विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.17 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९१ 104 77617 236275 202394 2026-08-27T16:23:49Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236275 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude> {{center|{{x-larger|सांगलीचे लोकविलक्षण धन्वंतरी}}}} {{center|{{xx-larger|आबासाहेब सांबारे}}}} {{rule}}{{rule|height=4px}}{{rule}} {{gap}}७०-८० वर्षापूर्वीची गोष्ट.<br> {{gap}}एक नामांकित वैद्य, आपल्या वाड्याच्या ऐसपैस ओसरीवर बसून, नेहमीप्रमाणे आपले रूग्ण तपासत होते. त्याना औषध देत होते. एवढ्यात बाहेरच्या दिंडी दरवाजापाशी मोठा गलका सुरू झाला. दोन-तीन हुजरे आले. "महाराज आले, महाराज आले,” असा पुकारा चालू होता. मग कळलं की महाराज म्हणजे कोणी साधासुधा राजा नव्हता. तो होता मोठा राजर्षी. प्रत्यक्ष कोल्हापूरचे शाहू महाराजच स्वतः वैद्यराजांच्या ओसरीवर आले होते. हे मोठं आक्रितच होतं. एवढा मोठा पैलवानी थाटाचा, सहा फुटी मर्द. त्याला काय कारण अिथं यायचं? पदरी डॉक्टरांची फौज असताना? हुजऱ्या वैद्यराजांच्या कानाशी जाऊन सांगू लागला. “महाराज आल्याती. महाराज आल्याती.” त्याच्या कृतीचा अर्थ स्पष्ट होता. तो असा की वैद्यराजानी आता आपल्या नेहमीच्या रूग्णांना रजा द्यावी आणि फक्त महाराजांकडे लक्ष पुरवावं. पण वैद्यराज एकदम अखडले. त्याच्यावर डाफरले,"अरे,आले असतील तुझे महाराज, मला काय त्याचं? हे आधीपासून ताटकळत बसलेले रोगी तपासतो. मग तुझ्या महाराजाना बघतो.”<br>{{gap}}हुजऱ्या चाट पडला. खरं म्हणजे घाबरलाच. बाहेर महाराजांची बग्गी अभी होती. त्याना सांगायचं कसं? त्यांचा असा अपमान? पण सांगणं तर भागच होतं. घाबरत घाबरत त्यानं सांगितलं. महाराज हसले. म्हणाले "हात्तिच्या, अेवढंच ना? थांबू आपण."<br>{{gap}}गोष्ट अशी होती की महाराज आपल्या पदरच्या गुलामअुद्दीन नावाच्या पैलवानाला घेऊन आले होते. तो अगदी मरणोन्मुख अवस्थेत होता. त्याच्या फुप्फुसात पू झाला होता. कफ आणि खोकल्यातून पू येत असे. असं बरेच दिवस चाललं होतं. डॉक्टरांचे सर्व अपाय थकले. मिरजेच्या डॉ. वानलेसनंतर, त्यांच्याच तोलामोलाच्या आलेल्या प्रख्यात डॉ.व्हेलनी तपासून सांगितलं, की पैलवानाची तब्बेत अगदीच खालावलेली आहे. जास्तीत जास्त आठ ते दहा दिवस जगेल. आमचे अुपाय आता<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर..........................६७</noinclude> 6vem6dbqyo8lyhgb5c2s21yjw4xi2hc पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९२ 104 77618 236276 202395 2026-08-27T16:25:58Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236276 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>संपल्यासारखे आहेत. तथापि सांगलीच्या एका वैद्याला दाखवून मगच कोल्हापूरला परत जा.<br>{{gap}}हा पैलवान महाराजांचा अत्यंत आवडता पैलवान होता. त्याच्यावर त्यानी खूप मेहनत घेतली होती. कुस्त्या मारून त्याने कोल्हापूरचा नावलौकिक वाढवावा, म्हणून त्याला उत्तम प्रतीचा खुराक चालू होता. त्याची अशी अवस्था झालेली बघून महाराज कष्टी झाले होते. शेवटचा अपाय म्हणून या वैद्याकडे आले होते. थोड्याच वेळात वैद्यराजानी महाराजांना आत बोलावले. दहा-पंधरा मिनिटे त्यानी पैलवानाची कसून तपासणी केली. मग ते महाराजांकडे वळून म्हणाले, "तुमचा पैलवान महिनाभरात अगदी खडखडीत बरा होईल." सर्वाना आश्चर्य वाटले. महाराजांचा तर विश्वासच बसेना. डॉ.व्हेलसारखा निष्णात डॉक्टर काय सांगतोय आणि हे वैद्यराज काय भाकित करत आहेत! अशीच त्यांच्या आणि अितरांच्याहि मनातील भावना होती.<br>{{gap}}काही असो. एक महिन्याचे औषध घेऊन मंडळी कोल्हापूरला परतली. ज्याचे आयुष्य आठ-दहा दिवसाचे त्याच्यासाठी संपूर्ण महिन्याचे औषध कशाला? असाच भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होता.<br>{{gap}}झाले. आठ दिवस झाले. दहा दिवस झाले. पैलवान काही मेला नाही! पंधरा दिवसानी महाराजांचा पी.ए, गाडी घेऊन घाबऱ्याघुबऱ्या कोल्हापूरहून सांगलीला वैद्यराजांकडे आला. त्याना सांगू लागला. तुम्हाला ताबडतोब येण्याची विनंती महाराजानी केली आहे. वैद्यबुवा म्हणाले, “अरे पण काय होतय ते तरी सांगशील किनई?” मग पी. ए. आणि बरोबर आलेली मंडळी सांगू लागली की पैलवानाला एकसारख्या रक्ताच्या अलट्या होत आहेत. फार घाबरा झालाय तो. म्हणून महाराजानी आपल्याला यायची विनंती केलीय. वैद्यबुवा हसले. म्हणाले, "सांगा तुमच्या महाराजाना, म्हणावं, आता तुमचा पैलवान चांगला बरा होण्याच्या मार्गावर आहे." ती दरबारी मंडळी बुचकळ्यात पडली. पण त्यानी गयावया करून वैद्यबुवाना स्वतःच कोल्हापूरला चलण्याची विनंती केली. मग ते कोल्हापूरला गेले. रूग्ण तपासला. शाहू महाराज आणि त्यांचे डॉक्टर्स तिथं होतेच. वैद्यानी खुलासा केला "ज्याअर्थी आता नुसत्या रक्ताच्या अलट्या होत आहेत त्याअर्थी पू होण्याची क्रिया बंद झाली आहे. फुप्फुसातील विष आता पूर्णपणे पडून गेलंय. आता शुध्द रक्त होण्याची प्रक्रिया सुरू झालीय. आता तुमचा पैलवान खडखडीत बरा होणार!”<br>{{gap}}आणि खरोखरीच महिनाभरात तो पैलवान चांगला बरा झाला. यमराजाच्या बगलेतच असलेल्या मृतवत् माणसाला, पुन्हा भूतलावरील माणसांमध्ये आणण्याची, किमया करणाऱ्या त्या धन्वंतरीचे नाव होते आबासाहेब सांबारे!{{nop}}<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर....................६८</noinclude> 0hvnjd37l1j7ruf2129hwmsltql08qw पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९३ 104 77619 236277 202396 2026-08-27T16:28:22Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236277 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}आबासाहेब म्हणजे त्यांच्याच काळात एक 'दंतकथा' बनून गेले होते! अनेक आयुर्वेदाचार्य, नुसता 'आबासाहेब सांबारे' या नावाच्या उच्चारानेच कानाच्या पाळीला हात लावून मनोमन नमस्कार करतात. जुने सांगलीकर त्यांच्याविषयी बोलायला लागले की त्यांच्या रसवंतीला आवर घालणे कठीणच.<br>{{gap}}शाहू महाराजानी पैलवान बरा झाल्यावर बिदागी म्हणून चार चांदीची तबके भरून नाणी पाठविली. पण आबासाहेबानी बिदागी घेतली नाही. “मला पोटाला देणारा श्रीगजानन माझ्या घरातच आहे” असे नम्रतापूर्वक सांगून आबासाहेब महाराजाना म्हणाले, “फार तर तुमचा पैलवान पुन्हा कुस्त्या करायला लागल्यावर आमच्या गणपती अुत्सवात येऊन कुस्त्या करू दे.” त्याप्रमाणे तो गुलामउद्दीन, आबासाहेबांकडील गणपतीच्या अुत्सवात कुस्त्या करत असे. आबासाहेबानी कोल्हापूरात यावं अशी शाहूमहाराजांची खूप इच्छा होती. तेथे मोठे रूग्णालय बांधून द्यायची तयारी होती असं म्हणतात. पण एकदा सांगलीच्या राजेसाहेबांकडे, राजवैद्य म्हणून निष्ठा वाहिल्यावर त्यात आबासाहेब बदल करणे कदापि शक्य नव्हते.<br>{{gap}}अशा या आबासाहेबांचं मूळ नाव कृष्णाजी विष्णु सांबारे. सांबारे हे काही त्यांच्या पूर्वजांचं मूळ नाव नव्हे. मूळचं आडनाव जोशी. तासगांव तालुक्यातील चिंचणी हे मूळ गाव. तिथं ही जोशी मंडळी पिढीजात भिक्षुकी आणि वैद्यकी हे दोन व्यवसाय अपजीविकेसाठी करत असत. सांगली संस्थानची स्थापना केल्यावर पहिले अधिपती श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यानी सांगलीचा नावलौकिक वाढावा या दृष्टिकोनातून अनेक शास्त्री, पंडित, गवई, पैलवान, व्यापारी मंडळी आदी विविध व्यवसायातील लोकांना सांगलीत वास्तव्यासाठी पाचारण केले. त्याना अनेक सवलती दिल्या. नोकऱ्या दिल्या. अपजीविकेची साधने दिली. या चिंचणीकर जोशी मंडळीना, सांगलीतील गणपतीच्या देवळात असणाऱ्या, चिंतामणेश्वराची म्हणजेच सांबाची पूजा, अुदरनिर्वाहाचे साधन म्हणून दिली. सांबाची पूजा करणारे म्हणून त्यांचं आडनाव 'सांबारे' झालं. आजमितिलाही ही पूजा व्यवस्था सांबारे मंडळींकडेच चालू आहे.<br>{{gap}}आबासाहेबाना दामोदरपंत आणि रामचंद्रपंत असे आणखी दोन भाऊ होते. तिघेही बंधू निष्णात वैद्य होते. आबासाहेबांच्या शिक्षणाविषयी फारशी माहिती अपलब्ध नाही. तथापि त्यांचे काही वैद्यकीय शिक्षण, पुण्याचे मेहेंदळे वैद्य, याजकडे झाले आणि बरेचसे शिक्षण त्यानी पिढीजात परंपरेवरून आणि जुन्या आयुर्वेदातील ग्रंथांवरून केले. त्यांची स्वतःची चिकित्सक वृत्ती आणि संशोधनाने प्राप्त झालेले ज्ञान यामुळेच त्यांचे वैद्यकी ज्ञान पूर्णत्वास गेले. सुश्रुत, चरक, वाग्भट अशा जुन्या<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर...........................६९</noinclude> 4m8eoa90n4njyw2wzuwhjn8iuvnrqzj पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९४ 104 77620 236278 202397 2026-08-27T16:36:38Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236278 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>ग्रंथाचे परिशीलन ते करतच. पण समोर येणाऱ्या नवीन नवीन रोग्यांचा आणि त्यांच्या विविध व्याधींचा ते सतत अभ्यास करत. रोगाच्या लक्षणानुसार ते औषध तयार करत. आणि रोगाचेच नाव औषधाला देत. त्यानी दिलेल्या काही औषधांची नावे आधुनिक आयुर्वेदातील औषधांस तंतोतंत जुळतात. मात्र त्यानी स्वतः तयार केलेली काही औषधे, चूर्णे, आयुर्वेदात सापडत नाहीत. त्यांची औषधयोजना करण्याची पद्धती आधुनिक वैद्यकाप्रमाणे होती. पातळ औषधे ते स्वतः तयार करीत. अर्क पद्धतीस त्यानीच प्रथम सुरूवात केली होती. तुळस, गुलाब, धमासा, वाळा यांचे ते अर्क काढून ठेवत. रानतुळस ही फार औषधी म्हणून तिचा अर्क नेहेमी काढून ठेवत. