मराठी भाषेचा इतिहास

From Wikipedia

अनुक्रमणिका

[संपादन] मराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने

मराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने ग्रांथिक साधने,कोरीव लेख-शिलालेख,ताम्रपट;लोकसाहित्य, अप्रत्यक्ष साधने

प्रमाण साधने कागदपत्रांचा आधार शासकिय आदेश, राजाने काढलेली फर्माने आज्ञापत्रे, करारनामे, तहनामे आपापसातील पत्रव्यवहार दुय्यम साधने तवारिखा,बखरी,पोवाडे,स्त्रोत्रे

[संपादन] 'मराठी' आणि 'महाराष्ट्र' शब्दांची व्युत्पत्ती

[संपादन] महाराष्ट्राचा सामाजिक राजकिय इतिहास आणि मराठी भाषा

[संपादन] आर्य आणि द्रविड

[संपादन] मतभिन्नता

[संपादन] मराठीचे भाषिक परिवर्तन

  • प्राकृत,अपभ्रंश,पाली,संस्कृत,तामिळ,तेलुगू,कन्नड,मल्याळम,गुजराथी,ओरिया,हिंदी,आरेबिक,फार्सि,उर्दू,इंग्लिश,पोर्तुगिज,पंचद्रविड,

आर्यभाषाकुल संस्कृतचा प्रभाव, संस्कृतपेक्षा वेगळेपण उगमकाळ

ग्रंथ ज्ञानेश्वरी,लीळाचरित्र,विवेकसिंधू,ज्योतिषरत्नमाला, ==शिलालेख ==ताम्रपट

[संपादन] मराठीच्या विकासाचे टप्पे

[संपादन] उगम,पूर्वमराठी काळ

[संपादन] आदिपर्व

[संपादन] मराठीचे मध्ययूग=

[संपादन] अर्वाचीन

[संपादन] आधुनिक

[संपादन] भाषाशुद्धी चळवळ

स्वातंत्र्यवीर सावरकर १९२३ पासुन १९३७ पर्यंत रत्नागिरीला स्थानबद्ध होते.प्र्त्यक्ष राजकारणातभाग घ्यायला त्यांना बंदी होती.तेव्हा त्यांनी समाजातील अंधश्रद्धा ,कालबाह्य रूढी यांवर टिका करणारे पुष्कळ लेख 'किर्लोस्कर' मासिकातून लिहिले.१९२४ मध्ये 'केसरी' मध्ये 'मराठी भाषेचे शुद्धीकरण' ही लेखमाला लिहिली.याच शीर्षकाची पुस्तिका नंतर प्रकाशित झाली.

ही लेखमाला स्वा.सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असताना लिहीली असल्यामुळे आणि सावरकरांबद्दल सुशिक्षित आदर आणि कुतूहल वाटत असल्यामुळे त्यांच्या सांगण्याचा अनेकांवर प्रभाव पडला .भाषाशुद्धीकरणे हे राष्ट्रकार्यच आहे. त्यामुळे आपण जरी राजकारणात भाग घेउन इंग्रजी राजवटीचा प्रतिकार करू शकलो नाही तरी सावरकर सुचवितात त्याप्रमाणे आपल्या भाषेचे शुद्धीकरण करून त्या रूपाने इंग्रजीची ह्कालपट्टी करू शकतो अशी सावरकरांच्या अनुयायांची श्रद्धा होती.

आरबी-फार्सी आणि इंग्रजी शब्दांच्या ठिकाणी मराठी आणि संस्कृत शब्द प्रयोग करावेत असे सावरकर व त्यांच्या अनुयायांचे मत होते.ही सावरकरांची भुमिका माधवराव पटवर्धनांनी थोड्या फरकाने म्हणजे श्क्य तीथे संस्कृत सुद्धा टाळावे व मराठी शब्द वापरावे अशा स्वरूपात मांडली(जळगाव साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण १९३६).

