विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.16 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk साहित्यिक:पांडुरंग सदाशिव साने 102 235 236021 210228 2026-08-22T06:10:43Z QueerEcofeminist 918 /* साहित्य */ लिंक्स 236021 wikitext text/x-wiki {{साहित्यिक | नाव = पांडुरंग सदाशिव | आडनाव = साने | आडनावाचे अक्षर = स | जन्मवर्ष = १८९९ | मृत्यूवर्ष = १९५० | वर्णन = | चित्र = | विकिपीडिया = {{लेखनाव}} | विकिकोट्स = | कॉमन्स = | कॉमन्स वर्ग = }} हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. == जीवन == साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशारितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिर|तत्त्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला. इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधीं|महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वत: खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळ|सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकर्यांधची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य - या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील ''बलसागर भारत होवो'' सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषण|उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसर्याय पांडुरंगाला खर्यार अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्ष|समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळ|आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वत: तमिळ भाषा|तामीळ, बंगाली भाषा|बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबर्याद, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. '''श्यामची आई''' ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ''''गीता प्रवचनेसुद्धा''' विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. ==आंतरभारती== गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतरभारतीची स्थापना करण्याचा प्रयत्न होय. प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वताला बांधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छीनाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ ठाकूर यांच्या शांतीनिकेतन|शांतीनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलत व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यांचे निधन झाले. == साहित्य == गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना ''स्त्री जीवन'' व ''पत्री'' अर्पण केली. ''श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली. === साहित्य === * [[श्यामची आई]] * [[सोनसाखळी]] * [[आपण सारे भाऊ भाऊ]] * [[गोड गोष्टी]] (कथामाला) * साप्ताहिक साधना (संस्थापक, संपादक) * [[भारतीय संस्कृती]] * [[स्त्री जीवन]] * [[रामाचा शेला]] * [[मनू बाबा]] * [[कला व इतर निबंध]] * [[पुरातत्वभूषण कै. इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र]] * [[ना. गोखले चरित्र]] [[वर्ग:प्राचीन साहित्यिक]] dykmhx8xsc0pba07f8wfwn232zcm2ji 236022 236021 2026-08-22T06:11:42Z QueerEcofeminist 918 /* साहित्य */ + 236022 wikitext text/x-wiki {{साहित्यिक | नाव = पांडुरंग सदाशिव | आडनाव = साने | आडनावाचे अक्षर = स | जन्मवर्ष = १८९९ | मृत्यूवर्ष = १९५० | वर्णन = | चित्र = | विकिपीडिया = {{लेखनाव}} | विकिकोट्स = | कॉमन्स = | कॉमन्स वर्ग = }} हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. == जीवन == साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशारितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिर|तत्त्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला. इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधीं|महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वत: खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळ|सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकर्यांधची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य - या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील ''बलसागर भारत होवो'' सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषण|उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसर्याय पांडुरंगाला खर्यार अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्ष|समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळ|आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वत: तमिळ भाषा|तामीळ, बंगाली भाषा|बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबर्याद, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. '''श्यामची आई''' ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ''''गीता प्रवचनेसुद्धा''' विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. ==आंतरभारती== गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतरभारतीची स्थापना करण्याचा प्रयत्न होय. प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वताला बांधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छीनाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ ठाकूर यांच्या शांतीनिकेतन|शांतीनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलत व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यांचे निधन झाले. == साहित्य == गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना ''स्त्री जीवन'' व ''पत्री'' अर्पण केली. ''श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली. === साहित्य === * [[श्यामची आई]] * [[सोनसाखळी]] * [[आपण सारे भाऊ भाऊ]] * [[गोड गोष्टी]] (कथामाला) * साप्ताहिक साधना (संस्थापक, संपादक) * [[भारतीय संस्कृती]] * [[स्त्री-जीवन]] * [[रामाचा शेला]] * [[मनू बाबा]] * [[कला व इतर निबंध]] * [[पुरातत्वभूषण कै. इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र]] * [[ना. गोखले चरित्र]] [[वर्ग:प्राचीन साहित्यिक]] 307lcf2ke6wtaedfrt8veuagqmfdfnm हरिपाठ/श्री एकनाथ हरिपाठ 0 5052 236024 227487 2026-08-22T07:50:27Z ~2026-45827-91 6177 236024 wikitext text/x-wiki १ हरीचिया दासा हरि दाही दिशा भावॆं जैसा तैसा हरि ऎक .. १.. हरी मुखीं गातां हरपली चिंता त्या नाहीं मागुता जन्म घॆणॆं .. २.. जन्म घॆणॆं लागॆ वासनॆच्या संगॆ तॆचि झालीं अंगॆं हरिरूप .. ३.. हरिरूप झालॆं जाणीव हरपलॆ मीतूंपणा गॆलॆं हरीचॆ ठायीं ..४.. हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. २ हरि बॊला हरि बॊला नातरी अबॊला व्यर्थ गलबला करूं नका .. १.. नकॊ अभिमान नकॊ नकॊ मान सॊडीं मीतूंपण तॊचि सुखी .. २.. सुखी त्याणॆं व्हावॆं जगा निववावॆं अज्ञानी लावावॆ सन्मार्गासी .. ३.. मार्ग जया कळॆ भावभक्तिबळॆं जगाचियॆ मॆळॆ न दिसती .. ४.. जनीं वनीं प्रत्यक्ष लॊचनीं ऎका जनार्दनीं ऒळखिलॆं .. ५.. ३ ऒळखिला हरी धन्य तॊ संसारी मॊक्ष त्याचॆ घरीं सिद्धीसहित .. १.. सिद्धी लावी पिसॆं कॊण तया पुसॆ नॆलॆं राजहंसॆं पाणी काय .. २.. काय तॆं करावे संदॆहीं निर्गुण ज्ञानानॆं सगुण ऒस कॆलॆं .. ३.. कॆलॆं कर्म झालॆं तॆंचि भॊगा आलॆं उपजलॆ मॆलॆ ऐसॆ किती .. ४.. ऎका जनार्दनीं नाहीं यातायाती सुखाची विश्रांती हरीसंगॆं .. ५.. ४ जॆं जॆं दृष्टी दिसॆ तॆं तॆं हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाहीं .. १.. वैकुंठ कैलासी तीर्थक्षॆत्रीं दॆव तयाविण ठाव रिता कॊठॆं .. २.. वैष्णवांचॆं गुह्य मॊक्षांचा ऎकांत अनंतासी अंत पाहतां नाहीं .. ३.. आदि मध्य अंत अवघा हरि ऎक ऎकाचॆ अनॆक हरि करी .. ४.. ऎकाकार झालॆ जीव दॊन्ही तिन्ही ऎका जनार्दनीं ऐसॆं कॆलॆं .. ५.. ५ नामाविण मुख सर्पाचॆं तॆं बीळ जिव्हा नव्हे काळसर्प आहॆ .. १.. वाचा नव्हॆ लांब जळॊ त्याचॆं जिणॆं यातना भॊगणॆं यमपुरीं .. २.. हरीविण कॊणी नाहीं सॊडविता पुत्र बंधु कांता संपत्तीचॆ .. ३.. अंतकाळीं कॊणी नाहीं बा सांगाती साधूचॆ संगतीं हरी जॊडॆ .. ४.. कॊटि कुळॆं तारी हरि अक्षरॆं दॊन्ही ऎका जनार्दनीं पाठ कॆलीं .. ५.. ६ धन्य माय व्याली सुकृताचॆं फळ फळ निर्फळ हरीविण .. १.. वॆदांताचॆं बीज हरि हरि अक्षरॆं पवित्र सॊपारॆं हॆंचि ऎक .. २.. यॊग याग व्रत नॆम दानधर्म नलगॆ साधन जपतां हरि .. ३.. साधनाचॆं सार नाम मुखीं गातां हरि हरि म्हणतां कार्यसिद्धी .. ४.. नित्य मुक्त तॊचि ऎक ब्रह्मज्ञानी ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. ७ बहुतां सुकृतॆं नरदॆह लाधला भक्तीविण गॆला अधॊगती .. १.. पाप भाग्य कैसॆ न सरॆचि कर्म न कळॆचि वर्म अरॆ मूढा .. २.. अनंत जन्मींचॆं सुकृत पदरी त्याचॆ मुखीं हरि पैठा हॊय .. ३.. राव रंक हॊ कां उंच नीच याती भक्तीविण माती मुखीं त्याच्या .. ४.. ऎका जनार्दनीं हरि हरि म्हणतां मुक्ती सायुज्यता पाठी लागॆ .. ५.. ८ हरिनामामृत सॆवी सावकाश मॊक्ष त्याचॆ भूस दृष्टीपुढॆं .. १.. नित्य नामघॊष जयाचॆ मंदिरीं तॆचि काशीपुरी तीर्थक्षॆत्र .. २.. वाराणसी तीर्थक्षॆत्रा नाश आहॆ अविनाशासी पाहॆ नाश कैचा .. ३.. ऎका तासामाजीं कॊटि वॆळा सृष्टी हॊती जाती दृष्टि पाहॆं तॊचि .. ४.. ऎका जनार्दनीं ऐसॆं किती झालॆं हरिनाम सॆविलॆं तॊचि ऎक .. ५.. ९ भक्तीविण पशु कशासी वाढला सटवीनॆ नॆला कैसा नाहीं .. १.. काय माय गॆली हॊती भूतापासीं हरि न यॆ मुखासी अरॆ मूढा .. २.. पातकॆं करिता पुढॆं आहॆ पुसता काय उत्तर दॆतां हॊशील तूं .. ३.. अनॆक यातना यम करवील कॊण सॊडवील तॆथॆं तुजला .. ४.. ऎका जनार्दनीं सांगताहॆं तॊंडे आहा वाचा रडॆ बॊलतांचि .. ५.. १० स्वहिताकारणॆं संगती साधूची भावॆं भक्ति हरीची भॆटी तॆणॆं .. १.. हरि तॆथॆं संत संत तॆथॆं हरी ऐसॆं वॆद चारी बॊलताती .. २.. ब्रह्मा डॊळसातॆं वॆदार्थ ना कळॆ तॆथॆं हॆ आंधळॆ व्यर्थ हॊती .. ३.. वॆदार्थाचा गॊंवा कन्या अभिलाष वॆदॆं नाहीं ऐसॆं सांगितलॆं .. ४.. वॆदांचीं हीं बीजाक्षरॆं हरी दॊनी ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. ११ सत्पद तॆं ब्रह्म चित्पद तॆं माया आनंदपदीं जया म्हणती हरी ||१|| सत्पद निर्गुण चित्पद सगुण सगुण निर्गुण हरिपायीं || २|| तत्सदिति ऐसॆं पैल वस्तूवरी गीतॆमाजी हरि बॊलियॆलॆ || ३|| हरिपदप्राप्ती भॊळ्या भाविकांसी अभिमानियांसी नर्कवास || ४|| अस्ति भाति प्रिय ऐशीं पदॆं तिनी ऎका जनार्दनीं तॆंचि झालॆं || ५|| १२ नाकळॆ तॆं कळॆ कळॆ तॆं नाकळॆ वळॆ तॆं ना वळॆं गुरुविणॆं ||१|| निर्गुण पावलॆं सगुणीं भजतां विकल्प धरितां जिव्हा झडॆ ||२ बहुरूपी घरी संन्यासाचा वॆष पाहॊन तयास धन दॆती ||३|| संन्याशाला नाहीं बहुरूपियाला सगुणीं भजला तॆथॆं पावॆ ||४|| अद्वैताचा खॆळ दिसॆ गुणागुणीं ऎका जनार्दनीं ऒळखिलॆं ||५|| १३ ऒळखिला हरि सांठविला पॊटीं हॊतां त्याची भॆटी दुःख कैंचॆं ||१|| नर अथवा नारी हॊ कां दुराचारी मुखीं गातां हरि पवित्र तॊ ||२|| पवित्र तॆं कुळ धन्य त्याची माय हरि मुखॆं गाय नित्य नॆमॆं ||३|| काम क्रॊध लॊभ जयाचॆ अंतरीं नाहीं अधिकारी ऐसा यॆथॆं ||४|| वैष्णवांचॆं गुह्य काढिलॆं निवडुनी ऎका जनार्दनीं हरि बॊला ||५|| १४ हरि बॊला दॆतां हरि बॊला घॆतां हांसतां खॆळतां हरि बॊला ||१|| हरि बॊला गातां हरि बॊला खातां सर्व कार्य करितां हरि बॊला ||२|| हरि बॊला ऎकांतीं हरि बॊला लॊकांतीं दॆहत्यागा{अ}ंतीं हरि बॊला ||३|| हरि बॊला भांडतां हरि बॊला कांडतां उठतां बैसतां हरि बॊला ||४|| हरि बॊला जनीं हरि बॊला विजनीं ऎका जनार्दनीं हरि बॊला ||५|| ‌ || भानुदास एकनाथ || १५ ऎक तीन पांच मॆळा पंचवीसाचा छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि .. १.. कल्पना अविद्या तॆणॆ झाला जीव मायॊपाधी शिव बॊलिजॆति .. २.. जीव शिव दॊन्ही हरिरूपीं तरंग सिंधु तॊ अभंग नॆणॆं हरी .. ३.. शुक्तीवरी रजत पाहतां डॊळां दिसॆ रज्जूवरी भासॆ मिथ्या सर्प .. ४.. क्षॆत्र-क्षॆत्रज्ञातॆं जाणताती ज्ञानी ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. १६ कल्पनॆपासूनी कल्पिला जॊ ठॆवा तॆणॆं पडॆ गॊंवा नॆणॆ हरी .. १.. दिधल्या वांचूनि फळप्राप्ति कैंची इच्छा कल्पनॆची व्यर्थ बापा .. २.. इच्छावॆ तॆ जवळी चरण हरीचॆ चरण सर्व नारायण दॆतॊ तुज .. ३.. न सुटॆ कल्पना अभिमानाची गांठी घॆतां जन्म कॊटी हरि कैंचा .. ४.. ऎका जनार्दनीं सांपडली खूण कल्पना अभिमान हरि झाला .. ५.. १७ काय नपुंसका पद्मनीचॆ सॊहळॆ वांझॆसी डोहाळॆ कैची हॊती .. १.. अंधापुढॆं दीप खरासी चंदन सर्पासी दुधपान करूं नयॆ .. २.. क्रॊधि अविश्वासी त्यासी बॊध कैंचा व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नयॆ .. ३.. खळाची संगती उपयॊगासी नयॆ आपणा अपाय त्याचॆ संगॆ .. ४.. वैष्णवीं कुपथ्य टाकिल वाळूनी ऎका जनार्दनीं तॆचि भलॆ .. ५.. १८ न जायॆचि ताठा नित्य खटाटॊप मंडूकी वटवट तैसॆ तॆ गा .. १.. प्रॆमावीण भजन नाकाविण मॊती अर्थाविण पॊथी वाचुनी काय .. २.. कुंकवा नाहीं ठावॆ म्हणॆ मी आहॆव भावावीण दॆव कैसा पावॆ .. ३.. अनुतापॆवीण भाव कैसा राहॆ अनुभवॆं पाहॆं शॊधूनियां .. ४.. पाहतां पाहणॆं गॆलॆं तॆं शॊधूनी ऎका जनार्दनीं अनुभविलॆं .. ५.. १९ परिमळ गॆलिया वॊस फुल दॆठीं आयुष्या शॆवटीं दॆह तैसा .. १.. घडीघडी काळ वाट याची पाहॆ अजून किती आहॆ अवकाश .. २.. हाचि अनुताप घॆऊन सावध कांहीं तरी बॊध करीं मना .. ३.. ऎक तास उरला खट्वांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली .. ४.. सांपडला हरि तयाला साधनीं ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. २० करा रॆ बापांनॊ साधन हरीचॆं झणीं करणीचॆं करूं नका .. १.. जॆणॆं नयॆ जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा कांहीं .. २.. साधनाचॆं सार मंत्रबीज हरी आत्मतत्त्व धरी तॊचि ऎक .. ३.. कॊटि कॊटि यज्ञ नित्य ज्याचा नॆम ऎक हरि नाम जपतां घडॆ .. ४.. ऎका जनार्दनीं न घ्यावा संशय निश्चयॆंसी हॊय हरिरूप .. ५.. २१ बारा सॊळा जणी हरीसी नॆणती म्हणॊनी फिरती रात्रंदिवस .. १.. सहस्र मुखांचा वर्णितां भागला हर्ष जया झाला तॆणॆं सुखॆं .. २.. वॆद जाणूं गॆला पुढे मौनावला तॆं गुह्य तुजला प्राप्त कैंचॆं .. ३.. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तॊचि जाणॆ .. ४.. जाणतॆ नॆणतॆ हरीचॆ ठिकाणीं ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. २२ पिंडीं दॆहस्थिती ब्रह्मांडीं पसारा हरिविण सार व्यर्थ भ्रम .. १.. शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी हरिसी जाणॊनि हरिच झालॆ .. २.. या रॆ या रॆ धरूं हरिनाम तारूं भवाचा सागरू भय नाहीं .. ३.. साधुसंत गॆलॆ आनंदीं राहिलॆ हरिनामॆं झालॆ कृतकृत्य .. ४.. ऎका जनार्दनीं मांडिलॆं दुकान दॆतॊ मॊलावीण सर्व वस्तु .. ५.. २३ आवडीनॆं भावॆं हरिनाम घॆसी तुझी चिंता त्यासी सर्व आहॆ .. १.. नकॊ खॆद करूं कॊणत्या गॊष्टीचा पति तॊ लक्ष्मीचा जाणतसॆ .. २.. सकळ जीवांचा करितॊ सांभाळ तुज मॊकलील ऐसॆं नाहीं .. ३.. जैसी स्थिति आहॆ तैशापरी राहॆं कौतुक तूं पाहॆं संचिताचॆं .. ४.. ऎका जनार्दनीं भॊग प्रारब्धाचा हरिकृपॆं त्याचा नाश झाला .. ५.. २४ दुर्बळाची कन्या समर्थानॆ कॆली अवदसा निमाली दरिद्राची .. १.. हरिकृपा हॊतां भक्तां निघती दॊंदॆं नाचती स्वानंदॆं हरिरंगीं .. २.. दॆव भक्त दॊन्ही ऎकरूप झालॆ मुळींच संचलॆं जैसॆं तैसॆं .. ३.. पाजळली ज्यॊती कापुराची वाती ऒवाळितां आरती भॆद नुरॆ .. ४.. ऎका जनार्दनीं कल्पॆंची मुराला तॊचि झाला ब्रह्मरूप .. ५.. २५ मुद्रा ती पांचवी लावूनियां लक्ष तॊ आत्मा प्रत्यक्ष हरि दिसॆ .. १.. कानीं जॆं पॆरिलॆं डॊळां तॆं उगवलॆं व्यापकॆं भारलॆ तॊचि हरि .. २.. कर्म\-उपासना\-ज्ञानमार्गीं झालॆ हरिपाठीं आलॆ सर्व मार्ग .. ३.. नित्य प्रॆमभावॆं हरिपाठ गाय हरिकृपा हॊय तयावरी .. ४.. झाला हरिपाठ बॊलणॆं यॆथूनी ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. अवघेंचि त्रैलोक्य आनंदाचें आतां | चरणीं जगन्नाथा चित्त ठेलें ॥१॥ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन ॥२॥ एका जनार्दनीं एकपणें उभा । चैतन्याची शोभा शोभतसे ॥३॥ -------------- नाथ परंपरा ------------- ct4z0nam6x8gw96bo49qm9h672x5l5j अनुक्रमणिका:सांगली आणि सांगलीकर.pdf 106 74682 236007 166373 2026-08-21T16:35:14Z कल्पनाशक्ती 3813 236007 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=सांगली आणि सांगलीकर |Language=mr |Volume= |Author=अविनाश टिळक |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=सांगली नगरवाचनालय |Address=सांगली |Year=2001 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 5="स्वागत" 13="लेखनामागील भूमिका" 17="प्रकाशकांचे मनोगत" 18="ऋणनिर्देश" 19="अनुक्रम" 20="महिमा सांगलीचा" 21="सांगलीचे आराध्य दैवत" 22="फोटो" 23="फोटो" 24="फोटो" 25="सांगली - एके काळची रम्य नगरी"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} d3z93bdp75j2oty5cskata3mkmqr8zd पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२ 104 77340 235988 172218 2026-08-21T15:50:21Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 235988 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><Br><br><br> {{center|{{xxxx-larger|सांगली आणि सांगलीकर}}}} {{center|<big> ■ लेखक ■</big>}} {{center|{{xx-larger|श्री. अविनाश टिळक}}}} {{center|{{Css image crop |Image = सांगली_आणि_सांगलीकर.pdf |Page = 2 |bSize = 365 |cWidth = 54 |cHeight = 47 |oTop = 459 |oLeft = 150 |Location = center |Description = }} }}{{nop}}<noinclude></noinclude> 9x3b01a6a5hmt7nzdejwxb85f2vrkhu पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३ 104 77342 235989 169349 2026-08-21T15:52:35Z कल्पनाशक्ती 3813 235989 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Komal Sambhudas" /></noinclude><br> {{Block center|<poem>{{x-larger|'''जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी'''}} कै. सौ. इंदूमती रामकृष्ण टिळक ही माझी जननी. कै. रामकृष्ण वासुदेव टिळक हे माझे जनक. हे मातापिता मला पूजनीय आहेतच पण ज्या कृष्णाकाठच्या रम्य सांगलीत माझा जन्म झाला ती सांगली नगरी एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी मला पूज्य आहे सांगली माझी जन्मभूमि आहे. याचा मला अभिमान आहे. असे म्हणतात की, 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.' जननी आणि जन्मभूमिच्या ऋणातून मुक्त होण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून सांगली नगरीविषयी लिहिलेले हे पुस्तक कृतज्ञतापूर्वक त्या सर्वांना अर्पण !</poem>}}<noinclude></noinclude> a2zbwljnnr9q6na5yl3siqs0f5clj1s 235990 235989 2026-08-21T16:02:37Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235990 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{Block center|<poem>{{x-larger|'''जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी'''}} कै. सौ. इंदूमती रामकृष्ण टिळक ही माझी जननी. कै. रामकृष्ण वासुदेव टिळक हे माझे जनक. हे मातापिता मला पूजनीय आहेतच पण ज्या कृष्णाकाठच्या रम्य सांगलीत माझा जन्म झाला [[File:सांगली आणि सांगलीकर pdf 3 नमस्कार चित्र.jpg|borderless|right]] ती सांगली नगरी एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी मला पूज्य आहे सांगली माझी जन्मभूमि आहे. याचा मला अभिमान आहे. असे म्हणतात की, 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.' जननी आणि जन्मभूमिच्या ऋणातून मुक्त होण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून सांगली नगरीविषयी लिहिलेले हे पुस्तक कृतज्ञतापूर्वक त्या सर्वांना अर्पण !</poem>}}{{nop}}<noinclude></noinclude> 82lzw16ipbdz6814jvqhm5mpq5kby3s पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४ 104 77344 235992 172215 2026-08-21T16:05:06Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 235992 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|सांगली आणि सांगलीकर}}}} ❖ लेखक<br> श्री. अविनाश टिळक<br> १/८, राजवाडा, सांगली ४१६ ४१६.<br> फोन : ३२३१३८ ❖ प्रकाशक<br> सांगली (जिल्हा) नगरवाचनालय, सांगली.<br> राजवाडा चौक, म.गांधी रोड, सांगली ४१६ ४१६ <br> फोन : ३७७७३६ ❖ हक्क<br> सौ. सुमन टिळक<br> १/८, राजवाडा, सांगली ४१६ ४१६.<br> फोन : ३२३१३८ ❖ प्रथम आवृत्ती : रविवार दि. २५ मार्च २००१ ❖ मुद्रक :<br> श्री. प्रभाकर द. खाडिलकर<br> सुबोध मुद्रण<br> ७०९ ब, गांवभाग, खाडिलकर गल्ली,<br> सांगली ४१६ ४१६. फोन : ३३१४८३ ❖ अक्षरजुळणी<br> स्वरुप उद्योग<br> ७०९ ब, गांवभाग, खाडिलकर गल्ली,<br> सांगली ४१६ ४१६. फोन ३३१४८३ ❖ किंमत : रु.१५०/- मात्र. ❖ टीप : लेखकाच्या मताशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.{{nop}}<noinclude></noinclude> deahy2e6ibcn1gnyfd27clzmn4wn34j पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५ 104 77345 235993 172222 2026-08-21T16:07:32Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 235993 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|स्वागत}}}} {{gap}}श्री. अविनाश टिळक हे मूळचे सांगलीचे. मध्यंतरी ते नोकरीच्या निमित्ताने अनेक वर्षे मुंबईत होते. निवृत्तीनंतर कांही वर्षापूर्वी ते सांगलीत येऊन स्थायिक झाले आहेत. त्यानंतर त्यांनी आपल्या साहित्यिक व सांस्कृतिक कामाची सुरवात नव्या जोमाने सुरु केली आहे. त्यांचे वडील कै. रा. वा. टिळक, 'टिळक मास्तर' म्हणून ओळखले जात. त्यांना वाचनाचा अतोनात हव्यास होता, वेडच होते. ते नगरवाचनालयाचे अविभाज्य सदस्य वाचक होते. किंबहुना वाचन हाच त्यांचा व्यवसाय होता. पेशाने ते शिक्षक होते इतकेच. आपले हे वेड त्यांनी दुसऱ्या पिढीत संक्रांत केले आहे. श्री. अविनाश टिळक हे त्याचे ठळक प्रतीक आहेत. म्हणूनच तेही वाचनालयाचे सक्रिय कार्यकर्ते व वाचन लेखनात रस घेणारे निर्मितीक्षम रसिक म्हणून सांगलीत ओळखले जातात. त्यांच्या नावावर 'आधारवड' नावाचा एक अतिशय निष्ठापूर्ण चरित्र ग्रंथ आहे. तो त्यांच्या वाङ्मयीन प्रवृत्तीची व क्षमतेची साक्ष देण्यास पुरेसा आहे. त्यांची लेखन शैली जुन्या नव्या पद्धतीचे रोचक दर्शन घडविणारी आहे. सांगलीबद्दलच्या त्यांच्या प्रेमाने 'सांगली व सांगलीकर' हा परिचय ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा त्यांना मिळाली व तो ग्रंथ त्यांनी प्रेमाने व परिश्रमाने सिद्ध केला आहे. पुस्तकामागील मनोभूमिकेत ते लिहितात "३५ वर्षांच्या दीर्घकालीन विरहात सांगलीची आठवण माझ्या मनात एकाद्या प्रेयसीच्या आठवणीसारखी ताजी होती" मुंबईच्या वैभवात लोळताना देखील त्याना हरिपूरच्या जत्रेची, तात्यासाहेबाच्या मळ्यातील हिरव्या पाण्यात मारलेल्या उड्यांची, वडावर रंगलेल्या सूरपारंब्याची, नगरवाचनालयातील ऐतिहासिक कादंबऱ्यात हरवलेल्या ध्यानाची, विवेक हजारे, विजय भोसले या क्रिकेटपटूंची आठवण येत असे. नंतर अन्यक्षेत्रांतील नामवंत, सांगलीचे सुपुत्र आहेत याचा त्याना अभिमान वाटत असे. आद्य नाटककार विष्णुदास भावे, देवल, खाडिलकर, साधुदास, वि. स. खांडेकर, वैद्य आबासाहेब सांभारे, उद्योगरत्न दादासाहेब वेलणकर, बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, वसंतदादा पाटील ही मंडळी तेंव्हा त्यांच्या नजरेसमोर येत. सांगलीकर कोणास म्हणावे याचा निर्णय त्यांनी स्वतः घेतला. ज्या व्यक्तीमुळे सांगलीचे नाव उज्ज्वल झाले तो सांगलीकर. अशा बावीस सांगलीकरांची निवड त्यानी केली. आणखी काही सांगलीकरांची नावे त्यांच्या दृष्टीसमोर आहेत.{{nop}}<noinclude>{{center|एक}}</noinclude> 6w289tvhmqt2ymd68c0cmxam8uy6wz4 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६ 104 77346 235994 172224 2026-08-21T16:10:06Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 235994 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}पुस्तकाचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात सांगली नगरीची पूर्व पीठिका व विकासाचा इतिहास सांगितला आहे. तर उत्तरार्धात बावीस नामवंत सांगलीकरांचा परिचय करुन दिलेला आहे. शेवटी परिशिष्टात आणखी काही सांगलीकर, सांगली मधील कांही प्रेक्षणीय स्थळे, नामवंत संस्था, गेल्या दोनशे वर्षांमधील महत्त्वाच्या घटना, सांगलीचा दुर्मिळ नकाशा, दुर्मिळ फोटो इत्यादी बाबींची माहिती देण्यात आलेली आहे. याप्रकारे हा सांगली परिचय परिपूर्ण करण्याचा साक्षेपी प्रयत्न टिळकांनी केलेला आहे. ही रचना विचारपूर्वक व आस्थेने केली आहे. {{gap}}'सांगली - एके काळची रम्या नगरी' हे पहिले प्रकरण. प्रथम सांगलीच्या परिसराची भावार्त आठवण दिली आहे आणि नंतर नगरीचा इतिहास आठवला आहे, इ.