विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.17
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf
106
104089
236233
236205
2026-08-26T12:09:11Z
कल्पनाशक्ती
3813
236233
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=लंकेचें वर्णन व वृतांत
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=कुलाबा
|Year=1934
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="प्रस्तावना" 7 ="अनुक्रमणिका" 8="नकाशा" 9 ="लंकापुराणपरिचय" 21 ="लंकेचा दंतकथात्मक इतिहास" 37 ="लंकेंत पहिले पाऊल : कोलंबो बंदर व रत्नपुर नगर" 43="फोटो" 52 ="फोटो" 59="फोटो" 62="कँडी व पेरेडॅनिया" 66="फोटो" 73="फोटो" 79 ="खडक-देऊळ व खडक-किल्ला" 82="फोटो" 87="फोटो" 92 ="बॅटिकोला व त्रिंकोमाली" 104 ="फोटो"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
jxrfw76mpqr65ynmmxaque9jsexdhi4
236252
236233
2026-08-27T08:44:26Z
कल्पनाशक्ती
3813
236252
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=लंकेचें वर्णन व वृतांत
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=कुलाबा
|Year=1934
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="प्रस्तावना" 7 ="अनुक्रमणिका" 8="नकाशा" 9 ="लंकापुराणपरिचय" 21 ="लंकेचा दंतकथात्मक इतिहास" 37 ="लंकेंत पहिले पाऊल : कोलंबो बंदर व रत्नपुर नगर" 43="फोटो" 52 ="फोटो" 59="फोटो" 62="कँडी व पेरेडॅनिया" 66="फोटो" 73="फोटो" 79 ="खडक-देऊळ व खडक-किल्ला" 82="फोटो" 87="फोटो" 92 ="बॅटिकोला व त्रिंकोमाली" 104 ="फोटो" 107 ="फोटो" 112 ="लंकेच्या जुन्या राजधान्या व मिहिंतले पर्वत" 114 ="फोटो" 117 ="फोटो"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
k332vick2h0o48aotnh1933fxg3apqi
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१६४
104
108741
236243
225277
2026-08-27T06:21:28Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236243
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="~2025-54611-5" /></noinclude>( १०८ )
जानवी देऊं नये चिंतामणराव पटवर्धन यानी या गोष्टीचा निर्णय करून आम्हास
समजाविला तो आम्हास पसंत आहे वगैरे. आश्विन शु ॥ १० शके १७४९.
सिद्धांतविजय, पृ० १०७.
श्री
(इ) वेदशास्त्रसंपन्न राजश्री समस्त ब्राम्हण क्षेत्र परशराममाहुली यासी
निलकं (ठ) शास्त्री थेते व मल्हार श्रोती व दाजी दिक्षीत वोक व कुपाशास्त्री
व गोविंदाचार्य आष्टपुत्रे व वामनशास्त्री साठे प्रमुख समस्त ब्राम्हण मुकाम पुणे
साष्टांग नमस्कार विनंती येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल तागाईत चैत्र
शुद्ध द्वादसी पावेतो जाणोन स्वकीय कुशल लिहित असावे विशेष पूर्वी शके
१७४५ फाल्गुण शु || १३ शके १७४७ चैत्र शुद्ध येकादशी अशा दोन सभा
तुलसीबागेत जाहल्या तेथे सर्वाचें मतें परभूस वेदकर्माचा आधिकार नाहीं असे
ठरोन सर्वांची समते जाहली. नंतर ज्याणी परभूपासून द्रव्य घेतले होते त्यापैकीं
कितेक ब्राह्मणास आनुतापं होऊन ज्ञातीस शरण येऊन प्रायश्चित घेऊन लेहून
दिल्हे कीं परभूनी द्रव्य देहून चांद्रसेनीय कायस्थास वेदकर्माचा आधिकार आहे
आसा शास्त्रार्थ ब्राह्मणापासून लेहून घेतले व चाद्रसेनी कायस्थ प्रभु यास वैदिक
तीन कर्माचा अधिकार आहे आसा पट करून त्यावर समंते करून घेतली असी
समज्यावरून विचार करिता ब्रहदज्याती विवेक हेमाद्री माधव प्रभृति सकल ग्रंथी
च्याद्रसेनी ज्याती काय लिहिली नाही शुद्रकमलाकर ग्रंथी पद्मपुराणातील म्हणोन
वचन लेहून च्यांद्रसेनी कायस्थ ज्याती वेगळी लेहून पद्मपुराणांतील वचन लेहून
त्या जातीस शुद्र साधारण धर्म लिहिले व परभूनी गागाभट याजकडून कायस्थधर्म
प्रदीप ग्रंथ करविला त्यात च्यांद्रसेनी कायस्थ प्रभू सज्ञेक दक्षण देशात आहेत असे
लिहून त्याच ग्रंथी च्यांद्रसेनीयास पद्मपुराणांतील वचन लेहून वेदोक्त कर्माचा
आधिकार नाहीं असे स्पष्ट लिहिले व कल्पीत श्लोक संस्कार करण्यास लिहिले व
हरीवंशात व त्याचे टीकेत व विष्णुपुराणांत व त्याचे टीकेत व विष्णु स्मृतीत
लिहिले आहे त्यास क्षेत्रिय शत्रु वध्य प्रतिज्ञेची सिद्धी वध अथवा वन्य क्षत्रीय
ज्यातीस वेदोक्त कर्मापासून चुत केल्यासिवाय होत नाहीं असे स्पष्ट लिहिले आहे
त्याजवरून श्री भार्गवराम याची क्षत्रियवधप्रतिज्ञेची सिध्धी वध न करिता
वेदोक्त कर्मछदावाचून होत नाही इत्यादिप्रमाणे करून चांद्रसेनास वेदोक्त<noinclude></noinclude>
oz5rqtk2nr3sutqow9xabd76tffcpjh
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/८७
104
111906
236234
236209
2026-08-26T12:09:50Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */
236234
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|'''खडक किल्ल्यावर जाण्याचा जिना, सिगिरिया.'''}}
{{rh|नं. ८||पान ७२}}
{{nop}}<noinclude></noinclude>
lzirjol2o7z0hq265v1zoemje73esxu
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१०३
104
111922
236229
2026-08-26T12:02:05Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236229
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|८८ |लंकेच वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>वजन आहे. डच राजवटीच्या वेळच्या किती तरी इमारती व त्यांचे अवशेष अजून त्रिंकोमालींत पाहण्यास सांपडतात. डच नांवें व डच तऱ्हेची घरबांधणी येथें दिसून येते; शेवटीं लंका हें बंदर इंग्रज लोकांच्या ताब्यात आलें. आतां तर त्रिंकोमाली येथें ब्रिटिश आरमारी आड्डा- सिंगापुरच्या पुरवणी दाखल करण्याचा ब्रिटिश सरकारचा बेत असल्यामुळें या बंदराला जास्तच महत्त्व आलें आहे व कालेकरून जास्त जास्तच येणार असा रंग दिसतो.<br>{{gap}}त्रिंकोमाली हे मुंबई बंदराप्रमाणें एक स्वाभाविक बंदर आहे. त्याची भौगोलिक उपस्थिति थेट मुंबईच्याप्रमाणे आहे. मात्र मुंबई बंदर हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरील व आरबी समुद्रावरील बंदर आहे, तर त्रिंकोमाली हे सिलोन बेटाच्या पूर्व किनाऱ्यावरील व बंगालच्या उपसागरावरील बंदर आहे. यामुळे दिशांची अदलाबदल झाली आहे. बाकी बंदराची स्वाभाविक ठेवण सारखी आहे. मुंबई बंदर मुंबई बेटाच्या पूर्वेस आहे तर त्रिंकोमाली बंदर शहराच्या पश्चिमेस आहे. मुंबई बंदराचें मुख दक्षिणेकडे आहे, तर त्रिंकोमाली बंदराचें उत्तरेकडे आहे, मुंबई बंदराच्या नजीक पनवेलची खाडी येऊन मिळते; तर त्रिंकोमाली बंदराच्या नजीक महावेली गंगा नदीची खाडी येऊन मिळते; मुंबईची मलबार टेकडी समुद्रावरील वारा व लाटा यांपासून बंदराचें संरक्षण करते; तर त्रिंकोमालीची गर्दछाय टेकडी बंदराचें वादळापासून संरक्षण करते; मुंबईला जसा बॅकवे नांवाचा उथळ पाण्याचा अर्धवर्तुळाकार भाग आहे; तसा त्रिंकोमालीस डचबे नांवाचा अर्धवर्तुळाकार भाग आहे. मुंबईचें कुलाबा टोंक बंदराच्या पश्चिमेस मुख्य समुद्राच्या बाजूचें टोक असून तेथें दीपगृह आहे; तर त्रिंकोमालीचे पूर्वेस मुख्य उपसागराच्या बाजूचें टोंक फाऊल पॉईंट म्हणून आहे व तेथें दीपगृह आहे. ज्याप्रमाणें मुख्य समुद्रासमोर व मुख्य समुदाच्या लाटा व वारा मिळणारे नेपीयनसी व महालक्ष्मी हे भाग आहेत, त्याप्रमाणें त्रिंकोमालीस फ्रेडरिक किल्ल्याचा किनारा व बॅकबे हा भाग आहे. दोन्हींही बंदरें खूप खोल पाण्याचीं व<noinclude></noinclude>
klf0lt3uckgtu505a9v9lejjk7wjwbr
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१०४
104
111923
236230
2026-08-26T12:03:31Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236230
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|'''त्रिंकोमालीच्या किल्ल्याचा तट.'''}}
{{rh|नं. ९||पान ८९}}
{{nop}}<noinclude></noinclude>
lxrjgm6zcgrymszut3itmg7kko08uq1
236231
236230
2026-08-26T12:03:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */
236231
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|'''त्रिंकोमालीच्या किल्ल्याचा तट.'''}}
{{rh|नं. ९||पान ८९}}
{{nop}}<noinclude></noinclude>
oyo3evw3pc9agzr5xj6uh6xarcgvc4w
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१०५
104
111924
236232
2026-08-26T12:08:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236232
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||बॅटिकोला व त्रिंकोमाली|८९ }}</noinclude>अत्यंत निवाऱ्याचीं असून बंदरांचा घेर मोठा आहे. यामुळे हव्या तितक्या बोटी व गलबतें राहण्याची उत्तम सोय आहे. याप्रमाणें या दोन बंदरांत आश्चर्यकारक साम्य आहे. अर्थात् मुंबईचा व्यापार अवाढव्य आहे व तेथे किती तरी आगबोटी व जहाजे यांची जा-ये सारखी चालू असते; त्या मानानें त्रिंकोमालीस फारच कमी जा-ये असते. कारण, सिलोन बेटाचा पूर्वभाग अजून बिनलागवडीचा, बिनवस्तीचा व जंगलमय आहे. पण सिलोनचा हा भाग जसजसा लागवडीस येईल व तेथील वस्ती वाढेल, तसतसे या बंदराचे महत्त्व व व्याप वाढेल. सध्यां खोल व निवाऱ्याचें उत्तम बंदर म्हणून येथें आरमारी आड्डा करण्याचा ब्रिटिश सरकारचा बेत आहे. त्या दृष्टीनें या बंदरापर्यंत आगगाडी करण्यांत आली आहे व बंदराची आरमारी बंदर या नात्याने वाढ चालू आहे.<br>{{gap}}याप्रमाणे त्रिंकोमालीचें महत्त्व आहे. अद्याप शहर फार मोठे नाहीं; पण शहर दुमदार, नीटनेटकें व निसर्गरमणीय आहे. शहरांत जिकडे तिकडे केळी नारळी पोफळीची रेलचेल आहे.<br>{{gap}}त्रिंकोमालीस मी अबकारी खात्यांतील सुपरिंटेंडेंटच्या मोठ्या हुद्यावर असलेल्या रा. बालसिंघम् (जाफना शहरचे रहिवाशी एक तामील गृहस्थ यांचे बंगल्यावर उतरलों होतों म्हणून मागे सांगितलेंच आहे. यांचा बंगला हे एक त्रिंकोमालींतील प्रेक्षणीय स्थळ आहे. तरी तेथपासूनच त्रिंकोमालीच्या स्थलवर्णनास प्रारंभ करणें ठीक होईल.<br>{{gap}}हा बंगला फ्रेडरिक फोर्ट नांवाच्या डच राजवटींत बांधलेल्या किल्ल्याचे आंत आहे. बंगालच्या उपसागरांत जरा पुढे घुसलेल्या त्रिकोनाकृति भूमिभागावर हा किल्ला बांधलेला आहे. हा भाग टेकडीवजा असून बराच उंच आहे. त्रिकोनाच्या समुद्राकडल्या दोन्ही बाजू निवळ भिंतीसारख्या उभ्या असलेल्या खडकाच्या असल्यामुळे त्या बाजू समुद्राच्या पाण्याच्या पातळीपेक्षां पन्नास फूट उंच असून, समुद्रांत घुसलेलें चिंचोळें टोंक तर<noinclude></noinclude>
9nfgashgahs0p0u5asqcp2k237gc5nt
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१५६
104
111925
236235
2026-08-26T12:29:02Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236235
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १०० )
आपणच पत्र राजश्री विठलराव दिवाणजीस देऊन पुढे आपणच त्यास नाहीं म्हणोन
वज्रटंक यांचे तडांतील ब्राम्हणास पूर्वीग उतरांग प्रायश्चीते दिल्हीं आणि हाली
गंधाक्षत होते समई त्यांत जे प्रमूख वज्रटंकासह यास प्रायश्चितरहित गंधाक्षतेस
घेतले. यावरून पाहता चांद्रसेनिय यांस सशास्त्र वैदिक कर्मत्रयाधिकार
आहे. तेव्हां दोष तो कोणाकडेच नाहीं. असे असोन निलकंठशास्त्री याणी पुर्वाग
उतरांग ब्राम्हणास प्रायश्चिते दिल्ही याचा अपवाद मात्र त्याचे माथा आला.
