-08-10T05:54:40Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ४८ ) दोन वर्ग. · कादंबरीच्या दोन अवस्थांना अनुरूप दोन वर्ग करितां येतात. वर्णनाची तन्हा, ऐतिहासिक कादंबऱ्यांप्रमाणेच असलेल्या, ह्मणजे ज्यांमध्ये समाजस्थितीचे कमीअधिक स..." 235346 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ४८ ) दोन वर्ग. · कादंबरीच्या दोन अवस्थांना अनुरूप दोन वर्ग करितां येतात. वर्णनाची तन्हा, ऐतिहासिक कादंबऱ्यांप्रमाणेच असलेल्या, ह्मणजे ज्यांमध्ये समाजस्थितीचे कमीअधिक सूक्ष्म वर्णन केलेलें असतें, व त्यावरून जितकी पात्रांच्या स्वभावाची ओळख होईल तितकीच होते, स्वभावाचा विकास दाखविण्याची, चिकित्सा करण्यांची फारशी खटपट केलेली नसते, अशा अगदी आरंभी होणाऱ्या सामा- जिक कथा पहिल्या वर्गात येतात. उदाहरणार्थ, ' मधली स्थिति, ' ' पण लक्ष्यांत कोण घेतो, ' या कादंबऱ्या नांवाप्रमाणे आजकालच्या - लेखकाच्या हयातीतल्या ह्यटलें तरी चालेल – गोष्टी आहेत. इंग्रजांच्या अमदानीत, इंप्र- जांच्या शिक्षणानें उत्पन्न झालेल्या नांवारूपास आलेल्या, मध्यमस्थितीतल्या वर्गाच्या, एका भागासंबंधींच्या या गोष्टी आहेत. इतकेंच नव्हे, तर पांढरपे- शांपैकी फक्त दक्षणी ब्राह्मणांबद्दलच्या आहेत; सारस्वत, प्रभु, दैवज्ञ इत्यादि इतर वर्गीविषय नाहींत. आजकालच्या समाजांतल्या पांढरपेशांपैकी एका विशिष्ट वर्गाच्या चालीरीतींचे वर्णन आहे, हें लक्ष्यांत ठेविलें, ह्मणजे या कादं- बऱ्यांची वास्तविक कल्पना होण्यास मदत होते. मध्यमस्थितीतल्या ब्राह्मण कुटुंबाची स्थिति, कुटुंबातल्या मंडळीवर संसाराच्या उलथापालथींत येणारे अनेक प्रसंग, या वर्गातल्या लोकांच्या चालीरीती, नवीन, परदेशी, कल्पनांचा होत असलेला परिणाम, इत्यादींवर लेखकाची सर्व मदार आहे; व लेखकाला बरेंच यश आले आहे, हे कोणालाहि कबूल होईल. या कादंबन्या लोकप्रिय होण्याचे कारण हेंच आहे. पात्रांच्या स्वभावाचा विकास, त्याची मीमांसा, यांचा जवळ जवळ अभाव आहे, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. पण लेखकाचा तो हेतुच नसल्यामुळे याबद्दल त्याला दोष देणें, व त्याच्या कृतीला नाके मुरडणें, रसि- काला शोभणार नाहीं. तसेच, "आजकालच्या गोष्टी" लिहितांना लेखकाची नजर ब्राह्मणांपैकी एका विशिष्ट वर्गापलीकडे गेली नाहीं, ही गोष्ट जरी खरी असली, तरी कादंबयांचा बरेवाईटपणा ठरविण्यांत तिचा उपयोग होत नाहीं. लेखकाची दृष्टि आकुंचित आहे, असें जरी कबूल केले, तरी विषयाची निवड ही लेखकाच्या मर्जीची गोष्ट आहे. त्याची कृति निंद्य की वंद्य, साधारण कीं टाकाऊ, हे ठरविणें वाचकांचं काम आहे. ज्या वर्गाचें चित्र काढले आहे तें<noinclude></noinclude> l8orq7simzsupbvjn5xd59u6e7bao3b पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/६१ 104 111405 235347 2026-08-10T05:55:10Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ (88) पटण्यासारखे आहे की नाही, इतकाच प्रश्न वाचकांपुढे येतो. शिवाय, आकुंचित दृष्टीचा दोष लेखकाच्या माथीं न येतो आमच्या समाजरचनेकडे लागतो, हें विसरता कामा नये ! स्वतःच्या शिवा..." 