स. १०२४ पासूनचे उल्लेख नोंदविले आहेत. सांगलीचा स्पष्ट उल्लेख इ.स. १६५९ साली लिहिलेल्या 'शिवभारत' या संस्कृत काव्यात आलेला आहे. सांगली या नावाविषयी अनेक समजुती आहेत. कृष्णा नदीच्या एका उंचवट्यावरचे सहा गल्ली असलेले गाव म्हणजे सांगली, कर्नाटकी पद्धतीचे नाव संगलकी, संगमावरचे म्हणून संगमी, त्यांचा अपभ्रंश होऊन सांगली. सांगलीचा इतिहास म्हणजे पटवर्धन राजघराण्याचाच इतिहास. १८०१ साली पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी सांगलीचे वेगळे संस्थान बनविले. नंतर वसंतदादा पाटील यांच्या काळापर्यंतची हकिगत आली आहे. या ठिकाणी विकसित झालेले उद्योगधंदे हळदीची प्रसिद्ध बाजारपेठ, इथे निर्माण झालेली नाट्यपरंपरा, शिक्षण व क्रीडा या क्षेत्रांतील नावलौकिक याबद्दलचा आढावा गौरवाने घेतला आहे. {{gap}}दुसरे प्रकरण सांगलीचे राजेसाहेब चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन (दुसरे) यांच्या संबंधीचे आहे. त्यांच्या घराण्याचा पूर्वेतिहास, राजपदाची योगायोगाने झालेली प्राप्ती, त्याना दिले गेलेले विचारपूर्वक शिक्षण, कॅप्टन बर्कसारख्या कर्तबगार प्रशासकाचे मार्गदर्शन, नंतर त्यानी प्रत्यक्ष राज्यकारभार करताना ब्रिटिश सरकार व संस्थानी प्रजेच्या अपेक्षा यामध्ये राखलेला समतोल, विवाहाच्या संदर्भात त्यानी दाखविलेल्या ठामपणा, त्यानी राज्यकारभारात आणलेला एकजिनसीपणा, दर्जा राखण्यासाठी सेवानिवृत्त आय.सी.एस अधिकाऱ्यांची नियुक्ती, इत्यादी बाबींचे दर्शन घडवते. संस्थानच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राजेसाहेबांनी अथक प्रयत्न केले. जमिनीची सुधारणा केली. उद्योगधंदे सुरु केले. दांडेकर, भिडे, वेलणकर, शिरगावकर यांचे कारखाने उभे राहण्यास प्रेरणा दिली. बँका उभ्या केल्या. संस्थानात लोकशाहीचे रोपटे रुजवले. शिक्षणविषयक पुरोगामी<noinclude>{{center|दोन}}</noinclude> imoevp97cr7gp84n6hqla5dkip11oxa पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८ 104 77347 235996 172233 2026-08-21T16:13:19Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 235996 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>सयाजीराव गायकवाड यांच्या सूचनेवरुन लिहिले गेलेले 'संशयकल्लोळ आणि ते रंगभूमीवर येण्यापूर्वीच देवलांचा घडलेला मृत्यू यांचा प्रत्ययकारी आलेख लेखकाने काढला आहे. {{gap}}त्यांचप्रमाणे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या बहुविध साहित्यसेवेचा, स्वाभिमानी वृत्तीचा, मान्यवरांशी घडलेल्या त्यांच्या सहवासाचा, 'केसरी' मधली त्यांची संस्मरणीय कारकीर्द, त्यांच्या प्रक्षोभक लेखामुळे लोकमान्य टिळकाना घडलेला तुरुंगवास, टिळकांच्या लेखनाची त्यानी आत्मसात केलेली शैली, क्रांतिकारी चळवळीतली त्यांची कामगिरी, नेपाळमध्ये घालवलेले दिवस, गंधर्व नाटक मंडळीसाठी त्यानी लिहिलेली नाटके, टिळकांचा मंडालेतील कारावास, केसरीशी संबंध संपणे, लोकमान्यांच्या सुटकेनंतर त्यानी पुन्हा केसरीत रुजू होणे, टिळकांचा १८२० साली झालेला मृत्यू, खाडिलकरांचे ट्रस्टीचे पद जाणे, लोकमान्य, नवाकाळ या वृत्तपत्रांची सुरवात, गांधीजीच्या राजकारणास पाठिंबा, १९२९ साली ‘राजद्रोहाचा खटला, तुरुंगवास, प्रकृती खालावणे, त्यांची अखेरची नाटके न चालणे, हा सर्व प्रवास श्री अविनाश टिळकांनी ठळकपणे उलगडला आहे. ज्या स्वातंत्र्याप्राप्तीसाठी कै. खाडिलकरांनी आपली लेखणी झिजवली ते त्याना पाहता आले. १९४८ साली त्यांचे देहावसान झाले. {{gap}}संत कोटणीस महाराजांच्यामुळे सांगलीला कीर्तनपंढरी म्हणून ओळखले जाऊ लागले. गुरुदेव रानडे त्याना आधुनिक एकनाथ म्हणत. त्यांच्या जीवनाची रूपरेषा लेखकाने मांडली आहे. त्यांच्या परमार्थसाधनेतील आणि व्यवसायातील चढउतार नमूद केले आहेत. त्यांच्या कीर्तनाची वैशिष्टये सांगितली आहेत. फार आस्थेवाईकपणे व सविस्तर अशी ही हकीगत आली आहे. {{gap}}आबासाहेब सांबारे हे लोकविलक्षण धन्वंतरी. कोल्हापूरच्या महाराजांना प्रतीक्षा करायला लावणारे आणि त्यांच्या पैलवानाला मरणाच्या दारातून परत आणणारे. त्या काळात आबासाहेब एक वैद्यकीय दंतकथा बनले होते. त्यांच्या गणपती उत्सवाचे महात्म्यही लेखकाने वर्णन केले आहे. आपल्या औषधोपचारांनी अल्लादिया खाँसाहेबांचा आवाज कसा पूर्ववत करुन दिला याची विस्मयकारक घटना लेखकाने रोचकपद्धतीने वर्णन केली आहे. लोकमान्यांपर्यंत त्यांची कीर्ती पोहचली होती. दुसरे असले विलक्षण व्यक्तिमत्व कवी साधुदासांचे. शीघ्रकवित्वाचे देणे लाभलेले ते संस्थानचे राजकवी होते, बुद्धिबळपटू होते. उत्तर पेशवाईच्या काळावर त्यानी उत्तम ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व होते. राजवैद्य आबासाहेब सांबारे व कोटणीस महाराज हे त्यांचे जवळचे स्नेही<noinclude>{{center|चार}}</noinclude> 11th3cx7apy000n1b58mp94q68lc863 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१० 104 77348 235998 171896 2026-08-21T16:16:59Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 235998 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>केला. विणकामाच्या शिक्षणाचा पाठपुरावा त्यानी सोलापुरात सर्वतऱ्हेची कामे करुन केला. १९१२ साली ३ मागांवर त्यानी कारखाना सुरु केला आणि त्याचा प्रचंड विकास केला. एकसष्टाव्या वर्षी त्यांची जी सुवर्णतुला झाली त्यातून एक ट्रस्ट निर्माण केला. त्यातून समाजातील विधायक कामाला मदत देण्याची योजना तयार केली. अखेरच्या पर्वात त्यानी ग्रंथ निर्मिती केली. 'कारखानदार कसा झालो' हे त्यांचे पुस्तक लोकप्रिय ठरले. वयाच्या ९१ व्या वर्षी १९७८ साली त्यांचे निधन झाले. {{gap}}संगीताचे गाढे व्यासंगी ग.ह. रानडे हे सांगलीचे सुपुत्र. त्यांचे शिक्षण सांगली येथे व पुण्यात फर्गसन कॉलेजमध्ये झाले. नंतर ते विलिंग्डनला फिजिक्स विषयाचे प्रोफेसर म्हणून आले. संगीतावर मराठी-इंग्रजीत त्यानी भरपूर लेखन केले. सुशिक्षतांचे संगीत, Hindustan Music, its Physics and Aesthetics व Music of Maharashtra ही त्यांची प्रमुख पुस्तके. संगीत नाटक अकादमीचे सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली. पुढे त्यानी Encyclopaedia of Music हा ग्रंथ सिद्ध केला. त्यांची संगीतावरची भक्ती आणि व्यासंग अनन्यसाधारण होता. {{gap}}नटवर्य मामा पेंडसे यांच्यावरील लेख रसिकतेने संपन्न आणि सविस्तर झाला आहे. त्यांची रंगभूमीवरील निष्ठा, त्यापायी उपसलेले कष्ट, केलेली हलकीसलकी कामे, नंतरचा रंगभूमीवरील प्रवेश आणि अभिनयाचे प्रात्यक्षिक, निरनिराळ्या भूमिकांतील अभिनयाला मिळालेले यश, केशवराव दात्यांचा लोभ, नंतर अनेक लहानसहान व्यवसाय करण्याची पाळी, मुंबईत सुरु केलेला दुधाचा धंदा आणि त्याचवेळी नाटक कंपन्याची येणारी आमंत्रणे, 'भाऊबंदकी'त नाना फडणीसांची गाजलेली भूमिका, या सर्व गोष्टींचे तपशीलवार वर्णन लेखकाने केले आहे. नाना फडणीसांच्या भूमिकेने मामाना मुंबईत विशेष स्थान प्राप्त करुन दिले. मध्यंतरीच्या काळात पोटदुखीच्या विकारासाठी त्यांची तीन ऑपरेशन्स् करावी लागली. नंतरही त्यांच्या अनेक भूमिका संस्मरणीय ठरल्या. त्यांचे 'केशराचे शेत' हे आत्मचरित्र वाचनीय ठरले. {{gap}}दुसरे अभिनेते गणपतराव मोहिते उर्फ मा. अविनाश. लता मंगेशकर यांच्या घराण्याशी त्यांचा अनेक दशकांचा घनिष्ट संबंध त्यांच्या नव्वदीत आजही तो टिकून आहे. 'कुलवधु' या नाटकाशी आणि 'पायाची दासी' या चित्रपटाशी त्यांचे नाव कायमचे निगडीत आहे. गेली ८५ वर्षे त्यांचा मराठी रंगभूमीशी निकटचा संबंध आहे. मा. अविनाश म्हणजे मराठी नाट्यकलेचा या काळातला<noinclude>{{center|सहा}}</noinclude> r70xrbj8qad8i5ijyr8slz1fndc0n0p पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११ 104 77350 235999 172237 2026-08-21T16:18:23Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 235999 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>चालता बोलता इतिहास आहे. नाट्यनिकेतनची त्यानी ३३ वर्षे सेवा केली. ते निवृत्त झाले तेव्हा त्यांची लोकप्रियता अबाधित होती. आजही ते ताठ मानेने आठवणींच्या विश्वात जगत आहेत. {{gap}}सांगलीचे सर्वात मोठे कर्तेकरविते म्हणजे वसंतराव पाटील. त्यांच्याशिवाय सांगलीकर सुपुत्रांचा इतिहास पूर्ण होणार नाही. त्यांचे सारे कर्तृत्व महाराष्ट्राला सुपरिचित आहे. त्याचा समर्थ आढावा श्री. टिळकानी घेतलेला आहे. कै. वसंतदादा हे सांगली भागातले राष्ट्रविख्यात व्यक्तिमत्व होय. सांगलीचे भाग्यविधाते. वसंतदादा यांच्या आयुष्यातील नाटयपूर्ण घटना लेखकाने अनुरुप शैलीत मांडल्या आहेत. त्यांच्या राजकीय जीवनातील कर्तृत्व आणि यशाची चढती कमान यांचाही आलेख चित्रित केला आहे. त्यानी केलेल्या कामाचा पसारा तपशीलाने दिग्दर्शित केला आहे. दानचिंतामणी राजमतीअक्का, क्रीडाक्षेत्रातील जागतिक कीर्तीचे क्रिकेटपटू विजय हजारे आणि बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, बुद्धिबळपटू भालचंद्र म्हैसकर, मल्लविद्येचे द्रोणाचार्य हरि नाना पवार, समर्थ कथाकार श्री. दा. पानवलकर या सर्वांच्या जीवनाचे आणि कर्तृत्वाचे ठसठशीत दर्शन श्री. अविनाश टिळकांनी घडविले आहे. त्याचप्रमाणे सय्यद अमीन या सांगलीतील साहित्यिकाचाही समावेश या मालिकेत केला आहे. ते एक सालस आणि संत प्रवृत्तीचे गृहस्थ होते. हिंदू-मुस्लीम ऐक्याचा पुरस्कार श्री. अमीन यानी आपल्या लेखणीने आणि वाणीने आयुष्यभर केला. संस्कृतचे नामवंत शिक्षक श्रीपादशास्त्री देवधर यांचे ते आवडते विद्यार्थी होते. ते सांगली नगरपालिकेचे नियुक्त सभासद होते. पुणे विद्यापीठाच्या कोर्टाचे सदस्य होते. 'पी.ई.एन' या आंतरराष्ट्रीय लेखकसंघाचे ते सभासद होते. त्यानी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला होता. ते अत्यंत साधेपणाने राहत असत. त्यानी एकूण १६ ग्रंथ लिहिले. त्यात संशोधनात्मक चरित्रे आणि धार्मिक साहित्य होते. इस्लाम, इस्लाम आणि नीतिशास्त्र, इस्लाम आणि संस्कृती हे त्यांचे प्रमुख ग्रंथ. हिंदू-मुस्लिमांचा सांस्कृतिक मिलाफ हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ. अकबर, पैगंबर यांची चरित्रे त्यानी लिहिली. तसेच छत्रपती शिवाजींचे चरित्रही लिहिले. ही सर्व पुस्तके त्यानी स्वखर्चाने प्रसिद्ध केली. ६८ व्या वर्षी सिटी बसच्या धक्का लागून त्यांचे अपघाती निधन झाले. {{gap}}सांगलीचा जन्मदाता चिंतामणराव पटवर्धन यांच्या जीवनदर्शनाखेरीज ही सांगलीकरांची मालिका पूर्ण झाली नसती. चिंतामणरावानी सांगलीला नवा चेहरा मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्याची पूर्वपीठिका लेखकाने आस्थेवाईकपणे व साद्यंत सादर केली आहे. गणेशदुर्ग, गणपतीमंदिर यांची<noinclude>{{center|सात}}</noinclude> l8xqtld4q7o1mp372ue5fhx7d25jhi1 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२ 104 77351 236000 172240 2026-08-21T16:19:30Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236000 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>उभारणी, त्यानी इंग्रज सरकारशी केलेले स्वाभिमानाचे वर्तन, पुढे इंग्रज सरकारने त्यांचा केलेला अभूतपूर्व सन्मान आणि त्यानंतर त्यांनी सांगलीची केलेली सर्वांगीण सुधारणा, याचे सरस निवेदन लेखकाने केले आहे. शेवटी सांगलीकर व्यक्तिंचे गुणगान संपवताना लेखकाने भैरवी म्हणून मंगेशकर सुरांना अभिवादन केले आहे. {{gap}}पुस्तकाच्या अखेरीस काही परिशिष्टे आणि पुरके जोडली आहेत. त्यांतून सांगलीतील महत्त्वाच्या संस्थांची माहिती आणि कालपट जोडले आहेत. ही माहिती उपयुक्त आणि पूरक आहे. {{gap}}श्री. अविनाश टिळक यानी अत्यंत परिश्रमाने सर्वप्रकारची माहिती एकत्र करुन हा एक ग्रंथ सर्वस्पर्शी केला आहे. नगर, वास्तू आणि नामवंत व्यक्ती यांची परस्परसंवादी आणि पूरक अशी रचना विचारपूर्वक आणि जातिवंत रसिकतेने केली आहे ती 'सांगली बहु चांगली' या प्रशस्तीची सार्थकता पटवून देणारी आहे. नगरीपेक्षा नामवंत व्यक्तींवर अधिक भर दिला आहे तो एक प्रकारे योग्यच म्हणावा लागेल. त्यात काही प्रमुख साहित्यिक, कार्यकर्ते, उद्योगपती, राजकीय नेते, क्रीडापटू आहेत आणि अन्य सांगलीकरही आहेत. {{gap}}सांगली नगरवाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे मान्य करून वाचनालयाच्या परंपरागत व्यवहारात एक नवी वाट पाडली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले पाहिजे. सुबुद्ध, रसिक सांगलीकर आणि सांगलीप्रेमी वाचक या ग्रंथाचे स्वागत करतील आणि ग्रंथकारास धन्यवाद देतील असा विश्वास वाटतो. {{rh|'निर्वेद', विश्रामबाग; सांगली.<br>१ फेब्रुवारी २००१||'''प्रा. म. द. हातकणंगलेकर'''}}{{nop}}<noinclude>{{center|आठ}}</noinclude> 4geaw09ptfw17sgpqrkrhx04emlz9xl पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३ 104 77352 236001 173581 2026-08-21T16:22:26Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236001 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|<big>'''लेखनामागील भूमिका'''</big>}} {{gap}}१९६१ मध्ये मी सांगली सोडली आणि १९९६ मध्ये मी पुन्हा कायम वास्तव्यासाठी सांगलीत आलो. दरम्यानच्या काळात मी मुंबईला रिझर्व्ह बँकेसारख्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या, बँकांची बँक असणाऱ्या संस्थेत नोकरी केली. रिझर्व्ह बँक आणि तिथं लाभलेला अफाट स्नेहपरिवार यांचे माझ्यावर अनंत अपकार आहेत. ऑफिसातील अनेक गुणीजनांमुळेच मला बॅडमिंटन, क्रिकेट, ब्रिज, कॅरम, ट्रेकिंग आदि क्रीडाविषयांपासून साहित्य, संगीत, नाट्य, अशा विविध विषयांकडे डोळसपणे पाहून त्यातील सौंदर्य समजावून घेण्याची, आनंद लुटण्याची दृष्टी लाभली. सांगलीतील विविध क्षेत्रांमधील, मानदंडांच्या कर्तृत्वाकडे पाहताना, मला या दृष्टीचा अुपयोग झाला. {{gap}}या ३५ वर्षांच्या दीर्घकालीन विरहातसुध्दा 'सांगली' या रम्या नगरीची आठवण एखाद्या प्रेयसीच्या आठवणीसारखी, माझ्या मनात सदैव ताजी होती! परगावात राहिलं की आपल्या जन्मगावाचं प्रेम आणि परदेशात राहिलं की आपल्या देशाचं प्रेम वाढीस लागतं! हा अनुभव सर्वांचाच असेल पण मोगल बादशहा बाबराने आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय तशी माझी गत व्हायची. दिल्लीत येऊन त्याने मोगल पातशाही स्थापली, वैभवात लोळू लागला तरी त्याला त्याच्या काबूल, कंदाहारच्या आठवणी, लालचुटुक रसरशीत कलिंगडाच्या फोडींच्या आठवणी, अस्वस्थ करुन टाकत. मुंबईच्या अलिशान बिल्डिंगज्, अुंची हॉटेल्स, विश्वविख्यात ब्रेबॉर्न स्टेडियम, वानखेडे स्टेडियम, तिथल्या क्रिकेट-मॅचेसच्या चित्तथरारक लढती, जहाँगीर आर्ट गॅलरीमधली प्रदर्शने, शिवाजी मंदिर, गडकरी रंगायतनची नाटकं, अखिल भारतीय कीर्तीच्या गायकांच्या, षण्मुखानंद हॉल, एन.सी.पी.ए., रंगमंदिर या ठिकाणी होणाऱ्या मैफली, अशा 'वैभवात' असतानासुद्धा मला आठवायची ती श्रावणी सोमवारची हरिपूरची जत्रा, आयर्विन ब्रिजच्या गॅलरीमधून दिसणारा कृष्णेचा महापूर, सांगली हाय्ग्स्कूल ग्राउंडवरील (आताचं छत्रपती शिवाजी स्टेडियम) संभू चाबूकस्वार, विवेक हजारे, विजय भोसले यांनी गाजवलेल्या आरवाडे शील्डच्या, चिंचेच्या झाडांवरुन (तो आमचा 'अीस्ट स्टँड'!) पाहिलेल्या क्रिकेट मॅचेस,<noinclude>{{center|नऊ}}</noinclude> eiz1luogv68z2ot4ahtql7riw0zfkf5 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४ 104 77353 236002 173584 2026-08-21T16:24:07Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236002 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>तात्यासाहेबांच्या मळ्यातील हिरव्यागार पाण्याच्या प्रशस्त विहिरीत मारलेल्या अुड्या, माळबंगल्याच्या अजाड माळावरच्या वडाच्या झाडांवरील सूरपारंब्या, सांगली नगरवाचनालयात धुंडाळलेल्या हरिभाऊ, नाथमाधवांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या, अशा बालपणीच्या अनेक आठवणी व्याकूळ करुन टाकत असत. {{gap}}पण हे होतं गावाचं प्रेम. निखळ प्रेम. {{gap}}जसजसं वय वाढत गेलं, जाणिवा रुंदावत गेल्या, तसतसं आपलं गाव कसं अभिमान बाळगण्याजोगं आहे याची सुखद जाणीव होऊ लागली. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर चंदू बोर्डेचा बॅकफूट कव्हर ड्राईव्ह बघताना, विजय हजारेंच्या लाजवाब कव्हर ड्राईव्हची आठवण निघायची. मग कुणी विचारायचा "अरे, हा हजारे तुमच्या सांगलीचा ना?" सी. सी. आय. माटुंगा जिमखाना येथे बॅडमिंटन मॅचेस बघताना नंदू नाटेकरांच्या आठवणी निघायच्या आणि मग हा जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू आपल्या सांगलीचा आहे याचा अभिमान वाटायचा. {{gap}}साहित्यसंमेलनातून, नाट्यसंमेलनातून वावरताना, आज फोफावलेल्या नाट्यसृष्टीचे जनक (विष्णुदास भावे) सांगलीचे आहेत. गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या दोन नाट्याचार्य सांगलीकरांनीच आपल्या अजरामर नाटकांमुळे सांगलीची कीर्तिध्वजा फडकत ठेवली, या वस्तुस्थितीचा अभिमान वाटायचा. आधुनिक मराठी वाङ्मयाच्या शिल्पकारांमध्ये अग्रस्थानी असणारे, मराठीतील पहिले ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, वि.स. खांडेकर हे सांगलीचे आहेत या जाणीवेने अूर भरुन यायचा. संगीताच्या मैफलीतून वावरताना आबासाहेब सांबारे, या सांगलीच्या धन्वंतरीच्या आठवणी निघायच्या, तेव्हा आश्चर्याने थक्क व्हायला व्हायचं. गानमहर्षी अल्लादियाखाँसाहेबांचा आवाज कसा त्याना 'सोडून' गेला होता आणि सांबारे वैद्यानी कसा या संगीत-सम्राटाला 'पुनर्जन्म' मिळवून दिला, मोगुबाई कुर्डीकरांसारख्या गान-तपस्विनी, नाथमाधवांसारखे कादंबरीकार, सांगलीत या वैद्यबुवाचं औषध मिळावं, देखरेख लाभावी, म्हणून कसे सांगलीत येऊन रहात असत, यांच्या आठवणी निघत. खुद्द लोकमान्य टिळक, आबासाहेबांना किती मानत असत याच्या साक्षी निघत. वसंतदादा पाटील यांच्या राजकीय कर्तृत्वामुळं सांगलीचं नाव, महाराष्ट्रातच काय पण संपूर्ण देशात दुमदुमत होतंच!{{nop}}<noinclude>{{center|दहा}}</noinclude> n7idxh4w3tqh6b3u5hfhwc71pbejz17 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१५ 104 77354 236003 173585 2026-08-21T16:25:42Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236003 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}हळूहळू सांगलीबद्दल नुसतं प्रेमच नव्हे तर सार्थ अभिमानही मनात नांदू लागला! {{gap}}तेव्हा या सांगली नगरीला भूषणभूत असणाऱ्या व्यक्तींविषयी एकत्रितपणे काही तरी लिहिलं जाणं आवश्यक आहे याची जाणीव सदैव टोचू लागली. {{gap}}सांगलीत आल्यावर तर हे काम किती कठिण आहे आणि त्याची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना आली. ज्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या, हरिभाऊंच्या तोडीच्या आहेत आणि ज्यांचं शीघ्रकवित्व, रेंदाळकरांसारख्या अनेक मान्यवर कवींना संभ्रमात पाडे, असे कवी साधुदास, ज्यानी प्रपंच नेटका करुन, वकिलीचा व्यवसाय चरितार्थासाठी करुन, भक्तिमार्गाची कास धरली, आपल्या अमोघ कीर्तनाने हजारो श्रोत्यांना आनंद दिला, समाजप्रबोधन करुन सन्मार्गाला लावले, ते संतश्रेष्ठ कोटणीसमहाराज, चार आणे मजुरीवर काम करत करत, सचोटी, हातोटी आणि चिकाटी या त्रिसूत्रीच्या आधारावर, स्वतःची सुवर्णतुला करुन घेण्याइतकी स्वतःची अुन्नती करुन घेतली, ते सर्व सोने समाजाला दानरुपाने परत करुन विलक्षण दातृत्व दाखविले, स्वतःचा कारखाना, समाजकंटकांच्या कारवायांमुळे, डोळ्यासमोर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असता, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा भरारी मारून, सांगलीकर जनतेस अुद्यमशीलतेचा वस्तुपाठ घालून दिला ते श्रीगजानन मिल्सचे धनी दादासाहेब वेलणकर, पैलवान म्हणजे जाता-येता गुरगुरणारा शक्तिशाली पुरुष, या कल्पनेला छेद देणारे, आपल्या सात्त्विक आचरणाने जनमानसात स्वतःसाठी आदराचे स्थान निर्माण करणारे, कुस्तीचे शास्त्रशुद्ध शिक्षण नवशिक्या पैलवानांना मिळावं म्हणून धडपडणारे हरि नाना पवार, असे किती तरी सांगलीकर डोळ्यासमोर चमकून गेले. {{gap}}अशा अनेक सांगलीकरांविषयी लिहायला हवं होतं! {{gap}}त्यातून डोळयासमोर एक तांत्रिक प्रश्न होता. तो म्हणजे मुळात आधी 'सांगलीकर' म्हणून कोणास संबोधायचं? नुसता जन्म सांगलीचा आणि कर्तृत्त्व सांगलीबाहेर असणाऱ्याला 'सांगलीकर' समजायचे की जन्म बाहेरगावचा असूनहि सांगलीत कर्तृत्व गाजवून समाजात मान्यता पावलेल्या व्यक्तीला 'सांगलीकर' म्हणायचे? {{gap}}या प्रश्नाची मी अनेक मान्यवरांबरोबर चर्चा केली. पण<noinclude>{{center|अकरा}}</noinclude> 9d9j6k33mcncnzpvwnnh7f6jh3j3c6p पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१६ 104 77355 236004 173586 2026-08-21T16:27:05Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236004 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>समाधानकारक तोडगा सापडला नाही. {{gap}}मग मी माझ्यापुरता सुवर्णमध्य साधला. ज्या कोणा व्यक्तीमुळे सांगलीचे नाव अुज्ज्वल झाले तो 'सांगलीकर'. {{gap}}मी निवडलेले बावीस मानकरी या स्वनिर्मित व्याख्येत बसतात; निदान ‘सांगलीकर' म्हणून सर्वमान्य असावेत ही अपेक्षा ! {{gap}}साहित्य, नाट्य, संगीत, अद्योग, वैद्यक, क्रीडा, राजकारण अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश या पुस्तकात केला आहे. अजून अनेक मान्यवर सांगलीकर आहेत. पण आर्थिक मर्यादांचा विचार करता, मला या बावीस सांगलीकरांपर्यतच स्वतःला थांबवावं लागलं; अन्यथा अजून किती तरी वर्षे मला थांबायला लागले असते! पण या पुस्तकाचे चांगले स्वागत झाल्यास 'आणखी काही सांगलीकर' समाजासमोर आणायची मनात अिच्छा आहे. {{gap}}"सांगली बहु चांगली," तेव्हा सांगलीविषयी काहीतरी हवंच, खरं म्हणजे सांगली नगरीच्या अतीव प्रेमापोटी, माझ्या या पुस्तकात 'सांगली' एवढ्याच विषयाचा मजकूर निम्म्यापेक्षा अधिक पुस्तक व्यापू लागला, तेव्हा नाईलाजाने मला 'सांगली - नियमन' करावं लागलं. धावता आढावा घेत घेत 'मोठी' सांगली 'छोटी' करावी लागली! {{gap}}अगदी मूळच्या सहा गल्लयांअितकी ती छोटी होणार नाही याची मात्र काळजी घेतली! {{gap}}आपल्या कर्तृत्वाचा ठसा विविध क्षेत्रांमध्ये अुमटवणाऱ्या पूर्वसूरींचे आणि विद्यमान व्यक्तिंचे ऋण फेडण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे. भावी पिढ्यांना तो स्फूर्तिदायक ठरेल, प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा आहे. {{gap}}अशी एकूण ही 'सांगली आणि सांगलीकर' या पुस्तकाची पूर्वपीठिका.{{nop}}<noinclude>{{center|बारा}}</noinclude> 6420oov3u0s5jm2w3p7zaof0355bajb पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१७ 104 77357 236005 173587 2026-08-21T16:30:26Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236005 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|<big>'''प्रकाशकांचे मनोगत'''</big>}} {{gap}}'सांगली आणि सांगलीकर' हा श्री. अविनाश टिळक यांनी लिहिलेला मौलिक ग्रंथ, वाचकांच्या हाती सोपविताना आम्हाला अनेक कारणांनी विशेष आनंद होत आहे. {{gap}}सांगली (जिल्हा) नगरवाचनालय ही संस्था एक प्रकारे भूतपूर्व सांगली संस्थानचे अपत्य आहे. सांगली नगरीच्या स्थापनेला या वर्षी म्हणजेच २००१ सालात दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने श्री. टिळक यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात औचित्य तर आहेच पण त्याशिवाय भूतपूर्व संस्थानच्या ऋणातून अंशतः अतराई होण्याची संधी या पुस्तकामुळे संस्थेला मिळाली आहे. {{gap}}या पुस्तकात सांगलीच्या गेल्या दोनशे वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेण्यात आला असून सांगलीसंबंधीची मौलिक माहिती एकत्र करण्यात आली आहे. तसेच विविध क्षेत्रात स्पृहणिय कामगिरी बजावून सांगलीचे नांव उज्वल केलेल्या बावीस सांगलीकरांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कर्तृत्वाचा सुयोग्य परिचय श्री. अविनाश टिळक यानी करुन दिला आहे. त्यामधून सांगलीच्या इतिहासाचे मनोज्ञ दर्शन घडते. सर्वांनीच आणि विशेषतः सांगलीकर जनतेने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. "जनतेत चांगल्या ग्रंथाची वाचन अभिरुची उत्पन्न करुन तिच्यामध्ये बौद्धिक व सांस्कृतिक विकास घडवून आणणे" या वाचनालयाच्या ध्येयधोरणाला पूरक होणारे कार्य अशा द्दष्टिकोनातून सदर पुस्तकाचे प्रकाशन संस्था करत आहे. {{gap}}या पुस्तकाचे लेखक श्री. अविनाश टिळक हे आमच्या कार्यकारिणीचे गेली दोन वर्षे तज्ञ सभासद आहेत. त्यानी अत्यंत परिश्रमपूर्वक लिहिलेले पुस्तक सर्वार्थाने परिपूर्ण आहे असा संस्थेचा दावा नाही; किंवा लेखकाचीही तशी धारणा नाही. तथापि स्थानिक इतिहास लेखनाला आधारभूत ठरेल असेच हे पुस्तक आहे हे निश्चित. विस्मृतीत जात असलेल्या सांगलीकर व्यक्तींचे कर्तृत्व भावी पिढ्यांना स्फूर्तिदायक ठरेल आणि त्यांच्या कार्यापासून अनेक सांगलीकर युवक प्रेरणा घेतील अशी आशा आहे. {{gap}}एकशे बत्तीस वर्षे पूर्ण करीत असलेले सांगली (जिल्हा) नगरवाचनालय ही आज एक सुप्रतिष्ठित संस्था आहे. सांगलीच्या सांस्कृतिक जीवनात या संस्थेला महत्वाचे स्थान आहे. नेहमीच्या पारंपारिक कार्यापासून एक वेगळा उपक्रम, संस्था या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या रुपाने हाती घेत आहे. या कल्पनेचे स्वागत झाल्यास अशाच तऱ्हेचे उपक्रम राबवण्यास संस्थेला हुरुप येईल. {{gap}}दोनशे वर्षे पूर्ण करुनही तरुण दिसणाऱ्या आणि सातत्याने नवे बदल स्वीकारीत शिक्षणाचे आणि संस्कृतीचे पश्चिम महाराष्ट्रातील केंद्र बनलेल्या सांगली नगरीस या ग्रंथाच्या प्रकाशनाद्वारे आम्ही मानाचा मुजरा करीत आहोत. {{rh|ॲड. भा. य. डोंगरे||श्री. ज. भा. लिमये}} {{rh|(कार्यवाह)||(अध्यक्ष)}} {{center|सांगली (जिल्हा) नगरवाचनालय, सांगली.