विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.16 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:सांगली आणि सांगलीकर.pdf 106 74682 236126 236113 2026-08-24T16:26:59Z कल्पनाशक्ती 3813 236126 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=सांगली आणि सांगलीकर |Language=mr |Volume= |Author=अविनाश टिळक |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=सांगली नगरवाचनालय |Address=सांगली |Year=2001 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 5="स्वागत" 13="लेखनामागील भूमिका" 17="प्रकाशकांचे मनोगत" 18="ऋणनिर्देश" 19="अनुक्रम" 20="महिमा सांगलीचा" 21="सांगलीचे आराध्य दैवत" 22="फोटो" 23="फोटो" 24="फोटो" 25="सांगली - एके काळची रम्य नगरी" 35 ="सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन" 46 ="महाराष्ट्राचा आद्य नाटककार विष्णुदास भावे" 55="नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल" 67="कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} 94ujzzcsg52s8l0kx2b2rwikkrvhv2i पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५६ 104 77582 236114 202171 2026-08-24T12:05:56Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236114 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>नाटकाची परंपरा निर्माण झाली होती, तिने गोविंदरावांच्या मनाचा वेध घेतला असावा. तिचे आकर्षण त्याना वाटले असावे. त्याचमुळे नाट्यलेखनाची ऊर्मी त्यांच्या मनात अंकुरली असावी. विष्णुदासांची पौराणिक नाटके ऐन बहरात होती. त्याकाळात 'सांगलीकर' या नावाच्या दोन नाटकमंडळ्या होत्या. एक धोंडोपंत मराठे यांची तर दुसरी श्रीपादपंत लेले यांची. या मंडळींचे नाटकाचे प्रयोग सांगलीत धुमधडाक्याने होत असत. त्यातच हरिपूरच्याच बळवंत भास्कर मराठे या तरूणाने स्वतःचीच एक नाटकमंडळी स्थापन केली होती. या साऱ्या गोष्टींचा परिणाम गोविंदराव देवलांची नाट्यअभिरूची वाढण्यात झाला असावा. या काळात हरिपुरात ते स्वस्थ बसून असावेत असे त्यांच्या चरित्रकारांच्या कथनावरून वाटते. देवलांचे प्राथमिक शिक्षण हरिपुरातीलच बंडोपंत लेले या पंतोजींकडे झाले. त्यानंतर त्यांचे बंधू कृष्णाजीपंत याना नोकरी लागून त्यांचे बेळगावी बिऱ्हाड झाले तेव्हा देवलांचे इंग्रजी शालेय शिक्षण तेथे सुरु झाले. पण दरम्यानच्या काळात नाटक या विषयाचा त्यानी सर्वांगाने अभ्यास केला असावा. त्यांच्या त्या बालवयातील या नाट्यअुद्योगाला अभ्यास म्हणणे योग्य नाही पण नाट्यवस्तु, अभिनय, संगीत, प्रवेश (त्याकाळात 'कचेरी' म्हणत) मग रंगत जाणारे अंक, या सर्व गोष्टींचे त्यानी जे अवलोकन केले, त्याचा भावी काळात त्याना फार अुपयोग झाला. एकूण नाट्यकलेचा अंकूर या बालवयातच त्यांचे ठायी रुजला.<br>{{gap}}बेळगावमध्ये सरदार्स हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय (हायस्कूल) शिक्षण झाले. मध्यंतरी कदाचित वडील बंधूंच्या बदलीमुळे ते पुन्हा कोल्हापुरात राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी दाखल झाले. बेळगावच्या सरदार्स हायस्कूलमधून १८७८- ७९ मध्ये ते मॅट्रिक झाले. सरदार्स हायस्कूलमधील मोठी कमाई म्हणजे त्याना झालेला कै. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सहवासाचा लाभ. अण्णासाहेब त्याना सरदार्स हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून लाभले. मूळची नाटकाची आवड, नाटककारच शिक्षक म्हणून लाभल्याने आपोआपच परिपक्व झाली. पण अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाचा खरा परिणाम देवलांच्या काव्यलेखनावर झाला. मुळात त्याना काव्याची आवड होतीच पण अण्णांच्यामुळे त्यांच्या काव्यरचनेस नक्कीच प्रोत्साहन मिळाले. मंगळागौरी, हरतालिका, व्रतबंधन अशा कार्यक्रमांस ते कविता करून देत. त्यांच्या संवेदनाक्षम मनाला सामाजिक दुष्ट रुढींमुळे स्त्रियांचे होणारे हाल याच काळात जाणवावयास लागले असावेत. कारण सामाजिक विषयावरील 'सासुरवाशीण' ही त्यांची कविता खूप गाजली होती. म्हाताऱ्या नवऱ्याशी लग्न झालेल्या तरूण सासुरवाशिणीच्या छळाचे वर्णन त्यात अगदी प्रत्ययकारी झाले आहे. त्यातील काही शेवटची कडवी अशी :{{nop}}<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर........................३२</noinclude> r6xf190d5p9ks9b6a7a3xjnrowrjlki पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५७ 104 77583 236115 202174 2026-08-24T12:10:42Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236115 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Block center|<poem>''"इतके होता जाते माध्यान्ह अलटून{{gap}}किती दुःख सोसू किती रडू यमुताई ।'' ''नाही झोप, पडते तशीच जाऊन{{gap}}कर्म पाठिशी लागलं खरं बाई'' ''घरिं तरि सदा दुखण्यानं हैराण{{gap}}देवा गोविंदा झडकरि येईबा धावून'' ''मात्रा घाशिता झिजले हात सहाण{{gap}}धेनू वरती काढावी पंकातून ॥"''</poem>}} {{gap}}"धेनु वरती काढावी पंकातून" या शेवटच्या ओळीवरून ती दुःखी सासुरवाशीण अुद्धाराची अपेक्षा करते असे दाखवले आहे.<br>{{gap}}'शारदा' नाटकाचे बीज बालवयातच त्यांच्या अंतर्मनात केव्हातरी रुजले असावे!<br>{{gap}}देवलाना गरीबीचे चटके फार लहानपणापासूनच बसलेले असावेत. त्यामुळेच त्यांचे शिक्षण खंडित होत होत वयाच्या २३-२४ व्या वर्षी ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले. याच गरीबीच्या चटक्यामुळे अुत्तर आयुष्यात देवल आपल्या नाटकांचे अधिकार, मानधन अशा विषयात कठोरपणे वागत.<br>{{gap}}मॅट्रिक झाल्यानंतर कॉलेजशिक्षण परवडण्यासारखे नव्हते. म्हणून चरितार्थाची सोय होईल या हेतूने कदाचित त्यानी शेतकी शिक्षणाचा अभ्यासक्रम पुरा केला असावा. त्यानी पुण्याच्या 'पूना कॉलेज ऑफ सायन्स' मधून दोन वर्षाचा अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर त्यानी थोडा काळ सरदार हायस्कूल बेळगाव, न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे नोकऱ्या केल्या असे दिसते. पण वरिष्ठांशी न पटल्याने सोडल्या. बेळगावच्या शेती खात्यातील नोकरी तर त्यानी निव्वळ नाटकाच्या प्रेमापोटी सोडली असे सांगतात. ते बेळगावला नोकरी करत असताना त्यांच्या मित्रमंडळीनी एका नाटकाचा प्रयोग पुण्यात शनिवारी लावला. त्याचे पत्र देवलाना दोन दिवस आधी म्हणजे गुरुवारी मिळाले. त्या नाटकात देवलांची महत्त्वाची भूमिका होती. हूगवर्फ या त्यांच्या वरिष्ठ साहेबाला हा माणूस नाटकासाठी रजा मागतो या गोष्टीचा फार राग आला. त्याने रजा नाकारली. नाट्यवेड्या देवलाना हे कसं सहन होणार? त्यानी साहेबांच्या तोंडावर राजिनामा फेकला आणि ताबडतोब टांगा पुण्याच्या दिशेने हाकारला! या दंतकथेत सत्याचा अंश किती हे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहे ते देवलांचे नाट्यप्रेम. आपल्या या वेडापोटी आणि तापट स्वभावापोटी नोकरीत आपले एकूण जमणे कठीण, ही खूणगाठ त्यानी मनाशी बांधली आणि यापुढे आयुष्यात नोकरी करायची नाही हे पक्के ठरविले. अर्थात हा निश्चय आयुष्यभर पाळला.<br>{{gap}}पुण्यातील वास्तव्याच्या सुरूवातीच्या काळात त्यानी आपले एक मित्र श्रीनिवास भिकाजी देसाई यांच्या साहाय्याने 'कादंबरी- कलाप' या नावाचे मासिक सुरू केले. त्यात रेनॉल्डसच्या 'मिस्टरीज ऑफ लंडन' या कादंबरीचे भाषांतर छापण्यास<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर..............................३३</noinclude> 10x4d9a0eimvoo8pbemqf9cvywx0ai8 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५८ 104 77584 236116 202183 2026-08-24T12:13:26Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236116 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>सुरूवात केली. पण हा व्याप काही देवलाना झेपला नाही. मासिक लौकरच बंद पडले. मग काही काळ वर्तमानपत्रात लिहून बघितले. 'पुणे वैभव' या पत्रात काही प्रचलित विषयांवर त्यानी लेखन केले. त्या काळी गाजलेल्या 'क्रॉफर्ड' प्रकरणावर 'गरीब रयतेचे काळ' या त्यांच्या लेखाबद्दल संपादकाना माफी मागावी लागली. मग मात्र देवलानी ठरविले की आता नोकरी नाही की अन्य अुद्योग नाही.<br>{{gap}}आता फक्त नाट्यव्यवसाय !<br>{{gap}}त्यांच्या सुदैवाने एक संधी त्यावेळी चालत आली.<br>{{gap}}त्यावेळचे राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपॉल कँडी यानी त्याच त्याच नाटकांचा पुन्हा पुन्हा प्रयोग होतो, तेव्हा नवीन नाटक लिहिले जावे म्हणून एक नाट्यलेखनस्पर्धा आयोजित केली. पहिल्या नाटकास रु. १५१/- चे बक्षिस ठेवले. तेव्हा देवलानी आपले पहिले नाटक 'दुर्गा' लिहिले आणि स्पर्धेसाठी पाठवले. हे नाटक म्हणजे टॉमस सदर्नच्या The Fatal Marriage or The Innocent Adultery या नाटकाचे रूपांतर आहे. 'दुर्गा' हे ६४ पानी शोकान्त नाटक आहे. दुर्गा नावाच्या स्त्रीचा नवरा मारला गेल्यावर (म्हणजे तशी बातमी प्रसृत झाल्यावर) ती स्त्री, तिच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या पुरूषाशी लग्न करते आणि दुर्दैवाने त्याचवेळी तिचा पहिला नवरा परत येतो. या नाटकात एकप्रकारे पुनर्विवाह दाखवला असताना, १८८५-८६ च्या सनातनी काळात हे नाटक रंगभूमीसाठी देवलानी लिहावे, हे थोडे आश्चर्याचे आहे. या शोकान्तकारी नाटकाच्या बक्षिसाची पण थोडी शोकान्तिकाच झाली. देवलांच्या 'दुर्गा' नाटकाचे बक्षिस जवळजवळ निश्चित झाले होते. पण एकूण ३५ हस्तलिखितांपैकी कै. वासुदेवशास्त्री खरे यांचे 'गुणोत्कर्ष' नाटक वाचायचेच राहून गेले असे शेवटच्या क्षणी परीक्षकांच्या लक्षात आले! आणि ते नाटक वाचल्यावर 'गुणोत्कर्षला' पहिले बक्षिस देण्यात आले! मात्र 'दुर्गा' नाटकाची पण परीक्षकानी वाखाणणी केल्यामुळे प्रिन्सिपॉल कँडीनी त्या नाटकास रू.७५/- चे खास बक्षिस दिले.<br>{{gap}}यासंबंधीच्या अुलट-सुलट बातम्या 'केसरी' च्या स्फुटात येत होत्या. पुस्तकरूपाने हे नाटक १८८६ मध्ये प्रसिद्ध झाले. देवलानी स्वतः हे नाटक बसवले आणि रंगभूमीवर त्याला बऱ्यापैकी यश मिळाले. नाट्यव्यवसायात स्थिर होण्यास 'दुर्गा' नाटक अुपकारक ठरले.<br>{{gap}}यानंतर देवल, अण्णासाहेब किर्लोस्करांच्या किर्लोस्कर नाटक मंडळींबरोबर काम करू लागले. म्हणजे अण्णासाहेबानी त्याना बोलावूनच घेतले. बेळगावच्या शाळेत विद्यार्थीदशेतील देवलांचे काव्यप्रेम, काव्यक्षमता, नाट्यवेड, नाटकाच्या बारीक- सारीक अंगांचे सूक्ष्म ज्ञान यांचा अण्णांना जवळून परिचय होता किंबहुना त्यानीच<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर..................................३४</noinclude> 0ob8810eyn49nkf9qp10jks0ors9p8a पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५९ 104 77585 236117 202185 2026-08-24T12:16:32Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236117 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>या साऱ्या गोष्टींना खतपाणी घातले होते. त्यामुळे गुरू-शिष्याची जोडी एकत्रितपणे काम करू लागली. अण्णांच्या संगीत 'शाकुंतल' नाटकात मूळात शकुंतलेच्या तोंडी पदे नव्हती. कारण शकुंतलेचे काम करणाऱ्या शंकरराव मुजुमदाराना गाण्याचे अंग नव्हते. पुढे भाऊराव कोल्हटकर कंपनीत आले. त्याना गाण्याचे अंग असल्याने शकुंतलेसाठी पदे घालण्याचे ठरले. अण्णासाहेबानी हे काम देवलांकडे सोपवले. आणि अण्णांच्या पदरचनेबरहुकुम पदे तयार करुन, देवलानी सर्वांची वाहवा मिळविली. शकुंतला व सुभद्रा या दोन्ही भूमिकांचे अभिनयशिक्षण देऊन, ही दोन्ही कामे भाऊरावांकडून चोख वठवून घेण्याची मोठी जबाबदारी देवलानी समर्थपणे पार पाडली. पुढे अण्णासाहेबांच्या 'रामराज्यवियोग' नाटकात भाऊरावांकडून मंथरेची व भास्करबुवा बखले याजकडून कैकयीची भूमिका त्यानीच बसवून घेतली.<br>{{gap}}मात्र अण्णासाहेबांच्या मृत्युनंतर किर्लोस्कर संगीत मंडळींबरोबरचे देवलांचे संबंध संपुष्टात आले. अण्णासाहेबाना असलेले स्थान आपल्याला मिळावे अशी त्या नाटकमंडळींकडून देवलांची रास्त अपेक्षा होती असा प्रवाद आहे. देवलांच्या अंगी असलेले नाट्याविषयक ज्ञान आणि काव्यप्रतिभा यामुळे तसे स्थान त्याना मिळायला हरकत नव्हती. तसे घडले नाही हे मात्र खरे. देवलांचा स्वतःचा तापटपणा आणि मानी स्वभावही आडवा आला असेल!<br>{{gap}}ते काही असो. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सहवासाचा, मार्गदर्शनाचा फार मोठा प्रभाव देवलांवर पडलेला होता. १८८५ मध्ये अण्णासाहेबांचा मृत्यू झाल्यावर देवलानी अत्स्फूर्त आर्या रचली. ती अशी :-<br> {{center|<poem>बलवत्-कवि - कविता -मधुमधुपासम रसिक रसिक जे प्याले । वदतील माधुरी ती ससित पयाचे न देति शत प्याले ॥१॥ बलवत् कवि ही भरत मुनीचीच मूर्ति अवतरली । जिच्या अनुमान कृतिने नाट्यकला अज्ञ ताप ती तरली ॥२॥</poem>}} {{gap}}अनेक ठिकाणी देवलानी अण्णासाहेबांविषयीचा आपला प्रेमभाव व्यक्त केला आहे. ‘शापसंभ्रम' नाटकाच्या नांदीमध्ये त्यानी आपल्या गुरुला वंदन केले आहे ते असे....... {{center|<poem>'श्रीनटनायक चिंतुनी आधी, बलवंता नमितो ॥ दुष्कर कामी प्रसाद गुरुचा धैर्य मना देतो ॥”</poem>}} आण्णांच्या शाकुंतलचे यश बघून संस्कृत वाङमयातील कथानकांवरून नाटके रचण्याची वा रूपांतरित करण्याची प्रेरणा देवलाना मिळाली आणि याच अुर्मीतून १८८६-८७ नंतर म्हणजे अण्णासाहेबांच्या मृत्युनंतर देवलानी 'मृच्छकटिक' आणि 'विक्रमोर्वशीय'<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर........................३५</noinclude> q32csvua0y1iu0hpnojkfgay5t54mbx पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६० 104 77586 236118 202187 2026-08-24T12:19:31Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236118 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>ही नाटके लिहावयास घेतली. त्यांपैकी मृच्छकटिक १८८७ मध्ये तर विक्रमोर्वशीय १८८९ मध्ये रंगभूमीवर आले.<br>{{gap}}'मृच्छकटिक' नाटकाला मोठेच यश मिळाले. या यशाचे कारण म्हणजे शूद्रकाच्या या मूळ नाटकात कथानकाचे धागे प्रेक्षकांची आतुरता वाढवणारे आहेत. अितर संस्कृत नाटकांच्या तुलनेत पाल्हाळ कमी आहे. चारूदत्ताचे औदार्य, वसंतसेनेची गुणप्रियता, मैत्रेयाची स्वामिभक्ति, मित्रप्रेम, शकाराचा शहाणपणाचा वास असलेला दुष्टपणा, तर शर्विलक व रदनिका यांची प्रेमकथा, या अनेक गोष्टींमुळे कथानक रंगत जाते. मूळ नाटकातून काटछाट करत देवलानी नाटक सुटसुटीत (त्या काळाच्या मानाने) बनवले. अुत्तम चाली, अभिनयसंपन्न नटवर्ग अणि खुद्द देवलानी मेहनतपूर्वक घेतलेल्या तालमी यामुळे या नाटकाचा बोलबाला खूप झाला. पुढे पुढे गंधर्वमंडळीनी थाटामाटाची सीनसिनरी करुन आणखी गंमत आणली. बालगंधर्वानी वसंतसेना आणि गणपतराव बोडसानी शकाराची भूमिका अजरामर करून टाकली.<br>{{gap}}त्या तुलनेत देवलांचे ‘विक्रमोर्वशीय' नाटक अजिबात यश मिळवू शकले नाही. त्याचे अतिमानुष कथानक प्रेक्षकांच्या मनाला भावण्यासारखे नव्हतेच.<br>{{gap}}देवलांचे एव्हाना पुण्यात बस्तान चांगले बसले. वृत्तीने नेमस्त असल्याने हरिभाऊ आपटे यांचेबरोबर त्यांचे चांगले मेतकूट जमले होते. न्यायमूर्ती रानडे यांच्या शिष्यपरिवारात जरी मोठ्या आस्थेने ते सामील झाले होते तरी एकूण सार्वजनिक जीवनातील धकाधकी त्याना मानवण्यासारखी नव्हती. पुण्यातील मित्रमंडळातील प्रो. वासुदेव बाळकृष्ण केळकर यांची मैत्री त्याना विशेष अुपकारक झाली. ते इंग्रजीचे प्रोफेसर आणि शेक्सपीयरच्या नाटकांचे मर्मज्ञ होते. त्यांच्यामुळे इंग्रजी नाटकातील बारकावे देवलांना नीटपणे समजून घेता आले. याच मंथनातून देवलांच्या 'झुंजारराव' नाटकाचा जन्म झाला.<br>{{gap}}'झुंजारराव' नाटक १८९० मध्ये प्रसिद्ध झाले. शेक्सपीयरच्या 'ऑथेल्लो' या जगप्रसिध्द शोकांतिकेचे रुपांतर म्हणजे देवलांचा झुंजारराव हे भाषांतर नाही तर रूपांतर असल्याने एतद्देशीय परिस्थितीला अनुसरून जुळणी देवलानी केली. ऑथेल्लो आणि इयागोचे झुंझारराव आणि जाधवराव झाले. डेस्डिमोनाची कमळजा झाली. ज्या कुणा महाभागाला शेक्सपीयरची मूळ कलाकृती माहीत नसेल त्याला हे नाटक म्हणजे स्वतंत्र कलाकृतीच वाटेल! मुळात कथानक, व्यक्तिरेखा या दृष्टीने शेक्सपीयरची ही कलाकृती अमर असल्याने आणि नाटक रूपांतराच्या साऱ्या मख्ख्या देवलाना अुत्तम प्रकारे अवगत असल्याने हे नाटक रंगभूमीवर बरीच वर्षे गाजले. गणपतराव जोशी यानी झुंझाररावाची भूमिका आणि बाळाभाऊ जोग यानी इयागोची भूमिका<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.............................३६</noinclude> b7d8z78ecoga79lbyxq8kx2axf3t0hs पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६१ 104 77587 236119 202188 2026-08-24T12:22:41Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236119 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>चांगलीच गाजवली.<br>{{gap}}याच सुमारास देवलांच्या रुपांतर प्रतिभेला ललकावणारी संधी आली.<br>{{gap}}१८९०-९१ च्या वर्षात इंदूरच्या संस्कृतप्रेमी अधिपतीनी बाणभट्टाच्या 'कादंबरी' वरून मराठीत संगीत नाटक लिहिण्याची स्पर्धा जाहीर केली होती. बाणभट्टाच्या लांबलचक समासांची ज्याना ओळख आहे, त्याना हे काम किती कटकटीचे, नाट्यकौशल्याची कसोटी पाहणारे होते याची कल्पना येईल. बक्षिसाची रक्कम एक हजार रूपयाची होती, हे मुख्य आकर्षण असले तरी त्यातील आव्हानाचे आकर्षणच देवलाना अधिक लोभावून गेलेले असणार! या कादंबरीवरून 'शापसंभ्रम' हे नाटक देवलानी लिहिले. अुपमा-अुत्प्रेक्षानी खचाखच भरलेल्या प्रदीर्घ वर्णनातून आणि काव्यमय कथेतून देवलानी अप्रतिम अशा नाटकाची निर्मिती केली. देवलांची बाकीची नाटके मूळ नाटकांवरून रूपांतरित झाली असल्याने त्यांच्या प्रतिभेला फारसा वाव नव्हता. पण जिथे कथेवरून नाटकाची निर्मिती असल्याने, नाटकाची पदे, प्रवेश, पात्रांची भाषणे, याबाबतीत देवलाना मुक्त स्वातंत्र्य मिळाले आणि त्यामुळे निर्माण झालेले नाटक परीक्षकांच्या कसोटीला अुतरलेच पण रंगभूमीवरील यशस्वितेच्या कसोटीलाहि पुरेपूर अुतरले. 