235347 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ (88) पटण्यासारखे आहे की नाही, इतकाच प्रश्न वाचकांपुढे येतो. शिवाय, आकुंचित दृष्टीचा दोष लेखकाच्या माथीं न येतो आमच्या समाजरचनेकडे लागतो, हें विसरता कामा नये ! स्वतःच्या शिवाय इतर ज्ञातींविषयीं माहिती-पुरी माहिती- लेखकांना यावी कशी ! सनातनधर्मानें पसंत केलेली, निदान चालू दिलेली, समाजव्यवस्थाच इतकी विक्षिप्त आहे की, तिच्या प्रभावाने प्रत्येक वर्गाच्या भोंवती ज्ञातिबंधनाचें मजबूत कांटेरी कुंपण पडलें आहे. आंत काय चाललें आहे तें दुरून कुंपणांतून जितकें दितेल तितकेंच आडोसापाडोसा घेऊन मिळविलेली माहिती वर्णन करण्यास पुरेशी होत नाहीं, हे उघड आहे. ह्मणून लेखकाला ज्या वर्गाची माहिती होती, त्याचें त्यानें वर्णन लिहिलें. असो. या वर्गातल्या कादंबऱ्यांना इंग्रजीत Novels of incidents ह्मणजे प्रसंगांस प्राधान्य देणाऱ्या कादंबऱ्या ह्मणतात. दुसऱ्या वर्गातल्या कादंबऱ्यांचा विशेष असा आहे, कीं, त्यांत स्वभावाच्या चिकित्सेवर फार जोर दिलेला असतो. कथानकांतले प्रसंग या चिकित्सेला पोषाक केलेले असतात. बियांपासून तो थेट भव्य, विस्तृत, विस्मयजनक वृक्ष होईपर्यंत झालेली वडासारख्या झाडाची अकल्प्य वाढ देखील वनस्पतिशास्त्रांत निष्णात असलेला मनुष्य ज्याप्रमाणें सुसंगत करून दाखवितो, त्याचप्रमाणें तेजाळ लेखक, मनुष्यस्वभाव व त्यांची प्रसंगाप्रमाणें प्रगट होणारी अतर्क्स रूपे यांची, आपल्या बुद्धिप्रभावानें वाचकांना ओळख पटवितो. अज्ञानामुळे उत्पन्न होणारा विस्मय घालवून अनंतरूपी मानवी स्वभावाबद्दल मनात कौतुक उत्पन्न करतो. असल्या कादंबयांचीं उत्कृष्ट उदाहरणें ह्मणजे George Mere- dith यांच्या कादंबन्या होत. त्यांची 'Egoist ' ही कादंबरी वाचतांना मति गुंग होते. या दुसऱ्या वर्गोंतल्या कादंबयांना इंग्रजीत Novels of Character-चारित्र्यबोधक किंवा Psychological Novels - मनोविकास- दर्शक - हें नांव देतात. वर जी शक्तीची किंवा अस्त्राची उपमा कादंबरीला दिली आहे, ती या दुसऱ्या वर्गातल्या गोष्टींना जास्त लागू पडते. आमच्याइकडे अशा कादंबन्या अजून झाल्या नाहींत, याला अनेक कारणें आहेत; पण मुख्य कारण आमच्या सुशिक्षित ह्मणविणारांमध्यें व ह्मणून आमच्या साहित्य सेवकांमध्यें, जिज्ञासा, विद्वत्ता, प्रयत्न व अनुभव यांचा अभाव ४<noinclude></noinclude> t3wh70kl2lz8puccrv8igdm81b8y4ru पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/४८ 104 111406 235349 2026-08-10T07:23:57Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235349 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३४|सिंधप्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>दिसली. पण एकही घर किंवा इमारत दगडी बांधणीची दिसली नाहीं. गांवांतील रस्ते बोळवजा असून निवळ धुळीचे व वाळूचे दिसले. बाजारपेठ बरीच लांबवर पसरलेली दिसली. पण त्या पेठेचा रस्ता अरुंद बोळवजाच होता. पूर्वकाळच्या राजधानीचे चिन्ह किंवा स्मारक कोठेही दृष्टीस पडलें नाहीं. शेवटीं एकदां त्या दुकानदाराचें दुकान सांपडलें. त्यांना मराठी येत होतें. कारण ते मुंबईकडे आठ दहा वर्षे राहिलेले होत. दोघे भाऊ व एक नोकर असे तीन इसम तीन समोरासमोरच्या दुकानांवर विक्रीस बसले होते. तो मुसलमानांच्या बकरईदच्या आदला दिवस होता. यामुळे दुकानदारबंधु विक्रीच्या कामांत फार गुंतलेले दिसले. तेव्हां त्यांनी आम्हांला एक पोऱ्या दिला व मग गांवांतील प्रेक्षणीय स्थळ, जुम्मामशीद पाहण्यास आम्ही