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये ज्या ज्या ओल्या हिरव्या वनस्पती मिळत, त्यांचे अर्क आबासाहेब काढून ठेवत. आबासाहेबांच्या ओसरीवर अनेक खेडूत मंडळी येत. त्यांच्याबरोबर आबासाहेब स्वतः रानावनात जाऊन, वेगवेगळ्या वनस्पतींची पाहणी करून ठेवत. ही श्रध्दाळू खेडूत मंडळी आबासाहेब सांगतील, त्या त्या वनस्पतींचे भारेच्या भारे, त्यांच्या ओसरीवर आणून टाकत. निरनिराळी द्रव्ये आणून, त्यांचे काढे करून, त्यांचे व्यवस्थित, शास्त्रशुध्द जतन करण्यावर आबासाहेबांचा विशेष कटाक्ष असे.<br>{{gap}}आबासाहेबांचं मोठं वैशिष्टय म्हणजे त्यानी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा कधीही दुरूपयोग केला नाही. सवंग व्यवसाय होऊ दिला नाही. एरवी त्यांच्या वाड्याच्या प्रशस्त ओसरीवर, सांगलीच्या शनिवारच्या बाजारासारखी गर्दी जमत असे. मग त्यात मोठमोठ्या सरकारी अंमलदारापासून अगदी अडाणी शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचा समावेश असे. अितकेच काय चोर, रामोशीसुध्दा त्यांच्याकडून औषधे घेऊन जात. एकदा गंमतीची गोष्ट घडली. आबासाहेब एकदा सांगलीजवळील डिग्रज या गावी एका आजारी रूग्णाला पहायला गेले होते. येताना रात्र झाली. बंद सारवटगाडीतून ते सांगलीला परतीच्या वाटेवर होते. अचानक आजुबाजूच्या अुसाच्या फडातून, तीन- चार रामोशी आले. व्यापारी समजून लुटालूट करण्याच्या अद्देशाने त्यानी गाडी थांबविली. पहातात तो आबासाहेब. तत्काळ त्यानी त्यांचे पाय धरले. माफी मागितली. सांगलीपर्यंत पोचवले. अितकेच काय, पण जवळ असलेले गुळाचे रवे दिले. अर्था तो चोरीचा माल. मग आबासाहेब कसे घेतील?<br>{{gap}}असे पण असायचे आबासाहेबांचे रूग्ण!<br>{{gap}}आबासाहेब औषधाचे पैसे घेत नसत. प्रत्येक रूग्ण म्हणजे परमेश्वराने शिकण्यासाठी पाठवलेला नवीन 'धडा' आहे अशीच त्यांची समजूत असावी. रोग्याच्या आणि त्याच्या व्याधीचा ते सतत विचार करीत. आयुर्वेदाचे ग्रंथ अघडून संदर्भ शोधत. सतत चिंतन करीत. या अव्याहत अभ्यासानेच त्याना रोगाची अचूक<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर...........................................७०</noinclude> bv2sqrersjnxnsse5dye9u4womxslwm पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९५ 104 77621 236279 202398 2026-08-27T16:39:36Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236279 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>परीक्षा होई. त्यांच्या या अभ्यासाची यथार्थ कल्पना नसणारे लोक मात्र त्याना हातगुण आहे असे समजत. आबासाहेब औषधाची फी घेत नसत. मात्र त्यांच्या असंख्य रूग्णांना, आबासाहेबांच्या गणेशोत्सवात, आपली सगळी फी हक्काने परत करण्याची संधी मिळे. अुत्सवात ज्वारी, तांदूळ, गूळ, शेंगदाणे, हरभराडाळ, तूरडाळ यांच्या थप्प्या लागत.<br>{{gap}}आबासाहेब सांबारे यांचेकडील गणपती- अुत्सव हे एक मोठेच प्रकरण होते.<br>{{gap}}आबासाहेब हे स्वतः मोठे गणेशभक्त होते. त्यांचा मित्र परिवार अफाट. सर्वजण मिळून उत्साहाने गणेशोत्सव साजरा करीत. एकदा गप्पांच्या ओघात, गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात आणि सार्वजनिकपणे साजरा करावा, अशी टूम निघाली. ही गोष्ट आहे १८९८-९९ सालातील. कदाचित् लो. टिळकानी पुण्यात सुरू केलेल्या शिवजयंती आणि गणेशोत्सव चळवळीचे लोण सांगलीत पोचले असेल. अुत्सव मोठा करायचा तर गणपतीची मूर्तीपण मोठी हवी. मग सात फूट उंचीचा शाडूचा गणपती करण्यात आला. दुर्दैवाने गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी चाचणी घेण्यासाठी बाहेर काढताना मूर्ती भंगली. सर्वजण निराश झाले. आता गणपतीची मूर्ती बनवायची केव्हा आणि प्रतिष्ठापना करायची तरी ती कधी? मग सर्वानुमते शक्कल काढण्यात आली. चार पाच दिवसात गजाननाची मूर्ती बनवून, दशमीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा करायची आणि अनंतचर्तुदशीला विसर्जन करायचे.<br>{{gap}}तेव्हापासून आजतागायत हीच प्रथा चालू आहे.<br>{{gap}}पाच-सहा वर्षे झाल्यावर, पूर्वी करत असत त्याप्रमाणे बुरूडाच्या कांब्या, तट्ट्या यांचा वापर करून कायमस्वरूपी एक लाकडी गणपती बनवावा असे ठरले. मूर्तीची अुंची केवढी असावी अशी चर्चा झाली, तेव्हा जमलेल्या मित्रमंडळीमध्ये जो सर्वात अुंच होता, त्याने आपले दोन्ही हात अुंचावले. तेव्हा त्या अुंचीइतकी मूर्ती बनवायची योजना ठरली. त्याप्रमाणे तीन भागात मूर्ती करण्यात आली. पोटाचा भाग, हलकी पिंपे वापरून करण्यात आला. मांडी आणि पाय हा भाग लाकूड आणि कागद यांचा लगदा मिळून करण्यात आला. असं करता करता दोन पुरूषभर, म्हणजे जवळजवळ १३ फुटांची मूर्ती बनली.<br>{{gap}}आणि त्यानंतर थाटामाटाचा, अुत्सवी गणेशोत्सव सुरु झाला.<br>{{gap}}दरवर्षी पहिले दिवशी सकाळी आणि शेवटच्या दिवशी रात्री श्री गणेशाच्या मूर्तीची मिरवणूक निघे. सुरुवातीला बैलगाडीतून, तर नंतर ट्रकवर, मूर्ती चढवून मिरवणूक निघे. सकाळी ९ वाजता मिरवणूक सुरू होई, ती मारूती रोड, कापडपेठ,<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.....................................७१</noinclude> 0manxk0wg9b8917menl0f2hx0cab6h8 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९६ 104 77622 236280 202401 2026-08-27T16:43:09Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236280 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>पोलिस स्टेशनवरून राजवाडा चौक, पटेल चौक, गणपती मंदिर, पाटील गल्लीतून सांबारे वाड्यात परत येई. रात्रीची मिरवणूक तर रात्री ९ वाजता सुरू होई ती पहाटे तीनपर्यंत चालत असे. गणपतीपेठेत हलवाई मंडळी, मिठाईची ताटेच्या ताटे, गणपतीवर अुधळीत असत. रात्रीच्या मिरवणुकीनंतर शोभेचे दारूकाम हे फार मोठे आकर्षण असे. या कामात अग्रेसर असलेली कवठे एकंद गावची मंडळी, दोन दोन महिने आधी सांबारेवाड्यात येऊन भुसनळे, चक्रे, झाडे, औट अशी सर्वप्रकारची शोभेची दारू बनवीत. शिवाय वाजणारे फटाके तर अनेक प्रकारचे असत.<br>{{gap}}या अुत्सवातील एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे आबासाहेबानी करवून घेतलेले दोन हत्ती. असं सांगतात की, एका वर्षी सांगलीकर अधिपतीनी, मिरवणुकीसाठी हत्ती देण्याचं नाकारलं, म्हणून आबासाहेबानी अीर्ष्येंने, कायमस्वरूपी दोन मोठे निर्जीव हत्ती बनविण्याचं मनावर घेतलं. कोल्हापूरातून मोठ्यात मोठ्या हत्तींची मापे आणवली. तरटे, कांबळी, अँगल्सचा वापर करून त्या हत्तींच्या मापाचे दोन मोठे हत्ती तयार केले. अुत्तम तऱ्हेने रंगवले. सर्व प्रकारचे दागिने वगैरे घालून, सुशोभित झूल घालून त्या हत्तीना जेव्हा मिरवणुकीने नेले, तेव्हा मिरवणूक गणपती मंदिराजवळ आल्यावर, पूर्वी तिथे हत्तीठाण्याजवळ बांधत असलेला खरा हत्तीसुध्दा या 'हत्तीना' पाहून बावरला. घाबरून साखळदंड तोडायला लागला.<br>{{gap}}आबासाहेबांचा गणेशोत्सव पूर्ण पाच दिवस चाले. मात्र आधी अुल्लेख आल्याप्रमाणे दशमीपासून अनंतचर्तुदशीपर्यंत. पाच दिवस सतत गायन, भजन, जादूचे प्रयोग, कुस्त्या अशा अनेकविध कार्यक्रमांचा धूमधडाका असे. सांगलीवाडी, कवलापूर, कर्नाळ डिग्रज अशा जवळपासच्या गावातून भजनीदिंड्या येत. त्यांची भजने होत. बिदागीचा सवालच नसे. आबासाहेब आपल्याकडून औषधापोटी काही घेत नाहीत, तर त्यांच्या गणपती अुत्सवात आपली जास्तीत जास्त सेवा रूजू व्हावी अशीच प्रत्येकाची अिच्छा असे. प्रत्येकाला मानाचा नारळ मिळे. रात्रभर कार्यक्रम आणि जोडीला सांगलीचे सुप्रसिद्ध कुरकुरीत भडंग आणि चहा. भडंगाची प्रसिद्धी आणि प्रथा तेव्हापासूनची आहे. 'भडंग' हे नामकरण आबासाहेबांचे चाहते सांगलीचे सुप्रसिद्ध कवी, साधुदास यानी केलं आहे, असं म्हणतात. या अुत्सवात हजारो लोक जेवून जात. मग त्यात पंक्तिप्रपंच नसे.<br>{{gap}}संस्थानच्या गणपतीउत्सवापेक्षाही हा अुत्सव मोठ्या प्रमाणावर होई. आणि खऱ्या अर्थाने हा सर्व समाजाचा अुत्सव असे. समाजाच्या सर्व थरातील माणसे ‘आपल्या' घरचा अुत्सव आहे अशा भावनेने सामील होत. स्पृश्यास्पृश्य भेद नावापुरतासुद्धा नसे. कोणी खालच्या समाजातील माणूस संकोचाने बाजूला राहू पाही तेव्हा आबासाहेब<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.............................७२</noinclude> rkplmgwo1z43dhblfkbf9i5xi4su9f8 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९७ 104 77623 236281 202402 2026-08-27T16:46:28Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236281 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>त्याला हाताला धरून जवळ आणत. लोकमान्य टिळकांचा खरा 'संदेश' आबासाहेबानी पुरापुरा जाणला होता.