'शापसंभ्रम' ला अर्थातच पहिले बक्षिस मिळाले. यात आणखी एक गंमत अशी होती. नाटकाचे हस्तलिखित पाठवताना लेखकाने आपले नाव प्रकट करावयाचे नव्हते तर खुणेचे वाक्य पाठवायचे होते. देवलानी खुणेचे वाक्य म्हणून पाठवलेली आर्या तितकीच प्रभावी आहे. ती आर्या अशी:<br> {{center|<poem>'असती चतुर परीक्षक, राय रसिक, जा सभेत जय मिळवी वळवी गुणे गुणज्ञा, गुरूजनकाचीहि योग्यता कळवी."</poem>}} {{gap}}इंदूरच्या अधिपतीनी मुद्दाम देवलाना बोलावून घेतले. ते स्वतः संस्कृतचे जाणकार असल्याने त्याना 'शापसंभ्रम' नाटकाचे फार अप्रूप वाटले. त्यानी देवलाना पारितोषिक तर दिलेच; याखेरीज अस्मानी रंगाचा रेशमी झगा, घड्याळ, चांदीच्या मुठीची काठी व पगडी देऊन देवलाना गौरविण्यात आले.<br>{{gap}}‘शापसंभ्रम' नाटकाचा प्रयोग सुरूवातीला आठ आठ तासांचा व्हायचा! आधी सात अंकांचा, मग पाच अंकांचा होत असे. १८९३ पासून असा प्रकार होत होता. अखेर देवलानी १९०८ साली बरीचशी पदे गाळून, नवीनच रंगावृत्ति तयार केली. नेहमी स्त्रीभूमिका करणारे भाऊराव कोल्हटकर या नाटकात पुरूष- भूमिकेत वावरले. पुंडरिकाची त्यांची भूमिका चांगली गाजली. याशिवाय चिंतोबा गुरव, कृष्णराव गोरे आदी नटांच्या भूमिकानी हे नाटक गाजले.<br>{{gap}}१८९३ च्या सुमारासच देवलानी अेका परकीय नाटकाच्या आधारे 'फाल्गुनराव'<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.........................३७</noinclude> g4ars7sj5qn8zql4lt5vi1nf6i25a9n 236121 236119 2026-08-24T12:25:41Z कल्पनाशक्ती 3813 236121 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>चांगलीच गाजवली.<br>{{gap}}याच सुमारास देवलांच्या रुपांतर प्रतिभेला ललकावणारी संधी आली.<br>{{gap}}१८९०-९१ च्या वर्षात इंदूरच्या संस्कृतप्रेमी अधिपतीनी बाणभट्टाच्या 'कादंबरी' वरून मराठीत संगीत नाटक लिहिण्याची स्पर्धा जाहीर केली होती. बाणभट्टाच्या लांबलचक समासांची ज्याना ओळख आहे, त्याना हे काम किती कटकटीचे, नाट्यकौशल्याची कसोटी पाहणारे होते याची कल्पना येईल. बक्षिसाची रक्कम एक हजार रूपयाची होती, हे मुख्य आकर्षण असले तरी त्यातील आव्हानाचे आकर्षणच देवलाना अधिक लोभावून गेलेले असणार! या कादंबरीवरून 'शापसंभ्रम' हे नाटक देवलानी लिहिले. अुपमा-अुत्प्रेक्षानी खचाखच भरलेल्या प्रदीर्घ वर्णनातून आणि काव्यमय कथेतून देवलानी अप्रतिम अशा नाटकाची निर्मिती केली. देवलांची बाकीची नाटके मूळ नाटकांवरून रूपांतरित झाली असल्याने त्यांच्या प्रतिभेला फारसा वाव नव्हता. पण जिथे कथेवरून नाटकाची निर्मिती असल्याने, नाटकाची पदे, प्रवेश, पात्रांची भाषणे, याबाबतीत देवलाना मुक्त स्वातंत्र्य मिळाले आणि त्यामुळे निर्माण झालेले नाटक परीक्षकांच्या कसोटीला अुतरलेच पण रंगभूमीवरील यशस्वितेच्या कसोटीलाहि पुरेपूर अुतरले. 'शापसंभ्रम' ला अर्थातच पहिले बक्षिस मिळाले. यात आणखी एक गंमत अशी होती. नाटकाचे हस्तलिखित पाठवताना लेखकाने आपले नाव प्रकट करावयाचे नव्हते तर खुणेचे वाक्य पाठवायचे होते. देवलानी खुणेचे वाक्य म्हणून पाठवलेली आर्या तितकीच प्रभावी आहे. ती आर्या अशी:<br> {{center|<poem>'असती चतुर परीक्षक, राय रसिक, जा सभेत जय मिळवी वळवी गुणे गुणज्ञा, गुरूजनकाचीहि योग्यता कळवी."</poem>}} {{gap}}इंदूरच्या अधिपतीनी मुद्दाम देवलाना बोलावून घेतले. ते स्वतः संस्कृतचे जाणकार असल्याने त्याना 'शापसंभ्रम' नाटकाचे फार अप्रूप वाटले. त्यानी देवलाना पारितोषिक तर दिलेच; याखेरीज अस्मानी रंगाचा रेशमी झगा, घड्याळ, चांदीच्या मुठीची काठी व पगडी देऊन देवलाना गौरविण्यात आले.<br>{{gap}}‘शापसंभ्रम' नाटकाचा प्रयोग सुरूवातीला आठ आठ तासांचा व्हायचा! आधी सात अंकांचा, मग पाच अंकांचा होत असे. १८९३ पासून असा प्रकार होत होता. अखेर देवलानी १९०८ साली बरीचशी पदे गाळून, नवीनच रंगावृत्ति तयार केली. नेहमी स्त्रीभूमिका करणारे भाऊराव कोल्हटकर या नाटकात पुरूष- भूमिकेत वावरले. पुंडरिकाची त्यांची भूमिका चांगली गाजली. याशिवाय चिंतोबा गुरव, कृष्णराव गोरे आदी नटांच्या भूमिकानी हे नाटक गाजले.<br>{{gap}}१८९३ च्या सुमारासच देवलानी अेका परकीय नाटकाच्या आधारे 'फाल्गुनराव<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.........................३७</noinclude> 5yniu2rd408edp1i8y0m6yurznjoxkw पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६२ 104 77588 236120 202191 2026-08-24T12:25:21Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236120 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>अथवा तसबिरीचा घोटाळा' या नावाचे एक गद्य नाटक रंगभूमीवर आणले. १८९४ मध्ये, शाहूनगरवासी नाटकमंडळीनी रंगभूमीवर आणलेल्या या नाटकात, गणपतराव जोशी अश्विनशेठची व बाळाभाऊ जोग रेवतीची भूमिका करत. पण हे नाटक फारसे चालले नाही.<br>{{gap}}१८९४ मध्ये पुण्यात वास्तव्य करून राहात असलेल्या देवलानी, हरिपूर- सांगलीतच स्थायिक व्हायचे ठरविले. १८९७च्या सुमारास विलिंग्डन कॉलेजच्या (त्यावेळी कॉलेज नव्हते) बाजूच्या माळरानावर जमीन घेऊन एक मळा करवून घेतला आणि मळ्यातच राहण्यासाठी घर बांधून घेतले. आयुष्यभर मळ्यात घर बांधून राहण्याचे त्यांचे फार दिवसांचे स्वप्न होते. पण याच दरम्यान त्यांच्या आयुष्यातील एक दुर्दैवी घटना घडली. ती म्हणजे त्यांच्या प्रेमळ पत्नी राधाबाई यांचे दुर्दैवी निधन झाले. दुर्दैवी अशा अर्थाने की बाळंतपणाच्या वेळी, एका नर्सने चुकून त्याना औषधाऐवजी कॉरबॉलिक ॲसिड दिले. लक्षात आल्यावर मिरजेच्या हॉस्पिटलमधील डॉक्टरानी, विशेषत: डॉ. वॉनलेस सारख्या निष्णात डॉक्टरानी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण ते धनुर्वात झालेल्या राधाबाईना वाचवू शकले नाहीत. (७ डिसेंबर १८९७)<br>{{gap}}प्रिय पत्नीचा मृत्यू देवलाना मोठा चटका लावून गेला. इतका की जसा त्यांचा संसार तिच्या निधनाने संपुष्टात आला. तसाच त्यांचा नाट्यलेखन संसारहि संपुष्टात आला.त्यानंतर त्यांच्या हातून फक्त एक अर्धवट लिहून तयार असलेले नाटक पुरे झाले आणि जवळजवळ वीस वर्षानंतर त्यांच्याच एका गद्य नाटकाचे संगीत नाटकात रूपांतर झाले.<br>{{gap}}आपल्या हरिपुरात राहात असताना देवल संगमेश्वराच्या देवळाबाहेर कृष्णा- वारणेच्या संगमाजवळ जो एक पिंपळाचा पार आहे त्या पाराशी बसून चिंतनमग्न होत असत. त्याच सुमारास सांगलीचे अधिपती कै. तात्यासाहेब पटवर्धन यानी आपल्या वृध्दापकाळात एका लहान वयाच्या मुलीशी विवाह केला. असे विवाह समाजात बरेचदा होत असत. पण प्रत्यक्ष राजाने, प्रजेच्या पालनकर्त्यानेच, असा विवाह करण्याने, त्या घटनेचे पडसाद उमटले. कविमनाच्या देवलांच्या कानी त्या कुमारीचा आक्रोश किंकाळ्या फोडत गेला असावा. कारण अशा चिंतनमग्नतेतूनच ती निष्पाप कुमारिका जख्ख म्हाताऱ्याशी लग्न ठरल्यावर, आपल्या जन्मदात्या आईला काय म्हणाली असेल, याचा विचार देवलांच्या मनात चमकून, त्या अद्रेकासरशी त्यांच्या तोंडून “तू टाक चिरून ही मान! नको अनमान!” ही ओळ बाहेर पडली!<br>{{gap}}आणि मराठीमधील एका अमर नाटकाचा जन्म झाला!<br>{{gap}}ते नाटक म्हणजे 'शारदा'. बायकोच्या मृत्यूआधीच या नाटकाचे काही प्रवेश<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर..........................३८</noinclude> 1abt0i4jlyda8hkcn0gq3wg9vi17si3 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६३ 104 77589 236122 202192 2026-08-24T12:28:17Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236122 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आणि पदे देवलानी लिहिली होती. पत्नीच्या दुःखाने व्यथित झालेल्या देवलांची लेखणी काही काळ स्तब्ध झाली. पण मनाच्या तळागाळात रूतून बसलेली शारदेची वेदना त्याना स्वस्थ बसू देईना. आणि अखेर दोन वर्षानंतर म्हणजे १८९८ साली, देवलानी ‘शारदा' नाटकाचे लेखन पूर्ण केले.<br>{{gap}}देवलांच्या एकूण सात नाटकांमध्ये त्यांच्या 'शारदा' या नाटकाला अतिशय महत्त्व आहे. समीक्षकांच्या मते त्यांची सहा नाटके एका पारड्यात आणि शारदा नाटक दुसऱ्या पारड्यात टाकले तर शारदेचे पारडे जड राहील! याचे प्रमुख कारण म्हणजे देवलांचे ते संपूर्णपणे स्वतंत्र नाटक आहे. त्यांच्या स्वतःच्या संवेदनाक्षम चिंतनशीलतेतून, स्फूर्तीच्या आवेगासरशी स्फुरलेले ते नाटक आहे. त्या नाटकावर त्यांचाच संपूर्ण अधिकार आहे. अितर नाटकांच्या बाबतीत अुलट परिस्थिती आहे. ती नाटकं संस्कृत वा इंग्रजी साहित्यावर आधारित, रूपांतरित, भाषांतरित अशी नाटकं आहेत. त्यामुळे नाही म्हटले तरी त्या कलाकृतीना थोडेसे गौणत्व प्राप्त होतेच. त्याहून महत्त्वाचे म्हणजे 'शारदा' हे सामाजिक नाटक आहे. यापूर्वीच्या नाटकातून ऐतिहासिक, पौराणिक, काल्पनिक कथानके असायची. त्या तुलनेत, आपल्या नेहमीच्या पाहण्यातील अनुभवातील माणसं नाटकात पात्ररूपाने भेटल्याने, प्रेक्षकांना अनपेक्षित सुखद आनंद मिळाला. वास्तविक 'शारदा' नाटकापूर्वी सामाजिक नाटके रंगभूमीवर अजिबात आली नव्हती असा प्रकार नव्हता. पण याच नाटकाला एवढे प्रचंड यश मिळाले की सामाजिक विषयावरील 'शारदा' हेच पहिले नाटक असं म्हणण्याचा प्रघात पडला! जरठकुमारी विवाहाचे आजमितीला महत्त्व नसले तरी १८९८-९९ च्या काळात, तो खळबळजनक वाटावा असाच विषय होता. एक श्रीमंत वृध्द गृहस्थ आपल्या श्रीमंतीच्या जोरावर, एका गरीब कन्येबरोबर विवाह लावू पाहतो आणि एक तरूण, बाणेदार तेजस्वी तरूण, हा बेत हर प्रयत्नाने हाणून पाडतो ह्या सूत्राभोवती नाटकाचे कथानक रचले आहे. या नाटकातील भुजंगनाथासारखा लंपट श्रीमंत, तोंडाने देवाचे नाव घेऊन कसाबाची करणी करणारा भद्रेश्वर, पैशाकरता पोटच्या पोरीचा गळा कापणारा कांचनभट, गरीब गायीसारखी श्रीमंताच्या दावणीला बांधली जाणारी शारदा, तिची अगतिक आई इंदिराकाकू आणि लोककल्याणाची तळमळ बाळगणारा तेजस्वी तरूण कोदंड अशी रोजच्या समाज-जीवनातील पात्रे नाटकात दिसली म्हणून त्या पात्रांशी प्रेक्षकांची एक प्रकारे भावनिक जवळीक निर्माण झाली. सरळसाधे संवाद, सुभाषितवजा वाक्ये, रोजच्या बोलण्यातील म्हणी, वाक्प्रचार आणि अनलंकृत भाषा, नाटकाच्या विषयाला अनुरूप असल्याने प्रेक्षकांच्या अंत:करणाला थेट जाऊन भिडते. 'श्रीमंत पतीची राणी,' 'जय कृष्णतटवासा,' 'मूर्तिमंत भीती उभी', 'तू टाक चिरून ही मान' यासारखी कथेचा परिपोष करणारी<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर................................३९</noinclude> tj5hm7c3r89gk2fyk72unbdjwi9x504 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६४ 104 77590 236123 202194 2026-08-24T12:30:38Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236123 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>सुंदर चालींची पदे यामुळे हे नाटक अल्पावधीतच लोकांनी डोक्यावर घेतले. सांगलीचे एक प्रसिद्ध नाटककार कै.न.ग. कमतनूरकर यानी देवलांची रुपांतरित नाटके आणि एकमेव स्वतंत्र नाटक 'शारदा', यासंबधात टिप्पणी करताना गंमतीनं म्हटलयं की 'शारदा' देवलांची औरस संतती असल्याने तिलाच देवलांचे नाव सांगण्याचा हक्क आहे. बाकीची नाटके हौसेने पाळावयास आणलेल्या 'परदेशी' मुलाप्रमाणे आहेत. त्यांच्या पालकानी कितीहि हौसेने, कितीहि ममतेने त्यांचे पालनपोषण केले, तरी ती अधूनमधून आपल्या मूळ 'घराण्याची' ओझरती पाझरती ओळख दाखविल्याशिवाय रहात नाहीत."<br>{{gap}}'शारदा' नाटकाने आर्थिक दृष्ट्या देवलाना फारच फायदा करून दिला. देवल मित्रमंडळीत म्हणत असत की 'शारदा' नाटकाने, त्याच्या नावातल्या प्रत्येक अक्षराचे तीन हजार रूपये मला दिले आहेत.” या नाटकाने प्रयोगापोटी म्हणजे हक्कापोटी व पुस्तकांच्या आवृत्तीवर असे मिळून देवलाना पंचवीस हजार रूपये मिळवून दिले असे गणपतराव बोडस यानी लिहून ठेवले आहे. ९०-९५ वर्षापूर्वीचा काळ आणि त्याकाळची रुपयाची किंमत लक्षात घेता ही रक्कम नक्कीच अभिमानास्पद होती. देवल आपल्या नाटकांच्या हक्काबाबत कमालीची जागरूकता दाखवत. आपल्या गुणांचा आणि श्रमांचा यथायोग्य मोबदला पदरात पाडून घेताना, ते यत्किंचितह दयामाया दाखवत नसत. मालकी हक्कांच्या संबंधात असा विशेष पायंडा पाडण्याचे श्रेय देवलाना दिले पाहिजे. आपल्या परवानगीवाचून प्रयोग केल्याबद्दल काही नाटकमंडळ्यांवर दावे लावून त्यानी कोर्टातून ते जिंकल्याचीही अदाहरणे आहेत. ही व्यवहारदक्षता अनेकांच्या टीकेस पात्र झाली हे खरे असले, तरी बालपणी व तरूणपणाच्या सुरूवातीच्या काळात, त्यानी दारिद्र्याचे जे चटके भोगले ते पाहता त्यांचे वर्तन दोषास्पद निश्चितच वाटत नाही, शिवाय नाट्यव्यवसाय हाच त्यांचा पूर्ण वेळेचा व्यवसाय होता हे लक्षात घेतले पाहिजे.<br>{{gap}}पत्नीचे दुःखद निधन झाले तेव्हा देवल ४२ वर्षांचे होते. नामदार गोखले, हरिभाऊ आपटे यासारख्या सुधारणावादी मित्रमंडळीत त्यांची अुठबस असे. तरीपण पुनर्विवाहाचा विचार करण्याइतके त्यांचे मन तयार झाले नसावे. कदाचित 'शारदा' नाटकाच्या लेखकाला तसं करणं शोभणार नाही असेहि त्याना वाटून गेले असेल. सांगलीच्या मळ्यात निवांत रहावे, चिंतन करावे असा त्यांच्या मनाचा कल झाला असावा. सांगली गावातील वडील बंधू कृष्णाजीपंत यांजकडे ते जेवायला जात. डॉ. देव यांच्याकडे मित्रमंडळीत गप्पा मारत. पण स्वभावतः ते आत्मकेंद्रित वृत्तीचे, मानी व तापट होते. कुटुंबियात वावरताना ते फार मनमोकळेपणाने वागत नसत. हळूहळू तत्वचिंतनाकडे व परमार्थाकडे त्यांचे मन लागू लागले होते. १९१० साली त्यानी<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर..............................४०</noinclude> h1bb2t7blibz4sih6le04v99xwsakn6 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६५ 104 77591 236124 202196 2026-08-24T12:32:52Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236124 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>थिऑसफीची दीक्षा घेतली होती. सांगली- हरिपुरात वास्तव्य असले तरी त्यांचा बराचसा वेळ नाटक-कंपन्यातून नाटके बसवून देण्यात जाई. मात्र ते फक्त स्वतःची व आपले गुरू अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या नाटकांखेरीज अन्य कोणाची नाटके बसवून देत नसत. सांगलीत १९०१ मध्ये रामभाऊ गोखले, कानिटकर, गोरे वगैरे मंडळीनी जी 'सामाजिक नाटक मंडळी' काढली होती, त्यांची नाटके देवल बसवून देत असत. भाऊराव कोल्हटकर असेपर्यंत किर्लोस्कर नाटकमंडळीत त्याना मोठा मान होता. मात्र १९०१ साली भाऊरावांच्या मृत्यूनंतर शंकरराव मुजुमदार यांजकडे नाटकमंडळींचे सर्वाधिकार आल्यावर, त्यांच्याशी देवलांचे खटके अडू लागले. आपला पूर्वीसारखा मुलाहिजा ठेवला जात नाही हे पाहून "आपण किर्लोस्कर कंपनीत पुन्हा पाऊल टाकणार नाही" अशी प्रतिज्ञा करूनच ते बाहेर पडले.<br>{{gap}}पुढे किर्लोस्कर नाटकमंडळीमधून बालगंधर्व, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे आदी मंडळी बाहेर पडली आणि त्यांनी १९१३ च्या सुमारास 'गंधर्व नाटक मंडळींची' स्थापना केली. त्या सर्वाना देवलांची नाट्यक्षेत्रातील योग्यता माहीत असल्याने त्यानी देवलाना नाट्यगुरू म्हणून आपल्या कंपनीत मानाने नेले. अर्थात तिथेही 'मानापमानाचा' प्रश्न होताच. कारण गंधर्व नाटकमंडळीत बालगंधर्वांचे लाडके नाटककार आणि देवलांचे गाववाले, नाट्याचार्य खाडिलकर आधीच सुप्रतिष्ठित होते. खाडिलकरांचे थोरले बंधू त्याना पित्यासमान होते. आणि अशा पितृतुल्य- बंधूंचे देवल मित्र आहेत आणि ज्येष्ठ नाटककार आहेत अशा आदराच्या भावनेतून खाडिलकर देवलांशी अदबीने वागत. बैठकीत बसले तरी स्वतःकडे कनिष्ठपणा घेऊन जरा दूर बसत. त्यामुळे या दोघा सांगलीकर नाटककारांत कधी बेबनाव झाला नाही. देवल फक्त स्वतःची व अण्णासाहेब किर्लोस्कर यांची नाटके बसवत तर खाडिलकर आपल्या नाटकांच्या तालमी स्वतः घेत.<br>{{gap}}गंधर्व नाटकमंडळी १९१६ च्या आरंभी बडोद्याच्या मुक्कामात असताना तेथील अधिपती सयाजीराव गायकवाड यानी, एखादी विनोदप्रचुर कॉमेडी रंगभूमीवर आणावी असे सुचवले. त्यावेळी देवल कंपनीत होते. त्यांना नवीन नाटक लिहिण्यासंबंधात विचारण्यात आले. देवलांची प्रकृती ठीक नसल्याने आणि त्यातच त्यांचा मधुमेह त्रास देत असल्याने, नवीन नाटक लिहणे शक्य नव्हते. मग गणपतराव बोडस यानी देवलांच्याच जुन्या 'फाल्गुनराव' नाटकाला संगीताची जोड देऊन ते रंगभूमीवर आणावे असे देवलाना सुचवले. ती कल्पना देवलाना आवडली. लागलीच ते सांगलीला आले. आणि यातून जन्माला आले ते सदाबहार नाटक 'संशयकल्लोळ'.<br>{{gap}}मराठी रंगभूमीवरील रूपांतरित नाटकांची छाननी केली तर 'संशयकल्लोळ' नाटक, त्या सर्व नाटकांचा मुकुटमणी शोभेल. देवलानी स्वतः एका विलायती<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.........................४१</noinclude> 4mabak9quw40algdtpx1qzqx4ihkzpm पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६६ 104 77592 236125 202197 2026-08-24T16:25:49Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236125 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>नाटकावरून म्हटलेले 'संशयकल्लोळ', ऑर्थर मर्फीच्या (All in the Wrong) आणि फ्रेंच नाटककार मोलिअरच्या 'गानारेल' या नाटकांशी जवळीक साधणारे आहे. एका प्रियकराने प्रेयसीला दिलेली तसबीर परपुरूषाकडे सापडून त्या प्रियकराने आणि ज्या परपुरुषाला सापडते त्याच्या बायकोने संशयग्रस्त होऊन घातलेले थैमान, ही या नाटकाची मध्यवर्ती कल्पना. पुरूष पात्राना फाल्गुनराव, अश्विनशेठ, वैशाखशेठ अशी मराठी महिन्यांची नावे आणि स्त्री पात्राना कृत्तिका, रेवती, रोहिणी अशी नक्षत्रांची नावे देवलानी बहाल केली आहेत. कृत्तिकेच्या तोंडी "घाईत घाई आणि विंचू डसला ग बाई,” “नवी नवलाची आणि वापरली की कवडीमोलाची" अशासारख्या रोजच्या बोलण्यातील अस्सल मराठमोळी म्हणी वापरल्यामुळे हे नाटक रूपांतरित आहे, असे चुकूनही वाटत नाही. भिक्षा मागणारा रामदासी, मोरावळा, गालावरचा तीळ, शालू, दागिने अशा भुल्लेखांमुळे नाटकात परकीय अंश औषधांपुरताही शिल्लक राहात नाही! सात्विक करमणूक करणारे आणि अकारण संशयाचे दुष्परिणाम दाखविणारे 'संशयकल्लोळ' हे एक बहारदार नाटक आहे. देवलांच्या काव्यातील प्रासादिकपणा जसा 'शारदे' तील पदांत अतरला आहे तसाच या नाटकातील पदांमध्ये अतरला आहे. 