}}{{nop}}<noinclude>{{center|तेरा}}</noinclude> socobtz5f4cysx2l08gk6i45dxf1j42 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८ 104 77358 236006 173588 2026-08-21T16:32:20Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236006 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|<big>'''ऋणनिर्देश'''</big>}} {{gap}}गेली तीन वर्षे मी या पुस्तक लेखनाच्या खटाटोपात आहे. या काळात मी असंख्य लोकांना भेटलो. अनेक वाचनालये धुंडाळली. या सर्वांचा नामोल्लेख करता येणार नाही पण कांहीचा केल्याशिवाय मनाला स्वस्थताही वाटणार नाही. अशा वेळी सर्वप्रथम डोळ्यासमोर नाव येते ते प्रि. क. श्री. काळे यांचे. काही पूर्वपरिचय नसताना त्यानी मला लेखनकामात बहुमोल मार्गदर्शन केले. सातत्याने प्रोत्साहन दिले. इतकेच काय पण वेळप्रसंगी पुस्तकाची प्रुफेही तपासून दिली. असेच सदैव माझ्या पाठीशी सातत्याने राहिले ते माझे मित्र प्रा. काशिनाथ वाडेकर. त्यानी आणि श्री. न.वा. सहस्रबुद्धे यानी प्रुफे तपासण्याचे किचकट काम मनापासून केले. माहिती संकलनासाठी डॉ. मधु आपटे, प्रा. सुधाकर रानडे, हिंदुराव पाटील, डॉ. श्रीनिवास नाटेकर, डॉ. सांबारे, प्रा. रोहिणी तुकदेव, श्री. शिवाजीराव पवार, संजय कोटणीस, मधुकर खरे, अशोक तेलंग, पंडित पानवलकर, सदानंद कदम, सिकंदर अमीन या सर्वांची मला मदत झाली. तसेच छायाचित्रे मिळविण्यासाठी सर्वश्री अशोकराव घारपुरे, प्रभाकर वेलणकर, सुरेश पाटील (माजी नगराध्यक्ष) यांची मदत झाली. या सर्वाचा मी ऋणी आहे. {{gap}}प्रा. हातकणंगलेकर सरांचे औपचारिकपणे आभार मानणेही चुकीचे ठरेल इतकी आस्था त्यांनी या पुस्तकाच्या कामी दाखविली. अनेक कामांच्या आणि दौऱ्यांच्या गर्दीतून त्यांनी प्रस्तावना लिहिण्यासाठी वेळ दिला हे माझे भाग्यच. सांगली (जिल्हा) नगरवाचनालयाने पुस्तक प्रकाशनाचे काम करुन एक प्रकारे पुस्तकाला प्रतिष्ठाच मिळवून दिली त्याबद्दल कार्यकारी मंडळाचा मी आभारी आहे. {{gap}}पुस्तकासाठी चाललेली माझी धडपड पाहून श्री. भास्करराव भिडे (माधवनगर) आणि श्री. प्रभाकरराव गद्रे (प्रसाद व्हरायटी स्टोअर्स) यानी आपणहून प्रत्येकी रु. १०००/- ची देणगी देऊन शुभारंभ केला. 'श्रीमती राजमती नेमगौंडा पाटील ट्रस्ट'ने मला रु.५०००/-ची घसघशीत देणगी दिली. याशिवाय पुढील व्यक्ती व संस्थानी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांचा मी ऋणी आहे. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालीका,<br> सांगली चेंबर ऑफ कॉमर्स<br> भारती विद्यापीठ<br> सांगली अर्बन को. ऑप. बॅक लि.<br> मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ - सराफ पेढी<br> मे. गोविंदराम शोभाराम आणि कंपनी{{nop}}<noinclude>{{center|चौदा}}</noinclude> dbwmkrrr58lnn3mutwvbdf9eh9ax8fn पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१ 104 77550 235991 172219 2026-08-21T16:04:04Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 235991 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>[[File:सांगली आणि सांगलीकर cover.jpg|borderless|center|'सांगली आणि सांगलीकर' पुस्तकाचे मुखपृष्ठ]]{{nop}}<noinclude></noinclude> 1igwn08dzqi7u7v0vew5uc6rhqig2k5 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७ 104 77551 235995 172227 2026-08-21T16:11:37Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 235995 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>दृष्टिकोन ठेवला. सर्वप्रकारचे शिक्षण आपल्या संस्थानात पाहिजे असे त्याना वाटत असे. त्यानी चाळीस वर्षे राज्य केले पण राजेपणाचा विलास केला नाही. राजे म्हणून सचोटीने जगले. संस्थान खालसा झाल्यावर ते सांगलीतच स्थायिक झाले. १९६५ साली ते काळाच्या पडद्याआड झाले. {{gap}}नटवर्य केशवराव दाते यानी सांगलीचे वर्णन नाट्यपंढरी असे केले. या पंढरीतले आद्य नाटककार श्री विष्णुदास भावे यांचा नंतर परिचय येतो. त्याना महाराष्ट्राचा भरतमुनी असे गौरवले आहे. भरतमुनीची थोरवी वेगळ्या क्षेत्रातील. विष्णुदास भावे पंडित वगैरे काही नव्हते. ते सामान्य गृहस्थ असले तरी हरहुन्नरी होते. चित्रकार, मूर्तिकार, बांधकाम तज्ञ, शेतकरी वगैरे. भावे मंडळी मूळ कोकणातली. विष्णुदासांचा पहिल्यापासून गाण्या-बजावण्याकडे ओढा होता. मध्यंतरी एका मांत्रिकाबरोबर ते पळून गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांच्या कलागुणांकडे पाहून राजेसाहेबांनी त्याना खाजगीकडे ठेवून घेतले. १८४२ साली दशावतारी खेळ करणारी एक कर्नाटकातील कंपनी सांगलीस आली. तिचे रासवट उद्योग श्रीमंतांना ठीक वाटले नाहीत. त्यानी भाव्याना यापेक्षा चांगल्या नाट्यकृती तयार करण्यास प्रोत्साहन दिले. फार मोठ्या प्रयत्नाने मराठीतले पहिले नाटक 'सीता स्वयंवर' प्रसिद्ध झाले. त्यानंतर रामायणातील प्रसंगांवर त्यानी ८ / १० नाटके रचली. त्यानंतर त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात अनेक चढउतार आले पण ते हरहुन्नरी असल्याने त्यानी ते सर्व पार केले आणि बाहुल्यांचा खेळ निर्माण केला. तो त्यानी स्वतः सर्वतोपरी सिद्ध केलेला होता. विष्णुदास भावे सर्वार्थाने आद्य नाटककार होते. {{gap}}तिसरे प्रकरण गोविंद बल्लाळ देवलांवरचे आहे. देवलांनी नाट्यलेखन व नाटयशिक्षण यातच आपले उभे आयुष्य घालविले. नोकरी व्यवसाय केला नाही. त्यांचा जन्म १८५५ मध्ये सांगलीजवळच्या हरिपूर येथे झाला. तेथे संगमेश्वराचे प्रसिद्ध देवालय आहे. गोविंदरावांचे मोठे बंधू कृष्णाजीपंत हे संगीतशास्त्राचे जाणकार होते. मधले बंधू हे नावाजलेले नट होते. सांगलीत नाटकाचे जोरदार वातावरण होते. बेळगावात शिक्षणासाठी गेले असताना देवलांना आण्णासाहेब किर्लोस्करांचा सहवास लाभला. त्यांच्या 'शाकुंतल' नाटकावरून देवलाना नाट्यनिर्मितीची स्फूर्ती मिळाली. मृच्छकटिक आणि विक्रमोर्वशीय लिहिले गेले. 'झुंझारराव' 'संशयकल्लोळ' आणि मराठीतील अजरामर नाटक 'शारदा' निर्माण झाले. नंतरच्या आयुष्यातील चढउतार, नाटक कंपनीत मास्तर म्हणून झालेली त्यांची नियुक्ती, गंधर्व मंडळीतला प्रवेश, बडोद्याचे अधिपती<noinclude>{{center|तीन}}</noinclude> 9e42hd5wz80w5k12psq59c21k6o5rum पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९ 104 77552 235997 172236 2026-08-21T16:15:18Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 235997 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>होते. साधुदासांच्या शीघ्रकवित्वाचे कांही नमुने पुस्तकात सादर केले आहेत. 'काव्यविहारी' हे रविकिरण मंडळापूर्वीचे सांगलीतले प्रसिद्धी पावलेले कवी. ते केशवसुतांच्या प्रणालीतील समाजसुधारणाविषयक कविता करत. आचार्य अत्रे यांचा काव्यविहारींवर विशेष लोभ होता. राष्ट्रीय भावनेला आवाहन आणि सुबोध, ओघवती रचना हे त्यांच्या काव्याचे विशेष होते. बुधगावकर सरकारनी त्याना शिक्षणासाठी मदत केली आणि नंतर ते त्या संस्थानात न्यायदानाचे काम करीत राहिले. आपल्या काव्यशक्तीची जोपासनाही ते निष्ठेने करीत राहिले. त्यांची 'कलिका' ही कविता मनोरंजनच्या पहिल्या पानावर छापून आली तेव्हा ते हर्षभरित झाले. 'काव्यविहार' व स्फूर्तिलहरी' हे त्यांचे काव्यसंग्रह रसिकमान्य झाले. त्या संग्रहांचा एम्. ए. च्या मराठी अभ्यासक्रमात समावेश झाला. नाटककार देवलांचे चरित्र आणि स्वतःचे आत्मचरित्र अशी त्यांची दोन गद्यसाहित्यातील पुस्तके. १९७५ साली काव्यविहारी निवर्तले. {{gap}}ज्ञानपीठ विजेते साहित्यिक विष्णु सखाराम खांडेकर हे देखील सांगलीचे सुपुत्र. सांगली येथे त्यांचा जन्म १८९८ साली झाला. त्यांचे घर गणपतीमंदिराजवळ होते आणि त्यांच्या जन्मदिवशी संकष्टी होती म्हणून त्यांचे नाव गणेश ठेवण्यात आले. ते दत्तक गेल्यावर त्यांचे नाव विष्णु सखाराम खांडेकर असे झाले. हे घराणे मूळचे कोकणातले. खांडेकरांचे शिक्षण सांगली हायस्कूलमध्ये झाले. तेथे त्यांनी उत्तम अभ्यास केला. त्याना स्कॉलरशिप मिळाली. पुढच्या शिक्षणासाठी ते पुण्यास फर्गसनला गेले. १९१४ साली त्यानी सांगली सोडली. ते कादंबरीकार, समीक्षक, चित्रपट कथालेखक झाले. अनेक मानसन्मान त्यांच्या वाट्याला आले. 'ज्ञानपीठ' पारितोषिकाने त्यावर कळस चढविला. {{gap}}धनी वेलणकर हे सांगलीचे स्वतंत्र बाण्याचे, कल्पक उद्योगपती. त्यांनी प्रसिद्ध गजानन मिलची स्थापना करुन सांगलीत उद्योगांची मुहूर्तमेढ उभी केली. त्यांचे आयुष्य विविध कसोट्या देण्यात खर्च झाले. मेहनतीने उभी केलेली गजानन मिल गांधीहत्येनंतर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. वेलणकरानी धीर सोडला नाही. एका वर्षापूर्वीच त्यांची सुवर्णतुला थाटामाटात साजरी झालेली होती. त्यानी मिलची पुन्हा उभारणी केली. वेलणकरांनी आयुष्याची सुरवात चार आणे मजुरीवर केली होती. लहानपणी व्यायाम करुन त्यानी कुस्त्या मारल्या होत्या. त्यानी नेहमीचे शिक्षण सोडून बडोद्यात विणकामाचे शिक्षण घेतले. ते टिळकभक्त होते. टिळकानी महाराष्ट्रीयन तरुणानी उद्योगधंदे उभारावेत असा संदेश दिलेला होता. त्याला अनुसरुन वेलणकरांनी स्वतंत्र उद्योग सुरु<noinclude>{{center|पाच}}</noinclude> 5nj56f2lzgxanzwa3rd5k019qz1rnk5 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/९२ 104 111661 236015 235814 2026-08-22T04:17:26Z JayashreeVI 4058 236015 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८०)'''}}}}</noinclude>जीवदया ह्मणजे मनुष्यांशिवाय इतर जीवांची दया, असा विपरीत अर्थ करून दाखवितात. <br>{{gap}}साध्य व साधन, यांचा पुरता विचार न केल्यामुळे विसंगतपणाचे कांहीं विलक्षण प्रकार दिसतात. आंधळे व हत्ती यांची गोष्ट याचे एक उत्तम उदाहरण आहे. हत्तीची पुरती कल्पना येण्यास डोळे अवश्य पाहिजेत, ही साधी गोष्टदेखील त्या बिचाऱ्यांच्या ध्यानांत आली नाहीं. आणि हत्ती खांबासारखा असतो, तुळईसारखा असतो, केळीच्या झाडासारखा असतो, अशा प्रकारचे गहन शोध त्यांनी लाविले! अशाच मासल्याची एक गोष्ट इंग्रज, फ्रेंच व जर्मन यांच्या विषयी आहे. एकदां या तिघांमध्ये उंट कसा असेल, याविषयीं प्रश्न निघाला. उंट कोणीहि पाहिलेला नव्हता. प्रश्न निघतांच इंग्रज इजिप्तकडे स्वतः डोळ्यांनी उंट पाहण्याकरितां निघून गेला. फ्रेंच, प्राणी ठेवण्याच्या बागेच्या Zoological Garden शोधाकरिता गेला. जर्मन जागेवरून हाललाच नाहीं. उलट मन व्यग्र होऊं नये ह्मणून दार बंद करून, उंट कसा असेल, कसा असला पाहिजे, याचा स्वतःशींच विचार करीत बसला. त्यानें काय शोध लाविला तो अजून कोणाला कळलेला नाहीं! <br>{{gap}}आता ही काल्पनिक उदाहरणे सोडून काही '''ऐतिहासिक मासले''' घेऊ. <br>{{gap}}महमद इब्न कासम याने जेव्हा इसवी सन ७१२ मध्ये सिंधवर स्वारी केली, तेव्हां पहिल्यानें त्यानें सिंधुनदीच्या तोंडाजवळ असलेल्या डेबुल-Dai-bul-बंदरावर हल्ला केला. तेथे एका देवालयाच्या शिखरावर मोठा तांबडा ध्वज फडकत होता. ध्वजाच्या खांबावर निशाण धरून मुसलमांनानीं तो पाडला. देवाचा ध्वज पडलेला पाहून शूर शिपायांना अचंबा वाटला. त्यांच धैर्य खचलें. शिड्या लावून मुसलमानांनी तट सर केला. हिंदूंची व ब्राह्मणांची कत्तल करून देऊळ उध्वस्त केलें, व तेथें मशीद बांधली. (Lane Pool Medieval India Under Mahomeden Rule p 8) <br>{{gap}}मृत्यूची देखील पर्वा न बाळगणारे योद्धे, फक्त झेंडा खालीं पडल्यानें हतबल झालेले पाहून, आश्चर्य व खेद यांनी मिश्रित असे हंसें येत नाहीं काय? गिझनीच्या महमूदाची सोमनाथावरची स्वारी, हें दुसरें उदाहरण घेऊ. या स्वारीची हकीगत वाचली, तर असें दिसतें कीं, तेथल्या ब्राह्मणवीरांनीं<noinclude></noinclude> 8w8ndv001i2bb9gwj0igm0j4kgatkdk 236016 236015 2026-08-22T04:18:37Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 236016 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८०)'''}}}}</noinclude>जीवदया ह्मणजे मनुष्यांशिवाय इतर जीवांची दया, असा विपरीत अर्थ करून दाखवितात. <br>{{gap}}साध्य व साधन, यांचा पुरता विचार न केल्यामुळे विसंगतपणाचे कांहीं विलक्षण प्रकार दिसतात. आंधळे व हत्ती यांची गोष्ट याचे एक उत्तम उदाहरण आहे. हत्तीची पुरती कल्पना येण्यास डोळे अवश्य पाहिजेत, ही साधी गोष्टदेखील त्या बिचाऱ्यांच्या ध्यानांत आली नाहीं. आणि हत्ती खांबासारखा असतो, तुळईसारखा असतो, केळीच्या झाडासारखा असतो, अशा प्रकारचे गहन शोध त्यांनी लाविले! अशाच मासल्याची एक गोष्ट इंग्रज, फ्रेंच व जर्मन यांच्या विषयी आहे. एकदां या तिघांमध्ये उंट कसा असेल, याविषयीं प्रश्न निघाला. उंट कोणीहि पाहिलेला नव्हता. प्रश्न निघतांच इंग्रज इजिप्तकडे स्वतः डोळ्यांनी उंट पाहण्याकरितां निघून गेला. फ्रेंच, प्राणी ठेवण्याच्या बागेच्या Zoological Garden शोधाकरिता गेला. जर्मन जागेवरून हाललाच नाहीं. उलट मन व्यग्र होऊं नये ह्मणून दार बंद करून, उंट कसा असेल, कसा असला पाहिजे, याचा स्वतःशींच विचार करीत बसला. त्यानें काय शोध लाविला तो अजून कोणाला कळलेला नाहीं! <br>{{gap}}आता ही काल्पनिक उदाहरणे सोडून काही '''ऐतिहासिक मासले''' घेऊ. <br>{{gap}}महमद इब्न कासम याने जेव्हा इसवी सन ७१२ मध्ये सिंधवर स्वारी केली, तेव्हां पहिल्यानें त्यानें सिंधुनदीच्या तोंडाजवळ असलेल्या डेबुल-Dai-bul-बंदरावर हल्ला केला. तेथे एका देवालयाच्या शिखरावर मोठा तांबडा ध्वज फडकत होता. ध्वजाच्या खांबावर निशाण धरून मुसलमांनानीं तो पाडला. देवाचा ध्वज पडलेला पाहून शूर शिपायांना अचंबा वाटला. त्यांच धैर्य खचलें. शिड्या लावून मुसलमानांनी तट सर केला. हिंदूंची व ब्राह्मणांची कत्तल करून देऊळ उध्वस्त केलें, व तेथें मशीद बांधली. (Lane Pool Medieval India Under Mahomeden Rule p 8) <br>{{gap}}मृत्यूची देखील पर्वा न बाळगणारे योद्धे, फक्त झेंडा खालीं पडल्यानें हतबल झालेले पाहून, आश्चर्य व खेद यांनी मिश्रित असे हंसें येत नाहीं काय? गिझनीच्या महमूदाची सोमनाथावरची स्वारी, हें दुसरें उदाहरण घेऊ. या स्वारीची हकीगत वाचली, तर असें दिसतें कीं, तेथल्या ब्राह्मणवीरांनीं<noinclude></noinclude> ry3etgbh0dscbf6fd96da2h6z0dpkyp पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/९९ 104 111755 235922 2026-08-21T11:59:11Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235922 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>ग्रामण्य नववें. हरिपंत फडके व आपा बळवंत यांचें ग्रामण्य. (शके १७११ इ. स. १७८९ ). कारकीर्द शाहूमहाराज धाकटे पेशवे सवाई माधवराव यांचे कारकीर्दीत सन तिस्स मया व अल्लफ शके १७११ सौम्यनाम संवत्सरे, प्रामण्ये झालीं तो मजकूर ... चांद्रसेनीय कायस्थ प्रभुंच्या इतिहासाची साधनें यांत प्रसिद्ध झालेल्या कायस्थ प्रभुंच्या बखरींत या ग्रामण्याची हकिकत अशी दिली आहे :- नाराणरावसाहेबांची पत्नी गंगाबाई यांचे उदरीं सवाईमाधवरावसाहेब जन्मले त्यासंनिध बाळाजी जनार्दन फडणीस द्वितीय सृष्टी उत्पन्न करणार महा बुद्धिमान कारभारांत वागत असतां, पूर्वील नारायणरावसाहेब यांणीं जें ग्रामण्य केलें, त्याचा मजकूर वास्तविक किंवा गैर वास्तविक यांतील आशय कसा, हा समजून घेण्या- स्तव श्रीवाराणशीक्षेत्रस्थ ब्राह्मणांस पत्र पाठविलें त्यांतील संशयनिवारणार्थ उत्तरप्रत्युत्तरासह बालबोध अक्षराचें पत्र लिहून आलें, त्यांवरून त्यांची खातर जमा जाहली तेंच पत्र बार केलें. बितपशील. 66 ‘*स्वस्तिश्रीमद्दंडकारण्यांतर्गत भीमरथीनाभिहृदयसंगत्योपलक्षित पुण्यारण्य - ग्रामस्थ दाक्षिणात्य राजर्षि धर्माधिकारी प्रांत पुर्णे व समस्त ब्राह्मणांप्रति. आर्यावर्तदेश आनंदवनत्रिकंटकविराजिताविमुक्तक्षेत्रस्थभटधर्माधिकारिशेषप्रभृती नामनेका नतयो विलसंतु ॥ माघशुक्लसप्तम्यावधि अत्रत्यक्षेममस्ति भावत्कं तदनुदिनमध्यधिकमाशास्महे ॥ विशेषस्तु भाषया . - - कल्याणकारक, सुशोभित अशा दंडकारण्यनामक देशांतील भीमानदीच्या नाभि आणि हृदय यांच्या संगत्यानें उपलक्षित' म्ह० ( भीमानदीच्या काठी असून. तिचाच पोट- भाग अशा ?) पुर्णे नामक ग्रामांत राहणान्या दक्षिणदेशीय, राजर्षि, धर्माधिकारी व समस्त ब्राह्मण प्रांत पुणे यांप्रति + मायविर्तनामक देशामध्यें, आनंदवन आणि त्रिकंटक या नांवाच्या दोन अतिपवित्र स्थलांनीं सुशोभित अशा अविमुक्त क्षेत्रांत (काशींत ) राहणान्या भट, धर्माधिकारी, आणि शेष इत्यादि उपनामानीं युक्त ब्राह्मणांचे अनेक नमस्कार विलसित होवोत. माघ शुद्ध सप्तमीपर्यंत येथे राहणाराचें क्षेम असे. भापलें क्षेम उत्तरोत्तर प्रतिदिवशीं वृद्धिंगत असावें मशी आम्हीं आशा करितों. विशेषः-<noinclude></noinclude> pgitjtb915dsf15k24x18apcc2bltia पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१०० 104 111756 235923 2026-08-21T11:59:34Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235923 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ४४ ) , राजश्री बाळाजी जनार्दन फडणीस यांणीं पुण्याहून मार्गशीर्ष शुद्ध दशमीचीं पत्रे पाठविलीं तीं पावलीं. तेथें लिहिलें कीं, प्रभूंचे ग्रामण्य येथे पडलें आहे. त्यास प्रभूचें आचरणाचा ग्रंथाधार कसा आहे ? त्याजवरून आह्मी सर्वांनीं, गागाभट्टकृत ' गागाभट्टी ' ' कायस्थप्रदीप, ' गोविंदभट्टकृत ' गोविंदभट्टी, स्कंद- पुराणांतर्गत 'रेणुका माहात्म्य' कमळाकरभट्टकृत 'शूद्रकमलाकर,' 'जातिविवेक इत्यादि निबंध ग्रंथ पाहून तुह्मांस लिहिले आहे. हे पाहिल्यावरून आपले ध्यानांत येईल. * कायस्थास्त्रिविधाः प्रोक्ताश्चित्रगुप्तस्तथापर ॥ दालभ्यगोत्रः क्षत्रजस्तु तृतीयः संकरात्मजः ॥ तत्र चित्रगुप्ताद्युत्पत्तिः ॥ पद्मपुराणे ॥ सृष्ट्यादौ सदसत्कर्मज्ञप्तये प्राणिनां विधिः ॥ क्षणं ध्याने स्थितस्तस्य ब्रह्मकायाद्विनि- र्गतः ॥ १ ॥ दिव्यरूपः पुमान् हस्ते मपीपात्रं च लेखनीम् ॥ चित्रगुप्त इति ख्यातो धर्मराजसमीपतः ॥ २ ॥ प्राणिनां सदसत्कर्मलेख्याय स नियो- जितः ॥ ब्राह्मणोऽतींद्वियज्ञानी देवाख्यो यज्ञभुक् सदा || ३ || भोजनादौ सदा तस्मा आहुतिर्दीयते द्विजैः ॥ ब्रह्मकायोद्भवो यस्मात्कायस्थो ज्ञाति- कायस्थ तीन प्रकारचे सांगितले आहेत. एक- चित्रगुप्त कायस्थ, दुसरा - क्षत्रज म्ह० चंद्रसेन राजा जो क्षत्रिय त्यापासून झालेला, ज्यास दाल्भ्य ऋषीनें उपदेश केला म्हणून दाम्यगोत्री म्हणतात, तो चांद्रसेनीय कायस्थ आणि तिसरा संकरजातीपासून झालेला संकरज कायस्थ त्यांपैकीं चित्रगुप्तादिकांची उत्पत्ति पद्मपुराणांत सांगितली मांह ती अशी की, - सृष्टीचे आरंभी ब्रह्मदेव, प्राणिमात्राचें पुण्यकर्म व पापकर्म कसे कळेल याचे क्षणभर चिंतन करीत राहिला तेव्हां त्याच्या देहापासून दिव्यरूपधारी, हातांत दौत व लेखणी धारण करणारा, ज्याला चित्रगुप्त असे म्हणतात तो पुरुष उत्पन्न झाला. तेव्हां च्याला ब्रह्मदेवानें, तूं यमराजाजवळ राहून प्राणिमात्राचे पुण्यकर्म व पापकर्म ल्याहावें असें सांगितलें. तो अतींद्रियज्ञानी ब्राह्मण आणि यज्ञांत नित्य हविर्भाग घेणारा देवरूपीही होय. ज्याला ब्राह्मणादि 'द्विज' भोजनाचे आरंभी नित्य चित्रगुप्ताय स्वाहा' अशी मन्त्राहुति देतात. तो ब्रह्मकायापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या देहापासून उत्पन्न झाला म्हणून -न्याला कायस्थ भसें म्हणतात. या मूमीवर त्याचे वंशातील व्मनेक गोत्रांचं कायस्थ आहेत. .<noinclude></noinclude> rvwey1qnbnlv9cbzgde1uxbgbycsjc4 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१०१ 104 111757 235924 2026-08-21T11:59:48Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235924 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ४५ ) रुच्यते ॥ ४ ॥ नानागोत्राश्च तद्वश्याः कायस्था भुवि संति वै ॥ यावरून कहाडप्रांतों व खानदेश संगमनेरप्रांती कायस्थ ब्राह्मण ह्मणून आहेत हे ब्रह्म- कायस्थ होत. अथ चांद्रसेनीय क्षत्रियकायस्थोत्पत्तिः ॥ स्कंदपुराणे रेणुकामाहात्म्ये ॥ स्कंद उवाच ॥ एवं हत्त्वाऽर्जुनं रामः संधाय निशितान् शरान् ॥ अन्व- धावत्स तान् हंतुं सर्वानेवाऽसुरान् नृपान् ॥ १ ॥ केचिद्गगनमाश्रित्य केचित्पातालमाविशन् ॥ जटां कृत्वात्मनः केचित्ब्रह्मवेषमधारयन् ॥ २ ॥ बभूवुस्तापसाः केचिद्वनमाश्रित्य तद्भयात् ॥ तत्रैवावस्थिताः केचिद्बभूवुर्नट- नर्तकाः || ३ || केचिद्वैतालिकाः शूरा राजानस्तद्भयार्दिताः ॥ सगर्भा चंद्र- सेनस्य भार्या दाल्भ्याश्रमं गता ॥ ४ ॥ ततो रामः समायातो दाल्भ्या- श्रममनुत्तमम् ॥ पूजितो मुनिना रामो ह्यर्घ्यपाद्यासनादिभिः ॥ ५ ॥ ददौ मध्यान्हसमये तस्मै भोजनमादरात् ॥ ददौ दाल्भ्यो मुनिश्रेष्ठो भार्गवाय महात्मने || ६ || भोजनावसरे तत्र गृहीत्वाऽपोशनं करे || रामस्तु याच- यामास हृदिस्थं स्वमनोरथम् ॥ ७ ॥ तस्मै प्रादादृषिः कामं भार्गवाय माहात्मने || याचयामास रामाद्वै कामं दाल्भ्यो महामुनिः ॥ ८ ॥ ततो द्वौ परमप्रीतौ भोजनं चक्रतुर्मुदा ॥ भोजनांते महाभागावासने उपविश्य च ।। ९ ।। तांबूलानंतरं दाल्भ्यः पप्रच्छ भार्गवं प्रति । यस्वया प्रार्थितं देव तत्त्वं शंसितुमर्हसि || १० || श्री राम उवाच तवाश्रमे महाभाग सगर्भा स्त्री समागता ।। चंद्रसेनस्य राजर्षेः क्षत्रियस्य महात्मनः ॥ ११ ॥ तन्मे त्वं प्रार्थितं देहि स्त्रीं सगर्भा महामुने ॥ ततो दाल्भ्यः प्रत्युवाच ददामि तव वांछितम् ॥ १२ ॥ यन्मया प्रार्थितं देव तम्मे दातुं त्वमर्हसि ॥ ततः स्त्रियं समाहूय चंद्रसेनस्य वै मुनिः ॥ १३ ॥ भीता सा चपलापांगी कंपमाना समागता | रामाय प्रददौ भीतां रामः प्रीतमना अभूत् ॥ १४ ॥ श्रीराम उवाच ॥ यत्त्वया प्रार्थितं विप्र भोजनावसरे पुरा ॥ तन्मे शंस महाभाग ददामि तव वांछितम् || १५ || दारुभ्य उवाच ॥ प्रार्थितं यन्मया पूर्व राम देव जगद्गुरो || स्त्रियो गर्भममुं बालं तन्मे दातुं त्वमर्हसि ॥ १६ ॥ ततो रामोऽब्रवीद्दाल्भ्यं यदर्थमहमागतः ॥ क्षत्रियांतकरश्चाहं तं त्वं याचितवा- नसि ॥ १७ ॥ प्रार्थितश्च त्वया विप्र कायस्थं गर्भमुत्तमम् ॥ तस्मात्कायस्था<noinclude></noinclude> m63p0elnevgk0c97o1duqnuyknmnai5 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१०२ 104 111758 235925 2026-08-21T12:00:02Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235925 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ४६ ) इत्याख्या भविष्यति शिशोः शुभा ॥ १८ ॥ *जायमानो यदा बालः क्षत्र- धर्मा भविष्यति । ततो दाल्भ्यः प्रत्युवाच भार्गवंप्रति हर्षितः ॥ १९ ॥ माकुरुष्वात्र संदेहं दुर्बुद्धिर्न भविष्यति ॥ एवं रामो महाबाहो हित्वा तं गर्भमुत्तमम् ॥ २० ॥ निर्जगामाश्रमात्तस्मात्क्षत्रियांतकरः प्रभुः ॥ ततः प्रकु- पितो रामो नानावेषधरानृपान् ॥ २१ ॥ ज्ञात्वा नारदवाक्येन अजस्रानपि चावधीत् ॥ धारयंतो मुर्खेऽगुष्टान् प्रार्थयतोऽभयं नृपाः ॥ २२ ॥ स्थिता- स्तेषां बली रामो दत्तवानभयं तदा ॥ हत्वाऽदौ हैहयान् कोपात्पितुर्वधमनु- स्मरन् ॥ २३ ॥ स्कंद उवाच ॥ कायस्थ एष उत्पन्नः क्षत्रियां क्षत्रियात्ततः ॥ रामाज्ञया स दाल्भ्येन क्षत्रधर्मादहिष्कृतः ॥ २४ ॥ दत्तः कायस्थधर्मो- sस्मै चित्रगुप्तस्य यः स्मृतः ॥ प्राप्तकायस्थनामत्वाल्लेख्यावृत्तिश्च भूभृताम् ॥ २५ ॥ [ तस्य भार्या कृता चित्रगुप्तकायस्थवंशजा ॥ तद्वंशजाश्व कायस्था दाल्भ्यगोत्रास्ततोऽभवन् ] ॥ २६ ॥ दाल्भ्योपदेशतस्ते वै धर्मिष्ठाः सत्यवादिनः ॥ सदाचारपरा नित्यं रता हरिहरार्चने ॥ २७ ॥ क्षत्रियाणा- मयं धर्मः कृतं मौंजीनिबंधनम् ॥ यत्किंचिद्वैदिकं जाप्यं नवग्रहमखादिकम् ॥ २८ ॥ नानाशांतिं च विधिवदृत्विग्भिरेव कारयेत् ॥ पण्णां च कर्मणां मध्ये त्रीणि कर्माणि जीविका ॥ २९ ॥ एवं या प्रकारेंकरून प्रभु क्षत्रिय चांद्रसेनीय कायस्थ दाल्भ्यगोत्री यांची उत्पत्ति आहे. मोठ्यांचे आग्रह बहुतच पडले तेव्हां शास्त्र राखून त्यांची समजावीस करर्णे प्राप्त ह्मणोन क्षत्रियत्वनिराकरणार्थ एक भागवतवाक्य लिहिलें तें कोणतें ? तर, " ↓नंदांतं क्षत्रियकुलं क्षत्रियत्वमनीनयदितिः " ॥ याचें उत्तर . परशुरामाचं भाषण ऐकून हर्षित झालेला दाल्भ्य ऋषि बोलिला कीं, हे रामा - मी हा राजपुत्र मागितला म्हणून तुम्ही निःक्षत्रिय पृथिवी करण्याचा आपला हेतु पूर्ण झाला नाहीं असें मनांत आणूं नये. हा दुर्बुद्धि होणार नाहीं. यावरून परशुरामाची क्षत्रिय नाहीसे करण्याची "पॉलिसी" क्रूरकर्म केल्याशिवाय सिद्धीस नेण्याची युक्ति दाल्भ्य ऋषीनें काढिली भर्से दिसतें. + हा मजकूर गोविंदमट्टानें व गागाभट्टानें मागाहून ढकललेला आहे. मूळ ग्रंथांत नाहीं. + नंद राजापर्यंतच क्षत्रियांचे कुळ राजधर्म पावेल.<noinclude></noinclude> qu7fetoluuh30drqpygt5nj1tqta5rd पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१०३ 104 111759 235926 2026-08-21T12:00:17Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235926 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>1 ( ४७ ) - ह्या वाक्येंकरून सर्व क्षत्रिय मेले ऐसी गोष्ट कैसी घडेल. वाक्यार्थ काय म्हणाल तर - नंदराजापर्यंत क्षत्रियव्यवहार ( राजधर्म ), अनंतर क्षत्रिव्यवहार ( राजधर्म ) जाईल. शरीरस्थ गर्भ मागितला ह्मणोन कायस्थ व्यवहार क्षत्रियपर्याय प्रभु- व्यवहारी जाहला म्हणोन ज्ञाती नष्ट न जाहली. तसीच दुराग्रही पुरुषांचे समजा - विशीकरितां, वैदिकक्रम निषिद्ध पाराशरस्मृतीचा एक चतुर्थ चरण भलताच करून गागाभट्टी लिहिली. तो कोणता ? तर, " *कपिलाक्षीरपानेन ब्राह्मणी- गमनेन च ॥ वेदाक्षरविचारेण कायस्थः पतितो भवेत् ॥ १ ॥ यार्चे उत्तर- अशीच जर स्मृति आहे तर सामान्यतः कायस्थत्रयासही निषिद्ध जाहलें. तेव्हां ब्रम्हकायस्थांसहि निषिद्ध होईल, आणि मूळचा पाराशरस्मृतिग्रंथ काढून पाहिला, तेथें या स्मृतीचा चतुर्थ चरण "शूद्रश्चांडालतां व्रजेत् " असा आहे, “कायस्थः पतितो भवेत् " असा नाहीं. वैदिककर्मनिषेधक स्मृति- वचन एकच लाविलें, आणखी निषेधक वाक्यच नाहीं. स्मृतितात्पर्यंत, वर्ण- प्रयास वैदिककर्माचा विधि सिद्धच आहे. शूद्रास मात्र निषेध. अन्य संकर- जातीयांचा शूद्रांत अंतर्भाव करून या तिहींचा निषेध होतो. कल्पिला तर, शूद्रादिकांस वैदिककर्मनिषेध नाहीं, असें होईल. , चतुर्थ चरण तसा ह्मणून कल्पितांच नये. अत एव गागाभट्टांनींही त्यांचे पद्धतींत विशेष वैदिक मंत्र स्पष्ट लिहिलेच आहेत. पूर्वी स्वजातीमध्ये लहानमोठे अनाचार होते, त्यामुळे ज्ञातिविहित कर्मा- धिकारें जातिहानि जाली. याचे उत्तर हे कलियुगपरत्वें सर्व ज्ञातींमध्ये अनाचार असतच आहेत. ते कोणते ह्मणाल तर कर्नाटक प्रांतीं ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण चांगले आहेत. त्यांमध्ये प्रत्यक्ष बहिणीची कन्या ( भाची ) इचा मामासमागमें विवाह होऊन संतति होत्ये. हे लोकविरुद्ध, शास्त्रविरुद्ध, अनाचार, मिश्रमैथिल यांचे ज्ञातीमध्ये प्रथम पंचवीस वर्षांची कुमारी, नंतर विवाह होऊन संतति होत्ये; ह्राहि मोठाच लोकावरुद्ध, शास्त्रविरुद्ध, अनाचार आहे. असें असतां त्यांचे षट्- - • कपिला गाईंच्या दुधाचे प्राशनानें, ब्राह्मणाच्या स्त्रीचेठाई गमन केल्यानें, आणि वेदाक्ष- रांचा विचार ( अध्ययनादिक ) केल्यानें कायस्थ, पतित ( जातिभ्रष्ट ) होतो. श्रीवेंकटेश्वर प्रेसने छापलेल्या पाराशरस्मृतींत ( पृ० ९ ) " कपिलाक्षीरपानेन ब्राह्मणी- गमनेन च ॥ वेदाक्षरविचारेण शूद्रस्य नरकं भुवम् " असा चरण भारत- ↑ शूद्र चांडाल पावेल.<noinclude></noinclude> ew4ar6a1mcbelqo29bcm26tp1lw5rak पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१०४ 104 111760 235927 2026-08-21T12:00:32Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235927 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>" ( ४८ ) " पूर्वीहि कर्माधिकार व ज्ञातीची हानि जाहली नाहीं. तेव्हां प्रभूचीच कैसी होईल ? एकच दाल्भ्यगोत्र असोन या गोत्रीच सर्व विवाहादिक कर्मे होतात ह्मणून ज्ञाति- कर्मद्दानि जाहली. याचे उत्तर- ज्या ऋषीचा जो वंश तो ऋषी त्या वंशाचे गोत्र. क्षत्रियवर्णंच भिन्न क्षत्रियांस गुरुगोत्र प्रसिद्ध आहे. दारभ्य ऋषीनें पालन करून उपदेश केला ह्मणून दारभ्यगोत्र लागलें. एतावता बाध नाहीं. सूर्यवंशीं व सोमवंशीं इत्यादि व्यवहार चालतच असोन सांप्रतही अमुक कुळींच इत्यादि व्यवहार चालतो. कुल वंश शब्दमात्र अर्थभेद नाहीं. [ * चंद्रसेन राजा याचा पुत्र सोमराज यानें चित्रगुप्त ब्रह्मकायस्थ याच्या वंशजाची कन्या विवाहिली; तेव्हां त्या जायेपासून संतति जाहली ते प्रतिलोम ] याचें उत्तर- " + ब्राह्मण्यां क्षत्रियात्सूतः " इत्यादि वाक्येंकरून सूतज्ञात प्रतिलोमापेक्षां उत्तम. + प्रतिलोम इदमंगीकृत्यापि ब्रूम इति न्यायेन. वस्तुतः ब्रह्मदेवशरीरापासून जाहला ह्मणून तो ब्रह्मकायस्थ. परंतु तो चतुर्वर्णावेगळा देव, देवगंधर्वजाति. पूर्वी क्षत्रिय राजे याहीं देवगंधर्व यांच्या कन्या बळात्कारें अथवा संतोषें विवाहिल्या; अर्से पुराणांतरीं बहुत स्थळी आढळते. शुक्राचार्यांनी आपुली कन्या देवयानी ययाति राजास दिल्ही. तेव्हां या क्षत्रिय कायस्थास प्रतिलोमताही नाहीं. उत्तमप्रति सूत, त्याचा क्षत्रियांतच अंतर्भाव त्यासही सर्व क्षत्रियकर्माधिकार आहे. चांद्रसेनीय क्षत्रिय कायस्थ कोणते ? याचे उत्तर- दारभ्य गोत्र कायस्थ प्रभु ऐशी आबालवृद्धपर्यंत ज्याची प्रसिद्धता असेल, तो चांद्रसेनीय कायस्थ. तर यास प्रभु ह्मणण्याचा प्रघात कसा पडला, यार्चे उत्तर- " \ चत्वारस्तनया आसन्सोमराजस्य विश्रुताः ॥ विश्वनाथो महादेवो भानुर्लक्ष्मीधरस्तथा ॥ १ ॥ संख्या वानप्य संख्योऽभूद्वि- श्वनाथो महाप्रभुः ॥ निवासः श्रीसरस्वत्यो रूपौदार्य कलाश्रयः॥२॥ हा मजकूर खरा नाहीं असें घर दाखविलेंच आहे. + क्षत्रियापासून ब्राह्मणीचे ठाई होतो तो सूत. + दें, सूत हा प्रतिलोमच आहे असा पक्ष घेऊनही आम्हीं बोललो तरी. ९ सोमराजाचे - विश्वनाथ, महादेव, मानु आणि लक्ष्मीधर असे प्रख्यात चार पुत्र होते, त्यांत विश्वनाथ हा महापंडित, असंख्य गुणांनी युक्त, लक्ष्मी आणि सरस्वती यांचें अधि ष्ठान आणि रूप, औदार्य व कला यांचा आश्रय असा महाप्रभु ( महा-समर्थ ) झाला. भसें स्कंदपुराणीं रेणुकामाहात्म्यति सांगितलें आहे.<noinclude></noinclude> qhrx6ptv67b0wi0k0vxh48dwp2umtuv पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१०५ 104 111761 235928 2026-08-21T12:00:45Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235928 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ४९ ) " स्कांदे रेणुकामाहात्म्ये इत्यमुक्तं यावरून महासमर्थ होतो त्यास प्रभु ह्मणतात. विश्वनाथ यास सर्वहि प्रभु ह्मणूं लागले, ह्मणून प्रभु व्यवहार रूढ पडला. सांप्रतहि ज्याणें जो रोजगार उदीम धंदा केला त्या व्यवहाराचें उपनाम पडतें व तेंच परंपरागत चालतें. त्याचा मूळपुरूष चंद्रसेनपुत्र सोमराज एकच, तेव्हां विवाहादिक कर्मे कोणाशीं जाहली ? याचे उत्तर-पूर्वी दोनच क्षत्रियांचे वंश, एक सूर्यवंश व एक सोमवंश यांचे परस्परें विवाह होतच असतां यदु, कुरु, पंडु, एकाचीच संतति यादवाची कन्या सत्यभामा कृष्णास दिल्ही असें पुराणांतरीं बहुतांस्थळी आढळते. सर्व सृष्टिक्रम असाच आहे. पूर्वी ब्रह्मदेवाचें शरीरापासून चतुर्वर्ण उत्पन्न जाहले; तेव्हां मूळ पुरुषाची रचना अनादिसिद्ध, व्यवहार चालत आला आहे तो खरा ब्रह्मदेवाचे दिवसांत दश अवतार होतात. त्यास पन्नास वर्षे जाहलीं आहेत. तेव्हां कोणत्या दिवसांत परशुरामावतार जाहला है परमेश्वर जाणें. तेव्हां अनादि व्यवहारच प्रमाण. आणखी स्कंद वाक्य. "* धारयंतो मुर्खेऽगुष्ठान् प्रार्थयतोऽभयं नृपाः ॥ स्थितास्तेषां बली रामो दत्तवानभयं तदा " तेव्हां आणखी क्षत्रिय राहिलेच होते ते हे एकच मिळाले. सारांश भगवदिच्छेकरून सृष्टि निर्माण जाहली. अनादिसिद्ध व्यव- हार भगत्सत्तेनें चालिला तो प्रमाण ऋषिकूळ नदीमूळ पाहूं नये. ऋषि - त्पत्ति पाहतां " हरिणी गर्भसंभूतो ऋष्यशृंगो महामुनिः ॥ तपसा ब्राह्मणो जातः केन जातेन कारणम् ॥ १ ॥ धीवरीगर्भसंभूतो व्यासो द्वैपायनो मुनिः ॥ तपसा ब्राह्मणो जातः केन जातेन कार- णम् ॥ २ ॥ उर्वशीगर्भसंभूतो वसिष्ठश्च महामुनिः ॥ तपसा ब्राह्मणो जातः केन जातेन कारणम् ॥ ३ ॥ ऐसेच या पृथ्वीचे ठाई कित्येक निर्माण जाहले. त्यांचें वर्णन किती कोठवर करावें. विश्वामित्र क्षत्रिय होत्साता ऋषीत * तेव्हां आपल्या मुखांत अंगुष्ठ धारण करणारे, अभय मिळण्याची इच्छा करणारे असे कितीएक राजे शरण आले असतां त्यांस, महाबली तो राम, अभय देता झाला. ↑ हरिणीच्या गर्भापासून झालेला महामुनि ऋष्यशृंग केवळ तपश्चर्येनेंच ब्राह्मण झाला. तेव्हां मूळच्या जातीचें कारणत्व काय करावयाचें आहे ? कोष्याच्या स्त्रीचे गर्भापासून झालेला मुनि द्वैपायन व्यास तपश्चर्येनेंच ब्राह्मण झाला. तेव्हां मूळच्या जातीचं कारणत्व काय करावयाचें आहे ? तसाच उर्वशीचे गर्भापासून झालेला महामुनि वसिष्ठ तपश्चर्येनेच ब्राह्मण झाला. तेव्हां मूळच्या जातीचें कारणत्व काय करावयाचें आहे ? 4<noinclude></noinclude> 48yxrtyi9jbe6kvuynalgy43dfr6aww पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१०६ 104 111762 235929 2026-08-21T12:00:58Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235929 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>प्रकारांतर. तस्मात, 66 * ( ५० ) • मिसळला. तसाच वाल्मीकही. कोकणस्थांचा सप्रवरसंबंध होतो. उत्पत्ति पाहतां * कस्य दोषः कुलेनास्ति व्याधिना को न पीड्यते" असें आहे. भगवत्कृत मोडोन आपण नूतन स्थापूं गेल्यास भग- वंतास कसे मानेल ! मानावयाचें नाहीं. है दृष्टोत्पत्तीस येतच आहे. विषाची परीक्षा पाहाणारांनीं पाहूं नये. पंडु व धृतराष्ट्र यांची उत्पत्ति व्यासापासून. पांडव यांची उत्पत्ति एकापासून एकेक ऐसें जगप्रसिद्ध ग्रंथांतरीं वर्णन. त्यांनी अश्वमेधादिक यज्ञ केले, त्यांचे घरीं लक्षावधि ब्राह्मण जेविले, स्वर्गी घंटारव जाहले. द्रौपदीस पंच भ्रतार. तिर्णे स्वहस्ते लक्षावधि ब्राह्मणांस अन् वाढिली. महासती होय दोष ठेवितां रौरवप्राप्ति. तात्पर्य “बलीयसी केवलमीश्वरे- च्छा " ॥ शके १७०१ विकारीनाम संवत्सरे. माहे आश्विन शुद्ध ८ मी रविवासरे इत्यलम्. श्री शुभं भवतु." प्रयोजन होत असतां तेथे कलह त्यांसही कोलटकर मामलेदार यांणीं सांगितले परंतु न ऐकतां दुराग्रहास येणेप्रमाणे समजून घेऊन माधवराव साहेब पंधरा वर्षांचे होईपर्यंत कधीं कांहीं कटकट न होतां यथास्थित चालत आलें. सवाई माधवराव यांची 'विनाशकाळी विपरीत बुद्धि' होण्याचे कारण पेणकर ब्राह्मणांचा व प्रभु याचे उपाध्ये टकले यांचा आपाजी यशवंत प्रभु यांचे घरीं पेर्णेत वाढून पेणकर ब्राह्मण यांणीं खटला केला. पुण्यास आणोन समजून सांगावयाचें तसें प्रवर्तक होऊन श्रीमंतांकडे जाऊन फिर्याद केली. आणि नारायणराव साहेब यांचे अनन्वित हेतु पूर्णतेस न गेले. यांचे वृत्त समजून घेऊन ग्राभण्य उभ करण्याची वीरश्री घातली. आणि पुणे मुक्कामीं बहुतेक ब्राह्मण जाऊन प्रभु- लोकांचा उपहास करण्यास प्रवर्तले ते समयीं श्रीमंतांनीं शास्त्री व पंचाईत मिळ- वून शास्त्रें मतें पाहतां चालत आलें तसें चालवावें. असें समजून नाना फडणीस यांचे समक्ष पंचाईत मनास आणावी ह्मणोन आज्ञा होऊन असामींनीं केलें त्यांची नांवनिशि. • * कोणाचे कुळांत अगदीं दोष नाहीं ? कोण व्याधीनें पीडित अगदीं होत नाहीं ? तर सर्वांचे कुळात काहींना कांहींतरी लहानमोठा दोष असतो व सर्वास लहानमोठा कांहींतरी ध्याधि होतच असतो. ↑ केवळ ईश्वराची इच्छाच बलवत्तर आहे.<noinclude></noinclude> o7nwik8pyylb23qkqtg81joldqdc8wz पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१०७ 104 111763 235930 2026-08-21T12:01:14Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235930 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>१ यज्ञेश्वर शास्त्री. १ भास्कर दीक्षित. ( ५१ ) १ आनंदराव जुनरकर. १ दिनकरपंत भडभडे, १ सदाशिवभट दात्ये. १ मोरोबा भावे. १ गोविंदराव पिंगळे. ३ सदरहू असामींस आज्ञा जाहली. त्यांणींही समजून घेऊन पेणकर ब्राह्मण यांसों खटला न करणें विषय समजून सांगों लागले. न ऐकतां दुराग्रहास प्रवर्तोन जुने कोटांत चिटणीस यांचे वाड्यावर खटला करावयाकरितां दोन वेळा गेले. ते समयीं आयाशास्त्री द्रावीड न्यायाधिशीचे कामावर होते ते ब्राह्मगांस अनुकूल या बळावर बेगुमान देणे. आयाशास्त्री यांचा जामात व दांडगे ब्राह्मण, मजुरीचे चार चार पैसे द्यावयाचे करार करून समागमें घेऊन बहुत समुदाय मिळोन प्रभूंवर चालून गेले. ते वेळेस ब्राह्मणांची व प्रभूंची मारामार जाहली. आणि ब्राह्मण कित्येक जखमी जाहले, व आयाशास्त्री यांचा जामात जखमीं जाहला. व प्रभुलोकही जखमी जाहले. नंतर ब्राह्मणांनी पळ काढून नाना- फडणीस यांजकडे फिर्यादीस गेले, आणि बहुत प्रकारें कागाळी सांगों लागले. ते समयीं नानाफडणीस याणें ब्राह्मणाचा बहुतच निषेध केला, कीं शास्त्रसंमतें सम- जून सांगितलें असतां दुराग्रहानें त्यांजवर चालून जाऊन दुलौकिक केला. हैं नीट नव्हे. तुह्मींच आजपर्यंत वडीलार्जित परंपरागत प्रभूंचे कार्य वेदोक्त कर्म करीत आलों आणि हल्लीं त्यांचा आश्रय गेल्यामुळे द्वेषबुद्धि करून खटला करतां हा सिद्धीस जाणार नाही. याप्रमाणे सांगितलें. तें न ऐकतां बळ जाऊन खटला करणें यांचे कारण काय ? या उपर यांसों खटला केला असतां मुलाजा होणार : नाहीं. प्रतिष्ठेस हानी होईल, अशी ताकीद देऊन ब्राह्मण घालविले. नंतर थोरथोर शास्त्री श्रीमंतांनीं बोलावून शास्त्रार्थ विचारिला, तेव्हां शास्त्री यांगी उत्तर केलें कीं प्रभु चांद्रसेनीय यांसों सर्व कर्मास अधिकार आहे. सभा करून शास्त्रार्थ सांगावयाची मर्जी असल्यास जो शास्त्रार्थ ग्रंथांतरों वास्तविक आहे तो सांगणें. पेणकर ब्राह्मण व्यर्थ दुराग्रहास प्रवर्तले याचे कारण नाहीं. पहिला दाखला पाहतां मुक्तक्षेत्र काशी तेथें शिष्ट ब्राह्मणांनीं निर्णय ठरविला तोच .<noinclude></noinclude> oqb4z199ah51qrtsd8q9i1hg3ytzbpc पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१०८ 104 111764 235931 2026-08-21T12:01:54Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235931 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>' ( ५२ ) प्रमाण आहे. त्यास दोष टेऊन दुसरा प्रकार करी असा कोण समर्थ आहे ? प्रभु- ज्ञातीचे गुरु आबा टकले हे सर्व शास्त्रीं निपुण आहेत ते शास्त्र विरुद्ध आचरणार नाहींत. . सभा करून सांगितले असतां टकले यांचें बोलणें प्रमाण ठरेल. शास्त्रा- नुमतें वेदाधिकारी आहेत अशी खातरजमा आहे त्यापेक्षां आतां युक्ति करावी जे, सभेमध्ये अनृत भाषण करीतां येत नाहीं याजकरितां तूर्त सभा करूं नये. मोघम पूर्ववत चालत आलेप्रमाणें हें सांगावें असें ठरवून ब्राह्मणांस अतः पर खटला करणें याचें कारण नाहीं. याप्रमाणें ताकीद केली. खटल्यास प्रारंभ शके १७१७ श्रावण शुद्ध ७ ते माहे आश्विन मासपर्यंत प्रभुमंडळी जात नव्हती. आपलाले घरीच होते. आश्विनमासीं माधवराव साहेब कैलासवासी जाहले. नंतर नाना फडणीस याणे प्रभुमंडळीस बोलावून समक्ष सांगितले जे, इतःपर ब्राह्मणार्ने तुम्हांसी खटला करूं नये अशी निक्षून ताकीद केली. तुह्मीं सरकार कामें बंद न करितां स्वस्थचित्तें आपले कामकाजावर येऊन पूर्ववत् कामें चाल- वावी. येविशीं समजुतीचें अन्वये बहुतेक सांगोन खटला मोडिला. पुढें श्रीमंत बाजीराव साहेब राज्याधिकारी राज्याचे कामावर आले ते समयीं चिटणीस सर्व प्रभुमंडळी याणीं विनंति केली कीं, विनाकारण पेणकर ब्राह्मण याणी खटला करून कर्मीतर चालवणें यासीं आडाआड केली, त्याजरून बाजीराव साहेबांनी चौकशी मनास आणून प्रांतोप्रांती शिक्यानिशी सनदा करून दिलेल्या असोन पूर्वीपासून कर्मांतर चालत आलेप्रमाणे चालवीत जाणें दिकत न घेणें. ' या प्रमाणें स्वदस्तुर लेखन होऊन चालूं लागले. रायबहादुर बाळकृष्ण आत्माराम गुप्ते यांनी जी ग्रामण्याची हकिकत प्रसिद्ध केली आहे त्यांत त्यांनीं प्रख्यात बखरनवीस मल्हार रामराव चिटणीस यांची पत्रे नमूद केलीं आहेत तीं येणेंप्रमाणेंः-- Q me पत्र नंबर १. पै छ ९ जिलकाद श्रावण रोज वर्दी पुण्याहून लक्ष्मणराव गोविंद व मल्हार रामराव चिटणीस यांणीं रामराव चिटणीस यांस पाठविली ती. रोजचें वर्तमान. बार.<noinclude></noinclude> 6y912rrztkt1s85k97nqc1wfw2qxstu पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१०९ 104 111765 235932 2026-08-21T12:02:11Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235932 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ५३ ) नारायणराव यांची यादी घेऊन फाडली. हा अक्स हरीपंत फडके व आपा बळवंत यांनीं धरून सूड घ्यावयाचा म्हणून पेणकर ब्राह्मण पुढे करून प्रारंभ केला. तो ऐसाजे, पेर्णेस ग्रामण्यें ब्राह्मणांनीं गर्भादानास होमास चरु करणार नाहीं म्हणोन कोणी गृहस्थाचे घरीं आग्रह केला. त्यावरून कोलटकर सुभेदार अनुकूल होऊन कज्या पाडिला आणि दहापांच कलमें, चरु करूं नये, व चार दिवस मुंजीचा अग्नि ठेवूं नये, (शवा ) सह गमन करूं नये. पिंडास चरु होतो तो करूं नये, असे दोनशें ब्राह्मणांचे संमतें पत्र करून याप्रमाणे प्रभू मान्य होतील तरी त्यांचे घरा जावें, नाहीं तर जाऊं नये. असे केल्यामुळे वर्षभर कम व हव्यें कव्ये राहिली. अगत्यें करणेंच त्यांनीं लग्न- विवाह इत्यादि दुसरे महालांत जाऊन करावीं; असे झालें. तेव्हां तेथील गृहस्थ पुष्कळ येऊन ज्ञातीस कळविलें. त्यावरून गणपत- 'राव कोलटकर मामलेदार यांस मजकूर कळविला कीं, तुमचे बंधू महालों बाबूराव आग्रहास पडून [असीं कामें ] करितात याजवरून गणपतराव यांनींही बहुत लिहिलें. परंतु त्याची उत्तरें ब्राह्मण ऐकत नाहींत ऐसी येत गेली.. नंतर बाबूराव कोलटकर गणपतराव यांजकडे पुण्यास आले. तेव्हां गणपतराव यांनी बहूत निषेध केला. त्यावरून ( प्रभुलोक ) यांचें ग्रंथांतर कसें आहे तें आम्ह समजूं तेव्हां करणें तें करूं असें म्हणूं लागले. वेदशास्त्रसंपन्न राजश्री आवा गुरूबावा व थोरले गुरूबावा जाऊन त्यांची खात्री केली कीं, चालतें हैं कांहींच नाहीं. यांस अधिकार विशेष आहे. तेव्हां ते बोलिले को, ब्राह्मण आग्रही. तेथील शिष्ट दहा पांच आणवितों, आमची खातरजमा केली तशी त्यांची करावी. नंतर ते ब्राह्मण त्यांनी आणविले, यावर त्यांहीं सारे ग्रंथ दाखविल्यावर गागाभट्टी गौण आहे त्यास संमत पत्र केलें तें फाडावे. याप्रमाणें ब्राह्मण मान्य होऊन कोलट- करांची पत्रे व या ब्राह्मणांची पत्रे रवाना झाल्यावरून पूर्वीप्रमाणे सहा चार महिनें चालिले. पुनः कोणी कोणी दिक्कत करूं लागले. कोलटकरांचें ही न मा- नीत. तेव्हां गुरूवावांचे दोन ब्राह्मण कोलटकरांचे स्वाधीन केले. आणि हे सर- कारचे ब्राम्हण म्हणोन कायें चालावीं अशीं केलीं. त्यांनीं सहा चार महिने चाल- : विले असतां एके दिवशीं कोलटकरांकडे कथा झाली त्यांत सारे ब्राह्मण मिळाले. तेथे त्या दोघा ब्राह्मणांस बुका, प्रसाद, खिरापत आम्हांबरोबर द्याल तर आम्ही<noinclude></noinclude> iwea0omtnrbo9jepg0c8ffwkajo05l0 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/११० 104 111766 235933 2026-08-21T12:02:23Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235933 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ५४ ) घेणार नाहीं म्हणून आग्रह करून उठून चालले. सुभेदार यांनी विचारिलें यांजकडे काय दोष ? तरी प्रभूंकडे हे मनस्वी कमें करितात असें म्हणून निघोन गेले. दुसरे दिवशीं सारे एकत्र होऊन पूर्वी संमत पत्रे फाडलीं तसेंच आणखी केलें. त्याजवरून कोलटकर यांनीं नेऊन विचारिलें तुमचे पद्धतीप्रमाणें पूर्वील चाली- पेक्षां विशेष कोणी काय केले ? तुमच्याच पोथ्या यांस दिल्या. तेव्हां बोलूं. लागले कीं, आम्हीं पूर्वी करीत होतों तेंच ठीक नाहीं. हल्ली ठरवूं तसें करावें.. त्याजवरून कोलटकर बोलले. गागाभट्टांनी पद्धति केली तशी तुम्ही नवी कशी ती करावी. चाललें तें कोणत्या आधारावरून न करावें म्हणतां तें समजवावें. पुढील पद्धति कोणत्या आधारावरून करणार तें लिहून द्यावें त्याजवरून कागद लिहून दिला जे, म्हणतों याप्रमाणे समजून देऊं नंतर सर्व आपले ठायीं विचारास बसले. निषेध कशावरून व पुढे काय करावें ते कांहीं सिद्ध न होय. तेव्हां दांडगावे आरंभून जो संमत न करील त्याचे घरीं जाऊं नये, हें अरंभिलें. ते समयीं कोलट- कर सुभेदार सुद्धां सत्रा घरांनी संमत न केलें. म्हणून तितकीं घरें वर्ज्य केलीं. आणि शेंपन्नास एक झाले. ते समयीं कोलटकर यांनी सदरहू झालें वर्तमान सविस्तर पुण्यास श्रीमंतांस लिहिलें. तें पत्र नाना फडणवीसांनीं वाचून शास्त्रीवावाकडे पाठविलें. शास्त्रीबावांनी पाहिलें, नंतर ब्राह्मण दांडगावे करितात ते मसाले करून आणावे ऐशी नानाची परवानगी सरसुभे यांस झाली, आणि त्यांपैकी पंचवीस तीस ब्राह्मण मुख्य मुख्य यांजवर दहादहा वीसवीस असे मसाले रुपये एकरों साठ करून गार्दी पाठविले. तेव्हां जितक्यांनी संमतें केलीं तितके एक होऊन मसाला देऊन शंभर ब्राह्मण पुण्यास आले. सरसुभ्यांकडे व शास्त्रीबावांकडे न जातां प्रभूंसाठी आम्हांवर जुलूम होऊन गार्दी मसाले करून अप्रतिष्ठा केली वगैरे मनस्वी वल्गना करीत गावांत हिंदू लागले. नंतर सरसुभे यांनीं माणसें लावून आणून बसवून पंचवीस तीस असामी बोलाविले असतां इतके कां आला ? प्रथम समतें केलीं तीं कां फाडिलीं व पुनः कां आणखी केलें ? आजपर्यंत कसें करीत आलां ? आतां कां नाहीं म्हणतां ? व पुढे कोणते संमतें कसें करणार ? हें लिहून द्या म्हणून तसदी केली. तेव्हां सर्व ब्राम्हण पेणेस जाऊन दहावीस असामी राहिले. आणि लिहून देतां ठीक न पडे. हांइतके दिवस करीत आलों ते चुकलों पुढें आम्हांस करूं नयेसें वाटतें. मागें केलें त्याचें प्रायःश्चित घेऊं ऐसी लिहीणी बाहेर पडलीं. बाहेर ही चार घरे फिरों लागले. नानापाशीं एकदोन वेळ उभे राहिले. त्यांनीं सरसुभ्यांकडे जा, ते सम-<noinclude></noinclude> q92mpfdr43uh1fjswabn1ly9hca5vwr पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१११ 104 111767 235934 2026-08-21T12:02:35Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235934 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ५५ ) जावितील, मग उत्तर सांगूं. हेंच उत्तर केलें. त्याजवर आपा बळवंतराव यांनी त्या ब्राह्मणांस अश्वासन देऊन आम्हीं तुमची दाद लावितों. मसाला देववितों. प्रभू पारिपत्य करणें आहेच. याद माघारी घेतली. ते पूर्वील वैर मनांत धरून नानापाशी जाऊन बोलले. हें काय ? शिष्ट ब्राह्मणाची प्रभूसाठीं अप्रतिष्ठा होते. प्रभू मनस्वी कर्मों करितात हें काय ? असें बोलिले. तेव्हां नानांनीं उत्तर केलें जे, आम्ही सर्व समजलों आहोत. तुमचें बोलणें भांडाळपणाचें. पुर्ते समजलांच नाहीं. सरसुभा मनास आणून आम्हांस समजावील तें करूं. नंतर आप्पा बळवंत अय्या शाख्यांचे घरीं आले. व यांस आपले घरों आणिले. आणि पेणकरांचा अभिमान धरावा असें करून शास्त्रीबावांकडून नानासीं एकदोन वेळां बोलाविलें, नानांनी उत्तरें साफ केली. शास्त्रीभावा म्हणूं लागले जे, ब्राह्मण ही बहुत एक विचार करितात. हेही मनस्वी कर्मों करितात याचा विचार करावा. असें बहुत आग्रह करून विचारितां नानांनीं उत्तर केलें कीं, आम्हांस यांत पडावयाचें नाहीं व कांहीं करावयाचें नाहीं. ब्राह्मण व प्रभू चित्तास येईल तसें करोत. तितक्यावर आप्पा बळवंत व शास्त्री व ब्राह्मण विचार करून सिद्धांत केला जे, वाद कशास सांगावा. सारे ब्राह्मण एक संमत करून दाहा पांच हजार संमतें त्याजवर करून नानास दाखवावीं. मग सहजच ते बहुतांत येतील. पडल्या फळाची परवानगी ब्राह्मण व प्रभू कांहीं करोत अशी झालीच आहे. म्हणोन एक संमताची यादी करून वरती नारायणराव साहेबांचे वेळचीं कलमें लिहून, यमाजीपंताची पद्धति पंचसंस्कारी ती काढून, अय्या शास्त्री यांजकडे नित्य पेणकर वगैरे ब्राह्मणांनीं मिळावें. तेथे आपले गुरूबावा नित्य जात. तेथें नित्य भवति न भवति व्हावी. त्यांत आबा गुरूजींनीं प्रथाधारें करून सर्वास कुंठित करावें पूर्वील ग्रंथाधारें हे शुद्र क्षत्रिय लोक ' चतूरनाम्ना' ( ? ) प्रसिद्ध असे आहेत. है व 'सुवर्णाश्च स्वरूपाढ्या' ( ? ) इत्यादि लक्षणें लिहिलीं त्यानीं युक्त त्या ज्ञातीस जे धर्म ग्रंथों असतील ते यांनी करावे, व करीत आहेत. मध्ये गागाभट्टांनीच या ज्ञातीचें घर बुडविलें. त्याशींच यांचा वाद आहे. ग्रंथ कसा केला. नवीन फर्कि कामंत्र कां केलें. कोणते संस्कारों वैदिक मंत्र. कोणते संस्कार अमंत्रक असें कां लिहिलें. अधिकारी नाहींत तरी कोठेच नसावे. तेव्हां ग्रंथ खोटा, परंतु काल देश वर्तमान जेथें जसें चालेल तसें चालतात. आणि<noinclude></noinclude> todw5r5wfmsrdcuzu2znfl73unicshz पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/११२ 104 111768 235935 2026-08-21T12:02:48Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235935 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ५६ ) ,, तुम्हीं गागाभट्टांनीं केलें तेंच करूं नये म्हणणार, तेव्हां आज तरी तसा श्रेष्ठ नवीन पद्धति कोण कशी करितो, व कोणत्या आधारे ती करावी असें त्या ज्ञातीचे म्हणणे. मध्यं यमाजीपंती झाली, ती तुम्हीं काढितां त्यांचा यांचा राज्यकारणी - द्वेष म्हणून ग्रामण्य केलें तें चाललें नाहीं. हे करितच आहेत. पंच- संस्कारी तुम्हीं म्हणतां तरी मुंजी तर त्यांच्या येथें अस्खलित चालतात. यमा- जीपंती पंचसंस्कारी लग्नादारभ्य असें लिहिलें तरी तेव्हांपासून व्रतबंध रहावे ते तुम्हींच करतां, व वाडवडील करीत आले. याचे प्रायश्चित्त काय ? गुरूबावांनीं उत्तर प्रत्त्युत्तर पेणकर संमतपत्रे घेऊन असें बोलणें झाल्यावर सर्व सभा कुंठित झाली. सभेत करण्याची बाकी ठेविलीं नाहीं, असें झालें. घरोघर हिंडूं लागले, परंतु सर्व सर्भेत मंडळी होतीच. ग्रंथ गुरुबावांनीं दाख- विले. या मुळे संमतें होण्यास विचार त्रिमंतकाचार्य ( ? ) शास्त्री ही शास्त्राधारें इकडील संमतें बोलत होते. व आयाशास्त्री यांजकडे ही दोन चार वेळ जाऊन तुम्हीं करितां हें अयुक्त. आम्हांस है शुद्ध ठाऊक आहे. ते बोलले श्रीगिरी- कर शंकराचार्यही येथे आले आहेत, त्यांजकडे संमताची यादी नेली. त्यांनीं उत्तर केलें. आम्ही धर्मसंस्थापक. उच्छेद करणें तें संमत घालावयाचें नाहीं. असें बोलले. पंडितांच्या घरोघर आपा बळवंताचा प्यादा घेऊन हिंडूं लागले. तेव्हां पंडित मंडळीनें उत्तर केलें कीं, एका बाजूस रामशास्त्री बावांचे संमत व एका बाजूस श्रीमं- तांचें संमत असें होईल तेव्हां आम्हीं संमतें घालूं आम्हीं कोणी ग्रामणिक नव्हेत. संमतपत्रे कशास पाहिजेत. ही राजधानी. येथें सभा करून पंडितांस विचारावें. त्याप्रमाणे श्रीमंतांनी आज्ञा करावी. तुम्ही लबाड आहांत. आयाशाख्याचा व आपाचा निरोप सांगतां त्यास त्यांचे संमत याजवर अगोदर कां नाहीं. त्यांचे संमत करून आणावें. यादींत पंचसंस्कार लिहिले त्यास आमचे बाप आजे वडील त्या ज्ञातीचे व्रतबंध करीत आले. आम्हीही केले. त्यांच्या अस्थि शुद्ध करून वडिलांस प्रायश्चित्त द्यावें, व आम्हीं घ्यावें तेव्हां असंमत होईल. असें बोलून पंडितांचीं संमते न झालीं. मग चहूंकडे संमतें होत नाहीत असे वाजलें, तेव्हां किरकोळ करणारही सरले. गंगाधर दीक्षितांकडे आपा बळवंताचा प्यादा गेलाजे, आपांनी विनंती केली आहे. तेव्हां दीक्षितांनीं उत्तर केलें. करणार, आम्ही आपांचे चाकर नाहीं. आपा कोण ? तुम्हीं प्यादे लावून 'आम्ही करीत नाहीं ' ,<noinclude></noinclude> cxk91tfg5tguygezv9a3jt5gmppxjrh पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/११३ 104 111769 235936 2026-08-21T12:03:03Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235936 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ५७ ) म्हणून सांग जा. असे झाल्यावर आम्ही शास्त्रीबावांकडे चिटी पाठविली कीं, आपण अधिकारी अशी चिटी पाठ- ब्राह्मण दांडगावा करून मध्येच ज्ञातीचा उच्छेद करणार. सर्वज्ञ. आम्हीं कसें चालावें. पूर्वीपासून आश्रय आपला. विली. त्याचें उत्तर आलें जे, आम्हीं यांत नाहीं कोणी शिष्टही मिळणार नाहीत. अशुद्ध गोष्ट परंतु सरकाराकडे व नानाकडे तुम्ही सर्व ज्ञातींनीं उभे राहून बोलावें. सरकार नाहीं व शास्त्रीवावा नाहींत. आणि मध्येच ग्रामण्य होतें. आम्हांस कोणी त्राता नाहीं कीं काय ? हें विचारावें असा निरोप आला. संमताची यादी चालावयाची राहिली. नंतर आयाशास्त्री यांनी नानांचे कानावर घातलें. ब्राह्मण असा विचार करीत होते. परंतु शिष्ट कोणी संमतें घालीत नाहींत ? सरकारचे नेट व आज्ञा कारकून असावा. त्याजवरून नानांनीं सांगितलें जे आम्हांस यांत पडावयाचें नाहीं. म्हणून पूर्वीच सांगितलें. हॅ सिद्धीस जावयाचें नाहीं. पूर्वी यमाजीपंत आदिकरून कोणी केलें तें सिद्धीस , मुंजी कां राहिल्या नाहींत. न गेलें. रिकामें अनर्थास कारण. तुम्ही कराल तें सिद्धीस जाणार नाहीं. हॅ मात्र ते दिवशीं सांगितलें नाहीं. यमाजीपंती पंचसंस्कारों केलें आहे तरी तुम्हींच करितां तेव्हां सहजच त्यांचे केलेलें मोडलें गेलें. चाललें नाहीं. हॅ सिद्ध झालें. परंतु याचा विचार तुम्हीं कांहीं पाहिला आहे कीं काय ? आणि त्यांचा एक उपाध्या पोथ्या घेऊन ( रेणुका- माहात्म्य व एक दोन ग्रंथ घेऊन ) हिंडतो. त्यांत कांहीं कांहीं' आधार आहे तेव्हां त्यास मोडावयाजोगें तुम्हांपाशीं कांहीं आहे कीं नाहीं, म्हटलें. तेव्हां शास्त्री यांनीं उत्तर केलें कीं, पोथ्या पुराणांतरच्या खऱ्या परंतु अनाचार आरोप ज्ञातीवर आहेत. पूर्वीचे, परंतु आलीकडे नाहीं. याजवर नानांनी उत्तर केलें आम्ही लहानपणीं पलांडुभक्षण करीत होतों. पांडुभक्षणां पुनरुप- नयन हैं कळल्यावर टाकिलें. म्हणून पूर्वी करित होतां तें करा, असे सांगून तुम्हीं आम्हांस भ्रष्ट करावें कीं काय चांगले केल्यास वाईट करा कां म्हणावे. अधिक केल्याचेंच फळ पावतील. आम्ही यांत नाहीं. सर सुभ्यांकडे ब्राह्मणांनी जावें तें समजावतील तें करूं. असें झाल्यावर शास्त्री सई ( फत्ते ) होऊन आले.<noinclude></noinclude> c6mxz467cbp1yzpi54ml9w61zim9jsx पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/११४ 104 111770 235937 2026-08-21T12:03:17Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235937 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ५८ ) पत्र नंबर २ पो । छ १९ जिलकाद श्रावणमास. यापुढे आयाशास्त्री व दादाशास्त्री लिमये व आपा बळवंत प्रमुख होऊन ग्रामण्य चालविलें, तो श्रावणीची संधी आली. गुरूबावांस पेणकर ब्राह्मणांनीं जाऊन शपथ घातली कीं, प्रभूंचे घरीं तुम्हीं जाऊं नये, त्याजवरून नानांचे कानावर घातलें. तेव्हां सरसुभ्यानें जनोबास आणून ताकीद केली कीं, ब्राह्मणांस निक्षून ताकीद करर्णे, श्रावण्या चालू देणे, त्याप्रमाणे त्यांनीं ब्राह्मणांस ताकीद केली. परंतु आम्हीं ऐकत नाहीं, उत्तर केलें. गुरूबावांस ओंकारेश्वराचे देवळापाशीं चतुर्दशीस नेऊन जाजम टाकून बसविलें. भोवते ब्राह्मण बसले. मनस्वी बडबड करणें चाललें. तेव्हां पुनः नानांचे कानावर घातलें. जनोबास नाना बोलले कीं, काम तुम्हांस रेंटत नाहीं हें काय म्हणून ? वरील दिवाणखान्यांत श्रीमंत बसले तेथें दादोपंत शास्त्री बोलावून नेऊन हा विषय तुमचा, यांचे उपाध्ये आणून ब्राह्मणांस सांगून उद्यांचे कर्म चालतें करणें, म्हणून सांगितलें. त्यांनीं शास्त्रीबावास कळविलें. शास्त्री- बावा तेच समयीं पालखीत बसून वाड्यांत आले. तेथून ब्राह्मणांस बोलावूं पाठविलें जे, चौघे जण जाबसालास येणें. दादाशास्त्री व आयाशास्त्री देवास म्हणून जाऊन तेथें बसले होते. तेव्हां दादाशास्त्री यांनी उत्तर केलें जे, चौघे येत नाहीं. येथें शास्त्रीबाबांनीं यावें अगर आम्हीं सारेच येऊ. इतकें म्हणून उभयर्ता उठून गेले. पुनः शास्त्रीबावांनीं दोन ढालाईत एक चोपदार व एक कारकून पाठविला. सरकार आज्ञा आहे. चौघांनी यावे, नाहीं तर आह्मीं नेऊं तेव्हां पेणकर चौघे आले. नंतर दुसरा चोपदार व कारकून पाठविला जे, आबागुरूजीस पाठवून देणें. कारकून व ढाला- ईत व चोपदार गुरूजीस घेऊन येत असतां नारायण जोशी पेणकर धावून जाऊन आबाचे पायांस मिठी घातली. ब्राह्मणांवर आला तेव्हां कारकून बोलला कीं, याउपर तोंडांत मारून नेऊं म्हणून ढालाईतास सांगून त्यास ओढून आबास घेऊन आले. शास्त्रीबावा यांनी आबास विचारिलें जे तुम्हीं श्रावणी करूं नये म्हणत है कोणत्या आधारावरून. कोणी शास्त्र पाहिलें आहे कीं काय ? तेव्हां आम्हीं पाहिलें नाहीं. म्हणून उत्तर केलें. यांस अधिकार नाहीं, म्हणून ह्मणतां आणखी तुमचा बोलणार कोण याहून समजलेला आहे कीं काय ? म्हणून जाबसालास विचारीलें. तेव्हां नाहीं, म्हणोन जबाब दिला, याजवर शास्त्रीबावा बोलले<noinclude></noinclude> ong51jf1py2nefftankiqn7a9ahgms2 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/११५ 104 111771 235938 2026-08-21T12:03:49Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235938 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ५९ ) तुम्ही करीतां हें परिणामाचे नव्हे. मार्गे यमाजीपंतीं केलें तें शेवटास गेलें नाहीं. व नारायणराव साहेबांनीं केलें तेहीं शेवटास गेलें नाहीं. तुम्ही काय पदार्थ ? यांजवर ब्राम्हण बोलूं लागले आपण शास्त्रसंमतें विचार करून ठरवितील तें आम्हीं ऐकूं, तोंपर्यंत श्रावणी करूं लागल्यास दंगा करूं, डोंचकीं फोडूं, अनर्थ करूं, त्यांजवर गुरुजीस शास्त्रीबावांनीं विचारिलें जे तुम्हीं कसें करीत आलां सांगणे. यांनीं उत्तर केलें यथाविधि होम चरू करून याज्ञिक करीत आलों. याप्रमाणे चतुर्दशीस झालें. पौर्णिमा श्रावणी ब्राह्मण दंगा करणार याजवरून नाना श्राव- सि बसले. त्यांजकडे चिटी पाठविली. सर्व गृहस्थ आम्हीं मिळोन बसलों. नानानीं जनोबास आणून बोलले, तुम्हास काम सांगितल्याप्रमाणे करण्याचा ऐवज नाहीं. म्हणोन दादोपंतासही आणून रागे भरले जे, तुम्हांस श्रावणी चालवि- ण्याविशीं सांगितलें असतां, हें काय ? आतां चालवाव्या असें सांगितले. दिवस विचारिला तो तीन घटका राहिला. तेव्हां आतां श्रावणी आटोपणार नाहीं तेव्हां कसें करावें. हें शास्त्रीबावांस विचारून येणें तो अस्तमान झाला. म्हणोन दादोपंतांस तुम्हीं जाऊन प्रभू ज्ञातीस सांगावें घोळाखालीं हा समय झाला. त्यास भोजनास उठावें. श्रावणी हस्तावर अगर श्रवणावर यथास्थित करवूं, आपण संशय न धरावा. भोजनास उठावें. याप्रमाणे नानाकडे जाऊन येऊन येथे बोलले. आम्हीं उत्तर केलें जे, पाठवून समजूत करणें पडली. बरें, असो. अडथळा झाला नाही. ब्राह्मणांचे आग्रहास्तव होतां होतां समय झाला. असें रुसव्याचे अर्थ बहुत बोललों. आमचे ज्ञातीस कोणीच त्राता नाहीं, असें झालें. श्रावणी राहिली. सारींच कर्मे बंद झाली. याचा मार्ग काय म्हणोन बोल- ल्यावर, फिरून नानाकडे व शास्त्री बावांकडे गेले. उभयतांचा निरोप घेऊन दहा घटिका रात्रीस आले जे उदईक वरकड कमैं चालण्याचा बंदोबस्त करून देऊं म्हणोन आज झाली ही गोष्ट आम्हांस देऊन भोजनास उठावें. असें बोलले. नंतर आम्हीँ सर्वत्र भोजनास उठलों प्रतिपदेस तृतीय प्रहरीं सभा करून पेण- कर नेऊन निषेध केले जे, तुम्हीं केलें हें ठीक नाहीं. चालतें तसें चालवावें. परिणाम शुद्ध नव्हे. तुमचें बोलणें गंगाधर दीक्षित त्रिंबकशास्त्री यांस समजावणे, त्यांचे गुरुजीही उभयतांकडे जातील असें बोलण्यास प्रारंभ झाला आहे. या मंडळीस आणिलें सरकारांतून सरकारांतून अथवा शास्त्री बावांकडून<noinclude></noinclude> ofsi6stqi6ntoh9dhbswfwla9jv2c7j पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/११६ 104 111772 235939 2026-08-21T12:04:04Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235939 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ६० ) पत्र नंबर ३ पो । छ ३० जिलकाद भाद्रपद मास. आपा बळवंत सर्वाध्यक्ष होऊन पूर्वी नारायणराव साहेबों केला संकल्प सिद्धीस न्यावासा करून पेणकर वगैरे ब्राह्मणसुद्धां दंग्यास प्रारंभ केला. तात्या चिटणिसांचे घरीं जाऊन शे पन्नास ब्राह्मण दरवाज्यांत बसून, सायंकाळपर्यंत उपोषण केलें. आच्यारी, पाणके, हाती द्यावे. तुमचे हातीं द्यावयाचे नाहींत. सरकारांतून मागतील तेव्हां देऊं [असें प्रभूंनीं ] उत्तर केलें, व नाना व शास्त्रीबावांचे कानावर घालविलें. तेथें उत्तर झालें जे, ब्राह्मण म्हणतील ते ऐकावें. त्यावरून पेणकरांस सांगितलें जे ब्राह्मण आमचे वाड्यांतील गेले. आम्हीं घालविले, तर त्यांचीं नावें लिहून द्या. त्याचें उत्तर केलें जे, सरकार मागतील तेव्हां देऊ. नंतर शास्त्रीवावांकडून कारकून व प्यादे येऊन ब्राह्मणांस बोलले जे, तुम्हीं म्हटल्याप्रमाणें त्यांनी कबूल केलें. मग दुराग्रह कां करितां, म्हणून उठवून नेले. अशा मजलीस आले आहे. , पत्र नंबर ४ पो । छ ३० जिलकाद भाद्रपद. तात्या चिटणिसांचे वाड्यांत ब्राह्मण येऊन दंगा करावा जानवीं घ्यावीं, धोत्रें दुहेरी करावीं, हा बेत झाला. तेव्हां आम्ही सर्व हुशार होतों, यामुळे परतोन गेले. आपा बळवंताचें म्हणणें नानापाशीं पडलें कीं, नारायणराव साहेबांची याद परत घेतली. त्यांचा सूड मला घेणेच. नाना बोलले इतका आग्रह कशास करितां, तात्या व आम्हीं एक होऊन ठरविलें तें करावें. तेव्हां तुमचें ऐकर्णे नाहीं. म्हणून बोलून गेले. ब्राह्मण पुढे करून दुराग्रह हा अविचार करावा. हीच शेवटची मजल आणली आहे. बरें ईश्वर त्राता घडेल ते लिहू. तीर्थ- विधि एकंदर तिकडील राहिल्या असतील त्या पत्र पावतांच व्हाव्या. इकडील च कोकणांतील करविल्या. श्राद्धपक्ष ब्राह्मणभोजन करणें त्या ऐवजीं दहावीस गाईं मिळवून त्यांस अन्न घालावे. असा इकडे बेत केला आहे. त्यांस सदरहू अन्वर्येच तिकडे असावे. नीलकंठराव यांचे येथें उत्साह त्यास ब्राह्मण हरदास उभा करूं नये. तो उभा राहतो तुम्हीं बसतां हैं नीट नाहीं हाही घोळ घातला आहे. येणेंप्रमाणे जिलकाद महिन्यांतील वर्तमान जिवबाचा मात्र दुराग्रह आहे. गुरुत्रावांनी सर्व पंडित मंडळीची खातरजमा यथास्थित केली आहे. - • .<noinclude></noinclude> 7xacaspywemamkzh179gjc8un5xymkh पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/११७ 104 111773 235940 2026-08-21T12:04:18Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235940 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ६१ ) , आयाशास्त्रीही पल्यावर आहेत. परंतु सरकार आज्ञा व पुढे काय निकाल करतील. पहावे. शास्त्रीबावांनीं सरकारच्या वतीने बोलावें, आणि सर्व पंडितांनीं इकडील बोलावे असा घाट आहे. श्री कोणते थरास नेईल तें नेवो. हे तरी पूर्व उसने उगवण्यावर आले आहेत. हरीपंत तात्यांनी गंगाधर दीक्षित यांस एकांतीं विचा- रिलें जे, तुम्हांकडे मनास आणणेचें आध्वर्यव आले त्यांत काय ध्यानांत आलें ? तेव्हां उत्तर केलें जे, प्रभुंच्या उपाध्यांनी दोन चार ग्रंथ आणून दाखविले. पेणकरांस दाखवा म्हटलें, त्यांजपाशीं ग्रंथ नाहीं. यमाजीपंताचे पत्र घेऊन हिंडतात, तेव्हां काय मनास आणावें.. तेव्हां तात्यांनीं खंबीर काढला जे, आपाबळवंत केवळ दुराग्रह करितात असें आम्हांस करणें नाहीं. पत्र नंबर ५ पो । छ १४ जिलकाद मिति भाद्रपद शुद्ध ११. पंडित मंडळीचा प्रकार तो चांगलाच झाला आहे. तात्या आल्यावर घरोघर ब्राह्मणांनीं दंगा करणें राहिला. ब्राम्हणभोजन हव्यें कव्ये ही राहिलींच तेव्हां नाना, तात्या व आपा बळवंत बसून विचार झाला. तेव्हां दुराग्रह विशेष करणे ठीक नाहीं. जेव्हां तेही दुराग्रहास पडतील तेव्हां तुमचा दाब राहणार नाहीं. काय बंदोबस्त करणें तो शास्त्रीबाबांकडून करवावा. प्रभूंनी एका केला आहे व जमेतही होत आहे. तेव्हां हैं ठीक नव्हे. त्याजवरून आपा बळवंत विचारांत पडून सरकारांतून पन्नास बारगीर मागून घेतले, ते नेहमी चौकीस त्यांनी आपल्या वाड्यांत बसविले. बाहेर जाणें तेही बहुत खबरदारीनें जात. नानांचें म्हणणें आम्हांस प्रभूंचाही पक्ष करणें नाहीं, व ब्राह्मणांचाही करणें नाहीं. शास्त्री | करतील तें करोत. तात्यांचा खंबीर उणें होईल तेंच करावयाचे. बळवंत बोलले, मी त्यांस युक्तीनें राजी करून उणें करितों अशी प्रतिज्ञा केली, त्याजवरून त्रिंबकरावानें तात्या चिटणिसांशीं बहुत साफीचीं हितशत्रुत्वपणाची बोलणीं फार केली. उत्तरें ही निर्भीडपणें सडकून शेवटचे मजलीचीं केळी, याजवरून यत्न थकून राहिले. पत्र नंबर ६ पो । । छ २२ जिल्हेज. आयाशास्त्री यांनीं एक दोन वेळ नानांचे कानावर घातलें जे, शास्त्रार्थ पाहतां यांचे ज्ञातीचें ठीक आहे. त्याजवरून उत्तर केलें वाजवी असेल तसेंच<noinclude></noinclude> gv7490xbst1ftz8m88btwxfaii35ksq पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/११८ 104 111774 235941 2026-08-21T12:04:30Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235941 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ६२ ) पाहून करावयाचें. याजवरून ग्रंथ मिळवावे, दाखले पहावे, हॅच चाललें आहे. दंगा करणें तर तूर्त तहकूब आहे. तात्याचा खंबीर आहे तोच आहे. श्रावणी, पक्ष, श्राद्धे, सर्वोची राहिली. आम्हांस कांहींच करणें नाहीं, म्हणून बसलों आहों. तूर्त पुस्तकाचा प्रसंग पडला आहे. मिती भाद्रपद वद्य पंचमी बुधवार. तात्या व आपा नानापाशीं बोलले जे, आज आमचे घरीं ब्राह्मण उपोषित बसले. असें विहू करून बोलतांच नानांनीं उत्तरास प्रारंभ करून बोलूं लागलें कीं, मार्गे बहुतांनीं केलें तें शेवटास गेलें नाहीं. नारायणराव यांनी कागदपत्र घेतले ते प्रसंगोचित त्यांनी काढून घेतले. पुढे ही त्यांचे दिवस असेच राहतील असें नाहीं कोणी तरी दैववान होऊन तो प्रभूंस अनुकूळ झाल्यानें त्यांचा वेळ पडल्यास, हॅ शल्य त्यांचे मनांतून जाणार नाहीं, तेव्हां या गोष्टीचा उद्योग करणें प्राप्त कार्या- अंतीं प्रभूसही देण प्राप्त येईल. तेव्हां पत्र घेतल्याचें सार्थक काय ? अतिभाग्यवान. तुम्हीं कधींचे. त्यांशीं स्पर्धा करणें उचित नाहीं. सत्ताबळे केले तरी, त्यांजवर जबरदस्ती करण्याचे कारण काय ? कोणतें आग्रहाचे बोलणें पडलें आहे. सर्व सोडून बसले आहेत. देखील नाहींत. ओढाओढ कराल तर मरावयास टेंकले आहेत. जमाल तरी किती जणास तात, याचा विचार करा. दुसरें, ते तुम्हीं त्यांजकडून पुढे बोलत तुम्हांसच ब्राह्मण्याचें एकी करून माराल ! लौकीक काय होईल ? ते काय वांकडे बोल- शास्त्राधार पाहतां ते वावगे चालत नाहींत. चालतात त्याहून त्यांनीं अधिक करावें परंतु त्यांचे करणे सर्व तुमचे स्वाधीन, तुम्हीं करितां तेच ते करितात. त्यांचे जातींत ब्राह्मण नाहींत अगत्य, आणि उपाध्येपणा करितां त्यांचें असें नाहीं. मग रिकामी कटकट वाढवावी यांत जीव नाहीं. तुम्हीं कांहीं बोल बोलतां व ऐकतां म्हणून ब्राह्मण तुमचे दारीं बसतात. आमचे दारों कां बसत नाहीत. स्पष्ट तुम्हीं की बोलत नाहीं. ब्राह्मणांजवळ बोलण्याचे कारणाचा ऐवज तरी काय आहे. प्रभूंचे उपाध्यांनीं चार पुस्तकें काढून मोठ्या हंगामाचे सर्भेत पंडित ब्राह्मणांस कायम केलें, तेव्हां तोंर्डे काढून कोणीच कां न बोललेत. दबून घरांत करितात इत- कॅच चांगले. दाब ठेवून त्यांनी वागावें, आणि गंगाधर दीक्षित यांस हा सर्व इतिहास नानाचे बोलण्याचा बोलून पुढे विचार काय करावा ? नाना मनावर घेत नाहीत. तेव्हां आपणास बोलतां येत नाहीं. परंतु हैं ठीक नाहीं. ब्राह्मणांस<noinclude></noinclude> mwoymqhanaftv1k9k231n76hdahl4p0 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/११९ 104 111775 235942 2026-08-21T12:04:42Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235942 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ६३ ) काय सांगावें ? त्यावरून दीक्षितांनी उत्तर केलें कीं, सर्भेत अथवा त्यांचे शास्त्र पाहूं जातां कांहीं ठीक नाहीं. त्यापेक्षा चालतें तें चालावें हें चांगलें. असें करण्याचे नसल्यास तुम्हांकडे स्वामित्व आहे. मर्जीस येईल तें सांगावें. आम्हांस विचारिलें तरी शास्त्राधारें सांगणे पडेल. प्रभूंचा उपाध्या समजून घेईल तें मान्य असें प्रभूस असतां त्यांचीच समजाविशी येथील मंडळी- कोन होणे कठीण आहे. पुस्तकेंही नवीन नव्हेत. गागाभट्टी व यमाजीपंती झाली असतां त्या अन्वयें चाललें नाहीं. त्यांतही वावगे नाहीं. ते नवीनच. तो उपाध्या प्राधान्य म्हणून बोलतो. त्याचे उत्तर होत नाहीं. तेव्हां शास्त्र लटकें कसें कोणी म्हणावें. त्यांचा अनाचार चित्तांत आणून म्हणावे तरी सारे सारखेच. आम्हांत तें तरी कसे काय आहे ! अन्योन्य नवीन आहे असें नाहीं. बहुत समुदायामुळे लोपलें जातें, इतकाच अर्थ. वरकड जेथे ब्राह्मण समजोन आहेत तेथें वावर्गे त्यांजकडेही नाही, असें नाहीं. म्हणोन अनाचार ही म्हणतां येत नाहीं असें ही बोलले. आपण गंगेस ( ? द्यावी हैं नीट. ) केलें तसें चालावें मान डोलवून पत्र २० पो छ २८ रबिलाखर पौष मास. । हरीपंत तात्यांचे पोटांत दुखत आहे. आमचा सर्वांचा निश्चय झाला आहे जे, पंडितांची सभा करून गंगाजळी सभेत ठेवून मागील ग्रंथ पाहून सांगावें. मागील ग्रंथ दूषित असल्यास फाडून टाकावे. तुम्हीं करून द्याल तो श्रीकाशीस नेऊन तेथें मान्य झाला म्हणजे तसेंच चालवू, नाहीतर आम्ही कांहींच करीत नाहीं. मग बलात्कार करितां हेंच निठुर बोलावें, याप्रमाणे गुरूबावांचे संमत आहे. जमादिलावल. पत्र २१ पो छ २ जमादिलावल. पेणकर ब्राह्मण कज्या करीत बसले आहेत. त्यांणी पौष वद्य १० रविवार प्रातःकाळीं तोफेबरोबर वेदशास्त्र गुरूबावांचे घरीं दोन ब्राह्मण बातमीस पाठविले. घरीं आहेत नाहींत म्हणून चौकशी केली, तों दार उघडून बाहेर येतात तो है बसले आहेत, गांठ पडल्यावर चार तैलंग मिळवून त्रिंबकराव तात्या चिटणीस यांजकडे सांगून पाठविलें. त्यांणीं चार माणसें पाठवून आबा तैलंगासमवेत<noinclude></noinclude> hv83499iz7tlcik2hhyezorti7nlynp पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१२० 104 111776 235943 2026-08-21T12:04:54Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235943 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ६४ ) त्यास घेऊन कोटांत आले. हें वर्तमान पेणकरांस समजतांच पन्नास पाऊणशे ब्राह्मण दरवाज्यांत गल्ली रोखून बसले. आबा कोटांत तुमचे घरी आला. हवाली करा म्हणो लागले. तुमचे स्वाधीन करीत नाहीं, असें उत्तर केलें. याजवर ब्राह्मणांनी जमाव केला. आम्हांकडीलही स्वकीय गृहस्थ दोन चारशे मिळाले. गल्लींतून कोणास येऊं फिरूं देईनात नारो महादेव राजश्री बाजीराव भाऊकडेस होता, त्यास गल्लींतून येतांना धरून बसवून घोत्र सोडिलें व जानवें तोडिलें. तो तसाच त्यांजवळ बसला राहिला. वो आया शास्त्री यांणी राजश्री नाना व तात्या यांजकडे आपले मतलबाप्रमाणे सांगितलें. बोलले परंतु ते दिवश मनावर घेतलें नाहीं. ती॥ राजश्री भाऊसाहेब प्रातःकाळींच तात्यांचे वाड्यांत आम्हीं गृहस्थ जमा करून भोजनोत्तर जिवबाचे घरीं बातमी लागतांच गेले. जाऊन त्यांस घेऊन गेलो. . . कारभारी यांस दोन तीन चिय्या पाठविल्या. ब्राह्मण दंगा करितात हे आपल्या राज्यांत ठीक नाहीं. सभा करून धर्माधारें सांगाल त्यास मान्य आहों. त्याचे उत्तर ते दिवशीं आलें नाहींच ते दिवशीं प्रहर- रात्रपर्यंत वाट पाहिली, नंतर गृहस्थ दरवाज्यांतून ब्राह्मणांचे अंगावरून आपआपले घरोघर गेले. एकादशी इंदुवारीं ब्राह्मण जमा झाले. आपले गृहस्थ दहा वीस पन्नास पाऊणशें जमा होऊन दरवाज्यानें वाड्यांत येत गेले. जमाव पुरा होतो हैं पाहून ब्राह्मणांनीं दाटी करून वाड्यांत येऊ लागले. असें होत होतें. ब्राह्म- णांनीं निकर्ष करून मराठी माणसें दरवाज्यांत उभीं होतीं त्यांचीं वस्त्रे व काव्या घेऊन मारूं लागले, इतक्यांत आयाशास्त्री यांचे जावई, दहा वीस तैलंग द्रावीड घेऊन येऊन लगट करून दरवाज्याचे उमन्यावर येऊन बसले, आणि तुम्हीं असें कां करितां तुम्हांशीं कांहीं बोलावयाचे आहे, म्हणून फळीस हात लावून वरकड ब्राह्मणांस इशारत करून दरवाज्याची फळी ढकलली. वाड्यांत जबरदस्ती करून येतात हॅ पाहून दरवाजा लाविला. त्या घालमेलींत जांवई व एक शागीर्द ब्राह्मण आंत आला. दरवाजा लावितां मोठा हुमाव झाला. आंतून शंभर दोनशे माणसे व बाहेरून शेदोनशे ब्राह्मण रेटारेंट करितां मोठा दरवाजा मोडून ते आत आल्यावर दहावीस ब्राह्मण मरतात. ब्राह्मण मेल्यावर आम्हीही राहतों हैं घडत नाहीं. असें समजोन आम्हीं, आपले ज्ञातीचा पांचचारशे जभाव झाला यासह, दरवाज्याजवळ आंतील अंर्गे उभे राहून व दरवाज्याचे भिंतीवर उभे राहून<noinclude></noinclude> 12of1p3l7w4b5ah89duhf1feskii8jb पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१२१ 104 111777 235944 2026-08-21T12:05:08Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235944 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ६५ ) कवलें मारावयास प्रारंभ केला. चुकावून कवलें मारिलीं. तेव्हां ब्राह्मण दरवाजा सोडून मारुतीजवळ गल्लींत व पाटणकर यांचे वाड्याजवळ जाऊन उभे राहून हाका मारुं लागले, कवलांचे मारापुढे येऊं न पावत. तेव्हां आम्हीं दरवाज्यांत येत नाहीं पुढे गल्लीत उगेच वसतों मारूं नका असे म्हणों लागले, उत्तम आहे म्हणोन मना केले. सोमवार एकादशीस जलस्पर्श नाहीं, मग अन्न कोठील. जाहले वर्तमानाच्या तात्यांस व नानास तीन वेळा चिठ्या पाठविल्या. तेव्हां कारकून पाठवून द्यावा याजवरून जिवबा व रावजी आपाजी यांस पाठ- दादोपंत व आयाशास्त्री तेथेच होते. त्यांचीं व म्हणोन उत्तर जासूद आला. विलें. ते तात्यांकडे गेले. यांची बोलणी बहुतच झाली. त्यांतील सारांश तुमचा जो आबा गुरुबावा तो स्वाधीन करा. नाहींतर ब्राह्मण ऐकत नाहीत. अग्रहास पडूं नका. पडल्यास पेंचांत याल. गुन्हेगाऱ्या द्याल. माझं बोलणें नव्हे, सरकार आज्ञा समजोन करावी. तात्याही बोलूं लागले. उत्तर केलें जे, आबा आमचे घरीं नाहींत, कोठें दंग्यांत गेले तें समजलें नाहीं. दोन दिवस अन्न पाणी बंद. ब्राह्मण उठवावेत. आबांचा शोध करून येऊन सांगतील ती विनंती करूं. तुम्ही सरकारांतून काय सांगणे ते सांगा. पेणकर यांचे ऐकणार नाहीं. असें म्हटल्या- वर आयाशास्त्री यांस व पेणकर यांस उठून जावें म्हणून निक्षून सांगितलें. तों तोफ झाली. परवानगीचे प्यादे दिले असतां ब्राह्मण उठले नाहीत. तिसरे दिवशीं त्रयोदशीस जिवबा व रावबा तात्यांकडे गेले. तात्या बोलले आबास कां हवाली करीत नाहीं. लबाड कारभार. परिणाम लागणार नाहीं. म्हणून दाटून बोलू लागले. तेव्हां यांणीं उत्तर केलें जे, तोंड आटपून बोला. तुमचें सोसणार नाहीं. न्यायेंकरून सांगा, अगर सरकारांतून सांगा. त्यास राजी म्हणत असतां दाबतां तरी आम्हीं जिवावर उदार मरतों. मग धंदा रोजगाराची काळजी कोणास. श्रीमंतांचे राज्य सोडून जावयाचें नाहीं. मरून राहूं. डोंचकीं मारा. अशीं निकडीचीं उत्तरें केलीं. नंतर दोन प्रहरीं दादोपंत येऊन ब्राह्मणां- पाशीं बोलून वाड्यांत आले. त्यांणी उपोषित गृहस्थ मंडळी बसली तें पाहिलें. निक- डीची उत्तरें ही समजोन घेतली. आबास हवाली करा म्हणजे ब्राह्मण उठवितों असें म्हणूं लागले. आबा आम्हांजवळ नाहींत व हें घडावयाचे नाहीं म्हणोन सांगितलें तेव्हां ते निघोन गेले. नंतर आमचे प्राण जातात पाणी पाहिजे. पन्नास बाहेर 5<noinclude></noinclude> f2lyw27huedo7ebu718likrcaylsr7u पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१२२ 104 111778 235945 2026-08-21T12:06:11Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235945 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ६६ ) पडोन नदीस जाऊन पाणी आणितो. यांत ब्राह्मणांच्या हत्या होतील. आम्हांकडे शब्द नाहीं. असें नानास लिहून पाठविलें. त्यांणी दादोपंतास नेऊन त्यांस तात्यांकडेस पाठविलें, आया शास्त्री व बाबा फडके व दादोपंत यांस पाठवून दिले. ते दरवाज्याजवळ ब्राह्मणापाशीं येऊन आम्हांस बोलाविल्यावरून दरवाजा उघडून आम्ही गेलो. आंत ब्राह्मण आले. त्यांणीं अतिशयेंकरून पागोटें जाळले त्यांस ऊं द्यावें. ( ? ) म्हणोन शास्त्री यांणीं सांगितलें. त्यावरून पागोटें दिलें. झालें तें उत्तम झालें. तुम्हीं व ब्राह्मणांनीं कांहीं मनांत आणूं नये. उठोन जावें. असें सांगोन ब्राह्मणांस नमस्कार करावा. त्यावरून बोलणें पडोन आमचा गृहस्थ तीन दिवस उपोषित जानवें धोत्र विरहित आहे यांसी काय आज्ञा. व जानवें द्यावें. उत्तम म्हणोन निरोप दिले. ते ब्राह्मण घेऊन गेले. त्यावरून धोत्र पत्र २२ पो।। छ ९ जमादिलावल माघ मास. पेणकरांच्या कज्याचा मजकूर पेशजीं लिहून पाठविला आहेच. त्या आलि- कडे वद्य चतुर्दशीस सायंकाळीं वे ॥ गुरूबावा वे ॥ गंगाधर दीक्षित यांजकडे जाऊन शास्त्री बावनीं मनास आणायास सांगितलें त्यापासून आम्हीं तुम्हांजवळ आहों. पेणकरांनीं दंगा केला म्हणून एकीकडे राहिलों. आतां तुम्हाजवळ आलो. राजश्री तात्यांकडे घेऊन चला, म्हटले. त्याजवरून ते दिवशीं आबा आम्हांकडे आले. उदईक आज्ञा होईल तरी भेटीस घेऊन येतों, म्हणोन कारकु- नाबरोबर सांगून पाठविलें. उत्तम आहे. तुम्हांजवळ असोद्या; आणवूं तेव्हां घेऊन या, असें उत्तर आलें. दुसरे दिवस अमवास्येस गुरुजीस दीक्षित घेऊन तात्यांची भेट केली. भेटल्यावर " हे आमचे ओळखीचे नित्य पंडितांत येत असतात. " पळालां कां" म्हणून विचारिलें. पेणकरांनीं दंगा केला. विशोभा करतील म्हणोन एकीकडे राहिलों. परंतु सरकारांत गंगाधर शास्त्री व त्रिंबक शास्त्री यांजवळ हजीर आहों. आम्हांकरितां यजमानाकडे चौकी बसली ते उठवावी असे बोलले. नानांशी बोलून उठवूं परंतु श्रावणीपासोन कोणाकडे कांहीं करूं नये, असें सांगितलें असतां यजमानाकडे कायें केलीं आहेत, म्हणोन पेणकर म्हणतात. असें रागें भरून बोलूं लागले. पेणकर म्हणतात है मुद्यानिशीं आंगीं लावावें, म्हणजे अवज्ञा झाली ती कबूल करूं, नाहीं तरी सरकार आज्ञेप्रमाणे चाललों आहों. पुढे सांगाल तसें "<noinclude></noinclude> bxbhnrv5ifov7oqaky7lme0qu39zs6m पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१२३ 104 111779 235946 2026-08-21T12:06:28Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235946 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ६७ ) दिलें तें समजूनच करूं असें उत्तर करून निरोप घेतला. गंगाधरशास्त्री यांस तुमच्या जिम्मेस असो द्यावे. म्हणोन निरोप दिला. ते दिवशीं गाद नानास विनंती करून उठवावे म्हणोन दादोपंतास त्यांनी सांगितलें. तो दिवस त्यांची गांठ न पडली म्हणून तसाच गेला. दुसरे दिवशीं परवानगी घेऊन गार्दी उठवून नेले. याज- वर जिवबा तात्यांकडे गेले, तुमचे गुरूबावा येऊन भेटले. मग चोकी उठविण्याविशीं रदबदली कां केली नाहीं. तेव्हां तात्या बोलले गुरूबावा केव्हां भेटले, कोठे होते, हॅ समजलें नाहीं. व चौकी परक्यांची नव्हती चौकीदार जाणारांस जाऊं देतो व येणारास येऊं देतो. मग दिकत ती कोणती ? तेव्हां मर्जीस येईल तेव्हां उठवाल म्हणोन आलों नाहीं. असें बोलिले, तें ऐकून भोजनास गेले. दादोपंत बसले होते. ते बोलूं लागले जे, गोविंदराव बावा रामाजी बावा वेडे नव्हते. नारायणराव साहेबाजवळ लिहून लिहून दिलें, त्याप्रमाणेच वर्तावें. आग्रह करूं नका. म्हणत नाहीं. एक मंत्र व सीक ( ? ) खेरीज करून करावें लिहून घेणार व देणार गेले. त्या मार्गे तात्या आहेत. त्यांचे विचारास येऊन सरकारांतून सांगतील त्याप्रमाणें करूं उत्तर कां करितां ? तात्यावर निमित्त कां ठेवितां ? यजमानास जाऊन सांगतों. सांगतील तसें येऊन बोलू असें म्हटलें. चार घटका बसा, तात्या भोजनोत्तर तुम्हांशीं बोलतील. तुम्हीं सांगितलें हेंच सांगणें होय. असे उत्तर करून निघून आले. त्याजवर द्वितीयेस शास्त्री यांस सांगून पाठवून गुरूजीस नेले. पेणकर ब्राह्मणांशीं पंचमीपर्यंत तुमचा फडशा करून निरोप देऊ म्हणून करार केला होता. ती गडबड आहे. फिरोन दंगाही करणार असें ऐकितों. मुदत सरली. पुढे आज्ञा काय ? म्हणोन विचारिलें. यांत नऊ कलमें असें सांगूं लागले. मुदत झाल्यावरून त्यांची तात्याकडे जाऊन आमची त्यावरून एका दौदिवश सांगूं म्हणोन उत्तर केलें असतां, आजच पेणकर मंडळी दादोपंताचे घरीं जाऊन बसली म्हणोन कळले. त्याजवरून शोधास पाठविलें त्यांस दादोपंतच नानाचे वाड्यांत भेटले. त्यांचे तॉडींची ऐकिले / 1 आहे. पुढे काय होईंक A 1984. तें समजेल तसे लिहूं.<noinclude></noinclude> 0f3daad0a3pliqxuemtbxx2r09i58mw पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१२४ 104 111780 235947 2026-08-21T12:06:41Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235947 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ६८ ) पत्र नंबर २४ पो॥ छ २७ जमादिलावल. - नाना मैराळ व सज्याबरोबरील पत्रे पावलीं, वडगांवचीही पत्रे पावलीं. ग्राम- ब्याचा मजकूर पेशजीं लिहिला. त्याजवर तात्यांनीं जीवबास नानापाशीं नेऊन त्याजपासून पूर्वी नारायणराव साहेबी समजोन केलें आहे. तुमचेही गोविंदराव - बावा व रामाजी बावा सर्व जात होते. त्यांणी समजोनच पत्र लिहून दिलें. त्यास तुम्ही रिकामे ओढितां तेही तसेंच चालावें असें बोलले. असें उत्तर केलें. नंतर तात्यांपाशीं निरोप पाठविला. पडते. त्यास आमचें म्हणणें वावर्गे नाहीं. यांणीं जाऊन सांगतों गंगेस गेले आहेत, त्यांस जें हें सांगणें व करर्णे सर्व ज्ञातीचे म्हणणें सभा करून आमची ज्ञात कोण हैं ठरवून द्यावें. नंतर सरकार आज्ञा, कर्में सांगाळ तशी करणें प्राप्त. परंतु सरकारांतून सांगणें तें विचारें सांगावें. असें म्हणून आले. त्याजवर आणखी जिवबास नेऊन सांगितल्याप्रमाणे पत्र परिच्छिन्न द्यावे. वाढूं नये असें असतां त्यांनी सांगितले, यांणी उत्तर केले हा विचार सर्वाचे मुख्य रामराव बावा चिटणीस ते तेथें नाहींत व नीळकंठराव लिहून आणवू. नंतर सांगणें तें सांगूं म्हणोन आले. हैं समजलेंच. त्याजवर ब्राह्मण येऊन दंगा शास्त्री यांजकडे एके दिवशीं ब्राह्मण बसले. असें चालले आहे. आपा सास- बडास गेले होते. तेही आल्यावर शेवट काय होतो हैं समजेल, नेट सोडिल्यास श्रासतात. जाणोन नेट सर्वांचा चांगलाच आहे. या प्रवाहामुळे कांहींच सुचत नाहींसें झालें आहे. वडिलांचा अशीर्वाद काय शेवटास लावील तें खरें, भार 4 तेव्हां पत्र देत नाहींत करावा असा घाट आहे. आया एक श्रीवर आहे. वरकड कोणी बोलावयास जागा किंवा आश्रय नाहीं हैं. समजलेंच आहे. आबालवृद्ध दगडमार करितात तितके सोसून होईल तसें शेवटपर्यंत पहातां निर्वाह करणार श्री समर्थ. वरकड यातना कोणतीही सोसणें बाकी राहिली नाहीं. झालें वर्तमान. कळावें. होईल तें मागाहून लिहूं. मोठा दुराग्रह. नारायणराव यांनी लिहून घेतलेली यादी त्याप्रमाणें मान्यतेची करून द्यावी. याबद्दल हरत-हेनीं ज्ञातीस कर्माची अडचण व राजश्री हें प्रकरण फंद फितूर वगैरे तुफान आदावती उपमर्द करणें हें सत्ताबळें व ब्राह्मणवाद आणि राजेपणाच स्वामित्व, त्यांचे घरीं अधिकार जबरीमुळे आला. त्याबळे ज्ञातीस त्राता नाहीं .. शास्त्र व विचार न पाहतां उपहास चालला. तेव्हां सर्वांनी विचार केला कीं,<noinclude></noinclude> 7151nqh4xhhcz2xgivfk522zp9w2kmb पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१२५ 104 111781 235948 2026-08-21T12:06:52Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235948 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ६९ ) जे ते जबरदस्ती जुलूम करतील ते सोसावे. जसा प्राण वांचल तसा वांचो. मरेल तो मरो. ईश्वरेच्छा. ईश्वराने डोळे झांकिले. जे दिवशीं उघडून पाहील ते दिवशीं सुदिन, परंतु एकवेळ नारायणरावाचे कारकीर्दीत लिहून घेतलें, तर्षे आणखी देणें हें तरी याउपरी परिच्छिन्न घडावयाचें नाहीं. प्राण गेले तरी जावोत. असा निश्चय होऊन उत्तरें साफ केल्यावरून महालोमहालीं सरकारी पत्र नारायणराव यांचे कारकीर्दीस नऊ कलमें यादी अन्वये पत्रे घातली. याप्रमाणें उपहास मांडला. बडबड झाली. असा सहा वर्षे काल काढला, त्या त्यात निर्वाह कळेल तसा केला, परंतु कबूल किंवा टांकास गुंतणें हैं केले नाहीं. नंतर शके १७१७ राक्षसनामसंवत्सरे सन खमस तिसैन मया व अल्लफ आश्विन शुद्ध १३ त्रयोदशीस माधवराव नारायण प्रधान गणपतीचे दिवाणखा- न्यांतील खिडकींत उभे होते. भाद्रपदापासून भ्रमिष्ठ होतेच. खिडकीतून उडी टाकिली. पाय मोडून मांडीचे हाड मोडले. आश्विन शुद्ध पौर्णिमेस काळ झाला. ग्रामण्य उपद्रव वगैरे समाप्त झाला. राज्यक्रांतीची फिकीरच प्राप्त झाली. नंतर बाजीराव रघुनाथ आले. त्यास वस्त्रें झालीं. आपले ज्ञातिमंडळींनी बाजीराव यांस विनंती केली कीं, सात वर्षे ग्रामण्य पडले, त्यावरून त्याणी आपले हाते विनंती चिटीवर तीन ओळी स्वदस्तूर लिहून दिल्या. चिटी नीळकंठराव रामचंद्र पागे यांचे हातची आहे ती. चिटी नीळकंठराव रामचंद्र याणे बाजीराव रघुनाथ पेशवे यांस विनंती लिहिली ती- शेवेसीं विज्ञापना, आमचे ज्ञातीचें प्रामण्य सात वर्षे पडले आहे, त्यास कैलास- वासी श्रीमंत नानासाहेब व श्रीमंत दादासाहेब व श्रीमंत थोरले माधवराव -- साहेब यांचे कारकीर्दीत मुंजी व श्रावण्या वगैरे संस्कार चालत आले त्याप्रमार्णे पुढे चालवावे. बाजीराव रघुनाथ प्रधान यांचों चिटीवर स्वदस्तूरचीं अक्षर. पूर्वीपासून चालत आलें त्याप्रमाणें चालावयास येईल. नवीन आक्षेप पढला आहे तो मजकडून पडणार नाहीं.<noinclude></noinclude> 0cmh0cdj0iqtbqe22w1aeqzy06j2nmx पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१२६ 104 111782 235949 2026-08-21T12:07:05Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235949 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ७० ) ● या ग्रामण्यासंबंधानें आणखी जे कागद उपलब्ध झाले आहेत ते खाली दिले आहेत:- ( १ ) बाजीराव रघुनाथ पेशवे यांचें पत्रः- वेदशास्त्रसंपन्न समस्त ब्राह्मण धर्माधिकारी ज्योतिषी क्षेत्र प्रयाग स्वामी गोसावी मासी. सेवक बाजीराव रघुनाथ प्रधान नमस्कार सु॥ तिसेन मया तेन व आलफ समस्त दाल्भ्य कायस्थ प्रभु चांद्रसेनीय याचा व पेणकर ब्राह्मण याचा प्रभुचे आचरणाविषयीं कजिया पडून आठ नऊ वर्ष ग्रामण्य वाढले. पेणकर ब्राह्मण याणी सरकारची पत्रे घेऊन प्रांतात पाटवून प्रभुकडील कर्मे बंद केली. सबब प्रभु व ब्राह्मण सरकारांत फिर्याद आले. त्याजवरून उभयतांचे सरकारात लेहून घेऊन शिष्टसमते मनास आणिता पूर्वीपासून प्रभुचे घरी कर्मे चालत आहेत त्याप्रमाणे पुढेही चालवावी असे ठरले. त्याजवरून हे पत्र सादर केले असे. तरी त्याप्रमाणे पुर्वापार गागाभट्टीप्रमाणे प्रभू याजकडे कर्मों चालत आली त्याप्रमाणें पुढेही चालवीत जाणे. दिकत न करणे. जाणिजे छ. २९ जिल्काद . बहुत काय लिहिणे मोर्तब सु ॥. ( २ ) पुण्याच्या ब्राह्मणांचें पेणकर ब्राह्मण यांस पत्र:- - स्वस्ती श्रीमत् सर्वोपयायोग्य वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्राह्मण यांसी. : प्रती नारायण जोशी प्रमुख समस्त पेणकर मुक्काम पुणे याचा कृतानेक शिर सा० नमस्कार विशेष. आपण पत्र पाठविले ते पावले. प्रभुमंडळीकडे कार्य प्रयोजन चालविण्याचा अडथळा आहे त्यास श्रीमंत रा० लक्ष्मणराव तात्या याणीं आम्हास लिहिले होते. त्याचे उत्तर येथून पाठविले आहे. त्याची नक्कल तुम्हाकडे पाठविली आहे. त्याजबद्दल दरबारी गृहस्थाचा जाबसाल पडेल तो आपण करून निभावणी करावी. गागाभट्टीची पोथी साद्यंत प्रयत्न करून आणविली म्हणोन लिहिले त्यास तुमचे लिहिल्यावरून गागाभट्टीचे पुस्तक संपूर्ण पाहिले. ब्याप्रमाणें चाल चालत आली आहे. त्या पुस्तकाअन्वये यथास्थीत आहे. त्याप्रमाण चालवावे. कोणते गोष्टीविषयी दिकत घेऊं नये. तूर्त सरकारांतून सरकार ब्राह्मण चालवावयास देतील त्याचे हातून यथापुर्वक चालत आले त्याप्रमाणे पुढेही चालवावे. कोणेविषयी अडथळा पडू देऊ नये. पूर्वापार चाल चालत आली<noinclude></noinclude> 8ge68nxwx4susiq2vmaxf8msejtgtsi पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१२७ 104 111783 235950 2026-08-21T12:07:37Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235950 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ७१ ) आहे त्याविषयी संशय कोणास असल्यास त्याणी संशयनिवृत्ती करण्यास पुण्यास यावे. संशयनिवृत्ती होईल. कळावे बहुत काय लिहिणे. रविवार. हे विनंती. शके १७०९ लवंग नाम सं० ( ३ ) पेशवे श्रीमंत माधवराव नारायण यांचें आज्ञापत्र :- कार्तिक शु ॥ ९ वेदशास्त्रसंपन्न राजश्री समस्त ब्राह्मण व धर्माधिकारी उपाध्ये जोतिषी प्रां॥ कन्हाड स्वामी गोसावी यांस. . ब ४१७% १४८० सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार सु ॥ तिसैन मया व अलफ को ॥ पेण पो॥ साकसे येथील समस्त ब्राह्मण याणीं हुजूर येऊन निवेदन केले कीं श्रीमंत कैलासवासी नारायणराव साहेब यांचे कारकिर्दीत परभूचे कर्माचरणाविशई सरका- रांतून ठराव करून दिल्हा त्याप्रमाणे त्याणीं वर्तावें. तें न करितां आपला धर्म सोडून मनवी वर्तणूक करून चोरून ब्रह्मकर्मे करितात येविसी त्यास ताकीद होऊन बंदो- बस्त जाला पाहिजे म्हणोन त्याजवरून मनास आणितां पेशजी कैलासवासी तीर्थ- रूप रावसाहेब यांचे वेलेस चौकसी होऊन परभूचे वर्तणुकेविसी कलमांचा ठराव जाला त्या प्रे| त्याणी सरकारांत कतबा लेहून दिल्हा त्यांतील कलम बितपसील, या ठिकाणी आधुनिक पुर्णेकर संशोधकांना आनंदाच्या गुदगुल्या उत्पन्न करणारा व नारायणराव पेशव्याच्या चितेवर पावन झालेला पृ० ३९ वर नमूद केलेला नऊ कलमी कतबा दिलेला आहे. -येणे प्रमाणे नवकलमें लेहून दिल्ही असतां परभू आपले घरीं चोरून ब्रह्म- कमें करितात यामुळे पेणकर ब्राह्मणाचा व त्यांचा कजिया वाढोन परभूचे घरचीं सर्व कमैं बंद जाली त्यास येविसीचा हालीहि विचार करितां परभूचे कर्माचरणा- विशई पेशजी चौकसी होऊन कलमें ठरावून दिल्ही आहेत त्याप्रमाणे त्यांणी वर्तावे ते न करितां आपला धर्म सोडून चोरून मनश्वी वर्तणूक करितात हे आनुचित. पेशजी कलमे ठरावून दिल्ही आहेत तीच योग्य ऐसे शिष्ट संमते ठरोन पुण्यांत परभूचीं घरे आहेत त्यास हुजूर ताकीद करून हे पत्र तुम्हास सादर केले असे. तरी प्रां म॥र येथें परभूचीं घरे असतील त्यांस निक्षूण ताकीद करून सदरहू कलमाप्रमाणे वर्तवीत जाणे. जाणिजे छ. २३ जमादिलाखर आज्ञाप्रमाण. लेखनसीमा. बार.<noinclude></noinclude> q48jmqjxpdogbdamvg44rhpp0i8cs54 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१२८ 104 111784 235951 2026-08-21T12:07:50Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235951 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ७२ ) ग्रामण्यांच्या बखरींतला मजकूर वरवर पाहून आपले मत बनविणा- रांना सकृद्दर्शनीं असें वाटण्याचा संभव आहे कीं नाना फडणीस ग्राम- ण्याच्या भानगडींत स्वतः मुळींच पडला नाहीं, उलट त्यानें बंडखोर ब्राह्मणांना वेळोवेळी समज देऊन ग्रामण्याचे बखेडे करण्यापासून परावृत्तच केले. परंतु कायस्थ प्रभुंच्या धार्मिक हक्कांबद्दल त्याचें स्वतःचे मत काय होर्ते, कायस्थ प्रभूंवर होत असलेला छळ व जुलूम हे वाजवी होते कीं अन्यायाचे होते, हे मात्र स्पष्ट व्यक्त न होऊं देण्याइतकी आपल्या वर्त- नाची सफाई त्याने ठेवली होती खास. तथापि बखरीतील पत्रव्यवहा- राच्या त्रोटक विवेचनांतून दृष्टी काढून, इतिहासाच्या विस्तृत क्षेत्रांत प्रत्यक्ष प्रवेश करून चोंहोंकडे दृष्टी फेंकली तर मात्र असेंच प्रत्ययाला येईल की ग्रामण्याच्या रंगभूमीवर स्वतः तटस्थपणाचा मुखवटा घालून देवपार्टी आणि राक्षसपार्टी यांची तोंडमिळवणी करण्याचा नाना फडणी- सानें जो पार्ट केला तो निवळ पार्टच होय आणि नाटकांतल्या सर्व प्रमुख- प्रमुख पात्रांचीं सूत्रे तोच स्वतः अलिप्त राहून गुप्तपणानें हालवीत असावा. श्रीशिवछत्रपति - वंशज सातारकर यांच्या वेदोक्ताचा प्रश्न इतका हडसून खडसून सिद्ध झालेला असतांनाहि, ज्या अर्ध्या शहाण्या नानानें त्यांच्या घराण्यांतलीं चालू वैदिक कर्मे बंद पाडवून तेथें मुद्दाम पुराणो- 'क्वाचा प्रघात पाडला, तोच नाना चां. का. प्रभुंच्या ग्रामण्यांत अगदी किंचित् धारीष्टाचे होईल. साधूप्रमाणे वागला असेल असें म्हणणें काशीच्या ब्राह्मणांस नानाफडणीसानें जे पत्र लिहिलें त्याचें आलेले उत्तर वर दिलेच आहे. हा इतका उपब्याप नानासारख्या चतुर मुत्सद्यास कर- ण्याचें कारणच नव्हतें. गागाभट्टासारख्या अग्रगण्य पंडितानें ज्या गोष्टीचा निकाल कधींच कायमचा लावून टाकला होता, त्याच प्रकरण पुन्हां काशीच्या पंडितांचे मत घेण्याचे कांहींएक प्रयोजन नव्हतें, ही गोष्ट नानासारख्या साडेतीन शहाण्यांत मोडणाऱ्या मुत्सद्याच्या ध्यानांत येऊ नये हैं विलक्षण होय ! पण वस्तुस्थिती मात्र तशी नाहीं. नारायणरावाच्या कारकिर्दीत सखाराम हरीच्या व निळकंठराव पाग्यांच्या तलखपणानें भेद- रून जाऊन, नारायणरावाला धरण्याच्या कटाची कुणकुण कळली असतो-<noinclude></noinclude> lp8nvib8rogpm2350n4uhcw4ubxam30 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१२९ 104 111785 235952 2026-08-21T12:08:08Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235952 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ७३ ) नाहि खुनाच्या आदल्याच रात्री नाना पुण्याहून सासवडाला पळून गेला. या त्याच्या पलायनाच्या मुळाशीं ग्रामण्याच्या भानगडीचा संबंध असावा असा तर्क आहे. इतिहाससंशोधन जसजसें होईल तसतसे याहि मुधाचे स्पष्टीकरण केव्हा तरी होईल असा भरंवसा वाटतो. परंतु सवाईमाधव- रावाच्या वेळचें जें आज्ञापत्र वर दिलें आहे ते आमच्या या तर्कांस पुष्क- ळच बळकटी आणणारे आहे. सवाईमाधवराव ता. १८ एप्रिल सन १७७४ मध्ये जन्मला. वरील पत्राची तारीख फाल्गुन व॥ १० शके १७११ सन १७८९ आहे. अर्थातच त्यावेळीं सवाई माधवरावाचें वय अवघें १५ वर्षांचें होतें. त्याला मरेपर्यंत नानाचा प्रतिबंध व कांच भयंकर होता. त्याला कोणतीही गोष्ट मुखत्यारीनें करितां येत नव्हती, हें महशूरच आहे. तेव्हां वरील आज्ञापत्र नाना फडणिसाचेंच होय यांत शंका नाहीं. शिवाय असल्या भानगडीच्या प्रकरणांत स्वतंत्र बुद्धीनें आज्ञापत्र काढण्या- इतकें सवाई माधवरावाचें वयहि नव्हतें. सातारच्या महाराजाच्या घराण्यांत वेदोक्त कर्मै बंद करून तीं पुरा- णोक्त विधीनें नानानें चालू केलीं या संबंधानें एक पत्र उपलब्ध झालें आहे तें असेंः-- नाना फडणविसाचें पत्र. श्री. राजश्री बाबुराव स्वामीचे शेवेसी- विनंती उपरी तुम्ही पत्रे पाठविली ती पावलीं राजश्री स्वामी यांची मुंज्य वैशाख वद्य पंचमीस आठ घटकाचे मुहूर्तावर समारंभेकरून जाहाली पुढे लग्नाचा समारंभ उतम जाहाला पाहिजे पाच-सात दिवस अवकाश असावा याजकरिता जेष्ट शुद्ध द्वीतीयेस लग्नाचा तीथीनिश्चय केला आहे पुराणोक्त विधीनें मुंज्य जाहाली येर्णेकरून बाईसाहेब आदिकरोन सर्वास संतोष वाटला किल्याखालीं उतरावयाचा मुहुर्त द्वादसीस योजिला आहे त्यास दोनसे स्वार चांगलें समागमें येक कारकून प्रमाणिक असे मुहुर्तापूर्वी येथे लौकर पाठवावे आज्ञेचे लक्ष धरून पंधरा हजार पावेतों कार्य उरकून घेतो म्हणोन लिहिले तें<noinclude></noinclude> i7ncv12m5gxqt8wez6r67q9w44kqu8a पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१३० 104 111786 235953 2026-08-21T12:08:21Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235953 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ७४ ) सविस्तर कळलें जैसीयास श्रीमंत माहाराजाची मुंज्य वद्य पंचमीस पुराणोक्त विधिकरून बाईसाहेबांस संतोष वाटून जाहाली ही गोष्ट तुम्ही फारच उत्तम केली.. ........... जेर्णेकरून चांगले दिसे ते तुम्ही कराल हेच समजले आहेत॥ छ. २३ र॥खर हे विनंती. पै॥ छ, २४ र॥