आश्विन कृष्ण त्रयोदशी

From Wikipedia

आश्विन कृष्ण त्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथी आहे.

[संपादन] या तिथीला साजरे करण्यात येणारे सण व उत्सव

दीपावलीच्या पाच दिवसांचे महत्त्व !

`आश्विन कृष्णपक्षात द्वादशीला गोवत्सपूजन, त्रयोदशीला धनत्रयोदशी, चतुर्दशीला नरकचतुर्दशी आणि अमावस्येला लक्ष्मीपूजन असते. पुढे कार्तिक प्रतिपदेला बलिप्रतिपदा, द्वितीयेला यमद्वितीया आणि भाऊबीज असते. याची सांगता करण्यासाठी पंचमीला पूजन करतात. असे पाच दिवस मिळून दीपावलीचा सण असतो.' - प.पू. परशराम माधव पांडे महाराज

गोवत्स द्वादशी भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्त्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करावयाचा आहे.

गोवत्सबारस : `सत्त्वगुणी, आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपले अंग-प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या, श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या व सर्व देवांनी तिच्यात वास्तव्य करावे, अशी योग्यता असलेल्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण-संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस येते. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते.'

धनत्रयोदशी ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची पूजा करतात. येथे `धन' म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायू, अग्नि, सूर्य, यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी ! अन्यथा अलक्ष्मीमुळे (पैशामुळे) अनर्थ घडतो.

धनत्रयोदशी : लक्ष्मीपूजनाच्या वेळी आम्हाला वर्षभराचा जमाखर्च द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेल्या संपत्तीचा प्रभूकार्यासाठी खर्च केल्यास, `सत्कार्यात धन खर्च झाल्यामुळे ती धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते.' धन म्हणजे पैसा. `हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला, जो आम्ही वर्षभरात पै पै करून जमा केलेला, त्यांपैकी कमीतकमी १/६ भाग हा प्रभुकार्यासाठी खर्च करावा', असे शास्त्र सांगते. पूर्वी राजे वर्षाच्या शेवटी आपला खजिना सत्पात्री दान करून खाली करायचे. तेव्हा त्यांना धन्यता वाटायची. यामुळे जनता व राजा यांच्यातील संबंध हे कौटुंबिक स्वरूपाचे होते. राजाचा खजिना हा जनतेचा असून राजा त्याचा केवळ सांभाळ करणारा आहे. त्यामुळे जनता कर देतांना आडकाठी न करता देई. त्यामुळे साहजिकच परत खजिना भरत असे. सत्कार्यासाठी धनाचा विनियोग झाल्यामुळे आत्मबल वाढते.

Dainik / Saptahik Sanatan Prabhat