'सुकांत चंद्रानना,' 'कर हा करी धरिला शुभांगी,' 'संशय का मनि आला' अशासारखी साधी, सुंदर पदे आणि त्यांच्या अप्रतिम, सोप्या वळणाच्या सतत गुणगुणाव्या वाटणाऱ्या चालीमुळे 'संशयकल्लोळ' च्या व्यावसायिक यशाची बाजू अधिकच बळकट झाली. बालगंधर्वानी आपल्या अभिनयाने आणि स्वर्गीय गाण्याने अजरामर केलेली 'रेवती' आणि गणपतराव बोडस यांचा 'फाल्गुनराव' यामुळे या नाटकाला दिगंत कीर्ती लाभली. नवरा-बायकोमधील संशय हा कालातीत विषय असल्याने हे नाटक सदाबहार राहिले आहे. काळाच्या ओघात देवलांची बाकी नाटके विसरून गेली तरी या नाटकाचा टवटवीतपणा कधीच कमी होणार नाही.<br>{{gap}}पण काय दैवदुर्विलास पाहा? जे 'संशयकल्लोळ' नाटक, रसिकानी दहा दहा, वीस वीस वेळा बघितलं, ते नाटक रंगभूमीवर आलेलं देवलाना काही बघायला मिळालं नाही. मधुमेह त्यांच्या शरीरात घर करून त्याना पोखरत होताच. बुटाला खडा लागल्याचे निमित्त होऊन त्यांच्या डाव्या पायाला जखम झाली. ती काही केल्या भरून येईना. साखरेचे प्रमाण बेसुमार वाढलं होतं. मिशन हॉस्पिटलच्या प्रख्यात डॉ. वानलेसनी शर्थ केली. पण काही उपयोग झाला नाही.<br>{{gap}}१३-१४ जून १९१६ च्या मध्यरात्री त्यांच्यावर मृत्यूने झडप घातली. त्यांच्या जीवननाट्यावर नियतीने अखेरचा पडदा टाकला!<br>{{gap}}आणि चारच महिन्यानंतर, रंगभूमीवर, २० ऑक्टोबर १९९६ रोजी 'संशयकल्लोळ' चा पडदा अुघडला !<br> {{right|●●●}}{{nop}}<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर..........................४२</noinclude> pmlneu6znz6l1ya5q00ndplcsnjdtmu पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६७ 104 77593 236127 202203 2026-08-24T16:28:52Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236127 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude> {{center|{{x-larger|प्रखर देशभक्त नाट्याचार्य}}}} {{center|{{xx-larger|कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर}}}} {{rule}}{{rule|height=4px}}{{rule}} {{gap}}सांगलीला ‘नाट्यपंढरी’ म्हणून ज्यांच्यामुळे गौरविले जाते ते कै. विष्णुदास भावे सांगलीचे. त्यानी लावलेले नाटकाचे रोपटे जोपासून त्याची वाढ केली ते कै. देवल सांगलीचे. आणि पाठोपाठ ही 'हॅटट्रिक' पुरी करणारे कै. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर पण सांगलीचेच. ह्या विलक्षण योगायोगाचे नाट्यप्रेमी सांगलीकरास केवढे अप्रूप वाटावे? कसल्या का आवाजात असेना, पण खाडिलकरांचे नाट्यपद गुणगुणणारा असा नाट्यवेडा सांगलीकर घराघरात आढळेल.<br>{{gap}}अशा या खाडिलकरांचा जन्म २३ नोव्हेंबर १८७२ रोजी सांगलीत झाला. दुर्दैवाने त्यांच्या वडिलांचा, प्रभाकरपंतांचा मृत्यू कृष्णाजीपंतांच्या जन्माच्या आधीच चार महिने झाला होता. बापाच्या मुळावर आलेला मुलगा म्हणून सर्वानी राग धरला, पण प्रत्यक्ष जन्मदात्या आईने तर एवढा दुस्वास केला की त्या तान्ह्या मुलाला अंगावर पाजायला पण ती तयार नव्हती! शेजारच्या पटवर्धनांच्या बिऱ्हाडातील मनुकाकू नावाच्या बाई नुकत्याच बाळंत झाल्या होत्या. त्यानी दया येऊन कृष्णाजीपंताना आपल्या नवजात मुलाचा भाऊ समजून अंगावर पाजले व त्याचे संगोपन केले. अर्थात् जन्मदात्या आईचा राग किती काळ टिकणार? पतिवियोगाने दुःखी झाल्यापोटीचा राग कालांतराने मावळून तिने आपल्या मुलाला मांडीवर घेतला. एकंदरीत महाभारतकालीन कृष्णाप्रमाणेच या कृष्णाच्या नशीबी पण "देवकीने वाहिला! यशोदेने पाळिला" असा प्रकार होताच!<br>{{gap}}कृष्णाजीपंतांचं प्राथमिक शिक्षण सांगलीच्या विष्णुघाटावरील दादा छापखाने यांच्या शाळेत झालं. या शाळेमुळे त्यांचं हस्ताक्षर चांगलं झालं. वर्गात अभ्यासात हुषार असले तरी अंगात हूडपणा फार. नदीकडेच्या वाळवंटात खेळणं, तासन् तास नदीत डुंबणं यात बराच वेळ जाई. इंग्रजी शाळेत गेल्यावर तेथील बापू सरदेसाई नावाच्या शिक्षकाची त्यांच्यावर फार छाप पडली. त्यांच्या अफाट वाचनाचा व वक्तृत्वाचा परिणाम म्हणून कृष्णाजीपंताना त्या दोन्ही गोष्टींची आवड लागली. भावी आयुष्यात लेखक व वक्ता म्हणून त्याना जी दिगंत कीर्ती लाभली तिची पायाभरणी<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर........................................४३</noinclude> 6heugecqfv79f6mp38dnl5csvajhb9q पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६८ 104 77594 236128 202205 2026-08-24T16:32:14Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236128 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>या सरदेसाईंमुळे झाली हे ऋण खाडिलकरानी फार मानलं.<br>{{gap}}नाटकं पहाण्याचा नाद सांगलीकराला जणू अुपजतच असतो. कृष्णाजीपंतांच्या बालपणीच त्याना हा नाद एवढा लागला की विद्यार्थीदशेतच त्यानी एक छोटं नाटक लिहून बघितलं! १८८९ साली ते मॅट्रिकची परिक्षा उत्तम तऱ्हेने पास झाले. थोरले बंधू हरितात्यांची आपल्या धाकट्या भावावर पुत्रवत् माया होती, त्यांच्या हुशारीचे त्याना कौतुक होते, म्हणून त्यानी फारशी सुस्थिती नसतानाही कृष्णाजीला कॉलेजशिक्षणासाठी पुण्याला पाठवले. बरोबर काही सांगलीचे मित्र होतेच. या सर्वांचे आश्रयस्थान म्हणजे सांगलीकरांचा पुण्यातील वाडा. सर्व मित्र तिथे एकत्र रहात. पुण्याच्या अुच्च वातावरणात कृष्णाजीपंतांची खरीखुरी मानसिक जडणघडण झाली. तो काळ चिपळूणकर- आगरकर व टिळक यांच्या कर्तृत्वाचा होता. त्यांच्यामुळे पुण्यात एक वेगळेच असे चैतन्याचे वारे वहात होते. देशभक्तीची प्रखर भावना प्रत्येकाच्या मनात जागृत झाली होती. फर्गसनमध्ये एक वर्ष काढल्यावर कृष्णाजीपंतानी डेक्कन कॉलेजमधे नाव घातले; कारण त्यांच्या आवडीच्या तत्त्वज्ञान विषयाचे नामांकित प्रोफेसर सेल्बी तेथे होते म्हणून. अभ्यास करतानाच दुसरीकडे त्यांच्या नाट्यविषयक आवडीस खतपाणी घातलं जात होतंच. 'हॅम्लेट' नाटकाचे प्रयोग बघून त्याना शेक्सपीयरचे आकर्षण याच काळात निर्माण झाले.<br>{{gap}}बी.ए. झाल्यावर ते सांगलीला आले. सांगली हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागले. घरसंसाराचा गाडा ओढायला मदत व्हावी हा हेतू होताच. दोन वर्षे शिक्षकाचे काम त्यानी आस्थेवाईकपणे केले. याच काळात त्यांनी त्यांचे पहिले नाटक (अगदी बालपणीचे लुटुपुटूचे सोडून) 'सवाई माधवरावाचा मृत्यू' हे लिहून काढले. पुण्यातील वास्तव्यात शेक्सपीयरच्या आकर्षणापोटी "हॅम्लेट आणि ऑथेल्लो" बघितल्यापासूनच त्या दोन्ही नाटकानी ते फार प्रभावित झाले होते. पेशवाईतील विचारी पण विकारी अशा सवाई माधवरावांवर हॅम्लेटचा आणि मंत्रतंत्राच्या कामात वाकबगार अशा केशवशास्त्री या पात्रावर ऑथेल्लोमधील आयागोचा बेमालूम पोशाख चढवून त्यानी मराठी साहित्यातील एका अजरामर नाटकाला जन्म दिला. नाट्यक्षेत्रातील त्यांची पहिलीच अुडी, पराक्रमी हनुमंताच्या जन्मतःच घेतलेल्या अुडीसारखी देदीप्यमान् ठरली!<br>{{gap}}सांगलीतील त्यांचा जीवनक्रम तसा मजेत चालला होता. जुन्या काळाप्रमाणे लग्न होऊन सौ. गौरबाईंना पहिले अपत्य झाले होते. सांगली नगरवाचनालयात चांगली पुस्तके मिळत. शिक्षकी पेशा चांगला चालला होता. मित्रमंडळ होतेच.<br>{{gap}}तरीपण कृष्णाजीपंतासारख्या गरूडवृत्तीच्या तरुणास या परिस्थितीत समाधान<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर......................................४४</noinclude> ttsblr9mrgwx4fcafp3rir6slujwcqk पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६९ 104 77595 236129 202207 2026-08-24T16:34:58Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236129 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>नव्हते. कृष्णेच्या पाण्यात पोहणारा जीव अथांग समुद्रातील अुंच अुंच लाटांवर आरूढ व्हायला बघत होता.<br>{{gap}}निबंधकार चिपळूणकर, पुण्यात जवळून पाहिलेले टिळक, यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने, स्वातंत्र्य-संपादनाच्या खडतर राजकारणात स्वतःला झोकून द्यावे, अशी अनिवार ऊर्मी त्याना गप्प बसू देईना. बाह्यात्कारी, कुटुंबाची आर्थिक दुरवस्था दूर करण्याच्या हेतूने, वकिलीचे शिक्षण घ्यावे म्हणून त्यानी एल.एल.बी. करण्यासाठी सांगली सोडली व ते मुंबईला आले.<br>{{gap}}एकीकडे अभ्यास चालू होता पण मनातील खळबळ कशी काय शांत करावी हे त्याना समजेना.<br>{{gap}}अशा चिंतेत असताना अचानक त्याना हवा तो रस्ता मिळाला. त्याची मौज अशी झाली.<br>{{gap}}"ब्राह्मण आणि त्याची विद्या" या नावाचा एक ग्रंथ नुकताच प्राचार्य गोळे यानी लिहिला होता. त्याचे परीक्षण करणारा लेख कृष्णाजीपंतानी “विविधज्ञानविस्तार” या मासिकात लिहिला. या लेखात त्यांच्या स्वतःच्या उत्कट देशभक्तीच्या विचारांचे, मानसिक आंदोलनांचे जणु प्रतिबिंबच पडले होते. या लेखाकडे अनेक विचारवंतांचे लक्ष गेले, तसे लो. टिळकांचे पण गेले. या लेखातल्यासारखे बाणेदार राष्ट्रीय विचाराचे स्वाभिमानी तरूण "केसरीला" मिळतील तर बरे होईल असे उद्गार त्यानी नारायणराव कानिटकरांकडे काढले. हे गृहस्थही नाटके लिहणारे होते. त्यामुळे त्यांची व खाडिलकरांची ओळख होती. मग ते खाडिलकरांना घेऊन टिळकांकडे गेले. प्रथम भेटीतच टिळकानी त्याना “केसरी” साठी लेख लिहायला सांगितला. विषय सुचवला, "राष्ट्रीय महोत्सवाची आवश्यकता." तो दिवस रविवारचा होता. सर्व माहिती गोळा करून अुत्साहाने खाडिलकरानी लेख लिहिला. मित्राना दाखवून, जरूर त्या सुधारणा करून, टिळकांकडे दिला. मनात धाकधुक होती. टिळकाना लेख आवडेल का? का नापसंत म्हणून परत करतील?<br>{{gap}}त्याकाळी “केसरी” मंगळवारी प्रसिध्द होत असे.<br>{{gap}}सोमवारचा दिवस बेचैनीत गेला.<br>{{gap}}मंगळवारी पाहतात तो काय! त्यांचा लेख प्रसिध्द झाला होता. नुसता लेख म्हणून नव्हे तर चक्क अग्रलेख म्हणून छापला होता!<br>{{gap}}सगळं कसं स्वप्रवत् घडलं होतं. अनिश्चिततेच्या भोवऱ्यात डगमगताना त्यातून मार्ग सापडावा म्हणून जी नाव ते शोधत होते ती नावच अचानक त्यांच्या हाती आली होती!{{nop}}<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.............................................४५</noinclude> c2p167uaqg1penf04mecdf7zmistjvj पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७० 104 77596 236130 202208 2026-08-24T16:37:43Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236130 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}हा कृष्णाजीपंतांच्या, नव्हे तर काकासाहेबांच्या, आयुष्याला दिशा देणारा मोठा टप्पा होता. (आता त्याना काकासाहेब म्हटले जात असे.)<br>{{gap}}काकासाहेबाना आता त्यांच्या आवडीचे क्षेत्र मिळाले होते. लोकजागृती करण्यासाठी म्यानाबाहेर पडायला उत्सुक असणाऱ्या तलवारीला रणभूमी मिळाली होती. ब्रिटीश सरकारवर टीकेची झोड अुठवणे, लोकाना निर्भयतेची शिकवण देणे, नव्या नव्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक प्रश्नांवर जागृती करणे, या कामात त्यांच्या धारदार लेखनशैलीची आणि संपादनकौशल्याची कसोटी लागली. त्याच सुमारास सर्वत्र दुष्काळ पडला. सोलापूर-विजापूर भागातील स्वरूप तर फारच भयंकर होते. ‘केसरी' त माहितीपर लेख लिहिण्याच्या दृष्टिकोनातून काकासाहेब त्या भागात दौऱ्यावर गेले. ते काम चालू असताना मनातील नाटककार सजग होताच. विजापूरचा उध्वस्त किल्ला बघितला तेव्हा मनात जी काही स्पंदने झाली, त्यातून त्यांच्या "कांचनगडची मोहना" या नाटकाची निर्मिती झाली. प्लेगच्या साथीच्या वेळी ते सांगलीला राहायला आले, तेव्हा त्यानी नाटकाचे प्रत्यक्ष लिखाण केले. पुढे हे नाटक प्रसिध्द झाले आणि २४ डिसेंबर १८९८ रोजी त्याचा पहिला प्रयोग पुण्यात झाला.<br>{{gap}}१८९७ च्या वर्षात पुण्यात प्लेगची साथ आली. पण ती परवडली असं म्हणण्याची वेळ लोकांवर आली. कारण प्लेगचा रोगी शोधण्याच्या निमित्ताने गोऱ्या इंग्रज सोजिरानी लोकांची जी ससेहोलपट केली, जुलूमजबरदस्ती केली, त्यामुळे सामान्य लोकांचे जिणे मुष्किल झाले. 'केसरी' ने जुलुमी अधिकाऱ्यांवर आणि सरकारवर टीकेची झोड उठविली. लोकांचा क्षोभ वाढत गेला, त्याचे पर्यवसान पुण्यातील जुलुमी अधिकारी रँडच्या खुनात झाले. हा सारा प्रक्षोभ केसरीतील लिखाणाने झाला, अशी सरकारची भावना झाली. त्यामुळे या ना त्या कारणाने सरकार टिळकाना अडकवण्यासाठी संधी शोधत होते. ती त्याना केसरीतील लेखावरून मिळाली. गंमत म्हणजे ज्या लेखावरून टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला गेला तो मुळात त्यांच्या हातचा नव्हता तर तो लेख काकासाहेबानी लिहिला होता. मात्र संपादक म्हणून त्याची संपूर्ण जबाबदारी टिळकांनी स्वीकारली. आपल्यामुळे टिळकांवर तुरुंगवासाची पाळी आली याचं काकासाहेबाना किती दुःख झालं असेल! टिळक मात्र तो खेळाचाच एक भाग असे समजून चालले. हा त्यांचा केवढा मोठेपणा!<br>{{gap}}लो. टिळकाना १४ सप्टेंबर १८९७ रोजी १८ महिन्याची शिक्षा झाली. या काळात 'केसरी' ची संपूर्ण जबाबदारी काकासाहेबांकडे होती. टिळकांची 'केसरी' मधील ठाम भूमिका तशीच पुढे चालू ठेवायची पण निमित्त शोधत असणाऱ्या सरकारचे गंडांतर तर येऊ द्यायचे नाही, अशी दुहेरी कसरत या काळात काकासाहेबाना<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर....................................४६</noinclude> 1374xjxhjrti2g2ljqsddk0ljgnndfp पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७१ 104 77597 236131 202209 2026-08-24T16:40:07Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236131 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>करावी लागली. ही करामत त्यानी एवढ्या कौशल्याने केली, की प्रो. मॅक्समुल्लर प्रभृती विद्वानांच्या प्रयत्नाने, सहा महिने आधीच तुरुंगातून सुटका झालेल्या टिळकानी, काकासाहेबांची मनापासून पाठ थोपटली. इतकेच काय, पण ६ सप्टेंबर १८९८ रोजी मुक्तता झाल्यावरसुद्धा, ४ जुलै १८९९ रोजी केसरीचे संपादकपद घेऊन 'पुनश्च हरिः ओम' करेपर्यंतच्या दहा महिन्यांच्या काळात, निर्धास्तपणे केसरीची सूत्रे काकासाहेबांकडेच टिळकानी राहू दिली. इतका त्यानी लोकमान्यांचा विश्वास संपादन केला होता. खुद्द टिळकानी आपल्या अग्रलेखात म्हटलंय की "सांधा जेव्हा बेमालूम जडेल, किंबहुना सांधा केला आहे की नाही याचीच पाहणाऱ्याला भ्रांत पडेल, तेव्हाच सांधा लावणाऱ्याचे कसब दृष्टीस येते. अशा प्रकारचा बेमालूम सांधा खाडिलकरांनी जडविला होता, हे केसरीच्या वाचकाना कळून आलेच आहे.”<br>{{gap}}किती लाखमोलाची शाबासकी!<br>{{gap}}साहित्यसम्राट न. चिं. केळकर आणि नाट्याचार्य खाडिलकर म्हणजे लो. टिळकांचे डावे-उजवे हात. (दोन्हा 'नाटक्ये' निघाले हे त्यांच्याविषयीचे टिळकांचे गमतीचे मत). केळकर आणि खाडिलकर यांची तुलना अप्रस्तुत असली, तरी खाडिलकरांनी टिळकांच्या लिखाणाची धाटणी एवढी आत्मसात केली होती की दोघांचे अग्रलेख वेगवेगळे ओळखणे कठीण व्हावे. टिळकांचे विचार व भिन्नभिन्न विषयांवरील मते काकासाहेबानी एवढी अभ्यासली होती, की अेखाद्या विषयावर टिळकाना कशा प्रकारचा लेख अपेक्षित आहे, याचे आपसूक ज्ञान काकासाहेबाना असे. प्रतिपक्षावर जोरदार आघात करताना, हातचे काही राखायचे नाही, त्याला पुरा लोळवायचा, अशी त्यांची वृत्ती असे. (न.चिं. केळकर यालाच अगदी 'शेणखतात लोळवणे' असे म्हणत.)<br>{{gap}}लो. टिळकानी संपादनाची धुरा घेतल्यावर, काकासाहेबानी काही काळ सांगलीत विश्रांती घेतली आणि लोकमान्यांच्या सल्ल्यानुसार एल. एल. बी. पूर्ण करण्यासाठी ते मुंबईला गेले. (कायद्याचं ज्ञान संपादकाला आवश्यक आहे असं टिळकाना वाटे.) त्याच सुमारास द. आफ्रिकेतील बोअर युध्द सुरू झाले. मूठभर बोअर लोकानी शस्त्रसज्ज इंग्रज फौजेशी जो यशस्वी सामना केला, त्याने प्रभावित होऊन काकासाहेबानी 'गनिमी काव्याचे युद्ध' ही रम्य युद्धकथा- लेखमाला केसरीत लिहिली. अर्थात् त्यामुळे एल. एल. बी ची पुस्तके बाजूलाच पडली!<br>{{gap}}याच कालावधीच्या सुमारास, टिळकांच्या मनात सशस्त्र क्रांतीसंबंधात काही विचार घोळत असावेत. (क्रांतिवीर वासुदेव बळवंताच्या गुप्त बैठकांना तरुणपणी ते जात होतेच) क्रांतिकारकांच्या वैयक्तिक प्रयत्नांना सहानुभूती असली, तरी केसरीमधून त्यांचे समर्थन कधी होत नसे. अशा एकट्या-दुकट्याच्या प्रयत्नानी परिणाम साधला<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर..................................४७</noinclude> he3q11trspn95yj9g0ptbdr4luh3z23 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७२ 104 77598 236132 202211 2026-08-24T16:42:16Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236132 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>जाणार नाही, याची त्याना जाणीव होती. मात्र सशस्त्र क्रांतीची शक्यता कितपत आहे, याची चाचपणी ते नक्कीच करत होते. आणि या मंथनातूनच खाडिलकरांचे नेपाळ प्रकरण उद्भवले.<br>{{gap}}नेपाळमध्ये जर्मनीतील शस्त्रास्त्रे बनवणाऱ्या 'क्रप्स' नावाच्या कारखानदाराचे साहाय्य घेऊन, रायफलींचा कारखाना काढावयाचा आणि त्यायोगे सैन्याची अभारणी करुन, सशस्त्र अठाव करायचा, असं या गुप्त योजनचं स्वरूप होतं.<br>{{gap}}आता अशा कामगिरीसाठी अत्यंत विश्वासू माणसाची योजना करणे आवश्यक होते, हे तर उघडच आहे. काकासाहेब खाडिलकरांसारखा दुसरा माणूस कोण मिळणार? आता काकासाहेबाना गुप्तपणे पाठवायचे म्हणजे कुठले तरी सोंग वठवायला हवे. त्यानी कोणते सोंग वठवावे? चक्क मंगलोरी कौले बनविणाऱ्या कारखानदाराचे. ‘कृष्णराव' हे नाव धारण करून नेपाळमध्ये त्यानी वास्तव्य केले. आयुष्यात ज्यानी मातीची खेळणी बनविण्यासाठीसुद्धा चिखलात हात माखून घेतले नसतील, अशा काकासाहेबानी कौले बनविणाऱ्या शास्त्राची कष्टपूर्वक माहिती करून घेतली, नव्हे चक्क कौले बनविली! देशाच्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या नेत्याच्या आदेशानुसार, काहीही करण्याची तयारी असणारी, अशी प्रखर देशभक्त माणसं बघितली, की आजच्या परिस्थितीत शरमेने मान खाली घातली जाते! त्यापुढची कमाल म्हणजे बंदुकीचा कारखाना उभारण्यात या ना त्या कारणाने विलंब होऊ लागला, कौलाचे काम संपले होते. नेपाळात वास्तव्य कायम ठेवण्याच्या दृष्टीने कोणता तरी उद्योग करणे आवश्यक होते, तेव्हा या काकासाहेबानी काडीपेटी तयार करणेचा कारखाना अभारण्याची तयारी सुरू केली! त्यातला 'गंध' सुध्दा माहीत नसताना! दुर्दैवाने नेपाळात लपत-छपत राहून, सर्व प्रकारची संकटे सोसून (भाषा, हवामान, अन्न सर्व भिन्न!) बंदुकीचा कारखाना अभारण्याची शक्यता दिसेना, स्वकियांच्या फंदफितुरीने या गुप्त बेताचा सुगावा ब्रिटीशाना लागला आहे याची शंका येताच 'कृष्णरावानी' आपला नेपाळातील गाशा गुंडाळला! ब्रिटीश सत्तेने जंगजंग पछाडले तरी नेपाळमधील ‘जंग' मंडळीनी थांगपत्ता लागू दिला नाही, म्हणून काकासाहेबांचे निभावले. एरवी फासावर मान लटकणे अशक्य नव्हते. दुर्दैवाने या प्रकारात १९०१ ते १९०४ अशी अमेदीतील तीन वर्षे खर्ची पडली.