गेलों. मशीद विटांची बांधलेली असून तिच्या सभोंवतीं तटवजा भिंत होती व आंत खूप मोठा खुला चौक होता. विटांच्या भिंतीला चुन्याचा गिलावा केलेला असून त्यावर रंगाचें नक्षीकाम केलेलें होतें. हे काम श्रीरंगपट्टणामधील टिपूच्या दर्या- दौलतीच्या धर्तीचें आहे असें वाटलें. पण एकंदर मशीदीची बांधणी मनावर परिणाम करणारी वाटली नाहीं. दोन चार शतकें राजधानी असलेल्या शहरांतील प्रेक्षणीय स्थळांची व एकंदर गांवाची दुर्दशा पाहून मला काळाचा महिमा दर्शविणाऱ्या खालील सुभाषिताची आठवण झाली. {{Block center|<poem>"भ्रातः कष्ट महो महान्सनृपतिः सामन्तचक्रंच तत् । पार्श्वसाच विदग्ध राजपरिषत्ताश्चन्द बिंबाननाः ॥ उद्वृत्तः सच राजपुत्र निवहस्ते बन्दिनस्ताः कथाः । सर्वे यस्य यशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः ॥</poem>}} खरोखरी ज्या शहरी पूर्वी दीड लाखाची वस्ती होती, जें शहर प्रांताचे मुख्य व्यापाराचें ठिकाण व बंदर होतें, जेथें प्रांताचे नबाब रहात असत त्या शहराची हीनदीन दशा पाहून '''कालायतस्मैनमः''' असे<noinclude></noinclude> 70yo87xs8aov3qmw85uyzfd4ny3tx04 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/४९ 104 111407 235350 2026-08-10T07:29:45Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235350 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जुनीं तीन प्रख्यात शहरें|३५}}</noinclude>उद्गार प्रत्येक प्रवाशाच्या तोंडून निघाल्यावांचून राहणार नाहींत असें मला वाटलें. झालें. आमचें ठठ्ठाचें दृश्यदर्शन संपलें म्हणाना. आमची मोटार स्टेशनवर परत जाण्यास दोन अडीच तास अवकाश होता तितका वेळ आम्ही दुकानदाराचे दुकानांत बसून काढला. पण आमचा वेळ कंटाळवाणा झाला नाहीं. दुकानामध्यें मुसलमान गिऱ्हाइकांची सारखी जा-ये चालू होती. गांवांत दहा हजारांची वस्ती असून त्यांपैकी सुमारें सात हजार लोक मुसलमान जातीचे आहेत असें कळलें. शिवाय ता मुसलमानी मोठ्या सणाचा आदला दिवस; तेव्हां मुसलमान गिऱ्हाइकांचीच गर्दी दुकानांत दिसावी हे स्वाभाविक होतें. बहुतेक मुसलमान गिऱ्हाईक गरीब व मध्यम स्थितींतील दिसले. ते लोक मुलांकरितां पाय- मोजे व त्यांचे बंद, मुलांचे गंजीफ्रॉक, मुलांच्या पाटलोणीचे ब्रेसेस, शर्टची बटनें, नानारंगी हातरुमाल, मोंगली गोंड्याची टोपी, पायांतले बूट व शू, मोठ्या माणसांचे गंजीफ्रॉक व बूट, लहान मुलांची खेळणीं इत्यादि वस्तू विकत घेत होते. ज्याप्रमाणे हिंदू लोकांमध्ये दिवाळीच्या सणाचे सुमारास मुलांना व मोठ्या माणसांना सुद्धां नवा कपडालत्ता विकत घेण्याची रीत आहे किंवा ख्रिश्चन लोकांमध्यें नाताळच्या सणाच्या सुमारास ज्याप्रमाणें मुलांना बक्षीस देण्याकरितां नाना खेळणी व वस्तू विकत घेण्याची पद्धत आहे तशा प्रकारची बकरईदच्या सुमारास नव्या वस्तू मुलामाणसांकरितां विकत घेण्याची रीत दिसली. मोटारटॅक्सीमध्ये भेटलेल्या मुसलमान गृहस्थानें सांगितलेल्या मोठ्या मिरवणुकीची रंगीत तालीम आम्हांला दुकानांत बसलों असतांना सहज पहाण्यास मिळाली. मुसलमानी पंजे व हिरवीं अर्धचंद्रांकित निशाणें घेऊन खूपसे लोक बाजारपेठेतून वाजतगाजत जात होते, त्यामुळे तो सर्व बोळ माणसांनी फुलून गेला होता. दुसऱ्या दिवसाची- खास बकर ईदच्या दिवसाची- मिरवणूक यापेक्षां पुष्कळ मोठी असली पाहिजे असें आम्हांला