<br>{{gap}}पुढे पुढे आबासाहेबांच्या वैद्यकीचा आणि गणेशोत्सवाचा लौकिक महाराष्ट्रभर पसरला. त्यांच्या वैद्यकी ज्ञानाची प्रचीती मोठमोठ्या गवयाना, पुढाऱ्याना येऊ लागली. त्यांच्या विषयींच्या कथा-दंतकथा सर्वत्र चवीने सांगितल्या जाऊ लागल्या, तेव्हापासून आबासाहेबांच्या प्रेमाखातर मोठमोठे नामांकित गवई, त्यांच्या गणपती- अुत्सवात येऊन आवर्जून गाऊ लागले. कोणकोण गाऊन गेले, मैफली गाजवून गेले त्याची मोजदाद करणेच कठीण. अुस्ताद अल्लादियाखाँ, त्यांचे सुपुत्र मंजीखाँ आणि भूर्जीखाँ, कागलकरबुवा, कडलासकरबुवा, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, शंकरराव सरनाईक यांपासून तो साक्षात् बालगंधर्व, गंगूबाई हनगल, मोगूबाई कुर्डीकर यांचेपर्यंत अनेक बुजुर्ग, सांगलीत आबासाहेबांमुळे येऊन गाऊन गेले. त्या मंडळींचे स्वर्गीय गायन ऐकून सांगलीकर मंडळी धन्य झाली. राजेमहाराजांच्या राजवाड्यातून, मोठमोठ्या मैफलीतून, गाणारी मंडळी, आबासाहेबांमुळे सर्वसामान्य लोकाना ऐकायला मिळाली.<br>{{gap}}हा एक मोठा चमत्कार होता. आणि तो घडायला एक प्रसंग कारणीभूत झाला. त्याचं असं झालं:<br>{{gap}}गानमहर्षी अल्लादियाखाँसाहेबाना अचानक आजार जडला. एकसारखी धाप लागायला लागली. तरूणपणी त्याना कुस्तीचा नाद होता. एका अटीतटीच्या कुस्तीप्रसंगी काही बाचाबाची झाली. आणि प्रतिस्पर्ध्याने खाँसाहेबांच्या छातीवर एक जोरदार गुद्दा लगावला. काही काळ ते बेशुद्ध झाले. तरूण वय असल्याने त्यावेळी खाँसाहेब त्या गंडांतरातून बचावले. पण पुढे त्या प्रसंगाचा त्रास जाणवू लागला. एकसारखी धाप लागू लागली. थोडा वेळ सुद्धा गाता येईना. किंबहुना थोडा वेळसुद्धा गाता उपयोगी नाही असाच डॉक्टरी सल्ला पडला. पालपिटेशन्स वाढली. एक असाध्य रोग असंच त्यांच्या आजाराचे स्वरूप (निदान त्या काळात तरी) बनले.<br>{{gap}}त्याच सुमारास किंवा काही काळ आधी, वर अल्लेखलेल्या गुलामअुद्दीनचा किस्सा, आबासाहेबानी मरणाच्या दाढेतून त्याला कसा ओढून काढला, याची कथा कोल्हापुरात सर्वत्र बोलली जात होती. खाँसाहेबांच्या निकटवर्तियाना साहजिकच शेवटचा अुपाय म्हणून आबासाहेबाना दाखवावं असं वाटू लागलं. पण "शहाण्या डॉक्टरकडून आलेलं मरण परवडलं पण वैद्यबिद्य काही नको" असं काही त्यांच्या चाहत्यांचं मत पडलं. पण अखेरीस डॉक्टरी अुपचारांचा काहीही अपयोग नाही, त्यानीहि आशा सोडल्यासारखे झाले तेव्हा मात्र त्यांचेच एक डॉक्टर चाहते, सर भालचंद्र भडकमकरसारख्या डॉक्टरानी "सांबारे वैद्यांकडे अवश्य जा” असे सांगितले.<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर...............................७३</noinclude> baq2d64jw5eci6kzateyfjnzqchm6mn पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९८ 104 77624 236282 202403 2026-08-27T16:48:47Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236282 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>मग खाँसाहेब आबासाहेबांकडे आले.<br>{{gap}}आबासाहेबानी काय जादू केली ते एक परमेश्वर जाणे. त्यांच्या अुपचारानी खाँसाहेबाना खरोखरच थोडंथोडं बरं वाटू लागले. आराम पडू लागला. हळूहळू चालता-बोलतानाची धाप थोडीथोडी कमी झाली.<br>{{gap}}पण गाणं गायचा धीर मात्र त्याना होईना.<br>{{gap}}आबासाहेबानी सांगितलं तरी धीर होईना. गायचा प्रयत्न केला आणि पुन्हा काही झालं तर? ही भीती त्यांच्या मनात होती. तेव्हा स्वतः आबासाहेबानी प्रेमळपणे समजावलं, म्हणाले “अहो तुम्ही मोठे गवई. तुमचं गाणं जगलं तर तुम्ही जगलात. एरवी निर्माल्य होऊन जगण्यात आणि मरण्यात काय अर्थ आहे?"<br>{{gap}}अितकं सांगूनही खाँसाहेबांची भीती कमी झाली नाहीच.<br>{{gap}}आबासाहेब संगीतप्रेमी होते. अस्सल जाणकार होते. ते स्वतः हार्मोनियम, पखवाज वाजवत. एकदा तेरदाळ मुक्कामी असताना त्यांचे स्नेही तात्यासाहेब कोटणीस यांच्याकडे राहिले. त्यांचे कीर्तन ऐकताना तात्यासाहेब थोडेसे तालाला कच्चे आहेत असे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा आबासाहेबानी स्वतः मेहनत घेऊन त्यांचे तालाचे अंग पूर्णपणे अव्यंग केले. म्हणजे अशी 'संगीत दुखणी' पण ते बरी करत! त्यामुळं कलाकाराच्या जीवनात, त्याच्या कलेचे स्थान किती विलक्षण महत्त्वाचं असतं, ह्याची त्याना जाण होती. खाँसाहेबांसारखा श्रेष्ठ कलावंत वाया जाऊ नये म्हणून ते त्यांची, त्यानी गावं म्हणून, अकसारखी मनधरणी करत होते. पण खाँसाहेब काही ऐकेनात. अखेरीस आबासाहेबानी आपला स्वर 'जरा वरच्या' पट्टीत लावला. त्यानी खडसावून सांगितलं “माझ्या औषधासाठी गाणे हेच पथ्य आहे. मी सांगतो तसं तुम्ही करणार नसाल, तर अद्यापासून माझं औषध बंद."<br>{{gap}}ही मात्रा मात्र एकदम लागू पडली!<br>{{gap}}कारण आबासाहेब औषध बंद करणार म्हणजे ग्रंथच आटोपला !! "कयामत आली” असं म्हणत खाँसाहेबानी, गाण्याचा रियाझ करायला सुरवात केली. आबासाहेब स्वतः समोर बसत. एक-दोन मिनिटे गायचं नंतर पाच-सहा मिनिटे गायचं असा प्रयोग सुरू झाला. त्याना धाप लागण्याच्या आत आबासाहेब स्वतःच त्यांचं गाणं बंद करीत. मग हळूहळू आबासाहेबानी त्यांच्या गाण्याचा अवधी वाढवायला सुरवात केली. “आता आपल्याला धाप लागत नाही" हा दृढ विश्वास त्यांनी खाँसाहेबांच्या मनात निर्माण केला. (अर्थात त्याना स्वतःला तशी खात्री होतीच!) त्यातून अखादे वेळेस ढास लागलीच तर ती औषधाच्या एक दोन डोसांमध्येच थांबते हेहि खाँसाहेबाना<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर...........................७४</noinclude> a6cwzaq3ydui3qzdp6xmau2rol4u916 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९९ 104 77625 236283 202404 2026-08-27T16:50:34Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236283 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>कळून चुकलं होतं.<br>{{gap}}हा 'चमत्कार' घडलाच कसा, याचं खाँसाहेबाना, राहून राहून नवल वाटत होतं. आबासाहेबांनी अक्षरशः त्यांचा पुनर्जन्मच घडवला होता. सागराच्या तळाशी गेलेले हे सुवर्ण-माणिक, अनमोल सुवर्णरल, संगीत रसिकजनांच्या हाती सुखरूप आणून पोचवलं होतं.<br>{{gap}}थोड्याच कालावधीनंतर खाँसाहेब अगदी पूर्वीसारखे गाऊ लागले. एक नाही, दोन नाही, तर तब्बल २८ वर्षे ते त्या आजारानंतर जगले. नुसतेच जगले नाहीत तर संगीत सम्राट म्हणून जगले. आबासाहेब सुरूवातीला त्याना म्हणाले होतेच. "तुमचं गाणं 'जगलं' तरच तुम्ही जगलात.”<br> {{gap}}किती सार्थ होतं ते बोलणं!<br>{{gap}}या प्रसंगानंतर खाँसाहेब आबासाहेबांच्या गणेशोत्सवात नित्यनेमाने येऊन गायला लागले. त्यांच्यामुळे अनेक गवई मंडळी आबासाहेबांच्या सान्निध्यात आली. त्यांच्या गणपतीपुढे भक्तिभावाने गाऊ लागली. त्यांच्या गणेशोत्सवाची कीर्ती सर्वदूर पसरली.<br>{{gap}}आबासाहेबांची ओसरी म्हणजे एक गुणीजनांचा दरबारच होता. साधुदासांसारखा प्रतिभाशाली कवी, कोटणीसमहाराजांसारख्या सत्पुरूषापासून, तो शेताच्या बांधावरच्या दुर्मिळ वनस्पती घेऊन येणाऱ्या खेडुतांपर्यंत, सर्व जनांची त्यात अुपस्थिती असे. गणपती मंदिरात पूजा सांगणारे सांबारे घराणे, पण खुद्द आबासाहेबांच्या वागण्यात स्पृश्य-अस्पृश्य, अुच्च-नीच, श्रीमंत-गरीब असा भेद 'औषधा' पुरतासुद्धा नव्हता. प्राण जाण्याच्या भीतीने घाबरून गेलेले सर्व जाती-जमातीचे रोगी डोळ्यात 'प्राण' आणून आपल्या व्याधीवर आबासाहेब केव्हा अपचार करतील याची वाट पहात असत. आबासाहेब कधी कुणाची निराशा करीत नसत.<br>{{gap}}खुद्द लोकमान्य टिळकांची आबासाहेबांवर श्रद्धा होती. आबासाहेबांचा पुण्यातही दवाखाना होता. आपल्या मधुमेहाच्या व्याधीसाठी लोकमान्य त्यांच्याकडून औषध आणवीत असत. १९२० च्या फेब्रुवारीमध्ये, ज्योतिष संमेलनाच्या निमित्ताने, लोकमान्य सांगलीस आले असताना आवर्जून सांबारेवाड्यात जाऊन आबासाहेबाना भेटून गेले. त्यांचा प्रचंड मोठा गणपती पाहून आश्चर्यचकित झाले. नंतर लोकमान्य अिंग्लंडमध्ये जायचे होते. म्हणून तिकडे जाताना आबासाहेबांकडून तीन महिन्याचे औषध घेऊन गेले होते पण दुर्दैवाने अिंग्लंडहून आल्यानंतर, त्याच वर्षीच्या १ ऑगस्टला त्यांचे निधन झाले. असं सांगतात की आबासाहेबानी लोकमान्यांची तब्येत तपासून त्याना<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.....................७५</noinclude> 2uchrz30zy45sr539asfgbh6c80g25t पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०० 104 77626 236284 202405 2026-08-27T16:51:50Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236284 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>विनंती केली होती की कमीतकमी तीन महिने, त्यानी आबासाहेबांच्या नजरेसमोर, सांगलीत रहावे. लोकमान्यांना त्यांच्या धकाधकीच्या जीवनातून, असे निवांत तीन महिने देणे शक्यच नव्हते. पण तसे ते राहते तर कदाचित् खाँसाहेबांसारखा एखादा चमत्कार घडलाही असता! आबासाहेबांजवळ राहून अुपचार करून घेण्यासाठी, नाथमाधवांसारखे सुप्रसिद्ध लेखक त्यांच्या पायाच्या व्याधीसाठी येऊन राहिले होते. सुप्रसिद्ध गायिका मोगुबाई कुर्डीकर, त्यांचा घसा खराब झाला, तेव्हा आबासाहेबांचे औषधोपचार लाभावेत म्हणून त्या सांगलीत येऊन राहिल्या होत्या.