विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.17 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk सदस्य:कल्पनाशक्ती 2 66162 236406 230206 2026-08-31T07:53:37Z कल्पनाशक्ती 3813 236406 wikitext text/x-wiki मला मराठी साहित्याची आवड आहे. Contest: Ratnagiri-GJC-OJT NEP Pilot-Sanskrit Wikisource Project<br> Start date and time: 2025-12-02 00:00:01 UTC<br> End date and time: 2026-06-16 23:59:59 UTC<br> https://wscontest.toolforge.org/c/342 Contest: Wikimedia Education Program - National Education Policy Pilot Project at Fergusson College, Pune Start date and time: 2026-01-28 00:00:01 UTC End date and time: 2026-06-30 23:59:59 UTC https://wscontest.toolforge.org/c/354 Goa University Workshops for Konkani Wikisource 26, 27, 28 Feb 2026<Br> 1.      26<sup>th</sup> February 2026- Government College of Arts Science and Commerce, Qupem, Goa<br> 2.      27<sup>th</sup> and 28<sup>th</sup> February 2026- Cuncolim Educational Society’s College of Arts and Commerce.- <br> proofreading of a book by Ravindra Kelekar; तुळशी and partial proofreading of book अघळ पघळ == following books can be accessed using wikireader app == === शरद जोशी === ग्रंथ संख्या - १३ [[शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती|शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती]], [[चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न|चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न]], [[शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख|शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख]], [[खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने|खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने]], [[अंगारमळा|अंगारमळा]], [[अन्वयार्थ - १|अन्वयार्थ - १]] (Linked to English Wikipedia), [[अन्वयार्थ – २|अन्वयार्थ – २]] (Linked to English Wikipedia), [[माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो...|माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो...]], [[बळीचे राज्य येणार आहे!|बळीचे राज्य येणार आहे!]] (Linked to English Wikipedia), [[अर्थ तो सांगतो पुन्हा|अर्थ तो सांगतो पुन्हा]] (Linked to English Wikipedia), [[पोशिंद्याची लोकशाही|पोशिंद्याची लोकशाही]] (Linked to English Wikipedia), [['भारता'साठी|'भारता'साठी]] (Linked to English Wikipedia), [[राखेखालचे निखारे|राखेखालचे निखारे]] (Linked to English Wikipedia) === जाई निंबकर === ग्रंथ संख्या - ४ [[साथ|साथ]], [[कमळाची पानं|कमळाची पानं]], [[अर्धुक|अर्धुक]], [[अ‍ॅलिस|अ‍ॅलिस]] === शैला लोहिया === ग्रंथ संख्या - ११ कादंबऱ्या- [[इत्ता..इत्ता..पाणी|इत्ता इत्ता पाणी]], [[शोध अकराव्या दिशेचा|शोध अकराव्या दिशेचा]] कथासंग्रह- [[आपले आभाळ पेलताना|आपलं आभाळ पेलताना]], [[कथाली|कथाली]], [[मनतरंग|मनतरंग]], [[तिच्या डायरीची पाने|तिच्या डायरीतील पाने]] कविता संग्रह- [[कविता गजाआडच्या|कविता गजाआडच्या]] अन्य ललित वाङ्मय- [[रुणझुणत्या पाखरा|रुणझुणत्या पाखरा]], [[वाहत्या वाऱ्यासंगे|वाहत्या वाऱ्यासंगे]], [[स्वरांत|स्वरान्त]] संशोधन / समीक्षा ग्रंथ- [[भूमी आणि स्त्री|भूमी आणि स्त्री]] === नरहर कुरूंदकर === ग्रंथ संख्या - ४ [[हैदराबाद विमोचन आणि विसर्जन|हैदराबाद विमोचन आणि विसर्जन]], [[वाटचाल|वाटचाल]] (Linked to English Wikipedia), [[पायवाट|पायवाट]] (Linked to English Wikipedia), [[परिचय|परिचय]] (Linked to English Wikipedia), [[ओळख]] ===इरावती कर्वे === ग्रंथ संख्या - १+ 3 [[भोवरा|भोवरा]] (Linked to English Wikipedia), verified- [[परिपूर्ती]], [[गंगाजल]], [[युगान्त]], I have not worked on this- [[आमची संस्कृती]] ===दत्तात्रय बळवंत पारसनीस=== ग्रंथ संख्या - १ [[बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र|बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र]] === डॉ. सुधा कोठारी === ग्रंथ संख्या - १ [[‘चैतन्य’ चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन|‘चैतन्य’ चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन]] ===[https://mr.wikipedia.org/wiki/पुरुषोत्तम_गणेश_सहस्रबुद्धे][[w:पुरुषोत्तम_गणेश_सहस्रबुद्धे|पु. ग. सहस्रबुद्धे]] === ग्रंथ संख्या - १३ प्रबंध- [[महाराष्ट्र संस्कृती|महाराष्ट्र संस्कृती]] linked to marathi wikipedia, [[विज्ञान-प्रणीत समाजरचना|विज्ञान-प्रणीत समाजरचना]] linked to marathi wikipedia, [[साहित्यातील जीवनभाष्य|साहित्यातील जीवनभाष्य]] linked to marathi wikipedia निबंध-संग्रह- (all linked to marathi wikipedia)- [[माझे चिंतन|माझे चिंतन]], [[वैय्यक्तिक व सामाजिक|वैय्यक्तिक व सामाजिक]], [[भारतीय लोकसत्ता|भारतीय लोकसत्ता]], [[भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म|भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म]], [[इहवादी शासन|इहवादी शासन]], [[हिंदुसमाज संघटना आणि विघटना|हिंदुसमाज संघटना आणि विघटना]], [[लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान|लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान]], [[सौंदर्यरस|सौंदर्यरस]], [[लोकहितवादींची शतपत्रे|लोकहितवादींची शतपत्रे]], [[केसरीची त्रिमूर्ति|केसरीची त्रिमूर्ति]] === [[w:श्रीपाद_महादेव_माटे|श्री. म. माटे]] === मराठी विकिपीडिया - https://w.wiki/AykH ग्रंथ संख्या - ३ (all linked to marathi wikipedia) [[पाश्चात्य पुरुषश्रेष्ठ|पाश्चात्य पुरुषश्रेष्ठ]], [[कर्तबगार स्त्रिया|कर्तबगार स्त्रिया]], [[अस्पृश्य -विचार|अस्पृश्य -विचार]] === [[साहित्यिक:पांडुरंग सदाशिव साने]] === साने गुरुजी मराठी विकिपीडिया - https://w.wiki/AykX ग्रंथ संख्या - ३ [[पुरातत्वभूषण कै. इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र]] linked to marathi wikipedia, [[ना. गोखले चरित्र]] linked to marathi wikipedia, [[इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र]], [[कला आणि इतर निबंध]], [[हिमालयाची शिखरें]], [[भारतीय नारी]]- validation wikidata entry, [[आपण सारे भाऊ]]- validation wikidata entry, [[स्त्री-जीवन]], [[देशबंधु दास]] === काशिनाथ नारायण साने === ग्रंथ संख्या - १ [[श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर]] Reader App साठी खालील पुस्तकांवर काम केले. [[महाबळेश्वर]]- चुका दुरुस्ती, wikidata entry, [[मराठी रंगभूमि]]- चुका दुरुस्ती, wikidata entry, [[अंगारवाटा...शोध शरद जोशींचा]]- चुका दुरुस्ती, wikidata entry === हमीद दलवाई , मेहरून्नीसा दलवाई === [[कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा]]- चुका दुरुस्ती, wikidata entry, [[राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान]]- चुका दुरुस्ती, wikidata entry, [[मी भरून पावले आहे]], [[लाट]], === सुनीलकुमार लवटे === [[प्रशस्ती]], [[शब्द सोन्याचा पिंपळ]], [[वाचावे असे काही]], [[मराठी वंचित साहित्य]], [[प्रेरक चरित्रे]], [[एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न]], [[वि. स. खांडेकर चरित्र]], [[कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक]], [[जाणिवांची आरास]], [[नवे शिक्षण, नवे शिक्षक]], [[साहित्य आणि संस्कृती]] === श्री. ग. माजगावकर === [[श्रीग्रामायन]], [[निर्माणपर्व]], [[बलसागर]] === तारा भवाळकर === [[मनातले जनात (स्त्री विषयक लेखसंग्रह )]], [[लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा]], [[मधुशाला]], [[यक्षगान आणि मराठी नाट्य-परंपरा]], [[राणीसाहेब रुसल्या]] ===लक्ष्मीकांत देशमुख=== [[पाणी! पाणी!!]], [[प्रशासननामा]] ===वर्षा देशपांडे=== [[कोयत्याच्या मुठीत]] ===हरि नारायण आपटे=== [[स्फुट गोष्टी भाग तिसरा]], [[स्फुट गोष्टी भाग ४ था]], [[मराठी वाड्मयाचा अभ्यास]] === धर्मानंद दामोदर कोसंबी === [[बुद्ध, धर्म आणि संघ]], [[निवेदन]] ===रा. द. रानडे (गुरुदेव रानडे)=== [[नित्यनेमावली]], [[रामदासवचनामृत]], [[श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ]]- लेखक वसंतराव देशपांडे ===गोविंद चिमणाजी भाटे=== [[काशी-रामेश्वर यात्रा]], [[सज्जनगड व समर्थ रामदास]], [[सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत]], [[तीन तत्त्वज्ञानी]], [[समाजशास्त्रावरील व्याख्याने]], [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास]], लंकेचें वर्णन व वृतांत === इतर === [[सोट्याह्मसोबा मेळ्याची पदें शके १८४५]], [[बालबोध पुस्तक चौथे]]- 1885, [[मराठी दुसरें पुस्तक (बालबोध)]], [[भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी]], [[बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी]], [[मृच्छकटिक]]- अमरेंद्र, [[लोक संस्कृतीचा गाभारा]]- राजेंद्र माने, [[इचलकरंजी संस्थानाचा इतिहास]]- वासुदेव वामन खरे, [[काशीयात्रा]], [[आर्य-स्त्री-रत्ने]]- यशोदाबाई भट, [[किर्लोस्कर संगीत मंडळी]]- शंकर बापूजी मुजुमदार, [[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]], [[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड)]], [[माझा जन्मभरचा एक उद्योग]]- न. चि. केळकर 4tk81v2jiltnws93xh799cr4sm268e8 अनुक्रमणिका:सांगली आणि सांगलीकर.pdf 106 74682 236395 236349 2026-08-30T15:46:40Z कल्पनाशक्ती 3813 236395 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=सांगली आणि सांगलीकर |Language=mr |Volume= |Author=अविनाश टिळक |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=सांगली नगरवाचनालय |Address=सांगली |Year=2001 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 5="स्वागत" 13="लेखनामागील भूमिका" 17="प्रकाशकांचे मनोगत" 18="ऋणनिर्देश" 19="अनुक्रम" 20="महिमा सांगलीचा" 21="सांगलीचे आराध्य दैवत" 22="फोटो" 23="फोटो" 24="फोटो" 25="सांगली - एके काळची रम्य नगरी" 35 ="सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन" 46 ="महाराष्ट्राचा आद्य नाटककार विष्णुदास भावे" 55="नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल" 67="कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर" 79 ="संत कोटणीस महाराज" 91="आबासाहेब सांबारे" 101 ="साधुदास" 111 ="अुद्योगरत्न कै. दादासाहेब वेलणकर" 123="प्रो. ग. ह.रानडे"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} nsav2vx5toage3qt96fvpwevjj6lsvv पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२३ 104 77649 236396 202551 2026-08-30T15:48:41Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236396 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude> {{center|{{x-larger|शास्त्रीय संगीताचे गाढे व्यासंगी}}}} {{center|{{xx-larger|प्रो. ग. ह.रानडे}}}} {{rule}}{{rule|height=4px}}{{rule}} {{gap}}ही कथा आहे संगीताच्या एका निःसीम उपासकाची. संगीतकलेचा आविष्कार करुन दाखवण्याची किमया, आवाजाची अनुकूलता नसल्याने नव्हती पण त्याची कसर या साधकाने आयुष्यभर त्या महान कलेची शास्त्रीय अुपपत्ती समजून घेण्यात व समजावून देण्यात भरुन काढली.<br> {{gap}}हा संगीततज्ञ म्हणजे प्रो. ग.ह रानडे.<br> {{gap}}१ ऑक्टोबर १९९७ रोजी त्यांची जन्मशताब्दी झाली म्हणून त्यांचे थोडे तरी स्मरण केले गेले, अन्यथा विस्मृतीच्या गर्तेत गेलेल्या या गुणीजनाचे सर्वसामान्य रसिकालाहि नाव माहीत असणे तसे कठीणच !<br> {{gap}}आजचे एक आघाडीचे संगीत समीक्षक, संगीतशास्त्राविषयी अुत्तम बोलतात, गाण्याच्या शास्त्रीय अंगाविषयी भरभरुन बोलतात, त्यात त्यांचा पराकोटीचा अभ्यास दिसून येतो; मात्र तोच माणूस तंबोरा घेऊन मैफलीत गायला बसतो तेंव्हा कुठे गेली याची प्रतिभा असा सामान्य श्रोत्याला प्रश्न पडतो.<br> {{gap}}असंच काहीसं प्रो. गणपतरावजी रानडे यांचे बाबतीत झालं. आवाजाची अनुकूलता नसल्यामुळे असेल, किंवा वयाच्या सत्ताविसाव्या वर्षानंतर गायनास सुरुवात केल्यामुळे असेल. मात्र गायक म्हणून जरी त्यांची छाप पडली नसली तरी संगीतातील शास्त्रीय अंगाचा गाढा व्यासंगी म्हणून कै. भातखंडेबुवांच्या बरोबरीने त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतले जातं.<br> {{gap}}प्रो. ग. ह. रानडे हे व्यवसायाने प्राध्यापक, फिजिक्सचे प्राध्यापक. त्यामुळे त्यानी संगीताचा, शास्त्रीय दृष्टीकोनातून, विचार केला आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे ‘फिजिक्स' च त्यानी पुस्तकाद्वारे, संगीताच्या अभ्यासकांसमोर मांडून, त्यांच्यावर मोठे अपकारच केले आहेत.<br> {{gap}}अशा या गणपतराव रानडे यांचा जन्म सांगलीत १ ऑक्टोबर १८९७ रोजी झाला. रानडे यांचे पूर्वज मूळ कोकणातले, मौजे जामसांडे, तालुका देवगड<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर................................९९</noinclude> mk1hh0h8ksz4ucz3gmf90q84s01z0js पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२४ 104 77650 236397 202555 2026-08-30T15:56:05Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236397 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>मधले. कोकणातील अितर अनेक नामवंत चित्पावन घराण्यांप्रमाणे, त्यांचे पूर्वज नशीब काढण्यासाठी देशावर आले. रानडे यांचे वडील मिरज संस्थानात नोकरीस होते. त्यांचे आजोळ सांगली येथील प्रसिद्ध ओक-फडणीस घराण्यातील. रानडे यांचे आई-वडील लहानपणीच निवर्तले. त्यामुळे त्यांचे पालनपोषण आजोळीच झाले. त्यांचे आजोबा भाऊसाहेब फडणीस हे प्रख्यात बुद्धिबळपटू तर होतेच पण संस्थानिक, सांगलीकर राजेसाहेब यांचेबरोबर घरोबा असलेले प्रतिष्ठित गृहस्थ होते. सांगलीतील सुप्रसिद्ध राजवैद्य आबासाहेब सांबारे आणि प्रख्यात संत तात्यासाहेब कोटणीसमहाराज, यांच्या निकटवर्तियांत त्यांची गणना होत असे. त्यामुळे रानडे आपल्या या फडणीस आजोबांबरोबर अुभयतांच्या घरी गायन- कीर्तन- भजन इत्यादि कार्यक्रमांस जात. आबासाहेबांकडे तर अल्लादियाखाँ, अब्दुल करीम खाँ यांजसारखे मोठमोठे गवई येत. त्यामुळे शास्त्रीय संगीताबद्दलचे आकर्षण रानड्याना बालपणापासून आपसूकच निर्माण झाले. कान आपोआप तयार होत गेला.<br> {{gap}}रानडे यांचे प्राथमिक शिक्षण सांगलीतील मराठी शाळा क्र. १ मध्ये झाले तर हायस्कूल शिक्षण सांगलीतील सरकारी हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे घराजवळच संस्कृतशास्त्री पंडित ग्रामोपाध्ये राहात. त्यांच्यामुळे रानडे यांचे संस्कृत शिक्षण अुत्तम तऱ्हेने झाले.<br> {{gap}}सांगलीत त्यावेळी कॉलेज शिक्षणाची सोय नसल्याने ते पुण्याला फर्ग्युसनमध्ये दाखल झाले. १९१५-१९१९ या काळात तेथे शिक्षण घेऊन ते बी.एस.सी. झाले. त्याच काळात प्रख्यात तत्त्वज्ञानी संत गुरुदेव रानडे तेथेच इंग्रजीचे प्रोफेसर होते. ते या गणपतराव रानडे यांचे नात्याने चुलते. त्यांच्या मार्गदर्शनाने गणपतरावाना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवता आले. त्यांच्या पुढील आयुष्यात त्याना या संस्कृत-इंग्रजी भाषेचा फार अुपयोग झाला.