विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.18
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/435
104
37017
236500
61794
2026-09-03T18:07:11Z
~2026-47953-09
6201
राजाराम बिन कान्होजी तिखोळे
236500
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="2409:40C2:100F:FFAF:8000:0:0:0" /></noinclude>________________
३१०
२०८]
॥श्री॥ २५ जून १७३०.
राजश्री गोविंद बल्लाळ गोसावी यांसिः विनंति उपरि. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. सुज्याअतदौलाचा मजकूर विस्तारें लिहिला व तुह्मीं त्याशी इतबार पुरावयाचे लिहिलें तें कळलें. ऐशियास, तुझी त्याशी बोलला व तेहि. तिकडे जात नाही असें बोलतात, हे यथार्थच. परंतु, तुर्त ते बोलतात एक, करतात एक, असें आमच्या बातमीचे रीतीने दिसते. कसे ? तरी, अलीकडे फौज उतरली, आपणहि अलीकडे आले आणि नजीबखान यास ठेऊन घेतले आहे. त्यास, त्यांणीं जेव्हां त्यास ठेऊन घेतले, तेव्हां एक प्रकारे दिसते. यास्तव कितेक त्याचे मतलब होऊन आमचा उपयोग पडावा यास्तव विस्तरें मजकूर सांगून राजश्री मिाजी अनंत व राजश्री नारा शंकर यांस रवाना कलें आहे. व फौज मागून येऊन पोहोंचली. त्यास, तुह्मीं पुढे सुज्याअतदौला यास लेहून पाठवावें की यांस कितेक आपले खातरदास्तीस्तव, सरकारचे उपयोगास्तव रवाना केले असेत ; हे येतात व फौजहि मागून येते तों तुह्मीं तेथें मुकाम करावा ; नजीबखानास लावून द्यावे आणि तागायत
२८९ रामाजी अनंत व नारो शंकर यांच्या दफ्तरी हिंदुस्थानांतील घडामोडीसंबधी पत्रे असावी. विठ्ठल शिवदेव, हिंगणे, अंताजी माणकेश्वर ह्यांच्याहि दफ्तरी ह्या घडामोडीसंबंधी कागदपत्र सांपडावे. आह्मी विठ्ठल शिवदेव, नारो शंकर व रामाजी अनंत ह्यांच्या वंशजांच्या गांवीं ह्मणजे विंचूर, मालेगांव इत्यादि ठिकाणीं शोध केला; परंतु, कागदपत्रांचा सुगावा लागला नाही. वर सांगितलेल्या पुरुषांचे कागदपत्र सांपडल्यास हिंदुस्थानांत मराठ्यांनी १७१४ पासून १७६१ पर्यंत ज्या कामगिया केल्या त्यांचा समग्र इतिहास कळेल. नारो शंकर यांच्यासंबंधी एक यादी मालेगांव येथे आह्मांस मिळाली तिच्यावरून तेथील दफ्तराची हकीकत कळून येईल.
॥ श्री॥ यादी शिवराव गोपाळ राजे बहादर संस्थान मालेगांव सु॥ सन १२४२ फसली. ती॥ कैलासवासी नारो शंकर नानासाहेब राजेबहादर हे त्रिवर्ग बंधू. यांचे वडील पूर्वी बिज्यापूरचे सुभ्याकडेस दिवानगिरीचे कामावर होते. असो. अलीकडील मजकूर. अबाजी शकर हे श्रीमंत पेशवे यांचे दरवारांत रोजगारास होते. लक्ष्मण शंकर यांणी पेशवे सर<noinclude></noinclude>
3z103xuzsholcgjgge1twknrz9avk2e
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/१२
104
112030
236482
236466
2026-09-03T13:04:40Z
Shurpalimedha
5041
236482
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>दुसऱ्या दिवशी पुस्तक व एक आणा दिला, की दुसरे पुस्तक मिळे. बऱ्याच वर्षांनी कळले की, ते विक्रेते 'मॅजेस्टिक प्रकाशन' चे केशवराव कोठावळे होते.</br>
{{gap}}जून महिन्यात शाळा सुरू झाली, पावसाळा सुरू झाला की आनंदाची बाब असे ती म्हणजे, नवीन पुस्तके विकत घेण्याची! त्याकाळी मराठी चौथीनंतर इंग्रजी शाळेत जायचे. इंग्रजी पहिली ते सातवी म्हणजे मॅट्रिक झाल्यावर कॉलेज. बहुतेक पुस्तके मोठ्या भावाने वापरलेली. एखाददुसरे नवीन असायचे. दादरला 'कोहिनूर थिएटरच्या (आताचे 'नक्षत्र') नाक्यावरबी 'नरेंद्र बुक डेपो', समोर 'भारत बुक डेपो', कोहिनूर थिएटरजवळ 'दादर बुक डेपो', पणशीकरांच्या शेजारी 'वसंत बुक डेपो'- कुठेही पुस्तक मिळाले नाही, की गलीत 'आयडियल बुक डेपोत जायचे. तेव्हा 'आयडियल बुक डेपो' एक गाळ्याचा होता. टांगलेल्या दोरीचा आधार घेत तीन लाकडी पायऱ्या चढून गेल्यावर मग दुकानात प्रवेश व्हायचा. तेथे सेकंड हॅण्ड पुस्तकेही मिळायची. एकदा मी 'आयडियल'मधून एक इंग्रजी पुस्तक घेतले. मी इंग्रजी पहिलीत होतो. पुस्तक पाहिल्यावर आमचे सर (मनोहर नाडकर्णी, आता वय ९३ वर्षे. हरी निवासच्या मागच्या रस्त्यावर राहतात.) म्हणाले, "हे पुस्तक दुसरीचे. तू ते बदलून आण." 'आयडियल'च्या दुकानात बोर्ड लावलेला आठवला, 'एकदा विकलेले पुस्तक परत घेतले जाणार नाही.' पुस्तकाची किंमत होती चार आणे. 'आयडियल'च्या नेरूरकरांनी पुस्तक बदलून दिले नाही तर चार आणे गेले, या भीतीने रात्री मला नीट झोप लागली नाही. दुसन्या दिवशी धडधडत्या छातीने 'आयडियल' मध्ये गेलो. नशीब असे की, नेरूरकरांनी ते पुस्तक बदलून दिले.</br>
{{gap}}नवीन पुस्तक आणले की, त्याचा वास घेताना मस्त वाटायचे. त्याला खाकी कागदाचे कव्हर घालायचे, त्यावर आपले नाव लिहायचे- यात संध्याकाळ जाई. आता 'आयडियल बुक डेपो' मोठ्या जागेत विस्तारलाय आणि 'वसंत बुक डेपो' सोडून इतर बुक डेपोंनी गाशा गुंडाळलाय...</br>
{{gap}}बुक डेपोच नव्हे तर, इतर मराठी व्यापारीही कमी होत चालले आहेत. लग्नसराईत साड्यांच्या खरेदीसाठी एकमेव दुकान होते- 'शहाडे - आठवले'. आता 'सुविधा', 'पानेरी', 'रांगोळी', 'रूपमीलन', 'सोसायटी', 'लाजरी' अशा दुकानांनी शहाडे - आठवलेंना भागे सारले आहे. कुलकर्ण्याचे 'गिरगाव पंचे डेपो' टिकून आहे. बोले रोडवर पारेख नावाचे पहिले लाकडाचे व्यापारी आले. त्यानंतर मारुतीचे देऊळ ते पोर्तुगीज चर्चपर्यंत लाकूड, हार्डवेअर,</br>
८। गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude>
10p27i1og30pgrc11rgb702o0s668g7
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/१३
104
112031
236483
236467
2026-09-03T13:27:01Z
Shurpalimedha
5041
236483
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>गादी, डनलॉप वगैरे बांधकाम व गृहोपयोगी वस्तूंची दुकाने आली. त्यातील एकही दुकान मराठी माणसाचे नाही.</br>
{{gap}}दादर स्टेशनसमोर मुळ्यांचे हॉटेल होते. त्यांचा मुलगा आमच्या शाळेत होता. तो गल्ल्यावर बसलेला दिसला, की आम्ही आत कॉफी प्यायला जात असू. (कारण : फुकट ). पुढे ही जागा 'सुविधा'ने घेतली. तरीही 'तांबे आरोग्य भुवन', 'पणशीकर', 'पेंडुरकर', 'लागू', 'पेठे', 'हरी महादेव वैद्य' टिकून आहेत, ही समाधानाची बाब. आजही खरेदीसाठी लोक दादरला येतात.</br>
{{gap}}लग्नात नवरा-नवरी गळ्यात फुलांचे हार घालून रिसेप्शनला उभी राहत असत. आता फुलांचे हार गेले. दुपारची जेवणावळ पाटावर बसून असे. नंतर टेबल-खुर्चीवर आणि आता बुफे पद्धत आली. लग्ने स्वजातीत होत असत. परजातीतल्या मुलीशी विवाह झालेला असल्यास तो टीकेचा विषय होई.</br>
{{gap}}गणेशोत्सवात मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल असायची. नागू सयाजीची वाडी, जाखादेवी मैदान, नाही तर भवानीशंकर रोडवरील 'ब्राह्मण सहाय्यक संघ' इथे अभिरूप न्यायालय, चक्री व्याख्यान, ब्रेन ट्रस्ट, मेळे, नाटके, गजानन वाटवे - बबन नावाडीकरांची भावगीते, बापट - पाडगावकर-करंदीकर यांचे काव्यवाचन, शाहीर अमरशेख, गवाणकर, अण्णाभाऊ साठे किंवा शाहीर पां. द. खाडिलकर (हे आम्हाला संस्कृत शिकवायचे) यांचे पोवाडे, रणजित बुधकर, भोंडे यांच्या नकला, नृत्ये- एकूण मनोरंजनाची मेजवानी असायची. 'दादर सार्वजनिक वाचनालया'तील वक्तृत्वोत्तेजक सभा (याचा नीट उच्चार करायला बहुतेकांना जमत नसे!) नावाची संस्था चक्री व्याख्यान आयोजित करीत असे. राजकीय पक्षांची भूमिका मांडणारे नट आवश्यक ती वेशभूषा करून आपापली बाजू मांडीत असत. 'ब्रेन ट्रस्ट'मध्ये प्रेक्षक कोणताही प्रश्न विचारीत व व्यासपीठावरील वक्ते खुसखुशीत उत्तरे देत. स. अ. शुक्लांचे 'जयद्रथ वध' किंवा अशीच पौराणिक नाटके असत. नाटक सुरू होण्यापूर्वी निदान दोन-तीन तास आधी आम्ही स्टेजसमोरची जागा अडवून बसत असू. नाटक बघता-बघता झोप लागे. जयद्रथाचे मुंडके आले किंवा रावणाच्या एंट्रीच्या आरोळीने घाबरून जागे होत असू. 'वारा फोफावला', 'कसा गं गडे झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा', 'रानात. सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते' ही तरुण मनाला गुदगुल्या करणारी भावगीते लोकप्रिय होती. 'जाती घडी पुन्हा येणार न्हाई रे, घुसून पुढं जायचं हायरे, आलं तुफान तसं गेलं उधान, आता माघार घेयाची न्हाई रे' हे
{{right|दादर । ९}}<noinclude></noinclude>
mkq0nntsfz8vm9fw7zk8oqeg1p9um1j
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/१४
104
112032
236485
236468
2026-09-03T13:36:47Z
Shurpalimedha
5041
236485
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>शाहीर अमरशेखांच्या पहाडी व बुलंद आवाजातले गाणे ऐकल्यावर बाहू स्फुरत असत.</br>