<br>{{gap}}पण दैवदुर्विलास असा की, हा लोकविलक्षण धन्वंतरी, स्वतः मात्र १९३३ च्या प्लेगच्या साथीचा बळी ठरला.<br>{{gap}}त्यानी लोकमान्यांचा संदेश सामान्य जनांमध्ये पोचवणारा दिमाखदार गणपती- अुत्सव १८९९ मध्ये सुरू केला त्या गोष्टीला १९९९ साली १०० वर्षे पूर्ण झाली आहेत.<br>{{gap}}त्या शताब्दीवर्षाच्या निमित्ताने, त्यांचे पुनर्म्मरण होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे.<br> {{center|●●●}}{{nop}}<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर........................७६</noinclude> 0y76bvpnz2ov6w2uhrkzmljga5r6juf पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/६ 104 111858 236265 236187 2026-08-27T15:00:56Z Shurpalimedha 5041 236265 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>{{gap}}त्या काळात दादरचे रस्ते मातीचे होते. भल्या पहाटे पाण्याची टाकी असलेली बैलगाडी यायची. पाण्याच्या टाकीला मागच्या बाजूला एक आडवा, भोके असलेला पाइप असायचा. गाडीच्या चालकाने दोरी ओढली, की पाइपच्या भोकांतून पाणी बाहेर पडायचे, रस्ता ओला व्हायचा. तो मृद्गंध आता अनुभवाला येत नाही.</br> {{gap}}उन्हाळ्यात माणसे फूटपाथवर झोपत. फूटपाथ हवेशीर असल्यामुळे छान झोप लागायची! घरात पंख्याची गरज नसे. समुद्रावरून येणारा वारा वाटेत कुठेही न अडखळता सरळ घरात घुसायचा. बहुतेक चाळी बैठ्या किंवा एकमजली. पहाटे पाचला हॉटेल उघडायचे. चहाचा पहिला कप भुतासाठी रस्त्यावर फेकला जाई. विड्या ओढून छातीचा खोका झालेल्या दमेकऱ्यांचा खोकण्याचा आवाज किंवा 'पाण्या निघाली गौळण' या गाण्याच्या ओळीव्यतिरिक्त सर्व काही शांत असायचे. सकाळी सहा-सातनंतर रहदारी चालू होई. 'याss कल्हऽऽई' ही कल्हईवाला आल्याची खूण असायची. 'केरबाऽऽ माऽऽणि केरबा' म्हणत एक ढेरपोट्या मिशीवाला इराणी रस्त्यावर फिरायचा. दृष्ट लागू नये म्हणून आया आपल्या मुलांच्या गळ्यात ही पिवळ्या मण्यांची माळ घालायच्या. कधी दारावर अर्धी लुंगी व छातीभर काळ्या दोराची गुंडाळी बांधलेले 'नाथपंथी ' 'यायचे; तर कधी 'जोगवा' मागण्यासाठी दाढी, टक्कल असलेला, साडी नेसणारा माणूस येई. 'हा बाप्या की बाई' हे कोडे असे. कधी बारक्या डोळ्यांचा, पाठीवर कापडाचे बोचके घेतलेला चिनी कापड विक्या येई. आंब्यांच्या दिवसांत 'साक्कर गोट्टी' ओरडत गावठी आंबे विकणारा येई. दिवेलागणीच्या वेळी बंडी घातलेला एक माणूस हातात लांब काठी घेऊन पळत रस्त्यावरचे दिवे पेटवीत जायचा. रात्री आठ वाजले की, 'ओपनिंगेऽऽ' असे ओरडत जाणारा माणूस दिसे. त्यानंतर सर्व काही सामसूम होई.</br> {{gap}}रस्त्यावरील वाहने म्हणजे नाक्या-नाक्यावर उभी असलेली 'व्हिक्टोरिया' नावाची घोडागाडी व दर वीस ते तीस मिनिटांनी येणारी 'बीईएसटी'ची बस. या बसचे 'ए', 'बी', 'सी', 'डी' असे रूट असायचे. गोखले रोडवर 'एफ' रूट यायची आणि प्रभादेवी, टिळक ब्रिजवरून शीवपर्यंत 'जे' रूट जायची. भाडे दोन आणे. व्हिक्टोरियाने दादर स्टेशनला जायला चार आणे भाडे घेत. हे फार जास्त वाटायचे. व्हिक्टोरियाच्या मागच्या दांडीला लोंबकळून कधी कधी आम्ही शाळेत जात असू. हे बघणारे 'गाडीवाले पिछाड़ी चाबूक' असे ओरडायचे. गाडीवाल्याच्या चाबकाचा फटका बसेल, या भीतीने आम्ही मग व्हिक्टोरियाची दांडी सोडत असू.</br> {{left|२ । गोष्ट एका डॉक्टरची}}<noinclude></noinclude> 50taty7lu2tyc45322dkeaeaulpllo6 236266 236265 2026-08-27T15:01:40Z Shurpalimedha 5041 236266 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>{{gap}}त्या काळात दादरचे रस्ते मातीचे होते. भल्या पहाटे पाण्याची टाकी असलेली बैलगाडी यायची. पाण्याच्या टाकीला मागच्या बाजूला एक आडवा, भोके असलेला पाइप असायचा. गाडीच्या चालकाने दोरी ओढली, की पाइपच्या भोकांतून पाणी बाहेर पडायचे, रस्ता ओला व्हायचा. तो मृद्गंध आता अनुभवाला येत नाही.</br> {{gap}}उन्हाळ्यात माणसे फूटपाथवर झोपत. फूटपाथ हवेशीर असल्यामुळे छान झोप लागायची! घरात पंख्याची गरज नसे. समुद्रावरून येणारा वारा वाटेत कुठेही न अडखळता सरळ घरात घुसायचा. बहुतेक चाळी बैठ्या किंवा एकमजली. पहाटे पाचला हॉटेल उघडायचे. चहाचा पहिला कप भुतासाठी रस्त्यावर फेकला जाई. विड्या ओढून छातीचा खोका झालेल्या दमेकऱ्यांचा खोकण्याचा आवाज किंवा 'पाण्या निघाली गौळण' या गाण्याच्या ओळीव्यतिरिक्त सर्व काही शांत असायचे. सकाळी सहा-सातनंतर रहदारी चालू होई. 'याss कल्हऽऽई' ही कल्हईवाला आल्याची खूण असायची. 'केरबाऽऽ माऽऽणि केरबा' म्हणत एक ढेरपोट्या मिशीवाला इराणी रस्त्यावर फिरायचा. दृष्ट लागू नये म्हणून आया आपल्या मुलांच्या गळ्यात ही पिवळ्या मण्यांची माळ घालायच्या. कधी दारावर अर्धी लुंगी व छातीभर काळ्या दोराची गुंडाळी बांधलेले 'नाथपंथी' 'यायचे; तर कधी 'जोगवा' मागण्यासाठी दाढी, टक्कल असलेला, साडी नेसणारा माणूस येई. 'हा बाप्या की बाई' हे कोडे असे. कधी बारक्या डोळ्यांचा, पाठीवर कापडाचे बोचके घेतलेला चिनी कापड विक्या येई. आंब्यांच्या दिवसांत 'साक्कर गोट्टी' ओरडत गावठी आंबे विकणारा येई. दिवेलागणीच्या वेळी बंडी घातलेला एक माणूस हातात लांब काठी घेऊन पळत रस्त्यावरचे दिवे पेटवीत जायचा. रात्री आठ वाजले की, 'ओपनिंगेऽऽ' असे ओरडत जाणारा माणूस दिसे. त्यानंतर सर्व काही सामसूम होई.</br> {{gap}}रस्त्यावरील वाहने म्हणजे नाक्या-नाक्यावर उभी असलेली 'व्हिक्टोरिया' नावाची घोडागाडी व दर वीस ते तीस मिनिटांनी येणारी 'बीईएसटी'ची बस. या बसचे 'ए', 'बी', 'सी', 'डी' असे रूट असायचे. गोखले रोडवर 'एफ' रूट यायची आणि प्रभादेवी, टिळक ब्रिजवरून शीवपर्यंत 'जे' रूट जायची. भाडे दोन आणे. व्हिक्टोरियाने दादर स्टेशनला जायला चार आणे भाडे घेत. हे फार जास्त वाटायचे. व्हिक्टोरियाच्या मागच्या दांडीला लोंबकळून कधी कधी आम्ही शाळेत जात असू. हे बघणारे 'गाडीवाले पिछाड़ी चाबूक' असे ओरडायचे. गाडीवाल्याच्या चाबकाचा फटका बसेल, या भीतीने आम्ही मग व्हिक्टोरियाची दांडी सोडत असू.</br> {{left|२ । गोष्ट एका डॉक्टरची}}<noinclude></noinclude> fyt4s14mcz58o6h85ro18q578xks8ho 236267 236266 2026-08-27T15:02:38Z Shurpalimedha 5041 236267 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>{{gap}}त्या काळात दादरचे रस्ते मातीचे होते. भल्या पहाटे पाण्याची टाकी असलेली बैलगाडी यायची. पाण्याच्या टाकीला मागच्या बाजूला एक आडवा, भोके असलेला पाइप असायचा. गाडीच्या चालकाने दोरी ओढली, की पाइपच्या भोकांतून पाणी बाहेर पडायचे, रस्ता ओला व्हायचा. तो मृद्गंध आता अनुभवाला येत नाही.</br> {{gap}}उन्हाळ्यात माणसे फूटपाथवर झोपत. फूटपाथ हवेशीर असल्यामुळे छान झोप लागायची! घरात पंख्याची गरज नसे. समुद्रावरून येणारा वारा वाटेत कुठेही न अडखळता सरळ घरात घुसायचा. बहुतेक चाळी बैठ्या किंवा एकमजली. पहाटे पाचला हॉटेल उघडायचे. चहाचा पहिला कप भुतासाठी रस्त्यावर फेकला जाई. विड्या ओढून छातीचा खोका झालेल्या दमेकऱ्यांचा खोकण्याचा आवाज किंवा 'पाण्या निघाली गौळण' या गाण्याच्या ओळीव्यतिरिक्त सर्व काही शांत असायचे. सकाळी सहा-सातनंतर रहदारी चालू होई. 'याss कल्हऽऽई' ही कल्हईवाला आल्याची खूण असायची. 'केरबाऽऽ माऽऽणि केरबा' म्हणत एक ढेरपोट्या मिशीवाला इराणी रस्त्यावर फिरायचा. दृष्ट लागू नये म्हणून आया आपल्या मुलांच्या गळ्यात ही पिवळ्या मण्यांची माळ घालायच्या. कधी दारावर अर्धी लुंगी व छातीभर काळ्या दोराची गुंडाळी बांधलेले 'नाथपंथी' यायचे; तर कधी 'जोगवा' मागण्यासाठी दाढी, टक्कल असलेला, साडी नेसणारा माणूस येई. 'हा बाप्या की बाई' हे कोडे असे. कधी बारक्या डोळ्यांचा, पाठीवर कापडाचे बोचके घेतलेला चिनी कापड विक्या येई. आंब्यांच्या दिवसांत 'साक्कर गोट्टी' ओरडत गावठी आंबे विकणारा येई. दिवेलागणीच्या वेळी बंडी घातलेला एक माणूस हातात लांब काठी घेऊन पळत रस्त्यावरचे दिवे पेटवीत जायचा. रात्री आठ वाजले की, 'ओपनिंगेऽऽ' असे ओरडत जाणारा माणूस दिसे. त्यानंतर सर्व काही सामसूम होई.</br> {{gap}}रस्त्यावरील वाहने म्हणजे नाक्या-नाक्यावर उभी असलेली 'व्हिक्टोरिया' नावाची घोडागाडी व दर वीस ते तीस मिनिटांनी येणारी 'बीईएसटी'ची बस. या बसचे 'ए', 'बी', 'सी', 'डी' असे रूट असायचे. गोखले रोडवर 'एफ' रूट यायची आणि प्रभादेवी, टिळक ब्रिजवरून शीवपर्यंत 'जे' रूट जायची. भाडे दोन आणे. व्हिक्टोरियाने दादर स्टेशनला जायला चार आणे भाडे घेत. हे फार जास्त वाटायचे. व्हिक्टोरियाच्या मागच्या दांडीला लोंबकळून कधी कधी आम्ही शाळेत जात असू. हे बघणारे 'गाडीवाले पिछाड़ी चाबूक' असे ओरडायचे. गाडीवाल्याच्या चाबकाचा फटका बसेल, या भीतीने आम्ही मग व्हिक्टोरियाची दांडी सोडत असू.