<br> {{gap}}कॉलेजशिक्षणानंतर रानडे सांगलीच्या सिटी हायस्कूलमध्ये नोकरीला लागले. थोड्याच काळात, त्यावेळी सांगलीत नव्यानेच सुरु झालेल्या विलिंग्डन कॉलेजात, फिजिक्स विषयाचे प्रोफेसर म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९२० ते १९४० या काळात त्यानी सांगलीतच अध्यापनाचे काम केले.<br> {{gap}}एकीकडे संगीताची श्रवणभक्ती चालू होती. लहानपणी, कोटणीसमहाराजांच्या घरातून निघणाऱ्या पालखीपुढे गाणे म्हणणे, एवढाच गाण्याचा असा त्यांच्यावर संस्कार होता पण प्रत्यक्ष गुरुजवळ बसून पारंपारिक पद्धतीने संगीताचे शिक्षण<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.....................१००</noinclude> 9028u29edrku0n7afap76a0wkvdw1f0 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२५ 104 77651 236398 202556 2026-08-30T16:04:16Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236398 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>घेण्याचा योग, फारच अुशीरा, म्हणजे त्यांच्या वयाच्या २७ व्या वर्षी आला, हे सुद्धा थोडेसे नवलाचेच म्हणावे लागेल. १९२४ साली सांगलीत येऊन राहिलेल्या, गणपतीबुवा भिलवडीकर यांच्याकडे, त्यांचे संगीताचे शिक्षण सुरु झाले. कॉलेजात प्राध्यापक असलेले रानडे गणपतीबुवांकडे त्यांच्या विद्यार्थीवर्गात बसून शिकू लागले. त्यांची कुशाग्र बुद्धि, जिज्ञासा, आणि शिक्षण घेण्याची तीव्र अिच्छा बघून, गणपतीबुवा त्याना स्वतंत्रपणे शिकवायला लागले. खुद्द रानडे यानी खूप गुरुसेवा केली व गाणे शिकण्यासाठी परिश्रम घेतले. हे गणपतीबुवा ग्वाल्हेरगायकी महाराष्ट्रात रुजवणाऱ्या पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे ज्येष्ठ शिष्य. गणपतीबुवांचे १९२७ मध्ये निधन झाल्यावर प्रो. रानडे, बाळकृष्णबुवांचे दुसरे शिष्य प्रसिद्ध गवई गुंडुबुवा इंगळे, यांच्याकडे पुढील शिक्षण घेऊ लागले. पण रानडे यांचा आवाज गायनास अनुकूल नव्हता. कदाचित संगीत-शिक्षणास प्रारंभ अुशीरा केला या कारणाने पण असेल. त्यामुळे अुत्तर आयुष्यात जरी त्यानी गाण्याचा छोट्या-मोठ्या बैठका केल्या, मुंबई आकाशवाणीवरुन गाण्याचे कार्यक्रम केले, तरी गाण्याचा आविष्कार हा आपला प्रांत नाही असे त्यानी कदाचित् मनोमनी ठरविले असावे. याअुलट त्याना लेखनाची हौस होती. मराठी, संस्कृत व इंग्रजी भाषांवर प्रभुत्व होते. त्यामुळे त्यानी संगीत-विषयक वाचन, संशोधन आणि लेखन यावरच आपली सर्व शक्ती केंद्रित केली.<br> {{gap}}त्याकाळी सुप्रसिद्ध लेखक आणि संगीताचे षौकीन, प्रो. ना. सी. फडके कोल्हापुरात 'झंकार' मासिक चालवत असत. त्यामध्ये 'संगीतातील नवमतवाद' ही लेखमाला चालू होती. प्रा. रानडे यांच्या घरी गाण्याच्या छोट्या-मोठ्या बैठका होत. त्यानिमित्ताने जमणाऱ्या मंडळींबरोबर या लेखमालेविषयी चर्चा होत. सांगलीतील कवि साधुदास, नाटककार कमतनूरकर, दत्तुबुवा भोसले, म्हैसकरबुवा अशी संगीताची जाणकार मंडळी येत; कधीकधी त्याकाळात सांगलीत वास्तव्य असणारे मा. दीनानाथ पण येत असत. प्रो. रानडे यांचे घर याबाबतीत, नंतर पुण्यात गाजलेल्या रविकिरण मंडळासारखेच झाले होते. त्यांच्या पत्नी सुमतीबाई, अगत्याने सर्वांचे चहा-पाणी, जेवणखाण करीत. प्रो. रानडे यांचे लेख पुण्याच्या 'भारतीय संगीत' या द्वैमासिकात येऊ लागल्यावर त्यांचे वर्तुळ आपोआपच वाढले. मा. कृष्णा (फुलंब्रीकर), वझेबुवा अशी मातब्बर मंडळीपण येऊ लागली. रानड्यांच्या घरातील सुग्रास पदार्थांची त्याना एवढी सवय झाली, की संकोच गेला, तेव्हा आपणहून आल्याबरोबर ही मंडळी 'पहले खाना, फिर गाना' असे म्हणत. मिरजेची तंतुवाद्ये बनवणारे मुसलमान कारागीर पण येत असत.{{nop}}<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर...................................१०१</noinclude> do2dnjvecz4j8v409ik9ylh5x5oqvu6 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२६ 104 77652 236399 202558 2026-08-30T16:20:16Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236399 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}असाच एक दिवस, ८-१० वर्षांचा एक मुलगा एका कानडी गृहस्थांसमवेत आला होता. "मुलगा पेटी छान वाजवतो, त्याला गाणे शिकायचे आहे" असे तो कानडी गृहस्थ सांगू लागला म्हणून त्या मुलाचा रानड्यानी घरी कार्यक्रम केला. त्याचे कौतुक म्हणून त्याला जरीची टोपी दिली. प्रो. रानडे यानी त्या मुलाला गाणे शिकण्यासाठी प्रो.बी. आर. देवधर यांचे नाव सुचवले. हा मुलगा म्हणजे पुढे सर्वाना वेड लावणारा जगद्विख्यात गायक कुमार गंधर्व !<br> {{gap}}कॉलेज-व्यतिरिक्त मोकळया काळात प्रो. रानडे यांचे संगीतविषयक वाचन व चिंतन जोरात सुरु झाले. संगीत कलेचे त्यानी विधिवत् शिक्षण घेतलेले असल्यामुळे शब्द-माध्यमातून, या श्रेष्ठ कलेची अुकल करुन दाखवावी असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचबरोबर विशेष अभ्यासकांसाठी व कलावंतांसाठीसुद्धा एखाद्या विवेचनात्मक ग्रंथाची गरज भासत होती; तसे अनेकांच्या बोलण्यातून जाणवत होते. या विचारमंथनातूनच प्रो. रानडे यानी १९३३ साली 'संगीताचे आत्मचरित्र अथवा सुशिक्षितांचे संगीत' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात संगीताचे तात्त्विक स्थित्यंतर, स्वर-विचार व रागरचनातत्व, वर्णोच्चार, भावना-विलास, सौंदर्योत्कर्ष अशा तात्विक गोष्टींचा सविस्तर अुहापोह केलेला आहे. स्वतः फिजिक्सचे प्राध्यापक असल्याने, अत्यंत चिकित्सक दृष्टया त्यांचे लेखन झाले आहे, जे आजच्या काळातसुद्धा, अभ्यासकाना अुपयुक्त आहे. विशेषतः संगीत कसे ऐकावे याबाबतचे त्यांचे विचार आजच्या सामान्य रसिकानी मुळातून वाचावेत एवढे बोधप्रद आहेत.<br> {{gap}}१९३८ साली प्रो. रानडे यानी Hindusthani Music - Its Physics and Aesthetics हे पुस्तक इंग्रजीत लिहिले. पुस्तक जाणकार रसिकाना एवढे भावले की त्या पुस्तकाच्या आजवर चार आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. ह्या पुस्तकाचा आणखी एक विशेष म्हणजे, भारतापेक्षा परदेशात या पुस्तकाची विक्री आणि बोलबाला अधिक झाला. पुढे त्यानी Music of Maharashtra हे पण पुस्तक लिहिले. तथापि त्यांचे काही अभ्यासपूर्ण लेख अप्रकाशित स्वरुपातच राहिले.<br> {{gap}}कोणतेहि लेखन करताना प्रो. रानडे, त्या लिखाणाच्या सत्यतेविषयी अत्यंत जागरुक असत. गोविंदराव टेंबे, ना.सी. फडके, प्रो. बी. आर. देवधर, प्रि. जठार आदी मान्यवरांना दाखवून स्वतःचे लेखन सुधारुन घेत. एकदा तर 'तंबोऱ्याची मिलावट' (इंग्रजी पुस्तकातील 'ड्रोन') हा लेख त्याना लिहायचा होता. दोन दोन<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर....................................१०२</noinclude> iwynyusgp10nidbui07xsf4ftulpuwj पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२७ 104 77653 236400 202559 2026-08-30T16:22:12Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236400 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>तंबोऱ्यांचा एकत्रित आवाज त्याना त्यासाठी ऐकायचा होता. मग त्यानी काय करावे? आपल्या दोन्ही लहान मुलांना (एक दहा वर्षाचा आणि दुसरा आठ वर्षाचा) त्यानी दोन तंबोरे २०-२५ मिनिटे वाजवत बसायला लावले. दोन्ही तंबोरे वाजायला लागले की दूर जाऊन ते स्वतः नीटपणे त्यांचे आवाज, एकत्रित आवाज, ऐकत. एक-दोन मिनिटे लक्षपूर्वक ऐकून पुन्हा जवळ येऊन, दोन्ही तंबोऱ्यांची त्याना पाहिजे तशी जवारी (गुढी । घोडीवरील सूत) किंवा गुढीखालील मणी, थोडा फार मागेपुढे करीत. एखादी खुंटी सैल करत. घट्ट करत. हा कार्यक्रम निदान अर्धा पाऊणतास चाले. मुलं रडकुंडीस येत, मग आई बिचारी खायला काजू नाहीतर जर्दाळू देऊन त्यांचे सांत्वन करी!<br> {{gap}}फिजिक्सचे प्रोफेसर असेही 'प्रयोग' करीत.<br> {{gap}}त्यांच्या अशा अनुभवसिद्ध लिखाणाने त्याना संगीतक्षेत्रात मोठाच नावलौकिक मिळाला. इचलकरंजी, बुधगांव, सांगली संस्थानांचे अधिपती त्यांचा योग्य तो मुलाहिजा राखत असत. त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या वेळी इचलकरंजीकर बाबासाहेब घोरपडे यानी रु.१०१/- चा पुरस्कार दिला होता. (१००० प्रतींच्या या पुस्तकाचा एकूण छपाईखर्च रु.३२५/- झाला होता हे इथं लक्षात घ्यायला हवं!) एकदा हिराबाई बडोदेकरांचा सांगलीच्या सदासुख थिअटरमध्ये तिकिट लावून जलसा होता. सांगलीचे राजेसाहेब तेथे कार्यक्रमाला पोचले. गेल्याबरोबर आधी त्यानी प्रो. रानडे कार्यक्रमाला आले आहेत का नाहीत याची चौकशी केली. ते आलेले नाहीत, असं कळल्यावर लागलीच एक खास सांडणीस्वार पाठवून त्याना बोलावून घेतले!.<br> {{gap}}१९४० मध्ये त्यांची डे. ए. सोसायटीच्याच पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये बदली झाली. पुण्याचे वास्तव्य त्यांच्या संगीतगुणाना फारच पोषक ठरले. पुण्याला आल्यावर त्यांचा विनायकबुवा पटवर्धन, गजाननबुवा जोशी, केशवराव भोळे, मिराशीबुवा, आबासाहेब मुजुमदार अशा संगीतक्षेत्रातील मातब्बर व्यक्तींबरोबर संबंध आला. प्रो. रानडे यांचे कार्यक्षेत्र त्यामुळे बरेच विस्तारले. पं. मिराशीबुवांबरोबर त्यांचा पूर्वीचा स्नेह अधिकच वृद्धिंगत झाला. दोघांच्या गाठीभेटीतून अनेक योजना निघाल्या. मिराशीबुवांच्या चीजांचे तीन भाग प्रो. रानडे यानी १९४४ ते १९५१ च्या दरम्यान संपादित केले. पुढे १९५२ ते १९६१ पर्यंत, मिराशीबुवांच्या बैठकीच्या स्वरुपात संपूर्ण विस्ताराचे गाणे लिहिलेल्या पाच भागांची प्रसिद्धी केली. त्याचबरोबर पंडित विनायकबुवा पटवर्धन यांची खाजगी संगीत संस्था,<noinclude>सांगली आणि सांगलीकर.............................. १०३</noinclude> pycmkbgejgp229gxar9c4o6zkmorihk 236401 236400 2026-08-30T16:22:33Z कल्पनाशक्ती 3813 236401 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>तंबोऱ्यांचा एकत्रित आवाज त्याना त्यासाठी ऐकायचा होता. मग त्यानी काय करावे? आपल्या दोन्ही लहान मुलांना (एक दहा वर्षाचा आणि दुसरा आठ वर्षाचा) त्यानी दोन तंबोरे २०-२५ मिनिटे वाजवत बसायला लावले. दोन्ही तंबोरे वाजायला लागले की दूर जाऊन ते स्वतः नीटपणे त्यांचे आवाज, एकत्रित आवाज, ऐकत. एक-दोन मिनिटे लक्षपूर्वक ऐकून पुन्हा जवळ येऊन, दोन्ही तंबोऱ्यांची त्याना पाहिजे तशी जवारी (गुढी । घोडीवरील सूत) किंवा गुढीखालील मणी, थोडा फार मागेपुढे करीत. एखादी खुंटी सैल करत. घट्ट करत. हा कार्यक्रम निदान अर्धा पाऊणतास चाले. मुलं रडकुंडीस येत, मग आई बिचारी खायला काजू नाहीतर जर्दाळू देऊन त्यांचे सांत्वन करी!<br> {{gap}}फिजिक्सचे प्रोफेसर असेही 'प्रयोग' करीत.<br> {{gap}}त्यांच्या अशा अनुभवसिद्ध लिखाणाने त्याना संगीतक्षेत्रात मोठाच नावलौकिक मिळाला. इचलकरंजी, बुधगांव, सांगली संस्थानांचे अधिपती त्यांचा योग्य तो मुलाहिजा राखत असत. त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या वेळी इचलकरंजीकर बाबासाहेब घोरपडे यानी रु.१०१/- चा पुरस्कार दिला होता. (१००० प्रतींच्या या पुस्तकाचा एकूण छपाईखर्च रु.३२५/- झाला होता हे इथं लक्षात घ्यायला हवं!) एकदा हिराबाई बडोदेकरांचा सांगलीच्या सदासुख थिअटरमध्ये तिकिट लावून जलसा होता. सांगलीचे राजेसाहेब तेथे कार्यक्रमाला पोचले. गेल्याबरोबर आधी त्यानी प्रो. रानडे कार्यक्रमाला आले आहेत का नाहीत याची चौकशी केली. ते आलेले नाहीत, असं कळल्यावर लागलीच एक खास सांडणीस्वार पाठवून त्याना बोलावून घेतले!.<br> {{gap}}१९४० मध्ये त्यांची डे. ए. सोसायटीच्याच पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये बदली झाली. पुण्याचे वास्तव्य त्यांच्या संगीतगुणाना फारच पोषक ठरले. पुण्याला आल्यावर त्यांचा विनायकबुवा पटवर्धन, गजाननबुवा जोशी, केशवराव भोळे, मिराशीबुवा, आबासाहेब मुजुमदार अशा संगीतक्षेत्रातील मातब्बर व्यक्तींबरोबर संबंध आला. प्रो. रानडे यांचे कार्यक्षेत्र त्यामुळे बरेच विस्तारले. पं. मिराशीबुवांबरोबर त्यांचा पूर्वीचा स्नेह अधिकच वृद्धिंगत झाला. दोघांच्या गाठीभेटीतून अनेक योजना निघाल्या. मिराशीबुवांच्या चीजांचे तीन भाग प्रो. रानडे यानी १९४४ ते १९५१ च्या दरम्यान संपादित केले. पुढे १९५२ ते १९६१ पर्यंत, मिराशीबुवांच्या बैठकीच्या स्वरुपात संपूर्ण विस्ताराचे गाणे लिहिलेल्या पाच भागांची प्रसिद्धी केली. त्याचबरोबर पंडित विनायकबुवा पटवर्धन यांची खाजगी संगीत संस्था,<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.............................. १०३</noinclude> ou7o5q2h9wjmzrws3ni4kxgdokstp4s पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२८ 104 77654 236402 202562 2026-08-30T16:27:33Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236402 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>त्यांच्याच आग्रहावरुन रजिस्टर्ड करण्यासाठी रानडे यानी बरेच परिश्रम केले. १९४२ मध्ये ती संस्था 'भारतीय संगीत प्रसारक मंडळ' या नावाने रजिस्टर्ड झाली. संस्थेचे पहिले अध्यक्षपद दत्तो वामन पोतदार याना तर अुपाध्यक्षपद प्रो. रानडे याना देण्यात आले.<br> {{gap}}१९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर शाळा-कॉलेजातून अुत्तम प्रकारचे संगीत शिक्षण दिले जावे या कल्पनेतून तत्कालीन मुंबई राज्याचे प्रमुख, नामदार बाळासाहेब खेर, यानी एक म्युझिक एज्युकेशन कमिटी नेमली. या कमिटीचे मेंबर- सेक्रेटरी म्हणून प्रो.रानडे यांची नेमणूक झाली. प्रि. जठार अध्यक्ष होते. मा.कृष्णा, विनायकबुवा, बी. आर. देवधर इत्यादि संगीत क्षेत्रातील दिग्गज सभासद होते. मुंबई प्रांताच्या विविध भागातील शाळा-कॉलेजातून या सर्वानी दौरे केले व या अनुभवातून प्रो. रानडे यानी जो परिश्रमपूर्वक रिपोर्ट तयार केला तो सरकारने जसाच्या तसा स्वीकारला यातच त्यांचे यश होते.<br> {{gap}}१९५० साली दिल्लीला संगीत नाटक ॲकेडमी स्थापन झाली. त्या ॲकेडमीच्या निरनिराळ्या चार-पाच कमिट्यांवर प्रो. रानडे यांची सल्लागार सदस्य म्हणून नेमणूक झाली. १९५५ साली मनिला (फिलिपाईन्स ) येथे झालेल्या South East Asiatic Conference मध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून अपस्थित राहण्याचा बहुमान त्याना मिळाला.<br> {{gap}}१९५८ साली कॉलेजच्या नोकरीतून ते निवृत्त झाले.<br> {{gap}}त्यानंतर तर एक मोठेच काम त्यांची वाट पहात होते! संगीत नाटक ॲकॅडमीने संगीताचा शब्दकोष तयार करण्याचे ठरवले होते. तेंव्हा १९५९ झाली त्यानी प्रो. रानडे याना Encyclopedia of Indian Music लिहिण्यासाठी पाचारण केले. त्यानी आनंदाने हे आवडीचे काम करण्यास संमती दिली. त्यानी मोठ्या जिद्दीने या कामाला सुरवात केली. त्यामध्ये भारतीय संगीताचा अितिहास, या संगीतशास्त्राची वैशिष्ट्ये, भारतीय संगीत पाश्चात्य संगीतापेक्षा कसे वेगळे आहे, ते कंटाळवाणे (Monotonous) का होत नाही याचा अुहापोह केलेला आहे. १९६१ च्या जून मध्ये हे काम जवळजवळ पूर्ण झाले व त्याची मुद्रणप्रत तयार झाली.<br> {{gap}}आणि एक वेगळेच संकट अभे राहिले!<br> {{gap}}१२ जुलै १९६१ ला पुण्यात पानशेतचा जलप्रलय झाला. प्रो. रानडे यांचे पुण्यातील घर अगदी मुठा नदीच्या काठीच होते. घरात पाणी शिरले. या प्रसंगी त्यांची संगीतावरची भक्ती, तुकारामाच्या अभंगासारखी पाण्यावर निश्चलपणे तरंगत<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.................................