हे कर्म निळकंठशास्त्री याजकडून अनुचित जाले. थथे शास्त्री याणी विठलराव
याचे नावे पत्र लिहिलें ते सदरी बार आहे. त्यावरून विचार पाहाता हे ज्ञाती
च्यांद्रसेनीय कायस्थ प्रभु यास वैदिक कर्मत्रयाधिकार, हे निलकंठशास्त्री याची
खात्री ह्मणोन हे शास्त्रज्ञ ज्ञाते असे पत्र लिहितात. नंतर विपर्यास बुद्धीस जाल्या-
वर आह्मी पत्रच दिल्हे नाहीं असें कुभांड करून प्रभुंचा अनादर पर्याय माहाराष्ट्र
शुद्र भाषणे परभु हेच रुढित आणून परभूस कर्मत्रयाधिकार नाहीं अशी तुळसी-
बागेत गुदस्ता सर्व ब्राह्मणांची समती करून घेतली. चांद्रसेनीय यांची उप-
लब्धीच नाहीं असेही निलकंठशास्त्री यांचे म्हणणे. परंतु त्यास सर्व ब्राम्हणानीं
समत दिलें नाहीं कीं च्यांद्रसेनिय प्रत्यक्ष हे असोन नाहीं कसे म्हणावे ? यावरून
पाहता हे ज्ञाती चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कर्मत्रयाधिकारी अशी थथे शास्त्री यांची
खात्री. पुढे द्वेशबुद्वी जाल्यावर परभु हे अन्य ज्ञाती कल्पून यास आधीकार नाही
ह्मणतात आणि चांद्रसेनिय यांची उपलब्धीच नाहीं असे ह्मणतात. तेव्हां चांद्रसेनिय
यास शास्त्रआधिकार यास नाहीं ह्मणे यास लाक्षा चालणार नाही ह्मणोन उपलब्धीच
नाहीं हेच यातील कारणहासील या ज्ञातीचा कमै लोप करावा हेच दृढ मानस.
च्यांद्रसेनिय यास वैदिक कर्मत्रयाधिकार आहे म्हणोन परभु हे ज्ञाती
भिन्न पाडून च्यांद्रसेनिय यांची उपलब्धी नाही ह्मणोन वाजवितात. पुढे चांद्रसेनिय
कायस्थ प्रभु हेच ज्ञाती शुद्र भाषा भेद परभु असे सिद्ध जाले. तेव्हां च्यांद्रसेनिय
यांसच कर्मत्रयाधिकार नाहीं ह्मणोन वाद प्रतिवाद करू लागले. त्याची समाप्ति
शास्त्र आधार सोडून पदर पसरून करितात. तेव्हां राघवाचार्य यांणी शास्त्रार्थविषई
प्रतिज्ञा केली ते खरी. निलकंठ शास्त्री याचा व्यवहार येविसीचा शास्त्र-
जन्य नव्हे. शुद्ध आग्रही. कारण पुर्वी अश्विन मासी परभारे तात्या काकिर्डे याज-
पासून कांहीं ब्राह्मणास द्रव्यलोभास्तव देकार करून च्यांद्रसेनीय यांस कर्मत्रयाधिकार<noinclude></noinclude>
msgsqvj0g7whxvbqy2y5ih4rcziy30a
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१५७
104
111926
236236
2026-08-26T12:29:17Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236236
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १०१ )
नाहीं म्हणोन यादी करून त्यावर समती घेऊ लागले ते काळों राघवाच्यार्य याचे
तडांतील ब्राह्मणांस काही द्रव्य लोभ दाखऊन तिनच्यार ब्राह्मण फिताउन नेले.
त्यांस काकिर्ड याणी सांगितले की, निळकंठशास्त्री व राघवाच्यार्य परभारे कलह
करित आहेत तो कलह आपल्यास कशास पाहिजे. तुम्ही यादीवर समत करून
आमच्या तडांत यावे. त्यावरून ते ब्राह्मण लोभॅ मान्य जाले. परंतु त्यां ब्राह्मणांचे
ह्मणणें कीं, निळकंठशास्त्री यासी तुम्ही गंधाक्षतेस बोलाऊ नये. कारण धोंडभट खरे
प्रभृती द्रवीड मंडळीनें त्यास बहिष्कार घातला आहे. तेव्हां काकीर्डे मान्य न करित
याजमुळे ते ब्राह्मण उठोन आले. यातील आर्थ पाहातां च्यान्द्रसेनीय यांचा कर्म-
लोप करण्याविषई द्रव्यही खर्च करून परभारें साधन करितात व मार्गशीर्ष मासी
पुढे सर्वांचे विच्यारे शास्त्रार्थ न होता यादी ठरवितात. त्यापुर्वीच कृत्रीम करून
समतें करून ठेवितात असें सिध्ध होतें. वस्तुतः विचार पाहांतां वर्ण मात्रांस गुरू
ब्राह्मण. शास्त्राधारे सर्वांस वागवावे हा आधिकार असता च्यांद्रसेनीय यांचा शास्त्रार्थ
सोडून त्यांस आधिकार नाहीं म्हणोन कुभांड केले तेव्हां ब्राह्मणच त्या ज्ञातीस
वादी जाले. ते पक्षी वादी दानधर्मे करून आगर कसाही वस्य करून त्याणी
पुर्वी समती पट दस्तैवज साध्य केला त्यास द्रव्य खर्च करून साधन करून घेतलें
ह्मणोन म्हणतात आणि आपण अशास्त्रास द्रव्य परभारें देवऊन लोभाविष्ट ब्राह्मण
करून समती घेतात तेव्हां च्यांद्रसेनीय याजबरोबर कलह शुद्ध आग्रही. वास्तविक
विच्यार पाहाता स्कंदपुराणी सह्याद्री खंडांतरगत रेणुका माहात्मी च्यांद्रसेनीय
कायस्थ प्रभु यांचा निर्णय लिहीला आहे. तेथे स्पष्ट वैदिक कर्मत्रयाधिकारी
म्हणोन षण्णांच कर्मणामधे त्रिणि कर्माणिजीविका असे प्रसिद्ध आहे. त्यांत क्षात्र
धर्मात् वहिष्कृतः या वचनावर सर्व कर्मापासुन त्यक्त होते तरी त्याच ग्रंथीं पुढे
साहा कर्मापैकीं तीन कर्मे करून निर्वाह करावा ह्मणोन सांगण्याचे प्रयोजन नवते.
ते पक्षी एक शस्त्रधारणरूप क्षात्रधर्म टाकऊन बाकी धर्म त्यांस आहेत असे
सिध्धच. तत्राप दुसरा आर्थ पाहातां श्रीभार्गवानं प्रतिज्ञा केली तो संपुर्ण क्षात्रधर्म
त्यागाविना वध प्रतिज्ञेची फलोप्ती येणार नाहीं असाही भाव धरावा तरी तो
संभव होत नाहीं. कारण, भार्गव राम परमज्ञाता. त्यांत ब्राह्मण आणि संपूर्ण क्षत्रीय
द्वेषबुध्धीच होते असे हीं नाहीं. कांहीं औदासीन व कांहीं दुष्ट. तेव्हां औदासीनाचा
वध करावा तरी त्यांत पातकच निर्माण होईल. तेपक्षों औदासीनाचा वध तो<noinclude></noinclude>
ax9f17j04134mkf5ujnxzvayf2xov23
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१५८
104
111927
236237
2026-08-26T12:29:32Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236237
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १०२ )
भार्गवानें केलाच नाहीं. दुष्ट होते त्याजविसी प्रतिज्ञा औदासीनाचे हत्येनें पातक-
•
मात्र होईल ह्मणोन वध न केला. यास प्रमाण पाहाता जनकादीक यासी
विरोध अगर वध केला नाहीं तेव्हां संपुर्ण क्षत्रीय यांचा नाष केला असा भाव
नाहीं. जसे ओदासीन राहिले त्यांचे सर्व धर्म राहिले, तेणेकरून वधप्रतिज्ञेस
बाध न आला. तसेच गर्भरक्षणार्थ दालभ्य ऋषीनें भार्गवाचें वचन घेऊन
रक्षण केले. तेव्हां त्या गर्भाचे टाई भार्गवाचे वधप्रतिज्ञेचा लेश राहिलाच नाहीं.