</br> {{left|२ । गोष्ट एका डॉक्टरची}}<noinclude></noinclude> lj8agopljjaveixe6kme32d5xxzu7sp पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/७ 104 111859 236268 236081 2026-08-27T15:10:01Z Shurpalimedha 5041 236268 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>{{gap}}त्याकाळी टॅक्सी नव्हती. पायी चालत जायचे; नाहीतर आगगाडी किंवा ट्रॅम ! आगगाडी दहा ते पंधरा मिनिटांनी यायची. मुलुंड-ठाण्याला जाणारी गाडी अर्ध्या तासानंतर यायची. बसायला नेहमी जागा मिळायची. फर्स्ट, सेकंड, थर्ड व इंटर असे चार क्लासेस असायचे.</br> {{gap}}गिरगावात जायचे असल्यास परळला चालत जायचे व तेथून ट्रॅम पकडायची. एक आणा भाडे दिले की, ट्रॅममध्ये तासभर आरामशीर झोप घ्यायला माणूस मोकळा असायचा. गोगलगायीच्या गतीने जाणारी ही ट्रॅम रस्त्याच्या मध्यभागी धावायची. तिला हॉर्नऐवजी घंटा असायची. ट्रॅमचा चालक पायाने ठण्ठण् अशी घंटा वाजवीत रुबाबात ट्रॅम चालवायचा. या आवाजाची कानाला इतकी सवय झालेली की, रात्री ट्रॅम बंद झाल्यावर चुकल्यासारखे वाटायचे, असे परेलला राहणारे मित्र म्हणत. चाळीतील जुनी माणसे ट्रॅमोलला 'टमरेल' म्हणत. पूर्वी ट्रॅमला घोडे जोडलेले असत, असे ते सांगत.</br> {{gap}}धान्य 'पायली' नावाच्या मापाने मोजायचे. दूध मापायचे 'छटाक', 'नवटाक' व 'शेर' या मापाने. सोळा छटाक म्हणजे एक शेर, हे इतकेच कोष्टक माझ्या लक्षात आहे. १ एप्रिल १९५७ पर्यंत एक रुपयाला सोळा आणे किंवा चौसष्ट पैसे मिळायचे. त्यानंतर एका रुपयाला शंभर नवे पैसे मिळू लागले. त्याकाळी 'चवली' (दोन आणे), 'पावली' (चार आणे) व 'अधेली' (आठ आणे) अशी नाणी होती. सत्तर वर्षांपूर्वी दोन आण्यांत जेवणाची थाळी मिळत असे.</br> {{gap}}एकाने मला एकदा हिशेब विचारला, “एका आण्याला पंचवीस केळी, तर एका केळ्याची किंमत किती?" मला उत्तर माहीत नव्हते. त्याने उत्तर सांगितले, "एक रेस." मी 'रेस' हे नाणे पाहिलेले नाही. जुना पैसा, 'ढब्बू' (दोन पैसे), 'पै' (एक पैशाला तीन पै) व तीन-दमडी (अर्धा पैसा) पाहिली आहेत.</br> {{gap}}ते मंदीचे दिवस होते. नोकऱ्या मिळत नव्हत्या. रेशनिंग सुरू होईपर्यंत (सुमारे १९४०) स्त्रिया नोकरी करीत नव्हत्या. शिक्षणाचा प्रसारही नव्हता. सबंध चाळीत एखाददुसरा पदवीधर असायचा. पोरगा मॅट्रिक झाला की, डोक्यावरून पाणी गेल्यासारखे वाटायचे. महिना तीस रुपये पगार मिळविणारा सुखी व समृद्ध समजला जाई. एवढ्या पगारात एकत्र कुटुंबाचे भागत असे. मोठ्या भावाला कपडे तंग होऊ लागले; तर ते धाकट्या भावाने वापरायचे, मोठ्या भावाने शाळेची पुस्तके जपून वापरायची व पुढच्या वर्षी तो पास</br> {{right|दादर । ३}}<noinclude></noinclude> 45qi2pw8z38jwp2k7f3fn0uk0tw4r99 236269 236268 2026-08-27T15:16:34Z Shurpalimedha 5041 236269 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>{{gap}}त्याकाळी टॅक्सी नव्हती. पायी चालत जायचे; नाहीतर आगगाडी किंवा ट्रॅम! आगगाडी दहा ते पंधरा मिनिटांनी यायची. मुलुंड-ठाण्याला जाणारी गाडी अर्ध्या तासानंतर यायची. बसायला नेहमी जागा मिळायची. फर्स्ट, सेकंड, थर्ड व इंटर असे चार क्लासेस असायचे.</br> {{gap}}गिरगावात जायचे असल्यास परळला चालत जायचे व तेथून ट्रॅम पकडायची. एक आणा भाडे दिले की, ट्रॅममध्ये तासभर आरामशीर झोप घ्यायला माणूस मोकळा असायचा. गोगलगायीच्या गतीने जाणारी ही ट्रॅम रस्त्याच्या मध्यभागी धावायची. तिला हॉर्नऐवजी घंटा असायची. ट्रॅमचा चालक पायाने ठण्-ठण् अशी घंटा वाजवीत रुबाबात ट्रॅम चालवायचा. या आवाजाची कानाला इतकी सवय झालेली की, रात्री ट्रॅम बंद झाल्यावर चुकल्यासारखे वाटायचे, असे परेलला राहणारे मित्र म्हणत. चाळीतील जुनी माणसे ट्रॅमरेलला 'टमरेल' म्हणत. पूर्वी ट्रॅमला घोडे जोडलेले असत, असे ते सांगत.</br> {{gap}}धान्य 'पायली' नावाच्या मापाने मोजायचे. दूध मापायचे 'छटाक', 'नवटाक' व 'शेर' या मापाने. सोळा छटाक म्हणजे एक शेर, हे इतकेच कोष्टक माझ्या लक्षात आहे. १ एप्रिल १९५७ पर्यंत एक रुपयाला सोळा आणे किंवा चौसष्ट पैसे मिळायचे. त्यानंतर एका रुपयाला शंभर नवे पैसे मिळू लागले. त्याकाळी 'चवली' (दोन आणे), 'पावली' (चार आणे) व 'अधेली' (आठ आणे) अशी नाणी होती. सत्तर वर्षांपूर्वी दोन आण्यांत जेवणाची थाळी मिळत असे.</br> {{gap}}एकाने मला एकदा हिशेब विचारला, “एका आण्याला पंचवीस केळी, तर एका केळ्याची किंमत किती?" मला उत्तर माहीत नव्हते. त्याने उत्तर सांगितले, "एक रेस." मी 'रेस' हे नाणे पाहिलेले नाही. जुना पैसा, 'ढब्बू' (दोन पैसे), 'पै' (एक पैशाला तीन पै) व तीन-दमडी (अर्धा पैसा) पाहिली आहेत.</br> {{gap}}ते मंदीचे दिवस होते. नोकऱ्या मिळत नव्हत्या. रेशनिंग सुरू होईपर्यंत (सुमारे १९४०) स्त्रिया नोकरी करीत नव्हत्या. शिक्षणाचा प्रसारही नव्हता. सबंध चाळीत एखाददुसरा पदवीधर असायचा. पोरगा मॅट्रिक झाला की, डोक्यावरून पाणी गेल्यासारखे वाटायचे. महिना तीस रुपये पगार मिळविणारा सुखी व समृद्ध समजला जाई. एवढ्या पगारात एकत्र कुटुंबाचे भागत असे. मोठ्या भावाला कपडे तंग होऊ लागले; तर ते धाकट्या भावाने वापरायचे, मोठ्या भावाने शाळेची पुस्तके जपून वापरायची व पुढच्या वर्षी तो पास</br> {{right|दादर । ३}}<noinclude></noinclude> 67qgry3xmt865lca1v4r3qs6zloy3mb पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/८ 104 111860 236270 236082 2026-08-27T15:22:32Z Shurpalimedha 5041 236270 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>झाल्यावर ती धाकट्या भावाला द्यायची, ही घराघरांतील रीत होती. निळ्या रंगाच्या दोन हाफ पैंटी व दोन पांढरे शर्ट यावर भागत असे. विजेचे बिल महिन्याला चार ते पाच आणे येत असे. बिल जास्त येऊ नये यासाठी पंचवीस वॅटचा बल्ब लावीत असत व रात्री सर्वजण लवकर झोपी जात.</br> {{gap}}आमच्या घरी वडिलांचे एक मामा येत असत. एकदा ते आले तेव्हा आम्ही दोघे भाऊ केस कापायला निघालो होतो. तेव्हा मुलांचे केस कापायला न्हावी तीन आणे घेई. मामा म्हणाले, "अरे, सहा आणे कशाला खर्च करता? मी कापतो या मुलांचे केस. कात्री व फणी आणा." माझा पहिला नंबर लागला. (दादा शहाणा!) मामांनी माझे केस कापले. आरशात पाहिले, तर माझे संपूर्ण डोके उंदराने कुरतडल्यासारखे दिसत होते. डोकंभर केसांच्या पायऱ्याच पायऱ्या पसरल्या होत्या. मी रडत रडत आईकडे गेलो. आईलाही हसू आवरेना. शेवटी मी शेजारच्या न्हाव्याच्या दुकानात गेलो. तेथेही सर्वजण फिदीफिदी हसू लागले. न्हाव्याने त्या दिवशी तीन आण्यांऐवजी चार आणे घेतले. अशी ही आमची काटकसर!</br> {{gap}}रस्ता ओलांडताना अपघात होईल, या भीतीने मी सात वर्षांचा होईस्तोवर मला घरच्यांनी शाळेत पाठवले नाही. मग एके दिवशी माझ्या मोठ्या भावासह मी म्युनिसिपालिटीच्या शाळेत गेलो. आम्हा दोघांना शाळेच्या ऑफिसात बोलावले गेले.</br> {{gap}}"तुझ्या भावाची जन्मतारीख कोणती?" हेडमास्तरांनी दादाला विचारले.</br> {{gap}}"मला माहीत नाही" - दादा उत्तरला.</br> {{gap}}"ठीक आहे. वर्गावर जा." हेडमास्तर म्हणाले. त्यांनी रजिस्टरमध्ये माझी जन्मतारीख 'तीन जानेवारी' अशी लिहिली, ती आजवर तशीच अ. हे. ज्या हेडमास्तरांनी माझे बारसे केले, त्यांचे नाव लक्षात नाही. ते गोठ्या मिश्यांचे व सूटबूट घातलेले होते. बहुतेक ते वसईचे ख्रिश्चन असावेत. हेडमास्तर शिस्तीबाबतीत कठोर होते. मुलांच्या पायात चपला नसतील तरी चालेल, पण डोक्यावर टोपी हवीच. टोपी नसेल तर डोक्यावर छडी बसे. हेडमास्तर वगळल्यास इतर सर्व मास्तरांचा ड्रेस ठरलेला असायचा. धोतर, शर्ट, शर्टावर कोट, शर्टाची कॉलर कोटाच्या कॉलरवर बसवलेली आणि डोक्यावर काळी टोपी. कपाळावर उभे किंवा आडवे गंध.</br> {{left|१४ | गोष्ट एका डॉक्टरची}}<noinclude></noinclude> 60s6mybi3uduhp2i5dw9zh86j04z3os 236271 236270 2026-08-27T15:26:27Z Shurpalimedha 5041 236271 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>झाल्यावर ती धाकट्या भावाला द्यायची, ही घराघरांतील रीत होती. निळ्या रंगाच्या दोन हाफ पॅंटी व दोन पांढरे शर्ट यावर भागत असे. विजेचे बिल महिन्याला चार ते पाच आणे येत असे. बिल जास्त येऊ नये यासाठी पंचवीस वॅटचा बल्ब लावीत असत व रात्री सर्वजण लवकर झोपी जात.</br> {{gap}}आमच्या घरी वडिलांचे एक मामा येत असत. एकदा ते आले तेव्हा आम्ही दोघे भाऊ केस कापायला निघालो होतो. तेव्हा मुलांचे केस कापायला न्हावी तीन आणे घेई. मामा म्हणाले, "अरे, सहा आणे कशाला खर्च करता? मी कापतो या मुलांचे केस. कात्री व फणी आणा." माझा पहिला नंबर लागला. (दादा शहाणा!) मामांनी माझे केस कापले. आरशात पाहिले, तर माझे संपूर्ण डोके उंदराने कुरतडल्यासारखे दिसत होते. डोकंभर केसांच्या पायऱ्याच पायऱ्या पसरल्या होत्या. मी रडत रडत आईकडे गेलो. आईलाही हसू आवरेना. शेवटी मी शेजारच्या न्हाव्याच्या दुकानात गेलो. तेथेही सर्वजण फिदीफिदी हसू लागले. न्हाव्याने त्या दिवशी तीन आण्यांऐवजी चार आणे घेतले. अशी ही आमची काटकसर!</br> {{gap}}रस्ता ओलांडताना अपघात होईल, या भीतीने मी सात वर्षांचा होईस्तोवर मला घरच्यांनी शाळेत पाठवले नाही. मग एके दिवशी माझ्या मोठ्या भावासह मी म्युनिसिपालिटीच्या शाळेत गेलो. आम्हा दोघांना शाळेच्या ऑफिसात बोलावले गेले.