१०४</noinclude> 12gpcx8bg8zc5pytmlzolcr3rhl9ck4 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२९ 104 77655 236403 202563 2026-08-30T16:33:52Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236403 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>राहिली !<br> {{gap}}त्यानी सोने, नाणे, पैसा-अडका याचा यत्किंचितहि विचार न करता शब्दकोशाची मुद्रणप्रत आधी पागोट्यात बांधली आणि पुराच्या पाण्यातून पोहून जात 'केसरीचा' गायकवाडवाडा गाठला आणि मुद्रणप्रत प्रलयातून वाचवली.<br> {{gap}}केवढी ही विलक्षण संगीतनिष्ठा!<br> {{gap}}आजहि ही मुद्रणप्रत मायक्रोफिल्मच्या रुपात दिल्लीच्या संगीतनाट्य- ॲकाडमीमध्ये जतन करुन ठेवलेली आहे.<br> {{gap}}या पराक्रमानंतर मात्र त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य गेले. तोंडावर, पायावर, रक्त गोठून फोड येऊ लागले. त्यानंतरहि त्यांचे लेखन-वाचन चालूच होते पण त्यात पूर्वीचा जोष अरला नव्हता. १९६५ मध्ये त्याना संगीत, नाट्य, ॲकेडमीची फेलोशिप भारत सरकारने दिली. त्यांच्या आजवरच्या संगीतसेवेचा हा मोठाच गौरव होता. २३ डिसेंबर १९६५ रोजी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते, दिल्लीमध्ये, 'रत्नसदस्य' हा किताब रानड्याना देण्यात आला.<br> {{gap}}पण दिल्लीची कडाक्याची थंडी त्याना बाधली. तेथे थंडीने लघवी गोठण्याचा त्रास झाला. घाईघाईने विमानाने त्याना मुंबईत आणण्यात आले. प्रोस्टेट ग्लँडच्या ऑपरेशननंतर ते काही काळ ठीक होते. पुन्हा रक्त गोठण्याचा त्रास सुरु झाला. डॉ. ग्रँट हास्पिटलमध्ये ब्रेन थ्रॉयबॉसिससंबंधीचे ऑपरेशन झाले. पण अुपयोग झाला नाही.<br> {{gap}}१० मार्च १९६६ ला ग्रँट हॉस्पिटलमध्येच ६९ व्या वर्षी प्रो. रानडे यांचे निधन झाले.<br> {{gap}}एका अर्थी एका संगीत साधनेचाच हा अंत झाला. संगीत क्षेत्रातील ज्ञानाचा, परिभाषेचा, शास्त्रशुद्ध तंत्राचा एवढा गाढा व्यासंग करणे याला मोठे बुद्धिवैभव आणि पराकोटीचे परिश्रम लागतात. प्रो. रानडे यानी तशी चिकाटी दाखवून, संगीतशास्राच्या अभ्यासकांवर मोठे अुपकारच केले आहेत. त्यांची शास्त्रोक्त संगीतावर एवढी विलक्षण निष्ठा होती की गायक व आकाशवाणी यांच्यामध्ये जो झगडा, नभोवाणी मंत्री बाळकृष्ण केसकर यांच्या कारकिर्दीत झाला तो त्याना फार व्यथित करुन गेला. श्रवण कसोटी (Audition test) पास झाल्याशिवाय कलाकाराना आकाशवाणीवर कार्यक्रम मिळेनात आणि अशी आपली 'परीक्षा' घेतली जाणे ज्येष्ठ कलाकारांना अपमानास्पद वाटू लागले म्हणून त्यानी<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर........................१०५</noinclude> 3o6ebp1u32bqwtfq4f5zmi5qv97whka पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३० 104 77656 236404 202617 2026-08-30T16:35:29Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236404 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आकाशवाणीवर बहिष्कार घातला. मधल्यामध्ये शास्त्रीय संगीताची आणि श्रोत्यांची गळचेपी होऊ लागली. ही स्थिती संगीतप्रेमी प्रो. रानडे याना सहन होईना. तेव्हा काही मान्यवर व्यक्तिंसमवेत, त्यानी मध्यस्थी करुन, दोघांमधील भांडण मिटवले. त्यामुळे कलाकारांचा योग्य मान राखला गेला. आणि श्रोत्यांची सोय झाली.<br> {{gap}}या संगीतप्रेमी माणसाच्या मनाचा तंबोरा अितका 'सुरेल' लागलेला असे की संगीताच्या दुनियेतील कोणताहि 'बदसूर' त्याना क्लेशकारक होई. म्हणून तर त्यानी हे भांडण मिटवण्यात सिंहाचा वाटा अुचलला.<br> {{gap}}प्रो. ग. ह. रानडे ही अनवट रागातील अपरिचित 'चीज' आहे असे इतरजनांना भले वाटो.<br> {{gap}}अस्सल संगीतषौकीन सांगलीकराना तसं कधीच वाटणार नाही!<br> {{center|●●●}} {{nop}}<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.............................. १०६</noinclude> r01mpzrscsktjw65iids6esbpioz50y अनुक्रमणिका:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf 106 104089 236408 236330 2026-08-31T08:00:56Z कल्पनाशक्ती 3813 236408 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=लंकेचें वर्णन व वृतांत |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=गोविंद चिमणाजी भाटे |Address=कुलाबा |Year=1934 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 5="प्रस्तावना" 7 ="अनुक्रमणिका" 8="नकाशा" 9 ="लंकापुराणपरिचय" 21 ="लंकेचा दंतकथात्मक इतिहास" 37 ="लंकेंत पहिले पाऊल : कोलंबो बंदर व रत्नपुर नगर" 43="फोटो" 52 ="फोटो" 59="फोटो" 62="कँडी व पेरेडॅनिया" 66="फोटो" 73="फोटो" 79 ="खडक-देऊळ व खडक-किल्ला" 82="फोटो" 87="फोटो" 92 ="बॅटिकोला व त्रिंकोमाली" 104 ="फोटो" 107 ="फोटो" 112 ="लंकेच्या जुन्या राजधान्या व मिहिंतले पर्वत" 114 ="फोटो" 117 ="फोटो" 133 ="फोटो" 136 ="जाफना अथवा नागद्वीप" 150 ="श्रीपाद शिखर" 163 ="लंका बेटांतील दोन शीतलनिवासस्थानें"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] nuxqwehl19nz1ed1cpth8zib8e3hn61 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/९३ 104 111825 236378 236018 2026-08-30T12:56:04Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 236378 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८१)'''}}}}</noinclude>स्वतःची अशी समजूत करून घेतली होती, कीं, सर्वनाशक जो महादेव तो शत्रूंचा संहार करून आपल्या देवालयाचे खचित संरक्षण करील. यवनांनां जयाची आशा मुळींच नको! ह्मणून महादेवाचा प्रताप बघण्याकरितांच कीं काय कोण जाणे, ब्रह्मवृंदांच्या झुंडीच्या झुंडी तटबंदीवर दिसत असत. पण '''महंमदाच्या''' अनुयायांनां '''महेश्वराच्या''' संहारशक्तीची दरकार वाटत नसल्यामुळे, त्यांनी शिड्या लावून तट सर केला. चालत्या बोलत्या देवांच्या मंत्रतंत्रांना कैलासातला देव दाद देईना. पन्नासहजार हिंदुधर्मासाठी बळी पडले! देवळाची लूट झाली. मूर्तीचे तुकडे होऊन ते गिझनीकडे रवाना झाले. (Ibid, PP. 26-27 ) लढाईत तरबेज, धर्मवेडाने पछाडलेल्या, कुशल सेनापतींच्या हाताखाली असलेल्या सैन्याची स्वारी कोणीकडे, आणि प्रतीकार करण्याची देवाकडेच सोपवून केलेली जंगी तयारी कोणीकडे! घरावर दरोडा आला ह्मणजे उपाय योजण्याचे काम मालकाचें तसें देवालयावर धाड आली, तर तिच्यापासून बचाव करण्याचें काम त्याच्या मालकाचें, ह्मणजे अर्थात् देवाचें! अशावेळी जर देवानें आपला प्रभाव दाखवावयाचा नाहीं, तर दाखवावयाचा तरी केव्हां? स्वतःच्याच निवासस्थानावर अरिष्ट आलें असतांना जर मंत्रतंत्र देवानें ऐकावयाचे नाहींत तर ऐकावयाचे तरी केव्हां? पण धरावरचा दरोडा मागे हटविण्याचे काम जरी मालकाचें असले, तरी त्याला सेवकांची पुरती मदत पाहिजे. नाहींतर मालकाचीच विटंबना होण्याची वेळ जशी येते, तशीच देवाची गत आहे. देवळाचें संरक्षण करण्यास देवाला स्वतःच्या सेवकांची, त्यांच्या पुरत्या मदतीची अपेक्षा होती. मनुष्यें हींच देवाचें हत्यार. त्यांच्या अंतःकरणांत प्रेरणा करूनच स्वतःच्या आलयाचे रक्षण करणें देवाला शक्य होतें. स्वतः प्रयत्न न करता आपल्यावर सर्वस्वी भार टाकणा-या मूर्ख उपासकांना देईन कर, पण भलें बळ कराहो,' अर्से चोख उत्तर देवाकडून मिळत असले पाहिजे. पण एक तर, हैं उत्तर ऐकावयाला या लोकांना कान नसतात, किंवा असले तर या उत्तराचा भावार्थ त्यांना समजत नाहीं. कदाचित् समजलाच, तर आळसामुळे, क्षुद्रवृत्ती- मुळे, दुराग्रहामुळे तो उमजत नाहीं. अशांतलीच स्थिति या विचाय भूदेवांची व त्यांच्यावर विसंबणाऱ्या लोकांची झाली असली पाहिजे. सोमनाथावरच्या या स्वारीची हकीगत वाचून ब्राह्मणांच्या व इतर उपा सकांच्या मूर्खपणाचें हंसें तर येतेंच; पण मूर्खपणाचा मोबदला इतक्या लव-<noinclude>{{gap}} ६</noinclude> sxjs0pnk1rtqis5ygnb3f012yg7i7fz पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१५५ 104 111991 236368 2026-08-30T12:04:31Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236368 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३४ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>गजबजलेले आहेत. जिकडे पहावें तिकडे नीटनेटक्या झोंपड्या, बंगले व चहाच्या गिरण्यांच्या खूप कांचेच्या खिडक्या असलेल्या व तांबड्या कौलाराच्या किंवा तांबडा रंग दिलेल्या पत्र्याच्या छपराच्या लांबच लांब दोन तीन मजली इमारती दृष्टोत्पत्तीस येतात. चहाच्या मळ्यांत म्हणजे सर्व डोंगरभर-पाठीवर लोंबत्या टाकलेल्या उभंट्या व बारिक तोंडाच्या टोपलींत हातांनीं खुडून चहाच्या डिकशा टाकणारे बायका-पुरुष रानोमाळ दृष्टीस पडतात. चहाच्या व रबराच्या पिकांच्या शोधांनी लंकेमध्यें क्रांतिकारक सुधारणा घडून आली आहे ती हीच. या सर्व भागांत एक इंच जागा वाया गेलेली नाहीं; या पिकांनीं पूर्वीच्या निरुपयोगी वनाचीं रबरांचीं उत्पादक बनें बनलीं व पूर्वीच्या ओसाड माळाचे जगाला मोह पाडणाऱ्या चहाच्या पिकांचे मळे बनले. जेथें पूर्वी हिंस्त्र पशूंचीच फक्त वस्ती होती, तेथें आतां सुधारलेल्या व संपन्न लोकांची वस्तीच वस्ती झाली आहे.<Br>{{gap}}हॅटनच्या दक्षिणेस '''मस्केलिया''' म्हणून एक बारा मैलांवर ठिकाण आहे. तेथपर्यंत मोटार बस सर्व्हिस आहे; तेथून डलहौसी म्हणून एक चहाची गिरणी आहे. ती मस्केलियापासून पांच मैल आहे. पुष्कळ यात्रेकरू मस्केलियापासून चालत श्रीपादशिखरावर जातात. पण पांच मैल चालण्यापेक्षां स्वतंत्र मोटारकार करणें श्रेयस्कर आहे. कारण शिखराचा चढाव खरोखरी ऊरफोडी व जीवजाई आहे. तेव्हां या पहिल्या पांच मैलांच्या चालीमध्यें शक्तिव्यय करणें इष्ट नाहीं. माझ्या वयोमानाच्या दृष्टीने जास्त विश्रांति मिळावी म्हणून मी हॅटनहून डलहौसीपर्यंत स्वतंत्र मोटार केली. त्याला दहा रुपये पडले. पण साधारणतः साहा सात रुपयांपेक्षां जास्त पडत नाहींत. भाषेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन माझ्या बरोबर आणलेल्या माणसानें मला फसविल्यामुळे मला दहा रुपये पडले. हॅटनपासून डलहौसीपर्यंत चहाचे मळे व रबराचीं बनें व कोठें कोठें युकॅलिप्टसच्या राया लागल्या. हा भागही विलक्षण डोंगराळ व चढउताराचा आहे; हॅटनपेक्षां हा चार-पांचशे फुटांनी सखल असावा. म्हणूनच शिखर या<noinclude></noinclude> e8erjhoygds4toh9ncut6weomxdvvyh 236370 236368 2026-08-30T12:06:03Z कल्पनाशक्ती 3813 236370 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३४ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>गजबजलेले आहेत. जिकडे पहावें तिकडे नीटनेटक्या झोंपड्या, बंगले व चहाच्या गिरण्यांच्या खूप कांचेच्या खिडक्या असलेल्या व तांबड्या कौलाराच्या किंवा तांबडा रंग दिलेल्या पत्र्याच्या छपराच्या लांबच लांब दोन तीन मजली इमारती दृष्टोत्पत्तीस येतात. चहाच्या मळ्यांत म्हणजे सर्व डोंगरभर-पाठीवर लोंबत्या टाकलेल्या उभंट्या व बारिक तोंडाच्या टोपलींत हातांनीं खुडून चहाच्या डिकशा टाकणारे बायका-पुरुष रानोमाळ दृष्टीस पडतात. चहाच्या व रबराच्या पिकांच्या शोधांनी लंकेमध्यें क्रांतिकारक सुधारणा घडून आली आहे ती हीच. या सर्व भागांत एक इंच जागा वाया गेलेली नाहीं; या पिकांनीं पूर्वीच्या निरुपयोगी वनाचीं रबरांचीं उत्पादक बनें बनलीं व पूर्वीच्या ओसाड माळाचे जगाला मोह पाडणाऱ्या चहाच्या पिकांचे मळे बनले. जेथें पूर्वी हिंस्त्र पशूंचीच फक्त वस्ती होती, तेथें आतां सुधारलेल्या व संपन्न लोकांची वस्तीच वस्ती झाली आहे.<Br>{{gap}}हॅटनच्या दक्षिणेस '''मस्केलिया''' म्हणून एक बारा मैलांवर ठिकाण आहे. तेथपर्यंत मोटार बस सर्व्हिस आहे; तेथून डलहौसी म्हणून एक चहाची गिरणी आहे. ती मस्केलियापासून पांच मैल आहे. पुष्कळ यात्रेकरू मस्केलियापासून चालत श्रीपादशिखरावर जातात. पण पांच मैल चालण्यापेक्षां स्वतंत्र मोटारकार करणें श्रेयस्कर आहे. कारण शिखराचा चढाव खरोखरी ऊरफोडी व जीवजाई आहे. तेव्हां या पहिल्या पांच मैलांच्या चालीमध्यें शक्तिव्यय करणें इष्ट नाहीं. माझ्या वयोमानाच्या दृष्टीने जास्त विश्रांति मिळावी म्हणून मी हॅटनहून डलहौसीपर्यंत स्वतंत्र मोटार केली. त्याला दहा रुपये पडले. पण साधारणतः साहा सात रुपयांपेक्षां जास्त पडत नाहींत. भाषेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन माझ्या बरोबर आणलेल्या माणसानें मला फसविल्यामुळे मला दहा रुपये पडले. हॅटनपासून डलहौसीपर्यंत चहाचे मळे व रबराचीं बनें व कोठें कोठें युकॅलिप्टसच्या राया लागल्या. हा भागही विलक्षण डोंगराळ व चढउताराचा आहे; हॅटनपेक्षां हा चार-पांचशे फुटांनी सखल असावा. म्हणूनच शिखर या{{nop}}<noinclude></noinclude> fgpjil6q3462smxzki90ncr2bf2yiab पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१५६ 104 111992 236369 2026-08-30T12:05:44Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "<br> {{center|'''मस्केलियाहून दिसणारा श्रीपादशिखराचा देखावा.'''}} {{rh|नं. १५|center|पान १३५}} {{nop}}" 236369 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|'''मस्केलियाहून दिसणारा श्रीपादशिखराचा देखावा.'''}} {{rh|नं. १५|center|पान १३५}} {{nop}}<noinclude></noinclude> 2u5ligwfyt8y8uhxn068iyjhrifrjv2 236371 236369 2026-08-30T12:06:21Z कल्पनाशक्ती 3813 236371 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|'''मस्केलियाहून दिसणारा श्रीपादशिखराचा देखावा.'''}} {{rh|नं. १५||पान १३५}} {{nop}}<noinclude></noinclude> fbm2t7fmh5fcq42tvtp95dd4cfggv3q पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१५७ 104 111993 236372 2026-08-30T12:11:00Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236372 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||श्रीपाद शिखर|१३५ }}</noinclude>डलहौसी ठिकाणापासून चार हजार फुटांचे वरच उंच पडलें. डलहौसी येथें शिखराकडून येणारी नदी उलटावी लागते; तिला छोटासा पूल आहे. तो टाकला म्हणजे चहाची गिरणी व चहाचा मळा लागतो. हा मळा अडीचशें एकरांचा आहे व त्याच्यापुरती चहाची गिरणी आहे. चहाचा हाच शेवटचा मळा; पुढें शिखराच्या पायथ्याशीं व शेजारच्या पर्वतराजीवर गर्द रानच रान आहे. शिवाय हे डोंगर उभे भिंतीप्रमाणें असून केवळ काळ्या भोर खडकाचे आहेत; तेव्हां त्यावर पीक होण्यासारखें नाहीं.<Br>{{gap}}श्रीपादशिखर हें शंकूसारखें उंचच उंच गेलेलें एकाकी शिखर आहे. त्याच्या दोन बाजूंना डोंगरांची एक रांग आहे खरी, पण ती त्या शिखरापेक्षां पुष्कळच ठेंगणी आहे. बाकी या डोंगराच्या बगलेनेंच शिखरावर चढण्यास प्रथम पाऊलवाट व पुढे पायऱ्या केलेल्या आहेत. या डोंगराच्या रांगेमुळें हे शिखर सिगिरिया खडकाइतकें अगम नाहीं; तरी पण शिखर दुर्गम आहे हे खास.