वाटलें. पण अशा मिरवणुकीला जगांतील मिरवणुकीची उपमा देणाऱ्या मुसलमान गृहस्थाचें कुपमंडूकत्व पाहून<noinclude></noinclude> ev54yx1z6grf4gled8fhu8q72uciy2f पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/५० 104 111408 235351 2026-08-10T07:34:46Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235351 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३६ |सिंधप्रांताचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>त्याची आम्हांला कीव आली. कारण आम्ही पाहिलेली मिरवणूक तालुका शहरांतील हजार पांचशे लोकांच्या मिरवणुकीपेक्षां मोठी नव्हती!" दुकानांत दोन तासांत खपलेल्या शेकडों वस्तूंपैकी एकही वस्तु देशी दिसली नाहीं. जपानी व जर्मन अशा स्वस्त मालानें दुकान भरलेलें होतें. गिऱ्हाइकांनाही मिळेल तितका स्वस्त मालच पाहिजे होता. सणानिमित्त मुलामाणसांकरितां कांहींतरी नव्या वस्तू घ्यावयास पाहिजेत म्हणूनच लोक खरेदी करीत होते. दुकान आलेले गिऱ्हाईक गरीब व मध्यम वर्गातील दिसलें. त्यांना देशी परदेशी ही भावना कुठली! आमच्या लोकांमध्ये नव्या नव्या वस्तूंबद्दल गरजा वाढल्या आहेत व खर्च करण्याची प्रवृत्तीही वाढली आहे. मात्र या गरजा परकी देशांतील मालानें भागविल्या जात असल्यामुळे देशाला दिवसेंदिवस दारिद्र्य येत चाललें आहे असें माझ्या मनांत आलें. देशी धंदेवाढीला आपल्या देशांत केवढे मोठे क्षेत्र आहे हे आजच्या दोन तासांच्या अनुभवावरून माझ्या ध्यानांत आलें. पण आमच्या देशांतील भांडवलवाल्या लोकांनीं व सरकारने देशी धंद्यांच्या वाढीस उत्तेजन दिल्याखेरीज हिंदुस्थानच्या वाढत्या दारिद्र्याचा प्रश्न सुटणें कठीण आहे. कारण लोकांची वृत्ति मिळेल तितका स्वस्त माल घेण्याकडे आहे व इतर देशांतील स्वस्त मालाशी टक्कर देणारा देशी माल आमच्या धंदेवाल्यांनी तयार केल्याखेरीज तरणोपाय नाहीं असेंही माझ्या मनांत आलें. अशा प्रकारचे विचार मनांत घोळत आहेत तोंच आमचा मोटारटॅक्सीवाला दुकानी आला. आम्ही दुकानदाराचे आभार मानून अड्ड्यावर गेलों व तेथें लगेच टॅक्सीमध्ये बसलों व परत स्टेशनवर आलो. वाटेनें मकली टेंकडीवरील थडग्यांकडे ओझरती दृष्टि टाकली. या प्रांतांतील सर्वच इमारती विटांच्या व गिलाव्याच्या दिसल्या, त्याप्रमाणें कबरीचे घुमट गिलाव्याचे असून त्यावर रंगीत नक्षीकाम केलेलें आहे असें आमच्या दृष्टोत्पत्तीस आलें. स्टेशनवर तास दोन तास थांबून आगगाडी आल्याबरोबर पुढल्या प्रवासास मार्गस्थ झालों.{{nop}}<noinclude></noinclude> 9r3fcwlltmf5aacw10a2ncfos7lvrsi पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/५१ 104 111409 235352 2026-08-10T07:43:39Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235352 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जुनीं तीन प्रख्यात शहरें|३७ }}</noinclude>{{gap}}जंगशाही स्टेशनपासून कोट्री-रुक या रेल्वेलाईनीवरील डोकी स्टेशन सुमारे दोनशे पंधरा मैल आहे. हा सर्व प्रवास आमचा रात्रीचा झाल्यामुळे सभोवारचा भूमिभाग मुळींच दिसला नाहीं. डोकीस आम्ही पहांटेस साडेपाच वाजतां पोहोंचलों. स्टेशनवर रा. मोहिते नांवाचे एंजिनियर (यांना आमचेकरितां कराचीहून पत्रानें कळविण्यांत आलें होतें) आम्हांला आपल्या बंगल्यावर नेण्यास आले व चहापाणी झाल्यावर आम्ही '''मोहनजोदारो''' पहाण्यास गेलों. या ठिकाणाचे वर्णन पुढील प्रकरणांत येणार आहे. तेथून बारा वाजतां परत आलों व मग '''लारखान्याच्या''' चाफेकर एंजिनियरांच्या मोटारकारमधून आम्ही वीस मैल सक्करबॅरेजच्या नव्या कालव्यावरील देखरेख रस्त्यावरून लारखान्यास आलों.