{{gap}}होळीच्या दिवसांत दारावर 'पोस्त' मागायला 'परीचा नाच' येत असे. दहा-बारा वर्षांचे मुलगे डोक्यावर केसांचा टोप व अंगात पौराणिक नाटकात घालतात, तसा ढगळ झगा घालून 'हासोनि नाचोनि या आनंदे, जाऊ कशी मी वृंदावना' हे गाणे आपल्या कमरेवर हात ठेवून गात असत. पाच रुपये पोस्त मिळाला की ते खूश होत.</br>
{{gap}}काहींच्या घरात ग्रामोफोन असे. रेडिओ फक्त हॉटेलात ऐकायला मिळे. फोनोवर 'रमला कुठे ग कान्हा' (लीला लिमये), 'बाई चला गोकुळाला' (विनोदिनी दीक्षित) किंवा 'संभाळ ग, संभाळ दौलत लाखाची ग' (वत्सला कुमठेकर) ही गाणी प्रसिद्ध होती. फोनोच्या रेकॉर्डला 'बांगडी' म्हणत.</br>
{{gap}}'डिसिल्वा हायस्कूल' चे पटांगण सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी फुलून जात असे. ना. सी. फडके, ज्योतिषी वसंत लाडोबा म्हापणकर, वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे यांची व्याख्याने असत. वसंत देसाई, बसंत प्रभू अशा प्रख्यात संगीतकारांचे कार्यक्रम होत. पिंगपाँग, इडली सांभारा (किंग काँग व सिली समारा यांचे विडंबन ) यांच्या अभिरूप कुस्त्या होत. नंतर नंतर वसंतराव देशपांडे, शांता आपटे, बडे गुलाम अली खाँ यांच्या संगीताच्या मैफली होत.</br>
{{gap}}प्रकाशभाई मोहाडीकरांच्या रूपाने दादरमध्ये चैतन्य अवतरले. त्यांच्या अनेकविध सामाजिक कार्यांतील 'अमर हिंद मंडळ' व तेथील 'वसंत व्याख्यानमाला' हे एक महत्त्वाचे योगदान. त्या काळातील तरुण पिढी घडली ती अशा व्याख्यानमालांच्या छायेत. या व्यासपीठावर नामवंत राजकीय नेते, विचारवंत, शास्त्रज्ञ, साहित्यिक, नाट्यकर्मी, संगीतकार, अभिनेते यांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांतील काही नावे अशी स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, साने गुरुजी, चिंतामणराव देशमुख, काकासाहेब गाडगीळ, आचार्य अत्रे, न. र. फाटक, सेतु माधवराव पगडी, दत्तो वामन पोतदार, प्रा. राम शेवाळकर, आप्पासाहेब पंत, व्ही. शांताराम, शाहू मोडक, बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, दत्ता सामंत, जयंत नारळीकर, ना. ग. गोरे वगैरे. एखादे व्याख्यान चुकले की, हळहळ वाटे. इथे नाटकेही होत. 'मंदारमाला', 'वन्हाडी माणसं' अशी नाटके इथे पाहिल्याचे आठवते.</br>
{{gap}}त्या काळात नाटकासाठी एकमेव हॉल म्हणजे परळचा 'दामोदर हॉल' होता. 'माझे घर', 'देवमाणूस', 'वहिनी' या नाटकांवेळी फ्लॅटसीन आले. तत्पूर्वी पडद्यावरच नाटक चालत असे. बाग, घर, रस्ता रंगविलेले पडदे</br>
१० । गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude>
ewupj2g99a10hydtgw83z4632jiurpo
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/१५
104
112033
236486
236480
2026-09-03T13:37:37Z
Shurpalimedha
5041
236486
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>असत. रस्त्याचा पडदा पडला, की नट खरोखरच रस्त्यावर उभा असल्याचा भास होई, पडद्याच्या डाव्या कोपन्यात 'पेंटर जुन्नरकर' असे नाव असे. रात्रीचा सीन असेल, तर स्टेजवर टांगलेला हिरवा दिवा लावला जाई. स्त्रियांची कामे पुरुष करीत. ध्वनिक्षेपक नव्हते. शेवटच्या रांगेपर्यंत आवाज पोचावा यासाठी पात्रे मोठ्याने बोलत.<br>
{{gap}}गिरगावातील 'साहित्य संघा'चे नाट्यगृह व दादरचे 'शिवाजी मंदिर' नंतरचे! मध्यंतरी फिरता व सरकता रंगमंच आला आणि गेला.
{{gap}}पूर्वीची तीन अंकी नाटके आता दोन अंकी झाली. 'शिवाजी मंदिरा'त सर्वांत समोरच्या रांगेचे तिकीट असे पाच रुपये. पु.लं.नी 'असामी, असामी' चे तिकीट पहिल्यांदा दहा रुपये लावले. त्या काळातील नाटके अविस्मरणीयच. 'काचेचा चंद्र', 'पुरुष', 'सूर्यास्त', 'गारंबीचा बापू', भोवरा', 'कट्यार काळजात घुसली', 'तुझं आहे तुजपाशी', 'बुवा तेथे बाया', 'डॉ. लागू', 'बऱ्हाडी माणसं', 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'नटसम्राट', 'संध्याछाया' ही अगदी काळजाला हात घालणारी व विसरता न येणारी नाटके. छबिलदास शाळा ही एकेकाळी नाट्यकर्मींची प्रयोगशाळा होती. 'चांगुणा', 'झुलवा', 'आधे अधुरे', 'शांतता कोर्ट चालू आहे', 'बेबी' अशी कितीतरी सुंदर नाटके इथे पाहायला मिळाली. याच हॉलमध्ये 'दादर- माटुंगा सोशल क्लब'चा जन्म झाला. डॉ. एस. जी. जोशी हे कान-नाक- घसा तज्ज्ञ गाण्याचेही शौकीन होते. तेच या संस्थेचे जन्मदाते. पुढे संस्थेचे नामकरण 'दादर- माटुंगा कल्चरल सेंटर' असे झाले व 'यशवंत नाट्यमंदिराजवळ तिचे स्थलांतर झाले.<br>
{{gap}}अमेरिकेहून चार नाटके आली. 'अलिबाबाची हीच गुहा', 'सुंदरा मनामध्ये भरली', 'वसुंधरा' व 'अवघा रंग एकचि झाला'. 'वसुंधरा' हे नृत्य नाटक कुसुमाग्रजांच्या 'पृथ्वीचे प्रेमगीत' या कवितेवर बेतलेले असून ७ डॉ. मीना नेरूरकर यांनी छान रीतीने सादर केलेले असूनही लोकांना तितकेसे आवडले नाही. मात्र त्यांच्या 'सुंदरा' ने कमाल केली. 'सुंदरा'च्या<br>
{{right|दादर । ११}}<noinclude></noinclude>
4z3vbh78owtgsu8kxb2wwhbmgr9ozts
236487
236486
2026-09-03T13:38:07Z
Shurpalimedha
5041
236487
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>असत. रस्त्याचा पडदा पडला, की नट खरोखरच रस्त्यावर उभा असल्याचा भास होई, पडद्याच्या डाव्या कोपन्यात 'पेंटर जुन्नरकर' असे नाव असे. रात्रीचा सीन असेल, तर स्टेजवर टांगलेला हिरवा दिवा लावला जाई. स्त्रियांची कामे पुरुष करीत. ध्वनिक्षेपक नव्हते. शेवटच्या रांगेपर्यंत आवाज पोचावा यासाठी पात्रे मोठ्याने बोलत.<br>
{{gap}}गिरगावातील 'साहित्य संघा'चे नाट्यगृह व दादरचे 'शिवाजी मंदिर' नंतरचे! मध्यंतरी फिरता व सरकता रंगमंच आला आणि गेला. 'तुझं आहे तुजपाशी' हे नाटक पाहावे 'साहित्य संघा'चेच! विजया जयवंत (मेहता) यांची उषा, दाजी भाटवडेकर यांचा काकाजी या अगदी अमर भूमिका. दार्जीनी आमच्या मेडिकल कॉलेजात 'अंमलदार' नाटक बसवताना इतर तीन 'अंमलदार' नाटके दाखवली. संहिता तीच असली तरी परिणाम साधला तो 'साहित्य संघा'च्या 'अंमलदार'ने नाटक हे दिग्दर्शकाचे माध्यम असते, हेच खरे! <br>
{{gap}}पूर्वीची तीन अंकी नाटके आता दोन अंकी झाली. 'शिवाजी मंदिरा'त सर्वांत समोरच्या रांगेचे तिकीट असे पाच रुपये. पु.लं.नी 'असामी, असामी' चे तिकीट पहिल्यांदा दहा रुपये लावले. त्या काळातील नाटके अविस्मरणीयच. 'काचेचा चंद्र', 'पुरुष', 'सूर्यास्त', 'गारंबीचा बापू', भोवरा', 'कट्यार काळजात घुसली', 'तुझं आहे तुजपाशी', 'बुवा तेथे बाया', 'डॉ. लागू', 'बऱ्हाडी माणसं', 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'नटसम्राट', 'संध्याछाया' ही अगदी काळजाला हात घालणारी व विसरता न येणारी नाटके. छबिलदास शाळा ही एकेकाळी नाट्यकर्मींची प्रयोगशाळा होती. 'चांगुणा', 'झुलवा', 'आधे अधुरे', 'शांतता कोर्ट चालू आहे', 'बेबी' अशी कितीतरी सुंदर नाटके इथे पाहायला मिळाली. याच हॉलमध्ये 'दादर- माटुंगा सोशल क्लब'चा जन्म झाला. डॉ. एस. जी. जोशी हे कान-नाक- घसा तज्ज्ञ गाण्याचेही शौकीन होते. तेच या संस्थेचे जन्मदाते. पुढे संस्थेचे नामकरण 'दादर- माटुंगा कल्चरल सेंटर' असे झाले व 'यशवंत नाट्यमंदिराजवळ तिचे स्थलांतर झाले.<br>
{{gap}}अमेरिकेहून चार नाटके आली. 'अलिबाबाची हीच गुहा', 'सुंदरा मनामध्ये भरली', 'वसुंधरा' व 'अवघा रंग एकचि झाला'. 'वसुंधरा' हे नृत्य नाटक कुसुमाग्रजांच्या 'पृथ्वीचे प्रेमगीत' या कवितेवर बेतलेले असून ७ डॉ. मीना नेरूरकर यांनी छान रीतीने सादर केलेले असूनही लोकांना तितकेसे आवडले नाही. मात्र त्यांच्या 'सुंदरा' ने कमाल केली. 'सुंदरा'च्या<br>
{{right|दादर । ११}}<noinclude></noinclude>
egggnxmgk29huynubz3ytjh9cs4f16j
सदस्य चर्चा:Sameer Bapu Ranbagle
3
112036
236484
2026-09-03T13:34:11Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
236484
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Sameer Bapu Ranbagle}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १९:०४, ३ सप्टेंबर २०२६ (IST)
2kup0ppai3ebxjsrp20ff9r97nchb48
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/१६
104
112037
236488
2026-09-03T13:38:38Z
Shurpalimedha
5041
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तिकिटांसाठी मात्र 'शिवाजी मंदिरा'पासून 'शिवसेना भवन'पर्यंत लोकांची रांग लागायची. नाट्यक्षेत्रातील हा एक चमत्कारच मानायला हवा. 'भाऊबंदकी' या नाटकात नानासाहेब फाटकांना राघोबादाद..."
236488
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>तिकिटांसाठी मात्र 'शिवाजी मंदिरा'पासून 'शिवसेना भवन'पर्यंत लोकांची रांग
लागायची. नाट्यक्षेत्रातील हा एक चमत्कारच मानायला हवा.