<Br>{{gap}}मस्केलियाहून चार हजार फुट उंचीच्या शिखरावर चढण्याच्या पाऊलवाटेचे साधारण सारख्या उंचीचे तीन टप्पे पडतात. पहिला टप्पा बाराशें तेराशें फूट उंचीचा आहे; हा टप्पा डलहौसी गिरणीपासून सुरू होतो व या खोऱ्यांतून निघणाऱ्या नदीवरील पुलाचे अलीकडे संपतो. ही पाऊलवाट आपल्या इकडल्या सिंहगड, पुरंदर वगैरे किल्ल्यांना जाणाऱ्या पायवाटेसारखी आहे. चढाव बेताबेतानें व वांकणा-वांकणानें असल्यामुळें फार भासत नाहीं; कांहीं चढावापर्यंत चहाचीं झुडपें लागतात; मग मात्र किर्र रान लागतें. या पहिल्या टप्याचे ठिकाणी थोडी सपाटी आहे व येथे दोन चार झोंपड्यावजा घरें व एक दोन चहा-कॉफीचीं दुकानें आहेत. इकडे अशा दुकानांना बुटी म्हणतात. मी डलहौसी येथून जो चढाव चढू लागलों तो एका तासानें या पहिल्या टप्याच्या दुकानाशीं आलों. येथें कॉफीचा एक कप घेतला व थोडी विश्रांति घेतली. येथून निघालें कीं, लागलीच डलहौसी गिरणीनजीक<noinclude></noinclude> 76bouh51rtjya9vsa40o6za91l32eze पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१५८ 104 111994 236373 2026-08-30T12:11:11Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "लागलेली नदी पुनः ओलांडावी लागते. येथें छोटासा पूल आहे; शिवाय प्रवाहा-पर्यंत पायऱ्या केल्या असून, येथें फराळ वगैरे करण्या- सारखी सोय केली आहे; नदीचं पाणी फार गोड व स्फटिकासारखें शु..." 236373 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३६ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>लागलेली नदी पुनः ओलांडावी लागते. येथें छोटासा पूल आहे; शिवाय प्रवाहा-पर्यंत पायऱ्या केल्या असून, येथें फराळ वगैरे करण्या- सारखी सोय केली आहे; नदीचं पाणी फार गोड व स्फटिकासारखें शुभ्र व स्वच्छ आहे. येथला देखावा खरोखरी मनोहर आहे. येथपर्यंत पाऊलवाट फार विकट किंवा शिडीसारखी उभी नाहीं. यामुळे येथपर्यंत मी मोठ्या मजेनें व आनंदानें आलों. शंकूसारख्या निमुळत्या झालेल्या श्रीपादशिखराचा रुंद पायावजा भाग येथून सुरू होतो. आतां पाऊलवाट सरून कोठें ओबड धोबड तर कोठें बऱ्या बांधलेल्या, कोठें चढत्या पण लांबट, तर कोठें सपाट पण पावलाच्या रुंदीच्या व फूट फूट उंचीच्या दगडी पायऱ्या लागतात; दोन्ही बाजूस दाट रान लागतें. हा चढ व पायऱ्या उभ्याच असल्यामुळे पहिल्या टप्प्याप्रमाणें सावकाशपणें कां होईना पण सारखें चढतां येत नाहीं. दहा पंधरा वीस पायऱ्या चढल्या म्हणजे मला दम लागे; म्हणून मी पांचदहा पायऱ्या - लांबड्या अथवा छोट्या चढल्यावर थांबत होतों व मागें वळून सभोंवारच्या किर्र रानाचा व गर्द झाडीचा देखावा हात व थोडी थोडी विश्रांति घेत डोंगर चढत होतों. अशा तन्हेनें दोन तास चालल्यावर मी दुसऱ्या टप्प्याशीं आलों. येथें सुंदर पाण्याचा झरा वहात होता; तो पाहनच श्रमपरिहार झाला. येथें आलों तों सात वाजले होते. येथें एक बुटी होती. तेव्हां येथें रात्रींचा फराळ करून पहांटेपर्यंत विश्रांति व झोंप घेण्याचा मी बेत केला. बुटीवाल्यानें एक कापडी - नव्हे - गोणपाटाची खाट व त्यावर एक गवताची चटई अशा चिजा निजावयास दिल्या. मी बरोबर ओव्हरकोट आणला होता. फराळ केल्यावर मी त्या खाटेवर आडवा झालों. ओव्हरकोट अंगावर घेऊन मी खाटेवर पडलों खरा; पण झोंप कसची येते ? त्या ओव्हरकोटानें थंडी मुळींच थांबेना; सारखी हुडहुडी भरत होती. पायांतले बुट काढले होते. पण • पाय फार गार पडले म्हणून पुनः बुट घातले. पण काय ! येरे माझ्या मागल्या ! मला ती रात्र थंडीत कुडकुडत काढावी लागली; शिवाय मध्यरात्र<noinclude></noinclude> 6emrcxxmxyejjmwkqw2vwhiz09kt0tu 236374 236373 2026-08-30T12:13:20Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236374 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३६ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>लागलेली नदी पुनः ओलांडावी लागते. येथें छोटासा पूल आहे; शिवाय प्रवाहा-पर्यंत पायऱ्या केल्या असून, येथें फराळ वगैरे करण्यासारखी सोय केली आहे; नदीचं पाणी फार गोड व स्फटिकासारखें शुभ्र व स्वच्छ आहे. येथला देखावा खरोखरी मनोहर आहे. येथपर्यंत पाऊलवाट फार बिकट किंवा शिडीसारखी उभी नाहीं. यामुळे येथपर्यंत मी मोठ्या मजेनें व आनंदानें आलों.<Br>{{gap}}शंकूसारख्या निमुळत्या झालेल्या श्रीपादशिखराचा रुंद पायावजा भाग येथून सुरू होतो. आतां पाऊलवाट सरून कोठें ओबड धोबड तर कोठें बऱ्या बांधलेल्या, कोठें चढत्या पण लांबट, तर कोठें सपाट पण पावलाच्या रुंदीच्या व फूट फूट उंचीच्या दगडी पायऱ्या लागतात; दोन्ही बाजूस दाट रान लागतें. हा चढ व पायऱ्या उभ्याच असल्यामुळे पहिल्या टप्प्याप्रमाणें सावकाशपणें कां होईना पण सारखें चढतां येत नाहीं. दहा पंधरा वीस पायऱ्या चढल्या म्हणजे मला दम लागे; म्हणून मी पांचदहा पायऱ्या- लांबड्या अथवा छोट्या- चढल्यावर थांबत होतों व मागें वळून सभोंवारच्या किर्र रानाचा व गर्द झाडीचा देखावा हात व थोडी थोडी विश्रांति घेत डोंगर चढत होतों. अशा तऱ्हेनें दोन तास चालल्यावर मी दुसऱ्या टप्प्याशीं आलों. येथें सुंदर पाण्याचा झरा वहात होता; तो पाहनच श्रमपरिहार झाला. येथें आलों तों सात वाजले होते. येथें एक बुटी होती. तेव्हां येथें रात्रींचा फराळ करून पहांटेपर्यंत विश्रांति व झोंप घेण्याचा मी बेत केला. बुटीवाल्यानें एक कापडी- नव्हे- गोणपाटाची खाट व त्यावर एक गवताची चटई अशा चिजा निजावयास दिल्या. मी बरोबर ओव्हरकोट आणला होता. फराळ केल्यावर मी त्या खाटेवर आडवा झालों. ओव्हरकोट अंगावर घेऊन मी खाटेवर पडलों खरा; पण झोंप कसची येते? त्या ओव्हरकोटानें थंडी मुळींच थांबेना; सारखी हुडहुडी भरत होती. पायांतले बुट काढले होते. पण पाय फार गार पडले म्हणून पुनः बुट घातले. पण काय! येरे माझ्या मागल्या! मला ती रात्र थंडीत कुडकुडत काढावी लागली; शिवाय मध्यरात्र<noinclude></noinclude> rmm5ekhe21z6yqd91jcxoawbpcllg6m पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१५९ 104 111995 236375 2026-08-30T12:16:37Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236375 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||श्रीपाद शिखर|१३७ }}</noinclude>होऊन गेली तो यात्रेकरूंची गडबड, बोलणीं व हांकाहांक ऐकूं येऊं लागली. कारण या शिखरावर चढण्याचा सररहा प्रघात म्हणजे रात्रभर शिखरावर चढत राहून, उजाडण्यापूर्वी माथ्यावर पोहोंचणे हा होय. एकदम व एका दमांत सर्व चढाव चढणें कदाचित् कठीण जाईल व एकदां झालेलें छातीचें दुखणें उमटेल ही माझ्या मनांत दहशत होती; म्हणून मी स्वतंत्र मोटारकार करून पायथ्याला लवकर येऊन दुसऱ्या टप्यावर आदले रात्रीं आलों होतों. जरी मला रात्रभर झोप लागली नाहीं तरी खाटेवर पडल्यामुळे व सहा तास पायांना विश्रांति मिळाल्यामुळे मला पहांटेस हुशारी वाटली. तेव्हां मी अडीच वाजतांच उठलों व बुटीवाल्याकडून चहाचा एक गरम पेला तयार करविला. पेलाभर चहा घेऊन मी पावणे तीन वाजतां तिसरा टप्पा चढू लागलों. हा शिखराचा टप्पा मात्र फार बिकट, ऊरफोडी व जीवजाई आहे यांत शंका नाहीं. आतां बहुतेक उभ्या जिन्यासारख्या पायऱ्या लागत होत्या; कांहीं ठिकाणीं तर खडकांत बारिक बारिक सबंद पायसुद्धां न राहील इतक्या लहान पायऱ्या खोदलेल्या होत्या. त्यांवरून जाणें फार धोक्याचें वाटलें यांत शंका नाहीं. अशा बिकट व खडकी खोदलेल्या पायऱ्यांच्या ठिकाणीं लोखंडी कठडा केलेला आहे खरा; पण तो जुना कठडा; त्यावर भार टाकणें धोक्याचेंच. तेव्हां उत्तम व सुरक्षित उपाय म्हणजे मनुष्यानें आपली वानरवंशी वृत्ती अंगिकारणें होय. मी तोच उपाय योजला हें सांगावयास नको. याप्रमाणें हातापायांनीं चढत कसाबसा दोन तासांनीं मी एकदांचा शिखराच्या माथ्यावर आलो. तेथें आधींच पुष्कळ यात्रेकरू आले होते व त्यांनी धुम्या पेटविल्या होत्या. तेव्हां त्या धुम्यांजवळ मी जाऊन बसलों. बाकी चढण्याच्या श्रमानें अंगांत बरीच उष्णता आल्यामुळें खाली बुटींत जितकी थंडी वाजली तितकी येथें थंडी वाजली नाहीं.<Br>{{gap}}लंकेंत यावयाचा बेत केल्यापासून '''ॲडॅम्स पीक''' वर जावयाचें असा मी मनाशी निश्चय केला होता; अर्थात् माझ्या पूर्वीच्या छातीच्या दुखण्यामुळे येवढ्या उंचीच्या शिखरावर चढतांना केव्हांही दम लागूं द्याव-<noinclude></noinclude> c8v9qwmsd1cbyi9q6zspogrqx3avm3g पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१६० 104 111996 236376 2026-08-30T12:19:46Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236376 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३८ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>याचा नाहीं अशीही पण मी मनाशी खूणगांठ घालून ठेविली होती. त्याप्रमाणें म्हणण्यासारखा त्रास न होतां मी या शिखरावर सुखरूप येऊन पोहोंचलों म्हणून माझ्या मनाला विलक्षण समाधान वाटलें. आज आपण एक दिव्यच केलें असें मला वाटलें.<Br>{{gap}}थोडी विश्रांति घेतल्यावर मी येथल्या बुद्धाच्या पावलाचें दर्शन घेतलें व यात्रेकरूंच्या तेथें दिसून आलेल्या रिवाजाप्रमाणें गुडघे टेकून मी तीनद मस्तक त्या पावलांवर ठेवलें. श्रीपादशिखर हें या शिखराचें बुद्धधर्मी नांव होय. कारण गौतमबुद्ध सीलोन बेटाला तीनदा आले व आपल्या येण्याचें प्रत्यक्ष प्रमाण म्हणून त्यांनी तिसऱ्यांदा या शिखरावरील खडकावर आपल्या पावलाची प्रतिमा उठविली अशी बुद्धधर्मी लोकांची दृढ भावना व श्रद्धा आहे. म्हणूनच हें शिखर इतकें पवित्र गणले जाऊन तें बुद्धधर्मी लोकांचें एक प्रमुख यात्रास्थान बनलें आहे. या शिखरावर मोठा पठार मुळींच नाहीं. शिखराचे माथ्यावर सहासात फुट उंचीचा व सात आठ फूट लांब रुंद असा एकसंधी सपाट खडक आहे. या सपाट खडकावर चार पांच फूट लांबीची व दीडदोन फूट रुंदीची पायाच्या पाऊलाची ओबडधोबड आकृति आहे. त्यावर छोट्याशा मंडपाप्रमाणें चारी बाजूंनी सर्वस्वी खुली अशी लहान इमारत बांधलेली आहे. खडकाला एका बाजूनें जाण्यास व दुसऱ्या बाजूनें परत येण्यास पायऱ्या केलेल्या आहेत. या खडकाचे सभोवार सात आठ फूट रुंदीचा प्रदक्षिणामार्ग आहे व त्या सभोवार छातीभर उंचीचा भिंतीचा कठडा आहे. यामुळे इतकें उंच व इतकें संकुचित हे ठिकाण आहे तरी येथें भय वाटत नाहीं. पावलाच्या आकृतीचें दर्शन घेण्यास येथें कोणास मज्जाव नाहीं; येथें पंड्या सारख्यांचा त्रास नाहीं; येथें सर्वांना मुक्तद्वार आहे. फक्त सर्व बुद्ध देवळांना जो नियम सररहा व सक्त रीतीनें लागू आहे तो नियम येथें पाळावा लागतो; तो म्हणजे पायऱ्यांयांचे खालीं पादत्राण व शिरस्त्राण अशीं दोन्हींही काढून ठेवावी लागतात. बौद्ध यात्रास्थानें मुक्तद्वारें ठेवण्यांत बुद्धधर्माचा हा केवढा तरी उदार-<noinclude></noinclude> 1wkn38rcehoam0i59mtgsjdck246ksh पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१६१ 104 111997 236377 2026-08-30T12:22:16Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236377 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||श्रीपाद शिखर|१३९ }}</noinclude>पणा आहे असें हें स्थान व बुद्धधर्माचीं इतर देवळें पाहून माझ्या मनांत आलें. लागलीच आमच्या हिंदु धर्मीत या मंदिर प्रवेशासंबंधी काय रणें माजली आहेत असा विचार मनांत आला. धर्माच्या बाबतींतील आपली संकुचित व कोतीवृत्ति टाकून हिंदुधर्मानें बुद्धधर्माचें उदार धोरण स्वीकारले पाहिजे तरच हल्लींच्या विचारजागृतीच्या व समानहक्काच्या भावनेच्या काळांत हिंदूधर्मीचा निभाव आहे; नाहींतर या धर्मातील एक मोठा वर्ग कालेकरून त्या धर्माला पारखा होईल असें माझ्या मनांत आलें.<Br>{{gap}}श्रीपादशिखरावरील पहिलें काम बुद्धाच्या पावलाचें दर्शन घेणें हें उरकण्यास हिंदुधर्माच्या देवदर्शनाप्रमाणे वेळ लागत नाहीं किंवा यातायात पडत नाहीं. अर्थात् तें काम मी तेव्हांच उरकलें. मग येथलें तितकेंच महत्त्वाचे किंबहुना अधिक महत्त्वाचें व अधिक आश्चर्यकारक काम म्हणजे येथला सूर्योदय पाहणें हे होय. या कामाकडे माझे व इतर यात्रेकरूंचे डोळे सकाळच्या सहा वाजल्यापासून लागले. आम्हीं सर्व मंडळीं पूर्वदिशेच्या भिंतीशीं उभी राहून सूर्योदय केव्हां होतो तें पहाण्यास टपून बसलो. रात्र- नव्हे आतां उजाडता दिवस- प्रतिपदेचा होता. अर्थात् पश्चिम दिशेच्या क्षितीजाकडे चंद्र गेला होता; प्रथम त्याचा प्रकाश चकचकीत पडला होता व तो सतेज दिसत होता. इकडे साहाचे सुमारास पूर्वदिशेस किंचित् तांबूस अशी बारिक धार दिसूं लागली. क्षणोक्षणीं ती लांबच लांब व थोडीशी रुंद होत चालली; तोंच इकडे चंद्र निस्तेज होत चालला व त्याचा प्रकाश मंद होत चालला. यावेळी मला कालिदासाच्या एका प्रसिद्ध श्लोकाची आठवण झाली. कालिदासानें वर्णन केलेला चन्द्रसूर्याचा एकदम अस्तोदय मी त्यावेळी पहात होतों. पहातां पहातां पूर्वेकडे तांबड्या रंगाऐवजी सोनेरी पिवळ्या रंगाची किनार क्षितिजावर दिसूं लागली. दूरवरचे ढग तांबडेलाल दिसूं लागले व सर्वत्र भराभर प्रकाश बाहूं लागला; चन्द्र जास्त जास्त निस्तेज व निष्प्रभ होत चालला. इतक्यांत पिवळ्या रंगाला पांढरटपणा येत चालला व शुभ्र प्रकाश वाढत चालला. आतां तांबडा पिवळा रंग<noinclude></noinclude> dca6jyo33e7tw31zfezlywgcjfwmc9t पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/९४ 104 111998 236379 2026-08-30T12:56:32Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ८२ ) - कर, आणि तोहि इतके प्राण खर्ची घालून त्यांनां यावा लागल्यामुळे, मनाला खेद वाटून कीव येते. व्यवहारांत धूर्त ह्मणविणारे लोक, धर्मसमजुतीमुळे कसे बेवकूब बनतात, ते बघून आश..." 236379 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ८२ ) - कर, आणि तोहि इतके प्राण खर्ची घालून त्यांनां यावा लागल्यामुळे, मनाला खेद वाटून कीव येते. व्यवहारांत धूर्त ह्मणविणारे लोक, धर्मसमजुतीमुळे कसे बेवकूब बनतात, ते बघून आश्चर्य वाटतें. तसेंच काफरांच्या हिंदूच्या एका अतिप्रसिद्ध देवालयाचा नाश करून पुण्य जोडावयाचें, कीर्ति मिळवावयाची, अशा उमेदीनें, निश्चयानें, शेंकडों कोस कूच करून येणाऱ्या महमूदाचें धर्म- प्रेम, साहस, शौर्य द्दी पाहून त्याच्याविषयीं मनांत आदर उत्पन्न होतो. महमूद रानटी स्वभावाचा माणूस नव्हता. तो विद्येचा चाहता होता. भोजराजाप्रमाणें आपल्या दरबारीं त्यानें रत्नँ बाळगिलीं होतीं. त्यांपैकीं बिरूनी व फर्दूसी यांचीं नांवें हजारोजणांनां परिचयाची झाली आहेत. तिरस्कार, खेद, आश्चर्य, आदर आणि हास्य अशा परस्परविरुद्ध भावना एकाच प्रसंगासंबंधानें मनांत येण्यास सर्व बाजूंनी विचार करण्याची संवय लागली पाहिजे. धिमेपणा पाहिजे. सत्याचा अभिमान पाहिजे, मनाला खंत वाटली पाहिजे. विसंगतपणाची जाणीव. सर्व बाजूंनी विचार करणे, ह्मणजे विसंगतपणाची जाणीव अंगी आणणें होय. आणि विसंगतपणाची जाणीव ही विनोदाची पहिली खूण आहे. विनो- दाची पूर्णावस्था मात्र, शरीर व आत्मा, या भिन्न प्रकृतीच्या नरदेहाच्या घटकांच्या अन्योन्यसंबंधावर अवलंबून आहे. विसंगतपणाचें मूळ या बिजो- डांच्या संयोगांत आहे. मनुष्याचे शरीर, त्यांतल्या शिरांची योजना, त्यांची मेंदूशी जोडणी, मेंदूची रचना, यांमध्ये जरी सृष्टीच्या करामतीचा कळस झाला असला, तरी या दृष्टीने इतर प्राणिवर्गापैकी एक, इतकाच मनुष्याचा दर्जा ठरतो. मनुष्यामध्ये दिसणारी स्वतःची जाणीव (Self-Consciousness ) ही देखील शास्त्रांच्या दृष्टीने इतर प्राण्यांमध्ये असलेल्या जाणीवेचें परिणत रूप असे दिसूं लागतें. कारण प्राणिवर्गामध्यें मनुष्य जितका श्रेष्ठ, तितकी त्याची जाणीवहि इतरपेिक्षां श्रेष्ठ असणे स्वाभाविक आहे, असें वाटू लागतें. सर्व प्राण्यांमध्ये माणसांनाच हंसता येते, याचे देखील विशेष आश्चर्य वाटत नाहीं. याप्रमार्णे शास्त्रांचा कल मनुष्यप्राण्यांचा विशिष्टपणा कमी करण्याकडे, सृष्टवस्तूंचे सर्व नियम मनुष्याला पूर्णपणे लावण्याकडे, त्याच्या आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व नाकबूल करण्याकडे असतो. पण इतर प्राण्यांप्रमाणे शरीराबरोबर स्वतःच्या<noinclude></noinclude> 82ofjczpbcqpqi9392knmwzntxz1ofr 236380 236379 2026-08-30T13:05:13Z JayashreeVI 4058 236380 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८२)'''}}}}</noinclude>कर, आणि तोहि इतके प्राण खर्ची घालून त्यांनां द्यावा लागल्यामुळे, मनाला खेद वाटून कीव येते. व्यवहारांत धूर्त ह्मणविणारे लोक, धर्मसमजुतीमुळे कसे बेवकूब बनतात, ते बघून आश्चर्य वाटतें. तसेंच काफरांच्या हिंदूच्या एका अतिप्रसिद्ध देवालयाचा नाश करून पुण्य जोडावयाचें, कीर्ति मिळवावयाची, अशा उमेदीनें, निश्चयानें, शेंकडों कोस कूच करून येणाऱ्या महमूदाचें धर्मप्रेम, साहस, शौर्य ही पाहून त्याच्याविषयीं मनांत आदर उत्पन्न होतो. महमूद रानटी स्वभावाचा माणूस नव्हता. तो विद्येचा चाहता होता. भोजराजाप्रमाणें आपल्या दरबारीं त्यानें रत्ने बाळगिलीं होतीं. त्यांपैकीं बिरूनी व फर्दूसी यांचीं नांवें हजारोजणांनां परिचयाची झाली आहेत. तिरस्कार, खेद, आश्चर्य, आदर आणि हास्य अशा परस्परविरुद्ध भावना एकाच प्रसंगासंबंधानें मनांत येण्यास सर्व बाजूंनी विचार करण्याची संवय लागली पाहिजे. धिमेपणा पाहिजे. सत्याचा अभिमान पाहिजे, मनाला खंत वाटली पाहिजे. {{center|{{larger|'''विसंगतपणाची जाणीव.'''