<br>{{gap}}या देखरेख रस्त्याने देखावा अद्वितीय वाटला. आडीचशे फूट रुंदीचा दुथडी पाण्यानें तुडुंब भरलेला व संथपणे वाहणारा तो कालवा, कालव्याचे बाजूच्या बांधावर उगवलेले हिरवे हिरवें गवत व लहान झुडपें, अलीकडच्या बंधाऱ्यावरील तो सरळ, सपाट, पांढरा शुभ्र व मऊ मऊ बिनखडीचा एक मोटार जाणारा रस्ता, त्या रस्त्याच्या भूमिभागाचे बाजूस हारीनें लावलेलीं टवटवीत पानांचीं नानाविध जातीचीं सुंदर झाडे हा सर्व देखावा विलक्षण चित्ताकर्षक आहे यांत शंका नाहीं. आमच्या मोटारला कोठेही धक्का बसत नव्हता. जणूं कांहीं मोटारकारला पायघड्या घातल्या आहेत! इतका रस्ता मऊ, गुळगुळीत व बिनखड्याचा होता! माझे लक्ष या अद्वितीय देखाव्यावर खिळलेलें असतांना मैलांवर मैल येऊन जात होते याचे भान राहिलें नाहीं व आम्ही लारखान्यांत चाफेकर यांचे बंगल्यावर केव्हां आलों हे कळलें नाहीं. आमचें जेवणखाण आटपेपर्यंत चारपांच वाजले. या सर्व वेळामध्यें आमची फार करमणूक झाली व आम्हांला फार कौतुक वाटलें तें रा. चाफेकरांच्या पांचसहा वर्षांच्या<noinclude></noinclude> 00ehw1yk1qske1s4vba6fwq0lfckwn2 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/५२ 104 111410 235353 2026-08-10T07:49:08Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235353 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३८|सिंधप्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>मुलाचें. इतका विलक्षण बोलका मुलगा आमच्या सर्व प्रवासांत आम्हांला क्वचित् भेटला असेल. या मुलाचें मन जणूं कांहीं खुलें करून ठेवलेलें होतें. मुलाला वयाच्या मानानें पुष्कळ माहिती दिसली व तो चवकसही फार होता. तो आम्हांला निरनिराळे प्रश्न करून माहिती करून घेत होता. मी प्रवासाचीं पुष्कळ पुस्तकें लिहिलीं आहेत हें कळल्यावर तीं मला वाचावयाचीं आहेत व म्हणून तीं मला पाठवून द्या अशी आग्रहाची विनंति त्या मुलानें केली. कराचीस परत आल्यावर मी त्याला माझीं प्रवास- पुस्तकें पाठवून दिलीं. ज्याप्रमाणें तो मुलगा नानाविध विषयांवर प्रश्न विचारी त्याप्रमाणे आपणही माहिती सांगत असे. त्यामध्यें त्यानें आम्हांला सांगितलें कीं सिंधूनदी आपला प्रवाह बदलणार आहे व मग सक्करधरण व सर्व कालवे फुकट कोरडे पडणार आहेत. सक्करच्या धरणाविरुद्ध अशा प्रकारचा आक्षेप मुलानें कोणाच्या तरी तोंडून एकला असला पाहिजे व तोच आक्षेप तो आम्हांला माहितीच्या रूपानें सांगत आहे असें मला वाटलें. मी त्या मुलाला थट्टेनें म्हटलें "अरे, असें झालें तर तुझ्या वडिलांची नोकरी व काम नाहींसें होईलना!" मुलगा खरोखरीच फार कौतुक करण्यासारखा आहे यांत शंका नाहीं. यामुळे आमचा सर्व वेळ मौजेंत व करमणुकींत गेला. सायंकाळी आम्ही लारखाना गांव पहाण्यास मोटारीनें निघालों. ठठ्ठा व हें गांव यांमधील विरोध माझ्या मनापुढे सारखा उभा रहात होता. ठठ्ठा हे मोडकळीस आलेलें व भिकार खेड्यावजा गांव दिसलें तर लारखाना हे मोठ्या भरभराटीच्या शहराप्रमाणे सुधारलेलें गांव दिसलें. येथले रस्ते प्रशस्त व निर्धूळ डामरी होते. येथल्या सार्वजनिक इमारती व राहते बंगले सुबक व नव्या बांधणीचे दिसले. गांवांतील बाजारपेठे मोठी प्रशस्त व नवीच बांधलेली दिसली व त्यांत मोठमोठीं दुकानें दृष्टीस पडली. मुंबई सरकारचे सध्यांचे एक मंत्री नामदार भूतो हे लारखाना जिल्ह्यांतील एक मोठे जमीनदार आहेत हे लारखाना शहर पाहतांना सहज कळून आलें.