'भाऊबंदकी' या नाटकात नानासाहेब फाटकांना राघोबादादाच्या भूमिकेत
व 'एकच प्याला' नाटकात सुधाकराच्या भूमिकेत पाहावे. त्या काळातले ते
अविस्मरणीय नट. लांबच्या लांब पल्लेदार वाक्ये नानासाहेब फेकत, तेव्हा गद्य
संगीताची मैफल वाटे. शब्दावरील वजन, लहेजा ऐकतच राहावा. दादरला
पूनावाडीत ते राहत असत. एकदा त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. दारात
भला मोठा अल्सेशियन कुत्रा. बोलता बोलता म्हणाले, 'मी तीन हजार
रुपयांची बचत करून ते बँकेत ठेवले. हेतू असा की, उतारवयात त्या पैशाच्या
व्याजातून उदरनिर्वाह होईल. पण कसचे काय! आज आमच्या कुत्र्यासाठीसुद्धा
ते पुरेसे होणार नाहीत!' ही गोष्ट सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची. नानासाहेब ‘एकच
प्याला' नाटकात सुधाकराची भूमिका करीत होते; तेव्हा सिंधूची भूमिका
मीनाक्षीबाई करीत असत. त्या छान गायच्या. त्यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण
झालेले होते. पूर्वाश्रमीचे नाव रतन. लग्न डॉ. शिरोडकरांशी झाले, तेव्हा त्या
अठरा वर्षांच्या होत्या. 'ब्रह्मचारी' (१९३८) हा चित्रपट 'कोहिनूर' सिनेमात
लागला, तेव्हा मी सुमारे दहा-अकरा वर्षांचा होतो. त्या काळात मीनाक्षीबाई
तरुणांच्या 'दिल की धडकन' होत्या. बऱ्याच वर्षांनी त्यांची माझी ओळख
झाली. 'ब्रह्मचारी' मागची कथा त्यांनी सांगितली ती अशी- 'यमुनाजळी
खेळू खेळ कन्हैया का लाजता' या गाण्याचे शूटिंग होते. मास्टर विनायक
यांनी मीनाक्षीबाईंना 'स्विमिंग सूट' घालायला सांगितले. अंगावर भरपूर कपडे
घालून अभिनय करायच्या त्या दिवसांत मानेपासून जांघांपर्यंतचा 'स्विमिंग
सूट' घालणे म्हणजे गहजबच ! मीनाक्षीबाई तयार होईनात. मा. विनायक तर
हट्टाला पेटलेले! मीनाक्षीबाई रडू लागल्या. त्यांनी डॉ. शिरोडकरांना विचारले.
ते म्हणाले, 'तू कॉन्ट्रॅक्टवर सही केलेली आहेस, तर तुला तो सीन करणे भाग
आहे.' मग त्या तयार झाल्या. तरीही 'शूटिंगवेळी कॅमेरामनशिवाय कुणीही
हजर राहू नये', अशी अट त्यांनी घातली. मग पाण्याच्या डबक्यात पोहत
असतानाचे शूटिंग संपले. अवघ्या तीन महिन्यांत चित्रपट पूर्ण झाला.
'ब्रह्मचारी' सिनेमा प्रकाशित झाल्यावर हा सीन सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.
'यमुनाजळी' पाहण्यासाठी म्हणून लोक 'ब्रह्मचारी' पाहायला जात. मीनाक्षींना
मात्र लोकांनी हैराण केले. त्या रस्त्यावरून जाऊ लागल्या की, लोक शेणाचे
गोळे फेकत, अर्वाच्य शेरे मारीत. कालांतराने हे कमी झाले. मीनाक्षीबाईना
अॅलर्जीचा त्रास होता. त्यामुळे सौम्य दम्याचा त्रास होत असे. त्यांच्या घरात
१२ | गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude>
jpo0xk14nzi0n70a9zmc8ak2zsskhwi
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/१७
104
112038
236489
2026-09-03T13:38:51Z
Shurpalimedha
5041
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "लव्हबर्ड्स होते. कदाचित त्यांची अॅलर्जी असावी. मी त्यांना किती आग्रह केला, 'मीनाक्षीबाई, आपण आत्मचरित्र लिहा. दुर्गाबाई खोटे, लीला चिटणीस, हंसा वाडकर यांची आत्मचरित्रे लोक आवडीने..."
236489
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>लव्हबर्ड्स होते. कदाचित त्यांची अॅलर्जी असावी. मी त्यांना किती आग्रह
केला, 'मीनाक्षीबाई, आपण आत्मचरित्र लिहा. दुर्गाबाई खोटे, लीला
चिटणीस, हंसा वाडकर यांची आत्मचरित्रे लोक आवडीने वाचताहेत.
आत्मचरित्र म्हणजे केवळ तुमची जीवनकहाणी नसून, त्या काळचा समाज,
लोकांची मानसिकता, त्यांची मूल्ये, विचार, भावना यांचे दर्शन घडते. हवे तर
शब्दांकन करायला मी खारला तुमच्या घरी येतो.' पण त्याबाबतीत त्या
फारशा उत्सुक दिसल्या नाहीत. लवकरच त्या गेल्या...
लीला चिटणीस शिवाजी पार्कला राहायच्या. माझा वर्गमित्र हजारे हा
त्यांच्या शेजारी राहायचा. त्याच्यासह भी लीलाबाईंच्या घरी एकदा गेलो
होतो. पुढे त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले. 'श्रीविद्या प्रकाशन'च्या
मधुकाका कुलकर्णीनी ते प्रकाशित केले. प्रकाशन समारंभाला खूप गर्दी झाली.
लोकांना बसायलादेखील जागा नव्हती. काहींनी खुर्च्याची मोडतोड केली.
याची भरपाई कोणी करायची, हा वाद निर्माण झाला. एक लेखक म्हणून माझे
मत विचारण्यासाठी त्या आमच्या घरी आल्या होत्या. मी माझे मत राखून
ठेवले. ('झाकली मूठ सव्वा लाखाची!' )
एकेकाळी 'बंधन', 'कंगन', 'झूला' हे लीलाबाईंचे चित्रपट गाजत होते.
त्या काळात मराठी चित्रपटांचीही चलती होती. 'संत तुकाराम', 'संत
ज्ञानेश्वर', 'रामशास्त्री', 'कुंकू', 'श्यामची आई', 'वहिनीच्या बांगड्या',
'गुळाचा गणपती', 'पुढचं पाऊल', 'जगाच्या पाठीवर', 'पायाची दासी' असे
किती चित्रपट सांगावेत ? कृष्णधवल चित्रपट असूनही आजदेखील या
चित्रपटांची गोडी अवीट वाटते. झाडामागे धावणे नाही, 'आयटम साँग'
नावाचा धिंगाणा नाही, हीरो-हिरॉइनची मैदानात लोळणफुगडी नाही,
तरीदेखील हे चित्रपट पुनः पुन्हा पाहावेसे वाटतात. 'कोहिनूर' (नक्षत्र) व
'प्लाझा सिनेमा' या दोन चित्रपटगृहांनी आम्हाला खूप काही दिले. पडद्याच्या
अगदी समोरच्या बाकाचे तिकीट असे तीन आणे. पुढे ते चार आणे झाले.
स्त्रियांसाठी खास काही रांगा राखीव असत. त्यामागे पुरुषांसाठी खुर्च्या असत.
बाल्कनीचे तिकीट आठ आणे. त्याकाळी 'बॉक्स' नावाचा एक प्रकार होता.
प्रियकर-प्रेयसीसाठी ही खास सोय असायची. तिकिटावर खुर्चीचा क्रमांक
नसे. सिनेमा सुरू होण्यापूर्वी आपापल्या क्लासच्या दरवाजासमोर प्रेक्षकांची
झुंबड जमे. दरवाजा उघडला की, जागा पकडण्यासाठी लोक आत घुसत.
त्रिलोक कपूर व निरुपा रॉय ही शंकर-पार्वतीची जोडी पडद्यावर दिसली की,
लोक उभे राहून नमस्कार करीत. संत तुकारामांची भूमिका करणारे विष्णुपंत
दादर । १३<noinclude></noinclude>
194dn0nlmht66lrhn41n3cg9cjrzmeu
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/१८
104
112039
236490
2026-09-03T13:39:06Z
Shurpalimedha
5041
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "पागनीस यांचा भजनाचा कार्यक्रम होई. लोक त्यांच्याही पाया पडत. हातगाडीवर उलट्या 'व्ही' आकारात दोन बोर्ड जोडून ती हातगाडी रस्त्यावर फिरवून सिनेमाची जाहिरात केली जात असे. राजकपूरच्..."
236490
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>पागनीस यांचा भजनाचा कार्यक्रम होई. लोक त्यांच्याही पाया पडत.
हातगाडीवर उलट्या 'व्ही' आकारात दोन बोर्ड जोडून ती हातगाडी रस्त्यावर
फिरवून सिनेमाची जाहिरात केली जात असे.
राजकपूरच्या 'बरसात'चे शूटिंग पाहायला एकदा गेलो. वरळीच्या एका
स्टुडिओमध्ये शूटिंग होते (१९४६). माधव पै व भुजंग पै हे दोन भाऊ
राजकपूरचे मेकअपमन होते, त्यांच्यामुळे मला प्रवेश मिळाला. स्टुडिओच्या
अर्ध्या भागात पाणी साठवून काश्मीरचे 'डाल लेक' तयार केलेले. डाव्या
कोपऱ्यात हाऊसबोटचा दर्शनी भाग व उजव्या कोपऱ्यात रेश्माच्या ( नर्गीस )
वडिलांची झोपडी. मागे कागदाची फुले-पाने. 'बरसात' चित्रपट पाहताना ही
संपूर्ण स्टोरी काश्मीरची असल्याचा आभास होतो. अशी ही फसवाफसवी!
त्या काळात पुस्तके, मासिके यांवर मुळगावकर किंवा दलालांनी काढलेले
चित्र असे. दोघांचीही चित्रे छान असत. स्त्री सौंदर्याची लक्षणे आमच्या मनात
बिंबली, ती मुळगावकरांच्या चित्रानुसार गोल चेहरा, काळेभोर डोळे,
लांबसडक केसांची वेणी, कपाळावर टिकली, चेहऱ्यावर सौम्य हसू, उंच
बांधा, चापून चोपून बसवलेली पाचवारी साडी वगैरे. पण त्यांच्या चित्रांचे
विशेष असे की, ती व तो यांचे चेहरे सारखेच असायचे. राधा ही गोल, गोंडस
चेहऱ्याची व कृष्णही गोल, गोंडस चेहऱ्याचा असे.
१९५५ नंतर प्रभादेवीच्या 'सिद्धिविनायका'च्या दर्शनासाठी गर्दी वाढू
लागली. आमच्या लहानपणी आम्हाला आई 'प्रभादेवी'च्या देवळात घेऊन
जात असे. कुणी आजारी पडले की नवस सांगायचा तो 'प्रभादेवी'ला.
जानेवारीत प्रभादेवीला जत्रा असायची. देवळात रोषणाई असायची. समोरच्या
मोकळ्या जागेत मेथीच्या भाजीने 'श्री प्रभावती प्रसन्न' ही अक्षरे काढलेली
असत. जत्रेच्या दहा दिवसांत रोज आमची फेरी असायची. जत्रेतील अनेक
खेळ आवडायचे, पण खिशात दमडा नसल्यामुळे नुसते दृष्टिसौख्य
अनुभवायचो. "सविता देवी, देविका राणी का नाच देखो." हुकमानुसार
कचकड्याच्या छोट्या बाहुल्या नाचायच्या. आम्हाला आश्चर्य वाटायचे. कुणी
बाहुल्या विकत घेतल्या, की तो विक्रेता मग बाहुल्यांच्या छातीला असलेल्या
छिद्रात ओवलेला केस दाखवायचा. केस ओढला की बाहुल्या नाचायच्या.
मोटारीत बसून काढलेला फोटो, चार्ली चॅपलीनचा सिनेमा, पाइप न जोडलेल्या
नळातून सातत्याने पडणारे पाणी, नळीवर बसवलेले बोलके मुंडके अशा
गोष्टी मनाला भुरळ पाडीत. प्रभादेवीला माझे मामा राहत होते. 'पाटणकर
काढा' वाले पाटणकर एका टेबलावर काढ्याच्या आठ-दहा बाटल्या ठेवून
१४ । गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude>
dytew8iyat5yi29tl1hmx3vdj62qsod
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/१९
104
112040
236491
2026-09-03T13:39:21Z
Shurpalimedha
5041
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "समोरच्या बिल्डिंगमध्ये बसलेले दिसत. मामा दुपारी झोपलेले असले की, ते उठेपर्यंत वाट पाहात बसे. दरवर्षी ते काही ना काही वस्तू आमच्यासाठी विकत घेऊन देत. “मामा, तो सिनेमाचा प्रोजेक्टर..."