}}}} {{gap}}सर्व बाजूंनी विचार करणे, ह्मणजे विसंगतपणाची जाणीव अंगी आणणें होय. आणि विसंगतपणाची जाणीव ही विनोदाची पहिली खूण आहे. विनोदाची पूर्णावस्था मात्र, शरीर व आत्मा, या भिन्न प्रकृतीच्या नरदेहाच्या घटकांच्या अन्योन्यसंबंधावर अवलंबून आहे. विसंगतपणाचें मूळ या बिजोडांच्या संयोगांत आहे. मनुष्याचे शरीर, त्यांतल्या शिरांची योजना, त्यांची मेंदूशी जोडणी, मेंदूची रचना, यांमध्ये जरी सृष्टीच्या करामतीचा कळस झाला असला, तरी या दृष्टीने इतर प्राणिवर्गापैकी एक, इतकाच मनुष्याचा दर्जा ठरतो. मनुष्यामध्ये दिसणारी स्वतःची जाणीव (Self-Consciousness ) ही देखील शास्त्रांच्या दृष्टीने इतर प्राण्यांमध्ये असलेल्या जाणीवेचें परिणत रूप असे दिसूं लागतें. कारण प्राणिवर्गामध्यें मनुष्य जितका श्रेष्ठ, तितकी त्याची जाणीवहि इतरपेिक्षां श्रेष्ठ असणे स्वाभाविक आहे, असें वाटू लागतें. सर्व प्राण्यांमध्ये माणसांनाच हंसता येते, याचे देखील विशेष आश्चर्य वाटत नाहीं. याप्रमार्णे शास्त्रांचा कल मनुष्यप्राण्यांचा विशिष्टपणा कमी करण्याकडे, सृष्टवस्तूंचे सर्व नियम मनुष्याला पूर्णपणे लावण्याकडे, त्याच्या आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व नाकबूल करण्याकडे असतो. पण इतर प्राण्यांप्रमाणे शरीराबरोबर स्वतःच्या<noinclude></noinclude> nbr8l7t5ex8jt3r7x2jt8vs6eko2hli 236381 236380 2026-08-30T13:05:41Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 236381 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८२)'''}}}}</noinclude>कर, आणि तोहि इतके प्राण खर्ची घालून त्यांनां द्यावा लागल्यामुळे, मनाला खेद वाटून कीव येते. व्यवहारांत धूर्त ह्मणविणारे लोक, धर्मसमजुतीमुळे कसे बेवकूब बनतात, ते बघून आश्चर्य वाटतें. तसेंच काफरांच्या हिंदूच्या एका अतिप्रसिद्ध देवालयाचा नाश करून पुण्य जोडावयाचें, कीर्ति मिळवावयाची, अशा उमेदीनें, निश्चयानें, शेंकडों कोस कूच करून येणाऱ्या महमूदाचें धर्मप्रेम, साहस, शौर्य ही पाहून त्याच्याविषयीं मनांत आदर उत्पन्न होतो. महमूद रानटी स्वभावाचा माणूस नव्हता. तो विद्येचा चाहता होता. भोजराजाप्रमाणें आपल्या दरबारीं त्यानें रत्ने बाळगिलीं होतीं. त्यांपैकीं बिरूनी व फर्दूसी यांचीं नांवें हजारोजणांनां परिचयाची झाली आहेत. तिरस्कार, खेद, आश्चर्य, आदर आणि हास्य अशा परस्परविरुद्ध भावना एकाच प्रसंगासंबंधानें मनांत येण्यास सर्व बाजूंनी विचार करण्याची संवय लागली पाहिजे. धिमेपणा पाहिजे. सत्याचा अभिमान पाहिजे, मनाला खंत वाटली पाहिजे. {{center|{{larger|'''विसंगतपणाची जाणीव.'''}}}} {{gap}}सर्व बाजूंनी विचार करणे, ह्मणजे विसंगतपणाची जाणीव अंगी आणणें होय. आणि विसंगतपणाची जाणीव ही विनोदाची पहिली खूण आहे. विनोदाची पूर्णावस्था मात्र, शरीर व आत्मा, या भिन्न प्रकृतीच्या नरदेहाच्या घटकांच्या अन्योन्यसंबंधावर अवलंबून आहे. विसंगतपणाचें मूळ या बिजोडांच्या संयोगांत आहे. मनुष्याचे शरीर, त्यांतल्या शिरांची योजना, त्यांची मेंदूशी जोडणी, मेंदूची रचना, यांमध्ये जरी सृष्टीच्या करामतीचा कळस झाला असला, तरी या दृष्टीने इतर प्राणिवर्गापैकी एक, इतकाच मनुष्याचा दर्जा ठरतो. मनुष्यामध्ये दिसणारी स्वतःची जाणीव (Self-Consciousness ) ही देखील शास्त्रांच्या दृष्टीने इतर प्राण्यांमध्ये असलेल्या जाणीवेचें परिणत रूप असे दिसूं लागतें. कारण प्राणिवर्गामध्यें मनुष्य जितका श्रेष्ठ, तितकी त्याची जाणीवहि इतरपेिक्षां श्रेष्ठ असणे स्वाभाविक आहे, असें वाटू लागतें. सर्व प्राण्यांमध्ये माणसांनाच हंसता येते, याचे देखील विशेष आश्चर्य वाटत नाहीं. याप्रमार्णे शास्त्रांचा कल मनुष्यप्राण्यांचा विशिष्टपणा कमी करण्याकडे, सृष्टवस्तूंचे सर्व नियम मनुष्याला पूर्णपणे लावण्याकडे, त्याच्या आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व नाकबूल करण्याकडे असतो. पण इतर प्राण्यांप्रमाणे शरीराबरोबर स्वतःच्या<noinclude></noinclude> rfe9ft239o2q7vi36p789lew3uxznf7 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/९५ 104 111999 236382 2026-08-30T13:06:10Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ८३ ) आत्म्याचें अवसान होतें असे मानण्यास, विनाशी सृष्टीचे नियम आत्म्याला लावण्यास तो तयार नसतो. शरीर व आत्मा यांचा संबंध जरी उघड असला, तरी पशूंच्याइतका त्याच्या शरीराचा..." 236382 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ८३ ) आत्म्याचें अवसान होतें असे मानण्यास, विनाशी सृष्टीचे नियम आत्म्याला लावण्यास तो तयार नसतो. शरीर व आत्मा यांचा संबंध जरी उघड असला, तरी पशूंच्याइतका त्याच्या शरीराचा आत्म्यावर ताबा चालत नसल्यामुळे, आत्म्याची सृष्टि शरीराच्याहून अगदीं भिन्न आहे, एक दृश्य, तर दुसरी भर्ती- द्रिय आहे, असें तो मानतो. शास्त्रें व धर्म यांच्या लढ्याचें कारण हेंच आहे. एकाच्या मतें शरीर आत्म्याच्या उन्नतीचे मुख्य साधन, तर दुसऱ्याच्या मतें शरीर आत्म्याच्या अवनतीचे मूळ, येथपर्यंत विरोध कधीकधी दिसून येतो. खरोखर स्थिति झणजे शरीर उन्नतीचें साधन, व अवनतीचे मूळ दोन्हीहि आहे. उपयोग करणारावर सर्व अवलंबून आहे. मनुष्यमात्राची सारी धडपड याकरितांच असते. शरीर व आत्मा यांच्या संयोगांत विसंगतपणाचे मूळ आहे, हें जरी ध्यानांत आले, तरी त्यांचे परस्परसंबंध इतके गुंतागुंतीचे आणि गूढ आहेत कीं, ते पुरंतपणीं समजणे दुरापास्त होते. इतकेंच नव्हे, तर, अवनति ह्मणजे काय, अधोगति कशाला ह्मणावयाची, उन्नति ह्मणजे काय, तिचे मार्ग कोणते, उपाय कोणते या मुख्य बाबतींत वाद राहतोच. धंदा, स्वभाव व बुद्धि ह्रीं सर्वोत सारखी नसल्यामुळे अवनति, अधोगति, व उन्नति, यांचे अनेक व परस्परवि- विरुद्ध देखील अर्थ झालेले आपल्याला दिसतात. निश्चयाचे बळ प्रत्येकांत सारखें नसल्यामुळे, या बाबतीत एकमत होणाऱ्या लोकांमध्ये देखील समजुतीत व वागण्यांत विलक्षण फरक पडतात. सांप्रदाय स्थापणारा पुरुष ( founder ) आणि त्याचे भक्तमंडळ यांची परंपरा न राहिल्यामुळे, तो सांप्रदाय खालाव- ल्याची उदाहरणे सर्वत्र आढळतात. परंपरा न टिकण्याचे कारण, व्यक्ती व्यक्तीं- तले फरक हैं उघड आहे. नेहमीं समजुतीप्रमाणे न वागल्यानें विसंगतपणा पदति येतोच, पण त्याबरोबर आशेप्रमाणे फळ मिळणे, प्रयत्नाप्रमाणे यश येणे अशक्य होतें. फळ व यश ही पुरतीं न मिळाल्यानें कारणांची शहानिशा न करतां मनुष्य कधीं- कर्धी हताश होतो, बिचाऱ्या शरीरावर, मनुष्यस्वभावावर, संसारावर, राग काढतो. पण निर्धार वाढविणे, हा जो खरा उपाय तो मात्र करीत नाहीं. संसा- रांत, शरीर व आत्मा, यांची कमीअधिक मानानें हेळसांडच होते. कांहीजण शरीराची जोपासना करण्यांत आत्म्याकडे दुर्लक्ष करितात; काहीजण आ- त्म्याला सद्गति देण्याच्या खटपटीत शरीराची उपासमार करितात; बाकीचे लोक<noinclude></noinclude> 4fsq3y1keqq7qldkv2pbeaprgy6fb74 236383 236382 2026-08-30T13:16:41Z JayashreeVI 4058 236383 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८३)'''}}}}</noinclude>आत्म्याचें अवसान होतें असे मानण्यास, विनाशी सृष्टीचे नियम आत्म्याला लावण्यास तो तयार नसतो. शरीर व आत्मा यांचा संबंध जरी उघड असला, तरी पशूंच्याइतका त्याच्या शरीराचा आत्म्यावर ताबा चालत नसल्यामुळे, आत्म्याची सृष्टि शरीराच्याहून अगदीं भिन्न आहे, एक दृश्य, तर दुसरी अतींद्रिय आहे, असें तो मानतो. शास्त्रें व धर्म यांच्या लढ्याचें कारण हेंच आहे. एकाच्या मतें शरीर आत्म्याच्या उन्नतीचे मुख्य साधन, तर दुसऱ्याच्या मतें शरीर आत्म्याच्या अवनतीचे मूळ, येथपर्यंत विरोध कधीकधी दिसून येतो. खरोखर स्थिति म्हणजे शरीर उन्नतीचें साधन, व अवनतीचे मूळ दोन्हीहि आहे. उपयोग करणारावर सर्व अवलंबून आहे. मनुष्यमात्राची सारी धडपड याकरितांच असते. <br>{{gap}}शरीर व आत्मा यांच्या संयोगांत विसंगतपणाचे मूळ आहे, हें जरी ध्यानांत आले, तरी त्यांचे परस्परसंबंध इतके गुंतागुंतीचे आणि गूढ आहेत कीं, ते पुरंतपणीं समजणे दुरापास्त होते. इतकेंच नव्हे, तर, अवनति ह्मणजे काय, अधोगति कशाला ह्मणावयाची, उन्नति ह्मणजे काय, तिचे मार्ग कोणते, उपाय कोणते या मुख्य बाबतींत वाद राहतोच. धंदा, स्वभाव व बुद्धि ही सर्वात सारखी नसल्यामुळे अवनति, अधोगति, व उन्नति, यांचे अनेक व परस्परविरुद्ध देखील अर्थ झालेले आपल्याला दिसतात. निश्चयाचे बळ प्रत्येकांत सारखें नसल्यामुळे, या बाबतीत एकमत होणाऱ्या लोकांमध्ये देखील समजुतीत व वागण्यांत विलक्षण फरक पडतात. सांप्रदाय स्थापणारा पुरुष (founder) आणि त्याचे भक्तमंडळ यांची परंपरा न राहिल्यामुळे, तो सांप्रदाय खालावल्याची उदाहरणे सर्वत्र आढळतात. परंपरा न टिकण्याचे कारण, व्यक्ती व्यक्तींतले फरक हे उघड आहे. नेहमीं समजुतीप्रमाणे न वागल्यानें विसंगतपणा पदरात येतोच, पण त्याबरोबर आशेप्रमाणे फळ मिळणे, प्रयत्नाप्रमाणे यश येणे अशक्य होतें. फळ व यश ही पुरतीं न मिळाल्यानें कारणांची शहानिशा न करतां मनुष्य कधींकधी हताश होतो, बिचाऱ्या शरीरावर, मनुष्यस्वभावावर, संसारावर, राग काढतो. पण निर्धार वाढविणे, हा जो खरा उपाय तो मात्र करीत नाहीं. संसारांत, शरीर व आत्मा, यांची कमीअधिक मानानें हेळसांडच होते. कांहीजण शरीराची जोपासना करण्यांत आत्म्याकडे दुर्लक्ष करितात; काहीजण आत्म्याला सद्गति देण्याच्या खटपटीत शरीराची उपासमार करितात; बाकीचे लोक<noinclude></noinclude> q2rhevfh4ttxrcsbxuk4ldwmrjye9zs 236384 236383 2026-08-30T13:17:09Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 236384 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८३)'''}}}}</noinclude>आत्म्याचें अवसान होतें असे मानण्यास, विनाशी सृष्टीचे नियम आत्म्याला लावण्यास तो तयार नसतो. शरीर व आत्मा यांचा संबंध जरी उघड असला, तरी पशूंच्याइतका त्याच्या शरीराचा आत्म्यावर ताबा चालत नसल्यामुळे, आत्म्याची सृष्टि शरीराच्याहून अगदीं भिन्न आहे, एक दृश्य, तर दुसरी अतींद्रिय आहे, असें तो मानतो. शास्त्रें व धर्म यांच्या लढ्याचें कारण हेंच आहे. एकाच्या मतें शरीर आत्म्याच्या उन्नतीचे मुख्य साधन, तर दुसऱ्याच्या मतें शरीर आत्म्याच्या अवनतीचे मूळ, येथपर्यंत विरोध कधीकधी दिसून येतो. खरोखर स्थिति म्हणजे शरीर उन्नतीचें साधन, व अवनतीचे मूळ दोन्हीहि आहे. उपयोग करणारावर सर्व अवलंबून आहे. मनुष्यमात्राची सारी धडपड याकरितांच असते. <br>{{gap}}शरीर व आत्मा यांच्या संयोगांत विसंगतपणाचे मूळ आहे, हें जरी ध्यानांत आले, तरी त्यांचे परस्परसंबंध इतके गुंतागुंतीचे आणि गूढ आहेत कीं, ते पुरंतपणीं समजणे दुरापास्त होते. इतकेंच नव्हे, तर, अवनति ह्मणजे काय, अधोगति कशाला ह्मणावयाची, उन्नति ह्मणजे काय, तिचे मार्ग कोणते, उपाय कोणते या मुख्य बाबतींत वाद राहतोच. धंदा, स्वभाव व बुद्धि ही सर्वात सारखी नसल्यामुळे अवनति, अधोगति, व उन्नति, यांचे अनेक व परस्परविरुद्ध देखील अर्थ झालेले आपल्याला दिसतात. निश्चयाचे बळ प्रत्येकांत सारखें नसल्यामुळे, या बाबतीत एकमत होणाऱ्या लोकांमध्ये देखील समजुतीत व वागण्यांत विलक्षण फरक पडतात. सांप्रदाय स्थापणारा पुरुष (founder) आणि त्याचे भक्तमंडळ यांची परंपरा न राहिल्यामुळे, तो सांप्रदाय खालावल्याची उदाहरणे सर्वत्र आढळतात. परंपरा न टिकण्याचे कारण, व्यक्ती व्यक्तींतले फरक हे उघड आहे. नेहमीं समजुतीप्रमाणे न वागल्यानें विसंगतपणा पदरात येतोच, पण त्याबरोबर आशेप्रमाणे फळ मिळणे, प्रयत्नाप्रमाणे यश येणे अशक्य होतें. फळ व यश ही पुरतीं न मिळाल्यानें कारणांची शहानिशा न करतां मनुष्य कधींकधी हताश होतो, बिचाऱ्या शरीरावर, मनुष्यस्वभावावर, संसारावर, राग काढतो. पण निर्धार वाढविणे, हा जो खरा उपाय तो मात्र करीत नाहीं. संसारांत, शरीर व आत्मा, यांची कमीअधिक मानानें हेळसांडच होते. कांहीजण शरीराची जोपासना करण्यांत आत्म्याकडे दुर्लक्ष करितात; काहीजण आत्म्याला सद्गति देण्याच्या खटपटीत शरीराची उपासमार करितात; बाकीचे लोक<noinclude></noinclude> p301yer2fq0ctdj042hh7n63kh23iz8 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/९६ 104 112000 236385 2026-08-30T13:25:49Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "कधीं शरीराची, तर कधीं आत्म्याची, अशी आळीपाळीनें दुर्दशा करितात. शरीर व आत्मा यांचे योग्य पोषण करून, एकाला दुसऱ्याचा मित्र बनविणारा महाभाग विरळा. अशी खरी स्थिति असल्यामुळे, असामा..." 236385 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८४)'''}}}}</noinclude>कधीं शरीराची, तर कधीं आत्म्याची, अशी आळीपाळीनें दुर्दशा करितात. शरीर व आत्मा यांचे योग्य पोषण करून, एकाला दुसऱ्याचा मित्र बनविणारा महाभाग विरळा. अशी खरी स्थिति असल्यामुळे, असामान्य व्यक्तींना आपण अधोगतीचे मूळ अजिबात खणून टाकले आहे असा भास होतो अशी त्यांची फसवणूक होते. स्वतःचे दोष पदोपदीं प्रत्ययाला येणारे सामान्य लोक त्यांनी पाहून खुळावतात. लोकोत्तर पुरुषांचा संग त्यांच्यासारखी वृत्ति बनविण्याकरितां, योग्य उपाय शिकण्याकरिता असतो, त्यांची पूजा करण्याकरिता नसतो, ही साधी गोष्ट ते विसरतात. त्यांनां देवाचे अवतार मानतात. त्यांचे बोल सर्वथैव प्रमाण समजतात. सर्व मानवांना लागू होणारे जन्ममरणाचे व आचरणाचे नियम यांनां ते अपवाद आहेत, असें ह्मणण्यापर्यंत ते विचारमूढ होतात. पण देहांत शरीर व आत्मा यांची गांठ पडल्यामुळे ती कायम असेपर्यंत, मनुष्यपणाची मर्यादा ओलांडल्याची भावना भ्रामक आहे, अशी खात्री करण्यास निसर्ग कधीं चुकत नाहीं. पापाच्या मूळाचा नाश केल्याचा मनुष्याचा जितका आव जास्त, तितकी त्याची तारांबळ उडविण्याची निसर्गाची इच्छा अनावर, असें दिसूं लागतें. {{block center<poem>"महादेव बडादेव सबदेवोंका बाबा।<br> भिल्लणके पीछे लगा हुवा तोबा तोबा!"</poem>}} {{gap}}या कवनाचा रोख, महादेवालादेखील शरीराचे पाश सोडीत नाहींत, मग बिचाऱ्या सामान्य लोकांवर एवढा रोष कां? असा आहे. मेनकेला पाहून विश्वामित्राची झालेली धांदल असलेच विचार सुचवते. कोणीहि फार तप करूं लागला, मनुष्यत्वाची सीमा ओलांडून अमर होण्याची हांव धरून धडपड करूं लागला, की अमरांचा अधिपति जो इंद्र, तो असल्या व्यक्तींची तिरपिट उडविण्याकरितां, खात्रीचा उपाय ह्मणून, एखाद्या अप्सरेची योजना करीत असे, व त्याला यशहि मिळत असे. यावरून, मनुष्यपण कोठें सरतें व देवपण कोठे सुरू होतें, ते इंद्राला बिनचूक माहीत होतें, असा पुराणांतल्या कथांमधून सारांश काढता येणार नाहीं काय? मनुष्यत्वाचा विसर पडणाऱ्या प्राण्यांचा भ्रम दूर करणारा, मनुष्यलोकींच पुरुषार्थ करण्यास भाग पाडणारा स्वर्गाचा राजा इंद्र, विनोदाचा आद्यजनक होत नाहीं काय?