खर. ( प्रो. डोंगरेकृत सिद्धांतविजय, परि. पू. १०६. ) आमच्या जवळील एका अप्रकाशित बखरींत खालील मजकूर आहे:- :- माधवराव नारायण पेशवे यांचे कारकिर्दीत काशिनाथ आबा गुरुबोवा याणी नाना फडणीस व हरिपंत फडके याणीं चांद्रसेनीविसी दुराग्रह करू नका तुम्हास पाच हजार रुपयेचा गाव इनाम करून देतो बोलले. ते न ऐकता व्रत्तीचा लोभ धरून पंडितास कुंठीत केले. तेव्हां बाजीराव पेशवे याणी धर्म चालवण्याविसी पत्रे दिल्ही. दुसऱ्या एका अप्रकाशित बखरींत माहिती आहे ती :- ( नारायणरावाची चिठी दादासाहेबानीं सखाराम हरीस परत दिली ) है हरीपंतास माहीत होते. त्याणी व आपा बळवंत याणीं एकविचार करून नाना फडणवीस याजला समजाविलें कीं ब्राह्मणांचा आणि प्रभुंचा कांहींच भेद सम- जुती येत नाहीं. याजकरितां त्याजला आचाराविषयीं शिक्षा जाली पाहिजे. येविषयों यमाजी शिवदेव याचे कारकिर्दीत ग्रामण्य जाले. ब्राह्मण बहुत मिळाले परंतु ज्ञातनिर्णय जाला नाहीं. भाऊसाहेब पाणपतास जातां या लोकांस बोला- विले असतां बराबर गेले नाहीत. असे उन्मत्त. यास्तव परत आल्यावरी समाचार घेऊं बोलले ते बहुतेकांचे श्रवणी आहे. आज्ञा जाली असतां त्यांचे शब्दापासून व धर्मसंस्थापनेपासून मुक्त होऊ. असें बोलता नानानीं उत्तर केलें कीं या गोष्टीचा साहस ज्याणी केला त्याचे कल्याण जाले नाहीं. भाऊसाहेब परत कोठे आले. तेव्हां तुम्ही आग्रह धरू नये. त्यासमयी हरीपंतानी पुन्हां उत्तर केले की ती गर्दी जाली त्यांत आपण होता. केवळ प्रभुमुळे नाश जाला. सर्वांचा एकवेळ समाचार ध्यावा असे मनांत येते. आज्ञा जाली पाहिजे. नाना भिडेमुळे उगेच राहिले. हरिपंतानी पडते फळाची परवानगी घेऊन प्रांतांत कागद पाठवून ब्राह्मण पुण्यास जमा करून ग्रामण्य केलें. पुढें त्रिंबकराव तात्या चिटनिवीस याचे बाब्यावरी ब्राह्मण चालोन जाऊन कलागत केली. मारामार होऊन ब्राह्मण श्रीमं-<noinclude></noinclude> 3elafawam59kim0szpmllrf6snmzox5 वर्ग:Formatting templates 14 111787 235954 2026-08-21T12:11:55Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:Formatting templates 235954 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:लेखन त्रुटी असणारी पाने 14 111788 235955 2026-08-21T12:12:01Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:लेखन त्रुटी असणारी पाने 235955 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:Template namespace templates 14 111789 235956 2026-08-21T12:12:09Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:Template namespace templates 235956 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:Internal link templates 14 111790 235957 2026-08-21T12:12:14Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:Internal link templates 235957 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:Lua-based templates 14 111791 235958 2026-08-21T12:12:20Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:Lua-based templates 235958 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:Templates using TemplateData 14 111792 235959 2026-08-21T12:12:26Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:Templates using TemplateData 235959 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:Modules subject to page protection 14 111793 235960 2026-08-21T12:12:31Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:Modules subject to page protection 235960 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:Headers missing parameters 14 111794 235961 2026-08-21T12:12:37Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:Headers missing parameters 235961 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:Marathi 14 111795 235962 2026-08-21T12:12:45Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:Marathi 235962 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:Username internal link templates 14 111796 235963 2026-08-21T12:12:53Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:Username internal link templates 235963 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:Typing-aid templates 14 111797 235964 2026-08-21T12:13:00Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:Typing-aid templates 235964 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:Pages with TemplateStyles errors 14 111798 235965 2026-08-21T12:13:05Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:Pages with TemplateStyles errors 235965 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:Project-भाषेप्रमाणे वापरकर्ते 14 111799 235966 2026-08-21T12:13:10Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:Project-भाषेप्रमाणे वापरकर्ते 235966 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:Template documentation 14 111800 235967 2026-08-21T12:13:29Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:Template documentation 235967 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:1909 works 14 111801 235968 2026-08-21T12:13:40Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:1909 works 235968 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:Pages to be merged 14 111802 235969 2026-08-21T12:13:47Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:Pages to be merged 235969 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:संगीत शारदा (नाटक) 14 111803 235970 2026-08-21T12:13:54Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:संगीत शारदा (नाटक) 235970 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:संदर्भ चुका असणारी पाने 14 111804 235971 2026-08-21T12:14:05Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:संदर्भ चुका असणारी पाने 235971 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:कविता गजाआडच्या 14 111805 235972 2026-08-21T12:14:11Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:कविता गजाआडच्या 235972 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:कोश साहित्य 14 111806 235973 2026-08-21T12:14:15Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:कोश साहित्य 235973 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:अमृतानुभव 14 111807 235974 2026-08-21T12:14:23Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:अमृतानुभव 235974 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:उपनिषदे 14 111808 235975 2026-08-21T12:14:29Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:उपनिषदे 235975 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:गीतारहस्य 14 111809 235976 2026-08-21T12:14:33Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:गीतारहस्य 235976 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 सदस्य चर्चा:Mitali pawar 3 111810 235977 2026-08-21T12:54:08Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 235977 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Mitali pawar}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १८:२४, २१ ऑगस्ट २०२६ (IST) rb6zikuygl3rvojbugp3ryinttwidxj सदस्य चर्चा:Maniabcd 3 111811 235978 2026-08-21T15:11:52Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 235978 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Maniabcd}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) २०:४१, २१ ऑगस्ट २०२६ (IST) i43yza7q07oavm5diwrc0ib0ht2a4zk पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१३१ 104 111812 235979 2026-08-21T15:36:06Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235979 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ७५ ) ताकडे रुबरू फिर्यादीस गेले. सवाईमाधवराव पेशवे याणीं तुम्ही परभारे जाऊन कलागत करून मार खाता आणि फिर्यादीस येता. आम्ही त्याजवर जुलुम कसा करावा तुम्ही दांडगाई करून त्यांचे घरी का गेला. आम्हास विचारू नका. तुम्ही ते मरा असे बोलल्यावरून त्याणी तीच रजा जाली मानून पुन्हा जाऊन दगड नल्ये घरावर फेकू लागले. घरांत वागण्यास अडचण धोंडा बसण्याचे भय होऊन त्याचे वाड्यांत सात आठसे स्वज्ञात होती त्याणी सोडगी जळाऊ लाकडे आणिली. त्यांतील एक एक उचलोन धावले. आणि मारीत गणपतीचे दरवाजापर्यंत काढून लाविले. मोठा दंगा माजला. सरकारांत जाहीर जाले. चिटणीस, पोतनीस, निलकंटराव, हैबतराव, शंकर नारोलकर, खंडेराव दौलत वगैरे बोलावून नेऊन विचारले. याणीं सांगितले प्राणच घेण्यास ब्राह्मण आल्यावर साप जंगलात राहतो परंतु सेपुट उडवले म्हणजे चावतो. तसे आम्हास मारू लागल्यावर त्यांचे तोंडाकडे पाहणे कसे घडेल ? या करितां मारले. आतां धणी आहांत पाहिजे तसे करावे. ऐकून घेऊन तुम्ही पंचाइतिस राजी शास्त्रार्थास आहा कीं नाहीं. याणीं उत्तर केले की गीता गंगा ठेवून पंडित सांगतील त्यास कबूल आहो. बरे म्हणून उत्तर जाले. विचार करितां रामशास्त्री याणी उत्तर नानास दिल्हे कीं त्यांचे स्त्रियानों पाक केला असतां आपण जाऊन जेवावे त्याणी वाढावे त्यांत भेद नाहीं. ते आपण एकरूप असें सांगता सभा करणें राहिले. पुढें माधवराव नारायण हवेली वरून पडले, वारले. नंतर बाजीराव रघुनाथ आले त्याणी सनदा माहालो- माहाली देऊन मोकलीक केली. रा. वि. का. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधनें खंड ६ यांत ज्या दोन जुन्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत त्यांतील मजकूरः--- (१) लेखांक ४४४. ग्रामण्य माधवराव नारायण शके १७१४ ता॥ १७१८ काशीहून पत्रे सर- कार श्रीमंतास आली. नंतर ( आपाशास्त्री ) पंचाईत झाली. सोडचिठ्ठीचीं पत्र बाजीराव रघुनाथ यांची झाली. एकवेळ याद जाली राहिली. दुसऱ्यानें पत्रे जाली, (२) लेखांक ४५९.<noinclude></noinclude> 2qxraj3u5tnf3e4pmc5vsg1m0lpv85s पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१३२ 104 111813 235980 2026-08-21T15:36:29Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235980 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ७६ ) पेशव्यास राजधानी प्राप्त झाल्यावर संपूर्ण ब्राह्मणमंडळी वेदविद्याअधीत. - क्षत्रिय चांद्रसेनीय लेखन विद्येत प्रवीण उदरनिर्वाह करून होते. सबब बराब- रीने वागले. चांद्रसेनीय थोडे, ब्राह्मण फार म्हणून द्वेष वाढला. परंतु कर्म- लोप जाइला नाहीं: आपाजी यशवंत बिरवाडी त॥ रायगड, पेणचा मामला सरकार अमलांत ब्राह्मणांनीं दंगा केला म्हणून सरकार हुकूम मार्गाचा सांगता दुराग्रहावर येऊन गैरसमजूत हरी बल्लाळ फडके यास समजाऊन प्रामण्य केले. तेव्हां रामशास्त्री प्रभुणे माहुलीकर यास नाना फडणीसानीं चिठी पा॥ याचा शास्त्रार्थ कसा ? त्याचे उत्तर त्यांनी पाठविले या करण्यानीं फार मेले यश आले नाहीं. आपण कजियांत पडूं नये. तेव्हां याची प्रचीत पाहणे, हरीपंत बोलोन, शके १७०९ प्लवंग संवत्सर, सनसमान समानीन मया व अलक, उत्पन्न केले. शास्त्री वर्तमान तावत्काल ग्रामण्य जालें नाहीं. बंद होतें नंतर शके १७११ कार्तिक शु || ३ रामशास्त्री वारले. आपाशास्त्री अधिकारी जाले न्यायाधिशांत. तेव्हां सनदा पाठवून कर्म बंद केलें. अप्रहास हरीपंत पडले. आपा- शास्त्री यास आरोप आणला. त्यानीं सन्यास घेतला. शके १७१६ आनंद- नाम संवत्सरे ज्येष्ठ शु॥७. नंतर माघमासी मोंगलावर श्रीमंताची स्वारी तयारी झाली. खर्ज्यावर फत्ते झाली. आश्विन शु || १२ श्रीमंतानीं उडी टाकली. पुढे चिटणीस व निळकंठराव व रावजी आपाजी यांनी बाजीराव प्रधान यांची रजा घेऊन पत्रे सरकारचीं माहालोमहालों घेऊन कर्म मोकळे केलें. त्या शा- ख्यांत पंडित त्यांचीं नांवें:- १ बाळशास्त्री टोकेकर. १ नरसिंहशास्त्री गुर्जर १ परशरामशास्त्री १ रामचंद्र दिक्षित बाम यांनीं सनदा चांद्रसेनीस शके १७१९ पिंगलनाम १ त्रिंबकशास्त्री. १ सूर्य नारायणशास्त्री. १ बाळशास्त्री चंदावरकर. १ त्रिमलाचार्य. संवत्सरे समान तिसैन मया काशीकरांनीं पत्र पाठविलें. अलफ वैशाख मास पुढें आपाशास्त्री काशीस गेले. त्याचें उत्तर इकडून गेलें. पुढें शके १७३९ इंग्रजी झाली.<noinclude></noinclude> fmybxeoa0801gsqi3dkvv2h5crapsqa पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१३३ 104 111814 235981 2026-08-21T15:36:50Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235981 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>सोनं भावनालय, ग्रामण्य दहावें. चिंतामणराव पटवर्धन व नीळकंठशास्त्री थत्ते यांचें ग्रामण्य. शके १७४९ इ. स. १८२७. प्रतापसिंह महाराज कारकीर्द नीळकंठशास्त्री थत्ते व बाळाजीपंत नातू व चिंतामणराव आपा पटवर्धन सांगलीकर हे प्रमुख होऊन ग्रामण्य केले यांतील हांशील. करून घेऊन शास्त्रग्रंथ मिळवून व तुमचे नीळकंठ शास्त्री थत्ते यांणीं उद्योग मनांत आणिला जे, बडोद्यास विठ्ठलराव देवाजी प्रभू गायकवाड यांचे दिवाण यांजकडील जीवनराव मल्हार प्रभू वकील निसबत गायकवाड यांशीं बोलणें घातले जे, विहलराव दिवाणजी हे दैववान निघाले. बहुत धर्म करीत आहेत. आपले ज्ञातींत कुलदीपक झाले आहेत. त्यांस ज्ञाती- विषयीं पेशजीं ग्रामण्यें बहुत झाली. परंतु निर्णय खास ठरून झालें नाहीं, त्यास मी अनुकूल आहे. सर्वत्र अनुकूळ ज्ञातीपाशी असतील तेही आणवावे. आणि निर्मळ कर्म, धर्म, चांद्रसेनी ज्ञातीचे जे तुमचे आहेत ते ठरवून सर्व सम्मतांनी करून देतों. कांहीं धर्म, खर्च असा जो करितात तो माझे विद्यमानें, या निमित्तें केलें असतां ज्ञातीचा उद्देश सत्पात्री धर्म यथायोग्य होईल. व मलाही काशीस जाणें आहे, त्या मार्गे येईन माझा सत्कार होऊन काशीयात्रा परिपूर्ण होई अशी संभावना व्हावी. बहुत कांहीं म्हणणें आहे असें नाहीं. पांचपंचवीस हजार आपण केले असतां सहजी होईल. याप्रमाणें सफाईचीं बोलणीं केलीं. यावरून यांणीं उत्तर केले कीं, मी सर्व कच्चा आपला मनोदय लिहितों परंतु आपले आशीर्वाद पत्र असावें. म्हणजे माझे लिहिण्यास नीट पडेल. त्याजवरून नीळकंठ शास्त्री यांणीं पत्र लिहून दिलें तें विलराव देवाजी यांचे नांवचें. मजकूर - कोकणांत कांहीं खटलें पडलें अमृतराव बाबा व राजश्री जीवनराव दिवाणजी यांस विदित केला. त्याविशीं ग्रंथ शोध करीत आहों. त्या प्रांतीं याचा शोध आपलाही त्या ग्रंथांवरून विचार असेलच शोध करून इकडे रवाना करावा. त्यांत चिरंजीव म्हणोन पिता पुत्रवत् आहेत तो मजकूर चिरंजीव राजश्री करून ठेविला असतां उपयोगी फार होईल येविशीं लिहून काय कळवावें.<noinclude></noinclude> b7j8sxor96m75os24ndy9pylpseoidf पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१३४ 104 111815 235982 2026-08-21T15:37:02Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235982 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>झालें हें नीट न झालें. ( ७८ ) म्हणोन नीळकंठ शास्त्री यांचे पत्र ..... नंतर सखाराम हरीचे पुत्र रामराव आण्णा देशीं आले होते. ते परत बडोद्यास जातां ते विहलराव दिवाणजीचे व्याही त्यांस अमंत्रण करून भोजनास नेऊन पोशाख दिला. आणि या ज्ञाती- प्रकरण विलराव दिवाणजीस बोलणेंचे पर्याय सर्व मजकूर लिहून बडोद्यास रवाना केले आहेत. त्यावरून दिवाणजीस बहुत संतोष व आवड होतीच. शास्त्री- बावांशीं बोलणें केलें. शास्त्रीबाबांचे बोलणें पडलें जे, सर्व अनुकूल समाधानें करून जे अनुकूल होतील त्यांची संमर्ते करून घ्यावीं. असें सांगितलें. त्याज- वरून राघवाचार्य रामानुज आदिकरून यांचे शाख्यांची विवक्षा होऊन अनुकूलता झाली. आणि संमतांची याद शास्त्रनिर्णय शास्त्रार्थ चांद्रसेनीय ज्ञातीचे ठरावून लिहून दिलें याजवर नीळकंठ शास्त्री थत्ते यांस है सर्व वर्तमान कळल्यावर त्यांचें बुद्धीस भ्रंस झाला की, आपणांस लाभ मनाजोगा होत नाहीं व आपण आपले हात राखून दाब ठेवून उपकार दाखविणें, जरब देणे, हें कांहीं राहिलें नाहीं. याजवरून जीवनराव वगैरे यांस बोलावून नेऊन बोलणें केलें जे, तुम्हीं राघवाचार्य प्रमुख मंडळीच्या संमतांची याद केली, याजवरून कांहीं शास्त्री मंडळी वगैरे आमचे ज्ञातीचे यांणी फाट खाल्ला आहे कीं, ते सर्व मंडळीस अनुकूल करून शास्त्रार्थ वगैरे करण्याचें कारण काय ? आम्हीं पांच सात मंडळी व आपण मिळून याद ठरवून दिली असती. याजवर आम्हांशी व आपल्यासारिखे महापंडितांशीं बोलावयाचे सामर्थ्य पृथ्वींत दुसरें कोणास आहे ? त्यास असें करणें केलेंत, यामुळे फाटाफूट होती असें दिसतें. मला या मंडळींत बसणें प्राप्त येईल उपाय नाहीं. असें बोलल्यावर यांणी उत्तर केलें कीं, सर्व आमची मदार तुम्हांवर तुम्हीं हैं सर्व उपस्थित करून हल्लीं हें सांगतां याजवरून आश्चर्य वाटतें, आपले मनांत काय आहे तें सांगावें. त्याजवरून उत्तर केलें कीं, असें तुम्हीं म्हणतां त्यास मी कांहीं तुम्हांस सांगितलें नाहीं. व बोललों नाहीं. तुमचा लबाड कारभार, माझा मला विचार पाहणे प्राप्त. तुम्हीं मजकडे येऊं नये. माझे गळां पडूं नये, या उपर तुम्हीं बोलणीं बोलूं लागल्यास मला कळेल ती रचना आतां करणें प्राप्त आहे. असें अंती संतापून नीतिमानावर जाऊन यांस निरोप दिला. नंतर यांणीं राघ- चाचार्य आदि शास्त्रीमंडळ यास हा मजकूर श्रुत केला. शास्त्रीबावा अनुकूळ<noinclude></noinclude> kf85r4b55on7nm8e25a8t5nh5yy47fv पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१३५ 104 111816 235983 2026-08-21T15:37:15Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235983 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ७९ ) , होऊन इतका ग्रंथ करवून हल्लीं नाश करावयास प्रवृत्त होतात, याजवरून है या सर्व मंडळीनी निश्चय करून सांगितले कीं, नीळकंठ शास्त्री याचे बडोद्यांस बजिन्नस दस्तऐवज असतां आपणच उद्भव करून असे मत्सरपणास प्रवर्तलां त्यास आम्ही सर्वत्र अविद्वान आहोत आणि ते विद्वान आहेत असें नाहीं व आम्हीं जें केलें तें शास्त्र पाहून विचक्षणा करूनच केलें आहे. काय आम्हांशीं बोलतील त्याचे उत्तरास आम्ही हजर आहोत. नीळकंठ शास्त्री यांचे व्याही बाळाजीपंत नातू हे इंग्रेजी सरकारांत पेशवे दरबारी यामुळे पटवर्धन रास्ते, ढंबढरे आदिकरून मुत्सद्दी मातबर व कोकणस्थ ज्ञाती, शास्त्री पंडित हा तट; व राघवाचार्य रामानुज व वज्रक शास्त्री आदि पंचद्रविड मोठे विद्वान त्यांत राघवाचार्य इंग्रेजी सरकारांत शाळेच्या कामावर मुखत्यार व चिंतामण दीक्षित व वज्रटंक शास्त्री व सखाराम शास्त्री व नारायण शास्त्री प्रभृति मंडळीचा हा येक तट होऊन दुफळी झाली. ते आपल्या मंडळीच्या संमताच्या यादी करूं लागले. करवीर स्वामी पुण्यास जाण्याचे बेतार्ने नगरानजीक किल्ले सातारा या मार्गे जाण्याचे अशा बेतानें क्षेत्र माहुली मुक्कामी आले, तेथें श्रीमन्महाराज राजश्री छत्रपति स्वामीची स्वारी शके १७४७ ज्येष्ठ व॥ एकादशीस श्रीकृष्णास्नानास गेली. तेथें श्रीस्वामीचें दर्शन घेतले. स्वामींनी पोषाख तीवर दुपेटा जवाहीर कंठी शिरपेंच प्रसाद दिला. साता-यांस येण्याविशीं आमंत्रण केलें. सरकारस्वारी आली. दुसरे दिवशीं मुत्सद्दी मंडळी पंडितराव व शास्त्री सारे सामोरे जाऊन आणिले. ठकार दीक्षित यांचे वाड्यांत जागा देऊन ठेविले. सामान सरंजाम सरकारांतून दिला. दुसरे दिवशीं स्वामींनीं मुत्सद्दी मंडळी यांचे घरीं जावें. पादपूजा घ्यावी. असें ठरल्यावरून पंडितराव यांचे घरीं गेले. बळवंतराव चिटणवीस यांणी ही विनंती केली. तो स्वामींनीं सांगितलें कीं, कोठें जाऊं नयें. असें महाराजांनी सांगितले तेव्हां कसें करावें ? आहों. भिक्षा घेतली. भोजन झाले आहे. आम्हीं बोरगांव जैतापुरीं गेलों त्याजवरून महाराजांस विनंती खरें परंतु सर्वांचेच घरीं जावें केली. तेव्हां आज्ञा झाली कीं, सांगितलें होतें असे सांगतों म्हणोन त्यांजकडील कारकून गोविंदराव हणमंतराव यांस बोलावून सांगितलें. त्याजवरून अमात्यपंत गोविंदराव दिवाण यांचे पुत्र, दाजी उपाध्ये, केशवराव अगटे, नाना अगटे, बळवंतराव बक्षी यांचे घरीं स्वामीची स्वारी<noinclude></noinclude> l481t4dwrqwk6ouxsfa4p7dfpxgeue8 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१३६ 104 111817 235984 2026-08-21T15:37:28Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235984 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ५० ) तेव्हां काका दीक्षित घरों दुजोडी व माजघर भोज- जाऊन पादपूजा झाली, पुनः बळवंतराव चिटणीस यांणीं विनंती केली कीं, स्वारी घरी यावी, मंडळीचें भोजन व्हार्वे, पूजा घ्यावी, यास दिवस मुकरर करून सांगावें. त्यास काका दीक्षित व्यास ही तेथे होते. त्यावरून उद्- ईक शुक्रवारी आषाढ शुद्ध १ प्रतिपदेस सरकारास मेजवानी आहे. द्विती- येस ब्राह्मणमंडळीस भोजन आहे. तृतीयेस रविवारी येतो अशी आज्ञा झाली. त्यावरून तरतुदीस लागले. आणि शुक्रवारी पुनः जाऊन अमंत्रण केलें. दीक्षित ही होते. ते बोलले कीं, जागा स्थल पहावें. चार पाणके येथील येतील त्यांस जागा पहावी. आच्यारी गांवांतील करावे तेहे आल्यास उत्तमच आहे. तेव्हां काकास सांगितलें कीं तुम्हीं जाऊन पहावें व करावें. येऊन जागा पाहून सोप्यांत स्वयंपाक करावा मागील नास जागा करावी. पूजेस जागा पुढील सोप्यांत करावी. असें ठरवून गेले. नंतर तूप शालजोडी धोतरजोडा स्वयंपाकाचें साहित्य होऊन सडासंमार्जन केलें. तेव्हां क्षेत्रमाहुली येथील शिष्ट दहापांच यांस आमंत्रण केलें. गांवांतही कोणा- कोणास आमंत्रण केलें. आपल्या सर्व ज्ञातीस स्वामीची पूजा होती, प्रसादास यावें; म्हणोन आंमंत्रणे केलीं. सरकारास वर्तमान कळविलें. शनवारी संध्या- काळीं आच्यारी पाणके येणार ते यावे, म्हणोन निरोप पाठविला. तेव्हां स्वामींनीं बाबाजीपंत सरकारचे कारकून तेथें कामावर ठेविले होते, त्यांस सांगि- तलें कीं, तुम्हीं कारखाना अच्यारी पाणके भांडी घेऊन जाऊन तरतूद करावी. ब्याजवरून बाबाजीपंत घरीं आले. जागा पाहून सामान भाजीपाला पाहिला. भांडी पाठवून देतो आणि दहा घटिका रात्रीस येतो म्हणोन गेले. भांड्यांस माणसें पाठविलीं. त्याणीं ठकाराच्या वाड्यांतून भांडी पाठविलीं. नंतर दोन घटकेंनी बाबाजीपतांनीं चिट्टी पाठविली कीं, उद्या रविवारों सरकार मंडळीस मेजवानी , , आहे आपण तरतूद करूं नये, भांडी परत पाठवावी अशी आली. तेच समयीं चिट्टी घेऊन दहा घटिका रात्रीस बळंवतराव व बाबाजी सरकारवाड्यांत गेले. सरकारास झालें वर्तमान काकादीक्षित सुद्धां समजाविलें. आमंत्रण करून स्वयं- तो चिंतोपंत भाटे व पाक चालीस लावण्यापर्यंत येऊन अशी चिट्टी आली. विसाजीपंत शेवड्ये खाली होते त्यांस बोलाविलें. दीक्षितांस विचारिलें कीं, ब्राह्मण यांचे घरी जेवतात कीं नाहीं. आजपावेतों कसें केलें. तेव्हां दीक्षित<noinclude></noinclude> rj36a0fug4cy8c7ft38j2bj516w6306 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१३७ 104 111818 235985 2026-08-21T15:37:43Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235985 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ८१ ) . व चिंतोपंत व विसाजीपंत यांणीं उत्तर केले कीं, उत्साह महोत्साह होतात, हजारो ब्राह्मण जेवितात. आम्हीं जेवितों. हैं वर्षोनवर्ष चालत आले आहे.. असें असतां स्वामींनीं कबूल करून असे कां सांगावें. दीक्षितांनी सांगितलें की, हा कालपर्यंत कांहीं दिक्कत नव्हती. चार घटिका रात्रीस कसे निर्माण झालें. नकळे. असे म्हटल्यावरून स्वामीकडील कारकुनास बोलावूं पाठविलें. नागो देवराव व हणमंतराव आले, त्यांस बसवून वरकड मंडळीस बाहेर बसविलें, आणि त्यांचे समक्षच बोलणं झालें कीं, बळवंतराव यांचे आमंत्रण घेऊन स्वयंपाकाची तरतूद होऊन शेवटीं असें फसविलें. याचे कारण काय ? तसेच करणें तरी अगोदर सूचना करावयाची होती. हैं ठीक न केलें. तेव्हां नागो देवराव व हणमंत - राव यांणीं उत्तर केलें कीं हैं सरकारापर्यंत कशास आणिलें, स्वामीपाशींच यावे तेच कृपा करतील, सरकारांनों उत्तर केलें कीं हैं झालें हैं नीट न झाले. बळवंतराव यांचा बखेडा झाला याची वाट काय ? त्यांणी अदालतीत अर्जी दिल्यास तुम्हांस जाबसालास यावे लागेल. या कामाचा फैसला झाल्याखेरीज स्वामींचें जाणे कसे होईल. इंग्रेज बहादूर तरी मनास आणतील, वर्षोंनवर्षे वहिवाट चालली ती कशी मोडतील. आमचे राज्यांत तरी होणारच नाहीं. पुण्यांतील दाबास आम्हीँ भ्यावयाचे नाहीं अशीं स्पष्ट उत्तरे झाली. कारण नाहीं. बळवंतराव तेथे आले असतां स्वामी कृपाच - , त्यास इतक्याचें करतील. फार चांगलें आहे. आपसांत समजले असतां आम्हांस गरज नाहीं. बळवंतराव यांस जावे अशी आज्ञा केली. त्याजवर काका दीक्षितांस घेऊन स्वामीकडे गेले. दर्शन घेतलें. वचन दिले त्याप्रमाणे शेवटास नेलें. पेशजीं तरतूद सर्व झाली.. म्हणोन विनंती केली. त्यास बागेत भोजन करावे. येतो. बोलले. तेव्हां स्वयंपाक डोईवर घेऊन जावयाचें कारण नाहीं. म्हटल्या- प्रमाणें येणें व्हावें किंवा कसे ? आज्ञा व्हावी. त्यावर काकादीक्षित सांगतील. तसें करूं. आमचा गुंता नाहीं म्हटलें, कारभारी यांणी दीक्षित आपणांशों बोलता, म्हणोन बाहर बोलाविले. आम्हीं विनंती करतो. घडेल असे बोलले. दीक्षितांनी उत्तरें करणें तीं साफ केलीं. तुम्हीं ठीक न केलें. बोलावयाचें नाहीं. घडेल तसें घडो. त्याजवर कारभारी आम्हांस यांत स्वामीकडे गेले. स्वामींनीं विचारिलें कीं, तुह्मांस राजांनीं कां बोलाविलें होतें ? तरी यासाठीं वः<noinclude></noinclude> tpn82rjlw8d9v7kc39batoc2fl3u34n पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१३८ 104 111819 235986 2026-08-21T15:37:57Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235986 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ८२ ) बोलाविलें होतें. चिट्टी कोणी पाठविली ? ती आम्हीं पाठविली. तुम्हांस कारण आतां मजला कां विचारितां ? कारभारी बाहेर आले. आणि चार घटिका अधिक- स्वामी पहाटेस तीन स्वयंपाक चालू कर- ● दीक्षित काय पडलें होतें ? लबाड कारभार का करावा ? कळेल तसे तुम्हींच सांगा, म्हणोन निंदा केली. सांगितलें कीं, आतां निद्रा करावी, कांहीं चिंता करूं नये. उण्या लागल्यास लागूं द्याव्या. रात्र दोन प्रहर होईल. घटका रात्री उठतात, तेव्हां बोलून आम्हीं आज्ञा घेऊ. ण्याची आज्ञा घेऊन सांगून पाठवितो. आतां आपण घरास जावें. चलावे बोलले. त्यावरून तीन प्रहर रात्रीस शनिवारी घरी आले. याप्रमाणे वर्तमान झालें हें सर्वत्र मंडळीस बोलावून आणून सांगितलें आणि सदरहू मजकूर लिहिला. तों पाहटची तोफ झाली. नंतर हरभट अकले यांस दीक्षि- तांकडे पाठविलें कीं, पहाटेस निरोप यावयाचा तो अद्याप आला नाहीं. याचे कसें व श्रीमन्महाराजांकडे विठ्ठल अमृत यांस पाठविलें कीं, आज्ञेप्रमाणें स्वामीकडे जाऊन तीन प्रहर रात्रीस आलो. असें वर्तमान झाले म्हणोन विनंती करावी ती केली. हरभट काकादीक्षितांस घेऊन स्वामीकडे गेले. दोन तीन घटिका दिवस आला. बळवंतराव यांजकडे अद्यापि निरोप गेला नाही. उशीर झाला म्हणोन बोलले. तेव्हां स्वामीनीं उत्तर केले कीं, तुम्हीं गांवांतील चार शिष्ट बोलवा. इकडील मंडळीही येईल. आम्हीं येतो. असें सांगितल्यावरून काका दीक्षित वाड्यांत आले. महाराजांस विनंती स्वामींनी याप्रमाणे सांगितलें म्हणोन केली. त्यावरून सरकारचें बोलावणें बळवंतराव यांस आलें. बळवंतराव वाड्यांत आले. सरकाराने दीक्षितांस सांगितलें कीं, तुम्हीं येथील शिष्ट कोण सांगणे ते सांगावें. आणि स्वागीस नेऊन पूजेचा समारंभ करावा. बळवंतराव यांस आज्ञा केली कीं, स्वामी येतात, मंडळी येतील, प्रहर दिवस आला. जल्दी करून अटोपावें, बाबाजीपंत सरकारचे कारकून यांस जाऊन तरतूद करावी. अशी आज्ञा केल्यावरून बळवंतराव घरी आले. स्वयंपाक आच्यारी, पाणके, दोन प्रहरी स्वामीस बोलवावयास बाबाजी चिट- स्वामीची स्वारी मंडळीसुद्धां निघोन आली. वरकड कारकून लावून तयारी झाली. णीस व काका दीक्षित गेले. मंडळी गृहस्थ व शिष्ट आले. देवापुढं सोप्यांत स्वामीस जागा रांगोळी कणे घालोन केली, तेथे स्वामी बसले. पूजा बळवंतराव यांनी केली. .