</br> {{gap}}"तुझ्या भावाची जन्मतारीख कोणती?" हेडमास्तरांनी दादाला विचारले.</br> {{gap}}"मला माहीत नाही" - दादा उत्तरला.</br> {{gap}}"ठीक आहे. वर्गावर जा." हेडमास्तर म्हणाले. त्यांनी रजिस्टरमध्ये माझी जन्मतारीख 'तीन जानेवारी' अशी लिहिली, ती आजवर तशीच आहे. ज्या हेडमास्तरांनी माझे बारसे केले, त्यांचे नाव लक्षात नाही. ते गोठ्या मिश्यांचे व सूटबूट घातलेले होते. बहुतेक ते वसईचे ख्रिश्चन असावेत. हेडमास्तर शिस्तीबाबतीत कठोर होते. मुलांच्या पायात चपला नसतील तरी चालेल, पण डोक्यावर टोपी हवीच. टोपी नसेल तर डोक्यावर छडी बसे. हेडमास्तर वगळल्यास इतर सर्व मास्तरांचा ड्रेस ठरलेला असायचा. धोतर, शर्ट, शर्टावर कोट, शर्टाची कॉलर कोटाच्या कॉलरवर बसवलेली आणि डोक्यावर काळी टोपी. कपाळावर उभे किंवा आडवे गंध.</br> {{left|१४ | गोष्ट एका डॉक्टरची}}<noinclude></noinclude> fnplpr57i56kwjt55fq5rnu5meyxvm2 पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/९ 104 111951 236272 2026-08-27T15:28:26Z Shurpalimedha 5041 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{Css image crop |Image = गोष्ट एका डॉक्टरची.pdf |Page = 9 |bSize = 419 |cWidth = 419 |cHeight = 594 |oTop = 3 |oLeft = 0 |Location = center |Description = }}" 236272 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>{{Css image crop |Image = गोष्ट एका डॉक्टरची.pdf |Page = 9 |bSize = 419 |cWidth = 419 |cHeight = 594 |oTop = 3 |oLeft = 0 |Location = center |Description = }}<noinclude></noinclude> lnz4mmy7wunkffrltela2i1oe1ndnru 236273 236272 2026-08-27T15:29:02Z Shurpalimedha 5041 236273 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>{{Css image crop |Image = गोष्ट एका डॉक्टरची.pdf |Page = 9 |bSize = 419 |cWidth = 419 |cHeight = 694 |oTop = 3 |oLeft = 0 |Location = center |Description = }}<noinclude></noinclude> 4akcjcpyvj7oj94cducopwbaemu1vww सदस्य चर्चा:Anant Thakre 3 111952 236274 2026-08-27T15:54:30Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 236274 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Anant Thakre}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) २१:२४, २७ ऑगस्ट २०२६ (IST) tmhdmc3y3o4l3z328b8nptosb3mtpcv पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/११९ 104 111953 236285 2026-08-28T09:39:06Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236285 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०० |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>away, the embodiment of a spirit that once lived and rejoiced and sorrowed here."<br>{{gap}}या इमारतींच्या नंतर जवळ जवळ एक मैल चालत गेल्यावर रणकोटविहार नांवाचा मोठा दागबा किंवा स्तूप आपली दृष्टि वेधतो. या स्तूपाचें काम विटांचें आहे. आतां विटांचा गिलावा बहुतेक पडला असून विटांच्या भेगांतून गवत व झुडपें वाढत चालली आहेत.<br>{{gap}}हा दागबा पाहून पुढे गेलें म्हणजे बुद्धसिंह प्रासाद नांवाची इमारत लागते. नंतर '''लंकातिलक''' अथवा जेतवाराम विहार नांवाचा दागबा लागतो. याचें अवशिष्ट काम सुद्धां मनुष्याचें मन थक्क करून सोडणारें आहे. प्रारंभीच एखाद्या युरोपांतील प्रार्थनामंदिराप्रमाणें लांबच लांब पायऱ्या लागतात व अष्टपैलू उंच प्रचंड खांबावर उभारलेली भव्य कमान लागते. आंत बुद्धाची चाळीस फूट उंचीची भव्य मूर्ति दृष्टीस पडते. या दागबाचा प्रमाणशीरपणा व भव्यता आश्चर्यकारक आहे यांत शंका नाहीं. हा दागबा वातदागेच्या तोडीचा आहे. त्यांतील तरतमभाव शोधून काढणे कठीण आहे. नंतर किरीविहार नांवाचा छोटा दागबा लागतो. जरा पुढे गेल्यावर एक खडकांतील खोदलेलें गोलविहार नांवाचें देऊळ लागतें. खडकांत खोदलेली बुद्धाची बैठी ध्यानस्थ मूर्ति आहे. ती नेहमीच्याप्रमाणें आहे, पण या देवळाला लागून असलेल्या लांबच लांब खडकांत बुद्धाची निर्वाण स्थितींतील निजलेली भव्य मूर्ति आहे व त्याचे डाव्या बाजूस बुद्धाचा आवडता शिष्य आनंद याची दुःखाश्रुपूर्ण अशी मूर्ति आहे. या दोन मूर्ति व पुलनरुवाच्या विश्रामगृहा नजीकच्या इमारतींतील हातांत पुस्तक असलेली पराक्रमबाहूची मानलेली तिसरी मूर्ति; या तीन मूर्ति भव्यता, गंभीरता, भावनादर्शकता, इत्यादि गुणांमध्यें लंकेतील पहिल्या प्रतीच्या मूर्ति होत असे सर्व कलाभिज्ञांचे मत आहे, या मूर्ति प्रत्यक्ष पाहिल्यावांचून त्या मूर्तीमध्यें दिसून येणारें मूर्तिकलाकौशल्य याची खरी कल्पना येणें शक्य नाहीं.{{nop}}<noinclude></noinclude> 70tqqsowkwrpd06fpa127mbwyk457dk पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१२० 104 111954 236286 2026-08-28T09:44:04Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236286 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेच्या जुन्या राजधान्या व मिहिंतले पर्वत|१०१ }}</noinclude>{{gap}}गोलविहार हें पोलनरुवाचें उत्तर दिशेचें या रस्त्यानें पाहतां येणारें शेवटचें प्रेक्षणीय स्थळ होय. तेथून परत येऊन मुख्य रस्त्याला मिळण्यापूर्वी पुनः उत्तरेकडे एक पाऊलवाट फुटतें; त्या पाऊल वाटेने गेलें म्हणजे प्रथम एक अष्टदल-कमलाकृति पुष्करणी लागते. लंकेसारख्या उष्ण देशामध्यें स्नानाच्या व जलविहाराच्या विशेष सोयी जुन्या राजवटींत केल्या जाव्या हें स्वाभाविक आहे. अशा स्नानगृहांची व पुष्करण्यांची विपुलता लंकेतील पुराणवस्तूंमध्ये दिसून येते. हीं स्नानगृहें व जलविहार मंदिरें या संबंधींची योजकता व कल्पकता अवर्णनीय आहे. हे जागोजाग असलेल्या दगडी स्नानगृहावरून तर दिसून येतेंच; पण लंकेतील अद्वितीय तीन भव्य मूर्तीप्रमाणें लंकेंत तीन अपूर्व अशी स्नानगृहें आहेत. त्यापैकीं पुलनरुवाचें कमलदल स्नानगृह हें एक होय. हे स्नानगृह अष्टपैलू असून प्रत्येक पैलू कमलदलाप्रमाणें घडविलेला आहे. आंत उतरण्यास सभोंवार तशाच कमलदलाकार पायऱ्या आहेत. या स्नानगृहाच्या कलाकुसरीची कल्पना तें पाहिल्याखेरीज येणें शक्य नाहीं. दुसरीं दोन स्नानगृहें मिहिंतले डोंगरावर आहेत. एकाचें नांव नागपुष्करणी होय. हे एक जीवंत खडकांत खोदून तयार केलेलें जीवंत पाण्याचें कुंड आहे. त्याला नागपुष्करणी म्हणण्याचें कारण कुंड खोदतांना खडकाचें वरच्या बाजूस पांच-फडी नागाची सुंदर व हुबेहुब आकृती पुष्करणीवर कोरली आहे. दुसरें सिंह-स्नानगृह नांवाची दगडाची बांधलेली पुष्करणी आहे. त्यांत दगडी नळानें पाणी येण्याची सोय असून, पुष्करणींतून पाण्याची धार सिंहाच्या जबड्यांतून पडते असें दाखविलें आहे. हेंही कोरलेलें सिंहाचें चित्र हुबेहुब आहे व सिंहाच्या जबड्यांतून येणाऱ्या पाण्याच्या धारेखालीं स्नान करण्याची कल्पना व योजना किती नवलाईची आहे.<br>{{gap}}या कमलदल पुष्करणीचे पुढें गेलें म्हणजे आणखी एक '''दमालामहासेया''' नांवाचा थूपाराम व जेतवनाराम विहारांच्या धर्तीवर बांधलेला दागबा दृष्टीस पडतो. हे तीन्ही दागबे एकाच पद्धतीवर बांधलेले<noinclude></noinclude> l2nl6dvcb7zgkq1w7joxgnofqskxzsb पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१२१ 104 111955 236287 2026-08-28T09:48:33Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236287 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०२ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>आहेत. दक्षिणेकडून उत्तरेकडे जातांना साधारण सारख्या अंतरावरच ते बांधलेले आहेत असें दिसतें. या दागबाचा विशेष म्हणजे तेथल्या भिंतीवरील रंगीत चित्रे होत. तीं सिगिरीया लेण्यांतील चित्राप्रमाणें आहेत. या तीन दागबावरून पुलनरुवा शहराचा विस्तार केवढा होता; व या शहरीं ललितकलांची प्रगती किती पराकाष्ठेची झाली होती हे दिसून येतें.