{{nop}}<noinclude></noinclude> 66fxmxkon20jf4iklgxx02obat07nph पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/५३ 104 111411 235354 2026-08-10T07:54:47Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235354 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जुनीं तीन प्रख्यात शहरें|३९}}</noinclude>{{gap}}खा. ब. "भूतो वसाहत" नांवाची भली मोठी पाटी एका प्रचंड कमानीवर दिसली. ही सर्व इस्टेट भूतोची असून त्यांत भाड्याकरितां बांधलेले बंगले व चाळी पुष्कळ आहेत असें कळलें. याप्रमाणें आम्ही मोटारींतून सर्व शहर फिरलों.<Br>{{gap}}शहराच्या जुन्या भागांतूनही आम्ही जाऊन आलो. येथले रस्ते अर्थात् अरुंद होते व घरेंही जुन्या पद्धतीचीं व गलिच्छ दिसली. नंतर आम्ही शहराबाहेर आलों.<Br>{{gap}}या शहरांत व शहराबाहेर जिकडे तिकडे खूप झाडी आहे. कारण या शहराला लागून नव्हे शहरांतून जुना कालवा गेलेला होता. नवा कालवा जरा दुरून गेला आहे. सध्यां जुना कालवा किल्ल्याच्या खंदकासारखा पाण्याने भरलेला दिसला. वाहतें पाणी नसल्यामुळे तें हिरवट रंगाचे दिसत होतें. आम्ही लारखान्याच्या एका मोठ्या व्यापाऱ्याची खासगी बाग पाहिली. बाग बरीच विस्तीर्ण असून त्यामध्यें नानाविध फुलझाडांचे ताटवे केलेले होते. बागेची एकंदर रचना मोठी मनोहर होती. नंतर आम्ही कालव्याच्या देखरेख रस्त्यानें पांच सात मैल गेलों व मग दुसऱ्याच एका रस्त्यानें परतें शहरांत आलों. आमचें लारखाना शहराचें दृश्यदर्शन संपलें. लारखाना जिल्हा हा सिंधमधील फार सुपीक जिल्ह्यांपैकी एक असून तो फार पुरातन काळापासून तांदुळाकरितां प्रख्यात आहे. सिंधमधला सर्वांत सुवासिक व सुंदर भात व तांदूळ. या जिल्ह्यांत होतो, असें कळलें. आतां बारमाही कालवा आल्यामुळे भाताशिवाय कापूस, गहूं, ज्वारी इत्यादि पिकेही मोठ्या प्रमाणावर होऊं लागलीं आहेत. म्हणून या जिल्ह्याची व अर्थात् जिल्ह्यांतील मुख्य शहराची भरभराट असून जसजशी कालव्याखालची जमीन जास्त लागवडीस येईल तसतशी या जिल्ह्यांची व शहराची आर्थिक स्थिति सुधारतच जाईल असें आम्हांला कळून आलें. रा. चाफेकरांचे आभार मानून आम्ही पुढील प्रवासास मार्गस्थ झालों.{{nop}}<noinclude></noinclude> 0w20pw1mig45ool27blpwguh4jobjrg पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/५४ 104 111412 235369 2026-08-10T11:12:36Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235369 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४०|सिंधप्रांताचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>{{gap}}लारखान्याहून '''शिकारपूर''' हे तिसरें प्रख्यात शहर पंचेचाळीस मैल आहे. पण लारखान्याहून शिकारपुरास जाण्यास स्वतंत्र आगगाडी नाहीं. लारखान्याहून ३४ मैलांवर असलेल्या '''रूक''' जंक्शन स्टेशनवर आगगाडी बदलावी लागते व मग '''रोहरी''' जंक्शन स्टेशनकडून क्वेट्टाला जाणाऱ्या आगगाडीत बसावें