<noinclude></noinclude> t11lcwurpk798z23cik584ld3ghqqf5 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१३९ 104 111820 235987 2026-08-21T15:38:18Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235987 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ८३ ) येणेंप्रमाणें स्वामीची पूजा होऊन ब्राह्मण मंडळीचीं पात्रे मागील दुजोडी सोपा व माजघर व पुढील मागील चौकांत मंडप दिले तेथे ठेविलीं. कित्ता मंडळी. कित्ता मंडळी. ७५ स्वामीकडील मंडळी स्वामी सहवर्तमान. १ तात्या उपाध्ये. १ भाऊ पंडितराव. १ दाजीबा उपाध्ये. २ नरसिंगराव लेले. २ रंगोपंत दादा संस्थान चाफळ. १...... उपाध्ये. ७ क्षेत्र माहुली. ५ क्षेत्र माहुली संगम. २ नागेश भट्ट अभल व हरभट अकले. १ माधवराव मुनशी, २५ गांवांतील मंडळी. १ राघोपंत वैद्य. १ महागांवकर. १०७ १८ १२५ प्रथम पंक्तीस सवाशें पात्र झाले, यांस विडे दक्षणा शिवसंभावना अत्तर गुलाब दिलें. नंतर बळवंतराव यांस स्वामींनीं प्रसाद पैठणी पागोटे व ज्याहा - नाबादी दुपटा दिला. प्रभू ज्ञातीची मंडळी प्रसादास बोलाविली होती त्यांणी स्वामीपुढे नारळ ठेविले. सर्वांस स्वामींनीं प्रसाद नारळ दिले. नंतर स्वामींची स्वारी पालखीत बसून दरवाज्याबाहेर गेली. तेथें निरोप घेऊन माघारे आले. नंतर आगंतुक ब्राह्मण व प्रभू मंडळी वगेरे यांचीं पात्रे मांडिलीं २०० आगंतुक ब्राह्मण, १०० गृहस्थ मंडळी गांवांतील, मिळोन सुमारे ३००. सदरहू मंडळीचीं व ब्रह्मणांचीं भोजनें झालीं. विडे देऊन सर्वांस निरोप दिले. मिती आषाढ शुद्ध ३ रविवार शके १७४७ पार्थिवनाम संवत्सरे सुरुस सति अशरीन मयातेन व अलफ. मुकाम सातारा. स्वामीची स्वारी साताम्यांतून जाऊं लागली तेवेळेस पत्र द्यावें म्हणोन विनंती केली त्याजवरून पत्र दिलें तें:- -<noinclude></noinclude> s5ak1tru9jeag4rn9vwdo8m219nq1gv सदस्य चर्चा:Daasbodh 3 111823 236012 2026-08-21T18:02:52Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 236012 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Daasbodh}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) २३:३२, २१ ऑगस्ट २०२६ (IST) ijvi2sgux8o3dg10u32w3399vued82j 236020 236012 2026-08-22T06:00:41Z QueerEcofeminist 918 /* आपण शोधत असलेले पान */ नवीन विभाग 236020 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Daasbodh}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) २३:३२, २१ ऑगस्ट २०२६ (IST) == आपण शोधत असलेले पान == [[b:दासबोध|येथे]] हलवले गेलेले आहे. आपण तिथे जाऊन ते वाचा धान्यवाद [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] ११:३०, २२ ऑगस्ट २०२६ (IST) a3vmomrl7jntih044y4qefz3cgpr1yj वर्ग:अध्यात्मिक 14 111824 236013 2026-08-21T18:04:54Z Daasbodh 6176 नवीन पान "दासबोध" 236013 wikitext text/x-wiki दासबोध tfqtpq3zj17t6lqbdg6ssrrpcw8iw58 236014 236013 2026-08-21T18:07:54Z Daasbodh 6176 /* */ 236014 wikitext text/x-wiki दासबोध ॥ स्तवननाम दशक प्रथम ॥ १ ॥ दासबोध दशक पहिला – समास पहिला : ग्रंथारंभ ॥ श्रीराम ॥ श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ । श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १॥ ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २॥ नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण । बहुधा अध्यात्म निरोपण । निरोपिलें ॥ ३॥ भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथीं ॥ ४॥ 2rooefxsgz9gjk2zor3u94jbasg4ifc 236019 236014 2026-08-22T05:22:59Z QueerEcofeminist 918 rv 236019 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/९३ 104 111825 236017 2026-08-22T04:19:12Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ८१ ) स्वतःची अशी समजूत करून घेतली होती, कीं, सर्वनाशक जो महादेव तो शत्रूंचा संहार करून आपल्या देवालयाचे खचित संरक्षण करील. यवनांनां जयाची आशा मुळींच नको! ह्मणून महादेवाचा..." 236017 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ८१ ) स्वतःची अशी समजूत करून घेतली होती, कीं, सर्वनाशक जो महादेव तो शत्रूंचा संहार करून आपल्या देवालयाचे खचित संरक्षण करील. यवनांनां जयाची आशा मुळींच नको! ह्मणून महादेवाचा प्रताप बघण्याकरितांच कीं काय कोण जाणे, ब्रह्मवृंदांच्या झुंडीच्या झुंडी तटबंदीवर दिसत असत. पण महंमदाच्या अनुयायांनां महेश्वराच्या संहारशक्तीची दरकार वाटत नस- ल्यामुळे, त्यांनी शिड्या लावून तट सर केला. चालत्या बोलत्या देवांच्या मंत्र- तंत्रांना कैलासातला देव दाद देईना. पन्नासहजार हिंदुधर्मासाठी बळी पडले 1 देवळाची लूट झाली. मूर्तीचे तुकडे होऊन ते गिझनीकडे रवाना झाले. (Ibid, PP. 26-27 ) लढाईत तरबेज, धर्मवेडाने पछाडलेल्या, कुशल सेनापतींच्या हाताखाली असलेल्या सैन्याची स्वारी कोणीकडे, आणि प्रतीकार करण्याची देवाकडेच सोपवून केलेली जंगी तयारी कोणीकडे ! घरावर दरोडा आला ह्मणजे उपाय योजण्याचे काम मालकाचें तसें देवालयावर धाड आली, तर तिच्यापासून बचाव करण्याचें काम त्याच्या मालकाचें, ह्मणजे अर्थात् देवाचें ! अशावेळी जर देवानें आपला प्रभाव दाखवावयाचा नाहीं, तर दाखवावयाचा तरी केव्हां ? स्वतःच्याच निवासस्थानावर अरिष्ट आलें असतांना जर मंत्रतंत्र देवानें ऐ- कावयाचे नाहींत तर ऐकावयाचे तरी केव्हां ? पण धरावरचा दरोडा मार्गे हटविण्याचे काम जरी मालकाचें असले, तरी त्याला सेवकांची पुरती मदत पाहिजे. नाहींतर मालकाचीच विटंबना होण्याची वेळ जशी येते, तशीच देवाची गत आहे. देवळाचें संरक्षण करण्यास देवाला स्वतःच्या सेवकांची, त्यांच्या पुरत्या मदतीची अपेक्षा होती. मनुष्यें हींच देवाचें हत्यार. त्यांच्या अंतःकरणांत प्रेरणा करूनच स्वतःच्या आलयाचे रक्षण करणें देवाला शक्य होतें. स्वतः प्रयत्न न करता आपल्यावर सर्वस्वी भार टाकणान्या मूर्ख उपासकांना देईन कर, पण भलें बळ कराहो,' अर्से चोख उत्तर देवाकडून मिळत असले पाहिजे. पण एक तर, हैं उत्तर ऐकावयाला या लोकांना कान नसतात, किंवा असले तर या उत्तराचा भावार्थ त्यांना समजत नाहीं. कदाचित् समजलाच, तर आळसामुळे, क्षुद्रवृत्ती- मुळे, दुराग्रहामुळे तो उमजत नाहीं. अशांतलीच स्थिति या विचाय भूदेवांची व त्यांच्यावर विसंबणाऱ्या लोकांची झाली असली पाहिजे. सोमनाथावरच्या या स्वारीची हकीगत वाचून ब्राह्मणांच्या व इतर उपा सकांच्या मूर्खपणाचें हंसें तर येतेंच; पण मूर्खपणाचा मोबदला इतक्या लव- ६<noinclude></noinclude> mdzupa1relqzipnaxi67z0yu1mpyael 236018 236017 2026-08-22T04:27:59Z JayashreeVI 4058 236018 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{({center|{{larger|'''(८१)'''}}}}</noinclude>स्वतःची अशी समजूत करून घेतली होती, कीं, सर्वनाशक जो महादेव तो शत्रूंचा संहार करून आपल्या देवालयाचे खचित संरक्षण करील. यवनांनां जयाची आशा मुळींच नको! ह्मणून महादेवाचा प्रताप बघण्याकरितांच कीं काय कोण जाणे, ब्रह्मवृंदांच्या झुंडीच्या झुंडी तटबंदीवर दिसत असत. पण '''महंमदाच्या''' अनुयायांनां '''महेश्वराच्या''' संहारशक्तीची दरकार वाटत नसल्यामुळे, त्यांनी शिड्या लावून तट सर केला. चालत्या बोलत्या देवांच्या मंत्रतंत्रांना कैलासातला देव दाद देईना. पन्नासहजार हिंदुधर्मासाठी बळी पडले! देवळाची लूट झाली. मूर्तीचे तुकडे होऊन ते गिझनीकडे रवाना झाले. (Ibid, PP. 26-27 ) लढाईत तरबेज, धर्मवेडाने पछाडलेल्या, कुशल सेनापतींच्या हाताखाली असलेल्या सैन्याची स्वारी कोणीकडे, आणि प्रतीकार करण्याची देवाकडेच सोपवून केलेली जंगी तयारी कोणीकडे! घरावर दरोडा आला ह्मणजे उपाय योजण्याचे काम मालकाचें तसें देवालयावर धाड आली, तर तिच्यापासून बचाव करण्याचें काम त्याच्या मालकाचें, ह्मणजे अर्थात् देवाचें! अशावेळी जर देवानें आपला प्रभाव दाखवावयाचा नाहीं, तर दाखवावयाचा तरी केव्हां? स्वतःच्याच निवासस्थानावर अरिष्ट आलें असतांना जर मंत्रतंत्र देवानें ऐकावयाचे नाहींत तर ऐकावयाचे तरी केव्हां? पण धरावरचा दरोडा मागे हटविण्याचे काम जरी मालकाचें असले, तरी त्याला सेवकांची पुरती मदत पाहिजे. नाहींतर मालकाचीच विटंबना होण्याची वेळ जशी येते, तशीच देवाची गत आहे. देवळाचें संरक्षण करण्यास देवाला स्वतःच्या सेवकांची, त्यांच्या पुरत्या मदतीची अपेक्षा होती. मनुष्यें हींच देवाचें हत्यार. त्यांच्या अंतःकरणांत प्रेरणा करूनच स्वतःच्या आलयाचे रक्षण करणें देवाला शक्य होतें. स्वतः प्रयत्न न करता आपल्यावर सर्वस्वी भार टाकणा-या मूर्ख उपासकांना देईन कर, पण भलें बळ कराहो,' अर्से चोख उत्तर देवाकडून मिळत असले पाहिजे. पण एक तर, हैं उत्तर ऐकावयाला या लोकांना कान नसतात, किंवा असले तर या उत्तराचा भावार्थ त्यांना समजत नाहीं. कदाचित् समजलाच, तर आळसामुळे, क्षुद्रवृत्ती- मुळे, दुराग्रहामुळे तो उमजत नाहीं. अशांतलीच स्थिति या विचाय भूदेवांची व त्यांच्यावर विसंबणाऱ्या लोकांची झाली असली पाहिजे. सोमनाथावरच्या या स्वारीची हकीगत वाचून ब्राह्मणांच्या व इतर उपा सकांच्या मूर्खपणाचें हंसें तर येतेंच; पण मूर्खपणाचा मोबदला इतक्या लव-<noinclude>{{gap}} ६</noinclude> c4mm5h0vo86bdjxde243a0hvjsjgp5b श्यामची आई 0 111826 236023 2026-08-22T06:13:07Z QueerEcofeminist 918 + 236023 wikitext text/x-wiki {{Redirect|mr:b:श्यामची आई}} 8nz5o0fs8lat9mnia8nmkzcwsf0wkci पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/३८ 104 111827 236025 2026-08-22T11:41:05Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236025 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३० |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>कवाड यांच्यासारखे मोठ्या दर्जाचे राजे सुद्धां या बोटीनं प्रवास करूं लागले आहेत.<br>{{gap}}वर सांगितल्याप्रमाणे माझी बोट बारा वाजतां मुंबई बंदराच्या बाहेर पडली व मग ती वेगानें चालू झाली. बऱ्याच वेळपर्यंत मुंबई बेट दिसत होतें; पण लंकेचा प्रवास विलायतच्या प्रवासाप्रमाणें दूर देशच्या प्रवासासारखा भासत नाहीं. कारण त्या प्रवासांत मुंबई बंदर एकदां दिसत नाहींसें झालें कीं, पांच सहा दिवसांनीं एडनचे उघडे बोडके व जळके खडक व डोंगर दिसूं लागेपर्यंत वर निळें निळें आकाश व खालीं धूसर व हिरवट रंगाचा समुद्र व त्यावर पांढऱ्या फुलांच्या माळांप्रमाणे येणाऱ्या लाटा याखेरीज कांहींच दिसत नाहीं. अफाट समुद्रावर आपली बोट एकाकी चालली आहे असा भास होतो. पण लंकेच्या प्रवासांत असें वाटत नाहीं; निदान पहिल्या दिवशीं तरी मला तसें वाटलें नाहीं. कारण हिंदुस्थानचा किनारा अस्पष्टपणे कां होईना पण सतत दिसत होता. रात्रीच्या वेळीं सुद्धां दीपगृहांतील फिरते व मधून मधून लकाकणारे दिवे दिसतात. यामुळे बोट किनाऱ्यापासून फारशी दूर नसावी असें कळून येतें. मनाला एक प्रकारचा न कळत धीर व विश्वास वाटतो, व जल-प्रवासाचा धोका केव्हांच मनांत येत नाहीं. विलायतेच्या प्रवासांत ज्याप्रमाणें मला अनुभव आला त्याप्रमाणे या प्रवासांतही अनुभव आला. अर्वाचीन जल-प्रवासांत सर्व प्रकारच्या सुखसोयी असतात. इतकेंच नव्हें तर येथला दिनक्रमही अगदीं रेखलेला व नियमित असतो. पहाटेस साडेपांच सहा वाजतां उठून सकाळचे सर्व विधी (यांत अर्थात् दाढी करण्याचा दररोजचा विधी वाढतो) आटोपतात तोंच न्याहारीची घंटा होते. मी यावेळीं सेकंड एकॉनॉमिक अथवा इंटर क्लासने गेलों; त्याला सहामाही परत प्रवासाच्या तिकिटासकट रु. १०७σ८ आणे किंवा ८ पौंड पडले. या क्लासाला '''शेजचहा''' मिळत नाहीं. पण ७॥ वाजतांच न्याहारी मिळते.<br>{{gap}}न्याहारी झाली की फराळाच्या वेळेपर्यंत डेकवर फिरावें किंवा धूम्रपान-गृहांत बसावें; किंवा समुद्राची शोभा पहावी. माझ्या विलायतेच्या प्रवासांत<noinclude></noinclude> nmmlx6tcft1j7fn1hrcz5z44719606v पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/३९ 104 111828 236026 2026-08-22T11:43:51Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236026 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेत पहिले पाऊल|३१ }}</noinclude>मला लाभलेल्या दोन्ही बोटींना बोटीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सभोंवार फिरण्यास मुभा होती. पण काँटे रॉसो बोटींत तशी सोय नव्हती. हे या बोटीचें मोठें वैगुण्य मला वाटलें. कारण येथें प्रत्येक वर्गाचें निराळें डेक होतें व एका डेकांतून दुसऱ्या डेककडे जाण्यास प्रतिबंध होता. यामुळें बोट येवढी मोठी असून सुद्धां आमच्या डेकची जागा संकुचित भासली; कारण बोटीचा इंटर वर्ग माणसांनीं चिकार भरलेला होता. पण माझा प्रवास काय तो दोन दिवसांचा! म्हणून संकुचित जागेची अडचण भासणार तोच आमची उतरावयाची वेळ झाली सुद्धां. या दिवसांत आरबी समुद्र अगदीं शांत असतो; बोट किनाऱ्यापासून फारशी दुरून जात नसल्यामुळें समुद्राचें पाणी धूसर हिरवट दिसतें. नेहेमी अनुभवास येणारा समुद्राचा काळसर दाट निळा रंग हिंदुस्थानचा किनारा टाकून कोलंबो बंदराच्या दिशेने थेट बोट पूर्वेकडे जेव्हां वळली तेव्हांपासून दिसूं लागला. मग कांहीं काळपर्यंत वर निळे आकाश व खालीं दाट निळे पाणी याखेरीज कांहीं एक दिसेनासें झालें.<br>{{gap}}मुंबईपासून कोलंबो बंदर ८८९ मैल आहे. ता. २३ च्या बारा वाजेपर्यंत म्हणजे बरोबर २४ तासांत आमच्या बोटीनें ४२९ मैलांची मजल मारली. कोलंबो बंदरास दुसरे दिवशीं दुपारी एक वाजतां बोट पोहोंचण्याचा अंदाज आहे असें दररोजच्या रिपोर्टावरून कळलें.<br>{{gap}}पण ता. २४ सकाळपासून आम्हाला हिंदुस्थानचा किनारा अदृश्य झाला व लंकेचाही किनारा दिसूं लागला नव्हता. तेव्हां अफाट समुद्रांत प्रवेश केल्याचा भास झाला. आतां खरोखरीच आरबी समुद्र टाकून आम्हीं हिंदी महासागरांत प्रवेश केला. या समुद्रांच्या नांवांचेही मोठें नवल वाटलें. हिंदुस्थानपासून आरबस्थान कितीतरी दूर पण हिंदुस्थानच्या येवढ्या मोठ्या लांबच लांब पसरलेल्या किनाऱ्यालगतच्या समुद्राचें नांव आरबी समुद्र! आणि हिंदुस्थानचा पश्चिम किनारा दूर टाकल्यावर लागणाऱ्या अफाट समुद्राचें नांव हिंदी महासागर! तेव्हां हीं नांवें<noinclude></noinclude> e6o9c075545x5bibv83tgy36sdwmzh5 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/४० 104 111829 236027 2026-08-22T11:46:00Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236027 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३२ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>अन्वर्थक नसून कांहीं तरी आकस्मिक कारणांनी पडलेली असावीं असें वाटल्यावांचून राहिलें नाहीं.<br>{{gap}}ता. २४ सकाळपासून म्हणजे आम्हीं हिंदी महासागरांत प्रवेश केल्यापासून वारा जोराचा सुटला व महासागरानें किंचित् उग्र स्वरूप धारण केलें. यामुळें कित्येक लोकांना व विशेषतः नाजूक बायकांना थोडीशी दर्यादुखी वाटूं लागून त्या केबीनमध्यें अंथरुणावर जाऊन पडल्यासुद्धां; पण तो वारा वादळी वारा म्हणण्याइतका जोरदार नव्हता. मात्र त्याने आमच्या बोटीच्या वेगाला थोडासा अडथळा केला व आदल्या दिवसाच्या अंदाजापेक्षां कोलंबोस पोहोंचण्यास तास दीड तास उशीर होणार असें समजलें. दीड दोन वाजतांच्या सुमारास एकदांचें कोलंबो बंदर दिसूं लागलें व तीन वाजतां बोटीने बंदरांत नांगर टाकला. बंदरांत बोट आल्यावर मेडिकल ऑफिसर व पोलीस ऑफिसर बोटीवर आले. त्यांनी थोड्या वेळापुरते किनाऱ्यावर जाणाऱ्या लोकांना आधीं परवाने दिले. ही मंडळी पुष्कळच होती. कोलंबोस उतरणारे उतारू थोडेच होते. दुसऱ्या वर्गानें जाणाऱ्या उतारूंना फार त्रास होत नाहीं; पण तिसऱ्या वर्गाच्या उतारूंना पुष्कळ वेळां दहा दिवस क्वारंटाईन किंवा निदान हजेरी तरी द्यावी लागते. लंकेंत जाणाऱ्या उतारूनें देवी काढल्याचा किंवा आंगच्या देवी आल्याचा व प्लेगची लस टोचून घेतल्याचा दाखला. बरोबर आणणे आवश्यक आहे. नाहींतर क्वारंटाईनचा त्रास पडतो. पण माझ्याजवळ दोन्ही दाखले असल्यामुळे मला कांहीं एक त्रास झाला नाहीं. मला जॉली बोटींत जाण्याची परवानगी मिळाली. येथें थोरल्या बोटी लागणारे मुंबई बंदराप्रमाणें खोल पाण्याचे धक्के नाहीत. असा धक्का बांधण्याचा विचार चालू आहे. चार वाजतां मी जॉली बोटींतून लंकेत पहिले पाऊल टाकलें. जॉली बोटीला दर माणशी आठ आणे पडतात; व दर बोजास हमालीही तितकीच पडते. हमाल बोजे आणून कस्टम ऑफिसांत ठेवतात. तेथें प्रत्येक ट्रंक उघडून आंतील वस्तूंची कसून तपासणी होते. माझ्याजवळ करास पात्र असें कांहीं नसल्यामुळे<noinclude></noinclude> kd84y9i8v9eig4tsfj65e55x2wxvgvq पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/४१ 104 111830 236028 2026-08-22T11:48:37Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236028 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेत पहिले पाऊल|३३ }}</noinclude>माझी लवकर सुटका झाली. कस्टम कचेरींतून बिनत्रास सुटका होऊन बाहेर आल्याबरोबर मनाला समाधान वाटत आहे तोंच थेट मुंबईसारखा देखावा पाहून पूर्व परिचयाचा मनाला आनंद वाटला. कोलंबो शहर मुंबई शहराची छोटेखानी आवृत्तिच आहे असें वाटलें. तसेंच डामरी काळसर रस्ते, तशाच फसरबंदी पाऊलवाटा, तशाच पिवळ्या, पांढऱ्या, तांबड्या रंगाच्या उंच उंच इमारती व त्यासमोर तशाच कमानदार आच्छादित पाऊलवाटा, तशाच वृक्षांच्या रांगा. सारांश, कोलंबो शहराचें प्रथम दर्शन मनावर अनुकूल ग्रह उत्पन्न करितें यांत शंका नाहीं. माझ्या हिंदुस्थानांतील दोघां स्नेह्यांनी कोलंबोस त्यांच्या स्नेह्यांना आगाऊ पत्रे लिहिलीं असल्यामुळे ते स्नेही कस्टम कचेरीशीं मला भेटले. त्यांच्या मदतीनें मी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या एका शांत व स्वच्छ गल्लीतील डोमिनियन हॉटेल नांवाच्या निवासगृहांत उतरलों. मला अगदीं पश्चिमेकडे समुद्रासमोरच खिडकी असलेली सर्वांत वरच्या मजल्यांतील '''एकमाणशी''' खोली मिळाली. त्यामुळें समुद्राचें हिरवट निळसर पाणी, त्या पाण्यावरून सतत किनाऱ्याकडे येणाऱ्या लहान मोठ्या लाटा व मधून मधून त्या लाटांनी उत्पन्न झालेल्या पांढऱ्या शुभ्र फेसांच्या माळा हा सुंदर देखावा सदा डोळ्यापुढे उभा राही व मनाला आनंद देई. दररोज फक्त चार रुपये देऊन मुंबईच्या नेपीयन सी रोडवरील समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या एखाद्या हवाशीर बंगल्यांत राहिल्याचा मला भास झाला. पण नेपीयन सी रोडच्या पेक्षांही येथला देखावा जास्त मनोहर आहे. कारण येथें खडकाळ व म्हणून घाणेरडा दिसणारा समुद्राचा भूमिभाग मुळींच दिसत नाहीं. ओहोटी असो भरती असो रस्त्याच्या लगतच्या पाऊल वाटेच्या सखल भिंतीला लागून नेहमीं समुद्राचें पाणी असतें.<br>{{gap}}मी कोलंबोमध्ये सुमारें दहाबारा दिवस राहिलों. त्या वेळांत पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळवर्णनाकडे आतां वळणं बरें. आधीं कोलंबो बंदर व शहर यांचें सामान्य स्वरूप सांगणे सोयीचे होईल.{{nop}}<noinclude></noinclude> gr4hfzg2cx5itd4e8xvp8mua9ti7d86 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/४२ 104 111831 236029 2026-08-22T11:52:19Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236029 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३४ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>{{gap}}कोलंबो बंदर हे मार्मागोवा बंदराप्रमाणें खुलें व भर समुद्रावरील कृत्रिम बंदर आहे. मुंबई, कराची यांच्याप्रमाणें तें आपोआप व सहज बनलेलें बंदर नाहीं. शिवाय तें अगदीं अर्वाचीन काळचें आहे. पोर्तुगीज व डच लोक जलमार्गानें पूर्व दिशेला व पूर्वेकडील देशांना येऊ लागले त्या वेळेपासून अलीकडेपर्यंत लंकेच्या दक्षिण टोकास असलेलें '''गॉल''' हेंच सिलोनचें बंदर होतें. तेथें प्रथमतः परदेशचीं गलबतें व आगबोटी लागत असत. पण तें बंदर बेटाचे अगदीं खालचे टोकाला असल्यामुळे फार गैरसोयीचें वाटे. म्हणून कोलंबो येथें सन १८७४ च्या सुमारास कृत्रिम बंदर करण्याचें ठरलें. कोलंबो येथें एके ठिकाणीं किनारा कांहींसा द्वारका बेटाप्रमाणे किंचित् पुढें आलेला आहे. तेथें टेकडीवजा थोडा उंच खडकही आहे. तेव्हां तेथें बंदर करण्यास सोयीची जागा पाहून खडकापासून तटवजा मजबूत भिंत थेट उत्तर दिशेला एका मैलापर्यंत बांधण्यांत आली. या प्रचंड बांधकामाच्या पायाचा दगड सातवे एडवर्ड प्रिन्स ऑफ वेल्स असतांना त्यांच्या हस्ते सन १८७५ मध्ये बसविण्यांतर आला. तें काम पुरें झाल्यावर दुसरी व मग तिसरी अशा निरनिराळ्या दिशेला भिंती घालण्यांत आल्या. या भिंतींना इंग्रजीत '''लाटमोड्या भिंती''' (break-waters) म्हणतात. या लाटमोड्या भिंतींवर लाटा आपटून त्यांच्या फेसाचे फेवारे कितीतरी उंच उडतात. हा देखावा विलक्षण खरा! या कृत्रिम भिंतीच्या योगानें साडेसहाशें एकरांचा समुद्राचा भाग मुख्य महासागरापासून जणूं कांहीं वेगळा केल्यासारखा झाला व तो या प्रचंड लाटमोड्या भिंतींमुळे सुरक्षित व स्वाभाविक बंदराप्रमाणे शांत पाण्याचा तलाव झाला. कारण हिंदी महासागरावरील वारा व लाटा या प्रचंड भिंती थोपवून धरतात व बंदरामध्यें भिंतीमधील प्रवेशद्वारानें आंत येऊन गलबतांना व आगबोटींना शांत पाण्यांत उभे राहण्यास सांपडतें. परंतु कोलंबो बंदराला मुंबई बंदराप्रमाणें मोठ मोठ्या बोटी धक्क्याला लागतील असा खोल पाण्याचा धक्का बांधलेला नाहीं. म्हणून मागें सांगितल्याप्रमाणें येथें मोठ्या आगबोटीतून जॉली<noinclude></noinclude> ffncs8f5w8nzhftou96pt64bq9b4abz पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/४३ 104 111832 236030 2026-08-22T11:54:01Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "<br> {{center|'''कोलंबोच्या लाटमोड्या भिंतीवर आपटणाऱ्या फेसाळ लाटा.'''}} {{rh|नं. १||पान ३४}}{{nop}}" 236030 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|'''कोलंबोच्या लाटमोड्या भिंतीवर आपटणाऱ्या फेसाळ लाटा.'''}} {{rh|नं. १||पान ३४}}{{nop}}<noinclude></noinclude> 9sgrr7qir42fgpgcn5974v39k0ix4v2 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/४४ 104 111833 236031 2026-08-22T11:58:26Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236031 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कोलंबो बंदर व रत्नपुर नगर|३५ }}</noinclude>बोटीनें किंवा होड्यांनी किनाऱ्याच्या धक्क्याला यावें लागतें. पण कृत्रिम असलें तरी हल्लीं कोलंबो बंदर बरेंच मोठें व महत्त्वाचें बंदर बनलें आहे. तेथें दररोज लहान मोठ्या कितीतरी आगबोटी व गलबतें जातां येतांना दृष्टीस पडतात. माझें निवासस्थान बंदरानजीक असल्यामुळे बोटींची केवढी मोठी रहदारी या बंदराला आहे हे मला प्रत्यक्ष पाहण्यास सांपडत असे.<br>{{gap}}कोलंबो शहराचें सामान्य स्वरूप समजून देणें फारच सोपें काम आहे. कोलंबो हे सात मैल लांबीचें, दोन अडीच मैल रुंदीचे सुमारें तीन लाख वस्तीचें शहर असून तें लंका बेटाच्या पश्चिम किनाऱ्यालगत व बेटाच्या लांबीच्या अर्ध्या अंतराचे जरा खालीं वसलेलें आहे. या शहराची उत्तर मर्यादा '''केलानी गंगा''' नांवाच्या नदीनें बनलेली आहे. ही नदी पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशांत निघून नागमोडी वळणे घेऊन कोलंबो बंदराच्या उत्तरेस तीन मैलांवर हिंदी महासागरास मिळते. या नदीशीं कोलंबो म्युनिसिपालिटीची हद्द संपते. कोलंबो शहराच्या दक्षिण दिशेस वरच्यासारखी स्वाभाविक मर्यादा नाहीं; कारण हा दक्षिण दिशेकडचा किनारा '''कालु गंगा''' नांवाच्या नदीच्या मुखापर्यंत सुमारें पन्नास मैल सारखा सलग आहे. पण म्युनिसिपालिटीची मर्यादा बंदरापासून चार मैलांवर असलेल्या '''वेलावाटा''' खेड्यापर्यंत आहे. शहराच्या पश्चिमेस अर्थात् हिंदी महासागर आहे. शहराची पूर्व- मर्यादा कृत्रिमच आहे व ती उत्तरेस कँडी व दक्षिणेस रत्नपुर या शहरांस जाणाऱ्या रेलवे रस्त्यांनी बनली आहे.<br>{{gap}}कोलंबो शहराचा मुख्य भाग म्हणजे ज्याला फोर्ट किंवा किल्ला म्हणतात तो होय. डच लोकांच्या ताब्यांत लंका बेट असतांना हा किल्ला त्यांनी बांधला. आतां त्यापैकीं कांहींच शिल्लक राहिलें नाहीं. मात्र तट पाडल्यामुळे मुबलक खुली जागा झाली व त्यामुळें या भागांत फारच प्रशस्त रस्ते व दुतर्फा रुंद पाऊलवाटा करावयास सांपडल्या. या भागांत व बंदरांत अगदी नजीक '''क्वीन्स हाऊस'''<noinclude></noinclude> k1qas95bzhqtm37ng5gf82xtda7p3mc