<noinclude></noinclude> hkdppjufmmk4zlvlnbbi76l68usp3vt 236386 236385 2026-08-30T13:26:34Z JayashreeVI 4058 236386 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८४)'''}}}}</noinclude>कधीं शरीराची, तर कधीं आत्म्याची, अशी आळीपाळीनें दुर्दशा करितात. शरीर व आत्मा यांचे योग्य पोषण करून, एकाला दुसऱ्याचा मित्र बनविणारा महाभाग विरळा. अशी खरी स्थिति असल्यामुळे, असामान्य व्यक्तींना आपण अधोगतीचे मूळ अजिबात खणून टाकले आहे असा भास होतो अशी त्यांची फसवणूक होते. स्वतःचे दोष पदोपदीं प्रत्ययाला येणारे सामान्य लोक त्यांनी पाहून खुळावतात. लोकोत्तर पुरुषांचा संग त्यांच्यासारखी वृत्ति बनविण्याकरितां, योग्य उपाय शिकण्याकरिता असतो, त्यांची पूजा करण्याकरिता नसतो, ही साधी गोष्ट ते विसरतात. त्यांनां देवाचे अवतार मानतात. त्यांचे बोल सर्वथैव प्रमाण समजतात. सर्व मानवांना लागू होणारे जन्ममरणाचे व आचरणाचे नियम यांनां ते अपवाद आहेत, असें ह्मणण्यापर्यंत ते विचारमूढ होतात. पण देहांत शरीर व आत्मा यांची गांठ पडल्यामुळे ती कायम असेपर्यंत, मनुष्यपणाची मर्यादा ओलांडल्याची भावना भ्रामक आहे, अशी खात्री करण्यास निसर्ग कधीं चुकत नाहीं. पापाच्या मूळाचा नाश केल्याचा मनुष्याचा जितका आव जास्त, तितकी त्याची तारांबळ उडविण्याची निसर्गाची इच्छा अनावर, असें दिसूं लागतें. {{block center|<poem>"महादेव बडादेव सबदेवोंका बाबा।<br> भिल्लणके पीछे लगा हुवा तोबा तोबा!"</poem>}} {{gap}}या कवनाचा रोख, महादेवालादेखील शरीराचे पाश सोडीत नाहींत, मग बिचाऱ्या सामान्य लोकांवर एवढा रोष कां? असा आहे. मेनकेला पाहून विश्वामित्राची झालेली धांदल असलेच विचार सुचवते. कोणीहि फार तप करूं लागला, मनुष्यत्वाची सीमा ओलांडून अमर होण्याची हांव धरून धडपड करूं लागला, की अमरांचा अधिपति जो इंद्र, तो असल्या व्यक्तींची तिरपिट उडविण्याकरितां, खात्रीचा उपाय ह्मणून, एखाद्या अप्सरेची योजना करीत असे, व त्याला यशहि मिळत असे. यावरून, मनुष्यपण कोठें सरतें व देवपण कोठे सुरू होतें, ते इंद्राला बिनचूक माहीत होतें, असा पुराणांतल्या कथांमधून सारांश काढता येणार नाहीं काय? मनुष्यत्वाचा विसर पडणाऱ्या प्राण्यांचा भ्रम दूर करणारा, मनुष्यलोकींच पुरुषार्थ करण्यास भाग पाडणारा स्वर्गाचा राजा इंद्र, विनोदाचा आद्यजनक होत नाहीं काय?<noinclude></noinclude> mpn43pkk2j25c2mwksj7ul4gukp0tyi 236387 236386 2026-08-30T13:27:25Z JayashreeVI 4058 236387 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८४)'''}}}}</noinclude>कधीं शरीराची, तर कधीं आत्म्याची, अशी आळीपाळीनें दुर्दशा करितात. शरीर व आत्मा यांचे योग्य पोषण करून, एकाला दुसऱ्याचा मित्र बनविणारा महाभाग विरळा. अशी खरी स्थिति असल्यामुळे, असामान्य व्यक्तींना आपण अधोगतीचे मूळ अजिबात खणून टाकले आहे असा भास होतो अशी त्यांची फसवणूक होते. स्वतःचे दोष पदोपदीं प्रत्ययाला येणारे सामान्य लोक त्यांनी पाहून खुळावतात. लोकोत्तर पुरुषांचा संग त्यांच्यासारखी वृत्ति बनविण्याकरितां, योग्य उपाय शिकण्याकरिता असतो, त्यांची पूजा करण्याकरिता नसतो, ही साधी गोष्ट ते विसरतात. त्यांनां देवाचे अवतार मानतात. त्यांचे बोल सर्वथैव प्रमाण समजतात. सर्व मानवांना लागू होणारे जन्ममरणाचे व आचरणाचे नियम यांनां ते अपवाद आहेत, असें ह्मणण्यापर्यंत ते विचारमूढ होतात. पण देहांत शरीर व आत्मा यांची गांठ पडल्यामुळे ती कायम असेपर्यंत, मनुष्यपणाची मर्यादा ओलांडल्याची भावना भ्रामक आहे, अशी खात्री करण्यास निसर्ग कधीं चुकत नाहीं. पापाच्या मूळाचा नाश केल्याचा मनुष्याचा जितका आव जास्त, तितकी त्याची तारांबळ उडविण्याची निसर्गाची इच्छा अनावर, असें दिसूं लागतें. {{block center|<poem>'''"महादेव बडादेव सबदेवोंका बाबा।<br> भिल्लणके पीछे लगा हुवा तोबा तोबा!"'''</poem>}} {{gap}}या कवनाचा रोख, महादेवालादेखील शरीराचे पाश सोडीत नाहींत, मग बिचाऱ्या सामान्य लोकांवर एवढा रोष कां? असा आहे. मेनकेला पाहून विश्वामित्राची झालेली धांदल असलेच विचार सुचवते. कोणीहि फार तप करूं लागला, मनुष्यत्वाची सीमा ओलांडून अमर होण्याची हांव धरून धडपड करूं लागला, की अमरांचा अधिपति जो इंद्र, तो असल्या व्यक्तींची तिरपिट उडविण्याकरितां, खात्रीचा उपाय ह्मणून, एखाद्या अप्सरेची योजना करीत असे, व त्याला यशहि मिळत असे. यावरून, मनुष्यपण कोठें सरतें व देवपण कोठे सुरू होतें, ते इंद्राला बिनचूक माहीत होतें, असा पुराणांतल्या कथांमधून सारांश काढता येणार नाहीं काय? मनुष्यत्वाचा विसर पडणाऱ्या प्राण्यांचा भ्रम दूर करणारा, मनुष्यलोकींच पुरुषार्थ करण्यास भाग पाडणारा स्वर्गाचा राजा इंद्र, विनोदाचा आद्यजनक होत नाहीं काय?<noinclude></noinclude> d4d7s4piplzezdi1unq1sbqcf9nxokn 236388 236387 2026-08-30T13:27:49Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 236388 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८४)'''}}}}</noinclude>कधीं शरीराची, तर कधीं आत्म्याची, अशी आळीपाळीनें दुर्दशा करितात. शरीर व आत्मा यांचे योग्य पोषण करून, एकाला दुसऱ्याचा मित्र बनविणारा महाभाग विरळा. अशी खरी स्थिति असल्यामुळे, असामान्य व्यक्तींना आपण अधोगतीचे मूळ अजिबात खणून टाकले आहे असा भास होतो अशी त्यांची फसवणूक होते. स्वतःचे दोष पदोपदीं प्रत्ययाला येणारे सामान्य लोक त्यांनी पाहून खुळावतात. लोकोत्तर पुरुषांचा संग त्यांच्यासारखी वृत्ति बनविण्याकरितां, योग्य उपाय शिकण्याकरिता असतो, त्यांची पूजा करण्याकरिता नसतो, ही साधी गोष्ट ते विसरतात. त्यांनां देवाचे अवतार मानतात. त्यांचे बोल सर्वथैव प्रमाण समजतात. सर्व मानवांना लागू होणारे जन्ममरणाचे व आचरणाचे नियम यांनां ते अपवाद आहेत, असें ह्मणण्यापर्यंत ते विचारमूढ होतात. पण देहांत शरीर व आत्मा यांची गांठ पडल्यामुळे ती कायम असेपर्यंत, मनुष्यपणाची मर्यादा ओलांडल्याची भावना भ्रामक आहे, अशी खात्री करण्यास निसर्ग कधीं चुकत नाहीं. पापाच्या मूळाचा नाश केल्याचा मनुष्याचा जितका आव जास्त, तितकी त्याची तारांबळ उडविण्याची निसर्गाची इच्छा अनावर, असें दिसूं लागतें. {{block center|<poem>'''"महादेव बडादेव सबदेवोंका बाबा।<br> भिल्लणके पीछे लगा हुवा तोबा तोबा!"'''</poem>}} {{gap}}या कवनाचा रोख, महादेवालादेखील शरीराचे पाश सोडीत नाहींत, मग बिचाऱ्या सामान्य लोकांवर एवढा रोष कां? असा आहे. मेनकेला पाहून विश्वामित्राची झालेली धांदल असलेच विचार सुचवते. कोणीहि फार तप करूं लागला, मनुष्यत्वाची सीमा ओलांडून अमर होण्याची हांव धरून धडपड करूं लागला, की अमरांचा अधिपति जो इंद्र, तो असल्या व्यक्तींची तिरपिट उडविण्याकरितां, खात्रीचा उपाय ह्मणून, एखाद्या अप्सरेची योजना करीत असे, व त्याला यशहि मिळत असे. यावरून, मनुष्यपण कोठें सरतें व देवपण कोठे सुरू होतें, ते इंद्राला बिनचूक माहीत होतें, असा पुराणांतल्या कथांमधून सारांश काढता येणार नाहीं काय? मनुष्यत्वाचा विसर पडणाऱ्या प्राण्यांचा भ्रम दूर करणारा, मनुष्यलोकींच पुरुषार्थ करण्यास भाग पाडणारा स्वर्गाचा राजा इंद्र, विनोदाचा आद्यजनक होत नाहीं काय?<noinclude></noinclude> fvc0wc49gypg7mxg2dq1bac4vzacip6 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/९७ 104 112001 236389 2026-08-30T13:28:21Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ८५ ) दृश्य व अदृश्य या दोन भिन्न वाटणाऱ्या सृष्टींचा मनुष्यदेहांत संयोग झा- ल्यामुळे, विसंगतपणा संसारांत कायमचा राहतो. शरीराचा नाश झाला, मनु- ष्यपणच लोपलें, की विसंगतपणाच..." 236389 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ८५ ) दृश्य व अदृश्य या दोन भिन्न वाटणाऱ्या सृष्टींचा मनुष्यदेहांत संयोग झा- ल्यामुळे, विसंगतपणा संसारांत कायमचा राहतो. शरीराचा नाश झाला, मनु- ष्यपणच लोपलें, की विसंगतपणाचाहि अंत होतो. जेथेंजेथें ह्मणून मनुष्यपण आहे, अपूर्णत्व आहे, तेथें तेथें विसंगतपणाहि आहे. देवपण किंवा पूर्णत्व आणि विसंगतपणा, हे गुण कधीहि एके ठिकाणीं सांपडावयाचे नाहीत. विसंगतप- णाचा अभाव ह्मणजे सर्वगुणसंपन्नता, आणि सर्वगुणसंपन्नता ह्मणजे पूर्णत्व. पूर्णत्वाशी - खरोखरीच्या मानलेल्या नव्हे विनोदाला काहीएक कर्तव्य नाहीं. त्याला विसंगतपणाशीं, अपूर्णत्वाशीं, आणि विशेषेकरून वरवरच असणाऱ्या पूर्णत्वाशी, ह्मणजे गुप्तदोषांशीं कर्तव्य आहे. विनोदाची पूर्ण वाढ. आतां, जितकी सुधारणा अधिक तितका मनुष्यांचा सहवास अधिक, ति- तकी एकमेकांशी घसट अधिक, आणि जितकी घसट अधिक, तितका वरपांगी सारखेपणा, सोशीकपणा, कळकळ व लपंडाव अधिक, हे उघड आहे. जितका वरपांगी सारखेपणा अधिक, जितका लपंडाव अधिक, तितके गुप्तदोष विपुल, व ते ओळखण्याचें काम कठिण. ह्मणून विनोदाची पूर्ण वाढ सुधारलेल्या स- माजांत पहावयास मिळते. सुधारलेल्या समाजांत, रोजच्या असंख्य व्यवहारांत एकमेकांशी संबंध येत असल्यामुळे, हरतऱ्हेच्या माणसाशी जुळवून घेणें भाग पडतें. तंटेबखेडे टाळण्याकरितां सावध रहावें लागतें. सर्वोकडे बारकाईनें पहा- ण्याची संवय होऊं लागते. विसंगतपणा प्रत्येकांत आहे असा अनुभव येऊ लागून, गुप्तदोष ओळखण्याची शक्ति हळूहळू येऊं लागते. स्वतःचे देखील दोष स्वतःला दिसूं लागून, आपण सर्वतोपरी शहाणे नाहीं हें प्रत्ययाला येऊन, स्वत:वि- षयींचा ताठा व इतरांविषयींचा तिरस्कार, दोन्ही कमी होऊं लागतात. खेड्या- पाढ्यांत जन्म गेलेले लोक व शहरांत राहणारे लोक, यांच्या वृत्तीत, स्वभावांत जे विलक्षण फरक दिसतात, त्याचें मुख्य कारण खेड्यापाड्यांत मनुष्यांची घसट कमी, व शहरांत अतिशय हें आहे. घसट याचा अर्थ मैत्री असाच नव्हे, तर एकमेकांशीं येणारा जवळचा संबंध, असा विस्तृत आहे हे विसरता कामा नये. स्वतःविषयींचा ताठा व इतरांविषयींचा तिरस्कार, दोन्ही कमी होऊं ला- गली कीं, सर्वोमध्ये असलेल्या मनुष्यपणाची ओळख पटू लागते, माणसांवि-<noinclude></noinclude> dnk4z3e603lbznal4143fq2qrinszem 236390 236389 2026-08-30T13:39:10Z JayashreeVI 4058 236390 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८५)'''</noinclude>दृश्य व अदृश्य या दोन भिन्न वाटणाऱ्या सृष्टींचा मनुष्यदेहांत संयोग झाल्यामुळे, विसंगतपणा संसारांत कायमचा राहतो. शरीराचा नाश झाला, मनुष्यपणच लोपलें, की विसंगतपणाचाहि अंत होतो. जेथेंजेथें ह्मणून मनुष्यपण आहे, अपूर्णत्व आहे, तेथें तेथें विसंगतपणाहि आहे. देवपण किंवा पूर्णत्व आणि विसंगतपणा, हे गुण कधीहि एके ठिकाणीं सांपडावयाचे नाहीत. विसंगतपणाचा अभाव ह्मणजे सर्वगुणसंपन्नता, आणि सर्वगुणसंपन्नता ह्मणजे पूर्णत्व. पूर्णत्वाशी-खरोखरीच्या मानलेल्या नव्हे-विनोदाला काहीएक कर्तव्य नाहीं. त्याला विसंगतपणाशीं, अपूर्णत्वाशीं, आणि विशेषेकरून वरवरच असणाऱ्या पूर्णत्वाशी, ह्मणजे गुप्तदोषांशीं कर्तव्य आहे. {{center|{{larger|'''विनोदाची पूर्ण वाढ.'''}}}} {{gap}}आतां, जितकी सुधारणा अधिक तितका मनुष्यांचा सहवास अधिक, तितकी एकमेकांशी घसट अधिक, आणि जितकी घसट अधिक, तितका वरपांगी सारखेपणा, सोशीकपणा, कळकळ व लपंडाव अधिक, हे उघड आहे. जितका वरपांगी सारखेपणा अधिक, जितका लपंडाव अधिक, तितके गुप्तदोष विपुल, व ते ओळखण्याचें काम कठिण. ह्मणून विनोदाची पूर्ण वाढ सुधारलेल्या समाजांत पहावयास मिळते. सुधारलेल्या समाजांत, रोजच्या असंख्य व्यवहारांत एकमेकांशी संबंध येत असल्यामुळे, हरतऱ्हेच्या माणसाशी जुळवून घेणें भाग पडतें. तंटेबखेडे टाळण्याकरितां सावध रहावें लागतें. सर्वांकडे बारकाईनें पहाण्याची संवय होऊं लागते. विसंगतपणा प्रत्येकांत आहे असा अनुभव येऊ लागून, गुप्तदोष ओळखण्याची शक्ति हळूहळू येऊं लागते. स्वतःचे देखील दोष स्वतःला दिसूं लागून, आपण सर्वतोपरी शहाणे नाहीं हें प्रत्ययाला येऊन, स्वत:विषयींचा ताठा व इतरांविषयींचा तिरस्कार, दोन्ही कमी होऊं लागतात. खेड्यापाड्यांत जन्म गेलेले लोक व शहरांत राहणारे लोक, यांच्या वृत्तीत, स्वभावांत जे विलक्षण फरक दिसतात, त्याचें मुख्य कारण खेड्यापाड्यांत मनुष्यांची घसट कमी, व शहरांत अतिशय हें आहे. घसट याचा अर्थ मैत्री असाच नव्हे, तर एकमेकांशीं येणारा जवळचा संबंध, असा विस्तृत आहे हे विसरता कामा नये. स्वतःविषयींचा ताठा व इतरांविषयींचा तिरस्कार, दोन्ही कमी होऊं लागली कीं, सर्वांमध्ये असलेल्या मनुष्यपणाची ओळख पटू लागते, माणसांवि-<noinclude></noinclude> fjxhwhjdbeb8g2oxbfto3donwg2f1at 236391 236390 2026-08-30T13:39:51Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 236391 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८५)'''}}}}</noinclude>दृश्य व अदृश्य या दोन भिन्न वाटणाऱ्या सृष्टींचा मनुष्यदेहांत संयोग झाल्यामुळे, विसंगतपणा संसारांत कायमचा राहतो. शरीराचा नाश झाला, मनुष्यपणच लोपलें, की विसंगतपणाचाहि अंत होतो. जेथेंजेथें ह्मणून मनुष्यपण आहे, अपूर्णत्व आहे, तेथें तेथें विसंगतपणाहि आहे. देवपण किंवा पूर्णत्व आणि विसंगतपणा, हे गुण कधीहि एके ठिकाणीं सांपडावयाचे नाहीत. विसंगतपणाचा अभाव ह्मणजे सर्वगुणसंपन्नता, आणि सर्वगुणसंपन्नता ह्मणजे पूर्णत्व. पूर्णत्वाशी-खरोखरीच्या मानलेल्या नव्हे-विनोदाला काहीएक कर्तव्य नाहीं. त्याला विसंगतपणाशीं, अपूर्णत्वाशीं, आणि विशेषेकरून वरवरच असणाऱ्या पूर्णत्वाशी, ह्मणजे गुप्तदोषांशीं कर्तव्य आहे. {{center|{{larger|'''विनोदाची पूर्ण वाढ.'''