236491
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>समोरच्या बिल्डिंगमध्ये बसलेले दिसत. मामा दुपारी झोपलेले असले की, ते
उठेपर्यंत वाट पाहात बसे. दरवर्षी ते काही ना काही वस्तू आमच्यासाठी
विकत घेऊन देत. “मामा, तो सिनेमाचा प्रोजेक्टर घेऊन द्या ना!” मी हट्ट
धरत असे, पण मामा कुठे ऐकायला ? कारण त्या प्रोजेक्टरची किंमत चार रुपये
होती. ते म्हणत, "कशाला तो प्रोजेक्टर घ्यायचा? काय तो उपयोगाचा? ही
दऊत घे. उपयोगाची वस्तू आहे." मग काचेच्या माशात असलेली दऊत मला
मिळे (किंमत आठ आणे ).
सिद्धिविनायक मंदिराजवळच्या संभाजी पार्क मैदानाला 'नर्दुल्ला टँक'
म्हणत. ‘रवींद्र नाट्यमंदिर' असलेल्या जागी आम्ही क्रिकेट खेळत असू.
धुळीने पाय माखले, की सिद्धिविनायक मंदिरातील तळ्यात हातपाय धुवायचे
व परतताना देवाला बाहेरूनच नमस्कार करायचा आणि घरी पळायचे.
मंदिरासभोवती पांढरा चुना लावलेली भिंत होती. या भिंतीत दिंडी दरवाजा
होता. आत शिरल्यावर उजव्या हाताला गाभारा व डाव्या हाताला तळे होते.
गाभान्यात मिट्ट अंधार. फार तर एक दिवली दिसे. पुढे 'सिद्धिविनायक'
प्रसिद्धीस पावला. 'प्रभादेवी' आहे तेथेच राहिली...
आमच्या वडिलांचा ज्योतिषावर विश्वास नसे; पण आईला वाटायचे, या
मुलांची मुंज - लग्न व्हायच्या वेळी जन्मपत्रिका लागणार. तिने एका प्रख्यात
ज्योतिष्याकडून आमच्या जन्मपत्रिका बनवून घेतल्या. या ज्योतिष्याकडे
त्याकाळचे चित्रपट निर्माते मुहूर्त मागायला येत, इतके ते प्रसिद्ध होते. त्या
ज्योतिष्याने पत्रिका बनवून द्यायच्या व गप्प बसायचे ना? याऐवजी माझी
पत्रिका पाहून ते म्हणाले, "हा मुलगा 'ढ' आहे. पुस्तकांवरील धूळ साफ
करण्यापलीकडे तो काहीएक शिकणार नाही." हे मी ऐकत होतो ( वय
वर्षे ९). मी तर हादरलोच! तेव्हा जो भीतीचा किडा माझ्या डोक्यात शिरला,
तो 'एमबीबीएस' होईपर्यंत टिकून राहिला.
आश्चर्य असे की, मी दवाखाना घेतल्यावर मुहूर्त विचारण्यासाठी त्याच
ज्योतिष्याकडे गेलो. 'वीस वर्षांपूर्वी तुम्ही वर्तविलेले भविष्य खोटे ठरले आहे.
आता दवाखान्याचा मुहूर्त विचारण्यासाठी मी आलो आहे' असे सांगितले तर
ते बघतच राहिले. मला वाटते- अनिश्चितता, अस्थैर्य ही ज्योतिषावरील
विश्वासाची कारणे असावीत. त्यांनी मुहूर्त दिला- १ एप्रिल १९५७ एप्रिल
फूल व नवा पैसा (रुपयाला शंभर पैसे) सुरू झाल्याचा तो दिवस.
पुढे लग्नासाठी आम्हा दोघांच्या पत्रिका जुळतात की कसे, ते पाहण्यास
गेलो. एकाने सांगितले, "पत्रिका जुळत नाहीत." दुसऱ्याकडे गेलो. त्याने
दादर । १५<noinclude></noinclude>
ppx0f0mrhdndg954s3fnahqq7ut79on
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/२०
104
112041
236492
2026-09-03T13:39:36Z
Shurpalimedha
5041
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "सांगितले, “जुळताहेत.” पहिल्याचे सोडून दिले, दुसऱ्याचे ऐकले! त्या अनुभवातून मुलांच्या लग्नावेळी कुणालाही जन्मपत्रिका दाखवल्या नाहीत. लहानपणी मी 'ढ' आहे असे सांगणाऱ्या त्या ज्योत..."
236492
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>सांगितले, “जुळताहेत.” पहिल्याचे सोडून दिले, दुसऱ्याचे ऐकले! त्या
अनुभवातून मुलांच्या लग्नावेळी कुणालाही जन्मपत्रिका दाखवल्या
नाहीत.
लहानपणी मी 'ढ' आहे असे सांगणाऱ्या त्या ज्योतिष्याचे नर्दुल्ला टँकवर
कीर्तन होते. मध्येच त्यांना पक्षाघाताचा अटॅक आला. मला बोलावण्यात
आले. बेशुद्ध स्थितीत ते पडले होते. थोड्याच वेळात ते गेले. त्यांचा मृत्यूचा
दाखला मीच भरला. असा अंत होणार आहे, हे त्यांना आधी कळले असेल
का? की दिव्याखाली अंधार?
आम्हाला नेत्यांइतकेच अभिनेत्यांचे आकर्षण होते. शिवाय आमच्या
लेखी साहित्यिक, कवी हे थोर लोक होते. अनंत काणेकर, कवी यशवंत यांना
पाहिल्यावर आम्ही सुखावलो होतो. चारुशीला गुप्ते या आम्हाला मराठी
शिकवीत. पु. ल. देशपांडे इंग्रजी शिकवीत असत. अभिनेत्यांना पाहण्यासाठी
आम्ही दुपारच्या सुट्टीत फिरलो होतो. १९५० पर्यंत शिवाजी पार्कच्या
आसपास त्यांची वस्ती होती. नंतर ते जुहूला गेले. तेव्हा 'कॉर्नर चेंबर्स' मध्ये
लीला मिश्रा, जरा पुढे गेल्यावर ई. बिल्लिमोरिया व बी. बिल्लिमोरिया, कॅडेल
रोडवर किशोर साहू, शाहू मोडक व शोभना समर्थ, केळुस्कर रोडवर
मा. विनायक, समुद्रावर जाताना वाटेत सी. रामचंद्र, पुढे आचार्य अत्रे, अखेर
समुद्राजवळ मुमताज शांती राहत असे. त्यातील कुणीही आम्हाला दिसत नसे,
पण त्यांचे पत्ते आम्हाला पाठ असत.
'शिवाजी पार्क' म्हणजे दादरचा मानबिंदू. अनेक पक्षांच्या, अनेक
नेत्यांच्या सभा पाहिल्या. 'शिवसेना' इथे जन्मली, वाढली. संयुक्त महाराष्ट्राचे
आंदोलन इथेच फोफावले. आणीबाणीचा विरोध इथे पाहिला. साहित्य संमेलन
पाहिले. शिवतीर्थाने सुनील गावसकर, अजित वाडेकर, सचिन तेंडुलकर असे
क्रिकेटवीर जगाला दिले. नारायण मूर्तीना 'इन्फोसिस' हे नाव इथेच सुचले.
थोर साहित्यिक, नेते, राजकारणी, पत्रकार, संगीतकार हे शिवाजी पार्कच्या
परिसरात राहिले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जवळच्या
चैत्यभूमीत विसावले. आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे,
स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, माधव मनोहर, जयवंत दळवी,
विद्याधर गोखले, चित्रकार पंडित, वसंत देसाई, सी. रामचंद्र, सुधीर फडके,
यशवंत देव, दादा रेगे, बापूसाहेब रेगे, नानासाहेब मोडक, प्रा. वि. ह.
कुळकर्णी, गं. दे. खानोलकर, धनंजय कीर, प्रकाशभाई मोहाडीकर अशी
विविध क्षेत्रांतील थोर मंडळी शिवाजी पार्क परिसरात राहिली - राहताहेत.
१६ | गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude>
0i4rte0r596d298po370o3obs4giiss
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/२१
104
112042
236493
2026-09-03T13:39:54Z
Shurpalimedha
5041
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "मुंबईच्या महापौरांचेही वास्तव्य शिवाजी पार्कसमोर असते. पूर्वी हा बिकानेरच्या महाराजांचा बंगला होता. गणपती विसर्जनादिवशी तर गणेश दर्शनासाठी अलोट गर्दी होते. सर्व वयाच्या व्यक..."
236493
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>मुंबईच्या महापौरांचेही वास्तव्य शिवाजी पार्कसमोर असते. पूर्वी हा
बिकानेरच्या महाराजांचा बंगला होता.
गणपती विसर्जनादिवशी तर गणेश दर्शनासाठी अलोट गर्दी होते. सर्व
वयाच्या व्यक्तींना शिवाजी पार्कचे आकर्षण होते व आहे. मुलांना
खेळण्यासाठी, प्रेमी युगुलांना गाठीभेटीसाठी (संध्याकाळनंतर), प्रौढांना
चालण्याच्या व्यायामासाठी आणि वृद्धांना गप्पांसाठी. रात्रीचे तीन-चार तास
वगळता इथे सातत्याने माणसांची वर्दळ असते.
सिटी इंजिनीअर नानासाहेब मोडकांचे नगर रचनेचे कौशल्य शिवाजी
पार्क व परिसर पाहिल्यावर दिसून येते. स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाला लागून
उगवत्या सूर्याच्या आकाराचे शिवाजी पार्क वसलेले. त्याच्या चार दिशांना
सूर्यकिरणांप्रमाणे चार रस्ते पार्कला समांतर असे इंद्रधनुष्यासारखे
अर्धगोलाकार आणखी दोन रस्ते. या भागात तेव्हा एकही दुकान नव्हते. सर्व
इमारती दोन मजली. तर असे हे टुमदार वस्तीचा परिसर असलेले शिवाजी
पार्क !
मला शिवाजी पार्कची आठवण आहे, ती आणखी एक-दोन
कारणांसाठी. इंग्रजी पहिलीत असताना शाळेच्या दुपारच्या सुट्टीत आम्ही एक
आणा देऊन एक तासासाठी सायकल भाड्याने घ्यायचो व शिवाजी पार्कला
चकरा मारायचो. एकदा मी एकटाच सायकल चालवत होतो. एक तास
संपला. मला 'प्लाझा सिनेमा'च्या दिशेला जायचे होते, पण वाट चुकलो.
गोल गोल चकरा मारल्या, पण वाट सापडेना. मी रडू लागलो. कर्मधर्म
संयोगाने एक पोलीस आला. त्याने वाट दाखवली. शाळेत उशिरा
पोचल्याबद्दल मास्तरांनी दम तर दिलाच, शिवाय भंडाफोड झाली.
दुसरी एक आठवण अशी शिवाजी पार्कवर आमच्या शाळेच्या क्रीडा
स्पर्धा होत्या. आमचा सहभाग संपला. आमच्या वर्गातील शिरोडकर म्हणाला,
"ए, आपण समुद्रावर पोहायला जाऊ या." तीन-चार मुले तयार झाली.
जवळच असलेल्या समुद्रावर गेलो. वाळूवर कपडे काढून ठेवले व आम्ही
चौघे पाण्यात उतरलो. वय सुमारे अकरा वर्षे. कुणालाही पोहता येत नव्हते.
किनाऱ्यावर आम्ही डुंबत होतो, एकमेकांवर पाणी उडवत होतो. इतक्यात
वर्गातल्या सुलभा, मालती, उमा या तीन मुली आल्या, "ए, नाडकर्णीसर
तुमच्यावर रागावलेत. तुम्हाला ताबडतोब घेऊन यायला सांगितलेय." त्यांना
पाहिल्यावर आम्ही पाण्यातच फतकल मारली, कारण मुलींसमोर आम्हाला
पाण्याबाहेर येणे शक्य नव्हते. आम्ही म्हणालो, "तुम्ही जा. आम्ही
दादर | १७<noinclude></noinclude>
jxt3jbhwq3kc4947q3af0u85sfhsuno
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/२२
104
112043
236494
2026-09-03T13:40:08Z
Shurpalimedha
5041
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "आलोच." पण "तुम्ही बाहेर आल्याशिवाय आम्ही जाणार नाही. तुम्हाला घेऊनच यायला सरांनी सांगितलेय" असे म्हणत त्या हटून बसल्या. जा- नाही, जा- नाही, करता करता अखेर आमच्यातला एक मुलगा वैतागून..."
