जयंत विष्णू नारळीकर
From Wikipedia
जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै, इ.स. १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी(BSc) प्राप्त केली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील कॅंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. रॅंग्लर (Wrangler) ची पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
१९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरीजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले - मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
अनुक्रमणिका |
[संपादन] संशोधन
- स्थिर स्थिती सिद्धांत
चार दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे अंतरीक्षविज्ञान क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रम चालू असतो. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसार माध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
[संपादन] साहित्यातील भर
[संपादन] विज्ञानकथा पुस्तके
- वामन परत न आला
- अंतराळातील भस्मासुर
- कृष्णमेघ (अनुवाद, मूळ लेखक:फ्रेड हॉयल Fred Hoyle)
- प्रेषित
- व्हायरस
- अभयारण्य
- यक्षांची देणगी
[संपादन] इतर पुस्तके
- आकाशाशी जडले नाते
- विज्ञानाची गरुडझेप
- गणितातील गमतीजमती
- विश्वाची रचना
- विज्ञानाचे रचयिते