<br>{{gap}}इतकी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यास जवळ जवळ अडीच तास लागले. मग मात्र उशीर झाला म्हणून मी तडक टपाल घरीं आलों. या सर्व वेळ झीमझीम पाऊस पडत होता. शिवाय, तीन चार तास पावसांत फिरलों होतों; खेरीज पोलनरुवा येथें हिवतापाची सांथ सदा असते म्हणून पोष्टमास्तर म्हणाले "तुम्हीं पुनः दृश्यदर्शनास निघू नका; पांच वाजल्यानंतर मी परत येईन व मग आपण सरकारी विश्रामगृहाकडे जाऊन '''तोपा''' तलाव पाहूं व पोलनरुवाचीं चित्रकार्डे विकत घेऊं व मी तुम्हांला अर्वाचीन काळचें एक बुद्ध देऊळ दाखवीन; उदईक सकाळी आपण पुढील मुक्कामास त्रिंकोमालीस मोटारनें जा." हा सल्ला मला पसंत पडला. म्हणून रा. हँडी बंगल्यावर परत येईपर्यंत मी बंगल्यांत बसून राहिलों व लंकेचीं मार्गदर्शक पुस्तकें चाळलीं. सायंकाळीं रा. हँडी हे परत आल्यावर त्यांचेबरोबर विश्रामगृहाला गेलों. हें विश्रामगृह मुख्य रस्त्याच्या उजव्या हातास जरा उंचवट्याच्या जागेवर बांधलेलें असून '''तोपावेवा''' तलावाच्या अगदीं काठांवर आहे. या विश्रामगृहाच्या व्हरांड्यांतून तोपा तलावाचा अवर्णनीय देखावा दिसतो यांत शंका नाहीं. केवढा विस्तीर्ण तो तलाव! तो थेट उत्तरेच्या डोंगरापर्यंत पसरलेला आहे असें भासतें. सभोवार दाट झाडांची गर्द छाया दिसते; ह्यायोगें पाणी काळसर हिरवट दिसतें. विश्रामगृहाचें पुढें खडक असल्यामुळे तलावाच्या मंद मंद लाटा खडकावर आपटत होत्या; या विश्रामगृहाची उपस्थिति व तेथून तलावाचा दिसणारा देखावा कितीही वेळ पाहिला तरी मनाचें समाधान होत नाहीं; पाऊस पडत असल्यामुळे व सायंकाळ होत चाल-<noinclude></noinclude> 6srwdi7reo559t3zr6pxtlol2ta1aab पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१२२ 104 111956 236288 2026-08-28T09:51:15Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236288 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेच्या जुन्या राजधान्या व मिहिंतले पर्वत|१०३ }}</noinclude>ल्यामुळे तलावाच्या बंधाऱ्याच्या पाऊल वाटेकडे आम्ही गेलों नाहीं. पोलनरुवाची दहाबारा चित्रकार्डे विकत घेऊन आम्हीं परत फिरलों; मग बुद्धधर्मी अर्वाचीन देऊळ पहाण्याकरितां गावांत गेलों. लंकेमध्यें बौद्धधर्म हा जीवंत व लोकांचा चालू धर्म असल्यामुळें बुद्धधर्मी नवीं देवळें बांधण्यांत येतात अशा देवळापैकीं हे देऊळ होतें; देऊळ फार मोठं नव्हतें. पुढें छोटेसें प्रवचनमंदिर होतें; देवळांत बुद्धाची बैठी ध्यानस्थ मूर्ति होती व त्याचे पुढे रुंद कठडा होता. या कठड्यावर बुद्धधर्मी लोक बुद्धाला अर्पण करावयाचीं फुलें ठेवतात. देवळाच्या सर्व भिंती व छताची तक्तपोशी या रंगविलेल्या असून त्यावर गौतम- बुद्धाच्या चरित्रांतील प्रसंगांची रंगीत चित्रे काढलेली होती; तसेंच कांहीं सृष्टिसौंदर्याचे देखावेही काढलेले होते. चित्रे बऱ्याच वरच्या दर्जाचीं होतीं. पण या देवळाचा आश्चर्यकारक विशेष म्हणजे देवळांच्या प्रदक्षिणामार्गाच्या आंतल्या भिंतीवर विजयापासून (म्हणजे ख्रिस्तपूर्व ३८३ पासून) कँडीच्या शेवटच्या विक्रमसिंह राजापर्यंत (इसवी सन १८१५) सर्व राजांचीं तैलचित्रें काढलीं असून त्याचे खालीं संगमरवरी दगडावर त्या राजांचीं नांवें व कारकीर्दीचे सन देणारे शिलालेख इंग्रजी व सिंहली भाषेत कोरलेले आहेत. हा या देवळाचा विशेष पाहून मला ब्रिटिश पार्लमेंटगृहांतील राजांच्या चित्रांची आठवण झाली. तीं चित्रे पाहून ज्याप्रमाणें लहान मुलांस लहानपणीं इंग्लंडचा इतिहास सहज समजण्याची सोय केलेली आहे तशी येथे लंकेच्या इतिहासासंबंधींची सोय केलेली पाहून मला आनंद व आश्चर्य वाटलें. आम्ही देवळांत शिरलों तेव्हां काळोखच पडला होता; पण माझे जवळ विजेचा दिवा होता म्हणून चित्रे पहाण्यास अडचण पडली नाहीं. नंतर बराच काळोख झाला म्हणून आम्ही तडक बंगल्यावर आलो. प्रातःकालीं रा. हँडी यांचा निरोप घेऊन मी मार्गस्थ झालों. झालें! पोलनरुवाचें माझें दृश्यदर्शन येथे संपलें. खरोखरीं या जुन्या राजधान्या सावकाशपणें पहाणें<noinclude></noinclude> 2k7qz90hedulbfwb4gpq405qyuuuhdg पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१२३ 104 111957 236289 2026-08-28T09:54:41Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236289 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०४ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>आवश्यक आहे. पण असें करण्यास लागणारा वेळ व पैसा कोठून आणणार? म्हणून मला आंथरूण पाहून पाय पसरावे लागले.<br>{{gap}}दुसरी जुनी राजधानी अनुराद्धपुर तिला मी त्रिंकोमालीहून मोटर मधून गेलों. तेव्हां त्या प्रवासवर्णनाकडे आतां वळणें बरें.<br>{{gap}}त्रिंकोमालीपासून अनुराद्धपुर ६७ मैल दूर आहे. सकाळी साडेसात वाजतां निघून सवा दहा वाजतां मी अनुराद्धपुरास पोहोंचलों. सर्व रस्ता डामरी व निर्धुळ होता. त्रिंकोमाली नजीकचें स्टेशन '''चायनाबे''' टाकलें तो लागलीच दाट व उंच अरण्यच अरण्य लागलें. शहरानजीक इतका दाट जंगलाचा मुलुख हिंदुस्थानांत फारच क्वचित् दृष्टीस पडतो. यामुळे या सडकेनें सारखे भरधाव चाललें असतांना मोठी मौज वाटते. कोठेंही वस्ती किंवा गांव लागत नाहीं; मोटारबस कोठेही थांबत नाहीं. सिनेमांतील देखाव्याप्रमाणें दोन्ही बाजूच्या दाट जंगलांतून सुंदर सरळ व गुळगुळीत सडकेनें आपली मोटारबस सारखी पळत राहते. हा देखावा '''होरावापोटाना''' गांवापर्यंत बदलत नाहीं; येथून पुढे मिहिंतले गांवापर्यंत जंगल कमी दाट व कमी उंच होतें; मधून मधून भाताची हिरवीगार शेतें दृष्टीस पडतात; लंकेचे विशेष नारळी केळी पोफळी यांच्या बागाही लागू लागतात व खेडीं व त्यांतील घरें डोकावतात; तसेंच मधून मधून तलावही लागतात. मिहिंतलेच्या नजीक तर फारच मोठें सरोवर लागतें. मग पुढील आठ मैलामध्यें तर भातशेती व बागाईत हीं सर्वत्र दिसूं लागतात. आपण पुष्कळ लोकवस्तीच्या पुष्कळ लागवडीच्या सुधारलेल्या भागांत आलों असें दिसून येतें तोंच अनुराद्धपुर शहराचा मुख्य रस्ता लागतो. या मुख्य रस्त्यावरच सेंट्रल हॉटेल नांवाचें हॉटेल लागतें. तेथें मीं उतरतों तों सवा दहा वाजले.<br>{{gap}}पोलनरुवा ही अनुराद्धपुरानंतर हजार वर्षांनीं झालेली लंकेची राजधानी होय; तर अनुराद्धपुर ही फार पुरातनकाळची राजधानी होय. पण या दोन राजधान्यामध्यें सध्यां किती जमीन-अस्मानाचें अंतर वाटतें.{{nop}}<noinclude></noinclude> oxdukqf7jcflr830iv656tuaeog8efy पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१२४ 104 111958 236290 2026-08-28T09:56:10Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "<br> {{center|'''अनुराद्धपुर, लोहप्रासादाचे दगडी खांब.'''}} {{rh|नं. १३||पान १०५}} {{nop}}" 236290 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|'''अनुराद्धपुर, लोहप्रासादाचे दगडी खांब.'''}} {{rh|नं. १३||पान १०५}} {{nop}}<noinclude></noinclude> cnr49j1jyp6kzfvnmc5e1c6e273pam4 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१२५ 104 111959 236291 2026-08-28T09:59:28Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236291 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेच्या जुन्या राजधान्या व मिहिंतले पर्वत|१०५ }}</noinclude>पोलनरुवा हें सध्यां रेलवेरस्ता झाल्यापासून वसलेले नवें खेडेगांव आहे तर अनुराद्धपुर हें सध्यां चांगलें गजबजलेलें शहर आहे.<br>{{gap}}येथें निरनिराळ्या सरकारी खात्याच्या कचेऱ्या आहेत; येथे मोठी बाजारपेठ आहे; येथें पुष्कळ खांसगी बंगले व घरें आहेत; येथे खासगी हॉटेलें आहेत. अर्थात् पोलनरुवाप्रमाणें हें पडकें जुन्या इमारतीचें अवशेष असलेलें "गडप झालेलें शहर" वाटत नाहीं; तर पुनरुज्जीवित गजबजलेलें व रस्त्याच्या दोन्ही बाजूस मधून मधून जुन्या इमारती अंसलेलें लोकवस्तीचें चालू शहर वाटते. येथें नारळी पोफळी केळीच्या स्वतंत्र बागा व बंगल्याभोंवतींच्या बागा व फळझाडें जिकडे तिकडे दृष्टीस पडतात.<br>{{gap}}सामान खोलींत टाकून चहा घेऊन मी लागलीच दृश्यदर्शनास बाहेर पडलों.<br>{{gap}}"ब्रेझन पॅलेस" किंवा जुनें नांव लोहप्रासाद हा मुख्य रस्त्याला लागून सेंट्रल हॉटेलनजीक आहे. आतां या प्रासादाचे तळमजल्याचे बिन घडलेले एकसंधी खांबच शिल्लक आहेत; पण हे खांब सहज न मोजतां येण्याइतके आहेत; खांबाचें हें एक रानच आहे असें वाटतें. हा पूर्वकाळी मोठा नऊ मजली बुद्ध भिक्षूंना राहण्यास बांधलेला मोठा प्रचंड विहार होता. या विहाराच्या प्रचंडतेची कल्पना हल्लीं उभ्या असलेल्या खांबांच्या रानावरून सुद्धां येते यांत शंका नाहीं; सध्यां या खांबानीं व्याप्त जागेच्यामध्यें लहानशी कुडलेली निवाऱ्याची व राहण्यासारखी जागा बांधण्यांत आली आहे व त्यांत दोन चार बुद्ध भिक्षू राहतात. मुख्य रस्त्याला आडवा रस्ता लागतो. त्या रस्त्यानें डावीकडे गेलें म्हणजे अनुराद्धपुराला पवित्र यात्रास्थानाचा मान मिळवून देणारें पिंपळवृक्षाचें देवालय लागतें. लंकेंत बौद्धधर्माचा फैलाव झाला, त्याकाळीं अशोकाच्या सुमित्ता नांवाच्या मुलीनें हिंदुस्थानांत ज्या पिंपळवृक्षाखालीं गौतमबुद्धाला धर्मज्ञान झालें, त्या पिंपळाची एक खांदी लंकेत आणली व ती देवानांपियतिस्स राजानें या ठिकाणीं लावली व त्याचा वृक्ष झाला. तोच वृक्ष<noinclude></noinclude> 40bo7qp6blewef1rilqcbfur88ipvsv पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१२६ 104 111960 236292 2026-08-28T10:02:53Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236292 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०६ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>अजून जीवंत असून त्याचें दर्शन घेण्याकरितां हजारों बौद्धधर्मी यात्रेकरू अनुराद्धपुरास येतात. जगांतील हा सर्वांत जुना जीवंत वृक्ष होय असें समजतात. या वृक्षदेवालयाचे मोठे आवार आहे. सभोवार विटांची भिंत असून प्रवेशद्वार उंच व भव्य आहे. प्रवेशद्वाराजवळ बूट टोपी काढून आंत प्रवेश केला, तों पिंपळाचे पारच पार सर्व आवारांत दिसून आले. मूळच्या पवित्र पिंपळाच्या झाडासभोवती तर पारावर पार