236494
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>आलोच." पण "तुम्ही बाहेर आल्याशिवाय आम्ही जाणार नाही. तुम्हाला
घेऊनच यायला सरांनी सांगितलेय" असे म्हणत त्या हटून बसल्या.
जा- नाही, जा- नाही, करता करता अखेर आमच्यातला एक मुलगा
वैतागून ओरडला, "तुम्ही गेल्याशिवाय आम्ही बाहेर येणार नाही. आमच्या
अंगावर एकही कपडा नाही." तशा भुली लाजल्या व पळाल्या. मग आम्ही
पाण्याबाहेर आलो....
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीचे मंतरलेले दिवस आठवतात. सर्वांना एकच ध्यास
होता- 'स्वातंत्र्यप्राप्ती! आम्ही विद्यार्थीही मागे नव्हतो. मी दादरच्या
'ओरिएंट शाळेत शिकत होतो. बाळासाहेब ठाकरे वरच्या वर्गात होते व
श्रीकांत ठाकरे मला दोन वर्षे ज्युनियर होते. रोज संध्याकाळी आम्ही काही
समवयस्क मुले इंजिनीअर मोडकांच्या बंगल्याजवळ भेटत असू. कांता
(लक्ष्मीकांत) धुमे, जया (जयवंत ) शिवलकर, रमेश तावडे, करंडेंचा कांता
(श्रीकांत कामत), श्रीकांत ठाकरे व मी असा आमचा ग्रुप होता. संध्याकाळी
आम्ही मग शिवाजी पार्क किंवा समुद्रावर जात असू. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी
आपण काय करायचे, मोठ्या नेत्यांना कशी मदत करायची, हे आमच्या
बोलण्यातील विषय असत. इतर तरुण मुले वासूगिरी करायला समुद्रावर जात
असताना आम्ही मात्र हा गहन विचार करीत असू. श्रीकांत ठाकरे वेळेवर
आले नाहीत, तर खिडकीबाहेर उभे राहून शिटी वाजवून त्यांना बोलावीत असू
( ते समोरच तळमजल्यावर राहात होते.) त्यांचे वडील 'प्रबोधन' कार घरात
असले, तर मात्र टरकत असू.
1.
'आझाद' नावाचे हस्तलिखित मासिक आम्ही काढत असू. संपादक मी
व कांता धुमे मुखपृष्ठावरील मौलाना आझाद यांचे चित्र श्रीकांत ठाकरे (वय
सुमारे पंधरा वर्षे) काढीत असत. या मासिकावर अभिप्राय घेण्यासाठी आचार्य
अत्रे, पां. वा. गाडगीळ, साने गुरुजी यांना भेटल्याचे आठवते. 'सी.के.पी.
हॉल' समोर साने गुरुजींची भाची राहत असे. साने गुरुजींना भेटलो, तेव्हा ते
नेहमीच्या बैठकीत बसून काही लिहिण्यात गर्क होते. त्यांनी कबूल
केल्याप्रमाणे दोन दिवसांत अभिप्राय लिहून दिला होता.
पुढे 'सिद्धार्थ कॉलेजात जात असताना शेजारच्या इमारतीत दुपारी
जेवायला जात असे. अचानक एके दिवशी श्रीकांत ठाकरे भेटले. गप्पांत जुन्या
आठवणींची उजळणी झाली. वरच्या मजल्यावरील आकाशवाणी केंद्र
दाखवायला ते घेऊन गेले. ते तेथे व्हायोलीन वाजवीत असत. (१९४९)
टेपरेकॉर्डरचा वापर नुकताच सुरू झाला होता, पण तोवर भी तो पाहिला
१८ । गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude>
702lzvd2y5k1o2v4o3w5ggf86msl0aw
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/२३
104
112044
236495
2026-09-03T13:40:20Z
Shurpalimedha
5041
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "नव्हता. स्टुडिओतल्या टेपरेकॉर्डरवर ध्वनिमुद्रण कसे होते, ते प्रथम मला श्रीकांत ठाकरेंनी दाखवले होते. हा पहिला अनुभव स्तंभित करणारा होता..... स्वातंत्र्यापूर्वी चहा पिणे, नाटक-सिन..."
236495
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>नव्हता. स्टुडिओतल्या टेपरेकॉर्डरवर ध्वनिमुद्रण कसे होते, ते प्रथम मला
श्रीकांत ठाकरेंनी दाखवले होते. हा पहिला अनुभव स्तंभित करणारा होता.....
स्वातंत्र्यापूर्वी चहा पिणे, नाटक-सिनेमा पाहणे या गोष्टी 'व्यसन'
मानल्या जायच्या. इराण्याच्या हॉटेलातील 'गुलाबी' चहात बुरून (ब्रून) पाव
बुडवून खाणे ही चैन मानली जाई. पानीकम, पावणा, दूधनी चाय, किंवा
गुलाब, नारंगी, फालसा, जिंजर, दूध कोल्ड्रिंक ही पेये आता अदृश्य झाली
आहेत.
त्या काळी आमची जीवनपद्धती ठरलेली असायची. रोज सूतकताई असे.
शिवाजी पार्कला 'हरी निवास' च्या मागे 'मीना सदन'मध्ये क्षीरसागर नावाचे
एक गृहस्थ सूत कातायला शिकवीत. प्रथम टकळी, नंतर धनुष्य टकळी,
त्यानंतर गांधी चरखा, त्यानंतर यरवडा चरखा (पेटीचा). यात एकदा मला
खादीचा हातरुमाल बक्षीस मिळाला. हे मला मिळालेले पहिले पारितोषिक.
दादरभर मी तो रुमाल अभिमानाने दाखवीत होतो. सूत कातून ते डिसिल्वा
रोडवरील 'खादी भंडारा'त दिल्यावर खादीचे कापड मिळायचे. खादीव्यतिरिक्त
आम्ही कोणतेही इतर कापड वापरत नसू. हिंदी शिकण्यासाठी आम्ही
'बालमोहन शाळेत जात असू. त्यावेळी विटांनी बांधलेले बैठे वर्ग होते.
बोर्डावर सुवाच्य अक्षरांत विद्यार्थ्यांचे जन्मदिवस, सुविचार वगैरे लिहिलेले
असत. आम्हाला त्याचे कौतुक वाटे. हर्डीकर नावाचे शिक्षक हिंदी शिकवीत.
'राष्ट्रभाषा प्रचार समिती'च्या परीक्षा असत. 'प्रथमा', 'प्रवेश', 'परिचय',
'कोविद' व 'रत्न' अशा परीक्षा असत. मी 'प्रथमा', 'प्रवेश' पास झालो.
'परिचय' तोंडी परीक्षेवेळी मला 'झाडावर पक्षी बसले आहेत' याचे हिंदीत
भाषांतर करायला सांगितले. मी 'झाडपर पक्षी बैठे है' असे भाषांतर केले.
परीक्षकांनी 'पेड पर पंछी बैठे है' अशी दुरुस्ती केली व मला पास केले. या
अगाध ज्ञानामुळे पुढे 'कोविद' परीक्षेची मी धास्तीच घेतली व हिंदीचा नाद
सोडून दिला.
संध्याकाळी मी 'राष्ट्र सेवा दला'च्या शाखेत जात असे. 'शिंग फुंकले
रणी वाजतात चौघडे, सज्ज व्हा उठा उठा सैन्य चालते पुढे', 'भारतीयांनो
आझाद होऊ या', 'विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा' अशी
स्वातंत्र्यपर अनेक गाणी ओठांवर असायची. 'पुढे जाता पुढे पाय,
मागे आता
आहे काय' हे गाणे म्हणताना डावा पाय व उजवा हात पुढे असायला हवा,
असे शाखाप्रमुखाने अनेकदा सांगूनदेखील आमचा डावा पाय मागे व उजवा
हात पुढे असायचा.
दादर । १९<noinclude></noinclude>
6e5wlbgs2twph53gzimw39jlm7xd772
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/२४
104
112045
236496
2026-09-03T13:40:34Z
Shurpalimedha
5041
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "अनंत पाटील रोडवर जिथे शिवाजी पार्क टेलिफोन एक्स्चेंज आहे, तिथे पूर्वी झोपड्या होत्या. अशा एका झोपडीत आमच्या गुप्त बैठका होत असत. प्रा. राम जोशी आमचे म्होरके होते. त्यावेळी ते 'रुईय..."
236496
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>अनंत पाटील रोडवर जिथे शिवाजी पार्क टेलिफोन एक्स्चेंज आहे, तिथे
पूर्वी झोपड्या होत्या. अशा एका झोपडीत आमच्या गुप्त बैठका होत असत.
प्रा. राम जोशी आमचे म्होरके होते. त्यावेळी ते 'रुईया कॉलेज' मध्ये इंटरला
होते.
'नॉर्थ बॉम्बे स्टुडंट्स युनियन' नावाची आम्हा विद्यार्थ्यांची संघटना होती.
आमच्या शाळेचा मी प्रतिनिधी होतो. धोबी तलाव येथील 'रंगभवन' मध्ये
अधिवेशन भरले. स. का. पाटील, सरोजिनी नायडू, भुलाभाई देसाई अशा
अनेक नेत्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. अनेक ठराव मांडले गेले, पास
झाले. बहुतेक ठरावांचे होते तसेच याही ठरावांचे झाले असावे. एकूण तो
काळ स्वातंत्र्याच्या विचारांनी भारावलेला होता...
मी शाळेत असताना १९४२ च्या 'चले जाव' लढ्याला सुरुवात झाली.
इतर विद्यार्थ्यांप्रमाणे मीही लढ्यात सहभागी झालो. त्यावेळी माझे वय सुमारे
चौदा वर्षांचे असल्यामुळे आमची कामे होती शाळा, दुकाने बंद पाडणे,
बुलेटिन वाटणे, निरोप पोचवणे, 'राष्ट्र सेवा दला'त जाणे, शाखा चालविणे,
बौद्धिके ऐकणे, सूत कातणे वगैरे. पण शाळा सोडली नव्हती. चहा-कॉफी
प्यायची नाही, सिनेमा पाहायचा नाही, खादीशिवाय इतर कापड वापरायचे
नाही, 'सत्यमेव जयते' यावर विश्वास बाळगायचा, राष्ट्रासाठी सर्वत्याग
करायचा, अशा प्रकारची अलिखित संहिता पाळीत होतो.
एकदा एक भलताच प्रसंग गुदरला. इंग्रज सरकारने 'मार्शल लॉ' पुकारला
होता. एके सकाळी आम्ही काही मुले बुलेटिन वाटत होतो. पोलिसांना
चुकवीत हे काम करावे लागे. त्या काळी पोलिसांच्या डोक्यावर पिवळी पगडी
व अंगावर निळा ड्रेस असे. एकाएकी गोया सोजिरांच्या गाड्या
आमच्यासमोर येऊन थांबल्या. संगीनधारी बंदुका असलेल्या सोजिरांनी पटापट
गाडीखाली उड्या मारल्या व आमच्या दिशेने ते धावत येऊ लागले.
निमिषार्धात दुकानांचे व घरांचे दरवाजे बंद झाले. आम्ही जीव मुठीत घेऊन
पळत सुटलो आणि शेजारच्या 'केशव भुवन'मध्ये शिरलो. पळत पळत दुसऱ्या
मजल्यावर गेलो. सर्व घरांचे दरवाजे बंद ! जाणार कुठे? एकच दार उघडे
दिसले; तो होता शौचकूप. आम्ही चौघेजण पटकन आत शिरलो व
शौचकूपाची कडी लावली. सर्वसाधारणपणे चाळीच्या शौचकूपाची कडी
तुटलेली असते किंवा लागत नसते. त्या दिवशी ती लागली हे आमचे नशीब!