तत्राप रेणुकामाद्दात्मीं वचन रामोवाच ॥ जायमानो भवेदबालः क्षात्र धर्मा
भविष्यति ॥ या वरून पूर्वे वाक्यें करूनच सर्व धर्मापासुन त्यक्त होता तरी पुढें
रामच म्हणतो कीं हा पुढें क्षात्रधर्मा होईल. ते पक्षी त्याच वचनें करून तो धर्म
गेलेच नाहीं. नंतर दाल्भ्यौवाच ॥ माकुरुष्वात्र संदेहो दुर्बुद्धिर्न भविष्यति यावरून
पाहता भार्गवाची वधप्रतिज्ञा दुर्बुध्धीचे ठाई त्या दुर्बुध्धीपासुन ऋषी वचनें
करून गर्भीच मुक्त झाला तेंच काली द्वेषरहित दुष्टकर्मी औदासीन त्यांचे सर्व
कर्म राहिलें. तेथें भार्गवाची वध प्रतिज्ञा राहिलीच नाहीं. याचे एक शस्त्रविद्ये-
सिवाय बाकी धर्म राहिले त्याणे वधप्रतिज्ञेस बाध आला नाहीं. प्रत्यक्ष त्रीणी
कर्माणी जिवीका म्हणोन वचन आहे ते न पहातां एकाच वचनाचा आर्थ वैपरीत्य-
भावे सर्व धर्म गेले ह्मणोन कक्षा घेणें हे अशास्त्र इत्यादि अन्वयावरून पाहातां
पुणे मुकामी निलकंठ शास्त्री प्रभृति ब्राम्हणांनी आग्रही तंटा करून दोन वर्षे
तड पाडुन ब्राह्मणांत दुफली केली होती है खोटे, असे शास्त्रांनुमतें व यादी व
सनदा पत्रे व श्रीअवीमुक्त क्षेत्रीचें समत पत्र व च्यांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांचे
पारंपर्य आचरणावरून सिद्ध होतें. यावरून आज्ञा होती जें राजश्री बळवंतराव
मल्हार चिटणीस घोलकर व भिवराव विठल व भगवंतराव मल्हार खासनिवीस
नाडकर संस्थान सातारा व नारायणराव सिताराम व विठलराव बाबाजी फणसे
' व विठलराव देवाजी दिघे व रावरावजी तासकर प्रभृती समस्त क्षेत्रियान्वय
च्यांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांची वहिवाट पुर्वापार वैदिक कर्मत्रयाधिकारे करून
परंपरागत चालत आल्याप्रमाणें अव्याहत पुढेही चालवित जाणे. विशेष लिहीणें तें
काय. शके १७४८ व्यय नाम संवत्सरे माघ मास महानुशासनं वरिवर्ति
इत्यलं
आतांपर्यंत उद्धृत
केलेल्या वरील हकीकतीवरून वाचकांना हे कळून
आलेच असेल कीं चित्पावन नोकरशाहीच्या श्रीमंत आश्रयाखालीं वावर-<noinclude></noinclude>
23je822qllhl2ibymgcm2e1bju4dlug
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१५९
104
111928
236238
2026-08-26T16:12:55Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236238
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १०३ )
णारे जवानमर्द ब्राह्मण ( ? ) वीर मराठी साम्राज्याच्या चिरस्था इत्वापेक्षां
स्वतःच्या ब्राह्मण्याचे डोले नाचविण्यांतच गर्क होऊन गेले होते. मुंब-
ईचे टोपीकर, म्हैसूरचे वाघ किंवा हैदराबादचे लांडगे यांना पायबंद
लावून छत्रपतीच्या भगव्या झेंड्याची इभ्रत वाढविण्याचा यत्न करण्या-
ऐवजी, स्वतःच्या भाडोत्री ब्राह्मण्याची महति वृद्धिंगत करण्यासाठीं,
खुद्द मराठी रियासतीच्या पिढीजात चित्पावनेतर स्वदेशबांधवांच्याच
तंगड्या छाटण्याचा उपक्रम करण्यांत ते अगदीं गढून गेले होते. सातार-
कर धन्याला धत्तुरा दाखवून विश्वासघाताच्या फोडणीनें खमंग बनविलेला
नोकरशाहीचा मलीदा खाऊन खाऊन परान्नपुष्ट झालेले मुळामुठासंगम-
निवासी चित्पावन तरवारबहादर आतां तरवारीकडे न पाहतां स्वतःच्या
गळ्यांतील जानव्याची ब्रह्मगांठ कुरवाळू लागले. प्रस्तुत ग्रामण्याच्या वेळीं
बाळाजीपंत नातू, चिंतामणराव पटवर्धन आणि निळकंठशास्त्री थत्ते या
दिग्विजयी त्रयीनें अनंत अत्याचार केले. त्या सर्वांची संभावना अगदीं
बारक्यांतल्या बारक्या टायपांत केली तरी ' मराठे आणि इंग्रज' पुस्तका-
सारखी तब्बल दोन पुस्तकें भरून निघतील. या ग्रामण्यासंबंधीं बरेचसे
कागदपत्र रावबहादुर डोंगरे यांनीं शोधून काढले आहेत व ते त्यांनीं
आपल्या "सिद्धांतविजय " नामक उत्कृष्ट ग्रंथांत छापूनहि प्रसिद्ध केले
आहेत. या त्यांच्या कामगिरीबद्दल चां. का. प्रभू समाजानें रावबहादुरांचे
कृतज्ञतापूर्वक आभारच मानिले पाहिजेत. यापुढील हकीकत रा. ब. डोंगरे
यांच्याच शब्दांत खालीं देतों:-
66
-
चांद्रसेनीय कायस्थ प्रभु व ब्राह्मण ह्या जातींमध्ये पेशवाईत बरींच
ग्रामण्ये झाली होतीं, हें मागें सांगितलेंच आहे. अशा प्रकारचें आणखी
एक ग्रामण्य पेशवाई बुडाल्यानंतर श्री. चिंतामण पांडुरंग पटवर्धन
सांगलीकर यानी पुढाकार घेऊन बाळाजीपंत नातू पुणेकर व निळकंठ
शास्त्री थत्ते यांच्या मदतीनें आपणांस पाहिजेत तसे नवे ग्रंथ सांगलीस
तयार (अ) करून घेऊन सन १८२५ च्या सुमारास साताराप्रांतीं उभे केलें
होतें. त्यावेळीं बळवंतराव मल्हार चिटणीस सुमंत चां. का. प्रभु यांनीं
करवीर मठाधीश्वर श्रीमत् शंकराचार्यास विनंती केली होती कीं, 'ब्राह्मण
,<noinclude></noinclude>
8g04bx1v7kxpka0jwro9lffx3xomaah
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१६०
104
111929
236239
2026-08-27T06:08:14Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236239
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १०४ )
आमच्या कर्मास विनाकारण अडथळा करून तंटा करीत आहेत ह्याचा
बंदोबस्त व्हावा. ' त्यावरून स्वामीनीं सर्व ब्रह्मवृंदास आज्ञा केली कीं
66
पूर्वीपासून जसें चालत आले आहे तसें चालवावें; तंटा कोणी करूं नये."
परंतु ' आम्ही म्हणतों तसा ठराव स्वामी करतील तर तो आम्हास मान्य
आहे,' असें म्हणणारा ब्रह्मवृंद ह्या वरील ठरावास थोडाच जुमानगार
होता ! माहुली वगैरे क्षेत्राच्या ब्राह्मणांनी चिंतामणराव सांगलीकरास
श्रीमंतांचे ( पेशव्याचे ) ठिकाणी स्थापून चां. का. प्रभूस शूद्र बनवि-
याच्या राष्ट्रीय कामावर ( ब ) त्यांची नेमणूक केली. सांगलीकरानी
पाहिलें कीं शंकराचार्यांस सामील करून घेतलें असतां आपले काम श्री
गणपतीच्या कृपेकरून निर्विघ्नपणे पार पडेल; पण आपल्या अधिकाराचा
बोज राहावा असें स्वामीस वाटत असल्यामुळे ते सांगलीकरांच्या कटांत
येईनात. तेव्हां स्वामीस बागुलबोवा दाखवून त्यांस आपल्या मुठींत.
आणून त्यांच्याकडून आपणांस पाहिजे त्या मतलबाची प्रभूंविरुद्ध
यादी सहीशिक्यानिशी शके १७४७ सालीं पर्वती मुक्काम करून घेतली.
व पुढे दोन वर्षांनी ( शके १७४९ ) त्या यादीच्या नकला सर्वदेशभर
७५ ठिकाणी पाठवून प्रभू लोकांस शूद्र बनविण्याचे कामास ( क )
चांगलीच सुरवात केली.
99
( अ ) " सेवेसी सा. नमस्कार विज्ञापना ता. छ २ २ ॥ कर पावेतो यथा-
स्थित आसे विशेष. आलिकडील वर्तमान तर सांगलीस ग्रंथ जाला तो दुतर्फा
स्वामीचे पत्री जाहल्यामुळे मनोदयानुरुप शेवटास गेला नाहीं त्यास हाली मुंबईचे
मुख्य सातान्यास येणार तेथे मु॥ किती दिवस होईल नकळे त्यासंधीत वाई
वगैरे समस्त ब्राह्मण हजार दोन हजार जमाव होऊन साहेबाजवळ फिरयाद
करावी जे या ज्ञातीप्रकर्णी यामागें शंभर वर्षात चार पाच ग्रामण्ये जाली त्यात
या ज्ञातीचे कबूल कतवे वगैरे सरकारांत येऊन याचे वागणुकीचा ठराव जाला
त्या । याणीं वागावे ते दांडगाईन वागणुक जाहली हालीही दांडगावा करून
जी गोष्ट इ॥ त॥ या ज्ञातींत आचरण जाहले नाही ते हाली महाराजाचे पुस्त-
पन्यामुळे आचरतात याचा बंदोबस्त सरकारांतून आपण केल्याविना होत नाहीं
यास्तव महाराजास निखालस स्पष्ट सांगून याचा पुस्तपना न होय आणि हाली<noinclude></noinclude>
7encxcvcdrycfdjbvd186bjjk6km3du
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१६१
104
111930
236240
2026-08-27T06:19:03Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236240
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>.
( १०५ )
सांगलीस ठराव होऊन पत्रे क्षेत्रो क्षेत्री गेली आहेत त्याप्रे । ! हे वागणूक करीत
असे जाहले पाो हा येक बेत दुसरा मनसुबा ब्राह्मणानी जमाव होऊन सदरी
लिहिल्या प्रो। वागणुकेचे साहेबाचे जाहिरण्यात आणून आपले वाड्यावर चालून
घेऊन मारामारी करून आवरु घ्यावी त्यांत जे जाया होतील ते होतील असाही
निग्रह करावा याच तटास आल्यास बल आणावे असे आहे सारांष साहेब तेथे
आल्यावर या गोष्टीचा उपक्रम सर्व मिळोन करावा यांत जे घडेल ते घडो असा
बहुत निकश होऊन करण्याचा बेत आहे अंकिले वर्तमान लिहिले आहे यासंधीत
आपण केले ते सेवटास न्यावे असी योजना याची जाहली आहे त्यास आपला
सांभाळ आजपर्यंत ज्याही केला त्यानी या समई कृपा करून अभिमान धरून
सरंक्षण केल्यास पार पडेल इकडील बेत आपण केले ते सेवटास नेण्याविसी वहुत
आग्रहाचे बोलावे असे आहे अद्यांत अकिले ते श्रुत व्हावे या करिता लिहिले आहे.
सेवेसी श्रुत होय हे वि॥.
सिद्धांतविजय पृ० ११३-१४.
( ब )
श्री गणपतीर्जयति.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृंद उभय क्षेत्र माहुली स्वामीचे
सेवेसी.
विद्यार्थी चिंतामणराव पांडुरंग साष्टांग नमस्कार विनंती येथील कुशल ता ॥ अधिक
आषाढ शु || १३ पावेतो यथास्थित असे विशेष. परभु हे चांद्रसेनी नव्हेत संकर
कायस्थ ज्यात्योद्भव शूद्राधम यास वेदकर्माचा अधिकार नाहीं व च्यांद्रसेनासहि
अधिकार वेदकर्माचा नाहीं व त्या ज्ञातीची उपलब्धीही नाहीं. असें असतां परभु
हे आलिकडे चांद्रसेनी म्हणवू लागले व आपले ज्ञातींत वेदोक्त कर्म व्हावी येविसी
आपले साधनाकरितां म्हणोन पुण्यांतील कांहीं ब्राह्मणास परभूंनी लोभाविष्ट केले. त्या
ब्राह्मणांनी चांद्रसेनी कायस्थ यांस वेदकर्माचा अधिकार नसता अधिकार आहे
म्हणोन परभुजवल शास्त्रार्थ लिहून दिल्हा, याजमुळे ग्रामण्ये होऊन ब्राह्मणांत
तट जाहले. गंधाक्षता वर्ज जाहली. व सोनार हे रथकार यास वेदकर्माचा
अधिकार आहे असे कांहीं ब्राह्मणांचे म्हणणे व जीनगर हे चर्मकतुल्य चम
काम करतात त्यास गल्यांत जानवीं घालण्यास आधिकार नाहीं असे असता
गल्यांत जानवी घालतात व आलिकडे पुण्यांत ब्राह्मणांचे व शुद्रांचे हावदांत पाणी<noinclude></noinclude>
rqsescrdi8xx6ncmnm06j9lbo34ryou
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१६२
104
111931
236241
2026-08-27T06:20:46Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236241
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १०६ )
भरतात. म्हणोन श्री गोदा यात्रोद्देशे शके १७४७ पार्थीव नामसंवत्सरांत श्री
स्वामी जगद्गुरु यांची स्वारी पुण्याचे सांनिध्य पर्वतीचे मुक्कामास गेली. तेथें सम-
जले व आम्हीही पुण्यास गेलो. पुण्यांतील ब्राह्मण व ग्रहस्थ श्रीचे दर्शनास आले
व आम्हीही दर्शनास गेलो. ते समयी ब्राह्मणांचे म्हणणे पडले त्यांतील
भाव. स्वामीचे आगमन जाहले व आपलीही स्वारी आली आहे. श्रीमंतांचे
ठिकाणी आपण विद्यमानी आम्हास. ब्राह्मणप्रभु ब्राह्मण्याचा कारभार
हा खटला मनास आणून तोडावा. सर्वाची गंधाक्षता करावी, म्हणोन.
त्याजवरून श्रीमंत कैलासवासी माहाराज छत्रपती संस्थान सातारा व श्रीमंत
कैलासवासी पंतप्रधान यांच्या कारकीर्दीत परभु यांची ज्ञाती कसी व त्यास
वेदकर्माचा अधिकार आहे किंवा नाहीं व त्यांचे आचरणाचा पाठ कसा याची
चौकसी जाहली त्यांत कसकसे ठरले व परभुजवळ चांद्रसेनीय कायस्थास वैदिक
तीन कर्माचा अधिकार आहे असा शास्त्रार्थ लिहून दिल्हा तो युक्त किंवा अयुक्त
हे पाहावे याकरितां कायस्थाची उत्पत्ती चित्रगुप्त व चांद्रसेनादी कायस्थ यांची
कसी व त्यास वेदकर्माचा अधिकार आहे की नाही याचा व दुसरा प्रकार सोनार
हे रथकार होत किंवा नव्हेत व त्यांस वेदकर्माचा अधिकार आहे किंवा नाहीं याची
चौकसी ग्रंथावरून सिष्टानुमतें व तिसरा प्रकार जीनगर यास गल्यांत जानवी
घालण्यास अधिकार नाहीं असें असतां गल्यांत जानवी घालतात त्यास यांचा
पूर्वापाठ कसा याचीही चौकसी पाहून सारांश करून श्री स्वामीस समजाविला
आणि विनंती केली त्यांतील भाव. चौकसी केली ती अयुक्त किंवा सप्रमाण याचा
विचार स्वामीनी करून सदरहू सारांशाअन्वये चालणेंविसीं श्री कासी क्षेत्रादी
क्षेत्रस्थ व पुण्यग्रामादि ग्रामस्त ब्राह्मण वगैरे यांस पत्र द्यावयास आज्ञा व्हावी
म्हणोन त्याजवरून सदरहूचा विचार श्री स्वामीनी करून सदरहू सारांशांत चौकशी
केल्याचे प्रकार कसकसे लिहिले ते वगैरे सर्वास कलावे. सारांशाअन्वये सर्वांनीं
चालावे याजकरितां सारांश वार करून निर्णयाची याद व पत्र लिहून दिल्हीं
आणि जिकडील तिकडे पाठवण्याविसी आज्ञा जाहली. त्याजवरून आपले
नांवचे पत्र व याद पाठविली आहे. पोहोचल्याचे उत्तर श्रीचे नांवे पाठवावे.