<br>{{gap}}नेपाळ प्रकरणाच्या अयशस्वी समाप्तीनंतर, काकासाहेब विश्रांतीसाठी सांगलीत येऊन राहिले. नेपाळच्या हवेत त्याना मलेरियाचा खूप त्रास झाला. पाच-सहा महिन्यांच्या सांगलीतील विश्रांतीनंतर, त्यानी पुण्यातच बिऱ्हाड मांडायचे ठरविले. त्यानुसार आई, पत्नी आणि दोन मुलीना घेऊन ते पुण्यात आले. १९०५ पासून पुन्हा<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर......................................४८</noinclude> g0pi0s9a4sb3of6mnmitgwirywkx7ia पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७३ 104 77599 236133 202212 2026-08-24T16:45:01Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236133 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>अुत्साहाने केसरीच्या कामास लागले. पण आता फक्त केसरीचे लेखन एवढंच काम नव्हतं. आता त्याना लेखणीबरोबर वाणीपण देशकार्याला जुंपायची होती. कारण लोकमान्य टिळक आता केवळ महाराष्ट्राचे पुढारी नव्हते तर अवघ्या हिंदुस्थानचे पुढारीपण त्यांच्याकडे चालत आले होते. गव्हर्नरजनरल लॉर्ड कर्झनच्या जुलुमी, घमेंडखोर राजवटीमुळे, त्याने केलेल्या बंगालच्या फाळणीमुळे, वंगभंग चळवळ जोरात पेटली होती. फाळणीमुळे बंगाल चेतला, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात लो. टिळकानी केसरीतील लिखाणातून, देशभर दौरे काढून, व्याख्यानाद्वारा पुरा हिंदुस्थान पेटवून दिला. ‘भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून ब्रिटीश सरकार त्यांच्याकडे दात ओठ खाऊन बघत होते. लोकमान्यांचे बिनीचे वीर या नात्याने 'केसरीतून' काकासाहेबानी जळजळीत लेखांची सरबत्ती केली. अनेक परिषदा, सभा, मेळावे, यातून अत्यंत प्रक्षोभक भाषणे करून, त्यानी सर्वत्र एकच दंगल अडवून दिली.............<br>{{gap}}आणि त्यातूनच पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली!<br>{{gap}}केसरीतील प्रक्षोभक लेखांनी सरकार हवालदिल झाले. पुन्हा टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला गेला आणि १९०८ मध्ये त्याना मंडाले येथे सहा वर्षांच्या शिक्षेवर पाठवले गेले. काकासाहेबांच्या मनाला आत्यंतिक क्लेश देणारी बाब म्हणजे, ज्या लेखामुळे लोकमान्यांना शिक्षा झाली, तो पुन्हा एकदा त्यांच्याच स्वतःच्या (काकासाहेबांच्या) हातचा होता! त्यामुळे काकासाहेबाना किती यातना झाल्या असतील, ते त्यांचे त्यानाच माहीत! पण धीरोदात्त टिळकांच्या तोंडून त्यासंबंधी ब्र निघाला नाही!<br>{{gap}}अकीकडे कर्झनशाहीच्या विरोधात काकासाहेबांचे लिखाण चालू होतेच, पण त्यांच्या मनातील नाटककार अस्वस्थ होता. कर्झनविषयीची चीड लोकांच्या मनात निर्माण करायची, तर नाटकाच्या मनोरंजक माध्यमाची आवश्यकता होती. या विचारमंथनातूनच ‘कीचकवध' या मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटकाचा जन्म झाला. महाभारतातील मदांध, अुर्मट, मस्तवाल कीचकाच्या माध्यमातून, त्यानी कर्झन यथार्थपणे अभा केला. गांजलेली द्रौपदी (सैरंध्री) म्हणजे विवश भारतमाता अण कीचकाच्या छातीवर बसून वज्रप्रहार करणारा भीम म्हणजे साक्षात् लोकमान्य, ही प्रमुख साम्यस्थळे लोकाना एवढी भावली, इतकी पटली, की ते नाटक महाराष्ट्रातील लोकानी अक्षरश: डोक्यावर घेतले. १९०७ ते १९१० पर्यंत हजारो लोकानी नाटकाचे प्रयोग बघितले. जनप्रक्षोभ वाढू लागला. काकासाहेबाना अभिप्रेत असलेली पारतंत्र्याची चीड लोकांमध्ये प्रकर्षाने वाढू लागली..........<br>{{gap}}या साऱ्याचा परिणाम अटळ होता. ब्रिटीश सरकारने १९१० सालच्या फेब्रुवारीत<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर..........................४९</noinclude> o07gyetpg4dyzzkxaluktg484qa11e9 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७४ 104 77600 236134 202213 2026-08-24T16:48:04Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236134 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>या नाटकावर बंदी घातली!<br>{{gap}}नाट्यक्षेत्रात काकासाहेबांची कीर्ती अशी दुमदुमत असताना, लोकमान्य तुरूंगवासात गेल्यावर, केसरीच्या कामात मात्र कटकटी सुरू झाल्या. आजवर खाडिलकर आणि केळकर, लोकमान्यांचे डावे-उजवे हात म्हणून वावरत होते. दोन्ही माणसे मातब्बर. लोकमान्यांसारखे लोकोत्तर नेतेच त्या दोघांना अेकत्रपणे सांभाळू शकत होते. पण तेच तुरूंगवासात अडकल्यावर, जुने मतभेद उफाळून आले. वास्तविक केसरीत खाडिलकरांनी लिहावे आणि मराठ्याचं काम केळकरानी पहावं, अशी व्यवस्था झाली असताना, कोणतीहि पूर्वसूचना न देता दोन्ही पत्रांचं (डिक्लरेशन) प्रगटन केळकरानी आपल्या एकट्याच्या नावे करून टाकले!<br>{{gap}}शेवटची काडी पडली. आपल्या स्वाभिमानाचा अनादर होत आहे, असे वाटून, खाडिलकरांनी मुकाटपणे 'केसरी' सोडला.<br>{{gap}}ही घटना दुर्दैवी खरीच, पण दुहीचा शाप असलेल्या महाराष्ट्राला नवीन नक्कीच नव्हती.<br>{{gap}}अर्थात् 'केसरी' सुटला तरी जनजागृतीचे काम करणारे दुसरे माध्यम काकासाहेबांच्या हातात होतेच.<br>{{gap}}कीचकवधानंतर लिहिलेल्या 'भाऊबंदकी' नाटकाने (१९०९) त्याना चांगलाच हात दिला होता. त्या नाटकाने पण प्रचंड लोकप्रियता मिळविली. नाटक हे अुपजीविकेचे साधन होऊ शकते याचा त्याना नव्यानेच स्वतः पुरता शोध लागला.<br>{{gap}}यातूनच अुभ्या महाराष्ट्राला वेडं लावणारं, गुंगवून टाकणारं द्वैत जन्माला आलं. ते म्हणजे बालगंधर्व-काकासाहेबांचा संयोग.<br>{{gap}}बालगंधर्वांच्या स्वर्गीय गाण्याने काकासाहेबाना संगीत नाटके लिहिण्याची प्रेरणा मिळाली. वास्तविक आजवरची त्यांची नाटके गद्य होती. पण आता गंधर्वासाठी संगीत नाटके लिहायची, म्हणून त्यानी गाण्याचा अभ्यास सुरू केला. अनेक गवयांच्या नामवंत चिजा ऐकल्या. आणि यातून जन्माला आले ते रंगभूमीवरील सदाबहार नाटक 'मानापमान' दि. १२ मार्च १९११ रोजी त्याचा पहिला प्रयोग किर्लोस्कर संगीत मंडळीने मुंबईत केला. नानासाहेब जोगळेकरांचा 'धैर्यधर, गणपतराव बोडस यांचा 'लक्ष्मीधर' आणि खुद्द बालगंधवांची 'भामिनी'. सुंदर सुंदर नाट्यपदांनी नटलेले हे नाटक अशा काही चढत्या श्रेणीने रंगत गेले की पहिल्या प्रयोगापासूनच प्रेक्षकानी या नाटकाला डोक्यावर घेतले.<br>{{gap}}या नाटकाच्या यशाने काकासाहेबाना मोठाच हात दिला.{{nop}}<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.................................५०</noinclude> fq18p89dulvlmdr8t76wj7mnahgv4il पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७५ 104 77601 236135 202221 2026-08-24T17:17:44Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236135 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}त्यापाठोपाठ १९१३ साली त्यांचे 'विद्याहरण' रंगभूमीवर आले. त्याचेही प्रयोग धुमधडाक्यात सुरू झाले.<br>{{gap}}'केसरी' तून सुटका ही एकप्रकारे अिष्टापत्तीच ठरली!<br>{{gap}}यानंतरच्या काळात नाटककार म्हणून ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच झाले. नाटकांचे ‘हाऊसफुल्ल' प्रयोग धुमधडाक्याने चालू लागले. आर्थिक सुबत्तेमुळे त्यांच्या पत्नीला, गौरबाईना, आता सढळ हाताने खर्च करता येऊ लागला. १९०६ साली 'यशवंत' अर्फ आप्पा (पुढील काळातील 'नवाकाळ' चे संपादक) आणि १९०८ साली ‘विनायक' या मुलांचा जन्म झाला. पुढे १९१५ मध्ये दोन्ही मुलांच्या थाटात मुंजी झाल्या. हा काळ म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा कालखंड म्हणता येईल.<br>{{gap}}अशी सुखाने मार्गक्रमणा चालू असताना, अचानक एक दिवस, आनंदाची बातमी आली. लोकमान्यांची सुटका झाली. १९१४ मध्ये ते गायकवाडवाड्यात आल्याचे कळल्यावर, दोन्ही मुलाना घेऊन, काकासाहेब त्याना भेटायला गेले. मंडालेसारख्या विजनवासातील तुरूंगवास भोगून परतलेल्या आपल्या गुरूचे दर्शन घेताना त्यांचे आनंदाश्रू थांबत नव्हते.<br>{{gap}}मग त्या दोघांमध्ये काय संवाद झाला माहीत नाही, पण दुसऱ्याच दिवसापासून काकासाहेब 'केसरी' मध्ये रूजू झाले. अशा सहजतेने की जसं काही मध्यंतरीच्या काळात काही घडलचं नव्हतं! टिळक आल्यावर थंडावलेले राजकारण पुन्हा तापू लागले. सुरत काँग्रेसपासून राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पडलेले जहाल- मवाळ गट, मुस्लीम व अितर जमाती, या सर्वांनाच स्वराज्यप्राप्तीच्या कामी एकत्र आणावे, असा विचार लोकमान्यानी लखनौच्या अधिवेशनप्रसंगी मांडला होता. त्याला अनुसरून जातीय ऐक्याची अभंग फळी निर्माण करण्याच्या दृष्टीने काकासाहेब नव्या जोमाने, नव्या अुत्साहात 'केसरी'त लिहू लागले.<br>{{gap}}काही दिवस चांगले गेले आणि एक दिवस अचानक त्यांच्या अुत्साहावर पाणी पडले. १ ऑगस्ट १९२० रोजी लो. टिळकांचे दुःखद निधन झाले.<br>{{gap}}पुन्हा १९१०च्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. कुठं माशी शिंकली कुणास ठाऊक? पण केसरीचे ट्रस्टी म्हणून असलेले काकासाहेबांचे नाव काटले गेले.<br>{{gap}}जड अंतःकरणाने काकासाहेबाना 'केसरी' चा निरोप घेतला. पण पारतंत्र्याविषयी चीड निर्माण करण्याचा वसा पुढे कसा चालवायचा, याचा त्याना प्रश्न पडलाच नाही. अचानकपणे तो प्रश्न सोडवला गेला.<br>{{gap}}टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जहाल राजकारणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी,<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.................................५१</noinclude> mjh1tobnk4d77dqozkuvtmtjdbxo1my अनुक्रमणिका:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf 106 104089 236155 236074 2026-08-25T10:53:40Z कल्पनाशक्ती 3813 236155 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=लंकेचें वर्णन व वृतांत |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=गोविंद चिमणाजी भाटे |Address=कुलाबा |Year=1934 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 5="प्रस्तावना" 7 ="अनुक्रमणिका" 8="नकाशा" 9 ="लंकापुराणपरिचय" 21 ="लंकेचा दंतकथात्मक इतिहास" 37 ="लंकेंत पहिले पाऊल : कोलंबो बंदर व रत्नपुर नगर" 43="फोटो" 52 ="फोटो" 59="फोटो" 62="कँडी व पेरेडॅनिया" 66="फोटो" 73="फोटो" 79 ="खडक-देऊळ व खडक-किल्ला" 82="फोटो"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] tkstczqqeqbub43gm9kif7d9lakgkju पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/३ 104 111855 236161 236077 2026-08-25T11:09:36Z Shurpalimedha 5041 236161 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="2402:E280:3E70:27:A5B3:A7E1:FFA2:356B" /></noinclude>गोष्ट एका डॉक्टरची </br> <br></br> पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०१२</br> <br></br> © डॉ. विठ्ठल प्रभू</br> २ सी, शिवसागर</br> पांडुरंग नाईक रोड</br> राजा बढे चौक, शिवाजी पार्क</br> मुंबई - ४०००१६</br> दूरध्वनी (०२२) २४४५२०६५</br> भ्रमणध्वनी : ९८२०६७५८१५</br> Email: vithal_prabhu@</br> <br></br> प्रकाशक</br> अशोक केशव कोठावळे</br> मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस</br> न्यू गर्ल्स स्कूलसमोर, राम मारुती रोड</br> ठाणे (प.) - ४००६०२</br> Email: majesticph@gmail.com</br> <br></br> मुद्रक</br> मधुराज प्रिंटर्स ऍन्ड पब्लिकेशन्स् प्रा. लि.</br> स.न. २९/८-९ पारी कंपनीजवळ</br> धायरी, जि. पुणे-४११०४१</br> <br></br> संगणकीय अक्षरजुळणी</br> ऑलरिच एण्टरप्रायझेस</br> जी-८, सुमीत सदन</br> भागोजी कीर मार्ग, माहीम</br> मुंबई - ४०००१६</br> <br></br> मुखपृष्ठ : सतीश भावसार</br> <br></br> मूल्य : ₹२००<noinclude></noinclude> 9wo1xrg38k4pu3qxk4qx61n24jlf39b 236162 236161 2026-08-25T11:10:12Z Shurpalimedha 5041 236162 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="2402:E280:3E70:27:A5B3:A7E1:FFA2:356B" /></noinclude>गोष्ट एका डॉक्टरची </br> पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०१२</br> © डॉ. विठ्ठल प्रभू</br> २ सी, शिवसागर</br> पांडुरंग नाईक रोड</br> राजा बढे चौक, शिवाजी पार्क</br> मुंबई - ४०००१६</br> दूरध्वनी (०२२) २४४५२०६५</br> भ्रमणध्वनी : ९८२०६७५८१५</br> Email: vithal_prabhu@</br> <br></br> प्रकाशक</br> अशोक केशव कोठावळे</br> मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस</br> न्यू गर्ल्स स्कूलसमोर, राम मारुती रोड</br> ठाणे (प.) - ४००६०२</br> Email: majesticph@gmail.com</br> <br></br> मुद्रक</br> मधुराज प्रिंटर्स ऍन्ड पब्लिकेशन्स् प्रा. लि.</br> स.न. २९/८-९ पारी कंपनीजवळ</br> धायरी, जि. पुणे-४११०४१</br> <br></br> संगणकीय अक्षरजुळणी</br> ऑलरिच एण्टरप्रायझेस</br> जी-८, सुमीत सदन</br> भागोजी कीर मार्ग, माहीम</br> मुंबई - ४०००१६</br> <br></br> मुखपृष्ठ : सतीश भावसार</br> <br></br> मूल्य : ₹२००<noinclude></noinclude> 9m699vmtssq49ce5ma414z91dk86gll 236163 236162 2026-08-25T11:10:50Z Shurpalimedha 5041 236163 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="2402:E280:3E70:27:A5B3:A7E1:FFA2:356B" /></noinclude>गोष्ट एका डॉक्टरची </br> पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०१२</br> © डॉ. विठ्ठल प्रभू</br> २ सी, शिवसागर</br> पांडुरंग नाईक रोड</br> राजा बढे चौक, शिवाजी पार्क</br> मुंबई - ४०००१६</br> दूरध्वनी (०२२) २४४५२०६५</br> भ्रमणध्वनी : ९८२०६७५८१५</br> Email: vithal_prabhu@</br> प्रकाशक</br> अशोक केशव कोठावळे</br> मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस</br> न्यू गर्ल्स स्कूलसमोर, राम मारुती रोड</br> ठाणे (प.) - ४००६०२</br> Email: majesticph@gmail.com</br> मुद्रक</br> मधुराज प्रिंटर्स ऍन्ड पब्लिकेशन्स् प्रा. लि.</br> स.न. २९/८-९ पारी कंपनीजवळ</br> धायरी, जि. पुणे-४११०४१</br> <br></br> संगणकीय अक्षरजुळणी</br> ऑलरिच एण्टरप्रायझेस</br> जी-८, सुमीत सदन</br> भागोजी कीर मार्ग, माहीम</br> मुंबई - ४०००१६</br> मुखपृष्ठ : सतीश भावसार</br> मूल्य : ₹२००<noinclude></noinclude> 5jxamdyus98huy22w2jbod2y0udpbh0 पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/४ 104 111856 236169 236078 2026-08-25T11:36:07Z Shurpalimedha 5041 236169 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>{{gap}}{{gap}}{{gap}}'''{{x-larger|अनुक्रम}}'''</br> <br> दादर ....{{gap}}{{gap}} ....{{gap}}{{gap}}....{{gap}}{{gap}} १</br> मी डॉक्टर झालो.....{{gap}}{{gap}} ....{{gap}}{{gap}}....{{gap}}{{gap}} २२</br> कॅलिडोस्कोप. ....{{gap}}{{gap}} ....{{gap}}{{gap}}....{{gap}}{{gap}} ५५</br> समाजजीवन. ....{{gap}}{{gap}} ....{{gap}}{{gap}}....{{gap}}{{gap}} १००</br> 'निरामय कामजीवन'ची गोष्ट.....{{gap}}....{{gap}}{{gap}} ११३</br> केल्याने देशाटन.....{{gap}}{{gap}} ....{{gap}}{{gap}}....{{gap}} १२७</br> नाटक झालेच पाहिजे!.....{{gap}}{{gap}} ....{{gap}}{{gap}}....{{gap}}{{gap}} १४८</br> सूर राहू दे.....{{gap}}{{gap}} ....{{gap}}{{gap}}....{{gap}}{{gap}} १६१</br> <br></br> <br></br> <br></br> {{center|तीन}}<noinclude></noinclude> rpt8h9be4v65x7vwnm928pci9bzatcm 236172 236169 2026-08-25T11:42:15Z Shurpalimedha 5041 236172 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>{{center|{{larger|अनुक्रम}}}} दादर.................................................... १</br> मी डॉक्टर झालो........................................... २२</br> कॅलिडोस्कोप.............................................. ५५</br> समाजजीवन.............................................. १००</br> 'निरामय कामजीवन'ची गोष्ट................................. ११३</br> केल्याने देशाटन............................................ १२७</br> नाटक झालेच पाहिजे!....................................... १४८</br> सूर राहू दे................................................ १६१</br> <br></br> <br></br> <br></br> <br></br> <br></br> <br></br> {{center|तीन}}<noinclude></noinclude> 2vr4xkrslvnjtsmko3w0or6qm7e0rdd 236176 236172 2026-08-25T11:52:27Z Shurpalimedha 5041 236176 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>{{center|{{larger|अनुक्रम}}}} {{Block center|दादर.................................................... १}} {{Block center|मी डॉक्टर झालो..................................................... २२}} {{Block center|कॅलिडोस्कोप....................................................... ५५}} {{Block center|समाजजीवन........................................................ १००}} {{Block center|'निरामय कामजीवन'ची गोष्ट................................. ११३}} {{Block center|केल्याने देशाटन................................................... १२७}} {{Block center|नाटक झालेच पाहिजे!............................................. १४८}} {{Block center|सूर राहू दे.................................................... १६१}} <br></br> <br></br> <br></br> <br></br> <br></br> <br></br> {{center|तीन}}<noinclude></noinclude> opy7j6u1rd8tf6xb7bla7xvacuam8kk 236177 236176 2026-08-25T11:57:23Z Shurpalimedha 5041 236177 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude><br></br> <br></br> {{center|{{larger|अनुक्रम}}}} <br></br> {{center|दादर..................................................................... १}} {{center|मी डॉक्टर झालो..................................................... २२}} {{center|कॅलिडोस्कोप......................................................... ५५}} {{center|समाजजीवन........................................................ १००}} {{center|'निरामय कामजीवन'ची गोष्ट................................. ११३}} {{center|केल्याने देशाटन................................................... १२७}} {{center|नाटक झालेच पाहिजे!............................................. १४८}} {{center|सूर राहू दे........................................................... १६१}} <br></br> <br></br> <br></br> <br></br> <br></br> {{center|तीन}}<noinclude></noinclude> t924eelngeqpj8hwxcxba82thlqpfqt 236178 236177 2026-08-25T11:57:47Z Shurpalimedha 5041 236178 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude><br></br> {{center|{{larger|अनुक्रम}}}} <br></br> {{center|दादर..................................................................... १}} {{center|मी डॉक्टर झालो..................................................... २२}} {{center|कॅलिडोस्कोप......................................................... ५५}} {{center|समाजजीवन........................................................ १००}} {{center|'निरामय कामजीवन'ची गोष्ट................................. ११३}} {{center|केल्याने देशाटन................................................... १२७}} {{center|नाटक झालेच पाहिजे!............................................. १४८}} {{center|सूर राहू दे........................................................... १६१}} <br></br> <br></br> <br></br> <br></br> <br></br> {{center|तीन}}<noinclude></noinclude> 9jy0m0et1du06nrzlwyf9xu9la7hycd 236179 236178 2026-08-25T11:58:12Z Shurpalimedha 5041 236179 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude><br></br> {{center|{{larger|अनुक्रम}}}} {{center|दादर..................................................................... १}} {{center|मी डॉक्टर झालो..................................................... २२}} {{center|कॅलिडोस्कोप......................................................... ५५}} {{center|समाजजीवन........................................................ १००}} {{center|'निरामय कामजीवन'ची गोष्ट................................. ११३}} {{center|केल्याने देशाटन................................................... १२७}} {{center|नाटक झालेच पाहिजे!............................................. १४८}} {{center|सूर राहू दे........................................................... १६१}} <br></br> <br></br> <br></br> <br></br> <br></br> {{center|तीन}}<noinclude></noinclude> p8j3puwgjgxur47z94fdho07d9psws2 236180 236179 2026-08-25T11:58:46Z Shurpalimedha 5041 236180 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude><br></br> {{center|{{larger|'''अनुक्रम'''}}}} <br></br> {{center|दादर..................................................................... १}} {{center|मी डॉक्टर झालो..................................................... २२}} {{center|कॅलिडोस्कोप......................................................... ५५}} {{center|समाजजीवन........................................................ १००}} {{center|'निरामय कामजीवन'ची गोष्ट................................. ११३}} {{center|केल्याने देशाटन................................................... १२७}} {{center|नाटक झालेच पाहिजे!............................................. १४८}} {{center|सूर राहू दे........................................................... १६१}} <br></br> <br></br> <br></br> <br></br> <br></br> {{center|तीन}}<noinclude></noinclude> hpj3oyke4bjqv6lky9kdtx79dtm10s3 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१४० 104 111869 236136 2026-08-25T04:48:17Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 236136 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ८४ ) श्रीशंकर. शिका. श्रीमच्छंकराचार्यन्वय संजाताभिनव श्री विद्याशंकरभारती- स्वामी करकंजोद्भव * * * * * श्रीविद्यानरसिंह भारतीस्वामीकृत नारायण स्मरणानि. वेदशास्त्र संपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृंदे क्षेत्रस्थ वगैरे वास्तव्य प्रभृति प्रांत यांसीं आज्ञा केली ऐसी जे, राजश्री बळवंतराव चिटणवीस संस्थान सातारा यांणों हुजूर विनंती केली कीं, आमची चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ही ज्ञाती यांचा ज्ञातिधर्म पूर्वीपासून आजपर्यंत वहिवाट जी चालत आली त्याप्रमाणे वागत असतां नवीन हह्रीं ब्राह्मण तंटा करितात त्यास आजपर्यंत जसें चालत आलें तसें चालवावें. नवीन तंटा न होई असा बंदोबस्त करून देणार स्वामी समर्थ आहेत. म्हणोन श्रुत केलें. याजवरून हैं आज्ञापत्र सादर केलें असे. तरी पूर्वीपासून आजपर्यंत जसा ज्ञातिधर्म चालत आला असेल त्याप्रमाणे चालविणें. नवीन तंटा करूं नये. विशेष लिहिणें तें काय. शके १७४७ पार्थिव नाम संवत्सर आषाढ मास. याउपरी करवीरकर शंकराचार्य करवीरकराच्या उपद्रवामुळे बंदोबस्त करून घेण्याकरितां पुण्यास गेले. ते पर्वतीस होते. त्यांजकडे नीळकंठ शास्त्री आपले तटाचे ब्राह्मण घेऊन एक यादी, प्रभूज्ञातीवर नानापरीचे दोष देऊन चांद्रसेनीय ज्ञातीचे शास्त्रार्थं राघवाचार्य प्रभृतीनों लिहून दिला तो खोटा अशा संमताची जाऊन समजाविली. राघवाचार्य प्रभृतींची मंडळी जाऊन बोलली की, शास्त्रार्थ खोटा आम्हीं म्हणणार नाहीं. निर्णय सिद्ध आहे. भाणि वज्रटंक शास्त्री यांणीं कता वैशाख शुद्ध ४ शनिवारी दिला. त्यांतील मजकूर या ज्ञातीकडे वेदोक्त कर्मों व्हावीं येविषयीं आपण अनुकूल अशा साधनाचें पत्र नीळकंठ शास्त्री थत्ते यांचे स्वदस्तुरें दाखवून देवू. तरी येविषयीं वाद सांगणार नाहीं. व आज्ञेप्रमाणें प्रायश्चित घेऊं. दस्तूर खुद म्हणोन दिलें. त्याजवर थत्ते शास्त्री यांस सांगितलें कीं, तुम्हीं याप्रमाणें कतबा देऊन निर्वाह करून घेणे. त्यावरून वैवाख शुद्ध ७ स थत्ते यांणीं कतबा दिला. त्यांतील मजकूर आमचा लेख<noinclude></noinclude> s962jgd16wqe3vdk6nauv9s5hyrc40u पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१४१ 104 111870 236137 2026-08-25T04:48:34Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 236137 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ८५ ) पं पं वाचनालय 3 अशा स्वामीची व राजश्री चिंतामणराव आपा म्हणोन याज- निघाल्यास स्वदस्तूर पटवर्धन यांची खातरी झाल्यास स्वामी आज्ञा करतील त्यास मान्य, उभयतांचें निर्णयास थत्ते यांचे हातचें अस्सल पत्र पाहिजे ते राजश्री विठ्ठलराव दिवाणजी यांजपाशीं बडोद्यास ते येण्यास दिवसगत लागली, याजमुळ वेदशास्त्रसंपन्न राजश्री नीळकंठ शास्त्री यांणीं मध्ये येऊन विनंती केली कीं, वज्रटंक यांगों कतबा दिला परंतु आमचे पत्र नाहीं, असते तरी रुजुवार्तास येते. उर्गेच आम्हांवर कतबा टाकून आमची अबरू मलीन केली. करितां स्वामींनी पत्र करून दिले पाहिजे. त्याजवरून रुजुवातीस पत्र येत नाही. त्यापेक्षां ब्राह्मणावर निमित्त आले त्यावरून त्यांस पत्र करून दिले. त्यांत मजकूर - वज्रटंक तुमचें पत्र असा स्वदस्तूर काढून दाखवा म्हणोन दोन महिने बोलत आले. परंतु बोलण्याप्रमाणं दस्ताऐवज निघाला नाहीं. यास्तव तुमचा मुचलका तुम्हांस परत दिला असे. वज्रटंक यांणी तुम्हीं पत्र दिलें म्हणोन सांगितलें तें मृत्रा. वज्रटंक यांचे पत्राविशीं बोलणं उपयोगी नाहीं. असे ध्यानीं आणून तुम्हांस हैं पत्र - टाकून ब्राह्मणांनीं स्वस्थ असावें. . करून दिलें असे. तरी परस्पर सर्व विरोध मिती वैशाख वद्य १० शके १७४८. येणेप्रमाणें पत्र लिहून वेदशास्त्र सं० राजेश्री मल्हार श्रोत्री यांजपाशीं तिराईत अमानत ठेऊन श्रोत्री यांस राजश्री चिंतामणराव पांडुरंग मिरजकर यांचे विद्यमानें ताकीद केली कीं, ते यांचे हातचें अस्सल पत्र हजुवातीस आलें असतां हें पत्र तुम्हांपाशीं अमानत ठेऊन आम्हांस माघारें द्यावें. अथवा पत्र नच आलें तरी उभयतां एक होतील तेव्हां नीळकंठ शास्त्री थत्ते यांचे हवालीं करावें. म्हणोन श्रोत्री याजपाशीं ठेविलें असतां इतक्यांत थत्ते शास्त्री यांचे हातचें अस्सल पत्र - रुजुवातीस प्रविष्ट झालें. तेव्हां वज्रटंक शास्त्री प्रभृति ब्राह्मण येऊन उपोषित बसल कीं, थत्ते यांणी रुजुवातीस यावें. आणि श्रोत्री यांजपाशीं अमानत लेख आहे तो आणवावा. त्याजवरून श्रोत्री यांजकडे ब्राह्मण वसविले की, पत्र करारा- प्रमार्णे माघारं द्यावें. त्यांणी येऊन वितता केली की, सायंकाळी पत्र आणून देतों. येविशीं दरम्यान चिंतामणराव आप मिरजकर यास देऊन श्रोन्नी घरा गेले. आणि नीळकंठ शास्त्री यास मिळोन पत्र न देतां घटाईच्या गोष्टी सांगून पुण्यांत तुळशीबागेत ब्राह्मणांचा जमाव करूं लागले. * तेथे निरोप सांगून पाट- - भोर<noinclude></noinclude> 0iny4f0tb36laoj9u5v467uskmv2sj6 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१४२ 104 111871 236138 2026-08-25T04:48:48Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 236138 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ८६ ) त्या ग्रंथा- वितांच ब्राह्मण जिकडील तिकडे गेले. ते दुसरे दिवशीं पांडुरंग रामचंद्र ढमढरे त्यांचे वाड्यांत मिळोन आपले जागीं विचार करून रुजुवातीस येतो. राजेश्री चिंतामणराव आपा मिरजकर व आनंदराव ढाकफलकर वकील निसबत आंगरे प्रभृति थत्ते व नातू यांचे तर्फेनें तिराईत आले. त्यांच विचारें पत्र पाहिलें. दो चिरंजीव म्हणोन पितापुत्रवत् त्यांत मजकूर कोकणांत कांहीं खटले पडले आहेत तो मजकूर चिरंजीव राजेश्री अमृतराव बाबा व राजेश्री जीवनराव दिवाणजी यांस विदित केला. म्हणोन पत्र आलें होतें तें दिवाणजीस दाखविलें. त्याविशीं ग्रंथशोध करीत आहों. त्या प्रांतों याविशीं आपलाहि शोध असेलच. शोध करून इकडे रवाना करावा. बरून विचार करून ठेविला असतां उपयोग फार होईल. येविशीं लिहून काय कळवावें म्हणोन नीळकंठ शास्त्री यांचे हातचें निखालस पत्र खरें असें ठरलें. ते तिराईत गेले, तेव्हां वज्रटक शास्त्री यांणीं कतबा टाकिला. त्या- प्रमाणे पुरवणी होऊन वादास खरे आले. व नीळकंठ शास्त्री चिरंजीव म्हणोन पत्र लिहून अगत्यवाद लिहितात, व पेणकर ब्राह्मणांचे पत्रही दाखवितात व ग्रंथ पाठवावा म्हणजे फार उपयोगी पडेल. म्हणोन थत्ते लिहितात. तेव्हां थत्ते शास्त्री अनुकूल होतात. जर करितां हे चांद्रसेनीय नाहीं तरी हे ज्ञाति त्यांस अनुकूल कशी होईल. यावरून त्यांशींही खातरीच व त्यावरून वेदशास्त्रसंपन्न राजश्री राघवाचार्य प्रभृति जे त्रिविध त्यांसच कायस्थांचा शास्त्रार्थ निवडून दिला. त्या अर्थी चांद्रसेनीय ज्ञाति हीच असें निश्चयें केलें हेंच खरें याप्रमाणे झाल्यावर शंकराचार्य यांणी आपले ज्ञातीस पत्र करून दिलें. श्रीशंकराचार्यस्वामीचें पत्र. शिक्का. श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य पदवाक्यप्रमाणपारावारपारीण यमनिय- मासनप्राणायामप्रत्याहरध्यानधारणास माध्यष्टांगयोगानुष्ठाननिष्ठ तपश्चक्रत्र- नाद्य विच्छिन्न गुरुपरंपराप्राप्तषड्दर्शन संस्थापनाचार्यव्याख्यान सिंव्हासना- वीश्वर सकलनिगमागमसारहृदय वैदिकमार्गप्रवर्तक सर्वतंत्रस्वतंत्र श्रीम- द्वाराजधानीपंचगंगातीरवास कमलानिकेतनकर वीरसिंव्हासनाधीश्वरश्रीमच्छं-<noinclude></noinclude> 304agmn58xsxclx57ahewj3pmztibkz पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१४३ 104 111872 236139 2026-08-25T04:49:11Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 236139 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ८७ ) करभगवत्पाद जान्हवीजनित श्रीविद्याशंकरपादपद्माराधक श्रीविद्यानृसिंहभारती स्वामिकृत श्रीभासकपरिव्राराणामनुदिन मेधमानभव्यप्रदनारायणस्मरणानि स्वस्तिश्रीमत्पद्मसेवोत्तमं वेदशास्त्रसंपन्न राजश्री समस्त क्षेत्रस्थ प्रांत प्रभृति ब्राह्मणान्प्रति मंगलं दिशतु विशेषस्तु अत्रत्यक्षेमपरिज्ञानपूर्वकं कुशलज्ञापनेन भवद्भिः पत्रद्वारा संतोषः प्रापणीयः ततस्तदनंतरं आज्ञा होती जे, शके १७४७ पार्थिवनाम संवत्सरांत संस्थान देवतेचें आगमन पुण्यासंनिध पर्वती येथे झालें. तों पुण्यग्रामस्त ब्राह्मणांत तट पडोन दुफळी राजेश्री बळवंतराव मव्हार चिटणीस घोलकर व भिवराव विल व भगवंतराव मल्हार खासनिर्वास नाडकर संस्थान सातारा व नारायणराव सीताराम व विहल बाबाजी फणसे व विठ्ठलराव देवाजी दिघे व आनंदराव रावजी तासकर प्रभृति समस्त चांद्रसेनीय कायस्थ प्रभूज्ञातीचे धर्म वादाने झाली, त्यांत वेदशास्त्रसंपन्न राजश्री राघवाचार्य प्रभृति मंडळी गृहस्थाशेष यांचं शास्त्रानुमतें प्रतिपाद्य कीं चांद्रसेनीय कायस्थ प्रभू यांस वैदिक कर्मत्रयाधिकार आहे व वेदशास्त्रसंपन्न राजेश्री नीळकंठ शास्त्री प्रभृति अशेष गृहस्थ मंडळी यांचे प्रतिपादन करणें कों चांद्रसेनीय कायस्थ प्रभू यांस वैदिक कर्मत्रयाचा अधिकार नाहीं. येविशीं उभय तटांस आज्ञा केली. कीं, ज्ञातिधर्म जे जे पूर्वापार चालत आले आहेत त्याप्रमाणे चालतील.. तुम्ही ब्राह्मणांनीं एकरूप असावें त्यावरून राघवाचार्य प्रभृति मान्य झाले. नीळकंठशास्त्री प्रभृति यांचे म्हणणे कीं, आम्हीं यादी लिहून देतो. त्या यादीवर श्रीनीं रुजू करून त्याप्रमाणे सर्वांचीं संमत व्हावीं. म्हणजे आम्हीं मान्य आहों. यांतील चौकशी पाहतां शके १७४६ चे सालों नीळकंठ शास्त्री यांणी राजश्री विलराव दिवाणजी यांस पत्र देऊन कोकणांत कांहीं खटले उत्पन्न झाले आहेत. त्याविशीं आम्हीं ग्रंथशोध करीत आह. तुम्हीं तिकडे शोध करून ग्रंथ पाठवावे म्हणोन लिहिल्यावरून येथें चार शास्त्रज्ञ होते. त्यापासून शास्त्राधार संमताचा पट करून त्याकारणास्तव घेतला. . नंतर नीळकंठ शास्त्री यांणीं बुद्धीस विपर्यास आणून आम्ही यांत नाहीं अस अक्षरें श्री ओंकारेश्वरी नंदिकेश्वराचे पाठीवर हात मारून बोलिले. पुढे तुळशी- बार्गेत जमाव करून प्रभूंस कर्मत्रयाचा अधिकार नाहीं. व चांद्रसेनीय काय - स्थांची उपलब्धी नाहीं. असें आम्हीं म्हणणार नाहीं, असें ब्राह्मणांचे म्हणणे<noinclude></noinclude> 37gy81794kv7aeiqvp9osaqoh9wy4zm पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१४४ 104 111873 236140 2026-08-25T04:49:24Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 236140 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ८८ ) पडलें. प्रभूंस कर्मत्रयाचा अधिकार नाहीं. अशीं सर्वांचीं संमतें झाली. कलह मिटला असतां त्या संमतीपटापैकी दोनचार ब्राह्मणास पूर्वांग उत्तरांग प्रायश्चितें थत्ते शास्त्री यांणीं दिलीं. बाकी तट झाला. तेव्हां उपाय नाहीं म्हणोन हल्लीं यादी करून राघवाचार्य यांचे तटांतील ब्राह्मणास प्रायश्चित्ती ठरवून एकी करावी असा पर्याय दिसोन आला. तॉ वेदशास्त्रसंपन्न राजश्री वज्रटंक शास्त्री यांणीं कतबा श्रीसन्निध टाकिला. त्यांतील मजकूर वेदशास्त्रसंपन्न राजश्री नीळकंठ शास्त्रीयावा थत्ते यांचे, प्रभूंचे घरों वेदोक्त कर्म व्हावें येविषई अनुकूल अशा साधनांचें स्वदस्तूरचें पत्र प्रभू यांस लिहून दिलें तें श्रीस दान- विल्यास श्रीची आज्ञा होईल त्याप्रमाणे प्रायश्चित्त घेऊन आज्ञेप्रमाणे राहूं; येविषयीं वाद सांगणार नाहीं. मिती वैशाख शुद्ध ४ गुरौ शके १७४८ व्ययनाम संवत्सरे हे विज्ञापना हस्ताक्षर खुद्द म्हणोन. त्यावरून नीळकंठ शास्त्री थत्ते यांशीं आज्ञा केली कीं, तुम्हीं या कतव्यावर कतबा देऊन पुरवणीस उभे राहणें. त्यावरून थत्ते शास्त्री यांणीं कतबा दिला. त्यांतील मजकूर प्रभूंचे घरों वेदोक्त कर्म व्हावे अशा साधनाचे आमच्या स्वदस्तूरचं पत्र आणून आपलेस दाखवू म्हणोन वज्रटंक यार्णे लिहून दिल्हे आहे त्याप्रमाणे आमचे स्वदस्तुर पत्र प्रभूंच्या येथें वेदोक्त कर्म व्हावें येविषयीं आणोन दाखवावं. त्याची चौकशी माझे हातचें खरे किंवा खोटें याची होऊन श्री स्वामीची व राजेश्री चिंतामणराव आपा यांची खातरी झाली म्हणजे स्वामी आज्ञा करतील त्याप्रमाणे ऐकूं. मिती वैशाख शुद्ध ७ शके १७४८ व्ययनाम संवत्सरे हे विज्ञापना. म्हणोन त्यावरून सदरहू पत्र नीळकंठ शास्त्री यांचे हातचे विठ्ठलराव दिवाणजी याजराशी बडोद्यारा त्यास येण्यास दिवसगत लागली. तेव्हां निळकंठ शास्त्री थत्ते यांणीं मध्ये येऊन विनंती केली कीं, पत्र आमचें हातचें असतें तरी रुजुवातीस येर्ते. पत्र आमचे हातचे नसतां वज्रटंक यांणीं कतबा टाकून आमची अबरू मलीन केली. त्यास श्रीनीं कृपा करून येविशीं मजला पत्र करून दिले पाहिजे. त्यावरून त्यांस पत्र लिहून तिराईतींत ठेविलें तें असें. वज्रटंकशास्त्री याणी, तुम्ही प्रभूंस वेदोक्त कर्म व्हावें, असें साधनपत्र स्वदस्तूरचे दिलें तें काढोन दाखवितों; म्हणोन ते दोन महिने बोलत आले. परंतु बोल- ल्याप्रमाणे दस्ताऐवज निघाला नाहीं. यास्तव तुमचा मुचलका तुम्हांस परत . '<noinclude></noinclude> 38bpg5wo4nrv692muiv44xnzkqa4p88 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१४५ 104 111874 236141 2026-08-25T04:49:40Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 236141 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ८९ ) दिला. असें वज्रटंक शास्त्री याणी तुम्हीं प्रभूंस पत्र दिले म्हणोन सांगितलें ते मृषा, वज्रटंक यांचे पत्राविषयीं बोलणें उपयोगी नाहीं. असें ध्यानीं आणोन तुम्हांस हैं पत्र करून दिलें असे, तर परस्परें सर्व विरोध टाकून ब्राह्मणांनीं स्वस्थ असावें. विशेष लिहिणें तें काय ? वैशाख वद्य १० शके १७४८ म्हणोन. याप्रमाणे लिहून वे। राजेश्री मल्हार श्रोती यांजपाशीं तिराईत ठेविलें. आणि श्रोती यांस ताकीद केली कीं, नीळकंठशास्त्री