काही सेकंदांतच शौचकूपाच्या दारावर सोजिरांच्या लाथा बसू लागल्या.
आमची छाती धडधडत होती. जीव मुठीत घेऊन आम्ही एकमेकांना खेटून उभे
२० । गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude>
mz6b0tpsgj7zoh6qbjsdt27pb6xi2pr
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/२५
104
112046
236497
2026-09-03T13:40:50Z
Shurpalimedha
5041
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
236497
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude><noinclude></noinclude>
50f1bvyhjsql3r1ct0t084lhyz7kosr
236499
236497
2026-09-03T13:41:58Z
Shurpalimedha
5041
236499
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>होतो. पंधरा-वीस मिनिटांनंतर चाळीतील खोल्यांचे दरवाडे उघडल्याचा
आवाज आला. आम्हीही बाहेर आलो. आयुष्याची दोरी बळकट म्हणून
वाचलो. संगीन पोटात शिरली असती तर हुतात्मा झालो असतो. पकडले
गेलो असतो, तर स्वातंत्र्यसैनिक म्हणून ताम्रपत्र मिळाले असते. रेल्वेने फुकट
प्रवास करण्यासाठी पास मिळाला असता, पण तसे काही घडले नाही.
माझ्या घरातील खिडकीतून 'केशव भुवन'चे दर्शन घडते, तेव्हा सत्तर
वर्षांपूर्वीच्या आठवणी मनात दाटतात.
आज
माणसाला 'मी'पणाचा अभिमान असतो. एक शुक्राणू व एक स्त्रीबीज
यांच्या संयोगातून हा 'मी' तयार होतो. यात 'मी'चे कोणतेही योगदान नसते..
'मी'ची आनुवंशिकता, त्याचे रंगरूप हे 'मी' ठरवू शकत नाही, या गोष्टी
आई-वडिलांकडून मिळतात. 'मी'ने कुठे जन्म घ्यावा, हे त्याची आई ठरवते.
त्याची भाषादेखील तीच ठरवते. त्याचे वागणे, विचार हे त्याचे पालक,
शिक्षक, मित्र, शेजारी, परिवार व समाज ठरवीत असतो. म्हणजे 'मी'चे
स्वतःचे असे काही नसतेच. मला वाटते मी दादर भागात राहिलो, वाढलो
म्हणून मी आहे असा झालो. उडुपीला वाढलो असतो तर इडली-डोसा
बनविण्यात पारंगत झालो असतो.
-
'आमच्या दादरसारखी सांस्कृतिक परंपरेची व सोयीची जागा जगात
कुठेही नाही,' असे दादरच्या रानडे रोडवर राहणारी मंडळी सांगतात. कारण
इथे स्टेशन, दुकान, मकान, वाण सामान, उद्यान (व स्मशान) एकाच रस्त्यावर
आहे, असे ते म्हणतात.
गेल्या पन्नास-साठ वर्षांत दादरचा चेहरा बदलला आहे, हे खरे. तरीही
इथे माणूसपण व आपलेपणा आहे. दादरमध्ये मध्यमवर्गीय आहेत; तसे गरीब
व श्रीमंतही आहेत. दादरला सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय व्यक्तिमत्त्व
आहे. माणसे उमेदीने जगतात.
बाहेर पाऊस पडतोय, डेकवर बडे गुलाम अली खाँची सीडी लावलीय,
पत्नीने कांद्याची गरमागरम भजी आणलीय, डाव्या हातात कढत कॉफीचा कप
व उजव्या हातात मंगेश पाडगावकरांच्या कवितेचे पुस्तक असल्यावर त्यापुढे
उमर खय्यामदेखील फिका वाटतो. दादरकरांची सुखाची कल्पना यापेक्षा
अधिक कोणती असणार?
दादर, तुझे सलाम!
दादर । २९<noinclude></noinclude>
cinzvgmbz1emlqvg0re2o76t66026s2
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/२६
104
112047
236498
2026-09-03T13:41:16Z
Shurpalimedha
5041
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "मी डॉक्टर झालो मेडिकल कॉलेज पन्नास-साठ वर्षांपूर्वीदेखील मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी चढाओढ असायची. पण ती आजच्यासारखी जीवघेणी नसे. पन्नास टक्के मार्क मिळविणाऱ्याला प्..."
236498
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>मी डॉक्टर झालो
मेडिकल कॉलेज
पन्नास-साठ वर्षांपूर्वीदेखील मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी
चढाओढ असायची. पण ती आजच्यासारखी जीवघेणी नसे. पन्नास टक्के
मार्क मिळविणाऱ्याला प्रवेश मिळे. पण तेव्हा इतके मार्क्स मिळवायलादेखील
मान मोडून अभ्यास करायला लागायचा. 'कोचिंग क्लास' नव्हते. फर्स्ट
क्लास मिळविणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असे.
आजच्यासारखे ९९ टक्के मार्क्स मिळत नसत! प्रवेशासाठी मेडिकल कॉलेजात
सुमारे ५०० अर्ज येत. त्या काळी बुद्धिमान विद्यार्थी इंटर सायन्सनंतर
इंजिनीअरिंगला जात, कारण इंजिनीअरिंगला प्रवेशासाठी किमान साठ टक्के
मार्क्स लागत. मेडिकलहून इंजिनीअरिंगला 'स्कोप' अधिक असे. हजार रुपये
पगाराची नोकरी सहज मिळायची. 'आपण जन्म घेतला आहे तो राष्ट्राचे व
समाजाचे देणे चुकविण्यासाठी' अशी काहीशी भोळी समजूत असल्यामुळे
बरेचसे विद्यार्थी मेडिकल कॉलेजात जात असत.
इंटरच्या परीक्षेच्या वेळचा एक प्रसंग आठवतो. आयुष्याचे भवितव्य
ठरविणारी अशी ही एक फार महत्त्वाची परीक्षा. परीक्षेआधीचा प्रत्येक सेकंद
लाख मोलाचा वाटायचा. दोन दिवसाआधी माझ्या परीक्षेचा क्रमांक
पाहण्यासाठी मी एका मित्राला 'रुईया कॉलेजा'त पाठवले. तो नंबर पाहून
आला. परीक्षेच्या पहिल्या दिवशी पंधरा मिनिटे आधी 'रुईया कॉलेजात
पोचलो. पण माझा क्रमांक असलेला बाक काही सापडेना. शेवटी कळले
की सर्व क्रमांकांचा बोर्ड 'रुईया कॉलेजा'त लावलेला असला, तरी माझ्या
परीक्षेचे सेंटर 'व्ही.जे.टी.आय. 'ला आहे. तोपर्यंत मी 'व्ही.जे.टी.आय. '
पाहिले नव्हते. परीक्षा सुरू व्हायला फक्त तीन मिनिटे शिल्लक होती. माझे
धाबे चांगलेच दणाणले. नुसती तारांबळ उडाली. धावत धावत मी नाक्यावर
आलो. इतक्यात आपल्या मोटारीतून उतरणारा एक गृहस्थ दिसला. माझा
२२ । गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude>
aqaxki33o67lp15e0h24y23rihgbrvw
पान:केशवाचार्यादिकृत महिकावतीची उर्फ माहीमची बखर.pdf/१०८
104
112048
236501
2026-09-04T02:03:06Z
~2026-47988-32
6203
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "(१०५) }दू0प्ड्रुहु, टुंर्दुगुंप्ग्रु ह्या शब्दळाचा मूळ अर्थं छ्येपभ्द्रु) 0£ [’}36 }]01’पै8, ]तश्र्तुधा 0£ 18 1101५16, असा आहे. ह्या व्युत्पद्र्यां पासून असें नियमन प्राप्त होते कॉँ राजू" हा शब्..."
236501
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="2401:4900:1FF5:C15F:A4DF:94FF:FE7D:838" /></noinclude>(१०५)
}दू0प्ड्रुहु, टुंर्दुगुंप्ग्रु ह्या शब्दळाचा मूळ अर्थं छ्येपभ्द्रु) 0£ [’}36 }]01’पै8, ]तश्र्तुधा 0£
[[18 1101५16, असा आहे. ह्या व्युत्पद्र्यां पासून असें नियमन प्राप्त होते कॉँ राजू"
हा शब्द ज्या काळ’ळा‘ वैग्देंक आर्मोत आबेंपति ईश्वर ह्या अर्थाचा वाचक झाला त्या काळी
"वाट्‘क आये व रोमन लोकांचे पूर्वज एकमेकांऱ् या ॰शजाराला होते; तसेच, गणराजू,
गणनायक,हेह शब्दज्या कालाँ गणराज्यसंस्थेंच्या अनुषंगानॅ वद्दिक आयात प्रचलित
आहे त्या काली जमैनादि लोकांचे पूर्वज वैळादेंक आयांच्या शैजाराला होते. रोमन व
जमेंन लोक वैदिक आर्मोच्यळा ज्ञेजारालळा होते व आयेभळाषळा बोलत होते म्हणून ते आर्यवंशी होते, असे मात्र समज्ञण्यांत अर्थ नाहीं. जमैन, साक्सतूं, रोमन, वगैरे लोक
वशग्नें आये नव्हते. राक्षसू , दानव, याटु, वगैरे- अनळायेंवर्शातले हे आयैभळाष लोक
होते. अशी होप्रळाचीनगणराज्यसंस्थाघेऊन भारतवर्ष हैं…नांव ज्या देशात पुढें
कालान्तरानें पडले त्या देशांत आर्योची धाड शिरलळी व त्या घाडीनें एकराज्य, वैराज्य,
साम्राज्य, माहळाराज्य इत्यादि राजकारणाचे नाना प्रयोग केले, आणि प्रयोग करून
थक्तया वर व अन्नसंनृप्त झाल्या वर मुक्तद्वारळो, तुटक, स’न्यस्त, वेद्ळात्तो, समग्जपराड्-मुख
व राष्टूपराटुमुख होऊन बसले.
सुदासाळादे वद्वग्वैदिक राजां पासून तो तहत बाजी-
सवाद्दि चित्पावन राजां पर्मेत हळाकम
थोड्याफारफरकामेंह्मा खेडांतचालूआहे
अअसतृप्त, संन्यासप्रवण व व्या’केस्वतंत्र लोकांचे
हजार वर्षे कमानुकमानें बसत आले
आहेत.
थरा वर थर ह्या देशांत गेल्या पांच
त्यांच्चळा करर्वी राजकीय,
देवघळार्मिक,
वैयापारिंक, भाषिक, राज्यमारक किंवा राज्यसाघक असे कोणते [हे सामुदायिक कार्य
रचय'स्फूनींनें किंवा पररफूत’निं आजपर्येत कधीं न झालेले नाहीं. हो सत्रे कार्ये र्पोटा
कारेतां राज्ययंत्र पय्कविंण्याचौ हाव घरणाऱ्या बाहेम्स्थ किंवा अतप्स्थ असंतुष्ट अल्पसंख्याक लोकाज्यळा हातून वेळीवेळ पार पङलेलळी‘ आहेत.