}}}} {{gap}}आतां, जितकी सुधारणा अधिक तितका मनुष्यांचा सहवास अधिक, तितकी एकमेकांशी घसट अधिक, आणि जितकी घसट अधिक, तितका वरपांगी सारखेपणा, सोशीकपणा, कळकळ व लपंडाव अधिक, हे उघड आहे. जितका वरपांगी सारखेपणा अधिक, जितका लपंडाव अधिक, तितके गुप्तदोष विपुल, व ते ओळखण्याचें काम कठिण. ह्मणून विनोदाची पूर्ण वाढ सुधारलेल्या समाजांत पहावयास मिळते. सुधारलेल्या समाजांत, रोजच्या असंख्य व्यवहारांत एकमेकांशी संबंध येत असल्यामुळे, हरतऱ्हेच्या माणसाशी जुळवून घेणें भाग पडतें. तंटेबखेडे टाळण्याकरितां सावध रहावें लागतें. सर्वांकडे बारकाईनें पहाण्याची संवय होऊं लागते. विसंगतपणा प्रत्येकांत आहे असा अनुभव येऊ लागून, गुप्तदोष ओळखण्याची शक्ति हळूहळू येऊं लागते. स्वतःचे देखील दोष स्वतःला दिसूं लागून, आपण सर्वतोपरी शहाणे नाहीं हें प्रत्ययाला येऊन, स्वत:विषयींचा ताठा व इतरांविषयींचा तिरस्कार, दोन्ही कमी होऊं लागतात. खेड्यापाड्यांत जन्म गेलेले लोक व शहरांत राहणारे लोक, यांच्या वृत्तीत, स्वभावांत जे विलक्षण फरक दिसतात, त्याचें मुख्य कारण खेड्यापाड्यांत मनुष्यांची घसट कमी, व शहरांत अतिशय हें आहे. घसट याचा अर्थ मैत्री असाच नव्हे, तर एकमेकांशीं येणारा जवळचा संबंध, असा विस्तृत आहे हे विसरता कामा नये. स्वतःविषयींचा ताठा व इतरांविषयींचा तिरस्कार, दोन्ही कमी होऊं लागली कीं, सर्वांमध्ये असलेल्या मनुष्यपणाची ओळख पटू लागते, माणसांवि-<noinclude></noinclude> hne3s7mcx5p2of7e9c2uy61fzu01hxg पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/९८ 104 112002 236392 2026-08-30T13:40:24Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ८६ ) ar आपलेपणा वाटण्यास सुरुवात होते. एक विशेष प्रकारची दृष्टि येते. ही विशेष प्रकारची दृष्टि, हा मनाचा कल, ही सर्वव्यापी विसंगतपणाची जाणीव, ही मनुष्यत्वाची ओळख, ह्मणजे विन..." 236392 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ८६ ) ar आपलेपणा वाटण्यास सुरुवात होते. एक विशेष प्रकारची दृष्टि येते. ही विशेष प्रकारची दृष्टि, हा मनाचा कल, ही सर्वव्यापी विसंगतपणाची जाणीव, ही मनुष्यत्वाची ओळख, ह्मणजे विनोद. कोणी हलका ह्मणून त्याच्याकडे वि- नोदाचे लक्ष जातें, व कोणी मोठा ह्मणून त्याच्याकडे डोळेझांक होते, अशी वस्तुस्थिति नाहीं. उच्च, नीच व साधारण, अशा सर्व व्यक्तींशी त्याला कर्तव्य आहे. त्याला दृष्टिआड कांहीं नाहीं. तो सर्वसाक्षी व समदृष्टि आहे. ज्याला ज्याला ह्मणून सर्वगुणसंपन्नतेची आढ्यता असेल, त्यालात्याला स्खलनशील मनुष्यस्वभावाची प्रचीति आणून देणें, त्याचा गर्वपरिहार करणें हें विनोदाचे एक कार्य आहे. नव्या जुन्यांच्या विसंगतपणाचीं जीं वर उदाहरणे दिलीं आहेत, त्यांचा उद्देश, कमी अधीक मानानें अपूर्णत्वाचा वांटा प्रत्येकाला कसा मिळाला आहे तें लक्षांत यावे हा होय. एक आक्षेप. कोणी असा आक्षेप आणतील कीं, उच्चनीच सर्व व्यक्तींनां एका पायरीवर बसविणें, दुसऱ्यांचे दोष शोधीत बसणें, हें क्षुद्रबुद्धीचें लक्षण आहे. दोषा- कडे लक्ष न देता गुणाकडे लक्ष देणें यांत मनुष्यजातीचें दित आहे. खरे आहे. पण गुणाकडे लक्ष देणें, ह्मणजे दोषाचा अभाव मानणें असें होत नाहीं. सर्वांमध्ये मनुष्यत्व आहे, व मनुष्यत्व ह्मणजेच अपूर्णत्व आहे, असें मानिल्यानें उच्चनीच अशा सर्वांना एका पायरीवर बसविल्याचा आरोप लागू पडत नाहीं. शिवाय, वि- नोद ह्मणजे दोषाचा शोध, ही कल्पनाच मुळी चुकीची आहे. जितकीं माणसें ति- तकीं मतें असें समाजांत होत असल्यामुळे, कोणती ग्राह्य व कोणती त्याज्य, व ती कशामुळे, याचा निर्णय होणें अवश्य असतें. पुष्कळ मतें अशीं असतात कीं, त्यांनी त्याज्य व ग्राह्य, हे भेद लावणेंच शक्य नसतें. मताप्रमाणेंच चालीरीतींची गोष्ट असते. उदाहरणार्थ, डाव्या किंवा उजव्या हातानें पाणी पिणे यांत अमुक प्राह्य, व अमुक त्याज्य, असा भेद करणें शक्य नाहीं. कोणत्या तरी कारणानें एक हात जायां झाला, किंवा कायमचा निरुपयोगी झाला, तर उरलेल्या हाताचा उपयोग करणें प्रत्येकाला भाग आहे. तसेंच रस्त्यांतून जातांना डाव्या बाजूनें चांगलें कीं उजव्या, हें ठरविणें अशक्य आहे. तर फ्रान्समध्ये उजव्या बाजूने जातात. इंग्लंडमध्ये डाव्या बाजूने जातात इंग्लंडमध्यें खास आमंत्रण असल्या-<noinclude></noinclude> rx022mg5l1ipaf0wb3zrcsogacv4tmq पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/९९ 104 112003 236393 2026-08-30T13:40:50Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ (८७) शिवाय मुलांना पार्टीला नेत नाहींत, तर फ्रान्समध्यें आईबापांबरोबर मुलांनांहि आमंत्रण आहे असें समजतात. दक्षिणीलोकांत भोजनाला सोवळेंभांडेंच नेतात, तर गुजराथेंत काही..." 236393 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ (८७) शिवाय मुलांना पार्टीला नेत नाहींत, तर फ्रान्समध्यें आईबापांबरोबर मुलांनांहि आमंत्रण आहे असें समजतात. दक्षिणीलोकांत भोजनाला सोवळेंभांडेंच नेतात, तर गुजराथेंत काही लोकांत सोवळें पत्रावळ व द्रोण हीं घरून नेतात. शेंडी ठेवावी की नाही, मिशा ठेवाव्या कीं नाहीं, पोषाख कोणता करावा, असल्या प्रश्नति ग्राह्म व त्याज्य हे भेद आगंतुक आहेत. मांसाहार ग्राह्य की त्याज्य, हा प्रश्नहि अशांपैकीच आहे. मांसाहार सर्वथैव त्याज्य ह्मणणारे लोक जीवावर बेतली असता 'आत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि' या तत्वाचा अव लंब करून आपद्धर्म ऊर्फ सवडशास्त्र निर्माण करितात. शरीराची निगा व वाढ हा अन्न खाण्याचा उद्देश आहे हे लक्षांत ठेवलें ह्मणजे शरीराला हानिकारक तें त्याज्य, व गुणकारक तें ग्राह्य, असा सरळ निकाल लागतो. मांसाहार व शाकाहार यांनी पापपुण्याची कसोटी लावण्याची जरूरी रहात नाहीं. अशीं इतर अनेक उदाहरणे वाचकांनां सांपडतील कीं ज्यांनां त्याज्य ग्राह्य, हे भेद लावणें ह्मणजे काथ्याकूट करणे होय. ग्राह्य व त्याज्य हे भेद महत्वाच्या बाबीकरितांच आहेत. बालविवाह, स्त्रीपुरुषांचे संबंध, ज्ञातिभेद, मूर्तिपूजा, गुलवाद (Theosophy) निवृत्तिवाद, यांना हे भेद लावा- वयाचे असतात. खरें व खोटें यांची कसोटी. सर्वच मतें, सर्वच चालीरीति, आळीपाळीनें ग्राह्य व त्याज्य आहेत, असें ह्मणर्णे ह्मणजे सत्य कांहींच नाहीं, सत्यासत्य हा भेदच भ्रामक आहे, असें ह्मणण्यासारखें आहे. कांहींच्या मर्ते एक खरें, तर दुसऱ्याच्या मतें तेंच खोटें, असे जरी होत असले, तरी निवळ खरें व निवळ खोटें, असें जगांत कोणतेंच मत नाहीं, आणि अशी कोणतीहि चालरीत नाहीं, हें लक्ष्यांत ठेवणे अवश्य आहे. जगामध्यें विकास ( development ) आहे, व या विकासामध्यें अव- शेषांचाहि ( survivals) अंतर्भाव होतो. ह्मणून दरेक मतांत व चालीरी- तींत अवशेषांची मिसळ आहे, खऱ्याखोट्यांचे मिश्रण आहे, हें लक्षांत न आ- ल्यामुळे, मनुष्यप्राणी भांबावून जातो, आणि सन्यासत्य हा भेदच चुकीचा आहे, असें ह्मणण्यास तो तयार होतो. अवशेषांच्या मानाने विकासाचे प्रमाण, खो-<noinclude></noinclude> 444trbovk81v42o1q7a3ho1p8u2ylv6 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१०० 104 112004 236394 2026-08-30T13:41:20Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ८८ ) ट्याच्या मानानें खऱ्याचा अंश अतिशय असलेली मतें व चालीरीति प्राह्य, व विकासाच्या मानानें अवशेषांचे प्रमाण, खऱ्याच्या मानानें खोट्याचा अंश अतिशय असलेलीं मतें व चाली..." 236394 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ८८ ) ट्याच्या मानानें खऱ्याचा अंश अतिशय असलेली मतें व चालीरीति प्राह्य, व विकासाच्या मानानें अवशेषांचे प्रमाण, खऱ्याच्या मानानें खोट्याचा अंश अतिशय असलेलीं मतें व चालीरीति त्याज्य होतात. सृष्टीमध्ये विकास दिसतो, हे पुष्कळांनां कबूल असते; पण विकासाबरोबर अव- शेष नष्ट होत नाहींत, इतकेंच नव्हे, तर विकासांत त्यांचा अंतर्भाव होतों, हें लवकर लक्षांत येत नाहीं. सत्याचीं रूपें जशीं अनंत, तशीं असत्याचीहि अनंत, हैं तव पटत नाहीं, ह्मणून थोडासा सत्यांश असला की, तें सर्वथैव सत्य, व थोडासा असत्यांश असला कीं, तें सर्वथैव असत्य, अशी समजूत करून घेण्याची माणसाची प्रवृत्ति फार असते. पण कमीअधिक मानानें प्रत्ये- काची सारखीच दशा होत असली, तरी मताभिमान हा राहतोच. नुसता मता- भिमान राहू दिला, वाढू दिला, तर समाज सुरळीत न चालतां, तिरस्कार, असंतोष, मत्सर, व द्वेष ही त्यांत फैलावतील. मनुष्यांचे प्रयत्न देखील मंदाव- तील. पण खऱ्याखोट्याचा निर्णय होणे तर त्यांच्या प्रगतीला, योगक्षेमाला, अत्यावश्यक आहे. ह्मणून निर्भेळ सत्य, व निवळ असत्य, असें कांहींच नाहीं; सत्यासत्य यचिं एक ठराविक रूप नसून, तीं अगणित आहेत व तीं कमी अधि- कमानानें मिसळलेली सर्वत्र आढळतात, अशी मनुष्यमात्राची खात्री पटविणें, हें विनोदाचें काम आहे. ' कमी अधिक मानानें ' हे साधे दिसणारे शब्द कितीतरी महत्वाचे आहेत. यांचा विसर पडत असल्यामुळे संसारति कितीतरी भानगडी उत्पन्न झालेल्या आपल्याला दिसतात. सत्य व असत्य हीं दोन्हीं एकाच वेळीं ओळखण्याची शक्ति, ह्मणजेच सर्वबाजूंनी विचार करण्याची शक्ति होय. ही अंगांत आली, ह्मणजे खऱ्याचा अंश कमी असणारीं मतें पूर्णपर्णे खरीं मानणाराविषयीं तुच्छता न वाटतां सहानुभूति वाटू लागते. मतांविषयींचा तिर स्कार थोडादेखील कमी न होता भूल पढलेल्या माणसाविषय आपलेपणाची जाणीव वाढते. Hate the system and not the products अशी मनाची वृत्ति होऊं लागते. चूक, मिथ्यामह, यांनां कोणत्याना कोणत्या तरी बाबतींत दरेकजण बळी पडतो. चूक होणें हें मनुष्यत्त्वाचें, अपूर्णत्वाचे, विसंगतपणाचें लक्षण आहे, असें स्पष्ट भासूं लागतें. आतां प्रत्येकाला मनुष्य- त्वाची ओळख पटविर्णे, ह्मणजे प्रत्येकाच्या दोषाचा शोध करणें, असें ह्मणाव- याचें असल्यास खुशाल ह्मणावें. C , ><noinclude></noinclude> ax3yya7jhj2kjlifxqvxke4guuijhux सदस्य चर्चा:Ajit Baviskar 3 112005 236405 2026-08-31T01:23:25Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 236405 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Ajit Baviskar}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) ०६:५३, ३१ ऑगस्ट २०२६ (IST) kp3onf4apfuxj1vua4xyrtrh2viez05 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१६२ 104 112006 236407 2026-08-31T07:59:54Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236407 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४०|लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>जाऊन शुभ्र पांढरा चकचकीत रंग होत चालला व सूर्याची सोनेरी रंगाची कोर दृष्टीस पडली. तेव्हां सर्व मंडळींचीं मनें आश्चर्यानें व आनंदाने भरून आली व सर्व मंडळींनीं कवाईती पलटणींतील शिपायाप्रमाणें सक्तीनें नव्हें पण आपखुषीनें सूर्यनारायणास हात जोडून नमस्कार केला; तोंच ती सूर्याची सुवर्णरंगी कोर मोठी होऊन सबंद सूर्यबिंब क्षितिजाच्या वर आलें. त्यानें सर्व आकाश व पृथ्वी प्रकाशमय करून टाकली. सूर्यबिंबालाही पांढराशुभ्र रंग आला; त्याचेसभोंवार निळसर असें वलय दिसूं लागलें; पुढें सूर्य बिंबही नीलवर्ण झालें! मग सूर्य बराच वर आला व त्याचेकडे दृष्टि देणें कठिण होऊं लागलें. या उंच ठिकाणावरून सूर्योदयाचा देखावा विलक्षण दिसतो यांत शंका नाहीं. अरुणोदयापासून सूर्योदयापर्यंत व नंतरही कांहीं काळपर्यंत क्षणोक्षणी क्षितिजावर, आकाशांत व पृथ्वीवर जो रंगपालट होतो व सूर्यबिंबाच्या बारिक कोरीपासून तो पूर्ण बिंब क्षितिजावर येईपर्यंत त्या सूर्याच्या रंगांत होणारे पालट आश्चर्यकारक आहेत यांत संशय नाहीं. काय तो अद्वितीय देखावा! त्रिंकोमालीस बंगालच्या उपसागरामधून होणारा सूर्योदय मी पाहिला होता. तो देखावाही प्रेक्षणीय आहे खरा. पण श्रीपादशिखरावरून दिसणारा सूर्योदयाचा देखावा अद्वितीय आहे. याचे कारण काहींही असो. सात हजार फूट उंचीवरून दाट व गर्द रानानें व्याप्त टेकड्यांच्या पलीकडून तो सूर्योदय आपण पाहतों म्हणून हे विलक्षण रंगपालट त्या ठिकाणाहून दिसत असावे. येवढी गोष्ट खरी कीं श्रीपादशिखरावरून पाहिलेला हा सूर्योदय आमरणांत माझ्या स्मरणांतून जाणार नाहीं.<br>{{gap}}सूर्योदयाचा दिव्य देखावा पाहिल्यावर माझें तेथलें कार्य संपलें. म्हणून मी साडेसहा नंतर त्या शिखरावरून खाली उतरूं लागलों. चढतांना जितके श्रम व त्रास पडला तितके श्रम व त्रास आतां झाला नाहीं. मात्र आतां शरीराचा तोल संभाळणें व बिकट घसरड्या पायऱ्यांवरून संभाळून जाणे आवश्यक होतें. त्याप्रमाणें काळजीपूर्वक व तोल संभाळून उतरल्यामुळे मला डलहौसी गिरणी नजीक येण्यास बारा वाजले. आदले दिवशी ठरल्याप्रमाणें मोटारवाला १ वाजतां तेथें आला व मग लागलीच मी हॅटनला एका तासानें परत आलों. मग तेथून पुढील दृश्यदर्शनास दुसरे दिवशीं नऊ वाजतां निघालों.<br><br><br>{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> k9uipwa0fsn372pv65dr071zosspr0t पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१६३ 104 112007 236409 2026-08-31T08:01:07Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ प्रकरण १० वें. ল लंका बेटांतील दोन शीतलनिवासस्थानें. लंका बेट विषुववृत्ताच्या नजीक असल्यामुळे एकंदरीत ऊष्ण प्रदे शांत मोडतें. ज्या कोलंबोच्या हवाशीरपणाबद्दल युरोपियन..." 236409 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ प्रकरण १० वें. ল लंका बेटांतील दोन शीतलनिवासस्थानें. लंका बेट विषुववृत्ताच्या नजीक असल्यामुळे एकंदरीत ऊष्ण प्रदे शांत मोडतें. ज्या कोलंबोच्या हवाशीरपणाबद्दल युरोपियन प्रवाशी मोठी तारीफ करतात तें कोलंबो बंदर व शहर पुष्कळ वेळां फार उकाड्याचें ठिकाण वाटतें. परंतु लंका बेट समुद्र- वलयांकित असल्यामुळें येथें थोडा थोडा पाऊस थोड्या थोड्या अंत- राने वर्षभर पडतो, म्हणून जमिनीवर सदा हिरवळ उगवलेली असते. पाण्याच्या विपुलतेमुळे बेटांत झाडी पुष्कळ आहे. या दोन कारणांनी लंका बेटाच्या विषुववृत्ताच्या नजीकपणामुळे उत्पन्न होणारी उष्णता व गरमी कमी होते यांत शंका नाहीं. शिवाय, लंका बेटामध्यें चार हजार पासून सात हजार फूट उंचीचे प्रांत व पठार असल्यामुळे असल्या उंची- वरच्या भागांत शीतल निवासस्थानें बनवितां आलीं आहेत. अशा शीतल निवासस्थानांतील दोन प्रख्यात स्थळांचें वर्णन या प्रकरणांत करण्याचा विचार आहे. ज्याप्रमाणें लंकेंतील प्रेक्षणीय स्थळांचा मुकुटमणी म्हणजे श्रीपादशिखर त्याप्रमाणें शीतलनिवासस्थानांचा मुकुटमणी म्हणजे न्युवारा एलिया किंवा प्रवाशांच्या आवडीचें नांव न्युरोलिया में होय. तेव्हां त्याचें प्रथम वर्णन करणें योग्य होईल. माझ्या दृश्यदर्शनाच्या क्रमांतही मी तें निवासस्थान प्रथम पाहिलें. मागच्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे श्रीपादशिखर पाहून मी तारीख २३१ जानेवारी रोजी दोन प्रहरीं हॅटन या स्टेशनला आलों. श्रीपाद- शिखर पाहण्यांत फार फाजील खर्च झाल्यामुळे मी थोडी काटकसर करून स्टेशनच्या सेकंड क्लास वेटिंग रूम मध्येच ती दुपार, रात्र व सकाळ इतका वेळ काढला. सिलोनमध्यें सेकंड क्लास प्रवाशांना अशा<noinclude></noinclude> ftmxg2jace61qburpukgtg4ikg3x6lq 236410 236409 2026-08-31T11:27:56Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236410 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''प्रकरण १० वें'''}}}} {{rule|7em}} {{center|{{x-larger|'''लंका बेटांतील दोन शीतलनिवासस्थानें.'''}}}} {{rule|5em}}<br>{{gap}}{{x-larger|'''लं'''}}'''का''' बेट विषुववृत्ताच्या नजीक असल्यामुळे एकंदरीत ऊष्ण प्रदेशांत मोडतें. ज्या कोलंबोच्या हवाशीरपणाबद्दल युरोपियन प्रवाशी मोठी तारीफ करतात तें कोलंबो बंदर व शहर पुष्कळ वेळां फार उकाड्याचें ठिकाण वाटतें. परंतु लंका बेट समुद्र-वलयांकित असल्यामुळें येथें थोडा थोडा पाऊस थोड्या थोड्या अंतराने वर्षभर पडतो, म्हणून जमिनीवर सदा हिरवळ उगवलेली असते. पाण्याच्या विपुलतेमुळे बेटांत झाडी पुष्कळ आहे. या दोन कारणांनी लंका बेटाच्या विषुववृत्ताच्या नजीकपणामुळे उत्पन्न होणारी उष्णता व गरमी कमी होते यांत शंका नाहीं. शिवाय, लंका बेटामध्यें चार हजार पासून सात हजार फूट उंचीचे प्रांत व पठार असल्यामुळे असल्या उंचीवरच्या भागांत शीतल निवासस्थानें बनवितां आलीं आहेत. अशा शीतल निवासस्थानांतील दोन प्रख्यात स्थळांचें वर्णन या प्रकरणांत करण्याचा विचार आहे. ज्याप्रमाणें लंकेंतील प्रेक्षणीय स्थळांचा मुकुटमणी म्हणजे श्रीपादशिखर त्याप्रमाणें शीतलनिवासस्थानांचा मुकुटमणी म्हणजे न्युवारा एलिया किंवा प्रवाशांच्या आवडीचें नांव न्युरेलिया हे होय. तेव्हां त्याचें प्रथम वर्णन करणें योग्य होईल. माझ्या दृश्यदर्शनाच्या क्रमांतही मी तें निवासस्थान प्रथम पाहिलें.