असा तिहेरी पार आहे व त्याला उजव्या बाजूनें वर जाण्यास पायऱ्या केलेल्या आहेत. पहिल्या पाराच्या चवथऱ्यावर समोरच गणपतीची मूर्ति पाहून मला आश्चर्य व आनंद वाटला. ही गणपतीची मूर्ति इलाला नांवाच्या लंकेच्या तामिळ राजानें तेथें बसविली, तेव्हांपासून ती तेथेंच आहे. पुढील बौद्ध राजांनीं ती काढून टाकली नाहीं. लंकेमध्यें हिंदुधर्मी व बौद्धधर्मी लोकांमध्ये इतकी सहिष्णुता व सलोखा पाहून मला त्या लोकांचे मोठं कौतुक वाटलें. गणपतीचे दर्शन घेऊन मी पायऱ्यांनी पहिल्या पारावर गेलों; प्रत्येक पारावर प्रदक्षिणेपुरती वाट आहे; असे आणखी दोन पार लागतात; तेव्हां पिंपळवृक्षाच्या शेवटच्या पाराचे बंद केलेले फाटक लागतें; हा जुना पिंपळवृक्ष फार मोठा नाहीं; सध्यां त्याच्या दोन फांद्या स्वतंत्र वृक्षाप्रमाणे वाढलेल्या आहेत; आडव्या वाढलेल्या वृक्षाच्या फांद्यांना पितळेच्या खांबाचा आधार किंवा धिरा दिलेला आहे. या पिंपळाची गळलेली किंवा जून पानें बौद्धधर्मी लोक पवित्र म्हणून घरी घेऊन जातात! मी सुद्धां एक पान घेऊन खिशांत घातलें व कांहीं दिवस तें माझ्या ट्रंकेत होतें. या पिंपळाचे पारानजीक बुद्धाची मूर्ति असलेलें एक सभामंडपवजा देऊळ आहे. तेथें बुद्धाची नेहेमीची बैठी ध्यानस्थ मूर्ति असून त्याला फुलें अर्पण करण्यास एक लांकडाचा रुंद कठडा मूर्तीच्या गाभाऱ्यापुढे आहे. त्यांवर नाना रंगाचीं व नाना जातीचीं फुलेंच फुलें दिसली. मागें उल्लेख केल्यानुमाणे त्या आवारांत किती तरी पिंपळाचे वृक्ष असून त्या प्रत्येकाला लहानमोठा दगडी पार बांधलेला आहे. अर्थात् हे सर्व पिंपळ वृक्ष मूळ वृक्षाच्या फांद्या, पारंब्या यापासून झालेले आहेत.{{nop}}<noinclude></noinclude> r1gh1z83ahee7n3mbpyxosmchrqca45 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१२७ 104 111961 236293 2026-08-28T10:05:47Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236293 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेच्या जुन्या राजधान्या व मिहिंतले पर्वत|१०७ }}</noinclude>{{gap}}ज्याप्रमाणें कँडी शहरामध्यें बुद्धाचें दंत देवालय हें मुख्य यात्रास्थान होय, त्याप्रमाणें अनुराद्धपुरामध्यें हा पिंपळाचा पार हें पवित्र यात्रास्थान होय. या पिंपळवृक्षाच्या देवळावरून 'पवित्र सडक' नांवाची आडवी सडक लांबवर जाते व या सडकेच्या दोन्ही बाजूस जुन्या इमारती व देवळें यांचे अवशेष दृष्टीस पडतात. ही पूर्वी मोठी मेघवन नांवाची बाग होती; अझून ही जागा मोकळीच असून, त्यांत उंच उंच जुनाट वृक्ष पुष्कळ आहेत. पवित्र सडकेनें जरासें पुढें गेलें म्हणजे '''रुवनेवली दागबा''' नांवाचा अनुराद्धपुरांतला सर्वांत जुना स्तूप यांचें आवार व फाटक लागतें. या आवारांतील नीटनेटक्या पाऊलवाटेनें आंत गेलें की उजव्या हातास बुद्ध भिक्षूंना राहण्याच्या अर्वाचीन इमारती लागतात व समोर स्तूपाचें जोतें व पायऱ्या लागतात. याचे उजव्या हातास एक बौद्धधर्मी मंडळाच्या कचेरीची छोटी इमारत लागते. बूट टोपी येथेंच काढून ठेवावी लागते. पायऱ्या चढून वर गेलें कीं, समोरच छोटेसें देऊळ लागतें, त्यांत बुद्धाची मूर्ति आहे. डाव्या हातास सोप्यावजा इमारत आहे. त्यांत पांचसहा उभ्या मूर्ति बसविलेल्या आहेत; पायऱ्याच्या दोन्ही बाजूस राजा-राणी यांच्या मूर्ति आहेत. पण या सर्व नव्याच मूर्ति असाव्यांत असें वाटतें. कारण हा दागबा पुष्कळ वेळा पडून पुनः पुनः बांधण्यांत आलेला आहे. सध्यांसुद्धां छोट्या देवळाच्या मागच्या प्रचंड स्तूपाचें बांधकाम नवेंच चालू असून तें बहुतेक पुरें होत आलें आहे. या स्तूपाच्या मुख्य घुमटाचें व त्याच्यावरील चवथऱ्याचे काम संपले असून फक्त चवथऱ्यावरचा मनोरा व छत्री फक्त व्हावयाची राहिली होती; पण केवढे प्रचंड हें बांधकाम आहे. त्या घुमटाच्या सभोंवार कितीतरी फरसबंदी खुली जागा आहे. यामुळे या स्तूपाची भव्यता वाढते यांत शंका नाहीं. या स्तूपाचें काम चालू असल्यामुळें घुमटाचे वर जाण्यास तात्पुरत्या शिड्या व जिने केलेले होते; त्यानीं आम्हीं वर गेलों. दहावीस जिने व शिड्या चढाव्या लागल्या असतील; जसजसे वर चढत जावें तसतसा सभोंवारचा अधिक अधिक<noinclude></noinclude> irence3jymyjh4ujjw9heykpqgmc9sn पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१२८ 104 111962 236294 2026-08-28T10:08:27Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236294 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०८ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>मनोवेधक देखावा दिसूं लागे. वरच्या चवथऱ्यावर चढल्यावर तर फारच दूरवरचा हिरवा हिरवागार देखावा दिसत होता. हा सर्व भूमिभाग अगदीं सपाट असून त्यावर दाट जंगल आहे; मधून मधून पांढऱ्या पाण्याचे तलाव व पाट दृष्टीस पडत होते. यांवरून पूर्वीच्या राजवटीमध्ये हा सर्व प्रांत पूर्ण लागवडीस आणलेला व दाट वस्तीचा असावा असें वाटल्यांवाचून रहात नाहीं. या उंच चवथऱ्यावरून अनुराद्धपुराचा पूर्वीचा विस्तार केवढा मोठा होता हे स्पष्टपणे कळलें. तेथून तीन मोठे स्तूप व दोन लहान स्तूप असे पांच स्तूप दिसतात. राजवाडे, विहार, चैत्य व खासगी घरें यांचे अवशेष तर जिकडे तिकडे पिसकारलेले दृष्टीस पडतात. अभयगिरी व जेतावराम दागबा हे थेट पुलनरुवा येथील दागबासारखेच दिसत होते; त्यावर हिरवेगार गवत व झाडेझुडपें उगवलेली दिसत होतीं. या शहरांत '''बसवकूल, तिसावेवा, न्यूवारावेवा''' असे तीन तलाव आहेत; शिवाय लहान लहान तलाव व पुष्करणी व स्नानगृहें तर किती तरी आहेत. ज्याप्रमाणें अर्वाचीनकाळीं पाश्चिमात्य देशांतील शहराच्या एखाद्या टॉवरच्या माथ्यावर गेले म्हणजे एकसमयावच्छेदेंकरून शहराची शोभा पाहण्यास सांपडते त्याप्रमाणें या दागबावर चढून जाण्याची सध्यां सोय असल्यामुळें अनुराद्धपूर शहर व त्याची नवी वस्ती व जुने अवशेष हे सर्व एकसमयावच्छेदेंकरून पाहण्यास सापडलें. या स्तूपाचें काम प्रचंड आहे. वरच्या चवथऱ्यावरून खालीं पाहिलें म्हणजे माणसें बाहुल्याप्रमाणें दिसतात; इतकें तें शिखर उंच आहे. या बांधत असलेल्या स्तूपावरून पूर्वीचे स्तूप कसें बांधीत असतील याची उत्तम कल्पना आली. भाविकपणानें किती तरी बौद्ध लोकांनीं डागडागिने व इतर मौल्यवान् वस्तू या स्तूपाचे बांधकामामध्ये टाकण्यास दिल्या असें मला कळलें. यावरून बुद्ध धर्माच्या जीवंतपणाची मला साक्ष पटली. खाली उतरून या रस्त्यानें पुढें गेलें म्हणजे उजवे बाजूस मोठें महा मेघवन नांवाचें उपवन लागतें. त्यांत कितीतरी विहार, स्नानगृहें व दागबा यांचे अवशेष लागतात. त्याचें बऱ्याच उजव्या हाताला अभयगिरी दागबा लागतो.<noinclude></noinclude> 9je0q6y6tpql8in9yomfi6csaru3z1c पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१२९ 104 111963 236295 2026-08-28T10:11:05Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236295 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेच्या जुन्या राजधान्या व मिहिंतले पर्वत|१०९ }}</noinclude>हा रुवनवेली सारखाच प्रचंड दागवा आहे. पण तो हल्ली बराच जीर्ण झालेला आहे. विटांवरील गिलावा जाऊन त्यावर गवत व झाडझाडोरा वाढला आहे. जरा पुढें गेलें कीं डाव्या बाजूस थूपाराम हा छोटा सुबक, सुंदर व सलग असलेला दागबा लागतो. आणखी सुमारें अर्धा पाऊण मैल चालल्यावर उजव्या बाजूस लंकाराम हा छोटा व जेतवानराम हा प्रचंड दागबा लागतो व इतर इमारतीचे अवशेष लागतात. अनुराद्धपुरचीं प्रख्यात पुरातन देवळें मुख्यतः याच पवित्र सडकेच्या बाजूला आहेत; बाकी अनुराद्धपुर हें त्याच्या वैभव काळीं लंडन शहरासारखें फारच विस्तीर्ण शहर असल्यामुळे दहावीस मैलांच्या घेरांत इमारतीचे पडके अवशेष- कोरलेले खांब, मोडक्या मूर्ति, घडलेले दगड, खांबाच्या वरची व खालची उथळी, अर्धचन्द्राकार पायऱ्या, जाळीदार खिडक्या- इत्यादि नाना खोदकलेचीं कामें दृष्टीस पडतात. बाहेरील वाटोळी सडक नांवाच्या सडकेनें मोटारींतून गेलें म्हणजे या अवशेषाचे धावतें दर्शन होतें व अनुराद्धपुराच्या पूर्ववैभवाचें व विस्ताराचें आश्चर्य वाटते. या शहरामधील तीन मोठमोठे तलाव फार प्रेक्षणीय आहेत. स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यानें गेलें म्हणजे अनुराद्धपुरच्या पाण्याच्या विपुलतेचा व विलक्षण लागवडीचा प्रत्यय येतो. आधीं सतत वाहणाऱ्या मलवातु ओया नांवाच्या नदीचा सुंदर पूल लागतो; मग धोधो वाहणारे पाट लागतात व सभोवारच्या सपाट प्रदेशामध्यें भाताची हिरवी हिरवीगार शेतेंच शेतें व केळी, नारळी व पोफळी यांच्या बागाच बागा लागतात. त्यावरून त्या प्रांताच्या सुपीकतेबद्दल व पूर्वीच्या राजवटीत केलेल्या पाणीपुरावठ्याच्या सोयीबद्दल आश्चर्य व आनंद वाटतो. या वाटेने जातांना व शहरांतील मुख्य रस्त्यांच्या बाजूला किती तरी लहान लहान तलाव व स्नानगृहें लागतात. उष्ण देशांत थंड पाण्याच्या स्नानासारखी सुखकारक गोष्ट नाहीं हें जाणून पूर्वीच्या काळीं सुंदर स्नानगृहें व पुष्करणी बांधण्याचा फार प्रघात होता असें पदोपदीं दिसून येतें.{{nop}}<noinclude></noinclude> 46ko8knd92nz0p588qfmtzecycbbusx