४७ अपर'पार अशी अन्नसंपत्ति, साहो कऱ्तूंव अत्यल्प कपडालत्या
वर शळीलौष्ण-
निवारण होईल अशी हवा, किंव्येक शतक पुरून ठरेल अशी जागा, व'वैळारे साधनांची
सुलभ अनुकूलता असल्या वुट्वेंऽ, ह्या देशांत जे जे लोक स्थायिक रान्टुवाशळी होतात तें
ते बहुंल्यानें मुक्तद्वारी, संऱ्यस्त, ज्यात्तांनिष्ठ, समाज्ञपराट‘मुख व रान्टपरादृमुख बनतात
होकहृण्याळीगल्याट्हारकान्यातसांक्सिली. अचाकप्रतां द्म्ह्रळीदिशां हिंडणाऱ्याक्
चान्यामान्या, रचून, कसली, जबरदस्ती, दंगे व लढाया ह्यांत चूर झालेल्या गेल्या
र्तांन हजार वर्षीर्तांल मथ्यआळाशयांतल्या मोंगलादि’ ळाबैनसुधारलेल्या उनाड लोफां कडे
ल्फिळारभ्नें दुर्लक्ष कलन,
अलीकडील चार तें वषांर्तांल सुसंस्कृत म्हणा‘वेंणळाऱ्या युरो-
पोयन लोकांना हे मुक्तद्वारळी, संन्यस्त, व्याक्तनिष्ठ व राष्दूपराहभुख लोक
प्रश्न करळीत क’ग्", सरकारे बनवून कर उकळींन न वसतां, सालप्तपणें,
क्शांत्वतेंनॅह्यादेशांतझ्तरांप्रमाणेंअन्नखातराद्विलाततरकायविंघडेंल]
कह्ज, रर्क्स बनवून, राष्त्रू निर्मुन, शळाब्रे रचून, ”शस्त्र-"हैं। घडवून, एक
ह्यऊन,
५
स्त्रदेशांतौल
लक्षावा’घे मोल
मजुरार्चा व मिकार
मण्ळा’गांर्चां
असा
ळिनमूट्रपर्णे,
एऋसमाज
जूट
उपासमार<noinclude></noinclude>
rop6qtbr27m1uxmkhus7p98c50unbl5
पान:केशवाचार्यादिकृत महिकावतीची उर्फ माहीमची बखर.pdf/१३०
104
112049
236502
2026-09-04T02:05:37Z
~2026-47988-32
6203
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "(१७) मत पाहे ऐसा कवणया ।त्रैमुवनों ।। शापै स्पोपेंन `मा'देनी ।। तेथे यापुर्दे तुं कवि क्षत्रि मत लागुनी ।। वरळो ॰शकसीं ।। १ १ ९ ।। ऐरेंन वचन बैळालिळळी [तेपण ।। ऎक्रौंन कोंपला शामक'ग्..."
236502
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="~2026-47988-32" /></noinclude>(१७)
मत पाहे ऐसा कवणया ।त्रैमुवनों ।। शापै स्पोपेंन `मा'देनी ।।
तेथे यापुर्दे तुं कवि क्षत्रि मत लागुनी ।। वरळो ॰शकसीं ।। १ १ ९ ।।
ऐरेंन वचन बैळालिळळी [तेपण ।। ऎक्रौंन कोंपला शामक'ग्ळी ।।
जैसा घुतें सिपिला अप्न । हात घा`लान परळी केशी ।।१२॰।।,
मजयाजेलाँ'ते मुद्रा ।। हा हा शब्द वद्ळो अवथारळा ।।
तापा‘स महृप्गंभिरा ।। शाप क्याले दारुण ।।१ २१।।
तुं द्येसिल अघवभ्फुग्ज ।। निवैश जाईल सहज ।।
पुरुपप्त्र नाहि तुज ।। अमग्म्ळ पापससळी ।।१२२ ।।
रेंस शळापवचन जाळे ।। ते ततक्षा’णें फळळें ।।
ऊशाप मागों आदरिर्ले ॥शामघ्णें तयेवैळ्ळो ।।१२२ ॥“
कोटि प्रह्मकन्या उद्यापन ।। द्र्व्पझारे कन्यादान ।।
चतुघिश वव्षे या पवेंति स्थापन।। वास करिर्सा ।।१ २४|।]
मग निसॉ कमिळो ।। मूयैप्नमा फार्क्सळा ।।
रळायळा तेवकासि साद्र् घाली ।। ते आहे’ ततक्षणळो ।। १२५
मग राजांतेथोन उचळिला । मुखासमिं वैसविला ।
हृस्तनापुसांते भाणिळळा ।।अंघकुग्ज ।। १२६ ।।
आश्चियैकेर्ले सकळी ।। कवि जाळें वनस्धळीं ।।
वृत्तांत सांगितला सकळी ।। प्रघग्जर्वोगासी ।। १२७ ||“!
आद्देकैळिप्नवुत्तांत । द्विज्ञकुळाश्चि केला भाषेत ।
ऊशाप सांगितला सर्तेप् प्रत ।। ऋळिप'कन्यैचा ।। १२८ ।।
तेथें फैथाअवे उपवरळी ।। व्याण द्रव्यन्यार्वेमेदिरळी ।।
पुण्य मज लागि अवघळारळी ।। दिवळें णाहेंजे ।। १२९ ।।
या परिकेळाटिउद्यापमें केळी ।। रळायासिं दृष्ट थाळी ।।
मगप्रयाणाउतावळि॥केलींरळाये॥ १२० ।।
प्रयाण केले कॅळाटिपबैतो । प्रघाना तम`वत विप्रमूऱ्’पँ ।।
जाकेन राहिले पवॅर्तो । चतुम्र्वेश वरुपें' ।।१ "२१ ।।
तेथे देवालय बांघिळें ।। कोटि यज्ञ केले ।।
रापचिंशांरेरदृत जाले ।। ।दैव्यरुझ्या १३२"
मगऊसाप जाला ।। क्रुळि पुत्र तपज्ञला ।।
नाव क्राळव्हेंळाय् ठेंविता जाला ।। रार्ये तयाचें ।। १३२ ।।
त्या काळकोटा पासुन ।। वश वूद्रो पावला जाण ।।
ते समुळ सांगेन ।। आईंकळा आतां ।। १३४ ।।
२<noinclude></noinclude>
6s8bvqvrtbsnsqkdg2ekscx611acb4a
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१७०
104
112051
236504
2026-09-04T06:55:42Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236504
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ११४ )
4
पुढं पाहता येईल, अशीं उत्तरें प्रत्योत्तरं निलकंठशास्त्री यांसी आमची श्रीचे
पुजेसंन्निध शपथ प्रमाणांनी गुप्त बोलणीं जाहलीं. हे शास्त्री नातू व पटवर्धन यांचे
तडांतील असतां गुप्त आम्हांकडे बोलतात. प्रभूस वेदकर्मे अधिकार आहे आणि
हेच शास्त्री त्याजकडे सांगतात चांद्रसेनी प्रभूस वेदकर्म अधिकार नाहीं
आणि थत्ते याजपासून हा कलह निर्माण जाहला. हे दुलग बोलून
भितात व आम्हांसही भयंकर प्रकार सांगतात. त्याजमुळे आम्हीहि भयाभीत
होऊन स्तब्ध जाहलों. त्यासमयीं आम्हापासून पत्र घेऊन चांद्रसेनीय
प्रभुज्ञातीकडील वेदकर्में उच्छेदकं पत्रे घेऊन धर्मशास्त्र ग्रंथास बाध आणून
आम्हांस ज्ञातिउच्छेदाचे दोषांत घातले. दुसरे ग्रंथांत नवीन कल्पित
श्लोक कोटि रचून लिहून कालांतरी त्या ग्रंथासही खोटेपणा,
आणिला. असे प्रकारे यादी सारांश व पत्रे लिहिलीं. हे कागद ब्राह्मण
शास्त्री पंडित विद्वान क्षेत्रक्षेत्राचे ठायीं पाहून ही खामीची पत्रे म्हणोन हसतील
हादुरलौकिक संस्थानचा केला. परंतु हे सारांष व पत्रे ही जे पाहतील ते साफ
समजतील संस्थानचे लिहिण्याचे सांप्रदायाप्रमाणें नाहींत. असे अनेक प्रकारचे पेचांत
घातलें. त्याजवरून चित्तास त्रास उत्पन्न जाहला कीं हा देह विसर्जन
करावा. या दिलगिरीत होतो. तो इतक्यांत आणखी अनाहूत संकट प्राप्त
जाहलें. प्रथम ज्यावेळीं आम्ही नातु व पटवर्धन यांचे म्हणण्याप्रमाणे प्रभु ज्ञातीचे
धर्म वैदिककर्मउच्छेदक तर्कटी सांरांष व पत्रे देण्याचे कबूल केले नहुते त्या-
संधीत ब्राम्हणापासून गोव्याचें तुफान आम्हांस पेचांत आणण्याबद्दल उभे करून
चिंतामणरावच आम्हास खबर देतात. परंतु हा मजकूर आम्हांस माहीत नाहीं
म्हणोन सांगितले. परंतु आम्ही बहुत भयाभीत होऊन बालाजीपंत नातु व
चिंतामणराव पटवर्धन यांचे बोलणे कबूल करून सारांपाच्या यादी व पत्रे त्यानीं
जी लिहिली ती गैरशिस्त असतां कांहीं न बोलता पुरी करून दिल्ही, परंतु
आम्हांस प्रथम जरब पडून या उभयतांचे म्हणण्याप्रमाणें आम्ही करण्यास आम्ही
अनकूल राहून करावे म्हणोन हे तरकट उभे केले होते. तो मजकूर कोणी
धारवाड सुभ्याचे साहेबास कळवून त्यांणी आमची चौकशी केली. त्यासमयी
आम्हास गुप्त येकट्यास साहेबानीं नेऊन श्रीची शफथ व गीता हातांत देऊन
सत्ये खरे असेल ते सांगावें कीं गोव्यास तुमचे तर्फेनीं सातारचे राज्याची पत्रे
वगैरे गेली व आळी किंवा कसा मजकूर आहे तो खरा सांगावा. तुम्ही संन्यासी<noinclude></noinclude>
e480e0vwja8kkh9bzn6ahq1rrrs4d5m
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१७१
104
112052
236505
2026-09-04T06:55:59Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236505
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ११५ )
गोसावी आहा. खरे तेंच बोलावे. तेव्हां आम्ही श्रीगीतेची पोथी हातांत घेऊन
श्रीनारायणाचे शफतपुरसर सांगितले कीं हे सारे खोटे तुफान आम्हावर
उभे केले. साहेब बोलले तुम्ही ब्राम्हणांचे गुरु तुम्हांवर तुफान उभे करण्याची
सबब काय ती सांगावी. तेव्हां आम्ही उत्तर केलें कीं पुणे वगैरे ठिकाणचे
ब्राम्हणांनी बळवंतराव चिटणीस सातारकर व विठलराव देवाजी बडोदेकर यांचा
द्वेष करून प्रभु ज्ञातीचे धर्माकर्मात तंटा उत्पन्न करून ग्रामण्य केले. त्यांत
मुख्य चिंतामणराव पटवर्धन व बाळाजीपंत नातू यांच्या म्हणण्यांत प्रभू ज्ञातीची
कमें बंद करावी. परंतु या उभयतांचे द्वेषाचे बोलणे सबब आम्ही प्रथम कबूल
केलें नाहीं. तेव्हां आम्हावर असी तुफानें उभी केली. ते वेळी आम्ही लाचार
होऊन संस्थानमठास इनामगांव वगैरे आहे हे जप्त होईल या भयामुळे पटवर्धन
व नातूनीं जें सांगितलें त्याप्रमाणे कबूल करून पत्रे व यादी दिल्या. त्या गैर-
शिस्त असतां आम्ही कांहीं न बोलता दिल्या. असा मजकूर जाहला असतां
साहेब गोवा आणि सातारचे वगैरे मजकुराची सबब विचारितात. परंतु हा तुफा-
नाचा मजकूर आम्हास कांहीं माहीत नाहीं आणि येविसी साहेबानी पुरी चौकसी
करावी. मी सन्यासी गोसावी. मला या कामाची गरज काय याप्रमाणें श्रीची
'शफथ करून सांगितले. नंतर साहेबानीं सांगितलें प्रभूचे जातीचे खटल्याचा मज-
कूर आम्ही ऐकत आहो आणि तुम्हीहि कोणास भेऊ नये.