यांचे हातचे अस्सल पत्र बडोद्याहून रुजुवातीस आल्यास हे पत्र आमचे तुम्हांपाशी अमानत आहे ते परत मागें द्यावें. पत्र नच आले तरी उभय ब्राह्मणाचे ऐक्य होईल तेव्हां नीळकंठशास्त्री यांचे हवालीं करावें. नंतर बडोद्याहून नीळकंठशास्त्री थत्ते यांचे हातचें अस्सल पत्र रुजुवातीस आलें. तेव्हां वज्रटंक शास्त्री प्रभृति ब्राह्मण येऊन उपोषित बसले कीं, थत्ते शास्त्री यांणीं रुजुवातीस यावें आणि मल्हार श्रोती यांजपाशीं अमानत पत्र आहे ते परत आणवावें. त्यावरून श्रोती यांस कराराप्रमाण पत्र मार्गे द्यावे म्हणोन सांगून पाठविलें असतां पत्र न येई, तेव्हां पांच आसामी ब्राह्मण तगाद्यास बसविले, नंतर श्रोती यांणीं राजश्री चिंतामणराव पांडुरंग मिरजकर यांचे विद्यमाने येऊन विनंती केली कीं, पत्र सायंकाळी आणून देतों म्हणोन कबूल करून मिरजकर यांचे दरम्यान गतीनें घरीं गेले. आणि पुण्यांत नीळकंठ शास्त्री यांस मिळोन फळी बांधोन बसले तदनंतर दुसरे दिवशीं तुळशीबागेत सभेचे बोलावणें केलें. तेथें ब्राह्मण जमा झाले. हें वर्तमान कळतांच राजश्री खंडो सीताराम वकील निसबत आंग्रे व बाबा ठॉसर यांजबरोबर ब्राह्मणांस सांगून पाठविलें कीं, नीळकंठ शास्त्री पत्राचें रुजुवातीस न येतां पुण्यांत बसले. तुम्हीं तेथें काय म्हणोन जमा झाला. इतके ऐकतांच ब्राह्मण जिकडील तिकडे ढमढरे यांचे वाड्यांत सभा करून गेले. दुसरे दिवशीं राजेश्री पांडुरंग रामचंद्र पुण्याचे तट बांधून बसले. पुनः नीळकंठ शास्त्री यांस तुमचे हातचे दस्ताऐवज पत्र आलें. रुजुवातीस येणें म्हणोन आज्ञा सांगून पाठविली असतां, आपण न येतां थत्ते शास्त्री याणी राजेश्री बाळाजीपंत नातू यांचे विचारें दद्दा गृहस्थ तिराईत चिंतामणराव आपा मिरजकर व आनंदराव ढाकेफलकर वकील निसबत राजश्री चिमाजी आपा व खंडो सीताराम वकील निसबत आंग्रे इत्यादिक चाणाक्ष दहा गृहस्थ मंडळी, पिशाच लिपीचें पत्र होतें म्हणून परीक्षेस पाठविली. त्यांचे<noinclude></noinclude> rm0ztacrl2fk07le56ebgxkicjvh3sr पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१४६ 104 111875 236142 2026-08-25T04:49:55Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 236142 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ९० ) तागाईत आश्विन शुद्ध त्रयोदशी पावेतों विशेष आपलेकडील वर्तमान तेथोन विचारास सदरहू पत्र नीळकंठ शास्त्री थत्ते यांचे हातचे खरें. थते शास्त्री पिशाच लिपी व बाळबोध दोन्ही लिपी लिहितात. असें ठरलें तें पत्र तपशीलवार :- सहस्रायु चिरंजीव विजयीभव राजश्री विठ्ठलराव दिवाणजी यांसीं प्रती नीळकंठ- शास्त्री कृतानेक आशिर्वाद येथील कुशल जाणोन स्वकीये लेखन आनंदवीत जावें. विद्वान येतात त्यांचें मुखे श्रवण होऊन परम समाधान होतें तें किती लिहावें. कोकणांत कांहीं खटला पडला आहे, तो मजकूर चिरंजीव राजश्री अमृतराव बाबा व राजेश्री जीवनराव दिवाणजी यांस विदित केला. ब्राह्मणाकडील पत्र आलें होतें. तें दिवाणजीस दाखविलें त्याविषयीं ग्रंथशोध करीत आहों. त्या प्रांती याविषयीं शोध आपला हि असेलच. आणखीही शोध करून इकडे रवाना व्हावा. म्हणजे ते ग्रंथ वाईकडील सांपडतील. त्या ग्रंथांवरून पक्का विचार करून ठेविला असतां समय फार उपयोग होईल. याविषयीं फार लिहून काय कळवावें. इकडील वर्तमान राजेश्री रामराव याणां विदित केलेच असेल. ईश्वरचरणी आपली निष्ठा आहे. तदनुरूप ईश्वर कृपा करीतच आहे, पुढेही करील. बहुत काय लिहिणें लोभ करावा हे आशिर्वाद म्हणोन है पत्र चतुष्टाईनें दहाजणांच्या विचारें नीळकंठ शास्त्री यांचे हातचें खरें असें ठरलें. सुटून ब्राह्मणांतील कलह मिटावा है चित्तांत न वागे. भट्ट खरे प्रभृति द्रविड ब्राह्मण मंडळी असामी ४० चाळीस यांणीं नीळकंठ शास्त्री थत्ते यांस बहिष्कार घातला. कारण पूर्वी शास्त्रानुमते आपला अनुसर असोन पत्रास नाकबूल जाऊन पांच चार ब्राह्मणांस वृथा प्रायश्चित्तें दिलीं. तदुत्तर दुसरे दिवशीं बहिष्कारामुळे आपले तटांत मिळावे असे चित्तांत आणून राहातेकर यांचे वाड्यांत आपलेच फळीचे ब्राह्मण जमा करून नीळकंठ शास्त्री दर ब्राह्मणास वसंतपूजेनिमित्त एक आंबा व अर्धा रुपया देऊन आपणांस गंधाक्षत करूं लागले. तेथेही खरे यांनी जाऊन बहिष्कार सांगितला. त्यावरून बाळाजीपंत नातू यांनी चौकीचे प्यादे आणून घोडभट्ट यांस कंपिनी सरकारच्या फरासखान्यांत पाठवून नीळकंठ शास्त्री यांस गंधाक्षत केली. नंतर घोडभट्ट खरे यांनी कंपिनी सर- कारांत गारपिरावर आपल्या अबरूबद्दल नातू यांजवर फिर्याद केल्यावरून नातू यांस सरकारांत बोलावून उत्तरें निरुत्तरें परस्परें समक्ष होऊन चौकशीअंती तत्राप चित्तांतील द्वैत नंतर वे। राजश्री धोंड-<noinclude></noinclude> 4cogpzcklkhv5yky6g2exsymzyck2yz पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१४७ 104 111876 236143 2026-08-25T04:50:15Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 236143 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ९१ ) बहिष्कार खरा असें ठरलें. राहातेकर यांचे वाड्यांतून त्या ब्राह्मणांसह श्रीसंनिध आले व राघवाचार्य प्रभृति ही जमा होऊन उभय तटांनी मान्यता लिहून दिल्या की, श्रीची आज्ञा होईल त्याप्रमाणे मानणें. परंतु नीळकंठ शास्त्री यांचा दुराग्रह कीं, चांद्रसेनीय कायस्थ यांचा शास्त्रार्थ खोटा म्हणोन संमति व्हाव्या. तेव्हां सशास्त्र असतां खोदें संमत देणें हें अनुचित यामुळे तट ते काळी तसेच राहिले. तों इतक्यांत, भगवंतराव मल्हार खासनिवीस व आनंदराव.. रावजी तासकर, चांद्रसेनीय कायस्थ प्रभु हे दर्शनास येऊन त्यांनीं समक्ष वृत्त निवेदन केलें कीं, ब्राह्मण आपसांत कलह करून आमच्या ज्ञातीस वैदिक कर्म- त्रयाधिकार नाहीं म्हणोन यादी करितात असें परभारा ऐकितों, परंतु आमचे घरों परंपरागत वैदिक मंत्रकरून संस्कार चालत आहेत. पूर्वीपासून शास्त्रज्ञ व शास्त्र नव्हती, आतांच नवीन झालीं असें नाहीं. मार्गे ही ब्राह्मणांनी एक दोन वेळ कांहीं खटला उपस्थित केला होता, त्याचा निर्णय शास्त्रानुमर्ते त्यावेळींच झाल्याची वहिवाट चालूं असतां आतां आपसांत तंटा करून उगीच यादी कर- णार त्यांस श्रीसाक्षाच्छंकर धर्मसंस्थापक आहेत, तेथें आणिकांसारखे व्हावयाचे नाहीं. त्यावरून त्यांस आज्ञा केली कीं, पूर्वी खटला झाला ते काळों शास्त्रानुमतें निर्वाह झाल्याचे साधन तुम्हांपाशी आहे किंवा कसे ? त्यावरून त्यांणी दहावीस साधनें आणून प्रत्यक्ष दाखविलीं. ती बितपशील १ बाळाजी बाजीराव प्रधान यांचे पत्र छत्रपति सातारकर यांचे नांवें, त्यांत मजकूर प्रभूंचे सुदामत चालत आहे त्याप्रमार्णे चालवावें त्यास अडथळा होऊं द्यावा. पूर्वापार चालत आलें तें चालवोन नवीन कजिया उपयोगी नाहीं. ब्राह्म- णाचा निर्गम स्पट आज्ञा करून करणार महाराज समर्थ आहेत. शेवेश श्रुत होय हे विज्ञापना म्हणोन पत्र. पेणकर यांणीं ग्रामण्य केलें, त्याचा निर्णय शास्त्रसंमत झाला, ते काळची पत्रे १ पूर्ववत् चालत आल्याप्रमाणे चालवावें म्हणोन पेशवे सरकारची परवानग होऊन यादी झाली ती वितपशील- १ यादी प्रभूंचें प्रामण्य पांच सात वर्षे पडून कमें बंद झालीं, त्यास स्वामींनी कृपा करून पूर्वीपासून कर्मों वगैरे चालत आली आहेत त्याप्रमाणे चालविली पाहिजेत, म्हणोन ज्या ठिकाणी प्रभूंची घरे असतील तेथील मामलेदारांस लागतील ती पत्र: 18APR 1990<noinclude></noinclude> mpy6zpqnxmvb31bwkymerx2tqy4ti9r पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१४८ 104 111877 236144 2026-08-25T04:50:32Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 236144 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ९२ ) १ सदई अन्वयें जोशी, उपाध्ये, धर्माधिकारी व समस्त ब्राह्मण यांचे नांवें पत्र. पूर्वीपासून कमै मुंजी वगैरे चालत आलीं आहेत त्याप्रमाणे चालवणें म्हणोन -सदरहू अन्वयें मामलेदार तालुके निहाय यांस व ब्राह्मणांस लागतील तीं पत्रे दे- चावी देणें - लिहिणें. छ० ६ रमजान सन सबा तिसैन फाल्गुन मास सदहू यादीवर - " देवाव बाळाजी जनार्दन फडणीस व " देणें " बाजीराव रघुनाथ प्रधान. लाशी रामचंद्र हरी फडके. , व मख- १ ते सालीं सनदा होणें राहिल्यावरून दुसरे सालीं याद झाली ती बितपशील- यादी समस्त दालभ्य कायस्थ प्रभु यांचा व पेणकर ब्राह्मण यांचा प्रभूंच्या आचर- गाविसी कज्या पडून आठ नऊ वर्षे प्रामण्य वाढलें. पेणकर ब्राह्मण यांणीं सर- कारचीं पत्रे घेऊन प्रांतांत पाठवून कमै बंद केलीं सबब प्रभु व ब्राह्मण सर- कारांत फिर्याद आले. त्यावरून उभयतांचं सरकारांत लेहून घेऊन शिष्टसंमत मनास आणितां पेशजींपासून गागाभट्टीप्रमाणे प्रभूंचे घरीं कर्मों चालतात त्य अन्वयें पुढें ही चालवावीं. असें ठरून हैं पत्र तुम्हांस सादर केलें असे. तरी -गागाभट्टीप्रमाणे चालत आहे त्याप्रमाणे पुढे ही चालवीत जाणें, दिकत न करणें म्हणोन सुरुसन समान तिसैन मया व अल्लफ लागतील ती पत्रे. १ जोशी, उपाध्ये, धर्माधिकारी समस्त ब्राह्मण महालानिहाय यांस. १ महालानिहायचे मामलेदार, सरदार व संस्थानी यांस. सदहूँ अन्त्रयँ जोशी, उपाध्ये, धर्माधिकारी व समस्त ब्राह्मण महालानि- - हायवे कमावीसदार सरदार व संस्थानी यांस लागतील तीं पत्र देणे- सदरहू यादीवर देणें बाजीराव रघुनाथ प्रधान, संमत बाळशास्त्री, मखलाशी तात्या गुरुजी. याप्रमाणें शिक्यांनिशीं सनदा प्रांतोप्रांतीं गेल्या त्यांपैकीं एक बार केली ती बितपशील. वेदमूर्ति समस्त ब्राह्मण धर्माधिकारी उपाध्ये व ज्योतिषी क्षेत्र प्रयाग गोसावी यांशीं-<noinclude></noinclude> i8ut2e8v2mqpfmj9pwl0pcgiugetdm7 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१४९ 104 111878 236145 2026-08-25T04:50:49Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 236145 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ९३ ) येथें बाजीराव रघुनाथ प्रधान यांच्या वरील पत्राची नकल पुन्हां दिलेली आहे. १ चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांचे कुलोपाध्याय वे आबाशास्त्री टकले तळेकर यांजवर पेणकर यांणी श्री अविमुक्त क्षेत्रों दुर्भाषणे वाजविल्यावरून (?) आबा यांणों क्षेत्रस्थ ब्राह्मण यांचे पत्र बाजीराव रघुनाथ प्रधान यांस श्री काशीहून पाठविलें तें बितपशील - स्वस्ति श्री ...... श्रीमत् बाजीराव प्रभुवर्यपंडित मुख्यप्रधानेषु . आश्रित नारायणभट्ट तथा लालभट्ट तथा गोपीनाथभट्ट रामपंत शेष तथा हरि- राम दीक्षित काळे तथा सोमनाथपंत पुणतांबेकर एतत्प्रभृति समस्त काशीस्थ ह्मणकृतानेकःशिर्वादाः वरीवर्ततां विशेषस्तु भाषया भाद्रपद शुद्ध त्रयोदशीपर्यंत समस्त सुखरूप असो विशेष वेदशास्त्रसंपन्न आबा शास्त्री टकले त्रिस्थळी यात्रेस श्रीक्षेत्रों आले तीर्थविधि कालाष्टक ब्राह्मण भोजनादि सर्व केलें. नंतर गोविं- दभट्ट वर्तक पेणकर येथें पूर्वीच आले होते त्यांणी घरोघर सांगितलें कीं, आबा- भट्टजी हे प्रभूचे उपाध्ये प्रभूंकडे हव्यकव्ये कार्यप्रयोजन चालवितात. त्यास प्रभूंचे ग्रामण्य झालें आहे याजमुळे हे अपांक्त आहेत. त्याजवरून आम्ही सर्व ब्राह्मण मिळोन आबाभटजींस विचारिलें कीं, तुमचें वृत्त कसें आहे तें सांगावें. 'आबाभटजींनी उत्तर केलें कीं, आम्ही पांच साहा वर्षे नागपूर प्रांतीं होतों. श्रीमंत बाजीरावसाहेब पुण्यास तेव्हां आम्ही पुण्यास आलों. आम्हांस अपक्तिं व्यवहार ठावकाच नाहीं. श्रीमंत महाराजांनीं कृपाळू होऊन वेदशास्त्रसंपन्न बाळ- शास्त्री बाबा यांजकडे प्रभूंचे ग्रामण्याची पंचाईत नेमून दिली. शास्त्री बावांनीं पेणकर बाह्मणांचीं त्र प्रभू या उभयतांचीं मान्यता पत्रे लिहून घेऊन सर्व शिष्टम ठराव केला कों पूर्वीपासून प्रभूंचे घरीं गागाभट्टीप्रमाणें कर्म चालत आहे त्याप्रमाणें पुढे ही विनदिकत चालवावें. याप्रमाणे ठराव होऊन श्रीमंत महाराजांची पत्रे प्रांतोप्रांती गेलीं. ग्रामण्य मोडलें. आमचा व्यवहार हा काळपर्यंत घरीं चिरंजीवाचें लग्न जाहलें. आठघरे यांची कन्या केली. प्रभूंकडे हव्यकव्यें कर्मप्रयोजने चालती झाली. पंचद्राविडांत अनुस्यूत चालत आहे. आमचे पुण्यांतच केलें. वे ॥ जगन्नाथभट्ट उपाध्ये लग्नामध्ये पंचद्राविड ग्रामस्त शिष्ट सर्व आले होते.<noinclude></noinclude> jshkuuxw6wcd2wzoibe5akswvht0tth पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१५० 104 111879 236146 2026-08-25T04:51:05Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 236146 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>● ( ९४ ) गंधाक्षता भोजनादि व्यवहार सर्व झाले. असें उत्तर केले. याचे दाखले येथे हो दोनचार पुरले, परंतु कितेक ब्राह्मणांनीं आपले आपल्यांत संशय घेऊन तड केले. विवाद बहुत होऊं लागले. तेव्हां आम्ही सर्व एकत्र मिळोन विचार केला कीं, श्रीमंत महाराजांस पत्र ल्याहावें. पत्राचे उत्तर येईल त्याप्रमाणे सर्वांनीं वर्तणूक करावी. याप्रमाणें निश्चय करून स्वामींस विनंतिपत्र लिहिलें आहे. त्याचें उत्तर सत्वर पाठवावें म्हणजे सर्व ब्राह्मणांचे क्लेश दूर होतील. ब्राह्मणांचे क्लेश दूर करणें अतिश्रयस्कर आहे, स्वामी जाणतच आहेत. यास्तव उत्तर अतिसत्वर पाठवावें. सदर्हृ अविमुक्तक्षेत्रस्थांचें पत्र पुणे मुक्कामी येऊन राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांणी वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळशास्त्री यांस या पत्राचें उत्तर द्यावे म्हणोन सांगितलेवरून बाळशास्त्री व ग्रामस्त पुणेकर यांची पत्रे श्री काशिक्षेत्रों गेल्यावरून तेथे क्षेत्रस्थांनी चौकसी शास्त्रानुमतें करून पत्र दिल्हीं. त्यांपैकीं ग्रामस्त पुणेकर यांचे नांवें पत्र आलें तें बितपशील -- स्वस्तिश्रीमदंडकारण्यांतर्गत भीमरथीनाडिद्दयसंगत्योपलक्षीत्त पुण्याख्य ग्रामस्छ दाक्षिणात्य राजर्षि धर्माधीकारि प्रांत पुणे व आठघरें व समस्त ब्राह्मणान्प्रति-- आर्यावर्तैकदेश आनंदवनत्रिकंटक विराजित आविमुक्तक्षेत्रस्छ भट्टधर्मा- धिकारिशेष प्रभृत्तिनामनेकानतयो विलसंतु चैत्रशुक्कुपंचम्यवधि अत्रत्यक्षे- ममस्ति भावत्कं तदनुदिनमेधमानमाशास्मे विशेषस्तु भाषया - आपण माघकृष्ण दशमीची पत्रे पाठविली ती पावली लिहिलें कीं, वे आबाशास्त्री टकले अपंक्त नाहींत. त्याचा व्यवहार पंचद्राविडांत हा काळपर्यंत चालत आहे. त्यांचे चिरंजीवास वेदमूर्ति जंगनाथभट उपाध्ये ग्रामस्त पुणेकर याणी आपली कन्या सर्व ग्रामस्ताचे विचारे दिल्ही. लग्न शके १७१९ माघमासीं झालें. लग्नांत सर्व पुण्यांतील शिष्ट ब्राह्मण व ग्रामस्थ गेले होते. अन्नव्यवहार त्यांचे घरीं अनुभ्यूत चालत आहे. दिकत नाहीं. आपण भटजी विषई संषय धरूं नये. तशी वेदशास्त्रसंपन्न राजेश्री बाळशास्त्री बावा प्रभृति पंडित मंड- ळीची पत्रेही असींच आली आहेत. त्यांत लिहिले कीं श्रीमंतांचे आज्ञेकरून सर्व शिष्ट मंडळ पांचचार वेळां मिळोन गागाभट सूचित मार्गावलंत्रेकरून प्रभु<noinclude></noinclude> ann0lyogejqlff7cn2tsmae09qytge3 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१५१ 104 111880 236147 2026-08-25T04:51:18Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 236147 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ९५ ) यांणी चालावें हें संमतपत्र झाले आहे. पूर्वीहि त्याप्रमाणेच अनुष्ठान प्रभूंकडे चालत आहे. प्रभू यांचेकडे कमै गागाभटीवरून चालवावी याप्रमाणे पत्रें श्रीमंतांचीं प्रांतांत गेलीं आहेत. दिकत नाही. असें लिहिलें. त्याजवरून वे आबाशास्त्री टकले यांसी आम्हीं विचारिलें कीं, तुम्ही प्रभूंचे कुळोपाध्याय, प्रभूंचा ज्ञातिविषय कसा आहे ? यास आधार काय ? पुण्यास निश्चय कोणते ग्रंथावरून झाला ? तेव्हां आबाशास्त्री यांहीं उत्तर केलें कीं गागाभट्टकृत कायस्थ- प्रदीप, गोविंदभट्टकृत गोविंदभट्टी, स्कंदपुराणांतर्गत रेणुका माहात्म्य, कमळाकर- भट्टकृत शूदकमळाकर, ज्ञातिविवेक इत्यादि निबंध ग्रंथ पहावे म्हणजे आपले ध्यानांत येईल. त्याजवरून आम्ही हे सर्व ग्रंथ पाहिले तों हे क्षत्रियान्वय चांद्रसेनीय प्रभु कायस्थ दाल्भ्यऋषीने क्षत्रियांतकर भार्गवरामाचे आग्रहास्तव शस्त्र धारणरूप क्षात्रधर्म टाकवून कायस्थ धर्म लेखनवृत्ति यांस दिली. ऋषीने पालन करून उपनयनादि संस्कार केले. यास्तव दाल्भ्यगोत्र असा निर्णय पूर्वोक्त ग्रंथ पाहतां होतो. आपण ठराव केला तोहि देशकालानुरूप यथायुक्तच केला असेल. सांप्रत व आबाशास्त्री टकले त्रिस्थळी यात्रा संपादून पुण्यास गेले आहेत. येथे कांहींएक कोकणस्थांनी व्यर्थ अत्याग्रह करून तड केला आहे यास्तव आम्हीं सर्वांनी लिहिलें आहे. तपशीलवार- संमतोऽयमर्थः ( महाराष्ट्रानां ) ४० सह्या. संमतोऽयमर्थः ( चितपावनानां ) २१ सह्या. संमतोऽयमर्थो ( वाजसनेयिनां ) ४ सह्या. संमतोऽयमर्थः ( करहाटकानां ) ९ सह्या. संमतोऽयमर्थः (करनाटकानां ) ७ सह्या. एतत्प्रभृति आवमुक्तक्षेत्रस्थ दोन अडीच सहस्रपर्यंत ब्राह्मण आबाशास्त्री टकले यांचा संग्रह केला असे. कळावे सुज्ञान्प्रत्यलं पल्लवित्येनेत्यने कानतयो विलसंतु. शके १७२३ दुर्मतिनाम संवत्सरे संवत् १८५८. येणेप्रमाणे असा कागद व दोनशे वर्षाचे पलीकडील लिपीचे जीर्ण रेणुकामाहात्म्य संबंध आणून दाखविलें आणि उभयतांनीं विनंती केली कीं, पूर्वापार वहिवाट<noinclude></noinclude> s5u3dvb7aixvudtsyyn1aajp6yoddwt पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१५२ 104 111881 236148 2026-08-25T04:51:33Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 236148 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ९६ ) मौंजीबंधनादि प्रतिवर्षी श्रावणी वैदिकमंत्रकरून चालत असतां उगाच आपसांत ब्राह्मण कलह करून अमर्याद भाषणे करितात. येविशींची वहिवाट व कागदपत्र पाहून आज्ञा करणार श्रीसमर्थ आहेत. त्यावरून पाहातां ब्राह्मण आपल्यात त्यांत राघवाचार्य व वज्रटंकशास्त्री यांचे तटाचे कलह करून भांडतात. 6 म्हणणें कीं, चांद्रसेनीय कायस्थ यांस कर्मत्रयाधिकार आहे आणि निळकं- ठशास्त्री थत्ते यांचे तडाचे चांद्रसेनीय यांस कर्मत्रयाधिकार नाहीं. असे परस्परं वादविवाद होत असतां, उभय तटांनी मान्यता दिल्या की, श्रींची आज्ञा होईल त्यास आम्ही मान्य. त्यांत राघवाचार्य प्रभृतींचं म्हणणें कीं, चार शिष्ट पांडेतांस मध्यस्थ नेमून श्रीसंनिध सभा व्हावी. त्यांचे विचारें