बहुत काय लिहिणे लोभ करावा हे विनंती.<noinclude></noinclude>
dot2dfn5avs6lp62aqqduiaixmenmhn
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१६३
104
111932
236242
2026-08-27T06:21:03Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236242
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १०७ )
(क) श्री विद्या नरसिव्ह भारती स्वामी संकेश्वर याणी वेदशास्त्रसपन्न परम
सिषोतम राघवाच्यार्य यास पत्र सही सिक्यानसी कार्तिक शु || १० शके
१७४८ व्येय नाम सवत्सेरी लियो पौ थोडे हसील म॥र फालगुनमासी आम्ही श्री
गोदावरी यात्रेस जाण्या बो। पुण्यानजीक पर्वतीचे मु॥ जाऊन राहिलो त्यासमयी
च्यांद्रसेनीय ज्ञातीचे शास्त्रार्था ॥ ब्राह्मणांत तंटा पडला होता तेव्हां उभयपक्षीचे
ब्राह्मण दर्शनास येऊन म॥र समजाविला त्यासभेत तुम्ही बोलला की स्वामीनी
गंगोदक व तुल (सी) घेऊन श्रीदेवासनिध बसून निरमछरपणें च्यांद्रसनिये
ज्ञातीस वेदकर्म अधिकार आहे किंवा नाहीं हे सत्ये सांगावे आथवा निरमछर
शास्त्री पंडित माहनेक्षत्री बसवून शास्त्र समते निरणय करून सांगावे परंतु
त्यावेली च्यांद्रसेनीय शास्त्रार्थ विषयखंडन मंडन करून पत्रे दिल्ही कारण
चिंतामणराव याचे मनी च्यांद्रसेनीय याचा द्वेष कोपिपक्षो आणखी च्यांद्रसेनीये
ज्ञातीचे द्वेषाचे आग्रगण्य बालाजीपंत नातु विपरित बोधिता नातु आमचे
संस्थानास उपद्रव करतील या भितीस्तव नातूचे मनोधारणार्थ मुद्रापूर्वक पत्रे दिल्ही
परंतु ती पत्रे मिथ्या स || हली रद करून च्यांद्रसेनीय ज्ञातीविसी शास्त्र ग्रंथ ग्रंथ
समती पाहता च्यांद्रसेनाना वैदिक कर्म अधिकार सत्ये आहे त्याजवरून हे पत्र
तुम्हांस लिहिले आहे.
"या यादीच्या प्रत्येक नकलेबरोबर श्रीशंकराचार्य स्वामीच्या नांवचे
एकेक पत्र जोडलें होतें. (ड) निळकंठ शास्त्र्यानी देखील पुण्यास प्रभू
विरुद्ध झालेल्या दोन सभांचा ठराव व श्रीशंकराचार्यांच्या यादीची माहिती
माहुलीच्या समस्त ब्रम्हवृंदास देऊन सांगलीकरापेक्षां आपण कमी
नाहीं (इ) असें दाखविलें. बाळाजीपंत नातुमात्र ब्रम्हवृंदास पत्रे याद्य
वगैरे लिहिण्याच्या भानगडीत न पडतां फक्त श्रीशंकराचार्यांस पकडींत
धरून बसले होते.'
"
(ड) (श्री विद्या नरसिंहभारतीशंकराचार्यांचे पत्र - ब्रम्हवृंद क्षेत्र माहुली यास )
परभु हे चांद्रसेनीय नसून संकरज आहेत. त्यास वेदकर्माचा अधिकार
नाहीं त्यांजकडे कोणी वेदोक्तकर्म चालवू नये चालविल्यास तो ब्राम्हण भ्रष्ट सम-.
जला जाईल. तसेच सोनारास वेदाचा अधिकार नाहीं. जिनगर लोकांस
-<noinclude></noinclude>
ftvxwju89opmrf116v29u75696extfd
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१६५
104
111933
236244
2026-08-27T06:21:44Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236244
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १०९ )
कर्माचा आधिकार नाहीं असे शके १७४८ मार्गसिर्षमासी राजश्री भाऊ दातार
याचे वाड्यात व मोतीबागेत तेथे दोन सभा होऊन ज्याणी परभूजवळ च्यांद्रसे-
नीयास वेदोक्त तीन कर्माचा अधिकार आहे असे लिहून दिल्हे त्यास हे वर्तमान
शास्त्रीय विच्यारणा होऊन सर्वांचे मते ठरोन ज्यानी परभूस लेहून दिल्हे होते त्याचे
सर्वांचे समंते प्रभु च्यांद्रसेनियास वेदोक्त कर्माचा आधिकार नाही असे जाले व
जगद्गुरु श्री शंकराच्यार्य याणी याच आन्वये समस्त ब्राह्मणाची नावे पत्रे करून
दिल्ही असे हा म॥ आपणास कळावा सर्वांनी आपआपले धर्मात शरण असावे
व जो आमार्गे चालेल त्यास सिक्षा आसावी परभु प्रकरणी जागोजाग क्षेत्रस्थाची
वगैरे समंते व कागद पत्र सकल वेदशास्त्रपन्न राजश्री दाजी दिक्षीत वोक
याजवळ समस्ताचे विच्यारे आहेत तेथे ज्यास प्रयोजन लागेल त्याणी पाहावे
हे विनंती.
सि० विजय प० शि० ६ पत्र ४.
सुप्रसिद्ध 'चित्पावन आयागो' राजमान्य राजेश्री बाळाजीपंत नातू '
यांनी जगद्गुरू श्रीशंकराचार्य यांचा जो अश्रुतपूर्व सन्मान आणि न भूतो
न भविष्यति अशी बरदास्त ठेविली होती, त्याचें वर्णन आम्ही पामरानें
काय करावें ? तें खुद्द श्रीशंकराचार्यांच्याच शब्दांनीं वाचकांपुढे ठेवलेलें बरें.
ईष्ट इंडिया कुंफणीच्या धारवाडच्या सुभ्यानें, म्हणजे कलेक्टरानें, जग-
द्गुरूंच्या मागे लागलेल्या नातूरूप बहिरी ससाण्याच्या शक्तीला पायबंद
लावल्यावर हातांत गीता घेऊन श्रींनीं जें खन्या कबुलीजबाबाचें पत्र
लिहून दिले त्याची नकल ता. ९ माहे नवंबर सन १९०३ च्या सुधारक
पत्रांत प्रसिद्ध झाली होती. त्याबद्दल संपादकाने खालीलप्रमाणें उद्गार
काढले होते:-
श्री शंकराचार्यांची तारांबळ.
सातारचे छत्रपती राजे प्रतापसिंह महाराज राज्यपदभ्रष्ट झाल्यानंतर त्यांची
दाद लावण्यासाठी म्हणून रा. रंगो* बापुजी नांवाचे एक गृहस्थ विलायतेस गेले
* रोहिडेश्वरासमक्ष, दादोजी कोंडदेवाला साक्ष ठेवून आद्य श्री शिवछत्रपति महाराजांनीं
ज्या कायस्थ प्रभूशीं ' स्वराज्यस्थापनेची आणभाक' केली, त्या दादजी नरसप्रभूचे
रंगो बापूजी हे पांचवे ख । स वंशज होत. ज्या दादजी नरस प्रभूनें शिवाजीशीं 'स्वराज्य-
स्थापनेची आणभाक' वाहिली, त्याच्याच खास वंशजावर छत्रपतीच्या गादीच्या चिरस्था-<noinclude></noinclude>
e5x37sy36u626germgtpi40u24ar1mw
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१६६
104
111934
236245
2026-08-27T06:22:02Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236245
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>.
( ११० )
होते. तेथे त्यांनीं आपल्या धन्याची गादी त्यास परत मिळावी म्हणून पराकाष्ठेचे
प्रयत्न केले आणि सरकार दरबारी केलेली मेहनत फुकट गेल्यावर निराश न
होतां इंग्रजी भाषा शिकून विलायतेंत लोकमत जागृत करण्याकरितां व्याख्यानें
देण्याचा क्रमही यानीं सुरू केला होता. विलायतेंत आपण कोणती कामे केली
याबद्दलची सविस्तर हकिकत आपल्या देशांत आपल्या धन्यास कळावी म्हणून
या स्वामीनिष्ठ व उद्योगी गृहस्थाने आपल्या प्रयत्नांची कच्ची हकिकत स्वहस्तें
मराठी भाषेत मोडी लिपींत विलायतेंतच शिळाछापानें छापून त्याचीं पुस्तकें बांध-
चून इकडे रवाना केली. *** पुण्यांतील कित्येक जबरदस्त व दुराग्रही ब्राह्मणांच्या
हट्टामुळे जगद्गुरूंस आपला अधिकार, आपले मत, व सत्यनिष्ठा कशी गुंडाळून
बाजूस ठेवावी लागली तें दृष्टोत्पत्तीस येणार आहे. या ब्राह्मणांचे वंशज हल्लीं
पुण्यांत हयात आहेत. त्यांना आपल्या पूर्वजांनीं धर्मगुरूंशी केलेली दंडेली व
त्यांची इतर कृष्णकृत्यें लोकांच्या आज नजरेस यावीं हैं आवडणार नाहीं.
......
"
इतका स्पष्टोक्तीचा प्रस्ताव करून सुधारकाच्या संपादकानें जगद्गुरूंचे
आज्ञापत्र त्यांतील कित्येक महत्वाच्या विशेष नामांच्या ठिकाणी "
अशीं टिंबें देऊन प्रसिद्ध केलें, याबद्दल या पुस्तकांत इतक्या उशीरानेंच
इत्याकरितां म्हणजे हिंदवी स्वराज्याकरितां विलायतेच्या पार्लमेंटपुढे झगडण्याचा आलेला
योग कितीहि खेदकारक असला तरी त्याहि योगांत कुतुहल उत्पन्न करण्याचे सामर्थ्य खास
आहे. रंगो बापूजींचें चरित्र आणि त्यानें विलायतेंत सतत सात आठ वर्षे छत्रपतीचे
प्रतिनिधी व वकील या नात्यानें बजावलेली स्वार्थत्यागपरिपूर्ण अद्भुत कामगिरी यांचा इति-
हास अत्यंत मनोरम, उपदेशपूर्ण आणि महाराष्ट्राच्या निसर्गजात राष्ट्रीय तडफीचा द्योतक
असा आहे. विलायतेंतल्या पार्लमेंटपुढे या कायस्थ प्रभूवीरानें जीं व्याख्यानें दिलीं व
स्वतः एक छोटेखानी इंग्रजी वर्तमानपत्र चालवून छत्रपतींच्या पदच्युततेच्या अन्यायाबद्दल
तेथील जें लोकमत जागृत केलें, त्याबद्दलचीं पुस्तकें व इतर लेख पाहिलें कीं मन आश्चर्यानें
"थक्क होऊन जातें, या वक्त्याच्या स्पष्टोक्तीपूर्ण वक्तृत्वानें वाचकांचें हृदय हादरूं लागतें
आणि त्यानें पार्लमेंटपुढे मांडलेल्या अस्सल लेखी दांडगा पुरावा पाहून रंगो बापूजीच्या
• विद्वत्तेबद्दल, कळकळीबद्दल व छत्रपतीच्या ठायीं असलेला अनन्य भक्तीबद्दल त्याचे धन्यवाद
गावे तितके थोडे असें वाटू लागतें. आम्ही यथावकाश या प्रभूवीराचें साग्र चरित्र
प्रसिद्ध करणार आहोत; त्यावरून हिंदवी स्वराज्याचे डेप्यूटेशन विलायतेंत नेण्याचा
आद्यमान चां. का. प्रभू समाजाचा आहे, हें ठसठशति रीतीनें सिद्ध होईल.<noinclude></noinclude>
3283v7u5af960gp26kjvn4d5toccjwt
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१६७
104
111935
236246
2026-08-27T06:22:25Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236246
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>१११. वाय
वाचनालय
भ
कां होईना, सं. सो.