पेशजीप्रमाणे तुमचे
मठाकडे गांवखेडीं चालतील. तुम्ही सारे ब्राम्हणांचे गुरु असतां तुम्हांस बुड-
`वण्याबद्दल हें काम उभे केले येविसी आम्ही चौकशी केली. व तुम्हीही
साफ सांगितले. परंतु या कामांत एक दोन खोटे तरकटी माणसे आहेत
याजवर स्वामीनीं भरंसा ठेऊ नये. आम्ही उत्तर केलं की खोट्याचा सहवास
आम्ही करणार नाहीं. साहेबानी उत्तर केले कीं ठीक सांगून आम्हास
निरोप दिला. हैं ही अरिष्ट ईश्वरानी दूर केलें. तों क्षेत्रस्थ ब्राम्हण व शास्त्री-
पंडीत कितेक दर्शनास येऊन विनंती केली कीं चिंतामणराव पांडुरंग पटवर्धन सांग-
लोकर यांनीं स्वामीचे नांवें पत्रे व सारांषाच्या यादीवर स्वामीचे निशाण व
सिकेमोर्तबानसी करून घेऊन जागोजाग पाठविली त्यांत चांद्रसेनीय कायस्थ
प्रभू ज्ञातीचे धर्मकर्माविसी वगैरे फार दूषणें ठेऊन विथर ( ? )
विस्तारे शास्त्रसंमतीवितरिक्त मनमानसे लिहिलें आहे त्यास हे प्रकार<noinclude></noinclude>
2l8rx5kneptv95sua6qjwrfkhhih6e8
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१७२
104
112053
236506
2026-09-04T06:56:14Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236506
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ११६ )
खरे किंवा खोटे हें स्वामीनीं पुरा विचार करून न पाहतां हे कागद दिल्हे. परंतु
स्वामीचे नांव व मठाचे नांवाचा दुरलौकीक फार पटवर्धन याच्या
लिहिण्यानी जाहला हे सत्य किंवा असत्य वाटत असल्यास स्वामीनी श्रीसान्निध्य
बसून गीता गंगाजळीसह बिल्वपत्रे व तुळसीपत्रे घेऊन निर्भत्छरपणे निबंध ग्रंथ
पाहून
सांगावे आथवा जे निर्मछर पापभीती जाणणारे शास्त्रीपंडित यांस बसवून
निबंध ग्रंथपाहून जे शास्त्रानुमते ठरेल त्याप्रमाणे उलट पत्र ल्याहावी. त्याज-
वरून स्वामी कृपाळू होऊन निर्भत्छरपर्णे श्रीसन्निध्य बसून गागाभटी व गोविंदभटी-
व कमलाकरक्रुत शूद्रकमलाकर, ज्ञातिविवेक व स्कंदपुराणांतरगत शयाद्रिखंडात्मक
रेणुकामहात्म वगैरे निबंधग्रंथ सत्य स्मरोन पाहतां चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यास
वैदिककर्माधिकार सत्य आहे. क्षेत्रीयान्वय चांद्रसेनीय प्रभु यांस दालभ्य ऋषीने
क्षेत्रियांतकर भार्गवरामाचे दुराग्रहास्तव शस्त्रधारणरूप क्षेत्रधर्म टांकऊन दालभ्य
ऋषीनीं पालण करून वैदिक कर्मैकरून उपनयनादि संस्कार करून पुढे परंपरागत
चालत आले. प्रभुज्ञातीचे संरक्षण दालभ्य ऋषीनीं केले सबब प्रभुज्ञातीस दालभ्य
गोत्र उच्चार चालत आहे. परंतु ग्रंथ ग्रंथावरून पुरा विचार करून पाहतां प्रभुज्ञातींत
गोत्रे निरनिराळी आहेत. असें असतां चिंतामणराव पांडुरंग पटवर्धन याणी
आती द्वेषबुद्धीनें कुचु करून या तरकटी सारांशाचे यादीत लिहिले कीं पर-
पुरुषापासून उत्पन्न जाहला जो पुत्र तो परभु कायस्थ ते दालभ्य गोत्रेकरून पर-
स्परे विवाह करितात. येक गोत्र म्हणोन लिहिले हें सर्वथा खोटे.
हे शास्त्र व ग्रंथसमतीखेरीज विचार न करितां असे जे विपरीत जागोजागी खोटे
* लिहून विद्यमान चिंतामणराव याणी आपले घालून आमचे नांवे जी पत्रे व यादी
चांद्रसेनीय प्रभुज्ञातीचे धर्मवेदकर्मे उछेदाविसी आम्हापासून घेऊन जागोजागी
जी पाठविली ती दरोबस्त रद्द करून हे पत्र लिहिले आहे. तरी समस्त
ब्राम्हण शास्त्री पंडित व धर्माधिकारी व जोसी उपाध्ये क्षेत्र क्षेत्रस्थानी व ग्रह-
स्तानी व चांद्रसेनीय समस्त ज्ञातीनी व राज्यअधिकारी असतील त्यानी वगैरे
हरकोणी त्या यादी व पत्रें येकंदर मजुर न धरितां चांद्रसेनीय प्रभुज्ञातीस.
वेद कर्माधिकार आहे हे त्रिवाच्य सत्ये श्री देवग्रही बसून हें पत्र
लिहून सर्वांस कलावयाकरितां पाठविलें आहे. तरी प्रभुज्ञातीत
वैदिक कर्मे परंपरागत चालवीत जाणे. दिकत न करणे. विशेष काय लिहिणें
●<noinclude></noinclude>
fvlrx05vf85xbhpbxd201i700d58ko5
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१७३
104
112054
236507
2026-09-04T06:56:27Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236507
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ११७ )
रा. मिती कार्तिक शु ॥ ९ शके १७५२ विकृतिनाम संवत्सरे महानुशासनं
वरिवर्ति
इत्यलं.
चिंतामणराव पटवर्धन व बाळाजीपंत नातु यांच्या ह्या प्रकारच्या लीला
चालल्या असल्यामुळे चिटणीसप्रभृती प्रभुमंडळींची खात्री होऊन चुकली
कीं आतां श्रीशंकराचार्य किंवा ब्राह्मण यांच्यावर भरवसा ठेऊन बसण्यांत
कांहीं अर्थ नाहीं. आपले संस्कार वेदमत्रांनी स्वतःच करूं लागल्या-
शिवाय निभाव नाहीं. असें निश्चित करून त्या बाबतींत छत्रपति सर-
कारकडे चिटणीसांनी अर्ज दिला, त्याचे आलेलें उत्तर येणेंप्रमाणें :-
यादी सरकार श्रीमन्महाराज राजश्री छत्रपति राजमंडळ हुजूर सातारा सो
समान अशरीन मयातैन व आलफ राजश्री बळवंतराव मल्हार प्रमुख समस्त
चांद्रसेनीय कायस्थ प्रभु याणी हुजूर आर्जी दिल्ही की ब्राह्मणाने पुण्यांत वेगेरे
ग्रामण्य करून पूर्वीपासोन वेदोक्त कर्मे आजपर्यंत करीत आले त्याअन्वयें न करितां
कोणी ब्राह्मणांनी आमचे ज्ञातींत येऊं नये व कांहीं कर्मे करूं नये असा तट केला
आहे. तेव्हां आम्हास गर्भदानापासून आमरणांत कमै सारी करणे येतात.
ब्राह्मण आले असता आम्हाकडून मनाई नाही परंतु न आल्यास आम्हास सारी
वेदोक्त कर्मकम चालवणे येतात. येविसी काय आज्ञा ती जाहली पाहिजे.
म्हणोन ऐसियास पुर्ववतप्राो ब्राह्मण येऊन न करीत तरी ज्ञातिधर्मात ज्याचे ते
मुख्यार. सरकार दखल करीत नाहीत. त्यांस तुम्ही ब्राह्मणासिवाय आपले
ज्ञातीचा बंदोबस्त कर्माविसी ठेऊन चालविले असतां मनाई व मदत नाहीं. कुंपणी
सरकारांतूनहि या सरकारांत सदरहू प्रो जबाब आला आहे.
छ० ३० मोहरम
मु॥ तारीख २४ आगष्ट सन १८२७ इसवी. मोर्तब असे.
महाराजांचें हें आश्वासन मिळतांच प्रभु-मंडळीनें शके १७४९ सालीं
साताज्यास सभा भरवून ठराव पास केला. हा ठराव मोठा महत्वाचा
आहे. तो सातारच्या प्रभुमंडळीनें ठिकठिकाणच्या ज्ञातीबांधवांस पाठ-
विला होता. त्याची साम्र नकल येणेंप्रमाणे:--
- -
यादी समस्त चांद्रसेनीय कायस्थ प्रभु शके १७४९ सर्वजितनामसंवत्सरे-आमचे
ज्ञातींत ब्राह्मण आजपर्यंत वेदोक्तकर्म शोडस संस्कारयुक्त हस्त श्राध्यादि वगैरे
त्र्यकर्माधिकारपणें करीत आले असे असून वारंवार तंटेबखेडे करावे आणि दुरं-<noinclude></noinclude>
pnwqoztdle8559lsdui76m95ytdfbbo
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/१७४
104
112055
236508
2026-09-04T06:56:40Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
236508
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ११८ )
भाषणे मानहानी उपहास करावी आपणच येऊन कर्मे करावी गोड बोलावें.
आर्जव करावे पुन्हा त्यांनी तंट्यात सिरोन तट करोन वल्गना करावी त्रयकर्मास
अधिकार आहे म्हणावें सवेच नाही हे तंट्यास आल्यावर म्हणावे जैसी तन्हा
करावी. पेशवे बालाजी बाजीराव यांची पत्रे व राजपत्रे वगैरे प्रभु म्हणोन
पुरवीची असोन परभु हे चालविले हाली परभ्यापरयंत यादींत लिहिले आहे.
परंतु कासी क्षेत्राची पत्रे अँसी (८०) आसामी ब्राह्मण मंडळीचे संमताचे वा
पुढेही बाजीराव कारकिर्दीपरयंत पुर्वापार चालवावे हे सिक्यानिसी सनदा असे
असून पुन्हां पुण्यांत आलिकडे बखेडा करून विटंबणा उपहास व मनस्वी दुरभा-
षणें करून सभा तुलसी बागेत वगैरे ठिकाणी केल्या. यांत आम्ही मनुष आबरू
आहे की नाही हा विचार न करिता आबरुचा जीव सतका (?) आहे हे मनांत न
आणिता हाजारोनी बडबड करून क्षेत्रोक्षेत्री पत्रे पाठविली आणि कर्मे चालण्यास
आडचणी पाडली. श्रीशंकराचार्य ब्राह्मणाचे स्वामी त्याणी ही यादी व राघवाचार्य
यांस पत्र सिकेमोर्तबानिसी दिले त्यात निखालस फ्रुम बखेडा केला हे उध्धार
आणोन तीन कर्माचा वगैरे अधिकार लिहून दिला असता समेट करून पोटासी
धरोन समारोप करतील हा मार्ग बहुत पाहिला. सेवट महाबळेश्वरी बखेडा तीर्थ
विधी श्राध्धास पाडला. आपणास चालवून करणे प्राप्त आलें व निसीक कळले
दिवसेदिवस उपमर्द करितात. व सेवटावर द्वेषबुद्धीनें निकर्ष करून ज्ञातीच
वुडवावी हे आरंभिले त्याअर्थी आपले तीन कर्मा पाोच गर्भाधान आष्टमांगल्यादि
अग्नी सिद्ध करितात तोच अनि स्मार्थ हा पुढे चालावा परंतु खटपट होत नाहीं
यामुळे करीत न आले परंतु हाली करावा व श्राध्धी आपण आपले बसावे
म्हणजे तरी पोटासी धरतील तह करून चालते तीन कर्मों वेदोक्त शोडपसंस्कार
हास्तश्राधादि बसून करितात ते करतील कटकटीचा समारोप करतील परंतु ते न
करितां हाली सभा करून इकडे ब्राह्मण आले त्यास मारहाण करून बहिष्कार
घातला व पुढे कोणी ब्राह्मणानी अनुष्धनादि जाऊन करू नये करतील त्यास बहि-
॰कार पडेल वगैरे आन्योन्य भाषणे वगैरे केली त्यास ब्राह्मण आपलेहून येणें बंद
केले असता आमची कर्मे बंद होतात ती आम्हास मुखत्यारपणे आपले ज्ञातीचा
बंदोबस्त ब्राह्मणाशिवाय येऊन करणे आले ते तीन कर्मे आहेत ती तजवीज तीन
कर्मे मिळतात व देतात यात तोटा नाहीं. व पुण्यांत व हाली ब्राह्मणाची ब्राह्म-
.<noinclude></noinclude>
ekm4kmvc49q56samqvh2jbhyxbi75ip