रायगड (किल्ला)
Wikipedia कडून
किल्ले रायगड मराठी साम्राजाच्या इतिहासामध्ये एक खास ओळख धरुन आहे. छ. शिवाजीराजांनी रायगडाचे स्थान आणी महत्व पाहुन १४व्या शतकात याला आपल्या साम्राजाची राजधानी बनवले. महाराजांचा राज्याभिषेक याच ठीकाणी झाला.
महाजांच्या पश्चात सुमारे सहा वर्षे रायगड राजधानी होता. गडावर जाण्यसाठी एकच मार्ग आहे. दुस-या मार्गाने गडावरुन उतरणा-या 'हिरकणीची' कथा अगदी प्रसिध्द आहे. गडावर जाण्यासाठी सध्या हवाई मार्ग [रोपवे] ची सोय आहे.
[संपादन] रायगडावरील अश्मयुगीन गुहा
पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाडगावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोपवेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या बाराशे पायऱ्या चढून गेलं, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा!' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असं म्हणू लागले आहेत. ...... जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून इथवर चढून आलं, की गुहेचं एक तोंड दिसतं. या तोंडातून आत गेलं की समोर येणारं दृश्य अचंबित करणारं आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेलं, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव, पाचाड ते पाचाड खिंड येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.
या गुहेत सतत वाहणारा थंडगार वारा, एकापाठोपाठ येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळुका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचं एखादं नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्ग यात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाचं जुनं वसतिस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा याचं आकर्षण इथे भेट देणाऱ्याला पडतंच पडतं.
रायगड म्हणजे दुर्गदुर्गेश्वर. महाराष्ट्राचा सर्वांत वैभवशाली किल्ला. शाळा- महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर येतात. काही जण दोरवाटेने पाळण्यात बसून जातात, तर काही हजार-बाराशे पायऱ्या चढून रायगडावर पोचतात. त्या सर्वांनी हे वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा अवश्य पाहिली पाहिजे.