स्या संपादकाचे आम्हीं जाहीर रीतीनें आभार मानतों.
स्थानिक संपादकीय जबाबदारी व साप्ताहिक पत्रांत नेहमींच भासणारी
जागेची उणीव, या दोन गोष्टी लक्षांत घेतां, सदहूं पत्र शब्द सोडलेल्या
धड्याप्रमाणें छापण्यांतहि संपादकानें चां. का. प्रभू ज्ञातीवर एक उप-
कारच केला, असें म्हटलें पाहिजे. परंतु पुण्यास " Ethnographical
Notes " च्या चां. का. प्रभू संपादकानें याच पत्राचा उतारा आपल्या
महत्वाच्या पुस्तकांत पुनर्मुद्रीत करतांना स्वतःजवळ या पत्राची समग्र
नकल रंगो बापुजीच्या मोडी पुस्तकांत असतांनाहि टिंबांच्या बुरख्या-
खालीं लपून बसलेल्या महत्वाच्या शब्दांना आणि वाक्यसमुच्चयांना
मुळींच वर डोकें न काढू देण्याची इतकी काळजी कां घ्यावी याचा
आम्हांला उलगडा होत नाहीं. असलीं अत्यंत महत्वाची आज्ञापत्रेसुद्धां
'समग्र ' न छापण्यांत ज्यांच्या विनयाचा अतिरेक होतो, त्यांच्या हातून
इतिहासाची सेवा काय होणार हे दिसतच आहे. असो. ऐतिहासिक
सत्यनिरूपणाच्या दृष्टीनें आम्हांला मात्र त्या विशेष नामांचा तिळमात्र
मुलाजा राखतां येत नाहीं किंवा टिंबांच्या आड लपलेल्या बऱ्याच मह-
त्वाच्या मजकुराला अतः पर तसेंच अंधारांत दडवून ठेवतां येत नाहीं
याबद्दल फार फार दिलगिरी वाटते. सदर्ह पत्र येणें प्रमाण:-
श्रीशंकर.
मठाचा शिक्का.
0
श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य वर्य श्रीमच्छंकराचार्यान्वय संजाताभिनव श्री
विद्याशंकर भारती स्वामी करकंजोद्भव श्री विद्यानरसिंह भारतीकृत नारायेण
स्मरणानि
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृंद क्षेत्रस्थ वगैरे वास्तव्य प्रभृति
प्रांतानिहाय यांस आज्ञा केली ऐसीजे - चांद्रसेनीय कायस्थ प्रभु या ज्ञातीचे
मंडलीशीं आति दीर्घद्वेषी रा. चिंतामणराव पांडुरंग पटवर्धन व बाळाजीपंत नातु
व निळकंठशास्त्री थत्ते वगैरे ब्राह्मण यांनी शास्त्र व ग्रंथसंमतीखेरीज ग्रामण्य
करून पुणे मुक्काम आम्हांपासून चांद्रसेनीय प्रभु मंडळीचे धर्म व कर्मों उच्छेदा-<noinclude></noinclude>
mf3sw68c0al90pkwb2ladq19il02vqi
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१६८
104
111936
236247
2026-08-27T06:22:42Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236247
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ११२ )
विसी पत्रे घेतलीं. तेवेळी आम्ही मठाचे संस्थानास स्वास्थ्य आहे त्यास उपद्रव
होईल या भीतिस्तव दिल्हीं. परंतु ते समयीं परस्परें उभय पक्षीचे ब्राह्मणांत
तड पडून शास्त्रसंमति ग्रंथानुधारें निर्मत्रपणे श्रीनारायणस्मरोन वास्तविक पाहतां
चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांस अनादि वेदकर्मे करण्यास अधिकार
आहे. त्याप्रमाणेंच वेदशास्त्रसंपन्न रा. राघवाचार्य यांस आम्ही पत्र' कार्तिक
शु॥ १० शके १७४८ व्ययनाम संवत्सरी लिहिले व प्रभुमंडळीत रा. वळवंतराव
चिटणीस व विलराव देवाजी वगैरे यांचे नांवेही पत्र दिल्हे वगैरे मजकुर
चिंतामणराव पटवर्धन व बाळाजीपंत नातुस कळवून या उभयतांची मर्जी आम्हा-
वर फार रुष्ट होऊन बोलणें घातले आणि आम्हांस पंचांत आणण्याबद्दल नाना-
प्रकारची तुफान उत्पन्न करून जरब घालू लागले. तेव्हां आम्हीं लाच्यार
होऊन संस्थानचे संरक्षणाबद्दल आशा धरून उभयतांचे बोलणें कबूल करून
म्हणती तें करावें किंवा देह समाप्त करावा असेंच प्राप्त जाहलें. ते समयीं
चिंतामणराव यानीं मनास आलें तसें कल्पित शास्त्रविरहित चांद्रसेनीय प्रभुज्ञातीस
वेदक में उच्छद आणि बाधक सारांशाच्या यादी व पत्र आम्हांपासून आश्विन
शु॥ १० शके १७४९ सर्वजित नामसंवत्सरांत आमचे सिके मोर्तब व स्वदस्तुरचं
निशाणानिशी पुरी करून घेतलीं, त्यांतील हांसील भाव चिंतामणराव याणीं
विनंती केली की ही चौकसी केली ती युक्त किंवा सप्रमाण याचा विचार
स्वामीनों करून सदर्हु सारांशान्वये चालण्याविसीं श्रीकासी क्षेत्रादि क्षेत्रस्थ व पुण्य
ग्रामादि ग्रामस्थ ब्राह्मण वगैरे यांसी पत्र द्यावयाविसी आज्ञा व्हावी म्हणोन त्याज-
वरून सदहुंचा विचार पाहता चिंतामणराव याणी चौकशी ग्रंथावरून मागील
पाठाची केली ते यथायोग्य सप्रमाण असे जाहले. सदहू सारांशांत चौकशी
केल्याचा प्रकार कसकसे लिहिले ते वगैरे सर्वास कळावे सारांश अन्वये सर्व
ब्राह्मणांनी चालावे याजकरितां सारांश बार करून निर्णयाची याद केली
त्यांतील हांसील चांद्रसेनीय यांस वेदकर्माचा अधिकार नाहीं व त्या ज्ञातीची
उपलब्धीही नाहीं. परभु हे चांद्रसेनी नव्हेत. संकर कायस्थ जात्योद्भव.
यांसहि वेदकर्माचा अधिकार नाही म्हणोन ज्या यास आथवा चांद्रसेनी म्हणोन
त्यांस वेदोक्तकर्मे करण्याविसी सर्वथा अनुमोदन देऊ नये. जर करितां कोणी
अनुमोदन देईल किंवा त्यांचे घरीं वेदोक्त कम करील किंवा करवील तो वेदबाह्य
श्रीदेवाचा व मठाचा व ब्राह्मणांचा अपराधी दंडास योग्य वगैरे कुचुये तर्कटी<noinclude></noinclude>
b7ebbozmb7an29e67tce60y8yg3qy44
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१६९
104
111937
236248
2026-08-27T06:22:57Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236248
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>223
18 JAN 1994
अनन्वित मजकुराचीं पत्रे चिंतामणराव याणें आपली प्रौढी मोठेपणा जनांत
दिसण्यास निमित्यास जागा करून आमचें नांवांनी त्यांनीच लिहून जागोजागी
पाठविली. त्या सारांषाचे यादीत छत्रपति यांची आमर्यादा करून याचा
मगदूर नसता मगरूरीनें भोसलेवंशावतंस श्रीशंभूराजाचा पुत्र श्री शाहूराजा सातारा
राजधानी. परंतु अनादी सांप्रदाय पाहतां छत्रपति सरकारास क्षेत्रीयकुला-
वतंस श्रीराजा म्हणोन क्षेत्रक्षादि ब्राह्मण शास्त्री पंडीत व अष्टप्रधान वगैरे सुद्धां
पूर्वीपासून हल्लींपर्यंत लिहीत आले. चिंतामणराव याचे मनी क्षेत्री बुडाले. परंतु
शास्त्रग्रंथ पाहता क्षेत्रिय ज्ञाति आहे. दुसरे पत्रांत पहा. श्रीमंताचे ठिकाणी
आपण विद्यमानी आहों हे अविचारी चिंतामणरावच लिहितात. परंतु छत्रपतीस
असें गैरशिस्त लिहिणें पेशवे यांचा देखील मगदूर नहुता व पेशवे याची योग्यता
जनजाहीर आहे. या मतिमंदास कशी शोभेल ? हा केवळ अज्ञपणा व हे गृहस्थ
शास्त्री अथवा पंडितही नव्हेत. पटवर्धन यांचे तडांतील निळकंठ शास्त्री थत्ते यांस
आम्ही श्रीची शफत घालून पुर्णे मुकामींच मनोभाव सफाबद्दल विचारले. तेव्हां
त्याणीं सांगितलें कीं चांद्रसेनीय प्रभुज्ञातीस वेदकर्म अधिकार ग्रंथग्रंथ पाहतां
आहे. परंतु बाळाजीपंत दादा नातू व चिंतामणराव आप्पा पटवर्धन यांचा
आग्रह, सबब ते म्हणतील त्याप्रमाणे मला करणें प्राप्त व स्वामीनींही उभयतांचे
मनसमजुतीप्रमाणे तूर्त करावें यांत चांगले आहे. परंतु आम्ही थत्ते यांस विचा-
रिलें कीं तुम्ही चांद्रसेनीय प्रभुकडे शास्त्रार्थ पूर्वी लिहून दिले हे खरें किंवा खोटें हेंच
सत्य सांगावें. तेव्हां थत्तेशास्त्री यांणीं उत्तर केलें कीं हे बजिन्नस चांद्रसेनीयप्रभु
यांस वेदकर्म अधिकार ग्रंथानरूप आहे म्हणोन मी पत्र लिहिलें तें खरें आहे. नंतर
आम्ही उत्तर केलें कीं प्रभुज्ञातीस वेदकर्माचा अधिकार आहे याप्रमाणेंच आम्हीही
जाणतों. तेव्हां आम्ही या ज्ञातीचे वेदकर्माचा उच्छेद कसा करावा ? नंतर
थत्ते यांणीं उत्तर केलें कीं प्रभुज्ञातीचे जाजती धर्म वाढवून शेर होऊं देऊं नयेत
अशी उभयतांची म्हणणी वगैरे कारणें तूर्त अनेक प्रकारचीं आहेत. सबब
प्रसंगानरूप चालावे. आपण व आम्ही आज प्रभुज्ञाती बुडाली म्हणाले
असतां ही ज्ञाति उच्छेद होऊन बुडती असें तर कधींच होत नाहीं. परंतु आज
त्या उभयतांचें न ऐकावें तरी स्वामीस व मला फार अडचणी
पडतील. सबब त्यांचे म्हणण्याप्रमाणें जरब ठेवून तूर्त लोटालोट करावी. मग
८<noinclude></noinclude>
dsymn60l5mhzw1tmjapiwzms8ebpiit
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१०७
104
111938
236249
2026-08-27T08:37:26Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "<br> {{center|'''त्रिंकोमालीचा 'स्वामी खडक''''}} {{rh|नं. १०||पान ९१}} {{nop}}"
236249
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|'''त्रिंकोमालीचा 'स्वामी खडक''''}}
{{rh|नं. १०||पान ९१}}
{{nop}}<noinclude></noinclude>
mg21z5is6tty069584sbn3ylw9ua9v0
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/११४
104
111939
236250
2026-08-27T08:40:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "<br> {{center|'''थुपाराम विहार पोलनरुवा.'''}} {{rh|नं. ११||पान ९७}} {{nop}}"
236250
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|'''थुपाराम विहार पोलनरुवा.'''}}
{{rh|नं. ११||पान ९७}}
{{nop}}<noinclude></noinclude>
4l37b7edo7e0gxbrgndgo6yrxcfv1ph
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/११७
104
111940
236251
2026-08-27T08:44:13Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "<br> {{center|'''वर्तुळाकार स्मारक - देवालयः वातदागे, पोलनरुवा.'''}} {{rh|नं. १२||पान ९८ }} {{nop}}"
236251
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|'''वर्तुळाकार स्मारक - देवालयः वातदागे, पोलनरुवा.'''}}
{{rh|नं. १२||पान ९८ }}
{{nop}}<noinclude></noinclude>
t2ts9zoochy1fmdx00wg6h7ldnsn5oq
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१०६
104
111941
236253
2026-08-27T08:44:40Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "दोन अडीचशें फुट उंच असल्यामुळे या बाजूनें किल्ल्याला स्वाभाविक तटच झाला आहे. फक्त किल्ल्याचा शहराला जोडणारा प्रवेश भाग सखल आहे. त्या बाजूसच रुंद व मजबूत तट बांधलेला आहे. किल्ल्य..."