शास्त्रानुमतें ठरेल. त्यास मान्य अथवा प्रतिपक्षी यांणी तुळशी गंगोदक घेऊन अगर देवालयी शिरून चांद्रसेनीय यांस कर्मत्रयाधिकार नाहीं म्हणोन सांगावें; त्यास मान्य किंवा श्रीका- शीक्षेत्री व म्हैसुरादि प्रांतांत मोठी मोठीं क्षेत्रे आहेत तेथे उभयतांनी आपलाले प्रतिपाद्य पक्ष लिहून पाठवावे. तेथें ठरोन येईल त्यास ही आम्ही मान्य. परंतु यांतून कोणत्याही पक्षास श्रीसन्नीध नीळकंठ शास्त्री यांणी ग्रहण करून मान्य केल नाहीं. तेव्हां तट तसेच राहिले. नंतर मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थीस व पंचमीस राजेश्री भाऊ दातार यांचे वाड्यांत नीळकंठशास्त्री थत्ते प्रभृतींनी आपल्याच मिळा- फातील चार मध्यस्थ नेमून राघवाचार्य यांचे तटापैकी एक राघवाचार्य यांस मात्र बोलावर्णे करून मठास न कळवितां गावांतच सभा केली. तेथे पूर्वपक्ष उत्तरपक्ष दिनशेष च्यार घटिकांपासून चौदा घटिका रात्रपावेतों झाला. तेव्हां राघवाचार्य यांणी मध्यस्थांस सांगितलें कीं, तुम्ही तुळशी गंगोदक घेऊन बोलावे. त अमान्य करून तद्भुतर निखालस वेव्हारिकावर शास्त्र सोडून आले, तेव्हां तुम्हांस काय सांगावें. गोपाळराव रामचंद्र पटवर्धन जमखंडीकर व बळवंतराव महादेव रास्ते प्रभृति यांणी तर राघवाचार्य यांस पदर पसरून मागून आम्ही सांगतों तें ऐकावें असा आग्रह केल्यावरून शास्त्रानुमत सोडून चौघांचे विचारें अशी यादी झाली ती वितपशील- यादी प्रभू यांस वैदिक कर्माचा अधिकार नाहीं परंतु चांद्रसेनीय कायस्थ यांस वैदिक कर्माचा अधिकार आहे किंवा नाहीं याचा निर्णय व्हावयाकरितां राजश्री भाऊ दातार यांचे वाड्यांत पुणे कसबे येथे मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थीसह पंचमी शके<noinclude></noinclude> lyzbz0uhbx01z78vhqmn26dh3xxbulz पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१५३ 104 111882 236149 2026-08-25T04:52:32Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 236149 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ९७ ) १७४८ व्ययनाम संवत्सरे या मितीस सभा होऊन तेथें निर्णय ठरला की, चांद्र- सेनीय कायस्थांस वैदिक कर्माचा अधिकार नाहीं असें सर्वांचेमतें ठरल्याविषयीं संमतें म्हणोन लिहून त्या यादीवर त्याच बैठकीस राघवाचार्य यांचे संमत घेऊन राघवाचार्य यांजबरोबर त्याच बैठकीस धोंडभट्ट खरे प्रभृतिद्रवीड याचा आक्षेप अप- शब्दांचा चित्तांत आणून नीळकंठ शास्त्री यांणीं गंधाक्षता केली. नंतर दुसरे दिवशीं श्रीसन्निध नीळकंठ शास्त्री प्रभृति येऊन विनंती केली कीं, आम्ही आपसांत समजलों. त्यास सर्वांची गंधाक्षता व्हावी. त्यावरून त्यास आज्ञा झाली जे, खारी पुणेसन्निध पर्वती मुक्कामी असतां तुम्ही परभारे गांवांत सभा करून समजला त्यापक्षी आमचे समक्ष गंधाक्षतेचें प्रयोजन काय आहे ? असें सांगोन स्वारी करवीरास जाण्यास प्रस्थानें निघोन मोतीबागेत गेली. तेथेही दुसरे दिवशीं मिळोन आले आणि विनंती केली की, आम्हीं समजलों आणि श्री शरण आलों. तरी श्रींनीं गंधाक्षता सर्वांची करून शहरांत चलावें व चार दिवस राहून नंतर जाणें व्हावें. त्यावरून सर्वास गंधाक्षता करून दुसरे दिवशीं गोखल्याच्या वाड्यांत येऊन सात आठ मुक्काम करून स्वारी करवीरास निघोन गेली. यावरून विचार पहातां चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांची वहिवाट पूर्वापार जातककर्मादारभ्य मौंजीबंधनादि संस्कार व प्रतिवर्षी श्रावण्या वेदकर्मे करून होतच आहेत. त्यांत मुंजीबंधन व श्रावण्या वैदिक कर्माशिवाय होत नाहींत असे शिलशिले त्यांचे असोन कोणी तंटा करितात तो व्यर्थ आग्रह, असें आर्थीच होतें. व पेणकराचें ग्रामण्या अंती यादी व सनदा यांत प्रत्यक्ष दालभ्य कायस्थ म्हणोन लिहितात तेव्हां दालभ्य तेच चांद्रसेनीय आणी पेशवाई कारकीर्द ब्राह्मणांची जबरी आग्रहॅकरून कोणतीही गोष्ट करण्यास शक्य, परंतु यांची रूढी व शास्त्र बलवतर जाणोन जाणोन ' पूर्ववत्' म्हणोन सनदा प्रांतांत देतात आणि त्या सनदांत लिहितात कीं, प्रभु यांचा व पेणकर यांचा आचरणावरून तंटा पडून पेणकर यांणीं सरकारचीं पत्र प्रांतांत पाठवून प्रभूंकडील कर्मै बंद केली. नंतर उभयतां 'सरकारांत फिर्याद आले, त्यावरून उभयतांचे लिहून घेऊन शिष्टसंमते मनात आणितां गागाभट्टी अन्वयें पूर्ववतप्रमाणें कर्मों प्रभु यांजकडे चालवावीं. असें ठरलें त्याप्रमाणे चालवीत जाणे. दिकत न करणें. अर्शी संदिग्ध पत्रे लिहितात. तेव्हां पूर्वी याजकडील पत्रे सरकारचीं पाठवून कर्मों बंद ७ .<noinclude></noinclude> oxkx7ppqnq5kj60tfi4u21zh95yjalr पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१५४ 104 111883 236150 2026-08-25T04:52:56Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 236150 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ९८ ) केलीं तीं पुराणोक्त असती तरी बंद करण्याचे प्रयोजनच नव्हतें. वैदिक कर्मों बंद करितात. त्याची चौकसी लिहितात. शिष्टानुमतें शास्त्र- चालत होतीं म्हणूनच कलह करून पत्रे पाठवून शिष्ट संगतें होऊन पूर्ववत् प्रमाणें ठरलें म्हणून संमतें मागील आचरणांत न्यूनाधिक्य नाहीं. पूर्ववत् निर्णय होतो. तेव्हां पेणकर ब्राह्मण वादास खोटे जाहले. व चांद्रसेनीय प्रभु खरे जाले. हा एक पक्ष, व पूर्वापार वैदिकमंत्रे करूनच यांजकडे कर्मों चालत आलीं हा एक पक्ष. एकूण दोन पक्ष सनदा व यादींवरून सिद्ध होतात व श्री अविमुक्तक्षेत्रीं चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांचे कुलोपाध्याय यांजवर मिथ्यापवाद दुःशब्द वे।। गोविंदभट्ट वर्तक यांणीं क्षेत्रीं वाजविल्यावरून श्री क्षेत्रींचे क्षेत्रस्थ यांनी बाजीराव पंडीत प्रधान यांस पत्र पाठविल्यावरून येथील शास्त्रनिर्णय ठरल्याप्रमाणें वे ॥ बाळशास्त्री प्रभृति पंडित मंडळीस लिहिण्याविसों सांगितलें. त्यांची पत्रे क्षेत्रस्थांस गेल्यावरून क्षेत्रस्थ यांणीं वे आबाशास्त्री टकले यांसी विचारिलें कीं, तुम्ही प्रभूंचे कुलोपाध्याय. यांचा ज्ञातिविशय कसा आहे ? पुण्यास कोणत्या ग्रंथावरून निश्चय जाला ? तें ग्रंथ क्षेत्रस्थ यांणीं टकले यांस विचारून ते प्रत्यक्ष पाहून निश्चय करून लिहितात कीं, हे क्षत्रियान्वय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू दाल्भ्यऋषीनें भार्ग- वरामाच्या आग्रहास्तव शस्त्रधारणरूप क्षात्रधर्म टाकवून कायस्थधर्म लेखन वृत्ति यांस देऊन ऋषीनें पालन करून यांचे उपनयनादि संस्कार केले म्हणोन मोठमोठे विद्वज्यन पंडित स्वदस्तूरसंमतें आपलालीं पृथक् पत्रावर करून समस्त ब्राह्मणांस लिहितात. तेव्हां ते दालभ्य कायस्थच चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांची परंपरागत रूढी व त्याप्रमाणेंच शास्त्रानुमतें शिष्टसमतें सनदा आहेत आणि ते काळी पुणेमुक्काम शास्त्रनिर्णयास कोण कोण पंडित होते ? याची चौकशी पाहतां शके १७४६ चे सालीं विठ्ठलराव दिवाणजी यांणीं वेदशास्त्रसंपन्न राजश्री त्रिंबकशास्त्री रामदुर्गकर यांस पत्र पाठविलें कीं, उगीच कोणी ब्राह्मणांनी येथे खटला उपस्थित केला आहे. त्यास आपलें येणें जाल्यास उत्तम. त्याचें उत्तर आले त्यांत मजकूर तूर्त म्हैसूरकर राजे यांणीं आम्हांस स्वास्थ करून देऊन राहवून घेतले आहे. तुमचा निर्णय बाजीराव साहेब यांचे कारकीर्दीत रामचंद्र दीक्षित वोक व त्रिमंगलाचार्य व नरसिंह शास्त्री गुर्जर व परशुराम शास्त्री वोक व बाळशास्त्री चंदावरकर व बाळशास्त्री न्यायाधीश व आम्ही मिळोन शास्त्रार्थ<noinclude></noinclude> nd29fsewfprsqxa7xstj69t5wofr7sl पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१५५ 104 111884 236151 2026-08-25T04:53:11Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 236151 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>, ( ९९ ) निवडला आहे यावरून पहाता हे मोठमोठे पंडित शास्त्रविषयांत श्रेष्ठ व तदान्वयें श्री काशिक्षेत्रस्थांचे शास्त्रनिर्णयाचे पत्र व त्या पत्रांत जे ग्रंथ लिहिले आहेत ते सांप्रत प्रत्यक्ष पाहतां, हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभु क्षत्रिय व कर्मत्रयाधिकारी असें सिद्धच होतें. व हली दोन वर्षे पुण्यांत कांहीं ब्राम्हणांनीं तड करून खटला केला असतां शास्त्रार्थ कुंठित न होतां राघवाचार्य यास पदर पसरुन मागोन घेतात तेव्हां शास्त्रार्थ खोटा म्हणण्यास कक्षा चालत नाहीं म्हणोन से दोनसे ब्राम्हणांत आचार्य यांस पदर पसरून मागतात असें सिद्धच. त्यांत पदर पसरून जी यादी ठरावीतात त्यांत लिहीतात कीं प्रभुस वैदिक कर्माचा आधीकार नाहीं. परंतु याचाहो अर्थ पाहातां आधीकार नाहीं असें लिहून परंतु राद्रे आपणच संशयांत पडतात. नाहीं असें स्पष्ट झाल्यावर संशयपर परंतु शद्वाचे प्रयोजन नाहीं. तस्मात त्यास वैदिक कर्माचा आधीकार नाहीं असी च्यांद्रसेनीयविद्वेषी यांची खात्री होत नाहीं. व पुढे लिहीतात कीं च्यांद्रसेनीय यांस वैदिक कर्माचा आधीकार आहे किंवा नाहीं, याचा विच्यार पाहातां सर्वाच मतें नाहीं असें ठरलें. तेव्हां वैदिक कर्मचा आधिकार आहे किंवा नाहीं याची पुर्वी खात्री नाहीं ह्मणोन निश्चयाकरितां जमा - जाले असे असोन शास्त्रमतें न म्हणतां सर्वाचें मतें म्हणोन यादी लिहून समति करितात ते पक्षी पूर्वी खात्री नाहीं म्हणोन संशय आहे किंवा नाहीं त्याचा नीर्णय शास्त्रमतें न होता सर्वांचे मते हा शुद्ध आग्रह शास्त्रविचार जाला नाहीं असे त्या यादीवरून होते. तेव्हां दोन वर्षे निलकंठ शास्त्री प्रभृतिनी तड माजवीला हा वृथा. पूर्वी निलकंठ शास्त्री याणी पत्र दिल्हे. चिरंजीव म्हणोन आगत्यवादे लिहीतात. ग्रंथ शोध आम्ही करित आहो तुम्ही ही तिकडे करून इकडे पाठवावे. पक्का विचार करून ठेविला असतां फार उपयोग होईल म्हणोन लिहितात तेव्हां हे महापंडित, कांहीं विचार करूनच पत्र लिहिले. पक्का मात्र विचार करणे राहिला. तेव्हां ते पत्र पूर्वी निष्कपट बुद्धिनें लिहिले ते शास्त्रमते खरे, ते काली क्षात्रधर्मात् बहिष्कृतः या वचनें करून येक शस्त्रधारणरूप अशी बुद्धि शास्त्रज्यन्यस्थत होती. पुढे कांहीं चित्तात विपर्यास द्वेष बुद्धिचा जाल्यावरून त्याच वचने सर्व धर्म गेले असा त्याच वाक्याचा उलट अर्थ करून वृथैव वाद वाढविला. वज्रटंकशास्त्री याणी कदबा दिल्याप्रमाणे पुरवणी जाली. प्रमाणे पुरवणीचा सेवट लागला नाहीं. निलकंठशास्त्री थथे याजकडून कतब्या - पुर्वी पत्र दिल्हे ते यथाशास्त्र हाशील<noinclude></noinclude> agg6aiqytzbyf0ipfsx7sggvympd3nu वर्ग:१८५६ चा जन्म 14 111885 236152 2026-08-25T04:57:31Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:१८५६ चा जन्म 236152 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:१९१९ चा मृत्यू 14 111886 236153 2026-08-25T04:57:37Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:१९१९ चा मृत्यू 236153 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 वर्ग:उपपाने 14 111887 236154 2026-08-25T04:58:14Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:उपपाने 236154 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/७२ 104 111888 236156 2026-08-25T11:00:08Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236156 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|६० |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>नाहीं. या रस्त्यानें पुढे गेलें कीं पूर्वीच्या कँडीच्या राजवाड्याचें विटांच्या बांधणीचें तटवजा पण खुजा भिंतीचें आवार लागतें. पुढ डाव्या हाताला हिरव्यागार हरळीनें हिरव्यागालीच्याप्रमाणे दिसणारें खेळाचं मैदान लागतें. लगेच बुद्धाचें दंत-देवालय लागतें. या देवालयाला राजवाडयाच्या धर्तीची तटवजा भिंत आहे. नव्हे हें देवालय राजवाडयाचा एक भागच आहे व देऊळ धरून मोठ्या थोरल्या आवाराला सुंदर जोतें व सुंदर तटवजा खुजी भिंत बांधलेली आहे. आतां राजवाड्याचें सर्व आवार व त्यामधील सर्व इमारती व राजवाडे हे सिलोन सरकारचे असून मुख्य राजवाड्यात सिलोनचे गव्हरनर कँडीस आले म्हणजे राहतात व दुसऱ्या इमारतीत न्याय कचेरी भरते. न्याय कचेरीची इमारत लांकडी असून त्याचे लांकडी खांब फार नक्षीचे आहेत. या इमारतींची नवलाईची गोष्ट म्हणजे या इमारतीचें छप्पर नेहेमींसारखें कवलारू नसून ते विटांनी बनविलेले आहे.<br>{{gap}}दंतदेवालयाची इमारत विटांचीच आहे; त्याच्या प्रवेशद्वारा नजीक पाण्याचा हौद आहे व उजव्या हाताला दुमजली वाटोळी व कंगोऱ्या कंगोऱ्याची छोटी इमारत आहे. त्यांत बुद्ध धर्माचे ग्रंथसंग्रहालय आहे. देवळांत गेलें म्हणजे एक सोपा लागतो, तेथे एक कारंजें आहे. पुढें बुद्धाच्या बैठ्या व हातावर डोके ठेवून आडव्या निजलेल्या दगडी मूर्ति आहेत. बुद्धाचा दंत ठेवण्याकरितां मोठ्या कुलुपानें रक्षण केलेलें गृह आहे. बुद्धाचा हा दंत बाहेर काढून दर आगष्ट महिन्यांत त्याची मोठी मिरवणूक काढतात. या महायात्रेला पुष्कळ यात्रेकरू जमतात. मोठमोठ्या शृंगारलेल्या हत्तींनीं पुरस्कृत अशी ही प्रचंड मिरवणूक असते. या दंत-देवळाला बरींच दालने आहेत. बुद्धलोकांमध्ये तांबड्या व पिवळ्या चाफ्याची फुलें मूर्तीपुढें व स्तूपासभोंवार वाहण्याची पद्धती दिसली. कालिनी येथील बुद्धमंदिराप्रमाणे येथेही भली थोरली एक नवी इमारत चालू आहे.<br>{{gap}}हिंदुस्थानांतील बुद्धधर्माचे अवशेष— स्तूपविहार चैत्य वगैरे- हे पूर्वकाळी बांधलेले किंवा कोरलेले जे काय आतांपर्यंत शिल्लक राहिले<noinclude></noinclude> h7nl6hchie9gr1t6gwcbyoghqzq89s1 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/७३ 104 111889 236157 2026-08-25T11:01:20Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ 236157 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|'''कँडीचें दंतदेवालय व दागबा.'''}} {{rh|नं. ५||पान ६०}} {{nop}}<noinclude></noinclude> 4pdi7d323kvkusbo1ynii6t7qirhhgr पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/७४ 104 111890 236158 2026-08-25T11:03:32Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236158 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कँडी व पेरेडॅनिया|६१ }}</noinclude>आहेत ते तसेच्या तसे अर्धवट किंवा मोडकळीच्या स्थितींत पहावयास सांपडतात. कारण हिंदुस्थानांत हल्लीं बुद्धधर्म मृतप्राय आहे. बहुजनांच्या आचरणांतील जीवंत चालू धर्म अशी त्याची स्थिति नाहीं. पण सिलोनमधली स्थिति अगदीं निराळी आहे. येथें अजून बहुजनसमाज बुद्धधर्मीय आहे. म्हणजे येथें बुद्धधर्म जीवंत व प्रचलित धर्म आहे. यामुळें येथल्या देवळांमध्ये दुरुस्तीचीं, वाढाव्याचीं, जीर्णोद्धाराचीं व नव्या इमारती बांधण्याचीं कामें चालू असलेलीं दृष्टोपत्तीस येतात. यामुळे देवळांचा खरा जुना भाग कोणचा व अर्वाचीन काळचा किंवा जीर्णोद्धार केलेला कोणता हें समजणे कठीण जातें व त्यांतच भाषेची अडचणही भासते. कारण देवळांतल्या बुद्धभिक्षूंना इंग्रजीचें ज्ञान आहे असें दिसून आलें नाहीं. मला तर त्यांची सिंव्हली भाषा कळेना. यामुळें मोडक्या तोडक्या इंग्रजीनें काय माहिती मिळेल तेवढ्यावरच समाधान मानून घ्यावें लागलें. नंतर आम्हीं शेजारींच असलेल्या कँडीच्या जुन्या वस्तूंचें छोटेसें संग्रहालय पाहण्यास गेलों. येथें कँडीयन राजवटीच्या काळची हत्यारें, कपडेलत्ते, भांडीकुंडी, दाग-दागिने लांकडी नक्षीकामाचे नमुने वगैरे वस्तू ठेवण्यांत आल्या आहेत. नंतर आम्ही सरोवराचें सभोवार हिंडलों. सरोवराच्या बांधकामाला लागून सुंदर तांबड्या रेतीची पाऊलवाट ठेविली आहे. तिनें फिरलें म्हणजे सरोवराची शोभा पाहण्यास सांपडते; शिवाय उंचावरूनही एक मोठा मोटाररस्ता बांधला आहे. त्यानें गेलें म्हणजे सरोवर व त्याच्या सभोवार असलेल्या गर्दछाय हिरव्यागार डोंगरांची मोठी मनोहर शोभा दिसते. हिरव्यागार पडद्या आडून भीत भीत तोंड बाहेर काढणाऱ्या गोषांतील बायांप्रमाणे या गर्दछाय डोंगरावरील इमारती हिरव्यागार झाडींतून आपली डोकीं भीत भीत प्रवाशांस दाखवीत आहेत की काय असा पहाणाऱ्यास भास होतो. आम्हीं लेडी हार्टन रस्त्याने बरेच चाललों. येथें केव्हां केव्हां किर्र रानाचा भास होई इतकी दाट झाडी भरशहरांत आहे. सरोवराच्या दुसऱ्या अंगास<noinclude></noinclude> hyphd7s4l2n87c8o7ad4ez4ntq4x904 पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/१ 104 111891 236159 2026-08-25T11:05:45Z Shurpalimedha 5041 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{Css image crop |Image = गोष्ट एका डॉक्टरची.pdf |Page = 1 |bSize = 402 |cWidth = 383 |cHeight = 597 |oTop = 3 |oLeft = 18 |Location = center |Description = }}" 236159 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>{{Css image crop |Image = गोष्ट एका डॉक्टरची.pdf |Page = 1 |bSize = 402 |cWidth = 383 |cHeight = 597 |oTop = 3 |oLeft = 18 |Location = center |Description = }}<noinclude></noinclude> b265o42ewj9nxnnb49gihtyb8z40tyq पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/२ 104 111892 236160 2026-08-25T11:07:26Z Shurpalimedha 5041 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{Css image crop |Image = गोष्ट एका डॉक्टरची.pdf |Page = 2 |bSize = 402 |cWidth = 383 |cHeight = 597 |oTop = 3 |oLeft = 18 |Location = center |Description = }}" 236160 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>{{Css image crop |Image = गोष्ट एका डॉक्टरची.pdf |Page = 2 |bSize = 402 |cWidth = 383 |cHeight = 597 |oTop = 3 |oLeft = 18 |Location = center |Description = }}<noinclude></noinclude> 8wrxz2zjcpew2l02xf76pqs1hpl758x पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/७५ 104 111893 236164 2026-08-25T11:20:38Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236164 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|६२ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>'''वेस''' पार्क नांवाची छोटी फुलबाग आहे. येथें उभं राहिलं म्हणजे कँडी शहरासभोवती सृष्टिदेवीनें आपल्या निसर्गरमणीयतेचें कसें कडे पसरलें आहे याची उत्तम कल्पना येते व हें शहर प्रवाशांचे व विशेषतः इंग्रज प्रवाशांचं इतके आवडते ठिकाण कां हें समजून येतें. सरोवराच्या या बाजूनें खालीं आलें म्हणजे सरकारी तुरुंगाची इमारत व तिचा उंच तट लागतो. ही जुनीच इमारत आहे. नंतर नवे बांधलेले चौकोनी मार्केट व नाटकगृह लागतें. याप्रमाणें सभोवारची सृष्टिकृत व मनुष्यकृत शोभा पहात पहात मनुष्य नव्या रस्त्याला येऊन मिळतों. झालें, कँडी शहर येवढेच व येथली प्रेक्षणीय स्थळे येवढीच. आतां फक्त लेडी ब्लेकड्राइव्ह नांवाच्या एका सहा सात मैलांच्या सहलवाटेचें वर्णन करावयाचें राहिलें.