Template:मुखपृष्ठ सदर

From Wikipedia

गेटवे ऑफ इंडिया, मुंबई
Enlarge
गेटवे ऑफ इंडिया, मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे १ कोटी ३० लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावर वसले आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वात मोठे शहर आहे (लोकसंख्या: सुमारे २ कोटी). मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून ते भारतातील ५०% प्रवासी व मालवाहतुकीकरता वापरले जाते.

मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था येथे स्थित आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे कायम येत असतात कारण येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मुंबई हे हिंदी चित्रपट उद्योगाचे केंद्र आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या ह्द्दीतच आहे व असा योग खूप कमी शहराच्या बाबतीत आहे.

[संपादन] इतिहास

आजची मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वात जुना लिखित पुरावा ई.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरुन पडले आहे. पोर्तुगीजांनी बोम बाहीया व इंग्रजांनी बाँबे असे नामकरण केले होते. १९९५ मध्ये या शहराचे नाव पुन्हा मुंबई करण्यात आले.

[संपादन] भूगोल

मुंबईचे भारतातील स्थान
Enlarge
मुंबईचे भारतातील स्थान

मुंबई पश्चिम किनारपट्टीत (कोकण विभाग) उल्हास नदीच्या मुखांवर असलेल्या साल्सेट बेटांवर वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा समुद्रसपाटीच्या पातळीत आहे. जमिनीची उंची सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग डोंगराळ आहे. मुंबईतील सर्वात उंच भूभाग हा ४५० मी. (१,४५० फूट) आहे. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ४६८ कि.मी.² इतके आहे.

[संपादन] अजून वाचा...


मागील अंक - मे २००६ - फेब्रुवारी २००६ - जानेवारी २००६ - जुलै २००५ - जून २००५