236253
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९०|लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>दोन अडीचशें फुट उंच असल्यामुळे या बाजूनें किल्ल्याला स्वाभाविक तटच झाला आहे. फक्त किल्ल्याचा शहराला जोडणारा प्रवेश भाग सखल आहे. त्या बाजूसच रुंद व मजबूत तट बांधलेला आहे. किल्ल्याचें प्रवेश- द्वार या सखल भागांतून आहे. सध्यां किल्ल्याला लष्करी महत्त्व कांहींच नाहीं; येथें सध्यां सरकारी बंगले असून सरकारी ब ेच अंमलदार या बंगल्यांतून राहतात. बालसिंघमूचा बंगला किल्ल्याचे एका टोकास असून बऱ्याच उंचवट्यावर आहे. बंगल्याचें जोतेंही खुप उंच आहे. यामुळें बंगला उठावांत दिसतो. बंगला एक 'मजलीच आहे. पण त्याची खुप उंच मांडावण आहे. पूर्वी हें एक छोटे प्रार्थनामंदिर होतें. त्याचीच दुरुस्ती व डागडुजी करून सध्यांचा बंगला बनविण्यांत आला आहे. बंगला उंचवट्याच्या टोकावर असून समुद्राच्या बाजूस त्याला खुला रुंद व्हरांडा आहे. यामुळें या बंगल्यां- तून बंगालचा उपसागर व त्याचें भव्य स्वरूप मोठें चित्ताकर्षक भासतें. बंगालच्या उपसागराचें अफाट पसरलेलें हिरवट निळसर पाणी, थाडथाड आवाज करीत बंगल्याच्या खडकावर आपटणाऱ्या त्या प्रचंड लाटा; त्या लाटांनी फेसाळलेलें तें पाणी, समोरच असलेला फाऊल पॉईंट व तेथलें पांढरें शुभ्र दीपगृह; हा देखावा अद्वितीय आहे; प्रातःकाळीं तर हा देखावा अधिकच रमणीय दिसतो. अरुणोदय झाला की पूर्वदिशा रक्तवर्ण होऊं लागते व समुद्राच्या निळसर हिरवट पाण्यावर उदय पावणाऱ्या सूर्यनारायणाचा प्रकाश पडला म्हणजे समुद्र विविध रंगी प्रचंड धनुष्याकार धारण करतो. उजव्या बाजूस डच पॉईंट व बंदराला संरक्षिणाऱ्या टेंकडीचें एक टोक आहे. त्यावर जिल्ह्याच्या कलेक्टरचा ( याला लंकेंत गव्हर्मेंट एजंट म्हण- तात ) बंगला आहे.
सूर्यनारायणानें समुद्रांतून आपले डोके वर काढलें म्हणजे जिकडे तिकडे प्रकाशच प्रकाश होऊन जातो; सकाळीं क्षितिजावर ढग असले तर निराळीच शोभा दिसते; त्यावेळीं प्रत्यक्ष सूर्यनारायण ढगाचे मागें लपलेला असतो, पण सूर्य किरणांमुळे ढगांवर तांबडा, केशरी पिवळा<noinclude></noinclude>
nxo2660guqugw1e77sstl06mys9kfde
236254
236253
2026-08-27T08:48:00Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236254
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९०|लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>दोन अडीचशें फुट उंच असल्यामुळे या बाजूनें किल्ल्याला स्वाभाविक तटच झाला आहे. फक्त किल्ल्याचा शहराला जोडणारा प्रवेश भाग सखल आहे. त्या बाजूसच रुंद व मजबूत तट बांधलेला आहे. किल्ल्याचें प्रवेशद्वार या सखल भागांतून आहे. सध्यां किल्ल्याला लष्करी महत्त्व कांहींच नाहीं; येथें सध्यां सरकारी बंगले असून सरकारी बरेच अंमलदार या बंगल्यांतून राहतात. बालसिंघमचा बंगला किल्ल्याचे एका टोकास असून बऱ्याच उंचवट्यावर आहे. बंगल्याचें जोतेंही खुप उंच आहे. यामुळें बंगला उठावांत दिसतो. बंगला एक मजलीच आहे. पण त्याची खुप उंच मांडावण आहे. पूर्वी हें एक छोटे प्रार्थनामंदिर होतें. त्याचीच दुरुस्ती व डागडुजी करून सध्यांचा बंगला बनविण्यांत आला आहे. बंगला उंचवट्याच्या टोकावर असून समुद्राच्या बाजूस त्याला खुला रुंद व्हरांडा आहे. यामुळें या बंगल्यांतून बंगालचा उपसागर व त्याचें भव्य स्वरूप मोठें चित्ताकर्षक भासतें. बंगालच्या उपसागराचें अफाट पसरलेलें हिरवट निळसर पाणी, थाडथाड आवाज करीत बंगल्याच्या खडकावर आपटणाऱ्या त्या प्रचंड लाटा; त्या लाटांनी फेसाळलेलें तें पाणी, समोरच असलेला फाऊल पॉईंट व तेथलें पांढरें शुभ्र दीपगृह; हा देखावा अद्वितीय आहे; प्रातःकाळीं तर हा देखावा अधिकच रमणीय दिसतो. अरुणोदय झाला की पूर्वदिशा रक्तवर्ण होऊं लागते व समुद्राच्या निळसर हिरवट पाण्यावर उदय पावणाऱ्या सूर्यनारायणाचा प्रकाश पडला म्हणजे समुद्र विविध रंगी प्रचंड धनुष्याकार धारण करतो. उजव्या बाजूस डच पॉईंट व बंदराला संरक्षिणाऱ्या टेंकडीचें एक टोक आहे. त्यावर जिल्ह्याच्या कलेक्टरचा (याला लंकेंत गव्हर्मेंट एजंट म्हणतात) बंगला आहे.<br>{{gap}}सूर्यनारायणानें समुद्रांतून आपले डोके वर काढलें म्हणजे जिकडे तिकडे प्रकाशच प्रकाश होऊन जातो; सकाळीं क्षितिजावर ढग असले तर निराळीच शोभा दिसते; त्यावेळीं प्रत्यक्ष सूर्यनारायण ढगाचे मागें लपलेला असतो, पण सूर्य किरणांमुळे ढगांवर तांबडा, केशरी पिवळा<noinclude></noinclude>
g6utdjhqcmimpae079lqd8vuu3f7tqh
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१०८
104
111942
236255
2026-08-27T08:57:32Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236255
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||बॅटिकोला व त्रिंकोमाली|९१ }}</noinclude>अशा नाना रंगांच्या छटा दिसतात; ढगाचे ते क्षणोक्षणी पालटणारे विलक्षण आकार व रंग पाहून मन थक्क होऊन जातें. या बंगल्यांत मी दोनचार दिवसच होतों. पण त्या सर्व दिवसांत पहांटेस उठून मी व्हरांड्यांत या अद्वितीय देखाव्याची शोभा पहात उभा रहात असें.<br>{{gap}}या फ्रेडरिक किल्ल्यावर आतां पाहण्यासारखें फारसें कांहीं एक नाहीं. किल्ल्याच्या सर्वांत उंच भागावर निशाण लावण्याचा उंच खांब आहे. त्याच्या जवळच एका जुन्या बराकीच्या छपराला लागून चार विटांच्या भिंतीवर एक लोखंडी तुळयांचा व लांकडी पटईचा मोडकळीस आलेला प्लॅटफार्म आहे. पूर्वी याचा टेहेळणी बुरुजासारखा उपयोग करीत असले पाहिजेत. या प्लॅटफॉर्मवर जाण्यास लांकडी जिना केलेला आहे. या प्लॅटफॉर्मवरून त्रिंकोमाली शहर व बंदर यांची रचना व ठेवण उत्तम तऱ्हेनें दृष्टोत्पत्तीस येते. सभोवार हिरवी हिरवी झाडी व जंगल दिसतें. हा प्रदेश साधारणतः सपाट आहे; व आसपासचा सर्व मुलूख जंगलमय आहे. येथून फ्रेडरिक किल्ल्याच्या मागच्या टोकाला गेलें म्हणजे सृष्टीचा एक अलौकिक चमत्कार दृष्टोत्पत्तीस येतो. हें ठिकाण बौद्धधर्मी व हिंदुधर्मी अशा दोन्ही धर्मांच्या लोकांना फार पूज्य वाटतें. ह्याबद्दलची दंतकथा तर रामायणकाळाला जाऊन भिडते; इतकी ती पुरातन आहे. हल्ली त्या ठिकाणाला '''स्वामी खडक''' म्हणतात. येथला देखावा खरोखरी आश्चर्यकारक आहे. येथें सुमारें ४०० फूट खोल असा खडक तुटलेला आहे. हा खडक ग्रानाईट जातीचा आहे. त्याला तिरप असं प्रचंड थर आहेत. समुद्राच्या लाटांनी म्हणा किंवा तोफांच्या गोळीबारानें म्हणा हा पदरापदराचा खडक पायऱ्या पायऱ्या सारखा उतरता फुटला आहे. एक पायरी पंचवीस किंवा पन्नास-फुट उंचीची राक्षसी पायरी बनली आहे. अशा तऱ्हेनें हा खडक थेट समुद्राच्या पाण्यापर्यंत पायरी पायरीनें उतरत गेला आहे. एक भला मोठा खडक तर मुख्य खडकापासून एका भल्या मोठ्या भेगेनें विभागला आहे. काय आश्चर्यकारक, भव्य व भीतिप्रद येथला देखावा आहे! मी उभा होतों त्याच्या उजव्या हाताला<noinclude></noinclude>
eo3zpwl1swo7kfcg7uz5oufsydsb06z
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१०९
104
111943
236256
2026-08-27T09:05:31Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236256
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९२ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>दोन प्रचंड खडकांचे राक्षसी आकाराचे मोठे थोरले काळे, भीषण धोंडे कलंडते असे उभे होते. हे केव्हां कलंडून पडतील याचा भरंवसा वाटत नाहीं; इतके ते बुंध्याकडून पोखरलेले आहेत. त्यांपैकी एकावर छोटासा एक स्तंभ आहे. तो शेंदराने तांबूस काळसर झाला आहे. तेथून या प्रचंड खडकाच्या पायऱ्या पाण्यापर्यंत गेल्या आहेत. अगदीं समुद्राचे सपाटीजवळ असलेल्या प्रचंड खडकाला जोत्याप्रमाणे कंगोरा व गलथा आहे. याच खडकावर रावणाच्या काळापासून एक शिवालय होतें. तें रावणानें या प्रचंड खडकासकट उचलून नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बाणानें त्या खडकाला एक भली थोरली भेग पडलेली त्या खडकाकडे जातांना दाखवितात. अक्राळ विक्राळ राक्षसाच्या जबड्याप्रमाणें ती भेग भयंकर दिसते खरी. ही झाली फार जुनी रामायण कालीन दंतकथा. ती येथल्या खडकाच्या राक्षसी स्वरूपावर केलेलें रूपक असावें असें वाटतें. पण जास्त विश्वसनीय व जिचीं दृश्य चिन्हें जोत्यासारख्या खोदलेल्या भागावरून अजून शाबूत आहेत ती दंतकथा अशी : येथलें देऊळ पोर्तुगीज लोकांनी पाडून टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हां महादेवानें देवळासकट समुद्रांत उडी घेतली अशी ही दंतकथा आहे. महादेवाचें देऊळ व पिंडी अजून समुद्रांत आहेत अशी भाविक हिंदूंची समजूत आहे. म्हणून या ठिकाणी दर सोमवारी व शुक्रवारीं तामीळी स्त्री-पुरुष या स्वामी खडकांवर येतात; अति बिकट वाटेनें व मोठ्या प्रयासानें समुद्र-सपाटीच्या खडकावर जातात व तेथें समुद्रांत अंतर्धान पावलेल्या महादेवाची पूजा करतात! महादेवानें समुद्रांत उडी घातली असो अथवा नसो; येथें एक मोठें देवालय असून पोर्तुगीझ लोकांनीं हे ठिकाण किल्ल्याकरितां पसंत केलें तेव्हां तें देऊळ पाडून टाकलें असावें, हा दंतकथेचा भाग खरा असला पाहिजे. पण हल्लींसुद्धां हे ठिकाण आश्चर्यकारक आहे यांत शंका नाहीं. येथून बंगालच्या उपसागराचें भव्य व अफाट स्वरूप दिसून येतें. खडकावर आपटणाऱ्या लाटांचा तो मेघगर्जनेसारखा आवाज; प्रचंड लाटांनीं उत्पन्न झालेला तो समुद्रफेस व एकामागून एक<noinclude></noinclude>
jynijm5q61akerxr2ld0k0138w8nquj
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/११०
104
111944
236257
2026-08-27T09:09:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236257
