११ जुलै २००६ चा मुंबईवरील बॉम्बहल्ला
Wikipedia कडून
भारताची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये जुलै ११, ई.स. २००६ रोजी एकापाठोपाठ एक अशा ७ बॉम्बस्फोटांची मालिका झाली. हया हल्ल्यामुळे मुंबईकरांच्या १२ मार्च १९९३च्या मुंबईवरील बॉम्बहल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. ह्या हल्ल्यामध्ये २०० लोक मृत्युमुखी पडले व साधारण ७०० लोक जखमी झाले.
[संपादन] सविस्तर माहिती
सगळे हल्ले मुंबईमधील पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर अथवा ट्रेनमध्ये (प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये झाले) झाले. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६:२४ ते ६:३५ ह्या ११ मिनिटांच्या कालावधित हे हल्ले झाले. मुंबईची धमनी समजली जाणारी पश्चिम रेल्वे दररोज अंदाजे ४५ लाख प्रवाशांची ने-आण करते. ह्या हल्ल्यांनंतर पश्चिम रेल्वेची वाहतुक बंद करण्यात आली. हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकुन पडले. अडकलेल्या प्रवाशांना ११ जुलैची रात्र त्यांचे जवळ राहणारे नातेवाईकांकडे काढावी लागली. ज्यांना हे शक्य नव्हते त्यांच्यासाठी प्रशासनाने शाळा-कॉलेजांमध्ये तात्पुरती व्यवस्था केली होती. बेस्टनेही प्रसंगाचे गांभिर्य ओळखुन प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने आपल्या सर्व बसेस रस्त्यावर आणल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख ह्यांनी मृतांच्या नातेवाईकांना १ लाख व जखमींना ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. भारतीय रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव ह्यांनी रेल्वेतर्फे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये व जवळच्या नातेवाईकाला रोजगार हमीची घोषणा केली. ह्या घटनेची इंग्रजीमध्ये माहिती येथे (इंग्रजी विकिपीडीयामध्ये) मिळेल.
११ जुलै २००६ मुंबई बॉम्बस्फोटांमधील जीवितहानी दाखवणारा तक्ता | |||
स्थळ | काळ (भारतीय प्रमाण वेळ) | मृतांची संख्या | जखमींची संख्या |
खार रोड | १८:२४ | ? | ? |
जोगेश्वरी | १८:२५ | ? | ? |
माहिम | १८:२६ | ? | ? |
मीरा रोड | १८:२९ | ? | ? |
माटुंगा रोड | १८:३० | ? | ? |
बोरीवली | १८:३५ | ? | ? |
वांद्रे (बांद्रा) | ? | ? | ? |
एकूण | ११ मिनिटे | २०० | ७१४ |