लागतें. रूकपासून शिकारपूर फक्त ११ मैलच आहे. पण आगगाड्या सोयीच्या आहेत. यामुळे रुक येथे जास्त वेळ थांबावे लागत नाहीं. फक्त एका आगगाडींतून दुसऱ्या पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरील आगगाडींत जाऊन बसावें लागतें. लारखान्याहून आगगाडी सुमारे दोन प्रहरी तीन वाजतां निघते, ती शिकारपुरास पांच वाजतां पोहोंचते. सिंधप्रांतांतील हा सर्व भाग दाट जंगलानें भरलेला आहे. जंगल फार उंच किंवा फार मोठें नाहीं तर आंखुड व भुरटें आहे व त्यांत मोठमोठीं जाड देठाचीं गवतें पुष्कळ आहेत. झाडेंसुद्धां बारीक शेराच्या पानासारख्या पानाचीं आहेत. पण जंगल मात्र खूपच दाट आहे यांत शंका नाहीं. यामुळे हा भूमिभाग रुक्ष किंवा ओसाड असा वाटत नाहीं. शिकारपूरच्या म्युनिसिपालिटीचे चीफ ऑफिसर रा. जोशी यांचेकडे आम्ही उतरण्याची व्यवस्था केली होती. त्याप्रमाणें रा. जोशी हे स्टेशनवर आले होते व त्यांचे मोटारींतून आम्ही त्यांचे बंगल्यावर आलो. चहापाणी झाल्याबरोबर आम्ही शिकारपुरच्या दृश्यदर्शनास निघालों.<br>{{gap}}प्रथमतः आम्ही नवी कोरीकरकरीत अशी इस्पितळाची इमारत पाहिली. इमारत उत्तम बांधणीची असून अर्वाचीन काळच्या वैद्यकीय सोयीनीं व शस्त्रक्रियेच्या शास्त्रीय उपकरणांनी युक्त अशी बांधण्यांत आली आहे. इस्पितळांत ४० रोग्यांची रहाण्याची सोय असून अर्वाचीन पद्धतीचें पांढऱ्या शुभ्र विटांनी मढविलेले शस्त्रक्रियागृह आहे. या इस्पितळांतील एक्सरेजची औषधीयोजना करण्याची यंत्रसामुग्री आम्ही पाहिली. इस्पितळाची एकंदर टापटीप, स्वच्छता व रोग्यांकरितां केलेल्या सुख-<noinclude></noinclude> 98zvjoan0g6cy5laeg7cmopddyd9xpy पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/५५ 104 111413 235370 2026-08-10T11:18:34Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ चि. नं. ८ ] शिकारपुर : म्युनिसिपल टाऊन हॉल [ पान नं. ४० चि.नं.९] शिकारपुर : आगीन आखाडा [ पान नं. ४०" 235370 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ चि. नं. ८ ] शिकारपुर : म्युनिसिपल टाऊन हॉल [ पान नं. ४० चि.नं.९] शिकारपुर : आगीन आखाडा [ पान नं. ४०<noinclude></noinclude> kd3hudz9m0n6a226o4668x0at4aj7bb 235372 235370 2026-08-10T11:52:08Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235372 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> [[File:सिंध 55-1 शिकारपुर म्युनिसिपल टाऊन हॉल.jpg|center|borderless|शिकारपुर म्युनिसिपल टाऊन हॉल]] {{center|चि. नं. ८ ] '''शिकारपुर : म्युनिसिपल टाऊन हॉल''' [ पान नं. ४०}} <br> [[File:सिंध 55-2 शिकारपुर आगीन आखाडा.jpg|center|borderless|शिकारपुर आगीन आखाडा]] {{center|चि. नं. ९ ] '''शिकारपुर : आगीन आखाडा''' [ पान नं. ४०}}{{nop}}<noinclude></noinclude> qmipx7rmfmapw5zcgoz86gfxms6vzl9 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/५६ 104 111414 235371 2026-08-10T11:18:40Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ चि. नं. १०] शिकारपुर: स्काऊट गृह [ पान नं. ४१ चि. नं. १ ] शिकारपुर : शाहीबाग [ पान नं. ४१" 235371 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ चि. नं. १०] शिकारपुर: स्काऊट गृह [ पान नं. ४१ चि. नं. १ ] शिकारपुर : शाहीबाग [ पान