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||बॅटिकोला व त्रिंकोमाली|९३ }}</noinclude>वेगानें येणाऱ्या त्या प्रचंड लाटा हा देखावा अद्वितीय आहे यांत शंका नाहीं. हे ठिकाण भीतिप्रद वाटतें खरें; पण सृष्टीचा हा एक विलक्षण चमत्कार पाहिला म्हणजे येथून लवकर हालूं नये असें वाटतें. तो भीतिप्रद, भव्य पण रमणीय देखावा सारखा पहात रहावेसें वाटतें. पण सायंकाळ झाल्यामुळे मला तेथून परतावें लागलें.<br>{{gap}}दुसरे दिवशीं सकाळीं मी त्रिंकोमालीचें दुसरें प्रेक्षणीय स्थळ- कनीया नांवाच्या सात ऊन झऱ्यांच्या विहीरी- पहाण्यास गेलों. हे ठिकाण त्रिंकोमाली- अनुराद्धपुर रस्त्यावर पांच सहा मैलांवर डाव्या हाताकडच्या हिरव्यागार बागेसारख्या सुंदर भागांत आहे. येथें झाडी खूप आहे. यांना इंग्रजीत विहीरी असें म्हटलें आहे खरे; पण हा एक ऊन पाण्याचा झरा आहे. तेथल्या पाण्यावर झालेली सुपारीची बाग दाट गर्दछाय आहे. या उन्हाळ्यासभोंवार भिंत असून आंत सभोंवार हिंडण्यास ओटा आहे. वीस पंचवीस फूट लांब व दहा पंधरा फूट रुंद अशी तांबूस पांढऱ्या वाळूची पुष्करणी आहे. ती सदोदित पाऊलभर पाण्याने भरलेली असते. त्या वालुकामय पुष्करणींत तीन चार फूट लांबी-रुंदीचे व दीड-दोन फूट उंचीचे असे सात हौद बांधलेले आहेत; त्यांतला एक हौद जरा मोठा आहे. बाकीचे त्यापेक्षां जरा लहान आहेत. या मोठ्या हौदांत सारखे बुडबुडे येत असतात. हेच खरें उन्हाळें होय. याचें पाणी खुपच कढत आहे. त्याला गंधकाचा मात्र वास येत नाहीं; बाकीच्या हौदांत असे बुडबुडे येत नाहींत व त्यांचें पाणी मोठ्या हौदाच्याइतकें गरमही नाहीं. तेव्हां या हौदांना या मुख्य हौदांतून वाळूच्या थरांतून पाण्याचा पुरवठा होत असावा. येथें मी आंघोळ केली हें सांगावयास नको. येथें हौदांत शिरतां येत नाहीं; बालडीने पाणी काढून आंघोळ करावी लागते. पण या निसर्गानें सदा तापलेल्या हौदामधून ऊन ऊन पाण्याच्या बादल्याच्या बादल्या डोक्यावर ओततांना मोठी मौज वाटते. या साधारण थंड दिवसांत ही कढत पाण्याची आंघोळ मोठी सुखदायक वाटते यांत शंका नाहीं. हे ठिकाण थेट आपल्या इकडल्या उन्हाळ्यासारखें<noinclude></noinclude>
l8z2tfxdxtf4gvr70my7v8zapd4zygb
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१११
104
111945
236258
2026-08-27T09:25:52Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236258
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९४ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>आहे. पण हे खासगी मालकीचें नाहीं; तर तें सरकारी मालकीचें ठिकाण आहे. येथे एक सरकारी रक्षक असतो. शेजारी विश्रांतिगृह आहे. येथेही पुष्कळ भाविक लोक येऊन स्नान करतात. या ठिकाणची दंतकथाही रामायणकाळापर्यंत पोहोंचते. रावण येथें आला असतांना विष्णूने वृद्ध माणसाचें रूप धारण करून रावणाला आपली आई कनीया वारल्याची बातमी सांगितली. तेव्हां रावणानें तेथल्या तेथें आईच्या नांवानें अर्घ्योदक देण्याकरितां जमिनींत बाण मारला; तोच हे गरम पाण्याचे झरे येथें उत्पन्न झाले. तेव्हांपासून ते अद्याप वहात आहेत.<br>{{gap}}संध्याकाळी आम्ही त्रिंकोमालीचें बंदर पहाण्यास गेलों. डाव्या बाजूस ती हिरवीगार गर्दछाय टेकडी व हिरवट नीळसर सरोवराच्या पाण्यासारखें निवाऱ्याचें, खोल पाण्याचें बंदर व त्या सरोवरसमान बंदरामधील छोटी हिरवीगार बेटें व बंदराच्या सर्व बाजूंना दूरवर दिसणारी नारळीची झाडी हा देखावाही अपूर्व वाटतो. टेकडीच्या बाजूनें उत्तम सडक गेली आहे. तिकडे आरमारी डॉकयार्ड आहे. आरमारी दवाखाना, आरमारी लोकांकरितां बराकी, बंगले व इतर इमारती थेट टेकडीच्या टोकापर्यंत पसरलेल्या दिसतात. आरमारी डॉक यार्डला दोन छोटे मनोरेवजा बुरूज केले आहेत व मोठें फाटक आहे. याचेनजीक ॲडमिराल्टी हाऊस म्हणून डच काळापासूनचा एक बंगला आहे. या बंगल्यांत एक फार जुना पिंपळाचा वृक्ष (बौद्धाचा ज्ञानवृक्ष) आहे. त्याचे सांवलींत हजार माणसें बसतील, इतका तो मोठा आहे. अर्थात् हा बंगला व त्यांतील वृक्ष आम्हांला पहावयास मिळाला नाहीं. पण या डॉकयार्डमध्ये जितक्या आंत प्रवाशांना जाऊं देतात, तितकें आंत आम्ही गेलों व मग तेथून परतलों. नंतर बंदराच्या बाजूच्या रस्त्यानें बालसिंघमच्या बंगल्याला परत आलो. त्रिंकोमाली बंदर फार खोल व निवाऱ्याचें आहे खरे; परंतु अजून येथें बोटींची किंवा गलबतांची फारशी जा-ये दिसली नाहीं. कारण आपल्या इकडच्या एखाद्या छोट्या तालुक्यासारख्या आंतल्या बंदराइतकीही गलबतें या येवढ्या मोठ्या बंदरांत दिसली नाहींत. झाले. माझे त्रिंकोमालीचें वर्णन संपले व माझा तेथला निवासही संपला. बालासिंघमचा निरोप घेऊन दुसरे दिवशीं प्रातःकाळीं मी पुढील दृश्य- दर्शनाकरितां मार्गस्थ झालों.{{nop}}<noinclude></noinclude>
0dfou2e0c7b2g5bpopnd2w2kjkhc801
236259
236258
2026-08-27T09:26:30Z
कल्पनाशक्ती
3813
236259
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९४ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>आहे. पण हे खासगी मालकीचें नाहीं; तर तें सरकारी मालकीचें ठिकाण आहे. येथे एक सरकारी रक्षक असतो. शेजारी विश्रांतिगृह आहे. येथेही पुष्कळ भाविक लोक येऊन स्नान करतात. या ठिकाणची दंतकथाही रामायणकाळापर्यंत पोहोंचते. रावण येथें आला असतांना विष्णूने वृद्ध माणसाचें रूप धारण करून रावणाला आपली आई कनीया वारल्याची बातमी सांगितली. तेव्हां रावणानें तेथल्या तेथें आईच्या नांवानें अर्घ्योदक देण्याकरितां जमिनींत बाण मारला; तोच हे गरम पाण्याचे झरे येथें उत्पन्न झाले. तेव्हांपासून ते अद्याप वहात आहेत.<br>{{gap}}संध्याकाळी आम्ही त्रिंकोमालीचें बंदर पहाण्यास गेलों. डाव्या बाजूस ती हिरवीगार गर्दछाय टेकडी व हिरवट नीळसर सरोवराच्या पाण्यासारखें निवाऱ्याचें, खोल पाण्याचें बंदर व त्या सरोवरसमान बंदरामधील छोटी हिरवीगार बेटें व बंदराच्या सर्व बाजूंना दूरवर दिसणारी नारळीची झाडी हा देखावाही अपूर्व वाटतो. टेकडीच्या बाजूनें उत्तम सडक गेली आहे. तिकडे आरमारी डॉकयार्ड आहे. आरमारी दवाखाना, आरमारी लोकांकरितां बराकी, बंगले व इतर इमारती थेट टेकडीच्या टोकापर्यंत पसरलेल्या दिसतात. आरमारी डॉक यार्डला दोन छोटे मनोरेवजा बुरूज केले आहेत व मोठें फाटक आहे. याचेनजीक ॲडमिराल्टी हाऊस म्हणून डच काळापासूनचा एक बंगला आहे. या बंगल्यांत एक फार जुना पिंपळाचा वृक्ष (बौद्धाचा ज्ञानवृक्ष) आहे. त्याचे सांवलींत हजार माणसें बसतील, इतका तो मोठा आहे. अर्थात् हा बंगला व त्यांतील वृक्ष आम्हांला पहावयास मिळाला नाहीं. पण या डॉकयार्डमध्ये जितक्या आंत प्रवाशांना जाऊं देतात, तितकें आंत आम्ही गेलों व मग तेथून परतलों. नंतर बंदराच्या बाजूच्या रस्त्यानें बालसिंघमच्या बंगल्याला परत आलो. त्रिंकोमाली बंदर फार खोल व निवाऱ्याचें आहे खरे; परंतु अजून येथें बोटींची किंवा गलबतांची फारशी जा-ये दिसली नाहीं. कारण आपल्या इकडच्या एखाद्या छोट्या तालुक्यासारख्या आंतल्या बंदराइतकीही गलबतें या येवढ्या मोठ्या बंदरांत दिसली नाहींत. झाले. माझे त्रिंकोमालीचें वर्णन संपले व माझा तेथला निवासही संपला. बालासिंघमचा निरोप घेऊन दुसरे दिवशीं प्रातःकाळीं मी पुढील दृश्य- दर्शनाकरितां मार्गस्थ झालों.<br><br><br>{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
g5w00ca0gxf9tbm8ad0ciij2gd0hj22
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/११२
104
111946
236260
2026-08-27T09:53:44Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236260
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''प्रकरण ७ वें'''}}}}
{{rule|7em}}
{{center|{{x-larger|'''लंकेच्या जुन्या राजधान्या व मिहिंतले पर्वत'''}}}}
{{rule|5em}}<br>{{gap}}{{x-larger|'''लं'''}}'''का''' बेटांतील बांधकला व मूर्तिकला यांचे आगर म्हणजे पुलनरुवा राजधानी, अनुराद्धपुर राजधानी व मिहिंतले धर्मगिरी हीं होत.<br>{{gap}}या तीन प्रेक्षणीय स्थळांचा कालक्रम अर्वाचीनाकडून प्राचीनाकडे आहे. तेव्हां याच अनुक्रमानें त्याचें वर्णन करणें युक्त आहे व आपोआप मीं हीं स्थानें वर्णिलेल्या क्रमानें पाहिलीं.<br>{{gap}}खडक-देऊळ व खडक-किल्ला पाहून मी दाबूलगांवाहून तिसऱ्या प्रहरी चार वाजतां मोटारबसनें '''पोलनुरुवा''' राजधानीस जाण्यास निघालों. दांबूल गांव टाकल्याबरोबर जंगलास सुरवात होते. पांच सहा मैल गेल्यावर अनुराद्धपुरचा रस्ता डावीकडेस टाकून मोटार त्रिंकोमाली रस्त्याला लागते. आतां जंगल दाट व मोठेही होतें. नंतर '''हावर्न''' गांव लागतें; दांबूलपासून हावर्न १६ मैल आहे. येथें मोटार थोडा वेळ थांबते. येथें पोस्ट ऑफिस असून त्याचे जवळच नवें शिव-देवालय पोस्टमास्तरनें बांधलें आहे. येथून रस्ता थेट पूर्वेस वळतो. आतां मात्र मोटार निबीड अरण्यांतून जाते; वाटोवाट केसाळ काळेभोर, भीषण भासणारे रानरेडे रस्त्याच्या बाजूला चरतांना दिसतात. येथून चवदा पंधरा मैलांवर '''मिनेरिया''' गांव लागतें. या गांवांत बरीच लागवड दृष्टीस पडली. हें गांव मिनेरिया नांवाच्या मोठ्या तलावाचे कांठीं आहे. हा तलाव महासेन राजानें सन ३०० च्या सुमारास बांधला; हा सिलोनमधला फारच मोठा तलाव असून याच्या आसपास जलचर व स्थलचर प्राण्यांची शिकार मुबलक मिळते. हा तलाव सतराशें वर्षांचा आहे. यावरून सध्या अरण्यमय बनलेला भाग त्या काळीं उत्तम भातशेतीचा व पुष्कळ वस्तीचा होता हें कळून येतें; व मागच्या राजांच्या राजवटीं<noinclude></noinclude>
hq1hcc7qacev3fuo7k72qqlol5xlv15
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/११३
104
111947
236261
2026-08-27T09:56:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236261