भाषाशुद्धी भुमीकेच्य मर्यादा सुद्धा विवीध व्यक्तिंनी व्यक्त केल्या तर काहींनी टिकाही केली.१९२७च्या पुणे साहित्य संमेलनात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी भुमिका अशी घेतली की कोणतीही भाषा अन्य भाषा संपर्का पासून अलिप्त राहू शकत नाही .दीर्घकाळ एकमेकींच्या सहवासात आदान-प्रदान होणे ही स्वाभाविक क्रिया आहे.जे शब्द मराठीशी एकरूप झाले आहेत ते केवळ अन्य भाषातून आले या कारणा साठी त्यांना बहिष्कृत करणे अव्यवहार्य आहे. मराठीत हवा,जमीन,वकील,गरीब,सराफ,ह्माल,इलाखा,जिल्हा,मुलुख,मसाला,हलवा,गुलकंद,बर्फी,मुद्दा,अत्तर,तवा,तपशील,सरबत असे शेकडो अरबी फारशी शब्द आले आहेत व ते मराठीचा एक भाग झाले आहेत.त्यांना मराठीतून काढून टाकणे अशक्य आहे.

प्राध्यापक श्री.के.क्षीरसागर यांचा विरोध अधिक तीव्र होता."खरी भाषाशुद्धी आणि तिचे खरे वैरी सावरकर आणि पटवर्धन" हा क्षीरसागरांचा आक्रमक शैलीतील लेख त्या वेळच्या सह्याद्री मासिकात प्रकाशित झाला,त्यामुळे बरीच खळबळ निर्माण झाली.'सह्याद्री' आणि 'लोकशिक्षण' या त्यावेळच्या मासिकांमधून भाषाशुद्धी बद्दलची मतमतांतरे मांडणारे अनेक लेख प्रकाशित झाले.

प्रा.क्षीरसागर यांच्या मते भाषाशुद्धीवाद्यांना क्लिष्ट आणि विकृत शब्द निर्मीतीचा रोग जडला आहे.भाषाशुद्धीचे कारण पुढे करून हल्ली जो उठतो तो नवे शब्द बनवत सुटला आहे. यामुळे मराठीचे स्वाभाविक सौंदर्य बिघडत असून फारसी आणि इंग्रजी शब्दांचे उच्चाटन व्हायच्या ऐवजी त्यांची आठवण पक्की होत आहे.

गोल्डन मीन साठी 'सुवर्ण मध्य' 'क्रोकोडाईल टियर्स' साठी 'नर्काश्रू'; 'रेकॉर्ड ब्रेक' 'उच्चांक मोडणे' हे किंवा असले शब्द म्हणजे शब्दाला शब्द ठेवून केलेली भाषांतरे होत.या भाषांतरित शब्दांमुळे मूळ इंग्रजी शब्दच कृत्रिम रूपाने मराठीत येत आहेत.सर्वसामान्य मराठी माणसालाही कोणता शब्द कोठे वापरावयाचा ते स्वभावताच कळते.'कमाल'शब्द त्याज्य आणि 'पराकाष्ठा' तेवढा स्वीकार्ह असे तो मानणार नाही.तर 'प्रयत्नांची पराकाष्ठा' आणि 'मूर्खपणाची कमाल' असा योग्य वापर तो करील.

परभाषांमुळे अधिक पर्याय उपलब्ध होतात.त्यामुळे सूक्ष्म अर्थच्छटा व्यक्त करायला त्यांचा उपयोग होतो हे मत गो.कृ.मोडक यांनीही मांडले आहे.अर्भक,संतान,संतती,मूल,बालक हे सगळे स्वकीय शब्द आहेत. पण कोणता शब्द कोठे वापरावयाचा याचे संकेत वेगळे आहेत.यात औलाद या परकीय शब्दामुळे आणखी भरपडली आहे. सह्याद्री मासिकासाठी एका विस्तृत लेखाद्वारा न.चिं.केळ्करांनी भाषाशुद्धीचे स्वागत करूनही तिच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत.त्यांच्या पद्धतीने युक्तिवाद करताना त्यांनी म्हटले आहे,'तत्वात जिंकाल पण तपशिलात हराल'

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 'भाषाशुद्धी' या प्रश्नाची 'चळवळ' होण्या सारखी स्थिती उरली नसली तरी अनेक भाषिक प्रश्नांची गुंतागुंत वाढली आहे असे दिसून येते.