नं. ४१<noinclude></noinclude> e4p9usb3ovoj6o6nebs6fu01vmhhk80 235373 235371 2026-08-10T11:54:03Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235373 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><Br> [[File:सिंध 56-1 शिकारपुर स्काऊट गृह.jpg|center|borderless|शिकारपुर स्काऊट गृह]] {{center|चि. नं. १०] '''शिकारपुर: स्काऊट गृह''' [ पान नं. ४१}} <br> [[File:सिंध 56-2 शिकारपुर शाहीबाग.jpg|center|borderless|शिकारपुर शाहीबाग]] {{center|चि. नं. १ ] '''शिकारपुर : शाहीबाग''' [ पान नं. ४१}}{{nop}}<noinclude></noinclude> tjpq6jq2y3qnc0yh3rulcdr0xup33sx पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/५७ 104 111415 235375 2026-08-10T11:57:04Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "सोई व इस्पितळाचे आसपास राखलेली खुली जागा हीं सर्व वाखाणण्या- सारखीं आहेत असें मला वाटलें. या सर्व इमारतीची योजना, बांधणी व व्यवस्था रा. जोशी यांचे हातची आहे हें कळून आम्ही रा. जोशी '..." 235375 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जुनीं तीन प्रख्यात शहरें|४१}}</noinclude>सोई व इस्पितळाचे आसपास राखलेली खुली जागा हीं सर्व वाखाणण्या- सारखीं आहेत असें मला वाटलें. या सर्व इमारतीची योजना, बांधणी व व्यवस्था रा. जोशी यांचे हातची आहे हें कळून आम्ही रा. जोशी 'यांच्या कौशल्याचे व कामगिरीचें कौतुक केलें. हैं इस्पितळ उद्धवमल ताराचंद या व्यापान्याच्या उदार देणगीचें मूर्तस्वरूप आहे. त्यानें स्वतः एक लाख रुपयांची देणगी देऊन दुसऱ्या व्यापाऱ्यांकडून आणखी दोन लाख रुपये जमवून दिले. सर्व देणग्या देणारांचीं नांवें इस्पितळाच्या प्रवेश- द्वाराच्या भिंतीवर एका सुंदर संगमरवरी दगडावर कोरलेली दिसली. या नव्या व उपयुक्त संस्थेचा लाभ गांवकऱ्यांना करून दिल्याबद्दल उद्भवमल ताराचंद यांचें मनांतल्या मनांत कौतुक करीत आम्ही इस्पितळांतून बाहेर पडलों. नंतर शेजारींच असलेले बॉयस्काउटचें व्यायामगृह पाहिलें. ही छोटीशी इमारत नवीच बांधलेली दिसली. दोन पिंगपाँग टेबलें राहतील इतका मोठा दिवाणखाना व्यायामगृहामध्यें आहे. गृहासमोर टेनीस कोर्टें आहेत व बँडस्टँडनें अलंकृत अशी सुंदर फुलबाग आहे. या - व्यायामगृहाचा विशेष म्हणजे येथें ग्रीक गोलनाटकगृहाच्या आकाराचा आगीन - आखाडा (camp-fire place) बांधलेला आहे. हा अर्थात् वरती खुला व बिनछपरी आहे. मात्र सभोवार वर्तुळाकार काँक्री- टच्या नाटकगृहाप्रमाणें बसण्यास चढत्या तीन चार पायऱ्या बांधल्या आहेत. हैं कामही वाखाणण्यासारखे आहे. हही काम रा. जोशी यांच्या • हातचें आहे असें कळलें. नंतर आम्ही गांवापासून मैल दीड मैलांवर अस- लेली एक गोशाळा पाहण्यास गेलों. केवढी प्रचंड ती गोशाळा ! येथें 'एकंदर २००० गुरे पाळली जातात असे कळले. येथें आम्ही दुभत गुरें व त्यांची वासरें पाहिली. येथें म्हाताऱ्या, आंधळ्या, लंगड्या अशा नाना व्यंगांनीं गांजलेल्या गाई आहेत. त्या प्रत्येक जातीच्या गाईंना निराळें गोगृह बांधलेले आहे. त्यांत हीं गुरें मोकळी सोडलेली दिसली. येथें गुरांचें खाण्याचें गवत तयार करण्याचें मोठें यंत्र पाहिलें. या यंत्रानें कडब्याचा बारीक भुगा करतात व मग त्याला थोडेसें मिठाचे<noinclude></noinclude> lx74955j6idw0r071s8g782tmiucgoi