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९६ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>तील प्रगतीचें कौतुक वाटतें. आमची मोटार निघाली तो अगदी काळोख पडला. येथून पोलनुरुवा चवदा पंधरा मैल आहे. हा सर्व भाग जंगलमय आहे. अरण्यांत सर्वत्र अंधार झाला. मोटारच्या दिव्याच्या प्रकाशानें समोरचा काय तो रस्ता दिसत होता; आतां रानकिड्यांचा किरकिर स्वर सारखा सुरू झाला. दोन्ही बाजूंस गुडूप अंधार, तो रानकिड्यांचा कर्णकटु स्वर, रस्त्याला लागून असलेल्या हिरव्यागार झाडावर पडणारा तो विजेच्या दिव्याचा धावता प्रकाश व मोठ्या वेगाने जाणारी ती एकाकी मोटारबस या सर्व गोष्टी मनांत भीति उत्पन्न करीत. अशा या निबीड अरण्यांत रात्रीचेवेळी जर मोटार बंद पडली, तर काय होईल असा भयप्रद विचार वारंवार मनांत येई; पण इतक्यांत अरण्य कमी होऊन तुरळक खुला भाग व मग क्वचित् झोपडी दिसूं लागली. तेव्हां आपण अरण्य टाकून शहरानजीक आलों असें कळलें व जीवांत जीव आला. मी सुमारें साडेसात वाजतां पोलनुरुवा येथें पोहोंचलों. मी रा. हँडी नांवाच्या तेथील पोस्टमास्तरना पेरेडॅनीयाहून रा. कनकरत्न नांवाच्या शेतकी खात्यांतील एका अंमलदाराचे परिचय-पत्र आणलें होतें. मोटारनें सरळ रस्त्यावर असलेल्या पोस्टमास्तरचे बंगल्याशी मला उतरविलें. बंगल्यांत कोणींच नव्हतें. पण पुढचा व्हरांडा खुला होता. तेथें सामान ठेवतों तोंच बंगल्यांतील नोकरानें माझें सामान हॉलमध्ये नेवून ठेवलें व मला बसावयास खुर्ची दिली. मी बराच वेळ वाट पाहिली, पण पोस्टमास्तरांचा पत्ता नाहीं, शेवटीं साडेआठ वाजल्यावर ते गृहस्थ आले. त्यांनीं तार पोहोंचल्याचे सांगितले व माझें आदरानें स्वागत केलें. पोस्टमास्तर बंगल्यांत एकटे रहात असून त्यांनी बायकामुळे मुलांच्या शिक्षणाकरितां जाफना येथें ठेविलीं आहेत असें कळलें. जेवणखाण आटोपून मी लागलींच निजलों. सबंद दिवसाच्या प्रवासाच्या श्रमानें व त्रासानें दमल्यामुळे मला लागलींच झोप लागली. मी सकाळी उठतों तों सारखा पाऊस पडत आहे. न्याहारी झाली तरी "पाऊस थांबण्याचें चिन्ह नाहीं. पण पाऊस फार जोराचा नव्हता,<noinclude></noinclude>
aijgqeqso0nkxy86n1lkol5v995cay9
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/११५
104
111948
236262
2026-08-27T10:03:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236262
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेच्या जुन्या राजधान्या व मिहिंतले पर्वत|९७ }}</noinclude>साधारण झिमझीम असाच पडत होता. तेव्हां पावसाळी कोट घालून मी रा. हँडीनी दिलेल्या मनुष्याबरोबर प्रेक्षणीय स्थलदर्शनास बाहेर पडलों.<br>{{gap}}पोलनरुवाचें टपाल-घर गांवाचे दक्षिणेस डाव्या हातास आहे. त्याच्या मागून उत्तरेकडे पाऊलवाटेनें गेलें म्हणजे पोलनरुवाच्या जुन्या राजधानींतील अवशिष्ट इमारती वगैरे प्रेक्षणीय स्थळे क्रमानें अर्ध्या पाऊण मैलाच्या अंतरावर लागतात; शहराचा विस्तार तीन चार मैल असल्यामुळें जाऊन येऊन दहा मैलांची मजल करावी लागली. त्याला साडेतीन तास सारखें चालावें लागलें. पण इतक्या श्रमांत बिनखर्चानें माझें पोलनरुवाचें दृश्य-दर्शन पुरें झालें.<br>{{gap}}टपालघराच्या मागें गेलें कीं, लागलीच पूर्वीच्या शहरांतील किल्ल्याचा खंदक लागतो. आतां खंदकांत पाणी नाहीं व तो बहुतेक ओहोरला आहे; पण खंदकाच्या दोन्ही बाजूंस जमिनीचे उंच बंधारे दृष्टीस पडले. या किल्ल्यांत राजवाडा होता तेथें राजवाड्याचा प्रचंड चवथारा व तितक्याच प्रचंड भिंती दृष्टीस पडल्या; त्यावरून वाड्याचा विस्तार याची चांगली कल्पना मनांत येते. पण जिकडे तिकडे कोरलेले खांब, नक्षीदार घडलेले दगड, उत्तम घडलेल्या पायऱ्या व कठड्याचे दगड जागोजाग दिसत होते व त्यावरून राजवाड्याच्या शिल्पकामाची कांहींशी कल्पना मनांत येत होती; येथे एक मोठें स्नानगृह किंवा जलमंदिर आहे. हा राजवाडा व किल्ला यांच्या तटबंदींतून बाहेर आलें कीं जुन्या शहरास सुरवात होते. प्रथमच एकावर एक वरचढ अशा विलक्षण व आश्चर्यकारक इमारती दृष्टीस पडतात. या बांधकलेच्या आगराचें जणूं कांहीं पूर्व प्रसाद-चिन्ह असें लहानसें शिव-देवालय लागतें. या देवालयाचें काम हिंदू पद्धतीचे असून फार सुबक आहे. या गाभाऱ्यांत सध्यां शिवाची पिंडी नाहीं; पण समोर नंदी आहे यावरून हे शिव-देवालय आहे हें कळून येतें. या देवालयावरून पुढे गेलें कीं प्रथम विटांची प्रचंड इमारत आपले लक्ष वेधते. हिला '''थूपाराम विहार''' म्हणतात. केवढी प्रचंड इमारत ही! तिच्या भिंती तर विलक्षण रुंद! आंत बुद्धाची विटांची<noinclude></noinclude>
48v82qhivhtwcpghsegpewc3oajjp2m
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/११६
104
111949
236263
2026-08-27T10:09:31Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236263
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९८ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>इमारतीला शोभेशी भव्य मूर्ति! इमारतीला साजेसा प्रशस्त जिना! या इमारतीचा प्रमाणशीरपणा व एकंदर बांधणी पूर्वकाळच्या बांधकलेच्या प्रगतीची उत्तम साक्ष पटवितात. जिन्यावरून वर गच्चीवर गेलें म्हणजे सभोवारचा हिरवागार देखावा व जागोजाग इमारतीचे व स्तूपांचे उंच मनोर दृष्टीस पडतात व या राजधानीच्या पूर्ववैभवाचें व विस्ताराचं मोठें आश्चर्य वाटतें. थूपाराम विहारानजीक '''निसंक''' लतामंडप नांवाचा मंडप लागतो. हा अष्टदल कमळाच्या आकाराचा, दगडी खांबाचा व दगडी कठड्याचा सुंदर मंडप आहे. या कठड्याचें काम सांची येथील कठड्याच्या कामापेक्षां साधें पण सुबक आहे. मंडपांत प्रवेश केला म्हणजे या बांधकलेच्या कामाचा मनावर फारच अनुकूल परिणाम होतो. याचेजवळ सत्तावीस फूट लांब, चार फूट रुंद व दोन फूट उंच असा मोठा दगडी फलक आहे व त्यावर मोठा शिलालेख खोदलेला आहे. पुढे '''हेतदागे''' नांवाची बुद्धाचे अवशेष ठेवण्याची इमारत आहे. ही इमारत बरीच पडलेली आहे; पण अवशेषावरूनही तिचें शिल्पकाम उच्च दर्जाचं आहे हें समजतें. याचे बाजूस सातमहाल नांवाची एक विलक्षण इमारत आहे. हिचे नावांप्रमाणें सात मजले असावे; पण सध्यां साहा मजलेच आहेत. या इमारतीच्या आंत मुळीं जातांच येत नाहीं. हिचा शंकूसारखा निमुळता आकार आहे. या इमारतीचा काय व कसा उपयोग करीत किंवा ती बांधण्याचा काय उद्देश हे एक मोठें गूढ आहे. या ठिकाणच्या इमारतीचा मुकुटमणी म्हणजे '''वतदागे''' नांवाची इमारत होय यांत शंका नाहीं. '''वर्तुलाकार बुद्धावशेष गृह''' असा या नांवाचा अर्थ आहे. नांवाप्रमाणें हें बांधकलाकाम वर्तुलाकार आहे. त्याचे एकावर एक चढते वर्तुलाकार असे प्रदक्षिणा मार्ग आहेत. पहिला वर्तुलाकार प्राकार छातीभर उंच असून त्याला उत्तरेस एकच प्रवेशद्वार आहे; मध्ये प्रदक्षिणेकरतां वाटोळा मार्ग आहे. याचे पुढचा प्राकार फारच कलाकौशल्याचा आहे. त्याला बरोबर चार दिशेला चार प्रवेशद्वारें असून, त्या प्रवेशद्वारांतून आंत जाण्याकरितां कठड्याच्या दगडी पायऱ्या आहेत. या पायऱ्या व<noinclude></noinclude>
gksc1ybo3hehrhhy3t5o89cyk0omypx
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/११८
104
111950
236264
2026-08-27T10:15:22Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236264
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेच्या जुन्या राजधान्या व मिहिंतले पर्वत|९९}}</noinclude>विशेषतः जमिनीच्या सपाटीला असलेली अर्धचन्द्राकृती पायरी (हिलाच इंग्रजीत Moonstone म्हणतात) हा एक लंकेंतील मूर्तिकलेचा अद्वितीय मासला होय यांत शंका नाहीं.<br>{{gap}}लंकेतील जुन्या इमारतीच्या प्रवेशद्वारांत ही अर्धचन्द्राकृती पायरी असावयाचीच! पोलनरुवा येथील या पायऱ्यांची सर दुसऱ्या कोणत्याही पायऱ्यांना यावयाची नाहीं हे खास. काय नवलाची या पायरीची योजना! या दगडी अर्धचन्द्राकार पायरीच्या बाहेरच्या कोरीवर फुलांची सुंदर माळ कोरलेली असते; मग त्याचे आंत हंसपंक्ति; नंतर हत्तीचा तांडा व शेवटीं दौड करणाऱ्या घोड्यांची रांग कोरलेली असते. किती हुबेहुब हीं कोरलेलीं चित्रे असतात; अर्धचन्द्राकृती पायरीच्या मधल्या भागांत सुंदर कमल कोरलेलें असतें. अशा चार अर्धचन्द्राकृती पायऱ्या चार प्रवेशद्वाराच्या प्रारंभीं आहेत. पायऱ्यांच्या कठड्याच्या पारंभीं द्वारपालांच्या मूर्ति खोदलेल्या आहेत. सर्व भिंतीवर सिंह व खुज्या माणसांची चित्रे आहेत. या इमारतीची शेवटची भिंत विटांची आहे. चार प्रवेशद्वारासमोर बुद्धाच्या बैठ्या ध्यानस्थ मूर्ति आहेत! सर्व इमारतीच्या मध्यबिंदूचे ठिकाणीं पूर्वी एक स्तूप होता. पण तो आतां कोसळून त्याच्या विटांचा ढिगारा मात्र राहिला आहे. या बांधकलेच्या कामाबद्दल एका युरोपीयनानें खालील उद्गार काढिले आहेत.<br>{{gap}}"In the present writer's opinion the Watdage is the most beautiful ancient building in Ceylon. It stands upon a paved platform approached by four entrances each with its balustrades and "moon-stones." The centre part is circular with a dado of carved stone slabs and four entrances to correspond to those on the lower platform. At the head of each flight of steps sits a smiling Budha, one facing each point of the compass. It is impossible to convey in cold words the beauty of this great work. It can only be felt by those who have stood on the sunny pavement. The poorest imagination must respond to this exquisite creation of a brain and heart long since passed<noinclude></noinclude>
mx8x0efb5t2stbion342kkiec94fi40