अर्नाळा

Wikipedia कडून

किल्ला
नाव अर्नाळा
उंची ० फुट
प्रकार सागर किना-यावरील किल्ले
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव अर्नाळा
डोंगररांग उ. कोंकण
सध्याची अवस्था


अर्नाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. उत्तर कोंकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्रास मिळते, त्यामुळे येथून खाडीच्या सर्व प्रदेशावर येथून नजर ठेवता येत असे.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

चारही बाजूने पाणी असणारा अर्नाळा हा जलदुर्ग गुजरातचा सुलतान महमुद बेगडा याने १५१६ मध्ये बांधला. १५३० मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून अनेक नवीन बांधकामे केली. १७३७ मध्ये, सुमारे दोनशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधनी केली. १८१७ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

[संपादन] छायाचित्रे

[संपादन] गडावरील ठिकाणे

अर्नाळा किल्ला चौकोनी असुन सुमारे दहा मीटर उंचीची अखंड व मजबुत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला तीन दरवाजे असुन मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुस दोन बुलंद बुरुज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असुन दोन्ही बाजुला वाघ व हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर दरवाजावर खालील शिलालेख आढळतो:

'बाजीराव अमात्य सुमती आज्ञापले शंकर!
पाश्चात्यासि वधुनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!'

किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वरभवानीमातेचे मंदिर आहे. या शिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या विहिरी सुद्धा आहेत. किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असुन त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिकामातेचे मंदिर आहे.


[संपादन] गडावर जाण्याच्या वाटा

पश्चिम रेल्वेच्या विरार पासून अर्नाळा अंदाजे १० कि.मी. असुन तेथे जाण्यास एस. टी. बस व रिक्षा यांची सोय आहे. समुद्रकिना-यापासून बोटीने किल्ल्यावर जावे लागते. ही बोट सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेउन जाते.


[संपादन] बाह्यदुवे