<br>{{gap}}मागच्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे श्रीपादशिखर पाहून मी तारीख ३१ जानेवारी रोजी दोन प्रहरीं हॅटन या स्टेशनला आलों. श्रीपाद- शिखर पाहण्यांत फार फाजील खर्च झाल्यामुळे मी थोडी काटकसर करून स्टेशनच्या सेकंड क्लास वेटिंग रूम मध्येच ती दुपार, रात्र व सकाळ इतका वेळ काढला. सिलोनमध्यें सेकंड क्लास प्रवाशांना अशा<noinclude></noinclude> 9hh9qgo0ddfxq8toha5kuccxyxt2rm8 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१६४ 104 112008 236411 2026-08-31T11:28:18Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ १४२ लंकेचें वर्णन व वृत्तांत तऱ्हेनें राहतां येतें हैं एक. शिवाय, लंकेंतील सुशिक्षित लोकांप्रमाणे रेल्वेचे नोकर प्रवाशांच्या सोयीकडे पाहणारे असल्यामुळे स्टेशनमास्तर..." 236411 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ १४२ लंकेचें वर्णन व वृत्तांत तऱ्हेनें राहतां येतें हैं एक. शिवाय, लंकेंतील सुशिक्षित लोकांप्रमाणे रेल्वेचे नोकर प्रवाशांच्या सोयीकडे पाहणारे असल्यामुळे स्टेशनमास्तरानें मला याप्रमाणे राहण्याची परवानगी दिली. इतकेंच नाहीं तर मी हॅटन गांव पहाण्यास गेलों असतां माझ्या सामानाचा एक बोजा ( या दुसऱ्या पर्यटनाकरितां मी सुटसुटीत असा सामानाचा एकच बोजा बरोबर घेतला होता ) मास्तराने आपल्या ऑफिसांत ठेवून घेतला. हॅटन गांव चरेंच मोठं आहे. तें चार हजार फुट उंचीच्या डोंगरावर वसलेलें असल्यामुळे एक प्रकारें शीतलनिवासस्थानासारखें आहे. ता. १ फेब्रुवारी सन १९३४ रोजी सकाळच्या नऊ पंचावनच्या आगगाडीनें मी न्युवारा एलिया या शीतलनिवासस्थानास जाण्यास निवालो; हॅटनपेक्षां न्युवारा एलिया है दोन हजार फुटांनी उंच आहे. हॅटनपासून न्युवारा एलिया अवघें २७ मैल आहे. पण या सत्ता- वीस मैलांत आगगाडी दोन हजार फूट वर चढते. अर्थात् हा सर्व उंच डोंगराळ प्रदेश आहे. पण याची मौज ही की हा सर्व प्रदेश चहा, रबर इत्यादि उत्पन्नाच्या पिकांनी पूर्णपणे व्यापलेला असून जिकडे तिकडे चहाच्या गिरण्या, राहण्याचे बंगले व मजुरांच्या चाळी सारख्या दृष्टो- त्पत्तीस येतात. हा इतका उंच प्रदेश आहे तरी येथें पाण्याची विल क्षण विपुलता आहे. नदी नाले व पाटबंधारे सारखे धों धों वहातांना दिसले. हॅटन स्टेशन सोडलें की लागलीच एक मोठा बोगदा लागतो व आगगाडीच्या डाव्या बाजूस मोठा डोंगर व उजव्या बाजूस वस्तीने गजबजलेली दरी दिसते. या सर्व भागांतून आगगाडी जातांना एकदां डाव्या हातास तर एकदां उजव्या हातास ( रस्त्याला अशी विलक्षण वळणे आहेत ) अॅडॅम्स पीक सारखे दिसत असतें. तलेवाकेले नांवाच्या स्टेशनच्या जरा आर्धी आणखी एक मोठा बोगदा लागतो. तलेवाकेले हैं स्टेशन हॅटनच्या दोनशे फूट खाली आहे; पण पुढचें स्टेशन वाडेगोडा हें तलेवाकेलेच्या थेट उत्तरेस असून चार मैलांत आगगाडी पांचशे फुटांच्या उंचीवर चढते. याच्या पुढचें स्टेशन<noinclude></noinclude> 8xx1dt0qm8h8ejq8sudz2ry8zjdik90 236412 236411 2026-08-31T11:38:20Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236412 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४२ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>तऱ्हेनें राहतां येतें हे एक. शिवाय, लंकेंतील सुशिक्षित लोकांप्रमाणे रेल्वेचे नोकर प्रवाशांच्या सोयीकडे पाहणारे असल्यामुळे स्टेशनमास्तरानें मला याप्रमाणे राहण्याची परवानगी दिली. इतकेंच नाहीं तर मी हॅटन गांव पहाण्यास गेलों असतां माझ्या सामानाचा एक बोजा (या दुसऱ्या पर्यटनाकरितां मी सुटसुटीत असा सामानाचा एकच बोजा बरोबर घेतला होता) मास्तराने आपल्या ऑफिसांत ठेवून घेतला. हॅटन गांव बरेंच मोठे आहे. तें चार हजार फुट उंचीच्या डोंगरावर वसलेलें असल्यामुळे एक प्रकारें शीतलनिवासस्थानासारखें आहे.<br>{{gap}}ता. १ फेब्रुवारी सन १९३४ रोजी सकाळच्या नऊ पंचावनच्या आगगाडीनें मी न्युवारा एलिया या शीतलनिवासस्थानास जाण्यास निघालो; हॅटनपेक्षां न्युवारा एलिया हे दोन हजार फुटांनी उंच आहे. हॅटनपासून न्युवारा एलिया अवघें २७ मैल आहे. पण या सत्तावीस मैलांत आगगाडी दोन हजार फूट वर चढते. अर्थात् हा सर्व उंच डोंगराळ प्रदेश आहे. पण याची मौज ही की हा सर्व प्रदेश चहा, रबर इत्यादि उत्पन्नाच्या पिकांनी पूर्णपणे व्यापलेला असून जिकडे तिकडे चहाच्या गिरण्या, राहण्याचे बंगले व मजुरांच्या चाळी सारख्या दृष्टोत्पत्तीस येतात. हा इतका उंच प्रदेश आहे तरी येथें पाण्याची विल क्षण विपुलता आहे. नदी नाले व पाटबंधारे सारखे धों धों वहातांना दिसले. हॅटन स्टेशन सोडलें की लागलीच एक मोठा बोगदा लागतो व आगगाडीच्या डाव्या बाजूस मोठा डोंगर व उजव्या बाजूस वस्तीने गजबजलेली दरी दिसते. या सर्व भागांतून आगगाडी जातांना एकदां डाव्या हातास तर एकदां उजव्या हातास (रस्त्याला अशी विलक्षण वळणे आहेत) '''ॲडॅम्स पीक''' सारखे दिसत असतें. '''तलेवाकेले''' नांवाच्या स्टेशनच्या जरा आधी आणखी एक मोठा बोगदा लागतो. तलेवाकेले हे स्टेशन हॅटनच्या दोनशे फूट खाली आहे; पण पुढचें स्टेशन '''वाटेगोडा''' हें तलेवाकेलेच्या थेट उत्तरेस असून चार मैलांत आगगाडी पांचशे फुटांच्या उंचीवर चढते. याच्या पुढचें स्टेशन<noinclude></noinclude> c2ckcxlamszu39v1p47mzb54uf7bsc5 236414 236412 2026-08-31T11:40:58Z कल्पनाशक्ती 3813 236414 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४२ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>तऱ्हेनें राहतां येतें हे एक. शिवाय, लंकेंतील सुशिक्षित लोकांप्रमाणे रेल्वेचे नोकर प्रवाशांच्या सोयीकडे पाहणारे असल्यामुळे स्टेशनमास्तरानें मला याप्रमाणे राहण्याची परवानगी दिली. इतकेंच नाहीं तर मी हॅटन गांव पहाण्यास गेलों असतां माझ्या सामानाचा एक बोजा (या दुसऱ्या पर्यटनाकरितां मी सुटसुटीत असा सामानाचा एकच बोजा बरोबर घेतला होता) मास्तराने आपल्या ऑफिसांत ठेवून घेतला. हॅटन गांव बरेंच मोठे आहे. तें चार हजार फुट उंचीच्या डोंगरावर वसलेलें असल्यामुळे एक प्रकारें शीतलनिवासस्थानासारखें आहे.<br>{{gap}}ता. १ फेब्रुवारी सन १९३४ रोजी सकाळच्या नऊ पंचावनच्या आगगाडीनें मी न्युवारा एलिया या शीतलनिवासस्थानास जाण्यास निघालो; हॅटनपेक्षां न्युवारा एलिया हे दोन हजार फुटांनी उंच आहे. हॅटनपासून न्युवारा एलिया अवघें २७ मैल आहे. पण या सत्तावीस मैलांत आगगाडी दोन हजार फूट वर चढते. अर्थात् हा सर्व उंच डोंगराळ प्रदेश आहे. पण याची मौज ही की हा सर्व प्रदेश चहा, रबर इत्यादि उत्पन्नाच्या पिकांनी पूर्णपणे व्यापलेला असून जिकडे तिकडे चहाच्या गिरण्या, राहण्याचे बंगले व मजुरांच्या चाळी सारख्या दृष्टोत्पत्तीस येतात. हा इतका उंच प्रदेश आहे तरी येथें पाण्याची विल क्षण विपुलता आहे. नदी नाले व पाटबंधारे सारखे धों धों वहातांना दिसले. हॅटन स्टेशन सोडलें की लागलीच एक मोठा बोगदा लागतो व आगगाडीच्या डाव्या बाजूस मोठा डोंगर व उजव्या बाजूस वस्तीने गजबजलेली दरी दिसते. या सर्व भागांतून आगगाडी जातांना एकदां डाव्या हातास तर एकदां उजव्या हातास (रस्त्याला अशी विलक्षण वळणे आहेत) '''ॲडॅम्स पीक''' सारखे दिसत असतें. '''तलेवाकेले''' नांवाच्या स्टेशनच्या जरा आधी आणखी एक मोठा बोगदा लागतो. तलेवाकेले हे स्टेशन हॅटनच्या दोनशे फूट खाली आहे; पण पुढचें स्टेशन '''वाटेगोडा''' हें तलेवाकेलेच्या थेट उत्तरेस असून चार मैलांत आगगाडी पांचशे फुटांच्या उंचीवर चढते. याच्या पुढचें स्टेशन{{nop}}<noinclude></noinclude> mfwjo01hc713eujy000adklb32d8mi5 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१६५ 104 112009 236413 2026-08-31T11:40:30Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ 236413 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|'''नानुओया घाट व ब्लॅक पूल तलाव.'''}} {{rh|नं. १६||पान १४३}} {{nop}}<noinclude></noinclude> ipg5ljk4wonlbcg0kp158q8zy11l06x पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१६६ 104 112010 236415 2026-08-31T11:48:09Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236415 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंका बेटांतील दोन शीतलनिवासस्थानें|१४३ }}</noinclude>दक्षिण दिशेला असून त्याचें नांव '''ग्रेट वेस्टर्न''' आहे. हे सुमारें ४८०० फूट म्हणजे हॅटनच्या वर ८०० फूट आहे. याला '''मोठें वेस्टर्न''' स्टेशन म्हणतात खरें पण हे या भागांतील सर्वांत लहान स्टेशन आहे हें पाहून मला 'नांव सोनुबाई हातीं कथलाचा वाळा' या म्हणीची आठवण झाली. याच्या पुढचें स्टेशन '''नानुओया''' नांवाचें आलें. येथें एक खोल नदीसारखा मोठा नाला लागला. त्यावर उंचच उंच पूल आहे. नानुओया हे स्टेशन ५००० फूट उंचीवर म्हणजे हॅटनपेक्षां एक हजार फूट उंच आहे. वीस मैलांत आगगाडीचा रस्ता एक हजार फुटानें उंच अशा भागावर आला. येथून '''रगाला''' गांवापर्यंत म्हणजे सुमारें वीस मैल नॅरोगेज रेलवे आहे. त्या रेलवे रस्त्यावर '''न्युरेलिया''' हे सात मैलांवरचें दुसरें स्टेशन असल्यामुळे नानुओया येथें मला गाडी बदलावी लागली. ही गाडी फार लहान खेळांतल्या आगगाडी सारखी वाटली. ही गाडी फार सावकाश चालते. सात मैलाला एक तास लागला. पण आगगाडीचा नाइलाज आहे. या सात मैलांत एक हजार फुट उंच जावें लागतें. कारण नानुओया ५००० फूट उंच आहे तर न्युवारा एलिया ६००० फूट उंच आहे. हा रस्ता बऱ्याच चढाचा असून त्याला आमच्या इकडल्या बैलगाड्यांच्या घाटरस्त्यासारखीं वांकडीतिकडी वळणें आहेत. मला आमच्या महाड-भोर रस्त्यावरील वरंध्या घाटाचीच आठवण झाली. या रेलवे रस्त्यानें वाकणाच्या बाबतीत व सावकाशीच्या बाबतीत आमच्या मद्रास सदर्न मराठा रेलवेवर कडी केली आहे यांत शंका नाहीं. '''न्युवारा एलिया''' स्टेशनला मी दोन प्रहरच्या दीड वाजतां पोहोंचलों. स्टेशनपासून बाजार जरा दूरच आहे. बाजार पेठेच्या टोकाला आडव्या रस्त्याला लागून असलेल्या '''विंडसर''' नांवाच्या निवासगृहांत मी उतरलों. दोन तास विश्रांति घेतल्यावर मी बाहेर पडलों. '''न्युवाराएलिया''' शहराच्या रस्त्याचे ओव्हरसीअर रा. थंबी पिल्ले म्हणून जाफनाचे गृहस्थ आहेत. त्यांना रा. कंदया यांनी माझ्या येण्याबद्दल पत्र लिहिलें होतें. म्हणून त्यांचा शोध करीत व अनायासें शहर पहात चाललो तोंच ते गृहस्थ आपल्या बंगल्याकडे जातांना मला भेटले. मग मी त्यांचे बरोबर<noinclude></noinclude> 93tudp7m8vg3mw7bkeq0i6q242ldnfz पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१६७ 104 112011 236416 2026-08-31T11:53:07Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236416 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४४ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>त्यांचे बंगल्यावर गेलों. प्रेक्षणीय स्थळांसंबंधीं चौकशी करतां "गांवांत कांहींच प्रेक्षणीय नाहीं; पांच सहा मैलांवर '''हगाला''' बाग '''क्यांडी'''च्या पेरेडॅनिया बागेप्रमाणे फार प्रेक्षणीय असून तेथून खालच्या सखल प्रदेशाचा देखावा फार रमणीय दिसतो. तो पाहण्यास सकाळच्या मेल मोटार बसने जाऊन पांच वाजताच्या मेलमोटारबसनें परत यावें म्हणजे खर्च अगदीं कमी येईल व बाग बारकाईनें व स्वस्थपणें पहातां येईल; बागेनजीक चहा कॉफीच्या बुटी आहेत; तेथें सिंहली फराळाचें मिळेल. सायंकाळी थेट माझ्या बंगल्यावर यावें; मी सकाळीं तुमचें सामान माझ्या बंगल्यावर आणण्याची तजवीज करतों. म्हणजे वसतीगृहाचें त्या दिवसाचें उगाच बिल भरण्याचें कारण नाहीं; या बागेच्या मैल दीड मैल अलीकडे उजव्या हातास अशोकाची मोठी राई लागते व डाव्या हाताच्या नाल्यामध्ये '''ब्लॅक पूल''' नांवाचा तलावासारखा एक पाण्याचा डोह आहे; ती अशोकाची राई म्हणजे रावणाचें अशोकवन; या वनांत सीतेला ठेविलें होतें व सीता त्या डोहामध्यें स्नान करीत असे; अशी पूर्वापार चालत आलेली दंतकथा या ठिकाणीं प्रचलित आहे. अशोकाची राई व नाल्यांतील डोह हे मोटारबस मधूनच दिसतात; तेव्हां जातांना व येतांना हीं दंतकथात्मक स्थानें नजरेत घालतां येतील; त्याकरितां निराळा वेळ काढण्याची किंवा त्रास घेण्याची जरूरी नाहीं; तिसरे दिवशीं सकाळीं '''भंडारवेला''' या निवासस्थानास सकाळच्या मेल मोटारबसने जातां येईल." अशा प्रकारचा सल्ला रा. थंबीपिल्ले यांनी दिला. तो खर्चाच्या दृष्टीने काय किंवा वेळ वांचविण्याच्या दृष्टीनं काय मला फार सोयीचा वाटला. त्याप्रमाणें करण्याचे मी ठरविलें. '''न्युवारा एलिया''' येथल्या मळ्यांत लंकेतील सर्वांत उत्तम चहा होतो हे मला पूर्वी ठाऊक असल्यामुळे तेथल्या उत्तम चहाचे एक एक पौंडाचे चार डबे मजकरितां विकत घेऊन ठेवण्यास मी रा. थंबी पिल्ले यांना सांगितलें. नंतर मी विंडसर हॉटेलला परत आलों.{{nop}}<noinclude></noinclude> djemoymsafamnz1f57lx6u91gxy0q0v पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१६८ 104 112012 236417 2026-08-31T11:54:57Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ 236417 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|'''न्युवारा एलिया शीतलनिवासस्थान.'''}} {{rh|नं. १७||पान १४५}} {{nop}}<noinclude></noinclude> i7p60txjgp7d3uizrpmn14h95u6ht34 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१६९ 104 112013 236418 2026-08-31T11:58:38Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236418 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंका बेटांतील दोन शीतलनिवासस्थानें|१४५ }}</noinclude>{{gap}}न्युवारा एलिया हें शीतलनिवासस्थान एका पर्वताच्या अरुंद पण लांबट अशा पठारावर वसलेलें आहे. त्याचे उत्तरेस व दक्षिणेस अशा दोन डोंगरांच्या रांगा पूर्वपश्चिम दिशेनें समांतर गेलेल्या आहेत. या सर्व पर्वतराजी विलायती वृक्षांनी गर्दछाय झालेल्या आहेत. हे निवासस्थान छोटेखानी आहे. पण येथली रचना व देखावा शीत कटिबंधांतला आहे. येथें लंका बेटाचे विशिष्ट वृक्ष तर औषधाससुद्धां मिळावयाचे नाहींत. येथें नारळी पोफळी नाहींत; येथें केळीचें नांव नाहीं; येथें पालमिरा पाम नाहींत; भाकरीची झाडें नाहींत; ताडपत्री ताड नाहींत उष्ण कटिबंधाचें चिन्ह येथें कांहींच नाहीं. येथें सायप्रस, फर, पाईन, गम, कझॅरिना, युकॅलिप्टस इत्यादि वृक्ष अतोनात आहेत. येथें गुलाबाची रेलचेल आहे; काश्मीरप्रमाणें गुलाबांच्या कुंपणी मीं फक्त या ठिकाणी पाहिल्या. येथें नाना रंगांच्या लिली नांवाच्या वेली व फुलझाडें आहेत; येथें नाना रंगी क्रोटन आहेत; विलायती फुलझाडें आहेत; येथें सर्व भूमिभाग हिरव्या हिरव्यागार गवतानें सुशोभित झालेला आहे. येथें मोठें गोल्फ मैदान आहे. येथें एक छोटा पार्क आहे. पण त्याची रचनाही विलायती पार्कप्रमाणें आहे. पार्कच्या सभोंवार एक वृक्षराजी; मध्येमध्यें फुलझाडांच्या ताटव्यांनी युक्त अशा खुल्या हिरव्यागार गवताच्या जागा; मधून मधून उंच उंच वृक्षांच्या राई; कारंज्यानें युक्त व कमलवेलींनीं आच्छादलेली पुष्करणी; छोटेसें सर्पाकार सरोवर व सर्व पार्कभर तांबूस वाळूच्या खडीच्या पायवाटा अशी रचना या पार्कची आहे. लंडनमधील एखादा छोटा पार्कच पहात आहों कीं काय असा मला भास झाला. येथें '''हँप्टन कोर्टपार्ट'''च्याप्रमाणे छातीभर लताच्या सुंदर कुंपणानें बनविलेला छोटासा चक्रव्यूह आहे. पण या चक्रव्यूहाला चार फेरे असतील नसतील; यामुळें या चक्रव्यूहांत सांपडून अडकून बसावयाची मुळींच धास्ती नाहीं; एक दोनदां प्रयत्न केला कीं परतावयाचा मार्ग सांपडून मनुष्य चक्रव्यूहाबाहेर येतो. येथें छोटेसें शर्यतीचें मैदान आहे; पण<noinclude></noinclude> 4h5wx5ajfqoz3cyvwuilg9w8u6kvtnw