<br>{{gap}}या सहलवाटेला मी एके दिवशीं तिसऱ्या प्रहरीं साडेतीन वाजतां पेरेडॅनीया बागेपासून निघालों तो तीन तासांनी कँडी शहरांतील मोटार बसस्टँडवर गेलों व मग दमल्यामुळे व उशीर झाल्यामुळे मोटार बसने परत बंगल्यावर आलों.<br>{{gap}}पेरेडॅनीया बाग टाकून कँडी रस्त्याला लागल्या वर '''गटांबे''' नांवाचें खेडें लागतें. या खेड्याचे डाव्या बाजूला 'लेडी ल्बेकड्राईव्ह' अशी पाटी लागते; मोटारीला इकडून जातां येत नाहीं; कँडी गांवाकडच्या टोंकाने फक्त येतां येते. लहानशा ओढ्याचा पूल टाकला कीं, महावेली गंगा पेरेडॅनीया बागेच्या पूर्व टोंकाकडून संथपणे वाहत येतांना दृष्टीस पडते. येथे नदीचे दोन्ही किनारे लालमातीचे आहेत असें दिसतें. त्या खोल, गंभीर गंगेचें पात्र पाहून मनाला आनंद होतो. पण या रस्त्यानें थोडे चाललें नाहीं तोंच नदीच्या दोन्हीं तीरांकडे प्रचंड पर्वत असून नदी मातीचे तीर टाकून खळखळ करीत खडकाळ भागांतून जात आहे असें दृष्टोत्पत्तीस येऊन नदीच्या स्वरूपांतील तो विरोध विस्मयकारक वाटतो तोंच नदी जास्त भीषण स्वरूप धारण करते व<noinclude></noinclude> 93gvrze6babmdm1xjbjzacw855jp3ku पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/७६ 104 111894 236165 2026-08-25T11:26:50Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236165 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कँडी व पेरेडॅनिया|६३ }}</noinclude>सहलवाटेच्या उजव्या बाजूस काळे काळे कुट्ट कातळ सहल वाटेला खेटून येतात.<br>{{gap}}या कातळावर हिरवें गवत किंवा रोंपडें नांवाला सुद्धां दिसत नाहीं; तर नदीच्या दुसऱ्या तीराला किर्र, निबिड रानाने भरलेले उंचच उंच डोंगर दिसतात व दोन्हींकडचे डोंगर इतक्या जवळ येतात कीं, नदी अगदीं चिळणींतून आंग चोरून चालली आहे असें वाटतें व आपल्या अप्रतिहत प्रवाहाला अडथळा करणाऱ्या दोन्हीं बाजूंच्या खडकांवर व पात्रांतील दगडांवर चवताळून जणूं कांहीं दांतओठ खात मोठ्यानें रोरावत विलक्षण वेगानें धांवत नदी पुढे चालली आहे असें भासतें. इतक्यांत तिच्या रोरावण्याला व रागाला भिऊन जणूं कांहीं दोन्ही बाजूंचे खडक परस्परांपासून दूर गेले आहेत असें भासतें येथें नदीचें पात्र पुष्कळच रुंदावतें व मग नदीचे लहान मोठे वेगवेगळे प्रवाह बनून जरा संथपणें नदी वाहूं लागते. पण उजवीकडून नदीला मिळणारा एक खोल व डोंगराकडून जोरानें पाण्याचा लोंढा आणणारा ओढा आल्यामुळे सहलवाट डावीकडे डोंगराच्या आंत आंत जाते व मग तेथें पूल ओलांडून पुनः डोंगराच्या पलीकडच्या बगलेला मनुष्य येतो. यामुळे सहलवाटेला केवढे तरी भलें मोठें वाकण येते. येथून उजव्या बाजूचे खडक संपतात व तांबूस रंगाच्या मातीचे डोंगर लागतात व त्या डोंगराच्या माथ्यापर्यंत चहाची लागवड केलेली दृष्टोत्पत्तीस येते. पुढे उजव्या हातांचा डोंगर जरा दुरावतो मग तेथें कोकोच्या सुंदर झाडांची बाग लागते; इकडे नदीमध्यें एक बेट बनून प्रवाहाचे दोन फांटे होतात व म्हणून नदी लहान दिसते व तिचें उग्र स्वरूप नाहींसें होऊन ती संथपणें वहात आहे असें दिसतें. याप्रमाणे क्षणोक्षणीं बदलणारे देखावे पहात सुमारें तासभर चालल्यावर नदी व डोंगर दूर जाऊन खोलगट सपाट जमीन लागली. तेथें आपल्याला चिरपरिचित अशीं हिरवीं हिरवीगार भाताची शेतें लागतात. भीषण व भयप्रदरूप टाकून निसर्गदेवीनें सुंदर हिरवा शालू नेसलेल्या स्त्रीचें रूप धारण केल्यामुळें भय, आश्चर्य, विस्मय इत्यादि मनोवृत्ति जाऊन सुख<noinclude></noinclude> qzyu2r4hklfy6tkons3o5dag0qoshie पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/७७ 104 111895 236166 2026-08-25T11:28:49Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236166 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|६४ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>व समाधान या कोमल मनोवृत्ति मनांमध्ये जागृत होतात. ही भात शेती टाकली तोंच पुनः डोंगराचा भाग लागला व रबरांच्या झाडाचें मोठें बन लागलें. मधून मधून चहाचे मळे लागतच होते व एक चहाचा कारखानाही लागला.<br>{{gap}}पुढे डोंगरामधला एक उतरता भाग दिसला. तेथे पुनः भाताची शेतें लागली. पण त्यांची ठेवण मोठी मजेची होती. ज्याप्रमाणे नदीला एखादा लांबरुंद पायऱ्या पायऱ्यांचा घाट असावा त्याप्रमाणें भातशेतीच्या लांबच लांब व अरुंद पट्ट्या एकावर एक घाटाच्या पायऱ्यांसारख्या दिसत होता. हा देखावा मोठा नयनमनोहर आहे. अशा लागवडीला येथें terraced cultivation (घाटाची लागवड) म्हणतात. यानंतर मी पुनः चढत्या अशा दाट रबराच्या वनांतून चाललों. जवळ जवळ दोन तास होत आले तरी कँडी येण्याचें लक्षण दिसेना; म्हणून एका बंगल्याच्या खुल्या सोप्यांत बसलेल्या गृहस्थास विचारलें तेव्हां तो म्हणाला, "या वाटेनें कँडी अझून पुष्कळच दूर आहे; पण तुम्हीं या रबराच्या बनांतून मळलेल्या पाऊल वाटेने डोंगराच्या माथ्यावर जा व तेथून डाव्या हातास खालीं जाणाऱ्या पाऊलवाटेनें उतरा म्हणजे तुम्ही कँडीला फार लवकर पोहोंचाल; सरळ रस्त्याने गेल्यास तुम्हांला कँडीस पोहोंचण्यास काळोख होईल. तेव्हां या मधल्या वाटेनें जा" त्या गृहस्थाचे आभार मानून मी त्यानें दाखविलेल्या मळलेल्या पाऊलवाटेने चालूं लागलों. जिकडे तिकडे रबरांची झाडेच झाडे! या उंच उंच वाढणाऱ्या झाडांची सावलीही खुब पडते; झाडाचे खालीं हिरवे हिरवें दाट गवत; फक्त एक पाऊल रुंदीची वाट काय ती मोकळी. या वाटेने जातांना मनाला सरपटणाऱ्या जनावरांची भीति वाटली; पण शेवटीं एकदां माथ्यावर आलों तोंच खाली जाणारी पाऊलवाट लागली. ती वाट बरीच बिकट व घसरडी होती. पूर्वीची जीवाणूंबद्दल भीतिं गेली पण आतां घसरून पडण्याची भीति वाटू लागली. परंतु लवकरच काळीकाळी सडक दृष्टीस पडली व मग जीवांत जीव आला. इतक्यांत<noinclude></noinclude> 30t057mqtu2zrm0jkc87vdi9t9mr8o9 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/७८ 104 111896 236167 2026-08-25T11:31:24Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236167 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कँडी व पेरेडॅनिया|६५ }}</noinclude>जोराचा पाऊस आला. मी रस्ता चालू लागलों तों पुन्हां कँडी दूर राहिली असें वाटलें. इतक्यांत पाऊसही थांबला. वाटेने जाणाऱ्या इसमास विचारतां तो म्हणाला "तुम्ही उलट वाटेने चालला आहांत" तेव्हां मी परत फिरलों. थोड्याच वेळांत कँडी शहराच्या वरच्या रस्त्याला आलों असें पाटीवरून दिसलें व मग मोटार बस उभी राहण्याची पाटीही लागली. दहा मिनिटें थांबतों तों मोटारबसही आली. अडीच तीन तास चालून मी दमलों होतों. मोटारबसमध्यें बसल्याबरोबर व मोटार चालू झाल्याबरोबर वारा वाहूं लागला व त्यानं श्रमपरिहार झाला. मी मोठ्या प्रमुदित-मनानें बिऱ्हाडीं पोहोंचलों. झालें, माझें कँडीपुराण संपलें व माझा कँडी येथील निवासही संपला. कँडी हे शहर हवापाणी व सृष्टिसौंदर्य या दोन्हीं दृष्टीनें सिलोनमधील एक नामांकित व पुराणप्रसिद्ध शहर आहे. याचा मला पांचसहा दिवस तेथें राहिल्यामुळे प्रत्यक्ष अनुभव आला. येथें कोलंबोप्रमाणें केव्हांही उन्हाळा भासला नाहीं. हवा नेहमीं थंड व गार वाटली. थोडथोडा पाऊस पडत असल्यामुळें व बरेच वेळां आकाश अभ्राच्छादित असल्यामुळे सूर्यप्रकाशाचा ताप किंवा उन्हांचा रखरखीतपणा केव्हांच भासला नाहीं. येथली हवा थेट विलायतेंतील हवेसारखी वाटली.<br>{{gap}}दुसरे दिवशीं मी खडक-देऊळ व खडक-किल्ला पाहण्याकरितां रा. कंदिया यांचे आभार मानून मार्गस्थ झालों.<br><br><br>{{rule|5em}}{{rule|7em}}{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> gl807xr3jqybhl49gi6kf2lob1z66x4 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/७९ 104 111897 236168 2026-08-25T11:35:34Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236168 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''प्रकरण ५ वें'''}}}} {{rule|7em}} {{center|{{x-larger|'''खडक-देऊळ व खडक-किल्ला.'''}}}} {{rule|5em}}<br>{{gap}}{{x-larger|'''मी'''}}पेरेडॅनीया बागेच्या स्टेशनहून ता. ११ डिसेंबर १९३३ रोजीं सकाळी ७॥ वाजतां '''मातले''' गांवास जाण्याकरितां निघालों. दुसऱ्याच '''कँडी''' स्टेशनला आगगाडी बदलावी लागते. स्टेशन टाकलें कीं चढता रस्ता लागतो व रस्त्याचे दोन्ही बाजूंस दाट फळ पिकेंच पिकें दिसतात; केव्हां कोकोचीं तांबूस रंगी मोठ्या पानाची व तांबड्या फळांनी शोभणारी झाडें लागतात, तर केव्हां किंचित् लहान पानांची व लहान काळसर फळांनी भरलेली कॉफीची झाडें लागतात, तर केव्हां झाडाच्या सालीला पाडलेल्या वाटोळ्या खाचेंतून पांढऱ्या शुभ्र चिकाची धार नारळी करटींत पडत असलेली रबराची झाडे लागतात; मधून मधून चहाचे मळेही लागतात; नारळीपोफळीकेळी हीं तर घरोघरीं व झोपड्याझोपड्यांत असतात हे पुनः पुनः सांगावयास नको. असा सर्वसुंदर देखावा मातले स्टेशनपर्यंत दिसत असतो. पेरेडॅनीयाकडून मातलेकडे डोंगराळ पण उतरता रस्ता आहे. कारण मातले कँडीपेक्षां ४०० फूट खालीं आहे. मातलें हा बराच मोठा गांव असून तेथली बाजारपेठ लांबच लांब आहे. येथें मी '''डांबुला''' गांवाला जाणाऱ्या मोटारबसमध्यें बसलों व मोटार ९ वाजतां चालू झाली. मातलेपासून डांबूल २८ मैल आहे. भाडे आठ आणे पडलें. येथून सुमारें १४ मैल '''नालंद'''पर्यंत उतरता रस्ता आहे. लागवड कमी दाट होत गेली असून मधून मधून भातशेती लागते. नालंदापासून सपाटीचा रस्ता लागतो. आतां लागवडीचा व पिकाचा मुलूख सरून सिलोनचा जंगली मुलख सुरू होतो.{{nop}}<noinclude></noinclude> exk45jj16s6g7548j2s3t5sihtpwmdb पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/८० 104 111898 236170 2026-08-25T11:39:22Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236170 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||खडक-देऊळ व खडक-किल्ला|६७}}</noinclude>{{gap}}मातलेला मोटारबसमध्ये बसल्यापासून झीम झीम पाऊस पडूं लागला होता तो त्या सबंध दिवसरात्रभर पडत होता. सुमारें साडे आकरा वाजतां मी डांबूला गांवाला पोहोंचलों. डांबूला हे अनुराद्धपुर त्रिंकोमाली व पुलनरूवा या तीन्ही शहरांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या आधींचें व म्हणून रहदारीचं ठिकाण आहे. गांव अगदीच लहान आहे. जिकडे तिकडे रानचरान! पण येथला विश्रांतिबंगला गांवाच्या मध्यावर असून त्यांत चांगल्या प्रशस्त खोल्या व मोठा खुला व्हरांडा आहे. सिलोनमध्यें असे विश्रांतिबंगले गांवोगांव सरकारी खर्चाने बांधलेले असून तेथें सर्वांची राहण्या-जेवणाची सोय केलेली आहे. सरकारी अंमलदार व खासगी प्रवाशी एकाच विश्रांतिबंगल्यांत राहतात व सर्वांना ठरलेल्या दराप्रमाणें राहण्याजेवणाचे पैसे द्यावे लागतात. मी येथें दीड दिवस होतों; त्याचें बिल सुमारें सात रुपये आलें. हे बिल जरा जास्तच वाटलें.<br>{{gap}}दोनप्रहरचा फराळ झाल्यावर मी डांबूल येथील खडकावरील बुद्ध धर्मी देवळें पाहण्यास निघालों. हा खडक म्हणजे दोनशे फूट उंचीची ग्रनाईट खडकाची किंचित् घुमटाच्या आकाराची टेकडी आहे. रस्त्याच्या अगदीं लगत हा खडक भिंतीसारखा उभाचा उभा आहे. हजारों वर्षे पाऊसपाण्याने व थंडीवाऱ्याने काळाकभिन्न झालेला हा खडक भयंकर भासतो यांत शंका नाहीं. पण हिरव्यागार गवतानें वा नाना फळपिकानें अलंकृत झालेल्या लंकेंत पाऊल ठेवल्यापासून येवढी सुळक्यासारखी उभी निर्वृक्ष सलग काळी काळीभोरे खडकाची टेकडी प्रथमतः पाहून फारा दिवसानें चिरपरिचित मित्र भेटल्याने जी मनाची स्थिति होते तशी माझी गत झाली. ज्याप्रमाणें विलासी स्त्रीपरिवारांत, केव्हां वीरांच्या आखाड्यांत तर केव्हां मुत्सद्यांच्या मजलसींत मग्न असणाऱ्या व सुंदर राजवाड्यांत राहणाऱ्या कृष्णाला फाटक्या तुटक्या पिशवींत पोहे घेऊन भिकार वेषांत येऊन भेटणाऱ्या सुदाम्याला पाहून आपला लहानपणचा बालमित्र भेटला म्हणून आनंद झाला त्याप्रमाणें ही टेकडी पाहून मला अत्यंत आनंद झाला.<noinclude></noinclude> ogpuhspyg8b9qgpa8htzrqif5e5l8xa पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/८१ 104 111899 236171 2026-08-25T11:41:59Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236171 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|६८ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>अर्थात् देवळाला जाणे इकडून शक्यच नाहीं. देवळाला जावयाचा रस्ता टेकडीच्या कमी उभ्या व खालच्या अंगास थोडीं फार झाडेझुडपें असलेल्या बाजूकडून आहे. झिमझिम पाऊस पडतच होता. तरी मी टेकडीवर चढत गेलों. जरा चढल्यावर इकडूनहीं सारखा खडकच लागतो. मात्र इकडल्या बाजूनें टेकडी मजगी मजगीनें उंच होत गेली आहे. खडकांत कांहीं कांहीं ठिकाणीं खोदलेल्या पायऱ्यांच्या खाणाखुणा दिसत होत्या. कांही ठिकाणीं बांधलेल्या पायऱ्या होत्या, कांहीं ठिकाणी प्रचंड खडकाच्या चिळणींतून पायऱ्या बांधल्या होत्या. पावसामुळे पायऱ्या व कातळ घसरडा झाला होता. म्हणून जपून जपून व सावकाश चालत व मध्यें मध्यें सभोवारचा देखावा पाहण्याकरितां थांबत थांबत मी शेवटीं एकदां टेकडीच्या बराचवर आलों तोंच लेण्याप्रमाणं खडकांत खोदलेली बुद्धधर्मी देवळांची रांगच रांग दिसली. ज्याला महाराष्ट्रांत आपण कोरीवलेणी म्हणतों त्याच तऱ्हेचीं सिलोनांतील हीं बुद्धधर्मी देवळें आहेत. मुख्य देऊळ अगर लेणें बरेंच मोठें आहे. समोरच बुद्धाची बसलेली मूर्ति आहे. नंतर दुसऱ्या उभ्या बुद्धाच्या शिष्यांच्या व बुद्धधर्मी राजांच्या मूर्ति आहेत. ज्याप्रमाणें म्हैसूर मद्रासेकडे मुख्य देवळाच्या प्रदक्षिणामार्गात देवांच्या मूर्तीची रांगच रांग ठेवलेली असते त्याप्रमाणें येथें व्यवस्था दिसली. उजव्या बाजूला उशीवर डोकें टेकलेल्या व आडवा असलेल्या बुद्धाची प्रचंड मूर्ति असून त्याचे शेजारीं आनंद नांवाच्या त्याच्या शिष्याची उभी असलेली प्रचंड मूर्ति आहे. लेण्याच्या दगडी तक्तपोशीला रंग दिलेला असून त्यावर व प्रदक्षिणेच्या वाटेच्या सर्व भिंतीवर रंगाची चित्रे काढलेलीं आहेत. मुख्य मूर्तीच्या मागून प्रदक्षिणा करतां येते. डाव्या हाताच्या बाजूला देऊळ बांधणाऱ्या राजाची मूर्ति व त्याची राणी हिंदु असल्यामुळे विष्णूची मूर्ति हीं या देवळांत आहे. बुद्धधर्मी देवळांत अशा तऱ्हेनें हिंदुधर्माच्या देवाच्या मूर्ति ठेवण्याची पूर्वापार पद्धति दिसते; तर इकडल्या हिंदु देवळांत बुद्धाची मूर्ति अर्वाचीन काळीही बसवितात हे मला पुढील प्रवासांत हबर्ने येथें नव्याच बांधलेल्या शंकराच्या देवळांत पहावयास सांपडलें.{{nop}}<noinclude></noinclude> l2e6hat66kuntd9bhqmiuqm9vv1lmof पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/८२ 104 111900 236173 2026-08-25T11:43:11Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236173 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|'''दांबूलच्या खडक देवळांतील मूर्ति.'''}} {{rh|नं. ७||पान ६८}} {{nop}}<noinclude></noinclude> pua2uzr92mejo55svu0l8iq8qwfda9o 236174 236173 2026-08-25T11:43:23Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ 236174 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|'''दांबूलच्या खडक देवळांतील मूर्ति.'''}} {{rh|नं. ७||पान ६८}} {{nop}}<noinclude></noinclude> mux36mwjcyg8xdrx2vsnlnrb7ob11q3 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/८३ 104 111901 236175 2026-08-25T11:47:29Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236175 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||खडक-देऊळ व खडक-किल्ला|६९}}</noinclude>{{gap}}मुख्य देवळाला लागून सारखी आणखी लहान लहान चार देवळें एकाच ओळींत कोरलेलीं आहेत. हल्लीं सर्व देवळांच्या पुढें अर्वाचीन मंगलोरी कवलाचा व कापलेल्या लांकडी कड्यांचा व्हरांडा बांधला आहे व समोर एक कांक्रीटचा हौदही केला आहे. हें अर्वाचीन काम शालजोडीला घोंगडीचे ठिगळ लावण्यासारखें दिसतें. या टेकडीवरून सभोवारचा सपाट हिरवा हिरवा गार व गर्द रानानें भरलेला प्रदेश सुंदर दिसतो. मधून मधून पांढऱ्या शुभ्र पाण्याचे तलाव व सरोवरें दृष्टीस पडत होतीं. यावरून पूर्वीच्या सिलोनच्या राजांनी जमिनीच्या लागवडीकरितां व पाणी पुरविण्याकरितां केवढाले तलाव सर्व प्रांतभर केलेले होते हे पाहून पूर्वकाळच्या संपन्नतेबद्दल व सुबत्तेबद्दल आश्चर्य वाटल्याखेरीज रहात नाहीं. हीं लेणीं पाहून मला मुंबई नजीकच्या कॅनरी लेण्याची आठवण झाली. दोन्ही लेण्यांच्या ठेवणीमध्यें व तेथून सभोंवार दिसणाऱ्या टेकड्यांच्या व सपाट प्रदेशाच्या देखाव्यामध्यें विलक्षण साम्य आहे. या दोन्ही लेण्यांची माहिती पुस्तकांत पहातांना दोन्ही लेणीं जवळ जवळ एकाच काळचीं आहेत हे वाचून तर माझें आश्चर्य द्विगुणित झालें. डांबूलाचीं हीं लेणीं इसवीसनापूर्वी एक शतकाचे सुमारास '''साद्धतिस्स''' राजानें बांधविलीं व सभोंवारचीं गांवें या देवळाच्या खर्चाला व बुद्ध भिक्षूंच्या योगक्षेमाकरितां बक्षीस दिली. त्यांचें उत्पन्न अजून या देवळाकडे चालतें.<br>{{gap}}दुसरे दिवशीं सकाळची न्याहारी करून मी मोटारगाडी चार रुपयांस ठरवून ''''सिगिरीया'''' नांवाच्या खडकाच्या टेकडीवरील किल्ल्याचें ठिकाण पहाण्यास गेलों. डांबूला पासून ते सुमारें बारा मैल आहे. पण पहिल्यांदा एकदोन मैल अनुराधपुर रस्त्यानें उत्तरेस जावें लागतें, मग डाव्या हातास ईशान्य (उत्तर पूर्व) दिशेला त्रिंकोमाली रस्त्याने सुमारें चार पांच मैल जावें लागतें व मग पुनः डाव्या हाताला वळून पांच मैल जावें लागतें. तिन्ही रस्त्यांना सारखें दाट जंगल आहे. रानरेडे वाटोवाट चरत असलेले दृष्टोत्पत्तीस येतात.{{nop}}<noinclude></noinclude> jb3ldutijck5w8ypxh4vvmhk4aohnio